Thursday, April 28, 2022

बारा मोटेची विहीर / Bara Motechi Vihir

 http://bhushankarmarkarworld.blogspot.com/2017/03/


  कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात असणारा भुदरगड बघायचा बेत ठरला तेव्हाच जाता जाता साताऱ्याजवळील लिंब गावातील 'बारा मोटेची विहीर' बघावी असं ठरलं. ह्या विहिरीच्या रचनेबद्दल एक वेगळा लेख लिहिणं योग्य वाटलं. भुदरगडाविषयी वेगळा लेख लिहणार आहेच.

फेसबुक आणि वॉट्सऍप वर ह्या विहिरीबद्दल बरंच वाचलं-बघितलं होतं. प्रत्यक्ष विहीर बघून कळलं कि जी माहिती सोशल मीडिया वर फिरत आहे, त्यातले फोटो हे ह्या विहिरीचे नसून चम्पानेर येथील दुसऱ्या एका विहिरीचे आहेत. त्या फोटो खालील माहिती मात्र ह्या बारा मोटेच्या विहिरीचीच दिलेली आहे. साहजिक बऱ्याच लोकांनी ही विहीर प्रत्यक्ष बघितली नसल्यानं जी माहिती मोबाईल आणि संगणकावर फिरतीये त्यावर विश्वास ठेवला जातो. वाचकांनी असल्या पोस्ट बद्दल दक्ष राहावं.

लिंब येथील बारा मोटेची विहीर आणि त्यावर बांधलेला राजमहाल/खलबतखाना
ही विहिर म्हणजे स्थापत्य शास्त्राचा एक उत्तम नमुना आहे ! जे काही बांधलेलं आहे, ते 'काय' बांधलंय आणि त्या बांधकामाचं 'प्रयोजन' काय हे जर अभ्यासपूर्वक जाणून घेतलं तर आपल्या पूर्वजांबद्दलच्या भावनेनं आपली छाती अभिमानानं अजून चार इंच फुलून येईल.

मुख्य विहीर अष्टकोनी आकाराची असून त्याच्या वरील बाजूस मोटा लावण्याच्या नऊ जागा आहेत. प्रत्येक तीन मोटांनंतर अष्ट बाजूंमधली एक बाजू मोकळी सोडली आहे. (तीन तीन मोटा 'अल्टर्नेट' बाजूंवर). एका बाजूच्या खालच्या अंगाला राजवाड्याचं बांधकाम आहे त्यामुळे ह्या बाजूवर मोटा नाहीत. त्याच्या डावी-उजवीकडे एक एक बाजूला सुद्धा मोटांचे चौथरे नाहीत.

विहिरीचा नकाशा (प्रमाणात नाही)
मोटांच्या जागांपासून पाणी पसरू न देता योग्य ठिकाणी वाहून नेण्यासाठी दगडात बांधलेले पाट आणि खाचा आहेत. सर्वच खाचा आज शाबूत नाहीत, कदाचित जमिनीखाली गाडल्या गेल्या असाव्यात किंवा ह्याचे दगड लोकांनी इतर बांधकामासाठी उचलून नेले असण्याची शक्यता आहे.

निमुळत्या आयताकृती भागात मुख्य विहिरीला जोडून असणाऱ्या दोन उपविहीरी आहेत. खरंतर ह्याला उपविहीर म्हणण्यापेक्षा 'हौद' संबोधलं तर जास्ती योग्य ठरेल.
मुख्य विहीर, त्याच्या उपविहिरी किंवा हौद आणि विहिरीमध्ये आत उतरायचा जिना ह्यांचा एकत्रित आकार शंकराच्या पिंडीप्रमाणे आहे. अश्या आकाराच्या बऱ्याच विहिरी शिवकाळात बांधल्या गेल्या. त्यातील एक विहीर पुण्यात अरण्येश्वर जवळ आहे (सध्या अत्यवस्थ). अजून एक विहीर कादवे गावाजवळील शिरकोली इथं बघायला मिळते.

दोन हौदांच्या वरील भागात मोटा लावण्याच्या  प्रत्येकी तीन अशा एकूण सहा जागा आहेत. म्हणजे विहिरीला मोटा लावण्याच्या एकूण पंधरा जागा !

ह्यातील बारा मोटा एका वेळेस चालू असायच्या आणि उरलेल्या तीन ह्या 'बॅक अप' म्हणून होत्या. त्यामुळे विहिरीला बारा मोटेची विहीर म्हणतात, असं वाचण्यात आलं.
एका वेळी बारा (च) मोटा चालू ठेवण्यामागे काय प्रयोजन असावं? पाण्याच्या अधिक उपश्यासाठी पंधरा पैकी अधिकाधिक (जास्तीत जास्त पंधरा) मोटा वापरल्या जात असाव्यात. पावसाळ्यात किंवा गरज नसताना ह्यातील काही मोटाच वापरण्यात येत असाव्यात (बाराच मोटा का ? ह्या संदर्भात काही दस्तऐवज असल्यास कृपया तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा).

विहीर जमिनीच्या पातळीच्या बऱ्याच खाली म्हणजे जवळपास वीस फूट खाली बांधली आहे. येथपर्यंत जाण्यासाठी दगडी जिना बांधला आहे.

विहिरीच्या आत उतरण्यासाठी दगडी जिना

दगडी जिना आतील बाजूने
जिना संपला कि दगडी सपाट वाट आहे. जिन्या नंतरचा हा दगडी रस्ता मुख्य विहिरीच्या अगदी काठापर्यंत येऊन थांबतो. ह्या वाटेच्या दोन्ही बाजूला उपविहिरी किंवा हौद बांधले आहेत. रस्ता संपतो तिथे एक कमान बांधलेली आहे.

जिना उतरून खाली आल्यावर असणारा दगडी रस्ता. ह्याच्या डाव्या उजव्या बाजूला जी खोलगट जागा आहे, ते हौद आहेत. समोर कमान आहे त्याच्या पलीकडे मुख्य विहीर आहे.
हौदांच बांधकाम खूपच विचारपूर्वक केलेलं आहे. ह्या हौदांचा उपयोग असा कि, जेव्हा मुख्य विहिरीला पाणी भरपूर असेल, तेव्हा कमानीमधून ते आतमध्ये शिरेल (ओव्हरफ्लो). हे जास्तीचं पाणी दोन्ही बाजूंच्या हौदामध्ये आपोआप साठवलं जाईल. जेणेकरून आत उतरायचा जिना आणि त्याच्यापुढील वाटेवर पाणी साठून राहणार नाही. कारण हा भाग पाण्याने भरला तर विहिरीमध्ये आत उतरायची वाट आणि खलबतखान्यात जाणारे अंधारे जिने पाण्यानं भरून जातील.
ह्या भागातील पाण्याचं प्रमाण खूपच वाढल्यास दोन्ही हौदांच्या वरती असणाऱ्या मोटांनी पाणी बाहेर काढता येईल.

मुख्य विहिरीला लागून असणाऱ्या कमानीच्या बाजूच्या दोन्ही भिंतींमध्ये वरती जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. पायऱ्यांच्या ह्या वाटा अतिशय चिंचोळ्या असून एका वेळेस एकच व्यक्ती जा-ये करू शकते. पायऱ्यांची ही वाट अंधारी आहे, ती वर जाताना एक 'U' टर्न घेते. पायऱ्यांचे आकार एक सारखे नाहीत. वरती खलबतखाना बांधलेला आहे. खलबतखान्याच्या दोन विरुद्ध दिशांनी पायर्यांच्या वाटा वरती येतात.

कमानीच्या बाजूच्या भिंतींमध्ये जे कोनाडे दिसत आहेत, त्या वरील महालात जाण्याच्या वाटा आहेत

कमानीचा दुसऱ्या बाजूने घेतलेला फोटो. वरील बाजूस महालाचा सज्जा दिसत आहे.
हौदांच्या आणि मुख्य विहिरीच्या मधोमध बांधलेला महाल (खलबतखाना) विशेष पाहण्याजोगा आहे. ह्याच्या बांधकामात दगडी खांब आहेत. खांबावर मारुती, गणपती, गजारूढ महाराज, अश्वारूढ महाराज अशी शिल्प कोरलेली आहे. ह्या महालास एक सज्जा (गॅलरी)आहे. त्याची दिशा विहिरीच्या बाजूला आहे. सज्ज्यास तीन महिरपी कमानी, कमानीच्या प्रत्येक बाजूला एक अशी एकूण सहा कमळ शिल्पे कोरलेली आहेत.
ह्याखेरीज विहिरीच्या बांधकामातील वाघ, सिंह, शरभ ह्यांची शिल्प बघण्यासारखी आहेत. ह्या शिल्पांबद्दल अधिक माहिती गूगल वर मिळू शकेल.
महालाच्या छतावर सिंहासनाची आणि दरबाराची जागा आहे. (ह्या जागेवर अधिक बांधकाम असावं असा एक अंदाज. कारण सिंहासन आणि सभेचे ठिकाण उघड्यावर का असावे ? का हे सभास्थान सध्याच्या पंचायती प्रमाणे गावातील लोकांचे एकत्रीकरण करून चर्चा करण्यासाठी असावे ?)

महालमधील खांब व त्यावरील शिल्प

खांबांवरील कमळ शिल्प
विहिरीच्या बांधकामाची माहिती देणारा शिलालेख विहिरीमध्ये जाणाऱ्या पायर्यांच्या वाटेवर लावला आहे.
ह्या शिलालेखावरून संभाजीराजे यांचे सुपुत्र शाहु महाराज (पहिले शाहु महाराज) यांच्या काळात या विहिरीचे बांधकाम शके १६४१ ते १६४६ (इसवी सन १७१९ ते १७२४) या दरम्यान सौ. विरुबाई भोसले यांनी केले असं समजतं.
आत उतरायच्या जिन्याच्या कमानीवर असणारा शिलालेख
अमित कुलकर्णी यांनी काढलेले विहिरीचे अप्रतिम फोटो :
http://amitshrikulkarni.in/wp-content/uploads/2016/03/Limb-Stepwell-5-1620x1080.jpg
http://amitshrikulkarni.in/wp-content/uploads/2016/03/Limb-Stepwell-6-1617x1080.jpg
http://amitshrikulkarni.in/wp-content/uploads/2016/03/Limb-Stepwell-1-1440x1080.jpg
http://amitshrikulkarni.in/wp-content/uploads/2016/03/Limb-Stepwell-4-1620x1080.jpg

सध्या तशी दुर्लक्षित असणारी ही विहीर आवर्जून बघण्यासारखी आहे हे नक्की !

विजयापुर / बिजापूर

ईब्राहीम रोझा......बिजापूर

IMG_02081_2__tonemapped"

IMG_0229"

IMG_0254"

IMG_0282"

IMG_0278"

Ibrahim Rouza 2"

Ibrahim Rouza 1"

https://www.misalpav.com/node/14977


https://kunalstrek.blogspot.com/2019/05/blog-post.html
मार्चच्या शनिवारी २३ आणि रविवारी २४ला माझी सुट्टी होती. गेल्या महिन्यातील दोन दिवसाची सुट्टी मी अशीच वाया घालवली पण ह्या वेळी कुठे तरी नक्की जायचं ठरवलं होता. अनेक ट्रेकचा मित्रांना विचारून बघितला कोणी रेंज ट्रेक साठी तयार नव्हता आणि कुठच्याही ग्रुपचा चांगला प्लॅन नव्हता.  मग मी ह्या वेळी बिजापूर/ विजयापुर करायचा ठरवलं.


ठरल्याप्रमाणे मी रात्री ११.४५ ची मुंबई-चेन्नई मेल चा द्वितीय श्रेणीचा शयनायन/स्लिपर तिकीट काढला होता. पण उशिरा कार्यक्रम ठरवून तिकीट काढल्यामुळे वेटिंगचा तिकीट मिळालं. त्यामुळे शेवट पर्यंत टांगती तलवार होती. त्यामुळे गुरुवारी सकाळी वातानुकूलित ३ टियरची तत्काळ तिकीट काढली. मग पहिली तिकीट रद्द केली. संध्याकाळी ९. ३० ची विजयापुरला जाणारी ट्रेन आहे. पण माझ्या कार्यालयाचा निघण्याचा वेळ रात्री ११ नंतर असल्यामुळे माझ्या साठी पाउणेबाराची ट्रेन सोयीस्कर होती. आणि ह्या वेळे मध्ये कुठच्या खाजगी किंवा सरकारी गाड्या हि नव्हत्या. त्यामुळे हीच ट्रेन माझ्यासाठी उत्तम होती. हि ट्रेन सोलापूरला सकाळी ९.३० ला पोहचते तेथून सोलापूर वरून  बिजापूरला जाणारी एसटी किंवा कर्नाटक मंडळाच्या गाडी पकडून बिजापूरला जायच ठरलं. सोलापूर ते बिजापूर अंतर रस्त्याने १०० किमी आहे. साधारण सव्वा दोन ते अडीच तास लागतात.

पहिला दिवस
ट्रेन  सकाळी ९. २० ला सोलापूरला पोहचली. तसाच मी रेल्वे स्थानकाबाहेरून दहा रुपयात शेअर रिक्षा पकडून एसटी डेपोला पोहचलो. मला विनयने सांगितलं होता रेल्वे स्थानकाच्या बाहेर पलीकडून पण गाडी भेटेल पण मी विचार केला आगारला गेलेलं बर.
सोलापूर एसटी आगारात कर्नाटक मंडळाची सोलापूर ते विजयपुरा ९.३० ची एसटी लागली होती. पण कोणच   माणसं आली नव्हती म्हणून वाहकाने गाडी अजून ५ते १० मिनटं जास्तवेळ थांबवली होती. मी गेल्यावर अजून १०/१२ माणसं आली तशी वाहकाने ९. ३८ ला गाडी सोडली. तिकिटाचे ११६ रुपये झाले. बिजापूरला पोहचायला मला १२ वाजले.
ट्रेन मध्ये पूर्ण ना झालेली झोप गाडीच्या प्रवासात पूर्ण झाली.

मुलूक / मुलुख मैदान तोफ आणि उपली  बुरुज
विनयच्या मदतीने कुठे हॉटेल करावं तसा मी दोन दिवस आदीच ऑनलाईन हॉटेल बुकिंग केला होता.
माझ हॉटेल बसवेश्वर रिंगण (सर्कल), बारा कमान  जवळ होता. पण मला विनयने दिलेल्या माहिती नुसार मी विजयापूर बस आगार वरून हॉटेलला न जाता. वॉटर टॅंक बस थांब्याला उतरलो आणि पाहिलं मुल्क मैदान तोफ आणि उपली  बुरुज बघून घेतलं. सोलापूर वरून येणाऱ्या गाड्या वॉटर टॅंक इथूनच बिजापूर मध्ये येतात. त्यामुळे वॉटर टॅक  थांब्याला उतरून, हि दोन्ही ठिकाणे जवळ पडतात. आणि जर मी सरळ हॉटेल मध्ये गेलो असतो तर मला हे दोन ठिकाण बघण्यासाठी परत पाठी यायला लागलं असता. त्यापेक्षा रस्त्यातच हि दोन्ही ठिकाण बघून पुढे जाणं मला बर पडलं.

हि दोन ठिकाण एकमेकांचा जवळ असल्यामुळे लगेच पाहून होतात. पाऊण तासात माझी दोन्ही ठिकाण पाहून झाली. मग तसाच मी शेअर रिक्षाने दहा रुपयात हॉटेल जवळ पोहचलो.

माझा हॉटेल बारा कमानचा एकदम बाजूला होता त्यामुळे मी ते दुसऱ्या दिवशी बघून घ्यायचा ठरवलं.
हॉटेल मध्ये जाऊन अंघोळ वगैरे करून बाहेर पडलो.  माझ्या दोन्ही बुटाचा सोल निघाला होता. ते मोची शिऊण देईपर्यंत १५ते २० मिनटं माझा कडे होती, तो पर्यंत मी जवळच्याच हॉटेल मध्ये जेवण करून घेतलं.

इब्राहिम रोझा मस्जिद
अडीच वाजले होते. मी आता इब्राहिम रोझा पाहायचा ठरवलं. त्या प्रमाणे मी गांधी चौक थांब्यावरून (बसवेश्वर रिंगण किंवा सर्कल जवळच गांधी चौक थांबा येतो ) अथणी रोड वरून जाणारी शहरी बस सेवाची बस पकडून वॉटर टँक बस थांबाच्या पुढचा बस थांबायला उतरलो. मला कुठची बस पकडली आणि नेमका कुठे उत्तरलो ते माहित नाही. कारण सगळ्या बसच्या फलक वर कन्नड मध्ये लिहला होता. त्यामुळे मी वाहकला विचारून चढलो. पण नंतर मी गूगल वर चेक केला असता.  त्या थांब्याला वर्क शॉप स्टॉप म्हणतात. वाहकाने ५ रुपयाची तिकीट दिली. तेथून मी चालत पाच मिनटात इब्राहिम रोझा जवळ पोहचलो.

साठ कबर
इब्राहिम रोझा बघून मी पुन्हा त्या थांब्या जवळ आलो. कारण त्याच रोडला पुढे  २.५ ते ३ किमी वर गूगल मॅप वर  अफझलखानच्या बायकोच्या ६३ कबरीचा ठिकाण दाखवत होता. त्याला साठ कबर बोलतात तिथे. त्या साठी मी आधी बस स्टॅन्ड वर लोकांना विचारून बघितला पण कोणाला काहीच माहित नव्हता.  मग मी रिक्षा वाल्याला विचारला एकाने आधी ८० रुपये सांगितलं. मग मी दुसऱ्याला विचारले त्यांनी पन्नास रुपये सांगितले मग मी त्या रिक्षातून गेलो.
 
रिक्षावाल्याला हि नीट माहित नव्हतं त्यांनी दुसऱ्या रिक्षावाल्याला विचारला. त्यांनी त्याला सांगितलं,अफझलपूर तक्के नाक्यावर रिंग रोडला उजवीकडे जाणारा रस्त्याने जा.  नाक्यापर्यंत तो बरोबर घेऊन गेला. मी माझा गुगल चा नक्षा चालू ठेवला होता. पण नंतर तो सरळ पुढे घेऊन जाऊ लागला. मी त्याला सांगितलं " तू चुकतो आहे " तरी पण तो बरोबर जातो आहे बोलत होता.  मला कळलं हा मला त्या रस्त्याने अफझलखान च्या स्मारक जवळ घेऊन चालला होता. कारण गूगल  नक्षा वर पण  मला त्याचीच दिशा दाखवत होता.

शेवटी मी त्याला थांबवलं. आणि कोणाला तरी विचारायला सांगितलं. मग कोणी तरी सांगितलं येथे नाही तिथे आहे. त्या जागी घेऊन जायायला रिक्षा वाला माझ्याकडे  आता ५० चे १०० रुपये मागू लागला. मी त्याला ७० मध्ये तयार केले आणि नक्षा नुसार चालायला सांगितलं. त्या नुसार तो गल्लीतून रिक्षा काडत होता. पण मध्येच निमुळता कच्चा रस्त लागायचा.  तेथील लोकांना विचारला ते म्हणत असा जा पण नक्की वाट सापडेना. मग शेवटी मी रिक्षावाल्याला बोललो जाऊदे मुख्य रस्त्याला येऊ आणि मग तू मला महामार्गावर बाहेर सोड आणि जा. आम्ही गल्लीतून बाहेर पडून रस्त्याला आलो आणि महामार्गाकडे चाललो होते. तेव्हा मला नकाशावर वर साठ कबरला जाणारा रस्ता पुढे दाखवू लागला.  पुन्हा मी  रिक्षावाल्याला  त्या रस्त्याला घ्यायला सांगितले, तो हि तयार झाला.  आणि त्याला हि आठवूं लागला बहुतेक तो पूर्वी  कधी तरी तेथे आला होता. मग आम्ही नक्षाप्रमाणे बरोबर त्या ठिकाणावर पोहचलो.

तेथे जातेवेळी मला महामार्ग जवळ दिसला, त्यामुळे मी विचार केला जाते वेळी महामार्गावर पोहचल्यावर कुठची तरी बस मिळेलच. मग मी रिक्षावाल्याला थांबायला सांगितले नाही.

जिथपर्यंत पक्का रस्ता जातो तिथपर्यंत रिक्षा घेऊन गेलो. नंतर पुढे पायवाट लागते. त्यावाटेने चालत ५ मिनटात आपण त्या स्थळावर पोहचतो. ह्या पायवाटेत मध्येच एक मोठा दरवाजा सारखी एक वास्तू /कमान लागते. त्याचा बाजूला तारेचं कुंपण असल्यामुळे मला पलीकडे जाता आलं नाही. आणि समोरून चढता येत नाही कारण त्याचा पायथा / चौथरा खूप उंच होता.
कबरी आत गावात असल्यामुळे शोधत पोहचेपर्यंत मला पाऊणे पाच वाजले. एक जण त्याचा लोखंडी दरवाजाला टाळा लावत होता. पण मी आलो म्हणून थांबला. पण नंतर मी त्याला जायाला सांगितले. कारण जागेला केवळ पुढून लोखंडाच कुंपण होता, पाठी अजून काही तरी काम चालू असल्यामुळे कुंपण नव्हतं. पण मला वाटत पुढच्यावर्षी पर्यंत त्या पूर्ण जागेला चारी बाजूने लोखंडी खांब आणि भिंतीचा कुंपण असेल.
आणि वेळेत चालू अथवा बंद होईल.
तेथे ६३ कबरी होत्या,  त्याचा पाठी अजून एक तुटलेली वास्तू आहे. त्यातील माती काढायचा काम चालू आहे. ते पूर्ण झाल्यावर ती पूर्ण वास्तू नक्की काय आहे ते कळेल.
त्या कबर बघून पुन्हा मी गावातून चालत अथणी किंवा तिकोटा -बिजापूर महामार्गावर गेलो. तेथे बस थांब्यावर पोहचलो. त्या बस थांब्याला मारुती कॉलोनी म्हणतात . तेथून गांधी चौक पर्यंत माझी ६ रुपये तिकीट घेतली.

( तरी अथणी रोडलाच अफझलपूर तक्के पासून पुढे अजून ३ते ३.५ किमी वर असलेला माझं संगीत नारी महाल मला माहित नसल्यामुळे करायचा राहील आहे.  तिथं पर्यंत बस जाते का नाही मला माहित नाही बहुतेक जात असावी. पण रिक्षाने जाऊ शकता पण जरा जास्त पैसे घेतील.)

गगन महाल
पाऊणे सहाला मी पुन्हा गांधी चौकीला पोहचलो. मग तेथून जवळ असलेल्या गगन महाल पाहून घेतला. सहा वाजता ते बंद होत. पण तेथे मुख्य एकच ती महलची वास्तू असल्यामुळे माझा १५ तें २० मिनटात पाहून झाले. त्या नंतर चौकीदार सगळ्यांना बाहेर काढू लागला. तो पर्यंत सव्वा सहा झाले. मग त्याचा समोर अजून एक वास्तू  आहे त्याला आनंद महाल बोलतात. बहुतेक तेथे आता महाविद्यालय हि चालत. पण त्या वास्तूत जास्त काही बघण्यासारखा नाही. ते पाहून, नंतर मी तेथील आसपासचा परिसर पाहत होता. ते पाहून नंतर मी हॉटेल वर गेलो.
थोडा आराम करून रात्री जेवून झोपलो. अश्या प्रकारे माझा पहिला दिवस संपला.

दुसरा दिवस
दुसऱ्या दिवशी मला खूप ठिकाणी फिरायचा होता. म्हणून सकाळी साडेसात ला उठून रस्त्यावर असलेल्या गाडी वर चहा बिस्कीट खाऊन सव्वा आठ किंवा साडे आठ चा सुमारास फिरायला सुरवात केली. 

असर महाल
मी पहिला असर महालला चालत गेलो. असे सांगण्यात येते असार महालला आदिल शाह न्याय निवाडे करत असे. असार महालला दोन बाजूने प्रवेश करू शकतात. एक मुख्य रस्त्यावरून डॉ आंबेडकर मैदान चा समोरून तर दुसरा पाठी असलेल्या वस्तीतून आहे. मला माहित नव्हता त्यामुळे मी हॉटेल पासून चालत पाठच्या रस्त्याने वस्तीच्या दरवाजाने प्रवेश केला. ह्या रस्त्याने येताना असर महालच्या पाठची लागून असलेली वास्तू  दिसते. त्याचा भिंतीचा मोठ्या कमानी खालून रस्ता गेला आहे. तो बघायला सुंदर वाटतो. ते नक्की पाहून घ्यावे.  त्याचा भिंतीचा कुंपण आणि कचऱ्यामुळे तेथे वर जाता येत नाही. त्याचा मी फोटो खाली अपलोड केला आहे.

बारा कमान
असर महाल पाहून मी पुन्हा हॉटेल मध्ये आलो आणि दिवसाचं महत्वाच काम करून घेतला. आणि मग हॉटेल मधून बाजूलाच असलेला बारा कमान पाहून घेतला. बारा कमान सकाळी ८/९ ला उघडत आणि संध्याकाळी ६ ला बंद होत. पंधरा ते वीस मिनटात माझं बारा कमान पाहून झाल. मग तसाच मी हॉटेल मधला सामान घेतला आणि सकाळी दहाला शेवटचा हॉटेल सोडला (चेक आऊट) केला. आणि तेथून मी ताज बावडी साठी गेलो.

ताज बावडी आणि जोडगुमाज
ताज बावडी आणि जोडगुमाज ला जाण्यासाठी KSRTC च्या डेपो पासून जवळ आहे. जोड गुमाज तर चालत पाच मिनिटावर आहे. त्याचा पुढे अजून पाच मिनिट चालत गेलो तर पुढे ताज बावडी आहे. हि दोन्ही ठिकाणे घनदाट वस्तीत असल्यामुळे तिथे बहुतेक शेअर रिक्षा हि जातात. ताज बावडीच्या गल्लीतून एकाद दुसरी बस पण मी जाताना बघितली. नक्कीच बसने ५ रुपये तिकीट असेल. 
पण मला माहित नसल्यामुळे मी बसवेश्वर सर्कल जवळून रिक्षा केली. एकाने मला ६० सांगितले दुसऱ्याला शेवटी चाळीस रुपये देऊ केले आणि नेले. तस बघायला गेलं तर ते अंतर जास्ती जास्त १ते सव्वा किमी असेल. पाच  ५ मिनटात रिक्षाने पोहचतो. जर मीटर वर रिक्षाने गेलो असतो तर माझं २० रुपयात काम झाल असता. बहुतेक मला अंतर लांब वाटावं म्हणून रिक्षावाल्याने मला जरा फिरवूनच नेला. नक्षा वर मला दिसत आहे तरी पण साहेब मला सांगतात इथून जवळ आहे.
ताज बावडी वर गेलो तर ताज बावडीचा लोखंडी दरवाजा बंद होता. आता बहुतेक कोणाला आत जाऊन देत नाही. तेथे कन्नड मध्ये माहिती लावली होती. त्याचा वर लिहिलेल्या इंग्लिश १०००० रुपयाचा आकड्या वरून तेथे आत गेल्यास दहा हजाराचा दंड असावा, असा मला अंदाज आला. मग दरवाजा बाहेरूनच फोटो काढून तेथून निघालो.  तेथे बसलेल्या लोकांना जामिया मस्जिदला कसा जायायचा विचारला. त्यांनी मला तेथून शेअर रिक्षा जातात सांगितलं. 

 मी ताज बावडी बघून बाजूलाच पाच मिनिटावर असलेल्या जोड गुमाज बघायला चालत गेलो. जोडगुमाज  म्हणजे दोन कबरी बाजू बाजूला आहे त्याला म्हणतात. मला आत जायायला भेटला नाही कारण गुमाजचा आत असलेल्या कबरीच्या आता मस्जिद केली आहे. त्यात मी आत जाते वेळी एक बाई बाहेर आली तिने रागाने सांगितले "फुल पॅन्ट पहेनके अंदर जाते हैं". मग मी बाहेरूनच बघून तेथून निघून गेलो.

मला आता लांडा कसाब तोफ आणि जामिया मस्जिद बघ्याची होती. मी गुगल नक्षा वर पहिला होता. तोफ आणि मस्जिद वेगळ्या दिशेला आहेत. मस्जिद जवळून गोल गुमाज जवळ आहे. आणि गोलगुमाज मला शेवटी करायचा होता. म्हणून मी पहिली तोफ बघायला गेलो.

लांडा कसाब तोफ
जोड गुमाज कडून मी चालत ५ मिनटात KSRTC बस आगार मध्ये गेलो. बस आगारचा समोरून मी रिक्षावाल्याला लांडा कसाब तोफेचा विचारला पण कोणाला माहित नव्हतं. मग मला नक्षा वर त्याचा जवळ बिजापूर RTO कार्यालय दिसला. मग मला RTO पर्यंत शेअर रिक्षा भेटली. दहा रुपयात त्यांनी मला बरोबर  RTO जवळ सोडला.  RTO चा बाजूलाच आपल्याला रस्त्याला तटबंदी आणि बुरुज दिसतो. तट बंदीची भिंतीला छेदुनच  रस्ता आला आहे. रस्त्याला उतरल्यावर डावीकडे एक बुरुज आणि तुटलेली तटबंदी दिसते. त्या बुरुजावर ती लांडा कसाब तोफ आहे. तोफ उघडयावर दुर्लक्षित पडून आहे.  बुरुजाचा तटबंदीवर खूप कचरा हि पडला होता. आदिल शहाचा काळात काही मोठ्या तोफ होत्या.  त्यात पहिली मुलुख ए मैदान आणि लांडा कसाब तोफ हि त्या मोठे तोफे मधली एक महत्वाची होती. 

जामिया मस्जिद
तोफ बघून मला आता जामिया मस्जिदला जायायचें होते.  त्यासाठी मला तेथून थेट शेअर रिक्षा नाही मिळत कळलं. त्यासाठी पहिला RTO बिजापूर ते  बागलकोट क्रॉस पर्यंत शेअर रिक्षाने तेथून पुढे जामिया मस्जिद साठी शेअर रिक्षा पकडायची. प्रत्येकी १० रुपये घेतात.

गोलगुमाज/ गोलघुमट
जामिया मस्जिद मध्ये पोहचेपर्यंत ११.१५ पर्यंत पोहचलो. मस्जिद बघून मी ११. ४० ला तेथून १० रुपयात शेअर रिक्षा पकडून ५ मिनटात गोल गुमाजला पोहचलो.

गोलगुमजला पोहचेपर्यंत पाऊणे बारा वाजले होते. आत गेल्यावर फिरायला वेळ लागेल आणि खायायला हि भेटणार नाही. म्हणून मी जेवून घेतलं. आणि मग गोलघुमट/गोलगुमाज पहायला गेलो.

गोलगुमाज पाहण्याची वेळ सकाळी ६ ते  सायंकाळी ५. ४५ पर्यंत आहे. सतराव्या शतकातील अली आदिल शहाच्या ह्या कबरीचा म्हणजेच गोलघुमटचा घुमट जगातील सगळ्यात मोठा आहे. गोलघुमटच्या पुढील वास्तूत संग्रहालय आहे. मी पहिला गोल घुमट पाहून घेतलं नंतर संग्रहालय. घुमट पाहायला मला दिड तास लागला. आणि संग्रहाला बघायला अर्धा ते पाऊण लागला. चार वाजले मग मी तासभर तेथील उद्यानात विश्रांती घेतली. आणि निघालो.

तेथूनच जवळ शंकराची मोठी मूर्ती आहे ते मला माहित नव्हता, नाही तर मी ते हि बघून आलो असतो. कारण माझी रात्री ९ ची मुंबई साठी बस होती. मग तो पर्यंत मी असाच जवळच्याच बाजारात फिरत होतो.
अश्या प्रकारे माझी बिजापूरची यात्रा संपन्न झाली. मला एकूण रुपये ४२७० खर्च आला. त्यातील माझा फक्त मुंबई ते विजापूर येऊन जाऊनच प्रवासाचा खर्च रुपये २३०० झाला.


मुलुख ए मैदान तोफ

उपली  बुरुज
इब्राहिम ए रोझा
साठ कबर (अफझलखानचा ६३ बायकोची कबर ) आणि खालील फोटोत कंबर च्या पाठी असलेली वास्तू

साठ कबर  कडे जाते वेळी लागणारा  दरवाजा किंवा अन्य काही
गगन महाल
आनंद महाल
असर महालाच्या पाठच्या दरवाजाने लागणारा किल्ल्याचा भाग
असर महाल
बारा कमान
ताज बावडी
जोड गुमाझ
लांडा कसाब तोफ
जामिया मस्जिद
गोलगुमझ /गोलघुमट







सोलापुर जिल्हा ( अंतिम भाग )

 

 सोलापूर भ्रमंती 
दिनांक १४ आणि १५जून २०१९

ह्यावेळी सोलापूरचे भुईकोट करायचे ठरविले होते. जायायचा टिकिट काढून ठेवला होता पण शेवटच्या क्षणापर्यत जाऊ की नको विचार करत होतो, कारण पाऊस पडला तर किल्ले निठ पाहता येणार नाही आणि एसटीने वेळेत आणि कुठून सुरुवात करावी. पण सुरुवात केली आणि शेवटपर्यंत सगळ उत्तम झाले. मी आतापर्यंत एकट्याने केलेल्या योजने मधील आठवणीत राहील असा उत्तम अनुभव मला आला.

प्रवास कसा करावा याचे अंदाज आणि शेवटी कसा  करायचा ते ठरवलं
सुरवात कशी करावी म्हणून ट्रेकचा एका व्हाँटसअप ग्रुप वर तर काहींना खाजगीत विचारल. मग ऐकाने कुर्डुवाडी वरून शेवटी सोलापूरला जायायचं सल्ला दिला. माझा हि मनात हाच विचार होता. सोलापूर वरून मुंबईला येण्यासाठी भरपूर गाड्या भेटतील म्हणून मग मी तसच ठरवलं.

ठरलं तर पाहिल्या दिवशी कुर्डुवाडीला उतरून पहिला करमाळा किल्ला, कमलाभवानी मंदिर नंतर परांडा किल्ला. रात्री सोलापूरला पोहचून दुसऱ्या दिवशी सोलापूर भुईकोट, मंगळवेढा,माचणूर आणि धोत्रीची गडी पण वेळे अभावी माझी धोत्रीची गडी राहिली.
मी इथे फक्त करमाळा, मंगळवेढा आणि मचणूर किल्ल्याची थोडी माहिती दिली आहे. बाकी किल्ल्याच विश्लेषण नाही दिला. मी एसटीने कसा प्रवास केला आणि कसा पोहचलो त्या बद्दल जास्त लिहला आहे. किल्ल्याबद्दलची माहिती मी स्वतः ट्रेकक्षितीज वरून वाचून गेलो, अतिशय सुंदर किल्ल्याची माहिती  देतात. त्यामुळे त्यांच्या साईट वर नक्की जाऊन पहा.

मुंबई ते कुर्डुवाडी, कुर्डुवाडी ते करमाळा प्रवास
मुंबई CSMT वरून रात्री ११.४५ ची चेन्नई मेलची सोलापूर पर्यंतची तिकीट काढली होती. शुक्रवारी रात्री कामावरून लवकर सुटल्यामुळे मी दादर वरून ट्रेन पकडली. ट्रेन कुर्डुवाडीला ७ चा ऐवजी ८ ला पोहचली. तसाच मी चालत १० ते १५ मिनटात कुर्डुवाडी एसटी आगारात पोहोचलो. तिथे ८.४५ची सोलापूर- नाशिक एसटी लागली होती. माझा कडे १५ मिनिट होते तोपर्यंत मी तिथेच नाश्ता करून घेतला.

कुर्डुवाडी ते करमाळा अंतर ४७ किमी आहे. एसटी ने मला सव्वा तास लागला. बरोबर दहा वाजता करमाळा स्थानकात पोहचलो.
(जेऊर वरून हि करमाळा  जाण्यासाठी तास ते दोन तासात एसटी आहे. त्याने हि जाऊ शकतात. माझा पहिला विचार जेऊरला उतरून एसटी ने करमाळ्याला जायायचा होता, कारण जेऊर ते करमाळा अंतर २१ किमी आहे. त्यामुळे मी लवकर पोहचलो असतो. पण मला गाड्याची माहिती नसल्यामुळे मी कुर्डुवाडी वरून जायचं ठरवलं. पण मी खाली करमाळा एसटी आगार मधील वेळापत्रकचा फोटो ठेवला. आहे त्यावरून तुम्हाला जेऊर ते करमाळा गाड्यांच वेळापत्रक कळेल.)

करमाळा किल्ला
एसटी आगारातून चालत ५ मिनिटावर किल्ला आहे. खरं बघितला तर पूर्ण गाव किल्ल्याचा तटबंदीच्या आत, बाहेर बसला आहे. त्यामुळे आपल्याला सगळे अवशेष शोधायला लागतात. किल्ल्याची तटबंदी आणि काही बुरुज ढासळायला लागले आहेत. ट्रेकक्षितीजच्या (trekshitiz) वेबसाईट वर दिल्याप्रमाणे मी मारुतीच मंदिर असलेल्या दरवाजा जवळ प्रथम गेलो. हाच मुख्य दरवाजा वाटतो. त्यातून आत गेल्यावर समोर मारुतीच मंदिर लागत आणि डावीकडे मंदिराच्या दरवाजा समोर अजून एक दरवाजा लागतो. मंदिराच्या आत अजून एक प्राचीन मूर्ती दिसते आणि बाहेर काही विरगळी आणि सतीशिळा दिसतात. तसेच मंदिराच्या समोर किंवा आतील किल्ल्याचा दरवाजाच्या तटबंदीला लागून, अजून एक छोट प्राचीन मंदिर आहे. आणि त्याचा बाजूला एक शंकराचा मंदिर आहे. त्या मंदिरात हि काही तुटलेल्या विरगळ आणि मूर्ती आहेत. मंदिरच्या गाभाऱ्यातील दगडी खांबावरून प्राचीन आहे असे कळते.

मंदिर बघून पुन्हा मुख्य दरवाजाच्या बाहेर येऊन डावीकडे किल्ल्याच्या तटबंदीला लागून पुष्कर्णी (पायऱ्यांची  विहीर) लागते. ती बघून मी पाठी फिरून पुन्हा मुख्य दरवाजाने आत जाऊन. पुन्हा आतील दुसरा दरवाजा लागतो तिथून आत गेलो. ह्या दरवाजाच्या बुरुजावर चढता येते. त्यासाठी उजव्या बाजूला असलेल्या मस्जिदच्या बाजूने बुरुजावर जाता येते. बुरुजावरून किल्ल्यातील थोडं गाव दिसते. पुन्हा खाली दरवाजा जवळ आल्यावर बाजूला असलेला महाल दिसतो. त्याचा विहिरीत आता पूर्ण कचरा टाकलेला आहे. हा महाल बघून पुन्हा दरवाजा जवळ आलो. तिथून एक रस्ता सरळ बुरुजाचा बाजूने जातो तर एक रस्ता उजवीकडे कडे जातो. उजवीकडील रस्त्याने गेलो असता आपण जुन्या कोर्ट जवळ पोहचतो. हा कोर्ट पहिला वाडा होता. तिथे आत एक विहीर आहे. अजून थोडं पुढे गेलो असता आपल्याला त्याचा दुसरा दरवाजा दिसतो.  हा लाखडी दरवाजा कायमचा बंद केलेला दिसतो.
कोर्ट / वाडा बघून बाहेर आल्यावर पुन्हा पाठी न जाता पुढे गेलो असता. आपण गावातील गल्लीतून जाताना आपल्याला तटबंदी लागते. त्या तटबंदीला पुढे एक लहान दरवाजा लागतो. ह्या दरवाजातुन बाहेर गेलो असता आपल्याला बाहेरून तटबंदीचे बुरुज आणि खंदकचा खड्डा दिसतो. पुढे रस्ता न दिसल्यामुळे मी पुन्हा दरवाजने आत येऊन गल्लीतून पुढे चालत राहिलो. आणि विचारत विचारत बुरुजाचा बाजूने किल्ल्याचा बाहेर आलो. मुख्य रस्त्याला आल्यावर जर पुन्हा डावीकडे वळून रस्त्याने बुरुजाचा बाजूने गेलो असता, पुन्हा एक रस्ता महात्मा गांधी महाविद्यालयचा बाजूने आत जाताना दिसतो. ह्या रस्त्याने गेलो असता हा रस्ता आपल्याला मारुती मंदिर जवळील दरवाजा जवळ घेऊन जातो. आणि बाजूला आपल्याला  बुरुज आणि तटबंदी दिसते.

किल्ल्यातून बाहेर पडून मी सात नाल्याची विहीर पाहायला गेलो. खरा तर मला खंदकातील विहीर बघायची ती किल्याच्या खंदका मध्येच होती. पण तिथे विचारलेल्या लोकांना कोणाला नीट माहित नव्हता. काही जणांनी  मला  सात नाल्याची विहीर म्हणून एक मोठी तळा एवढी विहीर आहे, तिथे पाठवलं. कोणी मला सांगितलं कि ह्यात सात विहीर आहेत. म्हणून ह्याला सात विहीर म्हणतात. पण पाणी एकदम सुखायला येते तेव्हा त्या विहिरी दिसतात. नाही तर एक मोठी विहीर दिसते. पण हि विहीर किल्ल्या पासून साधारण १ ते दीड किमी लांब  RTO कार्यालय जवळ आहे. बाकी मला तरी ती विहीर ऐतिहासिक वाटली नाही. तसा कुठे फलक हि नाही दिसला. त्यामुळे माझा इथे अर्धातास वाया गेला असा मला वाटलं. त्यामुळे मला पुढे उशीर झाला. त्यामुळे हि विहीर न पहिली तरी हरकत नाही.

कमलाभवानी माता मंदिर, ९६ पायऱ्यांची  बारव
तेथुन पुढे मी कमलाभवानी माता मंदिर बघायला गेलो. मंदिर गावातून २ किमी वर आहे. त्यामुळे खाजगी रिक्षा करून जायायला लागते किंवा एसटीने त्या मंदिराच्या फाट्याला उतरून ५ मिनटं लागतात. करमाळ्यावरून परांडा किंवा सालसचा दिशेने जाणाऱ्या एसटीने उतरावे. येथे लांबपल्याचा एसटी थांबत नाही.

मी मोठया विहिरी जवळून एका बाईकस्वार कडून मदत माघून एसटी स्टॅन्ड जवळ गेलो. तेथुन एसटीची वाट न पाहता ८०रुपये देऊन रिक्षा करून मंदिरात गेलो. सव्वा बाराला मी मंदिरात पोहचलो. मला साडे बाराची परांडा साठी एसटी पकडायची होती. पण मंदिर, ९६ पायऱ्यांची बारव आणि समाधी पाहेपर्यंत १ वाजला. हेच जर मी ती विहीर बघायला गेलो नसतो तर मला साडे बाराची परांडा एसटी भेटली असती.

मंदिराचा बाजूलाच बारव आणि समाधी आहेत. मंदिर किल्ल्या एवढेच प्राचीन आहे. असं म्हणतात किल्ल्या बांधायचा आधी मंदिर निर्माण केलं होता. मंदिर खूप सुंदर आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या सैराटचा गाण्याचा चित्रफीत मध्ये मंदिर आणि बारव दाखवली आहे.

करमाळा  ते परांडा प्रवासाचे वर्णन
एक वाजला होता. मी एसटी आगर मध्ये न जाता, तिथेच फाट्यावरील थांब्याला एसटी पकडली. पहिली १.३०ची भूम ला जाणारी लांब पल्ल्याची एसटी तिथे थांबली नाही. आगारात लावलेल्या वेळापत्रकात परांडा साठी २ ची एसटी होती, इथे फाट्याला हि पण गाडी थांबली नाही तर म्हणून मी पुन्हा आगारात जाणार होतो. तितक्यात एक एसटी येताना दिसली. म्हणून पुन्हा थांबलो तर नेमकी परांडा गाडी होती. आणि हि गाडी थांबली.  पण गाडी वेळे आधीच १.४५ ला फाट्याला आली. बरोबर २.४५ ला मी परंडा ला पोहचलो. ह्या मार्गावरती मला शेअर जीप दिसल्या नाही. त्यामुळे पूर्णपणे एसटी वर अवलंबून रहायला  लागते.

परांडा किल्ल्याच वर्णन
मी जेवलो नव्हतो त्यामुळे एक पूर्ण कलिंगड खाऊन पोटपूजा केली. आणि ३.१५ ला किल्ला पाहायला सुरवात केली. मी किल्ल्याबद्दल जास्त काही लिहीत नाही. पण मुख्य किल्ल्यात बघायला महादरवाजाची रचना. दरवाजाचा वरती असलेली मोठी तोफ, हमाम खाना, मस्जिद, विहीर, तोफेचे गोळे, बुरुजावर असलेल्या २ ते ३ मोठया तोफा आणि बाकी लहान लहान तोफा. किल्ल्याची बांदणी उत्कुर्ष्ट आहे. मला पूर्ण किल्ला पहायला अडीच तास लागले.

परांडा ते सोलापूर, बार्शी मार्गे प्रवासाचं वर्णन
मला रात्री राहण्यासाठी सोलापूरला जायायच होता. त्यासाठी मला बार्शीला जाऊन एसटी पकडायची होती. कारण परांडा वरून सोलापूरला थेट जाण्यासाठी दुपारी ३ ची शेवटची एसटी आहे. पण परांडा ते बार्शी दर तासाला एसटी आहे आणि बार्शी वरून सोलापूरला जायायला दर अर्ध्या तासाला विनावाहक न थांबता एसटी आहेत.

पाऊणे सहाला पाच मिनटं असताना मी पळत पळत एसटी आगारात गेलो. कारण ५. ४५ ची बार्शीला जायायची गाडी होती त्यानंतर ६.३० ची होती. मी बरोबर पाऊणे सहालाच पोहचलो.  हि गाडी चुकली असती तर मला खाजगी शेअर गाडी बघायला लागली असती, त्या गाड्या एसटी आगर पासून अर्धा ते १ किमी वर कुठन तरी सुटतात असं मला तेथील दुकानदाराने सांगितले. पण मला गरज लागली नाही. कारण गाडी १० मिनिट उशिरा आली.

परांडा ते बार्शी अंतर २८ किमी आहे. मला बरोबर १ तास लागला ७ वाजता मी बार्शी एसटी आगारला पोहचलो.
बार्शी ते सोलापूर आंतर ६८ किमी आहे. मला सोलापूरला पोहचायला पाऊणे दोन तास लागले. संध्याकाळी ८. ४५ ला मी सोलापूरला पोहचलो. सोलापूर मध्यवर्ती स्थानकात मंगळवेढाच्या एसटीचा वेळापत्रक बघून हॉटेलला गेलो. अशाप्रकारे माझा भटकंतीचा पहिला दिवस संपला.

सोलापूरचा किल्ला आणि सिद्धेश्वर मंदिरचा वर्णन 
दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० ला उठून अंघोळ नाश्ता करून, मी पहिला सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि सव्वा नऊ पर्यंत सोलापूर किल्ल्यामध्ये पोहचलो. किल्ला ASI चा अखत्यारित असल्यामुळे किल्ला पाहण्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ /६ पर्यंत आहे. दोन ते सव्वा दोन तासात माझा पूर्ण किल्ला पाहून झाला. चुकूनच एकाद दुसरा पहायचा राहिला असेल.

किल्ल्याचा एका बाजूला आपल्याला तलाव लागतो. तर तीन बाजूला त्यावेळी खंदक होता. पण आता बाजूचा खंदक दिसत नाही कारण किल्ल्याचा बाहेरील बाजूला आता बाग केली आहे. आपण जेथून किल्ल्यात प्रवेश करतो तेथेच पुढच्या बाजूला आपल्याला मोठा रुंद खंदक दिसतो. त्यावरून अंदाज येतो त्यावेळी खंदक पार करून येणे किती अशक्य असेल. खंदक अंदाजे  २५ ते ५० मीटर रुंद असावा.
किल्ल्यात आपण प्रवेश करतो त्याबाजूची किल्ल्याची तुटलेली तटबंदी तोडून रस्ता केलेला दिसतो. किल्ल्याचे मुख्य दरवाजे बघण्यासारखे आहे. तसेच पायऱ्या असलेली विहीर,मी गेलो तेव्हा विहिरीतील गाळ काढायचा काम चालू होता. बहुतेक ती पुन्हा स्वच्छ करून सुंदर करत असावे. किल्ल्यात तसेच एक उध्वस्थ मंदिर आहे. ह्या मंदिरापासून अजून एक मंदिर किंवा मस्जिद सारखी वास्तू दिसते.

सोलापूर ते मंगळवेढा आणि माचणूर प्रवासाचे वर्णन
पाऊणे अकराला मी किल्ला पाहून निघालो. पुन्हा हॉटेल वर जाऊन बॅग घेऊन बारा वाजता सोलापूर मध्यवर्ती एसटी आगारात पोहचलो. मला १२. १५ ची सोलापूर-सांगोला, वाया मंगळवेढा एसटी भेटली. मंगळवेढाला जायायला सकाळी ६ वाजल्यापासून एसटी आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत दर अर्ध्यातासाला एसटी आहे.

सोलापूर ते मंगळवेढा ५५ किमी अंतर एसटी ने मला एकतास दहा मिनटं लागली पोहचायला. एसटीचा तिकीट ७० रुपये होता. वाटेतच मचणूर लागते. मचणूरचा किल्ला हि पाहायचा होता. पण मी पहिला मंगळवेढा किल्ला पाहून येतेवेळी माचणूर किल्ला पहायचा ठरवलं. मंगळवेढा ते माचणूर अंतर १३ किमी आहे.

बहुतेक इथे सोलापूर ते मंगळवेढा शेअर जीप चालतात.

मंगळवेढा पोहचेपर्यंत दीड वाजला होता म्हणून मग मी पंधरा मिनटात जेवून घेतला. आणि मग पाऊणे दोनला  किल्ला बघायला निघालो.

मंगळवेढा किल्ल्याच वर्णन
एसटी आगार पासून ५ ते १० मिनटात चालत मी किल्ल्याजवळ पोहचलो. रस्त्याला एक तांदळा स्वरूपातील कुठच्या तरी देवाचं मंदिर लागलं त्यात एका पाषाणावर नागाची कोरीव शिल्प होता. ते बघून पुन्हा पुढे चाललो. तेथून ५ मिनटात मी किल्ल्याचा  ४ बुरुज आणि ४ भिंतच्या गडी जवळ पोहचलो. आता ते उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालय आहे. त्यात काही मूर्ती आहेत पण पोलीस फोटो काडून देत नाही कारण त्याचा पाठी कारागृह आहे. मला स्वतः अनुभव आला तरी एका पोलिसाने फोटो काढून दिले म्हणून बर झालं. आत अजून पाहण्यासारखं काही नाही.

तेथून बाहेर पडून मी त्या गडीच्या चारी बाजूने फिरलो. गडीच्या बाजूला एक मंदिर आहे त्याचा बाहेर हि काही मूर्ती आणि शिवपिंड आहे. गडीच्या पाठी डाव्या बाजूला काशीविश्वेशरचा प्राचीन मंदिर आहे. तिथे हि अजून काही मूर्त्ती मंदिराचा आवारात दिसतात. तर त्याचा बाजूलाच लागून पायरायची विहीर आहे. ती आता दुरावस्थेत आहे आणि त्याचा एका कोपऱ्यात ब्रह्माची ३ ते ४ फूट उंचीची मूर्ती आहे. मी तिथे जाण्याचा  प्रयत्न केला पण दगडी घसरून पडण्याचा भीतीने लांबून फोटो काढला.

श्री संत दामाजी महाविद्यालय येथील संग्रहालय
ते बघून मी "श्री संत दामाजी महाविद्यालय" कडे निघालो. कारण तेथे अनेक प्राचीन मूर्तीचा उघड्यावर संग्रहालय केला आहे. त्याचा मी फोटो खाली लावला आहे. मंगळवेढा ते महाविद्यालय अंतर १.५ किमी आहे. गडीचा जवळ पास एका दुकानदाराला विचारलं त्यांनी मला त्या महाविद्यालयचा नाव सांगितलं आणि जवळच आहे सांगितलं.  म्हणून मी गडीपासून सरळ मारवाडी गल्लीतून चालू लागलो. थोड्या वेळाने मी गुगल नकाशावर बघितला अजून १ किमी आहे. चालत चालत मी मारवाडी गल्ली जेथे बोराळेनाका रोडच्या गल्लीला भेटते तिथं पर्यंत चालत आलो.  त्या दोन्ही गल्ली एकमेकांना जेथे भेटतात. त्याचा २ मिनटं आधी मारवाडी गल्लीत रस्त्यात डावीकडे एक नवीन मंदिर आहे. त्याचा समोर म्हणजेच आपल्या उजवीकडे एक जुन/ प्राचीन लहान मंदिर/ घरासारखी वास्तू  दिसते. तिथे त्या वास्तूच्या बाहेर काही प्राचीन मूर्ती दिसतात आणि एक मूर्ती आणि विरगळ भग्न अवस्थेत वडाचा झाडाखाली आहे. त्यांचे मी फोटो खाली दाखवले आहे. तसेच हि जागा कुठे आहे मी त्याचा नकाशाचा फोटो हि लावला आहे. ज्याने करून तुम्हाला कळेल. सांगायचं तात्पर्य माझ्या मते बहुतेक लोकांना कदाचित हे माहित नसावं. आणि हि जी प्राचीन जागा आहे. त्याचा पाठी सांगोल्याला जाणारा रस्ता लागतो. तो पुढे २ मिनिटावर बोराळे नाक्याला मिळतो. तेथून तुम्ही सोलापूरला जाणाऱ्या रस्त्याने गेलात कि ७०० मीटर वर महाविद्यालय आहे.

 
वरील नकाशात सफेद वर्तुळ केलेलं मंगळवेढा किल्ला आहे. तेथून मी कुठच्या रस्त्याने गेलो, ते पिवळ्या रंगात तुटक रेशेने दाखवल आहे त्यात पिवळ्या रेषेत मारवाडी गल्ली दाखविली आहे. आणि त्या पिवळ्या वर्तुळात जिथे ह्या मूर्ती आणि वास्तू आहे ती जागा दर्शविली आहे. त्या वास्तूच्या पाठी लाल तुटक रेशेत सांगोला कडे जाणारा रस्ता दाखवला आहे.  आणि एकदम छोटा पिवळा बिंदू दाखवला आहे तो बोराळे नाका आहे. तेथून सरळ रस्ता सोलापूरला जातो.  एकदम खाली त्या वास्तूचे आणि मूर्तीचे फोटो हि लावले आहे


पण मी पुन्हा त्या गल्लीत येऊन बोराळे नाक्याचा दिशेने चालू लागलो. तेथे मला एक मोटारसायकल वर जाणारा मुलगा भेटला तो हि तिथेच चालला होता. त्याला, मला महाविद्यालय जवळ सोडायला सांगितलं. त्यामुळे मी दोन मिनटात तेथे पोहचलो. महाविद्यालयाचा दरवाजाने आत पायऱ्या चडून आल्यावर एक मोठं मैदान लागते. तेथे डाव्याबाजूला उघड्यावर मुर्ती ठेवल्या आहेत.


उघड्यावरील संग्रहालय पाहून मी पुन्हा पाठी बोराळे नाक्याच्या एसटी थांब्यावर आलो. बहुतेक तीन सव्वा तीन वाजले असावे. गाडीची वाट बघत होतो. पण तिथे शेअर जीप लागल्या होत्या. शेवटी त्यात चोंदून माचणूरला गेलो.

माचणूर किल्ला आणि सिद्धेश्वर मंदिर
मंगळवेढा ते माचणूर अंतर १३ते १४ किमी आहे. मला जीप ने २० मिनट लागली. माचणूर फाट्यावरून चालत  किल्ल्यात पोहचायला १० ते १५ मिनटं लागतात. पण त्या आधी मी जवळच असलेल्या श्री सिद्धेश्वरचा प्रचीन मंदिरात गेलो. मंदिरात दर्शन घेऊन मी किल्ल्याकडे निघालो.

सध्या किल्लाची फक्त तीन बाजूंची तटबंदी राहिली आहे. नदीच्या बाजूची तटबंदी राहिली नाही आहे, बाकी किल्ल्यात पूर्ण मोकळा मैदान दिसते. दरवाजातून आत प्रवेश केल्यावर समोर नदी कडेच्या बाजूला एक छोटी वास्तू दिसते. तेवढीच एक वास्तू किल्ल्यात आहे. किल्ल्यात पहाण्यासारखं बाकी काही नाही. त्यामुळे किल्ला  बघायला १५ मिनटं पुरेशी होतात. मला तरी तेवढा वेळ लागला.

बेगमपूरचा दर्गाच वर्णन
पाच वाजता मी पुन्हा मुख्य रस्त्याला येऊन सरळ सोलापूरला न जाता. पुढेच १ किमी असलेल्या बेगमपुरला
(किंवा बेगमपूर फाट्याला) उतरलो. कारण बेगमपूरला एक दर्गाह आहे त्याला बेगाम्बी दर्गाह म्हणतात. हा दर्गाह जेव्हा आपण माचणूर किंवा मंगळवेढा कडे जातो, तेव्हा नदीच्या पुलावरून डावीकडे किल्ल्यासारखी तटबंदी असलेली मस्जिद नजरेस पडते. त्याचा आकर्षणामुळे मी ती बघायला गेलो.

मचणूर वरून चालत गेलो असतो, तर मला १५ मिनटं लागली असती. पण रस्त्याने जाणाऱ्या छोटा मॅक्स ट्रक वाल्याला सोडायला सांगितले त्यामुळे मी पाच मिनटात बेगमपूरला पोहचलो. मुख्य रस्त्यावरून दर्ग्यापर्यंत पोहचायला ५ मिनटं लागतात. दर्ग्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर पुरातत्व खात्याचा राष्ट्रीय संपत्तीं असलेला फलक आहे. दर्गा आतून पाहण्यापेक्षा दर्ग्याची बाहेरील किल्ल्यासारखी तटबंदी, विशेष करून नदीच्या बाजूची तटबंदी पाहण्यासारखी आहे. तीच पूलावरून आकर्षित करते.

तसेच दर्ग्याच्या बाहेर आल्यावर समोरच गावात छोटा दगडी दरवाजाची कमान दिसते आणि समोरच एक दगडाचा चौथरा दिसतो. नक्की ते कोणाचं घर होत का अन्य काही ते मला कळलं नाही. ते बघून मी पुन्हा मुख्य रस्त्याला आलो. दर्गा बघायला मला १० मिनटं लागली. संध्याकाळचे सव्वा पाच वाजले होते, त्यामुळे मी जास्त वेळ दर्गा न बघता गाडी साठी मुख्य रस्त्याला आलो. कारण संद्याकाळी साडे पाच नंतर सोलापूरला जायायला १ तासाने गाडी आहे. म्हणून मी जरा घाई करत मुख्य रस्त्याला एसटी थांब्याला गेलो. मला ५. २५ ची सोलापूर गाडी भेटली.

सव्वा सहा वाजता मी सोलापूरला पोहोचलो. अश्याप्रकारे माझी सोलापूरची यात्रा संपन्न झाली.



काही गाड्यांची माहिती तर काही चादर खरेदी साठीची माहिती
सोलापूर मध्यवर्ती स्थानक ( सोलापूर सेंट्रल बस स्टॅन्ड) वरून 
  • सोलापूर ते पंढरपूर, सोलापूर ते तुळजापूर सकाळी ६ ते रात्री ९. ३० पर्यंत दर अर्ध्यातासाला विनावाहक गाडी आहे.
  • अक्कलकोटला जायायला सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत दर १५ मिनिटाला गाडी आहे.
  • नळदुर्गला जायायला सकाळी ७. ३० ते संध्याकाळी १८. ३० पर्यंत दर तासाला गाडी आहे.
  • मुंबईला जायला वेळेत आणि नेमक्या एसटी आहेत. 
  • पुण्याला जायला दर अर्धा ते पाऊण तासाला एक एसटी आहे. मात्र संध्यकाळी पाऊणे सहा नंतर तासाला एक गाडी आहे.
  • मंगळवेढा किल्ल्याला जायला सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत दर अर्ध्या तासाला एक गाडी आहे.
    तसेच सांगोला- मंगळगड मार्गे गावी जाणारी एसटी हि असते.


सोलापूरी चादर खरेदी करायची असेल तर काही माहिती
माझी रात्री ९.३० ची मुंबई साठी ट्रेन होती. तोपर्यंत काय करणार, म्हणून मी सोलापूरी चादर घेण्यासाठी गेलो.
मी तेथील रिक्षावाला आणि हॉटेल वाल्याकडून माहिती काढून घेतली होती. इथे चादरीची प्रसिद्ध दुकान कुठची आहे. तर मला ३ नावे कळली. गांजी शोरूम, पुलगाम आणि चिल्का. त्यात जर तुम्ही जास्त नग मध्ये (२५/५० किंवा १००) घेणार असाल तर गांजीचा कारखाना MIDC भागात आहे तेथे जावे. तेथे अजून स्वस्तात भेटतात असे  बोलतात. बहुतेक पुलगाम आणि चिल्का चा पण कारखाना आहे. पण नक्की कुठे ते मला माहित नाही. नाही तर गांजी, पुलगाम किंवा चिल्काच्या शोरूम मधून घ्यावा.



कुर्डुवाडी बस स्थानक वेळापत्रक खाली एका बाजूचा काढलेला फोटो त्यात परांडा आणि करमाळाचा वेळापत्रक पाहावे







करमाळा  बस स्थानक वेळापत्रक, खालील फोटोत अर्धा भाग आहे.



बार्शी बस स्थानक वेळापत्रक


सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक वेळापत्रक
सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक वेळापत्रक

सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक वेळापत्रक

सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक वेळापत्रक

सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक वेळापत्रक

सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक वेळापत्रक

सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक वेळापत्रक

सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक वेळापत्रक
परंडा बस स्थानक वेळापत्रक, हा फोटो गुगल वरून घेतला आहे.


करमाळा किल्ला
करमाळा  किल्ल्याचा मुख्य दरवाजा (डावीकडील, आतील भाग ) आणि आतील दरवाजा आणि त्यांचा समोर असलेला मारुतीच मंदिर

करमाळा किल्ल्याचा  आतील दरवाजाचा बुरुजावरून दिसणारं  दृश्य 

कमलाभवानी माता मंदिर

९६ पायऱ्याची बारव

सात नाल्याची किंवा सात विहीर, करमाळा

पायरची विहीर आणि खाली फोटोत कोपऱ्यात असलेली ब्रह्मदेवाची प्राचीन मूर्ती


मारवाडी गल्लीतून गेलो असता मला दिसलेल्या मूर्ती आणि वास्तू



मारवाडी गल्लीतून गेलो असता मला दिसलेल्या मूर्ती आणि वास्तू

मारवाडी गल्लीतून गेलो असता मला दिसलेल्या मूर्ती आणि वास्तू


श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा येथील संग्रालय

महाविद्यालयाचा बाहेरील फोटो आणि पिवळ्या रंगाचा वर्तुळ मध्ये संग्रालयाची जागा दर्शवली आहे

बेगमपूर दर्गा/ मस्जिद

बेगमपूर दर्गा/ मस्जिद

बेगमपूर दर्गा/ मस्जिद

बेगमपूर दर्गा/ मस्जिद

बेगमपूर दर्गा/ मस्जिद


बेगमपूर दर्गा/ मस्जिदच्या दरवाजा बाहेर आल्यावर समोरच हि दगडी दरवाजाची कमान दिसते आणि त्याचा आत किंवा समोरच एक दगडाचा चौथरा दिसतो. 

संत सावता माळी आणि त्यांची समाधी

 


संत सावता माळी हे नामदेवकालीन संत कवी. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरच्या जवळ अरणभेंडी या गावात शके 1152 मध्ये झाला. त्यांच्यामुळे अरणभेंडी हे क्षेत्र झाले. त्यांच्या पित्याचे नाव परसूबा, आईचे नाव नांगिताबाई. पत्नीचे नाव जनाबाई. अरणभेंडी येथे ज्या मळ्यात सावता माळी भाज्या पिकवता पिकवता विठ्ठलभक्ती करत, त्या मळ्यातच विठ्ठलाला पाहत. त्यांनी त्यांचा देहदेखील त्या मळ्यातच विठ्ठलाचे नाम घेत ठेवला. त्या ठिकाणी समाधिमंदिर बांधण्यात आले आहे. पंढरपूरला जाताना भक्तमंडळी आवर्जून अरणभेंडी येथे थांबतात आणि सावता महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात. संत सावता माळी यांनी त्यांच्या अभंगांमधून आणि जगण्यामधून कर्म हाच ईश्वर हा संदेश महाराष्ट्राला दिला.

संत सावता माळी यांनी हे सांगितले, की परमेश्वराची आराधना करताना भाव महत्त्वाचा असतो. मूर्तिपूजा आणि कर्मकांड यांपेक्षा भक्तिभाव हा खरा. त्यांनी मानवता धर्म हा महत्त्वाचा मानला.

सावता माळी यांनी त्यांचा ‘माळ्या’चा धर्म आचरत, शेती करत करत परमेश्वराची आराधना केली. शेतात भरपूर कष्ट करावेत, लोकांना खरा मानवता धर्म समाजावून सांगावा. त्यांच्या मनातील अंधश्रद्धांचे तण उपटून काढून समाजमनाची मशागत करावी, समाजात जागृती करावी या हेतूने सावता माळी अभंग लिहीत, कीर्तन करत. सावता माळी हे बंडखोर, कर्ते सुधारकच होते असे म्हणावे लागेल.

सावता माळी यांच्या गावाजवळ पंढरपूर आहे, परंतु ते कधीही पंढरपूरला जात नसत. सावता यांना तेथील संतांच्या मांदियाळीत सामील होण्याची इच्छा झाली नाही. त्यांना वाटे, की ते जातीचे माळी आहेत. त्यामुळे त्यांनी मनापासून शेतीत-मातीत राबावे, पिकांची मशागत करावी, गाईगुरांना प्रेमाने सांभाळावे. शेतीला पाणी द्यावे, चांगले भरघोस पीक काढावे, अडल्यानडल्यांना मदत करावी हीच खरी पांडुरंग भक्ती आहे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे ते शेतीत रमत. ते शेती सोडून कुठेच कधी गेले नाहीत.

एके दिवशी, पंढरपूरला जाणाऱ्या वारक-यांची दिंडी त्यांच्या शेताजवळच्या रस्त्यावरून चालली होती. सावता माळी यांनी त्यांच्या भजनांचा, टाळमृदंगाचा आवाज ऐकला आणि ते शेतातून बाहेर आले. त्यांनी त्या वारकऱ्यांची पाणी, भाकरी, फळे, फुले देऊन पूजा केली. निघताना सावता यांनी त्यांच्या पायांवर डोके टेकवले व ते म्हणाले, “पंढरपूरला निघाला आहात. पांडुरंगाला माझाही नमस्कार सांगा.” वारकरी चकित झाले. त्यांना वाटले, अरणभेंडी तर पंढरपूरच्या वाटेवरच, किती जवळ आहे, मग ते त्यांच्याबरोबर का येत नाहीत? त्यांनी त्यांच्या मनातील शंका सावता यांना विचारली. तेव्हा सावता माळी उद्गारले, “मी कसा येऊ? मी आलो तर देव माझ्यावर रुसेल. मला रागवेल.” वारक-यांनी विचारले, “का रागावेल?” त्यावर सावता माळी यांनी सांगितले, “अहो, माझा पांडुरंग या शेतात राहतो. या शेतात-मळ्यात राबणे, भाज्या-फळे पिकवणे, वाटसरूला भाकरी देणे हीच माझी विठ्ठलभक्ती. हा मळा हेच माझे पंढरपूर! ही ज्वारीची ताटे म्हणजे माझ्या पांडुरंगाची कमरेवर हात ठेवलेली जिवंत रूपे आहेत. ही सळसळणारी पाने, ही उडणारी पाखरे, हे झुळझुळ वाहणारे पाणी विठ्ठलभक्तीचीच तर गाणी सदासर्वदा गात आहेत. हे सर्व येथे, या मळ्यात आहे, तर मी पंढरपूरला येऊन काय करू? ”

त्यांचे हे बोल ऐकून वारकरी खजील झाले. पांडुरंग केवळ मूर्तीत नाही तर आपण जे रोजचे काम करतो ते हसतमुखाने, मनापासून करण्यात पांडुरंगाची खरी भेट होते. असा संदेशच सावता माळी यांनी त्यांना दिला होता! संत एकनाथ त्यांच्याविषयी म्हणतात, "एका जनार्दनी सावता तो धन्य | तयाचे महिमान न कळे काही" ज्ञानदेव-नामदेव यांच्याबरोबर ते तीर्थयात्रेला गेले होते. त्यांना संत ज्ञानदेव-नामदेव यांचा सहवास लाभला. त्यांचे भावविश्व नामदेवांच्या उपदेशाने भारावून गेले होते. त्यांची दृढ श्रध्दा कर्मावर होती. ज्ञानेश्वरांनी सावता माळी यांना 'भक्ती, कर्माचे आगर' असे संबोधले आहे. संत सावता माळी यांच्या जीवनात भक्ती आणि कर्म यांचा मनोज्ञ संगम झाला होता. श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेला कर्मयोग त्यांनी आचरणात आणला. ईश्वरदत्त कार्य निष्ठेने, श्रद्धेने, मनापासून करणे म्हणजे खरी ईश्वराची सेवा आहे. भक्ती आहे. कर्माशिवाय धर्म घडत नाही, भगवंत भावाचा भुकेला आहे, कर्मकांडाचा नाही, हा मौलिक विचार त्यांनी त्यांच्या अभंगांतून प्रभावीपणे मांडला आहे. कामात देव पाहणारा तो कर्मयोगी संत म्हणतो.

कांदा, मुळा, भाजी | अवघी विठाई माझी ||
लसुण, मिरची, कोथिंबिर | अवघा झाला माझा हरी ||
अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आमुचि माळियाची जात | शेत लावू बागाईत ||
आम्हा हाती मोट नाडा | पाणी जाते फुलझाडा ||
चाफा, शेवंती फुलली | प्रेमे जाईजुई व्याली ||
सावताने केला मळा | विठ्ठल देखियला डोळा ||

असे अभंग गात सावता महाराज त्यांच्या मळ्यात अखंड काम करत असत. पिकांना पाणी देताना, खुरपताना मुखाने अखंड हरिनाम घेत असत, म्हणून त्यांच्या जीवनात शांतता होती.

अरणभेंडी गावात त्यांच्याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. ती दंतकथा अशी आहे, की पैठणच्या कूर्मदास या अपंग भक्ताच्या बोलावण्यावरून प्रत्यक्ष विठ्ठल त्याला भेटण्यास निघाले असताना, वाटेत ते सावतोबाच्या मळ्यात थांबले. त्यांनी बरोबर संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांनाही घेतले होते. विठ्ठलाच्या मनात नामदेवांना भक्तीची पराकाष्ठा किती असते ते दाखवायचे होते. विठ्ठल त्या दोघांची नजर चुकवून सावता माळी यांच्यासमोर उभे राहिले आणि त्यांनी सावतोबांना घट्ट मिठी मारली. म्हणाले, “सावतोबा, माझ्या मागे दोन चोर लागलेत. मला पटकन् कोठेतरी लपव.” त्यावर सावतोबा म्हणाले, “देवा, अशी कोणती जागा आहे, जेथे तू कोणाला दिसणार नाहीस?” विठ्ठल म्हणाले, “मग तू मला तुझ्या उदरात लपव.” त्याबरोबर सावता माळी यांनी खुरपे घेऊन आपले पोट फाडले व देवास त्यात लपवले! इकडे, देवाचा शोध घेत घेत ज्ञानदेव, नामदेव सावता महाराजांपाशी आले आणि म्हणाले, “आमचा देव पाहिला आहे का तुम्ही?” सावता माळी यांनी काहीच उत्तर दिले नाही. नामदेवांनी देवाचा धावा सुरू केला. ते विठ्ठलभेटीसाठी व्याकूळ झाले. विठ्ठलाला ते पाहवेना. त्यांनी सावतास सांगितले, “काढ रे मला बाहेर, माझ्या वियोगाने त्याचा जीव जाईल.” तेव्हा सावतोबाने पुन्हा खुरप्याने पोट फाडून पांडुरंगास बाहेर काढले! सावतोबांना त्यांच्या उदरात प्रत्यक्ष विठ्ठलाने वास केला याचा परमानंद झाला. त्यांनी तो

 

 

‘सर्व सुखाचे सुख निर्मळ | कैसे दिसत आहे श्रीमुख निर्मळा ||
सावत्या स्वामी परब्रम्हपुतळा | तनुमनाची कुरवंडी ओवाळा ||’

अशा शब्दांत व्यक्त केला.

संत सावता महाराज आजारी पडल्यावर, त्यांनी सर्व गोष्टींचा त्याग केला आणि ते अखंड नामस्मरण करू लागले. त्यांनी त्यांचा देह पांडुरंगाला अर्पण करण्याचा निश्चय केला आणि ते शके 1217 मध्ये आषाढात पांडुरंगचरणी विलीन झाले! अरणभेंडी या गावात सावता महाराजांच्या शेतातच त्यांचे समाधिमंदिर बांधण्यात आले. त्यांनी मळ्यात जेथे देह ठेवला तेथेच त्यांच्या स्मृती जतन करून ठेवल्या गेल्या.

सावता यांच्यासारख्याच साधेपणाने त्यांचे समाधिमंदिर उभे आहे. गाभाऱ्यात विठ्ठल-रखुमाईची आणि सावता महाराजांची प्रसन्न मूर्ती आहे. सावतोबांचे अभंग भिंतीवर चारी बाजूंनी कोरलेले आहेत. वीणाधा-याच्या वीणेच्या झंकारात अहोरात्र मंदिर भरून जाते. लोक विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतात, सावता महाराजांच्या मूर्तीच्या पायांवर मस्तक टेकवतात, वीणाधाऱ्याच्या पुढे झुकतात आणि प्रसादाचे साखरफुटाणे खात खात, सावतोबांच्या अभंगांचे वाचन करतात. प्रपंच आणि परमार्थ एकच असल्याचे म्हणणारे, कांदा-मुळा, भाजीत विठ्ठल पाहणारे, मोट-नाडा-विहीर-दोरी यांनी अवघी पंढरी व्यापली आहे असे म्हणणारे सावता माळी त्यांना अभंगा अभंगातून भेटत राहतात. देवळातून मागच्या दरवाज्यात आले, की सावता यांच्या हिरव्यागार शेताच्या, निळ्याभोर आभाळाच्या पार्श्वभूमीवर भलामोठा वृक्ष सळसळत असलेला त्यांना दिसतो आणि त्या वृक्षावर किलबिलाट करत थव्याथव्यांनी उतरणारे पोपट, इतर पक्षी बघून आणि तेथील नीरव, शांत, प्रसन्न वातावरणात केवळ त्या वृक्षाची सळसळ आणि पक्ष्यांची गोड किलबिल ऐकत माणसे घटका-दोन घटका समाधिमग्न होतात. जणू तो मळा, ते आकाश, ती भल्यामोठ्या वृक्षाची सळसळ आणि पक्ष्यांचा किलबिलाट यांतून त्यांना सावता माळी यांचा पांडुरंगच भेटायला आलेला असतो!
- अंजली कुळकर्णी

ऐतिहासिक संदर्भांचे नातेपुते

 


_EtihasikSandarbhacge_Natepute_4.jpgनातेपुते हे गाव सोलापूर, सातारा व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे. पूर्वेला अकलूज, पश्चिमेला फलटण, दक्षिणेला दहिवडी, उत्तर दिशेला बारामती ही सरासरी चाळीस किलोमीटर अंतरावरची शेजारची मोठी गावे आहेत. नातेपुते हे पुणे-पंढरपूर या किंवा जुन्या महाड-पंढरपूर या रस्त्यावर आहे. तसेच ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर या महादेवाच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे. ते सातारा जिल्ह्यात 1930 पर्यंत होते. त्यापुढे पूर्वीचा माणदेशी परिसर. बोलीभाषा, संस्कृती, चालीरीती, परंपरा तशाच. गाव पर्जन्यछायेच्या प्रदेशात. वार्षिक सरासरी पाऊसमान चारशे ते पाचशे मिलिमीटर. परंतु सध्या नीरा उजव्या कालव्यामुळे पाण्याची परिस्थिती चांगली आहे.

नातेपुते गावाचा इतिहास इसवी सनाच्या चौदाव्या शतकापर्यंत पाहता येतो. नातेपुते गावाचे ग्रामदैवत गौरीहर मंदिराच्या बांधकामावरून ते ध्यानी येते. देऊळ बहामनी काळात (1350) हेमाडपंती शैलीत बांधले गेले आहे. गावाबाहेरील तळ्याचा नातेपुते गावाच्या पाणीपुरवठा योजनेत साठवण तलाव म्हणून वापर होतो. त्यास फुटके तळे असे म्हणतात. तलावाच्या बांधकामावरील चिन्हावरून तो इतिहास देवगिरीच्या यादव राजांपर्यंत पोचतो. गावाभोवती भक्कम भुईकोट किल्लेवजा तटबंदी होती. तिचे थोडे अवशेष भग्नावस्थेत दिसतात. औंध, फलटण, सातारापुणेनगर, विजापूर इत्यादी ऐतिहासिक संस्थांनांचा कारभार शेजारी होता. तटबंदीच्या आतमध्ये त्याकाळी शंभर-दीडशे कुटुंबे असावीत. ग्रामदैवत गिरिजापती (गौरीहर) मंदिर म्हणून त्यात वतनदार, मंदिराचे पुजारी बडवे, घडशी समाजातील भोसले, कलावंत-शेख कुटुंबे, प्रामुख्याने पाच-दहा कुटुंबे वाणी-जंगमांची होती व शेतकरी कुणबी अशी छोटी लोकवस्ती होती.

नातेपुते गावास इतिहासकाळात ‘शंकरापठण’ असे नाव होते. जुन्या महाराष्ट्रातील मराठ्यांचे (हैदराबाद संस्थानचा मराठवाडा) कुलदैवत असल्याने त्या भागातील अनेकांनी देवळाच्या बांधणीस हातभार लावला आहे. त्यांची नावे पायऱ्यावर, खांबांवर, फरशीवर, दरवाज्यांच्या उंबरठ्यावर वगैरे ठिकठिकाणी खोदलेली आढळतात. गिरिजाशंकर मंदिरासमोर चांगला विस्तीर्ण व उत्तम दगडी बांधणीचा तलाव आहे. पूर्वी उन्हाळ्यात त्या ठिकाणी मोठी यात्रा भरत असे. शाहू महाराजांचे आध्यात्मिक गुरू, ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांनी तो तलाव यात्रेकरूंच्या सोयीसाठी बांधला आहे. तलावाच्या बांधकामासाठी दहा हजार रुपये खर्च झाला आहे. ब्रह्मेंद्रस्वामींनी भिक्षाद्रव्य गोळा करून लोकोपयोगी देवालये, तलाव, विहिरी बांधल्या आहेत. त्यांना छत्रपती, पेशवे व काही मराठे सरदार यांच्याकडून पंधरा हजार आठशेतेहतीस रुपयांचे भिक्षाद्रव्य मिळत असे.

औरंगजेब दक्षिणेत आला त्यावेळी त्याचा पुत्र शहाजादा आंजुमशहा याने शिखर शिंगणापूर येथील ते देऊळ त्याच्या परवानगीने पाडून टाकले. देवाची यात्रा त्या वेळेपासून ‘शंकरापठण’ ऊर्फ नातेपुते येथे बादशहाच्या अंमलात भरत होती. शाहू छत्रपतींच्या काळात बसंतराव त्यांचा विश्वासू खोजा होता. त्याने त्या देवळाचा जीर्णोद्धार केला. त्यावेळी स्वामी शाहू महाराजांची परवानगी घेऊन पूर्वीचे हेमाडपंती यादवकालीन देवालय होते ते नवीन बांधले. त्याने श्री शंभू महादेव यांचे देवालय बांधून त्याचे नाव श्री सन्मुख उंबर्‍यालगत घातले आहे. त्यावर चरणी तत्पर बसंतराव निरंतर अशी अक्षरे कासवालगत काढली आहेत. लाखो यात्रेकरूंचे पाय त्या नावावर लागतात, त्यामुळे ते एक पुण्यप्रद काम ठरते.

_EtihasikSandarbhacge_Natepute_3.jpgबसंतराव खोजा याने शिखर शिंगणापूरच्या देवळाचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यावर नातेपुते येथे भरणारी देवाची यात्रा मना केली. त्याने शिखराखाली यात्रा पुन्हा भरण्यासाठी सरकारच्या शिक्क्यासह कौल दिला. बसंतराव खोजा याचे आडनाव कासुर्डे असून तो जातीने वाणी होता.

गंगाधरशास्त्री यांचा खून पंढरपूर क्षेत्रामध्ये 1815 मध्ये झाला. त्रिंबकजी डेंगळे हा दुसर्‍या बाजीरावाचा कारभारी. त्यानेच तो खून केल्याचे सांगून बाजीराव पेशव्यांमार्फत त्याला अटक करण्यास भाग पाडले. त्याला 1815च्या ऑक्टोबरमध्ये ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. इंग्रजांनी तुरुंगातील बंदोबस्तासाठी दक्षता घेऊनही त्रिंबकजी 12 सप्टेंबर 1816 रोजी फरार झाला. त्याने तुरुंगातून तबेल्याच्या भिंतीस भोक पाडले. त्याने त्यासाठी घोड्याची निगा राखणारा इसम हाती धरला. तो बाजीरावाने पाठवला होता. तो घोड्याच्या तबेल्यात राहून निगा राखता राखता गाणी गायचा. त्या गाण्याचा अर्थ इंग्रज शिपायांना कळत नसे, पण त्रिंबकजीला समजत असे. त्रिंबकजी त्याचा फायदा घेऊन निसटला. तो प्रथम खानदेशात गेला. नंतर सातार्‍याजवळ महादेवाच्या डोंगरात राहू लागला. त्याने त्यावेळी नातेपुते भागातील लोकांतून मदतीसाठी बारा विश्वासू सहकारी तयार केले. त्याने ब्रिटिशांविरूद्ध बंडाळी पुन्हा चालू केली. ब्रिटिशांनी त्रिंबकजीला पकडून देणार्‍याला दोन लाखांचे बक्षीस जाहीर केले. तसेच, त्रिंबकजीचा नुसता ठावठिकाणा, पत्ता लावून देणार्‍यास इंग्रजांनी पाच हजार रुपयांचे बक्षीस व एक चाहूर जमीन देण्याचे जाहीर केले.

त्रिंबकजींचा पत्ता ठाऊक असून जर कोणी त्याची माहिती इंग्रजांना दिली नाही तर त्याचे पारिपत्य केले जाईल असा जाहीरनामा पेशव्याने जरी काढून त्यावेळच्या पंढरपूरच्या कमाविसदार बाबुराव गणेश याला कळवला तरी प्रत्यक्ष बाजीराव पेशवाच त्रिंबकजीला सहाय्य करत होता. त्रिंबकजी डेंगळे याने जमवलेले विश्वासू बारा साक्षीदार नावानिशी पुढीलप्रमाणे : 1. बापू गायकवाड शेटफळकर, 2. नागोजी वाळुंज, 3. रविराव शिंदे लोणीकर, 4. महादजी पंत नातेपोतेकर, 5. तिमाप्पा वडारी, 6. गोधाजी डेंगळा, 7. सयाजी मुळे, 8. आप्पाजी पाकुरवावीकर,9. निंबाजी जाधव फलटणकर, 10. महिपतराव डेंगळा, 11. बापू वरडकर, 12. दाजी डफळे.

बाजीराव पेशव्याने नातेपुते महालाचा महालकरी त्रिंबकजीला मदत व्हावी असाच कारकून नेमला.

त्यावेळी घटना ज्या घडत होत्या त्याचे नातेपुते हे काही काळ केंद्रच बनले. संताजी घोरपडे, सेनापती याची हत्या 1697 च्या आषाढ महिन्यात नागोजी माने म्हसवडकर याने केली. बादशहाचा तळ त्यावेळी ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथे होता. त्याने बादशहाकडे अर्ज करून ज्या मागण्या केल्या आहेत त्यात नात्यापोत्याची गढी त्याला मिळावी; तसेच, ती गढी आतील साहित्य, शस्त्र, दारुगोळा यांसह मिळावी असा अर्ज औरंगजेब बादशहाकडे केला. त्यावरून त्या ठिकाणची गढी लष्करी दृष्ट्या महत्त्वाची होती हे लक्षात येते. गढीचे काही अवशेष नातेपुते गावी दिसून येतात. त्रिंबकजी साष्टीच्या तुरुंगातून पळाला, त्याने वरघाटी येऊन-डोंगरात राहून जमाव सुरू केला.

नातेपुते गावाची लोकसंख्या 1875 साली दोन हजार तीनशे शहात्तर, 1881 साली दोन हजार दोनशेएकसष्ट, 1971 साली सात हजार नउशेबेचाळीस, 2001 साली सोळा हजार सात व 2011 साली सतरा हजार नउशेएकोणसाठ अशी वाढत गेलेली आहे. गावात अठरापगड जातिधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.

लोकांचा मुख्य व्यवसाय शेती, व्यापार व घोंगडी तयार करणे असा होता. शेतमालाची मोठी बाजारपेठ म्हणून पूर्वीपासून नातेपुते प्रसिद्ध आहे. (सोलापूर जिल्हा गॅझेट, 1884). नातेपुते गावच्या परिसरातील चाळीस-पन्नास खेड्यांचा व्यापारउदीम, देवाणघेवाण नातेपुते बाजारपेठेत होतो. शेतमालाबरोबरच कापड, किराणा व भुसार माल, सोने-चांदी व फर्निचर या क्षेत्रांत तेथील व्यापार्‍यांनी मोठी भरारी घेतलेली आहे व फार मोठी आर्थिक उलाढाल त्या क्षेत्रात होते. नातेपुते गावचा आठवडी बाजार दर बुधवारी असतो. तो मोठा व पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यामध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत असते. माल व प्रवासी वाहतूक यासाठी खाजगी सर्व प्रकारच्या गाड्या तेथे उपलब्ध आहेत. शेतीही आधुनिक पद्धतीने केली जाते. त्यामुळे गावचे लोक कष्टाळू, उद्योगी व स्वयंभू; तसेच, समाधानी व सुखी आहेत.

गावात कापसाच्या आठ जिनिंग फॅक्टरी 1960 ते 1980 च्या काळात दिवसरात्र चालत होत्या. त्यामुळे रोजगार भरपूर होता. त्याकाळी नातेपुते ही मोठी बाजारपेठ शेंग-गूळ-कापसाची होती.

सद्यस्थितीत बराचसा नोकरवर्गही गावात स्थायिक झालेला आहे. स्वतंत्र आधुनिक बंगले व कॉलनी यांमुळे गावचे रूप पालटून गेलेले आहे. नातेपुते गाव पुणे-पंढरपूर रस्त्यावर असल्याने व शेजारी परिसरात वाडीवस्त्या व खेडी यांची संख्या जवळजवळ पंचवीस-तीस असल्याने रोज मोठे दळणवळण होत असते. तेथून सुमारे दीडशेभर एस.टी. बसगाड्यांची रोज ये-जा होत असते. त्याचा परिणाम म्हणून नातेपुते गावचे शहरीकरण-नागरीकरण वेगाने होत आहे व त्यामुळे तेथील जमिनींचे बाजारभाव खूप चढे आहेत.

नातेपुते गावाला पूर्वी ऐतिहासिक साखरबावी विहीर व पांडुरंगाच्या मंदिराशेजारचा आड यांचे पाणी पिण्यासाठी वापरात होते. पाऊसपाणी नियमित असल्यामुळे गावचा ओढा बारा महिने वाहत असे. त्यामुळे दुष्काळातही पाणी कमी पडत नसे. गावाला सॅण्ड फिल्टरेशनची चांगली पाणीपुरवठा योजना ग्राम पंचायतीच्या माध्यमातून 1970 च्या आसपास सुरू झाली. तिचे विस्तारीकरण होत आहे. तसेच नातेपुतेच्या इशान्य बाजूने ब्रिटिशांनी बांधलेला नीरा उजवा कालवा गेला आहे. त्यापुढे भोर तालुक्यात असलेल्या नीरा-भाटघर-देवधर-गुंजवणी या धरणांमुळे पंढरपूरपर्यंतचा भाग सुजलाम् सुफलाम् झालेला आहे. नातेपुते गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या जुन्या तळ्यात नीरा उजव्या कॅनॉलचे पाणी साठवले जाते. ते टाक्यांमधून फिल्टरेशन व निर्जंतुकीकरण करून गावाला नळावाटे दिले जाते. ग्राम पंचायतीला नागरिकांना सुमारे आठ लाख लिटर पाणी दिवसाला पुरवावे लागते. गाव पाण्याबाबत पूर्वीपासून सुखी व समाधानी आहे. नातेपुते गावाची पाणीपुरवठा योजना राज्यात आदर्श अशी मानले जाते.

नातेपुते ग्रामपंचायतीची स्थापना 1933 साली झाली. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ’ ही संस्था पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. कालांतराने आणखी तीन खाजगी सहकारी शेतकरी सोसायट्या निर्माण झाल्या. सध्या पाच राष्ट्रीकृत बँका, सहा नागरी सहकारी बँका व अकरा सहकारी पतसंस्था, साठ महिला बचत गट व अनेक खाजगी फायनान्स कंपन्या गावात कार्यरत आहेत. मार्केट कमिटीत मोठा व्यापार होतो.

नातेपुते गावात सरकारी अद्ययावत ग्रामीण रुग्णालय, चोवीस खासगी दवाखाने व तज्ज्ञ सात डॉक्टर आहेत. गावात बालवाडी ते कॉलेज व व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामध्ये सहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बालवाडी ते बारावीपर्यंतच्या तीन खाजगी संस्था, एक महाविद्यालय, एक आय.टी.आय. तर पंचवीस सरकारी अंगणवाड्या सुरू आहेत. त्यांचा लाभ परिसरातील वीस-पंचवीस खेड्यांतील ग्रामीण विद्यार्थ्यांना होतो. ग्रामपंचायत सार्वजनिक वाचनालय मोठे व चांगले आहे. त्यात सुमारे पंधरा हजार ग्रंथ आहेत.

गावात सुंदर व प्रशस्त ग्राम पंचायत कार्यालय, तलाठी व सर्कल कार्यालय, सिटी सर्व्हे कार्यालय, वीज उपकेंद्र कार्यालय, सार्वजनिक बांधकाम व इरिगेशन कार्यालय व कॉलनी, टपाल व दूरध्वनी कार्यालय, स्वतंत्र पोलिस ठाणे, एस.टी. स्टॅण्ड अशी अनेक सरकारी कार्यालये व तेथील कर्मचाऱ्याच्या वस्त्या निर्माण झाल्या आहेत.

ग्रामदैवत गिरिजापतीस गौरीहर असेही म्हटले जाते. नातेपुते हे पार्वतीचे माहेर मानले गेले आहे. नातेपुते हे गाव शिखर-शिंगणापूरच्या पायथ्याशी वसलेले असल्याने परिसरात असलेल्या सर्व हेमाडपंती अष्टलिंग मंदिरांपैकी नातेपुतेचे गिरिजापती मंदिर एक आहे. शिवभक्त बळीराजा हा तिचा भाऊ. त्याचेही सुंदर मंदिर गिरिजापती मंदिराशेजारी आहे. नातेपुते गावच्या मध्यभागी सुंदर असे ऐतिहासिक शिवाचे मंदिर आहे. मंदिर हेमाडपंती भक्कम दगडाच्या तटबंदीसह उंचावर बांधलेले आहे. मंदिर बहामनी काळातील (1350) आहे.

तसेच नातेपुते गावाच्या दक्षिणेला छोट्या टेकडीवर निसर्गरम्य सुंदर असे श्री पर्वतेश्वराचे दुसरे शिवमंदिर आहे. ते रचनेवरून पेशवेकालीन वाटते. मध्ये गावाचा ओढा आहे. मंदिराला जाण्यासाठी गावातून पूर्वेला व पश्चिमेला ओढ्यातून दोन पाणंद रस्ते आहेत. पाणंद रस्त्यांच्या दुतर्फा मोठी झाडे असल्याने भाविकांच्या मनाला तो प्रवास  आल्हाददायी व आनंदी वाटतो. तेथे राष्ट्रीय पक्षी मोरांचा वावर खूप आहे. गावाच्या ओढ्याची पूर्व बाजू तर ‘मोरांचा ओढा’ म्हणून प्रसिद्ध आहे. ग्राम पंचायतीने उत्तम अशी स्मशानभूमी पर्वतेश्वराशेजारी सर्व जाती-धर्मांसाठी तयार केलेली आहे.

_EtihasikSandarbhacge_Natepute_2.jpgग्रामदैवत गौरीहराचे मंदिर हे मराठवाड्यातील लोकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान आहे. तेथे चैत्र शुद्ध पंचमी ते अष्टमी या काळात मोठा उत्सव असतो. अनेक मानाच्या काठ्या व कावडी वाजतगाजत पायी देवाला पाण्याने अभिषेक घालण्यासाठी येतात. पंचमीला देवाला हळदी लागतात व अष्टमीला मध्यरात्री देवाचा विवाह सोहळा पार पडतो. या शिव-पार्वती विवाहासाठी मराठवाड्यातील भातंगडी गावाच्या ‘भातंगडी काठी’चा मान मोठा आहे. भातंगडी काठी म्हणजे पाण्याची कावड देवाला वाहिली जाते. पुढे ती काठी शिखर शिंगणापूरी जाते. पाण्याच्या अशा अनेक कावडी चैत्र यात्रेवेळी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पायीपायी, वाजतगाजत येतात. विवाह समारंभ मंदिरात रात्री होतो. देवळासमोरील उंच दीपमाळा पेटवल्या जातात. दीपमाळा शिखर शिंगणापूरच्या उंच डोंगरावरील देवळावरून दिसतात. तो लग्नसोहळा गावातील मानकरी, वतनदार, बडवे, भोसले, कलावंत-शेख, पाटील, देशमुख, देशपांडे, सर्व गावकरी आनंदाने मिळून पार पाडतात. लग्नातील नवरदेवाचा मान धनगर समाजातील माळशिरसच्या वाघमोडे पाटलांकडे तर नवरीचा मान नातेपुत्याच्या पांढरे-पाटील घराण्याकडे आहे.गावकरी दैनंदिन जीवनात परंपरेने चैत्र महिन्यात अनेक गोष्टी व्रताप्रमाणे पाळतात. श्री शंकर-पार्वतीचे लग्न प्रतीकात्मकच असते.

नातेपुते गावातील गिरिजापती मंदिर, बळीराजाचे मंदिर, समोरील तळे व संपूर्ण परिसर हा सातार्‍याचे राजे भोसले कुटुंबीयांच्या खाजगी मालकीचा आहे. सातार्‍याच्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या या संस्थानाकडून लिलाव पद्धतीने दरवर्षी दैनंदिन पूजाअर्चा व व्यवस्थेचे नियोजन केले जाते. बडवे कुटुंबीय पिढ्यान्पिढ्या ते सर्व श्रद्धेने व निष्ठेने करतात. देवाच्या पूजाअर्चा व व्यवस्था यांसाठी सातारा संस्थानातर्फे पुजारी बडवे, घडशी समाजाचे भोसले व कलावंत-शेख यांच्या कुटुंबीयांना उपजीविकेसाठी वतने म्हणून जमिनी दिलेल्या आहेत व देवस्थानाची व्यवस्था लावून दिलेली आहे.

नातेपुते गावाला ठरावीक अशी यात्रा-जत्रा परंपरा नाही. परंतु नातेपुते हे गाव आळंदी-पुणे-पंढरपूर मार्गावर असल्याने पूर्वीपासून श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत सोपान महाराज; तसेच, अनेक थोर साधुसंतांचा पालखी सोहळा पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी दरवर्षी जून-जुलै महिन्यात तेथूनच पायी जात-येत असतो. तो सोहळा मोठा व नयनरम्य असतो. नातेपुते या ठिकाणी पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो. पालखी सोहळा हा नातेपुते गावाच्या लोकांचा सर्वात मोठा अभिमानाचा, आनंदाचा, श्रद्धेचा व जिव्हाळ्याचा विषय आहे. चार ते पाच लाख वारकर्‍यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था सर्व जाती-धर्मातील गावकरी आनंदाने व कर्तव्यभावनेने करतात; सामाजिक ऐक्य व एकोपा यांचे दर्शन घडवतात. भजन, कीर्तन, प्रवचन व नामस्मरण अशा धार्मिक वातावरणात सारा गाव, आसमंत काही काळ डुंबून जातो.

_EtihasikSandarbhacge_Natepute_1.jpgनातेपुते गावाच्या दक्षिणेला, ओढ्याच्या पलीकडे साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर छोट्या टेकडीवर श्रीपर्वतेश्वर हे निसर्गरम्य शिवालय आहे. मंदिर बांधकामाचा ऐतिहासिक कालावधी निश्चित सापडत नाही. परंतु मूळ गाभार्‍याचे बांधकाम, तटबंदी प्राचीन असून सभामंडपाचे बांधकाम मात्र शंभर वर्षांपूर्वीचे असावे. मंदिराच्या थोडेसे दक्षिणेला ज्योतिबा तर आग्नेयेला सिद्धनाथ ही दोन छोटी मंदिरे आहेत. गावकरी श्रावणातील नागपंचमी उत्सव/सण दरवर्षी पर्वतेश्वराच्या मंदिराजवळ साजरा करतात. अलिकडे त्यास गावजत्रेचे स्वरूप आलेले आहे. त्या दिवशी त्या ठिकाणी नागोबा देवतेची प्रतीकात्मक पूजा नाभिक समाजातील राऊत कुटुंबीय करतात. गावकरी त्याचे दर्शन घेतात. त्यानिमित्ताने मंदिरातील परिसरात महिलांचे पारंपरिक खेळ, युवक व बालकांचे पतंगोत्सव, मैदानी खेळ; तसेच, मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. सर्व प्रकारची खेळणी, मेवामिठाई यांचा आस्वाद गावकरी निसर्गसान्निध्यात घेतात.

श्रावण महिन्यातील तिसर्‍या सोमवारी ग्रामदैवत गौरीहराच्या मंदिरात गावकऱ्याच्या वतीने महाप्रसाद भंडार्‍याचे (अन्नदान) व सायंकाळी महादेव आखाड्यात महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचे आयोजन ग्राम पंचायत व नातेपुतेकर ग्रामस्थ यांच्या मार्फत केले जाते.

नातेपुते गावात मुस्लिम समाज बराच आहे. शेख, तांबोळी, मुस्लिम, आतार, बागवान, नदाफ (पिंजारी) अशी पारंपरिक व्यावसायिक मंडळी आहेत. मुस्लिमांचे प्रार्थनास्थळ ऐतिहासिक शाही मशीद मोगलकालीन आहे. त्याचे इमाम व मानकरी काझी व मुलाणी हे आहेत. गावाबाहेर जुने दर्गे व पीर आहेत. मुस्लिम समाजाचे धार्मिक उत्सव व कार्यक्रम त्या ठिकाणी केले जातात.

जैन धर्मीयांनी चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर मुख्य पेठेत 1921 साली बांधले. त्या ठिकाणी 1008 भगवान श्री आदिनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंदिराचा जीर्णोद्धारही अलिकडील काळात करण्यात आला. जैन समाज गुजरात-राजस्थान या भागातून उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्रात दोन-तीनशे वर्षांपूर्वी आला. तो समाज व्यापार-उद्योगधंद्यात स्थिर व यशस्वी आहे. नातेपुते गावास व्यापारी पेठ म्हणून जो लौकिक प्राप्त आहे त्यात त्या समाजाचा वाटा मोठा आहे.

गावातील सधन व प्रतिष्ठित शंकरराव घुगरदरे, रघुनाथराव घुगरदरे, रघुनाथ इंगोले, मोहिनीराज ख्रिस्ती व गावकरी यांनी मिळून श्रीराम मंदिराची उभारणी व मूर्ती प्रतिष्ठापना शके 1848 मध्ये केलेली आहे. गावातील व्यापारी खंडो रामजी सोनवळ यांनी रामपंचायतनाच्या सुंदर व संगमरवरी मूर्ती दान म्हणून दिल्या. पूर्वीचे राम मंदिर गिरिजापती मंदिराजवळ होते. ते कालौघात नष्ट झाले. गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या गिरवी या आजोळी जात असताना सध्याच्या पेठेतील जागा राम मंदिरासाठी योग्य आहे असे गावकर्‍यांना सुचवले. त्यानंतर मंदिर उभारणी झाली. राम मंदिर व शेजारील मंडईतील हनुमान मंदिर यांचा ट्रस्ट 1993 साली केला गेला. मंदिराचा जीर्णोद्धार 1999 साली केला गेलेला आहे. गावचे कै. नरहर बंदिष्टे यांच्या घराण्यात प्रथमपासूनच दैनंदिन पूजा व उत्सव यांचा मान आहे.

बलखंडी गणेश मंदिर, साखरबावी विहीर व दक्षिणमुखी हनुमान मंदिर नातेपुते गावाच्या नैऋत्य दिशेला जुन्या वेशीबाहेर गावाच्या ओढ्याकाठी श्री पर्वतेश्वर रस्त्यावर आहेत. मंदिर प्रमाणबद्ध चौकोनी आकारात ताशीव व घडवलेल्या दगडात आणि चुन्याने बांधलेले आहेत. वर गोल घुमट आकार व कळस आहे. दगडी सुंदर नक्षीकाम व रेखीव मूर्ती कोरलेल्या आहेत. तशा प्रकारची व आकाराची दोन मंदिरे सांगली संस्थानच्या मुख्य गणपती मंदिराशेजारी आहेत. गणेश मूर्ती ही उजव्या सोंडेची संगमरवरी दगडाची रेखीव व सुंदर आहे. त्या ठिकाणी मंदिरात एक व बाहेर एक अशी दोन समाधिस्थाने आहेत. मंदिरात असलेली दगडी समाधी ही अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावचे गणेशभक्त बलखंडी महाराजांची आहे. त्यांनीच ती गणेशमूर्ती स्थापलेली आहे असे म्हणतात. म्हणून ते समाधिमंदिर असे ओळखले जाते.

मूळ मूर्ती 1970 च्या आसपास भंगली, त्यामुळे गावकर्‍यांनी जयपूरहून (राजस्थान) मूर्तिकारांना आणून मूळ मूर्तीच्या साच्यावरून हुबेहूब संगमरवरी मूर्ती तयार करून घेतली व तिची प्राणप्रतिष्ठा केली. मूळ मूर्ती समुद्रात विसर्जित केली.

मंदिराच्या जमिनीचे मालक अतुलशेठ बावकर यांच्यातर्फे गणेश जयंती व गणेशोत्सव हे दोन्ही धार्मिक कार्यक्रम साजरे होतात. दररोजची पूजाअर्चा श्रीधर कुलकर्णी परंपरेने पाहतात.

श्री भवानी माता मंदिर हे छोटे पण टुमदार मंदिर नातेपुते गावाच्या पश्चिमेला ऐतिहासिक बुरुजाजवळ छोट्या टेकडीवर आहे. गावाच्या मुख्य वतनदाराचा वाडा त्या ठिकाणी पूर्वी होता व जवळच गावाची वेस होती. भैरवनाथाचे मंदिर ओढ्याजवळ होते. त्या देवस्थानची जमीन पैठणकरांकडे आहे.

_EtihasikSandarbhacge_Natepute_5.jpgमंदिरातील भवानीदेवीची संगमरवरी मूर्ती प्रसन्न व मनोहर आहे. तिचीही पुनर्स्थापना व मंदिराचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे, कारण जुनी मूर्ती भंगली. माजी सरपंच कै. नानासाहेब देशमुख यांनी ते काम केले. त्यांच्या पुढील पिढ्यांकडून दैनंदिन पूजाअर्चा व्यवस्थेचे काम ब्राह्मण पुजार्‍यांकडून केले जाते.

या मंदिराच्या व गिरिजापती, पर्वतेश्वर या जुन्या ऐतिहासिक मंदिरांच्या समोर भग्न सतिशीळा, वीरगळ, भग्न मूर्ती व गद्धेगळ पाहण्यास मिळतात.

साखरबावी ही भलीमोठी चिरेबंदी विहीर पर्वतेश्वर मंदिरास पश्चिमेकडील पाणंदीतून जाताना ओढ्यानजीक तुटलेल्या रहाटासह दिसते. बाव, बावी म्हणजे विहीर आणि तिचे पाणी साखरेसारखे गोड म्हणून ती साखरबावी. सातारा जिल्ह्यातील धावडशीचे राजगुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी अनेक ठिकाणी विहिरी खोदल्या व बांधल्या. त्यांपैकी ती एक सुंदर विहीर आहे व ते इतिहासातही नमूद केलेले आहे. विहिरीला खूप व चांगले पाणी आहे. तिचे पाणी कोणत्याही मोठ्या दुष्काळात आटले नाही वा कमी पडले नाही. नातेपुते गावाला पिण्याच्या पाण्याचा तोच मुख्य स्रोत 1960 पर्यंत होता. सर्व गाव साखरवाबी व तिच्याच पूर्वेला थोड्या अंतरावर असलेल्या ऐतिहासिक पांडुरंगाच्या मंदिरासमोरील आडाचे पाणी पित होते. त्याकाळी ओढाही बारा महिने वाहत होता. कालानुरूप ग्राम पंचायतीने तेथे टाकी बांधली, इंजिन-पंप बसवले व त्यानंतर 1970 च्या दशकात नळपाणी पुरवठा योजना अस्तित्वात आली. गावाची लोकसंख्या वाढली. साखरबावी ग्राम पंचायतीची की खाजगी मालकीची या वादात अडकली व तिच्याकडे दुर्लक्ष झाले. विहिरीच्या उत्तरेला दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. ते समर्थ स्थापित आहे असे म्हटले जाते. त्या मंदिराच्या खालून साखरबावीस मोठा पाण्याचा झरा आहे.

इंदूरचे राजे होळकर संस्थानची जागा, दस्तऐवज व महादेवाला वाहिलेली प्रचंड मोठी मानाची कावड व त्यास पंचधातूचे मोठे हंडे येथील चांगण कुटुंबीयांकडे होते. चैत्र महिन्यात पाडव्याच्या मुहूर्तावर त्या कावडीने पाणी ग्रामदैवत गौरीहराला वाहिले जाई. ती प्रथा चालू आहे. नातेपुते गावाचा ऐतिहासिक वारसा शोधण्याचा प्रयत्न उपलब्ध ऐतिहासिक वास्तू, त्यांचा काळ, पारंपरिक कल्पना, गावातील ज्येष्ठ व जाणत्या व्यक्ती यांच्याशी चर्चा यामधून केला आहे. परंतु प्रत्यक्षात लेखी दस्तऐवज कोठेच नाही. काही ऐतिहासिक, धार्मिक ग्रंथ आणि प्राचीन मंदिरे व पडक्या वास्तू या आधारे शोध करावा लागते. नातेपुते गावाचा उल्लेख सुमारे बारा-चौदा ऐतिहासिक महत्त्वाच्या ग्रंथांत आलेला आहे. त्यावरून ऐतिहासिक काळापासूनचे गावाचे महत्त्व लक्षात येऊ शकते.

- रविंद्र प्रभाकर चांगण


सोलापुर जिल्ह्याचे पर्यटन

  सोलापुरात राहुन सगळी ठीकाणे फीरणे सोयीस्कर पडते, जर सोलापुरात राहणार असाल आणि आधी बुकींग करुन ठेवले असेल तर सिद्धेश्वर ट्रेन ने जा, ७ वाजता सोलापुरात पोहोचते, त्याच दिवशॉ गाणगापुर अक्कलकोट करणार असाल तर घाई होईल कारण ९.३० ला चेन्नई मेल सोलापुरात पोहोचते (थोडाफार उशीर होतो) आणि ११ ते ११-३० च्या दरम्यान गाणगापुर स्टेशनला पोहोचते. डायरेक्ट गाणगापुर ला जात असाल तर सी.एस.टी. चेन्नई मेल सोयीस्कर , कदाचित तीच एक ट्रेन आहे जी मुंबई हुन अक्कलकोट रोड मार्गे गाणगापुरला जाते. सोलापुर सोडल्या नंतर दुसरे स्टेशन होदगी (नाव नीट आठवत नाही) स्टेशन गेल्यावर महाराष्ट्र बॉर्डर संपते आणि कर्नाटक बॉर्डर लागते आणि फोनला रोमिंग सुरु होतं अक्कलकोट आणि गाणगापुर दोन्ही ठीकाणी रोमिंग लागलं होतं . गाणगापुर स्टेशन एकदम शांत आणि साधं आहे, अगदी सिनेमात दाखवल्या प्रमाणे ३-४ तासाने एखादी ट्रेन पास होते, स्टेशन वर ब्रिज ही नाहीये. स्टेशन्च्या प्लॅटफॉर्म वरुनच सरळ चालत चला टुवर्ड्स कर्नाटका प्लॅटफॉर्म जिथे संपतो तिथुन वेस्टलाच बाहेर पडा (त्याच प्लॅटफॉर्मला चेन्नी मेल थांबते म्हणजे ईस्ट वेस्ट गोंधळ होत नाही) , तिथेच रेल्वे फाटक आहे आणि ३-४ छोट्या रिक्षा (मधे ४ जण आणि मागे ३-४ बसण्याची सोय असलेल्या रिक्षा) असतात गाणगापुर मंदीरासाठी. माणशी ३० रु होते गेल्यावर्षी ., शेअरींग किंवा स्पेशल दोन्ही नेउ शकता. १ तास तर लागतोच, मधे तेव्हा थोडा रस्ता खराब होता पण रिक्शावाला आणि रिक्षेतले बाकी पॅसेंजर म्हणाले सोलापुर ते गाणगापुर रस्ता याहुन जास्त खराब आहे. दत्तमंदीरा आधी काही जणे संगमावर जाउन येतात, आम्ही ही गेलो , तीच रिक्षा पुढे ४ की, मी. गेली होती. जाताना मनाची तयारी करुन जा, दुर्गंधी , बकालपणा सगळीकडे पाहायला मिळतो, मी माझ्या डोळ्याने पाहुन आले, आम्ही मंदीरात पोहोचलो तेव्हा आरती सुरु झाली होती आणि गर्दी दिसत होती आम्हाला परतायचं ही टेंशन होतच पण गेल्या गेल्या समोर रांग दिसली , २० -२० रु जमा करत होते, नंतर कळालं ते वि.आय.पी. दर्शन होते. नाहीतर बाकी कुठुन तरी पायर्‍यांवरुन चढुन रागेत उभे होत होते, मंदीर अगदी छोटे आहे, आजु बाजुचा परीसर गलिच्छ आहे , राहायची सोय आहे पण परीसर पाहील्यावर राहायची ईच्छाच होणार नाही., इथनं जाताना एका सोलापुरकरला माहीती विचारताना गाणगापुरला राहायची सोय विचारल्यावर त्याने तिथे राहुच नका तुम्हाला आवडणार नाही हे का सांगितले होते ते तिथे गेल्यावर पटले. नंतर परतताना ट्रेन मधे एका माणसाने सांगितले की तिथे राहायचे असेल तर मंदीरातल्या पुजार्‍यांकडे सोय होते , ते सोवळ्यातच असल्याने राहण्याची जागा स्वच्छ असते. परतताना बहुतकरुन गाणगापुर अक्कलकोट अशा शेअरींग मधे जीप, ओम्नी कींवा रीक्षा असतात, पण १ तासाहुन जास्त प्रवास जर चारचाकी वाहनाने केला तर मला गाडी लागते त्यामुळे आम्ही रिक्षेचा आणि बसचाच ऑप्शन ठेवला. आम्हाला परत येताना रिक्षा मिळत नव्हती तर स्पेशल रीक्षा केली येताना २५०/- दिले त्याला तो तयार झाला, येताना मागच्या साईडला त्याने पब्लिक भरुन घेतली , मधे मात्र त्यानेच कुणाला बसु दिले नाही. स्टेशनवर पोहोचलो, आणि ट्रेन थोडीफार लेट असतेच , ५.३० नंतर अक्कलकोट रोडला पोहोचलो, ते स्टेशनही साधेच आणि वेस्टला बाहेर निघाल्यावर २-३ छोट्या रीक्षा उभ्या होत्या आणि बसही जाते असे ऐकले होते पण बाकीचे उभे असलेले म्हणाले की रिक्शेने लवकर पोहोचाल अर्ध्या तासात, तसे पोहोचलो ही. तो परीसर चांगला आहे , आम्ही साधारण ६-१५ ला मठात पोहोचलो, सगळीकडे वटवृक्षनिवासी महाराज संस्थान असे बोर्ड होते म्हणुन आम्ही सर्वांना अक्कलकोट महाराजांचा मठ कुठे आहे असेच विचारत होतो आणि सगळे तेच रस्ता दाखवत होते, शेवटी मठ जवळ आला आणि तिथे ही तेच नाव दिसले तेव्हा कुठे माहीत पडले महाराजांचे मुळ नाव वटवृक्षवासी स्वामी असेच आहे. जागा लहान असली तरी पुणा मुंबईची माणसे जास्त असतात राहणीमानावरुन पटकन ओळखु ही येतात. मठाच्या आवारात जास्त माणसे दिसली नाहीत तरी मठातुन बसस्टॉपवर गेल्या वर कळाले गर्दी काय असते, जरी १५-१५ मि. नी सोलापुरला बस असली तरीही अतिशय गर्दी होती , नंतर कळाले बसस्टॉप वर एक काउंटर आहे तिथुन काही बसेस चे तिकिट मिळते आणि जितक्या सीटस असतात तितकीच तिकीटे देत असल्याने गर्दी नसते. पण आम्हाला माहीत नसल्याने आम्ही त्या बसमधे जाउ शकलो नाही, बसमधे बसल्यावर तिकीट काढु हा ऑप्शनही नव्हता कारण बसमधे कंडक्टर नसतो असे एकाने सांगितले. बरं बसला लावलेला बोर्ड हा कर्नाटकी भाषेत असतो

 गाणगापुरला मंदीरातच पिठले - भाकरी असा प्रसाद मिळाला होता, आणि मंदीरात बर्‍याच जणांच्या अंगात संचारलेले असते म्हणुन जरा आजुबाजुला लक्ष ठेवा, एकीने मला पाठी मागुन जोरात ओरडुन घाबरवायचा प्रयत्न केला होता पण मला काही फरक पडला नाही तिच्या आविर्भावावरुन तरी ते मानसिक मानणं असावं असच वाटत होतं. किंवा अंगात भुत किंवा देव देवी संचारणं यावर माझा विश्वास नसल्याने असेल.

दुसर्‍या दिवशी आम्ही पंढरपुर जायचे ठरवले होते , सकाळी लवकर उठुन सोलापुर बस स्टॉपला जाउन ७.१५ ची पंढरपुर बस पकडली (थोड्याफार उशीरानेच सुटतात) , सोलापुर हुन सुटत असल्याने बस मधे आरामात जागा मिळाली, साधारण ५० रु. ते ५७ रु माणशी असे तिकीट होते, १.३० ते २.०० तासात पोहोचलो पंढरपुरला. बालमैत्रीणीचे सासर पंढरपुर असल्याने तिने सक्त ताकीद दिली होती की दोघीच आहात तर सासरचं कुणी पाठवते बरोबर एकट्या फीरु नका, दुष्काळी भाग आहे, खुप चोर्‍या आणि खुन ही होतात (आमच्या हुन जास्त तिलाच टेंशन आले होते) तिने तिच्या नणंदेच्या मुलाला सांगितले होते की आम्हाला मंदीर वगैरे फीरवुन सोलापुर बस मधे बसे पर्यंत घरी जाउ नकोस, तो बरोबर ९ च्या दरम्यान आम्हाला पंढरपुर बस स्टॉप ला घ्यायला आला होता. मंदीराजवळ आलो आणि सगळीकडे अस्वच्छता जाणवु लागली. वारी २-३ दिवसावर येउन ठेपली होती असे माहीत पडले, मंदीराच्या एकदम जवळ एक उजव्या हाताला एक चांगले हॉटेल सापडले नाश्ता छान झाला, नाव आठवत नाहीये पण लाकडी वाडा जसा असतो तसे त्याचे इंटीरीयर होते, नंतर मैत्रीणीच्या भाच्याने सांगितले सुरुवात चंद्र्भागा नदीपासुन आणि पुंडलिकाच्या मंदीरापासुन करुया, नदीला पाणी नाही पात्र आणि आजुबाजुच्या परीसराची अतिशय बकाल अवस्था , दुर्गंधी . मंदीरात तर जिथे तिथे बाजार, भट सतत कुणी पाया पडायला आले तर नाव विचारुन देवाला स्वतःच सांगतात "देवा -- - माणसाकडुन ५१ रु आले, आणि माणसे धडाधड काढुन देत होती, छोटसं मंदीर पण २-३ ठीकाणी पैसे मागणे सुरु होते, मी कुठल्याही मंदीरात गेले तरी पैसे आणि हार वाहत नाही त्यामुळे त्याने माझे नाव पुकारले तरी मी काही पैसे घातले नाही आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसुन तो पहातच राहीला, ५ पावले पुढे आलो तर तीथे कसलस तिर्थ की काय मिळत होते, पैसे टाकल्याशिवाय देत नव्हते नाही घेतले, तसही आजुबाजुची बकालवस्ती पाहता तिर्थ घेउच नये असे वाटते, त्यानंतर मंदीरात आलो, मैत्रीणीच्या नातेवाईकांचे मंदीराला लागुन फुले विकण्याचे दुकान असल्याने जवळचे सामान आणि चपला तिथे ठेवता आल्या, मंदीरात महीलांना वीतभर आकाराची पर्स नेण्यास परवानगी आहे त्यामुळे आम्ही तेवढी पर्स हातात घेतली होती आणि लेडीज पोलिस नसल्याने महीलांची चेकींग होत नव्हती त्यामु़ळे त्यात छोटा बेसिक फोन ही नेता आला, मंदीराची दुरावस्था पाहुन धक्का बसला, मंदीरात जवळपास १-२ महीने झाडले नसेल इतकी धुळ होती , खुप गर्दी , आणि टॉयलेट्स नुसते नावाला , ज्यांच्या कडे लहान मुले होती ती तर रांगेतच धक्क्यावर लघुशंका उरकत होते, पश्चात्ताप वाटला इथे आल्याचा, २.३० ते तीन तास रांगेत होतो. आमच्य पुढची एक व्यक्ति मात्र पांडुरंगाच्या भजनात तल्लीन होती, त्यांना बाहेरच्या जगाचा अगदी विसर पडला होता ते तीन तास ते अखंड भजन गात होते, मंदीर पाहुनच माझा जीव अक्षरशः कावला होता शेवटी अगदी जवळ आलो , जेव्हा विठ्ठ्लाची मुर्ती समोर आली तेव्हा मनाला इतकी शांतता मिळाली की त्या तीन तासांचे त्रास विसरुन गेलो (एक साईबाबांचे दर्शन सोडले तर बाकी ठीकाणी दर्शन घेताना असे आंतरीक समाधान मिळणे माझ्या बाबतीत खुप कमी होते). बाहेर आलो. पंढरपुरला शेगावच्या गजानन महाराजांचा मठ आहे, राहायची सोय ही उत्तम आहे, वॉशरुम ला जायला बाहेरचे ही लोक जाउ शकतात, मैत्रीणीच्या भाच्याने सांगितले की पुर्ण पंढरपुर मधे हे असे एकच ठीकाण आहे जिथे स्वच्छता आहे. आम्ही तिथेच जेवण ही केले आणि पंढरपुर बस स्टॉप वरुन बस पकडुन ३.३० वाजेच्या दरम्यान सोलापुरात परत आलो. आल्यावर मोगले गाठले, इरकल साड्यांची खरेदी केली आणि पुलगम मधे गेलो, तिथे खरेदी करुन ८ वाजे पर्यंत आमच्या राहायच्या ठीकाणी आसरा एरीयात आलो, मग तिथे स्मोकीज पिझ्झा इथे जाउन मस्त चिकन पिझ्झा हाणला. आणि खुप थकल्याने झोपी गेलो, आम्ही ज्या कलिगच्या बहीणी कडे राहत होतो तिच्या नवर्‍याला तातडीने हॉस्पीटलाईज करावे लागले होते आणि ते आय.सी.यु. मधे होते, त्यामुळे त्यांच्या घरात आम्ही दोघीच होतो , आम्ही हॉटेल मधे शिफ्ट होण्याचा विचार केला पण त्या ताई म्हणाल्या मला खुपच वाईट वाटेल जर तुम्ही गेलात तर मी काहीच करु शकले नाही , मी नसले तरीही तुम्ही प्लीज इथेच राहा शेवटी त्यांच्यासाठी आम्ही तिथेच राहीलो.

 सोलापूर मधील काही न चुकावावेत असे खाद्य पदार्थ:
१} भाग्यश्रीचा बटाटे वडा
२} पार्क किंवा सात रस्ता येथील डिस्को भजी
३} सुधा ची इडली / गणेश चा उत्तपा आणि डोसा
४} पार्क येथील भैयाची भेळ
५} सराफ कट्ट्याजवळ मनोज भेळ
६} कन्दले किंवा पुणेकर कामठे उसाचा रस
बाकी हॉटेल्स पुष्कळ आहेत आणि तिथे सगळ मिळते

पद्मशाली चौकात मिळणारी पाणी पुरी ट्राय करू शकता  मंगळवार पेठेतील डोसा विविध प्रकारात मिळतो.सेट डोसा,कट डोसा,दावणगिरी डोसा इत्यादी.खान्याच्या बाबतीत सोलापूर एक नंबर आणि इतर ठिकानंपेक्षा स्वस्त आहे.

नॉन व्हेज वाल्यासाठी शीग मटन. चकोले मटन भाजनालयातले (भोजनालयातले नव्हे).
शाकाहारीसाठी कडक भाकरी, शेंगा भाजी, घट्ट दही, मटकी फ्राय, पेंडपाला, हुग्गी, शेंगा पोळी, खवा पोळी हे सर्व हॉटेलात मिळतात.
ब्राह्मणी जेवणासाठी (तसा बोर्ड आहे) अनादी च्या दोन शाखा.
पूर्व भागात आंध्रा लोणचे, रायचूर (आंध्रा) भजी, चारु बोवा, हिरवे मटण, दालचा हे पण मिळते.
नाश्त्याला अगदी ५ रु डिशपासून ८० रु. पर्यंत ईडलीच्या व्हरायटी डिशेस मिळतात.
पुरी भाजी ही वेगवेगळ्या ४-५ प्रकारात मिळते.

 सोलापुरात सात रस्त्याजवळ डॉमिनोज आहे. भागवत पाशी अ‍ॅडलॅब आहे. मॅक्डी अन केएफसी तिथेच होतेय. बिगबाझार अन तळवलकर जवळ जवळ आहेत. चोकोलेड लै ठिकाणी आहे. ली रँग्लर लिनन क्लब वूडलँड पीएनजी अन लीवाईस एका लैनीत व्हीयापी रोडवर आहेत. वोल्व्होच्या लोफ्लोअर सिटीबस आहेत.

 खाण्यासाठी अजुन एक ठिकाण म्हणजे कन्ना चौकातील पाणी पुरी..पवार बंधू यांचे साड्यांचे दुकान मोठे आहे. तसेच सोलापूर महापालिका कार्यालय इंद्र भुवन पाहणे पण चुकवू नका. बाकी अजून काही मदत हवी असल्यास सांगा.

 

या सोलापुरला जरुर या, स्वागत आहे. पुर्वीपासुनच सोलापुर हे एक तुम्ही लिहिलेल्या धार्मिक ठिकाणांचं केंद्र म्हणुन सोयीचं आहे. सोलापुरात येताय तर खाणंपिणं मजेत करा..

जमल्यास, दातेंच्या गणपतीचं दर्शन घेउन या, देवळाच्या बाहेरुन देखील दर्शनाची सोय आहे, आणि त्यांचं ऑफिस तिथं मागंच आहे, विनंती केल्यास ते देऊळ उघडुन दर्शन घेउ देतात.

पुर्वभागातलं, म्हणजे अक्कलकोटलनाक्याच्या अलीकडं बालाजीचं मंदिर आहे, तिथं जाउन या.

बा़ळीवेशीतलं मल्लिकार्जुन मंदिर आणि माणिकचॉकाजवळ्चं जैनमंदिर ही जस्ट ५-१० मिनिट जाउन यायची ठिकाणं आहेत. सिद्धेश्वर तलावाच्या बाजुचा घाटावरचा गणपती देखील असाच आहे. अजुन ह.दे.प्रशाला बघा, आजकालचे शिक्षणसम्राट तेवढ्या जागेत १२-१४ संस्था उभ्या करतील

खाण्यापिण्याचं म्हणाल तर खरंच सोलापुरसारखी ओरिजनल जागा नाही...

सातरस्त्याजव़ळ राजमहाल मध्ये इडली खायला जा, तिथं तेलमसाला वेगळा मिळ्तो चटणीवर घालुन खायला, तिथुन रंगभवनकडं येताना इंडिया टि हाउस आहे, फक्त चहा घेउन जरा लांब जावं लागतं. पुढं विजापुर वेशीत २-३ पायनापल कोल्डिंकची दुकानं आहेत ती ट्राय करा.

सावरकर मैदानावर पैलवान कडचं आइस्क्रिम खा, तिथुन पुढं बागेच्या गेटसमोर सिद्धेश्वरमध्ये चहा प्या इथं केटी घ्या, नुसता चहा नको.

वर सांगितलेली भैयाची भेळ हा आमच्या शाळेच ऑफिशियल पाणीपुरी वाला होता, अगदी शाळेच्या कॅम्पसमध्ये होता तो. डिस्कोभजी हा प्रकार ओरिजनल साखर पेठ आणि भवानी पेठेत मिळेल्,पार्कवर ठिक आहे.

चादरी बद्दल सगळ्यांनी सांगुन झालंय, पुर्वभाग राम मंदिराच्या जवळ चाटलांच शोरुम् आहे तिथं जाउन या.

व्हेज जेवणासाठी स्टेशनच्या थोडंसं पुढं सुगरण आहे, सोलापुरी शेंगाच्या पोळ्या आणि खवाच्या पोळ्या खाउन या तिथं. नाश्ट्याला, मधला मारुतीच्या जवळ अप्पा हलवाई कंडं एक पुरी भाजी आणि एक प्लेट कुंदा खाउन या.

स्वताचया गाडीनं जाणार असाल तर, सोलापुरच्या अलीकडं लांबोटीला चिवडा, कुंदा आणि बाकरवड्या घेउन या. फक्त दुधातला चहा ही तिथली स्पेशलिटि आहे.

 

सोलापूर म्हंजे मजाच मजा. भरपूर खाणं आणि चित्रपट बघणं. जर का सुभाष चौकातल्या कुठल्या हॉटेलात राहिलात तर बर्याच गोष्टी पायी फिरून बघता येतील. किल्ला समोरच आहे. बाजारपेठा, पार्क मैदान, सिद्धेश्वर देऊळ, ह्दे प्रशाला, संगमेश्वर कॉलेज, वारद बंगला अर्थात ईंद्रभुवन अर्थात सोलापूर (म्?)न.पा.कार्यालय, आणि भरपूर टॉकिजेस.

सोलापूर म्हंजे खायला पर्वणी. सुप्रजा, स्वाद,नट्स चाट चा ठेला पण मस्त. त्याच्यानंतर दत्ताच्या देवळाजवळ आलं की आनंदाश्रम होतं. तिथला डोसा उर्फ दोसाई अफलातून होता.किल्ल्यासमोर रस्त्यावर्च्या गाड्यांवर चटणी सँडवीच प्रचंड भारी!!! आता मिळतं का कल्पना नाही. पूर्वी हाटेलातली जेवणं पण मस्त होती, अजूनही बर्यापैकी घरगुती चव टिकून आहे. अर्थात मागच्या ३ वर्षातले बदल माहीत नाहीत. पार्क मैदानाजवळ दूध पंढरीचे पेढे आणि फ्लेवर्ड दूध जरूर प्या.बाजारपेठेत दाणे खात खात भटका. लक्ष्मी मंडईत जा. माणिक चौक, सहकार पेठपर्यंत पायी फिरा.

पूर्वी मी लकी (बंद झालं),गदग ग्रँड (मजा गेली आता), मुक्ताई मिठाई इ. ठीकाणी मनमुराद खाल्ले आहे. तेंव्हा सकाळी सकाळी गरम गरम ईडली, द्वाशी आणि वडा सांबार देणारी एक गाडी लागायची. तूफान मजा यायची सकाळी सकाळी ते खाताना.

मस्त शहर आहे आणि मस्त लोकं आहेत.

 

ह्या चादरी (जेकार्ड म्हणतात) पेटंटेड सोलापूर चादरी म्हणून्च आहेत. सोलापुरातच बनतात. कॉटन असते. वापरायला अन धुवायला सोप्या असतात. उबदार असतात. तुलनेने स्वस्त असतात. सुंदर डिझाइन्स असतात. वेगवेगळ्या आकारात अन जाडीत मिळतात. मुख्य म्हणजे खूप कारागीरांना रोजगार मिळतो. हुश्श्श्श. झाले मार्केटिंग.
आता सल्ला. सोलापूर चादरी या नावाने दुसरीकडे ही तयार होतात. तो दर्जा नसतो. सोलापुरातील ४-५ मिल्स चे आउटलेट पुण्यामुंबईत आहेत. बरेच जण येथून नेऊन तिथे विकतात. व्हरायटी सोलापुरातच पहायला मिळते. अस्सल दर इथे कळेल, सोबत बेडशीट्स, वॉल हँगिंग, टॉवेल, नॅप्कीन्स, कुशन कव्हर पण असतात. तुम्हीच ठरवा काय करायचे ते.
सोलापुरात पुलगम चे मार्केटींग जोरात आहे पण अस्सल चादरी चिल्का, क्षीरसागर, गांगजी हे तयार करतात. एमेच १२ - १४ गाड्या दिसल्या की रेटमध्ये फरक पडणार. ;) रिक्शाने जावा. जमत असेल तर सातारी बोलीत बोला. फरक पडेल.

 

 http://www.misalpav.com/node/31913

प्रस्तावना :
जुलै २०११ मध्ये पंढरपूर आणि गोंदवले येथे गेलो होतो. त्या सहलीचे वर्णन या अधिक महिन्याच्या निमित्ताने देत आहे ..( या अगोदर वर्डप्रेसमध्ये आणि इतर ठिकाणी प्रकाशित केले आहे.) त्यावेळेस फोटो काढले नव्हते परंतू वर्णनातून ती कमतरता भरून निघेल अशी आशा करतो. पंढरपूर - गोंदवले रेल्वेने पर्यटन: -दोन रात्री एक दिवस. -:

गाभा :-
पंढरपूर ठिकाणे : सर्वसाधारण नकाशा.

११ जुलैला (२०११)आषाढी एकादशी होती. वारीच्या बातम्या पेपरात जूनपासून येत होत्या. आपण दुसय्रा राज्यांत जाऊन देवळे पाहात फिरतो आणि आपले पंढरपूरच पाहात नाही असा एक विचार मनात आला. हजार वर्षांपेक्षा अधिक याचे ऐतिहासीक उल्लेख आहेत. आम्ही काही चालत आळंदीच्या पालखीत अथवा आमच्या डोंबिवलीच्या वारीत जाणार नव्हतो. बस अथवा रेल्वेनेच जाणार होतो. पंढरपुरात दर्शनासाठी बराच वेळ लागतो हे ऐकून होतो.येथे धर्मशाळेत राहाणे जमेल का हापण एक प्रश्न होता .त्याप्रमाणे आयोजन करणे गरजेचे होते. सातारा,पुणे आणि सोलापूर या तिन्ही ठिकाणाची चाचपणी केली. वाचनालयातून काही पुस्तके आणली. ( माहितीस्रोत : "सचित्र पंढरपूर"- यशवंत रामकृष्ण ,१९६८.) वेळापत्रक आणि गाड्यांचे आरक्षण तपासले. जवळची ठिकाणे कोणती करता येतील याचा अंदाज घेतला.पंढरपूर थेट गाडीचे (५१०२७)आरक्षण संपले होते ,विजापुर गाडीचे (५१०२९)कुर्डुवाडीचे मिळाले.येताना गोंदवले मार्गे साताय्राला येऊन तिसय्रा दिवशी कोयना गाडी(११०३०) मिळणार होती.

.

आताचे २०१५चे कुर्डुवाडी ते पंढरपूर रेलवे टाइमटेबल-

.

पंढरपूर थेट गाडीचे वेळापत्रक-

.

कुर्डुवाडीस सकाळी जाणाय्रा गाड्या-

.

दर्शनाला वेळ लागला तर गोंदवले न करता साताय्राहून परत असं ठरलं. पत्नी आणि मी असे दोघेच जाणार होतो. २७जून २०११(ज्येष्ठ कृ एकादशी) रात्री पावणे बाराला कल्याणला गाडीत बसलो. ही जोडगाडी आहे. पुढचे बारा डबे विजापूर/पंढरपूर ५१०२९/५१०२७ चार /तीन दिवस जाणाऱ्या गाडीलाच मागचे सहा डबे शिर्डी ५१०३३ रोज जाण्यासाठी जोडलेले असतात. दौंडला गाड्या वेगळ्या करतात.त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ ठरलेलाच.
कुर्डुवाडीला गाडी दोन तास उशीरा पोहोचली.८.५०ची सोलापूर-कोल्हापूर इक्स०निघून गेली होती.पावणे दहा वाजले होते.बाहेर पडून पंधरा मिनीटे चालत डेपो गाठला. सवा दहाला पंढरपूर बस मिळाली आणि सवा अकराला उतरलो. पंढरपुरचा हा नवा डेपो छान आणि प्रशस्त आहे.सुलभची सोय आहे.प्रभु अण्णांच्या हॉटेलात भरपूर खाऊन घेतले. पोटोबा झाला आता विठोबा करायला निघालो. देऊळ येथून पंधरा वीस मिनीटांवर आहे असे कळले.बॅगज घेऊन चालत निघालो.सावरकर चौकाजवळून धर्मशाळा बघत चाललो. एकदा सामान आणि मोबाईल ठेवले की देवळात जाणे सोपे होणार होते.कैकाडी महाराज मठातले पुतळे आम्हाला पाहायचे नव्हते.एका धर्मशाळेत गेलो.बय्राच खोल्या दिसल्या दारापाशी चारपाच जण रांग पकडू न बसले होते.खोल्या एक तारखेपासून प्रतिपदेपासून देणार होते! ती रांग त्यासाठी होती! मग दुसय्रा एका ठिकाणी हेच उत्तर मिळाले.विचार केला अजून एका ठिकाणी पाहू. तिसय्रा ठिकाणी ‘शंकर महाराज वंजारी धर्मशाळे’त मात्र अगोदरच आम्हाला बॅगा ठेवायच्या आहेत खोली नकोय हे सांगितले.तिथल्या बाईंनी लगेच एक भिंतीतले कपाट उघडून दिले आणि वीस रुपयांची पावतीपण दिली.बॅगा, पर्स मोबाईलसकट ठेऊन त्याला आमच्याकडचे कुलूप लावल्यावर आम्ही मोकळे झालो. तिकडे सर्व धर्मशाळांची यात्रेच्या काळात खोल्या देण्याची तारीख ठरलेली असते. येथून चालत पश्चिमेकडून पूर्व दरवाजावरून येथे प्रवेश आहे. (प्रथम देवळात न जाता )समोरच्या चंद्रभागेच्या महाद्वार घाटावर आलो. जर तुम्ही बस डेपोकडून रिक्षाने आलात तर तुम्हाला येथे घाटाकडे जाणाय्रा चौकात (चार रस्ता,कमान) सोडतात.’येथे प्रथम चंद्रभागेत पाय धुवून पुंडलिकाचे समाधि दर्शन घ्या नंतर देवळात जा ‘ सांगेल.आम्ही तिकडेच निघालो.चौकातून उताराने पुढे गेले की चंद्रभागा नदी आणि थोडे पाण्यातच पुंडलिकाचे मंदिर,शंकराचे मंदिर आहे.बाजूला एक दगडी होडी आहे तिथे समाधि आहे. बस मधून येताना चंद्रभागेच्या पुलावरून नदीत भरपूर पाणी दिसते कारण तिकडे एक बंधारा बांधून पाणी अडवून ठेवले आहे.यात्रेच्यावेळी घाण झाली की पाणी सोडतात. हल्ली रोज दोन हजार,एकादशीला दहा हजार आणि आषाढीला आठ लाखतरी भाविक येतात.गावाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छतेवर ताण पडतो.त्यामुळे या दृष्टीने आणि निव्वळ भक्तीनेच नदीकडे,गावाकडे पाहाण्याचे ठरवले.वाळवंटातला एक कुत्रा भाकरी घेऊन पळतोय आणि नामदेव लोण्याची वाटी घेऊन त्याच्यामागे धावतांना दिसले. पुंडलिक आईवडिलांची सेवा करताहेत,पैलतिरावर रुक्मिणीचा रुसवा काढायला निघालेले देव पुंडलिकाच्या दारात फेकलेल्या विटेवर कमरेवर हात ठेऊन वाट पाहात थांबले आहेत हे चित्रही डोळयासमोर आणायचा प्रयत्न केला. आता मात्र नाकाला दुर्गंधि जाणवू लागली होती. दर्शनाला किती वेळ लागणार याची चिंता वाटू लागली.
एकादशीला अजून सतरा दिवस होते आणि गर्दी अजिबात नव्हती. आपण जे आता पुंडलिक मंदिरा पलिकडच्या तीरावर गाव पाहातो ते जुने पंढरपूर गाव.तिथेच पूर्वीचे मिटरगेज रे० स्टेशन होते. भाविक तिकडे उतरून नावेने इकडे यायचे.नावेचा धंधा महादेव कोळयांकडे होता.पुंडलिक त्यापैकी एक. पुढे शेठ हिराचंद यांनी १९२६ मध्ये नदीवर पुल बांधल्यावर नावाड्यांचा धंधा बुडाला. सात आठ वर्षांपूर्वी मिरज-कुर्डुवाडी ब्रॉडगेज रेल्वे आणि नवीन जागी स्टेशन झाले. भीमा नदी उगम पावते भीमाशंकराच्या डोंगरात पुणे जिल्हयात. पुढे तिला भामा,इंद्रायणी,कुकडी,मुळा मुठा,घोड आणि नीरा नद्या भेटतात तीच ही पंढरपूराची चंद्रभागा. येथे एकूण चौदा घाट आहेत.
१)लखुबाई
२)दिवटे
३)खिस्ते
४)कबीर
५)उध्दव
६)दत्त
७)कुंभार
८)अमळनेर
९)अहिल्याबाई
१०) महाद्वार येथे पुंडलिक मंदिर आहे
११)कासार
१२)चंद्रभागा
१३)मढे आणि
१४)खाका पुंडलिक मंदिर पाहून आता चौकाकडे चढून जातांना उजवीकडे अहिल्याबाईनी बांधलेला वाडा आणि आत राम मंदिर आहे ते पाहिले. समोरच एक द्वारकाधिश मंदिर आहे. हे बांधले शिंदेसरदारांनी. तिथून चौकात आलो. समोर गेलो तर देऊळ,डावीकडचा रस्ता जातो जुन्या वस्तीत आणि पुढे जनाबाईच्या गोपाळपूरला. इकडे नंतर जाणार होतो.या रस्त्यावर दुसय्रा बोळात(बारीक रस्ता)लाड पेढेवाल्यानंतर आहे संत नामदेव मंदिर. पुढच्या धर्मशाळेमुळे झाकले गेले आहे.मंदिर खरेतर केशवराजाचे आहे. याठिकाणची व्यवस्था नामदेव समाज पाहातो. नामदेवाचे मूळ घर गावात दुसरीकडे आहे. पंढरपूरच्या विठठलाचे महत्व वाढले ते त्याची भक्ती करणाय्रा संतांमुळे. हा देव आहे भावाचा भुकेला. त्याला भक्ताचे मन मोडवत नाही.रुक्मिणीची समजूत काढायला जातांना वाटेत पुंडलिकासाठी तिकडेच थांबला. पुंडलिक,नामदेव,ज्ञानेश्वर, एकनाथ,तुकाराम,जनाबाई,चोखामेळा,सावतामाळी, दामाजी आणि पुरंदरदास या सर्व संतांचे विठठलाशी नाते आहे.कुणासाठी माऊली,तर कुणासाठी मायबाप, बा ईट्टल,पाडुरंग, पुंडरिक,भगवंत ,श्रीहरी झाला आहे.
म्हणून संतांच्या दर्शनानंतर आता विठ्ठलाला भेटायचे. चौकातून परत देवळाच्या पूर्व प्रवेशाकडे निघालो.रस्त्याच्या दोन्ही बाजूस पेढे ,लाह्या,फुले,तुळशीमाळेची दुकाने आहेत.दुकानदारांनी सांगितले की फक्त तुळशीचा हार आत नेऊ देतात बाकी आल्यावर घ्या.यात्रेवेळी पाच लाखांवर भाविक कसे काय इथे मावतात?बरेच दुरून केवळ कळस पाहून माघारी जातात. आता देवळापाशी आलो.डावीकडे एक चार मजली नवीन उंच इमारत आहे.तिचे खालचे फाटक बंद होते! गर्दी झाली की यातूनच फिरत फिरत जावे लागते ते थेट चौखांबी मंडपातून चरणस्पर्श करता येतो.दोन अडीच तासांची निश्चिती.अथवा तुम्हाला मुख्य दारातूनही ‘मुखदर्शना’साठी दहा मिनीटांत फक्त सोळाखांबी मंडपापर्यंतच जाता येते, मूर्तीचे मुख लांबूनच पाहाता येते.आज अनपेक्षित धक्का होता मुख्य दारातूनच चरणस्पर्शला आत जायला सांगितले.संतांची कृपा.काल एकादशीला खूप गर्दी होती असे कळले. पहिली पायरी नामदेवाची.नामदेवाची इच्छा होती की समाधी नंतर त्याची पायरी बनवावी म्हणजे भक्तांचे पाय लागतील. नामदेवाबरोबरच चौदा जणांनी समाधी घेतली. चौदा पायय्रा आहेत .नामदेवाची इच्छा अपूरीच ठेवण्याची पूर्ण काळजी घेतली आहे -पायरीला पाय लावू देत नाहीत.बाजूने वर चढलो. दोन महिला पोलीसांनी पत्नीचे स्वागत केले ‘माउली इकडे या’, पुरुष पोलीसांनी मला ‘मामा इकडे या’. आम्ही अगोदरच मोबाईल,पर्स बैगा ठेवून आलो होतो.तपासणी करून आत सोडले. खरं म्हणजे हे देऊळ नवव्या शतकात पांडुरंगपल्ली नावाचे शंकराचे होते.त्याच्या खुणा आजही जोत्यावर दिसतात.अकराव्या शतकात मुसलमानी सुलतानांचे हल्ले देवळांतील मूर्तींवर होऊ लागले त्यावेळी मूर्ती लपवून ठेवायचे अथवा दुसरीकडे पाठवायचे.इथेही हेच झाले.शंकराचे देऊळ झाले विठ्ठलाचे.आताच्या मूर्तीच्या जागी दुसरी होती.असो. रांगेत कानडी भक्त बरेच होते.पाउण वाजला होता.रांग भराभर सरकली.मुक्ती मंडप,मोठा चौक पार करून सोळाखांबी मंडपात आलो.आजुबाजूची चित्रे रांगेतूनच पाहून समाधान मानले. चौकात गरूड आणि मारूती आहेत. एक खांब चांदीने मढवला आहे याला गरूड खांब म्हणतात. कर्नाटकातल्या हम्पिची विठ्ठलमंदिरातली मूर्ती सोळाव्या शतकांत मुसलमानांच्या आक्रमणाच्या वेळी इथे आणल्यावर तिकडचा एक भक्त आणि संतकवी पुरंदरदास इथे आला आणि याच गरूड खांबाला टेकून बसायचा.या मंडपातून आतल्या मंडपात जाण्याच्या दारावरच्या पितळी पट्टीवर एक लेख आहे. आतमध्ये चौखांबी मंडपात कर कटावरी ठेवूनिया विठ्ठल उभा दिसला.एका आडव्या पितळी मढवलेल्या लाकडी तुळईखालून वाकून पुढे जावे लागते (सर्व विठ्ठल मंदिरात असतेच). भक्तांनी मूर्तीकडे पाहात फार वेळ घालवू नये म्हणून एक महिला पोलीस प्रत्येक ‘माउली’चे आणि पुरूष पोलीस ‘मामा’चे डोके श्रीचरणावर लगेच टेकायला लावतात. तिथे जागापण चिंचोळी पाच सात फुटांचीच आहे.त्यामुळे पुढे सरकावे लागले.मला मूर्ती नीट पाहायची होती,कवचकुंडले आणि वीट. दहा सेकंदात काही शक्य नव्हते.शीरावर मुकुट असला तरी टिव्हिवर महापुजा दाखवतात त्यावेळी पाहिले होते की गुराखी अथवा गवळी कापडी टोपडे घालतात तशी आहे.कृष्णावतारात देव गुराखी झाला होता नं. बाहेर उजवीकडे जाताना रुक्मिणीचे देऊळ आहे. इथे जरा सावकाश दर्शन करता येते. पौराणिक कथेप्रमाणे रुक्मिणी पैलतिरावरच्या ‘दिँडिकारण्या’तच रुसलेली आहे तिकडे खरंच एक मूर्ती आहे म्हणतात.इकडची कृत्रिम आणि देवळाला न साजेशी आहे.रुक्मिणीच्या मंडपाशेजारी दोन देवघरे आहेत सत्यभामा आणि राही (?)चे आणि एक शेजघर देवीचे आहे.विठ्ठलाला आणि रुक्मिणीला सरदारांनी खूप दागिने दान केले आहेत. हे रोज बदलून मूर्तीवर घालतात.[हे सर्व दागिने २०११साली आषाढी एकादशीच्या अगोदर स्टार माझावर दाखवण्यात आले होते,यावर्षी २०१३ जूनमध्ये देवस्थान समितीनी सांगितले की सर्व चोरीला गेले आहेत ??!!] रुक्मिणी मंदिरातून घाईने बाहेर पडलो पण नंतर आठवले की तिथल्या काही गोष्टी पाहायच्या राहून गेल्या.त्यागोष्टी म्हणजे ‘चौऱ्यांशी’चा शिलालेख,नवग्रहांची शिळा, आणि कान्होपात्रा गुप्त होऊन तिचे झाड झाले ते दगडातील झाड.रुक्मिणीचा थाट नवरात्रांत अश्विन महिन्यात आणि कार्तिकात असतो.हिचे पुजेचे हक्कदार अथवा वहिवाटदार ‘उत्पात’ तर विठ्ठलाचे ‘बडवे’ आहेत . .
पंढरपूर हे एक नवीन क्षेत्र आहे.पुराणांत सप्त पुय्रांचा आणि काही नगरे,तलाव,कुंडांचा उल्लेख आहे त्यात पंढरपूर नाही.अकराव्या शतकात केव्हातरी विठ्ठलाची मूर्ती आल्यावर गावाचे महत्व वाढू लागले असावे.वैकुंठ,दक्षिण काशी आणि पुढे ज्ञानोबांच्या नंतर संतांचे माहेर झाले. आंध्रचे लोक पंडरिपुर म्हणतात. इकडे चार मोठया वाय्राअथवा यात्रा होतात आषाढी,कार्तिकी,माघी आणि चैत्री.शिवाय इतर सणावारीही भाविक श्रीमुख पाहाण्यास गर्दी करतात .इतर देवळांप्रमाणेच इथेपण हरिजनांना प्रवेश नव्हता. साने गुरुजींनी हे बदलायला लावले.देवळाला उत्पन्न रोख आणि वस्तु रुपाने बरेच येते.रोख रोज मोजून घेण्याऐवजी बडवे आदल्या दिवशी संध्याकाळी दुसय्रा दिवसाची बोली लावून तेवढी रक्कम जमा करतात.
दीड वाजला होता.पटकन चौकातून नामदेवमंदिरापाशी आलो.ऑटोरिक्षा करून(तीस रु)गोपाळपूरला आलो.हे गाव चंद्रभागेकाठीच तीन किमीवर मंगळवेढा रस्त्यावर आहे.वाटेत जातांना यात्रेसाठी रांगेकरता बांबूचे कुंपण बांधतांना दिसले.दर्शनरांग चार पाच किमी लांबते असे रिक्षावालाने सांगितले. मंगळवेढा(वीस किमि) संत दामाजीमुळे (आणि माडगुळकर बंधु)तर गोपाळपूर संत जनाबाईचे स्थान म्हणून प्रसिध्द झाले.ही एक किल्लेवजा जरा उंच अशी गढी आहे.येथे जनाबाईचे दगडी जाते(?),रांजण,रवी या वस्तु आहेत.एक कृष्णाचे देऊळ आहे.शुकशुकाट होता.मंगळवेढ्याकडून येणाय्रा एका बसने परत आलो .हा रस्ता विठठलमंदिराच्या मागून सावरकरचौकाकडे जातो .बरीच नर्सींग होम्स,हॉस्पिटल्स इकडे दिसली.हवीच ना एवढे यात्रेकरू येणार तर.कंडक्टरने आम्हाला धर्मशाळेच्या मागच्या बाजूस जवळ उतरवले.आमचे लॉकरमधले सामान ताब्यात घेतले आणि लगेच बस डेपो गाठला.
तीन वाजलेले.चहा वडा खाऊन गोंदवले बसची वाट पाहात थांबलो. साडेतीनला बस सुटली.म्हसवडमार्गे ८०किमी आहे. वाटेत दोन तीनच गावे लागली.वाहने,रहदारी फार नाही.मोकळा माळरानाचा मैदानी फार झाडी नसलेला ओसाड भाग आहे.थोडा पाऊस झालेला असल्यामुळे प्रवास जाणवला नाही.सवापाचला गोंदवले आले. गोंदवले मोठे गाव आहे.रस्त्याच्या उजवीकडे एक कमान दिसते.’ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराज संस्थान’येथून आत गेल्यावर मोठ्या आवारात रामाचे देऊळ,कार्यालय आणि लहान मोठे भक्त निवास आहेत. प्रथम कार्यालयात खोलीसाठी नोंदणी केली.नि:शुल्क आहे .”इथले नियम काय आहेत?” “काही नाहीत फक्त रामनाम घ्या. रामाच्या देवळातला नित्य कार्यक्रम फलकावर आहे .चहा,नाश्ता,भोजनाच्या वेळा लक्षात ठेवा.” खोलीत सामान टाकून आंघोळ करून तयार झालो.खोली साधी पण नीटनेटकी होती.शांत वातावरण.रामाच्या देवळात गेलो.छान देऊळ.काही भजन वगैरे होते.दर्शन घेऊन बाहेर आलो.
चहाची वेळ निघून गेल्यामुळे रस्ता ओलांडून समोरच्या एका हॉटेलात गेलो.मालक फार बोलका आणि अगत्यशील होता.लगबगीने भजी चहा आणला.डबल चहा पोटात गेल्यावर जरा बरं वाटलं. नाक्यावर आलो आणि तिथे लावलेला नकाशा पाहिला. जून महिना असल्यामुळे सात वाजले तरी अंधार झाला नव्हता.नकाशात दाखवल्याप्रमाणे दहिवडीच्या रस्त्याने पुढे उजवीकडे एक रस्ता गावात जातो तिकडे गेलो.चार दोन घरांनंतर एक देऊळ आले. ते पाहून पुढे काही दिसेना म्हणून मागे फिरलो तर एका घरातून आवाज आला ‘दादा मागे कशाला फिरताय? असेच पुढे जा आणि गोल वळसा घेऊन तिकडेच मोठ्या रस्त्याला लागाल. भाऊंचे आभार मानून पुढे निघालो.बैठी घरे आहेत आणि छान गावचे वातावरण आहे.कडुनिंबाची झाडे आहेत.गोंदवले महाराज संसारी संत होते.त्यांचे सर्व आयुष्य या गावात गेले.त्यांचे कुटुंब थोडे सधन होते.तरुणपणी त्यांना घरातल्या जिन्यावर रामाचे दर्शन झाले असे म्हणतात.रामनाम,भक्ती आणि सोपी प्रवचने यामार्गे ते भक्तांच्या स्मरणात राहिले आहेत.त्यानी चमत्कारांनी लोकांना देवाचे महत्व पटवले नाही. पुढे धाकटे राम मंदिर,मठ,मारुती,थोरले राम मंदिर,महाराजांचे घर आणि संग्रहालय पाहून परत आलो.छान ठेवले आहे.इथल्या सर्व गोष्टी त्याच्या जीवनाशी निगडीत आहेत. आज पंढरपुरातल्या भक्तिमय गजबजलेल्या वातावरणातून आता गोंदवल्याच्या शांत, रामनाम भरलेल्या परिसरांत आलो होतो. इथे वर्षभर सतत भक्तगण येत असतात. आवारातले भक्तनिवास, स्वच्छता आपल्या मनावर परिणाम केल्याशिवाय राहत नाही. महाराजांनी व्यक्तिपुजा, मठ याचे स्तोम वाढवले नाही. आपण येथे येतो रामाच्या मंदिरात. हे फारच आवडले. रात्री साडे आठला भोजनशाळेत गेलो. उत्कृष्ट व्यवस्था, सुग्रास भोजन, सेवेकऱ्यांचा नम्रपणा इथे लगेच जाणवतो. राहाणे, खाणे, पाणी, वीज सर्व खर्च संस्थानाकडून आणि देणगीदारांच्या अव्याहत पाठिंब्याने होतो. जरा कुठे अहंपणाचा लवलेश असेल तर तो इथे आल्यावर राहाणारच नाही. दिवसभर फिरल्यामुळे रात्री छान झोप लागली .
पहाटे उठून तयार होऊन (प्रत्येक मजल्यावर गरम पाण्याचे नळ आहेत) रामाच्या मंदिरात जाऊन आलो. आज आमचे सातारा स्टेचे कोयना एक्सप्रेस (११०३०)चे रेझ0न होते त्यामुळे निघणे गरजेचे होते पटकन समोरच्या हॉटेलात चहा वडे खाऊन खोलीतले सामान काढले. एका सेवेकऱ्याने अडवले. “का निघालात? आता नाश्ता चहा तयार आहे तो नाही का घेणार ?” “आमचे कोयनाचे तिकीट आहे .” आणि निरोप घेतला . रस्त्यावर कालरात्री पासून एक मुक्कामी दादर बस उभी होती ती साडेआठला निघाली त्याने चार किमिवरच्या दहिवडीला उतरलो . ही बस इंदापूर फलटण पुणेमार्गे दादरला जाते . दहीवडी डेपोला फलटणमार्गे पुणे जाणाय्रा बस खूप आहेत .सातारा सटे जाणाय्रा ( निढळ मार्गे ६५किमी ) कमी आहेत . नऊला इंदापूर सातारा बस आली . त्याने निघालो .तिकीट स्टेशन (माहुली स्टॉपचे) मिळाले नाही ,साताय्राचे दिले . वाटेत एक छानसा किल्ला(?) दिसतो . साडेदहाला कोरेगाव आणि कोरेगाव सटे स्टॉप आला . अगदी जवळ स्टे येते. कोयना गाडी येथेही (११.४५)थांबते. अकरा वाजता रेल्वेपूल, नदीचापूल गेल्यावर माहुली स्टॉप(=क्षेत्र माहूली )ला उतरलो. डावीकडे सात आठ मिनीटावर सातारा स्टे आहे.उजवीकडे माहुली गाव आणि नदी आहे.
अजून गाडीला तासभर अवकाश होता विचार केला नदीवर जाऊन येऊ. बॅगा घेऊन गावात घुसलो. “अहो तुम्हाला कुठे जायचे आहे?” “कुठे नाही, जरा वेळ आहे तर नदीवर जायचे आहे.” गावकय्रांनी रस्ता दाखवला. दहा मिनीटांत घाटावर आलो. दगडी पायय्रांचा सुरेख घाट, छानसे शंकराचे देऊळ होते. कोणीच नव्हते. पलीकडच्या तिरावरही एक मोठे शंकराचे देऊळ होते. थोडे दूरवरही नदीच्या वरच्या अंगाला एकसारखीच उंच कळस असलेली देवळे दिसत होती. पायय्रांवर बायका कपडे धूत होत्या.त्यांना माहूलीबद्दल विचारले. माहूली गाव साताय्रापासून दहा किमी आहे. हे ‘क्षेत्र माहूली’ आहे . इकडे कोणी फिरकत नाही. गावाचा थोडा भाग वर अगोदर आहे ते ‘संगम माहुली’. तिथे कृष्णा वेण्णा नद्यांचा संगम आहे. नंतर ती कृष्णा इथे येते. संगम ही खरी रम्य जागा असायला हवी पण तो घाट बनलाय मढं जाळायचा घाट. सातारा शहरात स्मशानच नाही. ते सर्व संगमावर जातात! क्षेत्र माहूली स्टेशन जवळआहे आणि चांगले आहे.भराभर पावले उचलून पावणेबाराला स्टेशनला आलो. बाराच्या कोयनाने सातला
दोन दिवस त्या भक्तिमय वातावरणातून वावरल्यावर आपल्याला पटतं की वारी करणारेनि का वारंवार जातात.आषाढ आला की दरवर्षी मनानेच तिथे पोहोचतो.

 

तपशीलवार आणि सहजसुंदर वर्णन.

खरं म्हणजे हे देऊळ नवव्या शतकात पांडुरंगपल्ली नावाचे शंकराचे होते

हे शंकराचेच कशावरुन? आणि तेथे शिवमंदिराच्या कुठल्या खुणा दिसतात?
शके ४३८ च्या एका ताम्रपटात पाण्डरंगपल्ली, जयदिठ्ठ व पंडराद्रिशेन असे काही शब्द डॉ. ग. ह. खरे यांनी निदर्शनास आणून दिले होते. शिवाय भागवदधर्म त्याही आधीपासून प्रचलित होताच. अर्थात तत्कालीन काळात विठ्ठलाची मूर्त भक्ती चालू होती का अमूर्त याबाबाबत नक्की सांगता येत नाही.

डॉ. शं गो. तुळपुळे यांना शके ११११ चा एक शिलालेख विठ्ठलाच्या पश्चिम द्वारासमोरील सार्वजनिक मुतारीच्या पायरीच्या दगडावर मिळाला. सध्या ह्या शिलालेखाची शिळा डायरेक्टर ऑफ अर्काइव्ह्ज यांच्या मुंबई येथील कचेरीत ठेवलेली आहे.

शिलालेखाचे वाचन असे.

सालवण सुरि ११११ सौ-
म्ये दिव | सुक्रे सम-
स्तचक्रवर्ति | मा -
हाजनिं | देवपरि -
वारे | मुद्रहस्तेहि अवघावें ला विठ -
लदेउनायकें || ए -
हि अवघावें लान
मडु ऐसा | कोठारीं
वाढसि जें | जा ती वी -
चंद्रु || हे क -
वणई न ठावें | स-
प्त | मुख्य संप्रति |
कवणु अतिसो देई तेआ-
सी विठलाची आण
ए काज जो फेडि
तो धात्रुद्रोहि |
--| कर्म |

आशय-
शालिवाहन सौर शक ११११ सौम्य संवत्सरी, शुक्रवारी समस्तचक्रवर्ति (पाचवा भिल्लम), महाजन, देवपरिवार, मुद्रहस्त विठ्ठलदेवनायक या सर्वांनी हे लहान असे देऊळ (लान मडु) स्पातिले. ते कोठारांतून वाढवावे. चंद्र जात विचारतो हे कोणासही ठाऊक नाही. (त्याप्रमाणे हे देऊळ लहान असले तरी त्याचा प्रतिपाळ सर्वांनी करावा. सांप्रत देवळाअचे मुख्य सात जण आहेत.. जो कोणी ह्या देवळास पिडा देईल (अतिसो) तो धात्रुद्रोही.

ह्याचा नंतरचा दुसरा शिलालेख येतो तो पंढरपूरचा प्रसिद्ध असा ८४ चा शिलालेख. हा शिलालेख शके ११९५ साली कोरला गेला जो ह्या मंदिराच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त होता म्हणूनच त्याचे नाव चौर्‍याऐंशीचा शिलालेख असे पडले. हा लेख रामदेवराव व त्याचा श्रीकरणाधिप हेमाद्रीपण्डित याने कोरविला. रामदेरायाने लान मडुची वाढ करुन मंदिराचा जीर्णोद्धार केला.

यादव राजवट संपुष्टात आल्यावर १३ व्या शतकात मलिक काफूरचा घाला इकडील मंदिरावर पडला व मंदिराचे स्वरूप नष्ट झाले. आज आपण जे मंदिर बघतो ते शिवकाळ व किंवा त्यानंतरचे आहे.

 

 

करमाळा आणि किल्ले परांडा

बरेच दिवस जायचं जायचं म्हणत ह्या महिन्यात अंबेजोगाईला जायचा योग आला. पुणे अंबेजोगाई प्रवासात नेहमीची वाट सोडून आडवाटेवरच ठिकाण म्हणून करमाळा बघायच ठरवल. पुण्याहून सोलापूर हायवेवर साधारण १०० किलोमीटर गेल्यावर भिगवणला फाटा लागतो तिथून ६० किलोमीटर वर करमाळा आहे. सोलापूर जिल्हातील एक तालुक्याचं ठिकाण असलेल करमाळा एक छोटस गाव आहे. सुरवातीच्या काळात बहामनी साम्राज्याचा भाग असलेले करमाळा नंतर नगरची निजामशाहिच्या अमलाखाली होते. निजामशाही सरदार रावरंभा निंबाळकरांची जहागीर असलेले करमाळा प्रसिद्ध आहे ते इथल्या कमला भवानी किंवा कमळजाइ मंदिरासाठी.
Pune Karmala Mp

कमला भवानीच मंदिर गावाच्या बाहेरील ओसाड अश्या माळावर आहे. मंदिरच वैशिष्ट्य म्हणजे इथे चक्क दाक्षिणात्य शैलीशी मिळतीजुळती गोपुरे आपले मंदिर प्रांगणात स्वागत करतात. महाराष्ट्रातील खूप कमी मंदिरात अशी गोपुरे बघायला मिळतात. शैलीतील हा बदल खरतर पिढीतील बदलामुळे झालाय. मुख्य मंदिर बांधल (कदाचित जीर्णोद्धार केला) सरदार राजे रावरंभा ह्यांनी तर बाजूची तटबंदी आणि हि गोपुरे बांधली त्याच्या मुलानी म्हणजे राजे जनकोजीनि. जनकोजी दक्षिणेच्या स्वारीवर असताना तिकडची मंदिरे आणि भव्य गोपुरे पाहून प्रभावित झाला आणि त्यांनी तिकडचे कारागीर करमाळ्यात आणून सुंदर गोपूर बांधून घेतली.
Gopur1

gopur 2
मूळ मंदिर चारही बाजूनी भक्कम दगडी तटबंदीनी वेढलेले आहे. तटबंदीच्या आतील बाजूस सुंदर दगडी ओवऱ्या आहेत आणि पूर्ण अंगणाला दगडी फरसबंदी केली आहे. मंदिरा समोर होमकुंड आणि तीन गगनचुंबी दीपमाळा आहेत. मंदिराची शैली हेमाडपंथी आहे असा उल्लेख सगळीकडे असला तरी त्या शैलीची वैशिष्ट्ये ठळकपणे इथे पाहायला मिळत नाहीत जसे उंच जोते, मंदिराचा बाह्य आकार आणि त्यावरील नक्षीकाम इत्यादी ह्या मंदिरावर दिसत नाहीत. कदाचित हेमाडपंथी आणि इस्लामिक शैलीची सरमिसळ झाली असावी असे वाटते. दिपामालांचा प्रकार हि पारंपारिक मराठी नसून बराचसा इस्लामिक प्रभाव असलेला वाटतो. एक शक्यता अशी वाटते कि मुळ मंदिर हेमाडपंथी शैलीतील असावे आणि जीर्णोद्धार निजामशाही काळात झाला असल्याने हि शैलीतील सरमिसळ झाली असावी. अलीकडच्या काळातच सुंदर अशा दगडी मंदिराला ऑइल पेंट फासून त्याच्या सुंदरतेला दृष्ट लागणार नाही ह्याची काळजी देवस्थान trust नि घेतलेली दिसतीय.

Darvaja

Deepmal 1

Deepmal 2

मंदिराबद्दल आख्यायिका अशी सांगतात कि सरदार रावरंभा हा तुळजापूरच्या भवानी मातेचा निस्सीम भक्त होता वृद्धापकाळात त्याला तुळजापूरला दर्शनाला जाणे शक्य होईना म्हणून भवानीने त्याला दृष्टांत दिला कि मी तुझ्या मागे तुळजापुराहून करमाळ्याला येईन पण तू मागे वळून बघायचे नाही. रावरंभा गावाबाहेरील माळापर्यंत आला आणि त्याच्या मनात शंका आली. देवी खरच मागे येत आहे कि नाही हे पाहण्यासाठी त्याने मागे वळून पाहिले आणि देवी अंतर्धान पावली. त्याचठिकाणी हे मंदिर बांधले आहे. आता अशीच कथा मी मिरजेच्या अंबाबाई बद्दलहि ऐकली आहे, खरे खोटे ती भवानीच जाणे. कमला भवानी मातेची मूर्ती मात्र अतिसुंदर आहे.. काळ्याशार पाषाणातील हातात त्रिशूल आणि तलवार धारण केलेली अष्टभुजा मूर्ती डोळ्याचे पारणे फेडते. देवीच्या उजव्या डाव्या बाजूस शंकर व गणपतीची छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या अगदी समोरच एक शंकराचे अगदी छोटेसे पण सुंदर दगडी घुमटी सारखे देऊळ आहे आणि त्याच्या शेजारी कुणाची तरी समाधी. समाधीचा वापर सध्या गावकरी पत्त्यांचा फड लावण्यासाठी करतात. मंदिर परिसराच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ९६ पायऱ्यांची विहीर.
mandir

Shankar

कातीव दगडात बांधलेल्या ह्या अष्टकोनी विहिरीत पाणी जवळपास ५० ते ६० फुट खोलवर असेल. पण पाण्यासाठी त्या खोलीपर्यंत बांधलेल्या एकसारख्या सुरेख ९६ पायऱ्या आहेत. पुरातन काळापासून पाणी पुरवठ्यासाठी बांधलेल्या अशा विहिरी (step wells) भारतभर पाहायला मिळतात. ह्या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे हि अगदी दक्षिण उत्तर अक्ष ठेऊन बांधली आहे. उत्तरेकडून पायर्या आणि दक्षिणेला विहीर. ह्या अक्षाचा फायदा म्हणजे सुर्यभ्रमण पूर्वेकडून पश्चिमेकडे होत असल्यामुळे, पाणी आणि पायऱ्या दिवसभर जास्तीजास्त वेळ सावलीत राहतात फक्त भरदुपारी १२ वाजण्याच्या आसपास पाण्यावर सूर्यकिरण पोहोचतात. त्यामुळे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते आणि सावलीतील पायऱ्या वापरणेही सोयीचे होऊन जाते. भारतभर जवळपास सगळ्याच अशा विहिरी (step Wells) ह्याच संकल्पनेवर बनलेल्या दिसतात हे विशेष. आपल्या पूर्वजांचे वातावरणाला अनुकूल करून घेणारे design बघून थक्क व्हायला होते. अर्थातच आपण जशी अनेक पुरातन पाणवठा ची जशी वाट लावली आहे तशीच ह्या विहारीची देखील लावली आहे. पाणी उपसा नसल्यामुळे आणि कचरा टाकल्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. जवळपास सगळीकडे गवत पसरले आहे आणि ह्या ऐतिहासिक ठेव्याशेजारीच ग्रामपंचायतीने महिलांसाठी असलेले पण बंद असणारे स्वच्छतागृह बांधले आहे.

Step well 1

Stepwell 2

इतक्या सुंदर मंदिर आणि परिसरात फिरल्यानंतर आम्ही निघालो अंबेजोगाई च्या दिशेने. रस्त्यातच आम्हाला मिळाला आणखी एक ऐतिहासिक ठेवा ज्याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. किल्ले परांडा...
पण तो आता पुढच्या भागात....

 मुख्य मंदिराच्या बांधकामाची शैली बरीचशी यादवकालीन / हेमाडपंथई असावी असा वाटते. वापरलेले स्तंभ आणि मुख्य म्हणजे structural system हि त्याप्रकाची म्हणजे खांब आणि तुळई ( trabeated system ) ह्यांचीच आहे. पण सगळीकडे मंदिर सरदार राव रंभा नि बांधले असाच उल्लेख आहे जो पटत नाही. म्हणूनच अस वाटत कि मूळ मंदिर यादवकालीन असावे आणि निजामशाही काळामध्ये त्याचा जीर्णोद्धार झाला असावा. नंतरच्या बांधकामावर जाणवण्या इतपत मुस्लीम स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसतोय. 

 

 

गुरसाळयाची भग्न गढी .... भाग १




|| श्री ||
पंढरपूरच्या वायव्येला पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतरावर असणारे गुरसाळे हे गाव विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे . माझ्या लक्षात मात्र हे गाव राहिलं आहे ते तिथं असणाऱ्या एका जुन्या पुराण्या गढी मुळं. ( गढीचा अर्थ खाली दिला आहे .)
आम्ही दहावीत असताना आम्हाला शाळेच्या वतीने एक अभ्यास म्हणून हा कारखाना दाखवण्यासाठी नेण्यात आलं होतं . तेंव्हा हा कारखाना नुकताच सुरु झाला होता . ओसाड माळरानावर हा कारखाना उभा होता . फारशी बांधकामं आजूबाजूला न्हवती . हे गुरसाळे गावही तेंव्हा सध्या इतकं विकसित झालेलं नव्हतं . कारखाना बघून झाल्यावर तिथल्या पत्र शेडमध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी जेवण केलं मग कुणी ताणून दिली तर काही जण गाण्याच्या भेंड्या खेळत बसले . आम्ही चार पाच जण बाहेर टेकड्यांवरून भटकत आलो . अचानक पश्चिमेकडे काही अंतरावर आमची नजर गेली आणि एका टेकडीवर उभी असणारी किल्ल्यासारखी हि वास्तू दिसली . आमच्या भागात अशी वास्तू कधी दिसलेली नसल्याने आणि किल्ला हा प्रकार फक्त इतिहासाच्या पुस्तकातच बघितला असल्याने कुतूहलाने आम्ही त्या गढीच्या दिशेने निघालो . थोडे अंतर काट्या कुट्यातून चालल्यावर आम्ही त्या टेकडीवर असणाऱ्या गढी जवळ येउन पोहोचलो . एक भव्य दरवाजा त्याच्या दोन्ही बाजूला दोन मोठे बुरुज थोडी अजून टिकून असलेली तटबंदी आमच्या नजरेला पडली . दरवाजातून आम्ही आत शिरलो . दोन्ही बाजूला उंच जोती होती . मग थोडे वळण आणि पुन्हा एक प्रवेश द्वार होते . त्यातून पुढे गेल्यावर आम्ही एका भग्न पठारावर येउन पोहोचलो . जागोजागी भुयारे दिसत होती . भूयारांचे बांधकाम आतून चांगले दगडी दिसत होते . आत उतरायला पायऱ्या होत्या . आमच्या पैकी काही धाडसी मित्रांनी त्या भुयारात उतरून डोकावून पाहिलं आणि आत लांबपर्यंत जाणारा मार्ग असल्याचं सांगीतलं . शिक्षकांच्या भीतीनं आणि वेळेत परत जायचं असल्यानं भुयारात जास्त लांब जाण्याचा आमचा विचार आम्ही टाळला आणि नंतर परत कधी या भुयारात जाण्याचं ठरवलं . उंच टेकडीवर ती गढी असल्याने तिथून चारी दिशांना लांबवरचं दृश्य दिसत होतं . अग्न्येये कडे असणारं पंढरपूर . काही अंतरावरून गढीला वळसा मारून वाहत पुढे गेलेली चंद्रभागा. दुरवर पसरलेली आसपासची शेतं .. त्या उध्वस्थ गढी मध्ये पाण्याच्या सोयीसाठी असणाऱ्या दोन मोठ्या चौकोनी विहिरी पण दिसल्या . गढीच्या त्या परिसरात काही वेळ फेरफटका मारून आम्ही आमच्या निवासस्थानी परतलो . मात्र त्याचं वेळी आम्ही ठरवलं होतं कि पुढच्या वेळी खास ह्या गढी साठी एका रविवारी यायचं . 
काल काही कामानिमित्त कारखान्यावर आलो होतो तेंव्हा गढीच्या या आठवणी जाग्या झाल्या मग काम संपल्यावर गाडी गढीच्या दिशेने वळवली . योगायोगाने एक मित्र भेटले . त्यांनी गढी कडे नेलं. आता तिथे फक्त तो मुख्य दरवाजा उरला आहे . बुरुज तट काही काही उरलेलं नाही . जमिनीवर असणारी भुयारं तशीच आहेत . त्या भुयारात काही अंतर जाण्याचा आम्ही प्रयत्न केला . त्या भुयारात जाण्याचा प्रयत्न आम्ही शाळेच्या त्या दिवसातही परत एकदा केला होता मात्र त्या वेळी जो विचित्र अनुभव आम्हाला आला तो मी पुढच्या भागात सांगेन . 

भग्न गढी -भाग-2


|| श्री ||
भुयारातलं संकट ..
गढीतल्या भुयारात शिरण्याचा आमचा प्रयत्न पहिल्या वेळी वेळ कमी असल्याने आणि आम्ही सज्ज नसल्याने सोडून द्यावा लागला पण काही दिवसातच आम्ही गढीत परत जाण्याचे नियोजन केले . डिटेक्टिव्ह कथा वाचण्याचे ते दिवस असल्याने आणि फास्टर फेणे सारख्या कथा वाचून आमच्याही डोक्यात असले काही धाडस करण्याचा किडा वळवळत असल्याने आम्ही आमच्या पद्धतीने तयारी केली . दोन तीन एव्हरेडीच्या ब्याटऱ्या एक दोन चाकू ( अंगावर काही आलं तर सौरक्षण नको का ? ) , पायात त्यातल्या त्यात बरे बूट ( आत साप असले तर काय करायचं ? ) आणि हो एका मित्रानं सिगारेटचं आख्खं पाकीट आणलं होतं . ( सिगारेट ओढल्याने बुद्धी तल्लख होते असं कुणीतरी विद्वानांनी आम्हाला सांगितलं होतं आणि अश्या मोहिमेवर जाताना बुद्धी तल्लख असायलाच हवी नाही का ? ) काही जणांनी रिकाम्या पिशव्या घेतलेल्या होत्या . आत खजिना असला तर तो भरून घ्यायला पिशव्या हव्यातच ना ! असे सुसज्ज होऊन आम्ही गढी कडे निघालो . ( आज शाळेत दिवसभर जादा तास आहेत असं आम्ही घरी सांगितलेलं होतं )
सायकलीवर आम्ही गुरसाळे गाठलं आणि मग गढीत पोहोचलो . त्यातल्यात्यात आत शिरायला सोपं वाटणाऱ्या एका भुयाराच्या तोंडाशी आम्ही जमलो . तोडफार घाम प्रत्येकाच्या तोंडावर चमकताना दिसत होता . मनावर आलेला तणाव दूर व्हावा म्हणून प्रत्येकाने कमीत कमी एक सिगारेट संपवावी असा वैद्यकीय सल्ला कुणीतरी दिला मग बहुमताने हा सल्ला पास झाला . मग लगोलग ती सूचना अमलात आणण्यात आली . एका मित्राने मस्त लायटर आणलेला होता . त्याचं सर्वांनी विशेष कौतुक करत ओठातली सिगार पेटवली . मग सिगारेटचे झुरके मारत काही सूचना सल्ले एकमेकांना देण्यात आले . भूत या प्रकारावर त्या वयात जास्त विश्वास असल्याने सगळ्यांनी सोबत देवाचा लहानसा खिश्यात मावणारा फोटो वगैरे ठेवलेला होता . एका मित्रानं ओमचं लॉकेट खास स्टेशन रोड वरून दोन रुपयांना विकत आणून गळ्यात घातलेलं होतं . ( ओमचं लॉकेट गळ्यात असल्यावर भुते खेते जवळ येत नाहीत असं आम्ही एका चित्रपटात बघितलं होतं )
हर हर महादेव " आमच्या भेदरलेल्या कंठातून कशीबशी गर्जना बाहेर पडली आणि आम्ही भुयाराच्या आत जाण्यास सज्ज झालो . आमच्यातले त्यातल्या त्यात धाडशी असणारे एक दोघे पुढे झाले . सर्वात मागे मीच होतो हे वेगळं सांगायला पाहिजे का मित्रांनो 

एक पायरी दुसरी पायरी , ..... सातवी पायरी ... एक एक पायरी मोजत आम्ही आत उतरू लागलो . हळू हळू बाहेरचा आत येणारा उजेड कमी झाला . ... " अरे बापरे समोर बरीच वळणं आहेत कि . " सर्वात पुढे असलेला मित्रं हातातल्या ब्याटरीचा उजेड समोत मारत म्हणाला . " जास्त आत गेलंच पाहिजे का ? " मी पाठीमागे वळून बघत म्हणालो . ( पुढे जाताना मागेही लक्ष असावं असं मी कुठेतरी वाचलेलं होतं. कारण अश्या मोहिमेत हल्ला नेहमी मागूनच होतो ) " छे छे आज या भुयाराचं रहस्य उलगडूनच जायचं " पुढे गेलेला एकजण म्हणाला . 
एक लांब बोळ ओलांडून आम्ही पुढे आलो एक महालासारखा छोटा भाग दिसला आणि कसला तरी बारीक गुई (((( गुई (((( आवाज कानावर यायला लागला . आम्ही आमच्या ब्याटऱ्या सगळीकडे फिरवल्या पण काही अंदाज येईना . पुढच्या मित्रांनी आणखी दोन पावले पुढे टाकली आणि एकदम गांधील माश्यांचा थवा आमच्या अंगावर झेपावला . काय होतंय ते कळायच्या आत त्या माश्यांनी आमच्या सर्वांगाचा ताबा घेतला . " बापरे पळा गांधील माश्या आहेत आत " कुणीतरी ओरडलं . मी तर केंव्हा पासून आदेशाची वाट पाहत मागे पळायच्या तयारीत होतो . सगळ्यात पहिल्यांदा मी भुयाराच्या बाहेर पडलो . माझ्या पाठोपाठ एकेक सरदार भूयाराबाहेर आले . 
हाश्श ((( हुश्श करत सगळे तिथल्या दगडावर बसले . अचानक माझं लक्ष एका मित्राच्या पाठीकडे गेलं. त्याच्या शर्टवर पाठीकडून गांधील माश्यांचा थवा बसलेला होता . मी त्याला किंचाळत हि माहिती दिली . त्याने आपला शर्ट कसाबसा काढला . तो पर्यंत दुसर्याच्याही शर्ट वर माश्यांचा थवा दिसला . जवळ पास सगळ्यांच्याच पाठीवर गांधीला माश्यांचे थवे बसलेले होते . सगळ्यांनी किंकाळ्या फोडत आपल्या अंगातले शर्ट काढले . आणि शर्ट हवेत फिरवत त्या माश्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला मात्र चिडलेल्या माश्यांनी जास्त त्वेषाने आमच्या वर हल्ला केला . आम्ही सगळे त्या माश्या शर्टच्या सहाय्याने हुसकावत गढीच्या त्या पडक्या वस्तुत पळायला लागलो . अचानक एका मित्राचं लक्ष गढीच्या उतरासामोरून वाहत जाणाऱ्या चंद्रभागेच्या पात्राकडे गेलं . " अरे चला नदीत बुड्या मारा माश्या पाण्यात येत नाहीत " . सगळे गढीच्या उतारावरून पळत सुटलो . धबा धब आम्ही चंद्रभागेत बुड्या मारल्या . माश्यांचे थवे आमचा पाठलाग करत आलेच . आम्ही श्वास कोंडून पाण्यात बुड्या मारायचो आणि श्वास कोंडला कि परत वर यायचो . त्या गांधील माश्या काही वेळ पाण्यावर घोंघावत राहिल्या आणि मग निघून गेल्या . थोड्या वेळाने आम्ही पाण्याबाहेर आलो . अंगावरच कपडे वाळवले आणि सुजलेली तोंडे घेऊन घरी परतलो . 
जाता जाता :---- इतिहासातल्या अनेक मोहिमा शत्रू सैन्याच्या कुटील कारस्थानामुळे फसल्याचं तुम्ही वाचलं असेल पण गांधील माश्यांच्या कारस्थाना मुळे फसलेली हिच एक मोहीम असावी . 
......................................श्याम सावजी ( त्या असफल मोहिमेतला एक शिलेदार )..... पंढरपूर

 गुरसाळयाच्या गढीचा खरा इतिहास .. भाग ३




|| श्री ||
गढीचा इतिहास जागा झाला !
काल मी पंढरपूर जवळ गुरसाळे गावी असलेल्या उध्वस्थ गढीची माहिती माझ्या वोल वर दिली होती . लोकांना ती चांगलीच आवडली . फेसबुक व्हाट्स अप अश्या सगळीकडून उस्फुर्त प्रतिक्रिया आल्या . काही फोन पण आले . यापैकी एक फोन जो माझे मित्र श्री यशपाल खेडकर सरांचा होता तो खूप महत्वाचा होता . श्री यशपाल खेडकर सर हे स्वेरी च्या कॉलेज ऑफ इंजीनिअरींग येथे प्राध्यापक आहेत त्यांनी गुरसाळ्याच्या या गढीचा इतिहास मला सांगितला . आणि त्या इतिहासाची त्यांच्या कडे असणाऱ्या " सोलापूर जिल्ह्याचा इतिहास " या पुस्तकातली माहितीही मला पाठवली . सोलापूर जिल्ह्याचा इतिहास हे पुस्तक श्री गोपाळराव देशमुख यांनी लिहिले आहे . त्या पुस्तकातील माहिती पुढील प्रमाणे हैद्राबाद सरकारने मध्यवर्ती अभिलेख कार्यालयातील निवडक कागद पत्राचे प्रकाशन तीन खंडात केले आहे . त्यातील भाग १ चे पृष्ठ २६८ वर आलेली माहिती गुरसाळे येथील कवड्यांचे वाड्या संबंधी आहे ती पुढील प्रमाणे ,
पंढरपूरचे लढाईचे समयी मानाजीने आपली स्त्री गुरसाळे नजीक पंढरपूर येथे महिपतराव कवड्याचा लेक आवजी कवड्या याचे आश्रयाने छपावुन ठेवली . लढाईत मानाजीची शिकस्त होऊन फरारी होऊन गेल्यानंतर आवजी कवड्याने पंतप्रधानाचे ( सवाई माधवराव ) कारपरदारास ( नाना फडणीसास ) इतीला केली. ( माहिती दिली ) यांनी लिहून पाठविले कि तुमापासीच ठेवणे . मानाजी फाकड्या शरीक आहे . त्याची फहमायश करून आपले इजमामात ठेवावा व मानाजी महादजी शिंद्याचे बिरादरात येकसुइने राहिल्यास सरफरायी करावी हाही मनसुबा कारपरदासाचा आहे " १०४ लेखांक ८९ . १६ ऑगस्ट १७८१ 

पहा मंडळी म्हणजे या गढीचा संबंध थेट पेशवाई आणि तिच्या पराक्रमी सरदाऱांपर्यंत येउन पोहोचला. अतुलनीय पराक्रम गाजवणाऱ्या व्यक्तीला फाकड्या असे संबोधले जाई . आजही गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला आपण " शाबास रे फाकड्या " असे म्हणतो . मानाजी फाकडे हा मराठेशाहीच्या तीन फाकड्यापैकी एक कर्तबगार पराक्रमी क्रूर असा सरदार राघोबा दादांच्या पक्षाचा होता . पानिपतच्या युद्धानंतर महादजी शिंद्यांना ग्वाल्हेर ची जहागीर मिळेपर्यंत सहा सात वर्षे मानाजी तेथील गढीचा मालक होता . महिपतराव कवडे त्यांचा लेक आवजी कवडे हे राघोबा पक्षाचे होते .त्यामुळे संकट समयी मानाजीने आपली पत्नी कवडे यांच्या या गुरसाळयाच्या गढीत सुरक्षेच्या कारणास्तव ठेवली होती .
महिपतराव कवडे यांचा पुत्र आवजी कवडे यानेच पंढरपूर विठ्ठल मंदिरात देवाचे दक्षिण बाजूस लक्ष्मीचे मंदिर बांधलेले असल्याचा उल्लेखही या पुस्तकात आहे . 
पुस्तकात पुढे लेखक म्हणतात कि गुरसाळे येथील कवड्याचे वाड्याचे पश्चिम बाजूस बांधीव असलेली पाण्याची विहीर एक सुंदर बांधणीची असून अजूनही ती चांगल्या अवस्थेत आहे . ( हि विहीर मी आत उतरून बघितलेली आहे . आत काही भूयारांचे मार्ग पोहोचलेले आहेत ) कवडेंचा ऐतिहासिक वाडा जरी ढासळला असला तरी पाण्याची बारव मात्र एकवेळ आवर्जून पहावी अशी आहे . गुरसाळे प्रमाणे कवड्यांचे इनाम गाव अजनुज येथे उत्तम बांधणीचा तटबंधी वाडा विस्तीर्ण स्वरुपात आहे . तो अद्यापही बऱ्यापैकी अवस्थेत आहे .
पुण्यात कवड्यांचा वाडा होता . कुरकुंभच्या देवीची पुनर्बांधणी गुरसाळे येथील वाडा आणि विहीर अजनुज तालुका श्रीगोंदा येथील वाडा आणि विहीर हि ऐतिहासिक कामे आजही पाहण्यासाठी इतिहास अभ्यासकांनी जावे अशीच आहेत . ....... श्री गोपाळराव देशमुख ... ( सोलापूर जिल्ह्याचा इतिहास )
-------------------------------------------------------------------------------------------------------- 
पहा मंडळी केवढा इतिहास दडलेला आहे आपल्या आजूबाजूला . गुरसाळे हे गाव फक्त साखर कारखान्यामुळे आपल्याला परिचित होते मात्र या गावाचा संबंध पराक्रमी फाकडे सरदार आणि पेशवाइ शी संबंधित आहे हे पहिल्यांदाच समजलं . कवड्यांची विश्वास पात्रता सुद्धा यातून दिसून येते कि मानाजी फाकडे सारख्या सरदाराने कठीण काळात सुरक्षेसाठी आपली पत्नी कवडेंच्या या गढीत सुरक्षित ठेवली . धन्य आहे ....... 
--------------------------------------------------------------------------------------------------------
जाता जाता :---- मी या गढीत काल गेलो तेंव्हा माझ्या सोबत गढी दाखवण्यासाठी गुरासाळयाचे जे माझे मित्र आले होते त्यांचे नाव सचिन कवडे . काय योगायोग आहे कि या गढीचे मालक एक कवडेच होते आणि मला काल या गढीत फिरण्यासाठी वाट दाखवत ज्यांनी मदत केली ते सुद्धा कवडेच होते . त्या सरदार कवडेंचे हे कुणी वारसदार आहेत का हे मला माहित नाही. त्यांनाही या गढीचा इतिहास सांगता आला नाही . सगळ्या योगायोगाच्या गोष्टी .................. श्याम सावजी .... पंढरपूर

 

 

 

पंढरपूरातील देवी दर्शन. . 1

|| श्री ||
पंढरपूरातील देवी दर्शन. . 1
अंबाबाई पटांगणातली देवी
पंढरपूरच्या ईशान्येला चंद्रभागेच्या काठावर हे देवीचे मंदिर आहे. मोठ्या विस्तीर्ण वृक्षांनी हे मंदिर वेढलेले आहे. मंदिरासमोरच्या एका वृक्षाच्या ढोलीत एक माणूस सहज बसू शकेल इतकी मोठी ढोली या वृक्षाला आहे या वरून या वृक्षाची जाडी आणि जुनेपण लक्षात यावे. मंदिर साधे सुबक आहे. मंदिरात देवीची सुबक मूर्ती आहे . तुळजापुरच्या देवीचीच हि प्रतिकृती असल्याचे म्हटले जाते . निसर्ग रम्य वातावरणात असलेल्या या मंदिरात पंढरपूरकर मोठ्या प्रमाणावर मंगळवार आणि शुक्रवारी गर्दी करतात . नवरात्रीत तर या मंदिराबाहेरील रांग संपता संपत नाही .पंढरपुरातील हे मुख्य देवी मंदिर आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही . पूर्वी या मंदिराच्या कडेने असणाऱ्या मैदानाला आंबाबाईचे पटांगण म्हटले जायचे . या मैदानात क्रिकेटचे सामने नेहमीच भरायचे .
...आम्ही जुन्या पेठेत राहायला आल्यावर त्यावेळी आमची परिस्थिती तशी वाईट होती . माझ्या घरच्यांनी या देवीच्या दर्शनाला जायला सुरुवात केली . योगायोगाने आमची परिस्थिती सुधारली . चांगले दिवस आले . समृद्धी आली . स्वतःचे घर खरेदी केले . या देवीवरची आमच्या घरच्यांची श्रद्धा वाढली .आणि मग हे देवीचे देऊळ नवरात्रीत रंगवण्याचा खर्च आमच्या घरच्यांनी देण्यास सुरुवात केली . देवळाच्या भिंतींवर पौराणिक प्रसंग वनारे पेंटर खूपच सुंदर पद्धतीने काढायचे . काही वर्षे ह्या उपक्रमात सातत्य राहिले मात्र काही कारणा वरून मंदिराच्या पुजाऱ्याशी तात्विक मतभेद झाल्याने आमच्या घरच्यांनी हा उपक्रम बंद केला आणि मग मंगळवेढा रोडला असणाऱ्या घाडग्यांच्या देवीला जायला आमच्या घरच्यांनी सुरुवात केली .. या घाडग्यांच्या देवी बद्दल मी सांगणार आहेच पण तो पर्यंत जगदंब . 
सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा ! .... श्याम सावजी ..पंढरपूर

पंढरपुरातील देवी दर्शन - २

|| श्री ||
मंगळवेढा रोडची घाडग्यांची देवी
पंढरपूरच्या अग्नेय दिशेला चंद्रभागेच्या काठावर हे मंदिर आहे यमाई तुकाई सोडली तर पंढरपुरच्या इतर चारही मुख्य देवी आग्नेय ,नैरुत्य ,वायव्य आणि ईशान्य या दिशांना आहेत . ( या पंढरपूरच्या सीमा रक्षक या उद्देशाने स्थापन केल्या गेल्या असाव्यात का ?) मंगळवेढ्याला जाणाऱ्या रोडवर एक लहानशी किल्ल्या सारखी किंवा गढी सारखी पडकी वास्तू आहे त्यात हे देवीचे मंदिर आहे . घाडगे नावाच्या सरदाराची हि गढी असल्याचं मी लहानपणी ऐकलं होतं . त्यामुळे आम्ही या देवीला घाडग्यांची देवी असं म्हणायचो . मला लहानपणी किल्ल्यात आल्याचं समाधान इथं आल्यावर व्हायचं .आत भरमसाठ वाढलेली झाडी आजही आहे . या देवीच्या मंदिराकडे तसं दुर्लक्षच झालं होतं तेंव्हा . पूर्वी एका लहानश्या पत्र्याच्या खोलीत देवीची मूर्ती होती. आता मोठं बांधकाम सुरु आहे . या नवरात्रात हे बांधकाम जवळ जवळ पूर्णत्वास आलेलं दिसलं .
अंबाबाई पटांगणातील देवीच्या माझ्या तितक्याश्या आठवणी नाहीत कारण तेंव्हा मी पाळण्यात होतो मात्र या देवीच्या बाबतीत माझ्या आठवणी ताज्या आहेत .
देवीच्या खोली बाहेर मोठ्ठा ओटा होता त्यावर मंदिराच्या पुजारीणबाई त्यांना आक्का बाई म्हणायचे त्या बसलेल्या असायच्या. वयस्कर होत्या आणि एकदम कडक . मंदिरातली शिस्त कोणी मोडली कि त्या रागवायच्या . याचा फटका मला पण बसला होता . त्यामुळे त्यांना मी खूप घाबरायचो . त्यांच्या कडेने आराधी , गोंधळी आणि भक्त महिलांचा गराडा असायचा . टांग्यातून पूजेचे साहित्य घेऊन आम्ही मंदिरात जायचो . माझ्या घरचे आक्का बाईशी गप्पा मारण्यात किंवा पूजेत गर्क झाल्यावर मी समोरच्या मैदानात खेळायला पळायचो . देवीच्या मूर्तीच्या समोर काही लहान लहान मंदिरे म्हणजे देवळ्या आहेत त्यात मरिआइ वगैरेंचे तांदळे आहेत . एक माकडाची मूर्ती आहे . या मूर्तीची कथा मी नंतर सांगेन . एक विटा आणि चुन्याची बनवलेली फारशी उंच नसलेली दीपमाळ आहे . ही दीपमाळ आणि ती छोटी छोटी मंदिरे एका रेषेत असल्याने मला ते सगळे रेल्वे गाडी प्रमाणे वाटायचे . ती दीपमाळ म्हणजे रेल्वेचे धुरांडे आणि मागची ओळीत असणारी देवळे म्हणजे तिचे डबे . दीपमाळ आणि इतर देवळे यांच्या मध्ये मोकळी जागा होती त्यात बसून मी ती र्रेल्वे चालवल्याचा अभिनय करायचो . हा... हा... हा... जणू काही ते देवीचे मंदिरच मी ओढून नेत होतो . या दीपमाळे जवळ एक छोटंसं चाफ्याचं झाड होतं . अगदी लहान उंचीचे पण बळकट . त्याच्यावर चढून त्याच्या फांद्या वरून उड्या मारायचाही उद्योग मी येथे आल्यावर करायचो ... लहानपणी या देवी बद्दल ब-याचश्या आख्यायिका ऐकायला मिळाल्या होत्या . त्यातील एका आख्यायिकेनुसार या गढी जवळच्या शेतात नांगरट करताना हि देवीची मूर्ती सापडली . दुसऱ्या आख्यायिकेनुसार घाडगे सरदारांना तुळजापूरला जायला वयोमानाने जमेना याची त्यांना खंत वाटू लागली . तेंव्हा एकदा स्वप्नात येउन देवीने आपण त्यांच्या गढीतील विहिरीत असल्याचे सांगितले . सकाळी सरदार घाडगे यांनी शोध घेतला असता विहिरीच्या एका कोनाड्यात त्यांना हि मूर्ती सापडली .. तीच हि आजची देवीची मुर्ती . सरदारांनी गढीतच तिचं छोटसं मंदिर बांधलं आणि तिथेच ते देवीची पूजा ,अर्चा ,सेवा करू लागले .आजही ती विहीर आणि त्या विहिरीतली मूर्ती सापडलेली देवळी तशीच आहे .
लहानपणी विहिरींची भीती वाटत असल्याने मी मंदिरा मागे असणाऱ्या या विहिरीकडे जात नसे . गढीचे भग्न अवशेष घाडगे सरदारांच्या वैभवाची साक्ष आजही देतात . गढीचे काही बुरुज आणि तट अजूनही चांगल्या अवस्थेत आहेत . मुख्य दरवाजा भव्य आणि देखणा आहे . त्या जुन्या काळाची आठवण करून देत दिमाखाने उभा आहे . गढीच्या परिसरात भूतेश्वर महादेवाचे मंदिर आहे . त्याच्या समोर राम मंदिर आहे . ही गढी आणि गढीचा परिसर हा माझ्या साठी आनंदाचे ठिकाण आहे . या मंदिराच्या परिसरात बसून मावळतीला जाणारा सुर्य बघणे हा माझा आवडता छंद .. जगदंब ! ...............................श्याम सावजी ..पंढरपूर

पंढरपुरातील देवी दर्शन - ३


यमाई तुकाई
(
ये माई तू का आली ?)
पंढरपूरच्या दक्षिणेला सांगोला रोडला यमाई तुकाईचे मंदिर आहे . उत्तरेकडे तोंड करून असलेल्या या साध्या सुध्या मंदिरात दोन तांदळे आहेत . यांना यमाई आणि तुकाई असे म्हणतात . पंढरपुरातील हे महत्वाचं आणि प्रसिद्ध देवी मंदिर आहे . नवरात्रीत तर या मंदिरात गर्दी असतेच पण मंगळवार शुक्रवार या देवीच्या दर्शनाला येणाऱ्यांची संख्याही कमी नाही. पूर्वी गावापासून काहीसे बाहेर आणि लांब ओसाड माळावर असे हे मंदिर असल्याने या देवीच्या दर्शनाला येताना भाविक पूर्वी हमखास टांग्याचा वापर करत. काही श्रद्धाळू भाविक तेंव्हाही चालत येत आणि आजही येतात. आता पंढरपूर या मंदिराच्याही पुढे पसरले आहे. इथून जवळच जिल्हा न्यायालयाची इमारत झाल्याने मोठ्या प्रमाणावर माणसांची वर्दळ असते.
या देवीची अख्याइका पुढील प्रमाणे सांगतात .
रावणाने सीतेचं अपहरण केल्यानंतर राम आणि लक्ष्मण या भागातून सीतेचा शोध घेत जात होते . राम खुपच शोकमग्न अवस्थेत होते . हे पार्वती मातेनं बघितलं आणि भगवान शंकरांना विचारलं , " रामाचा हा शोक खरा आहे का रामाला शांत कोण करणार ? " भगवान शंकर म्हणाले , " रामाला शांत करणं मला जमणार नाही . तू प्रयत्न करून बघ . " श्री रामाची परीक्षा घेण्याच्या हेतूनं पार्वती मातेनं सीतेचं रूप धारण केले आणि त्या श्री रामा समोर आल्या . मात्र श्री रामांनी सीता रूपातल्या पार्वती मातेला ओळखलं आणि तिला प्रश्न केला , " ये माई तू का आली ? " रामाने आपल्याला ओळखल्याचे बघताच पार्वती माता अदृश्य झाल्या त्या याचं ठिकाणी .

हे दोन तांदळे म्हणजे पार्वती माता आणि त्यांचे सीता रूप आहेत आणि ये माई .. तू का आली चा अपभ्रंश झाला यमाई तुकाई ... येथून जवळच पद्मावतीचे तळे आहे . यमाई तुकाईला आल्या नंतर भाविक येथून जवळच असणाऱ्या भूवनेश्वरीच्या दर्शनाला जातात तर काही जण आणखी पुढे जात कासेगावाच्या प्रसिद्ध देवीचेही दर्शन घेतात . भुवनेश्वरी देवी कासेगाव शिवेवर आहे . ..... श्याम सावजी ..... पंढरपूर  

पंढरपुरातील देवी .. ४

|| श्री ||
 टेकडीवरची आई . पद्मावती माई 
पंढरपूरच्या नैरुत्त्य दिशेला छोट्याश्या डोंगरासारखी वाटणारी हि टेकडी होती . बाहेरून दगड मातीचा ढीग दिसत असला तरी आतल्या बाजूने विस्तीर्ण भव्य असे एखाद्या स्टेडीयम सारखे पाय-या पाय-या चे दगडी बांधकाम दिसायचे .याला पद्मावतीचे तळे असेही म्हणतात . यात आता पाणी नाही आजही हे विस्तृत भव्य चौरस बांधकाम तसेच आहे . आत नगरपालिकेने सुंदर बाग बनवली आहे मात्र बाहेरील बाजूने बनवलेल्या शॉपिंग सेंटर मुळे टेकडी मात्र नष्ट झाली . आमच्या भागात डोंगर वगैरे प्रकार कधी बघायला मिळत नसल्याने हि टेकडी हाच आमच्यासाठी मोठ्ठा डोंगर होता . डोंगरावर जायची लहर आली कि या टेकडीवर जायचे . या टेकडीच्या आतील बाजूस पद्मावती देवीचे मंदिर होते . म्हणजे अजूनही आहे . या चौरसाकार तळ्याच्या मध्यभागी पद्मावती देवीचे हे मंदिर आहे . या मंदिरा पर्यंत जाण्यासाठी लहानसा दगडी पूल आहे . मंदिरात पद्मावती देवीचा तांदळा आहे .
माझी आदर्श प्राथमिक शाळा ही या पद्मावतीच्या टेकडी पासून हाकेच्या अंतरावर . त्यामुळे कधी या दिशेने शाळेत आलो किंवा घरी निघालो कि ही टेकडी दिसायची . शाळेच्या वयात मला डोंगर म्हणतात तो हाच असे वाटायचे . नंतरच्या आयुष्यात बरेच उंच डोंगर चढून गेलो पण पद्मावतीच्या या टेकडीचे थ्रिल काही औरच होते .
एकदा पहिली दुसरीत असताना शाळेत मी काही तरी खोडी केली आणि बाईंनी मला न्यायला आलेल्या माझ्या आज्जीला ते सांगितले . आज्जीचा पारा चढला " चल तुला त्या डोंगरावर सोडते " असे म्हणत तिने मला ओढत त्या टेकडीवर आणले . त्या वेळी माझ्या दृष्टीने आतली तळ्याची खोली खूपच होती त्यामुळे मी घाबरून गेलो त्यात पुन्हा या डोंगरावर देवी राहते असे मी ऐकले होते . आता देवी म्हणजे वाघ आलाच . ही आज्जी बया आपल्याला या डोंगरावर सोडून गेली आणि वाघोबा आले तर काय ? आणि नेमकी देवी त्याच्या वर नसली तर त्याला कोण कंट्रोल करणार ? या कल्पनेने मला घाम फुटला .मी आज्जीच्या पायावर लोळन घेत "पुन्हा असे करणार नाही . शाळेत नीट वागेन " अशी गयावया केली पण आज्जी ऐकेना . " तुला इथेच सोडून जाणार " म्हणाली . संध्याकाळची वेळ असल्याने अंधार पडत चाललेला होता .माझ्या नशिबाने नेमकी तळ्याच्या मैदानात काही तरुण मुले वौलीबॉल खेळत होती .त्यातला एक तरुण धावत आला आणि त्याने माझ्या आज्जीची समजूत घातली . देवीसमोर अंगात आलेल्या स्त्रीला आजूबाजूचे सगळे "शांत व्हा आई " अशी विनवणी करतात आणि मग ती स्त्री शांत होते तसा प्रकार झाला आणि आज्जी शांत झाली .
तो तरुण नंतर बरेचदा रस्त्यात भेटला कि ती आठवण करून द्यायचा आणि विचारायचा " आता नाही ना खोड्या करत शाळेत ? " .
पद्मावतीच्या त्या भागातून जाताना मला ही आठवण कधी आली की मी स्वतःशीच हसतो आणि मी एकटाच का हसतोय ? म्हणून लोक माझ्याकडे बघून हसतात . हसो बिचारे .... .....
.जगदंब !.........श्याम सावजी .........पंढरपूर

पंढरपूरच्या देवी - ५

|| श्री ||
कासेगाव शिवेवरची भुवनेश्वरी देवी
पंढरपूरच्या दक्षिणेला यमाई तुकाई मंदिराच्या थोडे पुढे गेल्या नंतर मुख्य रस्ता सोडून आणखी एक कच्चा रस्ता कासेगावकडे जातो . या रस्त्याला बरोब्बर कासेगाव शिवेवर भुवनेश्वरी देवीचं मंदिर आहे. येथून पुढे कासेगाव हद्द सुरु होते . पंढरपूरच्या रक्षणार्थ हि देवी पंढरपूर शिवेवर उभी असल्याचं सांगितलं जातं. यादेवीबद्धल फारशी माहिती किंवा दंत कथा मिळू शकली नाही मात्र हि देवी पंढरपूरकर आणि कासेगावकर या दोन्ही मंडळींमध्ये लोकप्रिय आहे. अगदी मोकळ्या माळावर असल्याप्रमाणे हे देवीचे मंदिर आहे. अगदी तुरळक घरे आजूबाजूला उभी आहेत. मंदिरात देवीच्या मुर्तीसामोराची दगडी चौकट काहीशी लहान असल्याने मूर्तीचे थोडे दुरूनच दर्शन होते.
भुवनेश्वरीचे दर्शन करून भाविक पुढे कासेगावच्या देवीच्या दर्शनाला जातात. येथेच देवी मंदिरा समोर शिवेवरच्या मारुतीचे मोठे मंदिर आहे ...
 जगदंब....... ...................श्याम सावजी.. पंढरपूर

पंढरपूरच्या देवी - ६





|| श्री ||
जुन्या अकलूज रोडची दुर्गा देवी
पद्मावती प्रमाणेच हि देवी सुद्धा टेकडीवर आहे . रानावनात , हिरव्यागार शेतीत हि टेकडी आहे . पंढरपूर सोडून दुसऱ्याचं कुठल्यातरी भागात आल्यासारखं या ठिकाणी आल्यावर वाटतं. अर्थात पंढरपूरपासून बरीच लांब जुन्या अकलूज रस्त्याला हे देवीचे मंदिर आहे.
या देवी बद्दल मला काही माहिती न्हवती . एकदा माझ्या काही विद्यार्थ्यांनी मला या देवी बद्दल माहिती दिली आणि चला जायचं का ? असं विचारलं . नेमके ते नवरात्रीचे दिवस होते . मग त्यांच्या बरोबर पहिल्यांदा या देवीला आलो. पंढरपुरच्या वायव्य दिशेला हि देवी आहे . जुन्या अकलूज रोडला हे मंदिर लागतं . पंढरपूर पासून सुमारे ५ ते ६ किलोमीटर अंतर असल्याने नेहमी या देवीला जाणाऱ्या भक्तांची संख्या कमीच असेल पण नवरात्रीत हि टेकडी माणसांनी फुलून येते . आजूबाजूला हिरवीगार शेतं आणि गावापासून दूर असल्याने आपण एखाद्या पर्यटन स्थळी आल्याचा भास होतो . या टेकडीच्या पायथ्याला एक ओढा आहे . इतर वेळी हा कोरडा असतो पण पावसाळ्यात याला पाणी येतं आणि मग हा परिसर खूप रमणीय दिसतो . इथं येणारे शाळा , महाविद्यालयाचे विद्यार्थी सहलीला आल्याप्रमाणे बरोबर खाद्य पदार्थ वगैरे घेऊन येतात व या टेकडीवर त्यांचा आस्वाद घेतात .
एका जाणकार व्यक्तीने अपत्यप्राप्तीसाठी आम्हा उभयतांना ११ रविवारी
 राहू काळात दुर्गा देवीच्या दर्शनाला जाण्यास संगीतलं होतं. मला हि देवी आठवली .त्यानुसार आम्ही दर रविवारी राहू काळात या दुर्गा देवीच्या दर्शनाला जायचो . रविवारचा राहू काळ साडे चार ते सहा या वेळेत येतो . या काळात या मंदिरात देवीसमोर आम्ही दिवा लावायचो आणि अपत्यप्राप्तीची प्रार्थना करायचो. ११ रविवार झाल्यानंतर आम्ही या देवीला चांदीचा पाळणा अर्पण केला . आज दोन गोड मुलं आमच्या घरात रांगत आहेत. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. असो.
मावळतीला जाणारा सुर्य आणि त्याचे पसरलेले लालसर पिवळे ऊन यामुळे हि टेकडी आणि हा परिसर संध्याकाळच्या वेळी खूपच देखणा दिसतो . टेकडी आणि आजूबाजूची शेते या पिवळसर उन्हात न्हाऊन निघतात आणि निसर्गाची जादू आपल्या मनावर मोहिनी घालते .
 " संधीकाली या अश्या धुंदल्या दिशा दिशा " अशी मनाची अवस्था होते . ...............
.श्याम सावजी ..........पंढरपूर

पंढरपूरच्या देवी .. ७




|| श्री ||
लखूबाई अर्थात दिंडीर वनातील रुक्मिणी आई 
पंढरपूरच्या पूर्वेला चंद्रभागेच्या काठावरच एका उंच चौथ-यावर हे लखुबाईचं मंदिर आहे . या भागाला पुराण काळात दिंडीर वन म्हणत होते असे सांगतात . लखुबाई हे माता रुक्मिणीचं लोक नाव . रुक्मिणी दिंडीर वनात कशी आली याची एक आख्यायिका येथे सांगितली जाते . माता रुक्मिणी आणि भगवान श्री कृष्ण एकांतात गप्पा मारत असताना राधेची हाक भगवंतांच्या कानावर आली . राधेच्या हाकेने भगवंत सैरभैर झाले . त्यांचं मन राधेकडे ओढ घेऊ लागलं. हे बघून रुक्मिणी मातेचा पारा चढला आणि ती रागारागाने तिथून निघाली . रुसलेली रुक्मिणी तडक दिंडीर वनात आली आणि तिथे लपून बसली . पाठोपाठ भगवान रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी दिंडीर वनात आले . येताना वाटेत त्यांची पुंडलीकाशी भेट झाली आणि पुंडलीकाने फेकलेल्या विटेवर भगवान उभे राहिले ते श्री विठ्ठल म्हणून लोकमान्य झाले .
एका उंच दगडी चौथर्यावर हे लखू बाईचं मंदिर आहे . चंद्रभागा नदी काठावरची जवळपास सगळीच मंदिरं अशी उंच चौथर्यावर आहेत . पुराच्या दृष्टीने हि खबरदारी असावी . वन म्हणावं असं आता या भागात काही नाही . ना झाडी ना झुडूप . मंदिराच्या आसपास एक दोन झाडे शिल्लक आहेत हीच काय ती वनाची खुण . लखूबाईची मूर्ती पूर्वाभिमुख आहे . लखूबाई च्या दर्शनाला महिलांची खूप गर्दी असते . 
लखुबाइच्या पूजेने पतीचे आयुष्य वाढते आणि घरात सुख शांती राहते असे बोलले जाते . देवी मंदिराच्या कडेने प्रदक्षिणेसाठी असणारा मार्ग हा अगदीच चिंचोळा असल्याने आणि चौथरा उंच असल्याने प्रदक्षिणा मारताना मी लहानपणी खूप घाबरायचो . कित्येकदा मी प्रदक्षिणा अर्ध्यातून सोडून दिली . आता ग्रीलचे कठडे बसवल्याने प्रदक्षिणा मारणं सुखकर झालं आहे ........ श्याम सावजी .......पंढरपूर —
 

पळसनाथाचा अद्भुत कळस (PALASNATH TEMPLE)

               कधी कधी बऱ्याच गोष्टी मनात असतात पण त्या पूर्ण करण्यासाठी नशिबाची सुद्धा साथ हवी असते. असंच एक ठिकाण बऱ्याच वर्षांपासून डोक्यात होतं ते म्हणजे भिगवण जवळचं पळसनाथाचं मंदिर. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे बाराही महिने उजनी धरणाच्या पोटी लुप्त झालेलं हे मंदिर. मंदिर जरी पाण्याखाली असलं तरी खूपच तीव्र दुष्काळ असला आणि त्यातच उन्हाळा तापू लागला तरच हे मंदिर पाण्याबाहेर येतं.म्हणुनच या मंदिराचं दर्शन होणं हि भाग्याची आणि योगायोगाची गोष्ट आहे.  १९७५ साली जेव्हा उजनी धरण बांधून पूर्ण झालं तेव्हा त्यासाठी आजूबाजूची गावं पुनर्वसित करण्यात आली पण मंदिर कसं हलवणार?? म्हणून हे मंदिर तिथेच ठेवून आजूबाजूची गावं स्थलांतरित झाली.  ११ व्या शतकात बांधलं गेलेलं हे मंदिर आजही त्याचं अस्तित्व टिकवून थाटात उभं आहे ते म्हणजे भिगवणचं "पळसनाथचं शिवमंदिर"
 पळसनाथचं शिवमंदिर
             गेल्या ३ वर्षांपासून ठरवलं होतं जेव्हा कधी हे मंदिर पूर्ण बाहेर येईल तेव्हा बघायला जायचं. एकदा फेब्रुवारी महिन्यात बारामतीला जाऊन आलेलो तेव्हा मित्राला सांगितलं होतं मंदिर बाहेर आलं की सांग. तसंच अचानक माझा मित्र मुकेशचा मला फोन आला की "अरे मंदिर बाहेर आलंय" पण नुसतं मंदिर बाहेर येऊन उपयोग नाही तर मंदिरात प्रवेश करता यायला हवं  हे उद्दिष्ट होतं म्हणून सोशल मीडियावरून तिथल्या स्थानिक मित्राचा नंबर घेतला व त्याला फोन करून विचारलं त्याचं नाव "विशाल काळे". तो मला म्हणाला मी तुला उद्या सकाळी बघून सांगतो. मी म्हंटलं ठीक. कारण इतक्या दूर जाऊन मला फक्त मंदिर बघण्यात अजिबात रस नव्हता. त्याचा दुसऱ्या दिवशी सकाळी निरोप आला की थोडा गाळ आहे पण ३-४ दिवसात मोकळं होईल. पुढच्या रविवारी आलात तर उत्तम. पण माझे पाय काही घरात टिकत नव्हते आणि त्यात अजून १० दिवस वाट बघायची म्हणजे अजून जड. १० दिवसात ही बातमी सगळीकडे पसरली तर त्यात गर्दीची अजून भर म्हणजे ते शक्यच नव्हतं म्हणून मिळेल तसं शनिवारी रात्री निघायचं ठरवलं.
             रात्रीची पंढरपूर पॅसेंजर पकडून सकाळी बरोबर ८ वाजता भिगवण स्टेशनला उतरून रिक्षा पकडली व सर्वात आधी Highway गाठला कारण पळसनाथला जायला तिकडून गाड्या मिळतात असं कळलं. जास्त वाट न पाहता पहिली जी गाडी आली त्यात चढलो तो होता एक टेम्पो जो शेळ्यांना घेऊन चालला होता त्यातच गावकऱ्यांशी गप्पा मारता मारता पळसनाथ आलं.
 शेळ्यांसोबतचा प्रवास 
             सुमारे २० किमी असलेलं हे अंतर अर्ध्या तासात कापून ९ च्या सुमारास गावापाशी पोहोचलो. पळसनाथ मंदिर तिथून २ किमी दूर. हे अंतर मात्र चालतच जावं लागतं.  इथे जाण्यास कोणतेही वाहन नाही. सकाळची वेळ असल्याकारणाने ही चाल सुद्धा मजेशीर वाटली नुकतेच पडलेलं ऊन गावात असलेली मंदिर, त्यात गुलमोहराच्या झाडांनी सजवलेला साज हे पाहून नेमकं गावात आल्याचा प्रत्यय येत होता.

पळसदेव गावातला प्रवेश
              चालत चालत अर्ध्या तासात धरणाजवळ जाऊन पोहोचलो अर्धा किमी अगोदरच मंदिर दिसायला लागलं तेव्हा इतकं मस्त वाटलं त्याचं शब्दात रूपांतर नाही करू शकत.  ज्या क्षणाची इतके वर्ष वाट पाहिली ते डोळ्यासमोर दिसत होतं. थोड्याच वेळात पाण्यापाशी जाऊन पोहोचलो बोट तयारच होती. जास्त कोणाला माहिती नसल्याने मी एकटाच होतो. ते सगळ्यात मोठं सुख होतं. बोटवाल्यासोबत गप्पा मारून तिथल्या भागाची माहिती घेऊन थेट मंदिराच्या जवळ जाऊन पोहोचलो.
दुष्काळसदृश्य परिस्थिती

पळसदेव मंदिरापर्यंतचा उजनीतून केलेला प्रवास
             मंदिरात जाण्यापूर्वी इतिहासाची पाने चाळली तर मंदिराला भेट देताना अजून मजा येते. अभ्यासकांच्या मते जुन्या काळात पळसदेव हे गाव "रत्नपूर" म्ह्णून ओळखले जायचे बाजारपेठेचे मुख्य केंद्र असलेल्या ह्या गावात एकूण ५ मंदिर होती. भीमा नदी जिथे उत्तरवाहिनी आहे तिथे एक ओढा येऊन मिळतो त्या संगमावर शके १०७९ म्हणजे ई. स. ११५७ मध्ये चांगदेव ह्या दंडनायकाने येथे एका विष्णू मंदिराची उभारणी केली ह्या माहितीचा शिलालेख मंदिरातील एका खांबावर दिसून येतो. विष्णुमंदिर पश्चिमाभिमुख असून दोन्ही मंदिराची वास्तुरचना साधारणपणे सारखीच आहे सदर मंदिराचा कळस नष्ट झाला असून मंदिराच्या तिन्ही बाजूस विस्तृत प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या बाहेरील बाजू ७ दगड आहेत ज्यावर दगड पटल्यास सप्तसुरांचा प्रत्यय येतो.
 काशीविश्वेश्वर मंदिर
 मंदिराच्या आतील बाजूस असलेले खांब 
 मंदिरातील शिलालेख 
            बारमाही पाण्यात असलेले पळसनाथाचे हे मंदिर म्हणजे मानवनिर्मितीचा सुंदर अविष्कार म्हणायला हरकत नाही. पळसनाथाचे मंदिर हे २८ फुटी म्हणजे सर्वात उंच असल्याकारणाने त्याचा कळस आपणास भर पाण्यात दिसू शकतो.  मंदिराचा कळस याआधी दगडी असावा नंतर तो विटांचा केला असावा.  ह्या कळसाचे वैशिष्टय म्हणजे म्हणजे सदर कळसाच्या आत प्रवेश करण्यासाठी एक छोटंसं प्रवेशद्वार आहे. शिखरावरील कळसाचा आकारही लक्षवेधी आहे. शिखरावर सर्पाकृती शिल्प आहेत.
 पळसनाथचा कळस व त्याचे प्रवेशद्वार 
कळसावरील शिल्प 

 पळसनाथ च्या कळसातील प्रवेश
            शिखराकडे डोळे भरून पाहिलं कि मग मंदिरात प्रवेश करायचा. मंदिराचे प्रवेशद्वार पंचशाखीय असून मंदिराला तिन्ही बाजूस प्रवेशद्वार आहे. मंदिरातील खांबांवरील नक्षीकामही देखणं आहे. मंदिरातील नक्षीकाम हे बरेचसे शाबूत आहे इतके वर्ष पाण्यात राहूनसुद्धा बांधकाम असं राहू शकत ह्याचंच आपल्याला नवल वाटतं. नंतर आपण गर्भगृहात प्रवेश करतो. गर्भगृहात आधी शिवपिंड होती पण गाव पुनर्वसित होताना गावकऱ्यांनी ती शिवपिंड पुनर्वसित झालेल्या गावातील मंदिरात स्थापन केली आहे. सभामंडपावरील असलेले एक शिल्प आजही लक्षवेधून घेतं ज्याच्या चहूबाजूस हनुमानाची प्रतिकृती आहे.
  
खांबावरील नक्षीकाम
गर्भगृहाचे प्रवेशद्वार
प्रवेशद्वारावरील शिल्पकौशल्य
प्रवेशद्वारावरील खांब

मंदिराबाहेरील शिल्प
 सभामंडपावरील शिल्प
            मंदिराच्या सभोवताली सुंदर तट असून आजूबाजूच्या परिसरात अनेक वीरगळी नंदी शिल्पपट पडलेले आहेत. तसेच अनेक कलाकुसर असलेले दगड अस्ताव्यस्त पडलेले दिसतात. मंदिराच्या समोरच विटांमध्ये बांधलेली प्रशस्त धर्मशाळा आहे. ह्या धर्मशाळेची प्रवेशद्वार ही हिंदू-मुस्लिम पद्धतीची आहे त्याचा आकार पाहिल्यावर आपल्या ते लक्षात येते.


मंदिराबाहेरील विरगळ

 आवारातील मंदिराचे अवशेष 
 मंदिराबाहेरील धर्मशाळा 
 धर्मशाळेच्या कमानी

 पळसनाथ मंदिर व धर्मशाळा 
             मंदिराच्या मागील बाजूसच एक राम मंदिर आहे. ह्या मंदिरावरील अवशेष खूप दर्शनीय आहेत. ह्या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला धरणाच्या पात्रातून बाहेर यावं लागतं. बाहेरून किनाऱ्यावरून चालत गेलं तरी आपण सुमारे १५ मिनिटात देवळापाशी पोहोचतो. हेही मंदिर प्रचिन असून मंदिरावरील अप्रतिम शिल्प आपलं  लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या बाहेरील बाजूस रामायणातील बरेचशे प्रसंग आपल्या समोरून जातात सेतू बांधताना वनरसेनेचे योगदान, राम लक्ष्मणाची धनुर्धारी कला. असे बरेचसे प्रसंग ह्या मंदिरात आपल्याला शिल्परुपी आढळतात.
 राम मंदिर 




मंदिरावरील शिल्प



मंदिराबाहेर पडलेले काही अवशेष
            आधी पळसनाथ मग काशी विश्वेश्वर आणि नंतर हे राममंदिर बघून खरंच स्वतः नशीबवान असल्यासारखं वाटलं. इतके वर्ष पाण्यातून तावून-सुलाखून निघालेलं हे मंदिर पाण्यात असूनही शाबूत राहतंच कसं आणि पाण्याच्या होणाऱ्या आघातांपासून वाचतच कसं ?? हा साधा प्रश्न कोणाच्याही डोक्यात येऊ शकतो. त्यामुळे मंदिराच्या ह्या वारशाला सुरक्षित राहण्यासाठी मनोमन प्रार्थना करून उजनीतून मी काढता पाय घेतला. 
जलसमाधी मिळालेलं पळसनाथ मंदिर
            आभार मानायचे झाल्यास त्या सर्वांची मानेन ज्यांच्यामुळे मला ह्या मंदिराची माहिती मिळाली आणि ज्यांच्यामुळे मी तिथपर्यंत पोहोचू शकलो त्यात माझा मित्र मुकेश आणि विशाल काळे ह्यांचं नाव मी प्रामुख्याने घेईन. मुकेशमुळे माझ्या डोक्यात पळसदेवला जायची प्रथमदर्शनी तयारी झाली आणि पळसदेवचा स्थानिक मित्र विशाल काळे ह्यामुळे मला मंदिराचे DAILY UPDATE मिळत गेलं त्यामुळे मला मंदिराचे जे रूप पाहायचे होते ते पाहण्यास मला मदत झाली त्याबद्दल विशाल मित्रा मी तुझा आयुष्यभर ऋणी राहीन. 
धन्यवाद.
 

 Google Location of Palasdev Temple.
 टीप :
 १) मंदिराला भेट देण्यास जाण्यापूर्वी आधी चौकशी करून जाणं गरजेचं आहे नाहीतर फेरी फुकट जाऊ शकते. 
आणि 
२) गावातून परतताना 'तुषार कोल्ड्रिंक "मधून लिंबू सरबताचा आस्वाद नक्की घ्या कारण ते अमृत आहे तशी चव तुम्हाला घरी बनवलेल्या लिंबू सरबतातही मिळणार नाही.

Madha Fort

Unknown

Marathwada Circuit- 1200 Kms, 7 forts, 2 Caves
Day 1: Pune-Madha-Paranda-Tuljapur (360 Kms)
Day 2: Dharshiv Caves
Day 3: Tuljapur-Ausa-Kharosa-Udgir-Nanded (280 Kms)
Day 4: Nanded-Kandhar-Dharur-Kunthaligiri (290 Kms)
Day 5: Kunthaligiri-Kharda-Bhadurgad AKA Dharmaveergad-Pune (265 Kms)



Type: Land Fort
Base Village: Madha
Where:201 KMs from Pune
Route: Pune-Tembhurni-Kurduwadi-Madha
Time visited: August 2011
Time to see around: ?
How to visit: Take a left turn from Tembhurni off Pune-Solapur highway towards Kurduwadi. From Kurduwadi take a diversion off ‘Kurduwadi-Latur’ toll road after toll naka. The road goes straight to Madha which is about 15 Kms from Kuruduwadi.
My Meter reading from Pune: 215





We reached the fort early at 9.30 AM. The road was in excellent condition all the way to Madha. I was excited to see fortification in pretty well condition. After I parked the car and asked the directions to local for the main entrance (which is complete traverse as you enter the village) he told us there’s nothing inside not to visiting the fort!

I insisted and I repented my decision few minutes later. The area around entrance was extremely filthy and such was strong stench that we had to return back to car unable to traverse through the muck to the entrance!   It was an unfortunate to see such a pathetic condition of entrance to the fort.

After the unpleasant venture I continued the journey with faint hopes to our next destination- Paranda.


http://ekpravas.blogspot.com/2011/08/marathwada-circuit-madha-fort.html


या वर्षीची गड्डा यात्रा - फोटो सहित


३१ डिसेंबर संपली आणि पहिल्या जानेवारीला डोळे उघडायच्या आधीपासुनच प्रत्येक सोलापुरकराला गड्ड्याचे वेध लागलेले असतात. सोलापुरचे ग्रामदॅवत श्री. सिद्धेरामेश्वरांची यात्रा मकर संक्रांतीला भरते. संक्रांतीच्या २-३ दिवसात देवळात व होम मॅदानावर बरेच कार्यक्रम असतात. संपुर्ण शहरातुन काठ्यांची मिरवणुक निघते. काठ्या या शब्दावर जाउ नका, या प्रत्यक्ष ३०-४० फुटि बांबु असतात, जे एक व्यक्ति आपल्या कमरेला बांधलेल्या विशिष्ट पट्ट्याच्या आधारे दोन्ही हातावर तोलुन धरत जवळ्पास संपुर्ण शहरातुन मिरवत आणतात. ही मिरवणुक ३ दिवस असते. सोलापुर शहरात एकुन ६८ ठिकाणी शिवलिंगांची स्थापना केलेली आहे, त्या सर्व ठिकाणी या काठ्या नेउन आणण्याची परंपरा आहे. संक्रांतीच्या दिवशी या काठ्यांचे व श्रीसिद्धेश्वराचे लग्न लावले जाते, त्याच दिवशी रात्री होम मॅदानावर दारुकाम म्हणजे फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम असतो. पुढील फोटो जालावरुन साभार.
ह्या वर्षी माझं या सगळ्या सोहळ्याला उपस्थित राहणं शक्य झालं नाही, पण नंतर सुट्टी मिळाल्यावर लगेच लेकाला घेउन मी सोलापुरला आलो. पहिल्यांदा श्रीसिद्धेश्वराच्या देवळात गेलो त्याची काही छायाचित्रे.
हे देउळ एका मानवनिर्मित तलावात आहे, त्याच्या मागे सोलापुरचा भुईकोट किल्ला दिसत आहे. हा तलाव किल्ल्याच्या एका बाजुला आहे.
येथे ही देवळात आत जाताना पाय धुण्याची छान सोय केलेली आहे. तसेच संपुर्ण देवळाच्या फरसबंदी आवारात पांढ-या रंगाचे पट्टे मारलेले आहेत, पायाला चटके बसु नयेत म्हणुन.

ही श्री. सिद्धरामेश्वरांची समाधी. वरच्या लाल रंगाच्या मंडपामुळे खालची संगमरवरी समाधी लाल दिसत आहे. या आवाराला तिनही बाजुला दगडी ओव-या आहेत व मध्ये काही जुनी झाडे पण आहेत.

श्री.सिद्धेश्वराच्या देवळातील ही मुर्ती / शिवलिंगावरचा मुखवटा, श्रावणांत याला विड्याच्या पानंची सजावट केली जाते, ती देखील अतिशय सुंदर असते.

हे मंदिरावरचे शिखर व या मंदिराला गाभा-याच्या दोन्ही बाजुला सभामंडपाला जोडुन दोन छोटी मंदिरे आहेत, असा प्रकार मी फक्त येथेच पाहिला आहे.


हे साधुबाबा खिळाच्या वर उभे राहुन सर्वांना आशिर्वाद देत होते, पण का माहित नाही फोटो काढताना ते लगेच खाली उतरले आणि थोडे रागावले.

मंदिराला तलावाच्या काठाला जोडणा-या छोट्या रस्ता वजा पुलावर या यात्रा काळात व श्रावणांत दुकाने लावलेली असतात.

या दुकानात नेहमीच्या गंडे, दोरे, फोटो, प्रसाद या धार्मिक वस्तुंबरोबरच भस्म / विभुती पण मिळते, हे गोल्,लंबगोल, कांडी ते बेसन लाडु यापॅकी ब-याच आकारात मिळते. सोलापुरातील लिंगायत समाजात रोज सकाळी छाती,कपाळ व खांद्यावर भस्माचे पट्टे ओढुनच घराबाहेर पडण्याची किंवा कामाधंद्याला लागण्याची परंपरा आहे.
दुपारी घरी आल्या बागेतल्या फुलांचे व झाडांचे काही फोटो काढले, मालकीण बाई - आमच्या मासाहेब ब-याच दिवसांनी भेटल्याने सगळ्यांना तरतरी आलेली होती.




आणि या आमच्या माहेरवाशिणी, यांनी दिवाळीत आकाशकंदिलाच्या वायर वरच आपला झुलता बंगला बांधला आहे. 
ही दुस-या दिवशीची सुरुवातीची खादाडी - 
आणि आता खाली गड्ड्यावरची विविध दुकाने- 
माझ्या लहानपणी या हॉटेलमध्ये खाजा नावाचा मॅद्याचा केलेला आणि वरुन प्रचंड पिठिसाखर घातलेला गोड पदार्थ मिळायचा, त्याचं वर्णन मी माझ्या लेकाला पुणॅ ते सोलापुर ४ तास सांगत होतो, पण या वेळी हा खाजा कुठे दिसलाच नाही. आताशा ही हॉटॅल बदलत्या काळाप्रमाणे डोसा, इडली ते पावभाजी ते चायनिज पर्यंत आली आहेत.
 पण लोकं गड्ड्यावर येतात ते या साठी, भाग्यश्री बटाटेवडा, पोलिसचॉकीच्या जवळ असणारा हा स्टॉल माझ्यासाठी गेल्या २० वर्षांचं आकर्षण आहे. दरवर्षी गड्डा फिरताना सुरुवातीला दोन , मध्ये दोन व शेवटी दोन असे वडे खाल्याशिवाय माझा गड्डा पुर्णच होत नाही, या वर्षी ही परंपरा पुढं माझ्या लेकाला देताना मला खुप छान वाटत होतं आणि तो पण पहिल्यांदाच इतक्या इंटरेस्ट्ने बटाटावडा खात होता.
माझे बाबा जसे मला खांद्यावर घेउन मला सगळा गड्डा फिरवत मी पण तसेच लेकाला घेउन फिरलो, त्याला खेळणी घेतली, वडे खाल्ले, उसाचा रस पिला, पापड खाल्ले, परत घरी येताना फुगा घेतला आणि मगच मला माझं बाबा होणं पुर्ण झाल्यासारखं वाटलं, लेक पण माझ्यासारखाच खांद्यावर झोपला होता, माझे केस घट्ट धरुन आणि पाय गळ्यात अडकवुन, माझा शर्ट पण तसाच मळला होता जसा बाबांचा मळायचा. फरक एवढाच होता की दुखणा-या खांद्याबद्द्ल मी दोन वेळा लेकाला सांगितलं आणि खाली उतरवलं होतं आणि बाबा कधी या बद्दल बोललेच नाहीत....
या फोटोपॅकी काही फोटो लेकानं खांद्यावर बसुन काढलेत.


 भाग्यश्री वड्याएवढेच हे चिवडे पण गड्ड्याचा अविभाज्य भाग आहेत.  ज्या मोठ्या पाळण्यांत बसायला मी अजुनही घाबरतो त्याचा लांबुनच काढलेला फोटो.
 परंपरेनुसार गड्डा फिरण्याचा शेवट या स्थानी झाला, या दादांनी दिलेलं पुदिन्याचं पाणी संध्याकाळ भर पोटात भरलेलं व्यवस्थित पचवतं, हा १-२ नाही तर १५ वर्षांचा अनुभव आहे.
तर अशी झाली या वर्षीची गड्डा यात्रा, पुढच्या वर्षी लग्नासहित ३ दिवस जायचा विचार आहे, पाहु या कसं जमतंय ते.
हर्षद

http://harshad-gaaanikha.blogspot.com/2011/01/blog-post_25.html



  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...