Wednesday, June 23, 2021

नंदुरबार जिल्ह्याची भटकंती

 इतिहास

धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्हा नव्याने निर्माण झाला आहे. १ जुलै १९९८ पासून हे अस्तित्वात आले. या जिल्ह्याचे मुख्यालय नंदुरबार आहे. या प्रदेशाचे प्राचीन नाव रसिका होते. नंतर यादवांच्या साम्राज्यावर राजानं राजा सेनचंद्र यांच्यावर राज्य केलं. मुस्लिमांच्या आगमनासह, फारुकी राजा  यांना देण्यात आलेली खिताब  खान म्हणून खानदेश नाव बदलण्यात आले होते. खानदेश संपूर्ण क्षेत्र धुळे आणि जळगाव दोन जिल्हे समावेश आहे आणि धुळे येथे मुख्यालय एक जिल्हा म्हणून पाहिली होती. तथापि १९०६ मध्ये प्रशासनिक कारणांसाठी खानदेशला पश्चिम खानदेश आणि पूर्व खानदेश असे दोन जिल्हे विभागण्यात आले. १९५० मध्ये नवीन तहसील अक्कलकुवा तयार करण्यात आला आणि १९५६ मध्ये राज्यांच्या पुनर्रचनेसह हे क्षेत्र मुंबई राज्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आणि त्यानंतर १९६० मध्ये ते महाराष्ट्र राज्याचा एक भाग बनले. असे करताना, नंदुरबार आणि नवापुर तहसीलमधील प्रत्येकी ३८ गावे, तळोदा मधील ४३ गावे आणि अक्कलकुवा तहसीलमधील ३७ गावे गुजरात राज्यामध्ये हस्तांतरीत करण्यात आली. १९७१ च्या जनगणनेत, अक्रानी महलची अक्रानी तहसील म्हणून सुधारीत करण्यात आली. १९६१ मध्ये जिल्ह्याचे नाव पश्चिम खानदेश ते धुली व त्यानंतर धुळे जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून बदलले गेले. जुलै, १९९८ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील निर्माण केल्यानंतर, ९३३ गावे ६ तालुक्याच्या समावेश नंदुरबार जिल्ह्यातील हस्तांतरित करण्यात आले होते. सहा तहसील अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापुर १९९१ च्या जनगणनेनुसार ९३३ गावे होते, जे २००१ च्या जनगणनेनुसार १७ नवीन गावांसह ९५० झाले. २०११ च्या जनगणनेनुसार, गावांची संख्या ९४३  झाली.

प्रशासकीय इतिहास

नंदुरबार हे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर प्रदेशातील (खानदेश प्रदेश) एक प्रशासकीय जिल्हा आहे. 1 जुलै 1 99 8 रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन झाले ज्याला आता धुळे आणि नंदुरबार असे म्हटले जाते. जिल्हा मुख्यालय नंदुरबार शहरात स्थित आहे. जिल्ह्यात 5034 वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचे क्षेत्र आहे आणि त्याची लोकसंख्या 1,311,70 9 आहे, ज्यामधील 15.45% शहरी आहे (2001 प्रमाणे). नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्याने दक्षिण व दक्षिण-पूर्वेस पश्चिमेस आहे आणि उत्तरेकडे गुजरातचा राज्य आहे, उत्तर आणि उत्तर-पूर्वेला मध्य प्रदेश राज्य आहे. जिल्ह्याच्या उत्तर सीमारेषाची व्याख्या महान नर्मदा नदीने केली आहे.

सातपुड्याच्या कुशीतलं, आदिवासींच्या भूमीतलं - नंदुरबार


महाराष्ट्राच्या उत्तरेकडील खानदेशातील नंदुरबार हा जिल्हा धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन अस्तित्वात आला. सातपुड्याच्या डोंगरद-यांत आणि जंगलाच्या सान्निध्यात राहणारे आदिवासी आणि अठरापगड जातींचे व नाना धर्मांचे लोक अशी वस्तीची सरमिसळ तेथे आहे. आदिवासींच्या बोली वेगवेगळ्या आहेत, तशीच त्यांची जीवनशैली वैविध्यपूर्ण आहे. लोकांची गुजराण शेती व जंगलसंपत्ती यांवर होते. औद्योगिक विकासाचे वारे तिकडे शिरलेले नसले, तरी आधुनिक जीवनशैलीने शिरकाव केला आहे. त्यामुळे तेथील आदिवासींच्या जगण्याची कुसही बदलत आहे.

नंदुरबार गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या चिमट्यात अडकलेला आहे. तो जिल्हा म्हणून 2000 च्या दशकात अस्तित्वात आला. जिल्ह्यात नंदुरबार, नवापूर, तळोदा, शहादा, अक्कलकुँवा आणि अक्राणी (धडगाव) असे सहा तालुके आहेत. ब्रिटिशकाळात निजाम स्टेटच्या पश्चिमेला, सह्याद्रीच्या रांगांपर्यंत पसरलेला भूभाग खानदेश म्हणून ओळखला जाई. प्रादेशिक वेगळेपण आणि कारभाराची सोय या करता खानदेशचे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे दोन विभाग केले गेले. पूर्व खानदेश (जळगाव, भुसावळ) हा काळ्या सुपीक मातीचा, तापीच्या खो-याचा भाग. कापूस-केळी यांकरता नावाजलेला. मुंबईला दूधपुरवठा करणारा. तो पश्चिम खानदेशच्या तुलनेत संपन्न, विकसित व पुढारलेला.




पश्चिम खानदेश (धुळेनंदुरबार) क्षेत्रातील तापी नदीच्या खो-याचा भाग सोडला तर सारा भाग डोंगराळ आणि मध्यम प्रतीच्या मातीचा. सातपुड्याचा भाग वगळला तर पावसाचे प्रमाण अल्प. आदिवासींचे बाहुल्य. गुजर पाटील, कुणबी पाटील, रजपूत, परदेशी, धनगर अशा अठरापगड जाती वेगवेगळ्या भागांत विखुरलेल्या आहेत.

कोकण आणि देश यांना वेगवेगळे करणारा आणि दक्षिण भारताच्या हवामानाला वेगळा आयाम देणारा, कन्याकुमारीपर्यंत पसरलेला सह्याद्री, त्याचा पसारा उत्तरेला नंदुरबार जिल्ह्यात, आडव्या आलेल्या तापी नदीच्या दक्षिण तटाशी आवरता घेतो. तापी पूर्व-पश्चिम वाहते. तिच्या उत्तरेकडे नदीला समांतर सातपुड्याचा पर्वत. पलीकडे, महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांची सीमारेषा नर्मदा नदी निश्चित करते. तापी नदीच्या दोन्ही बाजूंनी जिल्ह्याच्या मध्यावर पाचरीसारखा आत घुसला आहे गुजरातचा भूभाग. महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या सीमारेषेवर असणा-या  तापीवरील उकाई धरणाचा जलाशय गुजरातच्या प्रदेशात आहे. उकाई धरणामुळे गुजरातमधील बलसाड व सुरत या दोन जिल्ह्यांत हजारो एकरांचा संपन्न ‘शुगर बेल्ट’ अस्तित्वात आला. नंदुरबार जिल्ह्यात शहादा, नवापूर, तळोदा, नंदुरबार या क्षेत्रातील आदिवासी मजुर दरसाल गुजरातमध्ये ‘जगायला’ स्थलांतरित होतात. सरदार सरोवर धरणाची निर्मितीही महाराष्ट्र व गुजरात यांच्या सीमेवर आहे. सातपुड्याच्या कठीण प्रस्तरातून वाहणारी नर्मदा एका जागी इतकी अरुंद आणि खोल झाली आहे, की हरणे नदीच्या खाईवरून उडी मारून पलीकडे जात. सरदार सरोवराच्या जलाशय क्षेत्रातूनही हजारो आदिवासींना विस्थापित व्हावे लागले आहे.

जिल्ह्यातील प्रमुख शहर नंदुरबार हे मात्र सपाटीवर आहे. अर्थात सातपुड्याच्या व सह्याद्रीच्या डोंगरटेकड्या जिल्हाभर पसरल्या आहेत, तशा त्या शहराभोवती आहेत. पूर्वी ते शहर भोवतालच्या टेकड्या मजबूत भिंतींनी जोडून किल्ल्यासारखे कोटाने सुरक्षित केलेले होते. नंदुरबार शहर मध्यप्रदेशमधून येऊन नाशिककडे जाणा-या उत्तर-दक्षिण मार्गावर आणि सुरतकडून निजाम स्टेटकडे जाणा-याय पश्चिम-पूर्व मार्गावर येते. त्यामुळे व्यापाराचे ते मुख्य केंद्र होते. ब्रिटिश सत्ता स्थिरावल्यावर दक्षिण गुजरातमधील सुरत आणि पूर्व खानदेशातील मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे जंक्शन भुसावळ यांना जोडणारी रेल्वेलाइन टाकली गेली. त्या तापी व्हॅली लाइनवरील नंदुरबार हे महत्त्वाचे स्टेशन. बलसाड, वापी, नवापूर, नंदुरबार ही खानदेशातील प्रमुख गावे त्या रेल्वेलाइनला येतात. सुरत परिसरातील पारशी व्यापारी मंडळी जशी मुंबईच्या दिशेने डहाणूकडे सरकली, तशीच ती तिकडेही आली. त्या लोकांनी ताडी, दारू, लाकूड इत्यादींच्या व्यापाराबरोबरे रेल्वे इंजिनात जळालेला कोळसा लिलावाने घेण्याचे पिढीजात अधिकार सांभाळले. त्यांच्यासोबत गुजराती मंडळीही खानदेशात पसरली. त्याचा खानदेशच्या संस्कृतीवर खोल परिणाम झाला आहे. धेडगुजरी हा शब्द खानदेशमधील भाषेवरून तयार झाला. त्यामुळे धेडगुजरी म्हणजे धेडाची भाषा मराठी आणि गुजराथी मंडळींची भाषा गुजरी. वास्तवात मात्र नंदुरबारच्या स्थानिक भाषेत अहिराणी, भिली, मराठी व गुजराथी आणि मध्यप्रदेशच्या सामीप्यामुळे हिंदी या सर्व भाषांचा सहभाग आहे. आदिवासींच्या भिलोरी भाषेप्रमाणेच अहिराणी भाषेलाही वेगळी लिपी नाही, परंतु अहिराणी भाषा मृदू आहे. मराठी वा संस्कृत भाषांतील उच्चाराला कठीण असलेल्या र, स, श यांसारख्या अक्षरांचे अहिराणी, भिलोरीत अपभ्रंशित मृदू रूप वापरले जाते. त्याचबरोबर त्या भाषांत बोलताना आवाजात चढउतार असणारी एक लय असते. त्यामुळे त्या भाषेला उपजत गोडवा लाभतो. ते वैशिष्ट्य भिलोरी भाषेत तर विशेष जाणवते. आदिवासींच्या भिलोरी भाषेतही पोटभाषा आहेत. सातपुड्यात डोगरी भिली, तर नवापूर परिसरातील मावची, पावरा भिलांची पावरी इत्यादी बोलीभाषा आहेत. वानगीदाखल एकच वाक्य तीन बोलीभाषांत येथे दिले आहे :

१. कोठली : तुमनी बगिचामा एक बारी फुल फुललो सो. ताय मला देसा का?

२. पावरी : तुमरा बगिसामाय एक हाजलो फुल सेतह छो. मेह आपहात के?

३. डोगरी : तुमा बगिसामे एक हाजलो फुल फुल्याहं. तो माहू आपाहा के?

ह्या वाक्यास आणखी एक सांस्कृतिक संदर्भ आहे. आदिवासी समाजात पूर्वी मुलाचा बाप मुलीला मागणी घालायला जायचा तेव्हा अशा अर्थाचे वाक्य वापरून येण्याचा हेतू तो सुचवत असे.

नंदुरबार जिल्ह्यात आणि पूर्वीच्या धुळे जिल्ह्यातही कोणा एकाच जातीचे वर्चस्व नव्हते आणि त्यातही उच्च मानल्या जाणाऱ्या जातींचे संख्याबळ कमीच होते. त्यामुळे अठरापगड जाती त्यांच्या त्यांच्या जाती, पोटजातींची भाषा, संस्कृती टिकवून गुण्यागोविंदाने नांदल्या. जाती-जातींमध्ये समानता होती असे म्हणता येणार नाही, पण शत्रुत्वाचा अभाव होता. नंदुरबार क्षेत्रात  वेगवेगळ्या धर्मांचा प्रभावही जाणवतो. हिंदू, मुस्लिम, जैन, महानुभावी, कबीरपंथी अशा विविध धर्मनिष्ठा असणारे समाजगट तेथे सहिष्णु वृत्तीने जगतात. तसेच, नाते हिंदू-मुस्लिम समाजगटांतही होते. नंदुरबार शहरात काही वर्षांपूर्वी एकच माध्यमिक शाळा होती आणि ती होती नगरपालिकेची. नंदुरबारच्या प्रसिद्ध दर्ग्याजवळ ती शाळा होती. शाळेमध्ये गुजराथी, मराठी आणि उर्दू या तिन्ही माध्यम भाषांचे विद्यार्थी होते. ते एकाच शाळेत एकमेकांचे वेगवेगळेपण गृहीत धरून एकत्र शिकत होते. आठवड्यातून एक दिवस शेवटच्या पीरियडला सुट्टी असायची. घंटा झाल्याबरोबर सर्व मुले (अठरापगड जातींची आणि जैन, मुस्लिम, हिंदू धर्माची) टेकडीवरील दर्ग्याकडे पळत सुटायची. मध्ये आडव्या येणा-याज नदीवरील बांधावरून पोरे जीव खाऊन धावायची. एक शिक्षक साखरफुटाणे घेऊन अगोदरच टेकडीवरील दर्ग्याशी पहिल्या येणा-याे पोरांचे स्वागत करण्यास तयार असायचे. पहिल्या काही मुलांना ओंजळीने आणि मागून येणा-याा पोरांना मुठीमुठीने साखरफुटाणे दिले जायचे. नंदुरबार गावाची प्रथाही तीच होती. दर्ग्याच्या दरसाल होणा-या जत्रेला जाणा-यांत हिंदूंचा भरणा मोठा असायचा. तर गणपती उत्सवात हजेरी लावण्याला आणि मिरवणुकीसमोर लेझीम खेळण्याला मुस्लिम वस्तादांच्या तालमीतील पठ्‌ठेही हजर होत असत. गेल्या दोन-तीन दशकांत मात्र त्यांच्या त्यांच्या धर्मनिष्ठा असलेल्या समाजगटांत एकमेकांबद्दल द्वेष, अविश्वास आणि दूरत्व वाढत गेले आहे; परंतु तरीही तेथील धर्मनिष्ठेला कडवेपणाचा, तिरस्काराचा गडद रंग नाही.

शिक्षण घेणा-यां ची संख्या वाढू लागल्यावर गुजराती लोकांचे श्रॉफ हायस्कूल आणि ब्राह्मण व सवर्ण जातींचे डी.आर. हायस्कूल, मुस्लिमांसाठी उर्दू अँग्लो हायस्कूल सुरू झाले. आदिवासी पोरांना शिक्षण देण्यासाठी आदिवासी समाज कार्यकर्ते नटावदकर, जनार्दन वळवी यांनीही शाळा व आश्रमशाळा सुरू केल्या. त्यांचे मोठ्या शिक्षणसंस्थांत रूपांतर झालेले आहे. एका शिक्षणसंस्थेचा येथे उल्लेख करणे आवश्यक आहे. अक्कलकुँवा येथे ‘जामिया इस्लामिया ईशातूल उल्म’ या संस्थेने तीस वर्षांपूर्वी धार्मिक शिक्षण देण्यासाठी मदरसा सुरू केला. त्या संस्थेच्या विशाल परिसरात पंधरा हजारांवर तरुण-तरुणी आर्ट्‌स, सायन्स, आयटीआय, आयटी, युनानी मेडिकल, बीएड, डीएड अशा शिक्षणशाखांतील उच्च पदवीशिक्षण घेत आहेत. सर्वांना होस्टेल्सची उत्तम सोय आहे. शिक्षणाचे मिडियम उर्दू आणि मराठी आहे. संस्थेत मुस्लिम समाजातील विद्यार्थी जास्त असले तरी आदिवासी व इतर समाजगटांचे विद्यार्थी-विद्यार्थीही तेथे शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी पोळ्या करण्याचे यंत्र संस्थेने आणले आहे. अगदी अल्प काळात ते यंत्र पंचवीस हजार पोळ्या तयार करते. त्यावरून संस्थेच्या पसा-याची कल्पना येईल.

इतिहासपूर्वकालीन आदिवासी माणसांचे अस्तित्व या प्रदेशात होते असे दाखवणारे पुरावे प्रकाशा येथे उत्खननात सापडले आहेत. आदिवासी ते राजस्थानकडून आल्याचे सांगतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत भाट समाजाची माणसे त्या भागात राजस्थानातून दरसाल येत असत. आदिवासींचे पूर्वज त्या भागात कसे आले याबद्दल ते कथा सांगत. एका मोठ्या परातीत पाणी टाकून, त्यात धातूची तार ताणून तयार केलेल्या वाद्याला उभे करून त्याच्या घूं घूं ध्वनीच्या तालात भाट आदिवासींच्या पूर्वजांच्या कहाण्या सुरामध्ये गाऊन सांगत. भिल आदिवासींना पूज्य असलेल्या देवी मोगरा मातेचे स्थान गुजरातच्या सीमेवर आहे. देवीच्या दरसाल चैत्रात भरणा-या यात्रेला हजारो आदिवासी, बिगरआदिवासी कुटुंबे जातात. दोन-दोन दिवस लाइन लावून दर्शन घेतात. यात्रा अमावस्येला असल्याने पूर्वी मंदिराभोवतालच्या टेकड्यांमध्ये असंख्य चुली पेटत असत, तेव्हा भोवतालच्या जंगलावर असंख्य काजवे चमचमत असल्याचा भास होत असे. ब्रिटिश काळात आदिवासी राजा असलेल्या काठी गावाची होळी लोकांना आकर्षित करते. पूर्वापार चालत आलेली त्यांची वेषभूषा करून आलेले स्त्री-पुरुष विविध रंगांची बहार आणतात. भोंग-यार बाजार हे त्या भागाचे वैशिष्ट्य आहे. आदिवासी कुटुंबे यात्रांना बैलगाड्यांनी येऊन दोन-दोन दिवस मुक्काम करत. एकमेकांवर फिदा झालेल्या जोड्या यात्रेचा लाभ घेऊन पळून जात. कोणा तरी ओळखीच्या वा नातेवाइकांच्या घरात लपून राहत. पुरेसा अवधी सोबत काढून अशी जोडी घराकडे आली की दोन्हीकडचे नातेवाईक पंचमंडळींच्या साक्षीने, आपसात भांडण्याची हौस पुरी झाल्यावर दोघांचे लग्न लावून देत असत. त्या प्रथेला ‘झगडा मोडणं’ असे म्हटले जाई. आदिवासींच्या लग्नात आमंत्रणे देण्याची पद्धत नव्हती. ढोल वाजू लागला, की कोणीही यावे, नाचात सामील व्हावे, लग्नघर सधन असेल तर मध्येच बाजूला जाऊन पानाच्या द्रोणातून दोन घोट मोहाची होरो पोटात रिचवावी, परत नाचात सामील व्हावे.

आदिवासी ज्याला दिवाळी म्हणतात ते गावाच्या सोयीने होणारे, पंचांच्या निर्णयाने होणारे सामूहिक हॅपनिंग असते. ज्या गावात बहुसंख्य आदिवासी वस्ती आहे अशा गावात तो दिवस सामुहिक रीत्या साजरा केला जातो. त्या दिवशी बकरे कापून गावातील कुटुंबांना वाटे दिले जातात. गावात दिवाळी आहे असे समजल्यावर आठवडी बाजारात दुकाने मांडणारे विक्रेते गावात हजर होतात. गावात यात्राच भरते! जुगारवाली मंडळी अड्डे आडोशाला जमवतात. संध्याकाळी आदिवासी सोंगाड्या पार्टी येते आणि धेडगुजरी भाषेत करमणुकीचा कार्यक्रम सुरू होतो. स्त्री पार्ट कोवळे, मिसरूड न फुटलेले पोरगेच करते. आदिवासींत रोडाल्या नावाचा नाचत नाचत प्रेमगीते गाण्याचा किंवा गात गात नाचण्याचा प्रकार आहे. दोन सोंगाडे (स्त्री व पुरुष) एकमेकांसमोर, मधे काही अंतर सोडून उभे राहतात आणि आळीपाळीने प्रेमगीताचे एकेक कडवे म्हणतात. ध्रृवपदाला दोघे जवळ येऊन अत्यंत गतीने नाचतात. गावदिवाळीत केल्या जाणा-या सोंगाड्या पार्टीच्या कलापथकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांमध्ये पुढे बसण्याचा मान स्त्रियांना दिला जातो. पुरुष मंडळी मागच्या बाजूला बसतात. उत्तररात्रीनंतर, स्त्रिया-मुले निघून गेल्यानंतर पुरुष जरा जास्त रसिक होतात. संवादांत आणि गाण्यांत चावटपणाचे प्रमाण वाढते. परंतु सर्वसाधारणपणे, गावदिवाळीचा तो कार्यक्रम लहानमोठ्या स्त्री-पुरुषांनी एकत्रितपणे सर्व दिवस मजा घेण्याचा असतो.

दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेली आणखी एक यात्रा म्हणजे सारंगखेड्याची दत्तात्रयाची यात्रा. त्या यात्रेला गुजरात, राजस्थान, पंजाब अशा वेगवेगळ्या प्रदेशांतून उत्तमोत्तम घोडे विकण्यास येतात. लाखाच्या वर किंमत देऊन घोडे विकत घेणारी गि-हाइकेही तेथे येतात. यात्रा दोन आठवडे चालते. मुंबई-पुण्याकडील लोकांचेही ते आकर्षण होत आहे. तापीच्या काठाचे श्रीप्रकाशा तीर्थस्थान हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. गुजरातच्या सीमेवरील उकाई धरणाचे बॅकवॉटर कवेत घेतलेल्या गुजरातची सीमा प्रकाशापासून दोन-तीन किलोमीटरवर पोचली आहे. नाशिकला जाणे जमले नाही तर त्या भागातील हिंदू मंडळी अस्थिविसर्जन करण्याला प्रकाशाला येतात.

आदिवासींच्या परंपरेत मात्र त्या स्थानाला विशेष महत्त्व नाही. आदिवासींच्या दृष्टीने मोगरामातेनंतर दुसरे पवित्र स्थान म्हणजे अस्तंभ्याचा डोंगर- ते सातपुड्यातील उंच शिखर. महाभारतातील चिरंजीवपद प्राप्त झालेला अश्वत्थामा त्या डोंगराच्या आसपास भटकत असतो आणि त्या दुर्गम अशा गडावर यात्रेसाठी आलेल्या, रस्ता चुकलेल्या वा भलत्याच वाटेला गेलेल्या यात्रेकरूंना तो सुरक्षित रस्ता दाखवतो, अशा आख्यायिका सांगितल्या जातात. वणीच्या देवीला तेथून चालत जाणा-यांची संख्याही गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे.

लग्नाच्या वेळी लाऊडस्पीकर लावून सभोवताल दणाणून सोडण्याची आधुनिक पद्धत तेथेही पोचली आहे. लग्नाची घटिका मारुतीचे दर्शन घेऊन परतणारी नाचणारी पोरेपोरी ठरवतात. लग्नसमारंभात नाचणे हा अटळ असा कार्यक्रम असतो. त्यात स्थानिक वैशिष्ट्य आहे. हिंदी, गुजराथी वा मराठी पॉप्युलर गाणी स्पीकरवर लावली जातात, पण कॅसेट्‌सचा वा सीडीचा वापर करून नाही. बहुधा कोणातरी व्यावसायिक व सुमार आवाजाच्या स्थानिक गायकाला त्याच्या वाद्यवृंदासह कार्यक्रमाला आणले जाते. गायक पॉप्युलर हिंदी व गरब्याची गुजराथी गाणी म्हणतात. गाण्यामध्ये स्त्रीच्या आवाजातील ओळी गाण्यासाठी गायिका नसते. कोवळ्या आवाजाचा मर्दच बाईच्या आवाजात तशी गाणी म्हणतो. स्पीकर सिस्टिमवर सीडी लावण्यापेक्षा हा प्रकार महागडा आहे. पण एकूणच, लोक अजून लाइव्ह प्रोग्रॅम ऐकण्याला प्रेफरन्स देतात! लग्नाची गाणी परंपरागत चालत आलेली असतात हे खरे, परंतु ती गाणी पाठ केलेली नसतात आणि उत्स्फूर्त काव्यरचनाही नसते. असे म्हणता येईल, की परंपरेने चालत आलेल्या गाण्याच्या टेम्प्लेट्‌स असतात. लहान मुलांना रंगवण्याकरता पुस्तके असतात, त्यांतील रेखाचित्रांप्रमाणे गाण्यांचे ढाचे तयार असतात. गाणारी बाई त्यात वर्तमान वास्तवाचे रंग भरत जाते. मग ओळखीच्या, नात्यातील व्यक्तींना टोमणे मारणे, जुन्या घडलेल्या घटनांच्या आधारे टिंगल-टवाळी करणे असे तपशील त्यात भरले जातात. मैफल रात्रीच्या निवांत वेळी तासन् तास चालू राहते. आदिवासींमध्ये तर स्त्रियांना सामुहिक रीत्या गाणी म्हणण्याची उपजत आवड असते. चार बाया एकत्र आल्या, की त्यांचे दोन गट तयार होतात. प्रौढ बायांपैकी कोणी तरी गाणे म्हणण्याला सुरुवात करते. एका गटाने एक ओळ गायली की दुस-या गटाने तीच ओळ परत गायची. जोपर्यंत ती बाई गाण्याची पुढची लड सोडत नाही तोपर्यंत दोन्ही गटांत गायलेल्या ओळींचे आवर्तन सुरू राहते. एकच ओळ घोटून घोटून म्हटल्यामुळे लहान व तरुण वयांतील मुलींना ती गाणी आपोआप पाठ होतात.

आदिवासींच्या नाचात वापरले जाणारे ढोल वजनदार आणि मोठ्या आकाराचे असतात. ते ओझे गळ्यात घेऊन, एक चाळ वाजवत ढोलवाला सतत पावले टाकत असतो. ढोलाचा आवाज आला, की पोरेपोरी हळुहळू भोवती जमा होतात. पोरे, गडीमाणसे आधी नाचू लागतात, मग तारुण्याच्या सीमेवर असलेल्या मुली हळूच एकमेकांच्या पंजांत पंजे अडकावतात, खांद्याला खांदा भिडवून पावले टाकू लागतात. मग प्रौढ स्त्रियाही पुढे होतात. ढोलवाला, बासरीवाला, झांजवाला हा वाद्यवृंद मध्ये आणि भोवती पुढेमागे व रिंगणात गोलाकारात सरकणारे पोरापोरींचे लहान लहान गट. नवरात्रीचे नऊ दिवस गल्लोगल्लीत गरबा नाचणा-यांचा उत्साह दृश्य व श्रवणीय रूपांत जाणवतो. पुण्यामुंबईसारखे नाचांना धंदेवाईक रूप अजून तरी आलेले नाही, पण त्या बाबतीतही गुजरातचे अनुकरण होणार यात शंकेला जागा नाही. गरब्याप्रमाणे संक्रातीला पतंग उडवण्याचे वेड गुजरातमधून तेथे पोचलेलेच आहे.

जिल्ह्यातील लोकांच्या रोजच्या जेवणात मुख्य पदार्थ म्हणजे ज्वारीची भाकर आणि भरपूर शेंगदाणा वापरलेली चटणी. चटणी बनवण्याच्या पद्धतीत भरपूर तेल आणि मुबलक तिखट यांचा वापर. मात्र जात कोठलीही असो, पाहुणे-रावळे आले की खिचडी पाहिजेच. सोबत पापड, कुरडया, सांडगे यांसारखे तळणाचे पदार्थही असायला हवेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला गल्लोगल्लीत उन्हात खाटली तिरकी ठेवून त्यावर शेवया बनवणा-या स्त्रिया नजरेत येतात. सणासुदीला पुरणपोळ्या, मांडे असणारच. मुस्लिमांमध्येही मटणाच्या रश्शाबरोबर मांडे खाण्याची पद्धत आहे. गुजरात जवळ असल्यामुळे आणि स्थानिक पातळीवर तूर, मूग, हरभरा यांचे उत्पादन असल्याने स्वयंपाकात बेसनाचा उपयोग भरपूर प्रमाणात केला जातो. तेथील हॉटेलांत सकाळच्या नाश्त्याला लोक शेव-खमणी (खमण ढोकळा) खातात. त्याशिवाय तेथील खास पदार्थ म्हणजे भजीपात्रा. पात्रा म्हणजे अळूची पाने वा अळूच्या वड्या. मात्र खानदेशातील अळूच्या वड्या कडक तळलेल्या असतात, त्यामुळे त्या भरपूर टिकतात. सामिष खाणारे लोक बकरे वा बोकड खाण्याऐवजी कोंबडी खाणे पसंत करतात. लोकांनी कोंबड्या खाणे चिकनगुनियाच्या भीतीमुळे काही महिने बंद केले होते, पण नंतर परत सर्व व्यवस्थित सुरू झाले.

आदिवासींच्या सणासुदींत मोहाच्‍या दारूला खास महत्त्व असते. तशी दारू खास भट्टी लावून नवसागर वा किक आणणारी इतर केमिकल्स न वापरता बनवून घेतली जाते. एकूणच, तेथील लोकांमध्ये, आदिवासींच्या सहवासामुळे म्हणा हवे तर, पिण्याचा शौक जास्त दिसतो. कदाचित प्रमाण जास्त नसेल; पण निदान दारू पिणे हे फारसे निषेधार्ह मानले जात नाही.

आदिवासींमध्ये पुरुषांचे वेष खास वेगळे नाहीत, मात्र पुरुषांनी दागिने घालणे हे समाजमान्य आहे. भिल समाजातील स्त्रिया साडीचे दोन तुकडे करून कमरेच्या खाली एक आणि वर डोके व छाती झाकण्याकरता एक अशी वेगवेगळ्या रंगांची वस्त्रे वापरतात. पावरा स्त्रियांच्या पायांत, कानांत, गळ्यात वापरले जाणारे दागिने बहुधा चांदीचे असतात. बाकी ठाण्यातील वारली जमातीतील स्त्रियांना केसांची खास निगा राखून फुले माळण्याची हौस दिसते, तशी भिलांमध्ये नाही. खेड्यावर राहणा-या आदिवासीच्या घरामागे वाडी (किचन गार्डन) सर्रास पाहण्यास मिळते. तेथे मका, लिंबू यांसारखी झुडपे आणि वेगवेगळ्या शेंगांचे वेल लावले जातात, परंतु फुलांची झाडे क्वचित दिसतात. ठाण्यातील आदिवासी त्यांच्या घराच्या भिंती चित्रे काढून सुशोभित करतात, तीही परंपरा नंदुरबारात आढळत नाही. आदिवासींत स्त्री-पुरुषांतील नाते सवर्ण जातीतील नात्यापेक्षा अधिक समान आहे. गुजर समाजातही कुटुंबात स्त्रीला खास अधिकार परंपरेने दिले आहेत. शेतातील धान्य एकदा खळ्यातून घरी आले, की त्याची कशी विल्हेवाट लावायची यावर घरातील प्रमुख स्त्रीचा अधिकार असतो. घरातील प्रमुख स्त्री तिच्या लग्न झालेल्या मुलीकडे तिच्या मुलांपेक्षा जास्त झुकते माप देते, अशी तक्रार गुजर पुरुषमंडळींकडून ऐकू येते. मात्र तेथे गोचीदार परंपराही आहे. सासूनंतर घरातील मोठी सून तिच्या धाकट्या जावांवर अधिकार गाजवते. त्यामुळे कुटुंबातील धाकट्या भावाला मुलगी मिळणे कठीण होते. पण एकूणच, मध्यम व अठरा-पगड जातींत स्त्रियांना पुरेसे महत्त्व आणि अधिकार परंपरेने दिलेले असतात असे दिसते. हे सांस्कृतिक वास्तव व वेगळी जीवनशैली झपाट्याने बदलत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील लोकवस्ती मुख्यत: डोंगरद-यांतील गावपाड्यांत पसरलेली आहे. लोकवस्तीच्या केवळ अठरा-एकोणीस टक्के लोक शहरांत राहतात. त्यातही शहरांत राहणा-या  आदिवासींचे प्रमाण अगदीच अल्प आहे. मात्र आदिवासींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी आश्रमशाळा काढण्याचा कार्यक्रम शासन अनेक वर्षांपासून यशस्वीपणे राबवत आहे आणि त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीत बदल होत आहे. जिल्ह्यातील शिक्षितांचे प्रमाण आहे लोकसंख्येच्या सेहेचाळीस टक्के. आदिवासींमधील सुशिक्षितांचे प्रमाणही कमी नाही. सुशिक्षित आदिवासी स्तर आदिवासी संस्कृतीपासूनही अलग पडत चालला आहे. इतकेच नव्हे, तर मुलांपेक्षा मुली जास्त प्रमाणात शिक्षण घेत असल्याने पदवीधर आणि नोकरी करणा-याच मुलींना योग्य वर न मिळण्याची समस्या भेडसावू लागली आहे.

नंदुरबार स्वतंत्र जिल्हा घोषित झाल्यापासून नंदुरबार शहर व जिल्हा यांचे रूप बदलत आहे. सिव्हिल हॉस्पिटल, कलेक्टर ऑफिस, तहसिलदार ऑफिस, पोलिस कार्यालय यांच्या नवनव्या इमारती तेथे उभ्या राहिल्या आहेत. नंदुरबारमध्ये नवे शानदार नाट्यगृहही उभे राहिले आहे. रस्ते रुंदावले आहेत; चौकांत पुतळे उभे करून सुशोभित केले गेले आहेत. एकीकडे असे भौतिक बदल होत असताना वाढत्या लोकसंख्येमुळे, आधुनिक जीवनप्रणालीच्या प्रसारामुळे निर्माण होत असलेल्या वाढत्या गरजा पु-या करण्यासाठी नोक-यांच्या अभावामुळे स्पर्धा व ताणतणाव निर्माण होऊ लागले आहेत. गावागावांत पोचलेल्या टीव्ही-व्हिडिओमुळे तरुण-तरुणींच्या भोवतालचे वास्तव बदललेले नाही, मात्र त्यांची स्वप्ने शहरी व सधन वर्गाची झाली आहेत; वाढत्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा आणि स्पर्धा यांच्या दबावामुळे वाढते नैराश्य आणि आत्महत्यांचे वाढते प्रमाण ही भयावह समस्या समाजाला भेडसावू लागली आहे. तेथील आदिवासी मात्र यापासून दूर आहेत. त्याचे कारण त्यांची अल्पसंतुष्टता असावी.

आदिवासींच्या अल्पसंतुष्टतेतून ते आळशी असल्याचा सर्वमान्य भ्रम पसरला. त्यामुळेच 'घरात दाणा तर भील उताणा' अशा म्हणी अस्तित्वात आल्या. नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुके आणि धुळे जिल्ह्यातील दोन तालुके धरून लोकसभेचा मतदारसंघ होतो. विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. ते सर्व मतदारसंघ आदिवासींकरता राखीव आहेत. महाराष्ट्रातील एकूण आदिवासींचे नेतृत्व करणे तर वगळाच, पण त्या जिल्ह्यातील भिल, पावरा, कोकणी इत्यादी आदिवासींचे नेतृत्व करणारा कर्तबगार आदिवासी नेता लोकप्रतिनिधी झालेला नाही. वस्तुत: आदिवासी समाजात गावपातळीवर असलेल्या पंच पद्धतीतून लोकशाहीची बीजे रुजलेली आहेत; मात्र आदिवासीबाहुल्य असूनही पंचमंडळीशी नाते राखून त्यांचे स्वत:चे नेतृत्व टिकवण्याचे कसब आदिवासी नेत्यांनी अवगत केलेले नाही. जिल्ह्यातील आदिवासी नेते कोणा बिगरआदिवासी नेत्याचे बोट धरून चालणे पसंत करतात, असा गेल्या पाच-सहा दशकांचा दाखला आहे. गेल्या पाच-दहा वर्षांत ही परिस्थिती बदलत आहे.

सातपुड्यात सागाचे लाकूड प्रचंड प्रमाणात उपलब्ध होत होते. आंबा, मोह, चिंच, चारोळी यासारख्या वृक्षांच्या कंदमुळांपासून आदिवासींची अन्नाची गरज पूर्ण होत होतीच, पण शरीरास आवश्यक सर्व प्रकारची व्हिटॅमिन्स मिळत असत. सध्या पहाडपट्टीत कुपोषित बालकांची समस्या भयावह रूपात सतावत आहे. आदिवासी समाजात शारीरिक व मानसिक रोगांवर उपचार करणारे भगत व वैदू असतात. वैदूंना जंगलातील वनस्पतींचा वडिलोपार्जित ज्ञानसाठा उपलब्ध आहे. ज्यांनी जगण्याचे साधन म्हणून वनखात्याची नोकरी पत्करली आहे अशा सरकारी कर्मचा-यांनी स्थानिक वनस्पती व पशुपक्षी यांचे परंपरागत ज्ञान असलेल्या स्थानिक लोकांचे सहकार्य घेतले, तर स्थानिक जनसमूह श्रीमंतीचे नाही पण सुखी सुरक्षित जीवन जगू शकतील. आदिवासी कुटुंबांना खासगी मालकीने जंगल राखण्याच्या अटीवर जंगल उत्पादने घेण्याची परवानगी दिली तर वनविकास होणे अवघड नाही. परंतु जंगलविकास करण्यात वनखात्यांच्या कर्मचा-यांना रस नसतो.

शहादा तालुक्यात नुकतीच अशी घटना झाली. डोंगर-टेकड्यांवर जंगलतोड झाली तरी ती झाडे मुळातून नष्ट होत नाहीत. त्यामुळे एक-दोन वर्षें त्या जंगलजमिनींना संरक्षण दिले, की जंगल नव्याने वाढू लागते. दरा विरपूर या गावातील रहिवाशांनी अशाच प्रकारे जंगल राखले होते, गेल्या सहा वर्षांपासून. तेथून कित्येक मैल दूर असलेल्या धडगाव भागातील पावरा आदिवासींनी राखलेल्या त्या जंगलाची तोड मोठ्या प्रमाणात केली. माहीतगार असे सांगतात, की यामागे वनकर्मचा-यांचीच प्रेरणा होती. पूर्वी आदिवासी गावांत एकोपा होता; निवडणुकीतील स्पर्धेच्या राजकारणाने, गटबाजीने, धर्मपंथद्वेषाने गावाचे वातावरण दूषित झाले नव्हते. आता मात्र असे घडते. आदिवासी गावांमधला एकोपा कमी होतोय. हितसंबंधी लोक त्याचा फायदा घेत आहेत. परंतु एक आहे, निसर्गाबद्दल आपलेपणा अजूनही आदिवासी स्त्रीपुरुषांत टिकून आहे. वनखात्याच्या मालकीत असलेली सर्व जमीन आदिवासींना केवळ वर्षात एक पावसाळी पीक काढण्यासाठी नाही, तर मोह, चारोळी, चिंच, हिरडा यासारखे मोठे वृक्ष, औषधी गुण असलेली झुडपं आणि पावसाळी एकपिकी शेती अशा प्रकारची मिश्र शेती करण्यासाठी दिली गेली तर सातपुडा काही वर्षांतच हिरवागार दिसू लागेल.

आदिवासींनी त्यांची आदिम संस्कृती टिकवून ठेवावी असे काही जणांना मनापासून वाटते. ते केवळ रोमॅन्टिसिझममधून होते असे वाटत नाही. आदिम संस्कृती विकसित झाली माणसामाणसांतील परस्परावलंबी आणि निसर्गावलंबी सहज संबंधांतून. समुहामध्ये प्रत्येकजण प्रामुख्याने आणि प्राथमिकतेने होता माणूस. तेथे राजा आणि प्रजा, उत्पादक आणि गि-हाईक, मालक आणि मजूर अशा वर्चस्ववादी नात्यांतून आलेले संबंध अस्तित्वातच नव्हते. आदिम संस्कृतीचे आकर्षण आकारते ते माणूस म्हणून. आपण जे हरवले आहे ते त्याच्या धूसर स्मृतीतून. पण संस्कृतीचा संबंध असतो जीवनशैलीशी. जीवनशैली आकारते भोवतालाशी घडणा-या जिवंत संबंधातून. आदिवासीचे भोवताल बदलत आहे, जीवनशैली बदलत आहे. मग आदिम संस्कृती टिकून राहणार कशी?

या काळात एवढेच म्हणता येईल, एका स्थानावरून दुस-या स्थानी स्थलांतरित होणारे विस्थापित आणि एका संस्कृतीतून दुस-या संस्कृतीत स्थित्यंतरित होणारे विस्थापित, दोघांचीही पीडा एकाच प्रकारची आहे. ती पीडा केवळ आदिवासी जमाती नव्हे तर भारतीय संस्कृतीच्या परिघावरील सर्वच जाती-जमाती अनुभवत आहेत. नंदुरबार जिल्हा अशा अनेकांतील एक आहे. या दगडाधोंड्यांच्या महाराष्ट्रात सह्याद्री, सातपुडा, विंध्य अशा पर्वतरांगांशी नाते सांगणा-या  डोंगरद-यांंतील अनेक क्षेत्रांतील लोकसमूहांचीही हीच पीडा आहे.

- राजू लक्ष्मण ठोकळ




 दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग १६ नंदुरबार जिल्हातील तळोदा तालुक्यातील जहागीरदार बारगळांची गढी --२



दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग १६
नंदुरबार जिल्हातील तळोदा तालुक्यातील जहागीरदार बारगळांची गढी
तळोदा शहरात श्रीमंत बारगळ जहागीरदारांची वैभावाची साक्ष असून प्राचीन गढ़ी आहे. या गढीचा काही भागाच्या आता पड़झड झाली असली तरी काही बांधकाम अजूनही शाबूत आहे. भोजराज बारगळ यानी 1962 मधे या ऐतिहासिक वास्तुच्या बांधकामाला सुरुवात केली. पुढे त्यांचे पुत्र नारायणराव बारगळ यांनी गढीच्या कमानी दरवाजा बांधला. सुमारे सहा एकर परिसरात या ऐतिहासिक गढीचे बांधकाम झाले असुन हे बांधकाम पाच वर्ष चालले. बारगळ जहागीरदारांच्या घराण्यातील त्यांचे वंशज सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अमरजीतराव शिवाजीराव बारगळ व त्यांचे इतर आप्तेष्ट आजही या ऐतिहासिक गढीत राहतात. १९५२ पर्यंत तळोदयाचे प्रशासन हे बारगळ जहागीरदार यांच्या नियंत्रणाखाली चालायचे. जहागीरदार व गावाचे कामकाज चालवीण्यासाठी एक दिवाण सहा कारकुन असायचे. त्यापैकी दोन कारकुन हे त्यांच्या खाजगी कारभार पहायचे तर चार कारकुन जहागीरदारीचे कामकाज, हिशेब, वसुलीचे काम पहायचे. शिवाय बाहेरच्या प्रशासकीय कामासाठी दोन पाटील होते. मुलकी पाटिल पोलीस पाटील ही दोन्ही पदे त्या वेळी होती. मुलकी पाटलाचे पाच वतनदार घराणे होते. मगन गनपत पाटील, गोविंद कडवा पाटील याप्रमाणे. प्रत्येक पाटीलला २७ एकर जमीन त्या वेळी उत्पनासाठी मीळायची. शिवाय ज़माबंदी दरबारात मुलकी पाटलाला ६९ रुपये १० आणे फेटा, पागोटे, उपरणे, पान-सुपारीचा मान मीळायचा. पोलीस पाटलाला वर्षाला ५७ रुपये ६ आणे फेटा पागोटे, उपरणे, वेताची काठी हां मान मीळायचा. याशिवाय 16 मील कामदार, वनदार (जागले), चार महार कामदार, एक कोळी कामदार वतनदार होते. या कामदारानाही त्यांचा कामापोटी वतन दिले जायचे. येथील हल्लीचे बारगळ जहागीरदार अमरजीतराव बारगळ यांचे पणजोबा कृष्णराव आनंदराव बारगळ आजोबा शंकरराव कृष्णराव बारगळ यांच्या पीढ़ीपर्यंत दि: १-८-१९५३ पर्यंतताळोद्यात ही प्रशासन यंत्रणा बारगळ जहागीरदारांकडे सुरु होती. त्यानंतर ताळोद्यात शासकीय कारभार इनाम अँबाँक्युशन अँक्ट आला व शासनाकडे कारभार आला त्यानंतर तळोदयात शासकीय कारभार सुरु झाला. सन १८६७ चा गँझेतेड रिपोर्ट व बारगळ जहागीरदार संस्थानचे जुने ऐतिहासिक दस्तावेज व कागदपत्राच्या नोंदीत या प्रशासकीय प्रणालीचा उल्लेख आहे.
सांभार : http://sudhaspari.blogspot.in

सारंगखेडा यात्रा अश्वप्रेमीसाठी एक पर्वणी

महाराष्ट्रातील अनेक यात्रा प्रसिद्ध असून नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील यात्रा ही घोडेबाजारासाठी प्रसिद्ध आहे. ह्या यात्रेत निरनिराळ्या प्रकारचे घोडे दाखल होतात. सारंगखेडा येथे असलेल्या पुरातन दत्त स्वामी मंदिराच्या यात्रोत्सवात हा घोडे बाजार भरतो. शिरपूर तालुक्यातील भरवाडे येथील नंदा पाटील यांना स्वप्न पडले. त्यात त्यांना एकमुखी दत्ताचे मंदिर हे सारंगखेडा येथे उभे करावे असे सांगितले गेले. सुमारे तीनशे वर्षापूर्वी नंदा पाटील या ग्रामस्थाने एकमुखी दत्ताची स्थापना करुन छोटसे मंदिर बांधले हेाते. कालांतरांने ग्रामस्थांनी मंदिर ट्रस्ट उभारुन लोकवर्गणीतून मंदिराचा जिर्णोध्दार केला. नंदा पाटील हे वारकारी संप्रदायाचे आणि महानुभाव पंथाचे असल्याने आजही मंदिर ट्रस्टच्या कार्यकारिणीमध्ये सर्व सदस्य हे महानुभाव पंथाचे आहेत. अनेक भाविक नवस फेडण्यासाठी या यात्रेत सहभागी होतात. 

ही यात्रा घोडे बाजारासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या समोरच्या परिसरात हा घोडाबाजार भरतो. जिल्हा परिषद उपाध्यक्ष रावल यांच्या 20 एकर जागेवर हा घोडे बाजार भरला जातो. कृषी बाजार समिती व ग्रामपंचायतीचे कर्मचारी यात्रोत्सवासाठी झटतात. घोड्यांच्या देखरेखीसाठी जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागाचे कर्मचारी उपस्थित असतात. देशभरातून जवळपास 2000 ते 3000 घोडे विक्रीसाठी दरवर्षी यात्रेत विक्रीसाठी येतात. साधारणत: 40 हजारपासून घोडे खरेदीला बोली लावली जाते. अनेक अश्वप्रेमी ह्या घोडे बाजारासाठी बोली लावतात. आतापर्यंत 75 लाख रूपयांपर्यंत एका घोड्याची बोली लागली गेली आहे. यावरुन या यात्रेत होणारी उलाढाल व अश्वप्रेमीच्या आवडीची प्रचिती नक्कीच येते. 

सारंगखेड यात्रेतील घोड्यांमध्ये देवमान, कंठळ, जयमंगल, शामकर्ण, काळा, पाच कल्याणी हे गुणवान घोडे सर्वात मोठ्या प्रमाणावर अश्वप्रेमी खरेदी करतात. तर घोड्याच्या नाकावर पांढरे चट्टे, दोन भवरी असलेले, पोटाखाली भवरा असलेले, गळ्यावर भोवरा असलेले घोडे अश्वप्रेमी नाकारतात. या ठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान या भागातून घोडे विक्रीसाठी येतात. पंधरा दिवसाच्या या यात्रोत्सवात करोडो रूपयांची उलाढाल होते. 

यात्रोत्सवाच्या निमित्ताने भरलेल्या घोडे बाजारात घेाडे खरेदीसाठी व आनंद लुटण्यासाठी अनेक सिने कलावंतही सहभागी होतात. अनेक राजकीय पक्षांचे नेतेही हजेरी लावतात. संपूर्ण भारतात घोडे बाजारासाठी या यात्रेची ओळख निर्माण झाली आहे.

निलेश परदेशी, चाळीसगाव

अस्थबा, नंदुरबार

अष्टमबा हे नंदुरबार क्षेत्राचे धार्मिक स्थळ आहे आणि ते अक्रानी तहसीलमध्ये स्थित आहे. येथे अष्टभैया उत्सव दक्षिण गुजरात आणि उत्तर-पश्चिम महाराष्ट्र येथील आदिवासींचे सर्वात प्रमुख मेळाचे एक समजले जाते. दिवाळीच्या उत्सवाच्या दरम्यान, मेळा 10 ते 15 दिवस चालतो.
अष्टमबा हिंदू महाकाव्य महाभारत मधील पौराणिक पात्रांपैकी एक समजला जातो. आदिवासींच्या मते, त्यांना अश्वस्थमा नावाचे पुरुष चरित्र आणि गुरु द्रोणाचार्य यांचा मुलगा असे नाव आहे.

छायाचित्र दालन

    Asthamba,Nandurbar

कसे पोहोचाल? :

विमानाने

औरंगाबाद आणि सूरत हे सर्वात जवळचे विमानतळ आहेत आणि औरंगाबाद हे, राज्य परिवहन आणि खाजगी बसने अस्तम्बापर्यंत पोहोचण्यासाठी टॅक्सी सहज उपलब्ध आहेत. औरंगाबाद देशाच्या बहुतेक प्रमुख शहरांना जोडलेले आहे.

रेल्वेने

अस्तम्बा या धार्मिक स्थळाजवळ चे रेल्वे स्थानक हे नंदुरबार रेल्वे स्थानक हे जवळपास 71 KM आहे.

रस्त्याने

अस्तम्बा हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्रानी तहसील अंतर्गत येते. येथून जवळ असलेले नंदुरबार शहराचे अंतर साधारण 71 KM येते तर अक्रानी चे अंतर 35 km आहे

उनपदेव, गरमपाण्याचा झरा

उनपदेव हे गरम पाण्याचे झरे अडावाद या गावपासुन 6 KM अंतरावर शहादा तालुक्यात ,नंदुरबार जिल्हा, महाराष्ट्रात स्थित आहे. या मंदिराचा प्रमुख झरा हा गरम पाण्याचा झरा आहे. गोड पाणी वर्षभर वाहणारे गाईच्या तोंडून वाहते असे दिसत आहे, येथे जवळचे रेल्वे स्थानक हे नंदुरबार आणि दोंडाईचा हे आहेत

छायाचित्र दालन

  • पिकनिक स्थळ उनपदेव
    पिकनिक स्थळ उनपदेव
  • उनपदेव मंदिर
    Unapdev temple
  • उनपदेव - गरम पाण्याचे झरे
    उनपदेव - गरम पाण्याचे झरे

कसे पोहोचाल? :

विमानाने

उनपदेवपर्यंत पोहोचण्यासाठी औरंगाबाद आणि सूरत हे जवळचे विमानतळ आहेत.

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्थानक हे नंदुरबार आणि दोंडाईचा हे आहेत.

रस्त्याने

उनपदेव शहाद्यापासून २५किमी आहे. तेथे जाण्यासाठी बस उपलब्ध आहे

तोरणमाळ (महाराष्ट्रातील क्र.२ थंड हवेचे चे निसर्गरम्य ठिकाण)

एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण, यशवंत तलाव, सीता-खायी दरी, अतिशय हिरवेगार नैसर्गिक सोंदर्य, डोंगर, दऱ्या-खोऱ्या, धबधबे अशे अनेक वसुंधरेचे नटलेले तोरणमाळ.

छायाचित्र दालन

  • तोरणमाळ हिल स्टेशन
    तोरणमाळ हिल स्टेशन
  • तोरणमाळ हिल स्टेशन
    तोरणमाळ हिल स्टेशन

सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेले तोरणमाळ हे एक निसर्गरम्य ठिकाण. नंदुरबार जिल्ह्यातील हे ठिकाण महाराष्ट्रातील दोन नंबरचे व खान्देशातील सर्वात उंचावरचे थंड हवेचे ठिकाण आहे. याची उंची संद्रसपाटीपासून सरासरी ३३३६ फूट इतकी आहे. याच्या जवळपास मोठी शहरे नसल्याने पर्यटक कमी असतात व त्यामुळेच इथले निसर्ग सौंदर्य अजूनही टिकून आहे.

सकाळी सातला चोपड्याहून (जळगांव) निघालो. साधारण ६०किमीवर शिरपूर नाक्याला नाश्त्यासाठी थांबलो. जास्त वेळ घालवायचा नव्हता म्हणून पटकन मिळणारे पदार्थाच मागवायचे ठरले.
गरमागरम रस्सा वडा किंवा गिला वडा , भजी , कचोरी .

येथून पुढे दीड तासावर शहादा (५४ किमी) व तेथून ५०किमी (दीड तास) तोरणमाळ. धुळ्याकडून येणाऱ्या प्रवाशांनाही शहाद्याहुनच पुढे जावे लागते. तोरणमाळच्या आधी साधारण चार किमीवर नागमोडी वळणांचा खूप सुंदर घाट सुरु होतो. दुतर्फा सागवान वृक्ष व बांबूचे वन दिसते. घाटाला सात नागमोडी वळणे आहेत यावरून याचे नाव सातपायरी घाट असे पडले आहे. सर्वात वरची पायरी चढून आलो की सातपायरी पॉइंटहून आपल्याला सगळ्या पायऱ्या दिसतात. वाढलेल्या वनराईमुळे मला मात्र चारच पायऱ्या नजरेस पडल्या .

तोरणमाळला अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच हॉटेल्स आहेत. त्यातही दोन तीनच चांगली. येथे MTDC चे एक अतिशय मोक्याच्या जागेवर एक रिसॉर्ट होते पण काही वादामुळे ते बंद पडले आहे. सुदैवाने एका चांगल्या हॉटलमध्ये संपूर्ण ग्रुपसाठी रूम मिळाल्या. ताजेतवाने होऊन तोरणमाळचे पॉंईंट बघायला बाहेर पडलो.

बंद पडलेल्या MTDC च्या जागेततून दिसणारा परिसर व तलाव. याच परिसरात काही शिल्पही नजरेस पडतात.

'यशवंत' तलाव
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांनी सन १९६९ मध्ये तोरणमाळला भेट दिली होती. त्यांच्या नावावरून या तलावास यशवंत तलाव असे नाव पडले. पूर्वीचे या तलावाचे नाव मात्र अज्ञात आहे. या तलावास पायी अथवा गाडीने संपूर्ण फेरी मारता येते.
या तलावात बोटिंगचीही सुविधा आहे पण सध्या मात्र बोटिंग बंद आहे. तलावाजवळच गुरु गोरक्षनाथांचे मंदिर आहे.

सीता खाई पॉईंट : येथून घनदाट झाडीने भरलेली व उंच खडकांमधील खोल दरी दिसते. येथील पठाराहून दरीत कोसळणारा एक सुंदर धबधबाही नजरेस पडतो. येथे लगताच इको पॉईंट, सनसेट पॉईंट , खडकी पॉईंट आहेत


वळणा वळणाचे रस्ते

झुक झुक गाडी. खूप दिवसांनी घराबाहेर पडलेल्या मुलांनी सहलीचा पुरेपूर आनंद लुटला.

परिसरात अनेक औषधी गुण असलेल्या वनस्पती आहेत.
जडीबुटी विकणारा एक वैदू.

वाटेतील एक शिव मंदिर व शिल्प

संपूर्ण एकच असलेला वटवृक्ष

येथील आणखी एक प्रसिद्ध तलाव म्हणजे "कमळ तलाव किंवा लोटस तलाव"
नावाप्रमाणेच असंख्य कमळ फुललेली पहिली.

एका कड्यावरून दिसणारे सातपुडा पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्य

मच्छिन्द्रनाथ गुहा. या ठिकाणी थोडेसे अंतर चालल्यावर पायऱ्या उतरून आपल्याला गुहेपर्यंत पोहचता येते.

तोरणमाळचे क्षेत्रफळ खूपच कमी म्हणजे ४१ चौ.किमी आहे तसेच जवळपास सगळ्या पॉईंट पर्यंत गाडी जाते. यामुळे ३-४ तासात बहुतेक सर्व ठिकाणे पाहून होतात. आम्ही पहिल्या दिवशी पाहिलेली काही ठिकाणे दुसऱ्या दिवशी पहाटेच परत एकदा पहिली. अतिशय थंड वातावरणात धुक्याच्या चादरीत लपेटलेले तोरणमाळ बघताना एक वेगळाच अनुभव मिळतो.

समुद्रसपाटीपासून गावाची उंची २०१ मीटर तर हिल स्टेशनची ११५०मीटर आहे.
पालला शाळेत असतांना गेले आहे. आता परत केव्हा जाणे होईल तेव्हा निश्चितच फोटो देईन.



परतीच्या प्रवासात शहाद्याजवळील सारंगखेडा येथील दत्त मंदिर पहिले. हे एकमुखी दत्त मंदिर आहे. दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला सारंगखेडा येथे मोठी यात्रा भरते. यात्रेला ४०० वर्ष जुनी परंपरा आहे. यात्रेनिमित्त येथे भरणारा घोडेबाजार खूपच प्रसिद्ध आहे. करोनाकाळात मंदिर सध्या बंदच आहे. मंदिराच्या आत गाभाऱ्यात नवीन घुमट बसविण्याचे काम सुरु होते. कामानिमित्त देवांच्या मूर्ती बाजूच्या घरात हलविल्या आहेत. दर्शन घेतले व परतीचा प्रवास सुरु केला.

कसे पोहोचाल? :

विमानाने

औरंगाबाद हा सर्वात जवळचा विमानतळ आहे और औरंगाबाद, राज्य वाहतूक आणि खाजगी पर्यटनाची बस आणि टॅरिस तेरमांळपर्यंत पोहोचण्यासाठी सहज उपलब्ध आहेत. औरंगाबाद हे देशातील बहुतेक मोठ्या शहरांकडे चांगल्या प्रकारे जोडलेले आहे.

रेल्वेने

84 किमीच्या अंतरावर नंदुरबार सर्वात जवळचा रेल्वे स्थानक आहे आणि दोंडाईचा हे शहरापासून 75 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई धुळे (90 किमी) आणि चाळीसगाव (145 किमी) च्या प्रवासासाठी पर्यटक चांगले पर्याय आहेत. प्रेरणा एक्स्प्रेस, मालदा टाउन - सुरत साप्ताहिक एक्स्प्रेस, आणि चेन्नई जोधपूर एक्स्प्रेस असे काही रेल्वेगाड्या आहेत जे नंदुरबारमध्ये थांबतील.

रस्त्याने

तोरणमाल शहादा शहरापासून सुमारे 50 कि.मी. अंतरावर आहे जो सुरतपासून 258 किमी आणि नाशिकपासून 295 किमी अंतरावर आहे. धुळे, नंदुरबार आणि शहादा ते तोरणामाळपर्यंतची सरकारी बससेवा सुलभतेने उपलब्ध आहे.

प्रकाशा (दक्षिण काशी)

नंदुरबार जिल्हातील शहादा तालुक्यात तापी नदीचा काठावर वसलेलं प्रकाशा हे एक तीर्थ-क्षेत्र. यालाच आपण दक्षिण काशी म्हणून प्रख्यात आहे. जितके महत्व उत्तर कशी ला आहे, तितकेच महत्व दक्षिण-काशी ला देखील आहे.

छायाचित्र दालन

  • prakasha temple
    प्रकाश-मंदिर १
  • Kedareshwar temple
    केदारेश्वर_मंदिर
  • प्रकाशा
    प्रकाशा १

कसे पोहोचाल? :

विमानाने

औरंगाबाद आणि सूरत हे सर्वात जवळचे विमानतळ आहेत आणि औरंगाबाद देशाच्या बहुतेक प्रमुख शहरांना जोडलेले आहे.

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्थानक नंदुरबार आहे.

रस्त्याने

प्रकाशा हे शहादा पासून 13 km आणि नंदुरबार पासून 22 km अंतरावर वसलेले धार्मिक स्थळ आहे

संस्कृती आणि वारसा

Kedareshwar Temple Prakasha

प्रकाश येथील केदारेश्वर मंदिराचे छायाचित्र, 1880-90 च्या दशकात घेतलेले आहे. प्रकाश हे नंदुरबार जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्रातील लहान शहर आहे. हे दुहेरी-गुम्बज मंदिराचे मुख्य स्थान आहे ज्यात समोर एक गोल टॉवर आहे आणि याचे मुंबई लिस्टमध्ये वर्णन केले आहे. हे छायाचित्र पश्चिम भारताच्या दौर्याच्या भाग म्हणून घेतले गेले आहे. हे छायाचित्र 1880 आणि 1890 मध्ये वेस्टर्न इंडियाचे आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ द वेस्टर्न इंडिया दरम्यान एतिहसिक सम्बंध अंड संदर्भ म्हणून घेतले गेले आहे

नंदुरबार ची शान, बाल क्रांतीकारकांच शहीद स्मारक

1942 मध्ये महात्मा गांधींनी ब्रिटीशांविरूद्ध भारत छोडो आंदोलन सुरू केले. शिरीषकुमार नंदुरबारमध्ये सरकारविरुद्ध आंदोलन करीत होते. मंगळ बाजार परिसरात पोलिसांनी बॅरीकेड उभारले होते. जसजशी मिरवणूक गाठली त्याप्रमाणे पोलीसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज लावला. शिरीषकुमारकडे तिरंगा, भारतीय राष्ट्रध्वज होता. त्यांच्या लाठीचा आरोप मिरवणूक थांबवू शकले नाही तेव्हा पोलिसांनी गोळीबार केला. या घटनेत शिरीशकुमारची हत्या झाली. त्याचबरोबर धनसुखलाल वणी, घनश्याम दास, शशीधर केतकर आणि लालदास यांचाही याच जागेवर मृत्यू झाला.

छायाचित्र दालन

  • शिरीष कुमार
    शिरीष कुमार
  • शिरीष कुमार स्मारक नंदुरबार
    शिरीषकुमार-स्मारक 2

कसे पोहोचाल? :

विमानाने

औरंगाबाद हा सर्वात जवळचा विमानतळ आहे और औरंगाबाद, राज्य वाहतूक आणि खाजगी पर्यटनाची बस आणि टॅरिस तेरमांळपर्यंत पोहोचण्यासाठी सहज उपलब्ध आहेत. औरंगाबाद हे देशातील बहुतेक मोठ्या शहरांकडे चांगल्या प्रकारे जोडलेले आहे.

रेल्वेने

पर्यटकांसाठी नंदुरबार हे जवळचे रेल्वे स्थानक आहे.

रस्त्याने

नंदुरबार शहर हे नाशिक आणि सूरत या शहरांना जोडलेले आहे , सूरत पासून 174 km आणि नाशिक पासून 194 km अंतर आहे.

 

 

 

मेथी सिंदखेड धुळे मंदीर


 
 https://www.indianetzone.com/47/tourism_dhule_district.htm
 
 






खानदेशातील धुळे जिल्हयात अनेक प्राचीन मंदीरे आहेत. निजामपुर आणि शिरुड गावातील मंदीरांना भाविक मोठ्या प्रमाणात भेट देतात. याशिवाय अमली येथील विष्णु मंदीर, चिकसे येथील गंगाधरेश्वर मंदीर, इण्दावे येथील प्राचीन मंदीर, तापी आणि पांजरा नदीच्या संगमावर वसलेल्या मुडावद गावचे अहिल्याबाई होळ्करांनी बांधलेले कपिलेश्वर मंदीर, पांजरा नदीच्या डाव्या तीरावरचे नागपुर कोकाळे गावचे नागई मंदिर अशी प्राचीन मंदीरे आहेत.
           मेथी ता. सिंदखेडा जि.धुळे या गावी मंदीराचा समुह आहे. यातील लक्ष्मी आणि नारायणाची मंदीरे आहेत. हि दोन्ही मंदीरे अनेक अर्थाने अद्वितीय आहेत. हि दोन्ही मंदीरे शेजारी असून १.८२ मीटर उंच जगतीवर उभी आहेत. मंदीरात प्रवेश करण्यासाठी दोन्ही मंदीरावर पायर्या आहेत. नारायण मंदीरासमोर गरुड असलेला मंडप होता हे दाखविण्यापुरते अवशेष शिल्लक आहेत. या मंदीरापैकी लक्ष्मी मंदीर काहीसे लहान असून त्याचा मंडपही जरा वेगळ्या प्रकारचा आहे. 












 
दोन्ही मंदीरांचा तलविन्यास  मुखमंडप, मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा आहे. लक्ष्मी मंदीराच्या मंडपाला पुर्ण भिंती आहेत. तर नारायण मंदीराचा मंडप अर्धखुला आहे. नारायण मंदीराच्या बाह्यांगावर वैष्णव मुर्ती आहेत.मात्र बांधकामासाठी वापरलेला प्रस्तर निकृष्ट प्रतीचा असल्यामुळे या मुर्तींची कमालीची झीज होउन त्यातील मुर्तीशास्त्रीय तपशील नाहीसे झाले आहेत. लक्ष्मी देवीच्या मंदीरातील मुर्ती आणि तीच्या प्रभावळीत दाखवलेल्या नउ दुर्गावरुन हि मुर्ती कोल्हापुरच्या महालक्ष्मीसारखी असावी हे स्पष्ट होते. विष्णु, शिवपार्वती, लक्ष्मी (करंडक मुकुट धारण करून पद्मासनात आहे)तसेच शेषनागावरील विष्णु अवतार अश्या अतिप्राचीन मुर्ती या मंदिरात आहे.मंदिरातील शेषनागावरील विष्णु अवतार हि मुर्ती खानदेशात फक्त दोन ठिकाणी आहे असे म्हटले जाते, त्या पैकी मेथी गावातील हि एक मुर्ती.
या मंदीराच्या शैलीवरुन हे मंदीर इ.स. १२ व्या शतकात बांधले गेले असावे. धुळे शहरापासुन अवघ्या ४६ किलोमीटर वर मेथी हे गाव वसलेले असुन येथील अतिप्राचीन मंदिरांना अवश्य भेट द्या.

हरिहरेश्वर मंदिर पिंपळगाव | Discover Maharashtra

Discover Maharashtra

हरिहरेश्वर मंदिर पिंपळगाव

हरिहरेश्वर मंदिर पिंपळगाव –

खानदेशातील पाचोरा तालुक्यात अजिंठा पर्वत रांगेच्या पायथ्याशी वसलेले टुमदार गाव म्हणजे पिंपळगाव हरेश्वर. साधारणत: तीस हजार लोकवस्तीचे हे गाव व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. डोंगर पायथ्याची कसदार जमीन ,बऱ्यापैकी जलसाठा, पोषक वातावरण त्यामुळे फळबागा क्षेत्रात या गावाचा चांगलाच लौकिक आहे .बहुळा आणि डुब्बा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले असल्याने या गावाला विशेष धार्मिक, ऐतिहासिक तसेच पौराणिक महत्त्व पण आहे.(हरिहरेश्वर मंदिर पिंपळगाव)

पुराणात भस्मासुराची एक कथा सांगितली जाते.ती अशी की, दररोज चितेचे ताजे भस्म मिळावे म्हणून शिवशंकरांनी एका बालकाची नियुक्ती केली होती. एकदा भस्म न मिळाल्याने चितेतले  निखारेच तो घेऊन आला .त्याचे हात पोळले. त्याच्या एकनिष्ठ पणावर शंकर प्रसन्न झाले व भस्म शोधण्यासाठी तुझी वणवण होणार नाही म्हणून तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचे भस्म होईल असा त्याला वर दिला. परंतु त्याचा दुरुपयोग करू नकोस असा सल्ला पण दिला.

काही दिवस सर्व व्यवस्थित सुरू असताना त्याच्या मनात अहंकार शिरला. त्याला त्याच्या शक्तीचा गर्व चढला आणि तो वाटेल त्याचे भस्म करू लागला. त्याच्या असुरी शक्ती जागृत झाल्या. तो भस्मासुर म्हणून कुख्यात झाला. त्याने भूतल त्राही त्राही करून सोडले. आपल्या शक्तीने आपण कुणालाही परास्त करू शकतो असा उन्मत्त भाव त्याच्या मनात जागृत झाला.

एके दिवशी तो शंकराच्या च्या पाठीमागे लागला. त्यांनी कैलास सोडला. भस्मासुराची व त्यांची दृष्ट भेट झाली ती पाचोरा येथील पाताळेश्वर परिसरात. शंकर तेथून उत्तरेकडे बहुळाच्या दिशेने निघाले .बहुळेच्या काठी त्यांनी भैरवांना वर दिला. खेड्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांना तिथेच थांबवले. ते स्थान वरखेडी म्हणून प्रसिद्ध झाले. सावखेड्याच्या पुढे गेल्यानंतर ते गुप्त झाले. ती जागा गुप्तेश्वर महादेव म्हणून ओळखली जाते.

येथील मंदिराचे वैशिष्ट्य असे की, येथे शिवपिंड नाही. पाषाणालाच शाळुंखेचा नैसर्गिक आकार असून त्यातून जिवंत पाण्याची धार सतत वाहत असते. पूर्वी ती झऱ्यासारखी वाहत असे. आता थोडाफार ओलावा दिसतो. भस्मासुर शंकराचा पिच्छा पुरवत तिथपर्यंत आला.

शंकर भोजे परिसरात रुद्रेश्वर येथे प्रकट झाले. येथील मंदिरात शंकराची भलीमोठी पिंड आहे. ही पूर्णपणे चिखल गाळात रुतलेली होती. मंदिर भग्न झालेले होते. गावकऱ्यांनी खोदकाम करून ती मोकळी केली व नवीन मंदिर निर्माण केले. या परिसरात प्राचीन शिवमंदिराचे अवशेष सापडतात.( येथील रुद्रेश्वर मंदिराविषयी एक स्वतंत्र लेख लवकरच प्रकाशित करतो.)

भस्मासुर रुद्रेश्वर स्थानापर्यंत पाठलाग करत आला. त्यामुळे शंकरांनी पूर्वेकडे बहुळेच्या काठाने बहुळा व  डूबा या संगमावर विश्रांती घेतली. शंकरांचा पिच्छा पुरवत भस्मासुर तिथे जाऊन पोहोचला. शंकरांची अशी अवस्था पाहून विष्णूने मोहिनी रूप धारण केले व भस्मासुराला या संगमावर रोखून धरले .शंकर बहुळेच्या काठाने थेट अजिंठा पर्वत रांगेत तिच्या उगमापर्यंत जाऊन पोहोचले. तिथून त्यांनी मागे वळून पाहिले. म्हणून या जागेला मुरडेश्वर असे नाव प्राप्त झाले .

शंकरांनी मागे वळून पाहिले तर काय ,एक सुंदर ललना भस्मासुराला मोह पाशात अडकवण्याचा पूरेपूर प्रयत्न करत होती .मोहिनीने नृत्य प्रारंभ केले व आपल्या तालावर भस्मासुराला नाचायला भाग पडले. नृत्यात तल्लीन झालेल्या मोहिनीने आपला एक हात डोक्यावर ठेवला. तिचे अनुकरण करत भस्मासुराने देखील आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्या क्षणी तो धाडधाड पेटत जमिनीवर कोसळला. त्याचा अंत झाला.                               विष्णूने मोहिनी रूपाचा त्याग केला. ते  आपल्या मूळ स्वरूपात प्रकट झाले. शंकरांनी हर्षातिरेकाने त्यांना मिठी मारली. दोघांची कडकडून गळाभेट झाली.

हा प्रसंग जेथे  घडला ते स्थान म्हणजे हरिहरेश्वर मंदिर होय. आता या आख्यायिकेतील महत्त्वाचा भाग बघू .पाचोर्‍यातील पाताळेश्वर ते अजिंठा पर्वतरांगेतील मुर्डेश्वर असा शंकरांनी केलेला प्रवास हा मध्य काळापर्यंत व्यापारी मार्ग होता .मराठवाड्यातील व्यापारी घाटमाथ्यावरचा माल जोगेश्वरी मुर्डेश्वर येथील घाटातूनच खाली उतरवून खानदेशात प्रवेश करत असत.      आजही सावखेडा येथील भैरवनाथ यात्रेत मराठवाड्यातील गुळाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

येथील भैरवनाथाला सव्वाच्या पटीत गुळाचा नैवेद्य देण्याची परंपरा आहे. मुर्डेश्वर ,हरिहरेश्वर, रुद्रेश्वर या मंदिरांचे प्राचीनत्व व तेथील दगडी शिल्पे इतिहासात डोकवायला भाग पाडतात.

या आख्यायिकेतील अजून महत्त्वाचा भाग म्हणजे  भस्मासुराचे मागे लागणे आणि शंकराचे पलायन ही प्रतीकात्मक रूपे आहेत. जीवनात अनावश्यक संकटे मागे लागली की प्रत्येकाला तोंड देत शक्ती विनाकारण वाया न घालवता त्यापासून माघार घ्यावी लागते .ही यशस्वी माघार असते. अनेक महापुरुषांनी अशी यशस्वी माघार घेतल्याचे दिसून येते.

कुवत नसताना प्रचंड शक्ती हाती आली की व्यक्ती किती पाशवी वर्तन करू शकते याचे उदाहरण म्हणजे भस्मासूर होय. व्यक्ती कितीही सामर्थ्यशाली असली तरी स्वतःचा विवेक गहाण ठेवून दुसऱ्या च्या तालावर नाचू लागली की त्याची फलनिष्पत्ती काय होते हे भस्मासुर कथेतून शिकायला मिळते.

अविवेकी अनिर्बंध वर्तनाला वेसण घालण्यासाठी शांत संयमी व विवेकशील बुद्धिने घेतलेला निर्णय म्हणजे विष्णूचे मोहनी रूप होय. मानवी वर्तनाच्या प्रत्येक निकषावर या कथा घासून पहिल्या तर त्यातील यथार्थता लक्षात येते. खुळचट आणि अनैतिहासिक म्हणून त्यांची हेटाळणी करण्यापेक्षा मानवी व्यवहाराचे ते एक निष्कर्ष आहे असे मानले तर या कथा त्रासदायक ठरत नाहीत.        हरी आणि हर यांची भेट म्हणजे शैव आणि वैष्णव या संप्रदायांचे मनोमिलन आहे .त्यांच्यातील समन्वय सांस्कृतिक इतिहासाला मोठी कलाटणी देणारी घटना आहे .त्याचे प्रतिबिंब सांस्कृतिक भाव धारेत आढळून येते. हा समन्वय प्राचीन भारताच्या सांस्कृतिक इतिहासात खूपच मोलाचा ठरला .

पिंपळगाव हरेश्वर येथील हरिहरेश्वर मंदिर निर्मितीचा कालखंड पूर्व पेशवाई कालीन असावा याबाबत मते मतांतरे आहेत. मंदिराच्या पायऱ्या व घाट निर्मितीचा कालखंड शके1841 म्हणजे 1919 असा आहे. येथील पायरी लेख हा जगातील सर्वात लांबीचा शिलालेख आहे .

या शिलालेखाचे वाचन, हस्तलिखित संशोधन विभाग ,दख्खन पुरातत्त्व व सांस्कृतिक संशोधन केंद्र भारत सरकारचे संचालक तथा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील गांधी संशोधन केंद्राचे समन्वयक श्री भुजंगराव बोबडे यांनी केले आहे. या शिलालेखाची लांबी 15 मीटर नऊ इंच रुंदी 9 इंच आहे. शिलालेखांची भाषा मराठी असून लिपी देवनागरी आहे. भुजंगराव बोबडे व शेंदुर्णी येथील प्राध्यापक डॉक्टर प्रशांत देशमुख यांनी या शिलालेखाचे वाचन केले आहे.

ते पुढील प्रमाणे ….।। ओम श्री हरिहरेश्वराय नमः या फरशी चे काम शके१८४१ मध्ये झाले. त्यात मेहनत व लक्ष घालणारे सद्गृहस्थ मे. मामलेदारसो. श्रीधर आर.टी. देव जहागीरदार सीताभ्रतार श्रीधर यांच्यातर्फे मुखत्यार रामभाऊ रामचंद्र जोशी यांनी जहागिरीचे उत्पन्नातून खर्च रुपये २५००शे केला. जमाखर्च लिहिण्याचे काम रा नथू कुंता पाटील यांनी केला. बाकी कामात लागणारी सर्व सिद्धता व देखरेक देवराज मरडाजी पाटील यांनी केली. कारागीर कुऱ्हाडकर रामभाऊ, दगडू शिंपी, व. द. पंचाळ, ब्राह्मण व मंडळी, दगड पाडणारे पांडू गोविंदा माळी व मंडळी ।।  ।। देह त्यागिता किर्ती मागे उरावी, मना सज्जना हेचि क्रिया धरावी ।। श्री समर्था चे म्हणण्यावरून पुढे रा —केल्या कामास कोणी आश्रय देतील अशी आशा आहे. रा. त्यांनी वाड्यातील— फरशी चे प्रमुख खर्चाने केला. लेखक केशव दगडू मिस्त्री पतर दिले.

हा शिलालेख पायरीच्या अनेक दगडांवर कोरून एकाच रांगेत बसवला आहे. त्यामुळे याला पायरी लेख असे नाव दिले गेले. पायर्‍या चढून वर आले की उजव्या बाजूला एक सात फूट उंचीचा अखंड पाषाण रोवलेला आहे. त्यावर एक आकृती आसन घालून बसलेल्या अवस्थेत कोरलेली दिसते. या पाषाणाला भस्मासुर म्हणतात. तिथून मंदिराचा बाह्य परकोट सुरू होतो. त्याची उंची साधारण 28 फूट आहे. परकोटा चे बांधकाम चारही बाजूंनी बंदिस्त आहे. आत जाण्यासाठी एकच मुख्य दरवाजा आहे. त्या समोर घाट पायरीवर भला मोठा नंदी लक्ष वेधून घेतो.

मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला सुंदर दगडी महिरपीत कोरलेल्या छत्र्या नजरेत भरतात. पाटणादेवी येथील भास्कराचार्य व त्यांची कन्या लीलावती यांच्या समाध्या पिंपळगाव येथील हरेश्वर मंदिरात पाहिल्याने आश्चर्य वाटले.( याविषयी एक स्वतंत्र लेख लवकरच प्रकाशित करतो.) पिंपळगाव हरेश्वर येथील भास्कराचार्यांची समाधी पाच बाय पाच फूट उंचीच्या चौथर्‍यावर उभारली आहे. त्याला आधार देण्यासाठी चार फूट उंचीचा चौकोनाकृती ओटा बांधला आहे. सुंदर कोरीव काम केलेल्या चार दगडी स्तंभावरील नक्षीकाम साधे असले तरी महिरप सुंदर आहे .त्यावर दगडी छत आकर्षक रित्या बसवले आहे .छतावरील घुमटाकार कळस अलीकडे बसवला असावा.

या संपूर्ण मंदिराला स्थानिक गावकऱ्यांनी रंगरंगोटी करण्यापूर्वी सिमेंट व नर्मदा रेतीचे लिंपण केले आहे .त्यामुळे मंदिर पेशवेकालीन वाटण्याऐवजी अलीकडच्या काळातच बांधले याचा भास होतो. पाषाणावरील कोरलेली शिल्पे किंवा पानाफुलांच्या आकृती सिमेंटच्या अतिरेकी माऱ्यात धाराशयी पडल्याचे स्पष्टपणे दिसते .जीर्णोद्धार कर्त्यांनी फक्त मजबूतीकडे लक्ष दिले. त्यात एक समृद्ध वारसा आपल्याकडून कायमचा पुसला जातो याचेही भान मंडळींना राहिले नाही.

भास्कराचार्य यांच्या बाजूला असलेली लीलावती यांची समाधी मात्र अलीकडच्या काळात बांधली गेल्याचे स्पष्टपणे दिसते. या समाधीच्या शेजारी नंदीमंडप असून स्वतंत्र नंदीची मुर्ती त्यात सुशोभित आहे. नंदीच्या गळ्यातील घंटांची माळ पाठीवरून  शेपटीपर्यंत दर्शवली आहे. दोन बालिका आकृती नंदीच्या गळ्यातील घंटा वाजवताना चित्रित केल्या आहेत. नंदीमंडपाचे चारही खांब दगडी कोरीव कामाने सुशोभित केल्याचे स्पष्टपणे दिसते. त्यावरील जोतरे व तुळया लक्ष वेधून घेतात. नंदी मंडपाला आधार देण्यासाठी अलीकडे सिमेंटचे बांधकाम करून मजबूत केल्याचे स्पष्टपणे जाणवते. येथे नंदीमंडप स्वतंत्रपणे उभारला आहे. मंदिराच्या सभागृहात प्रवेश करताना दोन दगडी स्तंभावरील कलश व पाने लक्ष वेधून घेतात. त्याच्या बाजूला अलीकडच्या काळात गणपती मंदिर बांधून त्यात सुबक श्री गणेशाची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठित केली आहे.

सभागृहात प्रवेश केल्यावर वितानाची उंची व गाभाऱ्याची भव्यता नजरेत भरते. अलीकडे केलेले सिमेंटचे काम व रंगकाम यामुळे आपण चित्रपटातील एखादा थर्माकोलचा सेट पाहतोय की काय असा भास होतो. सभागृहाच्या दोन्ही बाजूला देवकोष्ठके आहेत पण त्यातील मूर्ती मात्र नाहीशा झालेल्या आहेत. सभागृह व गर्भगृह यातील अंतरिक्ष आठ दगडी खांबांवर तोललेला आहे. सभागृहातून प्रवेश केल्यावर सुद्धा शिव पिंडी चे दर्शन होत नाही हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

महाद्वारा वरील नक्षीकाम पानाफुलांचे असले तरी पायथ्याला यक्ष किन्नर गंधर्व मूर्ती स्पष्टपणे दिसतात. अंतरिक्षाच्या उजव्या कोनाड्यात गणपती मूर्ती चटकन लक्षात येत नाही. ती फारच सुंदरआहे. महाद्वाराच्या उंबरठ्यावर आल्यावर गर्भगृहातील शिवपिंडीचे वरतून दर्शन होते. आठ ते नऊ पायऱ्या उतरून गर्भगृहात जावे लागते. येथील शिवपिंडी विलोभनीय आहे .संपूर्ण गर्भगृहाला आतून संगमरवरी बांधकाम केले असून पुरेशी विद्युत रोषणाई केली आहे. त्यामुळे दर्शन व्यवस्थित घेता येते. येथील गर्भगृहाची खोली अन्य शिवमंदिरापेक्षा अधिक आहे. येथील शिवपिंडीवर नित्य पूजाअर्चा व नैवेद्याचा मान गुरव घराण्याकडे सोपवला आहे.

येथील पिंडी चे वैशिष्ट्य म्हणजे शाळुंखे वरील लिंगाचे दोन भाग स्पष्टपणे दिसतात .त्यापैकी अर्धा भाग विष्णू स्वरुप तर अर्धा शिव स्वरूप मानला जातो. विष्णू स्वरूपाला तुळस तर शिव स्वरूपाला बेलपत्र वाहण्याचा प्रघात आहे. एकाच पिंडीवर शिव आणि विष्णू यांची पूजा एकाच वेळी केली जाते. अशी ही खानदेशातील आगळीवेगळी परंपरा येथे पाहायला मिळते. कारण भस्मासुर वधानंतर याच ठिकाणी शिव आणि विष्णू यांची गळाभेट झाली होती. म्हणून शैव आणि वैष्णव परंपरांचा सुंदर मिलाफ येथे पाहायला मिळतो.

आषाढी व शिवरात्रीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते .चार वर्षांपूर्वी या पिंडीवर वज्रलेप चढवण्यात आला. गर्भगृहात रिकामे देव कोष्टक आहे. त्या वरील दगडी नक्षीकाम वाघळी येथील मुधाईदेवी मंदिरातील देव कोष्टकांत सारखेच आहे. गर्भगृहाचे वितान सुमारे पंचवीस फूट उंचीची असून त्यावर अप्रतिम नक्षीकाम केलेले आहे व पंख्यांची सोय केल्याने वायुविजनाची सोय झाली आहे.

बाहेरच्या बाजूला गणपती मंदिरा शेजारी एक गोलाकार दगडी बाणा बसवलेला दिसतो. शेगावचे संत श्री गजानन महाराज येथे दर्शनासाठी आल्यावर याच ठिकाणी ध्यान मुद्रित आसनस्थ होते असे सांगितले जाते. मंदिर गर्भगृहाचे बाह्य काम नागर शैलीतील आहे. त्यावर उडीसा मंदिर शैलीचा स्पष्टपणे प्रभाव जाणवतो. शिखरावरील कळस मात्र चौकोनी असून त्यावर गोलाकार घुमट चढवला आहे. त्याची रचना केदारनाथ मंदिर शिखर सदृश्य असल्याचा भास होतो. मंदिराच्या बाह्य भागावर तीनही बाजूंनी देवकोष्ठके आहेत परंतु त्यात मूर्ती मात्र नाहीत. कदाचित त्यांची झीज झाली असावी.

पाठीमागे नरसिंह प्रकट व हिरण्यकश्यपूचा वध अशी दोन स्वतंत्र शिल्पे आढळतात. त्यावर कीर्तिमुख कोरलेला आहे तर उजव्या बाजूला महिषासुरमर्दिनीची आकृती स्पष्टपणे दिसते. त्या खालील मूर्तीची पूर्णपणे झीज झाल्याने मूर्ती ओळखता येत नाही. मंदिर पाठीमागे सुंदर कमळ फुले मन वेधून घेतात. त्यासाठी खास पुष्करणी तयार केलेली आहे. त्यात गुलाबी, पांढरे ,गर्द निळे, जांभळे अशा विविधरंगी कमळ फुलांचा ताटवा डोळ्यांचे पारणे फेडतो.

पिंपळगाव गावापासून साधारणता दीड किलोमीटर अंतरावर असलेले हरिहरेश्वर मंदिर हे खानदेशातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे .त्याला पौराणिक तसेच ऐतिहासिक संदर्भ आहेत. संत गोविंद महाराज यांची समाधीदेखील याच गावात आहे.( त्यांचे विषयी स्वतंत्र लेख लवकरच प्रकाशित करतो.)

गावातून मंदिरापर्यंत जाण्यासाठी अलीकडे स्वतंत्र सिमेंटचा रस्ता बनवल्यामुळे भाविक तसेच पर्यटकांना जाणे सुलभ झाले आहे. पावसाळ्यात हा परिसर फारच रम्य भासतो. लोकप्रतिनिधींनी व इतिहास अभ्यासकांनी या मंदिरातील सर्वात लांबीच्या शिलालेखाची गिनीज बुक मध्ये नोंद होईल यासाठी प्रयत्न करावेत ही कळकळीची विनंती.

श्री गोविंद महाराज यांच्या समाधी मंदिरापासून हरिहरेश्वर मंदिराकडे जातांना डाव्या बाजूला एक सुंदर गणपती मंदिर डोळ्यांचे पारणे फेडते. मराठा शैलीतील या मंदिराला कैची पाषणांचा वापर करून मजबुती दिली आहे. शिखरावर चुन्याचे अप्रतिम काम करून सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. त्या कदाचित अष्टसिद्धी असाव्यात असे वाटते. चारही बाजूला ऑइल पेंट ची रंगरंगोटी केल्याने त्या मूर्तीतील सूक्ष्म तरल भाव ओळखता येत नाहीत परंतु मंदिर फारच रेखीव सुबक आहे.     पेशवेकालीन असलेल्या या मंदिराला आवर्जून भेट द्यावी असेच हे मंदिर आहे. मंदिरातील गणेश मूर्ती चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी, मुधाईदेवी, पाचोरा तालुक्यातील नगरदेवळे येथील संगमेश्वर मंदिरातील गणेश मूर्तीची विलक्षण साधर्म्य दर्शवते  त्यामुळे ही मूर्ती परिसरातील एखाद्या मंदिरातून येथे प्रतिष्ठापित केली असावी का असाही प्रश्न निर्माण होतो.

काही असो,  हा संपूर्ण परिसर निसर्गाच्या सानिध्यात असल्याने एका दिवसाच्या सहलीसाठी फारच सुंदर आहे. येथून जवळच सह्याद्रीच्या अजिंठा पर्वत रांगेत मुर्डेश्वर आचे प्राचीन मंदिर आहे. पावसाळ्यात पर्यटनाची हौस असणाऱ्या गिरी प्रेमींनी आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. पर्यावरणप्रेमी, निसर्ग वेडे पक्षीप्रेमी चातक, धार्मिक आस्थावान व इतिहास अभ्यासक या सर्वांना हे स्थान निश्चितच भरपूर आनंद देईल असे आहे. दिवाळीच्या सुट्टीत एका दिवसाच्या सहलीसाठी अतिशय योग्य असे हे स्थान आहे.

संजीव बावसकर, नगरदेवळे, जळगाव

 https://www.discovermh.com/harihareshwar-temple-pimpalgaon/

 https://www.deshdoot.com/local-news/nasik/glory-of-malegaon-ancient-mahadev-temple

 मालेगांव शहरातील ( Malegaon City ) काही वास्तू-स्थळांना ऐतिहासिक व प्राचीन वारसा लाभलेला आहे. त्यात मालेगांव भागाचे राजे श्रीमंत सरदार नारोशंकर राजेबहादूर यांच्या कतृत्वाने निर्मित मालेगांवचा भुईकोट किल्ला व त्यालगत असलेले श्री महादेव मंदिर, श्री किल्ला हनुमान मंदिर, वावीकरांचे श्री निळकंठेश्वर मंदिर, सटवाजी बुवा यांचे श्री विठ्ठल मंदिर, श्री रामसेतू हनुमान मंदिर, शिंपी समाजाचे शनीमंदिर लगतच श्री सत्यनारायण मंदिर असा हा धार्मिकदृष्ट्या समृद्ध परिसर आहे.

साधारणपणे किल्ला बांधताना मोसमनदी पात्रात मधोमध श्री महादेव मंदिर ( Shri Mahadev Mandir- Malegaon )निर्माण केले गेले आहे. सदर मंदिर काळ्या पाषाणातून साकारलेले आहे. भक्कम दगडी पाया व चिरेबंदी, त्यावर तिन फूट रुंदीच्या दगडी भिंती असे हेमाडपंती शैलीतील विटा व चुण्यात बांधलेले सुबक कळसयुक्त मंदिर बघताच नजरेत भरते. भव्यता आणि दिव्यतेमुळे आपोआपच भाविक नतमस्तक होतात.

संपूर्ण पंचक्रोशीत या मंदिराला तोड नाही. मंदिराचे स्वरूप म्हणजे मुख्य गाभारा, ज्यात भव्य अशी शंकराची पिंड आहे. गाभार्‍यात दुर्गादेवीची सिंहारुढ मूर्ती नंतर बसविण्यात आली आहे. दुसरे नंदी सभागृह आहे. तेथे श्री गणेशाची शेंदुर चर्चीत भव्य पाच फूट उंचीची दगडी मूर्ती भाविकांना आशीर्वाद देत असते.

काळ्या पाषाणातील भव्य नंदीची मूर्ती साधारणपणे शिवलिंगासमोर सरळ रेषेत असलेली! ध्यानमग्न अवस्तेतील मुद्रा असलेली नंदीचा मुर्ती, नागांचे स्वतंत्र छोटेखानी दगडी मंदिर तसेच कासव व द्वारपालांच्या दगडी मूर्ती, मंदिराबाहेर महाबली हनुमानाची गदाधारी शेंदूर चर्चीत वीरमुद्रा असलेली मूर्ती व मंदिर.

मंदिराच्या भोवतालचा परिसर हा घडीव दगडी बांधकामाचा असून मोसमनदी किनारी दगडी घाट व पायर्‍या बांधलेल्या आहेत. मंदिराबाहेर तुळशी वृंदावन व एक भुयार आहे. राजपरिवारासंबंधीत काही समाधीसुद्धा आहेत. शहरीकरणाच्या विस्तारापूर्वी सदर घाटावर भाविक व जनता पिण्याचे पाणी भरण्यासह अंघोळीसाठी व कपडे धुण्यासाठी येथेच येत असत.

मंदिर व्यवस्थापनासाठी गुरव परिवाराला पाचारण केलेले होते. त्यांना उदरनिर्वाहासाठी घरे व शेतजमीनी उपलब्ध करून दिलेल्या होत्या. येथे श्रावणी सोमवार, महाशिवरात्री, हरी-हरभेट इत्यादी उत्सवात भाविकांची मोठी मांदियाळी असे. सदर मंदिरात आतापर्यंत असंख्य रूद्रपूजा, अभिषेक, होमहवन व आरत्या होऊन शिवलींग अत्यंत पावन व जागृत झालेले आहे. येथे भाविकांची निस्सीम व अढळ श्रद्धा आहे. असे वैभवशाली परंपरा असलेले मंदिर व परिसर कालांतराने काही प्रासंगिक व नैसर्गिक कारणांमुळे दुर्लक्षित झाले. अनेक पूर तसेच 1979 चा महापूर सुद्धा मंदिराने सहन केला.

गेले पावणे तीनशे वर्ष ऊन, वारा, पावसाचे आघात झेलून मंदिर व परिसराची दुरावस्था झाली होती. मंदिराचे दगड सुद्धा तुटून चोरीला गेले होते. परिसराला अतिक्रमणांचा विळखा पडला होता. लोक परिसरात प्रात:विधी व गैरकृत्य करू लागल्यामुळे मंदिर बरीच वर्षे बंद राहू लागले. अधून-मधून उत्सवापुरते उघडले जात. मंदिराच्या वरच्या बाजूला शवविच्छेदनगृह होते. त्यामुळे भाविकांना परिसरात येण्याची भिती वाटे. काही वर्षांपूर्वी शहरातील व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत मंदिरात पुनश्च नित्य आरती, पूजापाठ सुरू केले. मंदिर व परिसराची देखभाल, पूजाअर्चा, उत्सव साजरे करून शहरातील भाविकांना मंदिराकडे आकृष्ट केले.

भाविकांनी एकत्र येऊन दैनंदिन पूजाअर्चा व उत्सव साजरे करण्यास हातभार लावत मंदिराची देखभाल, जीर्णोद्धार, उत्सव साजरे करणे व उदभवलेल्या समस्यांचे निस्तरीकरण आदी कार्य स्वखुषीने आपल्या खांद्यावर घेतले. नंतरच्या काळात पंकज रामेश्वर मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली भाविकांची श्री महादेव सेवा समिती स्थापन झाली. त्यावेळी अनिल मोरे, सुनील मोराणकर, संजय जगताप, अनिल परदेशी, वसंत श्रीवास्तव, भिका साखरे, कैलास सोनवणे, मिलींद गवांदे, रमेश मंडाळे, सचिन जाधव, संतोष जाधव, नारायण गवळी, रणजीत भाटी, खेमचंद तलरेजा, राकेश पगारे, प्रसन्न शिनकार, गजानन शिरसाठ आदी अनेक कार्यकर्त्यांचे तन, मन, धनाने सहकार्य लाभले. सोबतच समितीच्या स्थापनेपुर्वीच्या ज्येष्ठ सदस्यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य मिळत होते.

समितीने आत्तापर्यंत भाविकांच्या सहकार्याने मंदिराचा आतुन व बाहेरुन संपूर्ण जीर्णोद्धार केला असून मुळ रचनेला कुठलाही धक्का न लावता प्राचीन वास्तूकला जतन करण्याचा प्रयत्न केला आहे.

महादेवाच्या पिंडीला सुद्धा वेळोवेळी डागडूजी करून आधी तांब्याचे कवच आणि सध्या पितळी कवच चढवण्यात आले आहे. बाहेरुन सुद्धा कळसाचे जीर्ण झालेले प्लास्टर काढून मुळ रचनेतच नवीन प्लॉस्टर व रंगरंगोटी झाली आहे. लोकप्रतिनिधी दीपक भोसले व अ‍ॅड. ज्योती भोसले, राजेश गंगावणे, ताराबाई शिरसाठ, चिंतामण पगारे, मच्छिंद्र अहिरे आदींनी नगरसेवक निधी देऊन परिसराला वॉल कंपाउंड व तार कंपाउंडने संरक्षित करण्यास सहकार्य केले. तरीही थोडे काम शिल्लक आहे. त्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन दिले असून नगरसेविका दीपाली विवेक वारुळे यांचे सुद्धा जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

मंत्री दादा भुसे यांनी शोभिवंत लाईट, स्ट्रीटलाईट उभारून दिले. तसेच नगरसेविका वारुळे यांनी प्रयत्न करून सभोवताली पेव्हरब्लॉक व मंदिराच्या पाठीमागे माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना पाठपुरावा करून काँक्रीटीकरण करून दिले आहे. इतर नगरसेवकानी इलेंट्रीक पोल, बाकडे इत्यादि देऊन सहकार्य केले आहे. माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे यांनी मंदिरासाठी बोअरवेल करून दिली आहे.

नदीविकास आराखड्यात संगमेश्वर ते महादेव मंदिर असा पादचारी पूल उभारण्यात आला आहे. उत्सव व विविध उपक्रमांसाठी मुळ मंदिराची जागा अपुरी पडत असल्यामुळे मंदिराचा चहूबाजूंनी विस्तार करण्याचे समितीने काम हाती घेतले आहे. मंदिरच्या समोर जोडूनच एकसंघ सभामंडप व इतर बाजूंनी वाढवून विस्तारीत कार्य स्ट्रक्चरवर छतापर्यंतची उभारणी लोकसहभागातून केली आहे. ंकृषीमंत्री भुसे यांच्याकडून सुद्धा सुशोभिकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

राजेबहादूर परिवाराकडून वेळोवेळी सहकार्य प्राप्त होत असते. सध्या वर्षभरात श्रीमहाशिवरात्री उत्सव, श्रावण महिना, श्री हरिहर भेट उत्सव आदी साजरे केले जातात. तसेच नित्य आरती, अनुषंगिक धार्मिक परंपरा जतन केल्या जातात. समिती स्थापण्यासोबतच जयशंकर भजनी मंडळाची देखील स्थापना केली गेली आहे. भजनी मंडळाद्वारे दरसोमवारी रात्री दोन तास भजन केले जाते. प्रसंगानुरूप विविध आमंत्रणावरून अनेक ठिकाणी भजनाचा कार्यक्रम केला जातो.

 

 https://www.discovermh.com/sangameshwar-temple-nagardevale/

संगमेश्वर मंदिर नगरदेवळे | Discover Maharashtra

Discover Maharashtra

संगमेश्वर मंदिर, नगरदेवळे

संगमेश्वर मंदिर नगरदेवळे…

नगरदेवळे गावाच्या वायव्येस तीन किलोमीटर अंतरावर असलेले हे प्राचीन मंदिर ! तीन नद्यांच्या पवित्र संगमावर एका उंच टेकडीवर या मंदिराचे निर्माण कार्य झाल्याने त्याला संगमेश्वर महादेव म्हणतात.
संगमेश्वर मंदिर नगरदेवळे मंदिराचे नंदीगृह, सभामंडप व गर्भगृह असे तीन भाग पडतात. तीनचार वर्षांपासून या मंदिराचे जीर्णोद्धार कार्य भारतीय पुरातत्त्व खात्याने सुरू केले आहे. नंदीगृहाचे पुनर्निर्माण नव्याने केले आहे. त्यात प्राचीन नंदीची मूर्ती आहे . त्याची उंची तीन फूट लांबी चार फुटांपर्यंत आहे. गळ्यात घंट्यांची सुंदर साखळी माळ आहे . नंदिसमोर भद्र कलशधारी अलगद कोरलेला असून तो नंदिसमोर बसलेला आहे त्याचे तोंडमात्र शिवाकडे आहे अशा प्रकारचं नंदीशिल्प पाटणादेवी परिसरात पण आहे. येथे नंदीची शिंगे व कानांची मात्र झीज झाली आहे. मंदिराच्या बाहेर उजव्या हाताला एक वराह नंदी आहे .याचा आकार वराहासारखा असतो . त्यांना यज्ञवराह असेही म्हणतात. मूर्तीशास्त्रानुसार त्याला भूवराह असेही म्हणतात .

आता आपण सभागृहात प्रवेश करतो . डाव्या हाताला भिंतीला उजव्या सोंडेची गणपतीची मूर्ती लक्ष वेधून घेते . मूर्तीची सोंड नंतर दुरुस्त केलेली असली तरी हात व पायांची ठेवण प्रमाणबद्ध आहे . प्रत्येक पायात दोन असे चारही पैंजणांचे कोरीव काम सुबक आहे .कंबरेचा नंदीपाश , यज्ञोपवीत , मूषक हातातील परशु , अंकुश, मोदक ठळकपणे दिसतात.वरदहस्त मात्र भग्न झाला आहे .

सभागृहात उजव्या हाताला देवडीत तीन मुर्ती आहेत. पैकी एक डाव्या सोंडेची गणेशाची आहे . उजवा व डावा असे दोन गणेश असा दुर्मिळ योग्य येथे पहावयास मिळतो . ( पद्मालय सोडल्यास )
गणपतीच्या बाजूला चंडिकेची अर्धमूर्ती पहावयास मिळते . ही सप्तमातृकांमधील एक देवी म्हणून ओळखली जाते .ही देवी चालुक्यवंशाची कुलदेवता आहे त्यामुळे हे मंदिर चालुक्य कालीन असावे का ? असाही प्रश्न निर्माण होतो .
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे पोट खपाटलेले असून पोटावर विंचू कोरलेला आहे . तो भुकेचे प्रतीक आहे . तिला सहा हात असून ती शस्त्रधारी आहे .उजव्या हातात बालक मूर्ती कोरलेली दिसते . कंबरेला मेखला घंटाकर आहे .
चंडिकेच्या बाजूला पार्वतीचे शिल्प कोरलेले आहे .या मूर्त्यांचे चेहरे अस्पष्ट असल्याने त्यांचे सौंदर्य दिसत नाही . त्याच्याच बाजूला शंकर पार्वतीचे शिल्प आहे .

सभा मंडपाला प्रत्येक कोपऱ्यात तीन असे बारा खांब आहेत . खांबावरील कोरीव काम वाखाणण्याजोगे आहे . सभा मंडपाचे काम गोलाकार असून हवा व उजेड येण्यासाठी मोकळे ठेवले असावे .
आता आपण गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलो .गर्भगृहाचे मुख्य प्रवेशद्वार अत्यंत सुंदर असून अप्रतिम सुबक कोरीवकाम त्यावर आढळून येते . उंबरठ्याच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला किर्तीमुख कोरलेले आहे .विशेषतः शिवमंदिराच्या पायऱ्यांवर व इतर मुर्तींच्या मागे किंवा डोक्यावर किर्तीमुख कोरलेले असते . या ठिकाणी दोन शिंगे असलेली बटबटीत डोळ्यांची दोन किर्तीमुखे आहेत .त्यांचा चेहरा सिंहाचा आहे .

पद्मपुराणाच्या एका दंतकथेनुसार या किर्तीमुखाचा संबंध शिवाशी येतो . राहू आणि शिव यांच्या वादात शंकराच्या क्रोधाग्नीतून किर्तीमुख हा भयंकर प्राणी जन्माला आला . परंतु राहूने क्षमायाचना केल्यावर शंकराने किर्तीमुखास थांबविले .पण किर्तीमुखास भयंकर भूख लागली . तो मांसाची याचना करू लागला .तेव्हा शंकराच्या आदेशाने तो स्वतःचेच मांस खायला लागला . शेवटी त्याचे मुखच शिल्लक राहिले . या आज्ञाधारक पणाबद्दल शंकर त्याची प्रशंसा करतात व त्याला थांबवतात .तेव्हापासून किर्तीमुख हा शिवाच्या पायाशीच असतो .

किर्तीमुखाच्या डाव्या व उजव्या बाजूला शिल्पमालेत असंख्य देवी देवतांच्या शिल्पाकृती आहेत . तसेच मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूस अनेक देवतांच्या मूर्ती आहेत . त्यांचा स्वतंत्र अभ्यास करता येईल . मध्यभागी गणेशाची आकृती असून त्यामागे गणसेना असावी .

सभामंडप व गर्भगृहाचे खांब तसेच भव्य तुळया पाहिल्यावर थक्क व्हायला होते .साधारणतः 11 व्या शतकात या मंदिराचे बांधकाम पाहता कुठलेही तंत्रज्ञान विकसित नव्हते असे म्हणणे धाडसाचेच होईल .आपल्या पूर्वजांच्या तंत्रशुद्ध ज्ञानाबद्दल आपण विस्मित होतो .
मंदिराचा बाह्यभाग अत्यंत सुंदर व प्रशस्त आहे. मंदिर बांधकाम करतांना कुठेही चुन्याचा वापर करण्यात आला नाही . दगडी तुळया व खांब एकमेकांत साखळी पध्दतीने गुंफलेले आहेत . मंदिराची लांबी 50 फुटांपेक्षा अधिक आहे . चारही बाजूंनी मंदिर पाहतांना त्याची भव्यता जाणवते . एका नजरेत मंदिर पाहता येत नाही .

मंदिर परिसरात अनेक दुर्मिळ शिल्पे आढळतात .पैकी शिवपार्वती शिल्प अप्रतिम आहे . शिवाच्या डाव्या मांडीवर पार्वती बसलेली आहे .तिच्या डोक्यावर नागाने फणा उभारला आहे . शिव हे नंदीवर पद्मासनात बसलेले आहेत . मूर्तीच्या डाव्या बाजूस गणपती आहे .शिवपार्वतीच्या मागे दोन दंडधारी उभे आहेत . ते वीरभद्र व कार्तिकेय असावेत असे वाटते .
शंकराची अजून एक मूर्ती नंदीवर विराजमान आहे. स्थानिक लोकांनी शेंदूर चढविल्यामुळे मूर्तींचे मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. उघडयावर असल्याने या मूर्तींची झीज झाली आहे . पुरातत्व विभागाने मंदिर जीर्णोद्धारसोबत या शिल्पकृतींचे पण संवर्धन करावे ही अपेक्षा !!!

संजीव बावसकर, नगरदेवळे




 
 
बिजासन माता मंदिर.
महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवर हे मंदिर वसलेले आहे.
नवरात्रात ९ दिवस येथे विविध उत्सव साजरे केले जातात.
तसेच यात्रा देखील भरली जाते.
माहितीनुसार कोरोना महामारीमुळे या वर्षीचा नवरात्र उत्सव भक्तांसाठी रद्द करण्यात आला असुन मात्र मंदिरावर आकर्षक रोशनाई करण्यात आली आहे.
धुळे शहारापासुन केवळ ८५ किलोमीटर वर हे मंदिर आहे.

 
 आशापुरी भवानी मंदिर,मुल्हेर : हे मुल्हेर नजिकचे भारतातील एक अति प्राचिन स्थान असुन निसर्गरम्य वातावरणात वसले आहे। येथे बाजुलाच धबधबा आहे.कौटोंबिक वनभोजन सहलीसाठी अतिशय उत्तम स्थान आहे. हि देवी प्रेमळ असुन भक्तांच्या हाकेला लगेच धावते. पुढेच जाखोड धरण आहे त्यामुऴे सुंदर वाटते..
 

 
बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील अतिशय निसर्गरम्य पर्वतरांगातील मुल्हेर किल्ल्याच्या मागील बाजूस पायथ्याशी असलेल्या श्री क्षेत्र नरकोळ येथील आशापुरी माता मंदिर. संपूर्ण बागलाण तालुक्यातील भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असल्याने या मंदिर परिसराला भव्यता प्राप्त झाली आहे. श्री आशापुरी माता मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर भारतातील चार स्थानापैकी एक स्थान आहे. मंदिरासमोर श्री हनुमान, शेजारी शिवशंकर व मागील बाजूस श्री गणेशाचे मंदिर आहे. या मंदिरामधून मुल्हेर किल्ल्यावर जाण्यासाठी भुयारी मार्ग असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. येथून जवळच असलेल्या हरगडावर जाण्यासाठी पायवाट आहे. मंदिराच्या बाजूलाच चौरगड म्हणुन एक किल्ला आहे. मंदिराची काही बाजू पडझड झालेली आहे. दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराशेजारून करंजाडी नदी वाहते. बारमाही वाहणाऱ्या या नदीमुळे हे ठिकाण अतिशय निसर्गरम्य वाटते. मंदिर परिसर डोगंरांनी व दाट जंगलाने वेढलेला असल्याने भाविकांचे मन रमून जाते. काही वर्षांपूर्वी मंदिराच्या जीर्णोद्धारावेळी एक शिलालेख प्राप्त झाला असून, त्याद्वारे मंदिराची महती स्पष्ट होते. इ. स. १३०७ मध्ये मंदिराचे काम झाल्याची माहिती शिलालेखात आहे. या शिलालेखाचे वाचन मुल्हेर येथील श्री उद्धव महाराज समाधी संस्थानचे प्रमुख वै. ह. भ. प. डॉ. रघुराज महाराज पंडीत यांनी करून मंदिराच्या संपूर्ण इतिहासाचा उलगडा केला. यानंतर या मंदिराची महती व भव्यदिव्यत्वाता तसेच प्रचिती भक्तगणांना येवू लागल्या नंतर दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमााणात भाविक हजेरी लावू लागले आहेत.
नवसाला पावणारी देवी म्हणून श्री आशापुरी मातेची ख्याती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील आदिवासी बांधव देवीची मनोभावे सेवा करित आहेत. श्रiी हनुमान जयंतीनिमित्त मंदिर ठिकाणी भव्य यात्रोत्सव साजरा करण्यात येतो. या निमित्त राज्यभरातून भाविक येथे दाखल होत असतात. सटाणा येथून करंजाड मार्गे जाण्यासाठी एस. टी. आगारातून विशेष एस.टी. बसेसची सोय करण्यात आली आहे. कसे पोहोचणार :सटाणा➡️करंजाड➡️पिंगळवाडे➡️नरकोळ.
सटाणा शहरापासून अंतर :30 km.
 


 
 
कालिमाथ
औरंगाबाद
तालुका कन्नड.
कालिमाथ केवळ अशीच जागा आहे जिथे कालीची तिच्या बहिणी लक्ष्मी आणि सरस्वतीसोबत पूजा केली जाते. देवी कालीचे मंदिर आहे, जे मोठ्या संख्येने भाविक वर्षभर भेट देतात, विशेषत: नवरात्रोवेळी..
 

 
परंपरा [[ खान्देशातील सण आखाजी ]]
नुकत्याच येणाय्रा अक्षयतृतीयेला खान्देशात दिवाळीइतकंच महत्त्व असतं. माहेरवाशिणी माहेरी येतात, गोडधोड होतं. सालदार, बलुतेदार या दिवसापासून नवी सुरुवात करतात. पुरुषमंडळींना या दिवशी चक्क जुगार खेळण्याची परवानगी असते.
जळगाव आणि धुळे या दोन जिल्ह्य़ांच्या भूप्रदेशाला ‘खान्देश’ म्हणून आेळखले जाते. स्त्री वर्गाला माहेरची आेढ लावणारे अनेक सण महाराष्ट्रात साजरे केले जातात. त्यात विदर्भातील आखाडी, तर मराठवाडय़ातील नागपंचमी आणि खान्देशातील आखाजी या सणांचा समावेश करता येईल. खान्देशाची बोली, सण, उत्सव, चालीरीती या बाबी आपले स्वतंत्र सांस्कृतिक वैशिष्टय़ जपून आहेत.
वैशाख शुद्ध तृतीयेला देशावर अक्षयतृतीया म्हटले जाते, त्यालाच खान्देशात आखाजी असे म्हणतात. याच दिवशी कृतयुगाचा प्रारंभ होतो, असे मानले जाते. या प्रारंभ दिवसाला पवित्र मानून धर्मकृत्ये पार पाडण्याची प्रथा आहे. या दिवशी केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, देवांच्या आणि पितरांच्या नावाने केलेले कोणतेही कर्म अक्षय किंवा अविनाशी होते, असे मानतात. याच दिवशी परशुरामाचा जन्म झाला म्हणून प्रदोषकाळी परशुरामाची पूजा करून अघ्र्य देतात. स्त्रिया चैत्रात बसविलेल्या चैत्रागौरीचे याच दिवशी विसर्जन करतात.
खान्देशात आखाजी हा सण दीपावलीइतकाच महत्त्वाचा गणला जातो. शाळा आणि महाविद्यालयांना असलेली उन्हाळ्याची सुटी ही ‘आखाजी’ची सुटी म्हणूनच आेळखली जाते. अर्थात या सुटय़ा कधीकधी या सणानंतर लागतात. खान्देशवासीयांचे हे दुर्दैवच की, या सणाला इतर सणांप्रमाणे सुटी जाहीर केलेली नाही.
आखाजी-स्वातंत्र्याचा दिवस
खान्देशातील आखाजी हा सण सर्वासाठी संपूर्ण बंधनमुक्तीचा दिवस असतो. या दिवशी स्त्री, पुरुष, शेतकरी, शेतमजूर, आबालवृद्ध या सर्वाना पूर्ण स्वातंत्र्य लाभते. प्रत्येक जण बंधनमुक्त असतो. काम करणाऱ्या मजुरांना या दिवशी सुटी असते. शेतकरी सर्व शेतीची कामे या दिवशी बंद ठेवतात. मुलांना, तरुणांना पैसे, पत्ते, जुगार खेळायला पूर्ण मुभा असते. प्रत्येक विवाहित स्त्री या दिवशी सणानिमित्ताने माहेरी आलेली असल्याने ती झोके खेळायला, गाणी गायला, झिम्मा-फुगडी खेळायला पूर्ण मुक्त असते. आबालवृद्धांना आमरस आणि पुरणाची पोळी यासह सांजरी आणि घुण्या अशा मिष्ठान्नांची सुस्ती येते. ‘आगारी’ या प्रथेतून या दिवशी पूर्वजांचीही सोय केलेली आढळते. अशा प्रकारे खान्देशातील प्रत्येक व्यक्ती या सणाला मुक्त असते. दूरवर नोकरी करणारा प्रत्येक जण या दिवशी सुटी घेऊन बायकोमुलांसह आपल्या गावी परतलेला असतो.
शेतकरी-शेतमजुरांची आखाजी
अक्षयतृतीयेच्या दिवशी शेतकरी शेतीची कामे बंद ठेवतो. शेतमजुरांना या दिवशी सुटी असते. वर्षांच्या कराराने काम करणाऱ्या सालदाराचा हिशेब या दिवशी पूर्ण करून त्यास शेतकरी बंधनमुक्त करतो. सालदाराचा हा दिवस जुन्या मालकाकडील वर्षांचा शेवटचा दिवस असतो. याच दिवशी वाढीव रकमेवर शेतमजूर त्याच शेतकऱ्याकडे किंवा दुसऱ्या श्ेातकऱ्याकडे सालदार म्हणून करारबद्ध होत असतो. शेतकरी व शेतमजूर प्रेमळ, विश्वासू अशा व्यक्तीची निवड करून प्रसंगी जास्तीची रक्कम देऊन करारबद्ध होतात. याच काळात मुलामुलीच्या लग्नासाठी शेतमजूर शेतकऱ्यांकडून आपल्या मजुरीची आगाऊ रक्कमही घेत असतो. या सालदाराची एका वर्षांची मजुरी गावागावांनुसार व शेतकऱ्याच्या कामाच्या व्यापानुसार भिन्न असून साधारणत: आठ ते पंधरा हजार रुपये आणि काही पोते धान्य अशी आढळते. या दिवशी जुन्या सालदाराला मालकातर्फे जेवण दिले जाते. त्यास नवे जोडे कपडे शिवून दिले जातात. जुगार खेळायला व दारू प्यायला अतिरिक्त पैसेही दिले जातात. जुना सालदार आपल्या ताब्यातील कृषी अवजारे मालकातर्फे नव्या सालदाराकडे सुपूर्द करतो. अशा प्रकारे शेतमजुरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आखाजी हा सण. त्याच दिवशी हवा तो मालक निवडण्याचे आणि जुन्या मालकापासून रजा घेण्याचे स्वातंत्र्य या शेतमजुरास लाभते.
जुगार खेळण्याचा दिवस
आखाजी हा सण जुगार खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. या दिवशी सर्व मुले, माणसे पत्ते खेळतात. वर्षभर पत्त्यांना स्पर्श न करणारी मंडळी या दिवशी हमखास पत्ते खेळतात. त्या खेळात पैसे हरणे किंवा जिंकणे हे आलेच. जुगाराला बंदी असली तरी आखाजीच्या या काळात सर्वाना मुक्तपणे जुगार खेळता येतो. गल्लीत, आेसरीवर, गोठय़ात, झाडांखाली, देवळांच्या आेटय़ावर, पारावर अशा सर्वच ठिकाणी पुरुष मंडळी गटागटांनी पत्ते खेळताना आढळतात. कमी पैशांचे, जास्त पैशाचे असे ‘डाव असतात. जो तो आपल्या ऐपतीनुसार हव्या त्या डावात बसतो. आईवडील आपल्या मुलांना पत्ते खेळण्यासाठी पत्ते आणून देतात. खेळायला पैसेही देतात. असे पत्त्यांचे डाव आठ दिवस आधीच दिसायला लागतात. मात्र कायदे व पोलीस यांचा जबर धाक यामुळे हे प्रमाण शहरी भागात कमी होत चालले आहे. मात्र अक्षयतृतीयेला पोलीस खात्यालासुद्धा अशा जुगाराकडे कानाडोळा करावा लागतो. पूर्वी मुले या जुगारात कवडय़ाच खेळत असत. या दिवशी शेतमजुरांनासुद्धा जुगार खेळण्यासाठी मालकाकडून खुशाली म्हणून पैसे दिले जातात. जुगार खेळण्याच्या अतृप्त इच्छेला आखाजी या सणामुळे वाट करून दिली जाते. विशेष बाब ही की, मुलांना पैसे व पत्ते देणारे पालक अक्षयतृतीयेच्या दिवसाव्यतिरिक्त वर्षभर पत्ते, पैसे न खेळण्याचे आणि खेळू न देण्याचे नैतिक बंधन पाळतात.
आखाजी स्त्रीमुक्तीची :
जसजसे उन्हाळ्याचे तापमान तापू लागते तसतशी नवविवाहितेची हुरहुर वाढू लागते. अक्षयतृतीयेसाठी माहेराहून मूळ येण्याची ती वाट पाहते. आखाजीला माहेरी जाऊन झोक्यावर बसून सासरची सुखदु:खे गीतातून गायला ती आतुर झालेली असते. प्रत्येक विवाहित स्त्री आखाजी या सणासाठी माहेरी जाते. आखाजी हा स्त्रियांसाठी पूर्ण स्वातंत्र्याचा दिवस. हसणे, खिदळणे, झोके घेणे, गाणी गाणे, मारामारी करणे या सर्व अतृप्त इच्छांच्या पूर्तीचा हा दिवस. त्यासाठी सासरी राहून कसे चालेल? सासरी सासू-सासरे, दीर, नणंदा यांच्यासमोर स्वातंत्र्य मिळणे शक्यही नसते. आखाजीचे तीन दिवस स्त्री आपल्या माहेरी जाणं या स्वातंत्र्याचा मनसोक्त आनंद लुटत असते. द्वितीयेला गावभरच्या बायका, मुली एकत्र येतात. डफ वाजवीत बायकांची मिरवणूक शिवमूर्ती आणायला कुंभाराच्या घरी जाते. आधीच घराघरांत स्थापन केलेल्या गवराई ऊर्फ गौरीच्या प्रतिमेजवळ ती प्रतिमा ठेवतात. महाराष्ट्रभर साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासारखे स्वरूप या ‘गौराई उत्सवाचे खान्देशात आढळते. सर्व मुली, स्त्रिया एकत्रित येतात. गौराईच्या पाणी आणण्याच्या निमित्ताने त्या गावाशेजारच्या आमराईत जमा होऊन झिम्मा, फुगडी, नृत्य करतात, गाणी गातात. गावातून जाताना त्या पुरुष वेशात सजविलेल्या मुलीला वाजतगाजत नेतात. त्यास मोगल असे म्हणतात. मोगल ही मुलगी पॅन्ट, शर्ट, हॅट, डोळ्यांवर गॉगल, हातात उघडे पुस्तक अशा पोशाखात जमावातून वाजतगाजत चालत राहते. तिच्या डोक्यावर छत्री धरलेली असते. गावातून जात असताना बायका, मुली गाणी म्हणतात. गावाबाहेर आमराईत नाच, गाणे, झिम्मा-फुगडी झाल्यावर घराकडे परतात. या काळात पुरुष मंडळी जुगार खेळण्यात गर्क झालेली असतात. अक्षयतृतीयेला खान्देशभर प्रत्येक आेसरीवर किंवा झाडांवर झोका बांधलेला आढळतो. मुली-बायका रात्री बराच वेळपर्यंत झोका खेळतात, त्या वेळी गाणी, कथागीते गायिली जातात. या कथागीतांतून सासरचे सुखदु:ख, व्यवहारांतील अनुभव, उपदेश, चित्तथरारक कथा इ. विषय हाताळलेले असतात. झोक्यावर बसलेल्या मुलीच्या गाण्यांना झोक्यामुळे विशिष्ट सुरावट येते. तिच्यापाठोपाठ इतर मैत्रिणी त्या गाण्याला साथ देतात. या गाण्यांना आखाजीची गाणी म्हणून आेळखतात. गौराई आखाजीचा दुसरा दिवस हा स्त्रियांसाठी गौरी विसर्जनाचा असतो. घराघरांतील मुली, बायका पाटावर गौराईची प्रतिमा घेऊन बाहेर पडतात. ही मिरवणूक वाजतगाजत गावाबाहेर जाते. गावाबाहेर जात असताना सतत सामुदायिकरीत्या गौराईची गाणी गायली जातात. गावाच्या नदीकाठी मुली जमतात. तेथे झिम्मा, फुगडी खेळतात, नाचतात, गाणी म्हणतात.
नदीच्या दुसऱ्या काठावर पलीकडच्या गावच्या मुली हाच कार्यक्रम पार पाडीत असतात. गौरी विसर्जनाचा कार्यक्रम पार पडतो. त्यानंतर दोन काठांवरील, दोन गावांच्या स्त्रिया परस्परांना शिव्या देतात, परस्परांवर दगडफेक करतात, गोटे मारतात. स्त्रियांच्या दोन गटांतील हे युद्ध बराच काळ चालते. अंधार पडण्यापूर्वी त्या आपापल्या घराकडे परततात. अलीकडे दगडांनी परस्परांना मारणे ही प्रथा बऱ्याच गावांतून कमी झाली आहे. थोडक्यात आखाजी हा सण स्त्रियांच्या गाणी गाणे, नृत्य करणे, पुरुषी पोशाख घालणे, शिव्या देणे, मारामारी करणे, झोके घेणे इ. अतृप्त इच्छांना वाट मोकळी करून देणारा असून एक बंधनमुक्त जीवन जगण्याचा दिवस आहे.
आखाजी पितरांची
आखाजी स्त्री-पुरुष, आबालवृद्धांचा जसा मौजमजा करण्याचा दिवस आहे तसाच तो आपल्या पूर्वजांना, पितरांना श्राद्धविधी करून स्मरण्याचा दिवस आहे. श्राद्ध पूजन हे खान्देशात दोन प्रकारचे आढळते, ज्यांचे आई किंवा वडील वारले ते पहिल्या वर्षी जे श्राद्ध घालतात त्यास ‘डेरगं पूजन’ असे म्हणतात, तर ज्याच्या आप्ताच्या मृत्यूला एक वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे ते ‘घागर पूजन’ या नावाचे श्राद्धविधी पार पाडतात. डेरगं आणि घागर ही दोनही सारख्याच आकाराची भाजलेली मातीची भांडी. डेरगं या मडक्याला तेलरंग दिलेला असतो. अशी डेरगी, लोणचे घालण्यासाठी खान्देशात सर्रास वापरली जातात. या श्राद्ध पूजनात त्या मातीच्या मडक्यात पाणी भरू न त्यावर पाण्याने भरलेला मातीचा लोटा ठेवतात. या नव्या मडक्याच्या कडांवर सुताचे पाच पाच वेढे गुंडाळतात, त्यात पूर्वीच उगवून ठेवलेल्या गव्हाच्या हिरव्या-पिवळ्या रोपांचे पाच पाच जुडगे उभे ठेवतात व वरून दोरा गुंडाळतात. हे मडके मातीच्या चार ढेकळांवर ठेवतात. त्या मडक्यांवर सांजोरी व नैवेद्य ठेवून पूजा करतात. अग्नीत नैवेद्याचे हवन करतात. त्यास आगारी टाकणं असे म्हणतात. त्यानंतर पंगतीत जेवायला बसलेल्या मुद्दाम निमंत्रित केलेल्या जातीतल्या, पण दुसऱ्या कुळातल्या विवाहित असलेल्या पुरुषाची पूजा करतात. त्यास ‘पितर’ म्हणून संबोधतात. लहान मुले, वृद्ध यांनादेखील अशा पूजेपूर्वी अन्न उष्टे करू दिले जात नाही. अशा प्रकारे या सणानिमित्ताने प्रत्येकाच्या मनात पितरांची स्मृती जागृत होते.
आखाजी बलुतेदारांची
खान्देशातील आखाजी हा सण शेतकरी, शेतमजूर,पुरुष आणि स्त्रिया यांचा जसा आहे तसा तो शेतकऱ्यांसाठी राबणाऱ्या बलुतेदारांचाही आहे. या सर्व बलुतेदारांना ‘सांजऱ्या’, ‘घुण्या’ हे पदार्थ दिले जातात. वर्षभराच्या कामाची जी ठरलेली रक्कम किंवा धान्याचा हिस्सा असेल तो त्या बलुतेदाराला आखाजी या दिवशीच मिळत असते. बलुतेदाराच्या या हिश्शाला किंवा रकमेला ‘गव्हाई’ असे म्हणतात. बलुतं या शब्दाला खान्देशात पर्यायी शब्द गव्हाई असा रूढ आहे. बलुतेदार हे आपल्या सेवा श्ेातकऱ्याला वर्षभर प्रदान करतात. त्या मोबदल्यात त्याच्याकडून रोख रक्कम आणि धान्य अक्षयतृतीयेला घेतात. अशा प्रकारे आखाजी हा शेतमजुरांचा आणि बलुतेदारांचा नव्या वर्षांच्या आरंभीचा दिवस आहे.
तयारी आखाजीची
उन्हाळ्याच्या सुरुवातीला खान्देशात घरोघरच्या स्त्रिया वडे, पापड, कुरडय़ा, शेवया करतात. त्यानंतर त्यांना अक्षयतृतीयेचे वेध लागतात. अक्षयतृतीयेसाठी घर सारवून, झाडून स्वच्छ करतात. घरातील प्रत्येक चीजवस्तू साफ केली जाते. पत्र्याचे डबे, भांडी नदीवर नेऊन घासून आणतात. घरातील चादरी, गोधडय़ा, वाकळी स्वच्छ धुऊन काढतात. दीपावलीप्रमाणेच आखाजीसाठी घराची साफसफाई केली जाते. ही तयारी आखाजीपूर्वी पंधरा-वीस दिवस आधीच सुरू होते. घराघरांत ‘सांजोऱ्या’ आणि ‘घुण्या’ हे पदार्थ बनविले जातात. सांजोऱ्या या साखर किंवा गूळ घालून बनवितात. उन्हाळ्याच्या दिवसांत सकाळी अगर उन्हातून प्रवास करून आल्यावर शर्करायुक्त सांजोरी शरीराला ‘साखर’ देते. उन्हाची बाधा त्यामुळे टळते. आखाजीला आप्तेष्टांना, मित्रांना फराळाला बोलावतात. फराळ म्हणून सांजोऱ्या व घुण्याच असतात. खानदेशात दीपावलीला फराळाला बोलविण्याची पद्धती नाही, पण अक्षयतृतीयेला फराळाला बोलाविण्याची पद्धती आजही सुरू आहे.
जसजशी आखाजी जवळ येते, तसतसे शेतकरी योग्य असा सालदार हेरण्याचा प्रयत्न करतो. योग्य व्यक्तींना आमिष देतो. सालदारसुद्धा कंटाळलेल्या मालकाला सोडण्यासाठी इतर शेतमजूर मित्रांसह नवा मालक हेरण्याच्या प्रयत्नात असतो. मुलांची लग्ने जुळवून पैसे देणाऱ्या मालकाकडे सालदारकी पत्करतो, बलुतेदारसुद्धा महागाईनुसार त्या त्या घरातील कामाच्या व्यापानुसार आपल्या बलुतेदारीचे नवे दर जाहीर करतो. अशा प्रकारे प्रत्येक जण आखाजी या सणाची मोठय़ा आतुरतेने वाट पाहत असतो. खान्देशातील आखाजी हा सण आपली परंपरा आजही कायम टिकवून आहे. हा सण कामानिमित्ताने दूर दूर गेलेल्या खान्देशवासीयांना एकत्र आणणारा, स्त्रियांना स्वातंत्र्य बहाल करणारा, श्ेातकरी शेतमजूर आणि बलुतेदार यांचे ऋ ण फेडणारा, अनेक अतृप्त इच्छांना वाट करू न देणारा आहे. या सणातील बारीकसारीक विधींचा, गाण्यांचा, कथागीतांचा, नृत्य-परंपरा आदींचा अभ्यास करणाऱ्यांसाठी, लोकसाहित्याच्या अभ्यासकांसाठी ही पर्वणीच असते.
आखाजीचे आजचे बदललेले स्वरूप:- आखाजी आमच्या पिढीत जशी होती तशी आज राहिलेली नाही. तिचे स्वरूप पार बदलून गेले आहे. यांत्रिक जीवन, नोकरीधंद्यामुळे गाव सोडावा लागणे, कुटुंबांचे विभाजन, बदललेले कायदे, बदललेली गावांची रचना, पर्यावरणाचा ऱ्हास इत्यादी कारणांमुळे आखाजीचे स्वरूप बदलून गेलेले दिसते.
आखाजी पूर्वीप्रमाणे संपूर्ण स्वातंत्र्याचा दिवस राहिलेली नाही. आखाजीच्या दिवशीही शेतीची कामे आज होऊ लागली आहेत. हल्ली सालदार पद्धतीत मजूर अडकून राहायला तयार नाहीत. पूर्वी वर्षभराचे काही पोते धान्य व पाच ते सात हजार रुपये द्यावे लागायचे. हल्ली मजूर शासकीय दराने रोजचा हिशेब करून तीनशे पासष्ट दिवसांच्या मजुरीचा विचार करू लागला आहे. अन्नधान्याची पोती तो आता नाकारतो. शेतकऱ्याकडून धान्य घेण्यापेक्षा त्याला स्वस्त धान्य दुकानावर, धान्य सुरक्षाअंतर्गत २ ते ४ रुपये किलो या दराने मिळत असल्याने तो आता धान्यासाठी काम करीतच नाही. त्यामुळे सालदारकी ही पद्धती बाद होत चालली आहे. जे सालदार असतील त्यांच्या सालदारकीच्या कामाचे स्वरूपही आता पार बदलून गेले आहे. पूर्वी तो रात्रंदिवस मालकाकडेच सतत कामासाठी हजर राहात असे. आता तो केवळ दिवसांचे काही तासच बांधीलकी बाळगतो. पूर्वी मुलामुलीच्या लग्नानिमित्ताने वा अडचणीच्या वेळी शेतकरी आगाऊ रक्कम उचल म्हणून देत असे, त्यामुळे सालदार हा बांधला जात होता. आता तो बचत गटांकडून किंवा बँकेकडून उचल घेऊ लागला आहे. शासनाच्या नवनव्या योजनाही त्याला आíथक मदतीचा हात देतात. त्यामुळे कृषिजीवनाशी बांधीलकी असणारे या शेतमजुराचे संबंध बदलून गेले आहेत. बलुतेदारांची बलुतेदारीही आता संपुष्टात आली. तेही आता कामाचे रोख पसे घेऊन मोकळे होतात. शिवाय बलुतेदारांची कामेही आता बदलली आहेत, त्यांच्या सेवेचे प्रकारही बदललेले आहेत. सुतार आता अवजारे यंत्राने दुरुस्त करतो, तर केशकर्तनकार दर्जेदार सलून चालवितो, तो कुणाच्याही दाराशी जाऊन कटिंग करीत नाही. हे सगळं चित्र पालटल्याने आखाजीचे स्वरूपही बदलून गेले आहे.
तीच बाब आखाजीच्या झोक्यांची. गावाचे स्वरूप पार बदलून गेले आहे. गावात गटारी, रस्ते व नवनवे घरांचे बांधकाम यातून दारासमोर असलेली मोठमोठी निंबाची झाडे कापली, तोडली गेलीत. गावालगतीची आमराई ही आता अदृश्य झाली आहे. कुठे तरी चौकात एखादे झाड आढळते. त्याला सामुदायिक एखादा झोका बांधण्याशिवाय पर्याय नाही. दुसऱ्याच्या दाराशी मुली, बायका अल्लडपणे हसतखिदळत झोका खेळतीलही, मात्र हल्ली मोबाइलवर शूटिंग करणाऱ्या मुलांचेही वर्चस्व वाढत चालल्याने तेही स्वातंत्र्य बाद झालेले दिसते.
जुगार, पत्ते खेळणे हे कायद्याने जबर गुन्हा ठरत आहे. शिवाय दक्ष पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी जागृत राहून धाडीही घालताना आढळतात. त्यामुळे खुलेआम, झाडाखाली, ओटय़ावर पत्ते खेळणाऱ्यांची संख्या नाममात्र उरली आहे. मुले, मुली इतरत्र शहरांत शिक्षणानिमित्ताने दूर गेल्याने त्यांना आपल्या खेडय़ात येता येत नाही. खान्देशातच नव्हे तर महाराष्ट्रात कुठेही अक्षयतृतीयेला सुटी नाही, उलट त्या काळात मुलांच्या परीक्षाही असतात. त्यामुळे घराघरांतून मुलांची संख्याही रोडावत चालली आहे. घरात मुलंच नाहीत, कुटुंबात सदस्य संख्याच कमी झाली, सगळे विभक्त झालेत. शिवाय नव्या गृहिणींना पुरणाचे मांडे खापरावर भाजता येतीलच असे नाही. त्यामुळे मांडय़ांची जागा आता तव्यावरच्या लहान पुरणपोळ्य़ांनी घेतलेली आढळते. स्वयंपाकातील पदार्थाची संख्याही कमीकमी होत गेली. हल्ली तर आखाजीच्या निमित्ताने बनविल्या जाणाऱ्या घुण्या आणि सांजोऱ्या हा खाद्यपदार्थाचा प्रकार काही घरांतूनच पाहायला मिळतो. श्राद्धाच्या मडक्यावर ठेवण्यासाठी सांजोरी तरी बनविली जाते, मात्र घुण्या आता पाहायलाच मिळत नाहीत. त्यामुळे आखाजीची खाद्यसंस्कृतीही लोप पावत चालली आहे.
खेडय़ांतील नोकरीनिमित्ताने इतरत्र पांगलेले आता घराकडे येऊ शकत नाहीत. आहेत तेथेच डेरगं, मडकं घागर पुजतात. हल्ली मातीचे माठही महाग झाल्याने काही गृहिणी घरातील तांब्याच्या कळशीत पाणी भरून पुजताना दिसतात. शिवाय आगारी टाकायला शेणाच्या गोवऱ्याही दुर्मीळ झाल्याने गॅसवर तवा तापवून त्यावरच अन्न जळेपर्यंत तापवितानाही दिसतात.
आखाजीच्या तयारीची काळजी आता काहीशी कमीच झालेली दिसते. उन्हाळ्य़ात कराव्या लागणाऱ्या पापड, कुरडया, सांजोऱ्या आता बाजारातून रेडीमेड आणण्याकडे कल वाढत चालला आहे. घराघरांतून पत्र्यांचे डबे गायब झाल्याने त्यांची जागा स्टीलच्या, प्लॅस्टिकच्या डब्यांनी घेतल्याने आता आखाजीनिमित्ताने डबे घासण्याचा कार्यक्रमच बाद झालेला दिसता. गावागावांतून नद्याही गायब झाल्यात. नद्यांना पाणीच नाही. त्यामुळे सामुदायिकरीत्या नदीवर जाऊन भांडी घासणे, अंथरूण-पांघरूण स्वच्छ धुणे हेही बंद झाले. घराघरांत वॉिशग मशिनमुळे हा धुण्याचा कार्यक्रम रोजचाच बनला आहे. त्यासाठी आखाजीच्या मुहूर्ताची वाट कुणीही पाहात नाही. नदीवर गौराईचे विसर्जन, त्यातून गोटे मारणे, हेही बंद झालेले दिसते. शिक्षणामुळे आणि कायद्यांच्या बंधनामुळे मारामारी, शिव्या देणे हे तर मर्यादित झालेच, शिवाय गौराईऐवजी आता गणपती उत्सव, त्यातील विविध करमणूकप्रधान कार्यक्रम, शारदा उत्सव, टिपऱ्यांचा खेळ, गरबा नृत्य या बाबांचे प्रस्थ गावागावांतून वाढत चाललेले दिसते. झोके गेले, झोक्यावरची गाणी गेली, जाते गेले अन् जात्यावरची गाणी गेली. गौराई चालली, तिची गाणीही चालली. मोबाइल, टीव्ही हीच आता करमणुकीची साधने बनलीत. हल्ली गौराईची गाणी काहींनाच येतात.
शिक्षण, यांत्रिकीकरण, आधुनिकीकरण, संगणक, दूरदर्शन, मोबाइल यांनी जीवन पार बदलून टाकले आहे. काळाच्या ओघात या आखाजीचे स्वरूपही बदलून गेले आहे
 



 
 
कपार भवानी, बागलाण.
बागलाण मधील जवळपास सर्वच प्राचीन मंदिरे एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहेत. त्यातील एक म्हणजे कपार भवानी. आपल्यातील बहुतेकांना प्रश्न पडला असेल, आता हे कुठे आलं? सटाण्यातील फार कमी लोकांना या ठिकाणाची माहिती आहे.
कपार भवानी हे गूढ निसर्गरम्य ठिकाण. उत्तर महाराष्ट्रात सह्य़ाद्री डोंगररांगेच्या सुरुवातीस असलेले बागलाणच्या ढोलबारी डोंगररांगेत हे ठिकाण आहे. मुल्हेर किल्ल्यापासून फक्त दोन किमी अंतरावर. मुल्हेर गावापासून साल्हेरकडे जाताना जामोटी हे गाव लागते. या गावात हरगड किल्ल्याची एक सोंड उतरली आहे. जामोटी हे गाव तसे पाहायला गेले तर संपूर्ण डोंगररांगेने आणि पाण्याच्या पाट-कालव्यांनी वेढलेले, गावात मोजक्याच तीस-चाळीस झोपडय़ा असतील; पण देवीच्या मंदिर पायथ्यापर्यंत गावकऱ्यांनी मार्ग बनवलेला आहे. पायथ्यापासून साधारण ३०० फूट उंचीवर हरगडावर ही देवी एका ६५ फूट निसर्गनिर्मित आणि किंचितश्या मानवनिर्मित कपारीत स्थित आहे. म्हणूनच तिला कपार भवानी म्हणतात. लेणी असावी अशी या ठिकाणी रचना जाणवते.
कपारभवानीपर्यंत जाताना एका ठिकाणी विसावण्याचा मोह आपल्याला होतोच, पण आपण दमलो म्हणून नाही तर समोर दिसणाऱ्या सेलबारी दुर्गशृंखलेमुळे. अथांग पसरलेले हरणबारी धरण, बाजूला मांगीतुंगी, तांबोळ्या सुळका, न्हावीगड, शेंदोडगड ही शिखरे आपल्याला बोलवत असतात. जणू हात लांबवून आमंत्रण देत असतात. त्यात डावीकडचा हरगड किल्ला आपल्याला त्याचे राकट स्वरूप दाखवत असतो व उजवीकडील जिभ्या सुळक्याचा तीक्ष्णपणा आपल्याला आणखी चेव आणत असतो. खरं तर हरगडावरच हे मंदिर आहे. सह्य़ाद्रीच्या रौद्र दर्शनानंतर पुन्हा चढाई करून माथ्यावर पोहोचलो की, तेथील सुंदर धबधब्याने नव्याने तजेला मिळतो. निव्वळ निखळ शांतता, एका लयीत येणारा खळखळ असा मंद आवाज आणि मधूनच एखाददुसऱ्या मोरांचे ओरडणे. धबधब्याचे तुषार अंगावर पडू लागताच कपारीसमोर पोहोचतो. काळ्याकुट्ट अंधारात देवीजवळचा दिवा शांतपणे लुकलुकत असतो. त्याचा वेध घेत गुहेत जायचे. मग दिसते ती अनोखी शिल्पकला. डोंगरात कोरलेली अष्टभुजा व अष्टफुटी भवानी मातेची मूर्ती. तिच्या हातातील शस्त्रे आणि चेहऱ्यावरील तेज पाहून सर्व थकवा निघून जाातो. दुष्टांचे निर्दालन करण्यासाठीचे उग्र रूपपण जाणवू लागते. मूर्ती अभ्यासकांच्यामते मूळ मूर्ती महिषासूरमर्दीनीची असावी. तिच्या पायाशी रेडय़ाचे डोके असल्यासारखे दिसते. मूर्तीची ठेवण पाहता मूर्ती फार जुनी असावी असे वाटत नाही. पण मूर्ती रिलिफमध्ये कोरलेली दिसते. पूर्णपणे सुटी अशी कोरलेली नाही.कपार भवानी बागलाण,
वरच्या कडय़ावरून कोसळणारा बारमाही धबधबा, समोरील डोंगरावरील गुहा पुन्हा एकदा आपले लक्ष वेधतात. त्यामुळे कॅमेरा हातात घेतल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही. खूपच अद्भुत आणि अध्यात्मिक असे निसर्गरम्य पवित्र तीर्थक्षेत्र आहे. शेकडो मोर आणि १२ माही धबधबे केव्हाही स्वागतास तयार असतात. त्यामुळे हरपून जायला होते. म्हणून आयुष्यात एकदा तरी नक्की बघावे असे हे ठिकाण आहे.
अतिशय निसर्गसुंदर असे हे स्थळ आहे. ही देवी पायथ्याशी असलेल्या जामोटी आणि मुल्हेर गावातील शेकडो लोकांची कुळस्वामिनी आहे. परंतु शासकीय स्तरावरून होत असलेले दुर्लक्षामुळे एक चांगले पर्यटन स्थळ जंगलात झाकले गेले आहे.
कसे पोहोचणारः
नाशिक ➡️सटाणा ➡️ताहाराबाद ➡️मुल्हेर ➡️जामोटी ➡️कपार भवानी मंदिर.
 
 
 आपल्या बागलाण प्रांताला महाभारत कालीन इतिहास लाभलेला आहे. पाच पांडवांचे या प्रदेशात एके काळी वास्तव्य होते. याच काळात अज्ञात वासात असतांना पांडवांपैकी एक नकुल, कडून या परिसरात एका शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. आज हे ठिकाण कपालेश्वर मंदिर म्हणुन ओळखले जाते. येथे सुमारे ८०० वर्षांपूर्वीचे महादेवाचे भव्य मंदिर आहे. कपालेश्वर मंदिर हे किकवारी बु. गावाजवळ आहे. मंदिर अत्यंत सुंदर तसेच शांत आहे. मंदिर आवारातच भलामोठा पिंपळाचा वृक्ष आहे. इथे मंदिरात बसल्यावर अत्यंत शांत तसेच थंड वातावरण अनुभवायास मिळते. मंदिराच्या उजव्या बाजूस खाली ओढ्याकडे जाणाऱ्या पायऱ्या असून त्यांच्या सुरुवातीलाच लागून मोठी झाडे आहेत. पायऱ्या उतरल्यावर आपणांस पाण्याचा ओढा लागतो याचे उगम स्थान रस्ता परिसरातच छोट्या धबधब्याच्या रुपात आपणांस पहायला मिळते. कसे पोहोचणार : सटाणा - मुंजवाड - चौंधाणे - जोरण - कपालेश्वर.
सटाणा शहरापासून अंतर - 16 कि.मी
 
 
 
बीबी का मकबरा.. औरंगाबाद ...
बीबी का मकबरा हा मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा, आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. औरंगाबाद येथे बांधलेल्या एका भव्य महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानी, हिची कबर आहे.ही कबर असलेला मकबरा औरंगजेबाच्याच काळात मलिकाच्या मुलाने-आजम शाहने १६७९ इ.स. मध्ये बांधला. हा लाल आणि काळ्या दगडांबरोबर, संगमरवर आणि काही पांढऱ्या मातीपासून बनविलेला आहे. या मिश्रणास स्टको प्लॅस्टर (Stucco Plaster) असे म्हणतात. मकबरा एक भव्य ओट्यावर बांधलेला असून, त्यात मधोमध बेगम राबियाची कबर आहे. कबरीच्या चारही बाजूने संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत. त्या कबरीवर छतांच्या खिडक्यांतून दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्र प्रकाश पडेल, अशी रचना केली आहे मकबऱ्याच्या घुमटाला संगमरवरी दगड वापरला आहे. भव्य ओट्यावर चारही बाजूंनी मिनार बांधलेले आहेत. कधी काळी या मिनारांवर जाता येत होते.
ही राबिया दुर्रानीची कबर २८ नोव्हेंबर, इ.स. १९५१ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली.
 
 
 गिरणा धरण हे भारतातल्या पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातले एक धरण आहे. १९५५ मध्ये धरण बांधकामासाठी कुदळ मारली गेली. १४ वर्ष सलग काम झाल्यावर १९६९ मध्ये धरणाचे लोकार्पण झाले. चाळीसगाव शहराच्या पश्चिमेला ४० कि.मी.वर नांदगाव तालुक्यात हे महाकाय गिरणा धरण आहे. गिरणा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असला तरी सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी सर्वाधिक फायदा जळगाव जिल्ह्याला होतो. गिरणा धरणापासून निघालेला डावा पांझण कालवा ५३ कि.मी. लांबीचा, उजवा जामदा २० कि.मी.चा, डावा जामदा ४०चा तर निम्न गिरणा काठ कालवा ६० कि.मी. लांबीचा आहे. या कालव्यांमुळे गिरणा खोर्याला सुपीकता व समृद्धता लाभली आहे. तथापि कालव्यांपासून होणारी गळती, पाटचार्यां दुरुस्तीची गरज हे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. याबाबत गिरणा पाटबंधारे विभागाचे सतत दुर्लक्ष होत आहे. मालेगाव शहर, चाळीसगाव शहर, नांदगावसह ५६ खेडी अशा एकूण १२७ पाणीपुरवठा योजनांसाठी गिरणा धरण हा एकमेव जिवंत पाण्याचा स्रोत आहे. मात्र याच योजनांद्वारे जळगाव जिल्ह्याच्या जवळपास पाऊण भागातील लोकसंख्येची तहान भागते. बिगर सिंचनासाठी धरणाचे पाणी दहीगाव बंधार्यापर्यंत प्रवास करते. पिण्यासाठी २ महिन्यांतून एकदा पाणी सोडले जाते.
 
 
 
145 वर्षाची परंपरा असलेली जळगावची रथ यात्रा......भाविकांच्या अलोट गर्दीत गेल्या दिडशे वर्षांपासून
दर कार्तिकी एकादशीला जळगावात भगवान श्रीरामची रथयात्रा निघते....
31 फूटाची उंची असलेला हा रथ सागवानाच्या लाकडापासून बनविलेला आहे. ....रथावर पुढे दोन अश्वमुर्ती आहेत. ....रथाचे सारथ्य अर्जून करतो ,त्याच्या आजूबाजूला गरूड आणि मारूतीच्या दोन मुर्ती आहेत. ....
प्रभूरामाची मुर्ती मुख्य रथात मधोमध विराजमान केली जाते तर आजूबाजूला लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती असते....संपूर्ण रथ झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवला जातो. ....तर संध्याकाळनंतर रथावर दोनअडीचशे बल्ब लावले जातात. ....
या रथयात्रेचे वैशिष्ट्य असे की शेकडो किलो वजनाचा हा रथ भाविक दोरखंडाने ओढतात..... एकाच वेळी शंभरावर भाविक रामनामाचा जयजयकार करत रथ ओढतात. ....रथाचे संतुलन जाऊ नये म्हणून चाकाला तज्ञ मोगरी (अडथळा ) लावतात.....
सकाळी नऊ वाजता यात्रा सुरू झाल्यावर दोन किलोमीटरचे अंतर पार करायला रथाला दहा ते बारा तास लागतात. ....रस्त्यात जागोजागी रथाचे स्वागत आरती होते. .....आणि दोन लाखाहून अधिक भाविक रस्तोरस्ती उभे राहून रथाचे दर्शन घेतात.....
या रथाला हिंदू मुस्लिम एकतेचीही परंपरा आहे. ....रथाच्या वाटेवर असलेल्या दर्ग्यातर्फे दरवर्षी रथाचे स्वागत केले जाते. ....
रथयात्रेच्या आधी आठ दिवस वहन ( छोटा रथ) निघतात. ....शहरातल्या विविध काॅलन्यांमध्ये या वहनाला पानसुपारीसाठी आमंत्रण असते ...त्या ठिकाणी भजन भारूडाचा कार्यक्रम होतो. ...
रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोंगे काढली जातात. ....हे सोंग म्हणजे पुरूष स्त्रियांचे रूप घेऊन तयार होतात. ...तोंडाला शेंदूर लावलेला असतो आणि पाठीवर मोरपीसाची मनोरम सजावट असते....हे सोंग गल्लोगल्ली जाऊन एका विशिष्ट तालावर नृत्य करतात.....
अशी ही रथयात्रा जळगावचे सांस्कृतिक वैभव आहे. ....
सार्वै युवा मित्र मंडळ 
 
 
 निम्न पांझरा अक्कलपाडा प्रकल्प हा धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठा व महत्वपूर्ण प्रकल्प आहे. अक्कलपाडा प्रकल्पाचे बांधकाम झाल्यानंतर अक्कलपाडा धरण सात वर्षांनतर पहिल्यांदाच तुडूंब भरले आहे. या धरणाचा लाभ धुळे तालुका, धुळे शहर, शिंदखेडा तालुका, अमळनेर तालुका व अंश: साक्री तालुक्याला मिळणार आहे. या प्रकल्पासाठी मी आमदार असताना विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, वित्तमंत्री व तहसीलदार यांना दरमहा १५ स्मरण पत्रे तब्बल ३३ महिने नित्यनियमाने पाठवीत होतो. तसेच या प्रकल्पासाठी विधानसभेत आवाज उठवत सतत पाठपुरावा केला. असंख्य अडचणींनतर अक्कलपाडा प्रकल्पासाठी वेळोवेळी निधी मिळत गेला. आज अक्कलपाडा धरणाचे काम वक्राकार दरवाज्यासह १०० टक्के पूर्ण झाले असून हे धरण ३५ महिन्यात पूर्ण करू शकलो, याचा मला अभिमान असून आज अक्कलपाडा धरण तुडूंब भरलेले पाहताना मला मनापासून आनंद होत आहे. एका रॉकेलच्या डब्याची ही सारी करामत आहे. जनतेचा आशीर्वाद आणि प्रबळ इच्छाशक्तीमुळे हे सर्व मी करु शकलो.
 






 
नागचंद्रेश्वर मंदिर उज्जैन !!
नागपंचमी २०१७
तिसर्या मजल्यावर नागचंद्रेश्वरची मूर्ती फक्त नाग पंचमीच्या दिवशी दर्शनासाठी खुली असते.
नागचंद्रेश्वर उज्जैन हा हिंदू भगवान शिवचा एक अद्वितीय प्रकटीकरण आहे आणि मध्यप्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराच्या तिसर्या मजल्यावर हे शिवलचे दुर्मिळ मूर्ति आहे. नागनाथदासवर म्हणून शिवाची ही दुर्मिळ मूर्ति केवळ श्रावण महिन्यात नागपंचमी दिवशी दर्शनासाठी खुली असते. नागचंद्रेश्वराचे दर्शन श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशीच होते. या स्वरूपात हिंदू भगवान शिव नागा (साप) आणि चंद्र (चंद्र) यांच्याशी अधिक संबंधित आहेत.
श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. हा सण फार जुन्या काळापासून पाळला जात असावा. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, कुटायचे नाही. असे काही नियम पाळतात. भाविक श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.
शिवच्या मूर्तीवर्तुळाची वैशिष्ट्ये त्याच्या गळ्यात साप आहे
प्रत्येक वर्षी जगाला वाचविण्यासाठी भगवान विष्णूचे अनेक रूप आणि आकार आहेत. हिंदू धर्माच्या मते, शेशानग हे विष्णुच्या उर्जाचे स्वरूप आहे असे समजले जाते ज्याच्यावर तो विश्रांती घेतो.
सेशनाग केवळ यहोवासाठी विश्रांतीची जागाच देत नाही, तर त्याला देखील त्याचे संरक्षण करतो. आपण हे उपरोधिक आहे का? भगवान श्रीकृष्णांच्या जन्मावेळी ती शेशनाग होती ज्याने संत कृष्णाला वादळी वादळापासून वाचविले होते, तर त्याचे वडील वासुदेव त्याला नंदाच्या घरी घेऊन गेले. तर, हे निश्चितच रक्षणकर्ता आहे.
 
 
 
कानबाई माता उत्सव...
खान्देशाची आराध्य दैवत म्हणुन कानबाई उत्सव सर्वत्र उत्साहांत साजरी केला जातो.
नंदुरबार जिल्ह्यात रानमाळ,
शहादा तालुक्यातील प्रकाशा व धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कासारे या गावात कानबाईचे मंदिर असल्याचे सांगीतले जाते. एका दिवसाच्या कानबाई मातेच्या सण,
उत्सव सर्व परिवार एकत्रित येवुन मोठ्या जल्लोषात साजरा करुण पार पाडला जातो.
खान्देशची ग्रामदेवता म्हणुन ख्व्याती असलेल्या
कानबाई मातेच्या
श्रावण महिन्यातील
नागपंचमीनंतरच्या
पहिला रविवारी कानबाई मातेच्या एक दिवशीय स्थापना करुण उत्सव खान्देशात सर्वत्र उत्सवाने साजरा केला जातो.
पुर्वी खानाचं राज्य होतं. खान्देश परिसराचा राजा खान ह्याना पुत्र प्राप्ति नसल्याने खान्देश प्रजेने नवस मानला. राजा खान याना कन्या रत्न प्राप्त झाले.
त्यावेळी जनतेने "खानबाई' उत्सव साजरा केला.
खानभाई उत्सवाला खान्देशात कालांतराने या उत्सवाला अप्रभ्रुष होवुन कानबाई म्हणुन ओळखले जाऊ लागले.
तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार हां खान्देश- कान्हादेश-खान्देशी लोक कान्हा म्हणजे भगवान कृष्णाला मानतात.
म्हणुन त्यानी देवीचा उत्सव साजरी सुरु करण्यासाठी कानबाई हे नाव घेतले
. असावे अशी समज आहे.
कानबाई हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी, या समाजात साजरा होतो.
मात्र आता प्रतेक समाजात कानबाई मातेची स्थापना भाविक मोठ्या प्रमाणात करीत असतात.

 

*कानुबाई* मातेच्या *रोट* प्रारंभ होणार आहेत. त्यानिमित्ताने गावात जय्यत तयारी सुरू आहे. महिला वर्गाची तर घरात साफसफाई करुन अक्षरशः दमछाक झाली आहे. नोकरवर्गांना तर आता फक्त बळसाणेचेच वेध लागले असुन त्यांच्या बॅगा आतापासूनच पॅक व्हायला लागल्या आहेत.
👉 आता काही VIP मंडळीला रोट ही काय भानगड आहे हे समजल नसणार किंवा अपुरी माहिती असणार मग आता आपण पुर्णपणे माहिती घेऊ.
श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्य
ा पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं पुर्वी खानाचं राज्य होतं. त्याला तु'झ्या नावाची म्हणजे "खानबाई' साजरी करतो असं सांगुन हा हिंदुंचा सण साजरा करत होते. कुणी म्हणतं , हा खान्देश = कान्हादेश! खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी 'कानबाई' हे नाव घेतलं असावं. असो.
या उत्सवाच्या आधीही दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु,चण्याची दाळ घेतले जाते. तेही चक्कीवालीला आधी सांगुन ( तो मग चक्की धुवुन पुसुन ठेवतो.) चक्कीवरुन दळुन आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य. साड्यांचे पडदे लावुन डेकोरेशन केले जाते. कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते किंवा परनुन आणलेले असते.
'कानबाई परनुन आणणे'
पुर्वीच्या काळी एखाद्या खेड्यात ठरवुन गावचे पाटील लोक गावोगावी आमंत्रण पाठवायचे. ज्या घरातल्या बाईला काही कापलेलं, भाजलेलं नाही.अंगावर एकही डाग नाही अशा सवाष्णी निवडल्या जायच्या. सासरी असल्यातरी सासरकडचे लोक घेउन यायचे. तेव्हा गावात उत्सव व्हायचा. त्या स्रीयांना नाना वस्त्र अलंकारांनी सजवुन त्यांची पुजा करायचे. गावची गावं जेवायला असायची. टनाने पुरणपोळ्या रांधल्या जायच्या. अक्षरशः बैलगाड्यांवर स्वच्छ धुतलेली धोतरं अंथरुन शिजवलेला भात लादला जायचा. हा सगळा स्वैपाक,नदीवरुन पाणी आणण्यापासुन पुरुषमंडळी करायची. तिथे त्या सवाष्णींनी स्पर्श केलेला नारळ घेउन तोच वर्षानुवर्षे पुजेत वापरला जायचा. आता चाळीसगावजवळ उमरखेडला कानबाईचं मंदीर बांधलय. ज्यांना नविनच कानबाई बसवायची असेल तर ते नारळ घेउन तिथल्या मूर्तीला स्पर्श करुन आणतात.
तर असे हे परनुन आणलेले नारळ त्या दिवशी धुवुन घेतात त्यालाच नथ, डोळे, बसवुन इतरही पारंपारीक दागिने घालतात.केळीचे व कण्हेरीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेउन तिची स्थापना होते. कण्हेरीला खान्देशात फार महत्व आहे. काही गाण्यांमधे कण्हेरीलाच कानबाई संबोधलं जातं.कलशावरुनच गळ्यातले हार, मणी मंगळसुत्र चढवले जाते. वरुन शेवंतीची वेणी लावुन ओढणी लावली जाते. मग आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणे, तवा हे सगळं कणकेचच केलं जातं ( ही कणीक पण स्पेशली पीठात साजुक तुप घालुन दुधात मळलेली असते)कटाची आमटी, लाल भोपळ्याची(डांगराची) भाजी, पापड, भजे हे सर्व काशाच्या ताटात ठेउन देवीला ओवाळतात. इतर सणासारखाच इथे ही ज्येष्ठांना मान असतो. रात्री जागरण केले जाते. फुगड्या, गाणी म्हटली जातात. काही जणांकडे फक्त रोट असतात. मग ते रोट परातीत घेउन कानबाईच्या दर्शनाला येतात. या दिवशी कुणी कानबाईला काही मानता/ नवस केला असेल तर तो फेडण्यासाठीही गर्दी होते. मुख्यतः नारळाच्या तोरणाचा नवस असतो. आपल्या घरी दर्शनाला येणार्या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो.
काहींकडे हातापायाची कानबाई असते तर काहींकडे कानबाई- रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात.दुसर्या सकाळी लवकर उठुन कानबाईच्या विसर्जनाची तयारी होते. कानबाईची आरती करुन अंगणात चौरंग नेऊन ठेवतात. गल्लीतल्या सगळ्या कानबाया एकाच वेळेस निघतात. ढोल ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर ठेउन बायका नदीवर निघतात. कानबाईचा नि त्या स्त्रीचा नमस्कार करण्यासाठी ही झुंबड उडते. कानबाईपुढे मुले, मुली फुगड्या खेळतात. वाजत गाजत जातांना समोरुन दुसरी कानबाई आली तर दोन्ही कानबायांची चौरंग (डोक्यावर धरलेल्या स्थितीतच) जोडुन भेट घडवली जाते. अशातच एखाद्या कानबाई धरलेल्या स्त्रीच्या अंगात आले तर ती त्याही स्थितीत नाचते पण डोक्यावरचा कलश नि कानबाई अजिबात सरकत नाही.
नदीवर पुन्हा एकदा आरती होउन कानबाईच्या नारळाव्यतिरिक्त सगळ्याचे विसर्जन होते. नदीतलीच वाळु घेउन त्यावर कलश नि आपापले कानबाईचे नारळ तसेच डोक्यावर घेउन पुन्हा वाद्यांच्या गजरात घरी परततात. पुरणाचे दिवे मग मोडुन त्यांचा बारीक चुरमा केला जातो.


 जळगाव वरून चाळीसगाव कडे जातांना रस्त्याच्या डाव्या बाजूस अगदी सहजास दिसून येत एक प्राचीन मंदिर. मंदिराच्या बांधकामावरून लगेच हे हेमाडपंथी मंदिर असावे हे कळून येते. मुधाई देवी मंदिर,वाघळी असे या मंदिराचे नाव. तसा फलक जवळ गेल्यावर लगेच दिसून येतो. हे मंदिर एका आंशिक रूपाने नष्ट झालेल्या कृत्रिम दगडावर बांधलेले आहे. याचे बांधकाम इ स ११५० ते १२०० च्या आसपास केले गेले असावे. या पूर्वमुखी मंदिराची ताऱ्याच्या आकाराचे विधान असून त्यात एक गर्भगृह,अर्धमंडप व मंडपाची योजना आहे. या मंदिराचे पीठ,वेदिबंध तसेच जांघेचा भाग सुरक्षित असून शिखर नष्ट झालेले आहे. शिखराच्या जागी दगड आणि सिमेंट चे छत सुरक्षिततेसाठी तयार केले आहे. मंदिराच्या भिंती,रत्न,पाने,भौमितिक व ग्रासमुखाच्या आकृतींनी सुशोभित आहेत. मंदिराच्या उत्तर,पश्चिम आणि दक्षिणेस मध्यभागी भिंतीवर क्रमशः चंडिका ,सूर्य आणि गणेशप्रतिमा प्रामुख्याने विद्यमान आहेत.
मंदिराच्या आत दाराची चौकट, छत तसेच आधारस्तंभ यावर अत्यल्प अलंकरण आहे आणि याच्या गर्भगृहाची चौकट पाच शाखायुक्त असून ती वरील बाजूनी नवग्रह तर खालील बाजूस पाने भौमितिक आकारांनी सुशोभित आहे. द्वारशाखेवर एकावर एक दोन मुर्त्या घासल्या गेल्यामुळे त्यांची ओळख पटविणे अवघड जाते . गर्भगृहात एका नंदीवर बसलेले उमा महेश्वर मूर्ती आहेत.
याच्या पुरातात्विक महत्त्वामुळे भारतीय पुरातत्व विभागाने यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे.
 
 
 वणी नांदुरी घाट रस्ता


 
 
 
 https://www.facebook.com/khandesh2016/
 
 
 

बडगुजर समाजाची देवस्थाने

January 11, 2019 बडगुजर समाज 0

 काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत हे एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७७८-१७९० मध्ये बांधले. येथे सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत. मंदिरात नियमित पूजाअर्चा होत असते. मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे. मंडपात प्रवचने व कीर्तने होत असतात. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात. राममंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की सध्या जेथे राममंदिर आहे तेथे पूर्वी नागपंथीय राहात असत. काही नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात राम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती अंतरा-अंतरावर सापडल्या जेथे राममूर्ती सापडली ते रामकुंड, लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते लक्ष्मणकुंड, सीतेची मूर्ती सापडली ते सीताकुंड होय. या मूर्ती स्वंयभू म्हणून ओळखल्या जातात. गोदावरी नदीच्या घाटापासून याचे अंतर पायी चालत जाण्याइतके आहे.

 

कालिमाथ
औरंगाबाद
तालुका कन्नड.
कालिमाथ केवळ अशीच जागा आहे जिथे कालीची तिच्या बहिणी लक्ष्मी आणि सरस्वतीसोबत पूजा केली जाते. देवी कालीचे मंदिर आहे, जे मोठ्या संख्येने भाविक वर्षभर भेट देतात, विशेषत: नवरात्रोवेळी..
 
 


 

 

 

 

 

बडगुजर समाजाची देवस्थाने:

  1. चामुंडा-चोटीला – जुनागड-गुजरात
  2. शेलू-मेथी-शिंदखेडा, धुळे जिल्हा
  3. चोपडा
  4. सुरत
  5. पिळोदे, ता. अमळनेर, जि. जळगांव

या मंदिर परिसरातील आपला ग्रुप फोटो तुम्ही पाठवू शकतात. निवडक फोटोंना या पेजवर प्रसिद्ध 
करण्यात येईल .

चामुंडा माता मंदिर, जुनागढ
डॉ. कमलेश बडगुजर, नाशिक सहपरिवार – चामुंडा माता मंदिर, चोटीला

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...