Thursday, July 30, 2020

तिवरीचा सर्वतोभद्र गणेश व विदरण नृसिंह

काल परवा कुठेतरी व्हाॅट्सअॅपवर एक पोस्ट आली होती. .एका प्रसिद्ध ऐतिहासीक स्थळाला जाण्यासंदर्भात ती पोस्ट होती.मला पण आवडलं असतं तिथं जायला परंतू माझ्या व त्यांच्या प्रवासाच्या तारखा जुळत नव्हत्या.मी सहज विचार करत बसलो होतो.मी आतापर्यंत पाहिलेली अप्रसिद्ध ठिकाणं व
तिथे मला मिळालेली संस्मरणीय माहिती व त्यायोगे माझा काही अतिशय विद्वान व व्यासंगी आणि विनम्र व्यक्तींशी झालेल्या फोनवरील चर्चा. या प्रसंगामध्ये असंच एक नाव आठवलं तिवरीचं आणि साधारणतः चार -पाच वर्षांपूर्वीचा तो प्रसंग सगळा माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला.
मी दिग्रसला आलो होतो. दुपारचं जेवण झालं, आई तिच्या मैत्रिणीकडे गेली होती तर पप्पा वामकुक्षी घेत होते.मी काहीतरी कामानिमित्य माझ्या घराशेजारी असणाऱ्या गेस्ट हाऊस समोरील रस्त्यावरून चालत होतो. बहुतेक विड्याची पानं किंवा फळं घ्यायला आलो असेल.तितक्यात मला माझा बारावीचा वर्गमित्र विजय कपिले भेटला.विजय शिक्षक आहे.फार दिवसांनी आमची भेट झाली होती. थांबुन आम्ही बोलत होतो.क्षेमकुशल विचारून झाल्यावर मी विजयला सहज विचारलं की तो कुठे निघाला आहे? विजय म्हणाला की तो तिवरीला जातोय.माझा एक शेजारी मित्र आहे प्रशांत झोळ.या प्रशांतचा लहान भाऊ पण शिक्षक आहे. तो या विजयचा मित्र.या झोळ परिवारातर्फे तिवरीच्या प्रसिद्ध खडकी मारोती संस्थानात महाप्रसादाचा कार्यक्रम होता व तिथे विजयला बोलावलं होतं त्यामुळे विजय त्याच्या गाडीने तिवरीला जाणार होता.आता विजयने मला मी दिवसभर काय करणार आहेस? हे विचारलं.मला तसं काही विशेष काम नव्हतं असं त्याला सांगताच तो म्हटला की मग चल माझ्यासोबत तिवरीला.मी त्याला म्हटलं की अरे पण मला बोलावलेलं नाहीये.त्यावर तो म्हटला की तू मंदिरात थांब मी प्रसाद घेतो व मग आपण परत निघू.तसा प्रशांत माझा मित्र आहे म्हणून मी पण जायला तयार झालो.घेतलेल्या वस्तू घरी ठेवल्या व पप्पांना मी तिवरीला जातोय हे सांगुन मी विजयसोबत निघालो.
तिवरी, पूर्वी हे गाव दिग्रस वरून अमरावती यवतमाळ जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर होतं, पण अरूणावती प्रकल्पाचं पाणी चिंचोलीच्या पुलावर आलं आणि तो रस्ता आता रोहणा हरसूल साखरा लाख मार्गे जातो. तिवरी चांगलंच आडवळणाचं गाव झालंय आता.हरसूल साखरा यागावांपासुन मोख मार्गे तिवरीला जावं लागतं किंवा लाख या गावापासुन एक रस्ता दारव्ह्याला जातो तर दुसरा तिवरीकडे. इंग्रजी T सारखा फाटा आहे तो. या तिवरीला पूर्वी माझे काका शिक्षक होते तर पप्पांच्या शाळेचं दहावी परिक्षेचं केंद्र तिवरी असायचं.यामुळे मला तिवरी ऐकून माहिती होतंच.एखाद्या जागृत देवस्थानाची जशी भक्तांना हमखास पावणारं क्षेत्र म्हणुन ख्याती असते तशीच तिवरीच्या दहावीच्या परिक्षा केंद्राची नव्वदच्या दशकात ख्याती होती.त्या केंद्रावरून परिक्षा देणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना क्वचितच निराश व्हायला लागलं असेल.यामुळे पंचक्रोशीतील दहावी पास न होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तिवरीचं परिक्षाकेंद्र बरंच लोकप्रिय होतं.
मी व विजय त्याच्या बाइकने निघालो,मार्च महिना असावा….वसंत ऋतूचं प्रसन्न वातावरण होतं.रस्त्यात ठिकठिकाणी पळस फुललेला दिसत होता.आमच्या गप्पा सुरू होत्या.गप्पांच्या नादात आम्ही कधी अरूणावतीवरचा पुल ओलांडून साखरा पार करून लाख पर्यंत आलो ते कळलंच नाही.लाखपासुन आम्ही तिवरीकडे वळलो.लाख ते तिवरी या रस्त्यावर बरीच झाडी दिसत होती,डोंगरपण आहे.विदर्भात पळस खुप आहे.लाल फुलांनी बहरलेली पळसाची झाडं बघुन प्रसन्न वाटत होतं पंधरा वीस मिनीटांत आम्ही तिवरीला पोहोचलो.तिवरीचं खडकी/खडक्या मारोती हे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारं देवस्थान म्हणुन प्रसिद्ध आहे.प्रशांतकडचा प्रसादाचा कार्यक्रम तिथेच होता.आम्ही तिथे गेलो.दुपारची वेळ होती.आजुबाजूचा परिसर खडकाळ आहे.त्यातच एका  खडकात हनुमानाची स्वयंभू शेंदूर लावलेली प्रतिमा  आहे.आम्ही दर्शन घेतलं व प्रशांतला भेटलो.विजय सोबतच मला पण जेवायला बसायला सांगितलं त्यानी.आपल्याकडे देवाच्या प्रसादाला नाही म्हणायचं नसतं हा संस्कार व रिवाजपण आहे.मी  विजयसह पंगतीत बसलो.पंगतीत माझा अजुन एक मित्र अमोल गुल्हानेपण होता.जेवण खुप छान होतं.
जेवण झाल्यावर पाच दहा मिनीटं सर्वांशी बोलुन आम्ही परत निघालो. चर्चेत सगळ्यांनी आम्हाला आम्ही दूरच्या रस्त्यानी आलो,मोखमार्गे आलो असतो तर अंतर कमी पडलं असतं असं सांगितलं.त्यामुळे आम्ही परत जाताना मोख मार्गे जाण्यासाठी निघालो तेवढ्यात मला आठवलं की तिवरीला एक वैशिष्ट्यपूर्ण गणपतीची मूर्ती आहे असं मी लहानपणापासुन ऐकत आलो होतो.एका शिळेवर चार बाजूला चार गणेशप्रतिमा आहेत असं माझे काका व पप्पा सांगायचे.मी मात्र आजपर्यंत ती मूर्ती कधी बघितली नव्हती.मी विजयला त्या गणेशाचं दर्शन करूयात असं सांगितलं.विजय पण तयार झाला.आम्ही गावकऱ्यांना गणेश मंदिर विचारत गावात गेलो. हे मंदिर गावाच्या दुसऱ्या टोकाला एका शेतात होतं.रस्ता संपला तिथे गाडी उभी करून आम्ही पायवाटेने पुढे चालत निघालो.वाटेच्या दोन्ही बाजुला भारतात सर्व खेड्यांच्या रस्त्याच्या दुतर्फा असते तशीच घाण होती.ज्या दिवशी आपल्या समाजाची ही घाण सवय सुटेल तो सुदिन समजावा. अतिशय अनिच्छेनेच ते गलिच्छ दृश्य व दुर्गंधी सहन करत आम्ही त्या मंदिराकडे गेलो.
हे मंदिर एका शेतात आहे.त्या शेतमालकाला ही गणेश मूर्ती त्यांच्या शेतात सापडली.त्यांनी आपल्या शेतातच मंदिर बांधून गणेशमूर्तीची स्थापना केली आहे,त्यांचं नाव मी आता विसरलोय.आम्ही गणेशाचं दर्शन घेतलं.खरोखरच एका शिळेच्या चारही बाजूला चार गणेश प्रतिमा होत्या.शिळेच्या वरच्या बाजूला एक उंचवटा होता,त्याला मी शिवपिंडी समजलो.मूर्तीला शेंदूर लावणं सुरू आहे पण अद्याप त्या शेंदुरातूनही मुळ मूर्तीचं स्वरूप दिसत होतं.दर्शन घेऊन आम्ही परत निघालो तर मला गावातील काही घरांच्या मध्ये एक पडकं पण प्राचिन मंदिरासारखं बांधकाम दिसलं.मनात थोडं कुतुहल जागृत झालंच होतं.गाडी उभी होती तिथपर्यंत येऊन पोहोचलो,पहातो तर काय?त्या पडक्या मंदिराचं प्रवेशद्वार जवळच होतं.मी विजयला घेऊन मंदिरात आलो.तिथं असलेल्या ग्रामस्थाला मंदिर कोण्या देवाचं आहे हे विचारलं तर त्यांना ते माहिती नाही असं उत्तर आलं. प्राचिन हेमाडपंथी मंदिर पार मोडकळीला आलं होतं म्हणून ग्रामस्थांनी उर्वरीत अवशेष सिमेंटने बांधून काढले होते व पांढऱ्या रंगाने रंगवले होते.अवशेषावरून मंदिर फार मोठं नसावं हे कळत होतं.मी आत आलो एका छोट्या गाभाऱ्यात एक मूर्ती ठेवली होती.तिला पण ग्रामस्थ शेंदूर लावत होतेच.मी मूर्ती बघितली.मूर्तीचा सिंहाचा चेहरा व मांडीवरची आडवी पोट फाडलेली हिरण्यकश्यपूची प्रतिमा बघुन ती मूर्ती नृसिंहाची आहे हे माझ्या लक्षात आलं.मी विजयला त्याच्या मोबाइलमध्ये मूर्तीचा फोटो घ्यायला सांगितलं व तिथं उपस्थित ग्रामस्थाला मी ती मूर्ती नृसिंहाची आहे हे सांगितलं,मूर्तीचं मूळ शिल्प सगळ्यांना दिसावं म्हणून व तसंही नृसिंह मूर्तीला शेंदूर लावल्याचं मला कधी माहिती नव्हतं म्हणुन तुम्ही या मूर्तीला शेंदूर लावू नका अशी विनंती केली.पण अशा बाबतीत श्रद्धा,रूढी व परंपरा या अन्य सर्व बाबींवर भारी पडतात.दर्शन घेऊन आम्ही मोख मार्गे परत निघालो येताना रस्त्यात कळशाला विजयने गाडी गावात टाकली.लवकरच आम्ही एका झोपडीसमोर आलो.मला काही कळेना की आम्ही तिथे का आलोय? लवकरच विजयने बारा तेरा वर्षाच्या एका मुलाला आवाज देऊन बोलावलं.विजयला पाहुन तो जरा ओशाळवाणा झाला होता.त्याच्या पालकांना समोर बसवून विजय त्या मुलाला शाळेत नियमित येण्याविषयी समजावून सांगायला लागला.त्याने शाळेत नियमित यावं,परिक्षा द्यावी यासाठी विजय मोठ्या तळमळीने त्या मुलाला व त्याच्या पालकांना समजावत होता.झोपडी बघुन ती लोकं खुप गरीब असावीत याचा अंदाज करता येत होता.विजयची तळमळ बघुन माझ्या मनात विचारांचं काहुर उठलं होतं.आपला समाज कधी शिक्षणाप्रती जागरूक बनेल देवालाच माहिती. तिथुन निघुन आम्ही माझ्या घरी आलो.विजयजवळून तो नृसिंह मूर्तीचा फोटो माझ्या मोबाइलमध्ये घेतला.चहापाणी घेऊन विजय निघुन गेला.
ती नृसिंह मूर्ती मात्र माझ्या मनात घर करून गेली होती. मांडीवर हिरण्यकश्यपूची पोट फाडलेली प्रतिमा असलेली मी बघितलेली ही पहिलीच मूर्ती होती.याविषयी अधिक माहिती कुठून मिळवावी याचा मी विचार करत होतो.कधीतरी तरूण भारत या वृत्तपत्रात ज्येष्ठ मूर्तीशास्त्र तज्ञ देगलुरकर सरांविषयी आलेला एक लेख मी वाचला होता.त्या लेखाच्या लेखकाचा मोबाइल नंबर मी शोधुन काढला व त्यांना फोन करून देगलुरकरांचा फोन नंबर मागितला.त्यांनी देगलुरकरांची परवानगी घेऊन नंबर देतो असं सांगितलं.त्यानंतर सहा सात महिने उलटलेत पण मला त्यांचा नंबर भेटला नव्हता.अचानक एका कौटुंबीक कार्यक्रमात माझ्या मावसभावाच्या मेहुण्याने गप्पांच्या ओघात देगलुरकर सरांचं नाव घेतलं.मी त्यांना देगलुरकरांचा नंबर मागितला आणि त्यांनी तो मला दिला.दुसऱ्याच दिवशी मी देगलुरकर सरांना काॅल केला.माझ्या मनावर प्रचंड दडपण आलं होतं.एका अतिशय ज्येष्ठ मूर्तीशास्त्र तज्ञासोबत मी बोलणार होतो.माझी ओळख दिली व नंबर कोणाजवळून मिळाला ते सांगितलं.सरांना ती नृसिंह मूर्ती,लोकांचं तिला शेंदूर लावणं हे सगळं सांगितलं व सरांच्या सांगण्यावरून तो फोटो सरांना मेल केला.एक दोन दिवसांनी सरांच्या पूर्वपरवानगीने त्यांना काॅल केला तेव्हा सरांनी मला ही नृसिंह मूर्ती ‘विदरण नृसिंह’ प्रकारची आहे हे सांगुन नृसिंह मूर्तींचे पाच प्रकार सांगितलेत.तसंच या मूर्तीविषयी सगळी माहिती  सांगितली.एखादं शिल्प कसं बघायचं असतं याचं मला मिळालेलं ते सर्वोत्तम मार्गदर्शन होतं.चर्चेच्या ओघात मी त्यांना शेतातल्या गणेशमूर्तीविषयी पण बोललो,त्यांना सांगितलं की एका शिळेवर चारही बाजूंनी गणेशप्रतिमा आहेत तर त्यांनी ही ‘सर्वतोभद्र गणेश’प्रतिमा आहे हे सांगितलं.मी त्यांना या मूर्तीच्यावर शिवलिंग आहे का? हे विचारलं तर ते म्हणाले की ते शिवलिंग नसतं.मूर्तीच्या रचनेचा भाग होता तो उंचवटा.
सरांनी अतिशय शांतपणे माझ्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिलीत.मला हे पण आठवलं की यवतमाळजवळच्या कळंबला चिंतामणी देवस्थानात दारातुन आत प्रवेश केला की खाली गणेशमूर्तीच्या दर्शनासाठी तळघरात जाणाऱ्या पायऱ्या सुरू होतात तिथे पण शेंदूर लावलेली अशीच ‘सर्वतोभद्र गणेशाची’मूर्ती बसवलेली आहे.
मी ही संधी हातची जाऊ देणार नव्हतोच,मी सरांना इथुन पुढे असे वेगवेगळ्या शिल्पांचे फोटो पाठवत जाऊ का? असं विचारलं,सरांनी अतिशय मोकळेपणी मला त्याची अनुमती दिली.सोबतच माझा हा छंद खुप चांगला आहे असं प्रोत्साहनपण दिलं.या प्रसंगानंतर मी बरेचदा सरांना वेगवेगळ्या मूर्तींचे फोटो पाठवले आहेत व सरांनी पण अतिशय मोकळेपणानी मला माहिती दिली आहे.माझं तिवरीला जाणं हा एक योगायोगच होता.कदाचित खडक्या मारोतीवरून जेवण करून सरळ घरी परत आलो असतो तर नंतर आठवला सुद्धा नसता हा प्रसंग.परंतू तिथे गणेशमूर्ती बघण्यासाठी म्हणून मी जातो काय आणि नृसिंह मूर्ती बघुन देगलुरकरांसारख्या ज्येष्ठ मूर्तीशास्त्र तज्ञाकडून माहिती मिळवतो काय? सगळंच माझ्यासाठी तरी अकल्पनीयच होतं.मी फारसा देवभोळा नाही पण हा प्रसंग आठवला की मला वाटतं ही त्या नृसिंहाचीच इच्छा असावी की मला देगलुरकर सरांचं मार्गदर्शन मिळावं.
(सर्वतोभद्र गणेश मूर्तीचे फोटो मी व विजयने काढले नव्हते.पुढे मला हे फोटो माझ्याजवळ असावे असं मला वाटलं तेव्हा माझे मित्र कुलदीप जोशी यांनी हे फोटो काढून मला पाठवले होते.)
(सर्वतोभद्र गणेशाचं मंदिर तिवरीच्या श्री.भास्कर जवके पाटील यांच्या शेतात आहे या माहितीबद्दल व सर्वतोभद्र गणेशमूर्तीच्या फोटोंबद्दल कुलदीपचे मनःपूर्वक आभार.)

पुसदचा वीरगळ

कीर्तीमुख
विद्यार्थीदशेत  clinical methods चं पुस्तक वाचायचो. रूग्णाला तपासताना त्याच्या शरीरावर दिसणारी लक्षणं कशी कशी बघायची याचं वर्णन तिथं असतं.त्या वर्णनातलं एक वाक्य माझ्या मनःपटलावर कायमचं कोरल्या गेलंय ते म्हणजे Eyes only see, what mind knows.अर्थात रूग्ण तपासताना डाॅक्टरच्या मनात असलेल्या वैद्यकिय निदानाच्या संभावनाच त्याला रूग्णामध्ये प्रथमदर्शनी आढळू शकतात.कित्ती खरं आहे ना हे? अगदी आपल्या दैनंदिन जीवनात पण हे बऱ्याच अंशी लागू पडतं.पण कधी कधी या नियमाला अपवाद पण होतात एखाद्या प्रवासात.आपल्याला माहिती नसलेली अगदी ऐकलेली पण नसलेली एखादी गोष्ट आपण बघतो व कुतूहल जागृत होऊन त्याविषयीच्या माहितीचा शोध घेऊ लागतो आणि मग आपल्याला जी माहिती भेटते ती आपल्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या व जाणींवाच्या कक्षा विस्तारत नेते, नाही?
असाच एकदा ओंकारेश्वरला जाण्याचा योग आला.बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग क्षेत्र आहे ओंकारेश्वर. पुण्यसलिला नर्मदेच्या काठावर वसलेलं ओंकारेश्वर मध्यप्रदेशात येतं.मी माझ्या अन्य तीन मित्रांसह तिथे गेलो होतो.तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की तिथं नर्मदेच्या उत्तर तीरावर एक ओंकारेश्वराचं व दक्षिण तीरावर एक ममलेश्वराचं अशी दोन शिवालयं आहेत.आम्ही दक्षिण काठावर होतो त्यामुळे उत्तर तीरावरील मंदिराला जाण्यासाठी बोटीने जावं लागेल हे स्पष्टच होतं. जिथे गाडी पार्किंग होतं तिथंच एका व्यक्तिने एका बोटवाल्या मुलाला आवाज देऊन बोलावलं व त्याला आम्हाला उत्तर तीरावर जायचंय हे सांगितलं.आम्ही चौघे-पाचजण असूत.थोडंफार बोटीच्या
भाड्याविषयी घासघीस झाली असेल/नसेल व आम्ही त्याच्या बोटीने जायचं नक्की केलं.अठरा-एकोणवीस वर्षांचा सुदृढ तरूण पोरगा होता आमचा नावाडी. घाटाच्या पायऱ्या उतरून खाली आलो व त्याच्या बोटीत बसलो.ती मोटारबोट होती.नर्मदा मला कायमच भुरळ पाडते.आद्य शंकराचार्यांनी लिहीलेल्या नर्मदाष्टकाची,नर्मदा नदी बघुन मला आठवण येते.नदी काठचा उंचच उंच दगडी किनारा व त्या दगडांचे स्पष्टपणे दिसून येणारे स्तर बघण्यात मी चांगलाच गुंगलो होतो.आमची बोट नदीपात्राच्या मध्यभागी आली.पाण्याचा हिरवट काळसर रंग तिथं नदीपात्राची खोली खुप जास्त असावी हे स्पष्ट जाणवून देत होता.मी सहज माझ्या नावाड्याला नदी पात्राची खोली किती आहे
हे विचारलं. तर तो पोरगा मला म्हटला की ‘मैय्या यहां पाचंसौ फिट गहरी बहती है’.नर्मदातटीच्या या लोकांचं भावविश्व नदीभोवती इतकं छान गुंफलंय की ती लोक नदीला आईच समजतात.मला त्याचं नर्मदेला मैय्या म्हणणं खुपच भावलं.परंतू नदी पाचशे फुट खोल असेल याबद्दल त्याचं मत नदीचं तुलनात्मक अरूंद पात्र बघता फारसं पटत नव्हतं.पण मग नदीपात्राची खोली सांगणारा अन्य कोणताही माहितीस्त्रोत तिथं नव्हता.त्या नावाड्याचा जन्मापासून सगळा जीवनकाळ नर्मदेवरच गेला आहे त्यामुळे  त्याने सांगितलेल्या माहितीवर विश्वास ठेवायला काही हरकत नव्हती.आणि तसंही मी तिथे ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला आलो होतो,नदीपात्राची
लांबी,रूंदी,खोली माहिती करून घ्यायला नाही, त्यामुळे मी तो विषय तिथंच थांबवुन नावाड्याला त्याचं नाव वय शिक्षण इ विचारलं.त्याचं वय अठरा-एकोणवीस वर्ष काय जे त्याने सांगितलं ,शाळा आठवी नववीत सोडून दिलीये व आडनाव केवट आहे हे त्यानी सांगितलं.’हम केवट है’ हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर अभिमान डवरून आला होता.’पुराणो मे लिखा है, नर्मदा किनारे केवट सब से श्रेष्ठ होते है’ तो मला सांगायला लागला.मला हे ऐकून भारीच आनंद झाला.नर्मदेच्या दोन्ही तटांवर वेगवेगळ्या जनजाती व जमाती रहातात.नर्मदा परिक्रमा केल्यास सांस्कृतीक मानववंशशास्त्रा (cultural anthropology)  बद्दल बरीच माहिती भेटू शकते.कालांतरानी मी ओंकारेश्वराच्या पश्चिमेस नर्मदा किनारी फारतर पन्नास किलोमिटरवर असलेल्या रावेरखेडीला पहिल्या रावबाजी पेशव्यांची समाधी बघायला गेलो होतो.समाधी बघुन झाल्यावर तिथे सहज  नर्मदेत एका डोंगीत बसून फेरफटका मारला होता.त्या डोंगीच्या नावाड्याचं आडनाव वर्मा होतं व ती वर्मा लोक तिथं परंपरागत नावाडी व मच्छीमारीचं काम करतात हे पण नव्यानेच कळलं होतं. असो. जसाजसा घाट जवळ आला,आमच्या नावाड्याने दुरूनच आम्हाला मांधाता राजाचा राजवाडा दाखवला.नर्मदेच्या ऐन तीरावर नदीपात्राला लागुनच दाटीवाटीने बांधलेली घरं व नर्मदेच्या पुराच्या पाण्याचा उपद्रव होऊ नये म्हणुन त्यांच्या बांधलेल्या उंचच उंच मजबूत भिंती मला खुपच नाविन्यपूर्ण वाटल्या.घरांच्या त्या दाटीतंच तो नावाडी एका घराकडे बोट दाखवून ,वहां वो मेरा घर है,देखो असं म्हणाला.मला नक्की कोणतं त्याचं घर होतं हे शेवटपर्यंत लक्षात आलं नाही. लहानपणी रांगणं शिकण्यापूर्वी नर्मदेत पोहणं शिकलो असं ही तो सांगत होता . गप्पांच्या नादात लवकरच आम्ही घाटावर पोहोचलो व बोटीतुन उतरून घाटाच्या पायऱ्या चढून ओंकरेश्वराच्या मंदिरात गेलो.थोडावेळ रांगेत उभं राहून शिवलिंगाचं दर्शन घेतलं,मी तिथं लिंगाष्टक स्तोत्र म्हटलं होतं.बाहेर आलो व पाच एक मिनीटं थांबुन घाट उतरून खाली आलो.बोटीत बसून परत दक्षिण तीरावर आलो.तिथं त्या नावाड्याने आम्हाला जिथं उतरवलं त्याठिकाणी पायऱ्या सुरू होतात त्याच्या अलिकडेच एका गोमुखातून पाण्याचा एक मोठा झरा खळाळत नदीकडे वाहत होता.मी त्या झऱ्यात हात धुतले व तहान लागलीच होती तर तेच पाणी प्यायलो.खुपच छान वाटलं ते झऱ्याचं ताजं पाणी पिऊन,मला. घाटाच्या पायऱ्या चढून वर आलो व ममलेश्वराच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीचं दर्शन घेतलं. या मंदिरात तुलनेने गर्दी काहीच नव्हती.रूद्राष्टक म्हणून मी बाहेर पडलो व मंदिर परिसरात फिरायला लागलो.मुख्य मंदिरासमोरच एक दोन लहान लहान मंदिरं होती.एका मंदिराच्या दारासमोर एक चेहऱ्याचं शिल्प ठेवलं होतं तर बाजूला प्रांगणात  दोन तीन छोटे छोटे चौकोनी शिल्पं ठेवले होते.शिल्पाच्या चारही बाजूला ढाल तलवार घेतलेला योद्धा,शिवलिंगाची पुजा करणारी स्त्री,मंचावर झोपलेली व्यक्ती व आकाशातुन येणारी एक व्यक्ती व चंद्रसूर्य कोरलेले होते.मी कुतुहलापोटी यासर्वांचे फोटो काढलेत.मंदिराच्या भिंतीवर तांडवनृत्य करणाऱ्या शंकराचं शिल्प बघुन तर मला रावणानी लिहीलेलं शिवताण्डव स्तोत्रच आठवलं होतं.शंकरपार्वतीचं पण शिल्प होतं बहुतेक.या सगळ्यांचे मी फोटो काढलेत व आम्ही परत फिरलो.
घरी आल्यावर मी देगलुरकर सरांना त्या फोटो संदर्भात काॅल केला होता व त्या शिल्पांचे फोटो सरांना पाठवून दिले होते. देवळाच्या दारात ठेवलेलं चेहऱ्याचं शिल्प हे कीर्तीमुखाचं आहे तर चौकोनी शिल्प हे वीरगळ आहे,सरांनी मला सांगितलं. ‘वीरगळ’ हे प्राचिन काळी युद्धामध्ये वीरगतीला गेलेल्या एखाद्या योद्ध्याच्या स्मरणार्थ घडवल्या जायचे व मांडल्या जायचे.त्याकाळचे ते ‘अमर जवान ज्योती’ सारखे स्मारकच समजायला काही हरकत नसावी. अगदी सोमनाथला पण सरदार पटेलांनी  सोमनाथाच्या मंदिराचं पुनर्निर्माण केलं तिथे पण मंदिरापासुन थोडं दूर समोर मंदिराच्या रक्षणार्थ धारातिर्थी पडलेल्या सर्व ज्ञातअज्ञात वीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक छोटंसं स्मारकशिल्प बनवलंय.वीरगळाचं शिल्प वेगवेगळ्या धाटणीचं असू शकतं पण त्यावर सहसा ढाल तलवार घेतलेल्या योद्ध्याचं चित्र असतंच.सरांनी मला त्या चौकोनी शिल्पाच्या प्रत्येक शिल्पचित्राचा अर्थ सांगितला होता.चंद्रसूर्याचा अर्थ आकाशात चंद्रसूर्य असे पर्यंत त्या वीर योद्ध्याच्या हौतात्म्याची कीर्ती दिगंत राहिल, हे एकीकडे सर मला सांगत होते आणि जिथं ते शिल्प ठेवलं होतं तिथं ते कोणाच्या स्मृतीत ठेवलंय हे तर सोडाच पण ते एक वीरस्मारक आहे हे पण कोणाला फारसं माहिती नव्हतं याचा मी विचार करत होतो.
असंच एकदा माझ्या बहिणीकडे अलिबागला गेलो होतो.रात्रभर प्रवास करून दुसऱ्या दिवशी तिच्या घरी पोहोचलो,अंग सगळं घामाने व प्रवासाने आंबलेलं होतं.गेल्याबरोबर मस्त पंधरावीस मिनीटं आंघोळ केली व जेवण केलं.जेवणानंतर माझी बहिण मला फिरायला घेऊन निघाली.तिचे शेजारी आहेत धुमाळ काका.अगदी घरोब्याच्या संबंधातले.त्यांचं मूळगाव आहे नारंगी.ती मला नारंगीला त्यांच्या घरी व तिथुन बाजुच्या मंदिरात नेणार होती. अलिबागपासुन ईशान्येला  पेणला जाणाऱ्या रस्त्यावर पिंपळभाट ओलांडला की एक मोठा डोंगर लागतो.डोंगरातला घाट जिथे संपतो तिथे कार्लेखिंडीतून एक रस्ता उत्तरेकडे वळतो व मुख्य रस्ता पुढे वडखळ पेण कडे जातो.या उत्तरेकडे वळलेल्या फाट्यावर आत वळणावळणाच्या रस्त्यानी पंधरा वीस किलोमिटरवर नारंगी गाव आहे. रस्ता पूर्ण दुतर्फा झाडीने आच्छादलेला व रस्त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची कमीजास्त उंचीची भिंत.नुकताच श्रावण लागला होता.आम्ही निघालो तेव्हा दुपार झालेली होती व सूर्य ढगा आडून अधुनमधुन डोकावत होता. कोकणातलं मोठं प्रसन्न वातावरण होतं ते.भगिनी निवेदिता मला ठिकठिकाणी थांबवुन मोठमोठाली झाडं किंवा एखाद्या तळ्यात फुललेली water lily किंवा कमळाची फुलं  दाखवत होती.तिला निसर्गाची भारीच आवड, अर्थातच मलादेखील! मला तर कळत्या वयात जेव्हा पहिल्यांदा  सह्याद्री बघितला,तत्क्षणीच त्याने माझ्या मनावर गारूड केलंय, ते या जन्मी उतरणार नाही हे नक्की. रमतगमत आम्ही धुमाळ काकांच्या घरी गेलो.काका घरी नव्हते काकू होत्या.अगदीच खास कोकणी पद्धतीचं गाव व घर होतं काकांचं.माझी बहिण काकूंसोबत बोलत बसली व मी त्यांच्या परसबागेत गेलो.वेगवेगळी झाडं बघुन मी चांगलाच रमलो होतो त्यांच्या परसबागेत.त्यांनी पाळलेला ससा त्याच्या पिंजऱ्यात आरामशीर पहुडला होता. त्याला बघण्यात माझा वेळ कसा गेला ते मला कळलंच नाही .गप्पा आटोपल्यावर आम्ही सरबत घेऊन गावाशेजारच्या मंदिराकडे निघालो.गावापासून दोनएक किलोमिटर दूर डोंगराच्या चढावावर ते मंदिर होतं.मंदिराच्या जवळच एक जलकुंड होतं,जलकुंड कसलं छोटा तलावच होता तो तर पश्चिमेला सह्याद्रीची भलीमोठी उंच डोंगररांग होती. मंदिराजवळच कोणीतरी नुकताच कचरा जाळला होता त्याचा धूर सर्वत्र पसरला होता,अगदी मंदिरात सुद्धा.आम्ही आत गेलो,दर्शन घेतलं व बाहेर येऊन प्रदक्षिणा घातली. गाभाऱ्यातील एका कोनाड्यात एक छोटी मूर्ती होती.मी तिचा फोटो घेतला.मंदिराच्या बाहेर बाजुला एक शिल्प होतं.एक व्यक्ती खांद्यावर एक काठी घेऊन जाताना कोरलेला होता.मी त्या शिल्पाचा फोटो घेतला होता.ते शिल्प वीरगळ असावं असा माझा अंदाज होता.पण शिल्पाच्या हातात ढाल तलवार नसून एक काठी आहे हे बघुन मला तशी खात्री नव्हती.आमच्या इतिहासाशी संबंधित व्हाॅट्सअॅप ग्रुपवर त्या शिल्पाचा फोटो टाकल्यावर प्रा.रवी बावीस्कर सरांनी ते शिल्प वीरगळच आहे हे निश्चीत करून दिलं.त्या शिल्पाच्या हातातली काठी म्हणजे भाला असावा असंही त्यांनी सांगितलं.कोनाड्यातल्या मूर्तीचा फोटो बघुन ती मूर्ती भैरवाची आहे हे देगलुरकर सरांनी सांगितलं होतं.
आता मला वीरगळाची थोडीफार माहिती झाली होती.पुढे पुसदला एका अंत्यसंस्कारासाठी जाणं झालं होतं.तिसऱ्या दिवशी सावडण्यासाठी गेलो होतो.जाताना मित्राच्या गाडीवर गेलो पण येताना सगळेजण निघुन गेलेत.मी एकटाच राहिलो होतो हे बघुन एक नातेवाइक माझ्यासाठी थांबले. आम्ही रस्त्याने पैदल परत निघालो.स्मशानातून गांधी पुतळ्याकडे येणाऱ्या रस्त्यावर आम्ही चालत होतो.  त्या रस्त्यावरून करूणेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला वळलो आणि त्या वळणावर अगदी रस्त्याला लागुनच एक छोटंसं लाल रंगात रंगवलेलं मंदिर मला दिसलं.हा भाग गावाच्या  जुन्या   मध्यवर्ती भर वस्तीतला भाग आहे.या मंदिराच्या बाहेरच अगदी रस्त्याला लागुनच एक शिल्प ठेवलेलं आहे ते मला दिसलं.
शिल्पात एक व्यक्ती एका हातात तलवार व एका हातात ढाल घेऊन दाखवला आहे. हे शिल्प बघता क्षणीच मला ते वीरगळ आहे हे जाणवलं.मला फोटो घेण्याची इच्छा होती परंतू प्रसंगाचं औचित्य ओळखुन मी तो मोह आवरला होता. माझ्या डोक्यात त्या शिल्पाविषयीचे विचार सतत घोळत असायचे.कोण असेल बरं तो वीर योद्धा ज्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हे शिल्प तिथं मांडलं असेल? कुठल्या समरांगणी त्याला वीरमरण आलं असेल? ते युद्ध कधी झालं असेल? कोणाच्या बाजुने तो लढला असेल व कोणाविरूद्ध? याची कसलीही माहिती मला नाही.मला फक्त एवढं माहिती की औरंगजेबाच्या काळात पुसदची जबाबदारी राजस्थानातल्या कोण्या राजपूत सरदाराकडे होती. त्याच्या सैन्यातला सैनिक असेल हा की कोणी स्थानिक मराठी सैनिक? स्थानिकच असण्याची शक्यता जास्त कारण शिल्प पुसदला आहे.बरं याविषयी अधिक माहिती देऊ शकेल असं कोणी पुसदमध्ये माझ्या ओळखीचंही नाही. या माझ्यासाठी तरी अज्ञात वीराचं हे शिल्पं वाहत्या रस्त्याच्या अगदी कडेला उन्हापावसाचा मारा सहन करत बरंचसं उपेक्षित असं पडलंय खरी.बघितलं त्या क्षणापासुन हे शिल्पं माझ्या मनात घर करून होतं. मी सर्वप्रथम ओंकारेश्वरला एक शिल्प बघितलं,तेव्हा मला वीरगळाविषयी काहीही माहिती नव्हती.सहज औत्स्युक्यापोटी मी फोटो काढले व देगलुरकर सरांना दाखवले होते.त्यांनी दिलेल्या माहिती मुळेच माझ्या मनाला वीरगळ या शिल्पसंकल्पनेची जाणीव झाली होती.त्या माहितीच्या आधारेच मी नारंगीच्या वीरगळाविषयी कयास बांधू शकलो ,जो रवी सरांनी निश्चीत करून दिला होता.तर पुढे पुसदचा वीरगळ मला अगदीच अचानक व फारच वेगळ्या परिस्थितीत बघितल्या बरोबर ओळखू आला. Eyes only see,what mind knows चा पुनःप्रत्यय मी घेतला होता हे नक्की.
(वीरगळा विषयीची ही पोस्ट लिहीताना मी माझ्या जवळील सर्व भ्रमंतीतील शिल्पांचे फोटो असलेलं फोल्डर शोधत होतो.ते पूर्ण फोल्डरच माझ्या मोबाइल व लॅपटाॅपमधूनही गहाळ झाल्याचं मला लक्षात आलं.सुदैवाने माझा बारावीतला वर्गमित्र आशिष खेडकर याच्याजवळ ओंकारेश्वराच्या वीरगळाचे फोटो व्हाॅट्सअॅपला सापडलेत.त्यानी ते मला परत पाठवलेत.कीर्तीमुखाचा फोटो मला सापडला नाही.तर पुसदच्या वीरगळाचा फोटो माझा मित्र प्रशांत भट यानी काढून पाठवलाय. आशिष व प्रशांत दोघांचेही मनःपूर्वक धन्यवाद.)

Sunday, July 26, 2020

रायगड जिल्ह्याची भटकंती

  एक-दीडच्या दरम्यान काशीद बीचच्या आधी साधारण आठ किमीवर जेवणासाठी थांबलो. गेल्याच महिन्यात येथील हॉटेल समर्थकृपात जेवलो होतो . जेवण आवडले होते. त्यातच हॉटेलच्या गेटला लागूनच बिअर शॉपी असल्याने ह्यांचे व जावयांचे येथेच थांबण्याबद्दल एकमत झाले. मासे, मटण तांदळाची भाकरी मिळाल्याने जावई एकदम खुश. व्यवस्थित खाणे-पिणे आटोपले. येथल्याच स्टॉलवर चायनीज पदार्थांसाठीची तयारी सुरु होती. पण ही तयारी संध्याकाळसाठीची आहे असे समजले. सुटीच्या दिवशी अगदी रात्री १२ पर्यंत येथे वर्दळ असते असे कळले. जमल्यास संध्याकाळीही येथेच जेवायला यायचे ठरले.

येथून निघाल्यावर रूम शोधणे सुरु झाले. दोन दिवस सलग सुटी असल्याने बहुतेक हॉटेल भरलेली होती. थोडयाफार रूम खाली होत्या तेही चढे दर सांगत होते. पूर्वी गविंच्या एका प्रतिसादात प्रकृती रिसॉर्टचे नाव वाचल्याचे आठवत होते तेथे पोहचलो. रिसॉर्टचे दरपत्रक पाहून भर दुपारच्या उन्हात आम्ही गार पडलो. चार जणांसाठी रूमचा दर होता जवळपास रु.४० हजार. असे असूनही रिसॉर्ट पूर्ण भरलेले होते. यांचेकडे कोणतीच रूम शिल्लक नसल्याचे कळल्यावर जावयांना उत्साह संचारला. काहीही करून एखाद्या रूमची व्यवस्था कराच असे सांगू लागले. शेवटी रूम मिळतच नाही म्हटल्यावर नाईलाज झाल्यासारखे दाखवत आम्ही परत फिरलो. चार वाजायला आले होते. आता सरळ बीचवर जाऊन रात्री मुक्कामी आपल्या घरीच जावे असाही विचार मनात येऊ लागला. प्रकृती रिसॉर्टच्या थोडे पुढे मुख्य रस्त्यालाच एक रिसॉर्ट दिसले.


चौकशी केल्यावर एसी रूमचा तीन हजार असा दर मिळाला. घासाघीस करून पाच हजारात दोन रूम ताब्यात घेतल्या. थोडा आराम करून बीचवर गेलो. आज फक्त भिजायचे. फोटो काढायचेच नाहीत असे ठरवून फक्त एक फोन सोबत घेतला व बाकी सगळ्या इलेकट्रोनिक वस्तू रूमवरच ठेवल्या. किनारा माणसांनी फुलून गेला होता. . ऍडव्हेंचर स्पोर्ट्सवाल्यांची चांगलीच चलती होती. सूर्यास्त पाहून व पाण्यात यथेच्छ मजा करून रूमवर परत आलो. नऊच्या दरम्यान जेवणासाठी बाहेर पडलो. दुपारी जेवलो तेथेच जायचे ठरले. अंधार पडला होता आणि भूकही लागली होती त्यामुळे आता हेच अंतर खूप जास्त वाटत होते. येथे पोहचलो आणि गर्दी बघूनच कळले कि यांचे चायनीज जेवण खरोखरच चांगले असणार आहे. ऑर्डर दिली. वेळ लागणार होता. मधल्या वेळात सासरा-जावयानेआडोशाला एका टेबलवर आपली सोय करून घेतली.
यथील एक स्पेशल डिश, पॅकिंग फ्राईड राईस

पॅकिंग चिकन फ्राईड राईस, चिकन क्रिस्पी, चिकन चिली व माझ्यासाठी व्हेज फ्राईड राईस सर्व मिळून बिल झालं रु.५६०/- फक्त! अकरा वाजले. रूमवर जाण्यासाठी निघालो. दोन्ही मुली कामचलाऊ गाडी चालवतात त्यामुळे ह्यांची व जावयांची ड्रिंक अँड ड्राइव्हच्या त्रासातून मुक्तता होते. वाटेत थांबून आइस्क्रीमचा आनंद घेतला. रिसॉर्टला येऊन बऱ्याच वेळ आवारातच गप्पा मारून झोपायला गेलो.
सकाळी आरामात उठलो. नाश्ता करून बाहेर पडलो. येथील नाश्ता म्हणजे पोहे/उपमा. नाश्ता रु.३०/- एका प्लेटचे, चहा २० रुपये. खूप छान आणि स्वस्त.
थोडे रिसॉर्टविषयी : मुख्य रस्त्यालाच लागून दोन मजली इमारत आहे पुढे, पार्किंगसाठी जागा, बाग, लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था, पाठीमागे स्विमिंग पूल व आमराई (पूल काही कारणाने बंद होता. आंब्याची झाडे अजून लहान आहेत). एक विशेष वाटले इतकी चांगली व्यवस्था असून व आजूबाजूचे रिसॉर्ट गजबजलेले असताना या रिसॉर्टमध्ये आमच्या व्यतिरिक्त कुणीही नव्हते. जणूकाही संपूर्ण रिसॉर्ट आमच्यासाठीच राखीव होते. रिसॉर्टच्या मालकांनी यदाकदाचित हा लेख वाचला तर माझे सांगणे आहे की व्यवस्थापनात कुठेतरी सुधारणा आवश्यक आहे. (मालक मराठी माणूस व पुण्याचा आहे असे कळते).

रिसॉर्टचे प्रवेश द्वार ते मागील स्विमिंग पूल पर्यंतचा १८० अशांतला पॅनोरॅमिक व्ह्यू

येथील इतर काही फोटो

रिसॉर्ट सोडले व बीचवर गेलो. आज बीचवर थोडासा फेरफटका मारून काल फोटो काढले नव्हते त्याची भरपाई करून घेतली.

 
 
अलिबाग परिसराचा फेरफटका


‘करू या देशाटन’
सदराच्या मागील भागात आपण रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीच्या उगमपासूनचा सह्याद्रीला लागून असलेला पाली परिसर पाहिला. आजच्या भागात पाहू या कुंडलिका नदी सागराला मिळते तेथून उत्तरेकडे असलेला पर्यटकांचा आवडता अलिबाग परिसर. 
.......
रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीची किनारपट्टी ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते. इतिहासाच्या पाऊलखुणा तर येथे जागोजागी आहेत. मुंबई व पुण्याहून साप्ताहिक सुट्टी घालविण्यासाठी येथे येणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी होते. जास्त पर्यटक मुंबईतील असल्याने येथे फिरताना मुंबईत असल्यासारखे वाटते. कारण मराठी असले तरी हिंदीतच बोलण्याची आणि इंग्रजीची स्टाइल व फॅशन करण्याची चढाओढ दिसते.

ज्यू (इस्रायली) प्रार्थनागृह, अलिबागज्यू (इस्रायली) प्रार्थनागृह, अलिबाग
अलिबाग : मजा करायची आहे, धमाल मस्ती करायची आहे? मग चला अलिबागला! भारताचे दिवंगत लष्करप्रमुख जनरल अरुण वैद्य, तत्त्वज्ञ नानासाहेब धर्माधिकारी, ‘जय मल्हार’फेम देवदत्त नागे, अभिनेत्री अश्विनी भावे, ‘सारेगमप लिटिल चॅम्प’मधील मुग्धा वैशंपायन हे सर्व अलिबागचेच. सन १९०४मध्ये स्थापन केलेली चुंबकीय वेधशाळा अलिबागमध्ये आहे. आता येथे अत्याधुनिक यंत्रणा असल्याने हवामानाचा अचूक अंदाज मिळतो. अलिबागमध्ये कान्होजी आंग्रे यांची समाधी आहे. समाधी परिसर खूपच छान ठेवण्यात आला आहे. कान्होजी आंग्रे यांच्यामुळेच इंग्रजांना पश्चिम किनारपट्टीवर जम बसविता आला नाही. शेवटी इंग्रज बंगालच्या उपसागरातून कोलकाता येथे गेले व तेथून गंगा नदीच्या काठाने दिल्लीकडे पोहोचले. 

अलिबाग आणि त्याच्या शेजारच्या गावांमध्ये अनेक ज्यू (इस्रायली) लोक वस्ती करून होते. त्या वेळी इस्रायल अस्तित्वात नव्हते. इस्रायली आळी (गल्ली) नावाचा भागही अलिबागमध्ये आहे. या लोकांना बेने इस्रायली म्हणून ओळखले जायचे. त्यांचा प्रमुख व्यवसाय तेल गाळणे आणि विकणे हा होता. त्या वेळी तेथे बेने इस्रायली नावाचा श्रीमंत माणूस राहत असे. त्याच्या बागेत आंबा आणि नारळाचे अनेक वृक्ष होते. म्हणून स्थानिक लोक ‘अलीची बाग’ असे म्हणत व त्या वरूनच अलिबाग हे नाव रूढ झाले, असे म्हणतात. मॅजेन एवॉट सिनेगॉग (Magen Avot Synagogue) हे ज्यू लोकांचे प्रार्थनास्थळ येथे आहे व वारसा वास्तू म्हणून त्याची काळजी घेण्यात येते. व्हॉइसराय लॉर्ड कर्झन याने येथे भेट दिली होती. अलिबागच्या आसपास अनेक बीच आहेत व अलिबाग हे मध्यवर्ती असल्याने आणि दोन्ही बाजूला बीच असल्याने येथे गर्दी असतेच. 

हिराकोट : अलिबागच्या बसस्थानकापासून उत्तर पश्चिम कोपऱ्यात दोन किलोमीटर अंतरावर हिराकोट तलावाशेजारीच हा भुईकोट उभा आहे. कुलाबा किल्ल्याला संरक्षक म्हणून याची निर्मिती झाली होती. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी हा भुईकोट किल्ला १७२०मध्ये बांधला. या किल्ल्यात कान्होजी आंग्रे यांचा खजिना असे. जेव्हा पहिले बाजीराव यांचे रावेरखेडी येथे निधन झाले, तेव्हा नानासाहेब (थोरल्या बाजीरावांचे चिरंजीव) हिराकोट येथे मुक्कामास होते. त्यानंतर ते पेशवाईची वस्त्रे आणण्यासाठी साताऱ्याला गेले. सन १८४३मध्ये आंग्रे यांनी किल्ला सोडल्यावर इंग्रजांनी त्याचे तुरुंगात रूपांतर केले. किल्ल्याचे क्षेत्र प्रतिबंधित असल्याने आपल्याला आत प्रवेश मिळत नाही व पोलिसांच्या परवानगीने फक्त बाहेरून बघता येतो. 

कुलाबा किल्लाकुलाबा किल्ला


कुलाबा /सर्जेकोट किल्ला :
अलिबागच्या सागरकिनाऱ्यावर उभे राहिल्यावर समुद्रात एका प्रचंड खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही जलदुर्गजोडी दिसते. ती ३५० वर्षे सागराच्या लाटा अंगावर घेत उभी आहे. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूंनी पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो, तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भुईकोट बनतो. हा दुर्ग ज्या खडकावर उभा आहे, त्याची दक्षिणोत्तर लांबी २६७ मीटर असून, पूर्व-पश्चिम रुंदी १०९ मीटर आहे. शिवाजी महाराजांनी मोक्याच्या बेटांवर किल्ले बांधले व जुने बळकट केले. त्यापैकी कुलाबा किल्ला खूप महत्त्वाचा. कारण तो मुंबईच्या समोर आहे. इंग्रज व इतर पाश्चात्य आक्रमकांवर वचक ठेवण्यासाठी किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिद्धीस आला. 

किल्ल्याचे प्रवेशद्वार उत्तर-पूर्व दिशेला किनाऱ्याच्या बाजूला आहे. हा दुर्ग बांधताना दगडाचे मोठे मोठे चिरे नुसते एकमेकांवर रचलेले आहेत. दोन दगडांमधील फटीत चुना भरलेला नाही. त्यामुळे समुद्राची लाट किल्ल्याच्या तटाच्या भिंतींवर आपटल्यावर पाणी दगडांमधील फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर कमी होतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशी शिल्पे कोरलेली बघण्यास मिळतात. दुर्गाच्या दुसऱ्या दरवाज्याचे अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्याला एकूण १७ बुरुज आहेत. चार टोकांना चार, पश्चिमेला पाच, पूर्वेला चार, उत्तरेला तीन व दक्षिणेला एक बुरुज असे आहेत. बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारुखानी अशी नावे आहेत. 

किल्ल्यात प्रवेश करताच भवानी मातेचे मंदिर, पद्मावती देवी, गुलवती देवी यांची मंदिरे आहेत. डावीकडे पुढे गेल्यावर हजरत हाजी कमाल उद्दीनशहा दरबार यांचा दर्गा आहे. डावीकडे आंग्र्यांच्या वाड्याचे अवशेष दिसतात. किल्ल्यावर अजूनही लोकांचा राबता असलेले सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. गणेशमूर्तीची उंची दीड फूट आहे. १७५९ साली राघोजी आंग्रे यांनी हे मंदिर बांधले असून, गणेशाची संगमरवरी मूर्ती आहे. मंदिराच्या प्रांगणात उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे. मंदिरासमोर चिरेबंदी बांधणीची गोड्या पाण्याची पुष्करिणी आहे. पुष्करिणीच्या पुढे तटापलीकडच्या दरवाज्यातून बाहेर गेल्यावर स्वच्छ पाण्याची पायऱ्या असलेली विहीर आहे. 

दुर्गाच्या दक्षिण टोकाला असलेल्या दरवाज्याला धाकटा दरवाजा, यशवंत दरवाजा, दर्या दरवाजा अशी नावे आहेत. या दरवाज्यावर गणपती, गरुड, मारुती, मगरी, कमळे, वेलबुट्टी यांची नक्षी कोरलेली दिसून येते. किल्ल्याच्या तटात गोदीचे अवशेष आहेत. तेथे कान्होजींच्या काळात नवीन जहाजे बांधली जात व जुनी दुरुस्त केली जात असत. किल्ल्याच्या उत्तरेला चाके असलेल्या दोन तोफा आहेत. तोफांच्या चाकांजवळ तोफा बनवणाऱ्या कंपनीचे नाव कोरलेले आहे. डाउसन हार्डी फिल्ड, डाऊ मूट आयर्न वर्क्स, यॉर्कशायर, इंग्लंड...  वर्ष आहे १८४९. किल्ल्याच्या दक्षिण दरवाजातून सर्जेकोटला जाता येते. अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावरून ओहोटीच्या वेळेस किल्ल्यात चालत जाता येते. भरती-ओहोटीचे भान ठेवूनच किल्ल्यात जावे, नाही तर किल्ल्यावर अडकून पडावे लागेल. (कुलाबा किल्ल्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सर्जेकोट : कुलाबा किल्ल्याच्या उत्तरेस लागूनच सर्जेकोट आहे. मोठ्या भरतीच्या वेळी दोन्ही किल्ले वेगळे दिसतात. दोन्ही किल्ल्यावर जाण्यासाठी पूर्वी एक वाट होती. शिवाजी महाराज आपल्या आज्ञापत्रात म्हणतात, ‘किल्ल्यासमीप दुसरा डोंगर असू नये. असल्यास तो सुरुंग लावून फोडावा आणि शक्य नसल्यास त्या डोंगरावरही किल्ला बांधावा. यामुळे मुख्य किल्ल्याला संरक्षण मिळते. अन्यथा शत्रू त्या जागेवर मोर्चे लावून किल्ला जिंकून घेऊ शकतो.’ आज्ञापत्रातील या आज्ञेनुसार संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याजवळील खडकावर सर्जेकोट किल्ला बांधला. किल्ल्यावर बुरुजाव्यतिरिक्त अन्य कोठलेही बांधकाम अस्तित्वात नाही. शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा हा एक साक्षीदार आहे. 

भरती - ओहोटीची गणिते : 
- तिथीला तीनने गुणायचं आणि चारने भागायचे. उदा. पौर्णिमा म्हणजे १५ गुणिले ३ = ४५. 
४५ भागिले ४ = ११.२५
म्हणजे सव्वा अकरा वाजता दुपारी आणि रात्री पूर्ण भरती. त्यानंतर सहा तासांनी पूर्ण ओहोटी

- भरती-ओहोटीच्या गणितात (तिथी) तीनने गुणून मिनिटे वाढवतात. नवमी असेल तर ९ गुणिले ३ भागिले ४ = ६.७५
यात सहा हा पूर्णांक तास धरायचा आणि ०.७५ म्हणजे ४५ मिनिटे (एका तासाचा ०.७५ भाग म्हणजे ४५ मिनिटे)
तसेच ९ गुणिले ३ = २७ मिनिटे, एकूण मिनिटे : ४५+२७ = ७२ मिनिटे = १ तास १२ मिनिटे
यात आधीचे सहा मिळवा म्हणजे ६ + (१ तास १२ मिनिटे) = ७ वाजून १२ मिनिटे ही भरतीची वेळ मिळाली. 

- तिथीत +१ करून त्याची पाऊणपट केली की पूर्ण भरतीची वेळ कळते. उदा. पौर्णिमा - १५, १५+१=१६. १६ची पाऊणपट म्हणजे १२. म्हणजेच दुपारी १२ला पूर्ण भरती. नंतर सहा तासांनी पूर्ण ओहोटी. (भरती-ओहोटीची गणिते : साभार – ‘मायबोली’) 

अक्षी येथील सोमेश्वर महादेव मंदिर
 
 तपोभूमी कनकेश्वर




कनकेश्वर






अलिबाग तालुक्यातील श्री क्षेत्र कनकेश्वर हि तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक ऋषीमुनी व शिवभक्त येथे आराधना, साधना आणि तपश्चर्या करण्यासाठी वास्तव्य करीत असत. असें म्हणतात कि निसर्गाच्या सान्निध्यात परमेश्वराचे अस्तित्व असते आणि जो त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो त्याला त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. निर्बिड जंगलाचा परिसर असलेले हे मंदिर अलिबागच्या ईशान्येस १२ कि.मी. वर एका निसर्गरम्य अशा डोंगरावर वसलेले आहे. समुद्र सपाटी पासून उंची सुमारे ५००० फुट.   अनेक दिवस नित्याच्या पाठी लागून शेवटी तो तयार झाला. माझा जन्म हा सोमवारचा असल्याने लहानपणा पासूनच मला पशुपतीनाथां विषयी फार प्रेम.. मग कुठेही शिवालय दिसले तरी मी त्याचे दर्शन घेतल्याशिवाय रहात नाही.



कनकेश्वराच्या दर्शनाला जाणार म्हणून सकाळी लवकरच थंडीतूनच निघालो.  हळूहळू वडखळ, ईस्पात असें करत कधी कनकेश्वराच्या पायथ्याशी पोहोचलो कळलेच नाही. या स्थळाचे नाव कनकेश्वर पडण्याचे कारण म्हणजे शिवाने कनकासुर  नामक राक्षसाचा वाढ केला होता अशी आख्यायिका सांगितली जाते. शिवालयात पोहोचण्यासाठी सुमारे ७०० पायऱ्या वर चढून जावे लागते. या पायऱ्या १७४४ साली सरदार “ रघुजी आंग्रे” यांचे दिवाण “ गोविंद रंगदास” यांनी बांधल्या.  वर जाणाऱ्या पायऱ्या जमिनीलगत समांतर असल्याने आबालवृद्ध अगदी सहज दर्शनासाठी जाऊ शकतात.




सुरुवातीलाच एका मार्बल मध्ये मंदिराची माहिती आणि विशेष सूचना कोरलेली आहे. अशी पायऱ्यांची माहिती देणारा मार्गदर्शक आपल्याला आपल्याला बहुतेक टप्प्यांवर दिसतो.







कुठलाही विशेष दिवस नसल्यामुळे भक्तांची फारशी वर्दळ नव्हती; श्रावणी सोमवारी विशेषतः फार गर्दी असते. गप्पा मारत ..थोडेसे फोटोसेशन J करत नागोबाच्या टप्प्याला आम्ही पहिली विश्रांती घेतली.






काही अंतर चढल्यावर कनकेश्वराची पाउल खूण असलेली “देवाची पायरी” आपल्याला प्रथम दर्शन देते. थोड्याच वेळात आपण गायमांडी या दुसऱ्या विश्रांतीस्थानापर्यंत पोहोचतो. तिथून कठिण चढ समाप्त होतो.










गायमांडीचा टप्पा म्हणजे एका खडकाच्या खळग्यात गायीची पावले असून मुर्ती आहे. तसेच बाजूला ५ शिवलिंगे आहेत. एका गुराख्याच्या गायीच्या स्मरणार्थ बांधलेली हि जागा आहे असे येथील स्थानिकांकडून समजते. तिथून जवळच पिण्याच्या पाण्याची ही सोय केलेली आहे. तेथील थंडगार पाणी पिऊन आपला आत्मा शांत होतो; त्याची चव जणू काही अमृतासमानच! पुढे निर्बिड जंगलातून जाताना वाटेत पालेश्वराचे मंदिर लागते. याची विशेषतः म्हणजे याला फक्त पालाच वाहतात. येथून थोड्याच अंतरावर आपल्याला कनकेश्वराचे मंदिर दिसते. बाजूला असणाऱ्या प्रशस्त विहिरीला सभोवती जाळी मारून बंदिस्त केलेली आहे. कदाचित स्वच्छता/सुरक्षेच्या कारणास्तव केली गेली असावी. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच वानरसेना आमच्या स्वागताला तयार होतीच. आपण त्यांच्या वाटेला गेलो नाही तर तसा त्यांचा काही त्रास नाही.. हां पण; जर तुमच्या हातात प्रसाद किंवा खाण्याचे कही समान वगरे असेल तर जरा सावधच! कारण माझ्या हातातला प्रसाद चक्क दोनदा गायब झाल्यावर याचा मला चांगला अनुभव आला होता. मग काय... रिकाम्या हातानेच कनकेश्वराच्या दर्शनासाठी आत प्रवेश केला. त्यापूर्वी प्रवेश द्वारावरच्या भिंतीवर कोरलेले २ द्वारपाल आपले लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. जसे अगदी जय-विजयचं.  





गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगाला मनोभावे नमस्कार केला, एक मिठी मारली आणि मनात खूप भाव-भावनाचे तरंग उसंबळून आले. नाथांच्या “धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला ” या ओळी नकळतच ओठातून बाहेर आल्या.
मुख्य मंदिराला लागूनच “राम सिद्धीविनायक” देवस्थान आहे. त्याची संपूर्ण माहिती तेथील एका फलकावर लावलेली आहे. श्रीमंत परमहंस परिव्राजकाचार्य लंबोदरानंद स्वामी यांनी या मंदिराची स्थापना १८७६ साली केली आहे. मंदिराच्या परिसरात आपल्याला ब्रम्हकुंड, संत मनामाता समाधी मंदिर इ. चे दर्शन होते. येथील निरव शांतता पाहूनच त्यावेळी संतांनी या स्थानाची तपासाठी निवड केली असावी. कनकेश्वर परिसरातील थंडगार हवा व दाट वनराई याची कोणाला मोहिनी पडली नाही तर नवलंच!
येथील व्याघ्रेश्वर या देव्स्थानावरून कर्नाळा,माणिकगड,सागरगड व खांदेरी-उंदेरी हे दिसतात. पात्रुदेवीच्या मंदिरापासून खाली गेल्यावर समुद्र व मुंबई दिसते. देवस्थानाविषयी जी थोडी फार माहिती मिळाली ती अशी की, पुजा व अर्चा  उत्सवाची व्यवस्था आंग्रे यांच्याकडून होत असें. मंदिरासभोवतालाचा सुमारे १२१ हेक्टर डोंगर व त्यावरील वनस्पतीचे उत्पन्न हे देवासाठी वापरले जात असें. सरकारी दप्तरी हा डोंगर देवाच्या नावे नोंदवलेला आहे. रघुजी आंग्रेनी सवाई माधवराव पेशव्यांकडून १७७६ साली पायथ्याशी असलेले सोगाव हे गाव सर्व हक्कांसह देवस्थानाला इनाम दिले. येथील सर्वात मोठा उत्सव म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला भरणारी जत्रा.
थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. पाऊले थोडीशी जडचं झाली होती निरोप घेताना. “शिव हर शंकर नमामि शंकर” चा जयघोष मनात चालू ठेवत आणि एकदा तरी श्रावण महिन्यात तुझ्या दर्शनाला परत येईन अशी खुणगाठ मनाशी बांधत तिथून तिथून मार्गस्थ झालो...
 

कनकेश्वर निसर्गाचा एक अध्यात्मिक अविष्कार

दुपारी 11.30 चा सुमार मी आणि सौ उन्हाने करपलेल्या अवस्थेत मापगावात पोचलो आणि मग गाडी नीट लावून एकमेकांकडे आणि समोरच्या डोंगरावरच्या पायऱ्यांकडे डोळे मोठे करून पाहू लागलो. वेळ जरा चुकलीच होती आमची, एक तर पहाटे लवकर न उठणे हया दुर्गुणापायी ही विचित्र वेळ आमच्यावर आली होती. सकाळी उठायला उशीर मग भाऊच्या धक्क्यावरून 8 ची लाँच मिळाली पुढे 1.30 तास समुद्रातील प्रवास, मग रेवस चे सुनसान आणि मोडकळीस आलेले बंदर पाहून उत्साह अजून खोलात गेला. रेवस हुन मापगाव चोंडी मार्गे 18 किलोमीटर अंतर आहे ते पार केले आणि गावात पोचलो. मग थोडं थांबऊया का? असं मी विचारल्यावर सौ ने नकार दर्शविला आणि मग तिचा विश्वास थोडासा घेऊन आम्ही दोघे त्या पायऱ्या चढायला सज्ज झालो.
पेण हुन अलिबाग कडे जाताना उजवीकडे वडखळ सोडल्यावर एक डोंगररांग दिसायला लागते. त्यातल्या एका डोंगरावर 2 मनोरे दिसतात तो आहे कनकेश्वर चा डोंगर. सुमारे 700 पायऱ्या असलेला हा डोंगर चढून जाताना आपल्याला खूप सुंदर निसर्ग दाखवतो पण तो 12 च्या उन्हात कसा दिसेल हा विचार करत आम्ही चढत होतो. सारखा दम लागत होता पण देवाचे बोलावणे आले की सगळे फिके पडते, इथे देवाचे बोलावणे म्हणजे वेगळ्या अर्थाने घ्यावे. तर देवाच्या मनात असले की तो आपल्याला त्रास होऊ देत नाहीत त्याचा प्रत्यय आम्हाला आला. पायर्यांच्या बाजूला चांगली सावली आहे त्यामुळे थकवा भरून निघतो आणि त्यात सूर्य डोक्यावर असताना खांदेरी उंदेरी कडून येणारा सुसाट वाराच आम्हाला वर घेऊन गेला. प्रत्येक थांब्यावर वारा आम्हाला सुख देत होता आणि आम्ही कधी कनकेश्वर पर्यंत पोचलो लक्षात आलं ही नाही.



मी साधारण 18 ते 19 वर्षांनी परत येथे आलो तरी तिकडची पुष्करणी, आजूबाजूला असलेली गर्द झाडी मला पाहून अजून आनंदली कारण तिकडंच वातावरण अतिशय शांत, मन प्रसन्न करणारं आणि हृदयाला भिडेल असेच होते. गायमांडी (बैठ्या गाईची मूर्ती) पर्यंत चढ खूप दमछाक करतो पण गायमांडी पाशी पोचलो की स्वर्ग 2 बोटं दूर असल्याची जाणीव आजूबाजूचा निसर्ग आपल्याला नकळत करून देतो. इथले पाणी प्यायचे आणि मग 10 ते 15 मिनटं सपाट चाल करून कनकेश्वर देवस्थानची कमान पार करून मारुतीराया पाशी यायचं. इथला गणेश श्रीराम सिद्धिविनायक असल्यामुळे ह्या हनुमानाचे नाते त्याच्याशी काही वेगळेच आहे. खूप शांत वाटतं आणि पक्षांचा किलबिलाट थकवा दूर करतो. इथेच बाजूला अत्यंत सुरेख बांधणीचे ब्रह्मकुंड आहे ते पाहून एका सुंदर स्थापत्यकलेचा अविष्कार पाहायला मिळतो. पुढे आलं की पुष्करणी त्या मागे कंकेश्वरचे आखीव रेखीव जुने मंदिर आणि त्या मागे उंचावलेली गर्द झाडी अजून प्रसन्न करते.
इथून पुढे आलं की काही मोजक्या पायऱ्या चढून आपण श्रीराम सिद्धिविनायक मंदिराच्या अंगणात येतो तेथून तुमच्या प्रसन्नतेचा कळस घडायला सुरुवात होते. अत्यंत साधं बांधणीचं मंदिर त्यात अतिशय मोहक आणि देवत्व ठळक पणे जाणवणारी श्री गणेशाची मूर्त त्याबाजूला श्री लंबोदरानंद स्वामींचं समाधी मंदिर आणि त्यामागे धर्मशाळा, अंगण, मुदपाकखाना, अंगणात मामाच्या गावाची आठवण करून देणारी विहीर आणि ह्या सर्वांच्या मागे उंच वाढलेली पायरी आंब्याची आमराई. हा सगळा देखावा पाहिल्यावर तुम्ही आतून कधी ताजेतवाने होता हे कळतंच नाही.
दर वर्षी वैशाख पौर्णिमेला श्रीराम सिद्धिविनायक यांचा जन्म दिवस मोठ्या थाटात पण अतिशय साध्या आणि सुरेख नियोजनात साजरा केला जातो. पाच दिवसांचा हा आनंद सोहळा सर्वजण भक्तिभावाने आणि मनमुराद आनंद लुटत साजरा करतात. आम्ही या वर्षी2 दिवस गेलो होतो पण त्या 2 दिवसात जितकं सुख आणि आनंद मनात भरून घेता येईल तितका घेण्याचा प्रयत्न केला. दुपारी 1 वाजता पोचलो तेव्हा पहिली पंगत चालू होती, आणि त्यातले आग्रहाचे शब्द, त्यातून निर्माण होणारा हस्यकल्लोळ, मग थोडेसे खेचा खेचीचे शब्द यांमुळे दोन घास सहज पोटात जास्त जातात. 
ते सगळं पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि आम्ही सुद्धा तयार झालो त्या आग्रहाच्या डोहात मुक्तपणे विहार करायला. पंगत झक्कास झाली, साजूकतुपातल्या गरमागरम जिलब्या म्हणजे खवैय्यांना पर्वणीच. इथे एक आवर्जून नमूद करावेसे वाटते की उत्सवातले आचारी आणि सर्व महिलावर्ग तर सुगरण आहेच पण त्याच बरोबर पुरुष वर्ग सुद्धा तेवढाच मनापासून  पदार्थ बनवत असतो त्यामुळे इथल्या मुडपाकघराला खऱ्या अर्थाने पूर्णब्रम्ह किचन म्हणायला हरकत नाही. कारण दोन दिवसात जिलेबी, शिरा, बटाटा भजी, मेथांबा, कढीलिंबाची चटणी,  पाण्यात कालवलेले मेतकूट, तिथल्याच झाडाच्या कैऱ्यांचे बनवलेले मस्त चविष्ट लोणचे, त्या जोडीला आमटी भात, ताक, नाश्त्याला पोहे, साबुदाणा खिचडी, चहा हे सगळे पदार्थ स्वर्गातून जशी पुष्पवृष्टी होते तसे आमच्या वर येत होते आणि कोणत्याही 5 स्टार हॉटेल मधे मिळणार नाही इतकं समाधान पोटाला, मनाला मिळत होतं. 
ह्या सर्वांच्या जोडीला पहाटे पासून वेगवेगळे अध्यात्मिक आणि भक्तीने मुरलेले जिन्नस पदरात पडत होते, ते म्हणजे काकड आरती, मग भजन, दुपारी जेवणा नंतर धनंजय चितळे यांचे मार्मिकतेची जोड असलेले भगवत गीतेवरचे प्रवचन, त्या नंतर आरती आणि मग कीर्तन. जन्माच्या दिवशी सकाळी कंकेश्वराच्या चार द्वारांची पूजा करून म्हणजेच डोंगर चढून येताना लागणारे पालेश्वर द्वार, मंदिरामागे पश्चिमेला असलेले पात्रुबाई चे द्वार, मंदिराच्या उत्तरेस असलेले गायमुख द्वार आणि पूर्वेस असलेले व्याघ्रेश्वर द्वार. यांची पूजा करून जन्मोत्सव सुरू होतो. त्यानंतर कीर्तन त्यात जन्माची गोष्ट मग त्या वेळेस जन्म त्यात मग एखादा पाळणा ऐकायला येणे म्हणजे मन प्रसन्न होणे बस!!, जन्माच्या दिवशी रात्री पालखी मग त्याची बातच न्यारी आहे, रात्तभर भजनं, गौळणी, गजर, अभंग, श्लोक म्हणत म्हणत ती पालखी नाचवणे म्हणजे भक्ती सागरात मनसोक्त पणे डुंबण्यासारखे आहे. बर ह्याच्या जोडीला चहा आणि हवेतला गारवा मिळाला की आनंदाला चारचांद लागणारच. 
संध्याकाळी गायमुख किंवा पात्रुबाई च्या समोर बसून सूर्यास्त बघणे म्हणजे एक वेगळेच सुख आहे.
तर असा हा अध्यात्मिक आणि नैसर्गिक अविष्काराचा रंग चढलेला हा कनकेश्वर डोंगर सदैव मनात घर करून रहातो. मुंबईहून फार लांब नसलेला आणि जास्त वेळ न घेणारा हा कनकेश्वर एकदा तरी पहावाच.
!! श्रीराम सिद्धिविनायक प्रसन्न !!







सुमंत परचुरे.
कसे जाल अलिबागला?
जवळचे रेल्वे स्टेशन वडखळ व पेण - ३० किलोमीटर. जवळचा विमानतळ मुंबई - १०० किलोमीटर. जवळचे बंदर मांडवा - २० किलोमीटर. अलिबाग येथे साधी ते पंचतारांकित हॉटेल्स उपलब्ध आहेत. वर्षभर केव्हाही जाता येते.
 
 
 
३५-४० कि.मी. अंतरावर श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर बीचेस आहेत. तेथील मंदिर पण छान आहे.

दिवेआगारला""पाटील मेस / खाणावळ" आहे, छान मिळतं तिथे जेवण. नक्की जेवा त्यांच्याकडे.

राहण्याची ठिकाणांची काही माहिती. फक्त संपर्क क्रमांक आहेत Sad , ही माहिती मला माझ्या कंपनीतील सहकार्‍यांकडून मिळाली आहे.

Diveagar Stay

Anand Kelkar: 0214724242

Mauli Resort: 9969383433, 9324485569, 2147225015, 2147225225

Ramesh Awlaskar: 214724707
Suhas Bapat: 21472243777
Uday Bapat: 214724235
-
Panthasta Prangan - Pure VEG - 08087660965, 07588681403

 

 

पेण, पनवेल, उरण, घारापुरी...


‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील अष्टागरांची माहिती घेतली. या भागात घेऊ या पेण आणि पनवेल परिसराची माहिती. 
..........
पनवेल, पेण हा शेतीप्रधान परिसर आहे. या भागात भातशेती मोठ्या प्रमाणावर होते. तसेच मिठागरांसाठीही हा भाग प्रसिद्ध आहे. या भागात कदंब, मौर्य, सातवाहन, शिलाहार, यादव, निजाम, मुघल, पोर्तुगीज, मराठे व शेवटी इंग्रज अशा राजवटी होऊन गेल्या. आगरी आणि कातकरी समाजही या भागात मोठ्या प्रमाणावर आहे. आचार्य विनोबा भावे, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, रामभाऊ मंडलिक याच भागातील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही यशस्वी मोहिमाही याच भागात पार पडल्या. उरण, रेवस, पेण, कर्जत, नाणेघाट, जुन्नर, पैठण असा जुना व्यापारी मार्ग होता. आता या भागात औद्योगिक वसाहती वाढत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढत आहे. पनवेलसारखी महानगरपालिकाही अस्तित्वात आली आहे. 

पेण : पेण म्हणजे विश्रांतीचे ठिकाण. बुद्धकाळापासून पेणला जुन्नर-पुणे-नगरपासून माल येत असे. बंदर म्हणूनही पेण हे मोठे प्रसिद्ध ठिकाण होते. पेणजवळच अंबानदीची उपनदी असलेल्या भोगवतीच्या काठावर ‘अंतोरे’ नावाचे बंदर आहे. या बंदरातूनच रेवस खाडीतून व्यापार चाले. पेण हे अलीकडे प्रसिद्ध झाले ते गणपतीच्या मूर्तींमुळे, तसेच पेणचे पोहे आणि पापडामुळे. 

करणाई देवी मंदिरकरणाई देवी मंदिर
गणेश भिकाजी देवधर यांनी येथील मूर्ती उद्योगाचा पाया घातला. ते विजयदुर्गहून १८८५मध्ये मुंबईला जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकण्यास आले आणि त्यांनी पेण येथे मोल्ड वापरून मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. नारायण गणेश देवधर यांनी प्लास्टर ऑफ पॅरिस वापरण्यास सुरुवात केली. त्यांना १९४०मध्ये प्रभात फिल्म कंपनीकडून संत ज्ञानेश्वर चित्रपटासाठी ५०० मुखवट्यांची ऑर्डर मिळाली. आज अनेक कला केंद्रे पेणमध्ये उभी राहिली आहेत. आज पेणच्या आसपासच्या भागातील २५ हजार कलाकार मूर्ती करण्याच्या कामात गुंतले आहेत. साधारण १० ते १५ कोटींची उलाढाल येथे होते. परदेशस्थ महाराष्ट्रीयन येथून मूर्ती मागवितात. 

नुसतेच गणपती नाही, तर संत मीराबाई, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी, श्री साईबाबा, ज्ञानेश्वर, विवेकानंद, अनेक देवदेवता यांच्याही सुरेख मूर्ती येथे तयार होतात. येथे जवळजवळ ७५ ते ८० प्रकारचे पापड तयार होतात. पोह्याच्या गिरण्याही येथे आहेत. पानिपतच्या लढाईत वीरगती मिळालेल्या सदाशिवराव भाऊंच्या पत्नी पार्वतीबाई या पेणमधील कोल्हटकर घराण्यातील होत्या. 

वासुदेव बळवंत फडके यांचे घर, शिरढोणवासुदेव बळवंत फडके यांचे घर, शिरढोण
आचार्य विनोबा भावे यांचे गागोदे हे गावही पेणजवळच आहे. पेण व आसपासच्या भागात शिलाहारकालीन मंदिरांचे अवशेष आहेत. शहरातील वाकेश्वर (म्हणजेच आताचे वाकरूळ गाव), दांडेश्वर (रामेश्वर) व व्याघ्रेश्वर, गोटेश्वर, पाचणोलीचे पाटणेश्वर ही मंदिरे त्या काळातली आहेत. अनेक शिवमंदिरे मलिक कपूर व निजामशाही सैन्याने वेळोवेळी राजपुरीवर केलेल्या स्वारीच्या वेळी पाडून, मोडून टाकलेली आहेत. 

पेणमध्ये पूर्वी एक किल्लाही होता. तेथे सध्या एक तहसीलदार कचेरी आहे. शिवाजी महाराजांचे सैन्य व मुघलांचे तुंबळ युद्ध येथे झाले होते व ही लढाई जिंकली होती. त्या वेळी सरदार वाघोजी तुपे यांनी मोठी कामगिरी केली होती. त्यात ते जखमी झाले होते व त्यातच त्यांचा अंत झाला. छत्रपती शिवाजी महाराज येथे दोन वेळा येऊन गेले होते.
वासुदेव बळवंत फडके यांचा पुतळावासुदेव बळवंत फडके यांचा पुतळा
शिरढोण : आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे हे जन्मठिकाण. फडके यांचे क्रांतिकार्य सर्वांनाच ज्ञात आहे. त्यांचे राहते घर स्मारक म्हणून जपून ठेवण्यात आले आहे. फडके लहानपणी बोकडाच्या गाडीतून फिरत असत. ती गाडीही येथे आहे. मुंबई-गोवा महामार्गावावर पनवेल जवळच हे ठिकाण आहे. जवळच कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि कर्नाळा किल्ला आहे. 

विक्रम विनायक मंदिर, साळवविक्रम विनायक मंदिर, साळव
विक्रम विनायक मंदिर, साळव : विक्रम इस्पात कंपनीच्या परिसरात हे सुंदर, देखणे मंदिर एका टेकडीवर आहे. आकर्षक पद्धतीने चेकर्ड फरश्या वापरून पायऱ्या बांधल्या आहेत. बाजूने सुंदर बगीचा आहे. बागेत आदित्य बिर्ला यांचा पुतळा आहे. अलिबागपासून २० किलोमीटर अंतरावर कुंडलिका नदीच्या दक्षिणेस रेवदंडा ब्रिजच्या डाव्या बाजूला हे ठिकाण आहे.
नागोठणे : हे गाव पूर्वी अंबा नदीवरील बंदर होते. साधारण सन १९१४पर्यंत गलबते येथपर्यंत येत असत. धरमतर खाडीमध्ये वाळू भरल्याने अंबा नदी या ठिकाणी जलवाहतुकीसाठी योग्य राहिली नाही. रिलायन्स उद्योगसमूहाचा खनिजतेल शुद्धीकरण कारखाना व कारखान्याची सुंदर वसाहत हे येथील आकर्षण आहे. वसाहतीमध्ये शहरापासून दूर राहिलेल्या कर्मचाऱ्यांसाठी रंगीत कारंजे असलेला सुंदर बगीचा, तसेच करमणुकीसाठी चित्रपटगृह, खेळांच्या सुविधा, जॉगिंग ट्रॅक, सुसज्ज रुग्णालय, मुलांसाठी नर्सरी, तसेच इंग्रजी माध्यमाची शाळा व्यवस्थापनामार्फत चालविली जाते. 

मुसलमान ब्रिज, नागोठणेमुसलमान ब्रिज, नागोठणे
मुसलमान ब्रिज, नागोठणे : हा पूल नागोठणे पूल म्हणूनही ओळखला जातो. हा ऐतिहासिक पूल सन १५८०मध्ये निजामाचा चौल येथील सरदार अल्लुद्दीन याने बांधला. पोर्तुगीजांबरोबर सामना करण्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता. ४८० फूट लांब, १९ फूट उंच व नऊ फूट नऊ इंच रुंदीचा हा पूल ४०० वर्षांचा साक्षीदार आहे. इतिहासप्रेमी पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आहे. 

पनवेल : मुंबई-पुणे मार्गावरील हे एक महत्त्वाचे ठिकाण. येथूनच गोव्यासाठी हमरस्ता सुरू होतो. २५ ऑगस्ट १८५२ रोजी स्थापन झालेल्या नगरपालिकेचे सन २०१६मध्ये महानगरपालिकेत रूपांतर झाले आहे. पनवेल हे कोकण रेल्वेवरील मोठे जंक्शन आहे. दिल्लीपासून त्रिवेंद्रम, तसेच पुण्यापर्यंत हे रेल्वेमार्गाने जोडलेले आहे. पनवेल हे आयुर्वेदिक, तसेच अॅलोपॅथी औषधनिर्मितीचे केंद्र आहे. चिमाजी आप्पांनी खोदलेला वडाळे तलाव, याशिवाय जुनी मंदिरे, अशोक बाग अशी भेट देण्यासारखी ठिकाणे येथे आहेत. मुंबई अगदी जवळ असल्याने येथून मुंबईला येऊन-जाऊन काम करणाऱ्यांची संख्या खूप आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली ही सर्व महानगरे पनवेलजवळ येतात. लवकरच येथे आर्ट गॅलरी सुरू करण्यात येणार आहे. 

कर्नाळा किल्लाकर्नाळा किल्ला


कर्नाळा किल्ला :
किल्ल्यामध्ये दिसून येणाऱ्या टाक्यांवरून हा किल्ला सातवाहनकालीन असावा असे वाटते; मात्र याचा उल्लेख यादवकाळात आढळतो. किल्ल्याचे क्षेत्रफळ खूपच लहान आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार पडक्या स्थितीत आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे. समोर एका मोठ्या वाड्याचे अवशेष आहेत. वाड्याच्या जवळ शंकराची पिंड आहे. समोरच सुळका आहे. सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आणि धान्य कोठारे आहेत. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हा सुळका प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६५७मध्ये हा किल्ला घेतला. कर्नाळा अभयारण्याच्या परिसरातच हा किल्ला आहे. त्यामुळे किल्ला व अभयारण्य या दोन्ही गोष्टी पाहून होतात. अंगठ्यासारख्या दिसणाऱ्या आकारामुळे याचे वेगळेपण जाणवते. करणाई देवी मंदिर, तटबंदीचे जुने बांधकाम व थंड पाण्याच्या टाक्या अद्यापही पाहण्यास मिळतात. बोरघाटावर नजर ठेवण्यासाठी याची निर्मिती झाली. वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा अनंतराव कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. दोन-तीन दिवस किल्ला लढवून अगतिक झाल्यावरच त्यांनी किल्ला १८१८मध्ये इंग्रजांच्या स्वाधीन केला. 

कर्नाळाकर्नाळा


कर्नाळा अभयारण्य :
येथे वर्षभरात हंगामाप्रमाणे सुमारे १२५-१५० जातीचे पक्षी आढळतात. सुमारे १२ चौरस किलोमीटर परिसरात पक्षी अभयारण्य उभारले आहे. हे अभयारण्य पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर, पाताळगंगेच्या खोऱ्यात आपटे-कल्हाया व रानसई-चिंचवण गावांच्या पंचक्रोशीत वसलेले आहे. या ठिकाणी केव्हाही गेले तरी पाचपन्नास निरनिराळे पक्षी पहायला मिळतात. यात मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी ससाणा, शहाबाज, मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फ्लायकॅचर, भोरड्या, तांबट, कोतवाल, पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ, शाही ससाणा, टिटवी, बगळे असे अनेक पक्षी आढळतात. पक्ष्यांव्यतिरिक्त भेकरे, रानमांजरे, माकडे, ससे इत्यादी प्राणीही आढळतात. जंगल परिसरात विविध औषधी वनस्पती आहेत. तळातील भागात दिंडा, वावडिंग, कारवी अशी झुडपे आहेत. मध्य भागात पांगारा, बहावा, ताम्हण, यांचे प्रमाण जास्त आहे, तर उंचावरच्या भागात जांभूळ, साग, आंबा, आईन हे वृक्ष आढळतात. कर्नाळा किल्लाही याच परिसरात आहे. 

कर्नाळाकर्नाळा


न्हावा शेवा बंदर (JNPT)
: न्हावा शेवा हे‘जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) म्हणूनही ओळखले जाते. मुंबई बंदरावरील बोजा कमी करण्यासाठी, तसेच रेल्वेने मुंबईमधून इतरत्र वाहतूक करणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागल्याने हा प्रकल्प उभारला गेला. जगातील अत्याधुनिक बंदरांमध्ये याचा समावेश होतो. न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी) म्हणून प्रसिद्ध आहे. अरबी समुद्रावरील हे बंदर ठाणे खाडीतील न्हावा व शेवा या दोन गावांमधील जमिनीत घुसलेल्या समुद्राच्या पाण्यावर उभे केले आहे. आपल्याला घारापुरी बेटावरूनही हे बंदर दिसते. कोणत्याही बंदराला भेट देणे खूप आनंददायी असते. बोटीवर कंटेनर चढविले आणि उतरविले जात असतात, ते काम पाहण्यात खूप मजा येते. अजस्र क्रेन, कंटेनर्स उचलून बाजूला ठेवणारी अवजड मशिनरी यांचे काम तोंडात बोट घालायला लावते. बंदराच्या बाहेर कंटेनर वाहतूक करणारे हजारो मोठे ट्रक्स उभे असतात. 

उरण : उरण हे पुरातन शहर आहे. देवी उरणवतीवरून उरण हे नाव पडले. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या काळात उरुवन असेही नाव प्रचलित होते. अनेक भारतीय राजवंशांनी येथे शासन केले आहे. सुरुवातीच्या इतिहासात, मौर्य साम्राज्य, सातवाहन साम्राज्य, पश्चिमी क्षत्रप, वाकाटक साम्राज्य, चालुक्य आणि यादव यांचा समावेश होता. १५व्या शतकात पोर्तुगीज व पाठोपाठ इंग्रजही आले. पोर्तुगीज उरण म्हणत, तर इंग्रज ओरण म्हणत. सतराव्या शतकाच्या अखेरी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे आरमारी नेतृत्व उदयास आल्यावर त्यांनी पोर्तुगीज आणि इंग्रज यांना हुसकावून लावले. पोर्तुगीज आणि इंग्रज येथून स्थलांतरित झाले. त्यामुळे पोर्तुगीज वास्तव्याच्या खाणाखुणा दिसून येतात. त्या काळात बांधलेली चर्च अद्यापही आहेत. 

उरणचा कोट : आत्ताच्या उरणमध्ये कोटनाका आहे. पूर्वी येथे किल्ला होता. पोर्तुगिजांनी येथे किल्ला बांधल्याचा उल्लेख आहे. किल्ल्याला भक्कम तटबंदी, दिंडी दरवाजा, शस्त्रागार, दारूगोळा व दफ्तरखाना ठेवण्यासाठी भक्कम शिबंदी होती. १० मार्च १७३९ रोजी मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट जिंकल्याचा उल्लेख आहे. सध्या किल्ल्याची एक भिंत अस्तित्वात आहे.
करंजा बंदर : उरणला लागूनच दक्षिणेला हे ऐतिहासिक ठिकाण आहे. सन १५३४मध्ये पोर्तुगीजांकडे याचा ताबा आला. रेवस, करंजा, भाऊचा धक्का अशी वाहतूक चालू असायची. मांडवा बंदरामुळे यावर परिणाम झाला असला, तरी थोडी-फार वाहतूक चालू असते. अवर लेडी ऑफ चर्चची उभारणीही पोर्तुगीज राजवटीत झाली. तशीच अनेक चर्चेस करंजामध्ये होती. त्यांचे अवशेषही दिसून येतात. 

मोरा बंदर : हे बंदर चंद्रगुप्त मौर्याने वसविले. उरण वसण्यापूर्वी मोरा बंदर होते. मौर्य या शब्दावरून मोरे नाव पडले.
द्रोणागिरी किल्लाद्रोणागिरी किल्ला


द्रोणागिरी किल्ला :
हा किल्ला उरण शहराजवळ असलेल्या एका टेकडीवर आहे. बहुधा यादव काळात याची उभारणी झाली असावी. उरण आणि करंजाच्या जवळ असल्याने हा किल्ला जुन्या काळापासून धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण होता. संपूर्ण टेकडी जंगलाने झाकलेली आहे. किल्ला देवगिरीच्या यादवच्या राजवटीखाली होता. १५३०मध्ये पोर्तुगीजांनी किल्ला दुरुस्त केला. १५३५मध्ये फादर एंटोनो-डी-पोर्टोने येथे तीन चर्चेस बांधली. 

त्यानंतर आदिलशहाने किल्ला जिंकला आणि काही काळ त्याच्या ताब्यात होता. अखेरीस तो ब्रिटिशांच्या हातात गेला. १० मार्च १७३९ रोजी मानाजी आंग्रे याने या किल्ल्यासह उरण किल्ला घेतला. किल्ल्यावरील तटबंदीचे अवशेष आढळतात. बहुतेक इमारती व चर्च अवशेष स्वरूपात आहेत. 

पिरवाडी बीचपिरवाडी बीच


पिरवाडी बीच :
रायगड जिल्ह्यातील उरण परिसरातील हा सुंदर सागरकिनारा असून, येथून सूर्यास्ताचे सुंदर दर्शन होते.

माणकेश्वर बीच : पिरवाडी बीचच्या उत्तरेला जवळच हा सुंदर सागरकिनारा आहे. 

रत्नेश्वरी देवीचे मंदिररत्नेश्वरी देवीचे मंदिर


जसखार :
उरणजवळ न्हावा शेवा परिसरात हे ठिकाण असून, येथे रत्नेश्वरी देवीचे सुंदर मंदिर आहे. उरण तालुक्यातील हे जागृत देवस्थान आहे. हे मंदिर उरण तालुक्यातील जसखार या गावामध्ये उरण शहरापासून मुख्यत्वेकरून दोन किलोमीटर अंतरावर स्थित आहे. या मंदिरामध्ये दर वर्षी चैत्रकलाष्टमीला देवीची यात्रा भरविण्यात येते. 

घारापुरीघारापुरी


घारापुरीची लेणी :
ही लेणी उरण तालुक्यात आहेत. परंतु सध्या मुंबईहून गेट वे ऑफ इंडियापासून प्रवासी बोटी निघतात. त्याला साधारण एक ते दीड तास लागतो; पण पनवेल भागातूनही हे ठिकाण जवळ आहे. घारापुरी बेटाचे क्षेत्रफळ समुद्राच्या भरतीच्या वेळी सुमारे १० चौरस किलोमीटर आणि ओहोटीच्या वेळी १६ चौरस किलोमीटर असते. बेटावरच दक्षिणेस घारापुरी नावाचे छोटेसे गाव आहे. या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते. कोकणातील मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानी असावी. त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव नि मुघल यांनी तिथे क्रमाने आपली सत्ता प्रस्थापित केली. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले. शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केले. सन १७७४मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापन केले. १९८७ साली या लेण्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला. 

हत्तीचे शिल्पहत्तीचे शिल्प
घारापुरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते. त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे. एलिफंटा लेण्यांची निर्मिती इसवी सन ९०० ते १३००च्या दरम्यान झाली असावी. येथे एक शिलालेख सापडला होता. तो पोर्तुगीजांनी लिस्बनला पाठवला, तो गहाळ झाला. तो सापडला असता, तर याचा कालावधी आणि ती कोणी केली याचा मागोवा घेता आला असता. ही शैव लेणी असून, एका अखंड पाषाणात ही लेणी कोरण्यात आली आहेत. येथे एकूण पाच लेणी आहेत. त्यात शिवकथा कोरल्या आहेत. 

मुख्य गुहा अथवा शिवगुंफा भव्य असून, तिला महाकाय गुहा असे म्हणतात, ती ३९. ६३ चौरस मीटर आहे. २७ चौरस मीटरचा मंडप आहे. या लेण्यात भव्य दालन असून, मध्यभागी एक त्रिमुखी मूर्ती आहे. तीनही मुखे अतिशय सुंदर असून, त्यांच्या मुकुटावरील कलाकुसर प्रेक्षणीय आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या संयुक्त मूर्तीला त्रिमूर्ती असे म्हणतात. 

रावणानुग्रहरावणानुग्रह
दुसऱ्या गुहेमध्ये रावण कैलास पर्वत उचलतो आहे असे दाखविले आहे. शंकराच्या मुकुटात चंद्रकला आणि मागे प्रभा आहे. त्याच्या मुद्रेवर शांत, निश्चय आणि कपाळावर तृतीय नेत्र स्पष्टपणे दिसत आहे. शंकर बावरलेल्या पार्वतीला एका हाताने आधार आणि निर्भयतेचे आश्वासन देत आहे.  

विवाह मंडल ही तिसरी महत्त्वाची गुंफा. येथे घारापुरीच्या लेण्यांतील सर्वोत्कृष्ट लेणे आहे. शंकर-पार्वती विवाह यात दाखविला असून, देव-देवता विवाह समारंभाला उपस्थित राहिले, हा प्रसंग या चित्रात दाखविला आहे. इतर लेण्यांमध्ये मानवती पार्वती, गंगावतरण, शिवशक्ती अर्धनारी, महायोगी शिव, भैरव-महाबलाची मूर्ती अशी अन्य शिल्पेही पहायला मिळतात.

शिवपार्वती विवाहशिवपार्वती विवाह
समुद्रात थोडेसे आत गेल्यानंतर सी-गल पक्ष्यांचे अनेक थवे बोटीवर घिरट्या घालायला लागतात. हे पक्षी फेकलेले अन्नपदार्थ लीलया हवेतच उचलतात. सध्या तरी मुंबईमार्गे जाणे सोईस्कर आहे; मात्र लवकरच उरण येथून पर्यटकांसाठी व घारापुरीतील लोकांसाठी मोरा बंदर ते घारापुरी बोटसेवेचा प्रस्ताव विचाराधीन आहे. (घारापुरी लेण्यांबद्दल सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

रसेश्वर, रसायनी : हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स ही भारत सरकारची अंगीकृत कंपनी होती. १९६० साली सुरू झालेला कारखाना आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. रसायनी वसाहतीमध्ये शंकराचे मंदिर उभारले असून, त्याला ‘रसेश्वर’ असे नाव ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी दिले. 

कसे जाल पनवेल, उरण परिसरात?
पनवेल हे कोकण रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन असून, उत्तर भारतापासून त्रिवेंद्रमपर्यंत रेल्वेने जोडलेले आहे मुंबई-पुणे मार्गावरील हे प्रमुख ठिकाण असून, गोव्याला जाण्यासाठी येथूनच महामार्ग सुरू होतो. जवळचा विमानतळ मुंबई - ३५ किलोमीटर. नवी मुंबई विमानतळ लवकरच कार्यान्वित होत आहे. पनवेलमध्ये चांगली हॉटेल्स व भोजनाची उत्तम सोय आहे. जास्त पावसाचा जुलै महिना सोडून वर्षभरात कधीही जाण्यास योग्य. 

(या भागासाठी नागोठणे शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी सोमण यांनी काही माहिती दिली.)
अक्षी बीच : हे मच्छिमारांचे गाव आहे. काही लोक शांतताप्रिय असतात आणि त्यांना सागरकिनारी आनंद घ्यायचा असतो. अशा लोकांसाठी अक्षी बीच हा एक पर्याय आहे. नारळाच्या झाडांच्या पार्श्वभूमीवरील सुंदर, शांत आणि स्वच्छ किनारा पाहणे ही एक सुखद गोष्ट आहे. अनेक सागरी पक्षी येथे पाहण्यास मिळतात. सीगल्स, बार-टेल्ड गॉडविट, डनलिन, टर्न्स आणि प्लेव्हर्स या किनाऱ्यावरील बऱ्याच पक्ष्यांच्या प्रजाती येथे हंगामाप्रमाणे पाहता येतात. नागाव बीचकडे जातानाच अक्षी गाव लागते. अक्षी गावात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच उजव्या हाताला सोमेश्वर महादेव मंदिर आहे. कोकणातील इतर मंदिरांप्रमाणेच हे मंदिरसुद्धा कौलारू आहे. मंदिराचे सभागृह प्रशस्त असून प्रवेशद्वाराजवळ नंदीची मूर्ती आहे. तसेच सभामंडपातील लाकडी खांबांवर बारीक कोरीवकाम केले आहे. 

अक्षी शिलालेखअक्षी शिलालेख
‘अक्षी’ गावाची ओळख इ. स. १०व्या शतकापासून आहे. येथे पहिला देवनागरी शिलालेख सापडला आहे. पुरातत्त्वज्ञ डॉ. शं. गो. तुळपुळे यांच्या संशोधनाप्रमाणे तो मराठीतील पहिला शिलालेख आहे. त्यावर शके ९३४ म्हणजेच इ. स. १०१२ असा स्पष्ट उल्लेख आहे. शिलाहारवंशीय राजा पहिला केसीदेवराय याचा प्रधान भइर्जू सेणुई याच्या काळात म्हणजे शिलाहार काळात कोरलेला हा शिलालेख असून त्याने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य दिल्याचा यात उल्लेख आहे. हा शिलालेख संस्कृत-मराठी मिश्र देवनागरी लिपीतील असून नऊ ओळींचा आहे. त्या नऊ ओळींच्या वर चंद्र-सूर्य कोरले आहेत. खाली शापवाणीचे चित्र कोरले आहे. अक्षी अलिबागपासून सुमारे पाच किलोमीटर दूर आहे. 

रेवदंडा : चौल आणि रेवदंडा ही जोडगावे आहेत. रेवदंडा या गावाला पाच किलोमीटर लांबीची तटबंदी आहे. त्यात हे गाव सामावले आहे. रेवदंडा हे पौराणिक व ऐतिहासिक ठिकाण आहे. महाभारतात रेवतीक्षेत्र म्हणून ओळखले जायचे, असे सांगितले जाते. रेवती हे नाव श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलरामाच्या पत्नीच्या नावावरून पडले असे सांगितले जाते. या गावाचे सागरी महत्त्व ओळखून पोर्तुगीजांनी येथे किल्ला बांधायचे ठरविले. त्यानुसार सन १५२८मध्ये पोर्तुगीज कप्तान सोज याने हा किल्ला बांधायला सुरुवात केली. त्याअगोदर १५१६मध्ये पोर्तुगीजांनी कारखान्यासाठी एक इमारत बांधली, तिला चौकोनी बुरुज म्हणतात. हिची तटबंदी १५२१ ते १५२४च्या दरम्यान बांधली गेली. 

रेवदंडा किल्लारेवदंडा किल्ला


कुंडलिका नदीच्या खाडीच्या मुखावर ही अतिशय मोक्याची जागा पोर्तुगीजांनी काबीज केली. या ठिकाणापासून खाडीमार्गाने कोलाडपर्यंत जाता येत असल्याने संभाजी महाराजांच्या वेळी मराठ्यांनीही या ठिकाणी हल्ला केला होता; पण तो यशस्वी झाला आंही. २५ नोव्हेंबर १७४० रोजी झालेल्या तहानुसार पोर्तुगीजांनी साष्टीतील गावांच्या बदल्यात रेवदंडा व कोर्लईचा ताबा मराठ्यांना दिला. या किल्ल्यावर पूर्वी पोर्तुगीज आरमाराचा रखवालदा नावाचा सात मजली मीनार होता त्यापैकी चार शिल्लक आहेत. 

रेवदंडा बीचरेवदंडा बीच


किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पोर्तुगीजांचे राजचिन्ह कोरलेले आहे. या मनोऱ्याच्या पायथ्याशी तोफा पडलेल्या दिसून येतात. चर्चचे अवशेष, घरांची, वाड्यांची जोती शिल्लक आहेत. प्रवेशद्वाराच्या आत अजून एक दार आहे. त्याच्या पुढे तीन मोठे दगडी गोळे पडलेले आहेत. किल्ल्याच्या तटाखालून भुयारे आहेत; पण सध्या ती बंद केली आहेत. किल्ल्याच्या तटबंदीला लागूनच रेवदंडा बीच आहे. 

चौल रामेश्वर मंदिरचौल रामेश्वर मंदिर


चौल :
चौल आणि रेवदंडा ही जोडगावे आहेत. या गावाचा इतिहास दोन हजार वर्षे जुना आहे. हे सातवाहन काळातील बंदर होते. या दोन्ही स्थळांची पौराणिक नावे चंपावती-रेवती! चंपक म्हणजे चाफा. चौल चंपावती म्हणून ओळखले जायचे. आजही येथे चाफ्याची झाडे दाखविली जातात; पण काहींच्या मते येथे चंपा नावाची मासे पकडण्याची जाळी वापरली जातात, म्हणून चंपा ही ओळख, तर काहींच्या मते चंपा नावाच्या राजावरून हे चंपावती नाव पडले. या पौराणिक नावांशिवाय चेमूल, तिमूल, सिमूल, सेमुल्ल, सिबोर, चिमोलो, सैमूर, जयमूर, चेमुली, चिवील, शिऊल, चिवल, खौल, चावोल, चौले आणि चौल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे. एवढी नावे असलेले हे कदाचित एकमात्र गाव असावे. चौल नारळी-पोफळीच्या झाडीत दडलेले अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. अलीकडील इतिहासाप्रमाणे सन १५१६मध्ये अहमदनगरच्या राजा बुरहान याने पोर्तुगीजांना येथे एक कारखाना तयार करण्यास आणि बंदर बांधण्यास परवानगी दिली. येथे घोडे आयात करून ठेवले जात व त्यांचा व्यापारही होत असे. 

नागाव बीचनागाव बीच
पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या वतीने २००१ ते २००७ अशी सलग सात वर्षे चौलमध्ये वेगवेगळ्या भागांत उत्खनन करण्यात आले आणि यातून हे प्राचीन बंदर उजेडात आले. या उत्खननामध्ये त्या प्राचीन बंदराचे अवशेष, ‘जेटी’ची भिंत, सातवाहनकालीन विटांचे बांधकाम, रिंगवेल (नळीची विहीर), सातवाहनकालीन नाणी, मातीची भांडी, खापरे, तत्कालीन रोमन संस्कृतीत वापरले जाणारे मद्यकुंभ ‘अम्फेरा’ आणि असे बरेच काही आढळून आले. चौलमध्ये जुने कोकणी पद्धतीचे रामेश्वर मंदिर आहे. नंदीमंडप, दीपमाळ आणि रेखीव पुष्करिणी येथे आहे. मूळ मंदिराची निर्मिती कधी, कोणी केली याची माहिती मिळत नाही; पण मराठेशाहीत नानासाहेब पेशवे, मानाजी आंग्रे, विसाजीपंत सुभेदार यांनी वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे उल्लेख आढळतात. येथे एकवीरा भगवती देवीचे मंदिर असून, या मंदिराच्या गर्भागृहाच्या दरवाज्यावरील तुळईवर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम शके १६७६मध्ये (इसवी सन १७५२) केल्याचा एक संस्कृत लेख आहे. चौलचा अगदी प्राचीन उल्लेख ‘पेरिप्लस ऑफ एरिथ्राइन सी’ या आणि टॉलेमीच्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्रवासवर्णनात येतो. चौलसमोरच खदायीपलीकडे कोर्लईचा किल्ला आहे. येथून जंजिराही जवळ आहे. 

कर्जत, पनवेल, माथेरान परिसर...


लुईझा पॉइंट, माथेरानलुईझा पॉइंट, माथेरान
‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल परिसरातील पर्यटनस्थळे पाहिली. आजच्या भागात पाहू या कर्जत, खोपोली परिसरातील सह्याद्रीच्या खांद्यावर असणारी निसर्गरम्य ठिकाणे व माथेरानसारखे प्रदूषणमुक्त गिरिस्थान...
.....
दोन हजार वर्षांपूर्वी या डोंगराळ भागात बौद्ध साधकांनी चिंतनासाठी शांत परिसर निवडला. त्यांच्या पाऊलखुणा अद्यापही येथे दिसून येतात. कडेकपारीत जंगलात दडलेले किल्ले छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण करीत होते. स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी ही ठिकाणे क्रांतिकारकांना आश्रय देत होती. आज निसर्गप्रेमींची, जास्त करून पदभ्रमण करणाऱ्यांची पावले येथे आपोआप वळतातच. या भागावर शिलाहार, त्यानंतर यादव, निजाम, मुघल, मराठे आणि शेवटी इंग्रजांची राजवट होती. पुणे-मुंबई या दोन महानगरांना जोडणारा रेल्वेमार्ग व हमरस्ता याचा भागातून जातो. रेल्वेने जाताना डोळ्यांचे पारणे फिटविणारा खंडाळा घाट, अर्थातच अवघड बोरघाट याच भागातून जातो. याचे वर्णन करणारी माधव जूलियन यांची कविता आठवते. ‘कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी.’

माथेरान : माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. इ. स. १८५०मध्ये या जागेचा शोध त्या वेळच्या ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ह्यू पोएन्टेज मॅलेट यांनी घेतला. मुंबईचे तत्कालीन राज्यपाल लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी भविष्यातील हिल स्टेशन म्हणून याचा पाया घातला. मॅलेट याला ट्रेकिंगची आवड होती. त्याने चौक गावातून हा डोंगर पाहिला व त्याकडे तो आकर्षित झाला आणि गावाच्या पाटलाला घेऊन तो डोंगर चढून गेला. वनट्री हिल पॉइंटवरून तो वर आला. त्याला हे ठिकाण खूप आवडले. तो परत येथे आला, त्याने येथे छोटे घरही बांधले. त्याच्याबरोबर आणखी इंग्रज अधिकारी आले व त्यांनीही घरे बांधली आणि माथेरान अस्तित्वात आले. 

माथ्यावरील जंगल म्हणून माथेरान हे नाव रूढ झाले. पूर्वी पावसाळ्यात सहसा इकडे कोणी येत नसे. आता पावसाळ्यातही पर्यटक येत असतात. मधुचंद्रासाठी नवपरिणित जोडपीही पायी निसर्गसान्निध्यात फिरण्यासाठी माथेरानला पसंती देतात. माथेरानच्या जंगलात १५० प्रकारचे वृक्ष आढळतात. विविध जातीच्या, तसेच औषधी वनस्पतीही येथे आहेत. पर्जन्यमानाला अनुकूल असणारी जांभूळ, हिरडा, बेहडा, खैर, पांढरीची झाडे येथे दिसतात. या जंगलाचा फायदा म्हणजे कुठल्याही पॉइंटवर जाताना सावली मिळते व उन्हाचा कधीही त्रास होत नाही. 

साधारण २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. माथेरानमध्ये चालत किंवा घोड्यावरूनच फिरावे लागते. कोणत्याही यांत्रिक वाहनाला येथे परवानगी नाही. संपूर्ण पर्यावरणपूरक असे वातावरण येथे जपण्यात आले आहे. फक्त रेल्वे गावात येते. गाड्या गावाच्या बाहेरच दोन किलोमीटर दूर उभ्या कराव्या लागतात. 



नेरळ-माथेरान रेल्वे :
ही आबालवृद्धांची आवडती रेल्वे आहे. नेरळ ते माथेरान दरम्यानचे २१ किलोमीटर अंतर सुमारे दोन तास २० मिनिटांमध्ये पार करताना एक विलक्षण आनंद मिळतो. सह्याद्रीच्या डोंगरातील वळणे, बोगदे ही छोटी गाडी पार करत असताना वेगळाच अनुभव येतो. इ. स. १९०१मध्ये ब्रिटिश राजवटीदरम्यान प्रसिद्ध उद्योगपती सर आदमजी पीरभॉय यांनी १६ लाख रुपये खर्च करून ही रेल्वे बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मुलगा अब्दुल हुसेन आदमजी पीरभॉय याने १९०७ साली नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे बांधकाम पूर्ण केले. आता ती भारतीय रेल्वेखात्याच्या अखत्यारीत आहे. 

माथेरानमधील पर्यटनस्थळे : 

शार्लोट लेकशार्लोट लेक


शार्लोट लेक :
माथेरानला पाणीपुरवठा करणारा हा तलाव ब्रिटिश राजवटीतच बांधला गेला. पावसाळ्यात पडणाऱ्या प्रचंड पावसाचे पाणी अडवून हा तलाव तयार करण्यात आला आहे. हा तलाव गर्द हिरव्या झाडीत असल्याने याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. तलावाच्या जवळच माथेरान-इको पॉइंट आणि लुईसा पॉइंट आहेत. पावसाळ्यात तलाव भरून वाहू लागल्यावर धबधबा वाहू लागतो. त्याचा आवाज आसमंतात घुमत असतो. पर्यटक हे पावसाळी सौंदर्य टिपण्यासाठी येथे येतात. 

पॅनोरमा पॉइंट : हा पॉइंट सूर्योदय पाहण्यासाठी असला, तरी सूर्यास्तही येथून चांगला दिसतो. येथून पूर्,  पश्चिम बाजूचे विहंगम दृश्य दिसते. पूर्वेला खालच्या बाजूस नेरळ, तर पश्चिमेला गाडेश्वर तलाव आणि पनवेलपर्यंतचा परिसर दिसतो. पश्चिमेला हाजीमलंगपासून सुरू झालेली डोंगररांग, चंदेरी, पेब अशी एकामागोमाग पॅनोरमाला येऊन मिळते. पूर्वेकडे नेरळ, तसेच सिद्धगडापासून भीमाशंकर ते खंडाळ्यापर्यंतचा भाग दिसू शकतो. पहाटे सहाच्या आधी पॅनोरमावर पोहोचल्यास सूर्योदय बघायला मिळतो. पॅनोरमा मार्केटपासून सर्वांत लांब म्हणजे साडेपाच किलोमीटर अंतरावर आहे.

दस्तुरी अथवा माउंटबेरी पॉइंट : माथेरानच्या बाहेर जिथे गाड्या उभ्या करतात, तेथेच प्रवेशद्वारापाशी हा पॉइंट आहे. या पॉइंटच्या पुढे माथेरान पाहण्यासाठी पायी किंवा घोड्यावरून जावे लागते. 

वन ट्री हिल पॉइंट : चौक पॉइंट जवळच वन ट्री हिल पॉइंट आहे. येथूनच कलेक्टर मॅलेट पहिल्यांदा माथेरानला आला. इथूनही खाली चौक गाव दिसते. येथील समोर दिसणारा सुळका मुख्य डोंगरापासून अलग झालेला आहे. याच सुळक्यावर बरीच वर्षे एकच झाड होते. म्हणून त्याला वन ट्री हिल पॉइंट म्हणतात. हा सुळका म्हणजेच वन ट्री हिल पॉइंट. 

एको पॉइंट : लुईझा पॉइंट ते शार्लोट लेकच्या वाटेवर एको पॉइंट आहे. याच्या समोर असलेल्या प्रचंड कातळी भिंतीमुळे आवाज केल्यास प्रतिध्वनी (echo) ऐकू येतो. त्यामुळे हा एको पॉइंट. अनेक जण प्रतिध्वनींची मजा लुटण्यासाठी फटाकेसुद्धा घेऊन येतात. 

सनसेट पॉइंट किंवा पॉर्क्युपॉइन पॉइंट : येथून समोर गर्द झाडीत असलेला प्रबळगड दिसतो. समोरचे जंगल खूपच विलोभनीय आहे. प्रबळगडाच्या मुख्य पठाराला लागून एक छोटासा सुळका आहे. या सुळक्याच्या आणि पठाराच्या खिंडीतच बहुतेक वेळा सूर्यास्त होतो. 

लुईझा पॉइंट : इथूनही समोर प्रबळगडाचा देखावा दिसतो. मार्केटपासून सोडेतीन किलोमीटर अंतरावर हा पॉइंट आहे. लुईझाखेरीज चिनॉय, रुस्तुमजी, मलंग, हनिमून या छोट्या-मोठ्या पॉइंट्सवरून सारखेच दृश्य दिसते. लुईझा ते शार्लोट लेकच्या वाटेवर एको, एडवर्ड, किंग जॉर्ज हे पॉइंट लागतात. 

इतर पॉइंट : चौक पॉइंट, गार्बट पॉइंट, रामबाग पॉइंट, अलेक्झांडर पॉइंट, माधवजी पॉइंट, मंकी पॉइंट, हार्ट पॉइंट, मालडुंगा पॉइंट, चिनॉय पॉइंट, रुस्तुमजी पॉइंट, मलंग पॉइंट, एडवर्ड पॉइंट, किंग जॉर्ज पॉइंट, लिटल चौक पॉइंट. गाइड घेतला तरच माथेरान दर्शन व्यवस्थित होते. माथेरानमध्ये राहण्यासाठी बऱ्याच सोयी आहेत. दस्तुरी पॉइंटला लागूनच एमटीडीसीची रेस्ट हाउसेस आहेत. यांचे बुकिंग मुंबईच्या कार्यालयातून होते. इतर हॉटेल्सदेखील बरीच आहेत. चौकशी केल्यास काही ठिकाणी घरगुती राहण्याची सोय होऊ शकते. त्याचे दर बरेच कमी आहेत. 

पेब (विकटगड) : नेरळपासून पश्चिमेला तीन-चार किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. पायथ्याच्या असलेल्या पेबी देवीवरून पेब हे नाव पडले असावे. हा किल्ला चढताना लागणारे जंगल घनदाट आहे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असेदेखील नाव आहे. ट्रेकर्ससाठी हे ठिकाण महत्त्वाचे आहे. किल्ल्यावर घरे आहेत. त्याचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात धान्य कोठारांसाठी केला होता, असा स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ पेबच्या किल्ल्याबाबत आढळतो. पेबच्या वाटेवरच एक धबधबा आहे. किल्ल्यावरील गुहेसमोरून पावसाळ्यात सुंदर देखावा दिसतो. गुहेसमोरून आपल्याला नवरा-नवरी, भटोबा असे सुळके दिसतात. या गडावर कोणत्याही ऋतूत जाता येते. समर्थ रामदासस्वामींचे शिष्य येथे राहत असत. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ दोन दरवाजे अवशेष स्वरूपात आहेत. तसेच इमारतींचे अवशेष व पाण्याची टाकी आहे. किल्ल्याच्या दक्षिणेकडे एक बुरुज आहे. एक दत्तमंदिर व हनुमानाची मूर्ती येथे पाहायला मिळते. 

भिवगड/भीमगड : महाराष्ट्रात असे अनेक किल्ले आहेत, की इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही. त्यापैकीच भिवगड/भीमगड; मात्र ट्रेकिंगच्या सरावातून याची ओळख गिरिभ्रमणाची आवड असलेल्यांना झाली. पुणे-मुंबईहून एका दिवसात करता येण्यासारखा एकदम सोपा किल्ला म्हणजे भिवगड उर्फ भीमगड. ढाक आणि भिवगड एकाच वेळी करता येते. गडाचे माथ्यावरील एकूण क्षेत्रफळ फक्त चार एकर आहे. कर्जतजवळील वदप व गौरकामत गावामागे छोट्याशा टेकडीवर हा किल्ला आहे. ‘ढाक’ला जाण्याचा मार्ग वदप गावातून आहे. या मार्गावर भिवगडच्या खिंडीत पोहोचल्यावर उजव्या बाजूची वाट ‘ढाक’ला जाते, तर डाव्या बाजूची वाट भिवगडावर जाते. पावसाळ्यात येथे एक धबधबा पाहता येतो. किल्ल्यावर फक्त पाण्याची छोटी टाकी आहेत. भिवगडावर जाताना खोदून काढलेल्या पायऱ्याही दिसून येतात. 

चंदेरी किल्ला : बदलापूर-कर्जत मार्गावर माथेरान डोंगररांगेतच २३०० फूट उंचीवर हा किल्ला आहे. हे ट्रेकर्सचे आवडते ठिकाण समजले जाते. घनदाट जंगलातून वर गेल्यावर कातळाचा भला मोठा सुळका दिसतो. किल्ल्यावर एक गुहा आणि तटबंदीचे अवशेष आढळतात. सुळक्यावरून पूर्वेला माथेरान, पेब डोंगररांग दिसते. पश्चिमेला भीमाशंकरचे पठार, सिद्धगड, गोरक्षगड, पेठचा किल्ला दृष्टीस पडतो. येथून परिसराचे विलोभनीय विहंगम दर्शन होते. किल्ल्याचा परिसर पावसाळ्यात अधिकच रमणीय दिसतो. येथे जवळ असणारा धबधबाही मनमोहक आहे. धबधब्याचा आस्वाद घ्यायला अनेक पर्यटक येथे येतात. 

ढाकचा बहिरी किल्ला : हे ठिकाण कर्जत तालुक्यात असले, तरी पुण्याहून लोणावळामार्गे व मुंबईहून कर्जतजवळील वदपमार्गे येता येते. लोणावळ्याच्या जवळ असलेल्या राजमाची किल्ल्याजवळच हे ठिकाण आहे. घनदाट जंगलात ढाकचा बहिरी दडून बसला आहे. याची फारशी ओळखही कोणाला नाही; पण धाडसी ट्रेकर्सना हा किल्ला आव्हान देत असतो. ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस असलेल्या सुळक्याला ‘कळकरायचा सुळका’ असे म्हणतात. याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा. गिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्राची माहिती आणि गाइड असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे. ढाकच्या किल्ल्याचे दोन भाग आहेत. बहिरीची गुहा (तीन गुहांचा समूह) आणि ढाकचा किल्ला. गुहेमध्ये पाण्याची दोन टाकी आहेत, तर एका गुहेत शेंदूर फासलेला दगड आहे. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी पांथस्थांसाठी टाकीजवळ भांडी ठेवली आहेत. भोजन झाल्यावर ती भांडी साफ करून तेथेच ठेवायची असतात. अशी व्यवस्था करणारे गावकरी दुसरीकडे कोठेही नसावेत. १५०० फूट उंचीची कातळाची खडी भिंत आहे. 

इरशाळगडइरशाळगड


किल्ले पन्हाळघर :
रायगडाकडे जाणाऱ्या वाटेवर नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जात असावा. किल्ल्याला फारसा इतिहास नाही. ४५० फूट उंचीच्या लहान डोंगरावर हा किल्ला आहे. रायगडच्या संरक्षक शृंखलेतील हा एक किल्ला आहे. पुण्याचे इतिहास संशोधक सचिन जोशी यांनी केलेल्या संशोधनामुळे हा गड प्रकाशात आला. गडावर तटबंदी शिल्लक नाही. तसेच काही इमारतींचे अवशेष दिसून येतात. 

इरशाळगडइरशाळगड


इरशाळगड :
याला किल्ला म्हणण्यापेक्षा शिखर म्हटले तर वावगे ठरणार नाही. ३७०० फूट उंचीचा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील समजला जातो. इतिहासातही किल्ल्याचा फारसा उल्लेख नाही. मे १६६६मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी-रायरीपर्यंतचा सारा मुलूख घेतला. तेव्हा त्यात हा गडदेखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. गडावरील माचीपासून गडावर जाताना वाटेतच पाण्याचे एक टाके लागते. अशी अनेक टाकी बघण्यास मिळतात. समोरच प्रबळगड, माथेरान, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसतो. हा ट्रेकर्सचा मानबिंदू आहे. ट्रेकर्सच्या दृष्टीने हा अत्यंत कठीण समजला जातो. गिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्राची माहिती आणि गाइड असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे. २३ जानेवारी १९७२ रोजी याच सुळक्यावर एक दुःखद घटना घडली. कुमार प्रकाश दुर्वे याचा किल्ल्यावरून पडून दुःखद अंत झाला. त्याच्या स्मरणार्थ दर वर्षी २६ जानेवारीला मुंबई-ठाण्याचे गिर्यारोहक येथे जमतात. 

कोंडाणेकोंडाणे


कोंडाणे बौद्धलेणी :
इ. स. पूर्व २०० म्हणजे २२०० वर्षांपूर्वीची ही लेणी म्हणजे भारताच्या गौरवशाली कला व विचार परंपरेच्या साक्षीदार आहेत. कातळात काढलेली लेणी व त्यामधील कोरीव काम थक्क करणारे आहे. सन १८३०मध्ये विष्णू शास्त्री यांनी ही लेणी प्रथम पाहिली. त्यानंतर ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन ब्रिटिश जिल्हाधिकारी मिस्टर लॉ यांनी येथे भेट दिली. बौद्ध साधकांना चिंतनासाठी अशी निर्जन स्थळी निर्माण केलेली अनेक लेणी महाराष्ट्रात आहेत. साधारण सातवाहन राजवटीत यांची निर्मिती झाली. पुरातन बोरघाटमार्गे जाणाऱ्या मार्गावरच ही लेणी आहेत. जंगलाने वेढलेली ही लेणी निसर्गाचे लेणे अंगावर घेतल्यासारखी दिसतात. 

यासाठी कोंदिवडे गावापासून साधारण दीड तासाचा ट्रेक करावा लागतो. साधारण अर्ध्या वाटेवर एक सुंदर धबधबा तुमचे स्वागत करतो. त्यानंतर आपण लेण्याजवळ आल्यावरच गुंफा दिसतात. निसर्ग आणि मानवी कला यांचा अप्रतिम संगम आपल्या नजरेसमोर येतो. 

कोंडाणे बुद्धलेण्यांमध्ये एकूण आठ विहार आणि चैत्यगृहे आहेत. यामधील विहार हे सर्वांत जुने आहेत. ही लेणी इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात कोरलेली आहेत. कोंडाणे लेणी ही भाजे व पितळखोरा या लेण्यांच्या समकालीन लेणी आहेत. सातवाहन राजाच्या काळात या लेण्यांची निर्मिती झाली असावी, असे इतिहासतज्ज्ञांचे मत आहे. येथे असलेल्या शिलालेखात पुढीलप्रमाणे उल्लेख आहे. ‘कण्हस अंतेवासींना बलकेन कतं’ असा ब्राह्मी लिपीत हा उल्लेख आहे. याचा अर्थ कन्हशिष्य बलक याने हे लेणे निर्माण केले. 

चैत्यगृहचैत्यगृह


चैत्यगृह :
या लेण्यातील जे चैत्यगृह आहे, त्याच्या दर्शनी भागावरील वातायान हे पिंपळपानाच्या आकारात असून, छत हे गजपृष्ठाकार आहे. या चैत्यगृहाची लांबी २२ मीटर असून, ते आठ मीटर रुंद व ८.५ मीटर उंच आहे. स्तूपाचा परीघ हा २.९ मीटर आहे. सध्या स्तूप क्षतिग्रस्त अवस्थेत आहे. जवळपास दोन हजार वर्षे जुनी सागवान लाकडाची कमान आजही आपणास पाहायला मिळते. चैत्याला स्तंभाचे वलय होते. यातील स्तंभ अष्टकोनी असून, स्तंभावर चिन्हे अंकित आहेत. आज ते भग्नावस्थेत पडलेले आहेत. चैत्याच्या दर्शनी भागावर वेदिका पट्ट्यांचे नक्षीकाम आहे. तसेच छज्जे आपणास पाहायला मिळतात. सुंदर असे युगलपटदेखील येथे आहेत. या युगलपटातील पुरुष हे योद्धे असावेत. कारण त्यांच्या हातात शस्त्रे पाहायला मिळतात. त्याच्या खाली वेदिका पट्टी व चैत्य कमानीचे शिल्प प्रत्येक छज्जावर कोरलेले दिसते.

चैत्यगृहाच्या अगदी डाव्या बाजूला भग्नावस्थेतील यक्षमूर्ती दिसते. त्या मूर्तीच्या डोक्यावरील फेट्यावरील नक्षीकाम पाहून त्या वेळच्या कलावैभवाची प्रचिती येते. 

विहार व्हरांडाविहार व्हरांडा
विहार : चैत्यगृहाच्या बाजूला एक विहार आहे. हा विहार आयताकृती असून, याचा दर्शनी भाग कोसळला आहे. आतमध्ये प्रत्येक बाजूस सहा असे एकूण अठरा भिक्षू निवास आहेत. भिक्षू निवासाच्या दरवाजावर चैत्य गवाक्ष कोरलेले आहेत. त्याशिवाय दरवाजे असल्याच्या खुणादेखील आहेत. संभामंडप ११ मीटर लांब आहे, तर ९.५ मीटर रुंद आहे. छतावर असलेल्या अवशेषांवरून या ठिकाणी १५ स्तंभांची मांडणी असावी असे निदर्शनास येते. 

छताला रंगकाम असल्याचे अवशेष पाहायला मिळतात. सभागृहाच्या बाहेरच्या भागात भिंतीला चैत्यकमानीप्रमाणे पिंपळाच्या पानाच्या कमानीत अर्ध-उठावदार स्तूप कोरलेला आहे. वेदिका पट्टीचे नक्षीकाम आहे. तसेच याच विहाराच्या समोरील भागावर एक शिलालेख कोरलेला आहे, जो सहज लक्षात येत नाही. अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक जलस्रोतांचा सुयोग्य पद्धतीने वापर केलेला असून, त्या वेळच्या जलव्यवस्थापन कौशल्याची चुणूकही येथे दिसते. ‘जेथे लेणी तेथे पाणी’ याची प्रचिती येथे येते. बौद्ध लेण्यातील पाण्याचे टाके वर्षभर भरलेले असते. यामधील पाणी हे अतिशय थंडगार आणि शुद्ध असून पिण्यासाठी योग्य मानले जाते. येथे मधमाश्यांची पोळी असल्याने सुगंधी द्रव्ये मारून जाणे टाळावे. शिवाय कोणत्याही सुगंधी वस्तू सोबत घेऊ नयेत. तसेच पोळ्यांना धक्का लागेल असे काहीही करू नये. 

मुंबईमार्गे व पुणेमार्गे कर्जत या रेल्वे स्थानकात उतरून कर्जत येथील मुख्य रस्त्यावर, ब्रिजवर कोंढाणे लेण्याकडे जाण्यासाठी खासगी वाहने असतात. (अधिक माहितीसाठी http://abcprindia.blogspot.com/)

कोथलीगडकोथलीगड


कोथलीगड :
हा पेठकिल्ला म्हणूनही ओळखला जातो. नेरळच्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी मोठी गुहा आहे. गुहेमधून दगडातून कोरून काढलेला एक जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्याच्या आकाराचे बांधकाम केलेले आहे. या नरसाळ्यालाच कोथळीगड असे म्हणतात. कर्जत-मुरबाड रस्त्यावर कर्जतच्या पूर्वेसच हा किल्ला आहे. या छोटेखानी किल्ल्यावर शिवकाळामध्ये शस्त्रागार होते. तसेच याचा उपयोग टेहळणीसाठीही होत असावा. येथील निसर्गसौंदर्य ट्रेकर्सना मोहात टाकते. येथे कातळाचे शिखर व गुहापण आहे. 

कोथळीगडकोथळीगड


आंबिवली बौद्धगुंफा :
कोथळीगडाच्या पायथ्यातच आंबिवली बौद्धगुंफा आहेत. येथे पाण्याच्या टाक्या, १२ विहार आहेत. ब्राह्मी लिपीतील एक शिलालेखही आहे. ही लेणी कोथळीगडाबरोबरच बघता येतात. आवर्जून बघावीत अशी ही लेणी आहेत. 

आंबिवलीआंबिवली


कोथळीगडकोथळीगड
प्रबळगड : पनवेलच्या पूर्वेस खालापूर तालुक्यात हा किल्ला आहे. माथेरानच्या पश्चिमेस समुद्रसपाटीपासून २३२५ फूट उंचीवर हा किल्ला आहे. मुघलांकडून हा किल्ला ताब्यात घेतल्यावर खजिना मिळाला असे म्हणतात. सन १८१८मध्ये येथील तटबंदी व बुरुज ढासळले आहेत. आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी काही काळ येथे आश्रय घेतला होता. किल्ल्यावर काही इमारतींचे जोते आढळून येते.
 
कसे जाल कर्जत परिसरात?
कर्जत, पनवेल ही शहरे रेल्वे व रस्त्याने जोडलेली आहेत. जवळचा विमानतळ मुंबई. राहण्यासाठी माथेरान, पनवेल, डोंबिवली येथे व्यवस्था होऊ शकते. माथेरान सोडले तर बहुतेक ठिकाणी ट्रेकर्सना तेथील गावात किंवा किल्ल्यावरील देवळात गुहेमध्ये मुक्काम करता येतो. अतिपावसाचा जुलै महिना सोडून कधीही जावे. अर्थात यातील काही ठिकाणे दुर्गम आहेत. आपले वय आणि तब्येत या गोष्टी लक्षात घेऊन नियोजन करावे. 

बल्लाळेश्वर, वरदविनायक, बौद्धलेणी आणि बरेच काही...


‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीच्या दक्षिण तीरापर्यंतचा भाग पाहिला. या भागात जाऊ या थोडे उत्तरेकडे... सह्याद्रीच्या पायथ्याच्या कडेने....
............
रायगड जिल्ह्याच्या उत्तरेकडचा भागही निसर्गसमृद्ध आहे. अष्टविनायकापैकी पाली आणि महड ही तमाम गणेश भक्तांची आवडती श्रद्धास्थाने या भागात आहेत. दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाची साक्ष देणारी ठाणाळे खडसांबळेसारखी अनेक बौद्धलेणीही याच परिसरात आहेत. सह्याद्रीवरून कोसळणारे धबधबे या भागाचे सौंदर्य खुलवत असतात. जांभळे, करवंदांसारखा रानमेवा, विपुल वन्यजीवसंपदा या भागात आहे. 

श्री बल्लाळेश्वरश्री बल्लाळेश्वर


पालीचा श्री बल्लाळेश्वर :
अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे, की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) ओळखला जातो. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. पालीचा गणपती हा अष्टविनायकांच्या परिक्रमेतील आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. सूर्य उगवतो, तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूंना दोन तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. गणेशाचे कपाळ विशाल असून, डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून, ती चिमाजीअप्पांनी अर्पण केली आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरे येथील गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे. ठाणाळे व खडसांबळे ही बौद्ध लेणीही याच परिसरात आहेत. नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले. 

श्री बल्लाळेश्वर मंदिरश्री बल्लाळेश्वर मंदिर


पौराणिक कथेनुसार, विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगू ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख मुद्गल पुराणात आहे. कृत युगात येथे पल्लीपूर नावाचे नगर होते. तेव्हा तेथे कल्याण नावाचा वैश्यवाणी राहत असे. या कुटुंबात बल्लाळ नावाचा सुपुत्र झाला. बल्लाळ लहानपणापासूनच ध्यानधारणा व गणेशचिंतनात मग्न असे. अध्ययन व व्यापार न करता बल्लाळ भक्तिमार्गाला लागला व इतर सवंगड्यांनाही तेच करायला लावीत असे. म्हणून कल्याणशेठजींनी बल्लाळचा गणपती दूर फेकून दिला आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले. नंतर बल्लाळने ‘घरी जाणार नाही येथेच तुला देह अर्पण करीन’ अशा दृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. त्याचा भक्तिभाव पाहून श्री गजाननाने विप्र रूपात प्रकट होऊन बल्लाळला बंधनातून मुक्त केले व त्याला वर दिला. बल्लाळाने विनायकाला विनंती केली, की आपण येथे कायमचे वास्तव्य करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. तो वर बल्लाळाला देऊन श्री गजाननाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. बल्लाळविनायक या नावाने श्रीगणेश येथील शिळेमध्ये अंतर्धान पावले. तीच ही बल्लाळेश्वराची मूर्ती आहे. 

पाली खोपोलीपासून ३८ किलोमीटर अंतरावर आहे, तर पुण्यापासून १११ किलोमीटर अंतरावर आहे. खोपोली-पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीला रस्ता जातो. पाली हे सुधागड तालुक्याचे मुख्यालय आहे. 

उन्हेरे येथील गरम पाण्याचे कुंडउन्हेरे येथील गरम पाण्याचे कुंड
उन्हेरे : पालीच्या जवळच नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड आहे. उन्हेरे या गावाजवळील या गंधकमिश्रित पाण्याच्या कुंडात स्नान केल्यास त्वचेचे विकार व वाताचे विकार बरे होतात, असे म्हणतात. येथे तीन कुंडे आहेत. त्यापैकी एकातील पाणी खूपच गरम असते. इतर दोन कुंडातील पाणी सौम्य आहे. त्यामध्ये स्नान करता येते. एक कुंड स्त्रियांसाठी, तर एक पुरुषांसाठी आहे. या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळात मो. कृ. देवधर यांच्या अध्यक्षतेखाली हरिजन परिषद झाली होती. तसेच बापूसाहेब लिमये यांनी महायुद्धात सरकारला मदत करू नये असे आवाहन केल्यामुळे त्यांना शिक्षाही झाली होती. 

उद्धर रामेश्वर : रावणाने जटायूशी युद्ध करून ज्या ठिकाणी जटायूचे पंख छाटले व श्रीरामांनी ज्या ठिकाणी जटायूचा उद्धार केला ते ‘उद्धर’स्थान अशी लोकांची श्रद्धा आहे. रामेश्वर येथे श्री शंकराचे स्वयंभू स्थान असून, येथे अस्थी विसर्जनाचे कुंड आहे. येथूनच जवळ रामेश्वर वैभव हे थंड हवेचे ठिकाण आहे. (पाली येथून १४ किलोमीटर)

नेणवली/खडसांबळे लेणी : नेणवली लेण्यांनाच खडसांबळे लेणी असेही म्हणतात. खडसांबळे लेणी नेणवली गावात असल्याने त्यांना नेणवली लेणी असे म्हटले गेले पाहिजे. परंतु ब्रिटिश अभ्यासक खडसांबळे गावातून आल्यामुळे त्यांनी त्याला ते नाव दिले असावे. सह्याद्रीच्या डोंगररांगेतील ही बौद्ध लेणी पालीजवळच आहेत. चौल बंदरावरून नागोठणे खाडीमार्गे बोरघाटातून मावळात जाणाऱ्या व्यापारी मार्गावर ही लेणी आहेत. यांचा शोध रेव्हरंड अॅबटने १८८९ साली लावला. हेन्री कझेन्स यानेही या लेण्यांचे वर्णन केले आहे. ही लेणी इसवी सनाच्या पूर्वी दुसऱ्या शतकात कोरलेली असावीत. या काळात सातवाहन राजवट असल्याने त्यांचीच ही निर्मिती असावी असे मानले जाते. ही लेणी महाराष्ट्रातील आद्य लेणी म्हणूनही समजली जातात. इ. स. पूर्व २०० त इ. स. ५००पर्यंत यांची कामे चालली असावीत. या लेण्यांच्या इतिहासात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वासुदेव बळवंत फडके हे स्वातंत्र्यसेनानी याच लेण्यांत इंग्रजांपासून लपून राहिले होते. याचा अर्थ ही लेणी त्या काळात इंग्रजांना सापडलीच नाहीत, इतक्या अवघड ठिकाणी आहेत. 

खडसांबळे लेणीखडसांबळे लेणी


येथे ३० ते ४८ इतक्या मोठ्या संख्येने लेणी असावीत, असा संशोधकांचा कयास आहे. लेणी किती होती याबाबतीत अनेक मते आहेत. ही सर्व लेणी एकाच दगडात कोरलेली आहेत. हा दगड थोडा ठिसूळ असल्याने लेणी क्षतिग्रस्त झाली आहेत. लेण्यांच्या मुख्य चैत्यगृहाच्या बाजूला १७ भिक्खूंची निवासस्थाने आहेत. आज ती भग्न असली, तरी त्यांचे पूर्वीचे सौंदर्य मात्र अप्रतिम होते. डोंगरातून येणारा पाण्याचा प्रवाह स्तूपाच्या मागून काढून तो पाण्याच्या टाक्यात घेऊन जाणारी योजना आजच्या घडीलाही आश्चर्यकारक आहे. अशा अनेक तांत्रिक गोष्टी अभ्यासकांना माहिती करून घेता येतील. 

साधारण क्रमांक १ ते ९ या लेण्यांमध्ये बरीच पडझड झालेली दिसून येते. एक-दोन ठिकाणी स्तूपांचे अवशेष दिसून येतात. लेण्यांच्या दर्शनी भागात लाकडाचे काम असावे. कारण तशा पद्धतीच्या खोबण्या आपणास पाहायला मिळतात. 

बरीच लेणी नष्ट झालेली आहेत, भग्नावस्थेत आहेत. बऱ्याच लेण्यांच्या पुढील दर्शनी भाग नष्ट झालेले असून, छताचा भाग तेवढाच राहिलेला आहे. लेण्यांच्या एका ठिकाणी दोन स्तूपांचे अवशेष सापडतात. भिख्खूंच्या अस्थी ठेवून त्यावर ते स्तूप कोरलेले असावेत असे दिसते. लेणे क्रमांक आठ भव्य असून, प्रांगणातून तीन पायऱ्या चढून समोर असणाऱ्या दीर्घिकेत दालनाच्या उजव्या बाजूस एक अंतर्दालन आहे व मध्यभागी एक खोली आहे. बाह्यदालनाच्या बाजूस असणाऱ्या भिंतीच्या बाजूला प्रशस्त असे शयन ओटे आहेत. खोल्यांची रचना बघता हे लेणे राहण्यासाठी असल्यासारखे वाटते. या लेण्यात एकूण पाच ओटे आहेत. त्यामुळे येथे किमान पाच भिख्खूंची झोपण्यासाठीची व्यवस्था असावी.

नऊ क्रमांच्या लेण्यात छत शिल्लक असून, मागच्या खोलीत व मागच्या भिंतीच्या बाजूला ओटे शिल्लक आहेत. दहावे लेणे हे विहार लेणे आहे. याला सभागृह किंवा मोठे चैत्यगृह म्हणता येईल. महाराष्ट्रातील मोठ्या आयताकृती आकाराच्या चैत्यगृहात याचा समावेश होतो. या लेण्यांच्या स्तूपाच्या बाजूला एकूण १७ खोल्या आहेत. येथील स्तूप इतर लेण्यांप्रमाणे आपल्याला मध्यभागी दिसत नाही. तो एका कोपऱ्यात दिसतो. त्याच्या बाजूलाच ११ ते २१ क्रमांकाची लेणी आहेत. तीही भग्नावस्थेत आणि पावसाच्या पाण्यासोबत आलेल्या मातीने भरलेली आहेत. कड्याच्या पलीकडेही अनेक लेण्यांचा समूह आहे. कडा तुटल्यामुळे त्याचे विभाजन झालेले आहे. तिकडेही विहार संघाराम, तसेच शून्यगृह आहेत. ऐसपैस अशी जागा असणारी, कातळात कोरलेली ही लेणी आहेत. (अधिक माहिती http://abcprindia.blogspot.com/ येथे मिळू शकेल.)
ठाणाळे/नाडसूर लेणीठाणाळे/नाडसूर लेणी


ठाणाळे /नाडसूर लेणी :
पालीच्या गणपतीजवळ एका निसर्गरम्य ठिकाणी ही बौद्ध लेणी आहेत. तैलबैला ते मांदाड या जुन्या व्यापारी मार्गावर वाघजाई घाटावर ठाणाळे लेणी वसली आहेत. सह्याद्रीच्या पश्चिम उतरंडीवर ही लेणी एक हजार फूट उंचीवर आहेत. ठाणाळे गावापासून लेण्यांपर्यंत पायवाट आहे. सोबत वाटाड्या हवाच. हा लेणीसमूह सर्वप्रथम मराठी मिशन, मुंबई यांनी इ. स. १८९०मधील जानेवारी महिन्यात जाऊन पाहिला आणि सुप्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ हेन्री कझिन्स यांच्या संशोधक नजरेसमोर आणला. इ. स १८९०मध्ये कझिन्सने ठाणाळे लेण्यांना भेट दिली आणि इ. स. १८११मध्ये त्याने ‘Caves at Nadasur and Kharasamla’ ही पुस्तिका प्रकाशित केली. 

ठाणाळे स्तूपठाणाळे स्तूप


ठाणाळे नाडसूर लेणीठाणाळे नाडसूर लेणी
खडसांबळे लेणीसमूहापासून ही लेणी अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर आहेत. पावसाळ्यात तर येथील वातावरण आणि निसर्ग मोहून टाकणारा असतो. डोंगरावरून झेपावणारे प्रपात तुमची नजर खिळवून ठेवतात. वेगवेगळ्या हंगामात फुलणारी फुले, जांभळे आणि करवंदांसारखा मेवा येथे उपलब्ध असतो. ठाणाळे येथील लेणीसमूहातील सर्व लेणी पश्चिमभिमुख आहेत. येथे २३ लेण्यांचा समूह असून, पॉलिग्राफिक परीक्षणानुसार इसवी सनापूर्वी ५० ते सत्तर दशकात ही लेणी निर्माण केली असावीत. निवासी गुंफा आणि एक चैत्यविहार आहे. पूर्णावस्थेत नसलेल्या चैत्यविहाराच्या छतावर अप्रतिम नक्षीकाम केलेले दिसून येते. हेन्री कझिन्स यांनी या गुंफांचे वर्णन लिहून ठेवले आहे. गुंफा क्रमांक सात सर्व गुंफांमध्ये सर्वांत सुंदर आहे. गुहेच्या संपूर्ण भिंतीमध्ये पुरुष, स्त्रिया आणि प्राणी यांच्या आकृतीसह सजावट केली आहे. येथे दोन उल्लेखनीय शिलालेख आहेत. त्यावर दात्यांची नावे दर्शविली आहेत. 
 
ठाणाळे लेणी 

ठाणाळे लेणी

ठाणाळे लेणी  ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  

दोन-चार आठवडे, आमचा ठाणाळे लेणी करायचा विचार चालला होता. पण वेळेला दुसराच ट्रेक ठरवल्यामुळे होत नव्हता. शेवटी प्रणव आणि मी १ जुलैचा रविवारी करायचा ठरवले. ह्या वेळी आमच्या सोबत हेमेश आणी त्याची बायको स्वप्ना होती.

विकिपीडियावर सांगितल्याप्रमाणे ठाणाळे लेणी ह्या २३ बुधलेणींचा समुदाय असून, पहिल्या शतकातील आहे.

थोडक्यात प्रवासबद्दल
  • मुंबई वरून खोपोलीला ट्रेन ने पोहचावे.
  • खोपोली ते पाली एसटी पकडावी, त्या गाडीने पेडली गावात उतरावे 
  • खोपोली ते पेडली अंतर २९ किमी आहे. एसटीने प्रत्येकी ४५ रुपये तिकीट आहे.
  • पेडली ते ठाणाळे साठी रिक्षा करावी (किंवा शेअर रिक्षा हि असाव्यात पण ती भरेपर्यत वाट पहावी लागेल.)
  • पेडली ते ठाणाळे ६.५  किमी अंतर आहे, त्यासाठी आम्ही रिक्षाला १५० रुपये भाडे दिले.

प्रवासाचे वर्णन:
ठाणाळे लेणी रायगड जिल्ह्यातील, सुधागड तालुक्यातील ठाणाळे गावात आहे. पण ठाणाळे गावात जाण्यासाठी तुम्हाला एसटीने पेडली गावात उतरायला लागते. एकंदर इथपर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्ट ने प्रवास वेळेत करणे, खूप मोठ काम आहे. त्यासाठी आम्हला सकाळी ८ ची कर्जत-खोपोली ट्रेन कर्जत वरून पकडायची होती. ती ट्रेन पकडण्यासाठी, मी सकाळी ५..२० ची  सीएसमटी-कर्जत धीमी लोकल ५. ३२ ला करीरोड वरून पकडली. हि ट्रेन कर्जतला बरोबर ७. ४०ला वेळेत पोहचली. बाकी माझे मित्र मला डोंबीवलीला भेटले.

जास्त करून कर्जतला मुबईवरून आलेली लोकल ज्या स्थानकावर लागते, त्याच स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला खोपोली ट्रेन लागलेली असते. आम्ही ८. २५ ला खोपोलीला पोहचलो. खोपोली रेल्वे स्थानकाबाहेर हॉटेल मध्ये नाश्ता करून, आम्ही पालीसाठी एसटी बघायला गेलो.

खोपोलीला २ ठिकाणाहून एसटी सुटतात. एक मुख्य एसटी आगर आहे, जिथून बाहेरगावी जाणाऱ्या एसटी येतात. हे मुख्य आगार खोपोली स्थानकातून अंदाजे ३ किमी वर आहे. तर दुसरं रेल्वे स्थानकापासून चालत ५ मिनटाचा अंतरावर महामार्गावर आहे. येथे नगरपरिषदेच्या गाड्या सुटण्यासाठी वेगळा आगार आहे आणि त्याचा समोर रस्त्या पलीकडे. पाली व इत्यादी जवळपासच्या गावात जाण्यासाठी जाणाऱ्या एसटी सुटतात.

आम्ही नाश्ता करून, ह्या स्थानकात पोहचेपर्यंत नऊ वाजले होते. त्यामुळे आमची पाली एसटी गेली होती. बहुतेक ती एसटी ८ किंवा ८. ३० ची होती. आणि आता दुसरी गाडी ९. ४५/ १०. ४५ होती. त्यासाठी आम्ही मुख्य आगार मध्ये जाऊन एसटी बघायचा ठरवल. आम्ही रिक्षा करून तिथे पोहचलो. तिथून सकाळी ९ .४५ची मुंबई- पाली एसटी होती, आम्ही त्या एस्टीने जायचा ठरवलं. गाडी वेळेत आली पण सुठेपर्यंत १० वाजले.
खोपोली ते पेडली  २९ किमीचा अंतर पाऊण तासात पोहचलो. पेडलीला पोहचे पर्यंत १०. ५० झाले. पेडली पासून  पुढे पाली अजून ११ किमी आहे.

खोपोली ते पेडली पर्यंत शेअर गाडीने प्रवास कसा करावा.
खोपोली वरून तुम्ही शेअर गाडीने सुद्धा पाली किंवा पेडली पर्यंत जाऊ शकता. पण पाली किंवा पेडली पर्यंत थेट गाडी नाही.त्यासाठी तुम्हाला खोपोली वरून परळी गावात जायला लागते. नंतर परळी वरून पालीला जाण्यासाठी शेअर गाडी असतात, त्याने पेडली गावात उतरायला लागेल. परळी वरून मृगगडला सुद्धा जातात. 
तसच तुम्ही परतीचा प्रवास करू शकतात. पेडली गावातून तुम्हाला पाली, खोपोली, कर्जत आणि पनवेल ला जाण्यासाठी वेळेत एसटी आहेत.

पेडली ते ठाणाळे गाव अंतर ७ किमी आहे. पेडलीतून आता आम्हाला ठाणाळे साठी एसटी नव्हती. बहुतेक ठाणाळे गावातून वाया करत जाणारी ठराविक एक ते दोन एसटी असाव्यात. ठाणाळे गावात जाणाऱ्या रस्त्याला तशी पण जास्त रहदारी दिसली नाही. त्यामुळे आम्ही पेडली वरून एकवेळेच १५० रुपये भाडे देऊन रिक्षा केली. येते वेळी पण आम्ही त्याच रिक्षावाल्याला फोन करून बोलवून घेतले. बहुतेक ठाणाळे किंवा त्याचा पुढच्या गावात जाण्यासाठी शेअर रिक्षा असाव्यात. कारण आमची हि शेअर रिक्षाची ६ आसनी होती. पण आम्हाला उशीर होत असल्यामुळे आम्ही जास्त विचारपूस न करता. भाड्यावर रिक्षा ठरवली. जर तुम्ही ७ ते ८ जण असाल, तर तुम्हाला परवडेल. 

पेडलीवरून ठाणाळे गावात पोहचायला १५ मिनटं लागली.
ठाणाळे लेणीसाठी वाट गावाचा मागून जाते. त्यासाठी आपल्याला गावामध्ये जाऊन विचारायला लागते. अन्यथा वाट मिळणे मुश्किल आहे. आम्ही ११. १५ ला ट्रेकला सुरुवात केली.

ठाणाळे गाव ते ठाणाळे लेणी पर्यंतच्या वाटेचं वर्णन:
गावातल्याने दोन घराचा मागुन जायायला सांगितले. त्या घराचा पाठी गेल्यावर, एक पाय वाट जंगलात जात होती. आम्ही त्यावाटेने चालू लागलो. पाच मिनटात आम्ही एका लहान मोकळ्या जागेत पोहचलो. तिथून ठाणाळे लेणी आणि डोंगर दिसतो. इथून एक वाट डावीकडे खाली उतरताना दिसते, तर दुसरी उजवीकडे जंगलात जाताना दिसते. उजवीकडची वाट लेणीकडे जाते. उजवीकडील वाटेने पुढे चालू लागल्यावर, वाटेत मध्ये मध्ये वाट दर्शवण्यासाठी दगडावर बाणाचे चिन्ह केलेले दिसतात. त्यामुळे तुम्ही न चुकता लेणीपर्यंत पोहचू शकता. जास्त करून वाट जंगलातून जात असल्यामुळे काही ठिकाणी वाट चुकू शकतात, त्यामुळे बाण पहात जावे. जंगलात मच्छरचा त्रास खूप होतो. वाटेत आपल्याला ३ ओढे पार करायला लागतात. त्यात तिसरा ओढा शेवटच्या टप्प्यात येतो. ह्या ओढ्या ओलांडून ५ मिनटात लेणीजवळ पोहचतो.

लेणी बद्दल
लेणीपर्यंत पोहचेपर्यंत आम्हाला १ वाजला. मला लेणी बद्दल जास्त माहिती नसल्यामुळे, लेणीबद्दल वर्णन केलेले नाही. 

लेणी एका ओळीत असल्यामुळे, ओळीतच बघून होतात. त्यात मध्ये एक लेणी रुंदीला सगळ्यात मोठी लागते. त्याचा बाजूचाच कातळात एक मोठा स्तुपा आहे . स्तूपाचा थोडा अजून पुढे, एक लेणीजवळ मोठा कातळ तुटून पडलेला दिसत्तो. पण त्या कातळाच्या बाजूने एक वाट पुढे जाताना दिसते. तिथून पुढे गेल्यावर आपल्याला अजून ३ लेणी  दिसतात. ह्या शेवटच्या लेणी, ह्याच्या पुढे लेणी नाहीत पण इथून एक वाट पुढे जाताना दिसते. ह्या वाटेने पुढे गेलो असता लेणीच्या वरती पठारावर जाता येते. पण हि वाट कडेने जात असल्यामुळे, जपून जायला लागते. हि वाट खाली कुठे तरी उतरताना दिसते. त्यामुळे तेथे खाली न जाता वर पठाराकडे जावे. जिथून आम्ही वर चढलो, तिथे आम्हाला एका दगडावर लेणीच्या दिशेने बाण केल्याचे दिसले. त्यामुळे हि वाट नक्की कुठून येते किंवा कोणी ह्या वाटेने येतात कि नाही, ते कळलं नाही.

लेणीच्या पठारावरून दिसणारे अप्रतिम दृश्य:
साधारण १० मिनटात आम्ही पठारावर पोहचलो. पण पठारावरून दिसणारे दृश्य सुंदरच होते. पाऊस किव्हा पावसाचे ढग हि नसल्यामुळे. आम्हाला पठारावरून डावीकडे सुधागड दिसत होता, तर समोर थोडा उजवीकडे सरसगड दिसत होता. तर उजवीकडे खालील ठाणाळे गाव. आणि खाली पूर्ण हिरवागार जंगल दिसत होता. तर पाठी मुख्य डोंगर आणि त्यामधली घळ दिसते. ठाणाळे गावातून जेव्हा आपल्याला ह्या लेणी दिसतात, तेव्हा हा एकच डोंगरा वाटतो.  पण लेणीचा डोंगर आणि मुख्य डोंगर मध्ये एक घळ लागते. त्यामुळे लेणीचा डोंगर मुळ डोंगराची सोंड वाटते.

पठारावरून वाट वर डोंगरात जाताना दिसते. पण ह्या वाटेने बहुतेक गड माथ्यावर जाता येत नाही. कारण आम्ही जेव्हा पठारावर पोहचलो. तेव्हा खालील गावातील काही तरुण वर असलेल्या धबधब्यावरुन परताना,आम्हाला भेटले. आम्ही त्यांना विचारले असता, त्यांनी हि वाट फक्त धबधब्यावर जाते सांगितले.

लेणी मधून तुम्हाला सुधागड आणि सरसगड दिसत नाही. पठारावरून आम्ही सरळ परतीची वाट पकडली. उतरतेवेळी १ तासात आम्ही गावात पोहचलो. ह्या ट्रेकला आम्हाला प्रत्येकी ३०० रुपये खर्च आला.


ठाणाळे लेणी  ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  



गावातून वर आल्यावर दिसणारा ठाणाळे लेणीचा डोंगर

ठाणाळे लेणीच्या  पठारावरून दिसणारे दृश्य

पठारावरून पुन्हा परत लेणीकडे जाताना काढलेला वाटेचा फोटो
 

सरसगड : पाली या गावाच्या पूर्वेस हा किल्ला आहे. किल्ला पाहण्यासाठी तीन ते चार तास लागतात. गिरीदुर्ग प्रकारातील सरसगड उर्फ पगडीचा किल्ला उर्फ पालीचा किल्ला अशा विविध नावांनी तो ओळखला जातो. सरसगड इ. स. १३४६मध्ये मलिक अहमद (निजामशाहीचा संस्थापक) याने ताब्यात घेतला. म्हणजे हा किल्ला त्याअगोदर अस्तित्वात होता. बहुधा कोकणातील इतर किल्ल्यांप्रमाणे शिलाहार राजवटीत याचे बांधकाम झाले असावे (याला संदर्भ नाही.); मात्र शिवाजी महाराजांच्या ताब्यात आल्यावर शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदांना सुधागड व सरसगडाची सबनिशी दिली. शिवाजी महाराजांनी त्यांना सुधागडाच्या देखभालीसाठी पाच हजार होन आणि सरसगडासाठी दोन हजार होन दिले. पुढे भोर संस्थानात या किल्ल्याची व्यवस्था होती. सरसगडाची देखभाल १९४८ सालापर्यंत भोर संस्थानाकडे होती. . या गडाचा उपयोग मुख्यतः टेहळणीसाठी करत असत. या गडावरून पाली व जवळच्या संपूर्ण परिसराची टेहळणी करता येते. 

सरसगडसरसगड


संस्थाने खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी इतर गडांप्रमाणे सरकारकडे आली. किल्ल्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झालेले आहे. प्रवेशद्वाराची संरक्षणात्मक रचना थक्क करणारी आहे. दरवाज्याच्या आत इंग्रजी ’एल’ आकाराची देवडी बांधलेली आहे. हे दार बंद केले, तर या बाजूने शत्रू काय मुंगीसुद्धा आत येऊ शकणार नाही अशी याची रचना आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तुंग कातळाच्या भिंतीजवळ एक सुळका आहे. या सुळक्याच्या पायथ्याशी अनेक गुहा, तळटाकी असून, त्यात भरपूर पाणी आहे. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर खास बघण्यासारखे काही नाही. गडावर केदारेश्वराचे मंदिर आहे. येथे एक तलाव आहे. टेहळणीसाठी दोन बुरुज आहेत. या बालेकिल्ल्यावरून समोरच असणारा तीन कावडीचा डोंगर दिसतो. समोरच उभा असणारा सुधागड, तैलबैला, धनगड आणि कोरीगड दिसतो. तसेच पाली गाव, अंबा नदी, उन्हेऱ्याची गरम पाण्याची कुंडे, कोकण, जांभूळपाडा असा सर्व परिसर येथून दिसतो. किल्ला ट्रेकर्ससाठी हे आवडीचे ठिकाण आहे. 

सुधागडसुधागड


सुधागड :
पालीच्या जवळचाच हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून, याची उंची ५९० मीटर आहे. पूर्वी हा गड भोरपगड म्हणूनही ओळखला जायचा. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला आहे. इ. स. १६४८ साली मालवजी नाईक कारके, सरदार मालोजी भोसले, जाधव आणि सरनाईक या शिवाजी महाराजांच्या शूरवीरांनी किल्ला ताब्यात घेतला. शिवरायांनी या गडाचे सुधागड असे नामकरण केले. हा किल्ला भोर संस्थानाच्या अखत्यारीत होता. गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर या गावातच छत्रपती संभाजीराजे व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. राजधानीसाठी याही गडाचा विचार शिवरायांनी केला होता, असे सांगितले जाते. 

महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्यांचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती संभाजीराजांनी सुधागड परिसरात असणाऱ्या परली गावात हत्तीच्या पायी दिले. गडावर पाण्याचे अनेक तलाव आहेत. किल्ल्यावर पंतसचिवांचा वाडा आहे, तसेच भोरेश्वराचे मंदिर व भोराई देवीचे मंदिर आहे. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस सुबक नक्षीकाम असलेल्या समाध्या आहेत. येथील जंगलात अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात. भोराई देवीच्या मंदिराजवळ पुढे पाण्याची टाकी आहेत. टाक्यांच्या डावीकडे पुढे गेल्यावर चोर दरवाजा होता. तो आता अस्तित्वात नाही. 

वरदविनायकवरदविनायक


पाच्छापूर दरवाज्यातून गडावर गेल्यास थोडे चढल्यावर माणूस एका पठारावर पोहोचतो. पठाराच्या डावीकडे सिद्धेश्वराचे मंदिर, तसेच धान्याची कोठारे, टाके, हवालदार तळे व हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी आहे. गडावर रायगडच्या टकमक टोकासारखे टोक असून, येथून घनगड, कोरीगड, तैलबैला व अंबा नदीच्या खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते. रायगडावरील टकमक टोकासारखेच येथेही टकमक टोक आहे. या टोकावर उभे राहिल्यावर अंबा नदी व नदीच्या आजूबाजूची गावे दिसतात.

वरदविनायक मंदिरवरदविनायक मंदिर


महडचा वरदविनायक :
महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. सन १७२५मध्ये सुभेदार रामजी महादेव बिवलर यांनी हे मंदिर बांधले. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. हे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा सांगितली जाते. एका भक्ताला त्याच्या स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात मूर्ती पडली आहे असे दिसले. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून, गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. 

कसे जाल पाली परिसरात?
मुंबई-गोवा महामार्गावर वाकण येथे उतरून पालीपर्यंत जाता येते. जवळचे रेल्वे स्टेशन - नागोठणे. जवळचा विमानतळ मुंबई - १२५ किलोमीटर. मुंबई-पुणे रस्त्यावरून खोपोली गाव ओलांडल्यावर डावीकडे पालीपर्यंत रस्ता आहे. पाली येथे राहण्याची व भोजनाची उत्तम सोय आहे. येथे भरपूर हॉटेल्स आहेत. अतिपावसाचा जुलै महिना सोडून कधीही जावे.
 
‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर ते दिवेआगर या भागाची माहिती घेतली. आजच्या भागात पाहू या रायगड किल्ल्याच्या दक्षिणेकडील महाड परिसर. 
..........
या भागात बौद्ध गुंफा/लेणी असल्यामुळे सुमारे १८०० वर्षांचा इतिहास आहे. या भागाने सातवाहन, शिलाहार, यादव, निजाम, विजापूरचे आदिलशहा, त्यानंतर मराठे व अखेरीस इंग्रज अशा राजवटी पाहिल्या. आदिलशहाच्या काळात बाणकोटपासून महाडपर्यंत जलवाहतूक होती. बाणकोट, महाड, वरंधा, शिरवळ, पंढरपूर, विजापूर हा तत्कालीन राजमार्ग होता. महाड परिसराचा पश्चिम भाग म्हणजे सह्याद्रीची उतरण. अतिशय दुर्गम भागाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी उपयोग करून घेतला आणि निसर्गाबरोबर इतिहासाचा वारसाही आपल्याला दिला आहे. दुर्गम भागात असलेले गडकोट आणि त्यातील कपारीतून फिरताना जो आनंद मिळतो तो वेगळाच असतो. पोलादपूरपासून महाडपर्यंत या भागाने सह्याद्रीचा जणू मुकुटच धारण केला आहे. पोलादपूरच्या आंबेनळी घाटापासून ताम्हिणी घाटापर्यंत निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. 

शिवथरघळ येथील गुंफाशिवथरघळ येथील गुंफा


शिवथरघळ :
आध्यात्मिक, धार्मिक, तसेच निसर्गप्रेमींचे हे आवडते ठिकाण आहे. शिरवळहून महाडला येताना वरंधा घाट उतरल्यावर उजवीकडे शिवथरघळ आहे. हे ठिकाण सर्व बाजूंनी असलेल्या उंच पर्वतराजीत असून, वाघजाई दरीच्या कुशीत आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होत असून, ती पुढे सावित्रीला मिळते. शिवथरघळ आणि आजूबाजूचा सर्व परिसर चंद्रराव मोऱ्यांच्या जावळीच्या वतनात होता. जावळीचे मोरे हे विजापूर दरबाराचे वतनदार देशमुख होते. घनदाट जावळीच्या भू-प्रदेशामुळे मोरे यांना निसर्गाचे संरक्षण असल्याने ते बलाढ्य झाले होते. शिवरायांनी हा परिसर १६४८मध्ये आपल्या ताब्यात घेतला. समर्थ रामदास सन १६४९मध्ये या घळीत (गुहेमध्ये) वास्तव्यासाठी आले. सन १६६०पर्यंत म्हणजे दहा-अकरा वर्षे ते या ठिकाणी राहत होते. दासबोधाचा जन्म याच घळीत झाला. दासबोधाची सात/आठ दशके त्यांनी या घळीतच लिहून पूर्ण केली. दासबोध समर्थ रामदासांनी रचला आणि त्याचे लेखन त्यांचे पट्टशिष्य कल्याणस्वामींनी केले. दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत. महाराष्ट्र सरकारच्या राज्य मराठी विकास संस्थेने ७८०० ओव्यांचा हा ग्रंथ ऑडिओ स्वरूपात आपल्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला आहे. शास्त्रीय गायक संजय अभ्यंकर यांच्या आवाजातील या दासबोधाला राहुल रानडे यांनी संगीत दिले आहे. (दासबोधातील व्यवस्थापनासंदर्भातील उपदेशाबद्दलची लेखमाला वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

शिवथरघळ धबधबाशिवथरघळ धबधबा
छत्रपती शिवाजी महाराज सन १६७६मध्ये दक्षिणदिग्विजयासाठी जाताना श्री समर्थांचा आशीर्वाद येथूनच घेऊन पुढे गेले असे म्हणतात. रायगडाच्या पाडावानंतर हे ठिकाण दुर्लक्षित झाले होते. घनदाट जंगलामुळे नंतर कोणीही फिरकेनासे झाले. हे ठिकाण धुळे येथील विख्यात समर्थभक्त श्री शंकर कृष्ण देव यांनी १९१६ साली शोधून काढले. गुहेच्या तोंडावर पडणाऱ्या धबधब्यामुळे हे निसर्गप्रेमींचेही आवडते ठिकाण आहे. त्यानंतर या जागेच्या मूळ मालकांनी समर्थ सेवा मंडळाला जागेचे दानपत्र करून दिले. त्यानंतर साताऱ्याचे (दिवंगत) भाऊकाका गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा मंडळाच्या माध्यमातून तेथे अनेक सुविधा निर्माण केल्या गेल्या. तेथे आता दासबोध वाचन, प्रवचन, तसेच निरनिराळ्या वयोगटातील लोकांची शिबिरे भरविली जातात. आता तेथील व्यवस्थापन शिवथरघळ श्री सुंदरमठ सेवा समितीमार्फत केले जाते. तेथे राहण्याची, जेवण्याची व्यवस्था पूर्वसूचना देऊन केली जाते. पायऱ्या चढून आल्यावर समोरच शिवथरघळ श्री सुंदरमठ सेवा समितीने स्थापन केलेली इमारत लागते. इमारतीवरून पुढे गेल्यावर सरळ जाणारा रस्ता थेट गुहेपाशी घेऊन जातो. घळीमध्ये रामदासस्वामींची मूर्ती आहे. गुहेसमोरच सुंदर धबधबा आहे. त्याचा धीरगंभीर आवाज संपूर्ण दरीत घुमत असतो.
घळीच्या वरील डोंगरसपाटीवर चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. या सपाटीवरून राजगड, रायगड, तोरणा आणि प्रतापगड सारख्याच अंतरावर आहेत. या ठिकाणी पावसाळ्यात जाणे अविस्मरणीय ठरते. 

वरंधा घाटवरंधा घाट


वरंधा घाट :
पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर ‘वरंध घाट’ तथा ‘वरंधा घाट’ नावाचा २०-२५ किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या किल्ल्याला छेदून देशावरून कोकणात उतरतो. एका अवघड ठिकाणी एकावर एक अशी ४/५ हेअरपिन कर्व्हज (वळणे) यात आहेत. ज्या वेळी खालून बस किंवा ट्रकसारखे एखादे वाहन येत असते, त्या वेळी एकदम वरच्या बाजूला उभे राहून वाहन पाहताना, वळताना श्वास रोखला जातो. या घाटात पर्वत आणि जंगल याशिवाय काहीच दिसत नाही. घाटात गाड्यांचे आवाज प्रतिध्वनित होत असतात. भोरहून निघाल्यावर डावीकडे देवघर धरणाचा जलाशय, नागमोडी वळणे हा प्रवाससुद्धा खूप छान वाटतो. घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द झाडीत समर्थ रामदासस्वामींची शिवथरघळ आहे. घाटाच्या सुरुवातीला भोर तालुक्यातील हिरडोशी गाव आहे, मध्यभागी वाघजाई मंदिर आहे. वरंधा घाटातून उतरताना मध्यावर एका ठिकाणी गरम भजी, नाश्त्याचे पदार्थ मिळतात. थंडीत कुडकुडत गरम भजी आणि चहा पिताना खूप मजा येते. 

वाघजाईसमोरचा एक भलामोठा डोंगर अजस्र शिवलिंगाच्या आकाराचा दिसतो. पावसाळ्यात त्याच्या चारही अंगावरून असंख्य धबधबे कोसळत असतात. वाघजाईच्या पुढे लगेच एका खिंडीतून घाट डावीकडे वळतो. या खिंडीच्या दोन्ही अंगांचे डोंगर म्हणजेच कावळ्या ऊर्फ मनमोहनगड किल्ला. या गडावर वाघजाईकडील बाजूच्या डोंगरामध्ये नऊ टाकी आहेत. दुसऱ्या बाजूस अशीच काही टाकी व शिबंदीच्या घरांचे अवशेष दिसतात. इतिहासात फारशा परिचित नसलेल्या या गडावर प्राचीन काळापासून वाहत्या असलेल्या या घाटवाटेवर लक्ष ठेवण्याचे काम होते. ब्रिटिशांनी इ. स. १८५७मध्ये पक्का रस्ता तयार केला. उताराच्या शेवटी कोकणातील माझेरी, वरंध आणि बिरवाडी ही गावे येतात. 

चवदार तळे सत्याग्रह शिल्पचवदार तळे सत्याग्रह शिल्प


महाड :
मुंबई-गोवा महामार्गावरील महाड हे ऐतिहासिक ठिकाण आहे. सावित्री आणि गांधारी नद्यांच्या काठावर वसलेले हे शहर एके काळी ‘महिकावती’ या नावाने ओळखले जात असल्याचे सांगितले जाते. ‘बलिपटना’ आणि ‘पलईपटभाई’ असेही जुने नामोल्लेख आढळतात. पूर्वी उधाणाच्या भरतीच्या वेळी महाडपर्यंत गलबते येत असत. इतर भरतीच्या वेळी महाडच्यावर दीड किलोमीटरपर्यंत डोंगी (नावा) येऊ शकतात. सोळाव्या शतकात गव्हाच्या व्यापाराचे हे एक प्रमुख केंद्र होते. महाडमध्ये लोणारी कोळसा, तांदूळ यांचे उत्पादन होते. महाडच्या औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक, तसेच कापड उद्योग आहेत. महाड हे जणू रायगडाचे प्रवेशद्वार समजले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड येथून जवळच असल्याने शिवकाळात महाडचे महत्त्व अधिक वाढले. १७९६ साली येथे दुसरा बाजीराव, नाना फडणवीस व इंग्रज यांच्यामध्ये तह होऊन बाजीरावाला पेशवाई मिळाली. 

येथे चवदार, वीरेश्वर व हापूस ही तीन तळी आहेत. वीरेश्वर हे येथील प्रमुख मंदिर आहे. महाड खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे सत्याग्रहामुळे सर्वश्रुत झाले. १९२४ साली झालेल्या कुलाबा डिस्ट्रिक्ट डिप्रेस्ड क्लास मिशनच्या सभेत रामचंद्र मोरे यांनी बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेऊन चवदार तळ्याबद्दलची स्थिती कथन केली. तळे सर्वांना खुले व्हावे, यासाठी सत्याग्रह हा एकमेव मार्ग उपलब्ध असल्याची सर्वांचीच खात्री पटली. सत्याग्रहात महाड नगर परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुरबानाना टिपणीस, जी. एन. सहस्रबुद्धे हे चित्पावन ब्राह्मण समाजाचे सुधारक, ए. व्ही चित्रे हे सीकेपी समाजसुधारक आणि त्यांचे अनुयायी सामील झाले. २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची सुरुवात झाली. एक सार्वजनिक सभा घेऊन सुरबानाना टिपणीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सर्व सार्वजनिक ठिकाणे आणि तळी अस्पृश्यांसाठी खुली करण्यात येत असल्याचे जाहीर केले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मोर्चेकऱ्यांसह चवदार तळ्याकडे चालण्यास सुरुवात केली.

त्यांच्यापाठोपाठ त्यांचे अनुयायी चालू लागले व लवकरच हा जमाव चवदार तळ्यावर पोहचला. चवदार तळ्याच्या पायऱ्या उतरून डॉ. आंबेडकर पुढे सरसावले आणि आपल्या ओंजळीत पाणी घेऊन ते पाणी सावकाश प्यायले व सत्याग्रहाची सांगता झाली. या प्रसंगाचे एक शिल्पही येथे बसविण्यात आले आहे. या तलावाला चार बाजूने दारे होती. म्हणून त्याला चौदार तळे असेही म्हणत. 

गरम पाण्याचे झरे : शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर पश्चिमेला सव नावाचे छोटे गाव आहे. ते गरम पाण्याच्या झऱ्यांमुळे पर्यटकांचे आकर्षण असलेले ठिकाण आहे. झरे असलेली जागा खासगी मालकीची आहे. 

कोल लेणीकोल लेणी


कोल बौद्ध लेणी :
महाड तालुक्यात मंडणगडच्या बाजूला कोल हे गाव आहे. या गावात सातवाहन काळातील दोन लेणीसमूह आहेत. या लेण्यांची नोंद जेम्स बर्जेस यांच्या एपिग्राफिया इंडिका, तसेच ब्यूलर यांच्या इंडियन पॅलिओग्राफी यामध्येआहे. ल्युडर यांच्या एपिग्राफिया इंडिका (भाग १०) यामध्ये कोल लेण्यांच्या शिलालेखांचे अर्थ सांगितले आहेत.
पहिल्या समूहातील लेणी क्रमांक १, ३, ४, ५, ६ यामध्ये भिक्खू निवास असावा. सध्या ते मातीने पूर्ण भरलेले असून, त्यामधील शिलालेखही अस्पष्ट झाले आहेत. या सर्व लेण्यांमध्ये कोरीव आसने आहेत. त्यांचा वापर ध्यानधारणा करण्यासाठी केला जात असावा. नंतरच्या काळात वाटसरू मुक्कामासाठी याचा वापर करीत. 

कोल लेणीकोल लेणी


लेणी क्रमांक २ : हे मुख्य विहारलेणे आहे. या ठिकाणी प्रार्थनास्थान असावे. हे लेणे मातीने पूर्ण भरलेले आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या लेण्यात काही नाणी वगैरे सापडली आहेत. 

लेणे क्रमांक चारमध्ये पुढीलप्रमाणे शिलालेख आहे : ‘अघासकस गमिकियसा सिवदतस लेणे’ याचा अर्थ अघासकस गावातील उपासक सिवदत्त याने या लेण्यांचे दान दिलेले आहे. 

लेणे क्रमांक पाचच्या प्रवेशद्वारावर पुढीलप्रमाणे शिलालेख आहे : ‘भद्र उपासकस दुहुतूयसिरिय सिवदतस बितीया काय लेन देय धम्म’ याचा अर्थ - भद्र उपासकाची कन्या व सिवदत्त याची पत्नी धम्म सिरी हिने धम्मदान केलेली लेणी. सिवदत्त व त्याच्या बायकोने ही दोन लेणी दान केलेली आहेत. 

कोल बौद्ध लेण्यांचा दुसरा गट गावात शिरताच समोरच आहे. या समूहामध्ये तीन लेणी आहेत. कोल येथील सर्व लेण्यांची पुरातत्त्व विभागाने दखल घेऊन संरक्षित करण्याची आवश्यकता आहे. या लेण्यांची निसर्गामुळे होणारी हानी थांबविणे आवश्यक आहे. नाही तर १८०० वर्षांपूर्वीचा हा ठेवा नष्ट होण्याची शक्यता आहे. गावातील काही जाणकार लोकांच्या सहाय्याने लेणी संशोधक मुकेश जाधव, प्रशांत माळी, रवींद्र मीनाक्षी मनोहर (धम्मलिपी अभ्यासक) या लेण्यांच्या संवर्धनाचा, तसेच याची माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

गांधार पाले येथील शिलालेखगांधार पाले येथील शिलालेख


गांधार पाले बौद्ध गुंफा :
महाडजवळील सावित्री-गांधारी नद्यांच्या संगमावर जवळ असलेल्या टेकडीवर ३१ गुंफा आहेत. ही लेणी सातवाहन काळातील असावीत. हिनायन बौद्ध गुंफा पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात खोदण्यात आल्या. टॉलमेनीनुसार इसवी सन १५०च्या काळात पालेला बाली पाटण म्हटले जायचे आणि पेरिप्लसच्या काळात इसवी सन २४७च्या काळात पालैपटमई म्हटले जायचे वा तसे नाव असावे. शिलाहार राजा अनंत देव याच्या ११व्या शतकातील शिलालेखानुसार पालीपट्टण म्हणून या ठिकाणाचा उल्लेख आहे. या लेण्यांमध्ये चैत्यग्रियां नावाचे काही छोटे स्तूप आहेत. तसेच भगवान बुद्धांच्या मूर्ती, बोधिसत्त्व आणि काही विहारांच्या भिंती आणि खांबांवर काही शिलालेख आहेत. एका गुहेच्या भिंतीवर ब्राह्मी लिपीत कोरलेला शिलालेखदेखील आहे. ही बौद्धकालीन लेणी शिल्पकलेचा सुंदर नमुना आहेत. लेणी समूहात एकूण २८ लेणी आहेत व त्यात ३ चैत्य आणि १९ विहार आहेत. 

गांधार पाले गुंफागांधार पाले गुंफा


पुरातत्त्व विभागाने लावलेल्या फलकाजवळ उतरल्यानंतर लगेच लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण लेण्यांपर्यंत पोहोचतो. पायऱ्या चढण्यासाठी २०-२५ मिनिटे लागतात. लांबून ही लेणी त्रिस्तरीय दिसतात. या लेण्यांची अधिक माहिती http://abcprindia.blogspot.com/ येथे मिळू शकेल.

चांभारगड /महेंद्रगड : ट्रेकिंगच्या दृष्टीने मध्यम श्रेणीचा, १२०० फूट उंचीचा हा किल्ला मुंबई-गोवा महामार्ग ओलांडल्यावर रायगड रस्ता सुरू होतो तेथे समोरच पूर्वेला दिसतो. रायगडाच्या आजूबाजूला डोंगररांगांवर अनेक किल्ले आहेत. त्यात प्रामुख्याने लिंगाणा, काळदुर्ग, सोनगड व चांभारगड यांचा समावेश होतो. यांचा उपयोग केवळ घाटमाथ्यावर नजर ठेवण्यासाठी व टेहळणीसाठी होत असावा. गडावर एक छोटेसे पठारच आहे. किल्ल्यावर थोडे-फार घरांचे अवशेष आहेत, तर पठाराच्या खालच्या बाजूस पाण्याची एक-दोन टाकी आहेत. या टाक्यांच्या बांधणीवरून हा गड फार पुरातन असावा असे दिसते. गडावर पाहण्याजोगे काहीच नाही. अर्ध्या तासात संपूर्ण गडफेरी आटपते. रायगडाचा हा पश्चिमेकडील चौकीदार होता. 

वाळणकोंडीवाळणकोंडी
वाळणकोंडी : शिवथरजवळ काळ नदी उगम पावते व डोंगरातून वाहत येणारे तिचे पाणी वाळण गावाअलीकडे सपाटीला लागते. येथे खडकात मोठी घळ तयार होऊन एक डोह तयार झाला आहे. नदीच्या पात्रामध्ये श्री वरदायिनी देवीचे जागृत ठिकाण आहे. त्या ठिकाणी असलेल्या डोहातील मासे बाराही महिने तेथून जात नसल्याने डोहातील मासे देवाचे आहेत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नदीवरील झुलता पूल या ठिकाणाचे आकर्षण ठरला आहे. पुलावर उभे राहून हे मासे पाहता येतात. डोहात खाण्याचा पदार्थ टाकला की शेंदरी रंगाचे मस्तक असलेले प्रथम लहान व नंतर मोठे मासे वर येतात. माश्यांचे एकूण सात थर खालून वर येत असतात. आबालवृद्धांना या ठिकाणाचे आकर्षण आहे. थंडीच्या हंगामात शांत असलेल्या या रस्त्यावर रंगीबेरंगी, अतिशय सुंदर फुलपाखरे पाहावयास मिळतात. पावसाळ्यानंतर रस्त्याच्या कडेला रानफुलांचे मळेच फुललेले असतात. येथे थेट वाहन जाते. 

कवी परमानंद यांची समाधीकवी परमानंद यांची समाधी
पोलादपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून ‘शिवभारत’ लिहिणारे कवी परमानंद (परमानंद गोविंद नेवासकर) यांची समाधी येथे आहे. शिवभारत हा ग्रंथ अधिकृत संदर्भग्रंथ मानला गेला आहे. पोलादपूर हे मुंबई-गोवा, तसेच महाबळेश्वर मार्गावरील प्रमुख ठिकाण आहे; पण याची ऐतिहासिक ओळख फारशी कोणाला नाही. सदाशिव टेटलीकरांच्या ‘दुर्गयात्री’मध्ये याचा उल्लेख आला आहे. 

लक्ष्मण झुला (झुलता पूल) : पोलादपूरपासून १० किलोमीटरवर गोपाळवाडीजवळ सावित्री नदीवर झुलता पूल आहे. लोखंडी जाळीचा ६० फूट लांब व तीन फूट रुंद असा हा पूल असून, त्याखाली पाण्याच्या प्रवाहातील भोवऱ्यामुळे झालेले रांजणखळगे आहेत. सावित्री नदीचा प्रवाह या रांजणखळग्यात कोसळतो, तेव्हा निर्माण होणारा दुधाळ प्रवाह पाहताना डोळ्याचे पारणे फिटते. निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे. 

वीर तानाजी समाधीवीर तानाजी समाधी
उमरठ : वीर तानाजींचे मामा शेलार यांचे गाव म्हणजेच पोलादपूरजवळील उमरठ. येथे वीर तानाजी यांची समाधी आहे. शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची, पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, ‘गड आला, पण सिंह गेला’. चार फेब्रुवारी १६७२च्या (माघ वद्य नवमी) रात्री हे युद्ध झाले. मामाबरोबर रायगड जिल्ह्यातील उमरठ गावी (पोलादपूरजवळ) स्थायिक झालेले तानाजी मालुसरे यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील पाचगणीजवळील गोडोली होय. वीर तानाजींचे शव ज्या दुर्गम वाटेने सिंहगडावरून उमरठ येथे आणले, त्यास मढेघाट असे म्हणतात. 

मोरझोत धबधबामोरझोत धबधबा
मोरझोत धबधबा : उमरठ गावापासून दोन किलोमीटरवर खोपडगाव हद्दीत हा धबधबा आहे. निसर्गरम्य परिसरात हा धबधबा असून, मोराच्या पिसाऱ्याप्रमाणे आकार धारण करून हा धबधबा १०० फूट खाली कोसळतो. या फेसाळ प्रवाहाच्या तुषारांखाली आंघोळीसाठी पर्यटकांची गर्दी होते. म्हणूनच या धबधब्याला मोरझोत असे सार्थ नाव पडले आहे. 

सूर्याजी मालुसरे समाधीस्थळ : नरवीर तानाजी मालुसरे यांचे धाकटे बंधू सूर्याजी मालुसरे यांची समाधी सारवर या गावी आहे. आपल्या बंधूसमवेत त्यांनी स्वराज्याच्या प्रत्येक लढाईत सहभाग घेतला. सिंहगड फत्ते होण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांची पत्नी सती गेली. त्यांचीही समाधी येथे आहे. 

मंगळगड/कांगोरीगड : हा चंद्रराव मोरे यांनी बांधलेला किल्ला महाड वरंधा रस्त्याच्या दक्षिणेस दुधाणेवाडीजवळ आहे. महाड शहरापासून सुमारे १८ किलोमीटरवर तो आहे. २४५७ फूट उंचीवरील हा किल्ला ट्रेकिंगसाठी चांगला आहे. इ. स. १६४८मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला व त्याचे नाव मंगळगड ठेवले. तटबंदी आणि भिंतीचे भाग अजूनही दिसून येतात. इमारतींची पडझड झाली आहे. पेशव्यांविरुद्ध उठाव केला म्हणून सातारा गादीचे छत्रपतींचे स्वामिनिष्ठ सरदार चतुरसिंह यांना १८१२ ते १८१८ या कालावधीमध्ये या गडावर कैदेत ठेवले होते. गडावरच त्यांचे निधन झाले. इंग्रज अधिकारी मॉरिसन व हंटर यांनाही येथेच कैदेत ठेवण्यात आले होते. 

मंगळगडमंगळगड


रायगडाच्या संरक्षक साखळीतील हा मंगळगड किल्ला कांगोरी किल्ला म्हणूनही ओळखला जातो. जेव्हा जेव्हा रायगडावर आपत्ती आली, त्या त्या वेळी येथील फौजा रायगडाच्या मदतीला धावल्या. त्या वेळी सरदार गिरजोजी यादव यांनी रायगडावरील सोनेनाणे व अन्य महत्त्वाच्या वस्तू या गडावर सुरक्षेकरिता आणल्या. नंतरच्या काळात त्या पन्हाळगडावर रवाना करण्यात आल्या. १८१८च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धात कर्नल प्रॉथरच्या हल्ल्यात हा किल्ला इंग्रजांनी घेतला. अभिजित बेल्हेकर यांच्या ‘दुर्गांच्या देशा’ या पुस्तकामध्ये याचे छान वर्णन आहे. महाडहून या गडाजवळील पिंपळवाडीसाठी एसटी बसची सोय आहे. पुणे-मुंबई किंवा अन्य ठिकाणहून यायचे झाल्यास एखाद्या मुक्कामाची तयारी ठेवावी. यासाठी पायाच्या पिंपळवाडीतील मंदिरे सोईची. गडावर काहीही मिळत नाही. 

चंद्रगडचंद्रगड


चंद्रगड :
हा पोलादपूर तालुक्यात असून, महाबळेश्वरच्या आर्थर सीट पॉइंटच्या पश्चिमेस आहे. हा किल्ला दौलतराव मोरे यांनी बांधला. २२५८ फूट उंचीवरील या किल्ल्यावर फक्त पायवाटेनेच जाता येते. कृष्णा नदीच्या बलकवडी धरणाच्या मागे असलेल्या जोर गावातून पायवाटेने किंवा उमरठ-ढवळे गावाकडूनही पायवाटेने जाता येते; मात्र वाटाड्या हवाच. सह्याद्रीच्या रांगेतील हा अवघड किल्ला निसर्गरम्य तर आहेच; पण ट्रेकिंगच्या सरावासाठीही चांगला आहे. 

कसे जाल महाड परिसरात?
महाड हे तालुक्याचे ठिकाण असून, मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण आहे. महाड रेल्वे व महामार्गाने मुंबईशी, तसेच ताम्हिणी/वरंधा घाटाने पुण्याशी, तसेच आंबेनळी घाटाने महाबळेश्वर, सातारा, कोल्हापूरशी जोडलेले आहे. जवळचा विमानतळ मुंबई १२५ किलोमीटर, पुणे १३५ किलोमीटर. महाड येथे राहण्याची, जेवाणाची सोय होऊ शकते.
(बौद्ध लेण्यांचे अभ्यासक व लेण्यांचा शोध घेणारे आयु. मुकेश जाधव यांचे या लेखासाठी सहकार्य झाले.) 
 
 

रायगड - लोहरज्जू मार्गे

रायगडवर एक रस्ता १४०० पायºयांनी गडावर जातो. तर दुसरा रस्ता रोपवे कडे हिरकणीगावातून जातो.  १५ - २० वर्षांपूर्वी सुमारे १४०० पायºया चढून या किल्यावर जावे लागे. आता मात्र रोपवे सेवा सुरु झाली आहे. अवघ्या ५ मिनिटांत रायगडवर पोहचता येते. १५ वर्षांपूर्वी मी एका ट्रेकिंग क्लबबरोबर येथे पानशेत ते रायगड असा ट्रेक केला होता. मजा आली होती. दिवसभर चालून चालून पाय चांगले दमले होते. तीन दिवसाचा या ट्रेकमध्ये एक संपूर्ण दिवस  व एक रात्र रायगड पाहून झाला होता. रोलचा कॅमेरा असल्यामुळे जास्त फोटो काढता आला नाहीत. त्यानंतर आज बºयाच वर्षांनी रायगड किल्ल्यावर जाण्याचा आनंद काही औरच होता. आणि तेही रोपवे मधून.

रोप वे मार्गे रायगड :

४ फुट उंचीखालील लहान मुलांसाठी ११५ रुपये जाऊन येऊन. तर प्रौढ व्यक्तींसाठी १८० रुपये जाऊन येऊन तिकीट आहे. एका ट्रॉलीमध्ये ४ प्रौढ व २ लहान मुले बसतात. एका वेळी दोन ट्रॉली गडावर घेऊन जातात. त्याचवेळी वरून खाली दोन ट्रॉली गडावरून शिवभक्तांना घेऊन खाली येतात. गडावर जाण्यासाठी ट्रॉलीतून पाच मिनटं लागतात. चौकशी केली असता मे महिन्यात, शनिवारी व रविवारी, सुटटी दिवशी येथे गर्दी असते. दोन दोन तास थांबून वर गडावर जाण्याची वाट पहावी लागते. मी मात्र सुदैवी निघालो. शनिवार असूनही देखील पर्यटकांची गर्दी पाहिजे तेवढी नव्हती. तिकीट काढून रोपवे मध्ये बसलो. रोपवे सुरू झाला. ‘छत्रपती शिवाजीमहाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत रायगडाकडे रोपवेची ट्रॉली निघाली. मराठीतून रोप वे ला ‘लोहरज्जू’ असे मजेशीर नाव आहे. वर जाण्याचा अनुभव लिहिणे शक्य नाही. यासाठी एकदा तरी प्रत्त्यक्ष अनुभव घ्यायला हवा. वर जाण्यासाठी पाच मिनिटेच लागतात. परंतु जो अनुभव आहे तो मोजता येणार नाही. जसे जसे किल्यावर पोहचत होतो तस तसे खालील लावलेली वाहने, माणसे, शेती छोटे छोटे होत गेले. छातीत चांगलीच धडधड वाढत होती.  लांबवर उंच डोंगर दिसू लागले होते.  ज्युरॅसिक पार्कमधील धबधबा व हॅलिकॉप्टरचे दृश्य आठवले. रायगडावरून कोसळणारा धबधब्या शेजारून आपण वर पोहचतो. एकदम मस्त वातावरण अनुभवयाला मिळाले.  वरती पोहोचोस्तोवर ढग दाटून आले. वर पोहाचलो ते दाट ढगामध्येच. अचानक खालील दृश्य गायब झाले. गडावर काही पायºया चढून जाऊन मेणा दरवाज्यातून गडावर जाता येते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७० साली राजगडावरून रायगडावर राजधानी हलवली. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा १६७४ साली याच किल्यावर झाला. शिवाजी महाराजांचा मृत्यू १६८० मध्ये याच किल्यावर झाला. गडावर जगदीश्वराचे  मंदिर आहे. त्यासमोर समाधी व त्यांच्या वाघ्या या कुत्र्याचे स्मारकही आहे. हत्ती तलाव, गंगासागर तलाव, टकमक टोक, होलरचा माळ, हिरकणी बुरुज, मदरशाचे थडगे, नाना दरवाजा, महादरवाजा  या गोष्टी पहाण्यासारख्या आहेत. गडावर भोजनाची सोय आहे.
संपूर्ण गडावर मध्येच जोरात पाऊस व दाट धुक्यामुळे खालील परिसरत पाहणे शक्य नव्हते. मात्र, पाऊस संपता संपता गड पाहणे एक वेगळाच अनुभव होता. गड पाहून अडीचला रोप वे परत खाली आलो. खाली आल्यावर झुणका भाकरीवर ताव मारून पोटपूजा उरकली.
तेथून आम्हाला चिपळूणला करंजेश्वरी देवीचे दर्शन व मुक्कामाला जायचे होते.

(४ ते ५ ठिकाणे असल्यामुळे एकदम सर्व प्रवास वर्णन करणे शक्य नव्हते. फोटो सुद्धा बरेच काढले असल्यामुळे दोन वेगळे भाग करून प्रवास वर्णन करत आहे.  सध्या फक्त ताम्हिणी घाट व रायगड रोपेवे मधून रायगड हे वर्णन देत आहे. लवकरच श्री. करंजेश्वरी देवी, परशुराम मंदिर व श्री कर्णेश्वर याचा भाग लिहितो.)

भगवान श्री परशुराम मंदिर

हिरकणी गावातून रायगडावर दाट ढगातून जाणारा रोप वे.


रोपवेतून जाण्यासाठीचे नियम व अटी

रोप वे स्टेशन.


रायगडावरील एक दरवाजा
रायगडावरील बाजारपेठेतील एका दुकानाबाहेरी नक्षीकाम.
छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा.




 जगदिश्वराचे मंदिर.


लाडक्या वाघ्या कुत्र्याची समाधी.


छत्रपती शिवाजीमहाराजांचे समाधीस्थळ.
समाधीस्थळाशेजारील शिलालेख.


रायगडावर जाणारा रोपे वे मार्ग या मोठ्या धबधब्याशेजारून जातो.

रोपे वे चे यांत्रिकी जाळे

कसे जाल : 

  • मुंबई - गोवा महामार्गावरील महाड येथून २४ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. 
  • पुण्याकडून ताम्हिणी घाटातून उतरल्यावर एक रस्ता सरळ कोलाडगावाकडे जातो. तेथे न जाता  घाट उतरल्यावर डावीकडे निजापूरला जाणारा रस्ता आहे.  तेथून सुमारे २५ किलोमीटरवर रायगडला पाचाडमार्गे जाण्यासाठी रस्ता आहे. आम्ही या रस्त्याने गेलो. काही रस्ता घनदाट जंगलातून व निर्मुष्यवस्तीतून जातो. वाटेत धामणी, हरवंडी, खराबाचीवाडी आदी छोटे गावे लागतात. 
  • मुंबई - रायगड २१० कि. मी. (महाडमार्गे), 
  • पुणे - रायगड - १२६ कि. मी., 
  • महाड - रायगड - २७ कि. मी., 
  • पर्यटन महामंडळाची निवासस्थाने याशिवाय खाजगी हॉटेल उपलब्ध आहे.
 शेवते धबधबा.. महाड रायगड
पाहूनच डोळ्यांचे पारणे फेडणारा.. मनाला घायाळ करणारा हा आड्राई रोड शेवते गावाजवळील हा प्रसिद्ध धबधबा आहे.. उंचावरून फेसाळणारे पाणी.. चहूबाजूंनी रांग सह्याद्री हिरवागार परिसर वातावरण धुंद करते..
अशा या जागी आवश्य भेट द्या.. पावसाळ्यात येथील सौंदर्य स्वर्गालाही फिके पाडील असे आहे.. जर मला कोणी विचारले की स्वर्ग कोठे आहे तर मी अभिमानाने म्हणेल की पावसाळ्यात आमच्या महाड रायगड मध्ये भेट द्या.. येथेच स्वर्ग सुखाची प्रचिती येईल..
येथे जाण्यासाठी पुण्या मार्गे आलात तर एक मढेघाट कर्णावडी वरून रानवडी वाकी मार्गावर पुढे शेवते फाटा लागतो तेथून पुढे 20 मिनिटांच्या अंतरावर हा धबधबा आहे
मुंबई किंवा पुणे वरंध मार्गावरून येणार्यांनी बिरवाडी वरून वाघेरी रोड दहिवडला आल्यावर उजवीकडे वाकीरोडने वळावे पुढे सरळ खरकवाडी.. वाकी.. नंतर शेवते गावी यावे
पिकनिकचा आनंद जरूर लूटा पण निसर्गाचे भान राखून..
धन्यवाद 
 
 

मातेचे रान’ अर्थात माथेरान


निर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील  सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या तरी येथे केवळ मिनी ट्रेनच जाऊ शकते. बाकी प्रवास घोडा व पायी यांच्याद्वारेच करावा लागतो. अशा माथेरानला दिवाळीच्या सुट्टीच्या शेवटच्या रविवारी गेलो. त्या विषयी...

रायगड जिल्ह्यातील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जराशी वेगळी झालेली ही डोंगर रांग आहे. समुद्रसपाटीपासून साधारण ८०३ मी. म्हणजेच २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान आहे. केवळ पायीच या ठिकाणी हिंडता येत असल्याने अनेक पर्यटकांचा ओढा थोडा कमी आहे. मात्र, घोडा व माणसांनी ओढण्याची दोन चाकी रिक्षा यामुळे येथे पर्यटक वळू लागले आहेत. तशी ही सुविधा अनेक वर्षे सुरू आहे. पिंपरी-चिंचवडपासून १०० किलोमीटरवर तर मुंबईपासून ११० किलोमीटरवर अशा सारख्याच अंतरावर असलेल्या माथेरानकडे पर्यटक न वळतील तर नवलच. शनिवार, रविवार व इतर सुट्टींच्या दिवशी माथेरान पर्यटकांनी फुललेले असते. महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे. माथेरानमध्ये तीस वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळे आहेत. आरोग्यदायक व उत्साहवर्धक हवामान, अतुलनीय निसर्ग सौंदर्य व  जोडीला थंड हवा यामुळे माथेरानला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.  पर्यटकांसाठी हॉटेल, एमटीडीसीची निवासगृहे, काही छोटी हॉटेल्स आहेत. या शिवाय मुख्य बाजारपेठेत किंवा नाक्यावर चौकशी केल्यास काही ठिकाणी घरगुती राहण्याची सोय होऊ शकते. बाजार, उद्याने आदीं सोयी आहेत. गावात दवाखाना, शाळा यांसारख्या सुविधाही आहेत. एवढ्या लांबवर सुद्धा मोठी हॉटेल्स व लोकवस्ती पाहून आश्चर्य होते.

‘मातेचे रान’

 ब्रिटिशांनी माथेरान ही मुंबईजवळची जागा थंड हवेचे ठिकाण म्हणून मुद्दाम विकसित केली. इ. स. १८५० मध्ये मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड एलफिन्स्टन व ठाण्याचा कलेक्टर ह्यूज मॅलेट यांनी माथेरान शोधले. १८५४ मध्ये मुंबई गव्हर्नरने माथेरानवर बंगला बांधला. माथेरान शोधले म्हणजे येथे आधी वस्ती होतीच.

माथ्यावरील दाट वनश्रीमुळे याला ‘माथेरान’ हे नाव पडले. असेही म्हणतात की, धनगरांचे मातापिता याच जंगलात मरण पावल्याने या जंगलात ‘मातेचे रान’ (माथेरान) आहे. येथील निसर्ग पाहून सर आदमजी पीरमॉय यांनी प्रथम नेरळ ते माथेरान अशी पाऊलवाट तयार केली. नेरळ-माथेरान लोहमार्ग बांधण्यासाठी त्यांचा दुसरा मुलगा अब्दुल हुसेन यांनी प्रयत्न केले. एवढ्याश्या छोट्या माथेरानवर  १९०५ साली नगरपालिकेची स्थापना झाली.

पार्इंट (स्थळे) :

 इंग्रजांनी माथेरान वसवले त्यामुळे बहुतेक पार्इंटसला त्यांनी इंग्रजीच नावे दिली व ती आजही तशीच आहे. पॅनोरमा, गार्बट, अलेक्झांडर, हार्ट, लिटल चौक, ग्रेट चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लँडस्केप, लुईसा, पॉक्युर्पाइन, मंकी, आर्टिस्ट, स्फिंक्स, बार्टल आदी पार्इंटस पाहण्यासारखे आहेत.

वाहनांना बंदी :

माथेरानला घनदाट जंगलाचा विळखा आहे. सुदैवाने या ठिकाणी  वाहनांना जाण्यास बंदी आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हे पाऊल उचलणे गरजेचेच होते. नाहीतर हे ठिकाणही कास पठार, महाबळेश्वर आदी पर्यटन स्थळासारखेच प्रदूषणाकडे वळले असते. सध्या तरी गाड्यांना बंदी असल्यामुळे हे ठिकाण प्रदुषण विरहीत आहे. माथेरानचे खास वैशिष्टय असणारी छोटी रेल्वेच येथे जाऊ शकते. पूर्वी वाफेच्या इंजिनावर चालणारी रेल्वे आता डिझेलवर चालविली जाते. इंजिनावर चालणारी ही छोटी गाडी निर्सगाचे दर्शन घडवित आपला नेरळ ते माथेरान असा सुमारे २१ किलोमीटरचा प्रवास दोन तासात घडविते. आम्ही गाडी घेऊन गेल्याने दस्तुरी नाक्यावर गाडीतळावर गाडी लावून पुढे छोट्या ट्रेनने पुढे निघालो. ज्यांना नरेळवरून येणे जमत नाही अशासाठी दस्तुरी नाक्यावरून माथेरान ते मुख्य बाजारपेठ अशा २.५ किलोमीटरसाठी या गाडीतून जाता येते. दस्तुरी नाक्यावरून चालत ३०-३५ मिनिटे लागतात. ही रेल्वे आपल्याला सरळ बाजारपेठेत घेऊन येते. बहुतेक हॉटेल्सही या बाजारपेठेच्या अवतीभवती आहेत. या गाडीचे तिकीट प्रवेशद्वार ओलांडल्यावर काही अंतरावर मिळते. ही रेल्वे जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे. याशिवाय पर्यटकांच्या सोयीसाठी मुख्य प्रवेशद्वारापासून संपूर्ण माथेरानवर हिंडण्यासाठी घोडे व माणसांनी ओढण्याची दोन चाकी रिक्षा उपलब्ध आहे. ज्यांना पायी फिरणे शक्य नाही अशासाठी माथेरानवर घोडयावरून फिरावे लागते. पण याचे भाडे पाहता आपल्या दोन पायांची डुगडुगीनेच प्रवास करणे उत्तम ठरते. पण तरीही अबालवृद्धांना ही सोय पुरेशी ठरते. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल मातीने संपूर्ण परिसर सजलेला आहे. झाडांवरसुद्धा येथील मातीचा घोड्यांच्या जाण्यायेण्याने फुफाटा उडलेले दिसतो. येथील लोकांचा उदरनिर्वाह पर्यटकांवर अवलंबून आहे. बहुतांशी लोक हे मराठीच आहेत. काही कातकरी, ठाकर, आदीवासी लोकही येथे दिसून येतात.

        बाजारपेठेमध्ये विविध हस्तकौशल्यावरील आधारित वस्तू, चप्पल, बूट, पिशव्या, गृहपयोगी वस्तू, शोभेच्या वस्तू विकण्यास ठेवलेल्या आहेत.


लहान मुलांचे अर्थात मोठ्यांचेही आकर्षण असलेली माथेरानची राणी ‘मिनी ट्रेन’

वनश्री :

संपूर्ण माथेरानचा परिसर हा विपुल वृक्षांनी सजलेले आहे. गर्द हिरवीगार झाडी हे त्याचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेच. बेहडा,  हिरडा, खैर,  जांभूळ, आंबा अशी अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. या हिरवाईमुळे उन्हाळ्यातही उन्हाचा त्रास येथे होत नाही.

शार्लोट लेक

मुख्य बाजारपेठेपासून १ ते १.५ कि. मी. अंतरावर हे नैसर्गिक तळे आहे. माथेरानवरील पिण्याच्या पाण्याचा मुख्य साठा हाच आहे. पावसाळ्यात हा जलाशय संपूर्ण भरतो. या ठिकाणीही काही हॉटेल्स असून, दमून भागून आल्यावर याही ठिकाणी आपली पोट पूजा होऊ शकते. पाण्यात पाय अथवा आंघोळ करू नये अशी सूचना देऊनही अनेक पर्यटक सूचनेला न जुमानता यथेच्छ पाय धुण्यासारखे प्रकार करताना आपल्या दिसून येतात.  या पाण्यावर पुढे प्रक्रिया करून संपूर्ण माथेरानच्या हॉटेल्स व रहिवाशांना पुरविलेले आहे.

शार्लोट लेक


बाजारपेठेतील चप्पल विक्रेत्याचे दुकान.

प्रदूषणापासून  मुक्ती अनुभवण्यासाठी व निर्सगाच्या सान्निध्यात यायचे असल्यास एक दिवस का होईना पण माथेरानला येणे गरजेचे आहे. 

माकडेच माकडे :

माथेरानमध्ये पायथ्याशी आपण गाडी लावतो. या ठिकाणपासून ते संपूर्ण माथेरानावर माकडे दिसून येतात. पर्यटकांशी ओळख झाली असल्याने ही माकडे टोळीने पर्यटकांच्या मागे जाऊन हातातल्या खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसून येतात.

‘छोटे कुटुंब सखी कुटुंब’

कसे जाल :

  • माथेरान हे पुण्यापासून १२५ तर मुंबईपासून ११०  किलोमीटरवर आहे.
  • पुण्याहून येताना जुन्या पुणे-मुंबई महार्गावर खोपोली सोडल्यावर चौक म्हणून उजवीकडे रस्ता जातो. या रस्तावर कर्जतच्या अलिकडे नेरळ माथेरानकडे जाणारा रस्ता आहे.
  • (रस्त्याचे डांबरीकरण चालू असल्याने चौक ते नेरळ हा रस्ता खराब आहे.)
  • पायी माथेरानला येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण गाडीने येण्यासाठी   नेरळवरून डांबरी रस्त्यावर ८ किलोमीटरची घाटातून वेडीवाकडी वळणे घेत वाट आहे. याशिवाय लिट्ल चौक पॉईंटच्या खालून येणारी वाट, कर्जतहून गार्बेट पॉईंटवर येणारी १३ कि.मी.ची पायवाट आहे.

कधी जाल :

येथे जाण्यासाठी सप्टेंबर ते मार्च हा कालावधी चांगला आहे. भटक्यांसाठी पावसाळा ही योग्यच ठरतो. जून ते आॅगस्ट या काळात येथे जोरदार पाऊस पडतो. रायगडप्रमाणेच या ठिकाणी वरपर्यंत धुक्याचे साम्राज्य असते. उन्हाळ्यात येथे जाणे चांगले. कारण दोन्ही बाजूंनी गर्द हिरवी गार झाड असल्याने उन्ह्याच्या झळा लागत नाही.

काही टिप्स :

  • शक्यतो वेळ काढून सकाळी ९ वाजेपर्यंत माथेरानाला पोचून काही पार्इंटस पाहून संध्याकाळी ६ पर्यंत परतीचा मार्ग धरावा. एका दिवसात सर्व पार्इंटस पाहणे शक्य होत नाही. घोड्यावरून जाणार असलात तरी हे पार्इंटस पाहणे शक्य होत नाही. त्यासाठी किमान ३ दिवस तरी पाहिजेत.
  • सर्व पार्इंटस एकमेकांपेक्षा लांब अंतरावर असल्याने सोबत नकाशा असणे गरजेचे आहे. तसे वाटेत लोक ये - जा करत असतात.
  • स्वत:चे जेवण घेऊन जाणे उत्तम. येथील हॉटेल्स सर्वसामान्यांच्या अवाक्याच्या बाहेरील आहेत. म्हणजे काही मार्केट मधील हॉटेल्स तशी स्वस्त आहेत. पण ती शोधावी लागतात.
  • पाण्याची सोय करून जाणे चांगले. कारण काही पार्इंट सोडले तर वाटेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही.


 

 मनाला भुरळ पाडणारे महाड जवळील सुप्रसिद्ध धबधबे

कडाक्याच्या उन्हात तापलेला सह्याद्रीचा काळाकभिन्न कातळ  जलधारांच्या वर्षावानंतर हिरव्याकंच शालीनं सजून आपले रौद्र रूप काही काळ दडवून ठेवतो. डोंगरकड्यांवरून एकसुरात कोसळणारे प्रपात, त्याच्याशी लगट करून दाटणारं दाट धुकं, भर्राट वाऱ्याचे झोत आणि नीरव शांततेनं, रानभूल न पडल्यासच नवल... निसर्गाचं हे सौंदर्य अनुभवणे म्हणजे स्वर्गीय सुखाची अनुभूती मिळाल्यासारखंच आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला महाड तालुका नितांत सुंदर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. सावित्री, गांधारी आणि काळ नदीच्या तीरावर वसलेल्या महाड शहराला केवळ भूगोलंच नाही तर ऐतिहासिक वारसाही लाभला आहे. पावसाळ्यात रायगड किल्ल्या सोबतच आणखी काही ठिकाणे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहेत.

नाणेमाची धबधबा :-

महाड तालुक्यातील वाकी ( नाणेमाची ) गावातील आईचा बांध या नावाने नाणेमाची धबधबा ओळखला जातो. वेल्हे तालुक्यातील गुगुळशी गावातून आणि गाढवकडा / दुर्गाच्या कड्याशेजारून ह्या धबधब्याचे प्रपात स्वतःला  ६०० मीटर उंचावरून झोकून देतात. ह्याच धबधब्याच्या कुंडाजवळ प्रसिध्द आई देवीचे देवस्थान आहे. हल्लीच हा धबधबा सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यातून ह्या धबधब्याचे मोहक रूप नजरेत आणि कॅमेरात कैद करण्यासाठी पर्यटक येथे भेट देतात. नाणेमाची गावातील दरेकर बंधूंच्या स्टॉलवर जेवणाची व नाश्त्याची उत्तम सोय होऊ शकते.
दरेकर बंधू - ९४२१०१७०८१ / ७८७५१४५१३७


● शेवते धबधबा :- 


महाड शहरातुन बिरवाडी-दहिवड-वाकी असा २५ किमी चा प्रवास करून शेवते गाव गाठता येते. शेवते गावाच्या पुढे रस्त्यालगतच हा धबधबा आहे. सातवाहन काळापासून वापरात असलेल्या शेवते घाटाच्या डोंगरधारेवरून कोसळणारा धबधबा आपल्या मनाला भुरळ घालतो. गर्द हिरव्या झाडीत उंचावरून कोसळणारा, धुक्यात हरवून जाणारा आणि पावसाच्या सरींनी गारठून  टाकणारा हा शेवते गावचा परिसर आपल्याला जणू माथेरानलाच गेल्याची जाणीव करून देतो. अचानक वाढणारा पाण्याचा प्रवाह आणि निसरड्या धारदार दगडांमुळे पाण्याच्या प्रवाहात उतरता येत नाही. 

मोरझोत / माझेरी धबधबा :-  


महाड - पुणे यांना जोडणाऱ्या प्राचीन वाघजाई / वरंधा घाटाच्या दक्षिणेकडील  बाजूने हा धबधबा माझेरी गावात कोसळतो. १८५८ साली इंग्रजांनी कावळ्या किल्ल्यामधून गाडीरस्ता तयार केला. पावसाळ्यात वरंधा घाटात गरमागरम भजी आणि चहाचा आस्वाद घेण्यासाठी प्रवासी येथे थांबा घेतात. घाटात वाघजाई देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या पुढे असलेल्या पवार हॉटेल च्या बाजूला असलेल्या पठारावरून ह्या धबधब्याचे अविस्मरणीय दृश्य टिपता येते. धबधब्याच्या खालच्या बाजूस जाण्यासाठी माझेरी व तळीये या दोन्ही गावातून पायवाट आहे. गावापासून अर्ध्या तासातच ह्या धबधब्यापर्यंत पोहचता येते. पावसाचा जोर वाढला तर ह्याचं दिसणारं मोरपंखी रूप हे स्तिमित व छातीत धडकी भरवणारं असते. 

पळसगाव धबधबा :- 


महाड शहरापासून ३३ तर माणगाव पासून १५ किमी अंतरावर पळसगाव खुर्द  हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव आहे. महाड कडून पाचाडमार्गे जाताना रायगड आणि पाचाड कोट यांची भटकंती सुद्धा करता येऊ शकते. गावातून धनवी डोंगर आणि त्याच्या पायथ्याशी असलेला धबधबा आपलं दूरवरूनचं लक्ष वेधून घेतो. धबधबा समोर ठेवून चालायला सुरवात केल्यावर साधारणतः २० ते ३० मिनिटांनी आपण एका मंदिरापाशी पोहोचतो आणि तिथून आणखी पुढे १० मिनिटे चालल्यानंतर आपण धबधब्यापाशी पोहोचतो. ओढ्यातुन आणि भाताच्या शेतांमधून चिखल पायदळी तुडवत  जाताना येणारा अनुभव हा सगळा थकवा दूर करणारा आहे. लोकांना या ठिकाणाबद्दल जास्त माहिती नसल्याने इथे लोकांची वर्दळ कमीच असते. इथल्या निसर्गाला धोका पोहोचेल असे कोणतेही कृत्य येथे करू नका, ही विनंती. 

● सप्तधारा / सातधारा धबधबा :-


शेवते गावाकडे जाताना लागणाऱ्या वाकी गावात हा धबधबा आहे. एका ओढ्यावर असलेल्या पुलाजवळुन २० मिनिटांच्या अंतरावर डोंगराच्या खाचेमध्ये दडून बसलेला हा धबधबा आहे. सात टप्प्यात कोसळणाऱ्या पाण्याच्या झोतामुळे दगड अडकून मधल्या भागात कुंड/डोह तयार झाले आहेत. त्या कुंडांमध्ये पोहचणे मात्र शक्य नाही. त्याचे एकसंध प्रपात आणि झुळझुळणारा, खळाळत जाणारा आवाज आपलं मन गुंतवून टाकतो. वाढत्या पर्यटकांमुळे या भागांत कचरा करणे आणि मद्याच्या बॉटल फोडून फेकणे असे प्रकार वाढू लागले आहेत.

● कोथुर्डे धरण :-


महाड-रायगड रस्त्यावर १५ किमीचा प्रवास करून कोथुर्डे धरण गाठता येते. धरणाची व्याप्ती आणि त्याचे झोत पाहताच यात पोहण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही. विकेंड डेस्टिनेशन म्हणून पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मांदियाळी असते.

● मंडप धबधबा :-


महाड शहरापासून फक्त १२ किमी अंतरावर असलेल्या मांडले गावाच्या हद्दीत हा धबधबा वसलेला आहे. रायगडापेक्षा उंच असलेल्या गुयरी डोंगराच्या पायथ्याला हा धबधबा आहे. दोन ओढे पार करून मांडले गावातून अर्ध्या तासात इथपर्यंत पोहचता येते. धबधब्याच्या झोताखाली भिजण्याचा आणि त्याच्या डोहात उड्या मारण्याचा आनंद नक्कीच आपण घेतला पाहिजे. पाण्याचा प्रवाह वाढला की हा धबधबा जणू आईसलँड मधील जगप्रसिद्ध धबधबा skogafoss waterfall याचं मिनी मॉडेल असल्याचा भास होतो. 

● वाळणकोंड :-


महाड पासून २५ किलोमीटर अंतरावर वाळण गावाजवळ हे रांजणखळगे आहेत. कोंड म्हणजे नदीच्या पात्रातील कुंड, डोह. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे वाटेतील दगड कापले जातात. खडकांमध्ये खोल , अरुंद फट पडते आणि लहान मोठे खळगे तयार होतात , त्यांना रांजणखळगे असे म्हणतात. रायगडला विळखा घालणाऱ्या काळ नदीवर या खडकांमधे निर्माण झालेले रांजणखळगे निसर्गाच्या कलेचा एक उत्कृष्ट नमूनाच ! काठावर वरदायिनी देवीचे मंदिर आहे. नदीच्या प्रवाहाच्या प्रचंड वेगामुळे स्वयंभू शिळा वगळता इथले देवीचे संपूर्ण साहित्य पाऊस सुरू होण्यापूर्वी सुरक्षित ठिकाणी हलवले जाते. मागेच शिवलिंगाच्या आकाराचा किल्ले लिंगाणा आजुबाजूच्या परिसरावर आपली नजर राखून खंबीरपने उभा आहे. इथून डोंगरात असलेली महाराजांची प्रतिमा नजरेस पडते.



● केंबुर्ली धबधबा :-


मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळील केंबुर्ली गावाजवळ असलेला हा धबधबा येणाजाणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. तीन टप्प्यात कोसळणारा हा धबधबा महामार्गाची शान वाढवत आहे. याचे जलप्रपात अंगी झेलण्यासाठी अनेक पर्यटन येथे गर्दी करतात. 


● शिवथरघळ :- 

महाडपासून तीस किमी अंतरावर असलेल्या, सर्व बाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेल्या वाघजाई दरीच्या कुशीत हे ठिकाण आहे. चहूबाजूंनी वेढलेल्या हिरव्यागार झाडाझाडोऱ्याने झाकून टाकलेल्या डोंगराच्या पोटात शिवथरघळ आहे. या घळीला समर्थ रामदास स्वामी ’सुंदर मठ’ म्हणत असत. इमारतीहून पुढे गेल्यावर सरळ जाणारा रस्ता थेट घळीपाशी घेऊन जातो. घळीमधे रामदासस्वामींची मूर्ती आहे. घळीच्या समोरच सुंदर धबधबा आहे. तो धीरगंभीर आवाज करीत धरतीवर कोसळत असतो.


● मोरझोत धबधबा :- 


पावसाळ्यात डोंगरमाथ्यावरून असंख्य धबधबे निर्माण होतात. अशा धबधब्यात भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र आकर्षणाचा मानबिंदू ठरतो तो उमरठ जवळील मोरझोत धबधबा! उमरठ जवळील चांदके व खोपड गावच्या मध्यभागी हा धबधबा जवळजवळ २०० ते २५० फुटावरुन कोसळतो. या कदेकपाऱ्यात निर्माण झालेली नैसर्गिक गुहा व आजूबाजूचा हिरवागार परिसर एका वेगळ्या विश्वात आपल्याला घेऊन जातो. उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे व शेलार मामांच्या समाधीला नतमस्तक होऊन नंतरच येथे येणारा प्रत्येक पर्यटक मोरझोतकडे जातो. वरुन एकसंध येणारा मोरझोतचा हा जलप्रवाह जमिनीवर पडताच मोर आपला पिसारा फुलवून थुई- थुई नाचत असल्याचा भास निर्माण करतो. या धबधब्यावर महाड - पोलादपूर तालुक्यासह मुंबई - पुणे येथील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. जसजसा पावसाचा जोर वाढतो तसतसा हा धबधबा आपला आकार वाढवतो. या धबधब्यापर्यंत गाडी जात असल्याने पर्यटक जास्त संख्येने येथे येत असतात. मोरझोत धबधब्याजवळ मोठे दगड तसेच तीव्र उतार असल्याने पर्यटकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. 


● घागरकोंड :-

पावसाळ्यात कोकणच्या निसर्गाला वेगळाच बहर आलेला असतो. धरतीनं हिरवा शालू पांघरलेला असतो. डोंगरदऱ्यातून वाहणारे धबधबे, धरणं सर्वानाच मोहून टाकतात. मुंबई- गोवा महामार्गावरील पोलादपूरपासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर वसलेल्या घागरकोंड या दुर्गम भागातील झुलता पूल आणि खोल दरीत कोसळणारा धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरला आहे. या ठिकाणी जाऊन पर्यटनाचा आनंद तुम्ही नक्की घेऊ शकता, हे तुम्हाला या फोटोवरून  लक्षात आलंच असेल.  

●  मढे घाट धबधबा :- 


नरवीर तानाजी मालुसरे यांचं पार्थिव सिंहगडावरून उमराठ या त्यांच्या गावी नेले होते. या घाटवाटेला मढे घाट म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्यातील केळद आणि महाड तालुक्यातील वाकी या गावांना हा घाटमार्ग जोडतो. महाड तालुक्यातील कर्णवडी गावातून दोन तासांची पायपीट करून आपण धबधब्यापाशी पोचतो. महाड ते कर्णवडी हे अंतर  ३५  किमी आहे. केळद गावातून गाडी रस्ता थेट धबधब्यापाशी येतो. भर पावसात येथील टपरीवर वाफाळता चहा आणि गरमागरम मक्याच्या कणसाचा आस्वाद घेता येतो.

● कुडपन धबधबा :-


पावसाचा मनमाेहक आनंद लुटण्यासाठी निसर्गरम्य कुडपण टुरिझम पॉईंटला जरूर भेट द्यावी. कुडपणचे एक आश्चर्य म्हणजे भीमाची/ भीवाची काठी. भीवाची काठी म्हणजे "साधारण ४०० मी. उंचीचा आकाशात झेपावलेला एक सुळका!" त्याला स्थानिक नाव "भीमाची काठी" आहे पण खरं नाव आहे "भीवाची काठी"! कुडपणचा दुधाळ असा उंच धबधबा! हा धबधबा आणि भिवाची काठी मधली दरी म्हणजेच खेडच्या प्रसिद्ध जगबुडी नदीचा उगम. उंच डोंगर झरे, महाबळेश्वर घाट दर्शन, रायगड-रत्नागिरी-सातारा ह्या जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आणि मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या कुडपण ह्या गावाला पावसाळ्यात नक्कीच भेट द्यावी.


● कुंभे धबधबा :- 


माणगाव तालुक्यातील कुंभे गावाच्या नदीवर हा धबधबा आहे. कुंभे घाटाने वर आलो असता, एका बोगद्यातून प्रवेश केल्यावर उंचावरून कोसळणाऱ्या जलप्रतताचा आवाज आपल्या कानात घुमू लागतो. समोरच असलेल्या पठारावरून या धबधब्याचा पूर्ण नजारा कॅमेऱ्यात कैद करता येतो.


● मोनल्याचा धबधबा :-




महाड-रायगड रोडवर कोंझरजवळ असणाऱ्या कोंडरान गावातून हा धबधबा बघताच क्षणी आपलं लक्ष वेधून घेतो. फारसा परिचित नसणारा आणि कुठूनही न दिसणारा दोन टप्प्यात कोसळणारा हा धबधबा आहे. दुतर्फा डोंगरांनी वेढलेल्या कोंढरान गावात पावसाचा आनंद लुटण्यासाठी इथे नक्कीच भेट द्यावी.
 https://www.royalbhatka.com/2020/07/blog-post_10.html
 
 
 
 
 
 
 
 
 
 

  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...