महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा सिंधुदुर्ग!
कोकणातल्या फणसासारखा गोड आणि रसाळ असा जिल्हा सिंधुदुर्ग!
शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक अश्या सिंधुदुर्ग किल्ल्याला जन्माला घालणारा जिल्हा!
विस्तिर्ण असा समुद्र किनारा लाभलेला हा जिल्हा.
नेरूर या ठिकाणी काही शिलालेख आढळुन आले त्या शिलालेखावरून येथे कधीकाळी चालुक्यांची सत्ता होती असे उल्लेख आढळतात.
मराठयांच्या अगोदर येथे आदिलशाही राजवट होती.
सिंधुदुर्ग जिल्हा पुर्वी रत्नागिरी जिल्हयाचाच एक भाग होता 1 मे 1981 ला तो स्वतंत्र जिल्हा म्हणुन उदयाला आला.
ऐतिहासीक अश्या किल्ल्यामुळे या शहराला सिंधुदुर्ग असे नाव पडले.

सिंधुदुर्ग जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Sindhudurg District Information in Marathi
25 नोव्हेंबर 1664 ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुरदृष्टीकोनातुन या किल्ल्याची मुहूर्तमेढ रोवल्या गेली आणि 3 वर्षांमधे सिंधुदुर्ग किल्ला संपुर्ण बांधुन तयार झाला.
समुद्रमार्गे येणाया शत्रुवर नजर ठेवण्याकरता आणि त्याला नामशेष करण्याकरता या किल्ल्याची निर्मीती झाली, या किल्ल्याचे वैशिष्टय म्हणजे हा किल्ला शत्रुला सहजासहजी दिसत नसे अश्या प्रकारे हा बांधण्यात आला आहे.
हा एकमात्र असा किल्ला आहे ज्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधण्यात आले आहे आणि त्यांच्या पंजाची छाप या ठिकाणी पहावयास मिळते.
या जिल्हयात सुमारे 37 किल्ले असुन किल्ल्याचे सर्व प्रकार येथे बघायला मिळतात जसे सागरी जलदुर्ग, भुमीवरचा भुईकोट किल्ला, आणि उंच डोंगरावरचा गिरीदुर्ग.
सिंधुदुर्ग जिल्हयातील तालुके – Sindhudurg District Taluka List
सिंधुदुर्ग जिल्हयात एकुण 8 तालुके आहेत
- सावंतवाडी
- कणकवली
- कुडाळ
- देवगड
- दोडामार्ग
- मालवण
- वेंगुर्ला
- वैभववाडी
सिंधुदुर्ग जिल्हयाविषयी काही महत्वाच्या आणि वैशिष्टयपुर्ण गोष्टी – Satara Jilha Chi Mahiti
- लोकसंख्या 8,68,825
- क्षेत्रफळ 5207 वर्ग कि.मी.
- एकुण तालुके 8
- एकुण गावं 752
- साक्षरतेचे प्रमाण 30%
- 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 1036
- राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 या जिल्हयातुन गेला आहे.
- सिंधुदुर्ग च्या पुर्वेकडे अरबी समुद्र, दक्षिणेकडे कर्नाटक राज्यातील बेळगांव आणि गोवा आणि उत्तरेकडे रत्नागिरी जिल्हा आहे.
- सिंधुदुर्ग जिल्हा 1999 ला महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा घोषीत करण्यात आला.
- 121 कि.मी. चा विस्तीर्ण असा समुद्रकिनारा या जिल्हयाला लाभलाय…
- या जिल्हयात अनेक त.हेची रानफुलं आढळतात अभ्यासकांकरता हा अमुल्य असा ठेवा आहे.
- पर्यटन, मासेमारी, येथील मुख्य व्यवसाय.
- या ठिकाणी विशेषतः हापुस आंबा, फणस, काजु यांचे विपुल प्रमाणात उत्पन्न घेतले जाते.
- सिंधुदुर्ग किल्ल्याला 21 जुन 2010 ला भारत सरकारनं महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणुन जाहीर केले आहे.
- छत्रपती शिवाजी महाराजांचा हा ऐतिहासीक असा किल्ला जणु काही समुद्रात पाय रोवुन उभा असल्यासारखा भासतो.
- कोकणचे गांधी म्हणुन ज्यांना गौरवलं जातं असे अप्पासाहेब पटवर्धन! सिंधुदुर्ग जिल्हयात कणकवलीजवळ गोपुरी या ठिकाणी यांचा आश्रम आहे.
- रत्नागिरी, बेळगांव आणि गोव्यातील दाभोली ही जवळची विमानतळं आहेत.
तिर्थस्थळं आणि पर्यटन स्थळं – Places to Visit in Sindhudurg District
एकंदरीतच कोकणाला विस्तिर्ण असा समुद्रकिनारा लाभला असल्याने पर्यटनाकरताच हा जिल्हा ओळखला जातो. फिरण्याकरता तर असंख्य अशी ठिकाणं असुन जी मनाला शांतता आणि प्रसन्नता प्रदान करतात.
अनेक धार्मीक स्थळं देखील भाविकांकरता महत्वाची असुन येथे दरवर्षी भाविकांची संख्या वाढतीच आहे.
आता आपण सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन स्थळांकडे एक नजर टाकू.
मला आठवतं लहान असताना आम्ही कुडाळला होतो तेव्हां विहीरीकडे उभे राहून गोव्याच्या रंगीत गाड्या बघायचो. त्यातून फिरणारी माणसं वेगळीच वाटायची. आम्ही फक्त वर्षातून एकदा यस्टीच्या डब्यातून मामाकडे आणि गावाला जायचो. आता काळ बदलला. फिरणारी माणसे ऐवजी पर्यटन आणि पर्यटक हा प्रकार आला. खुप लांब देशात फिरण्यापेक्षा आपल्या सभोवती सिंधुदुर्ग जिल्ह्या मध्येच अनेक स्थळं अशी पाहण्यासारखी आहेत, की ती पाहायला आता लांबून लोक येतात. कोकण रेल्वे, प्रायव्हेट गाड्या यामुळे पर्यटकांचा ओघ वाढतच आहे. काही सुविधा अजून व्हायच्या आहेत.
सुरवात कणकवलीपासूनच. कारण जिल्ह्याच्या मध्यवर्ती शहरातच रेल्वे स्थानक, हॉटेल्स व एसटी स्टँड यासगळ्यामुळे बहूतांश पर्यटक कणकवलीपासुनच फिरायला सुरवात करतात.
प्रवासास आवश्यक समान खरेदी करा अमेझॉन वर
![]() कणकवली – भालचंद्र महाराज :सत्पुरूषांच्या या पुण्य कोकण भूमित भालचंद्र महाराज हे एक प्रसिध्द योगी पुरुष होऊन गेले. भालचंद्र महाराजांचे जगात अनेक भक्त गण आहेत. कणकवली श हरात त्यांची समाधी आहे. त्या समाधी स्थळावर सुंदर मठाची स्थापना करण्यात आली आहे. भालचंद्र महाराजांचे सर्व भक्तगण दरवर्षी महाराजांच्या जन्मादिवशी महाराजांच्या कणकवलीतील मठात येतात. अतिशय धीर गंभीर आणि प्रसन्नतेने भालचंद्र महाराजांचे मठ भरुन राहिल्याने येथे येणारा भक्तगण आनंदीमनाने तृप्त होतो. मठामधे भालचंद्र महारांजानी जेथे समाधी घेतली ते स्थान अतिशय पवित्र आहे. इथे आल्यावर मन:शांती लाभते. |
![]() गोपुरी आश्रम, कणकवली :कोकणगांधी सिताराम पुरुषोत्तम तथा आप्पासाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेला गोपुरी आश्रम कणकवलीत वागदे येथे गडनदीच्या तिरावर आहे. त्यांनी गोपुरीत कृषी क्षेत्रातून रोजगार कला उपब्ध करता येईल हे कृतितून सिध्द करुन दाखविले आहे. त्यांचा आदर्श जपणार्या त्यांच्या अनुयायांनी शेती, फळप्रक्रिया उद्योगात आता भरीव कामगिरी केली आहे. |
![]() भिरवडेंचे रामेश्वर देवालय:येथील रामेश्वर मंदिर डोंगराच्या कुशीत आहे. देवालयाबरोबरच येथील निसर्गसौंदर्यही भाविकांच्या भक्तीमय आनंदात अमोल ठेवा निर्माण होतो. |
![]() घोणसरीचा शिवगड किल्ला :निसर्गरम्य आणि हिरव्यागार परिसराच्या सान्निध्यात हा ऐतिहासिक साक्ष देणारा किल्ला पर्यटकांना कायम खुणावतो. तेथे भवानी मातेचे देवालय आहे. |
![]() वैभववाडी :नावातच वैभव असणार्या नैसर्गिक ओतप्रोत भरलेली वैभववाडीतील पर्यटन स्थळे |
![]() नापणेचा धबधबा :या धबधब्याचा उगम नाधवडे या गावी झाला आहे. तळेरेपासून १६ कि.मी. वर काहीसा आडबाजूला हा धबधबा आहे. हा धबधबा बारमाही कोसळत असतो. पाण्यामध्ये गंधकाचा अंश असल्याने येथील पाण्याने स्नान केल्यास त्वचाविकार बरे होतात असे आरोग्यतज्ञांचे मत आहे. त्यामुळे पर्यटकांसोबत त्वचा विकाराने ग्रासलेले लोक येथे भेट देत असतात. |
![]() ऐनारी डोंगरातील लेणी :वैभववाडी तालुक्यातील ऐनारी गावात डोंगरामध्ये प्राचिन गुंफा असून त्यामध्ये कोरीव लेणी आहेत. सुमारे १५० वर्षांपूर्वी या गुंफेचा शोध लागला. गुंफा अद्याप दुर्लक्षित असून आत काळोख असल्याने बॅटरी घेऊनच आत जावे लागते. |
![]() देवगड :देवगड हापूस आंब्याबरोबरच येथील पर्यटन स्थळे ही पर्यटकांना मनतृप्त आनंद देतात. |
![]() देवगड किल्ला :देवगडचा किल्ला हापूस आंब्याइतकाच प्रसिध्द आहे. त्याची ख्याती पर्यटकाला निश्चित आकर्षित करते. येथील किनारा व हापूस आंब्याची ही रोचकता औरच आहे. |
![]() विजयदुर्ग :सहा हेक्टर क्षेत्रात विस्तारलेल्या या जलदुर्गाची तटबंदी पर्यटकांचे खास आकर्षण बनले आहे. हा किल्ला पूर्वी मराठा आरमाराचे एक महत्त्वाचे केंद्र होते. किल्ल्यामध्ये मंदिर, विहीर तसेच युद्धकैद्यांना ठेवण्यासाठी एक कोठडी आहे. पाण्याच्या टाक्या,पडके महाल, तोफा आजही या किल्ल्यावर आहेत. किल्ल्याचे वैशिष्टय म्हणजे सुमारे २ कि.मी. अंतर असलेले एक भुयार असून धुळपांच्या वाडयातून बाहेर पडते. १६५३ साली काबीज केलेला हा किल्ला शिवरायांच्या आरमारात समाविष्ठ पहिला “जलदुर्ग” म्हणून यांची विशेष नोंद आहे. सध्या विजयदुर्ग हे एक उत्तम मासेमारी बंदर म्हणून उदयास येत आहे. |
![]() वाडा येथील विमलेश्वर मंदिर :देवगड पासून ६ कि.मी. अंतरावर विमलेश्वराचे सुंदर देवालय आहे. समुद्राच्या लाटांनी खळाळणार्या व डोंगराच्या सान्निध्यात विसावलेल्या या मंदिरात शिवपिंडी येणार्यांचे विशेष लक्ष वेधून घेते. या देवालयाच्या दोन्ही बाजुला खोदीव हत्ती आहेत. मंदिरासह येथील परिसरही विशेष प्रेक्षणीय आहे. |
![]() मिठबाब तांबळडेग किनारा :हा किनारा अतिशय स्वच्छ व शुभ्र वाळूचा आहे. या किनार्यावर गणबादेवीचे देवालय असल्याने पर्यटक समुद्र किनार्याचा मनसोक्त आनंद लुटता-लुटता गणबादेवीच्या पावलावरही लीन होतात. |
![]() कुणकेश्वर मंदिर :निसर्गरम्य सौंदर्यस्थळ व जागृत धार्मिक स्थान असा दुहेरी संगम असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व परिसरातील लक्षावधी भाविकांचे श्रध्दास्थान आहे. दरवर्षी हजारोंच्या उपस्थितीत येथे जत्रोत्सव संपन्न होतो. शिवमंदिरासह येथील किनार्याचा परिसर येथे येणार्याला सुखावतो. मंदिराच्या पश्चिमेकडील बाजूस पायर्यांवर लोळण घेणार्या सागराची विविध रुपे न्याहाळता येतात. |
![]() ओरोस :जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे जिल्हा मुख्यालय म्हणून जिल्हा प्रशासनाची जिल्हा कार्यालये आहेत. अतिशय आकर्षक पध्दतीने या इमारती उभ्या आहेत. |
![]() वालावल :येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिर हे प्राचीन व उत्कृष्ठ शिल्पाकृती असलेले देवालय आहे. या देवालयाची रचना, लाकडी कोरीव काम, अंतर्भागाची सजावट, बाजूस असलेला तलाव, त्यात फुललेली कमल पुष्पे रसिकाना मोहिनी घालतात. चंद्र – सूर्याचे दर्शन येथे एकाच वेळी घडते. मंदिराचे उत्तरेस वालावल खाडीचे सौंदर्य अप्रतिम आहे. |
![]() संत राऊळ महाराज मठ, पिंगुळी :कुडाळ पिंगुळी येथील भक्त वत्सल प.पू. राऊळ महाराज यांचे देखणे स्मारक त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे शिष्य विनायक अण्णा राऊळ महाराज आणि भक्तजनांनी त्यांचे भव्य मंदिर उभारले आहे. गाभार्यामध्ये प.पू. राऊळ महाराजांची मूर्ती असून मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे. |
![]() दत्तमंदिर, माणगाव :हे दत्त सांप्रदायाचे स्थान आहे. तेथे टेंब्ये स्वामींचे भव्य मंदिर उभारले गेले आहे. शिवाय त्यांनी स्थापन केलेले दत्तमंदिर भक्तांचे श्रद्धास्थान आहे. विश्वस्थांनी अद्ययावत धर्मशाळा बांधलेली आहे. तेथे राहण्याची सोय उपलब्ध आहे. |
![]() वेंगुर्ला :वेंगुर्ला बंदर हे स्वातंत्र्यपूर्व काळात आशिया खंडातील पश्चिम किनार्यावरील आयात – निर्यातीचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. या बंदरासमोर असलेलं शासकिय निवासस्थान म्हणजे ‘सागर बंगला’. ब्रिटिश राजवटीपासून अथांग समुद्राचे दर्शन घडविणार्या या विश्रामगृहात नेहमीच गर्दी असते. वेंगुर्ले बंदर, दिपगृह, मार्केट, दाभोली मठ, निशाण तलाव याबरोबरच वेंगुर्ला प्रसिद्ध आहे ते इथल्या मंदिरासाठी. |
![]() रेडीचा गणेश :येथे स्वयंभू गणेश मूर्ती असून भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. येथे खाणीचे खोदकाम चालू असताना भव्य द्विभूज गणेश मूर्ती आढळून आली असून त्याच जागेवर सुंदर मंदिर बांधून श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिराच्या दक्षिण बाजूस गोवा किनारपट्टीचे विलोभनीय दृष्य दिसते. |
![]() शिरोडा:हे गाव पूर्वी ‘शिरवडे’ या नावाने परिचित होते. पुढे अपभ्रंश होऊन ‘शिरोडा’ हे नाव प्राप्त झाले. या गावास ऐतिहासिक महत्त्व आहे. १९३० सालचा मिठाचा सत्याग्रह याच गावी झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मीठ पिकवणारे एकमेव गाव म्हणूनही शिरोड्याचा लौकिक आहे. परिसरात नारळाच्या झाडांच्या अनेक राया आहेत. तसेच काजूंचीही अनेक झाडे आहेत. जवळच यशवंतगड नावाचा पुरातन किल्ला आहे. छत्रपतींच्या काळात त्यास विशेष महत्त्व होते. |
![]() आरवली :शिरोड्यापासून एक किमी. अंतरावर ‘आरवली’ गाव आहे. येथील वेतोबाचे देवालय आदर्श नमुना मानला जातो. वेतोबाची भव्य पंचधातूची मूर्ती आणि भाविकांची अपार श्रद्धा यामुळे या गावाला आगळेच महत्त्व आहे. नजिकचे सातेरी मंदिर आणि तेथिल मूर्तीही दर्शनिय आहे. वेतोबाची जत्रा आणि नविन मूर्तीची पूनर्प्रतिष्ठापना वर्धापन उत्सव हे सिंधुदुर्गवासियांचे आकर्षण आहे. |
![]() मोचेमाड :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विश्वाच्या वैभवाची साक्ष देणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी मानला गेलेला पर्यटन प्रकल्प ‘मोचेमाड’ परिसरात साकारणार आहे. मोचेमाड किनारपट्टीवर सुमारे २०० फूट उंचीपर्यंतच्या आकाराच्या लहानमोठ्या टेकड्या असून पर्यटन तज्ञांच्या मते त्याचा उपयोग ‘सी डायव्हिंग स्पोर्टस’ या क्रिडाप्रकारासाठी करता येईल. स्वच्छ व सुंदर सागरी किनार्याबरोबरच पांढरी शुभ्र वाळू हे या किनारपट्टीचे वैशिष्ट्य आहे. याच परिसरात किनार्यांवरील लाटा व सागरी वारे यांच्यामुळे नैसर्गिक वाळूच्या भिंती तयार झालेल्या असून त्याचा उपयोग वाळूवरील ‘स्केटींग’ या क्रिडाप्रकारासाठी करता येईल. दूध, भाजीपाला तसेच कुक्कटपालन यासारखे लहान मोठे व्यवसाय उभे राहून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे ‘दशावतार ‘ सारखे कार्यक्रम देशी-विदेशी नागरिकांना दाखविण्यात येणार असल्याने कला-नाट्य क्षेत्रासही चांगले दिवस येणार आहेत. |
![]() रमणीय सागरेश्र्वर :वेंगुर्ला-शिरोडा रस्त्याने अर्थात नियोजित सागरी महामार्गाने जाताना वेंगुर्ला शहरापासून अवघ्या सुमारे ३ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. मुख्य रस्त्यापासून पश्चिमेकडे सागरेश्र्वर मंदिराच्या दिशेने काही अंतर जावे लागते. मंदिराच्या आवारात गोड्या पाण्याची विहीर आहे. तसेच भाविकांसाठी छोटेखानी धर्मशाळाही आहे. ‘सागरेश्र्वरच्या’ वाळूत तासनतास बसावे, सागराचे निरीक्षण करत, वाळूत खेळावे, किल्ले बांधावेत, भरतीच्या वेळात किनार्यास येऊन भिडताना तयार होणार्या अर्ध गोलाकार नागफणीच्या आकाराच्या सागरी लाटांच्या भिंती व हा हा म्हणता जाणवणारा त्यांचा क्षणभंगुरपणा न्याहाळणे हा देखील कोणाचा आवडता छंद असू शकतो. |
![]() सावंतवाडी :सावंतवाडी म्हणजेच ‘सुंदरवाडी’ या शहरावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली. या शहरात राजवाडा, लाकडी फळे, फुले (हस्तकला), मोती तलाव, नरेंद्र डोंगर, जगन्नथराव भोसले उद्यान, आत्मेश्वर तळी, व शिल्पग्राम आदी माध्यमातून येथे येणारे पर्यटक अधिक स्थिरावतात. ‘सावंतवाडी’ हे शहर संस्थान काळातील खेमसावंत-भोसल्यांची राजधानी होती. सावंतवाडीतील ‘चितार आळी’ हा भाग कलाकुसरीच्या वस्तूंच्या दुकांनांनी गजबजलेला असतो. सध्या सावंतवाडी हे राज्यातील लाकडी कलाकुसरीच्या वस्तु व हस्तकला उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. लाकडी खेळणी, लाखेच्या वस्तू, बाहुल्या, रंगीत फळे, रंगीत पाट, दरवाजांना लावण्याच्या विविधरंगी माळा, शोभेच्या गृहवस्तू उत्कृष्टपणे तयार केल्या जातात. |
![]() मोती तलाव :तलावात पूर्वी कधी मोती सापडले होते म्हणून त्या तलावास “मोती तलाव” असे नाव पडले. चारही बाजूने सह्याद्रीच्या पर्वत रांगानी वेढलेले सावंतवाडी शहर आणि शहराच्या मध्यभागी मोती तलाव. सध्या तलावात बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. तलावात कारंजे सुध्दा बसविण्यात आलेले आहेत. तसेच संपूर्ण तलावाच्या कडेला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. |
![]() निसर्ग कोंदण – आंबोली :आंबोली हे ठिकाण सावंतवाडीपासून सुमारे २५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे याठिकाणी पर्यटक निवास बांधले आहेत. शासकीय व वन खात्याचे विश्रामगृह तसेच खासगी हॉटेल्सही या ठिकाणी आहेत. सर्व हंगामात पर्यटकांची वर्दळ येथे सुरु असते. हिरण्यकेशी नदीचा उगम आंबोलीजवळच होतो. शंकराचे स्थान असल्याने तेथे महाशिवरात्रीस यात्रा भरते. आंबोली घाटातून दिसणारी सह्याद्री पर्वताची रुद्र रुपे चिरकाल स्मरणात राहतील, अशीच आहेत. अत्यंत आल्हाददायक हवा, सभोवताली दाटलेली गर्द झाडी, कधी हलके-फुलके विरळ धुके तर कधी दाट धुक्यांची दुलई पांघरलेला आसमंत, पावसाळी हंगामात धो-धो कोसळणारे असंख्य धबधबे-निर्झर, आंबोलीच्या घाटमाथ्यावर कधी टकरा घेणार्या तर कधी रेंगाळणार्या ढगांच्या मालिका, कड्यावर उभे राहिले असता खालून वेगाने येऊन आदळणारा वार्याचा, अवखळ झोत, दर्या-खोर्यांची भव्यता, गिरी-शिखरांची उंचाई, ही सारी सृष्टीची नवलाई आणि दिव्यत्व अनुभवण्यासाठी आंबोलीसच जायला हवे. उंच कड्यावरुन तळ्कोंकणातील दृष्ये तासनतास निरखित राहणे, ही येथील एक अपूर्वाई! आंबोली परिसरात असे ९-१० पॉईंटस् आहेत. |
![]() मालवण तालुक्यातील पर्यटन स्थळे :सिंधुदुर्ग किल्ला- मालवण नजिक भरसमुद्रात “सिंधुदुर्ग” हा जलदुर्ग आजही आपला ऐतिहासिक वारसा जतन करत खंबीरपणे उभा आहे. इ. स. १६६४ मध्ये ‘कुरटे’ नावाने ओळखल्या जाणार्या या बेटावर ४१ एकर क्षेत्रात शिवाजी महाराजांनी किल्ल्याची उभारणी केली. सागरी आरमाराचे हे तत्कालीन महत्त्वाचे ठिकाण होते. किल्ल्यास ३२ बुरुज आहेत. तटबंदी भक्कम व नागमोडी वळणाची आहे. किल्ल्यात शिवाजी महाराजांचे राज्यातील एकमेव शिवरामेश्र्वर मंदिर आहे. तसेच महाराजांच्या हाता-पायाचे ठसे जतन करुन ठेवण्यात आले आहेत. |
![]() निसर्गकन्या – तारकर्ली :मालवणच्या बंदरापासून ते तारकर्ली, देवबागपर्यंत सुमारे १२ कि. मी. लांबीची आकर्षक किनारपट्टी आहे. या शांत रम्य अशा ठिकाणी तंबुनिवास व रेस्टॉरंटची सोय करण्यात आली आहे. येथील किनारा जलविहारासाठीही प्रसिध्द आहे. |
![]() देवबाग :देवबागला तारकर्लीची खाडी व अरबी समुद्र यांचा सुरेख संगम पाहावयास मिळतो. कर्ली नदीचे विस्तीर्ण, रुंद पात्र, नदीमुखातून देवबागकडे जाताना दोन्ही किनार्यांवर दाटलेल्या हिरव्यागर्द माडांच्या व पोफळीच्या बागा, नदीचा संथ, शांत व सुरक्षित प्रवास, नदीपात्रात लागणारी छोटी मोठी नवलाईची बेटे, पात्रालगत असंख्य माडांच्या अंधारछायेत असणारी कोकणी परंपरेची घरकुले, समोर दिसणारी तुळशी वृंदावने ही सारी दृष्ये पाहत पाहत देवबागकडे सरकत जाणारी नौका हा अनुभव म्हणजे चिरकाल स्मरणात राहणारी एक आनंदयात्राच होय ! |
![]() धामापूर :धामापूर या निसर्गरम्य गावात भगवती मंदिरालगत सुंदर असा तलाव आहे. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही पाऊस पडला तरी मर्यादेच्या पलिकडे या तळ्यातील पाणी वाढत नाही आणि कितीही दुष्काळ झाला तरी तळ्यातील पाणी आटत नाही. हे तलाव विस्तीर्ण व विहंगम असल्याने येथे येणारे पर्यटक काही क्षण तरी स्वतःला हरवून जातात. |
![]() दोडामार्ग:या नव्याने उदयास आलेल्या तालुक्यात ही अनेक पर्यटनाची ठिकाणे विलोभनीय आहेत. |
![]() तिलारी धरण:तिलारी धरण हा प्रकल्प येथे साकारल्याने येथील निसर्गनिर्मित सौंदर्यात आणखीनच भर पडल्याने येथे येणारा पर्यटक स्थिरावल्याशिवाय राहणार नाही. येथील उन्नेयी बंधारा व नागनाथ मंदिर दिलखेचक आहे. तर पारगड किल्ला ऐतिहासिक ठेव आहे. सिंधुदुर्गातील पर्यटनस्थळांचा विकास होण्याच्या दृष्टीने शासन पातळीवरून आराखडे तयार होत असून निधीचाही विचार होत आहे. सिंधुदुर्ग बदलण्याची ‘सी-वर्ल्ड’मध्ये क्षमता |
श्री देवी भैराई मंदिर - मोंड - देवगड
मोंड गावच्या माळरानावर वसलेली माऊली श्री. भैराई देवी नवसाला पावणारी म्हणून तिची सर्वदूर ख्याती पसरली आहे. मोंड - वाघोटण मार्गावर देवगड तालुक्यातील एका टोकाला खाडी पलिकडे हे देवीचे पुरातन मंदिर आहे. मोंड गावावर निसर्गाने सृष्टी सौंदर्याची मुक्त उधळण केली आहे. खारेपाटण - कोर्ले - मुटाट - सौंदाळे - पडेल - पाटगांव - वाघोटण - वैभववाडी व तरेळे आदी गावांना जोडणा-या प्रमुख संगमावर मोंड गावापासून सुमारे ५ कि. मी. अंतरावर हे मंदिर वसले आहे. अतिशय निसर्ग संपन्न असे सडा - माळरान लाभल्याने पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येत आहे. मंदिराचे बांधकाम ऐतिहासिक वारसा दर्शवते. मंदिर गाभा-यातएक फुट खाली जमिनीत पाषाण असलेली देवी सुबक मुर्ती मन प्रसन्न करते. बाजूलाच देवीचे तरंग, पुरातन समई, विविध वाद्ये यामुळे विलोभनीय दृश्य आणि शांत वातावरण ही येथील वैशिष्टये आहेत. पूर्वी यामंदिर परिसरात घनदाट वनराई होती. बाजूलाच बारमाई पाणी देणारी विहीर आहे. कालांतराने वनराई तोडण्यात आली. सध्या मंदिराचे बांधकाम टप्प्या-टप्प्याने सुरू आहे. प्राचीन कलाकृतींचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर लोकांचे श्रद्धास्थान आहे. भैराई देवीला मोंड गावाची आई असे संबोधले जाते. ती कातळावर जाऊन बैसली. तीची अनेक रूपे आहेत. पहिली माय भवानीच्या रूपातील जुगाई, दुसरी सिंहासनी रूपातील नवलाई, तिसरी लेकरांवर दृष्टी ठेवणारी भैराई म्हणून भाविक भक्तांना ती दर्शन देते. मंदिर परिसरात पुरातन मंदिरांच्या वास्तु अनेक आहेत. श्री. देव अनुभव, श्री. देव ब्राम्हण, समोरच श्री. रामेश्वर, भावई तसेच लेकरांचे रक्षण करणारा बारापाचाचा चौचार विविध देवतांचे मंदिरे बाजूलाच वसली आहेत.
मंदिरापासून १ कि. मी. अंतरावर 'नंदीची घाटी' म्हणून ओळख असलेले ठिकाण आहे. येथे एक पुरातन वटवृक्ष आहे. त्याच्या भोवती चौथरा आहे.या चौथा-यावर एक लहानशी संगमरवरी पाटी आहे. त्यामुळे हा चौथरा केव्हा बांधला याची कल्पना येते. प्रिवर्षी याठिकाणी दसरा उत्सव मोठ्या थाटात साजरा होतो. दोन दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. माहेर वाशिणी व सासर वाशिणी, अबालवृद्ध भाविक येथे येतात. नवस बोलतात व नवस फेडतात. दसरोत्सवातील हे दोन दिवस जत्रा भरते. यावेळी देवस्वा-या रयतेसह मंदिर प्रदिक्षणा घालतात. असा अनोखा संगम पाहाय़वयास मिळतो.
कथा - पेज - देवाचा " गड" देवगड.

श्री देवी चौंडेश्वरी मंदिर - गिर्ये - विजयदुर्ग - देवगड
गिर्येबरोबरच विजयदुर्ग, रामेश्वर गावातील लोकांची ग्रामदेवी म्हणून श्री देवी चौंडेश्वरी ओळखली जाते. विजयदुर्गपासून मागे ७ किलोमीटरवर रस्त्यानजीकच चौघुले दुकान स्टॉपजवळ असलेले हे चौंडेश्वरीचे मंदिर बाजूच्या निसर्गरम्य वातावरणाने आपल्या नजरेमध्ये भरते. पूर्वी असलेल्या मंदिराचेे आता ग्रामस्थांच्या एकजूटीने पुर्णपणे नूतनीकरण करण्यात आले असून नव्या रूपात हे मंदिर येणा-या प्रत्येक भाविकाला भावते. कोकणातील बहुसंख्य मंदिराबाबत एखादी तरी आख्यायिका सांगितली जाते. चौंडेश्वरी मंदिरासंदर्भातही दोन आख्यायिका सांगितल्या जातात. मंदिर फारसं पुरातन नाही. जवळपास दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी हे मंदिर बांधण्यात आलं. मात्र चौंडेश्वरी देवीची भारतात जी काही मंदिरं आहेत, त्यापैकी महाराष्ट्रातील या मंदिराचा उल्लेख प्रामुख्याने केला जातो. बारा पाचाचे मानकरी मिळून या मंदिरातील वर्षभरात येणारे सर्व उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात.
देवीचा वार्षिक जत्रोत्सव देव दिवाळीला साजरा केला जातो. मोठी दिवाळी म्हणून चौंडेश्वरी देवीची जत्रा ओळखली जाते. यावेळी विजयदुर्ग, रामेश्वर गिर्ये गावातील सर्व ग्रामस्थ या उत्सवामध्ये सामिल होतातच. परंतू या गावातल्या माहेरवाशिणी खास ओटी भरण्यासाठी मंदिरात येतात. तसेच चौंडेश्वरी देवीचे पुणे, मुंबई, कोल्हापूर आदी भागातील भक्तगणही मोठ्या संख्येने या उत्सवात सामिल होतात. शिमग्यामध्ये या मंदिरातून जेव्हा देवखेळे बाहेर पडतात तेव्हा ते समोरच असलेल्या खळनाथ - चव्हाटा मंदिरामध्ये मुक्कामाला असतात. देवखेळ्यामध्ये सामिल झालेले लोक या मंदिरामध्ये कापडं नेसतात. खळनाथ मंदिराचा आणि चौंडेश्वरी मंदिराचा धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक वेळा संबंध येतो. खळनाथ मंदिर हे सुद्धा पुरातनकालीन असून ब्रिटीशांची सनद या मंदिराला मिळाली आहे. या मंदिराचाही जिर्णोद्धार करण्यात आला आहे. याठिकाणी वर्धापन दिन सोहळ्या व्यक्तिरिक्त होळी उत्सवाच्या दिवशीही दरवर्षी मोठा उत्सव साजरा केला जात.
कथा - पेज - देवाचा " गड "

श्री देवी पावणाई मंदिर - वानिवडे - देवगड
वानिवडे देवगड तालुक्यातील बेटाचे गाव म्हणुन ओळखले जाणारे वानिवडे गाव व ग्रामदैवत श्री देवी पावणाई हे पुरातन काळापासुनचे एक जागृत दैवत आहे. लोकवस्ती पासुन दुर असणारी देवी भक्तांच्या नवसाला पावते अशी श्रद्धा आहे. मूर्ति काळ्या दगडात कोरलेली आहे. तिच्या हातात ढाल, तलवार, गदा अशी शस्त्रे आहेत. घाडी मंडळी रोज या देवीची पुजा करतात.
एकबाजुस डोंगर व दुसऱ्या बाजुने वाहणारी खाडी या मध्ये वानिवडे गाव वसलेलं आहे. डोंगरावर देवीचे मंदिर असल्यामुळे संपुर्ण गावचा विचार करता ते एक मध्यवर्ती ठिकाण आहे. व गावच्या डोक्यावर विराजमान होऊन पुर्ण गावावर तिची क्रुपाद्रुष्टी आहे. तसेच हे मंदिर सपाट कातळ जमिनीवर आहे. आजुबाजुला घनदाट जंगल आहे. त्यामुळे निसर्ग सानिध्याने नटलेलं आहे. मंदिर परिसराच्या आजुबाजुस लोकवस्ती नाही आहे गावापासुन जवळजवळ २ कि.मी अंतरावर दुर आहे. आजुबाजुला कुठेच पाण्याचा स्त्रोत नसताना मंदिराच्या शेजारी मात्र गुहेच्या आकाराचे तळे असुन त्याला मात्र पुष्कळ थंडगार पाणी आहे व ते सहज हाताने काढण्यासारखे आहे. पूर्वी मंदिर फार जुने व कौलारू होते. या मंदिराच्या चौथऱ्यावर शके १८७६ अशी अक्षरे कोरलेली होती. आता मात्र गावकऱ्यांनी व भाविक भक्तांनी एक सुंदर देखणे मंदिर उभारले आहे. मंदिराच्या बाहेर उभे राहिले असता मोंड ,टेंबवली गावची मंदिरे सहज द्रुष्टीस पडतात. वानिवडे गावची देवी पावणाई देवी हे प्रमुख ग्रामदैवत असुन आकारी ब्राम्हण,देवी भावई,देव ईश्वर व सत्पुरुष अशी लहानमोठी मंदिरे या मंदिर परिसरात आहेत. देवी भवानी दसरोत्सवात देवी पावणाईच्या उजव्या बाजूला विराजमान होते. त्यानंतरच दसरोत्सवाची घटस्थापनेने सुरवात केली जाते. गावातील बारापाचाचे मानकरी व गावकरी मिळुन प्रबोधिनी एकादशी दिवशी हरीनाम सप्ताह, दसरा, होळी आणि अन्य उत्सव साजरे करतात.
देवळाचा वर्धापनदिन वसंतपंचमीला उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवात गोवा आणि मुंबईतील लोक आवर्जुन सहभागी होतात. यावेळी आजूबाजूच्या गावातील अनेक भाविक येतात. गावातील माहेरवाशीनि आवर्जुन दरवर्षी देवीची खणानारळांनी ओटी भरतात. या मंदिराला फार मोठा इतिहास आहे. देवीने कौल देऊन अनेक अडचणी सोडवल्याचे मानकरी सांगतात. तिच्या अनेक आख्यायिका आहेत.
वानिवडे गावची श्री. देवी पावणाई देवता ही बारा वाडीची ग्रामदेवता आहे. हिचा उगमस्थान गावात न होता सड्यावर जिथं जळवाडी परिसरामध्ये विराजमान झालेली पावणाई देवता आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आकार मर्याद असते. फक्त वानिवडे गावची श्री. देवी पावणाई ही तीन आकार मर्याद आहे. म्हणून त्या देवतेच्या स्थळातून एखादा भूत काढून पाठवला असता त्यासाठी एखाद्या माणसाने गोनभर नारळ संपवले तरी ते भूत मागे येणार नाही. कारण पान ठेवताना एकाच मर्यादेस पान ठेवणार एका आकारास पान ठेवून भूत परत येत नाही. म्हणून ज्यावेळी तीन आकार मर्यादेस पान ठेवले त्याचवेळी भूत मागे येईल. अशी तीची ख्याती आहे.
पूर्वी सौराष्ट्राच्या वेळीला वानिवडे गावची श्री. देवी पावणाई श्री. क्षेत्र कुणकेश्वर येथे गेली असता त्या ठिकाणी दरवाजा बंद होता. तो खुनी पावणाई देवीने बाजूला करून पुढील दरवाजा उघडला म्हणून आजही श्री. देवी पावणाईला पुढच्या दरवाने मान आहे. बाकीचे जे देव महाशिवरात्रीला श्री.क्षेत्र कुणकेश्वराला भेटायला येतात. त्यांना मागून प्रवेश आहे. ते मागच्या दरवाजाने प्रवेश करतात. ते सभामंडपामधून प्रवेश करू शकत नाही. त्याच्यानंतर वानिवडे गावची श्री.देवी पावणाई देवीच्या दृष्टांताबाबत अनेक दाखले दिले जातात.
विजयदुर्ग किल्ल्यावरील सेनानी धुळप यांच्या पागेतील घोड्यांना 'गोचिड' या पिसवांचा उपद्रव होत होता. धुळपांनी अनेक देवदेवतांना नवससायास केले. हुशार वैद्यांकडून औषधोपचारही केले. मात्र त्याचा काही उपयोग होत नव्हता. घोडे मात्र दिवसेंदिवस या आजाराने खंगत चालले होते. काहीही गुण येत नसल्याचे लक्षात येताच धुळपांनीही हात टेकले.
वानिवडे गावच्या पावणाईची ख्याती धुळपांच्या कानी गेल्यावर धुळपांनी पावणाईला साकडे घातले. त्यावेळी देवीने किल्ल्यावर जाऊन धुळप राजाला सांगितले. आधी सर्व माझ्या देवतेंना सोड तर मी सर्व 'गोचिड व पिसवांपासून मुक्त करेन तुझ्या घोड्यांना देवीने सांगल्याप्रमाणे देवतांच्या च्या बंदिमधून मुक्त केले.
वानिवडे गावच्या श्री. पावणाई देवीने धुळप राजाच्या घोड्यांच्या गोचिड व पिसवांना पाण्यासारखे उतरवले. व हे संकट दूर केले. त्यावेळी धुळप राजांनी देवी पावणाई या देवतेची खणानारळाने ओटी भरली व रयतेसह मोठा उत्सव साजरा केला. धुळप यांनी नवसाची परतफेड म्हणून देवीला एक मशाल व पंचारती भेट दिली या दोन्ही वस्तु मंदिरात आहेत.
कथा - पेज - देवाचा " गड " देवगड.
सिंधुदुर्ग जिल्हा :माहिती व विवेचन
लेखिका: मनीषा भगत
ऊज्वल ऐतिहासिक वारसा लाभलेला आणि अलॊकिक नैसर्गिक लावण्यांनी सजलेला जिल्हा म्हणजेच आपला सिंधुदुर्ग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य कर्तुत्वाची, हिंदवी स्वराज्याची साक्ष देणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्याने ओळखला जाणारा आपला अभेद्य सिंधुदुर्ग. १ मे १९८१ रोजी रत्नागिरी जिल्हाचे विभाजन करून कोकण विभागाचा आर्थिक विकास व्हावा या हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना झाली. पूर्वेला भक्कम अभेद्य अशा पर्वतराजीनी नटलेला आणि पश्चिमेला पसरलेला 1२०कि.मि.चा विस्तीर्ण निळाशार सागर किनारा, देवगड, वैभववाडी ,कणकवली, मालवण, वेंगुर्ला , कुडाळ सावंतवाडी दोडामार्ग, या ८ तालुक्यांनी आणि ७४३ गावांनी वसलेला आपला, सिंधुदुर्ग,कोकणचा मानबिंदू म्हणून ओळखला जाणारा सिंधुदुर्ग किल्ला मालवणच्या विस्तीर्ण अश्या समुद्रात डोलाने उभा आहे. ऐसपैस कौलारू घर, त्यासमोरील अंगणात असलेलं छानस तुळशी वृदावन,, घराभोवती असणारी नारळी पोफळीची झाडं , केळीची बन, अंगणाला शोभा आणणारी विविध फुलझाडे, पक्षाचा कानाला सुखावणारा किलबिलाट, हे कोकणातल्या प्रत्येक गावात दिसणार रेखीव चित्र. आणि देवभोळा असलेला मालवणी माणूस!
दॆव रमतो ते देवळामध्ये. प्रत्येक गावात वसलेल आहे ते गावाच ग्रामदेवतेचे रेखीव मंदिर,दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या त्याच्या मोठमोठ्या जत्रा, आणि त्या जत्रेची आतुरतेने वाट पाहणारी आपण मंडळी,रात्र दशावताराच्या विविध प्रकारच्या मनोरंजनाने गाजवणारी. सिंधुदुर्गला लाभलाय ते डोळ्याच पारणं फेड्णार अलोकिक निसर्गसौंदर्य.
सिंधुदुर्गला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आलय पण आज आपल्यावर वेळ आलीयती आपण आपल्या जिल्ह्यासाठी काय केल? आणि काय करू शकतो? हा विचार करण्याची. एवढ्या वर्षात जिल्ह्यात किती सुधारणा झाल्या त्या योग्य आहेत कि अजून बराच पल्ला आपल्याला गाठायचा आहे याचा सारासार विचार करण्याची.
सिंधुदुर्गतला१८००वर्षापूर्वीचा प्राचीन जलदुर्ग म्हणून जो ओळखला जातो- तसाच बंदर म्हणून जो प्रसिद्ध आहे तो विजयदुर्ग, आज त्याची बरीच दुरवस्था झालीय, कालानुरूप त्याची बरीच पडझड झालीय.
विजयदुर्ग
तीच गत सिंधुदुर्ग किल्याची शिवाजी महाराजांनी आपल्या असामान्य कर्तुत्वाने आणि बुद्धिमत्तेने बांधलेला किल्ला म्हणजे सिंधुदुर्गकिल्ला, किल्ल्यात एक भवानीमातेचं मंदिर ही आहे. शिवाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे येथे आढळतात. किल्ल्याची मजबूत तटबंदी, तेथे असलेल्या तोफा आपल्याला , इतिहासाची आठवण करून देतात. किल्ल्यात ६ते४ घरांचे छोटं गाव वसलंय, शिवाजी महाराजांच्या काळापासून त्यांचे पूर्वज तिथेराहतआलेत, किल्ल्याच्या बुरुजावर गेलं की अरबी समुद्राचे मनोहारी दर्शन होत. तसेच इथे असलेला दोन फांद्याचा माड. माड वृक्षाला एकच फांदी असते. पण इथे असलेला दोन फांद्याचा माड एकमेवच. किल्याला भेट द्यायला लाखो पर्यटक येतात. पण आज किल्याची बरीच पडझडझालीय, हा ऐतिहासिक वारसा जतन नाही करून ठेवला तर इतिहासाच्या कोणत्याच खुणा आपल्याकडे राहणार नाहीत.
isaMQaudUga-
या ऐतिहासिक ठेवी बरोबर सिंधुदुर्ग नटलाय तो स्वच्छ, सुंदर, अशा किनारपट्टीने, वेंगुर्ल्याचा भोगवेबीच, निवती बीच, मालवणचा तारकर्ली, देवबाग, कर्लीखाडी, तेरेखोलची खाडी, रेडीचासमुद्र, शिरोड्याचासमुद्र, सर्व समुद्रकिनारे स्वच्छ आणि नितांतसुंदर, आपल अस्तित्व विसरायला लावणारे जिथे खर्या अर्थाने क्षितीजा पाशी धरती आणि आकाशाच मधोमिलन झाल्यासारखं वाटत. किनार्याच्या सभोवताली पसरलेली सुरुची झाडं, सफेदवाळू, जिथे भान हरपून उसळणारा समुद्र बघत निवांत बसतायेईल. सिंधुदुर्गातल्या प्रत्येक किनारपट्टीचे एक आगळ वैशिष्ट्य आहे. पर्यटन जिल्हा होवूनही गोवा आणि केरळसारखे आपले समुद्रकिनारे विकसीत नाही झाले, तारकर्लीला स्कुबा ड्रायविंगचा प्रकल्प तेवढा चालू झाला आणि निवती बीचवर डॉल्फिनमाशांना बघण्यासाठी आणि स्नोकिंगसाठी पर्यटक गर्दी करतात बस इतकंच, देवगडच कुणकेश्वर हे समुद्रकिनारी वसलेलं एक रम्य ठिकाण, ई .स. ११०० मध्ये यादवांनी बांधलेलं देवगड कोकणच काशी म्हणून प्रसिद्ध आहे.
kuNakoSvar
रेडीचा गणपती हि असाच समुद्रकिनारी विराजमान झालेला.दोन हाताचा हा एकमेव गणपती म्हणून पूर्ण कोकणात प्रसिद्धआहे. त्याची मूर्तीही अवाढव्य, पण जेवढी प्रसिद्धी आणि विकास रत्नागिरीच्या गणपतीपुळेला मिळाली त्याच्या निम्माही विकास याठिकाणाचा झालेला नाही.
roDIcaa gaNaptI
काही राजकारणी लोकांनी जनतेच्या पैशांनी रिसोर्ट, लॊजेस, चालू केली पण ती सामान्य लोकांना परवडणारी नाहीत . एवढ्या समुद्रकिनार्यांनी व्याप्त असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्य उद्योगाला हवे तितके प्रोत्साहन नाही दिलजात, चांगली बंदर उपलब्ध नसल्यामुळे इथल्या माश्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध नाही होवूशकत. त्यामुळेच एवढा पैसा देणारा उद्योग पण वाढीला लागत नाही. शेती बरोबर मत्स्य शेती हा जोड धंदा शेतकर्यांना उपयुक्त ठरू शकतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज हजारो हेक्टर जमिनी मध्ये फक्त भातशेती घेतली जाते जी एकूण जमिनीच्या फक्त १० टक्के होयील, त्यात जर पाऊस वेळेवर नाही झाला तर हे प्रमाण १०टक्क्यावरून ५टक्क्यावर येवून पोचते. भातशेती बरोबर अजूनही बरीचशी पिकं घेणं गरजेचं आहे. शेंगदाणा, मिरची, डाळी या बरोबरच, फुलझाडाचाही प्रयोग राबवतायेयील. आज आमची मानसिकता इतकी बदललीय घरात लागणाऱ्या भाज्या, तांदूळ, मसाला, फळ, सर्व आठवड्याच्या बाजारातून तयार विकत घेवून येतो, पण या सर्वाचे उत्पादन आपण ही घेवू शकतो का ? याचा विचार आपण करतच नाही. फळांमध्येआंबाआणिकाजू यांचे मुबलकप्रमाणात उत्पन्न मिळते पण हा आंबा रत्नागिरीच्या हापूस आंब्याप्रमाणे परदेशात फारसा पोचत नाही. कोकणचे हे मेवे सातासमुद्रापार गेले पण त्यातातील किती टक्का सिंधुदुर्गातूनजातो? आज सिंधुदुर्गात काजूबियापासून काजूगर काढण्याचे कारखाने बरेचआहेत, या काजूला आणि आंब्याला परदेशातून मागणी असली तरी सामान्य शेतकऱ्याला काहीच मिळतनाही. तयार काजूचे तर आजचे दर ५००ते ६०० असताना शेतकऱ्याला फक्त किलोमागे४०ते५०रुपये मिळतात. मग सामान्य शेतकरी सामान्यच राहिला तर त्यात नवल ते काय?धनिक, व्यापारी मात्र आपली तिजोरी वाढण्याचे काम बजावतात.
आज सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात जमीनलागवडी शिवाय पडलेलीआहे, याजमिनीमध्येऔषधीवनस्पती , फळभाज्या मसाल्याचीपिके, बांबूची झाडे अश्या अनेक प्रकारची झाडाची लागवड करतायेईल. फळ बागायती वाढवून त्या फळावर योग्य ती प्रक्रिया करून आपल्याला फळाची बाजारपेठ काबीज करतायेईल. फळापासून बनणारी वेगवेगळ्या प्रकारची मिठाई, अर्क, सरबत, आईस्क्रीम पावडर या प्रकारचे उद्योग वाढीस लागले पाहिजेत पण यासाठी शेतीविषयक अभ्यासक्रम शिकवले गेले पहिजेत.
ओरोस येथील कृषिसंशोधन विद्यापीठ या कमी बराच मोलाचा हातभार लावत आहेत पण या ठिकाणी येणारे विद्यार्थी हे बहुतकरून इतर राज्यातून येणारे जास्त असतात. आपली जास्ती पिक हि रोगाच्या प्रादुर्भावाने वाया जातात.फळपिकांवर ही रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. त्यावर योग्य ती कोणती फवारणी करता येईल याचं शिक्षण मिळणं आवश्यकआहे,
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविधप्रकारचे खनिजसाठे मोठ्या प्रमाणात सापडतात. रेडी येथे लोहखनिजसापडते, कणकवलीत क्रोमाईटचे साठे सापडले आहेत. आंबोलीत बौक्साईट, कुडाळ येथे अभ्रक, काही तालुक्यात रंग निर्माण करणारेगेरू, चुनखडी, शिरगोळादगड, अश्या अनेक प्रकारचे महत्वाचे खनिजघटक सापडतात पण याचा स्थानिक जनतेला किती प्रमाणात उपयोग होतो हे आपणा सर्वाना माहीतच आहे. आज रेडी येथे मोठ्या प्रमाणात रेती उपसा केला जातो अश्याने समुद्राची आणि समुद्रातील संपत्तीची हानीहोते. समुद्रात मिळणाऱ्या अनेक मूल्यवान खनिजसंपत्ती याचा नाश होतो. मत्स्य व्यवसायावर परिणाम होतो. समुद्र संशोधना वर परिणाम होतो. समुद्रसंशोधनात एक मोठ शोधकार्य होवू शकते पण या कामी कोणतीच ठोसपाऊल उचलेली आढळत नाहीत, या सर्वांबरोबर जिल्ह्याचा ओद्योगिक विकास देखील झालेला नाही.काजूबिया पासून काजुगर काढण्याचे कारखाने, आंबे भरण्यासाठी लागणाऱ्या पेट्याचे कारखाने, वेंगुर्ले, मालवण येथे असलेले काथ्या बनवण्याचे आणि त्या काथ्यापासून ब्रश, दोरखंड बनवण्याचे कारखाने एवढेच काय ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचं ओद्योगीकरण, पारंपारिक उद्योगात मोडणारे. रेडी येथे असणारा उषाइस्पात हा बाहेरून आलेला कारखाना पण त्यात किती भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यात आल्या हा भाग अलहिदा.सावंतवाडी येथे असलेली लाकडी रंगीत खेळण्याची बाजारपेठ आज चीनी वस्तुनी काबीज केलीय.
येणार येणार म्हणून वाट पाहायला लावणारी कोकण रेल्वे जिल्ह्यात येवून बराच काळलोटलाय, यासाठी अनेकांनी आपल्या जमिनी गमावल्यात. पण हे सर्व करताना किती स्थानिक लोकांना कोकण रेल्वेत रोजगार मिळाला? स्टेशनबाहेरची जागा बऱ्याच अमराठी लोकांनी पटकावली, त्यावर त्यांनी चहाच्या टपऱ्या, हॉटेल्स बांधली आणि आम्ही त्याच्या हॉटेलमध्ये बसून हवापाण्यावर आणि गावच्या उठाठेवी वर गप्पा मारत बसलो .
आज जिल्ह्यात सगळीकडे वीज आली, पाणी आलं पण बऱ्याचर ठिकाणी आज हि पोहचलेली नाही,
फक्त मुख्य रस्त्यावर असलेली सोय छोट्याछोट्या गावापर्यंत पोहचली पाहिजे, कणकवलीत घनसोरी येथील धरणा अंतर्गत चालू करण्यात येणारा वीजप्रकल्प या कामी फार मोठा हातभार लावेल अशी आशा करण्यास हरकत नाही. दळणवळणाची साधनही म्हणावी तशी वाढली नाहीत, ठराविक वेळेने येणारी एस .टी आज ही दळणवळणाचे एकमेव साधन.बऱ्याच जणांनी आता स्वतःची वाहन घेवून ती भाड्याने लावलेली आहेत. लांबचा पल्ला गाठायचा असेल तर आपली बरीच धावपळ होते.दळणवळणाची साधनं वाढली पाहिजेत. समुद्रमार्गे हि दळणवळणाची चांगली सोय होवू शकते .पण त्यासाठी चांगल्या बंदराची सोय व्हायला हवी .तसेच वेंगुर्ला येथे येवू घातलेला विमानतळ वाहतुकीत मोलाची कामगिरी बजावेल अशी आशा ठेवायला हरकत नाही पण याचा सर्वसामान्य जनतेला किती फायदा होईल याचा हि विचार व्हायला हवा.
जशी स्थिती दळणवळणाची तशी स्थिती वैदयकीय सुविधांची, सर्व सुविधांनी उपयुक्त अस एकही सुसज्ज हॉस्पिटल नाही .जास्तीच्या वैद्यकीय सोयीसाठी मग गोव्याची वाट धरावीलागते.पावसाळ्यात पसरणारे साथीचे रोग, डासांचा प्रादुर्भाव यावर हि जिल्हापरिषद काही ठोस उपाययोजना करताना दिसत नाहीत .जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर त्याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या गावापासून करायला हवी. प्रत्येक घरात शौचालय बांधली गेली पाहिजेत. प्रत्येक गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आल पाहिजे. गाव स्वच्छ राहिल तर प्रत्येक व्यक्ती निरोगी राहील.
डॉ.रामकृष्ण भांडारकर, ब्यारीस्टर .नाथ पै, मंगेश पाडगावकर यासारखी प्रथितयश मंडळी सिंधुदुर्गात झाली, त्यांचा ज्ञानाचा वारसा आपण पुढे चालवला पाहिजे, जेणेकरून आपल्या जिल्ह्याच नाव जगाच्या कानाकोपर्यात पोहोचेल. शाळेतून मिळणारे शिक्षण पुरेस नाही. शाळेच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त बाकीच रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणार शिक्षण हि मुलांना द्यायला पहिजे.
जिल्ह्याच्या या न होणाऱ्या विकासाला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत, जबाबदारआहे ती आपली मानसिकता, अजूनही आपण जुन्या रूढी-परंपरात अडकून पडलोय. आजही गावच्या वेशीवर नाहीतर लांब जंगलात महारवाडा आढळतो. आजही जातीभेद, वर्णभेदयांचा पगडा आमच्यावर पडलेला आहे.बाराबलुतेदारीची पकड अजूनही सैल झालेली नाही, आज हि अनुसूचित जाती जमातींना तुच्छतेने वागवले जाते, लग्न करताना जात, कुळ, यांना अवास्तव महत्त्व दिल जाते.आज हि काही जातींना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. विहिरीवर पाणी भरण्यास मज्जाव केला जातो.हे सर्व बदलायला हवं.
जिल्ह्यात बरेच बदल होणे आवश्यक आहेत. मुलाचं शिक्षण झाले तरी त्यांना नोकरी मिळेल याची हमी नसते, मग आपोआप पाय वळतात ते मुंबईकडे किवा इतर राज्यात, आपल्या गावात राहून आपल्या गावचा विकास करावयाचा विचारच कुणी करतनाही, पाणी अडवा पाणी जिरवा या अंतर्गत शेती केल्यास आपणही श्रीमंत होवू शकतो पण आजच्या पिढीला शेती करण्यात रस नाही, नवीननवीन तंत्रज्ञान वापरून शेतीत नवीन प्रयोग करता येतील, जंगलतोड थांबवून जंगलाची वाढ कशी करता येईल या दृष्टीने पावलं उचलायला हवीत .
जिल्ह्याचा सर्वागीण विकास करताना निसर्गातील सौंदर्याला जराही धक्का न लागता सौंदर्य अबाधित राखून परिसरात बदल घडवून आणायचा आहे. चांगल शिक्षण सर्वाना उपलब्ध करून नंतर त्यानुसार रोजगारही उपलब्ध करून द्यायचेत. जास्तीतजास्त पर्यटक सिंधुदुर्गात कसे येतील या दृष्टीने पावलं उचलायलाहवीत. पर्यटकांना जास्तीत जास्त सोयी उपलब्ध करून द्यायला हव्यात. बऱ्याचवेळेला चाकरमानी मुंबईहून गावाकडे आले कि गावच्या विकासाच्या गप्पा रंगतात पण ते परत पुढच्या वेळेला गावात परत येईपर्यंत तो विकास चावडीवरच राहतो. पुन्हा त्याच गप्पापुढे चालू राहतात.
दशावताराच्या माध्यमातून लोकांना चांगल शिक्षण देता येईल.सिंधुदुर्गातली लोककलांना जास्तीतजास्त प्रोत्साहन देऊन त्याचा वारसा पुढे चालू ठेवायला हव.ऐतिहासिक वास्तुचे जतन करून ठेवायला पहिजे.त्याने आपल्या सिंधुदुर्गाची वेगळीओळख निर्माण झालीय. सिंधुदुर्ग कसा असावा असं जर मला विचारल तर मी म्हणेन माझा सिंधुदुर्ग आहे तसाच सुंदर राहावा, त्याच अलॊकिक सौंदर्य तसंच अबाधित राहावं, सगळीकडे असणारी हिरव्या वनराईन आपल्या डोळ्याच पारणं फेडावं. देवानेमुक्तपणे आपल्यावर केलेली निसर्गाची उधळण आपण त्याची निगा राखून, त्यात अजून भर घालून तशीच वाढवावी.अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञानात झालेल्या प्रगतीचा उपयोग आपल्या व्यैयतिक, गावच्या विकासासाठी जेणेकरून जिल्ह्याच्या विकासासाठी कसा करता येईल यासाठी प्रयत्नशील राहावं. मुलांच्या कलागुणांना वाव देवून त्यांचे भविष्य उज्ज्वल करायला हव, शेतीत नवीन तंत्रज्ञान वापरून फक्त भातशेतीवर भर न देता अजून कोणकोणती पिक घेवून शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न कस घेता येयील यावर गावागावातून कार्यशाळा घेतल्या जाव्यात.
गावातील मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, जेणेकरून त्यांचा आर्थिक विकास होईल. पावसाच्या पाण्याच योग्य ते नियोजन करून ते जास्तीत जास्त उपयोगात कस आणता येईल यासाठी प्रयत्न व्हावेत. गावागावात वीज पोहोचावी, गावाचा विकास व्हावा पण प्रदूषणरहित. नद्या, समुद्राचा खळखळता आवाज, पक्ष्याची किलबिल, वासराच हंबरण, पहिल्या पावसात आसमंतात भरून राहिलेला मातीचा सुवास, डोंगरदर्यातून खळखळणारेधबधबे, नजर पोहचेल तिथे आढळणारी हिरवळ,जिथे नजर जाईल तिथे दिसणारं चांदण्यांनी भरलेल आकाश, शेणाने सारवलेल्या जमिनी, विविध फुलांनी बहरलेलं आंगण , आंबा, फणस त्याच बरोबर रानमेव्यानी भरलेली जंगल, जंगलात आढळणारे वन्यप्राणी, हिरव्यागार पिकांनी डोलणार शेत, धुक्यात न्हालेली सकाळ, फणसासारखी वरून काटेरी पण आतून प्रेमळ असणारी माणसं, घराघरात साजरे होणारे गणपती उत्सव, हे कधीच बदलू नये. माझं कोकण सदॆव देवाने दिलेल्या निसर्गाच्या देणगीने संपन्न राहावे.
गाव हे गावच राहावे त्याच शहरीकरण होऊ नये
- सिंधुदुर्ग किल्ला – Sindhudurg Fort
ज्या प्राचीन ऐतिहासीक किल्ल्यामुळे या शहराला सिंधुदुर्ग असे नाव पडले असा सिंधुदुर्ग किल्ला अरबी समुद्रात आजही भक्कम पणे उभा असलेला आपल्याला पहायला मिळतो
हा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुरदृष्टीची साक्ष पटवणारा आहे,
समुद्रमार्गे येणाया शत्रुवर नजर ठेवण्याकरता आणि समुद्र मार्गांची सुरक्षा करण्याकरता महाराजांनी या किल्ल्याची निर्मीती केली
हा किल्ला बांधण्याकरता साधारण 3 वर्षांचा कालावधी लागला 25 नोव्हेंबर 1664 ला मुहूर्तमेढ रोवली गेली आणि 3 वर्षांत हा किल्ला पुर्ण झाला.
या किल्ल्यावर गोडया पाण्याच्या 3 विहीरी पहायला मिळतात (दुधबाव, दहिबाव, आणि साखरबाव अशी या विहीरींची नावे) किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि किल्ल्यात गोड पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच म्हणायला हवा.
किल्ल्याचे निरीक्षण करतांना हा किल्ला आणि त्यावरील बांधकाम किती विचारपुर्वक केले असावे याची साक्ष पटते
ठिकठिकाणी तोफांसाठी नियोजीत जागा, दुरवर अवलोकन करण्याकरता खिडक्या, कपारी, सैनिकांच्या सुरक्षेकरता करण्यात आलेल्या उपाययोजना, समुद्रापर्यंत घेउन जाणारा भुयारी मार्ग हे पाहुन स्तिमीत व्हायला होतं.
किल्ला बांधण्याकरता ज्या मच्छिमारांनी ही जागा शोधली त्यांना गावे ईनाम म्हणुन देण्यात आली.
या किल्ल्यावर एकमेव असे शिवाजी महाराजांचे मंदिर स्थापीत करण्यात आले आहे राजाराम महाराजांनी या मंदिराची स्थापना केली होती.
महाराजांजवळ एकुण 362 किल्ले होते डोंगरी आणि भुईकोट किल्ल्यांच्या बरोबरीने शत्रुची स्वारी परतवुन लावण्याकरता जलदुर्गांची निर्मीती देखील आवश्यक असल्याचे महाराजांनी हेरले आणि कितीतरी जलदुर्गांची निर्मीती त्यांच्या काळात त्यांनी समर्थपणे केली.
आजची युवा पिढी जेव्हां या किल्ल्यांचे अवलोकन करते तेव्हां त्याकाळातील वास्तुनिर्मीती, स्थापत्यकला, दुरदृष्टीकोन पाहुन अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहातात.
या ठिकाणी राहाण्याची सोय गणपतीपुळे आणि तारकर्ली येथे होउ शकते त्या ठिकाणी डज्क्ब् ने राहाण्याकरता निवासाची सोय केली आहे.
- देवगड येथील कुणकेश्वर मंदिर – Kunkeshwar Mandir
शुभ्र वाळुचा समुद्र किनारा अनुभवायचा असेल तर कुणकेश्वर ला यायलाच हवे.
फार प्राचीन असे महादेवाचे मंदिर या ठिकाणी असुन या स्थळाला दक्षिण कोकणाची काशी म्हणुनही फार प्रसिध्दी मिळाली आहे.
येथील शुभ्र किनायावर पाण्यात खेळण्याचा आणि अंघोळ करण्याचा मनमुराद आनंद लुटता येतो
येथील समुद्रात असलेल्या डाॅल्फीनचं देखील दर्शन घडण्याची शक्यता जास्त आहे.
येथील समुद्र किनायाची एक संपुर्ण बाजु नारळाच्या आणि आंब्यांच्या झाडांनी वेढलेली असल्याने निसर्गाचं दान या ठिकाणाला भरभरून मिळाल्याचे पदोपदी जाणवते.
येथील स्वच्छ किनारा आणि शुभ्र वाळु नजरेत भरते.
मुंबईपासुन 468 तर पुण्यापासुन कुणकेश्वर हे अंतर 368 कि.मी. असुन राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ने येथे सहज पोहोचता येते.
कोल्हापुर पासुन हे अंतर कमी आहे.
- विजयदुर्ग – Vijaydurg Fort
देवगड येथील विजयदुर्ग हा किल्ला जिल्हयाच्या किनारी असलेला सर्वात पुरातन असा किल्ला असुन 1205 साली शिलाहार घराण्याचे राजा भोज यांनी तो बांधलाय.
पुढे विजापुरच्या आदिलशहाकडुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 साली तो जिंकला आणि त्याचे नाव विजयदुर्ग असे ठेवले.
1653 ते साधारण 1818 या किल्ल्यावर मराठयांची सत्ता होती पुढे हा किल्ल्यावर इंग्रजांनी ताबा मिळवला.
अजिंक्य अश्या या किल्ल्याला जिब्राल्टर असे देखील म्हंटले जायचे.
17 एकर असा विस्तिर्ण परिसर या किल्ल्याने व्यापला आहे.
किल्ल्याच्या तीनही बाजुने विस्तीर्ण असा समुद्र पसरलेला आहे.
या किल्ल्यात आपल्याला दोन भुयारी मार्ग दिसुन येतात किल्ल्याच्या पुर्वेकडे एक आणि पश्चिमेकडे दुसरा भुयारी मार्ग आहे.
महाराष्ट्र राज्यातील संरक्षीत स्मारक म्हणुन 13 डिसेंबर 1916 रोजी हा किल्ला घोषीत करण्यात आला आहे.
विजयदुर्ग पहायचा असल्यास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथुन जाणे सोयीचे होईल. किल्ला पाहाण्याकरता सागरी महामार्गाची सफर सोयीची आणि आल्हाददायक ठरू शकते.
- तारकर्ली समुद्रकिनारा – Tarkarli Beach
तुम्हाला स्कुबा डायव्हिंगचा आनंद घ्यायचाय का? जर उत्तर हो असेल तर चला तारकर्लीला!
सिंधुदुर्ग ते तारकर्ली समुद्र किना.यापर्यंत साधारण दिड तास लागेल पण येथे आल्यानंतर स्वच्छ पारदर्शक समुद्रकिनारा पाहुन तुम्ही आनंदीत व्हाल.
हा समुद्र किनारा अरूंद किनारपट्टी असुन अरबी समुद्र आणि कर्ली नदी या संगमावर स्थित आहे.
नितांत पारदर्शक आणि स्वच्छ पाणी त्यामुळे हा समुद्र किनारा पर्यटकांमधे फार लोकप्रीय आहे.
तारकर्लीच्या किना.यावर आपण स्नोर्केलींग शिवाय स्कुबा डायव्हींगचा अविस्मरणीय असा अनुभव आपण घेउ शकतो.
येथील मालवणी पदार्थांची चव कायम तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील अशीच.
येथे पोहोचण्याकरता जवळचे बसस्थानक मालवण चे आहे.
आंबोली हिल स्टेशन – Amboli Hill Station
कोकणातले महाबळेश्वर म्हणुन प्रसिध्दी पावलेले हे ठिकाण महाराष्ट्रातील चेरापूंजी म्हणुन देखील ओळख मिळवुन आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयातले हे पर्यटनस्थळ सावंतवाडी या गावापासुन सुमारे 30 कि.मी. अंतरावर वसलेले आहे.
येथील निसर्ग आणि चांगले हवामान यामुळे हे ठिकाण पर्यटकांना खुप आकर्षीत करते.
विस्तीर्ण पसरलेले दाट जंगल, मनाला हवेहवेसे वाटणारे सृष्टीसौंदर्य आणि खोल घाट डोंगरद.या, कोसळणारे धबधबे आणि 12 ही महिने येथील थंड हवामान ही या ठिकाणाची वैशिष्टय आपल्याला अधोरेखीत करता येतील.
जवळच सावंतवाडी येथील राजांचा राजवाडा देखील आहे शिवाय देवीचे मंदिर देखील पहावे असेच.
मनोहरगड, महादेवगड नागरतास धबधबा डोळयाचे पारणे फेडतात, आंबोलीच्या घनदाट जंगलात अनेक वन्यप्राणी मुक्त संचार करतांना दिसतात.
मला आठवतं लहान असताना आम्ही कुडाळला होतो तेव्हां विहीरीकडे उभे राहून गोव्याच्या रंगीत गाड्या बघायचो. त्यातून फिरणारी माणसं वेगळीच वाटायची. आम्ही फक्त वर्षातून एकदा यस्टीच्या डब्यातून मामाकडे आणि गावाला जायचो. आता काळ बदलला. फिरणारी माणसे ऐवजी पर्यटन आणि पर्यटक हा प्रकार आला. खुप लांब देशात फिरण्यापेक्षा आपल्या सभोवती सिंधुदुर्ग जिल्ह्या मध्येच अनेक स्थळं अशी पाहण्यासारखी आहेत, की ती पाहायला आता लांबून लोक येतात. कोकण रेल्वे, प्रायव्हेट गाड्या यामुळे पर्यटकांचा ओघ वाढतच आहे. काही सुविधा अजून व्हायच्या आहेत.
सुरवात कणकवलीपासूनच. कारण जिल्ह्याच्या मध्यवर्ती शहरातच रेल्वे स्थानक, हॉटेल्स व एसटी स्टँड यासगळ्यामुळे बहूतांश पर्यटक कणकवलीपासुनच फिरायला सुरवात करतात.
![]() कणकवली – भालचंद्र महाराज :सत्पुरूषांच्या या पुण्य कोकण भूमित भालचंद्र महाराज हे एक प्रसिध्द योगी पुरुष होऊन गेले. भालचंद्र महाराजांचे जगात अनेक भक्त गण आहेत. कणकवली श हरात त्यांची समाधी आहे. त्या समाधी स्थळावर सुंदर मठाची स्थापना करण्यात आली आहे. भालचंद्र महाराजांचे सर्व भक्तगण दरवर्षी महाराजांच्या जन्मादिवशी महाराजांच्या कणकवलीतील मठात येतात. अतिशय धीर गंभीर आणि प्रसन्नतेने भालचंद्र महाराजांचे मठ भरुन राहिल्याने येथे येणारा भक्तगण आनंदीमनाने तृप्त होतो. मठामधे भालचंद्र महारांजानी जेथे समाधी घेतली ते स्थान अतिशय पवित्र आहे. इथे आल्यावर मन:शांती लाभते. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() गोपुरी आश्रम, कणकवली :कोकणगांधी सिताराम पुरुषोत्तम तथा आप्पासाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेला गोपुरी आश्रम कणकवलीत वागदे येथे गडनदीच्या तिरावर आहे. त्यांनी गोपुरीत कृषी क्षेत्रातून रोजगार कला उपब्ध करता येईल हे कृतितून सिध्द करुन दाखविले आहे. त्यांचा आदर्श जपणार्या त्यांच्या अनुयायांनी शेती, फळप्रक्रिया उद्योगात आता भरीव कामगिरी केली आहे. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() भिरवडेंचे रामेश्वर देवालय:येथील रामेश्वर मंदिर डोंगराच्या कुशीत आहे. देवालयाबरोबरच येथील निसर्गसौंदर्यही भाविकांच्या भक्तीमय आनंदात अमोल ठेवा निर्माण होतो. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() घोणसरीचा शिवगड किल्ला :निसर्गरम्य आणि हिरव्यागार परिसराच्या सान्निध्यात हा ऐतिहासिक साक्ष देणारा किल्ला पर्यटकांना कायम खुणावतो. तेथे भवानी मातेचे देवालय आहे. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() वैभववाडी :नावातच वैभव असणार्या नैसर्गिक ओतप्रोत भरलेली वैभववाडीतील पर्यटन स्थळे | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() नापणेचा धबधबा :या धबधब्याचा उगम नाधवडे या गावी झाला आहे. तळेरेपासून १६ कि.मी. वर काहीसा आडबाजूला हा धबधबा आहे. हा धबधबा बारमाही कोसळत असतो. पाण्यामध्ये गंधकाचा अंश असल्याने येथील पाण्याने स्नान केल्यास त्वचाविकार बरे होतात असे आरोग्यतज्ञांचे मत आहे. त्यामुळे पर्यटकांसोबत त्वचा विकाराने ग्रासलेले लोक येथे भेट देत असतात. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() ऐनारी डोंगरातील लेणी :वैभववाडी तालुक्यातील ऐनारी गावात डोंगरामध्ये प्राचिन गुंफा असून त्यामध्ये कोरीव लेणी आहेत. सुमारे १५० वर्षांपूर्वी या गुंफेचा शोध लागला. गुंफा अद्याप दुर्लक्षित असून आत काळोख असल्याने बॅटरी घेऊनच आत जावे लागते. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() देवगड :देवगड हापूस आंब्याबरोबरच येथील पर्यटन स्थळे ही पर्यटकांना मनतृप्त आनंद देतात. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() देवगड किल्ला :देवगडचा किल्ला हापूस आंब्याइतकाच प्रसिध्द आहे. त्याची ख्याती पर्यटकाला निश्चित आकर्षित करते. | येथील किनारा व हापूस आंब्याची ही रोचकता औरच आहे. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती एक मे १९८१ रोजी झाली. सिंधुदुर्ग
परिसराचा पौराणिक कथांत आणि इतिहासात उल्लेख आढळतो. रामायण व
महाभारतामध्येही या भागाचा उल्लेख आहे. नेरूर येथे सापडलेल्या शिलालेखावरून
हा भाग चालुक्य राजवटीखाली होता असे दिसून येते. येथे शिवाजी महाराजांनी
सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यानंतर या भागाला खूप महत्त्व आले. शिवाजी
महाराजांनी कोकण किनारपट्टीवर उरणपासून सिंधुदुर्गापर्यंत सागरी
किल्ल्यांची शृंखला निर्माण केली. त्यामुळे ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच
यांना पश्चिमेकडून अरबी समुद्रातून लष्कर भारतात घुसवता आले नाही. शिवाजी
महाराजांचे नौदलप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे, त्यांचे वंशज आणि सरदार
धुळुप यांनी अरबी समुद्रावर जणू अधिराज्यच केले. त्यामुळे ब्रिटिश व फ्रेंच
पूर्वेकडून भारतात घुसले. आंबा, फणस, कोकम, नारळ, काजू, मासे व पर्यटन ही
येथील उत्पन्नाचे साधने. हा जिल्हा बॉक्साइट, मँगनीज या खनिजांनी समृद्ध
आहे. देवगडमधील हापूस आंबे निर्यात होतात.
सिंधुदुर्गाकडून उत्तरेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीपर्यंत हापूस आंबे
पिकवले जातात. या संपूर्ण कोकणातील हापूस आंब्यांना आता भौगोलिक निर्देशन
मिळाले आहे. कारण येथील भौगोलिक परिस्थिती, हवामान आणि पारंपरिक उत्पादन
पद्धती या सगळ्यामुळे येथील आंब्यांना वैशिष्ट्यपूर्ण चव आहे. ![]() सिंधुदुर्ग किल्ला : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रथम स्थान म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला होय. परकीय आक्रमणापासून समुद्रमार्गे असणारा धोका लक्षात घेऊन कोकणात कुलाब्यापासून गोव्यापर्यंत महाराजांनी अनेक किल्ले बांधले. त्यातील सिंधुदुर्ग हा खूप महत्त्वाचा समजाला जातो. २५ नोव्हेंबर १६६४ रोजी मालवणजवळील कुरटे नावाच्या बेटावर त्यांनी बांधकामाला सुरुवात केली आणि तीन वर्षांत हा किल्ला बांधून पूर्ण झाला. किल्ल्याच्या कामावर १०० पोर्तुगीज, ५०० गवंडी, २०० लोहार व तीन हजार कामगार काम करीत होते. या किल्ल्याच्या पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून, या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले. किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले असे सांगितले जाते. नेर्न नावाचा एक ब्रिटिश व्यापारी या वेळी मालवण येथे आला होता. त्याने कसले काम चालू आहे याची खूप चौकशी करायचा प्रयत्न केला; पण त्याला थांगपत्ता लागला नाही. ४८ एकर क्षेत्रावर बांधलेल्या या किल्ल्याला तीन किलोमीटर लांबीची तटबंदी असून, माथा १२ फूट रुंद आहे. तटबंदीची
साधारण उंची ३० ते ५० फूट आहे. चार मच्छिमारांनी सिंधुदुर्ग किल्ला
बांधण्यासाठी योग्य जागा शोधून काढली. त्यांना गावे इनाम देण्यात आली. आता
किल्ल्यावरील बांधकामे नष्ट झाली आहेत. तटबंदीला लागून पहारेकऱ्यांच्या
खोल्या आहेत. तसेच स्वच्छतागृहेही आहेत. किल्ल्यात राजाराम महाराजांनी
बांधलेले श्रीशिवराजेश्वर मंदिर असून, आणखी एक जरीमरीचेही मंदिर आहे.
महाराजांच्या मूर्तीचे (या मूर्तीला दाढी नाही) दर्शन फक्त सकाळी सात वाजता
पूजेच्या वेळी होते. किल्ल्याच्या मागील बाजूस एक छोटे खिडकीवजा द्वार
आहे. येथून राजस्त्रियांसाठी समुद्रस्नानाची व्यवस्था होती. या ठिकाणाला
‘राणीची वेळा’ म्हणतात. किल्ल्यावर पूर्वी दोन फांद्या असलेले नारळाचे झाड
होते. मध्यंतरी वीज पडून ते नष्ट झाले. नारळाच्या झाडाला कधीही फांद्या
फुटत नसल्याने ते आश्चर्य होते. भुईकोट आणि
डोंगरी किल्ल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतून
लावण्यासाठी जलदुर्गांची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून
शिवाजीमहाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित
स्थळांचा शोध घेऊन त्यांनी समुद्रकिनाऱ्यांची पाहणी केली. आता
किल्ल्याच्या दक्षिण बाजूला स्कूबा डायव्हिंगची सुविधा आहे. त्यामुळे
सागरतळाचे सौंदर्य पाहणे शक्य झाले आहे. (सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) ![]() मालवण : मालवण नावाची व्युत्पत्ती अनेक प्रकारे सांगितली जाते. काहींच्या मते माडवनपासून मालवण, तर काहींच्या मते ‘मा’ म्हणजे आगर व लवण म्हणजे मीठ व त्यापासून मालवण. शिवाजी महाराजांनी १६५८मध्ये मालवण घेतले व नंतर जवळ सिंधुदुर्ग किल्ला बांधला. मालवण हे एक सांस्कृतिक गाव आहे. येथे नाटके, साहित्य संमेलने भरविली जातात. मालवण हे पर्यटकांचे किनारपट्टीवरील आवडते ठिकाण. मालवणी भाषा, सोलकढी आणि मासे खूप प्रसिद्ध आहेत. मालवणमध्ये मोठा मत्स्यबाजार भरतो. तेथे पाच ते सहा फूट लांबीचे मासेही विक्रीस येतात. मालवण हे पर्यटकांसाठी खवय्यांचे गाव समजले जाते. मालवणचे रॉक गार्डन आणि ज्योतिषविशारद ‘कालनिर्णय’कार जयंत साळगावकर यांनी बांधलेले गणपती मंदिर खूपच बघण्यासारखे आहे. ![]() तारकर्ली : मालवणपासून सात किलोमीटरवर तारकर्लीचा किनारा आहे. येथे ‘एमटीडीसी’चे रिसॉर्ट आहे. अनेक हॉटेल्स, दुकाने यांनी हे ठिकाण गजबजलेले आहे. लांबच लांब स्वच्छ समुद्रकिनारा पाहून मन आनंदित होते. येथे वॉटर स्पोर्टस् उपलब्ध आहे. स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, पॅडलबोट, बोटस्कूटर, पॅरासेलिंग असे विविध प्रकार येथे उपलब्ध आहेत. ‘एमटीडीसी’ने तर येथे रात्रीच्या मुक्कामासाठी चक्क आरामदायी हाउसबोट उपलब्ध करून दिल्या आहेत. ![]() देवबाग : मालवणपासून १० किलोमीटरवर हा अतिशय सुंदर, स्वच्छ असा समुद्रकिनारा आहे. येथे अनेक घरांतून पर्यटकांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था केली जाते. डॉल्फिनचे दर्शन येथे हमखास होते. येथून वालावलपर्यंत बोटीची सैर घडविली जाते. तोंडवळी : मालवणच्या उत्तरेला १९ किलोमीटरवर हा मऊ, शुभ्र वाळूचा एक सुंदर समुद्रकिनारा आहे. मालवण-आचरा रस्त्यावर हे गाव आहे. तोंडवळी हे गाव देव व्याघ्रेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. येथे एक गुंफा आहे. १० ते १२ पायऱ्या चढून गेले, की समोर आयताकृती उभी कोरलेली चौकट दिसते. आतील बाजूला गुंफा आहे. तोंडवळी किनाऱ्यावर फारशी वर्दळ नसते. येथे मंद सागरी हवा सतत वाहत असते. त्यामुळे वातावरण खूप छान असते. ![]() आंगणेवाडी : मालवणपासून १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मसुरे या गावातील बारा वाड्यांपैकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे; पण श्री भराडीदेवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी हे एक गावच असल्याचा समज सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. श्री भराडीदेवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्त्व प्राप्त झालेले आहे. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी अप्पांनाही मोहिमेमध्ये भराडीदेवीचा कृपाशीर्वाद लाभल्यामुळे त्यांनी २२ एकर जमीन या मंदिराला दान दिली होती. जत्रोत्सवाला तर भाविकांचा पूरच येतो. या देवीचा जत्रोत्सव साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होतो. ![]() कुणकेश्वर : हे मंदिर साधारण ११व्या शतकात यादव राजांनी बांधले असावे. याबाबत आणखी एक कथा प्रचलित आहे. ती म्हणजे, एक परदेशी व्यापारी (बहुधा अरब देशातील) त्याचे जहाज भरकटल्याने या बाजूला आला. त्याला रात्रीच्या अंधारात दिव्याचा उजेड दिसला. त्याला देव भेटल्यासारखे वाटले व त्याने प्रार्थना केली, ‘मला वाचविलेस तर मी तुझे मंदिर बांधेन.’ त्या दिशेने तो वादळ शमल्यावर आला. त्याला येथे शिवमंदिर दिसले. त्याने तेथेच सुंदर मंदिर बांधले; पण मूर्तिपूजा हे त्याच्या धर्माविरुद्ध असल्याने लोक आपल्याला ठार मारतील या कल्पनेने मंदिराच्या शिखरावरून उडी मारून त्याने आत्महत्या केली असे सांगितले जाते. त्याची येथे कबरही आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांनी अमात्य बावडेकरांमार्फत केल्याचे दाखले मिळतात. मंदिराची रचना थोडी दाक्षिणात्य पद्धतीची आहे. मंदिराला समुद्राच्या बाजूला संरक्षक भिंत आहे. मंदिराच्या आवारात गणपती, जोगेश्वरी, भैरव, नारायण, मंडलिक इत्यादी मंदिरे आहेत. हे मंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. (कुणकेश्वर मंदिराविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) चांदेलवाडी :
कुणकेश्वरजवळ चांदेलवाडी येथे एक गुंफा असून, यामध्ये नऊ पुरुष व महिलांचे
दगडी मुखवटे सापडले आहेत. स्त्रियांच्या कानात रिंग व कपाळावर बिंदी, तर
पुरुषाचे केस बांधलेले आहेत ![]() विजयदुर्ग : हा किल्ला शिलाहार घराण्यातील राजा भोज याने सन ११९५ ते १२०० या कालावधीत बांधला. भोज राजाने कोकणात १६ किल्ले बांधले होते. त्या वेळी हा किल्ला ‘घेरिया’ या नावाने ओळखला जात होता. कालांतराने हा किल्ला यादवांनी ताब्यात घेतला. नंतर तो विजयनगरच्या राजाच्या ताब्यात गेला. त्यानंतर बहामनी सुलतानाच्या ताब्यात गेला. सन १४९० ते १५२६ या काळात बहामनी राज्याच्या विघटनानंतर हा किल्ला विजापूरकरांकडे आला. तो १२५ वर्षे त्यांच्या अमलाखाली होता. सन १६५३ साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्यात अनेक सुधारणा केल्या. शिवाजी महाराजांनी याला विजयदुर्ग असे नाव दिले. किल्ल्याचे क्षेत्रफळ १७ एकर १९ गुंठे असून, त्रिस्तरीय तटबंदी आहे. किल्ल्याला २० बुरुज असून, घोड्यांच्या पागाही आहेत. विजयदुर्गावर
१८ ऑगस्ट १८६८ रोजी फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ पेरी जोन्सन याने हेलियम वायूचा
शोध लावला. त्या दिवशी कोकण किनाऱ्यावर विजयदुर्ग येथे खग्रास ग्रहण होते,
हे लक्षात घेऊन पेरी जोन्सन तेथे गेले. ग्रहण निरीक्षणाच्या वेळी त्यांना
सूर्याभोवती एका नवीन वायूचा शोध लागला, तोच हेलियम वायू. जेथे साहेबाने
दुर्बीण लावली होती, त्या जागेला ‘साहेबाची सीट’ म्हणून संबोधले जाते.
विजयदुर्ग हा मालवणजवळचाच एक देखणा जलदुर्ग आहे. जवळच सरखेल धुळूपांच्या
घरात त्यांच्या वापरलेल्या तलवारी बघण्यासारख्या आहेत. तसेच शिसम व
हस्तिदंत यांचा वापर करून तयार केलेला सुंदर देव्हारा आहे. धुळुपांनी २५०
वर्षांपूर्वीची काही चित्रेही जतन करून ठेवली आहेत. किल्ल्याला तीन बाजूंनी
समुद्र आहे. जमिनीच्या बाजूला पूर्वी खंदक होता. तो आता बुजला आहे.
समुद्राकडून हा किल्ला फारच छान दिसतो. सिंधुदुर्ग भेटीत कुणकेश्वर,
देवगडमार्गे येथे येता येते किंवा राजापूरमार्गेही जाता येते. (विजयदुर्ग किल्ल्याबद्दलचा सविस्तर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) ![]() देवगड : हे स्थळ हापूस आंब्यासाठी जगात प्रसिद्ध आहे. आंबा भारतात पुरातन काळापासून आहे; पण अफोन्सो दी अल्बुकर्क या पोर्तुगीज दर्यावर्दीने ही जात भारतात आणली. अल्फान्सो या नावाचा हापूस हा अपभ्रंश आहे. देवगडचे माजी आमदार दिवंगत गोगटे यांनी या आंब्याच्या कलमांचा प्रसार केला व त्याचे व्यापारी महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले. देवगड हे बंदर आहे. तसेच येथे किल्लाही आहे. त्याची तटबंदी बऱ्यापैकी दिसून येते. किल्ल्यातील इमारती नष्ट झाल्या आहेत. येथील डोंगरावर पवन ऊर्जा प्रकल्प साकारला आहे. वाडा :
देवगडहून विजयदुर्गाकडे जाताना खाडी ओलांडली की वाडा गाव लागते. येथे
निसर्गरम्य परिसरात विमलेश्वराचे मंदिर आहे. येथे काही वीरगळ (योद्ध्यांची
स्मारके) आहेत. तसेच कालभैरव गुंफा आहे. येथे गणपतीची सुरेख मूर्ती आहे.
तसेच मुख्य द्वाराच्या बाजूसच मोठी हत्तीशिल्पे आहेत. पावसाळ्यात येथील
झऱ्यात गरम पाणी वाहू लागते. नेने नावाच्या सत्पुरुषाची येथे समाधी आहे. ![]() गिर्ये : वाघोटण नदीच्या खाडीमध्ये डोंगराच्या पायथ्याशी सरखेल कान्होजी आंग्रे यांनी गोदी बांधली आहे. गोदी अर्धवर्तुळाकार असून, ३५५ फूट लांब व २२७ फूट रुंद आहे. सरदार धुळूप यांनी त्यांच्या कारकिर्दीत या गोदीचा विस्तार केला. येथे रामेश्वराचे कोकणी पद्धतीचे मंदिरही आहे. भगवंतगड : अमात्य
बावडेकरांनी सन १७०१मध्ये छत्रपती राजरा महाराजांच्या आज्ञेवरून वायंगणी
गावाजवळ हा किल्ला बांधला. येथे पायवाटेनेच जावे लागते. भरतगड : सन
१६८०मध्ये मसुरे गावाजवळ सावंतवाडीचे राजे फोंड सावंत यांनी हा किल्ला
बांधला. येथे बुरुजाचे अवशेष व काही तोफाही दिसून येतात. आचरा, मालवण,
विजयदुर्ग मार्गावर वायंगणीच्या पुढे हा गड असून, येथे सुमारे ४००
वर्षांपूर्वीचे रामेश्वर मंदिर आहे. कोकणी पद्धतीचे हे मंदिर असून, विविध
देवतांची शिल्पे आहेत. येथे शके ५८४मधील एक शिलालेखही आहे. या मंदिर
परिसरातच सुसज्ज ग्रंथालय आहे. रामगड : कणकवली मार्गावर रामगड हा किल्ला आहे. या किल्ल्याला १५ बुरुज आहेत. येथे सात तोफा, दारू कोठारे आहेत. सिद्धगड : रामगडजवळच हा छोटा किल्ला असून, कोलारवाडीकडून तेथे जाता येते. कसे जाल सिंधुदुर्गात? कणकवली,
ओरोस, कुडाळ, सावंतवाडी येथे कोकण रेल्वे स्थानके आहेत. गगनबावडा, फोंडा,
आंबोलीमार्गे कोकणात येण्यासाठी घाट आहेत. काही ठिकाणे मुंबई-गोवा
महामार्गावर आहेत. जवळचा विमानतळ कोल्हापूर आणि गोव्यात पणजी. कुडाळजवळ
चिपी येथे नव्याने विमानतळ बांधला असून, लवकरच कार्यान्वित होईल. मालवण,
कणकवली, तारकर्ली, कुडाळ येथे राहण्याची, जेवणाची चांगली सोय आहे. पावसाळा
सोडून वर्षभर कधीही जाण्यास योग्य. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दक्षिण भाग गोवा राज्याला लागून आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देशावरून येणारे गगनबावडा, फोंडा व आंबोली हे घाट
निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी बोलीची
ओळख मच्छिंद्र कांबळी यांच्या ‘वस्त्रहरण’ नाटकामुळे जगाला झाली. (मालवणी बोलीतील व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.) मालवणी
सोलकढी लोकप्रिय आहे. मालवणी मसाले आणि पदार्थांच्या चवी ज्यांनी एकदा
घेतल्यात, त्यांच्या जिभेवर कायम रेंगाळत असतात. त्यासाठी सिंधुदुर्गला भेट
देणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढत आहे. खाण्याबरोबर येथील सागरकिनारेही
भुरळ पडत असतातच. वाहतुकीसाठी रस्ते, रेल्वे आहेच. आता हवाई मार्गानेही
सिंधुदुर्ग जोडले जात आहे. चिपी येथील विमानतळ पूर्ण होऊन उद्घाटनाच्या
प्रतीक्षेत आहे. सावंतवाडी : सावंतवाडी हे ब्रिटिश काळात एक संस्थान होते. खेम सावंत-भोसले हे या संस्थानाचे संस्थानिक होते. खेम सावंतांनी १८५७च्या लढ्यामध्येही भाग घेतला होता. आताचे सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ आणि उत्तर गोव्यातील काही गावे मिळून हे संस्थान बनले होते. सावंतवाडीला ‘सुंदरवाडी’ असेही म्हटले जायचे. नावाप्रमाणेच सुंदर असलेल्या या शहराच्या मधोमध सुंदर मोती तलाव आहे. संध्याकाळच्या रोषणाईत हा तलाव आणखीच खुलून दिसतो. या संस्थानिकांचा राजवाडा आजही पाहण्यास खुला असतो. सकाळी साडेनऊ ते साडेबारा आणि दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत राजवाड्यात जाता येते. राजवाड्यात दुर्मीळ छायाचित्रांची फोटो गॅलरी असून, गंजिफा या जुन्या काळातील खेळाच्या निर्मितीचे केंद्रही आहे. तसेच विविध खेळ, खेळणी आणि लाखकामाच्या वस्तू येथे पाहायला मिळतात. आकर्षक हस्तकला वस्तूंचे दालनही राजवाड्यात आहे. संस्थानाच्या काळात १८७४मध्ये मोती तलावाची निर्मिती झाली. राजवाड्यासमोरील ३१ एकराच्या परिसरात धरण बांधण्यात आले. त्याच्या चारही बाजूंनी भक्कम दगडांनी बांधकाम करण्यात आले. याच्या जवळच लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध असलेली बाजारपेठ आहे. फळे आणि भाज्यांच्या अतिशय सुंदर आणि हुबेहूब प्रतिकृती चितारआळीत बनवल्या जातात. सावंतवाडीत काजू, हंगामाप्रमाणे आंबे, फणस, रातांबे, जांभळे उपलब्ध असतात. सावंतवाडीतील नरेंद्र डोंगर प्रसिद्ध आहे. तसेच मोती तलावाच्या काठावरच सावंतवाडी नगर परिषदेची इमारत उभी आहे. सावंतवाडीत कला महाविद्यालय, तसेच आयुर्वेद महाविद्यालय आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येथे शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. आंबोली : आजरामार्गे कोल्हापूर व चंदगडमार्गे बेळगावला जोडणाऱ्या आंबोली घाटातच हे निसर्गरम्य ठिकाण आहे. सदाहरित वृक्षांची शाल पांघरलेला हा परिसर निसर्गप्रेमींना भुरळ घालतो. आंबोली येथील महादेवगड, कावळेसाद, शिरगांवकर, नट, सावित्री असे असंख्य पॉइंट पाहण्यासारखे आहेत. हिरण्यकेशी नदीचा उगम येथूनच होतो. पावसाळ्यात सह्याद्रीच्या उतरणीवर कोसळणारे धबधबे हे आणखी एक आकर्षण. येथे अजूनही आपल्याला संस्थानकालीन भव्य इमारती पाहायला मिळतात. महात्मा गांधींनी काही काळ या ठिकाणी वास्तव्य केले होते. येथूनच ते शिरोडा येथे मिठाच्या सत्याग्रहासाठी मार्गस्थ झाले होते. आंबोली घाटातील प्रवास सुखद आठवण म्हणून पर्यटकांच्या स्मृतींमध्ये घर करून राहतो. (आंबोलीबद्दल अधिक माहिती देणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) नांगरतास धबधबा :
आंबोलीपासून १० किलोमीटर अंतरावर हा २०० फूट उंचीवरून डोंगर उतरंडीवर
डोंगर कापत जाणारा धबधबा आहे. घाटाचा शोध लावणाऱ्या धनगराचे मंदिरही येथे
आहे. असे म्हणतात, की इंग्रजांना घाटमार्ग काढण्यासाठी दिशा दाखवणाऱ्या या
धनगराचा इंग्रजांनीच काम होताच खून केला. चौकुळ : हे निसर्गरम्य ठिकाण आंबोलीजवळच असून, आता पर्यटनकेंद्र म्हणून विकसित होत आहे. घरगुती निवास व्यवस्था, मालवणी भोजन ही येथील खासियत. पावसाळ्यात परिसराची शोभा वाढविणारे छोटे-मोठे धबधबे पाहण्यास मिळतात. चौकुळच्या आसपास असलेल्या जंगलात गवे, हरणे, भेकरे, बिबट्या, ससे, रानमांजरे आदी वन्य प्राणी वास्तव्य करून आहेत. शिवाय असंख्य वनौषधी येथे सापडतात. दाणोली : आंबोलीहून
सावंतवाडीकडे येताना दाणोली येथे श्री समर्थ साटम महाराजांची समाधी आहे.
या भागातील लोकांची, तसेच आसपासच्या गावांतील लोकांची त्यांच्यावर श्रद्धा
आहे. दोडामार्ग : गोवा आणि कर्नाटकच्या
सीमेवरील हे गाव जंगली हत्तींचा वावर वाढल्याने प्रकाश झोतामध्ये आले आहे.
दोडामार्गजवळ एक सुंदर धबधबा आहे. पर्यटक येथे आता गर्दी करीत असतात. ![]() शिवापूर : आंबोलीच्या उत्तरेला एक दुर्गम, पण नितांत सुंदर असे शिवापूर गाव आहे. मनोहर व मनसंतोष गडाच्या पायथ्याशी वसलेल्या शिवापूरला जाण्यासाठी कुडाळमार्गे जावे लागते. शिवापूरच्या आसपास अनेक धबधबे आहेत. येथे नैसर्गिक झऱ्याच्या पाण्यावरच नळयोजना केल्या असून, या योजनांना वीजपुरवठ्याची गरज भासत नाही. ![]() ![]() माणगाव :
कुडाळवरून शिवापूरला जाताना वाटेत लागणारे कुडाळवरून सुमारे वीस
किलोमीटरवरचे एक महत्त्वाचे गाव म्हणजे माणगाव. दत्तावतारी परमपूज्य श्री
वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांचे जन्मस्थान या गावात आहे.
टेंब्ये स्वामी महाराजांनी घोरकष्टोद्धरण स्तोत्रासारख्या अनेक स्तोत्रांची
निर्मिती केली. त्यांची साधना विलक्षण होती. त्या माध्यमातून त्यांनी
जनतेची दुःखे दूर केली. त्यांची समाधी गुजरातमधील गरुडेश्वर येथे आहे.
महाराजांच्या जन्मस्थानाशेजारीच त्यांची आराध्यदेवता आणि माणगावची
ग्रामदेवता श्री यक्षिणीचे प्राचीन मंदिर आहे. येथील नक्षीकाम, छतावरील
लाकडातील कलाकारी पाहण्यासारखी आहे. या गावातून निर्मला नदी वाहते. टेंब्ये
स्वामींनी या गावात दत्तमंदिर उभारले. नंतर अहिल्याबाई होळकरांनी त्याचा
जीर्णोद्धार केला. अगदी अलीकडेच या मंदिराचा परिसर अधिक भव्य पद्धतीने
साकारण्यात आला आहे. येथे धर्मशाळा असून, राहण्याची आणि महाप्रसादाची सोय
आहे. (श्री यक्षिणी मंदिर, तसेच माणगावसंदर्भातील विस्तृत माहितीसाठी https://shreeyakshini.webs.com/ ही वेबसाइट तयार करण्यात आली आहे. मंदिरातील कलाकुसरीचे विविध फोटो तेथे पाहता येतील.) रेडी : मुंबई-गोवा
जलमार्गातील बंदर म्हणून रेडी प्रसिद्ध आहे. रेवतीद्वीप, रेवतीपट्टण किंवा
रेवतीनगर म्हणजेच आजचे रेडी गाव. येथील सागरकिनाऱ्याला हिरव्यागर्द
माडांच्या बागांची किनार, समोर लयीत गरजणारा दर्या आणि पसरलेली रूपेरी वाळू
यामुळे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. रेडीची आणखी एक ओळख म्हणजे
लोहखनिजाच्या खाणी. त्यामुळे हे गाव जगाच्या नकाशावर गेले. ऐतिहासिक वारसा
सांगणारा सोळाव्या शतकात बांधण्यात आलेला यशवंतगड या गावातच आहे. श्री देवी
माऊली, श्री महादेव आणि द्विभुज गणपती यांची येथील सुंदर मंदिरे भाविकांना
आकर्षित करतात. ![]() शिरोडा :
वेंगुर्ल्यापासून १७ किलोमीटरवर सागरकिनारा असलेले शिरोडा हे गाव आहे.
तेथून जवळच पाच-सहा किलोमीटरवर सुरूचे बन आणि नारळी-पोफळींनी वेढलेला सुंदर
समुद्रकिनारा आहे. ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार मिळविलेले साहित्यिक वि.
स. तथा भाऊसाहेब खांडेकर यांची ही कर्मभूमी. ते येथे काही काळ शिक्षक
म्हणून ट्युटोरिअल हायस्कूलमध्ये कार्यरत होते. १९३० साली शिरोडा येथे
महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाचा सत्याग्रह झाला होता. येथे
मिठागरेही आहेत. आरवली : शिरोडाच्या
उत्तर बाजूस आरवली गाव असून, सुंदर समुद्रकिनारा व कमळाच्या फुलांसाठी हे
गाव प्रसिद्ध आहे. सातेरी देवी आणि विठोबाचे येथे मंदिर आहे. आरवलीचे
वेतोबा हे देवस्थान प्रसिद्ध आहे. मोचेमाड : आरवलीच्या उत्तरेकडे मोचेमाड बीच असून. गर्दी कमी असल्याने शांत समुद्रकिनारा येथे अनुभवता येतो. वेंगुर्ला :
वेंगुर्ला शहराची मुख्य ओळख इ. स. १६०० ते इ. स. १८०० या काळात एक
व्यापारी बंदर म्हणून होती. परंतु आता केवळ एक मासेमारी बंदर अशीच त्याची
ओळख उरली आहे. वेंगुर्ला हे उत्तम दर्जाच्या काजूसाठीही प्रसिद्ध आहे.
संध्याकाळी समुद्रावरून येणाऱ्या नौका, अस्ताला जाणारा सूर्य हे दृश्य खूप
मनोहर असते. संध्याकाळी बंदरावरच मासेविक्री केली जाते. त्यामुळे ताजे व
स्वस्त मासे मिळतात. बंदराला लागूनच स्नॅकसाठी, जेवणासाठी व
राहण्यासाठीसुद्धा चांगले पर्याय उपलब्ध आहेत. बंदरापासून काही मिनिटांच्या
अंतरावर वेंगुर्ला लाइट हाउस आहे. समुद्राला टेकलेल्या डोंगरकपारी, तसेच
सुंदर बीच हे येथील वैशिष्ट्य. तसेच मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटची प्रतिकृती
असलेले वेंगुर्ल्याचे मार्केट, निशाण तलावही बघण्यासारखा आहे. शहर परिसरात
जवळजवळ ३० - ४० मंदिरे आहेत. अतिशय
कमी गर्दी असलेले किनारे (कोंडुरा किनारा -आरती प्रभूंचे जन्मगाव, वायंगणी
किनारा, सागरेश्वर किनारा, खवणे किनारा) येथे आहेत. या भागातील
समुद्रामध्ये हमखास होणारे डॉल्फिनदर्शन हेही येथील आकर्षण आहे. शेती व
फलोत्पादन याविषयी आवड असेल तर वेंगुर्ला फळसंशोधन केंद्राला भेट द्यायलाच
हवी. येथे काजूप्रक्रिया केंद्र आहे, तसेच मोठी नर्सरीही आहे. दापोलीच्या
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या या केंद्रात
फळझाडांच्या नव्या जाती विकसित केल्या जातात. काजूच्या ‘वेंगुर्ला’ नावाने
प्रसिद्ध असलेल्या जाती येथेच विकसित करण्यात आल्या आहेत. ![]() वेंगुर्ला रॉक्स : हे ठिकाण बर्न्ट आयलँड म्हणूनही ओळखले जाते. भारतातील पाच प्रमुख समुद्रीपक्ष्यांची घरटी येथे आढळतात. बऱ्याच पर्यटकांना याची माहिती नाही. येथे जाण्यासाठी तटरक्षक दलाची परवानगी लागते. मुख्यत्वेकरून समुद्री पाकोळ्यांचे हे वसतिस्थान आहे. हे आता संरक्षित पक्षी अभयारण्य म्हणून प्रस्तावित करण्यात आले आहे. या पक्ष्यांच्या लाळेपासून औषध तयार होते, अशा गैरसमजातून याच्या अंड्यांची व घरट्यांची तस्करी होत असल्याने याला संरक्षण देण्याची आवश्यकता आहे. निवती बंदर व वेंगुर्ले येथून येथे मोटरबोटने जाता येते. येथे ब्रिटिशकालीन दीपगृह आहे. ![]() सागरेश्वर किनारा : नियोजित सागरी महामार्गाने जाताना वेंगुर्ला-शिरोडा रस्त्यावर वेंगुर्ला शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर हा सुंदर किनारा आहे. सागरेश्वराचे मंदिर असल्यामुळे किनाऱ्यालाही तेच नाव पडले. मंदिर परिसरात गोड्या पाण्याची विहीर आहे. भोगवे : वेंगुर्ला ते मालवण
सागरी रस्त्यावर निवती-भोगवे-कोचरा येथील समुद्रकिनारा विलोभनीय आहे आहे.
भोगवे गावाजवळ कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो. लांबवर
पसरलेली स्वच्छ आणि शुभ्र वाळू आणि किनाऱ्याकडेला असलेल्या माडा-पोफळीच्या
बागा समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य आणखीच खुलवितात. ![]() निवती किल्ला : शिवाजी महाराजांनी सागरी शृंखलेमधील टेहळणीकिल्ला म्हणून हा किल्ला बांधला. डोंगराचा एक सुळका समुद्रात घुसला आहे व त्यावरच हा किल्ला आहे. किल्ल्यावर आता काही अवशेष नाहीत; मात्र येथून पश्चिमेकडे दूरवर सिंधुदुर्ग व लागून असलेला भोगवेचा समुद्रकिनारा अधिक सुंदर दिसतो. तसेच समुद्रात असणाऱ्या व किनाऱ्यावर असणाऱ्या खडकांवर आपटणाऱ्या लाटांचे तांडवही बघण्यासारखे असते. निवती बंदर : हे
मच्छिमार लोकांचे बंदर आहे व लागूनच छोटा किनाराही आहे. डॉल्फिन शोसाठी हे
ठिकाण अधिक सोयीचे आहे. समोरच ५०० ते ७०० मीटर अंतरावर खडकांची बेटे आहेत.
हे खडक वेंगुर्ल्यापर्यंत दिसतात. खडक शृंखला व समुद्रकिनारा यामध्ये
डॉल्फिनच्या झुंडी बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. अर्धा टन वजनाचे
सात-आठ फूट लांबीचे डॉल्फिन्स पाहताना छाती दडपून जाते. हा अनुभव मी आठ
वर्षांपूर्वी घेतला. धामापूर : या निसर्गरम्य गावात भगवती मंदिराजवळ एक वैशिट्यपूर्ण सुंदर तलाव आहे. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही पाऊस पडला तरी या तळ्यातील पाणी मर्यादेच्या पलीकडे वाढत नाही आणि कितीही दुष्काळ झाला तरी तळ्यातील पाणी आटत नाही. ![]() ![]() ![]() वालावल : कर्ली
नदीच्या खाडीच्या काठावर वसलेले वालावल हे अत्यंत रमणीय असे गाव आहे.
कुपीचा डोंगर, अत्यंत सुंदर अशी कर्ली नदी, समोरचे काळसे बेट,
लक्ष्मीनारायणाचे सुंदर मंदिर अशा अनेक वैशिष्टयांमुळे हे गाव पर्यटकांचे
आवडते ठिकाण झाले आहे. या गावातील लोक शिक्षण, संस्कृती, राजकारण, व्यापार,
उद्योग अशा सर्व क्षेत्रांमध्ये चमकली आहेत. दशावतारी नाटक मंडळींमुळे
सांस्कृतिक क्षेत्रात हे गाव अग्रेसर आहे. येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर
हे प्राचीन व उत्कृष्ट शिल्पाकृती असलेले कोकणी शैलीतील देवालय आहे. या
देवालयातील अंतर्गत रचना, लाकडावरील कोरीव काम, अंतर्गत सजावट, बाजूस
असलेला नारायण तलाव, त्यात फुललेली कमलपुष्पे पर्यटकांना आकर्षित करतात.
मंदिराच्या उत्तरेला वालावल खाडीचे निसर्गसौंदर्य दिसते. सावडाव धबधबा : कणकवलीपासून १० किलोमीटरवर राष्ट्रीय हमरस्त्यावरच आतील बाजूला १० मिनिटांत चालत जाण्यासारख्या अंतरावर हे ठिकाण आहे. धबधब्यात जाऊन पाण्याखाली उभे राहून मनसोक्त आंघोळ करणे म्हणजे एक पर्वणीच आहे. धबधब्यापुढील डोह उथळ आहे. धबधब्यामागे असलेल्या नैसर्गिक कोनाड्यात बसून पुढे पडणारे धबधब्याचे पाणी पाहणे एक मजेशीर अनुभव असतो; मात्र पाण्यास जोर असला, तर या भानगडीत पडू नये. लांबूनच मजा पाहावी. ![]() नापणे धबधबा : वैभववाडीपासून १५ किलोमीटरवर हा प्रपात असून, १०० फूट उंचीवरून पडतो. आजूबाजूला जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट असे आल्हाददायक वातावरण इथे असते. धबधब्याच्या पुढे खोल डोह आहे. धबधब्याच्या वरच्या बाजूस नाधवडे येथे महादेवाचे मंदिर आहे. तेथील एका कपारीतून पाण्याचा प्रवाह वर येतो. तीच नदी पुढे नापणे धबधब्यापर्यंत जाते. हा धबधबा १२ महिने पाहता येतो. येथे व्हॅली क्रॉसिंगचा अनुभव घेता येतो. ![]() ऐनारी लेणी : वैभववाडी तालुक्यातील ऐनारी गावात डोंगरामध्ये प्राचीन गुंफा असून, त्यामध्ये कोरीव लेणी आहेत. सुमारे १५० वर्षांपूर्वी या गुंफेचा शोध लागला. आत अंधार असल्याने बॅटरी घेऊनच आत जावे. घोणसरीचा शिवगड किल्ला : दाजीपूरहून
कोकणात उतरताना हा किल्ला लागतो. या किल्ल्याचा इतिहास फारसा ज्ञात नसला,
तरी कोकण वाटेवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याची उभारणी झाली असावी. तरीही
इतिहासात याचा थोडाफार उल्लेख आहे. इ. स. १७४०मध्ये बलवंतगडाहून (राजापूर,
जि. रत्नागिरी) तानाजीराव खानविलकरांनी चिमाजीअप्पांना पत्र लिहिले आहे.
त्यातील उल्लेख असा - ‘बावडा (गगनबावडा, जि. कोल्हापूर), बळवंतगड, सिवगड
तिनी जागे आपांचे पदरी घातले आहे. सिवगड तो सालपीच्या उरावर आहे.’ करवीर
घराण्याच्या इतिहासातील इ. स. १८००मधील पत्राप्रमाणे, सावंताच्या
हल्ल्याच्या शक्यतेने शिवगडावरील चौक्या वाढवून शेजारील घाटवाटा व पाज
यांचा बंदोबस्त करण्यास सांगितले आहे. इ. स. १७३९च्या एका पत्रात
शिवगडाच्या घाटात चौकीसाठी अमृतराव भगवंत प्रतिनिधी यांचा १५ लोक
नेमण्यासंबंधी महत्त्वाचा उल्लेख मिळतो. कणकवली :
कणकवली हे तालुक्याचे ठिकाण आहे. कणकवली हे नाव ‘कनकवल्ली’ या संस्कृत
शब्दापासून तयार झाले आहे. त्याचा अर्थ सुवर्णभूमी असा आहे. कोकण गांधी
सीताराम पुरुषोत्तम तथा अप्पासाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेला गोपुरी
आश्रम कणकवलीत वागदे येथे गडनदीच्या तीरावर आहे. कृषी क्षेत्रातून रोजगार
कसा उपलब्ध करता येईल, हे त्यांनी गोपुरीत कृतीतून सिद्ध करून दाखविले आहे.
कणकवली गावामध्ये भालचंद्र महाराज यांची समाधी आहे. त्या समाधिस्थळावर
सुंदर मठाची स्थापना करण्यात आली आहे. जवळच्या सांगवे गावात निसर्गरम्य
परिसरात श्रीरामेश्वर मंदिर आहे. दहीकाला उत्सवातील दशावतार हे तेथील मुख्य
आकर्षण आहे. वागदे गावातील आर्यादुर्गा मंदिरही सुंदर आहे. ![]() कुडाळ : कुडाळ हे ऐतिहासिक गाव आहे. चालुक्यकालीन ताम्रपट येथे सापडले आहेत. चालुक्य, शिलाहार, विजयनगर, आदिलशाही, शिवाजी महाराज, खेम सावंत व अखेर ब्रिटिश अशा अनेक राजवटी या ठिकाणी होऊन गेल्या. येथे शिवकालीन ‘घोडेबाव’ नावाची विहीर असून, तेथे घोडे पाणी पित असत. शिवाजी महाराजांच्या काळात कुडाळ-सावंतवाडी हा कोकण पट्टा तळकोकण म्हणून ओळखला जात असे. हा तळकोकण इतका दुर्गम होता, की तिथे पाण्यासाठी ३० ते ४० किलोमीटर लांब जावे लागत आसे. हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’प्रमाणे योजना राबवली. जागोजागी विहिरी बांधून घेतल्या. घोडेबाव ही विहीर त्यातलीच एक. तिचे महत्त्व मोठे आहे. पिंगुळी : कुडाळपासून
तीन किलोमीटरवर असलेले हे ठिकाण हस्तकलेसाठी, प्रामुख्याने चित्रकथी या
आदिवासी कलेसाठी प्रसिद्ध आहे. बाहुल्यांच्या खेळाच्या माध्यमातून
सावल्यांचे खेळ, नाच वगैरे प्रकार आदिवासी ठाकर जमातींकडून येथे दाखविले
जातात. ही पारंपरिक कला जतन करण्याचा प्रयत्न चालू आहे. येथे राऊळ
महाराजांचा मठ असून, भव्य आवारात अनेक मंदिरे आहेत. ओरोस :
या गावात सिंधुदुर्गनगरी या नावाने जिल्हा मुख्यालयाची नियोजनबद्ध
पद्धतीने उभारणी करण्यात आली आहे. जिल्हा मुख्यालय असल्याने येथे जिल्हा
प्रशासनाची कार्यालये आहेत. ओरोस गाव जुनेच आहे; पण नव्याने उभारलेल्या
सिंधुदुर्गनगरीची उभारणी ‘सिडको’ने केली आहे. कसे जाल सिंधुदुर्गात? सिंधुदुर्ग
जिल्हा रस्ते आणि कोकण रेल्वेमार्गाने जोडलेला आहे. लवकरच चिपी विमानतळ
कार्यान्वित होणार आहे. निवास, भोजनासाठी मालवण, कणकवली, वेंगुर्ले,
सावंतवाडी व बहुतेक सागरकिनाऱ्यांवर चांगली व्यवस्था आहे. | आम्ही स्टँडवर पोचलो तेव्हा दुपारचे अडीच वाजले होते. इथुन परतीच्या
गाड्या साडे तीन आणि शेवटची देवगडला जाणारी एसटी साडे चारला होती. जराही
वेळ न दवडता आम्ही किल्ल्याच्या दिशेने चालु लागलो. सकाळपासुन आराम करणारा
कॅम मी बाहेर काढला आणि खाडीच्या किनार्यावरल्या तटबंदीकडुन चालत
किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी पोचलो. मुख्य दरवाज्याला असलेले उत्तुंग
बुरुज आकाशाला भिडत होते. विजयदुर्ग किल्ला :- तटबंदी ट्रेक क्षितिजच्या कृपेने किल्ल्याच्या नकाशाची कॉपी होती. त्याप्रमाणे किल्ला बघायला सुरुवात केली. दरवाज्यातुन प्रवेश करताच खाली दिलेल्या नकाशाप्रमाणे पूर्वेच्या दरवाज्यातुन शिरुन उत्तरेकडल्या तटबन्दीवरुन चालायला सुरुवात केली. विजयदुर्गाचं मुख्य आकर्षण म्हणजे समुद्राच्या पोटात असलेली ती संरक्षक भिंत. एनीवेज ती भिंत काही दिसणार नव्हती पण या भिंतीबद्दल बरचं काही वाचलं होतं. श्री निनाद बेडेकर यांचं "विजयदुर्गाचं रहस्य" नावाचं एक पुस्तक आहे. त्यात त्या अद्वितिय संरक्षक भिंतीबद्दल आणि विजयदुर्गाच्या इतिहासाबद्दल बरीचशी माहिती आहे. महाराजांच्या आरमारातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून विजयदुर्ग प्रसिद्ध आहे. किल्ल्यापासुन दोन किमी अंतरावर गिर्रेवाडीत ३५० वर्षांपूर्वीचा जहाजे बनवण्याचा कारखाना म्हणजे गोदी आहे. विजयदुर्ग नकाशा :- साभार http://trekshitiz.com/ सिंधुदुर्ग जिल्ह्यातिल देवगड तालुक्यात 'विजयदुर्ग' हा अतिशय बळकट किल्ला उभा आहे. तिन्ही बाजुनी पाणी आणि एका बाजुला खुष्कीचा मार्ग, अशी भौगोलिक रचना असल्याने हा किल्ला नैसर्गिकरित्या बेलाग झालेला आहे. विजयदुर्गाची बांधणीही रेखीव आहे. एका पाठोपाठ एक अशी तिहेरी तटबंदी किल्ल्याला अधिकाधिक मजबूत जरत आहे. यातिल काही बुरुज तर चक्क तिन मजली आहेत. विजयदुर्गाला छुपे दरवाजे आहेत. त्यातलाच एक आहे जिभीचा दरवाजा. जिभी म्हणजे लाकडी दरवाज्यापुढे रचलेली दगडांची तटबंदी.ह्याला हस्तीनख असेही म्हणतात. छत्रपती शिवाजी म्हाराजांनी विजय संवत्सरात 'गिर्ये' गावानजिकचा हा दुर्ग जिंकून घेतला आणि त्याचं नामकरण केलं, 'विजयदुर्ग'. गिर्याचा किल्ला म्हणून ह्या दुर्गाला 'घेरिया' असेही म्हणतात. शिवाजीमहाराजांनंतरच्या कालखंडात कान्होजी आंग्रे ह्यांच्याकडे मराठी आरमाराचे अधिपत्य आले. विजयदुर्गही आंग्र्यांच्या ताब्यात आला. आंग्र्यांचं आरमार दर्यावर आपला वचक ठेवून होतं. ते बुडविण्यासाठी डच आणि विशेषतः इंग्रजांनी अथक परिश्रम केले; ते आंग्र्यांनी हाणून पाडले. आमच्याकडे वेळ कमी होता. आमहाला काही करुन साडे तीनची एसटी पकडायची होती. पण किल्ल्याचं सौंदर्यच असं काहीसं होतं की पावलोपावली तटबंदीवरुन चालताना फोटो घेत होतो. गणेश बुरुजावरुन दुपारच्या उन्हात विजदुर्गाचा किनारा शांत पहुडला होता आणि समुद्राच्या लाटा एका संथ लयीत त्याला थोपटवत होत्या. वाघोटन खाडी आणि विजयदुर्ग जेट्टी :- पुछे चालत चालत दर्या बुरुजापर्यंत आलो तेव्हा तिथे तटबंदीला खिंडार पडलं होतं आणि त्याच्या डागडुज्जीचं काम सुरु होतं. पुढे शाह बुरुजावर चढुन पुन्हा दक्षिणेच्या तटबंदीवरुन चालत चालत निघालो. इथुन तो विशाल समुद्र दुपारच्या उन्हात अतिशय तेजस्वी दिसत होता. कितीतरी वेळ फक्त त्याला पाहत राहीलो. एव्हाना तीन वाजत आले होते. गड पाहुन झाला होता. वेळेअभावी खूपच धावती भेट झाली होती पण नाकाशाप्रमाणे सगळा किल्ला बघुन घेतला. पुन्हा मुख्य दरवाज्यापाशी आलो तेव्हा तिथे हे तोफेचे गोळे ओळीत ठेवले होते. किल्ला पाहुन आम्ही पुन्हा एसटी स्टँडवर आलो. बस यायला अजुन अवकाश होता. आणि मला किल्ल्याचे बाहेरुन म्हणजे जेट्टीवरुअन काही फोटो घ्यायचे होते. फोटो घेउन झाल्यावर काहीतरी खायला म्हणुन आम्ही शेजारच्या हाटेलात शिरलो. तितक्यात बस आली. ![]() विजयदुर्ग :सहा हेक्टर क्षेत्रात विस्तारलेल्या या जलदुर्गाची तटबंदी पर्यटकांचे खास आकर्षण बनले आहे. हा किल्ला पूर्वी मराठा आरमाराचे एक महत्त्वाचे केंद्र होते. किल्ल्यामध्ये मंदिर, विहीर तसेच युद्धकैद्यांना ठेवण्यासाठी एक कोठडी आहे. पाण्याच्या टाक्या,पडके महाल, तोफा आजही या किल्ल्यावर आहेत. किल्ल्याचे वैशिष्टय म्हणजे सुमारे २ कि.मी. अंतर असलेले एक भुयार असून धुळपांच्या वाडयातून बाहेर पडते. १६५३ साली काबीज केलेला हा किल्ला शिवरायांच्या आरमारात समाविष्ठ पहिला “जलदुर्ग” म्हणून यांची विशेष नोंद आहे. सध्या विजयदुर्ग हे एक उत्तम मासेमारी बंदर म्हणून उदयास येत आहे. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
कासव संवर्धनाचा सिंधुदुर्ग पॅटर्न
वेंगुर्ले : ऑलिव्ह
रिडले जातीची कासवे हा सागरी अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक. अनेक
कारणांमुळे ही कासवे दुर्मिळ होत चालली असल्याचे लक्षात घेऊन काही सजग
नागरिकांनी त्यांच्या संवर्धनाचे शिवधनुष्य हाती घेतले. या कार्याचे परिणाम
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता दिसू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात वेळास
येथे भाऊ काटदरे आणि मित्रमंडळींनी गेली काही वर्षे कासव संवर्धनाचे काम
जोमाने सुरू केले आहे. आता त्या कामात सिंधुदुर्ग पॅटर्नही तयार झाला आहे. ![]() ![]() वेंगुर्ले
तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारा हे आता प्रमुख कासव संवर्धन केंद्र बनले
असून, सुहास तोरस्कर या कासवमित्राने कासव संवर्धनाचा जणू वसाच घेतला आहे.
त्याचबरोबर देवगड तालुक्यात तांबळडेग समुद्र किनाऱ्यावरही गेली अनेक वर्षे
हे काम निसर्गमित्र मंडळाच्या माध्यमातून सुरू आहे. यामुळे दुर्मिळ अशा
ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. सिंधुदुर्ग
जिल्ह्यात वेंगुर्ले आणि देवगड समुद्रात प्रामुख्याने ऑलिव्ह रिडले, ग्रीन
तर्टेल आणि हॉक्सबिल या जातीची कासवे आढळून येतात. गेल्या १५-२०
वर्षांपासून ऑलिव्ह रिडले जातीची कासवे वेंगुर्ले आणि देवगडच्या
समुद्रकिनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी येत आहेत; पण स्थानिक नागरिकांकडून या
अंड्यांचा खाण्यासाठी वापर होत होता. तसेच कुत्रे आणि अन्य जनावरांपासूनही
या अंड्यांना धोका होता. त्यामुळे या कासवांच्या संख्यावाढीवर निर्बंध आले
होते. ![]() ऑलिव्ह
रिडले कासवे म्हणजे सागरी अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक आहेत. ही कासवे
समुद्रातील विविध घटकांवर अन्नासाठी अवलंबून असतातत आणि शार्कसारखे मासे या
कासवांना खाऊन आपली उपजीविका करतात. त्यामुळे कमी होत चाललेल्या या
कासवांचे संवर्धन होणे गरजेच होते. त्यासाठी वेंगुर्ले तालुक्यात वायंगणी
आणि देवगड तालुक्यात तांबळडेग येथे कासव संवर्धनाचे प्रयत्न सुरू झाले.
याचा पहिला प्रयोग सुमारे पंधरा वर्षांपूर्वी तांबळडेग येथे सागर मालडकर
आणि त्यांच्या टीमने यशस्वी केला. हेच काम वायंगणी किनाऱ्यावर गेल्या काही
वर्षांपासून सुहास तोरस्कर आणि मंडळी करत आहेत. तसेच गेल्या चार
वर्षांपासून वायंगणीमध्ये कासव जत्रेसारखे कार्यक्रम आयोजित केले जात
असल्याने पर्यटनदृष्ट्याही कासव संवर्धनाला महत्त्व आले आहे. ![]() वाडा येथील विमलेश्वर मंदिर :देवगड पासून ६ कि.मी. अंतरावर विमलेश्वराचे सुंदर देवालय आहे. समुद्राच्या लाटांनी खळाळणार्या व डोंगराच्या सान्निध्यात विसावलेल्या या मंदिरात शिवपिंडी येणार्यांचे विशेष लक्ष वेधून घेते. या देवालयाच्या दोन्ही बाजुला खोदीव हत्ती आहेत. मंदिरासह येथील परिसरही विशेष प्रेक्षणीय आहे. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() मिठबाब तांबळडेग किनारा :हा किनारा अतिशय स्वच्छ व शुभ्र वाळूचा आहे. या किनार्यावर गणबादेवीचे देवालय असल्याने पर्यटक समुद्र किनार्याचा मनसोक्त आनंद लुटता-लुटता गणबादेवीच्या पावलावरही लीन होतात. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() कुणकेश्वर मंदिर :निसर्गरम्य सौंदर्यस्थळ व जागृत धार्मिक स्थान असा दुहेरी संगम असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व परिसरातील लक्षावधी भाविकांचे श्रध्दास्थान आहे. दरवर्षी हजारोंच्या उपस्थितीत येथे जत्रोत्सव संपन्न होतो. शिवमंदिरासह येथील किनार्याचा परिसर येथे येणार्याला सुखावतो. मंदिराच्या पश्चिमेकडील बाजूस पायर्यांवर लोळण घेणार्या सागराची विविध रुपे न्याहाळता येतात. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() ओरोस :जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे जिल्हा मुख्यालय म्हणून जिल्हा प्रशासनाची जिल्हा कार्यालये आहेत. अतिशय आकर्षक पध्दतीने या इमारती उभ्या आहेत. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() वालावल :येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिर हे प्राचीन व उत्कृष्ठ शिल्पाकृती असलेले देवालय आहे. या देवालयाची रचना, लाकडी कोरीव काम, अंतर्भागाची सजावट, बाजूस असलेला तलाव, त्यात फुललेली कमल पुष्पे रसिकाना मोहिनी घालतात. चंद्र – सूर्याचे दर्शन येथे एकाच वेळी घडते. मंदिराचे उत्तरेस वालावल खाडीचे सौंदर्य अप्रतिम आहे. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() संत राऊळ महाराज मठ, पिंगुळी :कुडाळ पिंगुळी येथील भक्त वत्सल प.पू. राऊळ महाराज यांचे देखणे स्मारक त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे शिष्य विनायक अण्णा राऊळ महाराज आणि भक्तजनांनी त्यांचे भव्य मंदिर उभारले आहे. गाभार्यामध्ये प.पू. राऊळ महाराजांची मूर्ती असून मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() दत्तमंदिर, माणगाव :हे दत्त सांप्रदायाचे स्थान आहे. तेथे टेंब्ये स्वामींचे भव्य मंदिर उभारले गेले आहे. शिवाय त्यांनी स्थापन केलेले दत्तमंदिर भक्तांचे श्रद्धास्थान आहे. विश्वस्थांनी अद्ययावत धर्मशाळा बांधलेली आहे. तेथे राहण्याची सोय उपलब्ध आहे. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() वेंगुर्ला :वेंगुर्ला बंदर हे स्वातंत्र्यपूर्व काळात आशिया खंडातील पश्चिम किनार्यावरील आयात – निर्यातीचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. या बंदरासमोर असलेलं शासकिय निवासस्थान म्हणजे ‘सागर बंगला’. ब्रिटिश राजवटीपासून अथांग समुद्राचे दर्शन घडविणार्या या विश्रामगृहात नेहमीच गर्दी असते. वेंगुर्ले बंदर, दिपगृह, मार्केट, दाभोली मठ, निशाण तलाव याबरोबरच वेंगुर्ला प्रसिद्ध आहे ते इथल्या मंदिरासाठी. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() रेडीचा गणेश :येथे स्वयंभू गणेश मूर्ती असून भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. येथे खाणीचे खोदकाम चालू असताना भव्य द्विभूज गणेश मूर्ती आढळून आली असून त्याच जागेवर सुंदर मंदिर बांधून श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिराच्या दक्षिण बाजूस गोवा किनारपट्टीचे विलोभनीय दृष्य दिसते. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() शिरोडा:हे गाव पूर्वी ‘शिरवडे’ या नावाने परिचित होते. पुढे अपभ्रंश होऊन ‘शिरोडा’ हे नाव प्राप्त झाले. या गावास ऐतिहासिक महत्त्व आहे. १९३० सालचा मिठाचा सत्याग्रह याच गावी झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मीठ पिकवणारे एकमेव गाव म्हणूनही शिरोड्याचा लौकिक आहे. परिसरात नारळाच्या झाडांच्या अनेक राया आहेत. तसेच काजूंचीही अनेक झाडे आहेत. जवळच यशवंतगड नावाचा पुरातन किल्ला आहे. छत्रपतींच्या काळात त्यास विशेष महत्त्व होते. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() आरवली :शिरोड्यापासून एक किमी. अंतरावर ‘आरवली’ गाव आहे. येथील वेतोबाचे देवालय आदर्श नमुना मानला जातो. वेतोबाची भव्य पंचधातूची मूर्ती आणि भाविकांची अपार श्रद्धा यामुळे या गावाला आगळेच महत्त्व आहे. नजिकचे सातेरी मंदिर आणि तेथिल मूर्तीही दर्शनिय आहे. वेतोबाची जत्रा आणि नविन मूर्तीची पूनर्प्रतिष्ठापना वर्धापन उत्सव हे सिंधुदुर्गवासियांचे आकर्षण आहे. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() मोचेमाड :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विश्वाच्या वैभवाची साक्ष देणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी मानला गेलेला पर्यटन प्रकल्प ‘मोचेमाड’ परिसरात साकारणार आहे. मोचेमाड किनारपट्टीवर सुमारे २०० फूट उंचीपर्यंतच्या आकाराच्या लहानमोठ्या टेकड्या असून पर्यटन तज्ञांच्या मते त्याचा उपयोग ‘सी डायव्हिंग स्पोर्टस’ या क्रिडाप्रकारासाठी करता येईल. स्वच्छ व सुंदर सागरी किनार्याबरोबरच पांढरी शुभ्र वाळू हे या किनारपट्टीचे वैशिष्ट्य आहे. याच परिसरात किनार्यांवरील लाटा व सागरी वारे यांच्यामुळे नैसर्गिक वाळूच्या भिंती तयार झालेल्या असून त्याचा उपयोग वाळूवरील ‘स्केटींग’ या क्रिडाप्रकारासाठी करता येईल. दूध, भाजीपाला तसेच कुक्कटपालन यासारखे लहान मोठे व्यवसाय उभे राहून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे ‘दशावतार ‘ सारखे कार्यक्रम देशी-विदेशी नागरिकांना दाखविण्यात येणार असल्याने कला-नाट्य क्षेत्रासही चांगले दिवस येणार आहेत. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() रमणीय सागरेश्र्वर :वेंगुर्ला-शिरोडा रस्त्याने अर्थात नियोजित सागरी महामार्गाने जाताना वेंगुर्ला शहरापासून अवघ्या सुमारे ३ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. मुख्य रस्त्यापासून पश्चिमेकडे सागरेश्र्वर मंदिराच्या दिशेने काही अंतर जावे लागते. मंदिराच्या आवारात गोड्या पाण्याची विहीर आहे. तसेच भाविकांसाठी छोटेखानी धर्मशाळाही आहे. ‘सागरेश्र्वरच्या’ वाळूत तासनतास बसावे, सागराचे निरीक्षण करत, वाळूत खेळावे, किल्ले बांधावेत, भरतीच्या वेळात किनार्यास येऊन भिडताना तयार होणार्या अर्ध गोलाकार नागफणीच्या आकाराच्या सागरी लाटांच्या भिंती व हा हा म्हणता जाणवणारा त्यांचा क्षणभंगुरपणा न्याहाळणे हा देखील कोणाचा आवडता छंद असू शकतो. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() सावंतवाडी :सावंतवाडी म्हणजेच ‘सुंदरवाडी’ या शहरावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली. या शहरात राजवाडा, लाकडी फळे, फुले (हस्तकला), मोती तलाव, नरेंद्र डोंगर, जगन्नथराव भोसले उद्यान, आत्मेश्वर तळी, व शिल्पग्राम आदी माध्यमातून येथे येणारे पर्यटक अधिक स्थिरावतात. ‘सावंतवाडी’ हे शहर संस्थान काळातील खेमसावंत-भोसल्यांची राजधानी होती. सावंतवाडीतील ‘चितार आळी’ हा भाग कलाकुसरीच्या वस्तूंच्या दुकांनांनी गजबजलेला असतो. सध्या सावंतवाडी हे राज्यातील लाकडी कलाकुसरीच्या वस्तु व हस्तकला उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. लाकडी खेळणी, लाखेच्या वस्तू, बाहुल्या, रंगीत फळे, रंगीत पाट, दरवाजांना लावण्याच्या विविधरंगी माळा, शोभेच्या गृहवस्तू उत्कृष्टपणे तयार केल्या जातात. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() मोती तलाव :तलावात पूर्वी कधी मोती सापडले होते म्हणून त्या तलावास “मोती तलाव” असे नाव पडले. चारही बाजूने सह्याद्रीच्या पर्वत रांगानी वेढलेले सावंतवाडी शहर आणि शहराच्या मध्यभागी मोती तलाव. सध्या तलावात बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. तलावात कारंजे सुध्दा बसविण्यात आलेले आहेत. तसेच संपूर्ण तलावाच्या कडेला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() निसर्ग कोंदण – आंबोली :आंबोली हे ठिकाण सावंतवाडीपासून सुमारे २५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे याठिकाणी पर्यटक निवास बांधले आहेत. शासकीय व वन खात्याचे विश्रामगृह तसेच खासगी हॉटेल्सही या ठिकाणी आहेत. सर्व हंगामात पर्यटकांची वर्दळ येथे सुरु असते. हिरण्यकेशी नदीचा उगम आंबोलीजवळच होतो. शंकराचे स्थान असल्याने तेथे महाशिवरात्रीस यात्रा भरते. आंबोली घाटातून दिसणारी सह्याद्री पर्वताची रुद्र रुपे चिरकाल स्मरणात राहतील, अशीच आहेत. अत्यंत आल्हाददायक हवा, सभोवताली दाटलेली गर्द झाडी, कधी हलके-फुलके विरळ धुके तर कधी दाट धुक्यांची दुलई पांघरलेला आसमंत, पावसाळी हंगामात धो-धो कोसळणारे असंख्य धबधबे-निर्झर, आंबोलीच्या घाटमाथ्यावर कधी टकरा घेणार्या तर कधी रेंगाळणार्या ढगांच्या मालिका, कड्यावर उभे राहिले असता खालून वेगाने येऊन आदळणारा वार्याचा, अवखळ झोत, दर्या-खोर्यांची भव्यता, गिरी-शिखरांची उंचाई, ही सारी सृष्टीची नवलाई आणि दिव्यत्व अनुभवण्यासाठी आंबोलीसच जायला हवे. उंच कड्यावरुन तळ्कोंकणातील दृष्ये तासनतास निरखित राहणे, ही येथील एक अपूर्वाई! आंबोली परिसरात असे ९-१० पॉईंटस् आहेत. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() कोंकणसफारी - रेडीचा यशवंतगड, तेरेखोलचा किल्ला आणि हरवलेली वाट
आजचा पल्ला जास्त दूर नव्हता. रेडीचा यशवंतगड, तेरेखोलचा किल्ला आणि
सावंतवाडी असं फिरुन यायचं होतं. संध्याकाळी जत्रा आणि दशावतार पण बघायचं
होतं त्यामुळे लवकर फिरुन येउन थोडा आराम करायचा असं ठरवलं. त्यामुळे आज
थोडं उशिराच निघालो. पुन्हा ती बाईक रेंटवर घेतली.आमच्या गावतुन मातोंड या
गावच्या रस्त्याने वर कापावर आलो. इथुन आसोलीमार्गे आरवली, शिरोडा, रेडी
असं जायचं होतं. सड्यावर पोचलो तेव्हा मस्त उन पडलं होतं. लहानपणी, मे ची
सुट्टी पडली की या सड्यावर वाडीतली आम्ही सगळी पोरं फिरायला यायचो. काजु,
आंबे, फणस, करवंद यांची चंगळ असायची. कधी कधी आमच्या क्रिकेटच्या मॅचेस पण
व्ह्यायच्या. या विस्तृत पसरलेल्या सड्यावर क्रिकेट खेळायला फार मज्जा
यायची. खूप धम्माल दिवस होते ते.
सड्यावरुन आसोली - टांकमार्गे आम्ही वेंगुर्ला - शिरोडा रस्त्यावर आलो. इथुन पुढे आरवलीचं प्रसिद्ध देवस्थान श्री वेतोबाच्या दर्शानासाठी गेलो. वेंगुर्ल्यातील अनेक प्रसिद्ध देवस्थानांपैकी आरवलीचा वेतोबा हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे. काही वर्षांपूर्वीच या मंदिराचा जिर्णोद्धार झालाय. मंदिर अतिशय सुंदर आहे. तसेच आरवलीचा समुद्रकिनाराही अतिशय सुंदर आहे. इथुन पुढे शिरोड्याच्या बाजारातुन वाट काढत काढत आम्ही हुड्यावर येउन पोचलो. इथुन उजवीकडला रस्ता रेडी-तेरेखोलकडे जातो तर डावीकडला रस्ता आरोंदा,सावंतवाडीकडे जातो. आम्ही रेडीच्या रस्त्याला लागलो. पहिल्यांदा रेडीचा प्रसिद्ध गणपती पाहायचा होता. रेडी गाव मँगनिझ आणि इतर खनिज द्रव्यांच्या मुबलकतेमुळे ९० च्या दशकात झोतात आले होते. इथे बर्याच मोठ्या प्रमाणात मायनिंग झाले आहे. अजुनही डंपर - ट्रक्स यांची ये जा सुरु असते.
रेडीचं गणपती मंदिर समुद्राच्या
किनारीच आहे. मायनिंगमुळे तिथपर्यन्तचा रस्ता फक्त डंपर आणि ट्रक्सच्याच
योग्यतेचा आहे. सध्या मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम सुरु आहे. मंदिरातली
द्विभुज गणेश मुर्ती खूप संदर आहे.
गणेशाचे दर्शन घेउन आम्ही यशवंतगडाकडे
निघालो. गावतल्या विठोबाच्या मंदिराच्या मागुन रस्ता किल्ल्यापर्यंत आणि
किनार्यापर्यंत जातो. काहीवेळातच रस्त्यावरुन किल्ल्याची तटबंदी दिसु
लागली. किल्ल्यापाशी येउन बाईक लावली आणि किल्ल्यात प्रवेश केला.
यशवंतगड नकाशा :- साभार http://trekshitiz.com/trekshitiz/index.asp
![]() नकाशात दाखवल्याप्रमाणे किल्ल्याला एकूण पाच दरवाजे आहेत. मुख्य दरवाज्याकडला बुरुज अजुन शाबूत आहे. प्रत्येक दरवाज्याची कमानही अजुन शाबूत आहे. दुसर्या आणि तिसर्या दरवाज्याच्या मध्ये एक खंदक आहे. अंदाजे २० फूट खोलीचा हा खंदक संपूर्ण किल्ल्याभोवती आहे. तिसर्या आणि चौथ्या दरवाज्याच्या बाजुला एक चोर दरवाजाही आहे. चवथ्या आणि पाचव्या दरवाज्याच्यामध्ये पहारेकर्यांसाठीच्या देवड्या आहेत. पाचवा दरवाजा भव्य आहे. आणि जुन्या वास्तुंची साक्ष देत उभा आहे. किल्ल्यात बरीच झाडी माजली आहे. नकाशात दाखवलेल्या वाटेप्रमाणे आम्ही वाड्याच्या दिशेने निघालो. वाड्यात प्रवेश करायला छोटे कमानदार दरवाजे आहेत. एका मागुन एक असे तीन दरवाजे आपल्याला दालनात घेउन येतात. हा वाडा थोडा भुलभुलैय्या टाईप आहे. वाड्याची बरीच पडझड झालेली आहे. भिंती तितक्या शाबुत आहेत. इथुन पुढच्या वाटेने आम्हाला पायर्या शोधुन तटबंदिवर चढायचे होते. बरीच शोधाशोध करुनही पायर्या सापडत नव्ह्त्या कारण किल्ल्यात बरीच झाडी माजलेली आहे. खूप वेळ इकडे तिकडे फिरुन मी जरा उत्तरेच्या बाजुने मोकळ्या जागेवर गेलो असता तटबंदीला लागून असलेल्या छोट्या पायर्या दिसल्या. इथुन एका बुरुजावरुन समोर निळशार अरबी समुद्र आणि रेडीच्या खाडीचे सुन्दर चित्र दिसत होते. मग त्या तटबंदीवरुन चालत चालत आम्ही पाचव्या दरवाज्यापाशी आलो आणि तिथे असलेल्या पायर्यांवरुन खाली उतरलो. किल्ल्यावर अजुन बघण्यासारखे काहीच नव्हते. नुसतं जंगल माजलं आहे. तिथुन आम्ही बाहेर पडलो आणि रेडीच्या किनार्यावर आलो.
किल्ल्याचे काही फ़ोटो
किल्ल्यातल्या त्या वाड्यात शिरलो तेव्हा वर पाहिलं तर
एक सुंदर फ्रेम दिसली. वाड्याचं छ्प्पर केव्हाच उडून गेलेलं. वाड्याच्या
भिंतीवरुन काही झाडं जगली होती आणि एक प्रकारच नैसर्गिक छप्पर त्या
वाड्याला दिसत होतं. पण सगळ्यात सुंदर त्या झाडांच्यामधुन ते निळं आकाश
दिसत होतं.
बुरुजावरुन दिसणारा आरवलीचा किनारा आणि रेडीची खाडी
महाराष्ट्रात या. वाघ तुमची वाट पाहत आहे. :) अह्ह्ह!! काय सुंदर किनारा होता! अगदी निळाशार पसरेला. शांत! एक - दोन अंग्रेज कपल्स तिथे समुद्रस्नान करत होते. आम्ही तिथुन पुढे किनार्यावरुन चालत निघालो. अनवाणी किनार्यावरुन चालताना काय भारी वाटत होतं. पाणीही अतिशय गार होते. बराच वेळ तिथे फिरुन मग आम्ही तेरेखोलला निघालो. तेरेखोल रेडीहुन ५ किमीवर आहे. इथला तेरेखोल हे गाव गोवा सरकारच्या हद्दीत येते. तेरेखोलची नदी अरबी समुद्राला जिथे मिळते तिथे काठावर हे गाव वसले आहे. इथल्या शांततेमुळे बरेच अंग्रेज लोक्स इथे असतात. आम्ही किल्ल्यावर पोचलो तेव्हा तिथे एका शाळेची सहल आली होती आणि सगळी मुले किल्ल्याच्या बाहेअरच्या आवारत जेवायला बसली होती. गोवा सरकारच्या हद्दीत असल्याने किल्ला उत्तम आहे. आतमध्ये एक मस्त रेस्टॉरंट आहे. गडाच्या आत पोर्तुगिजकालिन "सेंट अँथनी" चर्च आहे. किल्ल्यावर बाके काही विशेष नाही. पोर्तुगिज बांधणीचे कॅप्सुल बुरुज इथे पाहवयास मिळतात. इथुन तेरेखोलची खाडी आणि समोरे केरी बीच फार सुन्दर दिसतं. १७व्या शतकात सावंतवाडीच्या खेमसावंतांनी या किल्ल्याची उभारणी पोर्तुगिजांवर लक्ष्य ठेवण्यासाठी केली. त्यानंतर हा किल्ला पोर्तुगिजांकडेच होता.
किल्ल्याचे प्रवेशद्वार
किल्ल्यातले चर्च
बुरुजावरून दिसणारे केरीम बीच, तेरेखोल नदी आणि अरबी समुद्राचा संगम
किल्ला
फिरुन झाल्यावर आम्ही तेरेखोलच्या जेट्टीवर गेलो. इथुन एक मोठ्ठी लाँच
निघते आणि समोर गोव्याच्या केरीम बीचपर्यंत सोडते. इथे थोडावेळ बसुन मग
आम्ही परतीला लागलो. परत येताना महाराष्ट्र आणि गोवा बॉर्डरवर असलेल्या
जकात लाटेवर आम्हाला मपोसेच्या पोलिसांनी थांबवलं. इकडचं तिकडचं न विचारता
त्याने "पहिल्यांदा बॅग चेक केली. गोव्यात दारु स्वस्त असल्याने मोस्ट ऑफ
लोक इथुन दारु विनापरवाना घेउन येतात. त्यामुळेच असेल की त्याने आमची पहिली
बॅग चेक केली. मागल्यावेळी इथे आलो होतो तेव्हा माझा कझिन ड्युटीवर होता.
तिथुन आम्ही निघालो आणि पुन्हा हुड्यावर आलो. इथुन आता आरोंद्याला त्या
कझिनच्या घरी जेवायचं आंत्रण होतं तिथे गेलो. हा कझिन म्हणजे माझ्या मामीचा
भाउ. तो माझ्याच वयाचा. त्यावेळी सुट्टी पडली की मी इथे आरोंद्याला येत
असे. मग दिवसभर आमचे उंडगेगिरी सुरु असायची. इथे समुद्र जवळ असल्याने मला
हा गाव अतिशय आवडायचा. आम्ही दिवसभर खेळायचो, भटकायचो, कधी मासे पकडायला
जायचो तर कधी किरणपाणी इथे लाँचमध्ये बसुन पलिकडे गोव्याच्या किनार्यावर
फिरुन यायचो. इथुन अरंबोळ वैगरे अगदी हाकेच्या अंतरावर आहे. खूप वर्षानी मी
इथे आलो होतो. तिथे मस्त मच्छी खाउन आम्ही सावंतवाडीच्या रस्त्याला लागलो.
सचिनला सांवतवाडीची प्रसिद्ध लाकडी खेळणी त्या भाचींसाठी घ्यायची होती. मी ही कधी त्या चितार आळीत गेलो नव्हतो. चितार आळीत फिरुन काही लाकडी खेळनी खरेदी केली आणि तिथुन आम्ही घरच्या वाटेला लागलो. वाडीहुन घरी पोचायला अर्धा तास पुरेसा होता. अंदाजे पाच पर्यंत आम्ही पोचलो असतो. पण काही तरी वेगळंच झालं...
सावंतवाडि - चितार आळी ( खेळणी)
सावंतवाडीहुन निघुन आम्ही तळवडेला पोचलो. इथुन सरळ रस्ता
वेंगुर्लेला जातो आणि डावीकडे वळल्यास मातोंडमार्गे पालला म्हणजे आमच्या
घरी पोचायचा शॉर्टकट होता. रस्ता मला माहीत होता. पण माहीत नाही कुठे तरी
मी चुकलो. तळवडे गेटमधुन निघाल्यावर काही अंतरावरच पालसाठी उजवीकडे वळावं
लागतं, पण तो रस्ता इतका छोटा होता आणि तिथे कुठेच मार्गदर्शक फलक नव्ह्ता
त्यामुळे मी चुकलो आणि सरळ पुढे गेलो. काहीवेळाने सचिनने बाईक माझ्याकडे
दिली. खूप वर्षानी मी बाईक चालवायचा धाडसी प्रयत्न करत होतो. पहिल्या
झट्क्यात जमली नाही मग पुन्हा किक मारली, रेझ दिला, पहिला गिअर टाकला आणि
हळूहळू बाईक मारायला लागलो. रस्ता खडबडीत होता. मी ३०-४० वर बाईक मारत
होतो. फक्त मला भीती चढावाची वाटत होती कारण चढाव आल्यावर बाईक नक्की
कोणत्या गिअरवर आणि किती स्पीडवर ठेवायाची हे माहीत नव्हतं. तरी सचिन मागुन
सांगत होता आणि मी त्याचं ऐकुन गाडी मारत होतो. थोड्यावेळ्याने मातोंड आणि
पालला जोडणार तो खतरनाक चढाव आला आणि मी गांगरलो. कारण समोरुन एसटी वैगरे
आली तर उतार असल्याने एसटीवाले जोरात येतात. पण तसं काही झालं नाही. सचिन
सांगत होता गाडी आहे त्या स्पीडवरच ठेव. पण बाईकने थोडा वेग घेतला होता.
चढावाच्यामध्ये आलो आणि सचिन ओरडला गिअर पुढे टाक!
आता पुढे म्हणजे नक्की
कुठे हे धड कळेना. त्यात गिअर बदलायचा म्हणजे क्लच दाबायचा आणि गिअर
बदलायचा हे माहित होते. मी गिअर बदलायसाटी क्लच दाबला गिअर बदलणार इतक्यात
लक्ष्यात आलं की बाईकला रेझ मिळालाय.
अतिशय कन्फ्युझ्ड सिच्युएशन! सचिनने काही तरी सांगायचं म्हणुन ओरड्ला!
मला कळलं नाही ! बाईक रेझमध्ये होती ! सचिन म्हणाला क्लच सोड!
आय थिंक त्याला रेझ देउन नको असं म्हणायचं असेल.
मी क्लच सोडला! बाईक रेझमध्ये! फुल्ल व्हिल्ली ! काटकोनात उभी राहिली
अगदी घोडा दोन पाय वर करुन जसा उभा राहतो ना अगदी तशीच!!
आम्ही दोघे होतो त्या पोझीशनमध्ये धपकन खाली बसलो. बाईक समोर उभी राहुन बाजुला जाउन आडवी झाली !! हे सगळं कसं २०-३० सेकंदात घडलं!!
सुदैवाने आम्हा दोघांना काही लागलं नाही पण बम्सवर पडल्याने रस्त्यावरचे दगड टोचलेच!!
उठुन पहिल्यान्दा बाईक बघितली आणि तिला उचलून उभी केली. बाईकला विशेष काही झालं नव्हतं. डाव्या बाजुचा मिरर आणि पुढला इंडिकेटर दोन्ही गेले होते. बाईक दुसर्याची असल्याने अजुन टेंशन होतं. आम्ही बराचवेळ तिथे उभे राहिलो होतो. त्याचवेळी एक गावकरी तिथून बाईकवरुन जात होता. आम्हाला तिथे उभं बघुन त्याने बाईक थांबवली आणि आमची विचारपूस करायला सुरुवात केली. आम्ही काही नाही म्हणून वैगरे त्याला टाळलं पण त्याने ओळखलं होतं की हे दोघे बाईकवरुन पडलेत. आम्ही बाईक सुरु करुन पाहिली. ती ठीक होती. आता इथुन अगदी थोड्याच वेळ्यात आम्ही घरी पोचणार होतो. पण बाईकचं काय सांगायचं याचं टेंशन होतं. इथुन चढावावरुन आम्ही वर कापावर आलो आणि घराच्या दिशेने सुटलो. मी मामाला कॉल केला आणि त्याला सगळं सांगितलं.
१५-२० मि. माझ्या लक्ष्यात आलं की हे
माझं गाव नाही. म्हणजे मातोंडचा चढाव चढल्यावर कापावरुन लगेच उतार सुरु
होतो आणि ५ मि. आम्ही घरी पोचायला हवं होतं. पण १५-मि झाली तरी आम्ही पोचलो
नव्हतो. आजुबाजुचा परिसर ओळखिचा वाटत नव्हता आणि पुढे एका वाडीकडे आलो आणि
आजुबाजुची घरं बघुन मी ताडलं की मी रस्ता चुकलोय! पण चुकून कोणत्या गावात
आलो हे ही कळलं नव्हतं! सचिनला बाईक थांबवायला लावली आणि तिथे उभ्या
असलेल्या गावकर्यांना मी विचारलं की हा कोणता गांव आहे आणि इथुन पालला
कसं जायचं. ते लोक आम्हाला बघुन चिंतेत आले. एकजण म्हणाला हे आजगांव आहे.
भेन्डी! मी कसा काय चुकलो आणि कुठे चुकलो हेच लक्ष्यात येत नव्हतं. कारण
त्या चढावापर्यंत आणि तिथुन पुढे सड्यापर्यंत अगदी मला वाटलं होतं की मी
माझ्याच गावी आहे. कारण सगळा रस्ता अगदी सेम होता. आता काळोख पडायला आला
होता. त्यातल्या एकाने आम्हाला संगितलं की असेच जर सरळ पुढे गेलात तर
शिरोड्याला पोचाल किंवा पुन्हा मागे जा. कापावर जिथे दोन रस्ते फुटतात
तिथुन लेफ्ट मारा कही वेळाने अजुन दोन रस्ते दिसतील. पुन्हा लेफ्ट मारा.
जोसोली मार्गे तुम्ही आसोली या गावी पोचाल. आसोलीहुन घरचा रस्ता मला माहित
होता. शिरोड्याहुन पुन्हा उलटं येणं अजुन उशिर झाला असता म्हणुन आम्ही मागे
फिरलो.
सड्यावर आलो तिथे त्या माणसाने संगितल्याप्रमाणे फाट्यावरुन
लेफ्ट मारला. संध्याकाळ उलटुन गेली होती. हा रस्ता खराब होता. लालमातीच्या
रस्त्यावरुन धुरळा उडवत आम्ही पुढे चाललो होतो. काही वेळाने पुन्हा एका
तिठ्यापाशी आलो. इथुन लेफ्टला जायला त्या माणसाने सां गितलं होतं. तरीही
पुन्हा एकदा तिथुन जाणार्या एका माणसाकडुन कन्फर्म करुन घेतलं आणि आम्ही
जोसोलीच्या मार्गाने निघालो. हा रस्ता मस्तच होता. एका ठीकाणी डोन्गर फोडुन
वळणावळणाचा सुन्दर रस्ता बनवला आहे. दोन्ही बाजुला विशाल लाल रंगाचे डोंगर
उभे आहेत आणि त्या खिंडीतुन वळणावळणाच्या रस्त्यातुन आम्ही जोसोली गावात
पोचलो. हा रस्ता मला अतिशय आवडला होता. स्पेशली ती खिंड. जोसोलीतुन पुढे
आम्ही आसोलीला आलो आणि तिथुन घरी पोचलो. बाईकवाल्याची बाईक दिली. त्याला सगळं
समजावून सांगितलं. येउन जाउन ११० किमी झालं होतं आणि आम्ही १०० रु.
पेट्रोल भरलं होतं, सो त्याला ४०० रु. देउन आम्ही घरी पोचलो तेव्हा साडेसात वाजले होते.
तळवडेला
चुकल्यामुळे आम्हाला २०-३० किमीचा अतिरिक्त फेरा पडला होता. पण आजचा
दिवसही भन्नाट गेला होता. दोन किल्ले, खूप वर्षानंतर मित्राच्या घरी,
सावंतवाडीची चितार आळी, छोटासा अपघात, चुकलेली वाट आणि तो जोसोलीतला खिंडीतला रस्ता !!! घरी पोचलो आणि आता रात्री जत्रेला जायची तयारी करु लागलो.... कोंडुऱ्याची सागरसाद![]() कोकण किनाऱ्यावरील एक छोटंसं गाव कोंडुरा. चिं. त्र्यं. खानोलकर म्हणजे आरती प्रभू यांच्या कादंबरीतून अजरामर झालेलं, त्यावर आधारलेला शाम बेनेगल यांचा चित्रपटही आहे. खानोलकरांच्या गूढ लेखनातून उभ्या राहणाऱ्या विश्वाचा नायक म्हणजे रौद्र, गंभीर, रम्य असलेला निसर्ग. साहित्यातून वाचलेली, कथांमधून ऐकलेली गावांची नावं आपल्याला आमंत्रण देत असतात. एखादी कथा कादंबरी वाचत असताना जे चित्रविश्व आपण मनात उभे करत असतो, त्याला प्रेरित करणारं खरं ठिकाण कसं असेल हे पाहण्याची स्वाभाविक उत्सुकता आपल्याला असतेच. जिम कॉर्बेटच्या शिकार कथा वाचताना रुद्रप्रयाग, ठाक, काठगोदाम, चौगड अशा ठिकाणांबद्दल आकर्षण आणि उत्सुकता निर्माण झाली. कोंडुराच्या समुद्रकिनाऱ्याबद्दलही माझ्या मनात हीच भावना होती. कसं असेल हे ठिकाण? माझ्या मनात रंगवलं आहे त्या चित्रात दिसतं तसंच असेल का? हा विचार करत करत मी कोंडुराची वाट शोधत निघालो होतो. वेंगुर्ल्याच्या उत्तरेला दाभोळी-वायंगणी नावाचा अतिशय सुंदर, स्वच्छ, शांत सागरतीर आहे. आणि त्याच्या उत्तरेला एका डोंगराच्या पल्याड आहे कोंडुरा गाव. आणि तिथून कच्च्या वाटेने पाव किलोमीटर उतरून गेलं की आपल्याला हे सागररत्न गवसते. ![]() अनेक पुस्तकांमधून या ठिकाणी जाण्याची वाट दुर्गम आहे असं लिहिलं आहे. हा अतिशय छोटा समुद्रकिनारा दोन टेकड्यांच्या मध्ये आहे त्यामुळे तिथं पोहोचण्यासाठी तीव्र उताराची वाट शेवटच्या २०० मीटर मध्ये पार करावी लागते. पण हल्ली अगदी शेवटपर्यंत वाहन जाऊ लागले आहे. रस्त्यातील शेवटचा टप्पा मी गेलो तेव्हा कच्चा आणि खूप उतार असलेला होता, तसेच डांबरीकरण झालेले नसल्याने दगडधोंडे आणि लाल माती असलेली घसाऱ्याची वाट यावर गाडी घालण्यापेक्षा मी ती वर गावात पार्क केली आणि सुमारे पाव किलोमीटर अंतर चालत गेलो. दहा मिनिटांपेक्षा कमी वेळात मी कोंडुरा किनाऱ्यावर पोहोचलो होतो. ![]() तिथं महादेवाचं मंदिर आहे. नुकताच जीर्णोद्धार झाल्याने शहरी धाटणीचे दिसणारे हे मंदिर त्या ठिकाणी कालसुसंगत वाटेना. कोकणात हा anachronism चा त्रासदायक अनुभव पुन्हा पुन्हा येत राहतो. पण त्याकडे जमेल तितकं दुर्लक्ष करून पुढे जायचं. अशा ठिकाणी गाडीवाट असणे हे गावकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने आवश्यक जरी असलं तरीही पर्यटक जर इथं गाड्या भरून आले तर इथं जी काही गोंगाटमय जत्रा भरेल आणि कचऱ्याची जी काही रांगोळी होईल ती कल्पना करूनच कापरं भरलं. मी तुम्हाला इथं नेतोय खरा पण मला वचन द्या की तुम्ही सुजाण विवेकी पर्यटक असलं काहीही करणार नाही. ![]() कोकणातील तीन जिल्हे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग… पण प्रत्येक जिल्ह्यात निसर्गाचं, समुद्राचं रूप निराळं. रायगड जिल्ह्यातले समुद्र किनारे साधेपणाने लक्ष वेधून घेणारे.. रत्नागिरीत निळ्याशार समुद्राच्या जोडीने आपण भेटतो राकट डोंगरकड्यांना आणि गर्द वनराईला.. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र निसर्गाच्या किमयेची विविधता ही शब्दांनी वर्णन करण्याच्या आवाक्याबाहेरची आहे. मी काढलेल्या फोटोंमधून, व्हिडिओंमधून मी तुम्हाला या विश्वाचं भौतिक रूप दाखवू शकेन. पण अनुभवाची चौथी मिती ना लेखनातून साध्य होते ना फोटोंतून. कदाचित एखाद्या कसलेल्या चित्रकाराने तिथं काही दिवस राहून करामत केली तर इथं असण्याच्या अनुभवाची झलक तरी मिळेल. मंदिरासमोर माझं सामान ठेवून मी अनवाणीच किनाऱ्यावर उतरलो. ![]() किनारा अगदी छोटासाच. नजरेच्या कोनात मावेल असा.. अथांग सागराला भरभरून मिठी मारता येईल असं मला क्षणभर वाटलं. ओहोटी लागली होती. आणि वाळूतला ओलेपणा पावलांना थंडावा देत होता. रेशमी पांढऱ्या साडीला मोत्यासारखी चमक असते.. कोंडुऱ्याच्या पुळणीला हीच मोतिया चमक आहे. या किनाऱ्यावर असलेल्या माडांपैकी काही उंच ताठ उभे आहेत, तर काही वाकून जमिनीच्या दिशेने वळलेले आहेत. मी गेलो होतो तेव्हा सकाळचे दहा वाजले असतील. सूर्य माझ्या मागेच होता. नारळाच्या झावळ्यांतून झिरपणारी किरणे किनाऱ्यावर ऊन-सावलीची नक्षी रेखत होती. सूर्य जसजसा हळूहळू वर येत होता, तसतशी ही नक्षी नवीन आकार, नवीन रूप धारण करत होती. ![]() या किनाऱ्याजवळ दगडांमध्ये एक कोंड आहे. कोंड म्हणजे गुफा. इथं खळाळत जाणारं भरतीचं पाणी धीर गंभीर आवाजात केलेल्या मंत्रोच्चारांची आठवण करून देत होतं. या किनाऱ्यावर अनेक लॅटेराइट खडक आहेत.. त्यातून वाट काढत भरतीचे पाणी किनारा भरून टाकते. आणि परत जाताना सखल भागाच्या ओंजळीत थोडे पाणी साठून राहते. किनाऱ्याला एक वेगळे सौंदर्य देते. ![]() माझ्या मनातला कोंडुरा थोडा वेगळा होता. पण मी जे प्रत्यक्ष पाहिलं ते कल्पनेतून जास्त मोहक होतं. दर्या फिरस्ती करत असताना रेवसपासून तेरेखोलपर्यंत मी जवळजवळ सव्वाशे समुद्रकिनारे पाहिले आहेत. या सगळ्यांबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतात. असं वाटतं की आपल्या शब्दांतून कोकणातील निसर्गसौंदर्याची विविधता मांडणे अशक्य आहे. माझं प्रवासवर्णन फक्त साक्ष आहे माझ्या अनुभवाची. आणि तुम्हाला हाक आहे ही अपरान्तभूमी अनुभवण्यासाठी येण्याची मालवण तालुक्यातील पर्यटन स्थळे :सिंधुदुर्ग किल्ला- मालवण नजिक भरसमुद्रात “सिंधुदुर्ग” हा जलदुर्ग आजही आपला ऐतिहासिक वारसा जतन करत खंबीरपणे उभा आहे. इ. स. १६६४ मध्ये ‘कुरटे’ नावाने ओळखल्या जाणार्या या बेटावर ४१ एकर क्षेत्रात शिवाजी महाराजांनी किल्ल्याची उभारणी केली. सागरी आरमाराचे हे तत्कालीन महत्त्वाचे ठिकाण होते. किल्ल्यास ३२ बुरुज आहेत. तटबंदी भक्कम व नागमोडी वळणाची आहे. किल्ल्यात शिवाजी महाराजांचे राज्यातील एकमेव शिवरामेश्र्वर मंदिर आहे. तसेच महाराजांच्या हाता-पायाचे ठसे जतन करुन ठेवण्यात आले आहेत. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
गावाचे नाव :- वालावलजिल्हा :- सिंधुदुर्ग जवळचे मोठे गाव :- मालवण, कुडाळ, परूळे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वालावल नावेचे पुरातन निसर्गरम्य गाव आहे. या गावात नारायणाचे पुरातन कौलारू मंदिर आहे. वालावल गावाचे ६ व्या शतकातील नाव बल्लावल्ली होते. गावाला लागून असलेले दाट जंगलांनी वेढलेले डोंगर, दर्या, गावाच्या उत्तरेकडून वहाणारी कर्ली नदी यामुळे प्राचीन काळापासून हे गाव एखाद्या वनदुर्गाप्रमाणे दुर्गम होते. त्यामुळे प्राचीन काळापासून राजेरजवाडे, या भागातील अधिकारी यांनी या गावाचा आसरा घेतलेला आहे. इ.सनाच्या ११ व्या शतकात शिलाहार राजांचे या ठिकाणी वास्तव्य होते. नंतर विजयनगरच्या काळापासून बहामनी व नंतर विजापूरच्या राजवटी पर्यंत प्रभूदेसाई घराण्याकडे कुडाळ महालाची जहागिरदारी होती. त्यांचे वास्तव्यही वालावल गावात होते. इ.सनाच्या ११ व्या शतकात मुसलमानांनी गोवा काबीज केला. त्यावेळी गोव्यातील पेडणे महालातील हरमळ गावातून श्री देव नारोबाची मुर्ती ब्राम्हणांनी वालावल गावात आणली. त्यावेळी चंद्रभान व सूर्यभान हे वीर पुरुष याठिकाणी अधिकारी होते. त्यांनी नारायणाचे मंदिर बांधून वालावली गावाचे उत्पन्न मंदिराला दिले. मंदिरा समोरील दिपमाळांच्या मध्ये मंदिराची स्थापना करणार्या कल्याण पुरुषाची देवळी बांधण्यात आली आहे. लक्ष्मी नारायण मंदिराच्या स्थापनेचा काळ साधारण इ.स.१३५० ते १४०० च्या दरम्यान असावा. मंदिराची बांधणी चालुक्य पध्दतीची असून कालौघात मुळ मंदिराच्या बांधकामात भर पडत गेली. विलोभनीय सृष्टीसौंदर्य, मनाला भुरळ घालणारा इथला नयनरम्य परिसर, जीवनाला जलसंजीवनी देणारी कर्ली नदी! आणि या अशा मांगल्याची, पवित्रतेची जपणूक करणारे श्री लक्ष्मीनारायण मंदिर नजिकच श्रीदेव रवळनाथ, उंचावर वसलेले व तेथून सुमारे तीन-चार कि.मी. लांब असलेले माऊली मंदिर! सारेच अविस्मरणीय! वालावलचा श्री देव नारायण ! दंतकथेनुसार श्री नारोबा व माऊली हे भाऊबहीण तिर्थयात्रेला चालले होते. वाटेत वालावल गावी कुपीच्या डोंगर पठारावर (सड्यावर) माऊलीला तहान लागली म्हणुन श्री नारोबा पाणी आणण्यासाठी दरीत (गावात) उतरला. तेथील घरातून वड्याचा स्वयंपाक चालू होता. त्या वासाने नारोबाची भूक उफाळून आली. माऊलीला विसरून तो तिथेच जेवला. पोट भरल्यावर त्याला माऊलीची आठवण झाली. पाणी घेऊन भीत भीतच तो डोंगरावर गेला. नारोबा वेळेवर पाणी घेऊन आला नाही म्हणून माऊलीला खुप राग आला होता. रागाच्या भरात तिने नारोबाच्या श्रीमुखात दिली. (श्री नारोबाच्या मुर्तीच्या गालावरील खडडा याची खुण म्हणून दाखवतात.) या भांडणामुळे पुढे न जाता माऊली तिथेच राहीली.माऊलीचे देवालय पर्वती म्हणून सड्यावर बांधलेले आहे. (या ठिकाणी नवरात्रोत्सव होतो.) श्रीनारायणाचे मंदिर गावात आहे. दरवर्षी वैकुंठ चतुर्दशीस नारोबा, माऊलीस पाणी घेऊन जातो (श्रीनारायणाची पालखी पाणी घेऊन माऊली मंदिरात जाते.) श्री लक्ष्मीनारायाणाचे देवालय गावांतील “मुडयाचा कोन” या नावाच्या दरीच्या पायथ्याशी बांध घालून बनविलेल्या सुंदर विस्तीर्ण तलावाच्या काठी बांधलेले आहे. नैसर्गिक सौंदर्यामुळे व प्रसन्नतेमुळे या स्थानाला आपोआपच गांभीर्य व पावित्र्य लाभले आहे. ईतिहास - भगवान परशुरामाने कोकण प्रदेश वसविल्यापासून आर्यांची अधिसत्ता येथे सुरु झाली असावी. इ.स. पूर्वी २५० च्या सुमारास मौर्यवंशीय सम्राट अशोक याच्या अधिपत्याखाली रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा प्रदेश होता, असे इ.स. १८२२ मध्ये ठाणे जिल्ह्यात नालासोपारा या ठिकाणी सापडलेल्या शीलालेखावरून दिसून येते. सम्राट अशोकाच्या अखेरच्या काळात मौर्य सत्ता नष्ट होऊन हा प्रदेश सातवाहन किंवा शालिवाहन राजघराण्याकडे आला. त्यावेळी हा प्रदेश दक्षिण राष्ट्रांत मोडत असे. शालिवाहन राजघराण्याचा पहिला राजा सिमुक हा इ.स. पूर्वी ७३ व्या वर्षी गादीवर बसला. पैठण ही त्याची राजधानी होती. इसविसनाच्या सहाव्या शतकाच्या आरंभास चालुक्य कुळातील राजांनी दक्षिण राष्ट्र जिंकले. त्यांची राजधानी वातापीपूर (आत्ताचे विजापूर जिल्ह्यातील बदामी) ही होती. चालुक्यांनी दक्षिण कोकण ताब्यात घेतल्यापासून त्यांची दक्षिण कोकण व गोव्याची राजधानी रेवती द्वीप म्हणजे आजचे सिंधुदुर्गातील रेडी हे गाव होते. या चालुक्य कुळातील सत्याश्रय पुलकेशी नावाच्या राजाने आपला मुलगा चंद्रादित्य यास कुडाळ येथे राज्यकारभार करण्यासाठी पाठविले होते. हा चंद्रादित्य राजा व त्याची राणी विजयभट्टारिका ही फार उदार मनाची होती. राणी विजयभट्टारिका हिने कोचरे व नेरूर येथे काही जमिनी इनाम दिल्याचे ताम्रपट सापडले आहेत. वालावल गावाची वसाहतही प्राचीन असून नेरूर येथे सापडलेल्या एका ताम्रपटावरून या गावांचे चालुक्यकालीन नाव “बल्लावल्ली” असल्याचे दिसते. या ताम्रपटांतील उल्लेख असा- “नदी तटस्थ बल्लावल्ली सहम्यपूरयोर्मध्ये नेरूर नाम्ना ग्राम:” या ताम्रपटाचा काळ इ. स. ७००-७०१ असा असून त्याचा मुख्य उद्देश चालुक्य नृपती विजयादित्य याने वत्सगोत्री जन्नस्वामी याचा पुत्र देवस्वामी याला बल्लावल्ली व सहम्यपूर (सध्याचे सरंबळ) या गावांच्या मध्ये असलेले नेरूर हे गाव दान दिले हे नमूद करण्याचा होता. त्यानंतर आठव्या शतकात राष्ट्रकूट वंशाची अधिसत्ता आली. दक्षिण कोकणावर शिलाहार राजांनी पण राज्य केले. प्रथम ते राष्ट्रकूट व चालुक्यांचे मांडलिक होते. नंतर काही काळ स्वतंत्र राजे म्हणूनही राज्य करीत होते. “अकराव्या शतकाच्या सुमारास महालक्ष्मी लब्धवर प्रसाद ही उपाधी लावणाऱ्या कोल्हापूर शाखेच्या शिलाहार राजांनी ज्यावेळी कोकण प्रांतात राज्य मिळविले त्यावेळी वालावल येथील कुपीचा डोंगर या ठिकाणी त्यांचे वसतीस्थान असल्याचे दिसून येते” (असा हा सिंधुदुर्ग-ले. माधव कदम). शिलाहार भोजराजाने इ. स. ११०३ च्या सुमारास सिंधुदुर्गातील विजयदुर्ग किल्ला बांधला. इ. स. १२१२ मध्ये देवगिरीच्या यादव नृपती सिंधण याने शिलाहारांचे राज्य जिंकले. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील प्रसिद्ध शिवमंदिर यादवकुळातील राजांनी बांधले, असे म्हणतात. “यादवांच्या कारकिर्दीत कृष्णप्रभू या कुडाळदेशकर भारद्वाज गोत्री ब्राम्हणाला कोकणचा सर्वाधिकारी म्हणून नेमले गेले होते.” (असा हा सिंधुदुर्ग – श्री. माधव कदम) कै. रावबहाद्दूर वासुदेव अनंत बांबर्डेकर हे “मठगांवचा शिलालेख आणि ब्राम्हण सामंत राजवंश” या आपल्या पुस्तकात म्हणतात- “इ.स. च्या बाराव्या शतकात कुडाळचे देसाई यांनी सर्व कोकणात पुष्कळ दूरपर्यंत स्वाऱ्या केल्या होत्या असे समजते.” (वि.ज्ञा.वि. पु. १८) ‘In the twelfth century the Desai of Sawantwadi, the most northern of the poligar chiefs, overran the whole of the kokan’ (Bom.Gazeteer- Sawantwadi History). सावंतवाडी हा शब्द इ.स. १८ व्या शतकाच्या सुरवातीस रूढ झाला (तत्पूर्वी त्या प्रदेशाला कुडाळ प्रांत म्हणत). इ.स. १३१८-१९ मध्ये दिल्लीच्या मुस्लिम सुलतानांनी मलिक कफूरला पाठवून यादवांची सत्ता नष्ट केली व तिथून मुस्लिम सुलतानांची सत्ता सुरु झाली. मलिक कफूरच्या शेवटच्या स्वारीत गोमांतक त्याच्या साम्राज्यात गेला. “गोमंतकीय जनतेला मुसलमानी अंमल फार त्रासदायक झाला. हिंदू चालीरीती, समाजाची व्यवस्था, उत्कर्षाची साधने मुसलमानी विचारांच्या अगदी विरुद्ध असल्याने प्रत्येक ठिकाणी अपमान आणि त्रास सोसावे लागत. (आपल्या गोमांतक – गोमांतकाचा संक्षिप्त इतिहास- ले. श्री. प्रसाद गांवकर १९४७). चौदाव्या शतकाच्या मध्यापासून मुसलमानांनी गोव्यात प्रलय मांडला होता, आणि हिंदूंची दैना होऊन त्यांची देवालये भ्रष्ट होऊ लागली होती. “इ.स. १३५१-५२ मध्ये बहामनी हसन गंगूने गोवा घेऊन कदंबांचे राज्य बुडविले. इ.स. १३५२ ते १३८० मध्ये बहामनी सत्तेने गोव्यांत धर्मांतर, प्रजेची छळवणूक करून देवालये भ्रष्ट केली. गोवा प्रदेशाचे राज्य कदंबांकडे होते. तेव्हा सप्तकोटीश्वराला त्यांनी आराध्यदैवत मानले होते…. बहामनी सलतनतीने कदंबांचा पराभव करून गोवा घेतले तेव्हा त्यांनी सोमनाथप्रमाणे याही मंदिरात संपत्ती पुरून ठेवली आहे. अशा समाजाने संपूर्ण मंदिर उद्ध्वस्त करून टाकले.” (अर्वाचीन गोव्याचा इतिहास खंड ३, श्री. बा. द सातोस्कर). याच धार्मिक छळाच्या काळात श्री देव नारायणाच्या हरमल येथील देवालयाला धोका उत्पन्न झाला असावा व त्याची पूजाअर्चा करणाऱ्या ब्राम्हणांनी श्री देव नारायणाची मूर्ती उचलून वालावल येथे आणली असावी व जंगलात लपवून ठेवली असावी. इ.स. १३३६ मध्ये बुक्कराज व त्याचा मुलगा हरिहर यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली. त्यांचा मुख्य प्रधान माधवाचार्य याने इ.स. १३४५ मध्ये कोंकण प्रांतावर स्वारी करून मुसलमानांना या प्रांतातून घालवून दिले असे कोचरे येथील इ.स. १३९१ (शा.श. १३१३) च्या नरहरी मंत्र्याच्या ताम्रपटावरून दिसते. याच सुमारास “१३८० मध्ये विजयनगर सम्राट बुक्क याच्या कारकीर्दीत माधव मंत्र्याने गोवा घेतले. व हिंदू धर्माची पुनःप्रस्थापना केली…. तुर्कांना हुसकावून सप्तकोटिश्वर व गोव्यातील इतर मंदिरांचा पुनरुद्धार केला.” (श्री. बा. द. सातोस्कर) (नंतर तीनशे वर्षांनी शिवाजी महाराजांनी १३ नोव्हेंबर १६६८ रोजी मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य मंदिर उभारण्यासाठी कोनशीला बसविली.) अशा तऱ्हेने १४ व्या शतकाच्या उत्तरार्धात हा प्रदेश निर्वयन झाल्यावर व सर्व स्थिरस्थावर झाल्यावर श्री देव नारायणाच्या मूर्तीची स्थापना वालावल गांवी करण्यात आली असावी. इ.स. १४६९-७३ च्या दरम्यान कुडाळ प्रांतावर “ताब्रांची स्वारी” म्हणून प्रसिद्ध असलेली बिदरच्या बहामनी सुलतानाचा सरदार वजीर महंमद गवान याने स्वारी केली. माधवाचार्यांच्या इ.स. १३४५ च्या स्वारीपासून कुडाळ प्रांताची सर्व व्यवस्था होडावडेकर दळवी-सावंतांकडे होती. महंमद गावानाने इ.स. १४७३ मध्ये प्रभू यांच्या सहाय्याने होडावडेकर दळवी सावंतांना दूर करून कुडाळ प्रांत बहामनी सुलतानाच्या अंमलाखाली आणला. महंमद गवान याने कुडाळ प्रांत जिंकल्यावर परत जाताना कुडाळ प्रांताची व्यवस्था आपल्या कोकण स्वारींत मदत करणाऱ्या गोमजी प्रभू यांच्याकडे सोपविली. पंधराव्या शतकाच्या अखेरीस कोंकण प्रांत बहामनी अंमलापासून विजापूरचा बादशहा युसूफ याच्या ताब्यात गेला व आदिलशाही सत्ता सुरु झाली. या आदिलशहाने १६ व्या शतकामध्ये रेडी खाडीच्या मुखाशी बळकट असा एक किल्ला बांधला. तोच आज पडक्या स्थितीत असलेला यशवंत गड. इ.स. १६५२ मध्ये शिवाजी महाराजांनी तो जिंकल्यावर त्याला यशवंत गड हे नांव दिले ..- देवालयाची बांधणी वास्तुशास्त्रोक्त व टुमदार आहे. यास्तव मधून मधून स्थापत्यशास्त्र महाविद्यालयांचे विद्यार्थी या मंदिराच्या स्थापत्यकलेचा अभ्यास करण्याकरिता येतात. हल्लीच (इ.स. २०१० मध्ये) रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे विद्यार्थी स्टडी टूरसाठी येथे चार दिवस मुक्काम करून होते. त्यांच्या सोबत आलेले त्यांचे प्राचार्य श्री. खानोलकर म्हणाले की देवालयाच्या गाभाऱ्याबाहेरील शिल्पकला व देवळाचे बांधकाम हे पायाभूत स्थापत्यशास्त्राच्या कल्पनेशी जवळीक दाखवते. रामनवमीला येथे नऊ दिवस यात्रा असते. वालावल गावची कोणतीही व्यक्ती पंढरपूरची वारी करत नाही, असा गावचा रिवाज आहे. श्री देव नारायणाच्या मूर्तीस प्रसिद्ध विद्वान भय्यादाजी शास्त्री ‘अनिरुध्दाची मूर्ती' म्हणतात. या अगोदरही दुसऱ्या एका महाविद्यालयाची स्टडी टूर आली होती. या देवालयाचे बांधकाम एकाच वेळेस झालेले नसून, क्षेत्र महात्म्य वाढीबरोबर निरनिराळ्या शतकांत भक्तजनांकडून एक एक सुधारणा होत जाऊन त्याला सध्याचे स्वरूप आलेले आहे. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना- मुख्य देवालयाची बांधणी चालुक्य पद्धतीची असल्याचे म्हटले जाते. बांधकाम जांभेथर दगडाचे व आंतील खांब व गाभाऱ्याचा दरवाजा काळीथर दगडाचा आहे. त्यावर सुंदर कोरीवकाम आहे. गाभाऱ्याच्या महाद्वारावरील व त्यापुढील चौकांतील सहा पाषाणी स्तंभावरील कोरीव काम शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. महाद्वाराच्या दोन बाजूला दोन द्वारपाल असून मध्ये वरच्या बाजूस शेषशायी विष्णूची मूर्ती कोरलेली आहे. द्वारपालांच्या वरच्या बाजूलाही देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. महाद्वाराला लागून खाली डावीकडे विनम्र गरुडाची तर उजवीकडे मारुतीची मूर्ती कोरलेली आहे. खांबांची उंची सुमारे ६|| फूट असून खांबास वापरलेला पाषाण काळाकभिन्न व गुळगुळीत आहे. प्रत्येक खांबाच्या मध्यावर एक वीत उंचीच्या वेगवेगळ्या देवदेविकांच्या सुंदर मूर्ती वर्तुळाकार कोरलेल्या आहेत. प्रत्येक खांबावरच्या मूर्तीच्या वरची व खालची वेलबुट्टीसारखी नक्षी सुंदर व वेगवेगळ्या प्रकारची आहे. चौकाचा कडीपाटाचा छत, पाटावर कोरलेल्या पौराणिक देवदेवतांच्या मूर्तीनी भरलेला आहे. या मूर्तींविषयी कै. विश्वनाथ रेडेशास्त्री त्यांच्या “श्रीमन्नारायण चरित्रात” म्हणतात– “चौकातील छताच्या दिग्पतिंना वा दशावतारांस || काष्ठविनिर्मित देखुनि आश्चर्य गमेल सान थोरांस ||” या शिवाय श्री गणेश, महिषासूरमर्दिनी, भस्मासूर मोहिनी, श्रीशंकर यांच्या मुर्तीपण आहेत. श्री. गणेश विष्णू पुजारे (मामा पुजारे) यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन मेषाची तोंडे असलेला अग्निदेव, माणसावर बसलेला नैऋत्ती, बदक वाहन असलेला विश्वकर्मा, हरण वाहन असलेला सोम या लाकडी मूर्ती शंभर दिडशे वर्षापेक्षा जास्त पुरातन आहेत. चौकापुढील मुखशाळेचे काम काळीथर दगडाचे आहे. मुखशाळेचे छत हे शके १८०६ (इ.स. १८८४) मध्ये पुनर्बांधित झाले असावे असे एका दक्षिणोत्तर आडव्या मोठया तुळईवर “शके १८०६ नारायण मुखशाळा” अशा कोरलेल्या अस्पष्ट अक्षरावरून वाटते. यापुढे कोरलेली अक्षरे तुळईवरील रंगकामामुळे वाचता येत नाहीत. मुखशाळेपुढे नव्या जुन्या पद्धतीच्या मिश्रणाने बांधलेला अर्वाचीन सभामंडप व सभामंडपाच्या पुढे काळीथर दगडाची पाच खांबी दीपमाळ आहे. दीपमाळेच्या बांधकामाची पद्धत मराठेशाहीतील असल्याचे म्हटले जाते. या दीपमाळेच्या चौथऱ्यावर कल्याण पुरुषाची घुमटी आणि वृंदावन आहे. घुमटीत श्रीकडे तोंड करून बद्धांजली वीरासन घालून बसलेली विनम्र श्री कल्याण पुरुषाची व हातांत चवरी घेऊन उभी असलेली अशी त्यांच्या परिचारकाची अशा दोन मूर्ती आहेत. वृंदावनाच्या दर्शनी दासमारुतीची मूर्ती कोरलेली आहे. कल्याण पुरुषाची घुमटी श्रींचा सभामंडप बांधण्यापूर्वी सभामंडपाच्या ईशान्य कोपऱ्यातील आता असलेल्या मोठया खांबाच्या बाजूच्या जागेत होती. ही जागा सभामंडपात घेतल्यामुळे समाधीवरील कल्याण पुरुषाची आणि त्याच्या परिचारकाची मूर्ती दीपमाळेच्या चौथऱ्यावर घुमटी बांधून त्या ठिकाणी ठेवण्यात आल्यामुळे, समाधीच्या जागी कोणी बसू नये म्हणून एक लाकडी खुंट उभा करण्यात आला होता. या लाकडी खुंटाबद्दल श्री. गुं. फ. आजगांवकर यांनी आपल्या “वालावल दर्शन” या पुस्तकात “श्री नारायण देवालय बांधण्यापूर्वी हल्लीच्या कोनशिला समारंभाप्रमाणे उभारलेला तो आद्यस्तंभ आहे. अशा प्रकारचा स्तंभ उभारण्याची पद्धत विजयनगर स्थापन होण्यापूर्वीपासून रूढ होती.” असे म्हटले आहे. आता हा खुंटही अस्थित्वात नाही. परंतु तेथील बाळंद्यावर विश्वाकर्माची प्रतीकात्मक मूर्ती स्थापून कोणी बसू नये अशा सूचना लिहून ठेवण्यांत आल्या आहेत. कल्याण पुरुषाच्या घुमटीवर श्रींच्या पादुका कोरलेल्या आहेत. कल्याण पुरुषाने समाधी घेताना आपली नजर सतत श्रींच्या चरणाकडे असावी व श्रींच्या पादुकांवरील पाणी आपल्या मस्तकावर पडावे असे मागणे केले होते असे म्हणतात. श्रींनी आपल्या प्रिय भक्ताची ही इच्छा पूर्ण केली आहे. देवासमोर पितळेचा मोठा कासव मुखशाळेत बसविलेला आहे. त्यावर सन १८८९ असे (शके १८११) लिहिलेले असून स्थापत्यकर्त्याचे नाव भानु बापू हळदणकर असे आहे. देवालयाच्या सभोवार तट आहे. तटाच्या आतील देवस्थानाच्या पवित्र जागेला “जगत्” म्हणतात. या जगताला तीन दरवाजे असून वर नगारखाने बनविलेले आहेत. या नगारखाण्यापैकी दोघांचे नुतनीकरण झाले असून तिसऱ्याचे बांधकाम अर्धवट आहे. तटाच्या आतल्या बाजूस भक्तजनांना राहण्यासाठी “पडशाळा” किंवा धर्मशाळा बांधलेल्या आहेत. श्री नारायण मंदिराच्या उजवीकडे एक जुने देवचाफ्याचे झाड व जुनी धर्मशाळा होती त्या धर्मशाळेच्या मागे औदुंबर व त्याखाली काही योगी पुरुषांच्या समाध्या होत्या. धर्मशाळेच्या जागी देव पावणेराची वास्तू आता पुनः उभी राहिली आहे. नैऋत्येच्या बाजूने जगताला लागून विस्तीर्ण नयनरम्य तलाव आहे. तो तलाव दरीला बांध घालून तयार केलेला आहे. तलावांतील पाण्याचा उपयोग शेतीसाठी, पिण्यासाठी व श्रीदेव नारायणाच्या पूजा-अभिषेकासाठी करतात. या तलावाचे पाणी कधीही खराब होत नाही असा लौकिक आहे. काही वर्षापूर्वी तलावाच्या वेगवेगळ्या भागांतून पाण्याचे नमुने घेऊन तपासले असता ते आरोग्यास हानीकारक नसल्याचे आढळून आल्याचे कळते. श्रीदेव नारायणाची सेवा व या तलावाचे पाणी तीर्थ म्हणून सेवन करून पूर्वी क्षयरोगीही बरे झाल्याचे सांगतात. ह्या पाण्यास तीर्थाप्रमाणे मान असल्यामुळे या तलावाचे पावित्र्य राखणे सर्व ग्रामस्थ व भाविक यांचे कर्तव्य आहे, हे वेगवेगळे सांगणे न लागे. जवळजवळ ६० वर्षापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळातील गोष्ट. एप्रिल-मे महिन्याच्या सुमारास तलावाच्या बांधांतील मधला दरवाजा (मूस) उघडून तलाव पूर्णतः कोरडा करण्यात येई व तलावातील जमीन भुईभाडयाने भातपेरणीसाठी (पुनर्रोपण पद्धतीमधील रोपांसाठी) दिली जाई. तलाव आटला की आजूबाजूच्या विहिरी पण कोरडया होत. लोकांचे पाण्याचे हाल तर व्हावयाचेच पण श्री नारायणाच्या पूजा-अर्चेलाही पाणी मिळणे कठीण होत असे. लागोपाठ काही वर्षे असे झाले आणि एका वर्षी दीड-दोन वीत वाढलेल्या रोपावर प्रचंड प्रमाणात घनदाट अशी कीड पडली. रोपाखालील क्षेत्रापलिकडे अर्ध्या-पाव किलोमीटर (फर्लांगभर) पर्यंत ही कीड दिसत होती. तलाव पुनः कोरडा करून जमीन भुईभाडयाने देण्याचे धैर्यच कुणाला झाले नाही. गेले काही वर्षे एक नवीन प्रथा सुरु झाली आहे. पावसाळयाच्या सुरवातीस मत्स्यबीज तलावात सोडतात आणि उन्हाळ्यात मोठी जाळी घालून मासे पकडतात. त्यामुळे पाणी गढूळ तर होतेच पण पाण्याला माशांचा वास येवू लागतो. ही प्रथा बंद होणे आवश्यक आहे कारण ह्या तलावाला नारायणतीर्थ म्हटले जाते. देवाच्या अभिषेकासाठी हे पाणी वापरतात. या तलावाबाबत शंभर वर्षापूर्वीची स्थिती विश्वनाथ रेडेशास्त्री यांच्या पुस्तकात दिली आहे ती अशी- स्फटिक-सम तळ्याचे देखुनी शुद्ध पाणी | हरिखुनि मज वाटे तेथे ये चक्रपाणी ||दक्षिण दिग्भागी श्रीनारायण तीर्थ नामक तलाव सिन लोहित पद्माही शोभे, यज्जल म्हणे तृषित, ‘लाव’. तलावाच्या काठी शिवलींग व श्रीराम मूर्तीची स्थापना केलेली आहे. ज्यांना दक्षिण रामेश्वराचे दर्शन घेणे शक्य नाही, त्यांनी ते या ठिकाणी घ्यावे अशी श्रद्धा आहे. या शिवलिंगाच्या वरच्या बाजूला संध्यामठ (संन्यमठ) म्हणून एक खोली होती. त्या ठिकाणी काही ब्रम्हवृंद संध्या करीत तर साधू-संन्याशी शांत वेळेस ध्यानधारणा करीत. आता त्या जागी बांधलेली नवीन जागा देवस्थानाच्या कार्यालयाचा भाग आहे. कल्याण पुरुषाने बांधलेले देवालय म्हणजे मुखशाळेच्या मागील भाग. त्यानंतर विस्तार आणि सुधारणा चालूच आहे. मुखशाळेसहित तलावादी रचना श्रीमंत पेशवे यांच्या मदतीने झाली आणि कै. वे. शा. सं. नारायण भटजी इनामदार पित्रे यांनी हे काम करून घेतले. यासाठी इ.स. १७६० च्या सुमारास श्रीमंत पेशवे यांनी सात हजार रुपये वाडी दरबाराकडे पाठवून हे काम करून घेतले. श्रीमंत पेशवे यांनी केलेल्या बांधकामानंतर काही वर्षांनी एका जहाजावरील मोठी घंटा कोणीतरी मुखशाळेत आणून लावली. या घंटेवर ती कोणी, कधी व कोणत्या जहाजासाठी बनविली याबद्दल फ्रेंच भाषेत लिहिलेल्या दोन ओळी होत्या त्या अशा – “La Frigate le Franklin Fait Par Jean Bazin Anantis 1778” शिवाय तिच्यावर येशू ख्रिस्ताचे कृसी फिकशन् व तीन बॅजीस होते. या घंटेबद्दल किंवा ती ज्या जहाजावर होती याबद्दलचा अधिक इतिहास उपलब्ध नाही. नोव्हेंबर २००२ मध्ये या घंटेला तडा गेला व ती निकामी झाली. तिचेच साहित्य वापरून आता तेवढीच नवीन घंटा करून बसविण्यात आली आहे. श्रींच्या भक्तांच्या उदार देणग्यांमुळे देवालयातील आवारातील इमारतींचा जीर्णोद्धार, सुधारणा व नवीन बांधकामे होतच असतात. मंदिरामागील जीर्ण होऊन पडायला आलेल्या दोन धर्मशाळांची पुनर्बांधणी हल्लीच झाली. मंदिराच्या उत्तर तटाला लागून आतल्या बाजूस पूर्वी एक धर्मशाळा होती. आता ती अस्थित्वात नाही. श्री देव नारायणाच्या पूर्वेला तटाबाहेर ग्रामदेवता रवळनाथाचे प्राचीन देवालय आहे. दोन्ही मंदिराच्या मधे एक पिंपळाचा पार असून त्यावर मारुतीची घुमटी आहे. काही वर्षापूर्वी पिंपळाचे झाड पडले. आता तेथे औदुंबराचे झाड वाढले आहे. या मारुतीच्या घुमटीजवळच ब्राम्हणाची (भारद्वाजगोत्री कशाळीकरांचा मूळ पुरुष) समाधी असल्याचे सांगतात. आता तेथे भारद्वाजगोत्री कशाळीकर मंडळातर्फे जीर्णोद्धार करण्यात आला आहे. कै. अ. ब. वालावलकर यांच्या “मठ गावाचा शिलालेख आणि कुडाळ प्रांताचा प्राचीन इतिहास” पुस्तकात छापलेला मंदिर व त्याच्या परिसराचा नकाशा माहितीसाठी पुढे दिला आहे. हा नकाशा ७०-८० वर्षापूर्वी श्री नारायण मंदिराच्या आतील व बाहेरील परिसर कसा होता याची चांगली कल्पना देतो. आता या परिस्थितीत थोडाफार बदल झाला आहे. - श्री. वामन शांताराम वालावलकर संकलित श्री क्षेत्र वालावल या ग्रंथातून | ![]() निसर्गकन्या – तारकर्ली :मालवणच्या बंदरापासून ते तारकर्ली, देवबागपर्यंत सुमारे १२ कि. मी. लांबीची आकर्षक किनारपट्टी आहे. या शांत रम्य अशा ठिकाणी तंबुनिवास व रेस्टॉरंटची सोय करण्यात आली आहे. येथील किनारा जलविहारासाठीही प्रसिध्द आहे. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
देवगड-विजयदुर्ग मार्गावर गिर्येदेवगड-विजयदुर्ग मार्गावर गिर्ये गावात इतिहासकालीन श्री देव रामेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराला व स्वयंभू रामेश्वराच्या पिंडीला दैदिप्यमान अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. भक्तांना पावणारा व संकटाचे निवारण करणारा म्हणून या देवस्थानाचा लौकिक आहे. पंचक्रोशीतील पवित्र व जागृत देवस्थान आहे. या देवस्थान आहे. या देवस्थानची ख्याती सिंधुदुर्गप्रमाणे मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, गोवा या भागातही पसरली आहे. या ठिकाणाचे भाविक हजारोंच्या संख्येने श्री देव रामेश्वराच्या दर्शनासाठी येतात. रामेश्वर मंदिराचा जवळ जवळ 300 वर्ष जुना इतिहास आहे. मंदिराची बांधणी कोकणातल्या सर्व मंदिरांपेक्षा वेगळी अशी आहे. मंदिर साधे, कौलारू असून समोर पाच दीपमाला आहेत. हे मंदिर खोलगट भागात असल्याने समोरून किंवा मुख्य रस्त्यावरून मंदिर दिसत नाही.रस्त्यावरून फक्त मंदिराची हल्लीच्या काळातच रंगवलेली कमान दिसते. कमानी खाली उभे राहून खाली पाहिल्यास अजुन एक छोटी कमान दिसते. त्या कमानीला एक मंदिराच्याच वयाची घंटा लावली आहे. त्या भव्या कमानीतून आत जाण्यासाठी 150 मी. लांब, 15 मी. खोल असा जांभ्या दगडाच्या अखंड खडकातून खोदून मार्ग बनविलेला आहे. खाली उतरून गेल्यावर आत शिरताच मंदिराच्या आवारात 5-6 दीपस्तंभ दिसतात. कौलारू मंदिराच्या चारी बाजूस घनदाट झाडी आणि जंगल आहे. आत शिरल्यावर मंदिराच्या लाकडी खांबावर केलेले त्या काळ्चे कोरीव काम देखील लक्ष वेधून घेणारे आहे. गाभार्यात शिरल्यावर आत मध्ये अजुन एक छोटा गाभारा आहे त्यात प्राचीन काळीन शंकराची पिंडी दिसते. बाहेर एक भव्य नंदी आहे. उजव्या बाजूस एक रिकामा छोटा देवारा आहे, त्यात पुर्वी रामेश्वराची नंदीवर स्वार झालेली सुमारे 3 फुट उंच 50 व किलो वजनाची शुध्द चांदीची बनवलेली,चतुर्भुज श्री शंकराची प्रासादिक मूर्ती होती ती आता तिथून हलवण्यात आली आहे.. तेथील पुरातनकाळाचे साक्षात्कार देणारे देखावे, चोहोबाजूंच्या उत्तुंग कडा, ऐतिहासिक दस्तऐवज, प्रत्येक पावलावर येथे इतिहासाची वैशिष्टये भरलेली आहेत. याच मंदिराच्या परिसरात आंग्रेंच्या घराण्यातील सती गेलेल्या सखीची समाधी, मंदिराच्या चार दिशांचेचार बंगले, मंदिराच्या प्रवेशद्वारी बांधलेली कमान, भव्य बंगली आणि रामश्वराची मन आकर्षून घेणारी मनोहारी चांदीची मूर्ती या सर्व गोष्टी म्हणजे ऐतिहासिक आणि धार्मिक दोन्हींचा सुंदर संगम होय. प्रतिवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. या शिवाय श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या परिसरातील असंख्य भाविक रामेश्वराचे दर्शन घेतात. आवर्जून भेट देऊन पर्यटनाचा आनंद लुटण्यासारखे हे स्थळ आहे. इतिहास :- इ. स. १६ व्या शतकात मंदिराची स्थापना झाली असावी. मंदिराच्या वास्तूस्वरूपावरून या मंदिराचा विकास व विस्तार तीन वेळा करण्यात आला. इ. स. १६ शतकाच्या पूर्वार्धात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी देवस्थानाच्या मूळ स्थानाभोवती दगडी गाभारा उभारला आहे. त्याच कालावधीत कान्होजी आग्रेंचे पुत्र सरखेल संभाजी व सखोजी आंग्रे यांनी गाभाऱ्यापुढे कलाकुसरीने मढविलेला लाकडी चार खांबांचा सुंदर मंडप उभारला आहे. सभोवताली प्रदक्षिणा मार्ग बांधून मंदिर बंदिस्त केले. मंदिराभोवती फरसबंदी प्रांगण करून पश्चिम व दक्षिण दिशेला प्रवेशद्वारे बांधली आहेत. इ. स. १७६३ साली माधवराव पेशवे यांनी सरदार आनंदराव धुळप यांना आरमार सुभ्याचे प्रमुख नेमले तर इ. स. १७७५ साली श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी गंगाधर पंत भानू यांना विजयदुर्ग प्रांताचे मुलखी सुभेदार नेमले. इ. स.१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात सरकार आनंदराव धुळप व गंगाधरपंत भानू या उभयतांनी रामेश्वर मंदिरात बरीच कामे केली. सुभेदार गंगाधरपंत यांनी पुन्हा इ. स. १७८० च्या सुमारास मंदिरासमोर अत्यंत देखणा लाकडी सुरुदार खांब व महिरीपी कमानीने सजविलेला भव्य सभामंडप उभारला. सन १८२७ साली अनंतराव धुळप यांनी इंग्रजांच्या गलबताचा पाडाव करून जप्त केलेल्या एका जहाजावर अजस्र घंटा सापडली. त्या गलबतावरील आणलेली घंटा आनंदराव धुळपांचे वारस कृष्णराव धुळप यांनी ती घंटा इ.स. 1827 साली रामेश्वरला अर्पन करून मंदिराच्या प्रवेशद्वारावर टांगली असून ती आजही चांगल्या स्थितीत आहे. सध्या त्या मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर असलेली दीड मणाची घंटा धुळपांचा शौर्याची आजही साक्ष देत आहे. तसेच मंदिराच्या आवारातच उजव्या बाजूला मराठ्यांच्या आरमाराचे सरखेल संभाजी आंग्रे यांची समाधी व छत्री आहे. या मंदिराचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील पेशवे कालीन चित्रे. मराठा शैलीतील ही चित्रे अतिशय दुर्मिळ आहे. मंदिरातील कलाकुसरीचे काम प्राचीन संस्कृतीचा साक्षात्कार आहे. प्रशस्त बांधणी, प्राचीन चित्रांची आरास मंदिराच्या भव्यतेत भर घालते. मंदिराच्या भिंतीवर रामायणातील विविध प्रसंगांची अनेक रंगीत चित्रे असून अद्यापही त्यातील पुष्कळ चित्रांचे रंग चांगल्या सिथतीत आहेत. मंदिरातील नक्षीकाम पहाण्यासारखे आहे. श्री देव रामेश्वर मंदिर कोकणी व पेशवाई वास्तुशिल्प शैलीचा मिलाफ दर्शविणारा देखणा वास्तूविष्कार असून अशी मंदिरे अभावानेच आढळून येतात. .श्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला.श्री रामेश्वर हे वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत. श्री रामेश्वर मंदिर वेंगुर्ला शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. मंदिराची रचना पुरातन असून मंदिराच्या अंतर्गत केलेले सजावटीचे काम नविन आहे देवस्थानचा पूर्व इतिहास तसेच रचना यासंबंधी थोडक्यात माहिती.... शंकर हे आदिदैवत आर्यपूर्व प्राचीन असून ते लिंगरुपाने दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात स्थापलेले आढळते. त्यावेळी वेंगुर्ल्याचे श्री देव रामेश्वर मंदिर इ. स. १७व्या शतकात स्थापन झाले असावे असा अंदाज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६५५ च्या सुमारास दक्षिण-उत्तर कोकणातला बराच मुलुख काबीज केला आणि संगमेश्वरापासून मालवणपर्यंत आपली सत्ता स्थापन केली. त्यावेळी राजापूरची काही ब्राह्मण घराणी कुडाळ येथे स्थायीक झाली. या ब्राह्मणांचे आणि सावंतवाडी खेमसावंत यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते. अशाच एका ब्राह्मण कुटुंबातील कै. ग. बा. धामणकर नावाच्या गृहस्थास हे श्री रामेश्वराचे लिंग सापडले धामणकर हे वेंगुर्ले व तुळस गावच्या हद्दीतील वडखोलवाडी याठिकाणी जमीन घेऊन शेती करत. तुळस गावाहून एक ओढा येथे वाहत येत होता. या ओढ्यावर बांध घालून त्यांनी तलाव निर्माण केला. या तलावास निशाण तलाव म्हणून ओळखले जाते. या तलावाच्या निर्मितीसाठी धामणकर खोदाई करत असतांना ओढ्याच्या खोलगट भागात श्री देव रामेश्वराचे लिंग सापडले. श्री. धामणकरांनी हे लिंग आपल्या घराजवळ आणून त्याची पूजा अर्चा केली. गावातील गावकर मंडळी व गौड सारस्वत व्यापारी वर्गाची संमती घेऊन या लिंगाची स्थापना गावच्या मध्यवर्ती ठिकाणी नागेश्वर-भगवती मंदिरात त्यांनी ३५० वर्षापूर्वी केली. श्री देव नागेश्वराच्या ठिकाणी श्री देव रामेश्वराचे लिंग स्थापन करण्यात आले. तर श्री देव नागेश्वर मूळ स्थानापासून उचलून श्री देव रामेश्वराच्या डाव्या बाजूस नंदीसह स्थापन करण्यात आला. श्री देव रामेश्वर मंदिराची रचना - श्री देव रामेश्वर देवालयाच्या गाभार्याt श्री रामेश्वराचे लिंग असून लिंगासमोर नंदी आहे. बाजूला जैन ब्राह्मणाचे शिला प्रतिक आहे. गाभार्याच्या बाहेरील उजव्या बाजूस गणपतीची मूर्ती, तीन लिंगाकार शिला व एक नागाची शिला आहे. तर डाव्या बाजूस भगवतीची मूर्ती तसेच भगवतीच्या चाळा कुळ पुरुषाची मुर्ती आहे. गाभार्याच्या डाव्या बाजूस स्वतंत्रपणे नागनाथ देवालय असून यात लिंगावर धातूचा नाग विराजमान आहे व समोर नंदी आहे. या देवालयाच्या समोर लहानसे दत्त मंदिर आहे. त्रैमुर्ती दत्ताचे दर्शन व नागनाथाचे दर्शन एकाच प्रदक्षिणेत घडते हे महत्त्वाचे. दत्तमंदिराच्या मागच्या बाजूस औदुंबर वृक्ष आहे. देवालयाच्या गाभार्याच्या बाहेर सभा मंडपात उजव्या बाजूस श्री देव नितकारी तर डाव्या बाजूस असलेल्या लहान मंदिरात मारुती असून मंदिराच्या मागील बाजूस शनिदेव व मारुती आहे. रामेश्वर देवालयाच्या बाजूस स्वतंत्र असे राम-सीता मंदिर आहे. सभा मंडपातील सर्व खांबांवर वेगवेगळ्या देवतांच्या संगमरवरी टाईल्स लावल्या असून आकर्षक असे कोरिव काम केले आहे. देवालयाच्या समोरच्या भागात डावीकडे असलेल्या घुमटीत गारुडेश्वराची मूर्ती आहे. तर उजव्या बाजूस तुळशी वृंदावन, दिपमाळी आहे. मंदिर परिसरात धर्मशाळा असून वरच्या बाजूस नगारखाना आहे. समोरील भागात पिंपळाचे झाड असून त्या पारावर दुर्गादेवीचे मंदिर आहे. त्याही पुढे एक मोठा तलाव आहे. या मंदिरामध्ये वर्षभर कार्यक्रम सुरु असतात. दर संकष्टीला गणपतीची पालखी, दर सोमवारी भजन, चैत्र महिन्यात जागर, राम नवमी, हनुमान जयंती, अक्षय तृतीया (रामेश्वर वर्धापनदिन), आषाढातील भजनी सप्ताह, श्रावणातील सोमवार होणा-या वरदशंकर पूजा, दसरा, जत्रौत्सव दत्त जयंती, माघ महिन्यातील श्री गणेश जयंती व शिवरात्री हे उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरे होतात. आषाढ महिन्यात होणार सप्ताहाला सात दिवस विविध ठिकाणाहून भाविक दर्शनाला येतात. सप्ताहामध्ये स्थानिक कलाकार रांगोळी घालून आपल्या कलेचे प्रदर्शन करतात. रामेश्वर मंदिर व राम मंदिराता पौराणिक कथांवर आधारीत हालते देखावे साकारले जातात. सातव्या दिवशी दिडी कार्यक्रम होतो व आठव्या दिवशी पालखीवर लाडवांचा वर्षाव करुन काल्याने सप्ताहाची सांगता होते. तसेच महाशिवरात्रीला होणारा रथोत्सवही खास आकर्षणाचा विषय आहे. शिवरात्री दिवशी रात्री पालखी झाल्यानंतर रामेश्वराचे मोहरे (रुपडे) वाजत गाजत रथावर ठेवले जाते. त्यानंतर तरंगदेवतांकडून रथावर नारळ वाढवून रथ प्रदक्षिणेस सुरुवात होते. यावेळी अबालवृद्ध एकच गर्दी करतात. श्री रामेश्वराची पालखी कार्तिक पौर्णिमेला श्री सातेरीच्या भेटीस जाते व कार्तिक प्रतिपदेला रवळनाथ, भुतनाथ, गावडेश्वर यांच्याही भेटीस जाते. त्यावेळी तिथे यथोचित पाहुणाचार केला जातो. कार्तिक एकादशीला रामेश्वराच्या जत्रेस सातेरीची पालखी व तरंगदेवता भेटीस येऊन दोन्ही पालख्यांची मंदिराभोवती प्रदक्षिणा होते. कार्तिक शुद्ध त्रयोदशी गावडेश्वरच्या जत्रेला पुन्हा रामेश्वराची पालखी भेटीस जाते तेव्हा गावडेश्वरची पालखी विठ्ठल मंदिर येथे रामेश्वराची पालखी आणण्यासाठी येते. त्यावेळी होणारा दोन्ही पालख्यांच्या भेटीचा क्षण हा अर्वणीय असतो आपल्या इच्छापूर्तीसाठी म्हणून श्री रामेश्वरला दही भात लिपणे, साखरभात लिपणे, महानैवेद्य, अभिषेक अशा प्रकारचे नवस बोलण्याची प्रथा आहे. संदर्भ : सिंधुदुर्ग . स्वर्गाहुन सुंदर ... | ![]() देवबाग :देवबागला तारकर्लीची खाडी व अरबी समुद्र यांचा सुरेख संगम पाहावयास मिळतो. कर्ली नदीचे विस्तीर्ण, रुंद पात्र, नदीमुखातून देवबागकडे जाताना दोन्ही किनार्यांवर दाटलेल्या हिरव्यागर्द माडांच्या व पोफळीच्या बागा, नदीचा संथ, शांत व सुरक्षित प्रवास, नदीपात्रात लागणारी छोटी मोठी नवलाईची बेटे, पात्रालगत असंख्य माडांच्या अंधारछायेत असणारी कोकणी परंपरेची घरकुले, समोर दिसणारी तुळशी वृंदावने ही सारी दृष्ये पाहत पाहत देवबागकडे सरकत जाणारी नौका हा अनुभव म्हणजे चिरकाल स्मरणात राहणारी एक आनंदयात्राच होय ! | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
वाघाला पुजणारं गाव....तोंडवली,मालवणमालवण तालुक्यातल्या तोंडवली गावात चक्क वाघांचं मंदिर आहे. या व्याघ्रमंदिरात स्वयंभू शिवलिंगाबरोबर वाघांच्या दोन समाधीही आहेत. गावकरी या समाधींचं मनोभावे दर्शन घेतात. पर्यावरण रक्षणाचा आगळा आदर्शच या गावाने घालून दिला आहे कोकण किनारपट्टीवर निसर्ग सौंदर्याने नटलेली अनेक गावं आहेत. तोंडवली त्यातलंच एक गाव. मालवण-आचरा रस्त्यावरून तोंडवली फाट्यावरून आत आलं की, एका वळणावर समुद्राचं दर्शन होतं. यापुढे गाव संपला, रस्ता थांबला असं वाटतं असतानाच रस्ता नागमोडी होत उत्तरेकडे सरकत जातो. समुद्राची निळाई आकाशाला केव्हा जाऊन भिडते समजत नाही. माडांची बनं समोर दिसू लागतात. सुरूचा भिनभिनता आवाज एखाद्या यंत्रासारखा कानापर्यंत पोहोचत असतो आणि आपण तोंडवलीत पोहोचतो. याच गावात चक्क वाघाची पूजा होते. यासाठी गावात व्याघ्रेश्वराचे मंदिर आहे आणि गावच्या ग्रामदेवताच्या प्रांगणात दोन वाघांची समाधीही आहे. व्याघ्रेश्वराच्या मंदिरात असलेल्या स्वयंभू शिवलिंगाशेजारी वाघ, बिबट्या ठाण मांडून असतात. ऐकणारा भीतीने गार होतो, पण गावक-यांना त्याचं काही वाटत नाही. गावाच्या शेतीवाड्यांतून जंगलातून वाघ, बिबट्या व अन्य जंगली श्वापदं बिनधास्त फिरत असतात. तोंडवलीच्या छोटेखानी गावच्या हद्दीत कुणी घुसखोरी करू नये म्हणून हद्दीवर निशाण फडकताना दिसतं. गावच्या सीमारेषेवर एक स्तंभही उभा केला आहे. या भागाला ना कुणी अभयारण्य ठरवलं आहे, ना शासनाचा फतवा आहे. परंतु देवाचा आदेश म्हणून अनेक वर्षापासून येथील ग्रामस्थ या भागात कुणाला शिकारी करू देत नाहीत आणि स्वत:ही करत नाहीत. गावातल्या वाघोबाच्या समाधीतून गावक-यांचं इथल्या निसर्गावर किती प्रेम आहे, याची साक्षच पटते. तोंडवलीला लागूनच असलेल्या वायंगणी गावात पट्टीचे बरकणदार आहेत. त्यांची बंदूक आपल्या भागात येऊ नये म्हणून गावक-यांनी हद्दीवर निशाण रोवले असून त्यापुढे शिका-यांनी येऊ नये, असा अलिखित नियम आहे. शेजारच्या जंगलात एखाद्या प्राण्यावर बंदूक रोखली गेली आणि जखमी श्वापद या गावाच्या हद्दीत पोहोचलं तर, शिकारी त्याचा नाद सोडतात, कारण त्यांना ती शिकार मिळणार नसते. गावात वाघांची समाधी कशी उभी राहिली, याची एक कथा सांगितली जाते. ४० वर्षापूर्वीची गोष्ट. शेजारच्या गावातून वाघावर गोळी झाडली गेली. जखमी अवस्थेत वाघ तोंडवलीच्या जंगलापर्यंत पोहोचला. अन् अचानक शिका-यांची पावले थांबली. हाका-यांचे आवाज थांबले, कारण वाघ सुरक्षित हद्दीत पोहोचला होता. जखमेमुळे अंतिम घटका मोजणा-या वाघाने तेथेच प्राण सोडला. दुस-या दिवशी गुराख्यांना शिका-याच्या गोळीने मृत झालेला वाघ सापडला. त्यांनी मोठ्या दु:खाने वाघोबाला पालखीत बसविले आणि मंदिराकडे आणून त्याचे दफन केले. त्याची तिथे समाधी बांधली. दुसरी घटना १९९५ची. स्वयंभूकडे जाऊन एक वाघ बसला होता. देवासमोर नतमस्तक झाला होता. असं म्हणतात की, त्याला विषबाधा झाली होती. वाघ देवाच्या गाभा-यात आहे, तो बाहेर पडत नसल्याचं पाहून ग्रामस्थांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावलं. त्याच्यावर तिथेच औषधोपचार केला. परंतु काही दिवसांतच त्याने प्राण सोडले. वनविभागाची मंडळी वाघाच्या तपासणीसाठी दाखल झाली. त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी तयारी करू लागली. परंतु ग्रामस्थांनी त्यांना रोखले. ‘वाघ हे आमचं दैवत आहे. देव स्वयंभूच्या पायाशी येऊन त्याने प्राण सोडलेत. त्याच्या शरीराला सुरी लावू नका आणि गावातून त्याचे शव बाहेरही नेऊ नका.’ असं वनविभागाच्या मंडळींना सांगितलं, पण त्यांनी आपला हेका सोडला नाही. गावक-यांनी मग रूद्रावतार धारण केला. शेवटी वनविभागाच्या मंडळींना नमतं घ्यावं लागलं. मंदिराच्या उजव्या हाताला विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या शेजारी या वाघोबाला समाधीस्थ करण्यात आले. व्याघ्रेश्वर मंदिरात स्वयंभू पाषाण आहे. ग्रामस्थ सांगतात, पूर्वी मंदिरापर्यंत समुद्राची व्याप्ती होती. मंदिराच्या ठिकाणी एकदा मच्छीमाराचं जाळं अडकलं ते निघेना म्हणून त्याने ते तिथेच सोडलं. समुद्राला ओहोटी लागल्यावर त्या जाळ्यात एक शिवलिंग अडकलेलं दिसलं. कालांतराने वाळूची भर पडून त्या ठिकाणचा समुद्र मागे हटून जमीन तयार झाली. गावक-यांनी मग तिथे मंदिर बांधलं. १७५२मध्ये देवाची घुमटी बांधल्याचा उल्लेख आढळतो. गावापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर किनारा आणि सुरूबन आहे. तिथेच समुद्र आणि नदीचा संगम झाला आहे. डोंगराच्या पायथ्याला असलेल्या या मंदिराच्या पाठीमागे आणि गावाभोवती घनदाट जंगल आहे. या मंदिरात येऊन वाघ शांतपणे अंतर्गृहात बसतात, हे ग्रामस्थांनी पाहिलं आहे. पूर्वी वाघ मंदिरात नियमित येऊन बसत असत. जणू ती त्याची हक्काचीचही जागा होती. मंदिरात येऊन वाघ डरकाळ्या फोडत असे, म्हणून हा श्री देव व्याघ्रेश्वर म्हणून प्रसिद्ध झाला. स्वयंभूच्या मंदिरात वाघाच्या अनेक तसबिरी आहेत. आजही गावांत दोन ते तीन वाघांचा वावर आहे, असं गावकरी म्हणतात. पण गावातील कोणालाही त्याची भीती वाटत नाही आणि गाई-गुरांना वाघ काही करत नाही. तोंडवली गावात वाघ ही रक्षक देवता मानली जाते. गावात कुणीही शिकारीसाठी जात नाही आणि इतर कुणाला शिकार करूही दिली जात नाही. पर्यावरणरक्षण, व्याघ्र बचाव मोहीम हे शब्द एरवी सरकारी पातळीवरच वापरले जातात, पण तोंडवलीचे गावकरी गेली कित्येक वर्षे आपली स्वत:ची व्याघ्र बचाव मोहीम राबवत आहेत. त्यांनी प्राणीरक्षणासाठी स्वत:च वेगळे नियम आखून घेतलेत. गावात प्राण्याचा कधीच बळी दिला जात नाही. गावात पावसाळी शेती केली जाते. गाव श्रीमंत नाही, परंतु उत्सवाचा श्रीमंती इथे मोठी आहे. महाशिवरात्र, शिगमोत्सव, त्रिपुरारी पौर्णिमा, रामनवमी हे उत्सव म्हणजे गावची जत्राच असते. या काळात इथल्या सर्वच घरांमध्ये वाघाच्या प्रतिमेचं पूजन होते. प्रत्येक सणात वाघाचा मान पहिला असतो. व्याघ्रेश्वराची कृपा म्हणून गावाची ही दौलत आहे, असं येथील प्रत्येकाचं म्हणणं आहे. पर्यावरणाच्या मोठमोठय़ा गप्पा न करता वाघ वाचवण्याचं कार्य हाती घेऊन तोंडवलीच्या गावक-यांनी आगळा आदर्श घालून दिला आहे. त्याचं अनुकरण अनेकांनी करण्यासारखं आहे. या शिळेने वळण लावलं.. तोंडवली गावात शिरताना लागणा-या वळणावर एक विशाल शिळा आहे. या शिळेवर तशीच विशाल झाडं आहेत. यातील औदुंबराच्या झाडाखाली छोटेखानी खोली आहे. येथे म्हणे एक साधू बसत, तपश्चर्या करत. या शिळेवरही वाघोबा येई. वाट होती, इवलीशी आणि भीतीदायकही. शिळेतले घर म्हणजे गावच्या रहस्याचं उगमस्थान आहे, असं वाटतं. हवा येण्यासाठी एकच दरवाजा, हाच दरवाजा आत प्रवेश करण्यासाठी. एवढ्या विशाल शिळेत एकच खोली का? हा प्रश्न मनात येईल. वाघोबा येथेच का बसतो? असंही राहून-राहून वाटेल. पण त्याचं उत्तर कुणाकडेच नाही...जुनी-जाणती मंडळी सांगतात,... - साभार मालवणचे मालवणी भंडारी ... | ![]() धामापूर :धामापूर या निसर्गरम्य गावात भगवती मंदिरालगत सुंदर असा तलाव आहे. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही पाऊस पडला तरी मर्यादेच्या पलिकडे या तळ्यातील पाणी वाढत नाही आणि कितीही दुष्काळ झाला तरी तळ्यातील पाणी आटत नाही. हे तलाव विस्तीर्ण व विहंगम असल्याने येथे येणारे पर्यटक काही क्षण तरी स्वतःला हरवून जातात. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() सावंतवाडी तालुक्यातील पर्यटनस्थळेसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला चार चाँद लावण्यात महत्त्वाची भुमिका बजावतोय तो म्हणजे सावंतवाडी तालुका. 1. मध्यवर्ती शहर व बाजारपेठ: सावंतवाडी शहराच्या मधोमध सुंदर मोती तलाव
आहे. संध्याकाळच्या सुंदर रोषणाईत हा तलाव आणखीच खुलुन दिसतो. संस्थानाच्या
काळात 1874 मध्ये मोती तलावाची निर्मिती झाली. राजवाड्यासमोरील 31
एकराच्या परिसरात धरण बांधण्यात आले. चारी बाजुंनी भक्कम दगडांनी बांधकाम
करण्यात आले. पाणी ठेवण्यासाठी मुशी ठेवण्यात आल्या. अशाप्रकारे मोती
तलावाची निर्मिती झाली. त्याचबरोबर लगतच्या बाजारपेठेलाही भेट देऊन वेळ
घालवता येतो. 2. आंबोली: (वाचा: “गारेगार आंबोली”) 3. सावंतवाडी संस्थान: Report this ad 4.नरेंद्र वनोद्यान: 5. जगन्नाथराव भोसले उद्यान:
परुळे गावाचा वेतोबा :- श्री देव वेतोबा ग्रामदेवतेच्या मूर्तीची निर्मिती परुळे या गावाची वाडी ‘कुशेवाडा’ या वाडीतील ठिकाण ‘भाटी’ या ठिकाणी एक मोठे पाषाण होते त्या पाषाणातून निघणारा ॐकार ध्वनी लोकांना ऐकू येत असे. सदर परिसरात थोडी फार ब्राम्हण वस्ती आहे. या ब्राम्हणांची गुरे चरावयास जाण्याच्या मार्गावर पाषाण असल्यामुळे गुरे पोहोचविणे व आणणे तसेच जाणे व येणे यामुळे लोकांच्या कानावर हा ॐकार ध्वनी पडत असे. हळू हळू या प्रकारचा गावात प्रसार झाला व प्रत्यक्ष ऐकण्यासाठी गावातील लोक जमा झाले. विचार विनीमय सुरु असता वर नमूद केल्याप्रमाणे वेताळ-भावई सेवेसाठी असलेला साधू त्या ठिकाणी आला व त्याचे आदेशानुसार ‘वेतोबा’ देवतेची निर्मिती झाली.
ग्रामदेवता प्रमुख श्री देव वेतोबा पंचायतन परुळे सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वालावल नावेचे पुरातन निसर्गरम्य गाव आहे. या
गावात नारायणाचे पुरातन कौलारू मंदिर आहे. वालावल गावाचे ६ व्या शतकातील
नाव बल्लावल्ली होते. गावाला लागून असलेले दाट जंगलांनी वेढलेले डोंगर,
दर्या, गावाच्या उत्तरेकडून वहाणारी कर्ली नदी यामुळे प्राचीन काळापासून
हे गाव एखाद्या वनदुर्गाप्रमाणे दुर्गम होते. त्यामुळे प्राचीन
काळापासून राजेरजवाडे, या भागातील अधिकारी यांनी या गावाचा आसरा घेतलेला
आहे. इ.सनाच्या ११ व्या शतकात शिलाहार राजांचे या ठिकाणी वास्तव्य होते.
नंतर विजयनगरच्या काळापासून बहामनी व नंतर विजापूरच्या राजवटी पर्यंत
प्रभूदेसाई घराण्याकडे कुडाळ महालाची जहागिरदारी होती. त्यांचे वास्तव्यही
वालावल गावात होते. इ.सनाच्या
११ व्या शतकात मुसलमानांनी गोवा काबीज केला. त्यावेळी गोव्यातील पेडणे
महालातील हरमळ गावातून श्री देव नारोबाची मुर्ती ब्राम्हणांनी वालावल गावात
आणली. त्यावेळी चंद्रभान व सूर्यभान हे वीर पुरुष याठिकाणी अधिकारी होते.
त्यांनी नारायणाचे मंदिर बांधून वालावली गावाचे उत्पन्न मंदिराला दिले.
मंदिरा समोरील दिपमाळांच्या मध्ये मंदिराची स्थापना करणार्या कल्याण
पुरुषाची देवळी बांधण्यात आली आहे. लक्ष्मी नारायण मंदिराच्या स्थापनेचा
काळ साधारण इ.स.१३५० ते १४०० च्या दरम्यान असावा. मंदिराची बांधणी चालुक्य
पध्दतीची असून कालौघात मुळ मंदिराच्या बांधकामात भर पडत गेली. दंतकथेनुसार
श्री नारोबा व माऊली हे भाऊबहीण तिर्थयात्रेला चालले होते. वाटेत वालावल
गावी कुपीच्या डोंगर पठारावर (सड्यावर) माऊलीला तहान लागली म्हणुन श्री
नारोबा पाणी आणण्यासाठी दरीत (गावात) उतरला. तेथील घरातून वड्याचा स्वयंपाक
चालू होता. त्या वासाने नारोबाची भूक उफाळून आली. माऊलीला विसरून तो तिथेच
जेवला. पोट भरल्यावर त्याला माऊलीची आठवण झाली. पाणी घेऊन भीत भीतच तो
डोंगरावर गेला. नारोबा वेळेवर पाणी घेऊन आला नाही म्हणून माऊलीला खुप राग
आला होता. रागाच्या भरात तिने नारोबाच्या श्रीमुखात दिली. (श्री नारोबाच्या
मुर्तीच्या गालावरील खडडा याची खुण म्हणून दाखवतात.) या भांडणामुळे पुढे न
जाता माऊली तिथेच राहीली.माऊलीचे देवालय पर्वती म्हणून सड्यावर बांधलेले
आहे. (या ठिकाणी नवरात्रोत्सव होतो.) श्रीनारायणाचे मंदिर गावात आहे.
दरवर्षी वैकुंठ चतुर्दशीस नारोबा, माऊलीस पाणी घेऊन जातो (श्रीनारायणाची
पालखी पाणी घेऊन माऊली मंदिरात जाते.) नारायणाची
मुर्ती उभी असून अंदाजे ४ फूट उंच आहे. काळ्या पाषाणात घडवलेल्या या
मुर्तीच्या उजव्या पायाजवळ लक्ष्मी व डाव्या पायाजवळ गरूड कोरलेला आहे.
मंदिराच्या गाभार्याच्या दारावर शेषशाही विष्णु कोरलेला आहे. मंदिराच्या
सभामंडपात कोरीव काम केलेले लाकडी खांब व तुळया आहेत. काळाच्या ओघात
त्यावरील कोरीवकाम पुसट झालेल आहे. त्यातील एक खांब तुळशीचा आहे अशी वदंता
आहे. मंदिराच्या सभामंडपातील अंतराळाच्या (छताच्या) लाकडी पट्ट्य़ांवर पुराण
कथांमधील प्रसंग कोरलेले आहेत. याशिल्पाच्या बाजूच्या पट्टीवर "गंडभेरुंड"
कोरलेला आहे. (गंडभेरुंड म्हणजे एक धड, २ पाय,२ पंख व २ डोकी असलेला
पक्षी, हे विजयनगर साम्राज्याचे चिन्ह होते.) हा "गंडभेरुंड" पटकन
दिसण्यासाठी नारायणाच्या मुर्तीच्या नजरेच्या सरळ रेषेत पाहावे. या कौलारू
मंदिराच्या बाहेर ५ दिपमाळा आहेत. त्यापैकी ४ बाजूला ४ एकाच उंचीच्या ४
दिपमाळा आहेत. त्यांच्या वरच्या टोकावर कलश बनवलेले आहेत. मध्यभागी असलेली ५
वी दिपमाळ इतर दिपमाळांपेक्षा उंच आहे. या दिपमाळेच्या एका बाजूला तुळशी
वृंदावन आहे. त्यावर देवळाच्या बाजूला हनुमान कोरलेला आहे. दिपमाळेच्या
दुसर्या बाजूला " कल्याण पुरुषाची" घुमटी आहे. या घुमटीतील मोठी मुर्ती
वीरासनात बसलेली आहे. त्याच्या शेजारी छोटी मुर्ती आहे. मंदिराच्या मागच्या
बाजूस तळे आहे. जाण्यासाठी
:- वालावलला जाण्यासाठी मुंबई - गोवा महामार्गावरील कुडाळ गाठावे. कुडाळ -
वालावल हे अंतर १० किमी आहे. या मार्गावर एसटीची सेवा व रिक्षा उपलब्ध
आहेत. मालवण - वालावल हे अंतर ३० किमी आहे. मालवणहून परुळे गावापर्यंत एसटीने जाऊन पुढे रिक्षाने वालावलला जाता येते. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) सिंधुदुर्ग किल्ला, मालवण २) निवती किल्ला, निवती ३) वेतोबा मंदिर, परुळे ४) भोगवे बीच, भोगवे सर्व किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे. वेतोबाची पादत्राणे |दीड ते दोन फूट लांबीच्या चपला पायात सरकवल्या जातात आणि वेतोबा
नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडतो. त्याच्यासमोर सा -या शक्ती नतमस्तक होतात.
काळी शक्तीही त्याच्या समोर टिकाव धरू शकत नाही. ज्या-ज्या वेळी संकटांचे
तांडव सुरू होते. तेव्हा वेतोबाचे नुसते स्मरण करावे. म्हणजे संकटे आपला
मार्ग मोकळा करतात. वेतोबा सातत्याने भ्रमंती करतच असतो. त्यामुळे चप्पल
झिजतात अशी धारणा आहे आणि त्यांच्या श्रद्धेला वेतोबा कसूरही ठेवत नाही असे
म्हणतात, भक्तांच्या रक्षणासाठी वेतोबा सातत्याने भ्रमंती करतच असतो. तो
भक्तांची काळजी घेतो. म्हणून भक्त त्याचा त्रास हलका करण्यासाठी त्याच्या
पायात चपला सरकवतात. आरवली वेतोबाकडे गेल्यावर लाखो चपलांच्या जोडांचा ढीग
दिसतो. केळयाचे घड लक्ष वेधून घेतात. कोकणातल्या श्रद्धेचा आणि
निसर्गप्रेरणेचे हे एक भक्कम श्रद्धास्थान आहे.
देव कुठे आहे असा प्रश्न कुणी विचारल्यास उत्तर ठरलेलेच असते. देवत्वाची अनुभूती आम्ही घेऊ; पण आज आत्ता ताबडतोब आम्हाला देवत्वाचा अंश दाखवा, असे कुणी म्हटले तर भलेभले गप्पगार होतात. दावे-प्रतिदावे सुरू होतात. आरवलीच्या वेतोबाकडे मात्र हे सर्वच दावे फोल ठरतात. वेतोबा सर्वाना मंदिरात दर्शन देतोच, शिवाय रयतेच्या रक्षणासाठी भक्तांच्या सुख-दु:खात नेहमीच सहभागी असतो. भक्ताने कुठूनही साद घालावी आणि वेतोबा त्याच्या मदतीला धावून जातो. या भ्रमंतीत वेतोबा भक्तांनी दिलेली पादत्राणे वापरतो. त्याला चामडयाची पादत्राणे आवडतात. या पादत्राणांची झीज होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. आरवली येथील श्री वेतोबाचे मंदिर हे मूलत: वेताळाचे मंदिर आहे. आपल्याकडे ‘बा’ हा शब्द आदरार्थी वापरला जातो. तसेच जपानमध्ये सुद्धा ‘बा’ हा शब्द आदरार्थी वापरला जातो. गुजरातमध्ये आईला ‘बा’ म्हणण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे वेताळ या शब्दातील ‘ळ’ हा शब्द जाऊन आदरार्थी ‘बा’ हा शब्द आला व त्यामुळे आरवलीतील हे देवस्थान ‘श्री वेतोबा’ या नावाने रूढ झाले. वेताळ या शब्दातील महात्म्यसुद्धा अर्थपूर्ण आहे. या शब्दातील पहिले अक्षर वेगळे काढले तर उरतो ‘ताळ’, दुसरे अक्षर वेगळे काढले तर उरतो ‘वेळ’, तिसरे अक्षर बाजूला काढले तर उरतो ‘वेता’, ‘वेता’ म्हणजे वेत व अर्थातच वेताने वेळेवर ताळ्यावर आणणारी शक्ती म्हणजे वेताळ. या वेताळामध्ये भूताखेतांना व अपप्रवृत्तींच्या शक्तींना विरोध करण्याची शक्ती असते. या शक्तीचे स्वरूप अत्यंत प्रभावी परिवर्तनशील असते. यामुळेच आरवलीतील या देवस्थानची ख्याती सर्वदूर पसरली आहे. विजयनगरच्या हिंदू साम्राज्यात ‘हरवल्ली’ नावाने अस्तित्वात असलेले गावाचे नाव कालौघात बदलून आरवली झाले. ‘हर’ म्हणजे ‘शिव’ व ‘वल्ली’ या शब्दाचा अर्थ ‘वस्ती’. पूर्वी या क्षेत्राच्या आसपास सोमेश्वर, सिद्धेश्वर, कोकणेश्वर इ. शंकराच्या मंदिरांची मालिका असावी, असे जाणकार सांगतात. हे वेंगुर्ले तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून शिरोडा-टांक हम रस्त्यावर वसले आहे.
पूर्वी वेतोबाला फणसाचे झाड वापरले जायचे. यामुळे जेथे फणस असायचा ते स्थान वेतोबाचे असे समजले जायचे. आरवलीतील अनेक ग्रामस्थ वेतोबाकडे तातडीने जाता येत नसेल आणि त्याचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली तर कुठच्याही फणसाच्या झाडाखाली उभे राहतात आणि आपली इच्छा व्यक्त करतात. फणसाच्या झाडासमोर बोललेली कोणतीही इच्छा वेतोबा समोर पोहोचते अशी त्यांची श्रद्धा आहे. पंचक्रोशीत फणसाच्या झाडावर कुणीही शस्त्र चालवत नाही. या परिसरात फणसाचे अभयारण्यच म्हणायला हवे. कारण जेथे फणस असतो तेथे वेतोबाचा अंश समजून त्याची जपणूक केली जाते. निसर्गत: झाड तुटले तर बाजूला केले जाते. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे झाड तोडणे गरजेचेच असेल तर वेतोबाला साकडे घातले जाते. त्याच्याकडून कौलप्रसाद घेतला जातो. नंतरच सन्मानाने झाड तोडले जाते. तरीही फणसाच्या झाडाचे कोणतेही फर्निचर वापरताना आरवली पंचक्रोशीतील बांधव दक्षता घेतात. बैठकीचे पाट अथवा घराचा दरवाजा फणसाच्या झाडापासून केला जाऊ नये, असा अलिखित नियम पाळला जातो. या भागातील बांधव जगाच्या कुठच्याही कानाकोप -यात असले तरी फणसाच्या झाडाची पूजाअर्चा करतात. अशा झाडासमोर उभे राहून वेतोबाला साकडे घालतात. काही मंडळींनी अनवधानाने फणसाच्या झाडाचा गैरवापर केला. मात्र त्यांना त्रास झाल्याने पुन्हा अशी चूक करण्याचे धाडस करत नाही. वेतोबाला भक्तगण पादत्राणांचा नवस बोलतात, तसा केळीच्या घडाचा नवस बोलला जातो. त्याची जत्रा तर ‘केळीच्या घडांची’ जत्रा अशी संबोधली जाते. कुठच्याही हंगामात वेतोबाच्या मंदिरात पोहोचावे आणि केळी मिळत नाहीत असे कधी होत नाही. त्याशिवाय साखर, पेढे, लाडू वगैरे गोड जिन्नस, धोतरजोडी, उपरणी, पुतळी आदी नवसही बोलला जातो. मार्गशीर्ष महिन्यात होणा -या या देवाचा वार्षिक जत्रोत्सवास भक्तांची गर्दी असते. देवाचे मंदिर शके १५८२ (इ.स. १६६०)मध्ये बांधल्याचा दाखला सापडतो. या देवळाचा सर्व मंडप सुमारे इ.स. १८९२ ते १९०० या दरम्यान बांधला गेला असावा असा जाणकार मंडळींचा अंदाज आहे. श्रीदेव वेतोबाच्या मूर्तीस सालई झाडाच्या पानाचे ३३ प्रसाद (कौल) लावण्याची वहिवाट आहे. पीडित भक्तगण आपल्या समस्या सोडविण्यासाठी व नवीन कार्यारंभ करण्याच्या वेळी देवाचा कौल लावण्यासाठी मोठया संख्येने वेतोबाच्या दरबारात पोहोचतात. वेतोबाच्या भल्या मोठया पादुकांचे सर्वच भक्तांना आश्चर्य वाटते. सुमारे २०० वर्षापूर्वीपासूनची पादत्राणे पाहायला मिळतात. काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आलेली ही पादत्राणे पाहताना भक्तगण हरखून जातो. वेतोबाच्या सिंहासनासमोरील डाव्या हाताच्या खिडकीकडे या पादत्राणांचा खच
पडलेला असतो. यातली हवी ती पादत्राणे तो उचलतो आणि आपल्या चतु:सीमेतील
भक्ताचे रक्षण करण्यासाठी अदृष्य रूपाने फिरत असतो, अशी भक्तांची श्रद्धा
आहे. याची प्रचिती देवाला वाहिलेली नवीन पादुका काही दिवसानंतर तळाखालच्या
भागाने झिजल्याचे स्पष्ट दिसते. ही पादत्राणे याच गावातील चव्हाण परिवार
पिढयान् पिढया करत आहे. वेतोबाच्या पादत्राणांसाठी सुचिर्भूत होऊन पवित्र
मनाने बैठक मांडली जाते. दीड ते दोन दिवसात पादत्राणे तयार होतात. ही
पादत्राणे विशिष्ट जागेवर ठेवली जातात.
या जागेवरून वेतोबा आपल्याला हवा तो जोड उचलतो. वेतोबाच्या प्रांगणात पादुकांचा खच पडलेला असतो. मग जुनी पादत्राणे आरवलीच्या डोंगर भागात विशिष्ट ठिकाणी जाऊन मंत्रोच्चाराने जमिनीत पुरली जातात. अलीकडे वेतोबाच्या चांदीच्या पादुका तयार करण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरातून फूल आणि अंगा -याशिवाय भक्तांना कोणतीही वस्तू दिली जात नाही. काही भक्त मंडळींनी वेतोबाच्या स्मृती जपण्यासाठी पादत्राणे पूजेसाठी मिळावी असे साकडे घातले होते. मात्र वेतोबाने त्यासाठी परवानगी दिली नाही. या वेतोबाच्या दरबारात पोहोचल्यानंतरच त्याची खरी अनुभूती घ्यावी आणि अविश्वसनीय अशा मोठया आकाराच्या चामडयाच्या चप्पलांचा ढीग पाहावा. चपलांचे झीजलेले तळ पाहावे आणि देवासमोर नतमस्तक व्हावे. सिंधुदुर्गातील वेतोबाचे स्थान हे असे विलक्षण आहे. जिल्ह्यात वेतोबाचा
भक्त सांप्रदायही मोठा आहे. आरवलीच्या वेतोबाप्रमाणे, परुळेचेही वेतोबाचे
स्थान प्रसिद्ध आहे. श्री देव वेतोबा ग्रामदेवतेच्या मूर्तीची निर्मिती परुळे या गावाची कुशेवाडा वाडीतील भाटी या ठिकाणी एक मोठे पाषाण होते, त्या पाषाणातून निघणारा ओंकार ध्वनी लोकांना एकू येत असे. या परिसरात थोडीफार ब्राह्मण वस्ती आहे. या ब्राह्मणाची गुरे चरावयास जाण्याच्या मार्गावर पाषाण असल्यामुळे गुरे पोहोचविणे व आणण्यासाठी जाणे व येणे होत असल्यामुळे लोकांच्या कानावर हा ओंकार ध्वनी पडत असे. हळूहळू या प्रकाराचा गावात प्रसार झाला व प्रत्यक्ष ऐकण्यासाठी गावातील लोक जमा झाले. विचार विनिमय सुरू असता वर नमूद केल्याप्रमाणे वेताळ-भावई सेवेसाठी असलेला साधू त्या ठिकाणी आला व त्याच्या आदेशानुसार वेतोबा देवतेची निर्मिती झाली. वरील ठिकाणावरून हे पाषाण मुख्य रस्त्यालगत देऊळवाडी येथे आणून मूर्तीला आकार देण्याचे काम सुरू झाले. पण पूर्णत्व येईना म्हणून त्या ठिकाणाला कामुर्ले असे नाव पडले. दरम्यान शुद्धीकरणासाठी अपूर्ण मूर्तीयुक्त पाषाण हलवून तळीत ठेवण्यास नेण्यासाठी मुख्य रस्त्यावर आणले गेले व तेथे मूर्ती साकार करण्यात आली. पण मूर्ती हलेना. तेवढयात एक पांथस्थ आला त्याने हातभार लावताच पाषाण उचलणे शक्य झाले व ही मूर्ती तळीत आणून ठेवली. त्यानंतर मुख्य ग्रामदेवतेची स्थापना झाली. मात्र ज्या पांथस्थाने हातभार लावला त्यांचे वंशज आजही दरवर्षी स्वत:चे घरी अन्न शिजवून श्री देव वेतोबास नैवेद्य दाखवून स्वत: भक्षण करतात. श्रीदेव वेतोबा मंदिर - सिंधुदुर्ग ,आरवली
श्रीदेव वेतोबा मंदिर वेंगुर्लेपासून १२ कि.मी. अंतरावरील निसर्गरम्य अशा आरवली गावचे ग्रामदैवत श्रीदेव वेतोबा हे दक्षिण कोकणातील अत्यंत जागृत असे पुरातन देवस्थान आहे. श्री देव वेतोबा केवळ आरवली पंचक्रोशीत नव्हे तर उभ्या दक्षिण कोकणचा पालक, रक्षक आणि संकट निवारक म्हणून पिढ्यान पिढ्या भाविक जनतेचे श्रध्दास्थान आहे. संकटसमयी भक्ताच्या हाकेनुसार धावून येऊन संकट निवारण करणारा देव तसेच नवसाला पाहणारा देव अशी या श्रीदेव वेतोबाची ख्याती आहे. वेंगुर्ले-शिरोडा-रेडी रस्त्यावर आरवली येथे श्रीदेव वेतोबाचे पुरातन देवस्थान आहे. रस्त्यावरुनच श्रीदेव वेतोबाचे दर्शन घडते. मंदिराच्या गाभार्यात श्रीदेव भूमय्या, देवपूर्वस, श्री देव रामपुरुष, देव बाराचा ब्राह्मण, देव भावकाई या देवतांच्या पाषाण मूर्ती आहेत. वेतोबाची मूर्ती भव्य मानवाकृती आहे या द्विभुज मूर्तीच्या उजव्या हातात विक्रोश खड्ग असून डाव्या हातात कणीपात्र आहे. वेतोबाचे मंदिर प्रशस्त व दुमजली असून सुमारे दोन हजार लोक सहज बसू शकतील. वेतोबाला केळ्याच्या घडाचा नैवेद्य देतात तर भल्या मोठ्या चामड्याच्या चपलांच्या जोडांचा नवस बोलतात. श्री वेतोबाच्या वर्षातून दोनदा कार्तिक शुध्द १५ व मार्गशीर्ष पौर्णिमेस जत्रा होतात. श्री वेतोबास सालई झाडाच्या पानाचे ३३ प्रसाद लावण्याची वहिवाट आहे. योगी राज बापूमामा केणी महाराजांचे आरवलीच्या या श्रीदेव वेतोबास श्रीदेव विठ्ठल मानून भजत असत. आरवलीच्या वेतोबा देवस्थानात योगीराज बापूमामा केणी यांचा पाडवा नावाचा समारंभ ज्येष्ठ शुध्द प्रतिपादेस करतात. जेव्हा वेतोबा देवस्थानात काही अडचण किंवा संकट निर्माण होते तेव्हा बापू मामांना हाक मारुन त्यांचा अंधार उभा राहिल्यावर त्यांचा सल्ला घेतला जातो. श्रीदेव वेतोबाचे देवालय इ.स. १६६० मध्ये बांधण्यात आले. या देवालयाचा सभामंडप सुमारे इ.स. १८९२ ते १९०० च्या दरम्यान बांधला गेला. श्रीदेव वेतोबाचे देवालयाचा नगारखाना तीन मजल्यांचा आहे. तर देवालय दुमजली आहे.
सिंधुदुर्गातील लपलेली सौंदर्यस्थळे0गेल्या काही काळात कोंकणातील पर्यटन बऱ्यापैकी विकसित
झाले आहे. गोव्याला जाणारे देशी-विदेशी पर्यटक गोव्याला लागून असलेल्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांनाही भेटी देऊ लागले आहेत. पण
तारकर्ली, देवबागसारखे काही ठरावीक समुद्र किनारे आणि सावंतवाडी-
मालवणसारखी शहरे वगळता इतर ठिकाणे म्हणावी तशी पर्यटनाच्या नकाशावर आलेली
नाहीत. सिंधुदुर्गातील अशाच काही पर्यटन स्थळांचा घेतलेला आढावा.
मिठबाव-तांबळडेग # जवळचे रेल्वेस्टेशन : कणकवली # जवळचे बसस्थानक : देवगड किल्ले निवती # जवळचे रेल्वे स्टेशन : कुडाळ # जवळचे बसस्थानक : वेंगुर्ला, कुडाळ डच वखार (वेंगुर्ला) # जवळचे रेल्वे स्थानक : सावंतवाडी रोड # जवळचे बस स्थानक : वेंगुर्ला नापणे धबधबा ( नापणे, वैभववाडी) # जवळचे रेल्वे स्टेशन : वैभववाडी यशवंतगड (रेडी) रांगणागड (कुडाळ) (गुढीपूर) पिंगुळी येथे विविध कलांचा वारसा जपणाऱ्या ठाकर समाजाची वस्ती आहे. चित्रकथी, कळसूत्री, पांगुळबैल अशा कलांचा वारसा त्यांनी जपला आहे. गुढीपूर हे मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळजवळ वसले आहे. #जवळचे रेल्वेस्टेशन : कुडाळ, झाराप जवळचे बसस्थानक : कुडाळ मालवणात येऊन आनंद लुटलाच पाहीजे अशा टॉप 5 गोष्टीसिंधुदुर्गाचे पर्यटनविश्व मालवणचा आनंद लुटल्याशिवाय अपुर्ण आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेले मालवण देशविदेशातल्या पर्यटकांना कायमच भुरळ घालत आलं आहे. मालवणातले समुद्र किनारे, किल्ले, मंदीरे, ऐतिहासिक वास्तु या सर्वांनी मालवण न्हाऊन निघाले आहेत. पर्यटकांनी या सगळ्यांचा आनंद लुटावाच मात्र मालवणात आल्यावर खालील पाच गोष्टींचा आनंद न चुकता घ्यावा: #1 सिंधुदुर्ग किल्ला: ![]() मालवणचे आणी एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आकर्षणाचे केंद्रबिंदु म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात कुरटे बेटावर बांधला आहे. या किल्ल्यावर शिवरायांचे एकमेव मंदीर आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी होड्यांची सोय आहे. #2 तारकर्ली बीच #3 तारकर्ली बीचवरील साहसी खेळ: #4 मालवणी जेवण: #5 मालवणचं ग्रामीण जीवन: दोडामार्ग:या नव्याने उदयास आलेल्या तालुक्यात ही अनेक पर्यटनाची ठिकाणे विलोभनीय आहेत. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() तिलारी धरण:तिलारी धरण हा प्रकल्प येथे साकारल्याने येथील निसर्गनिर्मित सौंदर्यात आणखीनच भर पडल्याने येथे येणारा पर्यटक स्थिरावल्याशिवाय राहणार नाही. येथील उन्नेयी बंधारा व नागनाथ मंदिर दिलखेचक आहे. तर पारगड किल्ला ऐतिहासिक ठेव आहे. सिंधुदुर्गातील पर्यटनस्थळांचा विकास होण्याच्या दृष्टीने शासन पातळीवरून आराखडे तयार होत असून निधीचाही विचार होत आहे.https://malvani.com/sindhudurg-district-tourism-2/ Quick trip to explore Vijaydurg, Devgad & Nearby Area
Vijaydurg Fort and nearby area were on our wish list for a long time. We
got a chance to explore the places just after Diwali festival. We
planned 4 days trip to visit few places Like Vijaydurg, Devgad, and
beaches. Travelers for this trip were me and Wife Renuka.
About Vijaydurg Vijaydurg town is around 370 km from Pune. It is mainly famous for Vijaydurg Fort which was one of the oldest forts from Sindhudurg. It was built by King Bhoja II of Shilahar dynasty. Adil Shah of Bijapur took control of fort but Later it was captured and rebuilt by King Shivaji Maharaja. It is also known for beautiful Virgin beaches around Vijaydurg town. There are 2-3 ways (via Tamhini ghat, via Varandha ghat OR via Kumbharali ghat) to reach Vijaydurg. Best way to reach at Vijaydurg from Pune is, Catch National highway 4 (Mumbai-Bangalore highway) towards Kolhapur/Bangalore direction – Karad - take right after Karad for Kokrud - Anuskura Ghat - Rajapur - Vijaydurg. As we took a halt in Chiplun, we join Kumbharli ghat whereas for return journey we came by Anuskura Ghat.
Day 1: 20 October 17: Pune to Chiplun To save travel time, we decided to leave Pune on Friday noon. After lunch, we left Pune by 3:30 PM. We preferred Kumbharli ghat to reach Chiplun. The Road condition was good except some small rough patches in Ghat section. Due to less traffic and smooth road, we reached Chiplun before 9PM. I started Long distance cycling from last one year and I wanted to ride around Vijaydurg hence we took MTB cycle with us. We had Dinner at Restaurant Abhishek which is one of my favorite seafood hotels. Food was excellent in taste, definitely not to miss for seafood lovers. We checked few budget hotel and stayed for the night.
Expenses
Day 2: 21 October 17: Chiplun - Napane waterfall - Vijaydurg We left Chiplun by 6:30 AM. Our first destination was Napane Waterfall. It is also known as Sherpe-Napne Waterfall. Early morning foggy weather with the chilled wind on the national highway made our journey memorable. After Pali, I decided to ride Cycle up to Rajapur and Renu went ahead by car. I was willing to ride to waterfall site but to save time, we mounted cycle on the car and moved ahead. Best way to reach waterfall site is Talere - Nadhavade - Sherpe-Napane fall. We followed Google map which was the shortest path but was in terrible condition. While returning, we came to Talere. Also if your referring Google Map then check Sherpe-Napne waterfall (16.531413, 73.699234) instated of Napane waterfall.
Shrepe-Napne waterfall is two-tiered fall. The first step is smaller than Second and it is also ahead of second stage fall. This is 12 months running waterfall lies on the river. Better to not to Swim in running water to avoid injury from falling down from step to the waterfall. Forest nearby fall offers you a good sighting of western forest Birds. There is a small restaurant which serves snacks items. We had heavy snacks before moving to Vijaydurg.
We left this place by 2 PM and reached Vijaydurg. Road condition was quite bad but manageable by Car. We booked AC room at Hotel Vijaydurg Palace which is a stone throw away from Fort. Hotel owned by Mayur Shetye. It is budget category hotel with Non-AC and AC. Rooms are large enough for 4 people and offer you a view of Fort and Creek. Vijaydurg has very fewer options for stay.
We did check-in quickly and had some snacks. We decided to visit beautiful Vijaydurg Fort in the evening. Fort is located on the tip of creek facing towards the sea. Fort was built by King Bhoj during 1193-1205. It was captured by Adil Shah. In the year 1653, King Shivaji Maharaja won the fort and renamed as Vijaydurg. Fort was earlier known as Gheria fort. Fort was surrounded by sea from 4 sides and bridge trench as the entrance to the fort. Now, it is surrounded by sea from 3 sides by sea and land from one side. Fort was the capital of Naval base during Maratha empire lead by Kanhoji Angre.
Fort is open for an entire day with nominal entry fee. Fort has 20 Bastions and 3 layers protected the solid wall. It also has an underwater wall around a fort built during Shivaji Maratha empire. Purpose to protect the fort from Large ships approaching towards the fort. You can see Cannon fireballs after entering into fort area. On the right side of Entrance, there is a Storage room and Dock bastion area. Fort also has meeting room area, palaces, and Temple. People says Shivaji Maharaja himself hosted flag on this fort. Also, local claims that British scientist discovered Helium gas from fort while observing a solar eclipse in the year 1868.
You can view the Vijaydurg town from the topmost point of the fort. View of Beach and sea from the wall is breathtaking. We took a walk on the wall and witnesses beautiful sunset. We had dinner at the hotel and small walk before calling a day. My Tomorrow's plan was to explore Vijaydurg to Devgad area on Cycle whereas Renuka had some office work.
Expenses
Day 3: 22 October 17: Vijaydurg - Devgad - Vijaydurg I left Vijaydurg at 6 AM on My MTB cycle. Renu stayed in the hotel for some office work support. My route was from Vijaydurg to Devgad along with beaches like Pural beach, Padel beach, and Padavane beach. The entire route was full of the Up and downhill ride. It was my Solo ride and with the steady progress, I reached close to Pural beach (16.516536, 73.323227). After some point, tar road shifted to the rough narrow road. I reached on the beach after a couple of KM ride. It was Virgin beach with No tourist, No home, hotel etc. It was a lovely beach. I climbed down on beach so I was aware of riding uphill while going back. I took some rest on the beach and left the beautiful beach.
My next location was Padel beach. I took right on State highway (16.479880, 73.339976) towards the beach but I was blocked by a group of cows and Bulls. Street dog (belongs to the same group) was not in the mood to allow me to travel ahead so, I took U term and joined State highway. I missed Padel beach. I started my Bicycle journey towards Padavane beach. I stopped at a small village on coastal highway to refill my water sources. When people got to know that I'm a tourist on Cycle, they started asking me too many questions and also offered me tea/coffee. After some chitchat with locals, I moved ahead.
I took right turn on the highway (16.433411, 73.399896) and came across beautiful temple named Vimleshwar Shiva Temple (16.437588, 73.395430). Locals suggested me to visit the temple when I took break for water refilling. Temple is very old and hidden gem of Konkan. It has an idol of Lord Shiva and Lord Ganesha. It also has carved elephant which is painted recently. Temple area is very calm and hardly visited by tourists. It is very photogenic location. The Same road goes to a beach known as Padavane beach (16.411106, 73.367248).
My next destination was Devgad. It was around 10 in the morning. Renu planned to join me at Devgad by car for Lunch. Last Hill climb was an endurance test for me and somehow I managed to cross it. Renu was waiting at Devgad beach. Devgad beach can be visited while going to Devgad fort. Beach is quite small but clean n well maintained. You can see Windmills on to the top of the mountain. There is a path to visit the Windmills but we missed it due to short of time.
After a short break on Devgad beach, we went to Devgad Fort. I was on Cycle and Renu by Car. Fort is divided into two parts, one on top of Hill and second near Jetty close to sea line. Hardly any fortification is present near jetty hence people forgot or avoid to visit that part of the fort. Hill Fort area consists of Lord Maruti temple, Lord Ganesh Temple, fort wall, Few Bastions, Cannon and Lighthouse. Fort is not maintained properly and tourist mainly visits the lighthouse.
Historical information about the fort is not available. British won the fort from Maratha empire in the year 1818. You can enjoy the view of the sea from Lighthouse and engineers gives you a detail information about how lighthouse work. After visiting this part of the fort, we climb down (by Cycle and Car) to see the jetty side fortification. There are steps as well to climb down at jetty from Fort entrance gate. You can see ruined fort wall near the jetty. I stopped my Cycle ride at Jetty after completing 50km for the day from Vijaydurg to Devgad via 2 untouched beaches.
We took a lunch break at Diamond restaurant which was average in taste. We began our return journey towards Vijaydurg and meet 3 riders from the UK. They were on a journey from Mumbai to Goa on cycle. As Renu wanted to visit Vimleshwar temple, we took small break at temple and returned Vijaydurg by 4PM
For evening, we took a boat ride around the fort to witness the beauty of fort and enjoy the sunset time. We spend an hour on the boat. We missed the sunset due to clouds but the overall experience was good. We had seafood dinner in the hotel and took rest. Expenses
Day 4: 23 Oct 2017: Vijaydurg- Pune I woke up early in the morning and went to the fort for a walk. Walking on the fort wall and sunrise view from the fort was the perfect start of the day.
I came back and took my MTB for the ride. My destination was a beach (Beach name as per locals is Rameshwar whereas No official name for this beach) which is around 5km from Vijaydurg. GPS location on the beach is 16.552013, 73.322799. Proper road to the beach is not available. As you approach towards the beach, the road becomes narrow and suitable for Bike or Cycle. You need to climb down for last 50-100 meter to reach on the beach. Beach was untouched with white soft sand and Mountains on both ends. I was alone on the beach and it was the very peaceful environment.
I left the place after spending 20-30 min. My next destination was Rameshwar temple. DO NOT confuse or link this temple with the Rameshwaram temple from Tamil Nadu. Temple is dedicated to Lord Shiva. Temple built in the 16th century and local says that Shivlinga and Lord Ganesh Idol are Pandav Kalin idols. Entrance to Temple is very unique as you need to climb down small hill which was created by Cutting hill during Peshwa empire. As per locals, Temple was expanded three times in 3 different periods. Temple Gabjara ( the place where Idol is placed) was built by Kanhoji Angre (Admiral of Maratha naval fleet). Temple Mandapa and Pradakshina route were built by Sambhaji Angre and Sankhoji Angre (Sons of Kanhoji Angre). Later Entrance gates and entrance route was built by Madhavrao Peshwe along with some modifications in temple structure. Bell at the entrance was brought from Portuguese Ship which was captured by Maratha Navy in one of the successful raids.
Famous story (no evidence available) says that Kanhoji Angre was not happy due to set back while leading the naval fleet. Lord Shiva appeared in his dream and requested to fire a cannon fireball. Place where cannon fireball was fall, he found Shivlinga idol. He built the temple which resolved his issues.
I returned to the hotel and by 11 AM, we checked out. As Renuka wanted to visit the Temple, we went to Rameshwar Temple. After Temple visit, we decided to have a lunch. We had lunch at restaurant Mayuri (GPS 16.556086, 73.337074). The restaurant serves very delicious seafood and veg meal. They have Thali system which is quite less in price. You should read and implement their rules before having a meal. They strongly believe in "no wastage of Food". It is must visit restaurant if you're close to Vijaydurg.
It's time to start return journey after tasty seafood. We choose Anuskura Ghat road to join Bangalore - Pune national highway. We reached home safely by 9 PM
Expenses
Contact number for reference
GPS Locations
Thanks for reading this Travel Blog. Happy traveling. Hidden Gem: Vengurla and surrounding beaches along with Scuba in MalvanTravelers for this trip were I and Renuka. Friends Himanshu-Ketki and Vishal-Arya join us on last day and then they followed our Vengurla plan.
About Vengurla and nearby beaches: Vengurla is town from south Konkan of Maharashtra. Vengurla was captured by Dutch traders and afterward by British rulers. Malvani is native language and Marathi is widely spoken by locals. Vengurla area is surrounded by hills with evergreen foliage, tree plantation of Cashew, Mango, coconut and berry trees. Vengurla region consists of many beaches such as Bhogve, Nivati, Khavne, Vengurla, Shiroda, and Redi. Vengurla and nearby beaches are less popular because tourist fame Goa is its neighbor to the south Route to reach Vengurla from Pune/Mumbai is 1. Mumbai – Expressway – Pune – Kolhapur – Gaganbavada Ghat – Mumbai-Goa national Highway – Kankavali – Kudal – Vengurla. 2. Mumbai – Expressway – Pune – Kolhapur – Radhanagari Ghat – Mumbai-Goa national Highway – Kankavali – Kudal – Vengurla. (Better to avoid Radhanagari Ghat after sunset as it is very lonely and pass through Forest whereas Gaganbavada Ghat is busy route so safe for night journey) 3. Other options are to Taking Amboli Ghat after crossing Kolhapur and join Sawantwadi – Vengurla OR Mumbai - Mandgaon (From Pune, take Tahmini ghat and join Mandgaon) – Mumbai-Goa National highway – Kudal - Vengurla Day 1: 1 November 2016: Pune to Vengurla We wanted to leave Pune early morning but as it was a festival day (Bhau-bhij) so we left by 12 in noon after visiting sister’s place. We decided to go by Gaganbavada Ghat. We had our quick lunch break in Shirur at Shivsagar. We reached at Kolhapur by 4 PM. We decided to visit Mahalaxmi Temple from Kolhapur which is our family deity. We left Kolhapur by 6 PM. Our booking at Vengurla was in Dhuri Homestay located 9 km before Vengurla. We did advance booking from 2nd November hence we have to search for a place. Gaganbavada ghat Route was in pathetic condition and condition was continued till Kankavali. we were in Kudal by 9.30 PM hence we decided to take a halt and processed to Vengurla tomorrow. We booked std room in RSN executive hotel. The hotel was basic and very cheap in rate. For Dinner, we visited restaurant Gajali which is a famous place for seafood. I had seafood which was tasty. Hectic driving day come to an end by lovely seafood. GPS Locations: Mahalaxmi Temple, Kolhapur:- 16.694846, 74.222876 Gajali Restaurant:- 16.003154, 73.690668 Expenses:
Day 2: 2 November 2016: Vengurla – Mochemad – Shiroda – Redi and Keri-Arambul (Goa): We woke up by 6 AM and left the hotel by 7 AM. We went at Dhuri homestay to keep our bags in the room before we start a day trip to the south of Vengurla. Dhuri Homestay is owned by the family of Prashant Dhuri. It is location bit away from the main road and surrounded by forest. He is one of the most humble and down to earth person I have ever seen during my traveling across India. Dhuri Homestay consists of the cottage with two rooms.
Veg and Non-veg meal with authentic Konkani style is available and it was very tasty. They served Modak in sweet as part Veg Thali. No need to carry water as well water is pure and tastier than any mineral water. If you are interested in a peaceful stay in Konkan, away from the crowded and noisy surroundings, just pack your bags and go to Dhuri Homestay We left Dhuri stay for a day trip at around 8 AM. Our first destination was Mochemad Beach. Mochemad is the very small beach. Mountain is located on the one end and river creek on another end. The village is the home of Fisherman’s and you will find the only 1-2 fisherman on the beach. We visited in the early morning and fishermen were busy with their fishing activity. Route mentioned by Google was wrong. You have to take Right at Bus stop for Mochemad village which is around 1 km before Mochemad river bridge.
If you are traveling by car, then park the car in the village and take km walk as the road is too narrow. We visited the beach in the early morning hence we were able to take car close to the beach. Beach is not clean (you will find leftover fish or unwanted dead fish) but safe for swimming. You may face fish smell as unused fish thrown on the beach. We saw few jellyfish, crabs and other large dead fish on the beach. We did a small hike on the hill to enjoy the beach view. There is no Shop and restaurant on the beach. This serene beach allows you to relax away from the crowd.
After spending an hour on Mochemad, we left for our next destination was famous Shiroda beach. Beach have plenty of parking space. This beach is very beautiful lined with a shady grove of Casuarina trees (Known as Suru Ban in Marathi). There are many small food stalls where you can get snacks such as Vada pav, Omelet, Burji, maggi, tea-coffee etc. A lot of accommodations are available near the beach or few shacks (towards the south side of the beach) on the beach.
This beach offers you water sports at less cost as compared to Goa. We were not interested in water sports so we went for stroll on the beach. The Golden sand curved beach ends at Tiroda creek. You can see Redi beach on another side of the creek. Beach is beautiful with Golden sand but not suitable for swimming as waves are choppy. Non-Indian Tourist prefers Shiroda and Redi beach as a day trip from North Goa. View of Redi beach and Shiroda from Creek point is beautiful.
After Shiroda, we moved to our next destination i.e. Redi. Redi is mainly famous for Redi Ganesh Temple. Ganesh Idol was found in a mine in the year 1976. Local person, Sadashiv kambali saw a dream in which Lord Ganesh ask him to dig out the Idol from mine. Ganesh Idol was made by Pandava during their rules. After more investigation and digging process, mouse idol (vahana) was found. Ganesh idol was made up of solid rock. Now the entire original rock idol is covered with man-made beautiful Ganesh idol by adding paint layer. Idol is very attractive and tourist is allowed to take a photograph of it. Temple construction is in progress and limited parking space is available.
After visiting the temple, we went to Redi Beach. Redi beach is very small curved shape beach. You can view the Shirdoa beach on another side. In the creek, there is small beach island where you can go to a low tide time.Sea bed is flat which makes this beach much safer for swimming. It is the best beach to enjoy the sunset. It is not a crowdy place due to its location and very narrow roads leading to it. There is only one restaurant name Janu Resturant. They offer you good food and sea facing basic small cottages.
Redi Fort or Yashavant Fort is located close to Redi Beach. It is the last fort on Maharashtra coastal line. Fort was built to protect land and to keep a close watch on sea business routes. Fort was built in year 610 by chalukya but no strong evidence is available. Fort was captured by Adil Shahi in modern history. Later it was won by Sawant empire (Local empire) and then by Shivaji Maharaj.
Yashwantgad fort is unnoticed hidden gems from Redi
village. It is quite a lonely place to avoid after or during sunset
time. Fort has 4-5 entrance gate and old building ruined structural.
Entire area is covered across 9 Accor land. It is must visit place for
history lovers.
We were too hungry and decided to have lunch. We visited Fort tercol Heritage as it was converted into Heritage Hotel. There was no table available hence we saw small fort and left the place.This fort is located on the northern tip of Goa State. The fort was originally built by Maharaja Khem Sawant Bhonsle, the King of Sawantwadi, in the 17th century. Fort is on top of the Hill near Sea which was used to keep watch on naval activity. In 1746, Fort was won by Portuguese after the war. we had lunch at Hillrock which offers you good seafood and a beautiful view of Keri Beach
We spend around 2 hours on the beach and enjoyed the end
to end walk on the beach. Clean sand tempts you to stay longer time on
this beach. we decided to travel ahead for Arambol beach for sunset.
Now, this was the only beach left from our North Goa beach list. It was
our mistake to leave such beautiful beach for sunset and preferred the
busy beach.
Arambol Beach is around 25 min drive from Keri beach. It is famous and attracts international tourist. It was used to fisherman's village. Sadly, it has become very crowded and commercial. It is safe to say that Arambol is the new Calangute. I prefer nature beauty, less crowd, and peace but this disappointed me. I heard a lot about this beach. There are too many beach restaurants where you can enjoy the crowded beach with seafood and drinks.
It was not an ideal plan to visit Keri beach again for Sunset. We decided to witness the sunset from Arambol. When I was trying to capture panoramic time lapse, solo German tourist approached us to learn the technic. We become friends quickly and he shared his experience from Goa when we visited 30 years back. He loved Indian culture and invited us to visit Germany before leaving. We randomly selected one place to spend more than an hour with seafood and cold drinks.
After sunset, we left Goa and went at Dhuri for Dinner. We ordered a veg
meal and fish for barbecue. We were carrying our own barbecue set.
Dinner was fabulous in taste. It was a perfect end of our Day 2.
GPS Locations Dhuri Homestay: 15.896139, 73.679139 Mochemad Beach: 15.800466, 73.650906 (Drive till GPS 15.805241, 73.655242 and then take right for beach. Good Map route is not accurate for Mochemad beach) Shiroda Beach: 15.769325, 73.662672 Redi Beach: 15.752927, 73.664167 (You can search for Janu Resturant, Redi in Google as it is located on Beach) Yashwant Fort: 15.752628, 73.664105 (Take a left from GPS point to start fort trail) Querim Beach / Keri Beach: 15.717383, 73.690986 Arambol Beach / Harmal beach: 15.687082, 73.703607 Expenses:
Day 2: 3 November 2016: Vengurla – Kondura - Khavane - Kelus - Nivati:
We woke up by 7 and left Dhuri stay at 8 AM after
breakfast. Our morning beach destination was Vayangani beach. It is
typically fisherman's beach. It is long sandy beach and nice location
for a morning walk. The road towards the beach is narrow and covered
with dense trees. When we visited, No one was on the beach when we
reach. This is not a tourist friendly place but if you are looking for
loneliness and peace near Vengurla then this place is for you.
Beach is totally untouched and hardly visited by tourist. It is nestled in the lap of two mountains. Small sea Water Lake is the highlight of it. This is one of the best beaches I have ever visited from this area. We were only tourists on the beach in morning and during sunset. Due to Mountains and coconut plantation, the beach remains in shade till afternoon. Not recommended for swimming in the sea due to rocky patches. But you can enjoy swimming in small sea water lake. Food options are not available hence better to carry your own food. We did some photography on this beach. Beach is so small that it requires 3-4 min to take a complete stroll on the beach.
We heard in a village about Strike in the village. Got to know that Gas station will remain open till the stock. My car's fuel indicator was low so we decided to skip Bhogve beach for the evening and decided to go back to Vengurla. We came back in Vengurla in 45 min and refuel the car. Now it was not worth to travel towards Bhogve so we went on Vengurla port and Lighthouse.
Vengurla jetty is popular jetty from south Konkan. You can buy fresh fish freshly caught from the sea. View of Vengurla beach from the jetty is beautiful. There is a lighthouse to visit at Jetty. Vengurla lighthouse offers you breathtaking view of the sea. It is located on the edge of the mountain. You can visit this place from 9 am till 1 hr. before sunset. Government engineer explains the functionality of lighthouse. View from the lighthouse is best. There are two ways to reach at Lighthouse. You can take steps from Jetty to reach the lighthouse. There are around 800-850 steps to climb. Another way is by small road but better to ask locally for the appropriate road. We use steps after parking car at Jetty. It was good experience It was 4.30 in clock and we decided to visit Kondura beach for sunset. while leaving from Vengurla, we visited Dutch Factory. It is located around 1 km from the jetty. Now entry inside the property is now allowed. It was declared as dangers site and not safe. It used to storage of Dutch and then Government offices during Dutch era. Hardly any tourist visits this place.
We reached Kondura beach by 5.15 PM. We set up a tent on the beach and enjoyed the sunset with some snacks. It was one of the best evenings from this trip. Locals were busy in fishing with a fishing rod. Watching the sunset and capturing it in camera is my favorite activity. Here are some photographs were taken from Kondura beach.
we had our tasty dinner at Dhuri Homestay. They served us tasty Modak in sweets. Fish meal made in Malavani style was simply mouthwatering. After dinner, we had long chat with Prashant Dhuri. Tomorrow will leave for Malvan and our friends will join us for the day before we leave for Pune.
GPS Locations
Kondura Beach: 15.889512, 73.600781 (Last GPS point for car drive 15.889032, 73.603474)
Wayangani Beach: 15.878805, 73.605547 Motha Khavne Beach: 15.920228, 73.566473 Chota Khavne Beach: 15.922389, 73.561267 (Rough and small road, We managed by i20) Nivati Beach: 15.936953, 73.540500 Nivati Fort: 15.938709, 73.512439 (Not motorable road, Need powerful vehicle to drive till Fort entrance) Kille Nivati Beach: 15.939733, 73.516916 (Don't confuse with Nivati Beach. Very small and untouched beach)
Expenses:
Day 3: 4 November 2016: Vengurla – Bhogave - Malvan - Devbag:
We woke up by 6.30 AM and left Vengurla by 8 AM. This was our quick exploration trip to Vengurla and now we will visit these place next year. In morning section, we decided to take a pit stop at Nivati Fort and Bhogave beach before heading Malvan. Nivati fort is located close to Bhogave beach and it was built to protect the sea trade route. Fort was built by Shivaji Maharaj after the construction of Sindhudurga fort.
Bhogave beach is on the northern tip of Vengurla. There
are Karli River creek and Devbag beach on another side of Creek. The
beach has a rocky side and a sandy side. The rocky side is great for
photographs and watching water splash up behind you! Be careful, the
rocks are very sharp, do not go without a footwear. The sandy side is
very clean and shallow to an extent.
We just took a small stroll on the beach and left for Malwan. Our Friends were about to reach Malvan so we left the Beautiful region of Vengurla. Friend Himanshu and Ketaki joined us at Sindhudurg fort jetty which was our decided meeting point. Another couple Vishal and Aarya joined us in the evening. We decided scuba Dive and our Friend from Malvan Anway Prabhu took us on the boat. The weather was perfect for dive and a cool breeze was playing on sea water. Maximum depth for Dive in Malvan is around 25 – 28ft. Underwater visibility is in excellent condition from Nov to Feb end. This was our 3 Visit to Malvan for Dive experience. Before Malvan, I and Renu completed dives in Andaman and Goa. We geared up with suits and did some warm up in the water as the temperature was very low. As we swam into the deep waters, I felt I was in a different world altogether. There are plenty of Corals, Rock patches, and fishes around us. We were surrounded by beautiful and colorful small fishes, they aren’t harmful and watching them is a treat to the eyes. It is really hard to describe just how awe-inspiring SCUBA diving is … the underwater world is just so unique. It's True that quality of Scuba dive and marine life is better in Andaman/Goa but we are always more interested in underwater experience. You can feel your presence and listen heart beat which says to you, you are alive so live life.
Shoals of fish swim past you whilst some fish poke their heads out of small cracks in the rock. The more you look around, the more you see – Flat coral, Finger corals, Catfish, sea cucumber, urchins, Blue Line Grouper, Parrot fish, damsel fish, Curious batfish and even red snapper fish (my mouth was watering seeing them). After 25-30 min our instructor left us alone and we were exploring underwater life independently. Our confidence was boosted due to our solo scuba act in the water. After some photo session, we came back on our boat after 45+ min scuba dive.
Himanshu, Ketaki, and Renu were done with Scuba dive but I
was not satisfied. I took my own snorkeling gear and went alone in
water for snorkeling. After spending more than 30-40 min, I came back on
the boat. Everybody was hungry so we went to the restaurant for seafood
lunch. My favorite restaurant "Athiti Bamboo" was full with a long
waiting list so we went to Saiba restaurant.
After Lunch, we did check-in in booked hotel Annapurna
Nivas. we freshen up and went to Devbagh beach. Vishal-Aarya joined us
on the beach. We witness beautiful Sunset on Devbagh and then decided to
visit Tsunami Island. This island has emerged in 2004 after Tsunami
waves hit the coast. A local fisherman told us that prior to 2004, this
place used to be under water at least by 3-4 feet even during the low
tide. After the tsunami wave hit the coast, it has turned into an island
during low tide but gets submerged by 2-3 feet during high tide. This
island is very small and you can see it during low tide. Water sports
are arranged on this island and even during high tide, you can go there.
We had dinner in the hotel and a lot talks on different
topics. Tomorrow I and Renu will start our return journey to Pune
whereas friends will follow our footsteps to explore Vengurla area.
GPS Locations
Bhogave Beach: 15.956238, 73.503549
Devbagh Beach: 15.969524, 73.501575 Malvan Scuba Dive / Snorkeling point: 16.042065, 73.461599 (GPS location is in Sea hence you need to take Boat to reach this point) Expenses:
We woke up by 8 AM and left the hotel by 9 AM. We took ferry tickets to visit Sindhudurg fort. It takes hardly 10 min boat ride to reach there. We all visited fort before hence we didn't hire a guide. Sindhudurg (Sindhu = sea, durg = fort) was built by the great Maratha warrior King Shivaji in 1664. Fort was built over a period of three years spread over 48 acres area. The main entrance is concealed in such a way that no one can pinpoint it from outside. This fort has the only temple of great Maratha warrior King Shivaji. The fort also has a Bhavani temple and the impressions of hands and feet of Shivaji Maharaja. Construction of fort is very solid.
We had our breakfast at Jetty and left Malvan by 10 AM. We came back by Gaganbavda Ghat and took Lunch-Dinner break on national Highway. we came to Pune by 10:00 PM safely. Expenses:
Contact numbers for your reference:
Thanks for reading this Travel Blog. Happy traveling. Trip to beautiful Malvan - Tarkarli
After Mahabaleshwar trip, my next
target was to visit Konkan beach before Monsoon. We (Me and my
wife-Renuka) decided to visit Malvan-Tarkarli area. As we had to attend
my friend’s wedding on 26th in Sagali, we planned to move ahead and
spend our long weekend in Malvan area. Malvan is around 385 – 390km away
from Pune city.
About Malvan – Tarkarli
Malvan is a town in Sindhudurg District, Maharashtra. It is known as
Sindhudurg Fort, Malvani cuisine (Fish curry and Solkadi), Alphonso –
Mango and local food. Malvan is considered as heaven for the
non-vegetarians especially seafood lovers.
Tarkarli is just 7 km from Malvan with very beautiful long coastline
with white powder sand beaches, clear sea water. Tourists get attracted
towards Malvan - Tarkarli because of clean, beautiful beaches, Fort,
lovely nature, and very less crowd. People generally opt to go to Goa as
it is hardly 100km away from Malvan. Now it is a famous spot for
Snorkeling and Scuba diving.
Our main intention to visit this place is Snorkeling and scuba diving.
Best way to reach Malvan is Pune – National Highway 4 (NH 4) – Reach to
Kolhapur – from Kolhapur city either you can join Radhanagar forest road
OR Gaganbawada ghat road – Vaibhavwadi (If you opt Gaganbawada ghat
road) – Take a right at Phonda and join state highway 116 – Join
National highway 17 at Phonda Phata (Humbrath Titha village) – Take
right at Kasal - state highway 118 – Malvan.
To reach Tarkarli, take a left turn after Malvan Bus stand. The distance
between Malvan and Tarkarli is 7km. Resort MTDC is considered an
endpoint of Tarkarli and you can go ahead to visit Devbag by the same
road which is the end point of Malvan – Tarkarli road.
Regarding Radhanagar-Phonda ghat and Gaganbawada ghat, both
routes are same in terms of distance. If you want to enjoy dense forest
then prefer Radhanagar-Phonda ghat and if you want to enjoy driving then
Gaganbawada is best. Road quality in Gaganbawada is too good.We planned our visit to Malvan for 5 days i.e. on 27th April and 1st May 2012. Day 0 (26 April 2012): Pune – Sagali – Kolhapur (Distance traveled: 300km) As we have to attend friend’s wedding, we left home by 5am. We were traveling with my friends. After few hours we took breakfast at hotel Virangula on NH-4. This is one of my favorite restaurants on NH-4. Don’t miss Sabudana khichadi at Virangula.
Day 1 (27 April 2012): Kolhapur – Malvan via Radhanagar forest (Distance traveled: 165km)
We
woke up in the early morning and went to Mahalaxmi Temple. Because of
the rain the day before, the weather was very pleasant. There were fewer
people in the temple and hence we managed to come back within an hour.
After a nice breakfast, we actually began with our trip to Malvan. We
decided to go via Radhanagar forest and while coming back to Pune we
preferred Gaganbawada ghat route. Road journey was through very dense
forest and hardly had we seen any vehicle on this road. Definitely, you
should avoid this route after sunset.
We wanted to have lunch in Malvan but because of lots of pit stops in the forest and in Phonda ghat we were not able to make it. We took our lunch on NH-17 and reached to Malvan by 3pm. There are a lot of hotels and homestay options in Malvan and Tarkarli. Tarkarli gives you real Konkani feel so we went to Tarkarli. After research and lot of enquires, we decided to stay at Annapurna Nivas. This was homestay and within our budget. Room was ok but the surrounding property was excellent. Tarkarli beach was just 2-3 min walk from our Room. We could hear the sea from our room. After resting for a while, we planned to visit the beach for swimming. Surprisingly, even at 5.30 p.m., there were hardly any visitors. The beach slope was gentle and sea water was clean enough to see the seabed. This beach is much better than any other famous beach from Konkan area. Unfortunately, we were not able to witness sunset as the weather was cloudy. After some playful and relaxing time at the beach, we headed back to the resort. We gave a call to Mr. Rupesh who arranged snorkeling and scuba diving for us. As we had purchased our own kit and were aware of snorkeling, he was ready to give us boat transportation service and useful dive site information. We had our Dinner in Malvan at “Atithi Bamboo” restaurant which is famous in Malvan for Fish. Renuka ordered vegetarian meal whereas I ordered Surmai fish meal (king mackerel or seer fish in English). Food was simply awesome and we decided to have dinner here for next 3 days. Malvan trip is incomplete without having dinner in “Atithi Bamboo” restaurant. We ended our day 1 with a tasty dinner.
Day 2 (28 April 2012): Malvan – Sindhudurg fort – Snorkeling – Rock garden
Early
morning we went to the beach for a walk. Clear weather and cool morning
breeze from the sea made us feel fresh. In breakfast, Gosavi aunty
offered us local food. It was Konkani base rice Amboli with coconut
milk. It was heavy breakfast before we proceeded to Sindhudurg fort.
We took ferry tickets to visit Sindhudurg fort. It takes hardly 10 min boat ride to reach there. We hired a guide so will get to know the history of the fort. Sindhudurg (Sindhu = sea, durg = fort) was built by the great Maratha warrior King Shivaji in 1664. Fort was built over a period of three years spread over 48 acres area. The main entrance is concealed in such a way that no one can pinpoint it from outside. This fort has the only temple of great Maratha warrior King Shivaji. The fort also has a Bhavani temple and the impressions of hands and feet of Shivaji Maharaja. Construction of fort is very solid. Guide told us all the details about the fort. We wanted to spend more time on the fort for photography but we moved ahead for snorkeling. Mr. Anavay (Rupesh’s Brother) came to pick up us from the fort and took at the snorkeling point which is nearer from the fort.
As we have our own kit, we quickly entered the water. It was fun to see marine life for 1 hour. It was ending the season so visibility was bit poor. Best time to visit this place for snorkeling and diving is Nov and Dec month. Local people feed those fish with bread to attack so people can see them while snorkeling. We saw 4 to 5 types of fish. It was really a great experience, seeing the beauty of sea wildlife. Our scuba dive was planned on Monday but due to bad weather, we were not able to do it. We promised Rupesh to come back in the month of November just for Scuba diving. He gave us few snaps taken during snorkeling and scuba dive.
When we were back, we were too hungry so we went directly to restaurant name “Chaitanya”. This was an alright restaurant. Due to peak summer, we preferred to stay in our room for relaxation. In the evening around 5:30 PM we went to Rock garden in Malvan. The garden is so named because of its close proximity to the rocky shores of Arabian Sea. We spent more time on the rocky patch than in the garden. The Rock Garden is a good place for spending evenings. You can spend an entire evening just to view waves hitting on rocky patches creating huge water splash. Sunset at this point was amazing.
Walking around the market we picked up some Malvani shopping items like Masala, kokam, Amba-poli, pickles etc. Once our little ‘Malvani items shopping’ trip was over we headed back to our room. Aunty gave us information about a dealer/ wholesale agent who is the owner of Mango (Alphonso) business from Malvan town. We meet him at his place. His family is in this business from last 35yrs. They greeted us with Mango and other fruits. We got to know how they run this business. They take all mango trees from town on 5 or 10 yr. lease. They take care of trees for an entire year and then collect the Mangoes in the summer to sell in Mumbai/Pune/abroad Market. We requested them as we wanted to buy Mango and purchased 4 Dozen large sizes Alphonso at INR 400 per dozen rates (That time market price in Pune was INR 700-800/-).
I and Renu wanted to see Rapan (Traditional way of fishing in Malvan) so we woke up early morning at 4.45 a.m. and went to the beach by 5.15 a.m. Yesterday we got to know the timing by a fisherman about Rapan so we managed to reach there before time. Fishermen sail into deep sea in the midnight with huge size fishing net and spade it in such a way that it forms U shaped wall in the sea. In the early morning, they start pulling out the net with their bare hands in perfect coordination with each other. It looks graceful but I have no doubt that it must be very hard. There are at least 30-40 people pulling this Net. At the end when the complete net was pulled out of the sea, we saw too many live fishes. Nobody was in the mood to talk but when the whole Rapan process ended they gave us to answer to our all quires. We clicked a few photos and then local auction begins. It was completely fun to watch this Auction and the entire process.
We just roamed around the beach in the morning and spent 2-3 hours in water. Then we sat down on the beach for watching the sea and the waves. It was a nice morning and no work pressures, no daily routine. This was the laziest morning of the trip.
We came back to the room and went for lunch in Tarkarli at
hotel Tarkarli Nivas. The menu in the vegetarian Thali (Meal) was very
simple but the food was tasty. We took rest in the noon on rope hammock.
Our evening plan was to visit Devbag which is an endpoint on Malvan Tarkarli road. But due to the maintenance of the road, we were not able to go there. Runtime we decided to visit Ozar place for caves which is just 7-8km away from Malvan. After watching the cave we came to Ciwala beach which is in Malvan. The evening walk by the beach is also stressed relieving and revitalizing.
We had dinner again at “Atithi Bamboo” restaurant. I ordered Pomplet Fish Meal (Bramidae family fish/type of Stromateidae fish) with Solkadi (a Local non-alcoholic drink made of fresh coconut milk in mangosteen/ red mango juice spiced with ginger, garlic, and coriander). It was an awesome dinner.
We woke up at 8 and went to the beach for swimming. After
spending hardly half an hour we came back for breakfast. Monday is the
local Market day so we decided to visit the market. Lots of local people
selling a verity of the product as well as some local products. We did
some local food shopping and came back.
We were a bit confused about our day plan. We had 2
options; Relax in the resort for an entire day or visit Kunkeshwar
temple along with Vijaydurg. We decided to go with plan 2. Visit
Kunkeshwar temple was nice. Temple is built upon the seashore.
Kunkeshwar is the most devoted Lord Shankar Temple in the Sindhudurg
District. A local guy told us the history of the temple that a cow,
instead of milking for her master, was delivering it on a stone in the
jungle. Her annoyed master once followed her to that stone. Seeing the
behavior of the cow, he tried to axe the stone. As the axe hit the
stone, the red blood emerged out of the stone. The master understood
that this was not an ordinary stone; he apologized to the stone &
started worshipping it. That stone is the Shiva-Linga (The symbol of
Lord Shiva).
Later we went to Devgad but strong smell of dry fish from port made my wife uncomfortable and we decided to go back to resort. We took some rest and planned to visit Devbag (Devgad and Devbag are two different places. Devbag is 7km south from Tarkarli and Devgad is 66km north of Tarkarli) where Karli creek meets the Arabian Sea. Devbag is a small fishing village based on a thin strip of land with Karli backwaters on one side and the Arabian Sea on the other. Amazing view and must visit place in the evening. The location of this small beach is superb with its north and south side concealed by two hillocks and eastern side surrounded by backwater.
After spending 20-30 min on a small beach, we decided to go to our next destination, the Tsunami Island beach. This island has emerged in 2004 after Tsunami waves hit the coast. A local fisherman told us that prior to 2004, this place used to be underwater at least by 3-4 feet even during the low tide. After the tsunami wave hit the coast, it has turned into an island during low tide but gets submerged by 2-3 feet during high tide. This island is very small and you can see it during low tide. Water sports are arranged on this island and even during high tide, you can go there.
To reach to the tsunami island you have to hire a boat which cost you INR 500/- per boat. No one was there to share the cost so we said no to them. Local fisherman (young boy) approached towards us and he was ready to take us there in his own small size fiber boat (local name Dinghy) in just INR 200/-. The experience was thrilling and we entirely enjoyed this journey. Due to sea waves, the boat started rocking from side to side. Both fishermen managed to keep the boat steady. We spend 30 min on the beach and did Bumper ride. We were confident and comfortable during our return journey from tsunami island to Devbag beach. I liked the overall experience and gave him INR 70/- extra for making our last evening special. With the Devbag and tsunami island, our trip to Malvan-Tarkarli comes to an end.
I don’t want to go home without having fish in dinner on last night so we headed to “Atithi bamboo” and had Surmai fry and Savandala fish meal (Local name). This was my last full fish meal at the restaurant as we were going to head back to Pune the next morning.
We got up early and went to the beach for a while where we saw local fishing activity. We had our breakfast and left Malvan by 10 a.m. We followed the same route but instead of Radhanagari, we came via Gaganbawada ghat and reached home by 8 p.m. It was truly a stress-relieving trip.
मालवणची खाद्य भटकंती (What & where to eat in Malvan & Tarkarli)
सिंधुदुर्ग किल्ला (Sindhudurg Fort), तारकर्ली बीच (Tarkarli), देवबाग बीच
(Devbaug beach) यांच्यामुळे मालवण हे शांत गाव पर्यटनाच्या नकाशावर आलय.
मालवण म्हणजे फक्त सिंधुदुर्ग किल्ला, समुद्र, बीचेस आणि मासे असा अनेकांचा
समज असतो. पण मालवणची भटकंती म्हणजे केवळ एवढच नसून एक सुंदर खाद्य भटकंती
सुध्दा आहे.
मालवण परिसर फिरायचा म्हणजे सामान्य पर्यटकसाठी कोकण रेल्वे हा सर्वात
सोईस्कर पर्याय आहे. कोकण रेल्वेने कुडाळ स्थानकात उतरुन रिक्षा, जीप, एसटी
ने २६ किलोमीटर वरील मालवणला तासाभरात पोहोचता येत. कोकण रेल्वेच्या
"मांडवी आणि कोकणकन्या" ह्या दोन गाड्या त्यातली कॅटरींग सर्विससाठी
प्रसिध्द आहेत. भारतातल्या काही मोजक्याच गाड्यांमधे असे विविध आणि
दर्जेदार पदार्थ मिळतात. त्यामुळे आपली कोकणातल्या खाद्य भ्रमंतीची सुरुवात
कोकण रेल्वे पासूनच होते. कोकण रेल्वेत सकाळच्या नाश्त्यात शिरा - उपमा,
ब्रेड आम्लेट, इडली-वडा, कटलेट इत्यादी पासुन दुपारच्या/रात्रीच्या जेवणात
सुप्स, चिकन लॉलिपॉप, फ्राइड राइस, बिर्याणी ते आइस्क्रीम, गुलाबजाम
पर्यंतचे ४५ वेगवेगळे पदार्थ मिळतात. हे लक्षात राहाण्याच कारण म्हणजे एकदा
मालवणला जाताना दरड कोसळयाने आम्ही तब्बल १९ तास प्रवास करत होतो.
त्यावेळी मेन्युकार्ड मधल्या ४५ पदार्थातले ३२ पदार्थ आम्ही खाल्ले होते.
तुम्ही जर "जनशताब्दीने" जात असाल तर मात्र तुमची खाण्याच्या बाबतीत
हेळसांड होइल. कारण या गाडीला पॅंट्रीकार नाही आहे. पण निराश व्हायच काहीच
कारण नाही. कुडाळला ही गाडी दुपारी साधारण १ वाजण्याच्या सुमारास पोहोचते.
रेल्वेतून उतरल्यावर तुमच्या गाडीवाल्याला गाडी थेट "भावोजींच्या खानावळीत"
घ्यायला सांगायची. कुडाळ स्टेशन पासुन १ किमी अंतरावर असलेल्या या घरगुती
खानावळीत अस्सल मालवणी शाकाहारी आणि मांसाहारी जेवण मिळत. खानावळीत जेवणावर
आडवा हात मारला की तृप्त मनाने आणि भरल्या पोटाने गाडीत बसायच.
गाडीवाल्याला गाडी आरामात चालवायला सांगायच. याचे दोन फायदे आहेत. एक तर
खिडकी बाहेर दिसणार्या कोकणाच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता येइल आणि
दुसरा म्हणजे कोकणातल्या वळणदार रस्त्यांचा पोटाला त्रास होणार नाही. कुडाळ
-मालवण रस्त्यावर धामापूरचा तलाव हा प्राचिन तलाव आहे. तेथे थोडावेळ
थांबुन मगच मालवणच्या दिशेने पुढे जावे.
![]()
मालवणात पोहोचल्यावर आपल्याकडे दोन पर्याय असतात. एक तर तारकर्लीला
(Tarkarli) जाउन राहायच किंवा मालवण गावात मुक्काम करायचा. मालवण ते
तारकर्ली अंतर ७ किमी आहे. जाण्या येण्यासाठी रिक्षा,एसटी असे पर्यायही
आहेत. त्यामुळे कुठेही राहीलात तरी फारसा फरक पडत नाही. पण तारकर्लीत
राहीलात तर खाण्याचे पर्याय मर्यादित आहेत. तुम्ही ज्या हॉटेलात राहाल
तिथलच आणि जस मिळेल तेच खाव लागेल. पण मालवणात राहाल तर तुमच्याकडे
खाण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतील.मालवण सिंधुदुर्ग , तारकर्ली , देवबाग
परिसर पाहायचा असेल तर दोन दिवसांचा वेळ काढण आवश्यक आहे. मालवण - कुडाळ -
वेंगुर्ला - सावंतवाडी - आंबोली घाट ही ठिकाण पाहायची असल्यास चार ते पाच
दिवसांचा वेळ काढावा लागेल.
मालवणच सगळ्यात मोठ आकर्षण म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. मालवणच्या समुद्रात
असलेल्या ‘‘कुरटे‘‘ बेटावर शुध्द खडक, मोक्याची जागा व गोड्यापाण्याची सोय
ह्या गोष्टी पाहून शिवाजी महाराजांनी किल्ला बांधण्याची आज्ञा केली. दिनांक
२५ नोव्हेंबर १६६४ रोजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहुर्ताचा
चिरा बसवला. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले.
त्याप्रसंगी शिवाजी महाराज स्वत: हजर होते. गेली ३५0 वर्षे उन वारा पाउस
आणि लाटांचे तडाखे झेलत उभ्या असलेला सिंधुदुर्ग किल्ला पाहाण्यासाठी
मालवणला पोहोचल्यावर दुपारी ३ वाजताच्या सुमारास निघावे. सिंधुदुर्ग
किल्ला भर समुद्रातील बेटावर बांधलेला आहे. त्यामुळे तिथे आद्रता
(ह्युमिडीटी) प्रचंड असते. सकाळच्या चढत्या उन्हात किल्ला पाहायला गेल्यास
घामाने आणि तहानेने हैराण होण्याची शक्यता असते त्यामुळे संध्याकाळी कलत्या
उन्हात किल्ला पाहाणे उत्तम . मालवण धक्क्यावरून बोटीने १० मिनिटात
किल्ल्यावर जाता येते. किल्ला पाहाण्यासाठी एक तास मिळतो. किल्ल्याचा
गोमुखी दरवाजा , महाराजांच्या हाताचा आणि पावलाचा ठसा, शिवराजेश्वर मंदिर,
राणीची वेळा, भवानी मंदिर या महत्वाच्या गोष्टी पाहाण्यात एक तास पटकन
निघुन जातो. सिंधुदुर्ग किल्ल्यावर फिरुन आलेला थकवा घालवण्यासाठी
किल्ल्यातच मिळणार कोकम सरबत किंवा शहाळ प्यायल्या नंतर मिळणार सुख
अनुभवण्यात मजा आहे. भर समुद्रात असलेल्या किल्ल्यातील दुधबाव , दहीबाव,
सारखबाव या विहिरींच पाणी वापरल्यामुळे कदाचित या सरबताला एक वेगळीच चव
येत असावी.
सिंधुदुर्ग किल्ला पाहुन झाल्यावर थेट "सुवर्ण गणेश" मंदिराकडे मोर्चा
वळवावा. मालवण धक्क्यापासून चालत १५ ते २० मिनिटात मंदिरात पोहोचता येते.
या साध्याश्या मंदिरातील स्वच्छता, प्रसन्न वातावरण आणि गणपतीची सोन्याची
सुंदर मुर्ती आपल्या मनातील भक्तीभाव जागृत करते. आपले हात आपोआप जोडले
जातात. सुवर्ण गणेश मंदिरा पासुन ५ मिनिटावर "रॉक गार्डन" आहे. या खडकाळ
किनार्यावर फुटणार्या लाटांची गाज ऐकत, अंगावर तुषार झेलत सूर्यास्त
पाहाणे हा खुप सुंदर अनुभव आहे. आकाशात अनोख्या रंगांची उधळण पाहाताना तिथे
मिळणार्या भेळपुरीला वेगळाच स्वाद येतो. लहान मुलांसाठी इथे टॉय ट्रेन
आणि इतर खेळण्याचे साहित्य आहे. सूर्यास्ता नंतर रॉक गार्डनहुन निघुन मालवण
बाजारात फेरफटका मारण्यासाठी दाखल व्हाव. बाजारातल्या "भाग्यश्री (पूर्वीच
क्षुधाशांती)" तले गरमागरम बटाटेवडे खाणे आणि राणे कोल्ड्रींग मधे जाउन
लिंबु सोडा, फालुदा आइस्क्रीम खाण ही चाकरमान्यांची "पॅशन" आहे. गणपतीत
किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत मालवण बाजारात खरेदीला आल्यावर इथले वडे
खाल्ल्या शिवाय आणि घरच्यांसाठी बांधुन नेल्याशिवाय त्याची खरेदी पूर्ण होत
नाही. त्यामुळे इथे कायम ताजे, गरमागरम वडे मिळतात आणि पटापट संपतातही.
गरमागरम वडे खाउन झाल्यावर आईस्क्रीम खाण आलच.भाग्यश्री हॉटेलच्या समोरच
आणि मच्छीमार्केट जवळ "राणे कोल्ड्रींग: आहे. येथे मिळणारे विविध प्रकारचे
"फालुदा विथ आईस्क्रीम" चवीला अप्रतिम आहेत. याशिवाय टायटॅनिक, इत्यादी
आईस्क्रीमही खाउन पाहायला हरकत नाही.
मालवणी खाद्यपदार्थ म्हणजेच खाज, शेंगदाणा लाडु, शेवाचे लाडु (खटखटे लाडु) , कुळथाच पिठ, मालवणी मसाले, कोलंबीच लोणच, काजु आणि त्याचे विविध पदार्थ, फणसपोळी, आंब्याचे विविध पदार्थ इत्यादी एकाच ठिकाणी मिळणारी सिंधुदुर्गातली एकमेव बाजारपेठ मालवणात आहे. त्यामुळे मनसोक्त खरेदी करावी. त्यानंतर भूक लागण अपरीहार्यच आहे. रात्रीच्या जेवणसाठी मालवण बाजारातल "चैतन्य " किंवा " अतिथी बांबू " हे दोन चांगले पर्याय आहेत. मालवणात विविध प्रकारचे मासे उत्तम मिळतातच. पण मालवणत आल्यावर खायचा खास पदार्थ म्हणजे "मोरी मटण" आणि वडे किंवा भाकरी. मोरी म्हणजे शार्कची पिल्ल. येवढ्या खतरनाक माशाच नाव "मोरी" ठेवण फक्त मालवणी माणसालाच जमु शकत. तर या "मोरी माशाला" काटे नसतात. त्यामुळे नवखा माणुसही आरामात खाउ शकतो. याबरोबर तिसर्या मसाला (शिंपले), कर्ली फ़्राय (हा प्रचंड काटे असलेला पण खुप चविष्ट मासा असतो) , कोलंबी मसाला, आणि मालवण समुद्रात मिळणारा ताजा बांगडा यांची चव आवर्जुन घ्यावी. त्याच बरोबर जेवण झाल्यावर प्रत्येकाने आपापल्या वकुबा नुसार ताज्या सोलकढीचे ग्लास रिचवणे आवश्यक आहे.
दुसर्या
दिवशी सकाळी तुमच्या पुढे दोन पर्याय आहेत. देवबागला जाउन डॉल्फिन सफारी
करायची आणि स्नॉर्केलींग, वॉटर स्पॉर्टची धमाल अनुभवायची किंवा सिंधुदुर्ग
किल्ल्याच्या मागे स्क्युबा डायव्हींग करायचे. कौटुंबिक सहलीला आलेल्यानी
पहिला पर्याय निवडावा आणि साहासी पर्यटकानी दुसरा पर्याय.डॉल्फिन सफारीसाठी
सकाळी लवकर देवबागला पोहोचाव लागत. एवढ्या सकाळी मालवण मधली हॉटेल उघडलेली
नसतात. पण मालवण किनार्यावर सिंधु बाजार समोर असलेल "भगवान हॉटेल" उघलेल
असत. समुद्रावर मासे पकडणारे कोळी बांधव, बोटवाले आदी मस्य व्यवसायातल्या
लोकांचा इथे राबता असतो. इथली आसन व्यवस्था आणि स्वच्छता यथातथाच असली तरी
इथे मिळणारी मिसळ, वडा उसळ , जिलबी आणि बंगाली खाज रांगड्या चवीच आहे. खाउन
झाल्यावर काउंटरवर विकायला ठेवलेली चिवड्याची पाकीट बरोबर घ्यावित. हा
स्वादिष्ट चिवडा पुढच्या दिवसात अधुन मधुन तोंडात टाकायला मस्त आहे.सकाळी ९
वाजल्या नंतर मालवणच बाजारातली हॉटेल्स उघडतात. मालवणची खासियत असलेली
गरमागरम आंबोळी आणि चटणी खाण्यासाठी भंडारी हायस्कुल जवळच हॉटेल गाठाव.
त्यानंतर "विजया बेकरीत" मिळणारा स्पॉंज केक आणि शुबेरी बिस्किट बरोबर घेउन
भटकंतीसाठी बाहेर पडाव. तारकर्ली - देवबागला जातांना थोडीशी वाकडी वाट
करुन न चुकता "मोरयाचा धोंडा" पाहावा. मालवण किनार्यावरील मोरयाचा धोंडा
ह्या गणेश, चंद्रसूर्य, शिवलिंग कोरलेल्या खडकांची पूजा करुन व समुद्राला
सुवर्ण श्रीफळ अर्पण करुन महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहुर्ताचा
चिरा बसवला होता. आजही कोळी लोक याची पुजा करतात.
सकाळचा वेळ समुद्राच्या सानिध्यात घातल्यावर तुमच्या समोर संध्याकाळसाठी
दोन पर्याय उरतात. एक म्हणजे मालवण पासून १६ किमीवरील आंगणेवाडीच मंदिर
पाहुन संध्याकाळी तारकर्ली बीचवर जाउन आराम करणे. दुसरा म्हणजे मालवणपासून
३५ किमीवरच प्राचिन कुणकेश्वर मंदिर पाहुन परत येण. कुणकेश्वर मंदिराला
जाणारा रस्ता समुद्राच्या किनार्याने, खाड्यांवरचे छोटे मोठे पुल ओलांडत
कुणकेश्वरला पोहोचतो. कुणकेश्वरला जातांना वाटेत मालवण पासुन ४ किमी
अंतरावर रस्त्या लगत असणार्या ओझर येथिल नैसर्गिक गुहा आणि पाण्याची टाकी
पाहाता येतात. कुणकेश्वर हे समुद्र किनार्याला लागून असलेले निवांत आणि
सुंदर गाव आहे. या गावात इसवीसनाच्या अकराव्या शतकात यादवांनी कुणकेश्वरचे
प्राचीन शिवमंदिर बांधले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी व संभाजी महाराजांनी
या मंदिराचा जिर्णोध्दार केला. मंदिर पाहुन येताना आचरा तिठ्यावर थांबाव.
आजुबाजूच्या गावातून रोजंदारीवर, खरेदीसाठी आलेले लोक संध्याकाळी एसटीची
वाट बघत तिठ्यावर थांबलेले असतात. त्यांच्यासाठी इथल्या हॉटेलात गरमागरम
कांदाभजी काढल्या जातात. या हॉटेलात बनवलेली खमंग कांदाभजी खाउन मगच उरलेला
प्रवास करावा. कांदाभजी आणि चहा देणारी टपरी वजा हॉटेल आणि खाडी यांच नात
आहे. पूर्वीच्या काळी पूल नव्हते तेंव्हा खाडी ओलांडण्यासाठी होड्या
असायच्या. या होड्या पलिकडच्या किनार्या पासून अलिकडे येईपर्यंतचा वेळ या
हॉटेलात कांदाभजी, चहा आणि गजाली (गप्पा) यात वेळ निघुन जात असे. पुल झाले
आणि कांदाभजी देणारी अनेक हॉटेल्स काळा बरोबर नामशेष झाली. पण दोन तीन
गावच्या तिठ्यांवर असलेली कांदाभजींची हॉटेल्स आजही एसटीमुळे टिकुन आहेत.
तिथे कांदाभजी मिळण्याची वेळ मात्र सकाळी आणि संध्याकाळी. कुणकेश्वरहुन
येताना मालवणात शिरल्यावर त्याच रस्त्यावर लागणार्या "अतिथी बांबू" या
हॉटेलात माशांचा यथेच्छ समाचार घेउन दिवस संपवावा.
माझा एक
शाहाकारी मित्र बरीच वर्ष मालवणला जायला कचरत होता. मालवण म्हणजे सगळीकडे
माशाचा वास, समिष आहार अस त्याना वाटत होत. त्याच्या मातोश्रीनीही हीच
चिंता व्यक्त केली. मी त्याना म्हटल निर्धास्त जा. मालवण सर्वाना आपलस करत.
(येवा मालवण आपलाच आसा) मालवण बाजारात "वझे खानावळ" ही अस्सल शाकाहारी
खानावळ आहे आणि तिथे वरण,भात, भाजी, चटण्या, कोशिंबिर आणि तुपाची धार अस
साग्रसंगित जेवण मिळत. याशिवाय बर्याच हॉटेलात समिष आहारा बरोबर मालवणची
खासियत असलेल आंबोळी आणि काळया वाटाण्याच सांबार (उसळ) मिळतेच. त्यामुळे
शाकाहारी माणसांची कुठेही अडचण होत नाही.
दोन दिवस
मालवण परिसर फिरुन झाल्यावर मालवणचा निरोप घेउन निघाल्यावर कुडाळ,
सावंतवाडी मार्गे आंबोली गाठता येते आणि आंबोलीला मुक्काम करुन दुसर्या
दिवशी परतीचा प्रवास चालू करता येतो. मालवणहुन सकाळी निघाल्यावर मालवण -
कसाल - मुंबई रस्त्याने मालवणपासून ५ किमी वरील कुंभारमाठला गाठावे. येथे
कुंभारमाठ सबस्टेशन समोरुन घुमडे गावात जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने
१.५ किमी अंतर गेल्यावर दाट जंगलात लपलेल्या घुमडे गावातील अप्रतिम
घुमडाईदेवी मंदिरापाशी आपण पोहोचतो. (मालवणहून केवळ १० मिनिटात आपण
मंदिरापर्यंत पोहोचतो.) शांत, सुंदर मंदिर पाहून मन एकदम प्रसन्न होऊन
जाते. याठिकाणी असलेली शांतता, पक्ष्यांचे मंजूळ आवाज आणि बाजूने वाहाणारा
व्हाळ त्यावरील साकव अस परिपूर्ण कोकणी निसर्गचित्र येथे पाहायला मिळते.
इथे भरपूर छायाचित्रण केल्या शिवाय इथली भेट पूर्णच होत नाही.
सागरी महामार्गाने कुडाळकडे जाताना रस्त्यात कर्ली नदिवरचा प्रशस्त पुल
लागतो. गाडी पुलाच्या दुसर्या टोकाला पाठवून वाहानांची तुरळक वर्दळ
असलेल्या या पूलावरुन रमत गमत चालत, आजुबाजूचे निसर्ग सौंदर्य पाहात पुल
ओलांडण्यात खरी मजा आहे. पुल ओलांडल्यावर चिपी विमानतळाच्या बाजुने रस्ता
परुळे गावात उतरतो. या पुरातन गावात प्रथम आदिनारायण मंदिर आणि पुढे
गेल्यावर वेतोबा मंदिर संकुल लागते. या दोनही मंदिरातील मुर्ती
पाहाण्यासारख्या आहेत. वेतोबा मंदिर परिसरात अनेक विरगळी पडलेल्या
आहेत.वेतोबा मंदिराच्या समोरचा रस्ता वालावल गावात जातो. या गावातील
प्राचिन लक्ष्मी नारायण मंदिर आणि त्या मागचा जलाशय प्रसिध्द आहे. मंदिर
पाहुन कुडाळ गावात शिराव. जेवणाची वेळ झाली असेल तर "कोचरेकरांच सन्मान
हॉटेल" गाठाव. अन्यथा मुंबई गोवा महामार्गाने सावंतवाडी गाठावी. सावंतवाडी
हे गाव तेथील लाकडी खेळण्यांसाठी प्रसिध्द आहे. तसच मोती तलाव, राजवाडा ही
ठिकाण पाहुन घ्यावित. एव्हाना पोटात कावळे ओरडायला सुरुवात झालेली असते.
मासे आणि कोंबडी वड्यांसाठी सावंतवाडी एसटी स्टॅंडच्या बाजुची गल्ली
गाठावी. तेथील हॉटेलात अप्रतिम चवीच जेवण मिळत. शाकाहारींसाठी सावंतवाडीतली
"साधले खानावळ" मस्त आहे. जेवणावर ताव मारुन झाल्यावर ३० किलोमीटरवरील
आंबोली गाठावे. आंबोली हे थंड हवेच ठिकाण आहे. तसच सह्याद्रीतील जैव
विविधतेने श्रीमंत असलेल जंगल येथे आहे. आंबोलीतील महादेव पॉइंट, कावळेसाद
पॉईंट, नागरतास धबधबा, हिरण्यकेशी नदिचा उगम इत्यादी फ़िरण्याच्या जागा
त्या दिवशी संध्याकाळी आणि दुसर्या दिवशी पाहुन संध्याकाळी आंबोलीहुन
सावंतवाडी स्टेशन गाठावे आणि कोकण रेल्वेने अथवा बसने परतीचा प्रवास चालु
करावा.
मालवण भागातला एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीच्या घरी राहाणार असाल तर तुमची
खायची चंगळ होउ शकते. नाश्त्याला आंबोळी चटणी किंवा तांदळाच घावण आणि चटणी
हे स्पेशल मालवणी पदार्थ खायला मिळतील. नारळ दुधाच्या गुळ घालुन केलेल्या
रसात बुडवलेल्या शेवया हा खास प्रसंगी केला जाणारा पदार्थ तुम्ही खाऊ शकता.
उकड्या तांदळाची पेज आणि नारळाची चटणी किंवा उसळ हे मालवणी माणसाच्या
रोजच्या नाश्त्यातील पदार्थ आहे. तो ही ट्राय करायला हरकत नाही. "रेडी टू
कुक" पदार्थांचा जमाना येण्यापूर्वी अनेक वर्षापासून मालवणी जेवणात दोन
"रेडी टू कूक /सर्व्ह" पदार्थ आहेत. एक म्हणजे कुळथाची पिठी आणि दुसरी
सोलकडी. कुळथाच्या पिठाच मिश्रण, हळकुंड, धणे, मिरची यांच्या बरोबर योग्य
प्रमाणत करून कुळथाची पिठी बनवली जाते. कुळथाच्या पिठात लसणाच्या दोन तीन
पाकळ्या ठेचून पाणी घालून उकळल की कुळथाची पिठी तयार होते. कुळथाची पिठी
आणि गरमगरम भात आणि जोडीला चुलीत भाजलेला सुका मासा असला की इतर कशाची गरज
लागत नाही. (तसच कुळथाची पिठी जाडसर केली तर तोंडी लावायलाही होते.) चुलीत
भाजलेल्या सुक्या माशाचा वास नविन माणसाला सहन होणार नाही. पण निखार्यावर
भाजलेल्या सुक्या माशाचे तुकडे घालून बनवलेली खोबर्याची चटणी आणि जोडीला
नाचणीची भाकरी चवीला अप्रतिम लागते. मालवण परिसरात होणार्या मोठ्या
काकडीला तवस म्हणतात. त्या तवसापासून बनविलेला धोंडास हा केकसारखा गोड
पदार्थ बनवायला त्रासदायक असला तरी खायला मस्त लागतो. याशिवाय हळदीच्या
पानात बनवलेल्या पातोळ्या, ओल्या खोबर्याची गुळ घालुन केलेली काप (वड्या)
हे गोड पदार्थ घराघरात उत्तम बनतात. मालवणी माणुस फ़ार कमी वेळा हलवा,
पापलेट, सुरमई या मोठ्या माशांच्या वाटेला जातो. मच्छी बाजारात तारली,
मोदक, खवळी, पेडवे, बांगुर्ले इ.छोटे मासे मिळतात. या माश्यांच आमसुल आणि
मालवणी मसाला घालुन केलेल तिखल (आंबट तिखट घट्ट कालवण) नाचणीच्या /
तांदळाच्या भाकरी बरोबर खाण्याची मजा काही औरच. दुसर्या दिवशी हे तिखल उरल
असेल तर आटवून पेजे बरोबरही खायला चांगल लागत. मालवणी माणसाच्या परसात
होणार्या भाज्याही जेवणात आगळीच चव आणतात. शेवग्याच्या कोवळ्या पाल्याची
ओल खोबर घालून केलेली भाजी, केळफ़ुलाची मोड आलेले वाटाणे घालुन केलेली भाजी,
शेवर्याची छोटी कोलंबी घालून केलेली भाजी, अळंबीची भाजी, उन्हाळ्याच्या
दिवसात गेलात तर फ़णसाची, विलायती फ़णसाची भाजी, विलायती फ़णसाची तेलावर
परतलेली काप अशा विविध प्रकारच्या भाज्या खायला मिळतात.
सुचना :- १) मालवण व आसपासचा परिसर फ़िरण्यासाठी जीप बुक केल्यास फ़िरणे सोईचे पडते. जीप कुडाळ स्थानकात बोलवून घ्यावी. २) स्क्युबा डायव्हींग आणि स्नोर्कलिंगसाठी उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते फ़ेब्रुवारी त्यानंतर समुद्राच्या पाण्याची पारदर्शकता कमी कमी होत जाते. ३) स्क्युबा डायव्हींग केल्यावर त्याच बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता येते. ४) मालवण समुद्र किनारा, कुणकेश्वरचा किनारा, निवतीचा समुद्र किनारा धोकादायक आहेत. त्यात पोहणे टाळावे.
अमित सामंत बोंबडेश्वर मंदिर (Offbeat Kokan)
एकेकाळी मानवाला निसर्गातील अनेक आश्चर्यांचा उलगडा झाला नव्हता. त्यामागील
विज्ञानही त्याला कळले नव्हते. त्यामुळे अशा ठिकाणांना दैवी चमत्कार समजून
त्याठिकाणी त्याने मंदिरे उभारली. हिमाचल प्रदेशातील ज्वालाजी मंदिर, गरम
पाण्याच्या कुंडांभोवती भारतभर बांधलेली मंदिरे, लोणार सारख्या विवरात आणि
आजूबाजूला बांधलेली मंदिरे अशी अनेक उदाहरणे आपल्याला भारतात पाहाता
येतात.
मालवण पासून ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या मठ गावात बोंबडेश्वर मंदिर आहे.
कोकणी पध्दतीच्या साध्या कौलारू मंदिरा समोर चिर्याने बांधलेले दोन कुंड
आहेत. या दोन्ही कुंडातील पाणी समपातळीत राहावे यासाठी मधल्या भिंतीत काही
छिद्र ठेवलेली आहेत. यातील उजव्या बाजूच्या कुंडाता पाण्याचे झरे आहेत. या
कुंडातील पाणी मधल्या भिंतीत केलेल्या छिद्रातून बाजूच्या कुंडात जाते आणि
पुढे पाणी पाटामार्गे बागायतीत वळवलेले आहे. दोन तलावांपैकी उजवीकडील झरे
असलेल्या कुंडातील पाण्यात अधूनमधून बुडबुडे येत असतात. " बोंबडेश्वर "अशी
साद मोठ्या आवाजात घातल्यावर तळ्यातून येणाऱ्या बुडबुड्यांची संख्या वाढते.
अर्थात बोंबडेश्वर हा उच्चार न करताही केवळ मोठ्या आवाजात उच्चारलेल्या
शब्दांच्या कंपनानीही तलावातून बुडबुडे येतात. आम्ही तिथे असताना गावातल्या
दोन बायका बाजूच्या कुंडात पाणी भरायला आल्या होत्या. त्यांच्या
बोलण्यामुळेही कुंडातून बुडबुडे येण्यास सुरुवात झाली होती. मालवणी भाषेत
बोंबाडे म्हणजे बुडबुडे तळ्यातून येणाऱ्या या बुडबुड्यांच्या चमत्कारावरुन
याठिकाणी स्थापन झालेल्या पिंडीला (शंकराला) बोंबडेश्वर हे नाव प्राप्त
झाले आहे.
यावरुन २००२ साली उत्तरांचल मधील केदारेश्वरला पाहिलेल्या पुरातन शंकर
मंदिराची आठवण आली. केदारेश्वर मंदिराजवळ असलेले मंदाकिनी नदीचे पात्र
ओलांडल्यावर एक पडके मंदिर होते . त्या मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंग
पाण्यात पूर्णपणे बुडालेले होते . त्या ठिकाणीही "बम बोले" असे म्हटल्यावर
पाण्यात बुडबुडे येत असत. २०१३ साली केदारनाथला झालेल्या उत्पाता नंतर ते
मंदिर अस्तित्वात आहे की नाही याची कल्पना नाही . मुंबई गोवा मार्गावरील
तरळा गावावरून वैभववाडीकडे जाणार्या रस्त्यावर नाधवडे गावाच्या पुढे
'उमाड्याचा महादेव' मंदिर आहे. या मंदिरासमोर असलेल्या नदीच्या शांत
प्रवाहात पाण्यातून सतत बुडबुडे येत असतात.
गंधकामुळे अशा प्रकारचे बुडबुडे
पाण्यातून येतात असे ऐकले होते. पण गंधकाचा येणारा विशिष्ट वासही या
दोन्हीही ठिकाणी येत नव्हता . मग हे बुडबुडे कशामुळे येत होते . याचा उलगडा
होण्यासाठी भूशास्त्राची थोडीशी माहिती करुन घेणे आवश्यक आहे. भूस्तराखाली
जे अनेक दगड असतात त्यात सच्छिद्र दगडही असतात. या सच्छिद्र दगडात
असलेल्या पोकळीत हवा असते. कोकण होणाऱ्या प्रचंड पावसामुळे बेसॉल्ट खडकातील
क्षार वाहून जातात त्यामुळे जांभा दगडाची निर्मिती झालेली आहे . क्षार
वाहून गेल्यामुळे हा दगड सच्छीद्र बनलेला असतो. या सच्छिद्र दगडातून वाहात
येणार्या पाण्या बरोबर हवा दगडातील पोकळ्यांमध्ये अडकून राहाते. मोठ्या
आवाजामुळे पाण्यात कंपने निर्माण होतात. या कंपनांमुळे सच्छिद्र दगडातील
पोकळीत अडकलेली हवा बाहेर येते आणि आपल्याला बुडबुड्यांच्या स्वरुपात
पाहायला मिळते.
![]()
बोंबडेश्वर मंदिर परिसरात काही सुंदर विरगळ ठेवलेल्या आहेत. निसर्गातील हा
चमत्कार पाहाण्यासाठी बंबार्डेश्वर मंदिराला एकदा तरी जायला पाहीजे. या
बरोबरच कुडोपी गावातील कातळशिल्प पाहाता येतील. (यावर "गुढरम्य कातळशिल्प"
हा ब्लॉग लिहिलेला आहे.)
जाण्यासाठी :- मालवणहून आचर्यामार्गे कणकवलीला जाणाऱ्या रस्त्यावर मालवण
पासून २८ किलोमीटर अंतरावर बुधावळे गावाला जाणारा फाटा आहे. या रस्त्याने
बुधावळेला जाताना ५ किलोमीटर अंतरावर मठ नावाचे गाव आहे. गावात रस्त्याला
लागून बोंबडेश्वर मंदिर आहे. मठ ते कणकवली अंतर २० किलोमीटर आहे. मठ ते
देवगड अंतर ३६ किलोमीटर आहे.
गुढरम्य कातळशिल्प (Rock art near Malvan, Dist. Sindhudurg)
मालवणच्या घरी गेलो की, मी घरी स्वस्थ बसत नाही. सुदैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाण्यासारखी इतकी ठिकाण आहेत की, मला कधीच निराश व्हाव लागल नाही. काही दिवसापूर्वी लोकसत्ता मध्ये बातमी आली होती, "मालवणजवळ आदिमानव कालिन कातळशिल्प मिळाली". यापूर्वी मी मध्यप्रदेशातील भिमबेटकाच्या आदिमानवाच्या गुहा व चित्र पाहिली होती, त्यामुळे आमच्या कोकणातल्या आदिमानवांनी काढलेली कातळशिल्प पहाण्यासाठी मी उत्सुक होतो.
मालवण पासून ३० किमीवर असलेले कुडोपी गाव थोड आडबाजूला आहे. डोंगराततून
वहात येणार पाणी पाटाने गावात खेळवल आहे. त्यावरच गावाची शेती -बागायती व
धुण - भांड्यांच्या पाण्याची गरज भागते. गावात कातळशिल्पांबद्दल चौकशी
केली, पण अस काहीही आपल्या गावात नाही आहे अस गावकर्यांनी सांगितल.
तितक्यात मला आठवल की, आमच्या गावात दगडात कोरलेली प्रचंड विहिर आहे. ही
विहिर पांडवांची विहिर म्हणून ओळखली जाते. (आपल्या भारतात गावातल्याच
सामान्य लोकांनी पिढ्यान पिढ्या खपून काही अचाट, प्रचंड काम केलेलं असल तर
त्याला पांडवांच नाव दिले्ले आढळते.) त्यामुळे या कातळशिल्पांनाही
पांडवांचा काही संदर्भ असेल, म्हणून पांडवाच्या शिल्पांबद्दल विचारल्यावर
गावकर्यांनी होकार दिला, ते म्हणाले "पांडवाची चित्र " सड्यावर आहेत.
गावातल्या तरूण पिढीला या पांडवांच्या चित्राबद्दल फारशी माहिती नव्हती.
(हि खरतर आपली शोकांतीका आहे. आजवर अनेक ठिकाणी फिरतांना मला असा अनुभव
आलेला आहे, आपल्या गावात पहाण्या लायक एखादी ऎतिहासिक गोष्ट आहे, हेच
बर्याच जणांना माहित नसते.)
गावातल्या एका बुजुर्ग व्यक्तीला बरोबर घेऊन आम्ही गावाच्या मागचा डोंगर
चढायला सुरुवात केली. वाटेत एका झाडावर शेणाने बनवलेल मधमाश्यांच ३ फूट
उंचीच उलट्या नरसाळ्याच्या (फनेलच्या) आकाराच पोळ बघायला मिळाल. स्थानिक
लोक या पोळयाला "कुंभडक" म्हणतात. शेणाने बनवलेल्या या पोळ्याच्या
बाहेरच्या बाजूला हाताने जमिन सारवल्यावर जशी नक्षी येते तशीच नक्षी
मधमाशांनी पायांनी तयार केलेली दिसली. डोंगराच्या माथ्यावर पोहोचल्यावर
क्षितिजापर्यंत पसरलेला सडा व त्यावरच पिवळ पडलेल गवत नजरेत मावत नव्हत.
पंधरा मिनिट सड्यावर चालल्यावर अचानक आदिमानवाने कातळात कोरलेली चित्र
दिसायला लागली. त्यांचे आकार व गुढरम्यता पाहून आम्ही थक्क झालो. मी आणि
कौस्तुभ त्या शिल्पांवरच गवत उपटून त्यांचे आकार ओळखण्याचा प्रयत्न करू
लागलो. माणूस, झाडे, पशू, पक्षी, मासे इत्यादी आकार आम्ही ओळखू शकलो. यातील
एका मानवाकृतीची लांबी ३.५ मीटर भरली तर, एका वर्तूळाकृती चित्राचा परिघ ३
मीटर होता. काही चित्रांचे आकार मात्र गुढरम्य होते. त्यांचे आकार पाहून
मला शामलन नाईटच्या "साईन्स (Signs)" या हॉलिवूडपटाची आठवण झाली. त्यात
परग्रहवासी शेतांमध्ये मोठ मोठी वर्तूळं, चिन्ह काढून ठेवतात. पण ही चित्र
मात्र आदिमानवानेच काढलेली होती. त्यात दैनंदिन जीवनात आजूबाजूला दिसणारी
माणस, प्राणी, निसर्ग चितारण्याचा प्रयत्न दिसत होता. अशा चित्रप्रकाराला
शास्त्रीय भाषेत "रॉक आर्ट" म्हणतात. कुडोपीच्या या कातळचित्रांचाही
श्री.सतीश लळित यांनी अभ्यास करून त्यावर पेपरही प्रसिध्द केलेला आहे. एकूण
६० चित्र त्या माळावर विखुरलेली आहेत. ती शोधून त्यांचा अर्थ लावता लावता
तीन तास कधी निघून गेले कळलच नाही. परतांना मनात सारखा विचार येत होता ,
कोकणातला धुवाधार पाऊस, सड्यावरचा ठिसूळ दगड, वारा, गवत यांच्याशी झुंज देत
ही चित्र हजारो वर्ष तशीच पडली आहेत आज त्यातील बरीच चित्र नष्ट झाली
आहेत, पुसट झाली आहेत. आता जर या चित्रांचे योग्य संरक्षण केल नाही तर
उरलेला आपला हा राष्ट्रीय ठेवा सुध्दा नष्ट होईल.
जाण्यासाठी :- मालवण - देवगड रस्त्यावर मालवण पासून २२ किमीवर आचरा गाव
आहे. आचर्याहून एक रस्ता कणकवलीला जातो. या रस्त्यावर आचर्यापासून २.५
किमीवर डावीकडे कुडोपी गावाकडे जाणारा फाटा फूटतो. या फाट्याने ६ किमी
गेल्यावर गणपती मंदिर आहे. येथून उजव्या बाजूला एक रस्ता कुडोपी टेंब वाडीत
जातो. वाडीत पोहोचल्यावर गावातून वाटाड्या घेऊन कातळशिल्प पहायला जावे.
मालवण देवबागचं अनोखं 'त्सुनामी आयलंड'..!!
दोन
दिवसांपूर्वी गावाकडे आलोय सिंधुदुर्गात.. सकाळी १० ते संध्याकाळी ५
पर्यंत प्रचंड गरम..! घरात राहणं कठीण..! रात्री मात्र पांघरूणाशिवाय झोप
यायची नाही येवढी छान थंड हवा..! काल घरातील सर्वांना घेऊन बहुचर्चित मालवण, तारकर्ली, देवबागला गेलो होतो.. माझ्यासारख्या कोकणी माणसाला समुद्राचं कौतुक ते काय? परंतू देवबागच्या समुद्र किनाऱ्यावरील 'त्सुनामी आयलंड' बघण्याची उत्सुकता होती.. 'त्सुनामी आयलंड' हा एक निसर्गाचा चमत्कार आहे.. या बेटाच्या निर्मितीमागे काही शास्त्रीय कारणं असतील परंतू मला वैज्ञानिकीय शास्त्रीय कारणांमध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही.. कोणत्याही गोष्टीमागील कारणाचं अॅनालिसीस केलं की त्यातला रोमॅंटीसीझम संपलाच समजायचं.. हे आयलंड सभोवार पाणी आणि मध्येच जमीन अशा नेहेमीच्या प्रकारापेक्षा थोडं वेगळं आहे.. इथं सभोवार पाणी आणि मध्येही पाणीच असा काहीसा प्रकार आहे.. फरक येवढाच की सभोवतालच्या पाण्याचा ड्राफ्ट (खोली) २० फुटांचा असेल तर आयलंडवरच्या पाण्याची खोली ओहोटीच्या वेळेस जेमतेम दोन-तीन फूट तर भरतीच्या वेळेस चार-पाच फूट असते.. म्हणजे ऐन भरतीच्या वेळेस या ठिकाणी गेलो असता समोरून पाहीलं असता माणूस भर समुद्रात (खरंतर ही खाडी आहे) पाण्यात गुडघाभर पाण्यातच उभा आहे असंच दिसतं.. ओहोटीच्या वेळेस मध्यास मात्र थोडी पुळण जमिन, तिही फारतर अर्धा स्क्वेअर किमिची असेल, दिसते.. इथं काही स्टॉल्सही आहेत मात्र ते मताणासारखे बांबूंच्या उंच प्लॅटफॉर्मवर उभारलेले आहेत कारण खाली पाणीच असतं.. इथं संध्याकाळनंतर कोणालाही थांबता येत नाही.. या आयलंडला देवबागच्या किनाऱ्यावरून बोटीने जावं लागतं.. या सोयी उत्तम व किफायतशीरही आहेत.. हा आयलंड तसा फार पूर्वीपासून या ठिकाणी आहे.. स्थानिक लोक या बेटाला 'भाट' असं म्हणायचे. मात्र २००८ साली आलेल्या त्सुनामीमुळे या बेटाच्या रचनेत थोडा बदल झाला आहे.. हे बेट आता थोडं थोडं समुद्रात बुडत चाललंय अशी स्थानिकांची माहिती आहे.. सध्या इथं अनेक प्रकारचे वॉटर स्पोर्टस् चालतात.. तारकर्लीला जाणाऱ्यांनी या अनेख्या 'त्सुनामी आयलंड'ला जरूर भेट द्यावी.. - गणेश साळुंखे कोकणातील मंदिर वारसावास्तू आणि काष्ठशिल्पाकृतीWritten By अरुण मळेकर
कोकण प्रदेशातील मंदिर बांधकामासह त्यातील काष्ठशिल्पाकृती हा आमच्या प्राचीन कलेचा वारसा आहे.कोकण
प्रदेशातील मंदिर बांधकामासह त्यातील काष्ठशिल्पाकृती हा आमच्या प्राचीन
कलेचा वारसा आहे. भाविक- पर्यटक व अभ्यासकांचे ते आकर्षण आहे. पण पडझड होत
चाललेल्या या काष्ठशिल्पाधारी मंदिरांची आजची अवस्था पाहून मन खंतावते.
पुरातन मंदिराच्या नवीन बांधणी, नूतनीकरणाच्या नावाखाली निर्माण होत ही
मंदिरे नवीन चेहरा घेऊन उभारली जात आहेत. त्यात आकर्षकतेसह स्वयंपूर्ण
सुसज्जपणाही असेल, पण आमच्या पूर्वापारच्या संस्कृतीचा मापदंड ठरलेली
पारंपरिक कलाकृती नामशेष होत चालली आहे. हे थांबायलाच हवे नाहीतर आधुनिक
मार्बलयुक्त, चकाचक मंदिरे उभारताना मूळच्या मंदिरावर देवदुर्लभ
काष्ठशिल्पाकृती होती हे पुढील पिढीला सांगणारी आजची जाणकार मंडळीही तेव्हा
नसणार. परिसरातील उपलब्ध साधनसामुग्रीनुसार मंदिरवास्तू उभारली जाणं हे स्वभाविक आहे. त्यानुसार कोकणातील मंदिर उभारणीत काळा दगड, जांभा दगडाप्रमाणे टिकाऊ लाकडाचा वापर करण्यात आल्याचं जाणवतं. मंदिर सौंदर्य खुलवण्यात लाकडावरील अनोखं कोरीव काम हे येथील मंदिरवास्तूचं वैशिष्टय़ आहे. कोकणातील छोटय़ा-मोठय़ा नगरात अनेक मंदिरांत लाकडीकामाचा कलापूर्ण आविष्कार बघायला मिळतो. मंदिरांचे लाकडी खांब, तुळया, सज्जे, दरवाजे, उत्सव प्रसंगी वापरल्या जाणाऱ्या पालख्या, मुखवटे यातून कोकणची काष्ठशिल्पाकृती दिसून येते. ही काष्ठशिल्पाकृती निर्माण करणारे कुणी तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले कारागीर नव्हेत तर अंगभूत कलाकृतीद्वारे देवाच्या दारी सेवा रुजू करणारे स्वयंभू कलावंताची ही देवदुर्लभ-अजोड कलाकृती आहे. इतकंच नव्हे, तर भक्तगणांनी नवस बोलून इच्छापूर्ती झाल्यावर मंदिराला अर्पण केलेल्या अनेक आकर्षक लाकडी वस्तू म्हणजे काष्ठशिल्पाकृतीचा अनोखा खजिनाच आहे.
कोकणातील सभामंडप- गाभारा (गर्भगृह) दिसणारच. सभामंडपाचा विनियोग
प्रामुख्याने कीर्तन, प्रवचन, भजन ग्रामसभा यासाठी होत असतो. मंदिरांच्या
मजबूत लाकडी खांबावर आधारलेल्या छतावरही काष्टशिल्पांची कलाकृती दिसते.
कोकणातील सभामंडपांना भिंती नाहीत सभा मंडपापाठोपाठ दृष्टीस पडतो तो मंडप.
सभामंडप व मंडप हे परस्परांना जोडलेले असतात. मंडपाला लागूनच आधारासाठी
लाकडी खांब असून प्रदक्षिणा पथमार्गिकेची योजनाही असते. हे लाकडी खांब
चौकोनी, षट्कोनी, वर्तुळाकार आकाराचे दिसतात. तर काही ठिकाणी लाकडी खांबावर
पौराणिक प्रसंगाचे चित्रणही दिसते. मंदिरातील अखेरच्या टप्प्यात येतो तो
म्हणजे गाभारा (गर्भगृह) येथे मूर्तीचे दर्शन घडते. चौकोनी किंवा गोलाकार
दगडी गाभाऱ्याच्या भिंती यासुद्धा उंचीनी मोठय़ा असतात. गाभाऱ्याचे
प्रवेशद्वार उंचीनी कमी असून त्यावर चित्राकृती आढळते. देशातील दक्षिण
प्रदेशात मंदिर शिल्पात दगडातील अप्रतिम कलाकृतीचे कोरीव काम पाहायला
मिळते, तर कोकणातील पुरातन मंदिरातून आढळणारी काष्टशिल्पे ही पारंपरिक
पद्धतीची अप्रतिम स्थानिक लोककला आहे. री विमलेश्वर पांडवकालीन लेणी मंदीर - वाडा - देवगड
श्री विमलेश्वर मंदिर आणि पांडवकालीन लेणी, वाडा.
देवगड विजयदुर्ग मार्गावर विजयदुर्ग पासून 14 कि.मी. अंतरावर आणि विजयदुर्ग पासून 18 कि.मी. अंतरावर वाडा हे गांव आहे. या गावापासून 1 कि.मी. अंतरावर किंवा वरील मार्गावरील विमलेश्वर मंदिर थांबा येथून अर्धा कि.मी. वर फणसे -पडवणे जाणा-या रस्त्याला लागूनच श्री देव विमलेश्वर मंदिर आहे. येथून काही अंतरावर सुंदर पडवणे सागरकिनारा आहे. संपूर्ण उत्तम डांबरी रस्ता आहे. श्री विमलेश्वर मंदिर जांभ्या दगडाच्या गुहेत असून असून गाभारा, सभागृह व गॅलरी अशा तीन टप्प्यात ही गुहा कोरलेली आहे. गाभा-यामध्ये शिवलिंग असून मंदिरासमोर भव्य अंगण आहे. अंगणापासून मंदिराची उंची सुमारे 60 ते 65 फूट आहे. मंदिराच्या दर्शनी मध्यभागावर पाच मानवरूपी नग्न शिल्पे कोरलेली असून गुहेच्या दोन्ही बाजूला माहुतासह दोन हत्ती कोरलेले आहेत. अंगणातून देवळात प्रवेश केल्यावर प्रथम गॅलरी लागते. तेथे एक मोठी घंटा टांगलेली आहे. त्याच्यापुढे कातळावर 35 फूट रूंद व 15 फूट उंच असे सभागृह आणि त्याच्या बाजूने नक्षीकाम केलेले मोठेमोठे खांब आहेत. तेथून थोडया पाय-या चढल्यानंतर साडेसहा फूट उंच 16 फूट रूंद, 16 फूट लांब असा गाभारा लागतो. त्याच्या मध्यभागी शिवलिंग आहे. अशा प्रकारचे उंचावर शिवलिंग असणारे हे एकमेव मंदिर आहे. मंदिरातील शिवपिंडावर दररोज अभिषेक केला जातो. अभिषेकासाठी वापरले जाणारे पाणी, दुध, निर्माल्य झालेली फुले इ. शेजारच्या डब्यात बकले जाते. ती तेथेच मुरतात परंतु त्यातील पाण्याचा अंश अजिबात बाहेर जात नाही, ही बाब आश्चर्यकारक आहे. या मंदिरालगत मधुर पाण्याचा झारा बारामाही वहात असतो, घनदाट वनराईमुळे येथील पाणी उन्हाळयाच्या थंडगार असते. तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ते उबदार असते. मंदिराच्या दोन्ही बाजूला काळभैरव गुहा आहे. रस्त्यावरून मंदिराचा फक्त कळस दिसतो. मात्र प्रत्यक्षात पाय-या उतरून अंगणामध्ये जाऊन पाहिल्यास मंदिराच्या भव्यतेची कल्पना येते. सुंदर शिल्पकला आणि त्याच्या जोडीला रम्य निसर्ग आणि मानवी बुध्दी यांचा सुंदर मिलाप असलेले हे स्थळ पर्यटन दृष्टया अतिशय उत्तम स्थळ आहे. येथील घनदाट वनराई, रम्या आणि शांतता मनमोहून टाकते. कथा - पेज - देवाचा " गड " देवगड. | कोंकणसफारी - सिंधुदुर्ग, राजेकोट, सर्जेकोट आणि किल्ले निवती
दुसरा दिवस उजाडला. शुक्रवार ६ डिसें. आजचा पल्ला जास्त
लांब नव्हता, जाउन येउन शे-दिडशे किमी. वेंगुर्ला - मालवण-
किल्लेनिवती-वेंगुर्ला. आज जरा जास्त टप्पे गाठायचे असल्याने ५ रु./किमी या
रेटने आम्ही बाईक घेतली. बाईक जरा महागच पडणार होती. पण त्यामुळे आमचा
बराच वेळ वाचणार होता. सकाळी नउ - साडेनउच्या दरम्यान आम्ही गावातुन
निघालो. वेंगुर्ल्याहुन मालवण नविन झालेल्या सागरी महामार्गाने ४५ किमी.
आहे. वाटेत माझं गाव परुळे लागणार होतं. वेंगुर्ल्याहुन
दाभोली-केळूस-म्हापण-पाट-परुळे-चिपी-मालवण असा रुट आहे. वेंगुर्ल्याहुन
निघुन दाभोलीच्या सड्यावर पोचलो तेव्हा दहा वाजले होते. कोकणातला हा सडा
मला जाम आवडतो. नजर जाईल तिथवर पठार आणि भिरभिरणारा वारा. या दिवसांत
कापावर सोनेरी गवत उगवलं होतं. दूरवर पसरलेलं ते सोनेरी पठार आणि मधुनच
डोकं वर काढणारा एखादा 'मांगर'. पावसाळ्यात या सड्याचे रुप काय ते वर्णावे.
पावसाळ्यात संपूर्ण गवत नाहीसं झालेलं असतं आणि सड्यांच पूर्वीचं रुप
म्हणजे तो काळा कातळ. पावसाळ्यात भिरभिरणार्या वार्यासोबत अंगावर
पावसाच्या सरी झेलत या सड्यावरुन फिरण्याची मजा काही औरच! एका ठिकाणी
थांबून या सड्यावर काही फोटो घेतले. वाहन असलं की एक बरं असतं एखादी फ्रेम
लोकेट झाली की गाडी थांबवून लगेच ती शूट करायची.
सडा संपला आणि खाली वळणावळणाच्या घाटउतारातुन आम्ही केळुसला पोचलो. केळुसच्या पुढे अजुन एक घाट. तो संपवून आम्ही म्हापण मार्गे पाट या गावी आलो. पाटावरुन डावीकडला रस्ता परुळे - निवती - भोगवे - मालवण आणि पुढे आचारा, देवगड असा जातो. हाच नवीन सागरी महामार्ग. पाटला सस्त्याच्या डावीकडे माउलीचं सुंदर मन्दीर आही आणि उजव्या बाजुला एक तळं आहे. हे तळं सदानकदा लाल आणि सफेद कमळांनी फुललेलं असतं. सगळीकडे नुसती कमळंच. फारच सुंदर ! त्यानंतर वाटेत माझ्या गावच्या प्रसिद्ध वेतोबाच्या मंदीरापाशी थांबलो. आईने तिथे देवाला नारळ वाहायला सांगितला होता. देवदर्शन झाले आणि पुढे काही वेळातच आम्ही माझ्या गावी परुळे इथे पोचलो. शुक्रवार असल्याने आज गावचा बाजार होता. पण पहिल्यासारखा बाजार भरलेला अजिबात वाटत नव्हता. मला आठवतं लहानपणी मी आजीबरोबर बाजाराला यायचो. धम्माल असायची. आज्जी आईस्फ्रुट, भजी, फरसाणं, अजुन काय काय असं बरंच काही खायला घेउन देत असे. बाजार भरगच्च भरलेला असायचा. आता फक्त नावालाच उरला होता. श्री देव वेतोबा :- परुळे मंदिराच्या आवारात एक छान मुर्ती होती.:- परुळे बाजार :- परुळ्यात जास्त वेळ न थांबता आम्ही पुढे निघालो कारण परुळ्यात पोहचेपर्यन्त सव्वा अकरा वाजले होते. तिथुन एका छोटा घाट चढलो आणि पुन्हा एका सड्यावर आलो. इथे सध्या चिपी एअर पोर्टचं काम सुरु असल्याने मालवणकडे जाणारा मार्ग डायव्हर्ट केला होता. त्यामुळे आम्हाला सहा किमीचा अतिरिक्त फेरा पडला. एअरपोर्टचं काम अतिशय जोरात सुरु आहे. आम्ही गेलो तेव्हा रनवेचं काम सुरु होतं. चिपीहुन मग आम्ही मालवणच्या दिशेने निघालो आणि इथे एका अतिशय सुंदर जागी येउन पोचलो. मालवण आणि चिपी ( परुळे ) या दोन गावांच्या मधुन कर्ली नदी वाहते. हल्ली काही वर्षांपूर्वीच या नदीवर एक ब्रीज बांधलाय. तत्पूर्वी मला आठवतं, मालवणला जायला आम्हाला परुळ्याहून चिपीच्या पुढे कोरजाई गावी जावं लागे. इथे कर्ली नदी अरबी समुद्राला मिळते. कोरजाईहुन होडीने आम्ही मालवणला जायचो. पण आता या ब्रीजमुळे मलावणला लवकर पोचता येतं. त्या ब्रीजवर जेव्हा पोचलो तेव्हा समोरचं दृश्य वेडावून टाकणारं होतं. प्रचंड मोठी अशी ती कर्ली नदी संथ वाहत होती. त्या विशाल पात्राच्या दोन्ही बाजुच्या किनार्यावर माड डोलत उभे होते. दूरवर पसरलेलं ते नीळेशार पाणी अगदी डोळ्यात साठवून घेतले होते. या नदीवरला हा ब्रीज माझी अत्यंत आवडती जागा आहे. काही वर्षांपूर्वी मी या ब्रीजवरुन गेलो होता तेव्हाच अगदी हा ब्रीज आणि ते लोकेशन माझ्या मनात भरलं होतं पण त्यावेळी माझ्याकडे कॅम नव्हता. अशाचप्रकारचं पालघरला असलेल्या केळव्यातल्या दांडा खाडीवरलं ब्रीज मला भयंकर आवडतं. म्हणजे ते लोकेशन इतकं रोमँटीक आहे ना ! तसंच कर्ली नदीवरलं हे लोकेशन तर कळसच होतं. तिथुन पाय उचलवत नव्हता पण जमेल तितके फोटो घेउन आम्ही आता नॉनस्टॉप मालवणकडे निघालो. माडांतुन वाहणारी कर्ली नदी :- मालवण बाजारपेठेतुन वाट काढीत आम्ही जेट्टीवर पोचलो तेव्हा बारा वाजले होते. दुपारच्या उन्हात सिंधुदुर्ग किल्ला समुद्रात उभा होता. आम्ही पटकन किल्ल्याची तिकीटे घेतली आणि होडीतुन किल्ल्याच्या दिशेने निघालो. जस जसा किल्ला जवळ येत होता तसं तसं अभिमानाने छाती भरुन येत होती. आज पहिल्यांदाच मी या किल्ल्यावर जात होतो. होडीतुन मुख्य दरवाज्यापाशी उतरल्यावर होडीवाल्याने एका तासांत किल्ला बघुन यायला सांगितलं. महाराजांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचे मुख्य द्वारही 'गोमुखी' आहे. मालवणचा किनारा :) किल्ल्यावर बरीच वर्दळ होती. मुख्य दरवाज्यातुन शिरताना दक्षिणमुखी हनुमानाचे दर्शन घेतलं. नेहमीप्रमाणे ट्रेकक्षितिजच्या कृपेने नकाशा सोबत होता. नकाशा सोबत असल्याने किल्ला फिरताना आणि बघताना चुकायला होत नाही आणि किल्लाही लवकर बघून होतो. किल्ल्यात दर्शवल्याप्रमाणे सर्व प्रथम आम्ही महाराजांच्या हाताचे ठसे असणारी जागा शोधायला लागलो. नकाशात दाखवल्याप्रमाणे नगारखान्याच्या वरच ती जागा सापडली. महाराजांच्या हाताचे ठसा असलेली त्या जागेला एक छोटा दरवाजा केलाय आणि त्याला कुलूप लावले आहे. पण दरवाजा जाळीदार असल्याने ठसा दिसतो. मला वाटतं त्या ठश्याला चुन्याचा हात मारला आहे. तिथे नतमस्तक होउन आम्ही नकाशात दाखवल्यापप्रमाणे तटबंदीवरुन चालायला सुरुवात केली. इथुन समुद्र मस्तच दिसत होता. किल्ल्याच्या बुरुजावर लाटा अलगद आदळत होत्या. पाणी अगदी हिरवंगार होतं. उन मी म्हणत होतं पण वार्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती. आम्ही ज्या बाजुने फिरत होतो त्याबाजुला काहीच नव्हतं. त्या भागात दलदल माजली होती. मग बरंच चालल्यावर एका बाजुने शिवराजेश्वर मंदीराच्या मागच्या बाजुला खाली उतरलो. मंदीरात जाणार इतक्यात दुसर्या होडीतुन आलेली माणसं आत शिरली. गर्दीत नको म्हणुन मग आम्ही पुढे गेलो. तिथुन मग महादेव मन्दीरापाशी गेलो. महादेवाचे दर्शन घेतले. मंदिरात एक अतिशय लहान म्हणजे ३ बाय २ फुट आकाराची आयताकृती विहीर कशी होती. स्थानिकांच्या मते ते एक भुयार आहे. जे थेट मलवण शहराच्या उत्तरेकडे असलेल्या ओझर या गावी एक मठ आहे तिथे उघडते. महादेवाच्या मंदीरापासुन थोड्याच अंतरावर दूध बांव, दही बांव आणि साखर बांव अशा गोड पाण्याच्या विहीरी आहेत. ( बांव = विहीर ). हा किल्ला समुद्रात उभा असुनही आतमध्ये असलेल्या या गोड पाण्याच्या विहीरी महणजे आश्चर्यच मानले जाते. किल्ल्यावर असलेल्या रहिवाशी हेच पाणी वापरतात. पुढे काही अंतरावर भगवती देवीचं मंदीर आहे. तिथुन मग पुढे पायर्या.ववरुन चढुन आम्ही पुन्हा तटबंदीवर आलो. किल्ला बघुन संपला होता पण मघाशी राहिलेल्या शिवराजेश्वर मंदिरात जायचं राहुन गेलं होतं. मुख्य दरवाज्याच्या तटबंदीवरुन उतरुन मंदीरात गेलो. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात बैठी महाराजांची प्रतिमा फक्त येथे दिसते. शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर दिसत नाही. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते.सिंधुदुर्ग किल्ल्यातील देवालय इ.स. १६९५मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधले. या किल्ल्यावर २८२ फूट उंचीचा भगवा ध्वज इ.स. १८१२ पर्यंत फडकत होता. इ.स. १९६१ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटदुरुस्ती केली. भगवती मंदिर श्री शिवराजेश्वर मंदिर आता किल्ल्याविषयी थोडी ऐतिहासिक माहिती: ( साभार विकी आणि ट्रेक क्षितिज ) शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीत याबाबत पुढील मजकूर नमूद केला आहे : 'चौर्याऐंशी बंदरात हा जंजीरा,अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका,अजिंक्य जागा निर्माण केला । सिंधुदुर्ग जंजीरा,जगी अस्मान तारा । जैसे मंदिराचे मंडन,श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार । चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले । मालवणच्या समुद्रात असलेल्या ''कुरटे'' बेटावर शुध्द खडक, मोक्याची जागा व गोड्यापाण्याची सोय ह्या गोष्टी पाहून शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना आज्ञा केली; " या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा, चौर्यांंशी बंदरी ऐशी जागा नाही"! दिनांक २५ नोव्हेंबर १६६४ रोजी मालवण किनार्या वरील मोरयाचा धोंडा ह्या गणेश, चंद्रसूर्य, शिवलिंग कोरलेल्या खडकाची पूजा करुन व समुद्राला सुवर्ण श्रीफळ अर्पण करुन महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहुर्ताचा चिरा बसवला. किल्ला बांधण्यासाठी ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० गोवेकर पोर्तुगिज व ३००० मजूर ३ वर्षे अहोरात्र खपत होते. सागरी लाटांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी व किल्ल्याचा पाया भक्कम करण्यासाठी उकळते शिसे ओतून त्यावर मोठे मोठे चिरे बसवण्यात आले. तसेच घाटावरुन मागवलेला चुना वापरुन किल्ल्याचे इतर बांधकाम करण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. त्याप्रसंगी शिवाजी महाराज स्वत: हजर होते. सिंधुदुर्गच्या उभारणीने मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. इंग्रज, पोर्तुगीज, चाचे यांना वचक बसला.
असं म्हणतात की, किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन
खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार मच्छिमार
लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे
देण्यात आली. ऐतिहासिक सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे
खडकावर तीन शतके उभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे
अर्धा मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र
सुमारे ४८ एकर आहे. त्यांचा तट २ मैल इतका आहे. तटाची उंची ३० फूट असून
रूंदी १२ फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत.
बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे.
पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या
तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले.
सिंधुदुर्गाच्या इतिहासात डोकावल्यावर असे दिसते की, राजारामांच्या
मृत्यूनंतर कोल्हापूरातून ताराराणी स्वराज्याचा कारभार पाहात होती. शाहू
आणि ताराबाई यांच्यात झालेल्या वारणेच्या तहानुसार मालवण परिसराचा ताबा
ताराराणींकडे आला. मालवण समुद्रावर चाचेगिरीला ऊत आला होता. मेजर गॉर्डन व
कॅप्टन वॉटसन यांनी सिंधुदुर्ग २८ जानेवारी १७६५ रोजी ताब्यात घेतला.
त्यावेळी किल्ल्यातील दारुखाना जळून खाक झाला इंग्रजांनी किल्ल्याचे नाव
ठेवले.''फोर्ट ऑगस्टस'' कोल्हापूरच्या राणी जिजाबाई व ईस्ट इंडिया कंपनी
यांच्यातील करारानुसार २ जानेवारी १७६६ रोजी सिंधुदुर्ग मराठ्यांच्या
ताब्यात आला. निपाणिच्या देसाई विरूद्ध इंग्रजांनी करवीरकरांना मदत केली.
त्याच्या मोबदल्यात १७९२ ला हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला.
गडफेरी
आटपून आम्ही आमच्या ३३ नंबरच्या बोटीत येउन बसलो आणि पुढच्या प्रवासाला
निघालो. एव्हाना २ वाजले होते आणि पोटात कावळे ओरडत होते. थोडावेळ
फिरल्यावर बाजारात 'चैतन्य' हे ओळखीचे नाव दिसले आणि तिथेच जेवायला बसलो.
जेवण तर अप्रतिम होते. पण या चैतन्यवाल्यांचे एक रेस्टॉरंट प्रभादेवीला
सिद्धिविनायकाशेजारी आहे. पहिल्यांदा तिथे सुद्धा फार चांगलं जेवण
मिळायचं पण आता त्या जेवणला चवच नसते. असो. इथे मालवणात आम्हे भरपेट मासे
खाउन पुढे राजेकोट आणि सर्जेकोटसाठी निघालो.
जेवणाची वाट बघतोय. :) मलवण जेट्टीवरुन उत्तरेकडे राजकोट आहे. सिंधुदुर्गच्या रक्षणासाठी महाराजांनी पद्मगड, राजेकोट आणि सर्जेकोट हे किल्ले देखिल बांधले. आता या किल्ल्यावर एक बुरुज सोडल्यास काहीच नाहीए. स्थानिक मोकळ्या जागेचा उपयोग मच्छी सुकवण्यासाठी करतात. पण इथुन सिंधुदुर्ग किल्ला फार छान दिसतो. बाजुलाच खडकांमध्ये एक छोटे चर्च अगदी उठुन दिसते. राजेकोटवरून मालवण बंदर :)
राजेकोट
राजेकोटवरुन सिंधुदुर्ग किल्ला राजकोटावरुन मग आम्ही बाईक सर्जेकोटाकडे वळवली. मालवण - आचरा - देवगड सागरी महामार्गावर मालवणपासुन ४-५ किमी वर कोळंब खाडीवरलं ब्रीज पार केल्यावर डावीकडे एक वाट जाते त्या वाटेने सरळ जावे. सर्जेकोटावर काही नाही. प्रवेशद्वार छोटेसे पण कमानदार आहे. आत मध्ये बरीच झाडी माजली होती. तटबंदीचे अवशेष अधुन मधुन डोके वर काढत होते. बाहेर असलेल्या मंदीरच्या बाजुने गेल्यास खाडीच्या बाजुची तटबंदी आणि बुरुज अजुनही शाबूत आहेत. बाकी फक्त जंगल आणि झाडी. सर्जेकोट प्रवेशद्वार आणि तटबंदि :- सर्जेकोट संपवून मग आम्ही किल्लेनिवतीच्या दिशेने निघालो. किल्ले निवतीला जाण्यासाठी आम्हाला परुळ्यातुन जायचे होते. नुसार आम्ही पुन्हा मालवण - चिपी - परुळे अशा प्रवासाला लागलो. या वाटेवर कुठेतरी माझ्या निकॉन कॅमची लेन्स कॅप पडली ती माझ्या चिपीला आल्यावर लक्ष्यात आलं. असो. इथे कापावर एक सुंदर फ्रेम मिळाली. पण त्य टेंपो ट्रॅव्हलरच्या जागी एसटी असली असती तर ती फ्रेम अजुन खुलली असती. आम्ही परुळ्याला पोचलो तेव्हा साडेचार वाजले असतिल. तिथल्याच एका हाटेलात मस्त चहा मारला. इतक्यात समोरुन कुडाळ - किल्लेनिवती बस निवतीच्या दिशेने गेली. चहा संपल्यावर आम्ही पण निघालो. परुळे हा माझा गाव. पण शाळेसाठी मी माझ्या मामाच्या गावी असायचो आणि सुट्टी पडली की इथे यायचो. पण माझं मन इथे कधी लागायचं नाही. परुळे हा अतिशय निसर्ग संपन्न गाव. कर्ली नदी, भोगवे बीच, देवबाग, तारकर्ली यामुळे अजुनच खुलून दिसणारा. पण लहानपणी म्हणजे दहावी होईपर्यंत मल ह्या जागा फक्त ऐकून माहीत होत्या. आणि आज मी तिथे मनसोक्त उंद्डत होतो. परुळ्यातुन एक छोटा घाट चढुन आम्ही सड्यावर आलो. काहीवेळाने दोन रस्ते दिसतात. किल्लेनिवतीसाठी डावी मारायची आणि भोगवेसाठी उजवीकडे. आम्ही किल्लेनिवतीच्या दिशेने वळलो. काही वेळाने मघाशी बाजारातुन किल्ले निवतीला जाणारी बस इथे आम्हाला दिसली. तिच्यामागोमाग आम्ही किल्लेनिवतीला पोचलो तेव्हा पाच वाजले होते. तिथुनच किल्ल्याकडे जाणारा कच्चा गाडी रस्ता आहे. बाईक रेमटावत आम्ही किल्ल्यावर पोचलो आणि डाव्याबाजुला असलेल्या विहंगम निवती किनार्याचे दर्शन होताच हरखुन गेलो. अतिशय सुंदर असा हा किनारा इथुन किती सुंदर दिसत होता म्हणुन सांगू. यावेळी नकाशा नव्हता मग थोडं चढुन गेल्यावर झाडीतुन डोकावणारी तटबंदी दिसली. तितून आत शिरलो तर फक्त झाडीच झाडी पुढे काही दिसेना. त्या झाडीतुन वाट काढत उजवीकडे गेलो आणि एका मोकळ्या पठारावर आलो. बाजुला एक जंग्या बुरुज दिसला. तिथुन पुढे चालत आलो आणि समोरचं दृश्य पाहुन थबकूनच गेलो. समोर भोगवेचा किनारा शांतपणे पसरला होता. आम्ही बसलो ती जागा किती तरी शान्त होती. आवाज फक्त वार्याचा होता. कितीतरी वेळ आम्ही तिथे बसलो होतो. समोरच्या किनार्यावरुन नजर हटतच नव्हती. दुरवर अस्पष्टसा सिंधुदुर्ग दिसत होता. तिथुन उठावसं वाटत नव्हतं पण पुढे ४० किमी परतीचा प्रवास बाईकवरुन काळोखात होता. म्हणुन जरा घाई करुन निघालो. सुर्य एव्हाना पश्चिमेकडे कलला होता. सुर्यास्त टीपायचा होता पण घाई करुन घरी पोचणं गरजेचं होतं. तिथुन उठलो आणि पुन्हा त्या मोकळ्या पठारावर आलो आणि तिथे अजुन एक बुरुज दिसला. नकाशा नसल्याने किल्ला समजत नव्हता. मग त्या बुरुजाच्या मार्गाने गेलो. तिथे एक छोटंसं टाकं दिसलं जे झाडीने व्यापले होते. तिथुन एका आतमध्ये शिरलो आणि कळलं की खरं किल्ल्याचं वैभव इथे होतं. आम्ही त्या डावीकडल्याच बुरुजावरुन निघणार होतो. इथे किल्ल्याचे बरेचसे अवशेष आहेत. हा बालेकिल्ला असावा. इथुन पुढे टोकावर गेल्यावर फक्त समुद्रच समुद्र दिसतो. बालेकिल्यावर अजुनही तटबंदी, प्रवेशद्वार, देवड्या आहेत. इथुन खाली समुद्रकिनार्यावर काही नारिंगी रंगांचे खडक दिसतात. समोर वेंगुर्ल्याचे बर्न्ट रॉक्स हे समुद्रात असलेले दीपगृहही दिसते. इथे सुर्यास्त टीपून आम्ही परतीच्या मार्गाने निघालो. बालेकिल्ला सुर्यास्त :) काळोख पडलाच होता. पुन्हा त्या मार्गाने सड्यावरुन जाताना आता थंडी जाणवत होती. परुळ्यात उतरुन पुढे कुठेही जास्त वेळ न थांबता वेंगुर्ला बंदरावर जाउन बसलो तेव्हा साडे आठ वाजले होते. बंदरावर ताजे मासे घेउन कोळणी विकायला बसल्या होत्या. तिथे थोडावेळ बसुन मग घरी पोचलो. जाउन -येवुन १५० किमीचा प्रवास झाला होता. ५ रु./किमी या रेटने ७५०/- रु. झाले होते. मध्येच आम्ही २००/- रु. पेट्रोल भरलं होतं त्याचे वजा करुन पाचशे रु. आम्ही बाईकवाल्याला दिले. आणि घरी परतलो. आजचा दिवस मस्तच झाला होता. एकुण चार किल्ले बघुन झाले होते खर्चही आटोपशीर होता. दुसर्या दिवशी गावच्या एका देवीची श्री खाजणादेवीची जत्रा होती. पण आमच्या प्लॅनप्रमाणे रेडीचा गणपती, यशवंतगड, तेरेखोलचा किल्ला, सावंतवाडी असा प्लॅन होता... सिंधुदुर्गातील लपलेली सौंदर्यस्थळे0
गेल्या काही काळात कोंकणातील पर्यटन बऱ्यापैकी विकसित
झाले आहे. गोव्याला जाणारे देशी-विदेशी पर्यटक गोव्याला लागून असलेल्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांनाही भेटी देऊ लागले आहेत. पण
तारकर्ली, देवबागसारखे काही ठरावीक समुद्र किनारे आणि सावंतवाडी-
मालवणसारखी शहरे वगळता इतर ठिकाणे म्हणावी तशी पर्यटनाच्या नकाशावर आलेली
नाहीत. सिंधुदुर्गातील अशाच काही पर्यटन स्थळांचा घेतलेला आढावा.
मिठबाव-तांबळडेग # जवळचे रेल्वेस्टेशन : कणकवली # जवळचे बसस्थानक : देवगड किल्ले निवती # जवळचे रेल्वे स्टेशन : कुडाळ # जवळचे बसस्थानक : वेंगुर्ला, कुडाळ डच वखार (वेंगुर्ला) # जवळचे रेल्वे स्थानक : सावंतवाडी रोड # जवळचे बस स्थानक : वेंगुर्ला नापणे धबधबा ( नापणे, वैभववाडी) # जवळचे रेल्वे स्टेशन : वैभववाडी यशवंतगड (रेडी) रांगणागड (कुडाळ) (गुढीपूर) पिंगुळी येथे विविध कलांचा वारसा जपणाऱ्या ठाकर समाजाची वस्ती आहे. चित्रकथी, कळसूत्री, पांगुळबैल अशा कलांचा वारसा त्यांनी जपला आहे. गुढीपूर हे मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळजवळ वसले आहे. #जवळचे रेल्वेस्टेशन : कुडाळ, झाराप जवळचे बसस्थानक : कुडाळ http://www.rutugandha.com/?p=2898
कुडाळ
कुडाळ हा सिंधुदुर्ग जिल्यातील एक तालुका आहे. कुडाळ मध्ये आकेरी
, कसाल , माणगांव , केळूस , बिभावाने ,तेंडोली , ओरोस , पिंगुळी ,
शिवापूर , आंदुर्ले , झाराप अश्या प्रसिद्ध गावांचा समावेश होतो. कुडाळात
जायचा झाला तर कुडाळ रेल्वे स्टेशन , झाराप रेल्वे स्टेशन ला उतरून कुडाळ
तालुक्यात फिरता येते.
सुनियोजित शहर - सिंधुदुर्गनगरी
कुडाळ पासून १३ किमी अंतरावर
असेलेल्या शहरात सिंधुदुर्ग जिल्याचे मुख्यालय आहे. यापूर्वी ओरोस हे
मुख्यालय होतो. हे महाराष्ट्रातील पहिले सुनियोजित शहर.पर्यटन स्थळे - नेरूर - कुडाळ वरून मालवण ला जाताना धामापूर मार्गे कर्ली नदी लागते. नेरूरपारच्या पुलावरून जाताना नदीचे निसर्गरम्य सौंदर्य हे बघणासारखे असते. छायाचित्रकारांना इथे थांबून छायाचित्र घेण्याचा आपल्या कॅमेरात निसर्ग टिपण्याचा मोह तर आवारातच नाही. नेरूर हे गाव तिन्ही बाजूने नदीने वेढलेले आहे. या गावात सुंदर असे महालक्ष्मी चे मंदिर आहे. कलेश्वर देवस्थान - कुडाल तालुक्यातील नेरूर चवाटा येथे कलेश्वर हे शंकराचे मंदिर आहे. या मंदिराचे विशेष महत्व म्हणजे येथील शिवपिंड ही चौकोणी आकाराची आहे. त्याच बरोबर मंदिराचे कोरीव काम कलाकुसर बघण्यासारखे आहे.मंदिरात ६ खांब अप्रतिम कोरलेले आहेत. ऐतिहासिक शिवापूर - शिवापूर ला ऐतिहासिक तसेच प्रेक्षणीयस्थळ म्हणून ही ओळखले जाते. शिवापूर हे एक थंड हवेचे ठिकाण ही आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांच्या मध्ये सह्याद्री डोंगराच्या कुशीत वसले आहे. आणखी एक महत्व म्हणजे कर्ली नदीचे हे उगमस्थान आहे. येथून मनोहरगड आणि संतोषगड दिसतो. शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी वास्तव्य केले होते. मनोहरगड आणि संतोषगड - मनोहरगड आणि संतोषगड हे कुडाळपासून ४२ किमी अंतरावर सह्याद्री च्या कुशीत आहेत. येथे शिवापूर या गावातून जाता येते. मालवण
मालवण
मालवण हा महाराष्ट्र मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका
आहे. या तालुक्यात आचरे , जुवे, देवबाग , धामापूर , जमदुल , कोळंब , मसुरे
, सुकळवाड या सारख्या गावांचा समावेश आहे ज्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी तर
आहेच तसेच निसर्ग समृद्ध ही आहेत.
मालवण तालुक्यात प्रामुख्याने मासेमारी व्यवसाय चालतो पण हल्ली
काही तरुण मंडळींनी मालवण सिंधुदुर्ग चे नैसर्गिक महत्त्व ओळखून
पर्यटनाच्या व्यावसायात वळत आहेत.
मालवण तालुक्यातुन कारली नदी वाहते तसेच कोळंब खाडी , करली खाडी आणि कालवली खाडी अश्या तीन खाड्या लाभल्या आहेत.
पर्यटन स्थळे -
तारकर्ली किनारा
देवबाग कोणारा
कुणकेश्वर मंदिर
धामापूर तलाव
शिवकालीन सिंधुदुर्ग किल्ला
हेमाडपंथी रामेश्वर मंदिर
इत्यादी
http://mazosindhudurg.blogspot.com/2018/01/blog-post.html
महाराष्ट्रातील ह्या पर्यटन स्थळांना आयुष्यात एक वेळेस नक्की भेट द्या…![]() पाचगणी ![]() पाचगणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक खंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी. हे ठिकाण सुमारे १३७२ मीटर उंचीवर आहे. पाचगणी आणि महाबळेश्र्वर ही दोन्ही ठिकाणे अनेक प्रेक्षणीय दृश्यांसाठी प्रसिद्ध आहेत. डोंगरकडे, दाट झाडी, चिंचोळे मार्ग, पर्यटनाचे ठिकाण म्हणून मुद्दाम तयार केलेले उत्तर रस्ते हे पाचगणीचे वैशिष्ट्य. महाबळेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या १८-२० कि. मी. अंतरावर आहे. महाबळेश्वर इतकेच निसर्गसुंदर असलेले हे ठिकाण येथील पब्लिक स्कूल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. येथे राहण्याजेवणाच्या चांगल्या सोयी आहेत. पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे. माळशेज घाट ![]() माळशेज घाट हा नगर-कल्याण रसत्यावर आहे. मुसळधार पावसातील शहरातील बंदीस्त वातावरण, चिखल, ट्रॅफिक जाम हे सर्व सोडून शरीराला आणि मनाला विरंगुळा मिळण्यासाठी एखाद्या घाटात यावं असं वाटणं साहजिक आहे. अशा घाटात काही ठिकाणी विशेषत: माळशेज घाटात हात उंचावला तर हातात ढग येण्याची शक्यता असते. चोहीकडे मखमली हिरवळीचे गालिचे पसरलेले दिसतात. धुक्याची निळी दुलई लपेटली जाते. अशा धुंद वातावरणात पावसात चिंब होणचा आनंद आगळाच असतो. ![]() माळशेज घाट मुंबई-पुण्यापासून जवळच आहे. कल्याणहून 86 कि.मी.चा टप्पा दीड-दोन तासात संपतो. कल्याणहून बससेवा उपलब्ध आहे. या स्थळाची लोकप्रियता पाहता परदेशी पर्यटक मुंबईत उतरल्यावर व्यस्त जीवनशैली टाकून सरळ विश्रंतीसाठी माळशेज घाटाकडे वळतात. त्यामुळे मुंबई विमानतळापासून तिथे जाण्यासाठी टॅक्सी सहज मिळते. एकदा काय माळशेज परिसरात आलं की उंचच उंच गिरीशिखरं दिसतात. सर्वात प्रथम मनात भरतो तो इथला हरिश्चंद्र गड. पावसाळ्यात येथे डोंगरातून झरे लागलेले दिसतात. मखमली हिरवळीतून डोकावणारे दगडी डोंगर, त्यातून दुडूदुडू वाहणारे खटय़ाळ झरे, कुठे डोंगरातून थेट अंगावर वर्षाव करणारे झरे. कामशेत ![]() कामशेत हे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत नावाचा छोटासा घाट आहे. त्या घाटाच्या पायथ्याशी हे गाव आहे. हे गाव पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात येते. कामशेत हे रियासतकार सरदेसाई यांचे जन्मगाव आहे. इथे तुम्ही पॅराग्लायडींग व ट्रेकींगचा थरार अनुभवू शकता. अलिबाग ![]() लिबाग शहर समुद्रकिनार्याला लागून आहे. हे शहर मुंबईला लागून आहे. अलिबाग हे शहर सतराव्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी वसवले. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा जिल्हा होते. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी मुंबई-गोवा या प्रमुख मार्गाने जाता येते. या मार्गावर असलेल्या वडखळ या ठिकाणापासून पुढे अलिबागला जाण्यासाठी मार्ग आहे.हे अंतर मुंबईपासून १०८ कि.मी.आहे. ![]() अलिबागच्या समुद्रकिनार्यांशिवाय किहीम, थळ, वरसोली, अक्षी, नागाव, आवास, सासवणे, रेवस ,चौल, मांडवा, काशीद आणि कोरलई हे समुद्रकिनारेसुद्धा जवळच्या परिसरात आहेत. कुलाबा किल्ला, कनकेश्वर मंदिर, चौल, गणेश मंदिर(बिर्ला मंदिर), कान्होजी आंग्रे समाधी, उमा-महेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, मुरुड जंजिरा, दत्त मंदिर, हिंगुलजा मंदिर, शितळादेवी मंदिर, चुंबकीय वेधशाळा, कोरलई किल्ला ही काही मुख्य प्रेक्षणीय स्थळे अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरात आहेत. याच बरोबर मराठी भाषेतील पहिला मानला जाणारा शिलालेख अक्षी गावात आहे. सासवणे येथील करमरकर शिल्पालयातील अतिशय सुबक व मूर्त शिल्पे आहेत. दापोली ![]() दापोली केंद्रस्थानी ठेवून सर्व पर्यटन स्थळांना भेट देणे सहज शक्य आहे. ‘वीकएंड’ला या सर्व स्थळांना भेट देऊन परत मुक्कामी परतता येते. अलीकडे प्रत्येक वीकएंडला दापोलीत येणा-या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच दापोलीचा पर्यटनाचा हंगाम हा बाराही महिने असतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. येथील अनेक ठिकाणे आता पर्यटनात्मकदृष्टय़ा विकसित होत आहेत. ![]() निसर्गाने बहाल केलेले असीम सृष्टिसौंदर्य, स्वच्छ व मनमोहक विस्तीर्ण समुद्रकिनारे, तालुक्यातील ऐतिहासिक बंदरे, आंजल्र्यातील कडय़ावरचा गणपती, आसूदचे केशवराज व व्याघ्रेश्वर देवस्थान, दाभोळचे चंडिकामंदिर, केळशीतील स्वयंभू महालक्ष्मी मंदिर व याकूबबाबा सरवरी यांचा दर्गा अशी धार्मिक स्थळे, ऐतिहासिक वास्तू यांमुळे दापोली तालुका पर्यटकांच्या आक र्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याचबरोबर थंड, प्रसन्न हवेमुळे ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून असलेली ओळख यामुळे पर्यटकांना दापोली अधिकच भुरळ पाडत आहे. दिवेआगार ![]() दिवेआगर हे अतिशय शांत रमणीय व आरामदायक अस कोकणातील छोटासा टुमदार गाव. एकदा दिवेआगर ला भेट देवूनही मन भरला नाही म्हणून परत सगळं अनुभवण्यासाठी,समुद्र दर्शनाचा आनंद घेण्यासाठी,लहान पण सुबक मंदिरांच दर्शन’ घेण्यासाठी व कोकण मेवा खाण्यासाठी एका वीकेंडला पुन्हा एकदा पाय दिवेआगर कडे वळले.. दिवेआगरहून दिघीही १६ कि.मीवरच आहे. इथे जंजीरा किल्ल्याला जाण्यासाठी मोटरलाँच मिळते. खळबळत्या समुद्रातून सुमारे अर्धा तास सफर करून आपण जंजीर्याजवळ पोचतो. कास पठार ![]() कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणः २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. ![]() कास पुष्प पठाराने पर्यटनाच्या क्षेत्रात देशातच नव्हे तर जागतिक नकाशावर सातारा जिल्हयाचा लौकीक नोंदविला आहे. सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्पपठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून नुकतेच समाविष्ट करण्यात आले आहे. आज साताऱ्याच्या पर्यटनाची ओळख खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार झाली आहे. सातारा शहरापासून अवघ्या 23 कि.मी. वर धरतीवरच्या स्वर्गरूपाने साक्षात कास पुष्प पठार वसले आहे. सध्या कास पठार हे विविध जातींच्या फुलांनी बहरत असून पर्यटकांची रिघ कास पठाराच्या दिशेने सुरु झाली आहे. या पठाराची माहिती देणारे www.kas.ind.in हे संकेतस्थळ आहे. लोणार सरोवर ![]() पृथ्वीतलावरील अग्नीजन्य खडकातील एकमेव अशनीपात विवर असलेले लोणारचे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणजे अद्वितीय, अद्भुत आणि सर्वांसाठी रहस्यमय असणारा, निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आहे. त्या अशनीपातात पृथ्वीतलावर चार विवरे तयार झाली. त्यामध्ये अॅरिझोना (अमेरिका), ओडेसा (अमेरिका), बोक्सव्होले (ऑस्ट्रेलिया) आणि लोणार (भारत) यांचा समावेश आहे. पृथ्वीच्या पाठीवर अग्नीजन्य खडकातील लोणार हे सध्याचे एकमेव विवर आहे. निघोज रांजणखळगे आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड म्हणून या ठिकाणाची ख्याती आहे. कित्येक शतकापासून या कुंडामध्ये सतत पाणी असते. कितीही दुष्काळ पडला तरी पाण्याची पातळी कमी होत नाही. अतिशय सुंदर अशा कोरीव कामाप्रमाणे खडक या ठिकाणी पहावयास मिळतो. वर्षाच्या तिनही ऋतुमध्ये या ठिकाणी निसर्गाचे वेगवेगळे सौदर्य पहावयास मिळते. ![]() पावसाळयात खळखळणार पाणी अती सुदंर धबधबे हिवाळयात थोडयाशा ठिकाणी खडकावर उगवणारी हिरवळ मनाला प्रफुल्लीत करते. उन्हाळयात कुंडातील पाण्याचा गारवा बहरलेल्या हिरव्यागार वृक्षांची उणिवच भासू देत नाही एक रम्य परिसर व आकर्षक पर्यटन स्थळांचे केद्र म्हणूनही या ठिकाणाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. इंग्रजीत पॉट होल्स या नावाने ओळखले जाणारे हे रांजणखळगे अतिशय सुदंर व मनोवेधक असल्याने क्षणार्धात लक्ष वेधून घेतात. सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी याचे बांधकाम आरंभले. ![]() सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ व ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवकालिन ३ गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत त्यांची नावे दूध विहीर,साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव शिवाजी महाराजांचे शंकराच्या रुपातील मंदीर आहे याची स्थापना राजाराम महाराजांनी केली होती. माथेरान ![]() माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण ८०३ मी. किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्व-पश्विम व दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. ह्या कडांनाच पॉईंटस् म्हटले जाते. ज्या इंग्रजांनी माथेरान वसवले त्यांनीच या पॉईंटस् ना नावे दिली, त्यामुळे सहाजिकच ती इंग्रजीत आहेत. लोणावळा ![]() लोणावळा हे, भारतातील राज्य महाराष्ट्रातील, पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे. लोणावळा
पुण्यापासून ६४ किमी तसेच मुंबई पासून ९६ किमी
अंतरावर आहे. तेथील चिक्की हा एक सुप्रसिद्ध चवीने गोड
असलेला पदार्थ आहे
आणि हे मुंबई व पुण्यामधील एक महत्वाचे स्टेशन आहे. पुण्यामधील उपनगरीय
क्षेत्रामधून येथे येण्यासाठी लोकल रेल्वेगाड्या असतात. तसेच मुंबई – पुणे
एक्सप्रेस हायवे आणि
मुंबई – चेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो. तसेच
लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक
प्रशिक्षण केंद्र आयएनएस
शिवाजी चे मुख्यालय आहे.
सावंतवाडी तालुक्यातील पर्यटनस्थळे
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला चार चाँद लावण्यात महत्त्वाची भुमिका बजावतोय तो म्हणजे सावंतवाडी तालुका.
सावंतवाडी शहर व इतर गावे निसर्गसौंदर्याने नटलेली आहेत. आम्ही निवडलीयत यातलीच काही निवडक स्थळे!
1. मध्यवर्ती शहर व बाजारपेठ:
![]()
सावंतवाडी शहराच्या मधोमध सुंदर मोती तलाव
आहे. संध्याकाळच्या सुंदर रोषणाईत हा तलाव आणखीच खुलुन दिसतो. संस्थानाच्या
काळात 1874 मध्ये मोती तलावाची निर्मिती झाली. राजवाड्यासमोरील 31
एकराच्या परिसरात धरण बांधण्यात आले. चारी बाजुंनी भक्कम दगडांनी बांधकाम
करण्यात आले. पाणी ठेवण्यासाठी मुशी ठेवण्यात आल्या. अशाप्रकारे मोती
तलावाची निर्मिती झाली. त्याचबरोबर लगतच्या बाजारपेठेलाही भेट देऊन वेळ
घालवता येतो.
![]() सावंतवाडीची लाकडी खेळणी प्रसिद्ध असुन त्या खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडते.
2. आंबोली:
![]() सावंतवाडीपासुन जवळच आंबोली हे पर्यटनासाठी प्रसिद्ध गाव आहे. आंबोलीतील धबधबे, हिरण्यकेशी मंदीर, सनसेट पॉईंट प्रसिद्ध आहेत. आंबोलीला ‘गरीबांचे महाबळेश्वर’ असे देखील म्हटले जाते.
(वाचा: “गारेगार आंबोली”)
3. सावंतवाडी संस्थान:
![]() सावंतवाडी शहराचा मानबिंदु म्हणुन हा संस्थानकालीन राजवाडा गेल्या तीनशे वर्षांपासुन उभा आहे. या राजवाड्यात पुर्वी संस्थानाचा कारभार चालायचा. आता या राजवाड्याचा कारभार संस्थानाच्या राजमाता सत्वशिलादेवी भोसले पाहत आहेत. या भव्यदिव्य राजवाड्यात सर्व राजांचे फोटो, गंजिफासारख्या हस्तकलांची स्थळे आहेत.
4.नरेंद्र वनोद्यान:
5. जगन्नाथराव भोसले उद्यान:सावंतवाडी शहरात समुद्रसपाटीपासुन 300 मीटर उंचीवर निसर्दसौंदर्याने नटलेले नरेंद्र वनोद्यान वसले आहे. या डोंगरावरून वेंगुर्ले समुद्र किनाऱ्यापर्यंतचा परीसर नजरेस पडतो. या डोंगरावर लहानमोठे धबधबे, संस्थानकालीन विहीरी, तसेच प्राचीन मारूती मंदिरदेखील आहे. शहराच्या मध्यभागीच हे सुंदर उद्यान आहे. विरंगुळ्यासाठी येथे लहानथोरांची कायमच गर्दी असते. सुंदर रचना, विविध झाडं, खेळण्यांचा आनंद घेण्यासाठी या उद्यानात एखादा फेरफटका नक्की मारावा. मालवणात येऊन आनंद लुटलाच पाहीजे अशा टॉप 5 गोष्टी
सिंधुदुर्गाचे पर्यटनविश्व मालवणचा आनंद
लुटल्याशिवाय अपुर्ण आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेले मालवण देशविदेशातल्या
पर्यटकांना कायमच भुरळ घालत आलं आहे. मालवणातले समुद्र किनारे, किल्ले,
मंदीरे, ऐतिहासिक वास्तु या सर्वांनी मालवण न्हाऊन निघाले आहेत. पर्यटकांनी
या सगळ्यांचा आनंद लुटावाच मात्र मालवणात आल्यावर खालील पाच गोष्टींचा
आनंद न चुकता घ्यावा:
#1 सिंधुदुर्ग किल्ला:
![]()
मालवणचे आणी एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे
आकर्षणाचे केंद्रबिंदु म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. हा किल्ला छत्रपती शिवाजी
महाराजांनी समुद्रात कुरटे बेटावर बांधला आहे. या किल्ल्यावर शिवरायांचे
एकमेव मंदीर आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी होड्यांची सोय आहे.
#2 तारकर्ली बीच
![]() उघड्या डोळ्यांनी जर निसर्गरम्य समुद्रकिनारा बघायचा असेल तर ‘तारकर्लीत येवकच व्हया.’ तारकर्लीचा लांबच लांबच सुंदर बीचवर पर्यटनाचा आनंद लुटताना कोकणात आल्याचा खरा आनंद मिळतो.
#3 तारकर्ली बीचवरील साहसी खेळ:
![]() तारकर्ली बीचला भेट देऊन तेथील श्वास रोखुन धरणार्या साहसी खेळांचा आनंद न लुटता घरी परतणं, हे जरा मनाला पटतच नाही. त्यामुळे प्रत्येक पर्यटकाने इथल्या सर्फिंग, स्कुबा डायव्हिंग, पॅरासॅलिंग इत्यादी साहसी खेळांचा आनंद लुटलाच पाहीजे.
#4 मालवणी जेवण:
![]() मालवणच्या पर्यटनाचा आनंद लुटून तुम्ही दमला असाल आणी मोठ्याशा हॉटेलात जाऊन पिझ्झा-बर्गरवर ताव मारणार असाल तर तुमची पुर्ण ट्रीप फुकट गेली असं म्हणावं लागेल. मालवणात आल्यावर न चुकता इथल्या चमचमीत मालवणी भोजनाचा आस्वाद घ्या. इथले कोंबडी वडे, मच्छी कडी, मटन कडी तुमच्या सहलीचे चीज करतील. आणी या सगळ्यांनंतर एक ग्लास सोलकढी तो बनती है भिडू!
#5 मालवणचं ग्रामीण जीवन:
![]() जर तुम्हाला खरोखरचं सिंधुदुर्गच्या आणी मालवणच्या सौंदर्याची अनुभुती घ्यायची असेल तर कुठलंही हॉटेल बुक न करता शहरापासुन जवळच्या गावात निवासाची सोय पाहा. तरच तुम्ही इथल्या निसर्गाचा, सौंदर्याचा, संस्कृतीचा आणी इथल्या माणसांचा आनंद घेवु शकता.
अर्थातच, या फक्त आम्ही निवडलेल्या टॉप 5 गोष्टी आहेत. पुरो मालवण बघुचो तर दोन म्हयन्यांची सुट्टी घेवन येवा…
11 Lesser Known Facts About Sindhudurg
निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हा, मोठ्या काळजांच्या माणसांचा जिल्हा
म्हणुन आपला सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध आहे. इथलं पर्यटन, रुढी-परंपरा,
साधेपणा, खाद्यसंस्कृती, इतिहास अशा कितीतरी गोष्टींचं आकर्षण संपुर्ण
जगाला लागलेलं असतं. चला तर, आज आपण पाहुया सिंधुदुर्गाविषयीच्या अशाच काही
मनोरंजक व आश्चर्यकारक गोष्टी ज्या जगालाच काय, अगदी गाववाल्यालादेखील
फारशा माहीत नसतात.
निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हा, मोठ्या
काळजांच्या माणसांचा जिल्हा म्हणुन आपला सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध आहे.
इथलं पर्यटन, रुढी-परंपरा, साधेपणा, खाद्यसंस्कृती, इतिहास अशा कितीतरी
गोष्टींचं आकर्षण संपुर्ण जगाला लागलेलं असतं. चला तर, आज आपण पाहुया
सिंधुदुर्गाविषयीच्या अशाच काही मनोरंजक व आश्चर्यकारक गोष्टी ज्या जगालाच
काय, अगदी गाववाल्यालादेखील फारशा माहीत नसतात.
#1. धामापुर तलाव
|



































































.gif)


































































































भारत
देशातील शिल्प वैभवात लेणी शिल्पकला संख्येने जास्त व अग्रेसर असली तरी
वेगवेगळ्या प्रदेशातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं आणि त्यातील मंदिर
शिल्पकलाही वाखाणण्यासारखी आहे. देशातील प्रत्येक प्रदेशावर हजारो
वर्षांपासून उभ्या असलेल्या मंदिरांवर धर्माच्या अधिष्ठानासह अनेक
सत्ताधाऱ्यांच्या वैभवानी साकारलेल्या विविध शिल्पकलेचा आविष्कार नजरेत
भरणारा आहे.
सह्यद्रीच्या
अजस्र पहाडामुळे हा भला मोठा प्रदेश कोकण आणि त्यावरील घाटमाथा हे तीन
भौगोलिक विभाग निर्माण झाले. या प्रदेशावर आपली अधिसत्ता गाजवणाऱ्या
वेगवेगळ्या सत्ताधीशांचा देशांतर्गत आणि परदेशाबरोबर व्यापार चालत असे.
कोकणच्या सागरी भागातून येणारा माल घाटावरील बाजारपेठेत जात असल्याने त्या
मार्गातील शहरवस्ती – बाजारपेठा तयार झाल्या त्या परिक्षेत्रात मंदिराची
उभारणी झाली (हा काळ म्हणजे इ.स. ८ ते १३ वे शतक) यातील बऱ्याच मंदिरांना
धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक तसेच दंतकथांची पाश्र्वभूमी लाभलीय. यातील
काही मंदिरं त्यावेळच्या सत्ताधीशांच्या काळात बांधलेली आहेत. पण कोकणातील
बरीच मंदिरं शिलाहार राजवटीत बांधली गेली.
कोकण
मंदिरातील काष्ठशिल्प निर्मितीसाठी या कारागिरांनी परिसरातील सहज उपलब्ध
साग- फणस- आंबा या वृक्षांच्या लाकडांचा उपयोग मोठय़ा दूरदृष्टीने केला आहे.
कारण या वृक्षांचे लाकूड टिकाऊ आहे. मंदिरातील उपलब्ध जागेत काष्ठशिल्प
कलात्मकरीत्या बसवण्यासाठी या अज्ञात कारागिरांनी भूमिती शास्त्राचा आधार
घेतला असणार. ही काष्ठशिल्पं निर्माण करताना कारगिरांनी पारंपरिक छिन्नी,
हातोडा, गिरमिट इ. साधनांचा उपयोग केलाय, हे विशेष. मंदिरातील सुशोभित
काष्ठशिल्प दीर्घकाळ टिकण्यासाठी जवसाच्या तेलाचा उपयोग केला जातो. आता
मात्र रासायनिक प्रक्रियेतून तयार झालेलं द्रावण वापरण्याचा प्रघात सुरू
झालाय.



































प्रसिद्ध
साहित्यकार वि.स.खांडेकर हे वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा गावी शिक्षक
म्हणुन सेवा बजावत होते. 1968 साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देवुन गौरविले. त्यांच्या ‘ययाती’ या कादंबरीसाठी त्यांना 1974 साली साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.