जगातील सर्वोत्तम शिवस्मारक आंध्रप्रदेशातील श्रीशैलम
ना बड्या घोषणा, ना मोठ्या वल्गना. नाहीत निवडणुकीच्या मोसमातील शिवप्रेमाचे पोकळ उसासे. तरीही केवळ शिवभक्तीच्या ध्यासातून छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील एक (आजच्या मितीला तरी) भव्य राष्ट्रीय स्मारक महाराष्ट्रात नव्हे, तर दूर आंध्रप्रदेशातील कर्नुल जिल्ह्याच्या जंगली पट्ट्यामध्ये आज साक्षात उभे राहिले आहे. बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या श्रीशैलम मंदिराच्या पुरातन भिंतीजवळच या अपूर्व शिवस्मारकाची उभारणी मोठ्या कष्टाने मराठी नव्हे तर तेलगु बांधवांनी केली आहे हे विशेष! आजच्या बांधकाम सामुग्रीचा विचार करता या स्मारकाचे मूल्य दोनशे कोटींच्या वर जाईल. हैदराबादपासून सुमारे अडीचशे किलोमीटर अंतरावर नलमलाई पर्वताच्या रांगांमध्ये आणि घनदाट अरण्यात असे भव्य स्मारक उभारण्याची ज्योत एखाद्याच्या हृदयात पेटावी हेच खरे नवल. १९७४ मध्ये जेव्हा रायगडावर शिवराज्याभिषेकाचे तीनशेवे वर्ष साजरे केले जात होते तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधींसह रायगडावर जमलेल्या लाखोंच्या मेळ्यात मोरोपंत पिंगळे या ऐतिहासिक नावाच्याच एका तेलुगु शिवप्रेमी इसमाच्या डोक्यात ही ठिणगी पडली.
मूळ नागपूरवासी मोरोपंतांनी आपले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खंदे कार्यकर्ते या धर्मकृत्यासाठी सोबत घेतलेच, शिवाय श्री. टी. जी. व्यंकटेश हे काँग्रेसचे माजी मंत्री आणि रायलसीमा केमिकल्स या उद्योग समूहाचे कारखानदार तसेच कै. जी. पुलारेड्डी अशी अनेक पक्षांचे आणि धर्मीयांचे बळकट हात या महान कार्यासाठी एकत्रित आणले. या तेलुगु बांधवांनी 'शिवाजी स्फूर्ती केंद्रम' या संस्थेची प्रथम स्थापना केली. १९८३ साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या दोघांना त्या पवित्र क्षेत्री पाचारण केले. त्यांच्याच हस्ते स्मारकाची मुहूर्तमेढ रोवली. कन्याकुमारीचे विवेकानंद स्मारक साकारणाऱ्या आणि महाबलीपुरम येथील स्थापत्य शास्त्र कॉलेजचे प्राचार्य असलेल्या श्री गणपती सत्पथी त्यांच्या खनपटीला अहोरात्र बसून या शिवस्मारकाचा सुंदर आराखडा बनवून घेतला.
या राष्ट्रीय स्मारकाचा तळमजला पंचाहत्तरशे स्क्वेअर फूट असून तेथे शस्त्रागारांची व चित्रकलेची अनेकदा प्रदर्शने भरविली जातात. पहिल्या मजल्यावरचा दहा हजार स्क्वेअर फुटांचा दरबार हॉल केवळ नावातच नव्हे तर प्रत्यक्ष रूपात 'दरबार हॉल' आहे. या स्मारकाची उंची ब्याऐंशी फूट असून वरच्या नक्षीदार घुमटाची उंची अठ्ठेचाळीस फुटांची आहे. या मंडळींनी मुंबईत येऊन जे. जे. स्कूल ऑफ आर्टसच्या प्रोफेसर एन. पी. खानविलकरांना गाठले होते. त्यांच्याकडून शिवरायांचा सिंहासनाधिष्ठित बारा फूट उंचीचा ब्राँझचा सुंदर पुतळा घडवून घेतला. तो चार फुटी चबुतऱ्यावर बसवला गेला आहे. त्या दरबार हॉलमधील शिवपुतळ्याच्या आजूबाजूचे भव्य खांब, वरचा देखणा छत, अनेक धातूंतून बनवलेले पुढचे दोन खूर उंचावत दिमाखात उभे ठाकलेले बारा अश्व हा स्फूर्तीदायी प्रकार मुळातून पाहण्यासारखा आहे. दरबार हॉलच्या चारी भिंतीवर शिवचरित्र कथन करणारी सुमारे साठहून अधिक भव्य रंगीत चित्रे आहेत. त्या प्रत्येक चित्राखाली अभ्यागतांसाठी इंग्रजी, हिंदी आणि तेलगुमध्ये त्या त्या प्रसंगाची नेमकी आणि नेटकी वर्णने केली आहे.
गोवळकोंडा जिंकून, राजांनी मार्च १६७७ मध्ये भागानगर (आताचे हैदराबाद) सोडले. ते तिरुपती मार्गे जिंजीकडे (आताच्या तामिळनाडूमध्ये) निघाले. तेव्हा त्यांच्या सोबत वीस हजारांचे घोडदळ आणि तीस हजार पायदळ अशी चतुरंग सेना होती. आत्माकपूरच्या तळावर आपला मुख्य फौजफाटा ठेवून ते मर्यादित सड्या फौजेनिशी मलय पर्वतावरील श्रीशैलमकडे आले. बाजूच्या नदीमध्ये स्नान करून शिवरायांनी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. एप्रिल १६७७ मध्ये राजांचा तिथे सलग नऊ दिवस मुक्काम होता. तिथला निसर्गदेवतेचा अजब नजारा पाहून राजे इतके प्रसन्न आणि प्रभावित झाले की, त्यांनी हा दुसरा कैलासच आहे असे धन्योद्गार काढले. आज हैदराबादवरून श्रीशैलम दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे. पाऊणशे किलोमीटर प्रवास केल्यानंतर नीलपर्वताच्या मोठ्या रांगा आणि दुतर्फा घनदाट राखीव जंगल लागते. श्रीशैलम जवळ येताच अचानक घोड्यावरून खाली उडी ठोकावी तशी एक खोलगट दरी लागते. तेथेच श्रीशैलसागर हे धरण डोंगराच्या खोबणीमध्ये बांधले गेले आहे. ते पार केले की उंचवट्यावर श्रीशैलम लागते.
आजसुद्धा इथली निसर्गराजी मनाला भुरळ घालते. तो शांत आणि पवित्र परिसर पाहून शिवरायांना विरक्ती आली होती. शिवरायांनी त्या प्राचीन मंदिराच्या उत्तरेस स्वखर्चाने एक भव्य गोपुरम बांधून कढले आहे. त्याचा 'शिवाजी गोपुरम' असा आज उल्लेख केला जातो. ह्याच चिरेबंदी भव्य कमानीतून कार्तिक महिन्यामध्ये दीप पूजनासाठी भाविक मंदिरामध्ये प्रवेश करतात. राजांच्या आगमनापूर्वीच त्यांच्या अनुयायांनी तेव्हा याच परिसरात घाईने एक 'ध्यानमंडपम्' नावाची टोलेजंग वास्तू बांधून काढली होती. ती कालौघात पडून गेली आहे. मात्र त्या ध्यान मंदिराचे एक जुने छायाचित्र शिवाजी स्फूर्ती केंद्राकडे उपलब्ध आहे. आता तसेच ध्यानमंदिर नव्याने बांधायचा या मंडळींनी संकल्प सोडला आहे.
शिवस्मारकाच्या शेजारीच आवारात स्मारक समितीने 'शिवाजी अतिथी भवन' नावाचे तीन मजली मोठे गेस्टहाऊस बांधले आहे. त्यामध्ये साठ खोल्यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. आवारात एक सुसज्ज ग्रंथ विक्री केंद्र, आयुर्वेदिक औषधींचे प्रदर्शन अशा बऱ्याच सोयी आहेत.
शिवराय आणि त्यांचे सुपुत्र संभाजी व राजाराम या तिघांनीही दक्षिणेत कोलार, चिकमंगळूर, जिंजी, तंजावर, बेंगलोर ते त्रिचन्नापल्ली अशा विस्तीर्ण भूप्रदेशात तलवार गाजवली होती. औरंगजेब पाच लाखाची फौज घेऊन महाराष्ट्राच्या छाताडावर बसला होता. तेव्हा स्वराज्य वाचवण्यासाठी शिवपुत्र राजाराम गोसाव्याचे रूप घेऊन सातशे मैल दक्षिणेत चालत गेले आणि आजच्या चेन्नई जवळ जिंजी येथे त्यांनी राज्य स्थापन केले हा वास्तव इतिहास आहे. शिवरायांचे महाराष्ट्रात कुठे नाही असे भव्य स्मारक दक्षिणेत व्हावे ही खूपच मंगलमय घटना आहे.
शिवरायांनी स्वखर्चाने गरीब यात्रेकरूंसाठी श्रीशैलम येथे अन्नछत्र बांधले होते. ते पुढे अनेक दशके सुरू होते. येथील नलमलाई पर्वतातील चांचू वनजमातींची अनेक गीते मी ऐकली. त्यामध्ये शिवरायांच्या श्रीशैलम भेटीचा गौरव आहेच.
दूर श्रीशैलमच्या जंगलातील शिवरायांचा तो दरबार पाहून मी जेव्हा बाहेर पडत होतो तेव्हा आमच्या भग्न रायगडाभोवतीची कावल्याची ऐतिहासिक खिंड, कोकण दिवा, लिंगाणा ही गिरीशिखरे आणि किल्ले माझ्या मनाभोवती गर्दी करत होती. शिवरायांच्या रायगडाचा जिर्णोद्वार बाजूला राहू दे किमान आजची गडावरची दुरवस्था तरी कधी संपणार आहे, हा मेलेला महाराष्ट्र रायगडासाठी तरी कधी जागा होणार आहे असे प्रश्न ते सर्वजण मला विचारीत होते.
महाराष्ट्र सरकारचे बहुचर्चित शिवस्मारक कधी पूर्ण व्हायचे असेल ते होवो. परंतु निस्सिम शिवभक्तीच्या ध्यासातून आणि कष्टत्यागातून आम्ही श्रेष्ठ असे राष्ट्रीय शिवस्मारक बांधू शकतो. इतिहासकारांच्या फळीला किंवा एखाद्या शासकीय कमिटीला न जमेल असे संपूर्ण सेतू माधवराव वाङ्मयाचे प्रकाशन करू शकतो, याचे अद्वितीय उदाहरण दूरदेशीच्या तेलुगु बांधवांनी घालून दिले आहे. मी इतिहासाच्या वेड्या शोधापायी आजच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या अटकेपर्यंत जाऊन आलो आहे. मात्र श्रीशैलम येथील शिवस्मारकासारखे शिवरायांचे अन्य भव्य स्मारक मला तरी कोठेही पहावयास मिळाले नाही. ते निर्माण करणाऱ्या शिवप्रेमी तेलुगु बांधवांना मानाचा मुजरा!!
श्री शिवराजेश्वर मंदिर (सिंधुदुर्ग)
मुंबई - सिंधुदुर्ग. 459 की.मी
पुणे - सिंधुदुर्ग. 356 की.मी
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
शिवक्षेत्र श्री "शिखर शिंगणापूर" मंदिर !
महाराष्ट्राचे आराध्यदैवत माणदेशातील
म्हणून यास काळानुरूप शिंगणापूर हे नाव पडले आहे.
इथल्या डोंगर माथ्यावर एखाद्या शिरपेचा प्रमाणे शोभणारे शंभू महादेवाचे मंदिर
हे माणदेशात सर्वात उंच ठिकाणी वसलेले तीर्थक्षेत्र आहे असे मानले जाते .
हे देवस्थान अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते
तसेच शंभू महादेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील कुलदैवत आहे.
पायरी मार्गाने येत असताना मध्ये एक जिजाऊ वेशीतून पुढे येऊन सुबक आणि भक्कम शेंडगे दरवाजा ओलांडून
मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळ पोहचता येते. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच आपणास समोर नंदी
आणि डाव्या बाजूस नगारखाना पहावयास मिळतो. नंदीच्या दर्शनानंतर मंदिरामध्ये प्रवेश करताना
भगवान शंकरास शरण आलेल्या पार्वतीचे चांदीमध्ये कोरलेले शिल्प आणि त्यापुढे कासवाचे दर्शन घेऊन
मुख्य मंदिरात प्रवेश घेऊन भगवान शंकराच्या पिंडीचे दर्शन होते.
मंदिराच्या गाभाऱ्यात एक भगवान शंकर आणि दुसरे पार्वती आशी दोन लिंग आहेत यांची आहेत.
शिंगणापूरचे हे लिंग स्वयंभू लिंग मानले जाते.
या मंदिरास एक मुख्य आणि तीन उप-प्रवेशद्वार असे एकूण ४ प्रवेशद्वारे आहेत.
मंदिराच्या आवारात दोन दीपमळा पाहण्यास मिळतात. मंदिराचे एकूण शिल्पकाम हे अतिशय सुंदर
आणि सुबक असून यातून प्राचीन काळातील उत्तम सुबक शिल्पकलेचा अनुभव घेता येतो.
इ. स. पूर्व बाराशे शतकातील या मंदिराचे सौंदर्य चिरकाल टिकविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी
त्यांच्या कारकिर्दीत जीर्णोद्धार केला. मंदिराचे छत हे एकूण १८ दगडी खांबावरती स्थित आहे.
छताचा विस्तार बाहेरील खांबापासून 3 फूट बाहेर पर्यंत विस्तारित आहे
आणि त्यावर मंदिराचे शिखर स्थितः आहे शिखराच्या समोर सभामंडपाच्या वरती दोन्ही बाजूस
हत्तीचे शिल्प पहावयास मिळते.मंडपामध्ये ३ तांब्या पितळे सजवलेले नंदी आहेत.
मंदिराच्या शिखरावर आणि खांबांवर अनेक देवी देवतांची कोरलेली शिल्पे तसेच
अनेक प्रसंग पहावयास मिळतात. मंदिराच्या आवारात बरीच लहान मंदीरे आहेत
तसेच इथे एक जुनी पंचधातूची मोठी घंटा देखील पहावयास मिळते.
मंदिराच्या दक्षीण दरवाज्यातून अमृतेश्वर मंदिराकडे जाता येते , यास "बळी महादेव" म्हणून देखील ओळखले जाते.
या मंदिराकडे पोचण्यासाठी रस्त्याची व्यवस्था देखील आहे, या मंदिराची रचना महादेवाच्या मंदिराप्रमाणेच आहे.
मंदिराचे प्रेवेश द्वार २५ फूट उंचीचे आहे.हे मंदिर चौरसाकार असलेले हे मंदिर गाभाराआणि सभा मंडप असे विभागले आहे.
मंदिराच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेस चौकोनी चबुतरे असून उत्तरेकडून मंडपाकडे जाण्यास मार्गिका आहे.
मंडपाचे छत हे १६ कोरीव दगडी खांबांवर स्थित आहे. रुंद प्रेवशद्वारातून या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रेवेश करता येतो.
मंदिराचा गाभारा चांदणीच्या आकाराचा आहे. मुख्य (महादेवाच्या) मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाज्यातून
थोड्या अंतरावर एका टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज आणि संभाजी महाराज
यांच्या स्मृती स्मारकांचे दर्शन होते.
यामध्ये अनुक्रमे पश्चिमेकडे छत्रपती शिवाजी महाराज, मध्ये शहाजी महाराज आणि पूर्वेला संभाजी महाराज अशी स्थित आहेत.
मंदिराच्या आवारातून दूरवर एक तलाव दिसतो त्यास पुष्कराज तलाव महणून ओळखले जाते
याचे बांधकाम अथवा जीर्णोद्धार शिवाजी राजांचे आजोबा मालोजी राजे यांनी कलेले आहे.
१२ दिवस चालणाऱ्या शिखर शिंगणापूरच्या यात्रेची सुरवात चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुडी पाढव्याला होते.
पंचमीला पार्वती शंकराला हळद लागते व अष्टमीला रात्री १२ वाजता देवाची लग्न लागते.
हि यात्रा महादेवाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबनात भरते.
कावड हे या यात्रेचा महत्वपूर्ण भाग मानला जातो.
देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध ठिकाणाहून पाणी घेऊन कावडी येतात.
या पैकी मनाची कावड ही सासवड इथल्या "भुतोजी तेली" ( तेल्या भूत्याची कावड म्हणून प्रसिद्ध आहे ) यांची असते.
द्वादशीला शिखर शिंगणापूरच्या पायथ्याला पोचून दुपारी ही कावड आतिशय अवघड मुंगी घाटातून डोंगरावर चढवली जाते.
हा सोहळा हा अतिशय वोलोभनीय आणि रोमांचक आसतो यामध्ये वाद्यांच्या तालावर भक्तमंडळी तल्लीन होऊन नाचतात
तसेच खांद्यावरून नेल्या जाणऱ्या कावडींची नयनरम्य अशी रस्सिखाच देखील खेळली जाते.
द्वादशीच्या मध्यरात्री कावडीच्या पाण्याने देवांस अभिषेक घातला जातो.
शिखर शिंगणापूर पासून जवळच असलेले हे देवस्थान. भगवान शंकर तपश्चर्येला बसले असता
माता पार्वतीने भिल्लीनीचे रूप घेऊन तपश्चर्या भंग केली तेव्हा महादेव क्रोधीत होऊन
त्यांनी आपली जटा दगडावर आपटली आणि तिथून पाण्याचा प्रवाह प्रकट झाला
हा गोमुखातून पडणारा प्रवाह आजही पाहण्यासा मिळतो. पार्वतीने माफी मागून शंकरास शांती केले
आणि पुढे चैत्र शुद्ध अष्टमी शिखर शिंगणापूर येथे त्यांचा विवाह झाला.
शिखर शिंगणापूरची यात्रा पूर्ण झाली असे मानले जाते.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
अष्टविनायक : १ || श्री मयूरेश्वर (मोरगाव) ||
अष्टविनायक : १
श्री मयुरेश्वराची मूर्ती :
गाभार्यातील मयूरेश्वराची मूर्तीबैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे.मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावरनागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूसऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत.
जवळच श्री बालाजी मंदिर तसेच पुरंदर किल्ला आहे
|| गणपती बाप्पा मोरया ||
http;//maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
अष्टविनायक : २ || श्री सिद्धिविनायक (सिद्धटेक) ||
इतिहास :
श्री क्षेत्र सिद्धटेक अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे.
सिद्धटेकला यात्रेकरूंना सोयीचे रेल्वेस्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. दौडवरुन शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते. नदीवर नाव चालू असते.
१) पेडगाव :
भीमा नदीच्या तीरावर प्राचीन मंदिर आणि ऐतिहासिक किल्ला आहे.
२) राशीन :
झुलती दीपमाळ आणि देवीचे मंदिर आहे.
३) रेहेकुरी :
प्राणी-पक्षी अभयारण्य आहे.
४) भिगवण :
पक्षी अभयारण्य आहे.
५) दौंड :
भैरवनाथ व श्री विठ्ठल मंदिर आहे.
|| गणपती बाप्पा मोरया ||
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
अष्टविनायक : ३ || श्री बल्लाळेश्वर (पाली) ||
येथील देवस्थानच्या भक्त निवासात निवासाची व्यवस्था आहे. तसेच दुपारी प्रसादाची व्यवस्था आहे.
२) सुधागड : किल्ला असून भृगू ऋषींनी स्थापन केलेले भोराई देवीचे मंदिर आहे.
३) सिद्धेश्वर : पालीहुन ३ की.मी. स्वयंभू शंकराचे स्थान.
४) उद्धर : पालीहुन १० कि.मी.श्री रामाने जटायुचा उद्धार केलेले स्थान.
५) उन्हेरे : पालिहुन ३ कि.मी. गरम पाण्याचे झरे असलेले स्थान.
६) पुई : येथे एकविस गणेश मंदिरे आहेत.
७) ठाणाळे : येथे कोरीव लेणी आहे.
|| गणपती बाप्पा मोरया ||
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
अष्टविनायक : ५ || श्री चिंतामणी (थेउर) ||
हडपसर येथून थेऊर पी.एम.पी.एम.एल. ही शहरी बस सेवा आहे.
प्राचीन,शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले शिवमंदिर आहे.
२) केडगाव बेट :
श्री नारायण महाराज यांचा आश्रम व दत्त मंदिर आहे.
३) रामदरा :
येथे पाण्याने वेढलेले शिवमंदिर आहे.रामदरा हे निसर्गरम्य स्थळ आहे.
४) उरुळी कांचन :
म.गांधीनी स्थापन केलेला निसर्गोपचार आश्रम आहे.
५) वाडे बोल्हाई मंदिर :
वाघोली-केसनंद मार्गावर हे मंदिर आहे.
६) तुळापुर :
भीमानदी काठी संगमेश्वर मंदिर व छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आहे.
७) मरकळ :
आळंदी जवळ मरकळ येथे भिमानदी तीरावर विपश्यना केंद्र आहे.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
अष्टविनायक : ६ || श्री गिरिजात्मज (लेण्याद्री) ||
पुणे येथील शिवाजीनगर एस.टी.बसस्थानकातून लेण्याद्री येथे जाण्यासाठी एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे.
श्री छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ.
२) ओतूर :
पुरातन असे कपर्दिकेश्वर मंदिर आणि संत तुकाराम महाराज यांचे गुरु चैतन्यस्वामी महाराज यांची संजीवन समाधी
३) कुकडेश्वर् :
कुकडी नदीच्या उगमाजवळ कुकडेश्वर् मंदिर आहे.
४) माळशेज घाट :
अभयारण्य आणि थंड हवेचे ठिकाण
५) नाणेघाट :
प्राचीन राजमार्गावरील ऐतिहासिक घाट
६) कुकडी नदी :
या स्थानापासून सुमारे तीन कि.मी.अंतरावरुन वाहते.
माहिती संकलन-:निखिल आघाडे.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
अष्टविनायका : ७ || श्री विघ्नहर (ओझर) ||
२) देवस्थानचे "भक्तभवन" आहे.भक्तगणांसाठीखास स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, हे निसर्गरम्य क्षेत्र ही आहे.
२) आर्वी :
येथे उपग्रह केंद्र आहे.
३) खोडद :
येथे आशिया खंडातील सर्वात मोठी आकाश निरिक्षण दुर्बीण बसवलेली आहे.
४) आळे :
संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेडयाच्या मुखातून वेद वदवून आपले अलौकिकत्व सिद्ध केले,त्या रेडयाची समाधी येथे आहे.
माहिती संकलन-:निखिल आघाडे.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
यमाई देवी मंदिर औंध
यमाई देवीचे देवस्थान औंध च्या दक्षिणेस असलेल्या डोंगराच्या माथ्यावर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे.
भक्त जणांवर चाललेला औंधसुराचा अन्याय दूर करण्यासाठी जोतीबा चालून आले
परंतु त्यांची शक्ती या बलाढ्य राक्षाच्या शक्ती पुढे कमी पडू लागली
तेव्हा जोतिबांनी श्री यमाई ची मदत घेऊन औंधसुराचा वध केला आणी जनतेस भयमुक्त केले.
आणी तेह्वाच हा पौष पौर्णिमेचा दिवस भक्तगणांनी आनंद उत्सव म्हणून साजरा करण्यास सुरवात केली,
आजही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
मंदिरा सभोवतालचा परिसर हा निसर्गरम्य आहे.
डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी पायऱ्या तसेच रस्ता उपलब्ध आहे.
पायरी मार्गाने डोंगर चढताना सुरुवातीस देवीच्या पादुकांचे दर्शन होते आणी
पुढे अंतर-अंतरावर दोन्ही बाजूंस संगमरवरात कोरलेली हत्ती, वाघ, सिंह, द्वारपाल
यांची शिल्पे पहावयास मिळतात तसेच डोंगरात असलेले गणेश मंदिराचे दर्शन होते.
हे संग्रहालय श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी तयार केले असून यामध्ये
अनेक चित्रकृती, शिल्पे आणी पुरातन वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
यांची संगम्राव्रातील शिल्पे आणी पुढे नजरेस पडतो.
मंदिराच्या आवारात गणपती, दत्त, विष्णू, हनुमान व सरस्वती यांच्या मूर्ती व दत्त मंदिर आहे.
तटबंदिस पूर्वेस एक खिडकी असून तिच्या दोन्ही बाजूस फिरते दगडी खांब
येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेतात. खिडकीतून सूर्योदयाची किरणे थेट
श्री यमाई देवीच्या मुखावर पडतात. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री यमाई देवीची
काळ्या पाषाणात घडविलेली आणी कमळात स्थित असलेली मूर्ती आहे.
मुक्त झालेल्या औंधासुराने देवीकडे याचना करून तिच्या मंदिरासमोर स्थान प्राप्त केले.
म्हणूनच देवीच्या मंदिरासमोर औंधासुराचेही मंदिर आहे.
या मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून या मध्ये श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी
आपल्या कुंचल्यातून चितारलेली पुरानातील घडामोडींची तैलचित्रे आहेत.
मंदिराच्या अवरमध्ये असलेली दीपमाळ हि राज्यातील सर्वात उंच दीपमाळ आसे बोलले जाते.
या मंदिराच्या शेजारीच राजवाडा आहे. राजवाड्यामध्ये देखील श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी याच्या कलाकृती आहेत.
यात्रेस महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरून देखील भक्त येतात.
मोकळाई मंदिर: औंध गावामध्ये असलेल्या तळया शेजारी असलेले हे मंदिर
जुन्या काळातील दगडी बांधकामातील आहे. जेव्हा यमाई मातेने औंदासुराचा वाढ केला
तेह्वा झालेल्या युद्ध जखमांचा दाह देवीस असह्य झाला तेह्वा मातेने
येथील तळ्यात आपलेकेस मोकळे सोडून जलविहार केला आणि दाह शमविला,
यामुळे या ठिकाणी देवीस मोकळाई म्हणून प्रसिद्धी लाभली.
तळ्यातील पाणी पवित्र आहे आणि शरीरावरील रोग नाहीसे करतो आसे मानले जाते.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
आपल्या 'औंध' मधे यमाई मंदिरात आहे
औंध गावातील यमाई मंदिरासमोर असून तिची उंची तब्बल ६५ फूट आहे...
क्रुरकर्मा अफझलखानालाही झाले नाही ..त्यालाही या दीपमाळेची भुरळ पडली ..
असा उल्लेख बाँम्बे गॅझेटिअर मधे आढळतो
कृष्णा- कोयना व शिवगंगा यांचा त्रिवेणी प्रितीसंगम...
उत्तरेहुन वाहत येणारी कृष्णा व दक्षिणेहुन येणारी कोयना दोघी अगदी आमने सामने येवून एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि नंतर एकत्र पुर्वेला वाहत
जातात.
असे काटकोनात वाहने सहसा नद्यांच्या स्वभावात नाही. पर कराडचा प्रितीसंगम मात्र त्याला अपवाद.
तसे म्हंटले तर कृष्णा व कोयना सख्या बहिणीच...
महाबळेश्वर हे या दोघीँचे उगमस्थान. पण दोघींमध्ये केवढा फरक,
थोरली बहिण कृष्णा समजुतदारपणे वगणारी. ही लहान मुलीसारखी डोँगर- दर्याँमध्ये जास्त खेळत बसत नाही.
हिला घाई असते ती घाटांवर यायची. तहानलेल्या पिकांना पाणि पाजून ताजे तवाने करण्याची.,
तर धाकटी बहीण कोयना म्हणजे खुप खोडकर...
डोँगरांमध्ये खेळणे हिला फार आवडते. हिचे सगळे मित्र पण असेच रांगडे.,
प्रतापगड, मकरंदगड, आणि वासोटा, जावळीचे खोरे म्हणजे यांचे आंगण, पण धाकटी असली तरी आंगात जोर फार...
पूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवते.
तर अश्या या दोघी. अगदी भिन्न
स्वभावाच्या पण सख्या बहिणी.
जबाबदारीने वागणारी कृष्णा तर खोडकर कोयना.
उस शेती पिकवणारी कृष्णा,
तर भात पिकवणारी कोयना.
वाईच्या गणपतीचे पाय धुणारी कृष्णा,
तर प्रतापगडच्या भवानी मातेला नमन करणारी कोयना.
पण कराडला आलेवर दोघीँचाही ऊर दाटून येतो आणि धावत येवून दोघी एकमेकांना अलिँगन देतात.
"उत्तर भारतात जे स्थान गंगा यमूनेला तेच महाराष्ट्रात कृष्णा- कोयनेला, आणि कराड म्हणजे इथले प्रयाग."
कृष्णेचा किँवा कोयनेचा एकेरी उच्चार मराठी माणूस सहसा करत नाही. आपण नेहमी "कृष्णा कोयनाच" म्हणतो.
उदा. महाराष्ट्र गितातील हे कड्व,
"रेवा, वरदा, कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी,
एक पणाच्या भरती पाणी,
मातीच्या घागरी,
किंवा आपण शाळेत शिकलेली ही कविता.-
कशासाठी पोठासाठी, देशासाठी - देशासाठी.
गंगा आणि गोदावरीसाठी, कृष्णा- कोयना यांच्यासाठी.
याच कराडच्या प्रितीसंगमात शिवप्रभूंनी व त्यांच्या मावळ्यांनी अफजल्याच्या वधानंतर शस्त्रे धुतले.
यामुळे कृष्णा कोयना व शिवगंगा असा त्रिवेणी प्रितीसंगम झाला.
हा परिसर इतका सुंदर आहे की आई जगदंबा श्री उत्तरालक्ष्मी, छत्रपती शिवाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहीते ते यशवंतराव चव्हाणांपर्यँत पण यांच्या सौँदर्याला भुलले.
याच संगमावर कराडची ग्रामदेवी आई जगदंबा श्री उत्तरालक्ष्मी व शिवप्रभूस्थापीत आई जगदंबा तुळजा भवानीचे मंदीर आहे. तसेच यशवंतराव
चव्हाण यांची समाधी आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांनी " राजा शिवछत्रपती व शेलार खिँड " मध्ये कराडच्या प्रितीसंगमाचे सुरेख वर्णन केले आहे.
या प्रितीसंगमाच्या पण दोन वेगवेगळ्या छटा आहेत. उन्हाळ्यात व हिवाळ्यात यांचे शांत व कोमल रुप दिसते. तर पावसाळ्यात याचे रौद्र रुप दिसते.
मराठी मानसाने निदान एकदा तरी कराडच्या या प्रितीसंगमाचे दर्शन घ्यावे...
सिद्धेश्वर कुरोली
महादेवाचे जागृत शिवलिंग आणि त्यावरील ११ धारी पत्रातून होणार शिवनाद ...
सातारा शहरापासून ५० कि.मी च्या अंतरावर आहे
त्यांनी दैत्यांचा नाश करुन भूमि सुफलाम् केली .त्यामुळे जनता भयमुक्त झाली.
त्यानंतर अनेक वर्षांचा काळ निघून गेला.देशात बहामनी राज्य आले.दुहीमुळे त्याचे भाग झाले.
त्यापैकी विजापुरच्या आदिलशाहीखाली हा कुरोली भाग आला.
'मी येथे प्रगट होत आहे,तरी मला वर काढावे.त्यानुसार जमिन नांगरत असताना नांगराच्या फाळाला रक्त लागल्याचे आढळले.
त्यानंतर ती जमिन खोदण्यात आली व त्या ठिकाणी पिंड निघाली.तोच हा श्री सिद्धेश्वर होय.
वेदावती गंगेत विलीन होणाऱ्या ओढ्याकाठी या पिंडीची स्थापना करुन छोटेसे मंदिर बांधले गेल.
नंतर छत्रपति शंभूराजे पुत्र शाहू महाराजांतर्फे मंदिराचा जीर्णोद्धार झाला
'श्री सिद्धेश्वरमहात्म्य' हे अध्यायी ओवीबद्ध् पुस्तक रचून प्रकाशित केले आहे.
त्यावेळेस गावातील लांबवर पसरलेले ग्रामस्थ तसेच सिद्धेश्वरचे भक्त समस्त साताऱ्यातून दर्शनासाठी येतात
आणि रथोत्सव सोहळा पाहून जातात ....
अश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत गावातील हिंदू तसेच मुस्लिम महिला हि उपवास धरतात
हे एक वैशिष्ट्य येथे पाहायला मिळते ..... तसेच सिद्धेश्वर हा आमचाही देव आहे असे मुंस्लीम बांधव अभिमानाने म्हणतात ....
शीवनाद होतो गहन । परम पावन क्षेत्र जें ॥ ४५ ||
----------- गोंदवलेकर महाराज
१)जागृत शिवालिंगातुन येणारा शिवनाद.
२)यशवंत बाबा महाराजांची समाधी
३)क्षेत्रफळानुसार मोठे गांव
४)प्रसिद्ध मराठी सिनेकलाकार दिवंगत राजा गोसवीचे यांचे जन्मगांव
५)सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गांव
६) दारूबंदी साठी प्रसिद्ध असे गाव
७) किर्तन केसरी ह.भ.प. श्री विलासबुवा गरवारे ह्यांचे गाव
१) श्री सिद्धेश्वर स्वयंभू शिवलिंग आणि त्यातून होणारा शिवनाद
२) सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराजांचे निर्वाण स्थळ
३) ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज स्थापित राम मंदिर
४) विठोबा - विरोबा मंदिर ५) हनुमान मंदिर ६) कुर्लेश्वर मंदिर ७) हनुमान मंदिर
८) खंडोबा मंदिर ९) मशीद १०) दत्त मंदिर अशी जुनी धार्मिक स्थळे आहेत.
तुळजाभवानीचे प्रतिरूप करमाळ्याची कमलाभवानी
कमलाभवानीचा इतिहास पाहिला तर मराठा सरदार राजे रावरंभा निंबाळकर यांच्या उपासनेमुळेच तुळजापूरची तुळजाभवानी माताच करमाळ्यात दाखल झाल्याचे सांगण्यात येते . तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप मानल्या जाणा-या करमाळ्याच्या कमलाभवानी मातेला मोठा इतिहास लाभला आहे .
करमाळ्याच्या पूर्वेकडील उंच माळावर वैशिष्ट्यपुर्ण स्थापत्यकलेचा नमुना असणारे कमलाभवानीचे मंदीर आहे १७ व्या शतकात बांध ण्य़ात आलेले आहे हे मंदिर हेमाडपंती शैलीतील असून मंदिरातील बांधकामावर मुघली बांधकाम शैलीचाही प्रभाव असल्याचे दिसत आहे. उंच टेकडीवर असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायथ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत दगडी पाय-यांची चढण आहे. मुख्य मंदिरामध्ये श्री कमलाभवानी मातेची ४.३ फुटाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. सिंहारूढ आणि महिषासुराचे निर्दालन करण्याच्या आवेशात उभी असलेली भवानीमाता अष्टभुजा आहे . मंदिरात कमलाभवानी मातेच्या उजव्या बाजूच्या भागात श्री महादेवाची पाषाणातील पिंड आहे. त्यामागच्या मंदिरात श्री गणेशाची काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती आहे. गाभा-यात श्री विष्णु - लक्ष्मिची गरुडारूढ मूर्ती आणि त्यामागील गाभा-यात सुर्यानारायनाची सप्त अश्व जोडलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. एकाच मंदिरात पाच देवतांचे शक्तीपंचायतन असलेले करमाळ्यातील कमलाभवानी मातेचे मंदिर दुर्मीळ आहे तसेच कार्तिक स्वामीची मूर्ती देखील या मंदिरामध्ये पहावयास मिळेल. या शिवाय मुख्य मंदिराच्या समोर तीन गगनचुंबी गोपुरे आहेत. शहरामध्ये कोणत्याही बाजूने प्रवेश करताना दुरवरूनच देवी मंदिराचे स्थान दर्शविणारी ही गोपुरे उत्कृष्ट बांधणीची साक्ष देत उभी आहेत. मंदिर बांधणीचा विचार केला तर या मंदिर बांधकामात ९६ या आकडयाला फारच महत्व दिल्याचे स्पष्ट होत आहे. कारण ७५ फुट लांबी व ६५ फुट रुंदीच्या या मंदिराची उभारणीच ९६ खांबावर झाल्याचे दिसत आहे .
अस्तंबा ऋषीची यात्रा
अस्तंबा ऋषीची यात्रा
सातपुडयातील उंच डोंगर....
दोन्ही बाजुला असलेल्या हजारो फुट खोल दरी....
नागमोडी खडतर रस्ता..
अन शिखरावर असलेले अस्तंबा ऋषीचे विश्राम स्थान...
अस्तंबा ऋषीच्या दर्शनाची ओढ़ घेवुन घोषणा करीत भाविक हजारो फुट शिखर सहज
चढतात. दिपावली पर्वावरील धनत्रयोदशीला अस्तंबा ऋषीची यात्रा भरते. ह्या
यात्रेला नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील हजारो तरुण
पदयातत्रेने अस्तंबा ऋषीच्या दर्शनासाठी शिखराकड़े रवाना होतात. निसर्गरम्य
वातावरणात वसलेल्या अस्तंबा ऋषीच्या यात्रेचे भाविकांना आकर्षण असते.
म्हणुनच या यात्रेला येणा-या भाविकांची संख्या वर्षानवर्ष वाढत आहे. समुद्र
सपाटीपासुन ४ हजार फुट उंच शिखरावर अस्तंबा ऋषीचे देवस्थान आहे. भाविकांची
अपार श्रधा असल्याने हाती भगवा झेंडा घेत `अस्तंबा ऋषी महराज की जय ' चा
जयघोष करीत भाविक पदयात्रेने हजेरी लावतात. दिवाळीच्या पर्वावर
धनत्रयोदशीला यात्रोत्सवाला प्रांरभ होत असते. शापस्थ अवस्थेत जखमांनी
विव्हळणारा अश्वस्थामा आपल्या जखमांसाठी सातपुडयाचा द-याखो-यात तेल मागतो.
आजही शिखरावर जाणा-या यात्रेकरूंणा तो भेटतो व वेळप्रसंगी रस्ताहीन
झालेल्या यात्रेकरूंना मार्गदर्शन
करतो, अशी अस्तंबा ऋषीचे दंतकथा आहे. अश्वस्थामा यांचा महाभारतात उल्लेख
असला तरी त्यांचे स्थान भारतात कुठेही आढळत नाही. मात्र अश्वस्थामा (
अस्तंबा ) उल्लेख सातपुडयाच्या कुशिमधे उंच शिखरावर असल्याचे दिसुन येते.
दिवाळीच्या पर्वाला अस्तंबा ऋषीच्या यात्रेला प्रारंभ होतो. तळोदा येथुन एक
दिवस अगोदरच कॉल्लेज रोडपासुन वाजत-गाजत मिरवणुकीने मंदिराचे दर्शन घेवुन
यात्रेकरू अस्तंबा ऋषीच्या यात्रेसाठी रवाना होतात. कोठार, देवनदी, असली,
नकट्यादेव, जूना अस्तंभा, भिमकुंड्या या मार्गाने अस्तंबा ऋषी यात्रेला
जातात.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
ब्रम्हदेव, सिद्धेश्वर राम मंदिर, ठाणे
ब्रम्हदेव, सिद्धेश्वर राम मंदिर, ठाणे
हि मूर्ती काही वर्षांपूर्वी सिद्धेश्वर तलावातील गाळ काढताना मिळाली. मूर्ती साधारणपणे ८व्या शतकातील म्हणजे शिलाहारकालीन आहे. महाराष्ट्रात शिलाहारांच्या ३ शाखा – उत्तर कोकणाचे शिलाहार, दक्षिण कोकणचे शिलाहार आणि कऱ्हाड / कोल्हापूरचे शिलाहार. आता काहींना प्रश्न पडेल, शिलाहारांच्या तीन शाखा, मग हि मूर्ती कोणत्या शिलाहार शाखेने तयार करून घेतली आणि ती कोणत्या मंदिरात होती?
उत्तर कोकणचे शिलाहार या राजघराण्याने हि मूर्ती तयार करून घेतली. याच राजघराण्याने इ.स.१०६० मध्ये अंबरनाथचे सुप्रसिद्ध शिवमंदिर बांधले. हे राजघराणे राष्ट्रकूट राजघराण्याचे मांडलिक. इ.स. ८०० ते १२५० अशा साधारणपणे ४५० वर्षांचा त्यांचा काळ. या शिलाहार राजांची राजधानी होती श्रीस्थानक (सध्याचे ठाणे).
सिद्धेश्वर तलाव परिसरात ब्रम्हदेवाचे मंदिर असावे आणि हि मूर्ती त्या मंदिरातील गाभाऱ्यात असावी. तसेच मूर्तीची नित्यनेमाने पूजा होत असावी. काळाच्या ओघात मंदिर नष्ट झाले असावे आणि नंतर मुर्तीभंजंकापासून मूर्तीला वाचवण्यासाठी तिला मंदिराजवळ असलेल्या तलावात (म्हणजे आताच्या सिद्धेश्वर तलावात) लपवून ठेवली असावी.
ह्याचाच अर्थ असा निघतो कि ८व्या शतकापर्यंत महाराष्ट्रात
ब्रम्हदेवाची पूजा होत होती. अशीच दुसरी एक ब्रह्मदेवाची मूर्ती नालासोपारा
येथील मंदिरात आहे.
मूर्ती सुमारे ५ फुट उंच आणि उभी आहे. मूर्तीचे चारी हात भंगले असल्यामुळे
हातात काय असावे हे कळायला मार्ग नाही. मुर्तीशास्त्राप्रमाणे अक्षमाला,
वेद, कमंडलू आणि माला असावी. मूर्तीला चार डोकी असून तीन दर्शनी भागात, तर
चौथे डोके मूर्तीच्या मागच्या आहे. सर्व तोंडास दाढी आणि मिशी दाखवली आहे.
डोक्यावर अप्रतिम कोरीवकाम केलेला मुकुट आहे. कानात कुंडले असून जानवे आणि
करगोटा धारण केले आहे. अंगावर वेगवेगळे अलंकार दाखवले आहेत. मुर्तीच्या
उजव्या बाजूला सावित्री आणि डाव्या बाजूला सरस्वती खोदलेली आहेत. दोन्ही
बाजूंना हंस हे वाहन कोरले आहे. मूर्तीच्या मागे कलाकुसरयुक्त सुंदर
प्रभावळ आहे.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
श्री क्षेत्र भालचंद्र गणेश मंदीर(गणेशखिंड),अहमदनगर
श्री क्षेत्र काळभैरवनाथ मंदीर पुणवाडी,अहमदनगर
पुणवाडी,अहमदनगर
२. संत खुशालभारती महाराज
मार्गशीष वद्य प्रतिपदा ते वद्य नवमी या कालखंडामध्ये कीर्तन, प्रवचन,ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन विविध प्रकारचे कार्यक्रम होतात. आमटी-भाकरीचा भंडारा असतो. २०-२५ हजार लोक भंडारयाचा लाभ घेतात.
*********************
श्री सिध्देश्वर मंदीर, सिध्देश्वरवाडी, पारनेर,अहमदनगर
हे बांधकाम विश्वकर्मा यांच्या काळाचे आहे. येथे शिलालेखमोडी लिपीमध्ये कोरलेले आढळते. रामायण व महाभारताचा अभ्यास केल्यास पाराशर ऋषींना येथे तपश्चर्या केलेली आहे. या मंदीराचा संबंध पुराणाशी आहे.
केडगावची रेणुकामाता,अहमदनगर
याच मंदिरात दैवदैठण येथील संत शिरोमणी श्री. निंबराज महाराज काशीयात्रेहून गंगेची कावड घेऊन परतत असताना देवीने गवळीच्या स्वरुपात दर्शन दिले. मंदिराच्या जवळपास वस्ती नसलेल्या ठिकाणी निंबराज महाराज आले असताना भुकेने व्याकूळ झालेले होते. त्यांनी सरळ देवीस विनवणी केली, तर साक्षात देवी गवळण होऊन डोक्यावर दुधाचा माठ घेऊन आली. त्यांनी अंतज्ञानाने जाणले व ते देवीभक्त झाले. त्यांनी आपल्याबरोबर काशीयात्रेहून आणलेली गंगेची कावड मंदिराशेजारील बारवेलमध्ये ओतली. आज कितीही उन्हाळा असलातरीही बारवेलमध्ये पाणी असतेच.
१९४५ मध्ये के. बाबासाहेब मिरीकरांनी मंदिरापर्यतचा रस्ता ब्हावा, अशी अपेक्षा श्री गुरव कुटूंबीयांनी व्यक्त केली. येथे नवरात्रात घटी म्हणून स्त्रिया राहतात. मंदिराबाहेर पुरातन दीपमाळ आहे. परिसरात आराधी लोकांना राहण्यासाठी परसळी (ओवऱ्या) आहेत. मंदिराची पूजाअर्चा चार गुरवांच्या घरात विभागली आहे. शहरालगत असलेले हे मंदिर नवरनवला. मंदिराभोवती उंच तट असून, मुख्य मंदिरासमोर प्रशस्त प्रागंण आहे. मंदिराशेजारी भाविकासांठी सुंदर बगिचा तयार वात्रोत्सवासाठी सुशोभित करण्यात येते. येथे जाण्या-येण्यासाठी एस.टी. महामंडळाकडून जादा गाड्याची सोय करण्यात येते. हजारो भाविक देवीदर्शनाने मंत्रमुग्ध होतात. हार फुले-नारळ खाद्यपदार्थ व खेळणीच्या दुकाणे असतात. नवरात्रोत्सवातील सातव्या माळेस येथे भव्य यात्रा भरते. नवमीस मोठा होम होतो व दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपुजन होते आणि देवीचे पारंपारीक दागिने चढवीले जातात. सीमोल्लंघनाच्या दिवशी मानाच्या काठ्या श्री रेणुकामातेच्या दर्शनाने गेल्यानतंर उत्सवाची सांगता होते.
श्री विठ्ठल-रुख्मिणी(धाकटी पंढरी),अहमदनगर
श्री क्षेत्र गोरक्षनाथ मठ, मांजरसुंबा, नगर,अहमदनगर
श्रावण महिन्यात येथे महिनाभर श्रावणी यात्रा असते. मुख्य यात्रा तिसऱ्या व चौथ्या सोमवारी असते. येथे प्रत्येक महिन्याल्या राहुरीच्या गोरक्षनाथ मंड्ळ यांच्याकडुन भंडारा असतो. कार्तिक शु.१३ ला गोरक्षनाथ प्रकटदिन साजरा केला जातो. महाशिवरात्रीला देवाला गंगेच्या पाण्याने आंघोळ घातली जाते, यासाठी पायी कावडी जातात. आषाढी एकादशीला यात्रा भरते. शुध्द एकादशीला भंडारा असतो.
श्री विरभद्र (बिरोबा), मिरी (अ.नगर)
दसरयानंतर ५ दिवसांनी (कोजागिरी पोर्णिमेला ) येथे वैख असतो. हा वैख ऎकण्यासाठी आसपासच्या गावातील लोक गर्दी करतात.
पद्मावती देवीमंदीर, घोसपुरी,अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील विसापुर गावतील जठार घराण्यात एक व्यक्ती राह्त होती. तो माहुरगडाच्या जगदंबेची अतिशय मनापासुन भक्ती करत होता. त्याचे लग्न होऊन बरेच दिवस झाले ,परंतु त्याला मुलबाळ होईना म्हणुन त्याने माहुरगडच्या जगदंबेला मुलबाळ होऊ दे, असे साकडे घातले व तो जगदंबेची मनापासुन भक्ती लागला .त्याला एके दिवशी रात्री स्वप्न पड्ले की ,स्वप्नात देवीने सांगितल्याप्रमाणे तो भल्या पहाटे उठुन शेताता स्व्प्नात सांगितलेल्या ठिकाणी गेला. तेवढ्यात एका छोट्याशा बालकाचे रड्णे ऎकु आले .नंतर तो आवाजाच्या दिशेने जावु लागला .जवळ गेल्यानंतर त्याला फ़ुललेल्या तरवडाच्या झाडाखाली एक सुंदरशी मुलगी द्रुष्टीस पड्ली .त्याने ते छोटेसे बालक अलगत उचलुन आपल्या घरी आणले . तिला पाहताच त्याच्या पत्नीला व घरातील सर्वांना आनंद झाला ते दोघेही त्या मुलीचा सांभाळ ,पालणपोषण करु लागले. तिचे नाव पद्मावती असे ठेवले. जगदंबेच्या क्रुपेमुळे तिला घरातील सर्व मंड्ळी अंबिका असे म्हणत. अंबिका आता उपवर झाली .तिचे लग्न करावे असे तिच्या आई-वडिलांना वाटु लागले. मुलाचा शोध घेता घेता नगर तालुक्यातील मौजे रुईछ्त्तीशी येथील दरंदले कुटुंबातील एका मुलाशी अंबिकेचा विवाह ठरला. योग्य वेळेत तिचे लग्न करण्यात आले. अंबिका सासरी जावु येऊ लागली. दरंदलेंचा शेतीचा व्यवसाय फ़ार मोठया प्रमाणात होता. दिवस उन्हाळ्याचे होते. त्याने नांगराची इरजीक घालावयाचे ठरविले. अनेक शेतकरयांना इरजीकाचे आमंत्रण देण्यात आले. नंतर अंबिकेला न्याहरीसाठी स्वंपाक करावयास सांगितले. इरजिकीचा दिवस उगवला .अंबिकाने स्वंपाक करण्यास सुरवात केली. तिने ५ भाकरी व शेडगाभर कालवण केले. सासरे भाकरी घेण्यासाठी शेतावरुन घरी आले तर सुनबाईने भाकरीचे टोपले भरुन ठेवले होते. सासरयाने टोपले उचलुन शेतावर नेले. न्याहरीची वेळ झाली होती .शेतक्ररयांना त्यांनी न्याहरीसाठी हाक मारली. भाकरी कालवणाचे टोपले सोडले असता टोपल्यात पाचच भाकरी असल्याचे निदर्शनास आले. हे पाहुन सासरयांना विचार पडला. हे जेवण सर्वांना कसे पुरणार ? पण भुकेची वेळ असल्यामुळे सर्वांनी ठरविले की थॊडी थॊडी भाकरी खाऊया तर सासरयांनी जेवण वाढण्यास सुरवात केली. जेवढ्या भाकरी उचलल्या जात तेवढ्याच भाकरी टोपल्यात परत दिसु लागल्या .कालवणही तेवढेच दिसु लागले. सर्वांची जेवणे पोटभर जेवणे झाली तरी टोपल्यात पाच भाकरी व शेडगाभर कालवण तसेच शिल्लक राहिले. सर्वजण आश्चर्यचकित झाले .ही बातमी शेतकरयांमार्फ़त हा हा म्हणता संपुर्ण रुई गावात पसरली . अंबिकेच्या सासुला ही बातमी कळली ती अतिशय नाराज झाली .तिला वाटले की कोणीतरी काट्कीन आहे. हिला आपल्या घरंदाज कुटुंबात ठेवणे चांगले नाही,असे कुटुंबातील सर्वांना वाटले, दुसरा दिवस उजाडताच दुसरयादिवशी अंबिकेला माहेरी पाठवण्याची. सुनबाईना माहेरी घेऊन जाण्यासाठी सासरयांची नेमणुक झाली. त्याकाळी कुठल्याही प्रकारची वाहने नव्हती. सासरयाच्या घरी एक सुंदरशी घोडी होती .ती घोडी घेऊन अंबिका व सासरे यांचा प्रवास सुरु झाला. विसापुरच्या अलिकडे नगर तालुक्यातील घोसपुरी नावाचे गाव आहे. तेथपर्यंत येण्यास दुपार झालीहोती. कडक उन्हाळा असल्यामुळे घोसपुरी गावातील एका विहीरीवर विसाव्यासाठी अंबिका व तिचे सासरे थांबले. त्या विहीरीवर पाणी काढण्यासाठी काहीच साधन नव्हते. त्या विहीरीच्या मालकास विचारले असता त्यानेही काही साधन नसल्याचे सांगितले,म्हणुन त्यांनी थोडे पुधे जावुन नदीच्या कडेला झरा पाहिला व त्या ठिकाणी अंबिका पाणी आणण्यासाठी गेली. पाणी घेतले व सासरयांना दिले व अंबिका देखील पाणी प्याली. झरयाजवळील निसर्गरम्य परिसर पाहुन अंबिकेचे मन रमले व अंबिका काहीतरी निमित्त करुन सासरयापासुन दुर अंतरवर गेली .अंगावरील सर्व दाग-दागिने झरयाजवळील एका दगडाखाली ठेवुन ती तेथे गुप्त झाली. बराच वेळ झाला अंबिका काही येईना.सासरा विचारात पडला. त्याने अंबिका म्हणुन मोठ-मोठ्याने हाक मारण्यास सुरवात केली . तर गावापासुन २ कि.मी अंतरावर असलेल्या टेंभी नावाच्या डोंगरावरुन जी असा आवाज एकु येवु लागला. आवाजाच्या दिशेने सासरा घोड्यावर बसुन टेंभीच्या डोंगरावर धावत गेला. तेथे जावुन पाहतो तर अंबिका कोठेच दिसेना, टेंभीच्या डोंगरावरुन अंबिका अशी हाक मारली देवीने त्यांना गुप्त झालेल्या ठिकाणावरुन आवाज दिला .सासरे पुन्हा घोड्यावर बसुन गुप्त झालेल्या ठिकाणी आले. त्या घोड्याबरोबर त्या घोड्याचे शिंगरु होते. तेथे येवुन आपल्या सुनेस शोधले परंतु देवी दिसली नाही. यावेळी त्यांनी पुन्हा देवीला हाक मारली. त्यावेळी देवीने टेंभीवरुन आवाज दिला पुन्हा पुन्हा असे घडत राहिल्याने घोडी व शिंगरु टेकडी चढता चढता थकुन गेले .घोडी व शिंगरु ज्या ठिकाणी थकले त्या ठिकाणी त्यांचे पावले पाषाणात उमटले. त्या पाऊलखुणा आजही जशाच्या तशा दिसतात.
नृसिंह मंदीर (भातोडी),अहमदनगर
या मंदीरामध्ये पांडुरंग खंडु राऊत हे व्रुध्द बासरीवाद्क खुप सुंदर बासरी वाजवतात.
नाशिकचे मोदकेश्वर गणेश मंदिर
पैठण*
जायकवाडी प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचनप्रकल्प. या प्रकल्पाचे आराखडे प्रथमत: जुन्या हैदराबाद राज्याने तयार केले होते. त्यांमध्ये बीड जिल्हयांतील जयकुचीवाडी या खेड्याजवळ गोदावरी नदीवर २,१४७ दशलक्ष घ. मी. जलसाठ्याचे धरण बांधण्याची योजना होती. खेड्याच्या नावावरून प्रकल्पास जायकवाडी प्रकल्प हे नाव पडले. राज्यपुनर्रचनेनंतर व विविध पर्यायी जागांचा तौलनिक अभ्यास केल्यानंतर जयकुवाडीऐवजी वरच्या बाजूस असलेल्या १०० किमी. वरील पैठण येथे धरणाचे बांधकाम करावयाचे निश्चित होऊनही प्रकल्प सध्याच्याच नावाने ओळखला जाऊ लागला. धरणजागा बदलल्याने कालवे पूर्वीपेक्षा वरच्या पातळीवरून नेणे व सिंचनाखाली अधिक क्षेत्र आणणे शक्य झाले, पैठण उजव्या कालव्याची पातळी उंचावल्याने त्यामधून माजलगाव जलाशयास पुरवठा करणे तसेच गेवराई व माजलगाव या परंपरागत दुष्काळी तालुक्यांना सिंचनसुविधा उपलब्ध करणे शक्य झाले. प्रकल्प –अहवाल १९६४ मध्ये पुर्ण झाला. पहिल्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ कै. लालबहादूरशास्त्री ह्यांच्या हस्ते १८ऑक्टोबर १९६५ रोजी झाला. जायकवाडी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची सांगता २४ फेब्रुवारी १९७६ रोजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाली.
प्रसिद्ध जायकवाड धरण पाहणे हा अतिशय रम्य अनुभव आहे. जायकवाडी धरणाच्या पाण्याला आता नाथसागर असे संबोधततात. या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते सपाट जमिनीवर आहे. अशा प्रकारचे ते आशिया खंडातील केवळ दूसरे धरण आहे. शिवाय त्याचे बांधकाम मातीत केले आहे. धरणाची भिंत जवळजवळ पंधरा किलोमीटर लांबीची आहे. धरणाला २७ दरवाजे आहेत. या धरणाला मराठवाड्याला अन्यसाधारण म्हत्यव आहे. या धरणावर मासेमारीही चालते. धरणातील माशांची चव आपल्याला येथील हॉटेलमधून चाखायला मिळते. या धरणावर संद्याकाळ घालवणे हा विलोभनीय अनुभव आहे. धरणाच्या भिंतीवर उभा राहून धरणातील पाणी पाहिल्यास या धरणाची दोन रूपे आपणास पहायला मिळते. एक रूप अतिशय मनमोहक आणि दुसरे आक्राळ विक्राळ. हे धरण पहाताना एखाद्या सागराच्याच किनारी असल्याचा भास आपल्याला होतो. संद्याकाळी काळी क्षितिजापलिकडे डुंबणार्या सुर्याची किरणे समुद्राच्या पाण्याला सोनेरी करून टाकतात. हे दृश्य अतिशय मनमोहक दिसते.
जवळच ज्ञानेश्वर उद्यान आहे. या उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते म्हेसुरच्या वृंदावन गार्डनची प्रतिकृती आहे येथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच मनाला विरंगुळा मिळतो. मनमोहक फुलांनी युक्त असा बगिचा येथे आहे. लहानग्यांना खेळण्यासाठी खेळ उद्यान आहे. मुलांसाठी आगगाडी आहे. रंगीबिरंगी कारंजे आहेत. पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी धबधबाही आहे. तालावर नाचणारे पाणी पाहण्याचा एक वेगळाच आंनंद आहे. येथे आल्यानंतर आपण आपला थकवा विसरून उत्साह, आनंद मिळवतो.
पाबळ- मस्तानी गढी व विज्ञान आश्रम*
इतिहासातील अनेक पात्रे वर्तमानाला अद्याप निटशी उलगडलेली नाहीत. अनेकदा अशा पात्रांचा खरा इतिहास समजण्याऐवजी त्यांच्या विषयीच्या रंजक कहाण्याच जास्त परिचित झालेल्या असतात. थोरल्या बाजीरावांच्या मस्तानीचा उल्लेख यामध्ये खास करावा लागेल. मस्तानी कोण, कुठली, बाजीरावाबद्दलची तिची निष्ठा, तिचा मुलगा समशेर बहाद्दरनेही पेशव्यांबरोबर पानिपतच्या रणांगणावर पराक्रम गाजवत सोडलेला प्राण, हा सारा इतिहास कुणाच्या गावीही नसतो पण त्याऐवजी तिचे सौंदर्य आणि तिच्या गळ्यातून उतरताना दिसणारा रंगलेल्या विडय़ाचा रस..! या असल्या अतिरंजित कथा मात्र सर्वत्र परिचित असतात. असो, एकूणच पेशवाईतील या पात्राभोवतीचे तत्कालीन गूढ अद्याप कायम आहे.
इतिहास जे काही थोडेफार सांगतो त्यानुसार बुंदेलखंडचा राजा छत्रसालची ही मुलगी! इसवी सन १७२९ च्या सुमारास बाजीरावांच्या आयुष्यात ती आली. या दोघांमधील प्रेम जसे फुलत गेले तशी पुण्याच्या शनिवार वाडय़ावरही अनेक वादळे उठू लागली. बाजीराव-मस्तानीच्या या नात्यास आप्तेष्टांपासून ते धर्ममरतडांपर्यंत अनेकांचा उघड विरोध झाला. पुढे हा विरोध आणि ताणापासून मस्तानीला दूर ठेवण्यासाठीच बाजीरावाने तिला शिरूर तालुक्यातील केंदूर, पाबळ आणि लोणी (ता. आंबेगाव) ही तीन गावे इनाम दिली. यातील पाबळला तिच्यासाठी चार बुरुजांची एक बळकट गढीही बांधली. एकूणच या प्रखर विरोधातही बाजीरावाने मस्तानीला अंतर दिले नाही. अशातच उत्तरेत एका मोहिमेवर गेलेले असताना कुठल्याशा आजाराने बाजीरावांना घेरले आणि यात २८ एप्रिल १७४० रोजी नर्मदेच्या दक्षिणतिरी रावेरला त्यांचे निधन झाले. बाजीराव गेले पण जीवन मात्र मस्तानीचेच संपले! त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच ‘जेथे राया तेथे मी’ असे म्हणत या मस्तानीनेही पाबळच्या या गढीत आपला प्राण सोडला! गावाबाहेर जिथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या जागी तिची समाधी बांधण्यात आली.
जिवंतपणी जिची उपेक्षा झाली त्या मस्तानीच्या वाटेला मृत्यूनंतरही फक्त उपेक्षाच आली. ना तिच्या प्रेमाची कदर कोणी केली ना तिच्या मृत्यूची! मस्तानी पाठोपाठ तिची ही वास्तूही बेवारस झाली. दिवसामागे तटबंदीचे दगडचिरे निघू लागले. पुढे तर तिला नावे ठेवणाऱ्यांनीच तिच्या या गढीच्या दगड मातीने स्वत:ची घरे बांधली. आज ही गढी पूर्णपणे नामशेष होऊन तिचे खिंडार बनले आहे. या खिंडारात नाही म्हणायला तो अखेरचा एक बुरूज कसाबसा शिल्लक आहे. आता ही जागाही कोणीतरी बळकावण्यापूर्वीच तिथे या मस्तानीच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही करता आले तरच पाबळच्या इतिहासाला काही अर्थ राहील. गढीप्रमाणे समाधीचीही व्यथा! गावाबाहेर रानात असलेल्या या समाधी भोवतीच्या भिंती ढासळल्या आहेत. भोवताली झाडा-झुडपांचे रान माजले आहे. हे सारे कमी होते म्हणून की काय मध्यंतरी गुप्तधनाच्या लालसेपोटी कुणीतरी माथेफिरूने या समाधीचीच तोडफोड केली. दुर्दैवाचे हे फेरे मस्तानीच्या मृत्यूनंतरही तिला असे छळत राहिले. खरे तर सारा आमच्याच इतिहासाचा धागा. त्याचेही तितक्याच संवेदनशील हातांनी संरक्षण करण्याची गरज आहे. पण ना आमच्याकडे असे हात आहेत ना तसे मन ! नाही म्हणायला एक दिव्याचा खांब या समाधीजवळ अद्याप निष्ठेने उभा आहे आणि समाधीवरील दगडी कुंडीतील जाईचा वेल गेली कित्येक वर्षे मस्तानीच्या प्रेमाचा दरवळ पसरवत फुलतो आहे.
पाबळचा मस्तानीचा हा सारा इतिहास जसा आपल्यासमोर व्यथा बनून पुढे येतो. त्याचप्रमाणे इथल्या भूगोलाने मात्र गेल्या पाच-पंचवीस वर्षांत एक नवी कथा जन्माला घातली आहे. पाबळचा भोवताल हा तसा पूर्णपणे रखरखीत, पाण्यावाचून करपलेला माळ! अशा या माळावर १९८३ च्या सुमारास डॉ. श्रीनाथ कलबाग नावाचा एक व्रतस्थ अवतरला. शिक्षण, कौशल्य आणि कर्तबगारीमुळे देश-विदेशातील सर्व आकर्षणांना लाथ मारत त्याने इथे पाय रोवले! ग्रामविकासाचे ध्येय आणि तेही प्रयोगशील शिक्षणातून! या एकाच ध्यासातून या कर्मवीराने इथे एक प्रयोगशाळाच उभी केली- विज्ञान आश्रम! जिला भेट देण्यासाठी देश-विदेशातून अनेक अभ्यासक-संशोधक आणि सामान्य पर्यटक इथे येत असतात.
संस्थेच्या नावातच आधुनिकता (विज्ञान) आणि परंपरेचा (आश्रम) मिलाफ आहे. निसर्गावरच आधारित इथला अभ्यास, शिक्षण असे सारे काही आहे. चाकोरीबद्ध शिक्षण देण्याऐवजी मुलांची विविध कौशल्ये-गुणवत्ता विकसित करत त्यातून एकूण समाजाचाच विकास साधण्याचा प्रयत्न या प्रयोगशाळेतून केला जातो. इथे आलो की संस्थेच्या डोंबवजा खोल्यांपासून ते मुलांनीच विकसित केलेल्या विविध तंत्र कौशल्यांपर्यंतचा साराच प्रवास थक्क करून सोडतो. शेती, पाणी, हवामान, पशुपालन, गृह, आरोग्य, अभियांत्रिकी या साऱ्याच क्षेत्रातील प्रयोग संशोधन आणि कार्यानुभवात मुलांप्रमाणेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांचाही सहभाग असतो. ग्रामीण विकासावर कुठेतरी चर्चा-व्याख्याने झोडण्या-ऐकण्यापेक्षा अशा एखाद्या उपक्रमाला भेट दिली की डोळे उघडतात, पाय जमिनीवर येतात आणि हात मदतीसाठी धावतात! असे पर्यटन आपल्याला समृद्ध करण्याबरोबरच संवेदनशील करत जाते! पाबळला जाण्यासाठी पुण्यापासून शिक्रापुर पर्यंत बसेस उपलब्ध आहेत. तेथून पुढे खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागेल. स्वत:चे वाहन असेल तर अगदी उत्तम आहे.
सातपुड्यातील तोरणमाळ
महाराष्ट्रातील हिल स्टेशन्सच्या क्रमवारीत राज्यात दुसर्या क्रमांकावर तोरणमाळचा समावेश आहे. सातपुड्याच्या चौथ्या पर्वतरांगेत नंदुरबार जिल्ह्यात हा परिसर मोडतो. सातपुडा पर्वतात पंचमढी आणि अमरकंटकाच्या खालोखाल तोरणमाळचे पठार उंच आहे. हरिणीला जशी आपल्याजवळ असलेल्या कस्तुरीची कल्पना नसते त्याचप्रमाणे तोरणमाळच्या सौंदर्याची कल्पना असलेले अहिराणीच्या खान्देशात फारच कमी आहेत. कालपर्यंत इथे दळणवळणाच्या सुविधांचा अभाव होता. या सर्वांचा फायदा मात्र एक निश्चित झाला, तो म्हणजे तोरणमाळचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहिले.
सवतसडा
मस्तानी तलाव
पळसदेवमधील श्री पळसनाथ
श्री क्षेत्र पार्वतीपुर (पार)
श्री आदिशक्ती श्रीरामवरदायिनी हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठतील एक जागॄत शक्तीपीठ आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व हिंदू - मराठा सरदार, कुलवंत मराठा घराणी आणि समस्त वीरशैव समाज या सर्वांची ही कुलदैवत आहे.
श्रीरामवरदायिनी आईचे सुंदर देवालय हेमाडंपंथी पध्दतीने बांधण्यात आले आहे. मंदिराचे कळसासहित सुशोभिकरण केले असलेल्याने मंदिराच्या सौंदर्यात अमाप भर पडली आहे. मुख्य सभा मंडपासमोर असलेल्या पटांगणात एक प्राचीन झाड आहे तेथे बगाड लागते. सहयाद्रीच्या कुशीत घनदाट वनरार्इत नटलेले हे गाव. निसर्गाने अतिशय उदार अंत:करणानं अनोखे असे सॄष्टीसौंदर्य हया पावन परिसराला बहाल केले आहे. जवळूनच वाहणारी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना नदी व छ्त्रपतीच्या का ळात या नदीवर बांधलेला प्राचीन पुल हे या गावच्या सौंदर्यात आणखी एक आभूषण.
टाहाकारी मंदिर*
महाराष्ट्रात शैव, वैष्णव पंथांच्या खालोखाल या शक्तिदेवतेचा प्रसारही प्राचीन काळापासून झालेला आहे. कोल्हापूर, तुळजापूर, अंबेजोगाई, माहूरगड ही प्राचीन ‘शक्ति’स्थाने याचीच प्रचिती देतात. या प्राचीन माळेतीलच एककोरीव मणी म्हणजे नगर जिल्ह्य़ातील अकोल्याजवळचे टाहाकारी!
अहमदनगर जिल्ह्याचे काश्मीर म्हणून ओळखला जाणा-या अकोले तालुक्यात अनेक प्राचीन व कलाकुसरीने युक्त मंदिरे आहेत. अकोल्याहून समशेरपूरमार्गे टाहाकारी साधारण वीस किलोमीटरवर. अकोले आणि संगमनेरदोन्ही ठिकाणांहून एस.टी. बसची सोय. खरेतर गावात शिरेपर्यंत टाहाकारी देवीची श्रद्धा कानी येत असते. पण प्रत्यक्ष गावात गेल्यावर मात्र आढळा नदीकाठच्या त्या भव्य, कोरीव मंदिरावरील शिल्पकलेचे गारुडच मनावरआरूढ होते. त्रिदल पद्धतीचा गाभारा, अंतराळ, सभामंडप, मुखमंडप अशी मंदिराची रचना. यातील मुखमंडपच दहा खांबांवर आधारित. यावरूनच मंदिराची भव्यता ध्यानी येते. अध्र्यापर्यंत भिंत. या भिंतीचा बाह्य़ भागआणि या खांबांवर मुक्त हस्ते कोरीव काम केलेले. बाह्य़ भागावर शिव, पार्वती, गणेश, देवी आदी देवता; हत्ती, व्याल, घोडे असे प्राणी. यक्ष-यक्षिणी, अप्सरा, सुरसुंदरी आदी देवगण आणि जोडीने काही मैथुनशिल्पेहीकोरलेली! या मुखमंडपातच भिंतीलगत दगडी कक्षासनांची (बसण्याचे ओटे) रचना केलेली. मुखमंडपातील हे ‘वेरुळ’ पाहत सभामंडपात शिरल्यावर तर हे मंदिर लेणे आणखी विस्तीर्ण होते. बारा खांबांवर आधारित हा मंडप.त्याच्याभोवती पुन्हा तीन दिशांना तीन गर्भगृह. पैकी समोरचे मुख्य! हा मुख्य गाभारा आणि सभामंडपा-दरम्यान पुन्हा अंतराळाची रचना.
मंदिराची ही एकूण रचनाच गुंतागुंतीची! पण थोडेसे शांतपणे, लक्षपूर्वक पाहू लागलो की हा सारा गुंता त्यातली कोरीव कला दाखवत सहज सुटत जातो. सभामंडप आणि अंतराळाच्या खांबावर विविध भौमितिक आकृत्या,यक्ष प्रतिमा आणि देव-देवतांचे मूर्तिकाम केलेले आहे. सभामंडपाच्या छतावर एकात एक गुंफलेली वर्तुळे आणि मधोमध लटकणारे एक दगडी झुंबर आहे. अंतराळात काही देवकोष्टेही आहेत. मुख्य गाभाऱ्याच्यादरवाजावरही बारीक नक्षीकाम केले असून, त्याच्या शीर्षपट्टीवर गणेशाऐवजी देवीची संकेतमूर्ती स्थापन केली आहे. हे सारेच अफलातून! पण आपल्याकडील देवदर्शनामध्ये या इतक्या सुंदर मंदिरांना काहीच स्थाननसते. त्यामुळे मग या साऱ्या नजाऱ्याकडे दुर्लक्ष करत आपण फक्त त्या अभिषेक आणि हार-तुऱ्यांमध्ये अडकतो. दुर्दैव कुणाचे? आमचे की या जागोजागीच्या संपन्न वारशाचे हेच कळत नाही. मुख्य गाभाऱ्यातील त्याजगदंबेचे दर्शन घेत बाहेर यावे तो तिच्या बाह्य़ भिंतीवरील मूर्तिकाम थक्क करून सोडते. या मंदिराची बाह्य़रचना तारकाकृती आहे. ही भिंत अगदी छोटय़ा-छोटय़ा अंतरावर विविध कोनात दुमडली आहे. या दुमडलेल्याप्रत्येक छोटय़ा भिंतीच्या मध्यावर ओळीने हे मूर्तिकाम केलेले आहे. खरेतर टाहाकारी मंदिराचे हेच मुख्य आकर्षण! या मूर्तिकामात गणेश, शिव-पार्वती, चामुंडा आदी देवतांबरोबरच सुरसुंदरीचे तब्बल बावीस आविष्कारप्रकटले आहेत. सुरसुंदरी म्हणजे देवांगना. देवांच्या खालोखाल त्यांचा मान! त्यांच्या रचना-शैलीतून तत्कालीन कला आणि सौंदर्याचे अनेक आविष्कार उलगडतात. कुठकुठल्या या सुरसुंदरी..! कधी आरशात स्वत:चे सौंदर्यपाहणाऱ्या, कर्णभूषणे घालणाऱ्या, केसात गजरा घालणाऱ्या, केशशृंगार करणाऱ्या अशा - ‘दर्पणा’, तर कुठे नृत्य अवस्थेतील नृत्य सुरसुंदरी! बासरी, मृदंग वाजवणाऱ्या, हाती पक्षी घेतलेल्या शुकसारिका, मुलालाघेतलेल्या मातृमूर्ती अशा या त्रिभंग अवस्थेतील हे नाना सौंदर्याविष्कार! ..असे म्हणतात या सुरसुंदरीचा जन्म समुद्रमंथनातून झाला. खरेखोटे माहीत नाही, पण त्या अमृताचे भाव मात्र आजही त्यांच्या दर्शनी चमकूनजातात!
टाहाकारीचे हे मंदिर पाहिले, की मग त्याच्या निर्माणाच्या काळात उतरावेसे वाटते. या मंदिराची शैली, रचना यावरून ते यादवकालीन नि:संशय! शिवाय या मंदिराशेजारीच आणखी एक मोडकळीस आलेल्या मंदिरावर एकशिलालेख आढळला. ज्यावर साल दिले होते शके १०५० म्हणजेच आजच्या भाषेत इसवी सन ११२८! आणखी काय हवे!
टाहाकारीसारखी अनेक कोरीव शिल्पमंदिरे आज आपल्याकडे खेडोपाडी उपेक्षेचे जीवन जगत आहेत. अशा प्राचीन वास्तूंच्या देखभालीचे काम पाहणाऱ्या पुरातत्त्व विभागाचे त्यांच्याकडे लक्ष नाही तर दरदिवशी ढासळत्याबांधकामाने स्थानिक गावकऱ्यांचे मात्र चित्त लागत नाही. मग यातूनच जीर्णोद्धाराची टूम निघते. निधी जमतो आणि काम सुरू होते. पण शास्त्र-इतिहास सोडून फक्त श्रद्धेतून केले जाणारे हे प्रयोग म्हणजे ‘आजारापेक्षाउपचार जालीम!’ अशा पद्धतीचे ठरतात. टाहाकारीचे हेच दु:ख! एवढय़ा महत्त्वाच्या मंदिरापर्यंत पुरातत्त्व विभाग पोहोचलाच नाही, तेव्हा गावकऱ्यांनीच त्यांचे काम सुरू केले. जुनी, प्राचीन मोडकळीस आलेली शिखरेउतरवली. तिथे नवी अत्यंत विजोड अशी रंगीबेरंगी शिखरे चढवली. एवढा सुंदर मुखमंडप असताना त्यावर पुन्हा ‘आरसीसी’ मंडप घालण्यात आला. अनेक मूर्तीना विनाकारण शेंदूर थापला. आतील भाग रंगरंगोटीनेबटबटीत केला आणि या साऱ्यावर पुन्हा देणगीदारांच्या याद्या, नवे आरसे, झुंबरे असे बरेच काही..! हजार-अकराशे वर्षे जुने-प्राचीन असलेल्या या कोरीव मंदिराचे ऐतिहासिक मोल पार धुळीस मिळवले. टाहाकारीसारखे हेअसले प्रयोग गावोगावी सुरू आहेत आणि सरकार, संबंधित विभाग, तज्ज्ञ मंडळी आणि सुजाण लोकप्रतिनिधी या साऱ्यांनाच याकडे लक्ष द्यायला वेळ नाही! आमच्या गौरवशाली इतिहासाचाच हा भयाण वर्तमान म्हणावाकी काय! असे असले तरी टाहाकारी मंदिर आवर्जून पाहण्यासारखेच आहे. महाराष्ट्रातील प्राचीन ठेवा जपून कसा ठेवता येईल याकडे सगळ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
पिंगळजाई भवानी माता,पिंगळी
चकीत करणारी गोष्ट म्हणजे ह्या देवीच्या अगदी मूर्तीसमोर नंदी, कासव, व हनुमानाचेही मंदिर आहे पण इथे रामाची मूर्ती व शिवलिंग कुठेच पाहायला मिळत नाही...
सभामंडपातील खांबावर कोरीवकाम नाही
दीपमाळेच्या मागेच रसत्याला लागून हनुमानाचे मंदिर आहे व मंदिराबाहेर एक वीरगळ व दोन सतीशिळा पाहायला मिळतात.
मधुकेश्वर मंदिर'
वास्तूशिल्पकलेच्या अजोड नमुन्यांचं बनवासीचं 'मधुकेश्वर मंदिर'…
ऐका,या शिव मंदिराच्या काही खांबांना असं काही 'पॉलीश' केलं आहे की त्यांत
आपल्या कपड्यांचे निळा,गुलाबी सारखे रंग दिसतात ;आणि मंडपाच्या कोरीव
कारागिरी खांबांना दिलेल्या बहिर्गोल (convex) व अंतर्गोल (concave)
'इफेक्ट' मुळे आपले हात वर-खाली केल्यावर चक्क दोनाचे चार
दिसतात;देव-देवतांसारखे
लाल माती, हिरव्या गर्द झाडीच्या कर्नाटकातील देखण्या 'शिर्सी' पासून २३ कि.मी.वर असलेल्या 'बनवासी'चं दोन हजार वर्षांपूर्वीचं मधुकेश्वर(महादेव) मंदिर म्हणजे वास्तू शिल्पकला आविष्कार सौंदर्याचा एक अजोड नमुनाच ! दुस-या ते अठराव्या शतकांच्या दरम्यान चुटु वंशियांनी प्रथम बांधलेल्या, इ.स.३२५ पासून २५० वर्षे राजधानी राहिलेल्या,बनवासी च्या अप्रतिम मधुकेश्वर मंदिरात शिल्पकलेची एक-दोन नव्हे तर ४०चे वर स्तिमित करणारी वैशिष्ठे बघायला मिळतात.ती कळण्यासाठी मात्र जाणकार 'गाईड' बरोबर हवा !
सगळ्यात वैशिष्टपूर्ण आहे तो नंदी मंडपातील होयसाळा धर्ती शैलीतील प्रचंड मोठा नंदी.शिव मंदिरांतील बहुतेक नंदी हे सरळ पिंडीकडे चेहरा करून असतात.इथला नंदी तिरकस बसलेला असून,त्याचा एक डोळा शंकराच्या पिंडीकडे असून, त्यांत शांत भाव दिसतो; तर दुसरा डोळा शेजारच्या मंदिरातील पार्वतीकडे असून,तिने मारल्याने,त्यांत रागीट भाव जाणवतो.या मंडपाच्या मायादेवी कोरीव कारागिरी खांबांना दिलेल्या बहिर्गोल(convex) व अंतर्गोल (concave) 'इफेक्ट' मुळे आपले हात वर-खाली केल्यावर चक्क दोनाचे चार दिसतात.स्वत:ला देव-देव्यांसारखे चार हात करून पहायला कोणाला आवडणार नाही ? काही खांबांना असं 'पॉलीश' केलं आहे की त्यांत आपल्या कपड्यांचा निळा,गुलाबी सारखा रंगही दिसतो.स्वयंभू चतुर्भूज देव्यांनो रंगमय वस्त्रानिशी या खांबांत स्वत:ला करा नमो नम:!
मधुकेश्वर मंदिरात प्रवेश करताच दिसतात दोन विशाल स्थंभ.पहिला ४०फूट उंचीचा,एकसंध दगडातील 'ध्वजस्तंभ';आणि दुसरा 'दीप' किंवा 'ज्योतीस्तंभ'. देवालयात पाच मंडप असून,आवारात देव-देवतांसंबंधित अनेक वैशिष्ठपूर्ण गोष्टी आहेत. होयसाळ शैलीतील प्रत्येक खांबावरचं कोरीव कारागिरीचं नक्षीकामही निरनिराळं !सभा मंडपातील एका खांबांवर नागरी,हळकन्नड,तेलगु,तमिळ, संस्कृत अशा पाच भाषांतील शिलालेख असून,जमिनीवर चुटु वंशाची नागशिला आहे.त्रिलोक मंडपातील सिंहासनात खाली पाताळ;सत्व,रज,तम प्रतिकांचा भूलोक;वरती देवलोक असून,देवळातील घंटेमधून 'ओमकारा'चा नादध्वनी बराच काळ ऐकू येतो.मधुकेश्वर मंदिरात कोरलेले अष्ट दिशांचे देव त्यांच्या वाहनांसह;सपत्निक ('गाईड'ने कानडीतील पुस्तकावरून भाषांतरीत करून सांगितल्या प्रमाणे): पूर्व: इंद्रदेव-वाहन ऐरावत;पत्नी सचिदेवी.पश्चिम:वरुणदेव-वाहन मगर+हत्ती रूप;पत्नी अलकादेवी.उत्तर: कुबेरदेव-वाहन घोडा;पत्नी चित्रलेखा दक्षिण: यमदेव वाहन रेडा;पत्नी श्यामलादेवी. आग्नेय(S-W) : अग्नि-वाहन दोन तोंडी मेंढा;पत्नी अग्निस्वाहादेवी. वायव्य(N-W): वायू-वाहन सारंग(हरिणी);पत्नी अंजानादेवी.ईशान्य(N-E) : ईश्वर-वाहन नंदी;पत्नी पार्वती नैऋत्य(S-E): निराऋती-वाहन राक्षस;पत्नी दीर्घादेवी.
भित्तीचित्रात दूध देतानाची दोन तोंडाची गाय असून,तिचे एक मुख झाकले असता,वासराला पहिल्यांदीच दूध पाजत असल्याने घाबरल्यासारखी वाटते; तर दुस-या तोंडाने वासराकडे वात्सल्याने पहात असल्या सारखी वाटते.दोन देह,एक मुख अशी प्राण्यांतील विकृतीही कोरलेली दिसते.एका खोलीत बंद आहे सहाशे वर्ष जुना ग्रानाईटचा एकसंध पलंग.सूर्यनारायणा च्या मूर्तीचे खाली सात घोड्यांचे चित्र कोरलेले असून,एके ठिकाणी गणपतीची उभी अर्धी मूर्ती असून, तिचा दुसरा अर्धा भाग काशीत असल्याचं मानलं जातं.म्हणून या मंदिराला 'दक्षिण काशी' ही संबोधलं जातं.एका छोट्या नंदीवर टोर्चने प्रकाशझोत टाकला असता त्याची बुबुळे हालताहेत असा भास होतो.