Tuesday, December 21, 2021

पक्षिवेड्यांचं माहेरघर : ताल छापर

    निसर्गरत्नांची खाण असलेल्या आपल्या देशात असलेली निसर्गसंपन्नता आपण गेल्या अनेक लेखांमधून पहिली आहे. देशाच्या कुठल्याही भागात गेलो तरी आपल्याला खुणावणारा आणि सुखावणारा निसर्ग पाहणं ही खरंतर पर्वणीच असते. दक्षिण भारतातली घनदाट अरण्यं असोत किंवा मध्य भारतातील गवताळ कुरणांनी भरलेली पानगळी जंगलं असोत; ईशान्य भारतातली बर्फाचा शेजार लाभलेली जंगलं असोत, किंवा उत्तर भारतातली तराईच्या क्षेत्रात असणारी अरण्यं असोत, नानाप्रकारची जैवविविधता आपल्याला या जंगलांमध्ये पाहायला मिळते. याला पश्चिम भारतातली ओसाड माळरानं असलेली गुजरात, राजस्थानमधली जंगलंही अपवाद नाहीत. गुजरात राज्यातील काटेरी वनांमध्ये गीरच्या जंगलात तर आशियाई सिंहांचं एकमेव आणि शेवटचं आश्रयस्थान आहे. त्याची माहिती आपण याअगोदर घेतलीच आहे. कच्छच्या रणात असलेलं पक्ष्यांचं नंदनवनही आपण पाहिलं. राजस्थानातील रणथंबोर या वाघांच्या जंगलाचीही माहिती घेतली. तसंच, वाळवंटात असणाऱ्या सुंदर अशा राष्ट्रीय मरूउद्यानाविषयीही जाणून घेतलं. सांगण्याचा उद्देश एवढाच, की भारतातल्या अगदी ओसाड वाळवंटासारख्या भागांनाही निसर्गानं भरभरून दिलं आहे. या जंगलांचा आस्वाद घेण्यासाठी आणि तिथलं अद्भुत निसर्गविश्व पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य निसर्गवेडे या जंगलांना भेट देतात.
           राजस्थानमधील अशाच एका अप्रतिम जंगलाची माहिती आज आपण घेणार आहोत. मरूउद्यानाचं मर्मस्थळ असणाऱ्या थार वाळवंटाच्या सीमेवर असलेलं हे जंगल म्हणजे पक्षिप्रेमींसाठी खास आकर्षण आहे. राजस्थानमधील चुरू या जिल्ह्यातील हे अभयारण्य म्हणजे ‘ताल छापर’ वन्यजीव अभयारण्य. पक्ष्यांसाठी अनोखं जंगल असणाऱ्या या जंगलानं आणखी एक वैशिष्ट्य जपलं आहे. १९६६ मध्ये या जंगलाला अभयारण्य म्हणून मान्यता देण्यात आली, ती एका विशिष्ट प्राण्याच्या संरक्षणासाठी. हाच प्राणी या अभयारण्याचं वैशिष्ट्य आहे. तो प्राणी म्हणजे ‘काळवीट’. सुमारे २० चौरस किलोमीटर भागात हे अभयारण्य पसरलेलं आहे. अभयारण्याला ताल छापर हे नाव दोन गोष्टींमुळं मिळालं आहे. छापर हे या अभयारण्याच्या सर्वात जवळ असलेलं गाव. ताल म्हणजे तळं. या अभयारण्यात एक अनोखी परिसंस्था आहे. खारट जमीन आणि त्यावर आधारित परिसंस्था आपल्याला या अभयारण्यात पाहायला मिळते. इथं काही खाऱ्या पाण्याचे तलावदेखील आहेत. ताल छापर हा त्यातीलच एक खाऱ्या पाण्याचा तलाव. पूर्वी येथील खाऱ्या पाण्यातून मीठ बनवण्याचा उद्योग प्रसिद्ध होता.
        अभयारण्याच्या एकूण भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं, की थार वाळवंटाचा प्रभाव येथील भौगोलिक स्थितीवर आहे. वाळू आणि खडकांच्या अनेक छोट्या-मोठ्या टेकड्या आपल्याला इथं पाहायला मिळतात. मान्सूनच्या काळात या टेकड्यांवर पडणारा पाऊस हा अभयारण्यातील पाण्याचा मुख्य स्रोत आहे. टेकड्यांवर पडणारं पावसाचं पाणी अनेक ओढ्यांद्वारे आसपासच्या तलावांत जमा होतं. खाऱ्या जमिनीत असणारे हे गोड्या पाण्याचे तलावच येथील जीवसृष्टीला आपल्याकडं आकर्षित करतात आणि जंगलाचं ‘जंगलपण’ जपून ठेवतात. मान्सूनच्या काळात या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पूर्वी या भागात होणाऱ्या पावसामुळं संपूर्ण जंगलात पूरसदृश स्थिती निर्माण होत असे. मात्र मिठासाठी मोठ्या प्रमाणावर झालेल्या खोदाईमुळं सध्या फार कमी प्रमाणावर पाणी टेकड्यांवरून तलावांपर्यंत पोहोचतं. प्रामुख्याने काटेरी वन असणाऱ्या या जंगलात बाभळीची झाडं मोठ्या प्रमाणावर आहेत, तसंच शबरी किंवा शमीची झाडंही मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.
        ताल छापर अभयारण्य हे पक्ष्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. माळरानांच्या अस्तित्वामुळं शिकारी पक्ष्यांची विविधताही आपल्याला इथं पाहायला मिळते. अनेक पक्षी देशविदेशांतून स्थलांतर करून या अभयारण्यात येतात. काही महिने इथं वास्तव्य करतात आणि पुढच्या प्रवासाला निघतात. हे स्थलांतरित पक्षी पाहण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी अनेक पक्षिप्रेमी ताल छापर अभयारण्यात अगदी देशविदेशांतून येतात. काळवीट अर्थात कृष्णमृग या खास हरीणवर्गाच्या प्राण्यानं ताल छापर अभयारण्याला खास ओळख दिली आहे. हा प्राणी भारतातील अगदी सर्वसामान्य माणसांना माहीत झाला तो एका सिनेनटाच्या जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणामुळे.
       काळविटाला कृष्णमृग असंही म्हणतात. काळवीट किंवा कृष्णमृग हा एक देखणा प्राणी आहे. काळवीट कळपानं राहणारा प्राणी असून, एका कळपात साधारण १० ते ३० काळवीट असतात. गवताळ व खुरटी झुडपं असलेल्या क्षेत्रात प्रामुख्यानं काळविटांचं अस्तित्व आढळतं. काळवीट घनदाट तसंच डोंगराळ जंगलात राहण्याचं टाळतात. प्रौढ नराच्या पाठीचा रंग राखाडी किंवा पूर्ण काळा आणि पोटाकडील भाग पांढरा असतो. मादी नरापेक्षा लहान असतात आणि त्यांना शिंगं नसतात. त्यांच्या पाठीचा रंग पिवळसर बदामी आणि पोटाचा भाग नराप्रमाणे पांढरट असतो. नरांना पीळदार शिंगं असतात. काळवीट हा वेगानं धावणारा प्राणी असून तो ताशी सुमारे ८० कि.मी. वेगानं धावू शकतो. काळविटांचं आयुष्यमान अंदाजे १२ ते १५ वर्षं असतं.
         काळवीट हा हरणांच्या कुरंग वर्गाचा प्राणी आहे. हरणांमध्ये सारंग आणि कुरंग ही दोन उपकुळं आपल्याला पाहायला मिळतात. या उपकुळांत काळवीट, नीलगाय, चिंकारा, चौशिंगा इ. प्रजातींच्या हरणांचा समावेश होतो. कुरंग हरणांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांची शिंगं. ही शिंगं सारंग हरणांच्या शिंगांपेक्षा पूर्णत: वेगळी असतात, ती पोकळ असून हाडांच्या सांगाड्याचा एक भाग असतात. ही शिंगं कधीही गळून पडत नाहीत. याउलट सारंग प्रजातींच्या हरणांची शिंगं दरवर्षी गळून पडतात आणि नव्यानं येतात. कुरंग जातीच्या हरणांच्या शिंगाला एकच टोक असतं. शिंगाचं आकारमान सारंग हरणांच्या शिंगांपेक्षा बरंच लहान असतं.
       काळवीट हा भारतीय संस्कृतीत फार फार वर्षांपासून असणारा प्राणी आहे. अगदी इसवी सन पूर्व काळातही दगडावर केलेल्या रंगकामातही काळविटाचं चित्र पाहायला मिळतं. एकेकाळी भारतीय उपखंडात मोठ्या संख्येनं दिसणारा प्राणी अवैध आणि मोठ्या प्रमाणावर केलेल्या शिकारीमुळं कमी होत चालला आहे. १९७२ साली झालेल्या एका अभ्यासानुसार भारतीय उपखंडात या प्राण्यांची संख्या ४ दशलक्षच्या आसपास होती. १९८२ मध्ये रणजित सिंग यांनी केलेल्या अभ्यासानुसार भारतात २२५०० ते २४५०० इतकी काळविटांची संख्या होती. राजस्थानातील बिष्णोई जमातीच्या लोकांच्या जीवनामध्ये एकूणच जंगलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांनी संख्येनं कमी होत चाललेल्या या काळवीट प्राण्याच्या संरक्षणाचा प्रण केलेला आहे.
    ताल छापर अभयारण्यात एक विशिष्ट प्रकारचं गवत सापडतं. स्थानिक भाषेत या गवताला ‘मोठीया’ म्हणतात. ह्या गवताचं बीज हे तंतोतंत मोत्याच्या आकारासारखं दिसतं. यावरून या गवताला ‘मोठीया’ हे नाव मिळालं आहे. या बीजाची चव गोड असते. स्थानिक लोक हे बीज आवडीनं खातात. काळवीट आणि काही पक्षीही हे बीज आवडीनं खातात. मात्र प्रत्येक मोसमात हे गवत कमी प्रमाणात उगवतं. त्यामुळं या गवताचं संवर्धन करण्याची अधिक गरज आहे. येथूनच जवळ ‘जोर्बीर’ हे गिधाडांसाठी असलेलं संरक्षित क्षेत्र आहे.
         ताल छापर या अभयारण्याचं काळवीट आणि माळरानावर अवलंबून असलेल्या पक्ष्यांच्या दृष्टीनं असलेलं महत्त्व लक्षात घेतलं तर इथं असलेल्या एकूण भौगोलिक स्थितीवरून कोणीही या जंगलाला रूक्ष, ओसाड म्हणणार नाही. नानाविध शिकारी प्रजातींच्या पक्ष्यांसाठी असलेला हा स्वर्ग दरवर्षी निसर्गप्रेमींना आणि पक्षिनिरीक्षकांना आपल्याकडं आकर्षित करतो. अप्रतिम निसर्ग विविधतेमुळं आपण या जंगलाच्या प्रेमात पडतो. शुष्क माळरानावर असलेलं निसर्गाचं नंदनवन प्रत्येकाने किमान एकदा तरी पहावंच. निसर्गाच्या या असाधारण आणि अद्भुत चमत्काराला आपण एकदा भेट दिली, की आपली इथला निसर्ग पाहण्याची तहान शमत नाही. आपण वारंवार या अभयारण्याला भेट देतो आणि इथला निसर्ग मनसोक्त पिऊ लागतो.

कसं जाल? :-  पुणे/मुंबई-जयपूर- ताल छापर
भेट देण्यास उत्तम हंगाम :- नोव्हेंबर ते फेब्रुवारी
काय पाहू शकाल? :-  सस्तन प्राणी : वाळवंटी खोकड, वाळवंटी मांजर, चिंकारा, काळवीट इ.
पक्षी : भाट तीतर, राखी तित्तीर, ठिपकेवाला तीतर, ब्लॅक-बेलीड सँडग्रुज, साईक्स नाइटजार, चातक, करकरा क्रौंच, सामान्य क्रौंच, माळढोक, मॅक्वीनस् बस्टर्ड, कुदळ्या, युरेशियन करवानक, संघचारी टिटवी, क्रीम कलर्ड कोर्सर, धाविक, मधुबाज, भुरे गिधाड, काळं गिधाड, राजगिधाड, नेपाळी गरुड, लाँग लेग्ड बझर्ड, विविध प्रजातींचे ससाणे, घारी, सापमार गरुड, पिंगट गरुड, इस्टर्न इम्पेरियल ईगल, कंठी होला, तपकिरी होला इ.
सरपटणारे प्राणी : स्पाइनी-टेल्ड लिझार्ड, घोरपड, फुरसं, घोणस, मण्यार इ.
(सदराचे लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट)
 
By अनुज खरे informanuj@gmail.com

Monday, December 20, 2021

सांदण दरी

 

कार्यालयीन कामकाजातून वेळ काढून नाशिकला मामाच्या गावाला जायचा उद्देश यावेळी निराळा होता. तो म्हणजे सांधण दरी ला भेट द्यायचा. अर्थात पूर्वीच नियोजन केल्याप्रमाणे २४ एप्रील ला मी आणी माझा मामेभाउ व त्याचा मित्र असे तिघे पहाटे ५.३० वाजता नासिक वरून निघालो ते त्याच्या चारचाकीने. नासिक-मुंबई महामार्गाने घोटीच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला. थोड्याच वेळात डावीकडे औंढ्या, पट्टा, डुबेरे व उजवीकडे अंजनेरी,डांग्या, घारगड, कावनई असे किल्ले दिसू लागले. समोरच कळसुबाई, अलंग, कुलंग व मदनगडाची सह्याद्रीतील सर्वोच्च रांग दिसू लागली.


आम्ही घोटीच्या अलीकडून डावीकडे वळण घेतले व मोरधन किल्ल्याच्या कातळभिंतीच्या शेजारून असलेल्या सडकेने बारी गाठले. बारी हे कळसूबाईच्या पायथ्याचे गाव. आसपासच्या सर्व शिखरांत कळसुबाई आपले सर्वोच्च शिखर त्यावरील मंदिरासह मिरवत होती.

आम्ही खालूनच त्याचे दर्शन घेऊन पुढे निघालो ते भंडारदरा धरणापाशी असलेल्या शेंडी गावात पोहोचलो.

इथून सांदण दरीला दोन रस्ते जातात. एक शेंडीच्या अलीकडून घाटघरच्या मार्गाने साम्रद गावाला जातो (२३ किमी) व दुसरा धरणाच्या पाणलोट क्षेत्राला वळसा घालून घनचक्कराच्या पदरातून रतनवाडीच्या मार्गाने साम्रदला पोहोचतो (२६ किमी). आम्ह्लाला अर्थातच रतनगडाच्या पायथ्याल्या असलेल्या रतनवाडीच्या शिल्पसमृद्ध श्री. अमृतेश्वर मंदीराचे दर्शन घ्यावयाचे असल्याने आम्ही रतनवाडीच्या मार्गाने निघालो.
हा रस्ता निर्विवादपणे देखणा आहे. घनचक्कराच्या कडेने, तलावाच्या बाजूने कधी दाट झाडीतून तर कधी उघड्या आभाळाच्या साक्षीने ह रस्ता चढ उतार घेत वळणे वळणे घेत जातो. वाटेने कळसुबाई, अलंग, कुलंग व मदनगडाची रांग, बाजूलाच घनचक्कर रांग, त्याचे मुडा हे सह्याद्रीतील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर हे रौद्र दर्शन देतात. रतनगड व खुट्टा सुळका कायमच साथीला असतात. ३० मिनिटातच रतनवाडीला पोहोचलो.

अमृतेश्वर मंदीर व त्याच्या जवळच असलेली कोरीव काम असलेली पुष्करणी (कुंड) आमच्या पुढ्यातच होती. मंदीराच्या पाठीमागेच रतनगड व त्याचा खुट्टा सुळका उठावला होता.

पुष्करणी ही अतीशय देखणी व शिल्पसमृद्ध आहे. शंख, चक्र, गदाधारी विष्णू च्या अनेक प्रतिमा आहेत. शेषशायी भगवान विष्णू व लक्ष्मी तसेच गजाननाचीही प्रतिमा आहे.


पुष्करणी पाहून आम्ही श्री. अमृतेश्वर मंदीराचे दर्शन घेतले. १२०० वर्षांपूर्वीचे हे अतीशय देखणे हेमाड्पंथी कोरीव मंदीर आहे. मंदीराला पुर्वाभिमुख मुख्य द्वार व पश्चिमाभिमुख दुसरे द्वार अशी २ द्वारे आहेत. विविध शिल्पाकृतींचा खजिनाच इथे भरला आहे.

हे सर्व डोळ्यांत व कॅमेर्‍यात साठवून चहा, पोहे खावून आम्ही आमच्या मुख्य उद्दिष्टाकडे म्हणजे सांदण दरीकडे जाण्यासाठी साम्रदकडे निघालो( रतनवाडीपासून साम्रद ५ किमी) थोड्याच वेळात तिथे पोहोचलो. इथेतर सह्याद्री आपले राकट सौंदर्य दाखवत उभा होता. रतनगड, खुट्टा यांचे एका वेगळ्याच बाजूने अतीशय प्रेक्षणीय दर्शन होत होते. बाजूलाच आजोबाचा महाकाय पर्वत आपल्याला आजोबा का म्हणतात ते दाखवून देत होता. कळसुबाई, अलंग, कुलंग व मदनगड पाठीमागच्या बाजूने रौद्र दर्शन देत होते.


साम्रद ही छोटेखानी आदिवासी वाडी आहे. तिथे गाडी लावून आम्ही खंडूमामा यांस सांदण दरीची वाट दाखवण्यास बरोबर घेतले. १०/१५ मिनिटातच कातळाच्यासड्यावरून आमची वाट दाट झाडीत शिरली. व थोड्याच वेळात आम्ही एका घळीच्या मुखाशी आलो. सांदण दरीचे वैशिट्य म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली आहे. इथे खाली थोडेसे उतरावे लागते. अतिशय अरूंद अशी ही लांबच लांब जमिनीला पडलेली भेग आहे.
सांदण दरीचे मुख.--


घळीच्या सुरुवातीलाचा एक जिवंत झरा आहे जो कधीही आटत नाही. दगडांनी तो बंदिस्त केल्यामुळे अतिशय निर्मळ असे ते थंडगार असे ते पाणी पिवून आम्ही उल्ह्सित झालो. घळ उतरायला लागलो. सुरुवातीचा सोपा कातळटप्पा उतरुन आम्ही आत दरीच्या नाळेत प्रवेश केला.


आत दरीचे सापासारखे लांबच लांब वळण दिसत होते. काही ठिकाणी १५/२० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २/३ फूट अशी ती अतिशय निरुंद नाळ होती. दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकड्यांनी ती बंदिस्त केली होती.


पहिला कातळ्टप्पा उतरताच एका पाणसाठ्याने आमचा मार्ग अडवला. साधारण १.५ फूट खोल १२/१३ फूट लांब अश्या त्या पाण्यातून शेवाळलेल्या दगडांवरून आम्ही कौशल्याने मार्ग काडून पलीकडे गेलो. आता तीव्र उतार सुरु झाला होता. नाळ अधिकाधिक अरूंद होत होती. कुठेही सपाट मार्ग नव्हता. दरडी, लहानमोठे दगडगोटे यांचा अक्षर्शः तिथे खच पडला होता.

आता आमचा मार्ग दुसर्‍या मोठ्या पाणसाठयाने अडवला होता. एका बाजूला ४.५ फूट खोल पाणी दुसर्‍याबाजूला ३ फूट खोल पाणी होते. हेही कधीही आटत नाही कारण सुर्य इकडे कधीही पोहोचू शकत नाही. अतिशय थंडगार अश्या त्या पाण्यातून १७/१८ फूट लांब चालण्याचा थरार हा शब्दातीत आहे. प्रत्यक्ष अनूभवातूनच तो घ्यावा.


अजूनही आमचा नाळेतूनच प्रवास चालला होता. जवळ जवळ १.५ किमी अश्या ह्या अरूंद नाळेच्या टोकाशी पोहोचायला ३० /४० मिनिटे लागतात. दोहो बाजूंचे उंच उंच कातळकडे व आकाश्याच्या छोट्या तुकड्यापलीकडे काहीही दिसत नाही.

आता आम्ही नाळेच्या टोकाशी आलो होतो. आत इथून सह्य पर्वताचे उग्र दर्शन होते होते. ३५०० फूट सरळ तुटलेले कडे व रतनगडाचा कडा प्रेक्षणीय दिसत होता. ही नाळ पुढे काही अवघड कातळारोहण टप्प्यांवरून जात करोली घाटाला जावुन मिळते. अर्थात आम्ही त्याच्या वाटेला गेलो नाही हे सांगणे न लगे.


१५/२० मिनिटे तिथे थांबून आम्ही मागे फिरलो. परत त्या पाण्याचा थरार अनुभवला. दगडगोट्यांवरून दडस दडस चढून आम्ही घळीच्या बाहेर पडलो.

अप्रतीम अश्या ह्या निसर्गनवलाने आम्ही अवाक झालो होतो. ही अरूंद घळ पाणी व ज्वालामुखी यांच्या एकत्रीत परीणामामुळे बनली असावी. पूर्ण सांदण दरीत कधीही उन पोहोचत नाही त्यमुळे कायमच सुखद गारवा असतो.
आता परत आजोबा, रतनगड, खुट्टा , कळसुबाई रांगेचे डोळे भरून दर्शन घेतले.

साम्रद गावात अचानक छोटे चक्रीवादळ आले.

साम्रद वरून घाटघरच्या वाटेने निघालो. घाटघरचा रौद्र कोकणकडा व पायथ्याचा तलाव व त्यावरील विद्युत प्रकल्पाचे इथून सुंदर दर्शन होते.

तिथे थोडावेळ थांबून आम्ही आता धरणाच्या दुसर्‍या बाजूने निघालो. कळसूबाईच्या मागच्या पदरातून वळसा मारून परत शेंडी गाव व तिथून बारी, घोटी वरून आम्ही ३ च्या सुमारास नाशिकला पोहोचलो ते परत पुन्हा इथे यायच्या विचारानेच.

 https://www.misalpav.com/node/12184

 तुम्ही साम्रदला पोहोचताच तुमच्या गाडीभोवती कुणी ना कुणी गावकरी येतातच. कुणीही तुमच्याबरोबर वाट दाखवायला येईल. पावसाळ्यात मात्र शक्य नाही तेही अर्थात त्या २ पाणसाठ्यांमुळेच. जानेवारीनंतर कधीही जा किंवा आता या महिन्यात वा जूनच्या पहिल्या आठवड्यात जा. 

कोकणकडा (लाईट )...

( कोकणकडा स्ट्रॉंग हरिश्चंद्राच्याकड )

06

06

06

06

 0

06

06

06

06

 47

06

06

06

06

 :43

06

 किप कांल्म अँड चालत रहा

005

 

रॅपलिंगची तारांबळ

05

 प्रस्तरभंग सुरुवात

04

 अभयारण्य प्रवेश

03

 खुट्टा

02

 

पहाटेची सुरुवात ...

01

 

 

सह्कुटुंबासमवेत जा कारण ही घळ अवघड अजिबात नाही. त्यांनाही निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार अनुभवू द्या.

 ऑक्टॉबर- नोव्हेंबरमध्ये साम्रद्च्या पठारावर, दरीच्या कडेला पॅराग्यायडींग केले जाते. त्याचाही आणंद घ्या, त्याच वेळेस तेथे भन्नाट रानफुले फुलतात तसेच पावसळ्यात गेल्यास करोली घाटाच्या वरच्या अंगाला असलेला धबधबा वार्‍याने ऊलटा फीरतो, अदभुत दृष्य असते. 

 

 

 

 

लखनौ, प्रयागराज, वाराणसी आणि सारनाथ

उत्तर प्रदेश हे पर्यटनाच्या दृष्टीनं भारतातलं सगळ्यात प्रसिद्ध राज्य. परदेशी लोकांचा तर उत्तर प्रदेश म्हणजेच भारत असा गैरसमज झालेला दिसतो. क...