Thursday, October 20, 2022

तिरुपती - एक पर्यटन, तमिळनाडू - वारसा आणि ऐतिहासिक स्थळे पर्यटन.

 गाभा: 

तिरुपती - एक पर्यटन

आमची बरीच भटकंती सुरू असते त्यावरून नेहमी विचारणा होते की तिरुपतीला गेलात का? मग ठरवून टाकलं की करोना संपला की तिरुपती बघू. धार्मिक ठिकाणं म्हटली की गणपतीनंतरचा पितृपंधरवडा चांगला काळ असतो कारण गर्दी नसते. पण बालाजी वेंकटेशाच्या दर्शनासाठी जाणारच नाही तर या वेळी ठरवलं की नवरात्रात जाऊ. आणखी पुढे नेलं तर दिवाळी. मग नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये दुसरा पावसाळा इकडे सुरू होतो. शिवाय एकच एक ठिकाण ठरवून तीन चार दिवसांचे पर्यटन करणे धोक्याचे असते. याबरोबर तमिळनाडूतील कांचिपूरम, महाबलीपुरम ही जोडलं. कुठे काही संप, बंद,पाऊस झाला तर इतर ठिकाणे हात देतील. तमिळनाडूतला पावसाळा तर ओक्टोबर - नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये. मग नवरात्रात जाण्याचं नक्की केलं आणि तिरुपतीची माहिती काढायला सुरुवात केली.

काही लोक दरवर्षी तिरुपतीला जाणारे आहेत पण आम्ही प्रथमच जात आहे म्हणजे अगदी नवखे.पूर्वीच्या आंध्रप्रदेशात अगदी दक्षिणेकडे तिरुपती आहे. नंतर आंध्रप्रदेशचे दोन भाग झाल्यावरही आंध्रातच राहिले. जुनी राजधानी हैदराबाद ही नवीन तेलंगण राज्यात गेली. हा आइटीक्षेत्राचा विशेष भाग मिळाला तरी तिरुपतीसारखे श्रीमंती धार्मिक ठिकाण गेल्याने तेलंगणास दु:खच झाले. ते आता दुसरे एक धार्मिक ठिकाण बांधून भाविक खेचणार आहे. मोठा निधी दिला आहे.

तिरुमला/तिरुमलै (तिरु =श्री ,मलै=पर्वत) हे स्थान कसे निर्माण झाले याविषयी पुराणांमध्ये अनेक आख्यायिका आहेत.

कथा पहिली
विष्णूचा तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार. एकदा प्रलय होऊन पृथ्वी बुडाली तेव्हा विश्वाचा तारणहार विष्णू याने श्वेत वराहाच्या रूपाने येऊन पृथ्वीस सागरातून वर आणले आणि या पर्वतावर विश्रांती घेतली. त्यामुळे या स्थानास श्री वराह स्वामी क्षेत्र म्हणू लागले. किंवा आदि वराह क्षेत्र.

कथा दुसरी
वैकुंठाला सुखी स्थानाचा कंटाळा येऊन विष्णूने नारदमुनीस विचारले की दुसरी कोणतीतरी जागा सुचवा. तेव्हा नारदमुनीने शेषाचलम ही जागा सुचवली. शेषाचे सात फणे म्हणजे इथली सात शिखरे होत. तिरुमलैला शेषाचलमही म्हणतात.

कथा तिसरी
एकदा ऋषिमुनींनी एक मोठा यज्ञ करायचे ठरवले पण यज्ञ देवता कोण असावी यावर त्यांचे एक मत होईना. मग भृगू ऋषी म्हणाले की मी घेऊन येतो एका देवाला. प्रथम ब्रह्माकडे गेले तर त्यांच्या तीनही तोंडांनी लक्षही दिले नाही. मग भृगू गेले कैलासावर महादेवाला बोलवायला. पण महादेव पार्वतीशी बोलण्यातुन गुंग होते. मग पोहोचले वैकुंठाला. महाविष्णू लक्ष्मीची बोलण्यात मग्न. भृगूला आला राग. त्याने विष्णूच्या छाताडावर मारली लाथ. विष्णू जागे होऊन पाहतात तर समोर संतापलेले भृगू. विष्णूने भृगूची करुणा भाकली, पाय धरले आणि आपल्या पायाला लागले तर नाही ना विचारले. भृगुला आली विष्णूची दया आणि क्षमा केली. पण लक्ष्मीची आश्रय स्थान असलेल्या जागीच लाथ बसूनही विष्णूने काहीच केले नाही म्हणून लक्ष्मी वैकुंठ सोडून करवीर क्षेत्री म्हणजे कोल्हापुरात येऊन राहिली. ( रेल्वेने यांची नोंद घेऊन कोल्हापूर ते तिरुपती अशी हरिप्रिया एक्स्प्रेस सुरू केली आहे.) तिकडे वैकुंठाला विष्णूला कंटाळा आला आणि तो नारदाच्या सुचवणीनूसार शेषाचलम पर्वतावर येऊन एका मुंग्यांच्या वारुळात 'श्रीनिवास' रूपात राहिला. म्हणून हे तिरुमलै श्रीनिवासम क्षेत्र. पुढे लक्ष्मिला आपल्या पतिदेवाची काळजी लागून एका गायीला तिथे घेऊन फिरू लागली. त्या वारुळापाशी येऊन ती पान्हा सोडत असे. ही गाय तिथल्या एका राजाला देऊन लक्ष्मी कोल्हापुरात परतली तरी गाय आपले काम करतच राहिली. राजाच्या गुराख्याने ही गोष्ट राजाच्या कानावर घातली तेव्हा राजाने गायीला काठीने मारले. श्रीनिवास तिथून बाहेर आले आणि गायीच्या अंगावरचे काठीच्या माराचे वळ त्यांच्या देहावर पाहून राजा वरमला आणि क्षमा मागू लागला. मग विष्णूने त्यास सांगितले की ठीक आहे तुझ्या वंशाच्या एका राजास मुलगी होईल तेव्हा तिच्याशी लग्न करेन. तर तो राजा आकाश राजा आणि त्याची मुलगी पद्मावती. आणखी एका आश्वासनाने कृष्णाचा प्रतिपाळ करणाऱ्या यशोदेला विष्णूने वचन दिलेले की मी तुला पुढे एकदा दिव्य दर्शन देईन. त्याप्रमाणे यशोदा ही सांप्रत काळी वकुळादेवी म्हणून अवतरली. ती या 'श्रीनिवासाचे' स्थळ घेऊन आकाश राजाकडे पद्मावतीसाठी मागणी घालायला गेली. आणि श्रीनिवासाचे पद्मावतीशी लग्न झाले. (या पद्मावतीचे देऊळ तिरुपती गावापासून पाच किमी.वर कांचिपुरम रस्त्यावर आहे. )

एकूण तिरुमला/तिरुपती माहात्म्य पुराणांत आहे. आताच्या श्रीनिवास/ वेंकटेशा यापेक्षा वराह अवताराचे स्थान म्हणून आद्य आहे.

फोटो १
वराह स्वामी पुष्करणी, तिरुमलै

पुराणांत विविध पवित्र क्षेत्र आणि स्थानांचा उल्लेख असला तरी देऊळ ही कल्पना बहुधा थोडी उशिरा आली असावी.

तिरुमला आणि तिरुपती येथील देवळे
ऐतिहासिक आढावा.

पाचव्या शतकात पल्लव राजांनी ही देवळे बांधली. नंतर चोल राजांनी त्यात भर घातली. सोळाव्या शतकात विजयनगरच्या राजांनी त्यास गढी बांधून ,उंच गोपूरे बांधून भव्य दिव्य केलं.

अकराव्या शतकानंतर हिंदु राजांच्या राजवटी संपून मुसलमान,मोगल,ब्रिटीश राजवटी आल्या. देवळांची तोडफोड इकडे झाली नाही. ब्रिटिशांनी धार्मिक कार्यक्रमांतून बाजूला झाल्यावर या देवळांची व्यवस्था हाथीरामजी मठास सोपवण्यात आली. ती १८४३ ते १९३३ नव्वद वर्षे पाहात होते. नंतर देवस्थान कमिटी निर्माण केली गेली. १९८७ मध्ये सर्व कारभार आंध्र प्रदेश सरकारकडे गेला. त्यांनी मंडळावर कमीतकमी तीन आइएएस अधिकारी नेमले. ते धार्मिक सुसुत्रता,स्वच्छता, पर्यटन,सुरक्षा पाहतात. ( ते तिथे गेल्यावर लगेचच जाणवते.)

कुठे राहावे

याविषयी यूट्यूबवर खूप विडिओ आहेत. ते पाहून एक लक्षात आले की इतर शहरांत जशी हॉटेल्स आणि रेस्टारो आहेत तशी इथेही भरपूर आहेत पण देवस्थान कमिटीच्या निवासाची व्यवस्था पाहून ठरवून टाकले की एक दिवस तरी ( एकच दिवस खोली मिळते) या खोलीत राहून अनुभव घ्यायचाच. तो घेण्याचा योग आला आणि तिथली स्वच्छता आणि अगत्य पाहून तिथेच देव भेटला.

देवस्थानच्या रुमस बुकिंग विषयी.
आणि दर्शन पास.
देवस्थानच्या वेबसाइटवरून ( https://tirupatibalaji.ap.gov.in/ )ऑनलाईन रूम्स बुकिंग करता येते पण ते लवकर भरते. या रूमस 'श्रीनिवासम कॉम्प्लेक्स' ( बस स्टेशनजवळ,समोर) या इमारतीत असतात. आगावू बुकिंग न मिळाल्यास तिरुपती स्टेशनजवळच्या 'विष्णू निवासम' मध्ये करंट/ऑफलाईन बुकिंग होते. यासाठी राहणाऱ्या सर्वांना तिथे हजर राहून आधार कार्डस द्यावी लागतात. रूमचे भाडे रोखीने घेत नाहीत. कार्ड पेमेंटच करावे लागते. ( साधी नॉन एसी रु३४०,एसी ५००,डिलक्स ८००.)फक्त २४ तासांसाठी रूम मिळते. गर्दी नसल्यास दुसरे दिवशी आणखी २४तास इक्स्टेन्शन मिळू शकते. पण अगोदरच दोन दिवसांचे बुकिंग मिळत नाही. नियम बदलतात. खासगी हॉटेल्स तीन बेडचे १३०० रु घेतात,एसी रु दोन ते अडीच हजार १८टक्के टॅक्ससह. एकदम दोन तीन दिवसांसाठी रुम घेता येते हा फायदा. तिरुपतीमधल्या हॉटेलवर सर्व लगेच ठेवून फक्त एक लहान बॅग घेऊन तिरुमला'ला जाऊन येणे सोयीचे पडते.

दर्शनाचे तीन प्रकार आहेत.
१)दिव्य दर्शन - हे अलिपिरी फुटपाथ उर्फ सोपान वरून ३५०० पायऱ्या चढून तिरुमला'ला येतात त्यांना थेट दर्शन मिळण्याची सोय आहे. एक लाडू प्रसाद फुकट मिळतो.
२)सर्व दर्शन - फ्री. पण कितीही वेळ लागू शकतो.
३) स्पेशल दर्शन तिकिट - हे रुपये तिनशे भरून ऑनलाईन बुकिंग
https://tirupatibalaji.ap.gov.in/ या साइटवर होते. थोडे लवकर दर्शन होते. बुकिंग पुढच्या महिन्याचे अगोदरच्या महिन्याच्या पंधरा तारखेस उघडते. पण ते अर्ध्या तासात संपते.
या सर्व दर्शनाचे मिळून साधारणपणे वीस तासांत ऐंशी हजार लोकांना दर्शन मिळते.

कसे जावे
इथून बेंगळुरू केंपेगौडा विमानतळ २४० किमी.
चैन्नई विमानतळ १३० किमी आहे. सोयीचा.
रस्त्याने - सर्व मुख्य शहरांना जोडले आहे. रेल्वेचे तिरुपती स्टेशन गावातच आहे. रेनिगुंटा हे स्टेशन मुंबई -चेन्नई या मेन लाईनवर दहा किमी दूर आहे. तिरुपती -रेनिगुंटा -श्री कालाहस्ती या मार्गे खासगी आणि राज्यपरिवहनाच्या बसेस दर दहा मिनिटाला असतात. थेट टॅक्सीही आहेतच.

फोटो २
तिरुपती रेल्वे स्टेशन परिसर

याविषयीचे यूट्यूबवरचे विडिओ पाहून तिरुपतीमधून तिरुमाला पर्वतावर कसे जाता येते याची पूर्ण माहिती मिळाली. अल्लीपिरी सोपान मार्गे पायी चढून जाणाऱ्यांना विशेष महत्त्व दिले आहे. माझा तसेच करण्याचा विचार होता पण मी एकटा नव्हतो म्हणून बेत रद्द केला. तसा तिरुमला फार उंचावर नाही. ८२०मिटरस आहे, म्हणजे माथेरानपेक्षा शंभर मिटरस जास्ती. मध्यंतरी करोना काळात वरती गर्दी होऊ नये म्हणून एक नियम करण्यात आला होता. तुमच्याकडे दर्शन पास/तिकिट असल्याशिवाय बसने/वाहनाने वर जाऊ देत नव्हते. आता तो नियम काढला आहे. वर जाताना वाटेत लगेजची तपासणी केली जाते. पाण्याच्या वन-टाईम-यूस प्लास्टिक बॉटल्स नेता येत नाहीत. सध्या करोना मास्क बंधन काढले आहे.

खादाडी
संपूर्ण तिरुपती परिसर शाकाहारी आहे. इडली,वडे,डोसे आणि फक्त भात, सांबार, रसम,भाजी असलेली थाळी मिळते. एका ठिकाणी आंध्रच्या चटण्या, गुंगरा का खट्टा आचार आणि तेल मिळाले. इकडे सर्व पदार्थ केळीच्या पानावरच वाढले जातात. मेनू पाहून परोठा,नान, पंजाबी जेवण, महाराष्ट्रीय पिठलं भाकरी मिळण्याची रेस्टारोंही आहेत. आवडता चहा चांगल्या दुधाचा कुठेही/रेस्टारोंतही पंधरा रुपये फुल कप. मजा.

प्रसाद
फोटो ३
श्री वेंकटेशा बालाजी मंदिर बाहेरून

फोटो ४
श्री बालाजीचा रथ

हे महत्त्वाचे. आम्ही काहीही खटपट करून दर्शन करायचेच असे ठरवून गेलो नव्हतो. दहा मिनिटांत कुठे आत जाऊन येता येत असेल तिथे पर्यटन म्हणूनच जाणार होतो. नवरात्रानिमित्त ब्रह्मोत्सव सुरू होता. रात्री नऊला रांगेत राहिलेले भाविक सकाळी दहाला दहा सेकंदांचे दर्शन घेऊन बाहेर येत होते. देवाच्या दर्शनापेक्षा प्रसादाचे महत्त्व अधिक असते. ते मात्र मागच्या दाराने साध्य केले. चार लाडू मिळवले ( विकत घेतले.) नेहमिचेच बुंदीचे लाडू आहेत. आदि वराह स्वामी मंदिर आणि स्वामी पुष्करणी येथे गर्दी नव्हती ते पाहिले. इतके बारा तास रांगेत घालवलेले भाविक अन्नप्रसादमकडे जात होते. खूप गर्दी.

फोटो ५
तिरुमलै पर्वत, तिरुपती शहरातून

फोटो ६
तिरुमलै प्रवेश करताना एक कारंजा

चार तासांत तिरुमला आटपून खाली रूमवर विष्णू निवासमला आलो. तिथेही अन्नप्रसादमची सेवा आहे. दहीभात देतात हवा तेवढा. गर्दी नाहीच.( तिरुमलाच्या अन्नप्रसादम सेवेत संपूर्ण जेवण थाळी मिळते.)

इतर देवळे
तिरुपती रेल्वे स्टेशनला लागूनच श्री गोविंदराव स्वामी मंदिर आणि जत्रा बाजार आहे. ते शांतपणे पाहू शकतो. देऊळ हजार वर्षे जुने आहे, मोठे उंच (४०मिटरस)गोपूर आहे. तिरुमला पर्वतावर बघण्याची ठिकाणे आणि खाली तिरुपती मधील देवळे यांच्या देवस्थानच्या तसेच खासगी टुअरस आहेत. त्यांचे यूट्युबवरचे विडिओ पाहून आणि हाताशी असलेला वेळ याप्रमाणे अधिक पर्यटन शक्य आहे. वरच्या एका टुअरमध्ये मलबारी शेकरु पाहायला मिळते. वन्य प्राण्यांना खायला घालू नका अशा सूचना असतानाही त्या शेकरुंना भाविक लोक खायला देतानाचा विडिओ होता.तो आता Traveling Tadka channel ने काढून टाकला आहे.

फोटो ७
गोविंदराव स्वामी मंदिर, तिरुपती.

तिरुपती मध्येच तिरुमला वरून खाली येताना वाटेवरच पर्वताच्या पायथ्याशी (रेल्वे स्टेशनपासून तीन किमी) कपिलतीर्थ/कपिलेश्वराचे रम्य देऊळ आहे. छानसा धबधबा आणि पुष्करिणी आहे. ही फारच सुंदर जागा आहे. ही चुकवू नये.

फोटो ८
कपिलतीर्थ

पद्मावती मंदिरास गेलो नाही.
दुसऱ्या दिवशी तिरुपती पासून तीस किमी अंतरावर चे श्रीकालाहस्ती हे देऊळ पाहिले. इथे राहुकेतू दोष निवारण पूजा होतात त्यामुळे भाविकांची सतत येजा असते.

फोटो ९
श्री कालाहस्ती प्रवेश

विशेष - इथल्या ओटो रिक्षांना भाडेमिटर नाहीत. साठ रु/ किमी या भावानेच प्रवास करावा लागतो. बाकी धार्मिक ठिकाणी खर्च व्हायचाच. .

फोटो १०
पुष्करणी, तिरुपती. मागे रोषणाई केलेलं विष्णू निवासम.

पाऊस कुठे आला नाही आणि पर्यटन छान झाले.
(२,३,४,ऑक्टोबर २०२२.नवरात्र काळातले पर्यटन.)
 
 तिरुपती डोंगराखाली पद्मावतीचे मंदीर आहे. तेथे बालजीचे आणि पद्मावतीचे लग्न लागते. हा सोहळा रोज होतो.
या मागची कथा आहे की विष्णू ने राम अवतारात पद्मावतीला वचन दिले होते. ते वचन पूर्ण करण्यासाठी विष्णू ने बालाजी हा अवतार घेतला
तिरुमलै पर्वत आणि परिसर पाहण्याची जेवढी उत्सुकता होती तेवढी बालाजी दर्शनाची नव्हती.
घाटात दोन्ही बाजूंनी जी झाडे आहेत ती बरीच परदेशी वाणाची आहेत. आतल्या भागात भारतीय वनातली आहेत. झाडी मात्र दाट आहे.

भाषा कोणती? तिथले लोक तेलुगूच बोलतात. पण आपल्याला विचारतात तेलुगू?/तमिळ?/इंदी?/इंग्लिश?
भाविकांच्या गटात पंधरा टक्के महाराष्ट्रातून,पंधरा हिंदी भाषिक,तीस तेलुगू,तीस तमिळ वाटले. मराठी लोक नांदेड,लातूर भागातले शेतकरी अधिक. पंधरा -वीस तीस लोकांचे गट आणि एक म्होरक्या. हॉटेल रूम घेत नाहीत, विष्णू निवासाच्या दोन मजल्यांवर फरशीवरच राहतात. ऐसपैस जागा, थंड पाणी, स्वच्छता गृहे आहेत सोयी. मोठा गट असल्याने लगेजची चिंता नसते, लॉकरस घेत नाहीत. इथेही अन्नप्रसादम ( म्हणजे फुकट अन्न) देतात. फक्त दहीभात असतो, कितीही मिळतो. चांगला असतो.

महाप्रसाद कांदा लसूण नसलेला म्हणजे पुरी - भूबनेसरचा (भूवनेश्वरचा). उत्तम आहार असतो.

बालाजीच्या गर्दीचा बाऊ करण्यात अर्थ नाही..
प्रत्येक ठिकाणी वेटींग साठी रूम्स असतात, तिथे बाथरूम , खाण्याची , मुलांना दूध वगैरे सोय असते . अशा हॉल मधून थांबत थांबत पुढे जायचे असते . शेवटी अर्धा तास उभे राहावे लागते.
काही हॉल मध्ये स्क्रीन असते .. तिथे पौराणिक चित्रपट असतात..

लहान मुले, वृद्ध असतील तर डायरेक्ट दर्शन मिळते .

आपल्या पुराणात जसे नाममहात्म्य तसेच स्थानमहात्म्य आहे.
त्यामुळे मी घरीच बरा, तिथे जाऊन काय वेगळे वगैरे पब्लिक असता त्यांना फाट्यावर मारून एकदा दर्शन घेण्यासाठी नक्की जावे

 एक पत्रकार म्हणून जाऊन आलो. अगोदरच्या पंधरवड्यात/पितृपंधरवड्यात तासाभरात दर्शन मिळत होते असे कळले.
 

 

 

तमिळनाडू - वारसा आणि ऐतिहासिक स्थळे पर्यटन.

यामध्ये वेल्लोर, कांचिपूरम आणि महाबलीपूरम (मामल्लापूरम )या स्थळांना सप्टेंबरच्या (२०२२)शेवटच्या आठवड्यात भेट दिली होती. तिरुपतीची सहल याबरोबरच केली. तमिळनाडू भागात पावसाळा ऑक्टोबर ते डिसेंबर असतो. तर तिरुपतीला मॉन्सूनसह या महिन्यांतही पाऊस पडतो. चार पाच ठिकाणं घेण्याचा उद्देश असा की एखादं ठिकाण पावसामुळे रद्द झालं तरी इतर पाहून ऐंशी टक्के पर्यटन व्हावं. सर्व ठिकाणी देवळंच आहेत आणि शिल्पांची गर्दी. वेल्लोरचा किल्ला हे एक धार्मिक नसलेलं ठिकाण, परंतू या किल्ल्यातही एक सुंदर देऊळ आहे. ही धार्मिक ठिकाणं ऐतिहासिक कशी हा प्रश्न पडतो पण तिथे असलेले शिलालेख आणि काही शिल्पं इतिहासाची नोंद करतात.

तमिळनाडू राज्यात पाच प्रकारची पर्यटन स्थळे आहेत.
१) धार्मिक - देवळे. भरपूर आहेत आणि सर्व देवळे पुजेत आहेत. काहींना वारसास्थळे म्हणता येईल.
२) हिल स्टेशन्स . उटकमंडलम, कोडाईकनाल, येराकूड, वेलापराई वगैरे.
३)वने आणि निसर्ग. - मुदुमलाई, वेदांतंगल वगैरे.
४)भौगोलिक - कन्याकुमारी दक्षिण टोक, रामेश्वरम् सेतू वगैरे.बंदरं
५) ऐतिहासिक - किल्ले,बंदरं वगैरे. वेल्लोर, चेन्नई,पुमपुहार बंदर.

जावे कसे / सहल आराखडा

चेन्नई ते महाबलीपूरम ६०किमी.

चेन्नई ते कांचिपूरम ७५किमी.

चेन्नई ते वेल्लोर १४०किमी.

कांचिपूरम ते महाबलीपूरम ७०किमी.

कांचिपूरम ते वेल्लोर ७०किमी.

कांचिपूरम ते तिरुपती (आंध्रप्रदेश ) १२० किमी

राहावे कुठे?

सर्व बजेटची हॉटेल्स आणि लॉजही आहेतच. कांचिमध्ये राहिल्याने देवळे बघणे आणि वेल्लोर,महाबलीपूरम पाहून येणे सोपे झाले. या भागांत रस्ते चांगले मोठे होते आणि ट्राफिक नव्हते.

ही अंतरे पाहिल्यावर असा विचार येईल की फ्लाइटने चेन्नई गाठावे, तिथे राहावे आणि रोज एका ठिकाणी जाऊन परत चेन्नई हॉटेलवर यावे. पण यात महाबलीपूरम ठीक आहे. कांचिपूरम शक्य नाही कारण तिथली देवळे अकरा ते साडेचार बंद ठेवतात. त्यामुळे कांचिपूरमला तीन दिवस राहाणे सोयीचे पडते. इथे जवळपास एक हजार देवळे आहेत. त्यातली पाच अगदी मुख्य. कांचि रेल्वे स्टेशन ते बस स्टेशन एवढ्या परिसरातच आहेत.
तमिळ भाषेत 'कोईल' म्हणजे राजवाडा. पण आता देऊळ या अर्थी रूढ झालेला शब्द.

पहिला दिवस -

१.कामाक्षी अम्मन कोईल. - भाविकांचे आवडते. कांचिचे मुख्य देऊळ.
२.एकांबरेश्वरार -अति भव्य गोपूर, ३५०० (?)वर्षे जुने आंब्याचे झाड आहे. मोठ्या खांबांचा प्रदक्षिणा मार्ग.
#.कांचीकामकोटी पीठम.- आद्य शंकराचार्यांनी स्थापलेला मठ. ही इमारत आताच बांधलेली वाटते. जुन्या मठाभोवती बाधकाम वाढवत नेले असावे.
३. उलगराज पेरूमल कोईल ( वामनावताराचे देऊळ) .
ही चारही कोईल जवळ जवळ आहेत.

दुसरा दिवस

कांचिपूरम ते चेंगलपट (चेंगलपट्टू), चेंगलपट ते महाबलीपूरम. सत्तर किमी.या प्रवासात वाटेत तिरुक्कुळकुंद्रन'ची टेकडी आणि गाव येते. (इथेच प्रसिद्ध पक्षीतीर्थ आहे. तिथे थांबलो नाही.)
सकाळी महाबलीपूरम जाऊन पाहून चार वाजता परत येताना कांचिपूरममध्ये असलेले

Mahabalipuram

((मोबाईलवर पाहण्यासाठी लिंक
Mahabalipuram
https://youtu.be/9CsZkXgcPZE ))

४) 'वरदराज पेरूमल कोईल' चार ते सहा पाहाणे. - पुजेत असलेले महा विष्णू मंदिर. इथे पुष्करणीत असलेल्या सभामंडपात शिल्पे आहेत. अखंड कोरीव चार दगडी साखळ्या आहेत. मंदिराच्या आत फोटोग्राफी करता येत नाही. मार्गात अंधार आणि गिचमिड आहे परंतू खूप भित्तीचित्रे आहेत. तसेच एक सोन्याचे पाणी दिलेली दीड फुटी पाल आहे त्याचे दोन रुपये तिकिट घेतात. विष्णू आणि पाल यांचा पौराणिक संबंध काय हे माहीत नाही. परंतू बऱ्याच विष्णू देवळांच्या भिंतींवर पाली कोरलेल्या सापडतात. हंपीतल्या उत्कीर्ण विष्णू मंदिरावरही पाल आहे. भाषेच्या अडचणीमुळे पुजाऱ्यांना विचारता आले नाही.

कांचितील देवळे.

(( मोबाईलवर पाहण्यासाठी लिंक
Temples
https://youtu.be/q0EzIZr-nY4 ))

तिसरा दिवस

सकाळी वेल्लोर आणि परत चारला आल्यावर कैलासनाथार कोईल. हे आणि वैकुंठ पेरूमल कोईल ही सर्वात जुनी देवळे आहेत.
कैलासनाथार कोईल. - आठव्या शतकातील द्रविड शैलीतील छोटेसे मंदिर. जे भव्यतेत नाही ते इथे शिल्पकलेत साधले आहे. वालुकाश्म दगडातली शिल्पे झिजू लागली आहेत. ठसठशीत मोठी ५८ शिल्पे. मूर्तींवर भाव आहेत. एकूण तीन भाषांत शिलालेख आहेत.जुनी तमिळ,जुनी उडिया आणि संस्कृत. ऐतिहासिक वारसाच.
दिवसभर पाहता येते. वेल्लोर रस्त्यावर 'काशिभिष्वर कोईल' (काशी विश्वेश्वर कोईल) आहे तिथून दोन किमी आत कैलासनाथार कोईल आहे.

वेल्लोर आणि जलकंठेश्वर

(( मोबाईलवर पाहण्यासाठी लिंक
Vellore fort and Jalkantheshwar koil.
https://youtu.be/HcvFglGMlHY ))

Photo slideshow, Kailasnathar koil.

(( मोबाईलवर पाहण्यासाठी लिंक
Kailasnathar koil.
https://youtu.be/8aAFUti_eco ))

वैकुंठ पेरूमल कोईल - हेसुद्धा आठव्या शतकातील आहे पण वेळेअभावी पाहायचे राहिले.

चौथ्या दिवशी

कांचिपूरम ते तिरुपती. तिथे दोन दिवस राहून घरी परत.याचा दुसरा वेगळा लेख लिहिला आहे.

सप्तपुरींतील एक कांचिपूरम म्हणजे खूप जुने शहर. धार्मिक आहेच पण रेशमी वस्त्रे उद्योगही जुनाच आहे. तो पाहिला नाही परंतू कांचिपूरम पद्धतीच्या(कृत्रिम रेशमाच्या) साड्या हजार - दोन हजारांत मिळतात त्या सहा घेतल्या. खऱ्या रेशमाची साडी पंचवीस हजारांपुढे सुरू होते. कांचिमध्ये भाषेची अडचण येते.तमिळच बोलतात. साडी दुकानदार मात्र हिंदीत बोलतात. थोडी तात्पुरती तमिळ शिकलो ती बोललो.
(Learn Tamil through English, by Agurchand Babu channel.)

खादाडी -

एका ओळीत सांगायचं तर रसम, सांबारम, भातम. इटली, वडै, डोसै.

इतर टिप्पणी -

तमिळनाडूत गेलो नव्हतो. (म्हणजे तसं उटी आणि कन्याकुमारी झालं होतं) पण ,मदुरै,रामेश्वरम् करण्याचा विचार होता. ते खूप दूर आहे. अगोदर जवळचे पाहू आणि ठरवू म्हणून ही सहल काढली. त्यावरून देवळांची कल्पना आली. मदुरै,रामेश्वरम् जाण्याची गरज नाही हे ठरले. चेन्नई तर शहरच आहे ते बादच केले. देवळे आणि शिल्पे आवडत नसतील त्यांनी ही सहल करू नये.

फोटो - लेखामध्ये अडिचशे फोटो देणे शक्य नाही म्हणून फोटो स्लाईड शो करून यूट्यूबवर देण्याचा नवीन प्रयत्न केला आहे. शिल्पांची थोडी कल्पना येईल हा हेतू. शिल्पांचे फोटो असल्याने पोर्ट्रेट आस्पेक्ट ३:४ मध्ये काढले आहेत. मोबाईलवर बरे दिसतात. प्रयोग आहेत. सुधारणा करू. सवडीने पाहा आणि अभिप्राय द्या. फोटोंना क्रमांक दिले आहेत त्या संदर्भाने विचारणे सोपे जाईल. जीमेल स्टोरेज १५जीबी फ्री असले तरी अडिचशे फोटोंनी बाराशे एमबी अडवले असते आणि लेखात दहा पंधरा फोटो देऊन चालणार नाही म्हणून स्लाईडशो. विडिओ काढले आहेत पण ते जोडण्याचे सॉफ्टवेअर मोबाईलला नसते. असो.
 

पर्यटकांनो सावध! .... अर्थात टूरीस्ट ट्रॅप्स

  नुकतेच गोव्याला गेलो होतो तेव्हाचा अनुभव. या धाग्याची सुरवात करण्यास तो अनुभवच कारणीभूत ठरला आहे.


गोव्याला 'बिगफूट' या ठिकाणी एका एका ग्रुपला आत सोडतात आणि तिथे मांडलेले देखावे बघताना मागे त्या देखाव्यांचं वर्णन करणारी कॅसेट सुरू असते. प्रत्येक ठिकाणी काही मुली उभ्या राहून आता या देखाव्याचं वर्णन आहे, ते जे कॅसेटवर सांगताहेत ते इथे दाखवलं आहे वगैरे सांगत असतात. आम्हीही असे फिरत होतो. ते देखावे सुरू असतानाच मध्येच मार्ग एका सुवेनीर शॉपमधून जातो. (का ते ईश्वराला माहित!). तर आम्हीही त्या दुकानात घुसलो. काही वेळानी बाहेर आलो तर पुढे जो देखावा होता तिथे कॅसेट सुरूच नव्हती. आवाज कुठून भलत्या ठिकाणीच सुरू होता. आणि तिथे असलेली गाईड आपल्या इतर मैत्रिणींबरोबर गप्पा मारत बसलेली. तिला विचारलं की हे काय? तर म्हणे तुम्ही दुकानातून उशीरा आलात म्हणून ती ऑटोमॅटिक कॅसेट आपल्या वेगानं पुढे गेली. आता तुम्ही पुढे जाऊन ऐका. पण मग या इथल्या दॄष्यांचं काय? तर म्हणे तो चान्स गेला. दुकानात जाण्यापूर्वीच्या कॅसेटवरच्या निवेदनात दुकानात फक्त २ मिनिटं थांबा असं आहे म्हणे. हे आम्ही ऐकलच नव्हतं. आता देखाव्यांचं वर्णन सुरू असताना मधेच दुकानात किती वेळ थांबायचं हे सांगण्याची आयडियाही भारीच. शिवाय त्या दुकानाच्या आधी एक मुलगी एका प्रकारच्या दिव्यात तेल कसं घालायचं आणि मग तो सुलट केला तरी तेल कसं पडत नाही याचं प्रात्यक्षिक करून दाखवते. ते बघत असताना 'दुकानात केवळ दोन मिनिटं' ही सुचना कशी कानी पडणार? पण आम्हीही खट असल्याने पुढचा गृप येईपर्यंत तिथेच थांबलो आणि उरलेलं वर्णन पुन्हा ऐकलं. त्या गाईड मुली वैतागलेल्या वाटल्या. माझ्यामते ही प्रवाशांची फसवणुकच आहे.
     मी हैदराबाद्ला फिरायला गेलो होतो. जाताना एका हॉटेलच बुकींग अ‍ॅडव्हान्स पाठवुन केल होत. हॉटेलमधे दुपारी १:३० वाजता मधे पोचल्यावर रिसेप्शन मॅनेजरने मला जवळच्या रेस्टॉरंट मधे जेऊन यायला सांगितल. दुपारचे चार वाजले तरी रुम मिळेना. गोडित विचारल तर रिसेप्शन वाला मॅनेजरने फिरुन या, तुमच सामान क्लॉक रुम मधे ठेवा अस सांगितल. मग मात्र मी त्याला धुतला.
      शेवटी मीच अस म्हणालो की ए.सी. रुम नसेल तर साधी द्या पण रुम पाहिजेच. यावर तो म्हणाला हे आधी सांगितल असत तर दिली असती की. मी म्हणालो पण ए.सी. रुम बुक करुनही का नाही मिळाली ? यावर तो म्हणाला की आज जे पॅसेंजर जाणार होते त्यांनी मुक्काम वाढवला. त्यांना हाकलुन कस देणार ?
     हे खर की सिझनला माझ्यापेक्षा जास्त रेट देणार दुसरा कस्टमर मिळाला हे परमेश्वर जाणे. शेवटी साध्या रुम मधे तीन दिवस राहिलो.
दुसरा एक प्रसंग. यात आम्ही अक्षरशः पोळून निघालो आणि तरीही खुप हसलो देखिल. रागही येत होता आणि भारी विनोदी प्रसंगही घडला. त्याची कहाणी.

आम्ही काही नेहमी शिर्डीला जाणारे नाही. अनेकानेक वर्षांपूर्वी शाळेतून ट्रिपला गेले होते त्यानंतर गेल्या वर्षी गेलो. आमची कार जरा कमी गर्दीचा भाग पाहून थांबली. उतरतोय नाही तर एक माणूस धावत आला आणि 'चला चला, ४ नंबरच्या गेटवरून थेट दर्शन होतय' असं सांगत आम्हाला विचार करायची संधीही न देता घेऊन गेला. त्याच्यामागोमाग आम्ही पटापट गेलो. तो आधी त्याच्या दुकानात आम्हाला घेऊन गेला. चपला काढायला सांगितल्या आणि देवाकरता ताटं आमच्या हातात कोंबली. त्यात काहीबाही नेहमीच्या वस्तु होत्या. शाल पण घालून ताटाचं वजन आणि पैसे वाढवण्याचा त्याचा मनसुबा आम्ही तेवढ्यात हाणून पाडला. आणि मग आम्हाला दर्शनाकरता त्या सुप्रसिध्द ४ नंबरच्या गेटकडे सन्मानपूर्वक घेऊन जाण्याऐवजी केवळ हाताने दिशा दाखवण्यात आली.

आम्ही अनवाणी निघालो. मनात विचार करत होते की काय ही साईबाबांची कृपा. ज्या गेटमधनं दर्शन सुरू आहे त्याच गेटसमोर आपली कार थांबली. Happy तर ते ४ नंबरचं गेट खरंच लागलंही. पण त्यातून आत गेल्यावर जो भुलभुलैय्या सुरू झाला. भर दुपारची वेळ, अंगण तापलेलं आम्ही चटाचट पाय उचलत धावतोय - रिकाम्या रांगांमधून. बिचारी माझी लेकही हायहुय करत धावत होती. दीर्-जाऊ, त्यांचा मुलगा सगळी मंडळी आपली धावतायत. नवरा शहाणा. तो देवळात वगैरे येण्याच्या भानगडीत पडत नाही म्हणून बाजारातच फिरत होता. आम्ही असे धावत असताना एक भलंमोठं गेट लागलं आणि आम्ही पुन्हा मेन रस्त्यावर! आणि तिथून मग साग्रसंगित पुन्हा मेन रांगेत उभे. म्हणजे असं गेटवरून दर्शन वगैरे काही नव्हतच. प्रवेश केवळ मेन गेटवरूनच होता. कदाचित उत्सवाच्या प्रसंगी किंवा गर्दिच्या दिवशी ही इतर गेट्स उपयोगी असतील पण एखाद्या सामान्य दिवशी अशा मार्केटिंग गिमिक्सना प्लीजच फसू नका.
 
गोव्यात बीचवर अनेक ठिकाणी विविध प्रकारची फसवणुक होऊ शकते.
लहान वयातली मुलं जी ग्रुप करुन गोव्यात येतात त्यांना फॉरेनर सोबत फोटो वगैरे काढून देतो असे सांगुन, पैसे उकळणे वा कॅमेरा पळवने असे उद्योग सर्रास चालतात.

काही गुंड लोक हातचलाखी चा खेळ दाखवतात, ज्यात दर्शकाला तीन पैकी कोणत्या वाटी खाली लाल गोटी आहे हे ओळखायचे व बरोब्बर आल्यास तो जी किंमत लावेल त्याच्या दुप्पट पैसे मिळतात. या दर्शकांमधे त्याचे काही साथीदार असतात. ते बरोब्बर वाटीवर पैसे लावतात आणि हजारो रुपये जिंकल्याचे दाखवतात. मग ते पाहुन सामान्य लोक त्यास हमखास बळी पडतात. आणि जर एखादा खरच जिंकला तर त्यास हारे पर्यंत खेळण्यास भाग पाडतात अथवा पैसे हिसकावून घेतात.

सिंगापूर प्रवासात घेण्याची एक खबरदारी. तिथे एकदाच ठराविक दिवसांकरता MRT चा पास काढून बस किंवा ट्रेनमधून कितीही वेळा फिरता येतं. आम्ही ३ दिवसांचा पास काढला प्रत्येकी २०+आणखी काही सिंगापुरी डॉलर्सचा. त्यातले प्रत्येकी २० डॉलर्स हे डिपॉझिट म्हणून घेतलेले त्यामुळे परत मिळणार होते. त्यात जास्तीत जास्त कसं फिरता येईल वगैरे ठरवलं ('पैसा वसुल' भारतीय मनोवृत्ती, दुसरं काय!) त्याप्रमाणे फिरलोही. शिवाय लेकीला डबलडेकर खुप आवडली म्हणून मिळेल त्या डबलडेकरात वरती आणि सगळ्यात पुढे बसून शहरात फिरलो वगैरे वगैरे. पण पास घेताना एका महत्त्वाच्या गोष्टिकडे दुर्लक्ष झालं होतं. पासाची मुदत संपल्यावर तो काही ठराविक तिकिट काउंटर्सवर जमा करून आपलं डिपॉझिट परत मिळवायचं असतं. पास घेताना त्यांनी सांगितलं की ५ दिवसांच्या आत डिपॉझिट घ्यायला हवं. आम्ही गेले डुलत डुलत पाचव्या दिवशी तर आमचं डिपॉझिट काही मिळालच नाही. कारण ५ वा दिवस हा तो पास इश्श्यु केल्या दिवसापासूनचा मोजतात, संपल्यानंतरचा नाही. म्हणजे मुदत संपल्यावर पुढच्या दोन दिवसांत आम्ही डिपॉझिट क्लेम करायला हवं होतं. पण पहिल्यांदा गेलेल्या प्रवाशांना हे कसं कळणार?

असो. पुढच्यास ठेच मागचा शहाणा.
 
सिमल्याला काही दुकानात डेबीट / क्रेडीट कार्ड दिले तर ते आत घेऊन जातात. थोड्या वेळाने पावतीवर सही घेतली जाते. पण इकडे परत आल्यावर बॅलन्स चेक केला तर ते दोन काय चार पाच वेळा स्वाईप केल्याचं आढळत. आधीच्या ट्रॅन्झॅक्शनमधल्या रकमेची पावती दाखवतच नाहीत. फोन केला तर तक्रार करा म्हणतात. बँकेकडे फोन केला तर बघू, करू अशी उत्तरं मिळतात..

उत्तरांचल मधे गढवाल भागात कस्तुरीमृगाच्या पोटातील कस्तुरी विकतात. त्याला कस्तुरीचा घमघमाट असतो. लोक हे महागडे कस्तुरी विकत घेतात. दहा एक दिवसात त्यातून वास यायचा बंद होतो. खरतर हरणाचे केस लावलेली ती एक गोल वस्तू असते आणि तिच्यावर सेंट मारलेला असतो.. सावधान !

शिर्डीच काय कुठल्याही तीर्थस्थळी असा प्रकार आहे.....शिर्डी आणि शनिशिंगनापुर ला जरा जास्तच आहे.....अस कोणी जरी गाडीजवळ येउन त्रास देउ लागला तर आम्ही local आहोत रे बाबा दुसरे लोक शोध अस सांगायच्.....बस मधुन उतरताना हे एजंट लोक जे कार्ड देतात ते घ्यायच नाही.....त्याना आपल्या मागे आले तरी काहीच उत्तर द्यायच नाही की विचारायच नाही.....तुम्ही काही विचारल तर तो तुम्हाला लवकर सोडत नाही.....
शनिशिंगनापुरला तर हे एजंट लोक गाड्यावरुन पाठिमागे लागतात.....त्यासाठी काही टीप्स
१. शिर्डी वरुन शनिशिंगनापुरला जाताना गाड्यावरच्या एजंट लोकांचा खुप त्रास होतो ..... त्यामानाने घोडेगाव वरुन शनिशिंगनापुरला जाताना कमी त्रास होतो....
२. गाड्यावरती काही एजंट मागे लागले तर सरळ गाडी बाजुला घेउन ५-१० मि थांबणे.....दुसरा काहीच उपाय नाही....(माझे गाव शनिशिंगनापुरपासुन २०किमी आहे .....)
३. कुठल्याही दुकानातुन फक्त पुजेचे सामन घ्यावे श्रद्धा असेल तरच नाहीतर बाकी इतर पुजा .... यंत्र याच्या फंदात पडु नये......
 
मध्ये काश्मीर ला गेलो होतो...तिथे गाईड एका च शालीच्या कारखान्यात घेऊन जायला उत्सूक होता.. बाकीची वेळ पाळली गेली नाही तरी चालेल्..पण ही वेळ पाळायला तो धावत होता. ह्यात फसवणूक काहीच नाही...पण शेवटी स्वस्त मिळाली नाही वस्तु म्हणुन आपण खट्टू..

मथुरेला गेले असतील ना बरेच जण ?

कृष्णजन्मभूमी म्हणून प्रत्येक पंड्या वेगळ्याच मंदिरात घेऊन जातो आणि हीच अस्सल जागा आहे हे ठणकावून सांगतो. एका ठिकाणी तर कृष्णाचा जन्म कुठे झाला नेमकी ती जागा दाखवायला तयार होते. योग्य ती देणगी द्यावी लागत होती फक्त. विशेष म्हणजे इथं फसवणुकीपासून सावध रहा असा नम्र इशाराही देण्यात आला.
आणि वादग्रस्त म्हणून बंदोबस्तात असलेलं ठिकाण वेगळंच होतं. आता यातला एकाचाच दावा खरा असेल ना ?

काही कॉमन ट्रॅप्स-
१.VAT refunds. |प्रत्येक देशात याचे वेग वेगळे नियम असतात आणि सगळेच दुकानदार ते तुम्हाला सांगतिलच असे नाही. उदा. सिंगापुरात बिला बरोबर दुकानातुन एन्डोर्स केलेला येक फॉर्म लागतो , तो नसला तर रिफन्ड मिळणार नाही. या नियमांची आधिच माहिती करुन घेणे श्रेयस्कर.
२. खुप जास्त किमतीला वस्तु गळ्यात मारणे- उदा. थायलंड मधिल जेम फॅक्टरी. फॅक्टरी दाखवणारी व्यक्ती ते जेम तीथे किती स्वस्त मिळतात आणि तुम्हाला हे बाहेर विकुन कितीतरी फायदा होइल ई. सांगुन स्वस्त खडे महागात विकतात.
३. डुप्लिकेट वस्तु/पदार्थ - उदा. श्रीनगर ला दाल लेक मधे केशर / शिलाजीत विकणारे शिकारा घेउन फिरतात. थोडेसे केशर वाटित पाण्यात टाकुन रंग ही दाखवतात आणि प्रत्यक्षात रंगवलेले गवत विकतात.
४. गल्ली बोळात नेउन लुबाडणे- स्वस्त किंवा काही खास वस्तु विकायच्या बहाण्यानी मुख्य रस्त्या पासुन आत नेउन लुबाडळे जाते. उदा. शांघाय नान्जिन स्ट्रीट, भाषेची अडचण असल्याने प्रावासी ईथे काही फार करु शकत नाहीत.
 
होय, सचिन ट्रॅव्हलचा असा अनुभव आहे.
सिमला, कुलू मनालीची टूर होती. त्यांनी जिथे जिथे चहा, पाण्यासाठी थांबवले ती सगळी ठिकाणे स्वछतागॄहांच्या बाबतीत भिकार होती. पण ह्याबाबतीत केसरी वाले पण तिथेच गाड्या थांबवत असल्याने नक्की ट्रॅव्हल कंपनीचा दोष की तिथे सगळीकडेच असे असते की हे विशिष्ठ धाबेवाले टूर मॅनेजर्सना जास्त कट देतात आणि बाकी मनमानी करतात हे मला माहीत नाही.
तिथे कुलूला ज्या दुकानात ऑथेंटिक म्हणून नेले तेथे कपडे बरेच महाग पडले.. आणि ८०० रु चे ड्रेस मटेरील देखिल १५० रु च्या इतर दुकानातील मटेरीअल सारखेच फुले पडून खराब झाले.
फुलकारीचे कपडे सिमल्यानंतर कुठे दिसले नाहीत. पण टूर मॅनेजरने खूप मिळतील पुढे पुढे असे सांगीतले.

चोराची आळंदी चा अत्यंत वाईट अनुभव..
तिकडे ज्ञानेश्वर माऊली साठी नारळ आणी फुलांचे ताट घेतले.. त्याला विचारायचे विसरलो किती रु. झाले..
आम्हाला वाटले असती १०-२० रुपये किंवा ५० रु. खुप झाले तर. आम्ही परत आलो दर्शन करुन तर त्या महाभागाने रु.३०० मागितले मी अवाक झालो आणी सोबतचे मित्र सुध्दा खुप वेळ वाद घातला पण त्या ***(&*(&^*(&*(&*(&*(& दुकानदाराला लोकल दुकानदारानी सपोर्ट केला.. आम्ही पण बाराचे होतोच सगळ्या ठीकाणी बोंब मारुन आलो की हे प्रसादाचे ताट ३००रु. ला देतात कोणी घेऊ नका ... अतिशय विक्षीप्त अशी लोक आहेत तिथली ... देवाच्या नावाने चोर धंदे कशाला करतात देवच जाने Uhoh
जेंव्हा आम्ही पैसे देतच नाही म्हणालो तर त्या माकडानी आमचे चप्प्ल बुट लपवले घरात जाऊन .. आता आजुन राडा नको म्हणुन गुपचुप पैसे देऊन निघावे लागले.. आणि वाईट वाटणारी एकच गोष्ट म्हणजे तिथल्या तमाम जनते पैकी एकही जण ह्या &*&*(&(*& च्या विरुध्द बोलला नाही ..
माऊलींची ईछा म्हणून तो विषय तेंव्हाच डोक्यातुन काढुन टाकला पण आळंदी च्या लोकां विषयी आता फार काही चांगले वाटत नाही..
 
मुन्नार आणि उटी या दोन्ही ठिकाणचा अनुभव आहे:

टी इस्टेट मध्ये फिरायला गेले असताना जागोजागी चहा (पत्ती, पावडर, फ्लेवर्ड चहा) मिळणारी दुकानं आहेत. ते सँपल म्हणुन चवीला जो थोडा चहा देतात तो चांगला असतो. पण (सो कॉल्ड) तोच विकत घेऊन घरी येऊन केला की अतिशय बेक्कार चहा होतो.
आश्चर्य म्हणजे टाटा टी इस्टेटमधला चहाही तसाच बेक्कार निघाला. ( भरपुर किंमत होती, ४००-५०० रु. किलो).

माझाही सचिन ट्रॅव्हल्सचा असाच अनुभव आहे सिमला-कुलू-मनालीचा. इथे मुद्दामहून त्यांची कोणाशी तुलना करण्याचा हेतु नाहि, पण जे अनुभवले आहे / बघितले आहे ते मांडतो आहे.

वाटेत जेवण्यासाठी आणि चहासाठी बस थांबवलेली सगळी ठिकाणे स्वछतागॄहांच्या बाबतीत भिकार होती [एकच अपवाद - चंदीगढ-दिल्ली बॉर्डर जवळचे हॉटेल]. जेवण्यासाठीचे हॉलही सुमार होते आणि केसरीवालेही त्याच हॉटेलमध्ये असले तरी त्यांना दिलेले हॉल आणि पदार्थ नक्कीच उजवे दिसत होते. [मी चुकून(!) एकदा केसरीच्या हॉलमध्ये शिरलो होतो.]

मनालीमध्ये सकाळी सुरेख सूर्यप्रकाश होता आणि संध्याकाळी पावसाचे भाकीत होते [जे नंतर खरे ठरले]. टूरलीडरला हे सांगूनही सकाळी नाश्त्याच्या वेळेला एका मराठी माणसाची 'ओळख' करून देण्यात आली. त्याचे मनाली मध्ये दुकान आहे आणि मराठी माणसानेच मराठी माणसाला मदत केली पाहिजे अशा अर्थाचे भाषण करून झाले. मग त्याच्या दुकानाची पत्रकेही स्वत: टूरलीडर्सनी उत्साहाने वाटली. मग गाड्या ह्या मराठी माणसाच्या 'अगरवाल' नावाच्या दुकानाकडे नेण्यात आल्या. [तिथे घेतलेले सगळे केशर घरी आल्यानंतर फेकून द्यावे लागले, हे सांगायला नकोच.] सगळी सकाळ अशी बाजारहाट करण्यात घालवल्यानंतर संध्याकाळी पावसात आम्ही site-seeing केलं. पुढे एका sports-club मध्ये खेळ खेळून निघताना एका टूरलीडरला तिथल्या game arranger बरोबर commission साठी घासाघिस करतानाही बघितलं.

ह्याच टूरमध्ये 'कुफ्री'ला २५० रुपये देऊन घोडेस्वारी केली. घोडेवाल्याने १ तासात ५ पॉईंट दाखवणार सांगितले आणि १५ मिनिटात एका ठिकाणी घेऊन गेले. उतरा आणि फिरा इथे पाऊण तास. तिथे एकाच जागी ५ दुर्बिणी लावल्या होत्या ५ दिशांना तोंड करून आणि त्यातून बघण्यासाठी ५० रुपये वेगळे. आमच्या ग्रूपमध्ये एकाकडे मस्त SLR camera with Telescopic Lens होता, तर त्यालाही फोटो काढू दिले नाहित ५० रुपये दिल्याशिवाय. हि जबरदस्ती तिथल्या स्थानीक लोकांची होती, पण ट्रॅव्हलवाल्यांनी ह्याबद्दल एका शब्दानेही कल्पना दिली नव्हती. खरंतर, ते आम्हाला जेव्हा कुफ्रीला घेऊन गेले तेव्हा ह्या घोडेवाल्यांच्या ग्रूपशिवाय दूसरा कोणताही ग्रूप तिथे ऊपलब्ध नव्हता. पण टूरलीडरकडे तक्रार केल्यावर उत्तर मिळाले की, ही additional activity आहे आणि ती करायची की नाही ह्याचा निर्णय तुमचा असेल असे आधीच सांगितले होते.

आणि शेवटचा अनुभव ह्याच टूरमधला - रोहतांग पास ला जाताना वाहतूक-मुरंबा टाळण्यासाठी पहाटे ३ वाजता उठवून नेण्यात आले. वाटेत ३:३० ला एका छोट्या दुकानासमोर गाडी थांबवून snow-suits भाड्याने घेण्याचा सल्ला देण्यात आला. [परत इथेही आग्रह नाही - निर्णय तुमचा]. आता ३ वाजता उठून निघाल्यावर परत गाडीत डुलकी लागली होती, त्यामुळे मेंदू विचार करण्याच्या स्थितीत नव्हता. गुमान २५० रुपये देऊन कपडे भाड्याने घेतले आणि मोज्यांसाठी ५० रुपये. निघालो. वाटेत अर्ध्या-पाऊण तासाने मध्येच [दुर्दॅवाने] जाग आली आणि तशीच दुकाने रांगेने उभी दिसली. प्रत्येकापुढे फलक होता - Rent-out Snow suits for entire day. Rs. 50 only. झोप जी काही उडाली ती पुन्हा लागली नाही. 
 
मनालीतले ते तुम्ही उल्लेख केलेले मराठी हॉटेलियर आणि दुकानदार आहेत त्यांचा आम्हालाही वाईट अनुभव होता. मराठी आहेत म्हणून आम्ही त्यांच्या हॉटेलात उतरलो आणि भिकार सर्व्हिस, कोंदट रुम्स, अस्वच्छता (उश्यांचे तेलकट अभ्रे, टॉवेलही खराब, पाण्याच्या जगात कचरा), उर्मटपणा, चूका कबूल करायची तयारी नाही याचा अनुभव घेऊन दुसर्‍याच दिवशी चेकऔट केलं. जवळपास निम्म्या दरात त्यांच्याच हॉटेलच्या जवळ आम्हाला उत्कृष्ट, हवेशीर, प्रशस्त रुम्स असलेलं हॉटेल लगेच मिळालं.

केसरी ट्रॅव्हल्सचा.केसरीबरोबर सिक्कीम-दार्जिलिंग टुर केली, गंगटोक आणि दार्जिलिंग या दोन्ही ठिकाणी हॉटेल्सच्या बाबत आलेला हा वाईट अनुभव.
   टुर बुकींगच्या वेळेस गंगटोकला ऑरेंज कंट्री क्लब रिसॉर्टमध्ये रहाण्याची व्यवस्था आहे म्हणुन सांगितलं होतं. गंगटोकला पोचल्यावर सांगितलं की आपल्यापैकी काही फॅमिलीज ऑरेंज कंट्रीमध्ये तर काही वेगळ्या हॉटेलमध्ये रहातील कारण ऑरेंज कंट्री फुल्ल आहे. हीच गोष्ट मुम्बईहून निघण्याच्या आधी सांगितली गेली नव्हती. ज्या हॉटेलमध्ये आम्ही काही फॅमिलीज राहिलो त्या हॉटेलचा दर्जा आणि ऑरेंज कंट्री रिसॉर्टचा दर्जा यात खुपच फरक होता.
    तीच गोष्ट दार्जिलींगला झाली, काही फॅमिलीज हॉटेल व्हाईसरॉय तर उरलेल्यांची 'सोय' समोरच्याच तिबेट होम मध्ये करण्यात आली. दोन्ही होटेल्स समोरासमोर होती ही एकच गोष्ट सोडली तर दोघांच्या दर्जात प्रचंड फरक होता. टुर लीडरशी वादावादी झालीच तेव्हा त्याने सुचवलेला उपाय हा की फक्त रहा तिबेट होममध्ये पण जेवण्-नाश्ता व्हाईसरॉयमध्ये करायला या.
      एकतर ८ तासाच्या बस प्रवासानंतर संध्याकाळी ६ वाजता दार्जिलिंगला पोचलेलो, त्यात हा मनःस्ताप. चिकाटीने टुर लीडरच्या खनपटी बसुन केसरीच्या मुंबई ऑफिसमध्ये रीतसर तक्रार नोंदवली. रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल व्हाईसरॉयच्या लाउंजमध्येच बसलो होतो, त्याच दर्जाच्या दुसर्‍या हॉटेलमध्ये जेव्हा त्यांनी सोय केली तोवर रात्रीचे ११ वाजले होते.
   सर्वात वाईट या गोष्टीचे वाटले की या टुरमध्ये एकंदर १४ मराठी कुटुंबे होती पण एकाही कुटुंबाने येउन साधी विचारपुस/मदत करण्याचं सौजन्यही दाखवलं नाही. त्यानंतर केसरीच काय कोणत्याही ट्रॅव्हल कंपनीबरोबर टुर करण्याची ईच्छा नाहीय.
 
 हैद्राबाद : भाग्यश्री ट्रॅव्हल्स पुणे - पॅकेज टूर
ट्रेनमधे आमच्या नावाचे बुकिन्ग न करता वेगळ्याच नावाने बुक केलेली तिकिटे आणून दिली.
रहायला बेगमपेटमधे जे हॉटेल होते ते बरे होते. एक बस बुक केली होती ३ दिवसांसाठी
एक पुर्ण दिवस रामोजी फिल्मसिटीमधे गेला त्यामधे खाण्याची पॅकेटस देणार होते ती विसरली म्हणे घ्यायची म्हणून पार दुपारी दोन नंतर लंच टाईमपर्यंत काहीच दिले नाही. आणि संध्याकाळी चिवड्याची थोडीफार पॅकेटस आणून दिली.
त्या बसमधे आमचे कुटुंब आणि ३ ज्येष्ठ नागरिक महिला आणि २०/२५ दुकानदार होते बारामती, दौन्ड भागातले की जे शेवटपर्यंत आमच्याशी फारसे काही बोलले नाहीत. एनटीआर गार्डन पहायचे होते पण या सर्व गटाने विरोध केला म्हणून पहाता आले नाही.
बाकी तिकिटे काढण्यासाठी कुठे फारसे रांगेत थांबावे लागले नाही ही एक चांगली बाब होती.
पॅकेज ट्रीप मधे फारसे स्वातंत्र्य रहात नाही म्हणून मग पुढची ट्रिप (सिमला, मनाली) स्वतःच ठरवून केली. त्याबद्दल पुढच्या लेखात.

काश्मिर ला कोणी मार्तंड मंदिर दाखवत नाही...आम्ही ईकडून माहीती काढून गेलो होतो.. तिथे आमच्या लोकल माणसाला ही माहीत नव्हते...चौकशी केल्यावर रस्ता कळला.. हे त्याचे फोटो ईथे आहेत.... काही फोटोत माणसे आहेत.. त्यावरून त्या मंदिरा च्या उंचीचा अंदाज येईल.... हे कोणी टुर दाखवत असल्याचे ऐकीवात नाही.. ह्याची माहीती सकाळ मध्ये लिहायची होती...पण आळस..  (आता झटकायलाच हवा)..

------
------
------

तसेच हडप्पा सारखे श्रीनगर मध्ये सापडले होते... पण काही केल्या त्याचा पत्ता लागला नाही.. दाल लेकच्याच बाजूला आहे असे वाचले होते...

 कोल्हापुरातील एका त्यातल्या त्यात प्रसिद्ध अशा टूरिस्ट कंपनीची एक ३० सीटर लक्झरी 'लग्नकार्या' साठी आम्ही भाड्याने ठरवली. देण्याघेण्याच्या प्रश्न मिटला होता. गाडी तब्बल दहा दिवस अगोदर बुक केली होती. बुकिंगच्या दुसर्‍या दिवशी कंपनीतील एका एजंटचा फोन आला व बोलला, "तुम्हा ३० लोकांची त्यांची पूर्ण नावे, सेक्स आणि आजचे वय यासह एक यादी आज संध्याकाळपर्यंत ऑफिसमध्ये द्यावी." कशासाठी विचारले असता उत्तर मिळाले. "आर.टी.ओ.लायसन्स काढावे लागते. लग्नाला एस.टी. वापरली नाही म्हणून माणशी ३० रुपये चार्ज द्यावा लागतो." म्हणजे ३० x ३० असे एकूण ९०० रुपये जादाचे आणि लिस्ट दुसर्‍या दिवशी तिथे दिली. लग्न समारंभात असे खर्च अपेक्षित असल्याने आम्हा जेष्ठांना त्यात काही वावगे वाटले नाही. आम्ही मग ते चार्ज प्रकरण विसरूनही गेलो.

लग्नाच्या आदल्या दिवशी रात्रीचा प्रवास होता...कोल्हापूर ते पुणे. रात्री ७.०० ला लक्झरीने कोल्हापूर सोडले. बसमध्ये अन्यत्र जसा लग्नाचा दंगा मुले घालत असतात तसा आमच्याही इथे चाललाच होता. मजेत होते सर्वच. साधारणतः दोन टोल नाके गेल्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास बाहेर पावसाची रिपरिप चालू असताना ड्रायव्हरने शेजारील सायरन ऐकून लक्झरी साईडला लावली. तो आणि त्याचा जोडीदार काही कागदपत्रे घेऊन खाली उतरलेले आम्ही पाहिले. म्हटले असणार काहीतरी पोलिसांची वा आरटीओची कागदपत्रांची तपासणी. आम्ही आत गप्पा मारीत बसलो असताना दहाएक मिनिटांनी तो ड्रायव्हर आम्हा तिघा सीनिअर्सना खाली येण्याविषयी विनंती करू लागला. आम्ही उतरलो. तो कुजबुजला, 'साहेब, १००० रुपये मागत आहे." बरे मग याचा आमच्याशी काय संबंध ? तर सांगावे की न सांगावे अशा विचारात ड्रायव्हर वदला, "गाडीतील प्रवाशांची यादी नाही म्हणून." हा काय प्रकार आम्हाला कळेना. यादी तर टूरिस्ट ऑफिसमध्ये आम्ही पैशासह दिली होती. शेवटी आम्ही सरळ आरटीओ व्हॅनकडे गेलो तर तिथे ते नेहमीचे ताठर थ्री स्टारवाले बसले होते. त्याना आम्ही शक्यतो नम्रपणे 'लग्नाचे वर्‍हाड आहे, यादी व सरकारी चार्जेस आम्ही नोंदणी करतानाच अदा केला आहे" असे सांगितल्यावर त्यातील एकाने आमची अब्रूच काढली, "तुम्ही लोक सुशिक्षित आणि सरकारी नोकरीवाले आहात असे तो ड्रायव्हर म्हणत्योय. पण तुमची ड्युटी होती की त्या यादीवर आरटीओने सहीशिक्का दिला आहे की नाही ते पाहण्याचा. तुम्हाला माहीत आहे ड्रायव्हरकडे कुठली यादी आहे ते?" आम्हाला यादी कोणती आहे ते माहीत असणे शक्यच नव्हते, किंबहुना आमच्या कुणाच्याच मनी ती बाब इतकी महत्वाची असते याची कल्पना आली नव्हती.

तर त्या टूर कंपनीने चक्क गेल्या आठवड्यात त्याच लक्झरीने गावातील प्राथमिक शाळेतील मुलांसाठी आयोजित केलेल्या महाबळेश्वरच्या सहलीची यादी या ड्रायव्हरकडे दिली होती. बारा वर्षाखालील मुलांना आरटीओ चार्जेस बसत नाही, या नियमाचा फायदा घेऊन त्या नालायक संचालकाने आम्ही दिलेले ९०० रुपये खिशात घातले होते. आणि जर चुकून पोलिसाने अडविले तर १०० रुपये देऊन प्रकरण मिटविण्याचे संकेत त्या ड्रायव्हरला दिले होते. पण त्याच्या दुर्दैवाने [आणि आमच्याही] त्या रात्री थेट आरटीओ इन्स्पेक्टरनीच लक्झरी अडवली. पुढे जे व्हायचे ते झाले. लग्नासाठी तर जाणे भागच होते. कोल्हापूरातील एजंटला सेलवरून सत्राशेसाठ शिव्या आमच्या गाडीतील पोरांनी घातल्या आणि तो 'सौदा' १००० रुपयावर मिटविला. गाडी हलली.

पुढे लग्नात हा विषय काढला नाही. मात्र तिसर्‍या दिवशी कोल्हापुरला परतल्यावर ज्यावेळी आमची मुले संतापून त्या टूरिस्ट कंपनीच्या ऑफिसमध्ये घुसली त्यावेळी त्या मालकाची घाबरगुंडी उडाली. त्याला आमचा राग अपेक्षित होताच पण शिवाजी पेठेतील ते आठदहा तरूण त्याला दिवसा चांदणे दाखवायचे या निश्चयाने तिथे आलेली पाहिल्यावर त्याने आम्हाला बोलावून घेऊन ते हजार रुपये तर दिलेच पण झालेल्या त्रासाबद्दल आरटीओ पासचे ९०० ही परत दिले आणि विनंती केली की हे प्रकरण पेपरमध्ये देऊ नका. मुलांना आवरले....तो पर्यंत शिव्यांचा भडिमार दुसरीकडुन चालूच होता.

यातून शिकायचे तर टूरला निघण्यापूर्वी टूर लीडर वा कुटुंब प्रमुखाने गाडीसंदर्भातील सर्व कागदपत्रे रितसर ड्रायव्हरकडे [अगदी त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्ससह] पाहणे अत्यंत निकडीचे आहे.
 
 ओरिसात गेलं असता चिलका लेकच्या ट्रिपमध्ये तुमच्या बोटिवर येऊन लोक तुमच्या देखत शिंपले फोडून काळे, पिवळसर मोती काढून दाखवतात आणि ते विकतात. ते चुकूनही घेऊ नयेत. तसच कोरल्स फोडून पोवळीही दाखवतात त्याबाबतीतही तेच मत. अशा गोष्टी नेहेमी गव्हर्न्मेंट अप्रूव्हड दुकानातून घ्याव्यात. खूप मोह होतो. बरेच लोक घेतात तर आपण का नाही असही वाटू शकत.मोती, पोवळी खरी खोटी ह्याची गॅरंटी नाही. हातचलाखी असते का ते कळत नाही अगदी डोळ्यादेखत फोडत असताना. मनमानी किंमत सांगतात. एका मोत्याला २००रुपये वगैरे सांगतात मग आपण १०० रुपयांना विकत घेतो, काय बारगेनींग केलं म्हणून आपण खूष. काठावर आलो की काही १० रुपयाला एक मोती म्हणून विकत असतात. आपल्याला वाटतं, आपण फसलो का हे १० रुपयाला १ वाले प्लॅस्टीकचे मणी आहेत. परत पुण्याला आल्यावर गाडगीळांकडे गाठवायला नेल्यावर ते म्हणतात, मोती ठीक आहेत तुमचे. पोवळी दगडं आहेत. पोवळ्याला किती किंमत दिली ते सांगायचीपण लाज वाटते कारण आपण किती घाट्यात गेलो ते आपल्या तोंडाने काय सांगणार कारण पोवळ्याला मोत्यापेक्षा कितीतरी पटीने पैसे मोजलेले असतात. मग सुंदर दिसणारे दगड म्हणून सेटींगमध्ये आणखी पैसे टाकून आपण गाडगीळांकडून सेट्स करून घेतो. महागातली कोस्ट्युम ज्युलरी म्हणून पार्टीत दिसते चांगली. पण व्हॅल्यू काय असा विचार करायचा नाही. तर एवढ्या सगळ्यापेक्षा आपल्या नेहेमीच्या सराफाकडून घेणं किंवा गव्ह्र्न्मेंट अप्रूव्ह्ड दुकानातून घेण शहाणपणाच.

अशा गोष्टी नेहेमी गव्हर्न्मेंट अप्रूव्हड दुकानातून घ्याव्यात. >>
सरकारी दुकानांमधे किमतीच्या बाबतीत फसवले जाणार नाही याची खात्री असते म्हणून अनेकदा पर्यटक अशा ठिकाणी खरेदी करणे पसंत करतात. पण जयपूर /राजस्थान मधे सरकारी वाटतील अशी काही खाजगी दुकाने आहेत. म्हणजे दुकानांची नावे सरकारी वाटतील अशी असतात जसे स्टेट हॅन्डलूम स्टोअर, नॅशनल हॅन्डिक्राफ्ट असो. शोरूम" असली काहीतरी. टॅक्सीवाले तुम्हाला सरकारी/ खादी ग्रामोद्योग सारखे आहे ई. म्हणत तिथे घेऊन जातात. अर्थात दुकानात कमी प्रतीच्या वस्तु आणि किमती अवाच्या सव्वा! तसेच प्रॉडक्ट बद्दल तद्दन खोटी माहिती, जसे नेहमीच्या रासायनिक रंग वापरलेल्या ब्लॉक प्रिन्टेड चादरी असतात पण नैसर्गिक रंग वापरून रंगवल्या आहेत म्हणून सांगतात किंवा देवी देवतांच्या मुर्तींवर बसवलेले कृत्रिम चकाकणारे खोटे खडे सफायर्स आहेत म्हणून सांगतात ई. तेव्हा राजस्थान मधे फिरतांना अशा ठिकाणी गेल्यास कॅश काउन्टर वर जाऊन खाजगी दुकान आहे का याची माहिती विचारावी, सर्टीफिकेट्स लावली असल्यास ती वाचावी.
 
 
 

आम्ही ऑगस्ट २०१२ मध्ये जवळच कुठेतरी तीन रात्रीकरता ट्रिपला जायचे म्हणून इडलीवाल्यांच्या जाधवगढ हॉटेलचे बुकिंग नेटवरून केले. आता आता त्यांची साईट बदलली आहे. पण आधीच्या साईटवर त्यांनी मेजर झोल केला होता. रुम्समध्ये चार प्रकार होते - टेन्ट, डिलक्स रूम, प्रिमियम रूम आणि स्वीट रुम्स. तर या प्रत्येकाचा फोटोही दिला होता. त्यातील आम्हाला स्वीट रुम चा आवडला. ४ स्वीट रुम होत्या. आम्ही एक बुक केली. पार्ट पेमेंट केले.

तिथे पोहोचलो तर त्यांनी जी रुम आम्हाला दिली ती अजिबातच त्या फोटोसारखी नव्हती. फोटोत चांगली प्रशस्त (स्वीट नावाला साजेशी) रुम होती आणि इथे तर नेहमीच्या रेग्युलर रुमसारखी रुम! आम्ही त्यांना विचारलं तर म्हणे हिच सगळ्यात बेस्ट रुम आहे. कॉर्नरला आहे, फक्त याच रुमला बाल्कनी आहे वगैरे वगैरे. प्रवासानं थकून गेल्याने आम्ही जास्त वाद घातला नाही. शिवाय तिथे फोनवरून इंटरनेट अ‍ॅक्सेस होत नव्हतं आणि त्यांनी सांगितलं की त्यांची साईट डाउन आहे त्यामुळे त्यांचा कॉम्प्युटर वापरायला झाला नाही. शेवटी त्यांनी जी रुम दिली होती त्यातच झोपलो. पण आम्हाला खात्री होती की काहीतरी गडबड नक्की आहे.

सकाळी उठून पुन्हा रिसेप्शन गाठलं. पुन्हा साईट डाउन होती (म्हणे). पुन्हा तुमची रुम बेस्ट आहे. फक्त याच रुमला बाल्कनी आहे वगैरे रेकॉर्ड सुरू झाली. पण सकाळी लॉनवर फिरताना आम्ही एका दुसर्‍या रुममधल्या स्त्रीला तिच्या बाल्कनीत उभं राहून छानपैकी चहा पिताना पाहिलं होतं... स्मित त्यामुळे आम्ही ते सांगताच त्यांनी लगेच वाक्य फिरवत 'तुमच्या रुमला सगळ्यात मोठी बाल्कनी आहे आणि तुमच्या रुममधून बेस्ट व्हू दिसतो' असा नविन मुद्दा आमच्या गळी उतरवायला सुरवात केली. पण आम्ही जी रुम म्हणून बुक केली ती ही नाहीच. फोटो कंप्लीटली वेगळाच होता, त्याचं काय?

आम्ही बुक केली तो स्वीट होता आणि जी रुम आम्हाला दिली ती प्रिमियम रुम होती हे त्यांनी सांगितलंच नाही.

आता मात्र हे प्रकरण धसास लावायचंच असं आम्ही ठरवलं. डिनरच्या आधी आम्ही पुन्हा एकदा रिसेप्शनमध्ये गेलो. यावेळी तिथे एक वेगळा माणूस होता. त्यानं आम्हाला मॅनेजरच्या रुममध्ये नेऊन त्याचा कॉम्प्युटर वापरू दिला. जाधवगढच्या साईटवर जाऊन आम्ही त्याला त्याची साईट दाखवली. घे बाबा, डोळे भरून बघ आणि सांग काय घोळ केलायत तो! त्याने कबुल केले की फोटो महाराजा स्वीट चा आहे आणि आम्ही राहतोय ती प्रिमियम रुम आहे. (महाराजा स्वीट हा जाधवगढ मधिल सगळ्यात मोठा आणि सर्वात उंचीवरचा स्वीट आहे. द बेस्ट रुम.)

मॅनेजर जागेवर नव्हता, त्याच्या घरी होता. त्याला फोन लावला तर म्हणे त्या फोटोत आहे तीच रुम आम्हाला दिलेय. तेच तुणंतुणं ऐकून मी फोन नवर्‍याच्या हातून घेतला आणि त्या मॅनेजरला झाप झाप झापलं. हा फ्रॉड आहे आणि स्वीटचे फोटो टाकून तुम्ही लोकांची दिशाभूल करताय हे त्याला सांगितलं. मग तो क्षमा मागायला लागला. त्यानं आम्हाला म्युझियम स्वीटमध्ये शिफ्ट होण्याची विनंती केली. कारण महाराजा स्वीटमध्ये कोणी रहात होते म्हणे. शिवाय रात्रीचं जेवण आणि अनलिमिटेड वाईन ऑन द हाऊस देण्याची घोषणा केली. ते ऐकून तर आणखीनच वैताग आला. ( आम्ही डिनर केले पण वाईन घेतली नाही. स्मित )

एव्हाना आम्ही तीन रात्री तिथे राहण्याचा विचार रद्द केला होता. दुसर्‍या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट नंतर लगेच निघायचा विचार होता म्हणून रुमदेखिल बदलली नाही. ब्रेकफास्ट नंतर हॉटेल सोडले. त्यांनी आमच्याकडून आम्ही आधी भरले होते तेवढेच म्हणजे रु. १०,००० घेतले. अजून काही घेतले नाहीत. त्यामुळे आर्थिक तोटा तसा काही झाला नाही. पण वैतागवाणी ट्रिप आणि एक विचित्र अनुभव गाठीशी आला.

ट्रिपअ‍ॅडवाईजर.कॉम या साईटवर मी माझा अनुभव लिहिला होता. ते खात्री झाल्यावरच तो अनुभव प्रसिद्ध करतात. पण माझा अनुभव प्रसिद्ध झाल्यावर देखिल जाधवगडची साईट अनेक महिने तशीच होती. नंतर त्यांनी स्वीटचा फोटो बदलून योग्य तो फोटो टाकला पण त्यातही झोल केला होता. इतर रुम्स च्या बाबतीत माहितीशेजारच्या छोट्या फोटोवर क्लिक केले असता तोच फोटो मोठा होत होता. पण याच फोटोच्या बाबतीत त्या योग्य छोट्या फोटोवर क्लिक केले असता पुन्हा महाराजा स्वीटचा फोटो दिसत होता.

(याच ट्रिपअ‍ॅडवायझर वर इतरांनी लिहिलेले जाधवगढचे अनुभव तर भयानक आहेत. तिथल्या ओपन शॉवर रुमच्या बाबतीतला अनुभव तर डेंजर आहे. कोणीतरी गेस्ट आंघोळ करत असताना वरून एक माणूस बघत होता म्हणे. अरेरे )

आता हे इथे लिहिण्याआधी त्यांची साईट तपासली तर आता रुम्सचे योग्य आणि सर्व प्रकार दिसत आहेत. साईटच पूर्णपणे नविन दिसत आहे.

 
 

ओव्हरहाइप्ड प्रकार वाटलाय मला तरी तो गढीचा.

ती गढी खरं तर छान आहे. त्यात एक थीम हॉटेल काढण्याची कल्पनाही छान आहे. परीसर चांगला आहे. आम्ही पावसाळ्याच्या शेवटास गेलो होतो त्यामुळे खूप सुंदर हिरवळ होती. पण इतपतच.

१. जेवण बोअर.
२. थीम नुसार खोल्यांचं अंतरंग नाही. ते नेहमीच्या हॉटेलांसारखंच आहे.
३. महाबेक्कार सर्व्हिस. स्टाफ ट्रेंड नाही.
४. बाहेरच्या लोकांना एक दिवसाच्या पिकनिक करता येता येतं ते येऊन गर्दी करतात.
५. टेन्टस दूर आहेत.
६. स्विमिंगपूल स्वच्छ नव्हता.

 

शिवाजी महाराजांचे सरदार जाधवराव यांची ही गढी.अलिकडचे काळात त्यांच्या वंशजांपैकी दादा जाधवराव हे जनता दलाचे आमदार अनेक वर्षे होते. ते फारसे बदमाष राजकारणी नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती फार श्रीमंतीची नाही.या गढीचा मेन्टेनन्सही त्याना शक्य होत नसावा . त्यामुळे बर्‍याच दिवसापासून ते ही गढी विकण्याच्या मागे लागले होते. ऐशीच्या दशकात त्यानी रजनीशआश्रेम वाल्यांशी सौदाही केला होता त्या काळात रजनीश बाबा सम्भोगातून समाधीकडे जाण्याच्या रस्त्यावर चालत होते. त्यांच्या परदेशी शिष्यांनी कोरेगाव भागात अक्षरशः ' नंगा''नाच घातला होता. त्यामुळी ही ब्याद आपल्याकडे नको म्हणून सासवड परिसरातील लोकानी मोठे आन्दोलन करून हा सौदा रद्द करणे भाग पाडले होते.

मध्ये बरेच दिवस काहीच घडले नाही मग हेरिटेज वास्तू जपण्याच्या नावाखाली हा नवीन बाबा तेथे आला आणि लीज की विकत कुठल्या तरी टर्म खाली हे हॉटेल तिथे चालू आहे.... काही दिवसानी किल्लेही बळकावण्याचा विचार असेल... नुकतेच बाबाच्या हॉटेलच्या बालेवाडी क्रीडा संकुलातील अनधिकृत बांधकाम मनपाने तोडले आहे.

बाबाच्या करामती चम्पकच्या इडली हॉटेल आणि भामटा या धाग्यावर वाचा.....

 
 

मला नालासोपार्‍याच्या मिनि गोवा रीसॉर्ट मध्ये आलेला अनुभव -

मी त्यांची वेबसाईट वाचून तिथे जाण्याचा निर्णय घेतला. फोनवर खूप चांगली माहिती दिली. मी म्हटले मराठी माणसाचं रीसॉर्ट आहे चला जाऊया. फोनवर त्यांना आम्हाला दोन एसी रूम्स हव्यात म्हणून सांगितले होते. (नवर्‍याला जायचे नव्हतेच तिथे तरी माझ्या हट्टाखातर आला)

नालासोपारा पश्चिमेला गाव संपलं की त्या रिसॉर्टला जाण्याचा रस्ता जेमतेम इंडिका गाडी जाईल एवढा आहे. जरा इकडे तिकडे झालात तर गाडी खाजणात अडकेल असा. गाडी आत नेतानाच नवरा वैतागलेला. आम्ही साडेपाच वाजता पोहोचलो. तिथे पोहोचल्या पोहोचल्या म्हणाला मला पटत नाहीये ही जागा परत जाऊया. तरी मी मूर्ख म्हणून थांबू पाहू बरी वाटतेय रे जागा असे म्हणून थाम्बवले.

रीसॉर्टच्या समोर जो बीच आहे तो एक्दम भारी आहे, त्याच्या प्रेमात पडलेले मी.

रीसॉर्ट मध्ये गेल्यावर अर्ध्या तासानंतर आम्हाला दोन रूम्स दिल्या एकीचाही एसी चालू नव्हता.एसी रूम्स न मिळाल्याने नवरोबा गाडी चलू करून त्यात एसी लावून बसले. एक तास एसी चालू होतो नाही होत हे पाहिल्यावर त्यांच्याकडे आम्ही रूम्स बदलून मागितल्या. तर नवीन रूम्स द्यायला आठ वाजले. नवीन रूम्सचे एसी देखील चालू नव्हते.

एसी टेक्निशियन येऊन एसी चालू करून देईपर्यंत आम्ही खायला बटाटा भजी आणी बटाटा जिप्स मागवले. एक तर रिसॉर्ट मध्ये पुरेसा उजेड नव्हता. खाजणाच्या बाजूला जागा असल्याने किंवा काही ही कारणाने प्रचंड डास होते, त्या डासांना हाकलत काळोखात भजी आणि चिप्स खाल्ले. चिप्स संपवल्यावर माझ्या लक्शात आले की ज्या प्लेटमध्ये चिप्स दिले होते ती मेलामाईनची प्लेट कळकट आणि चक्क तुटलेली - मध्यभागी तीन इंचाची आरपार चीर गेलेली होती. त्याक्षणी मी तिथून परत फिरायचा निर्णय घेतला. गाडीचे डिझेल किती खर्च करायचे एसी साठी ह्या विचाराने विना एसी च्या खोलीत जाऊन झोपलेल्या नवर्‍याला उठवलं.

अर्थात नंतर त्यावेळच्या केअरटेकर बरोबर वाद. सॉरी मुलाने चूक केली तो नवा आहेम तुम्ही जाऊ नका मी तुम्हाला दुसरी प्लेट देतो, मी म्हटलं डॅमॅज इज ऑलरेडी डन आता फुकटात सुद्धा राहाणार नाही इथे. तुम्ही पैसे परत करा. मग आम्ही असे पैसे परत करू शकत नाही रुल नाहीये तसा, नंतर आम्ही पैसे उद्या बँक ट्रान्सफर करतो वगैरे सांगणे. अर्थात माझा विश्वास उडालेला होता. मी पोलिस स्टेशनला जायची तयारी करणे. तुम्ही इमॅजिन कराल तो सगळा वाद झाला. मग ओळ्खीच्या एका इन्स्पेक्टरला फोन केला तर तो नालासोपार्‍यातला राहणारा होता. मग तो त्या केअर्टेकरशी बोलला. नंतर तिथे उभे असणार्‍या एका माणसाशी बोलला. तो माणूस ह सगळा तमाशा तिथे उभं राहून पहत होता. मग ज्या इन्स्पेक्टरला फोन केला होता त्याच्याकडून कळले की तो माणूस त्या जागेचा मालक होत आणि ती जागा डेव्हलप करून रिसॉर्ट म्हणून चालवायला त्याने दुसर्‍या कंपनीला दिली होती. शिवाय तो मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या संरक्षणाला असलेला पोलिस होता. त्या माणसाने इन्स्पेक्टरला शब्द दिला की ह्यांना पैसे देववण्याची जबाबदारी माझी. मग केवळ दोन डिपार्टमेण्टची माणसे एक्मेकांना शब्द देत आहेत म्हणून मी गप्प बसले. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी नालासोपारा स्टेशनला जाऊन पैसे घेतले. त्यावेळी आम्हाला कळाले की मॅनेजर आणि केअर्टेकर अत्यंत उर्मट आहेत आणि स्टाफला व्यवस्थित वागवत नाहीत शिवाय रिसॉर्ट वर येणार्‍या लोकांच्या पुढ्यात खुषाल सिगरेट फुंकत पायावर पाय घेऊन बसून राहातात.

ह्याच्यापुढे ऑथेंटिक रीव्ह्यु शिवाय कोणत्याही रिसॉर्ट मध्ये जायचे नाही असे ठरवले आहे.

 
 

युरोपातील झेक रिपब्लिक या देशात शेजारच्या देशातून रस्त्यावरून प्रवेश करताना काही पैसे भरावे लागतात. त्यामध्ये स्कॅम होत असते आणि त्यामुळे अर्थातच पर्यटकांची फसवणूक केली जाते. हे कसं करतात हे उघड करणारा व्हिडिओ.

फसवणूक टाळण्यासाठी ऑफिशियल मशिनींमधूनच तिकिटे घ्या. ही ऑफिशियल मशीन सहजासहजी दिसणार नाहीत अशा ठिकाणी असतात. तर फसवणुक करणारे दुकान उघडून अगदी समोरच बसलेले असतात.

Europe's HIGHWAY STICKER SCAM Exposed (Honest Guide) : https://www.youtube.com/watch?v=FsWcc-9KMEc

वरील व्हिडिओ एक वर्षापूर्वीचा आहे. नुकताच त्याचा अपडेट देणारा व्हिडिओही आला आहे. परिस्थितीत काही सुधारणा नाही.

They Sued Us But Failed. Let's Expose Them Again! : https://www.youtube.com/watch?v=9_JfUukoK4k

 
 
बिजिंग वरून ग्रेट वॉल ऑफ चायना बघायला गेलो तेव्हा आमच्या चिनी गाईडने निक्षून सांगितले की जिथुन आपण सुरवात करणार आहोत तिथल्या दुकानात काहीही विकत घेऊ तर नकाच पण कुठल्याही वस्तूला हात लावू नका आणि हातात दिली तरी घेऊ नका. नम्रपणे नको असे सांगा.
तो ट्रॅप असतो, त्या वस्तु आधीच तुटलेल्या अलगद कळणारही नाही अशा जोडल्या असतात कुठे धरायचे ते त्यांनाच माहीत असते. तुम्ही हात लावला की तुटल्याच समजा. मग तुम्हाला त्याचे पैसे देण्या शिवाय गत्यंतर नाही.
------
दिल्ली बद्दल अनेक गोष्टी ऐकल्या असतील, पण मुंबईतही अशा काही गोष्टी होतात हे मला काही वर्षांपूर्वी कळले.
जर्मनीहुन एक कलीग आला होता आणि मुंबईला आम्ही कस्टमर व्हिजिटला गेलो होतो. माझा नेहमीचा टॅक्सी वाला होता, युपीचा. जर्मन कलीगला बायकोसाठी काहीतरी घ्यायचे होते, तेव्हा आम्ही बांद्र्याला पोचतच होतो, टॅक्सी वाल्याला सांगितले चांगला मॉल माहीत असेल तर तिकडे घे.
तो एका मोठ्या गिफ्ट शॉप टाईप दुकानाकडे घेऊन गेला, म्हटले इकडे नको. तर म्हणाला काही घेऊ नका पण दुकान एक राऊंड तर मारून या. मग नेतो मॉल मध्ये. म्हटलं का? तर म्हणे या दुकानात फॉरेनरला आणले की आम्हाला ५००₹ मिळतात मग त्याने काही घेतले नाही तरी.
गंमत म्हणुन आत जाऊन बघावे असा विचार केला तर आत जाताच एवढे दणकून स्वागत झाले जणु आम्ही मुख्य अतिथी आणि ते केव्हाचे आमची वाट पाहताहेत. ते पाहूनच त्याच्याही डोक्यात घंटा वाजली, म्हटले नुसते पाहायलाही नको, लगेच वळून बाहेर आलो. ड्रायव्हरला सांगितले परत अशा दुकानात आम्हाला कधीही न्यायचे नाही.
 

१९९५-२००० चा काळ. दिल्ली चंदिगढला फोन वरून हॉटेल बुक करून तिथे स्टेशनवर/विमानतळावर पोचून पुढे रिक्षा/टॅक्सीने हॉटेल वर पोचणे एक दिव्य असे. आपण ज्या हॉटेलला घेऊन जा म्हणुन सांगितले त्या ऐवजी त्यांना कमिशन मिळेल त्या हॉटेलमध्ये घेऊन जाण्यास ड्रायव्हर लोक कुठल्याही थराला जात. आपण सांगू ते हॉटेल बंद पडलेय, अरे कालच त्या हॉटेलला आग लागली, तिथे तर काल पोलिसांची रेड पडली धंदा चालतो तिथे, त्या हॉटेलचे आता नाव बदललंय अमुक हॉटेल झालंय वगैरे नित्याचे. या सगळ्याला आपण पुरून उरलो की दुसऱ्याच हॉटेल समोर थांबवून साहेब हे हॉटेल पाहून तर घ्या, नाही पटलं तर नका राहु एकदा बघुन तर घ्या. आमच्या कंपनीचा काँट्रॅक्ट असतो डायरेक्ट पेमेंट होते हॉटेलचे आम्ही पैसे दिले तर परत मिळत नाही वगैरे थापा मी आधी मारायचो, तर ते म्हणणार ज्याने काँट्रॅक्ट ठरवला तो कमिशन खात असेल, तुम्ही नवा काँट्रॅक्ट ठरवा चांगली हॉटेल्स दाखवतो तुम्हाला पण कमिशन मिळेल. नुसती कटकट. (यापेक्षा अहमदाबाद, बरोडा वाले बरे. बुकिंग असेल तर एवढे भाडे, नसेल तर दहा रुपयात घेऊन जातो म्हणायचे.)

सगळेच एवढ्या चिकाटीने मागे लागत नसत, पण थोडीफार तरी नाटकं करत, काही तर भयंकर करत.
मी पण हळूहळू निर्ढावलो आणि आग लागली म्हटलं तर हो बरोबर त्याच्याच चौकशीला आलोय फायर सेफ्टी डिपार्टमेंट कडून, रेड पडली म्हटले बरोबर, त्याचीच स्टोरी कव्हर करायला आलोय आमच्या पेपरसाठी अशी उत्तरं देऊ लागलो.

एकदा दिल्ली वरून चंडीगडला बसने पहाटे पोचलो.
जवळ पास सायकल रिक्षाच होत्या आणि हॉटेलही फार लांब नव्हते. नाही ! त्याच हॉटेल मध्ये न्यायचं आणि मध्ये दुसऱ्या हॉटेल बद्दल बोलायचंही नाही अशी तंबी देऊन रिक्षा ठरवली.
तर रिक्षा वाल्याने त्याच हॉटेलच्या कागाळ्या सुरू केल्या, लोकांचे सामान चोरीला जाते अन काय काय. मध्ये दुसरा रिक्षावाला क्रॉस झाला तर ओरडून त्याला म्हणाला "साब को अमकेही हॉटेल मे जाना है, बताओ" तो: " वहा कलही लडकी पकडी।" हा "देखो साब, मै ने बताया ना!"
मी "लडकी पकडी तो उधरही ले चलो."
आणि त्याने धाडकन रिक्षा कडेला घेऊन थांबवली आणि "मैने नही ले जाणा आप को, मुझे नही फसना है कोई लफडे मे।" असे म्हणुन सरळ एका टपरी कडे निघून गेला. पैसेही मागीतले नाहीत काही. मी बॅग घेऊन पुढच्या चौकात जाऊन दुसरा रिक्षा केला.
हॉटेलवाल्याला झाला प्रकार सांगितला तर म्हणाला आम्ही धुतला असता त्याला हे कळल्यावर म्हणुन त्याला चेहरा दाखवायचा नव्हता आम्हाला. आधी पण असे प्रकार झालेत.

२००० नंतर मग वेगळी हॉटेल्स, त्यांचाच पिक अप असे सुरू झाले आणि हे ऍडव्हेंचर्स दुर्मीळ झाले.


मलाही हैदराबाद मध्ये जाम फसवलं आहे
रिक्षा तर कैच्याकै महाग असतात तिथं
मी एक बिल्डिंग शोधत होतो, रिक्षावाल्याला विचारला तर म्हणे लेके जाता, बैठो
म्हणलं किती घेणार? तर म्हणे 50रु
आणि म्हणे इतना फिक्स है, बाद में खिटखीट नई करना

म्हणलं ठिके आता काय, तेव्हा गुगल मॅप्स वगैरे नव्हते,मोबाईल पण अगदी मागासलेले असत

बसलो, आणि एक चौक ओलांडून मला म्हणे ये सामने बिल्डिंग
माझं असलं डोकं सरकला म्हणलं हेच तू बोलला असता तर मी चालत आलो असतो ना
मी अजिबात 50 रु देणार नाही
तर आरडाओरडा करायला लागला, शिव्या द्यायला लागला
बाकीचे दोन तीन रिक्षावाले आले
हिंदीत भांडणात आपण बाजू बरोबर असूनही वाद घालू शकत नाही हे कळलं
कानाला खडा म्हणून निमूटपणे त्याला पैसे दिले

नंतर कधीही रिक्षा करताना किती अंतर आहे, कितिकिमी वगैरे आधीच विचारायचो
सगळ्यात बेस्ट म्हणजे ट्रॅफिक पोलीस ला विचारायचे,इथून या ठिकाणी जायचे आहे, रिक्षाचे किती होतात
तो बरोबर अंदाज द्यायचा मग त्याप्रमाणेच रिक्षा ठरवायची
नैतर तुमचा खिसा हलका झालाच

हैदराबाद चे रिक्षावाले कचाकचा भांडतात


खूप वर्षांपूर्वी नवी दिल्लीत सुरुवातीला फसवून चांगलंच घेतलं पण नंतर साधारण नवी दिल्ली स्टेशन ते आम्ही उतरलो होतो त्या रंजीत हॉटेलपर्यन्त किती रिक्षेचा दर साधारण द्यायला हवा सांगणारी चांगली लोकं पण भेटली त्यामुळे अंदाज आला. दिल्लीत मिश्र अनुभव आले. नवी दिल्लीत आपल्याला जणू नवीन बघितल्यावर पकडतात, त्यात आमचं लेकरू लहान होतं मग काय सॉफ्ट टार्गेट. नंतर मात्र फार वाईट अनुभव आले नाहीत कारण थोडे अलर्ट होतो आणि साधारण इथून इथे रिक्षा किती घेते वगैरे हॉटेलवर विचारून घेतलं.

एका प्रायव्हेट बसने दिल्ली दर्शन करत होतो, तो माणूस सांगत होता, प्रदूषण वगैरे बस जास्त करत असली तरी पैसे फेकले की काही अडत नाही आमचं. लाल किल्ल्यात मीना बाजारात काही छोट्या वस्तु अतिशय स्वस्त मिळाल्या त्या मी गिफ्ट म्हणून घेतल्या.

नंतर महाराष्ट्र मंडळ आहे तिथे गेलो. दिल्ली आग्रा मथुरा बस बुक केली, आग्रा इथे अमुक दुकानातून हे घ्या ते घ्या, असं गाईड सांगत होता, मी छोट्या वस्तु सिलेक्ट केल्या, फार काही घेतलं नाही. एकीकडे पेठा घेतला मात्र कारण बस नंतर थांबणार नव्हती. येताना पिंपरी चिंचवड च्या डॉक्टर कपलला (दोन मुलांसह होते ते), त्यांनी रात्री दिल्लीत मध्येच कुठे सोडलं, उतरल्यावर ते इथून कसं जायचं विचार करत होते, ते बघून मी फार घाबरले पण आम्हाला सुखरूप हॉटेलसमोर सोडलं.

चांदणी चौकात शाली छान स्वस्त मिळाल्या, त्या जवळच्या नातेवाईकांना गिफ्ट द्यायलाही घेतल्या. तिथे सर्व साड्या किंवा कपडे घेण्यासाठी आतमध्ये ओढायलाच बघतात, अशा ठिकाणी न जाता पराठे खाऊन आतल्या बाजूच्या गल्लीत खरेदी केली. तिथून येताना सायकलरिक्षेने आलो, स्वस्त होती, आम्ही थोडे वर पैसे दिले त्याला. काही रिक्षावाले (स्कूटर म्हणतात तिथे), मुलाला आत ओढायलाच बघायचे बसा बसा करत मग वाटेल तो रेट सांगायचे, त्यामुळे खूप सावध झालो आम्ही.

स्पेशल चाईल्डला घेऊन फिरताना काही फायदा घ्यायला बघत होते त्याचबरोबर काहींची मदतही झाली, म्हणून मी मिश्र अनुभव आले लिहिलं वरती.







Wednesday, October 19, 2022

Nashik Travel Blog

 
After our visit to the Statue of Unity, we travelled to Nashik to drop Renuka’s Cousin. We stayed 3 days in Nashik before leaving for Pune. This was my first visit to Nashik as a tourist as earlier visits were for a family function.

Read my Travel Blog On Statue of Unity here

About Nashik
             Nashik city is situated at the Bank of Godavari River. It is 4th largest city in Maharashtra. As per Ramayana, Laxman cut the nose of Shurpanakha (Sister of Ravana) and thus the city was named Nashik. The city is famous for Kumbha Mela which held every 12 years. Nashik is also known as the wine capital of India.

Nashik

23 December 2019: Nashik Local sightseen
             Our first destination was Nashik caves which are famous by name Pandav Leni. Pandav Leni name is nothing to do with Mahabharata’s characters Pandavas. I tried searching reason behind the name and found that earlier Caves name was Pundru Caves (In Pali language). After decades, people started calling Pandu and then word change (Term in Sanskrit apa-bhraṃśá/अपभ्रंश and in English corrupted form of a word by locals while passing name from 1 generation to another) to Pandav Caves. To visit Nashik Caves, you have to climb around 200 steps (around 20-25 min Hike). There is a total of 24 caves, one cave is chaitya (Cave number 18) and rest all are Viharas. Vihara means monastery for Buddhist whereas chaitya refers to Shrine or prayer Hall. These Caves carved between 1st Century BC and 3rd/4th century AD.

Steps to Nashik Cave

               Cave numbers start from rightmost cave starting with number 1 to Number 24 until the Left most point of Cave. Cave 1 and 2 are small in size Vihara cave. Cave 1 looks incomplete whereas Cave 2 have sitting and standing Buddha carved on the wall. You can see water trenches just besides cave 2. Cave 3 is known as Gautamiputra Vihara. It is the largest cave of the Nashik cave complex. Queen Gotami, the mother of Gautamiputra Satakarni (Satavahana Empire), built it and dedicated to Buddhist Samgha. Total of 18 cells is present in the cave. The entrance has six pillars carved with the story. You can see Bodhi tree, Stupa, Chakra and Dvarapal (Gatekeeper) over the entrance. There is a script available at the entrance of the cave, which describes the glory life of Queen Gautami mother of glorious king Gautamiputra.

Cave No 3 at Nashik Caves

Inside Cave No 3

                Caves 4 and 5 are destroyed and no script available on the wall of caves. These caves are small and you can see the few Monks Cells. Merchant dedicated cave 6 to Monks. Ascetic named Tapasini and Fisherman respectively dedicates caves 7 and 8 to monks. Cave 9 is small and no information is available.

Cave No 4 at Nashik Cave

Cave No 8

               Cave 10 is Nahapana Vihara and it is second largest Cave from Nashik Cave complex. Nahapana was the Ruler of the Western Kshatrapas emperor. Total of 16 cells is present in the cave. Pillars and walls are carving are beautiful whereas carving on pillars is similar to Karla Caves from Pune. Carved script is available in Cave 10, which describes that Cave donated to monks along with 3000 gold coin and food after defeating Satavahana Empire in year 106 CE.

Cave No 10 at Nashik Cave

               Cave 11 is Jain Cave and it has idol figure of goddess Ambika and Lord Indra. Cave 12, 13 and 14 are next to each other and small in size. You can see carved Buddha inside Caves and No script available in the caves. Cave 17 is Yavana Vihara and built-in 120 CE. It is close to the Chaitya Cave, which is Cave number 18. Cave 18 has Stupa and Pillars to complete Parikrama around Stupa.

Cave No 15

Cave No 18

Stupa from Nashik Cave

                Cave 19 is Sri Yajan Vihara and it contained a total of 21 cells. Hall in the cave is large and Shrine at the end of the wall. Shrine area has two cells. Shrine has 10 feet high Buddha seated on feet on a lotus. Carving style of Inner and outer part of caves are different which denoted that is carved in two different ages. Cave 23 and 24 have different figures of Buddha and Bodhisattvas.

Budhha Statue inside Cave Number 19

               You need around 2 to 3 hours to explore Caves properly. All Caves are facing east hence; morning will be the best time to visit the caves. After exploring caves, we visited the Dadasaheb Phalke memorial. He was the father of Indian cinema and made first Indian Film. Memorial has information on Dadasaheb Phalke’s films and on Indian cinema journey.
               We had our lunch and decided to explore the Panchvati area. According to Ramayana, Lord Rama along with wife Seeta and brother Laxman was sent to exile (Vanvas in Sanskrit meaning residence in Forest) for 14 years. After completing 10 years, they can on the northern bank of Godavari River near Nashik and lived for 2.5 years. This place is known as Panchvati. Our first destination was the Kalaram Temple. Kalaram temple name derives cos of the black status of Lord Rama. Temple was built in the year 1766 and Sardar Rangarao odhekar had a dream that statue of Rama is in River. He took that Statue and built the temple. Temple is an old and most important temple from Nashik city. Architecture and Carving on the temple are beautiful. A kilometre from Kalaram temple, there is another temple as Goraram temple. Statue of Rama in this temple is in White Color. Temple is old and carved in wood.

Kalaram Temple

               We went to see Seeta Gufaa. Photography is strictly not allowed here and you have to pass through the narrow cave. People with Asthma, Heart disease and obesity are not supposed to visit the Gufaa. It is believed that Lord Rama and Seeta use to worship Lord Shiva during their exile. Shivalinga is present inside Cave. Outside Cave area, there are five old Banyan trees. Due to which this area is called as Panchvati (Panch means Five and Vati means Banyan tree). Many Temples are located in this area, which linked with Ramayana.

Panchvati

               We explored the Panchvati area and then went to Ganga Ghat. It is one of the main Ghat on Godavari River in Nashik. A Lot of old temples are present on Ghat along with holy Rama Kund. Water is considered as Holy water and devotees come here for holy bath. Water is not clean at Ghat. This place hosts the Kumbha Mela (Gathering of Sandhu and Devotees) which happens once in 12 years. Last Kumbha Mela in Nashik was in the year 2015 and next will be in the year 2027. It is mainly known as Simhastha Kumbha Mela. When Jupiter and Sun enter in Sinha Rashi (Leo Zodiac BUT as per Hindu calendar) and when the lunar phase of the new moon (Amavasya) comes at that time Kumbha Mela begins.

Ganga Ghat, Nashik

               According to Hindu Mythology, when Amrit (immortality drink) Kumbha (Pot) appeared from Samudra-Manthan (churning of the ocean to find Treasures between God and Evil), Lord Indra asked lord Jayant (son of Indra) to take it away from evil. While carrying Amrit Kumbha, some drops of nectar fall at four places on earth as Haridwar, Prayagraj (old name Allahabad), Ujjain and Trimbak (Nashik). A Kumbha Mela is celebrated at these four places every twelve years for this reason. People believe that after bathing there during the Kumbha Mela, one can attain moksha (spiritual freedom). We went home after a visit to a holy place.

Ganga Ghat Nashik

Expenses: 
  • Pandav caves entry: INR 75/- for 3 person
  • Phalke museums entry: INR 30/- for 3 person
  • Car parking at Phalke museums: INR 10/-
  • Lunch at Sayali mutton: INR 680/- (chicken, Mutton plate, egg Burji n Rotis)
  • Snacks: ₹320 (2 Pani Puri, sandwich, 2 coffee)

24 December 2019: Nashik sightseen
               We left home by 8AM and visited Sadhana chulivarchi Missal for breakfast. It is considered as one of the most famous Missal from Nashik. Nashik along with Pune and Kolhapur is famous for Missal Dish. There are many famous Missal joints in Nashik and due to Time limit, we only able to taste this one. Overall missal was good in taste but Farshan factor was on the higher side rather than other ingredients. They have huge space and overcrowded on weekends. We went on a weekday so we got the table without waiting in the queue. Will try other missal joints in our next visit to Nashik for sure.

Sadhana Chulivarchi Missal

               After Breakfast, we went to Saptashrungi gad. It is around 55-60 km from Nashik city. Saptashrungi temple is dedicated to Goddess Saptashrungi. This place is considered a half Shakti Peetha from Three and a half Shakti Peetha of Maharashtra. There are 51 or 108 Shakti Peetha (Number varies in India based on different mythology account/Book) spread across the Indian subcontinent. The story behind Shakti Peetha is based on the death of Goddess Sati (Wife of Lord Shiva). When Lord Shiva got to know the death of Sati, he carried her body and roamed around it. Her Body parts fell on earth to become holy places known as Shakti Peetha.

Saptashrungi Gad
Saptashrungi Gad

               There is enough parking space available at the base. Many shops on road allowed you to park your vehicle without any parking fees but the catch is you have to buy Saadi and other Pooja stuff from the shop owner, which will cost you starting from INR600 and above. We parked our car in the parking area and took the funicular trolley to reach on top. Another option to reach on top is by climbing 510 steps. Trolley area is well maintained and the waiting area has shops to buy Pooja material for Goddess. Once you reach the top, you have to be a queue for Darshan. Time to take goddess Darshan depends on the date and time of your visit. It is believed that Goddess Saptashrungi took rest after defeating demon Mahishaasura.

Funicular Trolley

               After Visit to Saptashrungi visit, we went back to Nashik. Our evening destination was Vineyard. Though we do not drink Wine or any alcohol base drink, we visited the place to understand the process. We visited Sula Vineyard where you can take a tour to understand the Winemaking process. Overall, the vineyard was well decorated and maintained. They also have a tasting tour (Not sure but you can taste a couple of wine by paying some charges) and restaurant. We went to York winery which is a few kilometres from Sula. They also have some facilities like Winemaking tour, Wine tasting, and shop to buy Wine and restaurant. We got to know that food is good at York winery. We had a good dinner before our day ends.

Sula Vineyard

Expenses:
  • Car petrol: INR 2100/-
  • Missal: INR 398/- (3 Missal, Jilabi in Sweet, water bottle)
  • Entry fee at Saptsrungi: INR 30/-
  • Ropeway ticket: INR 270/- for 3 people
  • Parking at Saptsurngi: INR 50/-
  • Dinner at York: INR 1500/- (Soups, 1 veg and 1 Non-veg Starter, Veg Pulav, Chicken Biryani and Cold drink)

25 December 2019: Nashik and Travel back to Pune:
               We woke up at 8AM and left Nashik after breakfast. We decided to visit places like artillery museum (Deolali), Veer Savarkar smarak at Bhagur (Birthplace of freedom fighter Veer Savarkar), Gargoti mineral museum, Sinnar and Gondeshwar Temple at Sinnar. Our first destination was the artillery museum. Due to national holiday, the Museum was closed but they allow us to see the artillery, which is kept for display in open ground. The museum is located in Army camp from Deolali. There are old artillery weapons, Tanks, canons and Aircraft displayed in open ground. The museum building was closed due to holiday. Detailed information is available for each artillery.

Artillery Museum, Deolali

Artillery Museum, Deolali

Artillery Museum, Deolali

              Post artillery museum visit, we went to Veer Savarkar smarak. It is the birthplace of great freedom fighter Veer Savarkar. House has resorted and now converted into a museum. You are allowed to roam in the house. Volunteer/Caretaker of property explains to us about the place. We spend some time inside the house for meditation. There are books on Veer Savarkar available for sell.

Veer Savarkar Smarak

               Our journey begins towards Pune. We took a small detour to Sinnar for Gargoti Museum. It is one of the biggest private mineral collection. This museum has a collection of beautiful natural mineral and gem found in India. The museum has two-floor, which divides the collection into Deccan plateau collection and Prestige Gallery. Deccan plateau gallery displays mineral and crystals collected from Maharashtra and nearby Maharashtra state. Prestige gallery contains a collection of exclusive and rare collection from India and around the world. They have rocks from Moon and Mars as well as fossils. A guide from Museum gives you detail information about the huge collection. There is one shop where you can buy a few crystal, Gems and ornaments. It required more than an hour to see the entire museum.



             Our last destination was Gondeshwar Temple. It is located at Sinnar and temple dedicated to Lord Shiva. Temple was built in 11 or 12 century during Yadav dynasty. Temple Complex has Shiva temple at the centre and 4 small temples of Lord Vishnu, Lord Ganesh, Goddess Parvati and Lord Surya (Sun). Temple is built in Bhumija architecture. The main shrine contains Shivalinga. You can see scenes carved on the wall of the temple are from epic Ramayana.

Gondeshwar Temple, Sinnar

Gondeshwar Temple, Sinnar

Gondeshwar Temple, Sinnar

After a visit to the temple, we had lunch on the highway and reach Pune safely by 10PM.

Expenses:
  • Gargoti museums entry: ₹300/- for 3 people
  • Lunch: 340/-
  • Toll: ₹70/-
  • Coffee ₹50/- for 2 coffee
Places which we missed due to lack of Time
1. Trimbakeshwar Temple: This is one of the 12 Jyotirlingas in India
2. Nandur Madhmeshwar Bird Sanctuary: Bird Sanctuary. I have visited this place a few years back but went without Camera hence skipped blog on it. Best time to visit is from December to Mid March.
3. Someshwar Temple
4. Jain temple
5. Gangapur Dam
6. Anjneri Hill and Waterfall
7. Other Famous Missal Joints.
































लखनौ, प्रयागराज, वाराणसी आणि सारनाथ

उत्तर प्रदेश हे पर्यटनाच्या दृष्टीनं भारतातलं सगळ्यात प्रसिद्ध राज्य. परदेशी लोकांचा तर उत्तर प्रदेश म्हणजेच भारत असा गैरसमज झालेला दिसतो. क...