दर वर्षी दिवाळी मध्ये कुठे जायचं याची तयारी माझ्या मित्रांचे कुटुंब
जून जुलै मधेच ठरवतो आणि तसे मग ट्रेन चे बुकिंग करतो. बाकी सगळे नेहेमी
प्रमाणे एक एक कारण सांगून बाहेर पडले आता उरलो मी आणि माझा एक मित्र असे
आम्ही दोघेच. तर या वर्षी ठरला कि तिरुपती आणि महाबलीपूरम करावं. तसे
ट्रेन चे बुकिंग बघितले पण दिवाळी च्या नंतरचे सगळे बुकिंग वेटिंग लिस्ट ला
होते. पण ९ च वेटिंग असल्यामुळे पुणे ते तिरुपती हे बुकिंग करून ठेवले
होते.आणि त्या अनुषंगाने पुढची सगळी बुकिंग पण करून ठेवली ती सगळी कन्फर्म
होती . आता फक्त वाट पाहणे बाकी होतं.
माझे आणि मित्राचे अधे मध्ये वेगळी वेगळी ठिकाण शोधणं पण सुरूच होतं. मग या
सगळ्या शोध शोधी मध्ये आम्ही रामेश्वरम आणि मदुराई पण आमच्या ठिकणा मध्ये
ऍड केलं मग आता उरलेले ट्रेन चे बुकिंग केले.पण सस्पेन्स काही शेवटपर्यंत
संपणार नव्हता.
आमच्या जायच्या ट्रेन चे आरक्षण कन्फर्म होताच नव्हता आमचा जीव टांगणीला
लागला, मधेच मित्राचा फोने पण आला कि यावर्षीचा सगळं बुकिंग कॅन्सल करूयात
का थोडी अडचण आहे. माझ्या आशा पण मावळायला लागल्या होत्या. मग तेवढ्यात
कोल्हापूर ते तिरुपती हि स्पेशल ट्रेन दिसली आणि त्याचा पटकन बुकिंग करून
टाकला. ट्रेन ११.४० ची होती. पाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही
कोल्हापूर ला राज्य परिवहन च्या गाडी ने गेलो आणि नाश्ता करून धावत पळत
आमच्या ट्रेन मध्ये स्थानापन्न झालो. आणि सुरु झाली आमची एक यादगार सफर
दक्षिण भारत.
दिवस १ रेल्वे प्रवास.
दाटले रेशमी आहे धुके धुके
झुक झुक आगीनगाडी
माझा मुलगा
रिक्षा वाल्यांचा वाईट अनुभव मागे टाकून आम्ही पुढचा प्रवास सुरु केला
श्री कालहस्ती मंदिर गोपुर
इस्कोन मन्दिर
रेणीगुंटा स्टेशन च्या शेजारच्या हॉटेल जवळ शिवाजी महाराजांचा फ्लेक्स
पाऊस तर जोरात सुरु होता आणि मंदिरांमध्ये मोबाइलला परवानगी नव्हती मग तिथे जास्ती फोटोस काढता आले नाहीत
महाबलीपूरम - दिवस पहिला :
रेल्वे ने निघालो आणि महाबलीपूरम च्या जवळचा स्टेशन चेंगळपट्टू ला उतरलो
रेल्वे जवळपास दोन तास उशिरा पोचली. रेल्वे स्टेशन जवळच बस स्टॅन्ड होतं
तिथून मग एक दोन जणांकडे चौकशी करून एका बस मध्ये बसलो. बस पूर्ण खचाखच
भरलेली होती. तिथल्या एक दोन जणांनी सांगितलं कि महिलांना बस चा तिकीट नाही
त्यांना मोफत प्रवास आहे पण त्या प्रवासाचा तिकीट कंडक्टर कडून घ्या. सगळे
सोपस्कार पार पडले जवळपास एक तासाने मग आम्ही महाबलीपूरम च्या बस स्टॅन्ड
ला पोचलो. बुकिंग.कॉम वर हॉटेल अगोदरच बुक करून ठेवलेला होतं. गुगल मॅप वर
हॉटेल तर जवळच दाखवत होतं मग चालतच हॉटेल वर पोचलो. त्याने आधीच सांगितलं
कि फक्त इंग्लिश मध्ये बोला आम्हाला हिंदी येत नाही. मग सगळयांचे ओळखपत्र
दाखवून खोल्या ताब्यात घेतल्या हॉटेल च्या रूम आणि आजूबाजूचा परिसर तास छान
होतं आणि प्रत्येक मजल्यावर दोरीचा झोपाळा टांगलेला होता. मुले त्यातच
बसून लगेच खेळायला पण लागली. मग आम्ही फ्रेश होऊन थोडासा खाऊन आजच्या
उरलेल्या दिवसात काय करता येईल हे बघत होतो, तर जवळच सी शेल म्युझीयम होत.
मग तिकडे रिक्षा करून गेलो. ३५० रुपये एन्ट्री फी प्रति व्यक्ती भरून आत
गेलो. आणि शंख शिंपले यांचे असंख्य प्रकार आणि तेच वापरून केलेल्या वेगळ्या
वेगळ्या वस्तू आणि डिनोसॉर पार्क हे बघून मुले खुश झाली. तिथेच खूप वेळ
गेला. तिथून पुन्हा रिक्षा ने हॉटेल जवळ आलो आणि तिथेच रात्रीचा जेवण करून
झोपायला गेलो.
हॉटेल
शिंपल्यां मधून साकारलेल्या वेगळ्या वेगळ्या कलाकृती
म्युझीयम
डायनो पार्क
सकाळी जाग आली तीच पावसाच्या आवाजाने. रात्र भर पाऊस पडत होता. आणि रस्त्यात सगळं पाणी साचला होतं. सगळे यावरून बसलो होतो. मुलांना भूक लागली होती मग तसाच चालत चालत पुढे गेलो आणि एक चहाची टपरी दिसली त्याला चहाची ऑर्डर दिली आणि जवळपासची सगळी दुकान बंद होती मग त्यालाच विचारला आणि त्याने सांगितलेल्या ठिकाणी गेलो. त्याच्याकडं इडली, ,मेदु वडा, आणि पुरी भाजी होती. ३० रुपयांमध्ये ४ इडल्या १ वडा आणि भरपूर सांबर आणि नारळाची चटणी त्याच्याकडून आणि चहा वाल्याकडून पार्सल घेऊन हॉटेल वर गेलो. सगळ्यांनी नाश्ता केला आणि तसेच बसून राहिलो होतो, पाऊस कधी थांबतोय याची वाट पाहत. एक दोन तास असेच गेले पाऊस काही थांबायची लक्षणे दिसत नव्हती. पण आम्ही पण सहयाद्रीच्या कुशीत वाढलोय एवढयाश्या पावसाला घाबरतो होय. तसेच पावसात निघालो, आदल्या दिवशी एका रिक्षा वाल्याने नंबर देऊन ठेवला होता त्याला बोलावलं तर तो लगेच १० मिनटात आला. ४५० रुपये ४ तास असं ठरवून तो आमच्या सोबत आला. सगळी ठिकाण चालत जायच्या अंतरावर होती खरं तर पण पाऊस असल्यामुळे आम्हाला दुसरा काही पर्याय नव्हता. मग रिक्षा वाल्याने आम्हाला सगळी ठिकाण २-३ तासाच्या आतच दाखवली. सगळ्यात शेवटी शोर मंदिराच्या इथून त्याला जायला सांगितलं.आणि मुलांसोबत थोडा वेळ समुद्रकिनाऱ्यावर घालवून विंडो शॉपिंग करत करत चालत चालत हॉटेल वर आलो
शोर टेम्पल
कृष्णा बटरबॉल. अतिशय कमी जागा असून पण हा महाकाय दगड एकाच ठिकाणी आहे. त्याला लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सरकारने हलवायचा पण प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश नाही आल.
मंदिरांमधली काही शिल्पे
पंच रथ
महाकाय हत्ती
निवांत आणि निर्जन समुद्रकिनारा
परत येताना एक वेगळीच गणेश मूर्ती दिसली ती कशावर उभी आहे ते कळत
नाहीए लहान बाळ वाटतंय. पण तस नसावं. ज्याला माहिती असेल त्याने माहिती
दिल्यास बर होईल.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.