Saturday, March 28, 2026

नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती-

 आजपासून या मालिकेचा रोज एक भाग शेअर केला जाणार आहे. लेखिकेने नितांत सुंदर रीतीने आपले अनुभव मांडले आहे. वाचत असताना आपणच परिक्रमा करत असल्याची अनुभूती येईल.
______________________________

नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती
 भाग १
नर्मदा परिक्रमेचे अनुभव सांगताना सर्वप्रथम मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छिते आणि ती अशी की ही नर्मदा परिक्रमा मी केलेलीच नाही. ही नर्मदा परिक्रमा माझ्याकडून माझ्या गुरुंनी आणि माझ्या नर्मदा माईनी करवून घेतेली आहे, लहान मुलाला आई जशी हात धरून चालायला शिकवते आणि त्याच्या पडणाऱ्या प्रत्येक पावलाकडे आईचं बारीक लक्ष असतं तसंच एका बाजूला गुरूमूर्ती प. पू नाना महाराज तराणेकर आणि दुसरीकडे माझी नर्मदा मैया यांच्या सुरक्षा कवचात माझी परिक्रमा पूर्ण झाली. सुरक्षा कवच असणं आवश्यक आहेच, आणि परिक्रमेतला काही भाग हा खरोखर घाबरवून सोडणारा आहे. मी भाग्यवान कारण हे सुरक्षा कवच मला मिळालं! कसं याचा उलगडा पुढे होईलच. परिक्रमेचं अनुभव कथन करताना माझ्या वाणीला अहंकाराचा स्पर्श होऊ देऊ नको ही प्रार्थना मी माझ्या मैयाला करेन. याच प्रार्थनेसोबत मी वाचकश्रोत्यांना एक विनंतीसुद्धा करेन ती अशी की जशी मी मैयाचं लेकरू आहे तसे आपण सर्वजण ही तिची लेकरे आहात, तेव्हा जो काही भाव आपल्या मनात आहे तो तिच्याचपर्यंत थेट पोहचवावा, मी तुमच्या आणि तिच्यामधील दुआ नाही तर तुमच्यासारखीच तिची एक बालिका आहे, मी निश्चितच भाग्यवान आहे कारण ह्या परिक्रमेची संधी आणि ती पूर्णत्वाला नेण्यासाठी मैया आणि गुरू यांची सोबत मला लाभली. बरेचदा आपण काही तरी करावं असं आपल्या मनात असतं आणि कुणाच्या तरी प्रेरणेने आपल्या त्या कार्याची नीव ठेवल्या जाते. माझ्या अनुभव कथनाने आपल्या पैकी एखाद्याच्या जरी मनात नर्मदा माईच्या परिक्रमेची इच्छा निर्माण झाली तरी माझं हे अनुभव कथन सफ़ल झालं असं मी समजेन. संपूर्ण आयुष्यच बदलवून टाकणारी ही एक तपश्चर्या आहे आणि ज्याच्या त्याच्या शक्तिनुरूप आणि प्रारब्धानुसार ती घडवून घेतल्या जात असते हेच समजून घेणं आवश्यक आहे.
नर्मदा परिक्रमाच का करायची? तुम्हाला नर्मदा परिक्रमा करायचा विचार कसा आला?
साडेपाच महिने तुम्ही घराबाहेर राहिलात, घरच्यांनी कसं मान्य केलं? असे अनेक प्रश्न या वेळी
तुमच्या मनात असणार आहेत. त्या सर्वांची उत्तरं मी माझ्या कडून देण्याचा प्रयत्न करेनच.
तुमच्याकडून कदाचित काही असेही प्रश्न येतील ज्यांचे समाधान करण्याची क्षमता माझ्याकडे नसेल, अशी प्रश्न मैयावर सोपवून देऊयात, तिचं काय समाधान करायचे ते करेल! कदाचित तेच तुमच्या परिक्रमेचं बीज ही असेल? बघुयात.
तर नर्मदा परिक्रमाच का करायची? त्याची एक अख्यायिका आहे.
एकदा गंगा मैया आणि नर्मदा मैया तपश्चर्येला बसल्या होत्या. ज्यावेळी गंगामैयाची तपश्चर्या पूर्ण झाली त्यावेळी तिने शंकराला "मला तुमच्यात सामावून घ्या" असा वर मागितला आणि म्हणून शंकरांच्या जटेमध्ये गंगामाईला स्थान मिळालं. नर्मदा मैयाची तपश्चर्या पूर्ण झाली त्यावेळी "तुम्ही तुमच्या पंचायतनां सकट माझ्या मधे सामावून जा" असा वर तिने मागितला. आणि सर्व पंचायतनांसकट शंकर नर्मदा मैयामधे सामावून गेले. नर्मदा मैया मधे सर्व देवांचा वास आहे म्हणून नर्मदा मैयाची परिक्रमा ही सर्व देवांची परिक्रमा आहे. नर्मदा मैयाच्या किनारी बळी राजापासून तर ब्रम्हदेवापर्यंत असंख्य देव देवता, ऋषी मुनी यांनी तप केलं, आणि म्हणून नर्मदा किनारी असलेला प्रत्येक दगड हा शिवस्वरूप समजल्या जातो. इथे " हर कंकर शंकर " अशी उक्ती प्रचलीत आहे. आणि म्हणूनच परिक्रमा ही फ़क्त नर्मदा मैयाचीच करायची असते. बाकी कुठल्याही नदीला तिची परिक्रमा होण्याचं भाग्य लाभलेलं नाही. तसंच नर्मदा नदीचे महात्म्य सांगताना असं म्हटल्या जातं की सरस्वती मधे तीन वेळा स्नान करून पुण्य मिळतं, यमुने मधे सात वेळा स्नान करून पुण्य मिळतं, गंगेमधे एकदा स्नान करून पुण्य मिळतं मात्र तितकच पुण्य नर्मदेच्या केवळ दर्शनाने लाभतं. नर्मदा किनाऱ्यावर अनेक शक्ती
अदृष्य रुपात आजही तप करीत आहे आणि तिथली पवित्र कंपने आपल्याल्या त्या त्या ठिकाणी जाणवतात देखील!!
तुम्हाला नर्मदा परिक्रमा का कराविशी वाटली असं जेव्हा मला विचारल्या जातं तेव्हा
खरंच जाणवतं की हा विचार मनात आला आणि पूर्ण झाला असं काही झालं नाही. त्यासाठी मधे बरीच वर्ष जावी लागली. थोडक्यात मी विचार केला आणि मी परिक्रमा केली इतकं सोपं हे गणित नाहीये, त्यासाठी गुरू आणि मैया य दोघांची ही इच्छा असावीच लागते. मी १४ वर्षांची असताना मला पहिल्यांदा नर्मदा परिक्रमा कराविशी वाटली, मात्र आज मी परिक्रमा केली त्यावेळी मी चाळीशीला पोचलेली आहे. अर्थात त्या वयात ही परिक्रमा करणं शक्य ही नव्हतं , आणि भाग्यतही नव्हतं म्हणून ती तेव्हा झाली नाही, आता होतं म्हणून आता झाली. माझे गुरू प. पू नाना महाराज तराणेकर यांची पोथी मला माझी आजी वाचायला सांगत असे. मी रोज एक पान अशीच पोथी वाचायचे. त्या पोथीमधे नाना महारांजानी जेव्हा जलेरी (नर्मदा मैया सतत डोळ्यापूढे ठेवून) नर्मदा परिक्रमा केली होती त्यातले अनुभव कथा रुपात सांगितलेले आहे. ते अनुभव वाचताना अंगावर काटा यायचा, वाटायचं खरंच नर्मदा असं दर्शन देते का? खूप इच्छा व्हायची, पण तो विषय तिथेच थांबून राहीला. मात्र या अनुभवातून एक अनुभव माझ्या कायम लक्षात राहीला तो इथे आपाल्याला मुद्दाम सांगतेय कारण याचा संबंध पुढे मला आलेल्या अनुभवाशी आहे. तर ज्या वेळी नाना महारांजानी परिक्रमा केली तो काळ आजच्या काळासारखा नव्हता. आजच्या सारख्या सेवा, ठिकठिकाणी आश्रम, अन्नदान किंवा अन्नछत्र ठायी ठायी नव्हते. मोबाईल सारखी व्यवस्था ही नव्हती आणि दळवळणाची साधन देखील नाही. रस्ते नाही, किनाऱ्यावरची वाट ही अतिशय बिकट आणि घनदाट जंगलाची असा तो काळ. तर नानामहाराज जंगलातून एकटेच जात होते, संध्याकाळ व्ह्यायला आलेली, भूक तहानेनी व्याकूळ नाना महाराज थोडी विश्रांती घ्यायला म्हणून एका झाडाखाली बसलेले, भूक खूप लागलेली, तहान खूप लागालेली, आणि तोंडने नामस्मरण सुरू. नाना थकले होते, त्यांचा किंचीत डोळा लागतो न लागतो तोच त्यांना आवाज आला, "बेटा दूध पाओगे?" बघतात समोर
एक गावकरी महिला सोन्याचा भला मोठा घडा घेऊन उभी. दूध म्हंटल्यावर नांनाची भूक बळावली आणि तो भला मोठा घडा तोंडाला लावून ते घटाघट दूध पिऊ लागले. दूध संपल्यावर घडा तोंडाचा काढतात आणि बघतात तो ती महिला तिथे नाहीच... आता हा सोन्याचा घडा परत कसा कारायचा? कोण असेल ती महिला जिने इतका किमती सोन्याचा घडा असा सोडून दिला असावा? नानांच्या लक्षात आलं, ती दुसरी तिसरी कुणी नसून साक्षात नर्मदा माई होती. नानांनी तिचा घडा तिच्या पात्रात अर्पण केला... असे अनेक प्रसंग या पोथी मधे आहे.
माझ्या मनात नर्मदा परिक्रमा करण्याची प्रेरणा ही भक्ती पोटी नव्हे तर उत्सुकतेपोटीच निर्माण झाली होती.. माझी उत्सुकता माझ्या नर्मदा माईनी अशी काही शमवली की तिचं रुपांतर आता तिच्या भक्ती मधे आणि तिच्यावरच्या श्रद्धेमधे झालं आहे. मला नर्मदा परिक्रमा का करविशी वाटली याचं एक आणखी कारण आहे. किंबहूना ती अमलात कशी आली त्याचं कारण आहे असं म्हंटलं तरी चालेल. जुलै २०१७ मधे माझं पी.एच.डी चे सबमिशन होते. ते काम मला खरंच खूप जड जात होतं. त्यावेळी मी जरा डिप्रेशन मधे गेले होते, मात्र नर्मदा मैयाचे अनुभव ऐकले की खूप प्रसन्न वाटायचं एक वेळ तर अशी आली की जणू ती मैया बोलावतेय मला असं वाटू लागलं. मला माझ्या बद्दल, आयुष्याबद्दल, अध्यात्माबद्दल बरेच प्रश्न बऱ्याच वर्षांपासून भेडसावत होते. काहीतरी वेगळं समाधान, कसली तरी तृप्ती मला हवी होती, पण नक्की काय हे काही समजत नव्हतं. अज्ञाताचा अखंड शोध सुरु होता अणि त्याची उत्तरं मला नर्मदा परिक्रमेत मिळतील असा विश्वास मला जाणवत होता. तर असे काही माहित असलेले आणि काही माहितच नसलेले कारणं घेऊन मी परिक्रमेला निघाले.

सुरवातीला मी काही महिने घराबाहेर राहणार म्हंटल्यावर अपेक्षेप्रमाणे माझ्या घरून ही विरोध झालाच, पण माझा हट्ट आणि त्याहून माझ्या मनाची होणारी घालमेल समजून घेऊन माझ्या घरच्यांनी मला परिक्रमेला जाऊ देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या होकारा शिवाय मला जाता येणं शक्य नव्हतच. १ नोव्हेंबर २०१७ला ओंकारेश्वर येथून परिक्रमा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नागपूरहून मी, ठाण्याहून सौ डोंगरे आणि मुंबई हून सौ मंत्री अशा तिघी जणी सोबत परिक्रमा करू असा निर्णय घेतला. पण निर्णय घेणारे आपण कुणीच नसतो खरं.... ते सगळं तीच ठरवत असते आणि हे ती नर्मदा मैया वेळोवेळी जाणवूनसुद्धा देते. कसं ते पुढच्या भागांमध्ये लक्षात येईलच. 
क्रमशः
मालिकेचा रोज एक भाग शेअर केला जाणार आहे. लेखिकेने नितांत सुंदर रीतीने आपले अनुभव मांडले आहे. वाचत असताना आपणच परिक्रमा करत असल्याची अनुभूती येईल.
______________________________


नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती- 
भाग २
प्रत्यक्ष परिक्रमेच्या आधीच जेव्हा आशिर्वचनांची अनुभूती येते त्यावेळी.......
परिक्रमा करण्या आधी अनिल दास महाराजांकडून संकल्प करवून घेतला. हा संकल्प केला त्यावेळी मनात खूप घालमेल होती. नर्मदा माईशी डायरेक्ट पण मनातल्या मनात बोलणं पहिल्यांदा सुरू झालं. समोर खळखळून वाहणारी नर्मदा नदी, तिचं जीव घाबरवणारच ते रूप आहे. तिच्या प्रेमाची आणि तिच्या माझ्यावरच्या ममतेची प्रचिती मला जरी आली नसली तरी आई लेकराला काय हवय हे समजून घेण्यात कधीच कमी पडत नाही. तीने माझ्या मनाची घालमेल ओळखली मला म्हणाली यथाशक्ती परिक्रमा पूर्ण करेन असा संकल्प कर.... ती म्हणाली असच वाटलं मला. जसा एखादा विचार आपला नाही हे आपल्याला अचानक समजतं तसं झालं.. कुणीतरी कानात सांगावं तसं वाटलं... परिक्रमा सुरुही झाली नाही आणि आईनी सांगीतलं.. तुला जिथे गरज पडेल तिथे माझ्याशी निःसंकोच बोल, मी तुला मार्ग दाखवेन. परिक्रमा सुरु होण्याच्या आधीच मला आलेला हा अनुभव...
खरं तर या ही आधी मला एक अनुभव आला, माझ्या गुरु माऊलीचा.. मी परिक्रमेला जाण्याचा निर्णय घेतला आणि ठरल्याप्रमाणे मी इंदोरला आले. माझी आत्या इंदोरला असते तिच्याकडे मी मुक्कामाला होते. माझ्याकडे सगळेच नाना महारांजाचे अनुग्रहीत आहेत, पण अजून माझा अनुग्रह झाला नव्हता. अनेक वर्षांपूर्वी मी अनुग्रह घेणार होते, नाना महाराज ज्या भक्ताना अनुग्रह देणार होते त्या वहीत माझं नाव आणि अनुग्रह घेण्याची तारीख ही नमूद झाली होती, पण पुन्हा तेच आपण काहीच ठरवत नसतो. नाना महारांजाची तब्येत बिघडली, त्यांनी देह ठेवला, आणि माझा अनुग्रह घ्यायचा राहून गेला. मला खूप वाईट वाटलं होतं. तेव्हा मी १५-१६ वर्षांची असेन. मी ठरवलं, आता अनुग्रह घ्यायचाच नाही. माझे गुरू नानाच..., मला दुसऱ्या कुणाच कडून अनुग्रह घ्यावासाच वाटला नाही... आणि मी घेतला ही नाही. मनात मात्र मी नेहेमीच नानांनाच माझे गुरू समजत राहीले. तर गंम्मत अशी झाली की आत्ता म्हणजे नर्मदा परिक्रमा सुरू करण्याच्या दोन दिवस आधी मला आत्यानी विचारल, "का ग?, तुझा मंत्र झालाय नं घेऊन?" आणि मला अचानक मंत्र घ्यावासा वाटू लागला, रात्री साडे अकराला मला खूप बेचैनी वाटू लागली आणि गुरुमंत्र हवाच हे प्रकर्षानी जाणवू लागलं.
मी माझ्या आत्येभावाला सांगितलं. त्याने सकाळी बाबासाहेब तराणेकर (नानांचे नातू) यांना फ़ोन केला. माझी आधी भेट झाली होती, मी परिक्रमेला जाणार हे सांगून नानांचा आणि बाबा साहेबांचा अशिर्वाद घेऊन आले होतेच पण आता मला गुरुमंत्र हवा होता. बाबासहेबांना परगावी जायचे असतानाही, लेकरू परिक्रमेला जातय म्हणून वेळात वेळ काढून, त्याच दिवशी मला गुरुमंत्र दिला. माझ्या परिक्रमेला निघण्याच्या आधीच माझ्या गुरुंनी मला पंखाखाली घेतलं..
गुरुबळ पाठीशी आणि मैया भोवताली असताना माझी परिक्रमा पूर्ण आणि सुकर कशी होणार नाही?
परिक्रमा सुरु झाल्या झाल्या अनेकांच्या पायाला छाले आलेले मी पाहिले, असं म्हणतात या कालावधीत जो काय त्रास होतो ते आपले भोग असतात, आपण कुणाला तरी काही तरी त्रास दिलेला असतो आणि तो अपल्याला परत मिळणार असतो. आपलं देणं झालेलं असतं, आपण घेणं आता बाकी असतं.... तो त्रास सहन करावाच लागतो.. आणि खरोखर सोबत असलेले अनेक परिक्रमावासी वेगवेगळ्या त्रासातून जाताना मी पाहिले. मला काहिही त्रास झाला नाही. पूर्ण परिक्रमेत मला  तीनदा ताप चढला, आणि त्या त्या वेळेला मैयाचे अनुभव आले, मात्र शरीराला जखम, दुःख, पोट खराब होणे, पाय दुखणे, पायाला छाले येणे असा काहीही त्रास मला परिक्रमेत झाला नाही.... मला झाला नाही म्हणण्यापेक्षा माझ्या माईनी आणि माझ्या गुरुंनी तो वरचेवर झेलून घेतला. तो माझ्यापर्यंत पोहचूच दिला नाही... आणि हे मी इतक्या खात्रीपूर्वक फ़क्त येवढ्यासाठी सांगू शकते की मी एक अत्यंत सर्वसाधारण व्यक्ती आहे. माझ्या जीवनकालात किंवा गतजन्मांमधे मी अनेक चुका, अनेक पापं नक्कीच केले असणार आहे आणि तरीही मला त्रास झाला नाही कारण तो माझ्या गुरुंनी आणि मैयानी मला होऊ दिला नाही. अनेक पापकर्मांसोबत निस्वार्थ पणानी आणि निष्पाप मनानी एखाद तरी सत्कर्म माझ्या कडून करवून घेतल्या गेलं असलं पाहीजे की या जन्मामधे मला नाना महाराज गुरू म्हणून लाभले, त्यांचे आशिर्वाद मला मिळाले आणि काहीही त्रास न होता परिक्रमा करण्याचे भाग्य मिळाले आहे. म्हणून सुरवातीला मी जे म्हणाले तेच खरे.. ही परिक्रमा मी केलेली नाहीच.
एक महत्वाचा आणि अगदी सुरवातीचा अनुभव मी नमूद करायला विसरले आहे, त्याला कारण पण तसंच आहे, ते असं की हा अनुभव मला नागपुरात, म्हणजे परिक्रमा सुरु करण्याच्या महिनाभर आधी आला... आश्चर्य वाटलं नं? सांगते. माझ्या घरापासून कोराडी देवस्थान हे साधारण २५ किलोमीटर आहे. पायी चालण्याचा सराव म्हणून मी इथे पायी जाण्याचं ठरवलं. नुकतेच पांढरे कपडे शिवून घेतले होते. तेही वापरून बघावेत कम्फर्टेबल आहेत की नाही म्हणून त्या दिवशी तेच घातले, दसऱ्याचा मुहूर्त साधला, आणि निघाले. रस्त्यात कुत्री त्रास देतात म्हणून एक काठी घेतली होती, आणि कमंडलू हातात घेऊन चालण्याचा सराव करावा म्हणून तो ही घेतला होता. पाठीवर १२-१३ किलोची बॅग पण होतीच. साधारण १५ की. मी अंतर चालून झालं होतं. उन फार होतं. तसे सकाळचे साडे आठ नऊ झाले असतील. एका हॉटेल समोर जरा सावली होती म्हणून तिथे जरा थांबले. तेवढ्यात आतून एक मध्यम वयीन तरुण धावत बाहेर आला" नर्मदे हर मैया जी, परीक्रमेचा सराव करता आहात का? कार्तिक द्वादशीला उचला परिक्रमा" असं म्हणतच तो बाहेर आला. मला खूप आश्चर्य वाटलं. इथे नागपुरात मैयाजी म्हणून धावत येऊन मला हा नमस्कार करतो, याला कसं माहित मी परिक्रमा करणार ते? "मैयाजी थंड पाणी प्या, नाश्ता करा" असं म्हणत माझ्या हातातून कमंडलू ओढून घेऊन एव्हाना गरम झालेलं पाणी बदलून थंडगार पाणी त्यात दिलंसुद्धा.
त्याच्याशी छान ओळख झाली. गप्पा झाल्या. त्यांचं नाव अविनाश सोळंकी. ते दुबईला असतात, आणि नर्मदा खंडात ७ ठिकाणी अन्नछत्र चालवतात. त्यांची सासुरवाडी नागपूरला म्हणून ते इथे आले होते. हा माणूस मैयाचा भक्त आहे. सुट्टी अभावी त्यांची परिक्रमा होऊ शकत नाही याची त्यांना फार खंत आहे आणि काहीतरी सत्कार्य म्हणून ते स्वखर्चाने आणि काही मदतीने हे ७ आणि पुढे येऊ घातलेले ३ अन्नछत्र चालवत आहेत. अविनाशजींनी माझा नंबर लिहून घेतला. दुसऱ्या दिवशी वेळ काढून घरी आले आणि परिक्रमेची पूर्ण माहिती दिली आणि एक पुस्तक मला भेट म्हणून दिलं. संपूर्ण परिक्रमेत जिथे जिथे मला नेटवर्क असेल तिथे तिथे मला यांचा दुबईहून फोन येत. फोन करून हा माणूस मला पुढची माहिती सांगायचा आणि एक मागणी करायचा..." मैयाजी मागच्या फोन नंतर काय अनुभव आले सांगा". नेटवर्क अभावी बरेचदा फोन होत नसत. अविनाशजींच्या माध्यमातून माई मला सतत सोबत देत होतीच. आता सांगा, कोण कुठले हे अविनाशजी मला परिक्रमेच्या महिनाभर आधीपासून सोबत करत होते, ते अगदी परिक्रमा संपेपर्यंत. माझी परिक्रमा होणे हे खरंच सांगा, फक्त माझ्या निर्णयामुळे साध्य झालंय का? नाही. ह्या लेकराकडून परिक्रमा करवून घ्यावी हा माझ्या माईचा आशीर्वाद आणि माझ्या जन्मदात्यांची आणि पूर्वजांची पुण्याईच आहे. आणि हे जाणवून देणारे शिवाय अविनाशजींच्या मदतीचे अजूनही अनुभव आहेत.
लक्कडकोटची झाडी, नेमावर हे अनुभव मी विसरू शकत नाही. पण अनुभव सूचीमध्ये त्यांचा क्रमांक जरा नंतर आहे, पण त्या आधीचे विलक्षण आणि अविश्वसनीय अनुभव
आहेत, ते पुढच्या भागांमध्ये येतीलच. संकल्प घेतल्या गेला, आता परिक्रमेला सुरवात करायची. आम्ही तिघी एकत्र होतो, आणि एकत्र राहू असं वाटत होतं. सौ मंत्री यांना चालण्याचा फ़ारसा सराव नव्हता असं त्या म्हणाल्या त्यामुळे संकल्प घेण्याआधी देखील मोरटक्का ते ओंकारेश्वर आम्ही पायी चालून गेलो होतो, सराव करण्यासाठी. असं म्हणतात संकल्पात बळ असतं.. आणि हो, ते असतच! ते कसं समजलं याचा अनुभव सांगते. पण त्या आधी एक कबूलीनामा मला द्यावासा वाटतो. संकल्प झाला होता, खरं तर आता माझी मैयावर पूर्ण श्रद्धा असायला हवी होती, मनातून तशी इच्छाही होती, पण कुठली तरी भिती मनात होतीच... ओंकारेश्वर ते मोरटक्का मैया किनारी जाऊ नका असा सल्ला अनेकांनी दिला. तुमचं वजन जास्त आहे, तुम्हाला झेपणार नाही, वाट कठीण आहे असंही सांगण्यात आलं. इथे माझ्या मनानी दोन कारणं पुढे केली.. एक कठीण असेल, काही झालं तर? परिक्रमा पूर्ण व्हायची नाही आणि दुसरं, सौ मंत्री आणि सौ. डोंगरे या दोघीही त्या मार्गाने जाण्यास तयार नव्हत्या... मीसुद्धा हाय वे नी जायचं ठरवलं. खरं तर ती मैयानी माझ्या मनाची घेतलेली परिक्षा असावी, मी त्यात नापास झाले आहे... आणि पुढे आलेल्या अनुभवांनंतर आज मला हे जाणवतय की त्यावेळी मी चूक केली. यथा शक्ती केलेला संकल्प हे माझ्या भित्र्या मनाला झाकणारं आवरण ठरलं.. संकल्प कसा असावा असं सांगताना एक गोष्ट मुद्दाम इथे सांगतेय, आधीच सांगतेय म्हणजे संकल्प हा शब्द जरी आला तरी तो पाळल्या जाईल आणि जी चूक मी केली ती इतरांकडून होणार नाही.
गोष्ट अशी आहे, एक व्यापरी होता, त्यानी ठरवलं, आता यापुढे आपण कुणालाही पैसे द्यायचे नाही, जे काही देणं असेल ते देऊन मोकळं व्हायचं आणि मग पुढे कुणालाही एक पैसा पण द्यायचा नाही. त्यानी ठरल्याप्रमाणे जे काही देणे होते ते पूर्ण केले आणि संकल्प घेतला... पुढे काही दिवसांनी एक सन्यासी त्या व्यापाऱ्याकडे आला, आणि म्हणाला मला तुमच्याकडून १ रुपये घेणे आहे. व्यापाऱ्याने संकल्प घेतलेला, तो म्हणाला मी काहीही झालं तरी पैसे देणार नाही. सन्यासी निघून गेला, काही दिवसांनी परत आला, तेव्हा व्यापाऱ्यानी त्याला दुरून बघितलं, मुलाला सांगितलं, जा बाबा झोपलेत म्हणून सांग... सन्यासाला तसं सांगितल्यावर सन्यासी म्हणाला मी वाट बघतो पण आज मी माझे पैसे घेऊनच जाईन! बराच वेळ निघून गेला... व्यापाऱ्यानी मुलाला सांगीतलं, जा सांग त्या संन्याशाला, बाबा आजारी आहेत, तुला आता १ रुपया मिळनार नाही. मुलाने व्यापाऱ्याला समजवल, १ रुपया तर आहे, देऊन टाका नं.... व्यापारी आपल्या मतावर ठाम... मुलाने सांगितलं, बाबा आजारी आहेत... सन्यासी ठिय्या
मारून बसलेला एक दिवस व्यापारी मुलाला म्हणाला.. जा संन्याशाला सांग बाबा वारलेत. मुलाने संन्याशाला तसाच निरोप दिला. संन्यासी म्हणाला " अरेरे, माझा रुपया ही गेला आणि व्यापारी ही, आता याचा अंतिम विधी झाल्यावर मी माझ्या गावी परत जाईन" मुलगा घाबरला... त्याने वडिलांना सांगितले. व्यापाऱ्याने मुलाला अंतिम संस्कारांची तयारी करायला सांगितलं. मुलगा बिचारा नाईलाजाने तयारी करू लागला. लोक जमा झाले, व्यापाऱ्याला चितेवर ठेवण्यात आलं, आता मात्र मुलगा घाबरला, आपल्या वडिलांना जिवंतपणीच अग्नी द्यायचा?... त्याचे हात थरथर कापू लागले. वडिलांच्या छातीवर डोकं ठेवून तो वडिलांना विनवू लागला. "बाबा अहो एका रुपयासाठी तुम्ही मरणसुद्धा पत्करताय? काय हा मूर्खपणा?.. व्यापारी काही ऐकेच ना.. म्हणाला.. अग्नी दे, पेटव चिता, पण मी रूपया देणार नाही. मुलाने नाईलाजास्तव चितेला अग्नी दिला, आणि आता चिता पेटणार तेवढ्यात त्या अग्नीचं रुपांतर फुलांमधे झालं. संन्यासी चितेजवळ गेला आणि साक्षात विष्णू रुपात समोर आला... व्यापाऱ्याला चितेवरून दूर केलं... म्हणाला.. संकल्प असावा तर असा...
मी मात्र यथाशक्ती संकल्प केला.. म्हणजे कुठेतरी माझा विश्वास माझ्यावर आणि माझ्या मैयावर कमी पडला... ती कनवाळूच आहे, मला त्रास होऊ नये याची काळजी ती घेतेच आहे, पण मी तिच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून, काही तरी नियम ठेवून संकल्प केला असता तर तोही तिने पूर्णत्वाला नेलाच असता. पुन्हा परिक्रमेची संधी मिळाल्यास ही चूक माझ्याकडून होऊ देऊ नको असं मी तिला आताच विनवते. परिक्रमेचे नियम नक्की काय, त्याची कारणं नक्की काय हे खरं तर अजूनही हवं तसं मला समजलेलं नाहीये, पण १००% श्रद्धा हा नियम असायलाच हवा हे नक्की. भिती वाटणे म्हणजे श्रद्धा कमी पडणेच आहे आणि काही वेळेला माझ्याकडून ही चूक झालेली आहे. मात्र काही वेळेला माझ्या नर्मदा माईनी मला अगदी अभयाचं वरदान देखील दिलं ते कसं ते ही माझ्या अनुभव कथनामध्ये येईलच.
संकल्प करून झाला होता. कार्तिक द्वादशी, १ नोव्हेंबर २०१७ हा दिवस. मी या अनुभव कथनामधे माझी रोजनिशी सांगणार नाहीये कारण ज्याच्या त्याच्या प्रकृती आणि प्रारब्धानुसार परिक्रमा घडत असते. मी इथे मला आलेले अनुभव कथन करणार आहे कारण माझ्या मते ते अनुभव मला मिळणं हेच महत्वाचं होतं.. तर परिक्रमेची वाटचाल प्रत्यक्ष रित्या सुरु होण्याआधीचे अनुभव मी सांगितले, आता अनुभवाला सुरवात करू पुढच्या भागापासून.... नर्मदे हर.....
क्रमशः
या मालिकेचा रोज एक भाग शेअर केला जाणार आहे. लेखिकेने नितांत सुंदर रीतीने आपले अनुभव मांडले आहे. वाचत असताना आपणच परिक्रमा करत असल्याची अनुभूती येईल.
______________________________
नर्मदा परिक्रमा: विलक्षण अनुभूती!

या मालिकेचा रोज एक भाग शेअर केला जाणार आहे. लेखिकेने नितांत सुंदर रीतीने आपले अनुभव मांडले आहे. वाचत असताना आपणच परिक्रमा करत असल्याची अनुभूती येईल.
______________________________
नर्मदा परिक्रमा: विलक्षण अनुभूती!
भाग - 4
परिक्रमेच्या पहिल्याच दिवशी लागोपाठ अनुभव, एक शुभ संकेत, आणि एक कोडं पडतं तेव्हां…
नर्मदे हर.
नर्मदे हर… तर मागच्या भागात आपण मला पडलेल्या कोड्याबद्दल बोलत होतो! लेले काका असं काय म्हणाले होते? मी इतकी बुचकळ्यात का पडले? या कोड्याचा उलगडा कसा आणि कुठे झाला ते आता सांगते.
लेले काकांशी माझ्या ब-याच गप्पा झाल्यात. साधना कशी करायची? माझे गुरु कोण? कुठले श्लोक म्हणायचे, काय वाचायचं असे अनेक विषय ते माझ्याशी बोलत होते... खरंतर माझ्या बाबतीत त्यांनी फ़ार काही विचारलं नाही पण मी मात्र अनेक प्रश्न विचारू लागले. तेवढी मोकळीक तोवर बोलून निर्माण झाली होती. ते अगदीच प्रेमाने माझ्याशी बोलत होते… मधे मधे मला आशिर्वाद ही देत होते... छान होईल बेटा तुझं सगळं’… असं ऐकून छान वाटत होतं, कुणी एक आजोबा, काही कारण नसताना, निस्वार्थ भावनेनी आशिर्वाद देतात हेच मुळात एक वेगळं फ़ीलिंग होतं. मला हे लेले आजोबा वेगळे वाटले, पण आवडले होते.
आमचं भोजन प्रसादी घेऊन झालं आणि लेले काका म्हणाले, ‘बाळ, बरीच प्रश्न दिसतात तुझ्या मनात… बरं मी उत्तर देतो... तुला माझ्याबद्दल एक गोष्ट सांगतोच आता!’
आजोबा काय सांगतात याकडे मी कान लावून होते. त्यांनी जरा पॉज घेतला, मला थोडं बाजूला बोलावलं, आणि म्हणाले, ‘नाही मी नाही सांगणार तुला माझ्याबद्दल…’
अरेच्या, अचानक काय झालं आजोबा, सांगा ना... मी आग्रह केला. त्यावर ते म्हणतात… ‘नको, माझ्याबद्दल तुला नर्मदा मैयाच सांगेल काय ते! मी कोण आहे हे तुला तुझ्या नर्मदा मैयाकडून आणि तुझ्या सोबत च्या लोकांकडून समजेल… आणि ते ही तुझी परिक्रमा शेवटच्या टप्प्यात असेल त्या वेळी’.
मला आता मात्र फ़ारच वेगळं वाटू लागलं…
पण एक शुभ संकेत मिळाला... माझ्या परिक्रमेच्या शेवटच्या टप्प्यात असं आजोबा म्हणाले, म्हणजे परिक्रमा पूर्ण होणार हे नक्की. आजोबांना जास्त आग्रह न करता आम्ही पुढची वाटचाल सुरु केली. मी आता मझ्या मैत्रिणीसोबत होते आणि आजोबा त्यांच्या सोबतच्या पुरुष मंडळीं सोबत. ती माझी आणि आजोबांची शेवटची भेट. काय आश्चर्य न? त्या नंतर पूर्ण परिक्रमेत मला लेले काका पुन्हा दिसलेच नाही. मी मात्र प्रत्येक आश्रमात ते येऊन गेले का ही चौकशी करायचे. म्हातारा माणूस, आपल्या पेक्षा पुढे जाणार नाही कदाचित असं वाटायचं.
पुढे माझ्यासोबत मंदार वाळिंबे, सुदिन पराडकर आणि त्याचे काका, आणि तांबे बाबा असे लोक होते. सौ मंत्रींची परिक्रमा पूर्ण होऊ शकली नाही आणि सौ डोंगरे काही कारणास्तव वेगळ्या ग्रुप बरोबर होत्या… आम्ही सोबत राहयचं ठरवलं असून ते तसं झालं नव्ह्तं!... असो... तर लेले काकांबद्दल मंदार व ग्रुप माझ्याकडून ऐकून होते. मी लेले काकांचा शोध घेतेय हे त्यांना महित होतं. तब्बल साडे चार महिने गेलेत… मला लेले काका भेटलेच नाही, मात्र एक दिवस अचानक माझ्या समोर जे काही आलं त्याने मी धन्य धन्य झाले… माझ्या भाग्याचा मलाच हेवा वाटावा अशीच गोष्ट.
नरसिंगपूर जिल्ह्यातल्या गुरसी गावात एका मंदिरात आम्ही आश्रय घेतला. तिथून पुढचं गाव रमपूरा, फ़क्त ७ किमी. मी आणि तांबे बाबा गुरसीहून थोडं उशीरा निघालो... मंदार आणि मंडळी सकाळी लवकर निघून रमपू-याला पोचली. तिथून मंदार चा फ़ोन आला, म्हणाला, ‘ताई आज रमपुरा ला मुक्काम करायचाय!’ 
मी- काय? फ़क्त ७ किमी चालून मुक्काम? नाही रे, अशानी कशी पूर्ण व्हायची परिक्रमा. मी नाही मुक्काम करणार... मंदार- पण ही रमपु-याची मंडळी जाऊच देत नाहीयेत ताई… तुला मुक्काम करायचा नसेल तर तू दुसरी कडून जा... असं पुढच्या फ़ोन मधे मला सुदिन सुद्धा सांगत होता… त्या दोन तासात आमचे ३ ते ४ फ़ोन झाले…कुठे पोचलात, पुढचा रस्ता कसा असं आम्ही सतत कॉन्टेक मधे होतो. पुन्हा एक फ़ोन… मंदार म्हणाला, ताई नो ऑप्शन... तुला थांबायलाच लागेल... आणि आता जे मी सांगणार आहे त्याला तू नकार देऊच शकत नाही… तो म्हणाला, तुला लेले काका आठवतात?… मला वाटलं ते तिथे आहेत म्हणून मंदार आपल्याला थांबायला म्हणतोय... पण माहितिये का, ते तर नव्हते तिथे, मात्र तो आश्रम माझ्या गुरुबंधूनी तयार केलेला. माझ्या गुरुंचा वास तिथे… 
आता विषयच संपला होता… मंदारच्या एका वाक्याने पिक्चर क्लीअर झाला... तो म्हणाला, ‘ताई नाना महारांजाचा आश्रम आहे, तू मुक्काम करतेयेस, आणि लेले काकांबद्दल महत्वाची बातमी सांगायचीय... लवकर ये.’
साडे चार महिने, परिक्रमेचा जवळ जवळ शेवटचा टप्पा... अमरकंटकच आमचं नेक्स्ट टारगेट... काय समजणार होतं मला लेले काकांबद्दल???… 
‘माझ्याबद्दल तुला नर्मदा मैयाच सांगेल काय ते! मी कोण आहे हे तुला तुझ्या नर्मदा मैयाकडून आणि तुझ्या सोबतच्या लोकांकडून समजेल…आणि ते ही तुझी परिक्रमा शेवटच्या टप्प्यात असेल त्या वेळी.’ मला लेले काकांचं वाक्य आठवलं... उत्सुकता शिगेला पोचली… आणि मी रमपु-याला! गेल्या गेल्या गुरुंचा प्रसाद मिळाला…आणि मग मंदारनी जे सांगितलं ते ऐकून मी सुन्न च झाले… ‘ताई लेले काका कोण माहितिये का? ते साक्षात शंकर महाराज आहे...’ 
पुण्याला शंकर महाराजांचा आश्रम आहे हे आपल्याला महितच असेल. दत्त संप्रदायातले हे संत सद्गुरु! मोठे आणि भेदक डोळे, अजानुबाहू आणि गुडघ्यावर हात ठेवून बसलेले अशी यांची मूर्ती मी पाहिली होती. हे लेले काका म्हणजे शंकर महाराजच होते...मी विचारलं मंदार ला... तुला कसं समजलं रे?
तर त्याने धनंजय नाईक नावाच्या एक नर्मदा भक्ताची गोष्ट मला सांगीतली…
धनंजय नाईक हे दर वर्षी परिक्रमा करतात. ते शंकर महाराजांचे भक्त. दर वेळी शंकर महाराज त्यांना भेट देतात, पण ह्या साक्षात्काराबद्दल धनंजय नाईकांना उशीरा कळतं… या वेळी श्री नाईकांनी शंकर महाराजांना विनवणी केली की ‘मीच शंकर महाराज असं स्वत:च्या तोंडून सांगा, तरच माझा विश्वास बसेल...’ मी रमपु-याला असताना लेले काका अमरकंटकला पोहचले होते. धनंजय नाईंकाना त्यांनी स्वत: सांगितलं ‘माझी वाट बघत होतास ना? मीच शंकर महाराज आहे’ ही वार्ता वाऱ्यासारखी रमपु-याला पोचली, आणि माझ्या पर्यंत आली…परिक्रमा झाल्यावर मी धनंजय दादांना फोन करून या प्रसंगाची खात्री करून घेतली होती.
मी खरच भाग्यवान… परिक्रमेच्या आधी गुरुमाऊली मला पदरात घेते, श्री दत्तगुरु त्यांच्या अनेक रुपातून मला भेट देतात, माझी काळजी घेतात… लेले काकांनी मन भरून आशिर्वाद दिले आणि ठरवल्याप्रमाणे माझ्या कोड्याचा उलगडा माझ्याच गुरुंच्या ठिकाणी माझ्या डोळ्यासमोर आणला… या सगळ्या काळात एक घटना अजून घडली होती, आणि ती माझ्या नजरेतून सुटून गेली... पण मी त्यांचा नजरेतून सुटली नाही... शंकर महाराजांचं माझ्याकडे व्यवस्थित लक्ष होतं हे मला नंतर जाणवलं.
मी गरुडेश्वरला असतानाची गोष्ट. भालोद चे प्रतापे महाराज म्हणजे आई स्वरूप. मी त्यांची लेक... मूळचे नागपूर चे, त्यामुळे अजून थोडा सॉफ़्ट कॉर्नर… त्यांचे अनुभव पुढे सांगेनच, पण हे प्रतापे महाराज मला गरुडेश्वरला भेटायला आले... हो खास मला भेटायला भालोदहून नर्मदा मैया क्रॉस करून नावेतून आले होते. त्या वेळी त्या नावेत शंकर महाराजांचे भक्त त्यांची मूर्ती घेऊन आले होते. गरुडेश्वर घाटावर मी शंकर महाराजांच्या आरती आणि पूजे मधे सामिल होते...पण मी अनभिज्ञ होते... हे निम्मित्त मात्र होतं, संकेत होता, इशारा होता का काय ते माहित नाही, पण शंकर महाराज माझ्यावर लक्ष ठेवून होते हे समजायला मला साडेचार महिने लागले. नक्कीच मी पुण्यकार्य केलं असलं पाहिजे की असे संत सद्गुरु मला प्रत्येक ठिकाणी सांभाळून घेत होते. ‘गुरुकृपा हि केवलम’ म्हणतात तेच खरं. एक गुरु प्रसन्न असलेत की सुख दु:खाची तमाच जाणवत नाही... माझ्यासारख्यांना हे समजायला वेळ लागतो…पण हळू हळू प्रचिती येतेच! 
गुरु आणि नर्मदा मैया यांनीच माझी परिक्रमा पूर्ण करवून घेतलीये असं मी का म्हणतेय ते आता तुमच्या लक्षात येईल. कारण जसे संत सद्गुरु माझ्यासोबत सुरवाती पासून होतेत तशीच माझी नर्मदा माई पण होती... आमचा दुसरा, म्हणजे मोरटक्क्यानंतरचा मुक्काम झाला टोकसर ला. परिक्रमा सुरू होऊन अजून आठवडा ही व्हायचा होता… पूर्ण तयारी करून मी परिक्रमेला निघाले होते... 
माझ्या बाबांचे चांगले महागडे आणि सगळ्यात छान समजणारे केचूआ कंपनीचे जोडे मी घातलेले होते… आणि इतके चांगले जोडे असून ते टोकसर गावाच्या ५ कि.मी आधी फ़ाटले… अजून परिक्रमेची जेम तेम सुरवात होती…मात्र इथे सुद्धा मला वेगळाच अनुभव आला…
क्रमश:

या मालिकेचा रोज एक भाग शेअर केला जाणार आहे. लेखिकेने नितांत सुंदर रीतीने आपले अनुभव मांडले आहे. वाचत असताना आपणच परिक्रमा करत असल्याची अनुभूती येईल.
______________________________
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती !
भाग - ५
परिक्रमेच्या सुरवातीला केचूआ चे चांगल्या प्रतीचे जोडे पूर्ण फ़ाटतात तेव्हा…
नर्मदे हर… माझे जोडे फ़ाटले… तो अनुभव आता सांगते... मोरट्क्का ते टोकसर म्हणजे गोमुख घाट असा साधारण १० किमी चा प्रवास. यात मधे परमहंस आश्रम लागतो. इथे आमची भोजन प्रसादी झाली आणि इथून पुढे कसं काय माहित नाही पण अचानक माझा एक जोडा पूर्ण फ़ाटला, त्याचं सोल आणि वरचा जोड्याचा भाग वेगळा होऊ लागला. मी चक्क जोडे हातात घेऊन चालू लागले. पण त्यावेळी मनात जे विचार आले ते एरवी माझ्या मनात आले नसते.
नर्मदा खंड ही तपोभूमी आहे आणि या परिसराचा परिणाम आपल्या मनावर झाल्याशिवाय राहात नाही. मुख्य म्हणजे तो इतका नकळत होतो की आपल्यासाठी सुद्धा तो एक आश्चर्याचाच भाग असतो. एरवी रस्त्यात जोडे फ़ाट्ल्यावर माझी थोडी का होईना चिडचिड झाली असती…निदान आता कसं करायचं ही घालमेल तर झालीच असती, पण या वेळी असं झालं नाही… जोडे फ़ाटले हे वास्तव माझ्या मनानी इतकं चटकन स्वीकार केलं की त्याची वाच्यता सुद्धा सह प्रवाश्यांकडे झाली नाही… आपल्या सोबत  या पुढे ज्या काही घटना घडणार आहेत त्या मैयाची कृपा असणार आहे असा विचार मनात आला… वाटलं, कदाचित आपण परिक्रमा अनवाणी केली पाहीजे असं काहितरी मैयाला सुचवायचं असेल. पुढचं ३-४ किमी अंतर मी अनवाणी चालले... फार फ़ार कठीण असतं ते. तेव्हा जे काय दगड गोटे बोचले असतील त्या प्रत्येक बोचण्यातून मला अनवाणी परिक्रमा करणा-यांचं मनोबल काय असेल याची कल्पनाच आली! नाही…मी तेवढ्या तयारीची नव्हती… मला अजून खूप खूप शिकायचं आहे हे मला तेव्हा ख-या अर्थानी उमगलं… ते फ़ाटकेच जोडे मी पुन्हा पायात घातले आणि जमेल तसं चालू लागले. टोकसर आले की चांभाराकडून शिवून घेऊ असं स्वत:ला धीर देत मी टोकसर पर्यंत तशीच फ़ाटक्या जोड्याने पोचले खरे…पण टोकसर आणि पुढच्या तीन गावात चांभार नाही असं मला तिथे समजलं... आता काय करायचं?
अनवाणी चालण्याची क्षमता माझ्यात नाही हे मला समजलच होतं. तो विचार तिथेच सोडून मी झोपी गेले आणि मला शांत झोप लागली देखील! सकाळी गोमुख घाटावर मैया स्नानाला गेले होते. तिथे मैयाला विनवणी केली… आई योग्य तो मार्ग दाखव… मला हेच जोडे घालून परिक्रमा करायची होती, आणि याला ही कारण होतं, हे जोडे माझ्या बाबांचे... त्यांना परिक्रमा करण्याची खूप इच्छा होती, आणि म्हणून त्यांच्या जोड्यांमधून मला या नर्मदा मैयाची प्रदक्षिणा करायची होती. भावनिक कारण हे असं होतं या जोड्यांमागचं. मैयामधे उतरले आणि तिला विनवलं, आई, शक्य असल्यास हेच जोडे सुधरवून शिवून घालता येतील असं काहितरी घडवून आण.
सकाळच्या साधारण सहा वाजताची गोष्ट असेल. मी पुढचा प्रवास थोडा अनवाणी, थोडा फ़ाटक्या जोड्यातून असा करू लागले. कांकरीया गावाच्या आधी एक छोटसं गाव लागतं पीतनगर. तिथे एक किराणा मालाचं दुकान दिसलं... सौ डोंगरेंच्या मनात आलं की फ़ेविक्विक नी जोडे चिकटवून बघावे... निदान चालायला थोडं सोपं जाईल. मी आणि सौ डोंगरे त्या दुकानासमोर बसलो, मी फ़ेविक्विक विकत घेतेलं आणि जोडा चिकटवायला म्हणून पायातून बाहेर काढायला लागले… इतक्यात एक माणूस अगदी धावत माझ्याकडे आला, त्यानी माझ्या पायातला जोडा जवळ जवळ ओढून घेतला आणि तो पळून गेला… ‘अरे बाबा दुसरा तरी घेऊन जा’ इतकं सुद्धा बोलायची संधी मला मिळाली नाही… आता अनवाणी च चालायचं… जोडाच नाही… मात्र त्या माणसाबद्दल माझ्या मनात राग सुद्धा उत्पन्न झाला नाही… एरवी कदाचित आपल्या जवळची वस्तू कुणी हिसकावून घेतल्यावर क्षणिक का होईना राग येईल... पण कसा काय नाही आला मैयाच जाणे… तो दुकानदार, मी आणि सौ डोंगरे आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो होतो…दुकानदारानी आम्हाला चहा पाजला… आणि आम्ही पुढे निघालो... तो उरलेला एक जोडा मी तिथेच सोडून दिला आणि आता अनवाणी चालू लागले... सधारण अर्धा किमी जाऊन झालं असेल नसेल, हा मघाचा जोडा पळवून नेणारा माणूस मैया मैया करत आमच्या मागे आला... त्याच्या हातात माझे दोन्ही जोडे होते, म्हणाला, ‘वो चामरदा की घरवाली को बाहर जाना था, इसलिये जूता जल्दी जल्दी लेकर गया मैं. मैं तो केवट हूं...मुझसे जैसा बना मैंने सिलवा दिया. अब आपको नंगे पैर नहीं चलना पडेगा’. 
मी काय विचार करत होते आणि तो बिचारा माझ्यासाठी किती धडपड करत होता... मी पैसे देऊ केले… आणि जबरदस्ती त्याच्या हातात ठेवलेच... तो तयार नव्हता पण पैसा हा पैसा असतो आणि गरीबाला गरज असते... तसे मी काही फ़ार पैसे दिले  नाहीत... आणि तसं करून सुद्धा त्याचे उपकार कमी ही होणार नाहीतच…पण निदान काहीतरी समाधान... तिथून पुढे एका गावात एक चांभार दिसला आणि त्याच्याकडून मग ते जोडे मी पुन्हा व्यवस्थित शिवून घेतले.
तिथून पुढे कांकरीया नावाच्या गावाला एका आश्रमात थांबलो. ‘आसन लगादो’ असा आदेश मिळाला. आसन लावणे म्हणजे इथे विश्रांती करा, असा अर्थ होतो… त्यात भोजन प्रसादी घेणार हे येतच. इथला अनुभव मजेशीर होता. तास झाला, दिड तास झाला... पोटात भुकेनी खळ्बळ माजलेली आणि हा साधू काही भोजन प्रसादीचं नाव घेईना… शेवटी आमच्यातल्या एकाने हिम्मत करून भोजन प्रसादी चं विचारलं…तो रागवलाच... म्हणाला आप ही बना लो… आप तो बहोत पैसे वाले हो, आपको भोजन की क्या जरूरत? खरीद के खा लेना कहीं…’ आम्हाला काही समजेच ना, असं काय झालं एकदम? मग त्यानी सांगीतलं, ‘आपका सामान देखो…दुनिया भर की चिजें उठाके लाये हो... ऐसे आता है कोई मैया के घर?... मैया पर भरोसा नहीं, शहर से पढ लिख कर आते हो, और परिक्रमा परिक्रमा का ढोंग रचाते हो…अरे खाना भी ले लेना था साथ में…’ तो साधू चांगलाच चिडला होता. 
आमच्या जवळच्या भल्या मोठ्या आणि वजनी बॅग्स पाहून त्याला आमचा वैताग आला... मग तिथेच आम्ही प्रत्येक बॅग मधून अनावश्यक सामान, जास्तीचे कपडे वगैरे सगळं काढून गरीबांना देऊन टाकलं… आणि खरं सांगू…संचय हा त्रासदायकच… तिथे एक धडा असा मिळाला की संचय कुठला ही असो... तो वाईट...
आपण लोक नुसताच संचय करत असतो...पैशाचा, संपत्ती चा, नात्यांचा, माणसांचा, भावनांचा, आठवणींचा आणि मला वाटतं अगदी अनुभवांचा सुद्धा! ते साठवून ठेवलं की वजन होणारच! त्यापेक्षा येईल त्या प्रसंगी, मिळेल त्या परिस्थित, गाठीशी आलेले क्षण, जगणं आणि विसरून जाणं हे खरं समाधानाचं साधन आहे, आणि असं वागता येण्यासाठीचा प्रयास ही असावी साधना...
आम्ही सामान काढून टाकल्यावर त्या साधू महाराजांनी आम्हाला भोजन प्रसादी वाढली… ओझं उतरवल्याचा शरीराला आनंद झाला होता आणि मनालाही. इथून पुढे आमच्या जवळ दोन जोडी कपडे, एक पांघरूण (स्लिपिंग बॅग) आणि थोडे औषध... इतकंच सामान होतं. यातलं काही हरवलं गेलं तरी त्याची तमा असणार नव्हती…मुक्त मनानी आम्ही पुढची वाटचाल सुरू केली.
पुढे रावेरखेडीला जाताना एका परिक्रमावासी मैयाजींना तब्येती मुळे एका गाडीवाल्याचा आधार घ्यावा लागला… लोकं अनोळखी परिक्रमावासी च्या मदतीला धावून येतात इथे. परिक्रमावासीच्या रूपात नर्मदा मैयाला बघणारी इथली ही स्थानीय मंडळी आणि या अन्न्दाता स्थानीयांच्या रुपात परिक्रमा वासींना भेटणारी नर्मदा मैया, हा खरोखर विलक्षण प्रकार आहे. कोण कधी कुठे कुठल्या रूपात येईल आणि काय देऊन जाईल याचा अंदाजही बांधण कठीण आहे… आणि कधी कधी तर मैयाचं अस्तित्व जाणवतं पण ती अदृष्य रुपात आपल्या सोबत असते हे अनुभावाताक येतं, सांगितलं तर विश्वास बसू नये असेही काही अनुभव येतात. असाच एक अनुभव पुढच्या भागात सांगते.
क्रमश:🌹





























भाग - 4
परिक्रमेच्या पहिल्याच दिवशी लागोपाठ अनुभव, एक शुभ संकेत, आणि एक कोडं पडतं तेव्हां…
नर्मदे हर.
नर्मदे हर… तर मागच्या भागात आपण मला पडलेल्या कोड्याबद्दल बोलत होतो! लेले काका असं काय म्हणाले होते? मी इतकी बुचकळ्यात का पडले? या कोड्याचा उलगडा कसा आणि कुठे झाला ते आता सांगते.

लेले काकांशी माझ्या ब-याच गप्पा झाल्यात. साधना कशी करायची? माझे गुरु कोण? कुठले श्लोक म्हणायचे, काय वाचायचं असे अनेक विषय ते माझ्याशी बोलत होते... खरंतर माझ्या बाबतीत त्यांनी फ़ार काही विचारलं नाही पण मी मात्र अनेक प्रश्न विचारू लागले. तेवढी मोकळीक तोवर बोलून निर्माण झाली होती. ते अगदीच प्रेमाने माझ्याशी बोलत होते… मधे मधे मला आशिर्वाद ही देत होते... छान होईल बेटा तुझं सगळं’… असं ऐकून छान वाटत होतं, कुणी एक आजोबा, काही कारण नसताना, निस्वार्थ भावनेनी आशिर्वाद देतात हेच मुळात एक वेगळं फ़ीलिंग होतं. मला हे लेले आजोबा वेगळे वाटले, पण आवडले होते.
आमचं भोजन प्रसादी घेऊन झालं आणि लेले काका म्हणाले, ‘बाळ, बरीच प्रश्न दिसतात तुझ्या मनात… बरं मी उत्तर देतो... तुला माझ्याबद्दल एक गोष्ट सांगतोच आता!’
आजोबा काय सांगतात याकडे मी कान लावून होते. त्यांनी जरा पॉज घेतला, मला थोडं बाजूला बोलावलं, आणि म्हणाले, ‘नाही मी नाही सांगणार तुला माझ्याबद्दल…’
अरेच्या, अचानक काय झालं आजोबा, सांगा ना... मी आग्रह केला. त्यावर ते म्हणतात… ‘नको, माझ्याबद्दल तुला नर्मदा मैयाच सांगेल काय ते! मी कोण आहे हे तुला तुझ्या नर्मदा मैयाकडून आणि तुझ्या सोबत च्या लोकांकडून समजेल… आणि ते ही तुझी परिक्रमा शेवटच्या टप्प्यात असेल त्या वेळी’.
मला आता मात्र फ़ारच वेगळं वाटू लागलं…
पण एक शुभ संकेत मिळाला... माझ्या परिक्रमेच्या शेवटच्या टप्प्यात असं आजोबा म्हणाले, म्हणजे परिक्रमा पूर्ण होणार हे नक्की. आजोबांना जास्त आग्रह न करता आम्ही पुढची वाटचाल सुरु केली. मी आता मझ्या मैत्रिणीसोबत होते आणि आजोबा त्यांच्या सोबतच्या पुरुष मंडळीं सोबत. ती माझी आणि आजोबांची शेवटची भेट. काय आश्चर्य न? त्या नंतर पूर्ण परिक्रमेत मला लेले काका पुन्हा दिसलेच नाही. मी मात्र प्रत्येक आश्रमात ते येऊन गेले का ही चौकशी करायचे. म्हातारा माणूस, आपल्या पेक्षा पुढे जाणार नाही कदाचित असं वाटायचं.
पुढे माझ्यासोबत मंदार वाळिंबे, सुदिन पराडकर आणि त्याचे काका, आणि तांबे बाबा असे लोक होते. सौ मंत्रींची परिक्रमा पूर्ण होऊ शकली नाही आणि सौ डोंगरे काही कारणास्तव वेगळ्या ग्रुप बरोबर होत्या… आम्ही सोबत राहयचं ठरवलं असून ते तसं झालं नव्ह्तं!... असो... तर लेले काकांबद्दल मंदार व ग्रुप माझ्याकडून ऐकून होते. मी लेले काकांचा शोध घेतेय हे त्यांना महित होतं. तब्बल साडे चार महिने गेलेत… मला लेले काका भेटलेच नाही, मात्र एक दिवस अचानक माझ्या समोर जे काही आलं त्याने मी धन्य धन्य झाले… माझ्या भाग्याचा मलाच हेवा वाटावा अशीच गोष्ट.
नरसिंगपूर जिल्ह्यातल्या गुरसी गावात एका मंदिरात आम्ही आश्रय घेतला. तिथून पुढचं गाव रमपूरा, फ़क्त ७ किमी. मी आणि तांबे बाबा गुरसीहून थोडं उशीरा निघालो... मंदार आणि मंडळी सकाळी लवकर निघून रमपू-याला पोचली. तिथून मंदार चा फ़ोन आला, म्हणाला, ‘ताई आज रमपुरा ला मुक्काम करायचाय!’ 
मी- काय? फ़क्त ७ किमी चालून मुक्काम? नाही रे, अशानी कशी पूर्ण व्हायची परिक्रमा. मी नाही मुक्काम करणार... मंदार- पण ही रमपु-याची मंडळी जाऊच देत नाहीयेत ताई… तुला मुक्काम करायचा नसेल तर तू दुसरी कडून जा... असं पुढच्या फ़ोन मधे मला सुदिन सुद्धा सांगत होता… त्या दोन तासात आमचे ३ ते ४ फ़ोन झाले…कुठे पोचलात, पुढचा रस्ता कसा असं आम्ही सतत कॉन्टेक मधे होतो. पुन्हा एक फ़ोन… मंदार म्हणाला, ताई नो ऑप्शन... तुला थांबायलाच लागेल... आणि आता जे मी सांगणार आहे त्याला तू नकार देऊच शकत नाही… तो म्हणाला, तुला लेले काका आठवतात?… मला वाटलं ते तिथे आहेत म्हणून मंदार आपल्याला थांबायला म्हणतोय... पण माहितिये का, ते तर नव्हते तिथे, मात्र तो आश्रम माझ्या गुरुबंधूनी तयार केलेला. माझ्या गुरुंचा वास तिथे… 
आता विषयच संपला होता… मंदारच्या एका वाक्याने पिक्चर क्लीअर झाला... तो म्हणाला, ‘ताई नाना महारांजाचा आश्रम आहे, तू मुक्काम करतेयेस, आणि लेले काकांबद्दल महत्वाची बातमी सांगायचीय... लवकर ये.’
साडे चार महिने, परिक्रमेचा जवळ जवळ शेवटचा टप्पा... अमरकंटकच आमचं नेक्स्ट टारगेट... काय समजणार होतं मला लेले काकांबद्दल???… 
‘माझ्याबद्दल तुला नर्मदा मैयाच सांगेल काय ते! मी कोण आहे हे तुला तुझ्या नर्मदा मैयाकडून आणि तुझ्या सोबतच्या लोकांकडून समजेल…आणि ते ही तुझी परिक्रमा शेवटच्या टप्प्यात असेल त्या वेळी.’ मला लेले काकांचं वाक्य आठवलं... उत्सुकता शिगेला पोचली… आणि मी रमपु-याला! गेल्या गेल्या गुरुंचा प्रसाद मिळाला…आणि मग मंदारनी जे सांगितलं ते ऐकून मी सुन्न च झाले… ‘ताई लेले काका कोण माहितिये का? ते साक्षात शंकर महाराज आहे...’ 
पुण्याला शंकर महाराजांचा आश्रम आहे हे आपल्याला महितच असेल. दत्त संप्रदायातले हे संत सद्गुरु! मोठे आणि भेदक डोळे, अजानुबाहू आणि गुडघ्यावर हात ठेवून बसलेले अशी यांची मूर्ती मी पाहिली होती. हे लेले काका म्हणजे शंकर महाराजच होते...मी विचारलं मंदार ला... तुला कसं समजलं रे?
तर त्याने धनंजय नाईक नावाच्या एक नर्मदा भक्ताची गोष्ट मला सांगीतली…
धनंजय नाईक हे दर वर्षी परिक्रमा करतात. ते शंकर महाराजांचे भक्त. दर वेळी शंकर महाराज त्यांना भेट देतात, पण ह्या साक्षात्काराबद्दल धनंजय नाईकांना उशीरा कळतं… या वेळी श्री नाईकांनी शंकर महाराजांना विनवणी केली की ‘मीच शंकर महाराज असं स्वत:च्या तोंडून सांगा, तरच माझा विश्वास बसेल...’ मी रमपु-याला असताना लेले काका अमरकंटकला पोहचले होते. धनंजय नाईंकाना त्यांनी स्वत: सांगितलं ‘माझी वाट बघत होतास ना? मीच शंकर महाराज आहे’ ही वार्ता वाऱ्यासारखी रमपु-याला पोचली, आणि माझ्या पर्यंत आली…परिक्रमा झाल्यावर मी धनंजय दादांना फोन करून या प्रसंगाची खात्री करून घेतली होती.
मी खरच भाग्यवान… परिक्रमेच्या आधी गुरुमाऊली मला पदरात घेते, श्री दत्तगुरु त्यांच्या अनेक रुपातून मला भेट देतात, माझी काळजी घेतात… लेले काकांनी मन भरून आशिर्वाद दिले आणि ठरवल्याप्रमाणे माझ्या कोड्याचा उलगडा माझ्याच गुरुंच्या ठिकाणी माझ्या डोळ्यासमोर आणला… या सगळ्या काळात एक घटना अजून घडली होती, आणि ती माझ्या नजरेतून सुटून गेली... पण मी त्यांचा नजरेतून सुटली नाही... शंकर महाराजांचं माझ्याकडे व्यवस्थित लक्ष होतं हे मला नंतर जाणवलं.
मी गरुडेश्वरला असतानाची गोष्ट. भालोद चे प्रतापे महाराज म्हणजे आई स्वरूप. मी त्यांची लेक... मूळचे नागपूर चे, त्यामुळे अजून थोडा सॉफ़्ट कॉर्नर… त्यांचे अनुभव पुढे सांगेनच, पण हे प्रतापे महाराज मला गरुडेश्वरला भेटायला आले... हो खास मला भेटायला भालोदहून नर्मदा मैया क्रॉस करून नावेतून आले होते. त्या वेळी त्या नावेत शंकर महाराजांचे भक्त त्यांची मूर्ती घेऊन आले होते. गरुडेश्वर घाटावर मी शंकर महाराजांच्या आरती आणि पूजे मधे सामिल होते...पण मी अनभिज्ञ होते... हे निम्मित्त मात्र होतं, संकेत होता, इशारा होता का काय ते माहित नाही, पण शंकर महाराज माझ्यावर लक्ष ठेवून होते हे समजायला मला साडेचार महिने लागले. नक्कीच मी पुण्यकार्य केलं असलं पाहिजे की असे संत सद्गुरु मला प्रत्येक ठिकाणी सांभाळून घेत होते. ‘गुरुकृपा हि केवलम’ म्हणतात तेच खरं. एक गुरु प्रसन्न असलेत की सुख दु:खाची तमाच जाणवत नाही... माझ्यासारख्यांना हे समजायला वेळ लागतो…पण हळू हळू प्रचिती येतेच! 
गुरु आणि नर्मदा मैया यांनीच माझी परिक्रमा पूर्ण करवून घेतलीये असं मी का म्हणतेय ते आता तुमच्या लक्षात येईल. कारण जसे संत सद्गुरु माझ्यासोबत सुरवाती पासून होतेत तशीच माझी नर्मदा माई पण होती... आमचा दुसरा, म्हणजे मोरटक्क्यानंतरचा मुक्काम झाला टोकसर ला. परिक्रमा सुरू होऊन अजून आठवडा ही व्हायचा होता… पूर्ण तयारी करून मी परिक्रमेला निघाले होते... 
माझ्या बाबांचे चांगले महागडे आणि सगळ्यात छान समजणारे केचूआ कंपनीचे जोडे मी घातलेले होते… आणि इतके चांगले जोडे असून ते टोकसर गावाच्या ५ कि.मी आधी फ़ाटले… अजून परिक्रमेची जेम तेम सुरवात होती…मात्र इथे सुद्धा मला वेगळाच अनुभव आला…
क्रमश:















Saturday, February 28, 2026

इंग्लंड भटकंती

 मंडळी, मी सध्या यू. के. मधे आहे. आणि माझी अर्धंगिनी आणी 3 वर्षाचे सुपुत्र इकडे 2 महिन्यासाठी येत आहेत. तर ह्या 2 महिन्यात आवर्जून बघावीत अशी लंडन आणि उर्वरित यू. के. मधली ठिकाणे सांगा (शक्यतो निसर्ग सुंदर ठिकाणे. म्यूज़ियम्स बघण्यात आम्हाला इंट्रेस्ट नाही).
 
डाॅर्सेट- डर्डल डोअर, वेमथ
बाथ
आयल आॅफ वाईट
दि नीडल्स
आयल आॅफ मॅन
स्काॅटलँड- हायलँड्स
बीच आवडत असतील तर बोर्नमथ,स्कारबराह.
ब्लॅकपूल प्लेझर बीच
लेक डिस्ट्रिक्ट
स्नोडोनिया
लेयन पेनिनसुुुला
पीक डिस्ट्रिक्ट
Stonehenge
शिवाय बालाजी मंदिर, स्वामीनारायण मंदिर, हॅराॅडस, शार्ड, टावर ब्रिज, आॅक्सफर्ड स्ट्रिट,पीकॅडली, ट्र्फलगार, लंडन अाय, लाॅर्ड्स, याॅर्क व्हिल, न्यु कासल, लेस्टर अशी ही ठिकाणं आहेत.

 पूलला रहाता मग ब्राऊन सी आयलंड पण बघा. फेरी ने एक दिवसाची ट्रीप आणि ३ वर्षाच्या मुलाला मोर बघायला मजा येइल. पूल की वरून बोट मिळेल. ऑगस्ट मध्ये कुटुंब बरोबर असेल तर बोर्नमथ चा एअर शो चुकवू नका.

 

मराठी आंतरजालावर युकेमधील प्रवासवर्णने (लंडनखेरीज) फारशी वाचायला मिळाली नाहीत आजवर.

अनेक इंग्रजी चित्रपटांत इंग्लंडचा उत्तर भाग, आयर्लंड व स्कॉटलंडमधली विरळ लोकवस्ती असलेली निसर्गरम्य स्थळे दाखवतात. संधी मिळताच हे सर्व बघण्याचा मानस आहे. त्यापैकी एक - Lulworth Cove.

Lulworth Cove

तुमच्या पर्यटन मोहिमांना शुभेच्छा. कृपया प्रवासवर्णन नक्की लिहा.

डर्डल डोअर आणी लुल्वर्थ कोव

मी गेल्या वर्षी पूल, इंग्लंड येथे काही महिने होतो. तेव्हा पूल पासून जवळच डर्डल डोअर हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे असे समजले. मग असेच एका दिवशी तिकडे जायला निघालो. पूल वरून वूल ला जाणारी ट्रेन पकडली. पूल वरून वूलला जायला फक्त १८-२० मिनिटे लागतात ट्रेनने. वूल स्टेशनच्या बाहेरून taxi मिळते डर्डल डोअरला जायला. तिने अवघ्या १५ मिनिटात डर्डल डोअर जवळ पोचलो. जिथे taxi सोडते तिथेच एक हॉटेल आहे जिथे राहण्याची आणी जेवणाची व्यवस्था होऊ शकते. बरीच लोक कॅराव्हान घेऊन आली होती आणी त्या कॅराव्हान मधेच राहत होती. त्या हॉटेल पासून अंदाजे 10 मिनिटाची पायवाट आहे डर्डल डोअर पर्यंत पोचायला.

डर्डल डोअर हे चूनखडीने बनलेले नैसर्गिक ठिकाण आहे. ज्युरासिक कोस्टचा एक भाग तसाच समुद्रात गेलेला आहे आणी त्याला मध्ये एक छिद्र तयार झाले आहे समुद्राच्या पाण्यामुळे. प्रत्यक्षात ही जागा खाजगी मालकीची आहे; तरी सर्वाना तिथे जायला परवानगी आहे.

taxi जिथे सोडते तिथून एक तीव्र उतार आहे डर्डल डोअरला जायला.
taxi stand पासून डर्डल डोअरकडे जाणारी पायवाट.

ही पायवाट एका ठिकाणी संपते आणी तिथून पुढे थोड्या पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला सरळ डर्डल डोअरच्या समोर घेऊन जातात.
वरून काढलेले काही फोटो.

डर्डल डोअरचे काही फोटो खाली जावून एकदम जवळून काढलेले.

समुद्राचे पाणी खूपच थंड असल्याने पाण्यात जाण्याची हिम्मत झाली नाही.

जवळपास २ तास तिथे राहिलो आणी मग पुन्हा पायऱ्या चढून वर आलो. ज्या पायवाटेने डर्डल डोअरला आलो होतो तिने चालत चालत लुल्वर्थ कोवला जायला निघालो. हे अंतर अंदाजे २ की.मी आहे. पूर्ण पायवाट समुद्राच्या कडेने जाते. एका बाजूला अथांग समुद्र आणी दुसऱ्या बाजूला सुंदर हिरवळ.

लुल्वर्थ कोवच्या अगोदर एक सुंदर डोंगर दिसला समुद्रात. त्याचा फोटो.

लुल्वर्थ कोव म्हणजे नैसर्गिक रित्या तयार झालेले एक वर्तुळ म्हणू शकतो. तुम्ही अगदी कोवच्या मुखाशी जावू शकता. पण मुखाशी जाण्यापेक्षा डोंगरावरूनच फार सुंदर दिसते हे ठिकाण.
इथे काही हॉटेल्स आहेत आणी बाथरूमची सोय आहे.

लुल्वर्थ कोवचे काही फोटो.

तिथे काही लोकांची घरे देखील आहेत. इतक्या सुंदर ठिकाणी रहायला मिळत असल्याचा हेवा वाटला.


मग तिथे काही वेळ घालवला नी परत पूलला आलो.

अतिशय सुंदर जागा आहेत दोन्हीही. किमान एकदा तरी भेट द्याव्यात अश्या.

 

पहिल्या भागात डर्डल डोअर आणी लुल्वर्थ कोवची माहिती दिली होती.
त्याची लिंक इथे -
इंग्लंड भटकंती - डर्डल डोअर आणी लुल्वर्थ कोव

ह्या भागाची सुरवात एका फोटोने.

ह्या वर्तुळाकार पद्धतीने ठेवलेल्या घोड्याच्या नालेसारखी रचना असलेल्या दगडांच्या ठिकाणाचे नाव आहे 'स्टोनहेंज' आणि ते आहे इंग्लंडच्या 'Wiltshire' इथे. ह्याची गणना 'वन ऑफ द सेव्हन वंडर्स ऑफ मेडिएवल वर्ल्ड' मध्ये होते. हे prehistoric monument आहे. Archaeologists च्या म्हणण्यानुसार व कार्बन डेटिंग नुसार प्राप्त माहिती प्रमाणे हे ठिकाण ख्रिस्तपूर्व 3000 ते ख्रिस्तपूर्व 2000 दरम्यान बांधले गेले असावे. म्हणजे आधुनिक माणसाच्या खुणा दिसायच्या अगोदरपासून. ही जागा नक्की काय असावी आणि कशी उभारली असावी ह्या बद्दल बरेच तर्क वितर्क आहेत. कारण हे दगड इतके मोठे आहेत की ते त्या काळातल्या माणसाला तिथे घेऊन जाणे (त्या वेळी चाकाचा शोध लागला न्हवता) आणी असे उभे करणे, एकमेकांवर ठेवणे कसे शक्य झाले असेल हे एक कोडेच आहे. काहींच्या मते ही जागा म्हणजे मृत लोकांना पुरण्याची जागा होती. कारण ह्या जागेच्या आजूबाजूला केलेल्या उत्खननात ख्रिस्तपूर्व 3000 काळातील माणसाच्या हाडाचे अवशेष सापडले होते. युनेस्कोने ह्या जागेला 1986 मध्ये वर्ल्ड हेरीटेज साईटचा दर्जा दिला.
स्वतःची गाडी नसल्यानी आम्ही एका टूर कंपनी बरोबर जायचे ठरवले. ती टूर कंपनी सॅलिसबरी वरून स्टोनहेंजला घेऊन जाणार आणि परत सॅलिसबरीला आणून सोडणार असा प्लॅन होता. इंग्लंड मध्ये वेगवेगळ्या रूट वर वेगवेगळ्या खाजगी कंपन्या रेल्वे सेवा देतात. मग आम्ही पूल वरून Southampton ला साऊथ वेस्ट ट्रेन ने गेलो. तिथे गाडी बदलली आणि तिथून सॅलिसबरी स्टेशनला ग्रेट वेस्टर्न रेल्वेने गेलो. हा जवळपास दीड तासाचा प्रवास आहे. टूर ऑपरेटरची गाडी स्टेशनच्या बाहेर उभीच होती. सॅलिसबरी वरून अंदाजे 20 ते 25 मिनिटे लागली बस ने तिथे जायला. बसने एका रिसेप्शन सेंटरला सोडले. तिथे स्टोनहेंजचे तिकिट घ्यावे लागते. आम्ही टूर वाल्याकडून आलेलो असल्याने त्याने अगोदरच तिकिटाची सोय केलेली होती. ते तिकिट घेऊन एका दुसर्या बस मध्ये बसलो आणि त्या गाडीने स्टोनहेंज जवळ नेऊन सोडले.
लोकांनी जवळ जाऊन नासधूस करू नये म्हणून स्टोनहेंजच्या बाजूने दोरी लावून आत जायला मनाई केलेली आहे. पण वर्षातील एक दिवस असा असतो जेव्हा तुम्हाला ह्या वास्तूला हात लावायची परवानगी असते. तो म्हणजे 21 जून; उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस.
बऱ्यापैकी गर्दी असल्याने जास्त फोटो काढता आले नाहीत. कारण प्रत्येक वेळी फोटो काढतां कुणीतरी आडवे यायचेच. तरी पण जमतील तसे काढलेले अजून काही फोटो खाली देत आहे.

तिथे जवळपास दीड तास थांबून परत यायला निघालो. वाटेत 'ओल्ड सेरम' नावाच्या एक जागी २ तासा साठी सोडले बसने.
ओल्ड सेरमची रचना एखाद्या पडक्या किल्यासारखी आहे. आपल्याकडे एक सो एक किल्ले असल्याने एवढे काही विशेष वाटले नाही ओल्ड सेरमचे. (पण मुख्य फरक हा होता की आपल्या इकडे असते तसे कुणीही भिंतीवर प्रियकर प्रेयसीचे नाव खडूने लिहिले न्हवते किंवा आजूबाजूला कचरा केला न्हवता.) स्वतः:चा भूतकाळ जतन करण्याबाबत असलेली काळजी कौतुकास्पद.

मग शेवटी बसने सॅलिसबरी स्टेशनला सोडले. सॅलिसबरी मध्ये एक कॅथेड्रल आहे.इंग्लंड मधील अन्य शहरांप्रमाणेच हे अतिशय सुंदर शहर आहे. तिथे थोडा वेळ फिरून परतीची ट्रेन पकडली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Wednesday, February 25, 2026

कुमाऊँमधील रम्य भटकंती

भाग १: प्रस्तावना
 नमस्कार. नुकताच हिमालयामध्ये भरपूर फिरण्याचा, आकाश दर्शन आणि ट्रेकिंग करण्याचा योग आला. इतके सुंदर अनुभव आले की ते लिहिल्याशिवाय राहू शकत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे तिथे जे अनुभवलं, जे फिरलो ते लिहून आपल्यासोबत शेअर करण्याचा हा प्रयत्न आहे. हिमालयामध्ये खूप वेळेस जाणं झालं आहे! परंतु दर वेळेस हिमालय अतिशय संमोहक वाटतो. अतिशय वेड लावणारा हा अनुभव असतो. ह्यावेळीसुद्धा हिमालयामध्ये फिरताना वारंवार हा अनुभव येत होता.

तिथला सगळा पहाड़ी परिसर, छोटी गावं, एकदम साधे आणि अतिशय चांगल्या स्वभावाने चांगले लोकं! तिथला निसर्ग आणि तिथे फिरतानाचा आनंद! ट्रेकिंग आणि त्याच्यासोबत आकाशदर्शन, तेही अतिशय कडक थंडीमध्ये! थोडावेळसुद्धा उघड्या ठिकाणी बाहेर जाऊन बघणं किंवा अंगणामध्ये जाऊन आकाश दर्शन करणं अतिशय कठीण होतं! पण हा सगळा अनुभव ह्यावेळेस घेता आला.

(हिमालयातले फोटो इथे बघता येतील. माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल. )

एका लग्नाच्या निमित्ताने पिथौरागढ़ला जाणं झालं. पुढे काही दिवस तिबेट सीमेपासून साधारण शंभर किलोमीटर अलीकडे मुन्सियारी म्हणून एक एक गाव आहे. त्या गावामध्ये थांबून ट्रेकिंग आणि आकाशदर्शन करायचं असं ठरवलं. तिथे इतकी कडक थंडी असते ह्या दिवसांमध्ये! मागच्या वेळेचा अनुभव होता की आपण अंधार पडल्यानंतर म्हणजे संध्याकाळी सहाच्या पुढे आपण मोकळ्या जागेमध्ये पाच मिनिटंसुद्धा थांबू शकत नाही! इतकी थंडी असते. अक्षरशः दोन-तीन अंश तपमान असतं. जवळच सगळा हिमालय आणि थंड प्रदेश असल्यामुळे वारे पण खूप गार असतात. त्याच्यामुळे किती वेळ प्रत्यक्ष आकाश दर्शन करता येईल ही शंका होती. तासांमध्ये करता येईल का मिनिटांमध्ये करता येईल इथपासून शंका होती. पण आकाश दर्शनसुद्धा मनासारखं करता आलं. खूप सुंदर आकाश बघता आलं! त्याला जोडून ट्रेकिंग सुद्धा करता आलं.


.

.

.

ह्या प्रवासाची सुरुवात १ डिसेंबरला झाली. मुंबई ते बरेली असा प्रवास ट्रेनने केला आणि बरेली मधून पुढे टणकपूरला बसने गेलो. उत्तर प्रदेश थोडासा बघितला. उत्तर प्रदेशातले कमालीचे धूळ असलेले रस्ते बघितले! बरेलीच्या जवळ एका ठिकाणी शेतामध्ये असलेला बिबट्यासुद्धा बघायला मिळाला होता! असा हा सगळा प्रवास झाला. टणकपूरला पुढची बस घेण्याच्या आधी रात्री एका छोट्या बस स्टॉपवर थांबावं लागलं. तेव्हापासून थंडीचा कहर सुरू झाला! आणि थंडीची तयारी किती कमी होती, ते मला लक्षात आलं. अक्षरशः एक एक मिनिट जात नव्हता आणि पुढची माझी बस जी होती ती मध्यरात्री तीनची होती. कारण पहाड़ी भागामध्ये रात्री बस कमी प्रवास करतात. पहाटे बस निघतात. टणकपूरची विलक्षण थंडी अनुभवली. मग पहाटे तीन वाजता बस निघाली.

टणकपूर उत्तर प्रदेश- उत्तराखंडच्या सीमेजवळ आहे. नेपाळला अगदी लागून आणि कालीगंगा नदीजवळ आहे. पुढे चंपावत- लोहाघाटमार्गे पिथौरागढ़चा प्रवास झाला. सकाळी साडेआठला तिथे पोहोचलो. पण रात्रीचा प्रवास थरारक होता! त्या घाटाच्या रस्त्यावर बस टर्न करायलासुद्धा फार कमी जागा असतात. अतिशय विलक्षण अशा या सगळ्या प्रवासाची सुरुवात झाली.


.

.

आठ दिवस मी उत्तराखंडमध्ये होतो. त्या दिवसांमध्ये फिरता आलं आणि ट्रेकिंग करता आलं. जिथे जिथे जाऊ शकलो खूप विलक्षण वाटत होतं. सतत मी किती भाग्यवान आहे हीच जाणीव व्हावी, असा हा प्रवास होता. हा सगळा प्रवास व त्यातले अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहे.

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 23 डिसेंबर 2025.

समाजजीवनमानआस्वादलेख

प्रतिक्रिया

वाचतोय. फोटो आवडले. भाग्यवान आहात, सावकाशपणे सर्व पाहात आहात.

आठवणी जाग्या केल्यात. मी मुंस्यारीला दोनदा गेलोय. एकदा डिसेंबर आणि एकदा एप्रिल. फार छान जागा आहे. एप्रिल मधे लाल बुरांश फार छान दिसतो. गुलाबी बुरांश साठी खुलिया टॉपची वारी करावी लागते. माझी चुकली.

IMG_7853

IMG_20190427_113916_487

भाग २: पिथौरागढ़ भ्रमंती

३ डिसेंबरची‌ सकाळ! कालची रात्र उघड्या बस स्टॉपवर थंडीत काढल्यानंतरचा पहाटेचा अंधारातला घाटाचा प्रवास! ही रात्र संपणारच नाहीय असं वाटत होतं. पण चक्क रात्र लवकर गेली. डुलकी लागली आणि तास गेलेले कळालं नाही. टाईम लॅप्स फोटोग्राफीमध्ये जसे काही तासांचे काही सेकंद होतात, तशीच रात्र भरभर गेल्यासारखी वाटली! टनकपूरवरून तीनला निघालेली बस साडेपाचला चंपावतला चहासाठी थांबली तेव्हा पहाट झाल्याचं दिसलं! सर्वदूर उंच पर्वत! वळणा वळणांचा रस्ता! डोंगरात थोडी थोडी घरं आणि उतारावरची‌ शेती! "बीआरओ" च्या हिरक परियोजनेच्या अंतर्गत हा रस्ता येतो. नंतर लोहाघाट, गुरना मार्गे पिथौरागढ़! रस्ता कुठे बंद नाहीय आणि ट्रॅफिक जामही नाहीय. त्यामुळे तसं लवकरच म्हणजे साडेआठला पिथौरागढ़ला पोहचलो.

(हिमालयातले फोटो इथे बघता येतील. माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल. )

लग्नाकरता येणा-या नातेवाईकांसाठीच्या हॉटेलमध्ये जायचं आहे. पिथौरागढ़! साधारण १६०० मीटर उंचीवर वसलेलं शहर. दूरवर हिमशिखरं दिसत आहेत! कोवळ्या ऊन्हाचा आनंद घेत रस्ता विचारत निघालो. काही मुलं सोबतीला आली. त्यांनी शॉर्ट कट असलेल्या पायवाटा (पगडंडी) दाखवल्या. पहाड़ी लोक खरंच खूप वेगळे आहेत. त्यांच्यासोबत छोटा पण मस्त वॉक झाला. नंतर बायकोच्या बाजूचे नातेवाईक भेटले. गप्पा- गोष्टी झाल्या. लग्नासाठी आलेल्यांच्या भेटी झाल्या. नंतर भरपूर आरामही झाला.

डिसेंबर महिना असल्यामुळे इथे सूर्यास्त लवकर होतो. साडेपाचनंतर लगेच अंधार होतो! आणि दुपारी कमी असलेली थंडी लगेच फणा काढते! पिथौरागढ़च्या हॉटेलच्या गच्चीतून आकाश बघितलं. शहराचे दिवे बरेच आहेत आणि चंद्रही पोर्णिमेजवळ आहे. त्यामुळे चांगल्या स्वच्छ आकाशासाठी अजून वाट बघावी लागेल.


.

.

.

रात्री चांगला आराम झाल्यावर दुस-या दिवशी ४ डिसेंबरला चंडाक हिलकडे जायला निघालो. लग्नाचे विधी दुपारनंतर आहेत. त्यामुळे सकाळी १० पर्यंत मोकळा वेळ आहे. हॉटेलपासून चंडाक हिल साधारण साडेसात किलोमीटर येतं. गावातला मुख्य रस्ता माहिती आहे. त्यामुळे सहजपणे निघालो. एका हॉटेलात चहा- बिस्कीट घेतले आणि पुढे निघालो. हळु हळु घरं, दुकानं, सरकारी कार्यालयं मागे पडली आणि डोंगर सुरू झाला. दूरवरचे नजारेही सुरू झाले! अहा हा! हिमालयाच्या भव्यतेचा अनुभव देणारा हा परिसर! सकाळचे फिरायला आलेले तुरळक लोक सोडले तर निर्जन असा घाटाचा रस्ता! बाजूला डोंगरात व खाली छोटी गावं! सुंदर भ्रमंती‌ झाली. पूर्ण डोंगर चढल्यावर दूरवर अनेक हिमशिखरं नजरेच्या कक्षेत आली! त्याशिवाय दूरवरच्या डोंगरातले नागमोडी रस्ते आणि गावंही दिसत आहेत. एका ठिकाणी देवदार झाडांमध्ये जाणारी सुंदर पायवाट आहे! अहा हा! अवर्णनीय अनुभव! मनसोक्त फिरलो. थंडी इतकी कडक की, पूर्ण १५ किलोमीटर झाले तरी एक थेंबही घाम आला नाही आणि अजिबात तहानही लागली नाही! फक्त स्वेटर काढता आलं इतकंच. परतीच्या मार्गावर परत चहाचा ब्रेक घेतला आणि हॉटेलवर पोहचलो. बरेलीमधल्या "सॅटेलाईट" बसस्टँडनंतर इथे "उल्का माता मंदिर" आणि "अंतरिक्ष बंगलासुद्धा" बघायला मिळाला!

दुपारनंतर हळु हळु लग्नाचे विधी सुरू झाले. हिमालयात तरी डीजेचा त्रास नसावा अशी अपेक्षा होती. पण ती पूर्ण झाली नाही. अर्थात् दिल्लीसारख्या ठिकाणी होतो तितका त्रास नव्हता. लग्नामध्ये बँड वाजवणारे लोक मस्त सजून आले आहेत. पारंपारिक वाद्य आणि पहाड़ी संगीत! वरात मुलीकडच्या मंगल कार्यालयात गेल्यानंतरच दुपारचं जेवण झालं. इथल्या संगीताची शैली आणि वरातीतल्या लोकांचा पोशाख काहीसा तिबेटी बौद्ध पद्धतीचा वाटला. ऊन असेपर्यंत थंडी वाट बघत थांबलीय! लग्नाचे उरलेले विधी नंतर आहेत आणि ते खूप वेळ चालू राहतील. त्यामुळे आम्ही काही जण संध्याकाळी पिथौरागढ़वरून सत्गढ़ ह्या गावाला जायला निघालो.


.

.

सत्गढ़! पिथौरागढ़पासून २० किलोमीटर अंतरावर पण अगदी डोंगरात वसलेलं‌ हिमालयातलं पहाड़ी गांव! मागच्या वेळी इथलं आकाश अ वि श्व स नी य होतं! दरीमध्ये असलेली गावं अंधारात बुडाली आहेत! हळु हळु संधीप्रकाश जातोय. अंधारातच सत्गढ़ला पोहचलो! इथे जाताना आता कच्चा रस्ता झालाय. पण सुदैवाने आम्ही अशा जागी उतरलो जिथून मस्त पायवाटेने जावं लागेल. तीव्र चढाची पण छोटी सात मिनिटांची पायवाट! एक सुंदर ट्रेक. चला, निदान पायी चालताना तरी थंडीपासून सुटका मिळतेय! पण कसलं काय! जेमतेम चालत असेपर्यंत आणि पाच एक मिनिट गरम वाटलं. नंतर लगेच थंडीचा कडाका सुरू! आकाश दर्शन करणं खरंच सोपं नाहीय! थंडी भयाण होतेय! आकाशात थोडे ढग आहेत! कुठे कुठे अंधुक तारे दिसत आहेत. पण चंद्राचं तेज आकाशात पसरलंय! समोर डोंगरात ध्वज मंदिरातला दिवा चमकतोय! हिमालय! वा!

पुढील भाग: कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ३: सत्गढ़- हिमालयाच्या कुशीतलं गाव

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 2 जानेवारी 2026.


भाग ३: सत्गढ़- हिमालयाच्या कुशीतलं गाव

✪ कडक थंडीतलं आकाश दर्शन

✪ डोंगर उतारावरची शेती, छोटे घरं, आणि धुक्यात गुरफटलेली दरीतली गावं!
✪ नितांत सुंदर परिसरात केलेलं ट्रेकिंग
✪ संध्याकाळची केशरी हिमशिखरं
✪ "शेर! देखो वहाँ खड़ा है!"

सत्गड़! ५ डिसेंबरला पहाटे साडेचारला उठलो. कडक थंडी आहे! अक्षरश: गच्चीमध्ये आकाश दर्शनासाठी बसता येत नाहीय. जणू पर्थच्या मैदानात जम बसवण्याइतकं अवघड आहे. पण आकाशच इतकं संमोहक आहे की हळु हळु थंडीचा मारा थंड पडला! चंद्राचं राज्य असलं तरी आता तो मावळतीला कललाय. चंद्राच्या थोडा अलीकडे गुरू चमकतोय. व्याध दक्षिणेला क्षितिजालगत दिसतोय. पूर्वेला खूप जास्त तारे दिसत आहेत. सप्तर्षी चांगलेच वर येत आहेत. सिंह रास- मघा नक्षत्र, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी दिसत आहेत. फोटोग्राफीसाठी मोबाईल सेट करून ठेवला. हात थड थड कापत आहेत. पण अहा! काय रम्य पहाट! हळु हळु पक्ष्यांचं कूजन सुरू झालं!

(हिमालयातले फोटो इथे बघता येतील. माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल.)

सत्गड़! १९०० मीटर उंचीवरचं गाव. इथे जानेवारीनंतर बर्फ पडतो. आत्ताही भयाण थंडी आहे. इतकी थंडी की, तोंड धुणं- चूळ भरणंही नकोसं वाटावं! उजाडल्यानंतर चहा घेतला. इथे चहा हा पिण्याहून खूप मोठा अनुभव आहे! आधी हात गरम करायचे. नंतर चेह-यावर वाफ घ्यायची! आणि मग हळु हळु चहा घ्यायचा. असा पहिला राउंड! दिवसभरात किमान दोन आकडी राउंडस नक्की होतात! नंतर सहज तपमान बघितलं तर दिसलं की, सकाळी आठ वाजताचं सत्गड़मधलं तपमान १ अंश सेल्सियस आहे! म्हणजे पहाटे अजून कमी असणार! व्वा! तासभर तरी आकाश दर्शन करता आल्याचा आनंद झाला.

थोडा दिवस वर आल्यावर आणि दुसरा चहा व नाश्ता झाल्यावर फिरायला बाहेर पडलो. इकडे कुठेही गेलो तरी रम्य परिसर! नव्याने झालेला जीपचा कच्चा रस्ता बघत बघत त्या दिशेने बाहेर पडलो. डोंगर उतारावरची शेती, छोटे घरं, दूरवर वर आलेला सूर्य आणि धुक्यात गुरफटलेली दरीतली गावं! अहा हा! आणि फुलं- झाडं तर खूप सुंदर. पुढे मोकळ्या जागेमधून दूरवरची दृश्य समोर आली‌ आणि सकाळच्या केशरी ऊन्हात चमकणारे हिम शिखरही दिसले! व्वा! कच्च्या रस्त्याने खाली उतरून धारचुला हायवेला आलो. मनसोक्त पायपीट केली. मन भरणार नाही हे माहिती असूनही फोटो घेतले.


.

.

.

.

.

मुलीसोबत अजिंठा- वेरुळ- देवगिरी फिरलो होतो तेव्हा ती म्हणाली होती, अरे हा तर खारूताईंचा जिल्हा आहे! जिथे तिथे खारूताई! तिच्या हातावरसुद्धा खारूताई आली होती तेव्हा. तसा हा पिथौरागढ़ जिल्हा मला तिच्या लाडक्या ब्याऊंचा जिल्हा वाटतोय! तिच्या ऍलेक्ससारखेच ऍलेक्स सगळीकडे दिसत आहेत! तासभरात पाच किलोमीटर फिरलो आणि परत नातेवाईकांच्या घरी आलो. दिवसा समोरचा ध्वज मंदिराचा डोंगर, शेती, जंगल काय दिसतंय! कोवळं ऊन आणि चहा!

दिवसभरात गप्पा, चहा, आराम आणि निसर्गाला न्याहाळण्याचा क्रम सुरू राहिला. इथे दिवस तसा छोटा आहे. समोरच डोंगर आहेत, त्यामुळे सूर्य एक तास उशीरा प्रकट होतो आणि दुपारी तीननंतर परत डोंगराआड जातो! दुपारच्या वेळीच ती थंडी थोडी कमी वाटते. लोक दुपारी बाहेरची कामं करतात. गुरांचा संभाळ, जंगलाजवळून गवत डोक्यावरून आणणं, काही घराची कामं असं करतात. चार वर्षांपूर्वी इथे नेटवर्क खूप विरळ होतं. आता अगदी जोरात आहे. गावात घरांची कामंही सुरू आहेत. चार वर्षांपूर्वी पिथौरागढ़मध्येही गूगल पे चालत नव्हतं. आता सत्गड़मध्येही चालतंय!

दुपारी ध्वज मंदिराला जायचं होतं. पण माझ्या भाच्याला जमलं नाही. म्हणून नंतर माझ्या साडू- भाऊंबरोबर सत्गड़च्याच वरच्या भागात थोडा ट्रेक केला. डोंगर चढून वर गेलं की एक मैदान आहे. हनुमानाचं मंदिर आहे. तिथे मोकळ्या जागेतून विलक्षण नजारा दिसला! पंचाचुली शिखरं, ॐ पर्वत आणि इतर शिखरं खूप छान दिसत आहेत. बायनॅक्युलरमधून अजून छान दिसली आणि फोटोही घेता आले. अंधार पडायच्या आत तिथून परत यायला निघालो. येताना एक थरारक प्रसंग झाला!

आम्ही वेगाने शेतांमधून खाली उतरत घराकडे येत होतो. साडू भाऊंचं घर सत्गडमधलं जवळ जवळ सगळ्यांत वरचंच घर. पुढे लगेच जंगल व डोंगर सुरू होतो. घरापासून जेमतेम ३०० मीटर अलीकडे असताना साडू भाऊ एकदम थांबले आणि मला हाताला धरून धावायला लागले. त्यांनी हळु आवाजात मला सांगितलं, "शेर! देखो वहाँ खड़ा है!" खाली शेतात आणि घराच्या अगदी वर १०० मीटर अंतरावर खराच एक काळपट पिवळा मोठा प्राणी दिसत होता. आणि तो स्थिर होता. आम्हांला बघूनही पळाला नाही. ते पुढे म्हणाले की, कोल्हा असता तर पळून गेला असता. पण हा स्थिर उभा आहे, म्हणजेच तो वाघ आहे! आणि इथे तसे वाघ व इतर प्राणी काही नवीन नाहीत! अंधार पडल्यामुळे फोटो घेता आला नाही किंवा बायनॅक्युलरनेही बघता आलं नाही. दोन मिनिटांत तो हललेला दिसला व नंतर झाडीत दिसेनासा झाला! आम्ही नंतर लांबच्या वाटेने खाली उतरलो. साडू भाऊंच्या नजरेतून जाणवत होतं की, तो कोल्हा नव्हता!

घरी पोहचलो, चहा घेतला आणि रात्रच झाली! अगदी साडेपाच वाजता पूर्ण अंधार आहे आणि तारे दिसत आहेत! थंडी सहन होईल तितका वेळ म्हणजे अर्धा- पाऊण तास दुर्बीण सेट करून आकाश दर्शन केलं. नंतर मग मोबाईल फोटोग्राफी सुरू केली. इथे रात्री साडे- सहा- सातपर्यंत नीजानीज होते! संध्याकाळी उद्याचा कार्यक्रम ठरवला. उद्या सकाळी लवकर मुन्स्यारीला जायला निघेन. खाली रोडवरूनच थेट जाणारी जीप मिळेल. सत्गड़- कनालीछीना- जौलजिबी- मदकोट अशा रस्त्याने जायला मिळेल. बारा वर्षांपूर्वी उत्तराखंड मदत कार्यामध्ये सहभाग घेतला होता तेव्हा ह्याच गावांमध्ये फिरलो होतो. उद्या परत तिथे जायला मिळणार! कडक थंडीमुळे घेतलेल्या रजाई- पांघरुणासोबतच्या उत्सुकतेसह निद्राधीन झालो.

पुढील भाग: कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 7 जानेवारी 2026.


भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!

✪ उत्तराखंडमधल्या दुर्गम वाटेवरचा जीप प्रवास
✪ गोरी गंगेच्या तीरावर!
✪ जौलजिबी परिसरातल्या मदतकार्याच्या आठ्वणी
✪ मुन्सियारी- एक विलक्षण गाव
✪ नंदा देवी मंदिराचा ट्रेक
✪ पंचाचुली शिखरांच्या मागे होणारा चंद्रोदय!

६ डिसेंबरच्या पहाटे सत्गडवरून निघालो. जेमतेम उजाडायला लागलं आहे आणि जीप यायची वेळ झाली. आदित्यने मला खाली रोडवर सोडलं. सगळ्यांत मागच्या सीटवर बसून निघालो. सोबत टेलिस्कोप आणि बायनॅक्युलर असल्यामुळे ते सामान माझ्यासोबतच ठेवलं. सत्गडवरून मुन्सियारी अंतराने कमी म्हणजे फक्त १०८ किमी आहे. पण वाटेत सगळा पहाड़ी प्रदेश आणि बिकट रस्ता! त्यामुळे जायला निदान ४-५ तास तरी लागणारच. वळणा वळणाचा रस्ता! उलटीची भिती नको म्हणून पोहचेपर्यंत काहीच खायचं नाही असं ठरवलं. टनकपूर- पिथौरागढ़ प्रवासातही उपास केला होता. त्याचा उपयोग होतो, असा माझा अनुभव होता.

(हिमालयातले फोटो इथे बघता येतील. माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल.)

पिथौरागढ़- धारचुला हायवेने जीप निघाली! कनालीछीना, मेर्थी, ओगला, जौलजिबी अशी गावं तशी ओळखीचीच. अनेक वेळेस इथे येणं झालं आहे. कडक थंडीमुळे बंद असलेल्या काचांमधूनही बाहेरचा विराट नजारा जाणवतोय! कालीगंगेच्या पलीकडे नेपाळ! जौलजिबीला गोरीगंगा नदीचा पूल ओलांडून गाडीने डावा रस्ता घेतला. इथून पुढेच ती गावं होती. घरूडी, मनकोट, लुमती, चामी अशी जिथे २०१३ च्या पूरानंतर मदत कार्यासाठी मैत्री संस्थेच्या टीमसोबत काही‌ दिवस काम करता आलं होतं. फार वेगळा अनुभव होता तो. एका टप्प्यावर तर एक रौरावता धबधबा केवळ एका फळीसारख्या पुलावरून ओलांडावा लागला आणि मदत कार्यासाठी येऊन मीच इथे अडकतो की काय, असं वाटलं‌ होतं. तेव्हाचे त्या गावांमधले प्रवास, अनेक ठिकाणी झालेली शिबिरं आणि रेशन वाटप आणि पुढे अनेक ठिकाणी धबधब्यांमध्ये वाहणारी नदी ओलांडून केलेले प्रवास! खूप विलक्षण अनुभव होते. अनेक गावांमध्ये नद्यांनी मोठा विध्वंस केला होता. खूप नुकसान झालं होतं. मैत्रीतल्या अनेक जणांनी तर अनेक महिने इथे काम केलं होतं. आता अगदी वेगळ्या निमित्ताने माझं त्याच रस्त्यावरून जाणं होतंय! त्या सगळ्या आठवणी मनात दाटून येत आहेत.


.

.

.

.

जौलजिबी मागे पडलं तसा रस्ता हळु हळु बिघडत जातोय. चामी, लुमती अशी गावं मागे पडली. मदकोटच्या आधी खूप दुर्गम भाग लागला. बाजूलाच खळाळत वाहणारी गोरी गंगा! पण ह्यावेळी पात्र शांत वाटतंय. काही ठिकाणी अगदी अरुंद रस्ता आणि कुठे कुठे रस्त्यावर वाहतं पाणी! थोड्या अंतरानंतर तर रस्ता अगदीच बिकट झाला. इतका की, इथून ट्रक किंवा बससुद्धा सध्या जात नसणार असं वाटतंय. दोन जीप्ससुद्धा कशा बशा एकमेकींना ओलांडत आहेत! काही ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे. डोंगरातून जाऊन नंतर नदी ओलांडून रस्ता पैलतीरावर आला. कदाचित मदकोटनंतर चांगला असेल असं वाटलं होतं. पण रस्ता बिकटच आहे. मी काहीही नाश्ता केला नाही ते बरंच झालं, कारण काही प्रवासी सतत उलटी करत आहेत! खूप वेळाने जीप थोडा वेळ थांबली तेव्हा आसमंत नीट बघता आला. व्वा! हिमालयाच्या किती आत आहे जी जागा!

नदी ओलांडल्यानंतर थोड्या वेळाने परत घाट रस्ता सुरू झाला. नक्की, आता मुन्सियारीपर्यंत सलग चढ असणार. बघता बघता नदी खूप मागे पाताळात राहिली आणि रस्ता वर चढत गेला! अवाक् करणारा परिसर! डोंगरातली छोटी छोटी गावं! आणि शक्य त्या सगळ्या लोकांना व पोचवणारा व त्यांचं सामानही नेणारा जीप ड्रायव्हर! पहाडी गाणी! सत्गडवरून सकाळी ७ ला निघालेली जीप ११ वाजण्याच्या सुमारास मुन्सियारीमध्ये पोहचली! पोट हलकं असल्यामुळे काहीच त्रास न होता पोहचलो. सत्गडच्या नवीनजींच्या ओळखीतून इथल्या एका माणसाची ओळख मिळाली होती. त्या गुप्ताजींना भेटलो. त्यांनी एक चांगला होमस्टे सुचवला. आकाश दर्शनासाठी मोकळी गच्ची आणि अगदी समोर पंचाचुली आणि इतरही हिमशिखरं! वा! शिवाय मुख्य गावातच आहे, त्यामुळे जेवण- चहा जवळच मिळेल. मस्त चहा, नाश्ता आणि गप्पा झाल्यावर त्या सौम्या होमस्टेमध्ये गेलो. दुपारच्या ऊन्हात थंडी कमी वाजतेय. पण रात्री मजा येणार! पण काय ठिकाण आहे हे! अहा हा! आणि बाजूच्याच हॉटेलमध्ये आत गेल्यावर तर अजून सुंदर व्ह्यू मिळतोय! अगदी पंचाचुली शिखरांच्या सत्संगात असल्यासारखं‌ वाटतंय!

मुन्सियारी! पर्यटकांमुळे गजबजलेलं आणि वस्ती वाढलेलं पण तरी छोटसंच गांव! चहु बाजूंनी उंच पर्वत आणि द-या! इथे रात्र खूप लवकर पडणार. म्हणून दुपारी जास्त आराम न करता चार वाजताच नंदा देवी मंदिर बघायला निघालो. इथून साधारण दीड- दोन किलोमीटर अंतरावर असेल. म्हणजे एक छोटा ट्रेकसुद्धा होईल. अपेक्षेप्रमाणे रस्ता खूपच सुंदर आहे! अगदी हिमशिखरांकडे नेणारी वाट वाटेल असा! शांत रस्ता, दुतर्फा झाडं आणि नजारे! मंदिरामध्येही छान बाग आहे आणि दृश्यं सुंदर दिसत आहेत. मनसोक्त फोटो काढून आणि दृश्यांचा आनंद घेऊन परत निघालो. अंधार पडण्याच्या आत होम स्टेमध्ये पोहचायचं आहे आणि आकाश दर्शनाची सुरूवात करायची आहे! त्याआधी अर्थातच संध्याकाळची शिखरांवरची लालिमासुद्धा टिपायची आहे!

सूर्य डोंगराआड गेल्यावर थंडी वाढायला लागली. दुर्बीण सेट केली. तिथल्या हॉटेलवाल्यांनाही सांगितलं. तेही बघायला येतो म्हणाले. सूर्य मावळताना लालसर होणा-या हिमशिखरांचे फोटो घेतले. आणि साडेपाच वाजता तारे दिसायला लागले! पंचाचुलीच्या बाजूलाच ब्रह्महृदय आणि रोहिणी प्रकटले! नंतर गुरूसुद्धा आला. दोनच दिवसांपूर्वी पोर्णिमा झालेली असल्यामुळे चंद्रही लवकरच आला. पंचाचुलीच्या मागून होणारा चंद्रोदय! अहा हा! कडक थंडीमध्ये काही वेळ आकाश निरीक्षण केलं. खूप अंधुक तारे दिसत आहेत! मोबाईलच्या फोटोमध्ये देवयानी आकाशगंगा स्पष्ट येते आहे! फोटो सुंदर घेता आले! संध्याकाळीच जेवण केलं. रात्रभराच्या टाईम लॅप्सचं सर्व सेटींग करून ठेवलं. थोडा वेळ आकाश दर्शन केलं आणि रात्री ९ च्या सुमारास निद्रा आराधना सुरू केली. पहाटे उठून पहाटेचं आकाशही बघणार आहे. नक्कीच, ह्या कडक थंडीमध्येही आकाश दर्शन करता येणार! आणि आकाश फार सुंदर दिसणार!

पुढील भाग: कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 18 फेब्रुवारी 2026.

भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन

✪ अंध गायकासोबत विशेष भेट

✪ सप्तर्षी, स्वाती आणि पंचा-चुली!
✪ रात्रीच्या आकाशातली रंगांची उधळण आणि स्टार ट्रेल्स!
✪ अखेर चंद्रोदयाचा क्षण फोटोत घेता आला
✪ आकाशगंगेच्या पिठुर चांदण्याचा आनंद
✪ भयाण थंडीमध्ये चहाची ऊब!

७ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजता उठलो. मुन्सियारीची भयाण थंडी! पण आकाशात काय काय दिसेल ही उत्सुकताही तेवढीच! हिंमत करून दार उघडून बाहेर आलो. अहा हा! काय विलक्षण दृश्य आहे! सप्तर्षी पूर्ण वर आलेले आहेत. आणि महाराष्ट्रातून दिसतात त्याहून ते जास्त उंचीवर दिसत आहेत! कारण अर्थातच मुन्सियारीचं उत्तरेकडचं स्थान. काल संध्याकाळी शर्मिष्ठा तारकासमूहसुद्धा बराच वर दिसत होता. पहाटे तेजस्वी गुरू, मघा, पुनर्वसू, व्याध, स्वाती, चित्रा छान दिसले! अनेक कृत्रिम उपग्रहसुद्धा दिसत आहेत. हळु हळु पहाट होतेय. दुर्बिणीतून बघणं मात्र खूप कठिण आहे. दुर्बिणीच्या आरशाचं झाकण काढायलाच कष्ट पडले! बोटं गार पडत आहेत. थोडा वेळ दुर्बिणीतून निरीक्षण केलं. उजाडण्याआधी पूर्वेला एक ठळक तारा दिसला. हा शुक्र तर असू शकत नाही! विशाखा नक्षत्राच्या जवळ इतका ठळक तारा नाहीय! हा निश्चितच बूध असला पाहिजे. चक्क अर्धा तास बूध दिसला!

(हिमालयातले फोटो इथे बघता येतील: https://niranjan-vichar.blogspot.com/2026/02/experiencing-kumaon-himalay... माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल: https://open.spotify.com/show/00vTZSU2qaJE8FwVTHPe6p )


.

.

.

.

पंचा चुली हिमशिखरांच्या मागून उगवणा-या चंद्राचा व्हिडिओ.


शर्मिष्ठा मावळून सप्तर्षी वर येईपर्यंतचा 8 तासांचा टाईम लॅप्स व्हिडिओ.

मुन्सियारीमधली पहिली रात्र छान गेली. अद्याप चंद्र मोठा आहे आणि त्यामुळे थोडा फरक पडतोय. जितके अंधुक तारे अजून दिसले असते ते अजून दिसत नाही‌ आहेत. दुर्बिणीतूनसुद्धा खूप वेगळे असे ऑब्जेक्टस अजून तरी दिसले नाही आहेत. ही कसर फोटोमध्ये मात्र भरून निघतेय. प्रत्येक लाँग एक्स्पोजर फोटोमध्ये उपग्रहांच्या‌ ट्रेल्स येत आहेत. अजून दोन रात्री इथे थांबेन. पहाटेपासून उठल्यामुळे सकाळी परत झोप घेतली. रात्रभरामध्ये मोबाईलमध्ये आलेले फोटो बघितले. चंद्रोदयाचा व्हिडिओ/ टाईम लॅप्स तितका नीट आला नाहीय. आज आणि उद्या परत त्याचा प्रयत्न करेन. थंड पाण्यामुळे सकाळचं आन्हिक आवरणं हा मात्र त्रासाचा विषय ठरतोय! आणि थंडीवर चहाची ऊब!

दिवसा दिवसाच्या दृश्यांचा मनसोक्त आनंद घेतोय. कितीही‌ वेळा बघितलं तरी मन भरत नाही. काय ते उंच पर्वत! डोंगरातली छोटी छोटी गावं! त्यात जाणारे नागमोडी रस्ते! दूरवरून डोंगरातल्या वळणादार रेषा वाटतात! मुन्सियारीच्या जवळ तसं फिरायला खूप आहे. काही ग्लेशियर्सचे‌‌ ट्रेक इथून जवळच सुरू होतात. मुन्सियारीमध्येही काही छान ट्रेक आहेत. खेलिया टॉप हा असाच एक ट्रेक. तो करायची इच्छा आहे. पण तो खूप मोठा आहे- जाऊन येऊन सात- आठ तास जातील. आणि आकाश दर्शनाचं जागरण होत असल्यामुळे दिवसा आराम केला पाहिजे. त्यामुळे हा ट्रेक नाही करता आला. पण मुन्सियारी गावातच जास्त फिरलो. आणि अगदी जवळचे छोटे ट्रेक करतो आहे.

संध्याकाळी एक विशेष भेट झाली. पिथौरागढ़ जिल्ह्यातल्या बेरीनागचे अंध गायक- सुंदर बाफिला भेटले. इथे गावात एक जत्रा सुरू आहे. त्यात गाण्यासाठी ते आले आहेत. गुप्ताजींचे मित्र असल्यामुळे त्यांनी ओळख करून दिली. ते माझ्या बाजूच्या रूममध्येच थांबले आहेत. त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. त्यांनी बोलता बोलता सहज म्हणून काही गाणी गायली! अप्रतिम वाटली! त्यांचे बरेच कार्यक्रम व शो झालेले आहेत. दिवसभरात त्यांच्याशी अधून मधून भेट होत राहिली. त्यांचं युट्युब चॅनल आहे. पण आज आधुनिक तंत्रज्ञान वापरून अंध व्यक्तीसुद्धा कसा कंप्युटर व मोबाईल वापरू शकतात हे त्यांना माहिती नव्हतं. त्याबद्दल त्यांना थोडी माहिती दिली. माझ्या ओळखीच्या व्यक्तींचे अनुभव सांगितले.

दिवसभर हिमालयातल्या दृश्यांचा आनंद घेतल्यावर आता रात्रीच्या आकाशाची ओढ वाटतेय! सूर्य साधारण तीन वाजताच डोंगराआड गेला. हळु हळु थंडी सुरू झाली. पाच वाजता पंचा चुलीचे शिखर लाल व्हायला लागले! आणि साडेपाच पासून रात्र सुरू झाली! तारे प्रकाशित झाले! आज आणि उद्या चंद्र येईपर्यंत चांगला अंधार मिळेल. त्या वेळेत खूप सुंदर आकाश मिळालं! शर्मिष्ठा- सारथी परिसरामध्ये आणि पश्चिमेला श्रवण आणि डेनेब ता-याच्या जवळ आकाशगंगेचा पांढरा पट्टा काही वेळ दिसला! बायनॅक्युलरने तर अप्रतिम पिठुर चांदणं दिसतंय! ढिगाने अंधुक उपग्रह जाताना दिसत आहेत! वा! सातच्या रात्री चंद्रोदयाचा टाईम लॅप्स परत एकदा घेऊन बघितला. पण नीट आला नाही. पण नुसत्या डोळ्यांनी दिसणारं काय दृश्य आहे ते! शिखरांमागून हळु हळु लालसर प्रकाश वर येतो! हळु हळु चंद्राचं टोक वर येतं आणि त्या प्रकाशात शिखर पाठमोरं दिसतं! वा!

असं सात आणि आठ डिसेंबरच्या रात्री मुन्सियारीवरून छान आकाश दर्शन केलं. अखेर आठच्या रात्री शिखरांच्या आड उगवणारा चंद्रही टिपता आला! स्टार ट्रेलचाही छान टाईम लॅप्स घेता आला. रात्री चंद्र थोडा उशीरा उगवत असल्यामुळे तोपर्यंत आकाशही छान बघता आलं. फोटोमध्ये अँड्रोमिडा आकाशगंगाच नाही तर अंधुक अशी ट्रायंग्ल्युलम गॅलक्सी- M33 सुद्धा उमटली! युरेनससुद्धा कृत्तिकेच्या बाजूला फोटोत स्पष्ट आला. मध्ये मध्ये ढग असल्यामुळे टेलिस्कोपिक निरीक्षणं अशी मात्र तेवढी करता आली नाहीत. शिवाय दुर्बिणीने बघताना थंडीमुळे मर्यादाही आली. बायनॅक्युलरने मात्र वेड्यासारखे तारे दिसले.

असं मुन्सियारीमध्ये तीन रात्री मनसोक्त आकाश दर्शन केलं. अगदी सगळी इच्छा पूर्ण केली. टाईम लॅप्स व्हिडिओही मिळाला. रात्रीच्या अंधारात आणि पहाटेही दिसणारे पंचा चुली शिखर डोळे भरून बघितले! आता परत जावं लागेल! इथून पिथौरागढ़ला जाण्यासाठी जीपच सोयीची आहे. इथून थलकडे बस जाते, पण तिथून पिथौरागढ़ला जायला फिरून जावं लागेल. दोन वेळेस जीप्स निघतात. काही जीप्स अगदी पहाटे साडेचारला जातात आणि दुस-या काही जीप्स सकाळी ११ ला जातात. मी त्या जीपने जायचं ठरवलं. गुप्ताजींच्या ओळखीने जीपवाल्याशी बोलून ठेवलं. पहाटेचं आकाश दर्शन करून मग टेलिस्कोप पॅक करून ठेवेन आणि मुन्सियारीतच एक ट्रेक करेन. त्यानंतर ११ च्या जीपने निघेन. हे ठरवून आठच्या रात्री उशीरापर्यंत आकाश दर्शन केलं. नंतर ढग आले तेव्हा टाईम लॅप्सचे फोटो लावून निद्राधीन झालो.

पुढील भाग: कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 20 फेब्रुवारी 2026.


भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास


✪ पायवाटेवरची सुंदर भ्रमंती
✪ काटक बनवणारी पहाड़ी जीवनशैली
✪ एकमेकांना धरून राहणारी साधी माणसं
✪ पर्वत कितने ऊँचे कितने गहरे होते हैं!
✪ पहाड़ाची नानाविध रूपं!
✪ सत्गड़ची रमणीय संध्याकाळ

९ डिसेंबरची पहाट! मुन्सियारी आकाश दर्शनाचं शेवटचं सत्र! डोळे भरून आकाश बघितलं. चंद्र प्रकाशात चमकणारी पंचा चुलीची शिखरं मन भरून बघितली! थंडीचाही भरपूर आनंद घेतला! उजाडल्यावर टेलिस्कोप पॅक केला. चहाचा पहिला राउंड झाल्यावर आवरून भटकायला निघालो. कोवळं ऊन अंगावर घेताना मस्त वाटतंय. काल गावात थोडं फिरलो होतो तेव्हा एक जागा सुंदर दिसली होती. त्या भागात अजून पुढे फिरेन.

(हिमालयातले फोटो इथे बघता येतील. माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल. )

एका सुंदर गाण्यासह जीपमधून बघितलेला नजारा इथे बघता येईल.


.

.

.

.

.

.

.

मुन्सियारी गांव! तालुक्याचं ठिकाण आहे आणि पिथौरागढ़ जिल्ह्यातील जवळ जवळ उत्तरेकडचं सर्वांत मोठं गाव. इथे फिरताना खूप महिला डोक्यावर सिलेंडर घेऊन जाताना दिसत आहेत. इतक्या जास्त की, असं वाटलं की, कदाचित महिन्यातून आजच इथे सिलेंडर मिळत असतील आणि म्हणून त्या नेत असतील. आणि रिक्षा नसल्यामुळे डोक्यावरून नेत असाव्यात. पण नंतर कळालं की, इथे सिलेंडर रोज मिळतो आणि महिला अशाच त्या नेतात. पुढे महिला इतरही मोठं सामान नेताना दिसल्या.

मुन्सियारी गाव फिरलो. छोटी छोटी आणि चौकोनी घरं. जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये इथे बर्फवृष्टी होते. त्यासाठी अनेक घरांमध्ये रूम हीटरही असतो. हे गाव तसं सीमेलगत जाणा-या रस्त्यांवर येत नाही. त्यामुळेही कदाचित इथले जवळचे रस्ते इतके सुस्थितीत नाही आहेत. पायवाटेवरून हिमालयाच्या शिखरांचा आनंद घेत मस्त चाललो. छोटे धबधबे दिसले. पायवाटेवर शाळेत जाणारे मुलं भेटले. पहाड़ामध्ये येण्या जाण्याची‌ साधनं कमी असल्यामुळे पायी जाण्याचं आणि मेहनतीचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे शक्यतो लठ्ठपणा कमी दिसतो.

पायवाट छोट्या गावांकडे जातेय. रस्त्याच्या बाजूने आतमध्ये जातेय. पुढे गेल्यावर पायवाट परत रस्त्याकडे आली आणि येताना मुख्य रस्त्यावरून चालत आलो. रस्त्यावरही शाळेत जाणारे मुलं आणि पालक दिसले. कितीही फिरलो आणि कितीही निसर्ग सौंदर्य बघितलं तरी कमी वाटेल असा आसमंत! परत होमस्टेकडे गेलो आणि पंचा चुलींना न्याहाळत चहाचा आनंद घेतला! जीपचा प्रवास करायचा असल्यामुळे नाश्ता टाळला.

जीप होमस्टेपाशीच मिळाली. फक्त मुनिस्यारीमध्ये सगळ्या लोकांना घरपोच जाऊन घेण्यात आणि पेट्रोल भरण्यात वेळ गेला. त्यामुळे प्रत्यक्ष बाहेर पडायला १२ वाजले. ह्या प्रवासात समोरची सीट मिळाली! त्यामुळे मनसोक्त फोटोज आणि व्हिडिओ घेता आले.

पहाड़ी लोकांचा साधेपणा आणि एकमेकांना धरून राहण्याची वृत्ती सतत जाणवते. एका महिलेने अगदी सहजपणे जीप ड्रायव्हरकडे मोठी रक्कम दिली आणि पुढे एका गावात द्यायला सांगितली. त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं की, ते काही आधीपासून ओळखीचे नाहीत. पण विश्वासाने तिने पैसे दिले आणि तितक्याच सहजपणे त्याने देतो म्हणून सांगितलं. मुख्य मार्गालगतच्या गावांमध्येही जीपने नंतर सामान पोहचवलं. जीपचा प्रवास खूप सुंदर झाला. खूप सुंदर व्ह्यू मिळाला. पुढे बरम गावात जीप जेवायला थांबली तेव्हाही बाजूच्या गोरीगंगेचं छान दर्शन घेता आलं. वाटेत अनेक वेळा थांबत थांबत गेल्यामुळे आणि जेवणाच्या ब्रेकमुळे पोहचायला उशीर होत गेला. जौलजिबीपासून मोठा रस्ता सुरू झाला. तरीही प्रत्यक्ष सत्गडला पोहचायला ५ वाजत आले.

सत्गडला घरापर्यंत आता कच्चा रस्ता झाला आहे. पण तोही ट्रेकइतकाच सुंदर आहे. लॅपटॉप, बायनॅक्युलर आणि टेलिस्कोप घेऊन हा छोटेखानी १० मिनिटांचा ट्रेक केला. संध्याकाळच्या लाल सूर्यप्रकाशात काय विलोभनीय आसमंत दिसतोय! अर्थात् जाताना वाघाची आठवण आलीच! काही गाववासीही भेटले. अंधार पडण्याच्या थोडं आधी सत्गडला पोहचलो. सामानसह चालल्यामुळे मिळालेली उष्णता लवकरच गेली आणि थंडीचा कडाका सुरू झाला! अशा वेळी चहा खरोखर अमृततुल्य! घराच्या गच्चीतून दिसणारे डोंगर आणि झाडी हळु हळु काळोखात विलीन झाली. तारेही प्रकट झाले! आणि ध्वज मंदिरातला तेजस्वी दिवाही प्रकाशित झाला. चंद्र अजून जास्त उशीरा येत असल्यामुळे रात्री सत्गडमध्येही आकाश खूप छान मिळालं आणि आणखी छान फोटो घेता आले. उद्या ध्वज मंदिराचा ट्रेक करेन आणि परवा परतीचा प्रवास सुरू होईल!

पुढील भाग: कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ७: नितांत सुंदर ध्वज मंदिर ट्रेक

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 25 फेब्रुवारी 2026.






























नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती-

 आजपासून या मालिकेचा रोज एक भाग शेअर केला जाणार आहे. लेखिकेने नितांत सुंदर रीतीने आपले अनुभव मांडले आहे. वाचत असताना आपणच परिक्रमा करत असल्य...