येथून निघाल्यावर रूम शोधणे सुरु झाले. दोन दिवस सलग सुटी असल्याने बहुतेक हॉटेल भरलेली होती. थोडयाफार रूम खाली होत्या तेही चढे दर सांगत होते. पूर्वी गविंच्या एका प्रतिसादात प्रकृती रिसॉर्टचे नाव वाचल्याचे आठवत होते तेथे पोहचलो. रिसॉर्टचे दरपत्रक पाहून भर दुपारच्या उन्हात आम्ही गार पडलो. चार जणांसाठी रूमचा दर होता जवळपास रु.४० हजार. असे असूनही रिसॉर्ट पूर्ण भरलेले होते. यांचेकडे कोणतीच रूम शिल्लक नसल्याचे कळल्यावर जावयांना उत्साह संचारला. काहीही करून एखाद्या रूमची व्यवस्था कराच असे सांगू लागले. शेवटी रूम मिळतच नाही म्हटल्यावर नाईलाज झाल्यासारखे दाखवत आम्ही परत फिरलो. चार वाजायला आले होते. आता सरळ बीचवर जाऊन रात्री मुक्कामी आपल्या घरीच जावे असाही विचार मनात येऊ लागला. प्रकृती रिसॉर्टच्या थोडे पुढे मुख्य रस्त्यालाच एक रिसॉर्ट दिसले.
चौकशी केल्यावर एसी रूमचा तीन हजार असा दर मिळाला. घासाघीस करून पाच हजारात
दोन रूम ताब्यात घेतल्या. थोडा आराम करून बीचवर गेलो. आज फक्त भिजायचे.
फोटो काढायचेच नाहीत असे ठरवून फक्त एक फोन सोबत घेतला व बाकी सगळ्या
इलेकट्रोनिक वस्तू रूमवरच ठेवल्या. किनारा माणसांनी फुलून गेला होता. .
ऍडव्हेंचर स्पोर्ट्सवाल्यांची चांगलीच चलती होती. सूर्यास्त पाहून व
पाण्यात यथेच्छ मजा करून रूमवर परत आलो. नऊच्या दरम्यान जेवणासाठी बाहेर
पडलो. दुपारी जेवलो तेथेच जायचे ठरले. अंधार पडला होता आणि भूकही लागली
होती त्यामुळे आता हेच अंतर खूप जास्त वाटत होते. येथे पोहचलो आणि गर्दी
बघूनच कळले कि यांचे चायनीज जेवण खरोखरच चांगले असणार आहे. ऑर्डर दिली. वेळ
लागणार होता. मधल्या वेळात सासरा-जावयानेआडोशाला एका टेबलवर आपली सोय करून
घेतली.
यथील एक स्पेशल डिश, पॅकिंग फ्राईड राईस
पॅकिंग चिकन फ्राईड राईस, चिकन क्रिस्पी, चिकन चिली व माझ्यासाठी व्हेज
फ्राईड राईस सर्व मिळून बिल झालं रु.५६०/- फक्त! अकरा वाजले. रूमवर
जाण्यासाठी निघालो. दोन्ही मुली कामचलाऊ गाडी चालवतात त्यामुळे ह्यांची व
जावयांची ड्रिंक अँड ड्राइव्हच्या त्रासातून मुक्तता होते. वाटेत थांबून
आइस्क्रीमचा आनंद घेतला. रिसॉर्टला येऊन बऱ्याच वेळ आवारातच गप्पा मारून
झोपायला गेलो.
सकाळी आरामात उठलो. नाश्ता करून बाहेर पडलो. येथील नाश्ता म्हणजे
पोहे/उपमा. नाश्ता रु.३०/- एका प्लेटचे, चहा २० रुपये. खूप छान आणि स्वस्त.
थोडे रिसॉर्टविषयी : मुख्य रस्त्यालाच लागून दोन मजली इमारत आहे पुढे,
पार्किंगसाठी जागा, बाग, लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था, पाठीमागे
स्विमिंग पूल व आमराई (पूल काही कारणाने बंद होता. आंब्याची झाडे अजून
लहान आहेत). एक विशेष वाटले इतकी चांगली व्यवस्था असून व आजूबाजूचे
रिसॉर्ट गजबजलेले असताना या रिसॉर्टमध्ये आमच्या व्यतिरिक्त कुणीही
नव्हते. जणूकाही संपूर्ण रिसॉर्ट आमच्यासाठीच राखीव होते. रिसॉर्टच्या
मालकांनी यदाकदाचित हा लेख वाचला तर माझे सांगणे आहे की व्यवस्थापनात
कुठेतरी सुधारणा आवश्यक आहे. (मालक मराठी माणूस व पुण्याचा आहे असे कळते).
रिसॉर्टचे प्रवेश द्वार ते मागील स्विमिंग पूल पर्यंतचा १८० अशांतला पॅनोरॅमिक व्ह्यू
येथील इतर काही फोटो
रिसॉर्ट सोडले व बीचवर गेलो. आज बीचवर थोडासा फेरफटका मारून काल फोटो काढले नव्हते त्याची भरपाई करून घेतली.
‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीच्या उगमपासूनचा सह्याद्रीला लागून असलेला पाली परिसर पाहिला. आजच्या भागात पाहू या कुंडलिका नदी सागराला मिळते तेथून उत्तरेकडे असलेला पर्यटकांचा आवडता अलिबाग परिसर.
कुलाबा /सर्जेकोट किल्ला : अलिबागच्या सागरकिनाऱ्यावर उभे राहिल्यावर समुद्रात एका प्रचंड खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही जलदुर्गजोडी दिसते. ती ३५० वर्षे सागराच्या लाटा अंगावर घेत उभी आहे. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूंनी पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो, तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भुईकोट बनतो. हा दुर्ग ज्या खडकावर उभा आहे, त्याची दक्षिणोत्तर लांबी २६७ मीटर असून, पूर्व-पश्चिम रुंदी १०९ मीटर आहे. शिवाजी महाराजांनी मोक्याच्या बेटांवर किल्ले बांधले व जुने बळकट केले. त्यापैकी कुलाबा किल्ला खूप महत्त्वाचा. कारण तो मुंबईच्या समोर आहे. इंग्रज व इतर पाश्चात्य आक्रमकांवर वचक ठेवण्यासाठी किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिद्धीस आला.
कनकेश्वर निसर्गाचा एक अध्यात्मिक अविष्कार
पेण हुन अलिबाग कडे जाताना उजवीकडे वडखळ सोडल्यावर एक डोंगररांग दिसायला लागते. त्यातल्या एका डोंगरावर 2 मनोरे दिसतात तो आहे कनकेश्वर चा डोंगर. सुमारे 700 पायऱ्या असलेला हा डोंगर चढून जाताना आपल्याला खूप सुंदर निसर्ग दाखवतो पण तो 12 च्या उन्हात कसा दिसेल हा विचार करत आम्ही चढत होतो. सारखा दम लागत होता पण देवाचे बोलावणे आले की सगळे फिके पडते, इथे देवाचे बोलावणे म्हणजे वेगळ्या अर्थाने घ्यावे. तर देवाच्या मनात असले की तो आपल्याला त्रास होऊ देत नाहीत त्याचा प्रत्यय आम्हाला आला. पायर्यांच्या बाजूला चांगली सावली आहे त्यामुळे थकवा भरून निघतो आणि त्यात सूर्य डोक्यावर असताना खांदेरी उंदेरी कडून येणारा सुसाट वाराच आम्हाला वर घेऊन गेला. प्रत्येक थांब्यावर वारा आम्हाला सुख देत होता आणि आम्ही कधी कनकेश्वर पर्यंत पोचलो लक्षात आलं ही नाही.
दिवेआगारला""पाटील मेस / खाणावळ" आहे, छान मिळतं तिथे जेवण. नक्की जेवा त्यांच्याकडे.
राहण्याची ठिकाणांची काही माहिती. फक्त संपर्क क्रमांक आहेत
, ही माहिती मला माझ्या कंपनीतील सहकार्यांकडून मिळाली आहे.
Diveagar Stay
Anand Kelkar: 0214724242
Mauli Resort: 9969383433, 9324485569, 2147225015, 2147225225
Ramesh Awlaskar: 214724707
Suhas Bapat: 21472243777
Uday Bapat: 214724235
-
Panthasta Prangan - Pure VEG - 08087660965, 07588681403
पेण, पनवेल, उरण, घारापुरी...
कर्नाळा किल्ला : किल्ल्यामध्ये दिसून येणाऱ्या टाक्यांवरून हा किल्ला सातवाहनकालीन असावा असे वाटते; मात्र याचा उल्लेख यादवकाळात आढळतो. किल्ल्याचे क्षेत्रफळ खूपच लहान आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार पडक्या स्थितीत आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे. समोर एका मोठ्या वाड्याचे अवशेष आहेत. वाड्याच्या जवळ शंकराची पिंड आहे. समोरच सुळका आहे. सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आणि धान्य कोठारे आहेत. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हा सुळका प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६५७मध्ये हा किल्ला घेतला. कर्नाळा अभयारण्याच्या परिसरातच हा किल्ला आहे. त्यामुळे किल्ला व अभयारण्य या दोन्ही गोष्टी पाहून होतात. अंगठ्यासारख्या दिसणाऱ्या आकारामुळे याचे वेगळेपण जाणवते. करणाई देवी मंदिर, तटबंदीचे जुने बांधकाम व थंड पाण्याच्या टाक्या अद्यापही पाहण्यास मिळतात. बोरघाटावर नजर ठेवण्यासाठी याची निर्मिती झाली. वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा अनंतराव कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. दोन-तीन दिवस किल्ला लढवून अगतिक झाल्यावरच त्यांनी किल्ला १८१८मध्ये इंग्रजांच्या स्वाधीन केला.
कर्नाळा अभयारण्य : येथे वर्षभरात हंगामाप्रमाणे सुमारे १२५-१५० जातीचे पक्षी आढळतात. सुमारे १२ चौरस किलोमीटर परिसरात पक्षी अभयारण्य उभारले आहे. हे अभयारण्य पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर, पाताळगंगेच्या खोऱ्यात आपटे-कल्हाया व रानसई-चिंचवण गावांच्या पंचक्रोशीत वसलेले आहे. या ठिकाणी केव्हाही गेले तरी पाचपन्नास निरनिराळे पक्षी पहायला मिळतात. यात मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी ससाणा, शहाबाज, मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फ्लायकॅचर, भोरड्या, तांबट, कोतवाल, पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ, शाही ससाणा, टिटवी, बगळे असे अनेक पक्षी आढळतात. पक्ष्यांव्यतिरिक्त भेकरे, रानमांजरे, माकडे, ससे इत्यादी प्राणीही आढळतात. जंगल परिसरात विविध औषधी वनस्पती आहेत. तळातील भागात दिंडा, वावडिंग, कारवी अशी झुडपे आहेत. मध्य भागात पांगारा, बहावा, ताम्हण, यांचे प्रमाण जास्त आहे, तर उंचावरच्या भागात जांभूळ, साग, आंबा, आईन हे वृक्ष आढळतात. कर्नाळा किल्लाही याच परिसरात आहे.
न्हावा शेवा बंदर (JNPT) : न्हावा शेवा हे‘जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) म्हणूनही ओळखले जाते. मुंबई बंदरावरील बोजा कमी करण्यासाठी, तसेच रेल्वेने मुंबईमधून इतरत्र वाहतूक करणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागल्याने हा प्रकल्प उभारला गेला. जगातील अत्याधुनिक बंदरांमध्ये याचा समावेश होतो. न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी) म्हणून प्रसिद्ध आहे. अरबी समुद्रावरील हे बंदर ठाणे खाडीतील न्हावा व शेवा या दोन गावांमधील जमिनीत घुसलेल्या समुद्राच्या पाण्यावर उभे केले आहे. आपल्याला घारापुरी बेटावरूनही हे बंदर दिसते. कोणत्याही बंदराला भेट देणे खूप आनंददायी असते. बोटीवर कंटेनर चढविले आणि उतरविले जात असतात, ते काम पाहण्यात खूप मजा येते. अजस्र क्रेन, कंटेनर्स उचलून बाजूला ठेवणारी अवजड मशिनरी यांचे काम तोंडात बोट घालायला लावते. बंदराच्या बाहेर कंटेनर वाहतूक करणारे हजारो मोठे ट्रक्स उभे असतात.
द्रोणागिरी किल्ला : हा किल्ला उरण शहराजवळ असलेल्या एका टेकडीवर आहे. बहुधा यादव काळात याची उभारणी झाली असावी. उरण आणि करंजाच्या जवळ असल्याने हा किल्ला जुन्या काळापासून धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण होता. संपूर्ण टेकडी जंगलाने झाकलेली आहे. किल्ला देवगिरीच्या यादवच्या राजवटीखाली होता. १५३०मध्ये पोर्तुगीजांनी किल्ला दुरुस्त केला. १५३५मध्ये फादर एंटोनो-डी-पोर्टोने येथे तीन चर्चेस बांधली.
पिरवाडी बीच : रायगड जिल्ह्यातील उरण परिसरातील हा सुंदर सागरकिनारा असून, येथून सूर्यास्ताचे सुंदर दर्शन होते.
माणकेश्वर बीच : पिरवाडी बीचच्या उत्तरेला जवळच हा सुंदर सागरकिनारा आहे.
जसखार : उरणजवळ न्हावा शेवा परिसरात हे ठिकाण असून, येथे रत्नेश्वरी देवीचे सुंदर मंदिर आहे. उरण तालुक्यातील हे जागृत देवस्थान आहे. हे मंदिर उरण तालुक्यातील जसखार या गावामध्ये उरण शहरापासून मुख्यत्वेकरून दोन किलोमीटर अंतरावर स्थित आहे. या मंदिरामध्ये दर वर्षी चैत्रकलाष्टमीला देवीची यात्रा भरविण्यात येते.
घारापुरीची लेणी : ही लेणी उरण तालुक्यात आहेत. परंतु सध्या मुंबईहून गेट वे ऑफ इंडियापासून प्रवासी बोटी निघतात. त्याला साधारण एक ते दीड तास लागतो; पण पनवेल भागातूनही हे ठिकाण जवळ आहे. घारापुरी बेटाचे क्षेत्रफळ समुद्राच्या भरतीच्या वेळी सुमारे १० चौरस किलोमीटर आणि ओहोटीच्या वेळी १६ चौरस किलोमीटर असते. बेटावरच दक्षिणेस घारापुरी नावाचे छोटेसे गाव आहे. या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते. कोकणातील मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानी असावी. त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव नि मुघल यांनी तिथे क्रमाने आपली सत्ता प्रस्थापित केली. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले. शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केले. सन १७७४मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापन केले. १९८७ साली या लेण्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला.
समुद्रात थोडेसे आत गेल्यानंतर सी-गल पक्ष्यांचे अनेक थवे बोटीवर घिरट्या घालायला लागतात. हे पक्षी फेकलेले अन्नपदार्थ लीलया हवेतच उचलतात. सध्या तरी मुंबईमार्गे जाणे सोईस्कर आहे; मात्र लवकरच उरण येथून पर्यटकांसाठी व घारापुरीतील लोकांसाठी मोरा बंदर ते घारापुरी बोटसेवेचा प्रस्ताव विचाराधीन आहे. (घारापुरी लेण्यांबद्दल सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
कुंडलिका नदीच्या खाडीच्या मुखावर ही अतिशय मोक्याची जागा पोर्तुगीजांनी काबीज केली. या ठिकाणापासून खाडीमार्गाने कोलाडपर्यंत जाता येत असल्याने संभाजी महाराजांच्या वेळी मराठ्यांनीही या ठिकाणी हल्ला केला होता; पण तो यशस्वी झाला आंही. २५ नोव्हेंबर १७४० रोजी झालेल्या तहानुसार पोर्तुगीजांनी साष्टीतील गावांच्या बदल्यात रेवदंडा व कोर्लईचा ताबा मराठ्यांना दिला. या किल्ल्यावर पूर्वी पोर्तुगीज आरमाराचा रखवालदा नावाचा सात मजली मीनार होता त्यापैकी चार शिल्लक आहेत.
किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पोर्तुगीजांचे राजचिन्ह कोरलेले आहे. या मनोऱ्याच्या पायथ्याशी तोफा पडलेल्या दिसून येतात. चर्चचे अवशेष, घरांची, वाड्यांची जोती शिल्लक आहेत. प्रवेशद्वाराच्या आत अजून एक दार आहे. त्याच्या पुढे तीन मोठे दगडी गोळे पडलेले आहेत. किल्ल्याच्या तटाखालून भुयारे आहेत; पण सध्या ती बंद केली आहेत. किल्ल्याच्या तटबंदीला लागूनच रेवदंडा बीच आहे.
चौल : चौल आणि रेवदंडा ही जोडगावे आहेत. या गावाचा इतिहास दोन हजार वर्षे जुना आहे. हे सातवाहन काळातील बंदर होते. या दोन्ही स्थळांची पौराणिक नावे चंपावती-रेवती! चंपक म्हणजे चाफा. चौल चंपावती म्हणून ओळखले जायचे. आजही येथे चाफ्याची झाडे दाखविली जातात; पण काहींच्या मते येथे चंपा नावाची मासे पकडण्याची जाळी वापरली जातात, म्हणून चंपा ही ओळख, तर काहींच्या मते चंपा नावाच्या राजावरून हे चंपावती नाव पडले. या पौराणिक नावांशिवाय चेमूल, तिमूल, सिमूल, सेमुल्ल, सिबोर, चिमोलो, सैमूर, जयमूर, चेमुली, चिवील, शिऊल, चिवल, खौल, चावोल, चौले आणि चौल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे. एवढी नावे असलेले हे कदाचित एकमात्र गाव असावे. चौल नारळी-पोफळीच्या झाडीत दडलेले अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. अलीकडील इतिहासाप्रमाणे सन १५१६मध्ये अहमदनगरच्या राजा बुरहान याने पोर्तुगीजांना येथे एक कारखाना तयार करण्यास आणि बंदर बांधण्यास परवानगी दिली. येथे घोडे आयात करून ठेवले जात व त्यांचा व्यापारही होत असे.
कर्जत, पनवेल, माथेरान परिसर...
नेरळ-माथेरान रेल्वे : ही आबालवृद्धांची आवडती रेल्वे आहे. नेरळ ते माथेरान दरम्यानचे २१ किलोमीटर अंतर सुमारे दोन तास २० मिनिटांमध्ये पार करताना एक विलक्षण आनंद मिळतो. सह्याद्रीच्या डोंगरातील वळणे, बोगदे ही छोटी गाडी पार करत असताना वेगळाच अनुभव येतो. इ. स. १९०१मध्ये ब्रिटिश राजवटीदरम्यान प्रसिद्ध उद्योगपती सर आदमजी पीरभॉय यांनी १६ लाख रुपये खर्च करून ही रेल्वे बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मुलगा अब्दुल हुसेन आदमजी पीरभॉय याने १९०७ साली नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे बांधकाम पूर्ण केले. आता ती भारतीय रेल्वेखात्याच्या अखत्यारीत आहे.
शार्लोट लेक : माथेरानला पाणीपुरवठा करणारा हा तलाव ब्रिटिश राजवटीतच बांधला गेला. पावसाळ्यात पडणाऱ्या प्रचंड पावसाचे पाणी अडवून हा तलाव तयार करण्यात आला आहे. हा तलाव गर्द हिरव्या झाडीत असल्याने याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. तलावाच्या जवळच माथेरान-इको पॉइंट आणि लुईसा पॉइंट आहेत. पावसाळ्यात तलाव भरून वाहू लागल्यावर धबधबा वाहू लागतो. त्याचा आवाज आसमंतात घुमत असतो. पर्यटक हे पावसाळी सौंदर्य टिपण्यासाठी येथे येतात.
किल्ले पन्हाळघर : रायगडाकडे जाणाऱ्या वाटेवर नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जात असावा. किल्ल्याला फारसा इतिहास नाही. ४५० फूट उंचीच्या लहान डोंगरावर हा किल्ला आहे. रायगडच्या संरक्षक शृंखलेतील हा एक किल्ला आहे. पुण्याचे इतिहास संशोधक सचिन जोशी यांनी केलेल्या संशोधनामुळे हा गड प्रकाशात आला. गडावर तटबंदी शिल्लक नाही. तसेच काही इमारतींचे अवशेष दिसून येतात.
इरशाळगड : याला किल्ला म्हणण्यापेक्षा शिखर म्हटले तर वावगे ठरणार नाही. ३७०० फूट उंचीचा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील समजला जातो. इतिहासातही किल्ल्याचा फारसा उल्लेख नाही. मे १६६६मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी-रायरीपर्यंतचा सारा मुलूख घेतला. तेव्हा त्यात हा गडदेखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. गडावरील माचीपासून गडावर जाताना वाटेतच पाण्याचे एक टाके लागते. अशी अनेक टाकी बघण्यास मिळतात. समोरच प्रबळगड, माथेरान, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसतो. हा ट्रेकर्सचा मानबिंदू आहे. ट्रेकर्सच्या दृष्टीने हा अत्यंत कठीण समजला जातो. गिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्राची माहिती आणि गाइड असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे. २३ जानेवारी १९७२ रोजी याच सुळक्यावर एक दुःखद घटना घडली. कुमार प्रकाश दुर्वे याचा किल्ल्यावरून पडून दुःखद अंत झाला. त्याच्या स्मरणार्थ दर वर्षी २६ जानेवारीला मुंबई-ठाण्याचे गिर्यारोहक येथे जमतात.
कोंडाणे बौद्धलेणी : इ. स. पूर्व २०० म्हणजे २२०० वर्षांपूर्वीची ही लेणी म्हणजे भारताच्या गौरवशाली कला व विचार परंपरेच्या साक्षीदार आहेत. कातळात काढलेली लेणी व त्यामधील कोरीव काम थक्क करणारे आहे. सन १८३०मध्ये विष्णू शास्त्री यांनी ही लेणी प्रथम पाहिली. त्यानंतर ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन ब्रिटिश जिल्हाधिकारी मिस्टर लॉ यांनी येथे भेट दिली. बौद्ध साधकांना चिंतनासाठी अशी निर्जन स्थळी निर्माण केलेली अनेक लेणी महाराष्ट्रात आहेत. साधारण सातवाहन राजवटीत यांची निर्मिती झाली. पुरातन बोरघाटमार्गे जाणाऱ्या मार्गावरच ही लेणी आहेत. जंगलाने वेढलेली ही लेणी निसर्गाचे लेणे अंगावर घेतल्यासारखी दिसतात.
चैत्यगृह : या लेण्यातील जे चैत्यगृह आहे, त्याच्या दर्शनी भागावरील वातायान हे पिंपळपानाच्या आकारात असून, छत हे गजपृष्ठाकार आहे. या चैत्यगृहाची लांबी २२ मीटर असून, ते आठ मीटर रुंद व ८.५ मीटर उंच आहे. स्तूपाचा परीघ हा २.९ मीटर आहे. सध्या स्तूप क्षतिग्रस्त अवस्थेत आहे. जवळपास दोन हजार वर्षे जुनी सागवान लाकडाची कमान आजही आपणास पाहायला मिळते. चैत्याला स्तंभाचे वलय होते. यातील स्तंभ अष्टकोनी असून, स्तंभावर चिन्हे अंकित आहेत. आज ते भग्नावस्थेत पडलेले आहेत. चैत्याच्या दर्शनी भागावर वेदिका पट्ट्यांचे नक्षीकाम आहे. तसेच छज्जे आपणास पाहायला मिळतात. सुंदर असे युगलपटदेखील येथे आहेत. या युगलपटातील पुरुष हे योद्धे असावेत. कारण त्यांच्या हातात शस्त्रे पाहायला मिळतात. त्याच्या खाली वेदिका पट्टी व चैत्य कमानीचे शिल्प प्रत्येक छज्जावर कोरलेले दिसते.
कोथलीगड : हा पेठकिल्ला म्हणूनही ओळखला जातो. नेरळच्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी मोठी गुहा आहे. गुहेमधून दगडातून कोरून काढलेला एक जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्याच्या आकाराचे बांधकाम केलेले आहे. या नरसाळ्यालाच कोथळीगड असे म्हणतात. कर्जत-मुरबाड रस्त्यावर कर्जतच्या पूर्वेसच हा किल्ला आहे. या छोटेखानी किल्ल्यावर शिवकाळामध्ये शस्त्रागार होते. तसेच याचा उपयोग टेहळणीसाठीही होत असावा. येथील निसर्गसौंदर्य ट्रेकर्सना मोहात टाकते. येथे कातळाचे शिखर व गुहापण आहे.
आंबिवली बौद्धगुंफा : कोथळीगडाच्या पायथ्यातच आंबिवली बौद्धगुंफा आहेत. येथे पाण्याच्या टाक्या, १२ विहार आहेत. ब्राह्मी लिपीतील एक शिलालेखही आहे. ही लेणी कोथळीगडाबरोबरच बघता येतात. आवर्जून बघावीत अशी ही लेणी आहेत.
प्रबळगड : पनवेलच्या पूर्वेस खालापूर तालुक्यात हा किल्ला आहे. माथेरानच्या पश्चिमेस समुद्रसपाटीपासून २३२५ फूट उंचीवर हा किल्ला आहे. मुघलांकडून हा किल्ला ताब्यात घेतल्यावर खजिना मिळाला असे म्हणतात. सन १८१८मध्ये येथील तटबंदी व बुरुज ढासळले आहेत. आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी काही काळ येथे आश्रय घेतला होता. किल्ल्यावर काही इमारतींचे जोते आढळून येते.
बल्लाळेश्वर, वरदविनायक, बौद्धलेणी आणि बरेच काही...
पालीचा श्री बल्लाळेश्वर : अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे, की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) ओळखला जातो. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. पालीचा गणपती हा अष्टविनायकांच्या परिक्रमेतील आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. सूर्य उगवतो, तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूंना दोन तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. गणेशाचे कपाळ विशाल असून, डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून, ती चिमाजीअप्पांनी अर्पण केली आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरे येथील गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे. ठाणाळे व खडसांबळे ही बौद्ध लेणीही याच परिसरात आहेत. नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले.
पौराणिक कथेनुसार, विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगू ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख मुद्गल पुराणात आहे. कृत युगात येथे पल्लीपूर नावाचे नगर होते. तेव्हा तेथे कल्याण नावाचा वैश्यवाणी राहत असे. या कुटुंबात बल्लाळ नावाचा सुपुत्र झाला. बल्लाळ लहानपणापासूनच ध्यानधारणा व गणेशचिंतनात मग्न असे. अध्ययन व व्यापार न करता बल्लाळ भक्तिमार्गाला लागला व इतर सवंगड्यांनाही तेच करायला लावीत असे. म्हणून कल्याणशेठजींनी बल्लाळचा गणपती दूर फेकून दिला आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले. नंतर बल्लाळने ‘घरी जाणार नाही येथेच तुला देह अर्पण करीन’ अशा दृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. त्याचा भक्तिभाव पाहून श्री गजाननाने विप्र रूपात प्रकट होऊन बल्लाळला बंधनातून मुक्त केले व त्याला वर दिला. बल्लाळाने विनायकाला विनंती केली, की आपण येथे कायमचे वास्तव्य करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. तो वर बल्लाळाला देऊन श्री गजाननाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. बल्लाळविनायक या नावाने श्रीगणेश येथील शिळेमध्ये अंतर्धान पावले. तीच ही बल्लाळेश्वराची मूर्ती आहे.
येथे ३० ते ४८ इतक्या मोठ्या संख्येने लेणी असावीत, असा संशोधकांचा कयास आहे. लेणी किती होती याबाबतीत अनेक मते आहेत. ही सर्व लेणी एकाच दगडात कोरलेली आहेत. हा दगड थोडा ठिसूळ असल्याने लेणी क्षतिग्रस्त झाली आहेत. लेण्यांच्या मुख्य चैत्यगृहाच्या बाजूला १७ भिक्खूंची निवासस्थाने आहेत. आज ती भग्न असली, तरी त्यांचे पूर्वीचे सौंदर्य मात्र अप्रतिम होते. डोंगरातून येणारा पाण्याचा प्रवाह स्तूपाच्या मागून काढून तो पाण्याच्या टाक्यात घेऊन जाणारी योजना आजच्या घडीलाही आश्चर्यकारक आहे. अशा अनेक तांत्रिक गोष्टी अभ्यासकांना माहिती करून घेता येतील.
ठाणाळे /नाडसूर लेणी : पालीच्या गणपतीजवळ एका निसर्गरम्य ठिकाणी ही बौद्ध लेणी आहेत. तैलबैला ते मांदाड या जुन्या व्यापारी मार्गावर वाघजाई घाटावर ठाणाळे लेणी वसली आहेत. सह्याद्रीच्या पश्चिम उतरंडीवर ही लेणी एक हजार फूट उंचीवर आहेत. ठाणाळे गावापासून लेण्यांपर्यंत पायवाट आहे. सोबत वाटाड्या हवाच. हा लेणीसमूह सर्वप्रथम मराठी मिशन, मुंबई यांनी इ. स. १८९०मधील जानेवारी महिन्यात जाऊन पाहिला आणि सुप्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ हेन्री कझिन्स यांच्या संशोधक नजरेसमोर आणला. इ. स १८९०मध्ये कझिन्सने ठाणाळे लेण्यांना भेट दिली आणि इ. स. १८११मध्ये त्याने ‘Caves at Nadasur and Kharasamla’ ही पुस्तिका प्रकाशित केली.
खडसांबळे लेणीसमूहापासून ही लेणी अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर आहेत. पावसाळ्यात तर येथील वातावरण आणि निसर्ग मोहून टाकणारा असतो. डोंगरावरून झेपावणारे प्रपात तुमची नजर खिळवून ठेवतात. वेगवेगळ्या हंगामात फुलणारी फुले, जांभळे आणि करवंदांसारखा मेवा येथे उपलब्ध असतो. ठाणाळे येथील लेणीसमूहातील सर्व लेणी पश्चिमभिमुख आहेत. येथे २३ लेण्यांचा समूह असून, पॉलिग्राफिक परीक्षणानुसार इसवी सनापूर्वी ५० ते सत्तर दशकात ही लेणी निर्माण केली असावीत. निवासी गुंफा आणि एक चैत्यविहार आहे. पूर्णावस्थेत नसलेल्या चैत्यविहाराच्या छतावर अप्रतिम नक्षीकाम केलेले दिसून येते. हेन्री कझिन्स यांनी या गुंफांचे वर्णन लिहून ठेवले आहे. गुंफा क्रमांक सात सर्व गुंफांमध्ये सर्वांत सुंदर आहे. गुहेच्या संपूर्ण भिंतीमध्ये पुरुष, स्त्रिया आणि प्राणी यांच्या आकृतीसह सजावट केली आहे. येथे दोन उल्लेखनीय शिलालेख आहेत. त्यावर दात्यांची नावे दर्शविली आहेत.
![]() |
| ठाणाळे लेणी
ठाणाळे लेणी ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE लिंक वर क्लिक करा
|
- मुंबई वरून खोपोलीला ट्रेन ने पोहचावे.
- खोपोली ते पाली एसटी पकडावी, त्या गाडीने पेडली गावात उतरावे
- खोपोली ते पेडली अंतर २९ किमी आहे. एसटीने प्रत्येकी ४५ रुपये तिकीट आहे.
- पेडली ते ठाणाळे साठी रिक्षा करावी (किंवा शेअर रिक्षा हि असाव्यात पण ती भरेपर्यत वाट पहावी लागेल.)
- पेडली ते ठाणाळे ६.५ किमी अंतर आहे, त्यासाठी आम्ही रिक्षाला १५० रुपये भाडे दिले.
![]() |
| गावातून वर आल्यावर दिसणारा ठाणाळे लेणीचा डोंगर |
![]() |
| ठाणाळे लेणीच्या पठारावरून दिसणारे दृश्य |
![]() |
| पठारावरून पुन्हा परत लेणीकडे जाताना काढलेला वाटेचा फोटो |
संस्थाने खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी इतर गडांप्रमाणे सरकारकडे आली. किल्ल्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झालेले आहे. प्रवेशद्वाराची संरक्षणात्मक रचना थक्क करणारी आहे. दरवाज्याच्या आत इंग्रजी ’एल’ आकाराची देवडी बांधलेली आहे. हे दार बंद केले, तर या बाजूने शत्रू काय मुंगीसुद्धा आत येऊ शकणार नाही अशी याची रचना आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तुंग कातळाच्या भिंतीजवळ एक सुळका आहे. या सुळक्याच्या पायथ्याशी अनेक गुहा, तळटाकी असून, त्यात भरपूर पाणी आहे. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर खास बघण्यासारखे काही नाही. गडावर केदारेश्वराचे मंदिर आहे. येथे एक तलाव आहे. टेहळणीसाठी दोन बुरुज आहेत. या बालेकिल्ल्यावरून समोरच असणारा तीन कावडीचा डोंगर दिसतो. समोरच उभा असणारा सुधागड, तैलबैला, धनगड आणि कोरीगड दिसतो. तसेच पाली गाव, अंबा नदी, उन्हेऱ्याची गरम पाण्याची कुंडे, कोकण, जांभूळपाडा असा सर्व परिसर येथून दिसतो. किल्ला ट्रेकर्ससाठी हे आवडीचे ठिकाण आहे.
सुधागड : पालीच्या जवळचाच हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून, याची उंची ५९० मीटर आहे. पूर्वी हा गड भोरपगड म्हणूनही ओळखला जायचा. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला आहे. इ. स. १६४८ साली मालवजी नाईक कारके, सरदार मालोजी भोसले, जाधव आणि सरनाईक या शिवाजी महाराजांच्या शूरवीरांनी किल्ला ताब्यात घेतला. शिवरायांनी या गडाचे सुधागड असे नामकरण केले. हा किल्ला भोर संस्थानाच्या अखत्यारीत होता. गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर या गावातच छत्रपती संभाजीराजे व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. राजधानीसाठी याही गडाचा विचार शिवरायांनी केला होता, असे सांगितले जाते.
पाच्छापूर दरवाज्यातून गडावर गेल्यास थोडे चढल्यावर माणूस एका पठारावर पोहोचतो. पठाराच्या डावीकडे सिद्धेश्वराचे मंदिर, तसेच धान्याची कोठारे, टाके, हवालदार तळे व हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी आहे. गडावर रायगडच्या टकमक टोकासारखे टोक असून, येथून घनगड, कोरीगड, तैलबैला व अंबा नदीच्या खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते. रायगडावरील टकमक टोकासारखेच येथेही टकमक टोक आहे. या टोकावर उभे राहिल्यावर अंबा नदी व नदीच्या आजूबाजूची गावे दिसतात.
महडचा वरदविनायक : महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. सन १७२५मध्ये सुभेदार रामजी महादेव बिवलर यांनी हे मंदिर बांधले. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. हे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा सांगितली जाते. एका भक्ताला त्याच्या स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात मूर्ती पडली आहे असे दिसले. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून, गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे.
शिवथरघळ : आध्यात्मिक, धार्मिक, तसेच निसर्गप्रेमींचे हे आवडते ठिकाण आहे. शिरवळहून महाडला येताना वरंधा घाट उतरल्यावर उजवीकडे शिवथरघळ आहे. हे ठिकाण सर्व बाजूंनी असलेल्या उंच पर्वतराजीत असून, वाघजाई दरीच्या कुशीत आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होत असून, ती पुढे सावित्रीला मिळते. शिवथरघळ आणि आजूबाजूचा सर्व परिसर चंद्रराव मोऱ्यांच्या जावळीच्या वतनात होता. जावळीचे मोरे हे विजापूर दरबाराचे वतनदार देशमुख होते. घनदाट जावळीच्या भू-प्रदेशामुळे मोरे यांना निसर्गाचे संरक्षण असल्याने ते बलाढ्य झाले होते. शिवरायांनी हा परिसर १६४८मध्ये आपल्या ताब्यात घेतला. समर्थ रामदास सन १६४९मध्ये या घळीत (गुहेमध्ये) वास्तव्यासाठी आले. सन १६६०पर्यंत म्हणजे दहा-अकरा वर्षे ते या ठिकाणी राहत होते. दासबोधाचा जन्म याच घळीत झाला. दासबोधाची सात/आठ दशके त्यांनी या घळीतच लिहून पूर्ण केली. दासबोध समर्थ रामदासांनी रचला आणि त्याचे लेखन त्यांचे पट्टशिष्य कल्याणस्वामींनी केले. दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत. महाराष्ट्र सरकारच्या राज्य मराठी विकास संस्थेने ७८०० ओव्यांचा हा ग्रंथ ऑडिओ स्वरूपात आपल्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला आहे. शास्त्रीय गायक संजय अभ्यंकर यांच्या आवाजातील या दासबोधाला राहुल रानडे यांनी संगीत दिले आहे. (दासबोधातील व्यवस्थापनासंदर्भातील उपदेशाबद्दलची लेखमाला वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
वरंधा घाट : पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर ‘वरंध घाट’ तथा ‘वरंधा घाट’ नावाचा २०-२५ किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या किल्ल्याला छेदून देशावरून कोकणात उतरतो. एका अवघड ठिकाणी एकावर एक अशी ४/५ हेअरपिन कर्व्हज (वळणे) यात आहेत. ज्या वेळी खालून बस किंवा ट्रकसारखे एखादे वाहन येत असते, त्या वेळी एकदम वरच्या बाजूला उभे राहून वाहन पाहताना, वळताना श्वास रोखला जातो. या घाटात पर्वत आणि जंगल याशिवाय काहीच दिसत नाही. घाटात गाड्यांचे आवाज प्रतिध्वनित होत असतात. भोरहून निघाल्यावर डावीकडे देवघर धरणाचा जलाशय, नागमोडी वळणे हा प्रवाससुद्धा खूप छान वाटतो. घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द झाडीत समर्थ रामदासस्वामींची शिवथरघळ आहे. घाटाच्या सुरुवातीला भोर तालुक्यातील हिरडोशी गाव आहे, मध्यभागी वाघजाई मंदिर आहे. वरंधा घाटातून उतरताना मध्यावर एका ठिकाणी गरम भजी, नाश्त्याचे पदार्थ मिळतात. थंडीत कुडकुडत गरम भजी आणि चहा पिताना खूप मजा येते.
महाड : मुंबई-गोवा महामार्गावरील महाड हे ऐतिहासिक ठिकाण आहे. सावित्री आणि गांधारी नद्यांच्या काठावर वसलेले हे शहर एके काळी ‘महिकावती’ या नावाने ओळखले जात असल्याचे सांगितले जाते. ‘बलिपटना’ आणि ‘पलईपटभाई’ असेही जुने नामोल्लेख आढळतात. पूर्वी उधाणाच्या भरतीच्या वेळी महाडपर्यंत गलबते येत असत. इतर भरतीच्या वेळी महाडच्यावर दीड किलोमीटरपर्यंत डोंगी (नावा) येऊ शकतात. सोळाव्या शतकात गव्हाच्या व्यापाराचे हे एक प्रमुख केंद्र होते. महाडमध्ये लोणारी कोळसा, तांदूळ यांचे उत्पादन होते. महाडच्या औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक, तसेच कापड उद्योग आहेत. महाड हे जणू रायगडाचे प्रवेशद्वार समजले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड येथून जवळच असल्याने शिवकाळात महाडचे महत्त्व अधिक वाढले. १७९६ साली येथे दुसरा बाजीराव, नाना फडणवीस व इंग्रज यांच्यामध्ये तह होऊन बाजीरावाला पेशवाई मिळाली.
कोल बौद्ध लेणी : महाड तालुक्यात मंडणगडच्या बाजूला कोल हे गाव आहे. या गावात सातवाहन काळातील दोन लेणीसमूह आहेत. या लेण्यांची नोंद जेम्स बर्जेस यांच्या एपिग्राफिया इंडिका, तसेच ब्यूलर यांच्या इंडियन पॅलिओग्राफी यामध्येआहे. ल्युडर यांच्या एपिग्राफिया इंडिका (भाग १०) यामध्ये कोल लेण्यांच्या शिलालेखांचे अर्थ सांगितले आहेत.
लेणी क्रमांक २ : हे मुख्य विहारलेणे आहे. या ठिकाणी प्रार्थनास्थान असावे. हे लेणे मातीने पूर्ण भरलेले आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या लेण्यात काही नाणी वगैरे सापडली आहेत.
गांधार पाले बौद्ध गुंफा : महाडजवळील सावित्री-गांधारी नद्यांच्या संगमावर जवळ असलेल्या टेकडीवर ३१ गुंफा आहेत. ही लेणी सातवाहन काळातील असावीत. हिनायन बौद्ध गुंफा पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात खोदण्यात आल्या. टॉलमेनीनुसार इसवी सन १५०च्या काळात पालेला बाली पाटण म्हटले जायचे आणि पेरिप्लसच्या काळात इसवी सन २४७च्या काळात पालैपटमई म्हटले जायचे वा तसे नाव असावे. शिलाहार राजा अनंत देव याच्या ११व्या शतकातील शिलालेखानुसार पालीपट्टण म्हणून या ठिकाणाचा उल्लेख आहे. या लेण्यांमध्ये चैत्यग्रियां नावाचे काही छोटे स्तूप आहेत. तसेच भगवान बुद्धांच्या मूर्ती, बोधिसत्त्व आणि काही विहारांच्या भिंती आणि खांबांवर काही शिलालेख आहेत. एका गुहेच्या भिंतीवर ब्राह्मी लिपीत कोरलेला शिलालेखदेखील आहे. ही बौद्धकालीन लेणी शिल्पकलेचा सुंदर नमुना आहेत. लेणी समूहात एकूण २८ लेणी आहेत व त्यात ३ चैत्य आणि १९ विहार आहेत.
पुरातत्त्व विभागाने लावलेल्या फलकाजवळ उतरल्यानंतर लगेच लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण लेण्यांपर्यंत पोहोचतो. पायऱ्या चढण्यासाठी २०-२५ मिनिटे लागतात. लांबून ही लेणी त्रिस्तरीय दिसतात. या लेण्यांची अधिक माहिती http://abcprindia.blogspot.com/ येथे मिळू शकेल.
रायगडाच्या संरक्षक साखळीतील हा मंगळगड किल्ला कांगोरी किल्ला म्हणूनही ओळखला जातो. जेव्हा जेव्हा रायगडावर आपत्ती आली, त्या त्या वेळी येथील फौजा रायगडाच्या मदतीला धावल्या. त्या वेळी सरदार गिरजोजी यादव यांनी रायगडावरील सोनेनाणे व अन्य महत्त्वाच्या वस्तू या गडावर सुरक्षेकरिता आणल्या. नंतरच्या काळात त्या पन्हाळगडावर रवाना करण्यात आल्या. १८१८च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धात कर्नल प्रॉथरच्या हल्ल्यात हा किल्ला इंग्रजांनी घेतला. अभिजित बेल्हेकर यांच्या ‘दुर्गांच्या देशा’ या पुस्तकामध्ये याचे छान वर्णन आहे. महाडहून या गडाजवळील पिंपळवाडीसाठी एसटी बसची सोय आहे. पुणे-मुंबई किंवा अन्य ठिकाणहून यायचे झाल्यास एखाद्या मुक्कामाची तयारी ठेवावी. यासाठी पायाच्या पिंपळवाडीतील मंदिरे सोईची. गडावर काहीही मिळत नाही.
चंद्रगड : हा पोलादपूर तालुक्यात असून, महाबळेश्वरच्या आर्थर सीट पॉइंटच्या पश्चिमेस आहे. हा किल्ला दौलतराव मोरे यांनी बांधला. २२५८ फूट उंचीवरील या किल्ल्यावर फक्त पायवाटेनेच जाता येते. कृष्णा नदीच्या बलकवडी धरणाच्या मागे असलेल्या जोर गावातून पायवाटेने किंवा उमरठ-ढवळे गावाकडूनही पायवाटेने जाता येते; मात्र वाटाड्या हवाच. सह्याद्रीच्या रांगेतील हा अवघड किल्ला निसर्गरम्य तर आहेच; पण ट्रेकिंगच्या सरावासाठीही चांगला आहे.
रायगड - लोहरज्जू मार्गे
रायगडवर एक रस्ता १४०० पायºयांनी गडावर जातो. तर दुसरा रस्ता रोपवे कडे हिरकणीगावातून जातो. १५ - २० वर्षांपूर्वी सुमारे १४०० पायºया चढून या किल्यावर जावे लागे. आता मात्र रोपवे सेवा सुरु झाली आहे. अवघ्या ५ मिनिटांत रायगडवर पोहचता येते. १५ वर्षांपूर्वी मी एका ट्रेकिंग क्लबबरोबर येथे पानशेत ते रायगड असा ट्रेक केला होता. मजा आली होती. दिवसभर चालून चालून पाय चांगले दमले होते. तीन दिवसाचा या ट्रेकमध्ये एक संपूर्ण दिवस व एक रात्र रायगड पाहून झाला होता. रोलचा कॅमेरा असल्यामुळे जास्त फोटो काढता आला नाहीत. त्यानंतर आज बºयाच वर्षांनी रायगड किल्ल्यावर जाण्याचा आनंद काही औरच होता. आणि तेही रोपवे मधून.
रोप वे मार्गे रायगड :
४ फुट उंचीखालील लहान मुलांसाठी ११५ रुपये जाऊन येऊन. तर प्रौढ
व्यक्तींसाठी १८० रुपये जाऊन येऊन तिकीट आहे. एका ट्रॉलीमध्ये ४ प्रौढ व २
लहान मुले बसतात. एका वेळी दोन ट्रॉली गडावर घेऊन जातात. त्याचवेळी वरून
खाली दोन ट्रॉली गडावरून शिवभक्तांना घेऊन खाली येतात. गडावर जाण्यासाठी
ट्रॉलीतून पाच मिनटं लागतात. चौकशी केली असता मे महिन्यात, शनिवारी व
रविवारी, सुटटी दिवशी येथे गर्दी असते. दोन दोन तास थांबून वर गडावर
जाण्याची वाट पहावी लागते. मी मात्र सुदैवी निघालो. शनिवार असूनही देखील
पर्यटकांची गर्दी पाहिजे तेवढी नव्हती. तिकीट काढून रोपवे मध्ये बसलो.
रोपवे सुरू झाला. ‘छत्रपती शिवाजीमहाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा
घोषणा देत रायगडाकडे रोपवेची ट्रॉली निघाली. मराठीतून रोप वे ला ‘लोहरज्जू’
असे मजेशीर नाव आहे. वर जाण्याचा अनुभव लिहिणे शक्य नाही. यासाठी एकदा तरी
प्रत्त्यक्ष अनुभव घ्यायला हवा. वर जाण्यासाठी पाच मिनिटेच लागतात. परंतु
जो अनुभव आहे तो मोजता येणार नाही. जसे जसे किल्यावर पोहचत होतो तस तसे
खालील लावलेली वाहने, माणसे, शेती छोटे छोटे होत गेले. छातीत चांगलीच धडधड
वाढत होती. लांबवर उंच डोंगर दिसू लागले होते. ज्युरॅसिक पार्कमधील धबधबा
व हॅलिकॉप्टरचे दृश्य आठवले. रायगडावरून कोसळणारा धबधब्या शेजारून आपण वर
पोहचतो. एकदम मस्त वातावरण अनुभवयाला मिळाले. वरती पोहोचोस्तोवर ढग दाटून
आले. वर पोहाचलो ते दाट ढगामध्येच. अचानक खालील दृश्य गायब झाले. गडावर
काही पायºया चढून जाऊन मेणा दरवाज्यातून गडावर जाता येते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७० साली राजगडावरून रायगडावर राजधानी हलवली.
महाराजांचा राज्याभिषेक सोहळा १६७४ साली याच किल्यावर झाला. शिवाजी
महाराजांचा मृत्यू १६८० मध्ये याच किल्यावर झाला. गडावर जगदीश्वराचे मंदिर
आहे. त्यासमोर समाधी व त्यांच्या वाघ्या या कुत्र्याचे स्मारकही आहे.
हत्ती तलाव, गंगासागर तलाव, टकमक टोक, होलरचा माळ, हिरकणी बुरुज, मदरशाचे
थडगे, नाना दरवाजा, महादरवाजा या गोष्टी पहाण्यासारख्या आहेत. गडावर
भोजनाची सोय आहे.
संपूर्ण गडावर मध्येच जोरात पाऊस व दाट धुक्यामुळे खालील परिसरत पाहणे शक्य
नव्हते. मात्र, पाऊस संपता संपता गड पाहणे एक वेगळाच अनुभव होता. गड पाहून
अडीचला रोप वे परत खाली आलो. खाली आल्यावर झुणका भाकरीवर ताव मारून
पोटपूजा उरकली.
तेथून आम्हाला चिपळूणला करंजेश्वरी देवीचे दर्शन व मुक्कामाला जायचे होते.
(४ ते ५ ठिकाणे असल्यामुळे एकदम सर्व प्रवास वर्णन करणे शक्य नव्हते. फोटो सुद्धा बरेच काढले असल्यामुळे दोन वेगळे भाग करून प्रवास वर्णन करत आहे. सध्या फक्त ताम्हिणी घाट व रायगड रोपेवे मधून रायगड हे वर्णन देत आहे. लवकरच श्री. करंजेश्वरी देवी, परशुराम मंदिर व श्री कर्णेश्वर याचा भाग लिहितो.)
भगवान श्री परशुराम मंदिर
![]() |
| हिरकणी गावातून रायगडावर दाट ढगातून जाणारा रोप वे. |
![]() |
![]() |
| रोपवेतून जाण्यासाठीचे नियम व अटी |
![]() |
| रोप वे स्टेशन. |
![]() |
| रायगडावरील एक दरवाजा |
![]() |
| रायगडावरील बाजारपेठेतील एका दुकानाबाहेरी नक्षीकाम. |
![]() |
| छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा. |
![]() |
![]() |
| जगदिश्वराचे मंदिर. |
![]() |
| लाडक्या वाघ्या कुत्र्याची समाधी. |
![]() |
| छत्रपती शिवाजीमहाराजांचे समाधीस्थळ. |
![]() |
| समाधीस्थळाशेजारील शिलालेख. |
![]() |
| रायगडावर जाणारा रोपे वे मार्ग या मोठ्या धबधब्याशेजारून जातो. |
![]() |
| रोपे वे चे यांत्रिकी जाळे |
कसे जाल :
- मुंबई - गोवा महामार्गावरील महाड येथून २४ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.
- पुण्याकडून ताम्हिणी घाटातून उतरल्यावर एक रस्ता सरळ कोलाडगावाकडे जातो. तेथे न जाता घाट उतरल्यावर डावीकडे निजापूरला जाणारा रस्ता आहे. तेथून सुमारे २५ किलोमीटरवर रायगडला पाचाडमार्गे जाण्यासाठी रस्ता आहे. आम्ही या रस्त्याने गेलो. काही रस्ता घनदाट जंगलातून व निर्मुष्यवस्तीतून जातो. वाटेत धामणी, हरवंडी, खराबाचीवाडी आदी छोटे गावे लागतात.
- मुंबई - रायगड २१० कि. मी. (महाडमार्गे),
- पुणे - रायगड - १२६ कि. मी.,
- महाड - रायगड - २७ कि. मी.,
- पर्यटन महामंडळाची निवासस्थाने याशिवाय खाजगी हॉटेल उपलब्ध आहे.
पाहूनच डोळ्यांचे पारणे फेडणारा.. मनाला घायाळ करणारा हा आड्राई रोड शेवते गावाजवळील हा प्रसिद्ध धबधबा आहे.. उंचावरून फेसाळणारे पाणी.. चहूबाजूंनी रांग सह्याद्री हिरवागार परिसर वातावरण धुंद करते..
अशा या जागी आवश्य भेट द्या.. पावसाळ्यात येथील सौंदर्य स्वर्गालाही फिके पाडील असे आहे.. जर मला कोणी विचारले की स्वर्ग कोठे आहे तर मी अभिमानाने म्हणेल की पावसाळ्यात आमच्या महाड रायगड मध्ये भेट द्या.. येथेच स्वर्ग सुखाची प्रचिती येईल..
येथे जाण्यासाठी पुण्या मार्गे आलात तर एक मढेघाट कर्णावडी वरून रानवडी वाकी मार्गावर पुढे शेवते फाटा लागतो तेथून पुढे 20 मिनिटांच्या अंतरावर हा धबधबा आहे
मुंबई किंवा पुणे वरंध मार्गावरून येणार्यांनी बिरवाडी वरून वाघेरी रोड दहिवडला आल्यावर उजवीकडे ➡ वाकीरोडने वळावे पुढे सरळ खरकवाडी.. वाकी.. नंतर शेवते गावी यावे
पिकनिकचा आनंद जरूर लूटा पण निसर्गाचे भान राखून..
धन्यवाद
मातेचे रान’ अर्थात माथेरान
निर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या तरी येथे केवळ मिनी ट्रेनच जाऊ शकते. बाकी प्रवास घोडा व पायी यांच्याद्वारेच करावा लागतो. अशा माथेरानला दिवाळीच्या सुट्टीच्या शेवटच्या रविवारी गेलो. त्या विषयी...
रायगड जिल्ह्यातील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जराशी वेगळी झालेली ही डोंगर रांग आहे. समुद्रसपाटीपासून साधारण ८०३ मी. म्हणजेच २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान आहे. केवळ पायीच या ठिकाणी हिंडता येत असल्याने अनेक पर्यटकांचा ओढा थोडा कमी आहे. मात्र, घोडा व माणसांनी ओढण्याची दोन चाकी रिक्षा यामुळे येथे पर्यटक वळू लागले आहेत. तशी ही सुविधा अनेक वर्षे सुरू आहे. पिंपरी-चिंचवडपासून १०० किलोमीटरवर तर मुंबईपासून ११० किलोमीटरवर अशा सारख्याच अंतरावर असलेल्या माथेरानकडे पर्यटक न वळतील तर नवलच. शनिवार, रविवार व इतर सुट्टींच्या दिवशी माथेरान पर्यटकांनी फुललेले असते. महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे. माथेरानमध्ये तीस वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळे आहेत. आरोग्यदायक व उत्साहवर्धक हवामान, अतुलनीय निसर्ग सौंदर्य व जोडीला थंड हवा यामुळे माथेरानला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पर्यटकांसाठी हॉटेल, एमटीडीसीची निवासगृहे, काही छोटी हॉटेल्स आहेत. या शिवाय मुख्य बाजारपेठेत किंवा नाक्यावर चौकशी केल्यास काही ठिकाणी घरगुती राहण्याची सोय होऊ शकते. बाजार, उद्याने आदीं सोयी आहेत. गावात दवाखाना, शाळा यांसारख्या सुविधाही आहेत. एवढ्या लांबवर सुद्धा मोठी हॉटेल्स व लोकवस्ती पाहून आश्चर्य होते.
‘मातेचे रान’
ब्रिटिशांनी माथेरान ही मुंबईजवळची जागा थंड हवेचे ठिकाण म्हणून मुद्दाम विकसित केली. इ. स. १८५० मध्ये मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड एलफिन्स्टन व ठाण्याचा कलेक्टर ह्यूज मॅलेट यांनी माथेरान शोधले. १८५४ मध्ये मुंबई गव्हर्नरने माथेरानवर बंगला बांधला. माथेरान शोधले म्हणजे येथे आधी वस्ती होतीच.
माथ्यावरील दाट वनश्रीमुळे याला ‘माथेरान’ हे नाव पडले. असेही म्हणतात की, धनगरांचे मातापिता याच जंगलात मरण पावल्याने या जंगलात ‘मातेचे रान’ (माथेरान) आहे. येथील निसर्ग पाहून सर आदमजी पीरमॉय यांनी प्रथम नेरळ ते माथेरान अशी पाऊलवाट तयार केली. नेरळ-माथेरान लोहमार्ग बांधण्यासाठी त्यांचा दुसरा मुलगा अब्दुल हुसेन यांनी प्रयत्न केले. एवढ्याश्या छोट्या माथेरानवर १९०५ साली नगरपालिकेची स्थापना झाली.
पार्इंट (स्थळे) :
इंग्रजांनी माथेरान वसवले त्यामुळे बहुतेक पार्इंटसला त्यांनी इंग्रजीच नावे दिली व ती आजही तशीच आहे. पॅनोरमा, गार्बट, अलेक्झांडर, हार्ट, लिटल चौक, ग्रेट चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लँडस्केप, लुईसा, पॉक्युर्पाइन, मंकी, आर्टिस्ट, स्फिंक्स, बार्टल आदी पार्इंटस पाहण्यासारखे आहेत.
वाहनांना बंदी :
माथेरानला घनदाट जंगलाचा विळखा आहे. सुदैवाने या ठिकाणी वाहनांना जाण्यास बंदी आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हे पाऊल उचलणे गरजेचेच होते. नाहीतर हे ठिकाणही कास पठार, महाबळेश्वर आदी पर्यटन स्थळासारखेच प्रदूषणाकडे वळले असते. सध्या तरी गाड्यांना बंदी असल्यामुळे हे ठिकाण प्रदुषण विरहीत आहे. माथेरानचे खास वैशिष्टय असणारी छोटी रेल्वेच येथे जाऊ शकते. पूर्वी वाफेच्या इंजिनावर चालणारी रेल्वे आता डिझेलवर चालविली जाते. इंजिनावर चालणारी ही छोटी गाडी निर्सगाचे दर्शन घडवित आपला नेरळ ते माथेरान असा सुमारे २१ किलोमीटरचा प्रवास दोन तासात घडविते. आम्ही गाडी घेऊन गेल्याने दस्तुरी नाक्यावर गाडीतळावर गाडी लावून पुढे छोट्या ट्रेनने पुढे निघालो. ज्यांना नरेळवरून येणे जमत नाही अशासाठी दस्तुरी नाक्यावरून माथेरान ते मुख्य बाजारपेठ अशा २.५ किलोमीटरसाठी या गाडीतून जाता येते. दस्तुरी नाक्यावरून चालत ३०-३५ मिनिटे लागतात. ही रेल्वे आपल्याला सरळ बाजारपेठेत घेऊन येते. बहुतेक हॉटेल्सही या बाजारपेठेच्या अवतीभवती आहेत. या गाडीचे तिकीट प्रवेशद्वार ओलांडल्यावर काही अंतरावर मिळते. ही रेल्वे जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे. याशिवाय पर्यटकांच्या सोयीसाठी मुख्य प्रवेशद्वारापासून संपूर्ण माथेरानवर हिंडण्यासाठी घोडे व माणसांनी ओढण्याची दोन चाकी रिक्षा उपलब्ध आहे. ज्यांना पायी फिरणे शक्य नाही अशासाठी माथेरानवर घोडयावरून फिरावे लागते. पण याचे भाडे पाहता आपल्या दोन पायांची डुगडुगीनेच प्रवास करणे उत्तम ठरते. पण तरीही अबालवृद्धांना ही सोय पुरेशी ठरते. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल मातीने संपूर्ण परिसर सजलेला आहे. झाडांवरसुद्धा येथील मातीचा घोड्यांच्या जाण्यायेण्याने फुफाटा उडलेले दिसतो. येथील लोकांचा उदरनिर्वाह पर्यटकांवर अवलंबून आहे. बहुतांशी लोक हे मराठीच आहेत. काही कातकरी, ठाकर, आदीवासी लोकही येथे दिसून येतात.
बाजारपेठेमध्ये विविध हस्तकौशल्यावरील आधारित वस्तू, चप्पल, बूट, पिशव्या, गृहपयोगी वस्तू, शोभेच्या वस्तू विकण्यास ठेवलेल्या आहेत.
![]() |
लहान मुलांचे अर्थात मोठ्यांचेही आकर्षण असलेली माथेरानची राणी ‘मिनी ट्रेन’ |
वनश्री :
संपूर्ण माथेरानचा परिसर हा विपुल वृक्षांनी सजलेले आहे. गर्द हिरवीगार झाडी हे त्याचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेच. बेहडा, हिरडा, खैर, जांभूळ, आंबा अशी अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. या हिरवाईमुळे उन्हाळ्यातही उन्हाचा त्रास येथे होत नाही.
शार्लोट लेक
मुख्य बाजारपेठेपासून १ ते १.५ कि. मी. अंतरावर हे नैसर्गिक तळे आहे. माथेरानवरील पिण्याच्या पाण्याचा मुख्य साठा हाच आहे. पावसाळ्यात हा जलाशय संपूर्ण भरतो. या ठिकाणीही काही हॉटेल्स असून, दमून भागून आल्यावर याही ठिकाणी आपली पोट पूजा होऊ शकते. पाण्यात पाय अथवा आंघोळ करू नये अशी सूचना देऊनही अनेक पर्यटक सूचनेला न जुमानता यथेच्छ पाय धुण्यासारखे प्रकार करताना आपल्या दिसून येतात. या पाण्यावर पुढे प्रक्रिया करून संपूर्ण माथेरानच्या हॉटेल्स व रहिवाशांना पुरविलेले आहे.
![]() |
शार्लोट लेक |
![]() |
बाजारपेठेतील चप्पल विक्रेत्याचे दुकान. |
प्रदूषणापासून मुक्ती अनुभवण्यासाठी व निर्सगाच्या सान्निध्यात यायचे असल्यास एक दिवस का होईना पण माथेरानला येणे गरजेचे आहे.
माकडेच माकडे :
माथेरानमध्ये पायथ्याशी आपण गाडी लावतो. या ठिकाणपासून ते संपूर्ण माथेरानावर माकडे दिसून येतात. पर्यटकांशी ओळख झाली असल्याने ही माकडे टोळीने पर्यटकांच्या मागे जाऊन हातातल्या खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसून येतात.
![]() |
‘छोटे कुटुंब सखी कुटुंब’ |
कसे जाल :
- माथेरान हे पुण्यापासून १२५ तर मुंबईपासून ११० किलोमीटरवर आहे.
- पुण्याहून येताना जुन्या पुणे-मुंबई महार्गावर खोपोली सोडल्यावर चौक म्हणून उजवीकडे रस्ता जातो. या रस्तावर कर्जतच्या अलिकडे नेरळ माथेरानकडे जाणारा रस्ता आहे.
- (रस्त्याचे डांबरीकरण चालू असल्याने चौक ते नेरळ हा रस्ता खराब आहे.)
- पायी माथेरानला येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण गाडीने येण्यासाठी नेरळवरून डांबरी रस्त्यावर ८ किलोमीटरची घाटातून वेडीवाकडी वळणे घेत वाट आहे. याशिवाय लिट्ल चौक पॉईंटच्या खालून येणारी वाट, कर्जतहून गार्बेट पॉईंटवर येणारी १३ कि.मी.ची पायवाट आहे.
कधी जाल :
येथे जाण्यासाठी सप्टेंबर ते मार्च हा कालावधी चांगला आहे. भटक्यांसाठी पावसाळा ही योग्यच ठरतो. जून ते आॅगस्ट या काळात येथे जोरदार पाऊस पडतो. रायगडप्रमाणेच या ठिकाणी वरपर्यंत धुक्याचे साम्राज्य असते. उन्हाळ्यात येथे जाणे चांगले. कारण दोन्ही बाजूंनी गर्द हिरवी गार झाड असल्याने उन्ह्याच्या झळा लागत नाही.
काही टिप्स :
- शक्यतो वेळ काढून सकाळी ९ वाजेपर्यंत माथेरानाला पोचून काही पार्इंटस पाहून संध्याकाळी ६ पर्यंत परतीचा मार्ग धरावा. एका दिवसात सर्व पार्इंटस पाहणे शक्य होत नाही. घोड्यावरून जाणार असलात तरी हे पार्इंटस पाहणे शक्य होत नाही. त्यासाठी किमान ३ दिवस तरी पाहिजेत.
- सर्व पार्इंटस एकमेकांपेक्षा लांब अंतरावर असल्याने सोबत नकाशा असणे गरजेचे आहे. तसे वाटेत लोक ये - जा करत असतात.
- स्वत:चे जेवण घेऊन जाणे उत्तम. येथील हॉटेल्स सर्वसामान्यांच्या अवाक्याच्या बाहेरील आहेत. म्हणजे काही मार्केट मधील हॉटेल्स तशी स्वस्त आहेत. पण ती शोधावी लागतात.
- पाण्याची सोय करून जाणे चांगले. कारण काही पार्इंट सोडले तर वाटेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
मनाला भुरळ पाडणारे महाड जवळील सुप्रसिद्ध धबधबे
● नाणेमाची धबधबा :-
महाड
तालुक्यातील वाकी ( नाणेमाची ) गावातील आईचा बांध या नावाने नाणेमाची
धबधबा ओळखला जातो. वेल्हे तालुक्यातील गुगुळशी गावातून आणि गाढवकडा /
दुर्गाच्या कड्याशेजारून ह्या धबधब्याचे प्रपात स्वतःला ६०० मीटर उंचावरून
झोकून देतात. ह्याच धबधब्याच्या कुंडाजवळ प्रसिध्द आई देवीचे देवस्थान
आहे. हल्लीच हा धबधबा सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे
मुंबई-पुण्यातून ह्या धबधब्याचे मोहक रूप नजरेत आणि कॅमेरात कैद करण्यासाठी
पर्यटक येथे भेट देतात. नाणेमाची गावातील दरेकर बंधूंच्या स्टॉलवर जेवणाची
व नाश्त्याची उत्तम सोय होऊ शकते.
दरेकर बंधू - ९४२१०१७०८१ / ७८७५१४५१३७





































































































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.