आदिवासी बांधव हे निसर्गाची पूजा करणारे आहेत. त्यांची अशी श्रद्धा आहे की सर्व चराचर सृष्टीत जीवात्मा असतो, त्यामुळे त्यांच्या अनेक देवांना आकार नाही. निसर्गातील अनेक अद्भुत चमत्कारांना देवतारूपे मानून वृक्ष, पशू-पक्षी, नदी-नाले, सूर्य, चंद्र इत्यादी रूपात निर्गुण निराकार ईश्वराची तो पूजा करतो.सह्याद्रीमध्ये वाघ देवतांची शिल्पे/प्रतिमा असलेली अनेक पण छोटेशी मंदिरे पाहायला मिळतात.अशा वाघ देवताची प्रतिमा दगडात किंवा लाकडात कोरलेल्या असतात . आदिवासी भागामध्ये वाघदेवाला जंगलाचा राजा म्हणून मान दिला जातो. वाघदेव ही त्या आदिवासी बांधव लोकांची महत्वाची देवता आहे. कोकणी आदिवासी समाजात रूढी- परंपरा श्रदधेनुसार शेतात काम करत असताना किंवा जंगलात फिरत असताना वाघ,नाग यांच्या पासून धोका होऊ नये म्हणून, गावातील भगत(महाराज) किंवा गावात मोठा मान असलेली व्यक्ति जो असतो त्याच्या कडून पुजा करूण कोंबडा/कोंबडी मारून या वाघदेवतेची पूजा केली जाते.काही आदिवासी भागात ह्याला “गावशिवाऱ्या ” असेही म्हणतात. हा वाघोबा देव गावाच्या वेशीचे रक्षण करतो अशी त्यांची श्रद्धा आहे.

वाघापासुन माणसे , त्यांची दूध धुपती जनावरे यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून आदिवासी बांधव अश्विन व्दादशीला “वाघबारशी” हा सण साजरा करतात .नारळ फोडून वाघदेवाची पूजा केली जाते.त्याला असा मान दिला तर तो शांत होईल, कोणावर पण हल्ला करणार नाही हया हेतुने वाघबारशीचा सण साजरा करतात.
खालील छायाचित्रात तुंगी(कर्जत) किल्ल्यावर तुंग मातेच्या मंदिरात वाघ देवाचे शिल्प आहे.
– गणेश काळे
नाना शंकरशेठ यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले श्री अमृतेश्वर मंदिर
घोडबंदर किल्ल्यासाठी बोरिवली किंवा ठाणे रेल्वे स्थानकावरून येताना घोडबंदर गावात रस्त्यालागत अगदी वाटेवर नाना शंकरशेठ यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले एक श्री अमृतेश्वर मंदिर आहे. ज्या कोणालाही मुंबईचा इतिहास माहीत आहे , त्यांना मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ हे नावही माहीत असणारच ! खुद्द इस्ट इंडिया कंपनीला कर्ज देणारे मुंबईचे सावकार आणि मुंबईत पहिली सुरू झालेली रेल्वे-ट्रेन बोरीबंदर ते ठाणे दिनांक १६ एप्रिल १८५३ दुपारी ठीक ३.३० वाजता सुटली , याचे सर्व श्रेय एका मराठी माणसाचे म्हणजेच नाना शंकरशेठ यांचेच .
पिढीजात श्रीमंत असलेले नाना शंकरशेठ यांचं खर नाव “जगन्नाथ शंकर मुरकुटे” आणि मूळगाव-आजोळ मुरबाड ( ठाणे जिल्हा ) होते . म्हणून साहजिक यांची नाळ मुरबाडशीच जोडली आहे. त्यांचे वडील इंग्रजांना उधारी देणारे मोठे सावकार. त्यांचाचं एकुलता एक मुलगा म्हणजे नाना.
नानाचे आजोबा बाबूलशेठ हे व्यापारनिमित घोडबंदर येथे आले आणि तिथेच एक प्रशस्थ बंगला बांधला (जो सध्या अस्तित्वात नाही) आणि श्री अमृतेश्वरचे मंदिर बांधकाम केले.

या श्री अमृतेश्वर मंदिराला अडीशे वर्षाहून अधिकचा इतिहास आहे . मंदिर दुमजली आणि अजूनही कौलारू आहे ज्याला पाहिले की कोकणातील मंदिराची आठवण येते. सभागृह आणि पटांगण प्रशस्थ आहे .मागील बाजूस दीपमाळ आहे .गर्भगृहाच्या दोन्ही बाजूस एक गणेश आणि हनुमंतची मूर्ती आहे .गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर गणेश मूर्ती तसेच उंबरठय़ावर एक राक्षसाचे तोंड आहे ज्याला कीर्ती-मुख म्हणतात .तसेच गर्भगृहाच्या बाहेर नंदी आणि कासव आहे. गर्भगृहात शंकराची पिंड आहे. मंदिरातील जुन्या लाकडी स्तंभावरील कोरीव नक्षीकाम अजूनही नजर खिळऊन ठेवते.
मंदिर परिसरात गंगा माता ,शीतलादेवी ,बजरंगबली यांच्या मूर्ती असलेले छोटीशी देऊळवजा कोनाडे आहेत.

मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेर गणेश मूर्तीच्या बाजूस एका बाजूस नाना शंकरशेठ यांचा अर्धपुतळा आहे ज्याला दैवज्ञ ब्राह्मण समाज (दहिसर) येथील पदाधिकारी गेली अनेक वर्ष पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहतात.या घोडबंदर किल्ला आणि मंदिर परिसराचा इतिहास फारच रोमांचकारी , स्फूर्तिदायी व प्रेरणाई आहे. अशा या आडवाटेवरच्या मंदिराला भेट द्या…..
– गणेश काळे ( 3 मार्च -२०२४ )
महाकाली लेणी – मुंबई

मुंबई परिसरात काही लेणी आहेत त्या म्हणजे जोगेश्वरीची लेणी, अंधेरी येथील महाकाली लेणी तसेच दहिसरची मंडपेश्वर लेणी . यातील महाकाली लेणी बेसाल्ट खडकात कोरलेली १९ लेणी येथे आहेत. लेण्यांचा काळ इसवी सन पूर्व २ रे शतक ते इसवी सन 6 व्या शतक कोरल्या असाव्यात . हीनयान पंथियांची ही लेणी असून नंतर महायान अनुयायांनी बुद्ध प्रतिमा आणि बौद्ध चिन्हांनी यातील काही लेणी अलंकृत केल्या आहेत.
J.M.Campbell makes reference to a Pali inscription near one of the lattice windows, The inscription, dated to the 3rd century A.D. states :
‘Gift of a vihara, with his brother, by Pittimba, a Brahman of Gautama gotra, an inhabitant of Pachi Kama‘
J.M. कँपबेल (1882) ह्या लेण्या कोंडिवीटी गावाच्या जवळ असल्यामुळे त्यांना कोंदिवटे किंवा कोंदिवीटी लेणी म्हणून संबोधतात, फर्ग्युसन (1880) ह्याने त्यांना कोंदिवीटी लेणी असे नाव दिले आहे, तर S.R. वाउचॉपने (1933) त्यांना महाकाली लेणी म्हणण्याची प्रथा केली.
छायाचित्रात असलेली गुहा क्र. 9 (Chaitya Cave)
ही संकुलाची मुख्य गुहा आहे आणि बहुधा महाकाली येथील सर्वात जुने उत्खनन आहे.
यातील मुख्य चैत्यविहार बाराबर येथील सुदाम चैत्य लेण्यासारख्या गज पृष्ठकार व दर्शनी भागात अर्धवर्तुळाकार रचना असलेला आहे. त्याच्या आत स्तूप बंदिस्त असून दर्शनी भागातील गोलाकार भिंतीला दरवाजा आणि त्याच्या दोन बाजूस जाळ्यांच्या खिडक्या आहेत. खिडक्या आणि भिंत यामध्ये अरुंद प्रदक्षिणापथ तयार झाला आहे. या लेण्यांच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर नागद्वयींनी कमळ दंड धरला असून त्यावरील कमळासनात गौतम बुद्ध बसले आहेत, शिवाय त्यांच्या आजूबाजूला निरनिराळ्या आसनातील बुद्धमूर्ती आणि बौद्धचिन्हे अर्धउठावात कोरले आहे, परंतु येथील कातळ ठिसूळ निघाल्यामुळे ही सुंदर शिल्पे झिजून गेलेली दिसतात.(संदर्भ -सदाशिव टेटविलकर यांचे काही लेख)
भटकंती – दांडा खाडी आणि महिकावतीची बखर
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी महिकावतीची बखर या ग्रंथात दांडे या गावची व्युत्पत्ती दंड, ऋश्यादिगण अशी दिली आहे.दांडा या प्रदेशाचा प्राचीन संदर्भ उल्लेख ‘दांडा ऋशादिगण’ असा आहे.समुद्रात भराव टाकून केलेल्या भागाला ‘दांडी’ असं म्हणतात. मुंबईत अशा दोन दांडय़ा आहेत. एक म्हणजे खारदांडा आणि दुसरी म्हणजे कुलाबा दांडी. कुलाब्याची दांडी म्हणजे कुलाब्याचं हे शेवटचं टोक.

दांडा खाडीच्या मुखाशी असलेला एक छोटा जलदुर्ग पाण बुरुज म्हणून प्रसिद्ध आहे. किनाऱ्याजवळील झाडीत विसावलेला भुईकोट किल्ला आणि खाडी पाशी असलेला जलदुर्ग हे इतिहासाचे साक्षीदार आहे.भुईकोट किल्ला असल्यामुळे हा किल्ला चढायला तसेच बघायला सोपा आहे या किल्ल्याची संरक्षण भिंत साडेपाच फूट उंचीची आहे. तसेच तिचा आकार पंचकोनी आहे. तोफा डागण्यासाठी छिद्रं सुद्धा आहेत.दांडा खाडीच्या मुखाशी असलेला केळवे जलदुर्ग हा जंजिरा प्रकारात मोडतो त्यामुळे भरती आणि ओहोटीच्या वेळा बघून येथे जाणे उत्तम.केळवे शितलादेवी मंदिरावरुन बाजाराकडून पुढे जाताना दांडाखाडी पूल ओलांडल्यावर उजव्या हातास गावामध्ये दांडा कित्तल कोटाचे फारच थोडे अवशेष उरलेले आहेत आणि ते अवशेषही तीन भागात गावभर विखुरलेले आहेत. दोन ठिकाणचे अवशेष बुरुजासारखे असुन दुमजली आहेत. यातील एक बुरूज षटकोनी आकाराचा असुन दुसरा गोलाकार आहे. तिसऱ्या ठिकाणच्या अवशेषात एका भल्यामोठ्या वाड्याचा पाया आढळून येतो. हा पोर्तुगीजांच्या गव्हर्नराचा वाडा होता.पण प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी.
दांडे गावाच्या दक्षिणेला मोठा तलाव आहे त्यात दोन विहिरी आहेत. काठावर मारुतीरायाचे मंदिर आहे, समुद्रकिनारी शंकराचे मंदिर आहे. गावाच्या दक्षिणेला दांडा किल्ला होता त्या किनाऱ्याजवळ भव्य माची होती पण आज मूळ किल्ला व त्या इमारतीचे केवळ भग्न अवशेष उरले आहेत गावात समुद्राच्या बाजूला टाकीचा गुरुजी या नावाचा दुसरा केला होता त्याचीही आज केवळ जीर्ण व पडके अवशेष उरले आहे.
महिकावतीची बखर हे इतिहासआचार्य कै. वि. का. राजवाडे यांनी लिहिलेले आणि वरदा प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले पुस्तक महिकावती म्हणजे माहीम. हे माहीम म्हणजे मुंबईचे माहीम नसून पालघर येथील केळवे-माहीम मधील माहीम आहे. उत्तर कोकणचा इतिहास सांगणारी ही बखर साधारणपणे १४व्या शतकात लिहिली गेली असून ह्या बखरीमधला इतिहास काळ शके १०६० म्हणजे ई.स. ११३८ पर्यंत मागे जातो. आत्तापर्यंत सापडलेल्या सर्व बखरींमध्ये ही अत्यंत जूनी अशी बखर आहे.

दांडा खाडीच्या पुलावरून आजूबाजूचा परिसर व येथील सूर्यास्त बघणे म्हणजे पर्वणीच.
© गणेश काळे (9819026305)
हरगड किल्यावरील “कलाल बांगडी” पद्धतीची लोखंडी तोफ
जेव्हा एखादा किल्ला शत्रूच्या वेढ्यात सापडत असे, तेव्हा गडावर असलेल्या तोफा महत्त्वाच्या भूमिका पार पाडत. किल्ल्याच्या उंचीवरून खालील दिशेने तोफगोळे डागणे ही प्रभावी संरक्षणनीती होती. शिवाय, मोठ्या प्रमाणावर तोफा तैनात केल्यामुळे शत्रूच्या सैन्यावर वचक ठेवले जात.या तोफा म्हणजे केवळ युद्धातील हत्यारे नव्हती, तर त्या युद्धनीतीचा अविभाज्य भाग बनल्या होत्या. त्यांच्या मदतीने किल्ले राखले गेले, राज्ये लढली आणि इतिहास घडवला गेला. मध्ययुगीन काळातील रणांगणांवर गाजलेल्या तोफांचे योगदान हे आजही अढळ आहे.दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखान्याविषयी सखोल माहिती मिळत नाही. किल्यांवर तोफा लावून ठेवीत. लष्कराबरोबरच्या तोफांसाठी मोठं मोठे गाडे( वाहून नेण्यासाठी )असत. त्यासाठी सुतार, लोहार, चांभार, सस्सीदमार, तलफदार वैगैरे लोक असत.
अशीच तोफ मी पाहिली ती हरगडावर.सह्याद्रीच्या रांगेतील उपेक्षित दुर्ग म्हणजे हरगड. मात्र या गडावर भरपूर इतिहास दडला आहे. तेथे राजवाडे, इमारती होत्या.यावर ४.३ मीटर लांबीची ‘हजार बागदी’ नावाची ती अजस्र बांगडी पद्धतीची लोखंडी तोफ आहे. अशा महाकाय तोफा हातावरील बोटे मोजण्याइतक्या संख्येने सध्या काही गडांवर शिल्लक आहेत.
हरगड किल्यावरील “कलाल बांगडी” पद्धतीची लोखंडी तोफ

बैल किंवा हत्तीच्या गाड्यांतून तोफा वाहून नेल्या जात. लहानसहान तोफा उंटावर किंवा हत्तीवर बांधून त्यांचा फिरता तोफखाना बनवीत. त्यास सुतरनाल आणि गजनाल म्हणत. तोफगाडे ओढण्यास किमान २५० बैल लागत. दिवसाला ५ ते ६ किमी. चाल होई.
सर्वप्रथम भारतात पोर्तुगीज अभियंत्यांनी तयार केलेल्या बंदूका, तोफा व अग्नीबाण यांचा वापर केला गेला.हिंदुस्थानात तोफा आणणयाचे श्रेय बाबाराला दिले जाते , परंतु बाबर येथे येण्यापूर्वी दक्षिणेतील बहमनी सुलतान व गुजराथ मधील सुलतानांनी तोफा वापरल्याचे उल्लेख आढळतात .मुघलांकडे हलक्या, उंटावरच्या तोफा (जंबुरक) ही असत. हेनरी रेव्हिंग्टनने पन्हाळ्यावर उखळी [(मॉर्टर) तोफेची नळी आखूड व तोंड मोठे असते] डागल्या तेव्हा या प्रभावी शस्त्रांची उणीव शिवाजी महाराजांना खासच जाणवली असेल.पुढे छत्रपती शिवाजी महाराज पोर्तुगीज-इंग्रजांकडून तोफा विकत घेई. राजापूर (कोकण) येथे तोफांचा कारखाना होता. पेशवाईत अंबेगवाण, पुणे इ. ठिकाणी तोफा व गोळे बनविण्याचे कारखाने होते. त्यांचे मुख्य सरदार पानसे होते.परंतु शास्त्रशुद्ध तंत्राने तोफा उडवण्याच्या विद्येत पारंगत असणाऱ्या इंगजांनी सिंहगड, पुरंदर , रायगड, वासोटा इत्यादी किल्ले मराठ्यांकडून तोफाच्या बळावरच घेतले.
तोफा तयार करण्याच्या विविध पद्धती
युरोपियन बहुतांश तोफा , तयार केलेल्या साच्यामध्ये वितळलेला धातू ओतून तयार केल्या जात असत, परंतु लोखंडी तोफा तयार करण्यात एक मुख्य अडथळा असे , तो म्हणजे लोखंड फक्त अतिउच्च तापमानामध्येच वितळलेल्या स्थितीत राहाते व हे तापमान थोडे जरी खाली आले तरी हा वितळलेल्या लोखंडाचा रस साच्यामध्ये सर्वत्र एकसारखा पोहोचत नाही व यामुळे तोफेच्या नळीमध्ये छिद्रे ( pores ) राहतात व अशी तोफ वापरण्यास कुचकामी ठरते.
परंतु भारतात लोखंडी तोफा तयार करण्यासाठी “फोर्ज वेल्डिंग” (Forge Welding) ही अनोखी पद्धत वापरण्यात आली. या पद्धतीत,मोठ्या लोखंडी कड्या (Iron Rings) किंवा पट्ट्या बांगडीसारख्या तयार करून त्या एकमेकांवर ठेवत.त्या गरम करून मोठ्या ताकदीने एकत्र जोडल्या जात आणि एकसंध बनवल्या जात.अशाप्रकारे जोडलेल्या कड्यांमधून तोफेची नळी तयार केली जात असे.नंतर त्या जोडलेल्या भागांना अधिक बळकट करण्यासाठी, बाहेरून अतिरिक्त लोखंडी पट्ट्या गुंडाळल्या जात.यामुळे तोफ अधिक मजबूत होत असे आणि ती तुटण्याची किंवा स्फोट होण्याची शक्यता कमी होत असे.अशा तोफा नरवर, मुशिराबाद, डाक्का (बांगलादेश), विष्णुपूर , विजापूर , गुलबर्गा आणि तंजावर येथे आढळतात. सिद्द्यांच्या मुरुड जंजिरा म्हणजेच पद्मदुर्ग किल्ल्यावरील ‘कलाल बांगडी’ ही तोफ देखील याच पद्धतीने तयार केलेली आहे.
तोफांचे प्रामुख्याने ओतीव तोफ ,दुसरा घडीव तोफ आणि बांगडी प्रकाराच्या पहायला मिळतात.ओतीव तोफ म्हणजे धातू वितळवून साच्यात ओतून तयार केलेली तोफ.घडीव तोफ हा प्रकार ओतीव तोफेपेक्षा पुष्कळच वेगळा.
घडीव म्हणजे घडवलेली, साच्याशिवाय निर्माण केलेली.त्या धातूच्या तोफेच्या लांबीच्या सळया (रॉड) एका व्यवस्थित पद्धतीनं ठेवून त्यावर गोलाकार कडय़ांचं, तोफेच्या गोलाईच्या आकाराच्या कडय़ांचं-रिंगांचं संपूर्ण लांबीभर आच्छादन अशा पद्धतीनं घडवलेली दिसते
बांगडी प्रकाराच्या तोफ तयार करणारा कारागीर प्रथम तोफेच्या लांबी एवढा लाकडाचा लंबगोल घेत असे. या लंबगोलाचा व्यास, तोफेच्या नळीचा व्यास जेवढा ठेवायचा असेल तेवढा असे. मग, या लाकडी लंबगोलाभोवती लोखंडी पट्ट्या जवळ-जवळ बसवून, त्या तापवून आणि ठोकून एकमेकांना जोडल्या जात . या नंतर, लंबगोलावर बसवलेल्या पट्ट्यांमुळे तयार झालेल्या वर्तुळाच्या व्यासापेक्षा किंचित कमी व्यास असलेल्या, बांगडी सारख्या अनेक कड्या तापवून , या पट्टयांवर ठोकून बसवल्या जात असत. या कड्या थंड झाल्यावर आकुंचन पाऊन आतल्या लोखंडी पट्ट्यांच्या सांगाड्यावर घट्ट बसत असत. काही वेळा या बांगडी सारख्या कड्या पट्टयांच्या सांगाड्यावर बसवण्यापूर्वी , या सांगाड्यावर वितळवलेले शिसे ओतले जात .असे केल्याने दोन लोखंडी पट्ट्यांमध्ये असलेली बारकीशी फटही बंद होत असे व तोफ उडवल्यावर, आत दारूचा स्फोट झाल्यानंतर तयार होणारा वायू मध्येच निसटून जात नसे.
(पद्मदुर्ग)जंजीरा अजिंक्य राहीला तो अश्याच अजस्त्र बांगडी प्रकाराच्या तोफेमुळे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे 360 अंशामधे म्हणजे गोलाकार ती फिरवता येते. कलाल बांगडी या तोफेचा पल्ला १२ किमी पर्यंत आहे. पंचधातूपासून बनलेली ही तोफ कितीही उन असले तरी तोफ अजिबात तापत नाही. ही तोफ इतकी जड होती ही ती बोटीने आणणे अशक्यप्राय होते. त्यामुळे ती तुकड्या तुक़ड्यात इथे जोडण्यात आली.
इतर किल्ल्यावरील बांगडी तोफा
अहमदनगरचा भुईकोट -तब्बल 55 टन वजनाची 14 फूट 11 इंच लांब असलेली तोफ ‘मलिक ए मैदान’ जुने नाव ( बांगडी तोफ ) या तोफेचे तोंड मगरीच्या उघडलेल्या जबड्यासारखे आहे.
पद्मदुर्ग – सर्वात मोठी व लांब मारा करून शकणारी ‘कलाल बांगडी’ तोफ.
उदगीरचा भुईकोट किल्ला -चांदणी बुरुजावर दोन प्रचंड मोठ्या तोफा आहेत. यातील एक बांगडी तोफ दहा फूट तीन इंच लांबीची आहे.
भुईकोट परांडा – बाराव्या बुरुजावर एक मोठी बांगडी तोफ़ असुन तिचे तोफ़े तोंड मगरीच्या आकाराचे आहे. या तोफ़ेला दोन्ही बाजूला कड्या आहेत. सदर तोफ हि पंचधातूची असून चार मोठ्या बांगड्या जोडून तयार केल्याचे दिसते.
तसेच औसा किल्ला,कंधारचा किल्ला,नरनाळा किल्ला आणि इतर किल्ल्यावरही बांगडी तोफा आहेत.

सह्याद्रीतील किल्ल्यांची भटकंती करताना या ज्या वास्तू आहेत, त्या तुम्ही जरूर पाहाव्यात आणि त्याची माहिती घ्यावी. त्यामागचा इतिहास समजून घ्यावा. काही उपद्रवी जमात या वास्तूवर बसून त्याचा फोटो काढत असते, हे तुम्ही जरूर टाळावे, ही विनंती. या वास्तूंचे पावित्र्य जपावे, त्यांना मानाचा मुजरा करावा. कारण ही आहे आपल्या पूर्वजांनी जपून ठेवलेली मराठी संस्कृती.
-गणेश काळे (9819026305)
जिवदानीचा डोंगर उर्फ जिवधन किल्ला
काही किल्ल्यांच्या संदर्भात अनेकदा आपण त्यांच्या ऐतिहासिक महत्त्वापेक्षा आजच्या धार्मिक, सांस्कृतिक किंवा पर्यटकांच्या दृष्टिकोनातून त्यांना पाहतो. अशा किल्ल्यांचा इतिहास आणि त्यांच्या गडकोटांचा महिमा जरी काही प्रमाणात विस्मृतीत गेला असेल, तरी त्यांची प्रतिष्ठा आजही टिकून आहे.
पुरातन काळात गडाची स्थापना हा एक धार्मिक आणि आध्यात्मिक विधी असायचा. गड वसवायच्या आधी त्याच्या संरक्षणासाठी आणि यशस्वी स्थापनेसाठी एक विशेष प्रक्रिया पार पाडली जायची. या प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजे गडाची स्वामिनी किंवा मातृका स्थापन करणे. ही स्वामिनी म्हणजे गडाची संरक्षक देवी किंवा शक्ती मानली जात असे, जी गडाचे रक्षण करते.
गडाच्या मुख्य जागेवर तांदळा स्थापन केला जायचा, म्हणजे एक विशिष्ट पाषाण ठेवून त्याची पूजा केली जायची. त्या पाषाणात देवत्व निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे तो गड संरक्षित आणि शुभ होण्यासाठी केला जाणारा आध्यात्मिक प्रयत्न होता. देवतेचा कौल मिळाल्यावर त्या जागेवर छोट्या मंदिराची स्थापना केली जायची, ज्यामधून गडाच्या बांधकामाची सुरुवात होत असे.
गडाला दिलेलं नावच त्या देवतेचं नाव असायचं, ज्यामुळे गडावर दैवी शक्तीचा वास असल्याची श्रद्धा असे. एकदा का हे देवत्व निर्माण झालं की, त्या जागेला कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा संकटं जुमानत नाहीत, अशी भावना असे. या प्रक्रिया आणि श्रद्धेच्या माध्यमातून गडाचे रक्षण आणि त्याचे अजेयपण सुनिश्चित केले जात असे. हाच त्या काळातील किल्ल्याच्या स्थापनेचा प्रमुख उद्देश होता—गड आणि त्याच्या परिसरात यश, समृद्धी, आणि सुरक्षिततेची दीर्घकालीन स्थापना करणे.उदाहरणार्थ तुंगगडाची तुंगाई, कोरीगडाची कोराई ,तोरणगडाची तोरणजाई, रतनगडाची रत्नाई, कोर्लाईची कोर्लाई, लिंगाण्याची लिंगाई, अशेरीगडाची अशेराई, शिवनेरीची शिवाई.
जिवदानीचा डोंगर उर्फ जिवधन किल्ला
महाराष्ट्रातील १८ शक्तीपिठांपैकीही हे एक स्थान असल्याचं सांगितलं जातं.जिवदानी देवीचं मंदिर वैतरणा नदीच्या तटावर डोंगर कुशीत वसलेलं आहे.विरारच्या पश्चिमेला जीवदानी डोंगर, बारोंडा डोंगर व त्यांच्या दक्षिणेकडे लांबच लांब डोंगररांगा पसरलेल्या आहेत.या किल्ल्याचा इतिहास फार प्राचीन असावा हे तेथे असलेल्या लेण्यावरून सिद्ध होते. कदाचित कान्हेरी लेण्याच्या अगोदर असावा आणि तसेच लेण्यांचा सोपारा प्राचीन इतिहासाशी निगडित आहे.
जीवधनगडाची विविध कागदपत्रांत जीवधन, जीवधनगड, जिवदानीगड, जीवदायिनीगड, जीवधणगड, जीवधन किल्ला, जीवदान, असे संदर्भ मिळतात.
जीवधनगडाच्या प्राचीन दुर्गअवशेषांत जुजबी तटबंदीचे अवशेष, हिनयान महायान पंथाच्या लेण्याचे अवशेष, जीवदानी देवीचे स्थान यांचा समावेश होतो. या लेण्यात बुद्ध भिक्षूंनी निवास आणि संरक्षणाच्या दृष्टीने लेण्यात लाकडी प्रवेशद्वारासाठी भिंतीच्या दोन्ही अंगास खोबण्या कोरलेल्या दिसतात.आज जीवधनगडाच्या पाचपावली मार्गाने डोंगर माथ्यावर एका गोलाकार बुरुजावर अर्धवट अवशेष व चिरेबंदी तटबंदीचे अवशेष पाहण्यास मिळतात.
जीवदानी देवीची मूर्ती संगमरवरी असून मुद्रा प्रसन्न व रेखीव आहे. देवीचे चांदीचे सुंदर मखर आहे. देवीच्या शेजारीच पुरातन त्रिशूळ ठेवलेला आहे.आज जिथे देवीची जागा आणि तिच्या परिसरातील वास्तुशिल्प हा एक ऐतिहासिक वारसा होता, ज्यामध्ये लेणी आणि गुंफा यांचा समावेश होता. सध्या आई जीवदानीचे स्थान कातळामध्ये कोरलेल्या लेण्यांत आहे. या लेण्यांमध्ये देवीच्या डाव्या बाजूला एक छोटी लेणी होती आणि उजव्या बाजूस “कृष्णविवर” नावाची अरुंद गुंफा होती. कृष्णविवर गुंफेची लांबी फक्त पंधरा फूट असून, ती एवढी अरुंद आहे की एकावेळी फक्त एकच व्यक्ती आत प्रवेश करू शकते. या गुंफेला “कृष्णविवर” म्हणण्याचे कारण त्याच्या गूढ आणि अरुंद रचनेत असू शकते.
या गडावर जाण्यासाठी आज दोन मार्ग आहेत. एक वाट जीवदानीपाडा येथून आहे. तर दुसरा ऐतिहासिक पुरातन मार्ग आज पाचपायरी या नावाने ओळखला जातो. दुसरे म्हणजे भाविकांसाठी केलेली रोप-वेची सोय. रोप-वेची ट्रॉली सरळ येथेच उतरते. या गडावर काही ठिकाणी जाणारी वाट ही कच्च्या मातीची दगड-धोंडय़ांची आहे. गडावरच्या मंदिरात पोहोचण्यास अर्धा ते पाऊण तास खूप होतो. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून हवेशीर आहे. जीवदानी देवीचा गाभाराही प्रशस्त आहे. देवीच्या समोरच देवीचे वाहन चांदीचा वाघ देवीसमोर तोंड करून बसलेला आहे. प्रशस्त सभामंडपात बसल्यावर मंदिराच्या घुमटाच्या गोलाकार पोकळीत अष्टअंबेची सुंदर चित्रे रेखाटलेली आपणास पाहण्यास मिळतात. जीवदानी डोंगराला लागून पापडखिंड धरणाच्या पूर्वेला बारोंडा डोंगरावर जीवदानी देवीची भगिनी बारोंडा देवीचे पुरातन स्थान आहे. जीवदानीमाता, बारोंडामाता यांच्या सुरेख मूर्ती .जीवदानी देवीचे दर्शन घेऊन उजव्या हाताला लागून ऐंशी पाय-या चढून वर आल्यावर आपल्याला उजव्या हाताला जीवदानी देवीची भगिनी बारोंडा देवीचे छोटे पण सुंदर मंदिर पाहण्यास मिळते. पूर्वी येथून पुढे खाली गायगोठा या ऐतिहासिक ठिकाणी जाण्यास वाट होती. आजही ती आहे. येथून त्यावेळचे विरार गावाचे सुंदर दर्शन होत असे.

या बारोंडा देवीच्या मंदिराच्या समोरच म्हणजे जीवदानी देवी मंदिराच्या वर माथ्यावर काळभैरव व कालिकामातेचे मंदिर आहे.


पूर्वी या कालिकामातेच्या मंदिराच्या वरच्या भव्य शिळेवरून कोंबडे, बकरे कापून त्यांचे बळी देऊन त्यांचे अवशेष या शिळेवरून खाली टाकले जात असत. ट्रस्टचे खूप आभार मानले पाहिजेत की त्यांनी या अघोरी प्रकाराला आळा घालून ही अनिष्ट प्रथा कायमची बंद केलेली आहे. आज देवीच्या नावाने कोणताही बळी येथे दिला जात नाही.
या जीवधन गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून सभोवतालचा सुंदर प्रदेश नजरेत भरतो. पूर्वेस उजव्या हाताला कामणदुर्ग, तुंगारेश्वरचा पर्वत, तर डाव्या हाताला टकमक किल्ला डोळय़ांना सहज दिसतो. तर पश्चिम दिशेस अर्नाळय़ाचा किल्ला, थोडय़ा दुरवर भुईगावचा वज्रगड, त्याही पुढे वसईचा किल्ला पाहण्यास मिळतो. तसेच दक्षिण दिशेस जीवदानी डोंगराच्या पायथ्याखाली पापडखिंडी पाण्याचे धरण व या धरणाच्या पाठी डोंगर कपारीत जीवदानी देवीची भगिनी बारोंडा देवीचे कडय़ाकपारीत वसलेले स्वयंभू स्थान पाहण्यास मिळते.
शिवकाळात जीवधन पोर्तुगीजांच्या ताब्यात होता .संभाजी महाराजांनी सन १६८३मध्ये या किल्ल्यासाठी लढा देऊन हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतल्याचा उल्लेख सापडतो. पोर्तुगीजांनी २७ ऑगस्ट १६८५ रोजी जीवधन पुनश्च फिरंगणात दाखल करून घेतले.पुढे वसई व लगतच्या भागत पोर्तुगीजांचे हिंदूंवरील वाढते क्रूर अत्याचार पाहून पोर्तुगीजांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पेशव्यांनी वसईची मोहीम हाती घेतली.
मराठय़ांनी २१ मार्च १७३८ ला जीवधन पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. यानंतर हा गड बराच काळ मराठय़ांच्याच ताब्यात होता. अखेर १८१७ मध्ये इतर गडांसोबत हा गड इंग्रजांनी बळकावला.यानंतर काही काळाने मराठयांनी परत जीवधनवर कधी ताबा मिळवला याची निश्चित तारीख उपलब्ध नाही; पण २७ मार्च १७३१मध्ये फिरंग्यांनी दोन तोफा, दोनशे वीस गोर, तीनशे शिपाई, अठरा घोडेस्वार घेऊन मराठयांच्या जीवधनगडास वेढा दिला व जिंकला.
३० मार्च १७३७मध्ये चिमाजी अप्पांच्या बरवाजी ताकपीर नावाच्या सरदाराने ३०० माणसे घेऊन जीवधनगड काबीज केला. एप्रिल १७३७च्या पत्रानुसार जीवधनगडाच्या टाक्यांच्या सरसगिरीसाठी २ गवंडयांची निकड होती.
पूर्वी देवीच्या जवळ मोठी आणि प्रशस्त लेणीसुद्धा असावी, जी इतिहासाचे साक्षीदार होत्या. परंतु, देवीच्या दर्शनासाठी अधिक सोयीची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने या ऐतिहासिक वास्तू तोडल्या गेल्या असाव्यात. या तोडफोडीमुळे देवीचे दर्शन विनाअडथळा सुलभ होईल, असा विचार असावा.
या प्राचीन गड आणि त्याच्या ऐतिहासिक वास्तूंचा कायापालट करून आज सात मजली उंच जीवदानी देवीचे मंदिर उभारण्यात आलेले आहे. जुनी ऐतिहासिक वास्तू जपली गेली नसेल, तरी नव्या स्वरूपात उभारलेले हे मंदिर भाविकांना नवीन अनुभव देते. तथापि, अशा ऐतिहासिक स्थळांची नासधूस केल्याने त्या वास्तूंनी जपलेली सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा गमावला गेला असावा.असे धार्मिक स्थळे जेव्हा आधुनिक सोयीसुविधांसाठी बदलली जातात, तेव्हा इतिहास आणि श्रद्धा यामधील संतुलन साधणे हे खूप महत्त्वाचे असते.
-गणेश काळे (9819026305)

पूर्वी दळणासाठी वापरलेले एक ’जाते’
सह्याद्रीच्या भटकंतीत गडकिल्ल्यांची, घाटवाटा तसेच गावांमधील प्राचीन मंदीरे यांची सफर करताना अनेक गोष्टी आपल्या नजरेआड होऊ शकतात. गडावरच्या तसेच गड-किल्ल्यांच्या आजूबाजूच्या स्थानिक लोकांच्या संस्कृती, परंपरा आणि जीवनशैली याकडे आपले फारसे लक्ष जात नाही.आपली भटकंती थोडीशी डोळस तसेच समृद्ध ठेवली आणि त्याच्याद्वारे मागोवा घेतल्यास काही दुर्लक्षित वस्तू आपल्याला सुद्धा सापडू शकते. असेच एक ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग असेलेले , पूर्वी दळणासाठी वापरलेले एक ’जाते’ मला सापडले. त्याची थोडक्यात आपण ओळख करून घेऊया.

भारतीय संस्कृतीतील गृहदेवतांपैकी “जाते” ही एक गृहदेवता असल्याचे मानतात.असं हे जातं म्हणजे घराची शोभा, पावित्र्य, घरात जात्याला एक हक्काची जागा होती आणि त्याला चुकून जरी पाय लागला की लगेच नमस्कार केलाच जायचा.गावखेड्यात महिला पहाटे उठून जात्यावर दळण दळायच्या.पूर्वी तालुक्याच्या किंवा आठवडी बाजाराच्या गावात चक्की असे आणि खेडोपाडी वीजही अजूनही पोहचली नव्हती म्हणून चक्कीही नाही. त्यामुळे घराघरात नित्यनेमाने जात्याची घरघर ऐकू येत. सकाळी जात्यावरची घरघर ज्या घरातून ऐकू येई ते घर सधन म्हणावे असाच हा रिवाज होता.जात्यावर दळून भाकरीचं आणि कुळथाचं पीठ तयार करत.ग्रामीण भागात दळणासाठी “जाते” हेच प्रमुख साधन होते.पूर्वी धान्य दळणे कांढणे अशी कामे जात्यावर केली जात होती.आजही कित्येक खेडेगावांमध्ये “जातं” वापरला जातो.प्रत्येक घरात या वस्तू असायच्या.परंपरागत वडार समाज जंगलातून विशिष्ट दगड आणून त्यापासून जाते, वरंवटे, उखळ तयार करीत होते.वैद्यकीय दृष्टीनं म्हणालं तर घरातील बायकांना वेगळा व्यायाम करण्याचीही गरज भासत नव्हती.
“जाते” हा शब्द यंत्रकम् या यंत्रवाचक शब्दापासून बनलेला आहे. भारतात जात्याला झार, जाता, जंदक, जंदर, जंद्रुव, जातो इ. नावांनी ओळखतात.जतम – जत्त व पुढे जाते हा शब्द मराठीत आला. भारतात जात्याचा उपयोग आर्यांच्या भारतातील आगमनानंतर सुरू झालेला असावा, असे सींधू संस्कृतीतील आढळलेले जाते व द्रविड भाषांखेरीज इतर सर्व भारतीय भाषांत जात्याला आढळणारे शब्द यांवरून दिसून येते. मनुस्मृति व इतर संस्कृत ग्रंथांत विविध प्रकारांनी जात्याचा उल्लेख केलेला आढळून येतो.सिंधू संस्कृतीशी समकालीन व समान असलेल्या लोथल येथील उत्खननात इ.स.पू २००० च्या सुमाराचे जाते सापडले आहे.
अभीलषितार्थचिन्तामणि हा ग्रंथ इ.स. ११२९मध्ये, म्हणजे ज्ञानेश्वरीच्या १६१ वर्षांपूर्वी चालुक्य वंशातल्या सोमेश्वर या राजानं लिहिला. या ग्रंथात मराठी रूपं व मराठी शब्द कित्येक ठिकाणी आले आहेतच, पण विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रंथात रागतालाची माहिती देताना ग्रंथकारानं काही मराठी पदंही दिली आहेत. ही पदं किंवा ओव्या महाराष्ट्रातील स्त्रिया दळताना, कांडताना म्हणतात, असंही सोमेश्वर लिहितो. मराठीत लोकगीतांची परंपरा किती जुनी आहे, हे यावरून लक्षात येतं.
इ.स.पू १९ मध्ये रोमन अभियंते व्हिट्रव्हिअस पॉलिओ यांनी प्रथमत: पाण्याच्या प्रवाहावर चालणार्या पिठाच्या चक्कीचे वर्णन केलेले आढळते. आपल्या महाराष्ट्रात औरंगाबादचि जगप्रसिद्ध अशीच एक जुनी पानचक्की आहे. मुख्य हौदाच्या पश्चिमेस एका कोपऱ्यात वजनदार दगडाचे जाते (चक्की) आहे. ज्याच्या तळाशि लोखंडाचे पाते बसवलेले आहेत. ज्या स्तंभाद्वारे हौदात पानी पडते त्याच्यावरहि एक लहान टाकी आहे. या लहान टाकितुन एक जलप्रवाह जात्याच्या पात्यावर आपल्या शक्तिनिशि पडतो, त्या सरशी जात्याचा दगड फिरू लागतो. पुरातन काळी पाण्याच्या शक्तिवर चालनारे हे जाते (चक्की) गरीब लोकांचे धान्य दळण्याच्या उपयोगी पड़त असे.
जातं म्हणजे मराठी संस्कृतीतील एक जुने आणि महत्त्वाचे साधन, जे ग्रामीण भागातील जीवनाशी खूप जवळचे आहे. जात्याच्या वरच्या तळीला खुंटा बसवण्यासाठी केलेले गोल लहान भोक, धान्य टाकण्यासाठीची सोय, आणि हाताने फिरवून दळण्याची पद्धत ही जात्याच्या अनोखी रचना.दोन महिला समोरासमोर बसून उभा दांडा हातात धरून वरची तळी फिरवत असताना मध्यभागी असणाऱ्या पेल्याच्या आकाराच्या छिद्रातून धान्य टाकतात.जात्यावर दळताना जाते एका गतीने फिरविणे, लाकडी खुंटा व्यवस्थित पकडणे, धान्य केव्हा टाकायचे याचे एक तंत्र असत. तळ्याच्या घर्षणामुळे धान्याचे पीठ होऊन ते तळ्याच्या कडेला असणाऱ्या फटीतून बाहेर पडते.जुन्नर परिसरातील भागात अद्यापही धान्य दळण्यासाठी वा भरडण्यासाठी जात्यांचा काही ठिकाणी वापर करतात.
जात्याच्या खुंटय़ाला हळकुंड-सुपारी बांधून त्यात उडीद भरडले जातात आणि लग्नाच्या कामांचा शुभारंभ केला जातो.लग्न कार्यात जात्यावर हळद दळणे आणि ओवी गाणे म्हणण्याची पद्धत होती.पाचवीची (सटवाई पूजा) तयारी करण्याच्या विधीमध्ये पाटा वरवंटा, दगडी दिवा याचबरोबर “जाते” याला खूप महत्व अजूनही दिले जाते यामुळे नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला कुठलीही बाधा होऊ नये, त्याला चांगले आयुष्य व आरोग्य लाभावे हा हेतू असायचा. एकेकाळी पाय मुरगळला की, वृद्ध महिलांच्या सल्यानुसार त्या पायावरून जातं फिरवलं जात असे. मुरगळलेल्या हातापायावर तो एक चांगला उपाय असायचा असं म्हटलं जातं.
जात्यावर दळताना होणारी मौखिक साहित्यनिर्मिती-
लोकसंगीताच्या आणि लोकवाङ्मयाच्या परंपरेत मौखिक साहित्याला खूप मोठं स्थान आहे. जात्यावरच्या ओव्या याच मौखिक परंपरेचा भाग आहेत.ज्यात्यावर दळताना संत जनाबाईंनी, बहिणाबाई चौधरी ओव्या गायल्या.एकेकाळी जनाबाईने ‘सुंदर माझे जाते गं फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुक तू येरे बा विठ्ठला’ म्हणत ओवीतून जात्याची महती सांगितली होती.तसंच महानुभाव पंथाच्या लीळाचरित्रातील ज्या ओव्या आहेत, त्या ओव्यांचा जन्मही या जात्यावरच झाला असावा असा त्या पंथाच्या काही लोकांचाही दावा आहे.
गावोगावी आधुनिक गिरण्या सुरू झाल्या आहेत. कालांतराने जाते घरातच अडगळीत पडले. शहरातील फ्लॅट संस्कृतीत तर जात्याला आता स्थानच उरलेले नाही. आता केवळ लग्नकार्यात हळद दळण्यासाठी जात्याची आठवण होते.स्वयंपाक घरात आधुनिक मिक्सर आल्यामुळे घरातील उखळ, पाटा-वरवंटा, जातं या वस्तूंचा आता वापर कमी झाला आणि हळू हळू या सर्व वस्तू अडगळीत गेल्या.मावळतीला चाललेल्या मराठी शब्दांमधे आता उखळ ,मुसळ, पाटा, वरवंटा याच बरोबर “जातं” हा शब्द समाविष्ट झालेला आहे. यातील किती शब्द सध्या वापरले जातात व आपल्या पुढील पिढी पर्यंत किती शब्द पोचतील ? घरातील घरोट गेला म्हणून घरोट शब्दासह घट्या,जातं, भरडकी,भरडणं, दळणं,घरोट बसवणं, घरोट उपटणं,खुटा, दांडा,माकडी हे शब्द लुप्त झाले.ग्रामीण भागातील घरामधून “जाते” नामशेष झाल्याने जात्यावरील असंख्य ओव्या,म्हणी, उखाणे, नामशेष झाल्या.
जुन्या काळात स्त्रिया जात्यावर दळतांना ओव्या गाऊन आपल्या मनातल्या भावनांना मोकळी वाट करून देत.‘हरण पळे दुध गळे’ हा उखाणा यापुढे कोणाला कळणार नाही. ‘जात्यावर बसले की ओव्या सुचतात,’ अशी म्हणच प्रचलित झाली होती. यामुळे आपल्या मराठी सांस्कृतिक वारशाची ओळख कदाचित धूसर होत चालली आहे.दगडांपासून घडवलेल्या या वस्तूंनी संपूर्ण ग्रामीण संस्कृती अनेक अर्थानी घडवली आहे आणि संपन्नही केली आहे.ग्रामीण जीवनातील साधेपणा, परस्पर साहाय्य, आणि स्थायिकतेचे प्रतीक असलेली ही साधने ग्रामीण संस्कृतीच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाची ठरली आहेत.

ज्ञानेश्वरीचे आकलन करताना अनेकजण म्हणतात की “एकतरी ओवी अनुभवावी” अगदी तसेच जाते दळताना म्हटल्या जायच्या या ओव्यादेखील एक विलक्षण अनुभव देणाऱ्या आहेत.जीवनाची खरी ओळख देणारे जाते,दळताना म्हटल्या जायच्या ओव्या अन् गाणी; अनमोल ठेव्याला पुढच्या पिढ्या मुकणार हे मात्र खरे!
संदर्भ – मराठी विश्वकोश आणि वर्तमानपत्रातील कात्रणे
-गणेश काळे (9819026305)
भुताचे झाड
एकदम अंधा-या रात्री असे पांढरे शुभ्र झाड दिसणे एखाद्या नवख्या माणसास घाबरविणारे असते. त्यामुळेच याला भुत्या असे म्हणतात.वर्षातील बराच काळ निष्पर्ण असणारा हा वृक्ष त्याच्या पांढ-या आणि चमकदार खोडामुळे रात्रीच्या अंधारात काहीसा चमकताना भासतो.याच झाडाला जुनी लोकं (कांडोळचा अपभ्रंश करून) साडोल म्हणतात.काही ठिकाणी याला पांढरीचे झाड भुत्या, भुताचे झाड ,कांडोळ,करू, पांढरुप, कावळी, तांदूळ, सरडोल, कढई असेही म्हणतात.
मेळघाटातील या भुत्या वृक्षाची आदिवासी बांधव पूजा करतात. या झाडावर आदिवासी बांधव कधी चढत नाहीत. या झाडाला कधीही पायाचा स्पर्श आदिवासी बांधव होऊ देत नाहीत.कडाया किंवा भुत्या ( Sterculina urens) हे जंगलात सापडणारे पांढऱ्या खोडाचे वैशिष्ट्यपूर्ण झाड. झाडाच्या सालीपासून दोरही तयार करत असत. लोक सांगतात की, ५० वर्षांपूर्वी दुष्काळाच्या काळात या झाडाचा डिंक विकून आपला ते उदरनिर्वाह करत होते. डिंक देऊन त्याबदल्यात खाण्याच्या वस्तू घेत होते. डिंक काढण्याची पद्धत म्हणजे झाडाला आदल्या दिवशी दोन तीन ठिकाणी कुऱ्हाडीने घाव घालायचे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर जाऊन डिंक गोळा करायचा. यासाठी लोक कधीकधी दोन दिवस जंगलातच मुक्काम करायचे.
हे पानझडी वृक्ष त्याच्या परिसंस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. उन्हाळा वाढत जातो तसतशी पालवी मोठी होऊन झाड हिरवेगार दिसू लागते. फळांवर लव असते तशीच लव झाडांच्या पानांवरसुद्धा असते. लवेमुळे ती स्पर्शाला मऊसूत लागतात.खोडावरची बारीक लव खाजरी असते. कोकण व उत्तर कारवार येथील समुद्र किनाऱ्याजवळच्या खडकाळ जमिनीत नेहमी आढळणारा हा मोठा पानझडी वृक्ष दख्खनचे पठार, हिमालयाच्या पायथ्यास गंगेच्या पूर्वेस, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, ब्रह्मदेश इ. प्रदेशांतील पानझडी जंगलांत आढळतो.

लाकूड उग्र व अप्रिय वासाचे, ओलसर व तेलकट वाटते. सालीपासून मिळणारा पांढरा (कतिरा) गोंद औषधी गोंदाप्रमाणे (घशाच्या विकारांवर) उपयुक्त. मध्य प्रदेशातील गोंड लोक बिया भाजून खातात. पाने व कोवळया फांद्या भिजवून ठेवल्यावर मिळणारा बुळबुळीत द्रव गुरांच्या फुप्फुसावर विकारावर देतात.झाडाची साल आणि डिंक आख्ख्या जगात प्रसिद्ध आहे. झाडाची साल औषधी आहे; डायरियावर गुणकारी म्हणून वापरली जाते. दातांच्या कवळ्या बनवण्यासाठी साच्यांमध्ये पावडर टिकून राहण्यासाठीही त्याचा डिंक वापरला जातो. खाद्यपदार्थाच्या उद्योगातसुद्धा त्याचा डिंक वापरला जातो.
एकूणच मोठ्या प्रमाणात या वृक्षाची कत्तल केल्या जात असल्यामुळे अतिशय महत्त्वाचे असणारे हे वृक्ष दुर्दैवाने नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
-गणेश काळे( 9819026305 )
दुर्मिळ ‘रावणमाड’ वृक्ष
दुर्मिळ ‘रावणमाड’ वृक्ष -हा दुर्मिळ वृक्ष पाहायची योग्य जागा म्हणजे पालघर जिल्ह्यातील ‘शिरगांव किल्ला’.एका मूल खोडावर असलेल्या अनेक शाखांनी भरलेल्या डोक्यामुळे ‘रावणताड’ अशी उपाधी दिली आहे. याचे वृक्ष ४० ते ६० फुट इतके उंच असतात. मूळ खोड सुमारे १०-१२ फुट इतके उंच झाल्यावर त्याला दोन फांद्या फुटतात. या दोन फांद्या सहा फुट वाढीनंतर पुन्हा दुभांगतात आणि ही फांद्याची दुभंगण्याची क्रिया चालूच राहाते. फांद्या फुटणारा हा एकमेव वृक्ष आहे पामकुळातला.सामान्यत: नारळ, सुपारी, ताड, खजूर यांसारखे वृक्ष सरळ दिशेने वाढताना दिसतात; परंतु ‘डूम पाम’ मात्र दोन शाखांमध्ये विभाजीत होत जातो. या नव्या शाखांना पुन्हा दोन फाटे फुटत राहतात. झाडांची ही वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहिल्यावर एका धडावर अनेक डोके असलेल्या रावणाची आठवण होते, यातूनच या वृक्षाला स्थानिक भागात ‘रावणमाड’ असे नाव चिकटले आहे.

मुंबईचा भूशास्त्रीय वारसा गिल्बर्ट हिल (Gilbert hill)
मायानगरी मुंबईमध्ये एकेकाळी मोठ्या प्रमाणात डोंगर-टेकड्या
होत्या.कालौघात त्यांचे सपाटीकरण झाले असून काही मोजक्या टेकड्या शिल्लक
आहेत. यात, माझगाव टेकडी, शिवडीची राम टेकडी, वरळीची टेकडी, पाली हिल
,मलबार हिल या काही टेकडयांचा आवर्जून उल्लेख करता येतो. मुंबई या सर्व
भूशास्त्रीय जन्मखुणा आजही आपल्या अंगावर मिरवते. जर तुम्ही शाळेत भूगोल
नीट वाचले असेल, तर तुम्हाला माहित असेल की मुंबई आणि महाराष्ट्र हे डेक्कन
पठारावर स्थित आहे, जे ज्वालामुखीच्या मातीपासून बनले आहे.येथे
दशलक्षपूर्वी मोठा ज्वालामुखी उद्रेक झाला असावा, ज्यामुळे या भागात काळी
माती तयार झाली आणि पठार उभारले गेले. डेक्कन ट्रॅप हा डेक्कन पठारावर
पसरलेला एक मोठा आग्नेय प्रांत आहे, ज्याला पृथ्वीवरील सर्वात मोठ्या
ज्वालामुखी क्षेत्रांपैकी एक म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे.
अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट टेकडी ही याच ऐतिहासिक घटनेची साक्ष
आहे.ही टेकडी काळ्या बेसॉल्ट खडकाची 66 दशलक्ष वर्षे जुनी आणि 200 फूट उंच
एकसंध (monolith) रचना आहे,जी पृथ्वीच्या भेगांमधून बाहेर पडलेल्या
लाव्हामुळे तयार झालेली आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मेसोजोइक काळात
द्रवरूप लाव्हा पृथ्वीच्या भेगांमधून बाहेर पडून महाराष्ट्र, गुजरात आणि
मध्य प्रदेश या भारतीय राज्यांच्या मोठ्या भागात (सुमारे 50,000 चौरस
किलोमीटर) पसरला होता. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे त्या काळातील वनस्पती
व प्राणीजीवनाचा नाश झाला.तज्ज्ञांच्या मते, गिल्बर्ट टेकडी ही अशीच
दुर्मिळ भूवैज्ञानिक अवशेष असलेली जागा आहे, आणि जवळच्या जोगेश्वरी भागात
यासारख्या उभ्या स्तंभांचे समूह होते, जे दोन दशकांपूर्वी उत्खनन करून
काढून नष्ट केले गेले. मुंबई परिसरात अशाच प्रकारच्या ह्रायोलाइट,
ट्रॅकाइटसारख्या अग्निजन्य खडकांच्या स्तंभीयरचनाही पाहायला मिळतात.
सामान्यतः ज्वालामुखी पर्वत तयार होतो जेव्हा लाव्हा जमिनीच्या
आतून वरच्या दिशेने येतो आणि त्याचा थर थर साचतो.परंतु कधी कधी लाव्हा
वेगळ्या प्रकारे वागतो; तो अचानक वेगाने उभा वर सरकत पृथ्वीतील ट्रॅप्स
(जमिनीचे थर) दरम्यान उभा राहतो आणि घट्ट होतो.अशा प्रकारच्या रचनेला
“लॅकोलिथ” असे म्हणतात. गिल्बर्ट टेकडी निर्माण करणाऱ्या ज्वालामुखीच्या
लाव्हापासून दख्खनच्या पठारावरील विस्तीर्ण सपाट प्रदेश तयार झाल्याचेही
म्हटले जाते.गिल्बर्ट टेकडीचा बेसॉल्ट खडक चौरस आणि आयताकृती खांब
स्तंभाकार बेसाल्ट , “लॅकोलिथ” या
ज्वालामुखीय खडक प्रकाराचं उदाहरण आहे, ज्याचा शोध भूगर्भशास्त्रज्ञ
ग्रोव्ह कार्ल गिल्बर्ट यांनी लावला. लॅकोलिथचा अभ्यास करून त्याचे
वर्गीकरण करणारे व्यक्ती म्हणजे अमेरिकन भूवैज्ञानिक जी.के. गिल्बर्ट,
ज्यांच्या सन्मानार्थ मुंबईतील या टेकडीला नाव देण्यात आले आहे.या परिसराचे
व भौगोलिक महत्त्व जर्नल ऑफ द बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, डिसेंबर
1952 च्या 51 व्या खंडात नमूद केले आहे. याचा अर्थ गिल्बर्ट टेकडी ही मानवी
उत्क्रांतीच्याही खूप आधीपासून, सुमारे 13 दशलक्ष वर्षांपूर्वीपासूनच
अस्तित्वात आहे, आणि आजच्या मुंबई या गजबजलेल्या महानगराच्या फार
पूर्वीपासून आहे.

संपूर्ण जगात अशा केवळ तीन भौगोलिक रचना आहेत. यापैकी
दोन अमेरिकेत आहेत-कॅलिफोर्नियामधील ‘डेव्हिल्स पोस्टपाइल नॅशनल
मॉन्युमेंट’ आणि व्योमिंगमधील ‘डेव्हिल्स टॉवर नॅशनल मॉन्युमेंट’. मुंबईतील
गिल्बर्ट हिल हे तिसरे उद्यान 1952 मध्ये वन कायद्यांतर्गत ‘राष्ट्रीय
उद्यान’ म्हणून घोषित करण्यात आले.1970 साली टेकडी सध्याच्या आकारापेक्षा 5
पट मोठी होती आणि 1937 साली ती सध्याच्या आकारापेक्षा 10 पट मोठी होती.
पूर्वेला एस. वी. रोड ,उत्तरेला जी प्रकाश रोड ,उत्तर पश्चिमेकडे अंधेरी
क्लब पर्यन्त तसंच दक्षिण-पूर्व मासूम अली रोड दर्ग्या पर्यन्त टेकडीचा
विस्तार होता .पण सध्या टेकडी सात ते आठ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते, तर
टेकडीचा वरचा भाग 8,000 ते 10,000 चौरस फुटांवर पसरलेला आहे. वाढत्या
अतिक्रमणांमुळे डोंगर स्वतःच दिवसागणिक नष्ट होत आहे. लोककथांनुसार,
शतकांपूर्वी या टेकडीभोवती घनदाट जंगल होते. 60 ते 70 वर्षांपूर्वीपर्यंत,
डोंगराच्या सभोवतालच्या भागात दाट वनस्पती होत्या.


अंधेरी स्थानकापासून चालायला सुरुवात केली, तर आपण पंधरा मिनिटांत टेकडीवरील देवळात पोहोचतो. देऊळ व टेकडी सकाळी सात ते दुपारी ११ व संध्याकाळी चार ते सात या वेळातच खुले असते.गिल्बर्ट टेकडीवर हनुमान मंदिर आणि 400 ते 500 वर्ष जून गावदेवी दुर्गामातेचे मंदिर ही दोन मंदिरे आहेत. मंदिराला भेट देण्यासाठी तब्बल दोनशे पायऱ्या चढून वर जावे लागते. स्थानिक लोक हे आपले ग्रामदेवता मानतात. दरवर्षी लोक या मंदिरांमध्ये विविध सण साजरे करतात. मंदिरामध्ये ‘गावदेवी दुर्गा देवस्थान’ नावाचा एक ट्रस्ट आहे, जो टेकडीभोवती बांधकाम करण्यास परवानगी न देण्यासाठी मोहीम राबवतो. टेकडीचा माथा फारच लहान आहे, त्यामुळे मंदिराच्या भोवती फेरी मारून तुम्ही सर्व बाजूंनी टेकडी फिरू शकता. टेकडीच्या माथ्यावर चारही बाजूंना तारेचे कुंपण घातलेले आहे. टेकडीच्या आजूबाजूला झालेल्या बांधकामामुळे टेकडीला हादरे बसून टेकडीचा काही भाग कोसळत होता, म्हणून ही उपाययोजना केलेली. माथ्यावरून गगनाला भिडणाऱ्या इमारती आणि झोपडपट्टी नजरेस पडते. पश्चिम दिशेला उंचच उंच इमारती आणि त्याच्या पलिकडे अथांग पसरलेला अरबी समुद्र दिसतो. एकूणच निसर्गावरील माणसाच्या अतिक्रमणाची झलक या टेकडीवरून दिसते. येथे काळ्या घारी आणि भारतीय रिंग-नेक पॅराकीटचा वावर आहे. किंगफिशर, सन बर्ड आणि टेलर बर्ड यांसारखे उष्णकटिबंधीय पक्षी देखील या भव्य रचनेच्या परिसरात दिसले आहेत. मात्र, पर्यावरणतज्ज्ञांना भीती आहे की या पक्ष्यांची संख्या घटत जाईल, कारण गिल्बर्ट हिलला वेढलेल्या “काँक्रीट जंगलां”मुळे त्यांचा अधिवास नष्ट होत आहे. म्हणून, उर्वरित टेकडीला “राष्ट्रीय नैसर्गिक स्मारक” म्हणून संरक्षित करणे आवश्यक आहे.
आज टेकडीच्या परिसरात झोपडपट्ट्या वाढल्या आहेत. महसूल विभागाने टेकडीसमोर 16 मजली गगनचुंबी इमारती बांधण्यास परवानगी दिली आहे, आणि टेकडीचा भाग हळूहळू कमी होत आहे.हा डोंगर झपाट्याने झिजत चालला आहे, आणि त्याच्या आजूबाजूचे क्षेत्र बिल्डर्स व झोपडपट्टीवासीयांनी व्यापून टाकले आहे.गिल्बर्ट हिलचे जतन करणे ही भविष्यातील पिढ्यांसाठी अमूल्य देणगी ठरेल. हे अनोखं वारसास्थळ मुंबईसाठी एक अभिमानाचा ठेवा आहे आणि याचं संरक्षण करणं काळाची गरज आहे, जेणेकरून आपल्या “अतुल्य भारत” वारशाचे जतन होईल.

-गणेश काळे( 9819026305 )
नगरधन किल्ला
नगरधन किल्ला (Nagardhan Fort)
ता.रामटेक जि.नागपूर
हा किल्ला भुईकोट किल्ला या प्रकारात मोडतो.विस्ताराने आणि आकाराने हा किल्ला जरी लहान असला तरी विदर्भातील महत्त्वाच्या किल्ल्यात याची गणना होते.इ.स. पाचव्या शतकातील वाकाटक कालीन दुर्गाच्या अवशेषावर गोंड राजाच्या राजवटीत किल्ला बांधण्यात आला असल्याने जुन्या बांधकामातील विटांचा उपयोग आलेला आहे.नागपूर भोसल्यांच्या काळात या किल्याची वेळोवेळी डागडुजी काही नवीन बांधकामाची जोडणी यात करण्यात आली.
या किल्ल्याची लांबी १०२ मीटर व रुंदी ८८ मीटर असून तटबंदी आणि प्रवेशद्वार याची उंची ६ ते ८ मीटर पर्यंत आहे.किल्ल्याचे अजून एक वैशिष्ट्य त्याच्या तटबंदीत आहे.ते असे कि चौकोनी, गोल, अष्टकोनी आकाराचे बुरुज पहायला मिळतात.
किल्ल्याच्या उत्तराभिमुख प्रवेशद्वारावर श्री गणेशाचे शिल्पांकन असून कलश पूर्णविकसित कमळ,गजशार्दुल प्रवेशद्वार सुशोभीत आहे.प्रवेशद्वारावरच नगारखाना आहे.
दरवाजावर कोरलेली शरभशिल्पे
किल्ल्यात एक उथळ हौद आहे.यात उतरण्यासाठी चारही बाजूला पायऱ्या आहेत.पूर्वीच्याकाळी कदाचित यात उगवत असलेली कमळाची फुले महालाची शोभा वाढवत असावी.
किल्यातील “भुयारी मंदिर” हे एक अजून कवतिक आहे.
भूमिगत पाण्याचा हौद.
किल्ल्यात असलेल्या महालात येण्यासाठी असणारा दरवाजा जो सध्या उध्वस्त झालेला आहे.
नागपूर ते नगरधन अंतर ५० किलोमीटर आहे.नगरधन किल्ल्यासाठी रामटेकला यावे आणि तेथून ६ आसनी रिक्षाने जाता येते.हा किल्ला नगरधन गावाच्या जवळच आहे.
भद्र किल्ला (अहमदाबाद- गुजरात)
भद्र (Bhadra Fort)किल्ल्याची माहिती पाहण्याआधी आपण हा किल्ला ज्या अहमदाबाद शहरात आहे त्याचा थोडक्यात इतिहास पाहूया…..
११ व्या शतकात साबरमती नदीच्याकाठी आशाभिल्ल राजाने “आशावल” नावाचे गाव वसविले.पुढे कर्णसोळंकी राजाने हे गाव जिंकले आणि याचे “कर्णावती” असे नामकरण झाले.सुमारे शतकभर येथे हिंदू राजे राज्य करीत होते.परंतु तेराव्या शतकात मुस्लीम राजाचे आक्रमण झाले.१४-१५ व्या शतकात सुरवातीस बहामनी वंशाचा आणि गुलबर्गयाचा सुलतान अहमदशाह या राजाने राज्य केले.इ.स. १४११ मध्ये या कर्णावती शहराचे नाव बदलून अहमदाबाद असे करून अहमदशाहाने येथे आपली राजधानी वसवली. जुने अहमदाबाद साबरमतीच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे नवीन अहमदाबाद वसलेले आहे.
हा किल्ला अहमदाबादच्या मध्यवर्ती आणि लाल दरवाजाच्या नजीकच्या भागात आहे.लाल दरवाजाच्या नजीकच याचे अवशेष पाहवयास मिळतात.इ.स.१४११ मध्ये हा किल्ला बांधण्यात आला होता.पूर्वी किल्ल्याला ८ गेट होते, तीन मोठे, २ पूर्वेला आणि एक दक्षिण- पूर्व भागात, तीन मधम आकाराचे यातले दोन दक्षिण आणि एक उत्तर भागात होते.
पेशव्यांच्या काळात येथे मराठी अंमल चालू होता.दामाजी गायकवाड हे सरदार इकडे करवसुली करत होते.येथे मराठी मंडळीनी अजूनही गजबजलेला परिसर आहे.याच मराठ्यांनी भद्रकाली मातेचे मंदिर येथेच उभारले होते.हि मूर्ती काळ्या दगडाची असून मुखात चांदीची जीभ आहे.
भद्र किल्ल्यावर घड्याळ असलेला जो मनोरा आहे आणि यात जे घड्याळ आहे ते British East India Company ने खास लंडनवरून आणून 1878 मध्ये बसवले.
किल्ल्यातील सुंदर लाकडी कलाकृतीचे छायाचित्र
वीरेश्वर मंदिर- पेशवेकालीन मंदिर ( खोपोली )
काही
दिवसापूर्वी माझ्या वाचनात खोपोलीतील पेशवेकालीन मंदिराचा आला आणि मग हे
मंदिर बघण्याची इच्छा झाली आणि सरतेशेवटी पाहण्याचा योगपण आलाच.
साधारपणे १८व्या शतकात सध्याचे खोपोली हे शहर मराठेयांच्या अधिपत्याखाली होते आणि तेही विशेषकरून नाना फडणवीस यांच्या देखरेखीखाली.त्यांनीच हे वीरेश्वर मंदिर ३५० वर्षापुर्वी बांधून घेतले.मंदिर बांधायला साधारणपणे दीड वर्षे लागली जे १७५८ मध्ये पूर्ण झाले. तसेच या मंदिरा लगतच येणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्रहि बाधण्यात आले. असेही सांगण्यात येते कि, खोपोली घाट चढण्यापूर्वी आराम व्ह्यवा आणि त्यातून भक्ती पण ह्यवी हा यांचा उद्देश .पालीचा बल्लाळेश्वेर आणि महड येथील वरदविनायकाचे दर्शनासाठी पेशवे खोपोली घाटमार्ग याचा वापर करत होते.
भव्य सभागृह आणि सुंदर ,आकर्षक प्रवेशद्वार असलेले हे मंदिर उत्कृष्ट हेमाडपंथी बांधणीचे आहे.दुर्दैवाने १८८२ मध्ये देखभाली अभावी हे मंदिर कोसळले.
मंदिराचा
सध्या खूपच जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ मंदिर पूर्णपणे झाकोळून गेले
आहे.मंदिराच्या गाभाऱ्यात वीरेश्वराची पिंड आहे.असेही म्हणतात , या
पिंडीच्या स्थापनेसाठी काशीचे पुरोहित बोलावण्यात आले होते.या मंदिराच्या
देखरेखीसाठी आणि पूजेसाठी पेशव्यांनी ह्याचा मान गुरव घराण्याला देण्यात
आला.सध्या त्यांची पाचवी पिढी या मंदिराची दैनदिन पूजाअर्चा करत
आहे.श्रावणी सोमवारी महाशिवरात्री येथे पालखी सोहळयाचे आयोजन केले जाते.

या मंदिरासमोरच अष्टकोनी तलाव आहे आणि हाच तलाव खोपोली शहराची तहान भागवत आहे.या तलावाची निर्मिती पेशव्यांनी त्यांच्या सैनिकांसाठी तसेच घोडे आणि हत्ती यांची तहान भागवण्यासाठी केलेली होती.

ठाकरांचा देव बहिरी (भैरव) -ढाक बहिरी
Published by
on

गुहेत राहणाऱ्या या देवाला स्थानिक लोक ‘गडदेचा (गुहेतील) बहिरी’ असे म्हणतात. ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकरांनी ‘गडदेचा बहिरी’ या त्यांच्या कादंबरीतून तो जगापुढे आणला.ढाक गडाच्या पश्चिमेच्या उभ्या कडय़ातील पोटात अवघड ठिकाणी वसलेला. आजूबाजूच्या परिसरात राहणारे ठाकर ही दुर्गम वाट चढून वर येतात. पूजाअर्चा-नैवेद्य करत सूर्य मावळतीच्या आत खाली उतरतात. या बहिरीच्या गुहेत शेंदुर फासलेली पहिली मूर्ती श्री भैरवनाथ महाराज,दुसरी मूर्ती जोगेश्वरी मातेची आणि तिसरी मूर्ती श्री गणरायाची आहे.
महाकाली लेणी – मुंबई

मुंबई परिसरात काही लेणी आहेत त्या म्हणजे जोगेश्वरीची लेणी, अंधेरी येथील महाकाली लेणी तसेच दहिसरची मंडपेश्वर लेणी . यातील महाकाली लेणी बेसाल्ट खडकात कोरलेली १९ लेणी येथे आहेत. लेण्यांचा काळ इसवी सन पूर्व २ रे शतक ते इसवी सन 6 व्या शतक कोरल्या असाव्यात . हीनयान पंथियांची ही लेणी असून नंतर महायान अनुयायांनी बुद्ध प्रतिमा आणि बौद्ध चिन्हांनी यातील काही लेणी अलंकृत केल्या आहेत.
J.M.Campbell makes reference to a Pali inscription near one of the lattice windows, The inscription, dated to the 3rd century A.D. states :
‘Gift of a vihara, with his brother, by Pittimba, a Brahman of Gautama gotra, an inhabitant of Pachi Kama‘
J.M. कँपबेल (1882) ह्या लेण्या कोंडिवीटी गावाच्या जवळ असल्यामुळे त्यांना कोंदिवटे किंवा कोंदिवीटी लेणी म्हणून संबोधतात, फर्ग्युसन (1880) ह्याने त्यांना कोंदिवीटी लेणी असे नाव दिले आहे, तर S.R. वाउचॉपने (1933) त्यांना महाकाली लेणी म्हणण्याची प्रथा केली.
छायाचित्रात असलेली गुहा क्र. 9 (Chaitya Cave)
ही संकुलाची मुख्य गुहा आहे आणि बहुधा महाकाली येथील सर्वात जुने उत्खनन आहे.
यातील मुख्य चैत्यविहार बाराबर येथील सुदाम चैत्य लेण्यासारख्या गज पृष्ठकार व दर्शनी भागात अर्धवर्तुळाकार रचना असलेला आहे. त्याच्या आत स्तूप बंदिस्त असून दर्शनी भागातील गोलाकार भिंतीला दरवाजा आणि त्याच्या दोन बाजूस जाळ्यांच्या खिडक्या आहेत. खिडक्या आणि भिंत यामध्ये अरुंद प्रदक्षिणापथ तयार झाला आहे. या लेण्यांच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर नागद्वयींनी कमळ दंड धरला असून त्यावरील कमळासनात गौतम बुद्ध बसले आहेत, शिवाय त्यांच्या आजूबाजूला निरनिराळ्या आसनातील बुद्धमूर्ती आणि बौद्धचिन्हे अर्धउठावात कोरले आहे, परंतु येथील कातळ ठिसूळ निघाल्यामुळे ही सुंदर शिल्पे झिजून गेलेली दिसतात.(संदर्भ -सदाशिव टेटविलकर यांचे काही लेख)
यज्ञवराह शिल्प (बारामती- लोणी भापकर)
श्री देवविष्णू एकूण दहा अवतार असल्याचे मानले जाते. यातला तिसरा अवतार म्हणजे वराह.वराहावतारात विष्णूने पृथ्वी उचलली असा समज आहे. वराह हा राजशक्तीचे प्रतिक आहे.या अवतारात श्रीविष्णूने वराहाचे म्हणजेच डुकराचे रूप धारण केले होते.अशाच अवताराचे सुंदर रूप धारण केलेले शिल्प आपल्या महाराष्ट्रात आहे.पुण्याहून साधारणपणे ९०-९५ किमी अंतरावर आणि बारामती तालुक्यात अष्टविनायकां पैकी एक असलेल्या मोरगांव पासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर “लोणी भापकर” नावाचे गाव आहे.स्वत:चे वाहन असल्याच उत्तम कारण गाव थोडेसं आडवाटेवरच आहे.
पेशव्यांचे सरदार सोनजी गुरखोजी भापकर यांचे इनाम गाव.गावाच्या बाहेर एक सुंदर मल्लिकार्जून मंदिर आहे आणि याच आवारातच यज्ञवराहाचे हे सुंदर शिल्प दिसते. वराह अवताराची मूर्ती नृवराह हया स्वरुपाची म्हणजे नृवराहाचे धड मानवाचे तर शिर वराहाचे असते. शिल्पाच्या म्हणजेच वराहाच्या पायाशी शेषनाग आहे.पायांना नागदेवतेचे तोडे घातलेले आहेत, तसेच चारही पायांजवळ शंख, चक्र, गदा आणि पद्म ही विष्णूची प्रतीके साकारलेली आहेत.यज्ञवराहाच्या पायाजवळ कौमोदकी गदा आणि शेपटीत अडकलवेली पृथ्वी दिसते.पाठीवर १४२ विष्णू मूर्तीची प्रतिमा (झूल) अलंकृत केलेली आहेत.एवढी ही सुंदर मूर्ती तुम्ही नक्कीच पाहा.

संदर्भ :पोर्तुगिजांच्या घंटा (महेश मंगेश तेंडुलकर) ,सहली पुण्यातील -एका दिवसाच्या (प्र के घाणेकर).
लोणार (Lonar)
महाराष्ट्र जसा निसर्ग नवलाईने नटलेला आहे अगदी तसाच भौगोलिकदृष्ट्या देखील नटलेला आहे.याचे उत्तम उदाहरण आहे “लोणार सरोवर”.बेसॉल्ट खडकामध्ये म्हणजे काळ्या दगडात आकार घेतलेलं लोणार विवर हे जगातील एकमेव विवर आहे.उल्कापातामुळे निर्मित, बेसॉल्ट खडकातील भारतातले एकमेव आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सरोवर.
या सरोवराला जशी धार्मिक पार्श्वभूमी असली तरी वैज्ञानिकदृष्ट्याही हे सरोवर महत्वाचे आहे.सुमारे ५० हजार वर्षांपूर्वी महाप्रचंड उल्कापातामुळे या लोणार सरोवराची निर्मिती झाली असावी असा कयास आहे. जवळपास १.८३ कि.मी. व्यासाचे आणि १५० मीटर खोलीचे असे हे विवर आहे. तसचे ८ जून २००० साली या परिसरास लोणार वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.
लोणार सरोवरात तसेच त्याच्या परिसरात आपल्याला वनस्पतीशास्त्र,खगोलशास्त्र,पुरातत्त्वशास्त्र,पक्षीशास्त्र,भूगोलशास्त्र या सर्वांचा अभ्यास करता येतो.
लोणारचा निसर्गरम्य परिसर
पौराणिक लोणार संदर्भ – लोणार नगराचा पहिला संदर्भ ऋग्वेदामध्ये आला आहे.विविध पुराणामध्ये यावर विविध कथा आहेत.या तीर्थास कपिलतीर्थ,विरजतीर्थ,धारतीर्थ इत्यादी नावे होती.अनादी काळापासून या सरोवराच्या परिसरात लोक तपशर्यासाठी येत.स्कंदपुराणात नारदमुनी,कपिलमुनी,अगस्तीऋषी यांनी लोणारला तपशर्या केली आहे.येथेच लवणासुर नावाचा राक्षस देवास शरण आला म्हणून त्याच्या नावाचे लवणादीत्य तीर्थ सरोवरात निर्माण झाले.लवणासुर नावाच्या राक्षसाला विष्णूने मारल्यानंतर त्याच्या नावावर लोणार हे नाव या सरोवराला मिळाले असावे अशी पौराणिक कथा येथे सांगितली जाते, पण ही आख्यायिकाच म्हणावी लागेल.
लोणार सरोवरची ठळक वैशिट्ये
- पृथ्वीवरील अग्निजन्य खडकातील एकमेव विवर
- ८ जून २००० साली या परिसरास लोणार वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.
लोणार मधील प्रेक्षणीय मंदिरे
रामगया मंदिर ,विष्णू मंदिर ,वाघ महादेव मंदिर ,मोर मंदिरकमलजा मंदिरअंबरखाना मंदिर,शुक्राचार्य वेधशाळा सितान्हानी
श्रीकमळजादेवी (गावदेवी)

लोणार गावातील श्रीधारतीर्थ मंदिर

कसे जाणार?
बुलडाणा या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणाहून चिखली, मेहकरमार्गे लोणारपर्यंत पोहचता येते. रेल्वेची सुविधा नसल्याने बससेवा किंवा खासगी वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे शंभर किलोमीटर आहे. नागपूर भागातून येणाऱ्यांसाठी शेगाव आणि जालनापर्यंत रेल्वे सेवा आहे तर मुंबई येथून येणाऱ्यांना औरंगाबादपर्यंत विमान, रेल्वे सेवा उपलब्ध आहे. तेथून लोणारपर्यंत बससेवा आहे.
भद्र किल्ला (अहमदाबाद- गुजरात)
भद्र (Bhadra Fort)किल्ल्याची माहिती पाहण्याआधी आपण हा किल्ला ज्या अहमदाबाद शहरात आहे त्याचा थोडक्यात इतिहास पाहूया…..
११ व्या शतकात साबरमती नदीच्याकाठी आशाभिल्ल राजाने “आशावल” नावाचे गाव वसविले.पुढे कर्णसोळंकी राजाने हे गाव जिंकले आणि याचे “कर्णावती” असे नामकरण झाले.सुमारे शतकभर येथे हिंदू राजे राज्य करीत होते.परंतु तेराव्या शतकात मुस्लीम राजाचे आक्रमण झाले.१४-१५ व्या शतकात सुरवातीस बहामनी वंशाचा आणि गुलबर्गयाचा सुलतान अहमदशाह या राजाने राज्य केले.इ.स. १४११ मध्ये या कर्णावती शहराचे नाव बदलून अहमदाबाद असे करून अहमदशाहाने येथे आपली राजधानी वसवली. जुने अहमदाबाद साबरमतीच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे नवीन अहमदाबाद वसलेले आहे.
हा किल्ला अहमदाबादच्या मध्यवर्ती आणि लाल दरवाजाच्या नजीकच्या भागात आहे.लाल दरवाजाच्या नजीकच याचे अवशेष पाहवयास मिळतात.इ.स.१४११ मध्ये हा किल्ला बांधण्यात आला होता.पूर्वी किल्ल्याला ८ गेट होते, तीन मोठे, २ पूर्वेला आणि एक दक्षिण- पूर्व भागात, तीन मधम आकाराचे यातले दोन दक्षिण आणि एक उत्तर भागात होते.
पेशव्यांच्या काळात येथे मराठी अंमल चालू होता.दामाजी गायकवाड हे सरदार इकडे करवसुली करत होते.येथे मराठी मंडळीनी अजूनही गजबजलेला परिसर आहे.याच मराठ्यांनी भद्रकाली मातेचे मंदिर येथेच उभारले होते.हि मूर्ती काळ्या दगडाची असून मुखात चांदीची जीभ आहे.
भद्र किल्ल्यावर घड्याळ असलेला जो मनोरा आहे आणि यात जे घड्याळ आहे ते British East India Company ने खास लंडनवरून आणून 1878 मध्ये बसवले.
किल्ल्यातील सुंदर लाकडी कलाकृतीचे छायाचित्र
श्रीहरिश्चंद्रेश्वर मंदिर
Published by
on
“हरिश्चंद्र”
हे नाव उच्चारले कि एकतर राजा हरिश्चंद्र आणि त्यावर आधारलेला पहिला मूकपट
आठवतो नाहीतर डोंगर भटक्यांसाठी आवडते ठिकाण आणि त्यांच्यासाठी असलेले
“पंढरपूर” म्हणजे हरिश्चंद्रगड .विसाव्या शतकाच्या सुरुवातीला
हरिश्चंद्राची कथा लोकप्रिय होती. त्याचा दादासाहेब फाळके यांनी लाभ उठवला.
म्हणून २१ व्या शतकाच्या सुरुवातीला ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ सिनेमा
निर्माण झाला.हरिश्चंद्र चित्र-शिल्पकलांचा विषय झाला नाही. पण पुराणिक,
कीर्तनकार वगैरेंनी त्याची कथा जिवंत ठेवली.
पण याच नावाने
महाराष्ट्रात असलेले श्रीहरिश्चंद्रेश्वर मंदिर मात्र सगळ्यांसाठी अल्प
परिचित आहे आणि हे मंदिर आपल्याच महाराष्ट्रात जुन्नर या तालुक्यात दडलेले
आहे .स्वतःच्या वाहनाने जर कधी भिमाशंकरला जात असाल तर, थोडासा वेळ काढून
मुद्दाम हे मंदिर पाहण्यास काहीच हरकत नाही.या मंदिराचा थोडक्यात परिचय
करून देण्याचा हा माझा पहिला प्रयत्न.















