कर्नाटक दौरा भाग १ - (महाकूट मंदिर, पट्टडकल, ऐहोले)
दिनांक :- २०.१०.२०१९
महाकूट मंदिर : -
बदामी च्या आजूबाजूला असलेल्या प्रदेशातील "महाकूट मंदिर" हे प्रमुख देवालय आहे. महाकूट हे बदामी जवळील एक छोटंसं आणि शांत असं एक गाव आहे दोन डोंगरांमध्ये असलेलं हे मंदिर शैव आणि शाक्त ह्यांचं धार्मिक स्थळ आहे महाकूट वासियांसाठी हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. पौराणिक कथेनुसार अगस्थी मुनींशी झालेल्या युद्धात सहोदर वातापी आणि इल्वल ह्या दोन राक्षसांचा वाढ ह्याच ठिकणी झाला होता.
महाकुटेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून मंदिरात प्रवेश करण्यासाठी भव्य प्रवेशद्वार आहे मंदिरात अर्धमंडप मुखमंडप आणि गर्भगृह आहे. गर्भगृहात शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे आजही नित्यनियमाने तिथे पूजा होत असते
सुमारे दोन तास पट्टडकल मध्ये घालवल्यानंतर गाडी ऐहोलेच्या दिशेने वळवली तीनच्या सुमारास ऐहोले मध्ये पोहोचलो पट्टडकल जसं तसंच ऐहोले होतं. तिथेही बरीच मंदिर, एक विहीर अश्या पुरातन वास्तू. तिथे गेल्यावर सर्वात पाहिले पोहोचलो ते तेथील प्रसिद्ध दुर्ग मंदिरात. दुर्ग मंदिर हे प्रसिद्ध आहे ते त्यावरील शिल्पांसाठी. बराच वेळ असल्याकारणाने दुर्ग मंदिर मनसोक्त न्याहाळण्यास सुरुवात केली.
दुर्ग मंदिर :-
खरं पाहिलं तर हे दुर्ग मंदिर नसून हे शिव मंदिर आहे पण डोंगराच्या जवळपास असल्याकारणाने त्यास दुर्ग मंदिर म्हणून संबोधले जाते. मंदिराचा आकार बघितला तर तो तो हत्ती च्या पाठीसारखा आहे . मंदिराच्या आत एक गर्भगृह आणि सभामंडप आहे मंदिराच्या खांबावर देवी देवतांची शिल्पे कोरली आहेत मंदिराच्या चहूबाजूस शंकर विष्णू महिषासुर मर्दिनी ची रेखीव शिल्पे आहेत.
सुमारे २ तास ऐहोलेमध्ये घालवून पुन्हा बदामीच्या दिशेने
रवाना झालो खरंतर बदामीला जाऊन सूर्यास्त पाहायचा विचार होता पण ढगाळ
वातावरणामुळे ते काही शक्य होऊ शकलं नाही पण असो महाकूट मंदिर, पट्टडकल आणि
ऐहोले हे सर्व एका दिवसात पहायला मिळणं हे हि नसे थोडके. एकंदरीत काय तर
रिक्षा करण्याचा निर्णय अतिशय योग्य होता.
शेवटी हॉटेल मध्ये जाऊन फ्रेश झालो आणि थेट आठ वाजता बदामी
मध्ये जेवायला बाहेर पडलो तिथे सुद्धा एक घरगुती खानावळ शोधून काढली आणि
पोटभर जेवलो. जास्त वेळ न काढता जेऊन थेट हॉटेल मध्ये जाऊन झोपलो कारण
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून बदामी ला भेट द्यायची होती. दिवसभराची दगदग
आणि कमी झोप ह्यामुळे पडल्या पडल्या झोप लागली.
दिवस भाराचा खर्च:
रिक्षा (दिवसभर ) : - ८००/-
नाश्ता : - ४०/-
पार्किंग : - २०/-
दही : - १०/-
पट्टदकल प्रवेश फी : - ४०/-
नारळपाणी - ३०/-
पाणीपुरी: - १०/-
जेवण :- ५०/-
ऐहोळे प्रवेश फी : - ४०/-
-----------------------------
एकूण :- १०४०/-
पुढील प्रवास पुढच्या भागात.....
टीप : -
१) बदामी ला जात असाल तर हॉटेल बुक करताना हॉटेल राजसंगम हे बस स्टॅन्ड च्या जवळ असलेले एकमेव चांगलं हॉटेल आहे.
२) पट्टडकल आणि ऐहोले एका दिवसात करायचं असेल तर रिक्षा किंवा स्वतःची गाडी सोबत असणं गरजेचं आहे रिक्षा ८०० रु घेते.
कर्नाटक दौरा भाग २ :- बदामी
आजच्या दिवशी भेट देण्याची ठिकाणं होती ती म्हणजे अगस्त्य तलाव, भूतनाथ मंदिर, बदामी लेणी आणि बदामी किल्ला. बदामी लेणीची प्रवेशाची वेळ साडेनऊची असल्या कारणाने सर्वप्रथम अगस्त्य तलावला भेट द्यायला निघालो. अगस्त्य तलाव म्हणजे बदामी किल्ल्यावरून कोसळणाऱ्या धबधब्याचं पाणी जिथे जमा होतं ती जागा. तलावाच्या काठावरच एक देऊळ आहे त्याचं नाव "भूतनाथ मंदिर".
३) महाविष्णू लेणी
ह्या लेणीची निर्मिती इसवी सन ५७८ मध्ये झाली आपला मोठा भाऊ कीर्तिवर्म ह्याने १२ वर्ष यशस्वी राज्य केल्याच्या आठवणी मध्ये ह्या लेणी ची निर्मिती झाली बदामी मधील हि सर्वात मोठी लेणी आहे
४) जैन लेणी
ह्या लेणी मध्ये २३ तीर्थंकर पार्श्वनाथ ह्यांचे प्रार्थना करतानाचे शिल्प आहे. ज्याच्या डोक्यावर पाच फण्याचा सापाचं शिल्प आहे. दुसरं शिल्प आहे ते म्हणजे बाहुबली. बाहुबली तीर्थंकर नसून त्याग किंवा निर्वाण स्वीकार केलेला श्रेष्ठ मानव आहे. तिसरं शिल्प आहे ते म्हणजे भगवान महावीर. ह्या लेणी मध्ये २४ तीर्थंकर असलेले एक शिल्प आहे.
१) बदामी वरून हंपीला जायचं झाल्यास बदामी हंपी थेट बस नसल्याकारणाने बदामी ते इल्कल व इल्कल ते हंपी अशी बस पकडावी.
दिवसाचा खर्च :-
बदामी लेणी प्रवेश फी :- २०/-
जेवण : - ५०/-
बदामी ते इल्कल बस :- ७०/-
इल्कल ते होस्पेट : - ११५/-
होस्पेट ते हंपी : - १५/-
रात्रीचे जेवण :- १५०/-
-------------------------
एकूण :- ४२०/-
कर्नाटक दौरा भाग ३ :- हंपी
काल रात्री हंपीला पोहोचल्यावर पटकन जेवून झोपलो कारण आज मातंगा पर्वतावर सूर्योदय बघण्यासाठी लवकर उठायचं होतं. ठरल्याप्रमाणे पहाटे ५ वाजता उठून मातंगा पर्वत चढायला सुरुवात केली सुमारे अर्ध्या तासात वर पोहोचलो पण ढगाळ वातावरणामुळे सूर्योदय काही दिसला नाही पण विरुपक्ष मंदिराजवळून वाहणाऱ्या तुंगभद्रा नदीचे अप्रतिम दृश्य नजरेस पडले.
कडेलुकलु गणेशासारखेच अजून एक मूर्ती हंपीच्या दक्षिणेस नजरेस येते त्याच नाव म्हणजे ससेवकालू गणेश. १२ फूट उंचीच्या ह्या मूर्तीचे निर्माण सुद्धा एकाच दगडात करण्यात आले आहे.
हिंदू पौराणिक कथांनुसार, भगवान गणेश अन्नावर प्रेम करतात म्हणून ओळखले जातात. एकदा गणेशाने भरपूर भोजन केले, त्यामुळे त्याचे पोट फुटण्याच्या मार्गावर होते. पोट फुटण्यापासून रोखण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय न सापडल्याने गणेशने साप पकडला आणि त्याला पोटास बांधले. गणेशाच्या पोटाभोवती बांधलेल्या सापाच्या अस्तित्वामागील ही पौराणिक घटना आहे, जी मूर्तीवर दिसते.
बडवलिंग हि हंपीमधील ही सर्वात मोठी शिवलिंग प्रतिमा आहे. लक्ष्मी नरसिंह पुतळ्याशेजारी शिवलिंग समोर एका खोलीत ठेवलेले आहे. या चिन्हावर बारकाईने पाहिले तर त्यावर तीन डोळे कोरले आहेत पौराणिक कथेत असे आहे कि ह्या शिवलिंगाचे निर्मिती एका गरीब स्रीद्वारे केली असल्याने त्यास बडवलिंग शिवलिंग म्हणून ओळखले जाते.
भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी नरसिंह हा एक आहे हंपीमधील ही सर्वात मोठी मूर्ती आहे. नरसिंह सात फणी शेषनागावर बसले आहे. सापांचे डोके त्याच्या डोक्यावर छत्राप्रमाणे कार्य करत आहेत . रागीट आणि उग्र डोळ्यांमुळे ह्यास उग्रनरसिंह म्हणून संबोधले जाते
मूळ मूर्तीमध्ये नरसिंहाच्या मांडीवर बसलेली लक्ष्मी देवीची सुद्धा प्रतिमा होती परंतु विजयनगरावर झालेल्या आक्रमणामुळे ह्या मूर्तीचे गंभीर नुकसान झाले आहे. त्याच्या मांडीवर कोरलेल्या लक्ष्मीच्या प्रतिमेचा तोडलेला भागही गहाळ आहे. कदाचित हे लहान तुकडे केले असेल. पण देवीचा हात आजही आपणास निदर्शनास येतो
अच्युतरायाने विजयनगरातील राजघराण्यातील महिलांसाठी क्वीन बाथ नामक वास्तू बनवल्याचे समजते. इंडो-इस्लामिक शैलीमध्ये तयार केलेली, क्वीन्स बाथ एक विस्तृत रचना आहे ही आयताकृती इमारत असून इमारतीच्या चारही बाजूस बाल्कनी आहेत, प्रत्येकाला बाल्कनीला तीन खिडक्या आहेत. तलावाची खोली ६ फूट आहे आणि उतरण्यासाठी दगडांच्या पायर्याची सोय आहे.
महानवमी दिब्बा हि एक विजयी वास्तू आहे. उदगिरीवर विजय मिळाल्यानंतर राजा कृष्णदेवरायांनी ह्या वस्तूची निर्मिती केली होती ह्याची रचना हि हंपीच्या राजवाड्यांमधली सर्वात उंच रचना आहे ह्या वास्तूच्या उंचीमुळे हि प्रसिद्ध आहे. विजयोत्सव साजरा करण्यासाठी ह्या वास्तूचा उपयोग होत असे. ह्या वास्तूच्या चहूबाजूस भिंतीवर विविध शिल्पे अधोरेखित केली आहे ती ह्या विजयाची साक्ष देतात. महानवमी डिब्बा च्या आजूबाजूस हत्ती घोडे बांधण्यासाठी वेगळी जागा अधोरेखित करण्यात आली आहे, बाजूलाच राजा व प्रधान ह्यांच्या गुप्त चर्चेसाठी एक गुप्तखोलीसुद्धा आहे महानवमी डीब्बाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी पायऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
राजतुलाभार हि हंपीमधील एकमेव वास्तू जी आजही लोकांना तिच्या इतिहासामुळे आकर्षित करते ह्या वस्तूचा उपयोग १५ व्या शतकात नवीन वर्ष , राज्याभिषेक , दसरा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण अशा खास दिवसांसाठी राजांचा तुलाभार करण्यासाठी होत म्हणून ह्यास राजतुलाभार म्हणून संबोधले जाते.
हंपीमधील तुंगभद्रा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर स्थित ह्या विठ्ठल मंदिराची निर्मिती १६ व्या शतकात झाली असून हे मंदिर विष्णूस समर्पित करण्यात आले आहे. विठ्ठल मंदिर हे दुसऱ्या राज देवरायाच्या कारकिर्दीत बांधले गेले असून हे मंदिर मूळच्या दक्षिण भारतीय द्रविड स्थापत्यशैलीचे प्रतिनिधित्व करते
मंदिरावरील सुशोभित खांब व त्यावरील शिल्पांनी आजही पर्यटक प्रभावित होतात. मंदिरात विठ्ठलाची उत्कृष्ट मूर्ती आहे पण सद्यस्थितीत फक्त पुजारी येथे प्रवेश करू शकतात लहान गर्भगृह सर्वसामान्यांसाठी खुले आहे ह्या मंदिराच्या सभोवताली असलेला दगडी रथ हे सध्याचे प्रमुख आकर्षण आहे सध्या पन्नास रुपयाच्या भारतीय चलनावर ह्याच दगडी रथाची प्रतिकृती आहे.
कर्नाटक भाग ४:- हंपीची दुसरी बाजू
अंजनेया पर्वत हे हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. पौराणिक कथेच्या अनुसार जेव्हा रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात किष्किंदा नगरीत पोहोचले, जिथे हा अंजनेया पर्वत आहे जेव्हा हनुमानाला कळले कि दोन राजकुमार आपल्या नगरीत आले आहेत तेव्हा हनुमानजी स्वतः श्रीराम व लक्ष्मणास भेटावयास आले. पौराणिक कथांनुसार श्रीराम व लक्ष्मण ह्यांची बजरंगबली सोबत झालेली पहिली भेट हि इथेच होय. अंजनी पर्वताकडे खालच्या बाजूने पाहिल्यास माकडाच्या चेहऱ्याची एक प्रतिकृती आपल्या नजरेस पडते म्हणून ह्यास "MONKEY HILL" म्हणून ओळखले जाते.
अंजनेया पर्वताच्या आजूबाजूला बघण्यास काय आहे? असं विचारल्यावर लक्षात आलं कि सानापूर तलाव हे जलसाठ्याचे एकमेव ठिकाण आहे म्हणून तिकडे जायचे ठरवले. अंजनेया पर्वताच्या सुमारे १० किमी पुढे स्थित "सोनापूर तलाव" हे ठिकाण आहे. तुंगभद्रा नदीतील पाण्याच्या साठ्यासाठी म्हणून ह्या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. वाटेवरची काही गावे ओलांडून गेल्यावर एका चढावाच्या दिशेने गेल्यास अचानक हा तलाव समोर येतो. जोपर्यंत आपण जवळ पोहोचत नाही तोपर्यंत सोनापूर तलावाचा थांगपत्ता हि लागत नाही वर निळेभोर आकाश आणि त्याच आकाशात मोहून गेलेला निळाशार हा तलाव बघण्याची मजा हि काही औरच आहे.
रामायणात पंपा सरोवर म्हणजे आपण लहानपणी ऐकलेली शबरीची बोरे हि कथा ज्या ठिकाणी घडली तेच हे ठिकाण म्हणजे "पंपा सरोवर". राम व लक्ष्मण सीतेच्या शोधात जेव्हा आले तेव्हा त्यांची भेट शबरीशी झाली व तिने प्रभू श्रीरामास सांगितले कि तुम्हाला सीतेचा शोध घ्यायचा असल्यास तुम्ही हनुमानाची मदत घ्या. किष्किंदा स्थित पंपा सरोवर हे अंजनेया पर्वताच्या बरोबर समोर आहे.
हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश होऊन थोडावेळ आराम करून विरुपाक्ष मंदिराच्या बाजूसच असणाऱ्या हेमकूट पर्वतावरून दिसणारा सूर्यास्त अनुभवण्यास गेलो.
हेमकूट पर्वत
विरुपाक्ष मंदिराच्या डाव्या बाजूस पर्वतावर जाण्यासाठी एक रस्ता लागतो ते म्हणजे "हेमकूट पर्वत". हेमकूट पर्वत हंपीमधून सूर्यास्त बघण्यासाठीच उत्तम ठिकाण.हंपीमधील जवळपास सर्व पर्यटक हे सूर्यास्त बघण्यासाठी ह्याच ठिकाणी जमतात.
दिवसाचा खर्च
नाश्ता :- ४०/-
बाईक :- ५००/-
प्रसाद :- ११०/-
नारळपाणी : - ३०/-
चहा :- १०/-
जेवण :- ८०/-
----------------
एकूण :- ७७०/-
लाक्कुंदी बदामी पासुन साधारण पणे ८० किमी वर आहे. येथे येण्यासाठी बदामी - गदग - लाक्कुंदी असे यावे लागते.
येथे चालुक्य, कलाचुरी, सेऊना आणि होयसळा राजवटीतील ८ व्या ते १२ व्या शतकातील मंदीरे आहेत.
ह्या परिसरात सुस्थितील व भग्न अवशेषातील अशी बरीचशी मंदीरे आहेत. बरीचशी
मंदीरे गावात असल्याने गावकरी ईथे गप्पा मारतात, वामकुक्षी काढतात,
गुरे-ढोरे बांधतात त्यामुळे त्यांची पडझड झाली आहे.
काही सुस्थितील व ठळक मंदीरांचे फोटोज् ईथे देण्याचा माझा प्रयत्न आहे.
माणिकेश्वर मंदीरः
ईथे प्रसिद्ध पायर्यांची विहीर (पुष्करीणी) आहे. पण मी पावसाळ्यात गेलो असल्याने विहीरीचा बराचसा भाग पाण्याखाली झाकला गेला होता.
प्रचि १
-
-
-
प्रचि २
-
-
-
प्रचि ३
-
-
-
प्रचि ४
पुष्करीणी
-
-
-
प्रचि ५
-
-
-
प्रचि ६
-
-
-
प्रचि ७
(आंतरजालावरून साभार)
पुष्करीणीचे खरे स्वरुप असे आहे.

-
-
-
प्रचि ८
-
-
-
प्रचि ९
-
-
-
ब्रम्ह जिनालय (जैन मंदीर):
प्रचि १०
-
-
-
प्रचि ११
-
-
-
प्रचि १२
-
-
-
प्रचि १३
-
-
-
प्रचि १४
-
-
-
प्रचि १५
-
-
-
प्रचि १६
-
-
-
प्रचि १७
-
-
-
काशीविश्वेशर मंदीरः
प्रचि १८
-
-
-
प्रचि १९
-
-
-
प्रचि २०
-
-
-
प्रचि २१
-
-
-
प्रचि २२
-
-
-
प्रचि २३
-
-
-
प्रचि २४
-
-
-
प्रचि २५
-
-
-
नान्नेश्वर मंदीरः
प्रचि २६
-
-
-
प्रचि २७
-
बेलुर, हळेबिडू व सोमनाथपुर. कर्नाटक
कर्नाटक राज्याची निर्मिती १ नोव्हेंबर १९५६ ला झाली. कर्नाटक राज्याला ३००० वर्षांचा इतिहास आहे.
कर्नाटकात होयसळा राजांनी १०व्या ते १४ व्या शतकांत राज्य केले. ह्या दरम्यान त्यांनी बर्याच उत्तोमत्तम मंदिरांची निर्मिती केली.
होयसळा राजांची अशी लोककथा सांगण्यात येते की एक सळा नावाचा मुलगा होता.
एकदा तो त्याच्या गुरुंबरोबर (सुदत्त) जंगलात जात असताना त्यांच्यावर
सिंहाने हल्ला केला. हे पाहुन गुरुंनी त्या मुलाला आज्ञा केली "होय
सळा"(कन्नड भाषेत होय म्हणजे "मारणे"(strike/blow)). ती आज्ञा ऐकुन त्या
मुलाने सिंहाला ठार मारले. म्हणुन त्या मुलाचे नाव होय-सळा असे पडले.
बेलुर : बेलुर बंगलोर पासुन २५० किमी वर येते. जवळचे
रेल्वे स्टेशन म्हणजे अर्सिकेरे. ईथे हसन मार्गेही बसने जाता येते. हि
होयसळा राजांची पुर्व राजधानी होती. ईथे चन्नाकेशवा (विष्णु) चे १११७ मध्ये
बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे.
प्रचि १
-
-
-
प्रचि २
होयसळा राजांची राजमुद्रा...
-
-
-
प्रचि ३
-
-
-
प्रचि ४
-
-
-
प्रचि ५
-
-
-
प्रचि ६
-
-
-
प्रचि ७
-
-
-
प्रचि ८
-
-
-
प्रचि ९
-
-
-
प्रचि १०
-
-
-
प्रचि ११
-
-
-
प्रचि १२
-
-
-
प्रचि १३
-
-
-
प्रचि १४
-
-
-
प्रचि १५
-
-
-
हळेबिडू : हळेबिडू बेलुर पासुन १६ किमी वर आहे. ही होयसळा राजांची राजधानी होती. ईथे होयसाळेश्वरा हे ११२१ मधले मंदिर आहे.
प्रचि १६
-
-
-
प्रचि १७
-
-
-
प्रचि १८
-
-
-
प्रचि १९
-
-
-
प्रचि २०
-
-
-
प्रचि २२
-
-
-
प्रचि २३
-
-
-
प्रचि २४
-
-
-
प्रचि २५
-
-
-
प्रचि २६
-
-
-
प्रचि २७
-
-
-
प्रचि २८
-
-
-
प्रचि २९
-
-
-
प्रचि ३०
-
-
-
प्रचि ३१
-
-
-
प्रचि ३२
-
-
-
प्रचि ३३
-
-
-
प्रचि ३४
-
-
-
प्रचि ३५
-
-
-
प्रचि ३६
-
-
-
प्रचि ३७
-
-
-
प्रचि ३८
-
-
-
प्रचि ३९
राम - रावण युद्ध.
-
-
-
प्रचि ४०
-
-
-
प्रचि ४१
-
-
-
प्रचि ४२
समुद्रमंथन
-
-
-
प्रचि ४३
-
-
-
प्रचि ४४
-
-
-
प्रचि ४५

-
-
-
प्रचि ४६

-
-
-
प्रचि ४७

-
-
-
प्रचि ४८

-
-
-
प्रचि ४९

-
-
-
प्रचि ५०

-
-
-
प्रचि ५१

-
-
-
प्रचि ५२

-
-
-
प्रचि ५३

-
-
-
प्रचि ५४

-
-
-
प्रचि ५५

-
-
-
प्रचि ५६

-
-
-
शिवसमुद्रम धबधबा : शिवसमुद्रम धबधबा कावेरी नदीवर आहे. हे ठिकाण बंगलोर पासुन १४०किमी वर आहे. ईथे जाण्याचा सर्वात ऊत्तम काळ म्हणजे जुलाई-ऑगस्ट. कावेरीच्या प्रपातामुळे ईथे २ मुख्य धबधबे तयार झाले आहेत. गगनचुक्की व बाराचुक्की. ह्यांची ऊंची साधारण: पणे ९० मीटर आहे. ईथे गेल्यास बाराचुक्की जवळ मिळणारे ईथल्या गोड्या पाण्यातले तिखट मासे खायला विसरू नका.
प्रचि १
भातशेती, कनकपुरा रोड.
-
-
-
प्रचि २
शिवसमुद्रमजवळील जुन्या काळचा पुल.
-
-
-
प्रचि ३
-
-
-
प्रचि ४
गगनचुक्की धबधबे..
-
-
-
प्रचि ५
-
-
-
प्रचि ६
जलप्रपात.
-
-
-
प्रचि ७

-
-
-
प्रचि ८

-
-
-
प्रचि ९
-
-
-
प्रचि १०
कावेरी नदी.
-
-
-
प्रचि ११
रॉक फॉर्मेशन
-
-
-
प्रचि १२
बाराचुक्की धबधबे.
-
-
-
प्रचि १३

-
-
-
प्रचि १४
-
-
-
प्रचि १५

-
-
-
प्रचि १६

-
-
-
कुर्ग : कुर्ग कर्नाटकाच्या पच्शिम घाटात वसलेले एक
थंड हवेचे ठिकाण असुन ते बंगलोर पासुन २५० किमी वर आहे. कुर्ग कॉफी च्या
मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. ईथे गेलात तर कॉफी च्या मळ्यातील होम
स्टे मध्ये मुक्कामास जरूर रहा. अगदी वेगळा अनुभव असतो हा.
ईथे जाण्याचा सर्वात ऊत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते मार्च.
-
-
-
प्रचि १८
कुर्ग शहर.
-
-
-
प्रचि१९
कुर्गचा राजवाडा.
-
-
-
प्रचि २०
ओंकारेश्वर मंदिर.
-
-
-
प्रचि २१
कॉफीचा मळा.
-
-
-
प्रचि २२
कॉफीची फळे. ह्यांच्या आतील बिया दळुन कॉफी करतात.
-
-
-
प्रचि २३
खाली कॉफीचे मळे व वर सुपारी ची झाडे.
-
-
-
प्रचि २४
पच्शिम घाटातले जंगल
-
-
-
प्रचि २५
एक पायवाट.
-
-
-
प्रचि २६
अॅबे धबधबा.
-
-
-
प्रचि २७
दुबेर चा एलिफंट कँप.
-
-
-
बायलाकुप्पे, कुशलनगर :
ईथे तिबेटी बौद्ध भिख्खुंची मोठी मोनास्टरी आहे. ही मोनास्टरी १९७२ मध्ये तिबेटी निर्वासितांनी बांधली.
-
प्रवेशद्वार.
प्रचि २८
-
-
-
प्रचि २९

-
-
-
प्रचि ३०

-
-
-
प्रचि ३१
मुख्य सभागृह.
-
-
-
प्रचि ३२
भित्तीचित्रे.
-
-
-
प्रचि ३३

-
-
-
प्रचि ३४

-
-
-
प्रचि ३४

-
हंपी, कर्नाटक.
हंपी म्हटले कि लहानपणी ईतिहासाच्या पुस्तकात पाहिलेला उग्र नरसिंहाचा
पुतळा आठवायचा. हंपी ला भेट देण्याचा विचार बरेच दिवस मनात होता. हा योग
डिसेंबर २०१० मध्ये आला. हंपी कर्नाटकाच्या उत्तरेला आहे. इथले सर्वात
जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे होस्पेट.
हंपी तुंगभद्रा नदीच्या किनारी वसले आहे. सध्याचे हंपी म्हणजे पुर्वीचे
विजयनगर (विजयनगर साम्राज्याची (१३३६-१५६५) राजधानी) आणि विजयनगर साम्राज्य
म्हणजेच रामायणात उल्लेख असलेले किष्किंधा राज्य. इथे सर्वत्र विजयनगर
साम्राज्याचे भग्नावशेष विखरुन पडले आहेत.
ईथे झालेल्या उत्खननात आदिमानवाने वापरलेली भांडी, भित्तीचित्रे ईत्यादी सापडली आहेत.
हंपी बद्दलची बहुतेक सारी माहिती पहिल्या प्रचि मध्ये दिली आहे.
चला तर आज ह्या साम्राज्याची एक छोटिशी झलक पाहुयात.
प्रचि १
हंपी चा ईतिहास
-
-
-
प्रचि २
विरुपाक्ष मंदिर
-
-
-
प्रचि ३
-
-
-
प्रचि ४
विरुपाक्ष मंदिर पॅनो
-
-
-
प्रचि ५
कृष्ण मंदिर, प्रवेशद्वार
-
-
-
प्रचि ६
-
-
-
प्रचि ७
-
-
-
प्रचि ८
-
-
-
प्रचि ९
-
-
-
प्रचि १०
-
-
-
प्रचि ११
-
-
-
प्रचि १२
विजयनगर साम्राज्याचे राजचिन्ह
-
-
-
प्रचि १३
कृष्ण मंदिराजवळील बाजार
-
-
-
प्रचि १४
-
-
-
प्रचि १५
कृष्ण मंदिर परिसर
-
-
-
प्रचि १६
उग्र नरसिंह
-
-
-
प्रचि १७
भूमिगत शिवमंदिर
-
-
-
प्रचि १८
हजारी राम मंदिर
-
-
-
प्रचि १९
-
-
-
प्रचि २०
-
-
-
प्रचि २१
-
-
-
प्रचि २२
महानवमी डिब्बा
-
-
-
प्रचि २३
पुष्करीणी (पायर्यांची विहिर)
-
-
-
प्रचि २४
विहिरीला पाणी पुरविणारे पाट
-
-
-
प्रचि २५
विठ्ठल मंदिराला जाण्याचा रस्ता
-
-
-
प्रचि २६
विठ्ठल मंदिर
-
-
-
प्रचि २७
विठ्ठल मंदिर परिसर
-
-
-
प्रचि २८
-
-
-
प्रचि २९
दगडी रथ
-
-
-
प्रचि ३०
-
-
-
प्रचि ३१
-
-
-
प्रचि ३२
-
-
-
प्रचि ३३
-
-
-
प्रचि ३४
विठ्ठल मंदिरातले संगीतमय खांब. ह्या खांबांवर हात मारल्यावर ह्यातुन संगीत येते.
-
-
-
प्रचि ३५
-
-
-
प्रचि ३६
-
-
-
प्रचि ३७
-
-
-
प्रचि ३८
-
-
-
प्रचि ३९
-
-
-
प्रचि ४०
विठ्ठल मंदिर पॅनो
-
-
-
प्रचि ४१
गनगित्ती जैन मंदिर
-
-
-
प्रचि ४२
कमल महाल
-
-
-
प्रचि ४३
गजशाळा
-
-
-
तुंगभद्रा

-
-
-
प्रचि ४५
विजयनगर साम्राज्याचे भग्नावशेष.

हिरण्यकश्यपू मारताना नरसिंह म्हणजे उग्रनरसिंह. अशी मूर्ती साधारणपणे तळ्याच्या काठी असते. वरदा म्हणतेय की हा उग्र नाहीये. पण मला आठवतय एकदा गाईड म्हणाला होता की याच्या मांडीवर लक्ष्मी बसलेली होती, पण आता मूर्ती विद्रूप झाली आहे. ते नक्की काय भानगडे? वरदा...
ती आख्यायिका मलादेखील नीट ठाऊक नाही. एकदा वाचलय की यवनी आक्रमणाच्या भितीने मूर्ती नेऊन पंढरपुरात लपवली. एकदा वाचलय की पुंडलिकाच्या हाकेला ओ देऊन विठ्ठल गेला तो तिथेच आहे. एक मात्र खरं की कर्नाटकामधे देखील विठठल भक्ती पुष्कळ आहे. पुरंदरदासांच्या वगैरे रचना ऐकल्य्वार ते जाणवतं.
विठ्ठलाचा मांडलीक राजा (नाव नाही आठवत आहे आता) त्याला भेटायला येणार असतो. म्हणून विठ्ठल घरी सेवकाकडून निरोप पाठवतो की त्याच्या भोजनाची जय्यत तयारी कर . सेवक घरी येईपर्यंत राणी (पदुबाई) आणि तिच्या दासींचे जेवण झाले असते अणि ती सेवकाहाती उलट निरोप पाठवते की ती तयारी करणार नाही. पण ती सगळी तयारी करून ठेवते. इकडे विठोबाला तो निरोप मिळताच तो तिला शाप देतो. त्या रागाने पदुबाई मरते आणि तिच्या अस्थी समुद्रात वाहून जातात. घरी आल्यावर त्याला पदुबाईने केलेली तयारी दिसते आणि त्याला खूप दु:ख होते. दु:खभरात तो सन्यास घेतो आणि आपले राज्य सोडून निघून जातो.
तो मांडलीक राजा विठोबाला आणि पदुबाईला आईवडिलांच्या स्थानी मानत असतो. त्याला जेंव्हा हे कळते तेंहा त्याला आपल्यामुळे हे सर्व घडले असे वाटते आणि तो खूप कष्टी होतो. मग तो तपश्चर्या करून आपल्या आईच्या अस्थी सागराकडून मिळवतो आणि चंद्रभागेत विसर्जीत करतो. त्यातून एक कमळ उगवते. विठोबा फिरत फिरत त्या ठिकाणी येतो आणि ते कमळ तोडतो. त्यातून पदुबाई रुक्मीणीरुपाने प्रकटते. आपल्याच शापामुळे विठोबा तिच्याशी परत संसार करू शकत नाही पण तो मग पढरपुरातच रहातो.
अशी काहीशी अख्यायिका आहे.
वरचा मोठा गणपती आहे ना तसे दोन गणपती आहेत. एक कडलीकाळ गणेश आणि एक सासवीकाळ गणेश. (हरभर्या डाळीचा गणपती आणि मोहरीचा गणपती) हे दोन्ही गणपती किमान ८-१० फूटी आहेत आणि मोनोलिथ आहेत (बहुधा)
आता यवढ्या मोठ्या गणपतीला इतकी चिमुकली नावे का दिली आहेत कुणास ठाऊक?
नरसिंह मूर्तींचे काही प्रकारः
विदरण नरसिंह - म्हणजे हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन पोट फाडणारा नरसिंह
केवल नरसिंह - एकटाच, वैष्णव आयुधांसकट
स्थौण नरसिंह - खांबातून प्रकट होताना
लक्ष्मीनरसिंह - मांडीवर लक्ष्मी घेऊन बसलेला
योगनरसिंह - योगपट्ट बांधून बसलेला
कधीकधी हिरण्यकश्यपूशी युद्ध करताना दाखवतात.
नितिनचंद्र, पु.ना. ओक प्रकरणात प्लीज फारसं लक्ष घालू नका. त्यात खरंच
फारसा काही अर्थ नाही. आणि हंपी प्राचीन नाही मध्ययुगीन आहे. १५व्या
शतकातलं.
मुस्लिम देशात कोण म्हणतं असे भव्य प्राचीन अवशेष नाहीत म्हणून? भरपूर
आहेत. अगदी हंपीपेक्षाही भव्य आहेत. आपल्याला माहित नसतं एवढंच.
भारतीय स्थापत्यशास्त्राला घुमट आणि कमान (ट्रू आर्च - विथ की स्टोन) ही
मुस्लिम स्थापत्यशास्त्राकडून मिळालेली देणगी आहे. त्यामुळे आपल्या
संस्कृतीची, स्थापत्यशास्त्राची पत कमी होत नाही काही. ही अशी देवाणघेवाण
जगभर चालूच असते.
हम्पी सुंदर आहे. हे फोटो दोन वर्षांपूर्वीचे दिसतात. त्याच काळात आम्ही
मागच्या वर्षो तेथे गेलो होतो तेव्हा मात्र तेथे खूप गर्दी होती.
तेथे जाणाऱ्यांसाठी सूचना - सीजन असता तेथे जाऊ नये. विशेषत: शाळांच्या
सहली निघतात तेव्हा तेथे जाणे बिलकुल टाळावे. ती मंदिरे माणसांच्या गर्दीने
फुलली कि त्या वातावरणातील जादू हरवते. पाऊस काळात तेथे गर्दी कमी असते
आणि राहण्याचे दरही कमी असतात. शिवाय पाऊस मुसळधार नसल्याने जास्त अडचण
येत नाही. तेथे जाऊन guide घेऊ नये. निवांत चार पाच दिवस काढले तरी ते
अपुरे आहेत. सायकल घेऊन तो परिसर खूप भटकण्यात मजा आहे. तुन्गभद्रेच्या
काठावर संध्याकाळ व्यतीत करणे सोडू नये. जितकी गर्दी कमी तितका तो भाग
haunting वाटतो.
बदामी कर्नाटक
चालुक्यनगरी बदामी - भाग १ - ऐतिहासिक सहलीची सुरुवात
तेवढ्यात चहावाल्याच्या आवाजाने माझी तंद्री भंगली. बोचणाऱ्या थंडीवर उत्तम उतारा माझ्या समोर हजार होता. गरमागरम चहा घशाखाली गेल्यानंतर जरा तरतरी आली. नियोजित वेळेनुसार गाडीने प्रस्थान केले. एव्हाना उगवतीकडे तांबडं फुटू लागलं होतं. पाखरांची किलबिल सुरु झाली होती. बऱ्याच दिवसांनी सूर्योदयाचा प्रसन्न क्षण अनुभवत होतो. गाडीने जसा वेग पकडला तशी थंड हवा झोंबू लागली. मी मुकाट्याने खिडकी बंद करून झोपायचा प्रयत्न करू लागलो. गाडी तशी रिकामीच होती. समोरच्या सीटवर एक आजोबा अंगाचं मुटकुळं करून निवांत झोपले होते. मीही त्यांचा कित्ता गिरवत त्या मोकळ्या सीटवर आडवा पसरलो. भारतीय रेल्वेचा खडखडाट म्हणजे जणू बाळाचा पाळणाच! त्या हेलकाव्यांत छान झोप लागली. विजापूरला गाडीत गर्दी झाली. मग मात्र मला माझा सीटवरचा पसारा आवरता घ्यावा लागला. साधारण साडेअकराला बदामी स्टेशनवर उतरलो. बदामी हे कर्नाटक मधल्या बागलकोट जिल्ह्यातलं एक शहर. चालुक्यकालीन लेण्या आणि मंदिरे यांसाठी प्रसिद्ध. मी हॉटेलवर जाऊन आन्हिकं उरकली आणि शहर बघायला बाहेर पडलो.
शहर तसं लहानसंच होतं. जेमतेम २५००० लोकवस्ती असेल. सगळी प्रेक्षणीय स्थळं अगस्त्य तीर्थाच्या आसपास एकवटलेली आहेत. माझ्या हॉटेलपासून तिथलं अंतर साधारण २ किमी असेल. एरवी सहज चालून गेलो असतो. पण इथलं दुपारचं ऊन सहन होत नव्हतं. सोलापुरातला गारठा कुठच्या कुठे पळाला होता. शेवटी रिक्षा केली. शहरातल्या लहान-मोठ्या गल्ल्यांतून वाट काढत रिक्षा पुढे जाऊ लागली. त्या लहानशा रस्त्यावर फिरणारी गुरं, डुकरं, आणि कुत्री, मधेच खेळणारी लहान मुलं, आणि ये-जा करणारी लोकं एका टिपिकल भारतीय गावाचा अनुभव देत होती. या सगळ्या कोलाहलात ती प्राचीन मंदिरे कोणत्या अवस्थेत उभी असतील आणि त्यांचा कसा अनुभव येईल अशा विचारात मी होतो. तेवढ्यात ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग - संरक्षित क्षेत्र, बदामी’ अशी पाटी दिसली आणि एका प्राचीन कमानीतून रिक्षा आत शिरली. आत शिरताच एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश केल्याचा आभास झाला. उजवीकडे नितांतसुंदर असे अगस्त्य तीर्थ दिसत होते. तीर्थाच्या चहूबाजूंनी ताशीव कड्यांचे लाल पहाड रखवालदारांसारखे उभे होते. दक्षिणेकडच्या पहाडात बदामीची सुप्रसिद्ध गुंफा मंदिरे कोरलेली दिसत होती. शहराच्या बाजूने एक विस्तीर्ण घाट तीर्थात उतरत होता. त्याच्या समोरच्या बाजूला उभारलेले सुबक असे भूतनाथाचे मंदिर साऱ्या परिसराचे सौंदर्य एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवत होते. मी रिक्षातून उतरलो. तीर्थाच्या काठाशी एक प्रचंड वटवृक्ष आपल्या पारंब्या सावरत उभा होता. त्या रणरणत्या उन्हात थोड्याफार सावलीचा तोच एक आधार होता. मी तिथे थांबून आता काय बघू, कुठून सुरुवात करू याचा विचार करू लागलो. इतक्यात शेजारचे वस्तुसंग्रहालय नजरेस पडले.
| बदामीचे सुप्रसिद्ध भूतनाथ मंदिर |
उन्हापासून तात्पुरती सुटका म्हणून मी
त्या वस्तुसंग्रहालयात शिरलो. अपेक्षेपेक्षा आतली मांडणी फारच नेटकी होती.
उत्खननात सापडलेले अनेक अवशेष तिथे मांडले होते. त्यांपैकी मयूरतोरण आणि
लज्जागौरी ही शिल्पे विशेष उल्लेखनीय. एका दालनात चालुक्य साम्राज्याचा
इतिहास चित्रात्मक पद्धतीने मांडला होता. कन्नड भाषेची सध्याची लिपी कशी
उत्क्रांत झाली ती पक्रिया फारच आकर्षक पद्धतीने दाखवली होती. दुसऱ्या
दालनात बदामी आणि परिसराची त्रिमितीय प्रतिकृती बनवलेली होती. दुर्भाग्याने
आत फोटो काढायला मनाई होती. एकूण संग्रहालय लहानच होते. अर्ध्या तासात
तिथून मी बाहेर पडलो. बाहेरच्या दुकानातून बदामीविषयी माहिती असलेले एक
लहानसे पुस्तक विकत घेतले. युरोपातल्या प्रसिद्ध जागांविषयी जशी इत्थंभूत
माहिती इंटरनेट वर मिळते तशी भारतातल्या जागांविषयी मिळत नाही. शिवाय तिथे
कोणी मार्गदर्शक सोबत घ्यायचा तर त्यालाही कितपत माहिती असेल याची काय
शाश्वती? त्यामुळे मी सरळ पुस्तक वाचून पुढचा मार्ग ठरवायचा निर्णय घेतला.
एका तथाकथित प्रमाणित मार्गदर्शकाने लिहलेले ते पुस्तक तसे माहितीपर होते.
व्याकरणाच्या अनेक चुका असल्या तरी आसपासची आवश्यक माहिती त्यात होती. मी
त्या वटवृक्षाखाली विसावलो आणि पुस्तक चाळू लागलो.
बदामीचे मूळ नाव वातापी. प्राचीन
काळापासून हे शहर एक महत्त्वाचे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र होते. या
नावामागची कथाही रंजक आहे. कोणे एके काळी इथल्या डोंगरांत वातापी आणि इल्वल
असे दोघे असुरबंधू रहात होते. ते दाराशी येणाऱ्या पाहुण्यास भोजनासाठी
आमंत्रित करत. मग इल्वल वातापीला मारून त्याच्या शरीरापासून बनलेले अन्न
त्या पाहुण्यास खाऊ घाली. पाहुण्याने ते अन्न खाताच वातापी त्याचे पोट
फाडून बाहेर येई. मग दोघे असुरबंधू त्या मृत पाहुण्यास गट्टम करत. एकदा
योगायोगाने अगस्त्य ऋषी या परिसरातून जात होते. इल्वलाने त्यांना आमंत्रित
केले व ठरल्याप्रमाणे वातापीच्या शरीरापासून बनलेले अन्न खाऊ घातले. मात्र
अगस्त्य ऋषींनी असुरांचा डाव ओळखला व वातापी पोटात जिवंत व्हायच्या आधीच
“वातापी जीर्णोSभव” असा मंत्र म्हणून ते अन्न पचवून टाकले. अशा प्रकारे
वातापीचा त्याच्या भावाच्याच हस्ते मृत्यू झाला व लोकांची त्यांच्या
जाचापासून सुटका झाली. अगस्त्य ऋषींनी घडवून आणलेल्या त्या वधामुळे त्या
सरोवरास अगस्त्य तीर्थ असे नाव मिळाले.
साधारण इसवी सनाच्या पाचव्या शतकात उदयास
आलेले चालुक्य साम्राज्य दक्षिण भारतातले एक महत्त्वाचे साम्राज्य समजले
जाते. बदामीचे भौगोलिक, आर्थिक, व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन चालुक्य
सम्राट पुलकेशीन-१ याने आपली राजधानी इथे वसवली. इथली गुंफा मंदिरे, इतर
देवालये, आणि किल्ल्यांची उभारणी त्याच्याच काळात झाली. पुढे पुलकेशीन-२
याने आसपासच्या इतर राजवटींचा पराभव करून उत्तरेस नर्मदा नदीपर्यंत चालुक्य
साम्राज्याचा विस्तार केला. सुमारे तीनशे वर्षं चालुक्य साम्राज्याने
दक्षिण भारतावर आधिपत्य गाजवले. कालांतराने आठव्या शतकात अंतर्गत यादवी व
फितुरी यांमुळे या साम्राज्याचा अस्त झाला. चालुक्य राजांनी आपल्या
कार्यकाळात दक्षिण भारतातली मंदिरस्थापत्यकला भरभराटीस आणली. त्या काळात
बांधली गेलेली एकापेक्षा एक अशी सुबक मंदिरे आजही त्या गतवैभवाच्या खुणा
सांगत दिमाखाने उभी आहेत.
त्या मंदिरांची भेट कधी एकदा घडतेय याची कमालीची उत्सुकता माझ्या मनात होती.
चालुक्यनगरी बदामी - भाग २ - शिवालये आणि गुंफा मंदिरे
| उच्च शिवालयाकडे जाणारी वाट |
| एका दृष्टीकोनातून दिसणारी शिवालये |
| शिवालयाच्या बाजूने दिसणारे विहंगम दृश्य |
| गुंफा मंदिर क्रमांक चार |
| बाहुबली |
| वराह अवतार |
| वामनावतार |
बदामी छोटेसे गाव आहे. बदामीला स्वतःचे असे छोटे स्टेशन आहे. जवळचे मोठे गाव बागलकोट. बंगलोर ते बदामी असा ओव्हरनाईट प्रवास आहे.
बदामी ही चालुक्य राजवटीची राजधानी होती.
ईथल्या लेण्या, भुतनाथ मंदिर व किल्ला पहाण्यासारखा आहे. ईथे आसपास पण
पहाण्यासारखे बरेच काही आहे. जसे पट्टडक्कल, ऐहोळे, लाक्कुंदी ईत्यादी. हा
सर्व परिसर पहायचा म्हणजे कमीतकमी ३ दिवस हवेत. बदामीला मुक्कामाला
राहिलात तर ईथल्या KTDC च्या "मयुरा चालुक्य" ह्या हॉटेलमध्ये जरूर रहा.
अतिशय शांत, रम्य व स्वच्छ परिसर आहे.
बदामीच्या लेण्या:
बदामीच्या लेण्या ह्या ६ व्या व ७ व्या शतकातल्या आहेत. ईथे एकूण ४ लेण्या आहेत. लेण्यांचे कोरीव काम चालुक्य शैलीतील आहे.
बदामीबद्दल सविस्तर माहिती ईथे पहावी.
http://www.flickr.com/photos/mukulb/5871950013/
प्रचि १
-
-
-
प्रचि २
-
-
-
प्रचि ३
-
-
-
प्रचि ४
-
-
-
प्रचि ५
-
-
-
प्रचि ६
-
-
-
प्रचि ७
-
-
-
प्रचि ८
-
-
-
प्रचि ९
-
-
-
प्रचि १०
-
-
-
प्रचि ११
-
-
-
प्रचि १२
-
-
-
प्रचि १३
-
-
-
प्रचि १४
-
-
-
प्रचि १५
-
-
-
प्रचि १६
-
-
-
प्रचि १७
-
-
-
प्रचि १८
-
-
-
प्रचि १९
-
-
-
प्रचि २०
-
-
-
प्रचि २१
-
-
-
प्रचि २२
-
-
-
प्रचि २३
-
-
-
प्रचि २४
-
-
-
भुतनाथ मंदिरः
हे ७ व्या शतकातील, चालुक्य शैलीतील मंदिर आहे. हे भुतनाथाचे (शंकर) मंदिर आहे. हे मंदिर एका रम्य तलावाकाठी बांधलेले आहे.
भूतनाथ मंदिरसमूह आणि दक्षिण किल्ला
| भूतनाथ मंदिरे आणि अगस्त्य तीर्थ |
| मंदिरातला सुबक नंदी |
| अर्धवट बांधला गेलेला मंदिराचा कळस |
| डोंगरकड्यावरून दिसणारे विलोभनीय दृश्य |
![]() |
| कलत्या सूर्याच्या प्रकाशातले भूतनाथ मंदिर |
| बुरुजावरून दिसणारे अप्रतिम दृश्य |
![]() |
| बदामीचे चित्र रेखाटण्यात गुंतलेले चित्रकार आणि त्यांचे सुंदर कलाविष्कार |
प्रचि २५
-
-
-
प्रचि २६
-
-
-
प्रचि २७
-
-
-
प्रचि २८
-
-
-
प्रचि २९
-
-
-
प्रचि ३०
-
-
-
प्रचि ३१
-
-
-
बदामीच्या लेण्या:
प्रचि ३२
-
-
-
बदामीच्या किल्ल्याचे प्रवेशद्वार:
प्रचि ३३
-
-
-
प्रचि ३४
-
-
-
किल्ल्यावरील एक मंदिर
प्रचि ३५
-
-
-
प्रचि ३६
-
-
-
प्रचि ३७
-
-
-
प्रचि ३८
-
-
-

पट्टडकल
पट्टदकल
बदामी शहरातून बाहेर पडलो आणि बाईकने वेग घेतला. स्वच्छ उन पडलं होतं. सकाळची वेळ असल्याने उन्हाचा चटका फारसा जाणवत नव्हता. दक्षिण-मध्य भारतातला हा भाग म्हणजे तसा दुष्काळीच. अलमट्टी धरणामुळे इथे वर्षभर पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पाण्याचे तसे दुर्भिक्ष नाही. मात्र अत्यल्प पर्जन्यमान असल्याने मोठे वृक्ष फार कमी दिसतात. सारा भूप्रदेश रेताड आणि खडकाळ दिसत होता. थोडीफार खुरटी झुडुपे दिसत होती. शेतांमधली कापणी नुकतीच झालेली असावी. त्यामुळे शेतेही उजाड दिसत होती. विजेच्या तारांवर वेड्या राघूंची (Green Bee Eater) लगबग सुरु होती. मध्येच एखादा नीलकंठ (Indian Roller) पंख पसरून मनोहारी निळाईचे दर्शन घडवत होता. दूरवरून ऐकू येणारा खंड्याचा कलकलाट इथे मी सुद्धा आहे असे ठासून सांगत होता.
![]() |
| पट्टदकल मधील मंदिर समूह |
अर्ध्या-पाऊण तासांत आम्ही पट्टदकलला पोहोचलो. पट्टदकल हे बदामीसारखेच एक प्राचीन शहर. ग्रीक तत्त्ववेत्ता टॉलेमी याच्या Geography या इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात लिहलेल्या पुस्तकात या शहराचा उल्लेख सापडतो. पट्टदकल या नावाचा शब्दशः अर्थ होतो राज्याभिषेकाचा दगड. चालुक्य राजांनी सातव्या ते आठव्या शतकांच्या दरम्यान मलप्रभा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर राज्याभिषेकादि शाही समारंभांसाठी हा मंदिरसमूह बांधला. उत्तरोत्तर विकसित होत गेलेल्या चालुक्य स्थापत्यशैलीचे अत्युच्च स्वरूप या मंदिरांत बघायला मिळते. या समूहात एकूण ९ मंदिरे आहेत. सारी मंदिरे पूर्वाभिमुख असून शिवाला समर्पित आहेत. दक्षिण भारतीय ‘द्राविड’ शैली आणि उत्तर भारतीय ‘नागर’ शैली यांचे सुरेख मिश्रण या मंदिरांत दिसून येते. हा समूह युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेला आहे. प्रथमदर्शनी तरी पट्टदकल एक टिपिकल भारतीय खेडेगाव वाटत होते. आपण बरोबर जागी आलोय की नाही असा प्रश्न पडावा इतके ते गाव लहान आणि अविकसित वाटत होते. मात्र मंदिरांचा परिसर नजरेस पडला आणि इथे काहीतरी वेगळीच दुनिया वसली आहे की काय असा आभास झाला. अपेक्षेनुसार इथेही भारतीय पुरातत्व विभागाने मंदिरांचा परिसर कुंपणाने संरक्षित केला होता. मंदिरांच्या आजूबाजूला सुंदर बागही फुलवली होती. मी तिकीट काढून आत शिरलो.
| काडसिद्धेश्वर मंदिर आणि त्याच्या अग्रभागी असलेली नृत्यामग्न शिवाची मूर्ती |
![]() |
| संगमेश्वर मंदिर |
| गलगनाथ मंदिर |
| काशी विश्वेवर मंदिर आणि त्यावरचे जाळीदार नक्षीकाम |
| मंदिरातील अप्रतिम कोरीवकाम |
| विरुपाक्ष मंदिराचे प्रवेशद्वार |
![]() |
| खांबांवरील कलाकुसर |
पट्टडकल मलप्रभा नदिच्या काठी वसलेले आहे. ईथे जाण्यासाठी सर्वात जवळचे
रेल्वे स्टेशन म्हणजे बदामी. पट्टडकलला रहाण्याची काही सोय नाहीये.
त्यामुळे मुक्कामास बदामीस उतरावे. पट्टडकल बदामीपासुन २२ किमी वर आहे.
पट्टडकल चालुक्य राजवटीची राजधानी होती.
ईथे ७ व्या व ८ व्या शतकातील १० मंदिरांचा समुदाय आहे. यातील ४ मंदिरे
ही द्राविड शैलीतील आहेत तर ४ मंदिरे नागरा शैलीतील आहेत. बाकी २ मिश्र
शैलीतील आहेत. ह्या मंदिरांचा समावेश UNESCO च्या World Heritage
sites मध्ये होतो.
आठवतील तेव्हड्या मंदिरांची नावे येथे देण्याच्या प्रयत्न मी केला आहे. कोणास अधिक माहिती असेल तर नक्की कळवा.
पट्टडकल बद्दल अधिक माहिती येथे पहावी: http://en.wikipedia.org/wiki/Pattadakal
प्रचि १
-
-
-
प्रचि २
-
-
-
प्रचि ३
गळगनाथ मंदिर
-
-
-
प्रचि ४
गळगनाथ मंदिर
-
-
-
प्रचि ५
गळगनाथ मंदिर
-
-
-
प्रचि ६
-
-
-
प्रचि ७
-
-
-
प्रचि ९
संगमेश्वरा मंदिर
-
-
-
प्रचि १०
संगमेश्वरा मंदिर
-
-
-
प्रचि ११
संगमेश्वरा मंदिर
-
-
-
प्रचि ११
संगमेश्वरा मंदिर
-
-
-
प्रचि १२
-
-
-
प्रचि १३
-
-
-
प्रचि १४
-
-
-
प्रचि १५
-
-
-
प्रचि १६
-
-
-
प्रचि १७
विरूपाक्ष मंदिर
-
-
-
प्रचि १८
-
-
-
प्रचि १९
-
-
-
प्रचि २०
-
-
-
प्रचि २१
-
-
-
प्रचि २२
-
-
-
प्रचि २३
-
-
-
प्रचि २४
विरूपाक्ष मंदिर
-
-
-
प्रचि २८
विरूपाक्ष मंदिर
-
-
-
प्रचि २५
-
-
-
प्रचि २६
-
-
-
प्रचि २७
-
-
-
प्रचि २९
-
-
-
प्रचि ३०
-
-
-
प्रचि ३१
-
-
-
प्रचि ३२
-
-
-
प्रचि ३३
-
-
-
प्रचि ३४
-
-
-
प्रचि ३५
-
-
-
प्रचि ३६
जैन नारायण मंदिर
-
-
-
प्रचि ३८
जैन नारायण मंदिर
-
-
-
-
-
-
प्रचि ४०
-
ऐहोळे
मंदिरस्थापत्यकलेची प्रयोगशाळा - ऐहोळे
| ऐहोळे येथील मुख्य मंदिरसमूह |
| दुर्गा मंदिराची अर्धवर्तुळाकार रचना |
| दुर्गा मंदिराचे कोरीव स्तंभ |
| प्रदक्षिणा मार्ग |
| लाडखान मंदिर |
| लाडखान मंदिरातील कोरीव स्तंभ |
| अर्धनारीश्वर |
| रावणफडी गुंफा |
| नृत्यमग्न नटराजाचे महाकाय शिल्प |
| जैन गुंफांतील शिल्पे |
ऐहोळे बदामी पासुन ३३ किमी वर आहे. ईथे जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे
स्टेशन म्हणजे बदामीच. ही चालुक्य राजवटीची बदामी-पुर्व राजधानी होती.
ह्या परिसरात चालुक्य राजांनी बांधलेली जवळपास १२५ मंदिरे आहेत. पण बरीच
मंदिरे भग्न स्वरुपात आहेत. काही मंदिरांचे जिर्णोद्धाराचे काम सुरु आहे.
पौराणिक कथेनुसार परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रिय केल्यावर आपली कुर्हाड
ईथेच धुतली होती.
हा सर्व परिसर पहायला कमीत-कमी ५-६ तास तरी हवेत.
ऐहोळे बद्दल अधिक माहिती येथे पहावी.
http://en.wikipedia.org/wiki/Aihole
ईथे आठवतील तेव्हडया मंदीरांची नावे देतो आहे.
प्रचि १
दुर्ग मंदीरः
हे खरेतर देवीचे मंदीर नसुन शंकराचे मंदीर आहे. जवळच दुर्ग (किल्ला) असल्याने ह्याला दुर्ग मंदीर असे नाव पडले.
-
-
-
-
प्रचि २
-
-
-
-
प्रचि ३
-
-
-
-
प्रचि ४
मंदीराचा परिसर
-
-
-
-
प्रचि ५
-
-
-
-
प्रचि ६
-
-
-
-
प्रचि ७
-
-
-
-
लाडखान मंदीरः
प्रचि ८
-
-
-
-
प्रचि ९
-
-
-
-
प्रचि १०
-
-
-
-
प्रचि ११
-
-
-
-
रावणफाडी:
ही एका अखंड दगडात कोरलेली लेणी आहे.
प्रचि १२
-
-
-
-
प्रचि १३
-
-
-
-
प्रचि १४
-
-
-
-
प्रचि १५
-
-
-
-
प्रचि १५
-
-
-
-
प्रचि १६
-
-
-
-
प्रचि १७
-
-
-
-
प्रचि १८
-
-
-
-
प्रचि १९
-
-
-
-
प्रचि २०
हुचिमल्ली गुडी
-
-
-
-
प्रचि २१
-
-
-
-
प्रचि २२
-
-
-
-
प्रचि २३
-
-
-
-
प्रचि २४
मेगुती जैन मंदीर
-
-
-
-
प्रचि २५
-
-
-
-
प्रचि २६
-
-
-
-
प्रचि २७
-
-
-
-
प्रचि २८
-
-
-
-
प्रचि २९
-
-
-
-
प्रचि ३०
-
-
-
-
प्रचि ३१
रंगनथिट्टू पक्षी अभयारण्य
बंगलोरच्या आसपासच्या विकएंड साठिच्या ठिकाणांचा शोध सुरु झाला. कुठेतरी
जाऊन पडुन रहावे असे ठिकाण शोधत असताना रंगनथिट्टू पक्षी अभयारण्याला
जाण्याचा बेत पक्का झाला आणि एका शनिवारी सकाळी सहकुटुंब सहपरिवार निघालो.
रंगनथिट्टू पक्षी अभयारण्य म्हैसुर आधी व श्रीरंगापटना च्या नंतर आहे.
बंगलोर पासुन साधा:रणपणे १२० किमी वर. ह्या अभयारण्याजवळच KSTDC चा मयुरा
रिव्हर व्ह्यु हा नितांत सुंदर रिसॉर्ट आहे. हा रिसॉर्ट कावेरी नदीच्या
किनारी आहे. अतिशय शांत, हिरवागार व प्रसन्न परिसर आहे हा. बंगलोर मध्ये
रहाणार्याने किमान एकदा तरी ह्या रिसॉर्ट ला भेट द्यावी. म्हैसुर मधील
बरेच लोक ईथे दुपारी फक्त जेवण करायला व आराम करायला येतात. ह्या रिसॉर्ट
मध्ये कावेरी मध्ये बोटिंग करायची पण सोय आहे. असो.
रमतगमत ईथे दुपारी १ वाजता पोहोचलो. जेवण व थोडा आराम करुन ४ वाजता
अभयारण्यापाशी पोहोचलो. अभयारण्या च्या २ वेळा आहेत. एकदा सकाळी व एकदा
संध्याकाळी. ह्या अभयारण्यात एक तलाव आहे व मध्ये २-३ बेटे आहेत. सर्व
पक्षी ह्या तलावाच्या किनारी वा बेटावर असतात. ह्या तलावात बर्याचशा
नैसर्गिक मगरी पण आहेत. ईथे बोटीची व्यवस्था आहे. बोटवाले तुम्हाला अर्धा
ते पाऊण तास फिरवतात.
संध्याकाळी भटकंती आटोपुन परत रिसॉर्ट वर आलो. रिसॉर्ट वाल्यांनी मस्त कँपफायर लावुन दिला होता. गप्पा, खाणे-पिणे, पिक्षनरी ह्यात संध्याकाळ घालविली. दुसर्या दिवशी सकाळी परत अभयारण्याला भेट दिली. दुपारी रिसॉर्ट वरुन निघालो. ईथे जवळच फिश-लँड म्हणुन एक रेस्टॉरंट आहे. ईथे सी-फूड अप्रतिम मिळते. तेथे ताव मारला. येताना चन्नापटना ला थांबलो. येथे लाकडी खेळणी बनविण्याचा फार मोठा उद्योग चालतो. ईथे थोडी-फार खरेदी करुन रविवारी संध्याकाळी परत घरी आलो.
प्रचि १
रिसॉर्ट समोरील कावेरी.
-
-
-
प्रचि २
-
-
-
प्रचि ३
-
-
-
प्रचि ४
Pale Billed Flowerpecker
-
-
-
प्रचि ५
Painted Stork
-
-
-
प्रचि ६
-
-
-
प्रचि ७
-
-
-
प्रचि ८
Painted Stork
-
-
-
प्रचि ९
-
-
-
प्रचि १०
-
-
-
प्रचि ११
-
-
-
प्रचि १२
-
-
-
प्रचि १३
-
-
-
प्रचि १४
-
-
-
प्रचि १५
-
-
-
प्रचि १६
-
-
-
प्रचि १७
-
-
-
प्रचि १८
-
-
-
प्रचि १९
-
-
-
प्रचि २०
-
-
-
प्रचि २१
-
-
-
प्रचि २३
Pied Kingfisher
-
-
-
प्रचि २४
-
-
-
प्रचि २५
Cattle Egret (Breeding Plumage)
-
-
-
प्रचि २६
-
-
-
प्रचि २७
-
-
-
प्रचि २८
Asian Openbill Stork
-
-
-
प्रचि २९
-
-
-
प्रचि ३०
-
-
-
प्रचि ३१
-
-
-
प्रचि ३२
-
-
-
प्रचि ३३
White Ibis
-
-
-
प्रचि
-
-
-
प्रचि ३४
-
-
-
प्रचि ३५
Egret
-
-
-
प्रचि ३६
-
-
-
प्रचि ३७
-
-
-
प्रचि ३८
Intermediate Egret
-
-
-
प्रचि ३९
Night Heron
-
-
-
प्रचि ४०
पाखरांची शाळा
-
-
-
प्रचि ४१
वटवाघुळे
-
-
-
प्रचि ४२
-
-
-
प्रचि ४३
-प्रचि ४४

चिकमंगळूर
चिकमंगळूर परीसरात कॉफीच्या मळ्यातले होम स्टे (बंगले) प्रसिद्ध आहेत.
ह्यांचा दर सिझनवर अवलंबुन असतो. आम्हाला १५००/- दर माणशी दर रात्री असा
होम स्टे मिळाला. हे सर्व बंगले चिकमंगळूर शहरापासुन बाहेर जंगलात किंवा
मळ्यात असतात. हे सर्व मळे खाजगी असल्याने तिथपर्यंत जायचा रस्ता यथा-तथाच
किंवा कधी-कधी नसतोच. त्यामुळे स्वतःची गाडी असणे फार गरजेचे आहे.
चिकमंगळूर बंगलोर पासुन २५० किमीवर आहे. बराचसा रस्ता खुप चांगला आहे.
१२०-१३० चा वेग आरामात गाठता येतो. मध्ये थोडा-फार खराब पॅच आहे. पण
बंगलोरच्या बाहेर पडायलाच २ तास लागतात.
असो. सकाळी १० ला घराबाहेर पडलो व टाईमपास करत, फोटोज् काढत दुपारी ३ वाजेपर्यंत चिकमंगळूरला पोहोचलो.
ह्या भागात झेंडूचे पण बरेच मळे आहेत.
प्रचि १
-
-
जो बंगला रहायला बुक केला होता तो अगदी भन्नाट जागी होता. कॉफी मळ्यात
अगदी आत चारही बाजुने कॉफी मळ्यांनी ने वेढलेला, समोरच थोड्याच अंतरावर
मोठा डोंगर व त्यावर घनदाट जंगल व खाली एक मोठा तलाव. नितांत सुंदर जागी हा
बंगला होता.
बंगल्याकडे जाण्याचा रस्ता. दोन्ही बाजुला कॉफीचे मळे आहेत.
प्रचि २
-
-
-
प्रचि ३
-
-
-
कॉफी
प्रचि ४
-
-
-
प्रचि ५
-
-
-
प्रचि ६
सिल्व्हर ओक आणि काळी मिरीच्या वेली.
-
-
-
प्रचि ७
-
-
-
संध्याकाळपर्यंत बाकी सर्व जण पण येऊन पोहोचले.
पावसाळा होता म्हणुन हवेत थंडी होती. समोर व्हरांड्यात सर्व जण खुर्च्या
टाकुन बसले होते. तिथल्या कुक ने गरम -गरम सूप आणुन दिले. एकाने मोठी
शेकोटी लावुन दिली. पिक्शनरी, गप्पा, खाणे-पिणे ह्यात संध्याकाळ गेली.
दुसर्या दिवशी सकाळी मुलायनागिरी शिखर पहायला निघालो. हे कर्नाटकातील सर्वात ऊंच शिखर (१९३० मी) मानले जाते.
प्रचि ८
मुलायनगिरी
-
-
-
प्रचि ९
-
-
-
प्रचि १०
मुलायनगिरी समोर दिसणारा एक डोंगर.
-
-
-
तिसर्या दिवशी हेब्बे आणि कलाहत्ती धबधबे पहायला निघालो. ईथे जाणारा रस्ता
अगदी घनदाट जंगलातुन गेला आहे. रस्ता तर अतिशय वाईट आहे आणि शिवाय गाडीला
काही झाले तर जवळपास २०-३० किमीच्या परिसरात वस्तीही नाहिये. जवळपास ४०
किमीचा वाईट पॅच आहे. हेब्बे फॉल्सजवळ पोहोचल्यावर कळले की हा धबधबा
पर्यटकांना बंद केला आहे. मग तसेच पुढे कलाहत्ती फॉल्स ला निघालो.
प्रचि ११
-
-
-
प्रचि १२
-
-
-
प्रचि १३
-
-
-
प्रचि १४
-
-
-
प्रचि १५
पच्शिम घाटातील जंगलातले रस्ते
-
-
-
प्रचि १६
पच्शिम घाटातील जंगल
-
-
-
प्रचि १७
पच्शिम घाट
-
-
-
-
-
-
प्रचि १९
-
-
-
प्रचि २०
-
-
-
प्रचि २१
कलाहत्ती फॉल्स
-
-
-
प्रचि २२
-
-
-
प्रचि २३
परतताना लागलेले काही कॉफी मळे
-
-
-
प्रचि २४

-
-
-
प्रचि २५
-
-
-
प्रचि २६
भोगनंदिश्वर
भोगनंदिश्वर मंदिर बंगलोर पासुन ४० किमीवर नंदि हिल्सच्या पायथ्याशी येते. येथे २ मंदिरे एकमेकांना लागुन आहेत. भोगनंदिश्वर आणि अरुणाचलेश्वर. ही मंदिरे ८ व्या शतकातील स्थानिक बाणा राजवटीत बांधली गेली. हि मंदिरे मूळ द्राविड शैलीतील आहेत. पण उत्तरोत्तर चोला,होयसळा आणि विजयनगर राजवटीत ह्यांत भर घातली गेली.
प्रचि १-
-
-
प्रचि २
-
-
-
प्रचि ३
-
-
-
प्रचि ४
-
-
-
प्रचि ५
-
-
-
प्रचि ६
-
-
-
प्रचि ७
-
-
-
प्रचि ८
-
-
-
प्रचि ९
येथे असलेली पुष्करीणी...
-
-
-
प्रचि १०
-
-
-
प्रचि ११
-
-
-
प्रचि १२
-
कारवार
कारवार गोव्याच्या हद्दीपासुन अवघे ४० किमी वर आहे.
कारवार ही नितांत सुंदर आणि शांत आहे. गोव्याला लागुनच पण पर्यटकांची वर्दळ
अजिबात नाही. अगदी हौशी असेच लोक येथे येतात. नीरव शांतता, सफेद वाळू
असलेले समुद्र किनारे, हिरवागार परिसर, बाजुलाच पच्शिम घाट असे कारवारचे
वर्णन करता येईल.
कारवारमध्ये नुसती निरुद्देश भटकंती जरी केली तरी मजा येते. येथे मराठी
सर्रास चालते. जवळपासची आवर्जुन पहाण्यासारखी ठिकाणे म्हणजे सदाशिवगड
बीच, रविंद्रनाथ टागोर बीच, याना रॉक्स, गोकर्ण, दांडेली चे जंगल (पक्षी
निरीक्षणासाठी) ईत्यादी...
येथे मोठा नाविक तळ आहे. तसेच नौदलाचे एक संग्रहालयही आहे. तेथे आय एन एस
चपळ ही युद्धनौका ठेवली आहे. ईथला गाईड नौकेची निर्मिती, ईतिहास, कामगिरी
याची पुर्ण माहिती देतो. तसेच ही नौका तुम्हाला आतुन पुर्णपणे दाखविली
जाते. येथे नौदलाची एक लघुचित्रफितही दाखवितात.
प्रचि १
सुर्योदय, काली नदी
-
-
-
प्रचि २
-
-
-
प्रचि ३
काली नदिचे मुख.
-
-
-
प्रचि ४
-
-
-
प्रचि ५
-
-
-
प्रचि ६
-
-
-
प्रचि ७
सदाशिवगड बीच.
-
-
-
प्रचि ८
सदाशिवगड बीच.
-
-
-
प्रचि ९
सदाशिवगड बीच.
-
-
-
प्रचि १०
सदाशिवगड बीच.
-
-
-
प्रचि ११
आय एन एस चपळ, नौदल संग्रहालय.
-
-
-
प्रचि १२
-
-
-
प्रचि १३
रविंद्रनाथ टागोर बीच.
-
-
-
प्रचि १४
याना रॉक्स.
-
-
-
प्रचि १५
-
-
-
प्रचि १६
काली नदी, पॅनो.
-
-
-
प्रचि १७
सुर्योदय, काली नदी, पॅनो.
कुद्रेमुखची रानवाट - भाग १ - तोंडओळख आणि ट्रेकची सुरुवात
![]() |
| कुद्रेमुख ट्रेक (फोटो आंतरजालावरून साभार © http://www.b365.co.in) |
क्रमशः
कुद्रेमुखची रानवाट - भाग २ - शोला परिसंस्थेत प्रवेश
| वाटेतले रम्य दृश्य |
![]() |
| वन विभागाची चेक पोस्ट |
| दरीत फोफावलेलं गच्च रान आणि माथ्यावरची खुरटी झुडपे |
| बेचक्यातल्या कोंदट रानातून वाहणारा ओढा |
![]() |
| वाटेतला फलक आणि समोर ढगांच्या दुलईत दडलेले कुद्रेमुख शिखर |
| हिरवा शालू नेसलेले डोंगर |
| शोला परिसंस्था |
कुद्रेमुखची रानवाट - भाग ३ - शिखर आरोहण
![]() |
| ओंतीमाराकडे जाणारी वाट |
![]() |
| ओंतीमारा |
![]() |
| शिखरावर चढत जाणारी वाट |
![]() |
| शिखरावर |
![]() |
| टेकडीमागून रोरावत पुढे येणारा ढग |
![]() |
| शोला प्रदेश |
![]() |
| न संपणारी रानवाट |
कुद्रेमुखची रानवाट - भाग ४ - परतीचा रम्य प्रवास
| भिजून तृप्त झालेलं रान |
![]() |
| हात धरून ओहोळ पार करताना |
![]() |
| कॉफीचे मळे (फोटो आंतरजालावरून साभार (http://vivasayam.org/wp-content/uploads/2014/08/Plantation.jpg) |
कर्नाटकातील किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण - भाग १ - रम्य ट्रेनप्रवास आणि ट्रेकची सुरुवात
![]() |
| ट्रेकमधला एक निवांत समुद्रकिनारा |
![]() |
| ट्रेकचा मार्ग |
सातच्या सुमारास जाग आली. नुकतंच उजाडलं होतं. गाडीने नुकताच गोव्यात प्रवेश केला होता. थिवीम, करमाळी, वगैरे स्थानकं धाडधाड मागे पडत होती. मडगाव आलं तशी गाडी ऐंशी टक्के रिकामी झाली. मग काय, मी पळालो दारात. दारात उभं राहून धावत्या गाडीचा आनंद घेणं यासारखी दुसरी मजा नाही. तो झोंबणारा वारा, वळणावरून गाडी जाताना दिसणारे पुढचे-मागचे डबे, आजूबाजूच्या गावांतली उगाचच ट्रेनकडे बघून हात हलवणारी लहान मुले, गाडी अचानक बोगद्यात शिरली की दाटून येणारा अंधार, सारेच कसे गंमतीदार! वयाने कितीही आकडे ओलांडले तरी यातली गंमत कधी कमी झाली नाही. एकदा तिथे उभं राहिलं की गाडीच्या त्या बेसूर धडधडीतही लय सापडू लागते. पुलावरून गाडी जाताना घुमणारा आवाज एक्स्ट्रा बास सारखा वाटू लागतो. मग अचानक भास होतो, गाडी खरंच “कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी” असं गातेय की काय? मग उगीचच झुक झुक अगीनगाडी वगैरे बालगीतं आठवत राहतात आणि आपण काहीशा वेगळ्याच तंद्रीत रमतो. मग एखाद्या अधिकृत थांबा नसलेल्या मधल्याच लहानशा स्टेशनात गाडी थांबते आणि यादृच्छिक गोष्टींमध्ये रमलेला जीव धडधडत वर्तमानात येतो. एव्हाना गाडी कर्नाटकात शिरली होती. कारवार यायचे बाकी होते. आजूबाजूने नारळी-पोफळीच्या गच्च बागा दिसत होत्या. उतरत्या छपरांची लहान-मोठी घरे मधूनच डोकावत होती. मधूनच एखाद्या खाडीवरच्या पुलावरून गाडी धडाडत जात होती. दूरवर कुठेतरी त्या खाडीच्या पाण्याला पिऊन टाकणारा अथांग समुद्र दिसत होता. एखादी ब्राह्मणी घार ऐटीत पाण्यात सूर मारताना दिसत होती. किनाऱ्यावरच्या कांदळवनात राखी बगळे ध्यानस्थ होऊन मत्स्याराधना करताना दिसत होते. मधेच एखादा केकाटत जाणारा खंड्या त्यांच्या साधनेत व्यत्यय आणत होता. असे सृष्टीसौंदर्य न्याहाळण्यात वेळ मजेत जात होता.
![]() |
| कुठल्याशा छोट्या स्टेशनात थांबलेली ट्रेन |
| स्टेशनबाहेर वाॅर्मिंग अप |
क्रमश:
कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण - भाग २ - शांत समुद्रकिनारे आणि डॉल्फिन दर्शन
| वन्नळी बीच |
| लाटांमध्ये व्यत्यय आणणारे खडक |
| टेकाडावर बसून डॉल्फिन दर्शन |
टेकडीवरून खाली उतरणारी वाट थोडी अवघड होती. मोठाले खडक विखुरलेले दिसत होते. त्यावरून माकडउड्या मारत आम्ही खाली उतरत होतो. पुढच्या टप्प्यात तर वाट पाण्याच्या अगदी जवळून जात होती. तोल सांभाळत आम्ही त्या डेंजर झोनमधून बाहेर आलो. आता सगळ्यांचा जठराग्नी पेटला होता. मग तिथेच एका सपाट खडकावर सगळे जण बसलो आणि जेवणाची पार्सल्स उघडली. तासभर जेवण अधिक विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो. पुढचा बीच होता कडले बीच. हा बीच अगदीच शांत होता. आधीच्या बीचवर दिसणारी कोळ्यांची वस्ती इथे दिसत नव्हती. शिवाय बोटीही दिसत नव्हत्या. लाटा संथपणे वाळू भिजवत होत्या. मधेच काही खडक लाटांची लय बिघडवायचा प्रयत्न करत होते. पण त्या लहानशा व्यत्ययाचा त्या दर्याला काहीएक फरक पडत नव्हता. उष्ण हवेच्या झोतांवर घारी पंख पसरून घिरट्या घालत होत्या. शांतता बघून आम्ही तिथे ग्रुप फोटो काढायला सुरुवात केली. यात बराच वेळ जातोय हे बघून ग्रुप लीडर घाई करू लागला. मग सगळे हळू-हळू पुढे जायला निघाले.
| टेकडावरून दिसणारा रम्य बीच |
क्रमशः
कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण - भाग ३ - निर्वाणा बीच आणि एक रम्य सूर्यास्त
| बीचवरची फोटोग्राफी (सौजन्य - प्रणीत धुरी) |
| नावेतून नदी पर करताना (सौजन्य - देवेंद्र देशमुख) |
![]() |
| वेलेकन बीच आणि रम्य सूर्यास्त |
![]() |
| आमची कॅम्पसाईट (सौजन्य - देवेंद्र देशमुख) |
कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण - भाग ४ - गोकर्णचे नयनरम्य किनारे
| तीव्र उताराची वाट |
| स्मॉल हेल बीच |
कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण - भाग ५ - उरलेसुरले किनारे आणि न हरवलेला कॅमेरा
| टेकडीच्या धारेवरून जाणारी वाट |
![]() |
| हिरवंं उन आणि लाल माती |
| ओम बीचचे रम्य दृश्य |
![]() |
| कडले बीच |
![]() |
| गोकर्ण मुख्य बीच |
समाप्त
जोग फॉल्स
जुलै २०११ सुरु होता. बंगलोरात धो-धो पाऊस पडत होता. घरीही एकटाच होतो
त्यामुळे सारखे कुठेतरी जाण्याची खुमखुमी येत होती. पावसाळा होता म्हणुन
म्हणले एखाद्या धबधब्याला भेट द्यावी. जोग धबधब्याचे बरेच नाव ऐकुन होतो.
अजुन कोणी येते आहे का हे पहायला प्रकाशला (माबोकर प्रकाश काळेल) तर तो ही
तयार झाला आणि एका वीकएंड आम्ही दोघे निघालो.जोग फॉल्स पच्शिम घाटात अगदी
आत आहे. जोग फॉल्स ला जाण्यासाठी बंगलोर-शिमोगा-सागर-जोग फॉल्स असा प्रवास
आहे. बंगलोर -शिमोगा अशी रेल्वे आहे. हा साधारणःपणे ३.५ तासांचा प्रवास
आहे. आता बंगलोर-तलगुप्पा (तलगुप्पा - जोग फॉल्स १६ किमी) अशी नवी रेल्वे
सुरु झाली आहे. शिमोगा ला थांबुन दुसर्या दिवशी सकाळी जोग फॉल्स ला
निघालो. सागरला पोहोचलो तर मुसळधार पाऊस सुरु झाला होता. तिथुन दुसरी बस
घेऊन जोग फोल्स ला पोहोचलो. हा भारतातला दुसर्या क्रमांकाचा सर्वात ऊंच
(२५३ मीटर ) धबधबा आहे. हा धबधबा शरावती नदीवर आहे. ह्या धबधब्याचे राजा,
राणी, रोअरर आणि रॉकेट असे ४ प्रवाह आहेत. KSTDC ने धबधब्याच्या अगदी
तळापर्यंत नेण्यासाठी पायर्या बांधलेल्या आहेत.
तेथुन ह्या धबधब्याचे खरे रौद्र रूप पाहता येते. वरून पडणारा मुसळधार पाऊस,
धबधब्यामुळे होणारा तुषारांचा दाट पडदा, त्यात ढग अशा वातावरणात पायर्या
ऊतरून खाली गेलो व शक्य असेल तेव्हडे फोटोज् काढले.
(काही प्रचि slow shutter speed वापरुन काढण्याचा प्रयत्न केला आहे पण tripod नसल्यामुळे थोडेसे blur आले आहेत. )
प्रचि १
एक छोटा धबधबा:
-
-
-
प्रचि २
जोग फॉल्सः
-
-
-
प्रचि ३
जोग फॉल्स, तळाकडुनः
-
-
-
प्रचि ४
झरा
नागराजाच्या राज्यात.. अगुंबे
पश्चिम घाट – विषुववृत्तीय दाट पावसाळरान. जागतिक वारसा प्रभाग म्हणून नोंद झालेला हा प्रदेश म्हणजे वन्यजीवप्रेमींसाठी मोठी पर्वणीच. गुजरातमधल्या डांगपासून थेट तामिळनाडूपर्यंत, पश्चिम किनारपट्टीला साधारण समांतर पसरलेला डोंगरप्रदेश. कोकणातून घाटावर जायला याच डोंगररांगांमधून काढलेल्या घाटरस्त्यांनी आपण अनेक वेळा प्रवास केलेला असतो. त्यातच कधीतरी एखाद्या वन्य प्राण्याने अवचित दर्शन दिलेल असतं. माझ्यासारखा जंगली (जंगलप्रेमी) माणसाने एकदा या प्रदेशाला भेट दिल्यावर त्याच्या प्रेमात पडणं अगदी साहजिकच आहे. त्यात पावसाळा म्हटलं की पश्चिम घाटात किमान एक भ्रमंती केलीच पाहिजे असं प्रलोभन - व्यसनच म्हणा ना - खुणावत असतं. गेल्या वर्षी महाराष्ट्रात सह्याद्रीमध्ये आंबोलीत भ्रमंती केली होती. (उडणार्या (तरंगणार्या) बेडकाच्या प्रदेशात – भाग १, भाग २). आता या वर्षी एका मित्राने आयोजन केल्यामुळे दक्षिणेकडच्या कर्नाटकात अगुंबे भ्रमंतीचा योग आला.
मुंबई ते अगुंबे : जवळजवळ १३०० कि.मी. ट्रेनने (मत्स्यगंधा एक्स. १२६१९,
सोळा-सतरा तास,) उडुपी रेल्वे स्टेशनपर्यंत. तिथून बस डेपोपर्यंत प्रीपेड
तीन आसनी रिक्षा (सुमारे अर्धा तास, ८० रु.), तिथून बसने अगुंबे बस डेपो
(दीड तास, ६० रु.). इथून मुक्कामाच्या जागेपर्यंत (ARRS) रिक्षा (अर्धा
तास, १०० रु.).
आपला जीव मुठीत धरून, डोळे गच्च बंद करून आणि दोन्ही हातांना जे काय लागेल
ते घट्ट धरून उडुपी ते अगुंबे हा घाटातून बस प्रवास करायचा असतो. ४ या
आकड्यासारख्या अनेक चढउतारांवरून गाडी चालवताना गाडीचा वेग ६०-७०पेक्षा कमी
असला तर ड्रायव्हरला कामावरून काढून टाकायचा नियम असावा, किंवा
ड्रायव्हरला कमीपणा (इज्जत का इडली-डोसा) वाटत असेल अशी शंका येते. अशाच
वळणांवरून विरुद्ध दिशेने येणार्या गाड्यांशी गळाभेट चार वेळा जेमतेम
दोन-तीन इंचाने चुकली. ड्रायव्हरने कानडीत सडसडून काहीतरी उद्गार काढले.
बहुधा कानडीतून ‘अम्मा-आक्कां’ची ‘भ’कार-‘म’कारयुक्त आठवण असावी, कारण
बसमधल्या कानडी अम्मा-आक्कांच्या चेहर्यावर ‘मेल्याच्या जिभेला काही हाड..
बायकांसमोर असं काही बोलतात का..’ असे नाराजीचे भाव उमटले.
मग अगुंबेला (परतीच्या प्रवासात उडुपीला) उतरल्यावर अंग झाडून आपली सर्व हाडं शाबूत असल्याची आणि असली तर ती सर्व योग्य जागी असल्याची खातरी करून घ्यायची. आम्ही बसमधून उतरल्यावर मला ड्रायव्हर-कंडक्टरचे पाय धरायचे होते, पण बहुधा कमरेतल्या मणक्यांनी जागा सोडल्यामुळे मला वाकताच न आल्यामुळे शेवटी नुसतेच (कोपरापासून) हात जोडून त्यांना नमस्कार केला. असो.
अगुंबे हे नागराजाच्या विणीचं प्रमुख ठिकाण म्हणून प्रसिद्ध होतंच. नागराज (King Cobra Ophiophagus hannah) हा भारतातला सर्वात मोठा साप. जवळजवळ साडेचार-पाच मीटर लांब असतो. आपल्या अंड्यांच्या संरक्षणासाठी घरटं बनवणारा हा जगातला एकमेव साप आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये मिलन झाल्यावर एप्रिल-मेमध्ये मादी वाळक्या पानांचा ढीग बनवून त्यात अंडी घालते. पावसाळा सुरू होईपर्यंत त्यातून पिल्लं बाहेर येतात. डोंगरारांगांमधलं दमट, ओलसर आणि माणसाने वाट न लावलेलं अनाघ्रात पावसाळरान हे त्याचं वसतिस्थान आणि इतर साप (मुख्यत: धामण, दिवड इ.) हे प्रमुख अन्न या सर्व गोष्टी अगुंबेला जमून आल्या आहेत. त्यामुळेच नागराजांनी इथे आपलं साम्राज्य स्थापन केलंय.
जंगल परिसर - ३६० अंशात एक अवलोकन
रॉम व्हिटेकर आणि ए.आर.आर.एस.
सरपटणार्या प्राण्यांचे अभ्यासक रॉम व्हिटेकर यांनी काही वर्षांपूर्वी मद्रासला (आताच्या चेन्नईला) सुसर संशोधन आणि प्रजनन केंद्र स्थापन केलं. नागराजाबरोबरच एकूणच पावसाळरानाविषयी सखोल संशोधन व्हावं, यासाठी मूलभूत सुविधा असलेलं एक संशोधन केंद्र - Agumbe Rainforest Research Station - ARRS - त्यांनी इथे २००५मध्ये स्थापन केलं.
अगुंबे परिसरातल्या काही स्थानिक आदिवासी जमाती सर्प हाताळण्यात अत्यंत कुशल आहेत. त्यांच्या साहाय्याने नागराज आणि इतर विषारी सर्प पकडून, सर्पविषविरोधी लस (Anti snake venom) बनवण्यासाठी त्यांचं विष काढून ते संशोधन संस्थांकडे पाठवलं जायचं. पूर्वी इथे साप बर्याच प्रमाणात मारले जायचे, ते या उपक्रमामुळे खूपच कमी झालं. नॅशनल जिओग्राफिकने यावर एक माहितीपटही बनवला आहे. त्यामुळेच रॉम आणि ए.आर.आर.एस. खर्या अर्थाने प्रकाशात आले.

दोन-तीन वर्षांपूर्वी इथे एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला गेला. नागराजांना पकडून त्यांच्या शरीरामध्ये एक छोटीशी चिप बसवायची, म्हणजे त्यांचा मागोवा घेता येतो आणि त्यांच्या सखोल अभ्यासासाठी बरीच माहिती मिळते. त्यापासून मिळणार्या माहितीची छाननी सुरू आहे.
संशोधन केंद्रात शिरल्यावर “काय, कसा झाला प्रवास?” असं खास क्वल्लापुरी ढंगातलं स्वागत कानावर पडलं आणि कर्नाटकच्या मधोमध असलेल्या दाट जंगलात, मुंबईपासून हजारभर कि.मी. अंतरावर मायमराठीतले शब्द आयकून क्षनभर घ्येरीच आली बगा.. धीरज हा कोल्हापूरचा शेतकी पदवीधर, सहा वर्षांपूर्वी कुठल्यातरी संशोधन प्रकल्पनिमित्त इथे आला आणि तेव्हापासून इथेच राहतोय, इथलं संपूर्ण व्यवस्थापन सांभाळतोय. अत्यंत मितभाषी धीरजला बोलतं केल्यावर मात्र इथली अनेक रहस्यं उलगडत जातात.
नागराज आणि पावसाळरान यांच्याशी संबंधित अनेक विषयांवर संशोधन करण्यासाठी इथे अनेक विद्यार्थी, संशोधक येतात. त्यांच्या भोजन-निवासाची सोय इथे केली जाते. झोपायला गाद्या-उशा-पांघरुणं आहेत. दाक्षिणात्य पद्धतीचं (म्हणजे मुख्यत: भात. इथे तिन्ही त्रिकाळ भात खाल्ल्यामुळे, परत आल्यावर महिनाभर भात वर्ज्य केला.) शाकाहारी साधंसं जेवण, नाश्ता असतं. मात्र हे ‘हॉलिडे रिसॉर्ट’ नाही, त्यामुळे इथे कोणत्याही ‘लक्झरी’ नाहीत. सौर प्रणालीद्वारे वीज मिळते, त्यामुळे टीव्ही-फ्रीज-एसी-गिझर सोडाच, पंखेही नाहीत. फक्त दिवे आणि बॅटरी चार्जिंग (आणि केंद्रातला कॉम्प्युटर, महाजाल जोडणी) यासाठी वीज आहे. (आपल्याला आणखी काय पाहिजे म्हणा!) इथे फक्त बीएसएनएलचं मोबाइल नेटवर्क चालतं. माझं डॉल्फिन नेटवर्क मुंबईत नीट चालायची मारामार, पण तिथे मात्र ते आपोआप बीएसएनएलमध्ये गेल्यामुळे फक्त माझा आणि आणखी एकाचाच मोबाइल चालत होता.

आम्ही इथे राहिलो.
आमच्या राहायच्या खोलीच्या बाहेरच जंगलातली जीवविविधता दिसायला स्रुरुवात झाली. आंबोलीला बघितलेले जीव इथे बघायला मिळालेच, त्याशिवाय इतरही अनेक जीव दिसले. संशोधन केंद्रात पाऊल टाकल्यावर या मलबार चापडाने (Malabar pit viper Trimeresurus malabaricus) स्वागत केलं. दरवाजातच आडव्या बांबूला शेपटीचा वेढा घालून बसला होता. हातासारखा उपयोग करून शेपटीने पकड घेता येते, या शेपटीला Prehensile tail म्हणतात.

इथे खूप उंचच उंच वृक्ष आहेत. या उंच वृक्षांमधून सहजतेने वावरण्यासाठी, भक्ष मिळवण्यासाठी आणि भक्षकापासून संरक्षणासाठी जमिनीवरच्या काही प्राण्यांनी हवेत ‘तरंगण्याची’ क्षमता विकसित केली आहे. आंबोलीला दिसलेल्या उडणार्या (तरंगणार्या) बेडकाप्रमाणे इथे तरंगणारा सरडा, साप आणि खार आहेत. त्यासाठी त्यांच्या पोटाच्या दोन्ही बाजूंना पातळ पडदे असतात. ते पसरून हे प्राणी उंच जागेवरून खालच्या जागेवर तरंगत येऊ शकतात. आम्हाला तरंगणारा सरडा (Gliding lizard, Draco dussumieri) आणि साप (Ornamental flying snake Chrysopelea ornata) दिसले, पण कॅमेर्यात काही टिपता आले नाहीत.
सोनेरी बेडूक (Golden Frog Hylarana aurantiaca). आंबोलीला पाहिलेल्या कास्यबेडूक ( Bronze Frog Hylarana temporalis) आणि दुरंगी बेडूक (Bicoloured frog Clinotarsus curtipes) यांचा हा भाईबंद.

जवळच एक डबकं होतं, तिथे रोज रात्री दोन नर सोनेरी बेडकांची जुगलबंदी चालायची.
निळ्या डोळ्यांचा बेडूक (Raorchestes Luteolus??). याला मराठीतून नाव सुचलं – ‘नीलाक्ष’.

आपला नेहमीचा बेडूक (Indian bull frog Hoplobatracus tigerinus) याच्या शरीरावरची हिरवी नक्षी हळूहळू नाहीशी होते.

परिसराशी सरूपतेची (chemoflageची) दोन उदाहरणं

क्रिकेट फ्रॉग (Cricket frog Zakirana sp.) आणि आखूडतोंड्या रामानेल्ला (Narrow mouth frog Ramanella mormorata)
काही कीटक, विंचू वगैरे

पान खाणारी, पतंगाची अळी, झाडाच्या पोकळ खोडात लपलेला हा एका पतंगाचा कोष

कॅटायडिड (Katydid) आणि हिरवा कॅटायडिड (Round Headed Katydid Holochlora albida)

वाळक्या काटकीसारखा काडीकिडा (Stick insect, Indian walking stick Carausius morosus) आणि गवतावर बागडणारा नाकतोडा

चॉकलेट पॅन्झी फूलपाखरू (Chocolet Pansy Junonia iphita), विंचू (Scorpion Palemnaeus sp.)
अशा दाट पावसाळरानात उंचच उंच वाढलेल्या झाडांमुळे जमिनीपासून पन्नास-साथ फुटांवर एक ‘जंगलछत’ (कॅनोपी) तयार होतं. या छतामध्ये मोठ्या झाडाच्या आधाराने वाढणार्या> छोट्या वेली-वनस्पती (एपिफाइट्स), त्यावर आकर्षित होणारे कीटक, इतर छोटे-मोठे जीव, फांद्यांच्या बेचक्यात साचलेलं पाणी यांनी मिळून इतक्या उंचावर फांद्यांच्या बेचक्यात एक वेगळीच स्वतंत्र छोटीशी परिसंस्था तयार होते. ती पाहण्यासाठी उंच झाडाच्या एखाद्या फांदीवर झोल टाकून जाड दोरी टाकून, त्याला जुमार्ससारखी साधनं लावून वर चढायचं, याला म्हणतात कॅनोपी क्लाइंबिंग.. खरं तर मला रॉक क्लाइंबिंग, जुमारिंग, रिव्हर क्रॉसिंग, पर्वतारोहण अशा प्रकारांमध्ये रस नाही. पण इतक्या उंचावरून खाली, चहूबाजूना बघायचं हा एक वेगळाच, अगदी पक्ष्याला सगळ जग कसं दिसत असेल असा (बर्डस आय व्ह्यू) अनुभव असतो.
कॅनोपी क्लाइंबिंग करताना सुरक्षिततेसाठी हारनेस, हेल्मेट, जुमार्स वगैरे जामानिमा करावा लागतो.
कॅनोपी क्लाइंबिंगसाठी तयार

वर जाताना
खाली येताना
एका वेळेस दोघं किंवा तिघंही

या वेळी काही कारणांनी मी फार उंच चढू शकलो नाही, पण पुन्हा संधी मिळाली की थेट वरपर्यंत नक्की चढेन.
रात्री भटकंतीला बाहेर पडल्यावर आभाळ निरभ्र होतं, तेव्हा अगणित तारे चमचमत होते. (मुंबईत हे दृश्य तसं दुर्मीळच! मुंबईत तर प्रकाशाचंही प्रदूषण!!) मध्येच थोडासा मोकळा, शेतासारखा गवताळ भाग लागला. धीरजने सर्वांना टॉर्च बंद करायला सांगितलं, आणि.. ओहो, काही सेकंदांतच एक अलौकिक दृश्य बघायला मिळालं! गवतातले असंख्य काजवे (अळ्या आणि माद्या) लुकलुकायला लागले. ‘तारे जमींपर..’ जणू आकाशातले लक्ष लक्ष तारे जमिनीवर अवतरले आहेत असं ते दृश्य! कॅमेर्यात टिपता आलं नाही, तरी मनात मात्र साठवून ठेवलंय.
आम्ही नागराजाच्या राज्यात गेलो होतो. पण नागराजांचं दर्शन झालं नाही. लाजवंती (लोरिस Slow Loris Nycticebus coucang), नकटा / नाकाड्या चापडा (Hump nosed pit viper Hypnale hypnale) असे अनेक प्राणी दिसले नाहीत. पण तरीही जंगलाचं आकर्षण कमी न होता वाढतच जातं. कारण..
समुद्र, आकाश, पर्वत, जंगल - निसर्गाची ही विविध रूपं. या तिन्ही रूपांनी निसर्ग आपल्याला भव्यतेची, विशालतेची अनुभूती देत असतो. समुद्रकिनार्यावर बसून समुद्राकडे पाहणं, त्याची गाज ऐकणं, जंगलात आजूबाजूच्या दाट वृक्षराजीकडे पाहणं, एखाद्या निर्जन ठिकाणाहून आकाशाचं, तार्यांचं दर्शन.. भव्यतेच्या, विशालतेच्या या दर्शनाने मनातली सगळी मरगळ, नैराश्याची भावना, नकारात्मक विचार दूर होतात. रोजच्या जीवनसंघर्षाला सामोरं जायला नव्याने उभारी येते, नवं बळ मिळतं. नव्या कल्पना सुचतात, नवं काहीतरी बघायला मिळतं. म्हणून तर वेळ काढून अधूनमधून जंगलभ्रमंती केली पाहिजे, समुद्रकिनारी निवांत फेरफटका मारला पाहिजे, डोंगर-दर्यांत, पर्वताच्या कुशीत विसावलं पाहिजे ...
कैदाला आणि शिबी
Primary tabs
तेराव्या शतकात होयसाळांच्या राजवटीत एक महान शिल्पकार होवून गेले जकनाचारी. त्यांचा जन्म झाला तुमकुर जिल्ह्यातील कैदाला ह्या गावात. सोमनाथपुरा आणि बेलुरच्या सुंदर मंदिरांचे ते रचनाकार होते. ही मंदिरे बांधत असताना ते बरीच वर्षे घरी गेले नाहीत. त्यांचा मुलगा दनकाचारी. जो स्वत: एक उत्तम शिल्पकार होता त्याने आपल्या वडिलांना पाहिले नव्हते. त्याने आपल्या वडिलांचा शोध घेण्याचे ठरीवले. तो त्यांना शोधत बेलुरला येवून पोहचला. तिथे केशवाची एक मूर्ती मंदिरात स्थापन करण्यात येत होती. दनकाचार्याने त्या मूर्तीमध्ये दोष असून त्याची स्थापना करू नये असे सुचवले. ते ऐकून त्या मूर्तीचे मुख्य शिल्पकार जनकाचारी ह्यांना राग आला. ( बाप लेक अजून पर्यंत एक दुसर्याला ओळखत नव्हते) "ह्या मूर्तीत जर दोष निघाला तर मी स्वतःचा उजवा हात कापून टाकेन" अशी प्रति़ज्ञा जनकाचारी ह्यांनी केली.
त्या संपूर्ण मूर्तीवर चंदनाचा लेप देन्यात आला. काही वेळाने, नाभी वगळता बाकी सर्व ठिकाणचे चंदन वाळले. थोडी तपासणी केल्यावर त्यांना त्या ठिकाणी वाळू आणि पाणी असलेली एक छोटी पो़कळी सापडते आणि त्यात एक छोटा बेडूक.
हा दोष पाहिल्यावर जनकाचारी आपल्या हलजर्गी पणावर चिडतात आणि स्वत:चा उजवा हात तोडून टाकतात. नंतर पितपुत्राची ओळख होते.
ह्या घटनेनंतर ते दोघेही आपल्या गावी कैदाला इथे पोचतात. एक दिवस त्यांना स्वप्नात त्यांना विष्णु दर्शन देतात आणि जनकाचार्याने कैदाला इथे आपले मंदिर बांधावे अशी ईच्छा प्रकट करतात. आणि त्यानंतर कैदाला इथे चन्ना केशवा ( सुंदर विष्णु) मंदिर उभारण्यात येते. जनकाचारी आणि दनकाचारी स्वतः ती मुर्ती घडवतात. त्यानंतर ईश्वर प्रसन्न होऊन, वर स्वरूपात, जकनाचार्यांचा कापलेला हात पुनः पूर्ववत व्यवस्थित होतो.
कैदालाची विष्णुची मूर्ती ही बहुदा दक्षिण भारतातील( किंवा कदाचित पूर्ण भारतातील) सर्वात सुंदर मूर्ती आहे. भागवात पुराणातील विष्णुच्या वर्णानाप्रमाणे ही मूर्ती घडवली आहे. मूर्तीचा बाजूने विष्णुचे दाही अवतार कोरले आहेत. मूर्तीच्या एका हातात गदा आहे. पुजारी गदा आणि हाताची पाची बोटे ह्यांच्यातून एक सुई आरपार घालवून दाखावतात. वरील गोष्ट किती खरी ते माहित नाही, पण मी जर ईश्वर असतो तर ती मूर्ती पाहून नक्कीच त्यांच्या सर्व ईच्छा पूर्ण केल्या असत्या.
मंदिरात मूर्तीचा फोटो काढण्याची परवानगी मिळाली नाही म्हणून ही फोटो आंतरजालावरून साभार.
आता मी काढलेले फोटो.
हे मंदिर प्रचंड साधं पण प्रशस्त आहे. मंदिराचे प्रवेशद्वार.
दरवाज्यावर कोरलेली अप्सरा.
केशवा मंदिराच्या बाजूलाच एक शंकराचे मंदिर आहे. दुर्दैवाने ते बंद असल्यामुळे बाहेर जाळीतून फोटो काढावा लागला.
कैदालाहून चाळीस एक किलोमीटर अंतरावर NH4 वर शिबी (seebi) येथे नृसिहाचे मंदिर आहे. हे मंदिर जवळपास ४०० वर्षे जुने असून मंदिरात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे.
मंदिराचे प्रवेश द्वार
मंदिराचा आतील भाग
मंदिरा बाहेर एक मोठी पुष्कर्णी आहे. त्याचे काही फोटो
परत येताना तुमकूरजवळ एक मोठे तळं लागलं, तिथे सूर्यास्ताचे काढलेले काही फोटो
बेंगलोर ते कैदाला ७५ किमी आहे आणि तेथून शिबी ४० किमी. ह्यातील बराचसा प्रवास बेंगलोर-पुणे हायवेवर होतो. त्यामुळे आधी कैदालाला जा, परत तुमकुरला येवून शिबी. जेवण तुमकूरला करणे उत्तम. हा प्रवास अर्ध्या दिवसात करता येतो.
भोगानंदिश्वरा
Primary tabs
नंदिहिल्स बेंगलोरपासून अवघ्या ५० किमी अंतरावर आहे. नंदिहिल्स हि बेंगलोरवासियांसाठी सुटीच्या दिवशी भेट द्यायची आवडीची जागा. सुटीच्या दिवशी जवळपास जत्रा भरेल इतकी गर्दी असते आणि टेकडीवरचे योगानंदिश्वरा मंदिर सर्वांच्या परिचयाचे आहे. पण नंदिहिल्सच्या पायथ्याशी असलेलं भोगानंदिश्वरा हे बारशे वर्श जुनं मंदिर मात्र दुर्लक्षित राहिलं आहे. हे मंदिर नंदिहिल्सपासून फक्त पाच किमी अंतरावर नंदिग्राम ह्या खेड्यात आहे.
नवव्या शतकात बाणा राज्यघराण्याची राणी रत्नावली हिने ह्या मंदिराची स्थापना केली. ह्या मंदिराचा पुढे, गंगा, चोला, होयसाळा, पल्लवा आणि विजयनगर ह्यांचा कारकिर्दित विस्तार झाला. मंदिराच्या कलाकृतींमध्ये हे प्रकर्षाने जाणवते. मंदिराचा आवार प्रशस्त असून तिथे अरुणाचलेश्वर, उमामहेश्वर आणि भोगानंदिश्वर असे तीन मंदिरांचे संकुल आहे.
अरुणाचलेश्वर ही महादेबाची बाल अवस्था, भोगानंदिश्वरा ही तारुण्य अवस्था आणि योगानंदिश्वरा ही वैराग्यावस्था मानन्यात येते. भोगानंदिश्वरा हे शिवाच्या तारुण्य अवस्थेला समर्पित केले आहे.
मंदिराचा आवार प्रचंड मोठा आहे. त्याचे काही फोटो
प्रवेशद्वारावर कोरलेल्या काही अप्सरा.
आता मुख्य मंदिराचे काही फोटो.
आता मंदिरातील मूर्त्या आणि इतर कलाकुसर.
ह्या मंदिराच्या आवारात शृंगेरी तिर्थ नावाची एक मोठी पुष्कर्णी आहे आणि तिथे पिनाकिणी नदिचा उगम होतो असे मानन्यात येते.
पुष्कर्णीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला मंड्प.
पुष्कर्णीचे फोटो
पुष्कर्णीच्या भोवतलचा परीसर आणि तिथले मूर्तीकाम.
आता नंदिहिल्स वरून सूर्यास्ताच्या वेळी काढलेले काही फोटो.
चोला, होयसाला आणि विजयनगर ह्यांच्या कलाकृती एकाच ठिकाणी असणारे हे दुर्मिळ मंदिर आहे. प्रत्येक इतिहासप्रेमी मानसाने भेट जरूर द्यावी.
मंदिराला भेट देण्यासाठी दोन प्रकारे प्लॅन करता येत. नंदि हिल्स वर सूर्योदय पाहा. मग खाली येवून मंदिराला भेट द्या.
किंवा दुपारी दोन-तीनच्या सुमारास आधी मंदिराला भेट द्या मग नंदिहिल्सवर सुर्यास्त पाहायला जा.
मंदिराविषयी अधिक माहीत तुम्हाला इथे मिळेल.
http://www.karnataka.com/nandi-hills/nandi-village-bhoga-nandeeshwara-te...
भोगानंदिश्वरा:
याबद्दल पॉइंट ब्लँक यांनी इथेआधीच सविस्तर माहिती दिलेली आहे पण मला मूर्ती आणि त्यामागचे अर्थ यांचे आजिबातच ज्ञान नसल्याने काही प्रश्न पडले आहेत.
इथे त्या प्रश्नांचे निरसन करू शकणारी बरीच मंडळी आहेत त्यामुळे खाली काही फोटो चिटकवत आहे.
या चित्रात कोणीतरी घोड्यावर बसलेला दिसत आहे तसेच त्या खाली हत्तीदेखील दिसत आहे. मंदिराच्या समोरच्या भागातील दोन खांबावर हे शिल्प आहे. याचा काही विशेष अर्थ आहे का?
हे शिल्प नक्की कशाचे आहे? बऱ्याच ठिकाणी हे पाहण्यात आले आहे.
या चित्रात मोरावर आरूढ असलेला कार्तिकेय आहे का? आणि असल्यास त्याला तीन तोंड का आहेत?
या चित्रात काही व्यक्तींना चार हात आहेत तर काहीना दोन! तसेच एक गाय हि आहे जिला कलशामधील पाणी(हा माझा अंदाज! ) दिले जात आहे. उजव्या बाजूला एक व्यक्ती हातामध्ये एक कलश घेऊन उभी आहे, हा प्रसंग कोणता आहे? मुळात, कोरलेले प्रत्येक शिल्प काही इतिहास दर्शवते का?
आतापर्यंत गोमुख पहिले होते पण इथे मगरीसारखा(डोळ्यांवरून अंदाज लावला आहे ) प्राणी दिसत आहे आणि तिचे तोंड कोणीतरी उघडले आहे, असे का?
काही प्रश्न अत्यंत बाळबोधसुद्धा असतील कदाचित पण खरोखर याविषयी काहीच माहिती नसल्याने उत्सुकतेपोटी विचारले आहेत! :)
पाहिले आणि दुसरे जनरल शिल्प आहेत. तत्कालीन घोडेस्वार पहिल्या शिल्पात तर दुसऱ्या शिल्पात सिंह मुख असलेला हायब्रिड मनुष्य आहे.
तिसऱ्या शिल्पात डावीकडे नंदीवर आरुढ शंकर, मध्ये गरुडवाहन विष्णू तर त्याचे शेजारी हंसावर आरुढ चतुर्मुखी ब्रह्मा.
चौथ्या शिल्पात परत हेच त्रिदेव असून सर्वात उजवीकडे ऋषी आहे.
पाचव्या शिल्पात मकरमुख आहे. मकर सुद्धा गायीसारखाच पवित्र प्राणी मानला जातो.
हे मंदिर मुळात होयसाळांनी बांधले नसले तरी त्यांनी त्यात भर घातली असे कुठे तरी वाचले होते.
होयसाळा मंदिरांमध्ये हत्ती, सिंह, मोर, मकर, अश्व असे स्तर दिसतात. त्यात हत्ती स्थैर्याचे, सिंह शौर्याचे, अश्व प्रगतीचे प्रतिक आहे
मंदिर जेवढे सुबत्तेच्या काळात बांधले गेले तेवढे स्तर जास्त आहेत. उदा हळेबीड-बेलूर च्या मंदिरांमध्ये ८ स्तर दिसतात.
बाकी दुसर्या फोटोमधील नरसिंह आणि चौथ्या फोटोमधील ऋषी हे लेपाक्शी येथील नरसिंह आणि ऋषींच्या प्रतिमांशी फारच मिळते जुळते आहेत.
विरुपाक्षी, बंगारू तिरुपती आणि कोटिलिंगेश्वर
Primary tabs
विरुपाक्षी हे कोलार जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. हे मुलबागलपासून ५ किमी अंतरावर असून, इथे तेराव्या शतकातील एक प्रशस्त शिव मंदिर आहे. हे मंदिर कृष्णदेवराय दुसरे ह्यांच्या कारकिर्दीत बांधले गेले. ह्याची रचना हंपीतिल विरुपाक्ष मंदिराप्रमाने असल्याचे सांगण्यात येते. (हम्पी मी अजून पाहिले नाही तेंव्हा जाणकारांनी ह्यावर प्रकाश टाकवा.) ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, इथे एकाच गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत. आणि ह्यातील एका शिवलंगाचा रंग सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत बदलत राहतो. मी तिथे दुपारी तासभर होतो तेंव्हा ह्याची शहानिशा करता आली. पण हे मंदिर आज दुर्लक्षित आहे इतकं मात्र खरे.
मंदिराचे प्रवेशद्वार
आत प्रवेश केल्यावर होणारे भव्य मंदिराचे दर्शन
मागून बाजूने काढलेला अजून एक फ़ोटो
ह्याच आवारात श्रीकृष्णाचेही छोटेसे मंदिर आहे. त्यातील सुंदर मूर्ती.
तिथले पार्वतीचे मंदिर बंद होते. मंदिरा बाहेरील सिंह .
मंदिराबाहेर एक अर्धवट बांधलेले प्रवेश द्वार आहे.
विरुपाक्षीहून अंदाजे १३ किमी अंतरावर गुट्टाहल्ली इथे बंगारू तिरुपती हे मंदिर आहे. ह्याला लक्ष्मी व्येंकटेश्वरा स्वामी मंदिर अशा नावानेसुद्धा ओळखले जाते. एका छोट्याश्या टेकडीवर विष्णूचे तर बाजूच्या टेकडीवर पद्मावतीचे मंदिर आहे. इथे विष्णूचे दर्शन दरवाज्यातून न घेता खिडकीतून घेतात. भृगु महर्षी ह्यांच्या स्वप्नात देवाने असेच दर्शन दिल्यामुळे मंदिराची रचना अशा प्रकारे करण्यात आल्याचे पूजार्यांनी सांगितले.
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार
आत जाताच दिसणारे विहंगम द्रुश्य
पुष्कर्णिच्या मधोमध बसवलेला हा पक्षी. राजहंस आहे का?
मंदिराच्या खालच्या भागावर तयार केलेला हा गरूड , जणू मंदिर गरुडाने आपल्या पाठीवर घेतल्याचा आभास निर्माण करते.
बंगारु तिरुपतीपासून १० किमी अंतरावर कोटी लिंगेश्वर आहे. ह्या मंदिरात एक कोटि शिवलिंग स्थापन करण्याचा प्रकल्प चालू आहे. ह्याची सुरुवात १९७२ साली झाली. आजतागायत ९० लाख लिंग स्थापन झाल्याचे सांगण्यात येते.
आत जाताच आपण विविध आकाराच्या आणि प्रकाराच्या शिवलिंगाच्या सागरात हरवून जातो
हे चार मजली ईमारतिच्या उंचीचे शिवलिंग
त्याचाच जवळून काढलेला एक फ़ोटो.
दुसरे एक जवळपास वीस फुट उंचीचे शिवलिंग आणि त्यासमोर स्थापन केलला कलश
इथेच देवीच्या अनेक अवतारांच्या मूर्त्या आहेत
कोटिलंगेश्वर इथे केमरा आत नेण्यासाठी १०० रुपये द्यावे लागतात
हा पूर्ण प्रवास अर्ध्या दिवसात करता येतो. ह्या तिन्ही ठिकाणी जेवण्याची फारशी सोय नाही. गरज पडल्यास मुलबागलला जेवण करावे.
जाताना बेंगलोर चन्नई हायवे वरून कोलार बायपास करून मुलाबागालाही बायपास करून विरुपाक्षीला जात येते. येताना कोटि लिंगेश्वरहून परत मुलाबागालला ने येता, बंगारपेठ मार्गे बेंगलोरला येता येते. पण हा रस्ता थोडा अरूंद असून गाडी हळू चालवावी लागते.
कुरुडुमळे आणि मुलबागल
Primary tabs
कुरुडुमळे हे कोलार जिल्ह्यातील एक छोटेसे गाव, बेंगलोरपासून अवघ्या १०० किमीच्या आत. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच. कौडिण्य ऋषींनी येथे एका टेकडीवर तपश्चर्या केलली. बेंगलोरहून कोलार आणि तेथून जवळपास तीस किमी हायवेवर जायचे. मुलबागल हायवे सोडून तीन किमीवर आगे. मुलबागालहून कुरुडुमळे अवघ्या आठ किमॆवर आहे..
ह्या गावात एक गणपतीचे आणि एक सोमेश्वराचे मंदिर आहे.
गणपतीची मूर्ती अंदाजे बारा (काहि ठिकाणी चौदा लिहिले आहे) फूट उंचीची असून एका अखंड शाळिग्राम दगडात कोरली आहे. ही मूर्ती किती जुनी आहे ह्याची कुठेही नोंद नाही. चौदाव्या शतकापर्यंत हा गणपती उघड्यार होता. विजयनगरच्या राज्यांनी हे मंदिर मूर्तीभोवती बांधले. मंदिरात कलाकुसर तितकीशी पहावयास मिळत नाही. पण मंदिराच्या चौकटी वापरून एक छान आभास निर्माण करण्यात आला आहे. मंदिरातून जसजसे बाहेर जावू तसतशी मूर्ती मोठी होत असल्याचा भास होतो.
सुदैवाने ह्या मंदिरात देवतेचा फ़ोटो काढण्याची परवानगी मिळाली.
ह्या गावातील दुसरे मंदिर आहे सोमेश्वराचे. हे मंदिर गणपतीच्या मंदिरापेक्षा जुने आहे. चोलांनी मूळ मंदिराची उभारणी केली असून होयसाळा काळात त्यात वाढ करण्यात आली.
मंदिरात प्रवेश करताच हा गणपती आपले स्वागत करतो.
ह्या गणपतीचे एक खास वैशिष्ट्य आहे. ह्याच्या शरीरावार वेगवेगळ्या भागावर टिचकी मारली की वेगवेगळे आवाज निघतात आणि मूर्तीवर कुठेही जोड दिसत नाहीत. म्हणजे बहुधा आतून पोकळपणा एकसारखा नसावा असा एक अंदाज आहे.
मंदिराच्या खांभावर मजेशीर मूर्ती कोरल्या आहेत. तीन व्यक्ती आणि चारच पाय असलेले हे नृत्य.
त्याच आवारात कार्तिक स्वामींचे एक छोटेसे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती
एक विचित्र गोष्ट दिसून येते ती म्हणजे शंकराच्या मंदिरात इतर बर्याच देवतांच्या मुर्त्या आहेत. उदा ही बालाजीची मूर्ती .
असे ऐकण्यात आहे की कधी काळी कुरुडुमळे आणि जवळपास तीस मंदिरे होतॆ. ती सर्व अरकोटच्या नवबाने उधवस्त केली. काही वाचलेल्या मूर्त्या शंकराच्या मंदिरात आणून ठेवल्या आहेत.
परत येताना मुलबागलला भेट दिली. इथे विरांजनेय म्हणजेच हनुमानाचे मंदिर आहे. मारुतीची मूर्ती आठ फूट उंचीची आहे. ह्या मारुतीच्या हातात गदेबरोबर तलवार सुध्दा आहे. ह्याची स्थापना अर्जुनाने केली असे मानन्यात येते.
मंदिराच्या प्रवेशद्वाराचा फोटो
मंदिराचा आवार प्रशस्त आहे. आणि मंदिर परिसरात शेषशायी विष्णुची सुद्धा एक सुरेख मूर्ती आहे. आवाराचा एक फोटो.
बेंगलोरहून चन्नई हायवे वापरून कोलार बायपासवरून मुलबागला जाता येते. गाडी चालवण्यास रस्ता एकदम मस्त आहे. ही सहल अर्ध्या दिवसात पूर्ण करता येते. मुलबागल तालुक्याचे ठिकाण असून, नाष्ट्याची चांगली सोय आहे.
पूर्ण दिवस घालवायचा असेल तर कुरुडुमळे, मुलबागल, विरुपाक्षी, बंगारु तिरुपती, कोटी लिंगेश्वरा या सर्व ठिकाणी भेट देता येवू शकते. ऐनवेळी दुपारी उल्हास आल्यामुळे हे दोन ट्प्यात करावे लागले. राहिलेल्या ठिकाणांचे फोटो परत कधीतरी.
सोमनाथपुरा
Primary tabs
सोमनाथपुरा हे म्हैसूर जिल्हतील एक छोटेसे गाव. बेंगलोरपासून १४० किमी अंतरावर. इथे चन्ना केशवा हे होयासाला काळातील भव्य मंदीर आहे. होयसाळांचा सेनापती सोमनाथ ह्याने हे मंदिर १२६८ साली बांधले. हे मंदीर भगवान श्रीकृष्णाला समर्पित असून इथे जनार्दन, केशव आणि वेणुगोपाल ह्या तीन मुख्य देवता आहेत. त्यातील केशावाची मूर्ती गायब आहे.
कुणी सुलतानाने ह्या मंदिरातील मूर्त्यांची नासधूस करून मंदिराचा विटाळ केला. तेंव्हापासून ह्या मंदिरात पूजा केली जात नाहि.
मुख्य द्वारातून प्रवेश करताच दिसणारे मंदिर
मंदिराच्या भिंती विविध देवतांच्या मूर्त्यांनी सजल्या आहेत.
ह्या मंदिरातील सर्वात जास्त आवडलेली मूर्ती ही महिशासुरमर्दिनिची. आक्रमकता आणि नाजुकतेचा छान संगम
ही कल्पतेचा उच्चांक गाठणारी नृसिंह लक्ष्मीची मूर्ती . लक्ष्मीने कमळावर पाय ठेवला आहे. आणि त्या दबलेल्या कमळाला हत्ती आधार देतोय.
मंदिरचा द्वारपाल
ह्या मंदिराच्या एका कोपऱ्यात काही मोडक्या मूर्ती आहेत. ह्या बहुदा इतर मोडलेल्या मंदिरातील मुख्य देवता असाव्यात
ह्यात दोन जैन मुर्त्यासुद्धा आहेत
सोमानाथापुराचे हे मंदिर कलेचा एक खजाना आहे इथे लहान मोठ्या हजारो मूर्त्या कोरल्या आहेत. सोमनाथपुरा आणि तळकडु एक दिवसात पाहता येतात. सोमनाथपुरामध्ये जेवणाची कोणतीही सोय उपलब्ध नाहि. बेंगलोर म्हैसोर हायवेवर नाष्टा करून सोमणाथपुराला भेट द्या आणि जेवण्यासाठी तळकडुला जा. तळकडुचे फोटो लवकरच टाकेन.
नुग्गेहळ्ळी
Primary tabs
होयसाळा राज्यघरण्याने दहाव्या ते चौदाव्या शतकापर्यंत दक्षिण भारतात राज्य केले. त्यांनी जवळपास दोनशे मंदिरे बांधली. त्यातील हळेबेद बेलूरची मंदिरे जगप्रसिद्ध आहेत. पण इतर बरीच मंदिरे दुर्लीक्षीत आहेत किंवा मोडकळीला आलेली आहेत.
नुग्गेहळ्ळी हे हसन जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. श्रवनबेळगोळा पासून अवघ्या २६ किलोमीटर असूनहि प्रवाश्यांपासून लपून राहिले आहे. ह्या गावात तेराव्या शतकातील दोन सुंदर मंदिरे आहेत - लक्ष्मी नरसिंह आणि सदाशिव . ह्या मंदिरात टिपलेले काही फोटो :
मंदिराच्या भिंतीवर विविध देवी देवतांच्या मूर्ती कोरल्या आहेत.
क्लोज अप
अजून एक लक्ष्मीची मूर्ती . ह्या दोन्ही मूर्त्यांच्या हातात मक्याचे कणिस बघा. हि मंदिरे युरोपियन भारतात येण्याआधी बांधलेली आहेत. त्यामूळे मका त्यांनी भारतात आणला हा तर्क चुकीचा ठरतो
सदाशिव मंदिरात फारसे कोरीव काम आढळत नाही . पण मंदिर प्रेक्षणिय आहे.
अधिक माहितीसाठी
http://en.wikipedia.org/wiki/Lakshmi_Narasimha_Temple,_Nuggehalli
http://nuggehalli.org/
बेंगलोरहून श्रवनबेळगोळा आणि नुग्गेहळ्ळी एका दिवसात प्रवास पूर्ण होऊ शकतो. सार्वजनिक वाहतुकीची सोय बहुधा नसावी. जेवण श्रवनबेळगोळामध्ये केलेले उत्तम
सांगीतिक भटकंती :सवाई गंधर्वांचा वाडा(कुंदगोळ), गंगुबाई हंगालांचे घर (हुबळी) आणि संगीत गुरुकुल
फार दिवसांची इच्छा पूर्ण होण्यासाठी मुहूर्त लागावा लागतो. केवळ वेळ असून चालत नाही, वेळ यावी लागते. हुबळीची बायको असून वर्षात ४ वेळा सासुरवाडीला जाऊन पण केवळ १६ कि.मी. असणाऱ्या गावाला जायला झाले नव्हते. आज महाराष्ट्रातील सर्वात श्रेष्ठ गायक कोण होते हा प्रश्न आला कि भीमसेन जोशींच्या गुरूंचे म्हणजेच सवाई गंधर्व रामभाऊ कुन्दागोलाकारंच नाव ओघानेच येत. त्यांच्या वाड्यात जाउन त्या हवेचा फील घ्यायचा नंतर काही फोटो पहायचे असा फार वर्ष पासूनचा बेत होता. तसे गंगुबाई हंगालांचे घर हुबळी गावातच आहे. पूर्वी एकदा तिथे जाऊन आलो होतो पण फोटो काढायचा विसरलो होतो. आता नक्की प्लान करून गेलो होतो.
कसे जाल: कुंदगोळ हे हुबळी पासून केवळ १६ कि.मी. वर आहे. पुणे-बंगलोर(रा. म. क्र. ४) वर धारवाड-हुबळी बायपास संपला कि गब्बुर हे ठिकाण येते. तिथून २ कि.मी. अंतर मधेच डावीकडे कुंदगोळ ला रस्ता जातो. पूर्वी तिथे फलक होता. आता दिसला नाही. रस्ता चुकून सरळ ४० कि.मी. गेल्यावर चूक लक्षात आली. परत फिरून मधेच एका गावात राईट मारून गुन्दगोळ ला पोहोचलो.


गाव यथा तथाच आहे.तिथे एक स्मारक चांगले बांधले आहे. तिथे गेल्यावर सरकारी उत्तर मिळाले --- मालक लग्नाला गेले आहेत. बघायला मिळणार नाहि.ठिक आहे. वाडा कुठे आहे हे तरीनित सांगीतले. तिथे गेल्यावर पण आनंदच होता. वाडा सुंदर असून पण "आत पूजा चालू आहे" सोडणार नाहि. हे उत्तर मिळाले. गंधर्वांचे वडील येथील नाड्गिर वाड्या मध्ये क्लार्क होते आणि त्यांनी गन्धर्वाना आश्रय देवून फार मोठे उपकार केले आहेत असे दाखवण्याचा तेथील सध्याच्या पिढीचा प्रयत्न होता. अनेक वेळा विनंती केल्यावर सकाळी ८ च्या आधी आणि दुपारी ३ नंतरच प्रवेश मिळेल असे काही तरी सांगितले. रामाभौंची केवळ एक मूर्ती पाहायला मिळाली. तरीही तो सुंदर वाडा, त्याच्या बाजूचा गोठा वगेरे पाहून परत निघालो. भीमसेन जोशी जिथून पाणी भरून घागरी घेऊन जायचे तो तलाव कम विहीर वाटेत लागते. ती पाहून बिलकुल निराश न होता हुबळी चा रस्ता धरला. पर्यटनाला गेल्यावर निराशा होते कधी कधी…ठीक आहे. पण वाडा पहिल्यचे समाधान होते. आपण याचे देणे लागतो, हि जागा निट केली पाहिजे असा काहीसा भाव मनात आला. याचे कारण देखील समजले…राम भाऊ अथवा भीमसेन यांना कर्नाटक जवळचा वाटत नव्हता. तेथील लोकांना विशेष किंमत नव्हती यांच्या गुणांची।म्हणुन इतर ठिकाणी पर्यटन वाढवणाऱ्या या राज्याने रामभाऊ अथवा भीमसेन यांच्या घरी काही विशेष संघ्रहालय मात्र केलेले नाही.







गंगुबाई हंगालांची गोष्ट तशी नाही. या उलट गंगुबाई हंगालांच्या घरी उत्तम सहकार्य मिळाले. घर जरी २-५ बंद असले तरी मी कराडहून आलो आहे हे सांगितले मग त्यांनी प्रवेश दिला. सर्व ४ खोल्यांमध्ये दिवे लावले मग सुरु झाला फोटोंचा धडाका. एवढा कि त्या माणसाने मला विचारले…."पाहायला आलाय का फोटो काढायला?" मी लगेच फेकले "ऑफ्कोर्स…बघायला…पण डोळ्यात मावत नाहीये म्हणून फोटो काढून घरी जाउन नीट पाहीन"…त्याला गोळी पचली. गंगुबाई हंगालांच्या घरी मात्र मस्त स्मारक आहे. हुबळी च्या देशपांडे नगर मध्ये हे घर आहे. इथे त्यांचे अनेक गायक, राजकारणी यांच्या बरोबर चे फोटो आहे. अनेक वाद्य ठेवली आहेत. तिथे गाण्याचे वर्ग देखील चालतात…त्याला अजून "कोचिंग" चे रूप आलेला नाहि. त्यांना मिळालेले सर्व पुरस्कार येथे नीट जवळून पाहता येतात. याचे काही फोटो देत आहे. एका मागून एक सुंदर फोटो, साहित्य होते…सतारी, तंबोरे, तबले, पेट्या …किति मोजु…!! पुरस्कार आणि भेट वस्तू यांचा खच पडला होता. पहिल्यांदा मी माझ्या डोळ्याने पद्म भूषण आणि पद्म विभूषण हे स्वताच्या डोळ्यांनी पाहत होतो…आता जास्त वर्णन न करता सरळ फोटो पहा.

















(( वाढीव ))
आज सकाळी हुबळी इथे गंगुबाई हनगल यांच्या नावाने संगीत गुरुकुल चालवले जाते याची माहिती मिळली. लगेच तिकडे दौरा काढला. कर्नाटक सरकार ने संगीताच्या पंढरीत हा उपक्रम केला आहे. अतिशय छान जागी, डोंगराच्या पायथ्याशी ६ एकर जागेवर हे गुरुकुल बांधले आहे. ३० विद्यार्थी व सुमारे ६-८ गुरुजन हे कायम स्वरूपी इथे वास्तव्याला आहेत. विद्यार्थ्यांना पूर्णवेळ करीयर संगीतात करता यावे म्हणून हि सोय आहे. विद्यार्थ्यांना मानधन देखील दिले जाते. आधुनिक आणि पारंपारिक चा सुंदर मिलाफ येथे आहे. रीयाझा साठी उत्तम बैठक व साथीला छान वाद्य-वृंदा आहे. कायम गाण्याचे सूर इथे दरवळत असतात. तसेच सोलर हीटर, पाणी शुद्धीकरण अशा आधुनिक सोयी, स्वतंत्र लायब्ररी अशा अनेक सोयी आहेत. योग्य ठिकाणी सरकार ने पैसे खर्च केल्याचे समाधान वाटले पण आमच्या दळभद्री महाराष्ट्र सरकार ची पण आठवण आली कम स्वताची लाज वगेरे नेहमी प्रमाणे वाटली…सांगली-मिरज सारख्या संगीत पंढरी मध्ये असे काही का होऊ शकत नाही? नारायणराव बालगंधर्व यांच्या सारखा गायक जिथे झाला आणि ३-३ मोठे मंत्री ज्या जिल्ह्यातून आहेत अथवा आमच्या कराड गावात मुख्यमंत्री आहेत अथवा यशवंतराव चव्हाणन सारखे रसिक व दूरदर्शी नेतृत्व होते तिथे हे कधी होणार? आमची अस्वस्थता संपत नाही …!!!








पुढील भागात:बाइक वरून बंगलोर- म्हैसूर-बंदीपूर-मुदुमलाई- उटी- कुनूर
श्री क्षेत्र संगमेश्वर :- अद्भुत शिल्पाच्या शोधात केलेला प्रवास
श्री विश्वरूप शिवदर्शन :-
ह्या ठिकाणी असलेलं हे जगातील एकमेव शिवलिंग असून ह्यावर ३६० शिवप्रतिमा आहेत. शिवलिंगाची उंची साधारण ४ फूट एवढी असून ह्यावर भक्ताला वर्षभर अभिषेक केल्याचे पुण्य मिळते अशी ह्यामागील धारणा आहे
श्रीकृष्ण मूर्ती :-
आधीच सांगितल्याप्रमाणे कुडल गावात मिळालेल्या सर्व मूर्ती ह्या उत्खननात सापडलेल्या आहेत. त्याप्रमाणे गोकुळाष्टमीच्या दिवशी जमिनीतून मिळालेली हि अखंडित श्रीकृष्ण मूर्ती. श्रीकृष्ण म्हणजे भगवान विष्णूचा आठवा अवतार. ह्या मूर्तीत श्रीकृष्णाला गोपाळांच्या स्वरूपात दाखवलं आहे ह्यात श्रीकृष्णाच्या हातात बासरी असून डोक्यावर टोप व पायाशी गाय व वासरू आहे.
हरिहरेश्वर मंदिरातील वैशिष्ट्य म्हणजे अतिशय कलापूर्ण अशा शिल्पांनी परिपूर्ण नटलेले असे हे मंदिर आहे. मंदिराची रचना मुखमंडप, अर्धमंडप, स्वर्गमंडप अंतराळव गर्भगृह अशी आहे. मुखमंडपात एकाच दगडात एका बाजूस लक्ष्मी व दुसऱ्या बाजूस भैरवीची उत्कृष्ट कलाकृती आहे.
उत्खननात अढळलेल्या मूर्ती :-
ह्या मंदिरात दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. एव्हाना दहा वाजून गेल्याने १० ची सिटी बस थोडक्यात चुकली होती म्हणून बाहेर असलेल्या छोटेखानी हॉटेलमध्ये बसून गावकऱ्यांशी गप्पा मारत बसलो ११ च्या बस ची वाट बघत होतो. तेवढ्यात एका सद्गृहस्थांशी भेट झाली त्यांचं नाव "मधुकर बिराजदार". मधुकर बिराजदार हे ह्या मंदिर समूहाचे माहितगार. त्यांच्याशी गप्पा मारता मारता ह्या मंदिराचा हळू हळू इतिहास उलगडत गेला. त्यांच्याशी गप्पा मारून मंदिराला भेट दिल्याचे सार्थक झाले. एव्हाना ११ ची बस आली आणि मी कुडल गाव व ग्रामस्थांना निरोप देऊन परतीच्या प्रवासाला लागलो.
टीप :-
१) मंदिरापर्यंत पोहोचायचे असल्यास एकतर स्वतःची गाडी हवी अथवा सर्वप्रथम सोलापूर गाठावे तिथून विजापूर ला जाणारी बस पकडून टाकळीला उतरावे व टाकळीवरून मिळेल ते वाहन पकडून कुडल गावापर्यंत जावे.
२) मंदिराची विस्तृत माहिती हवी असल्यास गावात जाऊन "मधुकर बिराजदार" ह्यांच्याशी संपर्क साधावा
सेंट मेरीज आयलंड , ऊडुपी. (St.Mary's Island , Udupi) Offbeat Karnataka
६० दशलक्ष वर्षापूर्वी लाव्हारसामुळे दख्खनच्या पठाराची निर्मिती झाली त्याच वेळी या बेटाची आणि त्यावरील स्तंभांची निर्मिती झाली. या स्तंभांसारख्या रचनेला "कॉलम्नर जॉईंट" म्हणतात. चौकोनी, पंचकोनी, षटकोनी, सप्तकोनी, अष्ट्कोनी अशा बहुकोनी आकारात तयार झालेले हे स्तंभ एकमेकाला चिकटलेले असतात. ज्वालमुखीच्य उद्रेका नंतर लाव्हारस जर खोलगट भागात जमा झाला तर अशा प्रकारची रचन तयार होण्याची शक्यता असते. लाव्हारस थंड होण्याची प्रक्रीया पृष्ठभागापासून चालू होते. वरचा भाग थंड झाल्यावर हळूहळू खालचा भाग थंड होत जातो. अशा प्रकारे द्रवरुपातून घनरुपात येतांना तो आकुंचन पावतो आणि त्यामुळे त्याला भेगा पडतात. सामान्यत: या भेगा एकमेकांशी ६० अंशाच्या कोनात पडतात. त्यामुळे दगडाला षटकोनी आकार येतो. या भेगा पृष्ठभागाशी ९० अंशाचा कोन करतात त्यामुळे षटकोनी आकाराचे उभे स्तंभ तयार होतात. जर भेगा पडण्याच्या प्रक्रीयेत काही बाधा आली तर चौकोनी, पंचकोनी आकारचे स्तंभ तयार होतात.
वर्षानूवर्षे लाटांच्या आणि वार्याच्या मार्यमुळे या ठिकाणी अनेक स्तंभ तुटून पडलेले पाहायला मिळतात. बेटावर काही सेंटीमीटर उंच ते जास्तीत जास्त ३ ते ४ मीटर उंचीचे स्तंभ पाहायला मिळतात.
दगडी स्तंभांचे विविध आकार, त्यावर फ़ुटणार्या लाटा आणि विविध आकाराचे, रंगांचे शंख शिंपले गोळा करतांना वेळ कसा जातो ते कळत नाही. बोटीचा परतीचा इशारा देणारा भोंगा वाजायला लागतो. समुद्रात बुडणार्या सूर्याला साक्षीला ठेऊन आपण या सुंदर बेटाचा निरोप घेतो.
राजा की गद्दी (मडीकेरी)
गेल्या डिसेंबरात कर्नाटक राज्याच्या दक्षिणेकडील "मडीकेरी" या थंड हवेच्या ठिकाणी गेलो होतो. तिथे राजा की गद्दी / रॉयल टोंब या नावाच्या जुळ्या वास्तु पाहण्यात आल्या. मी आतापर्यंतच्या माझ्या प्रवासात (जो अत्यंत कमी आहे) येथे दिसलेले काहि तपशील याआधी कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे त्या अनुशंगाने जे काहि प्रश्न डोक्यात आहेत त्यासंबंधी चर्चा करण्याचा हेतु इथे आहे.
सर्वप्रथम तिथे लिहिलेल्या सरकारी बोर्डावरील माहिती अशी
==========
रॉयल टोंबः
इंडो-सार्सेनिक पद्धतीने बांधलेल्या ह्या वास्तुला गद्दी अथवा टोंब्
म्हणतात. कोडवा राजघराण्याने बांधलेल्या वास्तुपैकी काहि मोजक्या टिकलेल्या
वास्तुपैकी हि एक वास्तु आहे. येथील मधील टोंब राजा दोड्डावीरराजेंद्र आणि
त्याच्या राणीचा आहे. तर उजवीकडील टोंब राजा लिंगराजेंद्राच्या
स्मृतीप्रित्यर्थ त्याचा पुत्र चिकवीरराजेंद्र यांने १८२० मधे बांधला आहे.
इथे डावीकडे अजून एक वास्तु आहे ती राजाचा पुजारी रुद्रप्पाने १८३४ मधे
बांधुन घेतली.
हे राजे आणि कोडगु जंगलातील व भोवतीची त्यांची प्रजा शिवभक्त असल्याने
या वास्तुमधे शंकराची स्थापना केली आहे. मुख्य प्रवेशद्वारापाशी तसेच चारहि
मिनारांवर शंकराचे वाहन नंदी याचा पाहरा आहे.
============
कोडवा लोकांबद्दल (इतिहास): [संदर्भ विकी]
१. दोड्डावीरराजेंद्र हा वीरपुरुष होता.
हैदर अली आणि पुढे टिपु सुलतानाने कोडगु प्रांत बळकावला व या राजाला कैद
केले. तेव्हा या राजाने कैदेतुन पळुन, पुन्हा टीपुशी लढून आपला प्रांत
मुक्त केला.
उपकहाणी अशी की टीपुला हा प्रांत राखणे तसेहि जड होते. त्याची पाठ फिरते ना
फिरते इथेली प्रजा टीपुच्या सैन्याला सळो का पळो करून सोडत असत. टिपुने मग
हजारो जणांना श्रीरंगपट्टणमला नेऊन मुसलमान बनवणे चालु केले. भारतातील
अनेक प्रांताप्रमाणे जेव्हा ही प्रजा माघारी आली तेव्हा हिंदु कोडवांनी
त्यांना आपल्यात घेतले नाहि. ते कोडगु प्रांतातच राहिले मात्र् त्यांना
कोडवा-मपिलि म्हणू लागले
२. याउलट त्याचा नातु चिक्कवीरराजेंद्र अतिशय निर्दयी राजा होता. आपल्या कोडवा प्रजेला त्यांने छळायला सुरवात केली. त्यानिमित्ताने इंग्रजांनी त्याला हाकलुन सत्ता ताब्यात घेतली
आता मला पडलेले प्रश्न
१. विकीवरील माहिती व्यतीरिक्त या कोडवा लोकांबद्दल काहि विषेश माहिती
आहे का? इथे एक अख्खी वास्तु पुजार्याला बांधुन दिलेली दिसते.
पुजार्यांना इतका मान देणारी प्रथा प्रथमच पाहिली.
२. इंडोसार्सेनिक मंदीरांची वैशिष्ट्ये काय? सार्सेनिक आणि इंडोसार्सेनिक मधे फरक काय?
३. इथे प्रत्येक वास्तुच्या प्रवेशद्वारावर हातात डमरु आणि त्रिशुळ घेतलेला मात्र पायाखाली भुजंग असलेला पुतळा आहे तो कोणाचा असेल?
४. येथील चित्रांमधे जे साधु कोरले आहेत त्यांना मुकुट दाखवले आहेत.
(क्वचित मोत्याची माळ वगैरेही गळ्यात आहे). (अगदी कमंडलुधारी काठी
घेतलेल्या साधुच्या डोक्यावरहि मुकुट आहे). भारतात साधु क्षत्रियांप्रमाणे
मुकुट, आभुषणे वापरत असत का?
५. प्रत्येक खिडकीवर पुढील आकृती आहे. कोणाला कन्नड (अथवा कोडवा टिक्क?)
येत असल्यास त्याचा अर्थ काय ते सांगु शकेल का? (का आपल्या "श्री" सारखे
काहि आहे?)
६. पुढील चित्रांत दाखवलेला कोंबडासदृश प्राणी/पक्षी (मात्र तुरा नाहि,
चेहरा घोड्यासारखा वाटतो, आणि झुपकेदार शेपुट आहे) ओळखता येतोय का? असल्यास
तो नामशेष झाला आहे का? कारण हा पक्षी तिथे बर्याच ठिकाणी कोरलेला दिसला.
चित्रे भरदुपारी काढल्याने अतिप्रकाशात न्हाली आहेत.. क्षमस्व!
यानिमित्ताने काहि प्रमाणात टिपुसुलतानच्या वेळच्या मानी हिंदु राज्यांबद्दलहि वाचायला आवडेल.मात्र तो मुख्य चर्चाविषय नाहि
राजा दोड्डावीरराजेंद्र आणि त्याच्या राणीचा आहे. तर उजवीकडील टोंब राजा लिंगराजेंद्राच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याचा पुत्र चिकवीरराजेंद्र यांने १८२० मधे बांधला आहे.
यातील दोड्ड आणि चिक यांचा अर्थ मोठा आणि लहान असा होतो. नात्यातील मोठे-लहानपणा दाखवण्यासाठी याचा वापर होतो. उदा. कर्नाटकात मोठ्या काकाला दोड्डप्पा काकीला दोड्डम्मा, लहान काकाला चिक्कप्पा आणि काकीला चिक्कम्मा म्हणतात.
आता काही माहिती दे. प्रतिसादांतून चर्चा करूया.
१. हा रॉयल टोम्ब प्रकार काय आहे? म्हणजे समाधीसदृश काही किंवा कसे?
२. तू दिलेल्या फोटोंवरून मंदिर इंडो-सार्सेनिक आहे किंवा कसे ते कळत नाही. मूळ मंदिराच्या इमारतीचे फोटो लाव. व्हीटी स्टेशनची इमारत इंडो-सार्सेनिक पद्धतीची आहे असे म्हणतात.
३. साधूंची जी चित्रे आहेत त्यातील डावीकडील चित्रात मला तो साधू असल्यासारखा वाटला नाही. त्याच्या अंगावर जानवे नाही. (त्याच्यामागे बाईही दाखवली आहे. ;-) हा राजा असावा काय?) उजवीकडील साधू असावा त्याच्या अंगात जानवे आहे पण डोक्यावर मुकुट आहे असे वाटले नाही पण हे जरा चित्र स्पष्ट न दिसल्याने होत असावे. जरा खुलासा कर.
सहावा फोटो व्यालाचा असावा. ते अनेक ठिकाणी का येते? रॉयल सिम्बॉल आहे किंवा कसे ते पाहायला हवे.
इंडो-सार्सेनिकबद्दल माहिती येथे मिळेलच. :-)
द. भारतात पुजार्यांना विशेष महत्त्व असते ही गोष्ट खरी आहे. एक उदाहरण द्यायचे झाले तर - आमच्या कुटुंबाचे मूळ गाव आहे तेथे त्यांच्या इस्टेटीवर एक देऊळ आहे. फारा वर्षांपूर्वी तिथे माझ्या सासर्यांचे वडिल स्वतः पूजा करत. नंतर कुटुंब वाढले, पांगले. आता त्या देवळाची खरी मालकी आणि त्या देवळाच्या आजूबाजूच्या थोड्या परिसराची , तेथील घर, मळा इ. ची मालकी, देवळाच्या पुजार्याकडे आहे. देवळात कोणताही उत्सव असेल तर जरी आमच्या कुटुंबांकडून (सध्या माझे काही दीर ते करतात) करवून घेतला जातो परंतु त्या उत्सवाचा अर्धा खर्च हे पुजारी आपल्या स्वतःच्या पैशांतून स्वखुशीने आणि आनंदाने करतात.
यातील दोड्ड आणि चिक यांचा अर्थ मोठा आणि लहान असा होतो. नात्यातील मोठे-लहानपणा दाखवण्यासाठी याचा वापर होतो. उदा. कर्नाटकात मोठ्या काकाला दोड्डप्पा काकीला दोड्डम्मा, लहान काकाला चिक्कप्पा आणि काकीला चिक्कम्मा म्हणतात.
इथे मात्र ते लहान मोठे भाऊ नसुन वडील -मुलगा आहेत
आता काही माहिती दे. प्रतिसादांतून चर्चा करूया.
१. हा रॉयल टोम्ब प्रकार काय आहे? म्हणजे समाधीसदृश काही किंवा कसे?
हे टोम्ब काहि वास्तुंचा गुच्छ (?) आहे. यात दोन शिवमंदीरे आहेत. तर एक
पुजार्याने बांधलेले मंदीर आहे. बाकी दोन टिपू सुलतानाच्याबरोबर लढताना
शहिद झालेल्या दोघांची स्मारके आहेत (स्मारके व पुजार्याच्या मंदीराचा
फोटो नाहि)
२. तू दिलेल्या फोटोंवरून मंदिर इंडो-सार्सेनिक आहे किंवा कसे ते कळत नाही. मूळ मंदिराच्या इमारतीचे फोटो लाव. व्हीटी स्टेशनची इमारत इंडो-सार्सेनिक पद्धतीची आहे असे म्हणतात.
गुगलून इंडो सार्सेनिक बर्याच इमारती मिळाल्या पण मग सार्सेनिक आणि इंडो-सारर्सेनिक मधे फरक काय राहिला ते कळेना. (बरं इंडियातील सार्सेनिक वास्तु म्हणावं तर या शैतीत जगभरात बांधलेल्या वास्तु येतात)
३. उजवीकडील साधू असावा त्याच्या अंगात जानवे आहे पण डोक्यावर मुकुट आहे असे वाटले नाही पण हे जरा चित्र स्पष्ट न दिसल्याने होत असावे. जरा खुलासा कर.
या चित्रात उजवीकडे साधु आहे हे नक्की. त्याच्या एका हातात कमंडलु आहे, दुसर्या हातात काठी. गळ्यात तीनपदरी जानवे आहे (हे तीनपदरी कसे तोहि प्रश्न आहेच). शिवाय गळ्यात मोत्याची माळ, डोक्यावर मुकुट (मुकुट पारंपारिक पद्धतीचा शंकाकृती नसुन बसका मोत्याने सजवलेला व वरून उघडा असा वाटतो. त्यातुन साधुच्या जटा बाहेर आल्या आहेत)
सहावा फोटो व्यालाचा असावा. ते अनेक ठिकाणी का येते? रॉयल सिम्बॉल आहे किंवा कसे ते पाहायला हवे.
घोडा आणि कोंबडा असलेला व्यालहि असतो हे बघुन गंमत वाटली. असो, असेनाका बापडा ;)
अजून एक. प्रश्न पाच मधे दिसणारी (श्री/वी/पी सदृश) आकृती/अक्षरे अगदी काहि किर्तीमुखांच्या मस्तकी देखील आरूढ आहेत:
काहि इतर फोटोज:
वेळ होईल तशी इतर ऐकीव माहिती देखील टंकेन.. तुर्तास घाईत आहे
http://www.misalpav.com/node/19934
प्रस्तावना :
एखाद्या गोष्टीचे वेड जर मनात घेतलं तर ते पुर्ण केल्या शिवाय माझा आत्मा
शांत राहत नाही, असेच एक वेडं मला मागच्या सोमवारी/मंगळवारी टिम गोवा यांनी गोवाच्या इतिहासावर लेखन
करण्यास सुरूवात केली व पहिल्या भागामध्ये, विचार करावे व शोध घ्यावे असे
काहीतरी सापडले ते म्हणजे पाषाणावर खोदलेले / रेखाटलेले चक्रव्यूह पाहताना,
अगदी असेच नसले तरी त्याच्याशी मिळते जुळते काहीतरी मी पाहीले होते, पण
कोठे हे काही केल्या आठवत नव्हते, मग त्याचा शोध घेणे चालू केले, जुन्या
ट्रिपचे फोटो पाहिले, नेटवर शोधले पण काहीच हाती पडेना पण तोच काहीतरी
शोधताना काहीतरी सापडावे असे घडले, एक चित्र मला सोनालीने दाखवले व नंतर
तेथेच शोध घेतल्यावर जे दिसले ते अद्वितीय होते, हैलेबिडु येथे असलेल्या
पुरातन मंदिराचे फोटो कोणीतरी पिकासावर अपलोड केले होते. फोटो पाहिले थोडी
शोधा शोध घेतल्यावर समजले येथून (बेंगलोर पासून) जवळ नसले तरी लांब देखील
जास्त नाही हे स्थळ.
माझ्या सारखाच अजुन एक वेडा, माझ्या ऑफिसमध्येच आहे, पण कामामुळे आम्ही दोघे एकत्र भटकायला बाहेर पडू शकत, पण सगळे योग जूळून आले व अचानक शनिवारी पहाटे या प्रवासाला निघायचे असे ठरले सुद्धा. त्यांने नवीन बाईक घेतली आहे, बजाज अव्हेंजर. व त्याच प्रकारची माझी बाईक होती यामाहा एनटायसर, त्यामुळे लांबच्या बाईक प्रवासाचा अनुभव कामी आला. सकाळी ६ वाजता आम्ही बेंगलोरू मधून बाहेर पडलो. जास्त काही त्रास न घेणे हा एकमेव उद्देश ठेऊन बाईकचे स्पिड फिक्स ६० किमी / तास असे आम्ही दोघांनी ठरवले व पुर्ण प्रवास त्याच वेगाने केला. (जीवनात पहिल्यांदा कुठल्यातरी गोष्टीवर सुरवाती पासून शेवट पर्यंत कंट्रोल ठेवला)
प्रवासाला निघताना आम्हाला कल्पना नव्हती की आपण काय पाहणार आहोत व त्याचे महत्त्व काय. १००० वर्षापेक्षा जास्त काळात देखील, आसमानी व सुलतानी कहर झेलून दिमाखाने उभे असलेल्या व भारताच्या स्थापत्यकलेचा उज्ज्वल इतिहास संभाळून ठेवणार्या ३ भव्य व दिव्य अश्या स्थळांचे दर्शन आम्ही अचानक घेऊ, हे ध्यानीमनी देखील नव्हते पण सर्व अचानक ठरत गेले व प्रवास सूरू झाला..
स्थळ : हैलेबिडु
जिल्हा : ह्सन, कर्नाटक
कसे जावे : बाईक वरून २४० कि.मी. बेंगलोरू हून. जवळचे रेल्वे स्टेशन हसन व एअरपोर्ट बेंगलोरू.

द्वारसमुद्र, होयसाळ / होयसाल साम्राज्याची राजधानी. ईस्वीसन १००० ते १४०० हा काळ त्या साम्राज्याचा सुवर्णकाल होता. या काळामध्ये वेगवेगळ्या मंदिरांची व अनेक वास्तुशिल्पांचे निर्माण सातत्याने होत राहिले. पृथ्वीवरील स्वर्गाची निर्मिती केले होयसाळ / होयसाल सामाज्याने. द्वारसमुद्र व बेल्लूर यांना पृथ्वीवरचा स्वर्ग असे म्हणले जात असे. पुर्ण दख्खन (कर्नाटक) व तामिळनाडूवर होयसाल साम्राज्य पसरले होते.
ई.स. १००० च्या आधी त्या व आजूबाजूच्या सर्व प्रदेशावर जैन धर्माचा प्रचंड प्रभाव होता, तो प्रभाव मोडून काढून पुन्हा हिंदू साम्राज्य उभे करण्याचे श्रेय या होयसाळ / होयसाल राजांना जाते, त्यांनी त्या भागावरील जैन धर्माचा प्रभाव जवळजवळ पुर्ण नष्ट केला व आपल्या अद्भुत व देखण्या होयसाल स्थापत्य कलेतून अनेक मंदिरे उभी केली, जुळी मंदिरे या प्रकार देखील त्यांनी सुरू केला ( याची माहिती पुढे येईल). द्वारसमुद्र मध्ये असलेली व होयसाळ / होयसाल राजांनी निर्माण केलेली ही मंदिरे प्रामुख्याने शिव मंदिरे आहेत.

मलिक काफुर व मोहंम्मद बीन तुगलक, यांनी या साम्राज्यावर आक्रमण केले, सर्वात आधी दिल्ली सुलतानाच्या आदेशाने मलिक काफुर ने १३११-१३१५ च्या आसपास होयसाळ / होयसाल सम्राजावर आक्रमण केले व शेकडो उंटावरून, सोने व दागिने या साम्राजातून घेऊन गेला पण जाताना त्याने द्वारसमुद्र जवळ जवळ नष्ट केले, मंदिरे पाडली, मुर्त्या नष्ट केल्या व शहर ध्वस्त केले. यानंतर काहीच वर्षानंतर मोहंम्मद बीन तुगलक ने आक्रमण केले व राहिलेले सर्व लुटून नेले व द्वारसमुद्र पूर्णतः: नष्ट केले, त्याच्या तावडीतून काहीच मंदिरे शिल्लक राहिली ती देखील भग्न अवस्थेत.
पृथ्वीवरील स्वर्ग असणारे नगर, मातीत मिळाले, व त्याला नवीन नाव मिळाले हैलेबिडु म्हणजे जुनी राजधानी, एक नष्ट शहर.
३५० ते ४०० वर्ष होयसाळ / होयसाल राजांनी एका मोठ्या भूखंडावर राज्य केले. हे प्रामुख्याने शिव भक्त. यांच्या राज्याचं चिन्ह होते सिंह व योद्धा, त्याकाळी ज्ञात व वापरात असलेल्या तिन्ही लिपी मध्ये त्यांनी अनेक शिलालेख निर्माण केले ज्यामध्ये, तामिळ (जूनी), कन्नड व तसेच मोडी भाषेत. मंदिरामध्ये, विजय / धर्म स्तंभावर तसेच रेखीव संगमरवरी पाषाणावर यांनी विपुल लेखन केले, ज्यामध्ये विजय कथा, साम्राज्यात झालेले फेरबदल, पुराण कथा, देव स्तुती इत्यादी चा समावेश आहे. मंदिर निर्माण साठी त्यांनी स्थानिक पिवळसर दगड (प्रस्तर ?) व पाया व मूर्ती निर्माण साठी काळ्या पाषाणाचा वापर प्रामुख्याने केला.
आता त्या काळात उपलब्ध असलेली दोन मंदिरे शिल्लक व सुस्थितीत आहेत. हैलेबिडु व बेल्लूर. १२ किलोमीटरच्या अंतरावर वसलेल्या दोन प्राचीन शहरातील राहिलेले वैभव. तसे पाहता होयसाळ / होयसाल राजांनी आपल्या साम्राज्यात १५० च्या वर मंदिर निर्माण केलीत पण उल्लेखनीय व स्थापत्य कलेचा नमुना म्हणून हैलेबिडु व बेल्लूर हे महत्त्वाचे आहेत. मंदिरांची वैशिष्ट्य पुर्ण रचना व मांडणी वेगळ्या पद्घतीने केली गेली आहे. तीन द्वार असलेली व एकाच मंदिरात दोन गाभारे असलेल्या जुळ्या मंदिराची संकल्पना येथे राबवली गेली आहे. सर्वात प्रथम आपण हैलेबिडू मंदिर व त्याची रचना पाहू.

हैलेबिडु, असे नाव वापरण्यापेक्षा मी त्या शहराचे प्राचीन नाव पुढे वापरणार आहे जेणेकरून एका वैभवशाली शहराचे नाव आपल्या स्मृतीत कोरले जावे व आपल्या समृद्ध अश्या इतिहासामध्ये एक द्वारसमुद्र नावाचे नगर देखील होते ज्या नगराने देशाला व त्यावेळच्या समाज व्यवस्थेला एक नवीन प्रकारच्या स्थापत्य पद्धतीची, कलेची ओळख जगाला करून दिली याचा विसर पडू नये म्हणून.
तर,
द्वारसमुदचे मंदिर : एका तलावाच्या काठी उभारले गेलेले हे व पुर्ण पाषाणामध्ये निर्माण केले गेलेले हे मंदिर व त्याचे नाव आहे होयसळायेश्वर / होयसलायेश्वर मंदिर. राजघराण्यांचे प्रमुख मंदिर त्या राजघराण्याच्या नावानेच आजही ओळखले जाते. या मंदिराची ४-५ एकर परिसरामध्ये एक मुख्य जुळे मंदिर व आजूबाजूला सलग्न पण भारदस्त अशी ४-५ मंदिरे, समोर नंदी मंडप व (गर्भगृहाच्या समोर) विस्तृत तळे. अशी संरचना होती. आक्रमणानिमित्त प्रमुख मंदिर राहिले व बाकीची सलग्न मंदिरे काळाच्या ओघात नष्ट झाली / केली केली. आता द्वारसमुद्र मध्ये फक्त होयसलायेश्वर मंदिर आहे, पण ते भव्य व दिव्य आहे.

प्रवेशद्वारातून पाहिल्यावर अनेकांना तामिळनाडू मधील महाबलीपुरम (तामिळनाडू, ५०-६० किमी, चेन्नई पासून) मंदिराची आठवण झाली नाही तर नवलच. पण जसे जसे जवळ जाऊ तसा तसा फरक समोर स्पष्ट होत जातात. महाबलीपुरम विषयी नंतर कधीतरी लिहतो. तर होयसलायेश्वर मंदिर हे तीन टप्पात आहे. नजरेत भरतो तो पहिला भाग दर्शनी मंदिराचा. जसे जसे तुम्ही जवळ जाता तसे मंदिर निर्माण करताना वापरलेली कल्पकता समोर येत जाते. ५-६ फुटाच्या मंदिराचा पाया, पूर्णतः इंटर-लॉकिंग सिस्टम ( मराठी शब्द ? ) वापरलेला. जर हे मंदिर वरून पाहिले तर त्यांची रचना स्टार (चांदणी) सारखी आहे.

दुसरा टप्पा, बारा प्रकारचे लेअर (विभाग) असलेल्या भिंती. वेगवेगळ्या प्रकारे भिंती शिल्पे व नक्षी काम केलेले व अनेक पुराण कथा यांचे चित्रण याचा संगम म्हणजे मंदिराचे बाह्य रूप. सर्वात खालील विभागात, गज शक्तीचे प्रदर्शन, नंतर राज्य चिन्ह असलेल्या सिंहाचे व त्यांनंतर वेगळ वेगळ्या आपात्कालीन पद्घतीने नक्षी काम. त्याच्या वरच्या विभागात यक्ष, किन्नर, वाद्य वाजवणारे, नृत्यात मग्न असे नर्तकी व नर्तक यांची दर्शन. १० इंचाच्या आसपास उंची असलेल्या या विभागात, इतक्या बारकाईने कोरीव काम केले आहे की पाहताना दंग व्हावे व समोर पहात असलेले दृष्य आपल्या नजरे समोर घडत आहे असलेले नृत्य असावे असे भासते, अनेक छोट्या छोट्या गोष्टी, नर्तकीच्या पायातील पैंजण, ती च्या गळ्यातील दागिने व डोळे. कलेतून एखादं दृष्य जिवंत होते कसे या प्रश्नाचे उत्तर येथे मिळते.

नंतरच्या सातव्या व आठव्या विभागामध्ये (लेअर) पुरातन कथा रेखाटलेल्या आहेत, ज्यामध्ये रामायण व महाभारत प्रामुख्याने आहेत. कर्ण वध, अभिमन्यू वध, युद्ध रचना, आयुधे, रथ यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तसेच कृष्ण अवतारातील अनेक कथा येथे दिसतात, बाललीला कालिया मर्दन इत्यादी. प्रत्येक विभागाचे वैशिष्टे अधोरेखित करण्यामागचे कारण हे की त्यांनी जेव्हा मंदिर निर्माण सुरू केले तेव्हा त्यांना काय तयार करायचे आहे, याची स्पष्ट कल्पना होती, रामायणामध्ये महाभारत घुसत नाही अथवा महाभारतात इतर कथा. प्रमुख व महत्त्वपूर्ण कथा व त्यातील पात्र त्यांनी आधीच ठरवले होते, हे पाहताना लक्ष्यात येते. येथे काही गोष्टींचा संदर्भ तुम्हाला जोडावा लागतो, व ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्हाला त्या कथा पुर्ण माहिती असतील अथवा तो पार्ट, त्या कथेतील तो भाग स्पष्टपणे तुम्हाला समजला असेल. याच लेअर (विभागामध्ये ) ज्या चित्रा पासून हा प्रवास चालू झाला ते मला मिळाले. येथे तुम्हाला रावण कैलाश पर्वत उचलताना, कृष्ण - अर्जून अभिमन्यू च्या वधानंतर चर्चा करत असलेले, अर्जून व कर्णाचे भयंकर युध्द त्यांची अस्त्रे, शंकराचा दरबार, शंकराचे नटराज स्वरूप इत्यादी अनेक कथा पहावयास मिळतात.

चक्रव्यूह
ज्या चित्रा पासून हा प्रवास चालू झाला ते चित्र येथे देत आहे. हा फोटो टिम गोवा यांच्या लेखातील आहे.
हा सात लेयर मध्ये (विभागामध्ये) असलेल्या चक्रव्युहाचा नकाशा आहे. (९९.९% मला असे वाटते)
महाभारतातील प्रमुख घटना मधील ही एक घटना तेथे सचित्र कोरलेली आहे व तेथेच अश्याच पद्धतीचे एक भित्तीचित्र मला दिसले. व्युह रचना व त्याचा आकार. आधी मला गोव्यातील ते चित्र म्हणजे शक्यतो सुर्य घड्याळ असावे की काय असे वाटले होते व तसेच मी कोठेतरी पाहिले आहे असे वाटत होते, पण हे भित्तीचित्र पाहिल्यावर लक्ष्यात आले की नाही, हा चक्रव्यूह आहे व हा आपण उत्तर भारतात फिरताना, काही वाचन करताना पाहिलेले आहे.
यानंतरचा लेअर (विभाग) हा नक्षीकामाचा आहे व त्यानंतर मुख्य लेअर (विभाग) येतो तो भित्तीशिल्प याचा.
मी येथे व वरील लेखनामध्ये दोन वेगळे शब्द वापरले आहेत, भित्तीचित्रे व
भित्तीशिल्प. दोन्ही प्रकारे दगडामध्ये कोरून कला प्रदर्शन केले जाते पण,
दोन्ही मध्ये सौम्य असा फरक आहे, भित्तीशिल्प पुर्ण कोरीव व हाव-भावसह तसेच
पूर्णाकृती मूर्ती / मूर्तींची रांग असते, तर भित्तीचित्रे मध्ये कथेला
प्राधान्य असते मूर्तीच्या दिसण्यावर नाही (हा फरक मला वाटतो, याचे कुठलेही
शास्त्रीय कारण माझ्याकडे नाही आहे).

तर,
मुख्य लेअर (विभाग) मध्ये ३-४ फुट उंचीचे भित्तीशिल्प आहेत, ज्यामध्ये
विष्णूची अनेक रूपे, अवतार, ब्रम्ह स्वरूप, शिव स्वरूप गणेश मूर्ती व इतर
देवदेवता इत्यादी यांचे दर्शन घडते, येथे एक गोष्ट नोंद घेण्यासारखं आहे,
मंदिर हे शिव मंदिर आहे, राजे हे शिव उपासक होते, पण त्यांच्या कलेमध्ये,
आवडीमध्ये, फक्त शिव हा अट्टहास नाही आहे, विष्णू व शिव वाद ( जो उत्तर
भारतात होता, आहे.) दिसत नाही, ज्या होयसाळ / होयसाल राज्यांनी जैन धर्माची
पाळेमुळे खणून काढली दक्षिण भारतातून ( सध्या यांनीच की इतर कोणी याचे
उत्तर नाही, कारण याच्या राजधानी पासून म्हणजेच द्वारसमुद्र पासून ९०-१००
किमी दुरवर असलेले प्राचीन जैन धार्मिक स्थळ / पुरातन स्थळ जसेच्या तसे उभे
आहे, त्यामुळे थोडा गोंधळ होतो आहे.) त्यांनी निर्माण केलेल्या मंदिराच्या
भित्तीचित्रे / शिल्पा वर जैन तीर्थंकर देखील दिसतात. एक तर त्यांचा
सर्वधर्म समावेशक असा विचार असावा अथवा एखाद्या धर्माचे, पंथाचे मन दुखावणे
म्हणजे राजकारण हे कारण असावे.

मुख्य लेअर (विभाग) मध्ये विष्णूचा मक्ता जास्त उठावदार दिसतो, अनेक शिल्पे त्याच्या अवताराची आहेत, वराह अवतारापासून, नरसिंह अवतार व राम अवतार सगळेच तेथे दिसतात, बम्हास्वरूप देखील तेथे कोरलेले आहे त्याच बरोबर अजुन एक जाणवलेली गोष्ट म्हणजे जी मी इतर भारता अनेक मंदिरे फिरलो पण दुर्गा अवतार /काली अवतार बिंतीशिल्पे मंदिरावर कधी पाहिलेले आठवत नाही, गळ्यात मुंडमाला पासून पायाखाली लोळलेला राक्षस अश्या प्रकारच्या ३-४ शिल्पे तेथे आहेत.
याच लेअर मध्ये, गणेश मुर्ती देखील आहे, पण त्याला प्रमुख द्वारा वर स्थान नाही मिळालेले आहे, पण गणेश मूर्ती ही ब्रह्मा, विष्णू व महेश (शिव) याच्या बरोबरीने तेथे दिसते तसेच, इतर कुठल्या देवाची नाही पण एक ८-९ फुटी उंच गणेश मूर्ती त्याच प्रांगणातून मिळाली होती जी आधी प्रवेशद्वारासमोर होती. अतिशय रेखीव एका पाषाणातून घडवली गेलेली ही मूर्ती खरंच खूप सुंदर आहे. विष्णूच्या नरसिंह अवताराचा देखील येथे बोलबाला आहे, नरसिंह शिल्पे तर आहेतच, पण नरसिंह स्तंभ व नरसिंह कथा असलेला शिलालेख देखील येथे आहे, शक्यतो याचे कारण साम्राज्याचे प्रमुख चिन्ह सिंह हे होते. अनेक जागी सिंहाची शिल्पे कोरलेली आहेत.

सर्व जग डावीकडून उजवीकडे असे भटकते, पण आम्ही मुद्दाम उजवीकडून सुरूवात केली होती, कारण तेथे असलेली गर्दी टाळता यावी व योगायोगाने अनेकवेळा केलेला हा प्रयोग पुन्हा यशस्वी ठरला व मंदिर मनसोक्तपणे हवा तेवढा वेळ बाहेरून पाहता आले. मंदिराला तीन प्रवेशद्वार आहेत, एक मुख्य प्रवेशद्वार व दोन उजवी व डावीकडून प्रवेशद्वार. जे प्रमुख द्वार आहे त्यातून राजघराण्यातील मंडळींना प्रवेश, उजवीकडच्या प्रवेशद्वारातून मंत्री अथवा राजघराण्या समकक्ष लोकांचे प्रवेश द्वार, व डावीकडील प्रवेशद्वार सर्व सामान्य जनतेसाठी होते. उजवी व डावी बाजू पाहिली तर दोन्ही मध्ये कणमात्र फरक करता येत नाही, दोन्ही बाजूची जडण-घडण एकाच पद्घतीने व प्रकाराने केलेली आहे, द्वारपालाच्या मूर्ती पासून चौकटीवर असलेल्या चिन्हापर्यंत सर्व काही एक सारखे. पण राज घराणे ज्या द्वारातून प्रवेश करत असे, त्याची योजना वेगळी व खास पद्घतीने केली आहे.

प्रवेशद्वारापासून काही फुट अंतरावर मंडप आहे, ज्या मंडपात भला मोठा नंदी आहे, भारतात जे अखंड शिळेतून तयार केलेले नंदी आहेत, व जे मी पाहिले आहेत त्यात सर्वात रेखीव असा हा नंदी आहे, तसेच हा भारतातील ४ अथवा पाचव्या क्रमांकाचा सर्वात उंच नंदी आहे. नंदीद्वारापासून प्रवेश केल्यावर समोर मंदिराचे प्रवेशद्वार व आता एक मंडप व त्याच्या समोर गाभारा आहे. मुख्य मंदिरात ५ फुटी उंच व जवळ जवळ ८-९ फुटी रुंदीचे शिवलिंग आहे ( आकार अंदाजे) वर मी लिहिल्याप्रमाणे हे जुळे मंदिर आहे, एकाबाजूला शिवलिंग व एका बाजूला मुर्ती असलेला गाभारा. असे दोन गाभारे आहेत. दोन्ही गाभार्या समोर नंदी आहे, व त्याच्या साठी पाषाण मंडप आहे, जुळे मंदिर हा शब्द देखील याच कारणामुळे वापरला जातो.

हे मंदिराचे पुरावे व शिलालेख सापडले आहेत, त्यात एका भल्यामोठ्या सुर्यनारायणाच्या मुर्तीचा उल्लेख येतो, ज्यात सुर्य नारायण त्यांच्या सात अश्व जोडलेल्या रथातून येत आहेत असे रेखाटले होते, पण ती मुर्ती हरवलेली आहे, त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. ही पश्चिम मुख मूर्ती नंदी मूर्तीच्या बरोबर मागे म्हणजे पूर्वेकडे स्थापन केलेली होती आतील मंडपातील प्रत्येक खांब वेगवेगळ्या कथा सांगतो, जसे नरसिंह कथा, महाभारत कथा. छतावर अत्यंत रेखीव सुबक असे नक्षी काम केले आहे. भिंतीवर कन्नड/तामिळ मध्ये शिलालेख कोरलेले आहेत, वर लिहिल्याप्रमाणे एका गाभार्यात शिवलिंग आहे व दुसर्या गाभार्यात मुर्ती.

क्रमशः
आता अगदी थोडक्यात लिहिते. http://www.misalpav.com/node/17609 या आमच्या लेखात जो चक्रव्युह नाव दिलेला आकार आहे, त्या शिल्पाकृतींचा काळ साधारण नव अश्म युग असा निश्चित केला गेला आहे. म्हणजे आजपासून किमान ७ ते १२ हजार वर्षांपूर्वी कधीतरी. तिथल्या इतर आकृत्या या अगदी प्राथमिक स्वरुपातल्या शिकारी, प्राणी इ च्या आहेत. महाभारताचा काळ हा खूपच सुसंस्कृत लोकांचा झाला. या शिल्पांमधे अशा प्रगत संस्कृतीच्या कोणत्याही खुणा नाहीत. हा विशिष्ट आकार अन्यत्र खूप ठिकाणी सापडला आहे. लेबिरिंथ बद्दल मी तुम्हाला सांगावं असं काही नाही! पण आईच्या गर्भातील बाळ किंवा असा काही संदर्भ इतिहासपूर्व काळापासून या आकाराला लावला गेला असावा.
महाभारताचा काळ हा साधारण ५००० वर्षांपूर्वीचा असा आतापर्यंतचा समज होता. अर्थात या दोन्हीच्या काळाबद्दल नवीन संशोधन होतं तसे बदल होत आहेतच पण इतक्या प्राथमिक स्वरूपातील प्रस्तर शिल्पे, आकृत्या माहाभारत काळापूर्वीची आहेत यात काही संशय नाही. आपल्याकडे अनेक ठिकाणच्या शिल्पांना, देवळांना पांडवांनी तयार केली अशा कथा लोकांनी चिकटवल्या आहेत. तसाच प्रकार होऊन या आकृतीला चक्रव्युहाचे नाव दिले गेले असावे किंवा या आकृतीचा उपयोग करून नंतरच्या काळात चक्रव्युहाची कल्पना उदयाला आली असावी.
मी
जिथवर इतिहास वाचलाय त्यावरून सांगतो, राष्ट्रकूट, चालुक्य, त्यांच्याच
भावकीतले सोळंकी हे आपल्याला वाटतात त्या अर्थाने "शक्तीशाली","साम्राज्ये"
वगैरे नव्हती. तुम्हाला जो एकछत्री अंमल अपेक्षित आहे तो मौर्य व गुप्त
ह्यांच्या काळात होता. अगदि हर्षवर्धनाच्या काळातही "बलाढ्य केंद्र"सत्ता
अशी नव्हती. दक्षिण भारतातही नाही अन् उत्तर भारतात तर अजिबातच
नाही.(तिक्डे प्रामुख्याने काही चांद्रवंशीय व सूर्यवंशीय त्यातही राजपूत
घराण्यांची असंख्य राज्यांची greater rajputanaची कल्पना होती.)
It was like a loose confederate.The same way it existed in mid to late 18th century of Maratha confederate.
राज्यांचा संघ्,मांडलिक राजे,स्थानिक वतनदार अशी ती शृंखला होती.
आता हे वरच काहीच समजलं नाही अस्सं म्हणत असाल तर वेगळ्या शब्दात लिहितोय.
चंद्रगुप्त मौर्यानं सत्तेवर आल्याआल्या काय केलं? मुळात नंद राजघराण्यानं
आधीच सोळा महाजनपदांपैकी* काही घराणी घशात घालून मोठे "मगध राज्य" बनवले
होते. त्यांनी आधीच्या राज्यक्र्त्यांचा समूळ बिमोड केला. आधीच्या
राज्यक्र्त्यांचा वंश संपवला किंवा परागंदा व्हायला भाग पाडले.(मग ते पुढे
दूरच्या भाअगात जाउन शेती-वाडी, व्यापार-उदीम अशी सामान्य जनांसारखीच कामे
करत.) हे नंदांचं राज्य त्यानं takeover केलं.
नंतर आसपासची गणराज्ये(घराणेविहीन) काही जिंकून व काही तहाने जोडली. इतर
"राजां"ची राज्ये जिंकली, राजांना बंदी बनवले किम्वा मारून टाकले किंवा
सत्ताभ्रष्ट तरी केलेच केले.(विशेषतः घुसलेल्या ग्रीक क्षत्रपांना)
म्हणजे, आजच्या बिहार पासून ते उत्तरेला पेशावर्,मुल्तान पर्यंत एकच राज्घराणे शिल्लक राहिले :- मौर्य.
सगली सत्ता केंद्राच्या,मगधाच्या हातात. ह्यांच्याअशी स्पर्धक होइल असे सर्वच दूर झालेले,संपलेले.
अगदि तद्वतच तुघलक-खिल्जी-काफूर ह्यांनी केले.जिथे जिथे जिंकले, तिथले राजवंश तत्काळ किम्वा काही कालाने थेट संपवलेच. ती घराणी पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी सत्तेवर आलीच नाहित.(उदा:- दिल्लीहून व अजमेरहून चौहान घराणे संपले ११९१ला, ते कायमचेच. १२९१ला देवगिरीचे यादव संपले, ते कायमचेच. शिल्लक राहिलेल्या यादव कुळाला देवगिरी सोडून जावे लागले, साम्राज्य तर बुडालेच.)
"अस्सय होय. मग असच चालुक्य भरभराटॅएच्या काळात असताना होय्सळ कसे
असतील? ह्यांच्यापैकी एकाने दुसर्याअला संपवले असेलच ना" हा विचार सहज
डोक्यात येतो. पण तसे नाही.
गुप्त काळानंतर, म्हणजे चौथ्या पाचव्या शतकानंतर भारतात एक्संध असे कुठलेच राज्य नव्हते. हे भारताचे शाब्दिक चित्र मी देतोय ते पहा.
आजच्या बांग्लादेश व बंगालात गौड घराण्याची सत्ता होती. पश्चिम बंगालमधील
पश्चिम भागातून निघालेल्या वर्धन घराण्याची सत्ता बर्अयच
मध्यभारतावर्(महाराष्टृआपर्यंतही) ,पूर्व भारतावर(ओरिसा वगैरे) होती.
पैठण हे राजधानीचे ठिकाण होते. दक्षिणेला आख्खा आंध्र व बराचसा
कर्नाटक्,महाराष्ट्र ह्यांच्या ताब्यत होता.पश्चिमेला हे गुजरातच्या काही
भागापर्यंत होते.(कोकण व नाणे घाट तर त्यात आलेच) . त्यानंतर केरळ व
तामिअळ्नाडू मधे अशी अनेक घराणी होती, त्यातली प्रमुख चार पांड्य,चोळ,चेरा
आणि पल्लव.
मग एकाच वेळी इतकी सगळी घराणी कशी?
कारण त्यांच्या सीमा कधीच स्थिर नसत. सतत आपसात युद्धे व चकमकी चालत. मात्र
कुणीही जिंकले तरी समोरच्या घराण्याचा समूळ विनाश कधीच होत नसे.फक्त तह
होइ. काही खंडाणी व मुलूख द्यावा लागे व विजेत्याचे मांडलिक बनून रहावे
लागे. म्हणजे हरल्यानंतरही तुम्ही "राजा" ही पदवी लावू शकता.
"महाराजाधिराज" ही पदवी विजेता लावणार. एक उदाहरण समजा :- पाड्यांनी
चोळांचा पराभव केला. तर चोळ संपले का? तर नाही.
चोळांनी फक्त आपल्या खजिन्यातला काही हिस्सा पांड्यांना द्यायचा आणि
पांडयंना म्हणत रहायचे "तुम्ही राजे,राजधिराजे" बाकी त्यांच्या स्वतःच्या
महसूलात्, जीवनशैलीत व एकूणच राज्यकारभारात काहीही ढवळाढवळ होनार नाही.
अगदि "जैसे थे" तशीच स्थिती राहिल!! मग होतं काय की ह्या मांडलिक चोळ
राजांपैकीच कुणीतरी एक पराक्रमी राजा निघतो २-३ शतकांनंतर व मग तो आपले
मालक पांड्याम्ना हरवून आपली स्वामित्व सिद्ध करतो.
मग आधीच्या मालकांना, पांड्यांना तो समूळ संपवतो का? तर अजिबात नाही.तोही
आधीसारखेच त्याम्ना मांडलिक बनवून सोडून देतो. पुन्हा अजून दीड्-दोन शतकात
चाके पुन्हा उलटी होतात व पुन्हा पांड्य मालक!
तर स्थिती अशी होती.
म्हणजे मांडलिक राजा असला तरी त्याच्या राजय्चा तो भरभराटीचा काळ असू
शकतो(कला-स्थापत्त्य वगैरे किंवा एकूणच administration. भलेही सैनिकी
सामर्थ्य फार नसेल.)
सांगायचे म्हणजे, होयसळ हे त्याकालात चालुक्य किंवा राष्ट्रकूट ह्याम्चे
मांडलिक असले, तरी त्यांची राजधानी हळेबीडच होती. तिला कुणी मुलापासून
नष्ट्-भ्रष्ट करत नसे. युद्ध म्हणजे तात्कालिक आर्थिक हानी.बस्स. एकदा हे
ध्यानात घेतलं की मग स्वाभाविक लक्षात येतं की त्या चालुक्य्-अधिपत्याच्या
काळातच मंदिराची बांधणी होत रहाणे शक्य आहे. चालुक्यांचे अंकित असतानाच
त्यांनी इतर राजांचा पराबह्व करत स्वतःचा विस्तार केला असणे शक्य आहे.
आपण शालेय इतिहासात त्यामुळेच वाचले असेल "राष्ट्रकूटांनी चालुक्यांचा पराभव केला आणि चालुक्यांना उतरती कळा लागली" आणि २-३ शतकानी ह्याच्याच उलट "चालुक्यांनी राष्ट्रकूटांचा पराभव केला आणि राष्ट्रकूटांना उतरती कळा लागली" म्हणजेच, इतकी युद्धे होउन संपले कुणीच नाही. एकाच वेळी दोघेही कार्यरत राहू शकतात.
ह्याचे समांतर उदाहरण म्हणजे कित्येक राजपूत घराणी (मेवाड सोडून) असे
मानतात की १५२७ ते ब्रिटिशकालादरम्यानचा काळ (मुघलांनी अंकित केलेला) हा
त्यांचा वैभवशाली काळ होता!!!
उत्तमोत्तम स्थापत्यरचाना(खजानाबावडी वगरे सरख्या सुंदर विहीरी), भव्य -देखणे महाल हे राजपुतांनी मुघलांचे अंकित असतानाच बांधलेत.
अजून एक मुद्द काल निश्चितीचा व घराणी जे दावे करतात त्यांच्या सत्यतेचा येतो. बर्याचदा पुलकेशी व हर्षवर्धन किंवा हर्षवर्धन व बंगालचा गौडाधीप शशांक एकाच इलाख्यावर आपली सत्ता आहे असे साम्गतात्,दाखवतात!
तुम्ही म्हणता ते सत्य धरूनही सांगायचे म्हणजे धागाकर्ते सांगतात तो काळ बरोबर असण्याची भारपूर शक्यता आहे.
*सोळा महाजनपदे म्हणजे श्रावस्ती,कुशावती, कोसल्,वृज्जी,शाक्य,उज्जैन,काशी इत्यादी.
मागील भागात आपण होयसाळ / होयसाल साम्राजाची राजधानी द्वारसमुद्र (हैलेबिडु) बद्दल माहिती व छायाचित्रे पाहिली आता त्रिकोणातील २रा कोन. बेल्लुर.
मंदिराचे प्रवेशद्वार
द्वारसमुद्र पासून १२-१३ किलोमीटर बेल्लुर वसलेले आहे, एकेकाळी ही जुळी शहरे संपन्न व पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून समजली जात. राजाचा वरदहस्त व राजकोष मुक्त हस्ताने वितरीत करण्याची उदारता यामुळे अनेक कलांचा प्रसार होयसाळ साम्राज्यात झाला. अत्यंत भरभराटीच्या काळात बेल्लुर व द्वारसमुद्र मध्ये शेकडो मंदिरांची उभारणी केली गेली, शिल्पकलेला राजमान्यता होतीच पण त्याच्या सौंदर्यामुळे जनमान्यता देखील लवकरच मिळत गेली.
अर्जून
आताच्या काळात मुख्य मंदिरे व वस्तूसंग्रहातील अनेक शिलालेख, मुर्ती व त्या काळातील संपन्नतेचे पुरावे सोडले तर बेल्लुर / द्वारसमुद्र फक्त एका साम्राज्याच्या काही अंश शिल्लक राहिले आहेत. भारतीय पुरातत्व विभागाने प्रचंड काम या दोन मंदिरावर केलेले आहे. एकेकाळी पुर्ण नष्ट व विद्रुप केलेली ही मंदिरे भारतीय पुरातत्व विभागाने जसेच्या तसे पुर्ण अभ्यास करून उभे केले व त्यामुळे आपल्याला होयसाळ साम्राज्याच्या काही खाणाखुणा स्वतःच्या डोळ्यानी पाहता येतात हे आपले भाग्य.
मुख्य मंदिर
बेल्लुर मंदिराची रचना दक्षीणेत प्रसिध्द असलेल्या शिल्प प्रकारात आहे म्हणजेच विमान प्रकारात. प्रशस्थ पटांगण, उत्तुंग असे प्रवेशद्वारावरील शिखर, मुख्य मंदिर व त्याला सलग्न अशी उजवी/डावी कडे तेवढीच भारदस्त मंदिरे. मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर नजरेत भरतात ते दोन स्तंभ. ३०-४० फुटी उचं व एका अखंड शिळेतून निर्माण केलेले हे स्तंभ कुठल्याही आधारावीना उभे आहेत. ( आपल्याकडील मंदिरात जसे दगडी दिपमाळ दिसते तसेच दक्षीणे कडील मंदिरामध्ये असे स्तंभ दिसतात, याचे धार्मिक कारण माहिती नाही आहे, पण एखाद्या मोठ्या विजयाची आठवण रहावी म्हणून असे मोठ मोठे स्तंभ त्याकाळात उभे केले जात व त्यावर राजाने मिळवलेल्या विजयाची गाथा लिहली जात असे) मंदिराच्या दोन्ही बाजूला धर्मशाळा सदृष्य तात्पुरती राहण्याची सोय ( हा प्रकार याच काळात सर्वमान्य झालेला दिसतो आहे, कारण अश्या प्रकारची सोय द्वारसमुद्रला होती असे शिलालेखाच्या माहिती वरून समजते तशीच सोय, श्रवणबेलगोळ, हंप्पी व दक्षिणेतील अनेक मंदिरात दिसते तसेच आपल्या जवळच्या महालक्ष्मी मंदिरात देखील त्या प्रकारची सोय होती पण कालांतराने त्या तात्पुरत्या निवार्याचे छोट्या छोट्या मंदिरात रुपांतर बडव्यांनी केले.)
स्तंभ
तात्पुरते निवास्थान
बेल्लुरची मंदिरे देखील द्वारसमुद्रामधील मंदिरासारखी शिल्पकलेचा खजीना आपल्या अंगावर घेऊन उभे आहेत. चन्नकेशवाचे (कृष्ण) मुख्य मंदिर व डाव्या बाजूला असलेले मंदिर बंद आहे तर उजव्या बाजूचे रंगनायकी मंदिर. गोलाकार व लेअर पध्दतीचे नक्षीकाम असलेले स्तंभ, प्रशस्थ असा पाषाण मंडप, त्यानंतर विषेश कक्ष व मग गाभारा अशी संरचना असलेली ही तिन्ही मंदिरे आतून व बाहेरून अत्यंत रेखीव व सुरेख अश्या शिल्पांनी मढवलेली आहेत. जगप्रसिध्द आरश्यात आपले रूप निहारणारी नर्तिका हे शिल्प देखील येथेच आहे तसेच गरूडेश्वराची पुर्णाकृती मुर्ती देखील येथील वैशिष्ट आहे. मंदिर परिसरामध्ये जलकुंड व ४ विहीरी आहेत त्यापैकी जलकुंड उपयोगी राहिलेले नाही आहेत तर चार पैकी २ विहीरी अजून ही वापरत येतात, देवाच्या अभिषेकाच्या वेळी तेथीलच पाणी वापरले जाते.
चबुतरा / मंडप ???
स्तंभ
मंदिराचे बाह्य स्वरूप
मंदिराच्या पटांगणामध्येच पुष्करणी पध्दतीने येथे एक उत्तर दिशेला थोडे छोटे असे कल्याणी नावाचे कुंड / चौकोण विहीर / तळे आहे. ११७५ मध्ये याचे निर्माण केले गेले, उत्तर व दक्षिण दिशेला असलेली दोन प्रवेशद्वारे आहेत व प्रवेशद्वार दोन्ही हत्तीचे सुरेख शिल्प व तेथून पुढे मध्यभागी निमुळती होत जाणार्या चौकोणी पायर्या अशी रचना आहे. वरून पाहताना या तळ्याची वैशिष्टपुर्ण बांधणी लक्ष्यात येते. काही शतकापुर्वी बेल्लुर हे धार्मिक स्थळ म्हणून पुन्हा प्रसिद्ध होऊ लागले होते व तेथे रथयात्रा व इतर धार्मिक उत्सव याचे प्रस्थ वाढले होते तीच पध्दत अजून ही सुरू आहे त्यामुळे आहोरात्र येथे भाविकांचे येणे जाणे सुरू असते त्यातूनच अस्वच्छता निर्माण होऊ लागली व एकेकाळी आपल्या गोड व रुचकर अश्या पाण्यासाठी प्रसिध्द असलेली कल्याणी शेवटी लोकांसाठी बंद करण्यात आली आता फक्त बाहेरून दर्शन घेता येते, कधी एकेकाळी निळसर असलेले वाहते पाणी आता हिरवेगार पडलेले आहे.
कल्याणी जलकुंड
जलकुंड
गरुडदेव
ज्या दिवशी आम्ही बेल्लुरला गेलो तो दिवस तेथील धार्मिक जत्रेचा होता व
रथयात्रेची सुरवात होण्याच्या वेळीच तेथे पोहचल्यामुळे हजारो लोकांच्या
गर्दीने आमचे स्वागत केले व गर्दीमध्ये मनसोक्तपणे फिरता येत नाही व हवे ते
पाहता येत नाही. त्यामुळे बेल्लुरचा प्रवास लवकर संपवून आम्ही आमच्या
प्रवासातील तिसरे टोक म्हणजेच श्रवणबेलगोळ च्या दिशेने वाटचाल चालू केली.
क्रमशः
मागील भागात आपण बेल्लुर पाहिले. आता म्हैसूरपासून ९०-९५ कि.मी. दूर असलेल्या विंध्यगिरी पर्वतावर जैनधर्मियांचे मोठे तिर्थक्षेत्र आहे श्रावणबेळगोळ. मराठी माणसाला श्रावणबेळगोळ व तेथील गोमटेश्वराची मुर्ती माहिती असण्याचे कारण म्हणजे त्या मुर्तीच्या पायथ्यावर मराठीमध्ये केलेले शिलालेखन. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांना ही माहिती सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचा मान जातो.


श्रावणबेळगोळचा ज्ञात इतिहास हा शकवर्ष 8०० ते ११०० च्या कालावधीतील आहे. गंग राजे राचमल्ल (४ थे) यांच्या कालावधीत शक्यतो शकवर्ष ९५० च्या पुढे-मागे या गोमटेश्वराच्या मुर्तीचे निर्माण केले गेले. ही मुर्ती ५७ फूट उंचीची आहे व ती एका अखंड पाषाणातून बनवली गेलेली आहे. श्री चामुंडराय हे गंग राजे राचमल्ल (४) यांचे सेनापती होते, त्यांनी या मुर्तीची स्थापना केली होती. गोम्मटराय हे श्रीचामुंडराय यांचेच नाव म्हणून या मुर्तीला गोमटेश्वर असे नाव पडले. मुळ मुर्ती ही बाहुबली यांची आहे ( बाहुबली = सम्राट भरतचा लहान भाऊ).


मुर्ती एवढी उंच असल्या कारणाने या मंदिराला फक्त तटबंदी आहे, छत नाही. तटबंदीच्या दोन्ही बाजूला सभापंडप, मुनींच्या राहण्याची व्यवस्था आहे. या पुर्ण विंध्यगिरी पर्वतावर अनेक शिलालेख आहे, व त्या शिलालेखांची पुर्णपणे नीट काळजी घेतली जात आहे.

सिध्दर बस्ती
मुख्यमुर्ती स्थानाच्या बाहेर असलेल्या सर्व पाषाणातून निर्माण केलेल्या
गृहांना/ मंडपांना सिध्दर बस्ती असे म्हटले जाते. ज्याचे निर्माण शकवर्ष
१७००-१८०० मध्ये केले गेले. या सर्वभागात अनेक शिलालेख असून त्यावर
मंदिरासंबधी माहिती, निर्माते व दानासंबधी उल्लेख केलेला आहे.


गुल्लेकायी - अज्जी मंडप
पांच गोलाकार स्तंभ, एक शिलालेख व एका अज्जीची साडी नेसलेली मुर्ती. असलेला
हा मंडप अनेक दंतकथेमुळे प्रसिध्द आहे, चामुंडराय यांचा घमंड तोडण्यासाठी
देवी पद्मावती तेथे अज्जीच्या रूपात गेली होती ही सर्वात प्रसिध्द दंतकथा
आहे. हा मंडप शकवर्ष १४०० च्या काळत उभारलेला असून याचे स्तंभ मात्र शकवर्ष
१२०० च्या काळातील आहेत.

विंध्यगिरी पर्वतावर त्रिकुट बस्ती (ओदेगल बस्ती) म्हणून एकमात्र त्रिमंदिर आहे. पुर्वीच्याकाळी तळघर बांधण्यासाठी कणाश्म शिला नावाच्या दगडाचा विषेशतः वापर केला जात असे त्याच दगडातून हे मंदिर उभारले गेले आहे. शकवर्ष १४०० च्या काळत उभारलेले हे गोलाकार स्तंभ असलेले मंदिर बाहेरून जरी साधे वाटले तरी विषेश दगडांच्या वापरामुळे व याच्या अतंर्गत रचनेमुळे विशिष्ठ ठरते. आता तीन गर्भगृह असून प्रत्येक गर्भगृहात स्तरितशिला (संगमरवर) चा वापरून करून अत्यंत सुरेख व रेखीव अश्या तीर्थंकरांच्या मुर्त्या आहेत.



त्यागदं स्तंभ
कलात्मक सौंदर्याचे अनुपम उदाहरण असलेला त्यागदं स्तंभाचे ऐतिहासिक
दृष्ट्यादेखील अनन्य साधारण महत्त्व आहे. एक छोटा मंडप व त्यामध्ये
मध्यभागी हा स्तंभ आहे. याचे निर्माण शकवर्ष ९५०-१००० मध्ये केले गेले असून
या वापर श्री चामुंडराय दान-धर्म करण्यासाठी करत (तेथे उभे राहून दे डोळे
बंद करून दान देत असत). व शेवटी शेवटी त्यांनी आपल्या सर्व संपत्तीचे दान
येथे उभे राहूनच केले व सन्यास घेतला. स्तंभावर लतावेली यांचे सुरेख रेखाटन
केले असून पुर्ण स्तंभ रेखीव आहे.

अगुंबे : दक्षिण भारताची ‘चेरापुंजी’
-संजय उपाध्ये
भारतात सर्वांत जास्त पाऊस मेघालय राज्यातील चेरापुंजी येथे पडतो. त्यानंतर देशात आणखी एक ठिकाण आहे, की जेथे चेरापुंजीच्या तोडीस तोड असा झिम्माड पाऊस कोसळतो. कर्नाटकाच्या शिमोगा जिल्ह्यातील अगुंबे (ता. तीर्थहळ्ळी) येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या पावसाची नोंद झाली आहे. येथे वर्षभरात सुमारे ८,००० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. कर्नाटकात पश्चिम घाटाचा (सह्याद्री पर्वतरांग) मोठा भाग येतो. बेळगाव, कारवार, धारवाड, उडुपी, शिमोगा, चिक्कमंगळूर, हासन, कोडगू या जिल्ह्यांतील काही भाग पश्चिम घाटात मोडतो. त्यापैकी ‘मलनाड’ भागात दरवर्षी मोठा पाऊस होतो. मलनाड (कन्नडमध्ये ‘पावसाचा प्रदेश’) भागातील घनदाट जंगलात डोंगररांगांवर चिमुकले अगुंबे गाव वसले आहे. अगुंबे गाव अत्यधिक पावसामुळे ‘दक्षिण भारताचे चेरापुंजी’, ‘कर्नाटकाची वर्षा राजधानी’, ‘कर्नाटकातील सर्वांत ओले ठिकाण’ अशा विशेषणांनीही ओळखले जाते.
महिन्यात साडेचार हजार मिलीमीटर पाऊस!
अगुंबे पश्चिम घाटाच्या पर्वतरांगेतील एक छोटे गाव आहे. शहरीकरणापासून गाव लांब असल्याने तेथे मर्यादितच सुविधा आहेत. अगुंबेची लोकसंख्या अवघी ५०० आहे तर गावाचे क्षेत्र केवळ तीन चौरस किलोमीटर आहे. समुद्रसपाटीपासून गाव ८२३ मीटर उंचीवर आहे. अगुंबे गावात फेब्रुवारीतही पाऊस पडल्याची नोंद आहे. सर्वांत कमी पावसाचा महिना फेब्रुवारी आहे तर सर्वांत जास्त पाऊस जुलैमध्ये होतो. जुलैमध्ये एका महिन्यात सरासरी २,६४७ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. तर वार्षिक सरासरी ७,६२० मिलीमीटर (३०० इंच) इतका पाऊस पडतोच. तर आतापर्यंत एका महिन्यात सरासरी ४,५०८ मिमी (१७७.५ इंच) इतका पाऊस झाल्याची ऑगस्ट १९४६ ची नोंद आहे. त्यातूनच येथे भारतातील पहिली स्वयंचलित वेधशाळा (ऑटोमॅटिक वेदर स्टेशन) उभारण्याचे श्रेय पर्यावरणप्रेमी रॉमलस व्हिटकर यांना जाते. हरित वर्षावन भागात अगुंबे वसले आहे. तसेच विषुववृत्तीय वातावरण, उष्ण आणि आर्द्रता असे हवामानही येथे असते. त्यामुळे घनदाट चंदेरी धुके नेहमी अगुंबेच्या परिसरात पाहायला मिळते. येथील अगुंबे घाटही प्रसिद्ध आहे. या घाटातही मॉन्सूनच्या काळात धुवाँधार पाऊस कोसळत असतो.
जागतिक वारसास्थळाचा मान
पश्चिम घाटाचा भाग असल्यामुळे अगुंबेला साहजिकच जागतिक वारसास्थळाचा सन्मान प्राप्त झाला आहे. अगुंबेच्या जवळच सोमेश्वर अभयारण्य तर कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान आहे. अगुंबेइतकाच झिम्माड पाऊस कर्नाटकात आणखी काही ठिकाणी पडतो. पश्चिम घाटातील अगुंबेजवळील हुलिकल्ल (जि. शिमोगा), आमगाव (जि. बेळगाव), तळकावेरी (जि. कोडगू), कोकळ्ळी, कॅसलरॉक, नीलकुंड (तीनही जि. कारवार) येथील पावसाची सरासरीही अगुंबेशी स्पर्धा करते. यापैकी बेळगाव जिल्ह्यातील आमगाव येथे २०१० ला तब्बल १०,०६८ मिलीमीटर इतक्या प्रचंड पावसाची नोंद झाली आहे आणि ही नोंद कर्नाटकाच्या आजवरच्या पावसाचा उच्चांक आहे. मंगळूरपासून ९८ किलोमीटर अंतरावर अगुंबे आहे, तर बंगळूरहून ३५७ किलोमीटर अंतर आहे. किनारपट्टीवरील उडुपी येथे जवळील रेल्वेस्थानक आहे. तर जवळील विमानतळ हे बाजपे (मंगळूर) येथे आहे. रस्ते, विमान आणि रेल्वेने अगुंबे जगाच्या इतर भागाशी जोडले गेले आहे. त्यामुळेच येथे पर्यटकांचा वर्षभर राबता असतो. त्यातूनही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे महिने अतिशय आल्हाददायक असतात. हिरवा निसर्ग, खळाळते नाले, धबधबे आणि रम्य हवामान यामुळे मन उल्हसित होऊन जाते.
पाऊस वाढतच चाललाय!
पश्चिम घाटातील मॉन्सून पावसाचे प्रमाण अनेक वर्षे जवळपास स्थिर होते; पण गेल्या काही वर्षांत तेथे पाऊस पडण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. गोल्बल वॉर्मिंग किंवा हरित वायूचा परिणाम येथेही दिसून येऊ लागला आहे. त्याचा फार मोठा परिणाम होत आहे, असे गेल्या तीन-चार वर्षांतील आकडेवारी सांगते. २०१६ मध्ये ६,१५१ मिलीमीटर पाऊस अगुंबे येथे झाला. २०१७ ला ६,२७६ मिलीमीटर तर २०१८ ला तब्बल ८,२०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वर्षाची सरासरी आता ७,६२४ मिलीमीटर इतकी झाली आहे. पण पावसाची वार्षिक सरासरी काढताना तब्बल ५० वर्षांतील पावसाच्या नोंदी घेतल्या जातात. त्यावरून लक्षात येते, की अगुंबे आणि कर्नाटकाच्या पश्चिम घाट प्रदेशातील पावसाचे प्रमाण वर्षागणिक वाढतच चालले आहे. त्यामुळे पूर, भूस्खलन, झाडांच्या मुळाखालील जमीन निघून जाणे, जंगलप्रदेश कमी होणे असे धोके दिसून येत आहेत.
धबधबे, सूर्यास्त, ट्रेकिंग
अगुंबेतील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. शेतकरी भात आणि सुपारी ही पिके घेतात. सगळा जंगलप्रदेश असल्यामुळे शेती यथातथाच असते. त्यामुळे तेथील शेतकरी गरीबच आहे. रक्षा कवच व्हिवर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीने तेथील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कुटिरोद्योग सुरू केले आहेत. अगुंबेच्या परिसरात कुंडद्री, कोडचाद्री हिल्स, उडुपी, कारकळ, कोळ्ळुरु, श्रींगेरी, चिक्कमंगळूर, शिमोगा, भद्रावती, एन. आर. पुरा, होसनगर आणि तीर्थहळ्ळी ही पर्यटनस्थळे आहेत. याबरोबरच बरकाना, ओनके, जोगीगुंडी, कुडलूतीर्थ, सिरीमने हे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. सूर्यास्त पाहण्यासाठीही अगुंबे प्रसिद्ध आहे.
दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका पॉईंटवरून अरबी समुद्रात बुडणाऱ्या सूर्याचे अतिसुंदर दृश्य दिसते. खास हा सूर्यास्त पाहण्यासाठीच पर्यटक येथे येत असतात. अगुंबेची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. वर्षाजल संग्रह, औषधी वनस्पतींचे दस्तावेजीकरण, पर्यटन (ट्रेकिंग आणि फोटोग्राफी) तसेच कुटिरोद्योगासाठीही अगुंबे प्रसिद्ध आहे.
किंग कोब्राचे आश्रयस्थान
अगुंबे रेनफॉरेस्ट रिसर्च स्टेशनही येथे आहे. त्याशिवाय देशातील एकमेव असे नागराज अभयारण्यही (किंग कोब्रा सँक्चरी) येथे आहे. पश्चिम घाटातील पाऊस, हवामान, आर्द्रता आणि इतर पोषक वातावरण असल्याने नागराजाचे हे आश्रयस्थान बनले आहे. नागराजाचे अस्तित्व असल्यामुळे जंगल सशक्त आहे. अन्नसाखळीत नागराज अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे येथील जंगलाला सुदृढता लाभली आहे. त्यामुळे भारताचे महान सर्पतज्ज्ञ होमलस व्हिटकर यांनी येथे किंग कोब्रा अभयारण्य बनविण्यासाठी अतिशय मेहनत घेतली आहे. १९७१ ला त्यांनीच पहिला किंग कोब्रा येथेच पकडला होता. त्यातूनच आपल्या संस्कृतीत अतिशय महत्त्वाचे स्थान मिळालेल्या नागसर्पाला सुरक्षा मिळावी, त्याचे संवर्धन व्हावे तसेच त्याचा अभ्यासही होत राहावा, यासाठी या अभयारण्याचा उद्देश आहे.
पर्यावरणप्रेमी आणि सर्पतज्ज्ञ गौरीशंकर यांच्यासारखे इतर अनेक नागरिक येथील अभयारण्याशी संलग्न आहेत. गौरीशंकर यांनी आजपर्यंत नागरिकांच्या घरात घुसलेले तब्बल शंभरावर नागसर्प जवळच पण सुरक्षित ठिकाणी सोडले आहेत. तर दोनशेवर नागसर्पाची पिलेही सुरक्षित ठिकाणी पोचवली आहेत. नागसापांच्या या ठिकाणाला वाचविण्यासाठी वाहने शंभर मीटर दूरच थांबविली जातात. नागरिकही या ठिकाणाला जपतात. नागच नव्हे, तर येथे आढळणाऱ्या वानर, मोठी खार, पक्षी यांना इजा पोहचवत नाहीत. वारुळालाही धक्का लावत नाहीत. एकूणच तेथे नागसर्प, विविध पक्षी आणि माणूस यांचे सहजीवन पाहायला मिळते.
अगुंबेत गेल्या अकरा वर्षांत झालेल्या पावसाच्या नोंदी अशा : (सर्व आकडे मिलीमीटरमध्ये)
२०१०--६,९२९
२०११--७,९२१
२०१२--६,९३३
२०१३--८,७७०
२०१४--७,९१७
२०१५--५,५१८
२०१६--६,१५१
२०१७--६,२७६
२०१८--८,२०८
२०१९--७,६२०
२०२०--६,५८३
https://www.esakal.com/premium-article/know-all-about-agumbe-high-altitude-village-karnataka-heavy-rainfall-ass97
२ महिन्यापुर्वीच मैसूर - ऊटी ला जाउन आलो. तेव्हापसुन मनात होते की तिकडचे फोटु टाकावेत म्हणुन. पण मि पा वर इतकी उद्बोधक चर्चा चालु होती की उगा लोकांना डिस्टर्ब करावेसे वाटले नाही.
हा मैसूरचा प्रसिद्ध राजवाडा. ज्यानी राजस्थानमधले महाल पाहिले असतील त्यांना यात विशेष असे काही वाटणार नाही. पण राजवाडा छान जतन केलेला आहे. आणि इथली सर्वित्तम गोष्ट म्हणजे राजवाड्यातील तैलचित्रे. इतकी जिवंत तैलचित्रे मी आजवर इतर कोठेही पाहिलेली नाहीत. दुर्दैवाने आत कॅमेरा न्यायला बंदी आहे. त्यामुळे छायाचित्रण करता आले नाही. त्यामुळे राजवाड्याची फक्त बाहेरुनच छायाचित्रे काढुन समाधान मानावे लागले
वृंदावनचे पण फोटो टाकणार होतो पण का कोणास ठाऊक, २० वर्षांपुर्वी जे वृंदावन पाहिले होते ते हे नव्हेच असे वाटले. आता ती शान नाही उरली वृंदावनची. गणेशोत्सवात चिंचेच्या तालमीचे कारंजे पण त्याच तोडीचे असते. त्यामुळे असेल कदाचित पण काही विशेष नाही वाटले खरे.
वृंदावनने केलेली निराशा चक्क मैसूरचे प्राणिसंग्रहालय बघुन दुर झाली. आता झू बघुन खुष होण्याचे दिवस गेले खरे म्हणजे. माकड बघुन लहानपणी जे हसु यायचे ते पण येत नाही आता (मि पा ची कृपा. बरीच माकडे आहेत इथे. रोज आरसाही बघतो. त्याचाही परिणाम असेल कदाचित). पण मैसूर चा झू खरोखर अप्रतिम आहे. काही छायाचित्रे:
वरचा फोटो पुर्ण झूम लावुन काढलेला आहे. त्यामुळे क्लॅरिटी थोडी गंडली आहे.
वरच्या फोटोतला मिपाकर कोण हे ज्याचे त्याने ठरवावे ;)
लहानपणापसुन मैसूरचे सर्वात मोठे आकर्षण होते महिषासुराचा पुतळा. त्याचा हा पुतळा बघुन अंमळ थोडी निराशाच झाली. माझ्या कल्पनेतला हा पुतळा चांगला ५० -१०० फूट उंच आणि १०-१२ फूट रुंद होता. प्रत्यक्ष पुतळा बघुन पुतळ्याचा बोन्साय बघितल्यासारखा वाटला. माझ्या बरोबर असलेल्य मित्रांची पण थोड्याफार फरकाने अशीच निराशा झाली. तरी "तु अजुन थोडा जाड असला असतास तर असाच दिसला असतास" असे म्हणुन मित्राने त्यातल्या त्यात त्याचे मानसिक समाधान साधुन घेतलेच
हेच ते चामुंडा देवीचे सुप्रसिद्ध मंदीर
मैसूर मध्ये आमचे सर्वात जास्त निराशा केली मैसूर मसाला डोश्याने. मैसूर मसाला डोसा हवा असे म्हणालो की लोक आमच्याकडे फार विचित्र नजरेने पाहायचे. हा डोसा पुण्याच्या शेट्ट्यांनी चक्क मैसूरच्या नावावर खपवला आहे. शेवटी या डोश्यावर तडजोड केली. डोसा होता मात्र अप्रतिम
बाकी उटी भाग -२ मध्ये.
http://www.misalpav.com/node/13973
मैसूर भ्रमंती नंतर आम्ही गाडी करुन उटीला जायला निघालो. मैसूर - उटी हा अवघा ३ - ३.५ तासाचा रस्ता. पण संपुर्ण रस्ताभर मंजील से बेहतर लगने लगे ये रास्ते असेच वाटत राहते. वास्तविक आम्ही गेलो होतो जुलै मध्ये. त्यावेळेस पुण्यात पाउस सुरु झाला होता. पण मैसूर ते उटी या रस्त्यात आम्हाला पावसाचे टिपुस सुद्धा नाही दिसले. पण एकंदर वातावरण खुपच सुंदर होते. निम्म्याहुन आधिक रस्ता बांदिपुर आणि मदुमलाई अभयारण्यातुन जातो. कर्नाटक बाजुचे अभयारण्य बांदिपुर म्हणुन ओळखले जाते तर मदुमलाई तामिळ्नाडुच्या बाजुचे. एरवी हे एकच अभयारण्य. सकाळच्या वेळी रस्ता पुर्ण धुक्याच्या दुलईत वेढला गेलेला होता. ऊटीचे थंडी काय असेल त्याचा प्रत्यय एकदा अभयारण्यात शिरल्यावर यायला लागला. थंड वार्याचे झोत अंगावर यायला लागले तसे अधुनमधुन आम्ही काचा बंद करुन गाडीतील वातानुकुलन यंत्रणा चालु करायला सुरुवात केली. AC चे वारे थोडे कमी थंड होते. नंतर मात्र आम्ही हा नतद्रष्टपणा पुर्ण बंद केला. आणि निसर्गाचा आनंद पुर्ण अनुभवला. मैसूर ऊटी साठी AC गाडी उगाच केली असे मात्र नंतर संपुर्ण प्रवासभर राहुन राहुन वाटत होते.
बांदिपुर - मदुमलई ची ही छोटीशी झलकः
अभयारण्यातील रस्त्याने जाताना प्राणी चिक्कार दिसतात. तसे मैसूर च्या प्राणिसंग्रहालयात बरेच प्राणी बघितले होते. पण प्राणिसंग्रहालयातल्या प्राण्यांना पारतंत्र्याची एक विषण्ण झालर असते. निसर्गाच्या सान्निध्यातल्या या प्राण्यांना पाहिल्यावर जास्त प्रसन्न वाटते. कदाचित हे मनाचे खेळ पण असतील. पण तसे वाटते खरे. कदाचित त्यामुळेच प्राणिसंग्रहालयातील हत्ती रोडावल्यासारखे वाटतात. मात्र अभयारण्यातील हत्ती, अगदी हत्तीपालन केंद्रातील सुद्धा जास्त तजेलदार वाटले. या अभयारण्यात गाडीतुन खाली उतरायला आणि छायाचित्रण करायला मनाई आहे. आणि पकडल्यावर जबर दंड देखील होतो. आम्हाला हे माहिती नसल्यामुळे आणि आम्हाला महिती नाही हे वनरक्षकांना महिती नसल्यामुळे आम्ही थोडे फोटो काढुन घेतलेच
अभयारण्याच्या या दर्शनाने उटीपेक्षा इथेच कुठेतरी रहावे असे वाटायला लागले होते. तरीही नेटाने ऊटीला गेलोच. आणि मदुमलाईत रहायला नाही मिळाले याचे वाईट वाटले तरी उटीला गेल्याचा पश्चाताप मात्र नाही झाला इतके उटीदेखील सुंदर आहे. उटीला स्थानिक भाषेत उटकमंड असेही नाव आहे. पण कुठेही गेलो तरी पर्यटकांना उटी असेच म्हणताना ऐकले. समुद्रसपाटीपासुन उटी अवघे ७५०० फूट उंचीवर आहे. म्हणजे महाबळेश्वर पेक्षा केवळ ३०००- ४००० फूट उंच. उंचीतील हा फरक अर्थातच हवेत जाणवतो. पुण्यात ज्या वेळेस घामाच्या धारा लागत होत्या आणि महाबळेश्वरात पण थंडी वगैरे वाजत नव्हती तिथे त्याचवेळेस ऊटीला मात्र गुलाबी थंडी पडली होती. (आमच्यासारख्या सडाफटींग माणसांना गुलाबी थंडी कसली म्हणा. नुसतेच इतर जोडप्यांकडे बघुन गुलाबी गुलाबी म्हणायचे :) )
आम्ही पहिल्यांदाच दोडाबेट्टाला गेलो. आधीच उटी उंचावर त्यात दोडाबेट्टा उटीतले उंच शिखर, किंबहुना दक्षिण भारतातले सर्वात उंच शिखर. समुद्रसपाटीपसुन तब्बल ८६४० फूट उंचीवर. इथे आजुबाजुला हरीणे, जंगली अस्वले, ससे, चित्ता, नीलगाय इत्यादी प्राणी आहेत. आम्हाला एकही दिसला नाही. :)
दोडाबेट्टाचा अर्थ काय ते माहिती नाही. पण धुक्याची दुलई हेच नाव त्याला सार्थ ठरेल. दोडाबेट्ट्याला १२ महिने धुके असते. प्रमाण ऋतुप्रमाणे कमीआधिक असते एव्हढेच. दोडाबेट्टा वरुन काढलेली काही छायाचित्रे:
दोडाबेट्टावरुन आम्ही बॉटेनिकल गार्डन गाठले. तब्बल २२ एकरांच्या परिसरात वसलेले हे उद्यान केवळ वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर पर्यटकांसाठीसुद्धा एक पर्वणी आहे. तिथल्या काही फुलांची ही छायाचित्रे:
उद्यानातील काही लॅण्डस्केप दृष्ये आणि दुर्मीळ वृक्षसंपदा:
उटीच्या रोज गार्डनच्यावर आधी पण एक धागा टाकला होता. तरीसुद्धा त्यातील काही खुप निवडक छायचित्रे इथे परत डकवण्याचा मोह आवरत नाही आहे. रोज गार्डन मध्ये २८०० पेक्षा जास्त जातींचे गुलाब आहेत आणि हे भारतातील अश्या प्रकारचे सर्वात मोठे उद्यान आहे:
वाटले होते त्यापेक्षा हा भाग जरा जास्तच मोठा झाला. त्यामुळे इच्छा असुनही उरलेले फोटो या भागात टाकत नाही आहे. आमच्या प्रवासाच अंतिम टप्पा होते कुन्नूर. शब्दातीत असे ज्या निसर्गाचे वर्णन करता येइल त्याची छायाचित्रे पुढच्या भागात टाकेन आता.
सुहाना सफर और ये मौसम हसी ............ हे गीत शैलेंद्रने उटी - कुन्नूर प्रवासात लिहिले असावे अशी मला दाट शंका आहे. का कोण जाणे पण कुन्नूर मध्ये हे गाणे सारखे गुणगुणावेसे वाटते.
ऊटीमध्ये २ दिवस फिरल्यावर कुन्नूरला जायचे ठरले. बराच उहापोह केल्यावर जाताना टॉय ट्रेनने जावे आणि येताना कारने यावे हा सर्वमान्य तोडगा निघाला.
हीच ती युनेस्को ने वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणुन घोषित केलेली उटी ते कुन्नूर धावणारी आगगाडी.
ही फुलराणी निलगिरीच्या रांगा चढताना समुद्रसपाटीपासुन ७७०० फूटांचे अंतर पण लीलया चढते आणि निलगिरीतल्या डोंगररांगांचे चढउतार पार करताना अशी काही दिलखेचक दृष्ये आपल्यासमोर सादर करते की त्याला केवळ नजरेच्या कॅमेर्यामधुन टिपुन केवळ मेंदुच्या मेमरी मध्येच साठवावे लागते. कुठलेही यंत्र ही दृष्ये परिणामकारकरीत्या टीपण्यास असमर्थ आहे. १९०८ साली गोर्या साहेबाने सुरु केलेल्या या फुलराणीला चालवण्यासाठी तामिळनाडु सरकारला दरवर्षी ४ कोटीचा तोटा होतो म्हणे. पण निलगिरीच्या डोंगररांगांतील अवर्णनीय निसर्गापुढे हा खर्च देखील फारसा काहीच नाही असे वाटत राहते. ट्रेनमधुन काढलेली ही काही छायाचित्रे. पण असे आवर्जुन नमूद करावे लागेल की कुठलाही कॅमेरा या प्रवासाला योग्य न्याय नाही देउ शकत. हा प्रवास डोळ्यातच साठवावा:
या प्रवासात काही क्षण असे येतात की तुम्हाला अक्षरशः विमानात बसल्यासारखे वाटते. दोन्ही बाजुला खोल खोल जाणारी दरी आणि जणु काही आकाशातुन जाणारी आगगाडी. हे क्षण आम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी पिऊन काढले. छायाचित्रे घ्यायचे देखील भान कोणाला उरले नाही. खालील छायाचित्र काढले तोपर्यंत तो सर्वोच्च उंचीचा पट्टा निघुन गेला होता:
टॉय ट्रेनची ही सफर साधारण तासाभरात संपते. त्यानंतर सुरु होते ती निसर्गाच्या सान्निध्यातील एक प्रदुषणमुक्त आठवण. ट्रेनमधुन उतरल्या उतरल्या घडलेले कुन्नूरचे हे पहिले दर्शनः
कुन्नूर हे अश्या काही निवडक पर्यटनस्थळांपैकी काही आहे की जिथे जाउन आल्यावर कोणी विचारले की काय काय पाहिले की तुम्ही आपसुक सांगाल की निसर्ग सोडुन काहीच नाही. इतर कुठल्याही पर्यटनस्थळासारखे इथेही "दाखवायला" काही पॉईंट्स तयार केले गेले आहेत. परंतु ते बघितले नाहीत तरी तसा फारसा काही फरक पडत नाही. निसर्गसौंदर्य तिथे ठायीठायी भरलेले आहे. त्यासाठी वेगळ्या पोईंट्सची गरजच नाही आहे मुळात.
ट्रेनमधुन उतरल्या उतरल्या धुक्याने वेढलेल्या कून्नूरचे जे दर्शन घडले होते तेच रूप मनात भरुन राहिले आहे. कुन्नूर हे धुक्याने वेढलेले आहे असे म्हणण्यापेक्षा ते धुक्याने ग्रासलेले आहे असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल इतके धुके आहे तिथे. हे काही पुरावे:
धुके, थंडी (परत गुलाबी - उटीसारखीच. किंबहुना थोडीशी जास्तच), नजर जाइल तिथे हिरव्या पाचुने नटलेल्या दर्या आणि चहाच्या बागा म्हणजे कुन्नूर. किंबहुना कुन्नूर म्हणजे एक मोठी चहाची बागच आहे असे म्हणता येइल. इथल्या गाईड्सना का कोण जाणे पण इथे मुमताजच्या (शहाजहानची नाही. अपराध मधली मुमताज किंवा गोरे रंग पे ना इतना गुमान कर फेम रोटीमधली) चहाच्या बागा आहेत याचे कोण मोठे अप्रुप आहे. कुन्नूरच्या चहाच्या बागांचे हे काही फोटो:
" alt=""
आम्ही कुन्नूरच्या एकुण वातावरणानेच इतके भारावुन गेलो होतो की विशेष काही वेगळे पोइंट्स बघण्यात आम्हाला फारसा रस नव्हता. उगाच इकडेतिकडे भटकण्यात आणि निसर्गाचा पुर्ण आस्वाद घेण्यात आम्हाला जास्त मजा वाटत होती. त्यात वर आमच्या ड्रायवर कम गाईडला आम्ही जेव्हा जेव्हा कुन्नूरला काय बघण्यासारखे आहे हे विचारले तेव्हा त्याने न चुकता आम्हाला "सुसाइड पॉईंट" असे उत्तर दिले होते. हे ऐकुन आम्ही एवढे वैतागलो होतो की शोले मधला "लेकीन ये अंग्रेज लोक सुसाट क्यो करते है" हा एक लाखमोलाचा प्रश्न आहे यावर माझा पुर्ण विश्वास बसला होता. शेवटी या सुसाईड पायी या मरगठ्यांनी आपला जीव घेउ नये असा सुज्ञ विचार करुन आमच्या ड्रायवरने आम्हाला डॉल्फिन नोज आणि लॅम्ब रॉक अशी विचित्र नावे असलेल्या आणि अपेक्षेप्रमाणे जिथुन डोल्फिन नोज किंवा मेढा असे काहीच दिसत नाही अश्या पॉइंटसवर नेले. आम्हीदेखील कुठलेच पोइंट्स न बघता परत आलो असे कोणाला सांगुन त्यांच्या कुत्सित नजरांना सामोरे जायला लागु नये म्हणुन निमुटपणे त्याच्या मागोमाग गेलो. इथुन जे नजारे दिसले ते इतर कुठल्याही हिल स्टेशनवर दिसतील असेच होते. पण तरीही नेटाने आम्ही काही छायाचित्रे काढलीच. फरक काय तो इतकाच की इथे कुठेही नजर टाकली तरीही चहाच्या बागा हमखास दिसतात
मी आधीच म्हटल्याप्रमाणे शैलेंद्रने सुहाना सफर इथेच लिहिले असणार. बघा "ये आसमा झुक रहा है जमीं पे" याचा प्रत्यय देखील इथे वारंवार येतो:
अश्या या अतिरम्य गावात असेच एक सुंदरसे टुमदार घर बांधुन कायमचे वास्तव्य करावे असे राहुन राहुन सारखे वाटते आहे.
कुन्नूर खुणावते आहे. पण इलाज नाही. पापी पेट का सवाल है. इथेच काम करावे लागणार. त्यामुळे आता थांबतो.
इति मैसूर - उटी - कुन्नूर पुराण संपुर्णम.







































































































































































































































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.