https://chinmaye.com/2019/07/12/mjamamasjid/
दिल्लीची जामा मस्जिद

लाल किल्ल्यापासून अर्धा किलोमीटर अंतराच्या आतच सतराव्या शतकात बांधली गेलेली सुप्रसिद्ध जामा मशीद (शुक्रवारी मशीद) म्हणजे शाहजहानाबादमधील एक महत्त्वाची वारसा वास्तू. दहा लाख रुपयात बांधल्या गेलेल्या या मशिदीची काही सुंदर चित्रे पुरातत्व विभागाकडे आहेत.

कांद्याच्या आकाराचे तीन घुमट आणि निमुळते होत जाणारे जवळजवळ ४० मीटर उंच असलेले दोन मिनार हे जामा मशिदीचे वैशिष्ट्य. लाहोर येथे मुघल काळात बांधल्या गेलेल्या बादशाही मशिदीशी अनेक ठिकाणी आपल्याला साधर्म्य दिसते.


जामा मशिदीचा नमाज पढण्याचा भाग जवळपास १०० स्क्वेयर मीटर क्षेत्रफळाचा असून उंच कमानीच्या दरवाज्यातून आत प्रवेश करता येतो. मी प्रवेश केला बादशहासाठी राखीव पूर्व दरवाज्यातून. एकंदर ११ कमानी मशिदीच्या समोरच्या भागावर आहेत आणि मधील कमानीवर विशेष कोरीवकाम आहे.





या मशिदीचे उद्घाटन उझबेकिस्तान मधील इमाम बुखाराने केले. प्रांगणाच्या चारीबाजूला स्तंभांच्या आधारावर उभे असलेला भाग आहे आणि मधील जागेत जवळपास २५ हजार लोक एकावेळी नमाज पढू शकतात. चारही टोकांना घुमट असलेले छज्जे आहेत. २०० रुपयांचे तिकीट काढून आणि सुमारे ३२० पायऱ्या चढून मशिदीच्या छतापर्यंत जाता येते आणि तिथून घुमट, मिनार आणि जुन्या दिल्लीचा देखावा फारच अद्भुत दिसतो.



या मशिदीचे जुने नाव मस्जिद-ए-जहांनुमा होते. म्हणजे जगाचे सुंदर दृश्य दाखवणारी मशीद. इथं उभं राहून दिल्लीचे सुंदर दृश्य नव्हे तर अनेक दृश्ये पाहता येतील याची खात्री मी जरूर देईन. इंटरनेटवर अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की ही भारतातील सर्वात मोठी मशीद आहे.. परंतु खरं म्हणजे भोपाळची मशीद भारतातील सगळ्यात मोठी मशीद आहे.

भोपाळच्या ताज-उल-मस्जिदची गोष्ट पुन्हा कधीतरी. हा ब्लॉग वाचत राहा आणि नक्की शेयर करा.
लाल किला – शाहजहानाबाद (शहर सातवे)

दिल्ली म्हणजे भारतीय राजकारणाचे सिंहासन. राजे बदलले, तारखा बदलल्या, कालगणना बदलल्या, राजघराणी बदलली पण दिल्लीचे स्थान अटल आहे. सुरजकुण्ड आणि लालकोट ते ल्युटेयन्स दिल्ली हा मोठा कालखंड. एक हजार वर्षांपेक्षाही मोठा. पण आजही भारतीय प्रजासत्ताकाची राजधानी दिल्लीच आहे. काही काळ हा मान कलकत्ता, आग्रा वगैरेंना मिळाला पण तो त्या शहरांना टिकवता आला नाही. दिल्लीच्या इतिहासाचा वेध घेता घेता आता आपण शाहजहानाबाद म्हणजे दिल्लीच्या सातव्या शहरापर्यंत आलो आहोत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपले पंतप्रधान तिथूनच भाषण करतात. मुघल बादशाह शाहजहानने वसवलेले हे शहर आणि त्याचा मुकुटमणी म्हणजे लाल किला

दिल्लीतील प्रत्येक शहर आपल्याला वेगवेगळ्या कालखंडाची ओळख करून देते. नगररचना, स्थापत्यशास्त्र, त्या काळातील कारीगरी नि सौंदर्यदृष्टी. इतिहासातील घडामोडी आणि त्यांचा अभिकल्पना आणि स्थापत्यावर झालेला परिणाम अशी बरीच ज्ञान-दालने अशा वास्तू आपल्याला खुले करून देतात. इतिहास म्हणजे फक्त लढाया आणि राजे-राजवाडे यांची चरित्रे नव्हे. लोकजीवन, कला, तत्कालीन राहणीमान अशा अनेक गोष्टी इतिहासाच्या अभ्यासात महत्त्वाच्या असतात. विविध काळातील या वास्तू तर त्या काळाशी आपल्याला जोडणारे दुवेच. थेट त्या काळापासूनचे मूक साक्षीदारच. शाहजहान प्रसिद्ध आहे ताजमहाल बांधला म्हणून परंतु शाहजहानाबाद हे शहरसुद्धा डिझाईनच्या दृष्टीने खास आहेच. लाल किल्ला हा तर विश्व वारसा स्थळ आहे.


किल्ला मुघल काळात लाल वालुकाश्म वापरून बांधला गेला. आज मुघल सैनिकांची जागा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या सैनिकांनी घेतली आहे. दिल्ली दरवाजा आणि लाहोरी दरवाजा रचनेच्या दृष्टीने जवळजवळ सारखे आहेत. किल्ल्याभोवती विस्तृत खंदक असल्याने थेट हल्ला चढवणे कठीण होते. किल्ल्याचा परिसर मोठा असून आत मोठी बाजारपेठ सुद्धा आहे.

या बाजाराचे नाव छट्टा चौक. तुम्हाला निवांतपणे किल्ला पाहायचा असेल आणि बरोबर शॉपिंगप्रेमी जनता असेल जी तुम्हाला घाई करत असेल तर त्यांना या बाजारात सोडून पुढे जावे. कारण किल्ला नीट पाहायला दोन तास तरी लागतात. जर बरोबरचे लोक खरेदी वेडे असतील तर त्यांना चांदणी चौकात किंवा चावडी बाजारात सोडणे उत्तम.





प्रथम दिसणारे बांधकाम म्हणजे नगारखाना किंवा नौबत खाना. एकंदर मुघल शैलीवर उझबेक शैलीचा प्रभाव जाणवतो. कारण ही शैलीही तिमुरीद होती. समरकंद ला उलुघ बेगचा मदरसा आहे त्याचे फोटो पाहिलेत तर तुम्हाला अनेक साम्यस्थळे जाणवतील. अर्थात दोन्ही शैलींमधील सौंदर्य-विचाराची उत्क्रांती स्थानिक संस्कृतीच्या परिणामांमुळे बरीच वेगळी झालेली दिसते.

आता त्या इमारतीत हत्यारे आणि लढायांचा इतिहास सांगणारे उत्तम संग्रहालय आहे. सफाविद घराण्यातील हत्यारेही इथं पाहता येतात. आत गेल्यानंतर दिवाण-इ-आम आणि दिवाण-इ-खास अशा इमारती आहेत. दिवाण-इ-आम च्या खांबांमधील भौमितीय संतुलन अन दिवाण-इ-खास मधील कोरीवकाम फारच सुंदर आहे. मुमताज महल पाहताना तिथल्या जाळीकामातील नजाकत पाहून आश्चर्य वाटतं. काही वेळ तिथं बसून प्रकाशाचे दिशा बदलणारे कवडसे पाहायला मजा येते.




अनेक ठिकाणी कोरीवकाम, धातुकाम आणि इतर शिल्पनमूने आजही चांगल्या स्थितीत आहेत. मुमताज महालच्या इमारतीत सुंदर चित्रे असलेलं एक संग्रहालयही आहे. इस्लामिक कॅलिग्राफी किंवा अक्षरकलेचेही उत्तम नमुने इथं पाहता येतात. अनेक ठिकाणी कोरीवकाम, धातुकाम आणि इतर शिल्पनमूने आजही चांगल्या स्थितीत आहेत. मुमताज महालच्या इमारतीत सुंदर चित्रे असलेलं एक संग्रहालयही आहे.




या सगळ्या दिमाखात औरंगजेबाने बांधलेल्या मोती मशिदीचा साधेपणा जाणवतो. धर्मांध क्रूरकर्मा ही औरंगजेबाच्या स्वभावाची एक बाजू तर साधेपणा आणि शिस्त ही दुसरी बाजू. औरंगाबादजवळ जिथं त्याला दफन केलं गेलं ती जागाही त्याच्या मृत्यूपत्रात सांगितल्याप्रमाणे साधीच आहे.

हा किल्ला वास्तुरचनाकार उस्ताद अहमद लाहोरीने १६३९ ला बांधून पूर्ण केला त्याची शंभरी आली तेव्हा १७३९मध्ये नादिरशाहच्या स्वारीत दिल्लीची धूळधाण उडाली होती. नंतर ब्रिटिशांच्या काळातही या किल्ल्याला संघर्षाला सामोरे जावे लागले. सावन आणि भादो या दोन बांधकामाच्या समोर उभे राहिले की अनेक ब्रिटिशकालीन इमारती मागे दिसतात आणि ब्रिटिश राजसत्तेच्या आठवणी जागृत होतात. अठराव्या शतकाच्या शेवटी लखनवी शैलीत केलेल्या या चित्रातून आपल्याला किल्ल्याच्या तलविन्यासाची थोडी कल्पना येते. हा किल्ला वास्तुरचनाकार उस्ताद अहमद लाहोरीने १६३९ ला बांधून पूर्ण केला त्याची शंभरी आली तेव्हा १७३९मध्ये नादिरशाहच्या स्वारीत दिल्लीची धूळधाण उडाली होती. नंतर ब्रिटिशांच्या काळातही या किल्ल्याला संघर्षाला सामोरे जावे लागले. सावन आणि भादो या दोन बांधकामाच्या समोर उभे राहिले की अनेक ब्रिटिशकालीन इमारती मागे दिसतात आणि ब्रिटिश राजसत्तेच्या आठवणी जागृत होतात.




इथं किल्ल्यात पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे दुकान आहे. तिथं चांगली पुस्तके आणि भेटवस्तू घेता येतात. इथं एक बावली (विहीर) सुद्धा आहे. परंतु मी गेलो तेव्हा ती बंद होती. शेरशहा सुरीने बांधलेला पूल ओलांडून पलीकडे सलीमगड पाहायला गेलंच पाहिजे.


सलीमगढ किल्ल्यात आहेत नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेची स्मरणचिन्हे. पुढल्या वेळी आपण शाहजहानाबाद मधील जामा मशिदीच्या भटकंतीला जाऊ.
शोध सिरी किल्ल्याचा (शहर दुसरे)

दिल्ली शहराचा इतिहास शोधताना आपण अगदी पांडवकालीन इंद्रप्रस्थापर्यंत जाऊन पोहोचतो. गेल्या दीड हजार वर्षांची साक्ष देणाऱ्या विविध वास्तू आजही दिल्लीत पाहता येतात. आणि त्या पाहताना जणू टाइम मशीन मध्ये बसल्यासारखा अनुभव आपल्याला मिळतो. लालकोट-किला राय पिथौरा च्या परिसरातच पुढे मेहरौली ची बांधकामे झाले. कुत्ब मिनार उभा राहिला. १४व्या शतकाच्या सुरुवातीला दिल्लीवर मंगोल आक्रमणे सुरु झाली आणि त्यांच्यापासून शहराचे रक्षण करण्यासाठी सिरी दुर्गाची बांधणी सुरु झाली. सिरी हे दार-उल-खिलाफत या नावानेही प्रसिद्ध झाले. अनेक राजवाडे आणि मोठी बांधकामे उभी केली गेली. आज त्याच्या खुणाही अभावानेच दिसतात. शेरशहा सुरीने शेरगढ बांधताना सिरी दुर्गाचे दगड वापरले असं दाखवणाऱ्या नोंदी इतिहासकारांना मिळालेल्या आहेत. आज हौज खास आणि ग्रीन पार्क परिसरात या दुर्गाचे बुरुज आणि दगडी बांधकाम दिसते. काही इतिहासकार मानतात की हे शहर बांधत असताना हजारो मंगोल आक्रमकांची मुंडकी इथं पुरली गेली म्हणून सिरी हे नाव पडले. तर सय्यद अहमद खान मानतात की तिथं पूर्वी सिरी नावाचे छोटे गाव होते.
सिरी किल्ल्याची भटकंती सुरु होते शाहपूर जाट नावाच्या दक्षिण दिल्लीतील एका गावात. हो दिल्लीत अरुंद गल्लीबोळ असलेली गावं आहेत बरं का! तिथं काही बुरुज डीडीए उद्यानात दिसतात. दगडी बांधकाम आणि जवळपास अठरा फूट रुंद तटबंदी आपल्याला पाहता येते. गावात गेल्यावर तोहफेवाला गुम्बद नावाची खल्जी-तुघलकी शैलीत बांधलेली साधी पण आकाराने भव्य मशीद दिसते.

गुलमोहर पार्क भागात दरवेश शाह ची मशीद आहे. हे बांधकाम लोदीकालीन असलं तरीही किल्ल्याजवळील स्थान पाहता एकेकाळी ही मशीद महत्त्वाची होती असा कयास बांधता येतो.

या किल्ल्याच्या भिंतींचे विस्तृत बांधकाम पंचशील पार्क जवळ पाहता येते. हे एका कुंपण घातलेल्या बागेत बंदिस्त असून स्टेप बाय स्टेप नर्सरीच्या बाजूने तिथं प्रवेश करता येतो. उंच दगडी बांधकाम आणि सैनिक हत्यारे नेऊ शकतील व किल्ल्याचा बचाव करू शकतील इतकं रुंदही. बुरुजांना तीर मारण्यासाठी व शत्रूवर हल्ला करता यावा म्हणून जंग्याही होत्या. वेगवेगळ्या आकाराच्या दगडांना एकमेकांवर रचून आणि मध्ये जोडणी करणारं दगडमातीचं मिश्रण करून या भिंती बांधल्या गेल्या. मंगोल आक्रमकांना खिलजीने अनेकदा पराभूत केलं. पुढे तुघलक काळात दिल्लीत आलेल्या तैमूरने या तटबंदीचे आणि दुर्गातील इमारतींचे कौतुक केलेले दिसते.
सिरीच्या तटबंदीचा अजून एक सलग भाग पंचशील पार्कच्या दुसऱ्या टोकाला पुरातत्व सर्वेक्षणाच्या लहान मुलांच्या संग्रहालयाजवळ दिसतो. इथल्या भिंती पडलेल्या असल्या आणि उंच नसल्या तरीही तटबंदीचा तलविन्यास आणि दगडी बांधकामाची पद्धत समजून घ्यायला इथं निरीक्षण करणे उपयुक्त ठरते.
इथंच मुहम्मद वाली मस्जिद नावाची एक लोधी कालीन सुबक मशीद आहे. कोर्बेल पद्धतीच्या कमानीच्या दरवाजातून आत गेल्यावर घुमत असलेली आणि भिंतींवर कुराणातील आयत कोरलेली ही मशीद पाहायला मिळते. बागेत असल्याने इथं मोरांचा आवाज ऐकू येत असतो.
हौज खासच्या उच्चभ्रू वस्तीत अजून दोन महत्त्वाच्या वास्तू आहेत. मल्लू खान म्हणजेच इकबाल खानने नासिरुद्दीन तुघलकाच्या काळात बांधलेला ईदगाह आणि अलाउद्दीन खिलजीने उभा केलेला चोर मिनार.

दिल्लीतील कुत्ब मिनार सगळ्यांना माहिती असतो पण हा खिलजी कालीन मिनार फारसा ठाऊक नसतो. चौदाव्या शतकाच्या सुरुवातील हा मिनार बांधला गेला असावा. नीट पाहिलं तर दगडी बांधकामाच्या या मिनाराला कमानींचा पाया आहे आणि मिनारवर अनेक ठिकाणी भोकं आहेत असं दिसतं. सुमारे २२५ भोकं आहेत. ती कशासाठी असावीत? मंगोल आक्रमक किंवा चोरांना पकडून त्यांचा शिरच्छेद केला जात असे आणि त्यांच्यावर दहशत बसावी म्हणून या मिनारावर ती मुंडकी लटकवली जात असत. अलाउद्दीन खिलजीच्या एकंदर क्रौर्याच्या प्रकृतीकडे पाहता हे आश्चर्यकारक वाटत नाही.
८ हजार मंगोल आक्रमकांना ठार करून अलाउद्दीन खिलजीने जरब बसवली अशा नोंदी इतिहासकारांना मिळाल्या आहेत. जाफर खान सारख्या सेनानींच्या मदतीने खिलजीने या आक्रमकांचा निकराने बिमोड केला असं दिसतं. काही जणांच्या मते हे मारलेले मंगोल आक्रमक नसून स्थायिक झालेले दिल्लीकरच होते. त्यांनी मंगोल हल्लेखोरांना सामील होऊ नये म्हणून अलाउद्दीन खिलजीने हे क्रौर्य दाखवले असा एक दावा केला जातो. इथं वर जायला छोटासा जिना आहे पण त्याला कुलूप होते.
अलाउद्दीन खिलजीने १३०३ च्या सुमारास सिरी दुर्ग बांधला त्यापूर्वी १९२५ च्या सुमारास त्याने पाणीपुरवठा व्हावा म्हणून हौज खास येथे एक मोठा तलाव बांधला. पुढे १३५४ साली फिरोजशाह तुघलकाने त्यातील गाळ उपसून तलाव पुन्हा वापरात आणला.
सुमारे ७० एकर परिसरात हा तलाव पसरला होता. इथं इंग्लिश अक्षर एल च्या आकाराचा एक मदरसा आहे. एक मशीद आहे आणि स्वतः फिरोजशाह तुघलकाचा मकबरा सुद्धा आहे. तैमूरच्या नोंदीप्रमाणे हा तलाव इतका मोठा होता की एका टोकाहून मारलेला बाण दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचणे अशक्य होते. हौज अलाई नावाने हा तलाव प्रसिद्ध होता. आजही हौज खास हरीण उद्यानातून हा तलाव पाहायला जाता येते. तिथंच मुंडा गुम्बद नावाची अजून एक खिल्जीकालीन वास्तू आहे.
सर सय्यद मानतात की इथला मदरसा धार्मिक शिक्षणाच्या दृष्टीने एक महत्वाचे स्थान बनला होता. तिथंच फिरोजशाह तुघलकाचा मकबरा आहे जो त्याचा मुलगा नासिरुद्दीन तुघलकाने १३८९ मध्ये बांधला. या ठिकाणी नासिरुद्दीन तुघलक आणि अलाउद्दीन सिकंदर शाह (फिरोजशाहचा नातू) यांच्या कबरी सुद्धा आहेत. १३८८ पर्यंत सय्यद युसूफ बिन जमाल हुसेनी या मदरशाचे प्रमुख होते. या ठिकाणाची ख्याती मध्य आशिया, अरबस्तानातही पोहोचली होती.
या ठिकाणी दगडी बांधकामाच्या सौंदर्याचा सुंदर प्रत्यय येतो. तिथेच बाजूला असलेली नवीन काँक्रीटची बांधकामे अगदीच निरस दिसू लागतात.
या ठिकाणी अनेक लोधी कालीन मकबरे आहेत. हरीण उद्यानातील वनराईत असलेला बाग-इ-आलम का गुम्बद आणि जवळच असलेला काली गुमटी नावाचा छोटा मकबरा वाट वाकडी करून पाहायला हवा.

बाघ-इ-आलम चा घुमट हा मिया शेख शहाबुद्दीन ताज खान नामक संताचा असून अबू सय्यद नावाच्या माणसाने १५०१ च्या सुमारास सिकंदर लोदीच्या कालखंडात हा मकबरा बांधला. इथंच एक छोटी मशीद सुद्धा आहे आणि अनेक निनावी कबरी सुद्धा. राखाडी रंगाच्या दगडात नक्षीकाम करून एक वेगळा परिणाम इथं साधलेला दिसतो. (Forgotten Cities of Delhi – Rana Safvi page 26)

लोदीकालीन आणखी काही मकबरे या परिसरात आहेत. काही ठिकाणी मकबरे आहेत पण कबर नाही असं दिसतं. कदाचित कंत्राटदारांनी हे बांधले पण कोणा सामंताला ते विकले नाहीत अशी शक्यता आहे. छोटी गुमटी आणि सक्रि गुमटी (अरुंद घुमट) हे या दोन वास्तू प्रेक्षणीय आहेत.


सक्रि गुमटीच्या समोरच बारा खांब आणि कमानी असलेला बाराखम्बा मकबरा दिसतो. दगडी बांधकामातील प्रमाणबद्ध कमानी, खिडक्या आणि त्यातून चालणार ऊनसावलीचा खेळ सकाळी आणि सायंकाळी अधिक छान दिसतो. तिथं कबर नाही पण परिसरात अनेक निनावी थडगी मात्र आहेत.


ही भटकंती संपवून अरबिंदो मार्गाने परतण्यापूर्वी तिथं एका उद्यानात असलेली मकबऱ्यांची जोडगोळी पाहिली पाहिजे. दादी पोतीचे गुम्बद असे नाव यांना आहे. उंच मकबरा कोण्या मोठ्या उमराव महिलेचा असून छोटा मकबरा तिच्या विश्वासू सेविकेचा आहे. पोतीच्या म्हणजे सेविकेच्या मकबऱ्याच्या शिखरावर षट्कोनी आकारात लाल वालुकाश्म वापरून दिव्यासारखा कळस रचलेला दिसतो.

ही आहे सिरी किल्ल्याची म्हणजे दिल्लीच्या दुसऱ्या शहराची गोष्ट. आपण हा परिसर पाहताना काही लोदीकालीन मकबरे पाहिले. असे जवळजवळ १०० मकबरे दिल्लीत आहेत. लोदी काळातील सर्वात भव्य मकबरे लोदी उद्यानात किंवा बाग-ए-जद मध्ये आहेत.. त्याबद्दल विस्तृत चित्रप्रवास पुन्हा कधीतरी. दिल्लीचे तिसरे शहर म्हणजे तुघलकाबाद – त्याची कहाणी पुढील लिंकवर वाचा. https://chinmaye.com/2019/06/15/mtughlaqabad/
शोध जहाँपनाह चा (शहर चौथे)
जहाँपनाह म्हणजे विश्वाला आसरा देणारी जागा. मुहम्मद बिन तुघलकाने मेहरौली, सिरी आणि तुघलकाबाद यांच्या मधील भागात हे शहर वसवलं साधारण १३२८च्या सुमारास. हे दिल्लीचं चौथं शहर. मंगोल आक्रमकांपासून संरक्षण मिळावं यासाठी एक लांबलचक संरक्षित शहरांची मालिका करण्याचा हेतू जहाँपनाह बांधण्यामागे होता परंतु मुहम्मद बिन तुघलकाने राजधानी दिल्लीतून देवगिरी-दौलताबाद ला हलवण्याचा निर्णय घेतला आणि या शहराची निर्मिती मागे पडली. आज दक्षिण दिल्लीच्या काही परिसरात जहाँपनाह शहरातील विखुरलेली बांधकामे दिसतात पण त्याला आता एकसंध सीमेचे स्वरूप नाही. १३८७ साली दोन मजली आणि चौरस आकाराचा तलविन्यास (प्लॅन) असलेली मशीद बांधण्यात आली. ही खिडकी नावाच्या गावाजवळ असल्याने तिला खिडकी मस्जिद असं नाव पडलं. जहाँपनाह शहरातील ही एक प्रमुख वास्तू

या मशिदीच्या एका बाजूची लांबी साधारण २८८ फूट असेल. तिथं ११ फूट उंचीचे तळघर असून सुमारे १०० खोल्या तळघरात आहेत. हा भाग आता पुरातत्व खात्याने बंद केला आहे. मशिदीच्या चारही बाजूंना घुमट असलेले स्तंभ आहेत ज्यांची उंची सुमारे ४५ फूट असावी. या मशिदीतील स्तंभ आणि कमानींच्या रचनेतून सावली आणि प्रकाशाचा खेळ पाहायला मजा येते. पायऱ्या चढून छतावर गेलं की जवळजवळ ८५ छोटे घुमट तिथं दिसून येतात.
जहाँपनाह शहरातील अजून एक पाहण्यासारखे बांधकाम म्हणजे सातपुला धरण. मंगोल आक्रमणे आणि दुष्काळ यामुळे दिल्लीवर वाईट परिस्थिती ओढवलेली असताना मुहम्मद तुघलकाने अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी जहाँपनाह शहराच्या पूर्वी सीमेवर हे धरण बांधले. दगडी बांधकामाच्या या धरणात ३८ फूट उंचीच्या सात कमानी आहेत. १७७ फूट लांब या धरणाच्या दोन्ही बाजूला अष्टकोनी स्तंभ आहेत ज्यांना ३९ फूट कमानी आहेत. इथं मदरसे होते. प्रेस एन्क्लेव्ह मार्गावर साकेत या ठिकाणी सातपुला धरण पाहता येते.
प्रमाणबद्ध दगडी बांधकाम अन त्यावरील प्रमाणबद्ध कमानी व या दगडांचा पिवळट केशरी रंग यामुळे एक सुंदर रचना निर्माण होते. तिथं आता झुडपे माजली आहेत आणि आसपासच्या भागातील मुले खेळायला येतात. त्यामुळे हा भाग ओसाड पडलेला नाहीए. धरणाच्या भिंतीवर चढून या अभिकल्पनेचा आनंद जवळून घेता येतो.
ये बात और की अख्तर हवेलियां ना रहीं
खंडहर में कम तो नहीं अपनी आबरू रौशन

जहाँपनाह शहरातील सर्वात देखणी इमारत म्हणजे विजय मंडल. काही जण त्याला बिजय मंडल सुद्धा म्हणतात. एका उंच टेकडीवरील अष्टकोनी शीर्ष असलेली ही इमारत जहाँपनाह किल्ल्याचा बुरुज मानली जाते. इथूनच मुहम्मद बिन तुघलकाने त्याच्या सैन्याचे निरीक्षण केले असं म्हंटलं जातं. तीन दरवाजे आणि हजार खांब असलेला एक महाल इथं होता असं इब्न बतूताच्या नोंदीतून लक्षात येतं. आदिलाबाद किल्ल्यातही असा एक महाल असल्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. त्याला हजार सुतुन महल म्हंटलं गेलं आहे. या जागेला बदीह मंजिल म्हणजे खास जागा मानलं गेलं असून स्थानिकांच्या मते तिथं काही वर्षांपूर्वीही सोन्याची नाणी सापडत असत. अल्लाउद्दीन खिल्जीनेच हजार सुतुन राजवाडा बांधला आणि त्याच्या पायात मंगोल आक्रमकांची मुंडकी पुरण्यात आली अशी आख्यायिका आहे. इथं सापडलेल्या स्लॅब्स प्रमाणे जनरल कनिगहॅम ने या राजवाड्याचे ठिकाण विजय मंडलजवळ निश्चित केलेलं दिसतं. इथंच मलिक काफूरचा खून, अल्लाउद्दीन खिलजीच्या मलाच म्हणजे कुतुबुद्दीन मुबारकशाहचा खुसरो खानकडून खून आणि मग खुसरो खानचा घियासुद्दीन तुघलक कडून खून अशा घटना घडल्या. आज मात्र त्याचे अवशेषही इथं सापडत नाहीत. तिथेच पश्चिम बाजूला एक वेगळ्या आकाराचा मकबरा असून तो लोधी काळातील असण्याची शक्यता आहे. त्याच्या आत मात्र कब्र दिसत नाही.
बेगमपूर गावात विजय मंडलाच्या अगदी जवळच बेगमपुरी मस्जिद नावाची प्रचंड मोठी मशीद आहे. ही मशीद जहाँपनाह शहराची जामी मस्जिद होती. काही जणांच्या मते या मशिदीचा निर्माता खान-ए-जहाँ मकबूल तिलंगनी होता. मात्र पुरातत्व विभागाच्या पुस्तिकेप्रमाणे, सर सय्यद अहमदखान यांच्या असर-उस-संदीद मधील प्रतिपादनानुसार ही मशीद खान-ए-जुआन-शाह ने बांधली. यानेच खिडकी मशीद, कलन मस्जिद, कालू सराई मस्जिद, अशा एकंदर ७ मशिदी बांधल्या असे मानले जाते. पंधरा फूट पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला मशिदीचे उंच द्वार लागते त्यातून प्रवेश केला की प्रचंड मोठे प्रांगण दिसते.

पहिली बृहतमुखी मशीद असे या फॉर्मचे वर्णन केले गेले आहे. ६४ घुमट आणि २४ कमानींच्या मध्यभागी असलेली मोठी कमान व निमुळते होत गेलेले मिनार आपल्याला प्रांगणातून दिसतात.
शेख कबिरुद्दीन औलियाचा दर्गाह किंवा लाल गुम्बद किंवा रकाबवाला गुम्बद या नावाने जहाँपनाह शहरातील एक महत्त्वाची इमारत प्रसिद्ध आहे. काही प्रमाणात हा मकबरा घियासुद्दीन तुघलकाच्या मकबऱ्याशी साधर्म्य असलेला आहे पण त्याचा डोम किंवा घुमट मात्र तितकासा प्रमाणबद्ध नाही. काही चोरांनी सोनेरी कळस चोरण्यासाठी इथं कड्या लावल्या म्हणून रकाबवाला असे नाव पडले. तिथं अजून एक छोटा घुमट आणि मशिदीचे अवशेष दिसतात. लाल वालुकाश्म वापरून केलेलं नक्षीकाम आणि जाळीकाम सुंदर आहे.
हजरत युसूफ कातल हा संत लाहोरच्या काझी जलालुद्दीन यांचा शिष्य होता त्याचा दर्गा आपल्याला जहाँपनाह शहराच्या अवशेषांत पाहता येतो. आजही इथं पीरबाबाला फुलं, उदबत्त्या, चादरी वाहिल्या जातात. आणि मोकळ्या जागेत क्रिकेट खेळायला मुलं जमा होत असल्याने ठिकाण जागृत वाटतं. १२ खांबांवर १८ फुटी घुमट आणि जाळीच्या भिंती असा सुंदर फॉर्म या दर्ग्याला आहे.

तिथेच पांढऱ्या रंगाची छोटी पण रेखीव मशीद आहे आणि इथलं जाळीचे काम कुत्ब मिनारच्या अला-इ-दरवाज्या जवळील इमाम-जमीनच्या मकबऱ्याशी साधर्म्य असलेलं आहे, अर्थात तो मकबरा नंतर बांधला गेला त्यामुळे प्रेरणा युसूफ कातलच्या दर्ग्यातून आली असं म्हणता येईल. तिथं जुनी खानका (अन्नछत्र) आणि मदरसा यांचेही अवशेष दिसतात.
तुघलक घराण्यातील राजांनी तीन शहरे आबाद केली – घियासुद्दीन तुघलकाने तुघलकाबाद, मुहम्मद-बिन तुघलकाने जहाँपनाह आणि फिरोजशाह तुघलकाने कुष्क-ए-फिरोजाबाद. त्यानंतर लोधी घराण्यात मोठ्या प्रमाणावर मकबरे जरूर बांधले गेले पण स्वतंत्र शहर वसवण्यात आले नाही. त्यांनी अनेक बांधकामे पूर्वी वसवलेल्या शहरांमध्येही केली. जहाँपनाह नंतर फिरोजाबाद, नंतर दीनपनाह, मग शाहजहानाबाद आणि मग आजचं दिल्ली असा काही शतकांचा मागोवा आपण इथं घेणार आहोत. जहाँपनाह पूर्वी वसवलेल्या लालकोट आणि सिरीची कहाणी सुद्धा रंजक आहेच! तेव्हा या ब्लॉगवर येत राहा, follow करा आणि अभिप्रायही नोंदवा ही विनंती.
भटकंती फिरोजशहा कोटल्याची (शहर पाचवे)
फिरोजशाह कोटला म्हंटलं की बहुतेक लोकांना आठवतं क्रिकेटचं मैदान! अनिल कुंबळेनी दहा विकेट टिपण्याचा पराक्रम ज्या मैदानात केला तेच! त्या मैदानाच्या अगदी बाजूलाच एक ऐतिहासिक स्थळ आहे. ते म्हणजे फिरोजशाह कोटला नावाचा किल्ला. खरंतर मैदानाला नाव मिळण्याचं कारण हा किल्ला आहे. पण सामान्य लोकांच्या दृष्टीने हे समीकरण थोडंसं उलटं आहे. २०१६ च्या आयपीएल मध्ये क्रिकेट प्रोड्युसर म्हणून मी काही सामने या मैदानात केले होते. तेव्हाच या किल्ल्याचे बुरुज दिसले होते. मग नंतर निवांत फोटो काढायला गेलो तेव्हाही रिक्षावाल्याने कोटला म्हंटल्याबरोबर स्टेडियम का अशी पृच्छा केली. तर आज तुम्हाला सांगणार आहे फिरोजशाह तुघलक या सुलतानाने बांधलेल्या फिरोजाबाद शहराची कहाणी. हे दिल्लीचं पाचवं शहर.

फिरोजशहाला बांधकामे करण्याचा छंद तर होताच शिवाय जुनी बांधकामे जतन करण्यासाठी त्यांची दुरुस्ती करण्याचं महत्त्वही त्याला पटलेलं होतं. कुत्ब मिनार, हौज खास, अल्लाउद्दीन खिलजी आणि शमसुद्दीन इल्तमश च्या कबरी या बांधकामांची डागडुजी त्याने केल्याच्या नोंदी आहेत. भारतातील सर्वात जुना मकबरा म्हणजे महिपालपूरचा सुलतान गढीचा मकबरा .. त्याचीही दुरुस्ती फिरोजशहाने केली होती. पण बशीरउद्दीन अहमदच्या नोंदीप्रमाणे आपल्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत फिरोजशाह तुघलकाने ४० मशिदी, ३० मदरसे, २० खानका (बहुतेक अन्नछत्रे), २०० सराई, ३० गावे, १०० तलाव, ४० धरणे, १०० राजवाडे, १५० पूल आणि अनेक बगीचे बांधले. (The Forgotten Cities of Delhi – Rana Safvi (p.124) यमुना नदीकाठी गाविन नावाच्या गावाजवळ फिरोजशहाने १३५४ च्या सुमारास फिरोजाबाद शहर बांधायला घेतले. तत्कालीन पद्धतीप्रमाणे हे बांधकाम करण्यासाठी सिरी, जहाँपनाह, किला राय पिथौरा शहरांतील बांधकामे पाडून सामग्री गोळा करण्यात आली
मलिक गाझी शाहना हा फिरोजशाह चा मुख्य वास्तुविशारद होता तर अब्दुल हक हा त्याचा सहाय्यक. या काळात दहा हजार जण नमाज पढू शकतील अशा ८ मशिदी बांधल्या गेल्याची नोंद आहे. या किल्ल्याचे मूळ नाव कुष्क-ए-फिरोजाबाद होते. तारीख-ए-फिरोजशाही या ग्रंथात त्या काळाबद्दल बरीच माहिती सापडते. शम्स सिराज अफीफ नामक लेखकाने या नोंदी केल्या आहेत.

फिरोजशाह कोटला मध्ये जिन्न राहतात, तिथं लोकांना भयंकर अनुभव येतात असल्या कहाण्या अनेक ब्लॉग/ ट्रॅव्हल साईट्स वगैरेंनी पसरवल्या आहेत. मला तिन्ही वेळा कोणताही भयानक अनुभव आला नाही. एकदा तर मॅच संपल्यावर मध्यरात्री त्या परिसरात गाडीची वाट पाहत तासभर उभे होतो. दिल्लीत धोका असेल तर भूत किंवा जिन वगैरेपेक्षा चोर, दरोडेखोर वगैरेंपासून जास्ती आहे हे लक्षात घ्यायला हवं, थोडक्यात माणसाकडून! अर्थात तिथं जिन राहतात हा जुना विश्वासाचा भाग आहे. तिथं नन्हें मियां नावाच्या एका जिनसाठी पूजाही केली जाते. तारीख ए फिरोजशाही मधील वर्णनाप्रमाणे तिथं तीन महाल होते. महल-ए-अंगूर (खास लोकांसाठी) महल-ए-छज्जा-ए-चोबीन (लाकडी सज्जा असलेला महाल जो दरबारी नोकर वापरत) आणि महल-ए-बारी आम (सामान्य लोकांसाठी) तिसऱ्या महालाच्या पायाचा काही भाग अजूनही शाबूत असून तिथं अनेक श्रद्धाळू लोक आपापली गाऱ्हाणी जिन ला मिळावीत म्हणून तावीज, उदबत्ती वगैरे लावतात. या राजवाड्यांवर पूर्वी चित्रे आणि नक्षीकाम होते पण सुलतानाने यांना इस्लामविरोधी मानत पांढरा रंग लावून घेतला ( The Forgotten Cities of Delhi – Rana Safvi page 133) इस्लामविरोधी म्हणून रेशमी आणि सोनेरी नक्षीचे काम असलेले अंगरखे घालण्यासही मनाई होती.
तिथं असलेली जोती पाहिली की लक्षात येते की राजवाडे आणि इतर राजेशाही इमारती नदीकिनाऱ्याला समांतर बांधल्या गेल्या होत्या. तिथंच प्रांगणात एक सुंदर विहीर किंवा बावली आहे पण २०१४ मध्ये एक आत्महत्या घडल्यावर तिथं लोखंडी कुंपण आणि कुलूप लावून ती बंद करण्यात आली असं सांगितलं जातं (असं अनेक ऐतिहासिक ठिकाणांच्या बाबतीत घडल्याचा दुर्दैवी प्रकार आहे) दोन पातळ्या असलेल्या या विहिरीला परियों का कुंवा म्हंटले जाते. काही जणांच्या मते तिथं पऱ्या नव्हे जिन राहतात.

फिरोजशाह तुघलकाचा सरदार खान-ए-जहान ने एकंदर सात मशिदी बांधल्या असं मानलं जातं त्यापैकी एक जामी-मस्जिद कोटल्यात आहे. १३५४ साली ही बांधली गेली. तैमूरलंग ने इथं नमाज पढला तेव्हा त्याला ही इमारत इतकी आवडली की अशीच मशीद त्याने समरकंदला बांधून घेतली. घुमटाचे बांधकाम आणि पायऱ्या असलेलं प्रवेशद्वार ओलांडून या मशिदीत प्रवेश करता येतो. आजही इथं नमाज पढला जातो.
या इमारतीतील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथं असलेला अशोक स्तंभ. हरयाणातील टोबरा या ठिकाणी फिरोजशहाला हा स्तंभ दिसला आणि त्याने तो दिल्लीत आणून फिरोजाबादमध्ये स्थापित करण्याचे ठरवले. मौलवी जाफर हसनच्या नोंदीप्रमाणे – सेनवल रेशीम आणि सुती कापडात त्याला गुंडाळण्यात आले. गवताच्या गंजीने आधार व संरक्षण दिले आणि ४२ चाके असणाऱ्या गाड्यावरून हा स्तंभ दिल्लीत आणण्यात आला. दोरखंडाने हा गाडा ओढला गेला आणि एकेक दोरखंड २०० मजूर ओढत होते. दिल्लीत पोहोचल्यावर ७५ हजार किलो वजन नेऊ शकेल अशा बोटीतून हा स्तंभ यमुना नदीतून कोटल्यात आणला गेला. या स्तंभाच्या शीर्षावर ब्रॉन्झ धातूचा मुकुट होता जो सतराव्या शतकापर्यंत पाहण्यात होता (विल्यम फिंच १६११ नोंद शेवटची) वालुकाश्म उन्हात सोनेरी रंगात चमकत असल्याने या स्तंभाला सोनेरी स्तंभ किंवा मिनार-ए-झरीन असे नाव देण्यात आले.
१३ मीटर उंचीचा हा स्तंभ एका हवा महल सदृश इमारतीच्या शिखरावर आहे. त्यावर ब्राम्ही आणि संस्कृतमध्ये लेख आहेत. मूळ स्तंभ इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकात तयार केला गेला असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ब्राम्ही लिपीत अशोकाची तत्त्वे रेखित असून नागरी लिपीत संस्कृत लेखात चौहान राजा विग्रहराजा चौथा याच्या पराक्रमांची नोंद आहे.
शापित तुघलकाबाद (शहर तिसरे)
या रहे उजर या बसे गुज्जर
सूफी संत हजरत निजामुद्दीन औलिया च्या या शब्दांत या किल्ल्याच्या भग्न शांततेचे रहस्य बहुतेक सामावले आहे. चौदाव्या शतकात दिल्लीच्या या तिसऱ्या शहराची निर्मिती घियासुद्दीन तुघलक या प्रथम तुघलक शासकाने केली. हे बांधकाम १३२१ साली सुरु झालं असं मानलं जातं .

.घियासुद्दीन गाझी मलिक हा एका तुर्क माणसाचा आणि त्याच्या हिंदू जाट पत्नीचा मुलगा होता. मेहनत आणि कर्तबगारीने तो अल्लाउद्दीन खिलजीच्या राज्यात प्रांत सुभेदार किंवा गव्हर्नर पदाला जाऊन पोहोचला. गाझी मलिक खिलजीच्या विश्वासू सेनानींपैकी एक मानला जाऊ लागला. देपालपूर प्रांताचा मुख्य असताना त्याने मंगोल आक्रमकांचा कडवा प्रतिकार करून प्रतिष्ठा मिळवली होती. अशी गमतीशीर आख्यायिका आहे की दिल्लीचे दुसरे शहर सिरी बांधणाऱ्या सुलतान अल्लाउद्दीन खिलजीला गाझी मलिकने दक्षिण दिल्लीत एक नवा किल्ला आणि शहर बांधायला सांगितले, अल्लाउद्दीन खिलजीने त्याला तू सुलतान झालास तर बांध असं उत्तर दिलं. अल्लाउद्दीन खिलजीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा कुतुबुद्दीन मुबारकशाह सुलतान बनला पण खुसरो खानाने त्याला ठार करून सिंहासन ताब्यात घेतले. गाझी मलिकने याचा बदला घेत खुसरो खानाला संपवले आणि १३२० साली तुघलक घराण्याची स्थापना केली. अशी गमतीशीर आख्यायिका आहे की दिल्लीचे दुसरे शहर सिरी बांधणाऱ्या सुलतान अल्लाउद्दीन खिलजीला गाझी मलिकने दक्षिण दिल्लीत एक नवा किल्ला आणि शहर बांधायला सांगितले, अल्लाउद्दीन खिलजीने त्याला तू सुलतान झालास तर बांध असं उत्तर दिलं.


सुलतान होताच त्याने तुघलकाबाद किल्ला बांधायला सुरुवात केली. त्याच वेळी निजामुद्दीन औलिया बावलीचे बांधकाम करत होते. सुलतानाला हे पसंत नव्हते कारण त्याला सगळ्या मजूरांनी फक्त तुघलकाबाद किल्ल्याचे बांधकाम करायला हवे होते. त्याने तसा आदेश काढल्यावर काही भक्त असलेले मजूर बावलीचे काम रात्री करू लागले. मग संतापून सुलतानाने तेलाचा पुरवठा बंद केला जेणेकरून रात्री दिवे लावले जाणार नाहीत. सुफी आख्यायिकेप्रमाणे निजामुद्दीन औलियाचे शिष्य रोशन-चराग-ए-दिल्ली यांनी चमत्कार करून पाण्याचे तेलात रूपांतर केले आणि दिवे तेवते ठेवले. या संघर्षामुळे निजामुद्दीन औलिया आणि घियासुद्दीन तुघलक यांच्यात कटुता आली. औलियाने नवीन बांधू घातलेल्या शहराला शाप देत म्हंटले की हे उजाड तरी होईल किंवा भटकणाऱ्या गुज्जरांच्या वस्तीचे स्थान तरी होईल. आज या किल्ल्याची स्थिती काहीशी तशीच आहे.


या शापाबद्दल अजून एक आख्यायिका दर्ग्याचे फरीद निझामी इतिहासकार राणा सफावि यांना सांगतात. तिचा संबंध इस्लामच्या दृष्टीने संगीताला मान्यता आहे का? या प्रश्नाशी आहे. तुघलकाच्या दरबारात हजरत निजामुद्दीन औलियांना चर्चेचे आमंत्रण आले कारण सभांमध्ये संगीताला परवानगी असावी की नाही यावर चर्चा होणार होती. हा थोर सुफी संत दरबारात येताच सगळेजण उठून उभे राहिले आणि चर्चेचे अध्यक्ष न्यायाधीश काझी उल सुलतान यामुळे दुखावले गेले कारण सभेत काझीचे स्थान मानाचे होते. काझीला संगीतावर बंदी हवी होती पण निजामुद्दीन औलियानी हदिस चा हवाला देत सांगितले कि प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी आयेशाला लग्नाच्या वेळी आणि ईदच्या वेळी गायन वादन ऐकण्याची परवानगी दिली होती. आणि इमाम अल गझली सांगतात की प्रेषितांनी एका आनंदाच्या क्षणी अबू-बकर आणि उमर यांना गायन-वादन थांबवण्यापासून रोखले होते. (इहया-उलूम-अल-दीन २/२७८) The forgotten cities of Delhi – Rana Safavi (page 43) यावर वैतागलेल्या काझी उल सुलतानाने इमाम-हनाफी यांनी संगीताला परवानगी दिल्याचा दाखला मागितला. जिथं प्रेषितांची हदीस अंतिम पुरावा मानला जात नाही अशा चर्चेत मला सहभागी व्हायचं नाही असं सांगून संतापलेले हजरत निजामुद्दीन औलिया दरबारातून बाहेर पडले आणि तेव्हाच त्यांनी तुघलकाबाद शहराला उजाड होण्याचा शाप दिला.


पुरातत्व विद्वान अलेक्झांडर कनिंघम यांच्यामते किल्ल्याला १३ दरवाजे होते आणि अर्ध षट्कोनी आकारात किल्ला बांधला गेला होता. ४० फुटी उंच बुरुजांचे बांधकाम प्रचंड आकाराच्या दगडांनी केले गेले होते आणि काही दगडांचे वजन ८-९ टन इतके प्रचंड असल्याचे चाचण्यांनी सिद्ध केले. किल्ल्याचा आकार साधारणपणे शाहजहानाबाद शहराइतका असून ईजिप्शियन पद्धतीच्या उताराचे बुरुज मेहरौली बदरपूर रोडवरून स्पष्ट दिसतात. पुरातत्व विद्वान अलेक्झांडर कनिंघम यांच्यामते किल्ल्याला १३ दरवाजे होते आणि अर्ध षट्कोनी आकारात किल्ला बांधला गेला होता. ४० फुटी उंच बुरुजांचे बांधकाम प्रचंड आकाराच्या दगडांनी केले गेले होते आणि काही दगडांचे वजन ८-९ टन इतके प्रचंड असल्याचे चाचण्यांनी सिद्ध केले.


इब्न बतूताने केलेल्या वर्णनानुसार त्याने सुलतानाला हजार खांब असलेल्या राजवाड्यात पाहिले. आज मात्र तिथं केवळ भग्न अवशेष आणि गुरे चारायला आलेले काही गुज्जर एवढंच शिल्लक दिसतं
हुनुज दिल्ली दूर अस्त
दिल्ली अजून दूर आहे, सुलतान इथं पोहोचत नाही निजामुद्दीन औलियाचे उद्गार होते. बंगाल आणि बिहारवर विजय मिळवून परतणाऱ्या घियासुद्दीन तुघलकाच्या स्वागतासाठी तुघलकबाद जवळ युवराजने उभारलेल्या शामियानाला आग लागली आणि त्यात घियासुद्दीन तुघलक सुलतान मारला गेला. हे १३२५ साल होतं मुहम्मद तुघलकाने सत्तेसाठी हा कट केल्याचे इब्न बतूताचे म्हणणे आहे. पण हजरत निजामुद्दीन औलियाची भविष्यवाणी खरी ठरली असे भक्त मानतात. नंतर लगेचच पाण्याच्या कमतरतेमुळे तुघलकाबाद किल्ल्यावर उजाड होण्याची वेळ आली. घियासुद्दीन तुघलकाने हजरत निजामुद्दीन औलियाला दिल्ली सोडण्याचा आदेश दिला होता आणि युवराज मुहम्मद तुघलक औलियाच्या जवळ होता हे घियासुद्दीन सुलतानाला मंजूर नव्हते त्यामुळे हत्तींनी लाकडी शामियान्याच्या आधाराला धडक देऊन ते पाडले आणि अशा कट-कारस्थानाचा परिणाम तुघलकाच्या मृत्यूत झाला असं इब्न बतूता सांगतो तर अबू फझलने हे खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

घियासुद्दीन तुघलकाचा मकबरा किल्ल्यासमोरच आहे. चहूबाजूंनी तटबंदी आहे आणि कृत्रिम तळे निर्माण करण्यात आले आहे. या मकबऱ्याची निर्मिती घियासुद्दीन तुघलकाने तो जीवंत असतानाच केली होती. त्याने मूलतनामध्येही स्वतःसाठी एक मकबरा बांधला होता, जो त्याने एका सुऱ्हावर्दी संताला अर्पण केला असे दिसते. रुक्न-ए-आलम या नावाने हा मकबरा मुल्तानमध्ये आजही प्रसिद्ध आहे.


या मकबऱ्याच्या बांधकामात लाल वालुकाश्म आणि संगमरवर यांच्या मिलाफाचं सौंदर्य दिसतं. आतमध्ये एकंदर तीन कबरी आहेत. बहुतेक एक पत्नीची आणि एक मुलाची. तिथं जवळच अजून एक छोटा मकबरा आहे तो जफर खान या विश्वासू सेनापतीचा आहे असं मानलं जातं



तुघलकाबाद किल्ल्यात अजून काही बांधकामे आहेत, बावली आहे. तिथं जवळच आदिलाबाद नावाचा किल्लाही आहे. मागच्या खेपेत मी सगळं काही शूट करू शकलो नाही. पुढच्या वेळी तुघलकाबादमधील बांधकामे आणि जवळ असलेलं सुरजकुंड दोन्ही पाहण्याचा प्रयत्न करीन आणि दिल्लीच्या या तिसऱ्या शहराबद्दल अजून एक ब्लॉग लिहीन.
संदर्भ –
दिल्ली आणि परिसर – भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, The Forgotten Cities of Delhi – Rana Safav
टाइम मशीनमधून दिल्लीचा प्रवास
पांडवकालीन इंद्रप्रस्थ ते आजची नवी दिल्ली हा भारताच्या राजधानीचा प्रवास रोचक आहे. इतिहास म्हणून तो अर्धवट आणि सनावळ्यांच्या जंत्रीने शिकवला जातो. त्यातही मुघलकालीन गोष्टींना खूप महत्त्व दिले जाते आणि मग एकंदरीतच अनावश्यक माहिती म्हणून आपण इतिहासातील अनेक पानांप्रमाणे हे पानही उलटतो आणि विसरून जातो. दिल्लीत कधी पर्यटक म्हणून गेलोच तर घाईघाईत लाल किल्ला आणि कुत्ब मिनार पाहतो. अगदीच रस असलेले लोक हुमाँयू मकबरा किंवा लोधी उद्यानापर्यंत पोहोचतात. इतिहास आणि पुरातत्वाचा अभ्यास करत असताना artifact म्हणजे समकालीन मूर्त साधने एक महत्त्वाचा भाग असतो. आणि काहीही artifact म्हणजे समकालीन वास्तुरचना प्रचंड आकाराच्या इमारती असतात आणि शेकडो वर्षे जगत स्थित्यंतरातून गेलेल्या असतात. दहाव्या शतकातील तोमर राजवंशापासून आजपर्यंत दिल्लीत आलेल्या शासकांनी निर्माण केलेल्या इमारतींच्या अभ्यासातून आणि निरीक्षणातून हे स्थित्यंतर पाहता येतं आणि या ब्लॉग सीरिजच्या माध्यमातून मी ही गोष्ट तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. पांडवकालीन इंद्रप्रस्थ ते आजची नवी दिल्ली हा भारताच्या राजधानीचा प्रवास रोचक आहे. इतिहास म्हणून तो अर्धवट आणि सनावळ्यांच्या जंत्रीने शिकवला जातो. त्यातही मुघलकालीन गोष्टींना खूप महत्त्व दिले जाते आणि मग एकंदरीतच अनावश्यक माहिती म्हणून आपण इतिहासातील अनेक पानांप्रमाणे हे पानही उलटतो आणि विसरून जातो. दिल्लीत कधी पर्यटक म्हणून गेलोच तर घाईघाईत लाल किल्ला आणि कुत्ब मिनार पाहतो. अगदीच रस असलेले लोक हुमाँयू मकबरा किंवा लोधी उद्यानापर्यंत पोहोचतात. इतिहास आणि पुरातत्वाचा अभ्यास करत असताना artifact म्हणजे समकालीन मूर्त साधने एक महत्त्वाचा भाग असतो. आणि काहीही artifact म्हणजे समकालीन वास्तुरचना प्रचंड आकाराच्या इमारती असतात आणि शेकडो वर्षे जगत स्थित्यंतरातून गेलेल्या असतात. दहाव्या शतकातील तोमर राजवंशापासून आजपर्यंत दिल्लीत आलेल्या शासकांनी निर्माण केलेल्या इमारतींच्या अभ्यासातून आणि निरीक्षणातून हे स्थित्यंतर पाहता येतं आणि या ब्लॉग सीरिजच्या माध्यमातून मी ही गोष्ट तुमच्यासाठी घेऊन येतो आहे.
दिल्लीत आज जिथं पुराना किला आहे तिथं पुरातत्व सर्वेक्षण विभागाने उत्खनन केले होते आणि मातीची भांडी व इतर साहित्य सापडले होते. गुप्तकालीन मूर्ती, नाणी आणि इतर अनेक जुने दुवे दिल्लीची कहाणी सांगायला उपयुक्त आहेत पण या सिरीजमध्ये या गोष्टी डोकावणार असल्या तरीही आपण पाहता येतील अशा इमारतींवर लक्ष केंद्रित करत आहोत. त्यामुळे ही गोष्ट सुरु होते तोमरांच्या काळात. दहाव्या शतकात अनंगपाल तोमर राजाने बांधलेलं सूरजकुंड आणि अनंगपूर धरण आजही टिकून आहे. पण ही ठिकाणे दिल्लीबाहेर फरिदाबादला आहेत. पण तोमर काळाची साक्ष देणारी लालकोटची भिंत आजही कुत्ब मिनार जवळच्या मेहरौली भागात आजही पाहता येते. लालकोट हे दिल्लीचं पहिलं शहर

अल्लाउद्दीन खिलजीने कुत्ब मिनार भागात बरेच बांधकाम केले आणि मंगोल आक्रमकांच्या हल्ल्यांपासून दिल्लीचे रक्षण करण्यासाठी सिरी नावाचा एक किल्ला बांधून एक शहर निर्माण केले. दक्षिण दिल्लीत हौज खास भागात त्याने एक तलाव खोदला. शहापूर जाट भागात सिरी किल्ल्याचे काही अवशेष आपण पाहू शकतो. सिरी म्हणजे दिल्लीचे दुसरे शहर. मंगोल आक्रमकांना पकडून ठार करून त्यांची मुंडकी जिथं लटकवली गेली असा चोर मिनार या काळाची गोष्ट सांगतो.

तुघलक राजवंशाच्या राजांना वास्तुरचना आणि शहरे प्रस्थापित करण्यामध्ये खास रस होता. या राजवंशातील प्रथम राजा घियासुद्दीन तुघलकाने आजच्या दिल्लीत आग्नेयेला वसवलेलं शहर म्हणजे तुघलकाबाद. मेहरौली बदरपूर रस्त्यावर किंवा कधीकधी विमानातून दिल्लीत उतरताना तुघलकाबादचा प्रचंड किल्ला दिसतो. तुघलकाबाद हे दिल्लीचं तिसरं शहर

दक्षिण दिल्लीतील बेगमपूर गाव, विजय मंडल, आयआयटी दिल्ली वगैरे भागात सापडते मुहम्मद बिन तुघलकाने निर्माण केलेल्या जहाँपनाह शहराचे बांधकाम. हाच तो तुघलक राजा ज्याने काही काळ राजधानी देवगिरी-दौलताबादला हलवली होती. मंगोल आक्रमकांचा प्रश्न तेव्हाही तसाच भेडसावत होता त्यामुळे किला राय पिथौरा आणि सिरी शहराच्या मध्ये या शहराची निर्मिती झाली. जहाँपनाह म्हणजे जगाला आश्रय देणारी जागा. जहाँपनाह हे दिल्लीचे चौथे शहर

फिरोजशाह तुघलकाने दिल्लीच्या आजच्या क्रिकेट ग्राउंडच्या बाजूच्या भागात एक नवे शहर थाटले आणि नाव दिलं फिरोजाबाद. कोट या शब्दाचे दिल्लीकरण झाले कोटला आणि फिरोजशाह कोटला म्हणून हा रबल मेसनरी या दगड बांधणीच्या प्रकारातून बांधलेला दुर्ग उभा राहिला. फिरोजशाह कोटला हे दिल्लीचं पाचवं शहर

तुघलकांच्या नंतर आलेल्या लोधी घराण्याने काही मोठे मकबरे सोडता विशेष नागरी बांधकाम केलं नाही. नंतर हुमायून ने दिल्लीत दीनपनाह नावाचे शहर बांधायला सुरुवात केली. शेरशहा सूर या सूरवंशीय राजाने त्याचा पराभव केला आणि दिल्ली ताब्यात घेऊन दीनपनाह चे बांधकाम पुढे सुरु ठेवले. तिथंच शेरगढ नावाचा एक नवा किल्ला बांधायला घेतला. आज पुराना किला या भागात हे बांधकाम आपण पाहू शकतो. दीनपनाह आहे दिल्लीचे सहावे शहर

अकबराच्या काळात मुघलांनी राजधानी आग्ऱ्याला नेली आणि दिल्लीचे महत्त्व कमी झाले. त्यानंतर शाहजहान ने राजधानी पुन्हा एकदा दिल्लीला आणली आणि जिथं आज पुरानी दिल्ली आहे त्या भागात शाहजहानाबाद नावाचे शहर वसवले. दिल्लीमधील महत्त्वाचे विश्व वारसा स्थळ लाल किला आणि दिल्लीची जामा मस्जिद शाहजहानाबाद मधील मुख्य बांधकामे आहेत. ग्यानी दि हट्टी, परांठे वाली गली, कल्लू की निहारी, करीम्स अशी खवैय्यांची अनेक लाडकी ठिकाणे इथं आहेत. शाहजहानाबाद हे दिल्लीचे सातवे शहर

आज स्वतंत्र भारताची राजधानी असलेली दिल्ली म्हणजे ब्रिटिश स्थापत्यशास्त्री एडविन ल्युटेयन्सने २०व्या शतकात वसवलेली नगरी. इंडिया गेट, संसद भवन, राष्ट्रपती भवन, हैद्राबाद हाऊस अशी बांधकामे या काळात निर्माण झाली. नवी दिल्ली हे आठवं शहर

इतर अनेक महत्त्वाची बांधकामे दिल्लीत आहेत ज्यांचा समावेश कोणत्याही शहरात करता येत नसला तरीही दिल्लीच्या इतिहासात त्यांना महत्वाचे स्थान आहे. हुमायून चा मकबरा, सफदरजंग मकबरा, लोधी उद्यान, सुलतान गढी चा मकबरा, उग्रसेनची बावली, जहाज महल अशी अनेक. आणि त्यांचीही गोष्ट तुम्हाला ब्लॉग्समधून सांगूच. तर या मालिकेतील प्रथम ब्लॉग आहे लालकोट ते कुत्ब मिनार – दिल्लीच्या पहिल्या शहराची गोष्ट. नक्की वाचा आणि शेयर करा. आणि अभिप्राय जरूर कळवा
पुराना किल्ल्याची गोष्ट (शहर सहावे)

पुराना किल्ल्यात आपले स्वागत करतो तो बडा दरवाजा. त्यावर दिसतात झरोके आणि छत्री. दिल्लीच्या इतिहासातील सहावं शहर म्हणजे शेरगढ किंवा पुराना किला. असं म्हणतात की पांडवकालीन इंद्रप्रस्थ हे नगर या किल्ल्याच्या स्थानी होतं. शेरशहा सुरीने या किल्ल्याची निर्मिती केली ती हुमायून ने बनवलेल्या दीनपनाह शहराला नष्ट करून.



१९१२-१३ च्या सुमारास जेव्हा या ठिकाणी उत्खनन झाले तेव्हा इंद्रपत नावाचे गाव इथे सापडले पुढे १९६० च्या दशकात झालेल्या उत्खननात ३००० BCE च्या सुमारासची भांडी इथं सापडली. मौर्यकालीन, सुंगकालीन, शक-कुशाण कालीन, गुप्त-कालीन, राजपूत आणि मग दिल्ली सुलतानच्या कारकिर्दीतील अवशेषही सापडले. इतकी जुनी पार्श्वभूमी या जागेला असल्यामुळे इंद्रप्रस्थच्या कथेत दम आहे असं अनेक लोक मानतात.









या ठिकाणी अजूनही मजबूत अवस्थेत असलेली वास्तू म्हणजे किला-ई -कुहना मशीद. पाच कमानींचा दर्शनी भाग त्यातील मध्य कमानीच्या आजूबाजूला सुंदर कोरीव काम आणि वर घुमट अशी या मशिदीची रचना आहे. लोधी ते मुघल काळातील शैली-संक्रमण आपल्याला या ठिकाणी दिसते. जमाली-कमाली मशीद आणि बडा गुम्बद मशीद यातून अनेक वैशिष्ट्ये या वास्तूत आली आहेत. या मशिदीची निर्मिती १५४१ CE ला शेरशहा सुरीने केली. ५१ मीटर बाय सुमारे १५ मीटरचे प्रार्थनागृह आणि कमळाच्या कळ्यांचे नक्षीकाम असलेल्या मेहराबी. मशिदीच्या इमारतीच्या कोपऱ्यात असलेले टॉवर हेही अजून एक विशेष.

शेरशहा सुरीने मनोरंजनासाठी बांधलेले अष्टकोनी व मध्यभागी छत्री असलेले शेर-मंडल ही पुराना किल्ल्याची ओळख म्हणता येईल. कोरलेल्या कमानी व प्लास्टरने काढलेली नक्षी याचे सौंदर्य वाढवते. हुमायून याचा पुस्तकालय म्हणून वापर करीत असे आणि इथूनच पडून त्याचा १५५६ CE साली मृत्यू झाला असं इतिहासकार मानतात.

शेरमंडला समोर आहे हमाम. गरम-थंड पाण्याच्या तोट्या आणि वाफेच्या स्नानाची सोय असा इथला थाट. साधारणपणे सव्वातीन चौरस मीटर आकाराचा हा हमाम आहे.

दिल्लीत अनेक बावल्या आहेत … इथली विहीर ८९ पायऱ्या उतरून २२ मीटर खोल जाणारी आहे. पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी खास रचना इथं केलेली दिसते.


दक्षिण दिशेला हुमायूनी दरवाजा आहे. या दुमजली दरवाज्याची दुरुस्ती हुमायूनने केली असं म्हणतात. आज इथे लाईट आणि साउंड शोची जागा आहे.


उत्तर टोकाला असलेला तलाकी दरवाजा दुमजली आणि वर छत्री असलेला आहे. या नावाचा शब्दश: अर्थ वापरायला बंदी असलेला असा होतो. हा दरवाजा वापरायला का बंदी होती हे स्पष्ट करु शकतील अशी साधने मात्र उपलब्ध नाहीत.

- Khairul Manzil masjid



किल्ल्याशी संबंधित दोन वास्तू पाहायला आपल्याला किल्ल्याच्या मुख्य दारासमोरच्या रस्त्यापलीकडे जावं लागतं. सर्वप्रथम समोरच दिसते ती खैरुल मंजिल मशीद. मधल्या कमानीच्या दर्शनी भागावर कोरलेल्या लेखानुसार ही बांधली माहम अंगानी म्हणजे अकबराच्या दूध आईने. जर जोधा अकबर चित्रपट पाहिला असेल तर इला अरुणने हे पात्र रंगवलं आहे. मशिदीला लागून जे बांधकाम दिसते ते मदरशाचे आहे. तिथूनच पुढे गेल्यावर दिसतो शेरशहा दरवाजा किंवा लाल दरवाजा. पण सध्या त्याची डागडुजी सुरु असल्याने तो पर्यटकांना खुला नाही.


किल्ल्यासमोर एक छोटासा तलाव आहे तिथून तटबंदीचे सुंदर दृश्य दिसते आणि बुरुजांवरच्या छत्र्या नीट दिसतात. पुढच्या वेळेला जाऊ दिल्लीच्या पाचव्या शहरात म्हणजे फिरोजशाह कोटला किल्ल्यात. मी क्रिकेट मॅचच्या प्रक्षेपणाचं काम करायला तिथं अनेकदा गेलो आहे पण ते मैदानात! किल्ल्याला भेट देणं बाकी आहे अजून! पुढच्या दिल्ली दौऱ्यात नक्की …
लाल कोट ते कुतुब मिनार (शहर पहिले)
राजधानी दिल्लीला म्हणतात शहरों का शहर … गेल्या हजार वर्षांत विविध शासकांनी इथं शहरं वसवली. वेगवेगळी नावं .. विविध रचना आणि त्याचा रोचक असा इतिहास. या ब्लॉगमालिकेतून आपण दिल्लीच्या सात शहरांचा इतिहास जाणून घेणार आहोत. यापूर्वी या ब्लॉगवर शाहजहानाबाद आणि तुघलकाबाद बद्दल लिहीलं आहे. शाहजहानाबाद म्हणजे आजची पुरानी दिल्ली जिथं लाल किल्ला आणि जामा मस्जिद आहे… हे दिल्लीचं सातवं शहर … घियासुद्दीन तुघलकने वसवलेलं तुघलकाबाद हे तिसरं शहर ते सुद्धा या ब्लॉगवर तुम्हाला सापडेल. आज आपण वेध घेणार आहोत दिल्लीतल्या पहिल्या शहराचा. तोमर शासकांनी लाल खडकांच्या तटबंदीने उभा केला तो लाल कोट हा दिल्लीचा जुना ‘लाल किला’. किला हा फार्सी शब्द आहे. पूर्वी या ठिकाणाला दुर्ग राय पिठोरा म्हंटले गेले. आज या तटबंदीचे अवशेष मेहरौली, साकेत, कुत्ब कॉम्प्लेक्स वसंत कुंज या भागात पाहता येतात

.तोमर शासक अनंगपाल प्रथमने ७३१ CE मध्ये दिल्ली शहरात आपली राजधानी वसवली. त्याला पुढे तटबंदी निर्माण करण्यात आली शेवटचा तोमर शासक अनंगपाल दुसऱ्याकडून. पुढे चौहान शासकांनी तोमरांना पराभूत करून दिल्लीवर वर्चस्व निर्माण केले. लाल कोटाच्या तटबंदीत भर घालून किला राय पिथौरा बांधला गेला.

कुत्ब मिनारजवळच संजय वनमध्ये जाऊन हे अवशेष पाहणे शक्य आहे. भाग थोडासा दुर्गम आहे. त्यामुळे एकट्याने जाणे टाळावे. सकाळी बरेच लोक इथं धावायला येतात त्यामुळे वर्दळ असते. झुडपांतून जाताना किडे आणि सापांची काळजी घेतली पाहिजे. फुलपॅण्ट व बूट घालून जाणे उत्तम. एक मजला उंच आणि साधारण २० फूट रुंद असलेला तटबंदीचा अवशेष मी पाहिला. काही अंतर या तटबंदीवरच्या पायवाटेने चालत जाता येते. पलीकडे दिसतो कुतुब मिनार. ज्याची निर्मिती केली महमूद घुरी म्हणजे मुईझुद्दीन इब्न समच्या बरोबर आलेल्या व गुलाम घराण्यातील पहिल्या शासकाने म्हणजे कुतबुद्दीन ऐबकने.

मामलूक घराण्याच्या शासकांनी लगेच नवे शहर वसवले नाही. उलट लाल कोट भागातील बांधकामे, मंदिरे पाडून त्यांचं शहर वसवलं. साधारणपणे अल्लाउद्दीन खिलजीच्या काळापर्यंत या शहराला महत्त्व होते. कुत्ब मिनार परिसर पाहताना या संपूर्ण काळाचे दर्शन होते. ११९२ CE ला पृथ्वीराज चौहानचा पराभव करून दिल्लीवर मोहम्मद घुरीने राज्य स्थापन केले व आपला विश्वासू गुलाम कुतुबुद्दीन ऐबकला शासक म्हणून नेमले. पुढे १२०६ मध्ये मोहम्मदाच्या मृत्यनंतर ऐबकाने स्वतःला सुलतान घोषित केले व मामलूक म्हणजे गुलाम घराण्याची सुरुवात झाली. पुढे अल्लाउद्दीन खिलजीने सिरी शहराची बांधणी १३०३ च्या सुमारास केली. तोपर्यंतचा प्रवास विविध पुरातन वास्तूंच्या माध्यमातून पाहणे शक्य आहे.



कुत्ब मिनार आता मेट्रो स्टेशन आहे तिथून बॅटरीवली रिक्षा १० रुपयांत आपल्याला कुत्ब संकुलाजवळ आणून सोडते. तिकीट काढून आत शिरताच आपल्याला एक सुंदर दार दिसते. ते मंत्र मुघल काळात बांधलेले आहे. पुढे आल्यावर आपण प्रवेश करतो एका मशिदीच्या प्रांगणात. कुवत-उल-इस्लाम म्हणजे इस्लामचं सामर्थ्य असे नाव या मशिदीला ऐबकाने दिले. गमतीचा भाग असा की जवळजवळ २७ हिंदू व जैन मंदिरे पाडून जी साधन सामग्री मिळाली ती एकत्र करूनच इस्लामच्या सामर्थ्याला जन्म दिला गेला. त्यामुळे एकाच ठिकाणी शैव/ वैष्णव/ जैन सर्व प्रकारचे कोरीव काम पाहता येते. काही ठिकाणी जुन्या शिल्पांमध्ये जिथं मानवी आकृत्या होत्या त्या मुद्दाम विद्रुप केलेल्या दिसतात.
ऐबकाचा बखरकार हसन निझामी म्हणतो – मूर्तिपूजक आणि मूर्तींना ध्वस्त करण्याच्या संकेताला धरून ऐबकाने मंदिरे पाडली आणि जेत्याप्रमाणे एक ईश्वर (अल्लाह) मानणाऱ्या लोकांची मशीद उभी राहिली (पृष्ठ ५२ पुरातत्व विभाग विश्व वारसा मालिका माहितीपुस्तक)
या खांबांची भूमिती भुरळ पडावी इतकी आकर्षक आहे. त्यात विविध कोनातून डोकावणारे प्रकाशकिरण आणि सावल्या अजून गंमत निर्माण करतात. पुढे आपण येतो ऐबक आणि शमसुद्दीन इल्तुतमिशने बांधलेल्या स्क्रीनकडे. ही दोन बांधकामं विविध काळातील विविध रचनाशैलींबद्दल आपल्याला बरंच काही सांगतात आणि हिंदू-मुस्लिम रचनापद्धतीचा विकास कसा झाला याची कल्पना आपल्याला येते.



कुतुबुद्दीन ऐबकाने बांधलेल्या कमानींवरील कोरीव काम हिंदू कारागिरांनी इस्लामी मुकादमांच्या हाताखाली बांधलेले आणि कोरलेले आहे. त्यामधील सर्पाकृती वेलबुट्टी हिंदू तर त्यातून बहरलेली फुले इस्लामी धाटणीची आहेत. अरेबिक लिपीत कोरलेल्या आयतीसुद्धा अगदी सरळ साध्या पद्धतीने कोरलेल्या दिसतात.






इल्तुतमिशच्या काळात झालेल्या कोरीवकामावर इस्लामी शैलीची छाप जास्त स्पष्टपणे दिसते. कूफिक आणि तुघरा या दोन्ही शैलीची कॅलिग्राफी आणि भारताच्या पश्चिमेला पार स्पेनपर्यंत दिसणाऱ्या सारासेनिक वळणाचे कोरीव काम आपल्याला इथं दिसून येईल. असा दावा केला जातो की भारतात कमानी बांधायला किस्टोन आणि विशिष्ट आकाराच्या दगडांची रचना केली जात नसे त्यामुळे त्या कमानी कॉर्बेल पद्धतीने बांधल्या जात – ज्यात दगड पायऱ्यांप्रमाणे रचून मग गोल आकारात कोरले जात. कुतुब मिनारजवळ मेहरौलीत बल्बनच्या मकबऱ्यात प्रथम खऱ्या कमानीचा वापर केला गेला असा दावा काही अभ्यासक करतात. काही याला चूक मानतात… दोन्ही बाजूंचे पुरावे पाहणे मजेशीर ठरेल. इल्तुतमिश आणि खिलजी दोघांनी या मशिदीचा विस्तार केला आणि मग कुत्ब मिनारही कुव्वत उल इस्लामच्या सीमेच्या आत आला.



इल्तुतमिश आणि ऐबकाच्या स्क्रिनसमोर आपल्याला दिसतो एक काळा लोखंडी स्तंभ. चौथ्या शतकात हा स्तंभ एखाद्या विष्णूच्या मंदिराचा भाग म्हणून बांधला गेला असावा आणि विष्णूचे वाहन गरुड त्यावर स्थापित करण्यात आले असावे असा कयास बांधता येतो. या स्तंभावर गुप्त शैलीच्या लिपीत कोरलेल्या लेखावरून स्पष्ट होते की चौथ्या शतकात चंद्रगुप्त दुसरा या राजाच्या काळात विष्णुपद नावाच्या ठिकाणी हा ध्वजस्तंभ उभा केला गेला असावा. अनंगपाल तोमरने हा दुसऱ्या स्थानातून इथे आणला अशी मान्यता आहे कारण इतर कोणतेही समकालीन गुप्त अवशेष कुतुब परिसरात दिसत नाहीत. अनेक शतकं लोटलेली असूनही हा स्तंभ गंजला नाही. सर रॉबर्ट हाडफिल्ड यांनी केलेल्या रासायनिक तपासणीप्रमाणे या स्तंभात ९९.७२०% शुद्ध लोखंड आहे. वैज्ञानिकांनी असाही निष्कर्ष काढलाय की हे काम साच्यातील नसून फोर्ज केलेल्या लोखंडाचे आहे – संदर्भ जे पेज गाईड टू कुत्ब आणि ASI माहिती पुस्तक पण क्रमांक ५७ थोडक्यात काय तर चौथ्या शतकात भारतात उत्कृत्ष्ट दर्जाचं लोखंड ओतलं जाऊ शकत होतं. भारतीय पारंपरिक विज्ञानात शिकण्याजोगं बरंच काही आहे पण त्यासाठी वैदिक विमाने उडवण्याऐवजी असे चोख पुरावे एकत्र करावे लागतील. नाहीतर तेजोमहालयाच्या भाकडकथांसारखं व्हायचं!


हा स्तंभ मध्य प्रदेशातील विदिशाजवळ असलेल्या उदयगिरीहून आणला गेला असावा असं काही अभ्यासक मानतात. हा जग जिंकणाऱ्या राजाचा विष्णुभक्त राजाचा कीर्ती-स्तंभ आहे हे वाचून अल्लाउद्दीन खिलजीसारख्या महत्त्वाकांक्षी सुलतानाने काय विचार केला असेल असा प्रश्न पडतो.
अफगाण सुलतान जिथून आले त्या गझनीजवळ कुतुब मिनारासारखेच मिनार आहेत. पश्चिम अफगाणिस्तानात जामचा मिनार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिनार कुतुब मिनारच्या 10 वर्षे आधी बांधला गेला असावा आणि त्यातूनच कुतुबुद्दीन ऐबकाला कुत्ब मिनार बांधण्याची कल्पना सुचली असावी असं म्हणता येईल. जामचा मिनार गझनवीद राज्यावर विजय मिळाला म्हणून बांधला गेला आणि त्याची उंची ६० मीटर आहे. हा मिनार घुरींना पृथ्वीराजवर विजय मिळाला म्हणून बांधला असेही काही ब्रिटिश पुरातत्ववेत्ते मानतात.
७० मीटरपेक्षा अधिक उंचीचा कुत्ब मिनार दक्षिण दिल्लीत अनेकदा क्षितिजावर दिसतो. ११९९ CE मध्ये बांधकामाला सुरुवात केली कुतुबुद्दीन ऐबकने तर पूर्ण झाला असावा अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात … खिलजीने स्वतः असा अजून एक मिनार बांधायचा प्रयत्न सुरु केला ज्याचं नाव होतं अल्ला-इ-मिनार. पण सुमारे २५ मीटर बांधकाम झाल्यावर खिलजी मरण पावला असावा आणि मग हा प्रकल्प गुंडाळून ठेवला गेला.

या मिनारच्या तीन टप्प्यांवर कोरीव काम आणि बाल्कनी आहे.stalactite vaulting (ज्याला अरेबिकमध्ये मोकाराब किंवा मुकारना म्हणतात) या पद्धतीचा वापर करून हे छज्जे बांधलेले आहेत. पुढे तीनदा या मिनारावर वीज पडली व पुन्हा पुन्हा अगदी फिरुज शाह तुघलकच्या काळापर्यंत याची दुरुस्ती करावी लागली. लोधी शासकांच्या काळातही दुरुस्ती केली जाऊन संगमरवरासारखे नवे पैलू जोडले गेले असावेत.





मिनारच्या कोरीवकामात आपल्याला नक्ष पद्धतीच्या अक्षरांची सजावट दिसते. पूर्वी या मिनारच्या शीर्षावर असलेल्या जुन्या कपोलाचे (शिखराच्या डोमचे)१८०३ CE मध्ये झालेल्या भूकंपात नुकसान झाल्यामुळे मेजर स्मिथने कपोला बांधला. तेव्हा १७००० रुपयांचे बजेट त्यासाठी देण्यात आले. पण इंडो-सॅरसेनिक शैलीच्या मिनारावर हा बंगाली छत्री पद्धतीचा कपोला विजोड वाटू लागला आणि लॉर्ड हार्डिंजने तो कपोला काढून बसवला बागेत. त्याला आज स्मिथची फॉली (चूक) म्हणून ओळखले जाते.




शमसुद्दीन इल्तुतमिशचा मकबराही याच आवारात आहे. सुंदर कोरीवकाम पण घुमट कोसळल्याने खुल्या आकाशाखाली असलेली कबर असा इथला देखावा. या मकबऱ्याला तीन मेहराबी आहेत. अरेबिक पद्धतीची फुलांची नक्षी सर्व भिंतींवर कोरलेली दिसते आणि काही ठिकाणी हिंदू शैलीचे मोटिफ असणारी वेलबुट्टीही दिसते. squinch पद्धतीच्या कमानी हे या मकबऱ्याचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येईल.






इथं असलेला अजून एक मकबरा म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीचा मकबरा व त्याला जोडून असलेला मदरसा. मुख्य मकबऱ्याचा घुमट कोसळलेला दिसतो पण मदरशावरील घुमट शाबूत आहेत. हिंदू शैलीच्या कोनिकल डोमपेक्षा हे घुमट गोल पेंडेंटिव्ह पद्धतीने बांधलेले असल्याने वेगळे दिसतात.. या इस्लामिक शैलीचा वापर इथून पुढे अनेक ठिकाणी दिसतो. खिलजीच्या मकबऱ्याचे काम सेलजुक पद्धतीने झाले असे तज्ज्ञ मानतात. मध्य आशियातील सेलजुक घराणे असत झाल्यावर भारतात तुलनेने स्थिर परिस्थिती असल्याने ते कारागीर कामाच्या, आश्रयाच्या शोधात आले अशी मान्यता आहे.







इमाम जमीनचा मकबरा हा या परिसरातील तिसरा मकबरा. पण हा पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला सिकंदर लोधीच्या कारकिर्दीत बांधला गेला असावा. तुर्कस्तानहून आलेल्या इमाम जमीन उर्फ मोहम्मद अली कडे कुवत-उल-इस्लाम मशिदीमधील महत्त्वाचे अधिकारपद असावे म्हणून त्याच्या कबरीला तिथं जवळ स्थान मिळालं असावं असा कयास आहे. स्टुको किंवा जाळीकामाचे सुंदर नमुने आपल्याला तिथं पाहता येतात. लाल वालुकाश्म आणि संगमरवर यांचा मिलाफ आपल्याला दिसतो.



उंच कुतुबमिनार प्रसिद्ध आहे त्याच्या पायथ्याशी असलेल्या दरवाजाकडे लोकांचं लक्ष तितकंसं जात नाही. अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात हा दरवाजा बांधण्यात आला म्हणून याचे नाव अल्लाह-इ-दरवाजा. या दरवाजाचे कोरीव काम इतके सुंदर आहे की फक्त हा दरवाजाच एक पुरातन वास्तू म्हणून अभ्यासावा लागेल. इस्लामिक रचनापद्धतीची कलाकुसर, समतोलता, भौमितीय अचूकपणा आणि त्याच्या जोडीला हिंदू-जैन पद्धतीचे मोटिफ. कमळाच्या कळ्यांचे तोरण दरवाजाच्या सर्व कमानींना सजावट देते. दरवाजाच्या आतील व बाहेरील कोरीवकाम खरोखर शब्दांच्या पलीकडचं आहे.







कुतुब मिनारची कुवत उल इस्लाम मशीद बांधताना हिंदू-जैन मंदिरे पडून त्याचे स्तंभ वापरले गेले हा अधिकृत इतिहास आहे .. पण तरीही वास्तू म्हणून किंवा मटेरियल कल्चरच्या दृष्टीने कुतुब मिनार हा महत्त्वाचा वारसा आहेच भारताचा. वेरूळचे दशावतार लेणे बौद्ध गुंफेला वापरून कोरले गेले या आधारावर आज वेरूळला नावं ठेवणार का? जरी गोव्यातील देवालये तोडून चर्चेस बांधली गेली तरीही ओल्ड गोवा चर्चेज हा भारताचाच काय विश्व वारसा आहेच. उद्या इंडोनेशिया मुस्लिम बहुल आहे म्हणून तिथल्या हिंदू मंदिरांचा विरोध केलेला किंवा कंबोडियात कशाला मंदिर पाहिजे म्हणून अंगकोर वाटचा विरोध केला तर आपल्याला पटेल का? इतिहास तर वस्तुनिष्ठपणे अभ्यासायला हवाच पण पुरातन वास्तू म्हणजे काही फक्त ऐतिहासिक वारसा नव्हे … तो आपल्या देशाचा डिझाईनचा, कलेचा, मूर्त संस्कृतीचा वारसा आहे आणि तो कोणत्याही उपासना पद्धतीशी जोडलेला असला तरीही जपायला हवा असं मला वाटतं … याची दुसरी बाजू ही फक्त मुघल गोष्टींना हाइप केले जाणे ही सुद्धा आहे. हिंदू सोडा दिल्लीत अनेक इतर मुसलमान शासकानी बांधलेल्या अनेक इमारती आहेत पण त्या दुर्लक्षित आहेत त्याचा शोध घेताना पुढच्या वेळेला आपण जाऊ शेरशहा सूरच्या काळात शेरगढ शहर पाहायला.
the old fort

Bada Darwaja or the great door greets us with geometric splendour … Jharokhas and chhatris are key aesthetic elements here. This is the sixth city of Delhi – Shergarh or Purana Qila. It is believed that the fort stands on what was known as the Indraprastha during the Mahabharat era. Sher Shah Suri destroyed the Dinapanah city built by Humayun to build his own capital city.



During an excavation carried out in 1912-13 a village named Indrapat was cleared… later in another excavation conducted in the 60s grey ware dated 3000 BCE was found .. Relics from several other eras were found too .. Mauryan, Sunga, Shak-Kushana, Gupta, Rajput, Sultanate and mughal … artifacts from almost every documented period were found.









One of the few monuments from this fort that have survived the test of times is the Qila-I-Kuhna mosque. We can see a 51×15 mtr prayer hall here. Five arches with richly decorated central arch and beautiful dome gives this monument a fine visual balance. This mosque is considered important because we can see the transition between Lodhi architecture to Mughal design here. We can see several parallels with the Bada Gumbad mosque and Jamali Kamali mosque … especially corner towers and oriel windows. This mosque was built in 1541 CE by Sher Shah Suri. Lotus bud decoration and mihrabs with concentric arches are exhibits of extraordinary skills the makers possessed.

Sher Shah Suri built the Sher Mandal for perhaps recreational purpose. We can see recessed arches and plaster decoration on this octagonal structure. It is believed that Humayun used this building as his personal library and fell from the stairs of the pleasure tower in 1556 CE.

Right in front of Sher Mandal we can see Hamam … luxury bathing area with hot, cold and steam bath facility … it is roughly 3.25 square meter in size.

Among many baolis or step wells in Delhi, this one at the old fort has a unique shape. One needs to go down 89 steps or about 22 meters to reach the base. The overall design is aimed at reducing water loss by evaporation.


Humayuni Darwaja is the southern gateway. It was repaired by Humayun and today it hosts the light and sound show at the fort. It is a two storeyed gate with elaborate rubble structures and fortifications around it.


The southern gateway too is two storeyed and we can see the typical jharokhas and chhatris here too. This door was known as the Talaqi Darwaja or the forbidden gate. However, we do not know the accurate reason behind this nomenclature.

- Khairul Manzil masjid



We have to cross the street in front of the Bada Darwaja to see the two important monuments related to this site. Near the traffic light we see a mosque … the Khairul Manzil mosque built by Maham Anga (Akbar’s wet nurse) We can also see a Madarasa adjacent to the mosque. A few steps northwards we can spot the grand red sandstone gateway known as the Lal Darwaja or the Sher Shah gate. It is currently under conservation and therefore out of bounds for the tourists.


One must not miss the lakeside view of the fort … it is a good vantage point to see the rubble wall and the grandeur of the fortifications. If you take a cycle ride or walk northwards for a couple of kilometers you will spot the fifth city of Delhi … the Firoz Shah Kotla Fort … A story we shall reserve for some other day …
lal kot to qutb minar
Delhi is a city of cities. Several rulers established different cities in different era in this region… different names, different design ethos and diverse history. In this blog series we will try to explore the history and grandeur of the seven cities of Delhi. Earlier on this blog we have explored Tughlaqabad the third city and Shahjahanabad (Area that contains Red fort and Jami Masjid) – the seventh city. Today we will deep dive into 8th century to know more about the first city of Delhi – Lal Kot. Tomar rulers built this rubble wall with red sandstone in the eighth century, which was later expanded by the Chauhans and renamed Qila Rai Pithora. Qila is Farsi word and locally the fort was called Durg Rai Pithora. Today the ruins of this fort can be found in Mehrauli, Saket, Qutb complex and Vasant Kunj area.

Tomar king Anangpal first established his capital in 731 CE in Delhi, the last Tomar ruler Anangpal II built the rubble was around this city. Later Chauhans defeated Tomars to take control of the fort and Gadh Rai Pithora was built by expanding the Lal Kot.

One needs to go to Sanjay Van reserved forest to see the ruins of Lal Kot. Best visited in the morning because there are many joggers in the area.. later it gets deserted. One must be careful about insect bites and snakes… Full pants and shoes are a must. I think the wall is about 15 feet high and 20 feet wide. One can walk on the wall and catch a glimpse of the Qutb minar visible on the horizon. The largest stone tower in India built by Qutubuddin Aibak – the first ruler in the Mamluk dynasty.

The Mamluks did not immediately build any new city. They destroyed existing monuments and buildings in the area and recycled the material to build whatever they needed. Prithviraj Chauhan was defeated in 1192CE by Muizuddin Ibn Sam or Ghuri Mohammed and left his confidante slave Qutubuddin Aibak to administer the newly annexed area. After Muizuddin’s death in 1206CE Aibak declared himself a Sultan and Mamluk dynasty or slave dynasty was established. This area remained important till Allauddin Khilji established Siri Fort – the second city of Delhi in 1303 CE.



Qutub minar is a metro station now… battery operated Rickshaws bring you to the complex in just Rs. 10… We see a beautiful arched door as we enter but it belongs to a mughal era and it is a later addition. We enter the court of a beautiful perhaps one of the oldest mosques in India – Quwwat-Ul-Islam masjid. Almost 27 Jain-Hindu temples were demolished by Ghurid army and the material recovered after these demolitions was used to build the might of Islam. Interestingly one can see an eclectic mix of Shaiva/ Vaishnav/ Jain iconography in the courtyard. At some places human figures have been disfigured.
The conqueror destroyed the images of god and idol worship as per the custom and a grand mosque was built for the worshippers of one god – Hasan Nizami, Aibak’s court writer (Reference p.52 World heritage Series Qutub Minar, ASI
The symmetry and rhythm of the colonnade is attractive. Sun rays coming in different angles interact with the columns and create shadows. Then we proceed to the screens built by Aibak and Iltutmish. These two were constructed in two different eras and in two different styles. They tell us a lot about the evolution of Indo-Islamic architecture.



Aibak’s screen shows the work of Hindu artisans working under the supervision of Islamic designers. The serpentine pattern is Hindu and the floral blossoming is distinctly Islamic. Koranic verses have been calligraphed in a simple script pattern.






The Iltutmish screen is more richly decorated and very prominently Islamic in patterns. It contains Kufic and Tughra styled calligraphy and Saracenic work that can be found from India to Spain. IT is claimed that pure arch was brought to India by Islamic architects. Earlier Indian arches were corbelled arches. Earlier on this blog we have explored the Mehrauli archaeological park – home to Balban’s tomb where the first true arch in India was built. Many historians have disputed this claim and it would be interesting to see the other side. Iltutmish and Khilji expanded the mosque and even the Qutub minar now came inside the boundary of the mosque.



We can see a black Iron pillar in front of the Aibak’s screen. This was built for a Vishnu temple in the 4th century CE and perhaps Garuda was perched on the pillar. Gupta styled script on the pillar describes that it was created for Vishnupada in the reign of King Chandra Gupta the second. Anangpal Tomar brought this pillar from somewhere else because no other relic from the same era can be found in the Qutb complex. Even after several centuries the Iron pillar remains free from rusting. According to a test done by Sir Robert Hadfield about 99.72% of the pillar is pure iron. J Page says in his book that tests have proven that it was forged by a very advanced metallurgical process.


A few researchers feel that this pillar was brought from Udaygiri near Vidisha in present day Madhya Pradesh. I wonder what must have come to Allauddin Khilji’s ambitious mind that this pillar belonged to a victorious King..
Near Ghazni in Afghanistan there are minarets similar to the Qutb Minar. In Western Afghanistan minaret of Jam was built 10 years before Qutb minar and this perhaps inspired Qutubuddin Aibak to build his version of the victory tower. For some scholars the Minaret of Jam stood for the Ghuri victory of Ghazanvids and for some it commemorated Muizuddin’s victory over Prithviraj.
The Qutub Minar is more than 70 meters in height and visible clearly on the horizon in South Delhi. the construction started by Aibak in 1199 CE and it was completed during Allauddin Khilji’s reign. Khilji tried to build a minaret twice in height compared to the Qutub minar by barely over 24 meters in height the project was abandoned after Khilji’s death.

There are rich decorations on all the three stages of Qutub minar… especially the balconies made by Stalactite vaulting (known as Moracade or Muqarna in Arabic) The tower was struck by lightening three times and it was repeatedly repaired by Firoz Shah Tughlaq and Lodi rulers as well … who perhaps added element of marble to the red sandstone and buff monument.





We can see Naksh calligraphy on the Minar. Earlier Firoz Tughlaq built a cuppola on the top of the minar which was damaged during 1803CE earthquake. Major Smith was sanctioned Rs. 17000/- to replace the cuppola with new design. He built a Bengal chhatri styled cuppola which looked out of place on an Indo-Saracenic tower. Lord Hardinge later removed this and kept it in the garden.




Under deep blue sky opened up due to a collapsed dome we can see the grave of Iltutmish with rich, ornate motifs on the walls and squinch styled arches. While the design largely is Arabesque, we can see some Hindu motifs too.






Another important tomb here is the tomb of Allaudin Khilji. Though the main dome has collapsed we can see domes made by pendentive method on the Madarasa.. a style used in several monuments in India here on. Experts believe that Seljuq artisans designed the Maqbara of Allauddin Khilji. These artisans moved to India in the 15th century when the Seljuq dynasty collapsed…. looking for work in a relatively stable country like India.







Imam Zamin’s tomb is another important building of the complex. This cleric was perhaps an important office holder at the mosque and had come from Turkey. We can see beautiful stucco work in this monument. Beautiful mix of red and white.



Ala-I-Darwaja is beyond verbal description. Islamic geometry and free flowing Hindu motifs define this monument.







There is a lot to explore beyond Mughal era monuments … the first city of Lal Kot and Qutb Minar are a fine example of collaboration. In the next blog we will explore the Sher Gadh or Purana Qila. … keep watching this space.
लाल कोट ते कुतुब मिनार (शहर पहिले)
राजधानी दिल्लीला म्हणतात शहरों का शहर … गेल्या हजार वर्षांत विविध शासकांनी इथं शहरं वसवली. वेगवेगळी नावं .. विविध रचना आणि त्याचा रोचक असा इतिहास. या ब्लॉगमालिकेतून आपण दिल्लीच्या सात शहरांचा इतिहास जाणून घेणार आहोत. यापूर्वी या ब्लॉगवर शाहजहानाबाद आणि तुघलकाबाद बद्दल लिहीलं आहे. शाहजहानाबाद म्हणजे आजची पुरानी दिल्ली जिथं लाल किल्ला आणि जामा मस्जिद आहे… हे दिल्लीचं सातवं शहर … घियासुद्दीन तुघलकने वसवलेलं तुघलकाबाद हे तिसरं शहर ते सुद्धा या ब्लॉगवर तुम्हाला सापडेल. आज आपण वेध घेणार आहोत दिल्लीतल्या पहिल्या शहराचा. तोमर शासकांनी लाल खडकांच्या तटबंदीने उभा केला तो लाल कोट हा दिल्लीचा जुना ‘लाल किला’. किला हा फार्सी शब्द आहे. पूर्वी या ठिकाणाला दुर्ग राय पिठोरा म्हंटले गेले. आज या तटबंदीचे अवशेष मेहरौली, साकेत, कुत्ब कॉम्प्लेक्स वसंत कुंज या भागात पाहता येतात

.तोमर शासक अनंगपाल प्रथमने ७३१ CE मध्ये दिल्ली शहरात आपली राजधानी वसवली. त्याला पुढे तटबंदी निर्माण करण्यात आली शेवटचा तोमर शासक अनंगपाल दुसऱ्याकडून. पुढे चौहान शासकांनी तोमरांना पराभूत करून दिल्लीवर वर्चस्व निर्माण केले. लाल कोटाच्या तटबंदीत भर घालून किला राय पिथौरा बांधला गेला.

कुत्ब मिनारजवळच संजय वनमध्ये जाऊन हे अवशेष पाहणे शक्य आहे. भाग थोडासा दुर्गम आहे. त्यामुळे एकट्याने जाणे टाळावे. सकाळी बरेच लोक इथं धावायला येतात त्यामुळे वर्दळ असते. झुडपांतून जाताना किडे आणि सापांची काळजी घेतली पाहिजे. फुलपॅण्ट व बूट घालून जाणे उत्तम. एक मजला उंच आणि साधारण २० फूट रुंद असलेला तटबंदीचा अवशेष मी पाहिला. काही अंतर या तटबंदीवरच्या पायवाटेने चालत जाता येते. पलीकडे दिसतो कुतुब मिनार. ज्याची निर्मिती केली महमूद घुरी म्हणजे मुईझुद्दीन इब्न समच्या बरोबर आलेल्या व गुलाम घराण्यातील पहिल्या शासकाने म्हणजे कुतबुद्दीन ऐबकने.

मामलूक घराण्याच्या शासकांनी लगेच नवे शहर वसवले नाही. उलट लाल कोट भागातील बांधकामे, मंदिरे पाडून त्यांचं शहर वसवलं. साधारणपणे अल्लाउद्दीन खिलजीच्या काळापर्यंत या शहराला महत्त्व होते. कुत्ब मिनार परिसर पाहताना या संपूर्ण काळाचे दर्शन होते. ११९२ CE ला पृथ्वीराज चौहानचा पराभव करून दिल्लीवर मोहम्मद घुरीने राज्य स्थापन केले व आपला विश्वासू गुलाम कुतुबुद्दीन ऐबकला शासक म्हणून नेमले. पुढे १२०६ मध्ये मोहम्मदाच्या मृत्यनंतर ऐबकाने स्वतःला सुलतान घोषित केले व मामलूक म्हणजे गुलाम घराण्याची सुरुवात झाली. पुढे अल्लाउद्दीन खिलजीने सिरी शहराची बांधणी १३०३ च्या सुमारास केली. तोपर्यंतचा प्रवास विविध पुरातन वास्तूंच्या माध्यमातून पाहणे शक्य आहे.



कुत्ब मिनार आता मेट्रो स्टेशन आहे तिथून बॅटरीवली रिक्षा १० रुपयांत आपल्याला कुत्ब संकुलाजवळ आणून सोडते. तिकीट काढून आत शिरताच आपल्याला एक सुंदर दार दिसते. ते मंत्र मुघल काळात बांधलेले आहे. पुढे आल्यावर आपण प्रवेश करतो एका मशिदीच्या प्रांगणात. कुवत-उल-इस्लाम म्हणजे इस्लामचं सामर्थ्य असे नाव या मशिदीला ऐबकाने दिले. गमतीचा भाग असा की जवळजवळ २७ हिंदू व जैन मंदिरे पाडून जी साधन सामग्री मिळाली ती एकत्र करूनच इस्लामच्या सामर्थ्याला जन्म दिला गेला. त्यामुळे एकाच ठिकाणी शैव/ वैष्णव/ जैन सर्व प्रकारचे कोरीव काम पाहता येते. काही ठिकाणी जुन्या शिल्पांमध्ये जिथं मानवी आकृत्या होत्या त्या मुद्दाम विद्रुप केलेल्या दिसतात.
ऐबकाचा बखरकार हसन निझामी म्हणतो – मूर्तिपूजक आणि मूर्तींना ध्वस्त करण्याच्या संकेताला धरून ऐबकाने मंदिरे पाडली आणि जेत्याप्रमाणे एक ईश्वर (अल्लाह) मानणाऱ्या लोकांची मशीद उभी राहिली (पृष्ठ ५२ पुरातत्व विभाग विश्व वारसा मालिका माहितीपुस्तक)
या खांबांची भूमिती भुरळ पडावी इतकी आकर्षक आहे. त्यात विविध कोनातून डोकावणारे प्रकाशकिरण आणि सावल्या अजून गंमत निर्माण करतात. पुढे आपण येतो ऐबक आणि शमसुद्दीन इल्तुतमिशने बांधलेल्या स्क्रीनकडे. ही दोन बांधकामं विविध काळातील विविध रचनाशैलींबद्दल आपल्याला बरंच काही सांगतात आणि हिंदू-मुस्लिम रचनापद्धतीचा विकास कसा झाला याची कल्पना आपल्याला येते.



कुतुबुद्दीन ऐबकाने बांधलेल्या कमानींवरील कोरीव काम हिंदू कारागिरांनी इस्लामी मुकादमांच्या हाताखाली बांधलेले आणि कोरलेले आहे. त्यामधील सर्पाकृती वेलबुट्टी हिंदू तर त्यातून बहरलेली फुले इस्लामी धाटणीची आहेत. अरेबिक लिपीत कोरलेल्या आयतीसुद्धा अगदी सरळ साध्या पद्धतीने कोरलेल्या दिसतात.






इल्तुतमिशच्या काळात झालेल्या कोरीवकामावर इस्लामी शैलीची छाप जास्त स्पष्टपणे दिसते. कूफिक आणि तुघरा या दोन्ही शैलीची कॅलिग्राफी आणि भारताच्या पश्चिमेला पार स्पेनपर्यंत दिसणाऱ्या सारासेनिक वळणाचे कोरीव काम आपल्याला इथं दिसून येईल. असा दावा केला जातो की भारतात कमानी बांधायला किस्टोन आणि विशिष्ट आकाराच्या दगडांची रचना केली जात नसे त्यामुळे त्या कमानी कॉर्बेल पद्धतीने बांधल्या जात – ज्यात दगड पायऱ्यांप्रमाणे रचून मग गोल आकारात कोरले जात. कुतुब मिनारजवळ मेहरौलीत बल्बनच्या मकबऱ्यात प्रथम खऱ्या कमानीचा वापर केला गेला असा दावा काही अभ्यासक करतात. काही याला चूक मानतात… दोन्ही बाजूंचे पुरावे पाहणे मजेशीर ठरेल. इल्तुतमिश आणि खिलजी दोघांनी या मशिदीचा विस्तार केला आणि मग कुत्ब मिनारही कुव्वत उल इस्लामच्या सीमेच्या आत आला.



इल्तुतमिश आणि ऐबकाच्या स्क्रिनसमोर आपल्याला दिसतो एक काळा लोखंडी स्तंभ. चौथ्या शतकात हा स्तंभ एखाद्या विष्णूच्या मंदिराचा भाग म्हणून बांधला गेला असावा आणि विष्णूचे वाहन गरुड त्यावर स्थापित करण्यात आले असावे असा कयास बांधता येतो. या स्तंभावर गुप्त शैलीच्या लिपीत कोरलेल्या लेखावरून स्पष्ट होते की चौथ्या शतकात चंद्रगुप्त दुसरा या राजाच्या काळात विष्णुपद नावाच्या ठिकाणी हा ध्वजस्तंभ उभा केला गेला असावा. अनंगपाल तोमरने हा दुसऱ्या स्थानातून इथे आणला अशी मान्यता आहे कारण इतर कोणतेही समकालीन गुप्त अवशेष कुतुब परिसरात दिसत नाहीत. अनेक शतकं लोटलेली असूनही हा स्तंभ गंजला नाही. सर रॉबर्ट हाडफिल्ड यांनी केलेल्या रासायनिक तपासणीप्रमाणे या स्तंभात ९९.७२०% शुद्ध लोखंड आहे. वैज्ञानिकांनी असाही निष्कर्ष काढलाय की हे काम साच्यातील नसून फोर्ज केलेल्या लोखंडाचे आहे – संदर्भ जे पेज गाईड टू कुत्ब आणि ASI माहिती पुस्तक पण क्रमांक ५७ थोडक्यात काय तर चौथ्या शतकात भारतात उत्कृत्ष्ट दर्जाचं लोखंड ओतलं जाऊ शकत होतं. भारतीय पारंपरिक विज्ञानात शिकण्याजोगं बरंच काही आहे पण त्यासाठी वैदिक विमाने उडवण्याऐवजी असे चोख पुरावे एकत्र करावे लागतील. नाहीतर तेजोमहालयाच्या भाकडकथांसारखं व्हायचं!


हा स्तंभ मध्य प्रदेशातील विदिशाजवळ असलेल्या उदयगिरीहून आणला गेला असावा असं काही अभ्यासक मानतात. हा जग जिंकणाऱ्या राजाचा विष्णुभक्त राजाचा कीर्ती-स्तंभ आहे हे वाचून अल्लाउद्दीन खिलजीसारख्या महत्त्वाकांक्षी सुलतानाने काय विचार केला असेल असा प्रश्न पडतो.
अफगाण सुलतान जिथून आले त्या गझनीजवळ कुतुब मिनारासारखेच मिनार आहेत. पश्चिम अफगाणिस्तानात जामचा मिनार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिनार कुतुब मिनारच्या 10 वर्षे आधी बांधला गेला असावा आणि त्यातूनच कुतुबुद्दीन ऐबकाला कुत्ब मिनार बांधण्याची कल्पना सुचली असावी असं म्हणता येईल. जामचा मिनार गझनवीद राज्यावर विजय मिळाला म्हणून बांधला गेला आणि त्याची उंची ६० मीटर आहे. हा मिनार घुरींना पृथ्वीराजवर विजय मिळाला म्हणून बांधला असेही काही ब्रिटिश पुरातत्ववेत्ते मानतात.
७० मीटरपेक्षा अधिक उंचीचा कुत्ब मिनार दक्षिण दिल्लीत अनेकदा क्षितिजावर दिसतो. ११९९ CE मध्ये बांधकामाला सुरुवात केली कुतुबुद्दीन ऐबकने तर पूर्ण झाला असावा अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात … खिलजीने स्वतः असा अजून एक मिनार बांधायचा प्रयत्न सुरु केला ज्याचं नाव होतं अल्ला-इ-मिनार. पण सुमारे २५ मीटर बांधकाम झाल्यावर खिलजी मरण पावला असावा आणि मग हा प्रकल्प गुंडाळून ठेवला गेला.

या मिनारच्या तीन टप्प्यांवर कोरीव काम आणि बाल्कनी आहे.stalactite vaulting (ज्याला अरेबिकमध्ये मोकाराब किंवा मुकारना म्हणतात) या पद्धतीचा वापर करून हे छज्जे बांधलेले आहेत. पुढे तीनदा या मिनारावर वीज पडली व पुन्हा पुन्हा अगदी फिरुज शाह तुघलकच्या काळापर्यंत याची दुरुस्ती करावी लागली. लोधी शासकांच्या काळातही दुरुस्ती केली जाऊन संगमरवरासारखे नवे पैलू जोडले गेले असावेत.





मिनारच्या कोरीवकामात आपल्याला नक्ष पद्धतीच्या अक्षरांची सजावट दिसते. पूर्वी या मिनारच्या शीर्षावर असलेल्या जुन्या कपोलाचे (शिखराच्या डोमचे)१८०३ CE मध्ये झालेल्या भूकंपात नुकसान झाल्यामुळे मेजर स्मिथने कपोला बांधला. तेव्हा १७००० रुपयांचे बजेट त्यासाठी देण्यात आले. पण इंडो-सॅरसेनिक शैलीच्या मिनारावर हा बंगाली छत्री पद्धतीचा कपोला विजोड वाटू लागला आणि लॉर्ड हार्डिंजने तो कपोला काढून बसवला बागेत. त्याला आज स्मिथची फॉली (चूक) म्हणून ओळखले जाते.




शमसुद्दीन इल्तुतमिशचा मकबराही याच आवारात आहे. सुंदर कोरीवकाम पण घुमट कोसळल्याने खुल्या आकाशाखाली असलेली कबर असा इथला देखावा. या मकबऱ्याला तीन मेहराबी आहेत. अरेबिक पद्धतीची फुलांची नक्षी सर्व भिंतींवर कोरलेली दिसते आणि काही ठिकाणी हिंदू शैलीचे मोटिफ असणारी वेलबुट्टीही दिसते. squinch पद्धतीच्या कमानी हे या मकबऱ्याचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येईल.






इथं असलेला अजून एक मकबरा म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीचा मकबरा व त्याला जोडून असलेला मदरसा. मुख्य मकबऱ्याचा घुमट कोसळलेला दिसतो पण मदरशावरील घुमट शाबूत आहेत. हिंदू शैलीच्या कोनिकल डोमपेक्षा हे घुमट गोल पेंडेंटिव्ह पद्धतीने बांधलेले असल्याने वेगळे दिसतात.. या इस्लामिक शैलीचा वापर इथून पुढे अनेक ठिकाणी दिसतो. खिलजीच्या मकबऱ्याचे काम सेलजुक पद्धतीने झाले असे तज्ज्ञ मानतात. मध्य आशियातील सेलजुक घराणे असत झाल्यावर भारतात तुलनेने स्थिर परिस्थिती असल्याने ते कारागीर कामाच्या, आश्रयाच्या शोधात आले अशी मान्यता आहे.







इमाम जमीनचा मकबरा हा या परिसरातील तिसरा मकबरा. पण हा पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला सिकंदर लोधीच्या कारकिर्दीत बांधला गेला असावा. तुर्कस्तानहून आलेल्या इमाम जमीन उर्फ मोहम्मद अली कडे कुवत-उल-इस्लाम मशिदीमधील महत्त्वाचे अधिकारपद असावे म्हणून त्याच्या कबरीला तिथं जवळ स्थान मिळालं असावं असा कयास आहे. स्टुको किंवा जाळीकामाचे सुंदर नमुने आपल्याला तिथं पाहता येतात. लाल वालुकाश्म आणि संगमरवर यांचा मिलाफ आपल्याला दिसतो.



उंच कुतुबमिनार प्रसिद्ध आहे त्याच्या पायथ्याशी असलेल्या दरवाजाकडे लोकांचं लक्ष तितकंसं जात नाही. अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात हा दरवाजा बांधण्यात आला म्हणून याचे नाव अल्लाह-इ-दरवाजा. या दरवाजाचे कोरीव काम इतके सुंदर आहे की फक्त हा दरवाजाच एक पुरातन वास्तू म्हणून अभ्यासावा लागेल. इस्लामिक रचनापद्धतीची कलाकुसर, समतोलता, भौमितीय अचूकपणा आणि त्याच्या जोडीला हिंदू-जैन पद्धतीचे मोटिफ. कमळाच्या कळ्यांचे तोरण दरवाजाच्या सर्व कमानींना सजावट देते. दरवाजाच्या आतील व बाहेरील कोरीवकाम खरोखर शब्दांच्या पलीकडचं आहे.







कुतुब मिनारची कुवत उल इस्लाम मशीद बांधताना हिंदू-जैन मंदिरे पडून त्याचे स्तंभ वापरले गेले हा अधिकृत इतिहास आहे .. पण तरीही वास्तू म्हणून किंवा मटेरियल कल्चरच्या दृष्टीने कुतुब मिनार हा महत्त्वाचा वारसा आहेच भारताचा. वेरूळचे दशावतार लेणे बौद्ध गुंफेला वापरून कोरले गेले या आधारावर आज वेरूळला नावं ठेवणार का? जरी गोव्यातील देवालये तोडून चर्चेस बांधली गेली तरीही ओल्ड गोवा चर्चेज हा भारताचाच काय विश्व वारसा आहेच. उद्या इंडोनेशिया मुस्लिम बहुल आहे म्हणून तिथल्या हिंदू मंदिरांचा विरोध केलेला किंवा कंबोडियात कशाला मंदिर पाहिजे म्हणून अंगकोर वाटचा विरोध केला तर आपल्याला पटेल का? इतिहास तर वस्तुनिष्ठपणे अभ्यासायला हवाच पण पुरातन वास्तू म्हणजे काही फक्त ऐतिहासिक वारसा नव्हे … तो आपल्या देशाचा डिझाईनचा, कलेचा, मूर्त संस्कृतीचा वारसा आहे आणि तो कोणत्याही उपासना पद्धतीशी जोडलेला असला तरीही जपायला हवा असं मला वाटतं … याची दुसरी बाजू ही फक्त मुघल गोष्टींना हाइप केले जाणे ही सुद्धा आहे. हिंदू सोडा दिल्लीत अनेक इतर मुसलमान शासकानी बांधलेल्या अनेक इमारती आहेत पण त्या दुर्लक्षित आहेत त्याचा शोध घेताना पुढच्या वेळेला आपण जाऊ शेरशहा सूरच्या काळात शेरगढ शहर पाहायला.
ग्रेटर नॉएडा में आपका स्वागत है !!
आपने ग्रेटर नॉएडा के विषय में जरूर सुना होगा ! औधोगिक इकाइयों के साथ साथ शैक्षिक संस्थान भी यहां बहुत हैं जिनमें से अधिकांश इंजीनियरिंग एण्ड टेक्नोलॉजी तथा मैनेजमेंट के हैं। नॉएडा -ग्रेटर नॉएडा में शिव नादर विश्वविद्यालय, एमिटी विश्वविद्यालय , गलगोटिया विश्वविद्यालय , शारदा विश्वविद्यालय , नॉएडा इंटरनेशनल यूनिवर्सिटी सही एक सरकारी यूनिवर्सिटी गौतम बुद्ध विश्वविद्यालय तथा एक मेडिकल यूनिवर्सिटी भी है। दर्जनों इंजीनियरिंग कॉलेज हैं। इस ग्रेटर नॉएडा में प्रवेश के कई रास्ते हैं - एक दादरी -सूरजपुर होते हुए है। दूसरा नॉएडा -भंगेल सूरजपुर होते हुए , तीसरा नॉएडा -ग्रेटर नॉएडा हाइवे से परी चौक होते हुए और एक है गाज़ियाबाद से यामहा कंपनी होते हुए सूरजपुर गोल चक्कर से। इसी ग्रेटर नॉएडा के एक कोने में मैं अपनी रोजी रोटी कमाता हूँ और गाज़ियाबाद से रोज़ आता जाता हूँ। इस रास्ते पर सूरजपुर एक क़स्बा पड़ता है जिसके पास एक चौक है जिसे घंटा चौक कहते हैं। घंटा चौक इसलिए क्योंकि यहां मायावती के मुख्यमंत्री काल से एक बड़ा सा घण्टा लगाया गया था और इस घंटा के साथ ही बहुत सी पत्थरों की मूर्तियों को लगाया गया था। कहते हैं इस खेल में बड़ा खेल हुआ था और मायावती के स्थान पर अखिलेश सरकार आ गयी ! लेकिन खेल ज्यों का त्यों बना रहा लेकिन कुछ न हुआ न होता है। हमें केवल पत्थर की मूर्तियां दिखानी हैं आपको !
आइये मूर्तियां मेरा मतलब मूर्तियों की तस्वीर देखते हैं :
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() | ||||||
फिर मिलते हैं एक नयी पोस्ट के साथ !!
मिर्ज़ा ग़ालिब की हवेली : दिल्ली
आइये फोटो देखते हैं :
![]() |
![]() |
![]() |
ऊपर का कागज़ दिखाने का मतलब सिर्फ इतना है कि लोग कोई जगह नही छोड़ते गंदा करने से
|
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| ग़ालिब साब का कुर्ता |
![]() |
![]() |
![]() |
| भाईसाब हुक्का का शौक भी रखते थे |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| पाकिस्तान ने इनके नाम पर डाक टिकट भी जारी किया था |
![]() |
![]() |
![]() |
| और ये कनॉट प्लेस में लगा सबसे ऊँचा तिरंगा |
![]() |
| जय हिन्द |































































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.