Friday, June 19, 2026

हंपीचा ध्यास

 हंपी नावाचा एक मराठी सिनेमा आहे. ठीकठाक आहे, पण तेव्हापासून हंपीचा ध्यास लागला होता.

हंपीला जाण्याआधी मी मिपावर जयंत कुलकर्णी यांची "विजयनगर साम्राज्याची मालिका" नीट वाचून काढली. युट्युबवर शेकडो व्हिडिओ पाहिले. प्रत्यक्ष हंपी फिरताना "सफर हंपी - बदामीची आणि गदग परिसराची" हे आशुतोष बापट यांचे पुस्तक सतत सोबत होते. एक-दोन ठिकाणी गाईड घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, तेही केले.

तरी घरी आल्यावर ते भग्न अवशेष, तरीही ती भव्यता हे सर्व कसे साकार झाले आणि मग हे सर्व कसे नष्ट झाले, याचे मनाला खूप कुतूहल होते. यासाठी मग पुस्तक वाचायला सुरुवात केली.

रोबर्ट सेल चे A Forgotten Empire: Vijayanagar – A Contribution to the History of India पुस्तक आणि Fritz & Michell चे Hampi Vijayanagara आंतरजालावर उपलब्ध आहे. या पुस्तकांत डोमिंगोस पेस (१५२०-२२) आणि फर्नाओ नुनिज (१५३५-३७) यांनी हंपीला भेट दिल्याचे वर्णन आहे. तसेच तारीख-ए-फरिश्ता (गुलशन-ए-इब्राहीमी) हे पुस्तकाचाही संदर्भ म्हणून वापर केला आहे

हे सर्व वाचून आकलन होण्यासाठी तीन महिने लागले. मी अजूनही या सर्वांचे बारकाईने वाचन करत आहे.

समजलेली माहिती उतरवून त्यावरून AI ने सुरेख चित्रे तयार केली, जी खरोखरच खूप रोचक आहेत.

मिपाची थोरवी पाहता, पूर्ण बारकाईने काही पैलू अभ्यासल्यावरच लिखित माहिती द्यावी, असा मानस आहे.

तूर्तास ज्यांना हंपीला भेट द्यायची असेल, त्यांच्यासाठी ही हंपी इतिहासाची चित्रमालिका आहे. हंपी स्थापत्याबाबत इथे निवांतपणे लिहिणारच आहे.

ही मालिका हंपी (विजयनगर साम्राज्य) चा इतिहास सोप्या, वाचनीय मराठीत आहे. पौराणिक कथा, राजवंश (संगम → सालुवा → तुलुवा → आरविडू), युद्धे, राजकीय डावपेच आणि सांस्कृतिक पैलू यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. एकूण ७-८ भाग आहेत

 

१.उगम आणि पौराणिक कथा: पम्पा-शिव कथा, हेमाकुटा, विरुपाक्ष मंदिराचा इतिहास, किष्किंधा (रामायण काळ) यांचा उल्लेख. चालुक्य, होयसळ, कंपिली राजवटींचा परिचय. उत्तर भारतातील मुस्लिम आक्रमणे आणि दक्षिणेतील धोका याचे चित्रण केले आहे.भाग-१

१

 

२.संगम राजवंश (हरिहर-बुक्का): हरिहर-बुक्का बंधू, होयसळ साम्राज्याचा अंत, बहमनी सत्तेचा उदय (गंगू ब्राह्मण कथा), प्रारंभिक विस्तार. इब्न बतूताच्या वर्णनातून मदुराई सुलतानाची क्रूरता दाखवली आहे.
भाग-२

२

३.हरिहर द्वितीय,पंगळ युद्ध (बहामनींवर निर्णायक विजय).
भाग  ३

४

४.देवराय प्रथम: अडोनी वेढा, गोवा-चौल जिंकणे, पार्थल (सोनाराची मुलगी) प्रेमकथा (फेरिश्ता नुसार, अतिरंजित असू शकते),  देवराय प्रथमने सैन्य सुधारणा, घोडदळ मजबूत करणे यावर भर.
भाग-४

५.देवराय द्वितीय: बहमनी व गजपतींशी अनेक युद्धे, मुस्लिम धनुर्धाऱ्यांची भरती, दक्षिण व पूर्वेकडे विस्तार. संगम वंशाचा ऱ्हास.
भाग ५

५

६.सालुवा राजवंश: नरसिंह देवराय, गजपतींशी उदयगिरी युद्ध (पराभव), पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे जिंकणे. छोटा पण महत्वाचा संक्रमण काळ.

भाग 


७.कृष्णदेवराय (सुवर्णकाळ): तुलुव वंश, रायचूर युद्ध (१५२०), गजपती मोहीम (उदयगिरी, कोंडाविडू, कटक), १४ लढाया जिंकणे, प्रशासन, साहित्य (अमुक्तमाल्यदा), पोर्तुगीज संबंध. त्यांचे व्यक्तिमत्त्व, योद्धा व राजा म्हणून विस्तृत वर्णन.
भाग ७

 

८.अंतिम काळ: रामराय, राक्षस-तंगडी (तालीकोटा) युद्ध (१५६५), पाच सुलतानांची युती, पराभव आणि साम्राज्याचा ऱ्हास.
भाग ८

 

 

विरुपाक्ष मंदिर, हंपी.

ज्याप्रमाणे नगर शहरात थोड्या उंचीवर गेलात तर कधी  सपाट जागेवरून ‘चांदबिबी महाल’ दिसतोच, तसेच हंपीतलं विरुपाक्ष मंदिरही शहरातून कुठूनही सहज दिसतं. माझी रूम जिथे होती, तिकडूनही उत्तरेकडे नीट ठराविक उंचीवरून विरुपाक्ष मंदिराचे गोपुर दिसायचे. अगदी अंजनेरी पर्वतावरूनही हंपीचे गोपुर स्पष्ट दिसतात.

मंदिराच्या मुख्य गोपुरासमोर बाह्य प्रांगणात एक उंच आणि देखणा लाकडी रथ उभा होता. चैत्र पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने हा रथ बाहेर काढण्यात आला असावा.

विरुपाक्ष किंवा पंपापती मंदिर हे हम्पी (विजयनगर) येथील सर्वात प्राचीन आणि पवित्र मंदिर मानले जाते. शतकानुशतके हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे केंद्र राहिले आहे. पंपापती म्हणजे ब्रह्मदेवाची कन्या पंपा नदीची स्वामी किंवा पंपा-तीर्थाचा स्वामी. येथे तुंगभद्रा नदीला पंपा नदी म्हणूनही ओळखले जाते.हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर, हेमकूट डोंगराच्या उत्तरेला, अतिशय देखण्या निसर्गरम्य ठिकाणी वसले आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे.विरुपाक्ष मंदिराची मूळ स्थापना ७व्या शतकात बदामी चालुक्य काळात झाली. सुरुवातीला हे एक छोटे शिवमंदिर होते, ज्यात विरुपाक्ष किंवा पंपापती लिंगाची स्थापना करण्यात आली होती. ९व्या आणि १०व्या शतकातील उपलब्ध शिलालेखांमध्ये याचा उल्लेख आढळतो. १२व्या शतकात उत्तर चालुक्य काळात मंदिराचा लक्षणीय विस्तार झाला. याच काळातील पार्वती आणि भुवनेश्वरी ही दोन मंदिरे आजही अस्तित्वात आहेत. या मंदिरांमधील काळ्या दगडाचे लेथ-टर्न केलेले सुंदर स्तंभ हे त्या काळाचे जिवंत साक्षी आहेत.म्हणजेच, विजयनगर साम्राज्य स्थापन होण्यापूर्वीच हे मंदिर सुमारे ५०० ते ६०० वर्षे जुने होते.

१४व्या शतकापासून विजयनगर राजांनी या मंदिराला संरक्षण व संवर्धन दिले. देवराय दुसरा (१४२२–१४४६) यांच्या काळात मुख्य पूर्व गोपुर बांधण्यात आला. मात्र मंदिराचा सर्वात मोठा आणि वैभवशाली विस्तार कृष्णदेवराय (१५०९–१५२९) यांच्या काळात सुमारे १५१० मध्ये झाला. यावेळी रंगमंडप -महामंडप, आंतर गोपुर, अनेक उपमंदिरे, स्तंभयुक्त क्लॉइस्टर आणि इतर सजावटीचे काम पूर्ण करण्यात आले. लक्कण दंडेश (कृष्णदेवरायाचे सेनापती) यांनी या विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यामुळे विरुपाक्ष मंदिर विजयनगर साम्राज्याचे मुख्य देवस्थान बनले.

 विरुपाक्ष मंदिराचा हा गोपुर उंचीने ५० मीटर आहे. त्याचे बाह्यरूप फ्रॅक्टल या गणितीय संकल्पनेतून तयार झाल्यासारखे दिसते (अर्थात ‘फ्रॅक्टल’ ही संकल्पना नंतर प्रसिद्ध झाली).

 

फ्रॅक्टल स्थापत्यशास्त्र

फ्रॅक्टल ही गणितीय संकल्पना आहे जी स्वसदृशता वर आधारित आहे. म्हणजे एका आकाराचा छोटा भाग संपूर्ण आकारासारखाच दिसतो. हे नमुने वेगवेगळ्या स्केलवर आकारमानांवर पुनरावृत्ती होतात. बेनॉइट मॅन्डेलब्रॉट यांनी १९७५ मध्ये या संकल्पनेला औपचारिक स्वरूप दिले. प्रकृतीत फ्रॅक्टल्स सर्वत्र दिसतात. झाडाची फांदी, हिमकण, ढग, समुद्रकिनारा, रक्तवाहिन्या इत्यादी.

स्थापत्यशास्त्रात फ्रॅक्टल्सचा वापर केल्यास इमारती ज्यात पुनरावृत्ती, स्केलिंग आणि स्वसदृशता यांचा समावेश असतो. यामुळे इमारत नैसर्गिक, जटिल पण सुसंगत वाटते. हे अनैच्छिक असू शकते ज्यात सौंदर्य किंवा संरचनात्मक कारणांसाठी फ्रॅक्टल रचना वापरली जाते. तर काही वेळा हे औपचारिक असते ज्यात आधुनिक काळात संगणकाच्या मदतीने डिझाइन केले जाते. उदाहरणार्थ फ्रँक लॉइड राइट यांच्या काही इमारती किंवा समकालीन आर्किटेक्चर यात मोडतात. फ्रॅक्टल डिझाइनमुळे इमारती अधिक बायोफिलिक निसर्गाशी जोडणारी होतात ज्यामुळे मानवी मनःशांती, एकाग्रता आणि कल्याण वाढते.

भारतीय हिंदू मंदिर वास्तुकला ही फ्रॅक्टल्सची सर्वोत्तम उदाहरणे आहेत. फ्रॅक्टल थिअरी आविष्कार होण्यापूर्वी शेकडो वर्षे आधीच भारतीय स्थापत्यकारांनी ही रचना वापरली होती. मंदिरांच्या शिखर किंवा गोपुरात मुख्य शिखराभोवती लहान शिखरे त्याभोवती आणखी लहान शिखरे अशी रिकर्सिव स्वसदृशता दिसते. यामागे प्रतीकात्मक अर्थ आहे. मंदिर हे ब्रह्मांडाचे सूक्ष्म प्रतिरूप आहे. पूर्णता प्रत्येक भागात प्रतिबिंबित होते हा हिंदू दर्शनाचा सिद्धांत फ्रॅक्टल संकल्पनेत स्पष्ट दिसतो.हिंदू मंदिरांमध्ये मोठ्या आकारात जे आहे, ते लहान आकारातही तसेच असते. हीच गोष्ट फ्रॅक्टल गणितात “स्वसदृशता” म्हणून ओळखली जाते. प्राचीन भारतीय स्थापत्यकारांनी हे तत्त्व हजारो वर्षांपूर्वी मंदिरांमधून अमलात आणले असावे का ?

विरुपाक्ष मंदिर हंपी याचे गोपुर हे फ्रॅक्टल रचनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मुख्य आकार त्रिकोणी असून वर चढताना नमुने पुनरावृत्ती होतात जे स्नोफ्लेक सारखे दिसतात. हे १५व्या शतकातील विजयनगर साम्राज्यातील बांधकाम आहे. याचप्रमाणे खजुराहोचे कंदरिया महादेव मंदिर, मदुराई मंदिर आणि राणकपूर जैन मंदिर यांमध्येही फ्रॅक्टल रचना स्पष्टपणे दिसते.

इतर संस्कृतींमध्येही फ्रॅक्टल आर्किटेक्चर आढळते. आफ्रिकन गावे, घरं आणि कापड यांमध्ये स्केलिंग आणि रिकर्शनचे उत्कृष्ट नमुने आहेत ज्यांचा अभ्यास रोन एग्लॅश यांनी केला आहे. युरोपातील गॉथिक आणि बारोक कॅथेड्रल्स तसेच आधुनिक काळातील फ्रँक लॉइड राइट यांच्या ऑर्गेनिक आर्किटेक्चरमध्येही फ्रॅक्टल तत्त्वे आढळतात.

गोपुरातील स्वसदृशता म्हणजे मोठ्या आकारातील रचना लहान आकारात पुन्हा पुन्हा दिसणे. एकच नमुना वेगवेगळ्या आकारमानांवर पुनरावृत्ती होणे ही फ्रॅक्टलची मूलभूत वैशिष्ट्ये गोपुरांमध्ये स्पष्ट दिसून येते. विरुपाक्ष मंदिर हंपी याचे मुख्य राजगोपुर सुमारे पन्नास मीटर उंच आणि नऊ मजली आहे. यात स्वसदृशता अशी दिसते की संपूर्ण गोपुराचा मुख्य आकार त्रिकोणी आहे आणि खालच्या मोठ्या स्तरांवरील रेषा कोन व नक्षी वरच्या लहान स्तरांवरही त्याच रूपात पुनरावृत्ती होतात. प्रत्येक मजला हा खालच्या मजल्याचा लहान प्रतिरूप असतो. वर चढताना प्रत्येक पातळीवर नमुने लहान होत जातात तरी संपूर्ण गोपुरासारखेच दिसतात. ही रचना रिकर्सिव स्वसदृशता दर्शवते. म्हणजे गोपुराचा एखादा छोटा भाग वेगळा केला तरी तो संपूर्ण गोपुरासारखाच भासतो. याचप्रमाणे खजुराहोच्या कंदरिया महादेव मंदिरात मुख्य शिखराभोवती असलेल्या लहान शिखरांमध्येही आणखी लहान शिखरे दिसतात. मदुराई मीनाक्षी मंदिरातील गोपुरांवर प्रत्येक स्तरावर मुख्य गोपुरासारखीच नक्षी, देवमूर्ती आणि छोट्या शिखरांची पुनरावृत्ती होते. हिंदू दर्शनानुसार, गोपुर हे मेरु पर्वताचे प्रतीक आहे. ब्रह्मांडातील पूर्णता प्रत्येक छोट्या भागात असते, हेच तत्त्व गोपुरातील स्वसदृशतेतून व्यक्त होते. “पूर्णमदः पूर्णमिदम्” -पूर्णातून पूर्ण निघते, तरी पूर्णच उरते या वेदान्तातील कल्पनेशी हे जुळते.

विरुपाक्ष मंदिराच्या गोपुरात ही स्वसदृशता इतकी स्पष्ट आहे की, फ्रॅक्टल थिअरी आविष्कार होण्यापूर्वी शेकडो वर्षे आधी १५वे शतकात ती वापरली गेली होती?

 

या गोपुराच्या बाह्य भागावर अनेक सुंदर आणि अर्थपूर्ण शिल्पे कोरलेली आहेत. विशेषतः पहिल्या स्तरावर मैथुन शिल्पे स्पष्ट दिसतात. ही शिल्पे प्राचीन भारतीय परंपरेनुसार सृष्टीची सर्जनशीलता आणि जीवनचक्र दर्शवतात.

गोपुरावर विविध देवदेवतांची शिल्पेही मोठ्या प्रमाणात आहेत. शिव, विष्णू, गणेश, नंदी, राम-लक्ष्मण-सीता यांसारख्या देवमूर्ती, पौराणिक कथांमधील दृश्ये, यक्ष-यक्षिणी, गंधर्व आणि इतर सैद्धांतिक आकृत्या येथे कोरलेल्या आहेत. प्रत्येक मजल्यावर शिल्पांची रचना वेगळी असून, खालच्या स्तरांवर मानवी जीवन, प्रेम, सृष्टी आणि पौराणिक कथा यांचे दर्शन घडते, तर वरच्या स्तरांवर अधिक आध्यात्मिक आणि देवी-देवतांच्या रूपांचे चित्रण आहे.

एक सुंदर गजरा विकत घेऊन ,केसांत माळला ...चार पाच रील्स काढल्यावरच मंदिराकडे वळाले ,हे वेगळे सांगायला नको 😊

मंदिरात आत शिरताच तीन शिरे असणारा त्रिमुखी नंदी दिसतो. 

एका भिंतीवर विजयनगर साम्राज्याचे चिन्ह म्हणजे  वराह (जंगली डुक्कर), तलवार, सूर्य आणि चंद्र यांचा संयुक्त कोरीव आकृतिबंध दिसतो .वराह चिन्हाची सुरुवात मूळ चालुक्य राजवंशात झाली. बादामी चालुक्य (६व्या ते ८व्या शतक) यांनी सर्वप्रथम वराह (विष्णूचा तिसरा अवतार) याला आपले कुलचिन्ह स्वीकारले. चालुक्य राजे विष्णूचे परम भक्त होते आणि त्यांनी पृथ्वीला समुद्रातून वाचवणाऱ्या वराह अवताराला आपल्या राजकीय आणि सांस्कृतिक प्रतीक बनवले.

विजयनगर साम्राज्याने चालुक्य राजवंशाकडून हे चिन्ह आपल्या राजकीय चिन्ह म्हणून स्वीकारले. विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेनंतर (१३३६) हरिहर आणि बुक्का राय यांनी चालुक्यांच्या परंपरेचा वारसा चालू ठेवला. विशेषतः कृष्णदेवराय आणि त्यानंतरच्या राजांच्या काळात हे चिन्ह सर्वत्र प्रसिद्ध झाले आणि साम्राज्याच्या वैभवाचे प्रमुख प्रतीक बनले.

चिन्हातील घटक आणि त्यांचा अर्थ-

हे चिन्ह सामान्यतः वराह, तलवार, सूर्य आणि चंद्र यांच्या संयोजनात दाखवले जाते. वराह हे शक्ती, साहस, धर्मरक्षण आणि विजयाचे प्रतीक आहे. तलवार युद्धक्षमता, न्याय आणि साम्राज्य संरक्षण दर्शवते. तर सूर्य आणि चंद्र “आचंद्रार्क” (सूर्य-चंद्र अस्तित्वात असेपर्यंत) हे साम्राज्य टिकावे, असा शुभ आणि चिरंतन अर्थ देतात.

विरुपाक्ष प्रांगणात डावीकडे लक्ष्मी हत्तिणीचे दर्शन झाले. ती झुलत-झुलत लुसलुशीत हिरव्या चाऱ्यावर ताव मारत होती.🐘

समोरच्या मोठ्या प्रांगणात दोन मंडप आहेत . एक मोठा व एक छोटा. यांना फलपुजा मंडप/कल्याण मंडप/सभामंडप अशी अनेक नावे आहेत. यातील मोठ्या मंडपात जवळपास १०० खांब आहेत. या खांबांवर सिंह, कृष्ण, पौराणिक कथा इत्यादी अनेक शिल्पे कोरलेली आहेत. मी खूप वेळ इथे रेंगाळले . प्रत्येक खांबावर वादकांची शिल्पे ही खूपच वेगळी आणि रोचक आहेत. छोट्या मंडपात मधोमध एक शिळा आहे, जिला कुंपण घातले आहे व भोवती खांब आहेत.

पुढे गोपुराच्या आतल्या भागावर आणखी एक मोठे प्रांगण आहे. त्याच्या समोर प्रथम दीपमाळ, नंदीमंडप, मग मोकळी जागा आणि पुन्हा विरुपाक्ष मंदिराचे प्रसिद्ध रंगमंडप येते. त्यानंतर अंतराल (अंतःप्रकोष्ठ) आणि गर्भगृह. गर्भगृहात ‘पंपापती’ विरुपाक्ष म्हणजे शंकराचे पिंड आहे.

रंगमंडपात ८ खांब आहेत, जे ससा, बकरी, घोडा, मंगर, सिंह, व्याघ्र, हत्ती अशा विविध प्राण्यांपासून बनवलेल्या व्यालकृती (याली) स्वरूपात आहेत. विजयनगर साम्राज्यात बाजार, कल्याण मंडप, सभा मंडप, वादक शिल्पे यांसारखे व्यालकृती खांब खूप प्रसिद्ध आहेत. 

विरुपाक्ष मंदिरातील रंगमंडपाच्या पायऱ्यांजवळ शिलालेखात कृष्णदेवराय यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो, ज्यामुळे त्यांना या मंदिराचे सर्वात मोठे संवर्धक आणि दाता मानले जाते. विशेषतः १५१० ईसाली (त्यांच्या राज्याभिषेकाच्या काळात) कोरलेल्या कन्नड भाषेतील शिलालेखात कृष्णदेवरायांनी विरुपाक्ष देवतेच्या नावाने मोठ्या प्रमाणात दान आणि बांधकाम केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. यात त्यांनी रंगमंडप (महामंडप), आंतर गोपुर, मुख्य गोपुराची दुरुस्ती आणि इतर अनेक सजावटीचे काम पूर्ण केल्याचे नमूद आहे. त्यांनी मंदिराच्या देखभालीसाठी सिंगनायकनहळ्ळी या गावाचे दान दिले, तसेच सोन्याचे ताट, सोन्याचे आणि चांदीचे दिवे, अमृतपदीसाठी जमीन आणि उत्पन्नाची व्यवस्था केली.

 

यापुढे तिन्ही बाजूंनी ओसरी आहेत. त्यात एक भव्य दगडी रांजण दिसले, ज्यात पंचामृत करून प्रसाद तयार केला जात असे.त्याशेजारीच एक मीटर रुंद अशी दगडी चूल दिसली, जी चंदन उगाळण्यासाठी वापरली जाते असे समजले.

हम्पीतील विरुपाक्ष मंदिर हे विजयनगर चित्रकलेचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. रंगमंडपाच्या छतावर ही चित्रे काढली आहेत. ही हम्पीतील एकमेव जिवंत विजयनगर चित्रे मानली जातात. यातील प्रमुख विषय म्हणजे विदुरण्य महर्षींची मिरवणूक, अर्जुनाने मत्स्ययंत्र भेदून द्रौपदीचा स्वयंवर, दशावतार, शिव-कामदहन, त्रिपुरारी, कल्याणसुंदरम (शिव-पार्वती विवाह) आणि गिरिजाकल्याणम (पंपा-विरुपाक्ष विवाह) यांसारख्या पौराणिक घटना आहेत. ही चित्रे १६व्या शतकातील आहेत आणि विजयनगर चित्रकलेची उत्कृष्ट उदाहरणे मानली जातात.विजयनगर चित्रकलेचा नंतरच्या काळात मैसूर आणि तंजावर चित्रकला शैलींवर मोठा प्रभाव पडला

मी आपली मन लावून चित्र पाहत असताना एका मर्कटाने चपळाईने माझ्या केसांतील गजरा जोरात ओढला आणि निवांत खात बसला ,कोणाच्या हातातला प्रसाद ,पेय घे अशा मर्कट लीला मंदिरात सतत सुरु होत्या.तर अनेक कुटुंब वत्सल मर्कट कुटुंबही दिसले.ज्यात आई माकडिणीला पिल्लु माकड चिकटले आहे आणि वडिल माकड त्या पिल्लाला प्रेमाने गोंजारत आहेत. हे पाहुन हेच आपले पुर्वज असतील हे नक्किच पटले.🤩🐒

पंपा-भुवनेश्वरी देवीचे मंदिर विरुपाक्ष मंदिराच्या अगदी जवळ, उत्तरेकडील शांत कॉरिडोरमध्ये विराजमान आहे. या प्राचीन मंदिरात पाऊल टाकताच सुंदर अलंकार-वस्त्रांनी सजलेली देवीची मूर्ती पाहून मन एक वेगळ्याच भक्तीभावाने भरून जाते. १२व्या शतकातील चालुक्य शैलीतील हे छोटेसे मंदिर इतके सुंदर आणि पवित्र आहे की, येथे उभे राहिल्यावर आपण इतिहासाच्या काळात हरवल्यासारखे वाटते. याच ठिकाणी हम्पीच्या महान सम्राटांची संपूर्ण वंशावळ दगडावर इंग्रजीत रंगविली आहे .जी वाचताना  जणू हजारो वर्षांच्या गौरवशाली इतिहासाने आपल्याशी बोलत आहे असे वाटले.चार बाजूला स्तंभयुक्त क्लॉइस्टर भोवती फिरणारा मंडप-ओसरीवजा मार्गक्रमण भाग आहे.

मंदिराच्या उजव्या कोपऱ्यात काही पायऱ्या चढून गेल्यावर एक छोटी, रहस्यमय आणि अंधारी खोली आहे. त्या खोलीत प्रवेश करताच मनात एक अपूर्व कौतुक आणि आश्चर्य जागे होते. खोलीच्या पूर्व भिंतीवर असलेल्या एका छोट्याशा छिद्रातून बाहेरच्या भव्य ५२ मीटर उंच पूर्व गोपुराची उलटी प्रतिमा भिंतीवर स्पष्ट दिसते. प्राचीन काळातील हे पिनहोल कॅमेरा तंत्र पाहून,ही  किती अद्भुत कला होती. त्या काळातील भारतीयांचे विज्ञान आणि कलेचा हा संगम आहे .🙏

 

पिनहोल कॅमेरा हा जगातील सर्वात सोपा आणि प्राचीन कॅमेरा आहे. यात कोणतीही लेन्स (काच) वापरली जात नाही. फक्त एका अंधार्‍या खोलीत भिंतीवर एक अत्यंत छोटे छिद्र (pinhole) केले जाते. या छोट्या छिद्रातून बाहेरचा प्रकाश आत येतो आणि भिंतीवर उलटी प्रतिमा तयार होते.हे तंत्र “Camera Obscura” नावाने ओळखले जाते.

प्रकाश नेहमी सरळ रेषेत प्रवास करतो, ही मूलभूत भौतिकशास्त्रीय सत्यता विरुपाक्ष मंदिरातील पिनहोल कॅमेरा तंत्रामागील मुख्य रहस्य आहे. जेव्हा बाहेरचा तेजस्वी प्रकाश त्या छोट्याशा छिद्रातून आत येतो, तेव्हा प्रकाश किरण एकमेकांत मिसळत नाहीत किंवा एकत्र होत नाहीत. प्रत्येक किरण सरळ मार्गाने आत शिरतो आणि विरुद्ध भिंतीवर आपली छाप सोडतो. यामुळे बाहेरच्या गोपुराची प्रतिमा पूर्णपणे उलटी तयार होते .वरचा भाग खाली, खालचा भाग वर, डावा भाग उजवीकडे आणि उजवा भाग डावीकडे दिसतो.

मंदिराच्या उत्तरेकडील दाराने बाहेर पडताच, समोर एक पवित्र पुष्करणी दिसते. त्या वेळी उन्हाची तीव्रता वाढली होती, तरीही त्या ठिकाणचे शांत आणि पवित्र वातावरण मनाला मोहिनी घालते. हम्पी मंदिरासमोरून पुन्हा जाताना आम्ही हेमकूट टेकडी चढण्यास सुरुवात केली. प्रत्येक पाऊल उचलताना हृदयात एक वेगळाच रोमांच जाणवत होता .

मंदिराबाहेरील लाकडी रथ
मंदिराबाहेरील लाकडी रथ 

 

 फलपुजा मन्दिरातील खांबावरील वादक व सुरसुंदरी

१
3
कन्न्ड मधील शिलालेख
कन्नडमधील शिलालेख 
आकर्षक व्यालखांब
आकर्षक व्यालखांब  

 

नक्षीदार खांब
नक्षीदार खांब 

 

रंगमंडप छतावरील रंगीत छायाचित्रे (यात दशावतार दिसत आहेत)फोटो आंतरजाल 
दगडी रांजण
पिनहोल कॅमेराद्वारे गोपुर उलटी प्रतिमा 

हो त्या दिवशी संध्याकाळीही विविध रंगांनी सजलेल्या आकाशात विरुपाक्षचा गोपुरही पाहिला.त्या आकाशात तो शोभत होता तर त्या सर्वोच्च टोकावर चन्द्र्कोर विराजमान झाली होती..जणु पंपावती शंकराचेच हे रुप!!!😇



विरुपाक्ष मंदिर अतिशय सुंदर आहे. हंपीतून कुठूनही त्याचे रायगोपूर आभाळात उठावलेले दिसते.  फ्रॅक्टल्स पद्धतीला मंदिर शिल्पशास्त्रात खास शिखर- उपशिखर अर्थात शृंग-उपशृंग अशा संज्ञा आहेत. पंपा भुवनेश्वरी मंदिरात तर एकदम प्राचीन मंदिरात आल्यासारखे वाटते. 

तुमच्या लेखामुळे माझ्या विरुपाक्ष दर्शनाची आठवण आली. 


फ्रॅक्टल्स पद्धतीला मंदिर शिल्पशास्त्रात खास शिखर- उपशिखर अर्थात शृंग-उपशृंग अशा संज्ञा आहेत.

अच्छा 👍

कन्नप्पा नयनार खुप शोधला पण सापडलाच नाही. मी कोणाला तरी विचारायला पाहिजे होते.

कन्नप्पा नयनार अंतराळातील स्तंभावर आहे. केवळ विरुपाक्ष मंदिरातच इतकी शिल्पे आहेत की अगदी साताठ फेऱ्यांतही काहीतरी पाहणे राहून जावे.


देवळे पाडली नाहीत पण देव फोडले, विरुपाक्ष आणि आणि २/३ लहान देवळे वगळता एकाही देवळात गाभाऱ्यात मूर्ती नाही. अच्युतराय, विजय विठ्ठल, बाळकृष्ण, हजारराम, सरस्वती, चंद्रशेखर एकही लिव्हिंग टेम्पल नाही.


 

पण त्यातील देवळे पाडली नाहीत. राजवाडे पाडले, संपत्ती पळवली.

हे लिहायचे राहिले. नुकतीच एके ठिकाणी याबद्दल माहिती वाचली. फक्त विरूपाक्ष मंदिरात पूजा होते इतरत्र कोणत्याच मंदिरात होतं नाही कारण तिथल्या मूर्ती बहामनीन्नी फोडून भग्न केल्या आहेत.बडवेलिंग येथेही पूजा होते.

*****

हंपीतील बहुतेक मंदिरात मुख्य मूर्ती नाहीच, आणि आहेत त्या भंग केलेल्या....
चौदाव्या शतकात बहामनी सुलतानाने विजयनगर वर आक्रमण केले आणि त्यात त्याला थोडं फार यश आल्यावर भारतातील चारी -पाची मुस्लिम राजवटींनी हंपी अर्थात विजयनगर च्या साम्राज्यावर हल्ला केला. हल्ल्याचा मूळ उद्देश हा हंपीत असणार धन हा होता. 
पण येणार सुलतानी आक्रमण एका हातात तलवार आणि एका हातात कुराण घेऊन येते. त्यातून हंपीतील अनेक मंदिराची तोडफोड झाली, मुर्ती  भंग केल्या गेल्या.

पण त्यातून देखील जे दोन तीन मंदिर वाचले त्यातील प्रमुख म्हणजे "वीरूपाक्ष मंदिर " जे शिवाचे मंदिर आहे.
त्याची कथा स्थानिक लोक सांगतात की, मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारावर व बऱ्याच ठिकाणी विजयनगर च्या साम्राज्याचे राजचिन्ह कोरलेले आहे. ज्यात वराह (डुक्कर ),तलवार, चंद्र - सूर्य आहे. हे चिन्ह हंपीत बऱ्याच ठिकाणी दिसेल.

पण ह्या चिन्हात डुक्कर (वराह ) असल्याने ह्या मुस्लिम सैन्याला ते मंदिर तोडता आले नाही. कारण मुस्लिम डुकराला सगळ्यात अपवित्र मानतात, ते त्याच नाव देखील घेत नाहीत.

 

----- TEAM INDIAN HERITAGE PANDA 

खखोदेजा.


बडवीलिंग,  यंत्रोद्धारक हनुमान मंदिर, उड्डाण वीरभद्र मंदिर ह्यात आजही पूजाअर्चा चालू असते.

तसेच बहमनीच्या शकले झालेल्या पाच सुलतानांच्या नासधुशीत ह्या मंदिरांच्या शिल्पांचे फारसे नुकसान झाले नाही (फक्त गर्भगृहातील मुख्य देवता नष्ट झाल्या) ह्याचे कारण म्हणजे ह्या दख्खनी सुलतानांच्या सैन्यात बरेच हिंदू सरदार होते. मूर्तींची नासधूस सर्वच शाह्यांच्या काळात झाली मात्र सुरुवातीची गझनवी, खिलजी, घोरी, आणि मुघलांच्या बाबर आणि औरंगजेब ह्या राजवटी सर्वात असहिष्णु होत्या असे म्हणता यावे, औरंगजेब तर सर्वाथाने बुतशिकन होता.


हंपीत फिरायचे कसे??
मला खूप निवांतपणे, माझ्या सोयीनुसार प्रेक्षणीय स्थळे पाहायची असतात. त्यामुळे पहिल्या दिवशी रूमपासून विरुपाक्ष मंदिरापर्यंत रिक्षा केली (१५० रुपये, बार्गेनिंग केले). पहिल्या दिवशी मी जवळपास १० किलोमीटर पायी फिरले. फक्त एका लांबच्या ठिकाणी रिक्षा घेतली.
पूर्ण दिवस रिक्षा टुरिझम १५००-२००० रुपये प्रतिदिवस असते. ज्यांना अजिबात चालायचे नसेल त्यांनी रिक्षाच करावी. दुसऱ्या दिवशी १००० आणि तिसऱ्या दिवशी १२०० रुपये असे माझे रिक्षा खर्च झाले.
पर्याय
हंपीत ८०० रुपये प्रतिदिवस टू-व्हीलर (स्कूटर/बाइक) रेंटने मिळते. २००-४०० पर्यंत सायकलही मिळते. (सध्याच्या दरानुसार स्कूटर ४००-९०० रुपये पर्यंत असू शकते, बार्गेनिंग करा.)

***
हंपी पाहायचे कसे??
हंपीला जाण्याआधी मी पूर्ण एक आठवडा विजयनगर साम्राज्याविषयी वाचन आणि व्हिडिओ पाहिले. जयंत कुलकर्णी यांच्या लेखांचा, सागर बोरकर 
" उनाडक्या: हंपी: दिवस पहिला - हजारराम मंदिर आणि पानसुपारी बाजार - भाग ३ https://share.google/L3HFbci3Aq3iXZmL5 "
यांच्या हंपी ब्लॉगचा खूप फायदा झाला. केतन पुरी आणि आशुतोष बापट यांचे यूट्यूब व्हिडिओ ऐकले. आशुतोष बापट यांचे हंपीवरचे पुस्तकही विकत घेतले.

***
पोटोबाचा कसा करायचा
सकाळी भरपेट नाश्ता-ब्रंच (इडली, डोसा, उत्तपा, वडा) करायची सवय ठेवा. थेट सायंकाळी ५-६ ला जेवण. दरम्यान ज्यूस, रस, आयस्क्रीम, फळे आणि भरपूर पाणी — हायड्रेटेड राहा. (उन्हाळ्यात ४०°C+ तापमान असू शकते, म्हणून पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स घ्या.)

***
पहिल्या दिवशी
विरुपाक्ष मंदिर आणि त्याच्या परिसरातील हेमकूट पर्वत, दोन गणेश मंदिरे, कृष्ण मंदिर, लक्ष्मी नरसिंह, कोंदडराम अच्युतराय मंदिर आणि सूर्यास्त मातंग टेकडीवरून पाहायचा.
***
दुसऱ्या दिवशी
विजयविठ्ठल मंदिर, जुना राजवाडा परिसर, प्रसन्न विरुपाक्ष, म्युझियम, कोरॅकल राईड आणि सूर्यास्त तुंगभद्रा किनारी किंवा हेमकूट पर्वतावर.
****
तिसऱ्या दिवशी
अंजनेरी पर्वत, पम्पा सरोवर, शबरी गुहा, अनगुंडी किल्ला पाहायचे.
अतिरिक्त टिप्स

बार्गेनिंग सर्व ठिकाणी करा,राहणे, रिक्षा, टू-व्हीलर, सर्व काहीत.😅
उन्हाळ्यात गर्दी कमी असते, त्यामुळे चांगले डील आणि शांत अनुभव मिळतो.
सकाळी लवकर बाहेर पडा आणि दुपारी सावकाश विश्रांती घेत फिरा.
चांगले चालण्याचे शूज, सनस्क्रीन, टोपी आणि रिचार्जेबल पॉवर बँक घ्या.
मोबाईल नेटवर्क काही ठिकाणी कमकुवत असू शकते.


हंपीच्या जोडीने बदामी-पट्टदकल-ऐहोळे ही करावेचं असे आहे, भेट देण्यास हिवाळा ऋतू सर्वोत्तम. बदामीवरून सुरवात करून, पट्टदकल-ऐहोळे व शेवटी हंपी करणे श्रेयस्कर. स्वतःचे वाहन वापरणे अत्यंत सोयीचे व प्रवास कालावधी वाचवणारे, स्वतःचे वाहन असल्यास, दीड दिवस बदामी (लेणी, किल्ला आणि भूतनाथ मंदीर समूह-अगस्त्य तलाव परिसर), दीड दिवस पट्टदकल+ऐहोळे मिळुन व हंपी तीन वा चार दिवस अशी विभागणी सर्वसामान्य पर्यटकांसाठी पुरेशी ठरावी. अभ्यासु, संशोधक वृत्तीच्या लोकांसाठी तर कितीही दिवस कमी पडावेत असा परिसर आहे. 


सकाळी सहाला ही ठिकाणे उघडतात व त्यावेळी गर्दी अजिबात नसते व लगतच्या दाट मानवी वस्तीचा उपसर्ग ही मर्यादित असतो, त्यामुळे सकाळची ही वेळ गाठता आली तर अनुभव अजूनचं सुंदर होतो, तांबूस दगडी टेकड्यांवर कोवळी उन्हे उतरताना पाहणे 'खास' असते.  

 

या सर्व ठिकाणी स्थानिक मार्गदर्शक(Guide) घेण्याविषयी तडजोड अजिबात करू नये, सर्वसामान्य पर्यटकांसाठी मार्गदर्शकाशिवाय ही ठिकाणे पाहणे मुर्खपणा ठरेल इतके ते महत्त्वाचे आहे, शिवाय स्वतःचे वाहन असले तरी भरपूर चालायची तयारी असणे गरजेचे.... 


होस्पेटमधील प्राणी संग्रहालय आणि तुंगभद्रा धरणाच्या केंद्रीय जल निगमच्या ताब्यातील भागातून संध्याकाळच्या वेळी धरण परिसराची सफर हा अनुभवही नक्की घ्यावा असा आहे, जल निगमच्या एखाद्या कर्मचाऱ्याची ओळख असेल तर खाजगी वाहन थेट वर गेस्ट हाऊसपर्यंत नेता येते व धरणाच्या भिंतीवर ही सहज प्रवेश मिळू शकतो, तिथल्या विस्तीर्ण जलाशयाच्या पार्श्वभुमीवरचा कातरवेळेचा अनुभव 'दुर्मिळ' असा ठरावा...


कृष्ण मंदिर
दोन्ही गणेशाचे दर्शन घेऊन मग आम्ही पुढे चालू लागलो.ऊन बरेच होते तेव्हा नारळ पाणीने जीवाला थंडावा देत.कृष्ण मंदिरापाशी पोहचलो.त्याचे ते भव्य ,ऊंचच ऊंच  प्रवेशद्वार विजयनगर साम्राज्याची भव्यता पुन्हा अधोरेखित करत होती .उदयगिरी किंवा उत्कल (सध्याच्या ओरिसा राज्यात) या पूर्वेकडील राज्याच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी राजा कृष्णदेवराय यांनी १५१३ मध्ये त्यांचे मंदिर बांधले.
मंदिरात स्थापित केलेली मुख्य मूर्ती बाळकृष्णाची होती. ही मूर्ती आता चेन्नई येथील राज्य संग्रहालयात आहे.इ..स. १५१३ च्या एका शिलालेखात नमूद केल्यानुसार, या मोठ्या आणि सुशोभित, पूर्वेकडे तोंड असलेल्या मंदिराची प्रतिष्ठापना कृष्णदेवराय यांनी उदयगिरी (ओरिसा) येथून आणलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीने केली होती. पंचायतन शैलीत दोन आवारांसह बांधलेल्या या मंदिर संकुलात गर्भगृहासह मुख्य मंदिर, एक प्रवेशकक्ष, स्तंभयुक्त मंडप आणि सभागृहे, एक देवी मंदिर आणि अनेक उप-मंदिरे आहेत. याव्यतिरिक्त, मुख्य मंदिराच्या आग्नेय दिशेला एक स्वयंपाकघर आणि नैऋत्येकडील पहिल्या आवारात एक स्वतंत्र भांडार आहे. भव्य मनोरा असलेले पूर्वेकडील प्रवेशद्वार हे विजयनगर वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मंदिराच्या भिंतींवर भगवान कृष्णाची पौराणिक कथा असलेल्या भागवताचे आणि त्या काळातील जीवनाचे चित्रण कोरलेले आहे. महामंडपाच्या स्तंभांवर भगवान विष्णूच्या दहा अवतारांची शिल्पे आहेत. मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे ५०० मीटरच्या रस्त्यावरील बाजाराकडे आणि त्यानंतर एका पवित्र पाण्याच्या तलावाकडे घेऊन जाते. मंदिराच्या आवारात स्थापित केलेल्या एका मोठ्या शिलालेखावर या मंदिराची कथा आणि विजयाची कहाणी कोरलेली आहे.

आत शिरलो तर दोन्ही भिंतींवर कोरलेली शिल्पे दिसली अगदी वरपर्यंत साधारण १२- १५ फूटापर्यंत हे कोरीव शिल्पे होती.मी यापूर्वी कृष्णमंदिरातील शिल्पाविषयी एक व्हिडियो पाहिला होता.त्यानुसार यावरील विष्णूचे दशावतार शोधू लागले .अगदी पायथ्याशी लतासुंदरीचे आखीव शिल्प आणि त्या तिने हातात धरलेल्या लता -वेली वरपर्यंत गेल्या आहेत आणि त्यावर गोलात हे दशावतार कोरलेले आहेत.

लतासुंदरी

 

 

 

 

अगदी वर पाहिल्यावर या द्वाराच्या छतावर एक अनोखे कोरीवकाम आहे-चंद्रग्रहणाचे दृश्य.!त्यात चंद्रातील ससा आणि त्याच्याकडे सरकत येणारे राहू-केतू स्वरूपातील दोन सर्प दाखवले आहेत. हे चंद्रग्रहणाच्या पौराणिक कल्पनेचे कलात्मक चित्रण मानले जाते.या शिल्पात राहू हा सर्पाकार अथवा राक्षसी आकृतीच्या स्वरूपात दाखवला असून तो चंद्राला गिळण्याचा प्रयत्न करताना दिसतो. 
भारतीय पुराणांनुसार समुद्रमंथनाच्या वेळी अमृतपान केलेल्या राहूचे डोके भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने छाटले. मात्र अमृत पिल्यामुळे तो अमर झाला. तेव्हापासून सूर्य आणि चंद्र यांनी त्याची तक्रार केल्याचा राग मनात धरून राहू वेळोवेळी त्यांना गिळण्याचा प्रयत्न करतो. सूर्य किंवा चंद्र काही काळ झाकले गेले की ग्रहण होते, अशी लोकमान्यता होती.ही कथा केवळ धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित नाही तर  ती सामान्य जनतेला आकाशातील घटनांचे स्पष्टीकरण देणारी लोकप्रिय आख्यायिका होती. त्यामुळे मंदिरातील शिल्पकारांनी ग्रहणासारख्या खगोलीय घटनेलाही कलात्मक रूप दिले.

समोर असणारे भव्य प्रांगण आणि मुख्य मंदिर आणि उपमंदिरांचे आकर्षक छोटी छोटी कलात्मक शिखरे पाहून मी थक्क झाले.अशी तीन उपमंदिरे या मंदिराच्या प्रांगणात आहेत.

 

आता बाहेर पडतांना लक्ष समोरच्या गोपुराच्या शिल्पाकडे जाते .गुलाबी-लालसर रंगाचे हे काम अतिशय मोहक आहे,परंतु हवामान, वर्षाव आणि जीर्णता यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे, तरीही उरलेले भाग अद्भुत आहेत.त्यामुळेच ASI कडून तिथे डागडुजीचे  काम सुरु असून अनेक रॉड लावले होते .कृष्ण मंदिराच्या गोपुरावर मूळत विष्णूचे विविध अवतार,कृष्णलीला,देव-देवता,गंधर्व,अप्सरा.याली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 'युद्धप्रसंग' दाखवले आहे .
ही शिल्पे स्टुको (stuscco)शिल्पे आहेत.स्टुको ही चुनखडी, वाळू, गूळ, वनस्पतीजन्य घटक, शंखचूर्ण आणि कधी कधी अंड्याचा बलक किंवा इतर बांधणीकारक पदार्थ यांचे मिश्रण करून तयार केलेली सजावटीची कलाशैली आहे. या मिश्रणापासून मूर्ती, नक्षीकाम, देव-देवतांच्या आकृती आणि वास्तूवरील अलंकार घडवले जातात.दगड कोरून शिल्प तयार करण्याऐवजी स्टुकोमध्ये ओल्या मिश्रणाला आकार देऊन आकृती तयार केली जाते. नंतर ते वाळल्यावर त्यावर रंगकामही केले जात असे.
 

हे वरील छायाचित्र tales of gaurav या चॅनेलच्या सौजन्याने.

 

 

हे शिल्प दृश्य कृष्णदेवरायांच्या १५१२-१५१३ च्या कालिंग/उदयगिरी/ओडिशा मोहिमेतील विजय दर्शवते. त्यांनी गजपती राजा प्रतापरुद्रावर विजय मिळवला.हे शिल्पे त्या विजयाचे स्मारक आहेत.काही संशोधकांना हे फक्त "विजय" नव्हे तर युद्धातील हानी आणि मानवी भावनाही दाखवतात असे वाटते . उदाहरणार्थ, सैनिकांच्या चेहऱ्यांवरील विविध भाव.
हा लेख नक्की वाचा,हा युद्ध प्रसंगाचे खूप सुंदर वर्णन आहे .
https://www.spottedowlets.com/2019/11/krishna-temple-in-hampi-decoding…

या युद्धप्रसंगात योद्धे ढाली घेऊन.घोडे काही जोमदार, काही राजाच्या समोर,हत्ती युद्धरथ किंवा सैन्याच्या रांगेत(हे मला ओळखता आले नाही)
सैन्याची रचना, राजा कृष्णदेवराय  एका घोड्यावर स्वार दिसत आहेत,काही वर्णनांनुसार गंभीर चेहऱ्याने दिसत आहे. सैनिकांच्या चेहऱ्यावरील भाव काही हसरे, काही गंभीर किंवा दुखी दिसत आहेत.युद्धातील हालचाल, पडलेले सैनिक इत्यादी दाखविले आहे .व दुसऱ्या बाजूला गोपुरावर भगवान कृष्णाच्या लीला  संबंधित शिल्प आहेत.

 

आता आम्ही बाहेर पडलो.मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे ५०० मीटरच्या रस्त्यावरील बाजाराकडे आणि त्यानंतर एका पवित्र पाण्याच्या तलावाकडे घेऊन जाते.हा खरं तर मुख्य रस्ता -सपाट असा -रथांचा रस्ता होता, जो एकेकाळी 'कृष्ण बाजार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्याबाजाराकडे जात असे. अनेक मंडपात बाजारातील दुकाने होती.

 

लक्ष्मी नरसिंह


कृष्ण मंदिराच्या दक्षिणेला,२०० ते ३०० मीटर अंतरावर विशाल एकाश्म नरसिंह मूर्ती आहे. दक्षिण भारतात  नरसिंह पूजा खूप प्रचलित आहे.हंपीतील ही मूर्ती त्या परंपरेचे एक प्रमुख उदाहरण आहे.ही मूर्ती कृष्णदेवराय १५२८ ई. यांच्या काळात, कृष्णभट्ट या शिल्पकाराने एकाच दगडातून घडवली. विजयनगर साम्राज्याच्या शिखर काळातील ही एक अत्यंत महत्त्वाची कलाकृती आहे. कृष्णदेवराय वैष्णव भक्त होते आणि नरसिंह हे धर्मरक्षणाचे प्रतीक मानले जाते.मूर्ती सुमारे २२ फूट उंच असून ती एका अखंड ग्रॅनाइट शिळेतून घडवण्यात आली आहे.

विशेषतः होयसळ आणि विजयनगर स्थापत्यामध्ये उग्र नरसिंह, योग नरसिंह आणि लक्ष्मी नरसिंह ही रूपे प्रामुख्याने दिसून येतात.

१. उग्र नरसिंह 
उग्र नरसिंह हे विष्णूच्या क्रोध आणि धर्मसंरक्षणाचे प्रतीक मानले जाते. या रूपात नरसिंह हिरण्यकश्यपूचा वध करताना दाखवला जातो. सिंहमुख, मोठे गोल डोळे, बाहेर आलेले दात, फुगलेल्या आयाळीचे केस आणि अनेक हातांत शस्त्रे अशी त्याची वैशिष्ट्ये असतात.
बहुतेक मंदिरांच्या बाह्य भिंतींवर, द्वारशाखांवर किंवा मंडपातील शिल्पपट्टिकांमध्ये हे रूप कोरलेले आढळते. यामागील संकल्पना अशी की मंदिरात प्रवेश करणाऱ्या भक्तांचे आणि देवालयाचे संरक्षण करणारा उग्र देव बाह्य भागात असावा.

२. योग नरसिंह
योग नरसिंह हे पूर्णतः वेगळे आणि शांत स्वरूप आहे. हिरण्यकश्यपूचा वध झाल्यानंतर क्रोध शांत होऊन नरसिंह योगध्यानात स्थिरावला आहे, अशी या रूपामागील कल्पना आहे.या मूर्तीमध्ये पद्मासन किंवा योगासन,गुडघ्यांभोवती योगपट्टा,ध्यानस्थ मुद्रा,प्रसन्न किंवा गंभीर मुखमुद्रा अशी वैशिष्ट्ये दिसतात.
होयसळ स्थापत्यातील अनेक नरसिंह मंदिरांच्या गर्भगृहात योग नरसिंहाची प्रतिष्ठा करण्यात आली आहे. भक्तांना भय नव्हे तर आध्यात्मिक शांततेचा अनुभव देणे हा यामागील उद्देश असावा.

३. लक्ष्मी नरसिंह
हे नरसिंहाचे सर्वाधिक लोकप्रिय आणि भक्तिपर स्वरूप आहे. या रूपात लक्ष्मी देवी नरसिंहाच्या मांडीवर किंवा शेजारी बसलेली असते.लक्ष्मीच्या उपस्थितीमुळे उग्रतेचे रूपांतर करुणा आणि संरक्षणात होते. त्यामुळे ही प्रतिमा शक्ती आणि सौम्यता यांचा सुंदर समन्वय दर्शवते.

हंपीतील नरसिंह कोणत्या प्रकारचा?

लक्ष्मी नरसिंह ह्या हंपीतल्या मूर्तीबाबत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते. आज ती 'उग्र नरसिंह' म्हणून प्रसिद्ध असली तरी ती हिरण्यकश्यपूचा वध करणारी पारंपरिक उग्र नरसिंह प्रतिमा नाही. त्या मूर्तीमध्ये राक्षस नाही, युद्धदृश्य नाही आणि वधप्रसंगही दाखवलेला नाही.

मूळतः ती लक्ष्मी नरसिंह प्रतिमा होती. नरसिंहाच्या मांडीवर लक्ष्मी बसलेली होती. कालांतराने ताळिकोटच्या युद्धानंतर झालेल्या विध्वंसात लक्ष्मीचा बहुतांश भाग तुटून गेला.यामुळे मूर्तीचे मूळ सौम्य रूप हरवले आणि आज ती अधिक उग्र वाटते.  लक्ष्मीची मूर्ती नष्ट झाल्यामुळे आज केवळ विशाल सिंहमुखी नरसिंह दिसतो आणि त्याच्या तीव्र मुखमुद्रेमुळे त्याला "उग्र नरसिंह" म्हणण्याची प्रथा पडली.म्हणून शिल्पशास्त्रीय दृष्टीने हंपीची मूर्ती लक्ष्मी नरसिंह आहे, तर लोकप्रिय पर्यटनपर भाषेत ती उग्र नरसिंह म्हणून ओळखली जाते. हा फरक समजून घेणे अभ्यासकांसाठी महत्त्वाचे आहे.
यात अजून एक भर पडली ती ही मूर्ती योग नरसिंहही  आता भासते.हंपीतील लक्ष्मी नरसिंह मूर्तीचा योग पट्टा हा मूर्तीच्या सर्वात चर्चित आणि लक्षात येणारा भाग आहे.योग पट्टा हा योगासनातील स्थिरतेसाठी वापरला जाणारा पट्टा आहे. तो गुडघ्याभोवती किंवा पायांना बांधला जातो, जेणेकरून दीर्घकाळ ध्यान/योग मुद्रेत बसता येते.ही मूर्ती क्रॉस-लेग्ड (पद्मासनासारखी) योग मुद्रा मध्ये आहे. पाय ओलांडलेले, हात गुडघ्यांवर आणि गुडघे एकत्र धरलेले दिसतात.१९८० च्या दशकात ASI ने जीर्णोद्धार केला.नवीन गुडघे आणि दगडी योग पट्टा जोडला गेला. हा पट्टा गुडघ्यांना एकत्र बांधतो.
यामुळे मूर्ती आता योग नरसिंह किंवा लक्ष्मी नरसिंह म्हणून ओळखली जाते. काहीजण या जीर्णोद्धाराला वादग्रस्त मानतात, कारण मूळ उग्र रूप बदलले गेले.


परंतु या एकाच मूर्तीने तिन्ही उग्र,योग,लक्ष्मी नरसिंह म्हणून ओळखले जाणे खरंच खूप अद्भुत योगायोगच म्हणावे लागेल :)
नरसिंह हा विष्णूचा चौथा अवतार जो मानवी शरीर + सिंहमुख दर्शवतो.जिथे मानव = बुद्धी ,सिंह = शक्ती म्हणजेच शक्ती आणि विवेक यांचा समतोल सृष्टीत दाखवतात .मूर्ती पाहताक्षणी सर्वांत प्रथम लक्षात येतात बाहेर आलेले  डोळे आणि उग्र चेहरा. सिंहाचे केस, तीक्ष्ण दात आणि भयावह अभिव्यक्तीमुळे तिला उग्र नरसिंह म्हणून ओळखले जाते. पण त्याच वेळी ती योगासनात बसलेली आहे. गुडघ्याभोवती योग पट्टा (बांधलेला, जो दीर्घकाळ ध्यानस्थ राहण्यासाठी वापरला जातो.
मूर्ती अदिशेषनागाच्या तीन वळणांवर बसलेली आहे. शेषनागाचे सात फणे  डोक्यावर उभे राहून एक दिव्य छत्र तयार करतात.भारतीय तत्त्वज्ञानात शेष म्हणजे अनंत काळ,विश्वाचे आधारतत्त्व,ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणून ही मूर्ती केवळ देवप्रतिमा नसून "विश्वरक्षक" संकल्पना दर्शवते .मूळतः नरसिंहाच्या मांडीवर लक्ष्मीदेवी बसलेल्या होत्या आता केवळ तिचा एक हात कंबरेभोवती दिसतो. हात, अलंकार आणि लक्ष्मीची पूर्ण आकृती १५६५ च्या तालीकोटा युद्धानंतरच्या आक्रमणात नष्ट झाली, तरीही ही मूर्ती आजही उभी आहे जणू इतिहासाला आव्हान देत!
जर तुम्हाला आवारात आत जाण्याची संधी मिळाली (मला मिळाली नाही,मूर्ती सामान्यांसाठी कारणपूर्णपणे बंदिस्त करण्यात आली आहे ), तर तुम्हाला देवीचा हात विष्णूच्या पाठीवर आलिंगन अवस्थेत विसावलेला दिसतो,असे सांगितले जाते .

बदवीलिंग 


नरसिंहापासून काही पावलांवरच शेजारीच बदवीलिंग आहे.हे हंपीतील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक आहे-सुमारे ३ मीटर (९-१० फूट) उंच!!
एकाच दगडातून कोरलेले ह्या लिंगावर तीन डोळ्यांची नक्षी स्पष्ट दिसते.मंदिराचे गर्भगृह नेहमी पाण्याने भरलेले असते.ह्या शिवलिंगाचा पाया २ ते ३ फूट 
सतत पाण्यात  राहते. तुंगभद्रा नदीतून एक छोटी कॅनॉल ने पाणी मंदिरात आणले जाते, ज्यामुळे वर्षभर पाणी आटत नाही. गर्भगृह नेहमी पाण्याने भरलेले असते.पूजा करणारे भक्त किंवा पुजारी पाण्यात चालत लिंगाजवळ जातात.

"बदवी" किंवा "बडाव" म्हणजे कन्नड भाषेत गरिब किंवा दरिद्री असा होतो.
कथेनुसार, हे लिंग एक गरिब शेतकरी स्त्री  ने आपल्या भक्तिभावाने बनवले किंवा बनवण्यास प्रेरणा/अर्थ साहाय्य दिले. तिच्या साध्या-सोप्या श्रद्धेमुळे हे नाव पडले. ही कथा हंपीच्या लोकपरंपरेत प्रसिद्ध आहे.

नरसिंह आणि बदवीलिंग शेजारीच का?हा प्रश्न अनेक संशोधकांना पडतो.वैष्णव आणि शैव परंपरा अनेकदा वेगळ्या मानल्या जातात.परंतु विजयनगरमध्ये दोन्ही परंपरांना समान महत्त्व होते.त्यामुळे नरसिंह  'विष्णू' आणि बदवीलिंग 'शिव' या दोन प्रतिमा एकत्र उभ्या राहून धार्मिक समन्वय दर्शवतात.

पुढच्या ठिकाणाकडे आता चालू लागलो -प्रसन्न विरुपाक्ष मंदिराकडे ...रस्त्याच्या दोन्ही बाजूला केळीच्या बागा होत्या ,त्यामुळे चालायला मजा येत होती .पण नंतर लक्षात आले कि मंदिराकडचे अंतर खूप आहे ,तेव्हा रिक्षा करून तिकडे गेलो.

 

प्रसन्न विरुपाक्ष मंदिर

प्रसन्न विरुपाक्ष मंदिर हे हंपीतील सर्वात रहस्यमय आणि अनोख्या मंदिरांपैकी एक आहे. याला सामान्यतः भूमिगत शिवमंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर विजयनगर काळात बांधले गेले असून, जमिनीच्या पातळीपेक्षा काही मीटर खाली स्थित आहे. मंदिराकडे जाताना अनेक पायऱ्या उतरत खाली जावे लागते .मग चारी बाजुंना चिरेबंदी दगडांसारखे दगड वापरून भिंती बांधल्या आहेत .यामुळे हे ठिकाण अजूनच गूढ वाटते.

आजच्या जमिनीच्या पातळीवरून पाहिले तर मंदिराचे छप्पर जवळजवळ जमिनीच्या समांतर दिसते, परंतु मुख्य सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह खालच्या स्तरावर आहेत. यामुळे संपूर्ण मंदिर जमिनीत दडलेले असल्याचा भास होतो, म्हणूनच त्याला भूमिगत मंदिर म्हणतात.
या मंदिराचे आणखी एक गूढ वैशिष्ट्य म्हणजे त्यातील पाणी. गर्भगृह आणि आतील भाग वर्षभर पाण्याने वेढलेले असतात. पावसाळ्यात पाण्याची पातळी आणखी वाढते. काही संशोधकांच्या मते हे पाणी तुंगभद्रा नदीशी जोडलेल्या जलमार्गांमुळे येत असावे, मात्र याचे नेमके कारण आजही निश्चितपणे ज्ञात नाही. पाण्यात बुडालेले असलेले शिवलिंगाचे दर्शन येथे खास अनुभवास येते.
हे मंदिर विजयनगर स्थापत्यशैलीचे असले तरी हंपीतील इतर भव्य मंदिरांपेक्षा वेगळे आहे. येथे साधे दगडी स्तंभ, अलंकरणाचा कमीतकमी वापर, प्रशस्त महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी साधी आणि प्रभावी रचना दिसते. हजारराम मंदिर किंवा कृष्ण मंदिरातील सूक्ष्म नक्षीकाम येथे आढळत नाही. त्यामुळे काही अभ्यासकांच्या मते हे मंदिर राजघराण्याच्या खासगी पूजेसाठी वापरले जात असावे.
या मंदिराबाबत एक रोचक बाब म्हणजे ते जवळजवळ चारशे वर्षे माती आणि गाळाखाली पूर्णपणे झाकले गेले होते. १९८० च्या दशकात उत्खनन आणि संवर्धनाच्या कामांदरम्यान ते पुन्हा प्रकाशात आले.
प्रसन्न विरुपाक्ष नावाचे विशेष महत्त्व आहे. हंपीतील मुख्य विरुपाक्ष मंदिर हे भव्य सार्वजनिक तीर्थक्षेत्र आहे, तर हे भूमिगत मंदिर शिवाच्या प्रसन्न, शांत आणि कृपाळू स्वरूपाला समर्पित मानले जाते.
आता आम्ही पुन्हा मुख्य विरुपाक्ष मंदिराकडे निघालो ....

-भक्ती


हंपीचा ध्यास -५ (कंपा भूपा मार्ग ,अच्युतराय मंदिर ,मातंग टेकडी सूर्यास्त )

लेखकBhaktiयांनी शनिवार, 11/07/2026 16:10 या दिवशी प्रकाशित केले.

हंपीमधले अजून एक भव्य पण अगदीच कोपऱ्यात असणारे "अच्युतराय मंदिर ' आहे .
प्रसन्न वीरूपाक्षाचे दर्शन घेऊन रिक्षाने पुन्हा मुख्य विरुपाक्ष मंदिराजवळ पोहचलो .आणि थेटच अच्युतरराय मंदिर पाहण्यासाठी तुंगभद्रा नदीच्या काठेने पुढे निघालो.

"चक्रतीर्थ घाट "



 

तिथेच त्या नदीवरील नैसर्गिक घाटाचे नाव आहे "चक्रतीर्थ घाट "या नावामागे दोन वेगवेगळ्या आख्यायिका आहेत.
येथे भगवान शिवाने विष्णूला सुदर्शन चक्र दिले होते, अशी आख्यायिका आहे. 
तर 'चक्रतीर्थ' म्हणजे 'पाण्याचे पवित्र आवर्तन' तुंगभद्रा नदी विरुपाक्ष मंदिराच्या जवळून पूर्वेकडे वाहते  आणि सुमारे एक किलोमीटर पुढे जाऊन उत्तरेकडे एक तीव्र वळण घेते. नदीचे हे जवळजवळ ९० अंशांचे वळण,ज्यामुळे अनेक भोवरे आणि अधोप्रवाह निर्माण होतात. ज्या कोपराच्या वळणावर नदी पूर्वेकडून उत्तरेकडे आपली दिशा बदलते,त्याला चक्राकार वळण जाणून याचे नाव चक्रतीर्थ असे पडले .


 

कोदंड राम

प्रतिमा-आंतरजालाहुन

पुढे चढ चढून जात असतांना उजवीकडे कोदंड रामाचे मंदिर आहे.या मंदिरात अजूनही पूजा होते हे समाधानकारक होते. हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर आहे, चक्रतीर्थ नावाच्या पवित्र स्नानघाटासमोर काही पायऱ्या चंदन वर गेल्यावर आहे.गर्भगृहात एका एका मोठ्या नैसर्गिक खडकातून कोरलेल्या राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या उंच सुमारे १५ फूट -मूर्ती आहेत.

राम धनुष्य म्हणजेच कोदंड धरलेल्या मुद्रेत आहेत, म्हणून नाव कोदंडराम- धनुष्यधारी राम.
काही कथेनुसार सुग्रीवही रामासमोर वाकलेला दाखवला आहे.रामायण कथेनुसार हे ठिकाण किष्किंधा राज्याशी जोडलेले आहे.
भगवान राम सीतेला शोधत हम्पी -किष्किंधाप्रदेशात आले.सुग्रीवाने वालीशी युद्ध करण्यासाठी रामाची मदत मागितली.रामाने वालीला मारले आणि लक्ष्मणाने सुग्रीवाला किष्किंधेचा राजा म्हणून अभिषेक केला.या घटनेच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले गेले असल्याचे मानले जाते.काही स्थानिक कथांनुसार रामाने सुग्रीवाला राज्याभिषेक केल्याचे ठिकाण हे आहे.तर सुग्रिव याने ही मूर्ती बनवून घेतल्याची धारणा आहे .
पावसाळ्यात तुंगभद्रा नदीचे पाणी मंदिरापर्यंत पोहचते .


 

यंत्रोद्धारक हनुमान 

                                                                                             प्रतिमा-आंतरजालाहुन

या मंदिराच्या वरच्या बाजूलाच हंपीतील यंत्रोद्धारक हनुमान मंदिर आहे.श्री व्यासराज (१४४७–१५३९) हे विजयनगर साम्राज्याचे राजगुरू होते. ते कृष्णदेवराय यांचे गुरू होते. ते चार राजांच्या काळात राजगुरू म्हणून राहिले.

ते द्वैत दर्शनाचे महान विद्वान होते आणि पुरंदरदास, कनकदास यांचे गुरूही होते.हनुमान भक्तीचा प्रसार: व्यासराज यांनी ७३२ हनुमान मूर्ती दक्षिण भारतात  स्थापित केल्या. यातील बहुतेक वीर हनुमान (वीर मुद्रेत) होत्या.
व्यासराज यांनी ७३२ जैन विद्वानांना शास्त्रार्थात हरवले आणि प्रत्येक विजयानंतर एक हनुमान मूर्ती स्थापित केली.राज्यात हिंदू धर्माचे रक्षण आणि लोकांच्या मनोबल वाढवण्यासाठी वीर हनुमान पूजेला प्रोत्साहन दिले.
हंपीत यंत्रोद्धारक हनुमान मंदिर चक्रतीर्थ जवळ हे व्यासराज यांनी स्थापित केले.यामागची कथा अशी कि,व्यासराज रोज खडकावर कोळशाने हनुमानजींचे चित्र काढायचे, पण ते नाहीसे व्हायचे. १२ दिवसांनी हनुमानजी प्रकट झाले आणि षट्कोण यंत्र मध्ये स्वतःला बांधून (यंत्रोद्धारक) स्थापित करण्यास सांगितले.ही मूर्ती पद्मासन या योग मुद्रेत बसलेल्या अवस्थेत आहे.


 

कंपा भूपाचा मार्ग


 

                                                                                                  विजयनगर वराह राजचिन्ह 
 


 


 


 


 



 

या दोघांचे दर्शन घेऊन पुढे अच्युतराय मंदिराकडे निघालो .पण आता गडबड झाली.मंदिर उजवीकडे होते.पण कोण जाणे कशी मी वळाले डावीकडे !! आणि तिथे पहिल्यादा दिसले "वराह मंदिर" ! भव्य प्रवेशदाराच्या आतच विजयनगरचे राजचिन्ह असलेले वराह चिन्ह मोठ्या आकारात कोरलेले भिंतीवर दिसले.मंदिर छोटे आणि साधे आहे परंतु हे मंदिर वराह कि विष्णू मंदिर या बाबत मतभेद आहेत.

पुढे चालत राहीले अच्युतराय मंदिर का येईना हे कळेना .मग हा मार्ग जरा चढ़ायाकडे जातो त्या आधी अजून एक मंदिर आहे .ज्याला काही पायऱ्या दिसतात .या भागात अजिबात वर्दळ नव्हती जी मला वेरूळच्या अगदी कोपर्यातल्या अशाच कमी व वर्दळीच्या जैन मंदिरांची आठवण करून देत होती .हे मंदिर कोणते हे ओळखू शकले नाही .आता अजून पुढे गेल्यावर एक दुमजली देखरेख करायला असलेले गेट (Two Storied Gateway) दिसले .समोरून एक जण येत होता ,त्याला विचारले इकडे पुढे काय आहे ? तो म्हणाला "विठ्ठल टेम्पल"!!
हाय राम तर मी थेट विठ्ठल मंदिराच्या जवळ पोहचले होते तर ....पण मला विठ्ठल मंदिर अगदी निवांत पाहायचे होते ,आणि आता वाजले होते चार ! म्हणून पुन्हा मागे फिरले.नंतर नेटवर शोधल्यावर समजले की मी आता जो इतका मोठा मार्ग चालत आले त्याला म्हणतात "कंपा भूपाचा मार्ग"!!
 हा हम्पीमधील एक ट्रेक मार्ग आहे, जो त्याच्या आकर्षक खडकाळ भूभागासाठी ओळखला जातो. हा सुमारे २ किलोमीटर लांबीचा ट्रेक मार्ग आहे. हा ट्रेक मार्ग हम्पी बाजारापासून सुरू होतो आणि प्रसिद्ध विठ्ठल मंदिराच्या जवळ संपतो.ज्यात वराह मंदिर,नदीकाठच्या १०८ शिवलिंग रांगा नरसिंह मंदिर,सुग्रीव गुहा आहे.ज्यातील मी फक्त वराह मंदिर आणि नरसिंह मंदिर पाहू शकले .

 

अच्युतराय मंदिर/तिरुवेंगलनाथ मंदिर

आता पुन्हा अच्युतराय मंदिर कोठे आहे हे पाहत मागे त्याच मार्गाने निघाले.आता जरा धावतच सुटले.अखेरीस डावीकडे भव्य पुष्करणी आणि बाजाराचा भाग आणि ३०० मीटर अंतरा दूर अच्युतराय मंदिर दिसत होते .आधी मंदिराकडे निघाले.एका बाजूला अच्युतराय बाजाराच्या पडव्या/व्हरांडा होत्या पूर्वी दुकाने आणि निवासासाठी वापरला जात असे.तर दुसरीकडे विस्तीर्ण पुष्करणीही होती.मंदिर आणि त्याच्या समोरील गजबजलेला बाजार मिळून 'अच्युतपुरा' हा हंपीच्या पवित्र केंद्राचा एक महत्त्वाचा भाग बनला होता. मंदिरासमोरील रस्ता 'वेश्यांचा रस्ता' किंवा 'सूलाई बाजार' म्हणून ओळखला जातो. 
अच्युतरायाचे मंदिर म्हणूनही ओळखले जाणारे तिरुवेंगलनाथ मंदिर, इ.स. १५३४ मध्ये बांधले गेले. अच्युतराय हे महान विजयनगर सम्राट कृष्णदेवराय यांचे धाकटे बंधू होते.
 सामान्यतः राजा अच्युत देव राय यांच्या नावाने हे मंदिर ओळखले जाते तरी, ऐतिहासिक शिलालेखांमधून असे उघड झाले आहे की याचे बांधकाम अच्युत राय यांचे मेहुणे आणि दरबारातील एक उच्चपदस्थ अधिकारी हिरिया तिरुमला होते.  हे मंदिर ‘तिरुवेंगलनाथ’ या देवतेच्या नावापेक्षा, ज्यांच्या काळात ते बांधले गेले त्या अच्युतराय मंदिर या नावाने अधिक ओळखले जाते.
या मंदिर संकुलाला दोन आवार आहेत, आणि प्रत्येक आवारात एक प्रवेशद्वार व गोपुर आहे. मुख्य मंदिर दुसऱ्या आवारात वसलेले आहे. मंदिराच्या समोर गरुडाचे मंदिर आहे. आतील अंगणाच्या भोवती खां


 


 




 


 


 


 


 

 


 


या मंदिर संकुलातही एक कल्याण मंडप होता, जिथे देवतेचा वार्षिक विवाह सोहळा आयोजित केला जात असे. जवळपास १००  खांबांवर कुशलतेने कोरलेली शिल्पे आहेत.

अजिबात गर्दी नसलेल्या या मंदिराला मला कमी वेळ देता आला कारण वाजले होते पाच आणि आता मला सूर्यास्त पाहण्यासाठी मातंग टेकडी चढायची होती.पुन्हा चक्रतीर्थ मार्गे बाहेर पार्किंगच्या आलो. 

मोनोलिथिक नंदी

उजवीकडेच भव्य मोनोलिथिक नंदी एका मोठ्या मंडपात दिमाखात होता .नंदी शांत मुद्रेत बसलेला आहे आणि त्याचे लक्ष विरुपाक्ष मंदिराकडे आहे.

मातंग टेकडी
मातंग टेकडी अजून चढायला सुरुवात असल्यामुळे  नंदीसमोर  रेंगाळता ,टेकडी चढायला सुरुवात केली.मोठं मोठ्या उंच शिळा चढणे सुरुवातीला सोपे वाटत होते पण नंतर जरा चढाई अवघड वाटू लागली ,कारण दिवसभराचा थकवा आणि खूपच कमी वेळात खूप चढाई केली होती.त्यात मी स्पेशल साडी नेसली होती .मला पाहून अनेक जण अय्यो साडीत ही हा कठीण ट्रेक करतेय असे आश्चर्यपूर्ण  कुजबुज जाणवत होती .थोडा स्वतःचा अभिमान  वाटला पण माझी ट्रेक इन सारी ची मात्र हौस फिटली होती ..जिरली होती.अखेर मातंग टेकडी पूर्ण न चढता एका टप्प्यावर जेथून हंपीच्या प्रचंड शिळा अगदी खेळण्यातल्या चौकोनी ठोकळ्यासारख्या सगळीकडे विखुरलेल्या मनोरम वाटत होत्या.

वानरराज वालीने दुंदुभी म्हशीला ठार मारून त्याचे प्रेत मातंग पर्वतावर फेकले. यामुळे मातंग ऋषींनी वालीला शाप दिला की तो त्या पर्वतावर पाऊल ठेवू शणार नाही.नंतर दुंदुभीचा पुत्र मायावी युद्धासाठी वालीला गुहेत घेऊन गेला. वालीचा भाऊ सुग्रीव गुहेचे दरवाजे बंद करून बाहेर राहिला. वाली गुहेतून बाहेर आल्यावर सुग्रीवावर विश्वासघाताचा आरोप करून त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागला. प्रभू रामाने वालीचा वध केल्यावर सुग्रीवाला वानरराज्य मिळाले.
आता किष्किंधा-हंपी नगरीतले वानर इथेही लीला करतांना दिसू लागले ,कोणाची बॅग ,पाण्याची बाटली,खाऊ पळवं !
त्या शिळांवर बसून इतरत्र नजर फिरवली तर वेगवेगळ्या देशातले पर्यटकही दिसू लागले .जे सर्वजण समोर सोनेरी किरणांत न्हाहलेल्या हंपीच्या विशेष अशा शिळा ते सौंदर्य वीरुपाक्षच्या साक्षीने अनुभवत होते .खरोखर जगातल्या अनेक सूर्यास्त स्थळामध्ये हा एक उत्तम सूर्यास्तबिंदू आहे .


 


 

हंपी विजयनगर बाजार



 

मावळतीचे रंग माखून आनंदाचे किरण घेत खाली उतरलो तर समोर विविध रोषणाईत विरुपाक्ष मंदिर नटलेले दिसत होते .१५ व्या शतकातलया जगप्रसिद्ध अशा विरुपाक्ष/ हंपी विजयनगर बाजारपेठेतून मी पुढे पुढे निघाले होते.  प्राचीन काळी युरोपियन, अरबी, पर्शियन आणि चिनी व्यापारी येथे येत असत., विविध परदेशी देशांतील व्यापारी येथे मौल्यवान खडे, दागिने, रेशमी वस्त्रे इत्यादींसारख्या अनोख्या वस्तू विकत असत. तसेच, येथे गायी आणि घोड्यांचा व्यापारही होत असे.परदेशी प्रवासी जसे अब्दुर रज्जाक, निकोलो कोंती, डोमिंगो पेस,फर्नाओ न्युनीझ यांनी हंपी बाजाराची प्रशंसा करताना येथील प्रचंड समृद्धी आणि विविधतेचे वर्णन केले आहे.

पोर्तुगीज प्रवासी पेस आणि नुनिझ यांनी हम्पी बाजाराचे वर्णन केले आहे, "या रस्त्यावर अनेक व्यापारी राहत होते आणि तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे माणिक, हिरे, पाचू, मोती, लहान मोती, कापड आणि पृथ्वीवर अस्तित्वात असलेली व तुम्हाला खरेदी करण्याची इच्छा होईल अशी प्रत्येक वस्तू मिळेल." 
पुढे ते शहरातील काही रहिवाशांचे त्यांच्या सर्व मौल्यवान दागिन्यांनी नटलेले वर्णन करतात. "या प्रत्येक स्त्रीने आपल्या अंगावर जे काही बाळगले आहे, त्याची किंमत आणि मूल्य कोण सांगू शकेल? त्यांनी बाळगलेल्या बांगड्या, सोने आणि दागिन्यांचे वजन इतके जास्त आहे की त्यांच्यापैकी अनेकांना ते पेलवत नाही, आणि स्त्रिया त्यांचे हात धरून त्यांना मदत करत सोबत असतात."
अशा या भूतकाळातल्या वैभवाचे दृश्य मनात तराळत ठेऊन पुन्हा एकदा मंद समईच्या ,दिव्यांच्या उजेडात उभ्या वीरूपाक्षाचे दुरून दर्शन घेत आजचा  हंपी दर्शनाचा पहिला दिवस संपला होता . 
-भक्ती 
संदर्भ -
https://www.karnataka.com/hampi
https://www.pickpackgo.in/2015/09/achyuta-rayas-temple-complex.html
https://hampi.in



हंपीचा ध्यास -६ (विजयविठ्ठल मंदिर )

लेखकBhaktiयांनी बुधवार, 05/08/2026 17:17 या दिवशी प्रकाशित केले.



 



 

हंपीच्या पहिल्या दिवशी हंपी खरेदीसाठी फेरफटका मारला .तेव्हा हॅम्प कापडापासून बनवलेल्या बॅग घेतल्या.भांगेच्या झाडापासून बॅग ?त्यावर तर बंदी आहे ना ?असा प्रश्न मनात आला.
ते शोधता असे समजले की ,ज्या हेम्प बॅग्स बाजारात विकल्या जातात त्या THC खूप कमी असलेल्या औद्योगिक हेम्पपासून बनवल्या जातातत्यामुळे त्या सुरक्षित आणि कायदेशीर आहेत.
हंपीत कुठे सूर्योदय कुठे सूर्यास्त याची यादीच मी बनविली होती .पण आदल्या दिवशी इतकी दमली की दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय रू बाहेरच्या गॅलरीतूनच पाहिला .खर सांगते तोही कमाल होता .पाखरांचे थवे स्वछंद्पणे तांबूस आकाशात विहरत होते.विचार आला ,हंपीचे पक्षीही काय सुरेख आहेत :)
हंपीत एक सुंदर काफ्तान पद्धतीचा कुर्ता घेतला होता ,एकदम क्लास लुक झाला.ज्यामुळे आजचे सगळे फोटो मस्त येणार याचा मनात लाडू फुटला :)
आम्ही आधी विठ्ठल मंदिराकडे निघालो 

मंदिर उंच भिंतींनी वेढलेले असून त्याला पूर्व, दक्षिण आणि उत्तर दिशेला तीन प्रवेशद्वारे आहेत. मंदिरात प्रवेश करण्यासाठी सर्वसामान्यांना पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळील तिकीट खिडकीवर तिकीट खरेदी करावे लागते.या मंदिरात काढलेले २५/- /व्यक्ति तिकीट हे सर्व स्थळांना चालते जसे लोटस महाल,कमलापूर संग्राहालय  इ. 
हम्पी येथील विजया विठ्ठल मंदिरात बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक बग्गी सुरू झाल्या आहेत.वाहनांमुळे होणारे प्रदूषण आणि कंपनांमुळे प्राचीन अवशेषांना होणारे नुकसान टाळण्यासाठी, गेज्जाला मंडप आणि मंदिर परिसरादरम्यानच्या १ ते २ किलोमीटरच्या प्रतिबंधित पट्ट्यातून पर्यटकांची ने-आण करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने त्या सुरू केल्या.
या  इलेक्ट्रिक बग्गीने पुढे मंदिराकडे जाताना लागतो -'विठ्ठल बाजार' हंपीतील विजय विठ्ठल मंदिराच्या समोर पसरलेला विठ्ठल बाजार हा विजयनगर साम्राज्याच्या वैभवाचा जिवंत अवशेष आहे. सुमारे एक किलोमीटर लांबीचा हा पूर्व-पश्चिम रस्ता तुंगभद्रा नदीला समांतर आहे. एकेकाळी येथे मौल्यवान दगड, रेशीम, मसाले, घोडे आणि हत्ती यांचा मोठा व्यापार चालत असे. आजही येथील स्तंभांच्या रांगा आणि मंडपांचे अवशेष पाहून त्या काळच्या गर्दीच्या बाजाराची कल्पना येते. पश्चिमेकडे विठ्ठल मंदिर आणि पूर्वेकडे गेज्जला मंडप अशा दोन टोकांनी बंदिस्त असलेला हा बाजार हंपीच्या इतिहासाची एक महत्त्वाची कडी आहे.



मंदीराच्या प्रवेश द्वाराशी भग्नावस्थेतील गोपुरम, जरी त्याचा वरचा भाग तुटलेला असला तरी, आपले स्वागत करते.हा गोपुर उद्ध्वस्त करण्यासाठी तोफ वापरून यावर गोळे डागले असण्याची शक्यता वाटते.विजय विठ्ठल मंदिर हे स्थापत्यकला, शिल्पकला, संगीतपरंपरा आणि भक्तिसंस्कृती यांचा अद्वितीय संगम घडवणारे स्मारक म्हणून विशेष महत्त्वाचे आहे.
विजय विठ्ठल मंदिर भगवान विष्णूच्या विठ्ठल रूपाला समर्पित आहे. मंदिराच्या विस्तीर्ण परिसरात मुख्य मंदिराबरोबरच भव्य महामंडप, कल्याणमंडप, उत्सवमंडप, शंभर स्तंभी मंडप, दगडी रथ आणि विविध लहान देवळे आहेत. मंदिराच्या दगडी रचनेतून विजयनगरच्या शिल्पकारांचे कौशल्य दिसते,तर त्याच परिसराशी जोडलेल्या पुरंदरदासांच्या परंपरेतून विठ्ठलभक्ती आणि कर्नाटक संगीताचा इतिहास उलगडतो. त्यामुळे विजय विठ्ठल मंदिराचा अभ्यास हा केवळ एका मंदिराचा अभ्यास न राहता विजयनगरच्या व्यापक सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास ठरतो. 


 



 मंदिराच्या निर्मितीचा इतिहास
विजय विठ्ठल मंदिराच्या बांधकामाची सुरुवात विजयनगरचा राजा देवराय द्वितीय (इ.स. १४२२-१४४६)यांच्या कारकिर्दीत झाल्याचे उपलब्ध माहितीत नमूद केले आहे. मंदिराचा मूळ गाभा या काळात अस्तित्वात आला. पुढे विजयनगर साम्राज्याच्या राजाश्रयामुळे मंदिरसंकुलाचा विस्तार होत गेला.
कृष्णदेवराय (इ.स. १५०९-१५२९)यांच्या कारकिर्दीत मंदिराच्या विकासाला विशेष चालना मिळाली. शंभर स्तंभी मंडप, गोपुरे आणि इतर वास्तूंच्या निर्मितीशी त्यांचा संबंध जोडला जातो. पुढे अच्युतराय (इ.स. १५२९-१५४२) आणि सदाशिवराय यांच्या काळातही मंदिरातील काही भाग पूर्ण झाल्याचे नमूद केले जाते. त्यामुळे आज दिसणारे मंदिर हे एका राजाच्या कारकिर्दीत पूर्ण झालेले बांधकाम नसून, अनेक पिढ्यांच्या राजाश्रयातून विकसित झालेले विस्तीर्ण मंदिरसंकुल आहे. 
विजयनगरच्या काळात विठ्ठलभक्तीला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. विठ्ठलाच्या नावावरून काही गावांची नावे बदलण्यात आल्याचा उल्लेख आढळतो. मंदिरातील स्तंभ, भिंती आणि तुळयांवर विठ्ठलाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. काही ठिकाणी राजा आणि राणी विठ्ठलासमोर भक्तिभावाने उभे असल्याचे चित्रणही आढळते. यावरून राजसत्ता आणि धार्मिक भक्ती यांच्यातील संबंध अधोरेखित होतो. 
विजय विठ्ठल मंदिराचे संपूर्ण संकुल एका प्रशस्त तटबंदीच्या आवारात आहे. पूर्व, उत्तर आणि दक्षिण दिशांना भव्य गोपुरे असून त्यांच्या माध्यमातून मंदिर परिसरात प्रवेश करता येतो. या विस्तीर्ण प्रांगणात मुख्य विठ्ठल मंदिराबरोबरच देवीचे मंदिर, महामंडप, रंगमंडप, कल्याणमंडप, उत्सवमंडप, शंभर स्तंभी मंडप आणि प्रसिद्ध दगडी रथ आहेत.भारवाहक स्तंभांना केवळ वास्तुशास्त्रीय उपयोगापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यावर देवदेवता, याली, घोडे, हत्ती, योद्धे, पौराणिक प्राणी आणि विविध अलंकारिक आकृत्या कोरण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंदिरातील प्रत्येक वास्तुघटक हा स्वतंत्र कलाकृतीसारखा भासतो. 

मंदिराच्या प्रांगणात शिरताच समोर उभा होता तोच जगप्रसिद्ध "दगडी रथ"



विजय विठ्ठल मंदिराचे सर्वाधिक प्रसिद्ध प्रतीक म्हणजे त्याच्या आवारातील दगडी रथ. रथाच्या स्वरूपात बांधलेली ही वास्तू प्रत्यक्षात गरुडाचे मंदिर आहे. वैष्णव परंपरेनुसार गरुड हा भगवान विष्णूचा वाहन मानला जातो.रथाची संपूर्ण रचना दगडातून साकारलेली असून ती लाकडी मिरवणुकीच्या रथाची प्रतिकृती भासते. रथाच्या चाकांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली होती की ती अक्षाभोवती फिरू शकत होती. पूर्वी ही चाके फिरवता येत असत; मात्र संरक्षणाच्या दृष्टीने आता ती स्थिर करण्यात आली आहेत. 
रथाच्या स्थापत्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याचे बदलते स्वरूप. आज रथासमोर दोन हत्ती दिसतात,मात्र उपलब्ध निरीक्षणानुसार मूळ रचनेत येथे घोडे असावेत, असे मानले जाते. आजच्या हत्तींच्या मागील भागाजवळ घोड्यांचे मागचे पाय आणि शेपटीसदृश अवशेष दिसतात. यावरून रथाच्या पुढील भागात नंतर बदल करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जाते.
रथावर पूर्वी विटांचे शिखर होते, असेही नमूद केले जाते. कालांतराने ते नष्ट झाले. त्यामुळे आज दिसणारा रथ हा मूळ वास्तूचा अवशेष असला तरी त्यात काळानुसार झालेले बदलही स्पष्टपणे जाणवतात.
 
रथावरील रंगकामाचे अवशेष
विजयनगरमधील शिल्पे केवळ दगडाच्या नैसर्गिक रंगात ठेवली जात नसत, तर त्यांवर रंगकाम केले जात असल्याचे पुरावे आढळतात. दगडी रथाच्या काही भागांवर आजही जुन्या रंगकामाचे अवशेष पाहायला मिळतात. विशेषतः रथाच्या खालच्या भागातील तुलनेने संरक्षित भागांमध्ये रंगाचे अंश टिकून राहिले आहेत.दगडी रथ आज भारतीय सांस्कृतिक वारशाचे एक प्रसिद्ध प्रतीक बनला आहे. त्याचे चित्रण भारतीय चलनी नोटेवरही करण्यात आले आहे. 


 


 


 



रथाच्या बरोबर समोर नृत्यमंडप किंवा संगीत मंडप /रंग मंडप 


विठ्ठल मंदिर हे आधी बंदिस्त मंडपाचे होते .नांतरच्या काळात याला खुले मंडप जोडले/बांधले गेले.मुख्य बांधकाम कृष्णदेवराय  यांच्या काळात झाले.
विठ्ठल मंदिराच्या काही भागांमध्ये (उदा. प्रवेशद्वारे/गोपुर) कृष्णदेवरायांच्या दोन राण्यांनी तिरुमलादेवी आणि चिन्नादेवी योगदान दिले होते 
पण ऐतिहासिक परंपरेनुसार,पूर्वी नृत्य-संगीत कार्यक्रमांच्या वेळी राणी किंवा राजघराण्यातील स्त्रिया प्रेक्षक म्हणून येत असत.
त्यांच्या गोपनीयता राखण्यासाठी मंडपाच्या काही भागांवर किंवा बाजूच्या जागांवर कापडी पडदे / पडदे लावले जात.
काही ठिकाणी नर्तकी किंवा देवदासींच्या कार्यक्रमातही गोपनीयतेसाठी पडदे वापरले जात.यासाठी छतांना आणि पायापाशी काही तुळया दिसतात ज्यांना हे पडदे बांधले जात असावे.काही ऐतिहासिक स्रोतांनुसार ती पूर्वी हम्पीतील विरुपाक्ष मंदिरातील देवदासी / नर्तकी होती. तिच्या सौंदर्य आणि नृत्यकलेमुळे कृष्णदेवराय तिच्या प्रेमात पडले आणि नंतर तिच्याशी विवाह केला.तिच्यासाठी हा रंग महाल बांधला असावा अशीही धारणा आहे .

मुख्य सभागृहात रंगा मंडपात ५६ दगडी खांब आहेत.प्रत्येक मुख्य खांबाभोवती लहान खांब कोरलेले आहेत.या खांबांना हळूवार थाप दिल्यास वेगवेगळे संगीत स्वर (सा-रे-ग-म-प-ध-नि) किंवा वेगवेगळ्या वाद्यांसारखे आवाज येतात.मृदंग,वीणा,तबला,झांज,इतर तालवाद्ये.म्हणजे संपूर्ण हॉल एक मोठे वाद्य असल्यासारखे वाटायचे.आता संरक्षणासाठी खांबांना हात लावण्यास पूर्ण मनाई आहे. पूर्वी गाइड लोक थाप देऊन दाखवत होते, पण आता ते बंद आहे.प्रत्येक मुख्य स्तंभ सुमारे ३.६ मीटर उंच आहे.मुख्य स्तंभाभोवती ४ ते ७ कधीकधी १६ लहान स्तंभ कोरलेले आहेत.हे सर्व स्तंभ एकसंध  ग्रेनाइट शिळेतून कोरलेले आहेत.
काही स्तंभ मृदंग, तबला, डमरू, घंटा, वीणा यांसारख्या वाद्यांचे आवाज देतात.
रहस्य काय होते?-लोकांना वाटायचे की स्तंभ आतून पोकळ असावेत किंवा आत धातु/तार असावी. ब्रिटिश काळात अधिकाऱ्यांनी रहस्य जाणून घेण्यासाठी दोन स्तंभ कापून पाहिले. पण आत काहीही नव्हते .पूर्ण ठोस दगडच होता. ते कापलेले स्तंभ आजही मंदिर परिसरात दिसतात.
२००८ मध्ये इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्र (कल्पाक्कम) येथील शास्त्रज्ञांनी या स्तंभांचे वैज्ञानिक परीक्षण केले. त्यांनी अल्ट्रासोनिक, इम्पॅक्ट-इको आणि मेटलोग्राफी तंत्र वापरले.त्यावर हे दिसते कि,स्तंभ पूर्णपणे ठोस ग्रेनाइट आहेत.
आवाज फ्लेक्सुरल व्हायब्रेशन -स्तंभाच्या बाजूला वाकण्याच्या कंपनामुळे निर्माण होतो. हे ट्युनिंग फॉर्कसारखे काम करते.स्तंभाची लांबी, जाडी, आकार आणि दगडाची घनता यामुळे विशिष्ट फ्रिक्वेन्सी  तयार होते.लहान-जाड स्तंभ उच्च स्वर देतात, तर लांब-बारीक स्तंभ खोल स्वर देतात.
शास्त्रज्ञांनी मोजलेली फ्रिक्वेन्सी आणि प्रत्यक्ष निघणारा स्वर जुळतो. म्हणजे हे जाणीवपूर्वक तयार केले गेले होते.उदाहरणार्थ, एका स्तंभातून सुमारे ६४६ हर्ट्झ आणि दुसऱ्यातून ५३८ हर्ट्झ असा स्पष्ट आवाज निघतो.
आजची स्थिती
आज ASI ने संरक्षणासाठी खांबांना हात लावण्यास मनाई केली आहे आणि QR कोडद्वारे संगीत ऐकवले जाते.


 




कल्याणमंडप - विवाहविधी आणि उत्सवांचे दालन 



 

विजय विठ्ठल मंदिर संकुलातील कल्याणमंडप ही आणखी एक महत्त्वाची वास्तू आहे. ‘कल्याण’ म्हणजे मंगल किंवा विवाहाशी संबंधित असा अर्थ घेतला जातो. या मंडपाचा संबंध देव-देवतांच्या प्रतीकात्मक विवाहसोहळ्यांशी जोडला जातो.
मंडपाच्या मध्यभागी उंच, सुबकपणे घडवलेला मंच आहे. धार्मिक परंपरेनुसार येथे देव-देवतांच्या विवाहविधींचे आयोजन केले जात असावे. उपलब्ध माहितीनुसार विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या प्रतीकात्मक विवाहाशीही या मंडपाचा संबंध जोडला जातो.
कल्याणमंडपाच्या स्तंभांवर याली, घोडे, हत्ती, देवदेवता, योद्धे आणि विविध पौराणिक आकृत्यांचे कोरीव काम आहे. छत, तुळया आणि अधिष्ठानावरही सूक्ष्म नक्षीकाम केलेले आहे. त्यामुळे कल्याणमंडप हा धार्मिक उपयोगाबरोबरच विजयनगरच्या शिल्पकौशल्याचा उत्कृष्ट नमुना ठरतो. 
मंडपाची खुली आणि प्रशस्त रचना मोठ्या संख्येने लोक एकत्र येण्यासाठी उपयुक्त होती. त्यामुळे धार्मिक विधी, उत्सव आणि सामाजिक सहभाग या सर्वांचा विचार करून मंदिर वास्तूंची आखणी केली जात असल्याचे या रचनेतून दिसते.
महामंडपातील शिल्पे 
विजय विट्ठल मंदिराच्या महामंडप मध्ये अत्यंत सुंदर आणि वैविध्यपूर्ण शिल्पे कोरलेली आहेत. महामंडपाच्या अंतर्गत रचनेत मध्यवर्ती भागातील १६ स्तंभांचा समूह विशेष लक्षवेधी आहे. या भागातील स्तंभांवर याली, नरसिंह आणि इतर शिल्पविषयांचे अंकन आढळते.पायावरील शिल्पे,घोडे आणि योद्धे 
हंस ,दशावतारांच्या लहान प्रतिमा,विविध अलंकारिक नक्षीकाम केलेले आहे.


विजय विट्ठल मंदिराचे गर्भगृह
विजय विट्ठल मंदिराचे गर्भगृह हे मुख्य मंदिराचा सर्वात आतील आणि पवित्र भाग आहे. हे पूर्वाभिमुख असून गर्भगृह, अंतराळ आणि आच्छादित प्रदक्षिणापथ अशी रचना येथे दिसते. गर्भगृहावरील कळस विटांचा असून तो त्रितल द्रविड विमानाच्या स्वरूपात बांधलेला आहे.
येथे मूळतः भगवान विठ्ठल यांची मूर्ती स्थापित होती. मूर्ती कटीवर हात ठेवून उभी असण्याची परंपरा आहे. मात्र इ.स. १५६५ मध्ये तालिकोटच्या युद्धानंतर मंदिर उद्ध्वस्त झाले आणि गर्भगृहातील मूर्ती नष्ट झाली किंवा हलवली गेली. त्यामुळे आज गर्भगृह रिकामे आहे.
गर्भगृह आणि सभामंडपाच्या भिंतींवर एकाआड एक सुशोभित स्तंभ तसेच खोल कोनाडे कोरलेले आहेत. प्रवेशद्वारावर वैष्णव द्वारपाल आणि लक्ष्मीची प्रतिमा कोरलेली असल्याचे उल्लेख आढळतात. गर्भगृह पूजेचे पवित्र स्थान असल्याने आतील भाग तुलनेने साधा ठेवण्यात आला आहे. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणापथ असल्याने भक्त मूर्तीभोवती फिरू शकत असत. 
पंढरपूरची विठठ्ल मूर्ती काही काळ येथे हलवली होती अशी आख्यायिका आहे.तेव्हा रिकाम्या गर्भगृहातील त्या रिकाम्या स्थानावर माथा टेकवतांना अगदी भरून आले होते.पंढरपूर का विजयनगर विठ्ठलाचे मूळ गाव असे वाटले .सध्याच्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या एका शिलालेखावर एक जुना १२३७ चा एक लेख आढळला आहे. त्यावर असे लिहिले आहे की होयासाला राजा सोमेश्वर पंढरपूर हे गाव दान म्हणून दिले.
परंतु बर्‍याच इतिहासकारांचे मत असे आहे की विठ्ठल मंदिर हे तेराव्या शतकाच्या अगोदरच बांधली गेले आहे.पांडुरंग हे नाव सहाव्या शतकातील राष्ट्रकुट साम्राज्याच्या तांब्याच्या एका पत्र्यावर आढळले आहे. त्यामुळे कदाचित हे मंदिर सहाव्या शतकात बांधले गेले असावे असे वाटते.
14 व्या शतकामध्ये ज्यावेळेस बहामनी साम्राज्याच्या मलिक कफूर याने होयसला व यादव साम्राज्याचा नाश केला,त्यावेळेस पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती ही विजयनगर साम्राज्य हलवण्यात आली .तेच आज हंपी येथे विजय विठ्ठल मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु तलिकोटा च्या लढाईनंतर हंपी साम्राज्य ढासळले ,तरीसुद्धा आज शिल्पकलेचा एक उत्तम नमुना म्हणून हंपी प्रसिद्ध आहे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये समाविष्ट आहे.
ज्या वेळेस विजयनगर साम्राज्याची राजे कृष्णदेवराय यांना वाटले कि पंढरपूर आता सुरक्षित आहे, त्यावेळेस त्यांनी ती विठ्ठलाची मूर्ती संत भानुदास यांच्याकडे सोपवली व अशाप्रकारे ती मूर्ती परत पंढरपुरास आणली गेली. अशाप्रकारे विठ्ठलाचे वारकरी आणि हरिदास असे दोन सांप्रदायिक असणारे भक्त तयार झाले. वारकरी म्हणजे महाराष्ट्रातील आणि हरिदास हे कर्नाटकातील भक्त होय.अजून तरी विठ्ठलाची मूर्ती किती जुनी आहे हे कोणालाच माहीत नाही.



 

मंदिराच्या बाहेर एक मोठा शिलालेख कोरलेला आहे.एकूण विठ्ठल मंदिर परिसरात २३ हून अधिक शिलालेख आहेत (१५१३ ते १५६४ पर्यंतचे).

१. इ.स. १५१३ : विठ्ठलदेवासाठी गावाची देणगी
South Indian Inscriptions, Volume IX, Part II, Dynasties of Vijayanagara, No. 490 (A.R. No. 687 of 1922) मध्ये हा अभिलेख नोंदवला आहे. तो हम्पीच्या जवळील होस्पेट तालुक्यातील मुदलापूरम येथे सापडलेल्या दगडी फलकावर आहे. लेखाचा काल शक १४३५, श्रीमुख, चैत्र शु. ५, म्हणजे इ.स. १५१३ असा दिला आहे. तो कृष्णराय महारायांच्या कारकीर्दीतील आहे.
प्रकाशित इंग्रजी आशयाचा मराठी अनुवाद
“कृष्णराय महारायांनी अंगिरस संवत्सरातील फाल्गुन कृष्ण पक्ष अमावास्येला, सूर्यग्रहणाच्या प्रसंगी, होसूर-मगाणीतील विरुपापूर हे गाव विठ्ठलदेवाच्या सेवेसाठी दान केले. या दानातून विठ्ठलदेवाच्या रथोत्सवाबरोबरच दैनिक, पाक्षिक, मासिक आणि वार्षिक उत्सवांसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात यावी, असा त्याचा उद्देश होता. हे दान राजाचे वडील नरसन्ना-नायक-वोडेय आणि आई नागाजी-अम्मा यांच्या पुण्यस्मरणार्थ करण्यात आले.”
हा अभिलेख अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तो केवळ मंदिराला दिलेल्या जमिनीच्या दानाची नोंद करत नाही, तर विठ्ठल मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांची नियमितता देखील सूचित करतो. दैनिक पूजा, पाक्षिक, मासिक आणि वार्षिक उत्सव तसेच रथोत्सव यांच्यासाठी स्वतंत्र आर्थिक आधार उपलब्ध करून दिला जात होता. यावरून मंदिर ही नियमित धार्मिक आणि आर्थिक व्यवस्थेवर चालणारी संस्था होती, असे दिसते.
१५१३ च्या मंदिरातील शिलालेखाचा आणखी एक संदर्भ
विठ्ठल मंदिराच्या मुख्य मंडपाच्या प्रवेशाजवळ इ.स. १५१३ चा कन्नड शिलालेख असल्याचा स्वतंत्र छायाचित्रात्मक पुरावा उपलब्ध आहे. त्या शिलालेखात कृष्णदेवरायांच्या तीन राण्या, त्यांचे वडील नरसा नायक आणि आई नागला देवी यांची नावे येतात, अशी नोंद छायाचित्राच्या अधिकृत वर्णनात केली आहे.

“विजय विठ्ठल मंदिराच्या मुख्य मंडपाच्या प्रवेशभागात इ.स. १५१३ चा कृष्णदेवरायकालीन कन्नड शिलालेख आढळतो. या लेखात राजाच्या कुटुंबीयांचा—त्यांच्या राण्या, वडील नरसा नायक आणि आई नागला देवी यांचा उल्लेख येतो. त्याच काळातील South Indian Inscriptions मधील No. 490 हा विठ्ठलदेवाच्या सेवेसाठी गावदानाची नोंद करणारा स्वतंत्र अभिलेख आहे. या दोन्ही पुराव्यांचा एकत्रित विचार केल्यास कृष्णदेवरायांच्या काळात विठ्ठलदेवाच्या उपासनेला आणि मंदिरव्यवस्थेला राजाश्रय मिळत असल्याचे दिसते.”
२. इ.स. १५१६–१७ : शंभर स्तंभी मंडपाचा शिलालेख
हा पुरावा अधिक स्पष्ट आहे.
South Indian Inscriptions, Volume IX, Part II, No. 502 (A.R. No. 711 of 1922) मध्ये तो नोंदवला आहे. हा शिलालेख हम्पीच्या विठ्ठलस्वामी मंदिरातील शंभर स्तंभी मंडपाच्या उत्तरेकडील भिंतीवर असल्याचे प्रकाशित नोंदीत स्पष्टपणे सांगितले आहे. त्याची तारीख शक १४३८, धातु संवत्सर, म्हणजे इ.स. १५१६–१७ अशी दिली आहे.
प्रकाशित आशयाचा मराठी अनुवाद
“शक १४३८, धातु संवत्सरात राजा कृष्णराय महाराय यांनी देव विठ्ठलदेवासाठी शंभर स्तंभांचा मंडप बांधून घेतला.”
हा छोटा शिलालेख मात्र मंदिराच्या स्थापत्य इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण येथे विशिष्ट वास्तू ‘शंभर स्तंभी मंडप’ कृष्णदेवरायांनी बांधून घेतल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे या मंडपाच्या निर्मितीला कृष्णदेवरायांच्या कारकीर्दीशी जोडण्यासाठी हा एक महत्त्वाचा प्राथमिक पुरावा ठरतो.


विठ्ठल मंदिरातील अत्यंत गंमतीदार आणि कलात्मक कल्पकतेचे उदाहरण म्हणजे बैल आणि हत्तीचे संयुक्त शिल्प.
या शिल्पात शरीराचा एक भाग बैलाचा आणि दुसरा हत्तीचा दिसतो, दोन्हींचे एकच संयुक्त मस्तक असल्याने पाहणाऱ्याला कोणता प्राणी कुठे संपतो आणि दुसरा कुठे सुरू होतो याचा भास निर्माण होतो. हे शिल्प विठ्ठल मंदिराशी संबंधित म्हणून स्वतंत्रपणे नोंदलेले आहे.
विठ्ठल मंदिरातील एक अद्भुत शिल्प म्हणजे मकर. हा पौराणिक मिश्र प्राणी हत्ती, ससा, वाघ, साप आणि मगर (किंवा मासा/मोर) या पाच प्राण्यांच्या अवयवांचे एकत्रित रूप आहे. विजयनगर काळातील शिल्पकारांनी हे शिल्प आदर्श राजाच्या गुणांचे प्रतीक म्हणून कोरले. हत्ती शक्ती आणि स्थैर्य, वाघ धैर्य, साप चातुर्य व लवचिकता, ससा सतर्कता आणि मगर नियंत्रण दर्शवतो. म्हणजेच राजाकडे हे पाच गुण एकत्र असावेत, तरच तो साम्राज्य यशस्वीपणे चालवू शकतो.असा या शिल्पाचा प्रतीकात्मक अर्थ आहे. मंदिराच्या खांब, तोरण आणि कल्पाना मंडपावर हे शिल्प दिसते आणि कोनातून पाहिल्यावर वेगवेगळे प्राणी स्पष्ट दिसतात.
विठ्ठल मंदिराच्या छतावरून पावसाचे पाणी कसे नियंत्रित केले जाते.छतावर असलेल्या छिद्रांमधून पाणी आत येते आणि नंतर खाली पडते, जणू मंदिरात मोती टपकत आहेत असल्यासारखे दिसते.तसेच बाहेरील छत चिनी पॅगोडासारखे आहे.
 याच परिसरात आणखी एक अद्भुत शिल्प आहे  पाच-इन-वन शिल्प. एकाच दगडात कोरलेल्या या शिल्पात पाच वेगवेगळ्या गोष्टी दिसतात.माकड आणि तिचे पिल्लू, शिवलिंग, हनुमान आणि इतर प्राणी किंवा आकार. कोनातून पाहिल्यावर हे सर्व रूपे स्पष्ट दिसतात, ज्यामुळे विजयनगर काळातील शिल्पकारांची कला आणि कल्पनाशक्ती दिसून येते.हे शिल्प गाईड हमखास दाखवतातच.


उत्सव मंडप हा उत्तर-पूर्व कोपऱ्यात उत्सवांसाठी बांधलेला आहे.तर १०० खांबी मंडप दक्षिण बाजूच्या प्राकारात कृष्णदेवराय कालीन (१५१६) बांधलेला आहे.पायऱ्यांवरील बालस्ट्रेड पूर्वेकडील पायऱ्यांवर हत्ती उत्तर आणि दक्षिण पायऱ्यांवर याली आहे.


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 



 

हंपीच्या दगडी वैभवात विजय विठ्ठल मंदिराचा दगडी रथ जितका प्रसिद्ध आहे, तितकेच त्याच्या आसपास उभे असलेले हे वयोवृद्ध चाफ्याचे झाडही लक्ष वेधून घेते. ते दगडी रथाच्या अगदी जवळ, मंदिराच्या आवारात आहे. या नोंदीत त्याला “Vitthala Chariot Tree” असे नाव देण्यात आले असून, मंदिर परिसरातील प्रमुख वृक्ष म्हणून त्याची नोंद आहे.
हे झाड आपल्या वाकड्या-तिकड्या, वयाने झिजलेल्या फांद्या, जाड खोड आणि सुरकुतलेल्या सालामुळे विशेष उठून दिसते. दगडी स्थापत्याच्या कठोर, करड्या पार्श्वभूमीवर त्याच्या फांद्यांची सजीव वळणे आणि चाफ्याची फुले एक वेगळाच सौंदर्यबिंदू निर्माण करतात. आम्ही त्या झाडाकडे कौतुकाने पाहत असताना त्यावर एक घुबड दिसले.घुबड हे लक्ष्मी देवीचे वाहन मानले जाते.लक्ष्मी देवी संपत्ती, समृद्धी आणि शुभतेची देवी असल्याने मंदिरातघुबड दिसणे शुभ लक्षण मानले जाते,हा योगायोग कायम मनावर कोरला गेला आहे.



विठ्ठल मंदिराच्या पश्चिमेला, तुंगभद्रा नदीच्या उजव्या तीरावर वाळूच्या दगडाच्या स्तंभांचा एक मोकळा विस्तार आहे. सोळाव्या शतकात बांधलेला हा मंडप आता पुरंदरमंडपम म्हणून ओळखला जातो . विठ्ठलाचे महान भक्त पुरंदरदास (१४८४-१५६४) यांच्या नावाने हे ओळखले जाते.पुरंदरदास हे मध्वयती आणि व्यासातीर्थ यांचे अनुयायी होते.


पुरंदरदास -विठ्ठलभक्तीचा संगीतस्वर



विजय विठ्ठल मंदिराच्या सांस्कृतिक इतिहासाशी जोडलेले सर्वात महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे 'पुरंदरदास'. सु. इ.स. १४८४–१५६४ या काळात होऊन गेलेले पुरंदरदास हे कर्नाटक संगीतपरंपरेतील अत्यंत प्रभावशाली संतकवी मानले जातात.त्यांचे जन्मनाम श्रीनिवास किंवा तिम्मप्पा नायक असे सांगितले जाते. ते सुरुवातीला संपन्न रत्नव्यापारी होते. एका प्रसंगानंतर त्यांना वैराग्य प्राप्त झाले आणि त्यांनी भक्तीचा मार्ग स्वीकारला.श्रीनिवास नायक यांनी सर्व संपत्ती त्याग केल्यानंतर पत्नी व कुटुंबासह पंढरपूरला गेले आणि तेथे सुमारे १२ वर्षे वास्तव्य केले.तेथेच त्यांनी विठ्ठलभक्तीत मग्न राहून भक्तीगीते रचली आणि गात फिरले.
नंतर एका स्वप्नात किंवा दिव्य आज्ञेने त्यांना हंपीला जाऊन व्यासतीर्थ (व्यासराय) यांच्याकडे दीक्षा घेण्याची प्रेरणा झाली. तेथे १५२५ च्या सुमारास त्यांना “पुरंदर विठ्ठल” हे नाम मिळाले.
पंढरपूराशी त्यांचा संबंध फक्त वास्तव्यापुरता मर्यादित नव्हता. त्यांच्या सर्व रचनांमध्ये 'पुरंदर विठ्ठल' हे अंकित (स्वाक्षरी) आहे, जे पंढरपूरच्या विठ्ठलाचेच आहे. पंढरपूरच्या मंदिरात एक खांब 'पुरंदरदास खांब' म्हणून ओळखला जातो, जिथे ते भक्ती करीत असत अशी आख्यायिका आहे.शेवटी ते हंपीत राहिले आणि तिथेच १५६४ मध्ये समाधिस्थ झाले. पंढरपूर हे त्यांच्या भक्तीचे आणि संगीतकार्याचे महत्त्वाचे केंद्र होते.
त्यांच्या पदांच्या शेवटी ‘पुरंदर विठ्ठल’ हे अंकित आढळते. विठ्ठल हे त्यांचे इष्टदैवत होते. त्यांनी विठ्ठलाला केवळ दुरून पूजला नाही, तर मित्र, आई, वडील आणि स्वामी अशा विविध मानवी नात्यांत अनुभवले. साध्या कन्नड भाषेत रचलेल्या त्यांच्या पदांमधून विठ्ठलभक्ती सामान्य लोकांपर्यंत पोहोचली.परंपरेनुसार ४,७५,००० रचना रचल्या. आज सुमारे १,००० ते १,२०० रचना उपलब्ध आहेत. हम्पीतील विठ्ठल मंदिराजवळील पुरंदर मंडपाशी त्यांचा संबंध जोडणारी परंपरा आहे. तेथे ते वास्तव्य करून रचना करीत असत, असे मानले जाते. या परंपरेचा उल्लेख मंदिराच्या सांस्कृतिक स्मृतीत आजही आढळतो.


कर्नाटक संगीताला पुरंदरदासांचे योगदान
पुरंदरदासांचे महत्त्व केवळ भक्तिपदांच्या रचनेपुरते मर्यादित नाही. कर्नाटक संगीताच्या शिक्षणपद्धतीला क्रमबद्ध स्वरूप देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांच्या नावाशी जोडले जाते.त्यांनी सरळी वरिसाई, जंत स्वर, अलंकार, गीते इत्यादी क्रमबद्ध सरावपद्धती विकसित केल्याचे मानले जाते. या पद्धतीमुळे संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला स्वराभ्यासापासून पुढील संगीतप्रकारांकडे क्रमशः वाटचाल करता येऊ लागली.त्यांनी लोकभाषा आणि लोकजीवनाला संगीताच्या केंद्रस्थानी आणले. त्यांच्या गीतांमध्ये सामान्य माणसाचे जीवन, भावना, भक्ती आणि सामाजिक अनुभव यांना स्थान मिळाले. भाव, राग आणि लय यांचे एकात्मीकरण हे त्यांच्या संगीताचे वैशिष्ट्य मानले जाते.यामुळे पुरंदरदासांना कर्नाटक संगीताचे ‘पितामह’' म्हटले जाते. त्यांच्या कार्यामुळे पुढील कर्नाटक संगीतपरंपरेला एक भक्कम पाया आणि स्पष्ट दिशा मिळाली, अशी परंपरागत मान्यता आहे. 
पुरंदरदास यांचे प्रसिद्ध भजन कन्नड भाषेत तर आहेतच ,पण जी भाषेच्या सीमा ओलांडून वैश्विक झालेले सध्याचे प्रसिद्ध भजन -"एलम्मा तुलसी कोमलवेणी "...यातला पुरंदर विठ्ठल राणी शब्द किती समर्पक आहे.https://www.youtube.com/watch?v=Y8ZApXcnhy4
ಕನ್ನಡ ಲಿಪಿಯಲ್ಲಿ (Kannada Script)
ಪಲ್ಲವಿ
ಏಳಮ್ಮಾ ತುಳಸಿ ಕೋಮಲವೇಣಿ
ನೀಲವರ್ಣನ ರಾಣಿ ನಿತ್ಯ ಕಲ್ಯಾಣಿ ||ಪ||
ಚರಣ ೧
ಏಳುತಲೆದ್ದು ಶ್ರೀತುಳಸಿಗೆ ಕೈಮುಗಿದು
ಏಳು ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಹಾಕುತಲಿ
ಏಳು ಜನ್ಮದ ಪಾಪ ಕಳೆವಂಥ ತಾಯೆ ನೀ ||೧||
ಚರಣ ೨
ಉಟ್ಟ ಪೀತಾಂಬರ ಹೃದಯದೊಳ್ ಕೌಸ್ತುಭ
ತೊಟ್ಟ ಮುತ್ತಿನ ಅಂಗಿ ತೋಳ ಬಾಪುರಿಯು
ಇಟ್ಟ ದ್ವಾದಶನಾಮ ನೊಸಲಲ್ಲೆ ತಿಲಕವು
ಲಕ್ಷ್ಮೀರಮಣನು ನಿನಗೊಪ್ಪಿದನಲ್ಲ ತುಳಸಿ ||೨||
ಚರಣ ೩
ಎಡದ ಕೈಯಲ್ಲಿ ಶಂಖ ಬಲದ ಕೈಯಲ್ಲಿ ಚಕ್ರ
ಎಡಬಲಕೊಪ್ಪುವ ಛತ್ರಚಾಮರವು
ಮುಡಿದ ಮಲ್ಲಿಗೆ ಹೂ ಮುಡಿಯಿಂದಲುದುರುತ
ಒಡೆಯ ಶ್ರೀ ಪುರಂದರವಿಠಲನ ರಾಣೀ ||೩||
मराठी लिपीत (Devanagari / Marathi Script)
पल्लवी
एळम्मा तुळसी कोमलवेणी
नीलवर्णन राणी नित्य कल्याणी ||प||
चरण १
एळुतलेद्दु श्रीतुळसिगे कैमुगिदु
एळु प्रदक्षिणे हाकुतलि
एळु जन्मद पाप कळेवंथ ताये नी ||१||
चरण २
उट्ट पीतांबर हृदयदोळ् कौस्तुभ
तोट्ट मुत्तिन अंगि तोळ बापुरियु
इट्ट द्वादशनाम नोसलल्ले तिलकवु
लक्ष्मीरमणनु निनगोप्पिदनल्ल तुळसि ||२||
चरण ३
एडद कैयल्लि शंख बलद कैयल्लि चक्र
एडबलकोप्पुव छत्रचामरवु
मुडिद मल्लिगे हू मुडियिंदलुदुरुत्
ओडेय श्री पुरंदरविठलन राणी ||३||

“उठ, आई तुळशी, कोमल वेणी असलेली! नीलवर्ण (श्रीविष्णू) यांची राणी, नित्य कल्याणकारिणी!”


अजून एक भजन आहे ज्याने मला वेड लावले आहे :) https://www.youtube.com/watch?v=uCCaFqRoihQ
पल्लवी
तंबूरी मीटिदव
भवाब्धि दाटिदव ||प||
अनुपल्लवी
ताळव तट्टिदव
सुररोळु सेरिदव ||अ.प||
चरण
गेज्जेय कट्टिदव
खळरेदेय मेट्टिदव
गानव पाडिदव
हरिमूरुति नोडिदव
विठ्ठलन नोडिदव
(पुरंदर) विठ्ठलन नोडिदव
वैकुंठके ओडिदव
अर्थ (मराठीत)
तंबूरी वाजवणारा (हरीदास)
भवसागरा पार झाला
ताळ ठोका ठोकणारा
देवांमध्ये सामील झाला
घुगऱ्या बांधणारा
दुष्टांच्या हृदयावर पाय ठेवणारा
गाणे गाणारा
हरीची मूर्ती पाहणारा
विठ्ठलाला पाहणारा
पुरंदर विठ्ठलाला पाहणारा
वैकुंठाकडे धावणारा (मोक्षप्राप्ती)
जो हरीदास तंबूरी वाजवतो, ताळ ठोकतो, घुगऱ्या बांधून नाचतो आणि हरीनाम गातो, तो भवसागर पार करतो, दुष्टांना जिंकतो आणि शेवटी वैकुंठाला पोहोचतो.
 
पुरंदरदास पंढरपूरला होते तेव्हा रचलेले कानडी भजन 

https://www.youtube.com/watch?v=vE5BsiBtujc
पंढरापुरवेंब दोड्ड नगर
अल्लि विठोबनेम्ब दोड्ड साहुकार ||प||
अनुपल्लवी
विठोबनिरुवदु नदीतीर
अल्लि पंढरिभजने व्यापार ||अ.प||
चरण १
तंदे नीने तायि नीने पांडुरंग
नम्म बंधु नीने बळग नीने पांडुरंग
भक्तर पोषक पांडुरंग
नम्म मुक्तिदायक पांडुरंग ||१||
चरण २
विठोबनिगे प्रिय तुळसिहार
अल्लि भक्त जनर व्यापार
विठोबनिगे प्रिय बुक्किय गंध
अल्लि चंद्रभागा स्नान बलु अंद ||२||
चरण ३
श्रीहरि विठ्ठल पांडुरंग
जय हरि विठ्ठल पांडुरंग
विठ्ठल विठ्ठल पांडुरंग
नम्म पुरंदर विठ्ठल पांडुरंग ||३||

पंढरपूर नावाचे मोठे नगर
तिथे विठोबा नावाचा मोठा सावकार -श्रीमंत
विठोबा नदीच्या तीरावर राहतो
तिथे पंढरीची भजन-व्यापार भक्तीचा व्यवसाय चालतो
तूच आमचा बाप, तूच आई, तूच नातेवाईक, तूच कुटुंब
भक्तांचा पालनकर्ता आणि मुक्तिदाता
विठोबाला तुळशीची माळ आवडते, तिथे भक्तजन जमा होतात
विठोबाला बुक्क्याचा गंध आवडतो, चंद्रभागात स्नान करणे फार सुंदर
जय श्रीहरि विठ्ठल पांडुरंग!
आमचा पुरंदर विठ्ठल पांडुरंग!

या  चंद्रचूड शिवशंकर भजनावर मी भरतनाट्यम सादर केले होते :)
चंद्रचूड शिवशंकर पार्वती रमणने
निनगे नमो नमो ||प||
अनुपल्लवी
सुंदरतर पिनाकधर हर
गंगाधर गजचर्मांबरधर
नमो नमो ||अ.प||
चरण १
नंदिवाहन आनंददिंद
मूर्जगदि मेरेव नीने
अंदु अमृत घटदिंदुदिसिद
विष तंदु भुजिसिदव नीने
कंदर्पन क्रोधदिंद कण्तेरेदु
कोंद उग्रनु नीने
इंदिरेश श्रीरामन नामव
चंददि पोगळुव नीने ||१||
चरण २
बालमृकंडन कालनु एळेवाग
पालिसिदव नीने
कालकूटवनु पानमाडिद
नीलकंठनु नीने
वालयदि कपाल पिडिदु
भिक्षे बेडो दिगंबर नीने
जाल माडिद गोपालनेंब
हेण्णिगे मरुळादव नीने ||२||
चरण ३
धरेगे दक्षिण कावेरितीर
कुंभपुरवासनु नीने
करदल्लि वीणेय नुडिसुव
नम्म उरगभूषणनु नीने
कोरललि भस्म रुद्राक्षव धरिसिद
परम वैष्णव नीने
गरुडगमन श्री पुरंदर विठ्ठलगे
प्राणप्रियनु नीने ||३||
अर्थ (थोडक्यात)
चंद्रचूड (मस्तकावर चंद्र धारण करणारा) शिव शंकर, पार्वतीरमण!
तुला नमस्कार, नमस्कार!
सुंदर पिनाक धनुष्य धारण करणारा, गंगाधर, गजचर्म परिधान करणारा
नंदी वाहन असलेला, तीन जगांत शोभणारा
समुद्रमंथनात निघालेले विष प्यायलेला (नीलकंठ)
मन्मथाचा नाश करणारा उग्र रूप
श्रीरामाच्या नामाचे गुणगान करणारा
बाल मार्कंडेयाला यमापासून वाचवणारा
कपाल घेऊन भिक्षा मागणारा दिगंबर
गोपाल (कृष्ण) याच्यावर मोहित झालेला
कावेरी तीरावरील कुंभकोणमचा वास करणारा
वीणा वाजवणारा, सर्पभूषण धारण करणारा
भस्म-रुद्राक्ष धारण करणारा परम वैष्णव
पुरंदर विठ्ठलाचा प्राणप्रिय मित्र!
ही रचना शिवाला वैष्णव दृष्टिकोनातून स्तुती करते आणि शेवटी पुरंदर विठ्ठलाशी जोडते.
विजयनगर साम्राज्याच्या भरभराटीच्या काळात हम्पी हे संगीतकार, कवी आणि विद्वानांचे महत्त्वाचे केंद्र बनले होते. संगीतशास्त्रातील विविध मतप्रवाहांमुळे संगीताच्या शिक्षण आणि सादरीकरणात एकवाक्यता निर्माण करण्याची गरज होती.या संदर्भात अच्युतरायांच्या काळात रामामात्यांनी ‘स्वरमेल कलानिधी’* हा संगीतशास्त्रीय ग्रंथ लिहिल्याचा उल्लेख आढळतो. मात्र त्याचा अपेक्षित प्रभाव पडला नाही, असे उपलब्ध मजकुरात नमूद केले आहे.या पार्श्वभूमीवर पुरंदरदासांनी संगीतशिक्षणाला व्यवहार्य आणि क्रमबद्ध पद्धत दिल्याचे मानले जाते. त्यांच्या कार्यामुळे संगीत केवळ दरबारी किंवा विद्वानांच्या वर्तुळात न राहता सामान्य लोकांपर्यंत पोहोचले.


इ.स. १५६४–६५ च्या सुमारास पुरंदरदासांचा मृत्यू झाला. त्याच काळात विजयनगर साम्राज्याच्या अस्ताची प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर पोहोचली. इ.स. १५६५ मधील तालिकोटच्या युद्धानंतर विजयनगरची राजधानी हम्पी मोठ्या विध्वंसाला सामोरी गेली.मंदिरासह हम्पीतील अनेक वास्तूंचे नुकसान झाले. विजयनगरच्या पतनानंतर अनेक कलाकार, संगीतकार आणि विद्वान दक्षिणेकडील विविध प्रदेशांत गेले. पुढे म्हैसूर आणि तंजावरसारख्या केंद्रांनी या सांस्कृतिक परंपरांना आश्रय दिला.त्यामुळे हम्पीचा राजकीय अस्त झाला असला तरी त्याच्या सांस्कृतिक परंपरा संपल्या नाहीत. त्या विविध प्रदेशांमध्ये स्थलांतरित होऊन पुढील शतकांमध्ये विकसित होत राहिल्या.

आज विजय विठ्ठल मंदिर अंशतः भग्नावस्थेत आहे. मुख्य गर्भगृहात मूळ विठ्ठलमूर्ती नाही. तरीही मंदिराची वास्तुरचना, मंडप, शिल्पे, दगडी रथ आणि संगीत स्तंभ यांमुळे हे हम्पीतील सर्वाधिक महत्त्वाच्या स्मारकांपैकी एक आहे.दगडी रथाच्या चाकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना स्थिर करण्यात आले आहे. संगीत स्तंभांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना ठोकून ध्वनी निर्माण करण्यास पर्यटकांना मनाई आहे. मंदिर परिसरात रात्री प्रकाशयोजना करण्यात आली असून, त्यामध्ये मंदिराच्या वास्तूंचे दृश्य विशेष प्रभावी दिसते.मंदिराशी संबंधित पुरंदरदास उत्सवही आयोजित केला जातो. त्यामुळे पुरंदरदासांची संगीतपरंपरा आणि विठ्ठलभक्तीची स्मृती आजही या परिसराशी जोडलेली आहे. 


राजतुला” अर्थात King’s Balance / तुलाभार /तुलापुरुषदान



राजतुला हे विजय विठ्ठल मंदिराच्या नैऋत्य दिशेला, कंपा भूपाच्या मार्गाच्या शेवटी असलेले एक वैशिष्ट्यपूर्ण दगडी स्मारक आहे. याला King’s Balance, तुलाभार किंवा तुलापुरुषदान अशी नावे आढळतात. रचनेत सुमारे १५ फूट उंचीचे दोन ग्रॅनाइटचे स्तंभ असून त्यांना वरून एक आडवा दगडी तुळई जोडते. तुळईच्या खालच्या बाजूस पूर्वी तराजू किंवा झोळी लटकवण्यासाठी तीन कड्या आहेत..
या वास्तूचा संबंध तुलापुरुषदान या दानपरंपरेशी जोडला जातो. या विधीत राजा स्वतःच्या वजनाइतके सोने, चांदी, धान्य, रत्ने किंवा इतर मौल्यवान वस्तू दान करत असे, अशी परंपरागत माहिती आहे. ग्रहण, राज्याभिषेक, दसरा किंवा इतर महत्त्वाच्या धार्मिक प्रसंगी अशा दानविधी होत असावेत.
राजतुलेच्या एका स्तंभावर राजा आणि दोन राण्यांची उठावदार प्रतिमा कोरलेली आहे. ही प्रतिमा अनेकदा कृष्णदेवराय आणि त्यांच्या दोन राण्यांचे तिरुमलादेवी व चिन्नादेवी प्रतिनिधित्व करते, असे सांगितले जाते. मात्र येथे एक महत्त्वाची ऐतिहासिक सावधगिरी आवश्यक आहे: या वास्तूवर शिलालेख नाही, त्यामुळे ती निश्चितपणे कृष्णदेवरायांनीच बांधली किंवा त्यांच्याच तुलाभारासाठी वापरली, असे पुराव्याने ठामपणे सांगता येत नाही.
यामुळे राजतुला केवळ दानविधीचे साधन म्हणून न पाहता विजयनगरच्या राजसत्तेतील धर्म, राजकीय प्रतिष्ठा आणि दानधर्म यांचा संगम दाखवणारे स्मारक म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल.विजयनगरच्या राजांनी तुलापुरुष विधी केला होता. देवराय प्रथम यांनी राजधानीत मोती तोलले. कृष्णदेवराय यांनी १५१५ मध्ये अमरावतीच्या अमरेश्वर मंदिरात स्वतःला तोलले आणि मिळालेली रक्कम त्यांच्या दोन राण्यांनी ब्राह्मणांना दान केली. अच्युतदेवराय यांनी कांचीपुरममध्ये मोत्यांसह हा विधी केला.कृष्णदेवराय यांनी तेलुगूमध्ये लिहिलेल्या ‘अमुक्तमाल्यदा’ या दीर्घकवितेत असे सूचित केले आहे की तुलापुरुष विधीतून मिळालेली देणगी सर्वांनी नव्हे, तर केवळ अत्यंत गरीब ब्राह्मणांनीच स्वीकारली होती.
त्यांचे राजकवी नंदी तिम्मन यांनी तेलुगूमध्ये ‘पारिजातापहरणम्’ लिहिले. त्यात सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात वाद होतो आणि शेवटी दोघीही आपला पती कृष्णाला तराजूत तोलतात.
आता पुन्हा आम्ही पुढच्या ठिकाणाकडे निघालो ...रॉयल एन्क्लोसर उर्फ राजवाडा 

























No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

लखनौ, प्रयागराज, वाराणसी आणि सारनाथ

उत्तर प्रदेश हे पर्यटनाच्या दृष्टीनं भारतातलं सगळ्यात प्रसिद्ध राज्य. परदेशी लोकांचा तर उत्तर प्रदेश म्हणजेच भारत असा गैरसमज झालेला दिसतो. क...