भूरचना : गुजरात राज्यात १,१२० मी.पेक्षा उंच प्रदेश कोठेही नाही. तथापि या राज्याचे (अ) उत्तरेकडील व पूर्वेकडील आणि कच्छ-काठेवाडमधील डोंगराळ प्रदेश, (आ) सौराष्ट्राचे म्हणजे काठेवाडचे पठार, (इ) मैदानी प्रदेश व (ई) किनारी सखल प्रदेश व कच्छचे रण असे चार स्वाभाविक विभाग पडतात. (अ) उत्तरेकडे साबरकांठा व बनासकांठा जिल्ह्यांत अरवलीचे फाटे आलेले आहेत. त्यांच्या पश्चिम भागातून बनास व पूर्व भागातून साबरमती नद्या वाहतात. पूर्वेकडील डोंगराळ प्रदेशाच्या उत्तर व मध्य भागांत विंध्याचे व सातपुड्याचे फाटे आलेले असून उत्तर भागात रतनमाळ व पावागढ (८२९ मी.) डोंगर असून त्यांच्या उत्तरेस मही व पानम नद्या आहेत व दक्षिणेस नर्मदा व तिच्या ओरसंग व कर्जन या उपनद्या आहेत. मध्य भागात छोटा उदेपूर व राजपीपला डोंगर असून त्यात नर्मदा व तापी यांच्या दरम्यानचा डोंगराळ प्रदेश येतो. यात मठसर हे ८०० मी. उंचीचे शिखर आहे. तापीच्या दक्षिणेस सह्याद्रीच्या रांगा किनाऱ्याला समांतर गेलेल्या आहेत. त्यांत डांग व धरमपूरचे डोंगर अधिक उंच आहेत. सह्याद्रीवरून पूर्णा, अंबिका, औरंगा, पार व दमणगंगा या नद्या पश्चिमेकडे खंबायतच्या आखातास मिळतात. कच्छमध्ये पश्चिमपूर्व गेलेल्या तुटक डोंगरटेकड्यांच्या तीन रांगा आहेत. उत्तरेकडील रांग कच्छच्या रणातील बेटांच्या रूपाने दिसते. त्यातील पछम बेटावरील डोंगर कच्छमध्ये सर्वांत उंच (४६५ मी.) आहे. काठेवाडमधील उत्तरेकडील मंडा डोंगराळ प्रदेश राजकोटच्या पूर्वेस असून त्याचे चोटिल शिखर ३४० मी. उंच आहे. हा भाग पश्चिमेकडील भादर व पूर्वेकडील शत्रुंजय या नद्यांदरम्यानच्या एका अरुंद डोंगराळपट्टीने दक्षिणेकडील गीर रांगेशी जोडलेला आहे. गीर हा अनेक टेकड्यांचा समुदाय असून त्यात सारकाला (६४३ मी.) सर्वांत उंच व आग्नेयीकडील नंदीवेला (५२९ मी.) त्याखालोखाल आहे. गिरनारचा पर्वत मैदानात अलग उभा असून त्याचे गोरखनाथ हे १,११७ मी. उंचीचे शिखर गुजरातमध्ये सर्वांत उंच आहे. या सर्व डोंगराळ प्रदेशांच्या पायथ्याचा ७५ मी. ते १५० मी. उंचीचा उताराचा प्रदेश १० ते २५ किमी. रुंदीचा असून त्यावर काही भागात गवत व काही भागात अरण्ये आहेत. (आ) सौराष्ट्र पठार ७५ ते ३०० मी. उंचीचे असून ते लाव्हाचे बनलेले आहे. ते मध्यवर्ती डोंगराळ भागाकडे उंचावत गेले असून त्यावरून उत्तरेकडील मच्छू व अजी, पश्चिमेकडील भादर व पूर्वेकडील शत्रुंजय व भगवा या नद्या वाहतात. या पठाराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील ६० मी.पर्यंत रुंदीच्या व ६० किमी.पर्यंत व त्यापेक्षाही जास्त लांबीच्या अनेक भित्ती हे होय. (इ) पश्चिमेस किनारी सखल प्रदेश व पूर्वेस डोंगर पायथ्याचा प्रदेश यांदरम्यान गुजरातच्या मुख्य भूमीचे अत्यंत सपाट गाळमैदान आहे. ते सु. ९६ किमी. रुंद व दक्षिणोत्तर ४०० किमी. लांबीचे आहे. याच्या उत्तरभागात वालुकामय आणि खेडा जिल्ह्याच्या काही भागात वातोढ मृदा असून दक्षिणभागात नर्मदातापीच्या खोऱ्यात काळी रेगुड मृदा आहे. या मैदानातून साबरमती, मही, नर्मदा व तापी या प्रमुख नद्या वाहतात. (ई) दक्षिण काठेवाडाखेरीज गुजरातचा किनारा भरतीच्या वेळी पाण्याखाली जाणाऱ्या पंकपाटांनी व खारजमिनींनी भरलेला आहे. कच्छच्या पश्चिम व दक्षिण किनाऱ्यांवर अशा १०—१२ किमी. रुंदीच्या दलदली आहेत. भरतीचे पाणी ओहोटीच्या वेळी त्यावरील पंकिल प्रवाहमार्गांनी परत जाते. या पंकपाटांच्या दोन्ही बाजूंस वाळूच्या टेकड्या आहेत. कच्छच्या आखाताच्या दोन्ही बाजूंचा किनारी प्रदेश असाच आहे. काठेवाडच्या पश्चिम किनाऱ्यावर पंकपाट आढळत नाहीत परंतु दलदली मात्र आहेत. पोरबंदर व भादर नदीचे मुख यांदरम्यानची दलदल विस्तीर्ण आहे. खंबायतच्या आखाताचा किनारा खाड्यांनी युक्त आहे. येथेही दलदली असून त्यांत मधूनमधून बेटे आहेत. खंबायतच्या आखाताचा सर्व भाग उत्थान पावलेला आहे. एके काळी खंबायतचे आणि कच्छचे आखात निदान वर्षातून काही दिवस पाण्याने जोडले जाऊन काठेवाड हे एक बेट बनत असे. १८१९ च्या भूकंपामुळे मधील भाग उचलला जाऊन काठेवाड गुजरातच्या मुख्य भूमीशी कायमचे जोडले गेले. १९५६ मध्ये कच्छमधील अंजार येथे मोठा भूकंप झाला व २३ मार्च १९७० च्या भूकंपाने दक्षिण गुजरातचे बरेच नुकसान झाले होते. खंबायतपासून बलसाडपर्यंतचा सर्व किनारा मही, नर्मदा, किम व तापी आणि इतर नद्यांच्या खाड्यांनी भरलेला आहे. त्यावरही पंकपाट आढळतात. गुजरातला इतर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त लांबीचा २,५६० किमी. किनारा लाभलेला असून त्यावर कांडला, बेडी, ओखा, पोरबंदर, वेरावळ, भावनगर, खंबायत, भडोच, सुरत ही प्रमुख बंदरे आहेत. काठेवाडच्या दक्षिण किनाऱ्याजवळ दीव हे गोवा, दीव, दमण या केंद्रशासित प्रदेशाचे बेट आहे. कच्छचे रण : कच्छच्या उत्तरेस मोठे रण व पूर्वेस छोटे रण या विस्तीर्ण खाऱ्या दलदली सु. २१,००० चौ. किमी. क्षेत्र व्यापतात. मोठे रण २५६ किमी. पूर्वपश्चिम व १२८ किमी. दक्षिणोत्तर विस्ताराचे आहे. दोन्ही रणे पावसाळ्यात पाण्याखाली जातात. एरवी ती कोरडी असतात व त्यांतून पायवाटाही जातात. छोट्या रणातील पाणी नल सरोवरामार्गे खंबायतच्या आखातात येते. दोन्ही रणे म्हणजे समुद्रबूड जमिनीचा उचलला गेलेला भाग आहे. बनास, सरस्वती व लुनी या कच्छच्या रणास येऊन मिळतात. सौराष्ट्रातील नल व कच्छमधील नारायण या खाऱ्या पाण्याच्या सरोवरांखेरीज काही किरकोळ तळी गुजरातेत आहेत परंतु मोठे तलाव नाहीत.
जीर्ण स्फटिकजन्य खडकापासून बनलेल्या मृदा निकृष्ट आहेत. तथापि बांधकामास उपयोगी असे पोरबंदर दगडासारखे व सिमेंटला उपयुक्त असे चुना खडकासारखे मूल्यवान खनिजप्रकार जमिनीतून मिळतात. सौराष्ट्रातील नद्या पावसाळ्यात वाहून एरवी कोरड्या असतात. बाकी गुजरातच्या मृदा किनाऱ्याला दलदलीचा रेतीमिश्रित गाळ, सपाटीवर जलोढ नदीगाळ, भडोच व सुरत जिल्ह्यांत काही रेगुड माती, कच्छमध्ये आणि उत्तर गुजरातेत रेताड व वातोढ माती, अशा प्रकारच्या आहेत.
राज्यातील सर्वांत महत्त्वाचे खनिज गेल्या दशकात सापडलेले खनिज तेल व वायू होत. अंकलेश्वर, कलोल व खंबायतखेरीज अहमदाबादजवळही त्याचा प्रचंड भूमिगत साठा असण्याची शक्यता दिसली आहे. कच्छ व सौराष्ट्रात सु. १·७५ कोटी टन बॉक्साइट, शेकडो कोटी टन चुनाखडक, चिनी माती व इतर जातींची चिकण माती आहे. छोटा उदेपूर भागात आशियातील अत्यंत मोठा, १ कोटी मे. टनाहून जास्त फ्ल्यूओराइटचा संचय, कच्छमधील लखपतजवळील व भडोच जिल्ह्यात मिळू सु. २४ लाख टन लिग्नाइट, शिवाय क्वॉर्ट्झ, डोलोमाइट, फ्रोट, कॅल्साइट, जिप्सम व मँगॅनीज ही खनिजे गुजरातेत उपलब्ध आहेत.
उत्तर भाग कर्कवृत्तावर असणाऱ्या गुजरातचा प्रदेश बव्हंशी उष्ण कटिबंधातच येतो. कच्छ सौराष्ट्रासारखे तुटक भूभाग, सागरसानिध्य आणि वेगवेगळ्या भागांतील उंचसखलपणा या कारणांनी या राज्यातल्या तपमानात व पर्जन्यात विविध प्रकार आहेत. दक्षिण गुजरातेत ७५ ते १५० सेंमी. पाऊस पडतो आणि किमान व कमाल तपमानात आत्यंतिक फरक नसतो, डांगमध्ये २०० सेंमी. पाऊस पडतो. उत्तर गुजरातेत पाऊस ५० ते १०० सेंमी. असतो व थंडीत तपमान बरेच खाली जाते. उत्तर व पश्चिम सौराष्ट्रात पाऊस ६७ सेंमी.पेक्षा कमी, हवा शुष्क व थंडी कडक, तर दक्षिण व पूर्व सौराष्ट्रात पाऊस थोडा अधिक व हवामानही तुलनेने समशीतोष्ण असते. कच्छच्या वैराण प्रदेशात पाऊस फारच कमी असतो, किमान तपमान १५·६० से. ते २१·१० से. तर बाकीच्या गुजरात राज्यात ते २१·१० से. ते २३·९० से.इतके असते. कमाल तपमान पूर्व सौराष्ट्र, कच्छ व उत्तर गुजरातेत २९·४० से. ते ३२·२० से. आणि कच्छ व सौराष्ट्राच्या पश्चिम व दक्षिण किनाऱ्यांना व मध्य गुजरातेत २६·७० से. ते २९·४० से. असे राहते. अहमदाबादचे किमान तपमान १४० से. ते २७० से., कमाल तपमान २९० से. ते ४२० से. व सरासरी ३४·७० से. याप्रमाणे असते. राज्यात वनप्रदेश थोडा आहे. सौराष्ट्रातील गीरच्या जंगलाखेरीज भडोच व सुरत जिल्ह्यांचे पूर्वभाग आणि डांग जिल्हा एवढ्याच भागात जंगले आहेत. उल्लेखनीय प्राणी म्हणजे आशिया खंडात फक्त गीरच्या जंगलात आढळणारे अवशिष्ट सिंह व नल सरोवरावर दरवर्षी उतरणारे हंसक (फ्लॅमिंगो) हे स्थलांतरी पक्षी आहेत.
लोक व समाजजीवन : गुजरातचे बहुसंख्य म्हणजे ८०% च्यावर लोक जरी हिंदू असले, तरी त्यांच्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती बऱ्याच प्रमाणात आहेत. आधीचे गिरिजन निसर्ग, दगडधोंडे, भुतेखेते अशा दैवतांचे जडात्मवादी, तर नंतरचे हरिजन अन्य धर्माचे नाहीत म्हणून हिंदूंत जमा, उरलेल्या हिंदूंत बव्हंशी माध्व, रामानुजी, वल्लभाचारी, स्वामी नारायण अशा पंथांचे वैष्णव व बाकीचे काही स्मार्त, शैव, पाशुपत पंथी, माताजीचे पूजक व सूर्योपासक अशा पंथांचे आहेत. कित्येक समन्वयी सत्पुरुष भक्त, अनिश्चित पंथी असेही आढळतात. गुजरातमधील मुसलमानांत सुन्नी, शिया, इस्माइली, मेमेन, बोहरी असे पंथोपपंथ आहेत. पाचव्या शतकात मगध सोडल्यापासून गुजरात ही सध्या चार लाखांवर लोकवस्ती असलेल्या जैनांची साक्षात धर्मभूमीच झाली आहे. श्वेतांबर पंथाचा उगम व प्रसार याच भूमीत झाला आणि गुजरातच्या इतिहासात, राजकारणात, संस्कृतीत व जीवनात जैनांनी महत्वाचा वाटा उचललेला आहे. हिंदूंची दैवते द्वारकेचा कृष्ण, डाकोरचा रणछोडजी, गिरनारची अंबामाताजी आणि नर्मदातटाकीचा महादेव व जैनांची पूज्य स्थाने शत्रुंजय टेकडीवर व गिरनार पर्वतावर आहेत. पारशी या अल्पसंख्य पण प्रगत जमातीस प्रथम गुजरातमध्येच आश्रय मिळाला व त्यांच्या जरथुश्त्री धर्माचे पालन शेकडो वर्षांपासून त्यांना निर्वेधपणे करता आले आहे. त्यांची भाषा गुजराती असून नवसारी तालुक्यात ते अधिक प्रमाणात केंद्रित झाले आहेत. गुजरातमधील बहुसंख्य मुसलमानही गुजरातीच आपली भाषा मानतात व काही पंथांचे धर्मग्रंथदेखील गुजराती लिपीत आहेत. गुजरातची जनता परधर्म सहिष्णू असली, तरी जातिभेदाच्या बंधनातून मुक्त नाही व अस्पृश्यता निर्मूलनाची प्रगतीही खुद्द महात्माजींच्या गुजरातेत अजून म्हणण्यासारखी दिसत नाही. अनुसूचित जाती व ‘साळीपरज’ जमाती वगळता बाकीचा गुजराती समाज एकोप्याने व गुण्यागोविंदाने राहतो. व्यापारी वर्ग अन्य कोणत्याही राज्यापेक्षा येथे जास्त असल्याने ‘महाजन’ वर्गाकडे समाजाचे नेतृत्व असते. या वैश्यप्रधान संस्कृतीत अनुत्पादक विद्येला व व्यापारेतर पराक्रमाला महत्त्व नसल्याने, ब्राह्मणक्षत्रियांचे स्थान दुय्यम आहे. ज्ञातीचे नियंत्रण मानण्याची रूढी सामाजिक जीवनात, विशेषतः ग्रामीण भागात कायम आहे. तथापि परंपरागत आचारविचारांच्या पद्धतीत व्यावहारिक दृष्ट्या लवचिकपणाही आला आहे व उच्चनीचतेच्या कल्पना जन्मापेक्षा आर्थिक स्थितीवरूनही ठरू शकतात.
व्यापारात अन्यत्र कमाई करून आपल्या गावी चांगली घरे बांधण्याची प्रवृत्ती गुजरातेत असल्याने इतर राज्यातील खेड्यांपेक्षा इकडची खेडी अधिक संपन्न वाटतात. खेड्यातील सामान्य घरे कुडाच्या भिंतींची व गवती छपराची आणि बऱ्यापैकी घरे विटांनी बांधलेली व कौलारू असतात. लहानमोठ्या शहरांमधून मात्र सिमेंट काँक्रीटचा वापर सर्रास आढळतो. अनेक गावांचे जुन्या तटबंदीचे भाग अजून शिल्लक आहेत. गुजराती लोक अधिकांश शाकाहारी असून खेड्यात बाजरी वा ज्वारीची भाकरी, डाळी, तेल व भाज्या त्यांच्या भोजनात असतात. नागरी वस्तीत गहू, तांदूळ, दूधदुभते व साखर यांचा समावेश रोजच्या आहारात नित्य असतो. खेड्यातून पुरुषाचा वेश धोतर, कोपरी, सदरा आणि प्रसंगी अंगरखा, साफा किंवा पागोटे व बायकांचा चोळी, घागरा, उजव्या खांद्यावर पदराची साडी किंवा ओढणी असा असतो. तसेच पायात मोठाले पोकळ वाळे, हस्तिदंती बांगड्या, गळ्यात वजनदार अलंकार आणि दंडांवर व नाकाकानांत ठळक दागिने घालण्याची आवड ग्रामीण स्त्रियांत आढळते. शहरी वस्तीत पुरुष धोतर, शर्ट, डगला व टोपी घालतात आणि स्त्रिया उजव्या खांद्यावर पदर असलेली सहावारी साडी नेसतात. उत्तर गुजरातेत व कच्छ-सौराष्ट्रात लोकांच्या पेहरावावर राजस्थानची छाप दिसून येते. त्याचप्रमाणे त्यांची राहणी मध्य व दक्षिण गुजरातपेक्षा वेगळी असते. उत्तर गुजरात व कच्छ-सौराष्ट्राचे लोक जास्त काटक, कष्टाळू व कडवे , तर मध्य व दक्षिण गुजरातचे सौम्य, हौशी व सुखवादी वाटतात.
गुजराती भाषा नवव्या ते दहाव्या शतकांत शौरसेनीपासून विकसित झाली, असे अभ्यासकांचे मत आहे. संस्कृत-प्राकृतशी संबंध असल्यामुळे तत्सम व तद्भव शब्दांचा भरणा तिच्यात आहे. त्याशिवाय फार पूर्वीपासून व्यापाराच्या निमित्ताने इराण-अरबस्तानशी संबंध आल्यामुळे त्या देशांच्या भाषांतले, पोर्तुगीजांशी संपर्क आल्यामुळे त्यांचे आणि मराठी-कन्नडच्या शेजारामुळे त्या भाषांचे, असे अनेकविध शब्द गुजरातीत आले आहेत. देवनागरीतील काही अक्षरांचा आकार बदलून व शिरोरेखा वगळून गुजराती लिपी बनली आहे. जुने कवी या भाषेला प्राकृत किंवा अपभ्रंश म्हणत. महाकवी प्रेमानंदाने हिला प्रथम गुजराती हे नाव दिले. तिचा विकास दहाव्या शतकापासून होऊ लागला. तेव्हापासून गुजराती साहित्याची निर्मिती होऊ लागली. प्राचीन गुजराती साहित्य ‘गौर्जरी अपभ्रंश’ भाषेतील आहे. दहाव्या शतकात रासो हा व्रज-मारवाडी भाषांतील राजस्तुतिपर काव्यप्रकार सुरू झाला. त्याचा उपयोग जैन कवींनी धर्मप्रचारासाठी केला. अकराव्या ते चौदाव्या शतकापर्यंत धार्मिक व नैतिक स्वरूपाच्या तरंगलोलासारख्या रचना निर्माण झाल्या. भरतेश्वर बाहुबलिरास हा जैनरास सर्वांत प्राचीन आहे. त्याशिवाय सिरिस्थूलिभद्रफागूसारखी फागुकाव्ये किंवा ऋतूपरत्वे गाणी व बारमासी हा ऋतुगीतांचाच एक प्रकार जैन कवींनी व नंतर उत्तरकालीन कवींनीही हाताळला. त्या उत्तर कालातल्या ऐतिहासिक किंवा चरित्रात्मक आख्यानकाव्यांना प्रबंध म्हणत. इ. स. १४५६ मधील झालोरच्या पद्मनाभाचा कान्हडदे प्रबंध विख्यात आहे. दुसरा कालखंड गुर्जर भाषेच्या भक्तियुगाचा. त्यात नरसी मेहता, मीरा, आखो, भगत, प्रेमानंद, पुरोगामी विचारसरणीचा शामळ, दयाराम, भालण, भीम अशा अनेकांनी काव्ये रचली. त्यात नरसी-प्रेमानंद-दयाराम या त्रिमूर्तींनी गुजरात काव्यात श्रेष्ठ स्थान मिळविले. अर्वाचीन कालखंड १८५० मध्ये सुरू झाला. त्यांत नवप्रेरणेचा उद्गाता नर्मद, वेन चरित्रकार दलपतराम, विद्वान साहित्यिक नरसिंहराव दिवेटिया, प्रेमकवी कलापी, कान्त, सरस्वतीचंद्र ह्या युगप्रवर्तक कादंबरीचे लेखक गोवर्धनराम त्रिपाठी, भावकवी नानालाल, कांदबरीकार कन्हैयालाल मुनशी यांची नावे उल्लेखनीय आहेत. महात्मा गांधींच्या लेखनाने तर गुजराती भाषेत नवे गांधीयुग अवतरले. मोटेचा नाडा धरणाऱ्या माणसालाही समजेल, अशी सुबोध गुजराती भाषा लिहिण्यास कृतसंकल्प होऊन त्यांनी ती समाज प्रबोधनासाठी राबवली. त्यांचे समकालीन व अनुयायी काका कालेलकर, किशोरलाल मशरूवाला, महादेवभाई देसाई, रामनारायण पाठक व धूमकेतू अशांच्या लेखनाने दुसऱ्या महायुद्धकालापर्यंत गुजराती भाषा संपन्न झाली. १९४० नंतरच्या काळात कादंबरीकार रमणलाल देसाई, चुनीलाल मडिया, आचार्य गुणवंतराय, पन्नालाल पटेल कथालेखक गुलाबदास ब्रोकर, ईश्वर पेटलीकर नाटककार चंद्रवदन मेहता विनोदलेखक ज्योतिंद्र दवे टीकाकार विजयराय वैद्य, विष्णुप्रसाद त्रिवेदी सौराष्ट्राचे सव्यसाची साहित्यकार झवेरचंद मेघाणी त्याचप्रमाणे उमाशंकर जोशी, राजेंद्र शाह, निरंजन भगत अशा वाङ्मयसेवकांनी गुजराती भाषेच्या साहित्यात मोलाची भर घातली आहे.
कला व क्रीडा : गुजरातमधील हस्तकलांत मातीची भांडी, सुरती जरीकाम, कच्छी जडावकाम, पाटण येथील गोमेद (अकीक) अलंकार, अखेडा लाखकाम, पालनपूरचा सुंगधी माल आणि अहमदाबाद व इतर ठिकाणचे कोरीव लाकूडकाम उल्लेखनीय आहेत. गुजरातच्या चित्रकलेचे वैशिष्ट्य बाराव्या ते पंधराव्या शतकांतील जैन ग्रंथांत व नंतर पंधराव्या शतकातील हिंदू पोथ्यांत मिळालेल्या चित्रांतून आढळते. राजपूत शैली आधीची ही ‘दक्षिणी राजस्थान’ शैली खास गुजरातची मानण्यात येते. ‘शिलावत’ शैलीतील कच्छ व सौराष्ट्रातील भित्तिचित्रेही गुजरातच्या प्रादेशिक चित्रकलेची स्वतंत्र शैली दाखवितात. आधुनिक काळात गुजराती चित्रकलेचे पुनरुज्जीवन होऊन लाठीनरेश मंगलसिंगजी, ब्रिजलाल भगत, खोडीदार परमार, आचार्य रविशंकर रावळ, श्यावक्ष चावडा, कनू देसाई आदी चित्रकार ख्याती पावले आहेत. गुजरातच्या रंगभूमीची परंपरा अंबाजी-बहुचराजी या देवींच्या उत्सवातून होणाऱ्या ‘भवाई’ नामक प्रहसनात्मक नाट्यप्रकाराइतकी जुनी आहे. आधुनिक रंगभूमीची सुरुवात गुजरातेत १८५०च्या सुमारास झाली. त्या कामात पारशी मंडळींनी पुढाकार घेतला. हौशी नाट्यप्रयोगापासून सुरुवात होऊन, नंतर हळूहळू धंदेवाईक नाटक मंडळ्या नाटके करू लागल्या. प्रथम रूपांतरित नाटके होत पण लौकरच स्वतंत्र कृती होऊ लागल्या. १८६८ पासून नर्मद, मणिलाल त्रिभुवनदास, प्रभुलाल द्विवेदी, कन्हैयालाल मुनशी, चंद्रवदन मेहता यांच्या नाटकांनी गुजराती रंगभूमी गाजविली. गुजरातच्या परंपरागत सामूहिक क्रीडा, रास व गरबा ही नृत्ये आणि मार्गी व देसी हे लोकसंगीताचे प्रकार आहेत. खेळ व करमणूक भक्तीवर आधारल्यामुळे लोकनृत्ये व समूहगायने यांत स्त्री-पुरुषांच्या संमिश्र समाजाला निःसंकोचपणे भाग घेता येतो. व्यापारी साहस, सुखोपभोग, दानशूरता, कला, पुरस्कार, व्यवहारचातुर्य व श्रद्धाळूपणा ही गुजरातची विशेष लक्षणे मानता येतील.

सांस्कृतिक भारत : गुजरात
गुजरातमध्ये द्वारका, सोमनाथ, पालिटना, पावागड, अंबाजी, भद्रेश्वर, श्यामलजी, तरंग, गिरनार ही महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत. पोरबंदर हे महात्मा गांधींचे जन्मस्थान म्हणून ऐतिहासिक महत्त्व आहे. पाटणपुरा, सिद्धपूर, घुमली, दाभोई, वाडनगर, मोधेरा, लोथल व अहमदाबाद ही शहरेही ऐतिहासिक. अहमदपूर-मांडवी, चोरवाड व तिथल हे गुजरातची सुंदर समुद्रकिनारे. सतपुरा, सिंहाचे अभयारण्य, गिरचे अभयारण्य जंगल व रानटी गाढवांचे अभयारण्य (कच्छ) आदी पर्यटकांना आकर्षित करणारी ठिकाणे आहेत.
हेमचंद्र आचार्य, नरसी मेहता, मिराबाई, प्रेमानंद भट्ट, श्यामल भट्ट, दयाराम, दलपतराम, गोवर्धनराम त्रिपाठी, महात्मा गांधी, के.एम.मुन्शी, उमाशंकर जोशी, सुरेश जोशी, पन्नालाल पटेल, राजेंद्र शहा हे गुजरातीतील महत्त्वाचे लेखक आहेत. कवी कांत, झवेरचंद मेघानी, कल्पी आदी गुजराती कवी आहेत.
गुजराथी लोक हे खाण्यापिण्याचे शौकीन लोक.
कुठेही जातील तेथे अगोदर जेवण्याखाण्याची काय सोय आहे हे पाहून जातील.
ऑफिसातदेखील लंच साठी भक्कम पाच सहा कप्प्यांचा डबा नेतील. त्यात त्यांचा मधल्यावेळेतला नाष्ता देखील असेल.
बस मध्ये रेल्वे मध्ये गुजराथी लोक त्यांच्या घरचे पदार्थ खाताना दिसतील
त्यांचे आतिथ्य आगदी भारावून टाकणारे असते.
घरातच नव्हे तर अगदी हॉटेलात सुद्धा
हेच बघाना " अमे गुजराती " ( अर्थ "आम्ही गुजराथी ")
"अतिथी देवो भव " असे केवळ पाटीवर लिहून चालत नाही
अतिथीचे भरघोस स्वागत होते.
जेवायच्या अगोदर हात धुण्यासाठी ही सोय
जेवायच्या अगोदर स्वागत पेय. गुलाबाच्या पाकळ्या घालुन केलेले पेरुचे गुलाबी सरबत येते.
आणि पापडनो चुरो. मसाला साथे
आणि त्यानन्तर येते ती सुप्रसिद्ध गुजराती थाळी.
या थाळीतले पदार्थ
फुलका ( पोळी ) त्यावर मेथीना थेपला आणि वर छोटिशी दिसणारी बाकरी ( भाकरी
नव्हे.. बाकरी ही गव्हाच्या पिठाची असते आपण करतो त्या ज्वारीच्याभाकरीला
इथे "जार नो रोटलो " असे म्हणतात )
फुलका रोटलीच्या खाली दिसते "सोले कचोरी" ( मुगाची कचोरी) आणि तांदळाचे ढोकळा
आता त्या पासून क्लॉकवाईज.
"मगना दाळनो शिरो" अस्सल तुपातला चारोली वगैरे असलेलास्पेश्यल गुजराती शिरा
"बासुंदी " व्हॅनीला इसेन्स + बदाम + भरपूर सुके अंजीर
"दाळ" दालचिनी + लवंग असलेली तुरीची आमटी
"पनीर नु रसाळु शाक"
"लीला वटाणानु शाक" ( हिरव्या वाटाण्याची भाजी)
"बतेटानु रस्साळु शाक"
" लीला तुवेरनु कठोळ" ( हिरव्या तुरीची उसळ ) ( कठोळ = कडधान्य)
ताटाबाहेर
छास
सेलेड मा काकडी बीट गाजर ,आंबे हळद ,टमेटा
आणि
चित्रात न दिसणारी मस्त वरुन लोणकढी तुमाची धार असलेली "मग ना दाळनी खिचडी अने कढी"
एवढे झाल्यावर पुन्हा हात धुण्याचा कार्यक्रम
शेवटी मुखवास म्हणून वरीयाळी अने पान ( बडीशेप आणि पान )
या इथे थाळीचे तीन प्रकार आहेत. त्याना वेगवेगळी नावे आहेत.
"नगरशेठ थाळी" असल चांदीच्या ताटात ३१ वेगवेगळे खाद्यपदार्थ
"शेठ थाळी " २२ खाद्य पदार्थ
" वेपारी थाळी " १५ खाद्यपदार्थ
आम्ही वेपारी थाळी घेतली होती.
जेवणाची व्यवस्था एसी झोपडीत केलेली होती
तृप्त झालेल्या जिव्हेने आणि जडावलेल्या पोटाने आम्ही यजमानांचा निरोप घेतला.
परत येताना अक्षरशः ५ किलोमीटर चालत आलो तेंव्हा कुठे सुस्ती कमी झाली.
लिलु घास म्हणजे हिरवे गवत.
लीली बंगडी = हिरवी बांगडी.
लीलो चेवडो = हा बटाटाच्या चिवडा असतो तसा कच्च्या पपई पासून केलेला चिवडा असतो.
गुजरात मध्ये जैन लोकांच्या मुले कित्येक पदार्थात बटाटाऐवजी कच्ची केळी , कच्ची पपई यांचा वापर करतात.
जैन पावभाजीत बटाट्याऐवजी कच्ची केळी वापरतात
गुजराथ मधे असूनही बडोदा सीटी पक्कं महाराष्ट्रीअन शहर आहे.सर सयाजीराव गायकवाड यांचे.वेळ मिअळाल्यास लिहीन कधी आमच्या वडोदरा शहरा बद्दल.....
गुजरात राज्याला पश्चिमेकडील दागिना असे म्हणले जाते.गुजरातमध्ये मंदिर,अभयारण्य ,संग्रहालय आणि इतर अनेक वैशिष्ट्यपुर्ण ठिकाणे आहेत जी पर्यटकांना आवडतील.यामध्ये ह्रुद्यकुंज ( महात्मा गांधी निवासस्थान ) लोथल येथील सिंधु संस्कृतीचे अवशेष, महात्मा गांधींचे जन्मस्थान कीर्ति मंदीर,बडनगरचे हटकेश्वर मंदिर,धौलावारीया इत्यादी ठिकाणे अगदी हटके आहेत.द्वारका,पावागड,पालिताना पर्वत्,शामलाना,गिरनार पर्वतावरील मंदीर हे धार्मिक पर्यटनासाठी आहे.वास्तुकला आणि पुरातत्व वास्तुंमध्ये रुची असणार्यांसाठी अहमदाबाद्,डभोई,पाटण्,मोढेरा हो ठिकाणे पाहु शकतात.सातपुडा पर्वतराजीतील भ्रमंतीबरोबरच कोरवार्ड्,तिथल्,मांडवीचे समुद्रकिनारेही साद घालायला आहेतच.निसर्गप्रेमींसाठी गिरचे भारतीय सिंहासाठी प्रसिध्द असलेले राखीव वन आहेच.इतिहास हरवून जाणार्यांसाठी उपरकोट किल्ला,नजरबाग महाल, ड्भोई किल्ला तसेच गांधी स्मारक संग्रहालय्,बडोदा वस्तुसंग्रहालय आणि आर्ट गॅलरी पाहण्यासारखे आहे.
गुजरातमध्ये हिंदू और इस्लाम धर्माशी संबधीत बरीच धार्मिक स्थान आहेत.
द्वारकानाथ मंदिर
सोमनाथ मंदिर
तख्तेश्वर मंदिर
अक्षरधाम मंदिर
पालिताना मंदिर
कालिका मंदिर
जामा मस्जिद
राज बाबरी मस्जिद
रानी रुपमति मस्जिद
नारायण मंदिर
सिदी सैयद मस्जिद
गुजरात मधील राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य
गिर फाॅरेस्ट नेशनल पार्क
ब्लेककब नेशनल पार्क
मरीन नेशनल पार्क
वंसदा नेशनल पार्क
कच्छ डेजर्ट वन्यजीव अभयारण्य
जंगली गधा अभयारण्य
नील सरोवर पक्षी अभयारण्य
कच्छ बस्टर्ड सेंचुरी
शूलपानेश्वर वन्यजीव अभयारण्य
अहमदाबाद :-

अहमदाबादमधील रस्ते अतिशय स्वच्छ व प्रशस्त आहेत. पण रस्त्याची रुंदी जास्त असल्याने कुठे सिग्नल नाही. २०१७ साली हे शहर युनेस्कोने वारसास्थळ म्हणून घोषीत केले.११ व्या शतकात साबरमती नदीच्याकाठी आशाभिल्ल राजाने “आशावल” नावाचे गाव वसविले.पुढे कर्णसोळंकी राजाने हे गाव जिंकले आणि याचे “कर्णावती” असे नामकरण झाले.सुमारे शतकभर येथे हिंदू राजे राज्य करीत होते.परंतु तेराव्या शतकात मुस्लीम राजाचे आक्रमण झाले.१४-१५ व्या शतकात सुरवातीस बहामनी वंशाचा आणि गुलबर्गयाचा सुलतान अहमदशाह या राजाने राज्य केले.इ.स. १४११ मध्ये या कर्णावती शहराचे नाव बदलून अहमदाबाद असे करून अहमदशाहाने येथे आपली राजधानी वसवली. जुने अहमदाबाद साबरमतीच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे नवीन अहमदाबाद वसलेले आहे.जुन्या शहरात वळणावळणाच्या गल्ल्या आणि लाकडी कोरीवकाम असलेली घरे आहेत.
अहमदाबादमधील लोकप्रिय पर्यटनस्थळ :-
१) साबरमति आश्रम/महात्मा गांधी का घर
२) केलिको टेक्सटाइल संग्रहालय
३) भद्र किल्ला
४) जामा मशीद
५) सरखेज रोजा
६) शाह ए आलम रोजा
७) राणि नो हाजिरो
८) वस्त्रपुर तलाव
९) कांकरीया तलाव
१०) का़करीया प्राणी संग्रहालय
११) इस्कॉन मंदिर
१२) हाथी सिंह जैन मंदिर
१३) सिद्दी सैय्यद मशिद
१४) विंटेज कार म्युझीयम
१५) गुजरात सायन्स सिटी
१६) हलते मनोरे
तीन माकडे ....
गांधीजींचा जीवनप्रवास उलगडणारे संग्रहालय...
गांधीजीनी जगाला दिलेला हाच तो संदेश..
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन धृवतारे...
दोन राष्ट्रांचे पितामह...
अहिंसेची हिंसा...अखेरचा हा तुला दंडवत...
सुती धाग्यापासून बनविलेला हो फोटो...
तपस्वी, ध्यानमग्न, तेजस्वी महात्मा...
तेजाचे वलय प्राप्त झालेली वास्तू...गांधीजींचे निवासस्थान...
महात्म्याची सेवा करण्याचे भाग्य लाभलेल्या वस्तू...
एक स्वर्गीय अनुभूती...
सुमारे १०.३० च्या सुमारास साबरमती आश्रमात प्रवेश केला. तेथील गांधीजींच्या व्यक्तिचरित्रावर एक कटाक्ष टाकला. बाजूने जाणाऱ्या साबरमती नदीचं पात्र पाहिलं सोबतच खादी विक्री केंद्र, वाचनालय, विनोबा भावेंची राहण्याची जागा ह्या सगळ्याना भेट देऊन सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास साबरमती आश्रमातून बाहेर पडलो.
आवर्जून पहा:-मगन निवास्,उपासना मंदिर, उद्योग मंदिर्,हृद्य कुंज आणि नंदीनी
वेळः सकाळी ८.३० ते संध्याकाळी ६.३०
प्रवेश : मोफत
भद्र किल्ला (Bhadra Fort) :-
भद्र किल्ल्यावर घड्याळ असलेला जो मनोरा आहे आणि यात जे घड्याळ आहे ते British East India Company ने खास लंडनवरून आणून 1878 मध्ये बसवले.
किल्ल्यातील सुंदर लाकडी कलाकृतीचे छायाचित्र

या किल्ल्याला बहुमजली तटबंदी आहे.या किल्ल्यात भद्रकाली मंदीर आहे.याच मंदीरावरुन किल्ल्याला हे नाव पडले.या संदर्भात एक कथा सांगितली जाते.इथे राज्य करणार्या सुलतानावर कृपा करण्यासाठी इथे लक्ष्मी माता प्रगटली आणि तीने आशिर्वाद दिला कि हे शहर संपत्तीने भरलेले आणि समृध्द राहील.
या किल्ल्यात सध्या राजवाड्याचे अवशेष बघायला मिळतात आणि परिसरात बाग व हिरवळीचे पट्टे बघायला मिळतात.
पत्ता:- कोर्ट रोड ,अहमदाबाद
विशेष आकर्षण :- तीन दरवाजे क्लॉक टॉवर्,आझमखान सराई
वेळ- सकाळी ९ ते संध्याकाळी ५
प्रवेश फी- मोफत
कांकरिया लेक : -
हा लेक वर्तुळाकार असून १४५१ च्या दरम्यान बांधल्याचा अंदाज आहे. हा तलाव सुलतान मुहमद शहा आणि अहमद शहा ( दुसरा ) याने निर्माण केला.हा तलाव गुजरातमधील सगळ्यात मोठा तलाव आहे.याचा परिघ जवळपास २.२५ कि.मी. आहे. बहुतेक शासक याचा अंघोळीसाठी वापर करीत असल्यामुळे या तलावामध्ये पाणी शुध्दीकरणाची व्यवस्था आहे. या तलावाच्या मधोमध द्वीप महाल आहे ज्यामुळे या तलावाचे सौंदर्य अजून खुलले आहे.शिवाय या तलावाजवळ बाग आणि प्राणी संग्रहालय आहे.याशिवाय तलावात बोटींगची सोय देखील आहे. हा लेक बघताना हैद्राबादच्या हुसेन सागर तलावाची आठवण होत होती.अहमदाबाद फिरायला आला असाल तर एक दिवसाची पिकनिक करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
पत्ता:- कांकरीया,अहमदाबाद
विशेष आकर्षण - लहान मुलांसाठी बाग्,संगीताच्या तालावरचे कारंजे,जॉगर्स पार्क, बलुन राईड, आर्चरी,मिरर मेझ,
वेळ- सकाळी ९ ते रात्री १०, जॉगिंग करणार्यांसाठी पहाटे ४
प्रवेश फि- प्रौढांसाठी २५/- आणि मुलांसाठी १०/-
जॉगिंग करणार्यांना मोफत प्रवेश

विशेष आकर्षण - लहान मुलांसाठी बाग्,संगीताच्या तालावरचे कारंजे,जॉगर्स पार्क, बलुन राईड, आर्चरी,मिरर मेझ,
वेळ- सकाळी ९ ते रात्री १०, जॉगिंग करणार्यांसाठी पहाटे ४
प्रवेश फि- प्रौढांसाठी २५/- आणि मुलांसाठी १०/-
जॉगिंग करणार्यांना मोफत प्रवेश
कांकरीया प्राणी संग्रहालय :-
कमला नेहरु झुलॉजिकल गार्डन किंवा कांकरीया झु हे पर्यटकांनी आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण आहे.याची उभारणी १९५१ मध्ये झाली.हे प्राणीसंग्रहालय कांकरीया नदीच्या तीरावर उभारले गेले आहे.इथे मोठ्या प्रमाणात वनस्पती आणि झाडे बघायला मिळतात.वन्यजिव अभ्यासकांना हे प्राणी संग्रहालय म्हणजे पर्वणी आहे.इथे मोठ्या प्रमाणात सस्तन प्राणी आणि सरिसृप आह्ते.शिवाय २०१७ मध्ये इथे एक विशेष पार्क उभारण्यात ज्यात तरस्,बिबट्या असे निशाचर प्राणी ठेवले आहेत.इथे रात्रीसारखा काळोख केलेला असल्यामुळे हे प्राणी वावरताना आणि त्यांचा आवाज स्पिकरमधून आपल्याला एकायला मिळतो.
याशिवाय याच परिसरात टॉय ट्रेन, वॉटर पार्क्,निरनिराळ्या राईडस आणि खाण्याच्या पदार्थाचे स्टॉल आहेत.उत्तम गुजराती खाणे खायचे असेल तर नगीना वाडी या बगीच्याची थीम असलेल्या हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेउ शकता.
पता:- कांकरीया,अहमदाबाद
विशेष आकर्षण -रसाला नेचर पार्क आणि फुलपाखरु उद्यान
वेळ - मार्च ते ऑक्टोबर - सकाळी ९ ते संध्याकाळी ६.२५
नोव्हेंबर ते फेब्रुवारी - सकाळी ९ ते संध्याकाळी ५
प्रवेश फी- प्रौढ- रु २०/-
तीन वर्षापर्यंत - मोफत
शैक्षणिक सहल - ५/-
३ ते १२ वयोगटापर्यंत १०/-




हाथीसिंग जैन मंदिर :-
हाथीसिंग या व्यापाऱ्याने हे मंदिर बांधण्यास सुरुवात केली होती. पण हे मंदिर पूर्ण होण्याआधी वयाच्या ४९व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पुढे त्यांच्या पत्नीच्या देखरेखीखाली मंदिराचे काम पूर्ण झाले. त्यामुळे हे मंदिर हाथीसिंग याच नावाने प्रसिद्ध झाले.
अतिशय शांत व प्रेक्षणीय स्थळ. स्थापत्यकलेचा एक अदभुत अविष्कार. अतिशय देखणे कोरीव काम.
जामा मशिद :-

पत्ता : मनेका चौक, अहमदाबाद
वेळ : सकाळी ६ ते रात्री ८ ( नमाजाच्या वेळी मशीद पर्यटकांसाठी बंद असते)
प्रवेश : मोफत
सिद्दी सय्यद मस्जिद:
१५७३ साली बांधलेली हि मस्जिद अहमदाबाद शहराच्या मधोमध आहे.पिवळ्या वालुकाश्म दगडावर अतिशय नाजूक कोरलेल्या अर्धवर्तुळाकार जाळीदार नक्षीसाठी प्रसिद्ध.अहमादबादमधील हि मशीद म्हणजे फोटोग्राफरसाठी पर्वणी आहे.इथले नक्षीकाम बघून पर्यटक थक्क होतात.मशिदीच्या खिडक्यांना असलेल्या जाळीचा इंडीयन इन्स्टीट्युट अहमादबादने लोगो म्हणून उपयोग केला आहे.
पत्ता : घीकांता , अहमादबाद
विशेष आकर्षण : झाडाची नक्षी असलेली खिडक्यांची जाळी
वेळ : सकाळी ७ ते संध्याकाळी ६
प्रवेश फि : मोफत

जाळीदार खिडकीचे समोरील बाजूने टिपलेले सोंदर्य....
जाळीदार खिडकीचे बाहेरील बाजुने टिपलेले सोंदर्य...
चारही खडक्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे कोरीव काम आहे.
ह्या मस्जिदीवरील भिंतीत एका जाळीवर काढलेलं एका झाडाचं शिल्प प्रसिद्ध आहे. ते पाहिल्यावर आपल्याला सुद्धा त्या कारीगिरीचं नवल वाटतं.
अनेक घुमट आणि मिनार एकत्र असलेली वास्तु म्हणजे सरखेज रोजा.अहमदाबाद शहरातील इतर इस्लामिक वास्तुप्रमाणेच इथेही नाजुक कोरीवकाम बघायला मिळते. हि वास्तु सरखेज तलाव या मानवनिर्मित तलावाच्या काठावर उभारलेली आहे. अर्थात या वास्तुचे खांब, कमानी या इस्लामिक शैलीच्या असल्या तरी नाजुक कोरीवकामावर हिंदु शैलीचा स्पष्ट प्रभाव जाणवतो.

विशेष आकर्षण : शेख अहमद खाट्टू गंजी बक्षीचा दर्गा आणि बारादरी
वेळः सकाळी ९ ते संध्याकाळी ६
प्रवेश : मोफत
अहमदाबाद शहरामध्ये अनेक उत्तम कोरीवकाम आणि बांधणीच्या वास्तु आहेत.पर्यटकांनी आवर्जून पहावी अशीच एक वास्तु म्हणजे शाह आलम रोजा.यालाच रसुलाबाद दर्गा किंवा आलम नो रोजा असेही म्हणतात.इथे सुफी पंथ मानणारे भाविक लांबुन येउन भेट देतात. या मशीदीच्या घुमटावर मौल्यवान रत्न आणि सोन्यानी मढवले आहे.याच मशीदीच्या आवारात चोवीस घुमटांच्या दर्ग्यात शाह आलमच्या कुटूंबाची थडगी आहेत.मशीदीच्या जमीनीवर काळ्या आणि पांढर्या संगमरवराने नक्षीकाम केले आहे तसेच दरवाज्याच्या चौकटी आणि खांबात मोठ्या प्रमाणात संगमरवर वापरला आहे.

विशेष आकर्षण : संगमरवरात केलेले बांधकाम
वेळ- सकाळ ते संध्याकाळ
प्रवेश फि-मोफत
रानी नो हाजिरो :
रानी नो हाजिरो या गुजराती शब्दाचा अर्थ म्हणजे राणीचे थडगे.या ठिकाणी अहमदशहाच्या राण्यांची थडगी आहेत.हे ठिकाण मुख्य शहरापासून दुर आणि शांत जागी आहे. इथे असलेली थडगी इतर ठिकाणी जशी बंदिस्त जागी असतात तशी न बांधता, खुल्या जागेत बांधली आहेत.थडग्यावर हिंदु,जैन आणि मुस्लिम शैलीच्या नक्षीकामाचा प्रभाव जाणवतो.

पत्ता : मानेक चौक ,अहमदाबाद
विशेष आकर्षण : या मशिदीकडे जाणार्या रस्त्यावर विविध वस्तुंची विक्री करणारी दुकाने आहेत.
वेळः सकाळी ६ ते संध्याकाळी ६
प्रवेश : मोफत
मनोरंजनाबरोबरच ज्ञानात भर घालणारी जागा म्हणजेच गुजरात सायन्स सिटी. लोकांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी गुजरात शासनाने या सायन्स सिटीची उभारणी केली.आपल्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा म्हणून प्रत्यक्ष प्रयोग करुन त्यातून शिकण्याची व्यवस्था इथे केलेली आहे. लहान मुल आणि विद्यार्थी यांना अहमदाबाद शहरात आवर्जून भेट द्यावी अशी हि जागा.आकाराने प्रचंड पण अजूनही विकसनशील अवस्थेत असलेली जागा. इथे मंगळयान, भूकंप, ज्वालामुखी उद्रेक यांचा अनुभव घेण्यासाठी राईडस आहेत पण त्यासाठी किमान १५ जणांचा कंपू लागतो.
विशेष आकर्षण : 3D IMAX थिएटर, एनर्जी पार्क, म्युझिकल फाउंट्न, हॉल ऑफ स्पेस, ईलेक्ट्रोडोम, औडा गार्डन
वेळः सकाळी १०.३० ते संध्याकाळी ७.३०
प्रवेश फि : प्रौढांना २०/- रुपये आणि मुलांना ५/- तसेच शालेय सहलींना ५/-

या ठिकाणी मानवाच्या उत्क्रांतीपासून ते औद्योगिक विकासापर्यंत सर्व टप्प्यांचे अगदी सविस्तर विवेचन केले आहे.
वस्त्रपुर तलाव :
अहमादबादमध्ये एखादी संध्याकाळ घालविण्यासाठी उत्तम जागा म्हणजे हा वस्त्रपुर तलाव. शहरातील शांत, निवांत परिसरात हा मानवनिर्मित तलाव आहे.सभोवताली बाग आहे. या ठिकाणी असलेल्या खुल्या रंगमंचावर अनेक सांस्कृतिक वर्षभर कार्यक्रम केले जातात. गुजरातची परंपरा समजून घेण्यासाठी हे कार्यक्रम उत्तम माध्यम आहे.

पत्ता : वस्त्रपुर ,अहमदाबाद
विशेष आकर्षण : हिरवाइने नटलेला किनारा आणि जॉगर्स पार्क
वेळ : सकाळी ८ ते रात्री १०
प्रवेश : मोफत


13. The Pols, Ahmedabad

The Pols | Among the Best Tourist Places in Ahmedabad
You cannot leave Ahmedabad without visiting its Pols. Many cities in Gujarat have pols but those in old Ahmedabad are one of the best. These are tightly packed rows and blocks of houses, with each house having one or two secret entrance or exits that only the owner would know about. The pols have derived their name from Sanskrit word Pratoli, which means a gate. Going inside the houses through one of these secret doorways would be quite a thrilling experience. With urbanisation taking over most cities now, these pols now house the cottage industry set-up of the city. Most pols used to have a temple at the centre and a platform in the courtyard for feeding birds. The architectural style of pols is a mix of many elements, with some having a Peshwa symbol at the entrance while another sporting a Persian-style grapevine carving on its facade.
- Location: Multiple, Ahmedabad
- Special mention: Intricately carved wooden facades and frescoes
दादा हरी नी वाव :-

शक्यतो अहमदाबादला हिवाळ्यात भेट दिली तर उत्तम.नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी सुखद असतो.
अहमदाबादच्या रस्त्यावर खाकरा, ढोकळा, दाल वडा, खांडवी, खमण्,फाफडा,जलेबी, सामोसा, भजिया,पाणीपुरी, पराठे,पावभाजी, कुल्फी आणि बन मस्का
इंड्रोडा नेचर पार्क :-



वेळ : २४ तास

और पढ़े: द्वारिका के दर्शनीय स्थल और जानकारी
फन वर्ल्ड गांधीनगर – Fun World Gandhinagar
ज्यांना गांधीनगरच्या भटकंतीत मौज,मस्ती,धमाल करायची आहे त्यांनी नक्कीच भेट द्यावी अशी जागा म्हणजे फनवर्ल्ड.नावाप्रमाणेच एक दिवसाची सुट्टी घालवायला इथे भरपुर पर्याय आहेत.फन वर्ल्डमध्ये मास्टर स्लाईड,स्काय ट्रेन, रोलर कोस्टर,साया ट्रॉपर अश्या राईड आहेतच शिवाय बोटींगच्या सोयीबरोबर वॉटर राईडसुध्दा आहेत.यात मुलांसाठी घसरगुंडी, लेझी रिव्हर तसेच प्रौढांसाठी देखील काही वॉटर राईड आहेत.याच बरोबर भुक लागली तर जेवणाचा आनंद घेण्यासाठी फन वर्ल्डमध्ये रेस्टॉरंट देखील आहे.
वेळः सकाळी ९ ते रात्री १०
प्रवेश फी: मुलांसाठी १५/- तर प्रौढांसाठी रु ३०/- राईडसाठी रु ४००/- तसेच कॉम्बो रु ६००/- ( यात राईड्,जेवण सर्व समाविष्ट असते )
पुनीत वन गाँधी नगर – Puneet Van Gandhinagar

ज्यांना बागेमध्ये व झाडांमध्ये रुची आहे त्यांनी या उद्यानाला नक्कीच भेट दिली पाहिजे.
पत्ता : रोड नंबर ४८,सेक्टर १८ ,गांधीनगर
वेळः आठवड्यातील सर्व दिवस खुले असते.
शिल्पकाराचे गाव ( Craftsmen’s Village ):-
गांधीनगर या मुख्य शहराबरोबरच सात कि.मी.दुर पीतापुर नावाचे गाव आहे,या गावाची ओळख 'शिल्पकाराचे गाव' अशी आहे.याच गावात साड्यांवर नक्षीकाम केले जाते.या मुळे इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि दुकानदार खरेदीसाठी येतात.साड्यांवर लाकडी प्रिटींग ब्लॉकचा उपयोग करुन नक्षी उमटवली जाते.
गांधीनगरला भेट देणार असाल तर थोडा वेळ काढून या गावाला नक्कीच भेट द्या.नजरेसमोरच सांड्यावर उमटणारे डिझाईन पाहून इथे खरेदीचा मोह न झाला तरच नवल.
विट्ठलभाई पटेल भवन गाँधी नगर – Vithalbhai Patel Bhawan, Gandhinagar

और पढ़े : सूरत के दर्शनीय स्थल और जानकारी
बॉटनिकल गार्डन गांधीनगर – Botanical Garden

पत्ता : इंद्रोडा नेचर पार्क्,गांधीनगर
वेळः सकाळी १० ते संध्याकाळी ५(सोमवारी बंद)
प्रवेश फि : वय वर्ष ५ ते १२ मुलांसाठी रु ५/-, प्रौढांसाठी रु ३०/- विद्यार्थ्यांसाठी रु ८/-
संत सरोवर बांध गांधीनगर – Sant Sarovar Dam

पत्ता : गांधीनगर बस स्टँडपासून ५ कि.मी.
वेळ : पुर्ण दिवस आणि संध्याकाळी
महुदी जैन मंदिर गांधीनगर – Mahudi Jain Temple,

मंदिराच्या बाजुला तीस फुट उंचावर एक घंटा आहे.हि घंटा वाजवली तर मनातील इच्छा पुर्ण होतात असे मानले जाते.त्यामुळे हि घंटा वाजवण्यासाठीही मोठी गर्दी असते.
दांडी कुटीर (नमक पर्वत) संग्रहालय गांधीनगर – Dandi Kutir (Salt Mount) Museum

पत्ता : सॉल्ट माउंट्,सेक्टर १३ सी,गांधीनगर
वेळः सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३०
प्रवेश फि : भारतीय पर्यटकांसाठी रु १०/-, परदेशी पर्यटकांसाठी रु २००/-
https://www.thrillophilia.com/destinations/gandhinagar/places-to-visit
अदालज नि वाव (ADALAJ STEPWELL) :-
वाव म्हणजे पायऱ्यांची विहीर. हि विहीर १४००व्या शतकाच्या अखेरीस राजपूत राणी रुदाबाई यांच्या स्मरणार्थ बांधली होती. प्रवासी तसेच गावकर्यांना विश्रांतीचे एक ठिकाण म्हणून सुरुवातीस याचा वापर होत असे. अशा प्रकारच्या अनेक विहिरी गुजरातच्या विविध भागात आहेत. नंतर याचा उपयोग प्रामुख्याने पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी होऊ लागला.
हि विहीर अक्षरधाम मंदिरापासून साधारणता १८ किमी.च्या अंतरावर अहमदाबाद-गांधीनगर महामार्गावर आहे. जवळपास ७५ मी. लांब असलेली हि विहीर १६ खांबावर जवळपास ६०० वर्षानंतर भक्कम स्थितीत उभी आहे. विहिरीची रचनाच अशी केली आहे कि सूर्यकिरणे व्कचितच पाण्याला स्पर्श करतात त्यामुळे असे म्हणाले जाते कि बाहेरच्यापेक्षा पाण्याचे तापमान ५-६ अंशाने कमी असते.
अदालज हे अहमदाबाद पासून सुमारे १८ किमी दूर असलेलं एक गाव. अदालज ला जायचं झाल्यास अहमदाबाद वरून सिटीबस मिळतात
अदालज विहीर पहायची झाल्यास त्याची वेळ सकाळी ८ ते ६ आहे.
वर्षभर पावसामुळे पाण्याच्या पातळीत हंगामी उतार-चढ़ाव होणार त्यानुसार तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खोल खोदले गेले. राजा मेहमूद बेगडा ह्यांनी ही विहीर पूर्ण केल्यामुळे ही विहीर इन्डो-इस्लामिक स्थापत्यशास्त्रात बांधली गेली आहे. त्यामुळे विहिरीवरील शिल्पसुद्धा तशीच आढळतात.
सन १४९८ मध्ये ह्या विहिरीचं काम पूर्ण झालं. पाचशेहुन अधिक वर्षे पूर्ण होऊनसुद्धा आजही ह्या विहिरीवरील कोरीवकाम पर्यटकांचे लक्ष वेधुन घेतं. विहिरीच्या बाहेरून विहिरीचं एक दृश्य ज्यावरून आपल्याला विहीरच्या लांबीचा अंदाज येईल.
खरंतर अदालजच्या विहिरीसाठी कितीही वेळ असला तरी तो कमीच वाटेल
वेळः सकाळी ८ ते संध्याकाळी ६
प्रवेश शुल्कः मोफत
विशेष महत्वाचे : दरवर्षी नोव्हेंबरमध्ये अडालज नी वाव येथे जल उत्सवाचे आयोजन केले जाते.
मोढेरा सुर्यमंदिर (Modhera Suntemple)
गुजरातचे सोलंकीराजे म्हणजे सूर्यवंशी चालुक्य. ते सूर्यदेवाला स्वतःची कुलदेवता म्हणून भजत असत. त्यांच्या आराध्यदेवाच्या म्हणजे सूर्यदेवाच्या पूजेसाठी त्यांनी हे भव्य सूर्यमंदिर निर्माण केलं; पण या जागेचं महत्त्व फार पुरातन आहे असं मानलं जातं. स्कंदपुराणानुसार, आजच्या मोढेरा गावाभोवती एक मोठं अरण्य होतं. त्या अरण्यात ऋषी-मुनींचे खूप आश्रम होते म्हणून त्याला ‘धर्मारण्य’ असं संबोधलं जायचं. रावणाचा वध करून अयोध्येत परतणाऱ्या श्रीरामांनी रावणहत्येच्या पातकापासून मुक्त होण्यासाठी सीतेसह या धर्मारण्यात जाऊन यज्ञ केला अशी कथा आहे. आम्हाला मंदिर दाखवणाऱ्या ‘गाईड’च्या मते, प्रभू श्रीराम आणि सीता यांनी या ठिकाणाला भेट देऊन यज्ञ केला आणि या ठिकाणी ‘मोढेरक’ या गावाची स्थापना केली. याच गावाला पुढं ‘मोढेरा’ असं म्हटलं जाऊ लागलं. श्रीराम इथं आले होते असा लोकांचा विश्वास असल्यामुळे मोढेराच्या सूर्यमंदिरासमोरील कुंडाला ‘रामकुंड’ असंही म्हटलं जातं.
सन १०२४-२५ च्या सुमारास सौराष्ट्रातील सोमनाथाचं मंदिर उद्ध्वस्त करून पुढं सरकणारा गझनीचा क्रूरकर्मा महमूद याचं आक्रमण चालुक्य राजा भीमदेव पहिला यानं मोढेरा इथं युद्ध करून रोखलं होतं. इतिहासतज्ज्ञांचं असं मत आहे, की या देदीप्यमान विजयाचं प्रतीक म्हणून मोढेरा इथं हे भव्य सूर्यमंदिर उभारण्यात आलं.
ॐ भूर्भुवः॒ स्वः ।
तत्स॑वितुर्वरे॑ण्यं
भ॒र्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि ।
धियो॒ यो नः॑ प्रचो॒दया॑त् ॥
सूर्याची मुर्ती.
सूर्याची मुर्ती कशी करावी याचे काही नियम आपल्या शिल्पशास्त्रात लिहून ठेवलेले आहेत त्याप्रमाणे त्याच्या दोन्ही हातात कमळे हवीत. ती त्या मुर्तीच्या खांद्यापर्यंत जायला हवीत. त्याच्या पायात बुट दाखविले पाहिजेत...त्याचे सात घोडे दाखविले पाहिजेत इ.इ. असे अनेक नियम शिल्पशास्त्रात लिहून ठेवले आहेत व त्याच प्रमाणे मूर्ती घडवाव्या लागत.
पुढे मोढेराला १०२६ साली सोलंकी घराण्याचा राजा भिमदेव याने हे सूर्यमंदीर बांधले. सोलंकी हे सूर्यवंशाचे असल्यामुळे हे स्वाभाविकच होते. मंदीराचे बांधकाम किती काळ चालले होते याची कल्पना नाही परंतू राजाने व त्याच्या कलाकारांनी हे मंदीर किती जीव ओतून बांधले आहे याची कल्पना त्यावरील कलाकुसरीवरुन येऊ शकते. बऱ्याच मंदीराप्रमाणे येथेही मावळत्या सूर्याची किरणे गाभाऱ्यात पडतात. भारतातील बरीचशी देवळे तीन भागात बांधली जातात.
गर्भगृह, गुढमंडप आणि असलाच तर स्वर्गमंडप.
या मंदिराची काही आपली स्वत:ची वैशिष्ठ्ये आहेत. एकतर पुष्करणीत (सूर्यमंदीरात याला सूर्यकुंड म्हणतात) पाय धुतल्याशिवाय या मंदीरात प्रवेश करता येत नसे, म्हणजे प्रवेश करण्याचा मार्गच असा आखला होता.
सूर्य मंदिर संकुलात तीन विभाग आहेत. प्रवेश करताच दिसते ते "रामकुंड", हे पाण्याचे मानव निर्मित तळे, त्यानंतर "सभामंडप "आणि शेवटी "गूढमंडप अथवा गर्भगृह.
यात स्नान केल्यावर किंवा सूर्याला अर्ध्य दिल्यावर साधकाला एकूण दोन मंडपातून जावे लागे जे गरुडस्तंभासारख्या खांबांवर उभे केले होते.
पहिल्या मंडपाचे उरलेले दोन खांब
काठावरची देवळे
शितळादेवी; हिच्या डोक्यावर सूप आहे. देवीच्या साथीत मुलांना देवी येऊ नयेत म्हणून भाविक हिची पुजा करीत व अजूनही करतात.
सूर्यकुंडाभोवती १०८ मुर्ती आहेत व चार कोपऱ्यात गणपती, नटराज, शितळामाता, व विष्णू यांची देवळे आहेत.
नटराजाची अत्यंत सुबक मूर्ती. त्याच्या नृत्यातील डौल बघण्यासारखा आहे.
या देवतांची देवळे एकसारख्या अशा देवळात आहेत.
रामकुंड पाहून आपण मंदिराकडे वळलो की आपल्याला प्रथम दिसतो तो अत्यंत नाजूक कोरीव कामानं नटलेल्या खांबांवर तोललेला भव्य सभामंडप. रामकुंडाच्या पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश करताना आधी दिसतं ते दोन प्रचंड कोरीव स्तंभांवर उभं असलेलं कीर्तितोरण. पुढं मुसलमानी आक्रमणात या मंदिरानं खूप घाव सोसले, त्यात या तोरणाचा वरचा भाग नष्ट झाला, तरी त्याचे दोन खांब अजूनही गतवैभवाची साक्ष देतात. सभामंडप ‘सर्वतोभद्र’ म्हणजे चारही बाजूंनी प्रवेशद्वारं असलेला आहे. सभागृहाच्या छताला आधार देणारे खांब दोन प्रकारचे आहेत. प्रवेशद्वाराजवळ असलेले छोटे खांब आणि मुख्य मंडपात जमिनीपासून छतापर्यंत असणारे मोठे खांब, ज्यांच्यावर रामायण-महाभारतातले व इतर पौराणिक कथांमधले प्रसंग कोरलेले आहेत. या मंदिरात सौरवर्षातील ५२ आठवड्यांचं प्रतिनिधित्व करणारे ५२ स्तंभ आहेत.
सभामंडपात चारही बाजूंनी जाता येते. आतमधे खांबावर रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. छपराची उंची साधारणत: २३ फूट आहे. गुढमंढपातही अनेक शिल्पे कोरलेली आहेत काही कामसूत्रातीलही आहेत. याचे क्षेत्रफळ अंदाजे १३०० वर्ग फूट आहे. आतील भागात पूर्वी सूर्याची मुर्ती असावी. त्याच्याभोवती प्रदिक्षणेचा मार्ग ही आखलेला आहे. दर २१ मार्चला सूर्याची किरणे त्या मुर्तीवर पडतात. गुढमंडपात एक भुयार होते असे आमच्या गाईडने सांगितले जे सध्या बुजलेले आहे असेही सांगितले. खरे खोटे देव जाणे.
मंदीराच्या बाहेरील भिंतीवरील काही शिल्पे
बर्याच नमंदीरात मंदीराचा भार उचलण्यासाठी गजथर दाखविलेला असतो. येथे मात्र कमळाचा थर दाखविलेला आहे....
बाह्यभागातल्या एका शिल्पपट्टिकेवर एक छोटेसे प्रसूतिचित्र आहे. त्यात 'स्क्वॉटिंग' स्थितीतली प्रसूती दाखवली आहे. तिथले गाईड हे अगदी छोटे शिल्प आवर्जून दाखवतात आणि आजकाल पश्चिमेकडे लोकप्रिय होऊ घातलेली ही प्रसूती मुळातली आपल्याकडचीच आहे असे अभिमानाने सांगतात. (सांगत असत, आता माहीत नाही.)
दुर्दैवानं आज त्यापैकी काहीही अस्तित्वात नाही. खिलजीनं या मंदिराचा पुरता विध्वंस केलेला आहे; पण तरीही जे शिल्लक आहे तेच इतकं डोळे दिपवणारे आहे, की मूळ मंदिर किती वैभवशाली असेल हा विचार राहून राहून अस्वस्थ करतो. सूर्यमंदिरात प्रवेश केल्यावर बाहेर निघायचा विचारसुद्धा मनात येत नाही.
सूर्यकुंड अप्रतीम बघत रहावे असे आहे. सूर्यकुंडाच्या भोवती पायऱ्या व इतर देवतांची मंदीरे आहेत सूर्यकुंड आयातकृती असून १७६ फूट लांब व १२० फूट रुंद आहे.
रानी की वाव
चावडा घराणे अंदाजे ७४६ ते ९४२
सोलंकी घराणे अंदाजे ९४२ ते १२४४
वाघेला घराणे अंदाजे १२४४ ते १३०४
या घराण्यांनी पाटणहूनच गुजरातवर राज्य केले. अनहिलवाड (पूर्वीचे पाटण) हे त्या काळातील फार मोठे शहर असावे.
वास्तू विशेष
सगळ्यात मागे दिसते आहे ती विहीर..ही गावकर्यांना थोडीफार माहीत होती.
आत शिरल्याशिरल्या दिसणार्या शिल्पांनी सुशोभीत भिंती..
विहिरीची मापे पाहिली तर आपण तोंडात अचंब्याने बोटे घालतो. ६४ मिटर लांब, एका बाजुला २७ मिटर व एका बाजुला २७ मिटर. खोली आहे जवळजवळ २३ मिटर.
श्रीविष्णू वराह अवतार...
भूदेवीला एका हिरण्यकश्य नावाच्या राक्षसाने पळवून पाताळात एका सरोवरात लपवून ठेवले. पृथ्वी नाहीशी झाल्यामुळे सगळीकडे हाहा:कार माजला. त्यावेळे तेथे प्रकट होऊन श्रीविष्णूने वराहाच्या अवतारात जाऊन त्या राक्षसाचा वध करुन भूदेवीला आपल्या सुळ्यांवर बसवून वर आणले.....अशी काहीतरी गोष्ट आहे ती...
ओठांची रंगरंगोटी करणारी एक सुंदर स्त्री...
आळस देणार्या स्त्रियांच्या सौंदर्याबद्दल आपल्या साहित्यात बरेच काही लिहिले गेले आहे व अशा स्त्रियांची शिल्पेही विपूल प्रमाणावर सापडतात. असेच एक शिल्प कोपेश्वराच्या मंदिरावरही आहे...
बहुतेक मदन...हातात उस व दुसर्या हातात बाण हे त्याची चिन्हे दिसत आहेत....
पायर्यांच्या कडेला असलेल्या भिंतीवरचे कोरीवकाम...
कृष्णधवलची मजा काही औरच असते...
या प्रकारच्या खांबावर सगळा डोलारा उभा आहे..
भिंतींवरचे शिल्पकला...
यातील मूर्तींचा खजिना सापडला १९५० च्या मध्यास. भारतीत पुरातत्व खात्याने ५० वर्षे कष्ट करुन हा खजिन्याची गाळापासून सुटका केली व दहाच वर्षात युनेस्कोने रानी-की-बावला जागतिक वारसाचा दर्जा बहाल केला. या विहीरीत एकूण २९२ खांब असले असते पण आता त्यातील २२६ खांब जागेवर आहेत. आत्ता ज्या जमिनीवर उभी आहे त्या जमिनीवर मला वाटते अजून बरेच काही सापडण्यासारखे असणार. तेथे उत्खनन का केले जात नाही हा संशोधनाचा विषय ठरावा. गुजरात-कच्छ ते पार सिंधपर्यंत ख्रिस्तपूर्व काळापासून अशा अतिखोल विहिरी खणण्याचे ज्ञान स्थानिक लोकांकडे उपलब्ध होते हे निर्विवाद. पाण्याच्या काठाने असलेले बांधकाम ना फक्त सूर्याच्या तीव्र किरणांपासून व उष्णतेपासून संरक्षण करायचे पण मला वाटते तेथे पाण्याने गारवाही निर्माण होत असावा. विशेषत: राण्यांसाठी... आता एवढ्या खोलवर असलेल्या पाण्यापर्यंत पायर्यांवरुन पोहोचायचे म्हणजे वर्तुळाकार (चौकोनी पण स्कृचे तत्व) आकारात पायर्यास हव्याच. २३ मिटर खोल उतरण्यासाठी किती वेळ लागेल याचा हिशेब केला तर त्या वेळात भिंतीवरील शिल्पे पहात पहात खाली उतरणे हे स्वाभाविकच म्हणायला हवे. हे वाचून तुम्ही तेथे गेलात तर आपल्या डोळ्यासमोर राण्या, त्यांच्या दासी व इतर लवाजमा त्या पायर्या उतरत आहेत हे दृष्य निश्चितच उभे राहील.. शिवाय या मजल्यांवर त्या काळातील खास बायकांची तुळशीबागही भरत असे.
खांबांवरची नक्षी
खालच्या मजल्यावर आपल्याला जाता येत नाही पण आपण ज्या पायर्या उतरुन जातो त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरुन आपल्याला आतील शिल्पांचे दर्शन घडते. सगळ्यात वर दिलेले छायाचित्र अशाच आतील भातील श्रीविष्णूच्या मूर्ती आहे. ते कसे काढले आहे तेही दिलेलेच आहे. अशीच अजून दोनतीन शिल्पे.. आत अंधार असल्यामुळे याची छायाचित्रे काढण्यास थोडे अवघड आहे...
ही आतील भागात असल्यामुळे तुलनेने सुस्थितीत आहेत फक्त यावर जळमटे साठलेली दिसतात आणि शिवाय कबुतरांचा त्रास आहेच...
श्री गणपती...

एकूण ५०० प्रमुख व जवळजवळ ११०० लहान शिल्पे कोरलेली आहेत. पण ती अशी कोरली आहेत की एवढी शिल्पे असून कोठेही दाटीवाटी झाली आहे असे वाटत नाही. शिल्पांएवढेच महत्व मोकळ्या जांगांनाही कसे असते हे आपल्याला येथे कळते. ही सगळी विहीर श्रीविष्णूच्या अवतारांवर आधारलेली आहे. महाभारतातील प्रसंग, रामायणातील प्रसंग, काही जैन ऋषींच्या मूर्ती तसेच बुद्धाच्याही एकदोन मूर्ती आहेत. अप्सरा, नृत्यांगना व विषकन्यांची अगणित शिल्पे आहेतच.
किसकी सुरत चमक रही है इस आरसी में......
सगळ्यात आत पाण्याच्यावर मोडकळीस आलेली शिल्पे....
जेथे पाणी आहे ती विहीर. यावर पाणी उपसण्यासाठी मोटी आहेत त्या जुन्याच आहेत का तुलनेनी नंतरच्या काळातील याची कल्पना नाही....
विहीरीच्या बाजूने घेतलेले पायर्यांचे छायाचित्र...
सगळ्यात शेवटच्या मजल्यावरील भिंती आता कोसळायच्या परिस्थितीत असल्यामुळे तेथे कोणालाच जाण्यास परवानगी नाही पण तेथेही शिल्पे आहेत व वातावरण गुढरम्य आहे. भुकंपप्रवण प्रदेश असल्यामुळे पुरातत्व खात्याला जमिनीतील हालचालींची नोंद घ्यावी लागते. त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी काचेच्या पट्ट्या ठेवल्या आहेत. थोडीजरी हालचाल भुगर्भात झाली तर या खाली पडतात किंवा फ़ुटतात. आता अर्थात आधुनिक उपकरणेही आणलेली असावीत.
ह्या ऐतिहासिक वास्तुस यूनस्को ने २२ जून २०१४ ला जागतिक ऐतिहासिक वास्तूमध्ये सामील करून घेतलं व भारतात उपलब्ध असलेल्या सर्व विहिरींची राणी म्हणून ह्याचा सन्मान केला व सध्या चलनात असलेल्या १०० रु च्या नोटेमागे "रानी की वाव"च छायाचित्र देऊन ह्यास देशभरात प्रसिध्द केलं.
मोढेरा - पाटण - आबू
गुजरातचे पर्यटनाच्या दृष्टीने तीन ढोबळ भाग करता येतील. सौराष्ट्रातील पौराणिक महत्त्व प्राप्त असलेले धार्मिक पर्यटन, कच्छमधले नैसर्गिक रण, आणि राज्यात पसरलेली पुरातन कलाकौशल्य असलेली देवळे,मशिदी वगैरे. सापुतारा हे हिल स्टेशन तसे पाहिले तर नाशिकला जवळ असल्याने महाराष्ट्राचेच म्हणता येईल. तरंग हिल हे एक नव्याने उदयाला येत आहे. अहमेदाबाद,गांधीनगर,वडोदरा,सूरत या मोठ्या शहरांमध्येही बरेच पाहण्यासारखे आहे. पुढे दगदग झेपेनाशी झाली की या शहरांत फिरायचे हे ठरवून टाकले आहे.
गुजरात पर्यटनाच्या जाहिरातीत मोढेराचे सूर्यमंदिर, पाटणची राणी की वाव,सिद्धपूरचे बिंदूसरोवर तीर्थ दाखवतात ते एकदा पाहावे असा विचार करून नकाशे, रेल्वे टाइमटेबल उलगडले. अहमेदाबाद,मेहसाणा,सिद्धपूर,पालनपूर,आबू रोड(राजस्थान) हे एकाच रेल्वेमार्गावर आहे आणि या स्टेशनांवर सोयीच्या वेळी गाड्या थांबतात. मेहसाणापासून मोढेरा,पाटण, सिद्धपूर आणि वडनगर पंचवीस -पस्तीस किमी परिसरांत आहे. मेहसाणा ते आबूरोड जाण्यासाठी अहमेदाबाद_अजमेर इंटरसिटी इक्सप्रेस ( १०:२० - १३:१०) आहे. आबूरोड ते मुंबई गाड्या आहेत.
तीन आरक्षणं करून टाकली.
१) दादर ते भुज गाडीने मेहसाणा(१२९५९),
२) मेहसाणा ते आबूरोड (१९४११),
३)आबू रोड ते बान्द्रा ( १९७०८).
मेहसाणा मुक्काम तीन दिवस, माउंट आबू अडीचदिवस. सीजन ऑक्टोबरला सुरू होतो, सेप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हॅाटेल बुकिंग आगावू करण्याची गरज नसते त्यामुळे ते केले नाही.
( पुण्याहूनही येण्याजाण्यासाठी चांगल्या रेल्वे आहेत. इतर पर्यटक मेहसाणाला मुक्काम करत नाहीत. अहमेदाबाद येथे थांबून कार भाड्याने घेऊन / आयोजित सहल करून परत जातात. )
फोटो १
नकाशा १
फोटो २
नकाशा २
या बाजुच्या गाड्यांत उगाच गडबड गोंधळ नसतो. आरडाओरडा, पोलिस खिडक्या बंद करायला लावतात तसला गोंधळ नसतो. प्रवासी शातपणे बसून गप्पा मारतात. सूरत स्टेशनाचे सर्व फलाट रात्रीही खचाखच भरलेले दिसतात. अहमेदाबाद स्टेशन फारच गचाळ आहे याचे आश्चर्य वाटते.
पहिला प्रवास वेळेत होऊन मेहसाणात पोहोचलो. रेल्वेमार्ग आणि हाइवे (NH14/27) चिकटूनच आहेत. जुनं शहर आणि सिटि बस स्टँड पूर्वेस आहे. लॅाजटाइप एकदोन हॅाटल्स दिसली. पश्चिमेस राधनपूर सर्कल, मोढेरा सर्कल, मेहसाणा बस पोर्ट हे एकदोन किमीटरात आहे. इथे जनपथ,भाग्योदय वगैरे हॅाटेलस आहेत(राधनपूर सर्कल). ठीकठाक आहेत पण व्हॅल्युफॅारमनी नाहीत. एसी रुम पंधराशे रु. एका ठिकाणी राहिलो आणि तयार होऊन मोढेरा सर्कलपाशी आलो. मेहसाणा बस पोर्ट हा डेपो उत्तम आणि स्वच्छ आहे. बाजुलाच असलेले जैन मंदिर अवश्य पाहा. इथे भरपूर रुम्स धर्मशाळेच्या आहेत पण फक्त जैनांसाठी. जेवण चहा नाश्ता कुणालाही मिळतो. उत्तम शाकाहार.
मेहसाणा डेपो/मोढेरा सर्कलहून भरपूर बसेस, शेअर टॅक्सीज मोढेरा (२५किमी) जाण्यासाठी मिळतात. रस्ता उत्तम, ७०च्या स्पीडने वाहने जातात. ट्राफिक नाहीच. मोढेरा हे छोटेसे गाव आहे. इथे इतके सुंदर सूर्यमंदिर असेल यावर विश्वास बसत नाही. मोठे आवार पुरातत्व खात्याने बाग करून छान ठेवले आहे. आवाराबाहेरच्या शेतात मोर,वानरे आहेत. मंदिरासमोर मोठा पायऱ्यांचा तलाव आहे. सूर्याच्या मूर्ती मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर असल्या तरी गाभाऱ्यात नाही. शैव शिल्पे नाहीत. शेषशायी विष्णु आहे. खांब सुंदर आहेत. मोढेराहून बेचारजी मंदिर आणखी पंधरा किमी दूर आहे. तिथे गेलो नाही.
फोटो ३
मोढेरा पाटी
मोढेरा सूर्यमंदिर
video 860x480, size 22 MB, 00:57:00
फोटो ४
सूर्यदेव
पाटणला जाण्यासाठी वीस रु/ सीट शेअर टॅक्सी मिळाली. अठरा किमी अंतर आहे. रस्ता उत्तम. पाटणचा पटोला साड्यांचा बाजार आणि राणी की वाव पाहण्याचा उद्देश होता परंतू दुसऱ्या रिक्शाने तिथे पोहोचण्याअगोदर पोटपुजा करून घेतली.
फोटो ८
राणी की वाव पाटी
राणी की वाव ( व्हिडिओ )
00:01:30 ; SIZE 39 MB ; 848x480( व्हिडिओ )
फोटो ९
वामन
गुजरातची जुनी राजधानी पाटनगर / पाटण होती. नंतर आक्रमणानंतर त्याची नासधूस झाली. स्वातंत्र्यानंतर वडोदरा करण्याचा विचार होता परंतू अहमेदाबाद झाली आणि त्यानंतर सध्याची गांधीनगर. जुन्या पाटण गावाचा रस्ता आल्यावर विटांनी बांधलेली वीसपंचवीस फुट उंच तटबंदी आणि दरवाजे दिसतात. राणी की वाव परिसर मोठा सुंदर राखला आहे. बाग आहे आणि भितींबाहेर मोरपण आहेत. जमिनीच्या आत चाळीसपन्नास फुट पायऱ्या उतरून विहिर आहे. परंतू पूर्ण शेवटपर्यंत जाऊ देत नाहीत. आतल्या भिंतींवर तीनचारशे मोठ्या मूर्ती आहेत.
फोटो १०
घोडेस्वार
फोटो ११
पद्मपाणि
फोटो १२
वराहावतार
फोटो १३
नागकन्या
फोटो १४
राम
शैव शिल्पे नाहीत. दशावतार, नायिका इत्यादि. खाली उतरू तसे फार गरम होते. राणी की वाव'च्या मागेच सहस्रलिंग नावाचे शिल्पसमुह आहेत. तेही जमिनीत वीसफुटी चरात आहेत आणि खूप पसरलेले आहेत. उकाडा वाढलेला आणि परतीची रिक्शा मिळणार नाही साडेपाचनंतर या विचाराने लगेच निघावे लागले. तिसरे दिवशी हे पाहून नंतर आबूरोडला ट्रेनने जायचा प्लान होता. ती अजमेर एक्सप्रेस रोज रद्द करत होते, उकाडाही वाढला म्हणून सकाळी बसने आबूला जायचे ठरवले.
सकाळी बस स्टॅापला कळले की राजस्थान सरकारच्या बसेसचा संप चालू आहे त्यामुळे थेट आबूरोड बस जात नाही, थोडी दोन किमी अलिकडे चेकपोस्टपर्यंत सोडतात. हाइेमुळे प्रवास सुखद झाला. मग आबूरोड ते माउंट आबू जाण्यासाठी शेअर टॅक्सी (चार सीटसचे तीनशे रु) मिळाली. अठ्ठावीस किमी अंतराचे( स्पेशल) इंडिकावाल्याने पाचशे सांगितले. [[ नेरळ _माथेरान सात किमीचे ओम्नीवाले ३६० रु घेतात.]]
माउंट आबू हिल स्टेशन होण्याअगोदरपासून अर्बुदा पर्वत म्हणून प्रसिद्ध आहे आणि काही राजपुतांचे मूळस्थान. हजार पंधराशे मीटरस उंचीवर पसरले आहे. एक टोक गुरुशिखर १७२० मीटरस उंचावर आहे. वर लगेच गारवा जाणवू लागला. टॅक्सीत उतरल्यावर हॅाटेल एजंट पुढे सरसावले. जवळची दोन उगाचच पाहिली. रुम्स चांगल्या होत्या आणि मेन रोडवरच. पूर्वी एकदा(२००१) हॅाटेल सुधीर (राजेन्द्र मार्ग) येथे राहिलो होतो तिथेच गेलो. हजार - सोळाशेत छान रुम्स होत्या. बरेचजण ओनलाइन बुकिंगवाले होते. याच रुम्स दसरा ते दिवाळी सुटीत चार -सात हजारला जातात.
माउंट आबू एक दिवसात उरकण्याची, 'करण्याची' जागा नाही. इकडे रेंगाळायचे. सुप्रसिद्ध दिलवाडा जैन मंदिर, नकी तलाव, सनसेट पॅाइंट या भटकायच्या विशेष जागा दोन किमीटरांत आहेत. शिवाय खरेदी असतेच.
फोटो १५
इम्पोरिअमच्या बाहेर मूर्ती तशाच ठेवून जातात.
फोटो १६
शिवसेनेचा फ्ले क्स
फोटो १७
नक्की /नखी लेक
फोटो १८
Life jacket
नक्की लेकमध्ये बोटिंग नको वाटेल कारण लाइफ जाकिट्स अशी फेकलेली असतात.
रोज वेगळ्या रेस्टॅारंटात खायचे. दालबाटी हा मुख्य प्रकार होता, प्रत्येकठिकाणी थाळ्यांत बाट्या ठेवलेल्या दिसायच्या त्या आता गायब झालेल्या. पंजाबी,चाइनिज पदार्थांची मागणी वाढली आणि दालबाटी मागे पडली. दोनचार ठिकाणी रबडी दिसली परंतू ही माउंट आबूचं वैशिष्ट्य नाही, ते आबूरोड स्टेशनपरिसराचं. दक्षिणी इडली डोशासाठी अर्बुदा अजूनही सर्वोत्तम. गुजराथी थाळीसाठी सरस्वती, गुजराती भोजनालय. सकाळी बटाटे,टमाटे,कान्दे भरलेले टेम्पो वर येऊ लागतात. रेस्टारे त्यावरच चालतात ना.
रोज संध्याकाळी साडेसहा ते आठ तीन राजस्थानी कलाकार गाणं( फ्री) सादर करण्यासाठी हॅाटेलवर ठेवले होते. पण कुणीच येत नव्हतं. बिचारे. टिव्हिपुढे सगळे फिके झाले. शंभर रुपयांत फुल डे टुअरमध्ये साताठ जागा दाखवतात साडेनऊ ते चार.
तीन दिवस पटकन संपले आणि नऊला हॅाटेल सोडून माउंट आबू_ आबूरोड_अंबाजी एसी स्लिपर बसने (१५० रु) अंबाजीला आलो. ( आबूरोड_अंबाजी १८ किमी) हे गुजरातमध्ये आहे. नुकतीच भाद्रपद अष्टमी ते पौर्णिमा जत्रा संपली होती. गर्दी ओसरलेली. हे देऊळ पुरातन आहे परंतू सतत बदल करत असतात.मूळचे संगमरवरी पण आता त्यास सोनेरी पत्र्याने वरपासून मढवले आहे. ( अंबाजी = महालक्ष्मी). आम्ही मागच्या दाराने पटकन पाहून आलो. मेन गेटकडून मोठा लोंढा होता. बाजारात ओडिशाची छेनापोडी चांगली मिळाली. तीन वाजेपर्यंत आबूरोड स्टेशनच्या वेटिंगरुममध्ये पावणे पाचच्या गाडीसाठी तयारीत राहिलो. परिसरात आणि स्टेशनवर रबडी विकणाऱ्यांचे खूप ठेले होते. रबडी खाऊन तिकिटं पाहात होतो तेव्हा घोषणा झाली "मारवाड भागात रुळाचे काम चालू असल्याने गाड्या पाच तास उशिरा धावत आहेत." आलिया भोगासी पुन: रबडी घ्यावी लागली, कँटिनमध्ये जेवणही झाले. शेवटी पावणेदहाला वेळेवर पाच तास उशिरा गाडी आली. पधारों मार्हो देस पुन्हा एकदा जाणारच.
फोटो लिंक्स
(आणखी फोटो दिल्यास धागा लवकर लोड होणार नाही म्हणून लिंक्स देत आहे.)
राणी की वाव ३६०° , २७ एमबी, 00:01:14
सूर्यमंदिरावर बाहेर मोजकीच शिल्पे आहेत. आतमध्ये फार नाहीत. खांबांवरची झिजलेली आहेत किंवा साधी नक्षी आहे.
सिद्धपूर :-
. मेहसाणा तेसिध्दपुर एक तासाचा प्रवास आहे. रेल्वे ओवरब्रिजवरून गावात जावे लागते. इथे बोहरा समाजाच्या हवेली आहेत. सर्व हवेल्या बंद आहेत, मालक अमेरिकेत अथवा दुसऱ्या शहरांत राहतात.
सिद्धपूर बोहरा हवेली १
सिद्धपूर बोहरा हवेली २
बाजारातून दहा मिनिटे चालल्यावर रुद्र महालय आहे. आता प्रतिबंधित क्षेत्र आहे. पुरातत्व खात्याचे लोक तसेच पोलीस इथे तैनात असतो.मात्र पर्यटकाना बघायची परवानगी आहे. बाबरी मस्जिद प्रकरणानंतर ही विवादास्पद वास्तू घोषित केली गेली होती कारण इथे पूर्वी मशीद होती म्हणतात.
रुद्र महालय कमान
इथे अशा बऱ्याच कमानी होत्या आणि आत रुद्र महालय नावाचे शिवालय. दोनच कमानी राहिल्या आहेत.येथून एक वळसा घालून मागे गेल्यावर सरस्वती नदीचे विशाल पात्र दिसते. आता कोरडेच आहे. या तीरावर एक महादेव आणि मुक्तिधाम स्मशान आहे. ( साताऱ्याच्या संगम माहुलीसारखे यास महत्त्व आहे.) नदीपलीकडे अजून दोन महादेव आहेत. याच बरोबर आपल्याला बिंदु सरोवराला देखील भेट देता येईल.
बिंदु सरोवर हे मोठे आवार आहे. संपूर्ण लाल दगडाच्या फरशीने झाकले आहे. स्वच्छ आणि सुंदर जागा - हाइवे टच. या जागेला पौराणिक महत्त्व आहे. कपिलमुनि आणि कर्दम ऋषींनी इथल्या कुंडापाशी आईचे श्राद्ध केले होते. कुंडास मातृतीर्थ प्रसिद्धी मिळाली आणि श्रद्धाळू इथे आइचे श्राद्ध करतात. त्यांच्यासाठी पंचवीसेक लाल दगडातल्या मेघडंबरी बांधलेल्या आहेत. एकामध्ये आठजण बसू शकतात. पितृपंधरवडा दोन दिवसानंतर सुरू होणार होता तरीही पंधरा ठिकाणी विधी सुरू होते. गुजरात सरकारने २१ कोटी रु खर्च करून ही जागा सुंदर करून टाकली आहे. फोटोस बंदी आहे. एक म्युझिअम आहे त्यातला साडेचारफुटी काळ्या दगडातला विष्णु अप्रतिम! आवारात कर्दमेश्वर महादेव आहे. या रस्त्यावर एकूण पाच महादेव आहेत, हे एक विधिक्षेत्र असल्याने आणि सिद्धपुरात निम्मी वस्ती बोहरांची यामुळे हॅाटेल्स नाहीत.
शामलाजी:-

शरद पौर्णिमेला इथे विशेष उत्सव असतो.याच काळात गोकुळात श्रीकृष्णाची विशेष पुजा केली जाते.तशीच पुजा इथे देखील केली जाते.हे मंदीर ३२० फुट उंच असून जवळपास ५०० वर्ष जुने आहे.सभामंडप,अंतराळ आणि गर्भगृह असे मंदिराचे तीन भाग आहेत.शुभ्र संगमरवर दगडापासून मंदिराची उभारणी केलेली आहे.दुमजली असलेल्या या मंदिराचे खांब आणि भिंती या नक्षीकामाने मढवून टाकलेलया आहेत.मंदिराच्या बाह्य भिंतीवर रामायण आणि महाभारतातील प्रसंग कोरले आहेत.
Related Blogs: http://vadnagar.blogspot.com
वड़नगर
वडनगर हे पंतप्रधान मोदी यांचं जन्मगाव मेहसाणापासून पूर्वोत्तर चाळीसेक किमी दूर आहे. या शहराचा इतिहास २५०० वर्ष प्राचीन आहे.सातव्या शतकात भारतात आलेला चिनी प्रवासी ह्यु एन त्संग यानेही वडनगरला भेट दिली होती.
इथे एक बौध्द मठ आहे.तसेच नुकत्याच झालेल्या उत्खननात इथे प्राचीन स्तुप आणि काही दालन सापडली आहेत.वडनगर इथे १२ व्या शतकातील सोळंकी राजवटीच्या खुणा आढळतात.सरोवराभोवती पाचर वापरुन जोडलेले दगड किंवा पार्श्वभुमीवर असलेले कीर्ति तोरण हे त्याचेच प्रतिक.
दुसर्या शतकातील बुध्द्दाची मुर्ती इथे सापडली आहे.वडनगरला उत्खनन करताना दोन कोरीव स्तुप्,चैत्यगृह आणि नउ दालन देखील मिळाली आहेत.या दालनांची रचना स्वस्तिक आकाराची आहे.बौद्धकालीन किंवा नंतरची शिल्पे आहेत. त्यापैकी एक विशेष म्हणजे तोरण. याचे चिन्ह आणि नाव गुजरात पर्यटन खाते - हॅाटेल्ससाठी घेतले आहे.इथे असलेल्या अर्जुन बारी दरवाज्यावर असलेल्या शिलालेखाप्रमाणे राजा कुमारपाल याने हे शहर इ.स.११५२ मध्ये उभारले.याच शहराला इतिहासकाळात चमत्कारपुर्,आनंदपुर्,स्नेहपुर्,विमलापुर या नावाने देखील ओळखले जाते.
वडनगरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ताना रिरी संगीत महोत्सव. वडनगरच्या दक्षिणेला ताना आणि रिरी या दोन ब्राम्हण कन्यांची समाधी आहे.या दोघींची कथा आपल्याला थेट सोळाव्या शतकात घेउन जाते.अकबराच्या दरबारात तानसेन हा सर्वात महान गायक समजला जात होता.एकदा अकबराने तानसेनाला राग दीपक गायला सांगितला.मात्र हा राग गायिल्याने उष्णता तयार होउन त्याचा त्रास आपल्याला होणार हे माहिती असूनही तानसेनाने तो राग गायला.त्यामुळे तानसेनाला त्रास होउ लागला.तेव्हा तानसेनाचे गुरु रामदास यांनी त्याला राग मेघमल्हार एकायला सांगितला.त्यामुळे पाउस पडेल व शरीराचा दाह कमी होइल.ताना आणि रिरी या दोन भगिनी हा राग गाउ शकतात असे तानसेनाला समजले.त्याने त्यांच्या वडीलांकडे त्यांना गाण्यासाठी परवानगी मागितली.अकबरालाही या दोन बहिणींच्या गायनाची महती समजली आणि त्याने त्यांना दरबारात गाण्यासाठी आमंत्रण दिले.मात्र ब्राम्हण असल्यामुळे असे करणे हे अयोग्य वाटून त्या दोघीनी नकार कळविला.अकबराने त्यांचे मन वळविण्यासाठी आपले सैन्य वडनगरला पाठविले.तेव्हा त्या दोन्ही भगिनींन नकार कळविला आणि आपल्यामुळे इतर गावकर्यांना त्रास नको म्हणुन आत्महत्या केली.याच दोन्ही बहिणींची स्मृती म्हणून दोन छोटी मंदिर उभारली आहेत आणि त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी संगीत महोत्सव आयोजित केला जातो.
सध्या वडनगर थोड्या उंचीवर वसलेले आहे. इथे आलेले पर्यटक हाटकेश्वर मंदीर्,शर्मिष्ठा सरोवर्,ताना रीरी बाग्,धीरी,गौरीकुंड, खोखा गणपती, नागमंदिर अश्या ठिकाणांना भेट देउ शकतात.याचबरोबर गुजरातमधील दोन प्रसिध्द्द संत दयाराम आणि नरसिंह मेहता यांच्या स्मृती इथे आहेत.याचबरोबर सुप्रसिध्द कादंबरीकार गोवर्धन त्रिपाठी,संगीतकार कौमुदी मुन्शी याच भुमीतील.
हटकेश्वर मंदिर, वडनगर –
वडनगर आणि मोदी:-
जुन्या वड्नगर रेल्वे स्टेशनवर मोदींच्या वडीलांचे चहाचे दुकान होते.नरेंद्र मोदी आपल्या वडीलांना इथे मदत करीत होते.पण आज या स्टेशनचे स्वरुप बदलून गेले आहे. या चहाच्या दुकानात वडनगर राष्ट्रीय स्वंयसेवक शाखा चालवणारे वकील इनामदार नेहमी येत असत.नरेंद्र मोदींचा त्यांच्याशी परिचय वयाच्या आठव्या वर्षी झाला आणि ते स्वयंसेवक बनले.पुढे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री आणि पुढे पंतप्रधान झाले.आज वडनगरचे ब्रॉड गेज स्टेशनमध्ये झाले आहे.तसेच मेडीकल कॉलेज आणि बस स्टँडही झाले आहे.
https://www.gujarattourism.com/north-zone/mehsana/vadnagar.html
देवनी मोरी :-
गुजरातच्या उत्तर भागात देवनी मोरी हे बौध्दकालीन प्राचीन अवशेष असणारे स्थळ आहे.इथे आठव्या शतकातील बौध्द कलाकृती सापडल्या आहेत.तसेच गुर्जर्,प्रतिहार काळातीलही काही अवशेष मिळाले आहेत.इथे सापडलेल्या वस्तु शामलाजी संग्रहालय आणि बडोद्याच्या म्युझियममध्ये ठेवल्या आहेत.इथे सापडलेल्या वास्तुंच्या शैलीवरुन या परिसराचा इतिहास औरंगाबाद्,अजिंठा,वेरुळ यांच्या समकालीन असावा.इथे एक स्तुपही सापडला आहे.स्तुपावर बुध्दाच्या नउ मुर्ती गांधार शैलीत आहेत.इथे ग्रीक प्रभाव स्पष्ट जाणवतो.पश्चिमी क्षत्रपांचा भारतीय कलाकृतीवर पडलेल्या प्रभावाचे हे उदाहरण आहे.
कच्छचे रण
गुजरात राज्यातील कच्छचे रण हा क्षार प्रदेश निसर्गाचा एक असामान्य आणि देखणा आविष्कार आहे. अनेक बाबतीत वेगळा असलेला हा प्रदेश आपले अगदी स्वतंत्र भूशास्त्रीय रूप अजूनही टिकवून आहे आणि म्हणूनच भारतातील एक महत्त्वाचे भूवारसा स्थळ आहे. फार मोठ्या भूशास्त्रीय उलथापालथीतून गेल्यावरच या प्रदेशाला त्याची आजची सगळी वैशिष्ट्ये प्राप्त झाली आहेत.
कच्छच्या विस्तृत भागात कच्छचे मोठे रण (Great Rann of Kachchh) पसरले आहे. त्याच्या आग्नेयेला कच्छचे छोटे रणही (Little Rann) आहे. कच्छचे मोठे रण त्याच्या विस्तारासाठी, भूवैज्ञानिक इतिहासासाठी आणि जीवाश्मांसाठी एकमेव (Unique) म्हणून जगात प्रसिद्ध आहे. सोळा हजार चौरस किमीपेक्षाही जास्त क्षेत्रफळाच्या या प्रदेशात २० कोटी वर्षे जुन्या ज्युरासिक कालखंडातील अवसादी (Sedimentary) खडकांपासून तीन कोटी वर्षे जुन्या इओसीन कालखंडातील स्तरित अवसादी खडक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात अगणित जीवाश्मांचा अक्षरशः खच पडल्याचे आढळून येते. या प्रदेशाची समुद्र सपाटीपासून सरासरी उंची पाच मीटरपेक्षाही कमी आहे. दर वर्षी इथे ३०० ते ४०० मिमी पाऊस पडतो. याच्या उत्तरेला थरच्या वाळवंटातील वाळूच्या टेकड्यांचा परिसर असून दक्षिणेला बानीचा गवताळ प्रदेश आहे. बानीचा प्रदेश मूलतः उत्थापित (Uplifted) चिखल सपाटीचा (Mud flat) असून दहा हजार वर्षांपूर्वी तो पाण्याखाली होता. बानी प्रदेशाचे आजचे स्वरूप गेल्या आठ हजार वर्षांत तयार झाले आहे.
मोठ्या रणातील पच्छम, खदीर, बेला आणि चोरार या बेटांवर २५ ते ०.५ कोटी वर्षांपूर्वीचे समुद्रात तयार झालेले स्तरित, अवसादी खडक असून तेही असंख्य जीवाश्मांनी समृद्ध आहेत. सात ते दोन कोटी वर्षांपूर्वी कच्छच्या रणाला उथळ समुद्राचे रूप प्राप्त झाले होते. एक लाख वीस हजार पासून बारा हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या आंतर हिमानी (Inter glacial) काळात हे रण नळ सरोवरातून गुजरातच्या खंबायतच्या आखाताला जोडले गेले होते.
आजपर्यंत अनेक वेळा कच्छ आणि गुजरातच्या इतर भागांत समुद्र पातळी कमी अधिक प्रमाणात वर खाली होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना ज्या ज्या वेळी घडल्या त्या त्या वेळी अनेक सागरी वनस्पती आणि प्राणी समुद्रातील गाळात अडकून नष्ट झाले. त्यांचे जीवावशेष कच्छमध्ये आज जीवाश्मांच्या (Fossils) स्वरूपात फार मोठ्या संख्येने आढळून येतात. या जीवाश्मांतील विविधता खरोखरच आश्चर्यकारक असून जगात आज जीवाश्मांचा खजिना असलेले ठिकाण म्हणून कच्छ आणि कच्छचे रण ओळखले जाते!
कच्छचे रण हा प्रदेश जसा हंगामी (Seasonal) क्षारयुक्त म्हणून ओळखला जातो, तसा तो वाळवंटी पाणथळ (Desert Werland) म्हणूनही ओळखला जातो. पावसाळ्यात पाण्याखाली बुडालेला प्रदेश कोरड्या ऋतूत पाणी कमी झाल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बाष्पीभवनामुळे क्षारांनी भरून जातो आणि सगळा प्रदेश पांढऱ्या शुभ्र रंगाने आच्छादून जातो. राजस्थानातील लुनी नदीतून या रणाला अधून मधून पाण्याचा पुरवठा होत असतो. आपल्या प्रचंड मोठ्या भूशास्त्रीय प्रवासातील विविध घटनांचे अनेक पुरावे जीवाश्म, खडक आणि भूरूपांच्या स्वरूपात या क्षार प्रदेशाने जपून ठेवले आहेत.
भूशास्त्रीय काळात हा अरबी समुद्राचाच एक भाग होता. त्यानंतर या भागाचे जे उत्थापन (Uplifting) झाले, त्यामुळे तो समुद्रापासून तुटला आणि त्याचे रूपांतर एका मोठ्या पाणथळीत झाले. अनेक वर्षांपूर्वीपर्यंत खोल पाण्यामुळे तिथे नौकानयनही (Navigation) करता येत असे. नंतरच्या काळात मात्र पाणथळीत झालेल्या गाळाच्या प्रचंड संचयनामुळे इथे चिखलाचे विस्तीर्ण सपाट भाग (Mud flat) तयार झाले. आज केवळ पावसाळ्यात हे रण पाण्याने भरून जाते आणि वर्षाच्या उर्वरित काळात क्षारांचे एक विशाल वाळवंट होते!
या प्रदेशाच्या उत्क्रांतीत वारंवार होणाऱ्या भूकंपांचे मोठे योगदान आहे. १८१९ मध्ये इथे झालेल्या विनाशकारी भूकंपात अनेक गावे नष्ट झाली होती आणि ‘अल्लाह बंड’ (Allah bund) या ९० किमी लांब आणि ४ ते ५ मीटर उंच नैसर्गिक बंधाऱ्याची निर्मितीही झाली. या बंधाऱ्यामुळे सिंधू नदीचा मार्ग बदलला आणि कच्छच्या रणाला होणारा गोड्या पाण्याचा पुरवठाही संपुष्टात आला. या भूकंपाच्या साधारणपणे ८०० वर्षे आधीही असाच मोठा भूकंप झाल्याची नोंद आहेच. त्या भूकंपानेही या प्रदेशाच्या भूरूपिकीत (Geomorphology) मोठे बदल घडवून आणले होते.
या पाणथळीच्या प्रदेशात आज लोकसंख्या खूपच कमी असली तरी मानवी वस्त्यांच्या उत्क्रांतीच्या इतिहासात याला खूप मोठे महत्व आहे. ६० हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियाकडे जे प्राचीन मानवाचे स्थलांतर (Migration) झाले, त्या स्थलांतराच्या दुसऱ्या टप्प्यात ते मुख्यतः कच्छच्या रणाकडेच झाले, असे मानववंशशास्त्रज्ञ स्पेन्सर वेल्स यांचे मत आहे. ख्रिस्तपूर्व २६५० ते १४५० वर्षांपूर्वी हा प्रदेश सिंधू संस्कृतीचा किंवा हराप्पा संस्कृतीचा भाग होता. मोठ्या कच्छच्या रणात खदिर बेटावर ढोलावीरा नावाचे पुराजीवशास्त्रीय (Archaeological) वसतिस्थान उत्खननात मिळाले आहे. धोलावीराच्या जवळच ११ किमी अंतरावर १७ ते १८ कोटी वर्षे जुन्या झाडांचे अवशेष सापडले असून ते किनाऱ्यावरच्या दगडांत जीवाश्म स्वरूपात दिसतात. इथली नऊ मीटर लांब आणि अर्धा ते एक मीटर व्यासाची झाडे वालुकाष्मांत व चुनखडकांत अश्मिभूत (Petrify) झालेली आहेत! या भागाला त्यामुळेच जीवाश्म उद्यानाचा (Fossil Park)चा दर्जा देण्यात आला आहे.
जागतिक स्तरावर पाणथळ प्रदेशाचे संधारण आणि तिथल्या नैसर्गिक संपदेचा योग्य वापर होण्याच्या दृष्टीने, इराणमधल्या रामसर शहरात १९७१ मध्ये रामसर आंतरराष्ट्रीय कराराला (Treaty) मान्यता देण्यात आली होती. या करारानुसार कच्छच्या रणाला २००२ मध्ये रामसर पाणथळीचा (Ramsar Wetland) दर्जा देण्यात आलाय.
आज या क्षारयुक्त पाणथळ प्रदेशात अठरा जमातींचे वास्तव्य आढळते. मात्र इथली पारिस्थितिकी आज मोठ्या वाहनांची वर्दळ, वृक्षतोड, क्षार उत्पाटन (Extraction) यासारख्या घटनांनी बाधित होऊ लागली आहे. या विस्तीर्ण पाणथळीतच अनेक छोट्या पाणथळीही दिसून येतात. वाळवंटी पाणथळ, क्षार पाणथळ, लगून पाणथळ, दलदल पाणथळ यांनी आणि त्यातील जैवविविधतेने कच्छचे रण अगदी समृद्ध झाले आहे. स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांना, फ्लेमिंगोंना आणि अनेक प्राण्यांच्या जमातींना या प्रदेशाने मोठाच आधार दिला आहे.
आज भारतातल्या या अशा संवेदनशील भूवारसा ठिकाणच्या जीववैविध्याला कुठलेही संरक्षण नाही आणि म्हणावी तशी ओळखही दिली गेलेली नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. असे प्रदेश हे जलीय जैवविविधतेचे (Aquatic biodiversity) प्रचंड मोठे साठे असतात. परिसरीय, पर्यावरणीय आणि आर्थिक असे त्यांचे महत्त्वही खूप मोठे आहे. हे भूवारसा स्थान आज शहरीकरण, प्रदूषण आणि बदलले भूमी उपयोजन (Land use) यांचा खूप मोठा ताण तणाव सहन करीत आहे. परिणामी या स्थळाचा भौगोलिक विस्तार अक्रसतो आहे आणि त्याची आर्थिक, पर्यावरणीय आणि जलशास्त्रीय क्षमताही कमी होते आहे. या क्षारयुक्त जागेत जलजीवांची पैदास होत असते, ती माणसाच्या त्या भागात चालणाऱ्या विविध उद्योगांमुळे कमी होऊ लागली आहे. कच्छमधल्या या भूवारसा पर्यटन स्थळाचा अभ्यास असे दाखवतो की आपल्याकडे ह्या क्षेत्राच्या संधारणाची व विकासाची कुठलीही ठोस आणि सुनिश्चित यंत्रणा आजही नाही. त्यामुळे २० कोटी वर्षांचा भूशास्त्रीय इतिहास आणि भूवारसा असलेल्या या स्थळाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आणखीनच वाढली आहे हे नक्की.
कच्छचे रण
- स्थान संदर्भ : २३.९० उत्तर अक्षांश/६९.७४० पूर्व रेखांश
- समुद्रसपाटीपासून उंची : पाच मीटरपेक्षा कमी
- भूशास्त्रीय वय : २० कोटी वर्षे
- जवळची मोठी ठिकाणे : भूज (९० किमी), खबडा (१५ किमी), लोद्राणी (९ किमी).
सोळाव्या शतकापर्यंत सिंध-गुजरातचे राज्यकर्ते कच्छवरही अंमल चालवीत. नवव्या शतकात सिंधमधील सम्मा राजपुतांचा कच्छशी संबंध आला. त्यांच्याच एका शाखेतील जाडेजा राजपुतांपैकी खेंगारने सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस स्वायत्त संस्थान स्थापिले. राजधानी भूज येथे होती. जहांगीरने हाज यात्रेकरूंच्या कच्छी जहाजातील मुक्त प्रवासाच्या बदल्यात खंडणी माफ केली टाकसाळीचा परवाना दिला. प्रागमल (१६९८), लाखो (१७४१) या राजपुत्रांनी गादी बळकावण्यासाठी कारस्थाने केली. लाखोने मोगलांकडून माहीमरातिबचा मानही मिळविला (१७५७). १७३० मध्ये गुजरातच्या सरबुलंदखानाने आणि १७६२ मध्ये सिंधच्या गुलामशाह काल्होराने केलेल्या स्वाऱ्यांचा यशस्वी प्रतिकार झाला. अठराव्या शतकात कलावंत रामसिंग मालम याने कलावैभव कळसाला नेले,राजकारणावर दिवाण देवकरण, त्याचा मुलगा पुंजासेठ यांचा प्रभाव राहिला. महाराव गोदजी (१७६१ — ७८) याने फौज वाढवली. व्यापाराला उत्तेजन दिले,मांडवीला ४०० जहाजांचा ताफा राहू लागला. दुसऱ्या रायधनच्या (१७७८ — १८१३) काळात बजबजपुरी माजून सत्ता समादार फतह मुहम्मदच्या हाती गेली. चाचेगिरीला पायबंद घालण्यासाठी इंग्रजांनी हस्तक्षेप करून (१८०९) कच्छला मांडलिक संस्थान बनवले (१८१६, १८१९). तहान्वये भयताना (महारावचे भाऊबंद) दिलेले महत्त्व एकोणिसाव्या शतकात भोवले. त्यांचे उत्पन्न व अधिकार महारावपेक्षाही अधिक असत. मिठाच्या निर्यातीवर बंदी, मोरवीशी अढोईसाठी शतकभर चाललेला झगडा, काठेवाडातील संस्थानांचे वाढते नाविकी महत्त्व ही कच्छच्या प्रगतीला मारक ठरली. तरी भ्रुणहत्या, गुलामगिरी (विशेषत: झांझिबारशी संबंधित), सती पध्दती यांना आळा बसला आणि शिक्षण, वाहतूक, पाणीपुरवठा इ. सुधारणा झाल्या. तिसऱ्या खेंगारने (१८७८ —१९४२) रापड,भाचौ, मुंद्र, भूज, मांडवी, अब्दासा, लखपत, अंजार, नख्तराना असे शासकीय विभाग पाडले, चराऊ कुरणे राखीव केली व कांडला बंदराचा पाया घातला. सतरावे महाराव मदनसिंहजी यांनी विलीनीकरणाला मान्यता दिली (१ जून १९४८). १९५६ पर्यंत कच्छ मुख्यायुक्ताचा प्रांत व १९६० पर्यंत द्विभाषिक मुंबई राज्याचा एक भाग होता. त्यानंतर कच्छ गुजरात राज्यात समाविष्ट झाले. १९६५ मध्ये सिंध-कच्छचा सीमाप्रश्न चिघळला आणि पाकिस्तानने कच्छवर हल्ला केला. आंतरराष्ट्रीय लवादमंडळाने रणाचा सु. ८३७ चौ. किमी. भाग पाकिस्तानला दिला. सीमांकन १९६९ मध्ये पूर्ण झाले. १९७१ च्या भारत-पाक संघर्षात भारताने यातील बहुतेक मुलूख परत मिळविला. परंतु सिमला कराराने तो परत पाकिस्तानला मिळाला.
संदर्भ : Williams, L. F. Rushbrook, The Black Hills, London, 1958.
डॉ. श्रीकांत कार्लेकरकच्छचे रण आणि वन्यजीवन :-
संध्याकाळच्या वेळी इकडचे वन्यप्राणीही हालचाल करायला सुरुवात करतात. अंधार पडायला लागताच कोल्हेकुई सुरू होते. इथे खोकडाचेही दोन प्रकार पाहायला मिळतात. त्यातले एक खोकड हे फक्त वाळवंटात किंवा शुष्क गवताळ प्रदेशात सापडतं. बन्नीतले लोक या खोकडाच्या हुशारीच्या अनेक गोष्टी सांगतात. उदाहरणार्थ, खोकडाला पकडणं खूप कठीण असतं. त्याच्या मागे कोणी लागले तर खोकड आपली झुपकेदार शेपूट एका दिशेला वळवतं आणि पळून जातं दुसऱ्याच दिशेला! अगदीच पकडलं गेलं, तर खोकड पटकन त्याच्या घरात घुसतं आणि त्या घराची भुयारं एवढी लांब पसरलेली असतात की खोकड काही हातात येत नाही. या गोष्टी बऱ्यापकी प्रमाणात खऱ्या आहेत. शुष्क, झाडं नसलेल्या जंगलात बहुतेक प्राणी जमिनीखाली घरं करून राहतात. त्यात खोकडाच्या घराला सर्वात जास्त भुयारं असतात आणि ती पाच-दहा ठिकाणी वेगवेगळ्या दिशांना उघडतात!
कच्छमध्ये काही अतिशय दुर्मीळ असे पक्षी आणि सरपटणारे प्राणीही आढळतात. रण असले तरीही एकदा का पाऊस पडला की काही भागांत साठलेलं पाणी उन्हाळा येईपर्यंत वाहून जात नाही. अशा पाण्याच्या साठय़ांमध्ये हिवाळ्यात अनेक पक्षी जगातील इतर भागांमधून स्थलांतर करून इथे येतात. लांब माना असलेले, अंगावर छान गुलाबी रंगाच्या छटा असणारे अग्निपंख किंवा रोहित पक्षी तर इथे अंडी घालण्यासाठी येतात. याशिवाय फक्त गवताळ प्रदेशात किंवा वाळवंटात सापडणारे काही प्राणी, उदाहरणार्थ टिटवीचा एक अतिशय दुर्मीळ असा प्रकार आणि सरडय़ाच्या काही जाती इथे आढळतात. इथे एक शाकाहारी सरडा राहतो. अंगावर अनेक काटय़ासारखे खवले असणारा सरडा दिसायला दंतकथांमधील ड्रॅगनचीच एक इवलुशी नक्कल असावी की काय असा असतो. पण हा सरडा जवळपास पूर्णपणे गवताच्या आहारावर जगतो. एक पक्षी, ग्रे हायपोकॉलीयस, हा संपूर्ण भारतात फक्त कच्छमध्येच सापडतो. आशिया आणि आफ्रिका खंडात इतर ठिकाणी हा सापडत असला तरी त्या जातीचा पक्षी सगळ्या दुनियेत फक्त एकच आहे, त्यामुळे अनेक पक्षी निरीक्षकांची त्याला एकदा तरी बघण्याची इच्छा असते. हे सर्व प्राणीपक्षी आणि वनस्पतींचे प्रकार घनदाट जंगलात राहू शकत नाहीत, त्यांना असं खुलं रणच लागतं.
रण म्हणजे तरी काय? कच्छचा भाग हा पाकिस्तान आणि भारतामधील जमिनीचा अत्यंत समतल असा, समुद्राजवळचा प्रदेश आहे. उन्हाळ्यात अतिशय गरम, ५० डिग्री सेल्सिअसच्या पुढे जाणारं तापमान, तर उन्हाळ्यात चार डिग्रीच्या खाली जाणारा गारठा! इथल्या जमिनीत वनस्पती वाढत असल्या तरी काही भाग असा आहे जिथे मातीत मिठाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जवळपास काहीच उगवत नाही. पाऊस पडला की नद्यांचं, पावसाचं आणि समुद्राचं पाणी मिसळून हा भाग काही महिने पाण्याखाली जातो. एकदा ते पाणी सुकलं की मागे राहते ते भेगा पडलेली, मिठाने भरलेली जमीन. अशा जमिनीला ‘रण’ म्हटलं जातं. रणांत काही बेटंही असतात. हे छोटे टेकडीसारखे भाग पाण्याखाली जात नाहीत आणि त्यामुळे या बेटांवर वनस्पती, प्राणी आणि पक्षी जास्त प्रमाणात सापडतात. भारत-पाकिस्तान सीमारेषा बनण्यापूर्वी कच्छमधील लोक या बेटांवर गुरं चारायलाही घेऊन जायचे. एवढंच नव्हे, तर हे रण पार करूनच लोक भारत-पाकिस्तान असा प्रवास करत असत. त्यात अनेक वेळा कठीण प्रसंगही येत. पाणी नीट सुकलेलं नसेल तर त्या चिखलात अडकून पडण्याच्या घटना आधी बऱ्याच झाल्या आहेत. मिठाच्या थरामुळे जमीन दिसायला कडक दिसते पण पाऊल टाकताच मिठाचा पातळ थर अगदी बर्फाच्या थरासारखा फुटतो आणि पाय किंवा गाडीची चाकं अगदी खोलवर रुतून बसतात. अजून एक म्हणजे रणात जागांची ओळख पटायला काहीच दिसत नसल्यामुळे माणसाची दिशाभूल होते. त्यात पाण्याच्या कमतरतेमुळे आधीच डोकं गरगरत असेल तर वेगवेगळे भास होतात. जिन आणि भुतांच्या गोष्टी ऐकाव्यात तर त्या रणामध्येच.
गेल्या फक्त वीस वर्षांत या भागात अनेक बदल झाले आहेत. शुष्क गवताळ प्रदेश अजूनही सरकारला पडीक वाटत असल्यामुळे इथे मोठय़ा प्रमाणात झाडं लावण्यात आली. भराभर वाढवीत म्हणून दक्षिण अमेरिकेत वाढणारी, प्रोसोपीस जुलीफ्लोरा नावाची एका काटेरी झाडाची जात निवडण्यात आली, अगदी विमानाने बी पसरवण्यात आले. हे झाड एवढं भराभर पसरलं की काही वर्षांतच गवताची ५० टक्क्य़ांहून जास्त कुरणं संपुष्टात आली. दिसायला प्रदेश आता जास्त हिरवागार दिसत असला तरी वन्यप्राणी, माणूस आणि त्यांची गुरं यांना मात्र त्याची अडचण हाऊ लागली. कांकरेज गाई तर या झाडाचा पाला खाऊन आजारी पडू लागल्या. आधीच संपुष्टात येऊ लागलेल्या कुरणांना वनखात्याने कुंपण घातलं. गवत पुरेसं नसल्यामुळे आणि दुधाची मागणी वाढल्यामुळे नसíगक चारा कमी पडू लागला. मग बाजारातून चारा विकत घेण्याची सुरुवात झाली. सामाईक जमिनी जाऊन जमिनीचे खासगी तुकडे पडू लागले. कुंपणं वाढली. आजूबाजूच्या सर्व नद्यांवर धरणं बांधण्यात आली. एकही ओहोळ मुक्त राहिला नाही. त्यामुळे, रणात येणाऱ्या गोडय़ा पाण्यावर मर्यादा आली. जमिनीतील आणि पाण्यातील मिठाचं प्रमाण वाढलं. वन्यप्राणीच नव्हे तर तिथे राहणाऱ्या लोकांवरही याचा परिणाम होऊ लागला. पाण्यासाठी टँकर आणि नळावर अवलंबून राहायला लागले. खाऱ्या जमिनीत मिळणाऱ्या रासायनिक पदार्थाच्या अवाढव्य खाणी उभ्या राहिल्या. याशिवाय इतर अनेक बदल झाले, विशेषत तिकडच्या व्यवस्थापनात आणि पर्यावरणात. या सगळ्याचा परिणाम असा झाला की माणूस आणि निसर्ग यांच्यातलं नातं तुटलं. जमिनीचा टिकाऊपणा कमी झाला आणि लोक जास्त जोखमीचं असं, पशावर अवलंबून असणारं आयुष्य जगू लागले.
भारतातील अनेक शुष्क भागातील जंगलांची परिस्थिती अशीच आहे. गवताळ
प्रदेश, माळरानं वेगाने संपुष्टात येऊ लागली आहेत. आणि त्याबरोबर तिकडचा
निसर्ग आणि माणूसही. तरीही आपण या अनुभवातून फारसे शिकलेलो नाही.
परिस्थितीत बदल करण्यासाठी फारसे प्रयत्न केले जात नाहीत. तुम्ही आफ्रिकेची
दृश्य पाहिली आहेत का? तिकडचे ‘सव्हाना’ प्रकारचे गवताळ भाग जिथं जिराफ,
सिंह इत्यादी प्राणी राहतात हे भारतातील भागांपेक्षा फार वेगळे नाहीत.
इथेही गुरं पाळणाऱ्या अनेक जमाती आहेत आणि तिथेही अशा प्रकारचे बदल झाले
आहेत. त्यामुळे त्यांनी तिकडचं व्यवस्थापन बदलायला सुरुवात केली आहे. पण
भारतात अजूनही या जमिनीकडे लक्षं दिलं जात नाही ही दुर्दैवाची बाब आहे. हे
मान्य की हे बदल प्रचंड वेगाने होत आहेत. त्यांचा काय परिणाम होतोय हे
लक्षात यायच्या आधीच अजून एक मोठा बदल झालेला असतो. पण म्हणून त्याच चुका
पुन्हा करत राहणं (की कशाला उगीच काळजी करायची या गोष्टींची असं वाटत असतं
आपल्याला?) आणि त्या जमिनीवर अवलंबून असणाऱ्या लोकांनाच गुन्हेगार ठरवणं,
यापलीकडे का जात नाही आपण? याउलट असाही एक प्रयत्न होतो की जुनं होतं तेच
उत्तम, त्यामुळे लोकांनी (फक्त तिथे स्थानिक असणाऱ्या) आधीच्या पद्धतीने,
परंपरेने चालत असलेल्या नियमानुसारच राहावं. पण सध्याच्या परिस्थितीत
आजूबाजूचा निसर्ग आणि आपली अर्थव्यवस्थाच बदलली असताना हे तरी कितपत शक्य
आहे? निसर्ग आणि माणसाचं नातं जपण्याची जबाबदारी सरकारची, उद्योगपतींची आणि
आपल्यासारख्या सामान्य माणसांचीही नाही काय?
ओवी थोरात
शेकडो मैल खारट दलदलीचा वैराण प्रदेश, नजर जावी तिथे पसरलेली सपाट मुर्दाड जमीन, मधूनच एखाद्या ठिकाणी उगवलेली बाभळीसारखी काटेरी झाडं, थंडीच्या दिवसात मी म्हणायला लावणारी थंडी आणि उन्हाळ्यात काहिली करणारा गरमा, मूड बदलावा तस बदलणारं हवामान, मध्येच उठणारी धुळीची वादळं आणि तरीही पक्ष्यांसाठी असणारा स्वर्ग अशी अनेक वैशिष्ट्य सामावलेला भारतातील भूभाग म्हणजे कच्छचे रण. नभ धरणीचे मीलन व्हावे अशा क्षितीजाचे जिथे तिथे दर्शन घडणाऱ्या ओसाड रणात पर्यटन ही कल्पनाच अनेकांना हास्यास्पद वाटते. पण अनेक पक्ष्यांचं नंदनवन आणि रान गाढव अर्थातच घुडखर चे एकमेव आश्रयस्थान असणाऱ्या या रणाने गुजरातच्या पर्यटनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गुजरात राज्यात स्थित या रणाचे कच्छचे छोटे रण आणि मोठे रण असे दोन भाग पडतात.
यापैकी छोट्या रणात भारतातील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य आहे. १९७२ साली निर्मिती झालेल्या हे वन्यजीव अभयारण्य सुमारे ५००० चौ. किमी. क्षेत्रफळात पसरले आहे. घुडखर च्या संरक्षणासाठी या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. या अभयारण्यात अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी, उभयचर आणि अनेक प्रजातींचे पक्षी आढळतात. घुडखरचे एकमेव आश्रयस्थान असणारे हे अभयारण्य अनेक स्थलांतरीत पक्ष्यांसाठी जणू स्वर्गच.
इथे आढळणाऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये घुडखर शिवाय चिंकारा, नीलगाय, रानडुक्कर, तरस, खोकड, वाळवंटातील खोकड, कोल्हा, इ. प्राणी आढळतात. घुडखर हा इथे आढळणारा चित्तवेधक प्राणी. ‘गुजरातचे जंगली गाढव’ किंवा ‘बलुची जंगली गाढव’ म्हणूनही घुडखरला ओळखले जाते. हा प्राणी अंगापिंडाने अत्यंत मजबूत अतिशय वेगाने धावणारा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांची कमी होत असलेली संख्या पाहून गुजरात सरकारने त्यांना विशेष संरक्षण दिले. १९७२ सालच्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार शेड्युल १ मध्ये या प्राण्याचा समावेश करण्यात आला. २०१६ च्या आकडेवारीनुसार त्यांची संख्या अतिशय कमी असून हा प्राणी लुप्त होणाच्या मार्गावर आहे. त्यामुळे इथल्या वनविभागातर्फे या प्राण्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्राण्याला पळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोकळी जमीन लागते. त्यांचा वेगही तशी ७० ते ८० किमी इतका जास्त असतो. ही जमीन कमी होणे हा त्यांच्यासमोर असलेला सर्वात मोठा धोका आहे. इथल्या भागात मिठागरांची संख्या वाढत चालली आहे. लोकांकडून अभयारण्याच्या क्षेत्रात होत असलेले अतिक्रमण या प्राण्याच्या संख्येला मारक ठरत आहे. त्यामुळे ही मिठागरं अभयारण्याच्या बाहेर कशी जातील या दृष्टीने वनविभागाने प्रयत्न सुरु केले आहेत.
पक्षी निरीक्षकांसाठी छोटे रण हे नंदनवनच आहे. शेकडो प्रजातींचे दुर्मिळ पक्षी एका भागात पाहायला मिळणं ही पक्षीप्रेमींसाठी मेजवानीच आहे. इथलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे ‘मॅक्विन्स बस्टर्ड’ नावाचा पक्षी. माळढोक पक्ष्याच्या जातीचा हा पक्षी. हा पक्षी हिवाळ्याच्या मोसमात भारतात स्थलांतर करतो. मुख्यत्वे पाकिस्तानात याची वीण होते आणि मग हा पक्षी त्यानंतर रणात दाखल होतो. नेहमीच्या माळढोक पक्ष्यापेक्षा छोटा असणारा हा पक्षी निसर्गप्रेमींना छोट्या रणाकडे अक्षरशः खेचून आणतो. भारतातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पात जसे वाघ बघायला निसर्गप्रेमी जातात त्याचं ओढीने ते छोट्या रणात ‘मॅक्विन्स बस्टर्ड’ हा पक्षी पाहायला जातात. याशिवाय अनेक पक्षी या भागाला हिवाळ्यात भेट देतात. इथे त्यांची वीणही होते. या भागात अनेक पक्ष्यांची असंख्य घरटी आहेत. इथे नया तालाब नावाचा तलाव आहे. या तलावावर विविध प्रजातींच्या पक्ष्यांची अगदी रेलचेल असते.
Lesser Whistling Duck, Bar Headed Goose, Common Shelduck, Ruddy Shelduck, Red-Crested Pochard, Common Pochard, Garganey, Gadwall, Eurasian Wigeon, Great Crested Grebe, Lesser Flamingo, Greater Flamingo, Eurasian Thick-knee, Greater Thick-knee, Great White Pelican, Sarus Crane, Demoiselle Crane, Common Crane सारखे असंख्य पक्षी तुम्हाला इथे दिसू शकतील. Lesser Flamingo आणि Greater Flamingo यांची लक्षणीय संख्या हे इथलं आणखी एक वैशिष्ट्य. यातल्या काही जोड्या इथे रणातच वास्तव्याला आहेत. तर काही आफ्रिकेतून येतात. या पक्ष्यांची वीण मात्र इथेच होते. याशिवाय शिकारी पक्ष्यांची संख्या हेही रणाचे मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
Black-wing Kite, Short-toed Eagle, Griffon Vulture, Cinereous Vulture, Indian Spotted Eagle, Greater Spotted Eagle, Imperial Eagle, Steppe Eagle, Tawny Eagle, Golden Eagle, Bonelli’s Eagle, Booted Eagle, Western Marsh Harrier, Hen Harrier, Pallid Harrier, Montagu’s harrier, Osprey, Shikra, Eurasian Sparrow hawk, Black Kite, White-eye Buzzard, Eurasian Buzzard, Long-legged Buzzard, Common Kestrel, Red-necked Falcon, Laggar Falcon, Saker Falcon, Merlin, Eurasian Hobby, Peregrine Falcon असे अनेक शिकारी पक्षी इथल्या परिसंस्थेत समतोल राखून ठेवतात. बजाना खाडी नावाचे रणातील एक ठिकाण आहे. या ठिकाणी हे शिकारी पक्षी लक्षणीय संख्येने आहेत. या भागात असलेल्या मोकळ्या मैदानावर हे शिकारी पक्षी मोठ्या संख्येने बसलेले आढळतात. यातले काही शिकारी पक्षी खासकरून काही गरुड जातीचे पक्षी हे स्थलांतरित आणि अतिशय दुर्मिळ आहेत.
याशिवाय रात्रीचे पहारेकरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या घुबडांची आणि रातव्यांची संख्याही इथे मोठ्या प्रमाणावर आहे. Grey Nightjar, European Nightjar, Syke’s Nightjar, Indian Nightjar, Savana Nightjar या रातव्यांच्या प्रजाती तर Barn Owl, Spotted Owlet, Eurasian Eagle Owl, Rock Eagle Owl तसेच Short-eared Owl, Pallied Scops Owl सारख्या दुर्मिळ घुबडांच्या प्रजातीही आढळतात. याशिवाय Pied Avocet, Northern Wryneck, Black-rumped Woodpecker, Yellow-crowned Woodpecker, Coppersmith Barbet, Green Bee-eater, Blue-tailed Bee-eater, Blue-cheeked Bee-eater, Common Kingfisher, Pied Kingfisher, Black-capped Kingfisher, Common Woodshrike, Black Drongo सारखे अनेक प्रजातींचे पक्षी रणाचं सौदर्य वाढवतात.
गेली अनेक वर्ष मी रणात पक्षीनिरीक्षणासाठी जात आहे. मला नेहमीच भुरळ घालणाऱ्या जागांपैकी ही एक जागा. अहमदाबाद पासून सुमारे १०४ किमी अंतरावर असणाऱ्या झैनाबाद या गावात धनराज मलिक नावाच्या माणसाचे ‘डेझर्ट कोर्सर’ नावाचे हॉटेल आहे. इथे पर्यटन चालू करणाऱ्यात धनराज च्या वडिलांचा म्हणजेच शब्बीर यांचा सिंहाचा वाटा आहे. अत्यंत उबदार झोपड्यांच्या स्वरूपातील इथल्या खोल्या आहेत. या हॉटेलच्या भागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते आणि संपूर्ण हॉटेल पाण्याखाली जाते. त्यामुळे दरवर्षी खोल्यांची डागडुजी करावी लागते. कधी कधी तर काही खोल्या पूर्णपणे बांधाव्या लागतात. खोल्यांच्या भिंती माती आणि शेण यांनी तयार केल्या जातात. या भागातली बहुतेकशी घरं अशीच शेण आणि माती यांनी बनवली जातात. या घरांना ‘बुंगा’ म्हणतात. आमीर खानच्या लगान चित्रपटाचं चित्रीकरण रणाच्या भागातलं आहे. या चित्रपटात दाखवलेली घरं याच पद्धतीने बनवली होती. बाकी दुर्लक्षित राहिलेल्या रणाचं सौंदर्य चंदेरी दुनियेने मात्र अचूक टिपलं. रेफ्युजी, लगान, मगधीरा अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांचं चित्रीकरण रणात केलेलं आहे.
कासवासारख्या आकारामुळे नावं मिळालेल्या या कच्छच्या रणाचं सौंदर्य अफलातून आहे. अनेक प्रजातीचे पक्षी; सपाट मोकळी जमीन; घुडखर सारखा प्राणी; आपलं अस्तित्व दाखवून देणारे तरस, कोल्हा, खोकड यांसारखे इतर सस्तन प्राणी; hoopoe-lark सारखा दुर्मिळ पक्षी; मॅक्विन्स बस्टर्ड सारखा स्थलांतरीत माळढोक; लक्षणीय संख्येने असलेले शिकारी पक्षी आणि धनराज सारख्या पक्षीवेड्या माणसाचं आदरातिथ्य या सर्वांनी रणाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. या सगळ्याची सुरक्षा आपल्यावर अवलंबून आहे. या सर्वावर मोठ्या प्रमाणावर अभ्यास होणे गरजेचे आहे. नाहीतर केवळ ओसाड जमीन शिल्लक राहील. पौर्णिमेच्या रात्रीत तर रणाचं सौंदर्य अधिकच खुलतं. चंद्रप्रकाशात चमकणारी पांढरी शुभ्र जमीन पहिली की असं वाटतं की चंद्रच जमिनीवर उतरला आहे. आयुष्यात एकदा तरी कच्छला भेट द्यायलाच हवी. अमिताभ बच्चन यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, “आपने कच्छ नही देखा तो कुछ नही देखा! कुछ दिन तो गुजारो गुजरात में !!
कच्छच्या रणात नौकानयन / Navigation in the Rann of Kachchh
पर्यटनानिमित्त या प्रदेशाला भेट देणारे बरेच असले तरी तेथे मुक्काम ठोकून रोजीरोटीची सोय करण्यासारखे या भागात विशेष काही नाहीये असं तेथील लोकसंख्येवरून वाटावं. तरी, २०११ च्या जनगणनेत या भागाची लोकसंख्या २० लाखांवर पोहोचली आहे. सोयी होत आहेत, मीठाची निर्मिती, रासायनिक उद्योग, सिमेंट, जहाज बांधणी, विद्युत निर्मिती, कांडला आणि मुंद्र्यासारखी दोन मोठी बंदरं असे उद्योग वाढताहेत तशी लोकसंख्येत भर पडतेय. पण सिंधू संस्कृतीच्या वेळी इथं काय असावं? हडप्पन वसाहत येथे बहरली होती असं त्या भागात झालेल्या उत्खननावरून समजतं. त्यावेळच्या एकूण ६१ वसाहतींचा शोध या भागात लागला आहे. यातील बर्याच वसाहती सुरुवातीच्या काळातल्या तर काही नंतरच्या काळातल्या आहेत. हडप्पन लोक प्रथम पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतात वसले. नंतर ते कच्छ आणि सौराष्ट्रात पसरले. त्या काळी शेती हा मुख्य व्यवसाय समजला जात असे. सिंध प्रांतातले हडप्पन लोकही शेतीच करून उदरनिर्वाह करीत असे दृष्टोत्पत्तीस आलं आहे. पण मग त्यांना इथे दलदलीच्या, नापीक जमिनीवर वस्ती का कराविशी वाटली? इथे त्यांचा उदरनिर्वाह कसा होत होता? नुकत्याच प्रकाशित झालेल्या लेखात (करंट सायन्स, खंड १०५(११); २०१३; १४८५) यावर बर्याच वर्षांपासून वेगवेगळी मतं-मतांतरं नोंदली जात असल्याचं नमूद केलं आहे. हे लोक समुद्र मार्गे सौराष्ट्रातून इथं येऊन पोहोचले तर काहींच्या मते ते खुष्कीच्या मार्गानेच (म्हणजे जमिनीवरून) इथं आले अशा नोंदी असल्याचं दिसतं. अर्थात खुष्कीच्या मार्गाने ते इथं पोहोचल्याचं सांगणार्यात तेथील परिसर त्यावेळी आजच्या सारखाच होता अशा अनुमानावर असावा. परंतु यानंतर इथल्या पुराणकाळातल्या पराग कणांवरच्या संशोधनाच्या आधारानं या ठिकाणी त्यावेळी आतापेक्षा वेगळंच म्हणजे खार्या पाण्याचं पर्यावरण अस्तित्वात असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे सिंधू खोर्यातले लोक कच्छ येथे जलमार्गानेच येऊन पोहोचले असण्याची शक्यता असल्याचं मत पुढे रुजलं. कच्छमध्ये त्या काळी अतिशय पुढारलेली संस्कृती बहरली होती असं पुरातत्वशास्त्रीय संशोधन नमूद करतं. जरी हडप्पा येथील संस्कृती शेती उद्योगावर अवलंबून होती असं दिसत असलं तरी कच्छमधील हडप्पन मात्र उत्तम शेत जमिनी अभावी शेतीवर अवलंबून नसणार. एका दस्तऐवजानुसार यांना हुल्लर येथून, गुजरातच्या इतर भागातून, मलबार आणि सिंधमधूनही धान्यपुरवठा होत होता. या आधारानुसार हे लोक मग इथं शेती करण्यासाठी येऊन वसले नसून नौकानयनात प्राविण्य मिळवलेले आणि व्यापारी वृत्तीचे असावेत असं अनुमान काढलं गेलं. व्यापारउदीम हाच त्यांचा व्यवसाय असावा असा अंदाज बांधला गेला. गुजरात आणि विशेषतः कच्छ हा भाग चुनखडी, अगेट, शिसं या दगड आणि धातूंच्या खाणींसाठी तेव्हापासूनच प्रसिध्द होता. सिंधमधील हडप्पाच्या वसाहतींमधल्या आणि इतरत्र सापडलेल्या चुनखडीच्या कमानी येथूनच पाठवल्या गेल्या असाव्यात असा निष्कर्ष निघतो. या कमानीचं वजन प्रत्येकी शंभर किलोच्या आसपास भरतं. अशा वजनदार वस्तू इथून जलमार्गेच वाहून नेणं त्यांना सोयीचं होत असणार असा निष्कर्ष निघतो आणि त्यांचा उदरनिर्वाह असल्या व्यापारावर होत असणार असं अनुमान काढता येतं.
![]() |
आकृती १: (a) कच्छच्या रणाची सद्यस्थिती (b) ५००० वर्षांपूर्वीच्या स्थितीची स्थलाकृती |
![]() |
आकृती २: कच्छच्या किनार्यावरील हडप्पन वसाहतीं |
कच्छचा भूभाग भूकंपांसाठी प्रसिध्द आहे. मोठे प्राकृतीक बदल इथं घडवून आणणार्या अशा कित्येक भूकंपांची नोंद झालेली आहे. पुरातत्वशास्त्रानुसार हडप्पन काळात किमान तीन मोठे प्रलयकारी भूकंप तरी इथं झाले आहेत. इ.स.पू. २१०० वर्षांपूर्वी झालेला शेवटचा भूकंप पूर्वीच्या हडप्पन वसाहतींच्या विनाशास कारणीभूत ठरला. त्यानंतर काही दशकांनंतर हडप्पनांनी इथं पुन्हा नव्यानं वसाहती केल्या. पण या पूर्वीच्या वसाहतींच्या तुलनेत मोजक्याच होत्या आणि त्यातल्या काहीच जुन्या वसाहतींच्या जागी होत्या असं दिसतं. कारण त्यांच्यातील बर्याच जणांनी सौराष्ट्रात - त्यातल्या त्यात भूकंपांपासून कमी नुकसान करणारी जवळची जागा म्हणून - स्थलांतर केलं असावं असं तिथल्या नव्या वसाहतींवरुन अनुमान काढता येतं.
समुद्र पातळीत होणारे बदल हे दुसरे कारण. १३००० वर्षांपूर्वी जगभर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत होती आणि ही वाढ इ.स.पू. ६००० वर्षांपूर्वी स्थिरावल्याचं दिसतं. कच्छच्या रणातले पुरातत्वशास्त्रीय अभ्यास इथे बंदरांचं अस्तित्व असल्याचं सिध्द करतात. आता त्याठिकाणी केवळ ओसाड जमीन उरली आहे. त्यावेळच्या रणाच्या मध्यभागी असलेल्या बेटांच्या उत्तरेकडच्या किनार्यांची धूप झाल्याचे पुरावे आजही मिरवत आहेत. यानंतर मात्र येथील जमिनीची उंची वाढत जाऊन या भागातलं पाणी मागे हटलं.
बदल ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ती सतत घडत असते. काळाच्या उदरात यामुळे अनेक संस्कृती लयाला गेल्या, वसाहती नष्ट झाल्या तसंच निसर्ग नव्या रुपात नवचैतन्य घेऊन आला. कच्छचे रण याचं एक उत्तम, बोलकं उदाहरण ठरतं. बदलाचे स्वागत करण्यापलिकडे आपल्या हातात असतं तरी काय?
गारठा वाढल्यावर परदेशी पक्षांनी तलाव नदी नाले समुद्रावर गर्दी करावी तसंच नोव्हेंबर ते फेब्रुवारी या विस्तीर्ण खारट वाळवंटाला अनुभवण्यासाठी देश-विदेशातून लोकांची रीघ लागते. गुजरात टुरिझमकडून इथे रण उत्सव रंगतो आणि कच्छी हस्तकला, हस्तशिल्पाला जागतिक व्यासपीठ खुलं होतं.
पण सुरूवातीलाच तुम्हाला थोडं निराश करतो, इथे यायचं असेल तर खिसा थोडासा गरम ठेवा. कारण भूजपासून 80 किमीपर्यंत धोरडो गावाजवळच्या रण उत्सवला येण्यासाठी गुजरात सरकारची एकही बस उपलब्ध नाही. त्यामुळे प्रायव्हेट गाडीवाले तुमच्याकडे अगदी 2 हजाराची मागणी करू शकतात. बार्गेनिंग करत करत तुम्ही त्यांना फार तर हजार बाराशेपर्यंत आणू शकता. पण फक्त तिथे जाण्यासाठी 1200 रुपये देणं सर्वसामान्य माणसाला शक्य नाही. शिवाय ओला उबेर किंवा तत्सम वाहतुकीचं कुठलंही अॅप इथे निकामी आहे. मोदींनी करोडो रुपये नुसता अमिताभ बच्चनला घेऊन रणच्या जाहिरातीवर खर्च केलाय. दोन बस सोडायला काही अवघड नव्हतं. एकही बस न सोडण्यामागे मोदींचा गुजराती दिमाग असू शकतो. पण सर्वसामान्य लोकांना रणला जाणं तसं अवघडंच आहे.
असो, तरीही तुम्ही हजार बाराशेची गाडी करून गेलात. किंवा रेन्टवर मिळणाऱ्या बाईक घेऊन गेलात तर भूज ते कच्छचं रण हा रस्ता तुम्ही दीड दोन तासात सहज पूर्ण करता. 100 रुपयांचा गेटपास घेऊन आत प्रवेश मिळतो. गेटपाससाठी तुम्हाला कुठलाही फोटो आयडी सोबत ठेवावा लागतो. हा सगळा परिसर सैन्यदलाच्या अखत्यारित येतो. आतमध्ये प्रवेश केल्यावर अथांग शुभ्रदलदलीचा प्रदेश आपल्या नजरेस पडतो. हेच कच्छचं रण. एका टोकावर हा पांढरा शुभ्र वाळवंट आणि आकाशातली ढग शेजारी बसून गप्पा मारतात की काय असा भास होतो.
कच्छचं हे रण फक्त पर्यटकांचंच आकर्षण आहे असं नाही. गेल्या 200 वर्षात मिठाची शेती हा एक मोठा उद्योग इथे उभा राहिलाय. नोव्हेंबरपासून इथल्या आदिवासींकडून मिठाची शेती पावसाळा सुरू होईपर्यंत सुरू राहते. इथूनच भारताला एकूण मिठाच्या 75 टक्के मिठ मिळतं. देशाविदेशातून येणाऱ्या विविध प्राण्यांसाठी कच्छचं रण हे आपलं माहेरासारखं आहे. विविध पक्षांचे थवे ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान कच्छच्या किनाऱ्यावर आपली घरं बनवतात.
रणच्या वाळवंटात संध्याकाळ आणखीच शूभ्रधवल होते. सोनेरी किरणांनी निरोप घेणारा सूर्य इथल्या मिठाची गळाभेट घेत असतो. कुठल्यातरी कोपऱ्यात कच्छी संस्कृतीचे स्वर कानी पडत असतात. तर दुसरीकडे रास गरबा खेळणारी मंडळी. जगात आनंद खूप स्वस्त आहे. तो फक्त घेता आला पाहिजे. हा अनुभव कितीही पैसे देऊन जगात कुठेच विकत घेतला जाऊ शकत नाही. तो गोड अनुभव घेण्यासाठी तुम्हाला या खारट वाळवंटावरच यावं लागतं.
अंधार पडल्यावर घोडागाडी, उंटगाड्यांची लगबग वाढते. उदास खिन्न मन तिथून बाहेर पडायला तयार नसतं. पण जड पावलांनी आपल्याला तिथून बाहेर पडावंच लागतं. असं म्हणतात की पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा मंद शीतल प्रकाशामुळे इथले मिठाचे कण लखलखतात. पण दुर्दैवानं तो अनुभव घेता आला नाही. तसंही अपूर्णता हवीच, पुन्हा येण्यासाठीचं ते निमंत्रण असतं.
काला डुंगर. आपण त्याला डोंगर म्हणूयात. पण हा डोंगर रहस्यमयी आहे. एकतर इथून तुम्हाला समुद्र दिसतो, मिठाचं वाळवंट दिसतं, घनदाट वनराईचं जंगल दिसतं आणि त्यावर सुवर्णलेप म्हणजे तुम्ही कच्छच्या सर्वात उंच डोंगरावर उभे असता. हाच काला डुंगर. भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर इथून फक्त 70 किमी आहे. दुर्बिणीतून तुम्ही थेट बॉर्डरची सैर करून येता. इथूनच तुम्हाला जगातला शेवटचा पूलही दिसतो. असं म्हणतात की दत्तात्रेयांचं काही काळ इथे वास्तव्य होतं. इथल्या मंदिरात दोन वेळा लांडग्यांना खिचडीचा प्रसाद दिला जातो. मघाशी मी रहस्यमयी हा शब्द का वापरला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं कारणही ऐका. हा डोंगर सर करताना एका ठिकाणी मॅग्नेटिक पॉईन्ट लागतो. या पॉईन्टवर गाडी आली की ती बंद करायची तरीही तुमची गाडी किमान 20 च्या स्पीडनं उंच डोंगर चढू लागते. आहे की नाही कमाल!
भूज शहर हे ऐतिहासिक आणि सुखी संपन्न आणि समाधानी लोकांचं शहर आहे. इथे कुणालाही घाई नाही. खासकरून मुंबईसारख्या शहरातून आलेल्या लोकांना इथलं आयुष्य संथ वाटू शकतं. पण तसंही धावपळ करून आपण तरी काय मिळवलं? असा प्रश्न आपसूक पडतो. हा शांतपणा सुखावणारा आहे. भूजमधला आईना महल आणि प्राग महल इथल्या राजेशाहीचा इतिहास जिवंत ठेऊन आहेत. स्वातंत्र्यानंतर राजेशाही संपुष्टात आली पण आजही इथल्या लोकांच्या मनात राजाविषयीचा आदर कायम आहे. इथलं स्वामीनारायण मंदिर सुंदरतेचा, कलेचा आणि भावभक्तीचा अनोखा मिलाफ आहे. भूजमधलं म्युझियम तर देखणं आहे. भूकंपाचे असंख्य हादरे सोसणारं भूज कसं बदलत गेलं ते म्युझियममध्ये बघायला मिळतं. भूज शहरावर भूकंपाच्या त्या जखमा आजही दिसतात.
भूजपासून 10 किमीवरच्या भुजोडी गावात हॅन्डलूमच्या वस्तू बनतात. अख्खं गाव त्यासाठीच प्रसिद्ध आहे इथल्या चादरी, बॅग्ज आणि खासकरून बांधणी वस्त्राची वीण अधिक घट्ट आहे. थोड पुढे गेलात तर अजरखपूर लागतं. इथल्या नैसर्गिक रंगांच्या साड्या, दुपट्टे जगात प्रसिद्ध आहे. इथल्या आदरातिथ्य आणि प्रेमाचा स्वाद कच्छच्या खाण्यात उतरलाय. भरपूर तेल्यातल्या मसालेदार भाज्या, जाडजूड तळलेल्या मिरच्या, मुगाची सात्विक खिचडी कढी आणि ताक. मन तृप्त होतं! मी पुन्हा भूजला जाईन तर ते खाण्यासाठीच.
या संपूर्ण प्रवासात मला अनेक नवीन मित्र भेटले. खरंतर मी बाहेर पडतो तेच मुळात नवीन लोकांचा शोध घेण्यासाठी. हे अनपेक्षित भेटलेले मित्र परत कदाचित आपल्याला कधीच भेटत नसतात पण त्यांच्या आठवणी छान असतात. देशी परदेशी लोकांसोबत बोलून आपल्याला आपला आवाका कळतो. लिफ्ट मागून मागून प्रवास करण्यात वेगळीच मजा आहे. ती अशा प्रवासांमधून मिळत जाते. कच्छनंही मला दोन दिवसात बरंच काही दिलं.
इतिहासाच्या सोबतीने कच्छ आणि काठेवाड, भाग 1
मंगळवार
मुंबईहून भुजला जाणारे माझे विमान, निदान अर्धा तास तरी उशीरा सुटणार आहे. म्हणजेच मुंबईच्या आंतर्देशीय विमानतळावरचा माझा मुक्काम आता निदान 4 तासाचा तरी नक्कीच होणार आहे. आज सकाळी मी पुण्याहून मुंबईला येण्यासाठी म्हणून एस.टीच्या शिवनेरी सेवेने 8.30 वाजताच पुणे सोडले होते. ही शिवनेरी बस सेवा मात्र आहे अगदी वक्तशीर आणि अतिशय आरामदायी. मी या सेवेची तरफदारी मनापासून करायला तयार आहे. बसने मला विमानतळाच्या शेजारून जाणार्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर विमानतळाच्या अगदी समोरच सोडले होते व तेथून विमानतळावरील निर्गमन कक्षात मी अगदी सहज पोचू शकलो होतो. 1बी टर्मिनल मधील हा निर्गमन कक्ष आहे मात्र अगदी ऐसपैस! याच्या एका बाजूला प्रवाशांच्या सोईसाठी म्हणून बरीच दुकाने व एक कॅफेटेरिया दिसत आहेत. शो केसमध्ये मांडलेल्या वस्तू, पुस्तके यांचे विंडो शॉपिंग करत मी माझा वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो आहे. अखेरीस आमच्या उड्डाणाची घोषणा होते. नेहमीप्रमाणेच प्रवाशांची लगबग, व गोंधळ थोड्याफार प्रमाणात अनुभवल्यानंतर मी विमानापर्यंत पोचण्यात यशस्वी होतो. विमान पूर्ण भरलेलेच दिसते आहे आणि स्वस्त विमानसेवा या वर्गाखाली हे उड्डाण मोडत असल्याने पिण्याच्या पाण्याखेरीज दुसरी कोणतीच सुविधा विमानात उपलब्ध नाहीये.
कच्छ आणि काठेवाडचा प्रवास हा इतिहासाची सोबत घेतल्याशिवाय करताच येत नाही असे मला वाटते. पावला पावलावर पर्यटकाला येथे, पार इ.स.पूर्व 2500 ते अगदी भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा काळ, यांमधील इतिहासाच्या पाऊलखुणा दिसत राहतात आणि या शिवाय गेल्या 50 वर्षात, औद्योगिक क्रांतीमुळे या भागात जो आमुलाग्र बदल होतो आहे तोही क्षणाक्षणाला सतत जाणवत राहतो. निसर्गाने येथे दिसणार्या अथांग आणि असीम अशा आसमंतात, इतक्या अद्भुत आणि रौद्र सौंदर्याची लयलूट केली आहे की आपले मन आश्चर्याने आणि कौतुकाने पुरेपूर भरून जाते.
आमचे विमान भुज विमानतळावर उतरते आहे तेंव्हा संध्याकाळचे 5 वाजून गेले आहेत. समोर दिसणारा विमानतळ खूपच मोठा वाटतो आहे परंतु समोर टरमॅक वर उभे असलेले विमानदलाचे एक MI17 हेलिकॉप्टर सोडले तर बाकी काहीच विमाने दिसत नाहीत. भुज विमानतळावर दिवसाला फक्त 2 किंवा 3 उड्डाणे उतरतात ही गोष्ट लक्षात घेतली तर इथला आगमन कक्ष त्या मानाने खूपच प्रशस्त वाटतो आहे. मी मुंबईला चेक–इन खूपच लवकर केले होते त्यामुळे अपेक्षेनुसार माझे सामान सर्वात उशीरा बेल्ट्वर येते. मी टर्मिनलच्या बाहेर येतो तोपर्यंत बहुतेक मंडळी निघून गेलेली आहेत. आहेत.अगदी थोडी वाहने वाहनतळावर उभी आहेत. मात्र नशिबाने मला एक टॅक्सी मिळते. पण ती ज्या पद्धतीने मला लगेच मिळते ते काही चांगले चिन्ह नाही आणि आपल्या खिशाला जबरदस्त चाट बसणार आहे हे ही माझ्या लक्षात येते. पण तरी सुद्धा मी ती टॅक्सी घेतो कारण या निर्जन विमातळावर टॅक्सीची वाट एकाकीपणे बघत बसण्याची माझ्या मनाची काही तयारी नाही. हा विमानतळ शहरापासून फक्त 3 किमी लांब आहे आणि शहराच्या भरवस्तीमध्ये असलेल्या हॉटेलवर पोचल्यावर जेंव्हा टॅक्सी चालक माझ्याकडे 500 रुपयांची मागणी करतो तेंव्हा माझा होरा बरोबर असल्याची मला खात्रीच पटते. नाईलाजाने मी पैसे काढून देतो आणि हॉटेलमधल्या माझ्या रूमकडे वळतो. संध्याकाळी नंतर मी जरा पावले मोकळी करायला म्हणून बाहेर पडायचे ठरवतो व शहराच्या बाजारपेठेतून सरळ ‘हमिसर‘ तलावाकडे जाणारा रस्ता पकडतो. हा तलाव म्हणजे भुज शहराचा मध्यवर्ती बिंदू आहे आणि माझ्या हॉटेलपासून या तलावापर्यंतचे अंतर जेमतेम 15 मिनिटात चालत जाता येते आहे. मी तलावापाशी पोचतो तेंव्हा सूर्यास्त होतो आहे, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे समोर तलावात पाणीच नाहीये. या वर्षी म्हणे पाऊस फारच तुरळक पडला आणि तलावाला पाणी आलेच नाही. बाजारपेठेतील रस्ता गर्दीने नुसता फुलला आहे. वेडीवाकडी कशीही उभी केलेली वाहने, बेशिस्तपणे चाललेली वाहतूक, मोकाट सोडलेल्या गाई यामधून चालणे मुश्किल वाटते आहे. रस्त्याला पदपथ वगैरे नाहीतच आणि सगळीकडे कचर्याचे ढीग साठलेले दिसत आहेत. भुजचे प्रथम दर्शन तरी माझ्या मनाला फारसे पटलेले किंवा आवडलेले नाहीये. मी जरा कंटाळूनच हॉटेलवर परततो.
बुधवार
पुढचे 2 दिवस माझा मुक्काम कच्छच्या रणाजवळ असलेल्या ज्या कॅम्पमधे होणार आहे, त्या कॅम्पच्या व्यवस्थापनाने मला भुज रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या स्वागत कक्षात सकाळी बोलवले आहे. तेथे लवकर पोचता यावे म्हणून हॉटेलमधून 7.30 पर्यंत चेक आऊट करायचे असा माझा बेत होता. पण या हॉटेलची सेवा जरा मंद गतीनेच दिली जाते आहे असे दिसते. सकाळी 6 वाजता जो चहा येणार होता तो मिळालाच नाही व हॉटेलमधील रेस्टॉरन्ट मधे जाऊन प्यावा म्हणावे तर ते 7.30 शिवाय उघडत नाही. शेवटी सकाळी 8 च्या सुमारास चेक आऊट करण्यात मी यशस्वी होतो होतो आणि भुज स्टेशन जवळच्या स्वागत कक्षात पोचायला मला 8.15 होतात. मी गरम कपड्यात मला गुंडाळून घेतले आहे कारण येथे थंडी जबरदस्त आहे आणि झोंबणारे गार वारेही आहेत.
स्टेशन जवळच्या या स्वागत कक्षासमोर दिसणारे एकूण चित्र मला जरा निरुत्साही करणारेच वाटते आहे. समोर बर्याच बसेस कशाही वेड्यावाकड्या पार्क केलेल्या आहेत आणि जिकडे तिकडे सामानाचे ढीग आणि या कॅम्पमधे भाग घेण्यासाठी आलेले लोक घोळक्या घोळक्यांनी उभे आहेत. मी स्वागत कक्ष अशी पाटी लावलेल्या शामियान्यात शिरतो आणि एका काऊंटरपाशी जातो. आता आश्चर्यचकित होण्याची पाळी माझी आहे. आतले काम भलतेच शिस्तशीर आणि पद्धतशीर रितीने होताना दिसते आहे. समोरचा स्टाफ अतिशय अदबीने वागतो आहे आणि प्रवाशांच्या अडचणींचे निवारण करण्यास तत्पर दिसतो आहे. माझी कागदपत्रे बघितल्याबरोबर मला एक तंबू अलॉट केला जातो व बरोबर आणलेल्या सर्व सामानावर त्या तंबूचा नंबर लिहिलेले टॅग्ज दिले जातात. ते मी सामानाला लावायचे आणि कोणत्याही बसमधे चढायचे एवढे सोपे काम आहे. फक्त माझे सामान मी प्रवास करतो आहे त्याच बसमध्ये ठेवले जाईल हे माझे मलाच बघायचे आहे. मी बाहेर येतो व समोरच असलेल्या एका बसच्या सेवकाकडे माझे सामान देतो. ते त्याने बसमध्ये ठेवले आहे याची खात्री झाल्यावर बसमध्ये चढतो.
पुढच्या 10 मिनिटात, भुजच्या वायव्येला 80 किमी अंतरावर असलेल्या धोर्डो या गावाकडे जाण्यासाठी बस निघते. भुजच्या उत्तरेकडे असलेला हायवे 45 वरून आम्ही निघालो आहोत. परत एकदा भुज विमानतळाचे दर्शन होते. विमानतळाच्या कडांना असलेल्या हॅन्गर्समध्ये ताडपत्र्यांचे आच्छादन घातलेली बरीच लढाऊ विमाने दिसत आहेत. आजूबाजूचे दृष्य काही आगळेच, सहसा बाकी कोठे न दिसणारे असे आहे. मधे मधे हिरवट काळसर रंगाची उभी पिके असलेली शेते व त्याच्या मधे मधे ओसाड जमीनीचे मोठाले पॅचेस दिसत आहेत. मधून मधून साठलेल्या पाण्याची डबकी पण दिसत आहेत. 2 दिवसांपूर्वी भुजमधे जोरदार वर्षा वृष्टी झाली होती त्यामुळे बहुदा हे पाणी साठलेले असावे. शेतात जी पिके उभी आहेत ती बहुतांशी एरंडीची आहेत. एरंडी (Ricinus communis, or Euphorbiaceae) हे पीक त्याच्या बियांपासून मिळणार्या एरंडेल तेलासाठी घेतले जाते. शेतकर्यांना नगदी रक्कम मिळवून देणारे हे पीक येथे खूपच घेतले जाते कारण येथली अतिशय खराब जमीन आणि वाळवंटी हवामान! हे तेल म्हणजे आपल्या रोजच्या उपयोगातील अनेक उत्पादनांसाठी आवश्यक असलेला एक महत्त्वाचा उत्पादन घटक आहे. या उत्पादनांत, सौंदर्य प्रसाधने आणि मोटरगाड्यांच्या आणि इतर डिझेल, पेट्रोल इंजिनांसाठी जे वंगण लागते ते तेल, अशी दोन महत्त्वाची उत्पादने मोडत असल्याने एरंडी तेलाला खूपच मागणी असते.
आता शेतांच्या मधे मधे लागणार्या ओसाड पॅचेस मधली जमीन पांढरट दिसायला लागली आहे. हा पांढरा रंग, जमिनीत क्षारांचे प्रमाणे अवाजवी असल्याने दिसतो आहे. या ओसाड खारवट जमिनीत, फक्त बाभळीची झुडुपे उगवतात व टिकू शकतात. आम्ही जसजसे उत्तरेकडे जातो आहोत तसतसे या ओसाड जमिनींचे प्रमाण वाढते आहे व शेती अगदी थोड्या प्रमाणात, फक्त खेडेगावांजवळ, दिसते आहे. खेडेगावांतली घरे गोल आकाराची बांधलेली आहेत आणि त्यावरची छते शंकाकृती आकाराची दिसत आहेत. येथील पूर्वापार चालत आलेल्या घरांमध्ये, पूर्वी या शंकूच्या आकाराच्या छतावर गवत पसरण्याची पद्धत होती व त्यांना भुंगा असे नाव होते. आता सर्रास पणे मंगलोरी कौले छतावर घातलेली दिसत आहेत. मात्र छताचा आकार तसाच शंकू सारखाच आहे. घरांचा हा आकार असा बनवला जातो कारण, अशी घरे भूकंप झाला किंवा वादळ आले तरी त्यांना चांगले तोंड देतात व सहसा पडत नाहीत.
1 तासभर प्रवास केल्यानंतर बस रस्त्याच्या कडेला उभी रहाते. आजूबाजूला दिसणारे दृष्य अगदी कॉमन आहे. दोन्ही बाजूंना छोटी छोटी दुकाने, चहाच्या टपर्या आणि भाज्या वगैरे विकणारे स्टॉल्स. या गावाचे नाव आहे भिरंडीयारनी आणि हे गाव तसे प्रसिद्ध आहे. या गावात चप्पल, सॅन्डल या सारख्या चामड्याच्या वस्तू आणि खवा, किंवा त्यापेक्षा हुबळी, बेळगाव कडे जसा कुंदा मिळतो तसाच दिसणारा आणि चवीला लागणारा, मावा मिळतो. या गावाबद्दल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथून पुढे उत्तरेला जायचे असले तर इनर लाइन परमिट घ्यावे लागते असे म्हणतात. खरे खोटे मला माहीत नाही.
हे गाव सोडून आमची बस आता डावीकडे असलेल्या एका छोट्या फाट्याला वळली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गर्द झाडी आहे. येथून पुढे कच्छ्ची प्रसिद्ध चराऊ राने ज्यांना येथे ‘बन्नी‘ असे नाव आहे ती सुरू होतात. मात्र मला दिसत आहेत ती बाभळीची झुडपे व त्या खाली वाळलेले गवत. कच्छ मध्ये गाई आणि म्हशी यांच्या दुधाचे प्रचंड उत्पादन होते याला प्रामुख्याने ही बन्नी चराऊ राने कारण आहेत. इथल्या गवतावर पोसलेल्या बलदंड दुभत्या जनावरांचे कळप किंवा ताफे मला दोन्ही बाजूंना बाभळीच्या झुडपांमागे दिसत आहेत. आणखी अर्धा तास प्रवास केल्यानंतर बस एकदम थांबते. आम्ही रणाजवळच्या कॅम्पपाशी पोचलो आहोत.
शेकडो तंबू ठोकून उभा केलेला हा कॅम्प म्हणजे एक प्रचंड वसाहतच आहे. प्रत्येक तंबूमध्ये सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. जवळच वातानुकूलित भोजनगृह, खरेदीसाठी अनेक स्टॉल्स असलेली एक बाजारपेठ व एक सभागृह आहे. तंबूमध्ये वायफायची सुविधा देखील आहे. प्रथम मी आवश्यक त्या औपचारिकता पूर्ण करतो व त्या नंतर मला एक कॅम्पचे ओळखपत्र आणि भोजनासाठीची कुपॉन्स देण्यात येतात. ती सगळी घेऊन मी आरामात माझ्या तंबूकडे जातो. आशचर्याची गोष्ट म्हणजे माझे सामान, तंबू समोर आणून ठेवलेलेच आहे. तेथील सेवक वर्ग मला प्रथम न्याहरी घ्यावी अशी अशी सूचना करतो कारण न्याहरीची वेळ थोड्याच वेळात संपणार असते. मोठ्या थोरल्या भोजन गृहात अगदी गरम गरम जेवण तुम्हाला सर्व्ह केले जाते. संपूर्ण गुजराथी पद्धतीची पोहे, जिलबी आणि गाठिया यांची न्याहरी व त्यानंतर मसाला चहा याची लज्जत येथे काही औरच येते आहे.
आता दुपारच्या भोजनापर्यंत तसा मला मोकळा वेळ आहे. त्या नंतर आम्हाला जवळपास असलेल्या कच्छी खेड्यांच्यात तेथील कारागिरांनी केलेले भरतकाम आणि इतर कलाकुसर बघण्यासाठी नेण्यात येणार आहे. मी जवळच असलेल्या बाजारपेठेतील स्टॉल्समध्ये भटकण्यात वेळ घालवून आणि थोडीफार खरेदी करून माझ्या तंबूमध्ये परतण्याचे ठरवतो.
प्रत्यक्षात मात्र मी शेवटी अंदाजे 2 तास तरी तिथल्या दुकानांच्यात घालवतो. भरतकाम किंवा बांधणी प्रकारची वस्त्रे, त्यांचे रंग हे सगळे मनाला फारच लुभावणारे वाटते आहे. कलाकुसरीच्या इतर वस्तूंची कारागिरी सुद्धा फारच अप्रतिम वाटते आहे.
12.30च्या सुमारास मी माझ्या तंबूकडे परत येतो. प्रत्येक तंबूमध्ये, 2 शयनमंच, 2 टेबले, खुर्च्या उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे एक रूम हीटर, पाणी गरम करण्यासाठी एक इलेक्ट्रिक किटली आणि चहाचे किट टेबलावर ठेवलेले आहे. तंबूच्या मागच्या बाजूस आधुनिक सुविधा असलेले स्वच्छता गृह आहे.
मी जरावेळ आराम करतो व परत एकदा भोजन गृहात जाऊन संपूर्ण गुजराथी भोजनाचा आस्वाद घेतो व नंतर या कॅम्पच्या स्वागत कक्षाजवळ असलेल्या वाहनतळाकडे वळतो.
इतिहासाच्या सोबतीने कच्छ आणि काठेवाड, भाग 2
वातानुकूलित बसेसचा एक ताफाच मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला या कॅम्पच्या व्यवस्थापनाने कॅम्प रहिवाशांच्या सोईसाठी म्हणून नेहमी तयार ठेवलेला असतो. त्यापैकी पुढे असलेल्या एका बसमध्ये मी चढतो आणि पुढच्या काही मिनिटातच बस संपूर्ण भरल्यामुळे निघते सुद्धा! आम्ही परत एकदा भिरंडीयारनी गावाकडे जाणार्या चिंचोळ्या रस्त्याने निघालो आहोत. या गावाजवळ आमची बस आता हायवे 45 वर डावीकडे म्हणजे सकाळी आलो त्याच्या विरूद्ध दिशेला वळते आहे.
दुपारचे ऊन आता चांगलेच रणरणते आहे. वर सूर्य सुद्धा तळपतो आहे आणि अंग भाजून काढतो आहे. काही क्षणातच आम्ही गोल आकाराच्या 3 किंवा 4 भुंगा झोपड्यांच्या मधे असलेल्या एका मोकळ्या जागेत येऊन पोहोचतो.
खाली उतरल्यावर एका दृष्टीक्षेपातच माझ्या लक्षात येते की हे काही खरे भिरंडीयारनी गाव नाही. ते बहुदा या रस्त्याने आणखी थोडे पुढे गेल्यावर असावे. या भुंगा झोपड्या, कच्छ्च्या हस्तकला आणि भरतकाम केलेले कपडे, यांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी गुजरात सरकारने स्थापन केलेले एक विक्री केंद्र आहे. पण समोर जे काही विक्रीसाठी दिसते आहे ते इतके सुंदर आणि अप्रतिम आहे की आम्ही खर्या गावात न आल्याबद्दल मला तक्रार करण्यासारखे काहीच नाहीये. कपडे, चादरी या सारख्या वस्त्रांवर या इथल्या कारागीरांनी रंगांची जी बहारदार उधळण केलेली दिसते आहे त्याला खरोखरच तोड नसेल. या रंगांबरोबरच या वस्त्रांवर भरतकाम करून ज्या आकृत्या विणलेल्या आहेत त्या ही अजोड आहेत. अनेक प्राणी, पक्षी, भूमितीय आकृत्या, या वस्त्रांवर, कच्छी टाका म्हणून परिचित असलेल्या एका टाक्याने, विणलेल्या दिसत आहेत. सभोवती टाके विणून छोटे छोटे आरसे या आकृत्यांत बसवलेले आहेत त्यामुळे आसमंतावर तळपणार्या सूर्याचे किरण त्यावरून परावर्तीत होऊन ही वस्त्रे चमचम करत झगमगत आहेत. विक्री करणार्या स्त्री पुरुष खेडूतांनी याच प्रकारची वस्त्रे अंगावर व डोक्यावर घेतलेली आहेत. खरे तर हे रंग अतिशय गडद आणि उठावदार आहेत तरीही ते वापरून बनवलेली वस्त्रे भगभगीत किंवा बेगडी असल्यासारखी वाटत नाहीत. परंपरागत चालत आलेल्या या हस्तकलांचे हेच वैशिष्ट्य असते. ही वस्त्रे म्हणजे माझ्या डोळ्यांना एक मेजवानी असल्यासारखीच मला वाटते आहे. भिरंडीयारनी गावातील हे भुंगा विक्री केंद्र, जरी खरा भुंगा नसले तरीही डोळ्यांना अतिशय आल्हाद्कारक मात्र नक्कीच वाटते आहे.
एका भुंग्यामध्ये मला भिंतीपाशी एक विचित्र दिसणारे एक उपकरण ठेवलेले दिसते आहे. मुळात हे एक लाकडी कपाट आहे. त्यावर शाडूच्या मातीचा लेप देऊन त्यावर पांढरा रंग दिलेला आहे. कपाटाच्या समोरील बाजूस एक छोटा दरवाजा दिसतो आहे. या कपाटाच्या वरच्या बाजूवर 3 मडक्यांच्या प्रत्येकी केलेल्या 2 उतरंडी ठेवलेल्या आहेत. त्यांनाही पांढरा रंग दिलेला आहे. या सर्वच उपकरणाच्या बाह्य पृष्ठभागावर छोटे आरसे शाडूच्या मातीत रोवून पक्के बसवून टाकलेले आहेत. हे येथील खेडूतांचे विद्युत किंवा दुसरी कोणतीही शक्ती आवश्यक नसलेले असे शीतकपाट आहे. कपाटावर असलेली मडकी पाण्याने भरून ठेवली की अन्नपदार्थ किंवा दूध यासारखे पदार्थ कपाटातील छोट्या कप्प्यामध्ये खराब न होता व्यवस्थित राहू शकतात. कच्छ मध्ये उन्हाळा अतिशय कडक असतो व तपमान 50 अंश सेल्सस पर्यंत सहजपणे जाते. अशा परिस्थितीत हे ग्रामीण शीतकपाट खेडूतांना एक वरदानच ठरते.
आता आम्ही ‘होडको‘ नावाच्या दुसर्या एका खेड्यापाशी पोचलो आहोत. या खेड्याच्या थोड्या बाजूला, एक आदर्श खेडेगाव सरकारने उभारले आहे. या आदर्श गावाकडे जाण्याच्या रस्त्याच्या अखेरीचा 100 मीटर लांबीचा भाग हा दाट भरलेल्या बाभळींच्या वनामधून जातो आहे. मात्र ही बाभूळ आपल्याकडे दिसते तशी काटेरी बाभूळ (Gum Arabic) नसून आपण ज्याला विलायती बाभूळ (Prosopis juliflora) म्हणतो त्या प्रकारची चांगली उंच वाढलेली झाडे असल्याने त्यांच्या खालून सहजपणे जाता येते आहे. समोर दिसणार्या रंगवलेल्या भुंगा झोपड्या, स्वच्छ सारवलेली अंगणे, सगळीकडे आणि मुख्यत्वे भिंतींवर केलेले कलात्मक नक्षीकाम आणि चित्रे, पॉलिश केलेली घरांची दारे, यामुळे हे आदर्श गाव एखादा बॉलीवूड चित्रपटाचा सेट लावावा त्याप्रमाणे दिसते आहे.
असे असूनही हा चित्रपटाचा सेट मात्र नाही. या भुंगा झोपड्यांमध्ये लोक प्रत्यक्षात रहात आहेत. मला काही अतिशय गोंडस दिसणारी मुले या भुंगा झोपड्यांभोवती खेळताना दिसत आहेत. मी एका झोपडीत डोकावून बघतो. आतले घर अगदी स्वच्छ आणि टापटिपीने आवरलेले आहे. भिंतीवर लाकडी शेल्फ अडकवलेली आहेत व त्यांच्यावर घरातली भांडी–कुंडी व इतर सामान नीट लावून ठेवलेले दिसते आहे. समोरच्या भिंतीवर एका सपाट पाटीवर, शाडूच्या मातीचा थर देऊन त्यात बारके आरसे खोचून तयार केलेल्या डिझाइनचे एक पॅनेल लावलेले आहे. त्यातली कारागिरी दाद देण्यासारखीच आहे. या प्रकारच्या पॅनेल्सवरची डिझाइन्स, बहुधा भूमितीय आहेत व ती भिंतीवर बसवलेली आहेत. त्याच प्रमाणे स्थानिक कलाकारांनी तयार केलेल्या अनेक कलावस्तू आणि इतर गोष्टी आम्हाला बघता याव्यात म्हणून नीट मांडून ठेवलेल्या आहेत. कला गुण बहुदा या कच्छी खेडूतांच्या जनुकांमधेच असले पाहिजेत. नाहीतर त्यांनी बनवलेली अगदी साधी साधी डिझाइन्स सुद्धा दाद द्यावी अशीच आहेत. या लोकांच्या अंगात असलेल्या सृजनशीलतेचे किती कौतुक करावे तरी ते कमीच पडेल असाच कलाविष्कार येथे प्रदर्शनासाठी मांडून ठेवलेला आहे.
या कच्छी खेडेगावांची ही कलासफर करताना संध्याकाळ कधी झाली ते मला कळतही नाही. आम्ही परत बसमध्ये चढतो पण कॅम्पकडे परत न जाता साधारण ईशान्य दिशेला असलेल्या एक गेस्ट हाऊसकडे आमची बस वळते. तेथे संध्याकाळचा चहा व बिस्किटे यांचा मी समाचार घेतो आणि जरा फ्रेश होऊन आजच्या दिवसाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि अतिशय भव्यदिव्य मानल्या जाणार्या अशा एका निसर्ग करामतीचे दर्शन घेण्यासाठी तयार होतो. या निसर्ग करामतीला, धवल मरुभूमी (the white desert) या नावाने ओळखले जाते.
मी वर ज्या बन्नी या नावाने ओळखल्या जाणार्या चराऊ रानांचा उल्लेख केला आहे ती राने कच्छ्च्या सर्वात उत्तरेला असलेला व ज्यात मानवी वस्ती आहे अशा एका प्रदेशाभोवती पसरलेली आहेत. या प्रदेशाच्या उत्तरेला, एक अफाट मोठी अशी एक मरूभूमी सुरू होते. या मरूभूमीमध्ये कोणतीही खेडी किंवा वस्त्या नाहीत व येथे कोणी रहात सुद्धा नाही. ही मरूभूमी उत्तर–दक्षिण दिशेला 50 ते 125 किमी एवढी पसरलेली आहे तर भारताच्या पश्चिम किनार्यापासून ते पूर्वेला जवळजवळ 300 किमी पर्यंत या मरूभूमीचा आवाका आहे. मात्र ही मरूभूमी म्हणजे नुसत्या रेतीच्या टेकड्यांनी भरलेले एक वाळवंट नाही. मॉन्सूनचे वारे सुटले की ‘रण‘ या नावाने ओळखल्या जाणार्या या मरूभूमीमध्ये, अरबी समुद्राचे पाणी घुसते व या मरूभूमीच्या आसमंतात असलेल्या पर्जन्यपोषित नद्या सुद्धा तुडुंब वहात येऊन या पाण्यात भर टाकतात. या कारणांमुळे ही सर्व मरूभूमी दर वर्षी, या सर्व मॉन्सून कालात, काही फूट खोल पाण्याखाली असते. मात्र मॉन्सूनचे वारे ओसरले की हे सर्व पाणी परत समुद्राकडे धाव घेते आणि पाणी गळून गेल्यावरचे हे रण, प्रथम दलदलीच्या स्वरूपात बदलते व शेवटी त्याला एका कोरड्या वाळवंटाचे स्वरूप येते. हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूंमध्ये येथील जमीन कोरडी व पापुद्रे सुटलेली अशी दिसते. मात्र या मरूभूमीच्या काही भागावर मात्र गळून जाणारे समुद्राचे पाणी, मिठाचा (Sodium Chloride) एक थर सोडून जाते. जमिनीवर पसरलेला हा पांढर्या शुभ्र मिठाचा थर आसमंतात एक जादूमय वातावरण निर्माण करतो. रणाच्या या भागांना धवल मरूभूमी म्हणून यासाठीच ओळखले जाते व निसर्गाची अतिशय दुर्मीळ व अद्भुत अशी ही करामत डोळे भरून बघण्यासाठी मी आता निघालो आहे.
बस थांबते आणि मी खाली उतरतो. समोर काही अंतरावर एक बांबूचे कुंपण किंवा बॅरिकेड उभारलेले दिसते आहे. या कुंपणाच्या पलीकडच्या बाजूस कोणत्याही वाहनांनी जाऊ नये यासाठी ही तजवीज आहे. या कुंपणापलीकडे फक्त उंटाने ओढलेल्या गाड्या जाऊ शकतात. मात्र पलीकडे मला एक मोठा जनसमुदाय जमलेला दिसतो आहे. हिवाळ्याच्या दिवसातील संध्याकाळी, येथे पर्यटक शेकड्यांनी जमा होतात व पांढर्या शुभ्र क्षितिजामागे होणारा सूर्यास्ताचा भव्य खेळ, डोळे भरभरून बघत राहतात. या बॅरिकेडच्या मागे बर्याच अंतरावर, अगदी क्षितिजाजवळ मला एक पांढरा स्वच्छ पट्टा दिसतो आहे. तो शुभ्र पट्टा अर्थातच या धवल मरूभूमीचा आहे आणि तेथेच मी आता जाणार आहे.
मी बॅरिकेडमधून पुढे जातो. प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या, डबे तुम्हाला याच्या पुढे नेता येत नाहीत. मी खाली बघतो. पायाखालची जमीन जरा भुरकट–मातकट रंगाची वाटते आहे. मधून मधून पाणी साचलेली छोटी छोटी डबकी पण दिसत आहेत.
जमीन संपून ही धवल मरूभूमी जेथे सुरू होते आहे तेथे स्थानिक कलाकारांनी एक छोटेसे स्टेज उभारले आहे. त्यावर 5 किंवा 6 कलाकारांचा एक संच वाद्यांच्या साथीवर लोकगीते प्रस्तुत करतो आहे. साधारण लोकसंगीताच्या चाली असतात तसेच हे संगीत कानाला थोडे गूढ वाटत असले तरी कर्णमधुर आहे. अर्थात शब्द कच्छी भाषेतील असल्याने समजणे शक्यच नाही. मात्र या लोकसंगीताने या धवल मरूभूमीवर जो एक माहौल उभा केला आहे तसा परत आयुष्यात अनुभवणे कठीण आहे. मी माझे 1/2 फोटो या संगीत संचाबरोबर काढून घेतो आणि पुढे निघतो.
आता पायाखालची जमीन हळूहळू मळकट पांढरी होत जाते आहे आणि थोड्या अंतरावर अचानकपणेच ती शुभ्र धवल बनली आहे. वेड लागल्यासारखा मी तरातरा चालतच राहतो. पुढे आणखी एखादा किलोमीटर अंतर गेल्यावर मी स्तब्ध उभा राहतो. आता माझ्या चहूदिशांना फक्त एकच रंग उरला आहे. पार क्षितिजापर्यंत जाणवते आहे ती फक्त अपार आणि अफाट अशी धवलता. गेल्या काही मिनिटात येथे जादूने जोरदार हिमवर्षाव तर झाला नाहीये ना? अशी शंका माझ्या मनाला चाटून जावी इतका आसमंत आता पांढरा शुभ्र झाला आहे. बरोबरचे कोणीतरी मला विचारते की आपण असेच चालत राहिलो तर कोठे पोचू? मला खरे तर क्षितिजावर! असे उत्तर द्यावे असे मनापासून वाटते आहे पण मी ते उत्तर न देता रूक्षपणे सिंधमध्ये पोचू असे सांगून टाकतो.
मगाशी डोक्यावर तळपणारा सूर्य, आता पश्चिम क्षितिजावर 10 ते 15 अंशावर आला आहे. आणि माझ्या पश्चिमेला, जमिनीवर पाणी साचून तयार झालेल्या शेकडो खळग्यांच्या पुंजक्यांनी अचानकपणे सुवर्णकांती प्राप्त केली आहे. सूर्यकिरणांमुळे हे साचलेले पाणी, मोजता येणार नाही अशा अनंत ठिकाणीं, नुसते झळाळून उठले आहे व सह्स्त्रावधी सुवर्णतारका एकदम चमकाव्यात तसे चमचमते आहे. समोरचे हे अवर्णनीय दृष्य मला या अवनीतलावरचे वाटतच नाहीये. या प्रकारचे स्वर्गीय दृष्य माझ्या उर्वरित आयुष्यात परत बघता येईल असे काही मला वाटत नाही.
वेळ तर पुढे सरकतोच आहे. मी आसमंताची अक्षरश: शेकडोंनी छायाचित्रे घेतो आहे. पश्चिम क्षितिजावर पोचलेल्या सूर्याने आता थोडी नारिंगी छटा असलेला सुवर्णमय अवतार धारण केला आहे. सूर्याला हिरण्यगर्भ हे नाव पूर्वी ऋषींनी देण्यामागचे कारणच मला समोर दिसते आहे. सूर्याचा इतका शुद्ध आणि स्वर्गीय अवतार मी या पूर्वी कधीच बघितलेला नाही. मी सहाज पूर्वेकडे वळून बघतो. क्षितिजापासून साधारण 40 अंशावर दुधाच्या रंगाचा सफेद चंद्र आकाशात मला सहजपणे दिसतो आहे.
आणखी काही क्षण जातात. सूर्याची एक कड आता क्षितिजाला टेकते आहे. क्षणार्धात पश्चिमेला असलेले पाण्याचे सर्व सुवर्णमय पुंजके एकमेकाचा हात हातात घेतात व मला समोर दिसू लागतो नारिंगी सुवर्ण रंगाचा परंतु सबंध क्षितिजाच्या लांबीचा एक चिंचोळा पट्टा!हा पट्टा तर आता सूर्याचा एक भागच असल्यासारखा झळाळतो आहे. आणखी काही क्षण जातात.सूर्याची वरची कडही क्षितिजाआड लपते. त्याचबरोबर मगाशी झळाळणारे पाण्याचे ते पुंजकेही हरपतात.
मी एक उसासा टाकतो व परत फिरण्यासाठी मागे वळतो. चालत असतानाच माझ्या अचानक लक्षात येते की आजूबाजूच्या जमिनीने आता अचानक रुपेरी रंग प्राप्त केला आहे. सूर्य क्षितिजाआड गेल्याने आणि नारिंगी रंगाचा मागमूस न राहिल्याने चंद्राने आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली आहे. मगाशी सुवर्णकांती धारण केलेली ही शुभ्र धवल मरूभूमी आता रुपेरी बनली आहे. अगदी रूक्षपणे सांगायचे म्हटले तरी ही सभोवार दिसणारी अवनी आता अचानक जादूमय बनली आहे.
अगदी नाईलाजाने पाय निघत नसतानाही मी परत बसकडे वळतो व आमच्या कॅम्पकडे येण्यास निघतो. रात्री गरमागरम भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर माझे पाय जवळच असलेल्या अॅम्फीथिएटर कडे वळतात. आजा अहमदाबाद येथील एका नृत्य शाळेच्या विद्यार्थिनींचा ‘कुचिपुडी‘ पद्धतीच्या नृत्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. आता परत चांगलीच थंडी जाणवायला लागली आहे. मी अंगावर भरपूर कपडे चढवतो व डोळ्यावर पेंग येत असूनही हा प्रेक्षणीय कार्यक्रम पूर्ण बघतो.
नंतर झोपेची आराधना करत असताना माझे विचार उद्याच्या विशेष कार्यक्रमाच्या भोवतालीच केंद्रित झाले आहेत. उद्या सकाळी, जवळचे हे विराण आणि विशाल रण ओलांडून आम्ही, जेथे परत एकदा मानवी वस्ती शक्य आहे अशा पलीकडच्या म्हणजेच उत्तरेच्या बाजूच्या काठावर जाणार आहोत. परंतु या काठाच्या पलीकडे असलेला भूभाग मात्र आता भारताच्या स्वामित्वाखालील नाही.
(क्रमश)
https://chandrashekhara.wordpress.com
इतिहासाच्या सोबतीने कच्छ आणि काठेवाड, भाग 3
गुरूवार
आम्हाला कॅम्पच्या ऑफिसकडून सूचना मिळाल्या आहेत की रण ओलांडून पैलतीरी जाण्यासाठीच्या बसेस सकाळी 8 वाजल्यापासून मुख्य प्रवेशद्वारापासून निघतील. मी जरा लवकरच उठतो, भोजन गृहात जाऊन न्याहरी घेतो व मुख्य प्रवेशद्वारापाशी बरोबर 8 वाजता पोहोचतो. समोर पहिली निघणारी बस जवळ जवळ भरतच आली आहे. तरी पण काही मंडळी त्यांचे साथीदार न आल्याने उतरून जातात व मला बसच्या पुढच्या भागात खिडकीजवळची जागा मिळते. पुढच्या काही मिनिटातच बस भरते आणि आम्ही निघतो सुद्धा. या प्रवासासाठी असलेला आमचा गाईड सैन्यदलातून निवृत्त झालेला आहे आणि बर्यापैकी विनोदी स्वभावाचा असल्याने त्याच्या सूचनांची आम्हाला सगळ्यांनाच गंमत वाटते आहे. परत एकदा आम्ही भिरंडीयारनी गाव गाठतो व परत एकदा डावीकडे वळून हायवे 45 वरून उत्तर दिशेला प्रवास सुरू करतो. आसमंत साधारण तसेच आहे. बन्नी चराऊ राने, मधून मधून धष्टपुष्ट गाई म्हशींचे कळप आणि मधूनच एरंडीची शेते. या रस्त्यावरच असलेल्या ‘खावडा‘ गावामध्ये आम्ही पहिला हॉल्ट घेतो. रणाच्या वैराण आणि विशाल मरूभूमीमध्ये प्रवेश करण्याआधी लागणारे हे शेवटचे मोठे गाव आहे. येथे चहाचा कप घेणे अनिवार्य आहे असे आमच्या गाईडचे म्हणणे पडते व आम्ही त्याच्या इच्छेला मान देऊन गरमगरम चहाचा थोडा आस्वाद घेतो. या गावाचे सुद्धा एक हस्तकला वैशिष्ट्य आहे. येथे कलात्मक रित्या बनवलेल्या चामड्याच्या वस्तू उत्तम मिळतात. चपला व पर्सेसची डिझाइन अतिशय सुरेख आहेत. पण मला पुढच्या प्रवासाची इतकी उत्कंठा आहे की सध्या खरेदीकडे माझे फारसे लक्ष नाहीये.
खावडा गावातील रहिवासी मात्र इतर कच्छी लोकांपेक्षा खूपच भिन्न दिसत आहेत. चेहर्याची लांब ठेवण, धारदार आणि टोकदार नाके, सुरमा घातलेले डोळे यामुळे या लोकांचे बलुची किंवा पख्तुन लोकांशी असलेले साम्य लक्षात येण्याजोगे आहे. त्यांच्या डोकयावरील पगड्या, अंगावरील पठाणी पोषाख व गळ्याभोवती घेतलेले उपरण्यासारखे वस्त्र यामुळे हे लोक इथले मूळ स्थानिक नसावेत असा अंदाज मी बांधतो. आमचा गाईड खुलासा करत मला सांगतो की ही मंडळी काही पिढ्यांपूर्वी वायव्येकडून येथे येऊन स्थायिक झालेली आहेत आणि त्यांनी हे गाव आता आपले केलेले आहे. या लोकांचे मूळ स्थानिक कच्छी लोकांबरोबर फारसे संबंध नसल्याने आता गुजरात सरकार त्यांना इतर समाजाबरोबरच सामावून घेण्यासाठी खास प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे खावडा गावाजवळ मूळ कच्छी लोकांची वस्ती वाढावी म्हणून येथे नव्या उद्योगधंद्याना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे. नवीन उद्योगधंदे आले की नोकरीसाठी मूळ कच्छी मंडळी येथे येतील व सध्या या स्थलांतरितांचे जे इथे प्राबल्य आहे ते कमी होईल अशी कल्पना या मागे आहे.
आमच्या गाईडचा बरोबर आणलेल्या कागदपत्रांचा आणि बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या नावांचा व संख्येचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न चालू आहे. याचे कारण म्हणजे खावडा गावानंतर येथील स्थानिक सोडले बाकी असैनिक किंवा सिव्हिलियन लोकांना खास परवाना असल्याशिवाय पुढे प्रवास करता येत नाही. अखेरीस बसचा ड्रायव्हर, कंडक्टर स्वत: गाईड आणि आम्ही सर्व, यांचा ताळमेळ जमतो व आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो. कुरन नावाचे एक छोटेसे खेडे रस्त्यात लागते. यानंतर आसमंत हळूहळू बदलू लागला आहे हे माझ्या लक्षात येते. आता एरंडीची शेते जवळजवळ दिसतच नाहीयेत. टाकाऊ आणि वरकड जमिनीचे मोठमोठे तुकडे आता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसू लागले आहेत. बाभूळ आणि विलायती बाभूळ यांची झाडे आणि खाली वाळके गवत हे मात्र विपुल प्रमाणात सगळीकडे आहेत. थोडे अंतर पार केल्यावर आता आम्ही रणाच्या तीरावर असलेल्या जमिनीच्या शेवटच्या कडेवर येऊन पोचतो आहोत. बस काही क्षण स्तब्ध उभी आहे. मी त्याचा फायदा घेऊन समोरचे दृष्य मनात साठवण्याचा प्रयत्न करतो आहे.
माझ्या अगदी डोळ्यासमोर दिसतो आहे एक पूल. या पुलाखाली आता जरी कोरडीच जमीन असली तरी वर्षातील बराच काळ येथे समुद्राचे पाणी असते. माझ्या डाव्या हाताला दिसते आहे ती काल मी अनुभवलेली व मिठाचे थरावर थर असलेली धवल मरूभूमी. ही धवल मरूभूमी पार पश्चिम क्षितिजापर्यंत विस्तारली आहे. मात्र प्रत्यक्षात या धवल मरूभूमीच्या पुढे दलदलीचा प्रदेश व नंतर अरबी समुद्राकडे नेणारी कोरी खाडी लागते असे माझ्या जवळचा नकाशा सांगतो आहे. माझ्या उजव्या हाताला दिसते आहे कोणत्याही प्रकारच्या झाडाझुडपांचा लवलेश सुद्धा दिसत नसलेली, किरमिजी, मळकट रंगाच्या जमिनीची, एक अफाट पसरलेली वैराण मरूभूमी. मात्र अगदी पूर्व क्षितिजाजवळ, याच मरुभूमीने आपला रंग बदलला आहे. या ठिकाणी ही मरुभूमी थोडीशी निळसर ग्रे दिसते आहे. हा रंग बघणार्याला सहजपणे फसवतो आहे. असे बघितल्यावर येथे समुद्रकिनारा असला पाहिजे असे वाटते आहे. प्रत्यक्षात तसे काहीच नाही.
मात्र रणाचा हा देखावा बघताना निसर्गाची ही अद्भुत आणि दुर्मीळ करामत बघून माझे मन इतके आश्चर्यचकित झाले आहे की निस्तब्धपणे समोरचा देखावा बघण्याशिवाय काहीही करणे मला शक्य नाही. समोर दिसणार्या वैराण रणाचा वायव्येकडचा भाग, येथे गोड्या पाण्याची विपुलता असल्याने 200 वर्षांपूर्वी अतिशय सुपीक होता व येथे वर्षभर पिके डोलत असत असे मी वाचले आहे. परंतु समोर सध्याची परिस्थिती बघितल्यावर हे जवळपास अशक्यप्रायच वाटते आहे.
एखाद्या खोल पाण्याने भरलेल्या समुद्रात असावीत तशी अनेक बेटे या रणामध्ये आढळतात. ही बेटे मॉन्सून कालात पाण्याने वेष्टिलेली असली तरी बाकीच्या काळात या बेटांवर जमिनीवरच्या वाटांनी पोचता येते. अगदी ऐतिहासिक कालांपासून असे अनेक मार्ग येथील स्थानिक लोकांना ज्ञात होते व आहेत आणि या मार्गांनी उन्हाळ्यात रण सहजपणे ओलांडता येते. ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या काळात, रणाचा उत्तर किनारा हा त्यांच्या अधिपत्याखाली असलेला सिंध प्रांत व कच्छ संस्थान यामधील सीमारेखा म्हणून मानली जात असे. त्या काळात रण ओलांडण्यासाठी 4 मार्ग सर्वसाधारणपणे वापरात होते. यापैकी पहिला मार्ग हा कच्छ मधील लुना गाव आणि सध्याच्या पाकिस्तानातील ‘रहिम की बझार‘ हे गाव यांना विगाकोट आणि कांजरकोट या मार्गे जोडत होता तर पाकिस्तानातील नगरपरकर हे गाव आणि कच्छ मधील बेला आणि लोदरानी यांना जोडणारे 2 स्वतंत्र मार्ग अस्तित्वात होते. मोरी बेटावरून जाणारा व कच्छ मधील खावडा आणि पाकिस्तानातील डिप्लो या गावांना जोडणारा 4था मार्ग त्या वेळी वापरात होता. आता यापैकी कोणतेच मार्ग आता उपलब्ध नाहीत व सीमा सुरक्षा दलाने बनवलेले 2 किंवा 3 पक्के रस्ते आता रण ओलांडण्यासाठी वापरले जातात. या रस्त्यापैकी, खावडा गावापासून निघून रणाच्या उत्तर काठावर असलेल्या विगाकोट या एका जुन्या किल्याच्या भग्नावशेषांपर्यंत, अनेक बेटे जोडत गेलेल्या एका रस्त्याने, आम्ही रण ओलांडणार आहोत.
आमची बस आता परत पुढे निघाली आहे. रणाचा दक्षिण काठ आणि उत्तरेकडे, सर्वात जवळ असलेले कुवर बेट, या मध्ये वाहणारा रणातील जलप्रवाह इतका अरूंद आहे की एका पुलाच्या सहाय्याने तो सहज ओलांडता येतो. इंडिया ब्रिज किंवा भारत सेतू या नावाने ओळखला जाणारा हा पूल आमची बस आता ओलांडते आहे. या पुलाला लागून धर्मशाळा या नावाने ओळखले जाणारे पहिले सीमा चेक पोस्ट समोरच आहे. पाकिस्तानची सीमा जवळच असल्याने या चेक पोस्ट्पासूनच पुढे सुरक्षा नियम पालन अतिशय कडकपणे केले जाते. बस चेक पोस्टवर थांबते. आम्हाला आमच्या जवळचे मोबाइल फोन, कॅमेरे वगैरे सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे सुरक्षा दलाच्या हवाली करावी लागतात. मोबाइल मधले सिम कार्ड सुद्धा चालत नाही. या नंतर आमची बस सुरक्षा दल कर्मचार्यांकडून व या साठी मुद्दाम तरबेज असलेल्या नीलम या श्वानाकडून संपूर्णपणे तपासली जाते. अखेरीस आम्हाला हिरवा सिग्नल मिळतो व आम्ही पुढे निघतो. कुवर बेट, येथे तैनात असलेले सैनिक वगळले तर, बाकी तसे निर्मनुष्य आहे. आजूबाजूच्या जमिनीवर पिवळे पडलेले वाळके गवत व त्यातून मधून मधून वर डोकावणारी बाभळीची झुडुपे या शिवाय काहीच दिसत नाही. मधून मधून दिसणारे उघडे वाकडे खडक मला सह्याद्रीची आठवण करून देतात. मात्र रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंना एका पाठोपाठ एक, सैनिकांचे बंकर्स मात्र दिसत राहतात. एक वळण घेतल्यावर रस्ता बर्यापैकी सरळ होतो व थोड्याच वेळात आम्ही कुवर बेट ओलांडून रणावर असलेला आणखी एक पूल पार करतो व पुढच्या बेटावर प्रवेश करतो. या बेटाला सीमा सुरक्षा दलाने ‘चिडियामोर‘ असे नाव, येथे पक्षी खूप दिसत असल्याने, बहुधा दिलेले असावे. परत एक चेक पोस्ट समोर येते व बस थांबते. येथे बस चालकाने खाली उतरून काही औपचारिकता पूर्ण करणे अपेक्षित असते. बस मधील आमचा गाईड आमचे लक्ष उजव्या बाजूला लांबवर वेधतो व तेथे उभा असलेला चिंकारा किंवा इंडियन गॅझेल आम्हाला दाखवतो. भारतीय वन विभागाने संरक्षित म्हणून ही प्रजाती घोषित केलेली आहे व यांची एकूण संख्या आता मर्यादित असली तरी वृद्धिंगत होते आहे. हे चिंकारा या बेटांवर सुखाने रहातात, कारण त्यांना त्रासदायक ठरतील अशी हिंस्र श्वापदे किंवा माणसे ही दोन्हीही या बेटांवर रहात नाहीत व स्वत:ला परमेश्वराचा आधुनिक अवतार मानणारे चित्रपट नट त्यांची शिकार करण्यासाठी अवैध रित्या येथे फिरकू शकत नाहीत. मॉन्सूनचा काल सोडला तर हे चिंकारा एका बेटावरून दुसर्या बेटावर आरामात रणामधून फिरत असतात.
चिडियामोर बेट पार केल्यावर आता आमची बस खर्या रण प्रदेशातून प्रवास करते आहे. आम्ही प्रवास करत असलेला रस्ता भराव घालून जमीन पातळीपासून सुमारे 3 ते 4 फूट उंच केलेला आहे व रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चौरस आकाराचे चिरे ( दगड) कॉन्क्रीटमध्ये बसवून पेव्हमेंट केलेले आहे. हे पेव्हमेंट बहुधा रण पाण्याने भरले की रस्त्याच्या भरावाची हानी होऊ नये म्हणून केलेले असावे. रस्त्याचे डांबरीकरण केलेले असले तरी तो जेमतेम एक प्रवासी वाहन जाऊ शकेल एवढाच रुंद असल्याने दर 100 मीटर्सवर समोरून येणार्या वाहनांना एकमेकाला क्रॉस करणे सुलभ जावे म्हणून रस्त्याच्या बाहेरील बाजूस कॉन्क्रीट्मध्ये चिरे बसवून शोल्डर्स बांधलेले आहेत. बाजूला दिसत असलेला रणाचा पृष्ठभाग मात्र अजून ओलसरच दिसतो आहे. बर्याच ठिकाणी जमिनीमधे असलेल्या खळग्यांमध्ये पाणी साचलेले अजूनही दिसते आहे. आणखी एखाद्या महिन्याभरात रण वाळून पूर्णपणे शुष्क होईल व मग त्याला पापुद्रे सुटत जातील. मधेच रणामधून आरामात चालताना काही चिंकारा आम्हाला दिसतात. ते बहुधा एका बेटावरून दुसर्या बेटाकडे निघालेले असावेत. सुमारे 4 किमी अंतर रणामधून गेल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा एका बेटावर पोचतो आहोत. या बेटाचे नाव सीमा सुरक्षा दलाने बॉप्स BOPS बेट असे ठेवलेले दिसते आहे. येथे हेलिकॉप्टर उतरू शकतील असा तळ बांधलेला असावा कारण तशी पाटी समोर दिसते आहे. बेटावर पोचल्यावर परत एकदा आसमंत खूपसा बन्नी चराऊ जमिनींसारखा वाटतो आहे. वाळलेले गवत, त्यात मधून मधून काटेरी झुडपे असे दृष्य दिसते आहे. येथे थोडी मोठी विलायती बाभळीची झाडेही बरीच दिसत आहेत. रणातील या बेटांवर आतापर्यंत न बघितलेले एक झुडूप मला दिसते आहे. एखाद्या पुंजक्याप्रमाणे असलेल्या या झुडपातून, सूर्याच्या चित्रात लहान मुले किरण फाकलेले जसे दाखवतात तसे गवताचे दांडे फाकलेले आहेत व त्याला बारीक काटे किंवा पाने असावीत असे दिसते आहे. सेंन्च्रस Cenchrus प्रजाती पैकी ही झुडपे बहुधा असावीत. आम्हाला आणखी काही चिंकारा चरताना दिसतात.
बॉप्स बेट पार केल्यावर आमची बस आता परत एकदा रणामध्ये प्रवेश करते आहे. रस्ता नाकासमोर काढावा तसा सरळसोट दिसतो आहे. हा रस्त्याचा भाग अंदाजे 10 ते 12 किमी तरी असावा व तो सरळ रण ओलांडतो आहे. दोन्ही बाजूंना रणाची वैराण मरूभूमी शिवाय दुसरे काहीही दिसत नाहीये. परत एकदा डाव्या हाताला किंवा पश्चिमेला मला धवल मरूभूमीचे काही पॅचेस तळपणार्या सूर्याच्या उन्हात झगमगून उठताना दिसतात व बसच्या समोरच्या काचेतून पार उत्तरेला, झाडे झुडपे असलेला हिरवा पट्टा असल्याचा भास मधून मधून होत राहतो. बहुधा ते मृगजळ असावे किंवा बेटेही असण्याची शक्यता संपूर्ण नाकारता येत नाही. बाजूला दिसणार्या रणाच्या मरूभूमी मध्ये पाण्याचे ओढे व ओहोळ तेथे काही महिन्यांपूर्वी वहात होते याच्या स्पष्ट झिग–झॅग आकृत्यांच्या खुणा खालील मातीमध्ये दिसत आहेत. रस्ता थोडा पश्चिमेकडे वळतो व पुढे पुढे जात राहतो. सुमारे 30 ते 40 किमी अंतर असेच पार केल्यावर दूर उत्तर क्षितिजावर, मला वर उचललेली जमीन high ground दिसू लागले आहे आणि त्यावर 3 आधुनिक इमारतीही दिसत आहेत. प्रथम हे मृगजळ असावे असे मला वाटते पण त्या इमारती तशाच दिसत राहतात व त्या प्रत्यक्ष असल्याची खात्री पटते आहे. आमच्या गाईडच्या माहितीप्रमाणे या इमारतींना विगाकोट अतिथी गृह Vigokot guest house या नावाने ओळखतात. विगाकोट ही जागा आता आम्हाला हे स्पष्टपणे दर्शवते आहे की आम्ही रण ओलांडले आहे. भौगोलिक दृष्ट्या आम्ही आता सिंधमध्ये आहोत.
विगाकोट या स्थानावर 200 वर्षे पूर्वीपर्यंत एक भुईकोट किल्ला होता व या किल्याचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत असे म्हटले जाते. मला तर कोठे काही अवशेष दिसले नाहीत, परंतु तो भाग अलाहिदा. येथे एका स्थानिक राजाचे संस्थान 1819 मधील भयानक भूकंपापर्यंत होते. परंतु या भूकंपात हा किल्ला व गाव हे सर्व संपूर्णपणे नष्ट झाले आणि या गावाचा एकुलता एक जलस्रोत असलेली व गावाजवळून वाहणारी एक छोटेखानी नदीही आटली. त्यामुळे येथील वस्ती 1819 नंतर बहुधा उत्तरेकडे सरकली असावी.
विगाकोट अतिथी गृहापाशी आमची बस अजूनही थांबलेलीच आहे कारण अजूनही समोर दिसणार्या सीमा सुरक्षा दलाच्या चेक पोस्टवरून आम्हाला स्पष्ट असा कोणताच संदेश मिळालेला नाही. कदाचित आणखी काही औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक असावे. अखेरीस आम्हाला हिरवा दिवा मिळतो व आमची बस तेथून साधारण 200 मीटर अंतरावर असलेल्या एका तारेच्या कुंपणापाशी जाऊन थांबते. मी खाली उतरतो व चालत जाऊन या तारेच्या कुंपणापाशी उभा राहतो. मी आता भारताच्या आंतर्राष्ट्रीय सीमेपाशी पोचलो आहे. या कुंपणापासून साधारण 150 मीटरवर ही आंतराष्ट्रीय सीमा आहे व त्या पलीकडे पाकिस्तानच्या सार्वभौमत्त्वाखालील भूभाग सुरू होतो आहे. प्रत्यक्ष सीमा रेषेवर दर 40 मीटर अंतरावर साडेचार फूट उंचीचे व पांढर्या रंगाने रंगवलेले खांब दिसत आहेत. या खांबांवर आमच्या बाजूला इंडिया व विरुद्ध बाजूस पाकिस्तान अशी अक्षरे कोरलेली आहेत. मात्र पाकिस्तानच्या बाजूला पुढे कोणतेही काटेरी कुंपण घातलेले नाही. भारताच्या बाजूने तिकडे कोणी घुसखोरी करण्याची शक्यता नसल्याने पाकिस्तानला बहुधा अशा कुंपणाची गरज भासत नसावी. आमच्या बरोबर सीमा सुरक्षा दलाचे हवालदार राणा आहेत. ते आम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर देतात. पलीकडे पाकिस्तानने उभारलेले निरीक्षण मनोरे ते आम्हाला दाखवतात. या क्षणाला पाकिस्तानमधील कोणीतरी आमच्या कडे बघतो आहे आणि आम्ही कशासाठी येथे आलो आहोत? असे आश्चर्य मनात व्यक्त करतो आहे ही कल्पनाच मला मोठी थ्रिलिंग वाटते आहे. आमच्या बसमध्ये भारताच्या कानाकोपर्यातून आलेले स्त्री पुरुष आहेत परंतु या क्षणी सीमेवर उभे असताना ते एकच आहेत आणि फक्त भारतीय आहेत हे सर्वांच्या चेहर्यावरून मला स्पष्ट दिसते आहे.
या स्थानाच्या साधारण 5 किमी उत्तरेला कांजरकोट नावाच्या किल्ल्याचे भग्नावशेष आहेत. हा किल्ला विगाकोट येथील संस्थानिकाच्या भावाच्या मालकीचा होता व तेथे सन 1819 पर्यंत त्याचे संस्थान होते. कांजरकोट किल्ला व गाव हे दोन्ही विगाकोट प्रमाणेच भूकंपात संपूर्णपणे नष्ट झाले होते. कांजरकोटच्या आणखी काही किमी उत्तरेला, रहिमकी बझार हे गाव लागते. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, हा सर्व भाग आणि रहिमकी बझार गाव हे कच्छ्च्या राजाच्या अधिपत्याखालील भाग होता. पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर त्याने कच्छच्या या अधिपत्याबद्दल आपत्ती उपस्थित करण्यास सुरुवात केली आणि हा भाग सिंधमध्ये मोडत असल्याने आपल्या सार्वभौमत्त्वाखालील आहे असा दावा भारताकडे केला.
आम्ही उभे असलेल्या स्थानी 1965 या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झाले होते अशी माहिती हवालदार राणा आम्हाला देतात. येथे पाकिस्तानने हल्ला करून सीमा सुरक्षा दलाच्या 6 जवानांना शहीद केले होते. या जवानांच्या रक्ताने पुनीत झालेल्या भूमीवर मला काही क्षण का होईना स्तब्ध उभे राहण्याचे भाग्य लाभते आहे यासाठी मी मनोमन सीमा सुरक्षा दलाचा ऋणी आहे. त्या वेळचे ब्रिटिश पंतप्रधान यांच्या मध्यस्तीने नंतर येथे युद्धबंदी झाली व एक आंतर्राष्ट्रीय लवाद नेमला गेला. या लवादाच्या निर्णयाप्रमाणे कांजरकोट आणि रहिमकी बझार पाकिस्तानला देण्यात आले व विगाकोट भारतात राहिले. पण या सगळ्या घटनांना 47/48 वर्षे लोटली आहेत. आता ही सीमा पूर्णपणे शांत व सुरक्षित आहे. घुसखोरी होऊ नये म्हणून येथे आता काटेरी तारेचे तिहेरी कुंपण घातलेले आहे. माझ्या बायनॉक्युलर मधून पाकिस्तानमधील प्रदेशाचे निरीक्षण करण्यात मी आणखी काही मिनिटे घालवतो. परंतु आता परत जाण्याची वेळ आली आहे व थोड्या जड पावलांनीच आम्ही बसमध्ये चढतो व बस परत एकदा विगाकोट अतिथी गृहाशी पोचते. येथे आमच्यासाठी एका शामियान्यात उत्तम भोजनाची व्यवस्था केलेली आहे. त्या नंतर मी गेस्ट हाऊसच्या गच्चीवरून परत एकदा बायनॉक्युलर्सच्या सहाय्याने पाकिस्तानचा भूप्रदेश न्याहाळतो. मी उंचीवर असल्याने मला आता दिसते आहे की सीमेपार असलेल्या भूभागावर एक छोटीशी टेकडी सीमेच्या समांतर पश्चिमेकडे पसरलेली दिसते आहे. सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला मी या टेकडी बद्दल विचारतो व तेथे टेकडी आहे हे पक्के होते. माझ्या मनात ही टेकडी म्हणजे 1819 च्या भूकंपात तयार झालेली अल्ला बंड ही टेकडी असली पाहिजे असा विचार येतो आहे. या अल्ला बंडमुळेच ज्या नदीला सिंधू नदीचे पूर्वेकडचे मुख असे नाव मिळालेले होते त्या कोरी नदीच्या पात्रात अडथळा निर्माण होऊन तिच्या नदीपात्राचे, दलदलीच्या प्रदेशात रूपांतर झालेले होते. मात्र खरे खोटे सांगणे खूप कठीण असल्याने मी जास्त विचार करणे सोडून देतो. परंतु येथे दिसत असलेली टेकडी अल्ला बंड असण्याची शक्यता माझ्या मनाला वाटते आहे हे नक्की.
दुपारच्या भोजनानंतर आमची बस परत एकदा रण ओलांडून खावडा गावाकडे जाण्यास निघते. वर तळपणार्या सूर्याच्या प्रखर उन्हात आता प्रवास करावयाचा आहे ही कल्पनाही मला नकोशी वाटते. परंतु बस चालक वातानुकूलन यंत्र चालू करतो आणि त्या सुखद गारव्यात सर्वांचेच डोळे मिटतात. धर्मशाळा चेक पोस्ट पाशी गरम गरम चहाची व्यवस्था आहे. तो घेऊन खावडा मध्ये आम्ही पोचतो आहोत तोपर्यंत दुपारचे 4 वाजून गेले आहेत. रणाला दिलेली भेट जरी संपली असली तरी एक प्रमुख आकर्षण अजून बघायचे राहिले आहे. आमचा गाईड जेंव्हा आता आपण कालो डुंगर किंवा Black hillकडे आता जाणार आहोत याची घोषणा करतो तेंव्हा मी जरा साशंकतेनेच त्याला तिथे काय आहे असे विचारतो. परंतु तिथे एक मंदिर आहे एवढीच माहिती मला मिळते. बस साधारण पूर्वेकडे जाणार्या एका रस्त्याकडे वळते. पुढचे 10 ते 15 किमी रस्ता असंख्य चढउतारांचा आहे. मात्र बाहेर दिसणारा आसमंत मोठा वैशिष्ट्यपूर्ण दिसतो आहे. बाजूला दिसणार्या टेकड्या व दर्या या एकावर एक फरशा रचून तयार केल्या आहेत की काय असे दृष्य बाहेर दिसते आहे. 2001 च्या भूकंपात या दर्याखोर्यांमधे प्रचंड पडझड झालेली आहे व ती अजूनही अर्थात तशीच आहे. वाटेत एक टेकडी चुंबकीय टेकडी या नावाने प्रसिद्ध आहे. बसमध्ये मला तरी फारसे काही विशेष जाणवत नाही. बस वर पोचते व मुद्दाम तयार केलेल्या वाहन तळावर उभी राहते. आता येथून पुढे निदान अर्ध्या ते पाऊण किलोमीटर लांबीचा अगदी खड्या चढाचा रस्ता समोर दिसतो आहे. बसमधले बरेच जण गारठतात. मी नेटाने पुढे जाण्याचे ठरवतो. पहिल्या लागणार्या शिखरावर एक देऊळ आहे त्याच्याकडे मी फक्त एक दृष्टीक्षेप टाकतो व पुढे आणखी उंचावरील शिखराकडे चालू लागतो. या शिखरावर आसमंताचे निरीक्षण करण्यासाठी एक निरीक्षण चौथरा उभारलेला आहे.
या निरीक्षण चौथर्यावरून दिसणारे दृष्य मात्र इतके अप्रतिम आहे की वर येण्यासाठी घेतलेले कष्ट मी केंव्हाच विसरलो आहे. माझ्या अगदी डावीकडे अगदी पार क्षितिजापर्यंत धवल मरूभूमी पसरलेली मला दिसते आहे. त्याच्या एका कडेला थोडी मिठागरे आहेत. समोरच खावडा व कुवर बेट मार्गे पाकिस्तानातील सिंध प्रांत यांना जोडणारा इंडिया ब्रिज व त्याच्या मागे कुवर बेट दिसते आहे. इंडिया ब्रिजच्या उजवीकडे दिसते आहे अथांग रण. मात्र या उंचीवरून रणाचा हा भाग वैराण मरूभूमी दिसत नसून निळसर ग्रे रंगाचा एक अथांग सागर वाटतो आहे. या सागराच्या किनार्यावरील कडा खर्या समुद्रकाठी लाटांच्या फेसामुळे दिसतात तशा पांढर्याशुभ्र दिसत आहेत. मात्र येथे त्या तशा साचलेल्या मिठामुळे दिसत आहेत. या जागेवरून रण हे एखाद्या समुद्राच्या खाडीसारखे दिसते आहे. कोण्या जादूगाराने करावा तसा हा प्राकृतिक दृष्टी विभ्रम निसर्ग मला दाखवतो आहे.
नंतर तिन्हीसांजाच्या सुमारास मी कॅम्पवर परत पोचतो, गुजराथी जेवणाचा आस्वाद घेऊन आणखी एक सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम डोळे मिटू लागेपर्यंत बघतो. परंतु अंथरुणावर पडल्यावर मला निद्राधीन होण्यासाठी बरीच वाट बघावी लागते. रण, भारतीय सीमा आणि कालो डुंगरच्या माथ्यावरून दिसणारे अशक्यप्राय दृष्य हे सर्व माझ्या नजरेसमोरून बाजूला व्हायलाच तयार नाहीत.
उद्या मी परत भूजकडे जाण्यासाठी निघणार.
(क्रमश)
इतिहासाच्या सोबतीने कच्छ आणि काठेवाड, भाग 4
शुक्रवार
मी आज सकाळी जरा लवकरच तयार झालो आहे. भोजन कक्षात जाऊन मी चटकन न्याहरी उरकतो व भारताच्या एका दुर्लक्षित कोपर्यामधे स्थापन केलेल्या या विस्मयकारक कॅम्पला अलविदा म्हणतो. अतिशय आरामदायी व्यवस्था आणि कॅम्प व्यवस्थापनाने दाखवलेले उत्तम आतिथ्य यामुळे गेले 3 दिवस इतक्या पटकन संपले आहेत की विश्वास बसणेही कठीण होते आहे. बिनचूक प्लॅनिंग आणि त्याच बरोबर कमालीची कार्यक्षमता यामुळे कॅम्प व्यवस्थापनाला मला मनापासून दाद द्याविशी वाटते आहे. आमची बस कॅम्प सोडते व काही वेळातच परत एकदा भिरंडीयारनी गावात थांबते. या गावातला थांबा हा पूर्वीच्या मुंबई–पुणे रस्त्याला जसा खोपोलीचा थांबा अनिवार्य असे तसाच बहुधा इथल्या वाहन चालकांना वाटत असावा. परंतु या खेपेस मात्र मी बसमधून खाली उतरतो व दुधापासून बनवलेला इथला प्रसिद्ध मावा खरेदी करतो. भूजमध्ये मी पोचतो तेंव्हा सकाळचे 11 वाजले आहेत आणि हॉटेलमध्ये चेक इन करायला मला काहीच अडचण नाही. आजचा दिवस मी या पुरातन शहरामध्ये साइट सीइंग करण्यात घालवायचा असे ठरवले आहे. या शहराचे भूज हे नाव येथे जवळच असलेल्या 160 मीटर उंचीच्या भुजियो डुंगर किंवा Serpant Hill या नावाने ओळखल्या जाणार्या पर्वतामुळे पडले आहे. सर्पांचा राजा भुजंग याचे हे वसतीस्थान होते अशी एक आख्यायिका आहे व त्यामुळे या पर्वतावर भुजंगाचे एक मंदीर सुद्धा आहे.
8व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत कच्छ्वर सिंध मधील सामा या राजपूत घराण्याची सत्ता होती. हा काळ सिंधच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी ज्याबद्दल लिहून ठेवावे असा सुवर्णकाल होता असा समज आहे. या नंतर या राजांची सत्ता कमजोर पडत गेली. राजघराण्याच्या अंतर्गत अनेक कट कारस्थाने व हत्या घडवल्या गेल्या आणि अखेरीस या सामा राजपुतांचे वंशज असलेलेच लाखो जडेजा घराणे सत्तेवर आले. तेंव्हापासून हे घराणे जडेजा राजपूत या नावाने ओळखले जाते. या राजांनी सिंधमधून कच्छ्चा राज्यकारभार न चालवता तो कच्छ मधील अंजर गावातून चालवण्यास सुरुवात केली. कच्छच्या भौगोलिक मध्यावर भूज गाव येत असल्याने त्याचे महत्त्व ओळखून इ.स.1549 मध्ये खेंगराज 1 या राजाने आपली राजधानी भूजला हलवली आणि कच्छची भूज ही राजधानी अस्तित्वात आली.
प्रथम मोगल काळात व नंतर ब्रिटिश राजवटीत, जडेजा राजे बर्याच प्रमाणात आपले स्वतंत्र सार्वभौमत्त्व राखण्यात यशस्वी ठरल्याने भूज शहराला स्वत:चे असे एक व्यक्तिमत्त्व राखून ठेवता आले आहे. 18 व्या शतकात गादीवर आलेल्या लखपतजी 1 यांच्यापासून पुढे गादीवर आलेल्या सर्व जडेजा राजांनी भूजमध्ये नवे नवे महाल बांधले आणि शहर शोभिवंत करण्याकडे लक्ष बरेच केंद्रित केले. परंतु दर काही दशकांनंतर होत गेलेल्या महाभयंकर भूकंपांमुळे कच्छ्मध्ये बांधल्या गेलेल्या जवळपास सर्व इमारती जमीनदोस्त होत राहिल्या व जडेजा राजांनी बांधलेले महाल सुद्धा याला अपवाद ठरू शकले नाहीत. या भूकंप मालिकेपैकी सर्वात भयावह भूकंप 16 जून 1819 या दिवशी झाला. यानंतर 1844-45, 1864 आणि शेवटी 2001 मध्ये असेच जबरदस्त भूकंपाचे झटके भूजला बसले. या भूकंपांमध्ये कच्छ मधील जवळपास सर्वच जुन्या इमारती जमीन सपाट झालेल्या आहेत.
ऐना महल
भूजच्या साधारण मध्यभागात असलेल्या हमिसर तलावाच्या चहूबाजूंना भूजमधील बहुतेक प्रेक्षणीय स्थळे बांधलेली/ बनवली गेलेली असल्याने भूज मधील पर्यटन हे फारशा प्रयासांविना पर्यटकांना करता येते. मागच्या वर्षी हा तलाव तुडूंब भरून वहात होता म्हणे! परंतु या वर्षी पाऊसच न पडल्याने तलावात पाणीच नाहीये. तलावाभोवतीची प्रेक्षणीय स्थळे बघण्याआधी मी प्रथम पेटपूजा करण्याचे ठरवतो व बस स्टॅन्ड जवळील एका बर्या दिसणार्या हॉटेलात जाऊन कच्छी पावभाजीची ऑर्डर देतो. चमचमीत पावभाजीच्या भोजनानंतर भूजमधील साइट सीइंग, हमिसर तलावाच्या काठावर असलेल्या ऐना महालापासून सुरू करावे असे ठरवून एक रिक्षा ठरवतो. भूजमधील रिक्षा मात्र अत्यंत त्रासदायक वाटतात. एकतर बसण्यासाठी असलेल्या सीट्स आरामदायक अजिबातच नाहीत व पळताना त्या आवाजही प्रचंड प्रमाणात करत राहतात. ऐना महालाच्या प्रवेशद्वाराशी पोचल्यानंतर मात्र माझी मोठी निराशा होते. ईदची सार्वजनिक सुट्टी असल्याने ऐना महालाचे दरवाजे बंद असल्याचे मला दिसते आहे.
1750 मध्ये राव लखपतजी यांनी या महालाचे बांधकाम करून घेतले होते. या साठी त्यांनी आधीच्या वर्षांत रामसिंघ मालम या कारागिराला आरसे बनवणे आणि धातू काम यांचे विशेष शिक्षण घेण्यासाठी युरोपला पाठवले होते. होते. तो परत आल्यावर त्याने या महालाचे काम व्हेनिसहून काचा मागवून पूर्ण केले होते. या दुमजली इमारतीत दरबार हॉल, आरसे महाल आणि राजपरिवारासाठी कक्ष बनवण्यात आले होते. संगमरवरी फरशांनी आच्छादलेल्या भिंती व त्यावर सोन्याचे पाणी चढवलेल्या पत्र्याच्या कोंदणांत बसवलेले आरसे हे या महालाचे वैशिष्ट्य मानले जाते. त्याचप्रमाणे तळाच्या थोड्या वर असलेल्या एका प्लॅटफॉर्मवर बसवलेली कारंजी हे ही या महालाची एक खासियत आहे. हा महाल रामसिंघ मालम याच्या कारागिरीची कमाल मानली जाते. 18व्या शतकाच्या मध्यावर बांधलेला व युरोपियन छाप असलेल्या भारतीय स्थापत्याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या महालाचे नेहमीच नाव घेतले जाते.
ऐना महालाच्या बाह्य भिंतीवरील कोरीव काम
प्रागजी महाल
ऐना महालाच्या अगदी बाजूलाच हा महाल आहे. 1838-76 या कालात कच्छच्या गादीवर असलेले राव प्रागमलजी दुसरे यांनी या महालाचे बांधकाम करून घेतले होते. या महालाचे डिझाइन एक सुप्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद कर्नल हेनरी सेंट विल्किन्स यांनी केलेले होते. याच काळात बांधल्या गेलेल्या पुण्यातील डेक्कन कॉलेज, ससून हॉस्पिटल आणि ओहेल डेव्हिड सिनेगॉग (लाल देऊळ) या सारख्या इमारतींचे आराखडे याच वास्तुविशारदांनी केलेले असल्याने हा महाल मला अगदी सुपरिचित असल्या सारखाच भासतो आहे. हा महाल बांधण्यासाठी 10 वर्षे लागली व अंदाजे 20 लाख रुपये एवढा खर्च आला होता. मला मात्र हा महाल, मुंबईच्या फोर्ट विभागात असलेला राजाभाई टॉवर व त्या शेजारील मुंबई विद्यापीठाची मुख्य इमारत, या दोन्ही सारखाच हुबेहुब वाटतो आहे व त्यामुळे त्याची खास अशी छाप माझ्यावर पडू शकत नाहीये. या महालाच्या व्हरांड्यातील आधार स्तंभ आणि त्यावरील कॉर्निस हे भाग सुद्धा मला ओळखीचेच भासत आहेत. हा महाल सुदैवाने प्रवेश करण्यास आज खुला आहे. मी प्रवेश पत्रिका विकत घेतो व आत पाऊल टाकतो.
ब्रिटिश काळात भारतात असलेल्या अनेक छोट्या छोट्या संस्थानिकांचे जसे महाल होते साधारण त्याच धर्तीवर असलेल्या या महालामधे आता एक संग्रहालय बनवण्यात आलेले आहे. त्या कालातील फर्निचर, राजपरिवारातील व्यक्तींच्या वापरातील वस्तू, तैलचित्रे, भांडीकुंडी, शिकारीत मारलेल्या प्राण्यांची पेंढा भरलेली डोकी, बंदुका आणि राजपुत्र व राजकन्या यांची खेळणी या सारख्या गोष्टी येथे मांडून ठेवलेल्या दिसत आहेत. राव प्रागमलजी यांच्या दरबार हॉलचे नूतनीकरण चालू असल्यामुळे तो हॉल बंदच आहे. या संग्रहालयातील वस्तूंपैकी मला सर्वात काय आवडले असेल तर राजा रविवर्मा यांनी चित्रित केलेल्या चित्रांच्या छापील प्रतींची एक फ्रेम करून ठेवलेली मालिका. या फ्रेम्समध्ये या चित्रांमधील व्यक्तींच्या, विशेषेकरून स्त्रियांच्या अंगावरील वस्त्रांचे पदर किंवा काठ यावर बारीक चमचम करणारे खडे चिकटवले आहेत व त्यामुळे या चित्रांचे मूळ सौंदर्य मोठे खुलून दिसते आहे.
या प्रासादाच्या गच्चीवरून मला जवळचा असलेला पण संपूर्णपणे आटलेला हमिसर तलाव दिसतो आहे. त्याच प्रमाणे पलीकडेच असलेला रामकुंड हा पाणी तलाव ही कोरडा ठणठणीत दिसतो आहे. महालाच्या पुढच्या पोर्चपाशी एक चाकांवर बसवलेली तोफ ठेवलेली आहे. तिचा वापर कधी झाला असेल असे वाटत नाही. ही तोफ़ बहुधा एक शो पीस म्हणूनच ठेवलेली असावी. या महालाच्या समोर असलेल्या राणी महालाची 2001 मधील भूकंपात अपरिमित हानी झालेली असल्याने प्रागजी महालाचा संपूर्ण परिसर हा पडझड झालेल्या अवस्थेत दिसतो आहे. समोर दिसणारी तोफ या पडझडीची एकुलती एक मूक साक्षीदार असावी असे माझ्या मनाला वाटत राहिले आहे.
रामकुंड
या राणी महालाची एवढी हानी भूकंपामध्ये झालेली आहे की यात प्रवेश करणेही धोकादायक समजले जाते आहे. या राणी महालाचे स्थापत्य मात्र अप्रतिम आहे यात शंकाच नाही. गवाक्षे आणि द्वारे यांच्या बाहेर असलेल्या षटकोनी आकाराच्या बाल्कनी व त्यावर बसवलेल्या आणि कोरीव काम करून तयार केलेल्या जाळ्या, दरवाज्यांबाहेरील चौकटी या अतिशय सुंदर रितीने बनवल्या गेलेल्या आहेत. राणी महालाच्या स्थापत्याचे बाहेरून कौतुक करण्याशिवाय बाकी काहीच करणे शक्य नसल्याने मी तेथे काही मिनिटे घालवतो व कच्छ संग्रहालयाकडे जाण्यास निघतो.
महाराव खेंगरजी तिसरे यांनी सन 1877 मध्ये या संग्रहालयाची स्थापना केली होती. जुन्या काळातील स्थापत्याची वैशिष्ट्ये दाखवणारे नमुने, कच्छमधील हस्तकलांचे नमुने याचा मोठा संग्रह येथे आहे. परंतु ईदची सुट्टी असल्याने हे संग्रहालयही बंदच आहे. मला संग्रहालयाची बंद दारे बघूनच समाधान मानणे आवश्यक आहे.
राणी महाल
हातात भरपूर वेळ असल्याने जवळच असलेल्या स्वामी नारायण मंदीराला भेट देण्याचे मी ठरवतो. हे देऊळ म्हणजे झगमग करणार्या भव्य आधुनिक स्थापत्याचा एक नमुना आहे. या भव्य देवळाच्या वास्तूमधील स्तंभ आणि भिंती यावर संपूर्णपणे संगमरवर पाषाणाच्या फरशा बसवलेल्या असल्याने देऊळ संगमरवरातून बनवले असल्याचा भास होतो आहे. स्तंभ आणि बाहेरील भिंती यावर फुल रिलिफ प्रकारच्या अक्षरशः हजारोंच्या संख्येने मूर्ती–शिल्पे बसवलेली आहेत. ही शिल्पे मला छापलेल्या चित्रांप्रमाणे असावी अशी किंवा अगदी एकसारखी दिसणारी, वाटतात. शिल्पातील मूर्तींचे ओठ व कपाळावरील टिळा हा लाल रंगात रंगवलेला पाहून मात्र मला गंमत वाटते आहे. या देवळात भाविकांची नुसती झुंबड उडालेली आहे.
स्वामीनारायण मंदीराला भेट देऊन मी जवळच असलेल्या छटर्डी या ठिकाणाजवळ रिक्षा उभी करण्यास सांगतो. छटर्डी म्हणजे छत्र्या. पुण्याला शिंद्याची छत्री या नावाने प्रसिद्ध असलेली महादजी शिंद्यांची समाधी आहे. त्याच धर्तीवर कच्छ्च्या राजांच्या येथे छत्र्या किंवा समाध्या आहेत. यापैकी बहुतेक छत्र्या 2001 च्या भूकंपात पूर्णपणे कोसळल्या व आता त्यांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती सुरू आहे. या छत्र्यांभोवती एक संरक्षक भिंत उभारून आत जाण्यास बहुधा मज्जाव केलेला आहे. मी दुरूनच या छत्र्या बघतो व काही छायाचित्रे काढतो. या छत्र्यांवर मूळ स्वरूपात अतिशय उत्तम शिल्पे कोरलेली होती याच्या खुणा अजूनही स्पष्टपणे दिसत आहेत.
छटर्डी
हॉटेलवर परतण्याच्या आधी भूजमधील मुख्य बाजारपेठेमध्ये मी थोडा वेळ घालवतो व काही खरेदी करतो. नंतर हॉटेलवर व्यवस्थित भोजन घेऊन मी निद्रेची आराधना जरा लवकरच करण्याचे ठरवतो. भूजपासून सुमारे 250 किमी अंतरावर असलेल्या एका स्थानी मला उद्या जायचे आहे. हे ठिकाण, सुमारे 4000 वर्षांपूर्वी 20000 रहिवासी रहात असलेले व अत्यंत भरभराटीस आलेले व श्रीमंत असे बंदर व शहर होते. अर्थात आता तेथे फक्त भग्नावशेष उरलेले आहेत.
(क्रमश)
इतिहासाच्या सोबतीने कच्छ आणि काठेवाड, भाग 5
शनिवार
कच्छ्च्या रणाच्या साधारण मध्यभागी 313 चौरस किमी क्षेत्रफळाचे एक बेट आहे. या बेटाला खादिर बेट या नावाने ओळखले जाते. मी गुरुवारी भेट दिलेला व रणाच्या दक्षिण किनार्यालगत खड्या असलेल्या कालो डुंगर किंवा Black hill या नावाने परिचित असलेल्या पर्वतरांगांच्या साधारण पूर्वेला हे बेट येते. कालो डुंगर नजिकचा किनारा व खादिर बेट यामधील सरळ रेषेचे अंतर 25 किमी पेक्षा कमीच भरेल. परंतु या दोन्हींना जोडणारा कोणताच रस्ता अस्तित्वात नाही. गुजरात सरकारने काही काळापूर्वी या दोन्हींना जोडणारा रस्ता व पूल बांधण्याची तयारी केली होती. परंतु मध्यवर्ती सरकारने नेमलेल्या एका तज्ञांच्या समितीने असा रस्ता व पूल बांधण्याची कल्पना रणाच्या पर्यावरणास अत्यंत घातक ठरेल असे मत व्यक्त केल्याने हा प्रकल्प गुजरात सरकारला बासनात गुंडाळून ठेवणे भाग पडले.
मी आज भेट देऊ इच्छित असलेले स्थान, धोलाविरा, हे या खादिर बेटाच्या पश्चिम टोकावर असलेली एक छोटी वस्ती आहे. परंतु सरळ रस्ता नसल्याने मला रणाच्या काठाने जाऊन या बेटाच्या पूर्व टोकाकडून या बेटावर प्रवेश घेणे गरजेचे आहे. या बाजूने खादिर बेटावर येण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे. या रस्त्याने भूज आणि धोलाविरा यामधे पडणारे 250 किमी अंतर लक्षात घेऊन सकाळी शक्य तितक्या लवकर भूजहून प्रयाण करण्याचा माझा बेत फारसा यशस्वी होत नाही व मी हायवे 42 वर प्रवेश करतो तेंव्हा घड्याळात सकाळचे पावणेआठ वाजून गेल्याचे माझ्या लक्षात येते आहे. आहे. भूजच्या सीमेच्या बाहेर पडल्याबरोबर उजव्या हाताला मला भुजंगिया डुंगर किंवा Hill of the serpent व त्यावर असलेल्या भारदस्त किल्याची मजबूत तटबंदी दिसते आहे. हायवे 42 मात्र मोठ्या सुस्थितीत राखलेला दिसतो आहे. मात्र इतक्या ठिकाणी या रस्त्यावर पुराचे पाणी येऊ नये म्हणून सांडवे बांधण्याचे काम चालू आहे की त्यासाठी प्रत्येक वेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या डायव्हर्शन्स वरून गाडी न्यावी लागत असल्याने दर काही मिनिटांनी गाडीची गती अगदी हळू होते आहे. या हायवेच्या भूज ते भचाउ या संपूर्ण टप्यावर रस्त्याच्या उजव्या हाताला मोठमोठे उद्योग धंदे उभे राहताना दिसत आहेत. गाडीच्या ड्रायव्हरच्या म्हणण्याप्रमाणे हा सर्व विकास गेल्या 10 वर्षात झालेला आहे व त्याच्या आधी ही सर्व जमीन वैराण व ओसाड स्वरूपात होती. सकाळचे सव्वादहा वाजलेले असताना आम्ही सामखियाली गावाजवळ पोचतो आहोत व नंतर चित्रोड या गावाकडे जाण्यासाठी राष्ट्रीय हमरस्ता 15 वर वळतो आहोत. चित्रोड जवळ हा रस्ता सोडून आम्ही रापर गावावरून पुढे जाणार्या हायवे 51 वर वळतो. .वन प्रदेशातून जाणारा हा संपूर्ण रस्ता सुद्धा अतिशय सुस्थितीत आहे. हा वन विभाग सुद्धा कच्छ्मध्ये इतरत्र ठिकाणी दिसणार्या वनांसारखाच आहे. कोरडी जमीन, त्यावर वाळलेले गवत आणि बाभूळ व विलायती बाभूळ यांची झाडे झुडपे हेच दृष्य सगळीकडे दिसते आहे. मात्र सर्वत्र दुभत्या जनावरांचे मोठे कळप चरताना दिसत आहेत. रापर नंतर देसालपार, बालासार आणि लोडराणी या खेड्यांमधून हा रस्ता जातो व अखेरीस पश्चिमेकडे वळतो. लोडराणी खेड्यापासून सुमारे 8 किमी अंतरावर मला नाकासमोर जाणारा एक लांब पूल समोर दिसतो आहे. व हा पूल परत जमीन लागेपर्यंत धवल मरुभूमीमधून जाणार आहे हेही लक्षात येते आहे.
आमची गाडी पुलावरून जाऊ लागल्यानंतर दोन्ही बाजूकडील परिसराचे गाडीच्या काचेतून मला दिसणारे दृष्य, थोडक्यात सांगायचे तर एखाद्या स्वप्नातील दृष्याप्रमाणे अवर्णनीय आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसते आहे ती पार क्षितिजाला जाऊन पोचणारी धवलता. माझे दिशा ज्ञान आता हरवल्यासारखेच झाले आहे कारण डोळ्यासमोर दिसणारा डांबरी रस्ता सोडला तर सर्व दिशांना शुभ्र धवलतेशिवाय दुसरे काही दिसतच नाहीये. या धवलतेच्या वर आहे निळे स्वच्छ आकाश आणि तळपणारा सूर्य. अशा भ्रामक वातावरणात आम्ही बरीच मिनिटे घालवतो व अखेरीस पूल संपतो व आमची गाडी खादिर बेटावर पोचते आहे. रणातील इतर बेटांप्रमाणे हे बेट निर्मनुष्य नसून येथे छोटी छोटी बरीच खेडेगावे आहेत. रस्त्याने जाता जाता अमरपूर, गणेशपूर, बांबिनिका व अखेरीस जनान या गावांच्या पाट्या मला दिसतात. जनान मध्ये सीमा सुरक्षा दलाची एक चौकी आहे. येथून आम्ही पुढे जातो आणि मला समोर एक प्रशस्त असा वाहनतळ आणि ‘धोलाविरा पुरातत्त्व संग्रहालय असा मोठा नामफलक दिसू लागतो. मी घड्याळाकडे बघतो. दुपारचे सव्वाबारा झाले आहेत आणि आम्ही गुजरात शासनाने बनवलेल्या प्रशस्त व आरामदायी रस्त्याच्या कृपेने धोलाविराला अगदी वेळेत पोहोचतो आहोत.
बर्याच वाचकांना असा प्रश्न पडला असण्याची शक्यता आहे की भारताच्या पश्चिम सीमेजवळच्या एका कोपर्यातल्या स्थानावर असलेल्या व कोणत्याही मोठ्या शहर किंवा गावापासून दूरवर असलेल्या या खादिर बेटावर येण्यासाठी एवढी धडपड करून येण्याचा मी का प्रयत्न करतो आहे? अर्थातच यामागे एक कारण आहे. पुरातत्त्व विभागाचे संचालक श्री जगत पती जोशी यांनी 1967-68 मध्ये शोधून काढलेल्या व 1990 ते 2005 एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये दरवर्षी या जागी श्री आर. एस. बिश्त यांच्या नेतृत्त्वाखाली केले गेलेल्या उत्खननामुळे, भारताच्या इतिहासपूर्व कालाबद्दल आपल्या व परकीयांच्या मनात असलेले अनेक गैरसमज आणि भ्रम, निखालस खोटे असल्याचे आढळून आले आहे आणि त्या कालखंडामधील भारतीय द्वीपकल्पामधे सत्य परिस्थिती काय होती याची बर्यापैकी कल्पना या उत्खननामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकली आहे. त्यामुळे या जागेला मला भेट द्यायचीच आहे.
धोलाविरा संग्रहालयाजवळ मी थोडी चौकशी करतो व पुढच्या 2 तासासाठी श्री रावजीभाई यांना या पुरातन महानगरामध्ये फेरफटका करताना गाईड म्हणून घेण्याचे ठरवतो व त्यांच्या बरोबर, समोर दिसणार्या एका टेकडीवजा उंचवट्याच्या दिशेने चालण्यास सुरुवात करतो.
या टेकाडाचा बराचसा भाग उत्खनन करून फोडलेला दिसतो आहे. प्रथम समोर दिसते आहे सध्या पूर्ण कोरडी ठणठणीत असलेली आणि ‘मनहर‘ हे नाव असलेली एक पावसाळी नदी. या नदीवर कधी काळी बांधलेल्या एका पुरातन बंधार्याचे दगड पात्रात पडलेले दिसत आहेत. रावजी भाई सांगतात की या टेकाडाच्या वायव्य कोपर्यालगत सुद्धा ‘मनसर‘ या नावाची आणखी एक अशीच पावसाळी नदी आहे. या दोन नद्यांतून, पावसाळ्यात वाहणार्या पाण्याचा पूर्णत: वापर करता येईल अशी व्यवस्था या नगरीमधील नियोजनकारांनी केली होती. या पुरातन नगरीत एके काळी 15000 ते 20000 नागरिक रहात असत त्यांना पिण्यासाठी व इतर उपयोगासाठी पुरेसे पाणी केवळ या दोन पावसाळी नद्यांमधून उपलब्ध होत होते. परंतु 1 किंवा 2 महिनेच उपलब्ध होत असलेले हे पाणी वर्षभराच्या उपयोगासाठी म्हणून साठवून ठेवण्याची अतिशय विस्मयकारक व्यवस्था धोलाविरामधील नियोजनकारांनी केली होती.
टेकडाच्या पुढे उजव्या हाताला प्रथम मला दिसतो आहे एक मोठा पाणी साठवण्याचा तलाव. या तलावाच्या एका बाजूच्या भिंतीच्या कडेने पायर्या खोदलेल्या दिसत आहेत. ‘मनहर‘ नदीचे पाणी प्रथम या तलावात वहात येत असे. या तलावालगत 11 ते 13 मीटर रुंदीची एक भिंत मला दिसते आहे. मातीच्या विटा व मातीचेच प्लॅस्टर वापरून बांधलेल्या या भिंतीला दोन्ही बाजूंनी दगड किंवा चिरे पृष्ठभागांवर बसवून त्यांना मजबूती आणलेली आहे. इजिप्त मधल्या पिरॅमिडच्या भिंतींना जसा ढाळ दिलेला दिसतो तसाच काहीसा ढाळ या भिंतीला आहे. या नगरीतील किल्ल्याला चहूबाजूंना असलेल्या चार भिंतींची मजबूत तटबंदी केलेली होती. रावजीभाई मला सांगतात की हे शहर अस्तित्वात होते त्या 1200 वर्षांच्या कालखंडात ( इ.स.पूर्व 2600 ते इ.स.पूर्व 1400) या तटांची उंची 3 किंवा 4 वेळा वाढवली गेलेली होती. किल्यामध्ये पिण्याचे पाणी साठवण्यासाठी स्वतंत्र हौद व एक विहीर होती. या विहीरीचे पाणी बैलाच्या सहाय्याने मोटेद्वारा उपसले जात असे. पाणी साठवण्याच्या किल्यामधील हौदांच्या तळाला मध्यभागी गाळ साठून रहावा व वरील पाणी स्वच्छ रहावे म्हणून चौरस आकाराची कुंडे तळाशी खोदलेली होती. होती.या कुंडात पाण्यातील गाळ व इतर जड कचरा साठून रहात असे व ठरावीक कालानंतर या कुंडांमधील गाळ साफ केला जात असे.
पूर्वेकडचे महाद्वार
धोलाविरा मधे पर्जन्य वृष्टीचे प्रमाण अतिशय स्वल्प असले तरी पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब साठवला जाईल अशी परिपूर्ण व्यवस्था केलेली होती. या साठी तटाच्या भिंतींना उभे चर ठेवलेले होते व यातून खाली येणारे पाणी भाजलेल्या मातीच्या बनवलेल्या नळांतून आणून एका हौदामध्ये साठवले जात होते.
पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी बांधलेला चर
उत्तर महाद्वार
गुळगुळीत पॉलिश केलेला स्तंभाचा तळातील दगड
स्टेडियमच्या बाजूस प्रेक्षकांना बसण्यासाठी बांधलेल्या पायर्या
किल्यामधील विहीर
किल्यावरून पश्चिमेच्या बाजूस दिसणारी धवल मरूभूमी
धोलाविरा किल्यामध्ये पाणी पुरवठा वर्षभर सुरळीतपणे व्हावा या साठी केलेल्या योजनेच्या कांकणभर सरस अशी योजना, किल्यातील सांडपाणी बाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी धोलाविराच्या नियोजनकारांनी केली होती. किल्यामध्ये असलेल्या महालांमधील खोल्यांच्या कोपर्यांतून, भाजलेल्या मातीतून बनवलेले सांडपाण्याचे नळ भिंतींच्या तळाना बसवलेले होते. या नळांतून वाहत जाणारे पाणी मुख्य सांडपाण्याच्या वाहिनीला जोडलेले होते. जमिनीखालून जाणार्या या सांडपाण्याच्या वाहिन्यांमध्ये हवा अडकून पाण्याचा प्रवाह बंद होऊ नये यासाठी जमिनीवर उच्छ्वास बांधलेले होते. सांडपाणी नंतर पश्चिमेला, शहरापासून जवळच असलेल्या समुद्रात ( सध्या तेथे धवल मरूभूमी आहे) सोडले जात असे. प्रत्येक खोलीच्या कोपर्यात वापरलेले पाणी फेकून न देता साठवण्यासाठी ते मातीच्या मोठ्या कुंभांत साठवून ठेवण्याची प्रथा होती असे दिसते.
किल्याच्या पश्चिम तटबंदीच्या बाहेर सेवकवर्गाची निवासस्थाने आणि धान्य साठवून ठेवण्यासाठी मोठे हौद बांधलेले होते. त्याच्या पलीकडे आणखी अनेक पाणी साठवण्याचे तलाव बांधलेले होते. किल्याच्या पूर्व, उत्तर आणि पश्चिम तटबंदीमध्ये प्रवेशद्वारे बांधलेली होती. या द्वारांजवळ 1 किंवा 2 देवड्या बर्याच उंचीवर बांधलेल्या आढळून आलेल्या आहेत. कदाचित उंटांवर बसण्यासाठी चढ उतार या देवड्यांमधून केली जात असावी. देवडीला 3 बाजूंना भिंती बांधलेल्या होत्या व आता येण्याच्या मार्गाजवळच्या बाजूला दगडी गोलाकार स्तंभ उभारून छताला आधार दिलेला होती. हे गोलाकार स्तंभ एकमेकात अड्कवले जातील अशा छोटे गोलाकार आकाराचे चिरे एकावर एक ठेवून बनवलेले होते व हे गोलाकार तुकडे आजही इतस्ततः पडलेले दिसू शकतात. किल्याच्या मध्यभागी असलेल्या मार्गाचे, पॉलिश केलेल्या सॅन्डस्टोनचे व 4 फूट उंचीचे असे स्तंभ जमिनीवर उभे करून 3 भागात वर्गीकरण केलेले होते. उत्तर द्वाराजवळच्या एका देवडीत, पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांना, सिंधू संस्कृतीतील चिन्ह लिपी मध्ये लिहिलेला आणि 15 इंच उंच असलेली चिन्हे असलेला एक मोठा नामफलक सापडला होती. 3 मीटर लांबीचा हा फलक लाकडी होता व त्यावर जिप्सम या खनिजातून कोरलेली 10 चिन्हे बसवून हा नामफलक बहुधा द्वारावर उभा केलेला असावा. हे शहर नष्ट झाल्यावर हा फलक बहुधा तसाच देवडीमध्ये पडून राहिल्यामुळे त्याचे लाकूड कुजून नष्ट झाले व फक्त जिप्समची चिन्हे खालच्या पाषाणावर चिकटून राहिल्याने टिकली. पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मताने या नामफलकावर या शहराचे नाव बाहेरगावांहून येणार्या प्रवाशांना वाचता यावे म्हणून मोठ्या आकारात लिहिलेले होते.
उत्तर द्वाराबाहेर 10000 प्रेक्षक बसू शकतील असे एक मोठे स्टेडियम बांधलेले होते. हे स्टेडियम सांस्कृतिक किंवा औपचारिक समारंभ आणि आठवड्याचा बाजार या सारख्या प्रसंगी बहुधा वापरले जात असावे, धोलाविरा हे बंदर असल्याने तेथे कोणते जहाज माल घेऊन आले की त्यावरील मालाची खरेदी विक्री सुद्धा या स्टेडियम मध्ये केली जात असल्याची शक्यता वाटते. रावजीभाई मला सांगतात की किल्यातील जिन्यांना 7, 15 आणि 30 पायर्या आहेत व त्यावर काही सांकेतीक वस्तू ठेवून ती बहुधा रोजा सकाळी हलवली जात असे. या सोप्या पद्धतीने आठवडा, पंधरवडा व महिना यांची कालगणना केली जात असे. येथे पूर्वी समुद्र होता याच्या स्पष्ट खुणा किल्याच्या भिंती बांधण्यासाठी जे दगड वापरलेले आहेत त्यावर असलेल्या जीवाश्म खुणांवरून कळते. रावजीभाई मला शिंपल्यांच्या खुणा असलेला एक दगड दाखवतात.
पॉलिश केलेला दगडी स्तंभ
दगडी खांबाच्या तळातील खाचा घेतलेला दगड
किल्याची भेट आटोपून मी आता जवळच असलेल्या संग्रहालयाला भेट देतो आहे. येथे सापडलेली भाजलेल्या मातीची पात्रे, हत्यारे, मातीतून बनवलेल्या बाहुल्यांसारख्या वस्तू आणि उत्खननात सापडलेल्या असंख्य वस्तूंची छायाचित्रे येथे मांडलेली आहेत. या वस्तू व चित्रे बघून हे पुरातन शहर आणि येथे वास्तव्य करणारे लोक यांच्या जीवनशैलीबद्दल खूपच माहिती मला मिळते आहे.
भाजलेल्या मातीतून बनवलेली खेळणी
मनाला समाधान देणार्या या भेटीनंतर आम्ही बरोबर आणलेल्या खाद्यपदार्थांचा समाचार घेतो आणि थोडी विश्रांती घेऊन परतीच्या प्रवासाला निघतो. रापर आणि चित्रोड गावांच्या मध्ये आम्हाला रस्त्यावर एक नीलगाय (Boselaphus tragocamelus the largest Asian antelope, family Bovidae) आडवी येते व आपण खरोखरच वन विभागात अजून आहोत याची खात्री पटते. आम्ही सामखियाली गावाजवळ एका धाब्यावर चहा पितो व उजवीकडे भचाउ मार्गाने परत भूजकडे जाण्याऐवजी हायवे 27 वरून काठेवाड कडे जाण्यास निघतो. आजचा आमचा मुक्काम मोरवी किंवा मोरबी या शहरात आहे. हे शहर छोटया रणापासून फक्त 40 किमी अंतरावर असल्याने मला उद्या छोट्या रणाला धावती भेट देता येईल अशी आशा वाटते आहे. मोरवीला पोचायला आम्हाला तिन्हीसांजा होतात. मोरवी गावात शिरताना प्रथम काय जाणवते आहे ती आसमंतात आणि हवेत सर्वत्र असलेली धूळ. मोरवीमध्ये सिरॅमिक टाईल्स बनवणारे अनेक कारखाने असल्याने ही धूळ बहुधा अनुभवण्यास येते.
(क्रमश)
इतिहासाच्या सोबतीने कच्छ आणि काठेवाड, भाग 6
रविवार
मोरबी किंवा मोरवी हे काठेवाड मधील साधारण अडीच लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेले एक छोटेसे शहर आहे. काठेवाड मधील बहुतेक शहरांप्रमाणेच 1947 पर्यंत हे शहर म्हणजे सुद्धा एक संस्थानच होते आणि एकोणिसाव्या शतकात तरी आर्थिक स्थिती फारशी चांगली नसलेले ( ब्रिटिशांच्या वर्गवारी प्रमाणे तृतीय दर्जाचे) आणि उत्पन्नाचे फारसे स्त्रोत नसलेले असे संस्थान होते. सन 1879 मध्ये ब्रिटिश सरकारने वाघजी ठाकोर यांना या संस्थानाच्या राज्यपदावर आरूढ होण्यास मान्यता दिली व त्यांच्या कारकिर्दीत संस्थानाचे चित्र पालटले. राज्यपदावर आरूढ झाल्याबरोबर वाघजींनी मोरवी संस्थानाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न चालू केले. सन 1886 मध्ये त्यांनी मोरवी शहरापासून रेल्वे मार्ग सुरू करण्याचे काम सुरू केले. त्या काळात मोरवीच्या परिसरात मिठाचे उत्पादन हा एकच महत्त्वाचा व्यवसाय असल्याने कच्छ्च्या खाडीच्या पूर्वेकडील टोकांवर असलेल्या नवलाखी बंदरातून मिठाची वाहतुक करणे सोपे जाईल या कल्पनेने या बंदराचा विकास करणे त्यांनी सुरू केले. वाहतुकीच्या प्रकल्पांशिवाय त्यांनी मोरवी मध्ये नवीन शाळा, कॉलेजे व हॉस्पिटल्स यांची स्थापना केली. वाघजी यांच्या नंतर संस्थानाच्या राज्यपदी लखदीरजी ठाकोर यांना ब्रिटिश सरकारने बसवले. लखदीरजी यांनी सुद्धा मोरवी संस्थानासाठी बरेच कार्य केले. वीज निर्मितीसाठी पॉवर हाऊस, टेलेफोन एक्सचेन्ज, नवी मंदीरे, टेक्निकल हाया स्कूल आणि इंजिनीयरिंग कॉलेज या सारख्या असंख्य नवीन गोष्टी त्यांच्या कारकिर्दीत संस्थानात सुरु झाल्या.
मोरवीचे राजे आपल्या संस्थानात नवनवीन उद्योग चालू व्हावेत यासाठी प्रयत्नशील असत. चिनी मातीचे उद्योग, त्यासाठी लागणार्या कच्च्या मालाची उपलब्धता संस्थानात विपुल असल्याने, सुरू व्हावेत यासाठी अनेक सवलती व सुविधा या उद्योगाला मोरवी संस्थानाने देऊ केल्या. परशुराम पॉटरीज हा 40/50 वर्षांपूर्वी मोठे नाव कमावलेला पॉटरी उद्योग मोरवी संस्थानातच कार्यरत होता. आज मोरवी मध्ये 350 च्या वर सिरॅमिक टाइल्स बनवणारे कारखाने आहेत. याशिवाय भिंतीवर लावण्याची घड्याळे बनवणारे सर्व सुप्रसिद्ध कारखाने मोरवीतच आहेत.
लखधीरजी ठाकोर यांनी 1940च्या दशकात राज परिवारासाठी एक नवा पॅलेस बांधला होता. या पॅलेसला भेट देणे हा माझ्या आजच्या कार्यक्रमातील पहिला भाग आहे. मोरवीमध्ये जी रेल्वे लाईन बांधली गेली होती, त्या लाईनवर असलेल्या नझरबाग स्थानकाच्या बाजूला हा पॅलेस बांधलेला आहे. पॅलेसचा परिसर आणि त्या बाजूने बांधलेले कंपाऊंड हे दोन्ही अतिशय भारदस्त आणि मनावर छाप पाडणारे आहेत. बाहेरच्या कंपाऊंडला असलेल्या अनेक प्रवेशद्वारापैकी एकातून आम्ही आत शिरतो आणि एक वळण घेऊन आतील कंपाउंडच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. आम्ही प्रवास करत असलेली एस.यू.व्ही गाडी आतील कंपाऊंडरला असलेल्या या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी (आणि बंद) असलेल्या सर्वात मोठ्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना जी दोन छोटी प्रवेशद्वारे आहेत त्यापैकी एकातून सहजपणे आत जाऊ शकते आहे यावरून रॉट आयर्नमधून बनवलेल्या या संपूर्ण प्रवेशद्वाराच्या आकाराची कल्पना करणे सहज शक्य आहे. या प्रवेशद्वारापासून एक रस्ता सरळ पॅलेसच्या भव्य दर्शनी भागाच्या मध्यावर असलेल्या द्वाराकडे जातो. परंतु आम्ही डावीकडे वळतो आणि या बाजूला असलेल्या पोर्चखालील एका द्वाराजवळ गाडी थांबवतो.
पॅलेसची वास्तू दुमजली आहे व 1940च्या दशकात आधुनिक वास्तुकला म्हणून मानल्या जाणार्या आराखड्यानुसार ही वास्तू बांधलेली आहे. ही वास्तू बघताना मला मुंबईच्या मरीन लाइन्स स्टेशन जवळच्या भागातील याच कालात बांधल्या गेलेल्या इमारतींची असलेले या वास्तूचे साधर्म्य लक्षात येते आहे. वास्तूच्या दोन्ही कोपर्यात असलेल्या कक्षांना अर्धवर्तुळाकार आकार दिलेला आहे. वास्तूच्या दर्शनी भागावर ऑफसेट दिलेले पट्टे आहेत आणि सर्व खिडक्या अशाच एका पट्ट्यात सरळ रेषेत बसवलेल्या आहेत. खिडक्यांच्या लिंटेल्सच्या जरा वर लिंटेल्सच्या स्लॅब्ज मधूनच छज्जे बाहेर काढलेले असल्याने बाहेरच्या कडक सूर्यप्रकाशाला आत येण्यास मज्जाव केला जातो आहे.
आम्हाला तळमजल्याला भेट देण्याची फक्त परवानगी मिळालेली असल्याने हा मजला आम्हाला दाखवण्यात येतो आहे. या मजल्यावर उत्तर–दक्षिण असे बांधलेले 3 स्वीट्स (Suits) आहेत. प्रत्येक स्वीट्मध्ये एक हॉल, डायनिंग रूम आणि शयनगृह हे एकापाठोपाठ एक किंवा रेल्वेच्या डब्यांप्रमाणे बांधलेले आहेत. या 3 स्वीट्सच्या मध्ये 2 खुली प्रशस्त अंगणे आहेत. या स्वीट्सच्या दोन्ही टोकांना पूर्व–पश्चिम अशी विस्तारलेली अनेक दालने आहेत. यापैकी उत्तर टोकाला असलेल्या दालनांत एक मोठा दरबार हॉल, भेटीसाठी आलेल्या इच्छूकांना बसण्यासाठी असलेला बैठकीचा हॉल व एक शयन गृह आहे. दक्षिण टोकाच्या दालनांमध्ये एक पोहण्याचा तलाव, जिम्नॅशियम आणि बिलियर्ड्स कक्ष आहे. येथील बिलियर्डस टेबल नेहमीच्या टेबलांच्या दीड ते 2 पट मोठ्या आकाराचे आहे. तसेच जिम्नॅशियममधे असलेली व 1940च्या दशकात बनवलेली निरनिराळी व्यायाम करण्याची उपकरणे बघायला मला मोठी रोचक वाटत आहेत. पॅलेसमधील प्रत्येक कक्ष हा निराळ्या पद्धतीने बांधला गेलेला आणि सजवला गेलेला आहे. आतील सजावट पहाताना तिचा खानदानी व श्रीमंती रुबाब मनाला मोठी भुरळ् घालतो आहे. प्रत्येक कक्षाच्या तळाला असलेल्या इटालियन संगमरवराच्या टाइल्स सुद्धा निरनिराळ्या प्रकारच्या आणि रंगांच्या संगमरवरातून घडवलेल्या आहेत. हा पॅलेस बघताना त्या काळातील संस्थानिकांची जीवनशैली आणि श्रीमंती यांची चांगलीच कल्पना येते आहे. अर्थात ही सर्व संस्थानिक मंडळी शेवटी इंग्रज सरकारच्या इशार्यानुसार चालत होती हे सत्य या देखाव्यामागे अबाधित आहेच. लायब्ररी कक्षात असलेला एक 1940 मधील नकाशा मला अतिशय रोचक वाटतो आहे. हा नकाशा निरनिराळ्या प्रकारच्या झाडांच्या लाकडांचे तुकडे एका पॅनेलवर ‘इनले‘ करून बनवलेला आहे. प्रत्येक मोठ्या संस्थानासाठी निराळ्या झाडाचे लाकूड वापरलेले आहे. दरबार हॉलमधील ब्रिटिश कलाकारांनी काढलेली तैलचित्रे आणि छायाचित्रे मला खूपच भावतात.
मोरवी रेल्वेची इंजिन शेड
जुन्या पॅलेसचा दर्शनी भाग
मच्छू नदीवरचा झुलता पूल
मणी मंदीर
मोरवीची मच्छू नदी
पॅलेसची भेट आटोपून आम्ही बाहेर पडतो. बाजूलाच मोरवी मधील जुन्या रेल्वे इंजिनांसाठी बांधलेली शेड आहे. ती बघून आम्ही मच्छू नदीवरील झुलता पूल, जुना किंवा दरबार गढ पॅलेस आणि मणी मंदीर यांना एक धावती भेट देतो. परतत असताना हिरव्या रंगाच्या व ग्रीन टॉवर असे नाव असलेल्या एक लोखंडी स्ट्रक्चरकडे माझे सहज लक्ष जाते.
भोजन झाल्यावर दुपारी, मोरवीचे प्रमुख आकर्षण ( निदान माझ्या मताने) असलेल्या छोट्या रणाकडे जाण्यास आम्ही निघालो आहोत. हे छोटे रण मोरवीपासून फक्त 40 किमी अंतरावर आहे. मोरवी शहर जरी गुजराथच्या काठेवाड भागामध्ये मोडत असले तरी छोटे रण हे नेहमीच कच्छचा एक भाग म्हणून मानले गेले असल्याने मी परत एकदा कच्छ्कडे चाललो आहे असे म्हणता येईल. मोरवी– जेतपूर यांना जोडणारा हायवे 321 आम्ही जेतपूरजवळ सोडतो व गुजराथ सरकारने नवीनच बांधलेल्या हायवे 7 वर वळतो. गुजराथची राजधानी अहमदाबाद व उत्तरेकडील शहरे या नवीन रस्त्याने आता सरळ जोडली गेलेली आहेत. खाखरेची गावाकडे जाणारा दुसरा एक छोटा रस्ता आम्हाला घ्यायचा असल्याने आम्ही हायवे 7 लगेचच सोडतो व या रस्त्यावर वळतो. नर्मदा नदीचे पाणी आता इतपर्यंत कॅनॉलने आणले गेले आहे. या पाण्यावर वाढणारी एरंडी व जिरे यांची जोमदार पिके रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसत आहेत. नर्मदा कॅनॉलचे पाणी पोचल्याने हा भाग आता संपन्न झालेला दिसतो आहे.
जंगली गाढवाची कवटी
थोड्याच वेळात आम्ही वेणसर गावाजवळ पोचतो. येथून छोटे रण सुरु होते व उत्तरेला त्याचा विस्तार होत जातो. रणात जाणारा एक कच्चा रस्ता आम्ही पकडतो. आजूबाजूचा आसमंत परत एकदा गेले काही दिवस सतत बघितल्यामुळे ओळखीच्या झालेल्या मोठ्या रणातील आसमंतासारखा दिसू लागला आहे. लालसर ब्राऊन जमीन, त्यावर मधून मधून असलेली बेटे किंवा उंचवटे, गवताळ जमीन व सर्वत्र पसरलेली बाभूळ आणि विलायती बाभूळ यांची झुडपे हेच दृष्य चारी बाजूंना दिसते आहे. थोड्याच वेळात रस्ता संपतो आणि आम्ही सुकलेल्या रणातील सपाट जमिनीवर पोचतो आहोत. येथे हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूंमध्ये गाडी चालवता येते मात्र दुसर्या कोणाच्या गाडीच्या टायरच्या खुणांवरून मार्गक्रमण करणे हे नेहमीच बिनधोक असते. काही अंतरावर मला एक फुटलेला बंधारा दिसतो. या बंधार्याला सागर बंधारा असे नाव दिलेले होते परंतु मागच्या वर्षीच्या पुरामध्ये तो वाहून गेलेला आहे. थोड्या उंचीवर असलेल्या एका जागी आम्ही गाडी थांबवतो आणि रानटी गाढवे दिसतात का हे बघण्यासाठी खाली उतरतो. छोटे रण हे रानटी गाढवांसाठी अभयारण्य म्हणून घोषित केलेले आहे व ही रानटी गाढवे पहाण्यासाठीच खरे म्हणजे आम्ही येथे आलो आहोत. खाली मला एका जागी गाढवाची काही हाडे व कवटी पडलेली दिसते. हे गाढव बहुधा काही वर्षांपूर्वी मृत झालेले असावे परंतु गिधाडे आणि नंतर मुंग्या यांनी आपले काम उत्कृष्ट रित्या करून नंतर ही हाडे इतकी चाटून पुसून स्वच्छ केलेली आहेत की ही आता ती धुतल्यासारखी स्वच्छ दिसत आहेत. लांब अंतरावर एक नर गाढव एकटेच फिरताना आम्हाला दिसते ( रानटी नर गाढवे नेहमीच एकटी फिरत असतात.) पण ते बर्याच अंतरावर असल्याने त्याचे छायाचित्र काढणे मला शक्य होत नाही.
आम्ही पुढे निघतो. पुढे काही अंतरावर एक तळे दिसते आहे. याला स्थानिक लोक कॅनॉल तळे या नावानेच ओळखतात कारण नर्मदा कॅनॉल मधून गळती झालेल्या पाण्यामुळे हे तळे तयार झालेले आहे. मला तळ्याच्या निळ्याभोर पाण्याच्या पृष्ठभागावर काही पांढरे ठिपके तरंगताना दिसतात. आम्ही थोडे पुढे जातो व पक्षी विचलित होणार नाहीत एवढ्या अंतरावर गाडी थांबवतो. बायनॉक्यूलर्स मधून बघताना लक्षात येते की तेथे 4 पेलिकन आणि त्यांच्या मागे 6 फ्लेमिंगो दिसत आहेत. फ्लेमिंगो कुटुंबात 4 मोठे पक्षी व 2 पिल्ले आहेत. जरा काळजीपूर्वक5 बघितल्यावर5मी त्यांना नीट बघू शकतो आहे. खरे तर कच्छचे रण् हे फ्लेमिंगो पक्षांसाठी सुप्रसिद्ध आहे पण आतापर्यंतच्या या सहलीत, मला फ्लेमिंगो पक्षी कोठेच दिसू शकले नव्हते. फ्लेमिंगो बघता येतील ही माझी अपेक्षा येथे छोट्या रणात थोड्या प्रमाणात का होईना! शेवटी पूर्ण होते आहे. पाण्यामध्ये हे फ्लेमिंगो आपली मान मुरडुन घेऊन खाली पाण्यातील मासे शोधत अगदी स्तब्धपणे उभे आहेत. निळ्याशार पाण्यामध्ये त्यांचे केशरी रंगाचे पाय उठून दिसत आहेत.
आम्ही परत वळतो व जरा उंचावर असलेल्या हांडी बेटाकडे गाडी वळवतो. काही काळापूर्वी या ठिकाणाचा फायरिंग रेंज म्हणून पोलिस वापर करत असत. परंतु पर्यावरणवाद्यांच्या दबावामुळे त्यांनी आपली फायरिंग रेंज येथून आता हलवली आहे व रानटी गाढवांना हे रान परत मोकळे झाल्याने ती परतली आहेत.
हांडी बेटावर गाडी थांबवून आम्ही खाली उतरतो व इकडे तिकडे जरा बघितल्यावर 3 धष्टपुष्ट जनावरे शोधायला आम्हाला फारसा वेळ् लागत नाही. मध्यम आकाराच्या आणि घोड्याच्या उंचीएवढ्या असलेल्या या सर्व माद्या आहेत. त्यांच्या अंगावर ब्राऊन आणि पांढर्या रंगाचे पॅचेस दिसत आहेत.
हांडी बेटावर आणखी पुढे गेल्यावर आम्हाला धवल मरुभूमीचा एक पट्टा दिसतो. छोट्या रणाच्या काही भागात ही धवल मरुभूमी मोठ्या रणाप्रमाणेच दिसते. मात्र येथे असलेल्या मिठाचे व्यापारी स्वरूपात उत्पादन केले जाते आहे असे समोर उभे असलेली मिठागरे व ट्रक यावरून कळून येते आहे.
छोट्या रणातून परतताना खाखरेची गावाजवळ मला दोन किंवा तीन् मोर व सात किंवा आठ लांडोर यांचा एक थवा दिसतो. मोरांची निळसर–हिरवी पिसे पूर्णपणे झडून गेलेली दिसत आहेत. फक्त त्यांच्या माना व डोक्याजवळचा भाग तेवढा निळसर हिरवा दिसतो आहे. दोन मोरांनी आपला पिसारा खरे तर पूर्णपणे पसरलेला आहे. परंतु निळसर पिसे झडून गेल्याने हा पिसारा सध्या पिवळट ब्राउनिश दिसतो आहे. हा असा पिसारा बघितल्यावर कोणतीही लांडोर साहजिकपणे त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाहीये.
उद्या सकाळी आम्ही काठेवाडच्या समुद्र किनार्यावर असलेल्या प्रसिद्ध द्वारकाधीश मंदीराकडे जायला निघणार!
सिर खाडीचे महत्त्व
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये 3000 किमी लांबीची आणि बहुतांशी जमिनीवरून जाणारी आंतरराष्ट्रीय सीमा आहे. ही सीमा काश्मिरात काही भाग व ही सीमा अरबी समुद्राला जेथे मिळते तेथील थोडा भाग वगळला तर इतर सर्व ठिकाणी विवाद विरहित रितीने रेखलेली आहे. या रेषेचा अरबी समुद्राजवळचा 96 किमी लांबीचा भाग मात्र प्रथमपासूनच विवादास्पद आहे. मात्र या 96 किमी लांबीच्या विवादास्पद रेषेचे हे वैशिष्ट्य मानले पाहिजे की ही रेखा सध्या जशी दाखवली जाते ती कोणत्याही आंतर्राष्ट्रीय लवादाने किंवा स्वातंत्र्यपूर्व कालातील ब्रिटिश सरकारने मनास येईल त्याप्रमाणे आखलेली नसून ती एका भौगोलिक वैशिष्ट्याच्या (feature) सलग आखलेली आहे. हे भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे अरबी समुद्राला जोडलेली लहान अशी व सिर खाडी या नावाने ओळखली जाणारी एक खाडी आहे. या खाडीने गुजरात राज्यातील कच्छ हा विभाग आणि पाकिस्तानातील सिंध प्रांत हे विभागले जातात. या खाडीचे अक्षांश–रेखांश साधारणपणे 23°58′N 68°48′E. हे येतात. विकिपिडीया मधील वर्णनाप्रमाणे या खाडीला बाणगंगा असे नाव आहे. परंतु मला तरी इतर कोठे हे नाव आढळले नाही.
सन 1924 मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारने राव महाराज यांच्या अधिपत्याखाली असलेले भूज संस्थान आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील सिंध विभाग यांच्यामधील सीमेची आखणी करण्यासाठी या सिर क्रीकच्या प्रवाहाच्या साधारण मध्यावर खाडीमध्ये सीमा रेखा आरेखन करणारे स्तंभ उभारले होते. पाकिस्तानने प्रथमपासूनच या स्तंभांचे अस्तित्व व त्यावरून रेखीत केली जाणारी रेषा ही आंतर्राष्ट्रीय सीमा आहे हे अमान्य केलेले आहे. पाकिस्तानच्या मताने ही सीमा रेखा भारताच्या बाजूस पडणार्या या खाडीच्या पूर्व किंवा पश्चिम किनार्यालगत असणे आवश्यक आहे. (म्हणजेच या खाडीतील जलप्रवाह हा संपूर्णपणे पाकिस्तानच्या सीमा अंतर्गत असला पाहिजे.) भारताची भूमिका ही सीमा रेखा मूळ 1924 मध्ये उभारलेल्या स्तंभांच्या सलग असली पाहिजे अशी आहे.
बर्याच लोकांचे असे म्हणणे आहे की या एका छोट्याशा जलमार्गाला एवढे महत्त्व विनाकारण दिले गेले आहे आणि पाकिस्तान व भारत आपल्या भूमिकेवरून मागे हटण्यास तयार नसल्याबद्दल आश्चर्यही अनेकांना वाटते. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडे मागे गेले पाहिजे व मुळात सिर क्रीक मधील ही सीमा रेखा रेखीत करण्याचीच गरज का निर्माण झाली होती याची कारणे शोधली पाहिजेत. यासाठी कच्छ आणि सिंध यांच्या मधील सीमारेषेच्या पूर्वेकडील भागाकडे आपण प्रथम वळूया. प्राकृतिक नकाशा बघितल्यास लगेच लक्षात येऊ शकेल की पूर्वेकडील ही सीमारेखा, रण या नावाने ओळखल्या जाणार्या व खारवट पाण्याने आणि दलदलीने भरलेल्या अशा एका विस्तृत जलाशयाच्या उत्तर किनार्याच्या बाजू–बाजूने पश्चिमेकडे जाते. 1878 साली काढल्या गेलेल्या एका नकाशात सुद्धा ही सीमारेखा अगदी स्पष्टपणे आणि विवाद विरहित रित्या दर्शवलेली आहे.
या रेषेच्या पश्चिम भागाच्या थोड्या दक्षिणेला म्हणजेच कच्छ मध्ये, ‘लखपत‘ हे गाव वसलेले आहे. या गावाच्या उत्तरेला ‘कोरी‘ या नावाने ओळखली जाणारी एक नदी 1875 या वर्षापर्यंत वहात असे. मात्र मानव निर्मित व निसर्ग निर्मित अशा दोन्ही कारणांमुळे या नदीतून वाहणारे पाणी कमी–जास्त अशा चक्रामधून या वर्षाच्या आधीच्या 100 वर्षांच्या कालखंडात जात राहिल्याने ही नदी कधी भरपूर पाण्याने भरलेली तर कधी एक दलदलीने भरलेला एक पाणथळ प्रदेश अशी स्वरूपे घेत राहिली. ‘लखपत‘च्या‘ ईशान्येकडे असलेले व सध्या पाकिस्तान मध्ये असलेले ‘अली बंदर‘ हे गाव या ‘कोरी‘ नदीच्या किनार्यावर वसलेले होते व तेथूनच ही नदी ‘लखपतकडे‘ वहात येत असे. पाकिस्तानमध्ये या नदीला ‘पूरन‘ असे नाव आहे.
या ‘कोरी‘ नदीला ऐतिहासिक दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. अलेक्झांडर (इ.पूर्व 325) ते टॉलेमी (इ.स.150) यांच्या कालात ही नदी ‘लोनीबेरे‘ या नावाने परिचित होती आणि ही नदी सिंधू नदीचे पूर्वेकडील एक महत्त्वाचे मुख असल्याचे मानले जात असे. या नदीचे पाणी वळवण्यासाठी अली बंदर जवळ रहात असलेल्या सिंधी लोकांचे उद्योग 1764 पासूनच सुरू होते. या वर्षी या नदीवर एक मोठा बंधारा बांधण्यात सिंधी लोकांना यश आले. यामुळे ‘लखपत‘ जवळची शेती संपूर्णपणे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला व कच्छी आणि सिंधी सेनांमध्ये युद्ध झाले या युद्धात कच्छी सेनेचा दारूण पराभव झाला झाला आणि ‘लखपत‘ जवळील सुपीक जमीन पाण्याअभावी नापीक बनली. परंतु पुढील काही वर्षातच ‘कोरी‘ नदीला महाभयंकर पूर आला व अली बंदर जवळील बंधारा नष्ट होऊन परत एकदा कोरी नदीला भरपूर पाणी येऊ लागले. 1802 मध्ये अली बंदर जवळ नवा बंधारा बांधला गेला व ‘कोरी‘ नदीचे पाणी परत गायब झाले. परिणामी ‘लखपत‘ जवळील शेती नष्ट होऊन त्या जमिनीचा फक्त चराऊ जमीन म्हणून उपयोग होऊ लागला.
1819 साली झालेल्या एका भयानक भूकंपामध्ये कोरी नदीच्या पात्रात मोठे उंचवटे निर्माण झाले आणि सिंधू नदीचे पूर्वेकडील मुख मानल्या जाणार्या ‘कोरी‘ नदीच्या पात्राचे पाणथळ व दलदलीच्या प्रदेशात कायमस्वरूपी रूपांतर झाले. या भूकंपाच्या पाठोपाठ एका महाभयानक सुनामी लाटेने या कोरी नदीच्या पात्रावर आक्रमण केले आणि हा सर्व भाग जलमय झाला.
1846 मध्ये जिऑऑजिकल सोसायटी च्या त्रिमासिक मुखपत्रात (Quarterly journal of Geological society 2, 103, (1846) मिसेस डेरिन्झी या एका ब्रिटिश महिलेने कोणा एका कॅप्टन नेल्सनला लिहिलेले एक पत्र उदृत केले गेले होते. या पत्रात या महिलेले या सुनामी लाटेने हा सर्व भाग जलमय होऊन कसा हाहाकार उडाला होता याचे वर्णन केलेले आहे. थोडे विषयांतर होण्याचा धोका पत्करूनही हे वर्णन मूळातून वाचण्यासारखे असल्याने मी खाली देत आहे.
” कॅप्टन मॅकमर्डो यांचा एक गाइड त्यांना भेटण्यासाठी भूजकडे निघाला होता. तो ज्या दिवशी लखपतला पोचला त्याच दिवशी भूकंपाचे धक्के बसले. या धक्यांनी राजमहालाच्या भिंती हादरून त्यांचा थोडा भाग कोसळला व काही जिवीतहानी झाली. याचा परिणाम म्हणून सिंधू नदीचे पूर्वेकडील मुख असलेल्या कोरी नदीत समुद्राकडून मोठी लाट आली. या लाटेने पश्चिमेकडे सुमारे 20 मैलावर असलेल्या गुंगरा नदीपर्यंत, उत्तरेकडे कोरी नदीच्या मुखापासून 40 मैल अंतरावर असलेल्या ‘वेयरी‘ गावाच्या थोड्या उत्तरेपर्यंत तर पूर्वेला ‘सिंदडी‘ जलाशयापर्यंतचा सर्व प्रदेश जलमय झाला. हा गाइड ‘लखपत‘ मध्ये 6 दिवस( 19 ते 25 जून) अडकून पडला होता. या कालात भूकंपाचे एकूण 66 धक्के त्याने अनुभवले. त्या नंतर तो कोटडी गावापर्यंत पोचू शकला. या गावात उंच जमीनीवर बांधलेली काही लहान घरे फक्त अस्तित्वात राहिली होती. या जिल्ह्यातील रहिवाशांपैकी बहुतेकांचा ते समुद्रात वाहून गेल्याने या महाभयंकर लाटेने घास घेटला होता. सिंध मधील अगदी उत्तम मानली जाणारी बहुतेक घरे ही सूर्यप्रकाशात वाळवलेल्या मातीच्या विटांनी बांधलेली असतात तर बहुतेक खेडेगांवातील झोपड्या या वेड्यावाकड्या लाकडी खांबांच्या आधारावर वेळूच्या विणलेल्या चटयांचे आच्छादन टाकून बनवलेल्या असतात. कॅप्टन मॅकमर्डो यांच्या गाइडने यानंतरचे अंदाजे 20 मैल अंतर उंटावर बसून पार केले. या वेळी पाणी उंटाच्या शरीरापर्यंत पोचत होते. लखपत गाव तर संपूर्ण पाण्याखालीच होते. एका फकिराच्या मशिदीजवळचा एक खांब फक्त पाण्याच्यावर दिसत होता. ‘वेयरी‘ गाव (या गावाचा आता ठावठिकाणा लागत नाही.) व इतर खेडेगावे यामधील काही घरांचे फक्त अवशेष शिल्लक राहिले होते. असे म्हटले जाते की लखपत गावात दरवर्षी किमान 2 तरी भूकंप होतातहोतात. सिंदडी जलाशयाचे आता खारवट पाण्याने भरलेल्या एका दलदल प्रदेशात रूपांतर झाले आहे.”
याच भूकंपामुळे कच्छच्या रणाच्या उत्तर किनार्यासलग असलेल्या सिंधच्या भूभागाची एक पट्टीच्या पट्टी, एखादा बंधारा बांधावा तशी वर उचलली गेली. या निसर्गनिर्मित बंधार्याला ‘अल्लाह बंधारा‘ (God’s Bund) असे लोक म्हणू लागले. या बंधार्यामुळे सिंधू नदीचे पूर्वेकडचे मुख मानले जाणार्या कोरी नदीच्या जलप्रवाहाने आपली दिशा कायम स्वरूपी बदलली.
यापुढील कालात, कोरी नदीच्या खोर्यात जर सिंधू नदीला भयानक पूर आला तर गोडे पाणी व इतर वेळी समुद्राचे पाणी किंवा ते नसेल तर दलदल किंवा खारवट जमीन असे कच्छच्या रणाच्या इतर भागासारखेच स्वरूप प्राप्त झाले व त्यामुळे हा सर्व भाग अनिश्चित स्वरूप असलेला व कोणत्याही पद्धतीने मोजमाप करणे शक्य नसलेला असा बनला.
कोरी नदीचा 1819 मधील भूकंपानंतरच्या कालातील इतिहासही तितकाच रोचक आहे. इंपिरियल गॅझेटियर मधे हा इतिहास असा वर्णिलेला आहे.
” 1819 सालानंतर लखपत गावाजवळील, आधी सहज रित्या जहाजे जाऊ शकणारे कोरी नदीचे पात्र 18 फूट एवढेच खोल राहिले. येथून 16 मैल पुढे, 2 ते 6 मैल लांबीचे नदीपात्र जमीन पातळीच्या वर उचलले गेले तर त्यापुढील भागात नदी पात्राच्या दोन्ही बाजूंना असणार्या रणाचा भाग खाली गेल्याने 12 फूट खोलीचे एक नदी खोरे निर्माण झाले. याच्या पुढचा नदीचा भाग अल्लाह बंधारा निर्माण झाल्याने 25 ते 40 फूट वर उचलला गेला. त्याचवेळी सुनामीमुळे एक भयंकर लाट नदी पात्रात समुद्राकडून आली आणि सर्व नदी खोरे खार्या पाण्याने भरून गेले. यानंतरच्या 8 वर्षांत नदीला पूर आलेला असतानाच्या वेळा सोडल्या तर नदी पात्र संपूर्णपणे कोरडे राहिले होते. होते.1826 मध्ये अप्पर सिंधू नदीने काठांवर आक्रमण केले आजूबाजूचा सर्व वाळवंटी भाग पाण्याने भरून टाकला. या नंतर जवळ जवळ सर्व बंधार्यांना नदीच्या पाण्याने फोडून टाकले आणि अली बंदर जवळून वाहत येत हे पाणी शकूर लेक मध्ये घुसले. या वाहणार्या पाण्याने कोरी नदीच्या पात्रातील साठलेला सर्व गाळ एवढ्या प्रमाणात वाहून नेला की लखपत गावापर्यंत 100 टन माल वाहतुक करणारी जहाजे पोचू लागली. पुढची 3 वर्षे कोरी नदीला एवढे पाणी होते की अमिरकोट गावापर्यंत माल वाहतुक नदी मार्गाने शक्य होती.
मध्यंतरीच्या काळात सिंध मधील रहिवाशांनी नदीवरील सर्व बंधारे परत बांधले व 1834 मध्ये कोरी नदी परत कोरडी पडले. 1838 मध्ये पावसाळा सोडला तर इतर वेळी नदी कोरडीच होती. पुढची 36 वर्षे ( 1839-1874) अली बंदर पासून पुढचा नदीचा भाग गाळाने भरून गेला होता. होता.1856 मध्ये परत एकदा कोरी नदीला एवढे पाणी आले की नदीच्या मुखापासून शकूर जलाशयापर्यंत बोटी जाऊ शकत होत्या. 1868 नंतर लखपतच्या पुढे बोटी जाण्याचे बंद झाले. 1874 मध्ये परत एकदा मोठा पूर नदीला आला व नदीचे पाणी परत एकदा शकूर जलाशयात भरले.”
बर्याच वाचकांना असा प्रश्न पडणे साहजिक आहे की लेखाचा विषय सिर क्रीक असताना मी कोरी नदी बद्दलचे हे लांबलचक चर्हाट का सुरू ठेवले आहे? याच्या कारणांसाठी आपण 1908 मध्ये इंपिरियल गॅझेटियर मध्ये प्रसिद्ध झालेला एक नकाशा बघूया. या नकाशात कच्छ संस्थान व सिंध प्रांत यांच्यामधील सीमा स्पष्टपणे रेखीत केलेल्या आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना ही सीमारेखा पारंपारिक सीमारेषेनुसार रणाच्या किनार्याने जाते. मात्र पश्चिम भागात 1819 च्या भूकंपामुळे निर्माण झालेली भौगोलिक परिस्थिती या नकाशात विचारात घेतलेली नसल्याने ही सीमारेखा कोरी नदीच्या पश्चिम किनार्यासलग जाताना दर्शवलेली आहे. 1819 मध्ये ही भौगोलिक परिस्थिती संपूर्ण बदलली व कोरी नदीच्या पश्चिमेकडच्या भागाचे रूपांतर मानवी वस्ती किंवा कोणतेही भौगोलिक वैशिष्ट्य नसलेल्या एका खारवट पाणथळ दलदलीच्या प्रदेशात झाले. मॉन्सूनच्या काळात हा भाग पाण्याने भरून जाई तर इतर वेळी वैराण खारवट जमीन व दलदलीने हा भाग भरलेला दिसून येई. या प्रकारच्या भू प्रदेशात सीमा रेखन करणे अशक्यप्राय असल्याने प्रथा 1914 मध्ये व नंतर 1924-25 मध्ये कच्छ संस्थान व सिंध सरकार यांच्यात नवीन सीमा ठरवण्यासंबंधी वाटाघाटी झाल्या व नवीन सीमा रेखित केली गेली.
वाचकांच्या हे सहज लक्षात येईल की 1819 च्या भूकंपानंतर सतत बदलत राहणारी जी भौगोलिक किंवा प्राकृतिक परिस्थिती कोरी नदीच्या खोर्याच्या पश्चिम भागात निर्माण झाली होती ती बघता कच्छ संस्थान व सिंध यांच्या मधील या भागातून जाणार्या सीमेचे रेखन करणे अशक्यच होते. त्यामुळे कोरी नदी खोर्याच्या पश्चिमेला व तेथून सर्वात जवळ असलेल्या कोणत्यातरी भौगोलिक वैशिष्ट्याजवळ ही सीमारेखा आखणे गरजेचे बनले होते. सर्वात जवळचे व ज्याच्यालगत सीमेचे आरेखन स्पष्टपणे करता येईल असे भौगोलिक वैशिष्ट्य, सिर खाडी किंवा क्रीक हेच होते.
भरतीच्या वेळेस या खाडीत जहाजे येऊ शकत होती त्याचप्रमाणे मच्छीमारांच्या बोटी येथून खुल्या समुद्रात जाऊ शकत होत्या. त्यामुळे समुद्री सीमांचे आरेखन करण्याच्या कनव्हेन्शन प्रमाणे, या खाडीच्या मध्यावर कच्छ संस्थान आणि ब्रिटिश ताब्यात असलेला सिंध प्रांत या मधील सीमा रेषेचे आरेखन करणारे स्तंभ ब्रिटिश सरकारने 1924 मध्ये उभारले. हे स्तंभ उभारण्याचा निर्णय विचार करून घेतलेला आणि आंतर्राष्ट्रीय कनव्हेन्शन प्रमाणे होता याबद्दल मला तरी काही शंका दिसत नाही.
पाकिस्तानचा या सीमारेषेला विरोध असण्याची कारणे स्पष्ट होत नाहीत. कदाचित या सीमेमुळे पुढे अरबी समुद्रात 200 मैलापर्यंत त्यांना प्राप्त होणार्या व्यापारी पट्ट्यात तेल विहिरी सापडण्याची शक्यता असल्याने या पट्ट्यातील काही भाग भारतात गेला तर या भागाचा व्यापारी उपयोग करून घेता येणार नाही अशी भीति पाकिस्तानला वाटत असावी. एक गोष्ट मात्र सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. स्थिर आणि कोणताही विवाद ज्यामुळे निर्माण होणार नाही असे या भागात असलेले एकुलते एक भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे सिर खाडी हेच आहे आणि या प्रवाहाच्या मध्यभागी उभारलेल्या सीमारेखा स्तंभांमुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना या खाडीच्या प्रवाहाचा समप्रमाणात फायदा होत असल्याने ब्रिटिश सरकारने आखलेली ही सीमारेखा कायम करण्यातच दोन्ही देशांचे हित आहे.
11 मार्च 2013
वैशिष्टय़पूर्ण स्थळे रण ऑफ कच्छ
गुजरात राज्याने पर्यटनाच्या क्षेत्रात प्रयोग सुरू केल्यानंतर कच्छच्या वाळवंटात पर्यटकांचे लोंढे येऊ लागले.

भूकंपाने
तयार झालेलं तळं, ज्वालामुखीच्या क्रेटरमधलं जीवविश्व, पांढरं रण, बर्फोचं
हॉटेल, नॉर्दर्न लाइट, तयार व्हायलाच ४० वषर्र् लागणारे लिव्हिंग रूट
ब्रिज, लडाखची आईस हॉकी, व्हिएतनाममधलं कंदिलांचं शहर, न्यूझिलंडमध्ये
जमिनीखालच्या गुहांमधील काजव्यांची गर्दी अशी जगभरातील अनोखी दहा ठिकाणे
गुजरात राज्याने पर्यटनाच्या क्षेत्रात प्रयोग सुरू केल्यानंतर कच्छच्या वाळवंटात पर्यटकांचे लोंढे येऊ लागले. मात्र याच कच्छच्या रणात त्याही आधीपासून एका निसर्गवेडय़ाने अनेकांना भटकवायला सुरुवात केली होती. जुगल तिवारी त्याचं नाव. मूळचा राजस्थानचा. बीएनएचएसने नॅचरलिस्ट म्हणून त्याला येथे नेमलं. आठएक वर्षे येथे काम केल्यावर त्याच्या लक्षात आलं, येथे खूप काही करण्यासारखे आहे. मग तो मोटी विराणीला स्थायिक झाला. गावासाठी काहीतरी करायचं त्याच्या डोक्यात होतं. परिसरातील वन्यजीवनचा अभ्यास केला. या भागात येणाऱ्या वन्यजीव प्रेमींना त्याने भटकवायची सुरुवात केली. चारी धांड, लायलरी रिव्हर बेड अशा आडवाटेवरच्या ठिकाणांना तो घेऊन जाऊ लागला.
चारी धांड (धांड म्हणजे पाणी) तलावाच्या आसपास हजारोंच्या संख्येने येणारे कॉमन क्रेन्स हे आकर्षणाचे केंद्रबिंदू होऊ लागले. ४० ते ६० हजारांच्या घरात येणारे हे अडीच तीन फूट उंचीचे पक्षी दिवसभर जमिनीवर चोचीने टकटक करत असतात. पाऊस आल्यावर उगवणारे हिरवे कोंब. चोच खुपसून या कोंबातून बी बाहेर काढायचं आणि ते फोडून त्यातील दाणा खायचं काम ते करतात. दिवसाला २५० ग्रॅम दाणे त्यांना लागतात. उरलेला कचरा तेथे येणारे लार्क पक्षी फस्त करतात. त्यांच्यामुळे जमीन चारपाच इंच खोल खणली जाते, नैसर्गिरीत्या नांगरली जाते. सुपीक होते. पुढच्या वर्षी पुन्हा कोंब येतात. येथे एक अनोखी जीवनसाखळीच तयार झाली आहे. गोडय़ा पाण्यावरील अनेक प्रकारचे वेडर्स आणि शिकारी पक्षी येतात. हे सारं चारी धांडवर पाहता येतं.
चारी धांड जवळच्याच फुले या गावी ग्रे हायपोकेलिस पक्ष्यांची भारतातील एकमेव जोडी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये येते. येथून जवळच आठ किलोमीटर्सवर लायलरी रिव्हर बेड आहे. हा डेड रिव्हर बेड आहे. त्यातील व्होल्कॅनिक फॉर्मेशन पाहण्यासारखे आहे. विविधरंगी आणि आकाराचे नमुने पाहता येतात. अगदी दिवसभर आरामात येथे भटकता येते.
सरकारी रणोत्सवात हे काहीच नसते. प्रसिद्ध वाईल्डलाइफ डेस्टिनेशनवर खंडीभर पर्यटक येत असतात. येथे मात्र फक्त आपणच असतो. तेदेखील जुगलमुळे.
याच भटकंतीत कच्छचे प्रसिद्ध ‘व्हाईट रण’ पाहता येते. कोणे एकेकाळी येथे समुद्र होता, तो भूगर्भात खेचला गेला. दरवर्षी पाऊस पडून गेल्यावर सुकल्यानंतर हजारो किलोमीटरचा केवळ मिठाचा पांढरा पट्टा येथे दिसतो. हे सारं आवर्जून पाहावं अस आहे, आणि गेल्या काही वर्षांत हे पाहण्यासाठी चांगलीच गर्दी होत असते. परतीच्या प्रवासात मानवाच्या आदिम पाऊलखुणांचे भुजपासून ३०० किलोमीटरवर असणारे धोलावीरा पाहता येते.
केव्हा जाल : नोव्हेंबर ते मार्च. हे सर्व पाहण्यासाठी साधारण चार दिवस पुरतात. प्रवासाचा कालावधी वेगळा.
कसे जाल : रेल्वेने किंवा विमानाने भुजपर्यंत. मोटी विराणी भुजपासून ४५ किलोमीटर्सवर आहे.
आत्माराम परब – response.lokprabha@expressindia.com
पर्यटन मंत्रालयाच्या देखो अपना देश या 30:05:2020 रोजी झालेल्या 26व्या वेबिनार मालिकेद्वारे "जगण्याची जिद्द- कच्छची प्रेरणादायी कथा दाखवली गेली. भारतीय संस्कृतीच्या प्रेरकशक्तिचे दर्शन घडविणार्या, भारतातल्या गुजरात राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या कच्छ या जिल्ह्याचा इतिहास,संस्कृती ,हस्तकला वस्त्रोद्योग याचा संपन्न वारसा तसेच तेथील लोकांची नैसर्गिक आपत्ती विरुध्द लढण्याची चिकाटीचे दर्शन झाले•या वेबिनारमधून "कच्छ नही देखा तो कुछ नही देखा " हा संदेश देण्यात आला. एक भारत श्रेष्ठ भारत या शृंखलेअंतर्गत भारताच्या संपन्नतेचे दर्शन घडविणारी देखोअपना देश ही मालिका आहे.
या वेबिनारचे प्रस्तुतिकरण पर्यटन मंत्रालयाच्या अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालिका श्री रुपिंदर ब्रार यांनी केले तर संचालिका डाँ नविना जाफा यांनी ती सादर केली. श्रीमती जाफा यांनी भारतातील वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती आणि लोकांमधील अनुवंशिक ताकद याचे त्यांच्या प्रभावी कथनाद्वारे वर्णन केले.
कच्छचा भूप्रदेश हा खारट वाळवंट,हिरवी कुरणे आणि पाणथळ प्रदेश आहे. अशा प्रकारचा हा जगातील एकमेव अशा पध्दतीचा भूप्रदेश आहे. भारतातील मीठाची तीन चतुर्थांश मागणी कच्छचे रण पूर्ण करते. येथील खराई जातीचे उंट हे कोरड्या हवामानात वा खाऱ्या पाण्यात सुध्दा तग धरु शकतात. ते समुद्रात पोहू शकतात आणि खारट पाणी आणि वनस्पती खाऊन राहू शकतात. ते वाळवंटातीलतीव्र हवामान आणि अतीखारट पाण्याशी जुळवून घेऊ शकतात.
सादरीकरणातील सर्वात उत्तम भाग म्हणजे परंपरागत अज्रक ब्लाँक प्रिंटचे दर्शन •अज्रक प्रिंट हा गुजरात आणि राजस्थानातील सर्वात जुना ब्लाँकप्रिंटचा पारंपारिक प्रकार आहे• या पध्दतीने नैसर्गिक रंगांचा वापर करून कापडाच्या दोन्ही बाजूला हाताने प्रिंटचे हे कष्टकारक आणि लांबलचक रंग आत शिरू न देता काम कले जाते•( काही ठिकाणी रंग पसरणार नाही याची काळजी घेतली जाते)
त्यानंतर बँनीथ वाळवंट यावर एक परिसंवाद झाला , यात कुंभारकाम ,भरतकाम आणि चर्मकाम करणार्या तीन मोठ्या समाजातील कलाकारांचे काम दाखवण्यात आले•श्री जफाल्सो यांनी कर्ण कापलेल्या संन्यासी समाजाची ( सिध्दि सिध्दांत पंथ) आणि त्यांनी चालविलेल्या धर्मादाय अन्नदानाची ( community kitchen) माहिती दिली•
सादरीकरणात अरबी समुद्रात बोटी बनविणार्या सुफी पंथाच्या मार्गदर्शकाचे मांडवीच्या किनार्यावरचे सादरीकरणही झाले•
कच्छ मधील काही विशेष आकर्षणे
- ढोलावीरा _ युनेस्को जागतीक वारसा स्थळ आणि दुसरे सर्वात मोठे हडप्पा स्थान, शहररचना आणि वास्तुस्थापत्य याचे उत्तम उदाहरण
- फाँसिल पार्क
- कच्छचे रण अरबी समुद्रातील खारेवाळवंट
- काला डुंगर
- नारायण सरोवर मंदीर
- लाखपोर्ट किल्ला आणि बंदर
- सुरहान्डो_ मोराच्या आकाराचे वाद्य
- थाळीनृत्य _ लग्न वा बारशाच्या वेळचे नृत्य
- तुफान_ समुंदरकी मस्ती नावाचे मदहोश नृत्य
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील भुज तालुक्यात धोर्डो नावाचे गाव आहे•पर्यटनाच्या दृष्टिने ह्या गावचे वातावरण तितकेसे चांगले नाही. नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत पर्यटनाला चालना देण्यासाठी गुजरातेत रण उत्सव साजरा केला जातो•धोर्डो आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांमधे धोर्डो शुभ्र रण उत्सवामुळे अनेक कायमची आणि तातपुरती निवासी स्थाने उभारली आहेत. प्रचंड इच्छाशक्ती ,कल्पना आणि उपक्रमशीलता याने या कोरड्या आणि वेगळ्या भूप्रदेशात सामाजीक आर्थिक आणि सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण निर्माण होऊन येथील लोक आत्मनिर्भर झाले आहेत. यात गुजरात पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने होणार्या रण उत्सव टेन्ट सिटी चे मोठेस्थान आहे.
दरवर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात रण उत्लव साजरा केला जातो•मूलभूत सोयी उपलब्ध करून भुज शहराचे तंबू शहरात रुपांतर होते• बीएसएफ वाद्यवृंद,गरम फुगे उडविणे ,यासह पारंपारीक संगीत, नृत्य, खरेदी यांची आणि पारंपारीक भोजनाचा आस्वाद ही या उत्सवाची ठळक वैशिष्टे आहेत.
3_4 दिवस प्रवास आणि 7_8 दिवस कच्छची मजा लुटायला पुरेसे (आवश्यक ) आहेत • कच्छच्या या प्रवास मार्गदर्शिकेत पर्यटकांना तिकडची ठिकाणे,परंपरा,संस्कृती ,वस्त्रे ,वाद्ये ,बाजारपेठा,गावातील सहल ,नृत्ये यांची थोडक्यात माहिती उपलब्ध आहे.
भूज हे गुजरातच्या आजूबाजूच्या राज्यांशी रस्त्याने, रेल्वेने मुंबई आणि दिल्ली तसेच देशातील इतर भागांशी जोडलेले असून तेथे रुद्र माता विमानतळ ही आहे.
हे सादरीकरण https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featured पर्यटन मंत्रालयाच्या सर्व सोशल हँन्डल माध्यमांवर प्रदर्शित केले आहे.
यापुढील
मालिका दि•2जून 2020 रोजी सकाळी 11वाजता प्रदर्शित होणार असून ती हरियाणा
: संस्कृती, भोजन आणि पर्यटन या विषयावर असून त्यासाठी नोंदणी करावी https://bit/ly/3dmTbmz
कच्छ का रण | भारतकोश
कच्छ का रण गुजरात राज्य में कच्छ ज़िले के उत्तर तथा पूर्व में फैला हुआ एक नमकीन दलदल का वीरान स्थल है।
- कच्छ का रण लवणीय दलदली भूमि है जो पश्चिमी-मध्य भारत और दक्षिणी पाकिस्तान में स्थित है।
- कच्छ का रण लगभग 23,300 वर्ग किमी क्षेत्रफल में फैला हुआ है और पाकिस्तान सीमा से लगे भारतीय राज्य गुजरात में लगभग पूरा का पूरा अवस्थित है।
- कच्छ का छोटा रण, कच्छ की खाड़ी के पूर्वोत्तर में है और यह गुजरात के लगभग 5,100 वर्ग किमी क्षेत्र में फैला हुआ है।
- मूलतः अरब सागर का विस्तार रहा कच्छ का रण सदियों से एकत्रित होने वाले अवसाद के कारण एक बंद क्षेत्र बन गया है।
- कच्छ का रण समुद्र का ही एक सँकरा अंग है जो भूकंप के कारण संभवत: अपने मौलिक तल को ऊपर उभर आया है और परिणामस्वरूप समुद्र से पृथक् हो गया है।
- सिकंदर महान् के समय यह नौकायन योग्य झील थी। लेकिन अब यह एक विस्तृत दलदली क्षेत्र है, जो मॉनसून के दौरान जलमग्न रहता है।
- उत्तरी रण, जो लगभग 257 किमी में फैला हुआ है। पूर्वी रण अपेक्षाकृत छोटा है। इसका क्षेत्रफल लगभग 5,178 वर्ग किमी है।
- मार्च से अक्टूबर मास तक यह क्षेत्र अगम्य हो जाता है।
- यहाँ के लोगों का निवास निम्न, विलग पहाड़ियों तक सीमित है।
इतिहास
सन 1819 ई. के भूकंप में उत्तरी रण का मध्य भाग किनारों की अपेक्षा अधिक ऊपर उभर गया। इसके परिणामस्वरूप मध्य भाग सूखा तथा किनारे पानी, कीचड़ तथा दलदल से भरे हैं। ग्रीष्म काल में दलदल सूखने पर लवण के श्वेत कण सूर्य के प्रकाश में चमकने लगते हैं।
बड़े रण के पश्चिमी छोर पर भारत-पाकिस्तान सीमा को लेकर 1965 में विवाद उठ खड़ा हुआ था। अप्रैल में लड़ाई छिड़ गई और ब्रिटेन की मध्यस्थता के बाद ही युद्ध विराम हुआ। संयुक्त राष्ट्र के महासचिव द्वारा सुरक्षा परिषद को भेजी गई रिपोर्ट के आधार पर इस मामले को अंतर्राष्ट्रीय न्यायाधिकरण (ट्राइब्यूनल) को भेजा गया। जिसने 1968 में निर्णय लिया कि इसका लगभग 10 प्रतिशत हिस्सा पाकिस्तान को और लगभग 90 प्रतिशत भारत को सौंप दिया जाए और 1969 में विभाजन हुआ।
नारायण सरोवर वन्यजीव अभयारण्य :-
नारायण सरोवर वन्यजीव अभयारण्य को 'नारायण सरोवर अभयारण्य' या 'नारायण सरोवर चिंकारा अभयारण्य' के नाम से भी जाना जाता है। यह अभयारण्य गुजरात राज्य के कच्छ ज़िले में लखपत तालुका में अवस्थित है। इस अभयारण्य की मुख्य प्रजाति चिंकारा और भारतीय चिंकारा है। इस अभयारण्य का अधिकांश हिस्सा काँटेदार रेगिस्तान तथा झाड़-झंकाड़ वाला है। नारायण सरोवर अभयारण्य में 184 से भी अधिक पक्षियों की प्रजतियाँ पाई जाती हैं।
जैव विविधता
जंगली गधा अभयारण्य' के समान ही नारायण सरोवर भी कई जंगली जीवों का घर है, जिसमें स्तनधारी, सरीसृप और पक्षियों की अनेक प्रजातियों का समावेश होता है, जिसमें से 15 प्रजातियाँ अभी संकटग्रस्त हैं। यहाँ की मुख्य प्रजाति चिंकारा और भारतीय चिंकारा है। इस अभयारण्य के कठोर परिदृश्य में केवल वही प्राणी अच्छी तरह से रह सकते हैं, जो अत्यधिक गर्मी, तेज हवाएँ और लगातार तुफ़ानो के बीच रेगिस्तान की जलवायु में अनुकुलन साध सकें। इसी कारणवश अन्यत्र नहीं दिखाई देने वाली प्रजातियाँ भी यहाँ दिखाई देती हैं।[1]
खतरे में पड़े चिंकारा विश्व के एकमात्र ऐसे हिरन हैं, जिनके नर और मादा दोनों के सींग होते हैं। एक अध्ययन के अनुसार विश्व में क़रीब 7000 चिंकारा अस्तित्व में हैं। उसमें से 80 प्रतिशत गुजरात के कच्छ में रहते हैं और उनकी प्राथमिक ज़रूरत झाड़-झंकाड़ और झाड़ी वाला जंगल है, जो यहाँ सामान्य है। नारायण सरोवर वन्यजीव अभयारण्य उनके लिए अत्यंत महत्वपूर्ण जगह है। अभयारण्य में जंगली बिल्ली से लेकर स्याहगोश (केरेकल ) रण कि लोमी और खतरे मे पड़े भारतीय भेड़िया, टपकी वाले हिरनों से लेकर जंगली सूअर तक के अनेक स्तनपाई जीव रहते हैं। रेटल, अपनी सांप को मारने की क्षमता एवं तेंदुए, शेर, जहरीले सांप और मधुमक्खी के डंक से आक्रमक सुरक्षा के कारण इसने 'गिनीज बुक ऑफ़ वर्ल्ड रिकॉर्ड' में सबसे निर्भय प्राणी का खिताब पाया है।
वनस्पति
नारायण सरोवर अभयारण्य का अधिकांश हिस्सा कांटेदार रेगिस्तान और झाड़-झंकाड़ वाला है। इसके साथ ही कुछ मौसमी आर्द्र भूमियाँ और सवाना प्रकार के वनस्पति के सूखे जंगल भी हैं। गोराड और बबूल यहाँ कि प्रमुख वनस्पतियां हैं, पूर्व में गोराड और पश्चिम में बबूल काफ़ी उगता है। इसके अलावा निकट के इलाके में हरमो, बेर, पीलु, थोर, गुगल, आक्रमक 'पागल बबुल' जैसी क़रीबन 252 प्रकार की वनस्पतियाँ पाई जाती हैं।[1]
पक्षी
अभयारण्य में 184 से भी अधिक पक्षियों की प्रजातियाँ पाई जाती हैं। बस्टार्ड की तीनों प्रजातियाँ- ग्रेट इन्डियन बस्टार्ड, हौबारा बस्टार्ड और लेसर फ्लोरिकन यहाँ पाई जाती है। साथ ही साथ ब्लेक पेट्रीज, 19 तरह के शिकारी पक्षी और वौडरफोल की अनेक प्रजातियाँ भी मिलती हैं। कोई भी पक्षी प्रेमी यहाँ से नाराज होकर नहीं जा सकता।
काला डूंगर या ब्लैक हिल
गुजरात के कच्छ ज़िले का एक पर्यटन स्थल है। काला डूंगर से कच्छ का रण का दृश्य देखते ही बनता है तथा पहाड़ी स्थित ‘दत्तात्रेय मंदिर’ से सायंकाल की आरती पूजन के बाद पुजारी की आवाज़ पर सैकड़ों की संख्या में सियारों का दौड़ कर आना पर्यटकों को अचंभित करता है।
कांडला बंदरगाह
कांडला बंदरगाह (अंग्रेज़ी: Kandla Port) भारत में गुजरात प्रान्त में कच्छ ज़िले में स्थित देश का सबसे बड़ा बंदरगाह है। यह बंदरगाह भारत का सबसे पहला मुक्त व्यापार क्षेत्र है। कांडला बंदरगाह भारत के सबसे बड़े 12 मुख्य बंदरगाहो में से कार्गो हेन्डलींग में सबसे बड़ा है। यह कांडला नदी पर बना हुआ है। अधिकारियों की अनुमति लेकर यहां घूमा भी जा सकता है। यह बंदरगाह आयात-निर्यात से पूरे विश्व के साथ जुड़ा हुआ है। कांडला बंदरगाह खास आर्थिक क्षेत्र, जो स्पेश्यल ईकोनोमिक जोन से जाना जाता है। ये बंदरगाह पूरे भारत एवं एशिया का सबसे पहला खास आर्थिक क्षेत्र है, जिसकी स्थापना ई.स. 1965 में हुई थी।[1]
1 इतिहास
2 भौगोलिक स्थिति
3 सुविधाएं
4 पृष्ठदेश
5 आयात एवं निर्यात
6 अन्य जानकारी
7 टीका टिप्पणी और संदर्भ
8 संबंधित लेख
इतिहास
कांडला बंदरगाह एक ज्वारीय पतन है एवं इसका पोताश्रय प्राकृतिक है। इस बंदरगाह का निर्माण 1930 में कच्छ राज्य के लिए किया गया था। तब यहां एक जेट्टी थी, जिसमें साधारण आकार का केवल एक जहाज़ ठहर सकता था। किंतु विभाजन के फलस्वरूप जब कराची का बंदरगाह पाकिस्तान के अधिकार में चला गया, इसकी कमी पूरी करने हेतु ई.स. 1950 में पश्चिम भारत में अरबी समुद्र के कच्छ के अखात के तट पर कांडला बंदरगाह की स्थापना की गई थी, ताकि गुजरात के उत्तरी भाग, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली और जम्मू-कश्मीर राज्यों की व्यापार की आवश्यकता पूरी की जा सके। साथ ही मुम्बई के व्यापार भार को घटाया जा सके। अत: 1994 में कांडला बंदरगाह की योजना कार्यांवित की गयी। कांडला बंदरगाह का प्रशासन स्थानिक तौर पर कांडला पॉर्ट ट्रस्ट के हस्तक है, जिसका पूरा नियंत्रण भारत सरकार के शिपिंग मंत्रालय के अंतर्गत आता है।
टीका टिप्पणी और संदर्भ
↑ भारत का भूगोल |लेखक: डॉ. चतुर्भुज मामोरिया |प्रकाशक: साहित्य भवन पब्लिकेशन्स, आगरा |पृष्ठ संख्या: 367 |
↑ (Free Trade Zone)
देवभुमी द्वारका :-
द्वारका
द्वारकाधीशाचे मंदिर, द्वारका.

गुजरात राज्याच्या जामनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. लोकसंख्या १७,८०१ (१९७१). हे चार धामांपैकी एक असून गोमती नदीकाठी वसले आहे. भारतातील सर्वश्रेष्ठ पवित्र ठिकाणांत याची गणना होते. हिंदू लोक यास अत्यंत पवित्र मानतात. हे ओखाच्या दक्षिणेस सु. २५ किमी. आणि जामनगरच्या पश्चिमेस सु. ९६ किमी. आहे.
येथे जलमार्गाने व लोहमार्गानेही जाता येते, याचा उल्लेख महाभारत हरिवंश या ग्रंथात आणि भागवत, वराह ,स्कंद या पुराणांतही आढळतो. द्वारावतीपुर, द्वारवती, द्वारमती, वनमालिनी इ. नावांनीही हे प्रसिद्ध आहे. नगराभोवती असलेल्या तटाला अनेक द्वारे होती, त्यांवरून यास द्वारका, द्वारावती असे नाव पडले असावे.
पूर्वी हे आनर्त देशाच्या राजधानीचे ठिकाण होते. मथुरेत जरासंधापासून यादवांना त्रास होत असे, म्हणून श्रीकृष्णाने या ठिकाणी येऊन विश्वकर्म्याकडून समुद्राकाठी द्वारका नगरी स्थापन केली.
येथे द्वारकाधीशाचे (श्रीकृष्णाचे) सोनेरी कळस असलेले भव्य मंदिर असून त्याचा चार द्वारांचा सभामंडप साठ खांबांवर उभा आहे. मंदिरातील श्यामवर्ण चतुर्भूज उभी कृष्णमूर्ती १·२ मी. उंचीची आहे. तसेच या मंदिराच्या सभोवती अनेक लहान मोठी मंदिरे असून कुंडे व घाट प्रेक्षणीय आहेत. आद्य शंकराचार्याच्या चार मठांपैकी एक मठ येथे आहे. शहराच्या उत्तरेस १·५ किमी, अंतरावर द्वारका (रूपन) बंदर आहे. येथून पूर्वी मोठ्या प्रमाणात आयात निर्यात होत असे, पण ओखा बंदर झाल्यानंतर द्वारकेचे बंदर या दृष्टीने महत्त्व कमी झाले.
सध्या येथे एक सिमेंटचा मोठा कारखाना असून त्याची उत्पादनक्षमता दर दिवसाला ३०० टन आहे. येथे यात्रेकरूंसाठी १० धर्मशाळा असून वसंत पंचमी, अक्षय्यतृतीया, गोकुळाष्टमी इ. उत्सवांच्या वेळी मोठी यात्रा भरते. या प्रसिद्ध क्षेत्राच्या ठिकाणी झालेल्या उत्खननात इ. स. पू. दुसऱ्या शतकापासून नंतरचा इतिहास हाती आला. इ. स. पू. दुसऱ्या व पहिल्या शतकांतील लोकवस्तीचा पुरावा रोमन मद्यकुंभ, शंखांच्या बांगड्या व मणी ह्या स्वरूपात मिळाला.
इसवी सनाच्या पहिल्या ते चौथ्या शतकांतील थरांत उत्कृष्ट तांबड्या झिलईची मृत्पात्रे सापडली. त्यानंतरच्या सातव्या – आठव्या शतकांतील वास्तू दगडी पायांच्या व कौलारू छपरांच्या होत्या असे दिसते. तेराव्या-चौदाव्या शतकांतील वास्तूंत बहुरंगी काचेच्या बांगड्या, काचेचा मुलामा दिलेली आणि चिनीमातीची मृत्पात्रे आढळली. उत्खननात समुद्राची प्रलयकारी भरती दर्शविणारे वाळूचे प्रचंड थर सापडले. श्रीकृष्णाने स्थापलेली द्वारका हीच असे सागता येण्यासारखा कसलाही निश्चित पुरावा मात्र अद्याप मिळाला नाही.
लेखक - प्र. रा. सावंत / शां. भा.देव
द्वारकेचे पुरातत्वीय सत्य
द्वारका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर असून पश्चिम किनारपट्टीवर पाण्याने वेढलेल्या ओखामंडल या भागात गोमती नदीच्या उजव्या किनाऱ्यावर वसलेले आहे.
लोकप्रभा टीम | September 7, 2018 04:09 pm

उत्स विशेष
शमिका वृषाली – response.lokprabha@expressindia.com
श्रावण महिन्यात अनेक सण साजरे होतात, व्रतवैकल्ये केली जातात. रिमझिम
पावसाच्या धुंद मनमोहक वातावरणात आध्यात्मिक व धार्मिक परंपरांचा वारसा
जोपासायचे काम श्रावण महिना करतो. श्रावणात येणाऱ्या अनेक सणांपकी सर्वाचा
लाडका सण म्हणजे गोकुळाष्टमी, कृष्णजन्माचा दिवस. श्रावण महिन्याच्या वद्य
अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. कंसाच्या
कडेकोट बंदिवासात देवकीने आपल्या आठव्या पुत्राला जन्म दिला. विष्णूच्या या
आठव्या अवताराचे या दिवशी पृथ्वीवर दुर्जनांच्या नाशासाठी झालेले हे आगमन,
म्हणून हा दिवस मोठय़ा भक्तिभावाने व जल्लोषात साजरा केला जातो. कृष्ण हा
ईश्वर, ज्येष्ठ राजनीतिज्ञ, गोपिकांचा सखा अशा अनेक स्वरूपांत प्रसिद्ध
आहे. या कृष्णाच्या प्रेमात न पडणारे विरळच आहेत. जगाच्या पाठीवर सर्वत्र
कृष्णभक्त सापडतातच. याचे प्राचीन उत्तम उदाहरण म्हणजे हेलिडोटोरस.
हेलिडोटोरस हा इंडो ग्रीक राजाचा राजदूत भागभद्र या शुंग राजाच्या दरबारात
कार्यरत होता. विदिशा येथील इसवी सनपूर्व पहिल्या शतकातील स्तंभ शिलालेखात
ग्रीक राजदूत हेलिडोटोरस हा स्वत:ला ‘भागवत’ म्हणवून घेतो. यावरूनच
कृष्णभक्तीची परंपरा ही किती जुनी असावी हे लक्षात येते. ग्रीकही
कृष्णाच्या प्रेमातून अलिप्त राहू शकले नाहीत. गोकुळाष्टमी या सणाच्या
निमित्ताने आपण याच कृष्णतत्त्वाची उपासना करतो. म्हणूनच या सणाचे निमित्त
साधून याच कृष्णाशी निगडित असणाऱ्या एका ऐतिहासिक पलूचा आढावा घेणार आहोत.
ब्रिटिश आमदानीत अभ्यासकांनी रामायण व महाभारत तसेच इतर पौराणिक साहित्य या भाकडकथा आहेत म्हणून घोषित केल्या, ते साहजिकच होते. तत्कालीन विदेशी अभ्यासकांनी त्यांच्या संस्कृतीतील समाजरचनेनुसार किंवा त्यांच्या प्रादेशिक ऐतिहासिक मापदंडानुसार भारतीय इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. ज्या देशावर नेहमी परकीयांनी राज्ये केली, नेहमी परकीय आक्रमणे होत राहिली त्या भूमीत रामायण, महाभारत या केवळ कथाच असू शकतात असे प्रतिपादले जाऊ लागले, त्यामागची सत्यता पडताळून पाहण्यात आली नाही. यामधूनच मग आर्य भारताबाहेरून आले (आर्यन थिअरी) यासारखी गृहितके मांडली गेली त्यातून अनेक यक्षप्रश्न निर्माण झाले. भारताचा इतिहास हा अॅलेक्झांडरपासून सुरू होतो असे मानले जाऊ लागले, परंतु या पार्श्वभूमीवर एक आश्चर्याची घटना घडली, ही घटना जगाचा इतिहास बदलणारी ठरली. असंस्कृत भारतीय इतिहासाला ‘सुसंस्कृत’ बनवणारी हडप्पा संस्कृती जगासमोर आली. जगात चार प्राचीन मानल्या जाणाऱ्या संस्कृतींत ही हडप्पा संस्कृती गणली जाऊ लागली. या संस्कृतीची अनेक स्थळे उघडकीस आली; यामध्येच गेल्या काही दशकांत एक महत्त्वपूर्ण स्थळ आपला संबंध या संस्कृतीशी दर्शवत होते; हे म्हणजे द्वारका. द्वारकेचा कृष्णाशी असलेला संबंध आणि त्याच वेळी हडप्पा संस्कृतीशी असलेला संबंध हा भारतीय पौराणिक संस्कृती व भारतीय इतिहास या दोन्ही गोष्टींना आत्मचिंतन करायला लावणारा होता. आज आपण श्रीकृष्णाच्या ज्या शहराला द्वारका म्हणून ओळखतो, त्या शहराचे जुने नाव द्वारिका. भारतीयांच्या जीवनात द्वारकेचे वेगळेच महत्त्व आहे. आपल्या संस्कारातून, मनातून कृष्ण जसा आपण वेगळा काढू शकत नाही तसेच द्वारकेचे अस्तित्व भारतीयांच्या संस्कारातून पर्यायाने इतिहासातून वगळता येत नाही. पौराणिक कथा म्हटल्या, कीत्यात तथ्य किती, हा प्रश्न नेहमीच उभा राहतो आणि भारतात तर हा प्रश्नच जटिल केला गेला आहे. एक तर या कथा भाकड ठरविल्या जातात किंवा त्यांचे सादरीकरण अद्भुत दैवीकरणाच्या आच्छादनात केले जाते. त्यामुळे या कथांच्या गíभताकडे साहजिकच दुर्लक्ष होते. ऐतिहासिक तथ्य हाताळत असताना कुठल्याही पुराव्याला कमी लेखून चालत नसते; म्हणूनच साहित्यिक पुरावा हादेखील इतिहासात तितकाच महत्त्वपूर्ण असतो. एखादे साहित्य मग ते धार्मिक असो किंवा अधार्मिक, ते तत्कालीन समाजाचे प्रतिनिधित्व करत असते. त्यातील अद्भुततेचा किंवा लालित्याचा भाग वगळून त्याकडे डोळसपणे पाहणे गरजेचे असते. तसेच महाभारत- द्वारका यांच्या संदर्भात झालेले आढळते. भारतीय धार्मिक संकल्पनेत महाभारत, कृष्ण, द्वारका यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पौराणिक साहित्यातून श्रीकृष्णाने वसवलेल्या द्वारकेविषयी भरभरून लिहिलेले आहे. आता ही द्वारका अस्तित्वात होती का, असा प्रश्न निर्माण होतो? गेल्या पन्नास वर्षांत झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनातून द्वारकेचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे; परंतु याबरोबरच अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत.
१. द्वारका आहे किंवा होती तर मग श्रीकृष्ण सत्य समजावा की मिथ्या?
२. महाभारत इतिहास मानावा की एक भाकडकथा?
३. आतापर्यंत पाश्चिमात्य मापदंडानुसार भारताचा इतिहास जसा मांडला गेला आहे, तो तसाच आहे का?
या प्रश्नांवरूनच लक्षात येते की, हे प्रश्न केवळ इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाहीत तर, भारतीय समाज, संस्कृती, धर्म, राजकारण या सर्व बाबतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. म्हणूनच द्वारकेच्या संशोधनावर संपूर्ण जगाचे लक्ष केंद्रित झालेले आहे.
पौराणिक पार्श्वभूमी
द्वारका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर असून पश्चिम किनारपट्टीवर पाण्याने वेढलेल्या ओखामंडल या भागात गोमती नदीच्या उजव्या किनाऱ्यावर वसलेले आहे. द्वारका हे िहदू तीर्थक्षेत्रातील बद्रीनाथ, पुरी, रामेश्वर, द्वारका या चार धामांतील एक, तर मथुरा, अयोध्या, काशी, कांचीपुरम, उज्जैन, पुरी, द्वारका या सप्तपुरीतील एक महत्त्वपूर्ण स्थळ मानले जाते. सध्या अस्तित्वात असलेल्या द्वारकेची दोन रूपे आहेत एक गोमती द्वारका तर दुसरे बेट द्वारका. गोमती द्वारका ही धाम आहे, तर बेट द्वारका ही पुरी आहे. बेट द्वारका ही गोमती द्वारकेपासून २५ किलोमीटर अंतरावर असून बेट द्वारकेला जाण्यासाठी नावेने समुद्र ओलांडावा लागतो. खरं तर हा समुद्र नसून कच्छची खाडी आहे. द्वारकेत श्रीकृष्णाचं मंदिर हे गोमती नदीच्या काठी आहे. ती नदी सागरात एकरूप होण्यासाठी तिथे येते. १७० फूट उंचीचे असे हे मंदिर असून त्याचे शिखर पाच मजली आहे. त्या मंदिराचा सभा मंडप साठ खांबांवर उभा असून गर्भगृहात श्रीकृष्णाची चतुर्भुज अशी चार फुटांची मूर्ती आहे. श्रीकृष्णाच्या अष्टनायिकांची स्थापना जवळच्याच एका वाडय़ात केलेली आहे.
द्वारिका हा मूळ संस्कृत शब्द असून याचा अर्थ अनेक द्वार असलेलं नगर असा होतो. महाभारतात या स्थळाचा उल्लेख कुशस्थली असा करण्यात आलेला आहे. हे नगर भगवान श्रीकृष्णांनी वसवलेलं असून कालांतरांने सिंधु सागरात विलीन झाले अशी आख्यायिका आहे. असे असले तरी महाभारतातील व इतर पौराणिक साहित्यानुसार द्वारका ही कृष्णाने वसविण्यापूर्वी कुशस्थली या नावाने अस्तित्वात होती. देवी भागवत व श्रीमद भागवतानुसार जुनी द्वारका म्हणजेच कुशस्थली हे शहर ‘शर्यत’ राजवंशाचा राजा रेवत याने उभारलेले होते. राजा रेवत हा आनर्ताचा मुलगा असून वैवस्वत मनू याचा नातू होता. तर बलरामाची पत्नी रेवती ही रेवत राजाची कन्या होती. वायू-पुराणानुसार यादवांपूर्वी हे स्थळ आनर्ताच्या राजधानीचे ठिकाण होते. या राजवंशातील ककुद्मी या राजाच्या कारकीर्दीत पुण्यजन नावाच्या राक्षसाने हा प्रदेश बळकावला व कालांतराने जुनी द्वारका पाण्याखाली गेली. या घटनेनंतर बऱ्याच काळाने श्रीकृष्णाने द्वारका या नावाने येथे नवीन शहर वसवले. महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे जरासंधाने कालयवनाच्या मदतीने मथुरेवर सतरा वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला. अठराव्या वेळी जरासंध व कालयवनाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे श्रीकृष्ण व बलरामाने यादवांसह राजस्थानमाग्रे रैवतक पर्वताचा पायथा गाठला आणि तिथे सागरतीरावर त्याने नवी द्वारकानगरी उभारली, म्हणूनच श्रीकृष्ण रणछोडदास या नावाने प्रसिद्ध झाला. श्रीकृष्णाने नव्या नगरीसाठी भगवान विश्वकर्मा यांचे आवाहन केले. विश्वकर्मा प्रगट झाल्यावर त्यांनी श्रीकृष्णाच्या विनंतीवरून समुद्रावर तरंगत्या अशा अद्भुत द्वारकेची निर्मिती केली. ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती. द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते. जरासंधासारखे शत्रू द्वारकेत सहजासहजी प्रवेश करू शकणार नाहीत अशी या द्वारकेच्या प्रवेशद्वाराची रचना होती, असे वर्णन पुराणात सापडते. परंतु दुर्दैवाने त्या शहराचा अंतही पाण्यात विलीन होऊनच झाला. श्रीकृष्णाच्या देहत्यागानंतर द्वारकेला सागराने गिळून टाकले, प्राचीन द्वारका ही बेटावर वसलेली होती व बंदर स्थान होती. बंदर अर्थव्यवस्थेमुळे आíथकदृष्टय़ा पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती. गांधारीच्या शापामुळे यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचा नाश झाला, यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारकेला समुद्राने आपल्या अंतरात सामावून घेतले अशी आख्यायिका आहे. ती द्वारका समुद्रात बुडाल्यावर कृष्णाच्या नातवाने वज्रनाथने ती पुन्हा उभारली. परंतु कालांतराने तिचा अंतही तसाच झाला.
सध्या द्वारका व बेट द्वारका ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी पुराणकाळातील द्वारका होती का? यावरून अभ्यासकांमध्ये बरीच मतमतांतरे आहेत. ‘पेरीप्लस ऑफ एरिथ्रीअन सी’ या ग्रीक-रोमन ग्रंथात द्वारिकेला ‘बराका’ असे म्हटले गेले आहे, असा काही अभ्यासकांचा अंदाज आहे, तर टॉलेमी म्हणतो की, बराका हे एक द्वीप असून चारी बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. महाभारतकालीन द्वारका नेमकी कुठे स्थित आहे, यावर पुष्कळ मतभेद आहेत. पहिला लेखी पुरावा आपल्याला पालीटाना येथील ताम्रपटामध्ये सापडतो. या ताम्रपटाचा कालावधी इ.स. सहाव्या शतकात जातो. भारतीय पुरातत्त्वाचे जनक डॉ. हसमुखलाल सांकालिया यांच्या मते सध्याची द्वारका हीच महाभारतकालीन द्वारावती आहे. पौराणिक साहित्यात दोन द्वारकांचा उल्लेख प्रकर्षांने येतो, एक म्हणजे रेवत राजाची द्वारका व दुसरा उल्लेख म्हणजे श्रीकृष्णाची द्वारका. महाभारतातील सभापर्व व आदिपर्वानुसार तसेच विष्णू व वायू पुराणात उल्लेखलेली द्वारका ही गुजरातमधील रैवत पर्वताच्या परिसरातील आहे, तर महाभारतातील मौसल पर्व हरिवंश, भागवत पुराणानुसार द्वारका ही समुद्रकिनारी वसलेली आहे. हरिवंशाच्या विष्णुपर्वात द्वारकेचा उल्लेख वारीदुर्ग म्हणजेच जलदुर्ग म्हणून केलेला आहे. हा दुर्ग चहूबाजूंनी पाण्याने वेढलेला आहे असे वर्णन केलेले आहे. पुरातत्वज्ज्ञ डॉ. सांकलिया यांच्या मतानुसार या दोन्ही द्वारका वेगवेगळ्या काळांतील असून आदी पर्व, सभा पर्व, विष्णू पुराण व वायू पुराण यात नमूद केलेली द्वारका ही इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकातील आहे, तर मौसल पर्वातील द्वारका ही त्यानंतरच्या कालखंडातील आहे. बौद्ध साहित्यातही आपल्याला द्वारकेचा उल्लेख सापडतो. घट जातकात इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकातील द्वारकेचा उल्लेख केलेला आहे. या उल्लेखानुसार द्वारकेच्या एका बाजूस समुद्र, तर दुसऱ्या बाजूस डोंगर आहे. काही तज्ज्ञांच्या मतानुसार ज्या वेळेस यादव मथुरेहून द्वारकेस स्थलांतरित झाले त्या वेळेस त्यांनी एक द्वारका वसवलेली नसून तब्बल पाच द्वारका वसवल्या असाव्यात. केवळ साहित्यातच नव्हे तर गुजरातमध्ये अनेक लोककथांमध्ये वेगवेगळ्या स्थळांचा द्वारका म्हणून उल्लेख केला जातो. त्यात मूळ द्वारका, सध्याची द्वारका, माधवपूर, जुनागढ, पोरबंदर व मियानी किनाऱ्यामधील काही स्थळांचा समावेश होतो. प्रसिद्ध पुरातत्त्वज्ज्ञ डॉ. एस. आर. राव यांनी कुशस्थली हीच द्वारका आहे असा निष्कर्ष मांडला. त्यांच्या मतानुसार गोमती द्वारका व बेट द्वारका याच प्राचीन द्वारका आहेत; परंतु पुरातत्वज्ज्ञ डॉ. अलोक त्रिपाठी यांनी त्यांच्या मताचे खंडन करत, गुजरातमधील माधवपूर, जुनागढ, पोरबंदर व मियानी किनाऱ्यामधील काही स्थळे यांचा संबंध प्राचीन द्वारकेशी असावा, असे मत मांडले. त्रिपाठींनी जुनागढ हे स्थळ प्राचीन द्वारका असावे, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांच्या संशोधनात केला आहे. यासाठी त्यांनी सॅटेलाइट रिमोट सेिन्सग फोटोग्राफीद्वारे घेतलेल्या चित्रणाचा वापर केला. या छायाचित्रात त्यांना जुनागढ परिसरात आटलेल्या नदीचे पुरावे सापडले. त्या आधारे त्यांनी प्राचीन काळात जुनागढ येथे पूर्वी पाण्याचा स्रोत होता व तो कालांतराने आटला, अशी मांडणी त्यांच्या संशोधनात केली. प्राचीन साहित्यात पाण्याच्या स्रोतास सागर असे म्हणत, त्याचा आधारही त्यांनी घेतला. तसेच येथे डोंगररांग असून पुराणात द्वारकेचे वर्णन केल्याप्रमाणे सागर व पर्वत असे दोन्हीही येथे आहेत. म्हणूनच त्रिपाठी यांनी जुनागढला प्राचीन द्वारकेचा दर्जा दिला. याशिवाय सम्राट अशोक व शक राजा रुद्रदामन पहिला यांचे शिलालेखही जुनागढला सापडले आहेत, हे विशेष.
पुरातत्त्वीय पुरावे
सर्वात आधी १९६३ मध्ये गुजरात पुरातत्त्व विभागाने व पुण्याच्या डेक्कन अभिमत महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली द्वारकेच्या द्वारकाधीश मंदिराच्या बाजूलाच उत्खनन करण्यात आले. या उत्खननातून इसवी सन पूर्व कालखंडात तिथे वस्ती होती याचे पुरावे सापडले. या संशोधनातून द्वारका दोनदा बुडाली असाही निष्कर्ष निघाला. या पुरातत्त्वीय उत्खननात पाच वेगवेगळ्या कालखंडाचे थर अभ्यासकांनी उघडकीस आणले. या थरांतून रेड पॉलिश वेअर, मातीचे चेंडू, रोमन अॅम्फोरा, शंखांपासून तयार केलेल्या बांगडय़ा, मंदिराचे भग्न अवशेष, मध्ययुगीन कालखंडातील गुजरातच्या सुलतानाची नाणी, मध्ययुगीन काचेच्या बांगडय़ा, मध्ययुगीन चमकदार मृदभांडी असे काही महत्त्वपूर्ण अवशेष मिळाले. तर डेक्कन महाविद्यालयानंतर डॉ. एस. आर. राव आणि भारतीय पुरातत्त्व खात्याने १९७९-८० च्या काळात या भागात पुन्हा पुरातत्त्वीय उत्खनन केले. या उत्खननातून आठ कालखंडांचे थर उघडकीस आले. या शिवाय या भूभागावर इसवी सन पूर्व १५०० या कालखंडात एक प्रगत हडप्पाकालीन संस्कृती नांदत होती आणि ती समुद्रामुळे नष्ट झाली असा निष्कर्ष अभ्यासा अंती मांडण्यात आला. द्वारका हे भारतातील पहिले सागरी पुरातत्त्वीय स्थळ असून समुद्राच्या तळाशी झालेले उत्खनन आणि सर्वेक्षण गोव्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशियनोग्राफीच्या मार्फत करण्यात आले. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशियनोग्राफीच्या मदतीने १९८२-८३ साली बेट द्वारकेला सर्वात प्रथम ऑन शोअर म्हणजे किनाऱ्यावर आणि ऑफ शोअर म्हणजे थेट समुद्रात पाण्याखाली असे सर्वेक्षण सुरू झाले. १९८२ पासून सुरू झालेले हे सर्वेक्षण टप्प्याटप्प्याने २००१ पर्यंत चालले. किनाऱ्यालगत आणि समुद्राअंतर्गत चाललेल्या या सर्वेक्षणात अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी उघडकीस आल्या. २००५ आणि २००७ मध्ये भारतीय नौदल व भारतीय पुरातत्त्व खात्याने एकत्रितपणे सर्वेक्षण केले. १९९७ आणि २००१ या कालावधीत समुद्री उत्खननात बरेच महत्त्वाचे पुरावे आढळले. त्यासाठी अभ्यासकांनी द्वारकेच्या किनाऱ्यापासून इंटर-टाईडल झोन ते २५ किमी खोल पाण्यात गवेषण केले. या संशोधनात एक चौरस किमी एवढा समुद्री सपाटीचा भाग अभ्यासण्यात आला. हा परिसर दोन भागात विभागलेला होता. पहिल्या भागात म्हणजेच लोकेशन-ए मध्ये स्थापत्य अवशेष आढळून आले. या स्थापत्य अवशेषात बरेच अर्धवर्तुळाकार खडक सापडले. त्यांचा आकार ९० अंश म्हणजेच इंग्रजी ‘छ’ आकाराचा आहे. या स्थापत्य रचना ६०-८० सेमी. एवढय़ा उंचीच्या असून, याचबरोबर काही आयताकृती दगडी ठोकळेसुद्धा सापडले. वेगवेगळ्या प्रकाराचे जहाजांचे दगडी नांगरसुद्धा या उत्खननात सापडले, त्यावरून असे सिद्ध होते कीद्वारका ही कधी काळी महत्त्वाचे बंदर असण्याची शक्यता आहे. तसेच या शिवाय बेट द्वारका इसवी सन पूर्व १५०० मध्ये मुख्य भूमीला जोडलेली होती हेही या अभ्यासात सिद्ध झाले. एकूणच संपूर्ण सर्वेक्षणात दगडी वास्तूंचे अवशेष, उत्तर हडप्पाकालीन मृद भांडय़ांचे अवशेष, पाटे, भग्न विष्णू मूर्ती, मंदिराचे अवशेष, किल्ल्याच्या िभतींचे अवशेष, नांगर, पितळेच्या वस्तू, लोखंडाच्या गंजलेल्या वस्तूंचे भाग, जीर्ण लाकडी वस्तूंचे भाग, मणी, कुशाण कालीन नाणी असे अनेक पुरावे हाती लागले. थोडक्यात डॉ. एस. आर. राव यांच्याच शब्दात सांगावयाचे झाले तर द्वारका हे भारतीय इतिहासातील पहिले सागरी बंदर हडप्पा संस्कृतीबरोबरच भारतातील नागरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचेही प्रतिनिधित्व करते. हा दुसरा टप्पा इसवीसनपूर्व सहाव्या शतकातील आहे. श्रीमद्भागवतामध्ये द्वारकेचे वर्णन करताना नारदमुनी म्हणतात, ‘हे शहर उद्यान, पक्षी, पाखरं यांनी समृद्ध असून, इकडची जल-तलाव विविध पुष्पानी बहरलेली होती. त्यात इंदिवरा, अंभोजा, कहलारा, कुमुद, उत्पला कमळ आणि हंसाचे मधुर स्वर तरंगत असत. सोन्या-चांदी-पाचूनी बांधलेले नऊ लक्ष राजमहाल, या महालांमध्ये सोन्या- माणकांनी सजवलेल्या वस्तूंची आरास होती. शहर-रचना अप्रतिम स्थापत्यकलेचा नमुना होती. रस्ते, बाजारहाट, अनेक सभागृहे आणि देवतांची देवालये शहराची शोभा वाढवत असत. मार्ग, राजमार्ग, वस्तील मार्ग, या सर्वावर उष्णता कमी करण्यासाठी पाणी िशपडले जात असे. भगवान विश्वकर्मानी आपली विशेष कला भगवान श्रीकृष्णासाठी या नगर रचनेतून दाखवली. विश्वकमार्ंनी १६ सहस्र महाल उभारले. या सर्व महालात श्रीकृष्णांच्या १६ सहस्र राण्या राहत होत्या. या शहराला महाभारतात द्वारावती म्हणून ओळख होती. हे वर्णन जरी लालित्यपूर्ण असले तरी सापडलेल्या पुराव्यांवरून श्रीमद् भागवतामध्ये द्वारकेची वर्णन केलेली नगररचना अगदीच नाकारता येत नाही, असे संशोधकांना पुराव्यांवरून लक्षात आले.
द्वारकेचा शेवट
द्वारका हे भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण स्थळ आहे. द्वारकेचे धार्मिक महत्त्व हे तिच्या ऐतिहासिक पाश्र्वभूमीपेक्षा नेहमीच वरचढ ठरते. हे धार्मिक महत्त्व केवळ अस्तिकांसाठी नाही तर नास्तिकांसाठीही तेवढेच महत्त्वाचे असते. आस्तिक आपल्या श्रद्धेच्या चष्म्यातून द्वारकेकडे पाहतात तर नास्तिक अस्तिकांना विरोध करण्याच्या भूमिकेतून द्वारकेकडे पाहतात. या वादाच्या द्वंद्वाचे चटके भारतीय इतिहासाला उजाळा देणाऱ्या स्थळाला सोसावे लागतात. मग घडते ते राजकारण, म्हणूनच सगळ्या प्रकारचे पडदे, चष्मे डोळ्यांवरून बाजूला सारून एक ऐतिहासिक स्थळ म्हणून द्वारकेकडे पाहिल्यास आपल्यालाच पूर्वजांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा समजण्यास मदत होईल.
द्वारकेच्या संशोधनात बेट द्वारका हे तत्कालीन प्रसिद्ध बंदर आहे हे सिद्ध झाले आहे. तरीही उपलब्ध पुराव्यांवरून द्वारकेच्या काळासंबंधी अनेक वाद आहेत. नवीन संशोधनात जहाजांचे नांगर मोठय़ा प्रमाणात सापडले, या नांगरावरून ते कुठल्या भागातील असावेत, कुठल्या प्रकारच्या नौकांसाठी वापरले जात असावेत, असे अनेक अंदाज बांधता येतात. त्याचबरोबर अभ्यासकांनी द्वारकेच्या आजूबाजूच्या परिसरातही सर्वेक्षण आणि उत्खनन केले, या सर्वेक्षणात त्यांना गुजराती लिपी असलेला एक दगडी ठोकळा मिळाला. या दगडी ठोकळ्याची धाटणी, जहाजांच्या नागरांप्रमाणे असल्याने अभ्यासकांनी गुजराती लिपीच्या आधारे या नांगराचा काळ मध्ययुगीन असून अशा प्रकारचे नांगर इंडो-अरब व्यापाराचे निदर्शक होते, असा निष्कर्ष मांडला. वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाण्यात बुडालेल्या द्वारकेच्या अवशेषांना जगासमोर आणण्यात आले आहे, असे असले तरी या पुराव्यांची कालनिश्चितीही तशीच वैज्ञानिक पद्धतीने होण्याची गरज आहे. जहाजांच्या नांगरांचा काळ हा गृहीतकांऐवजी रेडिओमेट्रिक डेटिंगसारख्या वैज्ञानिक पद्धतीने शोधला असता तर सत्याकडे अधिक अचूक वाटचाल करता आली असती. नांगर मध्ययुगीन तर पूर्वीच्या उत्खननात मिळालेली मृदभांडी हडप्पाकालीन असल्याने अनेकविध कालखंडांमध्ये हा भूभाग वापरात होता, हेच लक्षात येते. ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात नेहमीच लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे ते स्थळ केवळ एकाच काळाचे निदर्शक असू शकत नाही. कालपरत्वे एक संस्कृती वसते, फुलते व कालांतराने नष्ट होते व त्याच ठिकाणी नव्याने दुसरी संस्कृती रुजू होते. असे असले तरी द्वारकेला सापडलेल्या पुराव्यांवरून हे मात्र नक्की सिद्ध होते की, द्वारका हे नागरीकरणाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरक्षित कार्यरत बंदर होते व इंडो-अरब व्यापाराच्या काळात ते प्रगतीच्या सर्वोच्च िबदूवर होते. म्हणूनच द्वाराकेच्या संदर्भात अजून सखोल व शास्त्रीय संशोधनाची गरज आहे.
श्रीकृष्णाची नगरी द्वारका महाभारत झाल्यानंतर जवळपास ३६ वर्षानंतर समुद्रात बुडाली.
द्वारका समुद्रात बुडण्यापूर्वी श्री कृष्णा समवेत संपूर्ण यदुवंश युद्धात मारला गेला. पौराणिक कथांनुसार “यादवी” माजून यदुवंश नष्ट होण्यामागे आणि श्रीकृष्णाची नगरी द्वारकेला जलसमाधी मिळण्यामागे दोन प्रमुख कारणे सांगितली जातात.
एक म्हणजे गांधारीने श्रीकृष्णाला दिलेला शाप आणि दुसरी म्हणजे ऋषी मुनींनी श्रीकृष्णाचा मुलगा सांबा याला दिलेला शाप.
अर्थात, सदर पौराणिक कथा या काही द्वारकेला जलसमाधी मिळाल्याचे सबळ पुरावे मानता येत नाहीत. पण आजही त्या समुद्रात एक शहर आहे, जे अगदीच महाभारतातल्या द्वारकेशी संबंध दर्शवते. संशोधक आजही पाण्यात उड्या घेऊन त्या प्राचीन नगरीचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेला एक रिपोर्ट ह्या संदर्भात वाचनीय आहे. इच्छुकांनी इथे क्लिक करून जरूर वाचावा.
असो – तर आपण या कथा सविस्तरपणे जाणून घेऊया.
गांधारीने दिला होता यदुवंशाच्या नाशाचा शाप
महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा युधिष्ठीर पुन्हा एकदा सिंहासनावर विराजमान होणार होता, तेव्हा गांधारीने महाभारताच्या युद्धासाठी श्रीकृष्णाला जबाबदार ठरवून शाप दिला की,
ज्याप्रकारे कौरवांच्या वंशाचा नाश झाला त्याचप्रकारे यदुवंशाचा सुद्धा नाश होईल.
==
हे ही वाचा : प्रेमाचं प्रतिक ठरलेल्या कृष्ण-राधेचा विवाह झाला होता का? प्रचलित कथा काय सांगतात?
==
ऋषींनी दिला होता सांबाला शाप
महाभारत युद्धानंतर जेव्हा ३६ वे वर्ष सुरु झाले तेव्हा अनेक वाईट घटना घडू लागल्या आणि द्वारकेत अपशकुनाचे संकेत मिळू लागले. एक दिवस महर्षी विश्वमित्र, कण्व, देवर्षी नारद द्वारकेला गेले. तेव्हा यदु वंशातील राजकुमारांनी त्यांची मस्करी करण्याचे ठरवले.
त्यांनी श्रीकृष्णाचा मुलगा सांबा याला स्त्री वेशात ऋषींसमोर उभे गेले आणि ऋषींना सांगितले की,
ही स्त्री गर्भवती आहे, हिच्या गर्भातून काय उत्पन्न होईल ?
सर्व ऋषींच्या जेव्हा लक्षात आले की हे तरुण आपला अपमान करत आहेत, तेव्हा त्यांनी क्रोधीत होऊन शाप दिला की,
श्रीकृष्णाचा हा मुलगा वृष्णी आणि अंधक वंशाच्या पुरुषांचा नाश करण्यासाठी एक लोखंडाचा मुसळ निर्माण करेल. त्याच कारणाने तुमच्यासारखे क्रूर आणि क्रोधी लोक स्वत:च स्वत:च्या संपूर्ण कुळाला नष्ट कराल. त्या मुसळाच्या प्रभावाने फक्त श्रीकृष्ण आणि बलराम वाचतील.
श्रीकृष्णला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना खात्री होती की हा शाप खरा ठरणार.
ऋषींच्या शापाच्या प्रभावामुळे सांबाने दुसऱ्याच दिवशी मुसळ निर्माण केला. जेव्हा ही गोष्ट राजा अग्रेसन याला समजली तेव्हा त्यांने त्या मुसळाचा चुरा करून तो समुद्रात फेकून दिला. त्यानंतर द्वारकेमध्ये भयंकर अपशकुन होऊ लागले. प्रत्येक दिवशी वादळे येऊ लागली.
नगरामध्ये उंदरांची संख्या इतकी वाढली की, रस्त्यावर माणसांपेक्षा उंदीरच जास्त दिसू लागले. ते रात्री झोपलेल्या माणसांचे केस आणि नखे कुरडतडून खात असत. गायींच्या पोटातून गाढव, कुत्रींच्या पोटातून बोका आणि मुंगुसांच्या गर्भातून उंदीर जन्माला येऊ लागले.
श्रीकृष्णाने जेव्हा नगरामध्ये होणारे हे अपशकुन बघितले, तेव्हा त्यांना कळून चुकले की गांधारी देवींचा शाप खरा होण्याची वेळ समीप आली आहे.
हे सर्व अपशकून आणि सोबतच चालू पक्षाच्या तेराव्या दिवशी असणारा अमावस्येचा योग अगदी महाभारताच्या युद्धाच्या वेळी असलेल्या क्षणासारखा होता.
गांधारीचा शाप अटळ आहे हे लक्षात आल्यावर श्रीकृष्णाने द्वारकेतील यदुवंशीयांना प्रभास तीर्थावर जाण्याची आज्ञा दिली. श्रीकृष्णाच्या आज्ञेचा मन राखून सगळे राजवंशी समुद्र किनाऱ्यावर प्रभास तीर्थावर येऊन राहू लागले.
==
हे ही वाचा : कुरुक्षेत्रात पांडवांचा निर्णायक विजय होण्यामागची, कृष्णनीतीची अशी ही एक कथा!
==
प्रभास तीर्थावर असताना एके दिवशी अंधक आणि वृष्णी वंशजांमध्ये बाचाबाची झाली.
तेव्हा सत्यकीने रागाच्या भरामध्ये कृतवर्माचा वध केला. हे बघून अंधक वंशीयांनी सत्यकीला घेरून त्याचावर हल्ला केला. सत्यकीला एकटे पाहून श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न त्याला वाचवण्यासाठी गेला.
सत्यकी आणि प्रद्युम्न दोघेच अंधक वंशीयांशी लढले, परंतु त्यांचे बळ कोठेतरी अपुरे पडले आणि अंधक वंशीयांनी रागाच्या भरात दोघांचा वध केला.
आपला पुत्राच्या आणि सत्यकीच्या वधाने क्रोधीत होऊन श्रीकृष्णाने हाताने जमिनीवरचे गवत उपटले. दुसऱ्याच क्षणी ते सांबाने निर्माण केलेल्या लोखंडाच्या मुसळामध्ये परावर्तीत झाले.
त्या मुसळामध्ये इतकी शक्ती होती की एका घावात ते समोरचाचे प्राण हिरावून घेत असे. श्रीकृष्णाने प्रभास तीर्थावर जाऊन त्या मुसळाने सर्वांचा वध करण्यास सुरुवात केली.
श्रीकृष्णाच्या डोळ्यादेखत सांब, चारुदेष्ण, अनिरुद्ध आणि गद या महावीरांचा मृत्यू झाला. श्रीकृष्णाने रागामध्ये इतर सगळ्याच यदुवंशीय वीरांचा वध केला. तेव्हा त्यांनी आपला सारथी दारूक याला सांगितले की,
तू हस्तिनापूराला जा आणि अर्जुनाला या सर्व प्रकाराबद्दल माहिती दे आणि त्याला द्वारकेला घेऊन ये.
दारूकने श्रीकृष्णाची आज्ञा पाळली. इकडे श्रीकृष्ण पुन्हा द्वारकेला परतले त्यांनी सर्व गोष्ट पिता वसुदेवांना सांगितली. यदुवंश नष्ट झाल्याचे दु:ख वसुदेवलाही झाले.
ही वार्ता वडिलांना ऐकवल्यानंतर श्रीकृष्ण बलरामाला भेटण्यासाठी जंगलामध्ये गेले. त्यांनी पाहिले कि बलरामाने आधीच समाधी घेतली आहे. व्यथित झालेल्या श्रीकृष्णाने देखील अवतार कार्य संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने स्वयं समाधी घेतली आणि त्याच अवस्थेत ते जमिनीवर पडून राहिले.
ज्यावेळी श्रीकृष्ण समाधीमध्ये होते, त्याचवेळी जरा नावाचा एक शिकारी शिकार करण्यासाठी आला त्याने लांबूनच हरीण समजून श्रीकृष्णाला बाण मारला.
बाण मारल्यानंतर तो शिकारी शिकार पकडण्यासाठी पुढे गेला, तेव्हा भगवान श्रीकृष्णाला बघून त्याला पश्चाताप झाला.
तेव्हा –
“हे सर्व विधिलिखित असून, माझा अवतार असाच संपणार होता…”
हे सांगून श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला आणि ते स्वर्गात निघून गेले.

इकडे दारूक श्रीकृष्णाचा निरोप घेऊन हस्तिनापुरात दाखल झाला. यदुवंश नष्ट झाल्याची वार्ता ऐकून अर्जुन त्वरित द्वारकेकडे रवाना झाला. अर्जुन जेव्हा द्वारकेला आला, तेव्हा तेथील भयावह परीस्थिती बघून त्याला खूप दु:ख झाले.
वसुदेवाने सर्व नगरवासीयांना आपल्या बरोबर घेऊन जाण्याची विनंती अर्जुनाला केली. कारण श्रीकृष्णाचे अवतार कार्य संपुष्टात आले होते आणि सोबत द्वारकेचा देखील अंत होणार होता.
अर्जुनाने वसुदेवाची ही विनंती मान्य केली आणि आजपासून सातव्या दिवशी इंद्रप्रस्थासाठी आपण रवाना होऊ अशी घोषणा केली. द्वारकेतील सर्व नगरवासीयांनी अर्जुनाची आज्ञा शिरसावंद्य मानून प्रस्थानाची तयारी सुरु केली.
==
हे ही वाचा : सरळ वाचली तर ‘रामकथा’ आणि उलट वाचली तर ‘कृष्णकथा’-“हा” ग्रंथ म्हणजे प्रतिभेचा उत्कृष्ट नमुनाच!
==
दुसऱ्या दिवशी सकाळी वासुदेवानी आपल्या प्राणाचा त्याग केला. अर्जुनाने विधीपूर्वक त्यांचे अंतिम संस्कार केले. वसुदेवाच्या पत्नी देवकी, भद्रा, रोहिणी या सुद्धा वसुदेवाच्या चितेवरून सती गेल्या. त्यानंतर अर्जुनाने प्रभास तीर्थामध्ये मारल्या गेलेल्या सर्व यदुवंशीयांचे सुद्धा अंतिम संस्कार केले.
सातव्या दिवशी अर्जुन आपल्या नातेवाईकांना आणि नगरवासीयांना आपल्याबरोबर घेऊन इंद्रप्रस्थाकडे गेला.
सर्वजण द्वारकेमधून बाहेर निघताच श्रीकृष्णाची प्राणप्रिय द्वारका नगरी हळूहळू समुद्रात बुडू लागली. ते दृश्य पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले. पुढील काही क्षणातच द्वारकेला जलसमाधी मिळाली.
तर अशी ही आख्यायिका! म्हटलं तर आख्यायिका…म्हटलं तर कथा…म्हटलं तर इतिहास…!
https://www.inmarathi.com/16856/there-are-some-important-reasons-behind-the-drowning-of-lord-krishnas-dwarka-city/
'या' एका चुकीमुळे लग्नानंतर १२ वर्षे रुक्मिणीपासून दूर राहिले श्रीकृष्ण
| Maharashtra Times | Updated: 26 Jun 2020, 3:11 pm
द्वारिका हा मूळ संस्कृत शब्द असून याचा अर्थ अनेक द्वार असलेले नगर असा होतो. द्वारका हे तीर्थक्षेत्रातील बद्रीनाथ, पुरी, रामेश्वर, द्वारका या चार धामांतील एक, तर मथुरा, अयोध्या, काशी, कांचीपुरम, उज्जैन, पुरी, द्वारका या सप्तपुरीतील एक महत्त्वपूर्ण स्थळ मानले जाते. द्वारकाधीश मंदिरापासून सुमारे २ कि.मी. अंतरावर रुक्मिणी मातेचे मंदिर आहे. या मंदिराची उभारणी १२ व्या शतकात झाल्याचे सांगितले जाते. श्रीकृष्णाच्या मंदिरापासून दूरवर रुक्मिणी देवीचे मंदिर का बांधण्यात आले? विवाहानंतर श्रीकृष्ण रुक्मिणी देवीपासून तब्बल १२ वर्षे लांब का राहिले? जाणून घेऊया...
'या' एका चुकीमुळे लग्नानंतर १२ वर्षे रुक्मिणीपासून दूर राहिले श्रीकृष्ण
रुक्मिणी देवी मंदिराची कथा
श्रीकृष्णांच्या
विनंतीवरून विश्वकर्मा यांनी द्वारका नगरीचे निर्माण केल्याचे सांगितले
जाते. श्रीकृष्णांच्या अवतारकार्य समाप्तीनंतर तत्कालीन द्वारका नगरी
समुद्रात विलीन झाली, असे सांगितले जाते. महाभारतकालीन एका कथेनुसार,
रुक्मिणी देवीचे मंदिर द्वारका नगरीपासून लांब असल्यामागे एक विशिष्ट कारण
असल्याचे सांगितले जाते. विवाहानंतर श्रीकृष्णाकडून एक चूक झाली होती. त्या
चुकीमुळे रुक्मिणी आणि श्रीकृष्णांना १२ वर्षांपर्यंत वेगळे राहावे लागले
होते. आता ज्या ठिकाणी मंदिर आहे, त्या ठिकाणी रुक्मिणी मातेने कठोर तप
केले होते, असेही सांगितले जाते.
दुर्वासा ऋषींची भेट
यदुवंशी
ऋषी दुर्वासा यांना कुलगुरू मानत असत. त्यामुळे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी
यांचा विवाह झाल्यानंतर कुलगुरूंचे आशिर्वाद घेण्यासाठी ते दुर्वासा
ऋषींच्या आश्रमात येतात. द्वारका नगरीत आदरातिथ्य करण्याची आणि सेवा
करण्याचा मानस असल्याचे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी दुर्वासा ऋषींना सांगतात.
आजही द्वारकेपासून काही अंतरावर दुर्वासा ऋषींचा आश्रम असल्याचे आढळून
येते. सध्या अस्तित्वात असलेल्या द्वारकेची दोन रूपे आहेत. एक गोमती
द्वारका तर दुसरे बेट द्वारका. गोमती द्वारका ही धाम आहे, तर बेट द्वारका
ही पुरी आहे.
अन्यथा १२ वर्ष होऊ शकली नसती जगन्नाथ रथयात्रा; परंपरा अबाधित
दुर्वासा ऋषींची अट
श्रीकृष्ण
आणि रुक्मिणी यांनी दिलेले निमंत्रण दुर्वासा ऋषी आनंदाने स्वीकारतात.
मात्र, श्रीकृष्णासमोर एक अट ठेवतात. आपण दोघे ज्या रथातून या आश्रमात आला
आहात, त्या रथातून मी येणार नाही. माझ्यासाठी दुसऱ्या रथाची व्यवस्था
करावी, अशी अट दुर्वासा ऋषी श्रीकृष्णाला सांगतात. कोणतेही आढेवेढे न घेता
श्रीकृष्ण दुर्वासा ऋषींची अट मान्य करतात. महाभारतात द्वारका नगरी या
स्थळाचा उल्लेख कुशस्थली असा करण्यात आलेला आहे. काही वर्षांपूर्वी
द्वारकाधीश मंदिराजवळ उत्खनन करण्यात आले होते. या उत्खननातून इसवी सन
पूर्व कालखंडात तिथे वस्ती होती याचे पुरावे सापडले होते.
महाभारत युद्ध भूमीवर श्रीकृष्ण दररोज शेंगदाणे का खायचे? वाचा
दुर्वासा ऋषींचे प्रस्थान
दुर्वासा ऋषींचा आश्रमात येण्यासाठी श्रीकृष्णाने एकच रथ आणला होता. त्यामुळे त्या रथाला असलेले अश्व श्रीकृष्णाने बाजूला केले. त्याऐवजी श्रीकृष्ण आणि रुक्मिणी स्वतः रथ ओढण्यासाठी सज्ज झाले. दुर्वासा ऋषींना विनंती केल्यानंतर ते रथारुढ झाले. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी दुर्वासा ऋषींना घेऊन द्वारकेकडे निघाले. द्वारका हे भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण स्थळ आहे. द्वारकेचे धार्मिक महत्त्व हे तिच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीपेक्षा नेहमीच वरचढ ठरते. द्वारकेच्या संशोधनात बेट द्वारका हे तत्कालीन प्रसिद्ध बंदर आहे हे सिद्ध झाले आहे.
श्रीकृष्णाकडून चूक
द्वारकेच्या
मार्गावर असताना रथ ओढून थकल्याने रुक्मिणीला तहान लागली. श्रीकृष्णाला ही
बाब समजताच त्याने पायाच्या अंगठ्याने जमिनीवर जोरदार प्रहार केला. तेथेच
पाण्याचा तुषार उत्पन्न झाला. ते पाणी पिऊन रुक्मिणीची तृष्णा शमली. या
गडबडीत दुर्वासा ऋषींना पाणी विचारायचे राहून गेले. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी
यांनी आपल्याला पाणी विचारले नाही, याचा दुर्वासा ऋषींना राग आला. आपला
अपमान झाल्याच्या भावनेतून त्याचा राग अनावर झाला आणि त्यांनी श्रीकृष्ण
आणि रुक्मिणीला शाप दिला.
दुर्वासा ऋषींचा शाप
द्वारका (Dwarka)
गुजरातमधील एक सागरी पुरातत्त्वीय स्थळ आणि हिंदूंचे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. ते गुजरातच्या देवभूमी द्वारका जिल्ह्यात (२०१३ पूर्वीचा जामनगर जिल्हा) आहे. तेथे द्वारकाधीशाचे मंदिर आहे. ही नगरी श्रीकृष्णाने समुद्र बारा योजने मागे हटवून वसवली आणि त्याच्या निधनानंतर ती समुद्रात बुडाली, अशी कथा आहे. परंपरेनुसार द्वारकेचा असा संबंध महाभारताशी व श्रीकृष्णाच्या जीवनाशी असल्याने या नगरीचा शोध सुमारे शंभर वर्षे घेतला जात आहे. या संबंधात साहित्यिक पुराव्यावर आधारित आणि पुरातत्त्वीय पद्धतीने भरपूर संशोधन झाले आहे. द्वारकेच्या शोधाच्या संदर्भात पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून बेट द्वारका आणि मूळ द्वारका ही दोन स्थळेदेखील महत्त्वाची आहेत. श्रीकृष्णभक्ती व हिंदुधर्मीयांच्या श्रद्धेशी निगडीत असल्याने समुद्रात बुडालेल्या द्वारकेच्या शोधाला प्रसार माध्यमांमध्ये भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे.

मार्कंडेय पुराणाचे भाषांतर करताना ब्रिटिश प्राच्यविद्या संशोधक एफ. ई. पार्जिटर यांनी द्वारका नगरी रैवतक पर्वताजवळ असल्याचे म्हटले होते. भारतविद्येचे ज्येष्ठ अभ्यासक ए. डी. पुसाळकर यांनी सध्याची द्वारका हीच प्राचीन द्वारका असल्याचे मत मांडले होते. १९६३ मध्ये डेक्कन कॉलेजच्या झैनुद्दीन अन्सारी व म. श्री. माटे यांनी द्वारकेत उत्खनन केले. तेथे त्यांना प्रारंभिक ऐतिहासिक काळातील (इ.स. पहिले शतक) व मध्ययुगीन वसाहतीचे पुरावे मिळाले; तथापि द्वारकेसंबंधी पुराणांमधील माहिती व मौखिक परंपरेतील उल्लेख अधिक महत्त्वाचे आहेत, असे मानणाऱ्यांनी द्वारका फक्त दोन हजार वर्षे जुनी असल्याचे मान्य केले नाही.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातर्फे एस. आर. राव (१९२२–२०१३) यांनी १९७९-८० मध्ये द्वारकाधीश मंदिराच्या प्रांगणात केलेल्या उत्खननात इ.स. नवव्या शतकातील विष्णू मंदिराचे अवशेष मिळाले. त्यानंतर राव यांनी १९८१ पासून केलेल्या संशोधनात द्वारकेच्या समुद्रात आद्य ऐतिहासिक काळातील (इ.स.पू. १५००) अवशेष मिळाल्याचे व श्रीकृष्णाच्या समुद्रात बुडालेल्या द्वारकेचा शोध लागल्याचे जाहीर केले; तथापि ही कालनिश्चिती वैज्ञानिक पद्धतीने केलेली नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच पाण्यात मिळालेली दगडी बांधकामे आणि अन्सारी व माटे यांना मिळालेल्या प्रारंभिक ऐतिहासिक काळातील दगडी भिंती यांच्यात साम्य आहे.

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानाने सन १९९०-९१ आणि पुन्हा १९९७ ते २००२ या काळात पाण्याखालील पुरातत्त्वीय संशोधन मोहिमा पूर्ण केल्या. साधारण एक चौ. किमी. परिसरात २५ मीटर खोलीपर्यंत सर्वेक्षण करण्यात आले. मिळालेल्या अवशेषांमध्ये घडीव दगडांच्या अर्धवर्तुळाकार भिंती व इतर दगडी रचना यांचा समावेश होता. त्यातल्या एका दगडावर गुजराती भाषेतील काही अक्षरे कोरलेली होती. द्वारकेला बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी एक दगडी धक्का बांधवून घेतला असल्याची माहिती पाहता पाण्याखालील दगडी बांधकामे विसाव्या शतकातील असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे. सर्वेक्षणात गोमती नदीच्या मुखापाशी समुद्रात एक किमी. अंतरापर्यंत ८ ते १० मी. खोलीवर अनेक दगडी नांगर पडलेले आढळले. परंतु द्वारकेला आद्य ऐतिहासिक काळातील (इ.स.पू. १५००) वसाहत असल्याचा व ती समुद्राच्या पाण्यात असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही.
एकंदर सागरी पुरातत्त्वीय संशोधनातून असे दिसते की, द्वारका प्रारंभिक ऐतिहासिक काळात अस्तित्वात असली व किमान इ.स. नवव्या शतकापासून द्वारका हे वैष्णव पंथाचे महत्त्वाचे धार्मिक स्थळ असले, तरी पाण्याखालील उत्खननात एखादी नगरी समुद्रात बुडल्याचा कोणताही थेट पुरावा मिळालेला नाही. फक्त एस. आर. राव यांचे संदर्भ देऊन व नंतरच्या संशोधनाकडे काणाडोळा करून श्रीकृष्णाची ३५५० वर्षे जुनी द्वारका सापडली असल्याचा दावा करणारे बरेच लेखन वर्तमानपत्रांमध्ये व पुरातत्त्वीय क्षेत्राबाहेर इतरत्र प्रसिद्ध झाले आहे; तथापि कोणताही ठोस पुरावा नसताना असा दावा करणे हे छद्मपुरातत्त्वाचे उदाहरण ठरते.
संदर्भ :
- Ansari, Z. D. & Mate, M. S. Excavations at Dwarka, Deccan College, Pune, 1966.
- Gaur, A. S.; Sundaresh; Gudigar, P.; Tripati, Sila; Vora, K. H. & Bandodker, S. N. ‘Recent Underwater Explorations at Dwarka and Surroundings of Okha Mandalʼ, Man and Environment, XXV (1): 67-74, 2000.
- Gaur, A.S.; Sundaresh & Vora, K. H. Underwater Archaeology of Dwarka and Somnath (1997-2002), Aryan Books International, New Delhi, 2008.
- Tripathi, Alok, Marine Archaeology: Recent Advances, Agam Kala Prakashan, Delhi, 2005.
- छायाचित्र सौजन्य : डॉ. शिल त्रिपती, गोवा.
द्वारका – पवित्र तीर्थक्षेत्र
द्वार
म्हणजे दरवाजा. त्यावरूनच या शहराचे नांव द्वारका पडले. येथे दोन द्वारे
असून एक आहे स्वर्गद्वार आणि दुसरे मोक्षद्वार. स्वर्गद्वारातून प्रवेश
करायचा आणि मोक्षद्वारातून बाहेर पडायचे. हिंदू धर्मियांसाठी अतिशय पवित्र
असलेले हे ठिकाण वैष्णवांच्या चार धामापैकी एक समजले जाते. आद्य
शंकराचार्यांनी जी चार पीठे स्थापन केली त्यातही द्वारकेचा समावेश असून
अन्य पीठात श्रृंगेरी, जगन्नाथ पुरी, ज्योतिर्मठ अथवा जोशी मठ यांचा समावेश
आहे. चार धामांतील अन्य धामे म्हणजे बद्रीनारायण, पुरी, रामेश्वर ही आहेत.
द्वारकेचा राजा कृष्ण म्हणून कृ ष्णाला येथे द्वारकाधीश म्हटले जाते.
द्वारका कृष्णासाठीच विश्वकर्म्याने वसविली असा समज आहे. या शहराचे उल्लेख
महाभारत, हरिवंश, भागवत पुराण, स्कंद पुराण, विष्णुपुराणातही आहेत. संपन्न
अश्या सौराष्ट्रातील हे शहर गोमती नदीकाठी असून त्याला द्वारमती, द्वारवती,
कुशस्थली अशीही नावे आहेत.
गावात पाहायचे ते पहिले द्वारकाधीशाचे मंदिर. सहाव्या सातव्या शतकातले हे
मंदिर असून मूळ मंदिर कृष्णाचा पणतू राजा वज्राने बांधले होते असा इतिहास
आहे. पाच मजल्यांचे हे मंदिर चुनखडी आणि दगडात बांधले असून मंदिरावर असलेला
ध्वज दिवसातून पाचवेळा बदलला जातो. येथेच स्वर्गद्वार आणि मोक्षद्वार आहे.
गोमती जेथे सागराला मिळते तेथेच हे मंदिर असून द्वारकाधीशाची अप्रतिम
सुंदर आणि दागदागिन्यांनी मढलेली मूर्ती भाविकांच्या नजरेचे पारणे फेडते.
याच परिसरात कृष्णाचा पिता वसुदेव, देवकी, बलराम, रेवती, सुभद्रा,
रूक्मिणी, सत्यभामा, जांबवती यांचीही मंदिरे आहेत.
द्वारकेतील सुंदर रस्ते, महाल , सुदामा सभा या आणखी काही पाहण्यालायक
वास्तू. येथे कृष्णाच्या राण्यांचे सात हजार महाल होते असेही सांगितले
जाते. त्यातील कांही आजही पाहायला मिळतात. सुंदर बगिच्यांनी या शहराला अधिक
देखणे बनविले आहे.
कृष्णाची खरी द्वारका ही नव्हे. कारण ती समुद्रात तीन वेळा बुडाली होती.
या द्वारकेपासून जवळच बेट द्वारका आहे. तेथे बोटीतून जावे लागते. मूळ
द्वारका बुडाल्यानंतर येथे कृष्णाने यादवांसह नवी राजधानी वसविली असे
सांगितले जाते. येथेही द्वारकाधीशाचे मंदिर असून या मंदिरातील मूर्ती
द्वारकाधीश मंदिरातील मूर्तीसारखीच आहे. येथे देवी रूक्मिणीचे विशेष मंदिर
आहे.. कृष्ण मंदिराला येथे जगद मंदिर असे संबोधले जाते. त्याचबरोबर
लक्ष्मीनारायण, त्रिविक्रम, जांबवती यांचीही मंदिरे येथे आहेत. येथून जवळच
बारा ज्योतिर्लिगातील नागेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे.
महाभारताच्या युद्धानंतर कृष्ण वैकुंठाला गेला त्यानंतर ३६ वर्षांनी
अर्जुन द्वारकेला गेला आणि कृष्णाच्या नातवाला हस्तिनापुरात घेऊन आला.
अर्जुन आणि कृष्णाचा नातू वज्र द्वारकेतून बाहर पडल्यानंतर ती द्वारकाही
बुडाली. विशेष म्हणजे या गावापासून दूर समुद्रात मूळ द्वारकेचे अवशेष
पुराणवस्तू संशोधकांना सापडले असून तेथे आजही समुद्रात बुडालेली तटबंदी
दिसते तसेच भांडी दागिने अशा अनेक वस्तूही सापडल्या आहेत. मात्र या ठिकाणी
जाता येत नाही. द्वारकेत निवासासाठी अनेक चांगली ठिकाणे असून
खाण्यापिण्यासाठीच्या सोयीही चांगल्या आहेत. खास गुजराथी पदार्थांचा आस्वाद
घेता येतो. जाण्यायेण्यासाठी रस्ते वाहतूक अतिशय सोयीची आहे. रेल्वेची थेट
सेवा आहे.
भूषण श्रीखंडे
sakal
जळगाव ः गोमती नदीच्या काठावरील द्वारकाधीश मंदिर हे गुजरातमधील सर्वात पवित्र व प्राचीन मंदिर मानले जाते. भगवान श्रीकृष्णाचे हे मंदिर असून देशातील श्रीकृष्णाच्या प्रमुख मंदिरांपैकी एक मानले जाते. येथे दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक द्वारकाधीश मंदिरात दर्शनासाठी येतात. या मंदिराशी संबंधित अनेक रंजक आणि पौराणिक गोष्टीं असून त्याची माहिती तुम्हाला आज आम्ही सांगणार आहो. चला तर जाणून घेवू द्वारकाधीश मंदिरा बाबत..
असा आहे इतिहास
द्वारकाधीश मंदिर सुमारे 2 हजार दोनशे वर्ष जुने असल्याचे मानले जात आहे. असे म्हणतात की हे मंदिर कृष्णा काळात व्रजभान यांनी बांधले होते. व्रजभान हे भगवान श्रीकृष्णाचे नातू समजले जातात. पौराणिक कथांमध्ये असे म्हटले जाते की हे स्थान 'हरि गृह' अर्थात भगवान श्रीकृष्ण जी यांचे निवासस्थान होते, जे नंतर मंदिर म्हणून बांधले गेले.
मंदिराला आहे अनेक नावे
द्वारकाधीश मंदिर अनेक नावांनी देखील प्रसिद्ध आहे. यात 'कृष्णा मंदिर', 'द्वारका मंदिर' आणि 'हरि मंदिर' असे म्हटले जाते, परंतु द्वारकाधीश मंदिराच्या नंतर हे मंदिर 'जगत मंदिर' म्हणून सर्वाधिक ओळखले जाते. हे शहर भगवान श्रीकृष्णाने समुद्रातून ताब्यात घेतलेल्या जमिनीच्या तुकड्यावर बनवले होते, तेथे आप मंदिर आहे.
मंदिरचे बांधकाम उत्कृष्ठ
द्वारकाधिश मंदिर भव्य मार्गाने तयार करण्यात आले असून चुनखडी आणि वाळूचा वापर करून हे स्मारक चालुक्य शैलीमध्ये बनवले गेले आहे. जे भारतातील सर्वात प्राचीन शैली प्रतिबिंबित करते. तसेच हे मंदिर दगडाच्या तुकड्यावर बांधले गेले आहे असे देखिल म्हतले जात असून हे पाच मजली मंदिरआहे.
सुर्य, चंद्राचे प्रतिक ध्वज
या मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकावलेला असून भक्त सूर्य आणि चंद्राचे प्रतीक याला मानतात. या ध्वजाची उंची सुमारे 75 फूट असल्याचे सांगितले जाते. असेही म्हटले जाते की मंदिराचा ध्वज दिवसातून किमान पाच वेळा बदलला जातो, जेव्हा जेव्हा ध्वज खाली केला जातो तेव्हा भाविक त्यास स्पर्श करण्यास उत्साही असतात.
स्वर्ग द्वार
या मंदिरात उपस्थित असलेले दोन दरवाजेही खूप महत्वाचे मानले जातात. उत्तरेकडे एक दरवाजा आहे, ज्याला 'मोक्ष द्वार' म्हणून ओळखले जाते. दुसरा द्वार दक्षिणेकडे दिशेला आहे ज्याला 'स्वर्ग द्वार' असेही म्हणतात. दक्षिण दरवाजामार्गे तुम्ही गोमती नदीच्या काठावरही जाऊ शकता.
सुर्य, चंद्राचे प्रतिक ध्वज
या मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकावलेला असून भक्त सूर्य आणि चंद्राचे प्रतीक याला मानतात. या ध्वजाची उंची सुमारे 75 फूट असल्याचे सांगितले जाते. असेही म्हटले जाते की मंदिराचा ध्वज दिवसातून किमान पाच वेळा बदलला जातो, जेव्हा जेव्हा ध्वज खाली केला जातो तेव्हा भाविक त्यास स्पर्श करण्यास उत्साही असतात.
गेटवे प्रमाणीकरण
या मंदिरात उपस्थित असलेले दोन दरवाजेही खूप महत्वाचे मानले जातात. उत्तरेकडे एक दरवाजा आहे, ज्याला 'मोक्ष द्वार' म्हणून ओळखले जाते. दुसरा द्वार दक्षिणेकडे दिशेला आहे ज्याला 'स्वर्ग द्वार' असेही म्हणतात. दक्षिण दरवाजामार्गे तुम्ही गोमती नदीच्या काठावरही जाऊ शकता.
बडोदा मधली सगळी ठिकाणी बघून रात्रीची अहमदाबाद स्टेशन वरून जुनागढ ला जाणारी गाडी पकडली आणि सकाळ सकाळी जुनागढ मध्ये पहिल्यांदाच गेलो केवळ पर्यटनासाठी. आधीच मुंबईवरून च एक टॅक्सी वाला बुक करून ठेवला होता . तो पहाटे साडे चार वाजता आमच्या करता जूनागढ स्टेशन वर उभा होता . त्यानेच काही गेस्ट हाऊस दाखवली त्यातलं एक छानस पसंत करून सकाळची आन्हिक उरकून आम्ही साडे आठ /पावणे नऊ पर्यंत तयार त्या दिवशीची ठिकाण पण खासच होती . सकाळ सकाळी "महाबत मकबरा" नि सुरवात केली आणि चढत्या क्रमाने सोमनाथ मंदिर बघून त्या दिवशीच्या फिरण्याचा शेवट केला . " महाबत मकबरा " बघण्यासारखा आहे . त्या दिवशी नेमकं तिथे एक प्रिवेंडिंग शूटिंग चालू होत त्यातच आम्ही पण फोटो काढले आणि नंतर श्री स्वामीनारायण मंदिर गाठलं . स्वामीनारायण मंदीर इतकं सुरेख आहे कि काही विचारायचंच नाही . नेहमीप्रमाणेच वेल मेन्टेन्ड . आणि उत्कृष्ट सुरेख . तिथलं कँटीन पण चांगलं आहे . सकाळ सकाळी निघालो म्हणून तिथेच नाश्ता केला त्यानंतर "उपेरखोत फोर्ट" वर चढाई. खर तर फोर्ट मध्ये बघण्यासारख काहीच नाहीये आणि फोर्ट हि आपल्या महाराष्ट्रातल्या सारखा नाहीये पण त्या फोर्टच्या आत एक विहीर मात्र आहे. नाव आहे " अडखडी वाव" म्हणजे विहीरच . (गुजराथ मध्ये विहिरी भरपूर असाव्यात आणि अगदि एकाहून एक सुंदर ) पण हि विहीर मात्र खूप वाईट अवस्थेत आहे . वाईट वाटलंच . का नाही स्वच्छ ठेवली ? तरी सुद्धा तिच युनिक सौंदर्य बघण्यासाठी तरी या विहिरीला भेट दिलीच पाहजे . हि विहीर कदाचित भारतातली सगळ्यात खोल विहीर असावी . तिच्या खोलीची भव्यता बघूनच धडकी भरते . आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विहिरीच्या बाजू . ( विहीर चौकोनी आहे ) तिच्या बाजू कार्व्हिंग केलेल्या नाहीयेत पण नैसर्गिक दगडांनी इतकं सुंदर कार्व्हिंग झालेलं आहे कि क्या बात . कितीही वाईट अवस्थेत असली तरी विहिरीला भेट दिलीच पाहिजे अशी हि विहीर
त्याच दिवशी गीता मंदिर मध्ये श्रीकुष्णाच्या समाधी स्थळा ला भेट दिली ( जिथे श्रीकृष्णाने शेवटचा श्वास घेतला ) त्याच संकुलात बलरामाचं मंदिर आहे ते बघितलं आणि त्रिवेणी घाटावर जाऊन त्या दिवसाची सांगता सोमनाथ मंदिराने केली . सोमनाथ मंदिराबद्दल सांगायला हवं का ? हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाहिलं ज्योतिर्लिंग समजल जात . या मंदिरावर कित्येक वेळा हल्ले झाले . त्याची तोडफोड केली गेली पण तितक्याच वेळा त्याची पुनर्निर्मिती पण झालीच . या मंदिरात फोटो काढायला परवानगी नाही .( त्यामुळे फोटो अर्थात नेटवरून साभार ) अगदीच काटेकोर सुरक्षा आहे . आतला गाभारा सोन्याने मढवलेला आहे असं म्हणतात . तिथेच आवारात रात्री " लाईट अँड साऊंड " म्युझिक शो पण होतात. असं हे उच्च दर्जाचं मंदिर बघून त्या दिवसाची सांगता केली आणि रात्री सासनगीर च्या " रो हाऊस " मध्ये मुक्काम. दुसऱ्या दिवशी गिरच्या च्या जंगलात सिंहांची भेट घ्यायची असल्याने ताबडतोब निद्रिस्त .
छान वर्णन! बडोद्याला बहीण असल्याने कित्येकदा भेट दिलीये आणि लक्ष्मीविलास पॅलेसही बघीतलेला आहे. मात्र रानीकी वावबद्दल ऐकलेही नव्हते, यावेळी नक्की भेट देणार. पुढे तुम्ही सोरटी सोमनाथबद्दल सविस्तर लिहीलय, आम्हीही 4 वर्षांपूर्वीच भेट दिलेली. त्यामुळे सोमनाथ टाळून गिरनार परीक्रमेचा बेत आहे, तर शक्य असल्यास त्याबद्दल लिहाल का? तुम्ही जुनागढला कोणत्या गेस्टहाऊसला आन्हिक उरकलीत?
आधी आमचा टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला तुम्हाला दोन तासांकरता धर्मशाळा शोधून देतो . आम्ही म्हटलं चालेल पण धर्मशाळा अगदीच बेताच्या होत्या शेवटी त्यानेच "आनंद" नावाचं एक हॉटेल ( गेस्ट हाऊस नव्हे सॉरी) शोधून दिल . काउंटर वर सांगितलं दोनच तास आहोत . फक्त अंघोळी करून तयार होणार इतकाच वेळ पाहिजे . त्यांनी ६०० रुपये घेतले पण रूम छान होती . मूख्य म्हणजे स्वच्छ . जुनागढ स्टेशन पासून जवळच आहे . गिरनार परिक्रमा नाही केली . रात्री सासनगीर ला रिसॉर्ट मध्ये मुक्काम केला आणि सकाळी गिरची जंगल सफारी केली Happy
आम्ही तीन वर्षांपूर्वी पाच दिवस आणि सहा रात्री मध्ये सौराष्ट्र ची ट्रिप केली होती.
1 ला दिवस .. सकाळी जामनगर इथे आगमन. संध्याकाळी कीचड वन आणि इतर स्थलदर्शन मुक्काम . जामनगरला आराम हॉटेल मध्ये मुक्काम . नंतर त्यांचीच गाडी घेतली फिरण्यासाठी.
2 रा दिवस .. स्पेशल टॅक्सी ने द्वारका, भेट द्वारका ,संध्याकाळी द्वारकेच्या देवळात आरती. ही फार सुंदर असते आणि इथेच मुक्काम .
3 रा दिवस .. मूळ द्वारका, पोरबंदर करून संध्याकाळी सोमनाथ आगमन. नंतर सोमनाथ दर्शन आणि लाईट म्युझिक शो . सकाळी सोमनाथ अभिषेक करून गिर सासन ला ताज हॉटेल मध्ये मुक्काम . पहाटे ताज च्या जीपने सिंह बघायला गेलो. नशिबाने मस्त पाहायला मिळाले .
4 था दिवस .. दुपारी निघून जुनागढ बघितले आणि संध्याकाळी मुक्कामाला राजकोट ला आलो.
5 वा दिवस .. राजकोट हून पालिताना बघितले आणि मुक्कामाला राजकोट ला आलो.
6 दिवस.. सकाळी राजकोट ला खरेदी वैगेरे केली. दुपारी आराम केला आणि संध्याकाळी मुंबईच्या गाडीत बसलो.
आम्हाला गिरनार आणि भुज मध्ये इंटरेस्ट नव्हता .
ही सगळी ट्रिप मीच आखली होती . गिर ला ताज मध्ये राहून आणि बाकी ठिकाणी ही उत्तम हॉटेल, भरपूर खायला प्यायला, पाच जणांना इनोव्हा एसी गाडी वैगेरे सगळं करून ही खूप म्हणजे खूपच स्वस्त आणि मस्त झाली. गाडी हातात असल्याने जरा ही दगदग झाली नाही.
जुनागढला हॉटेल हार्मनी चांगले आहे - स्वच्छ आणि कंफर्टेबल. अगदी समोर त्यांचेच रेस्तराँ पण आहे आणि तेही चांगले आहे.
गीरनारला साधारण ९०००+ पायर्या आहेत. चढायला ४ ते ५ तास लागतात. आई-वडिलांना जायची मनापासून इच्छा असेल तर नक्कीच चढून जातील. अगदीच चढवणार नसेल तर डोली पण मिळते. पण ती त्रासदायकच असते.
चढायला पहाटे २:३० - ३ ला सुरुवात करा. संपूर्ण रस्ताभर दिवे आहेत आणि कसलीही भिती नाही. सूर्य वर आल्यावर खूप दमछाक होईल. म्हणून उशीर करू नका. बरोबर माणशी २ लि. ग्लुकोजचे पाणी बाळगा (किमान). बाकी सामान शक्यतो नको. थंडी पहिल्या ३००-४०० पायर्यांपर्यंतच वाजते (आम्ही २६ जानेवारीला गेलो होतो). नंतर जराही थंडी वाजत नाही त्यामुळे गरम कपडे पण बेतानेच बाळगा - एक स्वेटर पुरे. वरती दत्त-धुनीच्या येथे प्रसाद मिळतो तो अगदी पोटभर असतो. नाही तर १-२ हॉटेल आहेत - देवीच्या शिखरावर.
बरोबर knee-cap नक्की बाळगा - गुढगेदुखी नसली तरी. आणि जोड्यांना चांगले कुशन असू द्या. सगळा रस्ताभर दगडी पायर्या आहेत.
आणि हो - नक्की जा. अगदी अविस्मरणीय अनुभव असतो.
https://www.maayboli.com/node/64745
History
Jam Shri Ravalji,head of Jadeja clan Rajput (Kshatriya) migrated from Kutch to Halar,established himshelf & set his throne at Khambhalia in V.S.1582 for some years it was his capital & new city in V.S.1596 named “Navanagar”.
Jam Khambhalia is the head quaters of the newly created formed Devbhumi Dwarka District which was carved out of Jamnagar district on 15 August 2013.The district consists 4 talukas : khambhalia,Kalyanpur,Dwarka and Bhanvad.The named Devbhumi Dwarka is derived from the famous Dwarkadhish Temple of Dwraka city which is one of the four holy places according to Hindu mythology.
Dwarka is believed to have been the first capital of Gujarat. The city’s name literally means the “gateway to heaven” in Sanskrit, as Dwar means “gate” and ka references “Brahma”.Dwarka has also been referred to throughout its history as “Mokshapuri”, “Dwarkamati”, and “Dwarkavati”. It is mentioned in the ancient prehistoric epic period of the Mahabharata. According to legend, Krishna settled here after he defeated and killed his uncle Kansa at Mathura. This mythological account of Krishna’s migration to Dwarka from Mathura is closely associated with the culture of Gujarat.Krishna is also said to have reclaimed 12 yojanas or 96 square kilometres (37 sq mi) of land from the sea to create Dwarka.
Dwarka was established as the capital in Saurashtra by the Aryans during the Puranaic. The Yadavas, who had migrated from Mathura, established their kingdom here when the city was known as “Kaushathali”. It was during this period that the city underwent rebuilding and was named DwarkaA friendly population of natives also prompted Krishna to settle at Dwarka when he decided, after fighting Jarasandha, the king of Magadh, to retreat from Mathura. The kingdom, also known as the Yaduvanshi empire, was established by Uugrasena, father of Kansa the then ruler and later Krishna flourished and extended its domainIt is said that Krishna conducted the administration of his kingdom from Dwarka while residing with his family in Bet Dwarka. The city’s Dwarkadhish Temple dedicated to Krishna was originally built around 2,500 years ago, but was destroyed by Mahmud Begada rulers and subsequently rebuilt in the 16th century. The temple is also the location of Dwaraka maţha, also called Sharada Matha/Peeth and “western peeth”, one of the four peeths (Sanskrit: “religious center”) established by Adi Shankaracharya.
As an important pilgrimage centre for Hindus, Dwarka has several notable temples, including Rukmini Devi Temple, Gomti Ghat, and Bet Dwarka. There is also a lighthouse at the land end point of Dwarka.
Archaeological investigations at Dwarka, both on shore and offshore in the Arabian Sea, have been performed by the Archaeological Survey of India. The first investigations carried out on land in 1963 revealed many artefacts. Excavations done at two sites on the seaward side of Dwarka brought to light submerged settlements, a large stone-built jetty, and triangular stone anchors with three holes. The settlements are in the form of exterior and interior walls, and fort bastions. From the typological classification of the anchors it is inferred that Dwarka had flourished as a port during the period of the Middle kingdoms of India. Coastal erosion was probably the cause of the destruction of what was an ancient port.
Places of Interest
Dwarkadhish Temple, Dwarka
Dwarkadhish Temple also known as the Jagat Mandir, is a Chalukya styled architecture, dedicated to Lord Krishna. The town of Dwarka has its history dated back to the Kingdom of Dwaraka in Mahabharata. The five storied main shrine is grand and marvelous in itself constructed of limestone and sand. The 2200-year-old architecture, is believed to be built by Vajranabha, who constructed it over the land reclaimed from the sea by Lord Krishna.
The black magnificent idol of Lord Krishna appears to be so appealing that devotees feel the presence of the lord before them. The temple showcases intricate sculptural detailing done by the ancestral dynasties that ruled the region. There are other shrines within the temple which are devoted to Subhadra, Balarama and Revathy, Vasudeva, Rukmini and many others. The devotees are expected to take a dip in the Gomti river before proceeding into the temple through the Swarg Dwar. The eve of Janmashtmi is the most special occasion in any Krishna temple, the Dwarkadhish temple is adorned by thousands of devotees chanting prayers and rituals. The shrine is a hive of colours, voices and faith transforming itself into inner silence and sanctity.

Nageshwar Jyotirlinga Temple
One of the 12 famous self-existent temples, Nageshwara Jyotirlinga Temple too houses a curious myth about its origin. The giant, beautiful and artistic statue of Lord Shiva mesmerizes tourists and pilgrims alike with its aesthetic appeal.The temple is the hub of festivities on the eve of Shivratri when devotees turn up in enormous numbers.

Dwarka Beach
Along the Arabian Sea coast, Dwarka Beach is a good place to relax in the evenings. Popular among both the locals and tourists, Dwarka Beach is located quite close to the main temples in town.

Beyt Island
Located around 30 km from the main town of Dwarka Beyt Dwarka is a small island and was the main port in the region before the development of Okha. While the island is enclosed by a few temples, white sand beach and coral reefs, the beach is also popular among tourists for its marine life, sea excursions, camping and picnics.
You can also enjoy water sports to make your trip a bit adventurous.

Gomti Ghat, Dwarka
If the holy scriptures are to be believed, the Gomti River is none other than the Ganges, descending directly from heaven. The most sought after spots out of the various shrines and ghats this is the place where the river meets the mighty ocean.
The water is saline yet highly tempting and devotees and tourists alike have no option but to give in to the inviting waters and go for a holy dip.

Rukshmani Temple
A small structure is an important shrine dedicated to Krishna’s beloved consort, Rukmani Devi. Not as majestically gigantic, this shrine is an architectural masterpiece in itself.
The rich paintings on the walls depicting Rukmini and Krishna as old as the 12th century, the intricate carvings on the walls leave the beholder spell bound.

Gopi Talav
Legend has it that this is the lake where Krishna used to entice his Gopis (young female inhabitants) with his youthful pranks and romantic nature. About 20km, the lake is surrounded by sandal like yellow sand which is used by the devotees to make tilaks on their bodies. It is quite a pretty sight.

Tourist Places

At Bhanvad Ghumali Village, there is a ancient temple called Navlakaha. This Ghumali village was known as Bhumilika or Bhubhutapalli…

Temple of Son Kasari is associated with story of “sati”, built after Ghumli was destroyed due to the curse. This…

At the link of Dist.Bhanvad Hathla village, there is a temple of Sanidev. This temple is ancient which is located…

Harsidhdhi Temple, at the Border of Halar and Sorath, is the temple of Shri Lord Krishna’s as well as king…

Guru Govindsinh’s most lovable brother Mohakamsinhji’s homeland is in Bet Dwarka. This gurdwara is constructed on his karmabhumima. In 1999,…

Located at the border of Kalyanpur Taluka known as Ran Pindara the Pindara village is believed to be associated with…

Sitatuated at the Confluence of three rivar on the Dist.Bhanvad Khambhalia road, the Ancient Indreshwar temple has became the center…

At Bhanvad taluka and border of Porbander District, above Barda Hills, during Jamrajvi, Kileswar Mahadev Temple was built. The area…

Shri Halar – Tirth Aradhanadham is located on the bank of the Sinhan River in the Midst of the pleasing…

Five kilometers east of the Beyt Dwarka main Sri Krishna temple there is a magnificent and unique temple for Lord…

As part of the Marine National Park near vadinar, Ecosystems are found on the narara island. Where one can go…

Located on the route between Dwarka city and Beyt Dwarka Island on the coast of Saurashtra in Gujarat is this…

At the end of the 8th century and beginning of the 9th century, Shree. Jagadaguru Adyasankaracaryaji had established up Shardapith…

The bridge will become an added attraction for devotees and tourists as it will be illuminated with LED lights and…

Since 1983, Shri Gayatri Shaktipeeth is the only temple of Gayatri Mata in Dwarka. One dharamsala is also associated to…

At Dwarka city there is a holy Gomatighat where there are many temple including Gomati Mataji temple. Gomatighat’s bath is…

Around five thousand years ago, a Shivalinga was revealed in the Arabian Sea, today we knowns as Shri Bhadkeshwar Mahadev…

Lord Sri Krishna temple in Gomati coast is holy, which temple is known as DWARKADHISH Temple. According to the opinion…
How to Reach
Flight
There are no regular flights from other major cities of the country to Dwarka. Nearest airports are Jamnagar Airport and Porbandar Airport. Dwarka 95 km away Porbandar Airport (PBD), Porbandar Dwarka 110 km away Govardhanpur Airport (JGA), Jamnagar,Gujarat.
By Train
Dwarka is well connected to other major cities of the country via regular trains. Railway Station(s): Dwarka (DWK)
By Bus
You can easily get regular buses to Dwarka from other major cities of the country. Bus Station(s): Dwarka
नवलखा मन्दिर :-
नवलखा मंदिर धुमली, काठियावाड़, गुजरात में स्थित है। यह मन्दिर पौराणिक शिल्पकला का एक उत्कृष्ट नमूना है। दूर से देखने पर ऐसा प्रतीत होता है कि ये मन्दिर लगभग 200 वर्ष पुराना होगा, किन्तु नजदीक से देखने पर यह बहुत पुराना दिखता है। मान्यता है कि बाबरा नाम के एक भूत ने इस मन्दिर का निर्माण किया था। नवलखा मन्दिर सोमनाथ के ज्योतिलिंग के समान ही बहुत ऊँचा है।
इतिहास
इस मन्दिर को देखकर लगता है कि इसका जीर्णोद्धार भी किया गया था। प्रतीत होता है कि इस मन्दिर को मुस्लिमों ने ध्वंस कर दिया था और बाद में काठी जाति के क्षत्रियों ने इसका पुनरोद्धार करवाया। नवलखा मन्दिर के विषय में मान्यता है कि मन्दिर को बाबरा भूत ने एक ही रात में बनाया था। मन्दिर के चारों ओर नग-अर्द्धनग नवलाख मूर्तियों के शिल्प हैं। सम्पूर्ण मन्दिर 16 कोने वाली नींव के आधार पर निर्मित किया गया है। यह शिव मन्दिर सोलंकी काल में बने प्रमुख महाकाय मन्दिरों में से एक है। नवलखा मन्दिर का जीर्णोद्धार होने से पुराना-मूल भाग आज भी मजबूती के साथ खड़ा है, जबकि नये हिस्से में परिसर छोटा है और आस-पास ऊँचे मकान होने के कारण तसवीर लेना कठिन है।
बाबरा भूत ने एक ही रात में बनाया था यह मंदिर!
भूत पिशाचों के बारे में आपने बहुत कुछ सुना होगा, लेकिन यह शायद ही सुना हो की किसी भूत ने मंदिर का निर्माण कराया हो। लेकिन हम यहां बता रहे एक एेसे मंदिर के बारे में जिसे भूत ने एक रात में ही बनाया था। यह मंदिर है काठियावाड़, गुजरात का नवलखा मंदिर।
भूत पिशाचों के बारे में आपने बहुत कुछ सुना होगा, लेकिन यह शायद ही सुना हो की किसी भूत ने मंदिर का निर्माण कराया हो। लेकिन हम यहां बता रहे एक एेसे मंदिर के बारे में जिसे भूत ने एक रात में ही बनाया था। यह मंदिर है काठियावाड़, गुजरात का नवलखा मंदिर। यह मंदिर पौराणिक शिल्पकला का एक उत्कृष्ट नमूना है।
देखने में यह मंदिर ढाई सौ साल से भी ज्यादा प्राचीन बताया जाता है। इसके बारे में मान्यता है कि बाबरा नाम के एक भूत ने इस मंदिर का निर्माण किया था, वो भी सिर्फ एक रात में। नवलखा मन्दिर सोमनाथ के ज्योतिलिंग के समान ही बहुत ऊंचा है। इस मंदिर को देखकर लगता है कि इसका जीर्णोद्धार भी किया गया था। प्रतीत होता है कि इस मंदिर को मुस्लिमों ने ध्वंस कर दिया था और बाद में काठी जाति के क्षत्रियों ने इसका पुनरोद्धार करवाया।
नवलखा मंदिर के विषय में मान्यता है कि मंदिर को बाबरा भूत ने एक ही रात में बनाया था। मंदिर के चारों ओर नग्न-अद्र्धनग्न नवलाख मूर्तियों के शिल्प हैं। सम्पूर्ण मंदिर 16 कोने वाली नींव के आधार पर निर्मित किया गया है। यह शिव मंदिर सोलंकी काल में बने प्रमुख महाकाय मंदिर में से एक है। नवलखा मंदिर का जीर्णोद्धार होने से पुराना-मूल भाग आज भी मजबूती के साथ खड़ा है, जबकि नए हिस्से में परिसर छोटा है और आस-पास ऊंचे मकान होने के कारण तस्वीर लेना कठिन है।
धूमली में जो अवशेष प्राप्त हुए हैं, वे 12वीं-13वीं शताब्दी के माने जाते हैं। जेठवा राज्य की पहली राजधानी धूमली पर्वतमाला के बीच में घाटी में स्थित थी। उसके कई खंडहर आज भी मौजूद हैं। जेठवा राज्य के इन मंदिरों का निर्माण 10वीं शताब्दी में हुआ माना जाता है। गुजरात का यह मन्दिर द्वादश ज्योतिलिंगों में से एक सोमनाथ मंदिर की तरह ही काफी ऊंचा है। मंदिर की छत और गुम्बज के भीतरी हिस्से में जो सुशोभन और नक्क़ाशी दिखाई देती है, वह अलग-अलग कालखंड की मालूम होती है।
मंदिर के अंदर बड़ा सा सभा-मंडप, गर्भगृह और प्रदक्षिणा पथ अन्य मंदिर की भांति ही है। इस मंदिर में प्रवेश के लिए तीन दिशाओं में प्रवेश चौकियां हैं। इसकी तीन खिड़कियों से हवा और प्रकाश के कारण पर्यटकों के लिए इस मंदिर को देखना रोचक अनुभव रहता है। नवलखा मंदिर की छत का गुम्बज अष्टकोण आकार का है। उसके ऊपर विविध पक्षिओं की आकृति पत्थरों पर उकेरी गई है। इसे पवित्रता का प्रतीक माना जाता है। सभा मंडप की दोनों मंजिलों के स्तम्भों के उपरी हिस्से को वैविध्यपूर्ण आकार दिया गया है।
उसमें ख़ासतौर से मानव मुखाकृति, हाथी की मुखाकृति, मत्स्य युगल, वानर, और कामातुर नारी के शिल्प कलात्मक दृष्टि से महत्तवपूर्ण हैं। नवलखा मन्दिर के पीछे पीठ क्षेत्र में दो हाथियों का शिल्प है, जिसमें दोनों को अपनी सूंढ के द्वारा आपस में लड़ाई और मस्ती करते हुए चित्रित किया गया है।
मंदिर के बाहरी क्षेत्र में उत्तर दिशा में लक्ष्मी-नारायण, दक्षिण दिशा में ब्रह्मा-सावित्री और पश्चिम में शिव-पार्वती के शिल्प दिखाई देते हैं। मंदिर के स्थापत्य में भरपूर विविधता दिखाई देती है। धूमली में जेठवा साम्राज्य की 10वीं से 12वीं, 13वीं शताब्दियों के बीच की समृद्धि को मंदिर की शिल्पकारी के द्वारा समझा जा सकता है।
नवलखा मंदिर - धुमली (गुजरात)
गुजरात के सौराष्ट्र क्षेत्र में ऐतिहासिक ईमारतों को ढूंढ़ने की जरूरत नहीं है। हम जहां कहीं से भी गुंजरते हैं वहीं कोई न कोई गाथा पथ्थरो में अंकित दिखाई देती है।
ऐसा ही पौराणिक शिल्पकारी का उत्कृष्ट नमूना है ऐतिहासिक नवलखा मंदिर, धूमली! जामनगर जिले के भाणवड़ तहसील के मोडाणा के पास हराभरा बरड़ा का जंगल है, जिसे 'छोटा गिर अभयारण्य' भी कहा जाता है। नंजदीक ही जामबरड़ा से उत्तर दिशा में बसा है यह गांव 'धूमली'।
सुरेन्द्रनगर जिले के पांचाल क्षेत्र के चोटिला शहर से दक्षिण दिशा में आनंदपुर नामक सुंदर नगर बसा हुआ था। कुछ पुरातत्वविद्दों का मत है कि यह शहर मैत्रक काल के आरंभ में बसा होगा। वर्तमान में यह आनंदपुर-भाड़ला के नाम से ही प्रचलित है। भारत के स्वतंत्र होने से पहले कई शताब्दियों तक यह शहर काठी जाति के लोगों के हाथ में रहा था।
दूर से देखने पर लगता है कि यह मंदिर करीब दो सौ साल पहले बनाया गया होगा। मगर नजदीक जाते ही यह काफी पुराना लगता है। इस मंदिर को देखकर लगता है कि उसका पुनरोद्धार भी किया गया होगा। हो सकता है कि इस मंदिर को मुस्लिमों ने ध्वंस कर दिया हो और बाद में काठी जाति के क्षत्रियों ने इसका पुनरोद्धार करवाया हो।
इस मंदिर के बार में एक लोककथा है। कहा जाता है कि इस नवलखा मंदिर को बाबरा भूत ने एक ही रात में बनाया था। मंदिर की चारों ओर नग्-अर्द्धनग् नव लाख मूर्तियों के शिल्प हैं। पूरा मंदिर सोलह कोने वाली जगति (नींव) के आधार पर बनाया गया है। यह शिवमंदिर सोलंकी काल में बने प्रमुख महाकाय मंदिरों में से एक है, ऐसा हम कह सकते हैं। पुनरोद्धार हुए इस नवलखा मंदिर का पुराना-मूल भाग आज भी सीना तानकर खड़ा है, जब कि नये हिस्से में परिसर काफी छोटा है और आसपास ऊंचे मकान होने के कारण तसवीर लेना कठिन है।
धूमली में फिलहाल जो अवशेष प्राप्त हैं, वे बारहवीं-तेरहवीं शताब्दी के माने जाते हैं। जेठवा राज्य की सब से पहली राजधानी धूमली पर्वतमाला के बीच में संकरी घाटी में स्थित थी। उसके कई खंडहर आज भी मौजूद हैं। जेठवा राज्य के इन मंदिरों का निर्माण कार्य दसवीं शताब्दी में हुआ था, ऐसी लोक मान्यता है।
यह मंदिर गुजरात के द्वादश ज्योतिलिंग में से एक सोमनाथ मंदिर की तरह ही काफी ऊंचा है। इस नवलखा मंदिर की छत और गुम्बज के भीतरी हिस्से में जो सुशोभन और नक्काशी दिखाई देती है वह अलग-अलग कालखंड की नंजर आती है। मंदिर के अंदर बड़ा सा सभा मंडप, गर्भगृह और प्रदक्षिणा पथ अन्य मंदिरों की भाँति ही है। इस मंदिर में प्रवेश के लिए तीन दिशाओं में प्रवेश चौकियां है। तीनों दिशा में पगथार भी हैं। तीन खिड़कियों से हवा और प्रकाश के कारण पर्यटकों के लिए इस मंदिर को देखना काफी रोचक अनुभव माना जाता है।
मंदिर का गर्भगृह वर्गाकार है और उसके ईर्द-गिर्द प्रदक्षिणा पथ है। इस नवलखा मंदिर की छत का गुम्बज अष्टकोण आकार का है। उनके ऊपर विविध पक्षिओं की आकृति पथ्थरों में तराशी गई हैं, जिसे पवित्रता का प्रतीक माना जाता है। सभा मंडप की दोनों मंजिलों के स्तम्भों के उपरी हिस्से को वैविध्यपूर्ण आकार दिया गया है। उसमें ंखासतौर से मानव मुखाकृति, हाथी की मुखाकृति, वृषभ, मत्स्य युगल, सिंह की मुखाकृति, वानर, दो मुखाकृति वाला वानर, हंस युगल और कामातुर नारी के शिल्प कलात्मक दृष्टि से बड़े नमूनेदार हैं।
मंदिर के पीछे पीठ क्षेत्र में दो हाथियों का शिल्प है, जिसमें दोनों को अपनी सूंढ के द्वारा आपस में लड़ाई-मस्ती करते दिखाया गया है। मंदिर के बाहरी क्षेत्र में उत्तर दिशा में लक्ष्मी-नारायण, दक्षिण दिशा में ब्रह्मा-सावित्री और पश्चिम में शिव-पार्वती के शिल्प दिखाई देते हैं।
इस मंदिर के स्थापत्य में हमें भरपूर वैविध्य दिखायी देता है। धूमली में जेठवा साम्राज्य की दसवीं से बारहवीं-तेरहवीं शताब्दियों के बीच की समृद्धि को मंदिर की शिल्पकारी बंखूबी प्रदर्शित करती है, यह आज भी खंडहरों को देंखकर लगता है।
संदर्भ - पत्थर बोले छे! 1988 / चित्र : मुकेश त्रिवेदी
भारतातील गर्भश्रीमंत गाव : धंदा शेती, १७ बँकांत ५ हजार कोटी आणि बरचं काही!

भारतातील गर्भश्रीमंत गाव :
भारत खेड्यांमध्ये राहतो. पण खेडी शहरांसारखी नाहीत. त्यांची ओळख शेती आहे.जेव्हा जेव्हा डोळ्यांसमोर गावाची प्रतिमा तयार होते, तेव्हा त्यामध्ये उंच इमारती, हायफाय शाळा, मोठी रुग्णालये आणि शहरासारखे मॉल नसतात. आपल्याला दिसून येतात ती फक्त मूलभूत सुविधांशी संघर्ष करताना. भारतातील अनेक गावांची परिस्थिती अशी आहे, पण भारतातील एक असेही गाव आहे जे देशातील सर्वात श्रीमंत गावांपैकी एक मानले जाते.
भारतातील गर्भश्रीमंत गाव : हे गाव समृद्ध का आहे?
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात असलेल्या या गावाचे नाव मधापर आहे, जे बँक ठेवींच्या बाबतीत जगातील सर्वात श्रीमंत गावांपैकी एक आहे. सुमारे 7,600 घरे असलेल्या या गावात 17 बँका आहेत. आणि हो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 92 हजार लोकांकडे या सर्व बँकांमध्ये 5 हजार कोटी रुपये जमा आहेत.
हे आश्चर्यकारक कसे घडले?
याचे कारण असे आहे की या बँकांचे खातेदार यूके, यूएसए, कॅनडा आणि जगाच्या इतर अनेक भागात राहतात. गावच्या मातीशी कधीही नाळ न तुटू दिलेल्या लोकांचे हे गाव आहे.
असा झाला गावाचा विकास
या गावातील बहुतेक लोक अनिवासी भारतीय आहेत.
परंतु देशाबाहेर राहूनही त्याने येथे पैसे जमा केले आणि शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्रे, मंदिरे, धरणे, हिरवळ आणि तलाव बांधले.
अहवालांनुसार, ‘मधापर व्हिलेज असोसिएशन’ नावाची एक संस्था 1968 मध्ये लंडनमध्ये स्थापन करण्यात आली.
ज्याचा उद्देश गाव सुधारणे आणि परदेशातील लोकांना जोडणे आहे.
संस्कृती वाचवणे हा यामागचा हेतू आहे
तथापि, शेती हा गावकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. त्यांचा माल मुंबईला निर्यात केला जातो.
याव्यतिरिक्त, या गावात लंडन कम्युनिटीला जोडण्यासाठी एक कार्यालय देखील आहे.
संस्कृती आणि मूल्ये जिवंत ठेवणे हा या समाजाचा एकमेव उद्देश आहे.
सध्या इथे त्याची कंपनी गुजरात ह्या दुसर्या कंपनीच्या सहाय्याने मस्त एकदम मख्खन असे रोड तयार करत आहे.
गुजरातमध्ये (खरेतर सौराष्ट्र) आल्यापासून प्रवास असा दोन टोकालाच होतो
आहे. एका बाजूला पोरबंदरच्या दिशेने आणि एका बाजूला राजकोटच्या दिशेने.
दोन्हीकडे जाताना येणारा समान अनुभव म्हणजे दुतर्फा दिसणारी जमीन आणि फक्त
मोकळी जमीन. एक गिरनारचा डोंगर सोडला, तर इथे डोंगर नावाला देखील दिसणे
मुष्कील. पोरबंदरला बघण्यासरखी ठिकाणे भरपूर, मात्र आमच्या पाहण्यात आलेली
आणी अती आवडलेली ठिकाणे म्हणजे सुदामापुरी आणि Porbandar Bird Sanctuary.
इथे निवांत बसून 'पाखरे' टिपण्याची देखील सोय आहे. पक्षांची माहिती देण्यासाठी जाणकार माणूस देखील उपलब्ध आहे. इथे आजारी, अथवा जखमी पक्षांची देखभाल देखील करण्यात येते.
ह्या ठिकाणापासून जवळच आहे ती म्हणजे सुदामापुरी. कृष्णमित्र सुदाम्याचे जन्मस्थान.
सर्व ठिकाणी असते तशी इथे देखील फटू काढण्यास बंदी असल्याने, बाहेरच्या बाजूने जमेल तेवढा क्लिकक्लिकाट केला आहे.
ही सुप्रसिद्ध 'लक्ष चौराशी' परिक्रमा. जी खरेतर सुदाम्याने
कृष्णभेटीसाठी केली, पण इथे चालून तुम्ही देखील तिचे पुण्य मिळवु शकता. इथे
सुदाम्याच्या जुन्या घराचे अवशेष फार छान जपलेले आहेत. खास गोष्ट म्हणजे,
इथे प्रसाद म्हणून पोह्याची पुरचुंडी दिली जाते. पोहे अक्षरशः अविट गोडीचे
असतात.
इथून पुढे सुरु होतो तो कीर्तिमंदिर अर्थात महात्मा गांधीचे जन्मस्थान आणि द्वारकेच्या दिशेन. ह्या धाग्यातच फटूंचा भडिमार झाल्याने, पुढच्या धाग्यात हा प्रवास पूर्ण करतो. अर्थात धागा उद्याच्या आतच त्वरेने टाकला जाईल हे नक्की.
रण आॅफ कच्छ ( प्रवास दैनंदिनी)
२८/१/२०१८
नवीन वर्षाचं कॅलेंडर आलं अन कुटं कुटं जायचं फिरायला? विचार डोक्यात घोळू लागले . अजेंडावर असलेल्या अमेरिका वारीसाठी गुगळून सप्टेंबर महिना निश्चित केला. साद देती हिमशिखरे... ती नेहमीच देतच असतात... एका मैत्रिणीचा फोन आला की एका आध्यात्मिक शिबिराला जातेस का ? माझी एक मैत्रिणच उपनिषदांवर शिबीर घेणार आहे नैनितालला. उपनिषदे वैगेरे नाॅट माय कप आॅफ टी... सगळं डोक्यावरुन जाईल... पण आठ दिवस निवांत हिमालय की गोदमें राहता येईल, असा विचार करून बुकिंग केलं. झालं ! दोन हजार अठराचा कोटा पूर्ण झाला. निवांत..... पण ... नेहमीच पण नकारात्मक नसतात कधी कधी सुखावह , सकारात्मक पण 'पण' असतात.
अचानक ध्यानीमनी नसताना ठरलेली ही ट्रीप!
त्याचं असं झालं पिंपळदला असल्याने माझ्याशी संपर्क न झाल्यामुळे शोभा/वंदना (बहीण) व तिच्या यजमानांनी एका प्रवासी कंपनी बरोबर जायचं ठरवलं 'रण आॅफ कच्छ' ! हो, तेच ते ! ज्याची जाहिरात अमिताभ बच्चन करतो ना तेच. माझी जी मोठ्ठी बकेट लिस्ट आहे ना त्यात हिमालया नंतर दुसर्या क्रमांकावर असलेलं हे स्थान! हं तर त्या प्रवासी कंपनीवाल्याकडे दोन जागा शिल्लक असल्याचा निरोप आला तिला. मी ही नागपूरला परतले होते. तिने आम्हाला विचारलं पण इतक्या वेळेवर रेल्वेचं आरक्षण मिळण्याची शक्यता कमीच वाटत होती म्हणून आधी फ्लाईटची तिकीट बघितली पण ती काहीच्या काही महाग! टूर तीस तारखेला अहमदाबादहून सुरू होणारे पण एकोणतीसच्या कुठल्याही गाडीचं आरक्षण शिल्लक नव्हतं. फक्त सत्तावीसच्या संत्रागाच्छी राजकोट स्पेशल ट्रेनमध्ये मात्र अडीचशे तिकीटं शिल्लक होती. पण परतीची स्लीपर क्लासची मिळत होती . ती आधी तर काढलीच व त्याचसोबत एसीची पण काढून ठेवली. अश्याप्रकारे रेल्वेला आम्ही नियमीत देणगी देत असतो smile दोन दिवस नंतर न राहता आधी राहू निताकडे (चुलत बहीण)असा विचार करून सत्तावीसची तिकीटं नंतर काढली अन् दोन दिवसांनी गाडीत बसलोही smile
नीताचं घर मणीनगर स्टेशनपासून जवळ, पण तिथे गाडी थांबत नाही पण काही कारणाने. म्हणजे सिग्नल वैगेरे नाही मिळाला आणि थांबली तर आम्ही उतरण्याच्या तयारीने दाराशी आलो. गाडी हळू झाली पण थांबली नाही. थोडं पुढे जाऊन थांबली अन् पब्लिक उतरू लागलेलं पाहून आम्ही पण उतरलो... थ्रील ! एडवेंचर ! रिक्शा करुन घरी पोचलो.
काकूने गरमागरम मेथीचे गोटे म्हणजेच भजी नाश्त्याला केली ती इतकी तोंपासू होती की फोटो काढायला विसरले. रात्र थोडी सोंग फार व पोट लहान! मनसोक्त गप्पा मारून आधीच ठरवलेल्या प्रोग्रामप्रमाणे इथलं स्पेशल काठियावाडी जेवायला गेलो. पंजाबी मेन्युला काट मारून स्थानिक जेवण मागवलं. उंधियो, भरीत, तुरिया पात्रानु शाक, खिचडी -कढी ! एकूण गुजराती गोडबोले, दिलदार व आतथ्यशील. ताकाचा मसाला आवडल्याचे सांगतात शंभरग्रॅम मसाल्याची पुडी हातात दिली. काॅलेज बाॅय माधव आम्हा बायकांमध्ये मस्त एन्जाॅय करत होता, कौतुक वाटलं.
घरी आल्यावर आराम व गप्पांत रात्र केव्हा झाली कळलेच नाही. जेवायचा प्रश्नच नव्हता . एकादशी दुप्पट खाशी! दुसर्या दिवशी एकादशी तर करत नाही पण दुप्पट खादाडी (रात्रीची व सकाळची)मात्र केली आदल्या दिवशी!
नीता सख्खी चुलत बहीण! बर्याच वर्षांनी नीताला प्रत्यक्षात भेटत होते. किती बोलू न बोलू झालं. ती एकेक तिची फाईट सांगत होती अन् मी तिच्याकडे थक्क होऊन पहात राहिले. कॅन्सर सर्व्हायवर नीता म्हणजे मूर्तिमंत सकारात्मकता! पंधरा वर्षांपूर्वी केमो, रेडीएशन करून दहा वर्षे व्यवस्थित गेली. नुसती व्यवस्थितच नाही तर एक उद्योगिनी उदयाला येत होती. सोयाबीनचे प्रोटीन रिच विविध टीकाऊ पदार्थ, सोया पफ्स, प्रोटीन पावडर, चटपटीत पूड चटणी असे करून विकायची. कामाला पाचसहा जण होते. भारतभर खादी ग्रामोद्योग प्रदर्शनात तिचा स्टाॅल असायचा.
त्यानंतर रिलॅप्स झाले. परत पाच केमो नीट पार पडले नंतर सहन झाले नाही त्यामुळे रेडीएशन घेतलेच नाही. दुर्दैव हात धुवून पाठीमागे लागले... पंधरा वर्षापासून चालू असलेला उद्योग तेव्हाच घाट्यात आला अन् व्यवसाय बंद करावा लागला. व्यवसायात सुभाषची साथ होती व सासुबाईंचा पाठिंबा. सुभाषकडच्या सात पिढ्या गुजरातच्या मातीत व पाण्यावर वाढलेल्या ! हार मानली नाही. विम्याचं काम सुरू केलं. घसरलेली गाडी जरा रूळावर आली. अॅलोपथीच्या औषधांचा परिणाम ह्रदयावर झाला. एका नामांकित आयुर्वेदिक डाॅक्टरकडे खोपोलीत ट्रीटमेंट घेतली त्याने बराच आराम पडला. घरबसल्या म्युच्युअल फंडाचे काम करते. दोन तरूण काॅलेजमध्ये शिकणारी मुले. सुभाष अमेरिकेत व्यवसाय करण्यासाठी गेलेत. दोन म्हातार्या सासू व आई, दोन तरुण मुले असे आज आनंदाने एकमेकांना सांभाळत राहताहेत.
hareThis
२९/१/२०१८
एक उनाड सकाळ
जेशी क्रुष्ण ! जय श्री क्रुष्ण अभिवादनाने प्रसन्न सकाळ झाली. आज्यांचे प्रात:स्मरण सुरू झाले होते व एकीकडे चहाची लगबग सुरू होती. कांकरिया तलावावर माॅर्निंग वाॅकला जायचं व नाश्ता करूनच परतायचा प्लॅन माधवने ठरवला होता. गाईड, घरचा कर्ता पुरुष व आईची जबाबदारी स्वत:कडे घेत तिन्ही भूमिका समजूतदारपणे, उत्साहाने पार पाडत होता. मावशीचे अर्धो कल्लाकाने जाऊ, मी आज दौडणार नाही गुजराथी अनुवादित मराठी ऐकायला मजा येत होती. त्याला काही सुचवायला म्हटलं की त्याचं उत्तर असायचं 'वांधो नथी' ही टॅग लाईन मला फारच आवडली. मनातल्या मनात म्हणायला सुरूवात केली तर लक्षात आलं आपण उगीचच्या उगीच वांधे करत बसतो. वांधो नथी
काॅलेजमध्ये असताना आम्ही दोघी बहिणी एकदा उन्हाळ्याच्या सुटीत अहमदाबादला आलो होतो, तेव्हा काका काकुंनी कांकरियाला नव्यानेच सुरू झालेले म्युझिकल फाऊंटन बघायला आणले होते. तेव्हा पहिल्यांदा इथली प्रसिध्द पावभाजी खाल्ली होती. पण आता पावभाजी बरोबरच प्रांतोप्रांतीच्या पंगतीला देशीविदेशी आलेले पदार्थ दिमाखाने बसले आहेत. आपणही त्यांना सामावून घेतलंय. संध्याकाळी चालू होणारे म्युझिकल फव्वारे अजूनही चालू स्थितीत आहेत. ही सगळी मजा पाहायला संध्याकाळी यायला हवं. पण गर्दीची आम्हाला सवय नसल्यामुळे सकाळी जायचा प्लॅनवर शिक्कामोर्ब केलं.
तलाव खूप स्वच्छ आहे. आरोग्य सजगता देश पातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर वाढल्याने सकाळीही तितकीच गर्दी होती चिल्लेपाल्ले वगळता.
कांकरिया तलाव फिरून बाहेर पडलो घटवलेल्या क्यॅलरी भरून काढायला. सुरुवात हेल्दी मिक्स वेज सूपने केली. स्ट्रीट फूड म्हणजे ट्रीट! विविध पदार्थांची रेलचेल. लिज्जत रेस्टाॅरेंटचा लाईव ढोकळा प्रसिध्द आहे पण ते नऊ वाजता उघडत त्यामुळे ढोकळा ठेल्यावरच खाल्ला. ठेल्यांची रांगच रांग आणि प्रत्येकाकडे गर्दी. आधी एक चक्कर मारून सर्वे केला अन 'खिचू' पासून आरंभ केला. बरेच पदार्थ चाखायचे म्हणून वन बाय थ्री करत बन मस्का, खिचू (तांदळाच्या उकडीवर कच्चं तेल, तिखट व मसाला भुरभुरवलेला) लाईव ढोकळा.<
IMG-20180202-WA0014.jpg
पोहे काय आपण नेहमीच खातो न, मग नको मागवायला. पण शेजारच्या ठेल्यावरचे सजवलेली पोह्याची प्लेट पाहून हो, पोहेच जरी असले तरी प्रत्येक घरची, प्रत्येक ठेल्यावरची चव वेगळी ना, आणि हो, नंतर उगीच रुखरुख नको म्हणत मागवलेच. अशी ही खादाड उनाड सकाळ!
आमच्या टूरमध्ये अहमदाबाद दर्शन होणारच होतं. त्यामुळे बाहेर गेलोच नाही. कित्येक वर्षांनी सगळ्यांना प्रत्यक्ष भेटत होतो . घरीच गप्पा मारण्यात एकमेकांच्या सहवासात घालवला. गोपी, नीताची लाॅ शिकणारी मुलगी संध्याकाळी एका ट्रीपहून परत आली तिही आमच्या गप्पात सामील झाली. तोंडी लावायला मज्जा नु लाईफचा वडापाव ! खादाडी, खादाडी अन् खादाडी continued... शेजारीच एक बेन कुर्ती विकते तिच्याकडे थोडी खरेदी केली. मनाजोगता, समाधानकारक दिवस!
३०/१/२०१८
आजपासून टूर सुरू होणार. प्रवासी कंपनी बरोबरचा हा पहिलाच अनुभव. गोपीची काॅलेजला जायची व आमची निघायची एकच वेळ अन तिच्या वाटेवरच आमचं हाॅटेल असा योग! ती सोडणार असल्याने निश्चींत झोप लागली. सकाळी 'आव जो' 'आव जो' करत सगळ्यांचा जड अंत:करणाने निरोप घेतला. साडेआठ वाजता मुंबई, पुणे बसने, ट्रेनने येणार्यांना हाॅटेल मेट्रोपोलमध्ये एकत्र यायला सांगितलं होतं.
आमच्यासाठी वंदना व जिजू सोडून बाकी अनोळखी होते. टूर कंपनीने पुण्यात सहप्रवाश्यांच गटग ठेवलं होतं त्यामुळे त्यांची आपआपसात ओळख झालेली होती. वयोगट चाळीस ते सत्तरी अपवाद होत्या मुली सोबत आलेल्या ऐंशी वर्षाच्या आजी . दोन पुण्याची पारशी जोडपी मराठी बोलणारी, गुज्जु, मल्याळी असा मिक्स ग्रुप होता. तारांकित हाॅटेलमधला ब्रेकफास्ट करून निघालो. बसमध्ये चढायला -उतरायला एक लोखंडी स्टूल जेव्हा जेव्हा ठेवला जायचा तेव्हा तेव्हा पूर्वांचल आठवायचे. तिथल्या बसच्या पायर्या खूप उंच असतात पण त्यांना स्टूलची गरज कधी वाटतंच नाही. चटकन कोणीही हात देतं.
अहमदाबाद ते भूज नऊ दहा तासांचा प्रवास. हाॅनेस्ट रेस्टाॅरेंटची चेन हायवेवर थोड्या थोड्या अंतरावर दिसत होती. दुपारचं जेवण काठियावाडी/गुजराथी घेतलं. रस्ते चांगले पण लांबच लांब! रस्त्याच्या दोन्ही बाजूला एरंडेल, कापूस व मिठाची शेती. भूजच्या जवळ जसं जसं जात होतो तसं तसं दोन्ही बाजूला सपाट ओसाड जमीन! गांवही दूर दूर. मनुष्य वस्ती तुरळक! मध्ये मध्ये उंटांचे कळप चरत होते. टूर मालक जयेश दिल्लीहून आला होता. तिथून त्याने तोंडात टाकायला बरेच प्रकार आणले होते त्यापैकी गुडगट्टे, गुळाच्या कांड्या मस्त होत्या.
संध्याकाळी हाॅटेल हिल व्ह्यु मध्ये पोचलो. छोटीशी ओळख परेड झाली. आम्ही नागपूरकर अल्पसंख्यक पण बर्याच जणांच नागपूरशी काही ना काही कनेक्शन निघालं. भूजमध्ये शिरतांना वाटेत भुकंपाच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या अर्थात सतरा वर्ष उलटली होती म्हणा!भूजमधल्या प्रसिध्द हाॅटेल 'प्रिन्स' मध्ये जेवायला गेलो. थाळीचा आकार बघूनच जीव दडपला. सगळंच जेवण छान होतं पण जिलबी और हलवे का जवाब नही. पोट भरलं पण मन नाही.
रण आॅफ कच्छ (प्रवास दैनंदिनी): ३
भूज म्हटलं की मनात येतात त्या भुकंपच्या आठवणी! इतक्या दूर राहणार्या व इतक्या वर्षांनंतरही आपल्या सारख्या लोकांना त्या आठवणी नको वाटतात. इथल्या लोकांची अवस्था त्यावेळेला काय झाली असेल विचार करून मन उदास होतं. 'रण आॅफ कच्छ' सुरू करण्यामागे तोच उद्देश होता. सर्वच गमावून बसल्यामुळे निराश, उदास झालेल्या मनाला उभारी देण्यासाठी काय करता येईल ह्या मंथनातून हा उत्सव सुरू झाला. त्यासाठी लागणारा मूळ घटक आतिथ्यशीलता त्यांच्या रक्तातच असल्याने तो उधार उसनवारीने आणायचा नव्हता व बाकीचे घटक कलासंपन्नता, सृजनशीलता, उत्सवप्रियताही असल्याने त्याला चार चाॅंद लागले. कच्छींनी ही कल्पना उचलून धरली. लोकं उत्साहाने, नव्या उमेदीने कामाला लागले. नव चैतन्य सळालंल आणि आज त्याचं मूर्त रूप आपल्याला पहायला मिळतंय. तुमचा माल उत्तम असला तरी तो लोकांपर्यंत पोचायलाही हवा न. अमिताभ बच्चन! नाम ही काफी है!
कच्छ नही देखा तो कुछ नही देखा
एखादं ठिकाण आपण बघायला जातो, फोटो काढतो, सेल्फी तर काढतोच व आपला प्रवासी धर्म निभावतो, धन्यता मानतो पण त्यापलिकडे आपण कधी डोकवत नाही. रणोत्सवाची कहाणी ऐकल्यावर प्रवासी म्हणून एक नवी दृष्टी मिळाली. कन्याकुमारीच शिला स्मारक पाहिलं ते केंद्राच काम सुरू केल्यानंतरच. त्यामुळे ते एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितल्याने त्याचा दर्जा एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून न राहता तो उंचावलाय, ते बनलंय 'तीर्थस्थळ'! एका दुसर्या अर्थाने प्रसिध्द होण्यासाठी कारण ठरलं 'लगान' त्याचा उल्लेख पुढे येईलच.
तर मग आता गुज्जु स्टाईलचा व सर्वसमावेशक नाश्ता करून निघूयात भूज सफरीला. स्वामी नारायण मंदिर, प्राग व आईना महल. त्या महालांच चित्र दर्शन घ्याच पण बस मधून उतरल्या उतरल्या गायींच्या शिंगांनी लक्ष वेधून घेतलं. घेऊयात 'गीर' गाईंचं दर्शन. बाकी गाईडने सांगितलेली रोचक माहिती घरी गेल्यावर लिहीन शेपटीत. लिहीन ना! वांधो नथी! आॅल इज वेल!
गिरनार.. श्री दत्तात्रेयांचे अक्षय निवासस्थान
कार्तिकी पौर्णिमेला मी गिरनार परिक्रमा आणि दत्तशिखरावरील पादुका दर्शन पुर्ण करून आले. बऱ्याच लोकांनी तुझा अनुभव लिही असे सांगितले.. त्याप्रेरणेने एक तोकडा प्रयत्न करत आहे.
त्या जगत्गुरुंच्या दर्शनाचे मी काय वर्णन करु.. शब्द तोकडे आहेत. तरी हा प्रयास गोड मानून घ्यावा ही विनंती करते.
मायबोलीवरही लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे तेंव्हा जाणकारांनी सांभाळून घ्यावे ही विनंती. तुमच्या सूचना व अभिप्राय अनमोल आहेत जेणेकरुन लेखनात सुधारणा होऊ शकेल.
गिरनार बद्दल नक्की कधी ऐकले होते लक्षात नाही पण लग्न झाल्यावर माझ्या सासूबाईंकडे श्री. प्रमोदजी केणे यांचे "दिव्यत्वाची जेथे प्रचिती" हे पुस्तक वाचायला मिळाले व गिरनार विषयी उत्सुकता वाढली. तरीही गिरनार इथून किती लांब आहे, शिवाय १०हज्जार पायऱ्या चढायच्या.. छे.. हे काही आपल्याने होणार नाही म्हणून सोडून दिलेले.. प्रमोदजींना आलेले अनेक दिव्य अनुभव वाचून लोक भारावून गिरनारला जातात.. तसे माझे काही झाले नव्हते.. आणि हे त्यांचे अनुभव त्यांच्याजवळ असलेल्या पुण्याईच्या शिदोरीमुळे होते.. सगळ्यांना थोडी येतात ते.. माझे व्यावहारीक मत.. शिवाय अश्या अनुभवांमुळे नक्की काय फरक पडतो जीवनात तेही माहीत नाही.
पण मग गिरनार विषयी गुगलवर वाचत गेले, जेंव्हा जेंव्हा जे जे वाचायला मिळेल ते वाचत होते. त्यात असे कळाले की पायऱ्या कठीण असतात वारा जोराचा वहात असतो, शिखर खूप उंच आहे, रस्ता एकदम घनदाट जंगलातून जातो. जंगल इतके दाट आहे की रात्रीच्या वेळी वन्य श्वापदे मार्गावर दिसतात.. का कुणास ठाऊक पण दाट जंगल म्हटले की मला त्याची ओढ लागते.. भीतीही वाटतेच.. पण जंगलात जायला, रहायला मनापासून आवडते. त्यामुळे अजुनच जावेसे वाटायला लागले. त्यात अचानक ध्यानी मनी नसताना माझ्या सासुबाई आणि माझ्या २ नणंदा गिरनारवर जाऊन आल्या.. त्यांचा उत्साह पाहुन माझी इच्छा आणखीन प्रबळ झाली.. ६० च्या आसपास वय असलेल्या माझ्या सासुबाई लीलया गिरनार चढून उतरल्या.. मग आपण का बर कच खावी असं वाटायला लागलं.. (सासुबाईंची क्षमता आणी इच्छाशक्ती अफाट आहे हे अलहिदा.)
मग काय सगळ्यांना सांगून झालं की कुणी जाणारं असेल गिरनारला तर मला सांगा, मलापण यायचं आहे. साधारण ३ एक महिन्यांपुर्वी आमच्या पुर्वी शेजारी रहाणाऱ्या काकुंचा फोन आला.. पुण्याहून एक ग्रुप नोव्हेंबरमधे जातोय तर आपण जायचं का. तेव्हा माझ्या प्रोजेक्टचं काम चालू होतं पण नोव्हे. पर्य्ंत ते कमी होणार होतं, तेंव्हा सुट्टी मिळण्याची शक्यता होती.. मी हो म्हणून टाकलं. मनी विचार केला पुढचं पुढे पाहू..
पण लगेचच त्यांचा दुसरा फोन आला की नवरात्रापर्यंत त्यांच नक्की काय ते ठरेल.. काही अडचणींमुळे त्यांचं नक्की होत नव्हत.. झालं मी थोडी थोडी माहीती वाचायला सुरवात केलेली, सकाळी लवकर उठून चालायला जाण्याची मनाची तयारी करत असतानाच (हो, मला आधी लवकर उठण्यासाठी मनाची तयारी करावी लागते, मग शरीराची.. लै अवघड काम असतंय ते) काकूंनी अस सांगितल्यामुळे परत सगळ शांत झाल.. कांकू दिवाळी दरम्यान जाण्यासाठी मोकळ्या झाल्या आणी आता परत आमच जाण्याच ठरू लागलं.. त्या ग्रुपला फोन केला तर जागा नव्हती ती लोकं ८ तारखेलाच निघणार होती.
शेवटी आम्ही आमचं जायचं ठरवलं आणि १२, १३,१४ ची तिकिटे काढली.. जातानाची वेटिंगवर होती तर येतानाची कन्फर्म झालेली. आता ऑफीसमध्ये सांगून सुट्टी टाकून, कामे मॅनेज करून परत चालण्यासाठी, लवकर उठण्यासाठी, मनाची, शरिराची थोडी थोडी तयारी सुरु केली. नेटवर वाचताना असे लक्षात आले की कार्तिकी पौर्णिमा दत्तदर्शनासाठी महत्वाची मानली जाते, त्यामुळे तिथे खुप गर्दी असणार.. आम्ही रहाण्याचे तिथे गेल्यावर पाहू असे ठरवले होते कारण अनेक धर्मशाळेत सहज जागा उपलब्ध होते, पण आता तसे चालणार नव्हते.. मग परत शोध सुरु झाला.. ज्या ग्रुपबरोबर जाणार होतो, त्यांची काकुंशी अधीची ओळख होती म्हणून त्यांनाही विचाराचे ठरले कारण ते निघणार तेंव्हा आम्ही गिरनारला पोहोचत होतो, त्यांच्यापैकीच एखादी खोली आम्हाला मिळाली असती तर काम सोपे होणार होते. ऑनलाईन धर्मशाळा फुल दिसत होत्या.. काकुंनी त्यांना फोन केला तर त्या म्हणाल्या असे नाही होऊ शकणार पण ऐनवेळी ३ जणांनी रद्द् केल्याने जागा आहे तेंव्हा तुम्ही आमच्या बरोबर येऊ शकता. जातानाची ३ तिकिटे आहेत आमच्याकडे फक्त येतानाची २ च् आहेत एकाच तात्काळमध्ये पहावं लागेल.
हे सगळे ६ तारखेला चालले होते आणि ही लोकं ८ तारखेला निघणार होती. मी तारखा पाहिल्या तर मला जास्तीची सुट्टी टाकावी लागणार नव्हती पण सुट्टी अलिकडे मात्र घ्यावी लागणार होती.. एक कांम नेमके शुक्रवारी किंवा सोमवारी येऊ शकत होते, आता परत डेव्हलमेंट टिम, आमचा ऑनसाईट असलेला माणूस, मॅनेजर या सर्वांशी परत बोलावे लागणार होते.. अधीची मंजूर झालेली रजा परत कॅन्सल करणे, नव्याने रजा टाकणे, कामाची आखणी करणे आले. पण सर्वांनीच सहकार्य दिले आणि ६ तारखेला संध्याकाळी ग्रुप बरोबर ८ तारखेच्या संध्याकाळच्या गाडीने निघण्याचे नक्की झाले.
हे सगळे होईस्तोवर Open SAP teamचा इमेल आला.. मी एका कोर्ससाठी नाव नोंदणी केली होती तो बरोबर ६ तारखेपासून सुरु होणार होता आणि पहिल्या आठवड्याचे साहित्य आणि सराव परिक्षा नेटवर उपलब्ध झाले होते. सराव परीक्षा १४ तारखेच्या आत द्यायची होती.. आम्ही १३ला रात्री येणार म्हणजे जायच्या आधी हे सगळे पुर्ण करायला हवे होते..
७ तारखेचा दिवस यातच गेला आणि ८ला दुपारी आम्ही निघणार होतो.. तयारी तर शुन्य होती.
आधी १२ तारखेच ठरलेलं तेंव्हा शनि, रवि हातात असणार होते.. तेंव्हा मायबोलीवर एकीचा गिरनारचा प्रवास वाचायला सुरू केलेली.. तिने बरीच शारीरीक तयारी, आखीव व्यायामाचे नियोजन वगैरे केलेले.. ते आठवले आणि ताण यायला लागला.. इतका की संध्याकाळी पित्ताने डोके दुखी वाढली.. याला अजुन एक कारण होते.. आम्ही गिरनारचा विचार केलेला तो गुरुशिखर चढून पादुकांचे दर्शन घेण्याचा.. पण ह्या ग्रुपमधे परिक्रमाही होती ज्यासाठी ३८ ते ४० किलोमीटर चालावे लागते.. दोन्ही कसं जमणार, परिक्रमा तर आधी होती आणि मग गुरुशिखर.. म्हणजे परिक्रमेने दमलो तर गुरुशिखरावर पाणी सोडावे लागणार होते आणि ते मन मानायला तयार होत नव्हते.. शेवटी मनाची तयारी केली कि परिक्रमा वर्षातून फक्त ५ दिवस - कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमे पर्यंतच करता येते तेंव्हा तिला प्राधान्य द्यायचे गुरुशिखरावर १२ही महिने जाता येते तेंव्हा तिथे परत जाता येईल.
मनाला आश्वस्त करित ८ तारखेला घरची कामे मार्गी लावीत तयारी पुर्ण केली. ८ तारखेला घरून काम करण्याची परवानगी मिळाल्याने अनेक गोष्टी कमी वेळात मार्गी लावणे शक्य झाले.
अगदी निघायच्या वेळी बॅग भरत २.३०ला निघणारे आम्ही ३ ला मार्गस्थ झालो.
मला जसे आठवत होते तशी मी सामानाची यादी करत होते अगदी टूथपेस्ट्, कंगवा ई. ई. ज्याचा फायदा निघताना ऐनवेळी बॅग भरताना झाला व काहीही न विसरता ३ वाजता मी बांद्रा स्थानकाकाडे निघाले..
क्रमश:
नीलाक्षी
माझ्याबरोबर शेजारी रहाणाऱ्या काकू व त्यांची बहिण होती.. त्यामुळे अगदी एकटे वाटणार नव्हते. जाताना त्या दोघी माझ्या घरी आल्या व आमचा माझ्या घरून एकत्र प्रवास सुरु झाला..
ओला बुक केली होतीच गाडीत बसल्यावर गेले २/३ दिवसाचा ताण निवळला आणि डोळे पेंगू लागले.. मनोमन कुलदेवतेला, दत्तात्रयांना आणि आई बाबांना नमस्कार केला. त्यांच्या पुण्याईनेच हा दिवस उजाडला होता.. बाबा, माझी आजी, आई आणि आजोळ हे दत्तभक्त. मी त्यांच्यामध्ये नास्तिकच! बाबा आणि आजीला स्वामी समर्थांचे वेड.. त्यांचा स्वामींवर गाढ विश्वास.. बाबांनी अगदी शेवट पर्यंत गुरुवारचे स्वामी दर्शन सोडले नव्हते.. आईने तर सगळे आयुष्यच त्यांच्या भरवश्यावर जगलेले.. माझी धाकटी बहीणही त्यांच्याच पावलावर चालणारी.. मीच कशी काय नास्तिक जन्मले या लोकात देव जाणे.. माझे म्हणणे अगदी स्पष्ट असे की देवाला जर सगळ्यांची काळजी आहे तर त्याला नमस्कार न करता, त्याची पुजा न करता त्याने सर्वांना आनंदी ठेवायला हवे. हा म्हणजे व्यवहारच झाला की तु माझे स्तोत्र म्हण मग मी तुला बळ देतो.. आता जसे वाचन वाढते आहे तसे हळुहळू उमगतंय असं वाटते आहे.. देव म्हणा निसर्ग म्हणा ही एक उर्जा आहे, आणि तिची शक्ती जर तुम्हाला मिळवायची असेल तर तिच्याशी संधान हवे. जसे इलेक्ट्रीसिटी घराबाहेर पोलवर वाहते आहे, पण घरात दिवा लावण्यासाठी, पंखा लावण्यासाठी, एसी ला वेगवेगळ्या पॉवरची बटणे, वायर टाकून ती घरात आणावी लागते. तिचे बटण गरज असताना दाबावे लागते तेंव्हा दिवा लागतो.. देवाचंही तसंच काहीसं असावं!
असो..तर आम्ही अगदी वेळेत गाडी सुटायच्या तासभर आधी स्टेशनवर पोचलो. गाडी फलाटावर लागली होती आणि बरीचशी लोकं गाडीत आपापल्या जागेवर गेलेली होती. जी थोडीफार मंडळी फलाटावर होती त्यांना भेटलो आणि आमच्या जागा जाणून घेऊन स्थानापन्न झालो.. गाडी अगदी वेळेवर सुटली आम्ही राजकोटच्या दिशेने निघालो. आजुबाजुला पाहीले तर सगळीच मंडळी गिरनारला निघालेली.. हळुहळू असे जाणवले की सारा डबाच गिरनारयात्रींनी भरलाय.. प्रत्येक ग्रुपच्या सहकाऱ्यांची वेगवेगळ्या डब्यांत वाटणी झालेली त्यामुळे बराच वेळ लोक या डब्यांतुन त्या डब्यात करत होती.
अखेर सगळे स्थिरस्थावर झाले, रात्री आम्हाला पॅक फूड देण्यात आले, मस्त पोळी भाजी, मसाले भात होता.. आम्ही जेवून झोपेची आराधना करू लागलो.. काही लोकांना ५ वाजता अलिकडच्या स्टेशनावर उतरायचे असल्याने दिवे बंद करून मंडळी ढाराढूर झोपली.
मला मात्र काही केल्या झोप येईना एक तर सर्वात वरचा बर्थ होता त्यामुळे सतत पडण्याची भीती. शेजारी एक लहान मुलगी होती एकदम चुणचुणीत, ती सर्वांना बालसुलभ विनोद सांगत होती, अखंड बडबड चाललेली. तिच्या निरागस गप्पा ऐकीत झोपेच्या आधीन झाले.. सकाळी ६लाच जाग आली, म्हणजे रात्रभर गाढ झोप नव्हतीच पण आता डुलकीही येईना तेव्हा उठून बसले.. थोड्याच वेळात बाकीची मंडळी उठली. गाडी बरोब्बर वेळेत राजकोटला पोचली. आयोजकांनी बस तयार ठेवली होती, मधे आंघोळीसाठी थांबून सोमनाथकडे प्रयाण केले.
सोमनाथची २ मंदिरे आहेत, एक नवे जिथे पाताळात खाली महादेव स्थापिले आहेत व त्यावरच्या मजल्यावरपण एक पिंड. पुर्वी हिंदूमंदिरे आक्रमणांपासून वाचविण्यासाठी ही व्यवस्था.
बऱ्याच लोकांना जुने मंदिर माहीत नसते ते फक्त नवीन मंदिरच पहातात. दोन्ही मंदिरे एकदम जवळ जवळ आहेत. हे मंदिर अनेकवेळा पाडले गेले व पुन:पुन्हा उभे केले गेले असे म्हणतात. अतिशय सुंदर बांधकाम, शंकराची पिंडही मोठ्ठी आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक. मी मंदिरात शिरले तेंव्हा प्रदोषाची सायंकाळची पुजा चालु होती. विविधरंगी, विविधसुगंधी फुले इतक्या आकर्षकपणे मांडली होती की पहात रहावे. मंत्रांचा धीरगंभीर आवाज गाभाऱ्यात घुमत होता.. एक प्रसंन्नता मंदिर वेढून राहीली होती. मनात शंकराचार्यांचे आत्मषटक घोळत होते - चिदानंदरुपम् शिवोहं शिवोहं !
चंद्राने दक्षाच्या शापातून मुक्त झाल्यावर येथे शिवलिंगाची स्थापना केली असे पौराणिक कथा सांगतात तर मंदिराचा उल्लेख अगदि इ.स. पुर्वीपासून इतिहासकारांना मिळतो. सध्याचे मंदिर हे सरदार वल्लभभाई पटेलांनी बांधले आहे.
मी दर्शन घेतले आणि मागे गेले, देवळाभोवती बाग थाटली होती, हिरवळ पसरलेली चहूबाजूनी. त्याच्याकडेने सज्जा होता सागर दर्शनासाठी. देवळातून बाहेर पडल्यावर डाव्या बाजूलाच प्रसिद्ध असलेला बाणस्तंभ पाहीला. म्हटलं व्हॉटस् ॲपचे सगळेच मेसेजेस् फेक नसतात तर
तर या खांबावर एकबाण दाखवून एक श्लोक कोरलेला आहे. त्याचा अर्थ असा की बाणाच्या दिशेने सोमनाथ मंदिर आणि दक्षिण ध्रुव यात कुठलाही भुभाग नाही. हा स्तंभ ६व्या शतकातील आहे म्हणतात.
मंदिर अगदी समुद्र किनाऱ्यावर आहे, पुर्वी आलेली लोकं सांगत होती की भरतीच्या वेळेत पाणी मंदीरात शिरत असे. आता मात्र भर टाकून बहुतेक, समुद्रापासून थोड उंचावर वाटलं देऊळ. मस्त समुद्रजल शांतपणे हेलकावत होतं.. दूरवर काही नावा दिसत होत्या एकूण शांतता वाटत होती मनाला..
सोमनाथाच्या दर्शनाने एक वेगळी उर्जा घेऊन आम्ही जुनागढला प्रस्थान ठेवलं. जुनागढ हे गावच एक गड आहे म्हणे. त्यामुळे गावाला अनेक मोठमोठाले दरवाजे दिसतात. तसेच बाजूची तटबंदीही सतत दिसत रहाते. काही ठिकाणी पडझड झालीय. पण बऱ्याच अंशी तटबंदी शाबूत असावी.
रात्री जुनागढ स्टेशनजवळ गीता लॉजमधे जेवलो, जेवण अप्रतीम होतं. मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांनी मधुर ताकाचा जगच टेबलवर आणून ठेवला.. मी मस्त २/३ ग्लास ताकच प्यायले.. केरळमध्ये सांबार, रस्सम, नाशिकला मिसळीच्या ठिकाणी रस्सा तस इथे अनलिमिटेड ताक.. भारीच.. जुनागढला जाणाऱ्यांनी एकदातरी इथे जेवाव. जेवणे आटोपून रात्री १०.३०ला आम्ही आमच्या खोल्यात पोचलो.
रहाण्याची सोय तळेठीला नरसी मेहता धर्मशाळेत होती. धर्मशाळा असली तरी सोय उत्तम होती. खोलीत गरमपाणी, एसी, सगळ्या सुविधा होत्या. आता २/३ दिवस आमचा ईथेच मुक्काम असणार होता. दिवसभराच्या प्रवासाने थकवा आलेला होता. उद्या सकाळी ४.३०लाच परिक्रमेला निघायचे होते. तेंव्हा खोलीत गेल्यावर ताबडतोब झोपून गेलो.
क्रमश:
सकाळी ४.३०ला बाहेर प्रांगणात सगळ्यांनी भेटायचे ठरलेले. ३.३०लाच उठलो, आवरून बरोब्बर ४.३०ला बाहेर हजर झालो. समोर गिरनारच्या पायऱ्यांवरील लाईटस् दिसत होते.. त्या दिव्यांच्या ओळीवरून रस्ता कसा जात असेल ते कळत होते. सारी मंडळी अगदी वेळेवर हजर झाली. ग्रुपलीडरने परिक्रमेच्या दृष्टीने काही सूचना दिल्या उदा. टॉर्च घेतल्याची खात्री करणे, काठ्या गरज लागत असेल तरच घ्या.. बऱ्याचदा घेऊन नुसतेच ओझे होते इत्यादी. धर्मशाळेच्या बाहेर पडून आम्ही सगळ्यांनी चहा/ कॉफीपान केले, ज्यांना काठ्या घ्यायच्या होत्या त्यांनी काठ्या निवडल्या आणि चालायला सुरुवात केली. हो आता कुठेही जायचं तर खोलीतून निघायचं व थेट चालू लागायचं
आता परिक्रमेविषयी थोडेसे:
गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे, यालाच परिक्रमा करणे असे म्हणतात. गिरनार च्या भोवतीने पूर्ण जंगल आहे. जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही. फक्त या परिक्रमेच्या कालावधीत ५ दिवस सर्वांसाठी प्रवेश खुला करतात.
ही परिक्रमा केवळ कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमे पर्यंत करतात. पहिला दिवस भवनाथमंदीरापासुन सुरु होतो. दुसरा मुक्काम जीना बाबांची मढी, तिसरा मालवेल आणि शेवटचा बोरदेवी मंदीर. अश्याप्रकारे एकादशीपासून सुरु करुन पौर्णिमेला परीक्रमेची समाप्ती करतात. हल्ली एखादा मुक्काम करुन किंवा एका दिवसात सलग चालून १२/१४ तासात पुर्ण करतात. पण एक तरी मुक्काम असावा असे शास्त्र आहे. (मी भाडीपाची फॅन आहे) यादरम्यान सर्व देव, यक्ष, गंधर्व, यती, ऋषी असे सगळेजण परिक्रमा करत असतात व त्यांचा सहवास व आशीर्वाद मुक्काम केल्याने मिळतो अशी भावना आहे.
तर अश्या या परिक्रमेच्या वाटेवर आमची पाऊले पडू लागली.
एवढ्या पहाटेसुद्धा रस्त्यात अनेक ठिकाणी आश्रम उघडे दिसत होते. अखेर ती कमान आली.. गिरनार परिक्रमा प्रवेशद्वार... आता खऱ्या अर्थाने चालणे सुरु होणार होते. अंधार मी म्हणत होता.. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही एवढा अंधार होता. या रस्तावर चालायला विजेरी अत्यावश्यक आहे. मधे मधे इतरांच्या विजेरीचा उजेड मिळतो पण तुमच्या पायाखाली खड्डा आहे की उंचवटा आहे ते पहाण्यासाठी तुमच्या हातात विजेरी हवीच हवी..
हेच ते प्रवेशद्वार :
मी परिक्रमेला सुरवात झाल्यावरच आमचा ठरलेला ग्रुप सोडून पुढे चालायला सुरवात केली. काल सोमनाथ मंदीरात झालेल्या चुकामुकीमुळे जरा लीडरनी प्रेमळ दटावणी केली. पण त्यांना मी विनंती केली की त्यांच्या इतक्या हळूहळू वेगाने मला चालता नाही येणार. इथून मी जी पुढे गेले ते शेवट पर्यंत पुढेच राहीले. आपण जर आपल्या सहज वेगाने चाललो नाही तर पाय जास्त दुखू लागतात. परिक्रमेचे अंतर पाहता मला ती रिस्क घ्यायची नव्हती.
जंगल सुरु झाल्यावर, म्हणा कमान ओलांडली की जंगलच सुरु होते; तेही घनदाट. तर इथून लगेचच हळूहळू चढालाच सुरुवात होते. या पहील्या चढाला जवानी की घोडी म्हणतात.. जवानीकी घोडी चढुन गेल्यावर जीनाबाबाकी मढीपाशी जरा रेंगाळलो. त्यांची चिलीम आजही तिथे आहे. बाजूला एक हनुमान आणि कालिकेचे मंदीर आहे. इथे बरेच नागासाधू बसलेले असतात आणि तुमचा रस्ता अडवून पैसे मागतात. ते जे काही चित्र होते ते फारच भयंकर वाटत होते.. काही साधूंची बडबड चालू होती - "१रुपयात काही येतं का आता १०रुपये तरी द्या." माझ्या मागून आलेल्या काहीजणींनी सांगितले की बायकांवरही शेरेबाजी करत होते म्हणे.. कसले हे साधू! मी फार बघू शकत नव्हते.. आपल्याला अश्या दिंगंबर अवस्थेतील माणसांना पहायची एकतर सवय नसते त्यामुळे आधी अवघडायला होतं.. त्यात इथे अनेकजण असे नुसते भस्म फासून बसलेले.. त्यांचाबद्दल अनेक वदंताही आहेत जसे की ही लोकं फार कोपिष्ट असतात, त्यांच्या डोळ्यात पाहिलं तर संमोहीत करतात इत्यादी इत्यादी.. आमच्या लीडरलातर पकडून पैसे द्यायला लावले म्हणे..
मी यु ट्युबवर पाहिलं होतं की ही लोकं पैसे मागतात, तेंव्हा हा मुक्काम जवळ आल्यावर मी काही नाणी हातात ठेवली. आणि कुणाकडेही न बघता भराभर चालायला सुरवात केली.. हात पुढे आला की नाणं ठेवायच आणि चालू लागायचं. त्यात मला एक जाणवलं की नामस्मरण चालू असेल तर ही लोकं बाजूला होऊन तुम्हाला रस्ता मोकळा करुन देतात.. नामस्मरण थांबलं की पैसे मागणार.. जीना बाबाच्या मढीच्या आधीपासून, नंतरही बऱ्याच अंतरापर्यंत ही लोकं रस्त्याच्या दुतर्फा बसलेली असल्याने मला माझा अनुभव टेस्ट करता आला.. पुढे पुढे साधूंबरोबर साध्वीपण होत्या (त्या मात्र दिगंबर नव्हत्या). त्याही पैसे मागत असत पुरुषयात्रेकरूंना ते त्रासदायक होई. यातून सुटकेचा मार्ग एकच, नामस्मरण. असे अनुभव यायला लागले की ही परिक्रमा नुसता जंगल ट्रेक न राहता यात्रा बनून जाते व जाणवते त्यांच्या इच्छेनेच केवळ आपण हे करु शकतो.
इथे येईस्तोवर चालणाऱ्यांचे वेगानुसार गट पडले होते. सर्वात आधी सुपरफास्ट बर्वेदादा, श्री. अभ्यंकर आणि अजून दोघे सासरा जावयाची जोडी होती. सासरेबुवाही ७०च्याजवळपास होते पण चालण्याचा वेग अफाट होता. त्यानंतर आमचा ग्रुप मी, राणे आजी, नगरचे चव्हाणदादा, शुभांगी, पुण्याचे पंकजभाऊ, त्यांच्या मातोश्री आणि त्यांची मैत्रिण, तेजस आणि शिरवळकडचा रोशन. तेजस आणि रोशन एकदम उमदे गडी होते आणि अगदी टणाटण उड्या मारत परिक्रमा पार करत होते. मी बऱ्याचदा पंकजभाऊंच्या आई आणि त्यांच्या मैत्रिणी बरोबर चालत होते. मधेमधे एकमेकांसाठी थांबून आमचा हा चमू मार्गक्रमण करत होता. आमच्या मागे माझ्याबरोबर आलेल्या २न्ही काकू आणि अजून २जणी होत्या. सर्वात शेवट सगळे लीडर आणि ज्यांचा वेग कमी आहे अशी माणसे. जंगल घनदाट होते व एकदा आत शिरल्यावर चालूनच बाहेर पडायचे त्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. म्हणून ग्रुप लीडर्स या लोकांना चीअर अप करत, मदत करत मागून येत असावेत.
चालताना दिसलेली पवनचक्की व पाण्याची उन्हाळी सोय
एकूण तीन डोंगर चढायचे आणि उतराचे असतात हे माहित होते. पण चढ एवढा होता की २रा डोंगर संपेपर्यंत थकायला झाले होते. मधे थांबत होतोच आम्ही. जवळपास ७०अंशाचे चढ होते.
परिक्रमा ही वर्षातून काही ठराविक दिवसच करता येत असल्याने गर्दीचा नुसता पुर आलेला होता. रस्त्याच्या दुतर्फा अनेक स्टॉल्स लागलेले दिसत होते.. भजी, पापड, खारे दाणे, फुटाणे, मसाला आलू, मीठ, मिरची, मसाला, भाज्या असे काय काय न् काय काय.. सर्वात कहर म्हणजे पानाचे ठेलेही होते. ठिकठिकाणी लिंबू सरबत, पाणी मोफत वाटत होते.. अनेक महाराजांचे रस्त्यात लंगर होते, ते चहा नाष्टा, जेवण वाटत होते.. हा सेवाभाव पाहून सद्गतीत व्हायला होत होतं..
असाच एक अमूलचा स्टॉलः
मीठ, मिरची, भाजीचे ठेले:
सुरवातीला टेंपो, गाड्या काही अंतरापर्यंत येऊ शकतात म्हणून दुर्लक्ष केलेले पण दुसऱ्या डोंगरावरही पाणी मोफत वाटत होते जे त्यांनी खालून कुठुनतरी लांबून वाहून आणलेले.. बरं ही लोकंही गरीबच दिसत होती.. हे सगळे मोफत वाटणारे अगदी हात जोडुन तुम्हाला आमंत्रण देतात.. तो सेवाभाव बघून शब्द सुचत नाहीत. काही ठिकाणी शहाळेही ५/५ रुपयांना विकत होते.. का? केवळ परिक्रमा वसीयांची सेवा हा भाव.. इकडे शहरातील विक्रेते असते तर अश्या ठिकाणी अजून १०० रुपयांना शहाळे विकले असते.. पहिल्याचढापासुन पुढे तुम्हाला सगळे पाठीवर वाहून न्यावे लागते.. गाडी अगदी ३ऱ्या डोंगराचा उतार संपल्यावरच! मला या माणसांची खूप कमाल वाटली.. मी मनातून या सगळ्यांना नव्हे त्यांच्या सेवाभावाला साष्टांग दंडवत घातला.
वारीत जशी सगळ्या प्रकारची माणसे दिसतात तशी परिक्रमेतही दिसत होतीच. सेवाभावी अनेक गरीब लोक होते तसेच लहान मुलाला घेऊन भीक मागणारे, अपंगलोक, वृद्ध भीकारी अनेक ठिकाणी दिसत होतेच. काही मुलांना शंकर, राम, लक्ष्मी असे साज चढवलेले व पैसे मागायला लावलेले तर काही ठिकाणी साधू जमीनीत पुर्ण डोके गाडून झोपलेले अशी अनेक निरीक्षणे करीत मी चालले होते. दुसऱ्या डोंगरमाथ्याला आम्ही साधारण ११.३०च्या सुमारास होतो. उन आजिबात जाणवत नव्हते. मला जरा जरी उन लागले तरी लगेच पित्ताचा त्रास होतो.. म्हणजे पित्त उसळतेच.. मग विश्रांती घेतल्याशिवाय आराम पडत नाही. पण आज मी अखंड चालत होते, थकवा जाणवल्यावर मधे लिंबू सरबत घेत होते, बरोबर इलेक्ट्रॉलचे पाणी घोट घोट घेत होते. पण पित्ताचा त्रास आजिबात जाणवत नव्हता. उन्हाचे अस्तित्वही डोंगरमाथ्याला जाणवत होते थोडेफार नाहीतर नाहीच.
मधे मधे अनेक ओढे दुथडीभरून वहात होते आणि बूट ओले होऊनयेत म्हणून मी कसरत करत होते. मधल्या एका ओढ्याला अशीच कसरत करताना उडी चुकली आणि पाण्यात पडले.बूट वाचवत होते आता बऱ्यापैकी पाय भिजले. झाले, सगळ्यांना करमणुकीला नवीन विषय मिळाला- "मी व ओढा". पुढे जिथे जिथे ओढा येत असे तिथे लोक आधीच हसायला सुरवात करत. या करमणुकीने आमचा थकवा विसरायला मदत होत होती.
३रा डोंगर अगदी लहान आहे असे ऐकले होते. लोकही असेच सांगत होते आता फार चढण नाही. त्यामुळे जरा बरे वाटत होते. पण ३रा चढ सुरु झाला आणि संपायचे नाव घेईना. शेवटी १.३० की २च्या सुमारास आम्ही कालीका देवळापाशी आलो. हे ठिकाण मालवेल व परिक्रमेचा मध्य आहे असे नंतर कळले. तेंव्हा मात्र चला आता हा डोंगर उतरला की परिक्रमा संपणार असे वाटत होते. उतारावर एक शॉर्टकट मिळाला, अजून अंतर कमी झाले. ३ऱ्या डोंगराच्या पायथ्यापाशी आलो तेंव्हा २.३० वाजलेले. आता भूक लागली होती. पायथ्याशी असलेल्या एका लंगर मध्ये पुरी, भाजी, गाठीया, शिरा, खिचडी असे पुर्ण गरमागरम जेवण जेवलो. आता मालिशवाले दिसायला लागले होते, निरनिराळ्या माळा, तेले अश्या वस्तूंची विक्री चालू झालेली. हे पाहून मला अजूनच वाटायला लागले की परिक्रमा संपत आली. काही लोक मालीश करून घ्यायला, झोप काढायला थांबले. मी मात्र चालणे सुरूच ठेवले होते. आता थांबायचे ते रूमवर जाऊनच.
चढत जाणारी नागमोडी वाटः
तासाभरात शेवटची कमान आली परिक्रमा संपल्याची, समोर बोरदेवी मंदिराची पाटी दिसली. मनातल्या मनात मी आनंदाने एक उडी मारली. (शारिरीक शक्यच नव्हते.) देवाचे आभार मानले. बोरदेवीचे दर्शन घेऊन पुढे जाण्याची प्रथा आहे परंतू पाटीवाचली तर एक कि.मी. अंतर होते म्हणजे येऊन जाऊन २ कि.मी. बापरे.. आता २किमी सुद्धा जास्त वाटायला लागले होते. मी तिथेच स्टॉल्सवाल्यांजवळ चौकशी केली तर म्हणाले इथे परिक्रमा संपली बोरदेवीचे दर्शन घेतले पाहिजेच असे नाही. ऐकून किती बरं वाटलं सांगू. थोडं चालल्यावर म्हटले किती अंतर बाकी ते तरी विचारू.. तर कळाले की इथून भवनाथ मंदीर अजून १२किमी. आहे. हे ऐकून फक्त पडायचीच बाकी होते. मनाला आवरलं, इतके अंतर चालून आलो आता हेही संपेल. तशी धुगधुगी होती अजून शरीरात आणि मन थकायला तयार नव्हतं.
हाही रस्ता जंगलातूनच आहे पुर्ण. मधे मधे गिरनार दर्शन देत होता. आजूबाजूला दाट झाडी छोटेसे ओहोळ.. रस्ता खरोखर सुंदर होता. मन प्रसंन्न् करत होता. हळूहळू चालत होते, आता टेकायचे झाल्यास अगदी खाली बसावे लागत होते, त्यामुळे शक्यतो ते टाळून उभ्या उभ्या विश्रांती घेऊन चालणे सुरु ठेवले होते. (एकदा खाली बसल्यावर उठताना काय परिस्थीती होत होती ते केवळ माझे मीच जाणे) तिसऱ्या डोंगराच्या उताराच्यावेळी पंकजभाऊंनी काठी दिलेली; तिचा खूपच उपयोग होत होता. त्याचे झाले असे की knee capsमी पहिल्यांदाच वापरत होते आणि त्याने उजव्या पायाची नस कुठेतरी दुखावली होती. मधे रस्त्यात थांबून मी त्या कॅपस् काढल्या तरी पाय उचलायला खूपच त्रास व्हायला लागला होता. मग काठीच कामी आली. मध्ये मध्ये शॉर्ट्कटस् होते पण पाउल नीट पडेल का याची शाश्वती न वाटल्याने सरळ मार्गावरुनच चालत राहिले.
बोलणे कधीच बंद झाले होते. थकव्याने डोळे मिटायला लागले होते. जेंव्हा जेंव्हा विचारू तेंव्हा सगळेजण ५किमी. राहिले सांगत होते पण हे शेवटचे ५ किमी काही संपायला तयार नव्हते. एकदातर मी केवळ खुणेनेच पोलीसांना विचारले किती अंतर आहे.. त्यांनाही माझी परिस्थिती पाहुन हसू आले. अर्थात उत्तर तेच होते -५ किमी. संपूर्ण परिक्रमेत मधे मधे पोलीसांचा तंबू होता, किंवा पोलीस येताजाताना दिसत होते. मदतीलाही तत्पर असावेत कारण एका कुटुंबातील मुलगा हरवला होता तो त्यांनी विक्रमी वेळात शोधून दिला होता.
मी मजल दर मजल करीत चालत होते. खोडीयारमातेचे छोटेसे देऊळ अगदी रस्त्यातच लागते. तिथे कळाले की बोरदेवीचे दर्शन नसेल घेतले त्यांनी इथे दर्शन घेतले तरी चालते. जणू भक्त्तांसाठी माता रस्त्यावर येऊन उभी होती. परिक्रमा सोपी करत होती. स्वत:ला मोटीवेटकरत होते. निघाल्यापासून अनेक वृद्ध माणसे दिसत होती, गुजराथी बायका केवढाली वजने डोक्यावर वहात वेगाने चालत होत्या. त्यांना पाहून अचंबीत होत होते. शेवटी ती वेळ आलीच. एका पाणीवाटपाच्या ठिकाणी बसायला जागा होती, समोर गिरनार दिसत होता.. आता मैलाचे दगड सुरुझाल्याने खरे अंतर कळत होते व खरोखर शेवटचे ५किमी. राहिले होते. शरीर प्रचंड थकले होते, वाटले बस्स आता कोणी काही म्हणो, मी काही इथून ऊठणार नाही.. मागून येणाऱ्यांना विचारू की एखाद्या गाडीवानाला विनंती करायची का ते. आता इथे अगदी दुचाकीपण दिसत होत्या पण रिकामी गाडी एकपण नाही. तेवढ्यात भलमोठं बोचकं घेऊन एक बाई आली आणि माझ्या शेजारी जरा टेकली. तिला विचारलंच न राहवून की बाई गं, एवढ सगळ ओझे कसे वाहतेस. तर ती हसून म्हणाली आम्हाला याची सवय आहे. ओझे नसेल तर भरभर चालता नाही येणार. तिचं कुटुंब आता लवकरच परिक्रमा पुर्ण करणार होतं आणि मग डोक्यावरच्या साहित्यातून तिला स्वयंपाक करायचा होता. बापरे.. इथे चालायची शक्ती नाही आणि ही बाई त्यानंतर स्वयंपाकपण करणारे.. मी स्वत:वरच रागवले.. ते काही नाही हे अंतर पुर्ण करायचेच.. चला यात्रावीरहो.. चालायला लागा.. तु हे करु शकतेस. आता फक्ता ५ किमी म्हणजे १च तास.. "common, you can do it!". परत चालणे सुरु झाले, दत्तात्रयांचे नाम मुखी सुरु केले. मागे नामस्मरणात चालताना असे जाणवले होते की आपले पाय जमिनीला लागतच नाहीयेत.. तो अनुभव आठवला आणि स्वत:ला सांगितले की तेच करून घेत आहेत तेंव्हा परिक्रमा पुर्ण होणारच ! जय गिरिनारी!
आतातर अगदी हळूहळू चालत होते, चालणे कसले म्हणा खुरडतच होते. काठी टेकवायची मग तिच्यावर जोर टाकून पाय ओढायचे. मधे क्षणभरच उभे रहायचे की उर्जा मिळायची, तिचा पुरेपूर उपयोग करायचा आणि जेवढा वेग साधता येईल तो साधायचा की परत थोड्यावेळाने पाय ओढणे सुरु, परत विश्रांती असे चक्र चालू होते. एकीकडे पुणेरी मन म्हणत होते, यांना कुणीतरी सांगायला पाहिजे, जिथे परिक्रमा संपल्याची कमान आहे तिथून पब्लिक ट्रान्सपोर्ट ठेवा. किती लोक घेतील तो. दुसरीकडे स्वत:ला सांगत होते, तुला कैलास-मानसरोवर चालत जायचे आहे ना, त्याची रिहर्सल समज. हे अंतर पुर्ण केलेस तर तुझी थोडी तरी तयारी होऊ शकते तिकडे जायची. तुला हे अंतर पुर्ण करायलाच हवे. मधेच रुम मधील बेड आणि आरामदायी वातावरण डोळ्यासमोर येत होते, हे अंतर कापले की आपल्याला आराम मिळणार आहे. तेंव्हा एकला चलो रे..
अश्या प्रकारे अनेक विचारांना फाटे देत, नामस्मरणकरत पावणे सहाला मी धर्मशाळेत प्रवेश केला. सकाळी ४.३०ला निघालेली मी ५.४५ म्हणजे जवळ जवळ १४ तासांनी परतले होते.
न आलेल्या व आधी पोचलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले तेंव्हा खुप मस्त वाटले. बाहेरच बाकावर बसून घेतले, रुमची चावी काकूंकडे होती. त्या मागे होत्या पण परिक्रमा चालत पुर्ण केल्याचे समाधान एवढे होते की लगेच आडवे व्हायला नाही मिळाले त्याचे आजिबात दु:ख झाले नाही. मी एक उद्देश्य पुर्ण केले होते. लगेच उद्या गडावर येणार का लोकांची चर्चा सुरु झाली. सगळेच इतके दमले होते की उद्याची कल्पना करवत नव्हती. मी म्हटले उद्याचे उद्या पाहू. खोलीवर गेल्यावर गरम पाण्यानी अंग शेकले, लवकर जेवून आडवे झालो तेंव्हा काय वाटत होते ते शब्दात मांडणे कठिण आहे.
क्रमश:
काल रात्री झोपताना बी कॉम्प्लेक्स व पेन किलर घेऊनच झोपलो होतो त्यामुळे सकाळी उठल्यावर कालच्या इतका थकवा जाणवला नाही. आज दिवसभर आराम होता, रात्री शिखरासाठी निघायचे होते. नाष्टाकरून परत एक झोप काढली. तेवढ्यात असे कळाले की कुणी मसाजसाठी पतीपत्नी धर्मशाळेशी संलग्न आहेत व त्याचा चांगला उपयोग होत आहे. माझा उजवापाय दुखराच झाला होता, एक पायरीही चढणे दुष्प्राप्प्य झालेले. सॅकच्या ओझ्याने खांदे सुजलेले. मी अगदी आतुरतेने तिची वाट पाहू लागले, पण ती काही येईना.. शेवटी तिचा फोन नं मिळवला तर तो तिच्या नवऱ्याचा होता तो म्हणाला की ती धर्मशाळेतच आहे; येईल. ह्यात दुपारच्या झोपेचे खोबरे झाले, हो ती आली आणि झोप लागल्यामुळे आपण दारच उघडले नाहीतर.. शेवटी ४.३०ला तिला पहायलाच बाहेर पडले तेंव्हा सापडली एकदाची. तिला जवळ जवळ पकडूनच रुमवर आणली. अजून कोणी बोलावल तर उशीरच झाला असता. तसेच मसाजची खूप गरजही होती. तिने फटाफट १५-२०मिनिटात मसाज केला. तिचा हात जरी पायाला लागला तरी कळ येत होती त्यात तीने शेवटी फटके मारले.. देवा रे.. पण तिला नसांची चांगली जाण असावी, माझा पाय तिने छान मोकळा करून दिला. आम्ही आंघोळी उरकल्या व जेऊन तयार झालो. रात्री १०.३०ला निघायचे ठरले होते; परत झोप काही येईना; मग असाच वेळ घालवला.
१०.३०ला बरोब्बर बाहेर आलो, ज्यांनी दुपारी डोली ठरवल्या होत्या ते लोक थोडे उशीरा निघणार होते. शेवटी सगळे जमून ११ला चालायला सुरुवात केली. ज्यांनी काल काठ्या घेतल्या नव्हत्या त्यांनी आज काठ्या घेतल्या. गुरुशिखरावर सगळ्यांनी काठी घेतलीच पाहिजे असे सांगितले होतेच. आधी भवनाथाचे दर्शन घेतले. भवनाथ हे शंकराचे देऊळ आहे, तेथील ग्रामदैवत. त्याला आधी प्रार्थना करायची की महादेवा, गुरुशिखर चढत आहोत, सगळा प्रवास सुखरुप होउ दे!
जाता जाता भवनाथ मंदिरा विषयी थोडेसे :
हे महादेवाचे जागृत मंदीर आहे असे म्हणतात. बाजूलाच मृगीकुंड आहे. त्याची काहीतरी गोष्ट ऐकलेली, पण लक्षात नाही आता. येथे शिवरात्रीला फार मोठी यात्रा भरते व मुहुर्तस्नाना साठी साधू थेट कुंडात उड्या टाकतात. हे मी कुंभमेळ्याबाबतपण ऐकले आहे. असे म्हणतात भगवान शिव स्वत: इथे त्यादिवशी स्नानाला येतात. कुंडाला प्रदक्षिणा करुन आल्यावर बाहेरच्या बाजूला एक दगड पाण्यात ठेवलेला आहे. पाण्यावर तरंगणारा दगड. असे म्हणतात की रामसेतूतील हा दगड इथे आणला गेला आहे म्हणूनच पाण्यावरही तरंगतो. रात्रीच्या अंधारात खरच तरंगत होता की नाही हे कळाले नाही. दिवसा पहायला हवे.
रात्रीचे भवनाथ मंदिर :
म्रुगी कुंडः
असे महादेवाचे दर्शन झाले की थेट पहिल्या पायरीशी चढावा हनुमान आहे, त्याला नमस्कार; त्यालाही प्रार्थना की शक्ती दे. त्यानंतर पहिल्या पायरीवर नारळ फोडला जातो. त्या पायरीवर डोके ठेवायचे, दत्तात्रयांना सांगायचे, तुम्हीच घेऊन जा आणि सुखरुप खाली आणा. मग सुरुवात. आम्ही भवनाथानंतर जवळच असलेल्या जुन्या आखाड्याच्या आश्रमातील दत्तालापण नमस्कार केला. उत्सुकतेने सभोवार नजर फिरवीली. चारी बाजूंनी बांधकाम करुन साधू आणि साध्वींसाठी रहाण्याची सोय केलेली अनेक मजली इमारत होती ती. अनेकसाधू, साध्वी दिसत होत्या. या प्रवासात साध्वींना तेही अनेक संख्येने मी पहिल्यांदा पाहिले.
दर्शन घेऊन गिरीशिखराकडे वाटचाल चालू ठेवली.
गिरनार हे भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला परिसर आहे. त्याची रेवताचल, कुमुद, उज्जयंत, श्वेताचल, श्वेतगिरी अशीही नावे आढळतात. श्रीराम व पांडवांनी इथे भेट दिल्याचे उल्लेख आढळतात. श्रीकृष्णाद्वारे रुक्मिणी हरणही इथेच झाले अशीही मान्यता आहे. गिरनारचे उल्लेख सम्राट अशोकापुर्वीच्या इतिहासातही आहेत असं वीकीपीडिया सांगतो. असा हा गिरनार पर्वत हिमालयापेक्षाही जुना. अनेक साधू, बैरागी यांची तपोभूमी. स्वत: दत्तात्रयांनी इथे १२हजार वर्षे तपश्चर्या केली होती ब आजही त्यांचे अक्षय निवासस्थान म्हणून ओळखले जाते. त्यांच स्थानावर आज दत्तपादुका उमटलेल्या आहेत. हां आता कुणी म्हणू शकतं की हातानी छिन्नी हातोड्याने त्या कोरू शकतं! तसे असेलही.. पण या स्थानावर अनेकांना अनेक अनुभव येतात जे पादुका उमटल्या ह्यावर श्रद्धा ठेवायला लावतात. गिरनारला जसे धार्मिक महत्त्व आहे त्याप्रमाणेच तो अनेक वन्यप्राणी, वनस्पती यांचे वसती स्थान आहे. अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती इथे मिळतात.
आम्ही सुरवात केली, चढाई रात्रीची असल्याने किती चढलो ते काही कळत नाही. हवा छान थंड असते त्यामुळे लवकर थकवा येत नाही. आम्ही त्रिपुरी पौर्णिमेला चढत होतो. परिक्रमेचा काळ, त्यातून पौर्णिमा त्यामुळे वाटेवरची सगळी दुकाने चालू होती. त्यांचा प्रकाश मिळत होता. पायऱ्यांवर दिवेही लावले आहेत. अगदीच अंधार वाटेल तर तिथे पौर्णिमेचा चंद्र नैसर्गिक प्रकाश पुरवत होता. सुचना पुर्वीच दिल्या गेल्या होत्या की चढताना आजिबात घाई करायची नाही. अगदी सावकाश एकेक पायरी चढायची. प्रत्येकजण त्याची अंमलबजावणी करत होता. तसंपण ही स्पर्धा थोडीच होती..
इथेही खूप गर्दी होती. अगदी सतत एकाबाजूने चढणारे चालत होते तर दुसऱ्या बाजूने उतरणारे. जसजस वर जाऊ तसतशी गर्दी कमी न होता वाढतच होती. कुणी मोबाईलवर दत्तनामाचा जप लावून चालले होते तर कुणी स्वामी समर्थांचा. काही तरुण मंडळी एवढ्या गर्दीतही धसमुसळेपणा करत सिनेमाच्या गाण्यांवर उड्या मारत चालत होती व यात्रेकरुंच्या रोषास पात्र होत होती. मी सावकाश चालत होते तरी पहिल्या सुपरफास्ट बॅचचे लोक माझ्या आजुबाजूला होते. आश्चर्यच वाटलं माझ्या वेगाचं.
मन स्थिरही होते, शांत होते पण भावूकही झालेले. माझे बाबा अनेकवेळा गुरुचरित्राचे पारायण करीत. त्यामुळे त्यातल्या अनेक गोष्टी आठवत होत्या. दत्तगुरु व गणपती हे देव न वाटता लहानपणी आम्हाला आमचे कुटुंबीयच वाटत असत त्यामुळे आजपर्यंत गुरु किंवा देव या नजरेने त्यांच्याकडे कधी पाहिले नाही; मला कुणा नातेवाईकालाच फार वर्षाने भेटायला जातोय असंच वाटत होतं.
पायरी चढताना आम्हाला सांगण्यात आलेले की विश्रांती उभ्यानेच घ्या, सारखे खाली बसलात तर अजून त्रास होईल. पायऱ्यांना एका बाजूला कठडे आहेत बहुतांशी. सुरवातीच्याच काही पायऱ्यांना आजिबात कठडे नाहीत. सतत चालत असल्याने हवा थंड असूनही थंडी आजिबात वाटत नव्हती. १५०० पायऱ्यांजवळ एक तरुण मुलगा खाली जाताना पाहिला. २५०० पायऱ्यांपासून परत आला होता तो. मला त्याचं आश्चर्य आणि स्वत:ची काळजी वाटली. हा मुलगा परत आला, आपण जाऊ ना ! पण मला थकवा आजिबात जाणवत नव्हता अगदी आरामात चढत होते. २०००पायरीच्या दरम्यान बेलनाथबाबा समाधी आहे. ते एक मोठे सिद्ध होते. २२५० पायरीवर डावीकडे राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुंफा आहे. ३/४ पायऱ्या चढून आतमध्ये जाऊन दर्शनास दोन सुंदर मूर्ती आहेत. तिथून एका कपारीतून अजून वर गुहेत जाता येते. अगदी घसपटत जावे लागते. वर ३शिळांमुळे एक छोटीशी खोली तयार झाली आहे. मस्त वाटलं वर गेल्यावर. इथे भर्तुहरी नाथांनी राजा गोपीचंदाला उपदेश करून तपाला बसवले होते. वरच्या गुहेत ५/६ माणसे बसू शकतात, मस्त उबदार वातावरण होते आत.
रात्रीचे खाली दिसणारे गाव :
यादर्शना दरम्यान सुपरफास्ट बॅच पुढे गेली, ती शेवट पर्यंत भेटली नाही. मी काहीकाळ एकटीच चालत होते, मग परत मंडळी भेटली. २,६०० पायऱ्यावर आसपास राणक देवीमातेची शिळ आहे अजून वर गेल्यावर ३,५०० पायऱ्यांपाशी प्रसूतीबाई देवीचे स्थान आहे. संतान प्राप्ती झाल्यावर भाविक येथे त्या संतानाला घेऊन येतात. आम्ही राणकमातेपाशी दिवा लावला. सगळेजण त्रिपुरवाती घेऊन आलेले व जिथे शक्य आहे तिथे वात लावत होते. येथून थोडे पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, काली माता, वरूडी माता, खोडीयार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत. चढता चढता आम्ही पहिल्या मुक्कामी पोहोचलो- जैन मंदिर - साधारण ४हजार पायऱ्या इथे पुर्ण होतात. इथे पायऱ्यांच्या दोन्ही बाजूनी बसायला जागा आहे. कुणी आडवे झालेले, कुणी बसल्या बसल्याच झोपलेले. आम्ही इथे पावणे ३ वाजता पोहोचलो.
कुड्कुडणारे आम्ही:
आता असं ठरलं की इथून पुढे सगळ्यांनी एकत्रच जायचं. जैन मंदिराच्या मागच्या बाजूस वळणावर बऱ्यापैकी मोकळी जागा मिळते. आम्ही तिथे थांबलो. मागची लोकं बऱीच मागे होती. झोपाळू मंडळींनी ताबडतोब खाली अंथरले व आडवे झाले. मी पण पाठ टेकून झोपण्याचा थोडावेळ प्रयत्न केला. आता चांगलच गार वाटू लागलं. चालण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून थंडी जाणवत नव्हती. अजून थांबलो तर थंडीने हुडहुडी भरेल अस वाटायला लागलं. इथे पोचल्यावर लगेचच कमरेला बांधलेले स्वेटर्स अंगावर चढले होते, कानटोप्या घातल्या गेल्या.
खरंतर चालून आता उत्साह आला होता. मोठ्या विश्रांतीची गरज वाटत नव्हती. चव्हाणदादा तर उभं राहुन अस्वस्थपणे येरझारा घालायला लागले होते. त्यांना आजिब्बात नुसत थांबून रहायचं नव्हतं. तसाच साधारण तासभर काढला असेल. मागून आमची मंडळी एकेक करून यायला लागली. आता अजून थांबणे फारच जीवावर आलेले, मागून आलेल्या लोकांनापण झोपायचे नव्हते. मग थोड्याच वेळात सगळेच निघालो. आता इथून नुसती चढाई जवळ जवळ संपली. म्हणजे चढाई होती पण मधे मधे पायऱ्या उतरायच्याही होत्या.
इथून डावीकडे जुना रस्ता खाली जाताना दिसतो. या जुन्या मार्गाने स्वामी समर्थ गिरनार चढुन आले होते असे म्हणतात. अजूनही बरेच सिद्ध योगी याच मार्गानी येतात अशी वदंता आहे. डोलीवाले मात्र या मार्गावर नसतात व आता सामान्यही सगळे नवाच रस्ता वापरतात. परंतु गर्दीमुळे येणाऱ्या लोकांना इकडे वळवत असल्याचे कळले. त्यामुळे आम्हालाही या मार्गाने यावे लागले असते कदाचित जो आत्तापेक्षाही अवघड आहे असे म्हणत होते. परंतू तसे झाले नाही.
आपल्याला उजवीकडून अंबाजीमाता शिखराकडे जायचे असते. तशी पाटीही इथे लावली आहे. गोमुखी मंदिराकडे, अंबामाता मंदिर, सहसावन मंदिर यासाठी बाणांनी दिशा दाखविली आहे.
हाच तो चौकः
रात्र असल्याने गोमुखी मंदिरावरून सरळ अंबामातेच्या मंदिरापाशी आलो. एरवी रात्री सारी मंदिरे बंद असतात पण आज त्रिपुरी पौर्णिमा असल्याने सगळी मंदिरे उघडी होती व सगळीकडे भाविकांची गर्दी होती. इथे जवळपास ५हजार पायऱ्या संपतात. म्हणजे खरतर अर्धाच रस्ता झालेला असतो.पण पुढच्या रस्त्यात पायऱ्या उतरणेही असल्याने कदाचित, जास्त वेळ लागत नाही. भाविकांची अशीही श्रद्धा आहे की पुढचा मार्ग अंबामाताच सुकर करते.
मी मातेला बाहेरूनच नमस्कार केला व पुढे गोरक्ष शिखराकडे चालत राहिले. हा मार्ग थोडा अवघड वाटला बाजूच्या कठड्यांची उंची जेमतेम घोट्या पर्यंतच वाटत होती. एका बाजूला दरी, रस्ता लहान वाटत होता व तीव्र वळणेही होती. जर वळणांवर जोरात वारा आला किंवा गर्दीत चालताना थोडा जरी धक्का लागला तर एका बाजूला कडप्प्याचा सपोर्ट नव्हता आणि खाली पडायला झाले असते. रात्र असल्याने नेमकी दरी किती खोल ते कळत नव्हते तरी विचाराने भीती वाटली.
आता समोरचा डोंगर चढून गेला की गोरक्षशिखर. इथून एक मधुर सुगंध दरवळायला लागला. खुप प्रसंन्न आणि उल्हसित वाटत होतं. तसं गिरनारवर काय परिक्रमेतही नैसर्गिक विधींसाठी काहीही सोय नाही. सरकारी शौचालये तोडक्या मोडक्या अवस्थेत, आतून झाडोरा वाढलेली होती नाहीतर बंदच. त्यांचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे लघुशंकेसाठी जिथे सपाट भाग आहे तिथे लोक आडोसा बघत आणि विधी उरकत होते. मधे मधे तो वास तुमची सोबत करतो. हा सुगंध वेगळा होता. जसजसे शिखर जवळ येत होते तसा वाढत होता. मला वाटले की रस्त्यात अनेक ठिकाणी छोटी छोटी देवळे आहेत. आपल्याकडे काय दगडाला शेंदूर फासला कि झाला देव. तिथे धूप, उदबत्ती लावलेली होती त्याचा वास असेल. नंतर लक्षात आलं की ते तर सगळीकडेच होतं मग हा सुवास फक्त गोरक्षशिखराजवळच का येत होता?
तर सुगंध उत्साह वाढवत होता आणि फार म्हणजे फारच छान वाटत होते. गोरक्ष गुहेपाशी डावीकडे गोरक्ष मंदीर आहे आणि उजवीकडे गुहेत तुम्हाला धुनी भस्म मिळते. तिथेच अगत्याने तुम्हाला चहा पाजला जातो. त्या प्रसादाला नाही म्हणायचे नसते हे आधी वाचलेले आणि अगत्य पाहून चहा घेतलाच. आतापर्यंत एखाद् दोन घोटच पाणी प्यायले होते, तहान अशी लागली नव्हतीच. चहा घेताना लक्षात आले की बराच वेळ आपण काहीही खाल्ले किंवा प्यायलेले नाही.
इथेच उभ्या उभ्या विसावा घेतला. तिथे एक साधू बसलेले होते व अनेकजण सेवेकरी होते. गरम गरम ताजा चहा करून सगळ्यांना देत होते. त्या बाबाजींना मी थोडी माहिती विचारली की गिरनार यात्रा का व कशी करतात. गर्दीमुळे असावं पण त्यांनी थोडक्यात जुजबी माहिती दिली.
गिरनार दर्शन हे आता फक्त पादुका दर्शन घेऊन पुर्ण करतात. पण खरतर इथे अनुसूया माता, महाकाली शिखर आहे. कमंडलू तीर्थाबरोबर यांचेही दर्शन घेतल्यावर गिरनार यात्रा पुर्ण होते. पण हल्ली लोकांना शक्य नसते त्यामुळे फक्त दत्त शिखर करतात. त्याचीही पद्धत त्यांनी सांगितली - खाली दामोदर तीर्थावर आंघोळ करायची मग भवनाथ, चढावा हनुमान अशी दर्शने करत कमंडलूतीर्थाला जायचे. तिथे परत आंघोळ करायची मग दत्तात्रय पादुका दर्शनाला जायचे. ते सांगत होते आताही जाणते लोक, साधू आधी कमंडलू तीर्थाला जातात, आंघोळ शक्य नसली तरी डोक्यावर तीर्थाचे प्रोक्षण करतात मग वर जातात. त्याबरोबर गोरक्ष धुनीपाशी असलेली घंटा आणि मोक्षाची गुहेविषयीपण त्यांनी माहिती दिली.
मी त्यांना नमस्कार केला पुढे डावीकडे धुनीचे दर्शन घेतले. इथली घंटा ३ वेळा वाजवायची व वाजवताना आपल्या पितरांची नावे घ्यायची म्हणजे सर्व पितरांना मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे. ती मोक्ष गुहा काही मला दिसली नाही.
पुढे गेल्यावर पायऱ्या उतरतानाही सुगंध बरोबर होता. खाली जैन मंदिराच्या अलिकडे असतानाच लोक म्हणत होते वर खूप गर्दी आहे तुम्ही थांबून जा. दर्शनाची रांग कमंडलू तीर्थापर्यंत पोचली आहे. आम्ही गोरक्ष शिखराचा एक जीना उतरला असेल् नसेल, रांगच सुरु झाली. आता जसजशी रांग पुढे सरकेल तसतस पुढे जायचे. हा रस्ता खरोखर लहान वाटतो त्यात डोलीवाले विश्रांतीला थांबले तर मग आपण त्या पायरीवर थांबूच शकत नाही.
डोलीवाल्यांची मात्र दया आली. एक डोलीवाला वयस्कर होता, ओझे उचलून त्याच्या तोंडाला अक्षरश: फेस आला होता. पोटासाठी माणसाला काय काय करावे लागते. हे ५ दिवस त्यांचा सिझन होता. वर्षभरातील सर्वात जास्त गर्दी या दिवसांत होते इथे. त्यामुळे याच दिवसांत कमावण्याची संधी. बरं एक डोली झाली की दुसरी डोली मिळेपर्यंत काम नाही. त्यासाठी त्यांना वरखाली फिरावं लागतं गिऱ्हाईक शोधत; म्हणजे परत पायऱ्या चढणे उतरणे आलेच. खुप कष्टामय जीवन आहे हे. तुम्हाला डोली आधीच धर्मशाळेत विचारुन ठरवता येते किंवा रस्त्यात वाटले तरी मागवता येते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या दुकानात विचारले तर त्यांच्याकडे डोलीवाल्याचे नंबर असतात ते मागवून देतात. फक्त मग डोलीवाला जिथे असेल तिथून येईपर्यंत वाट पहावी लागते. तुमच्या वजनानुसार ११ ते १४ हजारापर्यंत डोलीचे दर ठरतात. आमच्यापैकी काहीजणांनी डोली आधीच ठरविली होती तर एकीने येताना केली.
या डोलीवाल्यांचा आमच्या बरोबरच एक किस्सा झाला. गर्दी खूपच होती. रांगेतही माणसे अगदी गर्दी करुन उभी होती. डोलीवाले भरभर चालत व मध्ये जागा मिळताच विश्रांती घेत. ते मोठमोठ्याने सुचना देतच चालत जेणेकरुन त्यांना मार्ग मोकळा मिळेल व डोलीतील माणसाला आणि चालणाऱ्यांना एकमेकांचा धक्का लागणार नाही. ते विश्रांतीसाठी थांबताना देखील लोक पुढेमागे सरकून जागा करुन देत. गोरक्षशिखरापासून पुढे बऱ्याच वेळा एका बाजूला दरी असते. दुसऱ्या बाजूला डोंगर जरी असला तरी पायऱ्यांची कड आणि डोंगर यामधे अंतर असते व खड्डास्वरुप झालेले असते. म्हणजे जिन्याच्या पहिल्या दुसऱ्या पायरीवरुन पाहिले तर चांगला दिड दोन पुरुष उंचीचा खड्डा. तर झालं असं की डोली वाल्याला जागा देताना पुढेमागे लोक पटकन् सरकतात त्याच वेळी आमच्यातील एक अगदी कॉर्नरला गेली व पडणार इतक्यात तिच्या सॅकला पकडून एकाने खेचले तिला. इथे डोंगरबाजूला सगळे पाषाण आहेत त्यामुळे काय झालं असतं हा विचारही न केलेलाच बरा.
इथे दुसरे एक महत्वाचे म्हणजे गोरक्षशिखरापासून पुढे एकही दुकान नाही. त्यामुळे तुम्हाला काही घ्यायचे असल्या अंबामातेपाशी घेऊन ठेवावे किंवा नंतर शिखरापर्यंत काही तुरळक दुकाने आहेत तिथे. गोरक्षशिखरापासून पुढे पाणी जरी लागले तरी ते कमंडलू तीर्थापाशीच मिळणार. म्हणजे जवळपास तीनेकहजार पायऱ्या गेल्यानंतर. तेंव्हा आधीच पाण्याची सोय करून ठेवावी.
गोरक्षशिखरानंतर जी रांग लागली ती थेट पादुका दर्शन, कमंडलूतीर्थाचे दर्शन झाल्यावरच संपली. अनेकजण सांगतात या पायऱ्या खूप कठिण आहेत, जोराचा वारा असतो, रस्ताही तसा अवघड आणि चढही खडा आहे. वारा वगैरे इथे उंचावर आला तर काही खरे नाही. पण आम्ही रांगेत असल्याने आम्हाला चढाचा त्रास झाला नाही. वाराही शांत होता. एकेक पाऊल हळूहळू पुढे टाकत रांग मुंगीच्या पावलाने पुढे सरकत होती. ५.३०/६ च्या सुमारास आम्हाला आमच्या डोल्या दिसायला लागल्या. त्यांचे एकदम छान ४.३०/५ला वरती दर्शन झाले होते. खूप खुष होते ते सगळे. आमच्या एकूण ६ डोल्या होत्या, त्यांची वाट पहाण्यात, त्यांना भेटण्यात थोडा वेळ गेला. मध्ये एक दोन छोटी मंदिरे लागली. त्यांचे नाव विसरले, पण प्रसिद्ध असावीत. सगळेजण न चुकता नमस्कार करत होते. रांगेतून चालतानाच ती लागतात त्यामुळे दर्शने घेणे सहज होत होते. त्यातले पुजारी साधू काही लोकांना भस्म लावत होते व काही लोकांना रुद्राक्ष देत होते. माझ्या असं लक्षात आलं; रुद्राक्ष फार कमी लोकांना मिळत होता. मला दोन्ही मिळालं. भस्म व रुद्राक्ष.काहींना हाताला त्यांनी काहीतरी लावले. त्याला एक अप्रतीम सुगंध होता. आमच्यापैकी चव्हाण दादांच्या हाताला त्यांनी ते लावले त्यामुळे आम्हाला सुगंध कळाला. नंतर घरी आल्यावर पाहिले तर रुद्राक्षालाही तोच अवर्णनीय सुगंध येत होता. नंतर कळाले की तिथे गिरनारी बापूंची गुहा आहे, ते मंदिर भैरवाचे होते. तसेच तिथे ज्याच्या त्याच्या योग्यते नुसार रुद्राक्ष दिला जातो.
आता आम्ही कमंडलू तीर्थापाशी असलेल्या कमानी पर्यंत पोहोचलो होतो. उजवी कडच्या कमानीतून ३५० पायऱ्या खाली उतरून तीर्थाकडे जायचे तर डावी कडच्या कमानीतून पादुकांकडे. गर्दी इतकी होती की आम्हाला काही पर्यायच नव्हता; आम्ही दत्तशिखराकडे जात होतो. गर्दीचा उत्साह ओसंडून वहात होता. जय गिरिनारीच्या घोषणा दुमदुमत होत्या. येणारी लोकं घोषणा देत त्याला प्रतिसाद म्हणून तेवढ्याच मोठयाने रांगेतील लोक घोषणा देत. अशी घोषणाई सगळा आसमंत व्यापून राहिलेली. त्यामुळे कंटाळा, थकवा जाणवत नव्हता.
मागे गोरक्षशिखरापर्यंत गेलेली रांग
बाजूने अनेक साधूवर जाताना दिसत होते. त्यांचे निरिक्षण करण्यातही वेळ चांगला जात होता. कुणी भगवी वस्त्र नेसलेले, जटाधारी, हाती दंड व कमंडलूवाले, कुणी मोठ्ठा जटाभारवाले नुसतेच लंगोटीवाले, कुणी शुभ्र वस्त्रातील, या सर्वांचे डोळे खतरनाक वाटत होते, काही सामन्यांसारखे पण भगवी पचंगी नेसलेले किंवा भगवी वस्त्र घातलेले. सर्वजण आपल्या तंद्रीत भराभर वर जात होते. कधीकधी त्यांचा वेग पाहून तोंडात बोटे जात होती. घरी आल्यावर मामानी विचारलं त्यातले किती साधू खाली येताना तु पाहिलेस लक्षात आहे का? आणि डोक्यात प्रकाश पडला खरंच की वर जाणारे तर अनेक होते, खाली येणारा एखाद् दुसराच. खाली यायला मार्ग तर एकच आहे, निदान जैन मंदिरापर्यंत तरी. मग ही लोकं गेली कुठे?
आम्ही कमंडलू तीर्थाच्या अलिकडे असतानाच समोर अरुणोदय झाला. समोर क्षितिजावर तांबडे फुटले होते. अगदी एखादा रंगाचा फुगा फुटावा किंवा डब्यातून रंग सांडावेत तसे रंग क्षितिजावर पसरले होते. आम्ही इतक्या उंचीवर होतो की सूर्य कुठून डोंगराच्या मागून वगैरे न येता सरळ क्षितीजरेषेवरुन वर आला. अरुणोदयापासून सुर्योदयापर्यंतचे आकाश पहाणे केवळ अप्रतीम, अलौकिक अनुभव होता.
सूर्योदयाचे काही क्षण
समोरच्या दातार पर्वतावर मच्छिंद्रधुनी अंधारात पेटती दिसत होती, तिच्यावरचा झेंडाही आता नीट दिसत होता. इथे शंकराने दत्तात्रयांना, तर दत्तात्रयांनी मच्छिंद्रनाथांना दर्शन दिले असे म्हणतात. इतक्यात काही टारगट पोरे रांग तोडून जेष्ठांना न जुमानता पुढे आली. आमच्यातील तरुणांनी मग त्यांना अडवले व मागे जाण्यास भाग पाडले. त्यांची देहबोलीसुद्धा कीती बेफिकीरीची होती..
आता गुरुपादुका मंदिर दिसत होते. एक धीरगंभीर वातावरणात आपण प्रवेश करत आहोत असे वाटत होते. डोळे मिटले की ओम् च्या उच्चारवाने जसे तरंग तयार होतात तसे काहिसे वाटत होते. इथे येताना दत्तसंप्रदाय, दत्तमहाराज यांच्या लहानपणापासून कानावर पडलेल्या गोष्टी मनात रुंजी घालत होत्या. हळूहळू पायऱ्या कमी होत होत्या. आम्ही एकाठिकाणी बूट काढले. थोड्याच वेळात आता दर्शन होणार होते.
डोंगरा आडून दिसणारे मंदिर
क्रमश:
आता एक पायरी अन् बस् ते गिरिनारी स्वत: भेटणारेत आपल्याला.. मी मंदिराला नमस्कार करुन वर गेले. समोरच सुंदर त्रिमुर्तींची मुर्ती चेहऱ्यावर आश्वासक हसू ठेवून स्वागत करती झाली. मंदिर जवळ आले असतानाच मी घरून नेलेली वात, हिना अत्तर, फुले व तुळस काढून हातात ठेवलेली. ते सर्व दक्षिणेसह पुजाऱ्यांच्या हातात दिले. त्यातील खडीसाखर त्यांनी पादुकांना लावून परत दिली. त्या दरम्यान मी पादुकांना नमस्कार केला व गर्दी असल्याने हळूहळू चालत बाजूला क्षणभर थांबले. अगदी दगडात कोरलेली पावले. पुढची बोटे दिसत होती, मागच्या भागावर फुले वाहिली होती. अगदी रेखीव बोटे. ज्याची बोटे इतकी रेखीव ती व्यक्ती प्रत्यक्ष दिसायला कशी असेल. पादुकांभोवती कुंपणाप्रमाणे स्टीलच्या सळया उभ्या लावल्या आहेत. आपण लांबूनच दर्शन घ्यायचे. मागे गर्दी खुप होती, म्हणून प्रदक्षिणा करतच आम्ही बाहेर पडलो. याचसाठी केला होता सारा अट्टाहास.. मी इतके चढून वर पोहोचले होते, कोणत्याही थकव्याशिवाय.. मन तृप्त झाले होते. धीरगंभीरता मनात खोलवर उतरली होती. गोरक्षशिखरापासून दत्तशिखरापर्यंत आम्हाला जवळ जवळ ३/३.३० तास लागले होते. पण इतकावेळ कसा गेला आजिबात कळले नाही.
रांगेत उभे असताना खडकावर पडणार्या सावल्या:
आता उतरायला सुरवात. मनातून तिथून जाऊच नये असे वाटत होते. पण जाणे भाग होते. आम्ही परत कमंडलू तीर्थाच्या रांगेत उभे राहिलो. इथे एकदम शिस्तबद्ध कारभार होता. आधी धुनीचे दर्शन घ्यायचे, मग प्रसादासाठी दुसऱ्या मंडपात जायचे. तिथून बाहेर येऊन तीर्थ प्राशन करायचे मग बाहेर. इथेही बरेच लोक सेवेसाठी जाऊन रहातात. अखंड अन्नदान इथे केले जाते व येथील प्रसाद आवर्जून घेतला जातो. येथील धुनी दर सोमवारी सकाळी ६वाजता उघडतात आणि त्यात पिंपळाची पाने व पिंपळाचीच लाकडे ठेवली जातात. त्यातून आपोआप अग्नि प्रकट होतो. त्यात अनेकांना दत्तगुरूंचे दर्शन झालेले आहे. असं म्हणतात की दत्तगुरु जेंव्हा तपस्या करत होते तेंव्हा जुनागडमधे दुष्काळ पडला, म्हणून अनुसया मातेने त्यांच्या तपश्चर्येला थांबवून आजूबाजूची परिस्थिती त्यांना सांगितली. त्या प्रसंगी त्यांनी कमंडलू खाली फेकला, त्याचे कमंडलू तीर्थापाशी २ तुकडे झाले. एकातून अग्नी निर्माण झाला, तर एकातून पाणी. असे हे कमंडलूपासून निर्मिलेले कमंडलू तीर्थ.
इथे आम्हाला गरम गरम खिचडी, भाजी, दलीयाचा गुळाचा शिरा असा प्रसाद मिळाला, तोही सकळी सकाळी ८.३०च्या सुमारास. एकदम चविष्ट. सकाळी सकाळी एवढे अन्न गरमा गरम बनविणाऱ्या व वाढणाऱ्या सेवेकऱ्यांची कमाल वाटली.
आम्हाला असे सांगितले होते की वर बऱ्याचदा तीर्थ बाटलीत भरून देत नाहीत तेंव्हा बाटली नेऊ नका. पण आज बाटलीतही तीर्थ देत होते. त्यांना उन्हाळ्यात अक्षरश: १ गडूमधे आंघोळ, कपडे धुणे करावे लागते तरी अन्नदानात कधी खंड पडत नाही. हे ऐकून आम्ही अवाक् झालो. इथे एकूणच वर शिधा आणणेही खूप कष्टाचे आहे. अनेक लोक थोडाफार शिधा, पैसे असे दान देतात. आम्हीपण केले. आम्हाला दत्तगुरूंचा फोटो व प्रसाद भस्मासह मिळाला.
हे सगळ करून येईपर्यंत बरेच वाजले असणार. आता आम्ही आश्रमात पोचल्यावरच वेळ पाहिली. आता १५०० पायऱ्या चढून गोरक्ष शिखर गाठायचे, मग अंबाजी. परत गोरक्षांचे दिवसा उजेडी दर्शन झाले. आता मोक्षाची गुहापण दिसली. त्याला पापपुण्याची गुहापण म्हणतात. गुहाम्हणजे छोटासा बोगदाच आहे. त्यातून सरपटत सरपटत बाहेर पडायचे. मी डोके आधी घालायच्या ऐवेजी पायाकडून शिरले आणि बाहेर पडले. तर लोक म्हणायला लागले हे चुकीचं आहे, परत जा आणि डोक्याच्या बाजूने शिरा. मी म्हटले अहो असतं एखादं बाळ पायाळू..:)
काही रस्त्यातले फोटो :
तिथून अंबाजी माता शिखर गाठले. इथे एका दुकानी, आधी आलेल्यांचे चहापान चालू होते. मी लिंबू सरबत घेतले. रात्रीतून पाणी असे प्यायलेच नव्हते. खाली तीर्थावरही अगदी अर्धा ग्लास प्यायलेला. आता लिंबूसाखरेने अजून ताजंतवान वाटलं. अंबाबाईच्या मंदीरात गेले. आता गर्दी कमी झाली होती. चढणारे तर जवळपास कुणी नव्हतेच. अंबेचे मंदीर अगदी शांतपणे आतून पहायला मिळाले. देवी तर थेट आमची रेणुकामाताच. हे ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे असे ऐकले होते म्हणून पुजाऱ्यांना विचारले की देवीच्या कुठल्या अवयवामुळे हे स्थान निर्माण झाले. त्यांनी नाभी असे सांगितले. स्थानिक लोक बऱ्याचवेळा इथपर्यंत येऊन मातेचे दर्शन घेतात आणि खाली जातात असेही सांगितले. आता पुढचा टप्पा जैन मंदीरे.
जैन मंदिरांचा समूह इथे वसलेला आहे. ती दिसतातही खूप सुंदर. बरेच कोरीवकाम केलेली अनेक मंदीरे आहेत. त्यातील शिवमंदीर प्राचीन आहे असे म्हणतात. जाताना पटापट अंबामाता शिखराला पोहोचलो होतो. येताना मात्र वेळ लागला. त्यात मधे मी गोमुखी गंगेचे दर्शन घेतले तिथेही वेळ गेला. कितीतरी वेळ मंदिरे नुसती लांबूनच खुणावत होती. पण शेवटी एकदा त्यांच्या जवळ पोचलेच. आता उनही जाणवत होते. उन सावलीचा खेळ चालल्याने उन्हाचा त्रास मात्र झाला नाही.
बरीचशी मंदीरे बंद होती. मी नेमीनाथांचे मात्र पाहिले. हे मुख्य मंदिर २२वे जैन तीर्थंकर नेमिनाथचे आहे. प्राचीन राजवाड्यामध्येच हे जैन मंदिर आहे. काळ्या पाषाणामधील अतिशय सुंदर, सुबक, मोहक अशी नेमिनाथाची मूर्ती आहे. नेमिनाथ याच ठिकाणी सातशे वर्षे साधना करीत होते अन् हेच त्यांचे समाधिस्थान आहे. जैनलोकं इथपर्यंत दर्शनाला येत असतात. जरासा थकवा वाटत होता. मन मात्र एकदम फ्रेश होते. इथे क्षणभर विश्रांती घेऊन उतरू लागलो. आता फक्त पायऱ्या उतराच्या. पण तेच अवघड जाते असे म्हणतात, भराभर पायऱ्या उतरल्या तर नंतर पायात गोळे येतात तेंव्हा सावकाश उतराच्या.
सतत खुणावणारी जैन मंदिरे :
उजवीकडे रस्ता दिसतोय तिथे मंदिराच्या भिंतीमुळे उन्हापासून संरक्षण होते.
आता मी आणि शुभांगी थोडावेळ एकत्र उतरलो, मध्येच आम्ही एक काकडी खाल्ली दोघींनी मिळून आणि मस्त थंडगार वाटले, भूकही भागली, थकवाही गेला. मग मात्र ती पटापट पुढे निघून गेली. उतरताना परत भर्तुहरी-गोपीचंद गुहा, बेलनाथ महाराज करत सावकाश उतरत होते. मधे मधे उन जाणवत होते, मधेच आभाळ, छान वातावरण होते. आजूबाजूला निसर्ग ठासून भरलेला, दाट झाडी, झाडे तरी कीती वेगवेगळी. बेल, तुळस तर अमाप होते. मधे मधे पांढरी आणि पिवळी कोरांट फुललेली. कोरांटीची एवढी मोठी फुले पहिल्यांदाच पहात होते. लहानपणी अंगणात कोरांट होती पण तिची फुले म्हणजे साधारण अबोलीपेक्षा थोडी मोठी. इथे प्रदूषण नसल्याने सगळीच झाडे वेली तरारून वाढलेली.
खाली उतरता उतरता संध्याकाळ व्हायला लागली. वानरे आता खूप दिसायला लागली. त्यांचे मस्त खेळ चालू होते व आश्चर्य म्हणजे एकाही वानराने त्रास दिला नाही की रस्त्यात आले नाही. माकडेच फक्त त्रास देतात की काय कुणास ठाऊक. त्यांचे खेळ बघत किती पायऱ्या उतरतोय हेही कळत नव्हते. मधेच एका ठिकाणी एकदम सारे चिडीचूप झाले, वानरानी झाडावरुनच खॉक् असा इशारा दिला; मी ज्या पायरीवर होते तिथेच जवळच झाडीत खसपस झाली. मला वाटले कुठलेतरी जनावर पायरीच्या दिशेने येत असावे. मी जिथे होते तिथेच थांबले पण तो आवाज लांब जाऊ लागला. थोड्याच वेळात वानरे परत खाली उतरली आणि खेळू लागली म्हणजे जनावर गेले असावे मग मी ही चालू लागले. शेवटच्या पायरीवर आले तेंव्हा - " अरे पायऱ्या संपल्यापण" अशी मनाने प्रतिक्रीया दिली. परत पायरीवर डोके टेकले, दत्तगुरु, चढावा हनुमान यांचे आभार मानून भवनाथाकडे निघाले. मला असे कळले होते की शेवटच्या पायरीशी ॲक्युपंक्चरवाला बसतो आणि त्याचा खूप फायदा होतो. पण मला काही तो दिसला नाही.
मी भवनाथाचे दर्शन घेतले, जुन्या आखाड्यात जाऊन दत्तमुर्तीसमोर डोके टेकले. ही मुर्ती सुद्धा खूप प्रसंन्न आणि हसरी आहे. तिथे डोके टेकल्यावर क्षणात् जाणीव झाली की आपले उद्देश्य आता पुर्ण झाले. माझे डोळे भरुन आले, अश्रूंना बांध घालणे अवघड झाले. झ्टकन् उठून बाहेर पडले. जवळच धर्मशाळा होती. तिथे जवळपास सर्वच आलेले होते आणि आपापल्या खोल्यात विश्रांती घेत होते. सर्वात शेवटी माझ्या २न्ही काकू आणि अजून एक जण होती. तिचे बूट कमंडलू तीर्थापाशी चोरीला गेले त्यामुळे अनवाणी उतरत होती. ते पण मग निवांत उतरले. रात्री १२.३०ला गाडी होती त्यामुळे सगळ्यांनीच आंघोळ विश्रांतीला प्राधान्य दिले. दुसऱ्या दिवशी रात्री घरी पोचलो आणि ही गिरनार यात्रा सुफळ संपूर्ण झाली.
दिवसाचे भवनाथ मंदिर :
आम्ही रहात असलेले नरसी मेहता धामः
एक स्वप्नवत असा हा प्रवास झाला. स्टेशनजवळचा स्कायवॉक पार करताना त्या जिन्यांनीही माझी दमछाक होते, मधे थांबावं लागतं आणि हे एवढे परिक्रमेचे अंतर, इतक्या हजारो पायऱ्या कसेकाय पुर्ण केल्या माझाच विश्वास बसत नाही. तीन महिन्यांपूर्वी जेव्हा मला कळाले की रात्रीचे चढायचे असते तेंव्हा पहिली प्रतिक्रिया नको रे बाबा अशीच होती कारण मला झोप आजिबात आवरता येत नाही. (लक्ष्मी रस्त्यावर भर गणपती मिरवणुकीमध्येही मी दुकानाच्या पायरीवर बसून झोप काढलेली आहे ! ). पण गुरुशिखराच्या रस्त्यावर एकही क्षण थकवा किंवा झोप जाणवली नाही. उतरताना पाय लटपटतात, एकेक पायरी नको होते असे ऐकले होते, यातला एकही अनुभव मला आला नाही. उलट घरी आल्यावरही मी ताजीतवानी होते. सहज चालता येत नव्हते किंवा खाली मांडी घालून बसायला १/२दिवस त्रास झाला तेवढेच!
असे अनुभव आले की त्या जगतगुरुंवर आपोआप विश्वास बसतो आणि मस्तक त्यांच्या चरणी लीन होतं मनात शब्द उमटतात "जय गिरीनारी !"
असा हा प्रवास प्रत्येकाने एकदा तरी केलाच पाहिजे! एकदा तरी जंगल जोखले पाहिजे, गुरुशिखरावरील गूढता, रमणीयता अनुभवली पाहिजे. वरजाताना मुळीच फार खाणे पिणे नेऊ नये. रस्त्यात अनेक दुकाने आहेत व तिथे सर्व काही मिळते. पेनकिलर किंवा स्प्रे मात्र जवळ ठेवावा. त्याचा उपयोग होतो. वर जाताना कपडे सैलसर, सर्वांग झाकणारे व सुटसुटीत असावेत. त्याने चढाउतरायला व उन वाऱ्याचा त्रास होत नाही. गिरिनारची विशेषता हीच की इथे तुम्ही कुठलेही कपडे घालू शकता, अगदी ट्रॅकपॅण्ट टी शर्ट देखील.
या अश्या प्रकारच्या यात्रा आपणही करु शकतो हे बीज माझ्या सासूबाईंनी रोवले. त्यांच्या ठिकठिकाणच्या वाऱ्या पाहूनच मनातील सुप्त इच्छेला सत्यात आणणे शक्य वाटले. परत इतक्या ऐनवेळी जा तू मी काम संभाळतो म्हणणारा माझा कलीग, माझा बॉस यांचाही यात हातभार आहे. माझ्या नवऱ्यानेही जाण्याविषयी कुठलीच तक्रार केली नाही त्यामुळे मी समाधानाने जाऊ शकले. माझ्या नणंदेने औषधांची यादीच मला पाठवून दिली व ती उपयोगीही पडली. बहिणीनेही वेळोवेळी मॉरलसपोर्ट दिला ज्यामुळे ताण कमी होऊन तयारीवर व धेयावर लक्ष केंद्रीत करता आले. या अश्या अनेक लोकांच्या शुभेच्छा व शुभाशिर्वादाने ही यात्रा पूर्ण झाली.
सर्वात शेवटी असेच म्हणेन की एकतरी वारी अनुभवावी गुरुशिखराची! जय गिरिनारी!
नीलाक्षी
गूढ, अद्भुत तरीही विलोभनीय ....गिरनार
पार्श्वभूमी:
आपण आपल्या आयुष्यात काही गोष्टींचा ध्यास घेतला असतो. ती गोष्ट पुरी करण्यासाठी आपण जीवाचे रान करुन ते ध्येय गाठतो. पण कधीतरी असेही होते की कसलीही इच्छा, योजना मनात नसतांना एखादी गोष्ट आपसुक आपल्या पुढ्यात येऊन ठाकते आणि आपण अगदी झपाटल्यागत त्या मागे लागतो. ती पुरी करण्याच्या दॄष्टीने योग्य ती कार्यवाही अगदी नकळत घडून येते. घरात एखादं पक्वान्न बनवलं असतं आणि आई ते पक्वान्न आपल्या बाळाने खावं म्हणून आग्रह करत असते, पण अजाणतेपणामुळे बाळ मात्र नको नको म्हणत आढेवेढे घेत असतं. शेवटी आई बाळाचा हात धरुन स्वहस्ते त्याला भरवते आणि ती अवीट गोडी चाखतांच बाळाला जो आनंद होतो त्याचे वर्णन शब्दातीत असतं.
ऑगस्ट अर्थात श्रावण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात माझ्याकडून गिरनार पर्वताची यात्रा घडली. त्याची कहाणीही थोडीफार अशीच आहे. ही यात्रा अगदी पाच सहा दिवसांची असली तरी तो प्रवास माझ्या मनात त्याआधी तीन महिन्यांपासून सुरु झाला होता. या प्रवासात जे जे घडले ते तुमच्याबरोबर शेअर करावे तसेच हा अनुभव कायम स्मरणात रहावा यासाठी हा लेखनप्रपंच.
हे निव्वळ प्रवासवर्णन नाही. तर त्याला माझ्या विचारांची,अनुभवांची जोड आहे. वर लिहिल्याप्रमाणे मूळ प्रवासाच्या ३ महिने अगोदर ज्या आणि जशा घटना घडून आल्या आणि ध्यानी मनी नसलेली ही यात्रा माझ्याकडून घडवली गेली त्याचे मला जसे जाणवले तसे वर्णन यात असेल. या लेखनमालिकेचा 'श्रद्धा' हाच मूळ गाभा आहे, हे लक्षात घेऊनच हे वाचाल तर हे लेखन अधिक भावेल असं वाटतं.
साधारण फेब्रुवारी महिन्यात माझा चुलत भाऊ माझ्या घरी आला होता. त्या वेळी त्याने 'दत्त अनुभुती' नामक एक पुस्तक मला भेट दिले. "वाच तुला नक्की आवडेल", असं म्हणाला. यात काय आहे? असं विचारताच या पुस्तकाच्या लेखकाने गिरनार पर्वताच्या ११ वार्या केल्या आहेत आणि त्या दरम्यानचे अनुभव यात लिहिले आहेत हे सांगितलं त्याने. “मी वाचेन” म्हणून ते पुस्तक असंच टीपॉयमध्ये इतर पेपरांसोबत ठेवून दिले आणि त्याबद्दल विसरून गेले. या घटनेला तीन साडेतीन महिने उलटून गेल्यावर १८ मे या दिवशी घरात एकटी असतांना अचानक मला या पुस्तकाची आठवण झाली. लगेच ते वाचायला घेतले. अक्षरशः ते खाली ठेववेना, इतके थरारक अनुभव त्यात लिहिले होते. तोवर मला गिरनार नामक एक उंच पर्वत असून तिथे दत्तगुरुंचे जागॄत स्थान आहे जिथे गीरच्या जंगलातून जावे लागते,इतपत जुजबी माहिती होती. मात्र हे पुस्तक वाचत असतांना बर्याच गोष्टी कळल्या. काही शंका कुशंका मनात आल्याही ज्यांचे निरसन गूगल भाऊंनी केले. दहा हज्जार पायर्या चढून या दत्तगुरुंच्या स्थानी पोहोचता येते हे वाचताच "माझा आपला इथूनच नमस्कार घे दत्तबाप्पा" हे सहजोद्गार निघाले. याचं कारण मी मुळात श्रद्धावान असले तरी आवाक्याबाहेर असलेली शारिरीक मेहनत घेऊन, खूप उंच चढून किंवा खूप वेळ चालत त्याचप्रमाणे तासंतास रांगा लावून देवदर्शन घेणार्यांतली नाही. देव तर आहेच ना सर्वत्र , मग काय गरज आहे इतका त्रास करुन कुठे जायची हे असं साधं सोपं लॉजिक मी नेहमी लावत आले आहे. त्यामुळे गिरनारबद्दल काही वेगळे घडण्याची सुतराम शक्यता माझ्या बाबतीत नव्हती. पण.....
तसे घडायचे नव्हते………..
हे पुस्तक वाचल्यापासून गिरनार माझ्या डोक्यात घोळू लागाला. दुसर्या दिवशी नेटवर गिरनार बद्दल माहिती वाचून काढली. यू ट्युबवर काही व्हिडीओज पाहिले. पुस्तक वाचून आवडल्याची पोच रविवारी रात्री भावाला व्हॉटसअपवर दिली. त्याच्याशी चॅटींग करत असतांना सहज बोलून गेले की “हे पुस्तक वाचल्यापासून एकदातरी गिरनारला जावंस वाटतंय रे”. त्यानेही थम्ब्स अप ची स्मायली पाठवली आणि मी झोपले. दुसर्या दिवशी स्वप्नात मी स्वतःला गिरनार पर्वत चढत असलेलं पाहिलं. दोन दिवस सतत हेच विचार करतेय त्याचा परिणाम म्हणून असले स्वप्न पडले असणार असा विचार करतच सकाळी उठले. दूध तापत ठेवले असतांना सहज म्हणून फोन हातात घेतला, नेट ऑन केलं. सर्वात पहिले दिसला तो भावाचा मेसेज की श्रावण महिन्यात २४ ते २९ ऑगस्ट गिरनार यात्रा,इतर माहिती आणि लवकर नावे नोंदवण्याची सुचना. माझ्या भावाची मेडीकल कॉलेजातील मैत्रीण, जी स्वतः ज्या ग्रुपसोबत गिरनार यात्रा करुन आली होती तिने याच ग्रुपच्या पुढच्या यात्रेसंबंधित माहिती माझ्यासाठी भावाला पाठवली होती.
आपलं स्वप्न खरं होऊ घातलंय की काय असं मनात येऊन जीवाची उगीचच तगमग होऊ लागली. का कोण जाणे पण आपण गिरनारला जावं असं वाटू लागलं, पण त्याचबरोबर दहा हजार पायर्या समोर दिसू लागल्या. हे काही आपल्याला झेपायचे नाही. लहानपणापासून आजतागायत कधीच कुठला मैदानी खेळ, नियमित व्यायाम काहीही न केलेली मी, आता एकदम दहा हजार पायर्या कशा काय चढणार? याबद्दल साशंक होते, नव्हे माझ्या आवाक्यातलं हे नाहीच अशी खात्री होती.पण आतला आवाज काही वेगळं सांगत होता आणि ते म्हणजे प्रयत्न तर करुया, इतके लोक जाऊन आले आहेत की.कदाचित जमेलही आपल्याला. द्विधा मनःस्थिती झाली. लेकाचे दहावीचे वर्ष, त्याला फक्त आईंसोबत ठेवणे नवर्याला योग्य वाटेना, आईंचे ही वय झाले आहे. मग नवरा म्हणाला की तुझी मनापासून जायची इच्छा दिसतेय तर तू जा, मी आणि आई मिळून घरचं मॅनेज करु. तरीही अशा अनोळखी ग्रुपसोबत एकटं जायला मन धजावत नव्हतं. गिरनार चढाई ग्रुपनेच करतात. तो रात्री चढला जातो त्यामुळे शक्यतो लोक ग्रुपनेच जातात. माझं हो /नाही अजूनही नक्की ठरत नव्हतं. शेवटी भावाशी बोलले. त्याने त्याच्या मैत्रिणीशी बोलायला सांगितलं. तिने अगदी आश्वस्त केलं, की “बिनधास्त नाव दे, तुला घेऊन जाणारा 'तो' आहे इतकं लक्षात ठेव, बाकी कसलीही शंका मनात आणू नकोस”. बस्स ! मनाचा निर्णय झाला होता की आता मागे पहायचं नाही, फक्त कुणाची तरी सोबत हवीशी वाटत होती. ऑफिसमधली माझी एक मैत्रीण गुजराती आहे, देवभोळी आहे. ती येईलसे वाटले. ऑफिसमध्ये पोचताच तिला अमुक अमुक तारखांना गिरनारला येशील का? विचारले. क्षणाचाही विलंब न लावता तिने होकार दिला आणि मी आमच्या दोघींचं नाव रजिस्टर केलं. नाव देऊन पैसे तर भरुन ठेवू, जाणं, न जाणं पुढे बघू असाच विचार करुन.
का माहीत नाही एकदम शांत, निवांत वाटू लागलं. मनाची दोलायमान अवस्था शमली होती.पण खरी कसोटी आता सुरु होणार होती. ती म्हणजे इतक्या पायर्या चढून उतरण्यासाठी शरीराला आणि मनालाही तयार करणे. तीन महिने माझ्या हातात होते. स्वतःच्या शारिरीक क्षमतेबद्दल खात्री होती की हे माझ्याच्यानं होण्यासारखं नाही. त्यात कॉलेस्टेरॉल वरचेवर धोक्याची पातळी गाठत असतं माझं. आपल्यामुळे ग्रुपमधल्या कोणाला त्रास होऊ नये असं वाटत होतं.जे आधी जाऊन आले होते ते ट्रेकर्स वगैरे, ज्यांच्या गाठीशी असे डोंगरमाथे पालथे घालण्याचा मुबलक अनुभव आहे. माझ्यासारख्या ‘कच्च्या लिंबू’ कॅटेगरीतलं कोणी चढून गेलंय याबद्दल काही माहिती मिळत नव्हती.शेवटी मनाशी निर्धार केला की गिरनारची वारी ‘दत्तगुरुंच्या’ इच्छेनेच पुरी करता येते ही वदंता आहे, ते निर्विवादपणे खरं, तरीही आपण आपल्या परीने प्रयत्न चालू ठेवायचे, स्वतःची शारिरीक क्षमता वाढवायची,तितकं आपल्या हातात नक्कीच आहे. मगच देवाला आळवायचं की यापुढंचं सगळं तू बघून घे देवा.
झालं, दुसर्या दिवसापासून चालायला नियमितपणे सुरुवात केली, जी मी माझ्या लहरीनुसार कधी-मधी करत होते. ३-४ दिवस झाले, पण असे वाटू लागले की जिने चढण्यासाठी आवश्यक त्या व्यायामाची आता खरी गरज आहे. माझ्या काही ट्रेकर्स मैत्रिणींनी मोलाचे सल्ले दिले, त्यांचा फायदा चढताना झालाच. माझा भाचा गेली काही वर्षे मॅरेथॉन्स करत आलाय. त्याच्याशी बोलले. त्याच्याकडून जिने चढणे-उतरणे यासाठी शरीराची तयारी करण्यासाठी आवश्यक ते व्यायाम प्रकार जाणून घेतले. त्याने पाठवलेले व्हिडिओज पाहिले आणि सुरु झाली माझी भौतिक तपश्चर्या. दररोज सकाळी सूर्यनमस्काराने सुरुवात, हॅमस्ट्रींगचे व्यायाम,क्रंचेस, स्क्वॅटस इ. त्याचबरोबर प्रोटीन्सयुक्त आहार. संध्याकाळी ऑफिसातून निघतांना जिने चढून -उतरण्याचा सराव. हे दररोज करत, हळू हळू वाढवत महिन्या दीड महिन्याभरात रोज १४ सू.न., ४५ स्क्वॅटस, 30 क्रंचेस आणि २० ते २२ जिने चढणे -उतरणे इथवर गाडी आली. त्यानुसार आहारात बदल केल्यामुळे असेल कदाचित किंवा व्यायाम हळू हळू वाढवत नेल्यामुळे शरीराला सवय झाली असावी म्हणून असेल, पण थकवा जाणवत नव्हता. याच्या जोडीला ऑफिसला येण्या- जाण्यासाठी ट्रेनचे जिने चढणे-उतरणे हे तर होतच होते.
दिवस पुढे पुढे सरकत होते. अधून मधून भेटणारे बारीक दिसतेयस असे बोलू लागले. माझ्या गिरनार यात्रेबद्दल आणि त्यासाठीच्या तयारीबद्दल फारच कमी जणांना माहीत होते. बापरे दहा हज्जार पायर्या? जमणार आहे का तुला? काही झालं म्हणजे? असं माझ्या काळजीपोटी बोलून माझा आधीच डळमळता निर्धार गळपाटून जाऊ नये म्हणून मीच ठरवलं जेव्हा जायला निघू तेव्हा सांगायचं सर्वांना. वजनावर लक्ष ठेवून होते, ते काही कमी झाले नव्हते, मला थकवा, अशक्तपणा जाणवत नव्हता, So I was on a right track असे स्वतःला समजावत माझी साधना चालू ठेवली.
दिवस सरत होते. बघता बघता ऑगस्ट महिना येऊन ठेपला. घरापासून, घरच्यांपासून दूर रहाणं हे ऑफिसनिमित्तानं अधेमधे होत असलं तरी आता जिथे जाऊन रहाणार होतो ते एक गाव असणार होतं. तळेठी नावाचं गाव जिथून गिरनारचा पायथा सुरु होतो. या गावात काहीच सुविधा नाहीत. अगदी बँकेचं एटीएमही नाही असं आम्हाला सांगण्यात आलं होतं.त्यामुळे तिथे जाऊन दुसरं काही होऊ नये म्हणून स्वतःला मी या काळात विशेष जपलं. केव्हाही डोकं वर काढणारी माझी दाढदुखी., या ऐन मोक्याच्या वेळेस कशी कच खाईल? जुलैमध्ये तिने आपला इंगा दाखवायला सुरुवात केली. महिन्याभराचा अवधी होता. ताबडतोब डेंटीस्ट गाठून अक्कलदाढ काढण्याची शस्त्रक्रिया उरकून घेतली. इतर फिलिंग्स वगैरे पूर्ण केली.
माझ्या सोबत येणारी माझी मैत्रीण तर दररोज नियमित चालण्याचा व्यायाम कित्येक वर्षे करत आली आहे, तसंच ती पूर्वी गिरनारलासुद्धा जाऊन आली होती, पण ५००० पायर्यांवरील अंबा मातेच्या देवळापर्यंत. त्यामळे तिला बर्याच गोष्टी माहीत होत्या. ती रोज काही ना काही सल्ला देत असे. ती माझ्या सोबत असणार ही गोष्ट मला फारच दिलासादायक होती. पण याच सुमारास काहीतरी विपरीत घडले.
तिची आई आजारी पडली. प्रकॄती खालावत जाऊन ती अत्यवस्थ झाली. हॉस्पिटल, आय सी यू, या चक्रात ती अडकली. आईचे वय ८७. कधीही काहीही होऊ शकेल अशी परिस्थिती. जर ती येऊ शकली नसती तर मी पुन्हा एकटी पडले असते. मी एकटीने गिरनारला जावे याला आमच्या आई तयार नव्हत्या. त्यांनी जरी असे बोलून दाखवले नाही तरी त्यांचा काळजीचा सूर मला जाणवत होता. त्यांच्या मनाविरुद्ध आणि जीवाला घोर लावून माझा पाय घराबाहेर पडला नसता. त्यावेळी मनोभावे दत्तगुरुंना प्रार्थना केली की “इतकं सारं घडवून आणलंयस तर आता काही मोडता येऊ नये असं वाटतंय, याउप्पर माझ्यासाठी जे उचित असेल तसं घडू दे आणि ते स्वीकारायची ताकद मला दे”.
७ ऑगस्टला माझ्या मैत्रिणीची आई देवाघरी गेली, तिचे दिवसकार्य वगैरे होऊन मैत्रीण २० तारखेला घरी आली. २४ तारखेला निघायचे होते, दत्तगुरुंनी मार्ग दाखवला होता.
ऑगस्ट सुरु झाला तसा आयोजकांनी गिरनारयात्रेत सहभागी होणार्यांचा व्हॉटस अप ग्रुप तयार केला. त्यावर रोज काही ना काही सुचना येत असत. प्रवासात आणायचे सामान, पर्वत चढताना घेऊन जायच्या वस्तू, अगदी चढतांना चप्पल, बूट कसे असावेत इतक्या बारीक-सारीक बाबतीत मार्गदर्शन केले जाऊ लागले.त्यांच्या अनुभवी सल्ल्याबरहुकुमच मी माझी बॅग भरत होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आयत्या वेळी नवे बूट नकोत, म्हणून आधी बूट घेऊन ते घालून चालण्याचा, चढ-उताराचा सराव करु लागले. नऊ हजार पायर्यांच्या टप्प्याला भणाणता वारा असतो, छत्री कुचकामी ठरते, त्यामुळे रेनकोटच न्यायचे ठरवले. चढतांना आपण थकतो त्या वेळी पटकन एनर्जी मिळेल असे खाऊचे पदार्थ जवळ ठेव असा मोलाचा सल्ला भाच्याने दिला होता. त्याप्रमाणे स्निकर्स एनर्जी बार्स आणि खजूर, इलेक्ट्रलचे सॅशेस सोबत घेतले. बाम, रोल ऑन, सेंसर अशा वेदनाशमक गोष्टींनी औषधांची बॅग पूर्ण भरली.
या सुमारास पर्वतावर प्रचंड धुकं असतं. काही फुटांवरचंही दिसत नाही. त्यामुळे ७ ते ८ फूट लांब प्रकाशझोत पडेल अशी टॉर्च सोबत घ्यायची होती. ती घेतली. संपूर्ण चढाई रात्री करायची असली तरी अध्येमध्ये देवळात न्यायचे सामान विकणार्यांची दुकाने/घरे असतात. त्या लोकांशी संपर्क करुन कोणत्याही क्षणी डोलीची व्यवस्था करता येते ही दिलासाजनक खबर मिळाली. डोलीवाले किती पैसे घेतात तो अंदाज दिला गेला. मी तेव्हढे पैसे जवळ बाळगायचे ठरवले. कोणत्याही वेळी असे वाटले की आपण नाही चढू शकत तर अधिक त्रास सहन करण्यापेक्षा, किंवा एकटे वाटेत थांबण्यापेक्षा डोलीचा पर्याय चांगला होता. चढतांना जास्त वजन नको, म्हणून देवासाठीही घरुन काहीही प्रसाद्,वगैरे नेला नव्हता. आयोजक त्याची व्यवस्था करणार होते. अगदी रिक्त हस्ताने जात होते आणि खरंतर त्याला देऊन तरी काय देणार होते मी? तोच तर देत आला होता आजवर.
२४ ऑगस्ट २०१९....... गेले तीन महिने उराशी बाळगलेलं स्वप्न साकार होत होतं. आज दुपारी १२.४५ ची बांद्रा टर्मिनसवरुन ट्रेन होती. सकाळपासून शुभेच्छांचे फोन, मेसेजेस येत होते. समोरच्याच्या आवाजात काळजी जाणवत होती. मग मीच त्या प्रत्येकाला धीर दिला की काळजी करु नका, मी सुखरुप जाऊन येईन.
१०:३० वाजता निघाले.सर्वांनी बान्द्रा टर्मिनसलाच भेटायचे होते. तिथेच सारे सदस्य प्रथम भेटले. हा वसईचा ग्रुप.काही जण एकमेकांना ओळखत होते, तर काही अनोळखी. एकूण २४ सदस्य होते. पैकी सर्वात ज्येष्ठ व्यक्ती ६९ वर्षांचे आजोबा आणि सर्वांत ज्युनियर त्या आजोबांचा ७ वर्षांचा नातू. बाकी सगळे अधले मधले. बरेचसे एकेकटे होते, आम्हा दोघींसारखे, फक्त एक जोडपं आणि आजोबा-नातवाचं कुटुंब. विशेष म्हणजे २४ पैकी फक्त ३ जण जे आयोजक होते तेच आधी गिरनारला जाऊन आले होते, पैकी एक मी वाचलेल्या 'दत्त अनुभुती' या पुस्तकाचे लेखक बाकी सर्व नवखे, माझ्यासारखेच साशंक, त्यामुळे अगदी हुश्श झालं. जुजबी ओळख वगैरे झाली आणि आम्ही मार्गस्थ झालो.
क्रमशः
तुमच्या गावी आलो आम्ही
प्रवास सुरु झाला. दोन वेगळ्या डब्यांत मिळून आमचे २४ लोक बसले होते. आयोजक थोड्या थोड्या वेळाने चक्कर मारुन कुणाला काही हवं नको ते पहात होते. मिनरल वॉटरचे वाटप करीत होते. जाताना दुपारचे जेवण बोरीवली येथे तर रात्रीचे अहमदाबाद येथे गाडीत चढवले गेले. आयोजकांचे टाय अप्स असलेल्या कॅटररने पॅक्ड फूड गाडीत पोहोचते केले. पहाटे पावणेतीनच्या सुमारास जुनागढ येणं अपेक्षित होतं, जिथे आम्हाला उतरायचं होतं. त्यामुळे अहमदाबादला जेवण झाल्यावर सगळे गुडुप झोपून गेलो. झोपताना अडीचचा गजर लावला होता. त्याप्रमाणे उठलो. सामान आवरले. गाडी वेळेवर पोहोचत होती. साधारण तीनला दहा मिनिटे असतांना आम्ही उतरलो. रिक्षात बसून लगेच तळेठी गाठले. तिथेच आमची रहयची सोय केली होती आणि तिथूनच सगळीकडे जायचे होते.
पंधरा-वीस मिनिटांत आमचे हॉटेल आले. रूम्स ताब्यात दिल्या गेल्या. रूमवर गेल्यावर काही वेळ आराम केला. सकाळी नऊ-साडेनऊला तयार रहायला सांगितले होते. त्याप्रमाणे आवरत होतो. रुमवरच चहा नाश्ता केला.
आज २५ ऑगस्ट रविवारचा दिवस होता. आज रात्री गिरनार चढण्यास सुरुवात करायची होती. खोलीबाहेर असलेल्या गॅलरीतून आजुबाजूला पर्वत शिखरे दिसत होती. त्यांपैकी अनेकांच्या माथ्यावर ढगांनी दुलई पसरली होती.हिरव्यागार पर्वतशिखरावर अधेमधे पिंजलेल्या कापसासारखे भासणारे ढगांचे पुंजके लक्ष वेधून घेत होते. यातलं नेमकं कुठलं आपल्याला चढायचंय? उत्सुकता शीगेला पोचत होती. डाव्या बाजूला दिसत असणारा पर्वत आम्हाला दाखवला गेला. त्यावर काही बांधकाम केलेलं दिसत होतं. तो जैन मंदीर परिसर, जो ४००० पायर्या चढल्यावर येतो तो. इथवर जाणारे बरेच आहेत. विशेषतः स्थानिक जैन लोक. तेथून अजून वरती अगदी इवलुसं काहीतरी दिसत होतं ते अम्बाजी धाम होतं, ५००० पायर्या चढून येणारं अंबा मातेचं मंदीर. मग दहा हजार पायर्यांवरचं दत्तशिखर कुठे होतं? तर तिथे पोहोचण्यासाठी हा अम्बाजी धामचा पर्वत चढून विरुद्ध बाजूने उतरावा लागणार होता आणि त्या पुढे अजून एक डोंगर चढून उतरल्यावर मग तिसर्या सुळक्यावर दत्तशिखर. अबब.....
त्यामुळे पायथ्यापासून वर नजर टाकली तर दत्तशिखर नजरेत येणे शक्यच नाही. मनात म्हटलं इथे काही मुखदर्शन, लांबून दर्शन, व्हीआयपी दर्शन, नवसाची रांग अशा कॅटेगरीज नाहीत. जे आहे ते दहा हज्जाराचा पल्ला गाठूनच पहायचं.
तळेठी गाव
साधारण दहाच्या सुमारास बाहेर पडलो. सर्वप्रथम तळेठी गावचे ग्रामदैवत 'भवनाथ' मंदीरात निघालो. गिरनार यात्रा ज्या गावातून सुरु होते त्या गावच्या दैवताला सर्वप्रथम आमची यात्रा निर्विघ्नपणे पार पडू दे असं साकडं घातलं जातं. त्यासाठी सर्वात आधी या शिवमंदीरात आलो.पाऊस नव्हता. प्रसन्न हवा होती. सुंदर नक्षीदार बांधकाम असलेले हे शिवमंदीर खूप छान आहे. दर्शन घेऊन तेथून बाहेर पडलो.
भवनाथ मंदीर
आता कुठे? याचं उत्तर आलं "जटाशंकर", बरं म्हणत निघालो. तसं आम्हाला सांगितलं गेलं की जास्त नाही पण पाचएकशे पायर्या चढायच्या आहेत. माझा 'आ' वासला. एकतर गेले काही दिवस कोणत्याही संख्येपुढे ‘पायर्या’ हा शब्द ऐकू येताच माझे कान टवकारले जात होते. माझी चलबिचल सुरु झाली. डोळ्यांसमोर भाच्याचं मॅरेथॉनचं शेड्युल आलं. स्पर्धेसाठी ढोर मेहनत घेतात मात्र स्पर्धा ज्या आठवड्यात आहे तो पूर्ण आठवडा आरामाचा असतो. कसलाही व्यायाम करायचा नसतो शेवटचे काही दिवस. स्पर्धेसाठी एनर्जी साठवून ठेवायची असते. मी सुद्धा असेच केले होते. पण हे काय भलतेच? आज रात्री ‘मिशन गिरनार’ आहे तर त्याआधी कशाला ५०० पायर्या चढून उतरायच्या? ते ही उन्हात? आपण ग्रुपसोबत आहोत त्यामुळे ग्रुप लीडरच्या मतानुसारच वागायला हवे हे कळत होते, तरी देखील मी एक खडा टाकायचा असे ठरवून बोलले की “आता रात्री जाणारच आहोत ना, तेव्हाच ५०० पायर्यांवर जटाशंकराचं दर्शन घेतलं तर नाही का चालणार?”, "नाही हो ताई, जटाशंकर या अंगाला आणि गिरनार त्या तिथे". “अरे देवा”, हे स्वगत होतं. शेवटी ठरवलं की आपण स्पष्ट बोलून तर बघू. म्हटलं, "दादा, आपण आत्ताच ५०० पायर्या चढून उतरलो तर आपली एनर्जी वाया नाही का जायची या उन्हात? रात्रीसाठी ठेवायला हवी ना शिल्लक? उद्या करुयात का जटाशंकर?” तर उत्तर आले की "जटाशंकर म्हणजे प्रिलिम आहे असं समजा आणि रात्री फायनल एक्झाम." “बोंबला… म्हणजे प्रिलिम नंतर लग्गेच त्याच दिवशी फायनल? आपल्या चुका सुधारायला काही वावच नाही की..”. हे ही अर्थात स्वगत होतं. आता ठरवलं की जाऊ दे आता हे लोक जिथे नेतील तिथे गपगुमान जायचं, सांगतील तसं चढायचं , सांगतील तेव्हा उतरायचं. बाकी कोणीच काही बोलत नव्हते तर आपणच का विरोध करावा? त्यात ६९ वर्षांचे आजोबा, दुसरे साठीचे जोडपे उत्साहात चढायला तयार होते त्यांच्यासमोर मी हॉटेलवर जाऊन आराम करते हे बोलायचीही लाज वाटू लागली. मनाशी पक्कं केलं जे व्हायचंय ते सर्वांसोबत माझंही होईल, आता जास्त आढेवेढे घेणं नको. आमच्या म्होरक्याने शेवटी म्हटलं “ताई तुम्ही चला तर खरं, नक्की आवडेल तुम्हाला असं ठिकाण आहे ते.”
त्यांच्या शब्दांची प्रचिती काही वेळातच आली.गल्लीबोळ पार करत एका आडवाटेला लागलो आणि काही क्षणांतच घनदाट जंगलात. आजूबाजूला प्रचंड मोठमोठाली झाडं आणि अवतीभवती दगडा-खडकांतून जाणारी वाट, काही ठिकाणी कच्च्या पायर्या. बाजूलाच खळखळत वाहणारा झरा. ज्याचा आवाज मन प्रसन्न करीत होता. झाडे झुडपे इतकी दाट होती की सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोचतही नव्हती, अंधारुन आलं होतं.जाता जाता पक्ष्यांचे विविध आवाज अगदी मोराचा केकाही ऐकू आला. वाटेत भरपूर माकडे दिसली. पण ती माणसांना त्रास देत नव्हती. एकंदर परीसर आल्हाददायक होता. अजून एक आनंदाची गोष्ट मला जाणवली ती म्हणजे जिथे सूर्यकिरणे पोचू शकत नव्हती तिथे जिओचे नेटवर्क मात्र व्यवस्थित मिळत होते. ताबडतोब घरी व्हिडिओ कॉल लावला आणि घरच्यांना ही रम्य जागा दाखवली. कधीही कुठेही माझ्यासोबत असणार्या घरच्या तीन मेम्बरांची प्रकर्षाने आठवण येत होती.मध्ये एका ठिकाणी पाण्याचा प्रवाह ओलांडून पुढे जायचे होते, तिथे मात्र जरा भिती वाटली इतकंच. मुंबईकरांसाठी भुशी डॅमचे जे स्थान ते इथल्या स्थानिकांसाठी जटाशंकरचे. जागॄत देवस्थान म्हणून ज्ञात असलं तरी पिक्निक स्पॉट सारखी गर्दी, पाण्याच्या प्रवाहाखाली डुंबणारी जनता. पाचशे पायर्यांची तमा न बाळगता ट्रंका, पेटारे भरभरुन घरून आणलेले खाणे-पिणे उत्साहात वाहून नेणार्या बायका आणि दर पाचेक मिनिटांवर एखाद्या डेरेदार वॄक्षाखाली गोलाकार विसावलेला कुटुंब कबिला, मधोमध वर्तमानपत्राच्या कागदांवर उघडलेले खाण्याचे डबे, अगदी बाटल्या भरभरुन ताकसुद्धा घरुन घेऊन आली होती ही मंडळी. हे दॄश्य पाहून माझी मैत्रीण अगदी सद्गदीत झाली. मला म्हणे गुजराथी माणूस कधीही कुठेही भुकेला रहात नाही, ठाण मांडून खाणं चालू करतो आणि त्यापुढे मी गुजराथी माणूस आणि त्याची खाद्ययात्रा यावर एक चमचमीत व्याख्यान ऐकले.
पुढे जात जात आम्ही मंदीरात पोहोचलो. एका गुहेत , कपारीत ते स्वयंभू शिवलिंग होते आणि त्या भोवती डोंगर कपारीतून वाहत आलेल्या झर्यातील पाणी वाहत होतं. खरंच खूप शांत, रम्य वातावरण होतं तिथलं. मन प्रसन्न करुन गेला तो माहोल. दर्शन झल्यावर आम्ही परतीचा मार्ग घेतला. जटाशंकर मंदीर
यापुढचं ठिकाण होतं साक्षात गिरनार पर्वताची पहिली पायरी. नाही चढाई रात्रीच करायची होती. पण भवनाथ आणि जटाशंकर दर्शनाननंतर गिरनारच्या प्रथम पायरीवर नतमस्तक होत दत्तगुरुंना आणि स्वतःच्या आराध्य दैवताला प्रार्थना करायची असते की आज रात्री आम्ही तुमच्या दर्शनासाठी निघणार आहोत. आम्हाला सुखरुप वरपर्यंत नेऊन आणा. त्यानुसार आमच्यातील प्रत्येकाने पहिल्या पायरीवर डोके टेकून मनोभावे प्रार्थना केली. शेजारीच 'चढवावा हनुमान' नामक हनुमान मंदीर आहे. हनुमानाकडेही पर्वत चढून उतरण्यासाठी शक्ती द्यावी अशी याचना करायची असते. ते ही केले आणि जेवून हॉटेलवर परतलो.
आराम केला. डोंगरावर नेण्याचे जुजबी सामान सॅकमध्ये भरले. आपल्याकडे काही देवळांत विशिष्ट पोशाख घालूनच प्रवेश दिला जातो असे बंधन इथे अजिबात नाही. ज्याला चढतांना जे कंफर्टेबल वाटेल ते घालावे असे सांगण्यात आले होते. जीन्स, शॉर्टस, थ्री फोर्थ काहीही. संध्याकाळी जरा पाय मोकळे करुन आलो आणि जेवलो. रात्रीसाडेअकराला पुन्हा आंघोळ करुन निघायचे होते. डोंगर चढतांना आधारासाठी प्रत्येकाला काठी देण्यात आली होती.
एका हातात टॉर्च आणि दुसर्या हातात काठी या दोन गोष्टी प्रत्येकाकडे असायलाच हव्यात असे सांगितले गेले होते. दुसर्या दिवशी दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत डोंगरावर नेटवर्क नसल्यामुळे संपर्क करता येणार नाही, तरी काळजी करु नये असे घरच्या सदस्यांना सांगून ठेवायची सुचना आधीच केली गेली होती. निघतांना घरी फोन केला, सर्वांशी बोलले. मन भरुन आले होते. नवर्याला म्हटलं की जोवर नेटवर्क मिळतंय तोवर मी तुला एसेमेस पाठवत राहीन, किती पायर्या चढले , कशी आहे वगैरे. तू सकाळी उठशील तेव्हा मी नेटवर्कमध्ये नसेन पण तुला निदान समजेल तरी माझा प्रवास.
गेले तीन महिने सतत ज्याचा विचार मनात घोळत होता, अगदी ध्यास लागला होता, ते आता काही तासांनंतर दॄष्टीपथात येणार होते. खरंच डोळ्यांनी दिसणार होते की अर्धवट परतावे लागणार होते? माहीत नाही. पण आता त्याची पर्वा नव्हती. ज्याने इथवर आणलं तोच ठरवेल पुढचं. पण जर त्रास झाला, विशेषतः श्वास लागला, धाप लागली तर न लाजता डोली करायची हे मी मनाशी ठरवले होते. तरीही ती वेळ येऊ नये, आपण पायी चढून जावे ही इच्छाही होतीच.
आता ज्यासाठी इतका अट्टाहास केला त्या गिरनारस्थित दत्तगुरुंबद्दल थोडेसे:-
(ही माहिती 'दत्त अनुभुती' हे पुस्तक तसेच आंतरजालावर गिरनार बद्द्ल जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार इथे देत आहे).
गुजरात राज्यातील जुनागढ शहरात गिरनारच्या पर्वतरांगा आहेत. समुद्रसपाटीपासून ३६६५ फूट उंचीवर या पर्वतरांगांवरील सर्वांत उंच शिखर - गोरक्षशिखर आहे. तसेच 'गुरुशिखर' - हे गुरु दत्तात्रेयांचे अक्षय्य निवासस्थान आहे असे मानतात. 'गुरुशिखर' या ठिकाणी दत्तगुरुंच्या पादुका - खडकावर अर्धा ते एक इंच आत रुतलेल्या पावलांच्या ठशांच्या रुपात आहेत. पादुकांच्या मागे त्रिमुर्ती स्थापन केली आहे. पूर्वी गुरुजींव्यतिरिक्त केवळ एक व्यक्ती जाऊन दर्शन घेऊ शकेल इतपतच जागा होती, मात्र आता बांधकाम करुन साधारण १५ ते २० माणसे आत मावू शकतील इतकी जागा केली आहे. या स्थानावर गुरु दत्तात्रेयांनी, ज्या वेळी अत्री ऋषी - आणि अनसुयामातेचे पुत्र म्हणून पृथ्वीवर लौकिक अवतार धारण केला होता तेव्हा, या गुरुशिखरावर तब्बल १२००० वर्षे तपश्चर्या केली होती असे म्हणतात. तपश्चर्या सुरु असताना जुनागढ येथे दुष़्काळ पडला. पाऊस पडत नव्हता, त्यामुळे पिक-पाणी होत नव्हते, गुरे, वासरे, माणसे मरु लागली. त्यावेळी अनसुया मातेने आपल्या लेकाला तपश्चर्येतून जागे केले. जागे होताच त्यांनी आपल्या हातातील कमंडलू खाली फेकला, तो दुभंगून दोन ठिकाणी पडला, एका ठिकाणी पाणी उत्पन्न झाले तर दुसर्या ठिकाणी अग्नी. अशा प्रकारे दत्तात्रेयांनी अग्नी व पाण्याची सोय करुन जुनागढ मधील दुष्काळ दूर केला होता. या स्थानावर आजही अन्नपूर्णेचा वास आहे असे म्हणतात व येथे येणार्या प्रत्येकाला अन्नपूर्णेचा प्रसाद दिला जातो. अगदी सकाळी सहा वाजल्यापासून. त्यामुळे गिरनार चढत असतांना उपवास करु नये, इथला अन्नपूर्णेचा प्रसाद ग्रहण केल्यावरच ही यात्रा संपन्न होते असे म्हणतात. त्या ठिकाणी आजही पाण्याचे कुंड आहे. या स्थानाला ‘कमंडलू तीर्थ’ असे संबोधले जाते. जिथे अग्नी प्रकटला तिथे आजही दर सोमवारी पिंपळाच्या पानांची मोळी ठेवून विशिष्ट मंत्रोच्चरण करतांच स्वयंभू अग्नी प्रकट होतो. हीच धुनी. दत्तगुरु तेथे धुनीच्या रुपात प्रकटतात व अनेकांना त्या धुनीत त्यांचे आजही दर्शन होते असे म्हणतात. त्याचप्रमाणे इथे गोरक्षनाथांचे स्थान आहे. त्यांनी आपले सद्गुरु श्री दत्तात्रेयांना प्रार्थना केली होती की जिथे मी आहे तिथे तुम्ही, माझे गुरु असायलाच हवेत. म्हणूनच गोरक्षनाथांनी अधिक उंचावर जाऊन तापश्चर्या केली जेणेकरून त्यांच्या नजरेसमोर दत्तपादुका राहातील. हे गोरक्षशिखर म्हणूनच सर्वात जास्त उंचीवर (३६६५ फूट) आहे. पायथ्यापासून ४००० पायर्यांवर जैन तीर्थंकर नेमिनाथ यांचे स्थान व जैन मंदीरे आहेत. तर ५००० पायर्या चढल्यावर अंबा मातेचे देऊळ आहे. अंबा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन,तिचा आशिर्वाद घेऊनच गुरु शिखराकडे मार्गस्थ व्हावे असा प्रघात आहे. साधारण अडीच ते तीन हजार पायर्यापर्यंतची वाट ही गीरच्या जंगलातील आहे. त्यामुळे वन्य श्वापदे दिसू शकतात. यासाठी काठी आणि टॉर्च सोबत घ्यायला सांगितले जाते.
स्वतःभोवती अनेक गूढ वलये ल्यालेला, अद्भुत अशा आख्यायिका ज्याबद्दल सांगितल्या जातात असा हा गिरनार पर्वत. गिरनार चढण्यास जायचे असल्यास व्यवस्थित रस्ता माहीत असलेली व्यक्ती सोबत असावी, त्याचप्रमाणे जो वहिवाटीचा रस्ता आहे, त्या वाटेनेच चढावे आणि उतरावे असे सांगितले जाते. गिरनार ही पर्वत शॄंखला आहे. वहिवाटेनुसार जैन मंदीर, अंबाजी, गोरक्षशिखर,गुरुशिखर या मार्गाने न जाता, वेगळ्याच पर्वतावरुन, वेगळ्या मार्गानेही जाता येत असावे, मात्र अशा कोणत्याही वेगळ्या मार्गावर पायर्या, लाईटस नाहीत. पायरी मार्गावर लाईटस आहेत पण फार अंधुक प्रकाश, त्यामुळे पावसाळी वातावरणात टोर्च शिवाय पर्याय नाही. इतर मार्गाने जाता -येतांना वाट चुकण्याची, वन्य श्वापदांची भिती असते. या पर्वतांवर बर्याच गुहा आहेत. तिथे आजही अनेक जण तपसाधना करीत असतात. अशा आडमार्गावर अनेक तांत्रिक त्यांची साधना करीत असतात, त्यांच्या मार्गातून आपण जाऊ नये आणि म्हणून वहिवाटेनेच पायर्या चढत जावं असं सांगितलं जातं.
शिर्डी, अक्कलकोट आणि इतरही काही देवस्थानांबद्दल जी वदंता आहे तीच या तीर्थक्षेत्राबद्दलही आहे की इथे कुणीही स्वतःच्या इच्छेने येऊ शकत नाही. 'दत्तगुरुंची इच्छा' असावीच लागते. अशा अनेक आख्यायिका, पुरातन कहाण्या मनात साठवत आम्ही २४ जण सांगितल्या गेलेल्या सुचनांचा आदर करुन, शंका कुशंकांना स्थान न देता, असं खरंच असेल का? असे उलट प्रश्न न करता अर्थात पूर्ण श्रद्धेने चढू लागलो. जास्त लोक ३० ते ५० या वयोगटातील होते. कौतुक करावे तर आमच्या चमूतल्या बाल शिलेदाराचे, रजत त्याचं नाव. खूप उंचावर असलेल्या दत्तबाप्पाच्या दर्शनाला आजी आजोबा आणि आजीची बहीण जात आहेत हे कळताच त्याने येण्याचा हट्टच धरला. इतका की शेवटी आयत्या वेळेस त्याला आणि त्याची काळजी घेण्यासाठी त्याच्या आईलाही आमच्या सोबत घेतले. कराटे शिकत असलेल्या या चिमुरड्याचा स्टॅमिना जबरदस्त, सात वर्षांचा हा पोरगा, न थकता उत्साहात चढला तसेच सकाळी उतरलाही, कुठेही झोप येतेय, दमलो अशी तक्रार, कुरकुर नाही की आईला त्याला कडेवर घ्यावे लागले नाही. हॅटस ऑफ टू रजत.
साडेअकराच्या सुमारास एकमेकांना शुभेच्छा देत बाहेर पडलो. पुन्हा एकदा बंद असलेल्या भवनाथ मंदीराला बाहेरुन नमस्कार करुन गार्हाणे घातले आणि मार्गस्थ झालो. पहिल्या पायरीपाशी आलो. बूट काढून पुन्हा एकदा पहिल्या पायरीवर नतमस्तक झालो. त्यावेळी कंठ दाटून आला. सद्गुरुंना म्हटलं, “हे इतकं मोठं दिव्य करायला धजावतेय पण एकटी आहे, तुम्ही माझ्यासोबत रहा बस्स”. 'चढवावा हनुमंतालाही प्रार्थना केली. बूट घातले आणि चढण्यास सुरुवात केली.
क्रमशः
चालविसी हाती धरुनिया
आम्ही निघालो त्यावेळी पाऊस अजिबात नव्हता. काही पायर्या चढून होताच घाम येऊ लागला. पहिल्या पाचशे पायर्या खूप थकवणार्या असतात. त्यापुढे शरीराला सवय होते. आम्हाला दिलेल्या सुचनांनुसार आम्ही सावकाश चढत होतो. तसेच चढत असतांना जास्त बोलत राहिले की दम लागतो हे ही लक्षात घ्यायला सांगितले होते. पाणी अगदी गरज वाटली तरच, घोटभर पित चढण्यास सांगण्यात आले होते. काही अंतर चढून गेल्यावर आमच्या मागे-पुढे मराठी भाषिक लोक दिसू लागले. चौकशी करतां तो ५० जणांचा ग्रुप नाशिक, मनमाड येथून आला होता असे कळले. आपल्या सोबतच आपली भाषा बोलणारी मंडळी आहेत हे पाहून जरा बरं वाटलं. आमच्या ग्रुप मध्ये सर्वांत पुढे आयोजकांतील एक व शेवटी सर्वांत सावकाश चढणार्या सदस्याच्या मागे एक आयोजक अशी ग्रुपची रचना सुरुवातीपासून होती. त्यामुळे कोणीही रस्ता चुकण्याची, भरकटण्याची भिती नव्हती. तसंच चढत असतांना सर्वांत पुढे गेलेला ग्रुप जिथे थांबून विश्रांती घेई, तिथे मागून चालणारी मंडळी पोचली की आधी पोचलेली मंडळी मार्गस्थ होत असत आणि हेच मग त्या नंतरच्या मंडळींनी पुढच्या टप्प्यातील मंड्ळींसाठी केले, त्यामुळे चढतांना संपूर्ण ग्रुपमध्ये एक समन्वय होता . कुणीतरी फारच पुढे निघून गेलंय आणि कुणीतरी मागे एकटं पडलंय अशी मिसिंग लिंक कोणाच्याच बाबतीत चढतांना घडली नाही.
पहिल्या पाचशे पायर्या चढून होण्याआधीच आमच्या ग्रुपमधील एक काका थकले. त्यांनी मी चढू शकत नाही. डोलीनेच जाईन हा निर्णय घेऊन टाकला. ते खरच घामाने निथळत होते, प्रचंड धापही लागली होती. त्यांनी वेळीच योग्य निर्णय घेतला होता.ते जरा स्थिरस्थावर झाल्यावर आयोजकाने डोलीची व्यवस्था केली. डोलीवाल्याचे पैसे ठरवले. काकांना त्या डोलीवाल्याच्या ताब्यात देऊनच मग आयोजक पुढे चालू लागले.
मजल दरमजल करीत आमचे चढणे सुरु होते. आजूबाजूला बरीचशी टपरीवजा बंद दुकाने दिसत होती. साधारण अडीच हजार पायर्यांपर्यंत जंगलातील रस्ता असल्यामुळे वन्य श्वापदे आढळू शकतात. मध्यभागी दगडी पायर्या, एका बाजूला दरी तर दुसर्या बाजूला जंगल अशी रचना. ज्या बाजूला दरी होती,त्या बाजूला कठडा होताच असे नाही. त्या जंगलात कीर्र अंधारात पाहिले तर धुक्यामुळे काही अंतरावर पुढचे अजिबात दिसत नव्हते. भयपटात दाखवतात तसे झाडाचे बुंधे आणि धुक्यात अस्पष्ट होत गेलेली वाट...यामुळे वातावरणातील गुढ अजून वाढत होते. एका बाजूची अंधारात हरवलेली खोल दरी आणि दुसर्या बाजूचे धुक्यात अस्पष्ट दिसणारे जंगल. या दोन्ही गोष्टीची नाही म्हटलं तरी भिती वाटत होती. एकदा कधीतरी मी एकटीच राहिले. पुढची मंडळी किती पुढे गेलीत आणि मागून कोण येतंय हे धुक्यामुळे समजत नव्हते. कुणाचा बोलण्याचा आवाजही येत नव्हता. त्या क्षणी मी प्रचंड घाबरले आणि मनापासून सद्गुरुंना आळवले, मला भिती वाटतेय हे ही बोलले, काही वेळातच मागून आमची मंडळी येतांना दिसली. आता यापुढे चुकुनही डाव्या-उजव्या बाजूला बघायचे नाही, फक्त समोरच्या पायर्यांवर लक्ष केंद्रीत करुन पुढे चालायचे हे ठरवले.
हळूहळू चढतां चढतां ५०० पायर्या, १००० पायर्या, १२०० पायर्या असे टप्पे येत होते. अनेकदा येऊन गेलेल्या आयोजकांना ते टप्पे ओळखता येत होते आणि ते आम्हाला मार्गदर्शन करत होते. नवर्याला सांगून ठेवलं असल्यामुळे मला जेव्हा कळत होतं की ५०० पायर्या झाल्या, १००० झाल्या मी त्याला मेसेज करत होते. मी बरी आहे, फ्रेश आहे, हेही सांगत होते. माझा मेसेज गेल्यावर लगेच त्याचे उत्तर येत होते. मध्यरात्र उलटून गेली होती. त्याला सांगितलं की आता कधीही नेटवर्क जाईल आणि मग तू काळजी करशील, त्यापेक्षा झोप आता.तसेच झाले. चार हजार पायर्यानंतर मेसेजेस जात नव्हते.
आता बरेच उंचावर आलो होतो. धुकं वाढत असल्यामुळे सुरुवातीला जसा दरदरून घाम येत होता तो येणं थांबलं. धुक्यातूनच आमचे मार्गक्रमण चालू होते. साधारण दोन फुटांवरचंही दिसत नहतं. आजूबाजूचेही थांबत चढत होते. माझ्यासाठी आश्चर्याची वाटणारी गोष्ट घडत होती ती म्हणजे मला अजूनतरी धाप लागली नव्हती, थकवा जाणवत नव्हता. एरव्ही थोडेसे चालून दमणारी मी, चालण्याचा आळस करणारी मी चढत असूनही ताजीतवानी होते. मी माझ्या आयुष्यात स्वतःला इतके फिट फक्त या चढाई दरम्यान अनुभवले. तरीही अति आत्मविश्वास दूर सारून मी अधे मधे थांबत होते. घोटभर पाणी, खजूर, स्निकर्स हे अधे मधे खात होते.
माझी मैत्रीण हळू हळू चढत होती. तिचा आणि एका काकींचा चालण्याचा वेग समान होता. त्यामुळे त्या दोघी एकत्र चालत होत्या. मी त्यांच्या जरा पुढे चालणार्या मंडळींसमवेत होते. चारहजार पायर्या झाल्यावर पहिला टप्पा - नेमिनाथ स्थान म्हणजे जैन मंदिरे आली. खूप भारी वाटत होते. इथवर तर सुखरुप पोचलो हा अनांद सोबत होता. जैन मंदीरांना वळसा घालून आम्ही पुढचा रस्ता धरला.
काही अंतर चालून गेल्यावर एके ठिकाणी दोन रस्ते आढळले. एक डाव्या बाजूला जिथे आता जशा पायर्या चढत आलो त्याच धाटणीच्या पायर्या होत्या तर उजवीकडे पायर्या नसून साधी वळणावळणांची वाट दिसत होती. प्रथम येणार्याला अर्थातच जिथे पायर्या दिसत आहेत तिथून जायचे असे वाटले असते. त्यानुसार मी डावीकडे वळणार तोच आमचे नेहमी सर्वांत शेवटी रहाणारे आयोजक आता 'वाटाड्याची' भुमिका चोख बजावत होते. त्यांनी उजवीकडे जिथे पायर्या नव्हत्या तो आपला रस्ता असे सांगितले. मी प्रश्न केला की मग ही पायर्यांची वाट कुठे जातेय? त्यावर तिथे थोडे अंतर चढून गेल्यावर रस्ताच नाही असे समजले. त्या प्रसंगी गिरनारसारख्या ठिकाणी रात्री चढत असताना अनुभवी ग्रुप सोबत असणं किती गरजेचं आहे हे जाणवलं.
आता पुढचा टप्पा अंबाजी धाम - ५००० पायर्या हे आमचं लक्ष्य होतं.आमच्यासोबतच ज्या दुसर्या ग्रुपने चढण्यास सुरुवात केली होती त्या ग्रुपमध्ये एक गॄहस्थ झांजांच्या तालावर "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" असा नामघोष करत चढत होते. त्या नीरव गूढ शांततेत त्यांचा धीरगंभीर आणि खणखणीत आवाज आश्वस्त करीत होता.बाळ जसं आईला "आई, आई" हाकारत तिच्या दिशेने पुढे चालत रहाते तसं वाटत होतं. ग्रुपमधील अनेकांनी गिरनार उतरुन परतल्यावर हाच अनुभव सांगितला की ते "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" नामस्मरण ऐकले की एक प्रकारची उर्जा मिळत होती चढण्यासाठी आणि चालण्याचे श्रम जाणवत नव्हते.
आता चढतांना ढग आम्ही ज्या उंचीवर होतो त्यापेक्षा खाली दरीत विहरतांना दिसू लागले. हळू हळू जमिनीपासूनचे अंतर वाढत आहे हे दरीत नजर टाकतांच लक्षात येत होते. दिवसाउजेडी हा परिसर किती विहंगम दिसत असेल याची कल्पना मनात करत चालत होते. अजूनतरी पाऊस आला नव्हता. अगदी एखादी चुकार सरही नाही. मात्र वातावरण तसेच धुक्याचे. चढत असतांना हा एकच फोटो वरुन दिसणार्या वाटेचा काढला. बाकी सारे फोटो दुसर्या दिवशी उजेडात काढलेले आहेत.
कालपर्यंत एकमेकांना अनोळखी असलेल्या ग्रुपमध्ये आता चढतांना मात्र मस्त 'बाँडींग' झालं होतं. कुणाला कसलीही मदत लागली तरी अनेक हात पुढे सरसावत होते. सोबत आणलेला खाऊ, चॉकलेटस यांची देवाणघेवाण होत होती. जे आयोजक नव्हते त्या पुरुषांनीही स्वतःहून एकेका स्त्रियांच्या ग्रुपसोबत राहून, त्यांच्या वेगाने चढत कोणीही एकटे मागे पडणार नाही याची खबरदारी घेतली.
आम्हां सर्वांची चढत असतांना करमणूक करण्याची, श्रमपरिहार करण्याची जबाबदारी जणू आमच्यातील छोट्या सदस्याची होती. तो पठ्ठ्या भारी उत्साही. पटापट पायर्या चढून तो पुढे जाई आणि आपल्या घरची माणसे कुठवर पोचली हे तपासायला वरुन टॉर्च मारुन शोधत बसे. नेमका तो प्रकाशझोत मागून चढणार्यांच्या डोळ्यांवर पडून डोळे दिपत असत. बर्याचदा तर वीसेक पायर्या चढून गेलेला रजत परत तितक्याच तत्परतेने आई कुठवर आली हे बघायला खाली उतरत असे.या हिशोबाने मला तर वाटते त्याने गिरनार पर्वत सलग दोन वेळा चढून उतरला असावा.
हळूहळू वातावरणातील बदल जाणवत होते. मध्यरात्र केव्हाच उलटून गेली होती. तीन- सव्वातीनची वेळ असेल. ब्राह्म मुहुर्ताची वेळ. यावेळी केलेली उपासना, साधना अधिक फलदायी असते असं मानलं जातं. आमचीसुद्धा ही एक प्रकारची उपासनाच चालू होती की आणि ती देखील या सिद्ध भुमीत जिथे साक्षात दत्तगुरुंनी स्वतः तपाचरण केले आणि त्यांना सद्गुरुस्थानी मानणार्या त्यांच्या कैक शिष्य, साधकांनी देखील. अशा कित्येकांच्या तपसाधनेची पवित्र स्पंदने या पवित्र भुमीत, इथल्या आसमंतात भरुन राहिली असतील जी आम्ही त्या ब्राह्म मुहुर्तावर ग्रहण करु शकत होतो. आधी जाणवली तशी भिती आता अजिबात वाटत नव्हती.खूप प्रसन्न असे वातावरण अनुभवत आमचा प्रवास सुरु होता.
धिम्या गतीने चढत-चढत आता अंबाजी धाम दॄष्टीपथात येऊ लागले. बघता-बघता ५००० म्हणजे निम्म्या पायर्या होत आल्या की. मी ज्यावेळी अंबाजी मंदीराजवळ पोचले तेव्हा ३.५८ वाजले होते. ११.३५ वाजता पहिल्या पायरीपासून सुरुवात करुन, मध्ये अनेकदा विश्रांतीसाठी थांबूनही साडे चार तासांत आम्ही ५००० चा टप्पा गाठू शकलो होतो. मंदीर तर अजून बंदच होते. माझ्या आधी पोचलेली मंडळी हसतमुखाने स्वागत करत समोर आली. त्यांनी सांगितल्यानुसार मंदीराच्या पायरीवर डोके टेकवून नमस्कार केला. ‘इथवर सुखरुप आणलंस आई, आता पुढेही असंच सुखरुप ने अशी प्रार्थना केली ‘आणि जिथे सगळे बसले होते त्या टपरीवजा हॉटेलात आले. आधी पोचून ताज्यातवान्या झालेल्या मंडळींनी नुकत्याच पोचलेल्यांना जागा करुन दिली. आयोजकांनी या हॉटेलच्या मालकांना झोपेतून उठवून आमची मंडळी आता हळूहळू पोचतायत तर चहा तयार ठेवा असे सांगितले. गरम गरम चहा आणि पार्ले़ जी बिस्कीटस खाऊन तरतरी आली.
हळूहळू एकेक करत सर्व पोचले. सारे वेळेत पोहोचलो होतो. आता पावणेपाचपर्यंत इथेच थांबायचे होते.कारण यापुढचे अंतर एक ते दीड तासात पूर्ण होणार होते. गुरुशिखर -मंदीर पहाटे साडे पाच वाजता दर्शनासाठी उघडते. त्या आधी तिथे पोचल्यास कुठेही थांबायची सोय नव्हती. पायर्यांवर बसावे लागले असते. त्यामुळे इथेच थांबलो. खरं तर अजून निम्म्या पायर्या बाकी होत्या. मग दीड तासांत कसे काय पोचलो असतो आम्ही? असं म्हणतात की ५००० पायर्या चढून अंबा मातेचा आशिर्वाद घेतला की यापुढचं अंतर ती अंबा माता लीलया पुरे करुन घेते, तिच्या कूपाशिर्वादाने पुढचा टप्पा झरझर पार केला जातो. ती आईच दत्तगुरुंच्या पुढ्यात आपल्याला नेऊन ठेवते, हे ऐकतांच अगदी भारावून गेले.
आमचे पाचही आयोजक मदतीस तत्पर होते. गिरनार पर्वत यात्रेचा आनंद जो आपल्याला मिळाला तो इतरांनाही मिळावा या नि:स्वार्थी भावनेने या यात्रेचे आयोजन केले जाते आणि ही नि:स्वार्थी वॄत्ती प्रत्येकाच्या वागण्या-बोलण्यातून जाणवत होती, हे विशेष. कुठेही चिडचिड नाही, हातचे राखून माहिती देणे नाही. आताही जिथे थांबलो होतो तिथे थोडं स्ट्रेचिंग करा म्हणजे पाय मोकळे होतील अशी हळुवार सुचना त्यांनी दिली. त्यानुसार स्ट्रेचिंग करुन आम्ही पावणे पाचच्या सुमारास पुन्हा निघालो.
आता गोरक्षनाथ शिखराकडे जाऊ लागलो. याच रस्त्यावर प्रचंड वारा असतो. इथे एकमेकांचे हात पकडून कडं करुनच पुढे जाता येते असे ऐकले होते. आम्ही जेव्हा इथे पोचलो त्या वेळी वारा तर होताच पण असा वादळी वारा नव्हता. व्यवस्थित एकेकटे चालता येत होते. आता हा पर्वत उतरुन दुसरा चढायचा होता. त्यामुळे १०००-१५०० पायर्या उतरायच्या होत्या. काठीच्या आधारे त्या नीट उतरुन पुन्हा पुढील पायर्या चढू लागलो.
याच वाटेवरुन जात असतंना जर कदाचित मुसळधार पाऊस आला असतां तर?..... पाऊस पडत असतांना आजूबाजूच्या कडेकपार्यांतूनही पाण्याचे ओहोळ वहात पायर्यावर येतात, वार्याचा वेग अशा वेळी प्रचंड वाढतो, चढणे मुश्कील होते असे ऐकले होते. अंगावर सरसरून काटा आला. आम्ही दुसर्या दिवशी दुपारी खाली उतरेपर्यंत पाऊस मात्र अज्जिबात आला नाही. जुनागढ हा भाग कमी पावसाचा, त्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस संपला असावा असे म्हणावे तर आम्ही मुंबईत परतल्यावर नंतरच्याच आठवड्यात तिथे मुसळधार पाऊस पडला होता, रस्त्यांवर पावसाचे पाणी वेगाने वहात असल्याचे व्हिडीओज आमच्या गिरनार यात्रेच्या ग्रुपवर पाहिले आणि मनोमन देवाचे आभार मानले.
या घटनेचा नंतर विचार करीत असतंना जाणवलं की अरे आपल्याला तर गिरनारच्या वाटेवर व्ही आय पी ट्रीटमेंटच मिळत होती जणू काही, तेही कसलेही व्ही आय पी स्टेटस नसतांना. पण व्ही आय पी स्टेटस नाही कसे म्हणावे बरं? आपण सारी तर ‘दत्तगुरुंची बाळं’... हा एकच निकष पुरेसा आहे की व्ही आय पी पास मिळवण्यासाठी. जणू काही दत्तगुरुंनी स्वतः आमच्यासाठी रदबदली केली होती. पंचमहाभुतांना जणू आदेश दिले होते की "माझी बाळं डोंगर चढतायत मला भेटायला येण्यासाठी. तुम्ही तुमचं रौद्र रुप दाखवलंत तर भांबावतील बिचारी, हाल होतील त्यांचे. खरी 'राज की बात' तर ही आहे की ती सारी चढत नाहीचेत मुळी, मीच त्यांना कडेवरुन घेऊन येतोय. तेव्हा हे पंचमहाभुतांनो, माझ्या कार्यात मला मदत करा." आणि या आदेशाचे पालन प्रत्येक ठिकाणी केले जात होते. आम्हाला मोकळा मार्ग मिळत होता. अगदी जिथे कुठे पायर्या पाण्यामुळे ओल्या आढळल्या, तिथे त्यांच्यावर शेवाळ मात्र नव्हते. त्यामुळे कुठेच घसरायलाही झाले नाही.
आजूबाजूला आता स्थानिक काठियावाडी स्त्री-पुरुष दिसू लागले. आसमंत हळूहळू उजळू लागला होता. काळ्याकुट्ट अंधाराचे रुपांतर निळ्या सावळ्या रंगात होत होते. पुढे जात असतांना हळूहळू गुरुशिखराचा सुळका दिसू लागला. सरळसोट सुळका.... बघूनच धडकी भरावी असा. पण पायर्या मात्र वळणा-वळणाने सावकाश वर जाणार्या होत्या. घाटातल्या रस्त्यासारख्या. या शेवटच्या टप्प्यावर पोचलो आणि मन भरुन आले.
पहाट होत असतांना
आजूबाजूचं वातावरण भारलेलं जाणवत होतं. कोणत्याही मंदीरात, मंदीर परिसरात आपण पावित्र्य अनुभवतो. मात्र त्यात त्या स्थानमहात्म्याइतकेच योगदान इतर गोष्टींचेही असते, जसं फुलांचा मंद सुवास, धूप, उदबत्तीचा दरवळ, त्यांची हवेत विरत जाणारी वलये, शांतपणे तेवणारी समई, निरांजन, सोबत त्या मंदीरातील आराध्य दैवताची ऐकू येणारी आरती, स्तोत्र, धीरगंभीर आवाजातील मंत्रोच्चरण या सार्या गोष्टींचा तो एकत्रित परिणाम असतो. म्हणून गर्दीत,कोलाहलातही आपण ती शांती, पावित्र्य अनुभवू शकतो. इथे मात्र त्यांपैकी काहीच नव्हते. जे होते ते अजून नजरेस पडलेही नव्हते, तरीही ती शांती, ते पावित्र्य, शुचिता प्रत्ययास येत होती. अरुणोदयाची मंगल वेळ आणि गुरुशिखराचे सान्निध्य.....
गुरुशिखराबाहेर चपला, बूट काढायला जागा नाही, त्यामुळे आधी पन्नास एक पायर्या शिल्लक असतांना चौथरा असेल तिथेच काढून वर जा असे सांगितले होते आम्हांला.त्यानुसार ज्या टप्प्यावरुन मंदीराचे प्रवेशद्वार दिसत होते तिथे बूट काढले आणि सुरु झाला अखेरचा पन्नास पायर्यांचा प्रवास.....भावभावनांचे कल्लोळ मनांत उठवणारा.. तरीही मनाला तॄप्तीची अनुभुती देणारा......
क्रमशः पायर्यांची झलक
गुरुशिखर - गिरनार (या सुळक्यावर वरती जे निळ्या पांढर्या रंगात दिसतंय ते गुरुशिखर)
आजि म्या ब्रह्म पाहिले
तॄप्तीची अनुभुती ? कसं काय? अजून तर दर्शन व्हायचे होते त्याआधीच तॄप्ती? पण 'देवाघरची अशीच उलटी खूण असते', कुणाची ही वाट पहाण्यात एक अधीरता असते, घालमेल असते, पण या वाट पहाण्यात खरोखर तॄप्ती जाणवत होती, वाट पहाण्यातली तॄप्ती केवळ परमेश्वरच देऊ शकतो.
फक्त पन्नास पायर्या बाकी राहिल्यात या जाणीवेनेच आतून भरुन येत होते. जसजशी जवळ येत चालले होते, शरीरात सूक्ष्म कंप जाणवू लागला होता. धडधड वाढली होती. मी इथवर आले होते? नाहीच मुळी "तो" घेऊन आला होता.... माझं इथवर येणं घडून येण्यासाठी माध्यम ठरलेले अनेक जण आता नजरेसमोर येऊ लागले. पुस्तक देणारा भाऊ, या यात्रेविषयी माहिती देणारी त्याची डॉ. सहध्यायी, परीक्षा चालू असतांनाही “आई तू जा बिनधास्त म्हणणारा मुलगा”, वयाच्या ८२ व्या वर्षी घरची, लेकाची जबाबदारी सांभाळेन म्हणणार्या आई, आईला आणि लेकाला सोबत म्हणून , मनात असूनही माझ्याबरोबर न येता “तू निर्धास्तपणे जा”, म्हणणारा नवरा, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऑफिसातून सुट्टी मिळू शकेल की नाही अशी शंका येत असंताना बाणेदारपणे बॉसना Sir, let her take leave I will take care of her work in her absence असे म्हणून आश्वस्त करणारा ऑफिसातील सहकारी, मला व्यायाम आणि आहारासंबंधी योग्य मार्गदर्शन करणारा माझा भाचा, या यात्रेचे पाचही आयोजक आणि इतर ग्रुप मेंबर्स…. सर्वांची मी ॠणी आहे, तुम्ही सर्व नसता तर हे भाग्य माझ्या वाट्याला आले नसते.
गिरनारची वारी करतांना वाटेत 'दत्तगुरु' कोणत्या ना कोणत्या रुपात दर्शन देतात असे ऐकले होते. पण मला असे कोणीही दिसले/भासले नव्हते. कसलीही अनुभुती, चमत्कारीक अनुभव का ही ही नाही. हा विचार मनात येताच सद्गुरुंचे शब्द आठवले. "बाळांनो, चमत्कार पाहून नमस्कार करु नका.समोर दिसणार्या चमत्काराने तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? खरा चमत्कार सद्गुरु घडवून आणतात तो भक्ताच्या मनात आणि मनात बदल घडला की प्रारब्ध बदलायला वेळ लागत नाही”. अचानकच आठवले ज्या वेळी 'दत्त अनुभुती' पुस्तकात दहा हजार पायर्यांच्या प्रवासाबद्दल वाचले, त्या वेळीच मुखपॄष्ठावर असलेल्या गुरुशिखरावरील दत्तगुरुंच्या फोटोकडे पाहून म्हटले होते की "माझा नमस्कार इथूनच घे दत्तबाप्पा" असं बोलणारी मी आणि गिरनार दर्शनाची आस मनात घेऊन इथवर पोचलेली मी.... हा माझ्या मनातील बदल होता. हा माझा प्रवास होता नकारात्मक भावनेतून, सकारात्मकतेकडे नेणारा, न्युनगंडाकडून आत्मविश्वासाकडे नेणारा..... सद्गुरुंनी सांगितलं होतं की “जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्या ताकदीच्या बाहेरील कार्य आपण संपादन करतो, तेव्हा जाणावे की कुठेतरी, कुठल्यातरी क्षणाला ह्या कार्यामधील कुठलातरी भाग स्वयंभगवानाने माझे रुप घेऊन घडवून आणलेला आहे”. याहून जास्त अनुभुती कसली हवी होती मला? सद्गुरु म्हणतात की “परमेश्वराकडे प्रत्येकाची रांग ही वेगळीच असते, माझ्या रांगेत माझ्या पुढे कोणी नाही आणि मागेही नाही, मी एकटीच चालत असते माझ्या रांगेत, त्यामुळे अमक्याला हे मिळालं/दिसलं तर मला का नाही? हे विचार सोडा. 'ज्याला ज्याची गरज आहे ते त्याला मिळणारच आहे , कारण 'तो' तर भरभरुन द्यायलाच बसला असतो आपल्या लेकरांना, आपलीच झोळी फाटकी असते”..... हे सारं आठवून डोळे पाझरतील की काय अशी अवस्था झाली. कसेबसे स्वतःला सावरत चढू लागले.
श्रावणासारख्या पवित्र महिन्यात, एकादशीच्या दिवशी, सोमवारी हे दुर्लभ दर्शन घ्यायला मिळणार होते. माझ्यासाठी आजच्या दिवसाला आणखी खास महत्व होते. कारण आज २६ ऑगस्ट हा माझ्या आईचा जन्मदिन. ती असती तर आज तिचा ७५ वा वाढदिवस असता.नेमक्या याच दिवशी मला सद्गुरुपादुकांचे दर्शन होणे हा निव्वळ योगायोग खचितच नव्हता. आई-वडीलांची पुण्याई मुलांच्या कामी येते असं म्हणतात, तेच घडत असावं माझ्या बाबतीत.
पावणेसहा ते सहाचा सुमार. शेवटची पायरी चढले. समोर, लोखंडी सरकते दार, त्या दाराजवळ बसलेला गणवेषधारी पहारेकरी. आतमध्ये दॄष्टीक्षेप टाकत मी आत पाऊल टाकले, जिथे साक्षात दत्तगुरु पादुकांच्या रुपात स्थिरावले होते, त्या गुरुशिखरावरील मंदीरात मी आता या क्षणी उभी होते. चालत थोडी पुढे गेले, पादुकांसमोर , सभोवती गोलाकार बॅरीकेडस होते, तरीही पादुका व्यवस्थित दिसत होत्या. राखाडी रंगाच्या पाषाणावर, साधारण सहा ते साडे सहा फूट उंचीच्या व्यक्तीच्या पायांचा आकार जितका असेल त्या आकाराची दोन पावले, त्या पाषाणात रुतलेली, त्यामुळे जरा खोलगट, पायाच्या बोटांपासून मध्यभागापर्यंत पादुका तशाच अनावॄत्त होत्या. मागच्या भागांवर फुले वाहिली होती, जरी अर्धा भागच दिसत असला तरी अंदाज येत होता पावलांच्या लांबीचा. पादुकांच्या मागेच त्रिमुर्ती, ती मात्र पादुकांच्या आकाराच्या तुलनेत, छोटीशी, साजरी. पादुकांकडे एकटक बघत असतांना नकळत हात जोडले गेले आणि इथवर आवरुन ठेवलेले अश्रू घळघळा डोळ्यांतून वाहू लागले. आता ते आवरणं शक्य नव्हतं. त्याच स्थितीत डोकं टेकलं. आपल्या खूप जवळच्या कुणालातरी आपण बर्याच काळानंतर भेटतोय असं वाटत होतं. असा काही वेळ गेला. सावरलं स्वतःला. समोरच पुजारी बसले होते, ते पहात होते.पण त्यांना हे सवयीचं असावं बहुदा, कारण प्रत्येकाची अवस्था माझ्यासारखीच होत होती. मंदीरात अर्पण करण्यासाठी आम्हाला देण्यात आलेलं खडीसाखरेचं पाकीट आणि पादुकांसठी हिना अत्तराची छोटी बाटली, बाहेर काढली.गुरुजींना दिली. खडीसाखर लगेच प्रसाद म्हणून परत केली गेली. उभी राहिले, प्रदक्षिणा घालण्यासाठी. हात जोडून प्रदक्षिणा घालत परत समोर येत असतांना गुरुजी माझ्याकडे पहात माझ्या दिशेने येत असलेले दिसले, म्हणून तिथेच थांबले. त्यांनी एक लहानशी पोथी माझ्या हातात दिली आणि म्हणाले की "बेटी इसे रोज पढना, तुम्हारी हर इच्छा महाराज पुरी करेंगे!' त्या क्षणी पुन्हा एकदा कंठ दाटून आला. गुरुजी परत फिरुन पादुकांशेजारी जाऊन बसले. मला पुन्हा एकदा नमस्कार करायची अनिवार इच्छा झाली. पुन्हा एकदा पादुकांसमोर नतमस्तक झाले. मनोभावे नमस्कार केला. हुंदका दाटून आला. आवंढा गिळत उठले. अजून मागे बरीच माणसं खोळंबली आहेत. त्यांना माझ्यामुळे ताटकळत रहावं लागू नये असं वाटलं, कारण थोड्या थोड्या लोकांनाच एकावेळी आत सोडत होते. पादुकांकडे पहात- पहातच परत फिरले.
त्याच पायर्यांवर चढणारी माणसे होती. मी उतरु लागले. अगदी थोड्याच पायर्या उतरल्यावर माझी मैत्रीण दिसली. तिला म्हटले, “तू दर्शन घेऊन ये, मी थांबते इथे." अजूनही सूर्योदय झाला नव्हता. तांबडं फुटू लागलं होतं. ढगांआडून एखाद-दुसरी सोनेरी रेघ आकाशात पसरत चालली होती. एरव्ही हिल स्टेशन्सना, समुद्रकिनारी जाऊन सुर्यास्त कैक वेळा पाहिला आहे पण सूर्योदय पहाण्याची ही पहिलीच वेळ.तो सुद्धा गुरुशिखरावरुन दिसणारा सूर्योदय. पण तितका वेळ हाताशी नव्हता. आता धुनीचे दर्शन घ्यायचे होते. जी फक्त दर सोमवारीच प्रज्वलित होत असते.सहा वाजून गेले होते. आम्ही दोघी झटपट उतरु लागलो. अंधारात जे जाणवलं नव्हतं ते आता उजेडात दिसून आलं की बर्याच पायर्यांना कठडाच नाहीये. उतरतांना त्यामुळे जरा भिती वाटत होती. एकमेकींचा हात धरुन आम्ही खाली आलो. आता बर्याच पायर्या चढायच्या होत्या. त्या चढून झाल्या एकदाच्या. धुनीपाशी आणि त्याबाहेर गर्दी जमली होती. आम्ही पोहोचेपर्यंत आत धुनी प्रज्वलित झाली होती. आमच्यापैकी केवळ दोघे त्या वेळी तिथे होते, ज्यांना तो क्षण पाहण्याचे दुर्मिळ भाग्य लाभले. पुन्हा एकदा मनाला बजावले "ज्याला ज्याची गरज आहे, ते त्याला मिळणारच." शांतपणे रांगेत आत जात धुनीपाशी आलो. शिर्डीतल्या साईनाथांच्या द्वारकामाईतील धुनीची आठवण आली. लहानपणापासून देव म्हणजे साईबाबा हे समीकरण मनात फिट्ट झालेले. त्यांचंच बोट धरीत इथवर पोचले होते. मनोभावे धुनीला नमस्कार केला.
आता अन्नपूर्णेचा प्रसाद ग्रहण करायची वेळ. इतक्या लवकर पोचलो असूनही आत आमच्या आधीच पहिली पंगत बसली होती. त्यामुळे बाहेर थांबलो.पहिल्या पंगतीतील भाविकांचे प्रसादग्रहण झाल्यानंतर आम्हाला आत घेण्यात आले.एका वेळी साधारण तीस - चाळीस माणसे बसू शकतील इतकी जागा होती. सेवेकरीही तत्पर होते.भराभर पाने वाढण्यात आली. सकाळी साडे सहाच्या सुमारास डाळ, भात, शिरा-पुरीचा आस्वाद घेऊन आम्ही तेथून बाहेर आलो.
तिथून गोरक्ष गुफेकडे जायचे होते. पण स्त्रियांना आत जाऊ देत नाहीत. त्यामुळे बाहेरच बाकीच्यांची वाट बघत थांबलो. तोवर सकाळचे साडे सात वाजले होते.गिरनार जागा झाला होता. वर्दळ वाढली होती. आम्ही आता अंबाजी मंदीराकडे चालू लागलो. ते दर्शन अजून बाकी होते. अंबाजी मंदीरापाशी आता पुजेच्या, ओटीच्या सामानाची दुकाने उघडली होती. ते घेऊन आत दर्शनासाठी गेलो. रेणुका मातेसारखं दिसणारं अंबामातेचं रुप मनात भरलं. बाहेर येऊन परत एकदा पहाटे जिथे चहा घेतला होता, त्या हॉटेलात विसावलो. गिरनार वारीतील सर्व स्थळांचे दर्शन घेऊन झाले होते. आता परतीची वाट धरायची होती. कोल्ड्रींक घेऊन थोडा आराम केला. साधारण सव्वा आठ-साडे आठच्या सुमारास खाली उतरण्यास सुरुवात केली.
आता खरी कसोटी होती. उतरतांना अधिक त्रास होतो, पाय लटपटतात, पायांत गोळे येतात असे ऐकून होते. उतरायला सुरुवात केली आणि अगदी ८-१० पायर्या उतरताच उजव्या पायांत क्रँप आल्यासारखे वाटले. धस्स झालं. चढतांना अगदी पिसासारखी चढले होते. आता काय ? पायाची बोटे जरा हलवली. काही क्षण थांबले. बरं वाटू लागल्यावर पुन्हा उतरायला सुरुवात केली. पायांत गोळे ,पाय लटपटणे यांपैकी काहीच होत नव्हते. त्यामुळे हायसं वाटलं. आता फक्त एकच चिंता होती , ती उन्हाची. उन्हं प्रखर झाली की त्याची झळ लागणार. मला तर उन्हात गेलयावर त्रास होतोच होतो. त्यामुळे शक्यतो उन्हं चढायच्या आत खाली उतरण्याचा प्रयत्न करायचा असे ठरवले. माझी मैत्रीण अगदी सावकाश उतरत होती. तिच्याशी बोलले. तिच्या सोबत ग्रुपमधल्या काही जणी होत्या. त्यामुळे ती म्हणाली की तू पुढे झालीस तरी चालेल आणि मी पुढे निघाले. मध्ये-मध्ये वाटेत आमच्या ग्रुपमधले कु़णीतरी भेटत होते. उतरतांनाही थांबत, विश्रांती घेतच उतरलो.
एका ठिकाणी एक भली थोरली शिळा तिरप्या अवस्थेत - (४५ डीग्री च्या कोनात कललेली) आढळली. ती शिळा देवीमातेने आपल्या दोन्ही हातांनी धरुन ठेवली आहे असे मानले जाते. त्या स्थानावर देवीला हळदी-कुंकू, बांगड्या वाहिलेल्या दिसत होत्या.
आजूबाजूचे सॄष्टीसौंदर्य आता नजरेत भरत होते. उतरत असतांनाच काही फोटो काढले. सकाळच्या लख्ख प्रकाशात गिरनार डोळ्यांत साठवून घेत उतरत होतो. या अशा डोंगरातील गुहा अधेमधे दिसत होत्या.
आता विरुद्ध दिशेने चढून येणारी माणसे वाटेत दिसत होती. वर्दळ वाढत होती. ते लोक "दत्तात्रेय" पर्यंत चढून परत येताय का? कधी चढायला सुरुवात केलीत वगैरे चौकशी करत होते.
एका ठिकाणी जे पाहिलं ते बघून थबकलेच. एक कॄश अंगकाठीचा युवक एल पी जी सिलिंडर खांद्यावर घेऊन अनवाणी चढत होता, घामाने निथळत. त्यानंतर लगेच काही बायका सुद्धा मोठाल्या फरशा डोक्यावर घेऊन चढतांना दिसल्या. स्वतःची लाज वाटू लागली.
इथे यायचं म्हणून किती ते जीवाला जपलं होतं मी... ब्रॅण्डेड, अॅण्टीस्किड, कंफर्टेबल शूज निवडून घेतले होते, अशाच इतरही अनेक गोष्टी कंफर्ट देणार्या. स्वतःच्या कंफर्ट झोनमधून बाहेर यायचीच तयारी नसते नं आपली... इथे हे बिचारे कष्टकरी.... त्यांच्या पायांत साध्या चपलाही नव्हत्या नि शिरावर एव्हढं ओझं. मनात आलं आपल्याला मिळालेलं ‘व्ही आय पी स्टेटस’ हे या यात्रेपुरतं नसून त्या ‘दयाघनाने’ जन्मापासून आपल्याला बहाल केलं आहे. आपल्याला फक्त किंमत नाहीये त्याची. म्हणून तर साध्याशा मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टीचा आपण इतका बाऊ करत असतो. या कष्टकर्यांच्या रुपात खरोखर ‘देव दर्शन’ झाले आम्हा सर्वांनाच. इतर तीर्थस्थळांवर गर्दी करणार्या भिकार्यांपेक्षा हे लोक स्वाभिमानाने जीवतोड मेहनत करुन कष्टाची भाकरी मिळवत होते. मनोमन कडक सॅल्युट ठोकला त्यांना.
गिरनार यात्रेदरम्यान जाणवलेली एक खंत म्हणजे इतकं जागॄत देवस्थान असूनही हे फार दुर्लक्षित आहे. दुसर्याच दिवशी पाहिलेल्या सोमनाथ, प्रभास क्षेत्र येथील देवस्थानांचे वैभव बघता इथे तर किमान सुविधाही नाहीत. प्रसाधनगॄहही ९००० पायर्या चढून गेल्यावरच. सरकार इथे का लक्ष देत नाही? माहीत नाही. यात्रेकरुंसाठी नाही पण निदान इथल्या मजूरांचे असे अवजड सामान वाहून नेण्याचे कष्ट तरी दूर व्हावेत अशी मनोमन इच्छा आहे.
जैन मंदिरे दिसू लागली. त्या मंदीरांचे बाधकाम खूप सुंदर होते. गिरनारच्या पार्श्वभुमीवर ही जैन मंदीरे सकाळच्या उन्हात खूप लोभसवाणी दिसत होती. जैन मंदिरे
हळूहळू उन्हे चढू लागली. नेमक्या किती पायर्या उतरुन झाल्या, किती राहिल्या, कळत नव्हते. थोड्याच पायर्या आता शिल्लक राहिल्या असाव्यात असं स्वतःला समजावत मी उतरु लागले. अता कधी एकदा खाली पोचतोय असे होऊ लागले होते. साडेदहाच्या सुमारास उन्हाची झळ जाणवू लागली. मी थांबले एके ठिकाणी. सॅकमधून टोपी, गॉगल काढला. इलेक्ट्रलची पावडर पाण्यात घालून प्यायले. जरा बरं वाटू लागलं. पुन्हा उतरायला सुरुवात. आमच्या ग्रुपमधील एकाने गुढगे दुखू लागल्यामुळे उतरतांना डोली केली असे समजले. वाटेत प्रत्येक दुकानदार डोली हवी का? असे विचारत होता. “नाही, नाही” म्हणत मी आपली शक्य तितक्या लवकर उतरण्याचा प्रयत्न करीत होते. दहा- पंधरा पायर्या मग सपाट चौथरा, त्यापुढे वळण पुन्हा पायर्या, चौथरा, वळण ही रचना आता इतकी सवयीची झाली की डोळे मिटूनही तेच दिसू लागले.
वाटेत एका दुकानात मालिशचे तेल विकण्यास ठेवले होते. सांधेदुखीवर रामबाण औषध म्हणून. मागे माऊंट अबूवरील गुरुशिखरावर जातांनाही असेच मालिशचे तेल विकत घेतले होते, त्याचा आईंना बराच फायदा झाला होता. त्यामुळे इथेही २ बाटल्या घेतल्या. गिरनारवर शॉपिंग ही करुन झाले.
आता जमिनीपासूनचे अंतर कमी कमी होत चाललेले दिसले आणि आपण आता अगदी अंतिम टप्प्यात पोचलोय हे जाणवले. माझ्या ग्रुपमधील दोघे वाटेत भेटले. आम्ही तिघेही आता एकत्रच उतरत होतो.साडेअकरा वाजता पहिल्या पायरीवर पोचलो. रात्री साडेअकराला इथूनच सुरुवात केली होती. बारा तास पूर्ण झाले होते. परततांना पहिल्या पायरीवर डोकं टेकून आणि शेजारील हनुमानाला नमस्कार करुन सुखरुप नेऊन आणल्याबद्द्ल आभार मानायचे असतात. तसंच ग्रामदैवत भवनाथांचे दर्शन घेऊन त्यांचेही आभार मानायचे असतात. मगच यात्रा पूर्ण झाली असं समजलं जातं. त्यामुळे बूट काढले. पायरीवर डोके टेकायला म्हणून खाली वाकले, डोके टेकले, कंबर प्रचंड दुखत होती हे तेव्हा जाणवलं. कसंबसं उठून चढवावा हनुमानालाही नमस्कार केला आणि भवनाथ मंदीराकडे निघालो.
रस्त्यावर रहदारी वाढली होती. आमच्या हातातील काठी आणि एकूणच अवतार बघून लोक गिरनार चढके आये क्या? दत्तात्रेय तक गये थे क्या? अशी चौकशी करु लागले. हो हो म्हणत आम्ही कसे तरी स्वत:ला रेटत भवनाथ मंदीरात आलो. दर्शन घेतले. कितीही थकला असलात तरीही न जेवता झोपायचे नाही अशी सक्त ताकीद आयोजकांनी दिली होती. जेवण्याचे हॉटेल आणि कुपनही आदल्या दिवशी निघतांनाच दिले होते. त्यामुळे आम्ही तिघे त्या हॉटेलात गेलो. कसेबसे दोन घास खाल्ले आणि आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो. इथे परत २ मजले चढायचे म्हणजे दिव्य.... ते पार पाडलं. खोलीत आल्यावर फ्रेश झाले, एक क्रोसिन घेतली आणि पायांना रोल ऑन फासून झोपून गेले.
एकेक करत सारे परतू लागले. दुपारी दोन वाजेपर्यंत ग्रुपमधील सर्व खाली आले. आयोजकांनी एक मसाज करणारा माणूस बोलवून घेतला. तो प्रत्येकाच्या खोलीत जाऊन पायांना मसाज करुन देत होता. त्यामुळे खूप बरं वाटू लागलं.
सर्वांची गिरनार यात्रा पूर्ण झाली होती. यात्रा जरी पूर्ण झाली असली तरी या यात्रेआधी आणि त्या दरम्यान 'दत्तगुरुंशी' जुळलेली नाळ तशीच रहावी…..अगदी जन्मजन्मांतरीसाठी हीच इच्छा.
ही लेखमाला म्हणजे गिरनार वारीचे वर्णन आहे. पण ज्याप्रमाणे गिरनार वारी ‘दत्तगुरुंच्या इच्छेनेच’ घडते तसेच हे लेखनही. कारण बुद्धिदाताही 'तोच'. त्यामुळे हे लिहिणारी मी केवळ एक निमित्तमात्र, त्यानेच त्याला हवं तसं लिहून घेतलंय माझ्या हातून. असं असलं तरी या लेखनात अनवधानाने काही त्रुटी आढळल्या तर ते न्यून माझे समजून क्षमा कारावी.
शेवटी एकच सांगणे….
इदं न मम | इदं सद्गुरो:||
लेखनसीमा.
आयोजक - श्री. मंदार पाध्ये नंबर 99230 13375
गीर - सिंहांच्या देशात
अखेरीस ठरल्याप्रमाणे १६ जानेवारीला सकाळी आम्ही ११ जण टेम्पो ट्रॅव्हलर करून अहमदाबादहून सकाळी ६:१५ ला निघालो आणि दुपारी १:३० वाजताच्या सुमारास आमच्या हॉटेल वर पोचलो.
गीर - आशियाई सिंहांचे जगातील एकमेव नैसर्गिक वसतीस्थान. अहमदाबाद पासून साधारण ४००-४५० कि.मी. दूर - जुनागढ जिल्ह्यामध्ये आहे गीर अभयारण्य. १४३६ चौ. कि.मी. क्षेत्रफळाच्या या अभयारण्यात आजमितीला साधारण ४११ सिंह आहेत. आमच्या सफारी दुसर्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी होत्या - मुद्दामहून आम्ही त्या तश्या बुक केल्या होत्या कारण सकाळी लवकर आणि संध्याकाळी जंगली जनावरे दिसण्याची शक्यता जास्तं असते.
म्हणून पोचल्या दिवशी दुपारी आम्ही जवळ्च्या सासण गावात फेरफटका मारायला निघालो.
तिथे नदीकाठाजवळ काही पक्षी बघायला मिळाले.
एका छोट्या खारुताईचा झकास फोटो मिळाला.
दुसरा दिवस. सोमवार सकाळ - ६:१५ वाजता बर्फाळ गार वारं अंगावर घेत ओपन जिप्सी जीप्समधून आम्ही निघालो - सिंहांच्या देशात.
सुरवातीला spot झालं चितळ. ४११ सिंहाना पुरेसे भक्ष्य मिळावे म्हणून या जंगलात अंदाजे ४०००० चितळ, २०००-२५०० सांबरे आहेत.
आजूबाजूला दिसणारे विविध पक्षी बघत जंगल शोभेचा आनंद लुटत आम्ही चाललो होतो.
आणि मग तेवढ्यात आमच्या गाइडने दाखवले - pug marks - जंगलच्या राजाच्या पावलाचे ठसे.
आणि थोडे पुढे गेल्यावर दर्शन झाले जंगल च्या राजाचे. जेमतेम दहा ते पंधरा फुटांवरून जंगलामध्ये मुक्त असलेला सिंह बघणे हा एक अत्यंत रोमांचक आणि थरारक अनुभव आहे.
थोडे पुढे गेल्यावर दिसल्या महाराणी.
सिंह दिसल्याच्या आनंदात , तो थरार मनात ताजा ठेवत आम्ही होटेल वर परत आलो - सन्ध्याकाळच्या सफारी ला जाण्याच्या तयारीने.
दुपारी पुन्हा एकदा पहिल्यांदा दिसले सांबर.
आणि आमचं नशीब जोरावर असल्याचे परत एकदा सिद्ध झाले. आम्हाला परत "Lion Sighting" झाले - या वेळी दिसली एक सिंहीण तिच्या छाव्यासहीत.
तिथून थोडे पुढे गेलो आणि परत एक पूर्ण वाढलेली सिंहीण दिसली - अत्यंत जवळून.
गीर ला जाण्याचा मुख्य ऊद्देश आमच्या अपेक्षेबाहेर सफल झाला होता. आम्ही खरोखर नशीबवान होतो. आम्हाला दिसले त्याच्या आधी ४ दिवस कोणालाही सिंहांचं दर्शन झालं नव्हतं - इति आमचा गाईड.
ते खरं की खोटं ते माहीत नाही पण आम्हाला मात्र जंगलच्या राजाचं, राणीचं आअणि राजकुमाराचं एकदम जवळून झकास रोमांचक आणि थरारक दर्शन झालं.
अमिताभ बच्चन जाहीरातीमध्ये म्हणतो - "गीर की जंगलोंमें अपनेसे पंधरा फुट की दूरी पर जब शेर को देखा तो पैर जमींपर आ गये और अभिमान घुटनोपर". या वाक्याची सत्यता पूर्णपणे अनुभवायला मिळाली.
जमेल तेव्हा परत गीर ला यायचं असं मनाशी नक्की करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.