Monday, February 10, 2025

प्रभास पाटण अर्थात सोरटी सोमनाथ महत्व

http://www.misalpav.com/node/52742

 आपल्याकडे 12 ज्योर्तीलिंगांचे महत्व आहे. आसेतूहिमाचल विस्तार असलेल्या ह्या प्रचंड देशात ही बाराही ज्योतिर्लिंगे विखूरलेली आहेत. काही पोचायला सोप्या अशा ठिकाणी, काही घोर जंगलात, केदारनाथ सारखे ठिकाण तर अत्यंत दुर्गम अशा हिमालयात तर सोमनाथ हे समुद्र किनारी!
त्यापैकी सोरटी सोमनाथ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या मंदिरात जाण्याचा योग नुकताच आला. धार्मिक मान्यतेनुसार ह्या मंदिराचा क्रमांक पहिला येतो. बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा इथून सुरु करण्याची पद्धत आहे. माझा असा काही मानस नव्हता. पण त्यानिमित्ताने ह्या मंदिराविषयी थोडं वाचन केलं आणि लक्षात आलं की ह्या मंदिराचा इतिहास अत्यंत रोमांचक आहे. अनेक वेळेला संपूर्ण उध्वस्त होऊन सुद्धा आज हे मंदिर मोठ्या दिमाखात उभं आहे. कधी लूट म्हणून तर बरेचदा धार्मिक कारणांसाठी ह्या मंदिराला समूळ नष्ट करण्यात आले. तरी पण हे मंदिर प्रत्येक वेळी पुन्हा निर्माण करण्यात आले. असा इतिहास मला वाटत फक्त जेरुसलेमच्या मंदिराचा असावा.
फक्त इतिहासातच नव्हे तर पुराणात सुद्धा ह्या मंदिराविषयी फार रोचक कथा आहेत आणि त्यात सुद्धा हे मंदिर सध्या असलेल्या जागी चार वेळेस बांधण्यात आले आहे. त्यापैकी एक मंदिर खुद्द श्रीकृष्णाने बांधले आहे अशी कथा आहे.
इतिहासात पण ह्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. मुस्लिम आक्रमकांप्रमाणेच पोर्तुगीज लोकांनी सुद्धा इथे हल्ले केले होते. काही इंग्रज अधिकाऱ्यांनी इथून लुटून नेलेल्या काही गोष्टी परत मिळवण्याची भरपूर खटपट केली होती आणि ह्याविषयी चक्क इंग्लंडच्या संसदेत चर्चा झालेली आहे, असा सुद्धा एक संदर्भ आहे.
ह्या मंदिराच्या बाबतीत काही गोष्टी ह्या अद्भुत म्हणाव्या अशाच आहेत. हवेत तरंगणारे शिवलिंग असो किंवा मंदिराच्या आवारात असणारा बाणस्तंभ आणि त्यावर कोरलेला तो श्लोक ह्याबाबतीत आजदेखील प्रचंड कुतूहल आहे. उलट सुलट चर्चा होतच असते.
इतकं सगळं पाहता ह्याला फक्त मंदिर म्हणणं बरोबर नाही कारण ह्या एकाच जागेभोवती, धार्मिक, राजकीय, व्यापारी, ऐतिहासिक, कला, साहित्य अशा कित्येक गोष्टी थेट संबंधित आहेत.
ह्या सगळ्या गोष्टी आणि इतिहास एकत्र करून ह्या मंदिराविषयी थोडी माहिती लिहिण्याचा हा एक प्रयत्न असणार आहे. तो कसा वाटतोय नक्की सांगा. भेटू पुढच्या भागात! जय सोमनाथ!

पुढील भाग लवकरच प्रसिद्ध करा आणि तुम्ही काढलेल्या फोटोंबरोबरच त्यात भरपूर जुनी चित्रे/फोटो येऊ द्यात. उदाहरणार्थ भारतीय लघुचित्र शैलीतली चित्रे, इंग्रज प्रवासी चित्रकारांनी रंगवलेली आणि इंग्लंडात प्रकाशित केलेली छापाचित्रे, पुरातत्व विभागाने केलेले संशोधन आणि नकाशे, तत्संबंधी पोस्टाची तिकीटे आणि अन्य प्रकारची चित्रे.
.

.

ह्या पहिल्या भागात पाहूया प्रभास पाटण चे पौराणिक महत्व! प्रभास हे इथल्या भागाचे नाव! आणि पाटण हे गावाचं नाव. सोमनाथच्या मंदिराची इथे स्थापना होण्याच्या आधीपासून पाटणचे धार्मिक महत्व आहे. ह्याच कारण म्हणजे इथे होणारा तीन नद्याचा संगम! त्या तीन नद्या म्हणजे कपिला, हिरण आणि सरस्वती. ह्या तीन नद्याचा इथे संगम होतो आणि मग त्या समुद्रात विलीन होतात त्यामुळे ह्या क्षेत्राचं महत्व मोठे आहे.

मग येते मुख्य कथा! भारतीय पुराणांची काही वैशिष्ट्ये आहेत. निसर्गातल्या गोष्टींना पुराणात खूप सुंदर पद्धतीने वेगवेगळ्या कथामध्ये गुंफले आहे. त्यात काही देव आणि देवता हे वारंवार येतात. त्यात मुख्यत्वे आहेत इंद्र आणि चंद्र!

सोमनाथ इथल्या कथेचा नायक आहे चंद्र. चंद्राला एकूण 27 बायका होत्या (तो देव आहे, त्यामुळे शक्य आहे). ह्या सगळ्या जणी म्हणजे नक्षत्रासारख्या होत्या, खरं म्हणजे नक्षत्रच. तर त्यांचे वडील म्हणजे दक्ष राजा ह्यांनी लग्न लावताना असं वचन घेतलं होतं की चंद्र ह्या सगळ्यांवर सारखंच प्रेम करेल, दुजाभाव (इथे हा शब्द वापरता येईल की नाही, शंकाच आहे). करणार नाही. पण असं काही झालं नाही. लग्नानंतर चंद्राच प्रेम फक्त रोहिणी वर दिसायला लागलं. बाकी 26 झाल्या नावडत्या! मग काय त्या गेल्या पित्याकडे आणि केली तक्रार नवऱ्याची. संख्याबळ जास्त असल्यामुळे दक्ष राजाला दखल घ्यावीच लागली. त्याने जावयाला समजावून सांगितलं, वचनाची आठवण करून दिली पण काही उपयोग झाला नाही. शेवटी व्हायचं तेच झालं. सासऱ्याने जावयाला शाप दिला की तुझी ओळख, तुझं वैशिष्ट्य असलेलं तुझं हे तेज नष्ट होऊन जाईल!

हा शाप भयंकरच होता. पण शब्द निघून गेले होते. चंद्राचे डोळे खाडकन उघडले. आता काय? चंद्र गेला ब्रम्ह देवाकडे. ब्रम्हदेव एकदम हुशार, ते काही ह्या सासरा जावयाच्या भानगडीत पडले नाही आणि त्यांनी ही तक्रार redirect केली महादेवाकडे. पण चंद्राला काहीतरी धीर द्यावा म्हणून सांगितलं की बाबा एक काम कर, पाटणला जा, तिथं सरस्वती नदी आहे त्यात स्नान कर आणि महादेवाला शरण जा. चंद्राने पडत्या फळाची आज्ञा प्रमाण ह्या न्यायाने लगेच सांगितलं तसं केलं. आता तसं बघायला गेलं तर हे दोघे साडू. त्यामुळे महादेवाला लक्ष घालावंच लागलं. त्यांनी सगळी स्टोरी ऐकली आणि लई भारी सॉल्यूशन दिलं. ते म्हणाले शाप तर काही reverse घेता येणार नाही पण त्याला sub clause जोडतो. एकदा नष्ट झाल्यावर तुला तुझं तेज हळूहळू परत मिळेल. एकदा सगळं तेज परत मिळालं की सासरेबुवाचा शाप परत activate होईल आणि हे चक्र असंच चालू राहील. हे एकदम भारी झालं. चंद्राला धडा मिळाला, सासरेबुवाचा मान अबाधित राहिला, मेव्हण्या पण खुश आणि निसर्गाचा समतोल पण साधला. सगळी win-win situation!

ह्यानंतर मात्र चंद्राने खुश होऊन महादेवाचं सुंदर असं देऊळ सोन्यात बांधलं. महादेवाने सोमनाथ असं नाव धारण करून तिथेच राहण्याचा वर दिला. चंद्राला त्याच तेज इथे परत मिळालं म्हणून त्या क्षेत्राला प्रभास असं नाव पडलं.

इथून पुढे ह्या सगळ्या क्षेत्राचं महत्व वाढतच गेलं. श्रीकृष्णाच्या आयुष्यात असणारी स्यमंतक मण्याची गोष्ट सुद्धा इथेच घडली. जांबुवंतासोबत इथेच ती प्रसिद्ध fight होऊन सत्यभामेशी लग्न झालं. मुख्य म्हणजे चंद्राप्रमाणेच श्रीकृष्णाला सुद्धा दोष मुक्ती सोमनाथानेच दिली. श्रीकृष्णाची अवतार समाप्ती ह्याच ठिकाणी झाली आहे. मंदिरापासून जवळच असणाऱ्या भालका तीर्थ इथे पारध्याचा बाण लागून श्रीकृष्णाच्या नर देहाची इथे सांगता झाली.

चंद्रानंतर रावणाने हे मंदिर चांदीत बांधले होते आणि त्यानंतर श्रीकृष्णाने सुंदर असं लाकडी मंदिर बांधलं होतं.

वचनाला जागत सोमनाथ इथे राहून त्यांच्या भक्तांना दोषमुक्त करतात. ह्या स्थानाचं महत्व इतकं जास्त आहे की, सोमनाथच्या दर्शनमात्रे दोषमुक्ती मिळते, वेगळं काहीही करायची आवश्यकता नाही.

अशी ही सोमनाथ क्षेत्राची कहाणी सुफळ संपूर्ण!


सुरुवात चांगली पण लेख अगदी त्रोटक झाला आहे, लेखनात जास्त कंटेंट आणि छायाचित्रे आणून लेख समृद्ध करता येईल.
बाकी पाटण हा शब्द मूळच्या पट्टण ह्या संस्कृत शब्दावरून आलाय. त्याचा अर्थ म्हणजे व्यापारी केंद्र असलेले शहर. सर्वसाधारणपणे किनारपट्टीनजीक असलेल्या व्यापारी केंद्रांना पट्टण ही जोडणी देण्याची पद्धत होती.


प्रसिद्ध संस्कृत कवी हरिवंश ह्याने अकबर प्रशस्ती रचली होती.

अखिलं भुवनं याति यस्य शासनमण्डले।
स विष्णुरिव धर्मात्मा कालौ अकबरनामकः॥

ज्याच्या शासनाचा प्रभाव संपूर्ण जगावर आहे, तोच धर्मात्मा अकबर या कलियुगातील विष्णूसमान राजा आहे.

ह्याशिवाय बिरबल आणि इतर काही हिंदू कविंनी सुद्धा अकबराला परमेश्वरासमान मानले आहे.

जहांगीराला त्याचे हिंदू मनसबदार इंद्राचा अवतार मानत. अगदी आपल्याकडील मराठी वतनदारांचीही मोंगल सम्राटांना देव किंवा देवासमान मानली गेल्याचे उल्लेख असलेली काही पत्रे आहेत पण त्यांचे संदर्भ मजकडे नाहीत.

सत्तेपुढे जनतेचे शहाणपण चालत नाही हेच खरे.




































No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...