Sunday, December 26, 2021

अष्टविनायक :

 

 १ || श्री मयूरेश्वर (मोरगाव) ||


  अष्टविनायक : १ 
|| श्री मयूरेश्वर (मोरगाव) ||

मोरेश्वर/मयूरेश्वर (मोरगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो.

 श्री मयुरेश्वर मंदिर :

मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्यादगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनीमनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून यादेवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५०फूट उंचीची ‍संरक्षण भिंत आहे .
श्री मयुरेश्वराची मूर्ती :

 गाभार्‍यातील मयूरेश्वराची मूर्तीबैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे.मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावरनागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूसऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत.

 आख्यायिका :

असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावरउत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेरगणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला.त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असेनाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्यालामोरगाव असे म्हणतात.
या मंदिरात मयूरेश्वराबरोबर ऋद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत.असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्तीबनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ‍ती सिंधुसुराने तोडली.म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.
सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचेमानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिर्‍यांपासूनबनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती,मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीलायेथेच ठेवण्यात आले.

 जाण्यासाठी मार्ग :
· पुण्यापासून मोरगाव, हडपसर-सासवड आणि जेजुरीमार्गे ६४कि.मी. वर आहे.
 पुणे-सोलापूर मार्गावर पुण्यापासून ५५ कि.मी. वर चौफुला गावआहे. तेथून मोरगावला जाता येते. चौफुला ते मोरगाव अंतर २३कि.मी. आहे.
 पावसाळ्यात येथे मोर बघायला मिळतात.

जेवण्याची व राहण्याची सोय :

श्री माहेश्वरी भक्त निवास आहे. मेवाड भोजनालय या ठिकाणी निवास व भोजनाची व्यवस्था आहे. 

जवळील प्रेक्षणिय स्थळे :

१) पांडेश्वर :
पांडवानी बांधलेले पांडेश्वर मंदिर आहे. 
२)कऱ्हा नदी तीरावर जडभरताचे स्थान. 
नदीतीरावरील शिवमंदिर उत्तम शिल्पकलेचा नमुना आहे.
३)जेजुरी :
श्री मल्हारी मार्तंड खंडोबाचे प्रसिद्ध स्थळ आहे.
४) लवथळेश्वर :
शिवमंदिर - जेजुरी पासून सुमारे २ कि.मी. अंतरावर आहे.
५) सासवड :
श्री संत सोपान महाराज समाधी.
६) नारायणपूर :
एकमुखी दत्ताचे मंदिर. शेजारीच नारायणेश्वरचे शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले शिवमंदिर.
 जवळच श्री बालाजी मंदिर तसेच पुरंदर किल्ला आहे 

|| गणपती बाप्पा मोरया ||
http;//maharastramandirbynikhilaghade.blogspot.com


२ || श्री सिद्धिविनायक (सिद्धटेक) ||

 अष्टविनायक : २ 
|| श्री सिद्धिविनायक (सिद्धटेक) ||

सिद्धिविनायक (सिद्धटेक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ.
अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे.अष्टविनायकामधील दुसरा गणपती.

 इतिहास :

पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असूरांशी भगवान विष्णु अनेक वर्षे लढत होते. मात्र, त्यात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करन विष्णूने असुरांचा वध केला.
छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. 15 फूट उंचीचे व 10 फूट लांबीचे हे देऊळ पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. 3 फूट उंच व 2.5 फूट लांबीची ही मूर्ती स्वयंभू आहे.
हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले तेव्हा फडक्यांनी या मंदिरास 21 प्रदक्षिणा घातल्या. त्यांतर 21 दिवसांनी त्यांची सरदारकी परत मिळाल्याची अख्यायिका सांगितली जाते. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते

श्री सिद्धिविनायकाची मूर्ती :

श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फुट रुंद आहे. मूर्ती उत्तराभिमुखी असून गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. एक मांडी घातली असून त्यावर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य,गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे.उत्तराभिमुखी असलेली या मूर्तीची सोंड उजवीकडे असल्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे 5 किलोमीटर फिरावे लागते.

 भौगोलिक :

श्री क्षेत्र सिद्धटेक अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे.

 जाण्याचा मार्ग :

सिद्धटेकला यात्रेकरूंना सोयीचे रेल्वेस्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. दौडवरुन शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते. नदीवर नाव चालू असते.
·दौंड-काष्टी-पेडगावमार्गे सिद्धटेक या ४८ कि.मी. लांबच्या मार्गाने (नदी पार न करता) जाता येते. पुण्याच्या शिवाजीनगर एस.टी. स्थानकापासून दुपारी तीन वाजता थेट सिद्धटेकची बस आहे.
·पुण्याहून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस-दौंडमार्गे सिद्धटेक ९८ कि.मी. वर आहे. (नदी पार करावी लागते.)

जवळील प्रेक्षणिय स्थळे :

१) पेडगाव :
भीमा नदीच्या तीरावर प्राचीन मंदिर आणि ऐतिहासिक किल्ला आहे.
२) राशीन :
झुलती दीपमाळ आणि देवीचे मंदिर आहे.
३) रेहेकुरी :
प्राणी-पक्षी अभयारण्य आहे.
४) भिगवण :
पक्षी अभयारण्य आहे.
५) दौंड :
भैरवनाथ व श्री विठ्ठल मंदिर आहे.

|| गणपती बाप्पा मोरया ||
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

३ || श्री बल्लाळेश्वर (पाली) ||

 अष्टविनायक : ३ 
|| श्री बल्लाळेश्वर (पाली) ||

बल्लाळेश्वर (पाली) हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचेदेऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.गणेश पुराणातअष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्र्वरओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहेकी जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हागणपतीचा असीम भक्त होता.

 इतिहास :

नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतरकेले.

 श्री बल्लाळेश्वर मूर्ती :

श्री बल्लाळेश्वराची मूर्ती गाभार्यात पाषाणाच्या सिंहासनावर विराजमान आहे.मूर्ती अर्धगोलाकार असून तीन फूट उंचीची व डाव्या सोंडेची आहे.श्रीच्या मस्तकावर मुकुट आहे.श्रीच्या डोळ्यांत आणि नाभित जडवलेले हिरे मूर्तीवर सूर्याची किरणे पड़ताच झळाळून उठतात.श्रीच्या मागे चांदीची कलात्मक प्रभावळ असून रिद्धिसिद्धि त्यावर चवऱ्या ढाळीत उभ्या असलेल्या दिसतात.दुसऱ्या गाभार्यात चांदीने मढविलेला मूषक हातात मोदक घेतलेल्या अवस्थेत उभा आहे.

 श्री बल्लाळेश्वर मंदिर :

या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे, जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूसदोन तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिर्‍यांपासून बनवले आहेत, गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत.

 आख्यायिका :

विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्रीबल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. तर मुद्गलपुराणात जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथासांगितल्याचा उल्लेख आहे. कृत युगात येथे पल्लीपूर नांवाचे नगर होते. तेव्हा तेथे कल्याण नांवाचा वैशवाणी राहत असे. या कुटूंबातबल्लाळ नांवाचा सुपुत्र झाला. बल्लाळ लहानपणा पासूनध्यानधारणा व गणेशचिंतनात मग्न असे. अध्ययन व व्यापार न करता बल्लाळ भक्ती मार्गाला लागला व इतर सवंगड्यांनाही तेचकरायला लावीत असे, म्हणून कल्याण शेठजींनी बल्लाळचा गणपतीदूर फेकून दिला आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले. नंतरबल्लाळने घरी जाणार नाही येथेच तुला देह अर्पण करीन अशादृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. त्याचा भक्तिभाव पाहून श्री गजाननानेविप्र रूपात प्रकट होऊन त्यांनी बल्लाळला बंधनातून मुक्त केले वत्याला वर दिला. बल्लाळाने विनायकाला विनंती केली की, आपणयेथे कायमचे वास्तव्य करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात.तो वर बल्लाळाला देवून श्री गजाननाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली.बल्लाळविनायक या नावाने श्रीगणेश येथील शिळे मध्ये अंतर्धानपावले. तीच ही बल्लाळेश्वराची मूर्ती आहे.

 जाण्याचा मार्ग :

बल्लाळेश्वर (पाली) हे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे.पुण्यापासून ११० किलोमीटरवर आहे. पुणे- लोणावळा -खोपोलीमार्गे आपण बल्लाळेश्र्वरला जाऊ शकतो.

  जेवण्याची व राहण्याची व्यवस्था :

गावात भोजन व्यवस्था नाही, आगावू सूचना दिल्यास गावातील रहिवासी घरगुती भोजनाची व्यवस्था करू शकतात.
येथील देवस्थानच्या भक्त निवासात निवासाची व्यवस्था आहे. तसेच दुपारी प्रसादाची व्यवस्था आहे.

 जवळची प्रेक्षणीय स्थळे :

१) सरसगड : मंदिराजवळील किल्ला.
२) सुधागड : किल्ला असून भृगू ऋषींनी स्थापन केलेले भोराई देवीचे मंदिर आहे.
३) सिद्धेश्वर : पालीहुन ३ की.मी. स्वयंभू शंकराचे स्थान.
४) उद्धर : पालीहुन १० कि.मी.श्री रामाने जटायुचा उद्धार केलेले स्थान.
५) उन्हेरे : पालिहुन ३ कि.मी. गरम पाण्याचे झरे असलेले स्थान.
६) पुई : येथे एकविस गणेश मंदिरे आहेत.
७) ठाणाळे : येथे कोरीव लेणी आहे.
|| गणपती बाप्पा मोरया ||
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com






छोटे देश, भरपूर आनंद...

 मित्रांनो, आज २०२१ चा शेवटचा रविवार... वर्षभर ‘जिंदगी वसूल’ हे सदर लिहिताना मनस्वी आनंद आणि समाधान मिळालं. तुम्हा सर्वांसारखे प्रवास-प्रेमी वाचक मिळणं हे भाग्यच म्हणावं लागेल. अनेकांचे ईमेल्स यायचे व त्यांना जमेल तसं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीत असे. कित्येकांशी मैत्रीदेखील झाली. तुमच्यात ‘बजेट ट्रॅव्हल’विषयी एक उत्सुकता निर्माण झाली असेल आणि काही लोक नक्कीच ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धत अवलंबून प्रवास करतील अशी अशा करतो. प्रवासासाठी तुमच्याकडं जास्त पैसे असायलाच पाहिजेत असं गरजेचं नाही. तुम्ही फक्त तुमचे प्राधान्यक्रम ठरवून घेतले पाहिजेत, स्वतःला त्याबद्दल जाणीव करून दिली पाहिजे, काही तडजोडी केल्या पाहिजेत आणि परिस्थितीशी जुळवून घेऊन प्रवास करणं आवश्यक आहे. हे सारं केल्यास नक्कीच भारी फिरता येईल यात शंका नाही!

बजेट ट्रॅव्हल म्हणजे नेमकं काय? कसं करायचं? याविषयी मी वेळोवेळी काही मुद्दे मांडत आलोय; पण बजेट ट्रॅव्हलचे फायदे काय, असा जर विचार केलात, तर त्यामुळं :-

  • नवीन, वैविध्यपूर्ण मित्र बनवण्यासाठी बजेट-अनुकूल वसतिगृहं ही उत्तम ठिकाणं आहेत. भरपूर लोकांशी मैत्री होते.

  • प्रवास करताना जास्तीत जास्त पायी जर फिरलो तर उत्तमच. सर्वत्र चालणं हा व्यायामाचा एक सोयीस्कर प्रकार आहे (आणि तोही विनामूल्य आहे).

  • स्ट्रीट फूड अधिक चवदार तर असतंच; पण ते स्वस्तही असतं.

  • खिशात कमी पैसे असण्यानं सर्जनशीलता येईल, क्रिएटिव्ह होऊ, नवीन कल्पना डोक्यात येतील अशा इत्यादी गोष्टी घडतील.

  • बजेटमध्ये प्रवास केल्यानं आपला पैसा कुठं जातो आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो याचं आकलन होतं.

  • आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे पूर्णपणे पुन्हा नव्यानं समजतं.

  • बजेट ट्रॅव्हलमुळं आपण कायम ‘Down to Earth’ राहतो आणि चौकटीबाहेर स्वप्नं पाहायला लागतो.

बजेट ट्रॅव्हलमुळं आपण आव्हानांना सामोरं जाऊ लागतो, कृतज्ञतापूर्वक वागू लागतो, आत्म-नियंत्रण शिकू लागतो आणि निरोगी जीवनाकडं वाटचाल करू लागतो. एक जगावेगळा दृष्टिकोन हे बजेट ट्रॅव्हल नावाचं विद्यापीठ शिकवतं.

आजच्या सदरात जगातील सर्वांत कमी ज्ञात असलेल्या देशांबद्दल जाणून घेऊ या :

• कोमोरोस (Comoros) :

आफ्रिकेतील मादागास्कर आणि मोझांबिक या दोन देशांमधील महासागरात असलेल्या कोमोरोसमध्ये स्वच्छ पाणी आणि गुलाबी किनारे आहेत, जे पर्यटकांना आकर्षित करतात. तेथील हवेत काहीतरी वेगळं आहे, सहसा ‘परफ्यूम आयल्स’ असं याला म्हटलं जातं. कोमोरोसची बेटं फ्रेंच वसाहती काळापासून सुगंध तयार करण्यासाठी सुगंधी वनस्पतींची लागवड करत आहेत.

• ब्रुनेई (Brunei)

एका बाजूनं मलेशियाच्या बोर्नियोच्या जंगलांनी वेढला गेलेला ब्रुनेई हा आशिया खंडातील देश. सुलतान हसनल बोलकिया या एका व्यक्तिमत्त्वाभोवती बांधलं गेलेलं हे राष्ट्र आहे. त्या राजाकडं पाच हजारहून अधिक गाड्या आहेत. गेली सहा शतकं याच सुलतानाच्या कुटुंबाचं राज्य आहे. गिर्यारोहक आणि साहसी लोकांसाठी ब्रुनेईमध्ये नऊ पर्वत शिखरं, अनेक जंगलं राखीव आहेत.

• डोमिनिका (Dominica)

कॅरिबियन देशांपैकी एक डोमिनिकामधील दमट जंगलाखाली नऊ सक्रिय ज्वालामुखी आहेत. डोमिनिका हे एक वेगळं जग आहे : जंगल, गरीब लोक आणि आश्चर्यकारकपणे सुंदर ठिकाणं. पूर्वीच्या ब्रिटिश कॉलनीत अजूनही स्थानिक लोक चर्चला जाण्यासाठी दर रविवारी सर्वोत्तम पोशाख घालून आलेले दिसतात, तर तिथल्या बंदरांमध्ये क्रूजहून अधिक मासेमारी नौका आहेत. डोमिनिकामध्ये भरपूर धबधबे, नद्या आणि तलाव आहेत.

• माल्टा (Malta)

युरोपातील माल्टा हा देश बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे, तरीही बहुसंख्य लोकांना याबद्दल अधिक माहिती नाही. माल्टाची संमिश्र संस्कृती आहे : थोडेसे ब्रिटीश, थोडेसे इटालियन व थोडेसे मध्य पूर्व आणि येथे समुद्री डाकू, शूरवीर व सुलतान यांच्या आठवणींना उजाळा मिळतो. माल्टा समुद्रकिनारे, नाइटलाइफ, कडक उन्हाळा आणि स्कूबा डायव्हिंगसाठी प्रसिद्ध आहे.

• तिमोर लेस्टे (Timor Leste)

एकविसाव्या शतकात तिमोर लेस्टे हा देश उदयास आला. आशियातील सर्वांत नवीन देश म्हणून उदयास आल्याने तिमोर लेस्टेमध्ये काही दशकं अराजक होतं. आश्चर्यकारक नैसर्गिक चमत्कार, धुक्यानं झाकलेल्या पर्वत शिखरांपासून ते खडबडीत, निर्जन समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, पर्यटन पायाभूत सुविधांच्या अभावाला आव्हान देण्यास तयार असलेल्या प्रवाशांची तिमोर लेस्टे वाट पहात आहे. मूळ डायव्ह साइट्स अजूनही शोधल्या जात आहेत.

• मोल्डोव्हा (Moldova)

पूर्व युरोपमध्ये तुम्हाला मोल्डोव्हा हा आकर्षक देश सापडेल. तुम्ही या देशाबद्दल ऐकलं नाही असं एक कारण आहे : हा प्रवाशांनी युरोपमध्ये सर्वात कमी भेट दिलेला देश आहे. मोल्डोव्हामध्ये राजधानी शहर चिसिनौ, ओरहेयुल वेची, सोरोका किल्ला आणि टिपोवा मठ यांसह काही आकर्षक प्रेक्षणीय ठिकाणं आहेत. तुम्हाला वाइन आवडत असल्यास Miletii Mici येथे नक्की भेट द्या, कारण ती जागा जगातील सर्वांत मोठा अंडरग्राउंड वाइन तळघर आहे.

• गयाना (Guyana)

कोलंबिया, ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांची नावं ऐकली की आपल्यासमोर येतं ते ‘दक्षिण अमेरिका’. तिथंच, उत्तरेला व्हेनेझुएला आणि ब्राझीलच्या सीमेवर असलेल्या गयाना देशाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. देशाचा तीनचतुर्थांश भाग निर्जन आहे. इथं वन्यजीवन व साहसी प्रकार अनुभवण्यासाठी पर्यटक आकर्षित होत आहेत.

• सॅन मारिनो (San Marino)

जगातील सर्वात जुनं प्रजासत्ताक आणि युरोपमधील तिसरा छोटा देश. सॅन मारिनो हा देश इतिहासाचं एक जिवंत चित्र आहे, जे आज पर्यटकांना एक सुखद अनुभव देतं. ''सॅन मारिनो : ऐतिहासिक केंद्र आणि माउंट टिटानो'' ही साइट २००८ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीचा भाग बनली आहे. निवांत चालत फिरा. अरुंद गल्ल्या आश्चर्यानं भरलेल्या आहेत. पदपथ डोंगराच्या कडेला मनोरंजक मार्गानं वळवतात आणि नवं पाहण्यास आमंत्रित करतात.

तर मित्रांनो, या साऱ्या देशांची नावं तुम्ही ऐकलीच असतील असं नाही, किंबहुना त्याबद्दल माहिती असेलही; परंतु हे देश जास्त ज्ञात नाहीत. येणाऱ्या वर्षात कुठल्याही खंडात फिरायला गेलात तर नवं शोधण्याचा प्रयत्न नक्की करा. गेलं वर्षभर तुम्ही माझ्या या सदराला खूप प्रेम दिलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि शेवटी एकच सांगतो की, जमेल तेव्हा आणि जमेल तसं ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीनं बजेट ट्रॅव्हल करा. २०२० व २०२१ ही दोन्ही वर्षं तशी सर्वांसाठीच कठीण गेली आहेत. तरीही, जर तुम्‍ही मागच्या वर्षाच्‍या आणि त्याहून मागील वर्षाच्‍या तुलनेत आता थोडे बरे असाल, तर तुम्‍हाला काळजी करायची गरज नाही, तुम्‍हाला संयमाची गरज आहे. संयम बाळगा आणि बघा, येणारा काळ हा तुमचा असेल, तुम्हाला प्रवासाचे योग येतील आणि त्यातून निश्चितच ‘जिंदगी वसूल’ होईल!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

निसर्गरत्नांचं आश्रयस्थान : ईगलनेस्ट

 देशातली विविध जंगलं आणि त्यांचं माझ्याशी असलेलं अतूट नातं याबाबत मी गेल्या अनेक लेखांमधून तुमच्याशी संवाद साधलाय. निसर्गाच्या या अद्भुत कलाकृतीनं आजवर माझ्यावर जी भुरळ घातली, मला संमोहित केलं तिच्या अमलाखाली मी अनेक जंगलं भटकलो. या भटकंतीनं माझं जीवन खऱ्या अर्थानं समृद्ध झालं. भारतातल्या अगदी प्रत्येक भागातली जंगलं माझ्या या निसर्गयज्ञाच्या ध्यासापायी मी पालथी घातली. आजही एक प्रकारची अनामिक ओढ माझ्या मनात निसर्गाविषयी कायम आहे. मला निसर्गाची गोडी लावणारे माझे दोन गुरू म्हणजे व्यंकटेश माडगूळकर आणि किरण पुरंदरे यांनी मला निसर्ग बघायला, वाचायला शिकवला. आपल्याला निसर्ग वाचता आला नाही तर तो वाचवता कसा येणार, या विचारानं मीही मन लावून निसर्ग वाचला. निसर्ग वाचताना माझ्या असं लक्षात आलं, की निसर्ग वाचवण्यासाठी आपण असं वेगळं काही करण्याची गरजच नाही. उलट निसर्गानं आखून दिलेल्या नियमांनुसार आपण वागलो, निसर्गाचं ऐकलं, तर अख्खी मानवजात आपण वाचवू शकू. निसर्गाच्या अस्तित्वावरच आपलं अस्तित्व अवलंबून आहे, त्यामुळं निसर्गाला वाचवण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा त्याला जाणून घेऊन त्यानं आखून दिलेल्या चौकटीप्रमाणे वागलो तर आपलं भवितव्य उज्ज्वल असेल यात कोणतीही शंका नाही.

भारतातल्या अनेक सुंदर जंगलांपैकी अशाच एका सुंदर जंगलानं अगदी बालपणापासून माझ्यावर विलक्षण जादू केली होती. अर्थात, अगदी लहान असताना मला निसर्ग, जंगल वगैरे बाबींबद्दल फारसा गंध नव्हता. अगदी बालपणीच्या काळात आई-बाबा यांच्याकडून ऐकलेल्या गोष्टींमधून ईशान्य भारतातली जंगलं, तिथले प्राणी-पक्षी यांच्याबद्दल माझ्या मनात एक चित्र तयार झालं होतं. इथल्या जंगलातल्या जळवा माणसाच्या रक्ताचा अगदी शेवटचा थेंब संपेपर्यंत रक्त शोषून घेतात, इथले डास हे पक्ष्यांपेक्षा मोठ्या आकाराचे असतात, उडते सर्प आपल्या डोक्यावर हिरे घेऊन जातात, अशा नानाविध कल्पनांनी माझ्या मनात ईशान्य भारतातली जंगलं रंगवली होती. पण जसजसा मी मोठा होत गेलो, तसतशी मला ‘निसर्गदृष्टी’ लाभत गेली. या कल्पना केवळ अतिरंजक कथा आहेत हे समजत गेलं. पण ईशान्य भारतातल्या जंगलांची ओढ काही कमी झाली नाही. याचं कारण इथली सुंदर जंगलं आणि त्यात असलेली अफलातून जैवविविधता. याच ओढीतून मी अनेक वर्षांपूर्वी एका अभयारण्याला भेट दिली आणि त्या जंगलाच्या प्रेमातच पडलो. पक्षी निरीक्षण आणि पक्षी अभ्यास यांची नव्यानं व्याख्या ठरवणाऱ्या या जंगलाचं नाव आहे ‘ईगलनेस्ट वन्यजीव अभयारण्य’. अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या या अभयारण्याला निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व आहे. या जंगलाच्या ईशान्येला ‘सेसा ऑर्किड अभयारण्य’ आहे, तर पूर्वेला कामेंग नदीच्या पलीकडच्या बाजूला ‘पाके व्याघ्र प्रकल्प’ आहे. कामेंग हत्ती प्रकल्पाचा भाग असलेली ही तिन्ही जंगलं. १९५० साली भारतीय लष्कराच्या रेड ईगल तुकडीला या ठिकाणी तैनात करण्यात आलं होतं, त्यावरूनच या अभयारण्याचं नाव ‘ईगलनेस्ट’ अभयारण्य असं पडलं आहे.

१९८९ साली या जंगलाला अभयारण्य म्हणून मान्यता देण्यात आली. सुमारे २१८ चौ. कि.मी. क्षेत्रात हे अभयारण्य पसरलेलं आहे. टिप्पी नदी ही या जंगलातून वाहणारी प्रमुख नदी, जी पुढं कामेंग या नदीला मिळते. याशिवाय बुहिरी, दिहुंग या नद्या पुढं ब्रह्मपुत्रेला जाऊन मिळतात. मोठ्या प्रमाणावर पडणारा पाऊस हा या नद्यांचा मुख्य जलस्रोत आहे. या नद्या आणि काही छोटे-मोठे ओढे या अभयारण्यातील जीवांची तहान भागवतात. अतिशय दुर्गम भाग आणि कच्चा रस्ता यामुळं हे जंगल आजपर्यंत टिकून राहिलं आहे. वैज्ञानिक, सैन्य आणि निसर्ग पर्यटक एवढेच काय ते या जंगलाच्या संपर्कात येतात. पक्षी निरीक्षण यादृष्टीनं या जंगलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक प्रजातींचे दुर्मीळ प्राणी, पक्षी, कीटक आपल्याला केवळ याच भागात बघायला मिळतात. सुमारे ५२५ प्रजातींच्या पक्ष्यांचं हे अभयारण्य म्हणजे आश्रयस्थान. १९९५ साली रमणा अत्रेय यांनी ‘बुगुन लियोचिकला’ या दुर्मीळ पक्ष्याचा येथे शोध लावला. पुढं २००६ साली त्यांनी या पक्ष्याचं इथं पुन्हा निरीक्षण नोंदवलं आणि त्यावर अभ्यास केला. हा पक्षी भारतात या ईगलनेस्ट खोऱ्याव्यतिरिक्त अन्यत्र कुठंही आढळत नाही. गेल्या ५० वर्षांत भारतात शोधण्यात आलेली ही शेवटची पक्ष्याची प्रजाती आहे.

बुगुन लियोचिकला हा सातभाई पक्ष्याच्या कुळातील एक छोटा पक्षी आहे. त्याचा पिसारा पिवळट- हिरवट -राखाडी रंगाचा आहे आणि डोक्याचा वरचा भाग काळा असतो. त्याच्या चेहऱ्यावर नारंगी-पिवळ्या रेषा आणि पंखांवर पिवळे, लाल, पांढरे पट्टे असतात. शेपूट काळी असून, तिचं टोक लाल रंगाचं असतं. त्याचे पाय गुलाबी रंगाचे असतात, तर चोच तोंडापाशी काळ्या रंगाची असून, टोकाकडं पांढऱ्या रंगाची होते. या पक्ष्याचा साधारणतः आकार २२ सें.मी. एवढा छोटा आहे. २००६ मध्ये या पक्ष्यांची संख्या सुमारे १४ नोंदवण्यात आली होती. आता या पक्ष्याला मिळालेलं संरक्षण आणि त्यांचं नोंदवण्यात आलेलं निरीक्षण याच्या आधारे शास्त्रज्ञांच्या मते ही संख्या सुमारे ५० ते २५० या घरात पोहोचली असावी. रमणा अत्रेय यांनी २००५ साली ईगलनेस्ट अभयारण्यात हा पक्षी पाहिल्यावर त्याचं शास्त्रोक्त वर्णन केलं. याअगोदर त्यांनी हा पक्षी १९९५ साली इथंच पहिला होता. हा नवीन प्रजातीचा पक्षी आहे का, याची खात्री करण्यासाठी त्यांनी दोन पक्ष्यांना पकडून त्यांचा शास्त्रीय अभ्यास केला आणि २००६ साली नवीन प्रजातीचा पक्षी सापडल्याचं जाहीर केलं. या पक्ष्याचा रंग आणि आवाज इतका विशिष्ट आहे, की पक्षी निरीक्षकांच्या दृष्टीतून हा पक्षी निसटणं सहसा कठीणच. पक्षिशास्त्रात अशा प्रकारे पक्ष्याची नवीन प्रजात सापडणं ही दुर्मीळ घटना आहे. इथं राहणाऱ्या बुगुन जमातीच्या लोकांवरून या पक्ष्याला बुगुन लियोचिकला हे नाव देण्यात आलं आहे.

याशिवाय लाल पांडा, कॅप्ड लंगूर, अरुणाचल मकाक असे दुर्मीळ सस्तन प्राणी आणि अनेक प्रजातींचे दुर्मीळ सरपटणारे प्राणी या जंगलात सापडतात. ‘अबॉर हिल्स अगामा’ या सरड्याच्या प्रजातीचा शोध १२५ वर्षांनंतर पुन्हा ईगलनेस्ट अभयारण्यात लावण्यात आला. डॉ. अन्वरुद्दीन चौधरी यांनी १९९७ साली माकडाच्या नव्या प्रजातीचा शोध इथंच लावला. या प्रजातीचा अभ्यास करून ‘अरुणाचल मकाक’ असं नाव देण्यात आलं. एकूण, इथल्या जैवविविधतेचा अभ्यास केला तर असं लक्षात येईल, की अनेक दुर्मीळ प्रजातींच्या जीवांचं ईगलनेस्ट हे आश्रयस्थान. आपण एकदा या जंगलाला भेट दिली की आपल्या मनात या जंगलाबद्दल एक विशिष्ट स्थान निर्माण होतं. अफलातून निसर्गसौंदर्यासाठी आणि अद्भुत जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या जंगलाबद्दल आपल्या मनात एक विलक्षण ओढ निर्माण होते. ही ओढ आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. निसर्गाच्या या सादाला प्रतिसाद देऊन आपण निसर्गाकडं नकळत ओढले जातो. या ओढीनं निसर्ग आणि आपल्यातलं अंतर पावलापावलाला कमी होत जातं.

गेल्या वर्षभरात भारतातल्या निसर्गानं समृद्ध असलेल्या अनेक जंगलांचा आपण आढावा घेतला. ही जंगलं माझ्या दिठीतून मला जशी दिसली, तशी मी रंगवली. अनेकदा माझ्या लेखणीतून त्यांचं वर्णन करताना माझ्या अत्यंत आवडीचं जंगल असा अनेक जंगलांचा उल्लेख आला आहे. याचं कारण म्हणजे प्रत्येक जंगलाचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. त्यांची एकमेकांशी तुलना होऊ शकत नाही. एकतर निसर्ग हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, त्यामुळं प्रत्येक जंगलाला माझ्या मनात धृवपद आहे. या जंगलांनी माझ्यावर विलक्षण जादू केलेली आहे. ही ‘रानभूल’ मला निसर्गाच्या अधिकाधिक जवळ घेऊन गेली. निसर्गासमोर नतमस्तक झाल्यावर आज ‘निसर्गापुढे काय मागो कळेना’ अशी माझी अवस्था झाली आहे. त्या निसर्गनायकाकडं ‘सदा सर्वदा योग तुझा घडावा’ असं मागणं करतो आणि लेखणीला अर्धविराम देतो.

कसं जाल?

पुणे/मुंबई-गुवाहाटी-तेजपूर-भालुपोंग-तेंगा-रामलिंगा

भेट देण्यास उत्तम हंगाम -

नोव्हेंबर ते एप्रिल

काय पाहू शकाल?

सस्तन प्राणी : गवा, भेकर, रेड पांडा, हिमालयन सेरो, हिमालयन काळं अस्वल, कॅप्ड लंगूर, अरुणाचल मकाक, वाघ, हत्ती, लेपर्ड कॅट, गोल्डन कॅट, भूतान जायंट फ्लाइंग स्क्विरल, अॅरो टेल्ड फ्लाइंग स्क्विरल, स्लो लोरीस इ.

पक्षी : सुमारे ५२५ हून अधिक प्रजातींचे पक्षी, व्हाइट कॉलर्ड ब्लॅकबर्ड्स, वॉल क्रीपर्स, कॉमन बझार्ड, हॉगसन्स फ्रॉगमाऊथ, ब्लू व्हिसलिंग थ्रश, व्हाइट-क्रस्टेड लाफिंग थ्रश, बार्ड आउलेट, सिल्व्हर-इयर्ड मेसिया, बुगुन लियोचिकला, व्हाइट विंग्ड वूड डक, कॉमन मर्गेन्सर, राज धनेश, रीथ्ड हॉर्नबील, खलीज फिझंट, रुफस नेक्ड हॉर्नबील, आयबीस बील, लार्ज व्हिसलिंग टील, लाँग-बिल्ड रीन्ग्ड प्लोवर, हिल मैना, ब्लॅक स्टॉर्क, पिन-टेल्ड ग्रीन पिजन, हिमालयन पाईड किंगफिशर, तिबोटी खंड्या, फेअरी ब्लू बर्ड इ.

फुलपाखरं : सुमारे १६५ प्रजाती – भूतान ग्लोरी, ग्रे ॲडमिरल, स्कार्स रेड-फॉरेस्टर, डस्की लॅबिरिंथ, टायगरब्राऊन, जंगल क्वीन, व्हाइट एज्ड बुश-ब्राऊन, व्हाइट आऊल, इ.

(सदराचे लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. )

(शब्दांकन : ओंकार पांडुरंग बापट)

(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे.)




Tuesday, December 21, 2021

जगातील सर्वात थंड शहर (Most Cold City Of The World):

 जगातील सर्वात थंड शहर याकुत्स्कमध्ये तापमान -83 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले आहे. तेथे मानसशास्त्रज्ञ आणि छायाचित्रकारांनी तीव्र थंडीत मानवी भावना बदलतात की नाही हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. शहराचे तापमान इतके कमी का होते आणि मग येथील लोक कसे राहतात? जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तापमान खूप कमी असूनही तिथं लोकवस्ती आहे.(Coldest Places on Earth to Live)

इंटरनॅशनल फॉल्स ऑफ मिनेसोटा (International Falls of Minnesota) नावाचे शहर इतके थंड आहे की त्याला अमेरिकेचे हिमखंड म्हणतात. येथे विक्रमी तापमान -55 अंश सेल्सिअस आहे. या थंडीचा अंदाज येथील सरासरी 71.6 इंच बर्फवृष्टीवरून लावता येतो. संपूर्ण अमेरिकेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. तसे, कडाक्याची थंडी असूनही हे शहर पर्यटकांसाठी नंदनवनच राहिले आहे. कॅनडाच्या सीमेमुळे उन्हाळ्यात बर्फ मासेमारी आणि क्रॉस-कंट्री स्कीइंग देखील आहे. फोटो प्रतिकात्मक

इंटरनॅशनल फॉल्स ऑफ मिनेसोटा (International Falls of Minnesota) नावाचे शहर इतके थंड आहे की त्याला अमेरिकेचे हिमखंड म्हणतात. येथे विक्रमी तापमान -55 अंश सेल्सिअस आहे. या थंडीचा अंदाज येथील सरासरी 71.6 इंच बर्फवृष्टीवरून लावता येतो. संपूर्ण अमेरिकेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. तसे, कडाक्याची थंडी असूनही हे शहर पर्यटकांसाठी नंदनवनच राहिले आहे. कॅनडाच्या सीमेमुळे उन्हाळ्यात बर्फ मासेमारी आणि क्रॉस-कंट्री स्कीइंग देखील आहे. फोटो प्रतिकात्मक

कझाकस्तानमधील अस्ताना (Astana, Kazakhstan) शहरात जानेवारीत सरासरी तापमान -14 °C असते. कडाक्याच्या थंडीत पारा -61 अंशांपर्यंत घसरला आहे. त्यामुळेच अतिशय सुंदर घरे आणि मशिदींनी वेढलेले शहरातील रस्ते बहुतांश रिकामेच राहतात. येथील नद्या नोव्हेंबरपासून एप्रिलच्या सुरुवातीस गोठलेल्या राहतात आणि उन्हाळा येताच सामान्य नदीप्रमाणे वाहू लागतात. फोटो प्रतिकात्मक

कझाकस्तानमधील अस्ताना (Astana, Kazakhstan) शहरात जानेवारीत सरासरी तापमान -14 °C असते. कडाक्याच्या थंडीत पारा -61 अंशांपर्यंत घसरला आहे. त्यामुळेच अतिशय सुंदर घरे आणि मशिदींनी वेढलेले शहरातील रस्ते बहुतांश रिकामेच राहतात. येथील नद्या नोव्हेंबरपासून एप्रिलच्या सुरुवातीस गोठलेल्या राहतात आणि उन्हाळा येताच सामान्य नदीप्रमाणे वाहू लागतात. फोटो प्रतिकात्मक

उलानबाटार हे मंगोलियाचे (Ulanbatar Mongolia) सर्वात मोठे शहर आणि राजधानी आहे. समुद्रापासून सुमारे 4,430 फूट उंचीवर वसलेले, हे शहर जगातील सर्वात थंड राजधानी आहे, जेथे जानेवारीत सरासरी तापमान -24 °C आहे, जे -50 °C पर्यंत खाली येऊ शकते. हे शहर जंगल संपत्ती आणि स्थापत्य संस्कृतीसाठी देखील ओळखले जाते. तिबेटी शैलीची बौद्ध मंदिरे आहेत, ती पाहण्यासाठी पर्यटक दूरदूरवरून येतात. फोटो प्रतिकात्मक

उलानबाटार हे मंगोलियाचे (Ulanbatar Mongolia) सर्वात मोठे शहर आणि राजधानी आहे. समुद्रापासून सुमारे 4,430 फूट उंचीवर वसलेले, हे शहर जगातील सर्वात थंड राजधानी आहे, जेथे जानेवारीत सरासरी तापमान -24 °C आहे, जे -50 °C पर्यंत खाली येऊ शकते. हे शहर जंगल संपत्ती आणि स्थापत्य संस्कृतीसाठी देखील ओळखले जाते. तिबेटी शैलीची बौद्ध मंदिरे आहेत, ती पाहण्यासाठी पर्यटक दूरदूरवरून येतात. फोटो प्रतिकात्मक

कॅनेडियन शहर यलोनाइफ (Canadian city Yellowknife) हे बर्फाच्या वादळांसाठीही ओळखले जाते. सर्वात थंड देशांपैकी एक, कॅनडाचा हा भाग अत्यंत थंड आहे, जेथे सरासरी जानेवारी तापमान -27 अंश आहे. कमी होत असताना, ते -60 अंशांपर्यंत देखील जाते. तथापि, हे मनोरंजक आहे की हे शहर उन्हाळ्यात कॅनडातील सर्वात प्रकाशित शहरांपैकी एक आहे. कडक बर्फामुळे यलोनाइफला साहसप्रेमींचा मक्का मानला जातो. फोटो प्रतिकात्मक

कॅनेडियन शहर यलोनाइफ (Canadian city Yellowknife) हे बर्फाच्या वादळांसाठीही ओळखले जाते. सर्वात थंड देशांपैकी एक, कॅनडाचा हा भाग अत्यंत थंड आहे, जेथे सरासरी जानेवारी तापमान -27 अंश आहे. कमी होत असताना, ते -60 अंशांपर्यंत देखील जाते. तथापि, हे मनोरंजक आहे की हे शहर उन्हाळ्यात कॅनडातील सर्वात प्रकाशित शहरांपैकी एक आहे. कडक बर्फामुळे यलोनाइफला साहसप्रेमींचा मक्का मानला जातो. फोटो प्रतिकात्मक

रशियाचे नॉरिलस्क (Norilsk, Russia) शहर हे जगाच्या उत्तरेकडील टोकाला असलेले शहर आहे. येथील लोकसंख्या सुमारे एक लाख आहे. शहरात एकापेक्षा जास्त उत्तम संग्रहालये आणि भेट देण्याची ठिकाणे आहेत. मात्र त्यानंतरही येथे पर्यटनाला चालना मिळू शकली नाही, याचे कारण म्हणजे येथील थंडी. नोरिल्स्कमध्ये सरासरी तापमान -30 अंश राहते, तसेच  हिवाळ्यात ते -63 अंशांपर्यंत खाली येते. येथे एक खाण उद्योग देखील आहे, ज्यामुळे शहर हिवाळ्यात खोल काळ्या-लाल धुराने झाकलेले असते. अशा परिस्थितीत, कोणताही मोठा धोका लक्षात घेता, रशियन सरकारने 2001 मध्येच हे शहर बाहेरील पर्यटकांसाठी बंद केले. फोटो प्रतिकात्मक

रशियाचे नॉरिलस्क (Norilsk, Russia) शहर हे जगाच्या उत्तरेकडील टोकाला असलेले शहर आहे. येथील लोकसंख्या सुमारे एक लाख आहे. शहरात एकापेक्षा जास्त उत्तम संग्रहालये आणि भेट देण्याची ठिकाणे आहेत. मात्र त्यानंतरही येथे पर्यटनाला चालना मिळू शकली नाही, याचे कारण म्हणजे येथील थंडी. नोरिल्स्कमध्ये सरासरी तापमान -30 अंश राहते, तसेच हिवाळ्यात ते -63 अंशांपर्यंत खाली येते. येथे एक खाण उद्योग देखील आहे, ज्यामुळे शहर हिवाळ्यात खोल काळ्या-लाल धुराने झाकलेले असते. अशा परिस्थितीत, कोणताही मोठा धोका लक्षात घेता, रशियन सरकारने 2001 मध्येच हे शहर बाहेरील पर्यटकांसाठी बंद केले. फोटो प्रतिकात्मक

याकुत्स्क  (Yakutsk, Russia) नावाचे रशियन शहर  या यादीत अग्रस्थानी आहे. हे जगातील सर्वात थंड शहर मानले जाते, जिथे मानवी लोकसंख्या राहते. येथील सर्वात थंड तापमान -83 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. इथली प्रत्येक गोष्ट बर्फ आणि धुराने झाकलेली आहे. रशियाच्या लेना नदीच्या काठावर असलेल्या या गावात मासे दुकानांच्या बाहेर सजवले जातात आणि सततच्या बर्फामुळे ते महिनोमहिने ताजे राहतात. एवढ्या थंडीत इथल्या लोकांच्या भावनिक वर्तनात काही बदल झाला आहे का किंवा ते अशा थंडीत राहिल्यामुळे ते वेगळे वागतात का, हे जाणून घेण्यासाठी जिनिव्हा येथील स्टीव्ह आयनकर हा फोटोग्राफर इथे पोहोचला. मात्र, बराच वेळ छायाचित्रकार बाहेर जाण्याचे धाडस करू शकले नाहीत. नंतर त्याला कळले की बर्फाचा मानवी भावनांशी काहीही संबंध नाही. फोटो प्रतिकात्मक

याकुत्स्क (Yakutsk, Russia) नावाचे रशियन शहर या यादीत अग्रस्थानी आहे. हे जगातील सर्वात थंड शहर मानले जाते, जिथे मानवी लोकसंख्या राहते. येथील सर्वात थंड तापमान -83 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. इथली प्रत्येक गोष्ट बर्फ आणि धुराने झाकलेली आहे. रशियाच्या लेना नदीच्या काठावर असलेल्या या गावात मासे दुकानांच्या बाहेर सजवले जातात आणि सततच्या बर्फामुळे ते महिनोमहिने ताजे राहतात. एवढ्या थंडीत इथल्या लोकांच्या भावनिक वर्तनात काही बदल झाला आहे का किंवा ते अशा थंडीत राहिल्यामुळे ते वेगळे वागतात का, हे जाणून घेण्यासाठी जिनिव्हा येथील स्टीव्ह आयनकर हा फोटोग्राफर इथे पोहोचला. मात्र, बराच वेळ छायाचित्रकार बाहेर जाण्याचे धाडस करू शकले नाहीत. नंतर त्याला कळले की बर्फाचा मानवी भावनांशी काहीही संबंध नाही. फोटो प्रतिकात्मक

रशियातील आणखी एक शहर देखील सर्वात थंड शहरांच्या पंक्तीत आहे. ओम्याकोन (Omyakon, Russia) नावाचे हे शहर सायबेरियातील बर्फाळ खोऱ्याजवळ वसलेले आहे. हिवाळ्यात इथली जमीन बर्फाने इतकी कडक होते की लोकांना मृत्यूनंतर थडग्यात दफन करणे कठीण होते. सलग दोन ते तीन दिवस जमीन खोदल्यानंतरच दफन करता येते. जानेवारी महिन्यात येथील सरासरी तापमान सामान्यतः उणे ५० अंशांच्या आसपास राहते. येथे सर्वात कमी तापमान -71.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. जुलैमध्ये येथे उन्हाळा येतो तेव्हा दिवसाचे तापमान 18.7 अंशाच्या आसपास होते. फक्त हेच तापमान इथले सर्वात उष्ण आहे, ज्यामध्ये लोक बाहेर फिरतात आणि व्यायाम देखील करतात. अन्यथा व्यायाम किंवा काही शारीरिक श्रमामुळे येथे दम लागल्यामुळे मृत्यूचा धोका असतो. फोटो प्रतिकात्मक

रशियातील आणखी एक शहर देखील सर्वात थंड शहरांच्या पंक्तीत आहे. ओम्याकोन (Omyakon, Russia) नावाचे हे शहर सायबेरियातील बर्फाळ खोऱ्याजवळ वसलेले आहे. हिवाळ्यात इथली जमीन बर्फाने इतकी कडक होते की लोकांना मृत्यूनंतर थडग्यात दफन करणे कठीण होते. सलग दोन ते तीन दिवस जमीन खोदल्यानंतरच दफन करता येते. जानेवारी महिन्यात येथील सरासरी तापमान सामान्यतः उणे ५० अंशांच्या आसपास राहते. येथे सर्वात कमी तापमान -71.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. जुलैमध्ये येथे उन्हाळा येतो तेव्हा दिवसाचे तापमान 18.7 अंशाच्या आसपास होते. फक्त हेच तापमान इथले सर्वात उष्ण आहे, ज्यामध्ये लोक बाहेर फिरतात आणि व्यायाम देखील करतात. अन्यथा व्यायाम किंवा काही शारीरिक श्रमामुळे येथे दम लागल्यामुळे मृत्यूचा धोका असतो. फोटो प्रतिकात्मक

चंदनपुरी...जिथे बानुच्या सौंदर्याला भुलला खंडोबाराया! | चंपाषष्ठी स्पेशल

  चंपाषष्ठी (champashashthi) म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठ ही तिथी... मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात.

महाराष्ट्रात दुस-या क्रमाकांचे खंडोबाचे देवस्थान

मालेगाव तालुक्यातील प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र चंदनपुरी येथील खंडोबा मंदिरात शुक्रवारी चंपाषष्ठीनिमित्त यात्रोत्सव साजरा करण्यात येतो. हजारो मल्हारभक्तांनी खंडोबारायाचे दर्शन घेतले जाते. चंदनपुरी गावाला खंडोबा महाराज आराध्य दैवत लाभाले आहे. महाराष्ट्रात दुस-या क्रमाकांचे देवस्थान आहे. चंपाषष्ठीला दरवर्षी या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. तसेच जानेवारी महिन्यात चैत्र शुध्द पौर्णिमेला यात्रा भरते. यात्रेत लाखो भाविक महाराष्ट्राच्या कान्याकोप-यातुन देवाच्या दर्शनाला येतात.

चंपाषष्ठीची कथा
यामागील कथा अशी आहे की आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन ‘मणी’ व ‘मल्ल’ दैत्यांचा वध केला. ‘मल्हारी मार्तंड’ हा महादेवाचा एक अवतार होता. कृतयुगात ब्रह्म देवाने मणी व मल्ल राक्षसांना वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही. हे वर प्राप्त केल्यावर ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले. त्यांचा हा त्रास बघून ऋषीमुनींनी देवांकडे मदत मागितली. तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले ७ कोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसांवर चालून गेले. मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाची छाती फोडून त्याला जमिनदोस्त केले. तसेच मणी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे अशी इच्छा व्यक्त केली. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले.नंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला, तेव्हा त्याने शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली. तथास्तु म्हणून मार्तंड भैरवाने तेही मान्य केले. तेंव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाते.


बानुबयांचं गाव...चंदनपुरी
खंडोबाची द्वितीय पत्नी बाणाई हिचे हे गाव, बाणाईच्या सौदर्याला भूलून खंडोबाने याच ठिकाणी बाणाईच्या घरी धनगराचे रूप घेऊन धनगरवाड्यावर चाकरी केली होती व लग्न लावून जेजुरीस आणले असे सांगितले जाते. अनेक लोकगीता मधून ह्या कथेचे वर्णन दिसते तीच ही गिरणा नदी काठाची चंदनपुरी...

वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य

या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. तसेच या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात. तसेच या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्या मधील मालेगाव तालुक्यातील हे ठिकाण नाशिक-मालेगाव मार्गावर मालेगावचे अलीकडे चंदनपुरी फाट्या पासून ३ किमी अंतरावर आहे. गिरणा नदी काठी असलेल्या या गावातील गाडी रस्त्याने मंदिरा पर्यंत जाता येते. मंदिरास दगडी कोट असून पूर्व व पश्चिम बाजूने दरवाजे आहेत. मंदिराचे पुर्वद्वार प्रमुख असून या द्वारा बाहेर दीपमाळ पायारीमार्ग व मार्गाचे बाजूने चोथरे आहेत.पूर्व दरवाजाने आत गेल्यावर पूर्वभिमुख मुख्य मंदिर दिसते. मुख्य मंदिराची रचना मंडप व गर्भगृह अशी आहे. मंडपात जाण्यासाठी पूर्व द्वारास काही पायऱ्या आहेत हे मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधल्याचे सांगतात.

 पूर्वभिमुख गर्भगृहात एका पूर्वभिमुख कोनाड्यात खंडोबा, म्हाळसा, बाणाई यांच्या संगमरवरी उभ्या मुर्ती अलीकडे बसविल्याचे सांगतात या पूर्वीच्या मुर्ती काळ्या पाषाणाच्या होत्या व त्या भग्न झाल्याने या नवीन मूर्ती बसविण्यात आल्या. या मुर्ती समोर शिवलिंग आहे. मुख्य मंदिराच्या मागे कोटाचे पश्चिम दरवाज्याचे दक्षिण बाजूस एका कोनाड्यात शेंदूर चर्चित स्थान आहे. मंदिराच्या उत्तर बाजुस शिवलिंग व नंदी प्रतिमा आहे. चंदनपुरी गावाच्या पश्चिमेस एका उंचवट्यावर बाणाईचे छोटेसे मंदिर आहे. मंदिरातील मुर्ती संगमरवरी आहे, पौष पौर्णिमेस मोठी यात्रा भरते.

काशीचा कायाकल्प

   आजवर आपण ‘राउळी मंदिरी’ या सदरामधून भारतातल्या अनेक पुरातन मंदिरांची ओळख करून घेतली; पण आज परिचय करून घेणार आहोत तो अशा एका मंदिराचा, जे एकाच वेळी पुरातनही आहे आणि नित्यनूतनही. भारतातच काय पण; संपूर्ण जगात एकही असा हिंदू नसेल ज्यानं काशी शहर आणि तिथल्या भव्य काशी विश्वेश्वराचं नाव ऐकलं नसेल. आयुष्यात एकदा तरी काशीला जावं आणि विश्वेश्वराचं दर्शन घेऊन तिथलं गंगेचं पाणी तामिळनाडूमध्ये रामेश्वरी नेऊन तिथं त्या पाण्यानं शिवावर अभिषेक करावा, असं प्रत्येक भाविक हिंदू व्यक्तीला वाटतं.
  काशीमध्ये असं काय आहे की, हजारो वर्षांपासून हिंदूंचा जीव काशीमध्ये अडकलेला आहे? तेरा डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीमध्ये ३३९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या ‘काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पा’चं लोकार्पण केलं तेव्हा मी काशीमध्येच होते. जवळजवळ पाच लाख चौरस फूट विस्तार असलेल्या या प्रकल्पानं इंदूर संस्थानची राणी, देवी अहिल्याबाई होळकर यांनी १७८३ मध्ये बांधलेलं विश्वनाथाचं मंदिर थेट गंगाभिमुख केलं. काशी ही काशी आहे ती गंगा नदीमुळे. हिंदूंना सदैव पवित्र असलेली गंगा नदी काशीमध्ये एक खूप मोठं अर्धचंद्राकृती वळण घेते. तिच्या विस्तीर्ण पात्राच्या उत्तरेला, गंगेच्या डाव्या काठावर, वाराणसी वसलेलं आहे. फार प्राचीन काळापासून काशी ही एक पवित्र नगरी मानली गेलेली आहे.
       प्राचीन भारतीय साहित्यात या काशीनगरीचा उल्लेख ‘काशी, ‘वाराणसी’, ‘अविमुक्ता’, ‘आनंदवन’, ‘महाश्मशान’, ‘व्याप्ती’ अशा अनेक नावांनी केला गेलेला आहे. रामायण, महाभारत, स्कंद, मत्स्य, पद्म आदी पुराणं, बौद्धजातकं, बृहत्संहिता या सर्व ग्रंथांमधून काशीनगरीचा उल्लेख ‘भगवान शिवांची नगरी’ असा आहे.
          महाभारतातील एका कथेनुसार, काशीराज दिवोदास हा या काशीचा संस्थापक आहे. त्यानं इंद्राच्या आज्ञेवरून गंगेकाठी हे नगर वसवलं आणि भगवान शिवांना काशीमध्ये येऊन कायम राहायची विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन शिव इथं आले आणि त्यांनी भक्तांना सांगितलं की, प्रलय आला तरी काशी शिवांच्या त्रिशूळाच्या तीन टोकांवर सुरक्षित राहील, आणि इथं प्राणत्याग करणाऱ्या सर्वांना जन्म-मृत्यूच्या फेऱ्यापासून कायमची मुक्ती मिळेल.
      साक्षात् भगवान शिव काशीत राहायला आल्यामुळे इतर देव-देवताही इथं वास्तव्याला आल्या आणि मंदिरं घडत गेली. फार प्राचीन काळापासून काशी हे संस्कृत, वेद, ज्योतिष, व्याकरण आदी अध्ययनाचे एक प्रमुख केंद्र होते. चिनी प्रवासी ह्यूएन त्संग जेव्हा काशीत आला तेव्हा, ‘आपल्याला शंभर भव्य हिंदू मंदिरं दिसली’ असं त्यानं लिहिलं आहे, तर जेम्स प्रिन्सेप या ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ यानं अठराव्या शतकाच्या सुरुवातीला केलेल्या पाहणीत त्याला जवळजवळ एक हजार मंदिरं आढळली. काशी हे अतिशय सुंदर, श्रीमंत आणि हिंदूंसाठी पवित्र असं शहर होते आणि त्यामुळेच काशीवर इस्लामी आक्रमकांची सतत वक्रदृष्टी राहिली.
   काशी हे एक जनपददेखील होतं. ‘बौद्ध अंगुत्तर निकाय’ या ग्रंथात तत्कालीन भारतातील सोळा महाजनपदांमध्ये काशीची गणना होत होती. पुढं अकराव्या शतकात कनौजच्या गाहडवालवंशीय राजांनी वाराणसी इथं आपली उपराजधानी स्थापन केली. त्यांनी बाराव्या शतकात बांधलेलं वाराणसीजवळच्या कंदावा इथलं कर्दमेश्वर महादेव हे एकमेव असं मंदिर आहे, जे आक्रमकांच्या विध्वंसापासून वाचलं. ते मंदिर आजही मूळ स्वरूपात कंदावा इथं एका सुंदर पुष्करिणीशेजारी उभं आहे.
       कनौजचा राजा जयचंद राज्यावर असताना मुहंमद घोरीनं काशीवर स्वारी करून तिथली मंदिरं तोडली, हिंदूंचं शिरकाण केले आणि प्रचंड लूट केली. हे काशीवर झालेलं पहिलं इस्लामी आक्रमण. पुढं दिल्लीच्या तख्तावर आलेला कुतबुद्दीन ऐबक आणि त्यानंतरचा इस्लामी शासक अलाउद्दीन खिलजी यांनीही काशीवर हल्ला करून इथली हजार मंदिरं नष्ट केली, त्यात काशीविश्वेश्वराचंही मंदिर होतंच. हिंदूंनी ते परत उभारलं, हुसेन शाह शार्की आणि सिकंदर लोदी यांनी परत ते उद्ध्वस्त केलं. हा विध्वंसाचा आणि पुनर्निर्मितीचा क्रम सुरूच राहिला; पण हिंदूंनी कधीही काशीवरचा आपला हक्क सोडला नाही. जितक्या वेळा मंदिर पाडलं गेलं तितक्या वेळा ते परत बांधलं गेलं.
पुढं अकबराच्या काळात त्याचा सेनापती मानसिंह यानं १५८५ मध्ये काशी विश्वनाथाचं भव्य मंदिर नव्यानं बांधलं; पण औरंगजेबानं १६६९ मध्ये ते मंदिर जमीनदोस्त करून त्या जागी मशीद बांधली आणि हिंदूंवर जिझिया कर लादला. तेव्हा भक्तांनी तिथलं शिवलिंग नजीकच्या ज्ञानवापी विहिरीत लपवलं. औरंगजेबानं मंदिराची एक भिंत जाणून-बुजून अर्धीच पाडून तीवर मशीद उभारली; जेणेकरून हिंदूंना हा अपमान सदैव लक्षात राहावा. त्या काळी मंदिराच्या जागेलाच श्रीविश्वेश्वर मानून भक्त नमस्कार, पिंडदान व प्रदक्षिणा करत असत. औरंगजेबानं वाराणसीचं नावही बदलून महंमदाबाद असं ठेवलं होतं. छत्रपती शिवाजीमहाराजांना या घटनेनं अपरिमित दुःख झालं होतं. उत्तरेवर स्वारी करून हे मंदिर पुन्हा उभारावं अशी त्यांची खूप इच्छा होती; पण त्यांच्या अकाली मृत्यूमुळे ते शक्य झालं नाही.
        पेशव्यांच्या राजवटीच्या वेळी अहिल्यादेवी होळकरांनी औरंगजेबकालीन मशीद न पाडता ज्ञानवापीतून शिवलिंग बाहेर काढून, सध्या अस्तित्वात आहे ते पंचमंडपयुक्त विश्वनाथाचं मंदिर सतराव्या शतकात बांधलं. पुढं १८३९ मध्ये महाराजा रणजितसिंगानं या मंदिराचं शिखर सोन्यानं मढवून दिलं. हे मंदिर भारतातल्या सर्व हिंदूंना आकर्षित करतं. सध्या आहे ते मंदिर आकारानं छोटंसंच असलं तरी त्याचं शिखर रेखीव असून त्यावर कलात्मक नक्षी आहे. मागेच श्रीतारकेश्वराचं तसंच एक मंदिर आहे आणि दोन्ही मंदिरांना जोडणारा एक स्तंभयुक्त छोटा सभामंडप आहे; पण या मंडपाचं इस्लामी घुमटाकृती शिखर मुख्य मंदिरशिखराशी विसंगत वाटतं.
       पूर्वी हे मंदिर काशीच्या अगदी चिंचोळ्या, गजबजलेल्या गल्लीत होतं, त्यामुळे मंदिराचं स्थापत्य नीट दिसायचंच नाही. आजूबाजूला सर्वत्र अस्वच्छता होती. मंदिराबाहेर जेमतेम पन्नास माणसं उभी राहू शकतील इतकीच जागा होती. मंदिराच्या छोट्या आकारामुळे शेजारी असलेल्या औरंगजेबाच्या मशिदीचे घुमट डोळ्यांना जास्तच खुपायचे. आता मात्र मंदिरपरिसराचा पूर्ण कायापालट झालेला आहे. मंदिराभोवती बांधण्यात आलेल्या भव्य प्राकारामुळे मंदिर तर नीट बघता येतंच; पण हजारो लोक एकाच वेळी पूजा करू शकतात.
  प्रत्येक भारतीयानं काशीला जाऊन हे मंदिर बघितलंच पाहिजे इतकं सुंदर आणि भव्य-दिव्य असं हे मंदिर आता दिसतं.

By शेफाली वैद्य shefv@hotmail.com
(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

 मोदींपूर्वी मराठा साम्राज्याच्या महाराणीनं केलं होतं काशी विश्वनाथ धामचं पुनरुज्जीवन|Kashi Vishwanath Corridor

  पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी (PM Modi) काशी विश्वनाथ धाम (Kashi Vishwanath Corridor) हा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यांचं स्वप्न आता साकार झालं असून आज त्यांच्याच हस्ते या धामचे उद्घाटन होत आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी दोन दिवसीय वाराणसी दौऱ्यावर आहेत. पण, काशी विश्वनाथ धामची वैशिष्ट्ये काय आहेत? या धामचं पहिल्यांदा पुरुज्जीवन कोणी केलं होतं? तेच आज आपण पाहुयात.
२४१ वर्षांत तीनदा मंदिराला केलं पुनरुज्जीवित -
       गेल्या २४१ वर्षांत काशी विश्वनाथ मंदिराला तिसऱ्यांदा पुनरुज्जीवित करण्यात आलंय. या मंदिराला अनेकवेळा नेस्तनाबूत कऱण्याचा प्रयत्न देखील झाला. सुरुवातील मराठा साम्राज्याची महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी १७८० मध्ये या मंदिराला पुनरुज्जीवित केलं होतं. त्यानंतर महाराजा रणजीत सिंह यांनी १८५३ मध्ये या मंदिराच्या काही भागाला सोन्यानं मढवलं होतं. त्यानंतर 2019 मध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रकल्पांतर्गत या मंदिरात भव्य कॉरिडॉर बनवण्याचे काम सुरू झाले. भूमीपूजनानंतर सुमारे 2 वर्षे 8 महिन्यांनंतर या ड्रीम प्रोजेक्टचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. या संपूर्ण कॉरिडॉरच्या उभारणीसाठी 340 कोटी रुपये खर्च झाल्याचे समजते. मात्र, या संपूर्ण खर्चाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे दोन भाग -
     काशी विश्वनाथ कॉरिडॉर हे दोन भागात विभागण्यात आले आहे. मुख्य संकुल बांधण्यासाठी लाल रंगाचा दगड वापरण्यात आला आहे. कॉरिडॉरमध्ये चार मोठे दरवाजे आहेत, त्याभोवती एक प्रदक्षिणा मार्ग आहे. या मार्गावर संगमरवरी 22 शिलालेख लावण्यात आले आहेत. त्यावर शंकराचार्य, अन्नपूर्णा स्तोत्र, काशी विश्वनाथ आणि भगवान शंकराशी संबंधित महत्त्वाची माहिती नमूद करण्यात आली आहे. काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टच्या संकेतस्थळानुसार, हे मंदिर 'सुवर्ण मंदिर' म्हणूनही ओळखले जाते.
१६ लाख लाडूंचा प्रसाद -
   बनारसमध्येही महिनाभराचा उत्सव साजरा केला जाणार आहे, ज्याला ‘भव्य काशी-दिव्य काशी’ असे नाव देण्यात आले आहे. बनारसमधील एकही कुटुंब किंवा व्यक्ती या कार्यक्रमापासून वंचित राहू नये यासाठी 16 लाख लाडू प्रसादासाठी बनवले जात आहेत. कामगार ते लोकांच्या घरी पोहोचवतील. यासोबतच लोकांना स्मृतीचिन्हही देण्यात येणार आहे.

 

भन्नाट भूतान

       बघता बघता २०२१ हे वर्ष संपत आलंय. कोरोनानं आपल्या सर्वांचं आयुष्य बदलून टाकलंय. या दोन वर्षांत अनेकांच्या कोणी ना कोणी जवळच्या व्यक्तीचा वियोग झाला, तेव्हा अनेकांचा अधिक विश्वास बसला, की आयुष्य हे फार छोटं आहे, आपलं जगायचंच राहून गेलं तर? आणि मग काही लोकांनी त्यांच्या जगण्याचा ‘प्राधान्यक्रम’ बदलायला सुरुवात केली. तुम्ही असा विचार करताय की नाही अजून? मित्रांनो, आपला जन्म फक्त बिलं भरण्यासाठी किंवा मरण्यासाठी झाला नसून खऱ्या अर्थानं जगण्यासाठी झालाय हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रवासाला प्राधान्य देणारेही काहीजण तयार झाले आहेत. नवीन वर्षात अनेकांचे बऱ्याच ठिकाणी फिरायला जाण्याचे संकल्प असतीलच. थोडक्यात, हा सारा खटाटोप कशासाठी? तर नवं विश्व पाहण्यासाठी, चांगलं आयुष्य जगण्यासाठी आणि सुख-दुःखांना सामोरं जात खूश राहण्यासाठी…!
     सतत खूश राहणं हीदेखील एक कला आहे. दुसऱ्यांकडून कमीत कमी अपेक्षा ठेवल्या तर अपेक्षाभंगही कमी होतो. पण त्याहून भारी म्हणजे स्वतःकडून प्रवासाच्या, जगण्याच्या, अनुभव कमवण्याच्या आणि जास्तीत जास्त खूश राहण्याच्या अपेक्षा ठेवूया की…! ते साधंसोपं आहे तसं पाहिलं गेलं तर… असेच बहुसंख्य लोकं, जे जास्तीत जास्त खूश असतात ते आपल्या जवळच राहतात, हे तुम्हाला माहितीये का? त्या देशातील स्थानिक लोक सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा सकल राष्ट्रीय आनंदाला महत्त्व देतात. हा देश म्हणजे आपला शेजारी भूतान…! हा देश त्याच्या अद्वितीय तत्त्वज्ञानासाठी ओळखला जातो; सकल राष्ट्रीय आनंद (Gross National Happiness) आणि हाच त्यांच्या विकास धोरणाचा देखील एक भाग आहे.

शांग्री-ला व्हॅली (Shangri La)

नंदनवन भौतिक जगात अस्तित्वात असल्यास, ते भूतानमध्ये असेल. ब्रिटिश लेखक जेम्स हिल्टन यांच्या १९३३ च्या ‘लॉस्ट होरायझन’ या कादंबरीत वर्णन केलेलं शांग्री-ला हे कुनलुन पर्वतातील एक काल्पनिक ठिकाण आहे. आश्चर्यकारकपणे सुंदर भूतानने आपल्या संसाधनांचं इतक्या चांगल्या प्रकारे जतन केलं आहे आणि आपल्या संसाधनांचा इतका हुशारीनं वापर केला आहे, की भूतानला त्याच्या समृद्धतेमुळे आणि देशाच्या निसर्ग आणि पर्यावरणासाठी असलेल्या आसक्तीच्या भावनेमुळे शेवटचं शांग्री-ला म्हटलं गेलं आहे. भारत आणि चीनमधील हिमालयात खोलवर वसलेला एक छोटा, भूपरिवेष्टित देश भूतानमध्ये उंच पर्वत आणि खोल दऱ्या आहेत, ज्यामुळे विखुरलेल्या लोकसंख्येच्या वस्तींची ठिकाणं आहेत.
      भूतानमध्ये स्थिर राजकीय आणि आर्थिक वातावरण आहे. सामाजिक विषमतेच्या समस्या आणि प्रादेशिक असमानता दूर करण्यासाठी सतत प्रयत्न करून, अत्यंत गरिबी कमी करण्यात आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी या देशानं प्रचंड प्रगती केली आहे. पूर्वेकडील हिमालयाच्या शिखरांमध्ये, उंच इमारतींपेक्षा अधिक पर्वतीय मठांसह (Monasteries), भूतान हे हिमालयातील शेवटचं जिवंत राज्य आहे, जे आपल्या संस्कृती आणि परंपरांना शौर्यानं चिकटून आहे. परंतु हे ऐतिहासिक बौद्ध एन्क्लेव्ह हळूहळू आधुनिक होत आहे, त्यांच्या स्वतःच्या अटींवर. थोडक्यात काय, तर बदल हा होतच असतो. काही प्रमाणात आपली चौकट आखून बदल केले जातात एवढंच. मुळातच तेथील लोक भारीयेत. त्यांच्याशी संवाद साधला की लगेचंच आपलेपणा दिसतो. मी मागच्याच आठवड्यात लिहिलं होतं की, जे प्रवासी डोंगरात वेळ घालवतात, ते एका सकारात्मक शक्तीने किंवा ऊर्जेने जगताना दिसतात. भूतानमधील तर सर्वच नागरिक डोंगरांत राहतात. सहज विचार करा की काय कमालीची लोकं असतील तिथली...!
        भूतानची लोकसंख्या साडेसात ते आठ लाख असून, थिम्फू (Thimphu) ही राजधानी आहे. भूतानची राष्ट्रीय भाषा झोंगखा (Dzongkha) आहे. भूतानला बाइक राइड किंवा ड्राइव्ह करण्यात जी मजा आहे ना, ती कशातच नाही. अतिशय भन्नाट रोड आहेत. या देशात तर हमखास बजेट ट्रॅव्हल होऊ शकतं. भूतानला मार्च ते मे महिना आणि ऑक्टोबर – नोव्हेंबर हे महिने फिरण्यासाठी चांगले समजले जातात. भूतानचं एकमेव वास्तविक शहर; थिम्पूचं वीकेंड मार्केट, संग्रहालयं आणि बिअर आणि व्हिस्की बार अफलातून आहेत आणि येथे निवांत वेळ घालवता येतो. तक्तशांग गोएम्बा (टायगर्स नेस्ट मठ), देवदूतांच्या केसांना त्या जागी ठेवलं आहे. जगात बऱ्याच ठिकाणी लोक धार्मिक असतात, हे वेळोवेळी दिसून येतं. आपण प्रवास करताना रुढी-परंपरा समजून घ्यायच्या, तेवढीच ज्ञानात भर पडत राहते. Punakha Dzong ही भूतानची सर्वांत सुंदर इमारत असून, मो (MO-Mother) व पो (PO-Father) या नद्यांच्या संगमावर आहे. बुमथांग (Bumthang) खोऱ्यातील सातव्या शतकातील प्राचीन मंदिरं, पवित्र स्थळं आणि रोडोडेंड्रॉनची जंगलं ही न विसरता पाहिलीच पाहिजेत.
     चांगंगखा लखांग हा थिम्फू खोऱ्याकडं वळणाऱ्या एका छोट्या टेकडीवर वसलेला मठ तेराव्या शतकात बांधला गेला. बुद्ध डोर्डेन्मा; या ठिकाणी बसलेली बुद्धमूर्ती आहे. ब्राँझचा हा पुतळा आकर्षक आहे. ‘Suspension Bridge’ फोटोसाठी अथवा निवांत थांबण्यासाठी मस्त आहे. पारो (Paro) येथे रिंचेन पुंग झोंग ही जुनी अप्रतिम वास्तू आणि भूतानचा वारसा कॅप्चर करणारे, तसंच देशभरातून प्रदर्शित केलेल्या चांगल्या जतन केलेल्या कलाकृती या राष्ट्रीय संग्रहालयात पाहायला मिळतात. जलदापारा राष्ट्रीय उद्यान हे हिमालयाच्या पूर्वेकडील पायथ्याशी वसलेलं असून, तिथेच जवळ गोरुमारा राष्ट्रीय उद्यानही आहे. ही दोन्ही वन्यजीव अभयारण्यं सिंगल हॉर्नड गेंडा, हत्ती आणि बंगाल वाघ, ठिपकेदार हरणं, बार्किंग डीअर, सांभर हरणं, बायसन इत्यादींसाठी प्रसिद्ध आहेत. भूतानची रेड पांडा व गव्हाची बिअर फेमस आहे.
     मित्रांनो, भूतानचा पर्यटनस्थळ म्हणून विचार केला की सकल राष्ट्रीय आनंद, धनुर्विद्या, फडफडणारे प्रार्थना झेंडे, मुखवटा नृत्य, भिक्षू, रोडोडेंड्रॉन जंगलं, एक परोपकारी राजा आणि महागडं दैनंदिन पर्यटक शुल्क हे सारं डोळ्यांसमोर येऊन उभं राहतं. खरंच भूतान एक छोटासा पण भन्नाट देश आहे. भारतातून बाहेर जाऊन पटकन एखादा देश हिंडायचा असेल, तर भूतानला ७/८ दिवस निवांत जाऊन यायचं. शुद्ध हवा आणि शांतता मिळेल. या प्रवासातून नवचैतन्य प्राप्त होईल. खूश होण्यासाठी आपल्या कमाईतील थोडा तरी पैसा स्वतःच्या प्रवासावर खर्च करा आणि आपलीच जिंदगी वसूल करा... कारण कोरोनानं दाखवून दिलंय जगायचं कसं...! तर या निमित्ताने नवीन वर्षासाठी काही ना काही प्रवास करण्याचे प्लॅन्स आखा आणि त्यांना प्राधान्यक्रम देऊन प्रत्यक्षात उतरावा. सदिच्छा सर्वांना...

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)
By प्रज्ञेश मोळक pradnyesh.molak@gmail.com



अर्थपूर्ण रंगांचा आनंदी देश - 

सकाळ साप्ताहिक

चंद्रशेखर जोशी

भूतान हा भारतीय उपखंडातील सर्वाधिक ‘ॲव्हरेज हॅपिनेस इंडेक्स’ असलेला आपला सख्खा शेजारी देश. या देशाला भेट देण्याची तीव्र इच्छा अनेक दिवसांपासून होतीच. पण कोरोनापश्‍चात सोलो ट्रॅव्हलिंगवर बंदी आल्यामुळे मग सोबत्याचा शोध सुरू झाला. ट्रेकिंग आणि प्रवासाची आवड असलेला नाशिकचा मित्र प्रकाश जोशी सोबत यायला तयार झाला. मग इंटरनेटवरून भूतानबद्दलची माहिती घेण्यास सुरुवात केली. देश, धर्म, चलन, भाषा, अंतरे, वेश, बंधने शोधत गेलो (काही गोष्टींमध्ये नंतर तफावत आढळली).

प्रवासाची प्राथमिक व्यवस्था पार पडल्यावर आम्ही अखेर जयगाव या भारतीय सीमेवरील शेवटच्या गावामध्ये पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच ट्रॅव्हल एजन्सीच्या कार्यालयात हजर झालो. लिली नावाची व्यवस्थापिका, विशिष्ट भूतानी वेशभूषेतील गाइड पासन आणि ड्रायव्हर छोरतेन तिथे हजर होते. पासनने विशिष्ट रंगाचा ‘घो’ म्हणून ओळखला जाणारा गणवेश घातला होता. त्याच्याजवळ एक रंगीत शालही होती. या शालीच्या रंगावरून ही व्यक्ती कोणते काम करत असेल, हे लक्षात येते; उदाहरणार्थ, शासकीय कर्मचारी, धर्मविषयक काम, सामान्य नागरिक, मंत्री, राजा वगैरे. प्रत्येकासाठी वेगळ्या रंगाची शाल असते.

ओळखीचे आणि फिया वगैरे प्राथमिक सोपस्कार पार पडल्यावर ड्रायव्हर छोरतेन आमचे सामान घेऊन गाडीकडे गेला, तर गाइड पासन आम्हाला घेऊन इमिग्रेशन ऑफिसकडे. पंधरा मिनिटांत तेथील काम होऊन आम्ही भूतानच्या फुटशोलिंग या शहराकडे निघालो. फुटशोलिंगपासून राजधानी थिम्पूपर्यंत पावणेदोनशे किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी तब्बल सहा तास लागले, कारण संपूर्ण प्रवासात डोंगर-दऱ्या, भरपूर वळणे होती. पण रस्त्यातील निसर्गाची श्रीमंती, पाईन वृक्षांच्या रांगा, डोंगरांचे लेअर, त्यामधील रंगछटा, सूर्याचे लाइट इफेक्ट न्याहाळताना स्वतःला विसरून गेलो. रस्त्यामध्ये काही मॉनेस्ट्री आणि घरे पाहायला मिळाली. सर्वांची रचना एकसारखी आणि रंगकामसुद्धा विशिष्ट रंगसंगतीमध्ये होते. प्रवासात अनेक ठिकाणी विविध रंगांच्या पताका, झेंडे दिसत होते. तर काही ठिकाणी फक्त पांढऱ्या रंगाचे ध्वज दिसत होते. उत्सुकतेपोटी पासनला विचारले असता, रंगीत झेंड्यांमधील प्रत्येक रंग पंचमहाभूतांपैकी एकाचा आहे. या पताका, झेंडे वाऱ्याने जितके फडफडतात तेवढी आमची समृद्धी वाढत जाते, असे त्याने सांगितले. मग हे फक्त पांढरे झेंडे कशाचे? तर ते कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या स्मरणार्थ लावले जातात. त्यांच्या फडफडण्याने दिवंगत व्यक्तींच्या आत्म्याचा मुक्ती मिळण्याकडे प्रवास सुरू होतो, असे मानले जाते. तर, मानवी दोषांपासून मुक्त होण्यासाठी १०८ झेंडे लावले जातात, असेही पासनने सांगितले.

पांच्छू आणि वांग्छू या दोन नद्यांचा संगम आणि सर्वत्र हिरव्यागार डोंगरांच्या रांगा… एका ठिकाणी नदीवरचा नवीन पूल आणि पूर्वीचा लोखंडी पूल यांच्या पार्श्वभूमीवर एक सुंदर धबधबा चार चाँद लावत होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलच्या वेटरने बेल वाजवून ‘कुझुझांगपो ला’ असे म्हणून नाश्ता दिला. नंतर रिसेप्शनिस्टने ‘कुझुझांगपो ला’ म्हणजे गुड मॉर्निंग अशी माहिती पुरवली. रात्रभरची कडकडीत थंडी आता सकाळी कोवळ्या उन्हाबरोबर हळूहळू गायब होत होती आणि साइट सीइंगसाठी एक प्रसन्न दिवस आमची वाट पाहत होता.

राजधानीच्या शहराचे प्रथम दर्शन विलोभनीय होते. संपूर्ण शहरात फक्त एकाच चौकामध्ये ट्रॅफिक पोलिस होते, पण ट्रॅफिक सिग्नलसुद्धा नव्हते. तरीही संपूर्ण प्रवासात आम्ही आमच्याच काय, पण इतर गाड्यांचेसुद्धा हॉर्न ऐकले नाहीत. न राहवून मी छोरतेनला विचारले, ‘इथे गाड्यांना हॉर्न तरी आहेत का?’ ‘आहेत, पण आम्ही ते क्वचितच वाजवतो. ॲम्ब्युलन्स आणि अग्निशामक वाहने फक्त हॉर्न वाजवतात,’ असे त्याने सांगितले. शहरात सर्वत्र स्वच्छता दिसत होती, मात्र तेवढे स्वच्छता कर्मचारी दिसत नव्हते. पासन म्हणाला, ‘आमच्या परिसराची स्वच्छता ठेवणे हे आम्ही स्वतःचे कर्तव्य समजतो.’ थोडक्यात, ‘माझा देश माझी जबाबदारी’ असे प्रत्येकाचे वर्तन असते.

‘सिंपली भूतान’ या लिव्हिंग म्युझियममध्ये आम्ही गेलो. प्रवेश करतानाच ‘अरा’ नावाच्या तांदळाच्या पेयाने आमचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर आम्ही भूतानमधील घरांची रचना आणि बांधकाम कसे होते याचे दालन बघायला गेलो. मुख्यतः पाइनचे लाकूड आणि कॉम्प्रेस्ड चिखल यापासून घरे तयार केली जात, आता सिमेंटचा वापर करण्यात येतो आहे अशी माहिती तिथे मिळाली. भूतानची खाद्यसंस्कृती, कृषी उत्पादने, स्वयंपाकघरे, तेथील सरंजाम इत्यादी गोष्टी पाहिल्यावर आम्हाला एका हॉलमध्ये बसण्यास सांगितले. तिथे ‘बटर टी’ देण्यात आला आणि नंतर चार-पाच महिला कलाकारांनी सुंदर शिस्तबद्ध असे नृत्य केले. ज्या गाण्यावर त्यांनी नृत्य केले, त्यामध्ये मुख्यत्वे आमचे स्वागत आणि भूतानचे वर्णन होते.

म्युझियममध्ये एके ठिकाणी मात्र आम्ही स्तब्ध झालो. एक प्रौढ माणूस यंत्रावर शोभेच्या वस्तू तयार करत होता. दोन्ही हात नसताना केवळ पायांच्या साहाय्याने त्याचे हे काम चालू होते. या व्यक्तीला तिथल्या राणीने आश्रय आणि उपजीविकेचे साधन दिले होते. अशा सुमारे चार हजार लोकांना सरकारने आधार दिला आहे.

त्यानंतर तिरंदाजीचे प्रांगण आहे. तिरंदाजी हा भूतानचा राष्ट्रीय खेळ आहे. १४० मीटर अंतरावरून अचूक लक्ष्यभेद करणारे तिरंदाज येथे आहेत. आम्हाला मात्र पंचवीस फुटांवरचे लक्ष्य आणि प्रत्येकी दोन वेळा संधी देण्यात आली. एका सहप्रवाशाकडून लक्ष्यभेद होताच तेथील चार-पाचजणींनी ‘सेलिब्रेशन डान्स’ केला.

बाहेर पडून आम्ही भूतानमधील सर्वात उंच आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या बुद्धांच्या मूर्तीकडे वळलो. अतिभव्य अशी ही ब्राँझची मूर्ती घडवताना कलाकारांनी अनेक वर्षे आपली कारागिरी पणाला लावली असणार, असे वाटून गेले.

नंतर आम्ही ‘टाकेन’ या भूतानच्या राष्ट्रीय प्राण्याच्या संवर्धन केंद्रास भेट दिली. बोकडासारखे तोंड आणि उर्वरित शरीर गोवंशाचे, असा हा प्राणी तिथे पाहायला मिळाला. तसेच त्याच्या निर्मितीबाबतची कथादेखील समजली. त्या कथेनुसार, एक तांत्रिक शक्ती धारण करणारा एक साधू एका घरामध्ये जेवणासाठी गेला. यथेच्छ मांसाहार केल्यावर तेथील एका भक्ताने त्यांच्या शक्तीबद्दल शंका उपस्थित केली. तेव्हा या साधूने नुकत्याच ग्रहण केलेल्या दोन प्राण्यांच्या शरीराचा उर्वरित भाग एकत्र करून या प्राण्याची निर्मिती केली. टाकेनशिवाय तेथे विविध प्रकारची हरणे आणि एक याकची जोडी पाहायला मिळाली.

रविवार असल्याने इतर शासकीय ठिकाणे म्हणजे संग्रहालये, ग्रंथालये बंद होती. त्यामुळे पासनने आम्हाला ‘डोच्युला पास’ येथे नेण्याचे ठरवले. सुमारे चोवीस किलोमीटर अंतर गेल्यावर घाटाच्या मध्यावर एका सपाट जागेवर १०८ स्तूपांची निर्मिती केली होती. पूर्वीच्या काळी या घाटामध्ये झालेल्या लढाईत मृत्यू झालेल्या सर्व सैनिकांसाठी हे स्तूप उभारण्यात आले होते. विशेष म्हणजे धारातीर्थी पडलेल्या शत्रुसैन्यातील सैनिकांच्या नावेसुद्धा स्तूप उभारले होते. प्रत्येक स्तूप पूर्णतः बंद असतो व त्यामध्ये देवतांच्या मूर्ती जतन केल्या जातात.

परतीच्या प्रवासात पासनला कंठ फुटला आणि तो सांगू लागला… ‘आमच्या देशामध्ये राजेशाही, लोकशाही आणि धर्मसत्ता एकत्रित हातात हात घालून काम करतात. वीस जिल्ह्यांमध्ये वीस किल्ले आहेत आणि तिथून विविध मंत्रालयांचे काम चालते. संपूर्ण देशामध्ये उपजीविकेचे साधन नाही असा कोणीच नाही. कोरोनाच्या काळामध्ये आम्हा चार हजार गाइडना काम नव्हते तेव्हा सरकारने दरमहा प्रत्येकी दहा हजार रुपये पगार दिला. देशाच्या प्रत्येक उपक्रमामध्ये आमचे राजे स्वत: सहभागी असतात. आता तुम्ही पाहिलेल्या डोच्युला पासच्या युद्धातसुद्धा ते सहभागी होते. कुटुंबरचेनेमध्ये एकत्र कुटुंबपद्धती मोठ्या प्रमाणावर असली, तरी हल्ली एकल कुटुंबपद्धतीही काही ठिकाणी दिसत आहे. दुर्दैवाने घटस्फोट घेण्याची वेळ आल्यास त्याची नोंद सरकारकडे करावी लागते, तरच दुसरे लग्न करता येते आणि असेही तीनदा करण्याची मुभा आहे. लग्नाची नोंदणी केली असल्यासच होणाऱ्या अपत्याला नागरिकत्व मिळते.’

येताना एका मॉनेस्ट्रीवर मोठ्या अक्षरात काहीतरी लिहिले होते. हे जोंगा या स्थानिक भाषेत आहे काय, असे विचारता पासन म्हणाला, ‘नाही हे संस्कृत आहे. गुरू रिंपोचे यांनी या देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यापूर्वी आम्ही सर्व हिंदू होतो. आजही आमच्याकडे अंत्यसंस्कार दहन पद्धतीनेच होतात.’

पासनने बोलता बोलता आमच्या ज्ञानात बरीच भर घातली. भारतीय लष्करच भूतानचे संरक्षण करते, पण तिथे रॉयल भूतान आर्मी नावाचे त्यांचेही सैन्यदल आहे. सैनिकांचे प्रशिक्षण भूतानमध्ये, तर अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण मात्र भारतात होते. त्यांच्याकडे दोनच टीव्ही चॅनल आहेत आणि त्यावर ऐंशी टक्के वेळा धार्मिक कार्यक्रमच असतात. काही वृत्तपत्रे आहेत, पण त्यांचा खप मर्यादित आहे. तसेच इंटरनेट, मोबाईल यांचा वापरदेखील कामापुरताच आहे. मुख्य भाषा ‘जोंगा’ वगळता बाकी सर्व विषय इंग्रजीतूनच शिकवले जातात. त्यामुळे प्रत्येकाला इंग्रजी समजते.

हे ऐकत असतानाच एका डोंगरावर धुळीचे लोट उठताना दिसले. तिकडे पाहत पासन म्हणाला की तिथे वणवा पेटला आहे. आता १०-१५ मिनिटांत नारंगी जॅकेट घातलेल्या स्वयंसेवकांची गर्दी होईल. बसमधून ते तिथे जाऊन आग विझवूनच संध्याकाळी परत येतील. आमच्याकडे प्रत्येकजण काही वर्षे ‘स्वयंसेवक’ म्हणून निःस्वार्थ काम करतो.

संध्याकाळी अंधार लवकरच पडला. हॉटेलबाहेर पडलोच नाही. सकाळी पुन्हा स्वच्छ सूर्यप्रकाश! आजच्या दौऱ्याचा मुख्य आकर्षण बिंदू असलेले ठिकाण म्हणजे ‘टाकसंग मॉनेस्ट्री’. तासाभराचा प्रवास केल्यावर पारोच्या पुढे पंधरा किमीवर आम्ही बेस कॅम्पला पोहोचलो. बेस कॅम्पवरून पाहताना टाकसंग मॉनेस्ट्री जवळ असेल असे वाटले. परंतु, पासनने सांगितल्यानुसार, दोन डोंगर संपूर्ण ओलांडल्यावर तिसऱ्या डोंगरातील मोठ्या कातळावर हे धर्मशिल्प आहे. समुद्रसपाटीपासून ३१०० मीटर उंच असलेल्या या चढाईमध्ये दर दहा मिनिटांनंतर थांबून श्वासांचे संतुलन करणे भाग पडत होते. प्रकाश ट्रेकर असल्याने त्याला या गोष्टींचा सराव होता. तसेच सोबतच्या कच्च्या भिडूचा आत्मविश्वास कसा वाढवत न्यायचा हे त्याला ठाऊक होते. तिथे प्रत्यक्ष पोहोचल्यावर मात्र डोळ्याचे पारणे फिटले. सर्व कष्ट सार्थकी लागल्यासारखे वाटले. थकवा पळून गेला. सर्व बाजूंनी हिरव्यागार दऱ्या आणि डोंगर, मधूनच डोळे मिचकवणारा सूर्य आणि भव्य अशा कातळावर असलेले मॉनेस्ट्रीचे भव्य बांधकाम… अनोखेच दृश्य होते ते!

विश्रांतीच्यावेळी दोन महत्त्वाच्या गोष्टी समजल्या. एक म्हणजे, गुरू रिंपोचे या ठिकाणी तीन वर्षे तीन महिने तीन दिवस धर्मप्रसाराच्या कामासाठी राहिले होते आणि एका महिला साधूने उडत्या घोड्याचे रूप घेऊन त्यांना इथे पोहोचवले होते, अशी कथा सांगितली जाते. दुसरे म्हणजे, काही वर्षापूर्वी येथे आग लागल्याने संपूर्ण मॉनेस्ट्री जळाली होती, ती पुन्हा उभारायला चार-पाच वर्षे लागली.

एकूण सुमारे १६,८०० पायऱ्यांचा प्रवास पूर्ण करायला आम्हाला पाच तास लागले. मात्र परत येताना एक ७२ वर्षांच्या आजी पाठीवर ओझे घेऊन हसतमुखाने वर जाताना दिसल्या. त्या वरच साधूंच्या वस्तीच्या ठिकाणी राहतात असे समजले. येताना एका घाटाच्या टोकावर थांबलो. बरेच पर्यटक तिथे थांबले होते. समोरच ‘पारो’ हे भूतानचे एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहायला मिळाले. जगातील सर्वात धोकादायक विमानतळांपैकी एक. दरीमध्ये विमान उतरवायचे, तेही छोट्या रन वेवर हे मोठ्या कौशल्याचे काम आहे आणि फक्त दहा पायलटनाच याची परवानगी आहे.

साक्षीदाराला वकिलाने फिरवून फिरवून तेच प्रश्न विचारावेत तसे आम्ही पासन आणि घोरचेनला छळत होतो. त्यांच्या सर्व उत्तरांचे सार म्हणजे… आमचा देश आनंदी आहे, कारण ९५ टक्क्यांपेक्षा जास्त धर्मनिष्ठ वज्रयान बौद्ध, राजेशाही, लोकशाही आणि धर्मसत्ता यांचा सुरेख मेळ, प्रत्येक नागरिकाची उपजीविकेची व्यवस्था, राजावर व निसर्गावर प्रचंड प्रेम आणि निष्ठा, संपूर्ण देशामध्ये हत्याबंदी, दोन महिने मांसाहार वर्ज्य, किमान अपेक्षा आणि माझा देश, माझी जबाबदारी! एवढ्या छोट्याशा दौऱ्यामधून एखाद्या देशाबद्दल अंदाज बांधणे म्हणजे अक्षरशः शितावरून भाताची परीक्षा करण्यासारखेच आहे. असा विचार करत भूतानमधून परत भारतात प्रवेश केला. जयगावमध्ये दोन्ही भाषा आणि चलने चालतात. थोडीशी खरेदी केल्यावर परतीच्या प्रवासात चहाचे मळे आणि भूतानच्या आठवणी यामध्ये बागडोगरा विमानतळ कधी आले समजलेच नाही.

आनंद मिळवण्यासाठी जगाच्या पाठीवर इतर वेगवेगळ्या देशांत चाललेली माणसांची धडपड आणि भूतानमधील जीवन यांची तुलना करता आपण नक्की कशाचा त्याग करून काय मिळवत आहोत असा प्रश्न पडला. एवढ्यात परतीच्या प्रवासाची अनाउन्समेंट झाली…

  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...