Thursday, August 25, 2022

अमरनाथ यात्रा

 http://www.misalpav.com/node/50577

अमरनाथ यात्रा-बेचाळीस वर्षापुर्वीची आणी आताची.

https://www.misalpav.com/node/50542/backlinks

१. सन ऐंशीमधे अनुभवलेल्या अमरनाथ यात्रेतील अडचणी, सुखसोई व यात्रेकरूस आज उपलब्ध असलेल्या सोईंचा आढावा घेण्याचा प्रयत्न आहे.

२. क्लिक ३ कॅमेरात कैद केलेली छायाचित्रे काळाच्या ओघात लुप्त झाली, यंदा गेलेल्या यात्रेकरूने काही छायाचित्रे पाठवली आहेत व काहीअंतरजाला वरून घेऊन जुन्या आठवणींना उजळा द्यायचा प्रयत्न आहे. यात्रेकरूचे आणी आन्तर्जालाचे आभार.

मागील भागातून...

ठिक सहा वाजता कॅम्प सोडला व सिंध नदीच्या काठाने पायी प्रवास सुरू केला.

पुढे.......

आषाढ शुद्ध द्वादशी पासुन सुरू होणारी अमरनाथ यात्रा श्रावणी पौर्णिमेला संपन्न होते.अधिक मास, तीथींच्या क्षय,वृद्धी नुसार यात्रेचा कालावधी कमी जास्त होऊ शकतो. अमरनाथ हिमखंड काशमीर मधल्या लिद्दर खोर्‍यात आहे.एका बाजुला जोजीला पर्वत तर दुसरी कडे मचोई हिमखंड (ग्लेसियर) आहे.अमरावती नदी अमरनाथ हिमखंडातून उगम पावते व पंचतरणी कडून येणाऱ्या लिद्दर नदीला पवित्र गुफे पासून तीन कि.मी.अंतरवर मीळते.या जागेला संगम म्हणतात. इथेच बालटाल व पहलगाम कडून येणारे मार्ग एकत्र मिळतात.यात्रेकरू संगमावर स्नान करून अमरेश्वराचे दर्शन घेण्यास गुफे कडे प्रस्थान करतात.

mipa*****mipa

या गुफेत माता पार्वतीच्या विनंतीस मान देऊन भगवान शंकरानी त्यांना अमरकथा सांगीतली.पवित्र गुफा १३००० फुट तर अमरनाथ शिखर १७००० फुट उंचीवर आहे.
गुफे कडे जाण्यासाठी दोन मार्ग...
*****mipa^^^^^
एक, बालटाल मार्गे, सिंध नदीच्या किनार्‍यावरून छोटा पण कठीण, चौदा किलोमीटर सरळ,उभी चढण (steep gradient) बालटाल वरून पायी यात्रेची सुरूवात होते.
mipa*****mipa

mipa*****mipa

दुसरा सोपा,कमी चढउतार पण चाळीस एक कि.मी.अंतरअसलेला. पहलगाम,चंदनबाडी,पिस्सू टाॅप, शेषनाग,पंचतरणी,संगमावरून अमरनाथ कडे जाणारा हा सर्वात जुना यात्रा मार्ग.ऋषि भृगू सुद्धा याच मार्गाने गेले होते अशी किवदंती आहे.या मार्गावर पहलगाम हा पहिला पडाव.खरी पायी यात्रा चंदनवाडी पासुन सुरू होते.पुर्वी यात्रेकरू श्रीनगर वरूनच पायी यात्रेची सुरूवात करायचे.

कुठला मार्ग घ्यावा....

पहलगाम मार्ग समुद्र सपाटी पासुन सात हजार पाचशे फुटावरून सुरू होतो.चंदनवाडी पर्यंतची दोन हजार फुट चढण गाडीतूनच पार पडते व इथे एक दिवस मुक्काम असतो. भाविकांना अत्यंत प्रतिकूल अशा वातावरणाशी जमवून घेण्यास मदत होते (acclimatization).पिस्सू शिखराची चढण भाविकांची परीक्षा घेते त्या मानाने पुढील प्रवास मात्र सोपा वाटतो.मध्यम पण सुदृढ वयातील यात्रेकरूंना हा मार्ग सोपा आहे.

बालटाल नऊ हजार फुटावर स्थित असून पुढील आडिच तीन हजार फुट चढण खुप तीव्र असल्याने भाविकांची लवकर दमछाक होते. तसेच या मार्गावरून जाताना मोठा हिमखंड लागतो.तो पार करणे सुद्धा मोठे अव्हानच असते.भल्याभल्यांना गुढगे टेकवायला लावणारी चढण चढण्याची व उतरण्याची हिम्मत शरीर धडधाकट असेल तरच करावी अन्यथा हवाई मार्गाने यात्रा सुखनैव संपूर्ण करावी.यात्रेसाठी वैद्यकीय अनुमती, प्रमाणपत्र अनिवार्य आहे. तरूणाई या वाटेवर स्वार्थ म्हणजे ट्रेकचा थरार व परमार्थ दोन्ही साध्य करू शकते. इथेच तीला सुरक्षा रक्षकांची दैनंदिन जीवनात काय समस्या असतात त्याचे दर्शन होईल.

बाकी दोन्ही मार्गावर हवाई वाहतूक उपलब्ध आहे.उतारवयातील भावीकांना खुपच सोईचा मार्ग आहे.शारीरिक व अर्थिक क्षमते नुसार निर्णय घ्यावा. समुद्रसपाटी पासुन जसे उंचावर जाऊ तशी प्राणवायूची कमतरता भासते व शरीरावर प्रतीकूल परीणाम होण्याची दाट शक्यता आसते.

जनश्रुती प्रमाणे भगवान शंकराने अमरकथा फक्त एकट्या माता पार्वतीला सांगायची होती म्हणून आपले सर्व संगी साथी पाठिमागे सोडले.वाहन नंदीला जीथे सोडले ते बैलगाव (पहलगाम), चंद्राला चंदनवाडी मधे गळ्यातला सर्प ज्या तलावात सोडला ते शेषनाग,मंगेश पर्वतावर गणेशाला तर पंचतरणी मधे पंच महाभुतांना सोडले.एकट्या माता पार्वतीला गुफे मधे अमरकथा सांगीतली.एवढी काळजी घेऊनही कबुतराच्या जोडप्याने कथा ऐकली व ते अमर झाले.असे म्हणतात ते शुभ्र कपोत,कपोती पुण्यवान लोकांना दिसतात.

अमरनाथ यात्रा शिव भक्तांचे स्वप्न, तर स्थानिक लोकांचे मुख्य उपजीवीकेचे साधन.वर्षातील नऊ महिने बर्फाच्छादित असल्यामुळे धन-धान्य कमीच उगवते.येणाऱ्या यात्रेकरूनां विवीध सोई पुरवणे हाच मुख्य व्यवसाय.बाकी शेळ्या मेंढ्या पालन हा जोडधंदा. इच्छुक भाविक मोबदला देऊन बकरवाल व हिन्दू गुज्जर लोकांकडून तट्टू व डोली, पालखी घेऊ शकतात.
mipa*****mipa

यात्रेचा कालावधी,पहलगाम वरून पाच दिवस तर बालटाल वरून दोन दिवसाचा आहे.जागोजागी धर्मदाय संस्थाचे विनामूल्य लंगर भाविकांची खाण्या पिण्याची व्यवस्था करतात. राज्य पोलीस दल व सुरक्षारक्षक यात्रा सुचारू होण्या साठी दिवसरात्र सजग,सतर्क असतात.

mipa*****mipa

वाढणारी यात्रेकरूंची संख्या लक्षात घेत राज्य सरकारने सन दोन हजार मधे "श्री अमरनाथ जी श्राईन बोर्ड", स्थापन केले.बोर्डचे मानद अध्यक्ष महामहिम राज्यपाल आहेत.बोर्ड यात्रेकरूंचे नियंत्रण,सुरक्षा,वैद्यकीय मदत,रहाण्याची सोय,रस्त्याची देखभाल इत्यादी गोष्टी करता जबाबदार आहे.यात्रेसाठी नाव नोंदणी जम्मू मधे करावी लागते. आता यासाठी बोर्डाची स्वतंत्र वेबसाईट आहे.
http://www.shriamarnathjishrine.com/

**********mipa**********

नोंदणी केलेले यात्रेकरूंचे जथ्थे नियंत्रित करून पुढे रवाना होतात. यात्रेबद्दलची सर्व माहीती,नोंदणी आणी हवाई यात्रेच्या आरक्षणाची सोय सुद्धा या वेबसाईटवर आहे. आता लाखो भाविक यात्रेसाठी नोंदणी करतात. चित्र आता दोन्ही मार्ग नागरीकां साठी खुले आहेत. त्या वेळेस यात्रेच्या संपुर्ण कालावधीत आठ ते दहा हजार यात्री श्रीनगरमधे नाव नोंदणी करून यात्रेसाठी रवाना होत होते.दररोज २५०-३०० यात्री पण आज दररोज पंधरा हजार भाविक (प्रत्येक मार्गावरून ७५००) दर्शना साठी जम्मूवरून रवाना होतात. 

 

जम्मू ते बालटाल प्रवासातील काही छायाचित्रे.

mipa*****mipa

mipa**mipa

mipa**mipa

mipa*****mipa

mipa*****mipa

mipa**mipa

पुर्वी बालटाल मार्गावरून जाण्यास फक्त सेना आणी इतर सुरक्षाबल व त्यांचे कुटुंबीय यानांच परवानगी होती. इतर यात्री पहलगाम मार्गा वरूनच यात्रा संपुर्ण करायचे. बालटाल मार्ग कठीण असल्याने यात्रेकरू कमीच,आजच्या एवढी गर्दी नव्हती.मी गेलो तेव्हा बालटाल वरून एक दिवसात यात्रा पुर्ण करावी लागत असे.सकाळी जाऊन संध्याकाळी बालटाल मुक्कामी परत यावे लागत असे. गुफे जवळ रहाण्याची परवानगी कुणालाही नव्हती.संध्याकाळी चार वाजेपर्यंत सर्वांना परतीचा प्रवास सुरू करणे अनिवार्य होते.कै.श्री गुलशन कुमार,(टि सीरीज) यांचे लंगर यात्रेच्या कालावधीत अविरत चालत असे. फक्त काही साधू व लंगरचे सेवादार संगमावर राहू शकत होते. साधूंची स्वतःची तात्पुरती सोय (Make shift arrangement) होती तर लंगरची आपली पक्की, जोत्यावर बांधलेली चाळवजा बॅरक होती.इथे पोहोचताच भाविकांना गरम पाणी, चहा,भजी दिले जायचे व दर्शन घेऊन परत आल्यावर गरमा गरम स्वादिष्ट भोजनाची सोय होती. कष्टसाध्य यात्रा सुफळ संपूर्ण झाली या आनंदात भोजन अधिक स्वादिष्ट लागायचे.दमलेले भाविक दुप्पट उत्साहात परतीचा प्रवास सुरू करायचे.अर्थात ही माहिती मी संगमावर आल्यानंतरच कळाली.

आसो,यात्रा सुरू करूयात. कॅम्प मधे यात्रेबद्दल सर्व माहीती दिली, अंतर किती,पायवाटेवर काय काळजी घ्यावी,परत येण्याची वेळ वगैरे.सुरक्षाबलाचे काही जवान यात्रेकरूंना मदती साठी बरोबर असायचे.

आताचे बालटाल शिबीर

mipa*****mipa

जुलाईचा महीना होता तरी कडाक्याची थंडी होती. हिमखंडातून येणारे वारे थंडीत भर टाकत होते. तापमान साधारण दहा बारा डिग्री सेल्सियस पर्यंत होते. सहा महिन्यापासून याच भागात असल्यामुळे वातावरणाशी गट्टी होती.इतर भागातून आलेले यात्री कुडकुडताना दिसले. गरम शर्ट,स्वेटर,कानटोपी,लोकरीचे पाय व हात मोजे,स्नो गाॅगल्स,जंगल शूज,पाठीवर छोटा पिठ्ठू (Haversack) त्यामधे खाण्याचे पदार्थ,चहा,साखर व दुध पावडर व एक जोडी कपडा.पिठ्ठूलाच जोडून उष्णता रोधक (Insulated) गरम पाण्याने भरलेली बाटली.शरीराच्या उघड्या भागावर बोरोलीन चोपडले. फक्त तोंडाचाच भाग उघडा होता. ठिक सहा वाजता कॅम्प सोडला व सिंध नदीच्या काठाने पायी प्रवास सुरू केला.झुंजूमुजू झालं होतं पण सुर्योदयाला वेळ होता. बालटाल मार्ग कसला पायवाट,खूप चढ उतार,कठीण चढाई एकच तट्टू चालू शकेल एवढीच रुंदी.एका अंगाला उचंच उंच,दृष्टीक्षेपात न येणारी गीरीशीखरे तर दुसऱ्या बाजूस एका नजरेत न दिसणार्‍या खोल दर्‍या. छायाचित्रावरून स्पष्ट कल्पना येईल.

थोडे आवन्तर, सिन्द नदी मध्ये Trout fish एकल बोन, गोड्या पाण्यतले मासे भरपूर सापड्तात. या भागात मासे कमी लोक पसम्त करतात. वुलर्,डल झील आणी छोट्या छोट्या नद्या मधे खुप मासे पकड्ले. शाकाहारी कमळाच्या देठाची भाजि,कोशिम्बीर खुप छान बनवतात. दम आलू तर सगळ्यानाच माहित आसेल.

mipa*****mipa

mipa*****mipa

सुरूवातीलाच साठ अंश कोनातली चढण,चिखल,निसरडा रस्ता. पायवाटेवर धुळीचा सामना करवा लागतो. दमा, श्वासाचे रोगी याना त्रास होवू शकतो. भगवान शीव आणी खीर (क्षिर)भवानी माता का जयकारा करत स्थानिक लोकांनी तर आम्ही जय भवानी जय शिवाजी गर्जत पहीले पाऊल टाकले. यात्रेकरूंची गर्दी नव्हती. त्यावेळच्या पायवाटांपेक्षा आताचे रस्ते खुपच रूंद व समतोल आहेत. छायाचित्रां वरून रस्ता किती कठीण व चाळीस वर्षापुर्वी कसा असेल याची चांगलीच कल्पना येते. तुरळक मानवी वस्ती होती पण आता यात्रेकरूंची संख्या वाढल्याने अर्थार्जन वाढले म्हणून येथील वस्ती वाढली आहे.त्यावेळी चहा नाष्ट्याची दुकाने नव्हती. आज मात्र बरेच ठिकाणी लंगर,चहाची दुकाने आहेत.पुर्वेकडून सूर्योदय होत होता.बर्फाच्छादित गिरीशीखरे झळाळत होती. उन्हाळ्यात बकरवाल लोक डोन्गरावर राहायला येतात व थन्डीत पायथ्याशी परत येतात.

mipa*****mipa

स्नोगाॅगल्स डोळ्यावर चढवले.इथे येवून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे निसर्गाशी मस्ती करायची नाही,महागात पडते. बालटाल समुद्र सपाटी पासुन नऊ हजार फुटावर आहे.आम्ही बारा हजार फुटावर रहात असल्यामुळे फारसा फरक जाणवत नव्हता.मैदानी भागातून आलेल्या यात्रेकरूच्या चेहर्‍यावर मात्र तणाव स्पष्ट दिसत होता.
Identity disc प्रत्येक सैनीकाला दोन आल्युमिनीयम च्या चकत्या मिळतात. त्यावर नाव, नम्बर आणी धर्म लिहिलेला आसतो. एक हातावर तर एक गळ्यात बान्धायची आसते. नुक्ताच एका ३४ वर्शापूर्वी सइयाचिन हिम्खन्डात हरवलेल्या सैनीकाचा शोध लागला.

सर्वांनी चालायला सुरवात जोमात केली पण अनुभव आणी सवय नसल्यामुळे लवकरच छाती भरून आली श्वास उखडला,पाच दहा मिनिटातच काही यात्रेकरू थांबले तर काही चक्क खाली बसले. काहिंना फाजील आत्मविश्वास नडला.आमचा ग्रुप मात्र दमदार, नियंत्रीत पावले उचलत हळुहळू पुढे चालला होता.त्यावेळेला नैसर्गिक प्राणवायूवरच निर्भर रहावे लागत असे.आता प्राणवायूचे सिलेंडर मीळतात. त्यावेळेस पायवाट खुपच अरूंद, जेमतेम एक खच्चर चालू शकत होते.एकाच वेळेस एकच जण जाऊ शकत होता. पुढे चालणाऱ्या यात्रेकरूस ओलांडून जाणे दुरापास्त होते.तट्टूची सवारी आली तर डोंगराला चिटकून उभे राहीले तरी पाठ तट्टूला घासायची. बराच वेळ चालल्यावर लाकडाची झोपडीवजा पाच सात घरे दिसली. घड्याळात साडेसात वाजले होते. डोमील गावा जवळ पोहोचलो होतो,अदांजे पाच एकशे फुट अधीक उंचीवर आलो असू. त्यावेळेस कुठलीही पाटी,मैलाचे दगड असे काहीच नव्हते.आता मात्र जागोजागी फलक लावले आहेत.

mipa*****mipa

डोमील गावा पर्यन्त पोहोचलो, भुक लागली होती, एक कशमीरी तीन दगडाची चुल मांडून चहा विकायला बसला होता.अजुन बोहनी झाली नव्हती.आम्हीच पहिले गिर्‍हाईक होतो.विसावलो, नाष्टा केला चहा प्यायलो.गंमत म्हणून त्याच्या हुक्क्याचे दोन कश मारले.सिगरेट पाकीट दिले, चायवाला खुश झाला.चहाचे पैसे घेतले नाही.बरोबरचे साथीदार दृष्टीक्षेपात आले. चौदा किलोमीटर जायचे एवढेच माहीती,दोनच कि.मी.अंतर कापले होते.आजुन लांब पल्ला गाठायचा होता.पुढचा पडाव बरारी गाव होता पाच कि.मी अंतरावर,पोटपुजा झाली,श्वासाची गती सामान्य झाली एक दिर्घ श्वास घेत पुढ्च्या प्रवासा साठी पाऊले उचलले.

mipa*****mipa

मोठे डोंगर,खोल दरी आणी यांच्या मधे लपंडाव खेळणारी पाऊलवाट. मार्तंड तापहिन होता पण शरीर गरम झाले होते.अंगावरचे स्वेटर कमरेवर आले. दर एक तासाने थांबायचे ग्रुप एकत्र झाला की पुन्हा वाटचाल सुरू करायची असे ठरवून पावलांनी गती पकडली.आता डोगंर उतारावर बकरवाल आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन वर चढताना दिसत होते. आमची गती हळू जरी होती पण जसजसे उंचावर जात होतो दम तुटल्यावर थांबावेच लागत होते. डोमेल पासुन बरारी टॉप पर्यंत संपूर्ण तीव्र चढ होता.खड्या चढाई ची अम्हाला सवय असून सुदूधा वारंवार दम घेण्यास थांबावेच लागत होते.आमची चालण्याची गती खुपच कमी झाली.निसर्ग सौंदर्याचा पहात, आस्वाद घेत मजल दरमजल अमरनाथ,पवित्र गुफा जवळ करत होतो.

mipa*****mipa

डोगंरातल्या घळीत अजुनही बर्फ जमलेलेच होते.त्यातुन छोटे छोटे पाण्याचे ओहळ उतारावरून मैदाना कडे वेगाने वहात होते. एकास एक मिळून आपली ताकद वाढवत होते. खाली खोल दरी मधे हिमनदी त्यांना आपल्या पोटात सामावून घेत जास्त वेगाने पुढे जात होती. चित्र उतारावर हिरव्यागार कोवळ्या गवतावर शेळ्या मेढ्या,तट्टू ताव मारत होते.निसर्गाचे एका बाजुला रौद्र तर दुसरीकडे मखमली,मन- भावन रूप एकाच वेळेस दिसत होते.

तीन साडेतीन तास लागले असावेत. घामाघूम झालो होतो.अंगातले कपडे बर्‍यापैकी घामानं भिजले होते.बिस्कीट,नमकिन एकमेका बरोबर वाटून घेतले,पाण्यात ओ आर एस मीसळले,तहान भागली आणी स्फुर्ती सुद्धा आली.पूर्वानुभव कामाला आला.बाकीच्यांची वाट पहात बसलो. श्वासात श्वास आला.थोड्याश्या खाण्याने भुक नाही भागली पण ताजेतवाने झालो.आमच्याकडे सामान होते,"चहा बनवू या",मित्र म्हणत होते पण शरीराचे तापमान हळुहळू कमी व्हायला सुरुवात झाली होती.थंड पडण्याच्या अगोदर निघायला हवे होते.बरोबरचे अजून दिसत नव्हते. ही यात्रा शारीरिक क्षमते बरोबर मानसिक शक्तीपरीक्षणच आहे असे म्हटंले तर वावगे ठरणार नाही.उंच डोंगर आणी खोल दरी मधली छोटीसी पायवाट, तीव्र चढउतार, प्राणवायुची कमतरता व इतर यात्रेकरूंचे अनुभव यात्रा सुरू करण्या आगोदर मनात धाकधूक निर्माण करतात. बरारी टाॅप नंतर मात्र चढाई जवळ जवळ संपली होती. बर्फाच्छादित हिमखंड दृष्टीक्षेपात आला.

**********mipa**********

तापमान सात आठ डिग्री असावे. आतापर्यंत मातीच्या अरूंद पायवाटे वरून चालत होतो.सरळ चढण होती.हातात काठी व दुसरीकडे आधाराला डोंगराची भिंत असल्या मुळे तोल जाण्याची शक्यता कमी, पाय घसरला तरी सावरता येत होते. आता तीव्र उतार (Slope) पार करायचा होता.उतारावर चालणे, डोंगर चढण्या पेक्षा जास्त अवघड. गुडघ्यावर जोर येतो,अपोआपच चालण्याची गती वाढते,तोल सांभाळत चालणे मुश्किल. गुडघ्याच्या वाट्या दुखायला लागतात. तोंडावर कधी आपटू याचा नेम नाही.

सह्याद्रीची चढाई व हिमालयावर चढाई यात खुपच फरक आहे असे माझे मत आहे.एक मुख्य फरक म्हणजे सह्याद्री काळा कभिन्न, राकट, ज्वालामुखीतून जन्मलेला, गर्द झाडी,मुबलक प्राणवायू.मजबूत कडे कपारी ट्रेकर्स चे दोस्त.हिमालय नाजुक,भुसभुशीत,घसरगुंडीसारखा,पाण्यातून डोके वर काढलेला. रौद्र, हिरवळ कमीच, ती सुद्धा विशिष्ट उंचीपर्यंत पुढे धवल,शुभ्र आणी "नंगा". बर्फाच्छादित शिखरे राजाच्या मुकुटा सारखी चमकतात म्हणूनच की काय याला हिमराज म्हणतात असे वाटले.आसो. सह्याद्रीतले जंगल डोळ्याला थंडावा देते तर हिमालयात सूर्याची बर्फावरील परावर्तित किरणे एका क्षणात दृष्टिहीन करू शकतात. मैलभर पसरलेल्या हिमखंडातून पायी चालणे एक वेगळाच थरारक अनुभव.सात आठ महिन्यांपासून पडलेल्या बर्फाचे थर गोठून टणक झाले होते. हलकेच डोके अपटले तरी कपाळमोक्ष नक्कीच झाला म्हणून समजावे.जरा लक्ष इकडे तीकडे झाले तर दिवसा तारे दिसणारच.थंड जखम (Cold blunt injury) भयंकर दुःखदायक.आणलेल्या काठीचा खरा उपयोग इथेच झाला. काठीच्या खालच्या टोकाला शंकूच्या आकाराचा ठोकलेला अणकुचीदार टोक बर्फात रूतवत चालायचे. इथेपण प्राणवायूची कमी भासते. उतार आणी नंतर सपाटी वरचा प्रवास आसल्यामुळे फारशी दमछाक होत नव्हती.चालण्याची गती बर्‍यापैकी जलद होती.आठ किलोमीटर अंतरा करता चार साडेचार तास लागले पण पुढील चार किलोमीटर करता तास दिड तासच लागला.

सुचीपर्णी वृक्ष एखाद्या सुरक्षा रक्षका सारखे ठायी ठायी उभे असलेले दिसले.थोडंफार हिरवळ हिमखंडाच्या आसपास उमटून दिसत होती.जास्त इकडे तीकडे न बघता काळजीपूर्वक पावले टाकत होतो. स्नोगाॅगल्स घातले होते तरीही सूर्याची परावर्तित किरणे डोळे दिपवत होती, दृष्टिहीन होण्याची दाट शक्यता त्यामुळे खाली बघून चालणे सुद्धा धोकादायक. मजल दरमजल मजल करत बारा वाजण्याच्या सुमारास संगमावर, लंगर जवळ पोहचलो. त्या ठिकाणी बरीच चहल पहल होती.पक्की बसकी पण उतरत्या छपराची चाळवजा एकच इमारत दिसली. हेच ते गुलशन कुमार यांनी चालवलेला भंडारा,लंगर होता. ओट्यावर भाविक प्रसाद (जेवण) घेत होते. त्याच्या चेहर्‍यावर यात्रेचा मुख्य टप्पा सुरक्षीत पार पडल्याचे व इष्ट देवाचे मनसोक्त दर्शन घडल्याचा आनंद साफ दिसत होता. मस्तपैकी चहा ,भजी खाल्ली व भोलेबाबाच्या दर्शनासाठी प्रस्थान केले.

 

https://www.misalpav.com/node/50542/backlinks
https://www.misalpav.com/node/50577/backlinks
https://www.misalpav.com/node/50580/backlinks

mipa

mipa

mipa

mipa

mipa

संगम ते अमरनाथ तीन किलोमीटर अंतर पण लांबूनच उंचावरील पवित्र गुफा दिसत होती. साधारण एखाद किलोमीटर हिमखंडातून गेल्यावर अमरावतीचा कलकलाट ऐकू येवू लागला. ती सुद्धा भावीकां प्रमाणे देवाधिदेव महादेवाचे दर्शन घेऊन उड्या मारत जात होती. जणू महादेवाच्या जटेतील गंगाच. हिला अमरगंगा सुद्धा संबोधतात. टप्प्या टप्प्यावर छोटे छोटे धबधबे,भाविक स्नान करताना शिवस्तुती, रूद्र,व भोलेबाबा का जयकारा करताना दिसत होते.

कैलासराणा शिव चंद्रमौळी |
फणींद्र माथा मुकुटी झळाळी |
कारुण्यसिंधू भवदु:खहारी |
तुजवीण शंभो मज कोण तारी || १||
" ,

लहानपणी आईच्या तोंडून ऐकलेले व अजूनही लक्षात असलेले स्तोत्र म्हणत आम्हीपण अशाच एका धबधब्यावर आंघोळ केली व गुफे मधे दर्शनास दाखल झालो.गुफेमधे मोठे पांढरे शुभ्र शिवलिंग व त्याच्या शेजारीच सात आठ फुटाचा चांदीचा त्रिशूल रोवलेला होता त्यावरून शिवलिंगाची उंची लक्षात येत होती.थंडगार गुफेमधे अनवाणी पायाने परिणामी घोट्या पर्यंतचे पाय बधिर झाले.त्यावेळेस भाविक थेट बाबा बर्फानीच्या जवळ जाऊ शकत होते. जवळच माता पार्वती,गणेश यांचे हिमस्वरूप म्हणून पुजारी दाखवत होते.भक्त आणी इष्टदेवा मधे कुठलीही मध्यस्थी,रांग, सुरक्षारक्षक,स्टिलचे रेलींग, अभिषेक,धुप,उदबत्ती, बेल,हार फूले सारखे काहीच नव्हते. नावच भोला शंकर "दोन हस्त आणी एक मस्तक",यापेक्षा काही नकोच म्हणून तर बाबा भक्तास अशिर्वाद देत युगात युगे इथे रहात आहेत.

सर लाॅरेन्स यांच्या The Vally of Kashmir या पुस्तकात गुफेचे वर्णन असे केले आहे,
"In connexion with glaciation the sacred cave of Amar Nath is described, This cave, which is situated at an elevation of some 16,000 feet, is a large hemispherical hollow in the side of a cliff of white mesozoic dolomite. At the back of the cave there issue from the rock several frozen springs, the ice from which juts forth in spirals which subsequently reunite and form a solid dome-shaped mass of ice at the foot of the back wall of the cave: the size of this mass of ice, which is esteemed sacred by the Hindús, varies according to the season."

मनसोक्त दर्शन घेतल्यानंतर त्या आवाढव्य गुहेचे निरीक्षण सुरू केले. पाढंरे पती पत्नी पक्षी कुठे दिसले नाही पण तीनशे चौरस मीटर पेक्षा मोठी भव्य दिव्य नैसर्गिक गुफा कुठल्याच आधारा शीवाय बघून मात्र अपसुकच तोंडात बोट गेले. आजकाल गुफेमधे मोबाईल, कॅमेरा घेऊन जाण्यास परवानगी नाही. गुफेत फक्त पुजार्‍याला जाण्याची परवानगी आहे. हिमलिंगाचे फोटो काढू शकत नाही.

दोन वाजून गेले होते,पोटात कावळ्यांनी ओरडायला सुरवात केली होती.तीन किलोमीटर पायी चालल्यानंतरच जेवायला मिळणार होते. संगमावर,लंगर शिवाय कुठलाच पर्याय नव्हता. मस्तपैकी जेवण केले. पुडी,कचोडी, हलवा वर चहा सु.थोडावेळ आराम केला व परतीच्या मार्गाला लागलो. चार नंतर सर्वच यात्री परत निघणार,खच्चरवाले आणी खच्चर घरच्या ओढीने घाई म्हणून जरा लवकरच निघालो. रस्ता माहीत होता. सगळा उतार,गुडघ्याच्या वाट्या संभाळ्त आम्हीपण दुडकी चाल पकडली. इथे लवकरच अंधारून येते, हिमखंडावरून थंडगार वारे आणखीनच " मौसम खराब करतात".वाटेत थांबायची सोय नाही. एका मागोमाग एक एक भाविक क्राॅस करत आमची गाडी उताराला लागली. संध्याकाळी "सातच्या आत घरात", पुन्हा एकदा बालटाल बेस कॅम्प मधे जेवायला लाइनीत उभे राहीलो.

थोडे अवांतर, कशमीर खोर्‍यातील स्वर्गीय सौंदर्य पाहून बादशहा जहांगीरच्या तोंडातून अनायास फारसी भाषेतील उद्गार बाहेर पडले "गर फिरदौस बर रुए ज़मीं अस्त; हमीं अस्तो, हमीं अस्तो, हमीं अस्त", जमीनीवर कुठे स्वर्ग आहे?तर तो इथेच आहे!

खरोखरच कशमीर खोर्‍यातील सौंदर्य नवरसांनी परिपूर्ण आहे. मोगलानी शालीमार्,निशात्,हर्वन्, चार चिनार,चश्माशाही अशा आनेक सुन्दर बागा निर्माण केल्या. दल्,वूलर तलाव त्यातील तरन्ग्णार्या बागा, शिकारे , गरम पाण्याचे झरे ,पाढंरी शुभ्र हिमशिखरे (Silver crest of Himalayas) डोळ्यांना सुखावतात तर खोल खोल दरीत डोकावताना निसर्ग आपले रौद्र रूप दाखवतो.हिमखंडातून जन्म घेणाऱी छोटी धार पुढे "नद", बनते तेव्हा तीचे रूप पाहून उरात धडकी भरते.

सर लाॅरेन्स यांच्या The Vally of Kashmir या पुस्तकात काश्मीर खोर्याचा सर्वान्गीण आढावा घेतला आहे.

The mountains which surround Kashmir are never monotonous. Infinitely varied in form and colour, they are such as an artist might picture in his dreams. Looking to the north one sees a veritable sea of mountains, broken into white crested waves, hastening in wild confusion to the great promontory of Nanga Parbat (26,620 feet). To the east stands Haramukh (16,903 feet), the grim mountain which guards the valley of the Sind. On it the legend says the snow only ceases to fall for one week in July, and men believe that the gleam from the vein of green emerald in the summit of the mountain renders all poisonous snakes harmless.

अशीच एक नदी चिनाब,चिनाब खोर्‍यातील मोठ्ठ्या लाकडी ओंडक्यांना दर्भाच्या काडी प्रमाणे वाहून नेते. तेव्हा पुष्पा चीत्रपटाची अठवण या पिढीतील तरूणाई ला नक्कीच येईल. चाळीस वर्षाचा दिर्घ कालावधी उलटून गेल्यामुळे जास्त विवरण लक्षात नाही. घेतलेली छायाचित्रे काळाच्या ओघात नष्ट झाली. त्यावेळेस क्लिक ३ हाच कॅमेरा उपलब्ध होता. त्यात रोल टाकून छायाचित्र काढली होती. एका रोल मधे बारा छायाचित्र काढता यायची. यात्रा संपली परत युनिट मधे आलो दोन महिन्यानंतर सुट्टीवर गेलो तेंव्हा पुण्यात त्याच्यावर पुढील सोपस्कार झाले.श्वेत श्याम छायाचित्रे बरेच दिवस सांभाळली पण अस्पष्ट होत नष्ट झाली.

भगवंताने दिलेल्या हार्ड डिस्क मधे जेवढे सापडले, अतंरजालावर बघितल्यावर काही स्मृती जाग्या झाल्या त्या प्रमाणे जमले तसे मांडले.

यात्रा "ONCE UPON A TIME"ची आहे.

११-८-२०२२

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...