बदलापूर चा इतिहास
बदलापूर व परिसराचा शिलाहारकालीन इतिहास
देवळोली गावाजवळील चावीच्या आकाराची विहीर. \ बदलापूरपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या देवळोली गावात असलेली चावीच्या आकाराची ही दगडी विहीर आहे

२) स्तंभ वीरगळ चारही बाजूने कोरलेली
बेलवली गावा जवळील शिळा शिल्प (वीरगळ )
अक्षीचा शिलालेख
वांगणी गावा जवळील काही शिळा शिल्प
नालंबी गावा जवळील लाकडात कोरलली शिल्प (लाकडातील देव )
'गधेगळ स्मारक'.

चैत्यगृहाला लाकडी तुळयांचे छत आहे. या तुळ्यांवर ब्राह्मी लिपीतील लेख आढळले आहेत.
येथील सूर्यलेणे प्रसिद्ध आहे. या लेण्यात पौराणिक प्रसंगांचे पट, सालंकृत-शस्त्रधारी द्वारपाल, वन्यप्राण्यांचे थर आणि चैत्य-स्तूपांचे नक्षीकाम कोरलेले आहे. यात सूर्य आणि इंद्राचा मानला जाणारा देखावा आहे. या पहिल्या शिल्पात चार घोडय़ांच्या रथावर सूर्य स्वार होऊन चालला आहे, रथात त्याच्या मागे-पुढे त्याची पत्नी अथवा दासी आहे. त्यातील एकीने वर छत्र धरले आहे तर दुसरी चामर ढाळते आहे. त्यांच्या या रथाखाली काही असुर तुडवले जात आहेत. अनेकांच्या मते ही सूर्यदेवता, रथातील त्या दोघी त्याच्या पत्नी संज्ञा आणि छाया तर रथाखाली तुडवला जाणारा तो सूर्याचा शत्रू राहू आहे. एका मतानुसार रथारूढ असणारे हे शिल्प शक्राचे आहे. तर काहींना यामध्ये ग्रीकांच्या हेलिओस किंवा रोमनांच्या अपोलो देवतेचा भास होतो, असेही मानले जाते.
महत्त्व
Bedse Caves
Bedse Caves near Pune - A 2300 Year Old Buddhist Monument
History
![]() |
There are two main caves.The big one at centre is the chaitya (prayer hall) with large stupa.
While the other cave is a monastery-Vihar
बेडसे लेण्याच्या दोन्ही बाजुंना छज्जे आहेत.छज्जे वेदिकापट्टी लाकडी अलंकरणाप्रमाणे प्रस्तारातुन खोदण्यात आलेली आहेत.
![]() |
| The Carving in the Chaitya are wort seeing and they do make us remind of our ancient glory. |
![]() |
कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 15:07 IST2025-08-09T14:58:55+5:302025-08-09T15:07:22+5:30
पावसाळ्यात सहलीला जाण्याची एक वेगळीच मजा असते. जमिनीवर पडणारे पावसाचे थेंब, थंड वारा... यामुळे प्रवास मजेदार होतो. दक्षिण भारतातील दोन ठिकाणे, कुर्ग आणि मुन्नार, पावसाळी पिकनिक करण्यासाठी खूप लोकप्रिय आहेत.
01 / 07
पावसाळ्यात कुर्ग आणि मुन्नार पाहण्यासारखे आहे. या ठिकाणी तुम्हाला निसर्गाचे असे दृश्य पहायला मिळते, जणू आपण प्रत्यक्षात स्वर्गाचे दर्शन घेत आहोत, असे वाटते. जर, यावेळी तुम्हीही या पैकी एखाद्या ठिकाणी जायचा विचार करत असाल, तर चला जाणून घेऊया..
02 / 07
कुर्गला भारताचे स्कॉटलंड असेही म्हटले जाते. हे दक्षिण भारतातील एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे, जे कर्नाटक राज्यात आहे. बंगळुरूपासून त्याचे अंतर सुमारे २६५ किलोमीटर आहे. कुर्ग त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
03 / 07
येथे तुम्हाला अनेक एकरांवर पसरलेल्या हिरवेगार टेकड्या आणि कॉफीचे मळे आढळतील. कुर्ग त्याच्या सुंदर धबधबे आणि नद्यांसाठी देखील खूप लोकप्रिय आहे. येथे तुम्ही किंग्स सीट, दुबरे एलिफंट कॅम्प, तलकावेरी आणि मडिकेरी किल्ला यासारखी ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.
04 / 07
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे येथील हवामान वर्षभर आल्हाददायक राहते. धबधबे आणि बागांव्यतिरिक्त, तुम्हाला येथे अनेक ऐतिहासिक किल्ले आणि मंदिरे पाहता येतात. हे ठिकाण साहसी प्रेमींसाठी देखील परिपूर्ण आहे. येथे तुम्ही ट्रेकिंग, रिव्हर राफ्टिंग आणि जंगल सफारीचा आनंद देखील घेऊ शकता. येथील अॅबे फॉल्सचे दृश्य एकदा तरी पाहणे आवश्यक आहे.
05 / 07
मुन्नार हे दक्षिण भारतातील केरळमध्ये आहे. येथेही तुम्हाला चहाच्या बागा पाहायला मिळतील, ज्या पावसाळ्यात इतक्या हिरवेगार होतात की, सर्वांना मोहून टाकतात. बंगळुरूपासून त्याचे अंतर ५३२ किलोमीटर आहे.
06 / 07
मुन्नार हे दक्षिण भारतातील केरळमध्ये आहे. येथेही तुम्हाला चहाच्या बागा पाहायला मिळतील, ज्या पावसाळ्यात इतक्या हिरवेगार होतात की, सर्वांना मोहून टाकतात. बंगळुरूपासून त्याचे अंतर ५३२ किलोमीटर आहे.
07 / 07
मुन्नारमध्ये अनेक सुंदर धबधबे आहेत जे पावसात आणखी सुंदर दिसतात. धबधब्यांव्यतिरिक्त, तुम्ही येथे एरविकुलम राष्ट्रीय उद्यान, मट्टूपेट्टी धरण, कुंडला तलाव, टॉप स्टेशन आणि चहा संग्रहालयाला भेट देऊ शकता.
पाऊलखुणा – बंदलिके : आडवाटेवरचा चालुक्य ठेवा

>> आशुतोष बापट
कर्नाटकात चालुक्यांच्या पाऊलखुणा धुंडाळताना एक खजिना गवसला. राष्ट्रकूट, कदंब, चालुक्य अशा राजवटींच्या काळातले एक महत्त्वाचे नगर ‘बंदलिके’. इथे जैन शांतीनाथ बसदी, त्रिमूर्ती नारायण मंदिर आणि सोमेश्वर मंदिर अशी ठिकाणं आहेत. अप्रतिम कलाकुसर, कोरीव व देखणं शिल्पकाम असलेली ही मंदिरे पाहण्याचा अनुभव अद्भुत असाच असतो.
एकदा धोपट वाट सोडून आडवाटेवर जायची सवय लागली की पाय आपोआप तिकडे वळतात. मग ती आडवाट कोकणातली असो, मराठवाडय़ातली असो किंवा कर्नाटकातली असो. बऱयाचदा आडवाटेवर काहीसा दुर्मिळ आणि सुंदर खजिना सापडतो आणि तो जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो. कर्नाटक प्रांत हा वारसा स्थळे, संस्कृती, कला यांनी समृद्ध आहे. मोठमोठी ठिकाणं तर इथे आहेतच, पण इथल्या आडवाटेवरसुद्धा कमालीची सुंदर स्थळं आणि देखणी ठिकाणं सापडतात. कर्नाटकात चालुक्यांच्या पाऊलखुणा धुंडाळताना असाच एक खजिना गवसला. शिरसी-बनवासी-बळ्ळीगावी असं हिंडत असताना आणि तिथली देखणी मंदिरं बघत असताना बळ्ळीगावी या ठिकाणी एक प्राथमिक शिक्षक भेटले. मोडक्यातोडक्या हिंदी-इंगजीमध्ये त्यांचाशी बोलत होतो. इतक्या लांब ही मंदिरं बघायला मी आलोय हे कळल्यावर त्यांनी आवर्जून काही ठिकाणं सुचवली. त्यातले एक होते ‘बंदलिके’. ‘बळ्ळीगावीवरून तालेगुंडा, बिलकी, शिरीहळ्ळीमार्गे फक्त 15 किमी आहे. तुम्ही अवश्य जा तिथे’, असं अगदी अजिजीने सांगत होते. रस्ता कळणारा नाही म्हणून या मधल्या गावांची नावे कानडीमध्ये लिहून दिली आणि ‘लोकांना हे दाखवा, ते वाट दाखवतील’ असे सांगितले. त्यांचा आग्रह बघूनच बंदलिकेला जायचे ठरवले आणि तिथे मोठा खजिनाच हाती आला.
बंदलिके हे इ.स.च्या 10 व्या शतकातले एक महत्त्वाचे शहर होते. राष्ट्रकूट, कदंब, चालुक्य अशा राजवटींच्या काळातले एक महत्त्वाचे नगर होते. नगरखंड-70 या प्रदेशाच्या राजधानीचं हे नगर. जैन आणि कालामुख या संप्रदायांचे हे महत्त्वाचे केंद्र. बंदलिकेचा इतिहास हा इथे मिळालेल्या 31 शिलालेखांवरून समजला आहे. काही शिलालेखांतून याचे नाव ‘बांधवपुरा’ असेही आले आहे. या गावी जैन शांतीनाथ बसदी, त्रिमूर्ती नारायण मंदिर आणि सोमेश्वर मंदिर अशी ठिकाणं आहेत. बंदलिके इथे खूप मोठा पाण्याचा तलाव आहे. इथली मंदिरे या तलावाच्या आजूबाजूलाच वसली आहेत. त्यातल्या शांतीनाथ बसदीमध्ये आता कुठलीही मूर्ती नाही. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गाभारा अशी या बसदीची रचना आहे.
त्रिमूर्ती नारायण मंदिर हे तीन गाभारे असलेले मंदिर आहे. इ.स. 1160 मधे बांधलेले खास कल्याणी चालुक्य शैलीचे मंदिर. मुख्य मंदिरात विष्णूची उभी मूर्ती असून बाजूच्या दोन गाभाऱयांत शिवलिंगे आहेत. गाभाऱयाचे दार, त्याला दगडी जाळी, ललाटबिंब म्हणून गजलक्ष्मी अशी सगळी चालुक्यांची वैशिष्टय़े इथे दिसतात. तीनही गाभारे असेच सजवलेले आहेत. मंदिराच्या परिसरात बरेच वीरगळ मांडून ठेवलेले. काही वीरगळांवर जुन्या कानडी लिपीतले लेख कोरले आहेत. कुण्या वीराचे हे स्मारक त्याच्या देहत्यागानंतरसुद्धा वर्षानुवर्षे इथे उभे आहे. परिसरात अनेक लढाया झालेल्या असणार, त्याशिवाय हे एवढे वीरगळ इथे दिसायचे नाहीत. हे बघून बाहेर पडत असताना तिथला पुरातत्त्व विभागाचा सेवक माझ्यापाशी आला आणि ‘सोमेश्वर मंदिर बघितलं का?’ असं विचारलं. मी ‘नाही’ म्हटल्यावर मला म्हणाला, ‘मग एवढय़ा लांब येऊन काय बघितलं तुम्ही?’ मला हाताला धरूनच तो एका छोटय़ाशा उंचवटय़ापलीकडे घेऊन गेला. तिथे एक छोटेखानी देऊळ वसले आहे. आम्ही पाठीमागच्या बाजूने गेलो. माझ्या चेहऱयावरील आश्चर्य बघून तो म्हणाला, ‘पुढे तर चला…’ समोरच्या बाजूला गेल्यावर एक मंदिर त्याचा दरवाजा बंद असलेला, पण त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना दोन शिल्पपट! एकावर रामायण कोरलेलं आणि दुसऱया बाजूच्या शिल्पपटावर महाभारत कोरलेलं. वरपासून खालपर्यंत सात पट्टय़ा. खालून वर बघत जायचे की, रामायण आणि महाभारताच्या कथा दिसू लागतात. सगळी शिल्पं अगदी प्रमाणबद्ध आणि फार सुंदर. अगदी बारीक, पण कमालीचं कोरीव आणि देखणं शिल्पकाम केलेलं. ते बघून थक्क व्हायला झालं. बाकी मंदिर अगदी साधं. नगरखंड-70 चा प्रशासक बोप्पसेट्टी याने हे मंदिर इ.स. 1274 साली बांधले. गाभाऱयात शिवलिंग, ललाटावर गजलक्ष्मी आणि बाहेर दोन बाजूंना हे अफाट शिल्पवैभव.
कोण कधी कुठे कशासाठी एखादं मंदिर बांधेल… तेव्हा त्यांचा काय उद्देश असेल…आणि ते मंदिर शेकडो वर्षांनतरही त्या माणसाची महती सांगत उभे असेल हे सगळं आश्चर्यकारक म्हणायला हवं. त्याचबरोबर रामायण आणि महाभारत हे भारतीयांच्या मनात किती खोलवर रुजले आहे याची प्रचीती इथे आली. असं वाटलं की, हे रामायण आणि महाभारताचे शिल्पपट दाखवण्यासाठीच जणू हे मंदिर बांधले आहे की काय! त्या पुरातत्त्व विभागाच्या सेवकाचे मनोमन आभार मानले. तो म्हणाला, ‘इथे येणारी माणसे हे न बघताच जातात म्हणून माझं त्यांच्यावर बारीक लक्ष असतं.’ मला आपले राज्य आठवले. जाऊ दे. इतके सुंदर आणि देखणे शिल्पवैभव कर्नाटकात अगदी आडभागात वसले आहे ते बघता आले. भटकंती समृद्ध झाली. देवाक काळजी दुसरं काय!
– ashutosh.treks@gmail.com
(लेखक लोक संस्कृतीचे अभ्यासक आहेत)
भटकंती – एकशे आठ दिव्य मंदिरांपैकी वामनमूर्ती मंदिर

>> वर्षा चोपडे
आज जे महाबलीपूरम शहर आहे तेच शहर बळीराजाची राजधानी होती. या भागात पूर्वी घनदाट जंगल असावे. बाजूला कोचीन युनिव्हर्सिटी आहे. आजूबाजूला घरेही आहेत, पण हे मंदिर दोन सहस्र वर्षांपूर्वीचे आहे असे म्हटले जाते. विष्णू देवतेला समर्पित असलेले हे मंदिर भव्य आहे आणि आजही राजघराण्याद्वारे येथे विशेष पूजा केली जाते. शेजारी तेवढेच आकर्षक शिवमंदिर आहे. एकशे आठ दिव्य मंदिरांपैकी हे मंदिर पर्यटकांचे आकर्षण आहे.
बळीराजा आणि वामन अर्थात भगवान विष्णू यांची गोष्ट सर्वश्रुत माहीत आहे, पण या वामन देवतेचे मंदिर कुठे आहे, याबाबत खूप कमी लोकांना माहिती असावी. राजगिरी कॉलेजला जाताना रस्त्याच्या कडेला असलेले हे भव्य वामन मंदिर अर्थात थ्रिक्काकर-अप्पन मंदिर मला आकर्षित करायचे. मुंबईला जरी पोस्टिंग मिळाली तरी या मंदिराचा भव्यपण व सकारात्मक ऊर्जेचा प्रचंड स्रोत मनातून जात नाही. थ्रिक्काकर मंदिर हे ओणम उत्सवाचे केंद्र मानले जाते. कारण कोची शहरातील थ्रिक्काकर हे राजा महाबली यांचे निवासस्थान मानले जाते.
हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्रावणकोरच्या महाराजांच्या नेतृत्वाखाली 61 नादुवजी (स्थानिक शासक) यांनी ओणम उत्सवाचे संयुक्तपणे आयोजन केले होते. जातीय सलोखा हा उत्सव साजरा करण्याचे वैशिष्टय़ आहे. उत्सवाच्या भावनेनुसार ओणसद्य किंवा ओणम मेजवानीसाठी विविध धर्मांचे लोक मोठय़ा संख्येने उपस्थित राहतात. विष्णुमूर्ती असुर राजा महाबलीवर पाय ठेवत असलेल्या मुद्रेत आहे. मूर्तीचा चेहरा प्रसन्न आणि देखणा आहे. परशुरामाने मंदिराची स्थापना केल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे या मंदिरात 861 सालच्या ओणम उत्सवाच्या सर्वात जुन्या उल्लेखांच्या नोंदीदेखील आहेत. मूर्तीची सजावट मुख्यत चंदनाची पेस्ट, दागिने आणि कपडे वापरून केली जाते.
प्रत्येक दिवशी विष्णू देवतेला मत्स्य (मासे), कूर्म (कासव), वराह (डुक्कर), नरसिंह (अर्धा मानव अर्धा सिंह), वामन, परशुराम, राम, बलराम, कृष्ण, कल्की आणि त्रिविक्रम (वामनाचे दुसरे रूप) यांसह विष्णूच्या दहा अवतारांपैकी एकाच्या रूपात सजवले जाते. ओणम उत्सवात मंदिरात चक्यर कुथू, ओट्टमथुल्लाल, कथकली आणि पटकमसारख्या अनेक सांस्कृतिक कलांचे तसेच पंचवाद्यम आणि थायंबका नृत्य आणि संगीताचे सादरीकरण केले जाते. इतर वेळी येथे पारंपरिक वाद्यांचे प्रशिक्षण दिले जाते. हे मंदिर त्रावणकोर देवस्वोम बोर्डाच्या प्रशासनाखाली आहे. मंदिराच्या जवळ दोन मोठे तलाव आहेत. आतमध्ये गोडय़ा पाण्याची विहीर आहे.
दरवर्षी ओणम उत्सवात जुना ध्वज काढून नवीन ध्वज चढवण्यात येतो. मूर्तीला हत्तीवर बसून तलावाजवळ नेण्यात येते तेथे विधिवत पूजा होते. साऱ्या मंदिराभोवती नेहमीप्रमाणे दिवे लावले जातात. पारंपरिक वाद्यांचा गजर होतो. अनेक भक्त त्याकरिता मदत करतात. दिव्याच्या रोषणाईने मंदिर दिव्य प्रकाशाने उजळून निघते. पारंपरिक पांढऱ्या, सोनेरी पोशाखात सजून महिला-पुरुष, लहान मुले-मुली सामील होतात. वामन मंदिराच्या उपदेवता म्हणजे भगवती, सस्थवू, गोपालकृष्ण, नाग, ब्रह्मराक्षस आणि यक्षी. ब्रह्मराक्षस मंदिराबाहेरील संकुलात वटवृक्ष देवता आणि सर्पदेवता विराजमान आहेत.
भागवत पुराणात वर्णन केले आहे की विष्णुदेवतेने स्वर्गावर इंद्राचा अधिकार पुनर्संचयित करण्यासाठी वामन देवतेच्या रूपात अवतार घेतला होता. कारण परोपकारी असुर राजा बळी याने स्वर्ग ताब्यात घेतला होता. बळी हा विरोचनाचा मुलगा आणि भक्त प्रल्हाद याचा नातू होता. राजा बळी उदार होता आणि कठोर तपस्या आणि तपश्चर्येत गुंतला होता. त्याने आपल्या परोपकाराने आणि शूरपणामुळे जगाची प्रशंसा मिळवली होती. असे म्हणतात, इतरांकडून मिळालेल्या कौतुकामुळे तो स्वत:ला जगातील सर्वशक्तिमान राजा मानत असे आणि ते सत्य होते.
इंद्राला त्याचे राज्य परत मिळावे म्हणून ताडपत्राची छत्री घेऊन एका लहान ब्राह्मणाच्या वेषात वामन, बळीराजाकडे तीन पावले जमीन मागण्यासाठी गेला. राजा बळी उदार होता. देवावर त्याची प्रचंड आस्था होती. राजा बळीने त्याच्या गुरू शुक्राचार्य यांच्या इशाऱ्याला न जुमानता होकार दिला. त्यानंतर वामनाने आपली ओळख प्रकट केली आणि तीन पावले जमीन मागितली. वामनाने तिन्ही लोकांवर पाऊल ठेवण्यासाठी प्रचंड भव्य रूप घेतले. त्याने पहिले पाऊल स्वर्गातून पृथ्वीवर टाकले आणि दुसरे पाऊल पृथ्वीवरून पाताळात टाकले. राजा बळी आपले वचन पूर्ण करू शकला नाही. त्याने तिसऱ्या वेळी आपले डोके वामनासमोर केले. त्यानंतर वामनाने आपला पाय त्याच्या डोक्यावर ठेवला आणि राजाला त्याच्या नम्रतेसाठी अमरत्व दिले. वामनाने महाबली आणि त्याचे पूर्वज प्रल्हाद यांची पूजा करून आशीर्वाद मागितले आणि वामनाने त्याचे सार्वभौमत्व मान्य केले. काही ग्रंथांमध्ये असेही म्हटले आहे की, वामनाने बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवले नाही, तर त्याची केवळ परीक्षा घेतली. त्यानंतर त्याचे राज्य बळीला परत दिले व त्याला पुढील इंद्र होण्याचे वरदान दिले. याबाबत मतभेद आहेत. महाकाय स्वरूपात असलेल्या वामनाला त्रिविक्रम म्हणून ओळखले जाते. ही आख्यायिका उलागलंथा पेरुमल मंदिर, तिरुकोयिलूर मंदिर, उलागलंथा पेरुमल मंदिर, कांचीपुरम आणि काझीराम विन्नगरम, सिरकाझी या मंदिराशीदेखील संबंधित आहे.
या थ्रिक्काकारा मंदिरातील उत्सवाचा समारोप म्हणजे ध्वज खाली उतरवणे आणि मूर्तीला आंघोळ घालणे. याला आरत्तू असे संबोधले जाते. खजुराहोला वामन मंदिर आहे, पण ते या मंदिरासारखे फार प्राचीन नाही. राजा बळीला दुष्ट राजा म्हणून चित्रित का गेले, याचे उत्तर नाही, परंतु काही पौराणिक कथांनुसार तो एक दानशूर आणि न्यायप्रिय राजा म्हणून ओळखला जात असे. त्याच्या राज्याला स्वर्गासारखे मानले जात होते आणि त्याच्या राज्यात कोणताही अन्याय किंवा दुःख नव्हते. दिवाळीच्या सणातील बलिप्रतिपदा म्हणजेच बळीचा पाडवा म्हटलं की, आपल्याला बळीराजा आठवतो. त्याला ‘बळी’ किंवा ‘महाबली’ या नावानेही ओळखले जाते. त्याच्या राज्याचा उल्लेख ‘बळीचे राज्य’ असा केला जातो, जो ‘इडा-पीडा टळो, बळीचे राज्य येवो’ या प्रसिद्ध वाक्यात आजही वापरला जातो. नाशिक शहरात बळीराजाचे एकमेव मंदिर आहे. पुराणात जे लिहिले त्याला अनुसरून हा लेख आहे. सत्य काही का असेना, पण परशुरामाने स्थापन केलेले दक्षिणेतील हे वामनमूर्ती मंदिर अत्यंत सुंदर,भव्य आणि नक्षीदार असून तेथील पावित्र्य अनुभवायला काहीही हरकत नाही.
varshakisanc@gmail.com
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची,
कंबोडियाकडे अशा पाच गोष्टी आहेत, ज्या जगातील इतर कोणत्याही देशात नाहीत. या पाच गोष्टी कंबोडियासाठी सांस्कृतिक खजिन्यासारख्या आहेत.
01 / 07
कंबोडियाकडे अशा पाच गोष्टी आहेत, ज्या जगातील इतर कोणत्याही देशात नाहीत. या पाच गोष्टी कंबोडियासाठी सांस्कृतिक खजिन्यासारख्या आहेत, ज्यामुळे हा देश इतर देशांपेक्षा वेगळा आहे.
02 / 07
अंगकोर वाट मंदिर: कंबोडियाचा उल्लेख झाला की, सर्वात पहिले तोंडावर अंगकोर वाट मंदिराचे नाव येते. हे जगातील सर्वात मोठे धार्मिक संकुल आहे. युनेस्कोने त्याचा समावेश जागतिक वारसा स्थळात केला आहे. १६२ हेक्टरमध्ये पसरलेल्या अंगकोर वाट मंदिराचे कोरीवकाम आणि वास्तुकला ख्मेर संस्कृतीची ओळख दर्शवते. यासारखे मंदिर इतरत्र कुठेही नाही.
03 / 07
या मंदिराच्या भिंतींवर हिंदू पौराणिक कथांचा उल्लेख आहे. समुद्र मंथनाचे एक अद्भुत कोरीव काम आहे. याशिवाय रामायण आणि महाभारताच्या कथा देखील पाहायला मिळतात. असा दावा केला जातो की १२ व्या शतकात राजा सूर्यवर्मन द्वितीय यांनी हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित केले होते. नंतर ते बौद्ध मंदिर बनले आणि आज ते जगभरात लोकप्रिय आहे. वेगवेगळ्या देशांमधून लोक ते पाहण्यासाठी येतात.
04 / 07
टोन्ले:टोन्ले सॅप सरोवर हे कंबोडियाच्या वैशिष्ट्यांपैकी एक आहे. त्याची दोन वैशिष्ट्ये आहेत. पहिले, ते आग्नेय आशियातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. दुसरे, त्याचा प्रवाह वर्षातून दोनदा आपली दिशा बदलतो. पावसाळ्यात, सरोवराचा आकार ६ पट वाढतो. जगात इतर कुठेही असे ऋतू बदलणारे सरोवर नाही.
05 / 07
ख्मेर लिपी:कंबोडियाची वर्णमाला जगातील सर्वात अद्वितीय आहे.ही जगातील सर्वात लांब वर्णमाला आहे. तिच्या लिपीमध्ये ३३ व्यंजने, २३ स्वर आणि १२ स्वतंत्र स्वर आहेत. तिला ख्मेर लिपी असेही म्हणतात. संपूर्ण वर्णमालेत ७० हून अधिक अक्षरे आहेत, या अक्षरांमुळे ती जगातील सर्वात लांब वर्णमाला बनते. हेच कारण आहे की ती जगातील सर्वात खास लिप्यांपैकी एक आहे. या लिपीमध्ये संस्कृती आणि पाली भाषेचा प्रभाव दिसून येतो.
06 / 07
कंबोडिया ध्वज:कंबोडियाचा ध्वज हा जगातील एकमेव ध्वज आहे ज्यावर मंदिर आहे. कंबोडियाचे अंगकोर वाट मंदिर ध्वजावर दिसते. ध्वजाचे तीन रंग आहेत. निळा, लाल आणि पांढरा. निळा रंग स्वातंत्र्य आणि शांतीचे प्रतीक आहे. लाल रंग राष्ट्र आणि धैर्य दर्शवितो. ध्वजावर पांढऱ्या रंगात बनवलेले अंगकोर वाट मंदिर धर्म आणि संस्कृती दर्शविते. कंबोडियाच्या इतिहासात ध्वज दोनदा बदलण्यात आला आहे, परंतु मंदिर त्यातच राहिले आहे, ज्यामुळे येथील ध्वज खास बनतो.
07 / 07
अप्सरा नृत्य:अप्सरा नृत्य हे कंबोडियाच्या वैशिष्ट्यांपैकी एक आहे.हे एक पारंपारिक ख्मेर शास्त्रीय नृत्य आहे, जे बौद्ध आणि हिंदू कथा सादर करतात.विशेष हातवारे, हावभाव आणि पोशाख ही या नृत्याची खासियत आहे. ही कंबोडियाची सांस्कृतिक ओळख आहे. यामुळेच युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात त्याचा समावेश करण्यात आला आहे. हे कंबोडियाच्या शाही नृत्यनाट्याचा एक भाग आहे. हे सहसा विशेष प्रसंगी किंवा उत्सवांमध्ये आयोजित केले जाते.
संस्कृती-बिंस्कृती- गधेगाळ : एक सांस्कृतिक दस्तावेज

>> डॉ. मुकुंद कुळे
महाराष्ट्रात शिलाहारांपासून ते यादव काळ ते अगदी शिवपूर्व काळापर्यंत (बहामनी राज्य) हे शापवाणीयुक्त शिलालेख सर्रास सापडतात. हे सारेच शिलालेख साधारणपणे नऊ ते पंधरा या शतकातील आहेत आणि हे प्रामुख्याने मंदिर किंवा देवस्थानांना राजाने दिलेल्या विविध प्रकारच्या दान वा देणगीच्या निमित्ताने कोरण्यात आलेले आहेत. मात्र हे शिलालेख कोरताना, जवळजवळ प्रत्येकाने दानपत्राबरोबरच अर्वाच्य आणि अभद्र अशी शापवाणीही कोरलेली आहे. किंबहुना राजाज्ञेचे पालन न करणाऱयाला सणसणीत शिवीच घातली आहे… आणि ही शिवी मुख्यत्वे त्याच्या आईवरून घातलेली आहे. कारण शेवटी आई हा कुणाचाही संवेदनशील-नाजूक-हळवा कोपरा असतो. बहुधा ही मानसिकता तत्कालीन राजेशाहीला ठाऊक असावी आणि म्हणूनच आपल्या आदेशाचे सगळ्यांनी निमूट पालन करावे, यासाठी त्यांनी आज्ञा मोडणाऱयाला एकप्रकारे त्याच्या आईवरून शिवी घातलेली आहे. अशा शिलालेखांविषयी…
‘गीं सुष संतु। स्वस्ति ओं। पसीमस- मुद्राधीपती।
स्त्राr कोंकणा चक्री- वर्ती। स्त्राr केसीदेवराय।
महाप्रधा– न भइर्जु सेणुई तसीमीनी काले प्रव्रतमने।
सकु संवतुः 934 प्रधा- वी सवसरेः अधीकू दीवे सुक्रे बौ- लु।
भइर्जुवे तथा बोडणा तथा नऊ कुवली अधोर्यु प्रधानु। महालषु– मीची वआण। लुनया कचली ज-’
संस्कृत आणि मराठी भाषेचं मिश्रण असलेला हा शके 934 (इसवी सन 1012) मधला शिलालेख. या शिलालेखातील मजकुराचा अर्थ असा… ‘कल्याण होवो. पश्चिम समुद्राधिपती श्री कोकण चक्रवर्ती श्री केसीदेवराय याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याने शक संवत 934 प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. जगी सुख नांदो…’
मात्र रायगड जिह्यातील अलिबाग-चौल-रेवदंडा मार्गावरील अक्षी गावात सापडलेल्या मराठीतील या आद्य शिलालेखात पुढे एक घृणास्पद शापवाणीही कोरलेली आहे. ‘हे शासन (राजाज्ञा) जो कुणी भंग करील तेहाची माय गाढवे झविजे.’
हा शिलालेख ज्या कुणी कोरून घेतलेला आहे, तो ही शापवाणी केवळ शब्दांकित करून थांबलेला नाही; त्याने ती शिल्पांकितही केलेली आहे. शिल्पांच्या माध्यमातून कोरलेल्या अशा शापवाणीचे दाखले अनेक मिळतात. या प्रकारच्या अश्लील शापवाणीतून तत्कालीन मुस्लीम समाजही सुटलेला नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, रायगड जिह्यातील दाभोळ येथील जामा मशिदीत सापडलेला मराठी शिलालेख. शापवाणी कोरलेल्या या शिलालेखात म्हटलंय-
‘यासि कोणी हिंदु वा मुसलमान इरे वा इस्ति करिल, त्यावरिश त्याचे मएअवरि गडदा असे जाणिजे.’
(जो हिंदू अथवा मुसलमान ह्या स्थानाचा अवमान करील, त्याच्या आईवर गाढव चढेल, हे पक्के जाणून असा…)
अर्थात अशी शापवाणीयुक्त शिळा कोरण्यामागचा राजाचा-शासनकर्त्याचा हेतू काहीही असो, प्रत्यक्षात त्याला स्त्राrची अवहेलना करायची असो व नसो; पण कळत नकळत त्याच्याकडून स्त्राr लज्जित होते, एवढं नक्की… आणि म्हणूनच या शापवाणीयुक्त शिलालेखांकडे केवळ ऐतिहासिक वस्तू-वारसा म्हणून पाहण्याऐवजी, त्यांच्याकडे सामाजिक-सांस्कृतिक अंगानेही पाहिलं पाहिजे. कोणत्या सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय अवकाशात तत्कालीन शासनकर्त्यांना हे शापवाणीयुक्त शिलालेख कोरावेसे वाटले, शिलाहारपूर्वकाळात महाराष्ट्रात असे शिलालेख का सापडत नाहीत आणि शापवाणी कोरताना त्यांनी गाढवासारख्या प्राण्याचीच निवड का केली? काळाच्या पटलावर कोणतीही घटना सहज किंवा आपसूक घडत नसते. तिच्यामागे काही ना काही कार्यकारण भाव असतो. काळाचा, परिस्थितीचा रेटा असतो. त्यामुळे या साऱया मुद्दय़ांच्या परिप्रेक्ष्यातच या शापवाणीयुक्त शिलालेखांकडे पाहायला हवं.
या शापवाणीयुक्त शिलालेखांसाठी वापरण्यात आलेली शिळा, वीरगळांसाठी (वीरांच्या स्मरणार्थ उभारलेली शिळाशिल्पं) वापरण्यात आलेल्या शिळेसारखीच (पाटास्वरूप आणि चार ते पाच फूट उंच) असते. काहीशा चपटय़ा असलेल्या या शिळेच्या वरील भागात चंद्र आणि सूर्य कोरलेले असतात. चंद्र-सूर्याच्या या प्रतिमा त्या-त्या राजाची राजवट एकप्रकारे चंद्र-सूर्य असेपर्यंत शाबूत राहणार असल्याचं दर्शवत असतात. त्यानंतर मधल्या भागात राजाने दिलेलं दानपत्र कोरलेलं असतं. दानपत्राच्या खालीच अर्वाच्य भाषेतील शापवाणी कोरलेली असते. ही शापवाणी शक्यतो संस्कृतऐवजी स्थानिक भाषेतच कोरलेली असते. जेणेकरून ती सर्वसामान्यांना वाचता यावी.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्राrवर गाढव आरूढ होण्याची शापवाणी असल्यामुळे, ही शापवाणी कोरलेल्या शिळाखंडाना सरसकट ‘गधेगाळ’ किंवा ‘गधेगळ’ असं म्हटलं जातं. गाढवावरून दिलेली शिवी असल्यामुळेच हे नामाभिधान या शिळांना मिळालेलं आहे. अगदी मराठी भाषेतिहासातही ‘गधेगळ’ हाच शब्द वापरण्यात आला आहे आणि तो ‘वीरगळ’ या शब्दाच्या धर्तीवर तयार झालेला आहे. वीरगळ शब्दाची व्युत्पत्ती सांगताना ती वीरगळ अशी केली जाते. वीर म्हणजे शूरवीर-पराक्रमी, तर गळ हा शब्द कन्नडमधून आलेला आहे. कन्नडमध्ये कोणत्याही दगडाला कल्लू म्हणतात, तर कोनशिलेसारख्या दगडाला गल्लू म्हणतात. त्यामुळे वीरगळमधला ‘गळ’ हा शब्द कन्नडमधील कल्लू किंवा गल्लूचा अपभ्रंश आहे, हे नक्की. त्यामुळे वीरगळाचा अर्थ ‘वीराचा दगड’ असा होतो. साहजिकच वीरगळ आणि गधेगळ किंवा गधेगाळ यातील ‘गळ’ शब्दाच्या साधर्म्यामुळे गधेगळ म्हणजे ‘गाढवाचा दगड’ असा शब्दश अर्थ होतो. मात्र ‘वीरगळ’प्रमाणे ‘गधेगळ’ व्युत्पत्ती योजली आणि कदाचित ती खरी असली, तरी ‘गधेगळ’ या संबोधनात ‘गधा’ हा हिंदी शब्द का वापरण्यात आला आहे, ते कळत नाही. जर गधेगळा असलेली शिल्पं प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळत असतील, तर मग त्यांचं संबोधन ‘गाढवगाळ’ का नाही? की ‘गधेगाळ’ हा शब्दच हिंदीवरून आलेला आहे? कारण गधा हा शब्द तर थेट हिंदी आहेच, परंतु गाळ हा शब्द हिंदीतील ‘गाली’चा (म्हणजेच शिवीचा) अपभ्रंश असू शकतो. तसंही आपण मराठीत ‘शिवीगाळ’ हा शब्द वापरतो. म्हणजे कदाचित वीरगळधील ‘गळ’ हा शब्द कन्नडवरून आलेला असू शकतो. परंतु गधेगाळमधील ‘गाळ’ शब्द दगडनिदर्शक नसून तो संस्कृत-हिंदीतील शिवीनिदर्शक ‘गाली’ शब्दावरून आलेला शब्द असावा. मात्र अगदी पूर्वीपासून अशा प्रकारच्या शापवाणीयुक्त शिलालेखासाठी ‘गधेगाळ’ हाच शब्द रूढ आहे, एवढं खरं!
शेवटी गधेगाळ म्हणजे काय तर, शासकाची आज्ञा कुणी मोडल्यास, त्याच्या आईवर (किंवा परिस्थितीवश त्याच्या पत्नीवर) गाढव आरूढ होईल, असा दिलेला शाप. प्राचीन काळी अश्वमेधासारख्या यज्ञप्रसंगी अश्व आणि यज्ञाचा यजमान असलेल्या राणीचा संयोग घडवून आणतच असत. त्याचे दाखले पुराणग्रंथात अनेक सापडतात. त्यात अश्व हा पुरुषत्व आणि पराक्रमाचा प्रतीक. किंबहुना घोडय़ाला पूर्ण पुरुष मानलं जातं. कारण त्याला स्तन नसतात. मग घोडय़ासारखा वीर्यरसाने फुरफुरणारा प्राणी असताना, शापवाणी असलेल्या शिळाशिल्पांमध्ये घोडय़ाऐवजी गाढवाची (क्वचित काही शापयुक्त शिलालेखांमध्ये स्त्राrवर घोडा किंवा हत्तीही आरूढ झाल्याचं दाखवलं आहे.) योजना का केलेली आहे? खरं तर घोडा काय किंवा गाढव काय, स्त्राrसोबत एखादा प्राणी रत होण्याची कल्पना शापवाणीतही निषेधार्हच आहे. तरीही स्त्राrसोबत गाढव का, याची उकल व्हायला हवी. डॉ. रा. चिं. ढेरे यांनी ‘लोकसाहित्य ः शोध आणि समीक्षा’ या पुस्तकातील ‘शिवी आणि समाजोतिहास’ लेखात या प्रश्नाचा मागोवा घेतला आहे. ते म्हणतात- ‘घोडा आणि गाढव हे दोन्ही एकाच वर्गातील प्राणी असले, तरी घोडा हा केव्हाही अप्रतिष्ठित, अशुभ किंवा अमंगल मानला गेलेला नाही. उलट तो शौर्य आणि सौष्ठव यांचं प्रतीक मानला गेला आहे. तर गाढवाचा निकटचा संबंध शीतला, ज्येष्ठा आणि निऋती या तीनही अशुभ व विघ्नकर देवतांशी असल्यामुळे, त्यांचा प्रतिनिधी असलेला गाढव हा सुफलतेचा-समृद्धीचा दाता नसून तो निष्फळतेचा दरिद्रतेचा आणि अशुभाचा कारक आहे.’
याचा अर्थ दानपत्राचा भंग करणाऱयासाठी शापवाणी उच्चारणारा शासक केवळ स्त्राrची विटंबना करून थांबत नाही. तर एकप्रकारे त्या कुटुंबाला दारिद्रय़-अवकळा येईल, असंही सुतोवाच करतो. प्राचीन भारतीय वेदवाङ्मयात गाढवाचा- गदर्भ, रासभ, खर अशा वेगवेगळ्या नावांनी उल्लेख आलेला आहे. उज्जैन (उज्जयिनी) येथे आजही भरणारा गाढवांचा बाजार हा विक्रमादित्याच्या काळापासून (दोन हजार वर्षांपासून) भरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.
गधेगाळ शब्द, गधेगाळ असलेल्या शिल्पाचं स्वरूप नि त्या शिल्पामागच्या विशिष्ट संकेताचा अर्थ जाणून घेतल्यावर या गधेगाळ का निर्माण झाल्या असतील, याचा शोध घ्यायला हवा. कदाचित याचं उत्तर मुस्लिमांच्या दक्षिण भारतावरील आक्रमणात असू शकतं. दहाव्या-बाराव्या शतकापासूनच मुस्लिमांनी दक्षिणेत उतरायला सुरुवात केली होती. परिणामी शिलाहार ते यादव राजवटीचा महाराष्ट्रातला सुवर्णकाळ कालवंडायला सुरुवात झाली होती. या काळात महाराष्ट्र मोठय़ाच सामाजिक-सांस्कृतिक संकटातून जात होता. हे संकट दुहेरी होतं. एकीकडे परकीयांचं आक्रमण आणि दुसरीकडे महाराष्ट्रात वाढत चाललेला ब्राह्मणी धर्मवाद. परकीय आक्रमक मंदिरांच्या ठायी एकवटलेली अर्थसत्ता उद्ध्वस्त करण्याच्या मागे होते, तर यादव काळात हेमाद्रीपंताच्या वर्चस्वामुळे ब्राह्मणीधर्म आक्रमक झाला होता. त्याच्या ‘चतुर्वर्ग’ चिंतामणी या ग्रंथामुळे तर ब्राह्मणी व्रतवैकल्यांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले. परिणामी मंदिर संस्थांमध्ये त्यांचं प्राबल्य वाढलं होतं. सर्वसामान्य अशिक्षित जनता (संस्कृत येत नसलेली) आणि दुसरीकडे काही कारणाने मंदिर संस्था डळमळीत करणारे परकीय आक्रमक यांच्यासाठी निर्वाणीचा संदेश म्हणून या गधेगाळीचा प्रसार झाला असावा का?
म्हणजेच गधेगाळ असलेल्या शिलालेखांतून एकप्रकारे तत्कालीन समाजातील लोकरहाटीचं दस्तावेजीकरणही झालेलं दिसतं. महत्त्वाचं म्हणजे वीरगळ सापडण्याचं प्रमाण महाराष्ट्रात अधिक असलं, तरी वीरगळावर शिल्पाबरोबर शिलालेख कोरण्याची प्रथा नसल्यामुळे तो वीरगळ कुठल्या वीराचा, त्या वीराला कधी आणि कुणाकडून मरण आलं किंवा अन्यही कुठल्या प्रकारची माहिती मिळत नाही. याउलट गधेगाळ कोरलेल्या शिळांमधून किमान तत्कालीन शासनकर्त्याची, राजसेवकांची, सर्वसामान्यांची माहिती मिळते. या अनुरोधाने गधेगाळ कोरलेल्या शिळांकडे पाहिलं, तर या शिळा समाज-संस्कृतीच्या वाहकच ठरतात. त्यांच्यावर आईवरून शिव्या कोरलेल्या आहेत आणि म्हणून त्या निषेधार्हच आहेत, पण एक सामाजिक-सांस्कृतिक दस्तावेज म्हणूनही त्याकडे पाहायला हवे!
mukundkule@gmail.com
नद्या केवळ निसर्गाचं सौंदर्यच वाढवत नाही तर, मनुष्याची तहान देखील भागवतात. पण, या जगात असे ६ देश आहेत, जिथे एकही नदी नाही.

नद्या केवळ निसर्गाचं सौंदर्यच वाढवत नाही तर, मनुष्याची तहान देखील भागवतात. पण, या जगात असे ६ देश आहेत, जिथे एकही नदी नाही.

कुवेत : मध्य पूर्वेकडील देश कुवेतमध्ये एकही नदी नाही. या देशातील लोकांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी खाऱ्या समुद्राचे पाणी गोड केले जाते. यासाठी 'डिसॅलिनेशन प्लांट'चा वापर केला जातो.

ओमान : ओमानमध्येही एकही नदी नाही. मात्र, या देशात काही कृत्रिम तलाव आहेत. नदीची कोरडी पात्र भासवीत अशी तलावं पावसाळ्यात पाण्याने भरतात. पाणी भरताच, ती अगदी नैसर्गिक नदीसारखी दिसू लागतात.

सौदी अरेबिया : सौदी अरेबियामध्येही नदी नाही. येथील लोक पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी भूगर्भात साठवलेल्या पाण्याचा वापर करतात. याशिवाय, येथील डिसॅलिनेशन प्लांटद्वारे खारे समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवून ते वापरतात.

युएई : संयुक्त अरब अमिरातीमध्येही नदी नाही. ओमानप्रमाणे येथेही काही दऱ्या आहेत, ज्यामध्ये पावसाळ्यात पाणी साचते. पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी युएई देखील डिसॅलिनेशनचा वापर करते.

बहरीन : पर्शियन आखातात वसलेल्या या छोट्याशा देशात एकही नदी नाही. पावसाळ्यात येथे काही लहान तलाव तयार होतात, जी काही दिवसातच सुकून जातात. येथील लोक पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी इतर मार्गांवर अवलंबून आहेत.

माल्ता : माल्टामध्ये कायमस्वरूपी नदी नाही. येथे मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा काही लहान नद्या तयार होतात, परंतु त्या देखील जास्त काळ टिकत नाहीत. येथील लोक त्यांच्या पाण्याच्या गरजांसाठी भूगर्भातील पाण्यावर अवलंबून असतात.

















































