Monday, March 30, 2026

माहिती जिल्ह्यांची

 https://laxmankatekar.wordpress.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80/

माहिती जिल्ह्यांची

  प्रत्येक जिल्ह्यांची माहिती आपणास सविस्तरपणे या पानावर मिळेल.

____________________________________________________________________________________________

“अहमदनगर  शहर आणि जिल्हा”

भाग 5 वा        दि. 29 एप्रिल, 2019. 

                                                                                                                             

अहमदनगर शहर

अहमदनगर
महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: नगर
—  शहर  —
 

१९° ०४′ ५९.८८″ N, ७४° ४३′ ५९.८८″ E

·

गुणक: 19.08°N 74.73°E
प्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ  (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
• उंची
८५.१४ चौ. किमी
• ६५६.५४ मी
जिल्हा अहमदनगर
लोकसंख्या
• घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
३,५०,९०५[१] (२०११)
• ८,९००/किमी
१.०८ ♂/♀
७७.५२ %
कोड
• पिन कोड
• दूरध्वनी
• आरटीओ कोड
• ४१४००१
• +२४१
• महा-१६

 

अहमदनगर

हे महाराष्ट्रातील शहर सीना नदीच्या काठावर वसलेले आहे जे पुण्यापासून ईशान्येकडे साधारणपणे १२० किलोमीटरवर आहे. हे शहर अहमदनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

इतिहास

१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरोबगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्‍हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे १६३६ पर्यंत टिकली.मोगल बादशहा शहाजहानने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगर काबीज केले. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला तर १८१७मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर घेतले. शहरात अहमदनगरचा किल्लारेणुकामाता मंदिर (केडगांव) व चांदबीबी महल व बाग-ए-बहिश्त महल (सावेडी)अशी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. या शहराला नगर या नावानेसुद्धा ओळखतात. निजामशाहीचा संस्थापक पाथरीचा कुलकर्णी मध्ययुगीन कालखंडात दक्षिण हिंदुस्थानमध्ये ज्या पाच शाह्या होऊन गेल्या त्यामध्ये अहमदनगरची निजामशाही ही स्वराज्याच्या पायाभरणीसाठी पूरक ठरली. हिंदुस्थानमध्ये मुस्लिम सत्तेची सुरुवात झाल्यानंतर विविध भागांत त्यांनी आपली सत्तास्थाने निर्माण केली. त्यासोबत अनेक वास्तूंची निर्मिती झाली. आपल्या साम्राज्यविस्ताराचा एक भाग म्हणून त्यांनी संबंधित राजधानीला वा वास्तूला स्वतःची वा परिवाराची नावे दिली. त्यानुसार अहमदनगरच्या निजामशाहीलाही मोठा रोमांचकारी इतिहास लाभलेला आहे. अहमदनगर हे मूळचे शहर नसून प्रसंगानुसार त्याची उभारणी झालेली आहे. देवगिरीवर स्थापन झालेल्या बहामनी या राज्यात निजाम उल मुल्क पदवी धारण करणारा मलिक अहमद हा मूळचा हिंदू घराण्यातील असून परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या बहिरंभट कुलकर्णीचा नातू असून बहिरंभटाचा मुलगा तिमाभटाने मुस्लिम धर्म स्वीकारला. मलिक अहमद हा तिमाभटाचा मुलगा असून बहामनी साम्राज्यात पराक्रम गाजवत तो सुभेदार पदापर्यंत पोहोचला. बहामनी साम्राज्याचा दिवाण महंमद गवाणमुळे साम्राज्यविस्तार झाला परंतु राज्यकारभारावरील पकड ढिली होत गेल्याने बहामनी साम्राज्यातील प्रत्येक सुभेदाराने स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण केले. त्यानुसार मलिक अहमदने जुन्नर या ठिकाणी राजधानी ठेवून स्वतःचे निजामशाही नावाने स्वतंत्र झाल्याचे घोषित केले. तेव्हा बहामनीच्या फौजांनी मलिक अहमदवर आक्रमण केले. तेव्हा भिंगार गावाजवळील इमाम घाटात बहामनी सैन्याचा दारुण पराभव केला. विजय मिळवून देणारा परिसर म्हणून याच ठिकाणी २८ मे १४९० रोजी त्याने एका शहराची स्थापना केली. त्याला नाव दिले अहमदनगर. विशेष म्हणजे मलिक अहमदच्या फौजेत असणा-या राजा, सेनापती, प्रधान आणि काझी अशा सर्वांच्याच नावात अहमद होते. आपल्या मूळ पुरुषाच्या नावावरून या घराण्याने बहिरंभटावरून बहिरी नाव धारण केले तर पुढे प्रत्येक राजाने स्वतःला निजामशहा हा किताब लावला तर त्यांच्या साम्राज्याला निजामशाही म्हटले गेले. मलिक अहमद निजामशहा बहिरीने त्या ठिकाणी एका भुईकोट किल्ल्याची पायाभरणी केली. त्यानुसार अंडाकृती किल्ल्याचा परिघ मैलाचा असून किल्ल्याच्या भोवती मोठा खंदक तर बाजूने २२ मोठे बुरूज आहेत. किल्ल्यामध्ये पाण्याकरिता गंगा, जमुना, मछलीबाई व शक्करबाई नावाच्या ४ विहिरी असून सोनमहल, मुल्कआबाद, गगन महल, मीना महल, बगदाद महल यांसारखे महाल बांधले. दिवसेंदिवस यात वाढ होत गेली. तत्कालीन कालखंडात किल्लेवजा एका स्वतंत्र शहराची निर्मिती झाली. त्या भागाला कोटबाग निजाम म्हटले गेले. या कोटबाग निजामचे वैभव एवढे मोठे, अतिभव्य होते की, याची तुलना कैरो व पॅरिससारख्या भव्य शहरांसोबत व्हायची. अहमदनगरच्या निजामशाहीत एकूण ११ निजाम होऊन गेले. पैकी चौघांचे खून झाले. १२५ वर्षे या सत्तेने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. निजाम या शब्दाचा अर्थ होतो जमिनीची व्यवस्था पाहणारा, त्यामुळे संबंधित सुभेदाराला निजाम उल मुल्क ही पदवी असायची. अशी पदवी असणा-या दोन सरदारांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. पहिले १४९० चे अहमदनगरचे निजामशाही आणि दुसरे १७२४ चे हैदराबादचे निजामशाही. त्यामुळे या दोन सत्तांचा परस्पर कोठेही संबंध नाही. अहमदनगरच्या निजामशाहीत मलिक अंबरसारखा शूर आणि धोरणी प्रधान होऊन गेला. ज्याने जमीन महसूल व्यवस्था सुधारली. शिवाय शत्रूशी लढण्याकरिता गनिमी काव्याच्या युद्धनीतीचा अवलंब केला. म्हणून त्याला गनिमी कावा युद्धनीतीचा जनक म्हटले जाते. स्वराज्याला पोषक ठरणारी पाश्र्वभूमी याच निजामशाहीने दिली. कारण छत्रपती शिवरायांचे मूळ पुरुष बाबाजी भोसलेंपासून आजोबा मालोजीराजे, वडील शहाजी भोसलेंसह सर्व भाऊबंद याच निजामशाहीत पुढे आले. एवढेच नाही तर मालोजीराजे यांनी इंदापूर या ठिकाणी तर चुलते शरीफजी यांनी भातोडी (नगरजवळील)या ठिकाणी झालेल्या युद्धात निजामासाठी प्राण अर्पण केले. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे घडले तेच मुळी निजामशाहीत. मलिक अंबरनंतर त्यांनी निजामशाही वाचविताना मुर्तुजा निजामाला घेऊन परंडा या ठिकाणी गादी ठेवून स्वतंत्रपणे कारभार चालविला. शाहजहानने स्वतः निजामशाहीविरोधात मोहीम आखली नसती तर शहाजीराजांनी स्वतःच स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली असती. भोसले घराण्याबरोबर याच निजामशाहीत सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर घराणे नावारूपाला आले. या एकत्रितपणामुळेच विवाहबंधनातून नवीन कार्याची निर्मिती झाली. भोसले व घोरपडे हे घराणे मूळ एकच असून या घराण्यातील कर्णसिंहाला निजामाने राजे घोरपडे-बहाद्दर नावाचा किताब दिला होता. तेव्हापासून घोरपडे हे नाव उदयास आले. सोलापूर, परंडा, औसा, उदगीर, धारूर, देवगिरी, यांसारखे अनेक भुईकोट किल्ले निजामशाहीतच पुढे आले. साम्राज्यविस्तार करताना आदिलशहाबरोबर झालेल्या युद्धात इब्राहिम निजामशहा ५ ऑगस्ट १५९५ रोजी नळदुर्गात मरण पावला. तरी परंतु निजामशहा आणि आदिलशहाचे संबंध सुरळीत राहिल्याने पहिल्या बु-हाणशहा (१५०८ ते १५५३) ला इस्माईल आदिलशहाची मुलगी दिली होती. तर हुसेन निजामशहाची मुलगी चांदबिबी ही अली आदिलशहाला दिली होती. या शाही विवाहात सोलापूरचा किल्ला आंदण म्हणून वापरला गेला. निजामशाहीची देणगी म्हणजे हुसेन निजामशहाच्या काळात चिकबुरूज नावाने जगातील भव्य असणारी तोफ तयार केली. ५५ टन वजनाची ही तोफ बरेच दिवस परंड्याच्या किल्ल्यात होती. पुढे परंडा आदिलशहाकडे आल्यानंतर ऑगस्ट १६३२ साली ती विजापूरला गेली. तोफ वाहून नेण्याकरिता १० हत्ती व ४०० बैल लागायचे. सोलापूर व विजयनगरवर याचा वापर झाला. विजापूरच्या सर्जा बुरुजावर मुलुखमैदान नावाची ही तोफ पर्यटकांचे आकर्षण आहे.शेवटचा निजामशहा मुर्तुजा (तिसरा) हा मोगलांच्या कैदेत गेला आणि १६३६ साली पूर्ण निजामशाही साम्राज्य बुडाले. तेव्हापासून १७५९ पर्यंत अहमदनगर मोगलांच्या ताब्यात होते. शाहिस्तेखान, मिर्झाराजा जयसिंग आणि औरंगजेबाने छत्रपती शिवरायांविरोधात मोहीम आखण्यापूर्वी बरेच दिवस नगरमध्ये मुक्काम ठोकला होता. मोगलांचा विजापूरकडे जाणारा रस्ता म्हणजे औरंगाबाद, अहमदनगर, परंडा, काटी, जरखेड, मोहोळवरून पुढे जायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनाही नगरचा किल्ला ताब्यात राहावा अशी इच्छा होती. म्हणून त्यांनी ३० मे १६६४ साली आक्रमण केलेले आहे. मध्ययुगीन कालखंडातील फेरिस्तासारखा इतिहासकार निजामशाहीतच घडला गेला. मराठा साम्राज्याच्या विरोधात मोहीम काढणारा औरंगजेब शेवटी परत जाण्याकरिता निघाला तेव्हा १७०६ ते १७०७ या दरम्यान अहमदनगरमध्येच राहिला. त्यामुळे त्याच्या कैदेत असणा-या छत्रपती शिवरायांच्या पत्नी सकवारबाई, शंभूराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई, मुलगा शाहूसह अनेक मराठ्यांनी अहमदनगरचा पाहुणचार घेतलेला आहे. एवढेच नाही तर सतत २६ वर्षे दक्षिणेच्या मोहिमेवर असणारा औरंगजेब वार्धक्यामुळे २० फेबु्रवारी १७०७ रोजी अहमदनगरमध्येच वारला. पुढे १७५९ साली मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर तो महादजी शिंदेच्या जहागिरीत होता. मराठी साम्राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे नाना फडणीसांना नगरच्याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. पुढे १८१७ रोजी तो ब्रिटिशांनी जिंकल्याने त्यांनी अहमदनगरला लष्करी छावणी उभारली. ती आजही कायम आहे. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीचे कैदी याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. ब्रिटिशांमुळे शहराच्या आधुनिकीकरणाला चालना मिळाली तर १९४२ ला स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी काँग्रेसने आंदोलन उभे केले तेव्हा अनेक राजकीय कैदी नगरच्या किल्ल्यात डांबण्यात आले. पैकी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा मुक्काम दोन वर्षे होता. यादरम्यान त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ नावाचा ग्रंथ इथेच लिहिला. तर या ठिकाणी तुरुंगात असताना आंबेडकरांनी ‘थॉट ऑफ पाकिस्तान’ व मौलाना आझादांनी ‘गुबारेखातीर’ लिहून काढला. छत्रपती शिवरायांचे एक विश्वासू सेनापती खंडेराव कदम नगरजवळील प्रवरा देवळालीचे रहिवासी. अशा रीतीने अहमदनगरची निजामशाही म्हणजे हिंदू-मुस्लिमांचा मिलाफ होता. एवढेच नाही तर अल्लाउद्दिन खिलजीनंतर दक्षिणेतील हिंदूंची तलवार म्यान झाली होती. तिला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम निजामशाहीत घडून आले. एका अर्थाने अहमदनगरची निर्मिती स्वतः मलिक अहमदने केलेली असल्याने या शहराच्या नामांतराचा विषय कधी चर्चेला आल्याचे दिसत नाही. निजामाच्या सहिष्णुतेमुळेच अनेक मराठा सरदार तर पुढे आलेच शिवाय ज्ञानेश्वरांपासून ते शेख महंमदापर्यंतचे अनेक संत याच परिसरात निर्माण झाले. म्हणूनच संतकवी दासगणूंनी अहमदनगरविषयी लिहिताना म्हटले आहे की, मराठेशाहीचे जननस्थान पुण्यभूमी महापावन

मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या उदयकाली विठोजी भोसले, मालोजी भोसलेलखुजी जाधवराव निंबाळकर, पवार, बाजी कदमराव हे निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर ह्याच्या पदरी सेवेत होते. देवळाली प्रवरा येथील सरदार बाजी कदमराव ह्यांना साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले, किल्ल्यावर फितवा करून मिळवून दिल्याबद्दल देवळाली प्रवरा आणि रुई ही गावे इ.स. १५८० साली इनाम मिळाली होती. पुढे विजापूरकारांशी लढताना बाजी कदमांचा बंकापूर ( कर्नाटक ) येथे मृत्यू झाला. आजही त्यांचे वंशज हे देवळाली प्रवरा येथे आहेत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत हे घराणे आले. खंडेराव कदम आणि तिसरे बाजी हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. ह्यांच्याकडे राजगड किल्ल्याची तटसरनौबती होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत तामिळनाडू येथील वली गंडापुराम हा किल्ला जिंकला. ह्या किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी स्वराज्यासाठी आपले पूर्ण योगदान अर्पण केले. पानिपतच्या लढाईत ह्या घरातील सात पुरुष कामी आले. आजही कदमांकडे पारंपरिक आणि दुर्मिळ अशी जुनी शस्त्रे जपलेली आहेत. त्यांत धोप तलवारी, गूर्ज, कट्यारी, ढाली, बिचवे, हस्तिदंती गुप्त्या, भाले, शिवकालीन शिवराया आणि इतर ऐतिहासिक साधने आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा हे नगर जिल्ह्यातील पहिली नगरपालिका असलेले शहर आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेस भारताच्या माजी राष्टपती प्रतिभा पाटील ह्यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय भूजल पुरस्कार’ मिळालेला आहे. हा पुरस्कार तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग व तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार ह्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष श्री मुरलीधर कदम ह्यांनी स्वीकारला.. महत्त्वाचे म्हणजे देशातील फ़क़्त ह्या एकाच नगरपालिकेला हा सन्मान मिळालेला आहे.

अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा आहे. आजच्या परिस्थितीत अहमदनगर जिल्हा हा सर्वांत पुढारलेला आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात राहाता तालुकात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. ‘राळेगण सिद्धी’ या खेड्याने जिल्ह्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर ‘हिवरे बाजार’ हे आदर्श खेडे म्हणून नावारूपास आले.
महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ चौ.कि.मी. तर लोकसंख्या ४०,८८,००० इतकी आहे.
राज्याच्या मध्यभागी असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा व औरंगाबाद जिल्हे; पूर्वेस बीड जिल्हा ; पूर्व व आग्नेय दिशांस उस्मानाबाद जिल्हा; दक्षिणेस सोलापूर जिल्हा, तर नैऋत्येस व पश्चिमेस पुणे जिल्हा व ठाणे जिल्हा हे जिल्हे वसलेले आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असणार्‍या या जिल्ह्याने राज्याचे ५.५४% भौगोलिक क्षेत्र व्यापलेले आहे.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील प्रामुख्याने अकोले तालुका व संगमनेर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगांमध्ये अकोले तालुक्यात (नगर, नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर) आहे. शिखराची समुद्रसपाटीपासून उंची १६४६ मीटर आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील प्रमुख डोंगररांग हरिश्चंद्राची रांग या नावाने ओळखली जाते. जिल्ह्याचा काही मध्य भाग व उत्तर भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. गोदावरी, भीमा, सीना, मुळा व प्रवरा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, ढोरा, घोड नदी, कुकडी याही नद्या जिल्ह्यातून व जिल्ह्याच्या सीमा भागातून वाहतात. अहमदनगर जिल्ह्यातील हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान आल्हाददायक आहे. प्रामुख्याने जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.

हवामान
अहमदनगर जिल्ह्यातील हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान आल्हाददायक आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्याच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.
दळणवळण
जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र. ५०) जातो. तसेच कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग २२२ पारनेर, नगर, पाथर्डी या तालुक्यांतून जातो. पुणे-औरंगाबाद हा जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा राज्यमार्ग असून अहमदनगरला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती अहमदनगर-पुणे या मार्गावर. अहमदनगर रेल्वे स्थानक हे दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी. चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्ग जिल्ह्यात असून अहमदनगर-बीड-परळी आणि पुणतांबा-शिर्डी रेल्वे मार्ग आहे. संगमनेरहून रंधा धबधब्याकडे जाताना लागणारा विठे घाट व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट – हे नगर जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.

विशेष
मराठी भाषेतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी. ज्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हटले जाते, तो ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह आज अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात सर्वांत जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला, आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला राज्यातील जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे.
अहमदनगर जिल्हा ओळखला जातो तो सहकारी साखर कारखान्यांचा मूल स्रोत म्हणून! डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी) सुरू केली (१९२३), तसेच राज्यातील पहिला साखर कारखाना स्थापन केला (जून, १९५०), आणि सहकार या तत्त्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली. सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ श्री. धनंजयराव गाडगीळ या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते. या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर सहकारी साखर कारखान्यांची एक साखळीच राज्यात निर्माण झाली. एक सहकारी साखर कारखाना आणि त्या भोवतीच्या परिसराचा शैक्षणिक, औद्योगिक व सोयी सुविधांचा विकास अशी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली.

ऐतिहासिक महत्त्वाचे
या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मोगल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात अगस्ती ऋषींनी विंध्य पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर (आत्ताच्या नगर जिल्ह्याच्या परिसरात) वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे.

निजामशाही
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुऱ्हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली.

निजामशाहीच्या पडत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये नगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहमदनगरवर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.

इ.स. १९४२चे चलेजाव आंदोलन
इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी.घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबार – ए – खातिर हे ग्रंथ याच शहरात लिहिले

भूगोल

अहमदनगर शहराचे जगाच्या नकाशावरचे स्थान १९.०८° उत्तर अक्षांश, ७४.७३° पूर्व रेखांश असे आहे व शहराची समुद्रसपाटीपासून उंची ६४९ मीटर आहे.अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाने मोठा आहे.या शहराला सात जिल्यांनी जोडले आहे.

नद्या

गोदावी नदी व कृष्णा नदीची उपनदी भीमा या दोन मुख्य नद्या अहमदनगर जिल्ह्यातून वाहतात. बाकीच्या नद्या – प्रवरा, मुळा, सीना आणि धोरा. प्रवरा ही गोदावरीची उपनदी आहे.r hu प्रवरा नदीचे पाणी उंचावरून पडून रंधा धबधबा तयार झला आहे.

प्रसिद्ध व्यक्ती

वाहतूक व्यवस्था

मुंबई – विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग २२२ अहमदनगर शहरातून जातो. अहमदनगर हे पुणेऔरंगाबादसोलापूरनाशिकबीड या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी राज्य महामार्गांनी जोडले गेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अहमदनगरला जाण्यासाठी सोईस्कर आहेत.

दौंडमनमाड लोहमार्गावरील अहमदनगर हे महत्त्वाचे स्थानक आहे. येथून जाणार्‍या सर्व प्रवासी रेल्वेगाड्या अहमदनगरला थांबतात. अहमदनगरचे रेल्वे वेळापत्रक येथे पहा.[१]

अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

  • सारे जहाँ से अच्छा – पेन्सिल चित्र– अहमदनगरचे प्रसिद्ध चित्रकार श्री. प्रमोद कांबळे यांनी भारताच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये भारतातील नामवंत ५०० महान व्यक्तींची चित्रे ६५ फूट X १७ फूट आकारमानाच्या एका मोठ्ठ्या भिंतीवर काढली आहेत. इ.स. १९९७ साली काही महिन्यांमध्ये त्यांनी सारे जहाँ से अच्छा हे जगातील सर्वांत मोठे पेन्सिल चित्र पूर्ण केले.
  • शनी शिंगणापूर– येथे शनीचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. येथे कुठल्याही घराला आणि बँकांनासुद्धा कुलपे नाहीत. शनिदेव चोरांपासून गावाचे रक्षण करतो अशी स्थानिक लोकांची भावना आहे.
  • शिर्डी– हे ठिकाण साईबाबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
  • सिद्धटेक– येथील सिद्धिविनायक मंदिर हे अष्टविनायक मंदिरांपैकी एक आहे.विशाल गणपती मंदिर – हे नगरचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले मंदिर अहमदनगरच्या माळीवाडा भागात आहे.
  • रेणुकामाता मंदिर(केडगांव) – हे मंदिर केडगाव येथे आहे. ते अहमदनगर रेल्वेस्थानकापासून साधारणपणे ३ किलोमीटरवर आणि अहमदनगर बसस्थानकापासून सुमारे ५ किलोमीटरवर आहे.
  • भुईकोट किल्ला– इ.स. १९४२ मध्ये येथे जवाहरलाल नेहरू यांना इंग्रजांनी कैदेत ठेवले होते. तेथे त्यांनी “डिस्कव्हरी ऑफ इंडिया” हे पुस्तक लिहिले.
  • हरिश्चंद्रगड– एक ऐतिहासिक किल्ला. हा नगरपासून अंदाजे १२५ किलोमीटर अंतरावर आहे. सुप्रसिद्ध कोकण कडा येथेच आहे.
  • श्रीक्षेत्र “भगवानगड” हेमहाराष्ट्र राज्यातील बीड-अहमदनगर जिल्ह्यांतील सीमेवर असलेल्या, खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे मंदिर आहे. तसेच जनार्दनस्वामीभगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या समाध्या येथे आहेत. सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते.
  • महानुभाव आश्रम शिक्षण संस्था, वांबोरी: या आश्रमाची स्थापना सन २००३ मध्ये झाली. सुमारे ४०० विद्यार्थी या संस्थेत महानुभाव तत्त्वज्ञान व साहित्य यांचे अध्ययन करतात. संस्कृत साहित्याचार्य ऋषिराज शास्त्री महानुभाव हे या आश्रमाचे संचालक आहेत.
  • राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील श्री.संत कवी महिपती महाराज समाधी.

सलाबतखान दुसरा यांची कबर (चांदबीबी महाल)

शाह डोंगरावर अहमदनगर शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर, सलाबतखान दुसरा यांची कबर आहे.चौथे निजामशाहच्या (1565-88) कारकीर्दीत सलाबतखान  महान राजकारणी आणिअंतर्गत मंत्री होते.ही इमारत तीन मजली आणि अष्टकोनी आहे. स्थानिक रहिवाशांनी कधीकधी चुकून चंदीबीबी महल म्हणून संदर्भ दिला.
सलाबतखान दुसरा इ.स. 1580 मध्ये ही इमारत बांधली. इमारत सुमारे 70 फूट उंच आहे आणि गॅलरी सुमारे 20 फूट रूंद आहे.या ठिकाणी, सलाबतखानशिवाय त्याच्या दोन बेगम आणि मुलांची कबरदेखील आहे.

दमडी मशीद

अहमदनगर किल्ल्याजवळ स्थित, इ. स. 1567 मध्ये  साहिर खाननी दमडी मशिदीची स्थापना केली. मशिदीचा विस्तृत आकार आणि शिलालेख यासाठी प्रसिध्द आहे. येथे युरोप लोकांची  आणि इतर लोकांची कबरे  आहेत. मुगल पुरातन वास्तू – दमडी मशिदीची प्रतिकृती आहे गुजरातमध्ये आढळते.

कोटला 12 इमाम

उल्लेखनीय मशिदीला बारा इमामांचे कोताळा (बारा संतांचा किल्ला) असे म्हणतात.इ.स 1536 मध्ये बुर्हान निजाम शाह यांनी त्यांचे मंत्री शाह ताहिर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधली होती. बुरहान शाहने मशिदी शाह ताहिरच्या ताब्यात दिली आणि ती एक धर्मादाय संस्था आणि महाविद्यालय म्हणून वापरात आली.

कुंपणाची भिंत (91 * 91 मीटर) दगड आणि चुना या पासून तयार केलेली आहे.पूर्वेस व दक्षिण बाजूला दोन दरवाजे आहेत. बारा इमामांचा कोटाला निजामशाही वास्तुकलाचा एक उत्कृष्ठ नमुना आहे, जो त्याच्या कोरलेल्या आणि सजावलेल्या कमानीसाठी प्रसिद्ध आहे.यात तीन आयतांचे एकच प्रार्थना सभागृह आहे, प्रत्येकी पाच पाट्या खोल आहे आणि त्यावर सपाट छत आहे. समतोल वास्तुकला, सुबक रचना आणि उत्तम कारागिरीचे हे अतिशय सुंदर उदाहरण आहे.

कोट बाग निजाम

बहमनी राजाचा  सूड घेऊन उध्वस्त करण्यासाठी ज्याने अविश्वासाचा प्रयत्न केला आणि त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अहमद निजामशाह, आता मलिक अहमद  म्हणून स्वतःला म्हणतात, त्याने दौलताबाद नष्ट करण्याचा निर्णय घेतला. अहमदनगरच्या 75 मैलांवर दक्षिण-पश्चिम असलेल्या दौलताबादच्या काही अंतरावर येण्यासाठी त्यांनी अहमदनगरला पुण्याजवळील जुन्नर येथून आपले मुख्यालय हलविले. 1494 मध्ये सिना नदीच्या डाव्या काठावर अहमदनगर शहराची स्थापना झाली. शहराच्या मध्यभागी बाग निजाम होता (विजयाची बाग). 1499 मध्ये, मलिक अहमदला त्याचा सूड त्यांनी दौलताबादच्या किल्ल्यावर कब्जा केला आणि बहामन साम्राज्याचा नाश केला. या दुसऱ्या विजयाची आठवण म्हणून त्यांनी बाग निजाम भोवतीची भिंत उभारली. बाग निजाम नंतर अहमदनगर किल्ला बनला.

बाग रौझा

हे ऐतिहासिक स्मारक, काळ्या दगडांनी बांधलेले, अहमद निजामशाह यांचे निवासस्थान होते. हे ठिकाण एकेकाळी अहमद निजाम शाह यांचे एक घर होते. हे 16 व्या शतकात राजा निजामी यांनी बांधले होते. ही संपूर्ण स्मारक काळ्या दगडापासून बनलेली आहे जी दिल्ली गेटच्या अगदी जवळ आहे. पर्यटक इथे भेटायला येतात तेव्हा, जवळच एक दगड स्मारक असे म्हटले जाते की, 1565 मध्ये विजयनगर राजाच्या विरोधात तलकिटच्या युद्धात स्वतःला ओळखणारे एक राजघराण्याचे गुलाम अली  याचे आहे. गुलाम अली तिसरे निजामशाहच्या काळात होते.

फरिया बाग पॅलेस

हे स्थान निजामशाहचा मुलगा बुरहान शाह,जो सातव्या वर्षी 1508 मध्ये सिंहासनावर बसला होता त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात आला. हे महल प्राचीन काळातील कला व संस्कृतीची झलक दाखविते. हे उद्यान अष्टकोनी स्वरूपात केले जाते. येथे एक मोठे घुमट-आकार असलेले हॉल आहे. निजाम शाही राजा या राजवाड्यात शतरंज खेळत होते.

अहमदनगर भुईकोट किल्ला

या किल्ल्याला 500 वर्षांचा इतिहास असून  निजामशाहीचा संस्थापक अहमद  बादशाहाने शहर  वसविण्यापूवी इ.स.1490 मध्ये किल्ला बांधला. या किल्ल्याचा परिघ 1 मैल 80 यार्ड इतका असून किल्ल्यास 22 बुरुज आहेत. किल्ल्याभोवती अभेद्य तटबंदी आहे व त्याभोवती विस्तीर्ण खंदक आहेत. खंदक ओलांडण्यासाठी ब्रिटीशांच्या काळात इ.स.1832 मध्ये मागील बाजूस झुलता पूल बांधण्यात आला, अजूनही त्याचे अवशेष बाकी आहेत.

चौथा रेजीमेंट अहमदनगर, 1841

मुघल काळानंतर मराठा साम्राज्याचा अर्धा शतक 1803 मध्ये वेलिंग्लीच्या ड्यूक ऑर्थर वेलेस्ली यांनी अहमदनगर किल्ल्यावर कब्जा केला, परंतु ते पेशवेला दिले. 1817 साली ब्रिटिश लष्करींनी अहमदनगर ताब्यात घेतला आणि त्यानंतर ते राहिले. 1830 साली, ब्रिटीश सैन्याने अहमदनगरला पोहचण्यास सुरुवात केली, जी पूर्णत: ब्रिटिश सैन्याची गाडी बनली. 184 9 साली स्थानिक शेतकर्यांनी कलेक्टरकडे तक्रार केली की बार्ट प्रॅक्टिस घेऊन आर्टिलरी युनिट्सनी त्यांची शेती नष्ट केली जात आहे. कलेक्टरांनी त्यांच्याकडून कब्जा केलेली जमीन ताब्यात घेण्यास सेनाला विचारले. 1849 ते 1852 पर्यंत ब्रिटिशांनी किल्ल्याभोवती 400 एकर जमीन हस्तगत केली आणि कॅन्टोनमेंटची निर्मिती सुरू केली. 1889 मध्ये अहमदनगर गॅझेटियर मध्ये प्रकाशित केलेल्या विस्तृत खात्यांनुसार, फील्ड आर्टिलरी, युरोपियन इन्फंट्रीतील आमच्या कंपन्या आणि इंडियन इन्फंट्रीची एक कंपनी अहमदनगर येथे ताब्यात घेण्यात आली होती. 1913 साली 500 घोडेससाठी एक स्मृती डिपार्ट स्थापन करण्यात आले. 1897 मध्ये, अहमदनगरमध्ये एकूण 559 एकर जमीन लष्कराला प्राप्त झाली होती.

सेंट जॉन कॅथलिक चर्च

सेंट जॉन कॅथलिक चर्च हे ब्रिटीश काळाशी संबंधित आर्किटेक्चरचे उत्कृष्ट प्रदर्शन आहे. अठराव्या शतकात अहमदनगरमध्ये मोठ्या संख्येने सैनिकी युनिट तैनात करण्यात आले होते परंतु त्यांच्या पवित्र पुनरुज्जीवनसाठी त्यांचे जवळचे कोणतेही स्थळ नव्हते, अगदी केरकीहून परत येणारे पॅडरही होते. शेवटी अखेरीस सैनिकांना ब्रिस्टर्सने चर्च बांधले. ऐतिहासिक स्मारक असल्याने, सेंट जॉन्स चर्च हे अहमदनगरचे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे. चर्च रजिस्टरानुसार, 1817 मध्ये या ठिकाणी आगमन करण्यासाठी ऑक्सिलीरी हॉर्सेड कॅव्हलरी हे पहिले ब्रिटिश सैन्याची युनिट होते. नंतर 1830 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीत एक मोठी सैन्याची संख्या पाठविली गेली आणि हे ठिकाण एक मोठे छावणी बनले.

चर्चच्या दफनभूमीत आपल्याला अहमदनगरमध्ये तैनात असलेल्या ब्रिटीश सैन्याचे अनेक कबर सापडतात. दक्षिण-पूर्वेकडे रोमन कॅथलिक चर्च आणि एपिस्कोपलियन चर्च हे आणखीन दोन चर्च येथे जवळच आहेत.सेंट जॉन्स कॅथलिक चर्च हे अहमदनगरच्या बाहेरील भागात भिंगार येथे आहे.

औरंगजेब कबर

खुलताबाद गावात स्थित असलेला औरंगजेब महान मुगल सम्राटांचा शेवटचा होता. 1680 च्या सुमारास शिवाजी महारांजाच्या मृत्यू झाल्यानंतर औरंगजेब संपूर्ण दख्खन साम्राज्य जिंकला आणि त्याच्या राजवटीखाली आणला. त्यांनी आपले राज्य भिंगार जवळ स्थापन केले आणि 1707 सालात  वयाच्या  91 पर्यंत तेथेच ते राहिले. येथे  त्यांना दफन करण्यात आले . त्याच कबर परिसर मध्ये, औरंगजेबचा दुसरा मुलगा, आझम शाह, आणि त्याची पत्नी यांचे समाधीही आहे.

लष्कर दल मुख्यालय

1921 मध्ये, सहा  कार कंपन्या येऊन  1924 मध्ये रॉयल टँक कॉर्प्स शाळाची स्थापना रॉयल टँक कॉर्प्सच्या प्रशासकीय कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अहमदनगर येथे करण्यात आली.

आनंद धाम

अहमदनगरची जमीन या भूमीवर जन्मलेल्या अनेक संतांनी पवित्र केली आहे. त्यापैकी एक जैन संत श्री आनंद ऋषिजी महाराज आहेत. पोस्टल विभागातर्फे रु. 4 / – आचार्य आनंद ऋषिजी महाराज यांच्या सन्मानार्थ मुद्रांक छापलेले आहे. आचार्य आनंद ऋषिजी महाराज हे असे एक संत होते, ज्यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान त्यांच्या अनुयायांना त्यांच्या अध्यात्मिक मार्गदर्शनाप्रमाणे विपुल व महत्त्वपूर्ण होते. त्यांचा जन्म 1900 साली शिरल चिंचंदी, अहमदनगर येथे झाला आणि 13 व्या वर्षी रतन ऋषिजी महाराज यांच्याकडून दीक्षा मिळाली आणि अशाप्रकारे त्यांनी स्वतःला आध्यात्मिक उपक्रमातील जीवन व मानवतेसाठी सेवा म्हणून आत्मसात केले. त्याच्या शिकवणुकींमध्ये प्रेम, अहिंसा आणि सहनशीलतेमध्ये खोलवर रुजलेली होती. ते नऊ भाषांमध्ये प्रवीण होते आणि त्यांनी मराठी व हिंदी भाषांतून मोठ्या प्रमाणात लेखन केले. त्यांनी अनेक शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांची स्थापना केली आणि अनेक आरोग्य संस्थांची पुनर्रचना केली आणि नियतकालिकांची स्थापना केली. 1965 साली त्यांना “आचार्य” हे नाव देण्यात आले आणि 1992 मध्ये त्यांचा स्वर्गवास  झाला.आनंद धाम त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात आला.

अहमदनगर ऐतिहासिक संग्रालय आणि संशोधन केंद्र

अहमदनगर ऐतिहासिक संग्रहालय मे 1960 मध्ये स्थापन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील या संग्रहालयमध्ये या संग्रहालयात सूक्ष्म पेंटिंग, शिल्पे, शस्त्रं, पगडी आणि हस्तलिखित इत्यादिंचा एक अनोखा संग्रह आहे. गणेश मूर्तीचा विशेष विभाग आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे मूळ रंगविलेल चित्र ,  जर्मनीची साखळी नसलेली  सायकल , तांत्रिक गणपती, संस्कृत – मराठी शब्दकोश, 200 फूट लांबीच्या कुंडली ही या संग्रहालयाची  काही आकर्षणे आहेत.

(गुरुवारी, संग्रहालय बंद राहते. इतर दिवशी, भेट देण्याची वेळ – सकाळी 10 ते  संध्याकाळी 5 पर्यंत.)

कवलरी टँक संग्रहालय

टैंक संग्रहालयमध्ये, ब्रिटीश शैलीतील तोफ आणि गोळे ठेवले आहेत. आर्मड कॉर्प सेंटर आणि शाळा केंद्राजवळ स्थित असलेले कवलरी टँक संग्रहालय आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन 1994 मध्ये बी.सी. जोशी यांच्या हस्ते झाले. आशियातील एकमेव संग्रहालय आहे .अनेक राज्यकर्त्यांच्या कारकीर्दीदरम्यान वापरलेले दारुगोळा आणि शस्त्रे  येथे ठेवलेले आहेत. येथे 40 देशांतील टँकदेखील प्रदर्शित केले गेले आहेत जे अद्वितीय आहेत.

मेहेर बाबा समाधी

मेहेर बाबा (फेब्रुवारी 25, इ.स. 1894 – जानेवारी 31, इ.स. 1969) (जन्मनाव मेरवान शेरियार इराणी) हे भारतीय गूढवादी व आध्यात्मिक गुरू होते. इ. स. 1954 मध्ये आपण या युगातील अवतार आहोत अशी जाहीर घोषणा त्यांनी केली होती.

बालपणात त्यांच्यामध्ये अध्यात्माचा ओढा असण्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हजरत बाबाजान या मुस्लिम साध्वीशी त्यांचा परिचय झाला आणि सात वर्षे चाललेली आध्यात्मिक रुपांतरणाची प्रक्रिया सुरू झाली.पुढच्या काही महिन्यांमध्ये आणखी चार आध्यात्मिक व्यक्तींशी त्यांनी संपर्क साधला. उपासनी महाराज यांच्या समवेत ते सात वर्षे राहिले. नंतर त्यांनी सार्वजनिक कार्य सुरू केले. पर्शियन भाषेत मेहेर बाबाचा अर्थ ‘दयाळू पिता’ असा होतो. सुरुवातीच्या काही अनुयायांनी त्यांना हे नाव दिले. महारोगी, गरीब, मानसिक रुग्णांसाठी अनेक धर्मार्थ कार्ये त्यांनी केली.

शुक्लेश्वर मंदिर, भिंगार

हे मंदिर हजारो वर्षांपूर्वीचे आहे. हे रामायण काळापासून आहे.  भृगु ॠषींचे  शुक्राचार्य यांनी समांगा नदीच्या पश्चिम बाजूला भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी खूप तपश्चर्या केली होती. नानासाहेब पेशवे यांच्या आदेशानुसार सदाशिवभाऊ हे पानिपतची  लढाई लढण्यासाठी निघत होते. या घटनेचे स्मरण करून शुक्लेश्वर मंदिराचे पुनर्विकास करण्यात आले.  1757 मध्ये हैदराबादच्या निजाम यांनी नगरच्या किल्ल्याला भेट दिली व शुक्लेश्वर मंदिरासमोर बेलभंदरची मूर्ती बांधली.  विश्वास पाटील यांनी त्यांचे पानिपत कदंबरीत भिंगारच्या शुक्लेश्वर मंदिराचा  उल्लेख केला आहे.

नृसिंह मंदिर

नगरपासून सुमारे 17 कि.मी. अंतरावर भातोडी गाव येथे सुमारे 400-450 वर्षे जुन्या तलावाच्या जवळील कलावंतीण  महल, एकंगबाबी मैदान आणि प्रसिद्ध नृसिंह मंदिर आहेत. येथे नृसिंह पुतळ्याऐवजी तांडला आहे.

 

शिव मंदिर पारनेर

प्रवाहाच्या दोन्ही बाजूस शिव मंदिर पारनेरपासून जवळ जवळ 1.5 किलोमीटरच्या दोन लहान प्रवाहाच्या मध्ये शंकराचे दोन मंदिर आहेत आणि स्थानिक…

 

पाच दगडांचे दरवाजे

अहमदनगरच्या निजामशाही काळात मध्ययुगीन काळातील मोठ्या तटबंदीचे दरवाजे बांधले गेले. दरवाजे दगडांनी बांधलेले आहेत आणि घुमटचे बांधकामात विटा आणि चुना…

 

टोका येथील सिध्देश्वर, देवी आणि विष्णु मंदिर

प्रवारा आणि गोदावरी नद्यांच्या संगमावर स्थित केयेगाव टोका येथील तीन मंदिरे असलेला एक समूह आहे.येथे सिध्देश्वर महादेव मंदिर, देवी आणि…

 

घोटाण येथील जैन मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर

जैन मंदिरात गर्भगृह, अंतराळ, मंडप आणि मुखमंडप यांचा समावेश आहे. मंडप आणि आंतराळाची छत आणि गर्भगृहाच्या दाराचे चौकट सुंदर सजावटांसह…

 

कर्जत येथील शिव मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर

मल्लिकार्जुन मंदिर बसाल्ट खडकाने बनवलेले आहे आणि बाह्य भाग साधा पृष्ठभाग आहे.मंदिरामध्ये गर्भगृह आणि मंडपाचा समावेश आहे. मंदिर समोर नंदी…

 

ढोकेश्वर गुहा

दगडाच्या पठारातून निर्माण झालेल्या दोन खडकाळ पर्वंतामधील एक पर्वताच्या पूर्व दिशेस,  त्रिभुज कक्ष असलेले एक सर्वात मोठे  सभागृह म्हणजे ढोकेश्वर गुहा आहे….

 

रतनगड

रतनवाडीपासून 6 किलोमीटर अंतरावर, भंडारदरापासून 23 किमी, पुणे पासून 183 किमी आणि मुंबईपासून 197 किमी अंतरावर असलेल्या रतनगड हे महाराष्ट्रातील…

 

खर्डा किल्ला

खर्डा किल्ला, तालुका जामखेड , खर्डा म्हणजे पूर्वीचे शिवपटटण.  11 मार्च 1795 रोजी मराठयांनी याच  ठिकाणी निजामावर विजय मिळविला, त्या…

 

रेहकुरी  काळवीट अभयारण्य

रेहकुरी गाव कर्जत तालुक्यातील अहमदनगर शहरापासून सुमारे 80 किमी अंतरावर स्थित आहे. रेहकुरी दुर्मिळ आणि प्रसिद्ध प्राणी काळवीट  च्या अभयारण्यचे…

 

हरिश्चंद्रगड

खिरेश्वरपासून 8 किमी अंतरावर, भंडारदरापासून 50 किमी अंतरावर, पुण्यापासून 166 किमी आणि मुंबईपासून 218 कि.मी. अंतरावर, हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील अहमदनगर…

 

जिल्ह्याचे रूपरेखा

सहकारातून ग्रामोध्दार व संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा अहमदनगर  जिल्हा पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला आहे. क्षेञफळाच्या दृष्ट्टीने महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असलेल्या या जिल्हयाचे एकूण भौगोलिक क्षेञ 17048 चौ.कि.मी. असून ते राज्याच्या क्षेञफळाच्या 5.6 टक्के आहे.या जिल्हयाच्या उत्तर सीमेवर नाजिक ईशान्येस औरंगाबाद पूर्वेस बीड व उस्मानाबाद हे जिल्हे असून दक्षिण सीमेवर सोलापूर, पश्चिम सीमेवर ठाणे व पुणे जिल्हे लागून आहेत. 2011 च्या जनगणनेप्रमाणे जिल्हयाची एकूण लोकसंख्या 4543159 आहे.
पश्चिमेकडील डोंगराळ भाग व पूर्वेकडील सखल भाग हे जिल्हयाचे स्वाभाविक विभाग आहेत. पश्चिम भागातील हवामान थंड व कोरडे तर पूर्व भागातील हवामान उष्ण व कोरडे आहे. जिल्हयातील सरासरी पर्जन्यमान 382 मि. मीटर इतके असून पर्जन्यमानाची वाटणी असमान आहे.
गोदावरी व भीमा या जिल्हयातील प्रमुख नद्या आहेत. अहमदनगर जिल्हयाच्या उत्तर सीमेवरुन गोदावरी नदी वाहते. प्रवरा व मुळा या तिच्या उपनद्या आहेत. भीमा नदी जिल्हयाच्या दक्षिण सीमेवरुन वाहते. दक्षिण भागातून सीना,हंगा, घोड या नद्या दक्षिणेकडे वाहतात. काळी लालसर, काळी बरड व पांढरी या प्रकारात जिल्हयाची जमीन विभागलेली आहे. जनगणना 2011 नुसार जिल्हयात 1584 गांवे( तीन निर्जन गावांसह घानेगाव, सुजलपूर व गोंधवणी ) 14 तालुक्यात विखुरलेली आहेत. 14 पंचायत समित्या, 1311 ग्रामपंचायती, 1 महानगरपालिका, 9 नगरपालिका, 1(शिर्डी ) नगर पंचायत व 1 कटकमंडळ जिल्हयात आहेत.
रब्बी ज्वारी हे जिल्हयाचे मुख्य पिक, खरीप हंगामात बाजरी, भूईमूग, मठ, सोयाबीन व मूग ही पिके तर रब्बी हंगामात ज्वारी, गहु, हरभरा ही पिके घेतली जातात. ऊस हे जिल्हयाचे प्रमुख नगदी पिक असून त्यामुळे जिल्हयाची आर्थिक प्रगती झाली आहे. द्राक्षे, संञी, डाळींबेइ. फळांचे उत्पादनही जिल्हयात घेतले जाते. जिल्हयातील बागायत शेती प्रामुख्याने विहिरींच्या पाण्यावर केली जाते. गंगापुर, भंडारदरा, मुळा, घोड, कुकडी या धरणाच्या पाटपाण्यामुळे शेतजमिन ओलीताखाली येण्यास मदत झाली आहे.
सहकार क्षेत्रातील अग्रणी ही आपली ओळख अहमदनगर जिल्हा आजही जटकवून आहे. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना सन 1950 मध्ये प्रवरानगर येथे उभारला गेला. जिल्हयात 2015-16 या वर्षाअखेर सर्व प्रकारच्या एकूण 5295 सहकारी संस्था आहेत.
उद्योग क्षेत्रात अहमदनगर जिल्हा प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्र राज्याच्या निम्म्याहून अधिक साखरेचे उत्पादनएकटया नगर जिल्हयात केले जाते. 2016 अखेर जिल्हयात 20 साखर कारखाने कार्यरत आहेत.
जिल्हयात मार्च 2016 अखेर 100 टक्के विद्युतीकरण झालेलेअसून विद्युतीकरण झालेल्या खेडयांची व शहरांची संख्या 1603आहे.
अहमदनगर जिल्हयामध्येआरोग्य सेवे अंतर्गत सार्वजनिक व शासन सहाय्यित रुग्णालये, 20 दवाखाने, 96 प्राथमिक आरोग्यकेंद्रे व 555 उपकेंद्रे उपलब्ध आहेत.
अंगणवाडीपासून अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालया पर्यंत तसेच कृषि विद्यापीठाच्या सर्व शैक्षणिक सोयी अहमदनगर जिल्हयात उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातले पहिले कृषि विद्यापीठ राहुरी येथे स्थापन झाले असून कृषि अध्यापन व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहे. सप्टेंबर 2016 अखेर 5046 प्राथमिक शाळा, 956 माध्यमिक शाळा व 1085 उच्च माध्यमिक शाळा जिल्हयात आहेत.

मध्य रेल्वेचा 197 कि.मी. लांबीचा मार्ग जिल्हयातून जातो. सर्व प्रकारच्या 22186.87 कि.मी.लांबीच्या रस्त्यांनी जिल्हयातील 1584 गांवे जोडली असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे प्रवासी वाहतूकीचे विस्तृत जाळे या जिल्हयात आहे. एस. टी. मार्गाची एकूण लांबी 60471 कि.मी.असून एस.टी. महामंडळाच्या 841 एस.टी. बसेस जिल्हयात रस्त्यावर धावतात.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही जिल्हयाची अग्रणी बॅक असून जिल्हयात एकूण 610  वर्गीकृत  बँकाची कार्यालये आहेत. आशिया खंडात सहकार क्षेञात प्रथम क्रमांकावर असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवती सहकारी बॅकेच्या व इतर सहकारी बॅकेच्या एकू ण 296 शाखा जिल्हयात मार्च 2016 अखेर कार्यान्वित होत्या. अहमदनगर जिल्हयाची अन्नधान्याची बाजारपेठ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

आदर्श ग्राम योजनेचा मानदंड स्थापित केलेले पारनेर तालुक्यातील राळेगणसिध्दी हे गांव आदर्श खेडे म्हणून प्रसिद्ध आहे. विविध राज्यातील प्रशासकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, शासकीय प्राधिकारी,सामाजिक कार्यकर्ते व विविध देशी-विदेशी संस्था/ संघटनांचे प्रतिनिधी येथील कामांची पाहणी करण्यासाठी व अभ्यासासाठी भेट देत असतात. जलसंधारण, स्वच्छ इंधन इ. द्वारे लोकसहभागातून शाश्वत विकासाचा मूलमंत्र नगर तालुक्यातील  हिवरेबाजार गावाने राज्यात घालून दिला आहे.

श्री साईबाबांची शिर्डी व अवतार मेहेरबाबांचे मेहराबाद ही अहमदनगर जिल्हयातील धार्मिक स्थळे ही भारतातील नव्हेतर जगातील अनेक भक्तांची श्रध्दा स्थाने आहेत. याशिवाय श्री ज्ञानेश्वर मंदिर (नेवासा), श्री शनी शिंगणापूर, श्री दत्त मंदिर (देवगड) व चौंडी ( पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मस्थान), हजारो भाविकांचे श्रद्धास्थान भगवानगड (पाथर्डी)  व  सिध्दी विनायकाचे  सिध्दटेक या तीर्थक्षेञांनी भाविकांच्या मनात अहमदनगर जिल्हयाचे आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे.

इतिहास

अहमदनगरचा प्रारंभिक इतिहास 240 बी.सी.सी पासून सुरू होतो. जेव्हा मौर्य सम्राट अशोकच्या संदर्भात परिसराचा उल्लेख केला जातो. हे ठिकाणाला जिल्ह्याच्या दृष्टीने कोणतेही  महत्व नव्हते परंतु सध्याच्या शहराच्या शेजारच्या छोट्या-छोट्या गोष्टी जुन्नर  व पैठण यांच्यात महत्वाच्या बायपास जागा म्हणून ओळखल्या जात होत्या.

ई.स.पूर्व 90 ते  ई.स. 300या काळात सत्ताधारी राजघराण्यानी अहमदनगर वर राज्य केले. त्यानंतर राष्ट्रकूट राजवंश यांनी 400 ई.स. पर्यंत राज्य केले. 670 ई.स. चालुक्य व पाश्चात्य चालुक्य राजे. 670 to 973 ई.स.-राष्ट्रकूट राजे. गोविंद ३ रा  (785 to 810) आणि त्यानंतर 973 to 1190 ई.स.-पाश्चात्य चालुक्य राजे.अकोला तहसीलमधील हरिश्चंद्रगड येथे लेणी आणि मंदिराची रचना आणि या काळात तयार करण्यात आली.

पाश्चात्य चालुक्या नंतर 1170 ते 1310 या काळात देवगिरी यादव यांनी राज्य केले. अहमदनगरच्या ईशान्येस ७४ मैल  भागात, देवगिरी (आधुनिक दौलताबाद) यादवची राजधानी होती. यावेळी सर्वात उल्लेखनीय मंत्री आणि राजकारणी हा हेमाद्री  होता ज्यानी मोडी लिपीचा शोध लावला होता आणि जो अद्याप बुद्धीवादिंकडून  अभ्यास केला जात आहे.हेमद्रि खरोखर बुद्धिमान होते. चुनखडी  आणि सिमेंट  न वापरता इमारतींचे बांधकाम करण्याची संकल्पना निर्माण झाली .यामध्ये त्यांची मुख्य कल्पना अशी आहे की, एकमेकांच्या वर मध्यम आकाराचे दगड विशिष्ट कोनात रचून  अशा रीतीने भरणे म्हणजे भिंतीला  मंदिराचा आकार दिला जाईल.संपूर्ण जिल्हाभर पसरलेली अशी  26 मंदिरे याबद्दल साक्ष देतात.
यादवांचे प्रसिद्ध राजा रामदेवराव,  यांच्या समकालीन  संत  ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात  त्यांच्या महान कार्याचा  उल्लेख केला आहे.  हेमाद्री हे  या  प्रतिष्ठित राजाचे मंत्री होते. इतका  मजबूत आणि धाडसी, पण लष्करी अपरिपूर्णतेमुळे 1294 मध्ये दिल्लीच्या मोघल राजा जल्लाल्द्दीन खिलजीचा  सरदार मुख्याधिकारी  अलादीन खिल्जी यांच्या हस्ते राजा चा पराभव झाला.विंध्य पर्वतरांगांच्या दक्षिणेकडे असलेल्या मुसलमान राजाचे हे पहिले  आक्रमण.या विजयाने दख्खनमध्ये  मुस्लीम गढीची स्थापना करण्याच्या मुस्लिम महत्वाकांक्षाला जोरदार  यश मिळाले.

वारंवार झालेल्या आक्रमणानंतर 1318 मध्ये यांचे वर्चस्व संपले.1338 मध्ये दिल्लीच्या सम्राट मोहम्मद तुघलघकाने देवगिरीला आपली राजधानी बनवून त्याचे नाव दौलताबाद ठेवले. त्यानंतर तुघलक दौलताबादला निघून गेला आणि सम्राटाच्या सरदारांनी लोकांना लुटून नेऊन त्यांचे घरे आणि महाल इमारती यांना आग लावली. एक गटाचा नेता आणि एक अफगान सैनिक अलादीन हसन गांगु दिल्ली सम्राटांच्या शक्तीचा नाश करण्यात व 1347 साली गुलबर्गा येथे स्वतंत्र राज्य स्थापन करण्यात यशस्वी ठरला.

हे राज्य बहामनी किंवा ब्राह्मण राज्य म्हणून ओळखले जाते. हे राज्य 150 वर्षे टिकले व हसन गंगू बहमनी नंतर 13 राजांनी राज्य केलं. त्यानंतर बहामनी राज्याची पाच स्वतंत्र राज्ये विभागली गेली. अहमदनगर त्यांच्यापैकी एक होते, जे निजामशाही म्हणून ओळखले जाऊ लागले .

या विजयाने डेक्कनमध्ये मुस्लीम गढीची स्थापना करण्याच्या मुस्लिम महत्वाकांक्षाला जोरदार आक्रमक यश मिळाले. पुनरावृत्ती झालेल्या आक्रमणानंतर 1318 मध्ये अॅडम वर्चस्व संपुष्टात आला. महाराष्ट्राने दिल्लीतून नियुक्त राज्यपालांचे राज्य सुरू केले आणि देवगिरी येथे तैनात केले. 1338 मध्ये दिल्लीच्या सम्राट मोहम्मद तुघलकाने देवगिरीला आपली राजधानी बनवून त्याचे नाव दौलताबाद नाव ठेवले. त्यानंतर तुघलक दौलताबादला निघून गेला आणि सम्राटाच्या अवाढव्य सरदारांनी त्यांना लोकांना लुटले आणि घरे आणि महाल इमारती जाळल्या.

मुस्लिम धर्मातील एका अफगान सैन्याने अल्लादिन हसन गंगूने दिल्ली साम्राज्याची सत्ता उलथून टाकले  आणि 1347 मध्ये गुलबर्गा येथे स्वतंत्र राज्य स्थापन करायला यशस्वी ठरले. हे राज्य बहामनी किंवा ब्राह्मण राज्य म्हणून ओळखले जाते. हा राज्य 150 वर्षे टिकला, हसन गंगू बहमनी नंतर 13 राजांनी राज्य केलं. हसन गंगूचे प्रशासन प्रशंसनीय होते आणि प्रशासनाची रचना हि त्याची महान शक्ती ठरली. यानंतर पुढील राजे, जेव्हा 1460 मध्ये मोठा दुष्काळ पडला, त्यावेळी 1472 आणि 1473 मध्ये पुनरावृत्ती झाली. या काळात, थोर पुरुष बळकट व आज्ञाभंग करणारे बनले. प्रशासकीय संकटाचा सामना करण्यासाठी, प्रशासनात मोठे बदल घडवून आणण्यासाठी पंतप्रधानांनी मोहम्मद गवनेचा विचार केला. थोर लोक अतिशय व्यथित झाले आणि राजाला प्रभावित केले. त्यांनी मोहम्मद गवई यांच्यावर विविध आरोप लावले. राजाच्या मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यासाठी त्यांनी पुरेसे शहाणपण आणि मूर्खपणाचा विश्वास ठेवण्यासाठी राजा खूपच कमकुवत आहे. अशाप्रकारे 1487 मध्ये गरीब गबन मारले गेले.

त्यानंतर बहामनी राज्याची पाच स्वतंत्र राज्ये विभागली गेली. अहमदनगर त्यांच्यापैकी एक होता, निजामशाही म्हणून प्रसिद्ध होता. मोहम्मद गवन यांची निजाम-उल-रामभाई भैरी यांनी बहामनीच्या कार्यालयात पदवी संपादन केली आणि 1485 च्या आसपास भिर आणि अहमदनगर यांना त्यांची इस्टेट्समध्ये जोडण्यात आले. अहमदनगरच्या निजामशाही राजघराण्यातील संस्थापक मलिक अहमद यांना या क्षेत्राचे व्यवस्थापन करण्यात आले. सर्व प्रथम मलिक अहमद यांनी पुना जिल्ह्यातील जुन्नर येथे आपले मुख्यालय बनवले.

1486 मध्ये निजाम-उल-मुळची हत्या झाली आणि मलिक अहमद बहामनी राज्याचे पंतप्रधान झाले.मलिक अहमद राजापासून दूर असताना, राजा ने मलिक खानच्या विरोधात जाण्यासाठी सेनापती जहागीर खानला आज्ञा दिली. मलिक खान जवळजवळ अपुरी तयारी होती आणि त्याच्याबरोबर थोडी सेना होती.परंतु मोठ्या धैर्यवान आणि असामान्य चालीने त्याने 28 मार्च 1490 रोजी अहमदनगरच्या पूर्व मैदानावरील जहांगीर खान आणि बहामनी राज्याच्या सैन्याचा पराभव केला.त्यांचे मुख्यालय, जुन्नर दौलताबादपासून लांब होते, म्हणून 1494 मध्ये त्यांनी सिना नदीच्या डाव्या किनाऱ्यावर बाग निजाम जवळ एक शहर उभारले,ज्याला त्याच्यानंतर अहमदनगर नावाने संबोधले जाऊ लागले.अहमद निजाम अजूनही शांत नव्हता आणि बहामनी सैन्यावर बदला घेण्याची इच्छा होती. 1499 मध्ये तो अखेर यशस्वी झाला आणि दौलताबादचा किल्ला ताब्यात घेतला आणि तेथे त्यांची सेना तैनात केली. या विजयाचे स्मरण ठेवण्यासाठी अहमद निजाम यांनी बाग निजाम (हा अहमदनगरचा सध्याचा किल्ला) याच्याभोवती भिंत उभारली आणि त्यात लाल दगडांचा एक महाल बांधला.अहमद निजाम 1508 मध्ये मरण पावला आणि त्याचा सात वर्षांचा मुलगा बुर्हान सत्तेवर आला.

बुर्हान निजाम शहा( 1508 to 1553)

बुर्हान निजाम शहा सात वर्षांचा बालक असल्यामुळे, मुकामील खान दखानी, या सक्षम राजकारण्याची राजाचे सरंक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली .अखेर सत्तेचाळीस वर्षांच्या राजवटीनंतर 1553 साली चोपन्न वयाच्या बुर्हान निजाम शाहचा मृत्यू झाला.

हुसेन निजाम शाह ( 1553-1565)

हुसेन निजाम शाह आपल्या वयाच्या तेराव्या वर्षी त्यांच्या वडिलांनंतर सत्तेवर आला. हुसेन निजाम शाह यांनी अहमदनगर किल्ला दगडात बांधला. सुरवातीला किल्ला माती पासून बनविलेला होता. आता नवीन जोडणी म्हणून किल्ल्याभोवती एक खंदक बांधला गेला ज्यामुळे शत्रूला दगडांच्या भिंतीपासून सुरक्षित अंतरावर ठेवता आले. विजयनगरचा हिंदू राजा राम राजा याने , अनेकदा अहमदनगर किल्ल्यावर  हल्ला केला आणि हुसैन यांना जुन्नरपर्यंत जाण्याचा इशारा दिला.बीजापुरचा आदिल शाह ,हुसेन निजाम शाहाविरुद्ध राम राजाला नेहमी मदत करायचा. हुसैन निजाम शाहला मुस्लिम राजांमधील एकमेकांबद्दल वाईट भावना बाळगण्याच्या निरर्थकतेची जाणीव झाली.तो 1564 मध्ये रामराज यांच्या विरोधात बिजापूर, बेदर आणि गोवळ कोंड्याच्या राजांकडे सहभागी झाला.या चार राजांच्या एकत्रित लष्कराने 1565 मध्ये रामराज्याचा पराभव केला.यानंतर हुसेन निजाम शाह याचे अहमदनगर येथे निधन झाले, त्याला चार मुले व चार मुली होत्या.

मुर्तझा निजाम शाह ( 1565-1588)

मुर्तझा निजाम शाह, हुसेनचा मुलगा तो अल्पवयीन असतानाच त्याला सिंहासन मिळाले.राजकुमारांनी आपल्या वडिलांना तिरस्काराने वागवले आणि त्यांना स्नानासाठी गेले असताना, दरवाजे बंद करुन खिडक्या खाली एक मोठी आग पेटविली. अशाप्रकारे 1588 साली राजा गुदमरल्याने मृत्युमुखी पडला.

मिरान हुसेन निजाम शाह( 1588)

मिरन हुसैन यांनी मिर्झा खानचे पंतप्रधान म्हणून नियुक्त केले परंतु सुखवाद आणि अतिरेकीपणा वगळता काहीच काळजी घेतली नाही.मिर्झा खानने मिरन हुसेनला राजघराण्यातील पुरुष सदस्यांना ठार मारण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मिरन हुसेन यांनी पंधरा सरदारांची हत्या केली. काही दिवसांनंतर मिरन हुसेनने मिर्झा हुसैन यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मिर्जा हुसेनने ह्यांना हे कळले तेव्हा त्याने राजावर कब्जा केला आणि चुलत भाऊ इब्राहिम आणि इस्माईल यांना पूण्याहून बोलावले.नवीन राजाचे स्वागतास किल्लाच्या आत जात असतांना, जमालखान, अनेक अधिकारी व सैनिकांसह
एकत्रित होऊन दरवाजात जमले व त्यांनी मिरन हुसेनला भेटावयास जाण्याची मागणी केली. जेव्हा मिर्झा खानने हे पाहिले तेव्हा त्याने मिरन हुसेनचे डोके कापून बुरुजावर लावले.

 

इस्माईल निजाम शाह( 1588 to 1590)

जमाल खानने इस्माईलला निजाम शाह म्हणून मान्यता दिली.जेव्हा साम्राज्यातील अस्वस्थते बद्दल सम्राट अकबराला माहिती झाले,तेव्हा त्यांनी बुर्हान निजाम (इस्माइल शाहचे वडील ) यांना दख्खनकडे जाण्यास सांगितले. यापैकी एक लढ्यात जमाल खानचा मृत्यू झाला. बुर्हान निजामने त्याचा मुलगा ताब्यात घेतला आणि त्याला तुरुंगात ठेवले.

 

बुर्हान निजाम शाह (दुसरा)(1590 to 1594)

बुर्हान निजाम शाह वयाने खूपच वयस्कर होते आणि सुखवाद आणि अतिरेकीपणात मग्न होते. त्याच्या कारकिर्दीत काही महत्त्वाचे झाले नाही. 15 मार्च 1598 रोजी त्यांचे निधन करण्यापूर्वी त्यांनी त्यांचे उत्तराधिकारी इब्राहिमची नेमणूक केली.

 

इब्राहिम निजाम शाह 1594

इस्माईल निजाम यांनी आपल्या वडिलांच्या सल्ल्याद्वारे मियां मंजू दखनी जे त्याचे शिक्षक होते त्यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केले.इस्माईलचा राज्यात येखलास खान यांच्या नेतृत्वाखाली व मियां मंजू यांच्या नेतृत्वाखाली असे दोन पक्ष एक होते.एक प्रकारचे यादवी युद्ध त्यांच्यात होते.आदिल शाह नेहमी अहमदनगरला जिंकून घेण्याची इच्छा करीत होता, म्हणूनच हे काळल्यावर तो अहमदनगरच्या सीमेकडे सरकू लागला.यखलास  खानला लढायचे होते परंतु मियां मंजूने शांततेचा समारोप करण्याचे प्रस्तावित केले जेणेकरून दख्खनच्या सर्व सैन्याची संयुक्त ताकद सम्राट अकबर यांच्या इराद्याने आक्रमण पूर्ण करू शकेल.

 

अहमद  (II) 1594-95

विजापूर आक्रमणात राजाच्या डोक्यात गोळी मारली गेली. त्यामुळे चार महिने त्याचे शासन संपले.इब्राहिम निजाम शाहच्या मृत्यूनंतर बहुतेकाना असे वाटले की, राजाचा एकुलता पुत्र बहादूर, याच्या नावाची राजा म्हणून घोषणा होईल पण , मियान मंजू याला यांचा विरोध होता. पण त्याऐवजी अहमद यांना आणण्याचे मान्य करण्यात आले आणि बहादूर जो राजा इब्राहीमचा मुलगा होतो त्याला जबरदस्तीने चावंड किल्ल्याकडे पाठवून देण्यात आले.

लवकरच आपापसात भांडणे सुरु झाली आणि रक्तपात सुरु झाला.मियान मंजूने सर्व प्रकारचे अत्याचाराचेउच्चाटन करायचे होते आणि म्हणून त्याने राजकुमार मुराद, सम्राट अकबर यांचा मुलगा, जो नंतर गुजरातमध्ये होता, त्याचे सैन्य अहमदनगरला पाठवण्या साठी पत्र लिहिले.दख्खनवरआक्रमण करण्याची संधी मिळण्याची वाट पाहत असलेल्या राजकुमाराने  हे   निमंत्रण लगेच स्वीकारले.

मुराद अहमदनगरला जाताना अनेक प्रतिष्ठित नेत्यांनी यखलस खान याला सोडून ते मियां मंजूला सामील झाले.मियान मंजूने आधी राजकुमार मुराद यांच्याकडे निमंत्रण पाठवण्याची आपली चूक मान्य केली आणि निजाम शाहीच्या हितासाठी राजकुमार मुरादचा प्रतिकार करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याने अहमद सह अहमदनगरच्या  बाहेर पडला  आणि चांद बीबीला  किल्ल्याचे रक्षण करण्याची विनंती केली.  राजकुमार मुराद यांचे आक्रमण परतून लावण्यास सांगितले.मुरादने अहमदनगरच्या किल्ल्यावर हल्ला केला परंतु चांद बीबींनी अहमदनगरच्या बहादूर शाहची राजा म्हणून घोषणा केली व चांद बीबींनी त्याचे आक्रमण परतवून लावले.

15 99 मध्ये अकबरने राजकुमार दानियल मिर्झा आणि खान खानान यांना अहमदनगर ला पाठविले व किल्ल्याला वेढा घातला. सुल्ताना चांद बीबी प्रभावी प्रतिकार करू शकलानाही. म्हणून तिने राजकुमार दानियल यांच्याशी बोलणी करण्याचा निर्णय घेतला. परंतु हमीद खान यास ते मान्य नसल्याने त्याने विरोध केला व चांदबीबी ला ठार केले.मग मुगलांनी किल्ल्यात  प्रवेश केला आणि बहादूर याला पकडण्यात आले आणि दिल्लीला पाठविण्यात आले.

मुर्तझा निझाम शाह  (1600-1613)

सम्राट अकबर याने जरी आपल्या अधिकाऱ्यांना दख्खनच्या राज्याची देखभाल करण्यास नियुक्त केले तरी निजाम शाहच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला.त्यांनी त्यांचे स्वातंत्र्य गमावले होते त्यांनी शाह अली राजाचा मुलगा मुर्तझा याला राजा घोषित केले. 1636 मध्ये निजाम शाही संपली.

मोघल किंवा दिल्लीचे राज्य (1636 to 1759)

शिवाजी, मराठा राजा यांनी अहमदनगर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरावर हल्ला केला. त्यांच्याजवळ मजबूत सेना नव्हती पण सैन्याने गनिमी युद्ध चालू ठेवले आणि मोगला सैन्याला त्रास दिला. शाहजहांने औरंगजेबला 1636 मध्ये व पुन्हा 1650 मध्ये व्हाईसरॉय म्हणून नेमले. शिवाजीने 1657 आणि 1665 मध्ये अहमदनगरवर आक्रमण केले. इतर वेळी शिवाजी महाराजांचे मंत्री आणि सहकार्यांनी अहमदनगर येथे एकत्रितपणे हल्ला केला.औरंगजेबाने मराठ्यांचे  स्वतंत्र राज्याचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न केला परंतु ते कधीच यशस्वी झाले नाही आणि शेवटी अहमदनगरमध्ये २१ फेब्रुवारी १७०७ रोजी त्याचे निधन  झाले.

 

मराठ्यांचे राज्य  (1759 to 1817)

निजाम-उल-मुल्कच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन मुलांमधे सलाबत जंग व गझी उद-दीन यांच्यात वाद झाला.या राजकीय गोंधळामध्ये निजामांचा किल्लेदार कवी जंग यांनी पेशव्यांना साथ  दिली.निजाम 1760 मध्ये उदगिर येथे पराभूत झाला.

निजामने अहमदनगर व अहमदनगरच्या प्रांताचा मोठा भाग सोडला. 17 9 5 मध्ये खर्डा येथे निजामला पुन्हा मराठांनी पराभूत केले. १७९५  मध्ये सवाई माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर मराठ्यामध्ये मध्ये वादसुरु झाले . 17 9 7 मध्ये दौलतराव सिंदिया यांनी बाजीराव पेशवे यांच्याकडून अहमदनगरच्या किल्ल्याचा ताबा घेतला सिंधिया यांनी 17 9 7 मध्ये प्रसिद्ध राजकारणी नाना फडणवीस अहमदनगर किल्ल्यात कैदेत होते. अखेरीस तो 17 9 8 मध्ये सोडले पण अतिशय निराश झालेले नाना फडणवीस 1800 साली मरण पावले.

यशवंतराव होळकर आणि दौलतराव सिंदिया यांनी बाजीराव पेशवेला सतत त्रास दिला.म्हणूनच त्यांनी 31 डिसेंबर 1802 रोजी मंत्रीमंडळाची बैठकित ब्रिटिशांशी त्यांच्या सुरक्षेसाठी एक करार केला.

 

ब्रिटिश राज्य (1817 to  1947 )

जेव्हा इंग्रजांनी अहमदनगरचा ताबा घेतला तेव्हा अहमदनगर  जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर होते.  ब्रिटीश सैनिक व स्वातंत्र्यसैनिक यांच्यातील  सतत संघर्ष आणि दुष्काळ यांच्यामुळे अनेक माजी श्रीमंत वसाहती निर्मनुष्य झाल्या होत्या. ते गावोगावी, डोंगराळ आणि डोंगराळ भागात प्रामुख्याने पारनेर, जामगांव आणि अकोला भागात आश्रय घेऊन शस्त्रे गोळा करत होते. कोळी  आणि भिल्ल यांनी एकत्रित ब्रिटिश सैन्याला  त्रास  दिला. राघोजी भांग्रीया यांच्या नेतृत्वाखाली हे बंड  होते. शेवटी 1847 साली पंढरपूरला ते पकडले गेले आणि लगेच त्याला फाशी देण्यात आली.

1857 च्या महान स्वातंत्र्य संग्रामात (इंग्रजांनी ‘शिपाई बंडाळी’ असे संबोधले) अहमदनगर हे प्रचंड अशांततेचे एक ठिकाण होते. भाजीजी भागोजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय स्वातंत्र्यसैनिक सुमारे 7000 भिल्ल होते. ते डोंगराळ प्रदेशातील आणि विशेषत: पारनेर, जामगाव, राहुरी, कोपरगाव आणि नाशिकच्या परिसरात सक्रिय होते. परंतु अखेरीस इंग्रजांविरूद्ध  आवाज उठविण्याच्या या सर्व प्रयत्नांना नकार देण्यात आला आणि गुलामगिरी  टिकून राहिली. सुमारे 1880 पर्यंत  सर्वत्र जवळजवळ शांतता होती.

लोकमान्य टिळकांनी संपूर्ण भारतातील राजकीय चळवळी सुरु करण्यात आल्या  आणि त्या ब्रिटिश सरकारद्वारे  सक्तीने बंद करण्यात आल्या.  1920 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर 1 9 20 मध्ये महात्मा गांधींनी पुढाकार घेतला व सविनय कायदेभंग चळवळीची जबाबदारी घेतली. हजारोंच्या संख्येने  सत्याग्रह केला  आणि त्यांना  अटक करण्यात आली.  1920 ते 1941 दरम्यान सत्याग्रहाच्या अनेक आंदोलनांची सुरूवात झाली. 9 ऑगस्ट 1 942 पासून 1944 पर्यंत देशभरात सर्व भारतीयांनी शेवटच्या नि: शस्त्र आंदोलनाची सुरूवात केली. महात्मा गांधी, सरदार पटेल , राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद, सुभाष चंद्रारा बोस, डॉ. सय्यद महमूद, शंकरराव देव यांना अटक करण्यात आली. गांधी वगळता बहुसंख्य नेत्यांना अहमदनगर किल्ल्यात ठेवले होते. जवाहरलाल नेहरू, त्यांचे प्रसिद्ध पुस्तक लिहिले गेले अहमदनगर किल्ल्यात “द डिस्कव्हरी ऑफ इंडिया”

 

 

 

 

 

अहमदनगर जिल्हा
अहमदनगर जिल्हा
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा
महाराष्ट्रच्या नकाशावरील स्थान
देश  भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव नाशिक
मुख्यालय अहमदनगर
तालुके १. अकोले २. कर्जत ३. कोपरगाव ४. जामखेड ५. नगर ६. नेवासा ७. पाथर्डी ८. पारनेर ९. राहाता १०. राहुरी ११. शेवगांव१२. श्रीगोंदा १३. श्रीरामपूर १४. संगमनेर
क्षेत्रफळ १७,४१३ चौरस किमी (६,७२३ चौ. मैल)
लोकसंख्या ४५,४३,०८० (२०११)
लोकसंख्या घनता २६० प्रति चौरस किमी (६७० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या १७.६७%
साक्षरता दर ८०.२२%
लिंग गुणोत्तर १.०७ ♂/♀
प्रमुख शहरे अहमदनगरश्रीरामपूरसंगमनेरशिर्डी
जिल्हाधिकारी अनिल कवडे
लोकसभा मतदारसंघ १.अहमदनगर
२.शिर्डी

 

 

 

 

अहमदनगर 

हे महाराष्ट्रातील शहर सीना नदीच्या काठावर वसलेले आहे जे पुण्यापासून  ईशान्येकडे साधारणपणे १२० किलोमीटरवर आहे. हे शहर अहमदनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

इतिहास

१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरोबगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्‍हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे १६३६ पर्यंत टिकली.मोगल बादशहा शहाजहानने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगर काबीज केले. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला तर १८१७मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर घेतले. शहरात अहमदनगरचा किल्लारेणुकामाता मंदिर (केडगांव) व चांदबीबी महल व बाग-ए-बहिश्त महल (सावेडी)अशी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. या शहराला नगर या नावानेसुद्धा ओळखतात.
निजामशाहीचा संस्थापक पाथरीचा कुलकर्णी मध्ययुगीन कालखंडात दक्षिण हिंदुस्थानमध्ये ज्या पाच शाह्या होऊन गेल्या त्यामध्ये अहमदनगरची निजामशाही ही स्वराज्याच्या पायाभरणीसाठी पूरक ठरली. हिंदुस्थानमध्ये मुस्लिम सत्तेची सुरुवात झाल्यानंतर विविध भागांत त्यांनी आपली सत्तास्थाने निर्माण केली. त्यासोबत अनेक वास्तूंची निर्मिती झाली. आपल्या साम्राज्यविस्ताराचा एक भाग म्हणून त्यांनी संबंधित राजधानीला वा वास्तूला स्वतःची वा परिवाराची नावे दिली. त्यानुसार अहमदनगरच्या निजामशाहीलाही मोठा रोमांचकारी इतिहास लाभलेला आहे. अहमदनगर हे मूळचे शहर नसून प्रसंगानुसार त्याची उभारणी झालेली आहे. देवगिरीवर स्थापन झालेल्या बहामनी या राज्यात निजाम उल मुल्क पदवी धारण करणारा मलिक अहमद हा मूळचा हिंदू घराण्यातील असून परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या बहिरंभट कुलकर्णीचा नातू असून बहिरंभटाचा मुलगा तिमाभटाने मुस्लिम धर्म स्वीकारला. मलिक अहमद हा तिमाभटाचा मुलगा असून बहामनी साम्राज्यात पराक्रम गाजवत तो सुभेदार पदापर्यंत पोहोचला. बहामनी साम्राज्याचा दिवाण महंमद गवाणमुळे साम्राज्यविस्तार झाला परंतु राज्यकारभारावरील पकड ढिली होत गेल्याने बहामनी साम्राज्यातील प्रत्येक सुभेदाराने स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण केले. त्यानुसार मलिक अहमदने जुन्नर या ठिकाणी राजधानी ठेवून स्वतःचे निजामशाही नावाने स्वतंत्र झाल्याचे घोषित केले. तेव्हा बहामनीच्या फौजांनी मलिक अहमदवर आक्रमण केले. तेव्हा भिंगार गावाजवळील इमाम घाटात बहामनी सैन्याचा दारुण पराभव केला. विजय मिळवून देणारा परिसर म्हणून याच ठिकाणी २८ मे १४९० रोजी त्याने एका शहराची स्थापना केली. त्याला नाव दिले अहमदनगर. विशेष म्हणजे मलिक अहमदच्या फौजेत असणा-या राजा, सेनापती, प्रधान आणि काझी अशा सर्वांच्याच नावात अहमद होते. आपल्या मूळ पुरुषाच्या नावावरून या घराण्याने बहिरंभटावरून बहिरी नाव धारण केले तर पुढे प्रत्येक राजाने स्वतःला निजामशहा हा किताब लावला तर त्यांच्या साम्राज्याला निजामशाही म्हटले गेले. मलिक अहमद निजामशहा बहिरीने त्या ठिकाणी एका भुईकोट किल्ल्याची पायाभरणी केली. त्यानुसार अंडाकृती किल्ल्याचा परिघ मैलाचा असून किल्ल्याच्या भोवती मोठा खंदक तर बाजूने २२ मोठे बुरूज आहेत. किल्ल्यामध्ये पाण्याकरिता गंगा, जमुना, मछलीबाई व शक्करबाई नावाच्या ४ विहिरी असून सोनमहल, मुल्कआबाद, गगन महल, मीना महल, बगदाद महल यांसारखे महाल बांधले. दिवसेंदिवस यात वाढ होत गेली. तत्कालीन कालखंडात किल्लेवजा एका स्वतंत्र शहराची निर्मिती झाली. त्या भागाला कोटबाग निजाम म्हटले गेले. या कोटबाग निजामचे वैभव एवढे मोठे, अतिभव्य होते की, याची तुलना कैरो व पॅरिससारख्या भव्य शहरांसोबत व्हायची. अहमदनगरच्या निजामशाहीत एकूण ११ निजाम होऊन गेले. पैकी चौघांचे खून झाले. १२५ वर्षे या सत्तेने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. निजाम या शब्दाचा अर्थ होतो जमिनीची व्यवस्था पाहणारा, त्यामुळे संबंधित सुभेदाराला निजाम उल मुल्क ही पदवी असायची. अशी पदवी असणा-या दोन सरदारांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. पहिले १४९० चे अहमदनगरचे निजामशाही आणि दुसरे १७२४ चे हैदराबादचे निजामशाही. त्यामुळे या दोन सत्तांचा परस्पर कोठेही संबंध नाही. अहमदनगरच्या निजामशाहीत मलिक अंबरसारखा शूर आणि धोरणी प्रधान होऊन गेला. ज्याने जमीन महसूल व्यवस्था सुधारली. शिवाय शत्रूशी लढण्याकरिता गनिमी काव्याच्या युद्धनीतीचा अवलंब केला. म्हणून त्याला गनिमी कावा युद्धनीतीचा जनक म्हटले जाते. स्वराज्याला पोषक ठरणारी पाश्र्वभूमी याच निजामशाहीने दिली. कारण छत्रपती शिवरायांचे मूळ पुरुष बाबाजी भोसलेंपासून आजोबा मालोजीराजे, वडील शहाजी भोसलेंसह सर्व भाऊबंद याच निजामशाहीत पुढे आले. एवढेच नाही तर मालोजीराजे यांनी इंदापूर या ठिकाणी तर चुलते शरीफजी यांनी भातोडी (नगरजवळील)या ठिकाणी झालेल्या युद्धात निजामासाठी प्राण अर्पण केले. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे घडले तेच मुळी निजामशाहीत. मलिक अंबरनंतर त्यांनी निजामशाही वाचविताना मुर्तुजा निजामाला घेऊन परंडा या ठिकाणी गादी ठेवून स्वतंत्रपणे कारभार चालविला. शाहजहानने स्वतः निजामशाहीविरोधात मोहीम आखली नसती तर शहाजीराजांनी स्वतःच स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली असती. भोसले घराण्याबरोबर याच निजामशाहीत सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर घराणे नावारूपाला आले. या एकत्रितपणामुळेच विवाहबंधनातून नवीन कार्याची निर्मिती झाली. भोसले व घोरपडे हे घराणे मूळ एकच असून या घराण्यातील कर्णसिंहाला निजामाने राजे घोरपडे-बहाद्दर नावाचा किताब दिला होता. तेव्हापासून घोरपडे हे नाव उदयास आले. सोलापूर, परंडा, औसा, उदगीर, धारूर, देवगिरी, यांसारखे अनेक भुईकोट किल्ले निजामशाहीतच पुढे आले. साम्राज्यविस्तार करताना आदिलशहाबरोबर झालेल्या युद्धात इब्राहिम निजामशहा ५ ऑगस्ट १५९५ रोजी नळदुर्गात मरण पावला. तरी परंतु निजामशहा आणि आदिलशहाचे संबंध सुरळीत राहिल्याने पहिल्या बु-हाणशहा (१५०८ ते १५५३) ला इस्माईल आदिलशहाची मुलगी दिली होती. तर हुसेन निजामशहाची मुलगी चांदबिबी ही अली आदिलशहाला दिली होती. या शाही विवाहात सोलापूरचा किल्ला आंदण म्हणून वापरला गेला. निजामशाहीची देणगी म्हणजे हुसेन निजामशहाच्या काळात चिकबुरूज नावाने जगातील भव्य असणारी तोफ तयार केली. ५५ टन वजनाची ही तोफ बरेच दिवस परंड्याच्या किल्ल्यात होती. पुढे परंडा आदिलशहाकडे आल्यानंतर ऑगस्ट १६३२ साली ती विजापूरला गेली. तोफ वाहून नेण्याकरिता १० हत्ती व ४०० बैल लागायचे. सोलापूर व विजयनगरवर याचा वापर झाला. विजापूरच्या सर्जा बुरुजावर मुलुखमैदान नावाची ही तोफ पर्यटकांचे आकर्षण आहे.शेवटचा निजामशहा मुर्तुजा (तिसरा) हा मोगलांच्या कैदेत गेला आणि १६३६ साली पूर्ण निजामशाही साम्राज्य बुडाले. तेव्हापासून १७५९ पर्यंत अहमदनगर मोगलांच्या ताब्यात होते. शाहिस्तेखान, मिर्झाराजा जयसिंग आणि औरंगजेबाने छत्रपती शिवरायांविरोधात मोहीम आखण्यापूर्वी बरेच दिवस नगरमध्ये मुक्काम ठोकला होता. मोगलांचा विजापूरकडे जाणारा रस्ता म्हणजे औरंगाबाद, अहमदनगर, परंडा, काटी, जरखेड, मोहोळवरून पुढे जायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनाही नगरचा किल्ला ताब्यात राहावा अशी इच्छा होती. म्हणून त्यांनी ३० मे १६६४ साली आक्रमण केलेले आहे. मध्ययुगीन कालखंडातील फेरिस्तासारखा इतिहासकार निजामशाहीतच घडला गेला. मराठा साम्राज्याच्या विरोधात मोहीम काढणारा औरंगजेब शेवटी परत जाण्याकरिता निघाला तेव्हा १७०६ ते १७०७ या दरम्यान अहमदनगरमध्येच राहिला. त्यामुळे त्याच्या कैदेत असणा-या छत्रपती शिवरायांच्या पत्नी सकवारबाई, शंभूराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई, मुलगा शाहूसह अनेक मराठ्यांनी अहमदनगरचा पाहुणचार घेतलेला आहे. एवढेच नाही तर सतत २६ वर्षे दक्षिणेच्या मोहिमेवर असणारा औरंगजेब वार्धक्यामुळे २० फेबु्रवारी १७०७ रोजी अहमदनगरमध्येच वारला. पुढे १७५९ साली मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर तो महादजी शिंदेच्या जहागिरीत होता. मराठी साम्राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे नाना फडणीसांना नगरच्याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. पुढे १८१७ रोजी तो ब्रिटिशांनी जिंकल्याने त्यांनी अहमदनगरला लष्करी छावणी उभारली. ती आजही कायम आहे. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीचे कैदी याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. ब्रिटिशांमुळे शहराच्या आधुनिकीकरणाला चालना मिळाली तर १९४२ ला स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी काँग्रेसने आंदोलन उभे केले तेव्हा अनेक राजकीय कैदी नगरच्या किल्ल्यात डांबण्यात आले. पैकी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा मुक्काम दोन वर्षे होता. यादरम्यान त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ नावाचा ग्रंथ इथेच लिहिला. तर या ठिकाणी तुरुंगात असताना आंबेडकरांनी ‘थॉट ऑफ पाकिस्तान’ व मौलाना आझादांनी ‘गुबारेखातीर’ लिहून काढला. छत्रपती शिवरायांचे एक विश्वासू सेनापती खंडेराव कदम नगरजवळील प्रवरा देवळालीचे रहिवासी. अशा रीतीने अहमदनगरची निजामशाही म्हणजे हिंदू-मुस्लिमांचा मिलाफ होता. एवढेच नाही तर अल्लाउद्दिन खिलजीनंतर दक्षिणेतील हिंदूंची तलवार म्यान झाली होती. तिला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम निजामशाहीत घडून आले. एका अर्थाने अहमदनगरची निर्मिती स्वतः मलिक अहमदने केलेली असल्याने या शहराच्या नामांतराचा विषय कधी चर्चेला आल्याचे दिसत नाही. निजामाच्या सहिष्णुतेमुळेच अनेक मराठा सरदार तर पुढे आलेच शिवाय ज्ञानेश्वरांपासून ते शेख महंमदापर्यंतचे अनेक संत याच परिसरात निर्माण झाले. म्हणूनच संतकवी दासगणूंनी अहमदनगरविषयी लिहिताना म्हटले आहे की, मराठेशाहीचे जननस्थान पुण्यभूमी महापावन

मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या उदयकाली विठोजी भोसले, मालोजी भोसलेलखुजी जाधवराव निंबाळकर, पवार, बाजी कदमराव हे निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर ह्याच्या पदरी सेवेत होते. देवळाली प्रवरा येथील सरदार बाजी कदमराव ह्यांना साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले, किल्ल्यावर फितवा करून मिळवून दिल्याबद्दल देवळाली प्रवरा आणि रुई ही गावे इ.स. १५८० साली इनाम मिळाली होती. पुढे विजापूरकारांशी लढताना बाजी कदमांचा बंकापूर ( कर्नाटक ) येथे मृत्यू झाला. आजही त्यांचे वंशज हे देवळाली प्रवरा येथे आहेत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत हे घराणे आले. खंडेराव कदम आणि तिसरे बाजी हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. ह्यांच्याकडे राजगड किल्ल्याची तटसरनौबती होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत तामिळनाडू येथील वली गंडापुराम हा किल्ला जिंकला. ह्या किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी स्वराज्यासाठी आपले पूर्ण योगदान अर्पण केले. पानिपतच्या लढाईत ह्या घरातील सात पुरुष कामी आले. आजही कदमांकडे पारंपरिक आणि दुर्मिळ अशी जुनी शस्त्रे जपलेली आहेत. त्यांत धोप तलवारी, गूर्ज, कट्यारी, ढाली, बिचवे, हस्तिदंती गुप्त्या, भाले, शिवकालीन शिवराया आणि इतर ऐतिहासिक साधने आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा हे नगर जिल्ह्यातील पहिली नगरपालिका असलेले शहर आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेस भारताच्या माजी राष्टपती प्रतिभा पाटील ह्यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय भूजल पुरस्कार’ मिळालेला आहे. हा पुरस्कार तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग व तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार ह्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष श्री मुरलीधर कदम ह्यांनी स्वीकारला.. महत्त्वाचे म्हणजे देशातील फ़क़्त ह्या एकाच नगरपालिकेला हा सन्मान मिळालेला आहे.

भूगोल

अहमदनगर शहराचे जगाच्या नकाशावरचे स्थान १९.०८° उत्तर अक्षांश, ७४.७३° पूर्व रेखांश असे आहे व शहराची समुद्रसपाटीपासून उंची ६४९ मीटर आहे.अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाने मोठा आहे.या शहराला सात जिल्यांनी जोडले आहे.

नद्या

गोदावी नदी व कृष्णा नदीची उपनदी भीमा या दोन मुख्य नद्या अहमदनगर जिल्ह्यातून वाहतात. बाकीच्या नद्या – प्रवरा, मुळा, सीना आणि धोरा. प्रवरा ही गोदावरीची उपनदी आहे.r hu प्रवरा नदीचे पाणी उंचावरून पडून रंधा धबधबा तयार झला आहे.–

प्रसिद्ध व्यक्ती

वाहतूक व्यवस्था

मुंबई – विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग २२२ अहमदनगर शहरातून जातो. अहमदनगर हे पुणेऔरंगाबादसोलापूरनाशिकबीड या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी राज्य महामार्गांनी जोडले गेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अहमदनगरला जाण्यासाठी सोईस्कर आहेत.

दौंडमनमाड लोहमार्गावरील अहमदनगर हे महत्त्वाचे स्थानक आहे. येथून जाणार्‍या सर्व प्रवासी रेल्वेगाड्या अहमदनगरला थांबतात. अहमदनगरचे रेल्वे वेळापत्रक येथे पहा.

अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

  • सारे जहाँ से अच्छा – पेन्सिल चित्र– अहमदनगरचे प्रसिद्ध चित्रकार श्री. प्रमोद कांबळे यांनी भारताच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये भारतातील नामवंत ५०० महान व्यक्तींची चित्रे ६५ फूट X १७ फूट आकारमानाच्या एका मोठ्ठ्या भिंतीवर काढली आहेत. इ.स. १९९७ साली काही महिन्यांमध्ये त्यांनी सारे जहाँ से अच्छा हे जगातील सर्वांत मोठे पेन्सिल चित्र पूर्ण केले.
  • शनी शिंगणापूर– येथे शनीचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. येथे कुठल्याही घराला आणि बँकांनासुद्धा कुलपे नाहीत. शनिदेव चोरांपासून गावाचे रक्षण करतो अशी स्थानिक लोकांची भावना आहे.
  • शिर्डी– हे ठिकाण साईबाबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
  • सिद्धटेक– येथील सिद्धिविनायक मंदिर हे अष्टविनायक मंदिरांपैकी एक आहे.विशाल गणपती मंदिर – हे नगरचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले मंदिर अहमदनगरच्या माळीवाडा भागात आहे.
  • रेणुकामाता मंदिर(केडगांव) – हे मंदिर केडगाव येथे आहे. ते अहमदनगर रेल्वेस्थानकापासून साधारणपणे ३ किलोमीटरवर आणि अहमदनगर बसस्थानकापासून सुमारे ५ किलोमीटरवर आहे.
  • भुईकोट किल्ला– इ.स. १९४२ मध्ये येथे जवाहरलाल नेहरू यांना इंग्रजांनी कैदेत ठेवले होते. तेथे त्यांनी “डिस्कव्हरी ऑफ इंडिया” हे पुस्तक लिहिले.
  • हरिश्चंद्रगड– एक ऐतिहासिक किल्ला. हा नगरपासून अंदाजे १२५ किलोमीटर अंतरावर आहे. सुप्रसिद्ध कोकण कडा येथेच आहे.
  • श्रीक्षेत्र “भगवानगड” हेमहाराष्ट्र राज्यातील बीड-अहमदनगर जिल्ह्यांतील सीमेवर असलेल्या, खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे मंदिर आहे. तसेच जनार्दनस्वामीभगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या समाध्या येथे आहेत. सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते.
  • महानुभाव आश्रम शिक्षण संस्था, वांबोरी: या आश्रमाची स्थापना सन २००३ मध्ये झाली. सुमारे ४०० विद्यार्थी या संस्थेत महानुभाव तत्त्वज्ञान व साहित्य यांचे अध्ययन करतात. संस्कृत साहित्याचार्य ऋषिराज शास्त्री महानुभाव हे या आश्रमाचे संचालक आहेत.
  • राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील श्री.संत कवी महिपती महाराज समाधी.
  • अहमदनगर जिल्हामहाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा आहे. आजच्या परिस्थितीत अहमदनगर जिल्हा हा सर्वांत पुढारलेला आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात राहाता तालुकात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. ‘राळेगण सिद्धी‘ या खेड्याने जिल्ह्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर ‘हिवरे बाजार‘ हे आदर्श खेडे म्हणून नावारूपास आले.
  • अहमदनगर हे शहर ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे.
  • ह्या शहराचा इतिहास पहिला असता, ह्या शहरात अनेक शहरे अशी आढळतात ज्याचे वैशिष्ट्य त्याच्या नावातच दडले आहे, जसे कि पाथर्डी शहरात पार्थ म्हणजेच महाभारत कालीन अर्जुन रडल्याचे आढळते. तिसगाव हे छोटेसे गाव ह्या गावात तीस वेशी आढळतात.
  • तसेच पाथर्डी तालुक्यातील ‘मढी’
  • हे शहर ‘कानिफनाथगड’ म्हणून प्रसिद्ध आहे. नाथसम्प्रद्याचा पाया येथेच रचलेला आढळून येतो.

भौगोलिक स्थान व महत्त्व

अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ चौ.कि.मी. तर लोकसंख्या इ.स. २०११च्या जनगननुसार ४५,४३,०८० इतकी आहे. राज्याच्या मध्यभागी असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा व औरंगाबाद जिल्हे; पूर्वेस बीड जिल्हा ; पूर्व व आग्नेय दिशांस उस्मानाबाद जिल्हा; दक्षिणेस सोलापूर जिल्हा, तर नैर्ऋत्येस व पश्चिमेस पुणे जिल्हा व ठाणे जिल्हा हे जिल्हे वसलेले आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असणाऱ्या या जिल्ह्याने राज्याचे ५.५४% भौगोलिक क्षेत्र व्यापलेले आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील प्रामुख्याने अकोले तालुका व संगमनेर तालुक्यातसह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत.

महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगांमध्ये अकोले तालुक्यात (नगर, नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर) आहे. शिखराची समुद्रसपाटीपासून उंची १६४६ मीटर आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील प्रमुख डोंगररांग हरिश्चंद्राची रांग या नावाने ओळखली जाते. जिल्ह्याचा काही मध्य भाग व उत्तर भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. तसेच जिल्ह्याचा दक्षिण भाग हा घोड नदीभीमा व सीना या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.

गोदावरीभीमासीनामुळा व प्रवरा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळाढोराघोड नदी, कुकडी याही नद्या जिल्ह्यातून व जिल्ह्याच्या सीमा भागातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. गोदावरी या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची या जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. प्रवरा व गोदावरी नद्यांचा संगम नेवासे तालुकात होतो, या स्थळाला प्रवरासंगम असे म्हटले जाते.

अकोले तालुक्यातील डोंगराळ भागात भंडारदरा येथे प्रवरा नदीवर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो.

मुळा नदीवर जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण राहुरी तालुकात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातून अहमदनगर शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास ज्ञानेश्वरसागर असे म्हटले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे.

भौगोलिक दृष्ट्या जिल्ह्याची तीन भागात विभागणी होते-

  • पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश

अकोले तालुका आणि संगमनेर तालुका यांचा यात समावेश होतो. अजोबा, बाळेश्वर आणि हरिश्चंद्रगड यांसोबत अनेक शिखरे याच भागात आहेत. कळसूबाई,जे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे,१६४६ मीटरयाच भागात आहे.

  • मध्य भागातील पठारी प्रदेश

पारनेर तालुका आणि नगर तालुका आणि संगमनेर तालुक्याचाश्रीगोंदा तालुक्याचा व कर्जत तालुक्यांचा काही भर यात मोडतो.

  • उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेश

यात कोपरगावराहाताश्रीरामपूरराहुरीनेवासा, [[शेवगाव तालुका|शेवगाव तालुक्याचा] उत्तरेकडील प्रभाग येतो.या भागात गोदावरी, प्रवरा, घोड, भीमा आणि सीना नद्यांचे खोरे येते

 

हवामान

अहमदनगर जिल्ह्यातील हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान आल्हाददायक आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्याच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.

दळणवळण

जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र. ५०) जातो. तसेच [[राष्ट्रीय महामार्ग २२२|कल्याण-अहमदनगर हा राष्ट्रीय महामार्ग २२२ पारनेर, नगर, पाथर्डी या तालुक्यांतून जातो. पुणे-[[अहमदनगर] हा जाणारा महत्त्वाचा राज्यमार्ग असून अहमदनगरला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती अहमदनगरपुणे या मार्गावर. अहमदनगर रेल्वे स्थानक हे दौंडमनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी. चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्ग जिल्ह्यात असून अहमदनगरबीडपरळी आणि पुणतांबाशिर्डी रेल्वे मार्ग आहे. संगमनेरहून रंधा धबधब्याकडे जाताना लागणारा विठे घाट व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट – हे नगर जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.

विशेष

मराठी भाषेतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी. ज्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हटले जाते, तो ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह आज अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात सर्वांत जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला, आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला राज्यातील जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे.

अहमदनगर जिल्हा ओळखला जातो तो सहकारी साखर कारखान्यांचा मूल स्रोत म्हणून! डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी) सुरू केली (१९२३), तसेच राज्यातील पहिला साखर कारखाना स्थापन केला (जून, १९५०), आणि सहकार या तत्त्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली. सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ श्री. धनंजयराव गाडगीळ या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते. या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर सहकारी साखर कारखान्यांची एक साखळीच राज्यात निर्माण झाली. एक सहकारी साखर कारखाना आणि त्या भोवतीच्या परिसराचा शैक्षणिक, औद्योगिक व सोयी सुविधांचा विकास अशी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली.

ऐतिहासिक महत्त्वाचे

या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मोगल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात अगस्ती ऋषींनी विंध्य पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर (आत्ताच्या नगर जिल्ह्याच्या परिसरात) वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे.

निजामशाही

१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुऱ्हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली.

निजामशाहीच्या पडत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये नगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहमदनगरवर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.

इ.स. १९४२ चे चलेजाव आंदोलन

इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरूसरदार वल्लभभाई पटेलमौलाना आझादडॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी.घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबार – ए – खातिर हे ग्रंथ याच शहरात लिहिले.

राजकीय संरचना

अहमदनगर जिल्ह्यात २ लोकसभा मतदारसंघ असून १२ विधानसभा मतदारसंघ आहेत.

अहमदनगर (लोकसभा मतदारसंघ)

हा मतदारसंघ अहमदनगर शहरकर्जत-जामखेडपारनेरराहुरीशेवगाव व श्रीगोंदा या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.

शिर्डी (लोकसभा मतदारसंघ)

हा इ.स. २००९पासून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ श्रीरामपूरशिर्डीअकोलेसंगमनेरकोपरगावनेवासा या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.अहमदनगर जिल्हयाचे विभाजन करुन कोपरगाव जिल्हा करण्यात यावा यासाठी कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार रवींद्र जगताप हे अनेक वर्षापासून लढा देत आहे.त्यांनी कोपरगाव जिल्हा क्रुती समिती स्थापन करून शासन दरबारी लढा देत आहे.

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ

तसेच जिल्ह्यात ७५ अहमदनगर जिल्हा परिषद मतदारसंघ असून, १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.

अहमदनगर जिल्हयाचे विभाजन करुन कोपरगाव जिल्हा करण्यात यावा यासाठी कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार रवींद्र जगताप हे अनेक वर्षापासून लढा देत आहे.त्यांनी कोपरगाव जिल्हा क्रुती समिती स्थापन करून शासन दरबारी लढा देत आहे.

शेती

ज्वारी हे नगर जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे. अलीकडच्या काळात, जिल्ह्यात द्राक्षमोसंबीडाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन वाढते आहे. जिल्ह्यातील शेवंतीची फुलेही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी असते. जिल्ह्यात श्रीरामपूर येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.

कृषी व शैक्षणिकदृष्ट्या नगर जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राहुरी येथे स्थापन झालेले, महाराष्ट्रातील पहिले (१९६८) कृषी विद्यापीठ होय. या ठिकाणी कृषीविषयक विविध अभ्यासक्रम शिकवले जातात, तसेच अनेक पिकांबाबत संशोधन केले जाते. स्थापनेनंतर राहुरी विद्यापीठाचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. या विद्यापीठाने संशोधन करून वापरात आणलेल्या विविध पिकांच्या जाती राज्यातील शेतकर्‍यांमध्ये लोकप्रिय आहेत.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

श्रीगोदा

महत्त्वाची ठिकाणे

जिल्ह्यातील तालुके

अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४ उपविभाग आणि १४ तालुके आहेत.

  1. अकोले(संगमनेर उपविभाग)
  2. कर्जत(कर्जत उपविभाग)
  3. कोपरगाव(संगमनेर उपविभाग)
  4. जामखेड(कर्जत उपविभाग)
  5. नगर(अहमदनगर उपविभाग)
  6. नेवासा(श्रीरामपूर उपविभाग)
  7. पाथर्डी(अहमदनगर उपविभाग)
  8. पारनेर(अहमदनगर उपविभाग)
  9. राहाता(श्रीरामपूर उपविभाग)
  10. राहुरी(श्रीरामपूर उपविभाग)
  11. शेवगांव(अहमदनगर उपविभाग)
  12. श्रीगोंदा(अहमदनगर उपविभाग नवीन रचनेनुसार )
  13. श्रीरामपूर(श्रीरामपूर उपविभाग)
  14. संगमनेर(संगमनेर उपविभाग)

नवीन रचनेनुसार श्रीगोंदा (पूर्वीचा कर्जत उपविभाग) व पारनेर यांचे एकत्रित उपविभागीय कार्यालय अहमदनगर येथे स्थापण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील गावांची नावे तालुकानिहाय पाहण्यासाठी खालील प्रमाणे

https://ahmednagar.nic.in/mr/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87/

अहमदनगर जिल्ह्यातील नद्या” वर्गातील लेख

एकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.

आढळा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
‘विकिपीडिया’ मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
आढळा नदी
उगम पट्टागड, पाचपट्टावाडी, अकोले तालुका
पाणलोट क्षेत्रामधील देश अहमदनगर जिल्हामहाराष्ट्र
लांबी ४० किमी (२५ मैल)
उगम स्थान उंची १,००० मी (३,३०० फूट)
पाणलोट क्षेत्राचेक्षेत्रफळ १७७
ह्या नदीस मिळते प्रवरा नदी
धरणे आढळा प्रकल्प

 

 

 

 

 

गोदावरी(గోదావరీ)
उगम त्र्यंबकेश्वर
मुख काकिनाडा (बंगालचा उपसागर)
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्रकर्नाटकआंध्रप्रदेशमध्य प्रदेशओरिसा
लांबी १,४६५ किमी (९१० मैल)
उगम स्थान उंची १,६२० मी (५,३१० फूट)
सरासरी प्रवाह ३,५०५ घन मी/से (१,२३,८०० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचेक्षेत्रफळ ३,१९,८१०
उपनद्या इंद्रावतीमंजिराबिंदुसरा
धरणे पैठण(औरंगाबादगंगापूर(नाशिक), नांदूर मधमेश्वर(नाशिक), डौलेश्वरम

ऐतिहासिक, धार्मिक, आख्यायिका

यक्ष,त्र्यंबकेश्वर

प्रवरेकाठी पाषाण युगापासून गोदावरी खोऱ्यात मानवी वस्ती असावी व हडप्पा संस्कृतीला समकालीन अश्या संस्कृतीचा उगम या खोऱ्यात झाला असावा, असे दैमाबाद येथे झालेल्या उत्खननांनंतर इतिहासतज्ज्ञांचे मत झाले.

रामायण काळात प्रभू रामचंद्रांनी वनवासकाळात गोदावरी तटावर आश्रम बांधला होता असे समजतात. अर्थात गोदावरीच्या संपूर्ण प्रवाह क्षेत्रात ते ठिकाण नेमके कोणते, याचा काही पुरावा उपलब्ध नाही. नदीकाठची अनेक गावे सारखाच वारसा सांगतात.

एका आख्यायिकेत गौतम ऋषींच्या हातून चुकीने घडलेल्या गोवधाचे प्रायश्चित्त म्हणून, शंकराच्या इच्छेने अवतरलेल्या गंगेत स्नान करून ऋषींनी पाप धुतले अशी कथा आहे. आणि ही अवतरलेली गंगा म्हणजेच गोदावरी असा समज आहे. ही आख्यायिका नदी अवतरण्यापूर्वी पडलेल्या २४ वर्षांच्या दुष्काळाचे वर्णन करते.

त्र्यंबकेश्वराजवळ कुशावर्त, ब्रह्मगिरी व गंगाद्वार ही पवित्र स्थाने आहेत.

अहिल्या, गंगा, वैतरणा या उपनद्या ब्रह्मगिरीवर उगम पावतात व लगेच त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीस मिळतात.

ऐतिहासिक काळात पैठण व राजमहेंद्री येथे विविध राजवटींनी प्रदीर्घ भरभराटीचा काळ पाहिला. नजीकच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासात गोदावरी खोऱ्यात मुख्यत्वे मोगल व निजामाचीराजवट होती. स्वातंत्र्योत्तर काळात निजामाने स्वतंत्र भारतात संलग्न न होता आपले वेगळे राष्ट्र निर्मिण्याचा किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा घाट घातला होता. परंतु कॉँग्रेस व आर्य समाजाच्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद मुक्तिसंग्राम नेटाने चालवला. भारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेलांद्वारे केलेल्या पोलीस कारवाईनंतर हा भाग स्वतंत्र भारताशी संलग्न झाला.

महत्त्वपूर्ण शहरे, मानवी वस्ती, संस्कृती

गोदावरी नदी, नाशिक

गोदावरी खोऱ्यातील लोक मराठी आणि तेलुगू भाषिक आहेत. निजाम काळात उर्दू भाषेचा वापर शासकीय कामकाजात केला जात असे. भात हे तेलुगू लोकांचे मुख्य अन्न आहे तर ज्वारी हे मराठी लोकांचे मुख्य अन्न आहे. रेल्वे हा या संपूर्ण भागाला जोडणारा प्रमुख दळणवळणाचा मार्ग आहे.

गोदावरीचे उगमस्थान महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर येथे असून येथील कुशावर्त घाटावर कुंभमेळा भरतो व लाखो भाविक स्नान करतात. त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्र्यंबकेश्वरापासून जवळ असलेले नाशिक औद्योगिक शहर आहे. कोपरगाव तालुक्याचे शहर, जायकवाडी सिंचन प्रकल्प अशियातील सर्वांत मोठा मातीचा बंधारा आहे. पैठण हे धार्मिक महत्त्वाचे स्थान असून येथे जायकवाडी धरणाच्या पार्श्वभूमीवर नयन रम्य उद्यान आहे. नांदेड येथे शीख समुदायाचा एक प्रमुख गुरुद्वारा असून शिखांचे शेवटचे गुरु गोविंदसिंगयांचे नांदेड येथे निधन झाले होते.

आंध्रप्रदेशात कंदाकुर्ती येथे मंजिरा नदीहरिद्रा नदी या उपनद्यांचा गोदावरीशी त्रिवेणी संगम होतो. या सुंदर संगमावर आंतरराज्य पूल आहे. शिवालय व स्कंद आश्रम नावाची प्राचीन देवालये आहेत. बासर येथे देवी सरस्वतीचे मंदिर असून, धर्मापुरी (करीमनगर जिल्हा) हेसुद्धा प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. पट्टिसीमा ह्या नयनरम्य स्थळी गोदावरी नदीच्या मधोमध देवकूट डोंगरावर वीरभद्र मंदिर आहे. भद्राचलम्‌ येथेही श्री‍रामाचे सुंदर मंदिर आहे. राजमहेंद्री हे गाव राजमुंद्री या नावानेदेखील ओळखले जात असे. राजा महेंद्रवर्मन्‌ हा इतिहासातला पहिला ज्ञात तेलुगू राजा येथे होऊन गेला. दौलैश्वरम येथे १०० वर्षे जुना आशियातील सर्वांत लांब लोहमार्ग पूल आहे. कोव्वुर, तानुकु, श्रीरामसागर प्रकल्प, पोचमपाड इत्यादी गोदावरी नदीवरील महत्त्वपूर्ण स्थळे आहेत.

आंध्रप्रदेशात दर बारा वर्षांनी पुष्करम मेळा गोदावरी तीरावर भरतो, कुंभमेळ्याप्रमाणेच याचे स्नानमाहात्म्य सांगितले जाते.

 

भौगोलिक

गोदावरी आणि कृष्णा नदी बंगाल उपसागरास मिळताना-नासा फोटो

सह्याद्रीच्या कुशीत पश्चिम घाटात १,०६७ मीटर उंचीवर सुरू होणाऱ्या गोदावरीचा प्रवास मुख्यत्त्वे दख्खनच्या पठारावरून साधारणत: आग्नेय दिशेने होतो. आंध्रप्रदेशात भद्राचलम्‌नंतर गोदावरी पूर्वेच्या निमुळत्या डोंगर रांगांतून(पापी टेकड्या) पुढे सरकते. या ठिकाणी तिची रुंदी २०० मीटरपेक्षा कमी तर खोली ६० फुटाच्या आत एवढीच असते.

गोदावरी खोरे ३,१२,८१२ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते. त्यांतील महाराष्ट्रात १,५२,१९९ चौरस किलोमीटर, आंध्र प्रदेश ७३,२०१ चौरस किलोमीटर, मध्य प्रदेश ६५,२५५ चौरस किलोमीटर, ओरिसात १७,७५२ चौरस किलोमीटर तर कर्नाटकात गोदावरीने व्यापलेले खोरे ४,४०५ चौरस किलोमीटर आहे.

गोदावरीचा त्रिभुज प्रदेश ५,१०० चौरस किलोमीटरचा असून अत्यंत सुपीक समजला जातो. तज्ज्ञांच्या मते या त्रिभुज प्रदेशाच्या उत्क्रांतीचे तीन मुख्य टप्पे असून शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये गाळाचे प्रमाण जमिनींचा शेतीकरिता वाढता वापर व वाढत्या जंगलतोडीमुळे वाढल्याचे दिसून येते.

इतर नद्यांशी तुलना

एकूण लांबीत गोदावरीचा जगात ९२वा क्रमांक आहे. ६,६९० किलोमीटर लांबी असलेली आफ्रिका खंडातील नाईल नदी प्रथम क्रमांकावर आहे. तर सिंधू नदी ३,१८० कि.मी. लांबीसह २१व्या क्रमांकावर आहे. ब्रह्मपुत्रा २,९४८ कि.मी.(२८वा क्रमांक), तर २,५१० कि.मी. वाहून गंगा ३९वा क्रमांकावर येते. यमुना १,३७६ कि.मी., सतलज १,३७० कि.मी. लांबीच्या आहेत व अनुक्रमे १०२ व १०३ क्रमांकांवर आहेत. कृष्णा १,३०० कि.मी. वाहून ११४व्या तर १,२८९ कि.मी. वाहून नर्मदा ११६व्या क्रमांकवर येते. १,००० कि.मी. पेक्षा अधिक लांबीच्या जगात सुमारे १६० नद्या आहेत.

अंटार्क्टिका आणि गोदावरी

१३ कोटी वर्षांपूर्वी गोदावरी अंटार्क्टिका खंडातून वाहिली असेल का याचा भारतीय संशोधक शोध घेत आहेत. विभाजनपूर्व काळात दख्खनचे पठार आणि अंटार्क्टिका एकाच गोंडवन खंडाचा भाग राहिले असावेत असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे.

पहा: महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

उपनद्या आणि प्रकल्प[संपादन]

गोदावरी खोरे

ऊर्ध्व गोदावरी

दारणा नदी – दारणा धरण, कोळगंगा – वाघाड प्रकल्प, उणंद – ओझरखेड प्रकल्प, कडवा – करंजवन प्रकल्प, मुळा नदी [[मुळा धरण] प्रवरा नदी– भंडारदरा जिल्हा अहमदनगरनिलवंडे धरण, म्हाळुंगी – म्हाळुंगी प्रकल्प (सोनेवाडी ता. सिन्नर), आढळा – आढळा प्रकल्प, मुळा – मुळा प्रकल्प, शिवणी – अंबाडी प्रकल्प

मध्य गोदावरी

कर्पुरा नदीदुधना नदीयळगंगा नदीढोरा नदीकुंडलिका नदीसिंदफणा नदीतेरणा नदीमनार नदीतीरू नदीसुकना नदीमाणेरू नदीमंजिरा किन्नेरासानी नदीपूर्णा नदीमन्याड नदीआसना नदीसीता नदीलेंडी नदीवाण नदीबिंदुसरा नदी

विदर्भ आणि मध्यप्रदेशातील वर्धेचे खोरे

मध्यप्रदेशातून येणारी वैनगंगा सातपुडा रांगांतून जवळपास ३६० मैलांचा प्रवास करून वर्धेस मिळते. वर्धा नदी मध्य प्रदशात मुलताई येथे सातपुडा रांगांतून विदर्भात येते. तेथे तिचा संगम वैनगंगा आणि पैनगंगा या नद्यांशी होतो. नंतर गोदावरीस मिळेपर्यंत तिला प्राणहिता असे म्हणतात. मध्यप्रदेशातून येणारी इंद्रावती(इंद्रायणी) सातपुडा रांगांतून येऊन गोदावरीस मिळते.

खेक्रनाला – खेक्रनाला प्रकल्प, पेंच – पेंच प्रकल्प, बाग – बावनथडी (सागरा)प्रकल्प या विदर्भातून येणाऱ्या इतर उपनद्या आहेत

नाग कोलार कन्हाण पेंच वैनगंगानाग कोलार कन्हाण पेंच वैनगंगा गोसीखूर्द प्रकल्प

कर्नाटकातून येणारी

कर्नाटक राज्यातील गोदावरीचे पाणलोट क्षेत्र १७०१ वर्ग मैल आहे. मांजरा आणि तिच्या उपनद्या तेरणा, कारंजा, हलदी, लेंडी, मन्नार मिळून एकूण पाणलोट क्षेत्र ११९०० वर्ग मैल आहे.[१]

ओरिसातून येणाऱ्या नद्या

  • इंद्रावती नदी (काही ठिकाणी महाराष्ट्र राज्य व छत्तीसगड राज्य यांची सीमा इंद्रावती नदीने निश्चित होते)
  • सिलेरू
  • शबरी नदी

आंध्र प्रदेशातील

  • तालिपेरू

निसर्ग,शेती व आर्थिक

नांदुर-मधमेश्वर, जायकवाडी जलअभयारण्यात रोहितकरकोचासारस पक्षांच्या विभिन्न प्रजाती आढळून येतात.

नैसर्गिकदृष्ट्या दख्खनच्या पठारावरील गोदावरीच्या सुरुवातीचा प्रदेश कमी पर्जन्यमानाचा असल्यामुळे मुख्यत्वे या प्रदेशात कापूस, ज्वारी ही पिके घेतली जातात. सिंचित क्षेत्रामध्ये मुख्यत्वे ऊस, कापुस व केळी ही पिके घेतली जातात. तेलंगण आणि आंध्रप्रदेशात साधारणपणे भाताची शेती केली जाते.

गोदावरी नदीत मुख्यत: गोड्या पाण्यातील Cyprinidae माशांच्या प्रजाती आढळून येतात.

गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात ऍव्हिसेनिआ प्रजातीच्यामँग्रोव्ह झाडांची जंगले आढळतात त्यांना स्थानिक तेलुगू लोक माडा अडावी असे म्हणतात.मँग्रोव्ह झाडांची जंगले जमिनीचे आणि परिसराचे नैसर्गिकरीत्या संरक्षण करतात.[२]

बंधारे, पूल, नौकानयन

डौलेश्वर या गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशातील बंधारा ब्रिटिश अभियंता सर आर्थर थॉमस कॉटन याने बांधून पूर्ण केल्यानंतर हे क्षेत्र भाताची शेती, नौकानयन व मासेमारी यामुळे संपन्न झाले.

जलव्यवस्थापन

गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणार्‍या पाण्यापैकी ८०% पाणी जुलैऑक्टोबर या चार महिन्यातच वाहून जाते. उर्वरीत काळात खोऱ्यात दुष्काळाची स्थितीही असू शकते. हे पाणी व्यवस्थित वापरले जावे, पुरांचा प्रश्न मिटावा व ज्या ठिकाणी नदी पोहचत नाही त्या भागात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गोदावरी खोऱ्यात अनेक पाटबंधारे प्रकल्पांची निर्मिती केली गेली आहे.

नदी खोऱ्यातील विविध समूहांच्या गरजा वाढल्यामुळे इतर नद्यांप्रमाणेच गोदावरी नदीच्या पाणीवाटपाचे प्रश्न गंभीर झाले आहेत. नदीकाठांवर व कालव्यांवर असलेली अनेक खेडी, शहरे, राज्ये इत्यादी पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरांकरिता लागणार्‍या पाण्याकरिता परस्परांशी संघर्ष करीत असतात. पाण्याचा अपव्यय टळावा व योग्य पाणीव्यवस्थापन व्हावे यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचा दावा करते.

गोदावरीखोऱ्याचे पाणलोट क्षेत्र ३,१९,८१० कि.मी. असून भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ९.५% भाग व्यापते. महाराष्ट्राकरिता गोदावरी खोऱ्यात १,७९८ टी.एम.सी. उपलब्ध पाण्यापैकी ७५% म्हणजे १,३१८ टी.एम.सी. भरवशाचे असले तरी आंतरराज्य निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्यास अधिकतम १,०९७ टी.एम.सी. उपलब्ध होणार आहे. (कृष्णा खोरे १,२०१ टी.एम.सी., तापी खोरे ३२२ टी.एम.सी., नर्मदा खोरे २० टी.एम.सी. क्षमता असली तरी आंतरराज्य लवादानुसार सर्व खोरे मिळून एकूण १,८९० टी.एम.सी. पाणी महाराष्ट्रास उपलब्ध राहील.

आंध्र प्रदेश राज्यास किमान १,४८० टी.एम.सी. पाणी गोदावरी खोऱ्यातून मिळू शकते.

गोदावरीवरील काही सिंचन प्रकल्प

जायकवाडी धरण, पैठण

नाशिक व मराठवाडा मिळून ६६ लाख हेक्टर शेतीयोग्य जमिनींपैकी १६ टक्के क्षेत्रास सिंचनाचा फायदा झाला आहे तर अधिकतम प्रलंबित क्षमता २९ टक्के एवढी आहे.

पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाने किमान १,३२,००० हेक्टर जमीन भिजणे प्रस्तावित होते परंतु प्रत्यक्षात ४५,००० हेक्टर जमीनच सिंचनाखाली येऊ शकली. विष्णुपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प (आशियातला सर्वांत मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प – नांदेड) मराठवाडा विभागात सर्व प्रकल्प मिळून ४८,००,००० हेक्टर शेतजमिनींपैकी ८,००,००० हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. याशिवाय गोदावरीवर गंगापूर, नांदूर, मधमेश्वर (इ.स.१९०७), भावली(प्रस्तावित), वाकी(प्रस्तावित), भाम, मुकणे . अलिसागर – निझामाबाद पूरकालीन उपसा सिंचन प्रकल्प, श्रीरामसागर प्रकल्प – पोचमपाड, पोलावरम प्रकल्प (प्रस्तावित) इत्यादी प्रकल्प आहेत.

  • उपनद्यांवरील बंधारे

जलापुट बंधारा मचकुंड नदीवर आंध्रप्रदेश-ओडिशा सीमेवर आहे. बालीमेला सिंचन प्रकल्प (ओरिसा), अप्पर इंद्रावती नदी प्रकल्प, मंजीरा नदीवर निजामसागर प्रकल्प, कड्ड्म प्रकल्प, मेहबूबनगर प्रकल्प, लोअर तेरणा प्रकल्प, पुर्णा प्रकल्प, अप्पर पैनगंगा प्रकल्प, लोअर दुधना प्रकल्प, भंडारा सिंचन प्रकल्प, मुळा प्रकल्प, अप्पर प्रवरा प्रकल्प, अप्पर वैनगंगा, गोदावरी कॅनॉल, मनार प्रकल्प – कंधार, ऊर्ध्व पैनगंगा – पुसद इत्यादी.

नैसर्गिक आपत्ती

अतिवृष्टी, पुरांची नैसर्गिक संकटे आणि कोरडे दुष्काळ दोन्हीही गोदावरीच्या खोऱ्यात आढळून येतात. पुरांमुळे नदीतील सुपीक गाळाचा लाभही परिसरातील प्रदेशाला होतो. वाढत्या सिंचन क्षमतांमुळे पूर्वीपेक्षा पूर धोकापातळी कमी झाली असली तरी नदीपात्रातील वृक्षतोडीनंतर नदीपात्रात वाढणारा गाळ आणि पात्रालगतच्या वाढत्या मनुष्यवस्तीमुळे आर्थिक हानी व मनुष्यहानी वाढल्याचे दिसून येत आहे.

धोक्याची पातळी

  • भद्राचलम्‌ ५३ फूट

पूर परिस्थिती

१९५५ – ६८ फूट

१९८६ – ६८ फूट

२००६ – ६८ फूट

प्रदूषण

गोदावरी नदीत नजीकच्या मोठ्या नागरवस्तीतून येणाऱ्या सांडपाण्यापासून सर्वाधिक ८५% प्रदूषण होते. मान्सून सोडून इतर काळातील सिंचनोत्तर काळात नदीचे प्रवाह आधीच रोडावलेले व कमी वेगाचे असताना नदीची नैसर्गिक शुद्धीकरणाची प्रक्रिया मंदावते. शिवाय सांडपाणी सोडल्यामुळे पिण्याचे पाणी वरचे वर न घेता नदी पात्रातील विंधन विहिरींद्वारे अथवा धरणांतून घेतले जाते त्यामुळे पाणीनियोजन बिघडते व खर्चही वाढतो. उरलेले १५% प्रदूषण औद्योगिक कारणांमुळे होते. नाग पेंच कोलार नदीतून कन्हान मुख्यत्वे शह्ररी प्रदुषीत नद्या वैनगंगाला मिळतात सर्फेस वॉटर अम्ध्ये ऑक्सीजनची कमतरता आहे बिओड्डी जास्त आहे. नाग पेंच कोलार नदीतून कन्हान मुख्यत्वे शह्ररी प्रदुषीत नद्या वैनगंगाला मिळतात सर्फेस वॉटर अम्ध्ये ऑक्सीजनची कमतरता आहे बिओड्डी जास्त आहे.फ्लोराईड जास्त आहे डिझॉल्वड सॉलीड्स अधिक आहेत

 

 

ढोरा नदी ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक नदी आहे.

ढोरा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
‘विकिपीडिया’ मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.

मुळा नदी
उगम आजोबा डोंगर
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र
लांबी १५५ किमी (९६ मैल)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ २२७५.८६
ह्या नदीस मिळते प्रवरा नदी
धरणे ज्ञानेश्वरसागर

मुळा नदी सह्याद्री पर्वताच्या आजोबा डोंगराजवळ उगम पावते. हि प्राचीन नदी आहे . उगमापासून १३६ किलोमीटर वाहत आल्यावर बारागाव(नांदूर) (तालुका राहुरी) परिसरात तिला अडवून तिच्यावर धरण बांधण्यात आले आहे. इसवी सन १९५८ ते १९७२ दरम्यान बांधण्यात आलेले हे मातीचे धरण जिल्ह्यातील सर्वांत मोठे म्हणजे २६ दशलक्ष घनफूट क्षमतेचे आहे. धरणाचा पाया खोदताना काही भागात वाळू, काही भागात चिकणमाती, गेरू व कारा दगडाचे थर सापडले. त्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या. देशात पहिल्यांदा जलविरोधी काँक्रीटचा पडदा या धरणाच्या पायात बांधून त्याला मजबुती देण्यात आली. धरणाच्या भिंतीची लांबी २८५६ मीटर, तर उंची ४८.१७ मीटर आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र २३४८ चौरस किलोमीटर आहे. पाण्याखाली १३ हजार २०० एकर जमीन गेली आहे. धरणाला डावा व उजवा असे दोन कालवे असून त्यातून राहुरीनेवासे, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतीला पाणी पुरवले जाते. धरणाच्या भिंतीलगत पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह असून तेथून जलाशयाचे विहंगम दृश्य दिसते. या जलाशयाला ‘ज्ञानेश्वर सागर’ असे नाव

देण्यात आले आहे. तेथे मोठय़ा प्रमाणात मच्छीमारी चालते. नौकानयनासाठी हे उत्तम स्थान आहे. नगरपासून सुमारे ३५-४० किलोमीटर अंतरावर असलेले हे मुळा धरण पाहण्यासारखे आहे.संदर्भ हवा ]

पुढे मुळा नदी ही राहुरी शहरामधून पुढे जाऊन नेवासे आणि राहुरी च्या सीमेवर असलेल्या राहुरी तालुक्यातील तिळापूर येथे प्रवरा नदीला मिळते, त्या ठिकाणी संगमेश्वराचे मंदिर असून निसर्गरम्य असे वातावरण आहे. प्रवरा ही गोदावरी नदीची उपनदी आहे.

विशेष

पुणे जिल्ह्यातली मुळा नदी वेगळी आहे.

अहमदनगर जिल्ह्यात ७ महसूल विभाग आणि १४ तालुके आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील तालुके विभाग निहाय

 

अ.न. उप विभाग तालुका
1 नगर विभाग नगर
2 नेवासा
 3  कर्जत विभाग कर्जत
4 जामखेड
5 पाथर्डी विभाग पाथर्डी
6 शेवगाव
7 श्रीगोंदा विभाग श्रीगोंदा
8 पारनेर
9 संगमनेर विभाग संगमनेर
10 अकोले
11 शिर्डी विभाग राहाता
12 कोपरगाव
13 श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर
14 राहुरी

 

भौगोलिक

जमीनीचे प्रकार

अहमदनगर जिल्ह्यात विविध प्रकारची जमीन आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीचा डोंगराळ भाग आहेत. त्यांना कळसूबाई, अदुला, बालेश्वर आणि हरिश्र्चंद्रगड डोंगरी रांग म्हणतात. सह्याद्रीतील सर्वाधिक उंच शिखर कळसूबाई हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. हरिश्चंद्रगड, रतनगड, कुलंग आणि अजूबा हे जिल्ह्यातील काही शिखर आहेत. पुणे-संगमनेर रोडवरील चांदापुरी घाटावरील रंधा धबधब्याच्या मार्गावर आपल्याला  विटा घाट दिसेल.

आम्ही अहमदनगर जिल्ह्याच्या भौतिक व्यवस्थेवर विचार केला तर आपण तीन भौतिक विभाग आहेत असे दिसेल
पश्चिमी डोंगराळ क्षेत्र
मध्यवर्ती पठार प्रदेश
उत्तरेकडील आणि दक्षिणी मैदानाचे क्षेत्र

पश्चिमी डोंगराळ क्षेत्र : अकोले तालुका व संगमनेर तालुक्यांचा या प्रदेशामध्ये समावेश आहे. या प्रदेशातील अदुला, बालेश्वर आणि हरिशचंद्रगड च्या पर्वत रांगांमध्ये एकाच भागात अनेक उच्च शिखर आढळतात. सह्याद्रीतील 5427 फूट उंच असलेले सर्वोच्च शिखर कळसूबाई हे याच प्रदेशात आहे.

मध्यवर्ती पठार प्रदेश: पारनेर,अहमदनगर तालुका आणि संगमनेर,श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील काही भाग या क्षेत्रात येतो.

उत्तर आणि दक्षिण मैदानाचे क्षेत्र: या क्षेत्रात उत्तरी कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, नेवास्याचा समावेश आहे. हा गोदावरी आणि प्रवरा नदीच्या खोरयाच भाग आहे. श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या दक्षिणेकडील तालुक्यांचा भागही या भौतिक विभागात समाविष्ट केला आहे. या प्रदेशात घोड, भीमा आणि सिना नद्यांचे खोरे आहे.

नद्या

जिल्ह्यात दोन प्रमुख नद्या, गोदावरी आणि भीमा या कृष्णाची उपनदी आहे. पाणलोट क्षेत्र हे सह्याद्रीचे मोठे उदंड आहे जे हरिश्चंद्रगडावर पसरलेले आहे आणि जिल्ह्यातून पश्चिमेकडून पूर्वेकडे संपूर्णपणे पसरलेले आहे. जिल्ह्यातून वाहणारया महत्वाच्या नद्या आहेत प्रवरा, मुळा, सिना आणि धोरा. प्रवरा नदी गोदावरीचा उपनदी आहे. प्रवरा नदीचे पाणी खूप उंचीवरून पडते, ज्यामुळे रंधा धबधबा तयार होतो.

वन

अहमदनगर जिल्ह्यातील पश्चिम डोंगराळ भागात जंगल आहे.साग, बबूल, ढवडा, हळदू आणि नीम या जंगलात आढळणारे झाडे आहेत. आंबा, हळदी, आवळा, बोर आदी फळझाडे जिल्ह्यात आढळतात.

 

 

 

भूविज्ञान

ज्वालामुखीच्या लाव्हारसापासून संपूर्ण अहमदनगर जिल्हयाचा भूस्तर तयार झालेला असून तो दख्खन टापू या नांवाने ओळखला जातो. जिल्हयाच्या जमिनीचे साधारणपणे तीन भाग पडतात.

  1. नदी काठची पोयटयाची पांढरट जमीन
  2. डोंगराळउतारावरची काळी दगड गोटे मिश्रित जमीन
  3. पांढरट चुनखडीयुक्त ( बारड जमीन )

भुजल सव्हेक्षण विकास यंञणा अहमदनगर यांचेकडील माहितीनुसार अहमदनगर जिल्हा गोदावरी, भीमा व सीना या नद्यांच्या खो-यातील विविध 80 टक्के पाणलोट क्षेञात विभागला आहे. प्रवरा खो-यातील जमीन जास्त सुपीक आहे. पारनेर तालुक्याचा बराच भाग चुनखडीयुक्त जमिनीने व्यापलेला आहे.

रांजण खळगे निघोज

रांजण खळगे , निघोज

 

स्थान आणि सीमा

अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य नकाशावर दर्शविला आहे. हा जिल्हा राज्याच्या मध्यवर्ती भागात वसलेला आहे.

महाराष्ट्र राज्य नकाशा

स्थान

उत्तर अक्षांश18.2 ते19.9 अंश

पूर्व रेखांश 73.9 ते75.5 अंश

क्षेत्र

क्षेत्रफळ  (हेक्टर ) 1741271
वन क्षेत्र  ( हेक्टर ) 151571
सिंचनाखाली  ( हेक्टर) 425100
पिकाखालील क्षेत्र ( हेक्टर) 133356

सीमा

अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागात जिल्हे नासिक आणि औरंगाबाद आहे.
पूर्वेस बीड आणि उस्मानाबाद जिल्हे आहेत.
दक्षिणेस सोलापूर आणि पुणे हे जिल्हे  आहेत.
पश्चिमेकडे ठाणे आणि पुणे जिल्हे आहेत

 

जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील प्रशासकीय आणि कार्यात्मक मुख्याधिकारी असल्याने जिल्ह्यातील विविध विभागांमध्ये समन्वय साधण्याचे कार्य सोपवले जाते. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी / जिल्हा न्यायदंडाधिकारी आहेत.त्यांना एकूण जिल्हा प्रशासन हे सोपवण्यात आले आहे ज्यात ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषदे, पंचायत समित्या, ठराविक सहकारी संस्था, विधानसभा आणि संसदीय निवडणूक, रोजगार हमी योजना, पुनर्वसन यासारख्या विविध निवडणुका आहेत. प्रकल्पग्रस्तांचा, नागरी पुरवठा, भूसंपादन व इतर विकासात्मक उपक्रम याचा समावेश आहे.

अ.न. नाव पद
1 श्री. राहुल द्विवेदी (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी
2 श्री. पी.एल. सोरमारे अतिरिक्त जिल्हाधिकारी
3 श्री. प्रशांत पाटील निवासी उपजिल्हाधिकारी

उपजिल्हाधिकारी

अ.न. नाव पद
 1 रिक्त  उपजिल्हाधिकारी महसूल
2  श्री.जितेंद्र वाघ उपजिल्हाधिकारी  (रोजगार हमी )
3 श्री.महेश पाटील जिल्हा पुनर्वसन अधिकारी
4 श्रीमती जयश्री माळी  जिल्हा पुरवठा अधिकारी
5  श्री. जितेंद्र पाटील  उप जिल्हा निवडणूक अधिकारी
6  रिक्त  विशेष भूसंपादन अधिकारी – 1
7  रिक्त  

भूसंपादन अधिकारी 3

 

8  श्री. उदय किसवे विशेष भूसंपादन अधिकारी 7
9  श्री.पंकज चौबळ विशेष भूसंपादन अधिकारी 13
10 श्री. शाहूराज मोरे विशेष भूसंपादन अधिकारी 14
11 श्री.अजय मोरे विशेष भूसंपादन अधिकारी 15

तहसीलदार

अ.न. नाव पद
 1 श्री. सुधीर पाटील तहसीलदार, महसूल शाखा
 2 श्री.शरद घोरपडे तहसीलदार, भूसुधार शाखा
 3 रिक्त तहसीलदार, सामान्य प्रशासन
 4 श्री.किरण सावंत पाटील अन्नधान्य वितरण अधिकारी
 5 श्रीमती भारती सागरे तहसीलदार , संजय गांधी योजना
 6 श्री. सुनील सैंदाणे सहायक  जिल्हा पुरवठा अधिकारी
 7 श्रीमती हेमा बडे तहसीलदार, निवडणूक
 8 श्री.कैलाश पवार कार्यकारी दंडाधिकारी

अंतर्गत लेखा परीक्षण

अ.न. नाव पद
 1  श्री. महेश कावरे  लेखाधिकारी , आलेप , जमा शाखा
 2  श्री. राजेंद्र येळीकर  लेखाधिकारी, आलेप, खर्च शाखा

 

पाऊस

अहमदनगर जिल्हयाचे हवामान साधारणपणे उष्ण व कोरडे आहे. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा प्रामुख्याने अवर्षण प्रवण क्षेञ म्हणून ओळखला जातो. अहमदनगर जिल्हयाचे पर्जन्यमान अनिश्चित स्वरुपाचे असून पर्जन्याची वाटणी असमान आहे. अकोले व संगमनेर तालुक्याच्या पश्चीम भागातील सरासरी पर्जन्यमान इतर तालुक्यापेक्षा जास्त आहे. पण तेही नियमित नाही.

संदर्भ :- अंतरजाल , मित्र परिवार, सर्व सहकारी आणि कुटुंबातील सदस्य

संकलन आणि मांडणी :-                            

श्री.लक्ष्मण काटेकर, सोलापूर (महाराष्ट्र).

Laxman.katekar@gmail.com

Contact @ 7588020886.

 

____________________________________________________________________________________________

भाग :- 4                                                                               दि. 23 एप्रिल, 2019.

“पुणे शहर आणि जिल्हा”

हे पुणे ! शिवरायांनी याच पुण्यात बालपणी संस्करांचे व पराक्रमी धडे गिरविले. पेशवाईमध्ये याच पुण्याचे राजधानीचे स्थान भूषविले. पेशव्यांचे कर्तृत्वही फुलविले याच पुण्याने. असे हे पुणे ! लोकमान्य टिळकांची ही कर्मभूमी. थोर समाजसुधारक जोतिबा फुल्यांच्या समाजपरिवर्तनाच्या कार्यास सुरुवातही येथूनच झाली. या कार्याला प्रेरणाही या पुण्यातच मिळाली आणि…. विरोधही येथेच झाला.समाजपरिवर्तन, सुधारणेच्या कार्यात सर्वस्व झोकून देणाऱ्या अनेक समाजसुधारकांचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले. याच पुण्यातील सनातन्यांनी आगरकारांच्या हयातीतच त्यांची प्रेतयात्रा काढण्याचा करंटेपणाही दाखविला. असे हे पुणे ! टिळक व आगरकर असे दोन भिन्न विचार-प्रवाह येथेच निर्माण होतात; कधी हातात हात घालून आपली वाटचाल करतात तर कधी कायमच्याच दोन समांतर रेषा बनतात. गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी), महात्मा जोतिबा फुले, यांसारखे समाजसुधारक ही पुण्याच्या मातीने राष्ट्राला दिलेली देणगीच ठरली. रा. गो. भांडारकर, सुधाकर आगरकर, लोकमान्य टिळक, गोपाल कृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांसारख्या नररत्नांचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले – याच पुण्यात फुलले ! असे हे पुणे !

पुणे

(इंग्रजी :Puneउच्चार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे असे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठाह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. या शहराच्या पुणं या नावाचे Poona हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५० वर्षे प्रचलित होते. शहरात पूर्वापार चालत असलेल्या अनेक शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.

शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर असून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे. समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’; शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. मराठी ही शहरातील मुख्य भाषा आहे.

पुण्यामध्ये ऐतिहासिकः- लाल महालतुळशी बागशनिवार वाडा इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे सर्वांनी भेट द्यावी अशी आहेत.

नाव

पुणे हे नाव ‘पुण्यनगरी’ या नावावरून आले असल्याचे समजले जाते. इ.स. ८ व्या शतकात ते ‘पुन्नक’ (किंवा ‘पुण्यक’) नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इ.स. ११ व्या शतकात ते ‘कसबे पुणे’ किंवा ‘पुनवडी’ नावाने ओळखले जाऊ लागले. मराठा साम्राज्याच्या कालखंडात या शहराचे नाव ‘पुणे’ , आणि बोलीभाषेत ’पुणं’ असे वापरले जात होते. त्यामुळे ब्रिटिशांनी ’पुणं’चे स्पेलिंग Poona असे केले. त्यावरून परप्रांतीय लोक पुण्याला ‘पूना’ असे संबोधू लागले. पुढे शहराच्या नावाचे स्पेलिंग Pune असे केले. पूर्वीपासूनच हे शहर पुणे याच मराठी अधिकृत नावाने ओळखले जात होते.

पुणे काबीज केल्यावर औरंगजेबाला ते खूपच आवडले. त्याने या शहराला ’मुहियाबाद’ नाव दिले होते. पण प्रत्यक्ष पत्रव्यवहारात तो या शहराचा उल्लेख ’शहर नमुना’ असा करीत असे. पुणे येथील शनिवार वाडा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. त्यामुळे अनेक शहरातील लोक शनिवार वाड्याला भेट द्यायला येतात

इतिहास

शनिवारवाडा

आठव्या शतकात पुणे हे पुन्नक म्हणून ओळखले जात असे. शहराचा सर्वांत जुना पुरावा इ.स. ७५८चा आहे ज्यात त्या काळातील राष्ट्रकूट राजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे जंगली महाराज रस्त्यावर असलेली पाताळेश्वर लेणी. ही लेणी आठव्या शतकातील आहेत.

१७ व्या शतकापर्यंत हे शहर निजामशाहीआदिलशाहीमुघल अशा वेगवेगळ्या राजवटींच्या अंमलाखाली होते. सतराव्या शतकामध्ये शहाजीराजे भोसले यांना निजामशहाने पुण्याची जहागिरी दिली होती. या जहागिरीमध्ये शहाजीच्या पत्‍नी जिजाबाई वास्तव्यास असताना इ.स. १६३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीराजे भोसले यांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करत मराठ्यांचे स्वराज्य स्थापले. या काळात पुण्यात शिवाजीमहाराजांचे वास्तव्य होते. पुढे पेशव्यांच्या काळात इ.स. १७४९ साली सातारा ही छत्रपतींची गादी असलेली राजधानी राहून पुणे मराठा साम्राज्याचीप्रशासकीय राजधानी बनली. पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली. इ.स. १८१८ पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे राज्य होते. लाल महाल शनिवारवाडाविश्रामबाग वाडा ही पुण्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे आहेत. लाल महाल हे छत्रपति शिवाजी महाराजांचे, शनिवारवाडा हे थोरले बाजीराव पेशवे ते सवाई माधवराव पेशव्यांचे तर विश्रामबागवाडा दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे निवासस्थान होते. पुणे हे विद्येचे माहेरघर समजले जाते.

पुण्यातील शनिवार वाडा खूप प्रसिद्ध आहे परंतू काय आपल्याला माहीत आहे की बाजीरावांच्या या महालात एका राजकुमारची आत्मा भटकतं असते. जवळपासच्या लोकांना त्यांच्या ओरडण्याची आणि रडण्याची आवाज ऐकू येते. शनिवारवाडा आपल्या या भुताटकी प्रकरणामुळे ही प्रसिद्ध आहे. या महालाचा पाया 1730 साली शनिवारी ठेवण्यात आला असून त्या काळात 16, 110 रुपये लागत आली होती. या महालात एक हजाराहून अधिक लोक राहू शकत होते. 22 जानेवारी 1732 साली गृह प्रवेश करण्यात आले होते. नंतर यात एक काळे पान जुळले.या महालात 30 ऑगस्ट 1773 ला रात्री 16 वर्षाचे नारायण राव, जे मराठा साम्राज्याचे पाचवे पेशवा बनले होते, त्यांची कट रचून हत्या केली गेली. जेव्हा खाटीक किल्ल्यात शिरले तेव्हा नारायण रावांनी धोक्याची चाहूल लागली आणि ते आपल्या खोलीतून पळाले. नारायण राव पूर्ण महालात “काका मला वाचवा”….. “काका मला वाचवा” असे ओरडत होते. परंतू त्यांना वाचवण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही. नारायण रावांच्या काकांनी त्यांच्या हत्येचे षडयंत्र रचले होते असे लोकं म्हणायचे.

नारायण राव यांची आत्मा आजही या किल्ल्यात भटकत असते आणि त्यांचे शेवटले शब्द काका मला वाचवा हेही लोकांना ऐकू येतात. अंधारात हे महाल अजूनच भीतिदायक वाटतं. महालाच्या भीतींवर रामायण आणि महाभारत काळातील दृश्य बनलेले आहेत. या महालाच्या पहिल्या मजलावर 17-18 शताब्दीच्या दरम्यानच्या काही वस्तू आणि मुरत्या ठेवलेल्या आहेत. या महालाचा एक मोठा भाग 1824 मध्ये जळाला होता. शनिवार वाड्यात पाच दारं आहेत. जे दिल्ली दरवाजा, मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, नारायण दरवाजा आणि गणेश दरवाजा नावाने ओळखले जातात.

भूगोल

जगाच्या नकाशावरती पुण्याचे अक्षांश १८° ३१’ २२.४५” उत्तर, आणि रेखांश ७३° ५२’ ३२.६९ पूर्व असे आहेत.

पुण्याचा संदर्भ बिंदू (Zero milestone) हा पुण्यातील कॅम्प भागात असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसच्या इमारतीबाहेर आहे. पुणे शहर हे सह्याद्री डोंगररांगाच्या पूर्वेस, समुद्रसपाटीपासून ५६० मीटर (१,८३७ फूट) उंचीवर आहे. भीमा नदीच्या उपनद्या मुळा व मुठा यांच्या संगमावर हे शहर वसले आहे. पवना व इंद्रायणी या नद्यादेखील पुणे शहराच्या वायव्येच्या भागांतून वाहतात. शहराचा सर्वोच्च बिंदु वेताळ टेकडीसमुद्रसपाटीपासून ८०० मीटरवर आहे तर शहराच्या जवळ असलेल्या सिंहगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३०० मीटर आहे. पुणे शहर हे कोयना भूकंपप्रवण क्षेत्रात येते. कोयना गाव पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटरवर आहे. पुण्याला मध्यम व लहान भूकंप झालेले आहेत. कात्रज येथे मे १७२००४ रोजी ३.२ रिश्टर स्केल चा भूकंप झाला होता.

नद्या

पुणे शहराच्या हद्दीतून मुळामुठापवनाराम व देव या नद्या वाहतात.

पुणे शहराचा विस्तार:

पुण्यातील देऊळे

पुण्यात अनेक देवाची मंदिरे व देवळे आहेत. ते देव आणि ती देवळे त्या खास नावानेच ओळखली जातात. त्यांतली काही अशी :-

पाताळेश्वर मंदिरातील त्रिपुरी पौर्णिमा

पुण्याच्या परिसरातील अन्य मंदिरे

  • अरण्येश्वर,
  • थेऊरचा चिंतामणी – गणपती,
  • पद्मावती(सातारा रस्ता, पुणे).

पुण्यातील मठ

  • अक्कलकोट स्वामी महाराज मठ,
  • गगनगिरी महाराजअवतार मठ (धनकवडी),
  • गजानन महाराज मठ,
  • गुळवणी महाराज मठ,
  • बिडकर महाराज मठ,
  • रामकृष्ण मठ,
  • वरदेंद्र राघवेंद्र स्वामी मठ (लक्ष्मी रोड),
  • शंकर महाराज मठ,
  • शंकराचार्यांचा मठ(नारायण पेठेतील मुंजाबाच्या बोळात),
  • श्रीशृंगेरी शारदा मठ (कोथरूड),
  • सारदा मठ (राजाराम पूल),
  • राघवेंद्र स्वामी मठ (चिंचवड).

पुण्यातील स्मारके, समाध्या

  • कस्तुरबा गांधी यांची समाधी (आगाखान पॅलेस)
  • गंगाधर केळकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या दहनभूमीवर त्यांच्या दिनकर आणि भास्कर या दोन मुलांनी १९२८मध्ये उभारलेला स्तूप (ओंकारेश्वर पुलाखाली बालगंधर्व मंदिराशेजारी)
  • गुंजाळ घराण्यातील सतीचे वृंदावन (हे लकडी पुलाच्या अलीकडे नारायण पेठेच्या बाजूला होते, पुलाच्या भरावात गाडले गेले)
  • जंगली महाराज यांची समाधी (जंगली महाराज रोड)
  • नानासाहेब पेशवे यांची समाधी (पर्वती)
  • नानासाहेब पेशवे यांची समाधी (मुठा नदीकाठी पूना हॉस्पिटलजवळ).
  • बाबा महाराज समाधी (मॉडेल कॉलनी)
  • मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक (कोरेगाव पार्क)
  • लोकमान्य टिळकांना समर्पित केलेले टिळक स्मारक मंदिर हे सभागृह (टिळक रोड)
  • सवाई गंधर्व स्मारक (गणेशखिंड)
  • सावरकर स्मारक (नवी पेठ एस.एम. जोशी पुलानजीक)
  • नारायणराव पेशव्यांच्या दहनाची जागा दाखवणारा दगडी चौथरा (हा लकडी पुलाच्या अलीकडे नारायण पेठेच्या बाजूला होता; आता दिसत नाही)
  • पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या मराठी सैनिकांचे दगडी स्मारक (शनिवारवाड्यासमोर बाजीराव पुतळ्याच्या जागी होते. १९४० साली पुणे कॅन्टॉनमेन्टमध्ये हलवण्यात आले.): १९२१मध्ये या स्मारकाचे भूमिपूजन प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाले होते. नोव्हेंबर १९२२मध्ये या स्मारकाचे उद्‌घाटन झाले. स्मारकासाठी तत्कालीन संस्थानिकांनी व नागरिकांनी निधी उभा केला होता.
  • १८५७सालच्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्याच्या स्मरणार्थ उभारलेला क्रांतिस्तंभ (सारस बाग)
  • माधवराव पेशव्यांच्या पत्‍नी रमाबाई यांचे सतीचे वृंदावन (थेऊर)
  • संत ज्ञानेश्वरांची समाधी (आळंदी)
  • जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये रांजणगाव हे प्रसिध्द ठिकाण आहे.आणि या ठिकाणी वेहावेगल्या कंपन्या आहेत.

पुण्यातील असलेले नसलेले हौद

एकेकाळी पुण्यात बरेच हौद होते. या हौदांत एकत पाण्याचे झरे होते किंवा कात्रजहून कालव्याद्वारे या हौदांना पाणीपुरवठा होत असे. अजूनही काही हौद शिल्लक आहेत. अशा काही अस्तित्वात असलेल्या नसलेल्या हौदांची नावे :

  • काळा हौद
  • खाजगीवाले बागेतील हौद
  • गणेशपेठ हौद
  • ढमढेरे बोळातील हौद
  • तांबट हौद
  • तुळशीबाग हौद
  • नाना हौद (नाना वाड्यासमोरच्या या हौदाला कात्रजहून आलेल्या नळातून पाण्याचा पुरवठा होत असे.)
  • पंचहौद
  • फडके हौद (हा अस्तित्वात नाही).
  • फरासखाना हौद
  • बदामी हौद
  • बाहुलीचा हौद(दगडूशेठ दत्त मंदिराजवळच्या आता अस्तित्वात नसलेल्या या हौदावर एक बाहुली होती. डॉ. विश्राम घोले यांच्या ७व्या वर्षी निधन झालेल्या कन्येचे हे स्मारक होते.)
  • बुधवार वाड्यातील हौद
  • बोहरी जमातखान्यातील हौद
  • भाऊ दातार हौद
  • भाऊ महाराज हौद
  • भुतकर हौद
  • रामेश्वराजवळचा हौद
  • लकडखान्यातील हौद
  • पुणे विद्यापीठातील पुष्करणी
  • शनिवारवाड्यातील दोन हौद (पुष्करणी आणि हजारी कारंजे)
  • सदाशिव पेठ हौद (हे दोन हौद होते)
  • साततोटी हौद

बगीचे आणि पोहण्याचे तलाव

पुणे शहरात ८९ बगीचे/उद्याने आणि जवळजवळ तितकेच पोहण्याचे तलाव आहेत. त्यांपैकी काहींची नावे खाली दिली आहेत.

पुण्यातील ’प्रवेशद्वारे नसलेली गेटे’

एकेकाळी पुण्यात पोलीस चौकीला पोलीस गेट म्हटले जाई. अशीच काही पुण्यातील गेटे खालील यादीत आहेत. या बहुतेक गेटांच्या ठिकाणी आज पोलीस चौक्या आहेत.

  • कोंढवा गेट
  • क्वार्टर गेट
  • जाईचे गेट (हे सदाशिव पेठेत होते, आता अस्तित्वात नाही.)
  • पूल गेट
  • पेरू गेट
  • फडगेट
  • मरीआई गेट
  • म्हसोबा गेट
  • रामोशी गेट
  • स्वारगेट

पुणे शहरातील बगीचे नसलेल्या बागा (Baugs)

  • आदमबाग
  • आनंद गार्डन (रेस्टॉरन्ट)
  • ओशो झेन बाग
  • कबीर बाग
  • कौसरबाग, कोंढवा
  • चिमण बाग
  • ठुबे पार्क, शिवाजीनगर
  • ढमढेरे बाग
  • ‎तुळशीबाग
  • त्रिकोणी बाग, माडीवाले कॉलनी
  • नातूबाग
  • निर्मल पार्क (पद्मावती)
  • पटवर्धन बाग (या बागेच्या परिसरात श्यामाप्रसाद मुखर्जी नावाचे एक उद्यान झाले आहे.)
  • पुरंदरे बाग (आता अस्तित्वात नाही)
  • पेरूचा बाग
  • पेशवे बाग
  • फाटकबाग (म्हात्रे पुलाजवळ)
  • बेलबाग
  • भिडेबाग
  • भुजबळ बाग (बिल्डर्स)
  • माणिकबाग
  • मिलन गार्डन (हे धनकवडीमधील एक उपाहारगृह आहे)
  • मीनल गार्डन (ही दीनानाथ हॉस्पिटलजवळची एक वसाहत आहे)
  • मोतीबाग
  • योगी गार्डन (हॉटेल)
  • रमणबाग
  • राम बाग
  • वर्तक बाग, एरंडवणे
  • वसंतबाग
  • सॅलिसबरी पार्क
  • सारस बाग
  • सिताफळ बाग
  • सुपारीबाग
  • सोपानबाग
  • हिराबाग

डोंगर आणि टेकड्या

पुणे शहरात आणि आजूबाजूला बऱ्याच टेकड्या आहेत. त्यांपैकी काही या :-

  • अराई टेकडी (ARAI-Automotive Research Association of India) = वेताळ टेकडी
  • कात्रजची टेकडी
  • कोथरूडची टेकडी
  • गुलटेकडी
  • चतुःशृंगी
  • तळजाई
  • तारकेश्वर टेकडी (येरवडा)
  • तुकाई टेकडी (बाणेर)
  • तुकाई टेकडी (हडपसर)
  • दुर्गा टेकडी (निगडी)
  • पर्वती
  • पाचगाव
  • पाषाणटेकडी
  • फर्ग्युसन कॉलेजची टेकडी
  • बकरी हिल
  • बाणेर टेकडी
  • बावधनची टेकडी
  • बोपदेव घाट-टेकडी
  • भंडारा डोंगर (देहू)
  • भांबुर्डा टेकडी (वेताळ टेकडी) (भांबुर्डा वनविहार टेकडी)
  • महंमदवाडी टेकडी (हडपसर)
  • म्हातोबा टेकडी (हिंजवडी)
  • येरवड्याची येरंडेश्वर टेकडी
  • रामकृष्ण परमहंस नगर टेकडी, पौड रोड
  • राम टेकडी
  • राम टेकडी (हडपसर)
  • रेंज हिल्स
  • वनदेवी टेकडी (कर्वे रोड)
  • वाघजई
  • विधि महाविद्यालयाची टेकडी (एस्‌एन्‌डीटीची टेकडी)
  • वेताळ टेकडी
  • सिंहगड
  • सुतारवाडी टेकडी (पाषाण-सूस रोड)
  • सूसची टेकडी
  • हनुमान टेकडी

खिंडी

  • अप्पर खिंड
  • गणेश खिंड
  • डुक्कर खिंड
  • बावधन खिंड

नद्या, तलाव, हौद आणि नाले

पेशव्यांच्या काळात पुण्यात ८५ हौद होते. या सर्व हौदांत कात्रजच्या तलावातून खापराच्या नळांतून पाणी पुरवठा होत होता. कमी उंचीवरून जास्त उंचीवर पाणी चढवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे उसासे बांधले होते. रस्तारुंदीमध्ये सिंहगड रस्त्यावरील सर्व उसासे रातोरात काढून टाकण्यात आले.

  • अण्णासाहेब मगर स्टेडिअम येथील जलतरण तलाव (नेहरूनगर-निगडी)
  • आंबील ओढा
  • बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल व जलतरण तलाव, पद्मावती
  • ऑलिंपस हेल्थ क्लबचा तरण तलाव, कोथरूड
  • इंद्रायणी
  • ए.बी.एस. फिटनेस ॲकॅडमीचा तरण तलाव, विश्रांतवाडी
  • एलारस पूल्स, पूर्व चिंचवड
  • एस पी कॉलेजचा तरण तलाव
  • औंध तरण तलाव, औंध गांव
  • करपे तरण तलाव (हा काँग्रेस हाऊससमोर होता)
  • कात्रजचा तलाव
  • काळा हौद
  • कै. काळूराम मारुती जगताप तरण तलाव (पिंपळे गुरव)
  • कोंढव्याचे तळे
  • क्लब ॲक्वाया, कोरेगांव पार्क
  • गणपती विसर्जन तलाव (निगडी-सेक्टर २६)
  • न.वि. गाडगीळजलतरण तलाव, (गाडगीळ प्रशाला)
  • गोपाळ हायस्कूलचा तरण तलाव
  • कै.खिंवसरा पाटील तलाव (थेरगाव)
  • घोरपडी गाव तरण तलाव
  • चॉईस स्विमिंग पूल, कोथरूड
  • विष्णू अप्पा जगताप जलतरण तलाव, धनकवडी
  • जे.एस स्पोर्ट्‌स क्लबचा तरण तलाव, पिंपळे सौदागर
  • टिळक तरणतलाव, प्रभात रोडच्या डाव्या हाताला
  • डेक्कन जिमखाना या संस्थेचा तरण तलाव
  • केशवराव ढेरे तरण तलाव, येरवडा
  • तळजाई तलाव
  • देव नदी
  • धनकवडी तरण तलाव
  • नाग नदी
  • नागझरी
  • नांदे जलतरण तलाव, बालगंधर्व नाट्यगृह (जंगली महाराज रोड)
  • नाना हौद
  • नांदे तरण तलाव
  • निळू फुले तरण तलाव, स्वार गेटजवळ
  • न्यू जॉय्ज स्पोर्ट्‌स क्लब तरण तलाव, पाषाण
  • पंचहौद
  • पद्मावती तळे
  • नानासाहेब परुळेकर विद्यालयाच्या आवारातील जल तरण तलाव, विश्रांतवाडी
  • पवना नदी
  • पाषाण तलाव
  • पूना क्लबचा तरण तलाव
  • पूना स्पोर्ट्‌स ॲकॅडमी तरण तलाव, कल्याणीनगर
  • पेगॅसस हेल्थ क्लबचा तरण तलाव, हिंगणे बुद्रुक
  • पेशवेकालीन कात्रजचा पाट
  • फडके हौद
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरण तलाव (कासारवाडी)
  • कै.वस्ताद बाळासाहेब गावडे तरण तलाव (चिंचवड)
  • भामा नदी
  • भोसरी जलतरण तलाव (भोसरी)
  • महाराष्ट्रीय मंडळाचा तरण तलाव
  • मानस सरोवर
  • मावळ सृष्टी रिझॉर्ट, लोणावळा
  • मिनाताई ठाकरे जलतरण तलाव (यमुनानगर)
  • मुठा उजवा तीर कालवा
  • मुठा डावा तीर कालवा
  • मुठा नदी
  • मुळा नदी
  • वस्ताद बलभीम मोकाटे जल तरण तलाव, गुजरात कॉलनी (कोथरूड)
  • मोबियस फिटनेस सेंटर्चा तरण तलाव, बाणेर रोड
  • नथूजी दगडू भेगडे जलतरण तलाव, कर्वेनगर
  • भैरोबा नाला
  • राज एंटरप्रायझेसचा तरण तलाव, शिवणे (खडकवासला)
  • योगगुरू रामदेव महाराज क्रीडा संकुल व जलतरण तलाव, तळजाई टेकडी
  • लेखा फार्मचा तरण तलाव, देहू रोड
  • वंडर पूल्स, तळेगाव दाभाडे
  • शाहू कॉलेजचा तरणतलाव, पर्वतीदर्शनजवळ
  • शाहू तरणतलाव, सोमवार पेठ
  • शिवाजी तलाव (हा बुजवून त्यावर संभाजी उद्यान केले)
  • श्री छत्रपती शिवाजी महाराज तरण तलाव, आकुर्डी
  • शेप्स फिटनेस क्लबचा तरण तलाव, विश्रांतवाडी
  • श्री जिमचा तरण तलाव, विमाननगर
  • सदाशिव पेठ हौद (पूर्वी हे दोन होते)
  • स.प. कॉलेजचा तरण तलाव, एस.पी. कॉलेजच्या मागे
  • साततोटी हौद
  • वीर सावरकर तरण तलाव, कोंढवा खुर्द
  • संजय हेल्थ क्लबचा तरण तलाव, पाषाण गाव
  • सारसबाग तळे
  • सिंफनी क्लबचा तरण तलाव, पाषाण
  • सिंबायोसिस कॉलेजचा तरण तलाव
  • सिल्व्हर तरण तलाव, हॅपी कॉलनी, कोथरूड
  • सोलॅरिस तरण तलाव
  • हार्मनी ॲक्‍वॅटिक क्लबचा तरण तलाव, कोथरूड

पूल

पुण्यात खाली दिलेल्या यादीत नसलेले अनेक निनावी नाले आणि पूल आहेत. बांधकामे करून करून पुण्यातल्या दोन नद्यांना नाले बनवले आहे. मुठा उजव्या कालव्याच्या प्रवाहाला दुभंगून वाहणारे जुना कालवा आणि नवा कालवा असे दोन एकमेकांना समांतर असणारे कालवे हडपसरमध्ये आहेत. या प्रत्येक नाल्यावर आणि कालव्यांवर अनेक निनावी कॉजवे किंवा पूलही आहेत..उदाहरणार्थ, आंबील ओढ्यावर शाहू कॉलेज रोडवरच्या स्टेट बँक कॉलनीजवळ, दांडेकर पुलाखालून आणि दत्तवाडीजवळ असे तीन पूल आहेत, त्यांना नावे नाहीत. मुठेच्या उजव्या कालव्यावर सारसबागेजवळच्या सावरकरांच्या पुतळ्याशेजारी, स्वारगेटजवळ, हिंगणे गावठाणाजवळ, कर्वेनगरजवळ आणि गोळीबार मैदानाशेजारी पूल आहेत, मात्र त्यांना नावे नाहीत. आंबील ओढा आणि उजवा कालवा या दोघांवरती समाईक असलेल्या आणि पेशवे पार्कजवळ असलेल्या पुलाला शाहू महाराज पूल असे नाव दिले होते. हल्ली ते नाव वापरात नसावे. भैरोबा नाल्यावरच्या, शिंद्यांच्या छत्रीजवळच्या आणि इतर तीनचार पुलांना नावे दिलेलीच नाहीत.

मुठा नदीवरील पूल एकूण १६ –

  • एस.एम.जोशीपूल
  • ओंकारेश्वर पूल (नवीन नावविठ्ठल रामजी शिंदे पूल)
  • न.वि. गाडगीळपूल
  • जयंतराव टिळकपूल
  • काकासाहेब गाडगीळ पूल -झेड पूल (Z-Bridge) : फक्त दुचाकीसाठी
  • दगडी पूल (=डेंगळे पूल)
  • नवा पूल (=शिवाजी पूल – Lloyd’s Bridge)
  • भिडे पूल
  • म्हात्रे पूल
  • यशवंतराव चव्हाण पूल
  • राजाराम पूल
  • लकडी पूल (=संभाजी पूल)

या पुलावर दररोज सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुचाकी वाहनास प्रवेशबंदी असते.

  • वडगाव पूल
  • वारजे पूल (देहू रोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर)
  • संगम पूल (रेल्वेचा आणि वाहनांचा) – वेलस्ली पूल
  • आणि शिवाय फक्त दुचाकीसाठी असलेले दोन पूल आणि काही साकव.

मुळा नदीवरचे पूल एकूण १० –

  • औंधचा पूल (जुना)
  • औंधचा पूल (नवा – याचे नामकरण राजीव गांधी पूल असे केले आहे.)
  • दापोडीचा हॅरिस ब्रिज (रस्ता व रेल्वे)
  • दापोडी कॅन्टॉन्मेन्टमधील होळकर पूल
  • बोपोडीचा पूल
  • वाकड पूल

मुळा-मुठा नदीवरचे पूल –

  • कल्याणी नगर पूल (officially named as Prince His Highness Aga Khan Bridge)
  • बंडगार्डन पूल(=फिट्‌झगेराल्ड पूल)
  • बाबासाहेब आंबेडकर पूल
  • मुंढवा पूल
  • संगम पूल (=लॉर्ड Wellesley पूल)

ओढ्या-नाल्यांवरील पूल –

  • उजव्या-डाव्या कालव्यांवरचे काही निनावी पूल
  • घसेटी पूल
  • दांडेकर पूल: –

दांडेकर पूल हा पुण्यामधील आंबील ओढ्यावारील एक महत्त्वाचा पूल आहे. या पुलामुळे ‘नरवीर तानाजी मालुसरे सिंहगड रस्ता’ आणि ‘लाल बहादूर शास्त्री रस्ता’ हे दोन रस्ते जोडले गेले असल्याने यावर नेहमीच वाहनांची तसेच पादचाऱ्यांची वर्दळ असते. सदैव असलेली अस्वच्छता आणि दुर्गंधी हे या पुलाचे वैशिष्ट्य होय. पुलावर सतत वाहणारी कचराकुंडी, इतस्ततः पडलेला कचरा आणि भटकी रोगट कुत्री हे या पुलावरचे नेहमीचेच दृश्य असते. कचरा, कुत्र्यांची विष्ठा, विक्रीसाठीची मच्छी यामुळे या पुलावर सदैव दुर्गंधी असते.

  • (नागझरी वरचा) दारुवाला पूल
  • भैरोबा नाला पूल
  • सोनार पूल (फुरसुंगी येथील कालव्यावरील पूल)

रेल्वे मार्गाच्या वरचे पूल आणि खालचे सबवे

  • एचसीएमटीआर (High Capacity Mass Transit Route) रेल्वे पूल
  • संगम पूल
  • संचेती हॉस्पिटल पूल
  • खडकी-़अौंध सबवे
  • पिंपरी स्टेशनजवळचे शेजारशेजारचे दोन पूल (एकाचे नाव स्वर्गीय इंदिरा गांधी उड्डाण पूल)
  • चिंचवडचा पूल
  • आकुर्डीचा पूल
  • बिजलीनगरचा पूल
  • आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या (दक्षिणेकडच्या) एका बाजूकडील एक व दुसऱ्या बाजूकडील दोन सबवे
  • देहूरोड येथील पूल

उड्डाणपूल

  • अभियांत्रिकी महाविद्यालय दुमजली उड्डाणपूल (निर्माणाधीन)
  • एम्पायर इस्टेट उड्डाणपूल (निर्माणाधीन)
  • डांगे चौक उड्डाणपूल
  • धनकवडी पूल (सातारा रस्ता)
  • नवले पूल (कात्रज)
  • नाशिक फाटा-काळेवाडी दुमजली उड्डाणपूल
  • धायरी फाटा उड्डाणपूल
  • संचेती हॉस्पिटल उड्डाणपूल
  • कर्वे रस्ता दुमजली उड्डाणपूल (निर्माणाधीन)
  • नगर रस्ता दुमजली उड्डाणपूल (निर्माणाधीन) {येरवड्यात}.

पुतळे

पुणे शहरात रस्त्यारस्त्यात उभे केलेले शेकडो पुतळे आहेत. त्यांतील किमान ७७ पुतळे पुण्याच्या मध्यभागात आहेत. ३७ पूर्णाकृती व ४०० अर्धपुतळे आहेत. १३ पुतळे तर केवळ स्वारगेट-मार्केटयार्ड परिसरातच आहेत. या पुतळ्यांची देखभालही केली जात नाही.. शहरात वाहतुकीला अडथळा ठरू शकणारेही बरेच पुतळे आहेत. पुण्यात फक्त शिवाजी महाराजांचे कमीतकमी चाळीस पुतळे आहेत. त्यांशिवाय अन्य पुतळेही आहेत. फुले मंडईमध्ये अगदी मध्यभागी असलेला विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा अर्ध पुतळा मंडईतील समाजकंटक दलालांनी काही वर्षांपूर्वी उखडून नष्ट केला, तो परत बसवला गेला नाही. जिजामाता उद्यानातील एक मूर्तिसमूहात असलेला दादोजी कोंडदेवांचा पुतळा तोडून काढला, तोही परत बसवला गेला नाही. पुणे विद्यापीठामध्ये एका खासगी संस्थेने बसविलेला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चांगला नाही या कारणास्तव तो तोडून त्या जागी विद्यापीठ स्व-खर्चाने नवीन पुतळा बसवणार आहे.

गेल्या काही वर्षांत बरेच पुतळे काढून टाकले किंवा हलवून दुसऱ्या जागी नेले आहेत. उदाहराणार्थ, कोथरूडमधील महर्षी कर्वे यांचा पुतळा चौकातून हटवून कर्वे रोडच्या एका कोपऱ्यात प्रथापित केला आहे. स्वार गेट चौकातला केशवराव जेधे यांचा पुतळा हलवून स्वार गेट काॅर्नरला नेला आहे.

शिवाजी रोडवरील शनिवारवाड्याजवळचा काकासाहेब गाडगिळांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ झालेल्या अपघातात अथर्व डोंगरे या शाळकरी मुलाचा २००८ साली मृत्यू झाल्यानंतरही तो पुतळा अजून तेथेच आहे. त्या पुतळ्याची नीट निगाही राखली जात नाही.

पुणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणत पुण्यातील एकूण २३ पुतळे चौकाच्या मध्येच आढळले असून असून रहादारीला अडथळा करणारे आहेत. जिथे टिळक रोड आणि बाजीराव रोड मितात त्या पुरम चौकातील अभिनव शाळेजवळ वसंतराव पाटलांचा पुतळा आहे. तो पुतळा सणस मैदानात वसंतराव पाटलांच्याच स्मरणार्थ बांधलेल्या सभागृहात हलवावा अशी सूचना होऊनही, तो पुतळा तेथेच रहदारीला अडथळा करीत उभा आहे. दुरवस्थेत असलेला बाजीराव रोडवरील बाबुराव सणसांचा पुतळा हटवून सणस मैदानावर नेण्याचा ठरावही अजून बासनात आहे.

पुण्यात सध्या (२०१४) असलेल्या काही पुतळ्यांची जंत्री :

स्वारगेट-मार्केटयार्ड परिसरातील पुतळ्यांची यादी

अन्य ठिकाणचे पुतळे

  • कर्वे पुतळा, कोथरूड
  • पहिला बाजीराव पुतळा, शनिवारवाडा
  • झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा, संभाजी उद्यान
  • प्रमोद महाले यांचा पुतळा, सुपर मार्केट चौक, पूर्वी दीप बंगला चौक (पुणे)
  • आचार्य अत्रेपुतळा, बालगंधर्व नाट्यगृहाजवळील सावरकर भवनपाशी
  • महात्मा फुलेपुतळा, पुणे विद्यापीठ
  • शाहूपुतळा, एस्‌एस्‌पी‍ए्म्‌‍एस (पुणे)
  • सावरकर पुतळा, सारसबाग (पुणे),
  • संभाजीचा अर्ध पुतळा, गरवारे उड्डाण पूल,डेक्कन जिमखाना (पुणे), वगैरे.

पेठा

पुणे हे पेठांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या पेठांची नावे बहुतकरून आठवड्यातील वारांनुसार, तसेच ज्यांनी या पेठा वसवल्या अशा इतिहासकालीन व्यक्तींच्या नावांवरून- नाना फडणीस, नारायणराव पेशवे, सदाशिवरावभाऊ, सरदार रास्ते- ठेवली गेली आहेत. इ.स. १६२५ मध्ये शहाजीराजे भोसलेयांनी रंगो बापूजी धडफळे यांची पुण्याच्या प्रशासकपदी नियुक्ती केली. रंगो बापूजी धडफळे यांनी कसबा पेठ, सोमवार पेठ, रविवार पेठ आणि शनिवार पेठ या पेठा बांधल्या. इ.स. १६३० मधील आदिलशहाच्या हल्ल्यानंतर दादोजी कोंडदेव यांनी या पेठांची पुन्हा उभारणी केली. पुण्यातील पेठांची नामावली अशी:
कसबा पेठरविवार पेठ ऊर्फ मलकापूर पेठ, सोमवार पेठ (हिला शाहापूर पेठ म्हणत), मंगळवार पेठ (हिची जुनी नावे अष्टपुरा व शास्तापुरा पेठ), बुधवार पेठ ऊर्फ मुहियाबाद पेठ, गुरुवार पेठ ऊर्फ वेताळ पेठ, शुक्रवार पेठ (जुने नाव विसापूर), शनिवार पेठगंज पेठ ऊर्फ मीठगंज (महात्मा फुले पेठ ?)सदाशिव पेठनवी पेठनारायण पेठभवानी पेठ, मलकापूर पेठ (म्हणजेच रविवार पेठ), मुहियाबाद पेठ (म्हणजेच बुधवार पेठ), नाना पेठरास्ता पेठ (जुने नाव शिवपुरी पेठ), गणेश पेठवेताळ पेठ (म्हणजेच गुरुवार पेठ), सेनादत्त पेठ, नागेश पेठ (म्हणजेच न्याहाल पेठ), भवानी पेठ (टिम्बर मार्केट असलेली), घोरपडे पेठ. गुरुवार पेठ.

पुण्यातल्या रस्ते-चौक-वस्त्या आदींची खास नावे

  • ताडी गुत्ता चौक (कोरेगाव पार्क)
  • ताडीवाला रोड (येरवडा)
  • दारूवाला पूल (रास्ता पेठ)
  • माडीवाले कॉलनी (सदाशिव पेठ)
  • सरबतवाला चौक (गणेश पेठ)

गल्ल्या, बोळ, आळ्या

जुन्या पुण्यात अनेक गल्ल्या, आळ्या आणि बोळ होते. त्यांतले जवळपास सर्वच अजूनही जुन्याच नावाने टिकून आहेत. त्यांतल्या काहींची नावे:

रविवार पेठ

  • एन्‌‍आयबीएम गल्ली (कोंढवा)
  • कडबे आळी
  • खडकमाळ आळी
  • कांचन गल्ली
  • कापड‍आळी (कापडगंज)
  • कुंभारवाडा (जवळच कुंभारवेस, कागदीपुरा)
  • कोळसा गल्ली
  • खाऊ गल्ली (या नावाच्या अनेक गल्ल्या आहेत.)
  • गाय आळी
  • गूळ आळी
  • गौरी आळी
  • चांभार आळी
  • चोळखण आळी
  • जुनी तपकीर गल्ली
  • जोगेश्वरीचा बोळ
  • झांबरे चावडी
  • डाळ आळी
  • तांबट आळी
  • तुळशीबागेचा बोळ
  • दाणे आळी
  • दिगंबरनगर गल्ली (नं. १, २, ३, ४)
  • नेने घाट
  • पंतसचिवाची पिछाडी
  • फणी आळी
  • बुधवारगल्ली
  • बुरूड आळी
  • बोहरी आळी
  • भट आळी
  • भाऊ महाराजांचा बोळ
  • मुंजाबाचा बोळ
  • मुजुमदारांचा बोळ
  • मेहुणपुरा
  • लोणारआळी
  • लोणीविके दामले आळी
  • व्यवहारे आळी
  • शालूकर बोळ (=भाऊ रंगारी बोळ)
  • शिंदे आळी
  • शिंपी आळी
  • साडे सतरा नळी (हडपसर)
  • सायकल दवाखाना, कसबा पेठ

प्रसिद्ध वाडे

  • गायकवाड वाडा (केसरी वाडा): हा लोकमान्य टिळकांनी विकत घेऊन तेथे केसरी-मराठा वर्तमानपत्रांचे कार्यालय काढले. टिळक तेथेच राहात.
  • नाना वाडा: हा नाना फडणविसांनी बांधला. येथे टिळक-आगरकर-चिपळूणकरांनी स्थापन केलेली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची ’न्यू इंग्लिश स्कूल’ होती.
  • पुरंदरे वाडा – का कसबा पेठेत नव्यापुलाशेजारी आहे.
  • भिडे वाडा: हा वाडा भिड्यांनी जोतिबा फुले यांना मुलींची शाळा काढण्यासाठी दिला.
  • मुजुमदार वाडा: हा कसबा पेठेत मुजुमदारांच्या बोळात आहे. या वाड्यात होणाऱ्या गणेशोत्सवात नामवंत संगीतकार हजेरी लावत असत.
  • रास्तेवाडा: हा वाडा माधवराव पेशव्यांनी बांधून सरदार रास्त्यांना दिला. हल्ली येथे ‘आगरकर हायस्कूल’ ही मुलींची शाळा आहे. कधीकाळी आचार्य अत्रे या शाळेचे मुख्याध्यापक होते, आणि अभिनेत्री वनमालाशिक्षिका.
  • विश्रामबाग वाडा: येथे एक संग्रहालय आहे. वाड्याच्या बाजूच्या भागात पोस्ट ऑफिस आहे. पूर्वी या वाड्याच्या दर्शनी भागात म्युनिसिपालिटीचे जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय होते.
  • शनिवारवाडा: बाजीराव पेशव्यांनी बांधला. येथे पेशव्यांचे घर आणि कार्यालय होते.
  • होळकर वाडा: शनिवार पेठेतील या वाड्यात ‘अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल’ आहे.

पडी, वड्या आणि वाड्या

  • कुंभारवाडा
  • घोरपडी
  • जनवाडी
  • तानाजीवाडी
  • बिबवेवाडी
  • येवलेवाडी
  • वाकडेवाडी
  • वानवडी
  • हिंजवडी

शनिवारवाड्याचा परिसर

शनिवारवाड्याकडे तोंड करुन उभे राहिल्यावर नव्यापुलाच्या उजव्या हाताला बारामतीकर-जोशी आणि काळे यांचे जुने ऐतिहासिक वाडे. आहेत. बारामतीकर जोशी हे पेशव्यांचे व्याही होते.आणि काळे हे पेशव्यांचे परराष्ट्रीय वकील. खर्ड्यांच्या लढाईत जोशीनी मोठाच पराक्रम गाजवला होता.

या वाड्यांपासून थोडे पुढे गेल्यावर रस्ता वळतो तेथे पेशवाईतले प्रसिद्ध सावकार सरदार ओंकारांचा वाडा आहे. त्याकाळी मोठमोठी कर्जे सरकारला लागत. सरदार ओंकार हे काही प्रमुख सावकारांपैकी एक. चिमाजी अप्पांची मुलगी या ओंकारांकडे दिली होती.

मेहुणपुरा

ही शनिवारवाड्याच्या मागची व पश्चिमेची बाजू. पेशव्यांचे बरेच मेव्हणे तिथे राहात असत म्हणुन त्याला मेहुणपुरा म्हणतात. थोरल्या माधवरावांच्या काळातही मेहुणपुरा अस्तित्वात होता. मेहुणपुऱ्या जेथे दैनिक सकाळच्या चौकात अण्णासाहेब पटवर्धनांचा मोठा वाडा होता, आणि जिथे सकाळची कचेरी आहे तिथे पानिपत लढाईत शौर्य गाजविणाऱ्या सरदार विसाजीपंत बिनीवाल्यांचा वाडा होता. तिथेच शेजारी घोरपडेंचा वाडा. आता दक्षिणमुखी मारुतीच्या जवळच पेशव्यांचे प्रसिद्ध सरदार हसबनीस यांचा वाडा होता.

सरदार किबे, मोरोबादादा, खासगीवाले यांचे वाडे

आता जिथे प्रभात चित्रपट गृह (किबे नाट्य-चित्र मंदिर) आहे तिथे पेशवाईतले प्रसिद्ध सावकार किबे राहात. इंदूरकर, होळकर यांचेही किबे हे सावकार होते. नंतरच्या काळात तिथे नूतन मराठी विद्यालय भरत असे. या वाड्यातला आरसे महाल मोठा प्रेक्षणीय होता. त्याच्या समोरच मोरोबादादांचा सहा चौक असलेला मोठाच्या मोठा दोन-तीन मजली वाडा होता.

आनंदाश्रमाच्या शेजारीच नूतन मराठी हायस्कूल आहे. ज्यावेळी किबेंच्या वाड्यात शाळा भरत असे त्यावेळी इथे न्यू पूना कॉलेज होते आणि त्याही आधी खाजगीवाल्यांचा वाडा या जागेत होता. हा वाडा पाडून त्याठिकाणी आता नूमविची इमारत उभी आहे.

उपनगरे

पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या उपनगरांची नामावली अशी:
अप्पर इंदिरा नगरअरण्येश्वरआनंदनगर (सिंहगड रस्ता), आंबेगावएरंडवणेऔंधकँपकर्वेनगरकल्याणीनगरकात्रज, कोंढवा बुद्रुक , कोथरूडकोरेगाव पार्कखडकीखराडीगुलटेकडीगोखलेनगरघोरपडीडेक्कन जिमखानादत्तवाडीबोपोडीधनकवडीधायरीपद्मावतीपर्वतीपाषाणपिसोळीबाणेरबालाजी नगर (सातारा रस्ता), बावधनबिबवेवाडीबोपखेलभुसारी कॉलनीमुंढवायेरवडालोहेगाववडगांव (बुद्रुक)वडगांव शेरीवडारवाडीवाकडेवाडीवाघोलीवानवडीवारजे माळवाडीविठ्ठलवाडीविमाननगरविश्रांतवाडीशिवाजीनगरसॅलिसबरी पार्कसांगवीसुसहडपसर

पिंपरी चिंचवड– आकुर्डी, काळेवाडी, चिंचवडतुकारामनगरथेरगावनिगडीनेहरूनगरपिंपळे गुरवपिंपळे निलखपिंपळे सौदागरभोसरी यमुनानगररहाटणीरावेतरूपीनगर वाकडसंभाजीनगरसांगवी(जुनी आणि नवी), हिंजवडी

हवामान

सिंहगडचा पुणे दरवाजा

पुणे शहरात उन्हाळा, (मॉन्सून) पावसाळा व हिवाळा हे ऋतू अनुभवायाला मिळतात. उन्हाळा- मार्च ते मे (तापमान २५°-२९° से.) असतो व एप्रिल हा सर्वांत उष्ण महिना आहे. मे महिन्यात पावसाच्या सरी सुरू होतात. या महिन्यात उष्णता असतेच पण काही वेळेस दमटपणा अनुभवायला मिळतो. पुण्याच्या रात्री बऱ्यापैकी थंड असतात.

जून महिन्यातील अरबी समुद्रातून येणाऱ्या मॉन्सूनच्या वाऱ्यांयांमुळे पावसाळा सुरू होतो. पुण्याचे पर्जन्यमान वार्षिक ७२२ मि.मी. इतके आहे. जुलै महिन्यात सगळ्यात जास्त पाऊस पडतो. पर्जन्यमान मध्यम असले तरी अनेक वेळा पावसाच्या सरी पुणे शहरातील जीवनक्रम थांबवतात. पावसाळ्यात तापमान २०°-२८° सेल्शियस इतके असते.

मॉन्सूननंतर ऑक्टोबर महिन्यात दिवसाचे तापमान वाढते व रात्री थंड असतात. हिवाळा हा ऋतू नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यांपर्यंत असतो. पुण्याला भेट देण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. या काळात दिवसाचे तापमान २९°से तर रात्रीचे तापमान १०°से च्या खाली असते. डिसेंबर व जानेवारी महिन्यात तर तापमान ५-६°से पर्यंत उतरते. पुण्यात सर्वांत जास्त तापमान ४३.३°से इतके २० एप्रिल १९८७/७ मे १८८९ रोजी तर (१७८१-१९४० सालातील) सर्वांत कमी तापमान १.७°से १७ जानेवारी १९३५ला नोंदविले गेले. जानेवारी १९९१(?)मध्ये पुण्यात २.८°से इतके किमान तापमान नोंदवले गेले.

पुण्याच्या किमान तापमानाच्या काही नोंदी

  • २.८°से (२-१-१९९१)
  • ४.०°से (३-१-१९९१)
  • ४.४°से (१६-१-१९९४)
  • ४.५°से (२१-२-१९९३)
  • ४.७°से (२७-१-२००६)
  • ४.८°से (२१-१-१९९७)

इसवी सन २००३ सालापासूनचे पुण्याच्या तापमानाचे नीचांक

  • २००३: ६.९°से
  • २००४: ८.२°से
  • २००५: ५.९°से
  • २००६: ४.७°से
  • २००७: ८.३°से
  • २००८: ५.८°से
  • २००९: ८.५°से
  • २०१०: ६.५°से
  • २०११: ५.३°से
  • २०१२: ६.६°से
  • २०१३ (१४डिसेंबरपर्यंत): ६.८°से

जैवविविधता

पुणे शहर टपाल कार्यालयापासून २५ कि.मी. त्रिज्येच्या परिसरात साधारणपणे, सपुष्प वनस्पतींच्या १०००, फुलपाखरांच्या १०४, पक्षांच्या ३५० आणि सस्तन प्राण्यांच्या ६४ प्रजाती आढळतात.

वृक्षसंपदा

दिल्ली हे भारतातील सर्वाधिक वृक्षसंख्या असलेले महानगर आहे. त्याखालोखाल बंगलोर, कलकत्ता, नागपूर आणि पुणे यांचे क्रमांक लागतात. असे असले तरी, पुणे शहर हे भारतातील सर्वाधिक वृक्षविविधता असलेले महानगर आहे असे वृक्ष‍अभ्यासक श्री.द. महाजन यांचे मत त्यांनी २००५साली एका राष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या निबंधात म्हटले होते. या वृक्षांपैकी ५० टक्के वृक्ष देशी आहेत.

पुणे महानगरात १९९८साली केलेल्या वृक्षगणनेनुसार सुमारे ३३ लाख वृक्ष होते. त्यांची जातिनिहाय नावे अशी :-

देशी वृक्ष

अंकोळ, अंजन, अंजनी, अजानवृक्ष, अर्जुन, अशोक, आईन (ऐन), आपटा, आंबा, आवळा, उंडी (कॅलोफिलम इनोफिल्युम), औदुंबर, धेड उंबर, कडुनिंब (नीम-लिंबोणी), कढीलिंब, बकान नीम (बकाणा), महानीम, कदंब, कनकचंपा, करंज, मोठा करमळ, कवठ, कहांडळ, कळम (कळंब), काकड, कांचन, पिवळा कांचन, रक्तकांचन, श्वेतकांचन, काजरा, काटेसावर किनई, काळा कुडा, पांढरा कुडा, कुंती, कुंभा, कुसुम (कुसुंब) किंवा कोशिंब, कोकम, खडशिंगी, खरवत, खिरणी, खेजडी म्हणजेच शमी (प्रोसोपिस सिनेरारिया), खैर, गरुडवेल, गुंज, रतनगुंज, गेळा, गोळ, घटबोर, चंदन, चंदनचारोळी, चारोळी, चाफा, नागचाफा, सोनचाफा, चिंच, चिचवा, चीड (सरल किंवा पाईन – पायनस एक्सेलसा), जांभूळ, जायफळ, टेटू, टेमरू, टोकफळ, डलमारा, ताड, तांबट, तामण, दहीवण, दालचिनी, देवदार, धामण, धावडा, महाधावडा, रेशीम धावडा, नाणा, नांद्रुक (नांदुरकी), निरगुडी, नेपती, पळस, काळा पळस (तिवस किंवा रथद्रुम), पांगारा, बूच पांगारा, रानपांगारा, पाचुंदा, पाडळ, पायर, पारिजातक, पिंपळ, परस पिंपळ, पुत्रंजीव, पेटरा, पेटारी, पोलकी, फणस, फणशी, फालसा, बकुळ, जंगली बदाम, बहावा, बाभूळ, दुरंगी बाभूळ, बारतोंडी, बिब्बा, बीजा, बुरगुंड, बुरास, बूच, बेल, बेहडा, बोर, भुत्या, भूर्जपत्र, भेरा, भोकर, भोमा, माड, भेरली माड, मारवा, मुचकुंद, मेडशिंगी, मोई, मोखा, मोह, दक्षिण मोह, रबराचे झाड, रिठा, रुद्राक्ष, रोजवुड (शीशम-शिसवीचे झाड), रोहितक, लकूच, वड, वानवृक्ष, वायवर्ण, वारंग, पिवळा वारस, वावळ, वाळुंज (सावरकर स्मारकाजवळ असलेले हे झाड एकमेव आहे), शिवण, शिरीष, काळा शिरीष, संदन, साग, सालई, सुकाणू, सुपारी, सुरंगी, सोनसावर ऊर्फ गणेर (कोच्लोस्पेरम रेलिजियोसम), हिरडा, हिवर, वगैरे.

परदेशी वृक्ष

अगस्ता (हादगा), अनंत (केप जॅस्मिन), ट्री अँटिगोनान, रोज ॲपल (जाम), स्टार ॲपल, अंब्रेला ट्री, खोटा अशोक (पानाचा अशोक, मास्ट ट्री), आँकोबा, ऑर्किड ट्री (बटरफ्लाय फ्लॉवर), हाँगकाँग ऑर्किड ट्री, ब्राझिलियन आयर्नवुड, ऑलिव्ह, ऑस्ट्रेलियन चेस्टनट (न्यू इंग्लिश स्कूल समोर पंताच्या गोटात हे दुर्मीळ झाड आहे), मोगली एरंड (जट्रोफा), सिल्व्हर ओक, ऊर्वशी (ॲमहर्स्टिया नोबिलिस), कँडल ट्री, कण्हेर, पिवळा कण्हेर (बिट्टी), कँपेची ट्री (लॉगवुड), कमरक (करंबोला), कॅशियाच्या अनेक जाती, गुलाबी कॅशिया, रेड कॅशिया, काशीद (सयामी कॅशिया), कॉपर पॉड ट्री, इंडियन कॉर्क ट्री, स्कार्लेट कॉर्डिया, कॉलव्हिल्स ग्लोरी, काशीद (सयामी कॅशिया), कैलासपती (कॅननबॉल ट्री), कनांगा (यांग यांग), क्रेप मिर्टल, क्लुसिया (फॅट पोर्क ट्री), ख्रिसमस ट्री (ऑराकरिया), गमग्वायकम (लिग्नम व्हिटी), गिरिपुष्प (ग्लिरिसिडिया), गुजबेरी ट्री, गोल्डन बेल (पिवळा टॅबुबिया), पांढरा चाफा (डेडमॅन्स प्लॉवर, टेंपल ट्री), कवठी चाफा, तांबडा चाफा (रेड फ्लँगिपनी), गोरखचिंच (बाओबाब), विलायती चिंच (इमली), चेंडूफळ (पार्किया), सिंगापूर चेरी, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, जॅक्विनिया, जाम, टॅबुबियाच्या अनेक जाती, टॅबुबिया ॲव्हेलेनेडी, पिवळा टॅबुबिया (गोल्डन बेल), टिकोमा, आफ्रिकन ट्युलिप ट्री (स्पॅथोडिया), रोझी ट्रंपेट ट्री, ट्रॅव्हेलर्स ट्री, डाँबेया (वेडिंग प्लँट), डेडमॅन्स फ्लॉवर (टेंपल ट्री, पांढरा चाफा), ड्रासिना, तुती (मलबेरी), तुमा (मिलेशिया), जेरुसलेम थॉर्न, दिवी दिवी, निलगिरी (युकॅलिप्टस), पर्जन्य वृक्ष (रेन ट्री), ब्लॅक पर्ल, पामच्या अनेक जाती, अरेका पाम, चायनीज फॅन पाम, रॉयल पाम (बॉटल पाम), पावडरपफ, नीरफणस (ब्रेड फ्रूट ट्री), फिडल लीफ फ़िग, फिडल वुड ट्री, फ्लॉस सिल्क ट्री, बूच, तेल्पा माड (ऑइल पाम), गुलमोहर (फ्लँबॉयंट ट्री), नीलमोहर (जॅकारंडा), पीतमोहर (पेल्ट्रोफोरम), बटर फ्रूट ट्री (ॲव्होकॅडो), खोटा बदाम, बरसेरा (अत्तराचे झाड-लव्हेंडर ट्री), बिलिंबी, बिट्टी (पिवळा कण्हेर), बेगर्स बाऊल, बॉटल ब्रश, ऑस्ट्रेलियन बाभूळ, ब्रह्मदंड (सॉसेज ट्री), ब्लडवुड ट्री, ब्राउनिया, भद्राक्ष(गाउझुमा), मलबेरी (तुती), पेपर मलबेरी, महोगनी, आफ्रिकन महोगनी, मारखामिया, मोरपंखी (थूजा), राय‍आवळा, चेंजेबल रोज ट्री, लक्ष्मीतरू (सायमारुबा), शंबुकोश (सांबुकस), शेर (मिल्क बुश), संकासुर (शंखासुर, पीकॉक फ्लॉवर ट्री), मोठी सातवीण, गुलाबी सावर (शेविंग ब्रश ट्री), दिल्ली सावर, पांढरी सावर (कपोक), सॉसेज ट्री (ब्रह्मदंड), सुरू (कॅश्युरिना, खडसावर), सुबाभूळ (हॉर्स टॅमेरिंड, लुकेना), हुरा (सँडबॉक्स ट्री), स्पॅथोडिया (आफ्रिकन ट्युलिप ट्री), वगैरे.

पुण्यातील पक्ष

पुण्यात सुमारे ४०० जातींचे पक्षी आढळतात. त्यापैकी १५० जातींच्या पक्ष्यांची प्रभाकर कुकडोलकर यांनी काढलेली छायाचित्रे या ‘पुण्याचे पक्षी वैभव’ या पुस्तकात आहेत. या १५० जातींपैकी ४०हून अधिक जाती सहसा आढळून न येण्याऱ्या आहेत.

अर्थकारण

पुणे हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगरानंतर पुणे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. अजूनही पुणे शहराचा विकास वेगाने होत आहे. हे भारतातील बहुधा सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर असावे. जगातील सर्वाधिक दुचाक्या बनावणारा बजाज ऑटो उद्योग पुण्यात आहे. टाटा मोटर्स (भारतातील सर्वाधिक प्रवासी वाहतूक आणि औद्योगिक वाहने बनावणारा उद्योग), कायनेटिक, डाइमलर-क्रायस्लर (मर्सिडिझ-बेंझ), फोर्स मोटर्स (बजाज टेंपो) हे उद्योग पुण्याच्या परिसरात स्थिरावले आहेत.

पुण्यातील अभियांत्रिकी उद्योग – भारत फोर्ज (जगातील दुसरी सर्वांत मोठी फोर्जिंग कंपनी), कमिन्स, अल्फा लावल, सँडविक एशिया, थायसन क्रुप (बकाव वुल्फ), केएसबी पंप, फिनोलेक्स, ग्रीव्ह्‌ज इंडिया, फोर्ब्स मार्शल, थरमॅक्स इत्यादी.

विद्युत व गृहोपयोगी वस्तूनिर्माते व्हर्लपूल आणि एल.जी. यांचे उत्पादन करणारे कारखाने, फ्रिटो-लेज, कोका-कोला यांचे अन्न प्रक्रिया उद्योग पुण्यात आहेतच, शिवाय अनेक मध्यम व लहान उद्योगही पुण्यात आहेत. आंतरराष्ट्रीय हवाईमार्गाने पुणे जोडले गेले आहे. त्यामुळे जवळच्या जिल्ह्यांतील अनेक उद्योग निर्यात करू लागले आहेत.

पुण्यात माहिती-तंत्रज्ञान उद्योग विस्तारत आहे. हिंजवडीतील राजीव गांधी आय.टी पार्क, मगरपट्टा सायबरसिटी, तळवडे एम.आय.डी.सी. सॉफ्टवेअर पार्क, मॅरिसॉफ्ट आय.टी.पार्क (कल्याणीनगर), आय.सी.सी., इत्यादी आय.टी पार्क्समुळे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी उद्योगाची भरभराट चालू आहे.

महत्त्वाच्या भारतीय सॉफ्टवेअर कंपन्या- इन्फोसिस, टाटा, फ्ल्युएंट, क्सांसा, टी.सी.एस.टेक महिंद्राविप्रोपटनीसत्यमकॉग्निझंट, आयफ्लेक्स,सायबेज, के.पी.आय.टी. कमिन्स, दिशा, पर्सिस्टंट सिस्टम्स, जॉमेट्रिक सॉफ्टवेअर, नीलसॉफ्ट व कॅनबे पुण्यात आहेत.

महत्त्वाच्या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्या- बी.एम.सी. सॉफ्टवेअर, अमेझॉनमायक्रोसॉफ्ट, एनव्हिडिया ग्राफिक्स, एच.एस.बी.सी. ग्लोबल टेक्नोलॉजीज, आय.बी.एम., रेड हॅट, सिमेन्स, ई.डी.एस., यूजीएस, कॉग्निझंट, सिमँटेक, सनगार्ड, व्हर्संट, झेन्सार टेक्नॉलॉजीज, टी-सिस्टिम आणि एसएएस, आयपीड्रम वगैरे.

पुणे हे कॉल सेंटर किंवा बी.पी.ओ. उद्योगात देखील अग्रेसर आहे. कन्व्हरजिस, डब्ल्यू.एन.एस., इन्फोसिस, विप्रो, इएक्सएल, एमफेसिस या मोठ्या आऊटसोर्सिंग कंपन्या पुण्यात आहेत.

पुण्यातील काही मोठ्या कंपन्यांची मुख्यालये –

कमिन्स इंडिया लिमिटेडटेल्को/टाटा मोटर्स लिमिटेडबजाज ऑटो लिमिटेड,फोर्स मोटर्स लिमिटेडभारत फोर्ज लिमिटेड यासारखे उत्पादनक्षेत्रातील अनेक मोठे उद्योग येथे आहेत. १९९० च्या दशकात केपीआयटी कमिन्सइन्फोसिस,टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस,विप्रो,सिमँटेक,आय.बी.एम.,कॉग्निझंट सिंटेल सारख्या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपन्यांनी पुण्यात आपली केंद्रे उघडल्यापासून पुणे हे भारतातील एक प्रमुख माहितीतंत्रज्ञान उद्योगकेंद्र म्हणून नावारूपास आले आहे.

बाजारपेठ

पुण्यातील पारंपरिक बाजारपेठ: लक्ष्मी रस्ता

मार्केट यार्ड व महात्मा फुले भाजी मंडई (जुने नाव रे मार्केट) या ठिकाणे कृषी उत्पादनांचा तर रविवार पेठ हा भाग ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या घाऊक व्यापार चालतो. बुधवार पेठ ही विद्युत आणि संगणकीय उपकरणे, गरम कपडे, बॅगा, पुस्तके इत्यादी उत्पादनांच्या घाऊक आणि किरकोळ व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. तुळशीबाग हा बुधवार पेठेतील भाग तसेच डेक्कनवरील हाँगकाँग-लेन महिलांवर्गात लोकप्रिय नित्योपयोगी उत्पादनांच्या किरकोळ खरेदीसाठी लोकप्रिय आहे. अप्पा बळवंत चौक येथे शालेय व इतर पुस्तकांची बाजारपेठ आहे. लक्ष्मी रस्ता हा कपडा, तयार कपडे आणि सुवर्णालंकारांच्या खरेदीकरिता प्रसिद्ध आहे. कँप विभागातील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट येथे पाश्चात्त्य शैलीची उत्पादने मिळतात. त्याप्रमाणेच जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता या भागांतसुद्धा किरकोळ व्यापाराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला आहे.

पुण्यातल्या महात्मा फुले मंडईतून अनेक राजकीय कार्यकर्ते उदयास आल्याने या मंडईला लोक कौतुकाने मंडई विद्यापीठ म्हणतात. मंडईत महात्मा फुले मंडई प्रतिष्ठान या नावाच्या संस्थेचे कार्यालय आहे. प्रतिष्ठानच्या खटपटीमुळे मंडईचा ३०० मीटर त्रिज्येचा परिसर ‘वाय-फाय’ झाला आहे. ५०,००० गिगाबाईट्स एवढी या वाय-फाय सेवेची क्षमता असून त्या परिसरात एकाच वेळी कितीही लोक मोफत इंटरनेट वापरू शकतात.

खाद्य पदार्थ विकणारे फेरीवाले

पुण्यामध्ये असंख्य चहाच्या टपऱ्या आहेत. मनपसंत चवीचा चहा ह्या टपऱ्यांवर स्वस्त दरात मिळत असल्याने या टपऱ्यांचा धंदा जोरात चालतो. अन्य खाद्यपदार्थ विकणारे गाडीवालेही आहेत.

२०१३ सालच्या डिसेंबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे पुणे शहरात रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांची आकडेवारी

व्यवसायाचा प्रकार नोंदणीधारक परवानाधारक
चहा, कॉफी, वडापाव, ऑम्लेट, स्नॅक्स ३६२८ ३४५
भेळ, पाणीपुरी, चॅट ७६९ २०
चिनी खाद्यपदार्थ ३१२ १३
उसाची गुऱ्हाळे १९७

प्रशासन

नागरी प्रशासन

महानगरपालिका इमारत

पुणे शहराची व्यवस्था पुणे महानगरपालिका पाहते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय.ए.एस. अधिकारी दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. महानगरपालिका मतदारांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांनी बनते. नगरसेवकांचे नेतृत्व महापौर या पदावरील व्यक्तीकडे असते. महापौर हे केवळ नाममात्र पद असून या पदाकडे अधिकार कमी असतात. पुणे महापालिकेचे क्षेत्र हे ४८ प्रभागात विभागले गेले असून प्रत्येक विभागाचे कामकाज साहाय्यक आयुक्त पहात असतात. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार महापालिकेच्या नगरसभेवर निवडून येण्यासाठी उभे करतात.

जिल्हा प्रशासन

पुणे शहर महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा, जमीनजुमल्याच्या नोंदी ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते.

महानगर पोलीस यंत्रणा

पोलीस आयुक्त हा पुणे पोलिसांचा प्रमुख असतो. यो राज्याच्या गृह मंत्रालयाने नेमलेला एक आय. पी. एस्‌. अधिकारी असतो. पुणे पोलीस व्यवस्था ही महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते.

वाहतूक व्यवस्था

पुण्यातील रस्त्यावरील एक दृष्य

पुणे शहराबाहेरून जाणाऱ्या मुंबई-बंगलोर महामार्गाचे चित्र

पुणे शहर भारताच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी रस्ता, रेल्वे व हवाईमार्गाने चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. पुणे विमानतळावरुन एक मिलिटरी विमानतळ आहे. पूर्वी फक्त देशांतर्गत वाहतूक चालत असे पण आता सिंगापूर व दुबईला जाणाऱ्या उड्डाणांमुळे, विमानतळ आंतरराष्ट्रीय झाला आहे.

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक

रात्री दिसणारा सिंहगड रस्ता

नवा ग्रीनफिल्ड पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प महाराष्ट्र सरकार सुरू करणार असून तो चाकण व राजगुरुनगर या गावांमधील चांदूस व शिरोळी यांच्या जवळ (पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर) होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सोपवली गेली आहे.

पुणे उपनगरी रेल्वे

शहरात पुणे व शिवाजीनगर ही दोन महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. पुणे स्थानकावर सर्व रेल्वेगाड्या थांबतात. पुणे व लोणावळादरम्यान उपनगरी रेल्वे वाहतूक चालते. त्यामुळे पिंपरीखडकी व चिंचवड ही उपनगरे शहराशी जोडली गेली आहेत. पुण्याच्या उपनगरी गाड्या लोणावळ्यापर्यंत जातात तर मुंबईच्या कर्जत पर्यंत येतात. मध्ये फक्त घाटमार्ग आहे. रेल्वे प्रशासन लोणावळा व कर्जत/खोपोली ह्या गावांदरम्यानही स्थानिक उपनगरी गाड्या चालू करण्य़ाचा विचार करीत आहे. असे होऊ शकले तर, पुणे-मुंबईच्या दरम्यान असलेल्या कुठल्याही स्थानकावरून दुसऱ्या कुठल्याही स्थानकाला गाडी न बदलता जाता येईल. कर्जत-पनवेल लोहमार्ग तयार झाला असून त्यामुळे पुणे-मुंबई शहरातील अंतर २९ कि.मी.ने कमी झाले आहे. मात्र या मार्गावरून अजून फार गाड्या धावत नाहीत.

पुणे व मुंबई दरम्यानची रस्तावाहतूक मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे वेगवान झाली आहे. यामुळे दोन्ही शहरांदरम्यान केवळ तीन तासांचे अंतर राहिले आहे. शासकीय व खाजगी बससेवा पुण्याला मुंबईहैदराबाद व बंगळूर या शहरांशी जोडतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे (एस.टी) बससेवा पुण्याला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी जोडते.

पुणे शहर हे महत्त्वाचे आय.टी. (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) केंद्र आहे. पुण्यात चाकरमानी वाढत आहेत त्याचबरोबर गाड्या(कार)/दुचाक्यांची संख्या वाढत आहे. २००५ मध्ये पुण्याच्या १४६ चौ.कि.मी क्षेत्रफळात २०,००,०० कार (मोटारगाड्या) व १०,००,००० दुचाक्या होत्या असे एका अभ्यासात नमूद केले आहे.

तीन माणसे बसू शकतील अशा रिक्षा हे शहरांतर्गत वाहतुकीचे मुख्य साधन आहे. डिसेंबर २०१४ मध्ये पुण्यात सुमारे ५० हजार ऑटोरिक्षा होत्या. त्यांपैकी पेट्रोलवर चालणाऱ्या ११,३१२, डिझेलवरच्या १,९८४, सीएनजी (काँप्रेस्ड नॅचरल गॅस)वरच्या २७,०९४ तर एलपीजी (लिक्विड पेट्रोलियम गॅस)वर चालणाऱ्या ३,९५१ रिक्षा होत्या. हे आकडे पिंपरी-चिंचवडसाठी अनुक्रमे, १,५६८, ८०६, २,८२१ आणि ३६ होते.

पुण्यातील उपनगरे कल्याणीनगर, विमाननगर, मगरपट्टा, पिंपरी, चिंववड, बाणेर, वाकड, औंध, हिंजवडी, बिबवेवाडी, वानवडी, निगडी-प्राधिकरण झपाट्याने वाढत आहेत पण अरुंद रस्ते वाढत्या वाहनांना कमी पडत आहेत. रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल वगैरे प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित आहेत. काही पूल बांधून तयार झाले आहेत. तरीही, महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे योजना अंमलात यायला खूप वेळ लागतो.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरी ठरत आहे. पी.एम.टी. (पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट) व पी.सी.एम.टी. (पिंपरी-चिंचवड म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट) या अनुक्रमे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाहतूक व्यवस्थांचे एकत्रीकरण होऊन आता पी.एम.पी.एल. (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड) ही संस्था पुण्याची सार्वजनिक बस वाहतूक सांभाळते. वाहतूक-कोंडीमुळे मोटारगाडीचालक व दुचाकीचालक त्रस्त असतात, तर पार्किंगची अपुरी व्यवस्था त्यांना आणखी जेरीस आणते.

पुणे रेल्वे स्थानक

पुणे रेल्वे स्टेशनच्या ऐतिहासिक इमारतीचे उद्‌घाटन मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या उपस्थितीत २७ जुलै १९२५ रोजी करण्यात आले. इमारतीचा आराखडा १९१५ मध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष कामास प्रारंभ १९२२ मध्ये झाला आणि तीन वर्षात काम पूर्ण झाले. इमारतीच्या उद्‌घाटनाच्या दिवशी मुंबईहून एक विशेष रेल्वेगाडी पुण्यात आणण्यात आली होती. पुणे स्थानकाच्या इमारतीचा मूळ आराखडा ब्रिटिशकालीन आहे. पुणे स्टेशन आणि लाहोर जंक्शनचे डिझाइन एकसारखे आहे. पुण्याच्या स्टेशनची इमारत बांधण्यासाठी त्या वेळी पाच लाख ७९ हजार ६६५ रुपये खर्च आला होता.

इ.स. १९२९ मध्ये पुणे स्थानकात पहिली विजेवरची गाडी धावली. १९३० मध्ये जागतिक कीर्तीची डेक्कन क्वीन ही गाडी सुरू झाली. आशियातील पहिली दोन मजली आगगाडी- सिंहगड एक्सप्रेस– हीही पुण्यातूनच निघाली.

पुणे रेल्वे स्थानकाला २००२ साली रेल्वे बोर्डाने मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून गौरविले होते. सुपर फास्ट, गरीब रथ, एक्स्प्रेस, मेल, पॅसेंजर, लोकल यांसारख्या २३० गाड्या दररोज पुणे स्थानकावरून धावत असून दरोरज चार ते पाच लाख प्रवासी प्रवास करतात. २०१५च्या सुमारास स्थानकात सात साधारण आणि दोन व्हीआयपी असे एकूण नऊ फलाट होते.

लोकजीवन

पुणे शहराच्या लोकसंख्येत गेल्या २० वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. १९९१ च्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या ११ लाख होती. २००१ साली ती २५ लाख झाली. २०११ साली ती ५० लाखाच्या वर जाण्याची शक्यता आहे, ज्यात पिंपरी चिंचवड ह्या जुळ्या शहराची लोकसंख्याही समाविष्ट आहे. पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर आहे परंतु पुण्याच्या शहरी अर्थव्यवस्थेचा क्रमांक सहावा आहे. पुण्याचा दरडोई उत्पन्नाबाबत (per capita income) पहिला क्रमांक लागतो.

पुण्यात राहणाऱ्यांना पुणेकर असे संबोधतात. शहराची मुख्य भाषा मराठी असून इंग्रजी व हिंदी भाषादेखील बोलल्या जातात. पुणे शहरात सॉफ्टवेअर व वाहननिर्मिती व्यवसायात झपाट्याने गुंतवणूक होत आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात परप्रांतीय शहरात दाखल होत आहेत व लोकसंख्येत भर पडत आहे. पुणे शहराच्या विकासाबरोबर पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. शांत समजले जाणारे पुणे शहर १४/०२/२०१० रोजी झालेल्या बॉम्बस्फोटामुळे हादरले.

काही अपवाद वगळता पुणे हे भारतातील एक कायदा आणि सुव्यवस्था असलेले प्रगतीशील शहर समजले जाते.

पुण्याची भगिनी शहरे

ही शहरे पुण्याची भगिनी शहरे आहेत –

संस्कृती

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी समजली जाते. पुण्यात बोलली जाणारी भाषा ही मराठी भाषेची प्रमाणबोली (standard) मानली जाते. पुण्यात वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. पुणेकरांना संगीत, कला, साहित्याची जबरदस्त आवड आणि जाण आहे.

गणेशोत्सव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

पुण्यातील सार्वजनिक गणेश उत्सव

इ.स.१८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. भाद्रपद (ऑगस्ट किंवा सप्टेंबर) महिन्यात येणाऱ्या या सणाच्या दहा दिवसांत अवघे पुणे शहर चैतन्यमय असते. देशपरदेशांतून लोक हा उत्सव पाहण्यासाठी पुण्यात येतात. जागोजागी लहान-मोठी गणेश मंडळे मंडप उभारून देखावे सजवतात. या पुण्याचा प्रसिद्ध गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुणे फेस्टिव्हल नामक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजते. या कार्यक्रमात संगीत, नृत्य, मैफिली, नाटक आणि क्रीडा हे प्रकार समाविष्ट असतात. दहा दिवस चालणारा हा सण गणेशविसर्जनाने समाप्त होतो. अनंत चतुर्दशीला सकाळी सुरू होणारी विसर्जन मिरवणूक पुढच्या दिवसाच्या पहाटेपर्यंत चालते. मिरवणुकीसाठी पहिल्या पाच गणपती मंडळांचे अग्रक्रम ठरलेले आहेत.

कसबा गणपती-पुण्याचे ग्रामदैवत

  1. १.कसबा गणपती(हे पुण्याचे ग्रामदैवत आहे)
  2. तांबडी जोगेश्वरी गणपती
  3. गुरुजी तालीम गणपती
  4. तुळशीबाग गणपती
  5. केसरीवाडा गणपती(हे मंडळ टिळक पंचांगाप्रमाणे गणेशोत्सव साजरा करते.)

पुण्यातील गणेशोत्सव मंडळे प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती विसर्जित करून उत्सवमूर्ती परत नेतात. विसर्जन मिरवणुकीत ढोल, लेझीम अशी अनेक पथके असतात. अनेक शाळाही आपली पथके पाठवतात.

नवरात्र

फार पूर्वीपासून, पुणे शहरात असलेल्या तांबडी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी आणि चतु:शृंगी या तीनच देवींच्या देवळात नवरात्राची खास पूजा होत आली आहे. या देवींना नवरात्राच्या प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाची साडी नेसून वेगळ्या वाहनावर बसविले जाते. देवीची सजावट पाहण्यासाठी पुणेकर या देवळांना भेट देत आले आहेत. या नऊ दिवसांत चतुःशृंगीची यात्राही असते. दसऱ्याच्या दिवशी त्या यात्रेची समाप्ती होते.

पुण्यातल्या आणखीही काही देवळांमध्ये अशाच प्रकारे नऊ दिवस वेगवेगळी आरास करून देवीला नटवण्याची प्रथा काही वर्षांपासून सुरू आहे. कसबा पेठेतील त्वष्टा कासार समाजाची कासारदेवी त्यांपैकी एक आहे. नवरात्र जिथे साजरा होतो अशी आणखी काही देवळे :-
सप्तशृंगी महालक्ष्मी मंदिर, शिवदर्शन-सहकारनगरमधील महालक्ष्मी मंदिर, भवानी पेठेतील भवानी माता मंदिर, मुक्तांगण शाळेजवळील लक्ष्मीमाता मंदिर, वगैरे.

या दिवसात मुलींचे भोंडले होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्याची जागा आता गरब्याने घेतली आहे.

एके काळी पुण्यातील काही विशिष्ट देवळांमध्येच साजरे होणारे नवरात्र आता (२०१३ साली) २६८ देवळांत होऊ लागले आहे. असा नवरात्राचा उत्सव साजरा करणारी एकूण १२९२ मंडळे पुण्यात आहेत. त्यांपैकी १०२४ ठिकाणी सार्वजनिक उत्सव होतो. ३३१ मंडळे दुर्गापूजेच्या दिवशी मिरवणूक काढतात, तर २७२ मंडळे दसऱ्याच्या दिवशी आणि ३६४ मंडळे कोजागिरी पौर्णिमेला मिरवणूक काढतात.

पुणे शहरात २०१३सालच्या विजयादशमीला २९ ठिकाणी रावणदहनाचा कार्यक्रम ठेवला होता.

संगीत विद्यालये

संगीत विषयक कार्यक्रम करणाऱ्या संस्था आणि त्यांचे कार्यक्रम

  • आर्य संगीत प्रसारक मंडळ (सवाई गंधर्व संगीत महोत्सव)
  • कलाश्री संगीत महोत्सव (कलाश्री संगीत भजनी मंडळ; १९९८ सालापासून)
  • गानवर्धिनी
  • गानसरस्वती महोत्सव
  • जादू सिनेसंगीताची (राहुल देशपांडे + चंद्रशेखर महामुनी)
  • मटा कल्चर क्लब
  • मित्र फाउंडेशन
  • रवींद्र संगीताचे कार्यक्रम (ICCR)
  • रोहिणी भाटे (संवेदन मैफल)
  • वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान (वसंतोत्सव)
  • सप्तसूर कलामंच (संगीत सभा)
  • संवादिनी
  • साहित्य संगीत कला मंच
  • सुमन कल्याणपूर संगीत रजनी
  • सुराविष्कार (गानवर्धन आणि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्ट‌‍‌(‌स
  • स्नेह गीत (नेहा चिपळूणकर यांचा जुन्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम)
  • स्वरझंकार (कार्यक्रम – संगीत महोत्सव)
  • सृजन फाऊंडेशन (सृजन महोत्सव)

वाद्य विक्रेते

  • अजित मिरजकर
  • हरिभाऊ मेहेंदळे (V. Mehendale)
  • युसुफ मिरजकर

वाद्य कारागीर

  • यशवंतराव नाईक (यांना गानसंवर्धब संस्थेतर्फे वाद्य कारागीर पुरस्कार मिळाला आहे.)
  • पुरुषोत्तम जोग(यांना गानसंवर्धब संस्थेतर्फे वाद्य कारागीर पुरस्कार मिळाला आहे.)
  • साबण्णा बुरूड(यांना गानसंवर्धब संस्थेतर्फे वाद्य कारागीर पुरस्कार मिळाला आहे.)

सवाई गंधर्व संगीत महोत्सव

पंडित भीमसेन जोशी ह्यांनी पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला. दरवर्षी हिवाळ्यामध्ये हा अभिजात संगीताचा सोहळा पुण्यात होतो. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात सुप्रसिद्ध कलावंत हिंदुस्तानी व कर्नाटकी गायन, वादन व नृत्याचे संगीत प्रकार सादर करतात. संगीतप्रेमींना हा उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते. हा महोत्सव आर्य संगीत प्रसारक मंडळ भरवते.

वसंतोत्सव

दरवर्षी हिवाळ्यामध्ये वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान तर्फे “वसंतोत्सव” हा संगीत महोत्सव साजरा केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात अनेक कलावंत आपली कला सादर करतात. अभिजात संगीताबरोबरच नवीन प्रकारचे संगीतही येथे सादर केले जाते.

रंगभूमी

पुणे हे मराठी बुद्धिजीवींचे शहर आहे. मराठी रंगभूमी ही मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मराठी नाटके मग ती प्रायोगिक असो वा व्यावसायिक, पुण्यातील मराठी रसिक आवडीने पाहतात. टिळक स्मारक मंदिरबालगंधर्व रंगमंदिरभरत नाट्य मंदिरयशवंतराव चव्हाण नाट्यगृहसुदर्शन रंगमंच, गणेश कला क्रीडा मंच, नेहरू मेमोरियल हॉल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, विजय तेंडुलकर नाट्यगृह व रामकृष्ण मोरे – पिंपरी चिंचवड नाट्यगृह ही पुण्यातील व आसपासची महत्त्वाची नाट्यगृहे आहेत. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सुदर्शन रंगमंच हौशी कलावंतांना चांगले व्यासपीठ पुरवते. या यतिरिक्त बऱ्याच महाविद्यालयांची वर्तुळाकार प्रेक्षागृहे (amphitheatres) आहेत.

नाट्योत्सव आणि ते भरवणाऱ्या संस्था

पुण्यात होणारे नाट्योत्सव :-

  • रंगमहोत्सव (महाराष्ट्र कल्चररल सेंटर)
  • नाट्यसत्ताक रजनी (वाईड विंग्ज मीडिया)

चित्रपट

पुण्यात २३ मल्टिप्लेक्स आहेत. त्यांत एकूण ११६ पडदे आहेत. य पडद्यांवर मराठीहिंदी भाषा व इंग्रजी चित्रपट दाखविले जातात. अजून १० मल्टिप्लेक्स (५४ पडदे) सुरू होणार आहेत (५-१०-२०१७ ची स्थिती). पुणे स्थानकाजवळील आयनॉक्स, नगर रस्त्यावरील पी.व्ही.आर व सिनेमॅक्स ,विद्यापीठ रस्त्यावरील ई-स्क्वेअर, सातारा रस्ता, कोथरूड, डेक्कन, सिंहगड रोड येथील सिटीप्राइड, कल्याणीनगर येथील गोल्ड लॅब्स आणि आकुर्डी येथील फेम गणेश व्हिजन ही पुण्यातील मल्टिप्लेक्स आहेत. मराठी चित्रपट प्रामुख्याने प्रभात आणि सिटीप्राइड या चित्रपटगृहांत पहायला मिळतात. (प्रभात टॉकीज डिसेंबर २०१४मध्ये बंद होऊन २०१७मध्ये परत चालू झाले.).

पुण्यात बंद झालेली एकपडदा चित्रपटगृहे :- अनंत, अल्पना (शिरीन), आर्यन, एक्सेलसिअर, न्यू एम्पायर, जय हिंद, डीलक्स, नटराज (हिंदविजय), निशांत, भानुविलास, भारत, मिनर्व्हा, लिबर्टी, विजयानंद, वेस्टएंड, श्रीनाथ (ग्लोब), सोनमर्ग,

पुण्यात चालू असलेली एकपडदा चित्रपटगृहे :- अपोलो, अप्सरा, अरुण, अलका, अलंकार, अशोक, गुंजन, जयश्री, नीलायम, फन स्क्वेअर (दोन पडदा), रतन (पॅरेमाऊंट), राहुल (दोन पडदा), लक्ष्मी किबे (प्रभात), लक्ष्मीनारायण, वसंत, विजय, वैभव (दोन पडदा), व्हिक्टरी, श्रीकृष्ण.

व्याख्यानमाला

पुण्यात वक्तृत्वोत्तेजक सभा नावाची एक खूप जुनी संस्था आहे. तिच्यातर्फे पुण्यात अनेक वर्षे वसंत व्याख्यानमाला चालू आहे. त्यात भर पडत पडत आज २०१८ साली पुण्याच्या पिंपरी-चिंचवड भागात सुमारे ३२ व्याख्यानमाला चालतात. यांच्याद्वारे वर्षातील १००हून अधिक दिवस विविध व्याख्याने होत असतात. या चळवळीत पिंपरी-चिंचवड शहर व्याख्यानमाला समन्वय समितीचे मोठे योगदान आहे.

काही व्याख्यानमाला आणि वक्तृत्वस्पर्धा:-

  • आचार्य अत्रे स्मृती व्याख्यानमाला (विनोद विद्यापीठ, लकाकि रोड, शिवाजीनगर)
  • अविनाश धर्मामधिकारी व्याख्यानमाला
  • आर. डब्ल्यू. नेने प्रबोधनमाला
  • आरोग्य व्याख्यानमाला
  • इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स आयोजित व्याख्याने
  • महर्षी कर्वे व्याख्यानमाला
  • कृष्णराव भेगडे व्याख्यानमाला (तळेगांव दाभाडे)
  • जनवित्त अभियान
  • जय भवानी तरुण मंडळाची व्याख्यानमाला (मोहननगर-चिंचवड)
  • जयहिंद लोकजागर व्याख्यानमाला (संभाजी चौक, निगडी)
  • जानकीबाई आणि कृष्णाजी नूलकर व्याख्यानमाला
  • जिजाऊ व्याख्यानमाला (गांधीपेठ तालीम; भोजापूर, वगैरे वगैरे)
  • संत तुकाराम व्याख्यानमाला (तळेगाव)
  • पसंत व्याख्यानमाला (ही व्याख्यानमालापु.बा. जोग यांनी चालवली होती, आता बंद झाली)
  • पिंपरी चिंचवड महापाल्का व्याख्यानमाला
  • फुले-शाहू-आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला
  • भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर (वर्षभर व्याख्याने चालू असतात)
  • मधुश्री कलाविष्कार संस्थेची मधुश्री व्याख्यानमाला (निगडी प्राधिकरण)
  • मसाप गप्पा
  • माधव मदाने स्मृती व्याख्याने
  • रामभाऊ गोडबोले स्मृती व्याख्यानमाला
  • रोटरी क्लब निगडीच्या व्याख्यानमाला (शिशिर व्याख्यानमाला, वगैरे)
  • लोकसत्ता प्रणीत वक्ता दशसहस्रेषु वक्तृत्व स्पर्धा (मुंबई)
  • वसंत व्याख्यानमाला (निगडी)
  • वसंत व्याख्यानमाला (पुणे)
  • विजय तेंडुलकरस्मृती व्याख्यानमाला
  • स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला (तळेगाव)
  • शारदीय ज्ञानसत्र
  • छत्रपती शिवाजी व्याख्यानमाला (निगडी)
  • शिशिर व्याख्यानमाला (चिंचवड)
  • साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर वसंत व्याख्यानमाला
  • सिद्धिविनायक वार्षिक व्याख्यानमाला (संभाजीनगर-चिंचवड)
  • स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्‍व स्पर्धा
  • स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमाला (निगडी)
  • स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानची व्याख्यानमाला (संभाजीनगर-चिंचवड)
  • मराठी ग्रंथोत्तेजक संस्थेची सिंहावलोकन व्याख्यानमाला
  • प्रा. सुखात्मे व्याख्यानमाला
  • क्षितिजाच्या पलीकडे व्याख्यानमाला (दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि संशोधन केंद्र)
  • एस.जी.रानडे ट्रस्टतर्फे घेतली जाणारी राज्यस्तरीय स्व.लक्ष्मीबाई रानडे वक्तृत्व स्पर्धा.ही पुण्यातील सर्वात दर्जेदार स्पर्धा म्हणून ओळखली जाते. (सुरुवात-इ.स.१९३४)

पुणे शहरातली सभागृहे

  • अण्णा भाऊ साठे सभागृह
  • अत्रे सभागृह
  • एस.एम. जोशी सभागृह (गांजवे चौक)
  • मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक, कोरेगाव पार्क
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मंगळवार पेठ
  • सिंबॉयोसिस संस्थेचे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक खुले सभागृह
  • एस.एन.डी.टी. कॉलेजचे सभागृह
  • आबासाहेब गरवारे कॉलेज सभागृह
  • ग.ल. आपटे सभागृह
  • एस.एम. जोशी सभागृह
  • गणेश कला क्रीडा मंच
  • गणेश सभागृह
  • मधुसंचय गणेश मंदिर सभागृह
  • गोखले सभागृह
  • चव्हाण केंद्रातील मुख्य सभागृह, रंगस्वर सभागृह व सांस्कृतिक सभागृह
  • ज्योत्त्स्ना भोळे सभागृह (टिळक रोड)
  • टिळक स्मारक मंदिर सभागृह
  • तारापोर सभागृह
  • दरोडे सभागृह
  • नामदेव सभागृह
  • नीतू मांडके आयएमए सभागृह
  • नेहरू मेमोरियल हॉल
  • जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन (घोले रोड)
  • पत्रकार भवन सभागृह (गांजवे चौक)
  • पारिजात सोसायटीचे सभागृह (बिबवेवाडी)
  • फादर बार्को सभागृह
  • बालगंधर्व सभागृह
  • बालशिक्षण मंदिर सभागृह (कोथरूड)
  • बाळासाहेब ठाकरे कलादालन, सारसबाग
  • ॐकार बेडेकर गणपती सभागृह
  • भीमसेन जोशी कलादालन, सहकारनगर (?)
  • मधुसंचय गणेश मंदिर सभागृह
  • महात्मा फुले सभागृह, वानवडी
  • महापालिका सभागृह
  • माधवराव पटवर्धन सभागृह (मराठी साहित्य परिषद)
  • मुनोत सभागृह
  • देवी रमाबाई सभागृह (स.प. महाविद्यालय)
  • लोकमान्य सभागृह
  • वराहमिहीर सभागृह
  • विजय तेंडुलकर नाट्यगृह (अरण्येश्वर)
  • विणकर सभागृह (पद्मावती)
  • विष्णुप्रसाद सभागृह
  • शकुंतला शेट्टी सभागृह, (कर्नाटक हायस्कूल)
  • सह्याद्री सदन सभागृह
  • सावित्रीबाई फुले सभागृह, भवानी पेठ
  • सिद्धार्थ हॉल
  • सोनल हॉल
  • स्नेहसदन सभागृह
  • स्वप्नपूर्ती सभागृह
  • क्षिप्रा सभागृह
  • ज्ञानेश्वर नरहरे सभागृह

धर्म-अध्यात्म

चतुःशृंगी हे देऊळ शहराच्या वायव्य डोंगर-उतारांवर आहे. या मंदिराची उंची ९० फूट व रुंदी १२५ फूट आहे. याची व्यवस्था चतु:शृंगी देवस्थान पाहते. दर वर्षी आश्विन महिन्यातल्या नवरात्रीच्या दिवसांत मंदिरात जत्रेनिमित्त विशेष गर्दी असते.

शहरातील टेकडीवर पर्वती हे देवस्थान आहे.

पुण्याजवळील आळंदी व देहू येथे विठ्ठलाची मंदिरे आहेत. आळंदीत संत ज्ञानेश्वर यांची समाधी तर देहू येथे संत तुकारामांचे वास्तव्य होते. दरवर्षी वारकरी संप्रदायाचे लोक या संताच्या पालख्या घेऊन पंढरपुरास पायी जातात. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपुरात वारी पोहोचते.

पुण्यात भारतीय ज्यू लोकांची (बेने इस्रायल) मोठी वस्ती आहे. पुण्यात ओहेल डेव्हिड हे इस्रायल देशाबाहेरचे आशियातील सर्वांत मोठे, लाल चर्च म्हणून ओळखजे जाणारे सिनेगॉग (ज्यूंचे प्रार्थनास्थळ) आहे.

पुणे हे मेहेरबाबा यांचे जन्मस्थान तर रजनीश यांचे वसतीस्थान होते. कै.रजनीश यांच्या आश्रमात देशी-परदेशी पर्यटक भेट देतात. आश्रमात ओशो व झेन या बागा व एक मोठे ध्यानगृह आहे.

कबरी, मशिदी, दर्गे

  • धाकटा शेखसल्ला(हजरत ख्वाजा शेख सलाउद्दीन चिश्ती) दर्गा
  • मोठा शेखसल्ला दर्गा
  • गारपीर (शमशाद हुसेन खान)
  • साचापीर (अब्दुल रझाक)
  • सुभानशा दर्गा, बोहरी आळी
  • अल्लाउद्दीनसाहेब पीर (सर्किट हाउसच्या समोर)
  • कुतुबुद्दीन पीर (दारूवाला पुलाजवळ)
  • पेन्शनवाला मशीद (क्वार्टर गेटजवळ]]
  • मस्तानीची कबर (शनिवारवाड्याशेजारी)

खवय्येगिरी

सुजाता मस्तानी

काका हलवाई यांचे गोड पदार्थ, चितळे बंधूंची बाकरवडी, सुजाता व कावरे कोल्ड्रिंक्स यांची मस्तानी, बुधाणींचे बटाटा वेफर्स, लक्ष्मीनारायण चिवडा हे सर्व पदार्थ म्हणजे पुण्याची खासियत. जंगली महाराज रस्ता, कँप मधील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट, फर्ग्युसन रस्ता ही पुण्यातील खवय्यांची आवडती ठिकाणे आहेत. फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली खूप प्रसिद्ध आहे. अमृततुल्य नावाची चहाची दुकाने शहराच्या संस्कृतीचा भाग आहे. इतर महाराष्ट्रीय शहरांप्रमाणे मिसळवडा-पाव हे खाद्यपदार्थ पुण्यात जागोजागी मिळतात.

पुण्यातील डायनिंग हॉल्स हे अजून एक वैशिष्ट्य. स्वस्त असणारे हे हॉल आरामदायक तर असतातच पण ‘अमर्यादित खा!’ हा भाग विशेष उल्लेखनीय. रस्त्यांवरील गाड्यांवर मिळणारे कच्छी दाबेली, भेळपाणीपुरी इत्यादी गोष्ठी इतर शहरांप्रमाणेच पुण्यातही प्रसिद्ध आहेत. जुन्या शहरातील कोल्हापुरी जेवण पुणेकरांना आवडते.

पुण्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली बहुतांशी उपाहारगृहे शाकाहारी आहेत. जंगली महाराज ह्या सुप्रसिद्ध रस्त्यावर अशी जवळ जवळ २५ हॉटेले आहेत. (महाराष्ट्रात उपाहारगृहाला हॉटेल म्हणतात.)

मद्यप्रेम

३१ मार्च २०१२ अखेरच्या वर्षभरात ५१२ कोटी रूपयांची दारू पुण्यात रिचविली गेली.

प्रसारमाध्यमे

सकाळलोकसत्तालोकमतपुढारी ,महाराष्ट्र टाइम्सकेसरीप्रभातआपलं महानगर ही मराठी वृत्तपत्रे तर इंडियन एक्सप्रेसटाइम्स ऑफ इंडियासकाळ टाइम्स, व महाराष्ट्र हेराल्ड ही इंग्लिश वृत्तपत्रे लोकप्रिय आहेत. आकाशवाणी, ज्ञानवाणी,रेडियो मिर्चीरेडियो सिटीविविध भारतीरेडियो वन व पुणे विद्यापीठाची विद्यावाणी ही रेडियोकेंद्रे पुण्यात ऐकता येतात. कलर मराठी, झी मराठीई टीव्ही मराठीसह्याद्री दूरदर्शन या मराठी दूरचित्रवाहिन्या पुण्यात विशेष लोकप्रिय आहेत. पुणेकर अनेक हिंदी व इंग्रजी वाहिन्या देखील पाहतात. बीएसएनएल, टाटा व रिलायन्स या प्रमुख कंपन्या आंतरजाल (इंटरनेट) सेवा पुरवतात.

शिक्षण

पुणे विद्यापीठ

भारताच्या स्वातंत्र्यानंतर पुणे हे शिक्षण व संशोधन क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवू लागले. पुणे विद्यापीठराष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळाराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एनडीए) या संस्था स्थापन झाल्यामुळे पुण्याला हे शक्य झाले. फर्ग्युसन महाविद्यालय, स.प. महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्थांमुळे पुणे हे इ.स. १९०० पासुन नामांकित होतेच.

पुण्याला जवाहरलाल नेहरू यांनी पूर्वेकडचे ऑक्सफर्ड असे संबोधले होते. पुण्यात अनेक नामांकित शिक्षण संस्था आहेत. येथे शिकायला देशातून व परदेशातूनही विद्यार्थी येत असतात. पुणेकरदेखील उच्च शिक्षण-संशोधनाबद्दल जागृत आहेत.

शहरात सर्व विषयातील उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध आहेत. पुणे विद्यापीठराष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL), आयुका (IUCAA), आघारकर संशोधन संस्था (ARI), सी-डॅक (C-DAC), राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था (NIV), राष्ट्रीय कोषिका विज्ञान संस्था (NCCS), यशदाभांडारकर संशोधन संस्थाद्राक्षे- राष्ट्रीय संशोधन केंद्र (NRC-Grapes), कांदा आणि लसूण- राष्ट्रीय संशोधन केंद्र (NRC- Onion and Garlic), राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER), ईर्षा (IRSHA), वनस्पती सर्वेक्षण संस्था (BSI), सैन्यदलांचे मेडिकल कॉलेज (AFMC), राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र(NCRA) सारख्या अनेक संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करत आहेत.

शालेय व विशेष शिक्षण

पुणे महानगरपालिका अनेक शाळा चालवते. परंतु पालकांचा कल मुलांना खाजगी शाळेत घालण्याकडे असतो.

यातील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (SSC Board) किंवा केंद्रीय बोर्ड (सीबीएसई) या संस्थांशी संलग्न असतात. काही शाळा सीनियर केंब्रिज पुरस्कृत ICSE अभ्यासक्रम चालवतात. पुणे हे जपानी भाषेच्या शिक्षणाचे भारतातील सर्वांत मोठे केंद्र आहे. पुणे विद्यापीठासह इतरही अनेक संस्था जपानी भा़षेचे शिक्षण देतात. जर्मन (मॅक्स म्युलर भवन)फ्रेंच (आलियाँस फ्राँसे द पूना) या भाषादेखील (कंसात दिलेल्या संस्थांमध्ये) शिकविल्या जातात. काही शाळा इयत्ता आठवीपासून रशियनजर्मन व फ्रेंच या भाषा पर्यायी विषय म्हणून शिकवतात. रमण बाग प्रशाला,न्यू इंग्लिश स्कूल, ज्ञान प्रबोधिनी प्रशालाअक्षरनंदननू.म.वि.साधना विद्यालय हडपसर या काही शाळा पुण्यात प्रसिद्ध आहेत.

ज्ञान प्रबोधिनी पुणे वास्तू कळस

उच्च शिक्षण

पुणे परिसरातील विद्यापीठे

विद्यापीठाचे नाव विद्यापीठाचा प्रकार व्यवस्थापन
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (जुनी नावे – भारतवर्षीय महिला विद्यापीठ; इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटी) वैधानिक विद्यापीठ राज्य शासन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वैधानिक विद्यापीठ राज्य शासन
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) – अभ्यास केंद्र वैधानिक, मुक्त विद्यापीठ केंद्र शासन
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (वायसीएमओयु) – अभ्यास केंद्र वैधानिक, मुक्त विद्यापीठ राज्य शासन
डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डिआयएटी) अभिमत विद्यापीठ केंद्र शासन
गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठ खाजगी
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अभिमत विद्यापीठ खाजगी
डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ राज्य शासन
भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ खाजगी
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ अभिमत विद्यापीठ खाजगी
डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ अभिमत विद्यापीठ खाजगी
डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ खाजगी विद्यापीठ खाजगी
एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ खाजगी विद्यापीठ खाजगी
विश्वकर्मा विद्यापीठ खाजगी विद्यापीठ खाजगी
अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ खाजगी विद्यापीठ खाजगी
फ्लेम विद्यापीठ खाजगी विद्यापीठ खाजगी
स्पायसर ॲडवेंटिस्ट विद्यापीठ खाजगी विद्यापीठ खाजगी
सिंबायोसिस कौशल्य व मुक्त विद्यापीठ खाजगी विद्यापीठ खाजगी

पुणे परिसरातील स्वायत्त महाविद्यालये / संस्था

महाविद्यालय (कॉलेज) / संस्था (इन्स्टिट्यूट) प्रकार व्यवस्थापन
अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे संस्था राज्य शासन
विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालय खाजगी
फर्ग्युसन महाविद्यालय महाविद्यालय खाजगी
सिंबायोसिस संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय महाविद्यालय खाजगी
जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय संस्था खाजगी
इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेंट स्टडीज ॲण्ड रिसर्च (इंडसर्च) संस्था खाजगी
कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय महाविद्यालय खाजगी
एमआयटी ॲकॅडमी ऑफ इंजिनियरिंग संस्था खाजगी
सेंट मीरा महिला महाविद्यालय महाविद्यालय खाजगी

पुणे परिसरातील इतर महत्त्वाची महाविद्यालये / अभ्यास केंद्रे

पुण्यातील बव्हंशी महाविद्यालये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. काही महाविद्यालये अभिमत विद्यापीठांशी संलग्न आहेत.

कला/विज्ञान/वाणिज्य महाविद्यालये अभियांत्रिकी महाविद्यालये वैद्यकीय महाविद्यालये व्यवस्थापन महाविद्यालये इतर
नेस वाडिया महाविद्यालय एम.आय.टी. बी.जे. मेडिकल कॉलेज सिंबायोसिस राष्ट्रीय विमा अकादमी (नॅशनल इन्शुअरन्स अकॅडमी)
बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी लष्कराचे ए.एफ.एम.सी.(आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज) इंदिरा इन्स्टिट्यूट वाकड आय.एल.एस. विधि महाविद्यालय
आबासाहेब गरवारे महाविद्यालय भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय पुणे विद्यापीठाचा व्यवस्थापनशास्त्र विभाग (पुम्बा) भारतीय विद्याभ्यास (आयुर्वेद व सामाजिक शास्त्रे)
नौरोसजी वाडिया महाविद्यालय आय.एम.डी.आर.
स.प. महाविद्यालय
मॉडर्न महाविद्यालय, पुणे

पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून दरवर्षी १०,००० इंजिनियर यशस्वी होऊन बाहेर पडतात.

संशोधन संस्था

पुणे विद्यापीठाव्यतिरिक्त पुण्यात अनेक सुप्रसिद्ध व महत्त्वाच्या संशोधन संस्था आहेत. विद्यापीठाजवळ राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे तर विद्यापीठाच्या आवारात आयुकानॅशनल सेंटर फॉर रेडिओ स्ट्रोफिजिक्सव नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, राष्ट्रीय विमा अकादमी, केंद्रीय जल शक्ती संशोधन संस्था (Central Water and Power Research Station), उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थाआघारकर संशोधन संस्थाऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया व राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था या संस्थाही पुण्यात आहेत.

भांडारकर प्राच्य विद्या संस्था

लष्करच्या शिक्षण व संशोधन संस्था-

लष्करी शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था पुण्यात आहेत. श्री शिवाजी मराठा प्रिपरेटरी स्कूल (एस्‌‍एस्‌पीएम्‌‍एस), राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग (सीएम्ई), आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग वगैरे. लष्कराच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजचे (ए.एफ.एम.सी. वैद्यकीय महाविद्यालयाचे) विद्यार्थी भारतीय लष्कराच्या सेवेसाठी रूजू होतात. आर्मामेंट रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (जुने नाव – डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी), एक्सप्लोझिव्ह रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट लॅबोरेटरीडिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन व आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या लष्कराशी संबंधित संशोधन करणाऱ्या संस्था देखील पुण्यात आहेत.

खेळ

क्रिकेट हा पुण्यातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. हॉकीफुटबॉलटेनिसकबड्डी व खोखो हे खेळ देखील खेळले जातात. पुण्यात दरवर्षी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित केली जाते. पुण्यातील नेहरू स्टेडियमवरमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुख्यालय आहे. येथे क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. डेक्कन जिमखान्यात अनेक खेळ खेळण्याची सुविधा आहे. बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्समध्ये इ.स. १९९४चे राष्ट्रीय खेळ व इ.स. २००८ मध्ये दुसरे यूथ कॉमनवेल्थ खेळ भरले होते.

मूळ पुण्यातील असलेले प्रसिद्ध खेळाडू – हेमंत व हृषीकेश कानेटकरराधिका तुळपुळे व नितीन कीर्तने (टेनिस) हे आहेत. ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अनिल शिरोळे हे पुण्याचे माजी खासदार आहेत.

पुण्याजवळील गहुंजे येथे क्रिकेटचे एक अप्रतिम स्टेडियम आहे. त्याचे नाव सुब्रतो रॉय स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे.

पर्यटन स्थळे

संग्रहालये (एकूण ३० पैकी १७)

  • आगाखान पॅलेस संग्रहालय
  • पुणे रेल्वे स्टेशनजवळचे आदिवासीसंग्रहालय
  • सिंबायोसिसमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम
  • आर्य नागार्जुन संग्रहालय
  • जोशी म्युझियम ऑफ मिनिएचर रेल्वेज
  • डेक्कन कॉलेज पुरातत्त्व संग्रहालय
  • दर्शन संग्रहालय* सिंबायोसिस सोसायटीचे ॲफ्रो एशियन कल्चरल म्युझियम
  • बाहुली संग्रहालय (निर्माणाधीन)
  • ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम (पर्वती पायथा)
  • भारत इतिहास संशोधन मंडळ संग्रहालय
  • भूमी अभिलेख संग्रहालय
  • राजा दिनकर केळकर संग्रहालय
  • सदर्न कमांडचे राष्ट्रीय लष्करी संग्रहालय
  • राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी संग्रहालय
  • रे संग्रहालय (नवीन नाव महात्मा फुले संग्रहालय)
  • सुभेदार धर्माजी खांबे वस्तुसंग्रहालय

भेट देण्यासारखी अन्य स्थळे

कात्रज सर्प उद्यानखडकवासला धरणपर्वतीपाताळेश्वर लेणीफिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटबंड गार्डनमहात्मा फुले वाडालाल महालविश्रामबाग वाडाशनिवार वाडाशिंद्यांची छत्रीसारसबाग

पुण्याची प्रसिद्धी

  • पुणेरी खवचटपणा
  • पुण्याची खाद्यसंस्कृती ([१]
  • पुणेरी जोडा
  • पुणेरी पगडी
  • पूना साडी (धारवाडी खणाचे कापड असलेली)
  • पुणेरी पाट्या
  • पुणेरी मिसळ ([२])
  • पुण्याची आंबा बर्फी
  • पुण्याची बाकरवडी
  • पुण्याची भेळ
  • पुणेरी मराठी
  • पुणेरी विनोद

पुण्याची वैशिष्ट्ये

  • आशियामध्ये सर्वात जास्त पब्स पुण्यात आहेत.
  • भारतातील सर्वात जास्त धुम्रपान करणारे पुण्यात आहेत.
  • पुण्यात सर्वात जास्त सॉफ्टवेअर कंपन्या आहेत – (पुणे-२१२)(बंगलोर-२०८)(हैद्राबाद-९७) म्हणून या शहरास महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली म्हणतात.
  • एखाद्या शहरात असणाऱ्या सर्वात जास्त अभियांत्रिकी कॉलेजेसच्या संख्येत, ३५ या आकड्यासह, पुणे जगात आघाडीवर आहे.पुणे विद्यापीठाशी सुमारे ५७ अभियांत्रिकी कॉलेजेस संलग्न आहेत.
  • संरक्षण व वाणिज्यिक दोन्ही संस्था विमानोड्डाणासाठी एकाच धावपट्टीचा वापर करीत असणारे पुणे हे एकमेव शहर आहे.
  • पुण्यात सर्वात जास्त सहकारी व पब्लिक सेक्टर संस्था आहेत.
  • पुण्यात ३८% लोकसंख्या मराठी बोलणारी आहे. उरलेल्यांपैकी २०% उत्तर प्रदेशचे, १०% तमिळ बोलणारे, १४% तेलुगू बोलणारे, १०% केरळी, ८% युरोपियन, ५% आफ्रिकन, २% बंगाली, ६% इतर अशी आकडेवारी आहे.
  • पुण्यात वाहतूकीची घनता भारतात सर्वात जास्त आहे.
  • जगात सर्वात जास्त दुचाकी फक्त पुण्यात आहेत.
  • १५ विद्यापीठे एकाच शहरात असणाऱ्या भारतातील शहरांपैकी, पुणे एकमेव आहे.
  • पुणे जिल्ह्याला शिक्षणाचे माहेरघर असे म्हणतात.

पुण्यातील एका निष्कलंक आणि ख्यातनाम नागरिकाला दरवर्षी पुण्यभूषण हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :

पुणे शहरासंबंधी पुस्तके

  • असे होते पुणे (म.श्री. दीक्षित)
  • आम्ही करतो तोच कायदा: आम्ही राजे पुण्याचे (विनोदी लेखसंग्रह; लेखक : सुधाकर जोशी)
  • नामवंत पुणेकर, संस्था – वास्तू (लेखक: शां.ग. महाजन)
  • मर्चंट्‌स ऑफ पुना: कथा जिगरबाज व्यावसायिकांच्या (इंग्रजीत आणि मराठीत) – सकाळ प्रकाशन
  • पुणे शहराचा ज्ञानकोश – खंड १ (लेखक: शां.ग. महाजन)
  • मुठेकाठचे पुणे (लेखक :प्रा.प्र.के. घाणेकर). पुस्तक प्रकाशन तारीख २८-३-२०१५.
  • पुणेरी (श्री.ज. जोशी)
  • पुणे शहरचे वर्णन (नवीन नाव – पुणे वर्णन) (ना.वि. जोशी, १८६८)
  • पुणे शहराचे वर्णन (लेखक –गंगाधर देवराव खानोलकर) (१९७१)
  • पुण्याचा शनिवारवाडा: लेखक रमेश जि. नेवसे
  • पुण्याची पर्वती (प्र.के. घाणेकर)
  • पुण्याची स्मरणचित्रे (दादा फाटक यांनी १८९९ ते १९४० या काळात घेतलेली पुण्याची ११४ छायाचित्रे – संपादक – अजित फाटक, मंदार लवाटे)
  • पुण्याचे पक्षी वैभव (प्रभाकर कुकडोलकर)
  • पुण्याचे पेशवे (डॉ. अ.रा. कुलकर्णी)
  • पेशवाई (कौस्तुभ कस्तुरे)
  • पौर्णिमा (कादंबरी): लेखक साधुदास
  • मुळा-मुठेच्या तीरावरून (म.श्री. दीक्षित)
  • वैभव पेशवेकालीन वाड्यांचे (मंदा खांडगे)
  • शनिवारवाडा: लेखक प्र.के. घाणेकर
  • शनिवारवाडा: लेखक डॉ. गणेश हरी खरे
  • शनिवारवाडा (ललित कादंबरी): लेखक वा.ना. शहा
  • संध्याकाळचे पुणे (लेखकदि.बा. मोकाशी)
  • हरवलेले पुणे (लेखक: डॉ. अविनाश सोवनी)

 

    संकलन आणि मांडणी :-                            

श्री.लक्ष्मण काटेकर, सोलापूर (महाराष्ट्र).

Laxman.katekar@gmail.com

Contact @ 7588020886.

पुणे जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण प्रचलित आहे – पुणे तिथे काय उणे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा तर ईशान्य व पूर्वेस अहमदनगर जिल्हा आहे.


पुणे जिल्हा
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा
महाराष्ट्रच्या नकाशावरील स्थान

 

    देश  भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव       पुणे विभाग
मुख्यालय पुणे
तालुके १ आंबेगाव २ इंदापूर ३ खेड ४ जुन्नर ५ दौंड ६ पुणे शहर ७ पुरंदर ८ बारामती ९ भोर १० मावळ ११ मुळशी १२ वेल्हे १३ शिरूर १४ हवेली
क्षेत्रफळ १५,६४२ चौरस किमी (६,०३९ चौ. मैल)
लोकसंख्या ९९,२४,२२४ (२००१)
लोकसंख्या घनता ४६१.८५ प्रति चौरस किमी (१,१९६.२ /चौ. मैल)
साक्षरता दर ८०.७८
लिंग गुणोत्तर १.०८ ♂/♀

 

शिक्षण

जगप्रसिद्ध पुणे विद्यापीठ पुणे शहरात असून पुण्यास पूर्वेचे ऑक्सफर्ड असेही म्हणतात.

विशेष

अखिल विश्वासाठी पसायदान मागणार्‍या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणार्‍याया संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणार्‍या संत तुकारामांची, पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.

संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आणि संत तुकारामांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकर्‍यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.

शिवाजीच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणार्‍या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.

पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हटले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे.शहरातील ‘प्रयास’ हि स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.

ऐतिहासिक महत्त्वाचे

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून शिवाजी महाराज व जिजाबाईयांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. खेड शिवापूर येथे व पुण्यातील लाल महाल येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील कोंढाणाराजगड व पुरंदर हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नरपुरंदरभोरमावळमुळशी व वेल्हे हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.

पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक बाळाजी विश्वनाथ यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकीर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.

थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. कात्रजतलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्‍न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये मराठेशाहीचा व पेशवाईचा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.

पुणे जिल्ह्याच्या सीमा

 

पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. – भीमा नदी ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. भीमेचा उगम भीमाशंकर (ता. खेड) येथे होतो.

इतर नद्या पुढीलप्रमाणे – इंद्रायणी नदी, कर्‍हा, कुकडी नदीघोड नदी, नीरा, पवना नदीमांडवी, मीना, भामा, मुठा नदीमुळा नदी

पुणे जिल्ह्याचा नकाशा

 

प्रसिद्ध व्यक्ती

 

छत्रपती शिवाजी महाराजपु.ल. देशपांडेप्रल्हाद केशव अत्रेशरद पवार, पद्मश्री डी.जी.केळकर, पं. भीमसेन जोशी, डॉक्टर अप्पासाहेब पवार

उद्योगधंदे

महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत. मुंबई नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बर्‍याच औद्योगिक वसाहती आहेत.

ग्रंथालये

पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.

शेती

जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.

जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.

 

 

 

 

 

 

क्र. तपशील क्षेत्र (हेक्टर्स)
लागवडीखालील जमीन ९९८५२२
जिरायत ७५६११८
बागायत २४२४०४

 

क्र. हंगाम महत्त्वाचे पीक
खरीप बाजरी, तांदूळ
रब्बी गहू, हरभरा
खरीप व रब्बी ज्वारी

 

ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इन्द्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.

क्र. कारखान्याचे नाव गाव, तालुका
श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना शिरोली, जुन्नर
संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना हिंजवडी, मुळशी
राजगड सहकारी साखर कारखाना निगडे, भोर
घोडगंगा सहकारी साखर कारखाना न्हावरे, शिरूर
भीमा सहकारी साखर कारखाना मधुकरनगर, दौंड
सोमेश्र्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्र्वर, बारामती
माळेगाव सहकारी साखर कारखाना माळेगाव, बारामती
श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर, इंदापूर
इंदापूर सहकारी साखर कारखाना बिजवडी, इंदापूर
१० यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर, हवेली
११ भीमाशंकर सहकारी साखर कारखाना अवसरी बुद्रुक, आंबेगाव

भारतीय अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) (हवेली) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.

प्रेक्षणीय स्थळे

आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत.

अष्टविनायकांपैकी पाच गणपती : महाराष्ट्रात श्री गणपतीच्या आठ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात. या अष्टविनायकांपैकी पाच स्थाने पुणे जिल्हात आहेत:- चिंतामणी (थेउर)थेऊर,महागणपती (रांजणगाव)रांजणगावमोरेश्वर (मोरगाव)मोरगावविघ्नहर (ओझर)ओझरगिरिजात्मज (लेण्याद्री)लेण्याद्री – हे ते पाच विनायक होत.

जेजुरी : श्री खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.

भीमाशंकर : भारतातील बारापैकी पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा – भीमा नदीचा – उगम होतो.

भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.

उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- कसबा गणपती व ग्रामदेवता-तांबडी जोगेश्वरीचे मंदिरचतु:शृंगीचे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील कानिफनाथ मंदिरचिंचवड येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्र्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले – भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.

 

ऐतिहासिक

तालुक्यानुसार

शनिवारवाडा

मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे, शिवाय जगदीश्वर मंदिर आहे

तालुके

पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत :

  1. जुन्नर
  2. आंबेगाव
  3. खेड
  4. मावळ
  5. मुळशी
  6. हवेली
  7. वेल्हे
  8. भोर
  9. पुरंदर
  10. बारामती
  11. इंदापूर
  12. दौंड
  13. शिरूर
  14. पुणे शहर

राजकीय संरचना

लोकसभा मतदारसंघ ( ४ ) : पुणे ,बारामती,शिरूर व मावळ. ् (मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)

विधानसभा मतदारसंघ (२१) : जुन्नरआंबेगावखेडआळंदीशिरूरदौंडइंदापूरबारामतीपुरंदरभोरमावळचिंचवडपिंपरी , भोसरीवडगाव शेरीशिवाजीनगरकोथरूडखडकवासलापर्वतीहडपसरपुणे कँटॉन्मेंट व कसबा पेठ.

जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.

या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.

शेती

जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.

ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

दळणवळण

पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई – बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे – हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत.

देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.

पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रँकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.

 

इतिहास :

पुणे शहराच्या नावावरून जिल्ह्यासही पुणे जिल्हा असे नाव पडले. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या टॉलेमी याच्या लिखाणात पुण्याचा ‘पुन्नाटा’ असा उल्लेख आढळतो. राष्ट्रकूट राजवटीत या गावाचा ‘पुनवडी’ नावाने उल्लेख केला जाई. पुण्य या शब्दावरून पुणे हे नाव पडले असावे, अशीही एक उपपती मांडली जाते. मुळा व मुठा या नद्यांच्या संगमावर वसलेले पुण्यस्थळ म्हणून हे नाव पडले असावे. मोगल राजवटीत या गावाचा ‘कसबे पुणे’ असा उल्लेख आढळतो.
आंध्र, चालुक्य व राष्ट्रकुटांच्या प्राचीन राजवटी पुण्याने पाहिल्या. मध्युगातील यादवांचा अमलही पुण्याने पाहिला. बहामनी, निजामशाही व आदिलशाही राजवटीही येथेच त्यांच्या मनात रुजले. मराठा राजवटीत पुणे हे एक महत्त्वाचे राजकीय केंद्र होते. पुढील काळात पेशव्यांनी आपली राजधानी येते वसविली. १८१८ साली मराठेशाहीचा अस्त झाला व पुण्याच्या शनिवारवाड्यावरील भगव्या शेंड्याची जागा ‘युनियन जॅक’ने घेतली. स्वांतत्र्य आंदोलनातही पुणे अग्रभागी राहिले. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांची कर्मभूमीही पुणे हीच होती. पुण्याच्या गणेशखिंडीतच २२ जून १८९७ रोजी चापेकर बंधूनी रँड या जुलमी प्लेग कमिशनरचा वध केला. अनेक क्रांतिकारकांनी व स्वतंत्र्य सेनानींनी पुण्यास आपली कर्मभूमी मानले होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला आणि पुण्याच्या शनिवारवाड्यावरील ‘युनियन जॅक’ची जागा भारताच्या ‘तिरंगी झेंड्याने’ घेतली.

 

स्थान :

पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस व पुर्वेस अहमदनगर जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा. पश्चिमेस रायगड जिल्हा, तर वायव्येस ठाणे जिल्हा आहे. पुणे जिल्ह्याला नैसर्गिक सीमाही लाभली आहे. जिल्ह्याची कुकडी, घोड व भीमा या नद्यांनी तर दक्षिण सीमा नीरा नदीने निश्चित केली आहे. जिल्ह्याची पश्चिम सीमा सह्य पर्वतरांगांनी आखून दिली आहे.
जिल्ह्याचा आकार सर्वसाधारणः त्रिकोणी आहे. जिल्ह्याला पूर्व-पश्चिम जास्तीत जास्त विस्तार सुमारे १७१ कि.मी. असून दक्षिण-उत्तर जास्तीत जास्त विस्तार सुमारे १५५ कि.मी. आहे.

प्राकृतिक रचना :

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्य पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत. हा डोंगराळ भाग सुमारे ५ ते १० कि.मी. रुंदीचा असून त्यास ‘घाटमाथा’ असे म्हणतात जिल्ह्याच्या पश्चिम भागातीलच पण काहीशा वायव्येकडे असलेल्या नाणेघाटातून ठाणे जिल्ह्यात उतरता येते, तर बोरघात उतरून रायगड जिल्ह्यात प्रवेश करता येतो. जिल्ह्याच्या पश्चिम भागातीलच परंतु काहीशा नैऋत्येकडे असलेल्या वरंधा घाटातूनही रायगडा जिल्ह्यात उतरता येते. घाटमाथ्याच्या पूर्वेस असलेल्या ३० ते ४० कि.मी. रुंदीच्या पट्ट्यास ‘मावळ’ म्हणून ओळखले जाते. मावळ हा डोंगराळ भाग असून त्यामध्ये अधून-मधून सखल प्रदेश आढळतो.जिल्ह्याचा पूर्वेकडील व आग्नेयेकडील भाग पठारी असून त्यास ‘देश’ म्हणून ओळखले जाते>

भाटघर येथील धरण १९२९ मध्ये बांधण्यात आले असून पूर्वी ते तत्कालीन मुंबई इलाख्याचे गव्हर्नर लॉईड यांच्या नावाने ‘लॉईड धरण’ म्हणून ओळखले जात असे.

सह्याद्रीच्या रांगा उत्तर-दक्षिण पसरलेल्या असून या पर्वतरांगामध्ये उत्तरेस असलेले हरिश्चंद्रगड (१४२४ मीटर) हे जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर होय. तसुबाई, भीमाशंकर, शिंगी ही जिल्ह्यातीळ पश्चिम सीमेवरील सह्य पर्वतरांगांमध्ये वसलेली काही उंच शिखरे होत. जीवधन, धाक, अहुपे, नागफणी (ड्यूक्स नोज) ही या रांगांमधील आणखी काही महत्त्वाची शिखरे होत. जिल्ह्याच्या उत्तर भागात हरिश्चंद्रगड डोंगराच्या रांगा पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलेल्या आहेत. शिंगी, तासुबाई, मांडवी, ताम्हीनी व अंबाला या डोंगररांगाही सह्य पर्वततातून निघून पश्चिम-पूर्व अशा गेलेल्या आहेत. शिंगी डोंगररांगांनी भीमा व भामा या नद्यांच्या जलविभाजकाचे कार्य पार पाडले आहे. पवना व मुळा या नद्यांच्या दरम्यान मांडवी डोंगररांगा पसरलेल्या आहेत, तर मुळा व मुठा या नद्यांच्या दरम्यान ताम्हीनी डोंगररांगा पसरलेल्या आहेत. अंबाला डोंगररांगेने मुळा व नीरा या नद्यांच्या जलदुभाजकाचे कार्य केले आहे.
पश्चिमकडील डोंगराळ भाग या भागाला लागून असलेला पूर्वेकडील टेकड्यांचा उंच-सखल प्रदेशा व त्याच्याही पूर्वेकडील पठारी प्रदेश अशी जिल्ह्याची सर्वसाधारण प्राकृतिक रचना सांगता येईल. पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशात जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व भोर या तालुक्यांचा काही भाग येतो. बहुतांशी याच तालुक्यांचा पूर्व भाग; तद्वतच शिरूर; हवेली व पुरंदर या तालुक्यांचा काही भाग टेकड्यांच्या उंच सखल अ प्रदेशात मोडतो. दौंड, बारामती, इंदापूर आदी तालुक्याचा समावेस पूर्वेकडील पठारी प्रदेशात होतो.

मृदा :

पुणे जिल्ह्यातील तांबडी, तपकिरी व काळी अशा तीन प्रकारची मृदा आढळते. पश्चिमेकडून, जसजसे पूर्वेकडे जावे तसतशी मृदेची सुपीकता वाधलेली आढळून येते. जुन्नर, आंबेगाव, खेड व पुरंदर या भागातील डोंगराळ प्रदेशात तांबडी मृदा आढळते. खेड, हवेली, शिरूर, दौंड व पुरंदर या तालुक्यांच्या काही भागातील मृदा तप्किरी आहे. इंदापूर व बारामती या तालुक्यात काळी कसदार मृदा आढळते.

हवामान :

जिल्ह्यातील हवामान वर्षातील बराचसा काळ कोरडे व आल्हाददायक असते. उन्हाळ्यात तुलनात्मकदृष्ट्या हवामान उष्ण असते. मे महिन्यात तापमान ४१ डिग्री सें.ची मर्यादा ओलांडते. काही वेळा मेम्हिन्यात तापमान त्याहीपेक्षा अधिक वाढलेले आढळून येते. हिवाळ्यात तापमान ६ डिग्री सें.पर्यंतही खाली येते. इंदापूर, दौंड, बाराअती या पूर्वेकडील तालुक्यातील हवामान तुलनात्मदृष्ट्या अधिक उष्ण असते. पश्चिमेकडील डोंगराळ भागात तापमान तुलनात्मकदृष्ट्या कमी आढळते. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालखंडाला नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. घातमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक म्हणजे ३०० ते ४०० सें.मी.पर्यंत असते. घाटमाथ्याकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. जिल्ह्याचा पूर्व भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात मोडतो. येथील पावसाचे वार्षिक प्रमाण सर्वसाधारणतः ७०ते १२० सें. मी. पर्यंत असते. सुखटणकर, समितीच्या शिफारशीनुसार जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर व हवेली या तालुक्यांचा समावेश अवर्षणप्रवण क्षेत्रात केला गेला असून १९७४-७५ पासून या तालुक्यांमध्ये अवर्षणप्रवण क्षेत्रविकास कार्यक्रम राबविला जात आहे. आता डॉ. सी. एच. हनुमंतराव समितीच्या शिरफारशींच्या आधारे भोर, मुळशी व मावळ या तालुक्यांचाही नव्याने अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश करण्यात आला असून येथेही १९९४-९५ पासून अवर्षणप्रवन क्षेत्रविकस कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

नद्या :

भीमा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी होय. ती पुणे जिल्ह्यातच आंबेगाव तालुक्यात सह्य पर्वतरांगामध्ये ‘भीमाशंकर’ येथे उगम पावते. ती प्रथम काही अंतर जिल्ह्याच्या मध्यातून व नंतर जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून वाहाते. जिल्ह्यातील तिचा प्रवास आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यामधून व दौंड आणि इंदापूर या तालुक्यांच्या सीमावर्ती भागातून होतो. दौंड आणि इंदापूर तालुक्यांच्या सीमावरून वाहाताना तिने काही काळ पुणे व अहमदनगर आणि पुणे सोलापूर या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. दौंड आणि इंदापूर या तालुक्यांच्या सीमावरून वाहात जाऊन ती पुढे नीरा नदीचा प्रवाह आपल्या पोटात घालूनच सोलापूर जिल्ह्यात प्रवेशते. इंद्रायणी, घोड, मुळ, मुठा व नीरा या भीमेच्या जिल्ह्यातील प्रमुख उपनद्या होत.
इंद्रायणी ही भीमेची उपनदी जिल्ह्याच्य मध्यभागातून वाहाते. ही नदी लोणावळ्याच्या नैऋत्येस सह्य रांगांमध्ये कुरवंडे घाटाजवल उगम पावते. हवेली तालुक्यातील तुळापूर येथे ही भीमेस मिळते. नीरा नदी जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिम-पूर्व अशी वाहाते. आपल्या या प्रवासात तिने पुणे व सातारा आणि पुणे व सोलापूर या जिल्ह्याच्या नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. कऱ्हा ही नीरेची जिल्ह्यातील प्रमुख उपनदी होय. ती बारामती तालुक्याच्या सीमावर्ती भागात नीरेस मिळते. बारामती गाव कऱ्हा नदीकाठी वसले आहे. घोड ही भीमेची आग्नेयवाहिनी उपनदी. आंबेगाव तालुक्यातील आहुपे गावाजवळ हीचा उगम होतो. दौंडचा वायव्येस पाच किलोमीटर अंतरावर सांगवीनजिक ती भीमेस मिळते. आंबेगाव, गोडेगाव, वडगाव व शिरूर ही तिच्याकाठची प्रमुख गावे होत. कुकडी नदी जुन्नर तालुक्यात नाणेकडीजवळ चावद येथे उगम पावते. तिचा सुरुवातीचा प्रवास जुन्नर तालुक्यातून होतो. पुढे ती शिरूर व नगर जिल्ह्यातील पारनेर या तालुक्याच्या सीमेवरुन वाहाते. या सीमावर्ती भागातच ती घोड नदीस मिळते. मीना ही घोडनदीची आणखी एक उपनदी होय.

देशातील सर्वांत पहिले उपग्रह दळणवळण केंद्र (विक्रम) जुन्नर तालुक्याट आर्वी येथे १९७१ पासून कार्यरत आहे.

धरणे :

वेळवंडी या नीरेच्या उपनदीवर भाटघर येथे धरण बांधण्यात आले आहे. या धरणास पूर्वी ‘लॉईड धरण’ म्हणून ओळखले जाई. आता तेथील जलाशयास ‘येसाजी लीक जलाशय’ असे संबोधले जाते. खडकवासला प्रकल्पांतर्गत पुण्याजवळ तीन धरणे बांधण्यात आली आहेत. अंबी या मुठेच्या उपनदीवर वरसगाव येथे दुसरे धरण आहे. या धरणाच जलाशयास ‘वीर बाजी पासलकर’ यांचेनाव देण्यात आले आहे. अंबी, मोशी व मुठा या नद्यांवर खडकवासला येथे तिसरे धरण बांधण्यात आले आहे. याशिवाय पुण्याजवळच मुळशी येथे मुळा नदीवर आणखी एक धरण बांधण्यात आलेले आहे. भीमा प्रकल्पातंर्गत पवना नदीवर मावळ तालुक्यात फागणे येथे पवना धरण आहे. कुकडी प्रकल्पातंर्गत घोड नदीवर शिरूर तालुक्यात चिंचणी येथे तसेच आंबेगाव तालुक्यात डिंभे येथे तसेचह कुकडी नदीवर जुन्नर तालुक्यात येडगाव व माणिकडोह येथे धरणे बांधण्यात आली आहेत.
वरील प्रकल्पांशिवाय खेड तालुक्यातील चासकमान प्रकल्प, जुन्नर तालुक्यात पुष्पावती प्रकल्प, पुरंदर तालुक्यात नाझरे प्रकल्प हे मध्यम प्रकल्प जिल्ह्यात आहेत. बारामती तालुक्यात शिरसुफळ, इंदापूर तालुक्यात शेटफळ व दौंड तालुक्यात वरवंड, कासुर्डी आणि माटोबा हे महत्त्वाचे तलाव आहेत.

पिके :

बाजरी व तांदूळ ही जिल्ह्यातील महत्त्वाची खरीप पिके होत. तर गहू आनी हरभरा ही महत्त्वाची रबी पिके होत. ज्वारीचे पीक जिल्ह्यात दोन्ही हंगामांत घेतले जाते.
भोर, खेड, हवेली, इंदापूर हे तालुके खरीप ज्वारीच्या दूष्टीने तर इंदापूर, दौंड, शिरूर, बारामती व पुरंदर हे तालुके रबी ज्वारीच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. बाजरीचे पीक प्रामुख्याने शिरूर, जुन्नर, खेड व वेल्हे हे तालुके तांदळाच्या पिकासाठी प्रसिद्ध आहेत.

भारतातील पहिली मुलींची सैनिकी शाळा जुलै १९९७ पासूनपुणे येथे सुरू झाली आहे.

‘आंबेमोहोर’ हा सुवासिक तांदूळ भोर तालुक्यात विशेषत्वाने घेतला जातो. मुळशी तालुक्यात ‘कमोद’ जतीच्या तांदुळासाठी, तर जुन्नर तालुका ‘जिरेसाळ’ जातीच्या तांदुळासाठी प्रसिद्ध आहे. बारामती, इंदापूर व शिरूर हे तालुके गव्हाच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे होत. जुन्नर, खेड व इंदापूर

या तालुक्यात हरभरा मोठ्या प्रमाणावर घेतला जातो ऊस हे जिल्ह्यातील प्रमुख बागायती पीक असून बारामती, इंदापूर व हवेली हे तालुके उसाच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पुरंदर, दौंड व शिरूर या तालुक्यांतही उसाचे उत्पादन बऱ्यापैकी घेतले जाते.
पुणे हे महत्त्वाचेशह्र जिल्ह्यात असल्याने शहराच्या गरजा ओळखून जवळपासच्या भागात पालेभाज्या व फळभाज्या यांच्या उत्पादनास महत्त्व दिले जाते. खेड, हवेली आंबेगाव या तालुक्यांमध्ये भाजीपाला अधिक पिकविला जातो. आंबेगाव तालुक्यात टोमॅटोचे उत्पन्न चांगले निघते. खेडा, आंबेगाव व जुन्नर तालुक्यात बटाट्याचे पीक घेतले जाते. जुन्नर, खेड पुरंदर आदी तालुक्यांमध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. फळांचा उत्पादनाच्या दृष्टीनेही जिल्हा महत्त्वाचा गणला जातो. बारामती तालुक्यात व हवेली तालुक्याच्या काही भागात द्राक्षबागा आहेत. दौंड व शिरुर तालुक्यात संत्री मोसंबीच्या तर पुरंदर तालुक्यात अंजीर व सिताफळीच्या बागा आहेत. जिल्ह्याच्या काही भागात विशेषत्वाने जुन्नर, हवेली व दौंड या तालुक्यांमध्ये थोड्याफार प्रमाणावर फुलांची शेतीही केली जाते.

 

वने :

जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी जवळजवळ १२ टक्के क्षेत्रावर वने आहेत. कोणत्याही प्रदेशात पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने ३३ टक्के भू-क्षेत्र वनांखाली असणे अपेक्षित असते; हे लक्षात घेता जिल्ह्यातील वनांचे प्रमाण अतिशय कमी आहे. जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा अधिक वन-क्षेत्र पश्चिमेकडील डोंगराळ भागात आहे. मुळशी मावळ, आंबेगाव, भोर व वेल्हे या तालुक्यांमध्ये बऱ्यापैकी वने आहेत. हवेली व पुरंदर तालुक्यांच्या काही भागातही विरळ वने आहेत. आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर येथे अभयारण्य विकसित करण्यात आले असून या अभयारण्याचा काही भाग ठाणे जिल्ह्यातही पसरलेला आहे. पुण्यजवळच्या सिंहगड परिसराताही वनाचा जाणिवपूर्वक विकास करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील वनांमध्ये लांडगा, कोल्हा, तरस, ससा, रानमांजर, मुंगूस, सायाळ यांसारखे विविध प्राणी आढळतात. जिल्ह्यात सुमारे ३०० प्रकारचे पक्षी आढळून येतात.

पुणे येथे १९८२ पासून शासनमान्य शेअर बाजार कार्यरत आहे.

रानकोंबडा, तितर, मोर, पोपट, बुलबुल, कबुतर, आदी पक्षी येथील वनांत विशेषत्वाने आढळतात. भीमाशंकर येथील वनांत ‘शेखरू’ ही उडणारी खार आढळते.

किल्ले :

पुण्यापासून जवळह हवेली तालुक्यात ‘सिंहगड’ हा किल्ला आहे. या किल्ल्याचे पूर्वीचे नाव ‘कोंडाणा’ असे होते. ह किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. गड जिंकला पण सिंहपक्रामी तानाजी गेला म्हणून याचे नाव ‘सिंहगड’ आसे ठेवले गेले. जेथे शिवरायांचा जन्म झाला. तो शिवनेरी किल्ला जुन्नर तालुक्यात आहे. एथेशिवाई देवीचे प्राचीन मंदिर असल्याने किल्ल्यास ‘शिवनेरी’ हे नाअ पडले. जो गड जिंकून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले, तो ‘तोरणगड’ पुण्यापासून जवळच वेल्हे तालुक्यात वेल्ह्यापासून जवळच ‘राजगड’ हा डोंगरी किल्ला आहे. शिवरायाम्ची बरीचशी कारकीर्द या किल्ल्यावरूनच पार पडली. ‘पुरंदरगड’ पुण्यापासूनजवळ असलेला आणखी एक दुर्ग. हा गड पुरंदर तालुक्यात सासवडजवळ आहे. पुरंदरगडाला लागून ‘वज्रगड’ हा दुर्ग आहे. ‘लोहगड’ हा जिल्ह्यातील एक प्राचीन किल्ला असून तो मळवली रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेस सुमारे सात किलोमीटर अंतरावर इंद्रायणीच्या खोऱ्यात वसला आहे. बोरघाटाच्या मुखाशी असलेला हा किल्ला लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा गणला गेला होता. या किल्ल्याच्या जवळच विसापूर हा दुसरा किल्ला आहे. याशिवाय अनेक लहान-मोठे गडकोट पुणे जिल्ह्यात असून चाकणचा भुईकोट किल्ला व पुण्यातील पेशवेकालीन शनिवारवाडा इतिहासप्रसिद्ध आहेत.

महत्त्वाची स्थळे :

पुणे :

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. मुळा-मुठेच्या संगमावर वसलेले, एकेकाळी पेशव्यांची राजधानी असणारे हे शहर आज महाराष्ट्रातील महत्त्वाचे शैक्षणिक, सांस्कृतिक व औद्योगिक केंद्र मानले जाते.‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुण्यात शिक्षण विभागाचे संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्या पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांसारख्या शैक्षणिक संस्था तसेच अनेक सामान्य शिक्षण महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये, विधी महाविद्यालये, अभियांत्रिक महाविद्यालयचे व वैद्यकीय महाविद्यालये पुण्याजवळ येरवडा येथे असलेल्या आगाखान पॅलेसमध्ये महात्मा गांधीना कैदेत ठेवले होते. येथेच कस्तुरबांचा मृत्यू झाला.

पुणे हे पुणे विद्यापीठाचे मुख्य ठिकाण आहे. येथील राजा केळकर वस्तुसंग्रहालय व महात्मा फुले वस्तुसमंग्रहालय प्रसिद्ध आहेत.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ, चित्रपट आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र, आकाशवाणी केंद्र, भारत इतिहास संशोधन मंडळ, राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, राष्ट्रीय स्फोटके प्रयोगशाळा, मध्यवर्ती जल व शक्ती संशोधन केंद्र, उष्ण कटिबंधीय मान्सून प्रयोगशाळा (वेधशाळा), भारतीय अन्वेषण मंडळ, इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरटरी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी इत्यादी संस्था पुणे व परिसरात आहेत. पुण्याजवळ वानवडी येथे महादजी शिद्यांची समाधी आहे. हे ठिकाण ‘शिंद्यांची छत्री’ म्हणून ओळखले जाते. पुण्यापासून जवळच बालेवाडी येथे क्रीडासंकुल उभारण्यात आले आहे. पुण्याजवळच पानशेत व वरसगाव येथील जलाशयाच्या परिसराचा क्रीडाकेंद्र व पर्यटनस्थळ म्हणून विकास होत आहे. पुण्याजवळ निगडी येथे ‘अप्पूघर’ हे करमणुकीचे केंद्र आहे.
पुणे हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असून पिंपरी, चिंचवड, भोसरी, हडपसर, पर्वती व गुलटेकडी येथे औद्योगिक वसाहती आहेत. जवळच थेरगाव येथे कागद गिरणि आहे. पुणे हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन व बाजारपेठ असून पुण्याजवळ लोहगाव येथे विमानतळ आहे. पुणे-मुंबई अंतर रेल्वेने १९२ कि.मी. असून सडकेने १७० कि.मी. आहे.

जुन्नर : जुन्नर तालुक्याचे मुख्य ठिकाण. राजगुरुनगरपासून ६० कि.मी. अंतरावर, सह्याद्रीच्या कुशीत हे ठिकाण वसले आहे. येथूनच भीमा नदीचा उगम होतो. येथील महादेवाचे देवस्थान बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. येथील देवालय नाना फडणवीसांनी बांधले आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणूनही भीमाशंकर प्रसिद्ध आहे. येथे अभयारण्य विकसित करण्यात आले आहे.
आळंदी : पुण्यापासून जवळच असलेले हे तीर्थक्षेत्र खेड तालुक्यात मोडाते. इंद्रायणी नदीकाठी वसलेल्या या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीला ज्ञानरायांच्या समाधीचे दर्शन घेण्यास लाखो भाविक येथे गर्दी करतात.

देहू : पुण्यापासून जवळच हवेली तालुक्यात वसलेले तीर्थक्षेत्र. हे स्थान संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ म्हणून ओळखले जाते. फाल्गुन वद्य द्वितीयेला (तुकाराम बीज) येथे

अष्टविनायकांच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. ही स्थाने अशी : (१) चिंतामणी (थेऊर ता. हवेली) (२) श्रीगणपती (रांजणगाव, ता. शिरूर) (३) मोरेश्वर (मोरगाव, ता. बारामती) (४) श्रीविघ्नेश्वर (ओझर, ता. जुन्नर (५) गिरिजात्मक (लेण्याद्री, ता. जुन्नर).

मोठी यात्रा भरते. येथून पाच कि.मी. अंतरावर भंडारा डोंगर आहे. तेथे एकांतात तुकाराम महाराज चिंतन करीत असत, असे म्हटले जाते.

राजगुरुनगर : खेड तालुक्याचे मुख्य ठिकाण. हुतात्मा राजगुरुम्चे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध.

चाकण : खेड तालुक्यात. कांद्याची मोठी बाजारपेठ. येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध. येथे औद्योगिक वसाहत असून या परिसरात अनेक मोठे उद्योग उभे राहिले आहेत.

लोणावळे : पुण्यापासून ६० कि.मी. अंतरावर पुणे-मुंबई हमरस्त्यावा असलेले हे थंड हवेचे ठिकाण मावळ तालुक्यात मोडते. येथे आर. एन. एस. नौदल प्रशिक्षण केंद्र आहे. लोणावळ्यापासून जवळच वळवण येथे धरण आहे. लोणावळ्याच्या पूर्वेस ८ कि.मी. अंतरावर कार्ले, भाजे व बेंडसा येथे प्राचीन लेणी आहेत. कार्ले येथील लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकातील आहेत.

सासवड : पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण . येथे सोपानदेवाची समाधी आहे. जवळच असलेले ‘कोठीत’ हे गाव आचार्य अत्रे यांचे जन्मस्थान आहे. जवळच पुरंदर किल्ला आहे.

उरूळी-कांचन : हवेली तालुक्यात. येथील निसर्गोपचार केंद्र प्रसिद्ध आहे. १९८२ च्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे मानकरी व थोर गांधीवादी कार्यकर्ते मणिभाई देसाई यांनी स्थापन केलेली भारतीय अ‍ॅग्रो फाऊंडेशन ही संस्था येथे आहे. जवळच ‘भुलेश्वर’ हे श्रीशंकराचे देवस्थान व सहलीचे ठिकाण आहे.

जेजुरी : पुरंदर तालुक्यात. येथील गडावर महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचे देवस्थान आहे. सोमवती अमावास्येस येथे मोठी यात्रा भरते.

बनेश्वर : पुण्यापासून ३० कि.मी. अंतरावर नसरापूरजवळ हेस्थान वसले आहे. येथील शिवमंदिर प्रसिद्ध आहे. निसर्गरम्य परिसरामुळे सहलीसाठी लोक येथे येतात.

खेड-शिवापूर : हवेली तालुक्यात. येथील कमर‍अली दरवेशाचा दर्गा अनेक हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान आहे.

वढू : हे गाव शिरुर तालुक्यात भीमा-कोरेगावपासून ३ कि.मी. अंतरावर आहे. येथे संभाजी महाराजांची समाधी आहे.

भाटघर : हे भोर तालुक्यात असून नीरेची उपनदी वेळवंडीवर बांधलेले ‘लॉईड धरण’ येथे आहे. या धरणाच्या जलाशयास आता ‘येसाजी कंक जलाशय’ असे नाव देण्यात आले आहे. पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर असलेले हे स्थळ आता पर्यटककेंद्र म्हणून विकसित होत आहे.

पुणे जिल्ह्यात मांजरी येथे ग्रामसेवक व ग्रामसेविका यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र चालविले जाते.

आर्वी : हे ठिकाण जुन्नर तालुक्यात असून येथे ‘विक्रम’ हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे.

वालचंदनगर : हे ठिकाण इंदापूर तालुक्यात असून येथे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना, प्लॅस्टिकचा कारखाना, वनस्पती तुपाचा कारखाना व वालचंदनगर उद्योगसमूहाचा अभियांत्रिकी उत्पादनांचा कारखाना आहे.

पिंपरी-चिंचवड : पूर्वी पुणे शहराची उपनगरे समजली जाणाऱ्या या ठिकाणी आता स्वतंत्र महानगरपालिका आहे. पिंपरी आणि चिंचवड येथे औद्योगिक वसाहत असून या वसाहतींमध्ये व परिसरात अनेक, उद्योगधंदे स्थापन झाले आहेत. चिंचवड येथे श्रीमोरया गोसावी या सत्पुरुषाची समाधी आहे.

बारामती : बारामती तालुक्याचे मुख्य ठिकाण. कऱ्हा नदीकाठी वसले आहे. तालुक्यात माळेगाव व सोमेश्वरनगर येथे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने कार्यरत. येथे बारामती ग्रेप इंडस्ट्रीजचा मद्यनिर्मिती प्रकल्प कार्यरत असून येथील औद्योगिक वसाहतीत अनेक लहान-मोठे कारखाने उभे राहिले आहेत.

भोर : भोर तालुक्याचे मुख्य ठिकाण. भोर परिसरात अलीकडील काळात लहान मोठ्या अनेक उद्योगधंद्याचे केंद्रीकरण झाले असून येथील रंगाचा व रेक्झीनचा (भोर इंडस्ट्रीज) कारखाना प्रसिद्ध आहे.
याशिवाय पौड (मुळशी तालुक्याचे मुख्य ठिकाण, जवळच मुळशी येथे धरण.); शिरूर (शिरूर तालुक्याचे मुख्य ठिकाण. घोडनदीकाठी वसले आहे.); इंदापूर (इंदापूर तालुक्याचे मुख्य ठिकाण. सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना.); तळेगाव (मावळ तालुक्यात. काच कारखाना प्रसिद्ध.); वडगाव (मावळ तालुक्याचे मुख्य ठिकाण.) ही जिल्ह्यातील अन्य महत्त्वाची स्थळे आहेत.

उद्योगधंदे :

औद्योगिकदृष्ट्या प्रगत जिल्हा. जिल्ह्यात पिंपरी, चिंचवड, भोसरी, गुलटेकडी, पर्वती, हडपसर, बारामती, भोर, लोणावळे (तालुका मावळ), जेजुरी (तालुक पुरंदर), कुरकुंभ (तालुका दौंड), पिरंगुट (तालुका मुळशी), चाकण (तालुका खेड), कोरेगाव, शिक्रापूर, रांजणगाव, कारेगाव (सर्व तालुका शिरुर) या ठिकाणी वसाहती वा औद्योगिक केंद्रे प्रस्थापित झाली आहेत.
जिल्ह्यात पुणे-मुंबई राष्टीय महामार्ग हा प्रमुख औद्योगिक पट्टा आहे. टेल्को, फिलिप्स, बजाज, किर्लोस्कर, सेंच्युरी एन्का, गरवारे नायलॉन, क्रॉप्टन ग्रीव्ह्‌ज यांसारख्या

‘वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था’ ही सहकारी क्षेत्रातील प्रगत संशोधन संस्था पुणे येथे आहे.

उद्योगसमुहांचे अनेक आधुनिक उद्योग या औद्योगिक पट्ट्यात एकवटले आहेत. पिंपरी येथे हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोन्टिक्सचा कारखना आहे. खडकी व देहूरोड येथे केंद्र सरकारचा दारूगोळ्या कारखाना आहे. तळेगाव दाभाडे येथे काच कारखना व ईगल फ्लास्क कंपनीचा थर्मासचा कारखाना आहे. मुंढवा येथे भारत फोर्ज व कल्याणी स्टील या कंपन्यांचे अवजड यंत्रसामुग्रीचे कारखाने आहेत. चिंचवड येथे बजाज कंपनीचे स्कूटर व रिक्षा यांचे कारखाने आहेत. पिंपरी येथे टेल्को कंपनीचा मोटारीचा कारखाना आहे. भोर येथील रेक्झीनचा व रंगाचा कारखाना प्रसिद्ध असून इतरही अनेक कारखाने तेथे विकसित झाले आहेत. इंदापूर तालुक्यात वालचंदनगर येथे यंत्रनिर्मितीचे कारखाने आहेत. शिरूर तालुक्यात रांजणगाव येथे अपोलो टायर या कंपनीचा टायरचा कारखाना असून व्हर्लपूल या कंपनीचा रेफ्रिजरेटर निर्मिती प्रकल्पही आहे. याच तालुक्यात कोरेगाव-सणसवाडी येथे शार्प कंपनीचा दुरचित्रवाणीसंच निर्मितीचा प्रकल्प, इस्पात कंपनीचा फोर्जिंगचा कारखना व अन्य लहानमोठे अनेक कारखाने आहेत. पिंपरी येथे तसेच हवेली तालुक्यात लोणी-काळभोर येथे फिलिप्स कंपनीचे रेडिओ-दूरचित्रवाणी संच निर्मितीचे कारखाने आहेत. जिल्ह्यात दौंड तालुक्यात मधुरकरनगर येथे भीमा सहकारी साखर कारखाना, इंदापुर तालुक्यात भवानीनगर येथे श्रीछपत्रती सहकारी साखर कारखाना; बारामती तालुक्यात शिवनगर (माळेगाव) येथे माळेगाव सहकारी कारखाना, बारामती तालुक्यातच सोमेश्वरनगर येथे श्रीसोमेश्वर सहकारी साखर कारखना; हवेली तालुक्यात चिंतामणीनगर (थेऊर) येथे यशवंत सहकारी साखर कारखाना; जुन्नर तालुक्यात शिरोली येथे श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना, भोर तालुक्यात अनंतनगर (निगडे) येथे राजगड सहकारी साखर कारखाना; शिरूर तालुक्यात न्हावरे येथे घोडगंगा सहकारी कारखाना; इंदापूर तालुक्यात महात्मा फुले नगर (बिजवडी) येथे इंदापूर सहकारी साखर कारखाना; मुळशी तालुक्याट हिंजवडी येथे श्रीसंत तुकाराम सहकारी साखर कारखान हे सहकारी तत्त्वावरील साखर कारखने कार्यरत आहेत.
याशिवाय जुन्नर येथे हातकागद, बनविण्याचा व्यवसाय प्रचलित आहे. मेंढीच्या केसांपासून घोंगड्या बनविण्याचा उद्योगही जुन्नर तालुक्यात चालतो. विड्या वळणे, दोरखंड तयार करणे यासारखे उद्योग विखुरलेल्या स्वरूपात जिल्ह्याच्या विविध भागात आस्तित्वात आहेत.

वाहतूक :

मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जिल्ह्यातून जातो. खंडाळा, लोणावळे, कामशेत, वडगाव, तळेगाव, निगडी, चिंचवड, पिंपरी, पुणे, शिवापूर ३१४ कि.मी. लांबीचा राष्ट्रीय महामार्ग पुणे जिल्ह्यातून गेला आहे, तर पुणे जिल्ह्यातील लोहमार्गाची एकूण लांबी ३११ कि.मी. हून अधिक आहे. ही या महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे होत. पुणे-सोलापूर-हैदराबाद विजयवाडा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊही जिल्ह्यातून जातो. या महामार्गावर पुणे, लोणी, भिगवण, इंदापूर ही जिल्ह्यातील ठिकाणे आहेत. पुणे-नाशिक हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नासही जिल्ह्यातून गेला आहे. पुणे, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा ही या महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे होत. याशिवाय पुणे-अहमदनगर, पुणे-पंढरपूर, पुणे-बारामती (हडपसर, जेजुरीमार्गे), पुणे-महाड हेही प्रमुख रस्ते जिल्ह्यातून गेले आहेत. जुन्नरहून कल्याणकडे जाताना नाणे घाट लागतो. पुण्याहून साताऱ्यास जाताना आपणास कात्रज घात ओलांडावा लागतो. पुण्याहून सासवडला जाताना दिवे घाट पार करावा लागतो. भोरवरून महाडला जाताना वरंधा घाट उतरावा लागतो.
मुंबई-पुणे-कोल्हापूर हा लोहमार्ग जिल्ह्यातून गेला आहे. लोणावळे, तळेगाव, पुणे, उरळी-कांचन, दौंड ही या लोहमार्गावरील प्रमुख स्थानके होत. पुणे-मिरज हा जिल्ह्यातून जाणारा आणखी एक लोहमार्ग होय. सासवड रोड, जेजुरी, वाल्हे, नीरा ही या लोहमार्गावरील प्रमुख स्थानके होत. याशिवाय पुणे-बारामती हा रुंदमापी लोहमार्गही जिल्ह्यातून गेला आहे. पुणे व दौंड ही जिल्ह्यातील रेल्वे जंक्शन्स होत. पुण्याजवळ लोहगाव येथे विमानतळ आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून जुन्नर जवळच्या नाणेघाटातून घाटमाथा व तळकोकण यांच्यामध्ये व्यापार व दळणवळण चालत होते.

संकलन आणि मांडणी :-                            

श्री.लक्ष्मण काटेकर, सोलापूर (महाराष्ट्र).

Laxman.katekar@gmail.com

Contact @ 7588020886.

 

____________________________________________________________________________________________

भाग :- 3          दि. 13 एप्रिल, 2019

सातारा

महाराष्ट्र • भारत

दि. 13 एप्रिल , 2019

स्थान :-  १७° ४२′ ००″ N, ७४° ००′ ००″ E

गुणक:-   17.70°N 74.00°E

प्रमाणवेळ

भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+५:३०)

क्षेत्रफळ

१०,४८४ चौ. किमी

हवामान

• पावसाचे सरासरी प्रमाण

• १,४२६ मिमी (५६.१ इंच)

मुख्यालय

सातारा

तालुके

•           सातारा

•           कराड

•           वाई

•           महाबळेश्वर

•           फलटण

•           माण

•           खटाव

•           कोरेगांव

•           पाटण

•           जावळी

•           खंडाळा

लोकसंख्या

• घनता

लिंग गुणोत्तर

साक्षरता

• पुरूष

• स्त्री    २७,९६,९०६ (२००१)

• २६६.७७/किमी२

१.००५ ♂/♀

“७८.५२ %” %

 “८८.४५ %” %

“६८.७१ %” %

कलेक्टर व जिल्हा मजिस्ट्रेट      –           श्वेता सिंघल

Vehicle registration – MH-11

महाराष्ट्र राज्यातील एक इतिहास प्रसिद्घ शहर व जिल्ह्याचे मुख्यालय. ते अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी, किल्ल्याच्या उत्तर उतारावर वसले असून पुणे–बंगलोर या क्र.४ च्या राष्ट्रीय महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस सु.१२० व कोल्हापूरच्या उत्तरेस सु. १३० किमी.वर आहे. लोकसंख्या १,२०,०७९ (२०११). याच्या पूर्वेस पाच किमी.वर माहुली येथे याचे जवळचे रेल्वे स्थानक आहे.

सातारा किल्ल्याच्या नावावरून शहरास सातारा नाव पडले आहे. या नावाविषयी अनेक कथा-दंतकथा असून सातदरा, सप्ततारा, महादरा या शब्दांवरून हे आले असावे. काही तज्ज्ञांच्या मते येथील किल्ल्यावरील सप्तऋषींच्या मंदिरामुळे किंवा किल्ल्यास असलेले सतरा बुरूज वा द्वारे यांतील सतरा शब्दाचा अपभ्रंश होऊन सातारा हे नाव रुढ झाले असावे. किल्ल्याचे मूळ नाव सप्तर्षी किंवा सातदरे असे होते. पुढे ते सातारा झाल्याचे शाहूकालीन पत्रव्यवहारातून आढळते.

साताऱ्याचा प्रथम लिखित उल्लेख बहमनी सुलतान पहिला मुहंमदशाह (कार. १३५८– ७५) याच्या पत्रव्यवहारात आढळतो. त्याने ह्या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. बहमनी सत्तेचे विभाजन झाल्यानंतर हा किल्ला आदिलशाही अंमलाखाली आला आणि छ.शिवाजी महाराजांनी काबीज करेपर्यंत तो त्यांच्या अखत्यारीत होता. या काळात किश्वरखान ह्या सरदाराने पहिल्या आदिलशाहची (कार. १५५७–८०) विधवा बेगम चांदबीबी ही निजामशाहशी संगनमत करीत असल्याच्या संशयावरून तिला सातारा किल्ल्यात कैदेत ठेवले (१५८२); परंतु त्याच वर्षी किश्वरखानाचा पाडाव झाल्याने तिची सुटका झाली. पुढे आदिलशाहीत दिलावरखान याने कटकारस्थाने केली, म्हणून त्यास या किल्ल्यात ठेवण्यात आले होते (१५९२). या किल्ल्यातच तो मरण पावला. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत ह्या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणूनच केला जात असे. शिवाजी महाराजांनी २७ जुलै १६७३ रोजी हा ताब्यात घेतला. कर्नाटक मोहिमेच्या आधी १६७५ मध्ये ते आजारी पडले असताना त्यांचा दोन महिने या किल्ल्यात मुक्काम होता. याच काळात रघुनाथ हणमंते त्यांना भेटले आणि कर्नाटक मोहिमेची योजना निश्चित झाली. छ.राजारामांनी विशाळगडहून मराठ्यांची राजधानी येथे नेली (१६९८). त्यानंतर औरंगजेबाने १६९९ मध्ये तो काबीज करून त्यास अजमतारा हे नाव दिले. महाराणी ताराबाईंचे सरदार परशुराम त्र्यंबक यांनी मोगलांकडून तो परत मिळविला (१७०६) आणि त्याचे नाव अजिंक्यतारा असे करण्यात आले. छ. शाहूंनी मोगलांच्या कैदेतून मुक्त झाल्यावर (१७०७) अजिंक्यतारा काबीज करून तेथे स्वतःस राज्य राज्याभिषेक केला (१७०८) आणि सातारा संस्थानची निर्मिती झाली. सातारा संस्थान विलीन होईपर्यंत (१८४९) तो सातारच्या राजांच्या ताब्यात होता.

किल्ल्यावर सांप्रत जुन्या वास्तूंचे अवशेष, मंगळाई, हनुमान व महादेव यांची मंदिरे, महाराणी ताराबाईंचा पडिक राजवाडा, तेलातुपाचे रांजण, तीन तलाव एवढेच जुने अवशेष आढळतात. शिवाय महादरवाजाच्या देवड्यांच्या जोत्यावर कोरलेली वाली-सुग्रीव युद्घाची कथा आणि बुरुजावर तळवटी खोदलेले नागांचे शिल्पांकन पाहावयास मिळते. किल्ल्याच्या माचीवर डफळ्यांच्या घोड्यांची पागा, अक्कलकोटकरांचा वाडा, पिंगळ्यांचा वाडा व शेख मिराची घोड्यांची पागा हे शाहूकालीन अवशेष आहेत. किल्ल्यावर दूरदर्शन (१९८६) आणि आकाशवाणी (१९९२) यांची प्रक्षेपण केंद्रे असून त्यांची परिसीमा सातारा जिल्ह्यापुरती मर्यादित आहे.

छत्रपती शाहूंनी किल्ल्याच्या पायथ्याशी शाहूनगर वसविले (१७२१). तेच सांप्रत सातारा शहर असून तत्कालीन कागदोपत्री त्याचा उल्लेख, ‘सर्व कारखाने किल्ला साताऱ्यावरी ठेवून वरता वाडा वाचविला. शाहू तलाव म्हणून तळे केले. काही लोक वरती, काही लोक खाली रहावे असे केले. खालीशाहूनगर त्यास व वाड्यास पाणी खर्चास नाही म्हणून यवतेश्वरावरून नहर बांधून आणले’ असा आढळतो. छ. शाहूंनी अदालत वाडा, तख्ताचा वाडा वरंगमहालाचा वाडा इ. वास्तू बांधल्या. तख्ताच्या वाड्यामध्ये त्यांचे सिंहासन (तख्त) होते. शाहूंच्या सरदार-सावकारांनी शहरात अनेक वाडे बांधले.त्यांपैकी बरेच वाडे १७५३ मध्ये होळीच्या रात्री आग लागून जळाले, अशी पुरंदरे रोजनिशीत नोंद आहे. पुढे रंगमहालाचा वाडाही १८४७ मध्ये जळाला;मात्र प्रतापसिंह (कार. १८०८–३९) यांनी भवानी पेठेत नवीन वाडा बांधला (१८२४) आणि जुना वाडा बाळासाहेब सेनापतींस विकला. पुढेआप्पासाहेबांनी नवीन राजवाडा बांधला (१८४४). जुन्या राजवाड्यात ‘प्रतापसिंह हायस्कूल’ असून नव्या राजवाड्यात २००३ पर्यंत शासकीयकार्यालये व जिल्हा न्यायालय होते. आता त्यासाठी स्वतंत्र इमारती बांधण्यात आल्या आहेत. जुन्या-नव्या राजवाड्यांतून भित्तिचित्रे काढलेली असूनकाष्ठशिल्पाचे, विशेषतः कोरीव नक्षीकामाचे नमुने दृष्टोत्पत्तीस येतात. जुन्या राजवाड्यातील सभागृहात काही पौराणिक कथानकांवर आधारितभित्तिचित्रे असून त्यांत मानवी आकृत्यांना प्राधान्य दिले आहे व झाडे, वेली केवळ प्रतीकात्मक दाखविली आहेत. सीता स्वयंवर, द्रौपदी स्वयंवर,अमृतमंथन इ. कलात्मक चित्रांतून मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन होते; तर नवीन राजवाड्यातील सभागृहात रामायण-महाभारतातील कथानकांवरतसेच पौराणिक कथांवर आधारलेली भित्तिचित्रे आहेत. यांत हनुमान, शेषशायी विष्णू, समुद्रमंथन, रामपंचायतन, सीता स्वयंवर, द्रौपदी स्वयंवर,गोपींसह कृष्ण, नृत्यमग्न शिव, मल्ल वगैरेंची उल्लेखनीय भित्तिचित्रे आहेत.

शहरात वारांच्या नावांच्या पेठांव्यतिरिक्त रामाऊचा गोट, यादव गोपाळ पेठ, व्यंकटपुरा, चिमणपुरा, दर्गापुरा, केसरकर पेठ, राजसपुरा, पंतांचा गोट, रघुनाथपुरा, मल्हार पेठ, भवानी पेठ इ. पेठा असून त्या भागांस ऐतिहासिक व्यक्तिनामांवरून नावे पडली आहेत. शहरात अनेक मंदिरे असून त्यांपैकी जलमंदिर (भवानी), कोटेश्वर, कृष्णेश्वर, विश्वेश्वर, राममंदिर, विष्णुमंदिर, शंकर, बहिरोबा, ढोल्या गणपती, खिंडीतील गणपती, उत्तर चिदंबरम् नटराज (१९८५), महानुभाव मठ (१९१२) वगैरे प्रसिद्घ आहेत. शाहूंनी झेबुन्निसाच्या (औरंगजेबाची मुलगी) स्मरणार्थ डोला सुरू केला व अदालत वाड्यापलीकडे खतीबाचे घर व मशीद बांधली. यांशिवाय शहरात लहानमोठ्या नऊ मशिदी आहेत.

सातारची नगरपालिका (१८५३) शहरास पाणीपुरवठा, जलनिःसारण, स्वच्छता, रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती, पर्यावरण इत्यादींचे नियोजन करते. यवतेश्वर व महादरा येथून शहरास नळाद्वारे पाणीपुरवठा होतो. १८८६ मध्ये कास तलाव बांधण्यात आला आहे.कास तलावातून बिडाचे नळ टाकून विशिष्ट उंचीवरून पाणी खाली पडेल अशी व्यवस्था १९३५ मध्ये नगरपालिकेने केल्यानंतर तेथे ‘सातारा इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी’ने वीजनिर्मिती सुरू केली. भारतातील हे पहिले लहान प्रमाणातील जलविद्युत्‌केंद्र होय.

शहरात जिल्हा शासकीय कार्यालये असून दोन शासकीय रुग्णालयांसहित अनेक वैद्यकीय रुग्णालये आहेत. रयत व स्वामी विवेकानंद या दोन प्रसिद्घ शिक्षणसंस्थांची कार्यालये व त्यांच्या शैक्षणिक संस्था असून इतर काही मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळाही आहेत. येथील सैनिकी विद्यालय (१९६१) हे भारतातील जुन्या विद्यालयांपैकी एक आहे. गौरीशंकर अकादमी अभियांत्रिकी महाविद्यालय माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण प्रदान करीत आहे.शहरात लहानमोठी अनेक ग्रंथालये असून छ. प्रतापसिंह भोसले (नगरवाचनालय १८४९) ग्रंथालय व छत्रपती सुमित्राराजे भोसले ग्रंथालय ही त्यांपैकीदोन प्रमुख होत. स्वातंत्र्यपूर्व काळात शहरातून अनेक वृत्तपत्रे-नियतकालिके प्रसिद्घ होत असत. त्यांपैकी ऐक्य (१९२३)व ग्रामोद्घार (१९३५) अद्यापही प्रसिद्घ होतात. शिवाय सकाळ, पुढारी, तरुणभारत, सामना, लोकमत यांच्या सातारा आवृत्त्या येथून निघतात. शहराजवळच महाराष्ट्र राज्यऔद्योगिक विकास महामंडळाची वसाहत आहे.

शहरात छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, चार भिंती, अजिंक्यतारा, अनेक राजवाडे व त्यांतील भित्तिचित्रे, यवतेश्वर वगैरे काही प्रेक्षणीयस्थळे आहेत

सातारातील प्रमुख पर्यटनस्थळे:

कास पठार, ठोसेघर, अजिंक्यतारा – सातारातील अजिंक्यतारा किल्हा ११ शतकात दुसरा भोज राजाने बांधला, सज्जनगड, उरमोडी धारण

सातारा जिल्हा :-

भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुणे विभागातील एक जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथे फार अप्रतिम यात्रा असते. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. आधुनिक भारतातसुद्धा सातारा जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४८० चौ. किमी तर लोकसंख्या ३०,०३,९२२ (२०११) आहे. राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे ३.४% क्षेत्र व लोकसंख्येच्या सुमारे २.८९% लोकसंख्या सातारा जिल्ह्यात आहे. विस्तार अनुकमे १७५‘ उत्तर, ते १८११´ उत्तर अक्षांश व ७३३३´ पूर्व ते ७४ ५४´ पूर्व रेखांश आहे. जिल्ह्यात सातारा, वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, माण (तालुका मुख्यालय दहिवडी), खटाव (वडूज), कराड, पाटण, जावळी (जावली), मेढा, महाबळेश्वर असे एकूण ११ तालुके आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेस पुणे, पूर्वेस सोलापूर, दक्षिणेस सांगली, पश्चिमेस रत्‍नागिरी आणि वायव्येस रायगड हे जिल्हे आहेत. जिल्ह्याची उत्तर सरहद्द नीरा नदीने, तर पश्चिम सरहद्द सह्याद्रीने सीमित केली आहे. जिल्ह्याचे दक्षिणोत्तर कमाल अंतर १२० किमी. असून पूर्व-पश्चिम कमाल अंतर १२८ किमी. आहे. जिल्ह्याचा बराच भाग कृष्णा नदीच्या खोऱ्यात, तर काही भाग भीमा नदीच्या खोऱ्यात मोडतो. सातारा (लोकसंख्या १,५७,०००–२००१) हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून ते पुणे-बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर (क्र. ४) वसले आहे.

चतुःसीमा

सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात येतो. सातारा जिल्ह्याच्या

भूवर्णन

डोंगररांगा आणि त्यांच्या कुशीतील उंच पठारी प्रदेश व टेकड्या, उंच सखल भूमी, सपाट मैदानी प्रदेश अशी सातारा जिल्ह्याची प्राकृतिक विविधता आढळते. पश्चिमेकडील सह्याद्री डोंगररांगांचा प्रदेश, कृष्णा नदीखोऱ्याचा प्रदेश, नीरा नदीखोऱ्याचा प्रदेश आणि पूर्वेकडील टेकड्यांचा व माळरानाचा प्रदेश असे जिल्ह्याचे चार स्वाभाविक विभाग पडतात. जिल्ह्याच्या पश्चिम सरहद्दीवर उत्तरेस पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीपासून दक्षिणेस सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीपर्यंत सह्याद्रीचा विस्तार आहे. कृष्णा नदी खोऱ्याचा दुसरा स्वाभाविक विभाग सुमारे ३२ किमी. रुंदीचा व साधारण सपाट असून याच्या साधारण मध्यातून कृष्णा नदी वाहते. वाई, सातारा व कराड हे तालुके कृष्णा नदीखोऱ्याच्या प्रदेशात येतात. येथील जमीन काळी, कसदार व पिकाऊ आहे. नीरा नदी खोऱ्याच्या प्रदेशात खंडाळा व फलटण तालुक्यांचा बहुतांश भाग अंतर्भूत होतो. कृष्णा नदी खोऱ्याच्या पूर्वेकडील चौथा स्वाभाविक प्रदेश कमी पावसाचा आणि बहुतांश माळरानाचा आहे. येथील जमीन हलकी, वैराण आणि कमी प्रतीची आहे. कमी पावसामुळे या भागात वारंवार अवर्षणाची परिस्थिती निर्माण होते. खटाव व माण तालुक्यांचा बहुतांश भाग या स्वाभाविक विभागात येतो.

डोंगररांगा :-

सह्याद्रीच्या मुख्य श्रेणीपासून पूर्वेस व आग्नेयेस गेलेल्या अनेक डोंगररांगा आहेत. त्यांमध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे महादेव, कमळगड, वैराटगड, हातगेघर-आरळे, बामणोली-घेरादातेगड, भैरवगड-कांदूर या डोंगररांगा प्रमुख आहेत. त्यांपैकी महाबळेश्वरच्या उत्तरेस आठ किमी.वर सुरू होणारी कमी लांबीची कमळगड ही डोंगररांग असून तिच्यामुळे डावीकडील (उत्तरेकडील) वाळकी व उजवीकडील (दक्षिणेकडील) कृष्णा हे दोन प्रवाह एकमेकांपासून अलग झाले आहेत. वैराटगड ही डोंगररांग महाबळेश्वर पठारापासून सुरू होऊन पूर्वेस गेलेली आहे. या रांगेतूनच वाई-महाबळेश्वर हा घाटरस्ता जातो. वाईपासून आग्नेयेस १० किमी.वर या रांगेतील वैराटगड हा डोंगरी किल्ला आहे. महाबळेश्वरपासून सुरू होऊन वैराटगडरांगेला साधारण समांतर आग्नेय दिशेने विस्तारित झालेली, हातगेघर-आरळे ही डोंगररांग असून तिच्यामुळे कुडाळी व वेण्णा या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. या रांगेत डोंगरी किल्ला नाही. कोयना धरणाच्या शिवाजी सागर जलाशयाच्या पूर्व भागात, उत्तरेस महाबळेश्वरपासून सुरू होऊन दक्षिणेस सुमारे ६४ किमी. अंतरापर्यंत सह्याद्रीच्या मुख्य रांगेला जवळजवळ समांतर गेलेली, बामणोली-घेरादातेगड ही सह्याद्रीची एक प्रमुख रांग आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेप्रमाणेच ही रांग उंच, जटिल आहे. या रांगेच्या अगदी दक्षिण भागात घेरादातेगड हे तटबंदीयुक्त शिखर आहे. बामणोली-घेरादातेगड रांगेपासून पूर्वेस व आग्नेयेस मैदानी भागातून सातारा, केळवली-सोनापूर व जळू-वसंतगड या तीन मुख्य सोंडी गेलेल्या आहेत. पैकी सातारा ही सोंड केळघर येथून सुरू होऊन सातारा शहरापासून तशीच पुढे उरमोडी-कृष्णा या नद्यांच्या संगमापर्यंत पसरली आहे. या सोंडेमुळे वेण्णा व उरमोडी या नद्यांची खोरी विभागली गेली आहेत. या रांगेत सातारा शहराजवळ सातारा किंवा अजिंक्यतारा (१,००२ मी.) हा तटबंदीयुक्त किल्ला आहे. केळवली-सोनापूर ही दुसरी सोंड कमी लांबीची व काहीशी विखुरलेली व अनियमित स्वरूपाची आहे. या रांगेतील एका सोंडेवर सज्जनगड (सस.पासून ९०९ मी.) हा किल्ला आहे. जळू-वसंतगड ही तिसरी सोंड केळवलीच्या दक्षिणेस १४ किमी.वर बामणोली-घेरादातेगड रांगेपासून सुरू होऊन दक्षिणेस पाटणपर्यंत गेलेली आहे. पाटणच्या ईशान्येस ३ किमी.वर ही रांग आग्नेयेकडे कराडजवळील कृष्णा-कोयना नद्यांच्या संगमाच्या दिशेने गेली आहे. तिच्या काही भागाने तारळी व केरा नद्यांची खोरी तसेच कृष्णा व तिची उपनदी मांड आणि कोयना खोरे विभागली गेली आहेत. या रांगेच्या अगदी आग्नेय भागात कराडच्या वायव्येस ६ किमी.वर वसंतगड हा किल्ला आहे. जिल्ह्याच्या नैर्ऋत्य व दक्षिण भागात सांगली-सातारा जिल्ह्यांच्या सरहद्दी लगत भैरवगड-कांदूर ही डोंगररांग आहे. तिचा बराचसा भाग सांगली जिल्ह्यात असून, काही फाटे सातारा जिल्ह्यात ईशान्य व पूर्वदिशेत पसरले आहेत. त्यांपैकी कोयना व मोरणा या नद्यांदरम्यानचा गुणवंत गडफाटा, मोरणा-कोळे (वांग) नद्यांच्या दरम्यानचा काहीर-किरपा फाटा आणि कोळे नदी-नांदगाव ओढा यांदरम्यानचा काळेगाव-जखीणवाडी फाटा हे तीन फाटे महत्त्वाचे आहेत.

सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागातील महादेव डोंगररांगा आणि त्यांचे फाटे विशेष महत्त्वाचे आहेत. मुख्य महादेव रांगेच्या उत्तरेस नीरा नदीचे, तर दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे आहे. ही डोंगररांग महाबळेश्वरच्या उत्तरे सुमारे १६ किमी.वर सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुरू होऊन संपूर्ण जिल्ह्यात ती पूर्वेस किंवा आग्नेयेस पसरली आहे. या श्रेणीची सुमारे ४८ किमी. अंतरापर्यंत म्हणजे खंबाटकी घाटाच्या पुढे काही अंतरापर्यंतची दिशा पश्चिम-पूर्व अशी आहे. त्यानंतर ती आग्नेयेकडे वळली असून सातारा जिल्ह्याच्या पूर्व सरहद्दीपर्यंत या डोंगररांगांचा विस्तार कमी-अधिक प्रमाणात झालेला आढळतो. तडवळे गावापासून या रांगा अनियमित स्वरूपाच्या आहेत. महादेव डोंगररांगा काही ठिकाणी खंडित झालेल्या असून निरनिराळ्या भागांत त्या वेगवेगळ्या नावांनी परिचित आहेत. पश्चिमेकडे त्यांना गांधार देव डोंगर, मध्यभागी म्हस्कोबाचे डोंगर तर पूर्वेकडे सीताबाईचे डोंगर म्हणून ओळखले जाते. महादेव श्रेणीच्या दक्षिणेकडे गेलेल्या फाट्यांवर जरी अनेक किल्ले असले, तरी तिच्या मुख्य रांगेवर केंजळगड किंवा घेरा-केळंजा अथवा केंजाळा (१,३०१ मी.), ताथवडा (संतोषगड) व वारुगड असे फक्त तीनच किल्ले आहेत. त्यांपैकी घेरा-केंजाळा किल्ला महाबळेश्वरच्या ईशान्येस २२ किमी.वर, ताथवडा किल्ला माण तालुक्यातील दहिवडीपासून वायव्येस ३२ किमी.वर, तर वारुगड दहिवडीच्या उत्तरेस १८ किमी.वर आहे. महादेव श्रेणीत अनेक घाट मार्ग गेलेले आहेत. त्यांपैकी खंबाटकी घाटमार्ग साताऱ्याच्या उत्तरेस ४५ किमी. वर असून त्यातून पुणे-सातारा-बंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग क्र.४ गेला आहे. खंबाटकीच्या आग्नेयेस १९ किमी.वरील तडवळेजवळ असलेल्या घाटातून वाई-आदर्की व पुणे-सातारा हे दोन रस्ते गेलेले आहेत.

मुख्य महादेव डोंगररांगेपासून चंदन-वंदन, वर्धनगड आणि महिमानगड असे तीन प्रमुख फाटे दक्षिणेस गेलेले आहेत. या डोंगर रांगेने कृष्णा व वसना या नद्यांची खोरी वेगळी झाली असून, चंदन-वंदन हे दोन डोंगरी किल्ले या रांगेच्या साधारण मध्यावर आहेत. वर्धनगड डोंगररांग खटाव तालुक्यातील मोळगावापासून सुरू होऊन दक्षिणेस ८० किमी. पर्यंत सांगली जिल्ह्यातील कृष्णा काठावरील कुंडलपर्यंत गेलेली आहे.

सातारा जिल्ह्यात, विशेषतः वाई, जावळी आणि पाटण तालुक्यांत, मुख्य सह्याद्रीचे आणि शंभू महादेवाच्या डोंगरांचे माथे पूर्वेकडून पश्चिमेकडे ते क्रमाक्रमाने एकामागून एक असे उंच होत गेलेल्या पठारी मालिकांच्या पृष्ठभागावरील किल्ल्यांप्रमाणे दिसतात; कारण ते पृष्ठीय थर खडकाळ तटांमुळे तयार झालेले आहेत. पूर्वेकडून दख्खनच्या पठारी प्रदेशाकडून सह्याद्रीची उंची फार वाटत नाही; परंतु कोकण भागाकडून सह्याद्रीचे कडे ठळकपणे दिसून येतात. काही ठिकाणी या कड्यांचा उतार प्रपाती असून तेथे त्यांची खोली ९०० मी. पेक्षा अधिक आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांची उंची पूर्वेस कमी कमी होत गेलेली आहे. महादेव डोंगररांगेचाही उत्तरेकडील नीरा नदीकडील उतार तीव्र असून दक्षिणेकडील कृष्णा खोऱ्यातील उतार त्यामानाने कमी आहे. सह्याद्रीच्या बहुतांश रांगा विदारित स्वरूपाच्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील मुख्य सह्याद्रीरांगेत व तिच्या फाट्यांवर अनेक टेकड्या व डोंगरी किल्ले आहेत. विशेषतः वाई, महाबळेश्वर, जावळी व पाटण तालुक्यातील डोंगराळ, दुर्गम व वनव्याप्त प्रदेश लक्षात घेता त्या परिसरात अनेक डोंगरी किल्ले उभारले आहेत. वाई व खंडाळा तालुक्यांत बालेघर, धामणा, हरळी, कमळगड, केंजळगड, मांढरदेव, पाचगणी, पांडवगड, पिपली, सोनजाई, वागदरा, वंदन, वैराटगड, येरुळी (वेरुळी) या महत्त्वाच्या टेकड्या आहेत. यांपैकी सोनजाई ही सर्वांत कमी उंचीची (१,००२ मीटर), तर येरुळी ही सर्वाधिक उंचीची (१,३८१ मी.) टेकडी आहे. पाचगणी हे प्रसिद्घ थंड हवेचे ठिकाण आहे. वाईपासून पश्चिमेस १६ किमी. वरकमळगड (१,३७५ मी.), वायव्येस १८ किमी.वर केंजळगड (१,३०१ मी.),उत्तरेस ५ किमी. वरपांडवगड (१,२७३ मी.), आग्नेयेस १० किमी.वर वैराटगड (१,२०० मी.) . वरवंदन (१,१७४ मी.) हे डोंगरी किल्ले आहेत.

प्रशासन

तालुक्यांची लोकसंख्या व क्षेत्रफळ

सातारा जिल्ह्यातील एकूण ११ तालुके असून त्यांची सूची पुढीलप्रमाणे आहे.(संदर्भ जनगणना २००१)

क्र तालुका क्षेत्रफळ (चौ. कि. मी.) लोकसंख्या
महाबळेश्वर ३७८.९ ५४,५४६
वाई ६२२.६ १,८९,३३६
खंडाळा ६००.२ १,१९,८१९
फलटण १,१७९.६ ३,१३,६२७
माण १,६०८.२ १,९९,५९८
खटाव १,३७४.० २,६०,९५१
कोरेगाव ९५७.९ २,५३,१२८
सातारा ९५३.५ ४,५१,८७०
जावळी ८६९.० १,२४,६००
१० पाटण १,४०७.८ २,९८,०९५
११ कर्‍हाड १,०८४.८ ५,४३,४२४
  • जिल्ह्यातील नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था
क्र तपशील संख्या नावे
नगरपालिका ०९ साताराकर्‍हाडफलटणरहिमतपूरम्हसवडवाईमहाबळेश्वरपाचगणीमलकापूर
जिल्हा परिषद ०१ सातारा
पंचायत समित्या ११ सातारावाईखंडाळामहाबळेश्वरकर्‍हाडपाटणकोरेगावमाणखटावफलटणजावळी
ग्रामपंचायत १४८३ ———————

 

महाबळेश्वर व जावळी तालुक्यांत महाबळेश्वर, मकरंदगड, प्रतापगड आणि वासोटा ही उंच ठिकाणे असून त्यांपैकी महाबळेश्वर हे थंड हवेचे प्रसिद्घ गिरिस्थान, तर बाकीचे तीन डोंगरी किल्ले आहेत. महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस ११ किमी.वर मकरंदगड, दक्षिणेस २६ किमी.वर सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर वासोटा (१,१७२ मी.), तर नैर्ऋत्येस १३ किमी.वर इतिहास प्रसिद्घ प्रतापगड (१,०८१ मी.) किल्ला आहे.

सातारा विभागातील प्रमुख टेकड्यांत अजिंक्यतारा, यवतेश्वर, सज्जनगड, पेटोवा, घाटाई, पाटेश्वर आणि शूळपाणी यांचा समावेश होतो. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशीच सातारा शहर आहे. साताऱ्यापासून नैर्ऋत्येस सुमारे १० किमी.वर सज्जनगड (परळी-सज्जनगड) किल्ला आहे. याच्या डाव्या बाजूला भाट मराळी नावाचे देवी हे एक ठाणे आहे,हे ठाणे तुळजा भवानीची बहीण मंगळाइ चे ठाणे म्हणून प्रसिद्ध आहे.कोरेगाव तालुक्यात हर्णेश्वर, चवणेश्वर, जरंडा, नांदगिरी आणि चंदन या पाचटेकड्या आहेत. त्यांपैकी नांदगिरी, चंदन व जरंडा हे डोंगरी किल्ले असून ते साताऱ्यायापासून अनुक्रमे ईशान्येस १९ किमी., उत्तरेस २४ किमी. व पूर्वेस १३ किमी. अंतरावर आहेत. पाटणच्या परिसरात चांदली, दातेगड, गुणवंतगड (मोरगिरी), भैरवगड व जंगली-जयगड या प्रमुख पाच टेकड्या असून त्यांपैकी चांदली वगळता उर्वरित चार टेकड्यांवर तटबंदी आहे.

कराड परिसरात आगाशिव, पाल, सदाशिवगड व वसंतगड या चार टेकड्या आहेत. कराडच्या नैर्ऋत्येस सुमारे १० किमी.वर असलेल्या आगाशिव टेकडीचा माथा टोकदार असून तेथील खडकांत काही बौद्घ लेणी आहेत. पाल खेड्यापासून आग्नेयेस तीन किमी.वर पाल नावाची घुमटाकार टेकडी आहे. कराडच्या पूर्वेस पाच किमी.वर शिवाजी महाराजांनी बांधून घेतलेला सदाशिवगड हा डोंगरी किल्ला आहे. वर्धनगड श्रेणीच्या पश्चिमेकडील एका फाट्याच्या टोकावर हा किल्ला आहे. कराडच्या वायव्येस सहा किमी.वर वसंतगड आहे.

माण तालुक्यात वारुगड, खोकडा, शिखर-शिंगणापूर, ताथवडा (संतोषगड), जिरे-पठार, कुळकजाई आणि महिमानगड या प्रमुख टेकड्या आहेत. त्यांपैकी वारुगड, ताथवडा व महिमानगड टेकड्यांवर गडाची तटबंदी आहे. दहिवडीच्या ईशान्येस २१ किमी.वर शिखर-शिंगणापूर टेकडी असून तिच्या मध्यावर शिंगणापूर खेडे व महादेवाचे मंदिर आहे. खटाव तालुक्यात सोलकनाथ, भापशाह, वर्धनगड आणि भूषण गड्या चार टेकड्या आहेत. वडूजच्या उत्तरेस २९ किमी.वर सोलकनाथ टेकडी असून त्यात येरळा नदी उगम पावते. वडूजच्या पश्चिमेस २२ किमी.वर वर्धनगड आहे. या गडाची टेकडी महादेव श्रेणीचाच एक भाग असून तिचा माथा गोलाकार आहे. टेकडीच्या दक्षिणेकडून सातारा–पंढरपूर रस्ता जातो. वडूजच्या नैर्ऋत्येस १८ किमी. वर सपाट माथ्याचा, पण प्रपाती उताराचा खडकाळ भूषणगड किल्ला आहे.

सह्याद्रीत काही ठिकाणी खिंडी किंवा ग्रीवा आढळतात. त्यातून घाटमार्ग काढलेले आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही घाट महत्त्वाचे ठरले आहेत. खंबाटकी (पुणे–बंगलोर महामार्ग), पसरणी (वाई–महाबळेश्वर), आंबेनळी व पारघाट (महाबळेश्वर–महाड), कुंभार्ली (कराड–पाटण–चिपळूण) हातलोट आणि वासोळ्याच्या दक्षिणेस असलेला उत्तर तिवरा घाट हे जिल्ह्यातील प्रमुख घाट आहेत.

जिल्ह्यातील जमिनीच्या प्रतवारीत प्रादेशिक भिन्नता आढळते. महाबळेश्वर तालुक्यात तसेच वाई, जावळी व पाटण तालुक्यांच्या पश्चिम भागात जांभी मृदा आढळते. डोंगर उतारावरील मृदेच्या थराची जाडी कमी आहे; परंतु पावसामुळे डोंगराळ भागातून वाहत आलेल्या वनस्पतीजन्य पालापाचोळ्यामुळे व गाळामुळे नैसर्गिक अथवा कृत्रिम रीत्या तयार केलेल्या खाचरांमध्ये सुपीक मृदा तयार झाल्या आहेत. कृष्णा, वेण्णा, कुडाळी, कोयनाव केरा नद्यांच्या खोऱ्यात गाळाच्या सततच्या संचयनामुळे जाड थर असलेल्या सुपीक मृदा आहेत. जिल्ह्याच्या मध्य भागात गाळाची तसेच बेसाल्ट खडकापासून तयार झालेली काळी मृदा आढळते. कृष्णा खोऱ्यातील मृदा ही दख्खनच्या पठारावरील विशेष सुपीक मृदा समजली जाते. त्यांपैकी सातारा व कराड तालुक्यांतील कृष्णा काठच्या जमिनी अत्यंत सुपीक आहेत. नीरा व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यातील मृदा चांगल्या प्रतीची आहे. खंडाळा, फलटण व खटाव तालुक्यांच्या डोंगरी परिसरातील मृदा हलकी व खडकाळ आहे. माण तालुक्यातील जमिनीची प्रत अत्यंत निकृष्ट आहे. ओढे, नाले यांच्या दरम्यान माळरानाचे पट्टे आढळतात.

नद्या :-

सातारा जिल्हा हे प्रामुख्याने कृष्णा नदीचे जलवाहन क्षेत्र असून येथे कृष्णा, येरळा, माणगंगा, नीरा ही प्रमुख चार नदीखोरी आहेत. क्षेत्र महाबळेश्वर येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या नद्यांचे उगम-झरे दाखविले आहेत. या नद्या महाबळेश्वरपासून वेगवेगळ्या दिशांना वाहत जातात. कृष्णाही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. महाबळेश्वर येथील उगमानंतर वाई, सातारा, कोरेगाव व कराड या तालुक्यांतून, १६० किमी. अंतर वाहत जाऊन ती सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. वाई व कराड ही नगरे या नदीच्या काठावर आहेत. कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्राव्यतिरिक्त कुडाळी, वेण्णा, उरमोडी, तारळी व कोयना ह्या उजवीकडील आणि वसना व येरळा ह्या डावीकडील उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रांचा कृष्णानदीच्या बृहत् पाणलोट क्षेत्रात समावेश होतो. कुडाळी ही कृष्णेची एक लहानशी उपनदी जावळी व वाई तालुक्यांतून वाहते. महाबळेश्वर येथेच उगम पावणारी वेण्णा नदी साताऱ्याजवळील माहुली येथे कृष्णा नदीला मिळते. जावळी व सातारा तालुक्यांतून वाहणारी उरमोडी नदी वेणेगाव येथे कृष्णेला मिळते. पाटण व कराड तालुक्यांतून वाहणारी तारळी नदी उंब्रजजवळ कृष्णेला मिळते. कृष्णा नदीवर वाई तालुक्यात धोम गावाजवळ धोम धरण बांधण्यात आलेले आहे.

कोयना ही कृष्णेची जिल्ह्यातील सर्वांत मोठी उपनदी आहे. महाबळेश्वर येथील उगमानंतर जावळी व पाटण तालुक्यांतून दक्षिणेस हेळवाकपर्यंत ती वाहत जाते. त्यानंतर ती पूर्ववाहिनी होते व कराड शहराजवळ कृष्णेला मिळते. हे संगमस्थान प्रीतिसंगम म्हणून प्रसिद्घ आहे. कोयना नदीवरील कोयना धरण वीजनिर्मितीसाठी विशेष प्रसिद्घ आहे. सातारा जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवरून वाहणारी नीरा नदी पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांत उगम पावते. खंडाळा व फलटण तालुक्यांतून वाहत जाऊन पुढे ती सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. माणगंगा ही भीमा नदीची उपनदी माण तालुक्याच्या वायव्य भागात उगम पावून आग्नेय दिशेस वाहत जाते व पुढे सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. म्हस्कोबाच्या डोंगराळ भागात उगम पावणारी येरळा नदी कोरेगाव व खटाव या तालुक्यांतून वाहत जाऊन पुढे सांगली जिल्ह्यात प्रवेश करते.

प्रीतिसंगम :-

कऱ्हाड येथे कृष्णा-कोयना नद्यांचा संगम झाला आहे. या ठिकाणास प्रीतिसंगम म्हटले जाते. येथे कृष्णामाईचे मंदिर आहे. कऱ्हाडचे नाव यशवंतराव चव्हाण यांनी भारतात प्रसिद्ध केले. कऱ्हाडच्या (सातारा जिल्ह्याच्याही) शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीत यशवंतराव चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असणाऱ्या यशवंतरावांची केंद्रिय मंत्रिपदाची व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द गाजली, यशस्वी ठरली. ज्यांच्याकडे सांस्कृतिक जाण होती, विकासात्मक दूरदृष्टी होती अशा यशवंतराव चव्हाण यांची समाधी प्रीतिसंगमावर आहे.

हवामान :-

जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने तेथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. याच भागात महाबळेश्वर, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे आहेत. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १३५ सेंमी. असून जून ते सप्टेंबर या कालावधीत नैऋर्त्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. पावसाचे वितरण बरेच असमान आहे. महाबळेश्वर येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान सुमारे ६२५ सेंमी. असून खटाव, माण यांसारख्या पूर्वेकडील तालुक्यांत ते सुमारे ६० सेंमी.पेक्षाही कमी आहे. पश्चिमेकडील महाबळेश्वर, जावळी व पाटण हे तालुके अधिक पावसाचे आहेत.

 वनस्पती व प्राणी :-

सातारा जिल्ह्यातील १,५२४ चौ. किमी. क्षेत्र वनांखाली असून त्यांपैकी १,३६९ चौ. किमी. राखीव, ४८ चौ. किमी. संरक्षित व १०७ चौ. किमी. क्षेत्र अवर्गीकृत वनांखाली आहे. महाबळेश्वर, जावळी व पाटण तालुक्यांत तसेच वाई तालुक्याच्या पश्चिम भागात ही वने एकवटलेली आहेत. सह्याद्रीच्या उतारावर सदाहरित वने, तर सह्याद्रीच्या पायथ्याशी मिश्रवने आहेत. कोयना खोऱ्यात व जावळी तालुक्यात सुमारे ४२४ चौ. किमी. क्षेत्रावर कोयना अभयारण्य आहे. या अभयारण्यात व एकूणच जिल्ह्यातील दाट वनांमध्ये बिबट्यागवारानडुक्करअस्वल, सांबर इ. प्राणी आहेत. मायणी तलावाच्या परिसरात पक्ष्यांसाठी राखीव असलेले अभयारण्य विकसित करण्यात आले आहे.

कोयना नदीचे खोरे व कोयना धरणाचा परिसर, महाबळेश्वर, पाचगणी व पाटण परिसरात असलेली वनसंपदा, त्याच्या माध्यमातून होऊ घातलेला व्याघ प्रकल्प, कास, बामणोली, तापोळा परिसर आणि त्या भागात आढळणाऱ्या औषधी वनस्पती या सर्व सातारा जिल्ह्याच्या वैभवाच्या बाबी आहेत. जगभरातील जैव विविधता असलेल्या स्थळांना मानवाकडून धोका आहे. त्यात पश्चिम घाटातील विविध स्थळांबरोबरच सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीचाही समावेश होतो. येथील धोक्यात येत असलेली पर्यावरणीय परिसंस्था जपणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील जैव विविधतेने नटलेला हा भाग पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील परिसर (इको सेन्सेटिव्ह झोन) होणे ही काळाची गरज आहे.पश्चिम घाटातील विविध स्थळांचा ‘जागतिक वारसा स्थळांत’ (वर्ल्ड हेरिटेज साईट) समावेश होण्यासाठी भारताच्या केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने याबाबतचा प्रस्ताव ‘दि युनायटेड नेशन्स एज्युकेशनल ॲन्ड कल्चरल ऑर्गनायझेशन’ला (युनेस्को) पाठविला होता. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोच्या द्विसदस्यीय तज्ज्ञ पथकाने पश्चिम घाटातील जवळपास ३५ स्थळांना भेट दिली. याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील पुष्प पठार म्हणून नावलौकिक मिळालेले कास पठार, कोयना वन्य जीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान या स्थळांची डॉ.स्ट्राहम व डॉ. फर्ज या युनेस्कोच्या सदस्यांनी ऑक्टोबर २०१० मध्ये पाहणी केली. युनेस्कोच्या मंजुरीमुळे (२०१२) सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्य, कासपठार, चांदोली राष्ट्रीय उद्यान या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण औषधी व दुर्मीळ वनस्पती, जंगली व सरपटणारे प्राणी, कीटक आदींचे अधिक शास्त्रीय पद्घतीने संरक्षण-संवर्धन करणे शक्य आहे.

जुना इतिहास :-

अश्मयुगीन व ताम्र-पाषाणयुगीन काही लघु-अश्म हत्यारे व मृत्पात्रे कृष्णा-कोयना नदीखोऱ्यात आढळली. त्यांवरून या जिल्ह्यात प्रागैतिहासिक काळात मानवी वस्ती होती; मात्र जिल्ह्यात विस्तृत उत्खनन व शास्त्रीय दृष्ट्या अन्वेषण झालेले नाही. सातवाहनांची सत्ता या प्रदेशावर इ.स.पू. सुमारे २०० ते इ. स.३०० या काळात होती. तत्कालीन वरवंटे, जाती, खापरे इत्यादी अवशेष वाईच्या किवरा ओढ्याच्या परिसरात आढळले आहेत. तसेच या काळात काही हीनयान बौद्घलेणी कराड-वाई (लोहारे) येथे खोदली गेली असून शिरवळ, कुंडल, भोसे, माळेवाडी आदी ठिकाणी त्याकाळी गुंफा खोदल्या होत्या. भारहूत (मध्यप्रदेश) स्तूपाच्या अभिलेखात करहाटक (कराड) येथील यात्रेकरूंनी अनुदान दिल्याचा उल्लेख आढळतो. सातवाहनांनंतर चौथ्या शतकात हा प्रदेश पूर्वकालीन राष्ट्रकूटांच्या अंमलाखाली होता. त्या वंशाचा मूळ पुरुष मानांक (कार. इ. स. ३५०–७५) याने आपल्या नावे मानपूरनामक नगर स्थापून तेथे आपली राजधानी केली होती; हे मानपूर म्हणजेच सातारा जिल्ह्यातील माण असावे. या वंशाच्या अंमलाखालचा प्रदेश प्राचीन कुंतल देशात अंतर्भूत होत असल्याने येथील राजास कुन्तलेश्वर किंवा कुंतलाधिपती म्हणत. कुंतल देशात कृष्णवर्णा किंवा कृष्णा नदीकाठच्या प्रदेशाचा अंतर्भाव होत असे. ‘करहाटक ४०००’ या प्रदेशाचा कुंतल देशात समावेश होता. या राजांना उत्तरेतील गुप्तसम्राटांचा पाठिंबा होता. राजशेखर, भोज, क्षेमेंद्र इ. संस्कृत ग्रंथकारांनी उल्लेखिलेल्या परंपरेप्रमाणे गुप्तराजा दुसरा चंद्रगुप्त-विक्रमादित्य याने स्वकालीन राष्ट्रकूट राजाच्या म्हणजे मानांकाचा पुत्र देवराजच्या दरबारात कविकुलगुरू कालिदास याला आपला दूत म्हणून पाठविले होते. नंतर या घराण्याचे विदर्भातील वाकाटकांशी विवाहसंबंध झाले आणि पुढे ते त्यांचे सामंत झाले. या काळात उदयास आलेल्या विष्णुकुंडिन वंशातील दुसरा माधव वर्मा (सहावे-सातवे शतक) याच्या खानापूर ताम्र पटात रेठ्ठूरक (रेठरे बुद्रुक) या गावचा उल्लेख असून त्याच्या स्तंभाच्या निर्देशात राजमाची, शेणोली, कोला व मलखेट या गामांचा उल्लेख आहे. शिवाय दानपत्रातील बेलवाटिका व वठ्ठरिका म्हणजे अनुक्रमे बेलवंडे व वाठार हेही स्पष्ट आहे. यावरून काही काळ या वंशाचा या प्रदेशावर अंमल असावा. चालुक्य दुसरा पुलकेशीने हे राज्य खालसा करून (६३१) तिथे आपलाभाऊ विष्णुवर्धन याची काही काळ नियुक्ती केली. बादामीच्या चालुक्यांच्या पतनानंतरचा या प्रदेशाचा इतिहास सुस्पष्ट नाही; तथापि तो नंतरच्या राष्ट्रकूट (७५३–९७५) घराण्याच्या साम्राज्यात अंतर्भूत झाला असावा आणि त्यांनी त्यावर एखाद्या सामंताची नेमणूक केली असावी.या काळातील त्यांची राजधानी सातारा जिल्ह्यातील कराड येथे असावी. कर्नाटकातील उत्तरकालीन सिंदराजे आपल्याले खात स्वतःचा ‘करहाटपूर वराधिश्वेर’ असा निर्देश करतात, यावरून ते मूळचे करहाटचे होते, हे निश्चित. कर्नाटकातील काही सिंदराजांच्या लेखांत ते मूळचे करहाटकचे होते, असे उल्लेख येतात. यावरून सिंदनृपती आदित्यवर्मा याची राजधानी करहाटकच असावी असे वाटते. नंतर शिलाहार द्वितीय जतिग याने तो प्रदेश जिंकून करहाटक येथे आपली राजधानी केली असावी. या शाखेचा पहिला ज्ञात लेख मारसिंहाचा (१०५८) मिरज ताम्रपट होय. मारसिंह (कार. १०५०–७५) याच्या ताम्र पटात द्वितीय जतिगाचा मुलगा व उत्तराधिकारी गोंक याचे वर्णन असून तो करहाटक, कुण्डी, मिरिज देश यांचा अधिपती असल्याचा उल्लेख आहे. गोंकानंतर त्याचा मुलगा मारसिंह गादीवर आला. त्यावरून शिलाहारांची आरंभीची राजधानी करहाटक असावी. शिलाहारवंशी राजकन्या चंद्रलेखा हिच्या चालुक्य राजा सहाव्या विक्रमादित्याबरोबरच्या करहाटक येथील स्वयंवराचे वर्णन बिल्हणाच्या विक्रमांकदेवचरितात आहे. तिच्या पित्याचे नाव करहाटपती असे त्यात आले आहे. राजा मारसिंह हा तिचा पिता असावा. या शाही विवाहानंतर शिलाहारांनी आपली राजधानी करहाटकहून कोल्हापुरास हलविली असे दिसते; तथापि करहाटक येथे चालुक्य राजपुत्र मल्लिकार्जुन (चंद्रलेखेचा पुत्र) आणि सहाव्या विक्रमादित्याचा मांडलिक जोगम हे काही वर्षे राज्य करीत होते, असे कोरीव लेखांत उल्लेख आढळतात. कोल्हापूर व त्याच्या आसमंतात सापडलेल्या अनेक कोरीव लेखांत व वाङ्‌मयातही त्यांचा उल्लेख ‘करहाटाधिपती’ असाच आढळतो. शिलाहार वंशातील दुसरा भोज (कार. ११७५–१२१२) हा शेवटचा व श्रेष्ठ राजा होय. त्याने सातारा जिल्ह्यात १०–१२ किल्ले बांधले. त्यांपैकी सप्तर्षी (सातारा किंवा अजिंक्यतारा), चंदन-वंदन वगैरे काही प्रसिद्घ किल्ले होत. यादव राजा सिंघण (कार. १२१०–४६) याने भोजाचा पराभव केला. त्यानंतर हा प्रदेश यादवांच्या आधिपत्याखाली आला. या काळातील कोरीव लेखांत या प्रदेशाविषयी उल्लेख नाहीत. मात्र यादव वास्तुशिल्प शैलीतील मंदिरे फलटण (जबरेश्वर), परळी (शिवमंदिर व वीरगळ), कातरखटाव (कातरेश्वर), देऊर (विठ्ठल-रुक्मिणी), खटाव (नागनाथ), किकली (भैरवनाथ), शिंगणापूर (महादेव) इ. ठिकाणी आहेत. यांपैकी किकलीच्या भैरवनाथ मंदिरासमोर एक अस्पष्ट कोरीव लेख असून त्यातील ‘सिंघणदेव’ ही पुसट अक्षरे यादव वंशाच्या आधिपत्याचा निर्देश दर्शवितात यादवांच्या पतनानंतर (१३१८) दक्षिण हिंदुस्थानात राजकीय अनागोंदी होती. बहमनी सत्तेखाली (१३४७–१५३८) गुलबर्गा तरफाचा सातारा भाग होता. कोकण भाग वगळता अन्य प्रदेश बहमनी साम्राज्यात होता. मुहंदशाह बहमनी (कार. १३५८–७५) याने खुद्द सातारा किल्ल्याची डागडुजी करून परिसरात अनेक किल्ले बांधून संरक्षण व्यवस्था भक्कम केली. यानंतर हुमायूनशाह जालीम (कार. १४५८–६१), निजामुद्दीन (कार. १४६१–६३) आणि तिसरा मुहंदशाह (कार. १४६३–८२) हे सुलतान झाले. या काळात वाई व माण ही दोन प्रमुख लष्करी ठाणी होती. बहामनी सत्तेच्या विभाजनानंतर हा प्रदेश आदिलशाही अंमलाखाली आला. याकाळात जावळीचे चंद्रराव मोरे, फलटणचे राव नाईक निंबाळकर, मलवडीचे झुंझारराव घाटगे, म्हसवडचे माने आदी मातब्बर मराठा मांडलिक घराणी वंशपरंपरेने आपल्या जहागिरीच्या ठिकाणी कारभार करत होती. त्यांच्या जीवावरच आदिलशाही सत्ता कोकणात स्थिरावली आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी आपली सत्ता दृढतर केली. याचकाळात शिवाजी महाराजांनी जावळी व परिसर पादाक्रांत करून (१६५६) रायरी (रायगड) घेतला आणि पुढे अफजलखानाचा निःपात करून (१६५९) वाई देश जिंकला. शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंत व नंतरही किरकोळ अपवाद सोडता सातारा किल्ला व त्याचा परिसर मराठ्यांच्या अंमलाखाली होता. पुढे राजारामांनी सातारा ही मराठ्यां ची राजधानी केली. औरंगजेबाने सातारा-परळी किल्ल्यांसह बराच भाग मोगल सत्तेखाली आणला (१६९९). त्याच्या मृत्युनंतर (१७०७) तो शाहूंच्या अखत्यारीत आला आणि सातारा संस्थानची निर्मिती झाली. प्रतापसिंह भोसले (कार. १८०८–३९) यांच्या कारकीर्दीत सातारा शहर व जिल्ह्यात अनेक सुधारणा झाल्या. हा प्रदेश पेशवाईच्या अस्तापर्यंत (१८१८) मराठी सत्तेखाली होता; पुढे सुरूवातीस बिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे त्यावर वर्चस्व होते (१८५८) नंतर तो अव्वल इंग्रजी अंमलाखाली भारत स्वतंत्र होईपर्यंत होता (१९४७).स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या वेगवेगळ्या आंदोलनांत जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. शिरोड्याच्या आंदोलनात जिल्ह्यातील अनेक सत्याग्रही सामील झाले होते. काँग्रे स समितीने ‘छोडो भारत’चा ठराव मंजूर केला. त्याच दिवशी मुंबईतच सातारकरांच्या भूमिगत कारवायाचा प्रारंभ झाला. भूमिगत झाल्याने बहुसंख्य आंदोलक अटक टाळू शकले, त्यामुळे या जिल्ह्यातील आंदोलन दीर्घकाळ टिकून राहिले. गनिमी काव्याच्या युद्घतंत्राचा येथे उपयोग करण्यात आला. नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, किसनवीर, वसंतदादा पाटील, बाबुराव चरणकर, बरडे मास्तर, बाबुराव पाटणकर इत्यादींचे नेतृत्व या आंदोलनाला लाभले होते. नाना पाटील यांनी प्रतिसरकारची (पत्री सरकारची) योजना आखली. महाराष्ट्रातील भूमिगत आंदोलनांचे सर्वांत देदीप्यमान शिखर म्हणजे साताऱ्याचे प्रतिसरकार होय. स्वातंत्र्योत्तर काळात औंध, फलटणबरोबरच सांगली, मिरज, जत ही संस्थानेही सातारा जिल्ह्यातच समाविष्ट करण्यात आली. परिणामी सातारा जिल्हा आकारमानाने मोठा होऊन प्रशासकीय दृष्ट्या गैरसोयीचा बनला. त्यामुळे १ ऑगस्ट १९४९ रोजी तत्कालीन सातारा जिल्ह्याचे विभाजन करून उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले. १९६० मध्ये तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्याचे रूपांतर सांगली जिल्ह्यात, तर उत्तर सातारा जिल्ह्याचे रूपांतर सातारा जिल्ह्यात करण्यात आले.

फलटण येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले गेली अनेक वर्षे वास्तव्यास होते. आपल्या ओघवत्या वाणीने, वैशिष्ट्यपूर्ण अशा वक्तृत्वशैलीच्या माध्यमातून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, श्रीरामकृष्ण परमहंस या व्यक्तिमत्त्वांचे एक निराळेच दर्शन महाराष्ट्राला घडवले होते.

ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारताला पहिले पदक मिळवून देणारे श्री. खाशाबा जाधव हे कऱ्हाड तालुक्यातील गोळेश्र्वर या गावचे होते. श्री. जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कुस्ती या खेळात कांस्य पदक मिळविले होते. यांचे शालेय शिक्षण कऱ्हाडमध्ये झाले होते. ऑलिंपिकला जाण्यासाठी कऱ्हाडमधील लोकांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले होते.

ज्येष्ठ लोककलावंत शाहीर साबळे व महाराष्ट्रातील प्रमुख उद्योजक श्री. बी.जी. शिर्के यांचा जन्म जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी या गावचा. आपापल्या क्षेत्रात उच्च शिखर गाठल्यानंतरही या दोहोंनी आपल्या गावाशी संपर्क ठेवलेला होता.

सातारा जिल्हा ऐतिहासिक वैशिष्ट्ये :-

सातारा जिल्ह्यावर प्राचीन काळात सम्राट अशोकानंतर सातवाहन, चालुक्य,राष्ट्रकूट, शिलाहार आणि यादवांनी राज्य केले. सातारा कूट या नावाने प्रसिद्ध पावलेला हा भूभाग यादवांच्या पाडावानंतर बहमनींच्या अधिपत्याखाली आला. सतराव्या शतकात शिवाजी महाराजांनी सातारची भूमी मराठी राजसत्तेचे केंद्र बनविली. त्यानंतर संभाजीपुत्र छत्रपती शाहूने सातारा ही मराठी राज्याची राजधानी बनविली. मूलत: सातारा हे शहराचे नाव नसून ज्या किल्ल्याजवळ त्याची वसाहत आहे त्या किल्ल्याचे हे नाव आहे. सातारा किल्ल्याची जी नावे उपलब्ध आहेत ती अशी : मंगलाई, सप्तर्षी, सतारे, उकाबैन, इसमतआरा, शाहगड आणि अजीमतारा. या सहा नावांपैकी पहिली तीन फार जुनी आहेत. उकाबैन हे नाव बहमनी राज्यातील व त्यानंतरच्या आदिलशाहीतील आहे. अहमदनगरचा बादशहा हुसेन निजामशहा याची मुलगी व विजापूरचा बादशहा अली आदिलशहा याची राणी चांदबिबी हिला तिचा वजीर किशवरखान याने 1582 साली साताऱ्याच्या किल्ल्यात कैद करुन ठेवले होते. त्यावेळी इसमतआरा हे नाव मिळाले. इ.स. 1700 मध्ये औरंगजेबाने साताऱ्याचा किल्ला घेतला त्यावेळी त्याचा मुलगा अजीमशहा याचे नावावरुन अजीमतारा हे नाव दिले आहे. उकाबैन, इसमतआरा व अजीमतारा ही नावे गेल्या सहाशे वर्षांतील आहेत. मंगलाई, सप्तवर्षी व सतारे ही नावे सहाशे वर्षांमागील असून बाराव्या शतकाच्या अखेरची असावीत. पन्हाळगडावर राज्य करणाऱ्या शिलाहार राजांपैकी दुसऱ्या भोजराजाने पंधरा किल्ले बांधले असून त्यात सातारा किल्ल्याची नोंद मिळते. साताऱ्याच्या दक्षिणेस उभी चढण असलेल्या आणि सपाट माथ्याच्या टेकडीवर पन्हाळ्याचा शिलाहार राजा दुसरा भोज याने इ.स.1990 च्या सुमारास सातारा (अजिंक्यतारा) किल्ला बांधला असे म्हणतात.या किल्ल्याच्या भिंतींना सतरा बुरुज आणि सतरा दरवाजे होते. आणि त्यावरुन या किल्ल्यास आणि किल्ल्या जवळील गावास सातारा हे नाव पडले असावे. परंतु सातारा या शब्दाचे अनेक अर्थ आणि व्युत्पत्ती सांगण्यात येतात. सातदरा वरुन सातारा, महादरा तो सातारा, सप्ततारा पासून सातारा, अजिंक्य ताऱ्यावरील सप्त ऋषींच्या देवालयामुळे सातारा, पन्हाळगडाच्या ईशान्य दिशेकडील पूर्वीचे गाव सातर म्हणजे सातारा आणि वर सांगितल्याप्रमाणे सतरा दरवाजे असलेल्या अजिंक्यतारा (सातारा किल्ला) किल्ल्यावरुन सातारा शब्द आलेला असावा. परंतु येथील भूमीची विशेषत: वर उल्लेखिलेल्या एकाही व्युत्पत्तीने व्यक्त होत नाही, असे स्थानिक इतिहासकारांचे मत आहे. ही विशेषत: व्यक्त करणारी म्हणून सात म्हणजे विपुल या अर्थाच्या शब्दापासून सातारा संकल्पनेची व्यत्पुत्ती काही इतिहासकार मांडतात. सातऱ्सातर, म्हणजे विस्तार असा अर्थ निघतो. विस्तार करणारा तो सातारा हे विशेषनाम भाषशास्त्री दृष्टीने योग्य ठरते. अशा रीतीने सात-सातर-सातारा अशी व्युत्पत्ती अधिक सार्थ ठरते.

ऐतिहासिक वैशिष्ट्ये :-

जिल्ह्याला सातारा हे नाव कसे पडले याबाबत अनेक मते आहेत. साताऱ्याच्या दक्षिणेस साते नावाचे गाव आहे. त्याच्या जवळच्या दऱ्यास सातदरा असे म्हणतात. या सातदरा शब्दावरुन सातारा अशी उत्पत्ती झाल असावी. अजिंक्यताऱ्याचे जुने नाव सप्तर्षीचा किल्ला असे होते. या सप्तर्षीपासून सातारा नाव पडल्याचेही सांगितले जाते. सातर शब्दाचा अर्थ ईशान्य असा आहे. भोज राजाची राजधानी पन्हाळगड येथे होती. पन्हाळगडाच्या इशान्येस असलेले पूर्वीचे गाव सातर व त्यावरुन सातारा शब्द बनला असावा. औरंगजेबाचा मुलगा अजिमशहा याने सातारच्या किल्ल्याला वेढा दिला तेव्हा किल्ल्याला सतरा दरवाजे व बुरुज होते, यावरुनही सातारा नाव पडले असावे असे अनेक मतप्रवाह सातारा नावाच्या बाबतीत प्रचलित आहेत.
सातारा जिल्हा म्हणजे शूरांची आणि वीरांची कर्मभूमी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि युग पुरुष म्हणून समाज ज्यांच्याकडे पहातो त्या थोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद सर्शाने पावन झालेला हा जिल्हा नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसला आहे. उज्ज्वल परंपरा, देदिप्यमान इतिहास आणि थोर पराक्रमाची पार्श्वभूमी लाभलेल्या ह्या जिल्हयात महान साधूसंत आणि थोर ज्ञानी पुरुषही होउुन गेले. सुमारे नऊ लक्ष चौरस मैलांच्या प्रदेशावर सत्ता चालविणाऱ्या मराठी साम्राज्याची सातारा ही एके काळी राजधानी होती. सात नद्यांचे उगमस्थान असलेल्या या जिल्हयाला अंदाजे 22 हजार माजी सैनिकांच्या पराक्रमाचा वारसा लाभला आहे.आजही सेनादलात प्रचंड संख्येने जिल्हयातील जवान तळहातावर प्राण घेऊन सीमेवर देशाची सेवा बजावीत आहेत, ही ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष म्हणावी लागेल. सैनिकी जिल्हा म्हणून उदयास आलेल्या या जिल्हयातील काही गावांना मिलिटरी गावे तर काही तालुक्यांना लष्करी तालुके म्हणून आजही संबोधले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात देश स्वातत्र्यांसाठी घडलेल्या अनेक चळवळीमध्ये मोलाचे योगदान दिलेला हा जिल्हा पूर्वी दक्षिणेकडील वारणा नदीपासून उत्तरेकडील नीरा नदीपर्यंत दूरवर पसरला होता. स्वातंत्र्योत्तर काळात प्रशासकीय कामकाज आणि सोईच्या दृष्टीने सातारा जिल्हयाचे विभाजन होऊन दक्षिण सातारा व उत्तर सातारा अशा दोन स्वतंत्र जिल्हयाची निर्मिती झाली. पुढे दक्षिण सातारा जिल्हयातून सांगली जिल्हा तर उत्तर सातारा जिल्हयातून सातारा जिल्हा उदयास आला.

भागेलिक रचना :

भौगोलिकदृष्टया सातारा जिल्हा उत्तर अक्षांश 17.5 ते 18.11 व पूर्व रेखांश 73.33 ते 74.54 यांच्यामध्ये येतो. जिल्ह्याच्या उत्तरेस पुणे, पूर्वेस सोलापूर, दक्षिणेस सांगली, पश्चिमेस रत्नागरी व वायव्येस रायगड हे जिल्हे आहेत.

क्षेत्र व प्रशासकीय विभाग :

जिल्हयाचे क्षेत्रफळ 10 हजार 480 चौ. कि. मी. आहे. ते महाराष्ट्र राज्याच्या 3.40 टक्के आहे. आकारमानाच्या दृष्टीने राज्यातील एकूण 35 जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्याचा 12 वा क्रमांक लागतो. जिल्ह्यात 11 तहसील कार्यालये कार्यरत आहेत. जिल्ह्याचे सातारा, वाई, कराड व फलटण असे 4 उपविभाग होते. आता त्यात 15 ऑगस्ट 2013 पासून कोरेगाव, पाटण आणि माण-खटाव या 3 उपविभागांची नव्याने भर पडून एकूण 7 उपविभाग कार्यरत आहेत. ग्रामीण विभागासाठी 1 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 11 पंचायत समिती कार्यरत आहेत. आठ नगरपरिषदा व 1 नगरपंचायत असलेली शहरे असून जिल्ह्यात 1739 गावे आहेत. पुणे-बंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 या जिल्हयातून जात असल्यामुळे मोठ्या शहरांशी हा जिल्हा जोडला गेला आहे

नैसर्गिक रचना :

सह्याद्रीच्या पर्वत श्रेणी, डोंगरदऱ्या, चढ उताराची जमीन आणि सपाटीचे क्षेत्र असे जिल्ह्याचे सर्वसाधारण स्वरुप आहे. मुख्य डोंगराच्या 2 श्रेणी असून त्यापैकी सह्याद्री पर्वताची सुमारे 93 कि.मी. लांबीची उत्तरेकडून दक्षीणकडे जाणारी रांग म्हणजे जिल्ह्याची पश्चिम सिमा होय. तीला बामणोलीची रांग असेही म्हणतात. महादेवाचा डोंगर व त्याचे फाटे ही दुसरी डोंगरी रांग असून ती महाबळेश्वरच्या उत्तरेस सुमारे 16 कि.मी. पासून सुरु झालेली आहे. महाबळेश्वर-कोयना खोरे परिसर सोडलातर जिल्ह्यातील इतर डोंगर सामान्यत: लहान, वृक्षरहीत व खडकाळ आहेत. महाळेबश्वर हे जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण असून समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची 1436 मिटर आहे.

भूगर्भीय रचना :

जमीनीचा उंच सखलपणा लक्षात घेता पश्चिमेकडील प्रदेश डोंगराळ असून यामध्ये महाबळेश्वर, जावळी, पाटण व सातारा तालुक्याचा निम्मा भाग तर मधला कृष्णा काटचा प्रदेश खोलगट असून त्यामध्ये वाई, सातारा तालुक्यातील उर्वरित भाग, कोरेगाव व कराड हे तालुके येतात. पुर्वेकडील प्रदेश माळरानाचा असून त्यामध्ये खटाव, माण व फलटणचा काही भाग व खंडाळा हे तालुके येतात. या प्रमाणे जिल्ह्यातील 3 स्वाभाविक विभाग आहेत.

नद्या :

जिल्ह्याचा काही भाग भीमा नदीच्या खोऱ्यात तर बराच मोठा भाग कृष्णा नदीच्या खोऱ्यात मोडतो. कृष्णा ही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. कोयना, वेण्णा, कुडाळी, उरमोडी, वसना, येरळा आणि तारळी ह्या तिच्या उप नद्या आहेत. महाबळेश्वर पठाराच्या पुर्वभागात समुद्रसपाटीपासून सुमारे 1371 मिटर उंचावर कृष्णा नदी उगम पावते. मुखाजवळील पाणलोट क्षेत्र व्यतिरीक्त कुडाळी, वेण्णा, उरमोडी, तारळी आणि कोयना ह्या उजवीकडील व वसना आणि येरळा ह्या डावीकडील 7 उपनदयाच्या पाणलोट क्षेत्राचा कृष्णा नदीच्या बृहत लाभ क्षेत्रात समावेश होतो. उगमापासून जिल्ह्यातील सुमारे 160 कि.मी. अंतर पार करुन कृष्णा नदी सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. कोयना ही कृष्णेची सर्वात मोठी उपनदी आहे. ती सुद्धा महाबळेश्वर पठारावर उगम पावते आणि पाटण तालुक्यातील हेळवाक या गावापर्यंत दक्षिण दिशेने वाहत जाते. त्यानंतर प्रवाहाची दिशा बदलून ती पुर्व वाहिनी होते आणि कराड शहराजवळ कृष्णेस मिळते. हे स्थान प्रितीसंगम म्हणून प्रसिद्ध आहे. जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवरुन वाहनारी निरा आणि अग्नेय दिशेस वाहनारी माण या भीमा नदीच्या उप नदया आहेत. याशिवाय वांग व मांड या कृष्णेच्या उपनद्याही जिल्ह्यातून वाहतात.

हवामान व पर्जन्यमान :

भौगोलिक परिस्थितीनुसार जिल्ह्यातील हवामानात बदल आढळून येतात. उन्हाळ्यामध्ये पश्चिम विभागातील हवामान थंड आणि अल्हाददायक असते. परंतु पावसाळ्यात येथे थंडी असते. वाई तालुक्याच्या सपाटीवर मात्र वर्षभर समशितोष्ण हवामान असते. जिल्ह्याच्या मध्यभागी उन्हाळ्यात उष्ण हवामान असते व हिवाळ्यात दिवसा उबदार तर रात्री थंड हवामान असते. पश्चिम व मध्यभागापैक्षा जिल्ह्याच्या पूर्वभागातील हवामान अधिक उष्ण असते.ऋतुमानाप्रमाणे तेथील हवामानात वरील तफावत आढळते.

विशिष्ट भौगोलिक परिस्थितीनुसार जिल्ह्यातील पर्जन्यमानात खूपच तफावत आहे. पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान फलटण 463 मि.मी., खटाव व खंडाळा 499 मि.मी., माण 537 मि.मी. इतके कमी आहे. तर महाळेश्वर या पश्चिम भागातील उंचीवरील ठिकाणी 2344 मि.मी. इतके जास्त आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागात सह्याद्री पर्वत श्रेणीमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असून अगदी पश्चिम भागातील टोकास ते 5 हजार मि.मी. पेक्षा जास्त आहे. यामध्ये महाबळेश्वर तालुक्याचा समावेश होतो. तर पाटण, जावळी या तालुक्यात 1700 ते 2000 मि.मी. इतके आहे. जिल्ह्याच्या मध्य व दक्षिण भागात पावसाचे प्रमाण यापेक्षा खूपच कमी असून 800 ते 1000 मि.मी. असते. यामध्ये सातारा, वाई, कोरेगाव व कराड हे तालुके समाविष्ट आहेत. पूर्व भागात म्हणजेच फलटण, माण व खटाव तालुक्यात व उत्तरेकडे खंडाळा तालुक्या पावसाचे कमी असून ते सर्वसाधारणपणे 500 मि.मी. पेक्षा कमी असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1019.7 मि.मी. आहे. 2011 चे सरासरी प्रत्यक्ष मासिक पर्जन्यमान 1315 मि.मी. आहे.

जमीन व तीचे प्रकार :

जमिनीची प्रतवारी भिन्न स्वरुपाची आहे. गाळांच्या थरांच्या जाडीप्रमाणे जमिनीचा पोत विविध प्रकाराचा आहे. त्यामध्ये गाळांच्या थराची जाडी कमी असल्यामुळे अत्यंत नापीक पासून ते त्या थराची जाडी कमी जास्त असल्यामुळे मध्यम ते अत्यंत सुपीक असे जमिनीचे प्रकार आढळतात. महाबळेश्वर, जावळी, वाई व पाटण या पश्चिम भागातील तालुक्यातील जमीन लाल असून लॅटराईट प्रकारच्या पाषाणापासून बनलेली आहे. डोंगर उतारावरील मातीच्या थराची जाडी कमी आहे. परंतु पावसामुळे वाहून आलेल्या डोंगराळ भागातील वनस्पतीजन्य पदार्थामुळे व गाळामुळे नैसर्गिक अथवा कृत्रिमरित्या तयार झालेल्या खाचरातून डोंगराळ प्रदेशात सुपीक जमीन तयार झालेल्या आहेत.

कृष्णा, वेण्णा, कुडाळी व कोयना आणि केरा या नदयांच्या खोऱ्यातील वाई, जावळी व पाटण तहसीलमध्ये अत्यंत सुपीक व गाळाची जाड थर असेलेली जमीन तयार झालेली आहे. दख्खनच्या पठारामध्ये कृष्णा खोऱ्यातील जमीन अत्यंत सुपीक समजली जाते. त्यापैकी सातारा व कराड तालुक्यातील कृष्णा काठच्या जमीन कृष्णा खोऱ्यातील जमीन अत्यंत सुपीक समजल्या जातात. खंडाळा व फलटण तहसील मधील डोंगरी परिसरातील जमीन हलकी व खडकाळ आहे. परंतु निरा व तिच्या उपदयाच्या काठी असणाऱ्या जमीनी चांगल्या प्रतीच्या आहेत. कोरेगाव तालुक्यातील नद्या व नाले यांच्या काठी असलेल्या सुपीक जमिनीचे विस्तृत पट्टे वगळता कृष्णेच्या खोऱ्याच्या पूर्वेकडील भागातील जमीन खडकाळ आहे. माण तालुक्यातील जमिनीची प्रत अत्यंत निकृष्ट आहे. ओढे नाले यामधून माळरानाचे पट्टे पसरलेले असून त्यामध्ये बाजरी सारखी हलकी पीके व जनावरांना उपयुक्त असे चांगल्या प्रकारचे गवत मुबलक प्रमाणावर वाढते.

महत्वाच्या यात्रा-उत्सव :

जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. याशिवाय नवरात्रोत्सवही उत्साहाने साजरा केला जातो. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा, प्रतापगडावरील शिवप्रतापदिन, शिखर शिंगणापूर येथील शंभूमहादेवाची यात्रा, मांढरदेवी यात्रा उत्सव, पालीची खंडोबा यात्रा, औंधची यमाई यात्रा, सज्जनगड- दासनवमी उत्सव, म्हसवडची सिद्धनाथ यात्रा, पुसेगाव सेवागीरी यात्रा आदी अनेक यात्रा उत्सव जिल्ह्यात साजरे केले जातात. वारसा- साहित्य-कला- संस्कृतीचा :

साताऱ्याच्या परिसरात इ. स. पूर्व 200 मध्ये बौद्धांचा अंमल होता. आगाशिवाच्या डोंगरातील बौद्ध लेणी आजही त्याची साक्ष देत आहेत. तिसऱ्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत चालुक्य, राष्ट्रकूट, सिंधण, शिलाहार, यादव राजे सातारा येथे राज्य करीत होते. 14 व्या शतकात देवगिरीचे यादव व त्यानंतर हा प्रदेश बहामनी राजांच्या अंमलाखाली आला. 1498 ते 1659 या काळात हा प्रदेश आदिलशहाकडे होता.

1663 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी परळी व सातारचा किल्ला जिंकला. पुढे महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने हल्ला करुन हा किल्ला स्वत:च्या ताब्यात घेतला. 1706 मध्ये परशुराम प्रतिनिधीने हा किल्ला जिंकला व 1708 साली किल्ल्यावर शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला. सातारा एक सर्जनात्मक वारसा लाभलेला जिल्हा होय. इथे अनेक तत्वचिंतक, इतिहासकार, साहित्यिक, पत्रकार, कवि जन्मास आले. जयरामस्वामी, वामन पंडित यांच्यासारखे संत तर गोविंद सागर, पठ्ठे बापूराव, आण्णाभाऊ साठे व शाहीर साबळे यांच्यासारखे शाहीर आणि रामराव चिटणीस हे बखरकार येथेच जन्मले. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, गोपाळ गणेश आगरकर, न. चिं. केळकर हे समाज सुधारक आणि द. भा. पारसनीस, रा. भ.गोडबोले, भाऊशास्त्री लेले, ग. ह. खरे, लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारखे ख्यातकीर्त येथेच होऊन गेले. काका कालेलकर, बा. सी. मर्ढेकर, श्री. म. माटे, वसंत कानेटकर यासारख्या साहित्यिक नररत्नांनी सातारा जिल्हयाचा सांस्कृतिक आसमंत समृद्ध केला. कृष्णा काठी वाई येथे ज्ञानसाधनेची मोठी परंपरा निर्माण झाली. विश्वकोष निर्मितीचा त्यात विशेषत्वाने उल्लेख करावाच लागेल. रवींद्र भट, अभिनेता राजा गोसावी हे इथलेच. नवभारत संशोधन पत्रिकेने आणि अन्य नियतकालिकांनी सातारा जिल्ह्याची व पर्यायाने महाराष्ट्र राज्याची मोठी सेवा केली आहे.
निसर्ग सान्निध्याने नटलेल्या आणि डोंगर-दऱ्या-खोऱ्यांनी व्यापलेल्या या जिल्ह्यातील लहान-मोठ्या गड-कोट किल्ल्यांची संख्या 25 हून जास्त आहे.

तालुकावार गट-कोट किल्ल्यांची विभागणी अशी :

1) वाई- खंडाळा: कमळगड, पांडवगड, वैराटगड, केंजळगड,

2) जावळी-महाबळेश्वर: प्रतापगड, मकरंदगड, वासोटा,

3) सातारा-कोरेगाव: अजिंक्यतारा, सज्जनगड, चंदन-वंदन, नांदगिरी,

4) पाटण: दातेगड उर्फ सुंदरगड, गुरपावंतगड, भैरवगड, जंगलीजयगड,

5) कराड: सदाशिवगड, वसंतगड,

6) फलटण-माण: ताथवडा उर्फ संतोषगड, वारुगड, महिमानगड व

7) खटाव- वर्धनगड आणि भूषणगड आदी लहान-मोठे गडकोट किल्ले आजही इतिहासकालीन महापुरुषांच्या थोर पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत. यापैकी प्रतापगड, मकरंदगड, संतोषगड, वारुगड, महिमानगड, वर्धनगड, भूषणगड, सदाशिवगड हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले. ऐतिहासिक वारसा साताऱ्याच्या परिसरात इ.स.पूर्व 200 मध्ये बौध्दांचा अंमल होता. आगाशिवाच्या डोंगरातील बौध्द लेणी आजही त्याची साक्ष देत आहेत. तिसऱ्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत चालुक्य, राष्ट्रकूट, सिंधण, शिलाहार, यादव राजे सातारा येथे राज्य करीत होते. 14 व्या शतकात देवगिरीचे यादव व त्यानंतर हा प्रदेश बहामनी राज्यांच्या अंमलाखाली आला. 1498 ते 1659 या काळात हा प्रदेश आदिलशहाकडे होता. 1663 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी परळी व सातारचा किल्ला जिंकला. पुढे महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने हल्ला करुन हा किल्ला स्वत:च्या ताब्यात घेतला. 1706 मध्ये परशुराम प्रतिनिधीने हा किल्ला जिंकला व 1708 साली किल्ल्यावर शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला.

वीरांची खाण –

रत्नांची भूमी हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून ऐतिहासिक वारसा साताऱ्यास लाभला आहे.अफझलखाना -सारख्या बलाढ्य शत्रूस शिवछत्रपतींनी जिथून यमसदनी धाडले तो किल्ले प्रतापगड आजही ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्मपत्नी तथा संभाजी महाराज यांच्या मातोश्री सईबाई या फलटणच्या निंबाळकरांच्या सुकन्या. छत्रपतींचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे स्वराज्याशी थेट रक्ताचे नाते जोडणाऱ्या सातारा जिल्हयातील तळबीडचे. जिद्द आणि चिकाटी तसेच ताकद आणि पराक्रमाच्या जोरावर दिल्लीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची मर्द मराठ्यांची जुनी आकांक्षा साकार करणारे शूर सरदार महादजी शिंदे यांचा जन्म (कण्हेर-खेड, ता.कोरेगाव येथील म्हणजे) सातारा जिल्हयातीलच. न्यायदानात ज्यांनी न्यायासनाचे स्थान उंचावले ते रामशास्त्री प्रभुणे क्षेत्रमाहुलीच्या मातीत जन्मले.पराक्रमी पुरुषांप्रमणे महान धाडसी महिलांनीही या जिल्हयात जन्म घेतला.मेरी झाँसी नही दूंगीङ असे इंग्रजाना ठणकावून सांगणारी झाशीची राणी सातारा जिल्हयातील धावडशीच्या तांबे कुटुंबात जन्मली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्मपत्नी तथा संभाजी महाराज यांच्या मातोश्री सईबाई या सातारा जिल्हयाच्या फलटण येथील निंबाळकरांच्या सुकन्या. स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या सावित्रीबाई फुले या नायगावच्या पांढरीत जन्मल्या. तर महात्मा ज्योतिबा फुले खटाव तालुक्यातील कटगुणचे सुपुत्र. देश स्वातंत्र्यासाठी 1857 मध्ये इंग्रजांनी सातारच्या गेंडामाळ येथील फाशीचा वड येथे मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेले व हौतात्म्य पत्करलेले 17 जण सातारा जिल्हयातीलच. इंग्रजी सत्तेशी लढताना वडूज येथे एकाच दिवशी नऊ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. औंधचे पंतप्रतिनिधी हे स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रेरणास्थान होते. परशुराम घार्गे, उमाशंकर पांडे यांचे हौतात्म्य, किसनवीर, बर्डे मास्तर, किसन अहिरे, नानकसिंह, पांडु मास्तर, नाथाजी लाड, शेख काका यासारख्या अनेकांची नोंद या ठिकाणी घ्यावीच लागते. पुढे प्रति सरकारची स्थापना झाली. क्रांतीसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील यासारखे मातब्बर आणि थोर नेतृत्व पूर्वीच्या अखंड सातारा जिल्हयात जन्मले. महात्मा फुले आणि सावित्राीबाईनी शिक्षणाचं रोपटे लावले, ते जोपासलं, त्याचा वटवृक्ष केला तो सातारच्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी, बापूजी साळुंखेंनी. प्रति सरकारची संकल्पना इथल्याच क्रांतिसिंह नाना पाटलांची. देशाला प्रगतीची दिशा आणि विचारांचा आदर्श दिला यशवंतराव चव्हाण यांनी, त्यांना साथ मिळाली ती ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.किसन वीरासारख्या असंख्य विचारवंत देशभक्तांची. डॉ. बाबासाहेबांनी साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. 6000 ते 6500 मि.मी. पाऊस पडणारे महाराष्ट्राचे चेरापुंजी समजले जाणारे 4500 फुट उंचावरील महाबळेश्वरही साताऱ्यातच. येथेच समर्थ रामदास स्वामींचे समाधीस्थळ सज्जनगड आहे.

प्रेक्षणीय स्थळे
प्रतापगड छ.शिवाजी महाराजांनी इ.स.1656 साली प्रतापगड बांघला. प्रतापगड महाबळेश्वरच्या पश्चिमेला आठ मैलावर असून किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 3543 फूट आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी 10 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराज- अफझलखान यांची ऐतिहासिक भेट झाली. त्यात अफझलखानाचा वध झाला. या महान पराक्रमामुळे छत्रपतींचा लौकिक चौमुलुखी पसरला. या अतुलनीय पराक्रमामुळे शिवाजी महाराजांचे नाव साऱ्या दऱ्या-खोऱ्यात वाऱ्यासारखे पसरले. शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी देवीचे अत्यंत सुंदर आणि ऐतिहासिक मंदिर आणि शिवछत्रपतींचा भव्य अश्वारुढ पुतळा गडावर असून गडाच्या पायथ्याशी अफझलखानाची कबर आहे. इ.स.1818 पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. सज्जनगड सातारा शहराच्या पश्चिमेला 12 किलोमीटर अंतरावर परळी येथे श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेला हा सज्जनगड. या गडाच्या पायथ्यापर्यंत एस.टी.बस जाते. गडावर जाण्यासाठी 750 पायऱ्या चढून जावे लागते. गडावर श्रीस्वामी समर्थ रामदासांची समाधी आहे. दासनवमीला तेथे मोठा उत्सव असतो. गडावर सतत पाणी असणारी दोन तळीसुध्दा आहेत. इ.स.1673 मध्ये शिवाजी महाराजांनी सज्जनगड हा किल्ला जिंकून घेतला. इ.स.1700 मध्ये मोगल फौजांनी तो काबीज केला. परंतु औरंगजेबाच्या हयातीत मराठ्यांनी सातारा परिसरातील किल्ले परत घेतले. इ.स.1818 मध्ये ब्रिटिश फौजांनी सज्जनगड आपल्या ताब्यात घेतला. कुसबुद्रुक, कुसखुर्द, पळसावडे परिसरात मोरघळ येथे 3 मीटर उंचीची गुहा असून तिला तीन दालने आहेत. अजिंक्यतारा सातारा शहराच्या दक्षिणेला असलेला मोठा किल्ला म्हणून अजिंक्यतारा हा किल्ला ओळखला जातो. अजिंक्यतारा, अजिमतारा किंवा मंगळाईचा डोंगर या नावानेही तो ओळखला जातो. पूवी या किल्ल्यावरुन शहर व सभोवताच्या विस्तीर्ण प्रदेशावर देखरेख करीत असत. या किल्याच्या उतारावर शहराचा बराचसा भाग वसला आहे. अजिंक्यतारा शिलाहारवंशीय राजा दुसरा भोज याने 1190 मध्ये बांधला. 1673 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. 1698 मध्ये छ.राजाराम महाराजांनी सातारा ही मराठी राज्याची राजधानी जाहीर केली. महाबळेश्वर- पाचगणी महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण म्हणून केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देश पातळीवर लौकिकास आले आहे. तर जुने क्षेत्र महाबळेश्वर हे धार्मिक स्थळ आणि पंचनद्यांचा उगम म्हणून सर्वपरिचित आहे. महाबळेश्वर येथे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री या पाच नद्यांचा उगम होतो. या ठिकाणी ऐतिहासिक पंचगंगा मंदिर तसेच स्वयंभू शिवलिंगाचे महाबळेश्वर मंदिर आहे. परिसरातील अनेक पॉईंटस हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले आहेत. सनराईज किंवा विल्सन पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, केट्स पॉईंट व त्यालाच जोडून असलेला नीडल होल पॉईंट किंवा हत्तीचा माथा, विल्सन पॉईंट, मंकी पॉईंट, लॉडविक पॉईंट, टायगर्स स्प्रिंग, कार्नेक पॉईंट, हेलेन्स पॉईंट, एलफिन्स्टन पॉईंट, बॅबींग्टन पॉईंट, बॉम्बे पॉईंट, फॉकलंड पॉईंट, बगदाद पॉईंट आदी वैशिष्ट्यपूर्ण पॉईंट महाबळेश्वर परिसरात आहेत. पावसाळ्यामध्ये महाबळेश्वर येथील लिंगमाळा धबधबा, चिनामन्स धबधबा, धोबी धबधबा नयनरम्य आनंद देतात. संपूर्ण महाबळेश्वर आणि आसपासच्या गावांना वेण्णा तलावातून पाणी पुरवठा करण्यात येतो. सौंदर्याने नटलेल्या महाबळेश्वरच्या पसिरातील पर्यटकांचे हे एक महत्वाचे जलविहाराचे ठिकाण आहे. याशिवाय महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, मध, जॅम, क्रशेस, चिक्की पर्यटकात प्रसिद्ध आहे. येथील माल्कमपेठ या नावाने प्रसिद्ध असलेली बाजारपेठ पर्यटकांचे आणखी एक आकर्षण आहे. महाबळेश्वर येथे सध्या पर्यटकांची बारमाही गर्दी असते. पाचगणी हेही थंड हवेचे ठिकाण असून तेथील टेबल लँड या ठिकाणास भेट दिल्याशिवाय पर्यटक परतत नाहीत. सिडनी पॉईंट, पारसी पॉईंट, डेव्हील्स किचन, मॅप्रो गार्डन याशिवाय मॉरल रिआर्मामेट सेंटरही येथे आहे. पाचगणी हे निवासी शाळांसाठी प्रसिद्ध असून देश-विदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी या ठिकाणी येत असतात.

सातारा जाण्याचा मार्ग  :-

जवळचा विमानतळ :- पुणे 120 कि.मी. रेल्वे- जवळचे रेल्वे स्थानक वाठार स्टे. (ता. कोरेगाव) परंतू यापेक्षा पुणे रेल्वे स्थानकच अधिक सोयीचे आहे. एसटी बसेस- पुणे- वाई- महाबळेश्वर 120 कि.मी., मुंबई – महाबळेश्वर (महाडमार्गे) 247 कि.मी. औंध पूर्वी संस्थानिकांच्या जहागिरीचे औंध हे मुख्यालय होते. पंतप्रतिनिधींचा येथे मराठा स्थापत्य शैलीतील दुमजली वाडा येथे पहाण्यासारखा आहे. किन्हईचे कुलकर्णी पदाचे वंशपरंपरागत अधिकार असलेले त्र्यंबक कृष्णा हे पंतप्रतिनिधी घराण्याचे पूर्वज. या घराण्यातील रामचंद्र अमात्याच्या पदरी असलेल्या परशुराम त्रिंबकास छत्रपती राजाराम महाराजांनी 1690 मध्ये सरदारकी आणि सुभालष्कर व समशेरजंग हे किताब दिले होते. 1909 पासून भगवानराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी अधिकारारुढ होते.

यमाई देवी औंध गावाच्या नैऋत्येस 240 मीटर अंतरावरील टेकडीवर यमाई देवीचे मंदिर आहे. मंदीराभोवती तटबंदी असून तिला दहा बुरुज आहेत. तटबंदीस उत्तरेस व दक्षिणेस प्रवेशद्वारे आहे. हे प्रारंभिक मध्ययुगातील तारकाकृती मंदिर असून त्यास मुखमंडप व गर्भगृह आहे. गाभाऱ्यात यमाई देवीची पाषाणातील पूर्वाभिमुखी मूर्ती आहे. जवळच पाण्याचे तळे आहे. यमाई देवीची मोठी यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमेपासून आमावस्येपर्यंत असते.
औंध वस्तुसंग्रहालय सातारा व कोल्हापूर या मुख्य शहरांना जोडणारे औंध हे गाव संस्कृतीचे अनेक अवशेष आजही जनत करुन आहे. त्यात आठ हजारापेक्षा जास्त वस्तू असलेले हे वस्तुसंग्रहालय 1938 साली बाळासाहेब पंतप्रतिनिधींनी बांधले. विविध प्रदेशात निर्माण झालेली व त्या त्या प्रदेशाची वैशिष्ट्ये सांगणारी ऐतिहासिक चित्रे, संगमरवरातून कोरलेली शिल्पे, कोरीव काम केलेल्या धातूच्या व लाकडच्या वस्तू, हस्तीदंती कोरीव कलाकृती आणि स्ट्राँगरुम मधील मौलिक ऐतिहासिक रत्ने यांचे दुर्मिळ दर्शन या ठिकाणी पहावयास मिळते.हे वस्तु संग्रहालय आज महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाच्या ताब्यात आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या वस्तुसंग्रहालयाला भेट देतात. कास व शिवसागर तलाव, बामणोली, तापोळे सातारा शहराच्या पश्चिमेला यवतेश्वराचा डोंगर, या डोगराच्या कुशीत श्री शंकराचे स्थान आहे. श्रावणामध्ये हजारो भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात. यवतेश्वरपासून पुढे 16 कि.मी.अंतरावर कास तलाव आहे. या तलावाचे पाणी सातारा शहरासाठी बंद पाईपने पुरविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागातील या तलावाच्या परिसरात जंगली श्वापदे आहेत. हे ठिकाण सहलीचे केंद्र बनले आहे. या तलावावरुन पुढे काही अंतरावर कोयना धरणाच्या पाणलोटातील शिवसागर हा जलाशय आहे. हा भाग दाट झाडीने व्यापलेला आहे. वन विभागाने जतन केलेला नैसर्गिक वृक्षवाढीचा प्रदेश शिवसागराच्या किनाऱ्यावर आहे. बामणोली तसेच तापोळा ही जलाशयाच्या काठावरील हिरवाईने नटलेली गावे महाबळेश्वरच्या टप्प्यात असल्याने व बोटिंगसारख्या सुविधा तेथे उपलब्ध झाल्याने नवीन पर्यटन स्थळे म्हणून या गावांचा झपाट्याने विकास होत आहे. धावडशी साताराच्या वायव्येस 9 कि.मी.अंतरावर धावडशी हे गाव आहे. ब्रम्हेंद स्वामींना 1928 मध्ये छत्रपती शाहूंकडून इनाम म्हणून मिळालेले होते. ब्रम्हेंद्र स्वामी छत्रपती शाहूंचे राजगुरु व पेशव्यांचे गुरु होते. सन 1945 मध्ये ब्रम्हेंद्र स्वामी निर्वतल्यानंतर छत्रपती शाहूनी त्यांच्या समाधीवर मंदिर बांधले. मंदिर उत्तराभिमुखी, अतिशय रेखीव आहे. गाभाऱ्यात भार्गवरामाची काळया पाषाणातील मूर्ती आहे. धावडशीच्या तांबे घराण्यात जन्मलेली मेरी झाँसी नही दुंगी ! असा नारा देणाऱ्या झाशीच्या राणीचे धावडशी हे जन्मगाव. आजही तिच्या वाड्याचे काही अवशेष या ठिकाणी पहावयास मिळतात. मेरुलिंग धावडशी येथील ब्रम्हेंद्र स्वामी यांचा मठ व तळी प्रसिध्द आहेत. ठोसेघर
सातारा तालुक्यातील ठोसेघर येथील धबधबा पहाण्यास पावसाळी हंगामात तरुणाई लोटलेली असते. हे स्थळ सातारा येथून 36 कि.मी. अंतरावर आहे. चाळकेवाडी येथील पठारावर उभारलेला पवन ऊर्जा प्रकल्प हेही एक आकर्षक स्थळ ठरले आहे. वाई कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले वाई हे तर दक्षिण काशी म्हणून संबोधले जाते. येथे विश्वकोश निर्मितीचे कार्य चालू आहे. वाईनजिकच्या मेणवली येथे नाना फडणवीस यांचा सुप्रसिध्द वाडा आहे. सव्वा एकराच्या प्रशस्त जागेत बांधलेल्या या वाड्यात विविध प्रकारची कलाकुसर दिसून येते. पाली पुणे-बंगलोर महामार्गावर काशिळच्या पश्चिमेस सुमारे 7 कि.मी. अंतरावर असलेले पाली येथील खंडोबा मंदिर लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असून ते तारळी नदीच्या तीरावर वसलेले आहे. पौष महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. कोयना धरण संपूर्ण राज्याला वरदान ठरलेले कोयना हे धरण पाटण तालुक्यातील कोयना नदीवर बांधलेले आहे. 1960 साली हे धरण बांधण्यात आले. धरणाची पाणी साठवण क्षमता 98.78 टीएमसी एवढी आहे. या धरणातील जलाशयास शिवसागर जलाशय म्हणून ओळखले जाते. तापोळा ते कोयनानगर अशी बोटींगची सुविधाही पर्यटकांसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. कोयनानगरचे पं.नेहरु स्मृति उद्यान कोयना जलाशयाच्या शिवसागरात भारतीय अभियंत्यांनी चौथ्या टप्प्यात लेक टॅपिंगचा अभिनव प्रयोग यशस्वी केला. कोयनानगर परिसरात अलिकडेच अत्याधुनिक पध्दतीने उभारलेले पं.जवाहरलाल नेहरु स्मृति उद्यान हेही पर्यटन केंद्र म्हणून उदयास आले आहे. आबालवृध्दांची तेथे वर्दळ असते. पर्यटन विकास महामंडळातर्फे येथे पर्यटन विकासाचे प्रयत्न जोमाने सुरु झाले आहेत. वनकुसवडे- पवनऊर्जा साताऱ्यापासून 45 कि.मी.अंतरावर पाटण तालुक्यातील वनकुसवडे पठारावर 50 मीटर उंचीच्या मनोऱ्यावर तीन पात्यांच्या विंड टरबाईनद्वारे वाऱ्याच्या गतिज ेऊर्जेचा वापर करुन विद्युत जनित्रे फिरवली जातात. यातून पवन ऊर्जा निर्माण केली जाते. आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प येथे साकार होत आहे. आज येथे 857 पवन विद्युत जनित्रांच्या सहाय्याने 313 मेगावॅट वीज निर्माण केली जाते. मांढरदेव वाईच्या उत्तरेला नऊ कि.मी.अंतरावर महादेव डोंगराच्या रांगेत मांढरदेव हे ठिकाण काळुबाई देवीच्या स्थानासाठी प्रसिध्द आहे. वाई व शिरवळहून येथे जाता येते. सन 1850 मध्ये मंदिरावर शिखर बांधले. मंदिरात मध्यभागी काळुबाई देवीची स्वयंभू मूर्ती मखरात असून ती चांदीच्या पत्र्याने मढविलेली आहे. येथे पौष शुध्द 15 ला मोठी यात्रा भरते. म्हसवडची श्री सिध्दनाथ यात्रा, वाई, लिंब गोवे, क्षेत्र माहुली व कराड येथे कृष्णामाईचा उत्सव भाविक मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात. कारखेल (ता.माण) येथे संताजी घोरपडे यांचे स्मारक आहे. कराड येथील प्रीतिसंगम कराड येथील कृष्णा-कोयनेचा संगम हा आता केवळ संगमच न राहता ज्येष्ठ नेते स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या या प्रितिसंगमावरील समाधीमुळे येथे स्थानिक जनतेबरोबरच राजकीय नेते, पर्यटक यांचीही वर्दळ वाढली आहे. कराडमधील यशवंतराव चव्हाण स्मृति सदनही सदैव गजबजलेले असते. येथील अद्ययावत कृष्णा हॉस्पिटलमुळे परिसरातील जतनतेस वैद्यकीय सेवेचे नवे दालन खुले झाले आहे. यशवंतराव चव्हाण स्मृति सदन आणि वेणूताई चव्हाण प्रतिष्ठान वस्तु संग्रहालय, मनोरे ही कराडची वैशिष्ट्ये आहेत. शिखर शिंगणापूर पुराण, इतिहास, धर्म आणि राजकारण यांचा समन्वय साधणारे शिखर शिंगणापूर हे ठिकाण डोंगराच्या माथ्यावर हे मंदीर आहे. चैत्र अष्टमीच्या दिवशी शिव पार्वतीच्या विवाहाचा सोहळा येथे पार पडतो. देवालयाच्या गाभाऱ्यातील शालूंकेत असलेली दोन लिंग शिवशक्तीची प्रतिके असून ती स्वयंभू आहेत असे मानले जाते. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, मुखमंडप आणि नंदीमंडप यांचा मंदिरात समावेश आहे. गोंदवले दहिवडीच्या आग्नेयेस आठ कि.मी.अंतरावर गोंदवलेकर महाराजांचे गाव म्हणून प्रसिध्द आहे. येथे दास संप्रदायातील या महाराजांचा जन्म 1845 मध्ये व मृत्यू 1918 मध्ये झाला. येथे त्यांची समाधी असून लाखो भाविक दर्शनाला येतात. मंदिराचे संपूर्ण बांधकाम आधुनिक पध्दतीचे असून ते 1936-37 मधील आहे. गावाच्या उत्तरेस 300 वर्षापूर्वीचे भीमाशंकराचे मंदिर सुस्थितीतील आहे. चाफळ पुणे-बंगलोर महामार्गावरील उंब्रजच्या पश्चिमेला 10 कि.मी.अंतरावर कृष्णेची उपनदी मांडच्या उजव्या तीरावर चाफळ गाव वसलेले आहे. रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गावास धार्मिक व ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. रामदास स्वामी बारा वर्षाच्या तीर्थाटनानंतर आल्यानंतर त्यांनी येथे मारुतीची स्थापना केली. समर्थानी स्वहस्ते श्रीरामाचे मंदिर येथे बांधले. शिवाजी महाराजांनी या मंदिरासाठी 300 होन दान दिले. मंदीरात राम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्तीची 1648 मध्ये स्थापना केली. जीर्ण झालेले हे मंदिर उद्योगपती अरविंद मफतलाल यांनी 1972 मध्ये नव्याने बांधून दिले. मकर संक्रांतीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात महिला दर्शनासाठी येतात. पुसेगाव सातारच्या पूर्वेला पंढरपूर रस्त्यावर 36 कि.मी.अंतरावर येरळा नदीच्या तीरावर पुसेगाव वसले आहे. नाथपंथींच्या अकरा लिंगापैकी एक येथे आहे. येथे सेवागिरी महाराजांची समाधी आहे. त्यांनी अनेक कल्याणकारी कामे करुन 10 जानेवारी 1947 मध्ये येथे समाधी घेतली. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला मोठी यात्रा या ठिकाणी भरते. त्यावेळचा रथोत्सव प्रसिध्द आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी कामे केली जातात.जिल्हयातील अन्य महत्वाची ठिकाणे निसर्ग सान्निध्याने नटलेल्या आणि डोंगर-दऱ्या-खोऱ्यांनी व्यापलेल्या या जिल्हयातील लहान-मोठ्या गड-कोट किल्ल्यांची संख्या 25 हून जास्त आहे. तालुकावर गट-कोट किल्ल्यांची विभागणी अशी : 1) वाई- खंडाळा: कमळगड, पांडवगड, वैराटगड, केंजळगड, 2) जावळी-महाबळेश्वर: प्रतापगड,मकरंदगड, वासोटा, 3) सातारा-कोरेगाव: अजिंक्यतारा, सज्जनगड, चंदन-वंदन, नांदगिरी, 4) पाटण: दातेगड उर्फ सुंदरगड, गुरपावंतगड, भैरवगड, जंगलीजयगड, 5) कराड: सदाशिवगड, वसंतगड, 6) फलटण-माण: ताथवडा उर्फ संतोषगड, वारुगड, महिमानगड व 7) खटाव-वर्धनगड आणि भूषणगड आदी लहान-मोठे गडकोट किल्ले आजही इतिहासकालीन महापुरुषांच्या थोर पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत. यापैकी प्रतापगड, मकरंदगड, संतोषगड, वारुगड, महिमानगड, वर्धनगड, भूषणगड, सदाशिवगड हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले. आगाशिव डोंगर येथील लेण्या, वाई येथील मेणवलीचा नाना फडणीस यांचा वाडा आदी जिल्ह्यातील अनेक प्रेक्षणीय ठिकाणे पर्यटकांना साद घालतात. गड-कोट-किल्ले, अनेक प्रसिध्द प्रेक्षणीय स्थळे, निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक स्थळे, वस्तुसंग्रहालये, धरण जलाशय परिसरातील निसर्ग सान्निध्याने व्यापलेली स्थळे, जंगले, तीर्थक्षेत्रे, उद्याने, पावसाळयातील धबधबे अशा मनोहारी निसर्ग सौंदर्याने नटलेला सातारा जिल्हा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालीत आला आहे.
आर्थिकस्थिती  –  कृषी :-

जिल्ह्याच्या एकूण भूक्षेत्रापैकी १३% क्षेत्र वनांखाली, ६.९९% चराऊ कुरणांखाली, २.६१% बिगर शेतीसाठी, ४% क्षेत्र लागवडीलायक; पण पडीक जमिनीचे आहे. महसूल खात्याच्या गावपत्रकानुसार १९९८-९९ मध्ये ७.२६ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीलायक होते. त्यापैकी निव्वळ कसलेले क्षेत्र ५.८० लाख हेक्टर होते. एकूण ओलीत क्षेत्र २,२६,००० हे. होते. जिल्ह्यातील सुमारे ५७% खातेदार एक हेक्टरपेक्षा कमी जमिनीचे क्षेत्र असणारे होते. सातारा जिल्हा कृषिप्रधान असून येथे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांतील पिके घेतली जातात. बाजरी, तांदूळ, भुईमूग, घेवडा ही जिल्ह्यातील प्रमुख खरीप पिके असून, गहू व हरभरा ही रब्बी पिके आहेत. ज्वारीचे पीक दोन्ही हंगामांत घेतले जाते. कराड, खटाव, सातारा व पाटण या तालुक्यांत खरीप संकरित ज्वारीचे, तर फलटण, सातारा, वाई, कोरेगाव व खंडाळा या तालुक्यांत रब्बी ज्वारीचे पीक अधिक प्रमाणात घेतले जाते. पाटण, कराड, जावळी, महाबळेश्वर हे तालुके तांदळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्घ आहेत. माण, खटाव, खंडाळा, फलटण व कोरेगाव तालुक्यांतील कमी पावसाच्या पदेशांत बाजरीचे पीक घेतले जाते. फलटण, खटाव व जावळी हे तालुके गव्हाच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहेत.सातारा, कराड, पाटण, जावळी, वाई व कोरेगाव या तालुक्यांमध्ये भुईमूग अधिक प्रमाणात पिकविला जातो. हरभऱ्याचे उत्पादन सर्वच तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात घेतले जाते. फलटण तालुक्यात द्राक्षे व डाळिंबाच्या बागा आहेत. कराड तालुक्यात थोड्या फार प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. कोरेगाव व खटाव हे तालुके बटाट्या च्या; तर माण,फलटण व खंडाळा हे तालुके कांद्याच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहेत. कृष्णाकाठची वांगी प्रसिद्घ आहेत. ऊस हे प्रमुख नगदी पीक आहे. हळद, आले ही पिकेही येथे घेतली जातात. खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्र (१९३२),महाबळेश्वर येथील गहू गेरवा संशोधन केंद्र (१९४०), कराड येथील एकदल व गळितांच्या पिकांच्या जातीव्रर संशोधन करणारे केंद्र (१९४८), रहिमतपूर येथील आले संशोधन केंद्र ही जिल्ह्यातील प्रमुख कृषिशिक्षण व संशोधन केंद्रे आहेत. सन २००८-०९ मध्ये जिल्ह्यात प्रमुख कृषि उत्पादने अंदाजित पुढीलप्रमाणे झाली (उत्पादन मेट्रिक टन) : तांदूळ – १,०९३, गहू– ६९१, ज्वारी– २,१४२, बाजरी– ३३, मका– २७४, एकूण कडधान्ये– ३४७, भुईमूग– ७४०, कापूस (सरकीविरहित)– १५, आले– ५९५, हळद– १,१६६, बटाटा– २०,६९०. याशिवाय उसाचे उत्पादन ४२,३०० मेट्रिक टन झाले.जिल्ह्यात १० मोठे, १३ मध्यम व ८० लघु जलसिंचन प्रकल्प आहेत. जलसिंचन विकासासाठी कृष्णा खोरे विकास मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत धोम, कण्हेर यांसारखे मोठे प्रकल्प पूर्ण झाले. कृष्णा नदीवरील धोम धरणाचे काम १९७७ मध्ये पूर्ण झाले. या धरणामुळे जिल्ह्यातील २१,२८४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. धोम धरणातील पाणी डोंगरातून बोगदा काढून खंडाळा तालुक्यात नेण्यात आले आहे. वेण्णा नदीवर कण्हेर येथे १९८८ मध्ये बांधण्यात आलेल्या कण्हेर धरणामुळे १०,५४८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. १९६५ मध्ये नीरा नदीवर बांधलेल्या धरणामुळे २६,७८७ हेक्टर क्षेत्राला पाणी पुरवठा झाला आहे (२००३). कोयना नदीवर पाटण तालुक्यात मोठे कोयना धरण असून त्याच्या जलाशयास ‘शिवाजी सागर’ नाव देण्यात आले आहे. राज्यातील हा सर्वांत मोठा जलविद्युत्‌निर्मिती प्रकल्प आहे.‘लेक टॅपिंग’चे अभिनव व यशस्वी प्रयोग येथे करण्यात आले. याशिवाय कराड तालुक्यातील टेंभू उपसा सिंचन प्रकल्प, येवती येथील येवती म्हासोळी प्रकल्प, खोडशी येथील कृष्णा कालवा; पाटण तालुक्यातील तारळी नदीवरील तारळी बंधारा, आंबेघर येथील मोरणा प्रकल्प, मानेवाडी येथील उत्तरमांड प्रकल्प, डांगिष्टेवाडी येथील तारळी प्रकल्प, मराठवाडी येथील वांगप्रकल्प; सातारा तालुक्यात परळी येथील उरमोडी प्रकल्प; खटाव तालुक्यात येरळा नदीवरील नेर तलाव, बनपुरी येथील येराळवाडी धरण; माण तालुक्यात वाघेरी नाल्यावरील राणंद तलाव, बोडके येथील आंधळी प्रकल्प, माणगंगा नदीवरील म्हसवड तलाव; जावळी तालुक्यात हातगेघर येथील हातगेघर प्रकल्प, महू येथील महू प्रकल्प; वाई तालुक्यात नागेवाडी येथील नागेवाडी प्रकल्प व वाळकी नदीवरील बलकवडी येथील धोम-बलकवडी प्रकल्प; कोरेगाव तालुक्यातील आरफळ कालवा प्रकल्प इ. प्रकल्प जलसिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहेत. पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील देवघर येथील नीरा देवघर प्रकल्प; नीरा नदीवरील वीर धरण ही धरणे सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत.सन २००७ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यातील एकूण पशुधन १४.१७ लाख होते. त्यांपैकी ३.५९ लाख गाई व बैल, ३.४७ लाख म्हशी व रेडे, ७.०३ लाख शेळ्या व मेंढ्या आणि उर्वरित घोडे,गाढवे व खेचरे आदी पशुधन होते. मेंढीपालन हा माण, खटाव, फलटण आणि खंडाळा या कमी पावसाच्या तालुक्यातील एक प्रमुख कृषिपूरक व्यवसाय आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व दुग्धव्यवसायास महत्त्व प्राप्त झाले आहे. दुधाच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून संकरित गाई पाळल्या जातात. कराड, सातारा, फलटण, कोरेगाव व वाई या तालुक्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकरित गाई पाळण्याच्या व्यवसायाकडे वळले आहेत. दूध संकलनासाठी दुग्धव्यवसाय सहकारी संस्था स्थापन केल्या असून मार्च, २०१० अखेर जिल्ह्यात एकूण १,३४६ दुग्धव्यवसाय संस्था होत्या. त्यांद्वारे प्रतिदिनी सुमारे ६,००,००० लिटर दूधसंकलन केले जात होते. जनावरांवरील उपचारासाठी जिल्ह्यात एक रुग्णालय, ६० दवाखाने, १२५ मदत केंद्रे आणि २ फिरते पशुवैद्यकीय दवाखाने, १९४ कृत्रिम रेतन केंद्रे होती (२००९-१०)

उद्योग :-

औद्योगिक विकासाच्या दृष्टीने जिल्ह्याची वाटचाल चालू आहे. सातारा, कराड, फलटण, वाई येथे औद्योगिक वसाहती आहेत. सन २००९ अखेर कारखाना अधिनियमांतर्गत नोंदविलेले एकूण ५३४ उद्योग होते. जिल्ह्यात थेट विदेशी गुंतवणूक असलेले २३ प्रकल्प कार्यरत आहेत. सातारा तालुक्यात सातारा रोड येथे कूपर कंपनीचा डीझेल एंजिन निर्मितीचा देशातील पहिला कारखाना असून याच तालुक्यात जरंडेश्वर येथे भारत फोर्ज कंपनीचा लोखंडी सामग्री निर्मितीचा कारखाना आहे. युनिव्हर्सल लगेज या कंपनीचा बॅगा बनविण्याचा उद्योग ही सातारा येथे आहे. कराड येथे किर्लोस्कर बदर्सचा हेमेटिक सील्ड कॉम्प्रेसर हाइड्रोलिक प्रॉडक्ट कारखाना आहे.पाटण तालुक्यात दौलतनगर, कराड तालुक्यात रेठरे बुद्रुक (शिवनगर), यशवंतनगर व शेवाळेवाडी येथे, तर वाई तालुक्यात किसन वीर नगर (जांब), फलटण तालुक्यात फलटण येथे, सातारा तालुक्यात शेंद्रे (शाहूनगर), जावळी तालुक्यात कुडाळजवळ असे जिल्ह्यात सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने आहेत. याशिवाय फलटण तालुक्यात साखरवाडी व कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर येथे खाजगी क्षेत्रातील साखर कारखाने आहेत. सन २००९-१० मध्ये जिल्ह्यात ४८.११ लाख मे. टन उसाचे गाळप होऊन त्यापासून ५७४ हजार मे. टन साखर उत्पादन झाले. याशिवाय खटाव, माण व फलटण तालुक्यांमध्ये घोंगड्या विणण्याचा उद्योग प्रस्थापित असून कोरेगाव तालुक्यात तेल गाळण्याचा उद्योग चालतो. महाबळेश्वर येथे मधुक्षिका पालन उद्योग महत्त्वाचा आहे. जिल्ह्यात सर्व प्रकारच्या मिळून ६,३९५ सहकारी संस्था असून त्यांपैकी २,५४१ उत्पादन संस्था आहेत (२०१०). सातारा येथे रोजगार विनिमय केंद्र आहे. जावळी तालुक्यातील सुमारे २० व पाटण तालुक्यातील ३० गावांच्या परिसरात थोड्या प्रमाणात लोह खनिजाचे साठे आहेत. इमारतीचा दगड, चुनखडी व विटेसाठी उपयुक्त माती ही अन्य खनिजे जिल्ह्यात उपलब्ध आहेत. यांव्यतिरिक्त इतर महत्त्वाची खनिज संपत्ती जिल्ह्यात नाही. सातारा जिल्ह्यातील वनकुसवडे पठारावर महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेडा) तर्फे उभारलेला पाचशे मेवॉ. क्षमतेचा पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प हा राज्यातील सर्वांत मोठा पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प ठरणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात इतरत्र ही पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत. पुणे–बंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जिल्ह्यातून जातो. शिरवळ, खंडाळा, सुरूर, पाचवड, सातारा, उंब्र ज व कराड ही या महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे आहेत. या महामार्गाची जिल्ह्यातील लांबी १३१ किमी. आहे. सातारा या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणापासून चोहोदिशांना रस्ते गेलेले आहेत. याशिवाय सर्व तालुका ठिकाणे तालुक्यातील सर्व खेड्यांशी रस्त्याने जोडली आहेत. जिल्ह्यातील रस्त्यांची एकूण लांबी ९,७०७ किमी. असून त्यांपैकी ५,३९७ किमी. रस्ते डांबरी, २,७४७ किमी. खडीचे आणि १,५६३ किमी. इतर रस्ते आहेत. नोंदणीकृत वाहनांची संख्या ४,१०,१४८ होती (२०१०). पुणे सातारा मिरज हा मध्य रेल्वेचा लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. लोणंद, वाठार, सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, मसूर, कराड ही या लोहमार्गावरील प्रमुख स्थानके आहेत. जिल्ह्यात एकूण ६६५ डाकगृहे व १८८ तारगृहे आहेत. दूरध्वनींची संख्या ९१,३९७ (२००९-१०) होती. भ्रमणध्वनीचा प्रसार व लोकप्रियता अधिक वेगाने वाढल्याचे आढळते.

लोक व समाजजीवन

सातारा जिल्ह्याची २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या ३०,०३,९२२ असून त्यांपैकी १५,१२,५२४ पुरुष व १४,९१,३९८ स्त्रिया होत्या. २००१–२०११ या दशकात ६.९४% एवढी लोकसंख्यावाढ झाली. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स २८७ व्यक्ती इतकी आहे. दर चौ. किमी.स ५०९ ही सर्वाधिक घनता कराड तालुक्यात, तर दर चौ. किमी.स १३९ ही सर्वांत कमी घनता माण तालुक्यात आहे. एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ८१% लोक ग्रामीण भागात व केवळ १९% नागरी भागात राहतात. जिल्ह्यात एकूण १,७३९ खेडी व १५ नगरे आहेत. एकूण खेड्यांपैकी १८ खेडी ओसाड आहेत. दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण ९८६ आहे. चरितार्थासाठी अन्यत्र काम करणाऱ्या या पुरुषांचे प्रमाण बरेच असल्यामुळे राज्याच्या व देशाच्या तुलनेत या जिल्ह्यातील स्त्री-पुरुष गुणोत्तर जास्त आहे. ९.५१% लोकसंख्या अनुसूचित जातीची व ०.७५% अनुसूचित जमातीची होती. एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ३५% लोकसंख्या ० ते १४ वर्षे वयोगटातील, ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील सुमारे ९% आणि उर्वरित ५६% १५ ते ५९ वयोगटातील होती. काम करणाऱ्या या व्यक्तींची संख्या ८.९६ लाख (३६.५६%) आहे. एकूण काम करणाऱ्यापैकी ७०.८६% कामकरी हे शेतकरी व शेतमजूर असून उर्वरित २९.१४% खाणकाम, वस्तुनिर्माण उद्योग, बांधकाम, व्यापार, वाहतूक व अन्य सेवाक्षेत्रात गुंतलेले आहेत. साक्षरतेचे प्रमाण ८४.२०% असून पुरुषांच्या बाबतीत ९२.०९% व स्त्रियांच्या बाबतीत ७६.२९% आहे.

सैन्यात भरती

सातारा जिल्ह्यातून सैन्यात जाण्याची परंपरा आहे. तिच्यात अपशिंगे हे लहान गाव अग्रेसर आहे. या गावातल्या प्रत्येक घरातला निदान एकातरी सदस्य भारतीय सैन्यात भरती झाला आहे. १९६२च्या चीनविरुद्धच्या युद्धात चार, १९६५च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात दोन, तर १९७१च्या युद्धात एक जवान देशासाठी शहीद झाला आहे. देशाच्या सैन्यात योगदान देण्याची या गावची परंपरा लक्षात घेत, लॉर्ड माऊंटबॅटनपासून तर जनरल करिअप्पापर्यंत बऱ्याच बड्या मंडळींनी अपशिंगेला भेट देऊन त्या अनमोल योगदानाची नोंद घेतली आहे.

संदर्भ :- अंतरजाल आणि साहित्य वाचन,

संकलन :- श्री. लक्ष्मण काटेकर, सोलापूर. मोबाइल नंबर :- 7588020886.

इतर माहितीसाठी भेटा :-   https://laxmankatekar.wordpress.com

======================================================================

____________________________________________________________________________________________

भाग :- 2          दि. 12 एप्रिल, 2019

जिल्हा सांगली

उच्चार (सहाय्य·माहिती)
सांगली हे शहर पश्चिम महाराष्ट्रात (पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर आहे) वसलेले आहे. सांगलीची इ.स.२००८ सालची लोकसंख्या ५,०२,६९७ च्या आसपास आहे. हे शहर सांगली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ते कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे.

मुख्य भाषा
मराठी असून कन्नड, हिंदी आणि इंग्रजी भाषाही येथे बोलल्या जातात. आद्य मराठी नाटककार विष्णुदास भावे यांची ही जन्मभूमी आहे. सांगली संस्थानचे तत्कालीन राजा, चिंतामणराव पटवर्धन ह्यांच्या पुढाकाराने संस्थानात (‘सीता स्वयंवर)’ ह्या संगीत नाटकाचं पहिल्यांदाच सादरीकरण करण्यात आलं जे विष्णुदास भावे ह्यांनी लिहिलं आणि दिग्दर्शित केलं होतं. महाराष्ट्राच्या इतिहासात नाटक ह्या गोष्टीची सुरुवात सांगलीपासून झाली त्यामुळे सांगलीला (“नाट्यपंढरी”) ह्या नावानेही संबोधलं जातं. सांगलीच्या पटवर्धन संस्थानचे भव्य गणेश मंदिर पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंदिर आहे.
सांगली शहर हे पहिलवानांसाठी प्रसिद्ध आहे. हिंदकेसरी मारुती माने याच मातीतले. कुस्तीगीरांचे शहर अशीही सांगलीची ओळख आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगलीसह कुंडल, पलूस, शिराळा, वाळवा, मिरज, कोल्हापूर ह्या ठिकाणी ही कुस्ती ला प्राधान्य दिलं जातं. ह्या ठिकाणी भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात येतात .
सांगली येथील हळद बाजारपेठ ही अशियातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते.त्यामुळे सांगलीला हळदीची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. सांगली जिल्हा द्राक्षांच्या उत्पादनासाठीही प्रसिद्ध आहे. नुकतेच पलूस येथे द्राक्षांवर प्रक्रिया करणारे वाईन पार्कही सुरू झाले आहे. मुख्य पिके ऊस, डाळींब ही सुध्दा प्रमुख पिकं म्हणून मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जातात. आशिया खंडातील प्रथम क्रमांकावर गणला गेलेला वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना मोठ्या प्रमाणात साखर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
भडंग (एक प्रकारचे चुरमुरे), वडापाव आणि मिसळपाव हे सांगलीकरांचे आवडते खाद्यपदार्थ आहेत.

सांगली हे नाव
कृष्णेचा रमणीय काठ लाभलेल्या सांगली या गावात : १) गांव भाग
२) पेठ भाग
३) गवळी गल्ली
४) चांभार वाडा
५) वखार भाग
६) जांभवाडी
अशा सहा गल्ल्या किंवा भाग असल्याने याचे नाव सांगली पडले असे मानले जाते. या सहा गल्ल्या गावभागातील हरिदास गल्ली, वैद्य गल्ली, जोशी गल्ली, फडणीस गल्ली, खाडिलकर गल्ली अशा क्रमाने शहरच्या आराखड्यात दाखविण्यात आल्या आहेत. तसेच कन्नड भाषेतील पूर्वीच्या सांगलकी या नावाचे पुढे सांगली असे रूपांतर झाल्याचेही मानले जाते.

सांगली हे मुंबई पासून ३९० किमी व बंगलोरपासून ७०० किमी आणि कोल्हापूर पासून ५० किमी अंतरावरील एक प्रमुख शहर आहे.

कृष्णा नदीच्या काठावर वसलेले सांगली हळद व्यापार आणि साखर कारखाने यासाठी प्रसिद्ध आहे. सांगली एक प्रमुख शिक्षण आणि आरोग्य केंद्र देखील आहे. सांगली जवळ कृष्णा नदीच्या खोऱ्यात पर्यटन स्थळांची ठिकाणे आहेत.
प्राचीन काळामध्ये, सांगलीचा प्रदेश कुंडल म्हणून ओळखला जात होता. या भागावर राज्य करणाऱ्या चालुक्य घराण्याची राजधानी होती. स्वातंत्र्यपूर्व काळात, सांगली हे पटवर्धन राजघराण्यातील एक राज्य होते. १९४८मध्ये, सांगली भारताच्या प्रजासत्ताकामध्ये विलीन करण्यात आले. सांगली ही भारतात हळद व्यापार राजधानी आहे. येथे साखर उद्योग लॉबी आहे. सांगली शहरात वसंतदादा साखर कारखाना हा आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना आहे. सांगली द्राक्षांसाठीदेखील प्रसिद्ध आहे.
सांगलीत अनेक औद्योगिक वसाहती आहेत. सांगली-मिरज एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र ही सुनियोजित औद्योगिक वसाहत आहे . या औद्योगिक क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक ग्रीन हाऊस, हेल्थ क्लब, जलतरण तलाव, सॉफ्टवेअर प्रशिक्षण केंद्र, इत्यादी सोयी आहेत.

शिक्षण
येथे मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत . अभियांत्रिकी व व्यवस्थापन संस्था तसेच अनेक सॉफ्टवेअर प्रशिक्षण संस्था आहेत. अभियंते, दूरसंचार सॉफ्टवेअर व्यावसायिक, आधुनिक दूरसंचार व इंटरनेट सुविधा आणि मोबाइल सेवा भरपूर प्रमाणात असल्याने सांगली हे माहिती तंत्रज्ञान उद्योग असणारे एक आकर्षक स्थान झाले आहे. सांगलीमध्ये रुंद रस्ते, रेल्वे जंक्शन, सायबर कॅफे, मल्टि-खाद्यप्रकार, खूप चांगले शिक्षण, आरोग्य, दूरसंचार आणि मनोरंजन सुविधा, हॉटेल्स वगैरे असल्याने ते एक आधुनिक शहर बनले आहे. सांगली शहर माहिती तंत्रज्ञान उत्कर्षाला आले आले आहे. शहरात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क एकाच संकुलात उभारले आहे. सांगलीत भारतीय आणि परदेशी माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणखी एक सॉफ्टवेअर पार्क ‘उभारण्याच्या प्रयत्नात आहे. या शहराजवळ हरिपूर हे गाव आहे. सांगलीत नारळाची झाडे खूप आहेत. सांगली जवळ हरिपूर येथील गणपती मंदिर प्रसिध्द असून प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांचे स्थान आहे.

इतिहास :-
सांगली शहराचा इतिहास पटवर्धन या पेशव्यांच्या सरदार यांच्या मिरजेतील जहागिरी मध्ये झालेली वाटणी नंतर सुरु होतो असे मानले जाते परंतु त्यापूर्वीही सांगली या गावाचे अस्तित्व होते. तशा खुणा सांगलीतील गावभागात बघण्यास मिळतात. सांगली शहराचा व्यापारीदृष्ट्या विकास सन १९२९ साली आयर्विन पूलाच्या उभारणीनंतर सुरु झाला.आयर्विन पुलाला शुंभरहून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत

भूगोल :-
कृष्णाकाठची अतिशय सुपीक अशी जमीन सांगलीला लाभलेली आहे. त्यामुळे येथे चवदार भाजीपाला पिकवला जातो. ऊस व द्राक्षे इथे पिकतात. ज्वारी व बाजरी इथे बहरतात. तासगाव तालुक्यातील द्राक्षे व बेदाणे तर जगभर प्रसिद्ध आहेत.

पेठ :-
सांगली मिरज हे जुळे शहर म्हणुन ओळखले जाते. अमराई बाग ( Garden ) फार सुंदर आहे. सध्या बापट मळा म्हणजेच महावीर उद्यान शहरवासीयांचे आवडते ठिकाण झाले आहे.

हवामान
जैवविविधता :-
सांगली परिसर वेगवेगळ्या वनस्पती व प्राण्यांनी समृद्ध आहे.कृष्णा नदी आणि लहानमोठ्या तलावांमुळे परिसर समृध्द आहे.

अर्थकारण :-
सांगलीचे अर्थकारण मुळ व्यापार आहे. सबंध जिल्ह्यातून तसेच शेजारील जिल्ह्यातील व कर्नाटकातील काही भागाचा दैनंदिन व्यवहार सांगलीतूनच चालतो. येथील अर्थकारण व राजकारण यांचा मिलाप येथे दिसून येतो. येथील ऊस , द्राक्ष तसेच दूध याभोवती समाजकारण व त्याभोवती राजकारण फिरते.

बाजारपेठ :-
सांगलीची हळदीची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. तसेच द्राक्ष उत्पादनातही सांगली आघाडीवर आहे. साखरेसाठी ही सांगली प्रसिद्ध आहे सांगलीत गणपती पेठ, कापड पेठ, सराफ कट्टा, मार्केट यार्ड, मारुती रोड, हरभट रोड, माधवनगर या व्यापारी पेठा आहेतच पण सांगलीमध्ये `सांगली लोंखड मार्केट नावाचे एक प्रसिद्ध मार्केट आहे, सलीमभाई नदाफ हे त्याचे त्याचे संस्थापक-अध्यक्ष आहेत. ही १७० दुकाने एकत्र असलेली अधयावत बाजारपेठ सांगलीत कोल्हापूर रोडवर टी.व्ही. केंद्राजवळ आहे. येथे सर्व प्रकारचे लोंखडी पत्रे. पाईप, अँगल.प्लेट्स असे नवे जुने साहित्य, सर्व प्रकारचे कार/ट्रक/.मोटारसायकलचे नवे व जुने स्पेअर पार्ट‌्स मिळतात.तसेच येथे सर्व प्रकारच्या स्क्रॅपची खरेदी विक्री केली जाते. त्यामुळे येथे संपूर्ण देशभरातून मालाची आवक जावक होते. सांगलीमध्ये १०० फुटी रोडवर शामराव नगरच्या काॅर्नरवर महाराष्ट्र एकता चौकात जुने व नवे सर्व प्रकारचे कारचे स्पेअर पार्ट‌्स एकदम वाजवी व सवलतीच्या दरात मिळतात येथे कार स्ल्रॅपची २५ दुकाने आहेत. या ठिकाणी मारुती कारपासून होंडा सिटी-BMW पर्यंत सर्व प्रकारचे पार्ट‌्स उपलब्ध आहेत. तसेच माधवनगर हे सबमर्सिबल पम्पाचे होलसेल मार्केट म्हणून ओळखले जाते. माधवनगर मध्ये कोणतेही प्रकारचे सबमर्सिबल पम्पाचे विक्री होते, त्याबरोबर कसलेही सबमर्सिबल पम्पाचे रीपेअरी सुद्धा होते. भारतात येथूनदेखील मालाची आवक जावक होते. अधिक माहिती http://www.caroldpart.com अथवा http://www.autorelife.com येथे मिळते. सांगलीची बाजारपेठ ही प्रसिंद्ध बाजारपेठम्हणून प्रसिंद्ध आहे .शेअर मार्केट प्रमाणे संगलीमध्ये हळदीचा वायदा बाजार देशात प्रसिद्ध आहे सांगली व तासगाव ची बाजारपेठ बेदाणे सौदयासाठी प्रसिद्ध आहे

प्रशासन
१) नागरी प्रशासन:-
२) जिल्हा प्रशासन :-

वाहतूक व्यवस्था :-
सांगली रेल्वे स्थानक पुणे-मिरज रेल्वेमार्गावर असून येथे अनेक महालक्ष्मी एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस इत्यादी अनेक लांब पल्ल्याच्या जलद गाड्या थांबतात. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 सांगलीमधून जातो. पुणे-बंगळूर महामार्गावरून पेठ ह्या गावापासून सांगली ४५ किमी अंतरावर आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अनेक हिरकणी व निमआराम बसेस सांगलीला महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व प्रमुख शहरांसोबत जोडतात. शहरांतर्गत वाहतूकीसाठी शहरी परिवहन बसेस तसेच रिक्षा उपलब्ध आहेत.मोठ्या प्रमाणात महाविद्यालये असल्यामुळे वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे सांगली मध्ये कोणत्याही वाहतुकीच्या अडचणी निर्माण होत नाहीत.आता येथून शासनातर्फे ‘शिवशाही’ ही वातानुकुलीत बससेवा सुरु झाली आहे.या वातानुकुलीत बससेवेद्वारे सांगली पुणे,औरंगाबाद,शेगांव या शहरांना जोडले गेले आहे. रत्नागिरी ते हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाला असून तो सांगली मधून जातो.

लोकजीवन :-
सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे सर्व वर्गातील लोक अगदी गुण्या- गोविंदाने राहतात. सर्व धर्माचे लोक आपली संस्कुती जतन करतात.सांगली शहरात ब-याच जाती चे लोक रहात असून सर्व भाऊ भाऊ प्रमाने वागत असतात,या पैकी एक तळागाळातील मुस्लिम समाजातील, नदाफ, पिंजारी, समाज सम्पूर्ण महाराष्ट्रामध्ये विखुरलेला आहे, हा समाज फारच मागासलेला असून तो मिळेल ती कामे करून आपले जीवन जगत आहे , प्रामुख्याने हा समाज कापूस पिंजून गादी, ऊशी व लोकरीचे पासून `जेन` तयार, करण्याची कामे करतात आहे , परंतू आजच्या यांत्रिक यूगात या कामाची / कलेची जागा यंत्रानी घेतल्याने ही हस्तगत कला हळूहळु लोप पावनेच्या मार्गावर आहे, या साठी च समाज बांधवांसाठी सांगली चे श्री. सलीमभाई नदाफ यानी संम्पूर्ण महाराष्ट्र मधील सर्व नदाफ. पिंजारी, मन्सूरी , समाजातील बांधवांना एकत्रित आणने साठी ‘ अखिल भारतीय नदाफ सामाजिक संस्थेची’ स्थापना केली आहे व या माध्यमातून नदाफ बांधवांना व्यवसाय, ऊधोग, शैक्षणिक, आर्थीक ,वैवाहीक ,व ईतर सर्व मार्गदर्शन व मदत या संस्थेच्या माध्यमातून संम्पूर्ण महाराष्ट्रात करणार आहेत त्या साठी संस्थेची http://www.shadibandhan.net ही वेबसाईट कार्यरत आहे सर्व समाज बांधवांनी सम्पूर्ण महाराष्ट्रातुन सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सलीमभाई नदाफ यांनी केले आहे.

संस्कृती :-
मराठी रंगभूमीचा जन्म सांगली शहरात झाला.विष्णुदास भावे हे पहिले नाटककार येथे होऊन गेले. त्यांनी मराठी नाटक आणि रंगभूमीला अधुनिक चेहरा दिला. त्यांची अनेक नाटके आजवर गाजली असून सांगलीत त्यांच्या नावाचे प्रशस्त अशी नाट्यगृहं उभारण्यात आली आहेत. नाटकांमुळे कलाकारांची मोठ्या प्रमाणावर शहरात वर्दळ असते. सांगली शहराची नाट्यपंढरी अशीही ओळख आहे. सांगली जशी नाट्यपंढरी आहे तसेच सांगलीची ओळख बुद्धिबळाचे माहेरघर म्हणून देखील प्रसिद्ध आहे.सांगलीचा गणपती खूप प्रसिद्ध आहे.
सांगलीकरांचा व सांगलीचा सर्वात चटकदार खाद्य पदार्थ म्हणजे भडंग व भेळ. सांगलीतील कपाले व भोरे भडंगाला खूप मागणी आहे. सांगली मधील क्रीडा क्षेत्रात नुकतेच मानाचे पान लिहिले गेले. भारताच्या महिला क्रिकेट संघाने विश्वचषकात चांगली कामगिरी केली. या संघात सांगलीची Smriti Mansana स्मृती मानधना हिने चांगली कामगिरी बजावली. सांगली मधून चतुरंग अन्वय हा प्रसिद्ध दिवाळी अंक प्रकाशित केला जातो. या अंकाने आत्तापर्यंत 15 वर्षात 24 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केले आहेत.या अंकांचे महेश कराडकर हे संपादक असून अविनाश सप्रे कार्यकारी संपादक आहेत.

प्रसारमाध्यमे :-
सांगलीची प्रसिद्ध अशी केबल आहे एस एम एस – सांगली मिडिया सर्विसेस. तसेच लोकसंदेश न्यूज चॅनल जे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारण होत आहे, ९०.४ ग्रीन एफ एम, ९१.१ रेडीओ सिटी आणि ९१.९ आपलं एफ एम ही रेडिओ चैनल अग्रभागी आहेत या सांगली शहरातुन बरेचसे वृत्तपत्रे प्रसीद्ध होतात जसे पुढारी, लोकमत, सकाळ, पुण्यनगरी, जनप्रवास, ललकार, लोकसत्ता, तरुण भारत, तिसराडोळा, ईंडियान्युज, लोकसंदेश, अशी मराठी वृत्तपत्रे प्रसीदध होत असतांत ही वृत्तपत्रे आॅनलाइन वाचू शकता जसे INDIA NEWS वाचण्या साठी http://www.indianewsepaper.com वर ही पाहू शकता. सांगलीमध्ये फार पूर्वी पासून आकाशवाणी चे शक्तिशाली केंद्र असून याची सेवा अगदी धारवाड पर्यंत ऐकली जात होती. एफ एम केंद्राद्वारे ही सांगली आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता येतात.

शिक्षण :-
प्राथमिक व विशेष शिक्षण सांगली शहरात अनेक नावाजलेल्या प्राथमिक शिक्षण संस्था आहेत
• सांगली शिक्षण संस्था
सिटी हायस्कूल, हि. हा. रा. चिं. पटवर्धन हायस्कुल, रामदयाल मालु हायस्कुल, कै.ग.रा. कन्यापुरोहित प्रशाला, म के आठवले विनय मंदिर, बापटबाल शिक्षण मंदिर ,सिटी इंग्लिश मिडीयम स्कूल, इत्यादी .
• डेक्कन एजुकेशन सोसाइटी
सांगली हायस्कूल, आरवाडे हायस्कूल
महत्त्वाची महाविद्यालये[संपादन]
• वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय (विश्रामबाग).
• विलिंग्डन महाविद्यालय
• लठ्ठे ऐज्यूकेशन सोसायटी
• आप्पासाहेब बिरनराळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर
• शांतिनिकेतन महाविद्यालय
• भारती विद्यापीठ
• आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी
• आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनियरींग
• पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी
• चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स
• के डब्लू सी
• जी.ए. कॉलेज ऑफ कॉमर्स
• राजारामबापू इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
• पद्मभूषण वसंतदादा पाटील दंत महाविद्यालय
• मिरज मेडिकल कॉलेज
• मथु बाई गरवारे महाविद्यालय
• पतंगराव क़दम महाविद्यालय

पर्यटन स्थळे :-
बागेतील गणपती, हरिपूर

सांगली शहराचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांपासूनचे अंदाजे अंतर पुढीलप्रमाणे आहे.
क्र …पासून अंतर(कि.मी.)
१ औरंगाबाद- ४५७
२ नागपूर – ७६३
३ पुणे – २३१
४ मुंबई – ३९१
५ रत्नागिरी – १७९
~~~~~~~~~©~~~~~~~~~~
श्री लक्ष्मण काटेकर
सोलापूर
📞 ७५८८०२०८८६

सांगली जिल्हा
देश – भारत

राज्य – महाराष्ट्र

विभागाचे नाव – पुणे विभाग

मुख्यालय – सांगली

सांगली जिल्ह्यातील तालुके :-
शिराळा –
वाळवा –
तासगांव –
खानापूर (विटा)-
आटपाडी –
कवठे महांकाळ –
मिरज –
पलूस-
जत –
कडेगांव

क्षेत्रफळ :-
८,५७८ चौरस किमी
(३,३१२ चौ. मैल)

लोकसंख्या
२८२०५७५ (२०११)

लोकसंख्या घनता :-
३२८ प्रति चौरस किमी (८५० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या २४%

साक्षरता दर :-
८२.६२%

लिंग गुणोत्तर :-
१.०३ ♂/♀

लोकसभा मतदारसंघ :-
सांगली (लोकसभा मतदारसंघ).

विधानसभा मतदारसंघ :-
इस्लामपूर
• खानापूर
• जत
• तासगाव-कवठे महाकाळ
• पलूस-कडेगाव
• मिरज
• शिराळा
• सांगली

भूगोल :-
सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव (कर्नाटक), नैर्ऋत्येला कोल्हापूर व पश्चिमेला रत्‍नागिरी हे जिल्हे आहेत. पश्चिमेकडील शिराळा तालुका सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो. जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ आहे. कृष्णा खोर्‍याचा परिसर मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे.

सांगली जिल्ह्यातील तालुके :-
शिराळा, वाळवा, तासगांव, खानापूर (विटा), आटपाडी, कवठे महांकाळ, मिरज, पलूस, जत व कडेगांव

जिल्ह्यात जागोजागी भिन्नभिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती आहे. जत, आटपाडी, कवठे महांकाळ हे कायम दुष्काळी तालुके आहेत. पलूस, वाळवा, मिरज तालुक्यांतील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो. शिराळा, कडेगाव, खानापूर हे डोंगरी तालुके आहेत. एका टोकाच्या शिराळातालुक्यात जंगल आहे. तर दुसरीकडे जत तालुक्यात मैलोनमैल ओसाड जमीन आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या सांगलीचा निम्मा लोकव्यवहार कानडी भाषेत चालतो.

जिल्ह्याचे आकारमान :-
पूर्व-पश्चिम लांबी २०५ किमी व
उतर-दक्षिण लांबी ९६ किमी आहे.

सांगली जिल्हा कृष्णा, वारणा नदी व उत्तरेस महादेवाच्या डोंगराखालील पठार व माणगंगा नदीच्या पात्रात वसला आहे. कृष्णा नदीची जिल्ह्यातली लांबी १०५ कि.मी आहे. जिल्ह्याचे तापमान किमान १४ अंश सेंटिग्रेड व कमाल ४२ अंश सेंटिग्रेड यांदरम्यान असते. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४००-४५० मिलिमीटर आहे. जिल्ह्याची २००१सालची लोकसंख्या २८,२०,५७५ इतकी आहे.

निर्मिती :-
सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून दि १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा ‘दक्षिण सातारा’ जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. या जिल्ह्यात १९६५ साली कवठे महांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले गेले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने (युती सरकारने) पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली. सांगलीचे गणपती मंदिर हे खाजगी असल्यामुळे त्याचा सर्व खर्च श्रीमंतराजे हे करतात.
विशेष हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण होय. मराठी माणसाच्या जीवनात अढळ असे स्थान असलेल्या मराठी नाटकाचे उगमस्थान म्हणजे सांगली जिल्हा होय. येथेच विष्णुदास भावे यांनी पहिले मराठी नाटक सीतास्वयंवर सादर केले.
औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणणारे विठोजीराव चव्हाण व प्रतिसरकारचे प्रणेते नाना पाटील यांच्यासारख्या खंद्या वीरांना जन्म देणारी ही भूमी आहे. कलावंतांचा जिल्हा म्हणूनही सांगली प्रसिद्ध आहे. उत्तम दर्जाच्या तंतुवाद्यांची निर्मिती हे सांगली जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे.
संस्थानी खाणाखुणा, सुंदर कृष्णाकाठ आणि सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांचे जन्मस्थान हीदेखील सांगलीची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. नाट्यपंढरी व कलावंतांचा म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा औद्योगिक क्षेत्रात तसेच कृषी क्षेत्रातही प्रगती साधण्याचा प्रयत्‍न करत आहे.
सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. ‘वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१ चा सहकारी साखर कारखाना आहे’.
नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व, (जन्म : २६ जून, इ.स. १८८८ ; नागठाणे, सांगली, महाराष्ट्र – मृत्यू १५ जुलै, इ.स. १९६७) या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. बालगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले.

ऐतिहासिक महत्त्वाचे :-
प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व ऱ्हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हेदेखील संस्थान होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे मोठा सत्याग्रह झाला होता. गोरक्षनाथ महाराजांनी ( नवनाथांतले दुसरे नाथ) शिराळ्यामध्ये ३२ शिराळा येथे सुरू केलेला नागपंचमीचा उत्सव जगप्रसिद्ध आहे.मिरज येथील तंतुवाद्ये अतिशय प्रसिद्ध असून येथील वाद्ये जगभर पाठविली जातात.

दळणवळण :-
राष्ट्रीय महामार्ग क्र.४ हा पुणे व बंगलोर या शहरांना जोडणारा महामार्ग जिल्ह्यातून जातो. मिरज-पुणे व मिरज-कुर्डुवाडी-लातूर हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. मिरज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. सांगली हा महत्त्वाचा जिल्हा असल्याने आपल्याला येण्याची जाण्याची सोय चांगली आहे.

शेती :-
जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषत: शिराळे तालुक्यात पिवळसर, तांबूस, तपकिरी जमीन; तसेच मिरज, तासगाव तालुक्यात करडी व कृष्णा, वारणा, येरळा या नद्यांच्या खोर्‍यांत काळी-कसदार जमीन आढळते.
सांगली जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. उसाचे पीकदेखील जिल्ह्यात मोठया प्रमाणावर घेतले जाते. अलीकडील काळात सांगली जिल्हा द्राक्षोत्पादनासाठी प्रसिद्धीस आला असून त्यांतल्यात्यांत तासगाव व मिरज तालुके द्राक्ष उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहेत. द्राक्षापासून बेदाणे तयार करण्याचे उद्योग वाढत आहेत. याशिवाय कृष्णा नदीकाठच्या प्रदेशात-म्हणजे मिरज, तासगाव व वाळवे या तालुक्यांच्या कांही भागांत तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

जिल्ह्यातील प्रमुख पिके:-
बाजरी, भात (तांदूळ). ज्वारी, गहू, मका, ऊस, भुईमूग, हळकुंड/हळद, सोयाबीन, द्राक्षे, डाळिंब, कापूस.

राजकीय संरचना
लोकसभा मतदारसंघ :-
सांगली – मिरज,सांगली, पलूस-कडेगांव, खानापूर, तासगाव-कवठे-महांकाळ व जत हे विधानसभा मतदारसंघ मिळून सांगली लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. (जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आले आहेत.)
विधानसभा मतदारसंघ : जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत- मिरज, सांगली, इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगांव-कवठे महांकाळ व जत.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६१ मतदारसंघ आहेत, तर पंचायत समितीचे १२२ मतदारसंघ आहेत.

सांगली जिल्ह्यातील सहकारी बँका आणि पतपेढ्या:- (२०१०सालच्या डिसेंबरमधील स्थिती)
सांगली जिल्ह्यात एकूण नागरी सहकारी बँकांची संख्या २५ असून त्यात २ हजार कोटीच्या ठेवी आहेत. २५ बँकांपैकी ५ बँकांचे परवाने रद्द झाले आहेत. रिझर्व्ह बँकेचे निर्बंध असलेल्या २ बँका आहेत. चार बँकांचे विलीनीकरण झाले आहे, तर दोन विलीकरणाच्या मार्गावर आहेत.
परवाना रद्द झालेल्या बँका कुपवाड अर्बन, मिरज अर्बन, यशवंत. लॉर्ड बालाजी, वसंतदादा.
रिझर्व्ह बँकेचे निर्बंध असलेल्या बँका : कृष्णा व्हॅली, धनश्री महिला.
बंद पडून विलीनीकरण झालेल्या बँका : आष्टा अर्बन बँकेचे अपना बँकेत, पार्श्वनाथ बँकेचे कराड बँकेत, तर मुरघा राजेंद्र व आण्णासाहेब कराळे बँकांचे सारस्वत बँकेत विलीनीकरण झाले आहे.
संचालक मंडळ बरखास्त झालेल्या बँका (इ.स. २०१२ची स्थिती) : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. या बँकेचे संचालक मंडळ २९ मार्च २०१२ रोजी बरखास्त करण्यात आले. बरखास्त संचालकांत उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि विद्यमान संचालक शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलासराव शिंदे यांचा समावेश आहे..

पतपेढ्या :-
सांगली जिल्ह्यात एकूण १२०० पतसंस्था असून त्यात सुमारे ५०० कोटींच्या ठेवी आहेत. अडचणीतील पतसंस्था ८८ आहेत. चौकशी सुरू असलेल्या पतसंस्था ९६ तर प्रशासक व अवसायनातील संस्था २४० आहेत.
सांगली जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांपैकी ६८ नागरी सहकारी पतसंस्थांत ७९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले आहे.
जिल्ह्यातील २३ नागरी सहकारी पतसंस्थांतील २७ कोटी रुपयांच्या अपहारासाठी निरनिराळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर ४५ संस्थांची सहकार कायद्याच्या कलम ८८ अन्वये चौकशी सुरू आहे. जनलक्ष्मी, मुस्लिम अर्बन, संपत, साईनाथ महिला, सेंच्युरी अशा काही संस्थांवर फौजदारी कारवाई झाली आहे.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे :-
गणपती मंदिर, मिरजेचा दर्गा, संगमेश्वर मंदिर (हरिपूर), प्रचितगड व चांदोली धरण/अभयारण्य, बत्तीस शिराळा, तासगांव येथील गणेश मंदिर, दांडोबा अभयारण्य, शुकाचारी गुहा, पर्यटन गणेशदुर्ग किल्ला.

शहर :-
कृष्णेकाठी वसलेले सांगली शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, गावात मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला आहे.
• गणेश मंदिर : १८४४ मध्ये श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांनी बांधलेले येथील गणेश मंदिर प्रसिद्ध असून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांनी या मंदिरात बैठका घेतल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात.
• कृष्णा व वारणा नद्यांचा संगम : सांगलीपासून जवळच हरिपूर येथे कृष्णा व वारणा या नद्यांचा संगम झाला असून येथील संगमेश्र्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे स्फूर्तिस्थळ नावाचे स्मारक आहे.
• कृष्णा-येरळा संगमावरील ब्रम्हनाळ आणि बहे येथील रामलिंग इत्यादी ठिकाणे प्रसिद्ध आहेत.
• मिरज : मिरज हे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून येथील भुईकोट किल्ला, वानलेस मिशन दवाखाना व मीरासाहेब अवलियाचा दर्गा प्रसिद्ध आहेत.
• ख्वाजा मीरासाहेब दर्गा : हा ५०० वर्षे जुना असून, सर्व धर्मांतील व पंथातील लोक येथे दर्शनास येतात.
• सागरेश्वर अभयारण्य : सांगलीजवळील सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे. खानापूर, पलूस, वाळवा या तालुक्यांत हे अभयारण्य पसरले असून हे हरणांसाठी राखीव आहे.या अभयारण्याची निर्मिती वृक्षमित्र.धों.म.मोहिते यांनी केली. त्यांना सागरेश्वर अभायारण्याचे जनक म्हटले जाते.
• चांदोली (ता. बत्तीस शिराळा) : हे धरण वारणा नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली हे अभयारण्य येते. या जंगलात गवा ,अस्वल, बिबट्या हे प्राणी आढळतात
.
• औदुंबर : सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे कृष्णाकाठी दत्त मंदिर आहे. औदुंबर येथे राहूनच प्रसिद्ध कवी सुधांशू यांनी काव्यसाधना केली.
• पेंटलोद येथील प्रचितगड, बाणूरचा भूपाळगड, तासगावचे गणपती मंदिर, कवठे-एकंद येथील सिद्धारामाचे मंदिर व त्या ठिकाणी दसर्‍याच्या वेळी रात्रभर होणारी फटाक्यांची आतषबाजी विशेष प्रसिद्ध आहे.
• दंडोबा येथील उंच टेकडीवर शंकराचे प्राचीन मंदिर आहे.

पेड विजयनगर पर्यटन स्थल:-
हे स्थल तासगाव तालुक्यातील पेड वा व विजयनरच्या मध्य ठिकाणी आहे.तासगाव पासून २६ किमी अंतरावर आहे. अतिशय अश्या निसरगरम्य ठिकाणी हे पर्यटन स्थळ बनवण्यात आले आहे. येथे MTDC हॉटेल्स आहेत. लहान जंगल आहे. तसेच गार्डन , मनोरंजनासाठी खेळणी आहेत . या पर्यटन स्थळांमध्ये खूप अश्या मोठ्या तलावाचा समावेश आहे. येथे जवळच कृष्णा गोळे व शिवाजी गोळे यांची शेती आहे.

जिल्ह्यातील काही प्रसिद्ध व्यक्ती :-
क्रांतिसिंह नाना पाटील
• अण्णा भाऊ साठे
• ग.दि. माडगूळकर
• विष्णुदास भावे
• विष्णू सखाराम खांडेकर
• व्यंकटेश माडगूळकर
• नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व
• गोविंद बल्लाळ देवल
• चिंतामणराव पटवर्धन
• दादासाहेब वेलणकर
• ना.सं. इनामदार
• यशवंतराव चव्हाण
• राम नाईक
• वसंतदादा पाटील
• विजय हजारे
• अरुण कांबळे
• आर.आर. पाटील
• मधुकर तोरडमल
• जयंत पाटील
• भाऊसाहेब पडसलगीकर
• पतंगराव कदम(साहेब)
• वृक्षमित्र.धों.म.मोहिते

संगीत वारसा :-
मंगेशकर कुटुंबीय सुमारे १४ वर्षे सांगलीत वास्तव्यास होते. चित्रपट संगीतदिग्दर्शक बाळ पळसुलेही सांगलीचेच. ‘गुरुकुल या नावाने एक वर्षापासून संगीत विद्यालय सुरू झाले आहे विदुषी मंजुषा पाटील यांनी द वि काणबुवा प्रतिष्ठानच्या वतीने हे विद्यालय पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारक , स्टेशन चौक येथे सुरू केले आहे

राजकीय वारसा :-
सहकार क्षेत्राला निर्णायक वळण देणारे व आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत महाराष्ट्राला विकासाकडे नेणारे महत्त्वाचे निर्णय घेणारे वसंतदादा पाटील यांची कर्मभूमी व जन्मभूमी म्हणजे सांगलीच होय. वसंतदादांचा जन्म मिरज तालुक्यातील पद्माळे या गावचा होय. त्यांनी अनेक वर्षे विधिमंडळात व संसदेत सांगलीचे प्रतिनिधित्व केले.

उद्योग :-
जिल्ह्यात सांगली, मिरज, विटा, कवठे-महांकाळ व इस्लामपूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात बारा साखर कारखाने असून सांगली येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा देशातील सर्वाधिक दैनिक गाळप क्षमतेचा व आशियातील सर्वांत मोठा सहकारी साखर कारखाना आहे. उधोगांमध्ये साखरउद्योगा व्यतिरिक्त इतर अनेक व्यवसायांसाठी सांगली प्रसिद्ध आहे. उदा० हळद, मिरची, द्राक्षे, भडंग, आणि असे सांगलीतले बरेचसे उद्योग भारतात प्रसिद्ध आहेत .सांगलीच्या बाजारपेठेमधून महाराष्ट्रात व कर्नाटकात मालाची आवक – जावक आहे. येथील विष्णुअण्णा फळ मार्केट, मार्केट यार्ड, सांगली-मिरज .एम.आय.डी.सी. (औधोगिक वसाहती)मधून अनेक प्रसिद्ध उत्पादने जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचत आहेत. चिंतामणि मोटर्स ही भारतात र्मोडिफाइड गाडी बनवण्यासाठी ओळखले जाते. तसेच महाराष्ट्र कार ओल्ड पार्ट्स , ही फर्म सर्व लेटेस्ट कार्सचे जुना व नवे स्पेअर पार्ट्‌स भारतभर पोहोचवण्यासाठी ऑनलाइन सिविधा देते. हिची अधिक महिति आपन caroldpart.com वर मिळते. सांगली-कोल्हापूर रोडवर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ आणि जुना लोखंड बाजार आहे. या मार्केटमध्ये १७० दुकाने असून हे सांगली लोखंड मार्केट. नावाने ओळखले जाते. याची स्थापना सलीम नदाफ यानी केली असून ते मार्क्टचे अध्यक्ष आहेत (इ.स. २०१५)

साखर कारखान्यांची यादी
क्र नाव गाव, तालुका
१ वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना सांगली

२ विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना यावंतनगर, शिराळा

३ राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना साखराळे, वाळवा

४  किसन आहेर सहकारी साखर कारखाना वाळवा,

५ महांकाली सहकारी साखर कारखाना राजारामबापू नगर, कवठे महांकाळ

६ यशवंत सहकारी साखर कारखाना नागेवाडी, खानापूर

७ सोनहिरेराहकारी साखर कारखाना वांगी (कडेगाव), खानापूर (विटा)

८ डोंगराई सागरेश्र्वर सहकारी साखर कारखाना रायगाव, खानापूर, (विटा)

९ माणगंगा सहकारी साखर कारखाना लोणार सिद्धनगर, आटपाडी

१० तासगाव सहकारी साखर कारखाना तुरची, तासगांव

११ राजे विजयसिंह डफळे शेतकरी सहकारी साखर कारखाना तिप्पेहळ्ळी, जत

१२ निनाईदेवी सहकारी साखर कारखाना कोकरूड, शिराळा

१३ उदगिरी शुगर अँड पॉवर लि. बामणी-पारे, खानापूर(विटा)
_______________★______________
संदर्भ:- आंतरजाल व संकलन सह सर्व माहिती सामान्य जनमानसात समजली जावी हाच एकमेव हेतू आहे.
संकलन

श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर
 ७५८८०२०८८६
पाणी जपून वापरा, प्राणी, पक्षी, कीटक आणि जनावरे ह्यांना जमेल तसे पाणी प्यायला ठेवा.

___________________________________________________________________________________________

भाग :- 2          दि. 11 एप्रिल, 2019

जिल्हा सोलापूर

राज्य :- महाराष्ट्र

देश :- भारत—

शहर : — सोलापूर

स्थान :- १७° ४०′ ५९.८८″ N,७५° ५५′ ००.१२″ E

गुणक :-17.68°N 75.92°E

भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+५:३०)

क्षेत्रफळ :-  १४,८ ८६ चौ.किमी

उंची .४५७ मी

जिल्हा सोलापूर लोकसंख्या

  • घनता ४३,१७,७५६ (२०११)
  • २९०/किमी

पोस्ट कोड :- ४१३००१ ते

दूरध्वनी कोड :- +०२१७

RTO कोड:-  MH-13,     MH-45

 

उच्चार (सहाय्य·माहिती) :-

– शहर (इंग्रजीत Solapur/Sholapur)

हे दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असून ते पश्चिम महाराष्ट्र  या विभागात येते. ते सोलापूर  जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. सोलापूरला  कापडगिरण्यांचे शहर म्हटले जाते.सोलापूर या शहराला प्राचीन काळात सोन्नलागी किंवा सोन्नलापूर म्हणूनसुद्धा ओळखले जात असे. सोलापूर हे भारतातील मुख्य अशा उत्तर- दक्षिण रेल्वे मार्गावर असल्याने त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने ९-११ मे १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना दि १२जानेवारी, १९३१ रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. तेव्हापासून शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. विडी उत्पादनात सोलापूरचा महाराष्ट्रात वरचा क्रमांक आहे तर ‘सोलापुरी चादरी’ प्रसिद्ध आहेत. सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त चादर उत्पादन होते कारण येथील वातावरण हे चादर उत्पादनासाठी योग्य आहे. सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२ व्या शतकातील रहिवासी “श्री.शिवयोगी सिद्धेश्वर” यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापूर तलावबांधून त्यांनी सोलापूराची पाणी समस्या सोडवली.पंढरपूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूरजवळ असून अक्कलकोटचे प्रसिद्ध  स्वामी समर्थ मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर , मल्लिकार्जुन मंदिर , हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यात श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा म्हणजेच “गड्डा” ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात. सरकारच्या स्मार्ट सिटी अंतर्गत सोलापूरचे नाव या यादीत समाविष्ट झाल्याने आता सोलापूरही स्मार्ट शहर बनण्याकडे वाटचाल करताना दिसते आहे.

 

इतिहास:-

सोलापूरला एक ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे. इ.स.पू. २००  वर्षापासून सातवाहन,  चालुक्य,  राष्ट्रकूट,  यादव,  बहामनी,  अहमदनगरची  निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या. याच काळात स्वतः मुघल बादशाह औरंगजेब याने जवळपास साडेचार वर्ष सोलापूर जवळ राहून विकास साधत नवीन नवीन प्रथा रूढी जपण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा तो नमाज साठी लवाजमा सोबत घेऊन येत व सोलापूर मध्ये नमाज अदा करत तसेच बेगम साहिबा देखील सोलापूर मध्ये नमाज अदा करत व त्या वेळी पासून रमजान महिन्यात सैनिकांसाठी साहित्य व खाऊ खरेदीसाठी “बेगमपेठ व बाजार सुरू झाला” ह्याला जवळपास सव्वाचारशे वर्षाची परंपरा म्हणावी लागेल.

यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. मुघल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. सोलापूरला सोन्नलगिरी, गिरणगाव अशा नावानेही ओळखले जाते. सोलापूरचा इतिहास रोमांचक आहे.

मुंबई-चेन्नई , हैद्राबाद व दक्षिणेत जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत. पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही  जानेवारी, १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता.१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या वेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला व ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. हा शंकर शिवदारे सोलापूरचा पहिला हुतात्मा. या हौतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले. पण दि. ८,९ मे, १९३० या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर ‘नाईट’ याने जमावांवर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले. या आंदोलनादरम्यान दि.९,१०,११ मे, १९३० असे तीन दिवस सोलापूर ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली नव्हते, मुक्त होते. भारतातील (काही काळासाठी) ‘स्वतंत्र’ झालेला असा हा पहिला भाग! मे- जून, १९३० मध्ये सुमारे ४९ दिवस मार्शल लॉ हा कायदा सोलापूरला लागू होता. या काळात सोलापूरच्या ४ निरपराध युवकांना फाशी देण्यात आले. अब्दुल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा व जगन्नाथ शिंदे हे सोलापूरचे युवक दि. १२ जानेवारी, १९३१ रोजी धीरोदात्तपणे फासावर चढले. या प्रेरणादायी क्रांतिपर्वामुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते. पुतळ्यांच्या माध्यमातून आज या हुतात्म्यांची स्मृती सोलापुरात जतन करण्यात आली आहे. १९३०-३१ मधील या घटनांचे संदर्भ तत्कालीन ‘केसरी’ मध्ये आढळतात. १२ जानेवारी १९३१ रोजी या लढ्यातील चार वीर फाशी गेले. आजही तो दिवस सोलापूरकर हुतात्मा दिन म्हणून पाळतात.

तसेच पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचा सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. पर्यटन, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्चितच आहे.सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.

हुतात्मा जगन्नाथ शिंदे हे सोलापूर शहरात दक्षिण कसबा येथे शिंदे चौकात राहत होते. सोलापूर शहराचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असल्याचे दिसून येते. हुतात्मा शिंदे ज्या वास्तूमध्ये राहत होते ती वास्तू आज मोडकळीस आली आहे. तेथे आज कोणी वास्तव्यास नाही. त्यांना मुले नव्हती. त्याच्या भगिनी ताराबाई ह्या शिक्षिका होत्या. १९३७ साली स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापुरात आले होते. तसेच सोलापूर हे आंबेडकर चळवळीचे केंद्र आहे असे मानले जाते. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात असला तरी सोलापूरचे वैभव दिवसेंदिवस उज्ज्वल होत आहे. सोलापूरची सध्या स्मार्ट शहर म्हणून प्रगती होत आहे. सोलापूर हे सिद्धरामेशवेर नगरी म्हणून ओळखले जाते.

 

नावाचा उगमस्थान :-

“सोलापूर” ह्या नावाचा उगम ‘सोला (सोळा) आणि पूर (गावे)’ या दोन शब्दापासून झाला आहे. असे मानले जाते की, सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, आदिलपूर, काळजापूर, खडारपूर, खान्देरवाडी, चपळदेव, जामदारवाडी, फतेहपूर, मुहम्मदपूर, राणापूर, शेखपूर, सन्दलपूर, सोनापूर सोन्नलगी, सोलापूर आणि वैदकवाडी ह्या सोळा गावांपासून बनले आहे.

 

सोलापूर भूगोल :-

सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४८४४.६ चौरस किलोमीटर आहे. सोलापुरातील सरासरी पर्जन्यमान ५४५.४ मिलिमीटर (महाराष्ट्रातील सर्वात कमी) आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३(इ.स. २००१) आहे. भीमा नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही.

सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद; पूर्वेला उस्मानाबाद, दक्षिणेस सांगली व विजापूर जिल्हा व (कर्नाटक) तर पश्र्चिमेस सांगली,  सातारा व  पुणे हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या उत्तर, ईशान्य व पूर्व भागात बालाघाटच्याडोंगररांगा आहेत. तसेच पश्चिम व नैर्ॠत्य या भागांत महादेवाचे डोंगर आहेत. जिल्ह्याचा इतर भाग सपाट, पठारी आहे. या जिल्ह्याचे  हवामान  सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाते.

जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयेकडे  वाहणारी भीमा नदी जिल्ह्याचे दोन भाग करते. भीमेची जिल्ह्यातील लांबी सुमारे २९० कि.मी. आहे. भीमा पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखली जाते. नीरा-भीमा संगम माळशिरस तालुक्यात, तर भीमा-सीना संगम दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग-कुडल येथे होतो. जिल्ह्यातून सीना, नीरा, भोगावती, हरणी, बोटी, माण या छोट्या-मोठ्या नद्या वाहतात.

सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील््ा पश्र्चिम व मध्य भागांत पाणीपुरवठा सुलभतेने होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो (रोहित) पक्षी आढळतात. भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो. भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा बोगदा आहे. उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. याचबरोबर जिल्ह्यात सहा (६) मध्यम पाणीप्रकल्प आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो. सोलापूर हा जिल्हा धान्याचे कोठार आहे.

 

सोलापूरचे भौगोलिक समन्वय :-

अक्षांश: 17 ° 40’17 “उ

रेखांश: 75 ° 54’37 “पू

 

समुद्रसपाटीपासूनची उंची:-

473 मीटर = 1551 फूट

 

दशांशमध्ये सोलापूरचे समन्वय:-

अक्षांश: 17.671 5200 ° रेखांश: 75.9104400 °

 

सोलापूरचे डिग्री आणि दशांश मिनिटाचे समन्वय

अक्षांश: 17 ° 40.2 912 ‘उ रेखांश: 75 ° 54.6264 ‘पू

 

सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 तालुके आहेत:-

१) माढा

२) पंढरपूर

३) सांगोला

४) मंगळवेढा

५) बार्शी

६) करमाळा

७) अक्कलकोट

८) माळशिरस

९) मोहोळ

१०) द.सोलापूर

११) उ.सोलापूर

जुळे सोलापूर:-

शहराच्या दक्षिणेकडील सोलापूर-विजापूर महामार्गावरील भागास जुळे सोलापूर म्हणतात.

जैवविविधता :-

भारतीय डाळिंबे जगाच्या बाजारपेठेत तोरा मिरवत असताना सोलापूरच्या मातीत पिकलेल्या डाळिंबांना ‘सोलापूर डाळिंब’ असा विशेष भौगोलिक निर्देशांक मिळाल्याने सोलापूरची डाळिंबे आंतरराष्ट्रीय बाजारात आता वेगळा तोरा मिरवणार आहेत. सोलापूरच्या डाळिंबांना एक वेगळी प्रतिष्ठा मिळाली असून त्यामुळे निर्यातीला मोठा मिळाला आहे.

बाजारपेठ

सोलापूर शहर हे बाजारपेठेच्या दृष्टीने फार महत्व आहे. कारण सोलापूर शहरात हातमागावर नऊ वारी साडी तयार करण्याची प्रथा आहे. या साडीचा पोत हा इतका सुंदर आहे की प्रत्येक स्त्रीयांना हवाहवासा वाटतो. त्यामुळे सोलापूरची बाजारपेठ आजही प्रसिद्ध असल्याचे दिसून येईल.इथल्या नऊवारी साडीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सोलापूर शहर हे कामगारची वस्ती म्हणून ओळखले जाते.याचे मुख्य कारण म्हणजे पूर्वी पासून चालत आलेला हातमाग व्यवसाय आणि आता सुरु असलेला पावर लुमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून आज त्याबरोबरच महिला बिडी उद्योग यामुळे सोलापूरला हि ओळख प्राप्त झाली. सोलापूर जिल्हा हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो.बार्शी तालुक्यासह आजूबाजूच्या खेड्यातून मोठ्या प्रमाणातून ज्वारीची आयात केली जाते. यासाठी मंगळवेढा हा तालुका प्रसिद्ध आहे. सोलापूरात  सोलापूरी चादर हि तितकीच प्रसिद्ध आहे.तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू चे बाजारपेठ मोठ्या प्रमाणात आहे . दर वर्षी इलेक्ट्रो भरवला जातो त्या मधे ग्राहकाची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते वस्तूची खरेदी हि अगदी मोठा उस्थाणे केली जाते.

प्रशासन

मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात

एकूण २ लोकसभा व

११ विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच

६८ जिल्हा परिषद मतदारसंघ व

१३६ पंचायत समिती मतदारसंघ आहेत.

लोकसभा मतदारसंघ

१) सोलापूर,

२) माढा

 

माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर :- जिल्ह्यातील  करमाळा, माढा, सांगोला,  माळशिरस या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, सातारा जिल्ह्यातील माण व फलटण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

बार्शी हा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे.

विधानसभा मतदारसंघ (११) : मोहोळ, उत्तर सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर शहर, मध्य सोलापूर शहर,  अक्कलकोट,  पंढरपूर, करमाळा, माढा, सांगोले, माळशिरस, बार्शी.

सोलापूर वाहतूक व्यवस्था :-

सोलापूर शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेची समस्या जटिल आहे. ही समस्या बसस्थानक परिसरात अधिकच दिसून येते. तेथे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. सोलापूर शहरातून ४ प्रमुख महामार्ग जातात.

१) सोलापूर – पुणे,

२) सोलापूर – विजापूर,

३) सोलापूर – हैद्राबाद,

४) सोलापूर – धुळे.

त्याच प्रमाणे सोलापूर हे वाहतूक व्यवस्थेमध्ये खूपच विखुरलेले शहर म्हणून ओळखले जाते.

लोकजीवन

सोलापूर शहरात म्हशी पळवण्याची परंपरा अनेक वर्ष पासून सुरू आहे. कसब्यातील वीरशैव गवळी समाजाच्या वतीने दिवाळीमध्ये याचे आयोजन दरवर्षी केले जाते.भास्कर घराण्याच्या म्हशीला यावेळी पहिला मान असतो. म्हशी पळवण्याचा कार्यक्रम सोलापूर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

संदर्भ : अंतरजाल वरून सहकार्य घेत संकलन प्रयत्न, सोलापूर चा इतिहासात सर्व घडामोडी याव्यात व जनसामान्यांना इतिहास समजला जावा.

संकलन 

श्री. लक्ष्मण काटेकर, सोलापूर

  7588020886


Month: April 2016

Excell

[26/04 9:37 PM] Et Somnath Gaikwad Akot: मी तयार केलेला रजिस्टर खूप लहान आहे. यामध्ये ठराविक आणि शाळेसाठी आवश्यक रजिष्टर्स add करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
यामध्ये सर्वसामान्यपणे
*शाळेचा दाखला
*निर्गम उतारा
*विविध शिष्यवृत्ती
*TC रजिष्टर
* प्रत्येक वर्गाचा विद्यार्त्यांचा माहिती
*व इतर
डाउनलोड लिंक:-

https://www.dropbox.com/s/6qikgtgfvx627xt/Digital%20School1.4.xlsx?dl=1
हारके सरानी तयार केलेला रजिष्टर खुप मोठं असल्यामुळे परिपूर्ण असेल. मलाही मिळालं तर खुप बरं होईल. नदाफ सर इतराकडून सदर फॉर्मेट बाबत ऐकून आहे. हारके सरांचे एक्सेल मधील काम अवर्णनीय अशीच आहे. 👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏
[26/04 10:44 PM] ‪+91 94209 32308‬: फॉर्मले आपणास तीन प्रकारे देता येतात,
1 ) = चिन्ह देऊन टाईप
किंवा
2 ) फॉर्म्युला टॅब ला जाऊन fx function la क्लिक करून जी window ओपन होत त्यातून हवा तो निवडून
किंवा
3 ) फॉर्म्युला टॅब जाऊन fx च्या बाजूला function library तुन
Logical, text, यापैकी कोणता तो निवडून घ्या, या व्यतिरिक्त पाहिजे असल्यास more function ला क्लिक करा ,
=====================

( हे सर्व प्रकारचे फोर्मुले वाचले तर असे वाटते कि मला एक्सेल रुपी महासागरातील फक्त तांब्याभर  पान्याएवढीच माहिती आहे )
:mrgreen::mrgreen::mrgreen::mrgreen::mrgreen::mrgreen::mrgreen::mrgreen:
[27/04 7:26 AM] Suraj Shikalgar Sangli: Excel Formula : SUM ,Substract , Multiplication , Division

Microsoft Excel हे एक असे softwear आहे ज्याच्या साह्याने आपण आपले calculation सहज आणि सोपे करू शकतो. पण त्यासाठी त्याचे आवश्यक फोर्मुले येणे आवश्यक आहे. पण काही फोर्मुले कसे वापरावयाचे याचे ज्ञान काहीवेळा अपुरे असते. या ठिकाणी या ब्लॉग द्वारे सर्व आवश्यक फोर्मुले देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी आवश्यक आहे तेथे आपण सूचना देवू शकता.

SUM चा फोर्मुला 
हा फोर्मुला दोन किंवा अधिक सेल मधील संख्यांची बेरीज करण्यासाठी वापरला जातो.
जसे : जेथे RESULT हवा त्या सेल मध्ये क्लिक करा व तेथे = हे क्लिक करा व SUM हा शब्द TYPE करून ज्यांची बेरीज करावयाची आहे ते सर्व सेल निवडा.
किंवा
दुसरी पद्धत : RESULT च्या ठिकाणी “=” हे चिन्ह निवडा व जितक्या सेल ची बेरीज करावयाची त्या प्रत्येक सेल ला निवडा व + हे चिन्ह निवडून सेल निवडा पुन्हा + निवडून पुन्हा जितके सेल असतील तितके निवडा व प्रत्येक सेल च्या मध्ये + चिन्ह निवडा..
म्हणजेच
RESULT च्या सेल मध्ये “B3+C3+D3+E3” हे टाईप करा म्हणजे तुमच्या  “E5″ मध्ये 100 उत्तर मिळेल.

______________________________________________________________________________

वजाबाकी चा फोर्मुला : 

या मध्ये दोन संख्यांची वजाबाकी आपण तिसऱ्या सेल मध्ये करू शकतो यां साठी आपणास पारंपारिक पद्धीतीने जसे वजाबाकी करतो तसेच येथे सुद्धा वजाबाकी करू शकतो.
जसे :  TOTAL च्या सेल मध्ये ज्या दोन संख्यांची वजाबाकी करायची आहे त्यांच्या सेल ची वजाबाकी करा.
TOTAL मध्ये = चिन्ह दाबा. त्यानंतर मोठी संख्या – लहान संख्या निवडा , तुमचा REUSLT तुम्हाला मिळेल.

__________________________________________________________________________

गुनाकाराचा फोर्मुला :

दोन संख्यांचा गुनाकाराचा फोर्मुला कसा वापरावा हे येथे दाखवले आहे.
जसे : जेथे TOTAL हवी तेथे = चिन्ह दाबा, पहिली संख्या (B3) * दुसरी संख्या  (C3) टाका म्हणजेच ” =B3*C3 हा फोर्मुला टाका. म्हणजे त्या सेल मध्ये तुमचा RESULT मिळेल.

________________________________________________________________________________

भागाकाराचा फोर्मुला :

यामध्ये दोन संख्यांचा भागाकार कसा करावा हे दाखविले जाते.
जसे  : TOTAL मध्ये = चिन्हाचा वापर करा, व मोठी संख्या / लहान संख्या म्हणजेच दिलेल्या सेल मध्ये  “=B3/C3” या फोर्मुल्याचा वापर करावा लागेल म्हणजे दिलेल्या संख्येचा RESULT येईल.

डेमो image / video माहीती साठी खालील लिंक वर भेट द्या..

http://eschool4u.blogspot.in/2016/03/excel-formula-sum-substract-multiplication-division.html?m=1

सूत्रे

                     
        घन आकृती महत्त्वाचे सुञ

===================

1— इष्टीकाचित्ती  – 

पृष्टफळ   =   [ 2lb + 2bh + 2lh ]

घनफळ    = l × b × h
————————————
2—  घन

पृष्टफळ    =   6 × l²

घनफळ     = l × l × l  = l³
———————————————
3–वृत्तचित्ती / दंडगोल

वकृ पृष्टफळ  = 2πrh

एकूण पृष्टफळ = 2πrh  + 2πr²

घनफळ         = πr²h
———————————————-
4–शंकू  

वकृ  पृष्टफळ    =  πrl 

एकूण पृष्टफळ  = πr² + πrl
                        = πr ( r + l )

घनफळ      = 1/3  × πr²h
———————————————-
5  –गोल

पृष्टफळ   =  4πr²

घनफळ   = 4/3 × πr³ 
———————————————-
7– अर्धगोल 

पृष्टफळ   = 3πr²

घनफळ    = 2/3 × πr³
———————————————
8– पिरॉमिड 

पृष्टफळ  =( पाया क्षे. )+1/2×lbn
                  (  n  –  पाया एकूण बाजु)

घनफळ   =  1/3 ×(पाया क्षे. )×h
———————————————-
9–  बकेटाकृती घन

घनफळ  = 1/3×πh(r² +rR + R²)

r  – वरची ञिज्या ,R – खालची ञिज्या

==========================
📌  वरील सर्वच घनाकृतीत ….

l  –  लांबी / तिरकस उंची
b  – रूंदी
h  – उंची
r  – ञिज्या
π  – 22/7  or  3.14 

==================

सुट्टीत कामे

मुलांनी सुटीत करायलाच हव्यात
या गमती जमती

01. आपल्या परिसरात अंध, अपंग, कर्णबधिर, गतिमंद अशी काही खास मुले असतात. सुटीच्या दिवसातील काही दिवस त्यांच्यासाठी राखून ठेवा. त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवा. त्यांना बागेत फिरायला घेऊन जा. त्यांच्याशी खेळा. तुमच्या मदतीची नाही तर तुमच्या मैत्रीची त्यांना गरज आहे, हे लक्षात ठेवा. मला खात्री आहे त्यांच्या सहवासात तुम्हाला खूप नवीन गोष्टी कळतील.
02. या सुटीत कणिक मळायला शिकाच म्हणजे ‘मळणे’ याचा खरा अर्थ तुम्हाला अनुभवता येईल. तीन ते चार दिवसांच्या अथक सरावानंतर कणिक व्यवस्थित मळता येईल पण तोपर्यंत कपडे मळणार नाहीत याची काळजी घ्या.
03. एक दिवस घरातला शिवणाचा डबा घेऊन ‘शिवाशिवी’ करा. बटण लावणे, हुक लावणे, शिवणे, टीप किंवा धावदोरा घालणे, टाका घालणे याचा अनुभव मोठ्या माणसांसोबत घ्या.
04. सुटीतले किमान दोन दिवस तरी शिंप्याच्या दुकानात जाऊन बसा. शिंपी मापं कशी घेतो आणि कापड कसं बेततो याचं बारकाईनं निरीक्षण करा. शिंपीकाकांशी गप्पा मारा.
05. लहान बाळाचा एखादा जुना छोटासा शर्ट घ्या. त्याची व्यवस्थित मापं घ्या. कागदावर आकृती काढा. आता घरातले जुने रुमाल वापरुन तसा शर्ट शिवण्याचा प्रयत्न तर करुन पाहा.
06. या सुटीत वेगवेगळ्या फळांच्या बिया जिथून मिळतील तिथून जमवा. साफ करुन ठेवा. त्याचे वर्गीकरण करा. पावसाळ्यात सहलीला जाल तेव्हा या बीया डोंगरावर, बागेत किंवा रस्त्याच्या बाजुला रुजवण्याचा प्रयत्न करा.
07. प्रत्येक फळ कापण्याची पध्दत वेगळी असते आणि ती प्रयत्नपूर्वक शिकावी लागते. या सुटीत आंबा, कलींगड, पपनस, टरबूज, पपई, फणस, अननस अशी फळे वेगवेगळ्या पध्दतीने आवर्जून कापा आणि कापण्यातली गोडी अनुभवा.
08. आता तुम्ही कणिक मळायला शिकलाच आहात तर आता पोळी ‘लाटायचा’ ट्राय करा. काहीजणं प्रथमच लाटताना उभ्या-उभ्या डिस्को करतात, कंबरेतून लचकतात, घाटातून बाईक चालवत असल्याप्रमाणे हातातलं लाटणं पोळपाटावर फिरवत राहतात तर काही जणं मधेच लाटणं तोंडात धरून चक्क पोळपाटच फिरवत राहतात. मग पोळपाटावर काल्पनिक देशांचे नकाशे, बेटं, तुटलेले भूखंड तर काही ठिकणी चिकट ज्वालामुखी दिसू लागतात. चिडचिड किरकिर ऐकू येऊ लागते. यावर तुमचा विश्वास बसणार नाही म्हणून म्हंटलं ‘ट्राय’ करा.
09. गाजर, काकडी, मुळा, टॉमेटो, बीट किंवा कोबी यांची कोशींबीर करणं तुम्हाला सहज जमू शकतं. आठवड्यातून दोनदा अवश्य करा. घरातलेच काय शेजारी पण आनंदाने खातील.
10. सुटीतल्या एका रविवारी घरातल्या सगळ्यांनी ‘आपले कपडे आपण धुवावयाचे’ असं ठरवा. सगळ्यांनी मिळून कपडे धुवा. कपडे धुण्याचे तंत्र आणि मंत्र शिकताना पाण्यात मस्त दंगा करा.
11. आईच्या आणि बाबांच्या मदतीने “आमच्या खास रेसीपी” असे तुमच्या कुटुंबाचे चमचमीत रेसिपी पुस्तक तयार करा. या पुस्तकातील पदार्थांचे फोटो, रेसीपी आणि पदार्थांची वर्णनं अशी लिहा की शेजार्यांेच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. मग फोटो अपलोड करून त्याचे इ-बुक करा. ते सगळ्यांना सेंड करा. वाचणार्यां च्या जीभा खवळल्या पाहिजेत.
12. घरी इस्त्री करताना काहीवेळा खूप वेळ लागतो. तर इस्त्रीवाल्याच्या दुकानातील कपडे पाहून तर घाम येतो. म्हणूनच किमान एक दिवस याच कामासाठी राखून ठेवा. इस्त्रीवाल्याच्या दुकानात जाऊन तो फुलशर्ट, टी शर्ट, पॅंट आणि ब्लाऊज यांना इस्त्री कशी करतो व मग त्यांची घडी कशी घालतो हे समजून घ्या.
13. कपडे धुतल्यावर हॅंगरला लावण्याची पध्दत आणि इस्त्री केल्यावर हॅंगरला लावायची पध्दत वेगळी असते. हे शिकून घ्या. किंबहुना हल्ली खूप वेगवेगळ्या प्रकारचे हॅंगर्स मिळतात. त्याचा ही शोध घ्या.
14. या सुटीत तुम्ही तुमच्या घराची ‘आर्ट गॅलरी’ पण करू शकता. सुटीच्या दिवशी मुलांनी घरातल्या मोठ्या माणसांना समोर बसवून त्यांचे चित्र काढावे. मग मोठ्या माणसांनी त्याचप्रमाणे मुलांचे चित्र काढावे. प्रत्येक चित्रावर नाव न लिहिता चित्राखाली फक्त चित्रकाराचे नाव लिहावे. ही चित्रे भितींवर लावून त्यावर “आम्ही सर्व” असे शीर्षक द्यावे.
15. सेल्फी काढा पाच बोटांनी. एकाखाद्या दिवशी दुपारी जेवण झाल्यावर घरातल्या आरशासमोर खुर्ची घेऊन बसा. थोडावेळ निवांतपणे स्वत:ला पाहा. स्वत:कडे पाहा. मग आरशात पाहून स्वत:चेच मस्त चित्र काढा. चित्राखाली नाव न लिहिता चित्रातील व्यक्ती तुमच्या घरातल्यांना, शेजारच्यांना किंवा तुमच्या मित्र मैत्रिणींना ओळखता येते का पाहा.
16. सेल्फी धमाका करा. तुमच्या बिल्डिंगमधले, वर्गातले किंवा शाळेतले मित्र मैत्रिणी एकत्र येऊन आपापल्या सेल्फी चित्रांचं प्रदर्शन भरवा. चित्रांखाली नावे नसल्याने डब्बल धमाका झाला म्हणून समजा.
17. जुन्या निमंत्रण पत्रिकांचा कल्पकपणे वापर करुन त्यापासून सुंदर बुकमार्कस् तयार करा. हे बुकमार्क सेल्फी प्रदर्शनातील योग्य व्यक्ती ओळखणार्यां ना भेट द्या.
18. तुम्ही मुलांनी सुटी लागल्या पासून रोज एक पोस्टकार्ड लिहायचेच आहे.  आपल्या मित्रांना, सर्व नातेवाईकांना, वयम् च्या आवडत्या लेखक/लेखीकेला, संपादकांना, मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकांना किंवा तुमच्या बाजूलाच राहणार्याा मित्र मैत्रिणींनां सुध्दा. आम्ही तुमच्या ‘सुटी पत्रांची’ वाट पाहात आहोत बरं.
19. घराजवळच्या बॅंकेत तुमच्या नावाने खाते सुरू करता येते. आवश्यक असेल तेथे मोठ्या माणसांची मदत घेऊन तुमचे खाते सुरू करा. या सुटीपासून प्रत्येक महिन्याला थोडीफार बचत करण्याची सवय लावून घ्या. साठलेले पैसे तुम्हाला इतरांच्या मदतीसाठी पण वापरता येतील.
20. घराजवळील किराणामालाचे दुकान, औषधाचे दुकान, दवाखाना, डेअरी अशा ठिकाणी दिवसांतून रोज एक तास मदत करण्यासाठी जाता येईल. यासाठी घरातील मोठ्या माणसांच्या मदतीने प्रयत्न करा. खूप वेगळं पाहण्याचा आणि शिकण्याचा जाणीवपूर्वक अनुभव घ्याच.
21. निरनिराळी फळे, फुले, भाज्या व कंदमुळे यापासून आपणास वेगवगेळे नैसर्गिक रंग तयार करता येतात. उदा. आंबा, बीट, कोथिंबीर, गाजर, पालक, हळद, पळसाची फुले, जांभूळ, चिंच, शेवंतीची फुले इ. फक्त नैसर्गिक रंग वापरून तुम्हाला सुंदर चित्र रंगवता येतील. (यातील काही रंगीत चित्रे चवीष्ट पण असतील)
22. घरातल्या टेलीफोनच्या जवळ एका रफ वहीची गरज असते. पटकन नंबर टिपून ठेवायला तिचा उपयोग होतो. तुमच्या जुन्या वहीतील कोरे कागद फाडून त्यापासून मस्त रफ वही तयार करा.
23. आठवड्यातून एक दिवस किमान एक वेळ तरी आईसोबत स्वयंपाक घरात काम करायचेच आहे. मग होणार्यां गमती आम्हाला कळवायच्या आहेत.
24. विज्ञानाचे सोपे प्रयोग समजावून सांगणारी अनेक पुस्तके आता बाजारात किंवा वाचनालयात उपलब्ध आहेत. ती मिळवा. किंवा नेटवर http://www.arvindguptatoys.com ही साइट पाहा. इथे विज्ञानाचे हजारो प्रयोग आहेत. हे सोपे प्रयोग स्वत:हून करा. त्यातील मजा अनुभवा.
25. रोज घरासमोर वेगळे सुशोभन. सुशोभन करण्यासाठी टाकाऊ वस्तूंचाच वापर करा. सुशोभन करण्याच्या विविध पध्दती आहेत. घरासमोर एखाद्या फरशीवर किंवा मातीत कुठलेही एक चित्र काढा / आकृती काढा / ठिपक्यांची रांगोळी काढा व त्यात रंग न भरता त्यात टाकाऊ वस्तूंचा उपयोग करा. उदा. बांगड्यांच्या काचा, फळांच्या साली, रंगीत कागदांचे तुकडे, निर्माल्य, रानटी फुले, सुक्या फुलांचा चुरा, गवत, बीया, रंगीबेरंगी चिंध्या, शेंगांची टरफले, प्लास्टीकचे तुकडे, चहाचा चोथा इ. हे फोटो आम्हाला इ-मेलने पाठवा.
26. घरातील मोठ्या माणसांची परवानगी घेऊनच मग घरातील लाकडी स्टूल किंवा दरवाजा घासून सुंदर रंगवा. स्टुलावर वारली पेंटींग करा. तुम्हाला आवडणारी छोटी चित्रे किंवा नक्षी काढा. कामाचे व्यवस्थित नियोजन करुन मगच रंगवायला सुरुवात करा.
27. ज्या दुकानात पंखा, इस्त्री, मिक्सर दुरुस्त करतात अशा दुकानात जा. दुकानदाराच्या परवानगीने दुकानात सुरू असणार्याव कामाचे ‘शांतपणे’ निरीक्षण करा. मग दुकानदाराच्या सोयीच्या वेळात त्यांची परवानगी घेऊन त्यांना प्रश्न विचारून नवीन गोष्टी शिकून घ्या.
28. तुमच्या जवळच्या मित्रांना एका संध्याकाळी घरी बोलवा. कुणी काय करायचे याचे नियोजन करुन, सर्वांनी मिळून चटकदार ओली भेळ करा आणि तुमच्या पालकांना खिलवा. ही ‘खिलवा खिलवी’ मग सर्वच मित्रांच्या घरी करा.
29. सायकल चालवता येत नसेल तर ती शिका. सायकल येत असेल तर, गावातल्या अनोळखी रस्त्यांवरून फेरफटका मारा. नवीन रस्ते शोधा. गावाची, शहराची ओळख करून घ्या. सर्वांनी मिळून ‘सायकल ट्रिप’ काढा. आम्हालाही कळवा.
30. गावातील प्रत्येक दुकानाची पाटी ही वेगळी असते. म्हणजे त्यावरील अक्षरलेखन, रंगसंगती, त्यावरील चित्रे यांचं काळजीपूर्वक निरीक्षण करा. त्याचप्रमाणे वर्तमानपत्रातील जाहिराती, लेखांची शीर्षके पण पाहा. विशिष्ट वस्तूंचा किंवा गोष्टींचा अर्थ शब्दातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सुलेखन. तुम्ही एक सुलेखन वही तयार करा. त्या वहीत प्राणी, पक्षी, फळे, फुले किंवा निरनिराळ्या वस्तू यांची नावे वेगवेगळ्या पध्दतीने लिहावीत. म्हणजेच ‘जीराफ’ ज्या प्रकारे लिहिले असेल त्यापेक्षा ‘नाग’ वेगळ्याप्रकारे लिहिलेले असेल. तुम्ही तुमच्या नावाचे सुलेखन तुमच्या स्टाइलने करुन आम्हाला जरूर पाठवा.

खरं म्हणजे तुम्हाला रोज एक गोष्ट करता यावी, असा विचार करून मी तुम्हाला 50 गोष्टी सांगणार होतो. पण मी अचानक विचार बदलला. याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे, या जरी 30 गोष्टी असल्या तरी त्या काही रोज फक्त एकच करायच्या गोष्टी नाहीत. यासाठी नक्कीच तुम्हाला जास्ती दिवस लागतील. आणि दुसरं म्हणजे सगळ्या गोष्टी मीच का सांगाव्यात? ‘तुम्ही सर्जनशील आहात’ यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आणखी भन्नाट गोष्टी शोधून काढा. नवनवीन गोष्टी करुन पाहा, शिका आणि एनजॉय करा… आणि हे सारं मला ही कळवा.
मी तुमच्या ‘सर्जनशील एनजॉयमेंट’ पत्रांची वाट पाहतोय.

(राजीव तांबे)

गणित

ञिकोणी संख्या संकल्पना

  गणित अध्यापक मंडळ समुह 

         संबोध व संकल्पना 

          लेख भाग – 27

===========================

        ञिकोणी संख्या 

व्याख्या –  ” दोन क्रमवार संख्या चा गुणाकार करून गुणाकाराची निम्मी संख्या म्हणजे ञिकोणी संख्या होय ”

उदाहरणार्थ –  

    क्रमवार संख्या  – 5 , 6 

                            5 × 6  

ञिकोणी संख्या  = ———– = 15

                                2

वरील उदाहरणात  15 ही ञिकोणी संख्या आहे.

तर  5  व 6 यांना ञिकोणी संख्या चा पाया असे म्हणतात .

  =========================                             

 पहिली ञिकोणी संख्या 

   = 1 × 2 / 2  = 1

 दुसरी ञिकोणी संख्या 

    = 2 × 3 / 2  = 3

 तिसरी ञिकोणी संख्या 

     = 3 × 4 / 2  = 6 चौथी ञिकोणी संख्या 

     =  4 × 5 / 2  = 10

 पाचवी ञिकोणी संख्या 

    = 5 × 6 / 2  = 15

  सहावी ञिकोणी संख्या 

   = 6 × 7 / 2  = 21

अशाप्रकारे पुढील ञिकोणी संख्या शोधता येतील…

   28 ,  36  , 45  , 55 , 66 , 78 , 91 , 105 , 120, 136 ,……

अशा अनेक संख्या आपण शोधू शकतो.

=======================

 TET – 16/1/2016

काल झालेल्या परीक्षेत पहिलाच प्रश्न होता…

   6 ,  36  , 66 आणि 136 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत ?

पर्याय   – 

(1) चौरस संख्या 

(2) आयत संख्या 

(3) पंचकोणी संख्या 

(4) ञिकोणी संख्या  


नेहमी विचारले जाणारे उदाहरण –

   एक ञिकोणी संख्या देतात व त्याच्या पुढील चौथी , पाचवी अशी संख्या कोणती असा प्रश्न विचारला जातो ?

उदाहरणार्थ – 

  55 च्या पुढील 5 वी ञिकोणी संख्या कोणती  ?

स्पष्टीकरण  – 

 दिलेली ञिकोणी संख्या  = 55

या संख्येच्या दुप्पट करा = 55 × 2

                                 = 110

आता 110 हा कोणत्या दोन क्रमवार संख्या चा गुणाकार आहे शोधा….

आपणास समजेल …

  10 × 11 =  110 येते.

10  + 5 =  15 …..

म्हणून , 110 नंतर 5 वी ञिकोणी संख्या 

            15 × 16  

       =  ————–  = 120

                 2 

म्हणून ,  उत्तर   –  120

=======================

          लेखन व संकलन 

                 प्रविण बनकर 

गणित अध्यापक मंडळ समुह प्रशासक 

           777486019

=========================
दिलेल्या तारखेचा वार काढणयाची एक सोपी पद्धत:-
१) ३१ तारिख ओलांडताना ३ दिवस,
२) ३० तारिख ओलांडताना २ दिवस,
३) २९ तारिख ओलांडताना १ दिवस,
४) २८ तारिख ओलांडताना ० दिवस
     पुढे मोजावेत. म्हणजे दिलेल्या तारखेचा वार निघेल. त्यावरून विचारलेल्या तारखेचा वार पटकन काढता येईल.
उदा. १५ मार्च २०१५ रोजी गुरूवार असेल तर १८ मे २०१५ रोजी कोणता वार असेल?
उत्तर:- ३१मार्चचे ३ व ३० एप्रिलचे २ दिवस असे एकूण ५ दिवस वाढवा म्हणजे १५ मे रोजी मंगळवार येईल.
तेथून पुढे फक्त तीन दिवस वाढवले की १८ मे चा शुक्रवार मिळेल.
( अगदी तोंडी वार काढता येतो..try)




























































































No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

डोंगर भाऊ blog

 https://samantfort.blogspot.com/2022/06/offbeat-shangarh-pundrik-rishi-lake.html  ऑफ़बीट शानगड आणि पुंडरिक ऋषी सरोवर ट्रेक , हिमाचल प्रदेश (...