Friday, April 21, 2023

विदर्भाचे पर्यटन ( भाग 5)

 

  मोर्यकालीन स्तुपाचे संवर्धन हे कर्तव्यच!

इतिहासाच्या पानांतील मजकुर आणि त्याच्या सत्यतेची पाडताळणी करावयाची असेल, तर त्या काळातील ‘हेरिटेज’ वास्तुंचा अभ्यास करावा लागतो. शिलालेख, नाणी, नाण्यांवरील बोधचिन्हे आदींच्या सखोल अभ्यासानंतर इतिहासाला भक्कम पुरावा मिळतो. हे पुरावे कधी थेट जंगलाआड, डोंगरात दडलेले असतात तर कधी मातीच्या कुशीत आपल्या शोधकर्त्याची वाट पाह
त असतात. त्याला हुडकून काढण्याची आणि नवा इतिहास जगासमोर मांडण्याची जबाबदारी ही त्या त्या पिढीच्या खांद्यावर असते. पण भविष्यातील संशोधकांसाठी आपण त्यांच्या अभ्यासाचा अधारच नष्ट करत असू, तर त्यापैक्षा दुर्देव दुसरे काय असेल.
दिल्लीतील सहाशे वर्षांपूर्वीचे रविदासांचे मंदिर असो की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असो, सरकारने या ऐतिहासिक वास्तु जमिनदोस्त केल्या. ऐतिहासिक वारसे जपण्यात सरकारला किती स्वारस्य आहे, हे या दोन उदाहरणांवरून स्पष्ट झाले. पण येथे विषय निघाला तो महाराष्ट्रातील मौर्यकालीन भोन स्तुपावरून. भोन स्तुप नष्ट करण्याच्या मार्गावर सरकार असून हे स्तुप वाचवण्यासाठी लढा तीव्र झाला आहे. 

मौर्यकालीन साम्राज्याचा इतिहास जगासमोर मांडला तो भारतीय पुरातत्व विभागाचे जनक सर अलेक्झेंडर कनिंग्हॅम यांनी. चीनी प्रवासी ह्युयेनस्तांग यांच्या डायरीमुळे त्यांना तत्कालीन भारताचा भुगोल समजला. ह्युयेनस्तांग भारताच्या भ्रमंतीवर ६ व्या शतकात आले होते आणि त्यांनी भारताचे वर्गीकरण पूर्व, पश्िचम, उत्तर दक्षिण आणि मध्य भारत असे केले आहे. आजही त्याच वर्गीकरणानुसार भारताचे वर्णन केले जाते. त्यांच्या डायरीच्या आधारावर कनिग्हॅम यांनी बुद्धांच्या एेतिहासिक पुराव्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि टप्प्याटप्प्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली शहरे, स्तुप आणि दुर्गम डोंगरात दडलेल्या वास्तुकलेचा अद्भुत नमुना असलेल्या लेण्या त्यांनी प्रकाशात आणल्या. पुरातत्व विभागाची स्थापना झाल्यानंतर मुघलकालीन ऐतिहासिक स्थळे संरक्षित तर झालीच, त्याचप्रमाणे २५०० वर्षांपूर्वीचा इतिहासही समोर आला.
भारतात एकेकाळी बौद्ध धर्म सर्वत्र विस्तारलेला होता. त्यामुळे त्याच्या खुणा या आजही सापडत आहेत. असेच काही पुरावे २००२ मध्ये विदर्भात सापडले. भोन स्तुपाचा शोध  २००२ मध्ये डॉ. बी. सी. देवतारे यांनी लावला आणि येथे उत्खननाने जोर धरला. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भोन गावात मौर्यकालीन बौद्ध स्तुप आढळले. येथे २००३ पासून उत्खनन सुरु झाले आणि २००७ मध्ये उत्खननाचे काम थांबवले. भोन गावाजवळील पूर्णा नदीकिनारी बौद्ध स्तुप सापडले. त्यामुळे याचे नामकरण भोन स्तुप झाले. पुर्णा नदीकिनारी अनेक छोट्या-मोठ्या टेकट्या आहेत. या टेकड्या १० ते १२ हेक्टर परिसरात पसरल्या आहेत. टेकटी क्रमांक ६ येथे उत्खननादरम्यान हे स्तुप आढळले. हे स्तुप साधारण इसवी सन पूर्व ३०० शतकातील असल्याचे सिद्ध झाले. येथे सापडलेल्या तांब्याच्या नाण्यांवर बोधिवृक्षाची (पिंपळाचे झाड) प्रतिमा आढळली. तसेच एका पत्र्यावरही बोधिवृक्ष आढळून आला. टेराकोटा अर्थात विशेष प्रकारच्या मूर्तीवर ‘त्रिरत्न’ आढळले. एवढेच नाही तर येथे पाणी व्यवस्थापनासाठी विशिष्ट्य रचना असल्याचे आढळून आले. त्यामुळे येथे उत्खनन वेगाने होण्याची गरज भासू लागली. मात्र इतके भक्कम पुरावे आढळल्यानंतरही पुरातत्व विभागाने २००७ नंतर येथील उत्खनन बंद केले. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
असो, उत्खनन थांबले इथपर्यंत ठिक आहे, पण हा ऐतिहासिक वारसाच नष्ट करण्याचा डाव तत्कालीन काँग्रेस सरकारने मांडला आणि त्यानुसार पुरातत्व विभागाचा ना हरकत प्रमाणपत्र घेऊन येथे जीगाव धरण प्रकल्प सुरु केला. मुळात येथे आणखी उत्खनन होणे गरजेचे होते. उत्खनन झाले असते तर नवीन काही हाती लागले असते. २०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार निवडून आले. यावेळी सरकार ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पुढाकार घेईल, अशी अपेक्षा होती. मात्र झाले उलटेच. काही महिन्यांपूर्वीच्ा दिल्लीतील रविदास मंदिर जमिनदोस्त करण्यात आले. अर्थात हे मंदिर तोडण्याचे आदेश दस्तरखुद्द सर्वाेच्च न्यायालयातून आले होते. त्यामुळे हा निर्णय चुकीचा हाेता, असे म्हणणे म्हणजे न्यायालयीन व्यवस्थेचा अपमान करण्यासारखे ठरेल. पण जनभावना लक्षात घेता मंदिराचे संरक्षण करून संवर्धन करणे हे सरकारच्या हाती होते. मात्र सरकारने तसे न करनेच पसंत केले. संत रविदास मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. सिकंदर लोधीने दिल्लीतील तुगलकाबाद येथे १५०० च्या काळात हे मंदिर येथे उभारले. आज दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये संत रविदास यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे जनभावनाचा आदर आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी ही दोन कारणे संत रोहिदास मंदिर न तोडण्यास पर्याप्त होती. मात्र तसे झाले नाही.
हीच बाब आता भोन स्तुपाबाबत होत आहे. मुळात हे स्तुप मौर्यकालीन असल्याने त्याचे संवर्धन करणे हे पुरातत्व विभागाचे आणि सरकारचे कर्तव्यच आहे. पण याबाबत सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने आश्चर्य वाटत आहे. परिणामी आता स्थानिकांनाच रस्त्यावर उतरावे लागत आहे. भोन स्तुपाच्या संरक्षणासाठी यापूर्वीही आंदोलने झाली. मात्र मागील दोन महिन्यांत आंदोलनाची धार तीव्र झाली. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या बॅनरखाली आंदोलनाची रुपरेषा ठरली आहे. सप्टंेबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वाशिममध्ये धरणे आंदोलन झाले. बुलढाण्यात ठिकठिकाणी मोर्चे निघाले आणि टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र होत चालले आहे. बुधवारी (१८ सप्टेंबर २०१९) शेगावमध्ये राज्यस्तरीय संमेलन झाले. यामध्ये बौद्ध भिक्खुंच्या उपस्थितीत हजारो स्तुप समर्थकांनी मेळाव्यात हजेरी लावली आणि सरकारने गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली. भोन स्तुप वाचवण्याचा लढा तीव्र झाला असून थेट उत्तरप्रदेशमधूनही लढ्यात आंदोलक सहभागी होत आहेत. हा लढा यशस्वी होईल की नाही हा येणारा काळ ठरवेल. पण  ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे.

https://vinayshakyaviewson.blogspot.com/2019/09/blog-post.html


ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही

ऑरेंज सिटीऑरेंज सिटी

‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात आपण सैर करू या ‘ऑरेंज सिटी’ म्हणून ओळख असलेल्या, महाराष्ट्राची हिवाळी राजधानी असलेल्या आणि देशाच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या नागपूर आणि आजूबाजूच्या विविध पर्यटनस्थळांची...
..........
नागपूर हे विदर्भातील सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक शहर आहे. या शहरात महाराष्ट्राच्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन भरविले जाते. त्यामुळे ऐन थंडीत येथील वातावरण राजकीयदृष्ट्या तापलेले असते. नागपूर हे दिल्ली, चेन्नई व मुंबई-कोलकाता रेल्वेमार्गावरील प्रमुख जंक्शन आहे.

रिझर्व्ह बँकरिझर्व्ह बँक
नागपूरचा पहिला संदर्भ देवळी या वर्धा जिल्ह्यातील एका ताम्रपटामध्ये आढळून आला. प्रचलित माहितीनुसार छिंदवाड्यातील गोंड राजाचा मुलगा बख्त बुलंद शाह याने या शहराची स्थापना केली. या गोंड राजाने औरंगजेबाच्या पदरी आपली कारकीर्द सुरू केली होती. त्याने १२ गावांचे मिळून एक शहर बनविले. तो भाग म्हणजेच नागपूर. नागपूरला फणींद्रपूर असेही एक नाव आहे. येथून एक वृत्तपत्रही ‘फणींद्रमणी’ या नावाने प्रसिद्ध होत असे. फणा म्हणजेच नागाचे फुत्कारलेले तोंड. काहींच्या मते नाग नदी येथून वाहते म्हणून या शहराचे नाव नागपूर, तर काहींच्या मते येथे नागा लोकांची वस्ती होती म्हणून ते नागपूर.

संत्राबर्फीसंत्राबर्फी
नागपूरमध्ये रिझर्व्ह बँकेचे कार्यालय आहे. ब्रिटिशकालीन सुंदर इमारत हे या इमारतीचे वैशिष्ट्य. तसेच नागपूरमध्ये महालेखापाल (AG) यांचे कार्यालयही आहे. नागपूरमध्ये सध्या मेट्रोचे काम द्रुतगतीने चालू आहे. नागपूर हे कापड व्यापाराचे मुख्य ठिकाण आहे. पूर्वी नागपूरमध्ये कापड गिरण्या होत्या. आताही येथील कापडनिर्मिती (टेक्सटाइल्स) उद्योग मोठा आहे. येथे कापसाची मोठी उलाढाल होते. तसेच रेशीमकामही मोठ्या प्रमाणावर होते. खाद्यपदार्थनिर्मितीचे अनेक उद्योगही येथे आहेत. खवय्यांसाठी पाटवडी ऊर्फ सांबारवडी, तेजतर्रार चणा-चिवडा, बड्या मिठाईवाल्यांकडची संत्राबर्फी, नागपूर स्पेशल सोनपापडी आणि इथले सावजी जेवण खवय्यांसाठी तयार असतेच.

दीक्षाभूमीदीक्षाभूमी
दीक्षाभूमी: पश्चिम नागपूरमधील चार एकर जागेवर विस्तारलेली दीक्षाभूमी हे सामाजिक क्रांतीचे स्मारक आहे. नागपूर हे बौद्धधर्मीयांचे प्रेरणस्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयादशमीचा मुहूर्त साधून विचारधारेचे सीमोल्लंघन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महास्थविर चंद्रमणी यांच्याकडून पाच लाख अनुयायांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धर्माची दीक्षा येथे घेतली. तेव्हापासूनच हे स्थळ दीक्षाभूमी म्हणून ओळखले जाऊ लागले. कलिंग लढाईनंतर सम्राट अशोकाने धर्मांतर केले होते. त्यानंतर झालेले हे मोठे धर्मांतर समजले जाते. फरक एवढाच, की कलिंगची लढाई रक्तरंजित होती. त्यातून सम्राट अशोकाचे हृदय परिवर्तन झाले; मात्र या वेळी सामाजिक अन्यायातून बाहेर पडण्यासाठी हे क्रांतिकारक पाऊल उचलले गेले. बौद्ध धर्म हा धर्म नसून, एक आदर्श वैचारिक जीवनशैली आहे. दीक्षाभूमीवर विजयदशमीला अनुयायांचा महापूर लोटतो. येथे अत्यंत आकर्षक असा, सांची येथील स्तूपासारखा स्तूप बांधला असून, ते नागपूरचे वैभव आहे. सेओ दान मल (sheo dan mal) या जोधपूर येथील वास्तुविशारदाने याचा आराखडा तयार केला. १९७८ साली या स्मारकाचे बांधकाम सुरू झाले. ते २००१मध्ये पूर्ण होऊन तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. त्याला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. सुमारे १० हजार अनुयायी येथे बसू शकतील एवढी याची क्षमता आहे. आशियातील मोठ्या स्तूपांत याची गणना होते. याच्या तळमजल्यावरील हॉल २११ फूट बाय २११ फूट एवढा मोठा असून, मध्यभागी बुद्धाची सुंदर मूर्ती आहे. अनुराधापूर येथून आणलेल्या बोधिवृक्षाची फांदी येथे लावण्यात आली असून, तो वृक्ष आता मोठा झाला आहे.

डायमंड क्रॉसिंगडायमंड क्रॉसिंग
डायमंड क्रॉसिंग :
नागपूर जंक्शन हे उत्तर पूर्व रेल्वे (Old Grand Trunk Railway) आणि मुंबई-कोलकाता या मुख्य रेल्वेमार्गावरील प्रमुख जंक्शन आहे. येथील दोन्ही मार्गांना जोडणारे क्रॉसिंग डायमंड क्रॉसिंग नावाने ओळखले जाते.

रेशीमबाग : येथे असून, सध्या

 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघराष्ट्रीय स्वयंसेवक संघ
हे ठिकाण राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर १९२५ रोजी डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी केली. संघाचे कार्यालय सुसज्ज आधुनिक सुखसोयींनी युक्त असून, ते महाल विभागात आहे. संघस्थापना झाली त्या बैठकीला फक्त १० जण उपस्थित होते. सध्या संपूर्ण भारतामध्ये संघाच्या ५६ हजार ८५९ शाखा असून, सदस्य संख्या ‎सुमारे ५० ते ६० लाख आहे.

पूर्णवेळ प्रचारक हे ब्रह्मचर्य पाळणारे असतात. सकाळी व संध्याकाळी रोज शाखा भरविल्या जातात. संकटकाळी सेवेला धावून जाणारे अशी स्वयंसेवकांची ओळख आहे. आंध्र प्रदेशमधील वादळ, किल्लारी भूकंप अशा संकटांवेळी त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. उत्तर भारतात संघाचे कार्य जास्त प्रमाणावर आहे.

अंबाझरी तलावअंबाझरी तलाव
अंबाझरी तलाव :
हा तलाव नागपूर शहराच्या दक्षिणेकडे असून, नाग नदीचा उगम येथेच झाला आहे. या तलावाला पूर्वी ‘बिंबाझरी’ असे म्हणत. नागपूरच्या गोंड राजाच्या कार्यकाळात या तलावाची निर्मिती झाली. त्यासाठी, नागपूरजवळच्या लाव्हा गावानजीक असलेल्या महादगड डोंगरातून उगम पावलेल्या नाग नदीवर बंधारा बांधण्यात आला. उत्तर भारतातून नागपुरात या कामासाठी आलेल्या कोहळी समाजाच्या लोकांनी हा तलाव निर्माण केला. भोसले घराण्याच्या शासनकाळात या तलावात सुधारणा केल्या गेल्या. नंतर सन १८६९ या साली पडलेल्या दुष्काळामुळे तलावाच्या बांधकामात अनेक बदल करण्यात आले. या तलावाची उंची १७ फुटांनी व क्षमता तिपटीने वाढविण्यात आली. येथे १८ एकर जागेवर सुंदर उद्यान उभारण्यात आले आहे. म्युझिकल फाउंटन हे येथील आकर्षण आहे.

सीताबर्डी किल्लासीताबर्डी किल्ला
सीताबर्डी किल्ला :
सीताबर्डी शब्दाचा अर्थ सीतेची टेकडी असा होतो. आप्पासाहेब भोसले यांच्या सैन्याने तीन दिवस दिलेल्या निकराच्या लढ्यानंतर २८ नोव्हेंबर १८१७ रोजी हा किल्ला ब्रिटिश लष्कराच्या ताब्यात गेला. त्या वेळी येथे किल्ला नव्हता. त्याला ‘बडी टेकडी’ असे संबोधले जात असे. या किल्ल्यावर तोफखाना व दारुगोळा असे. तेव्हा या किल्ल्यावर अरब सेनेने हल्ला चढविल्याची नोंद आहे. हा किल्ला नंतर लष्कराच्या ताब्यात देण्यात आला. या किल्ल्याचे बांधकाम काळ्या दगडात आहे. वर्षात फक्त तीन वेळा म्हणजेच, २६ जानेवारी, १५ ऑगस्ट व एक मे रोजी याचा काही भाग जनतेसाठी खुला करण्यात येतो.

बालाजी मंदिरबालाजी मंदिर
बालाजी मंदिर :
हेही नागपूरमधील एक आकर्षक ठिकाण आहे. भगवान कार्तिकेयाची मूर्तीही येथे आहे.

पोद्दारेश्वर राम मंदिर : राजस्थानमधील उद्योगपती पोद्दार यांनी या राम मंदिराची उभारणी केली. शुभ्र संगमरमर व लाल दगडात हे मंदिर बांधण्यात आले आहे. रामनवमीला येथे मोठ्या शोभायात्रेचे आयोजन केले जाते.

महाराजबाग पशुसंग्रहालयमहाराजबाग पशुसंग्रहालय
महाराजबाग पशुसंग्रहालय :
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या प्राणिसंग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील प्राणी १० हजार रुपये देणगी देऊन दत्तक घेता येतो. राजे भोसल्यांच्या काळातील या बागेमध्ये २० प्रजातींचे जवळपास ३०० पशू-पक्षी आढळून येतात. वाघ, मोर, ससे, काळवीट आदींचा त्यात समावेश आहे.

नॅरो गेज रेल्वे म्युझियमनॅरो गेज रेल्वे म्युझियम
नॅरो गेज रेल्वे म्युझियम : ब्रिटिशांच्या काळात सुरू केलेल्या नॅरो गेज रेल्वेचा ऐतिहासिक वारसा सांगणारे व माहिती देणारे संग्रहालय नागपुरातील मोतिबाग परिसरात आहे. ब्रिटिशांनी मध्य भारतात सातपुडा रेल्वे म्हणून रेल्वेचे जाळे विणले. त्या मार्गावर स्वतंत्र भारतातही अनेक वर्षे प्रवास सुरू होता. हे रेल्वेमार्ग १९०३ ते १९०९ या कालावधीत सुरू झाले होते. जुने वाफेवर चालणारे इंजिन आणि आता नवलाईच्या वाटतील अशा अनेक गोष्टी येथे पाहायला मिळतात. या म्युझियममध्ये परलाखिमुंडी महाराजांचा खासगी कोच, वाफेवर चालणारे इंजिन, रेल्वेच्या दोन डब्यांमध्ये तयार करण्यात आलेले रेस्टॉरंट, १९०७ साली इंग्लंडमध्ये तयार झालेले वाफेचे इंजिन ठेवण्यात आले आहे.

तत्कालीन रेल्वेमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन १४ डिसेंबर २००२ रोजी झाले होते. येथे जुन्या आणि पुरातन काळातील भारतीय रेल्वेच्या वस्तू मोठ्या प्रमाणात आहेत.

झाशीच्या राणीचा पुतळा : सीताबर्डी भागात झाशीच्या राणीचा भव्य पुतळा हे मोठे आकर्षण आहे. लांब उडी घेण्याच्या पवित्र्यात असलेल्या घोड्यावर बसलेल्या राणीसाहेब आणि घोड्याचे मागील दोन पाय व शेपूट यावर तोललेला हा पुतळा बघत राहावा असाच आहे.

नागपूर म्युझियमनागपूर म्युझियम
नागपूर म्युझियम :
अजब बंगला नावाने ओळखले जाणारे हे संग्रहालय सिव्हिल लाइन्समध्ये आहे. १८६३ साली याची उभारणी झाली. पुरातन नाणी, शिलालेख, शिल्पे, सापडलेल्या ऐतिहासिक वस्तू, अश्मयुगीन हत्यारे अशा अनेक गोष्टी येथे आहेत. मुंबई कला संस्थेची अनेक पेंटिंग्जही येथे आहेत. येथे एकूण सहा दालने असून, मंगळवारची सुट्टी वगळता अन्य सर्व दिवशी सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत हे म्युझियम उघडे असते.

मिहानमिहान : हा नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीचा प्रकल्प आहे. नागपूरच्या भारतातील मध्यवर्ती स्थानाचा उपयोग करून, रस्ते व रेल्वे वाहतुकीचे जाळे जोडून सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोठ्या मालवाहतूक व प्रवासी वाहतूक केंद्रामध्ये रूपांतर करणे, हे मिहान प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. भारतात चालू असलेल्या आर्थिक विकास प्रकल्पांमधील सध्याच्या प्रकल्पांमध्ये हा सर्वाधिक गुंतवणुकीचा प्रकल्प आहे. मिहान प्रकल्प आग्नेय आशियाकडील व पश्चिम आशियाकडील मालवाहतुकीसाठी महत्त्वाचा थांबा बनणार आहे.

कामटी ड्रॅगन हाउसकामटी ड्रॅगन हाउस
कामटी ड्रॅगन हाउस :
ड्रॅगन पॅलेस नावाचे बुद्धिस्ट सेंटर सुलेखा कुंभारे यांच्या प्रयत्नांतून कांती येथे उभे राहिले आहे. जपानच्या ओगावा सोसायटीमार्फत १९९९मध्ये याची उभारणी झाली. भारत-जपान मैत्रीचे हे प्रतीक आहे. येथील भगवान बुद्धाचे चंदनशिल्प अतिशय देखणे आहे.

बुटीबोरी : ही नागपूरजवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे.

कोराडी औष्णिक विद्युत केंद्रकोराडी औष्णिक विद्युत केंद्र
कोराडी औष्णिक विद्युत केंद्र :
हे केंद्र २४०० मेगावॉट क्षमतेचे असून, ते १९७४मध्ये सुरू करण्यात आले.

खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र : कन्हान व कोलार या नद्या या गावाच्या आजूबाजूने वाहतात. पुढे कामठीकडे जाताना बीना या गावाजवळ या नद्यांचा संगम होतो. फार पूर्वी येथे ३० मेगावॉट क्षमतेचे इंग्रजकालीन औष्णिक विद्युत केंद्र होते. या गावाजवळच वलनी येथे कोळशाच्या खाणी आहेत. नागपूर शहरापासून हे केंद्र सुमारे १४ किलोमीटरवर आहे.

खिंडसीखिंडसी
खिंडसी :
रामटेक तालुक्यात असलेल्या खिंडसी तलावाच्या सभोवताली घनदाट जंगल आहे. नागपूरपासून ५३ किलोमीटर आणि रामटेकपासून अवघ्या साडेतीन किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे स्थळ पर्यटकांच्या आवडीचे पर्यटनस्थळ बनले आहे. येथे येणारे पर्यटक मोटरबोट्स, पेडल बोट्स, रोइंग बोट्स, वॉटर स्कूटर्स आदींच्या माध्यमातून जलतरणाचा आनंद घेऊ शकतात. लहान मुलांसाठी येथे साहसी खेळांचे पार्कही आहे. मोठ्यांसाठी जंगलात ट्रेकिंगचीही सुविधा आहे.

पेंच अभयारण्यपेंच अभयारण्य
पेंच अभयारण्य :
हे मध्य प्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यांच्या सीमाभागात वसलेले राष्ट्रीय उद्यान आहे. २७५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या या उद्यानाचा १० टक्के भाग महाराष्ट्राच्या हद्दीत येतो. उर्वरित विस्तार मध्य प्रदेशात आहे. हे अभयारण्य खूप सुंदर आहे. पेंच हे पक्षी अभयारण्य आहे. १९९९मध्ये या प्रकल्पाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. या जंगलात सस्तन प्राण्यांच्या ३३ प्रजाती, ३० प्रकारचे सरपटणारे प्राणी, १६४ प्रजातींचे पक्षी, ५० जातींचे मासे व १० प्रकारचे उभयचर प्राणी वास्तव्यास आहेत. पेंच नावाच्या नदीमुळे या भागाला पेंच नाव पडले. वाघ, बिबटे, अस्वल, सांबर, चितळ, चारसिंगा, नीलगाय, माकडे इत्यादी प्राणी या अभयारण्यात आढळतात. या जंगलात सागाची भरपूर झाडे आहेत. ऑक्टोबर ते जून या कालावधीतच अभयारण्यात खुला प्रवेश असतो. जुलै ते सप्टेंबर या अतिपावसाच्या काळात येथे प्रवेश दिला जात नाही. हे अभयारण्य नागपूरपासून ८६ किलोमीटर अंतरावर आहे.

उमरेड कोळसा खाण : 
आठ दशलक्ष टन वार्षिक क्षमता असलेली ही कोळशाची खाण आहे. या भागात हलबा कोष्टी समाजाची वस्ती असून, ते विणकर आहेत. कोळसा खाणीमुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आहे.

उमरेड-करहांडल अभयारण्यउमरेड-करहांडल अभयारण्य
उमरेड-करहांडल अभयारण्य :
हे अभयारण्य १८० चौरस किलोमीटर क्षेत्रावर विस्तारले आहे. आशियातील सगळ्यात मोठ्या असलेल्या जय या वाघाचे वास्तव्य येथे होते. भंडारा जिल्ह्यातील पवनी व नागपूरमधील भिवा, कुही व उमरेड परिसरात हे अभयारण्य विस्तारले आहे. जंगली कुत्री, बिबटे, शेकरू व अनेक प्रकारची हरणे येथे पाहण्यास मिळतात. नुकतीच (मार्च २०१८) ताडोबा वनक्षेत्रातील एक वाघीण प्रियकराच्या शोधात येथे आली आहे.

खेकरानालाखेकरानाला
खेकरानाला :
येथे एक बंधारा असून, हे सहलीचे ठिकाण आहे. हे सौंदर्याने ओतप्रोत असलेले धरणाचे ठिकाण आहे. खाप्राजवळील छिंदवाडा मार्गावर ते आहे. साहसी कृत्य करणाऱ्यांसाठी, विशेषत: पर्वतारोहण करणाऱ्यांसाठी हे ठिकाण अतिशय आदर्श असेच आहे. खेकरानाला धरणाच्या सभोवताली असलेला अतिशय शांत आणि निश्चल असा तलाव, घनदाट जंगल, हिरवागार निसर्ग, आरोग्यासाठी पोषक वातावरण हे येथील मुख्य आकर्षण. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी येथे लॉजिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे ठिकाण नागपूरपासून ५५ किलोमीटर अंतरावर आहे.

मरकड : हे २४ मंदिरांचा समूह असलेले ठिकाण असून, खजुराहो शैलीची छाप यावर पडली आहे. संत मार्कंडेय यांचे नावावरूनच या ठिकाणाचे नाव पडले.

रामटेक : रामटेक किल्ल्यावरून गावाचे विहंगम दृश्य दिसते. येथे वर आल्यावर लालतोंडी माकडे आपल्याजवळ येतात व आपल्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न करतात. नागपूर-जबलपूर मार्गावर थोडे आतील बाजूस हे ठिकाण आहे. आख्यायिकेप्रमाणे, हिरण्यकशिपूचा नाश केल्यावर नरसिंहाने आपली गदा येथे फेकली व त्यायोगे देवळाजवळ हे तळे निर्माण झाले.

राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर असून, त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे. टेकाडाची दक्षिण व पश्चिम बाजू नैसर्गिकरीत्याच संरक्षित आहे. उत्तरेकडे दुहेरी भिंत बांधून तटबंदी करण्यात आली आहे. बाहेरील भिंत आधीच्या गवळी राजांनी बांधली असावी, तर इतर काम नंतरचे आहे. नागपूरचे राजे रघूजी (पहिले) यांनी देवळाच्या बाहेरच्या मजबूत तटबंदीचे काम केले. मुख्य दरवाजा वराह दरवाजा या नावाने ओळखला जातो. कारण तेथून आत गेल्यावर लगेच वराह या विष्णूच्या अवताराची मोठी मूर्ती आहे. त्यापलीकडे आणखी तीन दरवाजे आहेत. सिंधपूर दरवाजा हा या रेषेतील दुसरा दरवाजा असून, त्यातून आतील तटबंदीत प्रवेश मिळतो, तर भैरव दरवाजातून आतल्या शेवटच्या तटबंदीत प्रवेश मिळतो.

आत राजा दशरथ व वसिष्ठ मुनी यांची देवळे आहेत. लक्ष्मणाचे मंदिर समोरच आहे व त्यामागे राम व सीतेचे मोठे देऊळ उभे दिसते. मुख्य वास्तूच्या सभोवताली इतर अनेक देवतांची मंदिरे आहेत.

नागपूरची खास वास्तुशैली रामटेकलाही दिसून येते. उत्तर व पूर्वेकडील भिंती, शिखरे, उपशिखरे, कलश व खांबांच्या बांधणीचे बारकावे या वास्तूत दृग्गोचर होतात. छोट्या छत्र्या, उलट्या कमलकळीची नक्षी, जाळीदार खिडक्या, सज्जे व उथळ देवळ्या यांमुळे देवळावर उजेड व सावल्यांचा नयनमनोहर खेळ दिसतो.

शिखरे भूमिज प्रकारची आहेत. गोकुळ दरवाजा व लक्ष्मण मंदिरावरील कोरीव काम खास उल्लेखनीय आहे. देऊळ पश्चिमेकडच्या सर्वांत उंच भागात असून, अंबाला तलावाच्या पश्चिम टोकाकडून टेकडीवर चढण्यास पायऱ्या आहेत. वर पोहोचल्यावर दगडी भिंत असलेले एक जुने तळे आहे. जवळच नरसिंहाची मोठी मूर्ती असलेले देऊळही आहे. राम मंदिर परिसरातच एक विशाल नंदी आहे व श्रीगणेशाचे पुरातन मंदिर आहे. नागपूरकर भोसल्यांच्या खास शस्त्रांचा साठा या मंदिरात आहे. कार्तिक महिन्यात येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेला या मंदिरात यात्रा भरते. त्या रात्री १२ वाजता उंच कळसावर दिवे लावले जातात.

येथे अगस्त्य ऋषींनी तपश्चर्या केली असेही म्हणतात. येथे चक्रधरस्वामी यांचे प्राचीन मंदिर आहे. १२व्या शतकात परिभ्रमण करत असताना भरुच (गुजरात) येथून स्वामी रामटेकला आले होते, असा उल्लेख मराठीतील आद्यग्रंथ असलेल्या लीळाचरित्रामध्ये आला आहे. येथे स्वामींचे १० महिने वास्तव्य होते. हे ठिकाण नागपूरपासून ५४ किलोमीटर अंतरावर आहे.

मनसर : नागपूर-जबलपूर मार्गावर रामटेकजवळील मनसर येथे पुरातन बौद्ध संस्कृती वसली असल्याचा शोध नुकताच लागला आहे. त्या परिसरात उत्खनन चालू आहे. मनसर येथे महाविहार होता, असे उत्खननात आढळून आले आहे. ही आयुर्वेदाचार्य नागार्जुन यांची कर्मभूमी असल्याचे मानतात. इ. स. २५०मध्ये रामटेकचा परिसर मौर्य शासकांच्या आधिपत्याखाली होता. सातवाहनांच्या काळात प्रवरपूर (सध्याचे मनसर) हे एक महत्त्वाचे ठिकाण होते. इ. स. ३५०मध्ये त्यांचा पाडाव करून वाकाटकांनी सत्ता काबीज केली. त्याच काळात कालिदास होऊन गेले, असे मानले जाते. हे ठिकाण नागपूरच्या ईशान्येस सुमारे ५४ किलोमीटरवर आहे.

तोतलाडोह धरण : रामटेकजवळील पेंच नदीवर तोतलाडोह नावाचे धरण आहे. हा परिसर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातच्या जवळ येतो. हे धरण पेंच नदीच्या जलविद्युत प्रकल्पाचा एक भाग आहे. येथील परिसर अतिशय मनमोहक आहे. हे धरण नागपूरपासून ८० किलोमीटरवर आहे.

नगरधन : हा भुईकोट किल्ला आहे. वाकाटककालीन या किल्ल्यास जुना इतिहास आहे. रामटेकपासून वायव्येला सुमारे सात किलोमीटरवर असलेल्या या किल्ल्याची जागा इसवी सनाच्या चौथ्या शतकात नंदीवर्धन म्हणून ओळखली जात होती. नगरधन हा त्याचा अपभ्रंश आहे. नगरधन गावाच्या पश्चिमेस या किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या वर मध्यभागी गणेशाचे शिल्प आहे. उमलती कमलपुष्पे हे यादवांचे चिन्ह प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना आहे. डाव्या बाजूला द्वारपालाचे एक शिल्प आहे. येथे पायऱ्यांची एक विहीर असून, छोटे अभयारण्याही आहे.

नागपूरमध्ये राहण्यासाठी सर्व श्रेणीतील उत्तम प्रकारची हॉटेल्स आहेत. रेल्वे, विमान, रस्तेमार्ग अशा सर्व मार्गांनी हे ठिकाण भारताशी जोडले गेले आहे. थंडीत कडाक्याची थंडी, तर उन्हाळ्यात कडक उन्हाळा असे येथील वातावरण असते. साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा येथे जाण्यासाठी उत्तम काळ असतो.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)


(‘ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि  काही आसपासच्या ठिकाणांची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5215861370476415045





उमरखेड, जि. यवतमाळ - विदर्भातील असं एक ठिकाण जिथे आहेत 10 बारव/पायविहीर

1) आईनाथ महाराज संस्थान बारव
2) पोलीस चौकी जवळील बारव
3) विठ्ठल-रुख्मिणी मंदिर बारव
4) दर्ग्या जवळील बारव (येथे आधी L आकाराची बारव होती, आता तिच्या पायर्या बुजून साधी वर्तुळाकार विहीर आहे.)
5) अंबवन येथील बारव
6) बालकदास मंदिर बारव (फोटो उपलब्ध नाही)
7) राम मंदिर बारव
 अंबवन रोडवरील बारव
9) खडकपुरा वार्ड बारव (फोटो उपलब्ध नाही)
10) लोकेशन उपलब्ध नाही.








राजमाता गोंड़रानी हिराई यांच्या कार्यकाळात अनेक महत्वाची कार्ये केलेली आहेत, मोगल काळ असताना सुद्धा आपल्या राज्यात गोहत्या बंद करणारी एकमेव होती. अनेक मंदिरे, विहिरी, जलाशय निर्माणकार्य, पाणी पुरवठा व्यवस्था आदि उल्लेखनीय कार्य केले आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत पती गोंडराजे बिरशाह यांच्या मृत्युनंतर समर्थपणे या गोंडवान चा राजकारभार सांभाळला...
राजमाता गोंडरानी हिराई यांची जयंती निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. या कर्तुत्ववान महिला राज्यकर्ति म्हणून चंद्रपूर चा इतिहास पुर्ण होऊ शकत नाही, गोंडरानी हिराई हिचे स्मारक या शहरात व्ह्ययला पाहिजे...
रानी हिराई यांच्या कार्यास मनःपूर्वक अभिवादन..!

दीक्षा भूमी, नागपूर
जगभरातील बौद्ध बांधवांचे हे अतिशय पवित्र आणि श्रद्धेचे ठिकाण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे 3 लाख 80 हजार अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी बोद्ध धम्म स्वीकारला होता. त्यांनी स्वीकारलेली ही दीक्षा आजही देशातील असंख्य लोकांसाठी प्रेरणादायी आहे.
भारतातील भीमबांधवांसाठी दीक्षाभूमी हे श्रद्धास्थळच आहे. प्रत्येक वर्षी अशोक विजया दशमी आणि 14 ऑक्टोबर रोजी (बाबासाहेबांनी दीक्षा स्वीकारली तो दिवस) येथे लाखो बौद्ध बांधव भेट देत असतात. या जागेवर भव्य स्तूप उभारण्यात आलेला आहे.
बाबासाहेबांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या दोन जागांपैकी एके दीक्षाभूमी असून, दुसरी म्हणजे, मुंबईतील चैत्य भूमी आहे. अतिशय सुंदर असे वास्तूशिल्प आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे संपूर्ण जगात दीक्षाभूमी प्रसिद्ध आहे. भारतातील पर्यटकाचेही हे मुख्य केंद्र आहे.




दुर्ग किल्ला, दृग, यवतमाळ
दुर्ग किल्ला हा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात दृग येथे घनदाट जंगलात वसलेला आहे. दुर्ग किल्ला स्थानिक भाषेत दुरुग किल्ला म्हणुन ओळखला जातो. दुर्ग याच्या नावातच दुर्ग आहे. छोटेखानी डोगरात वसलेला हा वनदुर्ग. एकेकाळी घनदाट जंगल असेल हे आजही जाणवते. दुर्लक्षित ठिकाण आज आपली निशाणी पुसून टाकत आहे. कळंब पासून ७ कि.मी वर दुर्ग गड आहे. गडावर भवानी रेणुका मातेचे पुरातन मंदीर आहे. पायथ्याशी हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिरापासून गडाच्या चढाई ला सुरुवात होते. गडावर जाण्यास दगडी बांधकाम असलेल्या पायर्या आहेत. पायर्यांच्या दोन्ही बाजूस रचीव दगडी तटबंदी आहे. या गडावर गोंड राजाचे वास्तव्य होते. दुर्ग गावा पासुन २ किमी अंतरावर हा किल्ला आहे.
(Photo - Vijay Menon, Bhagwan Chile)

















रामतीर्थ गुफा, कोठारी, चंद्रपूर
वर्धा नदीच्या काठावर स्वतःचे शेवटचे अस्तित्व टिकवून असलेली पुरातन " रामतीर्थ " गुफा. राम वनवासात असताना काही काळ येथे वास्तव्यास होते अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्यामुळेच या ठिकाणाला रामतीर्थ म्हणून ओळखले जाते.
सातवाहन काळातील काही अवशेष दुर्मिळ स्थितीत आढळतात. वर्धा नदीच्या प्रवाहात ऐतिहासिक पुरातन गुहेचे काही अवशेष वाहून गेले. एक पाषाण नदी पात्रात अस्तित्वात आहे. रामतीर्थ नामक गुफा ही कोठारी पासून चार किमी अंतरावर, काटवली - कुडेसावली च्या मध्यंतरी खामतुरली रीठ या भागात आहे.
पुरातत्व विभागाने या क्षेत्राचा अभ्यास करून दखल घेतल्यास हा पुरातन वारसा जगापुढे येईल.
(फोटो आणि माहिती - राज जुनघरे, संतोष सुर)




पुरातन शिव मंदिर, गोठणगाव, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली




काळा मारोती मंदिर, शिंगणापूर, अमरावती 

वीर हनुमान मंदिर, अड्याळ, भंडारा
अड्याळ हे गाव भंडारापासून सुमारे 27 कि.मी. अंतरावर, पौनी रोडवर आहे. गावात वीर हनुमानाची 9 फूट उंच मूर्ती आहे. हनुमानाने एका हातात डोंगर धरला आहे आणि त्याच्या पाया खाली दानव जंबुमलीला पायदळी तुडवताना दिसत आहे. या मंदिराच्या असेंब्ली हॉलमध्ये भगवान महादेवाचे एक छोटेसे मंदिर आहे. असे म्हटले जाते की प्राचीन काळापासून हनुमान आणि महादेव लिंग यांचे दैवत इथे आहेत आणि सुमारे १८९५ च्या सुमारास अड्याल येथील श्री साधूजी फुटाणे यांनी हे मंदिर बनवले होते. २००२ साली या दोन्ही मंदिरांचे नूतनीकरण गावकऱ्यांनी केले. हे मंदिर भव्य, सुंदर कलाकृती आहे. राम नवमीला प्रतिमेची भव्य रथयात्रा काढली जाते. ही यात्रा घोडा यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे आणि हनुमान जयंतीपर्यंत असते. वाल्मिकी रामायण, ससुन्दर कांडामध्ये रावण हनुमानाचा कब्जा करण्यासाठी प्रहस्ताचा मुलगा जंबुमालीला पाठवितो. जंबुमाली हनुमानावर त्याच्या असंख्य बाणांनी हल्ला करतो. हनुमान जंबुमालीच्या दिशेने एक मोठा खडक फेकतो, परंतु तो त्याला ठार करण्यात अपयशी ठरतो. मग हनुमानाने जांभूमलीकडे एक मोठे सालआचे झाड फेकून त्याचा वध करतो. हे प्राचीन दैवत वाकाटक काळापासून किंवा त्यापूर्वीचे सुद्धा असू शकते. असे म्हणतात की देवता स्वयंभू आणि जागृत आहे. जवळच खेडेगावात, चकारा येथे एक सुंदर प्राचीन मंदिर आहे.
माहिती - श्री चंद्रकांत भुते



वारी हनुमान मंदिर, वारी भैरवगड, अकोला
वारी हनुमान मंदिर हे बुलढाणा, अकोला व अमरावती या तीन जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आणि समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन आणि प्राणप्रतिष्ठा केलेल्या अकरा हनुमान मंदिर पैकी एक आहे.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यामध्ये येणाऱ्या वाण धरणाच्या कुशीत वसलेले हे देवस्थान, पर्यटन स्थळ म्हणुन प्रसिद्ध आहे. वाण नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिरात हनुमानाची भव्य मुर्ती आहे. जवळच हनुमान सागर नावाचे प्रसिद्ध वाण धरण आहे. हिरव्यागार परिसरात वाण नदीचे खळखळते पाणी मनाला शांती देऊन जाते.येथे नेहमीच भाविक व पर्यटकांची गर्दी असते.
वाण नदीच्या पात्रात एक खोल डोह आहे,या डोहाला "मामा भाच्याचा डोह" म्हणून ओळखले जाते. खुप वर्ष पूर्वी या डोहात मामा आणि भाचा पोहायला गेले असता त्यांचा बुडुन मृत्यु झाला,त्यामुळे या डोहाला असे नाव पडले आहे असे सांगतात. या डोहात 100 हुन अधिक लोकांनी प्राण गमवले आहे त्यामुळे यात पोचण्यास मनाई आहे.
प्रसिद्ध हनुमान मंदिर, अखंड गोमुख , मामा भाच्याचा डोह , वाण धारण अश्या या सातपुड्यात वसलेल्या ठिकाणाला अवश्य भेट द्या.


मोठा मारोती किंवा झोपलेला मारोती, लोणार, बुलढाणा (चुंबकीय हनुमान)
उल्कापातामुळे लोणार येथे निर्माण झालेले विवर आणि त्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर जगप्रसिद्ध आहे. पण त्याच सोबत लोणार येथे बरेच कमी प्रसिद्ध पण वैशिष्ट्यपूर्ण स्थळे आहेत. झोपलेला मारोती हा जमिनीवर आडवा पडलेला दिसतो म्हणून त्याला झोपलेला असे म्हणतात. मारोतीची मूर्ती साधारणतः वीर किंवा दास मारोती ह्या रुपात असते, त्यांत झोपलेले आडवा असलेला हा मारुती विशेषच.
अश्या प्रकारचा झोपलेला हनुमान खुलताबाद ला आहे. लोणार ला आकाशातल्या उल्का पडून जेव्हा विवर निर्माण झाले त्याचवेळी त्याचा एक तुकडा बाजूला पडला. गावबाहेरचे अंबर तलाव त्यातूनच निर्माण झाले आहे. त्याच अंबर तलावा नजीक मूळ उल्केच्या पाषाणातून हि मारुतीची मूर्ती केलेली असावी. ह्या मूर्तीत चुंबकीय शक्ती आहे. मूळ मूर्ती किती जुनी असावी ह्याबद्दल विविध श्रद्धा आहेत. आज आपण बघतो ते मंदिर श्री कानिटकर ह्यांच्या वाहिवाटीचे आहे आणि ते भाविकांना खुले असते. ह्या मूर्तीवर आधी शेंदुराचा जाड असा थर होता त्यमुळे मूर्तीचे मूळ रूप दिसत नव्हते. 2013 साली विधी करून शास्त्रीय पद्धतीने शेंदूर हटवला. आज आपण मारुतीची सुंदर मूर्ती बघू शकतो ते ह्यामुळेच. इथे गदा युक्त हनुमान आणि त्याच्या पायाखाली शनी किंवा पनवती म्हणतात ती दिसते. मारुती भक्ती मूळे शनीच्या साडे सातीची बाधा होत नाही ह्या मान्यतेमुळे ह्याला शनी म्हटले असले तरी मारुतीच्या पायाखालील हा माणूस रावणाचा किशोरवयीन मुलगा अक्षय कुमार आहे ज्याला मारुतीने मारले होते.
(माहिती - सचिन दिक्षीत)


हनुमान जयंती च्या हार्दिक शुभेच्छा !!
105 फुट उंचीची हनुमान मुर्ती, नांदुरा, जिल्हा- बुलढाणा


पुरातन बारव, गोंदिया


विदर्भातील अकोला जिल्ह्यातील माना ता. मुर्तिजापूर येथे उत्खननात तिन दिगंबर जैन तिर्थकरांच्या मुर्त्या मिळाल्यात. यात १००८ श्री संभवनाथ भगवान, १००८ श्री नेमिनाथ भगवान आणि
१००८ श्री महावीर भगवान यांच्या मुर्ती आहेत. तिन्ही प्रतिमा श्री. धर्मेंद्र आनंदराव अळसपुरकर जैन यांच्या घरी विराजमान केलेल्या आहेत.
(फोटो - सागर सव्वालाखे जैन)


 प्रभु श्रीराम मंदिर, रामटेक, नागपूर
प्रभु श्री राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. नागपूरपासून ५५ कि.मी. वर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे. येथून आजूबाजूच्या परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. राम मंदिर परिसरातच एक विशाल नंदी आहे व श्रीगणेशाचे पुरातन मंदिर आहे. येथे श्रीरामाचे सेनागण म्हणजे वानरांचा मुक्त संचार आहे. नागपूरकर भोसल्यांच्या खास शस्त्रांचा साठा या मंदिरात आहे.या मंदिरात कार्तिक महिन्यात येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेस यात्रा भरते. त्या रात्री १२ वाजता उंच कळसावर त्रिपुर प्रज्वलित केला जातो.
इ.स.२५० मध्ये रामटेकचा परिसर मौर्य शासकांच्या अधिपत्याखाली होता. सातवाहनांच्या कालात प्रवरपूर (सध्याचे मनसर) हे एक महत्त्वाचे ठिकाण होते. इ.स. ३५० मध्ये त्यांचा पडाव करून वाकाटकांनी सत्ता काबीज केली. त्याच काळात कालिदास झालेत असा समज आहे. संस्कृत काव्यातील एक अभिजात कलाकृती म्हणजे 'मेघदूत'. कविकुलगुरू कालिदासाने हे काव्य याच रामटेक परिसरात लिहिले आहे. सन १९७०-१९७१ मध्ये, रामटेक गडमंदिर परिसरात, महाराष्ट्र शासनाने 'कालिदास स्मारकाची' निर्मिती केली. आज या कालिदासांच्या नावाने येथे संस्कृत विद्यापीठ सुरू आहे. या ठिकाणी दरवर्षी 'कालिदास महोत्सव साजरा होत असतो.
जवळच, तोतलाडोह हे धरण आहे. रामटेकच्या दक्षिणेला असलेला वाकाटककालीन नगरधनचा किल्ला, त्यांची राजधानी होता.



 स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना असलेली सातमजली पायविहीर, महिमापूर, अमरावती
आश्चर्याने तोंडात बोटे जावीत अशी स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेली, औरस-चौरस भव्य ऐतिहासिक पायविहीर दर्यापूर तालुक्यातील महिमापूर या इवल्याशा गावात १४ व्या शतकापासून आजही दिमाखात उभी आहे. तथापि, महाराष्ट्र राज्याची संपत्ती आणि अमरावती जिल्ह्याचे वैभव असलेल्या या विहिरीकडे शासनाने सातत्याने केलेले दुर्लक्षही विहिरीइतकेच आश्चर्यकारक आहे.
अशी आहे रचना:
संपूर्ण बांधकाम दगडाचे. आकार चौकोनी. खोली ८० फूट. रुंदी ४० मीटर बाय २५ मीटर. विहिरीत उतरण्यासाठी ८५ प्रशस्त पायऱ्या. पायऱ्यांच्या मार्गावर किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमान कमानी. प्रवेशद्वारावर दगडात कोरलेली दोन लक्षवेधी पुष्पे. पायऱ्यांमध्ये क्षणिक विसाव्यासाठी टप्पे. आत शिरल्यावर विहिरीच्या चारही बाजूंनी फिरता येईल, बसता येईल अशी व्यवस्था. बांधकाम संपल्यावर तळाशी चहुबाजूंनी ओट्यासमान रचना. आतमध्ये दोन कोरीव ध्यानस्थ मूर्ती.
विहिरीचा इतिहास :
१४४६ ते १५९० या १४४ वर्षांच्या कालखंडात बहामणी साम्राज्याच्या पाच पातशाही होत्या. अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदीलशाही, हैदराबादची कुतूबशाही, बिदरची बरीदशाही आणि अचलपूरची इमादशाही, अशा त्या पाच पातशाही होत. अचलपूरच्या इमादशाहीचे संस्थापक फते इमाद उल मुल्क हे होते. फते इमाद उल मुल्क यांनी आरंभीच्या काळात भरमसाठ बांधकामे केलीत. ठळक बांधकामात चिखलदऱ्यातील दोन मशिदी, गाविलगड किल्ल्याचा परकोट, परतवाड्यातील हौद कटोरा ही उदाहरणे देता येतील. महिमापूरची विहीरही त्याच काळातील, असल्याचा निष्कर्ष इतिहास संशोधक अनिरुद्ध पाटील यांनी ठामपणे व्यक्त केला.
या रचना कालौघात नष्ट :
जमिनीपासून तीन-चार फूट उंचीपासून विहिरीच्या तळापर्यंतचे बांधकाम आजघडीला बघता येत असले तरी त्याशिवाय कालौघात नष्ट झालेली इतर अनेक वैशिष्ट्ये या विहिरीत होती, हे अभ्यासकांच्या शोधमोहिमेतून पुढे आले. पूर्वी या विहिरीवर दोन मजल्यांचे बांधकाम होते. पाहणाऱ्याला ही विहीर असल्याचे लक्षातच येणार नाही, अशी त्या बांधकामाची रचना होती. ते प्रमुख वैशिष्ट्यही होते. वरील दोन मजले पडल्यामुळे आता विहिरीच्या आतील बांधकाम वरून बघता येते. या विहिरीच्या आत आजदेखील कपाऱ्यांसमान भासणारी गूढ रचना आहे. कपारींचे गूढ काय, याबाबत जाणकारांमध्ये खल होत राहतो.
(माहिती - Amar Bhagwat)
(फोटो - Devashish Shah)


: झाडीपट्टी रंगभूमी
पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या चारही जिल्ह्यांचा संपूर्ण भाग घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. त्यामुळे या भागाला झाडीपट्टी असं संबोधण्यात येतं. या झाडीपट्टी भागातील रहिवाशांचं नाटकांवर अतोनात प्रेम. तेथील मूळ व्यवसाय हा शेतीचा. तेव्हा शेतीचा हंगाम संपला की तिथे नाटकांचा मौसम सुरू होतो. या काळात येथील आबालवृद्धांच्या नाट्यप्रेमाला उधाण येतं. झाडीपट्टी भागातील ही नाट्यचळवळ ‘झाडीपट्टी रंगभूमी’ या नावाने प्रसिद्ध आहे. या रंगभूमीला १२५ ते १५० वर्षांची परंपरा आहे हे विशेष.
भारतीय संस्कृतित जेवढं महत्त्व सणांना आहे तेवढंच महत्त्व झाडीपट्टीत नाटकांना आहे. पूर्वीपासूनच शेतीचा हंगाम संपला की दिवसा बैलांच्या शर्यती (ज्याला स्थानिक लोक शंकरपाट म्हणतात) आणि रात्री नाटक असा कार्यक्रम पुढील पाच महिने म्हणजेच ऑक्टोबर ते मार्चपर्यंत चालतो. या काळात दिवसभराची कामं आटपली की संध्याकाळी गावकरी पारांवर मोकळ्या मैदानात जमून यंदा कुठलं नाटक करायचं, कोणी कुठली भूमिका करायची, बॅकस्टेजचं काम कुणी सांभाळायचं हे आखतात. नाटकाशी संबंधित कुठलंही काम या लोकांसाठी गौण नसतं, हे विशेष. प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग हा रात्रभर चालतो आणि नाटक कुठलंही असलं तरी त्यात गाणी आणि लावण्या असायलाच पाहिजेत हा इथला अलिखित नियम.
गावाबाहेरील मोकळी जागा पाहून तिथे प्रेक्षकांना बसण्यासाठी एक मोठा आयताकृती खड्डा खणून त्यातून निघालेली माती खड्ड्यासमोर रचून २० ते ३० फूट उंच असा रंगमंच केला जातो. प्रयोगाच्यावेळी त्या जागेवर लाकडी फळ्यांच्या साहाय्याने तात्पुरता रंगमंच उभारला जातो. अशा ओपन थिएटरमध्ये रंगणार्या नाट्यप्रयोगाचा आस्वाद एकावेळी तीन ते चार हजार प्रेक्षक घेऊ शकतात.
अशा या आगळ्यावेगळ्या रंगभूमीला नाट्यशास्त्राचे कुठलेच नियम लागू नाहीत. आजूबाजूच्या गावातील नटमंडळी एकत्र येऊन नाट्यप्रयोग करत असल्याने सलग तालमींना वेळ नसतो. त्यामुळे संवाद पाठ करण्याऐवजी प्रॉम्पटरकडून संवाद ऐकून अभिनय सादर करण्यावर कलाकारांचा भर असतो. त्यामुळे कलाकारांएवढाच प्रॉम्पटरचा रोलही महत्त्वाचा. प्रयोगाच्यावेळी हार्मोनियम वा ऑर्गन वाजवून प्रॉम्पटरचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाते. साऊंड सिस्टीमची रचनाही आगळीवेगळी असते. प्रयोगाच्यावेळी रंगमंचाच्या मधोमध एक पॉवरफूल माईक लावला जातो आणि पात्र प्रत्येकवेळी त्याच्यासमोर येऊन संवाद म्हणतात.
या रंगभूमीचं आणखी एक महत्त्वाचं अंग म्हणजे पाच महिन्याच्या काळात नाट्यप्रयोगांसाठी होणारी आर्थिक उलाढाल. आर्थिक निकषांवर पाहिल्यास झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटकं मुंबई पुण्याच्या व्यावसायिक नाटकांच्या तोडीसतोड आहेत. या रंगभूमीवरील नाटकांच्या एका सर्वेक्षणाच्या निकालानुसार झाडीपट्टी रंगभूमी हा सांस्कृतिक व्यवसाय असून या व्यवसायात १० हजार कलावंत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कार्यरत आहेत आणि या व्यवसायात पाच महिन्यांच्या कालावधित साधारणतः २५ करोड रुपयांची उलाढाल होते. यावरून झाडीपट्टी रंगभूमी आर्थिकदृष्ट्या किती समृद्ध आहे याची कल्पना येते. या रंगभूमीच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. झाडीपट्टीच्या या चार ते पाच महिन्यांच्या सिझनवर कलावंत, मंडपवाले, बॅकस्टेज कलाकार, तबलजी, पेटीवाले, प्रकाशयोजनाकार, रंगभूषाकार, वेशभूषाकार, जाहिरातदार ते थिएटरबाहेरील चहाची टपरी, दुकानदार असे अनेकजण आपला गुजारा करतात. झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकांच्या प्रयोगाला ५० हजार ते दीड लाख रुपयांची विक्रमी तिकीट विक्री होते.
गेल्या १२५ ते १५० वर्षांच्या कालावधित झाडीपट्टी रंगभूमीत अमूलाग्र बदल झालाय. पूर्वीच्या संगीत नाटकांची जागा गद्य नाटकांनी घेतलीय. या रंगभूमीच्या प्रचंड आर्थिक उलाढालीमुळे मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील व्यावसायिक, कलाकारांनीही इथे प्रवेश केलाय. किंबहुना आपल्या कंपनीची पत वाढावी म्हणून शहरातील व्यावसायिक कलाकारांना वाट्टेल तेवढे पैसे मोजून आपल्या कंपनीत ओढण्याची चढाओढ इथे लागलली असते. त्यामुळे व्यावसायिक नाट्य कलाकारही पाच महिने इथे तळ ठोकून रहातात. पण यामुळे स्थानिक कला आणि कलाकारांची उपेक्षा होऊ लागलीय.
असं असलं तरीही नॉनस्टॉप १०० ते १५० प्रयोग करणारे कलाकार, प्रॉम्पटरच्या मदतीने हजारो प्रेक्षकांसमोर बेमालूम अभिनय करणारी नटमंडळी आणि गावागावातून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांच्या कलेला उत्स्फूर्त दाद देणारे नाट्यवेडे प्रेक्षक हीच झाडीपट्टी रंगभूमीची खरी ओळख आहे!


झाडीपट्टी मध्ये दंडार हे एक लोकनाट्य प्रसिद्ध आहे.. लेख पाहिजे असल्यास संपर्क करा 9307126713



कमळेश्वर मंदिर, लोहारा, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा येथील छोट्याशा गावात पुरातन महादेव मंदिर अस्तित्वात आहे, हे मंदिर जवळपास 1100 वर्षे जुने आहे.
अमरावती रोडवर यवतमाळ पासून अवघ्या 5कि.मी. अंतरावर लोहारा हे गांव आहे. अमरावतीला जातांना अगदी रस्त्यावरून येथील महादेवाचे हेमाडपंथी मंदिर दिसते. हे मंदिर यादवकालीन असून यादवांचे प्रधान हेमाद्री यांनी त्याची बांधणी केल्याचे मंदिराच्या धाटणीवरून लक्षात येते. हे मंदिर म्हणजे शिल्पकलेचा उकृष्ट नमुना असल्याचे दिसून येते. ह्या मंदिराचा परिसर अत्यंत प्रसन्न व शांत आहे. अशा या मंदिरातील महादेवाची उंच पिंड बघायला मिळते. महादेवाच्या पिंडीसमोरील श्री गणेशाचे विलोभनीय रूप आपणास पाहावयास मिळते. महाशिवरात्रीला येथे भक्तांची गर्दी जमते. हे प्राचीन मंदिर निसर्गरम्य परिसरात असल्यामुळे भक्तांना एक अद्भुत शांती चा अनुभव देते.

"मातृतीर्थ" सिंदखेडराजा
राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा
बुलढाण्यातील सिंदखेडराजा हे छ्त्रपती श्री शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान. शिवपूर्व काळातील अनेक महत्वपूर्ण घडामोडींचे हे एक केंद्र होते. येथे जन्मलेल्या जिजाऊ साहेबांचा जीवनप्रवाह जसजसा प्रवाहित होत गेला तसतसा अवघा महाराष्ट्र नकळत एका भावनिक सुत्रात बांधला गेला. मातोश्री जिजाऊ साहेबांच्या अलौकीक कतृत्वामुळे तत्कालीन लोकजीवनात स्वधर्म, अस्मिता आणि स्वाभिमान जागृत झाला. यावाड्याचे बांधकाम इ.स.१५७६ च्या सुमारास झालेले आहे. जिजाऊ साहेबांचा जन्म म्हाळसाबाईंच्या पोटी हेमलंबी नामसंवत्सर शके १५११च्या पौष शुद्ध पौर्णिमेला, गुरूवारी पुष्य नक्षत्रावर (१२ जानेमाव्री १५९८ रोजी) झाला. शिवमाता जिजाऊ हि महाराष्ट्रातील जनतेला स्वातंत्र्य व सुराज्य यांची अखंडपणे स्फुर्ती देणारी राजमाता आहे. म्हणुन जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेडराजा हे तिर्थेक्षेत्र झाले आहे.

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१
जिजाऊ सृष्टी, मातृतीर्थ सिंदखेडराजा
प्रचि २२

प्रचि २३
DCIM\100GOPRO\GOPR9380.

प्रचि २४
DCIM\100GOPRO\GOPR9378.

प्रचि २५

प्रचि २६

https://www.maayboli.com/node/61353







खोपड़ी: महापाषाण कालीन सभ्यता का साक्षी

भूगोल में किसी एक प्रदेश या भूखंड में सभ्यताएं स्थाई नहीं रही। प्रकृति के चक्र के साथ नया बनता गया तो पुराना उजड़ता गया। जब आर्यावर्त की सभ्यता डंके सारे विश्व में बजते थे तब आज के शक्तिशाली राज्य अमेरिका नामो निशान भी नहीं था। महाभारत के युद्ध में सब कुछ गंवा देने के बाद आर्यावर्त में नई सभ्यता का उदय हो रहा था। तब इस काल में मिश्र की सभ्यता उत्कर्ष पर थी और हम पुन: विकास की ओर बढ रहे थे। इन सभ्यताओं के उदय एवं पतन के साक्ष्य धरती पर पाए जाते हैं, प्राचीन काल के मानव एवं उसकी सभ्यता को जानने के लिए पुरातत्व पर आश्रित होना पड़ता है। पुरातत्ववेत्ता तकनीकि प्रमाणों के आधार पर प्राचीन सभ्यता को सामने लाते हैं। 
माला चा गोटा
अध्ययन की दृष्टि से इतिहास को कई कालखंडों में विभाजित किया गया है। इसमें एक काल खंड मेगालिथिक पीरियड (महापाषाण काल) कहलाता है। भारतवर्ष में विशाल पाषाणखंडों से बनी कुछ समाधियाँ (मृतक स्मृतियाँ) प्राप्त होती हैं जिन्हें महापाषाणीय स्मारक के नाम से सम्बोधित करते हैं। जिस काल में इनका निर्माण हुआ उसे महापाषाण काल कहते हैं। महाराष्ट्र प्रदेश के विदर्भ अंचल में नागपुर से 45 किलोमीटर की दूरी पर कुही कस्बा है। इस क्षेत्र में महापाषाण कालीन अवशेष पाए जाते हैं। जिसके उत्खनन की जानकारी मुझे डेक्कन कॉलेज के डॉ कांति पवार सहायक प्राध्यापक डेक्कन कॉलेज द्वारा प्राप्त हुई थी। उनके सहयोगियों एवं विद्यार्थियों द्वारा इस उत्खनन कार्य को अंजाम दिया जा रहा था। इस महापाषाण कालीन स्थल पर उत्खनन हो रहे उत्खनन कार्य को मैं देखना चाहता था। 
माला चा गोटा
मुंबई से लौटते हुए उत्खनन निदेशक कांति पवार को फ़ोन करने के पश्चात ज्ञात हुआ कि वे कुही में ही हैं। आज गर्मी बहुत अधिक थी, लू भी चल रही थी। पारा सातवें आसमान पर था, परन्तु उत्खनन स्थल पर पहुंचने की ललक ने तपते हुए सूरज का अहसास नहीं होने दिया। नागपुर से उमरेड़ मार्ग पर पाँच गाँव से बाँए हाथ को कुही के लिए रास्ता जाता है। इस रास्ते पर पत्थर की खदाने भी दिखाई देती हैं। जिनमें अभी उत्खनन जारी है। प्रारंभ में तो रास्ता धूल घक्कड़ से भरा हुआ है परन्तु आगे बढने पर ग्रामीण वातावरण की झलक दिखाई देने लगती है। हम लगभग भोजन के समय ही कुही पहुंचे। डॉ कांति पवार भोजन के लिए प्रतीक्षा कर रहे थे। हमने साथ ही भोजन किया और साईड देखने चल पड़े।
महापाषाण कालीन स्मारक
कुही कस्बे से थोड़ी दूर पर "माला च गोटा" नामक महापाषाण कालीन स्थल है। देखने से प्रतीत होता है कभी यह घन घोर वन क्षेत्र रहा होगा। सड़क के बांई तरफ़ बड़े पत्थरों का गोला बना हुआ है। जिसका ब्यास लगभग 15 मीटर होगा। इसे मेगालिथिक सर्कल (महापाषाण कालीन वृत) कहते हैं। इस सर्कल में सफ़ेद पत्थरों का प्रयोग किया गया है। शायद आस पास कहीं इन पत्थरों की उपलब्धता हो। पत्थरों का आकार बड़ा होने से ज्ञात होता है कि इस स्थान पर दफ़्न किया गया व्यक्ति सामाजिक दृष्टि से उच्च स्थान एवं सम्मान का पात्र होगा। अन्य स्थानों पर मेगालिथिक सर्कल मिलते हैं पर बड़े आकार के पत्थर मेंरी दृष्टि में देखने में नहीं आए। अगर इन पत्थरों को ध्यान से देखें तो "स्टोंन हेंज" की संरचना सामने आती है। उसमें गढे हुए पत्थर हैं और ये अनगढ़, बस फ़र्क इतना ही है। स्टोन हेंज एवं माला च गोटा दोनो को बनाने का प्रयोजन एक ही रहा होगा।
उत्खनन कार्य
स्मृति शब्द से ही  स्मरण रखने, करने का अर्थ निकलता है। वर्तमान में भी हम देखते हैं कि किसी की मृत्यू होने के पश्चात उसे याद रखने के लिए लोग मंदिर, धर्मशाला, प्याऊ, स्कूल एवं प्रतिमाओं का निर्माण करवाते हैं। यही याद रखने वाली एषणा मनुष्य की सभ्यता के साथ चली आ रही है। इस नश्वर लोक में व्यक्ति कुछ ऐसा कर जाना चाहता है कि जिससे उसे युग युगांतर आने वाली पीढियाँ याद कर सकें, स्मृति में संजोकर स्मरण कर सकें।  महापाषाण काल में भी मृतकों के लिए स्मारकों का निर्माण किया जाता था। मृतक के अंतिम यात्रा स्थल पर स्मृति स्वरुप विशालकाय पत्थरों का प्रयोग किया जाता था। किसी कब्र के स्थान पर एक पत्थर प्राप्त होता है किसी स्थान पर स्मृति वृत बना हुआ प्राप्त होता है। मृतक के साथ उसकी दैनिक आवश्यकताओं की वस्तुएँ एवं उसकी निजी प्रिय वस्तुओं को भी दफ़नाया जाता था। इस मैगालिथिक सर्कल में मुझे 3 बड़े गड्ढे दिखाई, जाहिर होता है कि "ट्रेजर हंटर्स" ने खजाने की खोज में इसे भी खोद डाला।
उत्खनन में प्राप्त मृदाभांड के टुकड़े
मेगालिथिक सर्कल एक टीले पर बना हुआ है। इसके बांई तरफ़ एक नाला बहता है और नाले के उस तरफ़ भी ऊंचाई वाला स्थान है। यही उत्खनन कार्य चल रहा है। इस स्थल के समीप ही नाग नदी बहती है। हमने स्थल निरीक्षण किया और पाया कि इस स्थान पर अन्य मेगालिथिक प्रमाण भी उपस्थित हैं। उत्खनन स्थल "खोपड़ी" कहलाता है। इसे रीठी गाँव कहते हैं। रीठी गाँव से तात्पर्य है वीरान गाँव, जो कभी आबाद था और उजड़ गया। राजस्व रिकार्ड में खोपड़ी गाँव का नाम दर्ज है और उसका रकबा भी है। परन्तु स्थान पर कोई बसाहट नहीं है। प्राचीन काल में इस स्थान पर मानवों की बड़ी आबादी रही होगी। जिसके अवशेष उत्खनन में प्राप्त हो रहे हैं। 5 वर्ष पूर्व इस स्थान सर्वेक्षण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण के पुराविद डॉ सुभाष खमारी ने किया था तथा वर्तमान में उत्खनन कार्य डेक्कन कॉलेज के उत्खनन निदेशक कांति पवार के निर्देशन में  डॉ गुरुदास शेटे, डॉ रेशमा सांवत के द्वारा किया जा रहा है।
उत्खनन स्थल पर डॉ रेशमा सावंत, ललित शर्मा एवं किसान भाऊ
डॉ कांति पवार ने बताया कि इस स्थान से उत्खन में भूतल के तीन स्तर पाए गए हैं, साथ ही अस्थियाँ, काले एवँ लाल मृदाभांड के टुकड़े एवं चित्रित मृदा भांड अवशेष, खाद्यान्न जमा करने के बड़े भांड, सिल बट्टा, लोहे का चीजल, लोहे की छड़ एवं अन्य सामग्री प्राप्त हुई है। जो इतिहास की नई परतें प्रकाश में ला रही हैं। महापाषाण काल की संस्कृति को लगभग 3500 वर्ष प्राचीन माना जाता है। उत्खनन धीमी गति से पर पुरातात्विय मानकों के आधार पर किया जा रहा है। जिससे की एक भी प्रमाण नष्ट न होने पाए। इस उत्खनन स्थल की 15 हेक्टेयर भूमि पे खेत हैं जिनमें गेंहू की फ़सल बोई गई थी। यह भूमि कुही के किसी जमीदार की है। उन्होने इसे उत्खनन कार्य के लिए सौंप दिया है। किसी को अपनी निजी भूमि पर उत्खनन कार्य कराने के लिए तैयार करना ही बड़ी बात होती है।
डॉ कांति पवार (सहायक प्राध्यापक डेक्कन महाविद्यालय पुणे)
डॉ कांति पवार कहते हैं कि महापाषाण कालीन उपलब्धियों से कुही क्षेत्र समृद्द है। कुही ब्लॉक के 30 किलोमीटर के दायरे में अड़म, मांडल, पचखेड़ी, पोड़ासा, राजोला, लोहरा इत्यादि महापाषाण कालीन स्थल पाए जाते हैं। अड़म में डॉ अमरनाथ ने उत्खनन किया था जहाँ मध्य पाषाणकाल से लेकर सातवाहन काल तक के पुरावशेष प्राप्त हुए। मांडल से वाकाटक नरेश प्रवर सेन का ताम्रपत्र प्राप्त हुआ। पचखेड़ी से मृतक स्तंभ प्राप्त हुआ है। इस तरह कुही क्षेत्र से पुरासम्पदाएँ प्रकाश में आने के कारण इतिहास की परते उघड़ रही हैं। डेक्कन महाविद्यालय का पुरातत्व विभाग इस क्षेत्र में अग्रणी हो कर कार्य कर रहा है।

http://lalitdotcom.blogspot.com/2014/05/blog-post_6.html


https://www.facebook.com/people/Lonar-Crater-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B0/100064625564498/
 

न्यु गद्रे







 
 
 
 
पुरातन बारव, देऊळगाव राजा, बुलढाणा
श्री बालाजी महाराज मंदिर परिसरात असलेली पुरातन बारव विहीर. मंदिराला लागुनच ही सुंदरशी पण वेगळ्याच धाटणीची पुष्करणी आहे. घडीव दगडात बांधलेली हि पुष्करणी चारही बाजुंनी बंदीस्त असुन आत उतरण्यासाठी दोन बाजुना तटभिंतीत पायऱ्या आहेत. जवळपास ४० फुट खोल असलेल्या या पुष्करणीत खाली तीस फुटावर एका बाजुस ओवऱ्या आहेत. नेहमी पाहण्यात असलेल्या पुष्करणीहुन वेगळी असलेली हि पुष्करणी आवर्जुन पहावी अशीच आहे. दरवर्षी ही महाशिवरात्री ला संस्थान तर्फे भाविक भक्तांसाठी खुली केली जाते.





निळकंठेश्वर बारव, सिंदखेड राजा, बुलढाणा
सिंदखेड राजा येथे असलेल्या दोन हेमाडपंती मंदिरापैकी एक निळकंठेश्वर मंदिर. या मंदिरासमोर एक भली मोठी तलावाएवढी बारव आहे. हि बारव राजे रावजगदेवराव जाधव यांनी बांधल्याचे सांगितले जाते. 23 मीटर × 23 मीटर प्रशस्त दगडी बारव आहे. ही बारव 28 उतरत्या पायऱ्यांनी बनलेली असून खोली जवळपास 9 मीटर आहे. मंदिराच्या आवारात एक भलेमोठे तुळशी वृंदावन आहे. या मंदिरामध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले श्रीविष्णुचे सुंदर कोरीव शिल्प आहे. बारव च्या परिसरात तीन मोठे शिवलिंग आहेत. तसेच शनी मंदिर आहे.



सजना बारव (पायरी विहीर), सिंदखेड राजा, बुलढाणा
माँ जिजाऊ यांचे जन्मस्थान सिंदखेड राजा येथे अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यापैकी एक सजना बारव. ही बारव राजे लखुजी जाधव यांच्या काळातील आहे. ऐतिहासिक चांदणी तलावाजवळ ही बारव आहे. विहिरीत प्रवेशासाठी पायऱ्या बनवलेल्या असून विहिरीवर दोन ओवऱ्या काढून स्नानगृहाची व्यवस्था केलेली आहे.







मोती तलाव आणि बारव, सिंदखेड राजा, बुलढाणा
जलयांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना असलेला मोतीतलाव! त्याकाळी जगदेवराव जाधवांनी सहा लक्ष रुपये खर्चून हा तलाव बांधला होता. २५८ मीटर लांब आणि साडेतीन मीटरपासून अठरा मीटपर्यंत रुंद भिंतीचा हा तलाव आहे. तलावाच्या भिंतीला एक चौकोनी वास्तू आहे. पायर्या उतरुन आत प्रवेश केल्यानंतर एक प्रशस्त किल्ल्यासारखी वास्तू नजरेस पडते. तिथे आणखी खाली तळमजल्यावर जाण्यासाठी पायर्या आहेत. एक षटकोणी रस्ता सुध्दा आत जातो पण तो बंदिस्त आहे. येथून तलावात जाण्यासाठी रस्ता आहे. तलावाचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी खिडकी आहे. आजही सिंदखेडराजा नगराला तात्पुरता नळपाणी पुरवठा या तलावातून केला जातो.


पुरातन शिव मंदिर, उमरद, बुलढाणा
हे ऐतिहासिक मंदिर असुन हेमाडपंथी शैलीचे बांधकाम आहे. सदर मंदिरावर गर्भप्रसवशिल्प पट्टीका आहेत... या मंदिरासमोरील भागात एक पुरातन बारवाचे अवशेष देखील आहेत.. हे मंदिर राजे गजानन जाधवराव यांच्या शेतात आहे. मंदिराच्या डाव्या बाजूस उमरदकर राजे जाधवराव घराण्याच्या समाधी असुन आजही त्या उत्तम अवस्थेतील आहेत.
उमरद देशमुख (रुसुमचे) ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा जिल्ह्यात असुन ते सिंदखेडराजा येथुन १५ कि मी व किनगाव राजा येथुन ३ कि मी वर असलेले एक ऐतिहासिक गाव आहे. सदरील गावात राजे लखुजीराव जाधवराव यांचे थोरले पुत्र राजे दत्ताजीराव जाधवराव यांची एक वंशजशाखा असुन येथे महादेव मंदिर, श्री नरसिंह मंदिर, रेणुका माता, अष्टभुजा देवी मंदिर, मारुतीची पायाखाली राहु असलेली वैशिष्ट्य पुर्ण मुर्ती, ऐतिहासिक बारव, शेषशायी विष्णू, भुदेवी, रावण दरबारातील शेपटीच्या वाटोळ्यावर बसलेले मारुती शिल्प, राजे जाधवराव घराण्याची सहा बुरुजांची ऐतिहासिक गढी आदी ऐतिहासिक वास्तु आहेत.
 

 
 
ऐतिहासिक देऊळगाव राजा, बुलढाणा
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा हे तालुक्याचे शहर आहे. स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराज यांचे आजोबा राजे लखोजीराव जाधव ह्यांच्या वतंनदारीतील हे एक महत्वाचे गाव होते. इतिहासाशी आपले नाते सांगत जाधवांची किल्लेवजा गढी व या गावास असलेला कोट आपले काही अवशेष सांभाळत आजही ताठ मानेने उभा आहे. देऊळगावराजा शहर बुलढाणा शहरापासुन ७८ कि.मी.अंतरावर तर सिंदखेडराजा शहरापासुन केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे. जुने देऊळगावराजा या भागात आपल्याला कोटाचे व गढीचे अवशेष पहायला मिळतात. देऊळगावराजा कोटाचे अवशेष म्हणजे याच्या तटबंदीत शिल्लक असलेले दोन दरवाजे. यातील एक दरवाजा गावाच्या टोकाला दक्षिण दिशेला असुन या दरवाजाच्या आतील बाजुस वीर हनुमान मंदीर आहे तर दुसरा दरवाजा गावाच्या उत्तर बाजुस सराफा बाजाराजवळ आहे. या दोन्ही दरवाजाचा खालील भाग घडीव दगडांनी बांधलेला असुन फांजीवरील भाग विटांनी बांधलेला आहे. यात बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या आहेत. या दोन्ही दरवाजांच्या कमानी शिल्लक असुन आतील लाकडी दारे मात्र नष्ट झाली आहेत. याशिवाय तिसरा दरवाजा आपल्याला बालाजी मंदीर परिसरात पहायला पहायला मिळतो. हा दरवाजा घडीव दगडांनी बांधलेला असुन दरवाजाच्या वरील भागात कोरीवकाम केलेला नगारखाना आहे. दरवाजाची लाकडी दारे व त्यातील दिंडी दरवाजा आजही शिल्लक असुन या दरवाजावर कोणतीही संरक्षण व्यवस्था दिसुन येत नाही. बालाजी मंदीर परिसरात अतिशय सुंदर असे जुने वाडे पहायला मिळतात. मंदिराला लागुन एक सुंदरशी पण वेगळ्याच धाटणीची पुष्करणी आहे. घडीव दगडात बांधलेली हि पुष्करणी चारही बाजुंनी बंदीस्त असुन आत उतरण्यासाठी दोन बाजुना तटभिंतीत पायऱ्या आहेत. जवळपास ४० फुट खोल असलेल्या या पुष्करणीत खाली तीस फुटावर एका बाजुस ओवऱ्या आहेत. नेहमी पाहण्यात असलेल्या पुष्करणीहुन वेगळी असलेली हि पुष्करणी आवर्जुन पहावी अशीच आहे. पुष्करणी पाहुन सरळ रस्त्याने नगरकोटाच्या दक्षिण दिशेला असलेल्या दरवाजाकडे जाताना साधारण ५०० फुट अंतरावर उजव्या बाजुस एक मध्यम आकाराची दरवाजाची कमान दिसुन येते. हि कमान म्हणजे गढीभोवती असलेल्या तटबंदीतील दरवाजा असावा. या कमानीच्या आतील बाजुस दक्षिणमुखी हनुमान मंदीर आहे. या कमानी समोरच कधीकाळी राजे रावजगदेवराव जाधवराव यांची गढी होती. चौकोनी आकाराची हि गढी साधारण दीड एकर परिसरात पसरलेली असुन या गढीची पश्चिमेकडील तटबंदी त्यातील दोन बुरुज व गढीचे मुख्य प्रवेशद्वार आजही शिल्लक आहे. गढीचे शिल्लक असलेले बुरुज व तटबंदी यांचे तळातील बांधकाम घडीव दगडात केलेले असुन वरील बांधकाम विटांनी केलेले आहे. दरवाजाच्या आतील भागात कमानीवजा बांधकाम असलेला चौथरा असुन पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. त्यातुन दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी जिना आहे. दरवाजाचा बाहेरील भाग आजही त्याच्या मुळ स्वरुपात असुन कोरीवकामाने सजवलेला आहे. गढीच्या आत देऊळगावराजा शिक्षणसंस्थेची शाळा असुन शाळेच्या इमारतीसाठी गढीची उर्वरित तटबंदी व बुरुज तसेच आतील वास्तु तोडण्यात आल्या आहेत. देऊळगावराजा नगरकोट परीसर पहाण्यास दोन तास पुरेसे होतात. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जाधव घराणे प्राचीन आहे. निजामशाही व आदिलशाही काळात स्वतःच्या कर्तुत्वावर व पराक्रमावर काही मराठा घराणी उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव हे एक प्रमुख घराणे होते. सोळाव्या शतकात सिंदखेडची देशमुखी मुळे घराण्याकडे होती. गावातील रविराव ढोणे याने बंड करुन मुळे घराण्याची कत्तल केली यात मुळे घराण्यातील यमुनाबाई ही गर्भवती स्त्री वाचली. ती दौलताबादला निजामशहाचे सरदार असलेल्या लखुजी जाधवांच्या आश्रयाला गेली. या काळात सिंदखेड परगणा लखुजी जाधव यांच्याकडे होता. त्यांनी रविरावचे बंड मोडून काढले. मुळेंच्या कुटुंबात देशमुखी सांभाळणारा वारस न आल्याने लखुजी जाधवाना १५७६ला सिंदखेडची देशमुखी मिळाली व सिंदखेडच्या भरभराटीला सुरवात झाली. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई हि लखुजी जाधवरावांची कन्या होती. २५ जुलै १६२९ रोजी राजे लखुजी जाधव, त्यांचे दोन पुत्र अचलोजी व राघोजी आणी नातु यशवंतराव यांचा निजामशहाने देवगिरीच्या दरबारात खुन केला. सिंदखेडराजा येथे त्यांची समाधी पहायला मिळते. राजे लखुजी जाधव यांच्या चार पुत्रांच्या वंशजशाखा त्यांना वतनी असलेल्या सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, आडगाव राजा, उमरद, किनगाव राजा, जवळखेड व मेहुणा राजा या ठिकाणी विस्तारल्या आहेत. राजे लखुजीराव यांचे नातु रावजगदेवराव जाधवराव यांनी इ.स.१६९० दरम्यान आपला कारभार सिँदखेड राजा येथुन देऊळगाव राजा येथे हलवल्याने देऊळगाव राजाचे महत्व वाढीस लागले. त्यांनी इ.स.१६९२ साली देऊळगावराजा येथे श्री व्यंकटेशाची मुर्ती स्थापन करुन मंदिर बांधले. त्यावेळेपासुन आजपर्यंत केवळ जाधवराव वंशजांना म्हणजे सिंदखेड, देऊळगाव, आडगाव, मेहुणे, किनगाव, उमरद आणि जवळखेड जाधवांना बालाजी मंदिराच्या गाभाऱ्यात लग्न लावण्याचा मान आहे.
 
मातृतीर्थ" सिंदखेडराजा
राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा
बुलढाण्यातील सिंदखेडराजा हे छ्त्रपती श्री शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान. शिवपूर्व काळातील अनेक महत्वपूर्ण घडामोडींचे हे एक केंद्र होते. येथे जन्मलेल्या जिजाऊ साहेबांचा जीवनप्रवाह जसजसा प्रवाहित होत गेला तसतसा अवघा महाराष्ट्र नकळत एका भावनिक सुत्रात बांधला गेला. मातोश्री जिजाऊ साहेबांच्या अलौकीक कतृत्वामुळे तत्कालीन लोकजीवनात स्वधर्म, अस्मिता आणि स्वाभिमान जागृत झाला. यावाड्याचे बांधकाम इ.स.१५७६ च्या सुमारास झालेले आहे. जिजाऊ साहेबांचा जन्म म्हाळसाबाईंच्या पोटी हेमलंबी नामसंवत्सर शके १५११च्या पौष शुद्ध पौर्णिमेला, गुरूवारी पुष्य नक्षत्रावर (१२ जानेमाव्री १५९८ रोजी) झाला. शिवमाता जिजाऊ हि महाराष्ट्रातील जनतेला स्वातंत्र्य व सुराज्य यांची अखंडपणे स्फुर्ती देणारी राजमाता आहे. म्हणुन जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेडराजा हे तिर्थेक्षेत्र झाले आहे.

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१
जिजाऊ सृष्टी, मातृतीर्थ सिंदखेडराजा
प्रचि २२

प्रचि २३
DCIM\100GOPRO\GOPR9380.

प्रचि २४
DCIM\100GOPRO\GOPR9378.

प्रचि २५

प्रचि २६

https://www.maayboli.com/node/61353







उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...