Saturday, April 17, 2021

नाशिक जिल्ह्याची भ्रमंती

 

प्रदीर्घ सांस्कृतिक परंपरा आणि सुखद हवामानासाठी प्रसिद्ध असलेले नाशिक शहर मुंबई, पुणे, औंरगाबाद या महानगरांच्या केंद्रस्थानी आहे. मध्य रेल्वेच्या प्रमुख लोहमार्गावरचे हे एक प्रमुख स्टेशन असलेले नाशिक मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाने जोडले गेले आहे. नाशिक सध्या चर्चेत आहे ते जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे.

दर बारा वर्षांनी येणारा हा भव्य सांस्कृतिक सोहळा अनुभवण्यासाठी जगभरातील पर्यटक नाशिकला येतात. विशेष पर्वणीच्यावेळी होणारे शाहीस्नान हा अत्यंत भव्य सोहळा असतो. देशातील साधु-संत या आनंद सोहळ्यात सहभागी होतात. पर्यटकांसाठी ही एकादृष्टीने पर्वणीच असते.कुंभमेळ्यास उपस्थित राहण्यासोबतच नाशिक परिसरातील पर्यटनस्थळांना भेटी देणे हादेखील आनंदानुभव असतो. अनेक प्राचीन मंदिराबरोबरच विविध प्रेक्षणीय स्थळे या परिसरात आहेत. त्यातील महत्त्वाच्या स्थळांची माहिती येथे देण्यात येत आहे.श्री सुंदर नारायण मंदिर गोदावरी तटावर सुंदर नारायण मंदिर आहे. मंदिराची बांधणी 1756 मध्ये गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी केली. मंदिरात श्रीविष्णूच्या डावी-उजवीकडे लक्ष्मी व सरस्वती देवीच्या मूर्ती आहेत. सदरचे मंदिर हे गोदावरी तिरावर आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकापासून 8 कि.मी अंतरावर आहे.

सीता गुंफा

राम वनवासात असताना सीतेचे वास्तव्य ज्या ठिकाणी होते ते स्थान ‘सीता गुंफा’ म्हणून ओळखले जाते. सीता गुंफेजवळच पाच वटवृक्ष आहेत. प्रभूरामचंद्र पंचवटीत आले असतांना तेथील पाच वटवृक्षाजवळ जाताच पाच ऋषि कुमारांचा उद्धार झाला. परंतु ते वटवृक्ष मात्र आजही कायम आहेत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. काळाराम मंदिराजवळ हे ठिकाण आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकापासून 8 कि.मी. अंतरावर आहे.

सोमेश्वर मंदिर

नाशिक बसस्थानकापासून सुमारे 8 कि.मी. अंतरावर गोदावरी नदीच्या काठी सोमेश्वर हे एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. येथे स्वयंभू सोमेश्वर भगवान शंकराचे मंदिर आहे. या मंदिराखालून एक गुप्त गंगा वाहत असून जवळच एका झाडाखालून तिचा प्रवाह प्रकट होऊन अव्याहत चालू असतो. अतिशय रमणीय व नयन मनोहर असलेला हा परिसर यात्रेकरूंना व चित्रपट सृष्टीतील निर्मात्यांना नेहमीच आकृष्ट करतो.

सप्तश्रृंगी गड

चांदवडच्या डोंगररांगेत नाशिकच्या उत्तरेस दिंडोरी तालुक्यात सुमारे 70 कि.मी अंतरावर सप्तश्रृंगी गड आहे. या गडावर सप्तश्रृंग निवासी देवीचे मंदिर आहे. भारतात देवीची 51 पिठे आहेत. त्यापैकी सप्तशृंगी देवी ही महालक्ष्मी असून तीच महाकाली व महासरस्वती आहे. महिषासूराचा वध केल्यानंतर विसावा घेण्यासाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. गड नाशिकरोड रेल्वेस्टेशन पासून 90 किमी. तर नाशिक मध्यवर्ती बसस्थानकापासून 80 कि.मी. अंतरावर आहे. गडावर संस्थानच्या खोल्या निवासासाठी उपलब्ध आहेत.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी वसले आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर हे एक प्रख्यात ज्योतिर्लिंग आहे. त्र्यंबकेश्वरचे मंदिर म्हणजे जुन्या व मनोहर अशा शिल्पाकृतीचा एक उत्कृष्ट नमुनाच आहे. गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या माथ्यावर झाला. गोदावरीचा मूळ उगम या पर्वतावर होऊन ती गंगाद्वारात उतरते. त्र्यंबकराज मूर्ती तळगाभाऱ्यात असून वालुकामय पिंडीतील तीन खाचा, ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक समजल्या जातात. मंदिरावर सुवर्ण कलशासह अप्रतिम कलाकृतीचे कोरीव काम केलेले आहे.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे वडीलबंधु संत निवृत्तीनाथ यांनी त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली असल्याने त्र्यंबकेश्वर हे संत, वारकरी आणि असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. निसर्गरम्य परीसर, पुरातन मंदिरे आणि पौराणिक महत्त्व यामुळेच त्र्यंबकेश्वर हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. त्र्यंबकेश्वर हे ठिकाण नाशिकरोड रेल्वे स्टेशन पासून 36 कि.मी. अंतरावर तर नाशिक मध्यवर्ती बसस्थानकापासून 28 कि.मी. अंतरावर असुन नाशिक मध्यवर्ती बसस्थानकापासून एस.टी. बसेसची जाण्यासाठी व्यवस्था आहे.

पंचवटी धार्मिक क्षेत्र

वनवास काळात प्रभू रामचंद्राचे वास्तव्य पंचवटीमध्ये होते. साहजिकच हा परिसर पवित्र असून सर्व तीर्थक्षेत्रे येथे आहेत. गोदावरीच्या पात्रामध्ये स्नानाच्या बऱ्याच जागा असून त्यास तीर्थ व धार्मिक कुंडे म्हणतात. ही तीर्थे पुढीलप्रमाणे आहेत. पीतृ तीर्थ, गालवतीर्थ, ब्रह्मतीर्थ, ऋणमोचन तीर्थ, कण्वतीर्थ, पापनाशक तीर्थ, विश्वतीर्थ, श्रोततीर्थ, कोटीतीर्थ, अग्नीतीर्थ, शुक्लतीर्थ, अस्थिवलाय तीर्थ तसेच रामगया तीर्थ, अरुणा, सूर्य, चक्र, आश्विनी, रुद्रयोगी विष्णू, योगी, आदी तीर्थही आहेत. पंचवटीमध्ये अनेक पवित्र मंदिर असून बहुतेक प्राचीन आहेत.

काळाराम मंदिर

प्रभु रामचंद्राच्या वास्तव्याचे जागेवरील हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिरात सर्व आजूबाजूंनी ओऱ्या असून मंदिरात प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मणाच्या सुरेख मूर्ती आहेत. पूर्वेस नगारखाना असून पश्चिमेभिमुख मारुतीरायाची मुर्ती आहे. सरदार ओढेकरांनी हे मंदिर 1782 मध्ये बांधल्याचे सांगतात. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस येथे मोठा उत्सव चालतो. रामनवमीस रामजन्म थाटात साजरा होतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात याच ठिकाणी मंदिर प्रवेशाचा ऐतिहासिक सत्याग्रह झाला होता.

नारोशंकर मंदिर

गोदावरी तीरावर प्रभु रामेश्वराचे हे मंदिर नारोशंकर राजेबहादुर यांनी 1747 मध्ये बांधले. 18 व्या शतकातील उत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून मंदिराची ओळख आहे. मंदिराच्या दर्शनी प्रवेशद्वारावर मोठी घंटा टांगलेली आहे. ही घंटा पोर्तुगिजांवरील विजयाचे प्रतिक आहे.

मुक्तीधाम

नाशिक पासून 8 कि.मी अंतरावर नाशिकरोड येथे मुक्तीधाम हे कै.जयरामभाई बिटको यांनी बांधलेले मंदिर असून येथे सर्व प्रमुख देवांच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्यात गीतेचे 18 अध्याय कोरण्यात आले आहेत. भाविकांच्या निवासाची व भोजनाचीही सोय आहे.

पांडवलेणी

नाशिकच्या नैऋत्येस आग्रारोड अंजनगिरी पर्वताच्या रांगेत वर निमूळते होत गेलेले शंखाच्या आकाराचे तीन पिरॅमिडच्या आकाराचे डोंगर आहेत. लांबून ते डोंगर अग्नि ज्वालाप्रमाणे दिसतात. यावरुन त्यांना त्रिरश्यमी असे नांव पडले आहे. मध्यभागीच्या डोंगरावर पांडव लेणी आहेत. या लेणी जैन राजांनी बनविल्या असून 2000 वर्षे प्राचीन आहेत. यामध्ये 29 गूंफा आहेत. आतील भगवान गौतम बुद्धाच्या आणि बोधीसत्वाच्यामूर्ती प्रेक्षणीय आहे. पांडवलेणी नाशिकरोड रेल्वे स्थानकापासून 8 कि.मी. अंतरावर तर मध्यवर्ती बसस्थानकापासून 9 कि.मी. अंतरावर आहेत.

चांभार लेणी

नाशिकच्या उत्तरेस पाच मैलावर म्हसरूळजवळ जैनांची गजपंथी लेणी आहेत. त्याला हल्ली चांभारलेणी असे नाव प्राप्त झाले आहे. गजंपथी टेकडीच्या पायथ्याजवळील म्हसरूळ या गावी 1942 साली पारसनाथ मंदिर बांधण्यात आले. ही लेणी 11 व्या शतकात बांधली गेली असून ती जैनांच्या पवित्र तीर्थांपैकी मानली जातात. पौष महिन्यात दर रविवारी येथे यात्रा भरते.

टाकेद तीर्थ

नाशिकपासून 71 कि.मी. व इगतपुरी पासून 26.3 कि.मी. अंतरावर असलेले टाकेद हे गांव या ठिकाणी रावण सीतेला नेत असता जटायुशी युद्ध झाले ते ठिकाण आहे.

दरवर्षी टाकेद या ठिकाणी महाशिवरात्रीस मोठी यात्रा भरते.

कपिलधारा तीर्थ

इगतपुरीपासून जवळच कावनाई येथे कपिलधारा तीर्थ आहे. कपिलमुनीने अनेक वर्षे येथे तपश्वर्या केली आहे. तसेच शेगांवच्या गजानन महाराजांनी याच ठिकाणी एक वर्ष तपश्चर्या केली आहे. येथे कामाक्षी देवीचे मंदिर असून चैत्र शुद्ध पौर्णिमेस यात्रा भरते. नाशिकपासून हे अंतर 40 किमी आहे.
 

नाशिक जिल्हा 

जिल्ह्याबद्द्ल 

नाशिक जिल्हा तर तसा सर्वांच्याच परिचयाचा आहे .कारण नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्ह्यामधील एक जिल्हा असुन  .नाशिक जिल्ह्याने अनेक वेगवेगळ्या कारणाने पूर्वीपासून आपली ओळख निर्माण केलेली आहे . प्रभू श्रीरामचंद्र ज्या वेळेस १४ वर्षे वनवासाला होते .त्यावेळेस  त्यांनी  आपल्या वनवासाचे शेवटचे दिवस व्यथित करण्यासाठी नाशिक ची निवड केली होती .त्यावेळेस नाशिक ला दंडाकार्याना म्हटले जायचे. 



नाशिक नावाचा उगम आणि नाशिक चे ऐतिहासिक महत्व -

नाशिक ला पूर्वी दंडाकार्याना म्हटले जायचे . पूर्वी नाशिकपासून पुढे दक्षिण  भाग सूर होत असे . आणि असुरांचे देखील साम्राज्य इथूनच सूर होत असे . म्हणूनच राक्षसांचा नाश करण्यासाठी आपल्या गुरु च्या सांगण्यावरून प्रभू श्रीराम यांनी यांनी नाशिक ची निवड केली पूर्वीचे ( दंडाकार्याना)

आणि या ठिकाणी गोदावरीच्या तीरी एक कुटी बांधून राहत असे आता आपण त्याला पंचवटी असे म्हणतो . याच ठिकाणाहून रावणाने हे सीतेच हरण  केले होते. आणि याच ठिकाणी लक्षुमणानें रावणाची बहीण शुर्पनखाचे नाक कापले होते ,त्या नंतर नाशिक ला नाक कापले म्हणून नास्तिकापूर देखील म्हटले जायचे ,आणि नंतर नास्तिकापूरचे नाशिक झाले अशी आख्यायिका सांगण्यात येते. नाशिक च्या मधोमध गोदावरी हि नदी वाहते आणि आणि हि नदी नऊ टेकड्यांच्या मधून वाहते ,आणि टेकडीचा संस्कृत अर्थ 'शिखा 'असा देखील होतो म्हणून नाशिक ला पूर्वी नवशिखा म्हणून देखील संबोदले जायचे . पूर्वीपासून नाशिक च्या आसपासचा भाग विविध नावांनी ओळखल्या जायचे . जनस्थान ,गुलशनाबाद ,त्रिकंटक ,नासिक आणि आत्ताचे नाशिक असे पाच नावांनी नाशिक पूर्वीपासून नावारूपाला आले . 

देशातील महान अशा चार  कुंभमेळ्यांपैकी एक कुंभमेळा नाशिक च्या गोदावरी नदी तीरी म्हणजेच पंचवटी येथे भरतो . आणि येथे अनेक शाहीस्नान देखील होते ..नाशिक पासून जवळच बारा ज्योतिर्लिंग पैकी एक त्रंबकेश्वर चे  ज्योतिर्लिंग असून त्या ठिकाणी देखील कुंभमेळा भरतो . 


नाशिकची भौगोलिक माहिती -

नाशिक जिल्हा सह्याद्रीच्या दख्खन पठारावरील उतरत्या भागावरील जिल्हा आहे . या जिल्ह्यात पूर्ववाहिनी गोदावरीनदी आणि पश्चिमवाहिनी तापीनदी या नद्यांचे खोरे येत असल्याने या जिल्हाच्या उत्तरेस  दख्खन पठाराच्या भूरचनेत मोठया  प्रमाणावरती बदल हे होत असतात . सह्याद्रीची प्रमुख रांग जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडून दक्षिण भागाकडे जाते . उत्तर भागाच्या पश्चिमेस  १३००मीटरपासून पूर्वेकडे ६५० मी.  पर्यंत उंचीची सेलबारी डोंगररांग आहे .त्यामधील मांगीतुंगी डोंगराची उंची १३३१ मीटर आहे . या पर्वत रांगेत पूर्वेकडे हिंदबारी खिंडी ,थेरमाळ आणि गाळण किल्ला आहे . गाळणाकिल्याच्या टापूत रस्त्यात एक खिंड आहे . दक्षिणेस घोलबारी डोंगररांग आहेत . या रांगेची उंची १६१३ मी . असून या रांगेत घोलबारी खिंड आहे . या रांगेच्या दक्षिणेस सातमाळा किव्हा चांदवडचे डोंगररांग ( अजिंठा) आहे . हि पूर्वेकडून ईशान्यपर्यंत पसरलेली आहेत . तिची उंची ११०० ते १३५० इतकी आहे . या रांगेत सप्तशृंगीगड हा १४०० मी. उंचीचा असून अचल व  जावाता  हे किल्ले अरुंद व सपाट आहेत . या रांगेच्या दक्षिणेकडे बाणगंगा नदी दरम्यान रामशेज डोंगर आहे . त्याच्या पूर्वेकडे चांभारलेणी हि जैनलेणी आहे . सातमाळेच्या दक्षिणेकडे भास्करगड - अंजनेरी डोंगर आहेत . भास्करगडाच्या पूर्वेस हरिहर किल्ला असून त्या ठिकाणी अजून तीन वेगवेगळ्या टेकड्या आहेत त्याला त्रिरेश्मी  टेकड्या देखील म्हणतात . त्यातील एकदम पूर्वेकडील त्रिशर्थी डोंगरावरती पांडवलेणी आहे .


नाशिक मधील प्रमुख नद्या आणि धरणे 

गोदावरी हि नसिक जिल्ह्याची प्रमुख नदी असून तिचा उगम हा नाशिक मधूनच होतो आणि ती थेट बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते . तसेच नाशिक ची दुसरी सर्वात मोठी नदी आहे ती म्हणजे गिरणा नदी .या व्यतिरिक्त वैतरणा ,मोसम ,दारणा ,वालदेवी, कादवा ,देव ह्या महत्वाच्या नद्या आहेत .गोदावरी  व गिरणा नदीला बारा हि महिने पाणी असल्यामुळे नाशिकचे मोठया प्रमाणावरील क्षेत्र हे सुपीक झालेले आहेत . 

नाशिक ला धरणांचा जिल्हा देखील म्हणता ,गोदावरीच्या पाण्यावरील गंगापूर धारण हे भारतातील एकमेव मातीचे सर्वात मोठे धरण  आहे . गंगापूरचे धरणातील पाणी नाशिक ,अहमदनगर औरंगाबाद ,पेठ सुरगाणा ,येवला ,मनमाड आणि गुजरात अशा जिल्ह्याना आणि तालुक्याला पाणी पुरवते . त्याच प्रमाणे वैतरणा धरणाचे पाणी हे अर्ध्या मुंबईची तहान भागवते . या व्यतिरिक्त दारणा ,बाहुली ,अंजनेरी ,कडवा ,काश्यपी ,गिरणा ,भाम ,मुकणे ,कडवा,कानोले,केळझर,अशी अनेक छोटीमोठी ३० च्या आसपास धरणे आहेत . 


नाशिक जिल्ह्याचे हवामान आणि पाऊस 

नाशिक चे हवामान साधारण सर्व ऋतूंना पूरक असेच असते . मार्च च्या मध्यापासून जून पर्यंत उन्हाळा असतो तेव्हा साधारण उष्ण तापमान ३८ ते ४० सेल्सिअस पर्यंत असते . जून महिण्याच्या मध्यापासून ऑक्टोबर पर्यंत साधारण पाऊस हा २०००  मी .मी इतका पडतो .त्यात सुरगाणा ,इगतपुरी ,पेठ ,ह्या भागात जास्त पाऊस पडतो . नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्याच्या शेवट पर्यंत थंडी हि असते तापमान साधारण ८ ते १० सेल्सिअस इतके असते .सर्वात जास्त कमी तापमान हे निफाड तालुक्यात असते साधारण ५ ते ७ सेल्सिअस .   


लोकसंख्या ग्रामीण आणि नागरी 

२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या हि ४९,८७,३४५ असून त्यात पुरुष २५,९१,९८० व महिला २३,९५,९३४ आहेत . लोकसंख्या वाढीचा दर हा प्रत्येकी दहा वर्ष्यानी २९. % आहे जो इतर राज्यां पेक्षा ६% जास्त आहेत . 

एकूण लोकसंख्येपैकीं ६१. १७ % लोक हि खेड्यात राहतात तर एकूण शहरी लोकसंख्येपैकीं ५८. ४८% लोक नाशिक तर २३. १६% लोक मालेगाव शहरात राहतात . 

नाशिक मधील तालुके 

* कळवण       * इगतपुरी     * चांदवड      * देवळा     *सुरगाणा      *पेठ     *निफाड    *दिंडोरी 

*येवला          *सिन्नर        *नांदगाव      *सटाणा     *मालेगाव (ग्रामीण)    *त्रंबक  *नाशिक ( ग्रामीण)  


नाशिक पर्यटन 

                                      त्रंबकेश्वर मंदिर ( ३०किमी   नाशिक ) 

                                      पांडवलेणी गुफा ( १०किमी) 

                                                रामशेज किल्ला ( १५ किमी )

अंजनेरी किल्ला ( ३० किमी) 
मांगीतुंगी जैन मंदिर ( १२० किमी )
सप्तशृंगी गड ( ८० किमी )


लेणी : नाशिक मध्ये दोन लेण्या आहेत. त्यापैकि एक पांडवलेणी आणि दुसरी चांभारलेणी. लेणी म्हटले कि डोळ्यासमोर अजिंठा वेरूळ सारखी लेणी येतात, पण सर्वच ठिकाणी तशी अपेक्षा करणे योग्य नसते. लेणी 
म्हणजे डोंगरातील छोट्या गुंफा असाही अर्थ घ्यावा लागतो. या दोन्ही लेणी अशाच प्रकारच्या आहेत नाशिक 
शहरा पासून चांभार लेणी सुमारे ८ कि.मी. अंतरावर आहे, तर पांडवलेणी नवीन नाशिक बस स्थानकापासून ५ कि.मी. अंतरावर Aवर आहे. चांभार लेणी हि  जैन लोकांची असल्याने या ठिकाणी आदिनाथांची काळ्या पाषाणांची मूर्ती मुख्य आहे व इतर दोन लेण्यात जैन धर्मतीलवेगवेगळी दृश्ये मूर्ती रुपात आहेत. या ११ शतकातील लेण्यांना गाजपंठी लेणी असेही म्हणतात. या टेकडीवरून नाशिक शहराचे सुंदर दृश्य दिसते. वरती जाण्यासाठी दगडी पायर्या येथे आहेत.  
पांडवलेणी : हि लेणी प्राचीन लेणी आहे सुमारे २५०० वर्ष पूर्वीची येथे जो पाली भाषेतील शिलालेख आहे त्यावरून हि लेणी २००० वर्ष पूर्वीची असल्याचे निश्चीत समजले जाते. एकूण २४ लेणी येथे आहेत. बुधस्तुप, भिक्षूंची निवस्थाने, बुद्ध्बोधीसविता, जैन तीर्थकर ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिकादेवी यांच्या मुर्त्या , पाच पांडव सदृश्य मुर्त्या , भीमा ची गदा, कौरवमुर्त्या, इंद्रसभा,देवादिकांच्या मुर्त्या या सर्व या लेण्यात आहेत. या टेकडीवरून नाशिक शहराचे दृश्य अतिशय सुंदर दिसते. या ठिकाण चा आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य असा आहे. या ठिकाणी बाजूला मोठे स्मारक आहे. 
पर्यटनाच्या दृष्टीने नाशिक शहरामध्ये लेण्याना अनोखे महत्व लाभले आहे.      

 RAMKUND

रामकुंड: नाशिक मध्ये आल्याबरोबर बहुतेक भाविक सर्वात आधी रामकुंडावर येतात. त्यांना रामकुंडात पुण्या स्नान करण्याची आस असते. कारण रामकुंड पवित्र स्थान मानले जाते. या रामकुंडला लागुनच सीताकुंडसुधा आहे. अनेक भाविकांना याची माहिती NASTE. RAMKUNDA आता जरी बांधलेल्या स्वरुपात दिसत असले तरी रामायणकाळात गोदावरी नदीच्या प्रवाहाचा तो एक भाग होय. राम-सीता-लक्षुमन तपोवनातील आपल्या पर्ण कुतीकडून या ठिकाणी स्नानासाठी यायचे. म्हणून पुढील काळात रामकुंडला महत्व मिळाले. रामकुंडात जिवंत पाण्याचे झरे आहेत. कदाचित त्यामुळेच येथे मृतांच्या अस्थींचे विलीनीकरण सहजोते. भक्कम बांधणी, दगडी बांधणी रामकुंडाची आहे. रामकुंडाची बांधणी पेशवे काळापूर्वी म्हणजे इ.स. १६९६ साली झाली. तेव्हाचे एक सरदार चीत्राराव खटावकर यांनी ती केली आहे. पेशवे काळात रामकुंडाची चांगली दुरुस्ती केली गेली व अलीकडेच इ.स. २००५ मधेही त्यात सुधारणा करण्यात आली आहे. रामकुंडात पुण्यास्नानाबरोबर इतर धार्मिक विधी केले जातात.  येथे विविध भागातून पर्यटक येत असतात. या परिसरात पर्यटकांना मंदिरे दाखाविण्यासाठी अधिकृत बिल्लाधारक गाईड असतात. त्या साठी आवश्यक ती सेवा फी घेतात. संध्याकाळाच्या वेळी या ठिकाणी प्रसन्न वाटते. तसेच या परिसरात आसपास देवाची अनेक मंदिरे आहेत.  

सप्तशृंगी देवी

एक दैवत.


सप्तशृंगी देवी
 वणी येथे सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. सप्तशृंगी देवस्थान नाशिक पासून ५५ कि.मी अंतरावर आहे नाशिक वाणी नांदुरी असा मार्ग नांदुरी हे खेडेगाव येथेच उतरावे या गाव समोर सप्तशृंगी गड दिसतो व यात्रेकरूंच्या गर्दी मुले ते लक्षात येते. नांदुरी गाव पायथा ते सप्तशृंगी गड पथावर हे अंतर ११ कि. मी. आहे. गडपठारा पर्यंतनेता येतात स्वताचे वाहन नसल्यास येथे JEEP, NINI बसेस, उपलब्ध असतात गडावर पोचण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो. सप्तशृंगी देवीची स्थापना मार्कंडे ऋषीने केली असे समजले जाते. या गदा समोरच मार्कंडे डोंगरही आहे. सप्तशृंगी देविपीठ हे महाराष्ट्रातील  साडेतीन शक्तीपीठ पेकी आद्यपीठ मानले जाते. देवी मंदिरापर्यंत जाण्यासाठी  सुरेख व रुंद दगडी पायर्या  आहेत. शिवाय परती साठी वेगळा रस्ताही केला आहे. देवीची मूर्ती डोंगरातील खडकात असून तिचा दर्शनी भागच मुर्तीरूप आहे. देवीची मूर्ती  भव्य आहे. तिच्या अठरा हातात अठरा शस्त्रे व पायाखाली तिने  महिसासुर राक्षसाला दाबून धरले आहे. मूर्ती तेजस्वी व प्रभावी वाटते. गाड्प्थारावर शिवाल्य्तीर्थ, शीतकडा किवा सातीकडा, जुने महादेव मंदिर आहे.नवरात्रात १५ दिवस येथे मोठी यात्रा भरते व वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम सदर केले जातात. 

 रामसेज, वाघेरा, खैराई

रामसेज, वाघेरा, खैराई

नाशिक पेठ रस्त्यावरच्या जकात नाक्‍यापुढे आशेवाडी गाव आहे. आतिथ्यशील गावकऱ्यांच्या आशेवाडीत मारुतीचं प्रशस्त मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारून छोटेखानी रामसेज किल्ल्यावर चढाई करता येते. आशेवाडीच्या दिशेला दिसणारा रामसेजचा बुधला डावीकडे ठेवत पुढे गेल्यावर रामसेज किल्ल्यावर चढणाऱ्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांनी वर चढून आल्यावर गडावर प्रवेश करण्यापूर्वी रामाचं मंदिर आणि थंडगार पाण्याची टाकी आहे. मारुती ते राम, हे अंतर आहे फक्‍त एका तासाचं! रामसेज गडमाथ्यावर कोरडी पाण्याची टाकी, पडक्‍या जोत्याचे अवशेष आहेत. माथ्यावर सुस्थितीत असलेलं मंदिर आहे. त्यात वा रामाच्या मंदिरात राहण्याची सोय होऊ शकते. आशेवाडीकडला बुधला व त्याजवळच ध्वजस्तंभ ही गडफेरीत करण्याची इतर ठिकाणं. रामसेजवरून समोर प्रशस्त भोरगड दिसतो. संरक्षण यंत्रणांची रडार सिस्टिम असल्याने भोरगडावर मात्र आपल्याला प्रवेश नाही. दिसायला छोटा असणाऱ्या रामसेजवर मोठा इतिहास घडलेला आहे. मुघलांविरुद्ध तब्बल पाच वर्षं या किल्ल्याने टिकाव धरला होता. एकेक किल्ला असा पाच वर्षं लढवण्याच्या क्षमतेतच स्वराज्याचं सामर्थ्य दडलं होतं. रामसेजवरून पुन्हा नासिककडे येताना म्हसरूळनजीक जैन चांभारलेणी आहेत. वेळ असल्यास ती जरूर पाहून घ्यावीत. म्हसरूळकडून एक रस्ता थेट वाघेऱ्यापर्यंत जातो. वाघेरा घाटमाथ्यावरचं गाव आहे. गावाच्या समोरच एक मोठा बंधारा व जलाशय आहे. जलाशयाच्या पाठी उभा आहे उंच वाघेरा. वाघेऱ्याचे कडे थेट घाटाखाली उतरलेले आहेत. धरणाच्या पाण्यावर व सुपीक जमिनीवर शेती करणाऱ्या गावकऱ्यांना वाघेरा किल्ल्याचा रस्ता विचारायचा. वाघेरा जलाशयाचा बांध उजवीकडे जिथे वाघेऱ्याच्या सोंडेला चिकटलेला वाटतो, त्या डोंगरधारेवरून गडावर चढाई करायची. घाटाखाली उतरलेल्या गडाच्या उंचच उंच कातळभिंती उजवीकडे ठेवत गडाची माची गाठायची. पाठीवर सामान नसल्यास माची गाठायला एक तास पुरे. माचीवरून वाघेऱ्याचा उंच सुळकेवजा उंचवटा, गडमाथा दिसतो. दहा-एक मिनिटांच्या सोंडेवरील सपाट चालीनंतर गडाच्या सुळकेवजा गडमाथ्याला भिडायचं. इथे पाण्याची कोरडी टाकी आहेत. इथून गडमाथा गाठायला दोन वाटा आहेत. गडमाथा डावीकडे ठेवत वळसा घालून चढणारी निसरडी वाट अथवा सोपं 10 फुटांचं प्रस्तरारोहण करून सरळ वर चढणारी कातळाची वाट. कोणत्याही वाटेने गडाचा सुळकेवजा माथा गाठायचा. तिथे उघड्यावर शिवलिंग आहे. फडकणाऱ्या भगव्या झेंड्याबरोबर गड सर झाल्याबद्दल ग्रुप फोटो काढायचा. अंजनेरी, ब्रह्मगिरी आणि आजुबाजूच्या परिसरावर नजर फिरवायची आणि परतीला लागायचं. वाघेरा गावातून गडमाथा गाठायला आणि स्थलदर्शनासाठी दोन तास पुरे. गडावर पाणी नसल्याने वा सावलीसाठी झाड नसल्याने सोबत आणलेलं पाणी प्यायचं आणि आल्या वाटेने गड उतरायचा. वाघेऱ्यातून घाट उतरून हरसूल गाठायचं. हरसूवरून ओझरखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठाणापाडा आहे. ठाणापाड्याला आश्रमशाळेसमोरून खैराई किल्ल्यावर चढाई करायची. निघताना टॉर्च घ्यायला मात्र विसरायचं नाही. खैराई किल्ला फारसा प्रसिद्ध नसलेला, दुर्लक्षित. ट्रेकिंगसंबंधीच्या पुस्तकात त्याचा उल्लेख नाही. नासिकचे हेमंत पोखरणकर यांनी त्याबद्दल माहिती पुरवली म्हणून आम्ही हा किल्ला करू शकलो. आश्रमशाळेसमोरून खैराई माचीवरचा माचीपाडा गाठायला पाऊण तास पुरे. माचीपाड्यातल्या गावकऱ्यांचं आतिथ्य स्वीकारून गड चढायला लागायचं. माचीवर पोहोचल्यावर डौलदार, बहरलेलं शेत आपलं स्वागत करतं. संध्याकाळी ते पिवळं शेत सोनेरी दिसू लागतं. माचीच्या टोकाला गडाजवळ दुतर्फा घरं आहेत. लुसलुशीत कोकरांबरोबर फोटो काढून झाले की गड चढायचा. गडाला बऱ्यापैकी तटबंदी आहे. माचीपाड्याकडला बुरुज नाक्‍यासमोर ठेवून चढत राहायचा. अर्ध्या तासाने आपण एका टेपावर येऊन पोहोचतो. इथून बुरुजाकडे तुटलेल्या तटावरून गडावर प्रवेश करता येतो. अथवा बुरूज व गडमाथा उजव्या अंगाला ठेवून गडमाथ्याला वळसा घालून गडाच्या पश्‍चिमेकडून गडावर सोप्या वाटेने प्रवेश करायचा. खैराईचा गडमाथा छोटेखानीच आहे. पण मनाला प्रसन्न वाटतं. गडावर पाण्याची टाकी आहेत. त्यातलं पाणी पावसाळ्यात पिण्यास हरकत नाही. गडाच्या तटावरून गड-प्रदक्षिणा करता येते. गडावर उघड्या मंदिराकडे दोन लहान तोफा पडलेल्या आहेत. मावळतीच्या रंगात गड फारच सुंदर भासतो. मावळणाऱ्या सूर्याला दंडवत घालून अंधार पडण्यापूर्वी माचीपाडा गाठायचा. माचीपाड्यावरून सोप्या वाटेने आल्याप्रमाणे ठाणापाडा गाठायचं. स्वतःची गाडी सोबत असेल व चालणारे भिडू असतील तर एका दिवसात हे तिन्ही किल्ले पाहून मुक्कामाला त्र्यंबकेश्‍वर वा अंजनेरी गाठता येतं. वाघेरा घाटाच्या खालचा खैराई तांत्रिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यात असला तरी भौगोलिकदृष्ट्या तो ठाणे जिल्ह्यात वाटतो. नाशिक त्र्यंबकेश्‍वरच्या आसपासच्या या किल्ल्यांची सफर आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते.
- मधुकर धुरी, युथ हॉस्टेल मालाड युनिट
yhai_malad@rediffmail.com
(साभार ः सकाळ) 

 गंगाद्वारावरचा "ब्रह्मगिरी'

गंगाद्वारावरचा "ब्रह्मगिरी'
अंजनेरी, ब्रह्मगिरी पर्वतरांग दोन मोठ्या नद्यांना जन्म देते... वैतरणा आणि गोदावरी. कोकणात वाहत जाणारी वैतरणा नळाद्वारे मुंबईतल्या घराघरापर्यंत पोचते. पवित्र गोदावरी तर दक्षिणेतील फार प्रसिद्ध नदी. नाशिक, पैठण, नांदेड यांसारखी अनेक पुण्यक्षेत्रं तिच्या काठावर वसली आहेत. पहाटे लवकर त्र्यंबकेश्‍वरला यायचं. त्र्यंबकेश्‍वरला यायला नाशिक आणि जव्हारकडून उत्तम रस्ता आहे. कुंभमेळा लागणाऱ्या त्र्यंबकेश्‍वराच्या पवित्र कुशावर्त तीर्थात स्नान करायचं. ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्‍वर महादेवाचं दर्शन करायचं आणि गावापाठी उभ्या असणाऱ्या ब्रह्मगिरीकडे कूच करायची. त्र्यबंकेश्‍वराहून ब्रह्मगिरीकडे जायला प्रशस्त वाट आहे. रस्त्यात मध्येमध्ये लिंबू सरबतवाल्यांची दुकानं आहेत. ब्रह्मगिरीचा शेवटचा कातळ चढण्यासाठी रेलिंग लावलेल्या पायऱ्या आहेत. चढताना माकडांना खायला न दिलेलंच बरं, नाही तर माकडं तुम्हाला चढताना अक्षरशः खिंडीत गाठतात. तुमची झडती घेऊन खाण्याच्या वस्तू लंपास करतात. एखादी काठी सोबत ठेवलेली बरी. ब्रह्मगिरीवरून त्र्यंबकेश्‍वराचं सुरेख दर्शन होतं. ब्रह्मगिरीच्या माथ्यावर एका टोकाला आहे गोवातीर्थ. तिथे गोदामाईची मूर्ती असणारं मंदिर आहे. मंदिराच्या समोर एका कुंडामध्ये गोमुखातून पाणी पडत असतं. हे मंदिर म्हणजे गोदावरी नदीचा मूळ उगम आहे, असा समज आहे. माथ्याच्या वरच्या दुसऱ्या टोकाला आहे शंकराचं मंदिर. शंकराने गुडघे टेकवून इथे जरा आपटले होते म्हणे. गुडघ्याचे दोन खड्डे व जरा आपटल्याच्या दगडावरील खुणा पाहण्यासारख्या आहेत. 4200 फुटांहून अधिक उंच असणाऱ्या या गडावरून हरिहर, बसगड, वाघेरा, अंजनेरी सहज दिसून येतात. याशिवाय ठळकपणे नजरेत भरतो तो अप्पर वैतरणा तलाव. आल्या वाटेने त्र्यंबकेश्‍वरकडे उतरताना डावीकडे गंगाद्वार आहे, ते जरूर पाहण्यासारखं. श्रावणातल्या सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालणाऱ्या भक्तांची रीघ लागलेली असते. संत ज्ञानेश्‍वरांचे गुरू व बंधू निवृत्तीनाथांनी त्र्यबंकेश्‍वरलाच समाधी घेतली. ब्रह्मगिरीच्या जवळच असणारा अंजनीपुत्र हनुमानाचा जन्म झालेला अंजनेरी, अप्पर वैतरणा काठचा श्रीघाट तसेच नाशिकची पांडव लेणी इथून जवळच आहेत व मुद्दाम पाहण्यासारखी ही स्थळं आहेत. अंजनेरी, ब्रह्मगिरी, हरिहर, बसगड असा ट्रेकसुद्धा करण्यासारखा आहे.
मधुकर धुरी
युथ हॉस्टेल, मा

खंडोबाची टेकडी हे नाशिक शहरातील एक महत्वपूर्ण पर्यटनस्थळ आहे. नाशिक शहराच्या जवळ देवळाली, या भारतीय सैन्याची छावनी परिसरात एका छोट्याशा टेकडी वरती वसलेले आहे. 
 खंडोबाची टेकडी चा इतिहास
 खंडोबाची टेकडी चा इतिहास हा खुप पुरातनकाली असा आसुन, हे मंदिर भगवान शंकराला अर्पण आहे आशी देखील एक आख्यायिका सांगण्यात येते. अख्यायिका नुसार हे मंदिर ५०० वर्षे जुने आसुन, भगवान शंकराने खंडोबाच्या रुपाने या ठिकाणी अवतार घेतला होता.मल्लदैत्य आणि मनिदैत्य या दोन भावांनी भगवान शिव ची आराधना करून त्यांना प्रसन्न करून त्यांच्या कडून वरदान घेतले कि धरती वर कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही.असे वरदान प्राप्त होताच या दैत्य भावांनी धरती वरती साधुसंत व मणुष्य जातीवर अत्याचार करणे, कष्ट देणे,सुरू केले. हि गोष्ट जेव्हा भगवान शंकराला कळाली तेव्हा त्यांनी क्रोधित होऊन स्वंय खंडोबाचा अवतार घेतला व या दैत्याचा नाश केला. व या टेकडीवर विश्राम केला. तेव्हा पासून या टेकडीला खंडोबाची टेकडी किंवा विश्राम टेकडी देखील म्हणतात. 

खंडोबाची टेकडी ची एका कथेनुसार हि देखील अख्यायिका आहे कि छत्रपती शिवाजी महाराज उत्तर दिशेला जातांना ह्या ठिकाणी विश्रामाला थांबत असे. तेव्हाच या मंदिराची त्यांनी स्थापना केली. 

मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन हे भगूरचे आमले परिवाराकडून केले जाते . 
खंडोबाची टेकडी वरील मंदिर
मंदिरात असलेली खंडोबा, म्हाळसा आणि भानू यांची मूर्ती
मंदिरपरीसरात अनेक छोटेछोटे मंदिर हि बांधण्यात आलेली आहे. मंदिर परिसरात बांधण्यात आलेलेेे 
 साईबाबा मंदिर
खंडोबाची टेकडी वरील मंदिर च्या समोरील बाजूस एक ध्वज स्तंभ उभारण्यात आलेला आहे. 
खंडोबाची टेकडी मंदिर परिसरातील मागील कड्यावरून रोज संध्याकाळी सूर्यास्त हा स्पष्टपणे आणि मोठा दिसतो . सूर्यास्त बघण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते . 
खंडोबाची टेकडी  मंदिर पायत्याशी तेथील मंदिर व्यवस्थापनेने एक पार्क उभारलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही छानपैकी बसू शकतात . या ठिकाणी खूप शांतता असते 
 खंडोबाची टेकडी ची दरवर्षी डिसेंबर महिण्यात चंपाषष्टीला यात्रा भरते .त्या वेळेसअसंख्य भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात . भगवान या ठिकाणी भगवान खंडोबाची तळी भरली जाते व देवाला वांग्याची भरीत आणि बाजरीची भाकर असा नैवद्य देखील या ठिकाणी दिला जातो . 

तर एकदा अवश्य आपण या खंडोबाच्या टेकडीला भेट द्या . तुम्हाला नक्कीच आवडेल . 

फ्लोवर पार्क , नाशिक. Flower Park, Nashik

नाशिक मधल्या प्रेक्षणीय स्थळा पैकी एक अतिशय सुंदर आसे फ्लॉवर🌺🌻🌹🌷 पार्क. 

 
नाशिक शहरापासून अवघ्या २० किलोमीटर नाशिक- त्रंबकेश्वर हायवे रस्त्यावर असलेले अंजनेरी गावालगत फ्लोवर पार्क हे साधारण १० एकर जागेत तयार केले गेलेले आहेत.साधारण ५० लाख फुलं वापरून तयार केलेले पार्क आहे .  पण आपल्याला हे फ्लोवर पार्क या जागेवर फक्त आगस्ट ते सप्टेंबर महिन्यातच बघायला मिळू शकते. एरवी या ठिकाणी वॉटर पार्क ( waterpark ) हे नियोजित असते . 


फ्लोवर पार्क ला पोहचण्यासाठी-
फ्लोवर पार्क हे नाशिक-त्रबंकेश्वर हायवे लगत आसुन, नाशिक पासून साधारण २० किलोमीटर अंतरावर आहे. आपण आपल्या खाजगी वाहनाने देखील या ठिकाणी पोहचू शकतात . जर आपल्याला बस नि जायचे असल्यास आपण त्रंबकेश्वर ला जाणाऱ्या बस मध्ये असून ,अंजनेरी गावाच्या फाट्या वरती उतरून पायी चालत फ्लोवर  पार्क पर्यंत पोहचू शकतो . किव्हा नसिक वरून टॅक्सी ,ऑटोरिक्षा ने देखील पोहचू शकतो . 

फ्लोवर पार्क मध्ये काय -काय बघाल .-
पार्क मध्ये एंट्री करतांनाच  तुम्हाला साधारण १०० मीटर चे हृदयाच्या आकाराचे वेलकम गेट लागेल . 

या ठिकाणी आपण फुलांनी बनवलेली कार  देखील बघू शकता . जिथे आपण छान  फोटो काढू शकतो . 

झाडांच्या फांद्या छाटून तयार केलेले घोडा आणि इतर प्राणी . 






सुंदर असे पाण्याचे तळे . तेथे काही वेळ निवांत बसू शकतात आणि वेळ घालवू शकतात . 


फुलांनी  तयार केलेला मोर ,बाहुली ,हत्ती ,घर 









ऑनलाईन बुकिंगसाठी संपर्क -flowerpark nashik
संपर्क -+91 9823306300 | +91 9922608360




सालाहण कुले कन्हे राजिनि नासिककेन
सातवाहन घराण्यातील तिसरा राजा कृष्ण सातवाहन (सिमुक सातवाहनाचा भाऊ) याचा हा नासिकचा उल्लेख असणारा सर्वात जुना ज्ञात शिलालेख. हा आहे पांडवलेणीतील १४ व्या क्रमांकाच्या लेणीत. जवळजवळ २२०० वर्ष जुना, नासिकचे प्राचीनत्व सिद्ध करणारा.

नासिक हे माझे आजोळ असल्याने पांडवलेणी तशी असंख्य वेळा बघितली होतीच, पण तिचे महत्व मात्र माहित नव्हते. यावेळी ३ दिवस सुट्टी घेउन नासिकला जायचा उद्देशच होता की पांडवलेण्याची निवांत भेट. मामेभावाला घेऊन सकाळी ७ वाजताच पांडवलेणी पायथ्याला पोहोचलो. पायथ्याला दादासाहेब फाळके स्मारक आणि स्तूप उभारला आहे. १५ मिनिटांची उत्तम पायर्‍या असणारी झाडीभरली चढण चढून पांडवलेण्यांपाशी पोहोचलो. मधून मधून मोरांची केकावली ऐकू येत होती.

१. पांडवलेणीकडे जाणारी झाडीभरली वाट

वास्तविक पांडवलेणीचा आणि पांडवांचा काहिही संबंध नाही. पांडवलेणी ही सातवाहन आणि क्षत्रप कालखंडात खोदली गेली. इथल्या कोरीव मूर्तींना पांडव समजले गेले तसेच हे अद्भूत काम पांडवांशिवाय कोणीही करू शकत नाही हा पूर्वापार समज यामुळेच या बौद्ध लेणींना पांडवलेणी हे नाव पडले.

२. अशा स्वरूपाच्या काही शिल्पांमुळेच या लेण्यांना पांडवलेणी असे संबोधले गेले.

पांडवलेणीच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच प्रथम दर्शन होते ते १० व्या क्रमांकाच्या लेण्याचे. हे लेणे नहपानाचे लेणे अथवा नहपानाचा विहार म्हणूनही प्रसिद्ध आहे. स्तंभ, ओसरी, कोरीव शिल्पेम विहार, आतल्या खोल्या अशी याची रचना. ओसरीतील सबंध भिंतीवर विदेशी क्षत्रपांचे शिलालेख आहेत. क्षत्रप हे शक, ग्रीस, इराण मधून आलेले.पण इथल्या संस्कृतीत विरघळून गेलेले. त्यांचे येथील शिलालेख हे ब्राह्मी संस्कृतात असून मुख्यत्वे त्यांनी दिलेल्या दानाचे आहेत. नहपान हा इराणी शब्द असून नह म्हणजे जनता व पन म्हणजे रक्षणकर्ता. नहपान हा गौतमीपुत्र सातकर्णीच्या समकालीन.

३. नहपान विहाराचे प्रथमदर्शन

४ व ५. गज, वृषभ, सिंहशिल्पे (पाठीमागील भिंतीवर क्षत्रपांचे शिलालेख दिसत आहेत)

इथे ओसरीतील स्तंभांवर पुढील बाजूस सिंह, गज, वृषभ शिल्पे कोरलेली आहेत. पण खरी गंमत आहे ती स्तंभांच्या मागील बाजूस ओसरीतील भागात.

इथे वरच्या भागाकडे नीट निरखून पाहिले असता काहिशी वेगळी शिल्पे दिसतात. शिर गरूडाचे आणि शरीर सिंहाचे अशी ही प्रतिमा. हा आहे ग्रिफिन, एक ग्रीक उपदेवता.

६ व ७. ग्रिफिन

पुढच्या स्तंभावर तर अजून एक आश्चर्यचकित करणारे शिल्प सामोरे येते. हे शिल्प आहे मानवी शिर असणारे आणि शरीर मात्र सिंहाचे. तोच तो इजिप्तच्या पिरॅमिडजवळ असणारा चिरपरिचित स्फिंक्स.
स्फिंक्स आणि ग्रिफिन या दोन्ही प्राचीन ग्रीक दंतकथांमधील देवता. त्यांचा पांडवलेणीतील समावेश दाखवतो तो प्राचीन काळात चालत असलेल्या पाश्चिमात्यांबरोबर चालत असणार्‍या व्यापाराचा पुरावाच. व्यापार्‍यांबरोबरच संस्कृतींमधला प्रवास, आदानप्रदानही इथे अधोरेखीत होते.

८,९, व १० स्फिंक्स

हे सर्व पाहून विहारात प्रवेश केला, हा विहार प्रशस्त, बरेच कक्ष असलेला व कसलाही आधार नसलेला. सभांडपात समोरच्या भिंतीवर स्तूपाची रचना आणि त्याच्या आजूबाजूला काही मूर्ती कोरल्या आहेत. महाराष्ट्रातील, किंबहुना भारतातील हा लेण्याद्रीनंतरचा सर्वात मोठा विहार. विहारातून बाहेर आलो, ह्या नहपान विहाराच्या आजूबाजूला काही दुमजली विहार आहेत व जवळच चैत्यगृहही आहे.

११. नहपान विहाराचा अंतर्भाग.

आता पाहणार होतो ते गौतमीपुत्र सातकर्णीच्या पराक्रमाची यशोगाथा असलेले ३ र्‍या क्रमाकांचे महाराष्ट्रातील कदाचित सर्वात महत्वाचे असे देवीलेणे. हे लेणे खोदवले आहे ते गौतमीपुत्राची माता गौतमी बलश्री हिने आणि तिचा पौत्र वासिष्ठिपुत्र पुळुवामी याने. गौतमी बलश्री स्वतःला महादेवी म्हणवून घेत असे म्हणूनही हे देवीलेणे.

१२. देवीलेणीचे मुखदर्शन

इथल्याही स्तंभांवर ग्रिफिन, गज, वृषभ शिल्पे कोरलेली आहेत. या सर्व स्तंभांच्या दर्शनी बाजूवर चौथर्‍याच्या खाली भारवाहक यक्ष कोरलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर रथाचे ओढायचे आडवे खांब कोरलेले आहेत जणू हा लेणीरूपी रथच ते आपल्या खांद्यांवर वाहात आहेत.

१३. लेणीचा भार वाहणारे यक्ष

१४.

इथेही ओसरीतल्या भिंतीवर गौतमी बलश्रीने कोरलेले गौतमीपुत्र सातकर्णीची महती सांगणारे शिलालेख आहेत ज्यांचा महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या शिलालेखांमध्ये समावेश होतो.

गौतमीपुत्र सातकर्णी हा त्याकाळचा भारतातील सर्वात सामर्थ्यवान राजा. त्याच्या उदयाच्या वेळी सातवाहन साम्राज्य क्षीण झाले होते, जुन्नर, नासिक इ. बहुतांश भाग क्षत्रपांनी गिळंकृत केला होता. गौतमीपुत्राने नहपान क्षत्रपाच्या विरोधात जोरदार आघाडी उघडून नासिक जवळच्या सह्याद्री रांगांमध्ये त्याचा संपूर्ण पराभव केला त्याचे शिलालेख या लेणीमध्ये कोरले गेलेले आहेत.हे युद्ध अतिसंहारक झालेले दिसते कारण यात नहपानाचे संपूर्ण क्षहरात कूळ नष्ट झाले. म्हणूनच उएथील शिलालेखात त्याला 'क्षहरात वंस निर्वंस करस' असे म्हटले आहे. त्याने नहपानाकडून जिंकलेल्या भूप्रदेशाचे वर्णनही प्रस्तुत शिलालेखात देण्यात आलेले आहे. तो प्रदेश म्हणजे अपरांत (उ. कोकण), अश्मक(नांदेड), मूलक(औरंगाबाद, बीड), ऋषिक (खानदेश), विदर्भ, सेटगिरी (जुन्नर), कृष्णागिरी (कान्हेरी), सह्याद्री, कुकुर (आग्नेय राजस्थान), आकारवंती (माळवा), अनूप (मध्यप्रदेश), पारियात्र(अबू पर्वत), सौराष्ट्र, विंध्य, श्रीशैल, मलय, महेंद्र (ओरीसा) इ. या शिवाय कर्नाटक, आंध्र मधील जवळजवळ सर्वच प्रदेश त्याच्या ताब्यात होता.
त्याकाळी त्याच्या इतका सामर्थ्यवान राजा भारतात दुसरा नव्हता. सातवाहनांचा मूलप्रदेश नहपानाच्या हातून जिंकून घेऊन त्याने सातवाहनांची प्रतिष्ठा वाढवली म्हणून त्याचा 'सातवाहन यश प्रतिष्ठा करस'
असा गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. 'ती समुद्द तोय पीतवाहन' म्हणजे ज्याची घोडी तीन समुद्रांचे पाणी पितात असाही उल्लेख येथे केला गेला आहे. उत्तरेकडील मोहिमेत गौतमीपुत्राने शक, यवन, पल्हव राज्यकर्त्यांचा पराभव केला म्हणून त्याला 'शक यवन पल्हव निदुसनस' असा उल्लेखही येथील शिलालेखात केला गेला आहे. सातवाहन राजे ब्राह्मण असून कट्टर वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. गौतमीपुत्र सातकर्णी स्वत:ला येथील शिलालेखात 'ब्राह्मणनस' म्हणवतो. क्षत्रियांचे निर्दालन केल्याने त्याला 'खतियदपमानदमन ' असेही येथे म्हटले आहे.

१५. गौतमी बलश्रीचा शिलालेख

गौतमीपुत्राची माता गौतमी बलश्री येथील शिलालेखात आपल्या पुत्राचे मोठे लोभस वर्णन करते-
गौतमीपुत्र हा धीर-गंभीर वृत्तीचा असून शरीराने भक्कम आहे. त्याचे मुखकमल पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे असून चाल हत्तीसारखी गंभीर आहे. त्याचे बाहू शेषाप्रमाणे पुष्ट आहेत. तो शूर तसेच नितीवानही आहे. पौरजनांच्या सुखदु:खात तो सदैव रममाण होत असून त्यांना संकटांमध्ये साहाय्य करत असे. त्याने प्रजेवर योग्य तेच कर लावले असून त्याने वर्णसंकर बंद केला आहे. स्वजातीची तो निष्ठेने जपणूक करत आहे, त्याने शत्रुलाही क्षमा केली आहे.

वरील शिलालेख गौतमीपुत्राच्या मृत्युंनतर गौतमी बलश्रीच्या वृद्धपणी गौतमीपुत्राचा मुलगा वासिष्ठीपुत्र पुळुवामीकडून तिने खोदवून घेतला आहे.

१६. गौतमीपुत्राने पाडलेले अस्सल चांदीचे नाणे जे त्याच्या स्वरूपावर प्रकाश टाकते. (विकिपेडीयावरून साभार)

याच शिलालेखांखाली गौतमीपुत्र सातकर्णीची पराक्रमगाथा शिल्पस्वरूपात कोरलेली आहे.
हा एक शिल्पपटच आहे.
या देखाव्यात डावीकडील पट्टीवर एक प्रेमी युगुल दाखवले असून ते गौतमीपुत्राचा पिता व सातवाहन राज्यलक्ष्मी यांचे रूपक आहे. यावरील पटात एक तरूण त्या स्त्रीचा अनुनय करताना व त्यापुढील शिल्पात तो तिला बळजबरीने उचलून नेताना दाखवला आहे. म्हणजे नहपान क्षत्रपाने सातवाहन राज्याचे हरण केले आहे.यापुढील शिल्पांमध्ये दुसरा तरूण त्या तरूणाकडून स्त्रीला खेचून परत आणताना दाखवला आहे. म्हणजे गौतमीपुत्राने गेलेले सातवाहन राज्य नहपानाकडून परत मिळवले. हा पट पुढे असाच दाखवला असून गौतमीपुत्राच्या निधनानंतर पुळुमावीने सातवाहन राज्यश्रीचे कसे निष्ठेने पालन केले ते दाखवले आहे.

१७ व १८.

१९ व २०

२० व २१ . शिल्पपटाचे संपूर्ण दर्शन

हे सर्व डोळ्यांत भरून पाहातच विहाराच्या आतमध्ये गेलो. हाही एक प्रशस्त विहार. याच्या आत काही कक्ष असून समोरील भिंतीवर स्तूपाची प्रतिमा कोरलेली आहे. या स्तूपाच्या बाजूस स्त्री प्रतिमा. यातील डावीकडील नमस्कार करत आहे तर उजवीकडील या स्तूपावर चवरी ढाळत आहे. वर गंधर्व विहार करताना दाखवले आहेत.

२२. देवीलेणीचा अंतर्भाग

विहारातील स्तूपाची रचना

हे सर्व पाहातच बाहेर आलो व आजूबाजूची लेणी पाहायला लागलो.

क्रमशः

हा भाग प्रवासवर्णन आणि इतिहास यांची नीटशी सांगड घालता न आल्यामुळे विस्कळीत झाला आहे तरी आपण तो गोड मानून घ्यावा. पुढील भागात पांडवलेण्यातील इतर लेण्यांचे फक्त फोटो व थोडेसेच वर्णन टाकेन.

 गेल्याबरोबर आपल्याला दहा क्रमांकाची लेणीचं दर्शन होतं. अर्रर्र...लेणीत तर काहीच नाही, असं इथे पाहिल्याबरोबर वाटायला लागतं. पांडव लेणी बघायला जाण्यापूर्वी वल्लीशेठचा हा लेख मोबाईलवर उघडून मग लेणी बघायला पाहिजे. आमच्या दुर्दैवाने मिपा त्या दिवशी बंद होतं. मला वल्ली सारखं निरखून बघता आलं नाही. मला ना शिलालेख दिसले ना ते ग्रीफिन दिसले. मला गौतमबुद्धांच्या मुर्त्या, धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा, चैत्य, महापरिनिर्वाणाचे शिल्प असे ठळक ठळक ओळखू आले. वल्लीशेठचा लेख वाचल्यावर मग एकेक शिल्पाची ओळख व्हायला लागते. बाकी, ते अवलोकितेश्वर, उषवदत्ता, चक्र, त्रिरत्न, वेगवेगळी प्रतिके, शिलालेख हे फक्त वल्लीला दिसतं. आपण पाहिलं ते नहापान विहार वगैरे हेही वल्लीशेठच्या कृपेने कळतं. बाकी, फोटो टाकतो. माहिती वल्लीशेठच देतील.

पांडव लेणी पाहुन फाळकेस्मारकालाही भेट दिली

 

नासिक लेण्यांतील महत्वाची अशी सातवाहनांची देवीलेणी आणि क्षत्रपांचा नहपान विहार सुरुवातीला पाहून मग इथल्या चैत्यगृहाकडे निघालो.
महाराष्ट्रातील इतर लेण्यांप्रमाणेच इथेही एकमेव चैत्यगृह आणि बाकीचे विहार अशी रचना. पिंपळपानाकृती कमान हे सर्वच चैत्यगृहांचे वैशिष्ट्य. गौतम बुद्धाला गयेत अश्वस्थ वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले त्याचे प्रतिक म्हणून ही रचना कोरली जाते.
इथल्या चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारावर ही कमान एकावर एक अशी दुहेरी स्वरूपात कोरलेली आहे. फुलाफुलांचे अतिशय नाजूक असे नक्षिकाम, त्यावर बौद्धांचे त्रिरत्न चिन्ह व त्याभोवतीने हत्ती, घोडे इ. प्राणी मोठ्या खुबीने कोरलेले आहेत.
चैत्यगृहावर नेहमीप्रमाणेच कोरलेले यक्ष, गवाक्षांनी केलेला त्रिमितीय आभास, स्तूपांची रचना हे सर्व आहेतच.
चैत्यगृहापाशीच एक शिलालेख आहे.

रञोअमस अरहलयस चालिसलनकस दुहुतुया महाहकुसि-
रिया भतपालिकाया रञोअमस अगियतनकस भदकरिका-
यासा भारिया कपननकमातुय चेतियघरम पावते-
तिरुन्हुमी निठपपित

याचा अर्थ
राजअमात्य चालिसलनाकाची पुत्री, अग्नित्राण भदकरिकाची पत्नी आणि कपननकाची माता महाहकुश्री भट्टपालिकेने हे चैत्यगृह त्रिरश्मी पर्वतावर स्थापित केले आहे.

भट्टपालिका ही नाणेघाटात उल्लेख आलेल्या नागनिकेचा मुलगा महाहकुश्री याची नात असे मानले जाते. याचा अर्थ हे चैत्यगृह क्षत्रप व गौतमीपुत्राच्या आधीचे.

चैत्यगृहात १६ सालंकृत खांबावर तोलले गेलेले गजपृष्ठाकृती छत, मधोमध वाटोळा गुळगुळीत स्तूप, स्तूपाची हर्मिका. इथे छताला लाकडी फासळ्या शिल्लक नाहीत पण त्यांच्या खाचा त्यांचे पूर्वीचे अस्तित्व दाखवतात. खांबांवरही काही शिलालेख कोरलेले आहेत.

१. चैत्यगृहाचे मुखदर्शन

२. पिंपळपानाकृती कमान व वरील स्तूप-गवाक्षांची रचना

३. कमानीवरील सुरेख ऩक्षीकाम

४.स्तंभांसहीत असलेला स्तूप

यानंतरचा एक मोठा विहार यज्ञविहार म्हणून ओळखला जातो, इथे यज्ञश्री सातकर्णीचा शिलालेख आहे. हा विहार अतिशय प्रशस्त असून आतमध्ये गर्भगृह खोदलेले आहे तिथे भगवान बुद्धाची भव्य बैठी मूर्ती आहे. स्तंभांवर नाजूक नक्षीकाम.

५. यज्ञ विहार

६. यज्ञविहारातील सिंहासनारूढ बुद्धमूर्ती

७. यज्ञविहारातील सालंकृत स्तंभ

यांनतरचे जवळजवळ प्रत्येक दालन विविध शिल्पांनी भरलेले आहे. दुमजली विहार, कधी मधूनच जैन कला तीर्थंकरांच्या मूर्तींसह भेटीस येते तर कधी बुद्धाच्या विविध प्रतिमा त्यांच्या अनुयायांसह कोरलेल्या दिसतात. काही सिंहासनारूढ, पद्मपाणी, शयनआसनावर आरूढ झालेल्या ह्या बुद्धांच्या चेहर्‍यावरील भावही बदलणारे, कधी शांत, कधी ध्यानस्थ योग्याचा भाव, काही ठिकाणी अर्धोन्मिलित भाव तर काही ठिकाणी प्रसन्न मुद्रा. त्यांच्या भोवती नाग, अश्व, इ. प्रतिमा, बाजूला चामर ढाळणारे सेवक, अवकाशातून पुष्पमाला घेउन आलेले गंधर्व अशी विविध शिल्पे पाहून अक्षरशः थक्क व्हायला होते.

८. दुमजली विहार

९. विहार

१०. विहार

११. लेणीमार्ग

१२. विविध भावमुद्रेतील बुद्धमूर्ती

१३.

१४.

१५.

१६.

या सर्व शिल्पांच्या बरोबरीने ब्राह्मी लिपीतले लेखही आपल्याला दिसत असतात.
त्यापैकी काही लेखांची थोडक्यात माहिती देतो.

सिधम सकस दमचिकस लेखकस वुधिकस
विण्हुदतपुतस दसपुरावथस लेणम पोढियो-
चा दो अतो एक पोढि या अपरा--सा मि माता
पितरो उदिसा

शक दमचिकाचा लेखक आणि दशपुराचा रहिवासी विष्णुदत्ताचा पुत्र वुधिकाने एक लेणे आणि दोन पाण्याची टाकी पैकी एक आपल्या माता पितरांसाठी (भेट)दिले आहे

लेणी शब्दाचे प्राचीनत्व इथे दिसून येते. पोढि म्हणजे पाण्याची टाकी त्याचाच अपभ्रंश होऊन (पाण)पोई असा आजचा शब्द रूढ झाला. लेखक ह्या शब्दाचा उल्लेखही येथे महत्वाचा आहे.

अजून एका शिलालेखात यवनांचा पण उल्लेख आला आहे.

सिधम उतरहासा दमतमितियकस योनकस धम्मदेवपुतस इदग्निदतस धम्मतमा
इमा लेणम पावते तिरण्हुमी खनितम अभमतरम च लेणस चेतियघरो पोढियो च मातापि-
तरो उदिस इमा लेणम सवबुधपुजय चतुदिसा भिक्खुसंघसा नियतितम
सह पुतेना धम्मरक्सिता

उत्तरेतील दंतमित्रीचा रहिवासी, धर्मदेवाचा पुत्र, यवन इंद्राग्निदत्त याने त्रिरश्मी पर्वतावरील एका चैत्यगृहानजीकच्या लेण्यात माता पितरांच्या स्मरणार्थ पाण्याची टाकी खोदलेली आहेत. आणि हे लेणे सर्व बौद्धांच्या पुजेसाठी चार दिशांनी आलेले बौद्धसंघां आणि त्याचा पुत्र धर्मरक्षित याने एकत्रितरित्या बांधले आहे.

यवन म्हणजे ग्रीक लोक. इथे येउन स्थायिक झालेल्या यवनांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता हे यावरून सिद्ध होते.

अजूनही असे दातृत्वाचे बरेच शिलालेख या ठिकाणी आहेत.

१७. एक शिलालेख.

शेवटच्या २४ व्या क्रमांकाच्या लेण्यात एका घुबडाचे शिल्प कोरलेले आहे. घुबड आपल्याकडे अपवित्र मानले जाते पण ग्रीकांमधे घुबड देवस्वरूप. ग्रीक उपदेवता अथेनाचे हे शिल्प त्याकाळच्या संस्कृतीवर असलेल्या ग्रीक प्रभावाचेच हे द्योतक.

१८. पांडवलेणीतून होणारे नासिकचे विहंगम दर्शन

एकूण २४ लेण्यांची ही माळ शिलालेखांनी, शिल्पांनी, देखण्या ऩक्षीकामाने सालंकृत झालेली आहे. सातवाहन, क्षत्रप, परत सातवाहन परत क्षत्रप अशी विविध स्थित्यंतरे या लेणीने पाहिली आहेत पण एकानेही दुसर्‍याचे बांधकाम उद्धस्त केले नाही. सातवाहन वैदिक, नहपानाच्या काळातील धर्मविहिन क्षत्रप आणि लेणी मात्र बौद्ध, जैन. सुरुवातीची हिनयान आणि नंतरची महायान. अशा विविध संस्कृतींचा संगम असलेली पांडवलेणी त्यांच्या अद्भूत शिल्पकलेसाठी बघायलाच हवीत.

 

पंचरथी मंदिराचं देवळी कराड

रमेश पडवळ

नाशिकमधील प्रत्येक मंदिर आपली वेगळी परिभाषा सांगताना दिसतं. कोणी आपल्या वयानं, शैलीनं ओळखलं जातं. तर कोणी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्यानं नटलेलं असतं, तर कोणी इतिहास सांगत असतं. कळवण तालुक्यातील देवळी कराड हे गाव अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण अशा पंचरथी मंदिराने नटलेलं आहे.

मानवाची मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृतीचे आध्यात्मिक अंग आणि भौतिक सृष्टी वा वास्तूरूप सृष्टी म्हणजे आधिभौतिक अंग. पहिल्यात धर्म, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, राजनीती, साहित्य आणि कला यांचा समावेश होतो, तर दुसऱ्यात ऐहिक स्वास्थासाठी निर्माण केलेल्या वस्तूंचा समावेश होतो. तसेच नाशिकच्या मनोमय सृष्टीतील प्राचीन कलावैभवाच्या पाऊलखुणा प्रत्येक गावांमध्ये विखुरलेल्या दिसतात. प्राचीन लेणी, किल्ले, वाडे, मंदिरे, शिल्पे, नाणी, शिलालेख, बारव, वीरगळी अशा अनेक लहानमोठ्या कलाकृतींचा अनुभव पावलोपावली घेता येतो. या सर्वांतून माणसाचं जगणही उलगडतं. समाजपुरूषाचा देह आणि त्याचा आत्मा याचे यथार्थ ज्ञान व्हायचे तर त्याची आधिभौतिक आणि आध्यात्मिक संरचना कशी आहे हे उलगडून पाहणे गरजेच ठरते. आत्माशिवाय देह जसा सचेतन असूच शकत नाही तसेच आधिभौतिक अंगाशिवाय केवळ आध्यात्मिक समृद्धीमुळे संस्कृती संपन्न ठरत नाही. संस्कृतीचा सर्वार्थाने विचार करावयाचा असेल तर या दोन्ही घटकांचा विचार आवश्यक असतो.

प्राचीन भारतीय स्थापत्याचा, शिल्पांचा आणि चित्रांचा उपयोग आधिभौतिक संस्कृती समजण्यासाठी होतो. एवढेच नव्हे तर मंदिर-स्थापत्य आणि मूर्तिशिल्पांतून त्या समाजाची आध्यात्म‌कि बाजूही समोर येते. ही मंदिरे इतिहासाचं अंतरंग उलगडत असतात. म्हणून हा वारसा जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हा वारसा हरवला तर आपलं आधिभौतिक आणि आध्यात्मिक संरचनाच उलगडली जाणार नाही अन् माणसानं ही मंदिरे का बांधली याचं कोडही कधी उलगडलं जाणार नाही. म्हणूनच कळवण तालुक्यातील देवळी कराड (कऱ्हाड) हे गाव मनाला भुरळ घालतं. या गावातील महादेव मंदिर एका अनोख्या शिल्पसौंदर्याचा साक्षीदार असल्याचा पुरावा देतं. नागर शैलीतील हे मंदिर फक्त मंदिर नाही तर ग्रामस्थांच्या दृष्टीने हा एक रथ आहे. या रथाला पंचरथ अथवा पंचरथी असेही ते म्हणतात. देव एखाद्या रथावरून स्वार होण्यासाठी सज्ज झाल्याचा भास या मंदिराकडे पाहिला की होतो. मूळात रथ ही संकल्पना शिखराच्या निमुळत्या होत जात असलेल्या शैलीच्या थरावरून जरी ठरत असली तरी ग्रामस्थांच्या पंचरथ या अनोख्या संकल्पनेला दादच द्यावी लागते, म्हणूनच देवळी कराडची सफर शिल्पसौंदर्याने नटलेली ठरते.

नाशिकहून दिंडोरी मार्गे वणीत जायचे. वणीतून एक रस्ता सप्तशृंगीकडे जातो, तर दुसरा सापूताऱ्याच्या दिशेने हतगडकडे. वीस किलोमीटर गेल्यावर हतगडपूर्वी बोरगाव लागतं. बोरगावातून उजव्या हाताला खिराड गावाकडे जाणारा रस्त्याने देवळी कराड (कऱ्हाड) कडे जाता येतं. जागोजागी रस्त्याला फाटे असल्याने विचारत विचारत जाणे कधीही योग्य. देवळी कराडमध्ये शिरताना लांबून काळ्याभोर शिखरावर भगवा फडकताना पाहिला की जीव भांड्यात पडतो. योग्य ठिकाणी अखेर पोहचल्याची ही खूण मनाला दिलासा देते. गावातून उजव्या हाताच्या रस्त्याने थेट मंदिरासमोरील पिंपळाच्या बलाढ्य झाडाच्या छायेत आपण पोहचतो. धाकट्या भावाप्रमाणे हे झाड या मंदिराचा सांभाळ करीत असेल, असे त्या वृक्षाच्या विस्ताराकडे पाहिले की वाटायला लागते. नाशिक परिसरात भूमिज शैलीतील मंदिरे सर्वाधिक आहेत. मात्र नागर शैलीतील मंदिरे तशी कमीच आढळतात. त्यामुळे देवळी कराडचे नागर शैलीतील चांगल्या स्थितीतील महादेव मंदिर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. हे मंदिर राज्य पुरातत्त्व विभागाने संरक्षित घोषित केले आहे. मात्र या मंदिराच्या शैलीबद्दल कोणताही फलक नसल्याने येथील ग्रामस्थ या मंदिराला हेमाडपंती मंदिर असेच म्हणतात.

नागर शैलीतील या मंदिराचे वैशिष्ट्य ‘प्रासादमंडन’ या प्राचीन संस्कृत ग्रंथातील तृतीय अध्यायात दिलेली आहेत. यातील पंचरथी मंदिराच्या संकल्पनेत हे मंदिर तंतोतंत बसते. पीठ, मध्यमपीठ, कनिष्ठ पीठ, जाड्यकुंभ, कर्णिका, ग्रासपट्टी, गजथर, नरथर, अश्वथर आदी संकल्पना स्पष्ट होतात. या मंदिरावर माजी पुरातत्त्व अधिकारी शंकर साठे यांनी प्रसिद्ध केलेल्या संशोधन निबंधातही याचे हे अनोखे वर्णन प्रत्यक्ष अनुभवताना प्राचीन वास्तूशास्त्रज्ज्ञांचे नवल वाटते. कोणत्याही आधुनिक उपकरणांशिवाय साकारलेले मंदिर हातांनी साकारलेले असेल यावर विश्वास बसत नाही. प्रथम दर्शनीच हे मंदिर रथासारखे भासते. नागरशैलीच्या वैशिष्ट्यांमध्ये शृंग, उरशृंग किंवा अंग, प्रत्यंग, रथिका (कोनाडे), शुकनात आणि शेवटी कलशासह आमलक हे सर्वकाही देवळी कराडच्या मंदिरात पहायला मिळते. मंदिराचे छत हे संवरणा पद्धतीचे असून, ते आकाशाकडे निमुळते होत जाणारे आहे. तर गर्भगृहाचे शिखर आमलक व कलशाने आच्छादिले असल्याने हे मंदिर नागर शैलीचे असल्याचे शंकर साठे सांगतात. मात्र या मंदिरावर गुजराती शैलीचा प्रभावही दिसतो. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने हे मंदिर जपण्यासाठी प्रयत्न करायला हवेत; तसेच ग्रामस्थांना देखील मंदिराचे महत्त्व समजावून सांगायला हवे, असेही ते सांगतात. गुजरात सीमेपासून जवळ हे गाव असल्याने त्यावेळी ज्या कोणी राजाने हे मंदिर बांधून घेतले असेल त्यावेळी गुजरातच्या कामगारांचा या सहभाग असेल, असे म्हणायला जागा आहे. म्हणूनच हे मंदिर पाहताना त्याच्या सर्व बारकाव्यांवर नजर टाकणे गरजेचे ठरते.

महादेव मंदिरात प्रवेश करताना चार-पाच पायऱ्या चढून गेल्यावर आपण अर्धमंडपात येतो. अर्धमंडपात डावी-उजवीकडे कठडा आहे. वर निमुळते छत असून, चौकोनी स्तंभ त्याला आधार देत उभे आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर डावी उजवीकडे शैवद्वारपाल आपले स्वागत करतात. मंदिराला एकूण तीन द्वारशाखा आहेत. पैकी एक स्तंभनक्षीची आहे. तिच्या माथ्यावर गणेशपट्टी असून, त्यावर अस्पष्ट झालेली गणेश प्रतिमा आहे. मंदिराचे सभामंडप गूढमंडप म्हणजे बंदिस्त आहे. अगदी साध्या स्वरूपाचे सभामंडप असून, शिल्पांनी नटलेले खांबांवर ते आधारलेले आहे. स्तभांवर कीर्तिमुख, घटपल्लव कोरलेली आहेत तर किचकाने स्तंभाला आधार देत छत पेलले आहे. सभामंडपातून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळ म्हणजे सभामंडप व गर्भगृह (गाभारा) यांच्यामधली जागा. प्रामुख्याने अंतराळ हे छत विरहित असते. मात्र येथे छत असून, त्यावर शुकनास आहे. अंतराळाच्या वर गर्भगृहाला जोडून पोपटाच्या शुकाच्या चोचीसारखे जे बांधकाम असते त्याला शुकनास असे म्हणतात. नागर शैलीचे हे आणखी एक वैशिष्ट्य असल्याचे शंकर साठे सांगतात.

अंतराळाच्या दोन्ही बाजूंना मूर्तीविरहीत कोनाडे आहेत. अंतराळाचा गुंग करणारा सोहळा अनुभवून गर्भगृहात प्रवेश करायला. गर्भगृहात जाण्यासाठी तीन-चार पायऱ्या उतरून जावे लागते. गर्भगृहाच्या मध्यभागी शिवपींड तर समोरच्या देवळीवजा कोनाड्यात गणपती व उमामहेश्वराच्या मूर्ती आहेत. उमामहेश्वरांची मूर्ती सुंदर आहे. गर्भगृहात पूर्वी विह‌रिीसारखा खोल खड्डा होता, असे दशरथ गांगुर्डे व महेंद्र चौथरी सांगतात. हा खड्डा नंतर बुजविण्यात आला. येथून जाण्यासाठी बोगदाही होता, असेही ग्रामस्थ सांगतात. मात्र आता ना बोगदा आहे नाही पाणी. महादेव मंदिर आतून जेवढे सुंदर तेवढेच बाहेरूनही आहे. पीठ, उपपीठ, पद्मपट्ट, अधोजाड्यकुंभ, कणी, कीर्तिमुख व मिथुन शिल्प अनुभवायला मिळतात. मंदिराच्या बाहेरील बाजूस प्रामुख्याने मूर्ती असतात; मात्र या मंदिराला भौमेतिक नक्षी आहे. मंदिर पाहून पिंपळाच्या झाडाकडे आपला मोर्चा वळवायचा. या पिंपळाची मुळे गावभर पसरलेली आहेत, असे ग्रामस्थ सांगतात. झाडाखाली काही मूर्ती व एक वीरगळ पहायला मिळेल. या वीरगळीकडे जरा निरखून पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराज शिवपिंडीसमोर हात जोडून एक गुडघा जमिनीला टेकवून बसल्याचे पहायला मिळते.

तर शिवपिंडीवर चंद्र व सूर्य कोरण्यात आले आहेत. वीरगळीच्या दुसऱ्या बाजूला शिवधनुष्य पेललेला सैनिक व समोर शत्रू असे कोरण्यात आले आहे. तर तिसऱ्या बाजूला आडवा पडलेला मनुष्य दाखविण्यात आला आहे. छत्रपतींसारखी दिसणारी प्रतिमा आणि कळवणचा काय संबंध असाही प्रश्न पडतो अन् हतगड किल्ल्यामुळे हा प्रश्न सुटतोही. छत्रपतींनी सुरत लुटी दरम्यान या मार्गाने ये-जा केल्याने त्यांच्या सैनिकाची ही वीरगळ असावी, असे त्यावरील चित्रांवरून वाटते. देवळी कराड असे गावचे नाव का पडले असेल याचे उत्तर महादेव कोळी व कोकणा आदिवासींकडे नाही. हा समाज नंतरच्या काळात येथे स्थलांतरीत होऊन आला असणार; मात्र कराडला देवळी हे नाव मंदिरावरून पडले असेल, हे स्पष्टच आहे. देवळी कराडकरांचा महाशिवरात्री हा मुख्य उत्सव. या उत्सवात बोहाडा साजरा केला जातो. यासाठी जवळच्याच अस्तमाळ या गावातून सोंगं आणली जातात. ही परंपरा अजूनही कराडकरांनी जपली आहे. आगारीचा पाडवा म्हणजेच अक्षय्यतृतीयेला आदिवासी मंडळी आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पूजापाठ करतात. यावेळी शिजविलेल्या भाताचे शिंतोडे घरावर व चुलीत टाकण्याची परंपरा आहे. तसेच डोंगरी देवाचा उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवात मिरवणूक काढली जाते. गावातील चावडी ते धानीपर्यंत पालखी खांद्यावर काढली जाते. गावात मारूती मंदिरही आहे. पूर्वमुखी महादेव मंदिरासमोर व उजव्या हाताला देवळी कराड वसलं आहे. मातीची लहान लहान घरे, घरासमोर बैलगाडी अन् शेतीचे अवजारे लक्ष वेधून घेतात. देवळी कराडचं मुख्य आकर्षण महादेव मंदिर असल्याने ‘आमच्या कडं देवाशिवाय काय बी नाय’ असे ग्रामस्थ सांगतात.

मंदिरं कशी निर्माण झाली असतील. याचा एक नमुना देवळी कराडपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले देवळी नावाच्या गावात पहायला मिळतो. या गावाला देवळी वणी असेही म्हणतात. हे गाव तेव्हा वणी संस्थानच्या अंतर्गत असल्याने गावाला देवळी वणी म्हटले गेले असावे. या गावात मंदिराच्या गर्भगृहाचीच बांधणी झालेला दगडांचा ढाचा आहे. हा ढाचा पाहिला की, येथेही देवळीकराडसारखं मंदिर उभे राहण्याच्या तयारीत होते; मात्र ते अचानक बंद पडलं असावे असे वाटते. या ढाच्यामुळे मंदिराची निर्मिती होत असताना पहिल्यांदा गर्भगृह कसा आकार घेत असेल हे पहायला मिळतं. देवळी गावातील हनुमान मंदिराच्या शेजारी पाच फूट उंचीच्या वीरगळींचा समूह सोहळा अनुभवणे हा देखील अनोखा अनुभव ठरतो. त्यावरील सैनिकांची शिल्पे आपल्याला युद्धभूमीची आठवण करून देतात. वीरगळींच्या शेजारीदेखील दगडी बांधणीचे मोठे मंदिर असेल, असे आजूबाजूला पडलेल्या मंदिराच्या अवशेषांवरून लक्षात येते.

देवळी कराड असो वा देवळी हे गाव. ही गावे खरेतर लहान-लहान आदिवासी पाडी आहेत. ती नंतरच्या काळात वसली; मात्र त्यापूर्वी हा परिसर मोठा इतिहास घेऊन जगत असणार यात शंका नाही. याच इतिहासाच्या या पाऊलखुणा जपण्याची गरज आहे. तरच नाशिकच्या इतिहासाची कवाडे कायम खुली राहतील, अन्यथा आपण एकएक करून सर्वकाही हरवून बसू. याचं भान नावातच देव अन् त्याचं घर असलेली देवळी ही दोन्ही गावे देतात.

डिस्क्लेमर : उपरोक्त लेखातील मते लेखकाची व्यक्तिगत मते आहेत.

https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/veshiwarchya-paulkhuna/pacharathi-temple/ 

 

 खंडोबाची टेकडी

खंडोबाची टेकडी हे ठिकाण माहित नाही असा माणूस नासिकमध्ये विरळाच! नासिकपासून १५ किमी. वरील देवळाली कॅंप भागात असलेली ही टेकडी स्वच्छ, मोकळ्या हवेमुळे व निरव शांततेमुळे प्रसिद्ध आहे. देवळालीतून निघाल्यावर काही मिनिटांतच टेकडीजवळ पोहोचायला होतं.हा संपूर्ण भाग सैन्याच्या ताब्यात असल्याने पायथ्यापाशी जवान उभे असतात. पायथ्यापाशीच डावीकडे एक तोफ दिसते. चढाईच्या सुरूवातीलाच या ठिकाणाबद्दलची माहिती लिहिलेली आहे. त्यांत या टेकडीचा विश्रामगड आणि शिवाजीमहाराजांच्या या टेकडीवरील वास्तव्याचा चुकीचा उल्लेख आहे. खरं तर विश्रामगड म्हणजे इथून जवळच असलेला पट्टा किल्ला व महाराजांचं वास्तव्य पट्टा किल्ल्यावर होतं. असो. टेकडी चढतांना रूंद व कमी उंचीच्या पायर्‍या असल्याने दमछाकही फारशी होत नाही. टेकडीचं सुंदर सुशोभीकरण केलं आहे. माथ्यावरील घुमटाकृती खंडोबाच्या मंदिराला आटोपशीर तट आहे.




मंदिराच्या आवारामध्ये बघण्यासारखे म्हणजे एक मोठी घंटा ...



..आणि बसलेल्या शंकराच्या डोक्यावर तोंड रेलवून मागे उभ्या असलेल्या नंदीची मूर्ती आणि द्वारावर उभे असलेले २ राक्षस-- मणि आणि मल्ल. या मणी आणि मल्ल या राक्षसांपासून भक्तांचे संरक्षण करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्यांचा विनाश केला. ते दोघेही शिवभक्त होते. परंतु त्यांना शंकराचाच विसर पडला होता. त्यामुळे त्यांचा नाश करण्यासाठी शंकराला मल्हारी मार्तंडाचा अवतार घ्यावा लागला होता, अशी आख्यायिका.



गाभार्‍यात ८ फुटी मुर्ती असलेल्या खांडधारी खंडोबाच्या दोन्ही बाजूंस बाणाई व म्हाळसाई यांच्याही मुर्त्या आहेत.राक्षसांशी झालेल्या युध्दात 'खांड' नामक तलवारीचा वापर कण्यात आल्याने खांडधारी 'खंडोबा'च्या नावाने मार्तंड मल्हारी ओळखले जाऊ लागले. खंडोबा मुळात कर्नाटकमधील देव आहे. कानडी भाषेत येळू म्हणजे सात व कोट म्हणजे कोटी म्हटले जाते. खंडोबाचे सात कोटी सैन्य होते.सात कोटींच्या संख्येत आपल्या घरात धनधान्य संपत्ती नांदावी,असा हेतु त्यांत आहे. त्यामुळे 'तळी आरती'च्या वेळी 'येळकोट येळकोट जय मल्हार' असा जयघोष केला जातो.
खंडोबाच्या पत्नीचे नाव म्हाळसा होते म्हणून खंडोबांला म्हाळसाकांत म्हटले जाते. खंडोबाची दुसरी पत्नी बाणाई धनगर होती. धनगर समाजाची ती कुलदेवता आहे. खंडोबाची पूजा करताना तळी भंडार्‍याला खूप महत्व आहे. नवीन येणारी बाजरी, वांगी, गुळ, लसुण, कांदे यांचा नैवेद्य यावेळी दाखविला जातो. खोबर्‍याचा प्रसाद देऊन कपाळावर हळदीचा भंडारा लावला जातो. त्यासोबत 'येळकोट येळकोट जय मल्हार' च्या जयघोषात 'तळी' उचलून खंडोबाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.खंडोबाचा उत्सव चंपाषष्ठीला असतो.
http://bornphd.blogspot.com/2010/07/blog-post.html

अशी ही अर्ध्या दिवसाची खंडोबाची टेकडीची वारी सुफळ संपुर्ण...

 

 नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य ( महाराष्ट्राचे भरतपूर )

संगमनेर- सिन्नर तसा दुष्काळी पट्टा, या भागात पाणथळ जमिनी आणि पक्षी अभयारण्य आहे असे सांगितल्यास कुणाल खरे वाटणारा नाही. सिन्नर पासून साधारण २५-३० किलोमीटर अंतरावर नांदुर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य आहे. सिन्नर पासून नांदुर मध्यमेश्वरची वाट दाखवणारा साधा एक दिशादर्शक फलक सुद्धा दिसत नाही.  चुकण्याची शक्यता जास्त, अशावेळी विचारात-विचारात गेलेले बरे.  नांदुर मध्यमेश्वर हे गोदावरी व कादवा नद्यांच्या संगमावर बांधलेले धारण आहे. धरणाजवळ पाणथळ जमिनी व दलदलीचा प्रदेश आहे याच भागावर हे पक्षी अभयारण्य वसलेले आहे. वर्षभर हजारो स्थलांतरित पक्षी या भागाला भेट देतात. कीटक आणि मासे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने येथे पक्ष्यांच्या पंगतीच्या पंगती उठतात.
माफक शुल्कात शासनाने पार्किंग व निरीक्षण मनोऱ्यांची सोय केलेली आहे. त्यापैकी १-२ मनोरे काही दिवस पूर्णपणे पाण्यात असतात. गाईडची मदत घेऊन पक्ष्यांच्या जवळ जावून निरीक्षण करता येते. शासनाने खरेतर मोफत दुर्बिणींची सोय केली आहे मात्र त्या पैसे मोजून वापरण्यासाठी घ्याव्या लागतात. करकोचे, विविध प्रकारचे बगळे, खंड्या, पाणकावळे, बदके, कोतवाल, rice field pipit, टीटव्या, भारद्वाज इत्यादी देशी तसेच रोहित सारखे अनेक स्थलांतरित पक्षी येथे पाहायला मिळतात. पक्ष्यांबरोबरच पाणवनस्पती व कमळांच्याहि अनेक प्रजाती येथे पाहायला मिळतात.
गावातील काही हॉटेलांमध्ये चिकन म्हणून अभयारण्यातील बदकांच्या वापर केला जातो असे जेव्हा गुरख्यांकडून जेव्हा कळले तेव्हा वाईट वाटले. शासनाचे पर्यावरण विषयक अशामुळेच तर मागे पडत नसेल. शासनाचे सर्वच प्रयत्न व्यर्थ नाहीत का ?  अनेक पक्षिमित्र या भागाला भेट देतात. येथील गर्दी दिवसेंदिवस वाढतेच आहे. पक्षी मुळातच भित्रे त्यात मोटारींच्या वर्दळीमुळे आणि गोंगाटामुळे भविष्यात येथील पक्ष्यांची संख्याही जर कमी झाली तर यात आश्चर्य करण्याचे कारण नाही.

























 

 गोंदेश्वर मंदिर


शिल्पकलेचा एक अद्भुत आविष्कार म्हणावे लागेल इतके सुंदर सिन्नर तालुक्यातील गोंदेश्वर मंदिर आहे. मंदिरात मनाला एक वेगळी शांती मिळते.  विशेषतः पहाटे आणि दुपारच्या वेळी मंदिरात राबता कमी असतो. हि मंदिराला भेट देण्यासाठी योग्य वेळ आहे असे माझे मत आहे.
मंदिरात जाण्यासाठी प्रथम सिन्नर गाठावे. सिन्नर -शिर्डी रोडवर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून डावीकडील वाट धरावी. पाचच मिनिटात आपण मंदिर परिसरात येवून पोहोचतो.

मंदिराचा आवार तसा मोठा आहे. मुख्य मंदिराभोवती सुर्य, पार्वती, विष्णू आणि गणेश यांची मंदिरे आहेत. या चारही मंदिरांची रचना जवळपास समान आहे पण जवळून पाहिल्यास फरक लक्षात येतो. मुख्य मंदिरा समोर नंदी आहे.  हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. असा हा मंदिराचा विशाल विस्तार आहे.
सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिराला ३ प्रवेशद्वारे आहेत. तिन्ही बाजूंनी येणाऱ्या प्रकाशामुळे कोरीवकाम केलेल्या भिंती व खांबांच्या वेगवेगळ्या छटा पाहण्याजोग्या आहेत.
हे मंदिर पुरातन हेमाडपंती शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे.
संरक्षित स्मारक असूनही मंदिराकडे थोडेसे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटत राहते. गाभाऱ्याची दुर्दशा,  सभोवतीची अस्वच्छता , पालापाचोळा मंदिराच्या आवारातच जाळणे, रिकामटेकड्यांचा हैदोस यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आहे.
































 नाम एवं पता - श्री दिगम्बर जैन सिद्धक्षेत्र, गजपंथा - म्हसरुल ग्राम - म्हसरूल, तहसील एवं जिला - नासिक (महाराष्ट्र) पिन - 422004

टेलीफोन - (का.) 0253 - 2530215, (पहाड़) 2024857

आवास - कमरे (अटैच बाथरूम) - 30, कमरे (बिना बाथरूम) - 10 हाल - 1 (यात्री क्षमता - 300), गेस्ट हाऊस - X 

यात्री ठहराने की कुल क्षमता - 1000

भोजनशाला - सशुल्क, ऑर्डर देने पर

आवागमन के साधन

रेल्वे स्टेशन - नासिक रोड़ - 15 कि.मी.

बस स्टेण्ड - नासिक सेन्ट्रल बस स्टेण्ड - 7 कि.मी.

पहुँचने का सरलतम मार्ग - रेल अथवा सड़क मार्ग, नासिक रोड़ रेल्वे स्टेशन से म्हसरूल (गजपंथा) सिटी बस एवं ऑटो रिक्सा द्वारा

निकटतम प्रमुख नगर - नासिक - 5 कि.मी.

 

प्रबन्ध व्यवस्था

संस्था - श्री दि. जैन तीर्थक्षेत्र म्हसरूल (गजपंथा)

अध्यक्ष - श्री विजय कुमार कासलीवाल (5616637, 09370292035)

मंत्री - श्री प्रदीपकुमार पहाड़े (098227- 98377) 

 चतुर्थ शतकातील जैन लेणी: चामर / चांभार लेणी

 


चामर लेणी महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक आणि त्याच्या आसपासच्या  भागांमध्ये असंख्य मंदिरे तसेच तीर्थक्षेत्र देखील प्रसिद्ध आहेत. चामर लेणी/तीर्थराज गजपंथ नाशिक-गुजरात रस्त्यावर म्हसरूळ येथे आहे. हे शहराच्या मध्यभागापासून फक्त ९ किमी. आणि नाशिक रेल्वे स्थानकापासून १६ किमी. अंतरावर आहे. आपण बस, टॅक्सी किंवा वाहनाच्या माध्येमातून तेथे पोहचू शकता. 

अकराव्या शतकात दक्षिण राजवंशातील चामराज नावाच्या जैन राजाने या लेण्या कोरल्या आहेत. आणि म्हणूनच या लेण्यांना चामर लेणी म्हणतात. तथापि, नाशिक गँझेटियरमध्ये याला चांभार लेणी असे संबोधले जाते. तळ पायथ्याशी चांभार पंथातील एका देवाचे मंदिर आहे. जैन मान्यतेनुसार या टेकडीला गजपाठी म्हणून देखील ओळखले जाते. 

चामर लेणी येथील लेण्या म्हणजे चतुर्थ शतकातील जैन लेणी आणि जैन धर्माचे एक पवित्र ठिकाण आहे. चामर लेणी हा तीर्थराज गजपंथचा एक भाग आहे, जे जैनांचे पवित्र स्थान आहे. हे स्थान जैन अनुयायांसाठी खूप महत्वाचे आहे. लेण्या सुमारे ४०० फूट उंचीवर आहेत. जैन मंदिराकडे जाणारा जिना काळ्या दगडांनी बनविला गेला आहे. ते दरीचे विस्मयकारक उत्कृष्ट  दृश्य देतात. हि बाजू अतिशय शांत वातावरण प्रदान करते जी रमण्यासाठी योग्य आहे. 

प्रादेशिक भाषेमध्ये लेण्यांना "चांभार लेणी" किंवा "चामर लेणी" असे नाव पडले. डोंगराच्या शिखरावर अशी काही मंदिरे आहेत ज्यात अनेक लेण्यांसह अनेक जैन संतांचे श्र्वेता चरण आहेत. आपल्याला क्षेमेंद्र कीर्तीची समाधी आणि एक सुंदर बाग देखील सापडेल. आपण भगवान महावीराच्या  चार दिशात्मक पुतळ्याच्या मंदिरात देखील जाऊ शकता.  

उत्तरेस रामशेज किल्ला आहे. तसेच पश्चिमेस बोरगड, दहेर आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

4th century Jain Caves: Chamar  /Chambar  Caves

Chamar Caves is located in Nashik district of Maharashtra state. Numerous temples and pilgrimage sites are also famous in and around Nashik. Chamar Caves / Tirthraj Gajpanth is at Mhasrul on Nashik-Gujarat road. It is only 9 km from the city center. And 16 km from Nashik railway station. You can get there by bus, taxi or vehicle.

These caves were carved on this mountain by a Jain king named Chamraj of the southern dynasty in the eleventh century. That is the caves are called Chamar Caves. However, in the Nashik Gazetteer it is referred to as Chambar Caves. At the base of the temple of a god of the Chambar sect. According to Jain mythology, this hill is also known as Gajpathi.

The caves at Chamar Caves are 4th century Jain caves and a sacred site of Jainism. Chamar Caves is a part of Tirthraj Gajpanth, a holy place of Jains. This place is very important for Jain followers. The caves are about 400 feet high. The staircase leading to the Jain temple is made of black stone. They offer a wonderful view of the valley. This side provides a very quiet environment which is perfect for enjoying.

In the regional language, the caves are called "Chambar Caves" or "Chamar Caves". There are some temples on the top of the hill which have many caves as well as Shweta Charans of many Jain saints. You will also find Kshemendra Kirti Samadhi and a beautiful garden. You can also visit the four directional temple of Lord Mahavira.

To the north is Ramshej Fort. Also to the west is Borgad, Daher.


 पराक्रमाचा शिलेदार: रामशेज किल्ला

 


 

नाशिकच्या जवळ असलेला हा किल्ला सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहेसंपूर्ण नाशिकमधून या किल्ल्याचे दर्शन करता येते. ‘मूर्ती लहान पण कीर्ती महानही उक्ती सार्थ ठरवणारा किल्ला म्हणजे रामशेज. रामशेज किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड. तो तेथून आठ कोस अंतरावर आहे.

रामशेजया शब्दाचा अर्थरामाची शय्याअसा होतो. वनवासात असताना भगवान श्रीराम यांनी याच डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे आणि तेथे त्यांची शेज आहे अशी लोकभावना. म्हणून  प्राचीन काळापासूनच या डोंगराला किल्ल्यालाहीरामशेजहे नाव मिळाले आहे.

नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून रामशेज किल्ला १५ किलोमीटर अंतरावर आहे. रामशेज किल्ला नाशिक-पेठ रस्त्यालगत उभा आहे. पेठ रस्त्यापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आशेवाडी नावाचे गाव आहे. आशेवाडी हे रामशेजच्या पायथ्याचे गाव. नाशिकच्या सीबीएस बस स्थानकावरूनपेठकडे जाणारी एस.टी. आशेवाडी गावाच्या फाट्यावर थांबते. तेथे उतरून आशेवाडी गावात पोचले, की रामशेज किल्ल्यावर चढाई करता येते.

पेठकडे जाणाऱ्या बसेस या किल्ल्याला वळसा घालून जातात. नाशिकच्या निमाणीजवळील पेठ नाका येथूनही खासगी वाहनांची सोय आहे. रस्त्यावर उतरल्यावरच रामशेजच्या टुमदार किल्ल्याचे दर्शन होते. आशेवाडी गावातून किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्यास ४५ मिनिटे लागतात.

समुद्रसपाटीपासून हा किल्ला ३२७० मीटर उंचीवर आहे. परंतु प्रत्यक्ष पायथ्यापासून त्याची उंची अधिक नसल्याने कोणत्याही ऋतूत हा किल्ला नजरेस पडतो. वातावरण साफ असल्याने आजूबाजूचा मोठा परिसर न्याहाळता येतो.

गावाबाहेर पडताना किल्ल्याच्या मुख्य कड्याचे दर्शन होते. इथे ध्वजस्तंभ उभारलेला आहे. पायथ्याला वळसा घालून थोडे पुढे गेल्यास पायऱ्या लागतात. आजच्या काळातील सिमेंटने या पायऱ्या बांधल्या आहेत. पायऱ्या चढत असताना रामशेज किल्ल्याचा आवाका ध्यानात येतो. किल्ल्याच्या दोन्ही टोकांमधील कड्यांचा परिसर दृष्टीस पडतो.

गडावर जाताना वाटेत एक गुहा लागते. या गुहेमध्ये रामाचे मंदिर आहे. तसेच एका बाजूला शिलालेख कोरलेला दिसून येतो. गुहेच्या खालच्या बाजूस एक पाण्याचे टाके दृष्टीस पडते. पावसाळ्यात ते पूर्ण भरून जाते. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.

गुहेच्या समोरून जाणाऱ्या पायऱ्या थेट गडमाथ्यावर जातात. गडाच्या दोन्ही टोकांमधील भागात आपण येऊन पोहोचतो. हा भाग बराचसा अरुंद आहे. समोरच बुजलेल्या अवस्थेत गुप्त दरवाजा आहे. या वाटेने खाली गेल्यास समोर देहेरच्या किल्ल्याचे दर्शन होते. पेठ रोडने चालणारी दूरवरची वाहतूक येथून न्याहाळता येते.

गुप्त दरवाजाच्या वर जाणारी वाट रामशेजच्या दुसऱ्या टोकाकडे जाते डावीकडची वाट थेट गडाच्या माचीकडे अर्थात, मुख्य बुरुजाकडे जाते. उजवीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यास काही पायऱ्या दिसून येतात. एका कड्यावर या पायऱ्यांची रचना केलेली आहे. येथे समोरच किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसतो. दरवाजा पाहून मुख्य वाटेला आल्यानंतर किल्ल्याच्या मुख्य बुरूजावर उभारलेला ध्वजस्तं दिसतो. तेथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मदिनी मोठा उत्स साजरा केला जातो.

या ठिकाणी उंच कडा आहे. खाली आशेवाडी गाव दिसते. सुमारे चार-पाच कि.मी. अंतरावर चामर लेणींचा डोंगर दृष्टीस पडतो. त्याहीपलीकडे दूरदूर पांडवलेणींचा डोंगर दिसतो. वातावरण स्वच्छ असेल, तर उजव्या बाजूला दूरवर अंजनेरी ब्रह्मगिरीचे पर्वत न्याहाळता येतात.

किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाकडे जाण्यासाठी माचीवरून परत मागे फिरावे लागते. या टोकाचा परिसर पहिल्यापेक्षा अधिक उंचवट्याचा आहे. थोडे वर चढून आल्यावर आपण एका सपाटीवर येऊन पोहोचतो. येथे पाण्याची दोन टाकी एक तलाव आहे. तलावापासून थोडे पुढे चालत गेल्यास एक देवीचे मंदिर दृष्टीस पडते. देवीभक्तांचे येथे सतत येणे-जाणे असावे, असे तेथील पाऊलखुणांवरून दिसून येते. नवरात्रात येथे मोठा उत्सवही होत असतो.

मंदिराच्या मागच्या बाजूस पुन्हा उतार चालू होतो. गडाचा दुसरा गुप्त दरवाजा याच ठिकाणी आहे. दुसऱ्या टोकाशीही दोन पाण्याची टाकी दिसून येतात. या माथ्यावर अनेक पडक्या घरांचे अवशेष विखुरलेले आहेत. मागील बाजूला मोठे उतरते पठार आहे. त्यास वळसा घातल्यास किल्ल्याच्या या टोकाचा घेर ध्यानात येतो.

समोरच टेहळणीसाठी वापरण्यात येणारा भोरगड नजरेस पडतो. नाशिक-पेठ रस्त्याचे पूर्ण दर्शन या भागातून होते. या टोकाच्या उजव्या बाजूला काही भग्न मूर्ती पिंडीचे अवशेष दिसून येतात.

 विहंगम पांडवलेणी

काही काही शहरांची नावे जरी घेतली तरी प्राचीन काळात गेल्यासारखे वाटते. आपले नाशिक यातलेच! भल्यामोठय़ा इतिहासापासून ते रामायण-महाभारताच्या गूढ -रम्य काळापर्यंत साऱ्याच खाणाखुणांनी इथला प्रत्येक भागभारावलेला आहे. तपोवन, पंचवटी, सीता गुंफा, ब्रह्मगिरी, अंजनेरी, काळाराम, गोदाराम, एवढेच काय बायकांचा रामही! नाशिकमधील प्रत्येक स्थळ हे असे इतिहास
पूराणातून प्रेरित झाल्यासारखे आहे. यातूनच शहराजवळच्या प्राचीन लेण्यांनाही ओळख मिळाली पांडवलेणी!नाशिक शहरापासून मुंबईच्या दिशेला ६ किलोमीटरवर ही लेणी! खेटूनच मुंबई-आग्रा महामार्ग धावतो. खरेतर हा रस्ता कधी दोन हजार वर्षांपूर्वीपासून असा धावतो आहे. नाशिककडे जाणारा हा प्राचीन व्यापारी मार्ग! या व्यापारी मार्गावरच मग या व्यापाऱ्यांच्या मदतीने आणि इथे नांदून गेलेल्या सातवाहन, क्षत्रप आदी तत्कालिन सत्तांधिशांच्या आश्रयाने या डोंगरात ही बौद्ध लेणी खोदली गेली. या लेणीच्या पायाशीच आता फाळके स्मारक झाले आहे. या परिसरात एक बुद्ध स्मारकही आहे. सांचीच्या स्तूप आणि तोरणाच्या आकारातील या भव्य वास्तूमध्ये भगवान गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान मांडलेले आहे.

पांडव लेणी! पूर्व-पश्चिम अशा २४ लेण्या! प्रत्येक दालन, त्याची दारातली ती ओसरी, ओसरीचे कोरीव खांब, शिल्पपट, बारीक नक्षीकामाने सजवलेला दर्शनी भाग या साऱ्यांनीच आल्या-आल्या चकीत व्हायला होते. ही कला, कसब, कोशल्ये, सौंदर्य, ज्ञान, तंत्र आणि दृष्टी हे सारे त्या काळात मानवाने कसे आत्मसात केले असेल असा प्रश्न पडतो.



खरे तर पर्यटक, अभ्यासक, इतिहासकार, पुरातत्त्वज्ञ यांची या लेण्यांची भेट गेल्या शतकातली! पण इथली सामान्य जनता हा स्थापत्याविष्कार कधी -कित्येक पिढय़ांपासून पाहत आहे. त्यांच्या लेखी हे सारे मानवी शक्तीपलिकडचे! मग यातूनच या अशा कलावास्तूंना देवांचे हात चिकटतात आणि मग मानवाने घडवलेल्या या लेणीला पांडवांचे नाव मिळते. आमच्याकडे गावोगावी अनेक मंदिरे पांडवांनी अशीच एका रात्रीत उभी केल्याच्या लोककथा ऐकायला मिळतात. या लोककथांमागचा हा भावार्थ लक्षात घ्यावा आणि खऱ्या इतिहासाकडे वळावे.

ही मूळची हीनयान पंथीय किंवा थेरवाद पंथाची लेणी! साधारण इसवीसन पूर्व पहिल्या शतकात तिची खोदाई सुरू झाली. पुढे बौद्ध धर्मातर्गत संक्रमण, विकसनाचे काही टप्पे पार पडल्यावर महायान पंथीयांनी आपल्या कलेची, विचारांची छाप या लेणीवर पाडली. यानंतर बराच काळ विजनवासात घालवल्यानंतर या लेण्यांचा वापर जैनांनी सुरू केला आणि त्यांनीही इथे काही खोदकाम-शिल्पकाम केले. पुढे मध्ययुगात हिंदुनीही त्यांची हनुमान, शिवलिंग आदी शिल्पे इथल्या कातळावर उतरवली. एकूणच अनेक पंथ, धर्म आणि कालखंड यामधून या लेणीचे स्थित्यंतर झाले आहे. ही लेणी पाहताना हा सर्व काळ आणि त्यातले हे बदल लक्षात घेऊनच निघावे.

एकूण ही २४ लेणी! यामध्ये एक चैत्यगृह तर उर्वरित सर्व विहार! विहार कसले सौंदर्य विहार! प्रत्येक दालन पाहण्यासारखे! नाजूक नक्षी, शिल्प सोंदर्य आणि रेखीव रचनांनी जणू या साऱ्याच लेण्या सजलेल्या! अगदी पहिल्या अर्धवट खोदलेल्या लेण्यापासूनच ही दुनिया भुलवायला लागते. पण यातही ३, १०, १७, १८, २० आणि २३ ही दालने विशेष महत्त्वाची!

तीन क्रमांकाचे लेणे तर साऱ्या महाराष्ट्राच्या इतिहासासाठी महत्त्वाचे! राणीचे लेणे म्हणून ओळखले जाणाऱ्या या लेण्याचे कोरीव मुखदर्शनच आपल्याला त्याच्याकडे खेचून नेते. ओसरीतील ते भारदस्त सालंकृत खांब, घट-आमलकांची रचना, आमलकांच्या कोपऱ्यावरचे यक्ष, या खाबांच्या शिरोभागी असलेली प्राण्यांची शिल्पे आणि त्यावर स्वार झालेले मानव हे सारेच विलक्षण! यातील काही प्राण्यांना तर पक्ष्यांची तोंडे! शरीर वाघ-सिंहाचे तर तोंड एखाद्या गरुडाचे! प्राचीन काळी पाश्चात्यांच्या स्थापत्त्यशैलीवर स्थान मिळवलेले हे ‘ग्रिफिन’ शिल्प! म्हटले तर आपल्या यक्ष-किन्नरांप्रमाणे त्यांची एक उपदेवता नाहीतर काल्पनिक पशू!

या खांबांच्या खाली चौथऱ्याच्या दर्शनी बाजूवर काही शक्तीशाली मानवी आकृत्या कोरल्या आहेत. निसर्ग आणि मानवाच्या हल्ल्यात त्यांची आता खूप मोठी हानी झालेली असली तरी आजही त्या शिल्पातून त्यांचा सामर्थ्यांचा भाव डोकावतो. प्राचीन काळापासून आमच्या स्थापत्याचा भार वाहणारे हे भारवाहक किंवा यक्ष! इथे या भारवाहकांच्या खांद्यावर तळातील आडवे खांब आल्याचा भास निर्माण केला आहे. जणू काही हे ‘भारवाहक यक्ष’ या लेण्याचा हा सारा रथच कुठेतरी घेऊन निघाले आहेत.

या लेण्यांचे मुखदर्शनही असेच विविध कोरीव थरांनी सजलेले. यातील पहिल्या थरात पशू-पक्षी, वेली-फुले आहेत. त्यावरच्या थरात कमळ आणि त्रिरत्नाची शुभप्रतीके आहेत. तर त्याहून वरच्या थरात अर्धकमळांचे एक तोरणच लगडलेले आहे.

हे सारे पाहात आत शिरावे तो विहाराचे प्रवेशद्वार सांचीच्या स्तूपाभोवतीचे एखादे तोरण घेऊन सजलेले. त्याच्या दोन्ही बाजूस पुन्हा हाती कमळ घेतलेले बोधीसत्त्व पद्मपाणी! आतमध्ये एक भलामोठा सभामंडप आणि भोवतीने ओळीने खोदलेल्या अठरा खोल्या आणि मधोमध उठवदार स्तूप! या स्तूपाच्या बाजूस स्त्री प्रतिमा. यातील डावीकडील नमस्कार करत आहे तर उजवीकडील या स्तूपावर चवरी ढाळत आहे. वरच्या बाजूस हाती पुष्पमाला घेतलेले गंधर्व अवकाशी विहार करत आहेत. खरेतर स्तूप ही चैत्यगृहातील पूजावस्तू पण नाशिक आणि अशाच काही लेण्यांमध्ये त्यांना विहारातही स्थान मिळाले. लेणीस्थापत्यात पडलेला हा फरक नाशिकमध्ये ठळकपणे दिसतो.

पण या लेण्याची आणखी खरी गंमत त्याच्या भाळी कोरलेल्या लेखांमध्ये आहे. या पांडवलेणीत तब्बल २७ ब्राह्मी लिपीतील लेख आहेत. यातील चार महत्त्वपूर्ण लेख या लेण्यात आहेत. संपूर्ण दर्शनी भिंत व्यापून टाकलेल्या या लेखात महाराष्ट्राचा आद्य कुल सातवाहनांच्या कुळाची, त्यातील सत्ताधीशांची माहिती मिळते. काहींचा राज्यारोहनाचा काळ मिळतो. सत्तेचा एकूण कालावधी, त्यांनी नहपान या शक राजाचा केलेला पराभव असा बराच मोठा तपशील कळतो. याशिवाय याच लेखातील माहितीतून विशेषता त्यातील दानधर्माच्या उल्लेखांमधून बौद्ध धर्मार्तगतच महायान पंथाचा कसा विकास होत गेला हेही समजते.

असो. यापुढे अन्य लेणी पाहात दहा क्रमांच्या लेण्यात येऊन थांबायचे. नहपानाचे लेणे म्हणून हे दालन ओळखले जाते. इथल्या लेखातून विदेशी क्षत्रपांविषयी माहिती मिळते. क्रमांक तीनच्या लेण्याप्रमाणे हाही एक रेखीव विहार! स्तंभ, ओसरी, सभामंडप, त्यात खोल्या, पाठीमागील भिंतीत कोरलेला स्तूप, त्यावर पुढे झालेले मूर्तीकाम हे सारे इथेही आहे. फक्त हे पाहताना इथल्या स्तंभांवरील प्राण्यांमध्ये आतल्या बाजूचे प्राणी थोडेसे लक्षपूर्वक पाहावेत. यामध्ये दोन ठिकाणी शरीर प्राण्याचे तर शिर मानवाचे असा विचित्र मेळ दिसेल. ग्रीकांच्या ‘स्फिंक्स’ची ही रचना! ग्रीक संस्कृतीत या ‘स्फिंक्स’ना रक्षकांचे काम! तत्कालीन आंतराष्ट्रीय व्यापार भरात असताना त्यांच्या कलेचाही आपल्यावर कसा प्रभाव पडला याचेच हे उदाहरण! इथले यवनांचे (ग्रीक) लेख, ग्रिफिन, स्फिंक्सच्या रचना हे सारे यातूनच! एवढेच काय या लेणीतील सर्वात शेवटच्या २४ क्रमांकाच्या लेणीत एका घुबडाचे शिल्पही कोरले आहे. घुबड खरेतर आपल्याकडे अशुभ पक्षी, पण याच घुबडाला अथेन्सच्या राज्यात मानाचे, उपदेवतेचे स्थान आहे. त्यांच्या अथेना या देवतेचे हे वाहन! यामुळेच आजही ग्रीसमध्ये गळ्यात एखादा गणपती अडकावा, तसे घुबडाचे पदक अडकवले जाते.

या लेण्याशेजारचे अकरा क्रमांकाच्या लेण्यात जैन कला अवतरलेली दिसते. मूळच्या बोद्ध लेण्यात जैन धर्मातील ऋषभदेव, अंबिका, वीर मणीभद्र यांची शिल्पे कोरलेली आहेत. खरेतर यानंतरचे प्रत्येकच दालन असे शिल्पांनी भरलेले आणि भारावलेले आहे. यातही बहुतेक भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमा! कुठे सिंहासनाधिश्वर, कुठे एखाद्या कमळावर बसलेले, कुठे शयन आसन! या प्रत्येक मूर्तीचा भावही निराळा! कुठे तो एखाद्या ध्यानस्थ योग्याचा, कुठे तो प्रसन्न-आशीर्वादाच्या मुद्रेतला तर कुठे अर्धोन्मिलित नेत्रांमध्ये तो अंतर्धान पावलेला! या प्रत्येक मूर्तीभोवती पुन्हा मग कुठे नागराज, कुठे ते मैत्रयी-पद्मपाणी असलेले बोधीसत्त्व, भक्तीभावात मग्न झालेले दाम्पत्य, चामर ढाळणारे सेवक, अवकाशातून पुष्पमाला घेऊन निघालेले गंधर्व.. या साऱ्याच शिल्पांनी ही लेणी जिवंत-सजीव केली आहे.

या दालनांमधून फिरत असतानाच ते गूढ ब्राह्मी लिपीतले लेख अधेमधे चमकत असतात. खरेतर या प्रत्येकाजवळ त्याचा अर्थ आणि सोबत आतमधील लेण्याची माहिती लावली तर! पण एवढे सरळ-विधायक विचार आमच्याकडे होत नाहीत. पांडवलेणीच्या या लेखांमध्ये ‘लेणं’ हा शब्द दोन ठिकाणी आहे. मराठी भाषेला मिळालेल्या या शब्दाचा हा सर्वात प्राचीन पुरावा. या जोडीनेच एका लेखात नाशिक असाही उल्लेख येतो. या शहराचाही हा सर्वात प्राचीन उल्लेख!

पांडव लेणीच्या या खोदकामात काही गंमती-जमतीही आहेत. १७ आणि २० क्रमांकांच्या लेण्यात महायान पंथीयांनी गर्भगृह खोदली आहेत. लेण्यांकडून मंदिरनिर्मितीकडे जाणाऱ्या आमच्या स्थापत्यकलेची ही सक्रमण अवस्था! काही विहारांच्या आणि इथल्या एकुलत्याएक चैत्यगृहाच्या दर्शनी भागात कोरलेल्या तुळयांच्या अग्रभागी काही मानवी चेहरे दाखवले आहेत. पाश्चात्यांची ही आणखी एक छाप! याला ‘डेन्टिल्स’ असे म्हणतात. या चैत्यगृहाच्या पुढय़ात १९ क्रमांकाचे लेणे आहे. या गटात सर्वात अगोदर खोदलेले हे लेणे! पण आता काही दशकापर्यंत ते गाडलेले-लुप्त अवस्थेत होते. ब्रिटिशांनी काढलेल्या काही चित्र-छायाचित्रांमध्येही हे लेणे दिसत नाही. पण या गूढ दालनाचा कुठेतरी धागादोरा हाती आला आणि एक सारे लेणेच जमिनीतून बाहेर आले.

२४ दालनांची ही लेणी पाहता-पाहता थकायला होते आणि अडकायला देखील! हे सर्व पाहून झाले की, लेण्यांच्या या माळेचा मुकुटमणी भासावा अशा चैत्यगृहात यावे. इथल्या एका भल्यामोठय़ा चिंचेच्या वृक्षाखाली हा देखावा विश्रांती घेत असतो. त्याची ती पिंपळपानाची कमान, त्यावरील चैत्यगवाक्षांची, स्तूपांची नक्षी, यक्ष, आतमधील सालंकृत स्तंभांची ओळ आणि मधोमध कधीचा बसलेला तो वाटोळा स्तूप! सारेच काहीकाळ इथे रेंगाळायला भाग पाडते. चैत्यगृहातील हे स्तूप म्हणजे खरे तर मृत्यूचे प्रतीक पण त्यामध्ये जीवनाचे दर्शन घडते. त्याला पाहता-पाहताच आत्ममग्नता येते. याच्याच वर एका लेण्यातील त्या गर्भगृहातील बुद्धाच्या शांत-ध्यानस्थ शिल्पाकडे पाहाताना समाधीचे चार क्षण अनुभवायाला होते. पण हे सारे पुन्हा ज्याच्या-त्याच्या विचारांचा भाग! काहींना या अशा अंधाऱ्या -गूढ गुहेत शिरल्याबरोबर चार क्षण शांततेचे अनुभवण्यापेक्षा शिटय़ा-किंकाळ्या देऊन स्वत:तील पशूत्त्व प्रगट करावसे वाटते. मध्येच कुणीतरी या ध्यानस्थ बुद्धाच्या खांद्यावर हात ठेवून आपली छबीही उतरवू पाहतो.. सारेच अनाकलनीय! असे वाटते, या शिल्पांची, त्यावरील भावांची, या भवतालातील शांततेची, ईश्वरी चितंनाची भाषा यांना समजतच नाही का?
 

 

सोमेश्वर धबधबा



 काही दिवस पूर्वी मैत्रिणीना  घेऊन नाशिक येथील सोमेश्वर धबधबा, मंदिर येथे छोटी सहल काढण्याचा योग आला. पदरी घोर निराशा पडली. धबधब्याकडे जाणारा रुंद रस्ता पाहून मन आनंदले होते. तोच तेथील अस्वच्छता बघून भ्रमनिरास झाला. पाच-सात वर्षांपूर्वीची परिस्थिती बरी होती, असे म्हणण्याची वेळ आली.

धबधबा पूर्ण आक्रसून गेला आहे. आजूबाजूला प्रचंड अस्वच्छता आहे. प्लास्टिक, कुरकु ऱ्यांची पाकिटे, अर्धी कच्ची खाल्लेली कणसे, पेरूचे तुकडे, एक ना अनेक. धबधब्याकडे जाणारा चिखलाने बरबटलेला रस्ता पाहून तर तिकडे जावे की नाही असा विचार आला. रेटून धबधब्याकडे गेलो, तर सगळीकडे तुटलेले रेलिंग, मागच्या पुरात वाहून आलेली घाण अजूनही त्या रेलिंगला अडकलेली. म्हणजे वर्षभर स्वच्छतेसाठी इकडे कोणीही फिरकलेले नाही. धबधब्याच्या पायथ्याशी जाणाऱ्या जिन्यात सर्वत्र काटेकुटे, तारांचे जाळे. धबधब्याखालचा डोह धोकादायक, हे मान्य केले तरी खालच्या बाजूला एक पूर्ण सुरक्षित रेलिंग उभे करता येत नाही का? तो जिना बंद करण्याचे कारण काय? धबधब्याजवळ काही पुरातन मंदिरे वगैरे दिसली, पण ती भीषण स्वरूपाच्या अस्वच्छतेने व पडझडीने ग्रस्त होती. त्यांची डागडुजी करता येत नाही काय? म्हणजे तो रस्ता धबधब्याकडे येणाऱ्या लोकांसाठी नसून ‘बॅ्रण्ड’ नेम असलेल्या प्रार्थनास्थळाकडे येणाऱ्यांसाठी होता तर. भाबडय़ा मनाचे डोळे उघडले.

कितीही तुलना करायची नाही म्हटले तरी होतेच. . इथे नाशकात पांडवलेण्यांची दुरवस्था तर आपण पाहतच आहोत. सोमेश्वर धबधब्याचीही तीच गत. सर्वप्रथम धबधब्यावरच्या पुलाला भक्कम कठडे बसविणे गरजेचे आहे. धबधब्याचे दर्शन पायथ्याकडून व वरूनही घेता आले पाहिजे. त्यासाठी योग्य अंतरावर भक्कम सुरक्षित, अगदी हातपायदेखील त्यातून जाऊ न शकणारे रेलिंग बसविणे अत्यावश्यक आहे. परिसराची पूर्ण स्वच्छता व्हावी. त्या ठिकाणी प्लास्टिकला पूर्ण बंदी करावी. परिसरात कचरापेटय़ांची व्यवस्था करण्यात यावी. मुख्य म्हणजे त्या कचरापेटय़ा वेळच्या वेळी रिकाम्या करण्याची जबाबदारी पार पाडावी. विक्रेत्यांना नदीपात्रात परवानगी नसावी. बाजूच्या पुरातन वास्तूंचाही विकास करावा.

नाशिकमधील मार्गदर्शक कमानींचा उल्लेखही अपरिहार्य आहे. पुण्या, मुंबईत कमानींवर हिरवे मार्गदर्शक, पथदर्शक बोर्ड नेहमीच पाहण्यात येतात. नाशकात कमानी उभारून वर्ष-दोन वर्षे होऊन गेली. पण सध्या त्या सर्वपक्षीय लोकांना, धार्मिक बुवा-बाबांना आंदण दिल्या आहेत की काय असे त्यांची होìडग्ज बघून वैफल्याने म्हणावेसे वाटते. बाबांनो तुम्ही औक्षवंत व्हा, आयुष्यमान व्हा, वाटलंच तर आमच्या आयुष्यातली २-४ वर्षेही ओरबाडून घ्या, पण त्या कमानी मोकळ्या करा. आम्हाला नाशकात कुठे, कसे फिरायचे, वळायचे ते कळू द्या! बाहेरगावच्या माणसांना त्या कमानीवरच्या पथदर्शकांचा उपयोग व्हावा हीच इच्छा. साधे हिरवे पथदर्शक बसवण्यासाठी एवढा वेळ लागावा हे अनाकलनीय आहे. या सर्वाकडे प्रशासन लक्ष देणार आहे काय, की सर्वसामान्यांचे हे अरण्यरुदन ठरणार?





 

  भारतातील पहिले मातीचे धरण गंगापूर धरण



 गंगापूर धरण [मातीचे पहिले धरण ]
नाशिक शहराची आजवरची ओळख एक धार्मिक स्थळ, औद्योगिक शहर म्हणून आहे, यापुढे शासनाने नाशिक पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला यावे यासाठी भारतातील गोड्या पाण्यातील जलक्रीडा केंद्र, साहसी, चित्तथरारक खेळांचे केंद्र विकसित करण्याचे ठरविले आहे. याठिकाणी बोट क्लब, संगीत कारंजे, मनोरंजन पार्क इत्यादी पर्यटन विषयक कामे होत आहेत. नाशिक परिसरात साहसी गिर्यारोहणाची  माध्यमातून विकसित होत आहेत  लवकरच नाशिक हे भारतातील प्रसिध्द राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला
.

भारतातील पहिले मातीचे धरण म्हणून गंगापूर धरण ओळखले जाते. या ठिकाणी मनोरंजन पार्क व बोट क्लब ही विकासकामे करण्याचे प्रयोजन आहे. धरणाच्या खालील बाजूस मनोरंजन पार्क अंतर्गत पर्यटकांच्या सोयीसाठी रेस्टॉरंट, होटेल असणार आहे. गंगापूर धरणावर पर्यटकांना धरणाचे देखावे पाहण्यासाठी व बसण्यासाठी पॅव्हेलियन, संगित कारंजे, मनोरंजन पार्क अंतर्गत बगीचा,लॅण्ड स्केपिंग, मुलांकरिता खेळणी, पर्यटकांच्या मनोरंजनासाठी अॅम्पीथिएटर,स्टेज व पार्किंग सुविधा इत्यादि कामे होणार आहेत.

बोट क्लब अंतर्गत बोटीपर्यंत जाण्यासाठी जिप जाऊ शकेल असा तीन प्लॅटफॉर्म असलेला 270 मी.लांबीचा जेटी ब्रिज बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी चित्तथरारक खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बोटी, पॅराग्लायडींग , ऍरो स्पीड बोट ,स्कुटर्स ,क्याकस बोटी , बनाना बोटी , रिगल बोटी , पारसेलींग बोटी व रिव्हर वॉक सिस्टिम इत्यादी विविध प्रकारच्या बोटी उपलब्ध असतील. बोट क्लब साठी सुसज्ज वाहनतळ , भुमिगत गटारी, डांबरी रस्ता बांधण्यात येणार आहे.

 नाशिकमधील पर्यटनासाठी अद्ययावत बससेवा आवश्‍यक


Admagnet - X
 नाशिक - पर्यटन क्षेत्रासाठी खास बससेवा सुरू करण्यासाठी पर्यटन विभागातर्फे एक कोटी 80 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. परिवहन महामंडळाने नाशिकमधील पर्यटनस्थळांसाठी खास अद्ययावत बससेवा सुरू करावी, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम, पर्यटन व पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज केले.

खासदार समीर भुजबळ यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेल्या अद्ययावत निमाणी शहर बसस्थानकाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात अध्यक्षस्थानी होते.

निमाणी बसस्थानक येथे झालेल्या कार्यक्रमास परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर, खासदार समीर भुजबळ, एसटी महामंडळाचे सुधाकर परिचारक, वनाधिपती विनायकदादा पाटील, आमदार जयप्रकाश छाजेड, आमदार जयंत जाधव, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, राष्ट्रवादी शहराध्यक्ष गजानन शेलार, नाना महाले, डॉ. कैलास कमोद, जिल्हाधिकारी पी. वेलरासू, महाराष्ट्र परिवहन नाशिक विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक जी. बी. पाटील, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता आर. जी. पसारकर उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले, की आधुनिक बसस्थानकाची निर्मिती करताना त्यात आवश्‍यक त्या सोयी-सुविधा देण्याचे काम या बसस्थानकात करण्यात आले आहे. सध्या सुरक्षा सप्ताह सुरू आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील रस्त्यांची लांबी, वाहनांची संख्या यांचे प्रमाण मोठे आहे. सरासरी अपघाताचे प्रमाण काढले तर ते इतर राज्यांच्या तुलनेने कमी आहे. चालकांच्या चुकीमुळे अपघात होण्याचे प्रमाण 86 टक्के आहे. बाकीचे अपघात रस्ते, वाहनांतील अचानक झालेले बिघाड यांच्यामुळे होतात. त्यामुळे अपघात टाळायचे असतील तर वाहन काळजीपूर्वक चालवावे.

श्री. थोरात म्हणाले, की राज्यातील 72 महामंडळांपैकी बससेवा ही सर्वसामान्य नागरिकांना चांगली सेवा देण्याचे काम करीत आहे. तरीही जनतेच्या रोषाला पहिल्यांदा बससेवाच बळी पडते. नाशिक शहर बदलण्याची संकल्पना घेऊन कामे होत आहेत. हे बदल करताना सुंदर नाशिक कसे असेल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्णत्रिकोणाची संकल्पना साकारताना या प्रयत्नातून नक्कीच आमूलाग्र परिवर्तन दिसेल.
श्री. देवकर म्हणाले, की सव्वा कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले हे बसस्थानक नाशिकच्या सौंदर्यात भर घालणारे आहे. या स्थानकाच्या माध्यमातून खासदार भुजबळ यांनी परिवहन विभागाला चांगली भेट दिली आहे. परिवहन महामंडळाने स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. त्याचा प्रवाशांना चांगला उपयोग होत आहे.

श्री. परिचारक म्हणाले, की नाशिकची शहर बससेवा फायद्यात आहे. 232 बस दिवसभरात एक हजार 700 फेऱ्या पूर्ण करतात. 62 वर्षांपासून सुरू असलेल्या बससेवेचा तोटा आता कमी होत आहे, ही आनंदाची बाब आहे.

खासदार भुजबळ म्हणाले, की नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी दोन हजार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळविली आहे. पर्यटनाच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येत आहेत. शहरात बससेवा सुरळीत व्हावी यासाठी आणखी 300 नव्या बस परिवहन महामंडळाने सुरू करण्याची त्यांनी मागणी केली.

प्रारंभी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या मोबाईल व्हॅनचे उद्‌घाटन करण्यात आले.

 त्र्यंबक रांगेतील: भास्करगड उर्फ बसगड किल्ला

भास्करगड उर्फ बसगड 

भास्करगड उर्फ बसगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात आहे.

नाशिक जिल्ह्यात सेलबारी-डोलबारी, अजंठा-सातमाळ, त्र्यंबक यातील नाशिकच्या पूर्वेस व इगतपुरीच्या दक्षिणेस पसरलेल्या त्र्यंबकडोंगर रांगेत भास्करगड, हर्षगड, त्र्यंबकगड, अंजनेरी, रांजणगिरी, गडगडा, बहुला असे अनेक किल्ले दिसून येतात. याच त्र्यंबकरांगेत येणारा भास्करगड किंवा बसगड हा हरिहर किल्ल्याचा सख्खा शेजारी आहे.

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपूरीच्या उत्तरेस एक डोंगररांग पसरलेली आहे, त्यास "त्र्यंबक रांग" असेही म्हणतात. ही रांग दोन भागात विभागली गेली आहे. पहिल्या टप्प्यात बसगड, हरिहर हे गड वसलेले आहेत, तर दुसर्‍या टप्प्यात ब्रम्हगिरी, अंजनेरी  हे किल्ले येतात.

निरगुडपाडा हे हरिहर व भास्करगड या दोन्ही गडाच्या पायथ्याचे गांव आहे. मुंबई - नाशिक महामार्गावरुन घोटी मार्गे निरगुडपाडा हे अंतर साधारण १७० कि. मी. आहे तर नाशिक- निरगुडपाडा हे अंतर त्र्यंबकमार्गे ४१ कि. मी. आहे. निरगुडपाडयाच्या समोरील बाजूस हरिहर किल्ला तर गावाच्या डाव्या बाजूला डोक्यावर टोपी ठेवल्यासारखा दिसणारा बसगड किल्ला आहे. या दोन्ही किल्ल्यांच्या मध्ये नागाच्या फण्यासारखे शिखर असलेला फणी डोंगर आहे. हरिहर, बसगड आणि फणी डोंगर या तिनही ठिकाणी निरगुड पाडा येथून जाता येते.

भास्करगडाचा माथा बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे कातळात खोदून काढलेला सर्पिलाकार जिना. असमान उंचीच्या पायर्‍या असलेल्या या जिन्याच्या दोन्ही बाजूला १० फूट उंचीच्या कातळभिंती आहेत. जिन्याचा मार्ग आपल्याला पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारासमोर घेऊन जातो. प्रवेशद्वार कमानीच्या महिरपीपर्यंत मातीत गाडलं गेलेल आहे. प्रवेशद्वारातून रांगत जाऊन किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. 

प्रवेशद्वारातून किल्ल्यात शिरल्यावर समोर व उजव्या बाजूला अशा दोन वाटा फूटतात. या दोनही वाटा किल्ल्याच्या पठारावर जातात. पण उजव्याबाजूच्या पायवाटेने १० मिनीटे चढल्यावर आपण किल्ल्याच्या विस्तीर्ण अशा पठारावर पोहचतो. किल्ल्याच्या पठारावर पडक्या वास्तूंचे, मंदीराचे अवशेष, बुजलेली टाकी, साचपाण्याचा तलाव त्याच्या काठी असलेला व दगडात कोरलेला हनुमान असे अवशेष पाहायला मिळतात.

निमूळते पण प्रशस्त पठार असलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून ३३४० फुट उंचीवर पूर्व-पश्चिम पसरलेला असून किल्ल्याचे क्षेत्रफळ साधारण ३२ एकर आहे. गडाचा माथा हा निव्वळ खडकच असल्याने आपल्याला सर्वत्र दगड पसरलेले दिसतात. पठारावर जाताना वाटेत उजव्या बाजूला एका वास्तुचे अवशेष असून त्यात काही कोरीव दगड दिसून येतात. पठारावर आपण जेथे पोहचतो तेथे पाण्याचे एक बुजलेले जोडटाके असून या टाक्यासमोर एक मोठ्या वास्तुचे अवशेष दिसून येतात. या पठारावरुन आपण गडाखालून वर येताना जो बुरुज दिसतो त्या बुरुजाकडे जाताना वाटेत पाण्याची दोन कोरडी टाकी दिसून येतात.

गडावर काही या टाक्याच्याखाली टोकाला असलेल्या बुरुजाला काही प्रमाणात तटबंदी असून बुरजावर जाण्यासाठी असलेला दरवाजा उध्वस्त झालेला आहे. किल्ल्याला या भागात काही प्रमाणात रचीव तटबंदी दिसून येते. पुढे आपल्याला एका मोठ्या वाडयाच्या भिंतीचे अवशेष दिसून येतात. या वाडयावरुन पुढे गेल्यावर एक साचपाण्याचा तलाव दिसून येतो. या तलावातच खडकात एक टाके खोदलेले आहे. तलावाच्या काठावर असलेल्या चार उध्वस्त भिंतीच्या आत एक टाके शेंदुर फासलेली हनुमानाची मूर्ती आहे. 

 

 अलंग किल्ला


अलंग, मदन व कुलंग किल्ला

अलंग किल्ला किंवा अलंगगड हा महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला सर्वात कठीण किल्ल्यांपैकी एक आहे. अलंग किल्ला पश्चिम घाटाच्या कळसुबाई परिसरामध्ये योग्यरित्या वसलेला आहे. ह्या किल्याला दाट जंगलाने वेढलेले आहे. 

या कळसूबाई परिसरात जवळजवळ तीन किल्ले वसलेले आहेत. पश्चिम घाटातील कळसूबाई परिक्षेत्रातील या तीन किल्ल्यांपैकी एक म्हणजे मदनगड व दूसरा कुलंग. नाशिक जिल्ह्यातील या दोन किल्ल्यांवर पोहोचणे सर्वात अवघड ते म्हणजे मदनगड आणि कुलंग. येथे या पर्यटनस्थळाला लोक हॉलिडेसाठी भेट देतात.

अलंग किल्ला इतर किल्ल्यांच्या तुलनेने लहान आणि छोटीसी पठार आहे. गडावर एक गुहा व दोन पाण्याचे कुंड आहेत. गडावर काहीही मानवनिर्मित वास्तू नाहीत. या किल्ल्याच्या पूर्वेस कळसुबाई, औंढा किल्ला, पट्टा आणि बिटानगड आहेत; उत्तरेस हरिहर, त्र्यंबकगड आणि अंजनेरी; हरिश्चंद्रगड, आजोबागड, खुट्टा (शिखर), रतनगड आणि दक्षिणेस कात्रबाई आणि पश्चिमेस कुलंग.

अलंग किल्ल्यावर जाण्यासाठी इगतपुरी / कसारा-घोटी-पिंपळनेरमोर मार्गाने कसारा किंवा इगतपुरी आणि नंतर आंबेवाडीला जाता येते. घोटी ते आंबेवडी अशी बस सेवा आहे. घोटीपासून २ किमी अंतरावर आंबेवाडी आहे. घोटी ते आंबेवाडीला सकाळी बस सेवा उपलब्ध असते. तेथून अलंग, मदन आणि कुलंग सहजपणे आपण पाहू शकतो. आंबेवाडीहून, अलंग ते मदन दरम्यानच्या वाटेवर जाण्यासाठी 2 तास लागू शकतात. कड्यातून डाव्या बाजूस दिसणारा किल्ला अलंग आहे, तर उजव्या बाजूला मदन आहे. 

प्राचीन टेकडी किल्ला: आड


आड किल्ला


आड किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. हा किल्ला फारच छोटा आहे किल्ल्याची उंची जवळजवळ ४०४६ फूट आहे. आडवाडीच्या बेस गावातून आड किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पायी जाण्यासाठी जवळजवळ अर्धा तास लागतो. हा प्राचीन टेकडी किल्ला मुख्यतः सिन्नर आणि इगतपुरी दरम्यानच्या भागात टेहळणी बुरूजासाठी वापरला जात असे. हा किल्ला पहिल्या शतकाच्या सुरूवातीस बांधण्यात आला होता, असा स्थानिकांचा विश्वास आहे. शिखरावर जाण्यासाठी मार्ग आहेत. एक माधली आडवाडीची असून ती सोपी पण लांब आहे. दुसरा वरची आडवाडीचा असून तो इतरांपेक्षा खंबीर पण खात्रीने आहे आणि १५ मिनिटे घेते. पट्टा, औंढा, डुबरगड, सोनगड, पर्वतगड, कळसूबाई शिखर इत्यादी किल्ले यावरुन पाहिले जाऊ शकतात.

गडाचा माथा रुंद पठार असून त्यावर सुमारे तीन पाण्याच्या टाक्या आहेत. गडावर काही जुन्या वास्तूही आहेत. या किल्ल्याचे वय जवळजवळ २२०० वर्षे आहे, असे वयोवृद्ध पाण्याच्या टाक्यांवरून आपण अंदाज लावू शकतो. गडावर पाण्याच्या टाकीच्या आत एक विचित्र शरभ शिल्प आहे. पूर्वेकडच्या खालच्या बाजूला एक गुहा पाण्याची टाकी आहे. सध्या बरीच पवन ऊर्जा कंपन्यांनी लगतच्या भागात पवनचक्की बसविली आहेत.

पश्चिमेस हनुमानाचे मंदिर आहे. या बाजुला किल्ल्याची पायरी चढण्याचा मार्ग आहे. आड उंच उभे आहे आणि त्याचा उत्तर-पश्चिम दिशेने अनुलंब दगड दर्शवित आहे. पायथ्यापासून किल्ल्याकडे पाहिले तर पांढऱ्या रंगाचा ठिपका दिसत आहे, ती एक गुहा आहे. या गुहेत, जगदंबा देवीची मूर्ती आहे. या गुहेला लागून असलेली आणखी एक उत्खनन केलेली गुहा आहे. ही गुहा निवासस्थानासाठी वापरली जाऊ शकते. गुहेच्या बाहेर पाण्याची टाकी आहे जी जवळजवळ जमिनीत पुरली गेली आहे. उत्तरेकडे जाताना काही पायऱ्या चढून वरच्या बाजूस पठारावर येते. या किल्ल्यावर सुमारे १५ टाक्या आहेत.

गडाच्या माथ्यावर चालत असताना काही ठिकाणी अवशेषांमधील वास्तू दिसू शकतात. या अवशेषांपैकी एकाकडे दगडी शिल्प आहे आणि ती परिधान करुन फाडल्यामुळे मूर्ती ओळखता येत नाही. या मूर्तीच्या समोर झूमरसारखा मोठा दगडी दिवा आहे. गडाच्या वरच्या भागावर दोन किल्ल्यांचे अवशेष आहेत, त्यातील एक समाधी आहे. गडाच्या पश्चिमेस भिंत असलेल्या दुसर्या इमारतीचे अवशेष दिसतात. गडाच्या उत्तरेस कोकण दरवाजाचे अवशेष आहेत. तथापि केवळ या दाराची चौकट उभी आहे आणि कमानाचे पडलेले दगड आजूबाजूला दिसू शकतात.

 आपलं नांदुरा


महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात नांदुरा हे एक महत्त्वाचे शहर वसलेले आहे. १९३१ मध्ये ब्रिटीशांच्या काळात नांदुरा नगरपालिका स्थापन झाली. 

नांदुरा हे शहर दोन भागात विभागले आहे, नांदुरा बुद्रुक आणि नांदुरा खुर्द (लहान नांदुरा) यांना ज्ञानगंगा नदीने वेगळे केले आहे, हे गाव अधिकृतपणे नांदुराचाच भाग मानले जाते.

नांदुरा तालुका राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 आणि मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर आहे. हावडा-नागपूर-मुंबई मार्गावरील मध्य रेल्वेचे रेल्वे स्थानक देखील आहे.

नांदुरामध्ये हातमागांसह तेल गिरणी, डाळ गिरण्या आणि  प्रेसिंग उद्योग आहेत. नांदुरा कापूस उत्पादनात अग्रेसर आहे. 

नांदुरा 'खवा' (कंडेन्स्ड दुध) साठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण जवळच्या सर्व भागात दूध उत्पादनांचा पुरवठा करणारे आहे. तसेच खव्यासारखी दुधाची उत्पादने, त्याची गुणवत्ता आणि चव याकरिता प्रसिद्ध आहे आणि दररोज बऱ्याचशा जिल्ह्यांत नेली जातात.

नांदुरा मध्ये एक महत्त्वपूर्ण व्यापार केंद्र देखील कार्यरत आहे. तेथे गहू, ज्वारी, डाळी, कापूस, कांदा, मिरची, लिंबू आणि वांग्यासारख्या बर्‍याच भाज्यांचा व्यापार होतो.

नांदुरा शहरात पूर्वस्कूल ते पदव्युत्तर स्तरापर्यंत शैक्षणिक सुविधा आहेत.

नांदुरा शहरातील हनुमानाची १०५ फूट मूर्ती पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. हे भारतातील सर्वोच्च हनुमान पुतळ्यांपैकी एक आहे. भगवान हनुमानाची मूर्ती पांढऱ्या संगमरवरी खडकाची असून योग्य ठिकाणी वेगवेगळ्या रंगांचा वापर केला जातो. भगवान हनुमानच्या डाव्या हातात गदा आहे आणि उजवा हात भाविकांना आशीर्वाद देत आहे. हि मूर्ती राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही त्याचा उल्लेख आहे. 

तसेच अंबादेवीगड नावाचे ऐतिहासिक स्थळ सुद्धा नांदुरा येथे आहे.

 अंकाई-टंकाई किल्ला


अंकाई-टंकाई किल्ला

अंकाईचा किल्ला हे पश्चिम सातमाळा पर्वत रांगेतील एक ऐतिहासिक स्थळ आहे. हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यात आहेभौगोलिकदृष्ट्या ते मनमाड जवळ आहे.

अंकाई आणि टंकाई समीप दोन भिन्न किल्ले आहेत. दोघांना सुरक्षित ठेवण्यासाठी एक सामान्य किल्ला बांधला आहे. पूर्वेकडील अरुंद नाक वगळता, अंकाईचा किल्ला सर्व बाजूंनी लंबदार दोर्‍या असलेल्या टेकडीवर आहे.

टंकाईचा किल्ला हा एक टेकडी आहे. हा सातमाळा रेंजचा एक भाग आहे. हा नाशिक जिल्ह्यातील सर्वात मजबूत डोंगराचा किल्ला अंकाई-टंकाई म्हणून ओळखला जातो. मैदानापासून ९०० फूट उंच आणि समुद्रसपाटीपासून ३२०० फूट उंच आहे.

गडाभोवती बरीच जागा पाहन्यासारखी आहे, यासह: किल्ल्याच्या पायथ्याशी दोन स्तरांवर पसरलेल्या जैन लेण्या, खालच्या स्तरावर दोन गुहा आहेत, त्यापैकी कोणत्याही गुहेत मूर्ती नाहीत. वरच्या स्तरावर, पाच गुहा आहेत ज्यामध्ये महावीर मूर्ती चांगल्या स्थितीत आहेत. मुख्य गुहेत यक्ष, कमळ आणि भगवान महावीर यांचे कोरीव काम आहे.

किल्ल्याच्या दक्षिणेकडील बाजूस एक खडक-पाण्याच्या कुंड्यांची मालिका आहे. गडावरील सर्व आकर्षणे पाहण्यासाठी सुमारे दोन तास लागतात.

सुरगाणा' संस्थान


इ.स. १७०० सालापासूनचा इतिहास आढळतो. एकेकाळी 'सुरगाणा' हे एक संस्थान होते. या संस्थानाच्या सरहद्दीपासून ५ ते ६ कि. मी. अंतरावर भदर हे आणखी एक छोटे संस्थान होते. तेही सुरगाणा संस्थानच्या अधिपत्याखाली होते. 

धार संस्थानच्या परमार घराण्यातील राजे श्रीमंत रविराव, शंकरराव, प्रतापराव, यशवंतराव आणि शेवटचे राजे श्रीमंत धैर्यशिलराव पवार हे सुरगाणा संस्थानचे राजे होऊन गेले आहेत, तर देशमुख घराण्यातील श्रीमंत माधवराव खंडेराव देशमुख, यशवंतराव देशमुख, आनंदराव देशमुख, आणि शेवटचे राजे नारायणराव देशमुख हे भदर संस्थानचे राजे होऊन गेले आहेत. 

सुरगाणा संस्थानचा 'मोतीबाग राजवाडा' अजूनही अस्तित्वात आहे. या राजवाड्याआधी दुसरा एक मोठा राजवाडा होता. मात्र फार पूर्वी तो जळून खाक झाल्याने हा मोतीबागेतील राजवाडा बांधण्यात आला होता. 

प्रतापराव देशमुख यांच्या दरबारात एकदा गायनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी एका गायकाने एक गाणे अतिशय सुरात गायले. गाणे ऐकून त्यावेळचे राजे प्रतापराव बेहद्द खुश झाले. छान सुरात गायलांस म्हणून गायकाचे कौतुक केले आणि “निंबारघोडी” ऐवजी “सुरगाणा” अशी संस्थानची नवी ओळख निर्माण केली. 

सुरगाणा तालुक्यातील सातमाळाच्या रांगांमध्ये "हतगड" किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केल्यानंतर त्यांचा पहिला मुक्काम हा "हतगड " किल्ल्यावर होता ,अशी आख्यायिका आहे.

'पवार' घराणे हे राजपुत. राजस्थानातील माउंट अबू हे त्यांचं मुळ स्थान. सुरवातीला पारमार या नावाने ते ओळखले जायचे. या घराण्याचे राजे भोज, राजे विक्रमादित्य यांची कारकीर्द गाजलेली. महाराष्ट्रातील सुरगाणा संस्थानाचे ते राजे. त्यांनी कोणत्याही साम्राज्यासमोर हार मानली नाही म्हणुन त्यांना 'बंदे मुल्क' म्हटलं जायचं. 

सुरगाणा प्रांतांच्या भौगोलिक स्थितीमुळे शत्रुला लढाई अवघड जात असे. दोन्ही बाजुंनी डोंगर असल्याने सुरगाणा जिंकणे कठिण होते. इतकेच काय तर व्यापार किंवा इतर कारणासाठी गुजरात प्रांतात जाण्यासाठी किंवा तिकडुन येण्यासाठी सुरगाण्यातून जावे लागे. त्यावेळी इतरांना हा मार्ग वापरण्यासाठी कर द्यावा लागत असे.

 घाट-माथ्यावरची प्रसिद्ध स्ट्रॉबेरी


Strawberry

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात लिंगामे, आमदर, सुकापूर, खिराड, पळसदर, वीरशेत, बोरगाव परिसरातील आदिवासी शेतकरी आठ ते दहा वर्षांपासून Strawberry वर यशस्वी प्रयोग करीत आहेत. 

या भागात Strawberry ने नगदी पीक म्हणून स्वतःची ओळख तयार केली असून, या भागातील शेतकरी कृषी विभागाच्या मदतीने Strawberry लागवडीकडे वळला आहे. 

शास्रशुद्ध पद्धतीने या पिकाचे उत्पन्न घेत आहेत. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त पिक घेतले जाते. दरवर्षी प्रतिकिलो ८० ते १०० रुपये भाव मिळत असल्याने आदिवासी शेतकरी या शेतीकडे वळला आहे. 

एक किलो दोन किलोचे खोके भरून Strawberry गुजरात मधील सुरत, बिलीमोरा, वघई, वाझदा येथे पाठविली जाते.

कळवण तालुक्याच्या पश्चिम भागात हवामान नेहमी थंड असते. त्यामुळे Strawberry शेतीसाठी येथील वातावरण पोषक सिद्ध होत आहे. 

Inter Dawn, Rani, Selva, Sweet Charly, आदी जातीचे रोपे येथील आदिवासी शेतकरी महाबळेश्वरहुन एका रोपास १० ते १५ रुपये या भावाने आणतात. त्यानंतर सरीच्या माध्यमातून अर्ध्या फुटावर Strawberry चे रोपे लावली जातात. दोन महिन्यात उत्पन्न सुरु होते व चार ते पाच महिने फळे येतात.

कळवण-सुरगाणा भागात १०५ ते १२० हेक्टर खाली Strawberry ची लागवड केली जाते.

 

अचला किल्ला


अचला किल्ला

अचला किल्ला  हा  सातमाळा   पर्वतरांगेत    पश्चिमेला आहे. तसेच वणीच्या उत्तरेस वसलेला आहे.

हा      किल्ला   महाराष्ट्रातील    नाशिक      जिल्ह्यात    आहे.    नाशिकपासून       ५५ कि.मी.             अंतरावर आहे.  अचला     हे वणीपासुन  २६ कि.मी.     अंतरावर  असलेल्या     बिलवाडी    गावाजवळ असून गुजरातच्या सापूताऱ्यापासून ३० कि.मी. अंतरावर दक्षिणेस आहे.

अचला किल्ला अजिंठा-सातमाळा पर्वतरांगाचा एक भाग आहे. अचला किल्ल्याची उंची ४०४०फूट म्हणजेच १२३१ मीटर समुद्र सपाटीपासून आहे.

अचला किल्ल्याचे क्षेत्रफळ खूपच लहान आहे. या किल्ल्याला बरीच तटबंदी नाही.  गडमाथा अत्यंत अरुंद आहे. गडावर फारसे पाहण्यासारखे काही अवशेष नाहीत. गडावर पाण्याची एक-दोन टाकी असून त्यापैकी एकासह पाणी आहे व दुसरे एक रिकामे आहे.

येथे एक दगड देखील आहे जो शेंदुरा (नारंगी रंग) मध्ये रंगलेला दगड आहे. हा दगड सुमारे 7 फूट (2.13 मीटर) आहे. सर्वात लांब आणि मोठा दगड असल्यामुळे, येथील एका गावाला पिंपरीवाडी किंवा “दगड पिंपरी” या नावाने ओळखले जाते.

 

 सातमाळा पर्वत रांगेतील सर्वात उंच किल्ला : धोडप



धोडप किल्ला

नाशिक जिल्हयातील कळवण तालुक्यात हा किल्ला आहे. नाशिक जिल्ह्याच्या मध्यभागातून जाणारी सह्याद्रीची पूर्व-पश्चिम डोंगररांग म्हणजे अजंठा-सातमाळा ही होय. अजंठा-सातमाळा रांग म्हणजे गिरीदुर्गाची साखळी आहे.

या साखळीमधील सर्वात उंच आणि बलदंड किल्ला म्हणजे धोडप हा होय. साल्हेरनंतर हा सह्याद्रीच्या पर्वतातील सर्वात उंच किल्ला आहेहा किल्ला समुद्रसपाटीपासून ४८२९ फूट (१४७२ मीटर) उंच आहे. 

सर्वात उंच किल्ला असल्याने आपणास संपूर्ण प्रदेशावर दृष्टीक्षेप टाकता येतो. शिवलिंगासारख्या आकाराचा माथा असलेला धोडप या आकारामुळे दूरवरुन स्पष्टपणे ओळखू येतो. माचीसारखा भाग मोकळा उंचावर असल्यामुळे येथून गडाचा परिसर तसेच धोडपचा वरचा सुळका उत्तम प्रकारे दिसतो. 

येथून चांदवड, इंद्राई, कांचन-मंचन, इखारा, कन्हेरा, रावळ्या-जावळ्या, सप्तश्रृंगी, अहिवंतवाडी, अचला अशी सातमाळा रांग पहायला मिळते. दक्षिणेकडील विस्तृत प्रदेश न्याहाळता येतो. तसेच उत्तरेकडील साल्हेर-सालोटा चे दर्शन होते.

किल्ल्याचा वरचा भाग दगड आणि वीटा या दोहोंचा वापर करून बांधला आहे. येथे भगवान हनुमानाची मूर्ती असलेली एक टाकी आहे. तसेच येथे एक २९ मीटर रुंद बोगदा आहे. 

वरील सुळक्याच्या मागील बाजूस एक मोठी मानवनिर्मित गुहा व काही पाण्याची टाकी आहेत. पायथ्याशी एक गुहा आहे. एका गुहेत वसलेले एक मंदिर सुस्थितीत आहे. काही इतर गुहाही सभोवताली दिसतात आणि आकाराने मोठ्या आहेत.

 ब्रिटीशांच्या काळातील धरण: चणकापुर

चणकापुर धरण

चणकापूर धरण हे  भारतातील   महाराष्ट्र    राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात अभोणाजवळ गिरणा नदीवर बांधलेले आहे. हे धरण १९ व्या शतकात ब्रिटीशांनी बांधले होते. चणकापूर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे.

सर्वात कमी पाया असलेल्या धरणाची उंची ४१ मीटर (१३५ फूट) आहे तर लांबी ३,७०५ मीटर (१२,१५६ फूट) आहे. व्हॉल्यूम सामग्री २,१२३ किमी3 (५०९ क्यू मैल) आहे आणि एकूण संचयन क्षमता ७९,६९०.०० किमी3 (१९,११८.६५ क्यु मैल) आहे.

कळवण तालुका हा पावसाचा व धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. कळवण तालुक्यात खुप लहानमोठी धरणे आहेत. 

ब्रिटीशांच्या काळात ह्या चणकापुर धरणाजवळ आदिवासी आणि इंग्रजांमध्ये खुप मोठी लढाई झाली होती. ह्या लढाईत खुप आदिवासी बांधव शहीद झाले होते. त्यांच्या स्मृति जपून ठेवण्यासाठी चणकापुर गावात शहीद स्तंभ आणि स्मृतिस्मारक बांधन्यात आले आहे.

 

 समेधशिखर: मांगी-तुंगी

मांगी -तुंगी

नाशिक जिल्हा अनेक आश्चर्यांनी नटलेला आहे. यात समेधशिखर म्हणून प्रसिद्ध असलेले मांगी-तुंगी हे क्षेत्र.

मांगी - तुंगी हा महाराष्ट्रातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील भिलवाड गावानजीक हा किल्ला उभा आहे. 

मांगी-तुंगी हे नाशिकपासून १२५ कि.मी. अंतरावर ताराबाद जवळील मध्यभागी पठारासह एक प्रमुख दुहेरी-उंच शिखर आहे. पश्चिमेकडील मांगी हे शिखर समुद्रसपाटीपासून ४,३४३ फूट (१,३२४ मीटर) उंच आहे, आणि पूर्वेकडील तुंगी हे शिखर ४,३६६ फूट (१,३३१ मीटर) उंच आहे. 

मांगी-तुंगी हे धुळे जिल्ह्यापासुन फक्त १०० किमी दूर आहे, धुळे हे उत्तर महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध शहर आणि ह्या जिल्ह्याला खानदेश चा भाग म्हणून ओळखला जातो.

मांगी-तुंगी येथे नुकतीच जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे. तेथे चढून जाण्यासाठी सुमारे दोन हजारांहून अधिक पायऱ्या आहेत.

मांगी व तुंगी हे पर्वताचे दोन टोके आहेत. येथे जाण्यासाठी साडेचार हजार पायऱ्या चढाव्या लागतात. तुंगी पर्वतावर प्राचीन लेणी आहेत. गिरीराज नावाचे जलकुंड, अंतरिक्ष चैत्यालय, चंद्रप्रभू भगवंतांची मूर्ती पहाता येते. 

मांगी-तुंगीच्या मांगी या शिखराच्या खालच्या टप्प्यावर जगातील अखंड दगडातील सर्वात उंच १०८ फूटी श्री ऋषभदेवाची मूर्ती सध्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. त्यात १३ फुटाचे कमळ व १०८ फूट उंचीची मूर्ती पाहताना नवल वाटते. हा सोहळा अनुभवताना आपण नक्कीच खूश व्हाल.

डोंगरावर ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ असलेल्या अनेक गुहा असून त्या महावीर गुहा, शांतीनाथ, आदिनाथ, पार्श्व म्हणून ओळखल्या जातात. 

मांगी डोंगरावर कृष्णकुंड असून, ते कृष्णाच्या शेवटच्या दिवसाचे प्रतीक समजतात. येथे सात मंदिरे असून, वरती जातानाच्या मार्गात अनेक पादुका कोरलेल्या दिसतात. तुंगी डोंगरावर पाच मंदिरे आणि दोन गुहा आहेत. 

मांगी आणि तुंगी यांना जोडणाऱ्या खिंडी सदृश मार्गातही २ गुहा आणि एक मंदिर आहे.

 गुजरातचं प्रसिद्ध हिल स्टेशन : सापुतारा

सापुतारा

सापुतारा हे स्थळ भारताच्या गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक या शहरापासून सुमारे ८० कि.मी. अंतरावर नाशिक-डांग-सुरत रस्त्यावर आहे. हे ठिकाण गुजरात राज्याच्या वाझदा राष्ट्रीय उद्यानाजवळ आहे. मुंबई अथवा अहमदाबाद येथून रेल्वेने बिलीमोरा या स्थानकापर्यंत जाऊन तेथून बसने अथवा टॅक्सीने येथे येता येते. 

गुजरात-महाराष्ट्र राज्यसीमा येथून सुमारे ५ कि.मी. अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १००० मीटर उंचीवर असलेले सापुतारा हे स्थान सातपुडा पर्वतरांगेत एका पठारासारख्या ठिकाणी वसलेले आहे.

नैसर्गिक सौंदर्य आणि जैव-विविधतेने नटलेलं, सापुताऱ्यात वर्षभर थंड हवामान असतो आणि बरीच बाग, उद्याने आणि अभयारण्ये आहेत. आपल्या कुटुंबियांसह आनंद घेण्यासाठी सापुतारा एक आदर्श पर्यटन स्थळ आहे. 

हिल स्टेशनच्या सभोवतालची डोंगर आणि जंगले ट्रेकिंगच्या उत्साही लोकांसाठी एक आदर्श ठिकाण आहेत.  या शहराला 'सर्पांचा वास' म्हणून देखील ओळखले जाते आणि येथे सर्पगंगा नदीच्या काठावर नाग देवताचे मंदिर आहे.

नागेश्वर महादेव मंदिर, जैन मंदिर आणि स्वामीनारायण मंदिर यासह अन्य धार्मिक स्थानेही सापुताऱ्यात आहेत.  हिरव्यागार दरीच्या मधोमध खोल वसलेले सापुतारा तलाव हे मुख्य आकर्षण आहे आणि त्या तलावात नौकाविहाराची सुविधा उपलब्ध आहे. 

येथे स्टेप गार्डन, रोझ गार्डन आणि लेक गार्डन सारख्या काही सुंदर बगीचा आहेत. पुष्पक रोप-वे म्हणून ओळखला जाणारा रोप-वे पर्यटनासाठी आणखी एक आकर्षण आहे कारण आजूबाजूच्या परिसरातील पक्ष्याचे दर्शन घडवते. 

सापुताऱ्यात पाहण्यासारखी खुप ठिकाणे आहेत त्यामधे अ‍ॅक्वेरियम, इको पॉईंट, कलाकारांचे खेडे (आर्टिस्ट्‌स व्हिलेज), मध संकलन केंद्र, गीरा धबधबा, बोट क्लब, म्युझियम (संग्रहालय), रोप-वे, सनराइज पॉईंट, सनसेट पॉईंट, हतगड किल्ला, इत्यादी.

कोकणा, भिल्ल, महादेव कोळी आणि वारली हे येथील आदिवासी जमातीचे मुख्य समुदाय आहेत आणि त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यांच्या गावाला भेट द्या जिथे आपणास त्यांचे जीवन आणि संस्कृती जवळच्या ठिकाणाहून अनुभवता येईल. गावकरी खूप आदरातिथ्य करणारे आहेत. 

वारली चित्रकला किंवा इतर आदिवासी हस्तकला येथे आपणास पहावयास मिळतील. सापुतारा संग्रहालयात विविध प्रकारचे कपडे, भांडी, पारंपारिक कलाकृती, जीवनशैली, डांग आदिवासींची घरे दर्शविली आहेत. संग्रहालयात विविध कार्यशाळा देखील आयोजित केल्या जातात.

 वन पर्यटन: अर्जुन सागर (पुनद धरण)


अर्जुनसागर
नाशिकच्या कळवण तालुक्यातील पुनद नदीवर एक नयनरम्य जलाशय आहे अर्जुन सागर. कळवण तालुक्याचे दिवंगत आमदार श्री. ए. टी. पवार साहेब यांच्या नावावरून ह्या धरणाला अर्जुन सागर हे नाव देण्यात आले आहे. तब्बल ६१० दशलक्ष घनमीटर  पाण्याची साठवण क्षमता असलेल्या या धरण परिसराचा परीघ दाट जंगलाने वेढलेला आहे.

या पुनद अर्जुनसागर निसर्ग पर्यटन क्षेत्रात प्रतापनगर, उंबरदे, काठरे दिगर ही वनक्षेत्रे येतात. धरणालगतचे हे वनक्षेत्र एकूण १३०० हेक्टर क्षेत्रफळाचे आहे. 

या आदिवासीबहुल क्षेत्रात कोकणा, महादेव कोळी, भिल्ल आणि इतर समाजाचे लोक त्यांच्या स्थानिक संस्कृतीसह सण-उत्सव साजरे करताना आणि लोककला आणि लोकसंस्कृतीचे जतन करताना दिसतात. धरणाच्या पाण्यामुळे इथला शेतकरीही सुखावलेला आहे. येणाऱ्या पर्यटकांना इथल्या ग्रामीण जीवनाबरोबर आदिवासी पदार्थाची चवदेखील चाखता येते. पर्यटकांसाठी अर्जुनसागर निसर्ग पर्यटन केंद्र म्हणजे पर्यटनाचा मनमुराद आनंद देणारं  केंद्र असंच त्याचं वर्णन करावं लागेल.

पावसाळ्यात भोवतालच्या डोंगररांगांतून वाहणारे छोटे-मोठे धबधबे त्यातून वाहणारे असंख्य ओहोळ, झरे आपल्या मनाला प्रसन्न करून जातात. गंगा-जमुना हे भूगर्भातील पाण्याचा स्रोत असलेले दोन मोठे तलाव हे या वनातील नैसर्गिक खजिनाच आहेत. 

डोंगररांगांमधून धावणारी चढ-उताराची वाट आपल्याला अनेक दुर्मीळ वनस्पतींबरोबर डेरेदार वृक्षांचे दर्शन घडवते. त्याच्या सावलीखालून फिरण्याची संधी देते. खैर, आवळा, साग, जांभूळ, आंबा, रानभेंडी, पिंपळ, वड अशा अनेक वृक्षांची दाटी आपण इथे पाहू शकतो. राष्ट्रीय पक्षी मोर, राज्य पक्षी हरियाल, यासारख्या पक्ष्यांबरोबर असंख्य पक्षी अर्जुन सागराभोवती मस्त विहरताना आणि दिसतात. अनेक स्थालांतरित पक्षी आणि पाणपक्षी आपलं अस्तित्व या जलाशयात दाखवत असतात. 

निसर्गप्रेमी, गिर्यारोहक, साहसवीर, पक्षीप्रेमी यांच्यासह वन्यजीवतज्ज्ञांची येथे नेहमीच गर्दी असते. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या या अर्जुन सागर जलाशयाच्या परिसरात साल्हेर किल्ल्याचे विहंगम दृष्य दिसते.

 खोल दरी: भेगू

भेगू दरी


नाशिक जिल्ह्यातील गुजरात सीमेवर असणारे हे रमणीय एकदम खोल दरी असणारे प्रसिद्ध असे स्थळ ते म्हणजे भेगू.

ही दरी कळवण मधील मांगलीदर या गावी आहे. हे गाव एकदम गुजरात सीमेवर आहे. ह्या दरी नजदीक खूप जंगल आहे. गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असल्या कारणाने इथे पावसाळ्यात पर्यटकांची खूप गर्दी जमते.

मांगलीदर धरणातील पाणी ह्या दरीतून खोलवर कोसळते. मोठा धबधबा आहे. हे पाणी गुजरात मध्ये जाते. पर्यटक या दरीत मनसोक्त आनंद लुटतात. दरीच्या काठावरून दरीत बघितलं तर नजर पोहचत नाही इतकी खोल दरी आहे.

असे म्हणतात की पूर्वी इथे खूप मोठा डोंगर होता, पण तो कालांतराने नाहीसा झाला आणि एक दरी तयार झाली.

 सातमाळेतला रक्षणकर्ता: मोहंदरी गड


मोहंदरी उर्फ शिडका किल्ला नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. अचला, अहिवंत आणि मोहंदरी हे तीन किल्ले जवळच आहेत. हा किल्ला अहिवंत किल्ल्याच्या रक्षणासाठी बांधण्यात आला होता. या किल्ल्याच्या खाली असलेल्या डोंगराला छिद्र असल्यामुळे हा किल्ला लांबून दिसतो. ह्या किल्ल्याची उंची जवळजवळ 3900 फूट आहे.

पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत पसरलेल्या नाशिक जिल्ह्यातील सातमाळा पर्वतरांगेत खूप किल्ले आहेत. मोहंदरी किल्ला उर्फ ​​शिडका किल्ला त्यातीलच एक आहे. हा किल्ला छिद्रामुळे पटकन ओळखला जातो. मोहनदरी किल्ला हा सप्तश्रृंगी गडापासून 13 कि.मी. आणि अहिवंत किल्ल्यापासून 5 कि.मी. अंतरावर आहे.

पूर्वेकडील बाजूने प्रवेश केल्यावर तिथे तटबंदीचे अवशेष दिसतात. पश्चिम दिशेकडे जाताना पठारावर पाण्याची मोठी टँक आहे, पण पाणी पिण्यायोग्य नाही. गडाच्या पश्चिम काठावर तटबंदी असून तेथे छिद्रे खालच्या बाजूला आहेत. त्यावर एक केशर रंगाचा झेंडा बसविला गेला आहे, ज्यामुळे तो सहजपणे ओळखण्यायोग्य होतो. 

पूर्वेकडील प्रवेशद्वारातून जाताना वाटेत दोन कोरड्या पाण्याच्या टाक्या आहेत. येथून पुढे जाताना घरांच्या काही इमारती दिसू लागतात आणि पुढे जाताना तीन पाण्याच्या टाक्या आहेत, त्यापैकी एकही पाणी पिण्यायोग्य नाही. किल्ल्यापासून जवळच असलेल्या डोंगराच्या मध्यभागी पडलेल्या फाट्याच्या मधोमध एक बुरुज व तटबंदी आहे.

या किल्ल्यापासून पश्चिमेस अहिवंतगड, पूर्वेस कन्हेरा, सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या-जावळ्या, दक्षिणेस धोडप व उत्तरेस अभोणा गाव व चणकापूर धरण दिसते.

 अप्रतिम धबधबा: भिवतास



भिवतास हे ठिकाण सुरगाणा तालुक्यातील केळवण, खोकरविहीर या पसिसरात आहे. या पश्चिम भागात सतत पाऊस पडला की, त्यामुळे परिसरात चांगले वातावरण तयार होते. लहान नदी नाल्यांना पूर येतो. पश्चिम वाहिनी नार, पार, वाजडी नद्यांना पूर आल्यावर भिवतास धबधबा ओसंडून वाहतो. 

येथे नदीच्या पाण्यातून ढसळणारा धबधबा असून हा धबधबा सुमारे १००० फुट खोल खाली कोसळतो. परिसरात निसर्ग रम्य वातावरण असल्याने प्रसन्न वाटते. त्यामुळे येथे गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक पर्यटक भेटी देत असतात. असे असले तरी हा धबधबा पर्यटकांसाठी सुरक्षित नाही.

धबधब्याच्या दोन्ही बाजुंना प्रचंड दरी आहे. त्यामुळे जर एखादयाचा तोल गेला तर त्यास वाचवणे अशक्यच आहे. परंतु जर येथे सुरक्षितता पुरवुन अधिक सोयी सुुविधा दिल्या तर पर्यटकांचा ओढा अजुन वाढु शकतो. 

या भागातील नागलीची भाकरी आवडीने बाहेरुन येणारे पर्यटक खातात. आदिवासी भागातील जेवणावळीकडे शहरातील पर्यटकांचा कल असतो. पर्यटनाच्या निमित्ताने येथे हॉटेल व्यवसाय बहरु शकतो.

 कळवणमधील एक किल्ला: प्रेमगिरी





प्रेमगिरी हा जोरदार सोपा आणि आनंददायक ट्रेक आहे ज्यास अवघ्या ४ तास लागतात. 
चणकापूर धरणाशेजारी सेलबारी रेंजमध्ये प्रेमगिरीने अनेक काळापासून आपली भूमिका कायम ठेवली आहे. प्रेमगिरी प्रदेशात सैन्याच्या कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. इतिहासाच्या नकाशावर अशी कोणतीही लढाई किंवा ऐतिहासीक घटना घडली नाही.

कळवणपासून जवळच एकलहरे गावाच्या मागेच प्रेमगिरी किल्ला आहे. एकलहरे गावातून हिंगळवाडी ला गाडी मार्ग आहे, हिंगळवाडी गडाच्या पायथ्याशी आहे. समुद्रसपाटीपासून ८१० मीटर उंचीचा हा गिरिदुर्ग पूर्व-पश्चिम पसरलेला आहे. प्रेमगिरी फारसा उंच नसला तरी किल्ल्यावर जाण्यासाठी तीव्र चढणीची पण घसाऱ्याची पायवाट आहे. 

हिंगळवाडीतून चालत गडाच्या पूर्वेस असलेल्या टोकापासून उतरणाऱ्या धारेवर चढायचे. या पायवाटेच्या शेवटच्या टप्प्यात २० फुटाचा कातळ टप्पा चढून जावं लागतं. गडमाथ्यावर पोहचल्यावर लांबलचक पसरलेला माथा दिसतो. गडाच्या पश्चिम टोकाकडे चालत गेल्यावर सुरुवातीस घरांचे दोन तीन पाया (जोते) दिसतात. 

बरंच अंतर माथा तुडवल्यावर  एका उंबराच्या झाडाखाली विराजमान असलेले शिवलिंग आणि नंदी महाराज दर्शन देतात. झाडाच्या छायेतच बांधलेलं एक छोटेसं पुरातन मंदिर दिसते. मंदिरात हनुमंताची सुंदर मूर्ती पाहायला मिळते. इतर गडावरील हनुमंत मूर्तीपेक्षा ही मूर्ती जरा वेगळीच आहे. हनुमंताच्या दर्शनास पंचक्रोशीतील भाविक गडावर येत असतात.

हनुमंत मंदिराच्या शेजारीच काही अंतरावर रामकुंड आणि सीताकुंड नावाच्या पाण्याच्या टाकी पाहायला मिळतात. टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. गडाच्या उत्तर टोकास कातळ कोरीव पायऱ्यांची वाट दिसते, हा गडाचा राजमार्ग ! एकलहरे गावातून प्रेमगिरी आणि इंग्रमाळ यांच्या मधील खिंडीत मळलेली पायवाट येते. खिंडीतून गडचढाई करताना शेवटच्या टप्प्यात कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. पायऱ्यांवर एका अरुंद कपरीला शेंदूर लावलेला दिसतो. मात्र दरवाजा आणि तटबंदी चे अवशेष कुठेही दिसत नाहीत. गडाचा वापर टेहळणीसाठी करत असावेत. 

प्रेमगिरीवरून दक्षिणेस अजिंठा सातमाळा रांगेतील  गडकोटांचे उत्तर दर्शन होते. सप्तश्रृंगी, मार्कंड्या, कण्हेरगड, जावळा-रावळा, धोडप, इखारा हा सर्व परिसर अगदी जवळ दिसतो. शेजारचा इंद्रमाळही लक्ष वेधून घेतो. 

किल्ला प्रेमगिरी, ता. कळवण


 एक निसर्गरम्य पर्वत: केम


केम हे सुरगाणा तालुक्यातील शिंदे दिगर या गावातील सर्वात उंच पर्वत आहे. हा पर्वत शिंदे दिगर, राहुडे, डांगराळे, गोगूळ, पांगारबारी या गावांच्या हद्दीत येत.

केम हा सातमाळा पर्वतरांगांच्या पश्चिमेस उभा असलेला एक महत्वाचा आणि आकर्षक पर्वत आहे. हे वणी - सापुतारा महामार्गावर आहे आणि म्हणूनच सापुतारा जवळ आहे जे एक हिल स्टेशन आहे. निऱ्हळ टेकडी त्याच्या ईशान्य दिशेला लिंगामे या गावात आहे. हातगडच्या दक्षिण-पश्चिमेस केम, पश्चिमेला केमवर एक विशाल टेकडी आहे.

या पर्वतापासुन सात नद्यांचा उगम झाला आहे. गिरणा नदी केम टेकड्यातून उगम पावते आणि पूर्वेला नाशिक व जळगांव जिल्हा ओलांडून जळगाव जिल्ह्यातील उत्तर दिशेला फिरते आणि तापी नदीत सामील होते. नदीकाठावरील धरणे म्हणजे चणकापूर आणि गिरणा धरण. गिरणा हे नाव गिरजा देवीचे नाव आहे (पर्वती) ज्याचे मंदिर पर्वताच्या शिखरावर आहे.

गावकरी नियमितपणे मंदिरात दर्शन घेतात. मार्ग झाडांपासून मुक्त आहे आणि शिखरावर पोहोचणे अगदी सोपे आहे. या पर्वतावर जंगल आहे, ह्या जंगलात खूप वेगवेगळ्या औषधी वनस्पती आहेत. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या सणाच्या वेळी या ठिकाणी यात्रा भरत असते. ईशान्य दिशेला या प्रदेशातून उगम झालेल्या चार नद्या आहेत. गिरणाचे खोरे डेक्कन पठारावर आहे आणि त्याच्या खोऱ्यात सुपीक माती आहे आणि ती खोलवर शेतात आहे. केम टेकडी नापीक आहे परंतु बर्‍यापैकी प्रख्यात आहे. एक लांब मार्ग उंच डोंगराला माथ्यावर आणतो.


 माझं साल्हेर



साल्हेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. साल्हेर-मुल्हेर या जोडीतला हा साल्हेरचा किल्ला असून सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच  किल्ला आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील गिरिदुर्गांच्या बाबतीत अतिशय संपन्न आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये ५७ गिरिदुर्ग आहेत. या गिरिदुर्गामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच असा साल्हेरचा किल्ला येतो.

नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागामध्ये बागलाण प्रांत आहे. तो सध्या सटाणा या तालुक्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. नाशिक जिल्ह्यामधील सर्वांत जास्त किल्ले सटाणा तालुक्यातच आहेत. साल्हेरचे युद्ध इ.सन १६७१-७२ मध्ये शिवाजी महाराजांनी साल्हेरचा दुर्ग जिंकला. 

साल्हेरवाडीतून गडावर जाणारा रस्ता साल्हेरच्या नैर्ऋत्येकडून गडाच्या पश्चिमेकडील माचीवर पोहोचतो. येथे उत्तराभिमुख दरवाजा असून ही माची तटबंदीने बंदिस्त केलेली आहे. माचीमधून पायवाटेने उत्तरेकडे चालत निघाल्यावर गडाच्या माथ्यावर जाणारी वाट लागते. ही वाट चार दरवाजे ओलांडून गडावर पोहोचते.

साल्हेरचा माथा हा चारही बाजूने उंच कातळकड्यांनी वेढलेला असल्यामुळे तटबंदीची फारशी आवश्यकता नव्हती. माथ्यावरच्या पठारावर एक उंच टेकडी आहे. ही टेकडी म्हणजे गडावरील सर्वोच्च ठिकाण आहे. याच्या माथ्यावर जाण्यासाठी सोपा मार्ग आहे. गडाच्या उत्तर अंगाला असलेल्या पठारावर विस्तीर्ण आकाराचा तलाव आहे. याला गंगासागर तलाव असे म्हणतात. गंगासागर तलावाशेजारी गंगा-यमुना टाके आहे. टेकडीच्या वाटेवर गुहा आहेत.

गडाच्या पायथ्याला साल्हेर निवासिनी गडकलिका देवीचे सुंदर मंदिर आहे. तसेच गृहस्वरूप अमृताभवानी व सिद्धिविनायक गणेश मंदिर आहे. गडाच्या माथ्यावर गुहेत दत्त व हनुमान मंदिर आहे. तसेच माथ्यावर मंदिर रेणुका देवीचे असून ही परशुरामाची माता आहे. ह्या देवीला अक्षगंगा सुद्धा म्हणतात. गडाच्या पहिल्या टेकडीवर चंदन टाके आहे त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. 

समोर छिद्र पडलेला डोंगर म्हणजे कंडाणा किल्ला आहे. साल्हेर गडाचे स्थान आणि उंची यामुळे आजुबाजुला असलेला विस्तीर्ण मुलुख न्याहाळणे आनंददायी ठरते. साल्हेरच्या माथ्यावरुन अचला, अहिवंत मार्कींडय़ा, रावळा-जवळा, धोडप, मुल्हेर किल्ले दिसतात. 

साल्हेर किल्ल्यावरील जंगलात बिबट्या आहेत. बिबट्याचे दर्शन काहीवेळा होते. तसेच माकडे व मोर खूप प्रमाणात आहे. मागील बाजूस घारी आहेत. ह्या किल्याच्या चारही बाजू पावसाळ्यात विविध प्रकारच्या पक्ष्यांनी भरलेल्या दिसून येतात.

अहिराणी येथील स्थानिक बोली आहे. ती मराठी मिश्रित भाषा आहे. अहिराणी सारखी ही भाषा वाटत असली तरी या भागातील कोकणा समाज आदिवासी लोक आदिवासी कोकणा-कोकणी भाषा म्हणून तिला ओळखतात. तसेच इथले भिल्ल भिलाव भाषा बोलतात.

Reference:

Wikipedia

 माता सप्तश्रृंगी देवी



नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते अर्धे पीठ आहे.

सप्तशृंगी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तो नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळते. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते.

माता सप्तश्रृंगी देवीची मूर्ती ८ फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. देवीला अकरा वार साडी लागते व चोळीला तीन खण लागतात. डोक्‍यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कमरपट्टा, पायात तोडे, असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात.

हे स्थान नाशिक जिल्ह्यात उत्तरेस ५५ किलोमीटर अंतरावरील दिंडोरी-कळवण तालुक्‍यांच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व - पश्‍चिम डोंगररांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४५६९ फूट उंचीवर आहे.

देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने ४७२ पायऱ्या आहेत. चढणीचा मार्ग असून, दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने परतीचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचे आहेत. पहाटे पाच वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. सहा वाजता काकड आरती होते. आठ वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसवून तिचा साज-शृंगार केला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. बारा वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी ७.३० वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात. 

 पंचरथी मंदिराचं देवळीकराड

 



नाशिकमधील प्रत्येक मंदिर आपली वेगळी परिभाषा सांगताना दिसतं. कोणी आपल्या वयानं, शैलीनं ओळखलं जातं. तर कोणी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्यानं नटलेलं असतं, तर कोणी इतिहास सांगत असतं. कळवण तालुक्यातील देवळी कराड हे गाव अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण अशा पंचरथी मंदिराने नटलेलं आहे.


मानवाची मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृतीचे आध्यात्मिक अंग आणि भौतिक सृष्टी वा वास्तूरूप सृष्टी म्हणजे आधिभौतिक अंग. नाशिकच्या मनोमय सृष्टीतील प्राचीन कलावैभवाच्या पाऊलखुणा प्रत्येक गावांमध्ये विखुरलेल्या दिसतात. प्राचीन लेणी, किल्ले, वाडे, मंदिरे, शिल्पे, नाणी, शिलालेख, बारव, वीरगळी अशा अनेक लहानमोठ्या कलाकृतींचा अनुभव पावलोपावली घेता येतो. भारतीय स्थापत्याचा, शिल्पांचा आणि चित्रांचा उपयोग आधिभौतिक संस्कृती समजण्यासाठी होतो. एवढेच नव्हे तर मंदिर-स्थापत्य आणि मूर्तिशिल्पांतून त्या समाजाची आध्यात्म‌िक बाजूही समोर येते. ही मंदिरे इतिहासाचं अंतरंग उलगडत असतात. म्हणून हा वारसा जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हा वारसा हरवला तर आपलं आधिभौतिक आणि आध्यात्मिक संरचनाच उलगडली जाणार नाही अन् माणसानं ही मंदिरे का बांधली याचं कोडही कधी उलगडलं जाणार नाही. म्हणूनच कळवण तालुक्यातील देवळी कराड (कऱ्हाड) हे गाव मनाला भुरळ घालतं. या गावातील महादेव मंदिर एका अनोख्या शिल्पसौंदर्याचा साक्षीदार असल्याचा पुरावा देतं. नागर शैलीतील हे मंदिर फक्त मंदिर नाही तर ग्रामस्थांच्या दृष्टीने हा एक रथ आहे. या रथाला पंचरथ अथवा पंचरथी असेही ते म्हणतात. देव एखाद्या रथावरून स्वार होण्यासाठी सज्ज झाल्याचा भास या मंदिराकडे पाहिला की होतो. मूळात रथ ही संकल्पना शिखराच्या निमुळत्या होत जात असलेल्या शैलीच्या थरावरून जरी ठरत असली तरी ग्रामस्थांच्या पंचरथ या अनोख्या संकल्पनेला दादच द्यावी लागते, म्हणूनच देवळी कराडची सफर शिल्पसौंदर्याने नटलेली ठरते.

नाशिक परिसरात भूमिज शैलीतील मंदिरे सर्वाधिक आहेत. मात्र नागर शैलीतील मंदिरे तशी कमीच आढळतात. त्यामुळे देवळी कराडचे नागर शैलीतील चांगल्या स्थितीतील महादेव मंदिर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. या मंदिराच्या शैलीबद्दल कोणताही फलक नसल्याने येथील ग्रामस्थ या मंदिराला हेमाडपंती मंदिर असेच म्हणतात. कोणत्याही आधुनिक उपकरणांशिवाय साकारलेले मंदिर हातांनी साकारलेले असेल यावर विश्वास बसत नाही. प्रथम दर्शनीच हे मंदिर रथासारखे भासते. 

महादेव मंदिरात प्रवेश करताना चार-पाच पायऱ्या चढून गेल्यावर आपण अर्धमंडपात येतो. अर्धमंडपात डावी-उजवीकडे कठडा आहे. वर निमुळते छत असून, चौकोनी स्तंभ त्याला आधार देत उभे आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर डावी उजवीकडे शैवद्वारपाल आपले स्वागत करतात. मंदिराला एकूण तीन द्वारशाखा आहेत. पैकी एक स्तंभनक्षीची आहे. तिच्या माथ्यावर गणेशपट्टी असून, त्यावर अस्पष्ट झालेली गणेश प्रतिमा आहे. मंदिराचे सभामंडप गूढमंडप म्हणजे बंदिस्त आहे. अगदी साध्या स्वरूपाचे सभामंडप असून, शिल्पांनी नटलेले खांबांवर ते आधारलेले आहे.

गर्भगृहात जाण्यासाठी तीन-चार पायऱ्या उतरून जावे लागते. गर्भगृहाच्या मध्यभागी शिवपींड तर समोरच्या देवळीवजा कोनाड्यात गणपती व उमामहेश्वराच्या मूर्ती आहेत. उमामहेश्वरांची मूर्ती सुंदर आहे. गर्भगृहात पूर्वी विह‌िरीसारखा खोल खड्डा होता, खड्डा नंतर बुजविण्यात आला. येथून जाण्यासाठी बोगदाही होता, असेही ग्रामस्थ सांगतात. मात्र आता ना बोगदा आहे नाही पाणी. महादेव मंदिर आतून जेवढे सुंदर तेवढेच बाहेरूनही आहे. पीठ, उपपीठ, पद्मपट्ट, अधोजाड्यकुंभ, कणी, कीर्तिमुख व मिथुन शिल्प अनुभवायला मिळतात. मंदिराच्या बाहेरील बाजूस प्रामुख्याने मूर्ती असतात; मात्र या मंदिराला भौमेतिक नक्षी आहे. मंदिर पाहून पिंपळाच्या झाडाकडे आपला मोर्चा वळवायचा. या पिंपळाची मुळे गावभर पसरलेली आहेत.देवळी कराड असे गावचे नाव का पडले असेल याचे उत्तर महादेव कोळी व कोकणा आदिवासींकडे नाही. हा समाज नंतरच्या काळात येथे स्थलांतरीत होऊन आला असणार; मात्र कराडला देवळी हे नाव मंदिरावरून पडले असेल, हे स्पष्टच आहे. देवळी कराडकरांचा महाशिवरात्री हा मुख्य उत्सव.

देवळी कराड हे गाव खरेतर लहान आदिवासी पाडा आहे. तो नंतरच्या काळात वसला; मात्र त्यापूर्वी हा परिसर मोठा इतिहास घेऊन जगत असणार यात शंका नाही. याच इतिहासाच्या या पाऊलखुणा जपण्याची गरज आहे. तरच नाशिकच्या इतिहासाची कवाडे कायम खुली राहतील, अन्यथा आपण एकएक करून सर्वकाही हरवून बसू.

Reference by:
Marathi News from Maharashtra Times, 7 May 2017

 

  हतगड_किल्याचा_गौरवशाली_इतिहास






किल्यावर_तब्बल_४७०_वर्ष_जुना_शिलालेख.

इ स १५४८. साली कोरलेला शिलालेख हतगड किल्ल्यावर असून किल्ल्या हतगड_किल्याचा_गौरवशाली_इतिहास हतगड_किल्याचा_गौरवशाली_इतिहास चा उजव्या बाजूला राणीचा बाग म्हणून एक आडवाट आहे त्या ठिकाणी असून तब्बल ४७० वर्षांपूर्वी कोरलेला शिलालेख आहे. या शिलालेखाची उंची ४फूट उंच २.४इच रुंद असून सोळा ओळींचा शिलालेख असून पहिल्या १४ओळी संस्कृत आणि शेवटच्या २ मराठी म्हणजेच संस्कृत+प्राकृत  अशा भाषेत हा शिलालेख आपल्याला बघायला मिळेल.

 बागलानच्या  बागुल घरान्याच तब्बल ३५०वर्ष राज्य या किल्य्यावर होत.निजामशाहीतील  निजाम घराण्यातील सर्वात मोठा राजा बुऱहान निजामशहा यांच्या कडून बागुल घराण्यातील भैरवसिंग राजाने हा किल्ला वेढा घालून इ. स १५४८ साली आपल्या ताब्यात घेतला असा ह्या शिलालेखात उल्लेख आहे.

     पण जवळपास आता ५०० वर्ष होत असलेला हा शिलालेख आता झिजत चालला असून महाराष्ट्रातील किल्यांच्या इतिहासातील देवनागरी लिपीत कोरलेला हा सर्वात मोठा शिलालेख  हतगड किल्ल्याचा असावा असे इतिहास अभ्यासकांचे मत असून या त्याचे जतन करून त्यावर अभ्यास करणे गरजेचे आहे.

-------------------------------------------------------------------

Glorious_history_of_Hatgad fort












Fort_470_years_old_inscription on the fort. 1548 The inscription carved in the year is on Hatgad fort and the fort is a glorious history of Hatgad fort. The height of this inscription is 4 feet high, 2.4 inches wide and it is an inscription of 16 lines. The first 14 lines are in Sanskrit and the last 2 are in Marathi ie Sanskrit + Prakrit.

The fort was ruled by the Bagul dynasty of Baglan for 350 years. The fort was besieged by Bhairav ​​Singh king of the Bagul dynasty from Burhan Nizamshah, the eldest king of the Nizam dynasty. It is mentioned in this inscription that he took possession of it in 1548.

However, this inscription, which has been going on for almost 500 years, is now in a state of disrepair.

नाशिकचं कपालेश्वर मंदिर, जिथे महादेवासमोर नंदी नाही ; जाणून घ्या आख्यायिका...

         नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या किना-याजवळ कपालेश्वर महादेव मंदिर आहे. पुराणात असे म्हटले आहे की, भगवान शिव शंकर येथे काही काळ वास्तव्यास होते. जगभरात असलेल्या प्रत्येक शिवमंदिरात नंदी हा शिवपिंडीसमोर असतोच. नंदी हा जरी महादेवाचे वाहन समजला जात असला तरी नाशिकच्या या मंदिरात महादेवाच्या पिडींसमोर नंदीच नाही, कारण याठिकाणी महादेवाने नंदिला आपले गुरु मानले आहे. मग, नेमकं असं काय झालं की या ठिकाणी महादेवाने नंदिला आपलं गुरु मानलं आहे. चला तर जाणून घेऊया या मागची आख्यायिका….
अशी आहे या मागची आख्यायिका…
        एकदा इंद्र सभा भरली होती. त्या सभेला सर्व देव उपस्थित होते. त्यावेळी ब्रम्हदेव व शिवशंकर यांच्यात वाद झाला. त्यावेळी पाच तोंडे असलेल्या ब्रम्हदेवाची चार तोंडे वेध म्हणत तर एक तोंड निंदा करत असे. संतापलेल्या महादेवांनी ब्रम्हदेवाचे पाचवे तोंड (निंदणारे) तोंड उडविले. ते तोंड शिवशंकर यांच्या हाताला चिटकून बसले. त्यामुळे शिवशंकरास ब्रम्हहत्येचे पातक लागले. त्यावेळी महादेवांनी या पातकापासुन स्वताची मुक्ती करुन घेण्यासाठी त्रिभुवन पालथं घातलं. मात्र, त्यांचं पातक काही दूर होईना… या पातकापासून आपली कशी सुटका करुन घ्यावी याची चिंता महादेवांना सतावत होती.
         ब्रम्हहत्येच्या दोषापासून मुक्ती कशी मिळवायची या चिंतेत असलेल्या महादेवांची हीच समस्या अखेर नंदीने सोडविली. अशातच नंदीनं महादेवांना नाशिकच्या रामकुंडावर आणले. याठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवांचं ब्रम्हहत्येचं पातक दूर झालं आणि ते ब्रम्हहत्येच्या दोषातुन मुक्त झाले. आपल्याला या पातकापासून नंदीनं मुक्ती दिली, यामुळेच या ठिकाणी महादेवांनी नंदीला आपला गुरु मानलंय. अशी आख्यायिका आहे.
रामकुंडात विसावला नंदी
        कपालेश्वर मंदिराच्या समोरच काही अंतरावर गोदावरी नदी वाहते. या नदीतच म्हणजेच रामकुंडात हा नंदी विसावलेला आहे. यावेळी शंकराने नंदीला सांगितल्यानुसार बारा ज्योतिर्लिंगानंतर नाशिकमधील कपालेश्वर मंदिराचे महत्व आहे. महादेवाचं हे असं मंदिर आहे, जिथे नंदीच नाही. एका कपालेश्वर मंदिराच्या दर्शनात बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य मिळत असल्याचा पौराणिक संदर्भही सापडतो.
महाशिवरात्रीला होते मोठी गर्दी
          आजच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. सकाळपासून भाविक दर्शनासाठी रांगा लावतात. महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक केला जातो. पूजाविधी केले जातात. याशिवाय कपालेश्वर मंदिरात दर सोमवारी व श्रावणी सोमवारी भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करतात.

Gargoti- Mineral Museum

Unknown

Gargoti is the only museum in the country which houses such a vast collection of crystalline minerals; is owned privately and is conceived by Mr.K.C.Pandey, an enthusiast who has been collecting from last 30 years.

The Museum is set in a beautiful, fully airconditioned building and is a must-visit location for all those who love nature. The museum is divided into two galleries- Minerals from the Deccan Plateau and The Prestige Gallery displaying the best national as well as international stones.

How to Reach and Visit timings:
It is located on pune Nashik Highway, approx 25Kms before Nashik in MIDC area near Sinnar.

There are clear directions and Welcome Arch if you are travelling from Pune. Do check out recent timings. When I had visited back in 2007 this it was open 24 hours all days a week.


Can’t remember exactly but there was some 250/- ticket. It’s a guided tour the guide explains you in detail about all the rocks and where they are found.

Website: http://www.gargoti.com/

At its grand entrance we are welcomed by a tall statue of Mother India and there are two huge Ganpati statues, one in quartz and other in single jaipuri rock. The museum houses the collection of Zeolites and it said that some of the Zeolites are more precious than Diamonds.


There are various specimens of diamonds, cut stones, light green cubical apophyllite, crystals of yellow calcite, blue-green aquamarine and Punes own cavansite.

There are some stones which shine in dark while others are hidden like treasure inside rocks.

It amazing to see simple oval stones with varied designs from Narmada- called Narmade che Gote. A souvenir shop selling mineral specimen, necklaces and other decorative items is attached to the museum.

It’s simply amazing and worth visit this marvellous museum.

-December 26, 2007

 http://ekpravas.blogspot.com/2009/08/gargoti-mineral-museum.html

 

घोरपडे घाट व जुने त्र्यंबकेश्वर मंदिर


१९ व्या शतकातील घोरपडे घाट हा पेशवेकालीन घाट आहे. १८३१ साली तो बांधण्यात आला.

शिवाजी पुलाजवळ मुठा नदीच्या डाव्या काठावर बांधलेली ही पायऱ्या असलेली व किल्ल्यासारखी दिसणारी छोटेखानी दगडी वास्तू आहे. दैनंदिन विधी करण्यासाठी नदीच्या काठावर बांधलेल्या या घाटाच्या मागे मंदिराचे अवशेष दिसतात. पूर्वीच्या भांबुर्डा गावात असलेला हा घाट फेब्रुवारी १८३१ मध्ये पेशवे सरदार यशवंतराव घोरपडे यांचे वंशज दौलतराव घोरपडे यांनी बांधला. चार बुरुज, एक भक्कम भिंत, नगारखाना आणि नदीच्या दिशेने उतरून जायला पायर्‍या अशा स्वरुपाचे या घाटाचे बांधकाम होते. तटबंदीच्या भिंतीला दोन खोल्याही जोडलेल्या आहेत. इतिहासकार दत्तो वामन पोतदर यांनी या घाटाला भेट दिल्याविषयी आणि तिथे १० फेब्रुवारी १८३१ असे कोरलेल्या दगडाविषयी लिहून ठेवले आहे.

१९६१ च्या पुरात या वास्तूचा काही भाग वाहून गेले आणि शिलालेखही उद्ध्वस्त झाले. ही वास्तू अत्यंत जीर्ण झाली असली, तरी त्या ठिकाणी दोन मंदिरांचा पाया दिसतो. यापैकी एक मंदिर महादेवाचे असल्याची खात्री पटली आहे, पण दुसरे मंदिर अद्याप समजू शकलेले नाही. १७७३ ते १८१० या कालावधीत नोंदवण्यात आलेल्या अनेक याद्यांमध्ये घोरपडे घाटावरील भांबुर्डा गावातील त्र्यंबकेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. येथे मंदिरचे अवशेष असण्याची खूप शक्यता आहे. भांबुर्डा गावात पेशवाईच्या काळातील वरुडेश्वर आणि त्र्यंबकेश्वर ही दोनच शिवमंदिरे असल्याची नोंद आहे. भांबुर्डा येथील काही वृद्ध रहिवाशांना त्र्यंबकेश्वर मंदिर अस्पष्ट आठवते आणि जुन्या काळात नागबळी पूजेसाठी त्याचा गाभारा उपयोगात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र त्र्यंबकेश्वर मंदिराच्या अज्ञात पायाचे संकेत मिळाले असले, तरी या गृहीतकाला पुष्टी देण्यासाठी कोणताही ठोस पुरावा नाही.

पुणे तहसीलच्या नगर विकास नकाशात काही छत्र्या (स्मारके) दाखविण्यात आल्या आहेत, पण त्या कोणाच्या असाव्यात याबद्दल फारशी माहिती नाही. एक विश्वास असा आहे की, एक छत्री दौलतरावांच्या आई बयाबाई घोरपडे यांच्या सन्मानार्थ होते.

image









शिवाजीनगर येथील काँग्रेस भवन रोडवरून बसस्टॉपच्या मागे असलेल्या नदीपात्राकडे जाणार्‍या मातीच्या रस्त्यावरून या घाटावर पोहोचता येते. दुर्दैवाने योग्य देखभालीअभावी या घाटावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. तसेच बांधकामाच्या कपारींमधून झाडे उगवल्याने हे बांधकाम मोडकळीस आले आहे. सुलभ शौचालयाशेजारच्या शिवाजी पुलावरून घाटापर्यंत पोहोचण्यास अडथळा आहे. इतिहासकार मंदार लवाटे यांच्या संग्रहातील एका जुन्या छायाचित्रात सर जॉर्ज लॉईड ब्रिजच्या उभारणीदरम्यान एका छोट्या मनोर्‍याचेही अस्तित्व दाखवण्यात आले आहे. नंतर लॉईड पूलाला शिवाजी पूल असे नाव देण्यात आले.

सौजन्य: टाटा टेक्नॉलॉजीस्.

 https://map.sahapedia.org/article/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%20%E0%A4%B5%20%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0/5606

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...