Wednesday, March 19, 2025

जाता सातार्‍याला -

 

 मेणवली, धोम, वाई परिसर

Submitted by जिप्सी on 31 August, 2015 - 00:16

जाता सातार्‍याला....

१. जाता सातार्‍याला . . . . .
२. "कास"ची फुलं "झक्कास"
३.रौद्र सौंदर्य - ठोसेघर धबधबा
४. "Mesmerizing" महाबळेश्वर

प्रचि ०१
वाई येथील प्रसिद्ध ढोल्या गणपती मंदिर

प्रचि ०२
वाईहुन मेणवलीकडे जाताना

प्रचि ०३
मेणवली येथील नानासाहेब फडणवीसांचा वाडा

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७
वाड्यासमोरचा गणपती

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११
कृष्णा नदीच्या काठावर मेणवली येथे बांधलेला घाट. (स्वदेस, सिंघम, बोल बच्चन सिनेमा आठवला का?)

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५
कृष्णा माई

प्रचि १६

प्रचि १७
मेणवली घाटाचे विहंगावलोकन. युट्युबवर एकाने प्रदर्शित केलेला सुंदर व्हिडियो
Menavali Ghat Video By Impressive Creation Wai

प्रचि १८
मेणवलीतुन दिसणारा "पांडवगड"

प्रचि १९

प्रचि २०
धोम गावातील अतिशय सुंदर, प्राचिन असे श्री नृसिंहाचे मंदिर.
मंदिरात दगडी कमळाच्या मधोमध असलेल्या कासवाच्या पाठीवर नंदी विराजमान आहेत. इतकी सुंदर कलाकृती मी आजवर पाहिली नाही. पण मंदिरात प्रचंड गर्दी असल्याने फोटो नीटसे काढता आले नाही (कसलासा धार्मिक कार्यक्रम चालु होता).
प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०
एकाच खांबावर असलेले (चारही बाजुला चार आणि वर एक ) हे पाच चेहरे.

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३
धोम धरण
प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

विषय: 

व्हॉट्सअप व फेसबुकवर मध्यंतरी "बारा मोटेची विहिरीचा" फोटो आणि माहिती फिरत होती. माहिती खरीच होती पण जे फोटो व्हॉट्सअपवर फिरत होते ते गुजरात, पाटण मधील "राणीनी वाव" आणि "जयपुर-आग्रा रोडवरील "चांद बावडी"चे होत. "राणीनी वाव" व "चांद बावडी"च्याच तोडीची आपल्या महाराष्ट्रातील, सातारा जिल्ह्यातील शेरे लिंब गावची "बारा मोटेची विहिर" आहे.

साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावर म्हणजे सातारा ते भुईंज रस्त्यावर उजवीकडे "शेरी लिंब" नावाचे गाव आहे, या गावात एक शिवकालीन इतिहासाची साक्षीदार अशी बारा मोटेची विहीर आहे. शिवकालीन स्थापत्य शास्त्राचा एक अद्भुत उदाहरण म्हणजे हि बारा मोटेची विहीर. हि विहीर पाहताना थक्क व्हायला होतं, म्हणजे हि विहीर आहे कि भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे बघा विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि कमान असलेला भरभक्कम दरवाजा, मध्यभागी दोन मजली महाल आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी. साधारण शिवलिंगाचा आकाराची हि विहीर आहे. अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार वाघांची शिल्पे आहेत. विहिरीस आलिशान जिना आणि आत उतरण्यास चोरवाटा आहेत. या विहिरीवर बारा मोटा चालत असत असे म्हणतात, नीट लक्ष देवून पाहिल्यास बारा मोटेचे बारा चौथरे नजरेस पडतात. या विहिरीचे बांधकाम इ.स. १६४१ ते १६४६ या दरम्यान श्रीमंत सौ. विरुबाई भोसले यांनी केले. या विहिरीची खोली ११० फुट असून व्यास साधारण ५० एक फुट आहे. विहीर दोन टप्प्यात विभागली आहे. अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती दुसरी विहीर. या दोन्ही विहिरींना जोडणारी दुमजली इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे.
(व्हॉट्सअप वरील माहिती)

अधिक माहिती या ब्लॉगवर उपलब्ध आहे.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
बारा मोटेपैकी अलिकडच्या ६ मोटा
प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४
दातेगड

दातेगडास भेट देण्यासाठी कराड-कोयनानगर मार्गावरल्या पाटण ह्या गावातून चाफोली रोडने १५ मिनिटे चालल्यानंतर, डाव्या बाजूलाच लाल मातीची मळलेली पायवाट दिसते. ही पायवाट थोड्या अंतरानंतर दातेगडावरून उतरत आलेल्या डोंगरधारेस मिळते. या रस्त्याने ४५ मिनिटे चालल्यानंतर एक दर्गा लागतो. या दर्ग्यासमोरून टेकडीच्याच धारेवरून मळलेल्या पायवाटेने पठारावर पोहोचता येते. तेथून साधारण २० मिनिटांच्या अंतरावर गडाच्या पायथ्याचे टोळेवाडी गाव लागते.
दातेगडावर जातांना वाटेतच एक भग्न प्रवेशद्वार लागते. या भग्न प्रवेशद्वारातून मार्ग काढल्यावर समोरच तटात खोदलेल्या १० ते १२ फुटी श्रीगणेशाच्या आणि हनुमानाच्या मूर्ती दिसतात. अशा प्रकारच्या मूर्ती फारच कमी किल्ल्यांवर आढळतात. समोरच असणार्‍या २० पायर्‍यांचा चढ चढून गेल्यावर आपण गड माथ्यावर पोहचतो. गड माथ्यावर डावीकडे वळल्यावर काही पायर्‍या खाली उतरतात. या पायर्‍या आपल्याला थेट ५० फुट खाली असणार्‍या विहिरीपाशी घेऊन जातात. ही विहिर म्हणजे वास्तुशास्त्रामधील एक अदभूत नमुना आहे. विहिरीच्या तोंडाशीच महादेवाची एक पिंड आहे. हे सर्व पाहून गडाच्या दुसर्‍या टोकाशी जावे. या ठिकाणी काही पाण्याची टाकी आढळतात. बाकी गडावर पाहण्यासारखे काही नाही. गडमाथा बराच निमुळता असल्याने फिरण्यास अर्धातास पुरतो.
(माहिती:- विकीपिडिया & ट्रेकक्षितिज.कॉम)

प्रचि १६
दातेगडावरील तलवारीच्या आकाराची विहिर
प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

महाराष्ट्रात अजुन असाच काही "पाताळातील खजिना" दडलेला आहे त्यापैकी पालवण (जि.सातारा) व सामानगड (जिल्हा कोल्हापूर) हे माहित आहे. अजुन काहिची माहिती असल्यास इथे जरूर शेअर करा.

प्रचि ०१

किटकभक्षी वनस्पती - ड्रॉसेरा इंडिका (Drossera indica)

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४
दर सात वर्षांनी फुलणारी कारवी

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
कौला (स्मिथिया)

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९
कमलिनि/कुमुदिनी

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ०१

माण देश हा तसा दुष्काळी भाग. कमी पावसाचा प्रदेश. सितामाईच्या डोंगरातुन उगम पावणार्‍या माणगंगा नदीच्या नावाने हा भाग ओळखला जातो. हा भाग जरी दुष्काळाचा असला तरी पर्यटनाच्या बाबतीत मात्र सुकाळ आहे. छत्रपती शिवरायांचे कुलदैवत "शिखर शिंगणापुर" , वर्धनगड, महिमानगड, वारूगड, संतोषगड, भूषणगड इ. दुर्गसंपत्ती तर मायणीचे पक्षी अभयारण्य, पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांचा मठ, गोंदवले येथील गोंदवलेकर महाराजांचा मठ, म्हसवडचा सिद्धनाथ इ. महत्वाची ठिकाणे माण (म्हणजेच दहिवडी) तालुक्यात येतात. माणदेशी भटकंती जरा जास्तच जिव्हाळ्याची होती कारण फलटणपासुन २०-३० किमी तर शिखर शिंगणापुरहुन (फलटणच्या दिशेला) १३ किमी अंतरावर असलेले माझे कुलदैवत आणि माझे गाव "फलटण". माझं गाव फलटण असलं तरी या भागात फक्त कुलदैवताच्या यात्रेनिमित्तच २-३ दिवस जाणे होते आणि जत्रेत व्यस्त असल्याने परीसराची भटकंती होत नाही. म्हणुन मुद्दाम वेळ काढुन केलेली माण देश परिसरातील हि भटकंती. Happy

पुण्याहुन मायबोलीकर दिपक डि आणि मुंबईहुन अस्मादिक असे दोघांची भटकंती. वाकडहुन लवकर निघुन पहिल्या दिवशी प्रथम "कल्याणगड" अर्थात "नांदगिरीचा किल्ला" त्यानंतर "वर्धनगड" आणि मग "महिमानगड" करून शिखर शिंगणापुर, जावली करून फलटण येथे मुक्काम, दुसर्‍या दिवशी फलटण-दहिवडी मार्गावरील "वारूगड" आणि शेवटी "संतोषगड" असा भटकंतीचा प्लान होता. पण पहिल्याच कल्याणगडने चकवल्याने आणि महिमानगडाने थकविल्याने आम्ही दहिवडीला मुक्काम केला आणि दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर निघुन प्रथम शिखर शिंगणापुर, आमचे कुलदैवत जावलीचा सिद्धनाथ करून मग फलटण आणि तेथुन वारूगड व संतोषगड करून पुणे मार्गे मुंबई. वेळेच्या अभावी वारूगडला मनासारखी भटकंती झाली नाही आणि फोटोही काढता आले नाही. त्यामुळे वारूगडला पुन्हा एकदा फेरी होणार. Happy
(किल्ल्यांची माहिती Trekshitiz.com व शिखर शिंगणापुरची माहिती विकिपिडियावरून साभार)

कल्याणगड अर्थात नांदगिरीचा किल्ला
कल्याणगड हा सातारा विभागात मोडणारा किल्ला आहे. कल्याणगडाचेच दुसरे नाव म्हणजे ’नांदगिरीचा किल्ला’ असे आहे. सातार्‍यापासून अर्ध्या दिवसात हा किल्ला आपण पाहून येऊ शकतो. या परिसरातील किल्ले हे मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर विराजमान झालेले आहेत. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्यावर असलेली व लांबलचक पसरलेली गुहा होय. फेब्रुवारी - मार्च पर्यंत या गुहेत पाणी असते. गुहेतील मिट्ट काळोखात, गुढगाभर गार पाण्यातून गुहेच्या टोकापर्यंत (दत्त पादुकांपर्यंत) जाण्याचा थरार या किल्ल्यावर अनुभवता येतो.
सातारा येथे सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने या किल्ल्याची निर्मिती केली. हा किल्ला इ.स ११७८ ते इ.स१२०९ या कालावधीत बांधला गेला असावा.
इ.स १६७३ मध्ये शिवरायांनी सातारा व आजुबाजूचा प्रदेश जिंकून घेतला, त्यातच कल्याणगडाचा देखील समावेश होता. पुढे शिवकालानंतर गडाचा सर्व कारभार प्रतिनिधींकडे सोपवला गेला. पेशव्यांमध्ये व प्रतिनिधींमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यावर हा किल्ला पेशव्यांकडे आला. इ.स १८१८ मध्ये जनरल प्रिझलरने हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात घेतला.
प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८
किल्ले वर्धनगड
वर्धनगड छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला किल्ला आहे. सातरा जिल्ह्यातून जाणार्‍या महादेव डोंगर रांगेवर, भांडलीकुंडल नावाचा जो फाटा आहे. त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्याच्या सीमेवर, कोरगाव पासून ७ मैलांवर व साताराच्या ईशान्येस १७ मैलांवर वर्धनगड किल्ला बांधलेला आहे. सातारा - पंढरपूर मार्गावर कोरेगाव नंतर येणारा घाट याच किल्ल्याच्या पदरातून जातो. किल्ल्याला लागूनच असलेल्या लालगून व रामेश्वर ह्या दोन डोंगरावरून किल्ल्यावर तोफांचा चांगला मारा करता येत असे. किल्ल्यावरील वर्धनीमातेच्या मंदिरात पंचक्रोशीतील लोकांचा राबता असतो.
अफजलखानाच्या वधानंतर छ्त्रपती शिवाजी महाराजांनी वर्धनगड बांधला. १२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर १६६१ शिवाजी महाराज या गडावर मुक्कामाला होते. संभाजी महाराजांच्या वधानंतर ५ में १७०१ मध्ये मोगलांनी पन्हाळा जिंकला. त्यानंतर औरंगजेबाने आपले लक्ष्य सातार्‍यातील किल्ल्यांकडे वळवले. मोगल सरदार फतेउल्लाखान याने सल्ला दिला की ‘‘ बादशहांनी खटावला छावणी करावी, म्हणजे पावसाळ्यात चंदन-वंदन व नांदगिरी हे किल्ले जिंकून घेता येतील’’. औंरगजेबाने या योजनेला मंजुरी दिली. दि. ८ जूनला फतेउल्लाखान आपल्याबरोबर काही सैन्य घेऊन खटावच्या बंदोबस्तासाठी गेला. त्याने खटावचे ठाणे जिंकले. मराठ्यांचा पराभव झाला. यानंतर मोगलांची फौज खटावच्या ठाण्यात जमा होऊ लागली होती. आज ना उद्या हे सैन्य वर्धनगडाला वेढा घालणार हे निश्चित होतं म्हणून वर्धनगडातील मराठ्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाड्यांतील लोकांना आक्रमणाची आगाऊ कल्पना दिली होती. ज्या लोकांना शक्य होते त्यांनी आपल्या बायका मुलांना किल्ल्यात नेले. नंतर ९ जून १७०१ रोजी वर्धनगडाच्या किल्लेदाराने आपला एक वकील फतेउल्लाखाना जवळ पाठवला. त्याने याला सांगितले की ‘‘किल्लेदाराला प्राणाचे अभय मिळत असेल तर तो मोगलांना किल्ला देण्यास तयार आहे’’. फतेउल्लाखानाने विनंती ताबडतोब मान्य केली. खरतर फतेउल्लाखानाकडे वकील पाठवून किल्ला ताब्यात देण्याची बोलणी करणे हा वेळाकाढूपणा होता.मोगलांचा किल्ल्यावर होणारा हल्ला पुढे ढकलणे हा त्यामागचा हेतू होता. किल्लेदाराने किल्ल्याच्या संरक्षणासाठी सैन्याची जमवाजमव करणे हा त्यामागील हेतू होता. फतेउल्लाखान किल्लेदार आज येईल उद्या येईल म्हणून वाट पाहात राहीला, पण एकही मराठा सैनिक त्याच्याकडे फिरकला सुध्दा नाही. फतेउल्लाखानाला मराठयांचा डाव लक्षात आला आणि त्याने १३ जून रोजी किल्ल्यावर हल्ला चढवला.
त्याला मराठ्यांनी चोख प्रत्युत्तर दिले, पण यात अनेक मराठे मारले गेले. अनेकजण जखमी झाले. मोगलानी मराठ्यांच्या चाळीस लोंकाना कैद केले. मग मोगलानी किल्ल्याच्या पायथ्याच्या अनेक वाडया जाळून टाकल्या. या लढाईत मोगलांचे पण अनेक सैनिक प्राणास मुकले. दि. १९ जूनला रात्री मराठ्यांनी वर्धनगड सोडला. दि. २२ जून रोजी ‘मीर ए सामान ’ या खात्याचा व्यवस्थापक अली रजा हा वर्धनगडातील मालमत्ता जप्त करण्यासाठी गेला. त्याने किल्ल्यातून सहाशे पंचाहत्तर मण धान्य , चाळीस मण सोरा व बंदुकीची दारू ,सहा मोठ्या तोफा व जंबुरक असा माल जप्त केला. त्याच दिवशी औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून ‘सादिकगड’ असे ठेवले.
वर्धनगड तीन वर्ष मोगलांच्या ताब्यात होता. सप्टेंबर १७०४ मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला व किल्लेदार किशोरसिंगला कैद केले. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोगलांनी किल्ला पुन्हा ताब्यात घेतला. इ.स.१७०७ मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला. इ.स. १८१८ मध्ये वर्धनगड इंग्रजांच्या ताब्यात गेला.
प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
वर्धनगडाची अधिष्ठात्री श्री वर्धिनी माता
प्रचि १४

प्रचि १५
किल्ले महिमानगड
महिमानगड हा सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात मोडणारा किल्ला आहे. या परिसरातील किल्ले हे मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर विराजमान झालेले आहेत. सातारा - पंढरपूर रस्त्यावर महिमानगड गाव आहे . गावाच्या मागे मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर असलेला महिमानगड किल्ला त्याच्या ताशीव कातळ कड्यांमुळे आपले लक्ष वेधून घेतो.
आदिलशहाच्या काळात विजापूर या राजधानीपासून कोकणातल्या बंदरांपर्यंत जाणारा, विजापूर - पंढरपूर - सातारा - वाई - महाड असा व्यापारी मार्ग होता. या मार्गाचे रक्षण करण्यासाठी महिमानगड किल्ल्याची योजना केली होती. साताराच्या पूर्वेकडील प्रांताचे संरक्षण करण्याकरीता शिवरायांनी जे किल्ले घेतले, त्यापैकीच एक महिमानगड. पूर्वी किल्ल्याच्या रक्षणाकरीता महार रामोशी मिळून ७५ इसम ठेवलेले होते. किल्ल्याचा हवालदार आणि सबनीस यांची इनामे अद्यापही वंशज पाटील व कुळकर्णी यांच्याकडे चालू आहे.

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५
शिखर शिंगणापुर
सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून २० कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. फलटणपासून अग्नेयीस सुमारे ३७ किमी. एवढे अंतर आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटी पासून १,०५० मी. उंचीवर आहे. मंदिरात जायला जवळपास ४०० पायर्‍या चढून जावे लागते.

शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव म्हणजे महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे.

शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र गुढी पाडव्यापासुन ते चैत्र पोर्णिमेपर्यंत असते. चैत्र शु. अष्टमीला शंकर व पार्वती यांच्या विवाहाचा मुख्य सोहळ्यांपैकी असतो. तत्पुर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेस विवाहाचा मुहूर्त म्हणून (हळकुंड ) हळद जात्यावर दळली जाते. चैत्र शुद्ध पंचमीस खानदेशातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वर्‍हाडी म्हणून येतात आणि शंभु महादेवाला व पर्वतीमातेला म्हणजेच शिवलिंगाला हळद लावतात. चैत्र शुद्ध अष्टमीला संध्याकाळी शंभु महादेव मंदिराचे शिखर(कळस) बांधून ते श्री अमृतेश्वर (बळी ) मंदिराचे शिखर(कळस ) यांना पागोटे (सुताची जाड दोरी) बांधले जाते. यासाठी लागणारे पागोटे मराठवाड्यातील शिवभक्त घेऊन येतात. लग्नासाठी ५५० फूट लांब पागोटे विणले जाते. यांस शंभु महादेवाचा लग्नाचा आहेर मानला जातो. ज्या कुटुंबाला हे काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात आणि रात्री १२ वाजता मंगलाष्टके व सनई चौघड्याच्या गजरात शंभु महादेव आणि पार्वतीमातेचा विवाह सोहळा "हर हर हर महादेव" च्या जयघोषात पार पाडला जातो. चैत्र शुद्ध एकादशीस इंदोरचे राजे होळकर महादेवाचे दर्शन घेत.
चैत्र शुद्ध द्वादशीस, मुंगी घाटातून कावड आणताना चैत्र शुद्ध द्वादशीस महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, "हे म्हाद्या, धाव, मला सांभाळ अशी" असा सगळा द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो.

प्रचि २६

प्रचि २७
जावलीचा श्री सिद्धनाथ
आमच्या यात्रेबद्दल (बगाड आणि धडका) या बद्दलचा लेख
ओढ लावती अशी जिवाला गावाकडची माती ....
मला बी जत्रंला येऊ द्या की रं....

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०
किल्ले संतोषगड
सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे. शंभूमहादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा रांग. यापैकी म्हसोबा डोंगररंगेवर संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत. हा सर्व परिसर तसा कमी पावसाचाच मात्र ऊसाच्या शेतीमुळे सर्व परिसर सधन झालेला आहे. माण तालुक्यात असणार्‍या या किल्ल्यांना पाहण्यासाठी दोन दिवस लागतात. संतोषगडाला ताथवड्याचा किल्ला असेही म्हणतात.

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३

प्रचि ४४
कोण म्हणतं निसर्ग फक्त हिरव्या रंगातच जास्त खुलुन दिसतो?
खरं तर त्याच सोनसळी रूपही तितकंच मनमोहक Happy

प्रचि ४५

जुन्या अठवणी ताज्या केल्यास

प्रचि ४४

प्रचि ३३

Mesmerizing" महाबळेश्वर

Submitted by जिप्सी on 21 August, 2015 - 11:33

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६
मॅप्रो गार्डन
प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०
मित्रांसोबत थोडी फोटुगिरी Happy
प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

विषय: 









 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...