Friday, November 24, 2023

तिर्थ बुद्रुक : सातवाहनकालीन बौद्ध केंद्र उस्मानाबाद

 

धाराशिव की उस्मानाबाद ? काय सांगतो इतिहास ? जाणून घ्या...



शिवलिंग, चामर लेणी

आजच्या घडीला नामांतराचे वारे सर्वत्र घुमू लागले आहे. इलाहाबादचे 'प्रयागराज' तर फैजाबादचे 'अयोध्या' झालेले आहे. हे वारे महाराष्ट्रातही पोहोचले आहे. नामांतर करणे योग्य की अयोग्य अशा चर्चांना उत आलेला आहे. इतिहासात होऊन गेलेल्या चुकांचा पाढाच वाचला जात आहे. ते एका अर्थाने योग्य आहे, कारण जो देश स्वतःचा उज्ज्वल इतिहास विसरतो, तो प्रगती करू शकत नाही. नाव बदलून विकास साधता येत नसला तरी स्थानिक लोकांची अस्मिता जागी होऊन सांस्कृतिक गुलामी संपवता येऊ शकते. अशाने जनभावनेचे मनोधैर्य नक्कीच वाढण्यास मदत होईल. परंतु कुठल्याही ठिकाणाचे नामांतर करण्यापूर्वी त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी तपासणे आगत्याचे आहे.

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ व अहमदनगरचे ‘अंबिकानगर’ करावे का? किंवा करू नये अशा चर्चांच्या उधाणात उस्मानाबादचे ‘धाराशिव’ का व्हावे ? याविषयी म्हणावी तसी चर्चा होताना दिसत नाही. खरे तर महाराष्ट्रातील इतर ठिकाणांच्या अगोदर उस्मानाबादचे नाव 'धाराशिव' व्हायला हवे. तेव्हाच मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्रसैनिकांना खरी श्रद्धांजली वाहता येईल. सर्वप्रथम धाराशिव आणि उस्मानाबाद ही नावे कशी? व केव्हा? प्रचारात आली, या मागची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहूयात.

संपूर्ण उस्मानाबद जिल्ह्याला सध्याच्या ज्या उस्मानाबादमुळे ‘उस्मानाबाद जिल्हा’ हे नाव प्राप्त झाले, त्याचे पूर्वीचे नाव ‘धाराशिव’ होते, हे सर्वांना माहित आहे. या ठिकाणाला 'धाराशिव' नाव असण्याचा सर्वांत प्राचीन व अस्सल पुरावा तब्बल बाराशे वर्षांपूर्वी इ. स. ८०७, ८१० व ८१२ या वर्षांतील राष्ट्रकूटकालीन ताम्रपटांत पाहायला मिळतो. यापूर्वीही सु. सहाव्या शतकात येथील परिसरात जैन व हिंदू लेणी खोदली गेली होती. म्हणजेच आजपासून किमान पंधराशे वर्षांपूर्वीही धाराशिव हेच नाव प्रचारात असावे, हे सहजच लक्षात येते.  

धाराशिव हे नाव या ठिकाणाला कसे प्राप्त झाले, यांविषयी अनेक मत-मतांतरे आहेत. एका मतानुसार ‘धारा’ आणि ‘शिव’ नावाच्या राजांमुळे हे नाव रूढ झाले असावे. तसेच 'धाराशिव'  या नावाला दोन स्थानिक भिल्ल कारणीभूत असल्याचेही सांगितले जाते. एका अन्य मतानुसार शहराच्या जवळच खोदल्या गेलेल्या चांभार लेणीतील सु. सहाव्या शतकातील 'शिव' (शिवलिंग) व लेण्यांजवळून वाहणाऱ्या भोगावतीच्या जल’धारा’ यामुळे 'धाराशिव' हे नाव प्राप्त झाले असावे. अन्य एक मत म्हणजे धारासूरमर्दिनीचे मंदिर होय. धारासूरमर्दिनी या शब्दातील ‘धारा’ व चांभार लेणीतील ‘शिव’ मिळून धाराशिव झाले असावे. परंतु या मतांविषयी एकवाक्यता दिसून येत नाही.

धाराशिव नावाचा उल्लेख अपभ्रंश भाषेतील ‘करकण्डचरिउ’ (११ वे शतक) व संस्कृतमधील ‘बृहत्कथाकोश’ (इ. स. ९३१-३२) या  ग्रंथांतही सापडतो. यानंतर चौदाव्या शतकात बहमनी सत्तेची पाळेमुळे या ठिकाणी घट्ट बसली. चौदाव्या शतकात ख्वाजा शमसुद्दीन दर्गा बांधला गेला. परंतु याही काळात धाराशिव हेच नाव प्रचारात होते. मुस्लिम शासक असले तरी त्यांनी जनतेच्या भाव-भावनांचा आदरच राखला. नामांतराचा कुणी विचारही केला नाही. त्यानंतर शिवकाळात या भागावर आदिलशाही व निजामशाही ही घराणी राज्य करीत होती (सु. १५ ते १७ वे शतक). त्यानंतर मोगलांकडे हा प्रदेश आला. औरंगजेबाचे वास्तव्य काही काळ तुळजापूर या ठिकाणी होते. म्हणजेच तोही जनभावनांच्या विरुद्ध जाऊ शकला नाही. यावेळीही धाराशिव नाव प्रचारात होते.

मोगल सत्ता कमजोर झाल्यानंतर निजाम-उल-मुल्क (मीर कमरुद्दीन खान) या मोगल सरदाराने हैद्राबादला आपली राजधानी बनवून इ.स. १७२४ साली निजाम राज्याची स्थापना केली. धाराशिवसह मराठवाडा निजाम राज्यात राहिले. तेथून पुढे सु. १८७ वर्षे इतर निजाम शासकांनी राज्य केले. म्हणजेच या निजामांच्या काळातही अगदी १९११ पर्यंत ‘धाराशिव’ हेच नाव प्रचलित होते. कागदोपत्रीही असाच उल्लेख मिळतो. ही ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता धाराशिव हे नाव येथील लोकांची ओळख बनले होते, असे दिसून येते. हिंदू-मुस्लिमांच्या  कित्येक पिढ्यांना हेच नाव माहित होते. यावरून धाराशिव हे मूळ नाव या भागातील लोकांसाठी अस्मितेचा मुद्दा आहे, हे सहज कळून येते.

आता उस्मानाबाद नावाची पार्श्वभूमी पाहूयात. इ. स. १८६१ साली 'नळदुर्ग' हे जिल्हा केंद्र बदलून ते धाराशिवला आणण्यात आले. इ .स. १९११ साली उस्मान अलीने आपल्या राज्यरोहनाचे औचित्य साधून धाराशिव हे मूळ नाव बदलून उस्मानाबाद असे केले. परंतु हे नाव लोकांच्या पचनी कधी पडलेच नाही. व या नावाचा विरोध हा वाढतच राहिला. आजही जुन्यापिढीतील लोक उस्मानाबाद ऐवजी 'धाराशिव' हेच नाव मुखात घेतात. ते इतके तोंडवळणी पडले की आजही ते लोकांच्या मनात घर करून राहिले आहे. 

यानंतरचा बराचसा इतिहास आपणास माहित आहे. भारतात स्वातंत्र्य चळवळ धगधगत होती. मराठवाडयातील जनतेलाही जुलमी निजामांकडून स्वातंत्र्य हवे होते. अनेक आंदोलने व छुट-पुट लढाया सुरु होत्या. मुहम्मद अली जिनांनी पाकिस्तानचे बिगुल वाजविलेच होते. जनक्षोभ वाढत होता. पुढे १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. मराठवाडयातील जनताही निजामांचा प्रतिकार करू लागली. परंतु जनभावनांचा आदर करेल तो उस्मान अली कसला. जनक्षोभ तीव्र झाल्याचे कळताच रझाकाररुपी छळ सुरु झाले. जनता यात पार होरपळून गेली. जनतेचे आतोनात हाल होऊ लागले. निजामी अत्याचाराचा पूर आला. या सर्व गोष्टींना उस्मान अली जबाबदार होता, ज्याचे नाव धाराशिव शहराला दिले गेले होते.

आजच्या पिढीतील पूर्वजांवर उस्मान अलीमुळे अत्याचार झाले. कित्येकांच्या कत्तली झाल्या. अशा या उस्मान अलीचे नाव, ज्याचा आम्हा धाराशिवकरांशी काडीचाही संबंध नाही, जो पाकिस्तानशी हातमिळवणी करू इच्छित होता, तसेच जनभावनेच्या विरुद्ध जाऊन तो स्वतंत्र राष्ट्र उभारू इच्छित होता. ज्यासाठी तत्कालीन कॉंग्रेस व भारताचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांना पोलीस कार्यवाही करून धाराशिवसह मराठवाडा मुक्त करून घ्यावा लागला. ज्या निजाम राज्यात महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर इ. सारख्या नेत्यांना सहजासहजी सभा घेण्यास परवानगी मिळत नसे. या सर्व गोष्टींना कारणीभूत होता तो उस्मान अली. या उस्मान अलीचे नाव या जिल्ह्याला असणे म्हणजेच असंख्य हुतात्म्यांचा, देशभक्तांचा व भारतमातेचा अपमान नाही का? हा आपल्या तमाम पूर्वजांचा अपमान नाही का? मराठवाडा मुक्तीसाठी हुतात्म्यांनी रक्त सांडले नसते तर आजचे सरकार तरी येथे असते का? या सर्व गोष्टींचा विचार महाराष्ट्र सरकारने करायला हवा. 

इतर नामांतरे योग्य की अयोग्य याविषयी आम्ही धाराशिवकर सध्यातरी बोलू इच्छित नाही. परंतु उस्मानाबादचे धाराशिव हे नाव असणे किती योग्य आहे, हे या नावामागच्या इतिहासावरून कळून येते. त्यामुळे 'धाराशिव' या नावाला विरोध न करता व राजकारणाला बळी न पडता, कायदेशीररित्या एकमताने सध्याचे उस्मानाबाद हे नाव बदलून ‘धाराशिव’ हे नाव व्हायला हवे. तेव्हाच मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांस खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली जाईल.

  

धाराशिव लेणी

धाराशिव येथील दुर्लक्षित चांभार लेणी (मराठी)


लेणी क्र.२, चांभार लेणी, उस्मानाबाद.
लेणे क्र. २, चांभार लेणी, धाराशिव (उस्मानाबाद).
उस्मानाबाद शहर व परिसरच नव्हे तर संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यालाच समृद्धशाली ऐतिहासिक व पुरातत्वीय असा वारसा लाभलेला आहे. प्राचीन काळी सातवाहन-रोमन व्यापारी मार्ग याच प्रदेशातून जात होता. पुढे वाकाटकोत्तर काळ, चालुक्य, राष्ट्रकूट, उत्तर चालुक्य, यादव, बहामनी, आदिलशाही व निजाम काळात हा भाग एक अतिमहत्त्वाचा प्रदेश बनून राहिला. त्यामुळे साहजिकच प्राचीन लेणी, स्तूप, मंदिरे, शिल्प, किल्ले, गढी, वाडे, मठ, दर्गे, मस्जिद इ. अशी अनेक प्राचीन स्थळे जिल्ह्यात जागोजागी विखुरलेली आपणास आढळून येतात. आज हा जिल्हा ‘तुळजाभवानी मातेचा जिल्हा’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.  
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर व परिसरात धाराशिव लेणी, हातलाई देवी टेकडी, चांभार लेणी, कपालेश्वर मंदिर, लाचंदर लेणी, हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाजी दर्गा इ. स्थळे विशेष प्रसिद्ध आहेत. यांपैकी चांभार लेणीचे नाव आपल्यापैकी अनेकांनी ऐकले असले तरी, याचे महत्व व ऐतिहासिकता अजूनही अनेकांना माहित नाही.  
तत्कालीन धाराशिव परिसराचे सर्वप्रथम सखोल सर्वेक्षण जेम्स बर्जेस या एका स्कॉटिश विद्वानाने १८७५ च्या डिसेंबर महिन्यात केले. ते धाराशिव पंचक्रोशीतील चांभार लेण्यांसह अनेक ठिकाणी फिरले व विविध स्थळांच्या नोंदी नमूद करून घेतल्या. त्यांनी १८७८ साली लंडन येथून प्रकाशित झालेल्या ‘द अँटिक्वटीज इन द बिदर अँड औरंगाबाद डिस्ट्रिक्ट्स’ या आपल्या एका अहवालामध्ये चांभार लेणीची सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यावेळी त्यांनी यातील एका लेण्याचा तलविन्यासही बनविला होता. 
भोगावती नदीच्या जवळच डाव्या बाजूला असणाऱ्या एका छोट्याशा टेकडीवर सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी उत्तराभिमुख या हिंदू लेणी खोदण्यात आल्या. उस्मानाबाद शहरापासून दक्षिण-पश्चिमेला वैराग रस्त्याने जाताना या लेण्यांचे दर्शन होते. येथून पुढे डाव्या बाजूला पायवाटेने लेण्यांपर्यंत पोहोचता येते. वास्तविक पाहता येथे दोन स्वतंत्र लेणी खोदण्यात आलेली आहेत.
पहिल्या लेण्याच्या समोरील बराचसा भाग कोसळलेला असला तरी काही खोल्या व इतर खोदकाम सुस्थितीत आहे. लेण्याच्या पश्चिम दिशेला पूर्वाभिमुख द्वारावर नक्षीकाम केलेली एक खोली आहे. याच्या दोन्ही बाजूंना काही आकृती अस्पष्ट दिसतात. 
पश्चिमाभिमुख खोली, लेणे क्र. १. चांभार लेणी.

याच्या वरच्या बाजूला काही शिल्पकामांसाठी आखलेली ओळ दिसते. यांपैकी उजव्या हाताला फक्त गणेशाचे एक छोटेसे शिल्प कोरण्यात आलेले दिसून येते.
गणेश प्रतिमा (खंडित) लेणे क्र.१. (चांभार लेणी)/(सौजन्य: जयराज खोचरे)

जेम्स बर्जेसच्या मते हा शिल्पपट मुळात सप्तमातृकांसाठी आखलेला असावा. येथून थोडेशे पूर्वेला अजून एक खोली आहे. मुळात ती तुलनेने एका मोठ्या खोलीच्या मागे असावी, असे दिसते. या खोलीच्या द्वाराला तीन सपाट शाखा आहेत. जवळच चार स्तंभयुक्त ओबडधोबड काम दिसते. लेण्यासमोर पडलेला दगडांचा खच व लेण्याच्या भिंती दरम्यान अजून दोन खोल्या आहेत. त्यांपैकी एकात थोडेसे खंडित झालेले एक विशाल ‘शिवलिंग’ आहे. यामुळे येथे पूर्वीपासूनच शिवाराधना होत असावी, असे दिसून येते. या खोल्यांना लागून चार स्तंभयुक्त एक दुसरी खोली आहे. लेण्याच्या पूर्वेला शेवटी अजून एक मूर्तीविरहित खोली असून ती पश्चिमाभिमुख आहे. या लेण्याच्या समोरील एकूण भाग जवळपास १०० फुट रुंद आहे.

शिवलिंग, लेणी क्र. २. धाराशिव
शिवलिंग, लेणे क्र. १. धाराशिव.
या पहिल्या लेण्यापासून पूर्वेला थोड्याच अंतरावर वरच्या बाजूला, उत्तराभिमुख एक दुसरे हिंदू लेणे आहे. याची रुंदी २६ ते ३१.७ फुट तर खोली २५ ते २८.६ फुट भरते. या लेण्याची एकही भिंत सरळ व व्यवस्थितपणे खोदण्यात आलेली दिसत नाही. लेण्याच्या पुढचा भाग दोन अष्टकोनी खांबांनी युक्त असून दोन शिल्पविरहित अर्धस्तंभ दोन्ही बाजूंना आहेत. सभामंडपात दोन आडव्या ओळींमध्ये चार-चार असे मिळून एकूण आठ स्तंभ आहेत. यांपैकी मधल्या भागातील समोरील दोन स्तंभ १६ बाजूंचे, मागील ओळीतील मधले दोन अष्टकोनी, तर सभामंडपाच्या दोन्ही बाजूंचे चौकोनाकृती आहेत. स्तंभांचे शीर्ष साधारण आहेत. 
मंडप, लेणे क्र.२, चांभार लेणी, धाराशिव (उस्मानाबाद)
गर्भगृहाचे द्वार अलंकृत असून दोन्ही बाजूंना अर्धस्तंभ कोरण्यात आलेले आहेत. हे स्तंभ कर्नाटकातील बदामी लेण्यातील गर्भगृह, तसेच मुंबई जवळील घारापुरी येथील लेणी क्र. चार येथील प्रवेशद्वारांसारखेच आहेत.
या लेण्याचे गर्भगृह ७.१० x ७.८ फुट असून मधोमध एक ४.५ x २.८ फुटाची वेदी (उंच आसन) आहे. त्या वेदीच्या मधोमध एक फुटाचे चौकोनाकृती वेज आहे. या लेण्याचा इतर लेण्यांशी तौलनिक अभ्यास केल्यास हे दुसरे लेणे भगवान विष्णू किंवा दुर्गा अथवा महालक्ष्मी या देवतांना समर्पित असावे, असे जेम्स बर्जेस यांचे मत आहे.
लेणे क्र.२ चा तलविन्यास (सौजन्य : जेम्स बर्जेस)
जेम्स बर्जेसच्या मते चांभार लेणी हिंदू असून, ती सर्वसाधारणपणे सहाव्या शतकाच्या सुरुवातीस खोदण्यात आली असावीत. या लेण्यांच्या जवळच ‘लाचंदर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या अन्य लेणी असून, भोगावती नदीच्या आजूबाजूला खडकात काही खोदकाम केलेल्या खोल्या दिसून येतात.
या चांभार लेण्यांचे स्थान लयन स्थापत्य विकासाच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. संपूर्ण भारतात आरंभिक काळात खोदण्यात आलेल्या हिंदू लेण्यांपैकी ही एक असून, येथे उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात प्राचीन असे शिवलिंग आहे.  
लेणे क्र. २ समोरील आवार व सुंदर दृश्य
या प्राचीन शैव स्थळाचे संवर्धन व संरक्षण होणे गरजेचे आहे. लेण्यांची स्थिती अत्यंत शोचनीय असून त्यांच्या जपणुकीची योग्य ती व्यवस्था तात्काळ न केल्यास महाराष्ट्राच्या प्राचीन वैभवाचा हा मौल्यवान ठेवा नष्ट होण्याची शक्यता आहे. लेण्यांची दुर्दशा नैसर्गिक आणि मानवी आपत्तीमुळे झाली आहे. हा वैभवशाली वारसा उस्मानाबादकरांनी व शासनाने जपायला हवा. तसेच या शैव-पीठाचे पुनरुज्जीवन करायला हवे. सर्वांनी एकत्र येवून उस्मानाबाद शहराचा उज्ज्वल इतिहास जगासमोर मांडण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. असा हा अनमोल सांस्कृतिक ठेवा भावी पिढी समोर ठेवण्याच्या आतच नामशेष होवू नये, म्हणून लेणी संवर्धनाचे पवित्र कार्य हाती घ्यायला हवे. आपण सर्वांनी आपले व आपल्या पूर्वजांचे अस्तित्व टिकवून ठेवल्यास आपल्या उज्ज्वल परंपरेचे खऱ्या अर्थाने रक्षण होणार आहे.

 

 

 

 https://vijaysardehindi.blogspot.com/2020/07/blog-post.html

संभवतः गौतम बुद्ध के जीवन से संबंधित घटना (सफ़ेद चूना पत्थर में  बना शिल्प)

आज से लगभग १८०० साल पूर्व वर्तमान महाराष्ट्र सहित दक्षिण भारत के अधिकांश हिस्से पर सातवाहनों का अधिकार था. इनका व्यापार यूरोप के रोमन साम्राज्य के साथ भी हुआ करता था. रोमन साम्राज्य से विभिन्न प्रकार का सामान भारतीय प्रायद्विप के पश्चिमी समुद्री तट पर बने बंदरगाहों तक जहाजों के माध्यम से आया करता था. इन बंदरगाहों से भारत के अंदरूनी प्रदेशों से व्यापारी-सामान रोमन साम्राज्य के लिए निर्यात किया जाता था. हमारे व्यापारी भी इस वैश्विक व्यापार में निपुण थे. मसाले, मणि, सूती कपड़ा तथा अन्य जीवनावश्यक वस्तुओं का लेन-देन व्यापार के माध्यम से हुआ करता था. यह व्यापार सातवाहनकाल में अपनी चरम सीमा तक पहुँच चुका था. इसी कारण से भड़ोच, शुर्पारक (नाला सोपारा), कल्याण, चौल, ब्रह्मपुरी, भोकरधन, अरिकामेडू आदि व्यापारिक केन्द्रों एवं शहरों का विकास दिन-दूनी रात चौगुनी गति से हो रहा था.

तिर्थ बुद्रुक के निवासी

जीवन के हर अंग जैसे समाज, संस्कृति, धर्म, व्यापार, शिल्पकला एवं स्थापत्य में भी तेजी से विकास हो रहा था. इस समय बौद्ध धर्म का प्रचलन इस प्रदेश में अधिक था. बौद्धों से संबंधित स्तूप, विहार, मठ आदि वास्तुओं का निर्माण द्रुतगति से हो रहा था. भारतीय महाद्वीप में अनेक व्यापारिक मार्गों का निर्माण हो चुका था. या पहले से प्रचलन में रह चुके मार्गों का महत्त्व अब बढ़ चुका था. इनमें से एक मार्ग महाराष्ट्र के मराठवाड़ा (मध्य महाराष्ट्र) क्षेत्र से होकर गुजरता था, जिसे उस समय ‘दक्षिणापथ’ के नाम से भी जाना जाता था. मराठवाड़ा के पैठण और तगर (तेर) नामक समृद्ध केन्द्रों का नाम रोमन साम्राज्य तक पहुँच चुका था.

तेर से प्राप्त मृणमूर्तियाँ (टेराकोटा), तेर (तेर संग्रहालय से साभार)

तेर में सातवाहनों एवं रोमन सम्राज्य से संबंधित अवशेष पाए गए हैं. इनमें सिक्के, मर्तबान, हस्तिदंत से बनी स्त्रीमूर्ति, विभिन्न प्रकार के रोमन दीप आदि वस्तुएँ सम्मिलित थीं. तेर से प्राप्त हस्तिदंत से बनी मूर्ति इटली के पॉंपेई से प्राप्त मूर्ति से मिलती-जुलती है. अब तक तेर के बाद अगले पड़ाव के रूप में कर्नाटक के कलबुर्गी जिले में स्थित ‘सन्नती-कनगनहल्ली’ की चर्चा ही विद्वानों में थीं. लेकिन इन दोनों के बीच भी कुछ केन्द्रों का होना तय था. इसी दिशा में मैंने इस प्रदेश के प्राचीन पुरावशेषों से संबंधित ग्रंथों को पढ़ना एवं इस संबंधित स्थानों को भेंट देने का सिलसिला शुरू कर दिया. इसी प्रक्रिया का परिणाम था- तीर्थ बुद्रुक में नए सिरे से प्राप्त हुए बौद्ध धर्म से संबंधित शिल्प एवं स्तूप के संभावित अवशेषों की महत्त्वपूर्ण खोज.

भिमाशंकर टीला (सातवाहनकालीन स्तूप? के अवशेष), तिर्थ बुद्रुक

तीर्थ बुद्रुक नामक छोटासा गाँव महाराष्ट्र के उस्मानाबाद (प्राचीन धाराशिव) जिले के तुलजापुर तहसील से मात्र ९ किमी की दुरी पर बालाघाट पहाड़ियों की एक पहाड़ी पर स्थित है. 

तिर्थ बुद्रुक गाँव का परिदृश्य

सन २००१ में किसी साधू की कुटिया के लिए यहाँ पर स्थित एक टीले की खुदाई का काम चल रहा था. ग्रामीणों को खुदाई से बड़ी आकर की कुछ ईंटें बरामद हुई. यह काम तत्काल रोका गया. यह खबर हवा की तरह प्रदेश में फ़ैल गई. महाराष्ट्र के पुरातत्त्व विभाग के संचालक ने खबर सुनते ही उक्त स्थान की छान-बीन की. ये ईंटों से निर्मित एक गोलाकृति स्तूप के अवशेष थे (संभवतः यह एक अन्य मनौती स्तूप रहा होगा). उन्होंने बाद में इस संबंधी एक संक्षिप्त टिपण्णी विभाग की पत्रिका में भी छपवाई. ऐसा करते समय उन्होंने वहाँ पर पड़े अन्य महत्त्वपूर्ण पुरावशेषों एवं इस स्थान के प्राचीन महत्त्व की ओर अधिक ध्यान नहीं दिया. इसके बाद इस स्थान के बारे में कहीं कुछ ख़ास लिखने या सुनने में नहीं मिला.

कालभैरवनाथ मंदिर एवं आस-पास का सामान्य दृश्य, तिर्थ बुद्रुक

सन २००८-०९ में मेरे अपने गाँव अपसिंगा में सातवाहनकालीन अवशेष प्राप्त हुए, जो तिर्थ बुद्रुक से महज १६ किमी की दुरी पर स्थित है. यहाँ एक प्राचीन ढाँचे की रचना मिली, जो संभवतः किसी स्तूप की भी हो सकती है. तत्पश्चात २०१३ में इन अवशेषों पर एक शोधलेख भी प्रकाशित किया गया. 

अपसिंगा (सातवाहनकालीन  पुरास्थल) से प्राप्त ईंटों की संरचना

२०१३ में मैंने तिर्थ बुद्रुक के लगभग १४वीं सदी में निर्मित कालभैरवनाथ मंदिर को भेंट दी. इस मंदिर के प्रांगण में रखे कुछ शिल्प दिखाई पड़े. 

डेक्कन कॉलेज, पुणे में मंदिर एवं स्थापत्य की पढ़ाई का अनुभव यहाँ काम आया. इसी दौरान मैं डेक्कन कॉलेज से पी.एचडी भी कर रहा था. सर्वेक्षण का कार्य सर्वत्र शुरू था. मंदिर के सामने रखे सफ़ेद चूना पत्थर (लाइमस्टोन) में बने शिल्प मुझे कुछ अलग लगे. मैंने आस-पास के क्षेत्र की अधिक छान-बीन की. इसमें मुझे स्तूप के लिए सफ़ेद चूना पत्थर में बने अलंकृत रचनाओं के अवशेष दिखाई पड़े. 

स्तूप के अवशेष, तिर्थ बुद्रुक

यहाँ पर लगभग १३वीं सदी में बने भिमाशंकर टीले पर भी सातवाहनकालीन ईंटे तथा ईंटों से बनी किसी स्थापत्य-रचना के अवशेष दिखाई दिए. यह मंदिर तथा प्राचीन टीला खंडहर में बदल चुके थे. 

प्राचीन टीले पर बने भिमाशंकर मंदिर के अवशेष, तिर्थ बुद्रुक


भिमाशंकर मंदिर के अवशेष, तिर्थ बुद्रुक

इसके बाद कईं बार मैंने इस क्षेत्र का दौरा एवं सर्वेक्षण किया. इसकी विस्तृत जानकारी प्राप्त करने के बाद मुझे ज्ञात हुआ कि यहाँ पर पड़े शिल्प एवं अन्य अवशेष अमरावती और सन्नती-कनगनहल्ली के स्तूपों से मिलते-जुलते हैं. यहाँ से चूना पत्थर में बने शिल्पों के साथ सातवाहनकालीन मृद्भांड के ठिकरें, घर की छत पर लगाए जाने वाले खपरैल (tiles) तथा पद्म पदक (medallions) भी प्राप्त हुए हैं. 

स्तूप से संबंधित पद्म पदक (Medallion), तिर्थ बुद्रुक

मध्ययुगीन अवशेषों में भिमाशंकर एवं कालभैरवनाथ मंदिर के अवशेष, शिवलिंग, भैरव, महिषासुर मर्दिनी, विष्णु के शिल्प, वीरगल (hero stones), सती शिला, नंदी की प्रतिमाएँ, मंदिर से संबंधित शिलालेख आदि अवशेष प्रमुख हैं.

कालभैरवनाथ का मंदिर, तिर्थ बुद्रुक


भैरव, कालभैरवनाथ मंदिर, तिर्थ बुद्रुक
महिषासुरमर्दिनी, तिर्थ बुद्रुक

मैंने २०१५ में हैदराबाद में संपन्न पुरातत्त्व से संबंधित अंतर्राष्ट्रीय सेमिनार में तिर्थ बुद्रुक के इन पुरावशेषों सहित यहाँ के मध्ययुगीन अवशेषों पर शोधकार्य प्रस्तुत किया था.

वीरगल एवं नाग शिल्प, तिर्थ बुद्रुक

वीरगल (hero stone), तिर्थ बुद्रुक

नंदी, तिर्थ बुद्रुक

तिर्थ बुद्रुक से प्राप्त आद्य ऐतिहासिक अवशेषों का संबंध सातवाहनकाल से था. इस समय इंडो-रोमन व्यापार अपनी चरम सीमा पर था तथा व्यापारियों का आवागमन इस क्षेत्र में हुआ करता था. लगभग इसविसन की १ से ३री सदी में यहाँ चूना पत्थर एवं ईंटों से निर्मित स्तूप का निर्माण कार्य हुआ होगा. संभवतः समृद्ध व्यापर के चलते यह कार्य सफल हुआ था. अबतक दक्षिणापथ के इस व्यापारी मार्ग पर महाराष्ट्र में तेर के बाद भव्य वास्तु के अवशेष प्राप्त नहीं हुए थे. तीर्थ बुद्रुक के स्तुपावशेषों से यह बात सामने आ रही है कि तेर के बाद व्यापारी मार्ग पर तिर्थ बुद्रुक एक महत्त्वपूर्ण पड़ाव था, जो आगे जाकर सन्नती नामक स्थान से जुड़ जाता था, जबकि यह तेर इतनी विस्तृत बस्ती नहीं थी. हालाँकि इसी जिले के सिद्धेश्वर वडगाँव के सिद्धेश्वर मंदिर के पास सातवाहनकालीन एक स्थापत्य रचना प्राप्त हुई है. यहाँ पर इस काल से संबंधित ईंटें बड़ी संख्या में मिलती हैं.

संभवतः स्तूप का टीला, वडगाँव सिद्धेश्वर

तिर्थ बुद्रुक से प्राप्त शिल्प संभवतः गौतम बुद्ध के जीवन से संबंधित है. इसमें एक पुरुष एवं तीन स्त्रियों को दर्शाया गया है. 

स्तूप से जुड़ा चूना पत्थर में बना शिल्प 

हंसपट्टिका, तिर्थ बुद्रुक


इन शिल्पों के लिए प्रयोग किया गया सफ़ेद चूना पत्थर (limestone) दक्षिण महाराष्ट्र में नहीं मिलता. इसलिए अब यह निश्चित रूप से कहा जा सकता है कि यह पत्थर सन्नती-शहाबाद के क्षेत्र से यहाँ व्यापारी मार्ग से लाया गया था. कनगनहल्ली के स्तूप को सजाने के लिए वहाँ से बड़ी तादाद में मिलने वाले सफ़ेद चूना पत्थर का ही इस्तेमाल किया गया था. सातवाहनकालीन अन्य शिल्पों एवं स्थापत्य रचना को देखकर यह अनुमान लगाया जा सकता है कि यह स्तूप हीनयान मत से संबंधित रहा होगा. यहाँ के शिल्प अमरावती शैली में बनवाए गए हैं. यह स्थान अमरावती शैली में बने शिल्पों का एक महत्त्वपूर्ण उत्तरी केंद्र माना जा सकता है. अपितु, इस प्रकार के कुछ अवशेष तेर नामक स्थान पर भी मौजूद होने के कारण, अब तेर यह स्थान अमरावती शैली में बने शिल्पों के फैलाव की उत्तरी सीमा बताई जा सकती है. तिर्थ बुद्रुक और तेर के शिल्पों की शैली अमरावती होकर उक्त शिल्पों की रचना कनगनहल्ली और अमरावती से थोड़ी सी भिन्न दिखाई देती है. संभवतः इस पर स्थानीय कारीगरी का प्रभाव पड़ा हो.

संभवतः मोर की  आकृति, तिर्थ बुद्रुक


खंडित स्तूप (लाट) के अवशेष


प्राचीन टीले का एक हिस्सा, तिर्थ बुद्रुक



सातवाहनकालीन ईंटों से निर्मित दीवार, तिर्थ बुद्रुक


स्तूप संबंधित अवशेष, तिर्थ बुद्रुक

टीले का एक खुला भाग, तिर्थ बुद्रुक

सातवाहनकालीन स्थापत्य रचना के अवशेष उस्मानाबाद जिले में गड देवदरी, तेर, वडगाँव-सिद्धेश्वर एवं अपसिंगा में भी दिखाई देते हैं. इनमें से वडगाँव और अपसिंगा की स्थापत्य रचना बौद्ध-स्तूप से संबंधित होने के प्रमाण अब तक मौजूद नहीं हैं. 

गड देवदरी का प्राचीन टीला, गडदेवदरी

इन समृद्ध अवशेषों के मिल जाने से ऐतिहासिक दृष्टि से मराठवाड़ा के इस क्षेत्र का महत्त्व बढ़ चुका है तथा तिर्थ बुद्रुक यह स्थान सातवाहनकालीन एक बौद्ध केंद्र के रूप में वैश्विक पटल पर स्थापित होने में मदद मिली है.   

 



https://www.youtube.com/watch?v=uYsgUkxAFR8

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...