Friday, July 29, 2022

अंदमान - एक अविस्मरणीय सफर

 https://www.misalpav.com/node/33551

अंदमानला एकदा तरी जायचेच, असे बरेच दिवस मनाशी ठरवले होते. तो योग नेमका या आक्टुंबरात आला.महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांत मुंबई ते चेन्नई आणि चेन्नई ते पोर्ट ब्लेअर, असा प्रवास करत, सकाळी ८ वाजता निघालो ते दुपारी पावणेदोनच्या सुमारास पोर्ट ब्लेअरला उतरलो. तिथे एकाच्या हातात आमच्या नांवाचा फलक बघताच जीव भांड्यात पडला. सहल आयोजक अतिशय सुस्वभावी आणि उत्तम सेवा देणारा मिळणे, हेही भाग्यात असावे लागते. ते तसे आहे हे जाणवताच आणखीनच रिलॅक्स झालो. पहिल्या दिवशी फार वेळ नसल्याने, रुमवर फ्रेश होऊन, लगेचच कॉर्बिन्स कोव्ह या पोर्ट ब्लेअरच्याच एका जवळच्या बीचवर गेलो. दुपारी ३ ते ५ असा चांगला वेळ गेला. सायंकाळी ५ वाजताच सूर्यास्त झाल्याने कोजागिरीच्या चंद्राचा आनंद घेता आला.

कॉर्बिन्स बीचचे काही फोटो
१.
Corbyn's cove

२.
Corbyn's cove

३.
Corbyn's cove

४. तोच चंद्रमा नभांत
Corbyn's cove
त्यानंतर, गाडी लगोलग सेल्युलर जेलकडे वळवली. पण त्या दिवशी जेल बंद असल्याने फक्त 'लाईट आणि साऊंड शो' बघितला. तो अगदी अवश्य बघण्यासारखा आहे. सावरकरांसारखेच बंगाल आणि पंजाब मधले असंख्य क्रांतिकारक या तुरुंगात होते आणि त्यातले काही तर तिथेच छ्ळवणुकीला बळी पडले. जेलचा इतिहास आणि त्यावेळची आतली परिस्थिती, अगदी जिवंतपणे तुमच्या समोर उभी करतात तेंव्हा अंगावर काटा उभा रहातो.
दुसर्‍या दिवशी सकाळी ६ वाजता निघायचे होते. पण तिकडे चार साडेचारलाच कोंबडे आरवायला सुरवात झाली. सकाळी ८ वाजता नाश्ता आटोपून ठीक ९ वाजताची बोट गांठली. एक तासाचा प्रवास करुन आम्हाला नॉर्थ बे आयलंडला नेण्यांत आले.

५.
नॉर्थ बे कडे जाताना
North Bay

६. जेटी
jetty

७. नॉर्थ बे आयलंड
North Bay

तिथे मोठी बोट किनार्‍यापर्यंत नेत नाहीत(कारण खालचे प्रवाळ त्याने खराब होते). त्यामुळे एक किलोमीटर आधीच आम्हाला एका छोट्या होडीत बसवण्यांत आले.त्या बोटीच्या तळाला मॅग्निफायिंग कांच बसवण्यांत आली होती. वर ऊन होते, म्हणून आमच्या सर्वांच्या डोक्यावर मिळून एक काळे प्लास्टिक पांघरले. पुढच्या २० मिनिटांत आम्हाला अत्यंत सुंदर कोरल्स बघायला मिळाले. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कोरल्सशी तोंडओळख तरी झाली. त्यानंतर आमच्या चॉईस प्रमाणे आम्हाला स्कुबा डायव्हिंग साठी नेण्यांत आले. कपडे बदलण्यासाठी तिथे छोट्या पत्र्याच्या रुम्स आहेत आणि जवळचे मौल्यवान सामान ठेवण्यासाठी लॉकर देखील!
त्या छोट्या खोलीत तो स्कुबाचा वन पीस घालताना माझी अवस्था अगदी कपड्यांच्या दुकानातल्या ट्रायल रुम सारखीच झाली. त्यातून मागचे झिप लागेचना! शेवटी तशाच अवस्थेत बाहेर येऊन एकाकडून ते झिप लावून घेतले.बाहेर चिक्कार महिला वर्ग बसला होता. पण त्यांना या साठीपार बुढ्ढ्याकडे बघण्यात इंटरेस्ट नव्हता आणि त्या बुढ्ढ्यानेही लाज कधीच सोडून दिली असल्यामुळे, काही प्रश्न निर्माण झाला नाही. आम्ही दोघंही म्हातारा-म्हातारे त्या तसल्या ड्रेसमधे डुगुडुगु चालत, कासवे जशी पाण्याकडे जातात तसे पाण्यांत उतरलो. इतरांचे ट्रेनिंग चालू असल्याने आणि त्या दिवशी इन्स्ट्रक्टर लोक कमी असल्याने, आम्हाला आमचा नंबर येईपर्यंत पाण्यांत डुंबण्याचा सल्ला मिळाला.
साधारण पाऊणतास पाण्यांत डुंबल्यावर आमचे ट्रेनिंग सुरु झाले. मास्क चढवून आणि मागे ऑक्सिजन सिलिंडर लावून, तोंडानेच श्वास-उच्छवासाची क्रिया जमायला थोडा वेळ लागला. पाण्याखाली तोंड बुडवून तसा सराव केल्यावर दोन माणसांनी आमची बखोटी धरुन, आम्हाला पाण्याखाली नेले. खालचे दृश्य पाहिले आणि आम्ही थरारलो. पुढचा अर्धा तास, खालचे अविस्मरणीय जिवंत कोरल्स आणि रंगीबेरंगी मासे बघण्यांत कसा गेला ते कळलेच नाही. ते हलणारे, आपल्या चाहुलीने स्वतःला मिटून घेणारे, वेगवेगळ्या आकाराचे कोरल्स पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. आमचे अंडर वॉटर फोटो काढून त्याची एक सीडीही करुन देण्यांत आली. बाहेर आल्यावर तो स्पेशल सूट अंगापासून वेगळा करायला, पुन्हा एकदा लोकांची मदत घ्यावी लागली. सगळे आवरेपर्यंत थोडा उशीर झाला. आमची बोट वाट पहात उभी होती. बोटीवरचा माणूस आम्हाला शोधायला आला होता. बोटीत बसल्यावर आमचा प्रवास रॉस आयलंडकडे सुरु झाला.

 

रॉस आयलंड हे ब्रिटिशांनी स्वतःला आराम करण्यासाठी विकसित केले होते. मधे तीन वर्षे ते जपान्यांच्या ताब्यात होते.
आता तेथे त्यांच्या इमारतींचे भग्नावशेष आहेत. रॉस आयलंड म्हटले की 'अनुराधा राव' या गाईडची आठवण येणारच. या बाईंनी तिथल्या पशु-पक्ष्यांना अगदी आपलंसं करुन टाकले आहे. आम्ही गेलो तेंव्हा त्या, वीणा ट्रॅव्हल्स च्या सदस्यांना मार्गदर्शन करत होत्या, म्हणून त्यांना डिस्टर्ब केले नाही. हरिणे, ससे, मोर व विविध पक्षी इथे, माणसांना अजिबात न घाबरता वावरताना दिसतात.

१. My Dear

२.
more

३.
Black

तिथल्या बागाही अतिशय सुंदर आहेत.

४.
Garden

दीड तासांनंतर आमची बोट आम्हाला परत न्यायला आली. म्हणून आम्ही परत पोर्ट ब्लेअरला निघालो. तिथे पोचल्यावर, आमचा ड्रायव्हर जेटीवर हजर होताच. तिथून आम्ही चिडिया टापू नांवाच्या किनार्‍यावर सूर्यास्त बघायला गेलो. पण त्यादिवशी खूप ढग होते त्यामुळे सूर्यदर्शनच शक्य नव्हते. या किनार्‍यावर त्सुनामीच्या विध्वंसाची झलक पहायला मिळाली.

५.
Tsunami

त्सुनामीमुळे पडलेल्या झाडांच्या खोडापासून तिथे नॅचरल बेंचेस तयार केले आहेत.

६.
Benches

तिसर्‍या दिवशी सकाळी आम्ही हॅवलॉक आयलंडला निघालो. तिथे एक दिवसाची सहल सुद्धा करता येते. पण आम्ही तिथे रहायचे ठरवले. कारण तिथले इतर बीचेसही आम्हाला निवांतपणे पहायचे होते. तो निर्णय योग्य ठरला कारण हे बेट फारच सुंदर आहे.

७.विजयनगर बीच-हॅवलॉक
vijaynagar

८.
vijaynagar

९. बीचसमोर आमचे रिसॉर्ट
Resort

१०. राधानगर बीच - हॅवलॉक

Radhanagar

११.
radhanagar

१२. काला पत्थर बीच - हॅवलॉक

kala patthaar

१३.
kala Patthar

१४. आमची परतीची क्रूज

Cruise

हॅवलॉकहून परत यायला अंधार झाला. त्यामुळे संध्याकाळी आराम केला. पाचव्या दिवशी सकाळी लवकर उठून बारटांगला गेलो. अंतर १०० किमी आहे. तिथे जाताना, अर्ध्या रस्त्यावर एक चेकपोस्ट आहे. तिथे सर्व वाहने शिस्तीत थांबतात. प्रत्येकाची परमिशन तपासली जाते. त्यानंतर एक आदिवासी टापू सुरु होतो. तिथे कुठेही वाहन थांबवायचे नाही, आदिवासींचे फोटो काढायचे नाहीत, त्यांच्याशी बोलायचे नाही, अशा सक्त सूचना होत्या. वाटेत आम्हाला दोन आदिवासी स्त्रिया दिसल्या.त्यांतील एक पूर्ण विवस्त्र होती. पुढे बारटांगला गेल्यावर कार पार्क करुन, फेरीने समोरच्या किनार्‍याला गेलो. तिथे कागदपत्रांची खातरजमा झाल्यावर एका स्पीडबोटीत बसलो. अर्धा तास प्रवास केल्यावर एका किनार्‍यावर उतरलो. तिथून १.२ किमी चालल्यावर लाईमस्टोनची गुहा आली. त्यांतले चित्रविचित्र लोंबणारे शेप्स पाहून परतलो, पुन्हा चालत किनार्‍यावर येऊन बोटीने बारटांगला आलो. काही पर्यटक, एवढ्या एका गुहेसाठी इतका प्रवास कशासाठी? अशा तक्रारी करत होते. पण अशा लोकांना हे समजत नाही की या प्रवासांत आजूबाजूचा निसर्ग पहायचा असतो, त्याचा आनंद त्या गुहेपेक्षाही जास्त असतो.

१५. स्पीडबोटीतून उतरताना

Boat

१६. गुहेकडे जाताना

guha

१७.
road

१८. परतीचा प्रवास

return

बारटांगहून गेस्ट हाऊसला पोचायलाही उशीर झाला. शेवटच्या दिवशी अर्धा दिवस हातात होता. प्रथम एक सॉ मिल पाहिली. त्यांचे म्युझियम चांगले आहे. नंतर सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणजे सेल्युलर जेल! प्रत्येक मराठी माणसाचा उर अभिमानाने भरुन येईल अशी पवित्र जागा.

१९. लाईट व साऊंड शो साठी बसायची जागा.

L & S

२०.तुरुंगाच्या सात विंग्सना जोडणारी केंद्रीय हुकमत

jail

बाकीचे सावरकरांच्या कोठडीचे वा कोलुचे फोटो मुद्दमहूनच देत नाही. त्या दु:खद आठवणी कशाला ?

एकंदरीतः- अंदमानला एकदा तरी जरुर जावे. सर्व प्रकारची उपहारगृहे आहेत. रहायची हॉटेल्स फार महाग नाहीत. निसर्ग उत्तम आहे.लोकसंख्या कमी आहे. आम्हाला नेहमीच्या टूर कंपन्यांचे जे माणशी दर आहेत त्याच्या निम्माच खर्च, त्यांच्याहीपेक्षा चांगली व्यवस्था असून झाला. आपली पृथ्वी खरंच फार सुंदर आहे. आपण माणसांनीच तिचे बकाल शहरांत रुपांतर केलंय.

 सावरकरांच्या कोठडीकडे जाताना- शेवटची कोठडी सावरकरांची.

way

२. आंत शिरताना

saavarkar

३. नतमस्तक

jayostute

४. कोलू

kolu

५. कोलू फिरवताना मॉडेल

kolu

६. बेड्या

Bedya

७. सेल्यूलर जेल

jail

 अंदमानची सर्व च्या सर्व बेटे अतिशय सुंदर आहेत. भारतातील प्रत्येक माणसाने थायलंड किंवा दुबई ला जाऊन परदेशाना पैसे देण्यापेक्षा आपल्या देशातील नितांत सुंदर अशा गोष्टी प्रथम पाहिल्या पाहिजेत. पण भारतातच फिरायला गेलो हे डाऊन मार्केट वाटणारे रेसिडेंट नॉन इंडियन्स फार दिसतात.
सेल्युलर जेल पाहताना आणी तेथील सर्व गोष्टी पाहताना स्वातंत्र्यसैनिकांनी भोगलेल्या अनन्वित हाल अपेष्टान्चे दर्शन पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. स्वातंत्र्य वीर सावरकर यांचा फोटो पाहून मी एक मिनिट नतमस्तक होऊन शांत उभा होतो. त्या माणसाच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची झलक पाहून तुम्ही किती क्षुद्र आहात याची जाणीव होते आणी आपण लोकांनी देशाची काय स्थिती करून ठेवली आहे ते पाहून स्वतःची लाज वाटते. प्रत्येक देशभक्त माणसाने एकदा तरी भेट द्यावी असे स्थळ आहे. 

 http://www.misalpav.com/node/20137

 ने मजसी ने परत मातृभूमीला.... सागरा प्राण तळमळला..!

नुकतच काही दिवसांपूर्वी अंदमानला जाण्याचा योग आला. कार्यालयीन काम असल्यामुळे केवळ दोनच दिवस तिथे राहण्याचे ठरले होते (वरून संमती मिळाली होती). कार्यालयातर्फे राहाण्याची व प्रवासाची सोय करण्यात आल्यामुळे तसा निश्चिंत होतो पण तरी एकटेच जावे लागणार म्हणून थोडा नाराजसुध्हा होतो. तिथली भाषा कोणती यावर तीन वेगवेगळे इनपुटस मिळाल्याने आणखीच गोन्धळलो.

तर हैद्राबाद ते चेन्नै १तास आणि तिथुन विमान बदलुन पोर्ट ब्लेअर २तास असा एकूण प्रवास . पोर्ट ब्लेअर करिता चेन्नैवरून केवळ तीनच फ्लाइट्स आहेत; इन्डिअन एअरलाएंस, किंगफिशर आणि जेट. त्यासुद्धा सकाळि १० वाजण्यापूर्वी. पोर्ट ब्लेअरला कोलकात्याहुन सुद्धा जाता येतं. चेन्नैवरून आमच्या विमानात ३० ते ४० जेष्ठ मन्डळि चढलित. सगळ्यांनी पिवळ्या टोप्या घतलेल्या होत्या. त्यांच्या संभाषणारून ते सर्व पुण्याचे असल्याचे कळले.

चहापानानंतर भेजा फ्राय २ बघता बघता थोडि झोप लागली तोच लोकांचा गल़़का आणि कॅमेर्‍याच्या आवाजांनी जाग आली सगळे लोक आपापल्या कॅमेर्‍यातून बाहेरचे फोटो घेत होते. ते दृष्यच तसे विहंगम होते. कुठे निळ्या तर कुठे हिरव्या रंगाचे ते समुद्राचे पाणी त्यात मधुनच एखादे छोटेसे बेट. समुद्राचा तळ स्पष्ट्पणे दिसत होता. माझा कॅमेरा मी बॅगेत ठेउन चेक इन केल्यामूळे मनाचा खूप जळफळाट झाला. त्यावर कडी म्हणजे माझे आसन नेमके विमानाच्या पंखावर मग काय जेव्हा जेव्हा विमान माझ्या बाजूने कलायचे तेव्हा तो नजारा बाघायाला मिळायाचा.

शेवटि एकदाचे विमान वीर सावरकर विमानतळावर उतरले. हे विमानतळ अगदिच लहान आहे. बाहेर हॉटेलची गाडि घ्यायला आलेली होतीच. एक सांगायची गोष्ट म्हणजे पोर्ट ब्लेअरला फिरायाला आटो रिक्षाच वापरा टॅक्सिच्या फंदात पडु नये कारण विमानतळ ते हॉटेल करीता आटो ५० रू घेतो तर टॅक्सी रू.१५०. पोर्ट ब्लेअर अंदमानची राजधानी असूनसुद्धा एका लहान जिल्ह्याच्या ठिकाणाप्रमाणेच आहे. तर हॉटेलला जाऊन फ्रेश झालो नास्ता केला आणि थोडा फिरायाला निघालो पायीच.

जवळच एक संग्रहालय आहे 'समुद्रीका नॅवल मरिन म्युजिअम ' २०रू चे प्रवेश तिकिट आणि कॅमेर्‍याची पास काढून आत गेलो.

प्रवेशद्वारतच एक मोठा सांगाडा ठेवलेला आहे 'निळ्या देवमाश्याचा' त्याच्या आकारावरूनच खरोखरचा देवमासा किती मोठा असावा याचा अंदाज येतो.
.

.

आत संग्रहालयात अंदमान व निकोबार बेटांची रचना, तिथले मूळ निवासी, समुद्री जीवसृष्टी, शिकारिच्या पद्धती, निरनीराळे शंखशिंपले, मत्स्यालय इत्यादींची सचित्र माहिती व प्रत्यक्ष नमुने ठेवलेले आहेत.
.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

तिथे दीड तास घालवल्यावर साहेबांचा फोन आला त्यामुळे परत नेट कॅफे जवळ करावा लागला. सगळे काम संपेस्तोवर ६ वाजले. हॉटेलला जाऊन विचारणा केल्यावर कळले की सेल्यूलर जेलचा लाईट आणि साउंड शो ६.३०ला असतो पण तो मिळण्याची शक्यता धूसरच होती. ऑटो घेऊन तिथे पोचलो तर दार बंद करण्याची तयारि सुरू होती तसाच तिकिट खिडकिला गेलो व तिकिट घेऊन आत घुसलो. पूढचा एक तास हा शब्दातीतच म्हणावा लागेल. सेल्यूलर जेल म्हणजे हेच ते कुप्रसिद्ध काळ्या पाण्याचं कारागार. खरं सांगतो त्या कार्यक्रमामधिल वर्णनं ऐकून अशृ थंबवणे कठिण झाले होते. नरकयातना म्हणतात त्याची कल्पना तिथे आली.











.

कॅमेरा तात्पूरता गंडला होता म्हणुन काही फोटो नीट आले नाहित. कार्यक्रम संपल्यावरच ठरवले काहिही झाले तरी उद्या परत यायचे दिवसाच्यावेळि म्हणजे कारागाराचा परिसर नीट पहाता येइल.अंदमानला रात्र थोडि लवकरच होते व सोबत कुणीच नव्हते म्हणून एकट्यानी जास्त धाडस करू नये म्हणून मुकाट परत आलो हॉटेलला.
दुसर्‍या दिवशी ऑफिसचे काम उरकता उरकता १२ वाजलेत. लागलीच हॉटेलला फोने करून कुठे जाता येईल याची विचारणा केली असता कळले की एकूण ३ बेटांचा टूर असं पॅकेज असतं वायपर, रॉस आणखी एक. त्यासाठी सकळी ९ वाजता निघावं लागत. मला ऊशिर झाल्यामूळे ते शक्य नव्हते. मग फक्त ऱोस बेटावर जायचे ठरले. राजीव गांधि जलक्रिडा संकुलातून फेरी जातात तिथं पोहोचलो तर सारा शुकशूकाट. तिकीट काढलं व फेरी येइपर्यंत जरा आजुबाजूला फेरफटका मारला.

.

.

हे सुनमी स्मारक. सुनामीच्या विध्वंसात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली. सुनामीच्यावेळी या फेरी कित्येक कीमी दूर आणि उंचावर जाऊन पडल्या होत्या.

शेवटि एकदाची फेरी आली. फेरित मी एकटाच होतो कारण चूकिची वेळ. ते दूर तिथे डोंगरावर दिसतयं ते कारागृह.

.

फेरी प्रमाणेच या बेटावर सुद्धा मी एकटाच होतो. परत प्रवेश तिकिट कॅमेरा पास तयार करून आत गेलो तर तिथं हरिणांचे मुक्त कळप. खुशाल हात लावा त्यांना.

.

या बेटावर गोर्‍या साहेबांचे क्वार्टस होते एके काळि आता फक्त भग्न अवशेष.
.

.

तिथे एक छान स्वछं छोटासा बीचपण आहे परंतु तिथे उतरायच्या पयर्‍या तुटलेल्या असल्याने केवळ फोटोंवरूनच आनंद मानावा लागला.

.

.

.

१ तासाची पायपीट वरून प्रचंड आर्द्रता त्यामूळे येणारा घाम आणि कहर म्हणजे बेटावर जलपानाची काहीच सोय नाही. तस एक छोटं कँटिन आहे पण ते बंद होतं.
२ वाजायला आले होते आणि पोटात कावळे ओरडत होते पण सहन करण्याशिवाय उपाय नव्हता.
तिथून परतीची फेरी घेतली. पण परत येऊन सुद्धा खायला काहिच मिळालं नाही. म्हटलं ठिक आहे एक दिवस असापण.

तिथे जवळच पायर्‍या आहेत कारागृहाला जाण्याकरीता. ५० पायर्‍या असाव्यात पण एक एक पायरी चढताना पायाला कित्येक किलोंच वजन बांधल्या प्रमाणे जाणवत होतं.
शेवटि एकदाचा वर पोचलो आणि ते प्रवेशद्वार पाहिलं ' सेल्यूलर जेल - राष्ट्रिय स्मारक'.

.

.
परत तिकिट काढलं आणि तिथल्या संग्रहालयात दाखल झालो. हे संग्रहालय म्हणजे त्या हुतात्म्यांना आदरांजली आहे ज्यांनी आपलं सर्वस्व या देशासाठी वाहिलं. भींतिंवर चहुबाजुला त्या वीरांच्या तसबिरी आहेत. हजारांवर नक्कीच असतील. ज्यांनी जीव गमावला त्यांची तपशिलवार माहिती इथे बघायला मिळते.

हा कारगृहाचा गणवेश.

.

हा यातना देण्यासाठिचा वेगळा गणवेश.

.

या वेगवेगळ्या शिक्षा.
.

हे सगळं पहाताना आजूबाजूचा आवाज नाहीसा होतो निशब्द व्हायला होतं.

नंतर मुख्य करागारकडे वळलो. तिथे दारातच हे शब्दं.

https://lh4.googleusercontent.com/-HpLif3K5sn4/Tu4pbHzp4LI/AAAAAAAAAE4/q...

थोडं आत गेल्यावर आहे ही स्वातन्त्र्य ज्योती.
.

ही या कारागाराची प्रतिकृती तारामाश्याच्या आकाराची.

.

त्याच्या प्रत्येक बाजूवर तीन मजले व प्रत्येक मजल्यावर ५ बाय ६ च्या आकारच्या २० ते ३० बराकी.

मला ओढ लागून होती ती स्वातंत्र्यवीरांची बराक पाहाण्याची.

जसा जसा पायर्‍या चढू लागलो ह्रूदयाचे ठोके वाढू लागले. सोबतीला लाकडि पायर्‍यांचा आवाज. इथे सुद्धा मी एकटाच होतो. त्या बराकिंसमोरून जाताना कमालिची भिती वाटत होती. सावरकरांची बराक एकदम टोकाला आहे. संपूर्ण कारागारात केवळ याच बराकिवर नावाची पाटि आहे.
.

जोडे बाहेर काढले आणि आत गेलो.
.

भिंतीव सावरकरांचे पेटिंग आणि त्यावर हार माळलेला. आदल्या दिवशी जे मराठी मंडळ माझ्या विमानात होते त्यांच्या हाती मी तो हार पाहिला होता.

.

फोटोपुढे दंडवत घातला आणि थोडा वेळ तिथंच बसलो. माझ्या आयुष्यातील काही अनमोल क्षणांपैकी हा एक.

.

.

त्या लोखंडी दारातून हे जे दिसते आहे ते आहे फाशीघर सावरकरांच्या अगदि दारा पुढे खालिल बाजुस व वरिल झरोक्यातून ऐकू येतो तो दूरवर असलेल्या समुद्राच्या गाजांचा आवाज. (अवांतर - स्वातंत्रवीरांना त्यांचे वडिल बंधु गणेश सुद्धा याच कारागारात आहेत हे तब्बल दोन वर्षानी कळलं).

.

त्यानंतर वर सेन्ट्रल टॉवर मधे गेलो. हा वरून दिसणारा नजारा.

.

खाली गेलो फाशीघर सुद्धा पाहिलं. मग मात्र मनं भरून आलं काहिही करण्याची ईछा राहिली नाही. परत येताना पायीच बाजारपेठेचा चक्कर मारला पण विकत घेण्यायोग्य काहीच वाटलं नाही. जेवणं केलं आणि हॉटेलला परतलो.

हिंदी ही इथली सामान्य बोलीभाषा. अंदमान केंद्रशासित प्रदेश असल्याने इथे मद्य अतिशय स्वस्त दरात मिळतं. तश्या मित्रांच्या खूप फर्माईशी होत्या पण उड्डाण नियमांची माहिती नसल्याने ते विकत घेण्याचा बेत रद्द केला. तसा अंदमानचा टूर हा ३ ते ४ दिवसांचा होउ शकतो पण मला थोड्या मर्यादा असल्याने तो आटोपता घ्यावा लागला.

रात्री बाहेरच मस्तं जेवण करून हॉटेलला परतलो. दुसर्‍या दिवशी सकाळि परत निघयचं होतं.

माझी भटकंती : अंदमान..

"यह तीर्थ महातीर्थों का है
मत कहो इसे काला पानी ।
तुम सुनो यहा की धरती के
कण कण से गाथा बलिदानी ॥"
---- गणेश दामोदर सावरकर

मराठी माणसाला अंदमानची ओळख आहे ती सावरकर बंधुंच्या "सजा-ए-कालापानी" मुळे... मीही जेव्हा अंदमानला निघालो, तेव्हा मनात उत्सुकता होती ती "सेल्युलर जेल" ला बघण्याचीच ! एकदा तिथे पोहचल्यावर मात्र सौंदर्य, विविधता आणि इतिहासाची पाखरण असलेल्या ह्या भुमीला पाहुन वाटलं की, ये सफर यादगार रहेगा !!
कोलकात्याहुन उडून पोर्ट ब्लेअरला उतरलो. मनापासुन सांगतो, मी आजपर्यंत पाहीलेल्या सगळ्या भारतीय शहरांमध्ये हे सगळ्यात निटनेटकं शहर आहे ! अक्षरशः सुईपासुन प्रत्येक गोष्ट ज्या ठिकाणी भारताच्या मुख्य भुमीवरुन येते, अश्या ठिकाणी हे लोक इतके आटोपशीर, नीट कसे राहतात ह्याचच मला नवल वाटत होतं.
पोर्ट ब्लेअर वरुन आम्ही जवळच्याच एका किनार्‍यावर गेलो. जातांना वाटेत जागोजागी त्सुनामी ने केलेल्या हानीचे अवशेष दिसत होते. हा एक नमुना

ह्याचा मुळ्यांचा पसारा फोटोत माववणं म्हणजे एक दिव्यच होतं..

त्या बीचवर पोहोचल्यावर मात्र आम्ही वेडावलो. सर्वदुर निळ्या रंगाच्या छटा दाखवणारा अथांग सागर पहुडला होता. त्यातल्या मी त्या आधी पाहिलेला समुद्र म्हणजे मुंबईचा, मग तुम्ही माझी अवस्था ओळखु शकता. तिथुन आम्ही दुसर्‍या एका बेटावर निघालो. ह्याचं नाव "कोरल आयलंड"..

इथे जातांना मी पुन्हा एकदा स्वर्गाला खो देऊन परत आलो. झालं असं, की मी बोटच्या समोरच्या टोकावर उभा होतो. माझा विचार होता की किनारा जवळ आल्यावर उडी मारीन. किनारा अद्याप दुरच होता, तेवढ्यात मला पोज मध्ये पाहुन एका मित्राने मस्तीत दिला की मला ढकलून ! आम्ही बुडबुड करत तळाशी... (मला पोहता येत नाही बरोबर). नाकतोंडात खारट पाणी गेल्यावर हात पाय झाडत वर आलो. वर येवून पाहतो, तर बोट सरळ माझ्या उरावरच येत होती. मी आपला "इकडं (उरावर येणारी) बोट नी तिकडं समुद्र" ह्या अवस्थेत. शेवटी पुन्हा एकदा बुडबुडत वर आलो, अंगावर येण्यार्‍या बोटीलाच रेटा मारुन किनार्‍याकडं हातपाय मारले नी आमचे चरण जमिनीला टेकले... :-)
इथे स्नॉर्केलिंग करुन, पाण्यात डुबक्या मारुन आम्ही परत पोर्ट ब्लेअरला आलो...
संध्याकाळी "सेल्युलर जेल"ला लाईट अँड साउंड शो बघायला गेलो. अगदी "मस्ट सी" आहे हा शो. जेलच्या वेगवेगळ्या भागांवर प्रकाश पाडून, त्यांना अतिशय योग्य अशा संवादांची आणि संगिताची जोड देत हा शो आपल्या डोळ्यांसमोर "सजा-ए-कालापानी" चा काळाकुट्ट इतिहास उभा करतो..
रात्रीच्या वेळी घेतलेले जेलचे दर्शन...

आणि जेलच्या समोर पार्कमधे असलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा पुतळा....

मात्र रात्रीच्या वेळी जेलचे दर्शन घ्यायला परवानगी नसते. म्हणुन मग नंतर यायचे ठरवून परत गेलो..

दुसर्‍या दिवशी आम्हाला दक्षिण अंदमान मधल्या "बारटांग" नावाच्या द्विपावर जायचे होते. पोर्ट ब्लेअर ते बारटांग ह्या प्रवासात तुम्ही जंगलातुन प्रवास करता, जिथे "जारवा" नावाच्या "प्रिमिटीव्ह" आदिवासी समुहाचे वास्तव्य आहे. जारवा लोक आधुनिकते पासुन अतिशय दूर असुन ते बाहेरच्यांशी संपर्क टाळतात. तरीही प्रवासात आम्हाला काही जारवा दिसले. त्यांना फोटो घेतलेला आवडत नाही म्हणुन मी ते टाळलं. रस्त्यात आम्हाला एक जारवा स्त्री तिच्या चिमुकल्यांसह दिसली. आणि खरंच, शप्पथ सांगतो.. कमरेपासुन वर ती विवस्त्र असुनही मला एकदम स्ट्राइक झाला तो तिचा चेहरा ! अतिशय आखीव आणि तेजस्वी असा तो चेहरा कुठल्याही "फेअर अँड लव्हली" ब्युटी कन्सेप्टच्या कानफडीत मारेल असा होता.. :-०

बारटांग ला पोहचल्यावर आम्ही "मड वल्कॅनो" बघायला गेलो.

एका एकरभराच्या जागेत,काहीतरी रासायनिक प्रक्रियेनी जमिनीतून सतत चिखल वाहत असतो. हा अनोखा प्रकार पाहुन मजा आली. इथे ह्या वल्कॅनोज चा वैज्ञानिक अभ्यासही सुरु आहे.

बाराटांगच्या दुसर्‍या भागात चुनखडीच्या गुहा आहेत. भुगोलात शिकलेल्या "स्टॅलेक्टाईट्स, स्टॅलेग्माईट्स" वगैरे इथे बघायला मिळतात. (उजेड बरोबर नसल्याने फोटोज काही चांगले आले नाही मात्र).. इथे जाण्यासाठी "मॅनग्रोव्हस" च्या जंगलातून जावे लागते. पाण्यात मगरी-बिगरी असल्याने प्रवास मस्तपैकी टरकीफाईंग होतो.

इथल्या जंगलात काही दिसलेल्या काही सुंदर छटा...

परत पोर्ट ब्लेअरला आलो. पुढचा टप्पा होता "हॅवलॉक आयलँड".... इथे जाण्यासाठी दोन-अडीच तासांचा समुद्रप्रवास करावा लागतो. समुद्र सूर्याच्या सोबतीने प्रकाशाच्या किमया दाखवत होता..

हॅवलॉकला पोहचलो आणि .... आ हा हा !! सुखावलो. पुन्हा एकदा निळाईची जादू पसरायला लागली. आणि "सी ग्रीन" किंवा "ब्ल्यु ग्रीन" च्या कुठल्याही रंगछटेत न समावणारी ती कलाकारी समोर होती..

त्यातल्या त्यात मला हा किनारा आवडण्याचं मुख्य कारण म्हणजे बर्‍याच दुरपर्यंत हा किनारा उथळ आहे. जवळजवळ अडीच-तिनशे मीटर आतपर्यंत माणसाच्या खांद्याच्या वर पाणी येत नाही. मी नुकताच "स्वर्गसुख" उपभोगता उपभोगता
परत आयटमपणा करण्याच्या मुडमध्ये नव्हतो. ओहोटीत तर किनार्‍याचा विस्तार स्पष्टपणे समोर येत होता...

इथे खुप भटकलो मी..
वेगवेगळ्या आकारांचे, रंगांचे शंख-शिंपले गोळा केले. (कुणासाठी ते नाही सांगणार आमि, जा ! ;-))

इथं कुणीतरी लपलेले आहे. शोधा बरं जरा...

इथुन आम्ही राधानगरी बीचला गेलो. आशियातील टॉपच्या १० बीचेस मधे ह्याचा नंबर लागतो. इथला सुर्यास्त प्रसिद्ध आहे. पण आम्हाला मात्र ढगाळ वातावरणामुळे तो बघायला मिळाला नाही. इथे खेकड्यांनी बनवलेली रांगोळी किनाराभर पसरलेली होती..

ह्याला कॅमेर्‍यात कैद करता करता माझी पार वाट लागली. एका बिळावरुन दुसर्‍या बिळावर त्यांना टिपायला मी फिरत होतो. शेवटी म्हटलं, एका ठिकाणी कॅमेरा धरुन वाट बघू, तर हे महाशय लपंडाव खेळायच्या मुड मधे. भोकाच्या तोडांशी आल्यावर मी क्लिक करणार एवढ्यात पुन्हा तुरुतुरु आत.. पुन्हा बाहेर आले, मी क्लिकतो म्हटलं का पुन्हा भोकात पसार... अक्षरशः भोकाशी आली होती !

दुसर्‍या दिवशी परत पोर्ट ब्लेअर ला आलो. आज सेल्युलर जेलला जायचेच, असं ठरवलं होतं.. दुपारी आम्ही त्या स्वातंत्र स्मारकात पोहोचलो.

सुरुवातीला सेल्युलर जेल ७ रांगांचे बनलेले होते. (मॉडेल खाली) मात्र दुसर्‍या विश्वयुद्धाच्या काळात जर्मन-जपानी सैन्याच्या बॉम्बवर्षावात त्याचे चार भाग नष्ट झाले.

आत कैद्याना देण्यात येणार्‍या अमानुष वर्तणुकीचे दृष्य दाखवणारे काही मॉडेल्स ठेवलेले होते.

हे बघून झाल्या-झाल्या आम्हाला सगळे बाहेर चलायला सांगू लागले. मी म्हटलं, मला सावरकरांची कोठडी पहायचीय. तिथले अधिकारी म्हणत होते की ती तिसर्‍या मजल्यावर एकदम टोकाला आहे, वेळ लागेल. मी त्यांना बोललो, "पाच मिनिटं थांबा." आणि सुस्साट पळत सुटलो. स्वातंत्र्यवीरांच्या कोठडीसमोर पोहचलो आणि.... अंगभर रोमांच दाटून आले. पाय पुढे रेटेना. माझा मित्र मागुन आला नी म्हणाला, "अरे, अंदर क्यों नही जाता?" मी म्हटलं, थांब. थोड्या वेळाने आत गेलो. त्यांच्या प्रतिमेला नमस्कार केला.. थोडा वेळ कोठडीत डोळे मिटून उभा राहीलो. कोठडीचे फोटो काढून बाहेर आलो. मात्र त्या कोठडीत उभं राहून फोटो काढून घ्यायची माझी हिंमत झाली नाही. फक्त अंदमानला यायची ऐपत झाली, म्हणून स्वातंत्र्यवीरांच्या जागेवर, क्षणभराचा का होईना, हक्क सांगायची आपली लायकी नाही, हीच एक भावना मनात होती त्याक्षणी...

ह्या काळ्यापाण्याच्या प्रदेशातली हिरवळ आणि निळाई मनात ठेवून, दुसर्‍या दिवशी चेन्नईला रवाना झालो...

http://www.misalpav.com/node/15257

 

 अंदमान भारतातच असल्याने करन्सी रेशो बघायची गरज नव्हती. दुसरे म्हणजे जालावर शोध घेतला असता चेन्नई आणि कोलकाताहून तिकडे थेट विमानसेवा उपलब्ध होती . मात्र कनेक्टिंग विमाने मुंबईहून जास्त होती. अर्थात पुणे-मुंबई फारसे अंतर नसल्याने बाय रोड जायला आमची काहीच हरकत नव्हती.माझ्या नेहमीच्या एजंटकडून प्लॅन मागवला असता ४ जणांच्या सहलीसाठी त्याने ५ दिवस ४ रात्री साठी सुमारे ६०,०००/- रुपये आकारले. त्यात हॉटेलचे वेगवेगळे पर्याय होते त्याप्रमाणे किंमत थोडीफार कमी जास्त होणार होती. परंतु विमानाचे तिकीट बघता एकूण चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला अशी परिस्थिती होती. पण हातात वेळ कमी होता आणि तेव्हढ्यातच सगळे बसवायचे म्हणजे पदराला खार लागणारच असा "सुज्ञ" विचार करून निमूटपणे बुकिंग करून टाकले. मग हापिसातील कामाचे डोंगर उपसायला सुरुवात केली.(असे म्हटले की कसे छान वाटते) आणि सगळ्या मीटिंगांमध्ये अंदमान सहलीबद्दल एखाद दोन वाक्य टाकून देऊ लागलो. उगाच कोणी आयत्या वेळी म्हणायला नको की "तू असा कसा न सांगता गेलास?" अशा तऱ्हेने ऑस्ट्रेलिया ,कॅनडा, अमेरिका,इंग्लंड आणि कुठल्या कुठल्या लोकांना मी अंदमानला चाललोय हे समजले. आणि त्यांची असूया बघून मला आसुरी आनंद होऊ लागला.(पुढे परत आल्यावर मी नसताना त्यांचे काहीच कसे अडले नाही हे ऐकून दु:ख झाले, ते असोच)

तर यथावकाश तो दिवस उजाडला आणि आम्ही पुण्याहून मुंबईस प्रस्थान करते झालो. दरवेळी मुंबईत गेल्यावर रस्ते, मेट्रो,नवनवीन उड्डाणपूल वगैरे बघून "हीच का ती"? असा प्रश्न मला पडतो. आयुष्याची कित्येक वर्षे जिथे उभा आडवा तिरका (म्हणजे सेंट्रल/वेस्टर्न/हार्बर) फिरलो, त्या मला आता जे व्ही एल आर /एस व्ही एल आर म्हटले की बाउन्सर जातात. चेंबूरहून कुलाब्याला १५ मिनिटात पोचता येते हे पाहून डोळे पाणावतात. घाटकोपरहून अंधेरीला मेट्रोने जाताना साकीनाक्याचे ते संध्याकाळचे ट्राफिक आठवते. आता तर म्हणे शिवडीहून न्हावा शेवाला थेट पूल होणार आहे २२ कि.मी. चा. कालाय तस्मै नमः
==============
पुढील माहिती विकीवरून साभार

तेराव्या शतकात झाओ रुगुआ यांनी लिहिलेल्या झु फॅन झी या पुस्तकात अंदमानचे नाव मध्य चिनी भाषेत 'ąanh də man( आधुनिक मँडरिन चिनी भाषेत युंटुओमन) या नावाने आले आहे. 'कंट्रीज इन द सी' या पुस्तकाच्या ३८ व्या अध्यायात झाओ रुगुआ यांनी स्पष्ट केले आहे की, लांब्री (सुमात्रा) येथून सेलानकडे जाताना प्रतिकूल वाऱ्यामुळे जहाजे अंदमान बेटांच्या दिशेने वाहतात. १५ व्या शतकात वू बेई झीच्या माओ कुन नकाशात झेंग हे च्या प्रवासादरम्यान अंदमानची नोंद "अँडेमन माउंटन" (आधुनिक मंदारिन चिनी भाषेत आंदेमान शॅन) म्हणून केली गेली. आतापर्यंत नोंदवलेले सर्वात जुने पुरातत्त्वीय पुरावे सुमारे २,२०० वर्षांपूर्वीचे आहेत; तथापि, अनुवांशिक, सांस्कृतिक आणि विलगीकरण अभ्यासातील संकेत असे सूचित करतात की या बेटांवर मध्य पॅलेओलिथिक (सुमारे 60,000 वर्षांपूर्वी) च्या सुरुवातीच्या काळात वस्ती असावी. मूळ अंदमानी लोक त्या काळापासून ते १८ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत या बेटांवर मोठ्या प्रमाणात विलगीकरणात राहत असल्याचे दिसून येते. राजेंद्र चोल दुसरा याने अंदमान निकोबार बेटांचा ताबा घेतला. अंदमान आणि निकोबार बेटांचा वापर त्यांनी श्रीविजय साम्राज्याविरुद्ध मोहीम सुरू करण्यासाठी सामरिक नौदल तळ म्हणून केला. इ.स. १०५० च्या तंजावूर शिलालेखात सापडलेल्या या बेटाला चोलांनी मा-नक्कावरम ("महान खुली/नग्न भूमी") असे संबोधले.युरोपियन प्रवासी मार्को पोलो (१२ वे-१३ वे शतक) यांनीही या बेटाचा उल्लेख 'नेक्युवेरान' असा केला आहे आणि नक्कावरम या तमिळ नावाच्या भ्रष्ट स्वरूपामुळे ब्रिटिश वसाहतकाळात निकोबार हे आधुनिक नाव पडले असावे.

https://en.wikipedia.org/wiki/Andaman_islands
==========================================
तर यथावकाश ट्रॅफिकमधून वाहत वाहत एकदाचे विमानतळावर पोचलो आणि भरून पावलो. रात्री विमानतळावर दिवस उजाडलेला असतो. एकतर मुंबई कधीच झोपत नाही. त्यातून हे विमानतळ प्रकरण तर नाहीच नाही. तर चेक इन करून मोकळे झालो आणि इकडे तिकडे करत वेळ घालवू लागलो.
a

d

c

विमानतळावर इतके काही बघण्यासारखे असते (शॉपिंग शिवायही) की बरेचदा वेळ भर्रकन निघून जातो.
d
मुंबई विमानतळावरचे काही सजावटीचे प्रकार
c

a
a

d

c

तसा तो गेलाच आणि आम्ही प्रथम चेन्नई आणि मग पोर्ट ब्लेअर अशी दोन विमाने पकडून सकाळी ७ च्या सुमारास वीर सावरकर अंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो.

चेन्नई विमानतळावरील सजावट--कॉलिंग प्रचेतस फॉर माहीती

d

c

a

d

b

b
b

b

अंदमानला पोचल्यावर सगळ्यात प्रथम जाणवले ते म्हणजे वेळेचा फरक. अंदमान हे जरी भारतात असले तरी नकाशाप्रमाणे ते मिझोराम च्या खाली आणि थायलंडजवळ आहे. त्यामुळे भारतीय प्रमाणवेळच पाळली जात असली तरी वेळेत साधारण तासाभराचा फरक आहे. घड्याळात ७ वाजले असले तरी ८-८.३० सारखे ऊन होते. १० मिनिटात आम्ही हॉटेलवर पोचलो . आज सकाळी मोकळा वेळ होता आणि दुपारी सेल्युलर जेल आणि लाईट आणि साउंड शो बघायला जायचे होते. तसेही रात्रभराचा प्रवास झालेला असल्याने डोळे गपागप मिटत होते. हॉटेलवर जाऊन फ्रेश झालो आणि मस्त ताणून दिली. ३-४ तास मस्त झोप झाल्यावर जरा बरे वाटले. हॉटेलवारचे मेन्यू कार्ड बघितले पण ते काही एव्हढे खास वाटले नाही. झोमॅटो स्वीगी उपलब्ध होते पण गुगलवर शोधले तर जवळपास ५०० मीटरच्या अंतरावरही हॉटेल्स दिसत होती. त्यामुळे चालतच जायचे ठरवले. हॉटेलवरून निघालो आणि अंदाजे चालत पुढे गेलो असता पाहिले एक छान सुपरस्टोर दिसले. लगेच मंडळी आत शिरली आणि सटरफटर खरेदी झाली. थोडेच पुढे एक "ग्रीन पार्क" नावाचे हॉटेल दिसले.

b

नावावरून जरा घोटाळा झाला पण आत शिरल्यावर मालकाच्या डोक्यावरच्या देवादिकांच्या तसबिरी बघून दाक्षिणात्य हॉटेल असल्याची खूण पटली आणि आम्ही निर्धास्त आत गेलो.तिथे एकदम टिपिकल केरळी पद्धतीचे थाळी जेवण मिळत होते. ३-४ भाज्या,रसम,सांबार, ढीगभर भात आणि अपलम पापड. अहाहा !! मजा आली आणि इथे असेतोवर जेवायला इकडेच यायचा निश्चय केला.

पोटभर जेवणानंतर पुन्हा हॉटेलवर जाऊन टी व्ही बघत लोळत होतो. ३ वाजत आले होते. तेव्हढ्यात ड्रायव्हरचा फोन आला आणि त्याने आम्हाला थोड्याच वेळात सेल्युलर जेलच्या दारात सोडले. एका ऐतिहासिक वास्तूच्या दाराशी आम्ही उभे होतो.

b

b

ब्रिटिशांनी जेव्हा भारतावर किंवा इतरत्र राज्य केले तेव्हा समुद्राच्या आजूबाजूचे प्रदेश त्यांनी तुरुंग म्हणून वापरले जसे की अंदमान,मंडाले,रत्नागिरी,ब्रिटिश गयाना,फ्रेंच गयाना बेटे वगैरे. पण त्यावेळी त्यांना स्वप्नातही वाटले नसेल की अजून १०० वर्षांनी ही ठिकाणे पवित्र तीर्थक्षेत्रे म्हणून ओळखली जातील. जसे प्रत्येक मराठी आणि भारतीय माणसासाठी मंडाले हे नाव टिळकांशी आणि गीतारहस्य ग्रंथाशी जोडले गेले आहे तसेच अंदमान हे नाव स्वा. विनायक दामोदर सावरकर आणि कमला या महाकाव्याशी. ब्रायटन हे त्यांच्या "ने मजसी ने" गीताशी जोडले आहे तर मार्सेली हे नाव जहाजाच्या पोर्ट होल मधून मारलेल्या उडीशी, लंडनमधील इंडिया हाऊस हे बॉम्ब बनविण्याशी आणि पुस्तके कोरून पिस्तुले भारतात पाठवण्याशी अशा अनेकानेक जागा. त्या पवित्र वास्तूमध्ये आत शिरलो आणि पहिले उजव्या हाताला एक बोर्ड दिसला.
b

तिथेच आत एक संग्रहालय होते जिकडे सेल्युलर जेलचे मॉडेल ठेवले होते आणि काही माहितीदर्शक फोटो भिंतीवर लावले होते. ते बघून गाइडबरोबर आत जेलच्या फेरिसाठी निघालो.

गाईड एका कुटुंबाचे २०० रुपये आकारतो पण ते जी माहिती देतात त्यामानाने ही किंमत फार नाही. (एकुणातच अंदमान महागडे नाही, किमती वाजवी आहेत)
b

पुढील माहिती विकिपीडियावरून
==================================
अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे हे कारागृह आहे. मुख्य भारतीय भूमीपासून हजारो किलोमीटर अंतरावर आणि समुद्रापासून हजारो किलोमीटर दुर्गम अशा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या सैनिकांना तुरूंगात ठेवण्यासाठी हे ब्रिटीशांनी बांधले होते. काळ्या पाण्याच्या नावाखाली ती बदनाम होती.

ब्रिटिश सरकारने भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांवर झालेल्या अत्याचारांचा मूक साक्षीदार असलेल्या या कारागृहाचा पाया १८९७ मध्ये रचला होता. या कारागृहात ६९४ खोल्या आहेत. ह्या खोल्या बांधण्याचा उद्देश कैद्यांमधील परस्पर संवाद थांबविणे हा होता. ऑक्टोपस प्रमाणेच सात शाखांमध्ये पसरलेल्या या तुरुंगाच्या आता केवळ तीन शाखा शिल्लक आहेत. जेलच्या भिंतींवर शूर शहीदांची नावे लिहिली आहेत. येथे एक संग्रहालय देखील आहे ज्यामधून शस्त्रे ज्यावरून स्वातंत्र्य सैनिकांवर छळ करण्यात आला होता.

अंदमानमधील वसाहतीच्या मुख्य उद्देश म्हणजे समुद्राच्या वादळात अडकलेल्या जहाजांना सुरक्षित जागा पुरविणे. असा विचार केला होता की बंदरांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी तोडगा काढणे हाच एक उपाय आहे. या बेटांवर तोडगा काढण्याचा पहिला प्रयत्न १७८९ मध्ये झाला जेव्हा कॅप्टन आर्चीबाल्ड ब्लेअरने चथम आयलँडमध्ये सेटलमेंट केली. ही जागा नेव्हिगेशनल म्हणून गणली जात असल्याने ही वस्ती उत्तर अंदमानमधील पोर्ट कॉर्नवालिस येथे नंतर हलविण्यात आली. वसाहतीचा तोडगा काढण्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला नव्हता आणि १७९६ मध्ये संपुष्टात आला.

६० वर्षांनंतर, या बेटांवरील बंदरांच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रश्न आला होता, परंतु पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात देशभक्तांना पेरण्यासाठी वास्तविकपणे १८९७ मध्ये बंदिवान वसाहतीची स्थापना केली गेली. अंदमान आणि निकोबार आणि निकोबार बेटांवर १० मार्च १८५८ रोजी २०० स्वातंत्र्यसैनिकांच्या पहिल्या तुकडीच्या आगमनाने कैद केलेल्या वसाहतीची कारावास सुरू झाली. बर्मा आणि भारतातील मृत्यूदंडातून काही कारणास्तव जगलेल्या सर्व दीर्घावधी व आजीवन कारागृहात असलेल्या देशभक्तांना अंदमानच्या बंदिवासात वसाहतीत पाठविण्यात आले.

पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर, वहाबी बंडखोरी, मणिपूर विद्रोह इत्यादींशी संबंधित सैन्य व इतर देशभक्तांना ब्रिटीश सरकारविरूद्ध आवाज उठवण्याच्या गुन्ह्याखाली अंदमानच्या बंदिवासात असलेल्या वसाहतींमध्ये पाठवण्यात आले.
=================================================
७ शाखा आणि मध्ये वॉच टॉवर अशा पद्धतीने बांधण्यात आले असले तरी आता या कारागृहाचे केवळ १,६,७ ह्याच शाखा शिल्लक आहेत. बाकीच्या ठिकाणी हॉस्पिटल्स वगैरे तयार करण्यात आली आहेत.

प्रत्येक शाखेच्या समोर पुढच्या शाखेची पाठ येते जेणेकरून कैदी एकमेकांना पाहू शकणार नाहीत. खुद्द सावरकर बंधूना २ वर्षे माहित नव्हते की ते दोघे अंदमानात आहेत. कैद्यांनी कामे करायचे कारखाने प्रत्येक शाखेच्या समोर आहेत. तेथे ठेवलेली तेल काढण्याची आणि काथ्या वळण्याची यंत्रे बघितली तर आजही अंगावर शहारा येतो.
b

b

b

दररोज तेल आणि काथ्याचा ठरलेला कोटा पूर्ण केला नाही तर ज्या शिक्षा देत असत त्या बघून कैद्यांचा किती भीषण छळ होत असेल याची पुरेपूर कल्पना येते.

b

आणि सर्वात कहर म्हणजे आजही तेथे असणारी फाशी देण्याची जागा. एका बंद झोपडीवजा खोलीत ३ फाशीचे दोर , त्याखाली पांढरी खूण केलेली कैदी उभी करण्याची जागा आणि एका बाजूला असलेली एक लोखंडी लिव्हर. ३ कैदी आणि मृत्यू यांच्या मधला अखेरचा दुवा.

b

b

किती जणांनी तिथे परमेश्वराकडे अखेरची प्रार्थना केली असेल? हा आपला शेवटचा क्षण आहे हे समजून किती जणांना तिथे रडू आले असेल? मृत्यू परवडला पण इथल्या कठोर शिक्षांमधून आता सुटका होणार या भावनेने किती जणांना तिथे आनंद झाला असेल? मला तिथे उभे राहवेना. हळूहळू समोरचे दृश्य डोळ्यातील अश्रुनी पुसट होत गेले.

पुढे निघालो आणि ७ व्या शाखेत तिसऱ्या मजल्यावरची शेवटची खोली बघायला गेलो. काय विशेष आहे या खोलीत? जश्या इतर ६९३ खोल्या तशीच ही पण एक.

b
पण नाही. या खोलीचे नशीब इतके विलक्षण की एक असामान्य कैदी तिथे काही वर्षे वास्तव्यास होता. त्या खोलीत त्याला मुद्दामून ठेवले होते. त्या खोलीत जायला नेहमीच्या दाराशिवाय अजून एक लोखण्डी दार आहे जेणेकरून कैदी पळून जाऊ नये. त्या खोलीतून समोरची फाशीची जागा सतत दिसत राहते आणि तिथल्या किंकाळ्या रोज ऐकू येत राहतात. तिथे राहणाऱ्या कैद्यांचे मन खच्ची व्हावे यासाठी ही सगळी व्यवस्था आहे. आपल्या असामान्य बुद्धीच्या जोरावर हजारो लोकांना दिशा दाखवणाऱ्या भयंकर जहाल आणि धोकादायक माणसासाठी एव्हढी तयारी तर हवीच.
b

b

पण कसले काय? ५० वर्षे मुदतीच्या दोन काळ्यापाण्याच्या शिक्षा एकत्र सुनावणाऱ्या न्यायाधीशाला हा कैदी म्हणाला होता "तुम्हाला नक्की खात्री आहे की अजून पन्नास वर्षे तुमचे राज्य आमच्यावर राहील?" जेलमधील हिंदू मुस्लिम कैद्यांना एकमेकांविरुद्ध भडकविण्याचा ब्रिटिशांचा प्रयत्न त्याने हाणून पाडला. दंडाबेडी वाजवून एकमेकांशी बोलायची भाषा तयार केली आणि कैद्यांना शिकवली. कमला हे महाकाव्य रचले. आणि तेलाच्या घाण्याला जुंपून शिवाय चाबकाचा मार देणाऱ्या बारी साहेबाला ठणकावले की "खबरदार यापुढे हात उचललास तर, आम्ही तर शीर तळहातावर घेऊन बाहेर पडलोय, तू मात्र सांभाळ--की घेतले न हे व्रत अंधतेने । लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने । जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे । बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे।।'

एकीकडे पावले यंत्रवत पुढे पुढे जात होती तर डोक्यात हे सगळे विचार धावत होते. त्या नादातच खाली उतरलो आणि बाहेर पडलो. थोडावेळ समोरच्या बागेत वेळ घालवून पुन्हा लाईट आणि साउंड शो साठी आत शिरलो. या शो बद्दल मी काय लिहिणार?

b

b

प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी बघावाच असा हा जबरदस्त शो आहे. शाखा १ आणि ७ च्या भिंतीचा पडदा करून प्रोजेक्टरने जी कथा तासभर दाखवली जाते ती पाहून एखाद्याचे डोळे पाणावले नाहीत तरच नवल.

b

b

शो च्या शेवटी राष्ट्रगीत चालू झाले आणि शेवटी उत्स्फूर्त पणे भारतमाता की जय असा जयघोष झाला. यंत्रवत बाहेर पडलो आणि गाडीत बसलो.

वाटेत बोलताना सगळेच या अनुभवाने भारावून गेले होते. पुढे एका चढावर बरेच ट्राफिक लागले. वाहने अडकली होती. काही कारण तर दिसत नव्हते. गाडी हळूहळू पुढे सरकली आणि ड्रायव्हरने सांगितले डावीकडे पहा. तिथे एक वाईन शॉप होते आणि ते बंद व्हायला शेवटची ५ मिनिटे बाकी असल्याने तिथे आडव्या तिडव्या गाड्या लावून दारू घेण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. क्षणात धाडकन वर्तमानात आलो आणि हसत हसत हॉटेलवर पोचलो.(क्रमश:)

https://traveltriangle.com/

मी आत्तापर्यंत श्रीलंका, मॉरिशस आणि अंदमान अशा ३ ट्रिप ह्या साईटवरुन बूक केल्या आहेत. सहसा विमान प्रवासाची तिकिटे स्व्तः काढणे चांगले कारण आयत्या वेळी काही बदल झाल्यास आपल्याला थेट समजते. एकदा आपला प्लान दिला की आपल्याला २-३ एजंटचे कोट येतात. त्यापैकी जे आवडेल्/परवडेल ते घ्यायचे. ट्रिप कस्टमाईझ करायची असेल (१-२ दिवस कमी जास्त किवा ठिकाणे कमी जास्त करणे) तर तसेही करुन मिळते. विमानतळावर शक्यतो स्थानिक एजंटची गाडी पिक अप करायला येते. तेथुन पुढची जबाबदारी त्यांची. काही समस्या आल्यास लोकल एजंट आणि ट्रॅव्हल ट्रँगल दोन्ही मदत करतात(एस्कलेशन करता येते, पण एकुण अनुभव चांगला आहे). बोलुन काम झाले नाहीच तर गूगल रिव्ह्यु खराब करायची धमकी द्यावी, म्हणजे सुतासारखे सरळ येतात.


विमानतळाचे नाव अजूनही सावरकरांच्या नावाने आहे हे नशीबच!
त्या विमानतळाला दुसरे कोणतेही नाव इतके जास्त शोभणार नाही.
.
.
साठ हजार रुपये प्रत्येकी की चौघांचे? आणि पुणे ते पोर्ट ब्लेअर हा प्रवास मुंबई ते पोर्ट ब्लेअर पेक्षा १०००-१५०० कमी दिसतोय. दिवसांनुसार कमी जास्त होत असावा, तरी पुणे ते मुंबई प्रवास करण्यापेक्षा पहिला पर्याय जास्त सोयीस्कर असावा.
.
.
चेन्नई विमानतळावरील निर्गमन कक्षातील त्या शिल्पांचे फोटो मीसुद्धा प्रचेतस यांना विचारण्यासाठी काढले होते, पण राहून गेले.
.
.
सेल्युलर जेल खरोखर तीर्थक्षेत्रच आहे! लाईट अँड साऊंड शो सुंदर दिसतोय. सावरकरांचे कार्य आणि विचार इतके प्रेरणादायी आहे की भारावून जाणे साहजिक आहेच. क्रमशः असल्याने इतर निसर्ग आणि समुद्र किनारे पुढील भागात येतीलच.
.
.
अवांतर : चेन्नई विमानतळावरील एक शिल्पसंच -
1

२. डावी़कडील शिल्प - पोपट वाहन असलेला केवळ कामदेव माहिती आहे. पण त्याच्या हातात धनुष्यबाण असतो. इथे हातात वीणा असल्याची स्थिती दिसते.
2

३. उजवीकडील शिल्प - हंसावरील देवी - सरस्वती? हाता वीणा असावी असे हातांच्या स्थितीवरून वाटते. काही ठिकाणी रतीचे वाहन हंस असल्याचंही वाचलंय. शिवाय डावीकडे कामदेव आहे.
3

४. मधील चित्र - दाक्षिणात्य शैली वाटते. डावीकडे नंदी. डोक्यावर जटा+चंद्रकोर = शिव आहे का? पण शिवाच्या पायाखाली कोण आहे?
4


१. शिवाचं रूप: उजवा पाय अगदी मस्तकपर्यंत उचलला आहे. त्याचा काही अर्थ आहे का?

२. खालील रांग: मध्ये कार्तिकेय, त्याच्या उजवीकडे विष्णू, मग ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाच्या उजवीकडे कोण आहे?


शिवाचं बहुतेक तांडवनृत्य सुरू असावं. मस्तकापर्यंत उचललेला पाय म्हणजे ललाटतिलक मुद्रा.
ब्रह्मदेवाच्या उजवीकडे हिरव्या रंगाचा पोपटाची चोच असलेला शुकमुनी असावा. हा व्यासांचा अयोनीज पुत्र. शिव एकदा पार्वतीला कथा सांगत असताना एक पोपटही तो कथा ऐकू लागला आणि ऐकता ऐकता मध्येमध्ये हुंकार भरू लागला, त्याने पार्वतीची एकाग्रता भंग झाल्याने शिवाला राग आला व तो शुकाला मारायला धावला, भेदरलेल्या शुकाने व्यासांच्या आश्रमात प्रवेश करून त्यांच्या पत्नीच्या शरीरात प्रवेश केला आणि दडून राहिला, व्यासांनी अभय दिल्याने तो बाहेर आला व व्यासपुत्र बनला व पुढे शिवभक्त झाला अशी थोडक्यात कथा.

 "४ जणांच्या सहलीसाठी त्याने ५ दिवस ४ रात्री साठी सुमारे ६०,०००/- रुपये आकारले"

यात लहान मुले किती? दोन रूम दिल्या का एकच? खर्च चौघांचा मिळून असेल तर जेवण, भटकंतीसाठी गाडी, प्रत्येक ठिकाणाची प्रवेश फी , वॉटर स्पोर्ट्स इ. खर्च वेगळा असेल ना?

रु.६०,०००/- चौघांसाठी घेतले.(२ लहान,२ मोठे) त्यात राहणे( प्रत्येक ठिकाणी २ सेपरेट ए.सी. रूम), जीप ने फिरणे, पोर्ट ब्लेअर ते हॅव्लॉक आणि परतीचे बोटीचे तिकिट, जेल व लाईट आणि साउंड शो चे तिकिट हे समाविष्ट होते. वॉटर स्पोर्ट वगैरे गोष्टी आम्ही स्वतःच्या खर्चाने केल्या. विमानाची तिकिटे ही स्वतः काढली. पुर्ण खर्च २.२५ लाखाच्या आसपास झाला. (पुणे-मुंबई+खरेदी वगैरे मिळुन)

विमान प्रवासाचा खर्च धरला तर थायलंड, व्हिएतनाम, मालदीव, दुबई या सर्व टूर अंदमान पेक्षा कमी बजेट मधे बसतात. तीस वर्षांपूर्वी शाळेत असताना तिथे भेट दिली होती. आताचे फोटो बघून बरेच renovation झाले आहे असे वाटते. मी गेलो तेव्हा तात्यारावांची कोठडी खोली धुळीने भरलेली होती. भिंतीचा रंग उडालेला होता आणि फक्त एक फोटो लावला होता. मला माझ्या शिक्षकांनी जाण्यापूर्वीच तिथे सावरकरांना साष्टांग नमस्कार घालायला सांगितले होते. मी तिथे कोठडीत तसा साष्टांग दंडवत घातला. तर सोबतचे लोक आणि मुख्यत: शहरी पोरे पोरी खूप हसले, चेष्टा केली. माझे कपडे धुळीने माखले. मी दुर्लक्ष केले. पण त्यांच्या प्रतिक्रियेबद्दल खूप वाईट वाटलं होतं.

बाकी फाशी गेटचे दोरखंड आणि लिव्हर ओढल्यावर पायाखाली उलटणारा तक्ता हे पाहून जुनी आठवण जागी झाली. तेव्हा एका विचित्र हौसेने तो फास गळ्यात घालून घेतला होता. आणि एकदम भान येऊन धडकी भरली. दोर उतरवला.

तो तुरुंग आहे हे क्षणभर बाजूला ठेवले (कठीण आहे ते) तर असे म्हणता येईल की ही वास्तू अतिशय निसर्गरम्य सुंदर जागी आहे. अथांग समुद्र दिसतो. हे तात्यारावांनी देखील नोंदवले आहे. अनेक तुरुंग अशा निसर्गरम्य जागी आहेत. गोव्यातही एक आहे असाच सी फेसिंग.

ऑस्ट्रियामध्ये एक नाझी छळछावणी बघायला गेलो होतो. तिचेही लोकेशन नितांत सुंदर होते. अशा ठिकाणी अनेक जण हालात जगले आणि क्रूर पद्धतीने मारले गेले हा विरोधाभास फारच विचित्र वाटतो.

आज सहलीचा दुसरा दिवस. रात्रभर मस्त झोप झाल्यामुळे ताजेतवाने वाटत होते.
b

आज पोर्ट ब्लेअरहून हॅवलॉक बेटावर बोटीने जायचे होते. त्यामुळे पटापट नाश्ता करायला खाली उतरलो. पण अजून सातच वाजले असल्याने नाश्ता तयार नव्हता. त्यामुळे किचनमधून आम्हाला सँडविच आणि फ्रुटीची पाकिटे पार्सल म्हणून दिली गेली. ती सॅकमध्ये टाकून सामान घेऊन खाली उतरलो. तोवर गाडी आम्हाला घ्यायला आलीच होती.

b

१०-१५ मिनिटात जेट्टीवर पोचलो. आमच्यासारखे बरेच पर्यटक पोर्ट ब्लेअर ते हॅवलॉक प्रवास करणार होते त्यामुळे तिथे थोडी रांग लागली होती. विमानतळावर असते तशीच सुरक्षा तपासणी सुद्धा होत होती. सी आय एस एफ चे जवान बारकाईने लक्ष ठेवून होते. कदाचित इथे एकूणच सैन्याचा प्रभाव जास्त असावा. त्यामुळे की काय माहित नाही, पण एकूणच लोक शांत प्रवृत्तीचे वाटले. पूर्ण सहलीत कुठेही फार कटकटी, भांडणे वगैरे ऐकू आली नाहीत. सुरक्षा तपासणी करणाऱ्या एका जवानाच्या शर्टावर देशमुख असे नाव दिसले त्यामुळे मी पुढे होऊन जरा आस्थेनी मराठीत चौकशी केली. तर ते औरंगाबादचे होते. मराठी ऐकून त्यांच्याही चेहऱ्यावर जरा स्मित झळकले. परमुलखात अचानक माहेरची माणसे भेटल्यावर कसे होईल तसेच काहीसे. पुढे होऊन बाकड्यावर विसावलो. बोट यायला वेळ होता. २-३ टी व्ही लावले होते त्यावर टिपिकल बॉलीवूडी गाणी लावली होती. मिका सिंग, बादशाह आणि कोण कोण रॅपर्स अंगविक्षेप करताना दिसत होते. गाडीत सुद्धा तसलीच बॉलीवूडी श्रीमंती प्रेम विव्हळ गीते किंवा तेनुं काला चष्मा सारखी ढिनच्यॅक गाणीच वाजताना दिसत होती. एकुणातच इथले लोक बॉलिवूडचे दिवाने असावेत. आसपास पोरांचे रडणे,खाणे,आयांचे धपाटे घालणे असा मस्त गदारोळ चालू होता. त्यातल्या त्यात छान म्हणजे हनिमूनला आलेले बरेच लव्हबर्ड्स दिसत असल्याने नेत्रसुख होते. तर अशा तर्हेने वाट बघता बघता अर्धा तास गेला आणि एकदाची बोट बंदराला लागली. आधीचे उतारू उतरले आणि आम्ही आत गेलो. आमच्या बोटीच्या बाजूलाच भारतीय नौसेनेची तुलनेने प्रचंड जहाजे उभी होती. एक तर जवळजवळ ४ मजली होते.

b

b

b

यथावकाश बोट निघाली आणि पोर्ट ब्लेअरहून बाहेर पडून खुल्या समुद्रात जाऊ लागली.
b

b

खानपान सेवा सुरु झाली आणि त्याबरोबरच फोटो काढायची स्पर्धाही.
b

b

b

b

बोटीला सगळीकडे खिडक्या असल्याने लोक कुठे कुठे बसून फोटोसाठी पोझ देत होते. बाहेरही सुंदर देखावे दिसत होते. गुगल मॅप बोटीचे ठिकाण दाखवत होता. इथे रेंज मिळणार नाही अशा बेतानेच अंदमानला आलो होतो, पण मित्तल गुरुजेनच्या कृपेने बहुतेक ठिकाणी ५ जी सेवा मिळत होती. तरीही एक सूचना- जवळ बऱ्यापैकी रोख रक्कम ठेवावी कारण बऱ्याच ठिकाणी रेंज असली तरी यु पी आय चालले नाही.

जवळपास दीड तासाच्या प्रवासानंतर बोट हॅवलॉक बंदरात पोचली आणि सामानसुमान घेऊन बाहेर पडायची लगबग सुरु झाली. बाहेर पडायचा अरुंद मार्ग ,प्रवाशांची दाटीआणि त्यातच त्यांना घेण्यासाठी आलेले ड्रायव्हर लोक्स याची नुसती वर्दळ उडाली. सुदैवाने आमच्या ड्रायव्हरला मी आधीच फोन करून ठेवला असल्याने जास्त अडचण आली नाही आणि आम्ही गाडीपाशी पोचलो. ह्या ड्रायव्हरची हेअर स्टाईल बघून आम्ही त्याला उडता पंजाब नाव देऊन टाकले. दहाच मिनिटातच गाडीने आम्हाला हॉटेलवर सोडले आणि दुपारी ३ वाजता तयार राहण्याची सूचना देऊन उडता पंजाब निघून गेला. हे हॉटेल पोर्ट ब्लेअरच्या हॉटेलपेक्षा मस्त होते.

b

b

प्रशस्त आणि स्वच्छ खोल्या, आजूबाजूला नारळ सुपारीचे झाडे यामुळे अचानक कोकणात आल्यासारखे वाटू लागले.

b

बाहेर ऊन सणसणीत तापले होते, त्यामुळे पहिले आत जाऊन ए सी लावला आणि गारेगार झालो. मग सावकाशीने अंघोळी वगैरे उरकल्या आणि खोलीवरच जेवण मागवले. टी व्ही ला मस्त अमेझॉन फायरस्टिक लावली होती, त्याच्यामुळे नेटफ्लिक्स,अमेझॉन प्राईम,झी स्टुडिओ सगळेकाही उपलब्ध होते. त्यामुळे दुपार आनंदात गेली. गारेगार खोलीत तंगड्या ताणून पडलेले असतानाच पुन्हा उडता पंजाब चा फोन आला आणि नाईलाजाने खाली उतरलो.
b

संध्याकाळचा कार्यक्रम म्हणजे राधानगरी बीचवर पोहणे हा होता. १०-१५ मिनिटात गाडीने आम्हाला तिथे नेऊन सोडले. जगातला ७ क्रमांकाचा स्वच्छ बीच अशी ह्याची ख्याती आहे आणि खरोखरच "टरकॉईज ब्लु " (मराठीत??) रंगाचे नितळ पाणी बघून आम्हाला वेड लागायची पाळी आली.

b

b

b

कपडे बदलायला आणि अंघोळीला खोल्या आणि कपडे ठेवायला लॉकर अशी छान सोय असल्याने धन्य झालो. आपल्याकडे कोकणात इतके सुंदर समुद्रकिनारे आहेत, तिथे माफक दरात नाही का अशा सोयी करता येणार? असा विचार मनात आलाच.

b

सुरुवातीला थोडेफार फोटो काढून झाल्यावर सरळ पाण्यात शिरलो आणि २ तास मस्त दंगा केला. आजूबाजूला काही मराठी/गुजराती लोक पोहत होते त्यामुळे तुम्ही कुठले आम्ही कुठले वगैरे झाले. मनसोक्त पोहून झाल्यावर भूक लागल्याने नाईलाजाने बाहेर यावे लागले आणि तोवर निघायची वेळही झाल्याचा साक्षात्कार झाला. त्यामुळे कपडे बदलून आणि थोडेफार खाऊन तेथून निघालो आणि हॉटेलवर येऊन पोचलो. उतरताना ड्रायव्हरलाच विचारले की जवळपास कुठली चांगली रेस्टोरंटस आहेत का? त्याने एक दोन नावे सांगितली.

b

रात्री जेवायला तिथेच गेलो आणि चांदण्यात , रातकिड्यांची आवाज ऐकत शतपावली करत हॉटेलवर परत आलो. दुपारी ब्रम्हास्त्र बघून डोके पिकले असल्याने यावेळी रिस्क न घेता दिल चाहता है लावला आणि बघता बघता झोपून गेलो. (क्रमश:)


दुर्दैवाने अंदमानचे तिकीट मुंबई पासून साधारण माणशी २५ हजार एकेरी इतके येते. म्हणजेच जोडप्याचा नुसता १ लाख रुपये खर्च विमानाच्या तिकिटावर येतो.

यामुळे यावर्षी परत एकदा अंदमानला जायचा बेत मी रद्द केला. या मार्गावर सरकारने तिकिटाच्या किमतीवर बंधन टाकले पाहिजे असे वाटते.

अर्थात असेही वाटते कि एवढे तिकीट असल्यामुळेच अंदमानमध्ये इतर ठिकाणी आहे तशी पर्यटकांची तोबा गर्दी नाही. आणि ती ठिकाणे अजूनही अत्यंत सुंदर अशा निसर्गसौंदर्याने नटलेली आहेत.

मौरिशसच्या निम्म्या आणि मालदीव च्या एक चतुर्थांश खर्चात तुम्हाला तेवढीच मजा करता येते हे हि खरे.


अंदमानला जाणारे प्रवासी भरपूर आहेत. केवळ पर्यटक नव्हे.

त्यात बरेचसे सरकारी नोकर आहेत आणि त्यांना चेन्नई किंवा कोलकाता येथून जाण्यायेण्यासाठी प्रवासी भत्ता मिळतो याचा फायदा विमान कंपन्या घेतात असे वाटते. कारण अंदमानला जाणारी विमाने कायमच भरलेली असतात.

यामुळेच बर्याच लष्करी अधिकाऱ्यांना आयत्या वेळेस तेथे जायचा प्रसंग आला तर ( ताम्बरम) चेन्नई येथून हवाई दलाच्या वाहतूक करणाऱ्या विमानातून बाकड्यावर बसून प्रवास करावा लागतो. असा प्रवास मी एकदा केलेला आहे. (तो मुळीच आरामदायक नाही)

प्रवासी भत्ता मिळतो याचा फायदा विमान कंपन्या घेतात असे वाटते.
हा एक मुद्दा नकीच असेल , असे इतरत्र हि होताना पहिले आहे

क्वांटास या ऑस्ट्रेलियातील विमानसेवककडे देशात जवळ जवळ एकाधिकारशाही आहे ( अजून एक दोन विमान सेवा आहेत पण त्या कधी जगतात कधी नामशेष होतात) येथील अंतरे आणि कमी लोकसंख्या यामुळे काही मार्गांवर जे भाडे आकारले जाते ते प्रचंड असते, त्या पैशात त्यापेक्षा लांबवर म्हणजे आशियात जाता येते

अर्थात विमान प्रवासाचे भाडे हे एक शास्त्र असावे कारण त्यात इतके अनाकलनीय प्रकार बघायला मिळतात
- काही सेवा ह्या काही श्रीमंत सरकारने चालवलेलया असतात आणि भरपूर पैशाचे पाठबळ असल्यामुळे टाय स्वस्तात शिरकाव करून घेतात जेणेकरून केवळ मुक्त बाजारपेठेतील
- काही जागी दुर्गम ठिकाणी पूर्ण विमान हे "फ्लाय इन फ्लाय आऊट" वाले खाण कामगारांनी भरलेले असते त्यांना "किती भाडे" हा प्रश्न नसतो.. फटका बसतो तो एका दुसऱ्या सर्वसामान्य प्रवाश्याला )
- असे बरेचदा ऐकले आहे कि मुंबई दिल्ली एवढया पैशात मुबई दुबई/ बँकॉक जाता येते ? खरे का ?
- एक अनुभव असा कि ऑस्ट्रेल्यात ते मुबई ( युएई मार्गे ) जे भाडे होते त्यात फक्त २०% जास्त घालून थेट लंडन पर्यंत जाता येत होते .. आता बघा हे गणित कसे जमते? २०% अधिक देऊन जवळ जवळ ७५% जास्त अंतरावर कसे काय जात येते ?


हलकटपणा ?!
नाही म्हणणार अगदी धंद्याचे गणित आहे ते शेवटी ,
जाहिरातीतील "चापलुसी " मात्र विमान कंपन्या नक्कीच करतात , विशेष करून उभे / आडवे लांब पसरलेलय देशात
जाहिरात असते "चला बाली ला केवळ ३०० $ आपण बघायला जातो तर
ते भाडे एकतर
- फार कमी दिवशी उपलब्ध असते
- प्रत्येक उड्डाणात फार कमी जागा या दारात असतात
- निघायचे ठिकाण ज्वलंत जवळचे असते - पर्थ बाली केवळ ३ तास ४५ मिनिटे पण हि जाहिरात करतात सिडनी ला ! जिथून बाली आहे ६ तास १५ मिनिटे एवढे !
- म्हणजे चाल कोलंबो ला फक्त क्सक्सक्स रुपयात असे म्हणायचे आणि ते असणार फक्त कोची ते कोलबाबा आणि जाहिरात करणार दिल्ली भागात किंवा अमृतसर ला!

याउलट कधी गंमतशीर फायदा हि होतो
"जनता क्लास" मध्ये पूर्वी रिकाम्या शीटा असतील तर जो तो झोपायःची सोय होतीय का बघायला धडपडत असतो .. एकदा प्रवासाचं आधी विमान कंपनी चे ई-मेल आले कि "३ च्या रांगेत तुम्ही एकटेच आहेत तर तुम्हाला उरलेली दोन "शिट " अगदी स्वस्त दारात विकत घायचंय आहेत का ?"
मी घेतल्या निदान ७ तासाच्या रात्रीच्या प्रवासात जरा तरी आडव पडायला मिळटाय तर हि किंमत फार नवहती
...! अर्थात जवळच्या प्रवासाचं डोळ्यातील असूया दिसली .. शेवटी एकाला ३ बोर्डिंग स दाखवले .. तो हि बहुतेक मनात म्हणाला असेल कि "काय चक्रंम आहे हा माणूस" ३ इकॉनॉमी तिकिटे काढण्या पेक्षा हा माणूस सरळ बिझिनेस क्लास चे तिकीट का नाही काढत आहे ! अर्हताःत त्याला मी अंदरकी बात सांगत बसलो नाही ..


काल संध्याकाळीच हॉटेलवर सोडताना उडता पंजाब ने सकाळी ७.३० ला तयार राहायचे फर्मान सोडले होते. कारण ८ वाजता एलिफंटा बीचवर जाण्यासाठी बोट सुटणार होती.तिकिटे तिथेच काढायची असल्याने वेळेत जाणे सोयीचे होते. त्याप्रमाणे आम्ही ७ वाजताच तयार होऊन बसलो. थोडाफार नाश्ताही करून घेतला. इकडे स्टेपल्ड डाएट असल्याप्रमाणे सर्वत्र पुरी आणि वाटाणा उसळ हाच नाश्ता मिळत होता. कदाचित सगळा माल बाहेरून मागवावा लागत असेल किंवा दाक्षिणात्य लोक तसेही नाश्त्याला पुरी खातात म्हणून असेल. पण तेच तेच बघून कंटाळा येत होता. तरीही दोन घास खाल्ले. गाडीची वाट बघत बसलो पण ती काही येईना. मग फोनाफोनी सुरु झाली. पहिले ड्रायव्हर आणि मग ट्रॅव्हल एजंट यांचे डोके खाल्ले आणि शेवटी एकदाची गाडी आली. दहा मिनिटात फेरीबोटच्या धक्क्याशी पोचलो.
b

तिथे बरेच तिकीट काउंटर होते आणि वॉटर स्पोर्ट साठी तिकिटे विकत होते. प्रत्येक एजंटचा काउंटर ठरलेला दिसत होता त्याप्रमाणे आमच्या एजंटने एका टेबलाकडे मला नेले. तिथल्या मुलीने सगळी माहिती दिली. योजना बरी वाटली. प्रत्येक खेळाचे ६०० रुपये अशी तुम्हाला पाहिजे तेव्हढी कुपन्स घ्यायची. मग बोट तुम्हाला एलिफंटा बीचवर नेणार. तिथे तुम्हाला पाहिजे ते खेळ खेळायचे.जितकी तिकिटे उरतील ती इथे आल्यावर परत करायची आणि ते पैसे परत घ्यायचे.
b

ही योजना फक्त पॅरासेलिंग या प्रकाराला लागू नव्हती कारण ते सगळ्यात महाग होते (प्रत्येकी ३५०० रुपये). शिवाय स्नॉर्केलिंग साठी अधिकचे १००० रुपये दिल्यास १५-२० मिनिटे जास्त फिरून प्रवाळ बघायला मिळतील असे सांगितले. अर्थातच आम्ही त्याला तयार होतो. तर अशा तर्हेने व्यवस्थित लुटून झाल्यावर आम्हाला एका बोटवाल्याच्या ताब्यात दिले गेले. १० जणांची फायबर बोट. सुझुकी किंवा यामाहाचे इंजिन पण एकाच गोष्ट चांगली म्हणजे सर्वांना लाईफ जॅकेट दिली होती. बोटवाल्यानेही हयगय न करता ते घातले होते. एकुणातच लोकांच्या सुरक्षेची काळजी (कायद्याच्या धाकाने असेल किंवा कसेही) घेतली जाते होती.
b

b

बोट सुरु झाली आणि किनाऱ्यापासून १००-१५० मीटर आतल्या बाजूने एलिफंटा बीचकडे प्रवास सुरु झाला. ऊन मी म्हणत होते, पण दूरवर कुठेतरी काळ्या ढगांचा पुंजकाही दिसत होता.

b

मधेच वाऱ्याची झुळूक येऊन जात होती. १०-१५ मिनिटात एलिफंटा बीचला पोचलो. इथेही कपडे बदलायला साध्याच पण खोल्या होत्या. माफक दरात लॉकर होते. स्टॉलवर खाण्यासाठी भेळपुरी, सामोसा, सरबत, चहा /कॉफी, फळे असे प्रकार होते. मंडळी उत्साहात तयार झाली पण तोवर लांबवर दिसलेला पाऊस आमच्या भेटीला तिथे येऊन पोचला आणि वातावरण कुंद झाले. टपटप पडणारे थेम्ब म्हणता म्हणता धारा बनले आणि सुरक्षेच्या कारणास्तव सगळे खेळ थांबले. मंडळी जरा हिरमुसली. वेळ घालवायला म्हणून थोडे खान पान झाले. सुदैवाने पाऊस ओसरला आणि खेळ पुन्हा सुरु झाले.
b

प्रथम स्नॉर्केलिंगचा आनंद घेतला. साधे पोहताना पाणी स्वच्छ होते त्यामुळे समुद्र तळ दिसत होताच, पण मास्क लावून जरा ५० मीटर आत गेल्यावर तळाचा नजारा जो खाडकन बदलला की माझा आपल्या नजरेवर विश्वासच बसेना. अचानक समुद्रतळ खोल झाला आणि मी जणू काही एखाद्या पर्वत शिखरावरून खाली बघतोय असे वाटू लागले. खालच्या खोल काळोखी दऱ्यांचा अंदाजच येईना. सर्वत्र फक्त प्रवाळ दिसत होते. आता आमच्या गाईडने आम्हाला रव्याच्या पुड्या हाती दिल्या आणि थोडा थोडा रवा बाहेर सोडायला सांगितले. त्याबरोबर रंगीबेरंगी माशांच्या झुंडीच्या झुंडी आमच्या बरोबर खेळू लागल्या आणि रवा खायला धडपडू लागल्या. मासे अक्षरश: हाताला लुचत होते आणि पुडी ओढायचा प्रयत्न करत होते. त्यांचे इतके नानाविध रंग होते की मी लहान मुलासारखा हरखून गेलो. काय काय बघू असे झाले. स्कुबा पेक्षा हा प्रकार मला आवडला. तांत्रिक बाजूनेही सोपा वाटला.

b

१० मिनिटात स्नॉर्केलिंग करून झाले आणि आम्ही इतर खेळ खेळायला मोकळे झालो.

b

सगळीकडे असतात तसेच खेळ इथेही होते त्यामुळे विशेष काही लिहिण्यासारखे नाही.

b

थोडा वेळ खेळून झाले आणि पुन्हा ढग दाटून आले. यावेळी मात्र पावसाचा नूर काही वेगळाच होता. सपासप धारा सुरु झाल्या आणि सगळे बोटवाले आणि वॉटर स्पोर्ट्स वाले आपापली दुकाने आवरू लागले. खेळाचे सामान किनाऱ्यावर आणून ठेवू लागले. बोटी एकमेकींना बांधून ठेवू लागले. खेळ थांबल्याने लाईफ जॅकेट अशी झाडाला टांगली गेली

b

थोडा वेळ लोकांनी खाण्यापिण्याच्या दुकानांवर गर्दी केली, परंतु लवकरच सगळ्यांना कळून चुकले की मेरीटाईम बोर्ड किंवा जी कोणती नियामक संस्था आहे तिच्या इशाऱ्याने सगळे खेळ थांबवले गेले होते. हळूहळू पर्यटक पांगू लागले. स्टाल वालेही दुकाने आवरू लागले. सकाळपासून इथवर उकाड्यात आलो असल्याने सुरुवातीला पाऊस छान वाटत होता. मात्र आता थंडीने अंग काकडून सगळे गार पडले. त्यातच आमचा बोटवाला कुठे दिसेना. हळूहळू इतर पर्यटक एक एक करून बोटीत बसून निघू लागले. गर्दी कमी होऊ लागली. तितक्यात आमचा बोटवाला दिसला. तो कुठल्या घाईत होता काय नाहीत पान आम्हा सगळ्यांना एकाच ठिकाणी बसायला सांगून तो कुठेतरी गायब झाला. अजून १०-१५ मिनिटे गेली. सुरुवातीला या सगळ्या गोष्टी चेष्टेवारी नेणारी मंडळी आता मात्र कातावली. त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी होती कि स्टाल वाल्यांच्या म्हणण्याप्रमाणे मागच्या जंगलझाडीतून मुख्य बेटावर चालत जाण्यासाठी रस्ता होता. अर्थातच ते लोक स्थानिक असल्याने त्यांच्या रोजच्या वापरातील असला तरी आम्हाला काही तो झेपला नसता. पान अगदीच बोट न आल्यास निदान एक पर्याय होता. मात्र आमचा अंत पाहून शेवटी बोटवाला आला. काय झाले होते माहित नाही, मात्र त्याने हिकमतीने लांबून कुठून तरी आमची बोट आणली होती. पटापट बोटीत बसलो आणि परतीचा प्रवास सुरु झाला. येताना छान वाटणाऱ्या लाटा आणि उडणारे तुषार आता मात्र तितके छान वाटत नव्हते. समुद्र खवळलेला होता. जरी आम्ही किनाऱ्यापासून १०-१५० मीटर आतमध्ये होतो तरी तिथे पाणी चांगलेच खोल होते. दहा माणसांची छोटी बोट थपडा खात खात पुढे जात होती. वरतून पडणाऱ्या थंडगार पाऊसधारा आणि समोरून चापचाप उबदार समुद्री पाण्याचा मारा अशा दुहेरी कात्रीत आम्ही सापडलो होतो. तोच लांबवर एक मोठे जहाज दिसले . बोटवाल्याला विचारले तर तो म्हणाला की हे रेस्क्यू जहाज आहे. अशी ४ जहाजे इथे आसपास तैनात आहेत, त्यामुळे तूम्ही घाबरू नका. थोडा धीर आला. यथावकाश तो २५-३० मिनिटाचा एरोलार कोस्टर प्रवास संपवून आम्ही किनाऱ्याला आलो आणि जीव भांड्यात पडला. एकुणात सकाळी गमती जमतीत सुरु झालेली सहल हवामान बदलल्याने एकदम साहसी झाली होती. आधीच्या सगळ्या "पेड" वॉटर स्पोर्ट पेक्षा हा येतानाचा खेळ सर्वात भारी ठरला.(क्रमश:)


काल दमून भागून हॉटेलवर परतल्यावर अर्थातच अजून काहीही करायची इच्छा उरली नव्हती. वातावरणही पावसाळी होते, त्यामुळे उरलेला दिवस आराम केला आणि रात्री लवकर जेवून गॅलरीत गप्पा मारत बसलो. मग गुडूप झोपलो. आज सकाळी लवकरच पुन्हा जेट्टीवर पोचायचे होते आणि पोर्ट ब्लेअरला जाणारी बोट पकडायची होती. शिवाय दिवसही लौकरच उजाडत असल्याने जागही लवकर येत होती. वेळ न घालवता आवरून घेतले आणि नाश्ता केला.सामान आवरलेलेच होते, त्यामुळे टेन्शन नव्हते. ७.३० पर्यंत गाडी येऊन उभी राहिली आणि १० मिनिटात आम्ही जेट्टीवर पोचलो सुद्धा.

b

बोट येऊन उभी होती पण कर्मचारी अजून आले नव्हते. त्यामुळे निवांत धक्क्यावर फिरत होतो. खाली पाण्यात पहिले तर मोजकेच मासे आणि जेलीफिश नितळ पाण्यात पोहत होते. डोक्यात एक कल्पना आली. पिशवीतला बिस्किटाचा पुडा काढला आणि बिस्किटे थोडी थोडी चुरून पाण्यात टाकू लागलो. आणि काय आश्चर्य? काळ स्नॉर्केलिंग करताना दिसले त्यापेक्षा जास्त विविध रंगी मासे झुंडीने ,येऊ लागले. चुरा खाण्यासाठी त्यांच्यात जणू स्पर्धाच सुरु झाली. हजार रुपयांच्या ट्रीपमध्ये जे पहिले दहा रुपयांच्या बिस्किटांनी सुद्धा केले होते. फक्त इथे आम्ही पाण्यात नव्हतो तर १५-२० फूट वरती उभे होतो. उरलेला चुरा खायला भरपूर चिमण्या गोळा होऊ लागल्या. थोडा वेळ हा खेळ चालला , मात्र आता बोटीचा कर्मचारीवर्ग आल्याने दरवाजे उघडले आणि आम्ही लगबगीने सामान घेऊन बोटीत स्थानापन्न झालो. थोड्याच वेळात बोट भरली आणि सुटली. खानपान सेवा सुरु झाली. एकीकडे टॉम अल्टर ची कुठलीतरी जंगल मुवि पडद्यावर दिसत होती. अर्थात टॉम अल्टर बद्दल मला आदरच आहे. पण गम्मत वाटली की ज्या ब्रिटिशांच्या कब्जातून अंदमान सोडवायला भारतीय स्वातंत्र्य सेनानी धडपडले त्यातीलच एक ब्रिटिश अंदमानला या म्हणून जाहिरात करतो आहे. काव्यगत न्याय कि काय म्हणतात ते हेच असावे.

२ तासात पोर्ट ब्लेअरला पोचलो. आज फक्त सायंकाळी कॉर्बिन कोव्ह बीचला भेट देणे आणि खरेदी इतकाच कार्यक्रम होता. त्यामुळे दिवस तास मोकळाच होता. मग आम्ही कार्यक्रमात थोडा बदल केला आणि रॉस बेट बघायचे ठरवले. हे बेट सेल्युलर जेल आणि आसपास फिरताना समोरच दिसत राहते. असे म्हणतात की ब्रिटिश लोकांनी प्रथम रॉस बेटावरच वस्ती केली आणि तिथून ते पोर्ट ब्लेअरला ये जा करत (कारण पोर्ट ब्लेअर हे मुख्यतः जेल म्हणून वापरले जायचे). नंतर मात्र काही कारणाने रॉस बेट मागे पडले आणि पोर्ट ब्लेअरच प्रमुख सत्ता केंद्र झाले.

तर आम्ही ड्रायव्हरला सांगितले की तू आमचे सामान हॉटेलवर नेऊन टाक, आणि वाटेत आम्हाला रॉस बेटावर जाणाऱ्या बोटी मिळतात तिथे सोड. जाऊन येऊन साधारण ३-४ तास लागणार होते त्यामुळे आम्ही दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत परत येणार होतो. या नवीन योजनेनुसार ड्रायवरने आम्हाला रॉस बेटाकडे जाणाऱ्या बोटीच्या धक्क्यावर सोडले आणि तो सामान घेऊन निघून गेला. आम्ही बोटीची तिकिटे काढली आणि बोटीत बसलो. ही बोट काही लोकांना रॉस बेटावर सोडून पुढे नॉर्थ बे ला जाणार होती. नॉर्थ बे मुख्यतः वॉटर स्पोर्ट साठी प्रसिद्ध आहे. पण ते आम्ही आधीच केलेले असल्याने आम्हाला नॉर्थ बे ला जायचे कारण नव्हते. १५-२० मिनिटात आम्ही रॉस बेटावर उतरलो. उतरल्यावर सगळ्यात पाहिले आश्चर्याचा धक्का बसला तो म्हणजे २ हरिणे जणू प्रवाशांचे स्वागत करायला उभी होती.

b

जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांकडून ती मजेत हात लावून घेत होती, खाणे स्वीकारत होती आणि फोटोला पोझही देत होती. आम्हीही त्यांचे जरा लाड करून पुढे झालो आणि बघतो तर पुढे जवळ जवळ १००-१५० हरणांचा कळप फिरत बागडत होता. रॉस बेटावर इतकी हरणे कुठून आली असावीत बरे? असा विचार करतच आम्ही पुढे झालो. पण सगळीच हरणे काही माणसाळलेली नव्हती, त्यामुळे त्यांच्या शिंगांपासून काळजी घ्यावी लागत होती, पण एकूणच सगळी मोकळीच फिरत होती.

b

b

रॉस बेट साधारण ०.३ वर्ग कि.मी इतके आहे. पण उंच सखल असल्याने चालत फिरणे थोडे दमणूक करणारे ठरते त्यामुळे आम्ही सरळ विजेच्या गाडीचा पर्याय निवडला . ही गाडी तुम्हाला बेटावरील मुख्य ठिकाणे दाखवते आणि उच्चतम बिंदुला नेऊन सोडते.

b

b

तिथून तुम्हाला पायऱ्या उतरून मागच्या बाजूला असलेले दीपगृह बघून परत यावे लागते आणि मग तीच गाडी तुम्हाला परत आणते. एका गाडीचे भाडे ६०० रुपये.

b

तूनळीवर आधीच पहिल्या प्रमाणे इथे अनुराधा राव नावाच्या एक मराठी बाई वस्तीला आहेत आणि त्या हरणांशी बोलतात. त्यांनी बोलावले की हरणे जवळ येतात असे बघितले होते. पण त्या आम्हाला कुठे दिसल्या नाहीत.

b

b

तर आम्ही गाडीतून बेटावरच्या मुख्य इमारती बघत बघत उच्चतम बिंदूवर पोचलो. आता जवळपास दोनशे पायऱ्या उतरून मागच्या बाजूला खाली जायचे होते. बेटाचा शेवटचा बिंदू म्हणजे दीपगृह आम्हाला खुणावत होता आणि त्याच्या मागचा उसळता समुद्र भुरळ घालत होता.

b

घनदाट झाडांमधून रस्ता खाली उतरत होता. त्यामुळे ऊन जाणवत नव्हते. सरते शेवटी रस्ता संपला आणि उथळ समुद्रात उभारलेले खांब आणि त्यावर टाकलेले लाकडी पूल पार करून आम्ही शेवटच्या बिंदूवर पोचलो.
b
इथून पुढे रस्ता नव्हता आणि दीपगृह तर अजून लांब होते. पण हाती असलेल्या वेळेत एक अजून जागा बघितल्याचे समाधान मनात घेऊन आम्ही परतलो. सर्वोच्च बिंदूवर आलो तर तिथे नुकतेच एक झाड पडले होते, सुदैवाने काही जीवित हानी झाली नव्हती.

b

पण त्यामुळे परतीची गाडी पकडायला जास्त चालावे लागणार होते. यथावकाश गाडी पकडून परत आलो आणि दुसऱ्या महायुद्धात बांधलेला एक जपानी बंकर पाहून परतीच्या बोटीत बसलो.
b

पोर्ट ब्लेअरला परतून ग्रीन पार्क मध्ये जेवलो आणि हॉटेलवर आलो.

भरपूर दमणूक झालेली असल्याने थोडा वेळ मस्त झोप काढली. झोपेतून उठून बाहेर पाहिले तर संध्याकाळ उतरली होती. मुलांनी तर आधीच गुगलवर बघून बीच बोअरिंग असल्याचे जाहीर केले होते आणि दांडी मारली होती. ड्रायव्हरचा फोन आला तेव्हा क्षणभर मनात आले की इथेच आराम करूया किंवा खरेदीला बाहेर पाडूया. कशाला मरायला कॉर्बिन कोव्ह बीचला जायचे? पण आळसावर मात केली आणि एक कडक चहा पिऊन गाडीत बसलो. ७-८ कि.मी प्रवास करून गाडीने आम्हाला बीचवर सोडले आणि २ तासाने परत येतो सांगून निघून ड्रायव्हर गेला. कुठल्याही बीचसारखा साधारण बीच , फिरायला लांबलचक , थोडेफार खाण्यापिण्याचे स्टॉल , वॉटर स्पोर्टच्या सोयी वगैरे होते. गप्पा मारत मारत बीचला एक फेरी मारली.मग थोडे खाल्ले.

b

पाण्यात पाय सोडून बसलो आणि आजूबाजूची वर्दळ बघत बसलो. आज ट्रिपचा शेवटचा दिवस होता. उद्या सकाळी परतीचा प्रवास. त्यामुळे निवांतपणा होता.

b

संध्याकाळ हळूहळू उतरत चालली होती. सूर्य मावळत होता आणि अंधार पसरू लागला होता.

b
हळूहळू लोक कमी कमी होऊ लागले, तसे आम्हीसुद्धा आवरते घेतले आणि ड्रायव्हरला फोन लावला .

b

पण फोन लागेचना. बरेचदा प्रयत्न केले पण यश नाही. मग ट्रिप को ऑर्डिनेटरला फोन केला. तो म्हणाला काळजी करू नका मी बघतो. ५ मिनिटात त्याचा फोन आला की ड्रायव्हरला चिडिया टापू नावाच्या ठिकाणी पाठवले आहे, तिथे रेंज नसल्याने फोन लागत नाही. पण तो थोड्याच वेळात पोचेल. तुम्ही तिथेच थांबा. आम्ही थांबलो. अजून १५-२० मिनिटे गेली. अंधार झाला. २-४ रिक्षा होत्या. काही गाड्या होत्या. तितक्यात एक बस समोर येऊन उभी राहिली. ती शहरात जाणारी होती , साधारण नावावरून हॉटेलजवळ जाईल असे वाटत होते. पुन्हा को ऑर्डिनेटरला फोन केला आणि बसने जाऊ का? म्हणून विचारले, पण त्याचे आपले एकाच. थोडे थांबा गाडी येईलच. इकडे बस निघून गेली. अंधार वाढला, रिक्षा कमी झाल्या. लोकही तुरळक राहिले. आता मात्र माझी सटकली आणि मी किमान १५ व्या वेळी को ऑर्डिनेटरला फोन केला आणि त्याला शिव्या घातल्या .त्यानंतर त्याच्या दिल्लीच्या मुख्य ऑफिसात फोन करून तिथल्या बाईला झापले आणि गुगलवर तुमचा रिव्ह्यू माझ्या हातात आहे म्हणू धमकावले. ही मात्रा बरीक लागू पडली आणि तिने बिनशर्त माफी मागून समोर दिसेल ती रिक्षा पकडा, पैसे मी देते म्हणू सांगितले. अर्थात माझा मुद्दा तो नव्हताच मुळी. इतके पैसे खर्च केल्यावर शंभर दोनशे साठी कोण वाद घालतोय? पण गैरसोय झाल्याचा राग होता. तणतणत समोर दिसेल ती रिक्षा पकडली. किर्रर्र अंधारात रिक्षा वळण वळणाच्या रस्त्याने धावू लागली. उजवीकडे समुद्र साथ करत होता. पण आता तो मागास एव्हढा छान वाटत नव्हता. तुरळक एखादी गाडी बाजूने जात होती, पण बाकी सुनसान होते. १० मिनिटे अशीच तणावात गेली आणि रिक्षाने एक वळण घेतले मात्र अचानक कायापालट झाल्याप्रमाणे किंवा नाटकात जसा फिरता रंगमंच असतो त्याप्रमाणे दृश्य बदलले आणि आम्ही शहराच्या गजबजलेल्या भागात आलो. इथे समुद्रकिनारा तटबंदी करून सुशोभित केला होता .इतकी सुंदर दिवाबत्ती केली होती आणि रंगीबेरंगी कपडे घातलेले लोक फिरत होते, की १० मिनिटापुरवी आपण किती तणावात होतो हे आठवून माझे मलाच हसू आले. कदाचित रिक्षावाल्याला सुद्धा माझ्या भावना पोचल्या असाव्यात. तो जरा मोकळा झाला आणि म्हणाल "साहेब, काळजी करू नका, अंदमान एकदम सुरक्षित जागा आहे, इथे पर्यटक बिनधास्त फिरू शकतात, घाबरायचे कारणच नाही." यथावकाश त्याने आम्हाला हॉटेलवर सोडले आणि आमचा जीव भांड्यात पडला. आम्ही हॉटेलवर पोचलो मात्र थोड्याच वेळात फोन वाजू लागले आणि एक एक जण भेटायला येऊ लागला. थोडक्यात दिल्ली ते अंदमान चाव्या फिरल्या होत्या आणि आम्हाला झालेल्या त्रासाबद्दल माफी मागायला लोक भेटू इच्छित होते. पण चूक कोणाची हि चर्चा करत बसण्यापेक्षा झालेगेले विसरून जाण्यातच शहाणपणा होता. त्यामुळे मी सौम्य शब्दात एकेकाची हजेरी घेतली आणि प्रकरणावर पडदा टाकला. एकुणात ट्रिपचा शेवट लक्षात राहील असा झाला. पण ५ दिवसांचा एकूण हिशोब मांडायचा तर ५ टक्के त्रास आणि ९५ टक्के मजा असे धरून ट्रिप छानच झाली होती. वातावरण चांगले होते, लोक चांगले भेटले, खूप गैरसोय, कोणी आजारी पडणे असले काही झाले नाही. एक सुंदर अनुभव पदरी पडला. हॉटेलवरच जेवण मागवले आणि सामानाची आवरा आवरी केली. आता उद्या सकाळी पोर्ट ब्लेअर ते चेन्नई आणि तिथून पुणे. (समाप्त)











समुद्र में मोती : अंडमान निकोबार द्वीप समूह की यात्रा (Andaman Trip - Hindi Blog)


यात्रा मात्र एक शब्द ही नहीं बल्कि अपने आप में एक ऐसी परिकल्पना है जो किसी भी मनुष्य में रोमांच का संचार कर देता है। यूँ तो मैंने बहुत से जगहों की यात्रायें की है लेकिन बचपन से किसी यात्रा के बारे में ज्यादा आकांक्षित था वो जगह बस एक ही था अंडमान एवं निकोबार द्वीप समूह (Andaman and Nicobar Island)। वर्ष 2019 में विवाह के पश्चात अपनी पत्नी के साथ घूमने के लिए हमने इसी स्थान को चुना। अंडमान एवं निकोबार द्वीप समूह एक केंद्र शासित प्रदेश है जो सुदूर बंगाल की खाड़ी के मध्य में स्थित है. यह 572 छोटे बड़े द्वीपों का एक समूह है जिसमे 37 द्वीपों पर लोग रहते हैं। 

अपने विवाह के पश्चात् मैं अपने पत्नी के साथ लखनऊ के चौधरी चरण सिंह विमानतल से अंडमान एवं निकोबार द्वीप समूह(Andaman and Nicobar Island) की राजधानी पोर्ट ब्लेयर(Port Blair) में स्थित वीर सावरकर विमानतल की ओर वायु मार्ग से बढ़ चला। यह कोलकाता होते हुए 4-5 घंटे की लम्बी यात्रा था। आसमान से बंगाल की खाड़ी(Bay of Bengal) की नीली सतह को देखना अद्भुत अनुभव था। कुछ घंटो की यात्रा के उपरांत समुद्र के मध्य में खूबसूरत द्वीप समूह ऐसे नज़र आने लगे जैसे मोतियों की माला को किसी से बहुत ही सलीके से पिरोया हो।मन का रोमांच हिलोरे मार रहा था कि जैसे हम अपने सपनो के मंज़िल की ओर बस पहुंचने ही वाले हैं। हमारी यह यात्रा 6 रात्रि / 7 दिन की थी जिसको मैं प्रतिदिन के हिसाब से वर्णन करूँगा। 


➨ पहला दिन ( लखनऊ से पोर्ट ब्लेयर / सेलुलर जेल / कोरबिन कोव बीच )

सुबह 10 बजे हमारा विमान पोर्ट ब्लेयर के वीर सावरकर हवाई अड्डे(Veer Savarkar Airport) पर उतरा। हवाई अड्डे के निकास द्वार पे हमारे लिए गाड़ी खड़ी थी जिसके ड्राइवर रवि थे। रवि ने हमारे होटल "डी मरीना"(De Marina) तक पहुंचाने के क्रम में हमारा अभिवादन और स्वागत किया। होटल में ज़रूरी औपचारिकताओं को पूरा करने के बाद हम लोगो ने थोड़ा विश्राम किया। दोपहर 1 बजे हम लोग अपने ड्राइवर रवि के साथ सेल्लुलर जेल(Cellular Jail) देखने के लिए पहुंचे। इसे ही काला पानी की सजा भी कहा जाता था। इस जेल की नींव अंग्रेज़ो ने 1897 में रखी थी । इस तीन मंज़िली जेल में कुल 694 कोठरियां हैं जिसको इस ढंग से बनाया गया है कि बन्दी आपस में मेल मिलाप ना कर पाएं। ऑक्टोपस की तरह इसके सात शाखाएँ हैं जो मध्य में आपस में जुड़े हुए है। सबसे आखिरी में सावरकर कोठी(Savarkar Cell) है जहाँ वीर सावरकर ने अपने जीवन के 13 वर्ष (1911 -1924 ) गुज़ारे। सेलुलर जेल में घूमने के दौरान यह अनुभव करना ही भयानक था कि कैसे हमारे स्वतंत्रता सेनानियों ने अपना जीवन इन जेलों में कैद होकर काटा होगा। जेल परिसर में ही एक फांसी घर है। इस जेल में बंदियों को दी जाने वाली भयानक यातनाओं के बारे बताने के लिए  तथा स्वतंत्रता सेनानियों के जीवन परिचय के लिए एक राष्ट्रीय संग्रहालय एवं मेमोरियल भी है। 

सेलुलर जेल घूमने के बाद हम लोग पोर्ट ब्लेयर के पास स्थित कोरबिन कोव बीच(Corbyn Cove Beach) पहुंचे। यह एक बहुत ही खूबसूरत समुद्र तट है। नारियल के सुन्दर पेड़ों के नीचे  बैठकर नीले समुद्र को निहारना बेहद ही सुकून देने वाला था। नारियल पानी को हाथ में लिए हुए  रेत पर घूमने का मज़ा ही अलग था  कोरबिन कोव बीच पे कुछ अच्छा वक़्त बिताने के बाद हमें वापस सेल्लुलर जेल जाना था जहाँ 1 घंटे का लेज़र लाइट और साउंड शो होना था 

शाम होते ही लेज़र लाइट और साउंड शो(Laser Light & Sound Show) शुरू हुआ। इस शो में बॉलीवुड अभिनेता ओम पुरी जी की बेहद गंभीर आवाज़ में काला पानी और सेल्लुलर जेल में स्वतंत्रता सेनानियों पर ज़ुल्म और अत्याचार को उस जेल परिसर के एक पीपल की पेड़ की नज़रो से सुनाया गया है पीपल के पेड़ के द्वारा इस विवरण को सुनकर ही रूहें काँप जाती है। लेज़र लाइट और साउंड शो देखने के बाद अमर सेनानियों के बलिदान को याद करते हुए और सेल्लुलर जेल की मिट्टी को नमन करते हुए हम लोग वापस अपने होटल विश्राम करने आ गए


 दूसरा दिन ( हैवलॉक आइलैंड  / स्वराज द्वीप  /  राधानगर बीच )

अगली सुबह हम लोगो को हैवलॉक द्वीप(Havelock Island) जिसका नाम अब परिवर्तित करके स्वराज द्वीप(Swaraj Dwip) कर दिया के लिए निकलना था। करीब 113 वर्ग  किलोमीटर में  फैला हैवलॉक द्वीप सफ़ेद बालू के बीचों वाला जगह है जो कोरल रीफ और  हरेभरे जंगलो से घिरा हुआ है यह द्वीप पोर्ट ब्लेयर से करीब 39 किलोमीटर उत्तर पूर्व में स्थित है

सुबह 6  बजे हमारे ड्राइवर रवि ने हमको  पोर्ट ब्लेयर के जेट्टी पे पंहुचा दिया जहाँ  से हैवलॉक द्वीप(Havelock Island) तक की यात्रा हमको क्रूज(Cruise) से करना था। क्रूज का नाम सी-लिंक(Sea Link) था जो बेहद ही खूबसूरत और आरामदायक था। लगभग 2 घंटे की रोमांचक यात्रा के बाद हम लोग 8 बजे हैवलॉक द्वीप पहुंच गए। वहाँ के ड्राइवर प्रकाश ने हमको हमारे बीच रेसॉर्ट "गोल्ड इंडिया बीच रेसॉर्ट"(Gold India Beach Resort) पहुँचा दिया यह बहुत ही खूबसूरत बीच रेसॉर्ट नारियल के बगीचों से घिरा हुआ है और समुद्र तट के सामने है नाश्ता करने के बाद करीब 11 बजे हम लोग राधानगर बीच के लिए निकले। प्रकाश रास्ते में राधानगर बीच(Radhanagar Beach) की विशेषताएं बता रहा था। 

राधानगर बीच(Radhanagar Beach) एक बहुत ही खूबसूरत बीच है जो सफ़ेद रेत, फिरोज़ी नीले रंग के पानी और हरे वनस्पतियों  के लिए मशहूर है। इस बीच को टाइम पत्रिका(Time Magazine) द्वारा एशिया के तीन बेहतरीन बीचों में रखा गया है। यहाँ लोग स्विमिंग(Swimming),स्नॉर्कलिंग(Snorkeling), फिशिंग(Fishing) और स्कूबा डाइविंग(Scuba Diving) करने आते है। हम लोगों ने इस बीच पर काफी देर तक तैराकी किया और उसके बाद बीच के किनारे लगे सुन्दर पेड़ो के नीचे  बैठकर जंगली फलों का स्वाद लिया। हम लोगों ने फिश स्पा(Fish Spa) का आनंद भी लिया जिसमे पैर को छोटी छोटी मछलियों के टैंक में रखना होता है। डॉक्टर फिश नाम की ये मछलिया आपके पैरों के डेड स्किन को खा जाती है  4-5 घंटे इस बीच पर कब गुज़र गए पता ही नहीं चला। लगभग 6 बजे हम लोग अपने रेसॉर्ट वापस आ गए। शाम को चाय पीने  के बाद हम लोग अपने रेसॉर्ट के सामने बने बीच पर टहलने गए सूर्यास्त के बाद हवा के ठंडे झोकों के साथ शांत एवं मनोहारी वातावरण में रेत पर पड़ते कदम मन को बेहद ही लुभा रहे थे


तीसरा  दिन (हैवलॉक द्वीप / स्वराज द्वीप  /  एलीफैंट बीच )

नाश्ता करने के बाद ड्राइवर प्रकाश ने हम लोगो को हैवलॉक द्वीप(Havelock Island)  के जेट्टी पे पहुँचाया जहाँ स्टीमर से एलीफैंट बीच(Elephant Beach) पे जाना था। एलीफैंट बीच हैवलॉक द्वीप के दूसरे कोने पर है जहाँ आप जंगल से ट्रैकिंग करके 30 मिनट में पहुंच सकते है। दूसरा रास्ता स्टीमर का है जिसमे 15 मिनट में यहाँ पहुँचा जा सकता है।  स्टीमर वाले रास्ते में एक सुन्दर सा हाथी की शक्ल का लाइट हाउस दिखता हैं जो रात में पानी के जहाज़ों को दिशा बताता है। 

एलीफैंट बीच(Elephant Beach) के लोकप्रिय होने का कारण है यहाँ होने वाला वाटर स्पोर्ट्स(Water Sports)। जेट स्की(Jet Ski), सी वॉक(Sea Walk), सोफा राइड(Sofa Ride), स्नॉर्केलिंग(Snorkeling) और पैरासेलिंग(Parasailing) करने के लिए यहाँ पर्यटकों की भीड़ रहती है। हम लोगो ने जेट स्की और सोफा राइड का आनंद लिया और पैरासेलिंग का टिकट लेकर अपनी बारी आने का इंतज़ार करने लगे। बीच पर उत्सव जैसा माहौल था। बीच पर सूख कर नीचे गिरे हुए पेड़ इसकी खूबसूरती को चार चाँद लगा रहे थे। यहाँ के फलों से भरे प्लेट और नारियल पानी का मीठा स्वाद  शरीर में स्फूर्ति का संचार कर रहा था जो पैरासेलिंग करने के लिए ज़रूरी भी था। करीब 1 घंटे के बाद हमारा नंबर आया। पैरासेलिंग के लिए 10-12  लोगो के समूह को एक छोटे से स्टीमर द्वारा समुद्र में खड़े एक विशेष स्टीमर पर ले जाया गया जो पैरासेलिंग के लिए ख़ास उपकरणों से लैस था। पैरासेलिंग वाला स्टीमर हम लोगो को समुद्र के और अंदर लेकर गया और बारी बारी से सबको पैरासेलिंग कराने लगा। पैरासेलिंग में शरीर को पैराशूट से बांधकर एक रस्सी से आसमान की ओर छोड़ा जाता है और जैसे जैसे स्टीमर चलता है वैसे ही हमारी ऊंचाई ऊपर होने लगता है। पैरासेलिंग करते समय मनमोहक हवाओं के बीच आसमान की ऊंचाइयों से नीचे देखने पर गाढ़े नीले समुद्र में स्टीमर और उससे उठने वाली दूधिया लहरें बेहद ही सुन्दर दृश्य बना रही थी। यह 15 मिनट का अद्भुत अनुभव रोमांचित करने वाला और कभी ना भूलने वाला पल था।  स्टीमर पे बैठे पूरे समूह को पैरासेलिंग करने में 2.5 घंटे का समय लगा। पैरासेलिंग करने के बाद हम लोग वापस एलीफैंट बीच पर आ गए। कुछ वक़्त बीच पे बिताने के बाद हम लोग स्टीमर से  हैवलॉक द्वीप के जेट्टी से होते हुए वापस अपने रेसॉर्ट आ गये। रात के भोजन लिए रेसॉर्ट के तरफ से बीच के किनारे कैंडल लाइट डिनर(Candle Light Dinner) की व्यवस्था थी। समुद्र के किनारे कांच  के बोतलों में रखे मोमबत्ती के उजाले में साफ़ सुथरे आसमान में टिमटिमाते तारों के नीचे बैठना मनोहारी था। पैर  के नीचे रेत की परते, लहरों की कलरव ध्वनि और टेबल पे रखे ताज़े फूलों की महक के बीच डिनर करना बहुत ही कमाल  का अहसास था।


चौथा दिन (नील आइलैंड/शहीद द्वीप/सीतापुर बीच / भरतपुर बीच / स्कूबा डाइविंग / लक्ष्मणपुर बीच )

दो दिन हैवलॉक द्वीप पर बिताने के बाद हम लोगो को अपने अगले पड़ाव नील आइलैंड(Neil Island) जिसका नाम बदल कर अब शहीद द्वीप(Shaheed Dwip) कर दिया गया है की ओर निकलना था। नील द्वीप(Neil Island) पोर्ट ब्लेयर के उत्तर पूर्व में लगभग 36 किलोमीटर तथा हैवलॉक द्वीप से दक्षिण में 18 किलोमीटर में स्थित है। तिकोने आकार का यह द्वीप अंडमान द्वीप समूह(Andaman and Nicobar Island) के ताज़े फलों और सब्ज़िओं का मुख्य स्रोत है।

हम लोग 9 बजे अपने क्रूज सी-लिंक से 1 घण्टे की यात्रा के बाद नील द्वीप पहुंच गए। ड्राइवर सुजीत ने हमको हमारे बीच रेसॉर्ट "टैंगो बीच रेसॉर्ट"(Tango Beach Resort) पहुंचाया। थोड़ा आराम करने के बाद हम लोग सीतापुर बीच(Sitapur Beach) के लिए निकले। यह बीच एक सूर्योदय पॉइंट था जहाँ समुद्र के अंदर से सूरज निकलता हुआ दिखता है। बीच के किनारे की हरियाली, यहाँ का सफ़ेद रेत और नीला पानी नहाने के लिए अच्छा विकल्प देता है। कुछ फोटो खींचने के बाद हम लोगो ने प्राकृतिक नज़ारों का लुफ्त उठाया।

सीतापुर बीच के बाद हम लोगों को भरतपुर बीच(Bharatpur Beach) जाना था जहाँ पर स्कूबा डाइविंग(Scuba Diving) करना था। स्कूबा डाइविंग में ऑक्सीजन सिलेंडर से लैस एक विशेष स्विमिंग ड्रेस पहनने के बाद समुद्र की गहराइयों में जल के अंदर के जीवन का दर्शन करना होता है। हमलोग स्कूबा डाइविंग के पेशेवर लोगों के साथ बोट में बैठकर समुद्र के अंदर एक पुराने टूटे हुए लाइट हाउस के पास पहुंचे। यह जगह अपने विशेष गहराई और लाइट हाउस के होने की वजह से स्कूबा के लिए बेहतरीन था। स्कूबा डाइविंग करवाने वाले प्रशिक्षित टीम में कुल 4 थे। जिसमे एक नाव चालक, एक स्कूबा डाइविंग के दौरान समुद्र के सतह से देखभाल करने के लिए तथा 2 स्कूबा डाइवर्स थे जिनको हम लोगो का स्कूबा करवाना था।  नाव में हम लोगो को सारे उपकरण की कार्यशैली और पानी के अंदर के संकेतों के बारे में बताया गया। नाव से समुद्र में उतरने के बाद मुँह से ऑक्सीजन कैलेंडर से सांस लेना सिखाया गया। सभी जरुरी प्रशिक्षण के बाद स्कूबा डाइविंग करने हम लोग समुद्र के अंदर जाने लगे। समुद्र के अंदर का नज़ारा बेहद ही खूबसूरत था।  कोरल , रंग बिरंगे पौधे और सुन्दर मछलियाँ बहुत ही अच्छी लग रही थी। बहुत सारे मछलियों का झुण्ड हमारे पास घूम रहा था। समुद्र के अंदर की दुनिया अतुलनीय और रंगीन थी। करीब 30 मिनट तक हम लोग पानी के अंदर ही रहे।  एक विशेष कैमरे से हमारा फोटो और वीडियो शूट भी हुआ। स्कूबा डाइविंग का बेहतरीन अनुभव लेने के बाद हम लोग अपने रेसॉर्ट वापस आ गए।

हमारे रेसॉर्ट से लगभग 1 किलोमीटर की दूरी पर लक्मणपुर बीच(Laxmanpur Beach) था जहाँ एक सनसेट पॉइंट(Sunset Point) था। हमारे रेसॉर्ट के सामने बने बीच से उस पॉइंट का रास्ता रेत पे चलते हुए जाना था।  यह कोई पक्का रास्ता नहीं बल्कि जंगल और समुद्र के लहरों के मध्य में फैले रेत का था। हरे पेड़ों के झुरमुट और रेत से साथ मिले सफ़ेद शंख और सीपियाँ इस रास्ते को बेहद मनमोहक बना रही थी। हम लोग लहरों के पास ही चल रहे थे और पानी का पैरों से टकराना ऐसा महसूस  करा रहा था जैसे हमारा स्वागत वो अपने ढंग से कर रहा हो। लगभग 15 मिनट चलने के बाद हम लोग सनसेट पॉइंट पहुंच गए। यह पॉइंट द्वीप के सबसे पश्चिमी छोर पे स्थित हैं जो त्रिभुज के आकर का है।

यहाँ एक ओर जमीन है और बाकि तीन ओर नीला विशाल सागर। यहाँ काफी भीड़ थी। स्थानीय लोगों ने यहाँ मैगी ,चाय और पकोड़े के छोटे अस्थाई दुकानें रखी थी। इन दुकानदारों ने अपने दुकान के सामने लकड़ी के बेंच बना रखे थे जहाँ बैठकर मैगी और चाय के चुस्कियों के साथ सूर्यास्त का नज़ारा(Sunset View) मन को मोह लेने वाला था। जैसे जैसे सूरज सागर के आँचल में जा रहा था वैसे वैसे आसमान की लालिमा बढ़ती जा रही थी। सूर्यास्त के समय समुद्र का पानी किसी सोने की माला के तरह चमक रहा था और लहरों के बीच खड़े लोगों की परछाइयां एक विहंगम दृश्य प्रस्तुत कर रहा था। 3 घण्टों का वक़्त कैसे गुज़र गया पता ही नहीं चला। हम लोग उन्ही रेत के रास्तों से होते हुए बाते करते करते वापस अपने रेसॉर्ट आ गए।


➨ पाँचवा दिन ( नील आइलैंड  / शहीद द्वीप    पोर्ट ब्लेयर मार्केट )

सुबह 8 बजे उठकर हम लोगो ने नाश्ता किया और अपने रेसॉर्ट के सामने नारियल के बगीचे और उसके सामने बने बीच पे टहलने के लिए गए। थोड़ी फोटोग्राफी करने के बाद हम लोगों को रेसॉर्ट से चेक आउट करना था। हमारे ड्राइवर सुजीत ने हमें नील द्वीप(Neil Island) के जेट्टी पे दोपहर 12 बजे पहुंचा दिया। 1 बजे हमारे क्रूज का प्रस्थान समय था। नियत समय पर हमारा क्रूज सी-लिंक पोर्ट ब्लेयर(Port Blair) के लिए रवाना हुआ। यह 2.5 घंटे की यात्रा थी लेकिन रास्ते में चक्रवात आ गया जिससे तेज़ बारिश होने लगा और लहरें  बहुत तेज़ और ऊँची उठने लगी। समुद्र की लहरें क्रूज के खिड़कियों से टकराने लगीं जो शीशे के बने थे। यह अनुभव थोड़ा डरावना सा लग रहा था क्योंकि हमारा क्रूज बहुत ही धीरे धीरे चल रहा था और काफी हिचकोले खा रहा था। तेज़ चक्रवात के क्रूज के फसने के कारन 2.5 घंटे की इस यात्रा को पूरा करने में 5 घंटे लग गए। जब समुद्र तट दिखने लगा तब कुछ जान में जान आयी। पोर्ट ब्लेयर के जेट्टी पर हमको ड्राइवर रवि मिला और उसने हम लोगो को वापस अपने होटल पंहुचा दिया।  

करीब 2 घंटे आराम करने के बाद हम लोग लोकल मार्किट में शॉपिंग करने के लिए निकले। यहाँ के स्थानीय मार्किट का मुख्य आकर्षण शंखों, सीपियों तथा मोती के बने हुए सुन्दर आभूषण तथा घर में सजावट के लिए हाथ से बने शो पीस हैं। यहाँ के बाजार में अंडमान निकोबार द्वीप समूह के विभिन्न जनजातिओं के लोगो की मूर्तियाँ भी मिलती हैं जो अपने ख़ास पहनावे की वजह से बहुत ही सुन्दर दिखती हैं।  हम लोगो ने ढेर सारी शॉपिंग किया और परिवार के लोगो के लिए उपहार भी खरीदे। शॉपिंग करने के बाद स्ट्रीट फ़ूड का भी लुफ़्त  लिया और वापस अपने होटल आ गए।


➨ छठा दिन ( बारातांग द्वीप   / जारवा जनजाति  / मैंग्रोव  वन  / लाइमस्टोन केव्स /  पोर्ट ब्लेयर )

बारातांग(Baratang) एक द्वीप है जो पोर्ट ब्लेयर से लगभग 101 किलोमीटर उत्तर दिशा में है। यहाँ जाने के लिए जंगल से होकर गुज़रना होता है जो कि एक जारवा फारेस्ट रिज़र्व(Jarawa Forest Reserve) है। हम लोग सुबह 3 बजे बारातांग(Baratang) के लिए सड़क मार्ग से निकले क्योंकि जारवा फारेस्ट रिज़र्व का गेट प्रतिदिन केवल 2 बार ही खुलता है। एक सुबह 6 बजे और दूसरा सुबह 9 बजे। हमलोगों ने 6 बजे का समय चुना था और लगभग 5  बजे जारवा जंगल के गेट पर पहुंच कर ज़रूरी परमिट लिया और 6 बजे गेट खुलने का इंतज़ार करने लगे। जारवा फारेस्ट रिज़र्व में सुबह 6 बजे गेट खुलने पर पर्यटकों के गाड़ियों का काफिला अंदर जाने लगा। सबसे आगे वन विभाग की गाड़ी थी। यह 40 किलोमीटर लम्बा घना जंगल जारवा जनजाति(Jarawa Tribe) का निवास स्थान है जो इस जंगल के मूलनिवासी है। हम लोगों ने जंगल के रास्ते में जारवा आदिवासी लोगों(Tribals) को देखा जो तीर धनुष लिए अपने पारंपरिक वेशभूषा में बहुत ही आकर्षक लग रहे थे। इन लोगो की बस्ती भी दूर से दिख रही थी । इन लोगो से हाथ मिलाने और खाने पीने की चीज़े देने की सख्त मनाही थी। वन विभाग के लोग इस बात का ख़ास ख्याल रख रहे थे कि जारवा लोगो को गाड़ी से चोट ना लगे। 

करीब 1 घंटे में हम लोग जारवा जंगल के दूसरे छोर पर पहुंच जहाँ से फेरी के माध्यम से हम लोग बारातांग द्वीप पहुंचे। बारातांग का मुख्य आकर्षण है यहाँ के मैंग्रूव के वन(Mangrove Forest) और लाइमस्टोन / चूना पत्थर के बने प्राकृतिक गुफाएं(Limestone Caves)। हम लोग एक स्टीमर पर बैठ कर लाइमस्टोन केव्स की और निकले। स्टीमर के रास्ते में मैंग्रोव के वनों(Mangrove Forest) से समुद्र के किनारे भरे पड़े थे। अपने लम्बे लम्बे जड़ों और विशेष रूप रंग के कारण ये वन बहुत अच्छे लग रहे थे। स्टीमर पर 20 मिनट की यात्रा के बाद जंगलों के बीच बने उस जगह पहुचें जहाँ से चूना पत्थर से बने प्राकृतिक गुफाएँ(Limestone Caves) देखने 2 किलोमीटर पैदल चलकर जाना था। लगभग 20 मिनट में हम लोग उन गुफाओं के प्रवेश द्वार पे पहुंच गए और इन गुफाओं की जानकारी के लिए एक गाइड ले लिया। शुरू में तो गुफा के अंदर थोड़ा उजाला था लेकिन जैसे जैसे हम लोग अंदर जाने लगे अंधकार बढ़ने लगा।  गुफायें सफ़ेद रंग के चूना पत्थर से प्राकृतिक रूप में बनी थीं। टॉर्च की रौशनी में हमारे गाइड ने हमको विभिन्न प्रकार की आकृतियों को दिखाया जिसमे शिवलिंग, हाथी की सूंढ़, कमल का फूल इत्यादि। यह गुफा प्रकृति द्वारा बनाया गया अद्भुत कृति था। इन् गुफाओं में हम लोगो ने 1 घंटा बिताया और स्टीमर से वापस बारातांग के फेरी तट पर पहुँच गए। यहाँ के स्थानीय ढाबा पर दोपहर का भोजन करने के बाद जारवा जंगल होते हुए वापस पोर्ट ब्लेयर(Port Blair) अपने होटल आ गए। 


➨ सातवा  दिन ( पोर्ट ब्लेयर से लखनऊ )

यह 6 दिन की यादगार यात्रा के बाद का घर वापसी का समय था। वीर सावरकर विमानतल से घर वापस जाने के क्रम में हम लोग अंडमान निकोबार द्वीप समूह(Andaman and Nicobar Island) में बिताये गए अपने यादगार पलों को संजो रहे थे। यहाँ के लोगों की आतिथ्य दिल को छू लेने वाला था। यहाँ के सफ़ेद रेत और नीले समुद्र को निहारना एक बहुत ही सुकून देने वाला पल था।  हरे भरे जंगल, मैंग्रोव के वन, वाटर स्पोर्ट्स, जारवा जनजाति और प्राकृतिक खूबसूरती हमारे अंडमान के यात्रा अद्वितीय बना दिया था। हमारे स्वतंत्र सेनानियों के बलिदान की कहानी कहता यहाँ का सेलुलर जेल आपके मन में शहीदों के लिए सम्मान भर देता है। कुछ ही देर में हमारा विमान आसमान में था जहाँ से अंडमान निकोबार के द्वीप(Andaman and Nicobar Island) मोतियों की तरह फिर से दिखने लगे। वाकई में समुद्र में मोती हैं अंडमान निकोबार द्वीप समूह।

 *********

➝ अंडमान एवं निकोबार द्वीप में ये करना ना भूलें   : पैरासेलिंग, स्कूबा डाइविंग, जेट स्की, सी वाक, फोटोग्राफी।
➝ अंडमान एवं निकोबार द्वीप कैसे पहुँचें  : सबसे अच्छा तरीका हवाई मार्ग से देश के सभी हिस्सों से जाया जा सकता है।  समुद्री मार्ग से कोलकाता , विशाखापट्टनम और चेन्नई से  पोर्ट ब्लेयर जा सकते है लेकिन समय काफी अधिक लगता है।  
➝ अंडमान एवं निकोबार द्वीप  जाने का सबसे अच्छा समय :   अक्टूबर से अप्रैल
➝ अंडमान एवं निकोबार द्वीप घूमने के लिए पर्याप्त दिन      :   6 रात  /  7 दिन 



















Video Links below:

1. Parasailing at Elephant Beach, Havelock Island, Andaman
2. Scuba Diving at Neil Island, Andaman
3. Mangrove Forest at Barataang, Andaman
4. Limestone Caves at Barataang, Andaman


Blogger Name: Pramod Kumar Kushwaha
For more information & feedback write email at : pktipsonline@gmail.com
https://www.pktipsonline.com/2020/04/blog-post_30.html



 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...