Saturday, December 12, 2020

कर्नाटकाचे पर्यटन

 

कर्नाटक दौरा भाग १ - (महाकूट मंदिर, पट्टडकल, ऐहोले)

            बऱ्याच दिवसांपासून म्हणण्यापेक्षा बऱ्याच वर्षांपासून हंपीला जाण्याचा फक्त विचारच चालला होता पण ह्यावेळी दिवाळीच्या निमित्ताने हा दौरा सत्यात उतरवण्याची संधी होती. म्हणून फ़क्त आठ दिवस अगोदर सर्व नियोजन केलं. फक्त एक आठवडाच होता म्हणजे Reservation confirm मिळणं अशक्यच होतं म्हणून जसे मिळतील तशी तिकीट काढली बाकी सगळं तेव्हाचं तेव्हा बघू म्हणून सोडून दिलं. बरं फक्त हंपी करण्यापेक्षा वाटेत येणारे बदामी आणि आजूबाजूची काही ठिकाण घ्यायची ठरवली. म्हणून आधी कल्याण ते बदामी एक Reservation काढलं आणि बदामी आणि हंपीचं हॉटेल बुक करून ठेवलं
             १९ ऑक्टोबर शनिवारी रात्री गदग एक्सप्रेस पकडून रविवारी सकाळी बरोबर १० वाजता बदामी स्टेशन ला उतरलो. स्टेशन बाहेरून हॉटेलपर्यंत रिक्षा केली मुद्दाम मी माझं हॉटेल बस स्टेशनच्या समोर घेतलं होतं जेणेकरून हंपी ला जाताना काही त्रास होणार नाही बदामी मध्ये दोन दिवस आणि हंपी मध्ये तीन दिवस असं नियोजन होतं. बदामी मध्ये पाहण्याची ठिकाणं म्हणजे पाहिलं बदामी, दुसरं महाकूट मंदिर तिसरं पट्टाडकल आणि चौथं ऐहोले.
दिनांक :- २०.१०.२०१९
        बदामी मध्ये वास्तव्य असल्यामुळे पहिल्याच दिवशी  महाकूट, पट्टडकल आणि ऐहोले करायचं ठरवलं ज्या रिक्षेने प्रवास केलेला त्यांनाच तयार केलं आणि त्याच रिक्षेने नंतरचा प्रवास सुरू केला.

महाकूट मंदिर : -
                    बदामी च्या आजूबाजूला असलेल्या प्रदेशातील "महाकूट मंदिर" हे प्रमुख देवालय आहे. महाकूट हे बदामी जवळील एक छोटंसं आणि शांत असं एक गाव आहे दोन डोंगरांमध्ये असलेलं हे मंदिर शैव आणि शाक्त ह्यांचं धार्मिक स्थळ आहे महाकूट वासियांसाठी हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. पौराणिक कथेनुसार अगस्थी मुनींशी झालेल्या युद्धात सहोदर वातापी आणि इल्वल ह्या दोन राक्षसांचा वाढ ह्याच ठिकणी झाला होता.
                 महाकुटेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून मंदिरात प्रवेश करण्यासाठी भव्य प्रवेशद्वार आहे मंदिरात अर्धमंडप मुखमंडप आणि गर्भगृह आहे. गर्भगृहात शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे आजही नित्यनियमाने तिथे पूजा होत असते
नंदिकेश्वर महाकूट मंदिर 








                      महकुटेश्वर मंदिरातून दर्शन घेतल्यावर पुढच्या प्रवासाला लागलो ते म्हणजे पट्टडकल. कर्नाटक चे लोक त्याला "पट्टाडकलू" म्हणून संबोधतात पट्टडकल हे ठिकाण बदामी शहरापासून सुमारे १८ किमी दूर आहे पट्टडकल आणि आईहोले ही दोन्ही ठिकाणं एकाच दिवशी करायची झाल्यास बस मिळणं कठीण असल्याकारणानेच रिक्षेच्या पर्यायाचा अवलंब करावा लागतो.
पट्टडकल
               पट्टडकल हे ठिकाण म्हणजे एकाच ठिकाणी असलेल्या अनेक मंदिरांचा समूह.  पट्टडकलच्या आवारात असलेली मंदिरांची नाव खालीलप्रमाणे
१ ) काडसिद्धेश्वर मंदिर
२) जांबूलिंग मंदिर
३) गलगनाथ मंदिर
४) संगमेश्वर मंदिर
५) विरुपक्ष मंदिर
६) मल्लिकार्जुन मंदिर
७) काशीविश्वेश्वर मंदिर
८) चंद्रशेखर मंदिर

१) काडसिद्धेश्वर मंदिर
       कडसिद्धेश्वर मंदिर हे पट्टडकल मधील गलगनाथ मंदिराशेजारी असलेलं एक मंदिर आहे. कडसिद्धेश्वर नामक एक संन्यासी इथे राहत असल्याकारणाने ह्या मंदिरास "काडसिद्धेश्वर मंदिर" म्हणून संबोधले जाते. झालेल्या पडझडीमुळे ह्या मंदिराचं शिखर हे तुटलेल्या अवस्थेत आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस शिव हरिहर आणि अर्ध नारेश्वर च शिल्प चित्रित करण्यात आलं आहे.
काडसिद्धेश्वर मंदिर
२) जांबूलिंग मंदिर
         जांबूलिंग मंदिर हे नागर शैलीत बनवलं गेलेलं मंदिर आहे. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या कळसावर असलेले नटराजाचं अप्रतिम शिल्प.
जांबूलिंग मंदिर
३) गलगनाथ मंदिर
       आठव्या शतकात बांधलेलं हे मंदिर पूर्वाभिमुख आहे हे मंदिरसुद्धा नागरशैलीत बांधलं गेलं आहे मंदिराच्या बाहेरील बाजूस प्रदीक्षिणेस प्रशस्त जागा आहे प्रवेशद्वारावर नटराजाचं अनोखा शिल्प आहे.
गलगनाथ मंदिर
४) संगमेश्वर मंदिर
       संगमेश्वर मंदिर हे आठव्या शतकाच्या आसपास बांधलं गेलेलं एक शिवमंदिर आहे. हे मंदिर बांधण्यासाठी चालुक्य राजा विजयादित्य ह्याने प्रचंड मेहनत घेतली म्हणून ह्या मंदिरास विजयेश्वर मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
संगमेश्वर मंदिर
 ५) विरुपाक्ष मंदिर
         विरुपाक्ष मंदिर हे इ. स. ७४० मध्ये द्रविड शैलीत स्थापन केलेलं असून हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. ह्या मंदिराची स्थापना लोकमहादेवी नामक राणीने आपल्या पतीच्या कांची विजयाच्या आठवणीत बांधले आहे म्हणून ह्यास लोकेश्वर मंदिर म्हणून संबोधतात. मंदिराच्या पूर्व द्वारासमोर असलेल्या मोठ्या प्रांगणात काळ्या दगडात कोरलेली एक भव्य नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या दरवाज्यापाशी दोन्ही बाजूस द्वारपालाची शिल्प आहेत व आजूबाजूस शृंगारिक जोडप्यांची शिल्प रेखीत करण्यात आली आहेत.
विरुपाक्ष मंदिर
६) मल्लिकार्जुन मंदिर
         मल्लिकार्जुन मंदिर हे विरुपाक्ष मंदिराच्या अगदी जवळ आहे. हे एक शिवमंदिर आहे शंकराला त्रैलोकेश्वर सुद्धा म्हंटलं जातं. हे मंदिर विक्रमादित्य च्या महाराणी त्रैलोक महाराणी ने आपल्या पतीच्या विजयाला स्मरून निर्माण केलं होतं.
मल्लिकार्जुन मंदिर
७) काशीविश्वेश्वर मंदिर
            काशीविश्वेश्वर मंदिर हे मल्लिकार्जुन मंदिराच्या बाजूस असलेले मंदिर. ह्याची बाहेरील बाजूस असलेली सजावट अप्रतिम आहे. उत्तरी शैलीतल्या असलेल्या मंदिराच्या कळसावर शिव नृत्य करीत असल्याचे शिल्प आहे बाहेरील बाजूस शिव पार्वती अर्धनारेश्वर ह्यांची शिल्पं आहेत.
काशीविश्वेश्वर मंदिर
८) चंद्रशेखर मंदिर
चंद्रशेखर मंदिर       

        सुमारे दोन तास पट्टडकल मध्ये घालवल्यानंतर गाडी ऐहोलेच्या दिशेने वळवली तीनच्या सुमारास ऐहोले मध्ये पोहोचलो पट्टडकल जसं तसंच ऐहोले होतं.  तिथेही बरीच मंदिर, एक विहीर अश्या पुरातन वास्तू. तिथे गेल्यावर सर्वात पाहिले पोहोचलो ते तेथील प्रसिद्ध दुर्ग मंदिरात. दुर्ग मंदिर हे प्रसिद्ध आहे ते त्यावरील शिल्पांसाठी. बराच वेळ असल्याकारणाने दुर्ग मंदिर मनसोक्त न्याहाळण्यास सुरुवात केली. 

दुर्ग मंदिर :-
             खरं पाहिलं तर हे दुर्ग मंदिर नसून हे शिव मंदिर आहे पण डोंगराच्या जवळपास असल्याकारणाने त्यास दुर्ग मंदिर म्हणून संबोधले जाते. मंदिराचा आकार बघितला तर तो तो हत्ती च्या पाठीसारखा आहे . मंदिराच्या आत एक गर्भगृह आणि सभामंडप आहे मंदिराच्या खांबावर देवी देवतांची शिल्पे कोरली आहेत मंदिराच्या चहूबाजूस शंकर विष्णू महिषासुर मर्दिनी ची रेखीव शिल्पे आहेत.























 
ऐहोलेतील प्राचीन मंदिर व शिल्प सौंदर्य 

              सुमारे २ तास ऐहोलेमध्ये घालवून पुन्हा बदामीच्या दिशेने रवाना झालो खरंतर बदामीला जाऊन सूर्यास्त पाहायचा विचार होता पण ढगाळ वातावरणामुळे ते काही शक्य होऊ शकलं नाही पण असो महाकूट मंदिर, पट्टडकल आणि ऐहोले हे सर्व एका दिवसात पहायला मिळणं हे हि नसे थोडके. एकंदरीत काय तर रिक्षा करण्याचा निर्णय अतिशय योग्य होता.
           शेवटी हॉटेल मध्ये जाऊन फ्रेश झालो आणि थेट आठ वाजता बदामी मध्ये जेवायला बाहेर पडलो तिथे सुद्धा एक घरगुती खानावळ शोधून काढली आणि पोटभर जेवलो. जास्त वेळ न काढता जेऊन थेट हॉटेल मध्ये जाऊन झोपलो कारण दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून बदामी ला भेट द्यायची होती. दिवसभराची दगदग आणि कमी झोप ह्यामुळे पडल्या पडल्या झोप लागली.

दिवस भाराचा खर्च:
रिक्षा (दिवसभर ) : - ८००/-
नाश्ता : - ४०/-
पार्किंग  : - २०/-
दही : - १०/-
पट्टदकल प्रवेश फी : - ४०/-
नारळपाणी - ३०/-
पाणीपुरी: - १०/-
जेवण :-  ५०/-
ऐहोळे प्रवेश फी : - ४०/-
-----------------------------
एकूण :- १०४०/-

पुढील प्रवास पुढच्या भागात.....

टीप : -
१)  बदामी ला जात असाल तर हॉटेल बुक करताना हॉटेल राजसंगम हे बस स्टॅन्ड च्या जवळ असलेले एकमेव चांगलं हॉटेल आहे.
 २) पट्टडकल आणि ऐहोले एका दिवसात करायचं असेल तर रिक्षा किंवा स्वतःची गाडी सोबत असणं गरजेचं आहे रिक्षा ८०० रु घेते.    

 

कर्नाटक दौरा भाग २ :- बदामी

               कालचा पट्टडकल,आईहोलेचा दौरा झाला आज सकाळी लवकर उठायचं म्हणून काल रात्री सुद्धा लवकर झोपलो ठरल्याप्रमाणे ५ वाजता उठलो पण खिडकीतून बाहेर बघतो तर काय पाऊस. मग पुन्हा झोपलो आणि सकाळी बरोबर साडेसहाला उठलो पटापट तयार झालो आणि ७ च्या सुमारास बाहेर पडलो एव्हाना उजाडलं सुद्धा होतं.
 बदामी लेणीवरून दिसणारा बदामी किल्ला,उजव्या बाजूस भूतनाथ मंदिर व अगस्त्य तलाव       
         
          आजच्या दिवशी भेट देण्याची ठिकाणं होती ती म्हणजे अगस्त्य तलाव, भूतनाथ मंदिर, बदामी लेणी आणि बदामी किल्ला. बदामी लेणीची प्रवेशाची वेळ साडेनऊची असल्या कारणाने सर्वप्रथम अगस्त्य तलावला भेट द्यायला निघालो. अगस्त्य तलाव म्हणजे बदामी किल्ल्यावरून कोसळणाऱ्या धबधब्याचं पाणी जिथे जमा होतं ती जागा. तलावाच्या काठावरच एक देऊळ आहे त्याचं नाव "भूतनाथ मंदिर"
                सकाळी गावातील बरीच जण Morning walk साठी म्हणून अगस्त्य तलावापाशी जमले होते. मी सुद्धा सकाळी सात वाजता पोहोचलो होतो. भूतनाथ मंदिर उघडण्याची वेळ माहिती नसल्याने मी जवळचं असलेल्या पायरीवर एक काका बसले होते त्यांना विचारलं की भूतनाथ मंदिर किती वाजता उघडतं तेव्हा ते हातवारे करून मला सांगायला लागले तेव्हा मला कळलं की ते मूकबधिर आहेत. पण तरीही त्यांनी मला त्यांच्या भाषेत बदामीच्या संपूर्ण भागाची ओळख करून दिली त्यावेळी खऱ्या अर्थाने सांगायचं तर माझं मन भरून आलं की "माणसाला बोलायची किती इच्छा असते पण बोलता येत नसतं तरीही त्यांनी माझ्यासाठी घेतले परिश्रम हे खरंच कौतुकास्पद होते. त्यांचं नाव ते मला सांगू शकले नाहीत म्हणून मी त्यांच्या ओळ्खपत्राचा फोटो काढला व नंतर मुंबईत येऊन माझ्या कर्नाटकच्या मित्राला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं त्यांचं नाव "मनोहर". मनोहर काका तुमचे खूप खूप आभार.
SELFIE WITH MANOHAR KAKA
प्रवासवर्णन पुढीलप्रमाणे
दिनांक : २१.१०.२०१९
१) अगस्त्य तलाव
         अगस्त्य तलाव हा बदामी मधील सर्वात सुंदर तलाव आहे. चारी बाजूने डोंगराने वेढलेला हा तलाव पावसाळ्यात पुर्णतः भरलेला असतो अगस्त्य तलावाच्या मागील बाजूस असलेल्या २ धबधब्याना लहान बहीण मोठी बहीण म्हणून संबोधले जाते. अगस्त्य तीर्थ च्या उजव्या बाजूस बदामी किल्ला असून डाव्या बाजूस बदामी लेणी आहेत. समोर भूतनाथ मंदिर असून मधोमध अगस्त्य तीर्थ आहे.
अगस्त्य तलाव
२) भूतनाथ मंदिर
               अगस्त्य तलावाला लागूनच असलेल्या मंदिरास "भूतनाथ मंदिर" म्हणून ओळखले जाते. भूतनाथ म्हणजे "आत्मांचा देवता". भूतनाथ मंदिर हे भूतनाथ समूह मधील एक आहे.  बलुआ नामक दगडापासून बनविले गेलेले हे मंदिर भगवान शंकराच्या भक्तांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ह्या मंदिरात शंकराच्या भूतनाथ अवतारात पूजा केली जाते.  मंदिराचे बांधकाम हे दक्षिण भारतीय द्रविड़ियन आणि उत्तर भारतीय नगर शैली ची आठवण करून देते.
भूतनाथ मंदिर 
 
दगडावरील देवांच्या मूर्ती

शेषशायी विष्णू
३) बदामी लेणी
               चालुक्यांच्या राजवटीत म्हणजेच पाचव्या शतकात बांधली गेलेली ही लेणी सर्व धर्मांना समर्पित केलेली आहे.  बदामी लेणी ही त्या काळच्या अपूर्व ज्ञानाचे एक प्रतीक आहे कारण इतक्या मोठ्या डोंगरांना कापून त्यात शिल्पकला करणं ही सामान्य गोष्ट नाही ह्या लेण्यानंतर पूर्ण दक्षिण भारतात ही शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणून ओळखली गेली.
बदामी लेणी
i) शैव लेणी
      ही एक शैव लेणी असून ह्याची निर्मिती ३ टप्प्यात करण्यात आली आहे. गर्भगृह सभामंडप आणि मुखमंडप. 
ह्या लेणीतील प्रसिद्ध असलेले शिल्प म्हणजे प्रवेशाच्या पश्चिमेस असलेली नटराजाची शिल्पकृती.
अठरा हाताची असलेली ही प्रतिकृती कमळाच्या फुलावर उभी आहे. वरील दोन हातात सर्प पकडले आहेत. बाकीच्या हातात डमरू जपमाळ पुष्प त्रिशूल आणि विणा निदर्शनात येते. शिवच्या ह्या नृत्यास गणपती बघत आहेत.




नागशिल्प
गजवृषभ शिल्प
२) वैष्णव लेणी
        बदामी लेणीच्या ह्या दुसऱ्या लेणीमध्ये भगवान विष्णूंचे अनेक अवतार शिल्पित करण्यात आले आहेत. हि लेणी भगवान विष्णूंना समर्पित करण्यात आली आहे
वैष्णव लेणी
लेणींवरील रेखीव शिल्प
 

 
 

३) महाविष्णू लेणी
    ह्या लेणीची निर्मिती इसवी सन ५७८ मध्ये झाली आपला मोठा भाऊ कीर्तिवर्म ह्याने १२ वर्ष यशस्वी राज्य केल्याच्या आठवणी मध्ये ह्या लेणी ची निर्मिती झाली बदामी मधील हि सर्वात मोठी लेणी आहे
महाविष्णू लेणी 







भगवान विष्णूंचे विविध अवतार



४) जैन लेणी
            ह्या लेणी मध्ये २३ तीर्थंकर पार्श्वनाथ ह्यांचे प्रार्थना करतानाचे शिल्प आहे. ज्याच्या डोक्यावर पाच फण्याचा सापाचं शिल्प आहे. दुसरं शिल्प आहे ते म्हणजे बाहुबली. बाहुबली तीर्थंकर नसून त्याग किंवा निर्वाण स्वीकार केलेला श्रेष्ठ मानव आहे. तिसरं शिल्प आहे ते म्हणजे भगवान महावीर. ह्या लेणी मध्ये २४ तीर्थंकर असलेले एक शिल्प आहे. 
पार्श्वनाथ 


४) बदामी किल्ला                  
        बदामी किल्ला, डोंगराच्या माथ्यावर बदामी लेण्यांसमोर वसलेले एक प्रमुख आकर्षण आहे. हा किल्ला मुख्य शहरापासून दोन किमी अंतरावर आहे. बदामी किल्ला हा भूतनाथ मंदिराच्या पूर्वेकडे आहे. एकेकाळी हे चालुक्य घराण्याच्या राजांचे घर होते. हा किल्ल्यापर्यंत केवळ पायीच पोहोचता येतो. किल्ल्यावर दोन मंदिरे आहे जी पाचव्या शतकात भगवान विष्णूची उपासना करणारे राजा पुलकेसन द्वितीय यांनी बांधली आहेंत.  
       वरील शिवालय भगवान शिवाला समर्पित आहे तर खालील मंदिर हे गणेशाला समर्पित आहे. वरील शिवमंदिराच्या बाह्य भिंतींवर हत्ती आणि सिंह यांसारख्या पौराणिक कोरीव काम दिसून येते. शिवालयाच्या उत्तरेस सोळाव्या शतकातील टिपू सुलतान काळाची तोफ आहे जी १६व्या शतकातील टेहळणी बुरूजाप्रमाणे दिसते. हा किल्ला त्या प्रदेशातील प्रमुख आकर्षणे म्हणून गणला जातो ज्यामध्ये दोन धान्य कोठार , एक खाजगी खोली, चौकाच्या भिंती आणि एक गुप्त भूमिगत कक्ष आहे.
बदामी किल्ल्याचे प्रथम प्रवेशद्वार

दुसरे प्रवेशद्वार



बदामी किल्ल्यावरील बुरुज
बदामी शहर व किल्ल्यावरील तोफ
१५५० सालची तोफ 



धान्यकोठार

शिवमंदिर
गणेशमंदिर
               बदामी किल्ल्यावरून एक फेरफटका मारून आता पुन्हा हॉटेल च्या दिशेने निघालो, बदामी किल्ला उतरताना वाटेत असलेल्या फुलझाडांवर बरीच फुलपाखरं नजरेस पडली त्यांना कॅमेरा मध्ये कैद करून हॉटेलच्या दिशेने रवाना झालो. 




छान किती दिसते... फुलपाखरू 
           एव्हाना ११.३० वाजले होते. अजून जेवण करून हंपीच्या दिशेने प्रवास करायचा होता. हॉटेलमध्ये जाऊन सर्वप्रथम पोटभर जेवण केलं आणि थेट बस स्टॅन्ड गाठलं व हंपीच्या प्रवासाला लागलो. एक वाजताच्या सुमारास बदामीतुन प्रस्थान करून सुमारे साडेसहाच्या सुमारास स्वारी हंपी मध्ये दाखल झाली हॉटेल बुक असल्याने सर्वप्रथम बॅग टाकली फ्रेश झालो आणि हंपीच्या प्रसिद्ध हॉटेल मध्ये जेवणाचा आस्वाद घेतला.

 MANGO TREE RESTAURANT
टीप :-
 १) बदामी वरून हंपीला जायचं झाल्यास बदामी हंपी थेट बस नसल्याकारणाने बदामी ते इल्कल व इल्कल ते हंपी अशी बस पकडावी.
 
दिवसाचा खर्च :-
बदामी लेणी प्रवेश फी :- २०/-
जेवण : - ५०/-
बदामी ते इल्कल बस :- ७०/-
इल्कल ते होस्पेट : - ११५/-
होस्पेट ते हंपी : - १५/-
रात्रीचे जेवण :- १५०/-
-------------------------
एकूण     :-      ४२०/-

 

कर्नाटक दौरा भाग ३ :- हंपी

               बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला हंपी दौरा, प्रथम त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. कर्नाटक राज्यातील बेलारी तालुक्यातील होस्पेट या शहरापासून १३ किमी अंतरावर असलेले हंपी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी. आजही हंपीच्या सभोवतालच्या परिसरात भग्नावस्थेत उभे असलेले महाल, देवदेवतांच्या मूर्ती, विविध दगडी कमानी, स्नानकुंडे, बाजारचा मुख्य रस्ता, बाजूने दुकानांच्या जागा, आसमंतातील टेकडय़ा, माळरान हे सर्व पाहताना मन उद्विग्न होते. यामागचा भव्यदिव्य गौरवशाली इतिहास एका क्षणात आपल्याला त्याकाळातील आठवण करून देतो.
हंपीतील प्रसिद्ध दगडी रथ
          काल रात्री हंपीला पोहोचल्यावर पटकन जेवून झोपलो कारण आज मातंगा पर्वतावर सूर्योदय बघण्यासाठी लवकर उठायचं होतं. ठरल्याप्रमाणे पहाटे ५ वाजता उठून मातंगा पर्वत चढायला सुरुवात केली सुमारे अर्ध्या तासात वर पोहोचलो पण ढगाळ वातावरणामुळे सूर्योदय काही दिसला नाही पण विरुपक्ष मंदिराजवळून वाहणाऱ्या तुंगभद्रा नदीचे अप्रतिम दृश्य नजरेस पडले.
हंपी 
           ते दृश्य कॅमेरात टिपून पुन्हा दिवसाच्या नव्या सुरवातीला लागलो पूर्ण दिवस हंपीमध्ये फिरायचा असल्याने दिवसभरासाठी एक सायकल घेतली.
                   
अच्युतराया मंदिर
           मातंगा पर्वताच्या पायथ्याशी असलेले ह्या मंदिराचे निर्माण इ स १५१३ ते १५३९ मध्ये कृष्णदेवरायचा छोटा भाऊ अच्युतरायच्या कारकिर्दीत झाले म्हणून ह्या मंदिरास अच्युतराय मंदिर म्हणून संबोधले जाते मंदिरावरील कोरीवकाम अगदी रेखीव आहे काही ठिकाणची पडझड झाली असली तर हे मंदिर सौंदर्याची एक छाप आपल्यावर सोडून जातेच.
 
अच्युतराया मंदिराचा आवार 
मंदिराचे प्रवेशद्वार

बाजारपेठ
मंदिरावरील कलाकृती
एकशिला नंदी
      अच्युतराया मंदिरातून बाहेर आल्यावर विरुपक्ष मंदिराकडे जाताना वाटेत उजव्या हाताला आपल्या एक दगडात कोरलेला एक नंदी नजरेस पडतो त्यास एकशिला नंदी म्हणून संबोधले जाते.
एकशिला नंदी 
कडेलकालु गणेश
         भारताच्या दक्षिणेकडील भागात अस्तित्वात असलेल्या भगवान गणेशांच्या सर्वात मोठ्या मूर्तींपैकी कडेलकालू गणेश हि एक आहे. हंपीच्या हेमकुटा टेकडीच्या उतारावर कडालेकलु गणेशमूर्ती असलेले हे मंदिर आहे. कडेलकालू गणेश या पुतळ्याची उंची ६.६ मीटर (१५  फूट) असून हि मूर्ती एका विशाल दगडात कोरली गेली आहे. ह्या  गणेशाचे पोट अशा प्रकारे बनवले गेले आहे. म्हणूनच, या मूर्तीला कडालेकलू गणेश असे नाव देण्यात आले आहे. हंपी येथे अस्तित्त्वात असलेल्या सर्वात मोठ्या पुतळ्यांपैकी एक आहे
कडेलकलू गणेश मंडप
कडेलकालु गणेश
सासेवकालू गणेश
         कडेलुकलु गणेशासारखेच अजून एक मूर्ती हंपीच्या दक्षिणेस नजरेस येते त्याच नाव म्हणजे ससेवकालू गणेश. १२ फूट उंचीच्या ह्या मूर्तीचे निर्माण सुद्धा एकाच दगडात करण्यात आले आहे.
             हिंदू पौराणिक कथांनुसार, भगवान गणेश अन्नावर प्रेम करतात म्हणून ओळखले जातात. एकदा गणेशाने भरपूर भोजन केले, त्यामुळे त्याचे पोट फुटण्याच्या मार्गावर होते. पोट फुटण्यापासून रोखण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय न सापडल्याने गणेशने साप पकडला आणि त्याला पोटास बांधले. गणेशाच्या पोटाभोवती बांधलेल्या सापाच्या अस्तित्वामागील ही पौराणिक घटना आहे, जी मूर्तीवर दिसते.
ससेवकालू गणेश मंडप 
 
बडवलिंग
         बडवलिंग हि हंपीमधील ही सर्वात मोठी शिवलिंग प्रतिमा आहे. लक्ष्मी नरसिंह पुतळ्याशेजारी शिवलिंग समोर एका खोलीत ठेवलेले आहे. या चिन्हावर बारकाईने पाहिले तर त्यावर तीन डोळे कोरले आहेत  पौराणिक कथेत असे आहे कि  ह्या शिवलिंगाचे निर्मिती एका  गरीब स्रीद्वारे केली असल्याने त्यास बडवलिंग शिवलिंग म्हणून ओळखले जाते. 
बडवलिंग
लक्ष्मी नरसिंह मंदिर
            भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी नरसिंह हा एक आहे हंपीमधील ही सर्वात मोठी मूर्ती आहे. नरसिंह सात फणी शेषनागावर बसले आहे. सापांचे डोके त्याच्या डोक्यावर छत्राप्रमाणे कार्य करत आहेत . रागीट आणि उग्र डोळ्यांमुळे ह्यास उग्रनरसिंह म्हणून संबोधले जाते
मूळ मूर्तीमध्ये नरसिंहाच्या मांडीवर बसलेली लक्ष्मी देवीची सुद्धा प्रतिमा होती परंतु विजयनगरावर झालेल्या आक्रमणामुळे ह्या मूर्तीचे गंभीर नुकसान झाले आहे. त्याच्या मांडीवर कोरलेल्या लक्ष्मीच्या प्रतिमेचा तोडलेला भागही गहाळ आहे. कदाचित हे लहान तुकडे केले असेल. पण देवीचा हात आजही आपणास निदर्शनास येतो
लक्ष्मी नरसिंह
QUEEN'S Bath
         अच्युतरायाने विजयनगरातील राजघराण्यातील महिलांसाठी क्वीन बाथ नामक वास्तू बनवल्याचे समजते. इंडो-इस्लामिक शैलीमध्ये तयार केलेली, क्वीन्स बाथ एक विस्तृत रचना आहे ही आयताकृती इमारत असून इमारतीच्या चारही बाजूस बाल्कनी आहेत, प्रत्येकाला बाल्कनीला तीन खिडक्या आहेत. तलावाची खोली ६ फूट आहे आणि उतरण्यासाठी दगडांच्या पायर्‍याची सोय आहे.
                सदर तलावाची रचना ही ३० चौरस मीटर असून  तलावापर्यंत पोचण्यासाठी संरचनेसारखा पूल बनविला गेला आहे.  बहुधा राणी साहेब आंघोळ करत असताना लोकांना या क्षेत्रात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी अशी युक्ती केली असावी. तलावापर्यंत पोहोचणाऱ्या पाण्याची रचना सुद्धा वेगळ्याप्रकारे करण्यात आली आहे.

QUEEN'S Bath
पुष्करणी
         हंपीतील पुष्करणी म्हणजे पवित्र पाण्याची टाकी असून ती मंदिरांना जोडलेली आहे. हंपीतील बहुतेक मोठ्या मंदिरांमध्ये जवळच पुष्करणी बनविली आहेत. पवित्र टाक्या मंदिरे आणि मंदिरांच्या आसपासच्या लोकांच्या विविध विधी आणि कार्यात्मक बाबींसाठी पुष्करणीचा उपयोग होत असे. पुरातन काळात हंपीच्या लोकांकडून या टाक्या पवित्र जागा मानल्या जात असत. आजही विजयनगर साम्राज्याच्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी हंपीला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी पुष्करणींचे मोठे आकर्षण आहे.
पुष्करणी
महानवमी दिब्बा
       महानवमी दिब्बा हि एक विजयी वास्तू आहे. उदगिरीवर विजय मिळाल्यानंतर राजा कृष्णदेवरायांनी ह्या वस्तूची निर्मिती केली होती ह्याची रचना हि हंपीच्या राजवाड्यांमधली सर्वात उंच रचना आहे ह्या वास्तूच्या उंचीमुळे हि प्रसिद्ध आहे. विजयोत्सव साजरा करण्यासाठी ह्या वास्तूचा उपयोग होत असे. ह्या वास्तूच्या चहूबाजूस भिंतीवर विविध शिल्पे अधोरेखित केली आहे ती ह्या विजयाची साक्ष देतात. महानवमी डिब्बा च्या आजूबाजूस हत्ती घोडे बांधण्यासाठी वेगळी जागा अधोरेखित करण्यात आली आहे, बाजूलाच राजा व प्रधान ह्यांच्या गुप्त चर्चेसाठी एक गुप्तखोलीसुद्धा आहे महानवमी डीब्बाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी पायऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.


हत्तीच्या पायदळी देण्यात येणाऱ्या शिक्षा
महानवमी दिब्बा
हजाररामा मंदिर
           शाही राजवटीच्या मध्यभागी असलेले हजारारामा मंदिर हंपीचे मुख्य आकर्षण आहे. हे स्थान फक्त समारंभांसाठी वापरले जात होते आणि रामायणातील महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे प्रतिनिधित्व करणार्‍या कलाकृतींसाठी हे मंदिर भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. भगवान विष्णूला समर्पित केलेले हे मंदिर हंपी प्रदेशातील सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराच्या भिंती १५ व्या शतकाच्या कलेने सुशोभित आहेत. चार कोरलेल्या ग्रॅनाइट स्तंभ अर्ध-मंडपच्या सौंदर्यात भर घालतात. हजारा रामा मंदिरात भेट देणारे पर्यटक पूर्वीच्या राजांच्या काळात अस्तित्त्वात असलेल्या वास्तू व सांस्कृतिक वारशाचा शोध घेऊ शकतात. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर कोरीवकाम या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.



ग्रॅनाईट स्तंभावरील कोरीवकाम
रामायण महाभारतातील प्रसंग
पाताळेश्वर शिवमंदीर (Underground shiva mandir)
          पाताळेश्वर शिवमंदीर हे जमिनीपासून खाली असल्याकारणाने ह्यास पाताळेश्वर शिवालय म्हणून संबोधले जाते पूर्वाभिमुख असलेल्या ह्या मंदिरास आत जाण्यासाठी पायऱ्यांची रचना करण्यात आली आहे. पाताळेश्वर शिवालयाची निर्मीती ही पहिल्या बुक्कराय ह्यांच्या काळात झाली. मंदिराची रचना ही प्रांगण आणि गर्भगृह अशी करण्यात आली आहे मंदिराच्या गर्भगृहात नंदी व शिवलिंग असून पावसाच्या पाण्यामुळे आतील शिवलिंगाचे दर्शन सुद्धा होत नाही पण बाहेरील नंदीचे मुख दृष्टीक्षेपात पडते.


पाताळेश्वर शिवमंदीर
कमल महल (Lotus mahal)
        महानवमी दिब्याच्या उत्तरेस गेल्यास एक मैदान नजरेस पडते त्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यास समोर कमळाच्या आकाराची एक वास्तू दिसते ती म्हणजे "कमल महल" त्यास कमल महल किंवा चित्रांगना महल म्हणून सुद्धा संबोधलं जातं. कमल महल ही दुमजली वास्तू असून ह्याचं निर्माण हे इंडो-इस्लामिक पद्धतीने करण्यात आले आहे. महालाच्या उत्तरेस वरच्या मजल्यावर जाण्यास पायऱ्यांची व्यवस्था आहे. उन्हाळयात सुद्धा ह्या ठिकाणी थंड हवेचा वावर असे त्या उद्देशानेच कमळ महल चं निर्माण केलं गेलं आहे. थंडीच्या दिवसात हवेपासून बचाव होण्यासाठी म्हणून वरच्या खिडकीस पडदे लावण्याची सोय आजही दिसून येते.

कमल महल
गजशाळा  (ELEPHANT STABLE)
          गजशाळा ही वास्तू त्याकाळी राज्यांच्या हत्तीचे निवासस्थान म्हणून ओळखली जात. गजशाळेच्या ह्या वास्तुत एकूण ११ खोल्या असून एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी प्रत्येक खोलीत छोटा दरवाजा आहे, गजशाळेच्या छताचा भाग हा गोलाकार आहे. गजशाळेच्या उत्तरेस असणारी वास्तू ही पहारेकऱ्यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जात.
 गजशाळा  (ELEPHANT STABLE)
Octagonal well
राजतुलाभार (KING'S BALANCE)
          राजतुलाभार  हि हंपीमधील एकमेव वास्तू जी आजही  लोकांना तिच्या इतिहासामुळे आकर्षित करते  ह्या वस्तूचा उपयोग १५ व्या शतकात  नवीन वर्ष , राज्याभिषेक , दसरा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण अशा खास दिवसांसाठी राजांचा तुलाभार करण्यासाठी होत म्हणून ह्यास राजतुलाभार म्हणून संबोधले जाते.
राजतुलाभार
विजया विठ्ठल मंदिर
           हंपीमधील तुंगभद्रा  नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर स्थित ह्या विठ्ठल मंदिराची निर्मिती १६ व्या शतकात झाली असून हे मंदिर विष्णूस समर्पित करण्यात आले आहे. विठ्ठल  मंदिर हे दुसऱ्या राज देवरायाच्या कारकिर्दीत  बांधले गेले असून हे मंदिर मूळच्या दक्षिण भारतीय द्रविड स्थापत्यशैलीचे प्रतिनिधित्व करते 
            मंदिरावरील सुशोभित खांब व त्यावरील शिल्पांनी आजही पर्यटक प्रभावित होतात. मंदिरात विठ्ठलाची उत्कृष्ट  मूर्ती आहे पण सद्यस्थितीत  फक्त पुजारी येथे प्रवेश करू शकतात लहान गर्भगृह सर्वसामान्यांसाठी खुले आहे ह्या मंदिराच्या सभोवताली असलेला दगडी रथ हे सध्याचे प्रमुख आकर्षण आहे सध्या पन्नास रुपयाच्या भारतीय चलनावर ह्याच दगडी रथाची प्रतिकृती आहे.
 
 
दगडी रथ
विजया विठ्ठल मंदिर
             आजच्या दिवसाचा शेवट हा विजया विठ्ठल मंदिर बघून केला कितीही ठरवलं तरी ह्या वास्तू बघून मन भरत नाही पण वेळ पुढे पुढे जात राहते होणाऱ्या सूर्यास्ताचा विचार करून विजया विठ्ठल मंदिरातून काढता पाय घेतला व परतीच्या मार्गाला लागलो कारण पुढच्या दिवशीचा दौरा हा हंपीच्या दुसऱ्या बाजूस जायचं होता त्यामुळे वेलेतच हॉटेल मध्ये पोहोचलो आणि ठरल्याप्रमाणे मँगो रेस्टॉरंटमध्ये जेऊन त्यादिवसाची सांगता केली. 
दिन का साथी 
 टीप :-
१)  सर्वात पहिले सांगायचं झालं तर सिझन सोडून हंपी केलं तर हंपी बघण्यात एक वेगळी मजा आहे. पावसाळा पावसाळा संपता संपता केल्यास गर्दीसुदधा कमी असते आणि कमी गर्दीतच हंपी बघण्यात मजा आहे.
२) खर्च कमी करायचा असल्यास सायकल हा उत्तम पर्याय आहे १०० रुपयात दिवसभर सायकल मिळते ज्यात तुमची हंपीची सर्व ठिकाणं आरामात बघून होतात व सोबत गाईड घ्यावा.
३) लोटस महाल च तिकीट विजया विठ्ठल मंदिरास चालत त्यामुळे शक्यतो दोन्ही ठिकाण एकाच दिवशी करायचा प्रयत्न करावा.
४) सर्वात महत्वाचं म्हणजे संध्याकाळी परतताना शक्यतो सूर्यास्ताच्या आताच परतावं कारण नंतर साधं वाटसरू सुद्धा हंपीच्या वाटेवर दिसत नाही.

दिवसभराचा खर्च :-
सायकल  :- १००/-
चहा नाश्ता :- ३०/-
जेवण :- १५०/-
गाईड :- ३५०/-
प्रवेश फी :- ४०/-
चहा :- २०/-
जेवण :- १५०/-
-----------------------
 एकूण :- ८४०/-

 

कर्नाटक भाग ४:- हंपीची दुसरी बाजू

         मागच्या भागात आपण पहिली ती हंपीची एक बाजू आजच्या भागात आपण पाहू ती हंपी ची दुसरी बाजू. थोडक्यात MONKEY HILL म्हणजेच अंजनेया पर्वत, पण तिथे भेट देण्यापूर्वी प्रथम बाजूला असलेल्या विरुपाक्ष मंदिरास प्रथम भेट दिली. विरुपाक्ष मंदिर हे हंपीतील केंद्रस्थानी असलेले मंदिर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे दिवसाची सुरुवात हि विरुपाक्ष मंदिराच्या दर्शनाने करून नंतर गाडी भाड्याने घेऊन अंजनेय पर्वताचा प्रवास सुरु केला.
विरुपाक्ष मंदिर
            हंपीमध्ये स्थित विरुपाक्ष मंदिर हे भगवान शिव आणि त्यांची संगीतमय देवी पंपा यांना समर्पित करून ह्या मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. विरुपाक्ष मंदिर हे नऊ मजले व ५० मीटर उंच गोपुरम असलेले हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेकडील हेमकुट टेकडीच्या पायथ्याशी आहे. हे मंदिर दक्षिण भारतीय द्रविड स्थापत्यशैलीची आठवण करून देते. हे वीट आणि चुनखडीने बनलेले आहे. ह्या मंदिरास "पंपपती मंदिर" म्हणून देखील ओळखले जाते.  विरुपक्ष मंदिर हे ७व्या शतकाचे असून त्यावर कोरलेली कोरीव काम ९व्या व  ११व्या शतकातील आहे. सुरुवातीला या मंदिरात केवळ काही पुतळ्यांचा अंतर्भाव करण्यात आला होता पण कालांतराने हे मंदिर एक विशाल इमारतीत रूपांतर झाले. १०व्या शतकात कृष्णादेवरायांनी रंग मंडप बांधला होता जो विजयनगरच्या स्थापत्यशैलीचे नेतृत्व करतो. आजही मंदिरात एक मानाचा हत्ती आहे ज्याची भक्त मनोभावे पूजा करतात.







मंदिरावरील कोरीवकाम
पुष्करणी


मानाचा हत्ती
अंजनेया पर्वत
              अंजनेया पर्वत हे हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. पौराणिक कथेच्या अनुसार जेव्हा रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात किष्किंदा नगरीत पोहोचले, जिथे हा अंजनेया पर्वत आहे जेव्हा हनुमानाला कळले कि दोन राजकुमार आपल्या नगरीत आले आहेत तेव्हा हनुमानजी स्वतः श्रीराम व लक्ष्मणास भेटावयास आले. पौराणिक कथांनुसार श्रीराम व लक्ष्मण ह्यांची बजरंगबली सोबत झालेली पहिली भेट हि इथेच होय. अंजनी पर्वताकडे खालच्या बाजूने पाहिल्यास माकडाच्या चेहऱ्याची एक प्रतिकृती आपल्या नजरेस पडते म्हणून ह्यास "MONKEY HILL" म्हणून ओळखले जाते.
अंजनेया पर्वत

MONKEY HILL


हनुमानाचे जन्मस्थान


 
अंजनेया पर्वतावरून दिसणारे हंपीचे विलोभनीय दृश्य
निले गगन के तले 
सानापूर तलाव
          अंजनेया पर्वताच्या आजूबाजूला बघण्यास काय आहे? असं विचारल्यावर लक्षात आलं कि सानापूर तलाव हे जलसाठ्याचे एकमेव ठिकाण आहे म्हणून तिकडे जायचे ठरवले. अंजनेया पर्वताच्या सुमारे १० किमी पुढे स्थित "सोनापूर तलाव" हे ठिकाण आहे. तुंगभद्रा नदीतील पाण्याच्या साठ्यासाठी म्हणून ह्या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. वाटेवरची काही गावे ओलांडून गेल्यावर एका चढावाच्या दिशेने गेल्यास अचानक हा तलाव समोर येतो. जोपर्यंत आपण जवळ पोहोचत नाही तोपर्यंत सोनापूर तलावाचा थांगपत्ता हि लागत नाही वर निळेभोर आकाश आणि त्याच आकाशात मोहून गेलेला निळाशार हा तलाव बघण्याची मजा हि काही औरच आहे.

सानापुर तलाव
पंपा सरोवर उर्फ मातंग तलाव
           रामायणात पंपा सरोवर म्हणजे आपण लहानपणी ऐकलेली शबरीची बोरे हि कथा ज्या ठिकाणी घडली तेच हे ठिकाण म्हणजे "पंपा सरोवर". राम व लक्ष्मण सीतेच्या शोधात जेव्हा आले तेव्हा त्यांची भेट शबरीशी झाली व तिने प्रभू श्रीरामास सांगितले कि तुम्हाला सीतेचा शोध घ्यायचा असल्यास तुम्ही हनुमानाची मदत घ्या. किष्किंदा स्थित पंपा सरोवर हे अंजनेया पर्वताच्या बरोबर समोर आहे.

पंपा सरोवर 
             तुंगभद्रा नदीची दक्षिण बाजू बघून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो. एव्हाना २ वाजल्याकारणाने भर उन्हात तुंगभद्रेचा पूल ओलांडताना एक निसर्गरम्य दृश्य नजरेस पडलं. चारही बाजूला दगडांचा खच, वरती निळेभोर आकाश, खाली नितळ तुंगभद्रेचे पात्र व मधोमध आपण. हंपीची हि एक आठवण नजरेत व कॅमेरात कैद करून हॉटेलच्या दिशेने रवाना झालो.
 तुंगभद्रा नदीवरील पूल 


निसर्गरम्य
             खरंतर तुंगभद्रा नदी ओलांडून बोटीने यायचा तर प्रवास १० मिनिटाचा आहे. पण नदीला पूर आल्याकारणाने गाडी घेऊन हे अंतर तब्बल २३ किमी होतं. पण आलो आहे तर सगळं करावं म्हणून गाडी घेतली पण आलो ते बरंच झालं, निदान रामायणाच्या वास्तूंचे एका अर्थाने साक्षीदारच झालो.
               हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश होऊन थोडावेळ आराम करून विरुपाक्ष मंदिराच्या बाजूसच असणाऱ्या हेमकूट पर्वतावरून दिसणारा सूर्यास्त अनुभवण्यास गेलो.
 हेमकूट पर्वत
              विरुपाक्ष मंदिराच्या डाव्या बाजूस पर्वतावर जाण्यासाठी एक रस्ता लागतो ते म्हणजे "हेमकूट पर्वत". हेमकूट पर्वत हंपीमधून सूर्यास्त बघण्यासाठीच उत्तम ठिकाण.हंपीमधील जवळपास सर्व पर्यटक हे सूर्यास्त बघण्यासाठी ह्याच ठिकाणी जमतात.   




  हेमकूट पर्वतावरील सूर्यास्त 
           सूर्यास्त बघून झाल्यावर वेळ आली होती ती दुसऱ्या दिवशी हंपीला निरोप द्यायची परत केव्हातरी नक्की येईन ह्या आशेने व मागील ४ निवासाची अविस्मरणीय यात्रा आठवत त्या रात्री झोपी गेलो व दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परतीच्या प्रवासाला लागलो.
 
दिवसाचा खर्च
नाश्ता :- ४०/-
बाईक :- ५००/-
प्रसाद :- ११०/-
नारळपाणी : - ३०/-
चहा :- १०/-
जेवण :- ८०/-
----------------
एकूण :- ७७०/-
 
"दिन का साथी "
टीप : -  तुंगभद्रा नदी ओलांडून बोटीने जाण्याचा पर्याय कधीही उत्तम आहे कारण त्यामुळे वेळ हि वाचतो व पैसेही. पण काहीही झालं तरी तुंगभनद्रेची दक्षिण बाजू हि आवर्जून बघावी.

लाक्कुंदी बदामी पासुन साधारण पणे ८० किमी वर आहे. येथे येण्यासाठी बदामी - गदग - लाक्कुंदी असे यावे लागते.
येथे चालुक्य, कलाचुरी, सेऊना आणि होयसळा राजवटीतील ८ व्या ते १२ व्या शतकातील मंदीरे आहेत.
ह्या परिसरात सुस्थितील व भग्न अवशेषातील अशी बरीचशी मंदीरे आहेत. बरीचशी मंदीरे गावात असल्याने गावकरी ईथे गप्पा मारतात, वामकुक्षी काढतात, गुरे-ढोरे बांधतात त्यामुळे त्यांची पडझड झाली आहे.
काही सुस्थितील व ठळक मंदीरांचे फोटोज् ईथे देण्याचा माझा प्रयत्न आहे.

माणिकेश्वर मंदीरः
ईथे प्रसिद्ध पायर्‍यांची विहीर (पुष्करीणी) आहे. पण मी पावसाळ्यात गेलो असल्याने विहीरीचा बराचसा भाग पाण्याखाली झाकला गेला होता.
प्रचि १

-
-
-
प्रचि २

-
-
-
प्रचि ३

-
-
-
प्रचि ४
पुष्करीणी

-
-
-
प्रचि ५

-
-
-
प्रचि ६

-
-
-
प्रचि ७
(आंतरजालावरून साभार)
पुष्करीणीचे खरे स्वरुप असे आहे.

-
-
-
प्रचि ८

-
-
-

प्रचि ९

-
-
-

ब्रम्ह जिनालय (जैन मंदीर):
प्रचि १०

-
-
-
प्रचि ११

-
-
-
प्रचि १२

-
-
-
प्रचि १३

-
-
-
प्रचि १४

-
-
-
प्रचि १५

-
-
-
प्रचि १६

-
-
-
प्रचि १७

-
-
-
काशीविश्वेशर मंदीरः
प्रचि १८

-
-
-

प्रचि १९

-
-
-
प्रचि २०

-
-
-
प्रचि २१

-
-
-
प्रचि २२

-
-
-
प्रचि २३

-
-
-
प्रचि २४

-
-
-
प्रचि २५

-
-
-
नान्नेश्वर मंदीरः
प्रचि २६

-
-
-
प्रचि २७

-

 बेलुर, हळेबिडू व सोमनाथपुर. कर्नाटक

 कर्नाटक राज्याची निर्मिती १ नोव्हेंबर १९५६ ला झाली. कर्नाटक राज्याला ३००० वर्षांचा इतिहास आहे.
कर्नाटकात होयसळा राजांनी १०व्या ते १४ व्या शतकांत राज्य केले. ह्या दरम्यान त्यांनी बर्‍याच उत्तोमत्तम मंदिरांची निर्मिती केली.
होयसळा राजांची अशी लोककथा सांगण्यात येते की एक सळा नावाचा मुलगा होता. एकदा तो त्याच्या गुरुंबरोबर (सुदत्त) जंगलात जात असताना त्यांच्यावर सिंहाने हल्ला केला. हे पाहुन गुरुंनी त्या मुलाला आज्ञा केली "होय सळा"(कन्नड भाषेत होय म्हणजे "मारणे"(strike/blow)). ती आज्ञा ऐकुन त्या मुलाने सिंहाला ठार मारले. म्हणुन त्या मुलाचे नाव होय-सळा असे पडले.

बेलुर : बेलुर बंगलोर पासुन २५० किमी वर येते. जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे अर्सिकेरे. ईथे हसन मार्गेही बसने जाता येते. हि होयसळा राजांची पुर्व राजधानी होती. ईथे चन्नाकेशवा (विष्णु) चे १११७ मध्ये बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे.
प्रचि १

-
-
-
प्रचि २
होयसळा राजांची राजमुद्रा...

-
-
-
प्रचि ३

-
-
-
प्रचि ४

-
-
-
प्रचि ५

-
-
-
प्रचि ६

-
-
-
प्रचि ७

-
-
-
प्रचि ८

-
-
-
प्रचि ९

-
-
-
प्रचि १०

-
-
-
प्रचि ११

-
-
-
प्रचि १२

-
-
-
प्रचि १३

-
-
-
प्रचि १४

-
-
-
प्रचि १५

-
-
-

हळेबिडू : हळेबिडू बेलुर पासुन १६ किमी वर आहे. ही होयसळा राजांची राजधानी होती. ईथे होयसाळेश्वरा हे ११२१ मधले मंदिर आहे.
प्रचि १६

-
-
-
प्रचि १७

-
-
-
प्रचि १८

-
-
-
प्रचि १९

-
-
-
प्रचि २०

-
-
-
प्रचि २२

-
-
-
प्रचि २३

-
-
-
प्रचि २४

-
-
-
प्रचि २५

-
-
-
प्रचि २६

-
-
-
प्रचि २७

-
-
-
प्रचि २८

-
-
-

प्रचि २९

-
-
-
प्रचि ३०

-
-
-
प्रचि ३१

-
-
-
प्रचि ३२

-
-
-
प्रचि ३३

-
-
-
प्रचि ३४

-
-
-
प्रचि ३५

-
-
-
प्रचि ३६

-
-
-
प्रचि ३७

-
-
-
प्रचि ३८

-
-
-
प्रचि ३९
राम - रावण युद्ध.

-
-
-
प्रचि ४०

-
-
-
प्रचि ४१

-
-
-
प्रचि ४२
समुद्रमंथन

-
-
-
प्रचि ४३

-
-
-
प्रचि ४४

-
-
-

सोमनाथपुर : सोमनाथपुर म्हैसुन पासुन ३५ किमी वर आहे. सोमनाथपुर येथे होयसळा शैलीचे १२६८ मधे बांधलेले केशव मंदिर आहे.
प्रचि ४५

-
-
-
प्रचि ४६

-
-
-
प्रचि ४७

-
-
-
प्रचि ४८

-
-
-
प्रचि ४९

-
-
-
प्रचि ५०

-
-
-
प्रचि ५१

-
-
-
प्रचि ५२

-
-
-
प्रचि ५३

-
-
-
प्रचि ५४

-
-
-
प्रचि ५५

-
-
-
प्रचि ५६

-
-
-

 

शिवसमुद्रम धबधबा : शिवसमुद्रम धबधबा कावेरी नदीवर आहे. हे ठिकाण बंगलोर पासुन १४०किमी वर आहे. ईथे जाण्याचा सर्वात ऊत्तम काळ म्हणजे जुलाई-ऑगस्ट. कावेरीच्या प्रपातामुळे ईथे २ मुख्य धबधबे तयार झाले आहेत. गगनचुक्की व बाराचुक्की. ह्यांची ऊंची साधारण: पणे ९० मीटर आहे. ईथे गेल्यास बाराचुक्की जवळ मिळणारे ईथल्या गोड्या पाण्यातले तिखट मासे खायला विसरू नका.

प्रचि १
भातशेती, कनकपुरा रोड.

-
-
-
प्रचि २
शिवसमुद्रमजवळील जुन्या काळचा पुल.

-
-
-
प्रचि ३

-
-
-
प्रचि ४
गगनचुक्की धबधबे..

-
-
-
प्रचि ५

-
-
-
प्रचि ६
जलप्रपात.

-
-
-
प्रचि ७


-
-
-
प्रचि ८


-
-
-
प्रचि ९

-
-
-
प्रचि १०
कावेरी नदी.

-
-
-
प्रचि ११
रॉक फॉर्मेशन

-
-
-
प्रचि १२
बाराचुक्की धबधबे.

-
-
-
प्रचि १३


-
-
-
प्रचि १४

-
-
-
प्रचि १५


-
-
-
प्रचि १६


-
-
-

कुर्ग : कुर्ग कर्नाटकाच्या पच्शिम घाटात वसलेले एक थंड हवेचे ठिकाण असुन ते बंगलोर पासुन २५० किमी वर आहे. कुर्ग कॉफी च्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. ईथे गेलात तर कॉफी च्या मळ्यातील होम
स्टे मध्ये मुक्कामास जरूर रहा. अगदी वेगळा अनुभव असतो हा.
ईथे जाण्याचा सर्वात ऊत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते मार्च.
-
-
-
प्रचि १८
कुर्ग शहर.

-
-
-
प्रचि१९
कुर्गचा राजवाडा.

-
-
-
प्रचि २०
ओंकारेश्वर मंदिर.

-
-
-
प्रचि २१
कॉफीचा मळा.

-
-
-
प्रचि २२
कॉफीची फळे. ह्यांच्या आतील बिया दळुन कॉफी करतात.

-
-
-

प्रचि २३
खाली कॉफीचे मळे व वर सुपारी ची झाडे.

-
-
-
प्रचि २४
पच्शिम घाटातले जंगल

-
-
-
प्रचि २५
एक पायवाट.

-
-
-
प्रचि २६
अ‍ॅबे धबधबा.

-
-
-
प्रचि २७
दुबेर चा एलिफंट कँप.

-
-
-
बायलाकुप्पे, कुशलनगर :

ईथे तिबेटी बौद्ध भिख्खुंची मोठी मोनास्टरी आहे. ही मोनास्टरी १९७२ मध्ये तिबेटी निर्वासितांनी बांधली.
-
प्रवेशद्वार.
प्रचि २८

-
-
-
प्रचि २९


-
-
-
प्रचि ३०


-
-
-
प्रचि ३१
मुख्य सभागृह.

-
-
-
प्रचि ३२
भित्तीचित्रे.

-
-
-
प्रचि ३३


-
-
-
प्रचि ३४


-
-
-
प्रचि ३४


-

 हंपी, कर्नाटक.

हंपी म्हटले कि लहानपणी ईतिहासाच्या पुस्तकात पाहिलेला उग्र नरसिंहाचा पुतळा आठवायचा. हंपी ला भेट देण्याचा विचार बरेच दिवस मनात होता. हा योग डिसेंबर २०१० मध्ये आला. हंपी कर्नाटकाच्या उत्तरेला आहे. इथले सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे होस्पेट.
हंपी तुंगभद्रा नदीच्या किनारी वसले आहे. सध्याचे हंपी म्हणजे पुर्वीचे विजयनगर (विजयनगर साम्राज्याची (१३३६-१५६५) राजधानी) आणि विजयनगर साम्राज्य म्हणजेच रामायणात उल्लेख असलेले किष्किंधा राज्य. इथे सर्वत्र विजयनगर साम्राज्याचे भग्नावशेष विखरुन पडले आहेत.
ईथे झालेल्या उत्खननात आदिमानवाने वापरलेली भांडी, भित्तीचित्रे ईत्यादी सापडली आहेत.

हंपी बद्दलची बहुतेक सारी माहिती पहिल्या प्रचि मध्ये दिली आहे.
चला तर आज ह्या साम्राज्याची एक छोटिशी झलक पाहुयात.

प्रचि १
हंपी चा ईतिहास

-
-
-
प्रचि २
विरुपाक्ष मंदिर

-
-
-
प्रचि ३

-
-
-
प्रचि ४
विरुपाक्ष मंदिर पॅनो

-
-
-
प्रचि ५
कृष्ण मंदिर, प्रवेशद्वार

-
-
-
प्रचि ६

-
-
-
प्रचि ७

-
-
-
प्रचि ८

-
-
-
प्रचि ९

-
-
-
प्रचि १०

-
-
-
प्रचि ११

-
-
-
प्रचि १२
विजयनगर साम्राज्याचे राजचिन्ह

-
-
-
प्रचि १३
कृष्ण मंदिराजवळील बाजार

-
-
-
प्रचि १४

-
-
-
प्रचि १५
कृष्ण मंदिर परिसर

-
-
-
प्रचि १६
उग्र नरसिंह

-
-
-
प्रचि १७
भूमिगत शिवमंदिर

-
-
-
प्रचि १८
हजारी राम मंदिर

-
-
-
प्रचि १९

-
-
-
प्रचि २०

-
-
-

प्रचि २१

-
-
-
प्रचि २२
महानवमी डिब्बा

-
-
-
प्रचि २३
पुष्करीणी (पायर्‍यांची विहिर)

-
-
-
प्रचि २४
विहिरीला पाणी पुरविणारे पाट

-
-
-
प्रचि २५
विठ्ठल मंदिराला जाण्याचा रस्ता

-
-
-
प्रचि २६
विठ्ठल मंदिर

-
-
-
प्रचि २७
विठ्ठल मंदिर परिसर

-
-
-
प्रचि २८

-
-
-
प्रचि २९
दगडी रथ

-
-
-
प्रचि ३०

-
-
-
प्रचि ३१

-
-
-
प्रचि ३२

-
-
-
प्रचि ३३

-
-
-
प्रचि ३४
विठ्ठल मंदिरातले संगीतमय खांब. ह्या खांबांवर हात मारल्यावर ह्यातुन संगीत येते.

-
-
-
प्रचि ३५

-
-
-
प्रचि ३६

-
-
-
प्रचि ३७

-
-
-
प्रचि ३८

-
-
-
प्रचि ३९

-
-
-
प्रचि ४०
विठ्ठल मंदिर पॅनो

-
-
-

प्रचि ४१
गनगित्ती जैन मंदिर

-
-
-
प्रचि ४२
कमल महाल

-
-
-
प्रचि ४३
गजशाळा

-
-
-

प्रचि ४४
तुंगभद्रा

-
-
-
प्रचि ४५
विजयनगर साम्राज्याचे भग्नावशेष.

 हिरण्यकश्यपू मारताना नरसिंह म्हणजे उग्रनरसिंह. अशी मूर्ती साधारणपणे तळ्याच्या काठी असते. वरदा म्हणतेय की हा उग्र नाहीये. पण मला आठवतय एकदा गाईड म्हणाला होता की याच्या मांडीवर लक्ष्मी बसलेली होती, पण आता मूर्ती विद्रूप झाली आहे. ते नक्की काय भानगडे? वरदा...

ती आख्यायिका मलादेखील नीट ठाऊक नाही. एकदा वाचलय की यवनी आक्रमणाच्या भितीने मूर्ती नेऊन पंढरपुरात लपवली. एकदा वाचलय की पुंडलिकाच्या हाकेला ओ देऊन विठ्ठल गेला तो तिथेच आहे. एक मात्र खरं की कर्नाटकामधे देखील विठठल भक्ती पुष्कळ आहे. पुरंदरदासांच्या वगैरे रचना ऐकल्य्वार ते जाणवतं.

विठ्ठलाचा मांडलीक राजा (नाव नाही आठवत आहे आता) त्याला भेटायला येणार असतो. म्हणून विठ्ठल घरी सेवकाकडून निरोप पाठवतो की त्याच्या भोजनाची जय्यत तयारी कर . सेवक घरी येईपर्यंत राणी (पदुबाई) आणि तिच्या दासींचे जेवण झाले असते अणि ती सेवकाहाती उलट निरोप पाठवते की ती तयारी करणार नाही. पण ती सगळी तयारी करून ठेवते. इकडे विठोबाला तो निरोप मिळताच तो तिला शाप देतो. त्या रागाने पदुबाई मरते आणि तिच्या अस्थी समुद्रात वाहून जातात. घरी आल्यावर त्याला पदुबाईने केलेली तयारी दिसते आणि त्याला खूप दु:ख होते. दु:खभरात तो सन्यास घेतो आणि आपले राज्य सोडून निघून जातो.

तो मांडलीक राजा विठोबाला आणि पदुबाईला आईवडिलांच्या स्थानी मानत असतो. त्याला जेंव्हा हे कळते तेंहा त्याला आपल्यामुळे हे सर्व घडले असे वाटते आणि तो खूप कष्टी होतो. मग तो तपश्चर्या करून आपल्या आईच्या अस्थी सागराकडून मिळवतो आणि चंद्रभागेत विसर्जीत करतो. त्यातून एक कमळ उगवते. विठोबा फिरत फिरत त्या ठिकाणी येतो आणि ते कमळ तोडतो. त्यातून पदुबाई रुक्मीणीरुपाने प्रकटते. आपल्याच शापामुळे विठोबा तिच्याशी परत संसार करू शकत नाही पण तो मग पढरपुरातच रहातो.

अशी काहीशी अख्यायिका आहे.

हा पहा मोठ्या गणपतीचा फोटो

 

वरचा मोठा गणपती आहे ना तसे दोन गणपती आहेत. एक कडलीकाळ गणेश आणि एक सासवीकाळ गणेश. (हरभर्‍या डाळीचा गणपती आणि मोहरीचा गणपती) हे दोन्ही गणपती किमान ८-१० फूटी आहेत आणि मोनोलिथ आहेत (बहुधा)

आता यवढ्या मोठ्या गणपतीला इतकी चिमुकली नावे का दिली आहेत कुणास ठाऊक?

नरसिंह मूर्तींचे काही प्रकारः

विदरण नरसिंह - म्हणजे हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन पोट फाडणारा नरसिंह

केवल नरसिंह - एकटाच, वैष्णव आयुधांसकट

स्थौण नरसिंह - खांबातून प्रकट होताना

लक्ष्मीनरसिंह - मांडीवर लक्ष्मी घेऊन बसलेला

योगनरसिंह - योगपट्ट बांधून बसलेला

कधीकधी हिरण्यकश्यपूशी युद्ध करताना दाखवतात.

नितिनचंद्र, पु.ना. ओक प्रकरणात प्लीज फारसं लक्ष घालू नका. त्यात खरंच फारसा काही अर्थ नाही. आणि हंपी प्राचीन नाही मध्ययुगीन आहे. १५व्या शतकातलं.
मुस्लिम देशात कोण म्हणतं असे भव्य प्राचीन अवशेष नाहीत म्हणून? भरपूर आहेत. अगदी हंपीपेक्षाही भव्य आहेत. आपल्याला माहित नसतं एवढंच.
भारतीय स्थापत्यशास्त्राला घुमट आणि कमान (ट्रू आर्च - विथ की स्टोन) ही मुस्लिम स्थापत्यशास्त्राकडून मिळालेली देणगी आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीची, स्थापत्यशास्त्राची पत कमी होत नाही काही. ही अशी देवाणघेवाण जगभर चालूच असते.

 हम्पी सुंदर आहे. हे फोटो दोन वर्षांपूर्वीचे दिसतात. त्याच काळात आम्ही मागच्या वर्षो तेथे गेलो होतो तेव्हा मात्र तेथे खूप गर्दी होती.
तेथे जाणाऱ्यांसाठी सूचना - सीजन असता तेथे जाऊ नये. विशेषत: शाळांच्या सहली निघतात तेव्हा तेथे जाणे बिलकुल टाळावे. ती मंदिरे माणसांच्या गर्दीने फुलली कि त्या वातावरणातील जादू हरवते. पाऊस काळात तेथे गर्दी कमी असते आणि राहण्याचे दरही कमी असतात. शिवाय पाऊस मुसळधार नसल्याने जास्त अडचण येत नाही. तेथे जाऊन guide घेऊ नये. निवांत चार पाच दिवस काढले तरी ते अपुरे आहेत. सायकल घेऊन तो परिसर खूप भटकण्यात मजा आहे. तुन्गभद्रेच्या काठावर संध्याकाळ व्यतीत करणे सोडू नये. जितकी गर्दी कमी तितका तो भाग haunting वाटतो.

बदामी कर्नाटक

 

चालुक्यनगरी बदामी - भाग १ - ऐतिहासिक सहलीची सुरुवात

सव्वीस जानेवारीची पहाट. अर्धा तास उशिराने धावत असलेली सोलापूर सुपरफास्ट अखेरीस सोलापूर स्थानकात शिरली. आपली पुढची गाडी चुकणार नाही याची खात्री पटल्याने मी निर्धास्त झालो. अर्धवट झोपेतच मी गाडीतून उतरलो. वातावरणात कमालीचा गारठा होता. मात्र गाडीतल्या एसी पेक्षा हा काहीसा बोचणारा गारठाच जास्त आल्हाददायक वाटत होता. पलीकडे पाच नंबरवर हुबळी सुपरफास्ट लागली होती. मी लगबगीने जाऊन माझी जागा शोधली आणि गाडी सुटायची वाट बघत बसलो. सव्वीस जानेवारीच्या सुट्टीला जोडून आलेल्या वीकेंडमुळे चार दिवस सलग सुट्टी मिळाली होती. एवढी सुट्टी म्हणजे माझा जीव घरात रमणे अशक्य. मग कर्नाटकातल्या ऐतिहासिक जागांच्या सहलीचे नियोजन केले आणि निघालो. बदामी, पट्टदकल, आणि ऐहोळे यांसाठी दोन दिवस तर हम्पीसाठी दोन दिवस असा कार्यक्रम होता. या जागांविषयी बरेच ऐकले होते. आज प्रत्यक्ष भेट देण्याचा योग आला होता. सगळी जय्यत तयारी करून मी निघालो होतो. काहीतरी भन्नाट पहायला मिळणार आणि नेहमीच्या दिनचर्येतून चार दिवसांची सुटका होणार या भावनेने मी फारच उत्साहात होतो.

तेवढ्यात चहावाल्याच्या आवाजाने माझी तंद्री भंगली. बोचणाऱ्या थंडीवर उत्तम उतारा माझ्या समोर हजार होता. गरमागरम चहा घशाखाली गेल्यानंतर जरा तरतरी आली. नियोजित वेळेनुसार गाडीने प्रस्थान केले. एव्हाना उगवतीकडे तांबडं फुटू लागलं होतं. पाखरांची किलबिल सुरु झाली होती. बऱ्याच दिवसांनी सूर्योदयाचा प्रसन्न क्षण अनुभवत होतो. गाडीने जसा वेग पकडला तशी थंड हवा झोंबू लागली. मी मुकाट्याने खिडकी बंद करून झोपायचा प्रयत्न करू लागलो. गाडी तशी रिकामीच होती. समोरच्या सीटवर एक आजोबा अंगाचं मुटकुळं करून निवांत झोपले होते. मीही त्यांचा कित्ता गिरवत त्या मोकळ्या सीटवर आडवा पसरलो. भारतीय रेल्वेचा खडखडाट म्हणजे जणू बाळाचा पाळणाच! त्या हेलकाव्यांत छान झोप लागली. विजापूरला गाडीत गर्दी झाली. मग मात्र मला माझा सीटवरचा पसारा आवरता घ्यावा लागला. साधारण साडेअकराला बदामी स्टेशनवर उतरलो. बदामी हे कर्नाटक मधल्या बागलकोट जिल्ह्यातलं एक शहर. चालुक्यकालीन लेण्या आणि मंदिरे यांसाठी प्रसिद्ध. मी हॉटेलवर जाऊन आन्हिकं उरकली आणि शहर बघायला बाहेर पडलो.

शहर तसं लहानसंच होतं. जेमतेम २५००० लोकवस्ती असेल. सगळी प्रेक्षणीय स्थळं अगस्त्य तीर्थाच्या आसपास एकवटलेली आहेत. माझ्या हॉटेलपासून तिथलं अंतर साधारण २ किमी असेल. एरवी सहज चालून गेलो असतो. पण इथलं दुपारचं ऊन सहन होत नव्हतं. सोलापुरातला गारठा कुठच्या कुठे पळाला होता. शेवटी रिक्षा केली. शहरातल्या लहान-मोठ्या गल्ल्यांतून वाट काढत रिक्षा पुढे जाऊ लागली. त्या लहानशा रस्त्यावर फिरणारी गुरं, डुकरं, आणि कुत्री, मधेच खेळणारी लहान मुलं, आणि ये-जा करणारी लोकं एका टिपिकल भारतीय गावाचा अनुभव देत होती. या सगळ्या कोलाहलात ती प्राचीन मंदिरे कोणत्या अवस्थेत उभी असतील आणि त्यांचा कसा अनुभव येईल अशा विचारात मी होतो. तेवढ्यात ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग - संरक्षित क्षेत्र, बदामी’ अशी पाटी दिसली आणि एका प्राचीन कमानीतून रिक्षा आत शिरली. आत शिरताच एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश केल्याचा आभास झाला. उजवीकडे नितांतसुंदर असे अगस्त्य तीर्थ दिसत होते. तीर्थाच्या चहूबाजूंनी ताशीव कड्यांचे लाल पहाड रखवालदारांसारखे उभे होते. दक्षिणेकडच्या पहाडात बदामीची सुप्रसिद्ध गुंफा मंदिरे कोरलेली दिसत होती. शहराच्या बाजूने एक विस्तीर्ण घाट तीर्थात उतरत होता. त्याच्या समोरच्या बाजूला उभारलेले सुबक असे भूतनाथाचे मंदिर साऱ्या परिसराचे सौंदर्य एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवत होते. मी रिक्षातून उतरलो. तीर्थाच्या काठाशी एक प्रचंड वटवृक्ष आपल्या पारंब्या सावरत उभा होता. त्या रणरणत्या उन्हात थोड्याफार सावलीचा तोच एक आधार होता. मी तिथे थांबून आता काय बघू, कुठून सुरुवात करू याचा विचार करू लागलो. इतक्यात शेजारचे वस्तुसंग्रहालय नजरेस पडले.

बदामीचे सुप्रसिद्ध भूतनाथ मंदिर 


उन्हापासून तात्पुरती सुटका म्हणून मी त्या वस्तुसंग्रहालयात शिरलो. अपेक्षेपेक्षा आतली मांडणी फारच नेटकी होती. उत्खननात सापडलेले अनेक अवशेष तिथे मांडले होते. त्यांपैकी मयूरतोरण आणि लज्जागौरी ही शिल्पे विशेष उल्लेखनीय. एका दालनात चालुक्य साम्राज्याचा इतिहास चित्रात्मक पद्धतीने मांडला होता. कन्नड भाषेची सध्याची लिपी कशी उत्क्रांत झाली ती पक्रिया फारच आकर्षक पद्धतीने दाखवली होती. दुसऱ्या दालनात बदामी आणि परिसराची त्रिमितीय प्रतिकृती बनवलेली होती. दुर्भाग्याने आत फोटो काढायला मनाई होती. एकूण संग्रहालय लहानच होते. अर्ध्या तासात तिथून मी बाहेर पडलो. बाहेरच्या दुकानातून बदामीविषयी माहिती असलेले एक लहानसे पुस्तक विकत घेतले. युरोपातल्या प्रसिद्ध जागांविषयी जशी इत्थंभूत माहिती इंटरनेट वर मिळते तशी भारतातल्या जागांविषयी मिळत नाही. शिवाय तिथे कोणी मार्गदर्शक सोबत घ्यायचा तर त्यालाही कितपत माहिती असेल याची काय शाश्वती? त्यामुळे मी सरळ पुस्तक वाचून पुढचा मार्ग ठरवायचा निर्णय घेतला. एका तथाकथित प्रमाणित मार्गदर्शकाने लिहलेले ते पुस्तक तसे माहितीपर होते. व्याकरणाच्या अनेक चुका असल्या तरी आसपासची आवश्यक माहिती त्यात होती. मी त्या वटवृक्षाखाली विसावलो आणि पुस्तक चाळू लागलो.

बदामीचे मूळ नाव वातापी. प्राचीन काळापासून हे शहर एक महत्त्वाचे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र होते. या नावामागची कथाही रंजक आहे. कोणे एके काळी इथल्या डोंगरांत वातापी आणि इल्वल असे दोघे असुरबंधू रहात होते. ते दाराशी येणाऱ्या पाहुण्यास भोजनासाठी आमंत्रित करत. मग इल्वल वातापीला मारून त्याच्या शरीरापासून बनलेले अन्न त्या पाहुण्यास खाऊ घाली. पाहुण्याने ते अन्न खाताच वातापी त्याचे पोट फाडून बाहेर येई. मग दोघे असुरबंधू त्या मृत पाहुण्यास गट्टम करत. एकदा योगायोगाने अगस्त्य ऋषी या परिसरातून जात होते. इल्वलाने त्यांना आमंत्रित केले व ठरल्याप्रमाणे वातापीच्या शरीरापासून बनलेले अन्न खाऊ घातले. मात्र अगस्त्य ऋषींनी असुरांचा डाव ओळखला व वातापी पोटात जिवंत व्हायच्या आधीच “वातापी जीर्णोSभव” असा मंत्र म्हणून ते अन्न पचवून टाकले. अशा प्रकारे वातापीचा त्याच्या भावाच्याच हस्ते मृत्यू झाला व लोकांची त्यांच्या जाचापासून सुटका झाली. अगस्त्य ऋषींनी घडवून आणलेल्या त्या वधामुळे त्या सरोवरास अगस्त्य  तीर्थ असे नाव मिळाले.

साधारण इसवी सनाच्या पाचव्या शतकात उदयास आलेले चालुक्य साम्राज्य दक्षिण भारतातले एक महत्त्वाचे साम्राज्य समजले जाते. बदामीचे भौगोलिक, आर्थिक, व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन चालुक्य सम्राट पुलकेशीन-१ याने आपली राजधानी इथे वसवली. इथली गुंफा मंदिरे, इतर देवालये, आणि किल्ल्यांची उभारणी त्याच्याच काळात झाली. पुढे पुलकेशीन-२ याने आसपासच्या इतर राजवटींचा पराभव करून उत्तरेस नर्मदा नदीपर्यंत चालुक्य साम्राज्याचा विस्तार केला. सुमारे तीनशे वर्षं चालुक्य साम्राज्याने दक्षिण भारतावर आधिपत्य गाजवले. कालांतराने आठव्या शतकात अंतर्गत यादवी व फितुरी यांमुळे या साम्राज्याचा अस्त झाला. चालुक्य राजांनी आपल्या कार्यकाळात दक्षिण भारतातली मंदिरस्थापत्यकला भरभराटीस आणली. त्या काळात बांधली गेलेली एकापेक्षा एक अशी सुबक मंदिरे आजही त्या गतवैभवाच्या खुणा सांगत दिमाखाने उभी आहेत. 

त्या मंदिरांची भेट कधी एकदा घडतेय याची कमालीची उत्सुकता माझ्या मनात होती. 


चालुक्यनगरी बदामी - भाग २ - शिवालये आणि गुंफा मंदिरे

उच्च शिवालयाकडे जाणारी वाट 
एव्हाना चार वाजत आले होते. उन्हं कलती व्हायला लागली होती. उत्तर शिवालयांकडे जाणारा मार्ग समोरच दिसत होता. हर हर महादेव म्हणून मी पायऱ्या चढायला सुरुवात केली. वाट तशी खड्या चढणीची होती. काही अंतर चढून जाताच ती वाट डोंगरांच्या मधल्या घळईत शिरली. इथे वेगळाच प्रसन्न गारवा जाणवत होता. पहाडाच्या भिंतींवर काही अर्धवट कोरलेली शिल्पे दिसत होती. मधेच एखादे पिंपळाचे रोप त्या पहाडाच्या अन्तःपुरातल्या पाण्याच्या आधारावर वाढलेले दिसत होते. त्याची अस्ताव्यस्त पसरलेली मुळे त्या पहाडाला एखाद्या जटाधारी मुनीचे रूप देत होती. त्या घळईतून बाहेर पडलो आणि डाव्या हाताला निम्न शिवालय दिसले. पहाडावरच्या पठारावर ते सुबक शिवालय फारच खुलून दिसत होते. त्या पठारावरून एका बाजूला अगस्त्य तीर्थ तर दुसरीकडे बदामी शहर असे विहंगम दृश्य दिसत होते. मंदिर तसे लहानसेच होते. मात्र त्यावरचे कोरीवकाम तत्कालीन स्थापत्यविशारदांच्या कौशल्याची दाद देत होते. मंदिराच्या मागच्या अंगाने वर पाहिले असता पाठीमागचा पहाड आणि त्यावरचे उच्च शिवालय नजरेच्या एका टप्प्यात दिसत होते. तांबूस रंगाचा ओबडधोबड पहाड ते अद्भुतरम्य शिवमंदिर आपल्या छातीवर अभिमानाने मिरवत होता. काही क्षणांसाठी आयन रँडच्या कादंबरीतला हॉवर्ड रॉर्क आठवला. रॉर्क एक निष्णात स्थापत्यविशारद एका विलक्षण दृष्टीकोनातून स्थापत्यकलेची जोपासना करतो. तो म्हणतो, एखाद्या भूभागात कशा प्रकारची वास्तू बांधायची याची प्रेरणा तिथला निसर्गच देत असतो. स्थापत्यविशारदाची भूमिका एवढीच की त्याने त्या मूळ प्रेरणेशी प्रामाणिक राहून वास्तू बांधावी. ती प्रेरणा अचूक ओळखणे हेच त्या विशारदाचे कौशल्य. बदामीतल्या स्थापत्यविशारदांना ती प्रेरणा हुबेहूब समजली होती. इथला दगड अन् दगड जणू त्यांना सांगत होता, माझ्यापासून शिल्पे घडवा, कळस बांधा, अलंकृत खांब उभारा! 

एका दृष्टीकोनातून दिसणारी शिवालये 
काहीशा गूढ प्रेरणेने मी त्या उच्च शिवालयाकडे निघालो. आता चढण फारशी तीव्र नव्हती. निम्न शिवालयापेक्षा काहीसे मोठे असे ते शिवालय एखाद्या ध्यानमग्न ऋषीस्तव त्या पहाडावर विराजले होते. जणू काही साऱ्या संसाराची तिथून स्थितप्रज्ञतेने पाहणी करत असावे. तिथून निम्न शिवालय करंगळीएवढे भासत होते. त्याखालचे बदामी शहर म्हणजे जणू अस्ताव्यस्त पसरलेला पाचोळा. मंदिरावरच्या कोरीव मूर्ती पुढे सरकणारा काळ एखादा सिनेमा पहावा तशा स्तब्धतेने पाहत होत्या. काळाची असंख्य कडू-गोड आवर्तनं पाहून त्यांनाही विरक्ती आली असेल एव्हाना. मंदिराच्या गाभाऱ्यात शिरलो तर एक अनामिक गारवा जाणवू लागला. बाहेरचं कडक उन त्या पाषाणमंदिराच्या भिंतींनी जणू पिऊन टाकलं होतं. तिथली गूढ शांतता कमालीची प्रसन्न वाटत होती. मंदिर म्हणजे देवाशी संवाद साधण्याची जागा. पण त्यासाठी आधी स्वतःशी निःसंदिग्ध संवाद हवा. तो साधण्यासाठी आवश्यक ती वातावरण निर्मिती करणे हा मंदिराचा मूळ उद्देश. एखाद्या नास्तिकाला जरी त्या शिवालयात नेलं तरी तो अंतर्मुख होईल असे वातावरण त्या शिवालयात अनुभवास येत होते. तिथे थोडा वेळ घालवून मी मंदिराच्या बाहेर पडलो. शिवालये असलेल्या या पहाडावर काही बुरुज आणि तटबंदी आहे. तिथे काही वेळ छायाचित्रण करून मी खाली उतरलो. समोरच्या गुंफा खुणावत होत्या.

शिवालयाच्या बाजूने दिसणारे विहंगम दृश्य 

अगस्त्य तीर्थाच्या काठाकाठाने चालत मी पलीकडच्या बाजूला पोहोचलो. गुंफांकडे जाणारा रस्ता समोर दिसत होता. साधारण पावणेपाच वाजले होते. सहा वाजता गुंफा बंद होणार होत्या. तासाभरात सगळं बघून होईल की नाही याच्या विचारात मी होतो. पण उद्याचा दिवस पट्टदकल आणि ऐहोळे यांसाठी ठरवलेला असल्याने इथे पुन्हा यायला मिळेल की नाही याची खात्री वाटत नव्हती. शेवटी जेवढं होईल तेवढं बघू असा विचार करून मी तिकीट काढलं आणि पायऱ्या चढू लागलो. तो सगळा परिसर गर्दीने फुलून गेला होता. सव्वीस जानेवारीची सुट्टी असल्याने जवळपासचे लोक मोठ्या प्रमाणावर तिथे आले होते. कोण्या एका शाळेची सहलही आली होती. त्या शंभर-एक पोरांचा कलकलाट सगळीकडे भरून राहिला होता. त्या गुंफांमध्ये लपंडाव खेळणाऱ्या पोरांना त्यांचे शिक्षक मोठमोठ्याने हाका मारून बसकडे पिटाळत होते. एकूणच माझा इकडे येण्याचा दिवस चुकला होता. पण आता काही इलाज नव्हता. त्या सगळ्या गोंगाटाकडे दुर्लक्ष करून मी वर चढू लागलो. सुरुवात शेवटच्या गुंफेपासून करावी आणि एक-एक गुंफा बघत खाली यावे असा विचार करून मी थेट शेवटच्या गुंफेपाशी गेलो. इथे एकूण चार गुंफा आहेत. त्यांपैकी पहिली शंकराला, दुसरी व तिसरी विष्णूला, तर चौथी जैन तीर्थंकरांना समर्पित आहे. 

गुंफा मंदिर क्रमांक चार 


बाहुबली 

चौथ्या गुंफेबाहेरच्या प्रांगणात जरा शांतता होती. अगस्त्य तीर्थ आणि पलीकडचे भूतनाथ मंदिर इथून फारच विलोभनीय दिसत होते. मी गुंफेत शिरलो. अखंड पहाडातून कोरून बनवलेली ती गुंफा तशी प्रशस्त होती. आतल्या खांबांवर, छतावर, सगळीकडे नाजूक कोरीवकाम केलेले होते. मंडपातून आत शिरताच डाव्या बाजूला नजरेस पडली तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांची मूर्ती. मूर्तीच्या डोक्यावर पंचमुखी आदिशेष दिसत होता. त्याच्याच समोरच्या बाजूला निर्वाणावस्था प्राप्त झालेला बाहुबली दिसत होता. गुंफेच्या गर्भगृहात चोविसावे तीर्थंकर वर्धमान महावीर ध्यानमग्न अवस्थेत दिसत होते. गुंफेतल्या भिंतींवर इतर तीर्थंकरांच्या आकृती दिसत होत्या. या गुंफेत जैन धर्मीय कदाचित निवास करत असावेत. एकंदरीतच गुंफेची रचना एखाद्या मंदिराच्या अंतर्गत रचनेसारखी होती. म्हणूनच या गुंफांना गुंफा मंदिरे म्हटले जात असावे. तिथून खाली उतरून मी तिसऱ्या गुंफेपाशी आलो. तिसरी गुंफा चौथ्या गुंफेपेक्षा जास्त मोठी होती. या गुंफेस महाविष्णू गुंफा म्हटले जाते. आत शिरल्या बरोबर अलंकृत खांब नजरेस पडले. समांतर उभ्या रेषांनी त्या खांबांना बहुमितीय आकार दिला होता. त्यांच्या वरच्या भागात देव-देवतांची शिल्पे कोरलेली होती. डाव्या हाताला महाविष्णूची विलोभनीय मूर्ती विराजमान झालेली दिसत होती. पंचमुखी आदिशेषाने याही मूर्तीच्या वर छत्र धरले होते. बाजूला गरुड आणि लक्ष्मी यांच्या आकृती दिसत होत्या. त्याच्याच समोरच्या बाजूला विजय नरसिंहाची मूर्ती आवेशात उभी होती. हिरण्यकपशूचा वाढ केल्यानंतरचा विजयी उन्माद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. याच गुंफेत प्रणयाराधानेत मग्न जोडप्यांच्या काही मूर्ती दिसत होत्या. त्यांचे पोशाख, अलंकार, भावमुद्रा सारे काही त्या लाल पाषाणातून हुबेहूब साकारले होते. 


वराह अवतार 
दुसऱ्या गुंफेत विष्णूचे काही अवतार आणि त्यांच्या संदर्भातल्या कथा साकारल्या होत्या. बळीराजाच्या मस्तकावर पाय ठेवणारा वामन हे त्यातले लक्षवेधी शिल्प होते. त्यासोबत वराह अवतारही साकारला होता. या गुंफेत मुख्य मूर्ती मात्र नव्हती. पहिल्या गुंफेपर्यंत पोहोचलो आणि सुरक्षारक्षकाने शिटी वाजवत सगळ्यांना बाहेर काढायला  सुरुवात केली. गुंफा बंद व्हायची वेळ झाली होती. जमेल तेवढे पाहून घेण्याच्या उद्देशाने मी आत शिरलो. ही गुंफा शंकराला समर्पित होती. सर्वात जुनी आणि सगळ्यात मोठी असलेली ही गुंफा गर्भगृह, सभा मंडप, आणि मुखमंडप अशा तीन भागांमध्ये विभागलेली होती. एका बाजूला तांडवनृत्य करणारा अठरा हातांचा शंकर पाषाणातून घडवलेला होता. त्याच्या मागील दोन हातांत एक नाग, तर इतर हातांत डमरू आणि इतर वाद्ये होती. त्याच्या शेजारी गणेश व इतर वादक दिसत होते. नृत्यमग्न शंकराची ती मूर्ती नटराज म्हणून ओळखली जाते. अत्यंत कौशल्याने घडवलेली ही मूर्ती भारतीय अश्म-छेद स्थापत्यकलेचा उत्तम नमुना समजली जाते. याच गुंफेत महिषासुरमर्दिनी, अर्धनारीश्वर, आणि गजवृषभ अशी इतर शिल्पेही होती. आता अंधार पडू लागला होता. आधीच अंधारलेल्या त्या गुंफामध्ये अजून गडद अंधार हळूहळू उतरत होता. त्यामुळे फोटो काढता येणे अशक्य झाले होते. बाहेरचा गलका वाढतच चालला होता. शेवटी मी गुंफांची भेट आवरती घेतली आणि खाली उतरलो. बदामीतल्या सगळ्यात महत्त्वाच्या जागेला पूर्ण न्याय देऊ शकलो नाही याची काहीशी हुरहूर मनात दाटली होती. मात्र पाषाणात कोरलेल्या एवढ्या सुंदर मूर्ती पाहून नजर संपृक्त झाली होती. उद्या जमलं तर परत येईन असा विचार करून मी हॉटेलवर परतलो.


वामनावतार  

  बदामी छोटेसे गाव आहे. बदामीला स्वतःचे असे छोटे स्टेशन आहे. जवळचे मोठे गाव बागलकोट. बंगलोर ते बदामी असा ओव्हरनाईट प्रवास आहे.
बदामी ही चालुक्य राजवटीची राजधानी होती.
ईथल्या लेण्या, भुतनाथ मंदिर व किल्ला पहाण्यासारखा आहे. ईथे आसपास पण पहाण्यासारखे बरेच काही आहे. जसे पट्टडक्कल, ऐहोळे, लाक्कुंदी ईत्यादी. हा सर्व परिसर पहायचा म्हणजे कमीतकमी ३ दिवस हवेत. बदामीला मुक्कामाला राहिलात तर ईथल्या KTDC च्या "मयुरा चालुक्य" ह्या हॉटेलमध्ये जरूर रहा. अतिशय शांत, रम्य व स्वच्छ परिसर आहे.

बदामीच्या लेण्या:
बदामीच्या लेण्या ह्या ६ व्या व ७ व्या शतकातल्या आहेत. ईथे एकूण ४ लेण्या आहेत. लेण्यांचे कोरीव काम चालुक्य शैलीतील आहे.
बदामीबद्दल सविस्तर माहिती ईथे पहावी.
http://www.flickr.com/photos/mukulb/5871950013/

प्रचि १

-
-
-

प्रचि २

-
-
-

प्रचि ३

-
-
-

प्रचि ४

-
-
-

प्रचि ५

-
-
-

प्रचि ६

-
-
-

प्रचि ७

-
-
-

प्रचि ८

-
-
-

प्रचि ९

-
-
-

प्रचि १०

-
-
-

प्रचि ११

-
-
-

प्रचि १२

-
-
-

प्रचि १३

-
-
-

प्रचि १४

-
-
-

प्रचि १५

-
-
-

प्रचि १६

-
-
-

प्रचि १७

-
-
-

प्रचि १८

-
-
-

प्रचि १९

-
-
-

प्रचि २०

-
-
-

प्रचि २१

-
-
-

प्रचि २२

-
-
-

प्रचि २३

-
-
-

प्रचि २४

-
-
-
भुतनाथ मंदिरः
हे ७ व्या शतकातील, चालुक्य शैलीतील मंदिर आहे. हे भुतनाथाचे (शंकर) मंदिर आहे. हे मंदिर एका रम्य तलावाकाठी बांधलेले आहे. 

भूतनाथ मंदिरसमूह आणि दक्षिण किल्ला

पट्टदकल आणि ऐहोळेची सहल तशी अपेक्षेपेक्षा लवकरच संपली. ऐहोळेमधली शेकडो मंदिरे जेवढी पहाल तेवढी कमीच. शिवाय एका मागून एक मंदिरे बघून दृष्टी बधीर झाल्यासारखी वाटू लागली होती. त्यामुळे जेवण झाल्यानंतर मी थेट बदामीकडे परतायचा निर्णय घेतला. शहरात पोहोचलो तर जेमतेम चार वाजले होते. सूर्यास्त व्हायला अजून २ तास बाकी होते. तसाही अगस्त्य तीर्थाच्या पलीकडचा भूतनाथ मंदिर समूह बघायचा राहिला होता. तो पाहू आणि सूर्यास्ताच्या वेळी थोडीफार फोटोग्राफी करू असा विचार करून मी बाईकचालकाला अगस्त्य तीर्थाजवळ सोडायला सांगितलं. चालकाचे पैसे चुकते केले आणि मी भूतनाथ मंदिरांकडे जायला निघालो. तीर्थाच्या परिसरात संपूर्ण शुकशुकाट होता. शुक्रवारचा कामाचा दिवस असल्याने आसपासच्या उठवळ पर्यटकांची गर्दी दिसत नव्हती. एखादे पर्यटन स्थळ असावे तर ते असे! मी मोठ्या खुशीत कॅमेरा काढून भूतनाथ मंदिराचे फोटो काढू लागलो. तीर्थाच्या पार्श्वभूमीवर दिसणारी ती सुबक मंदिरे आणि मागचा रक्तवर्णी डोंगरकडा हे बदामीचे अगदी टिपिकल चित्र. गुगलवर बदामी टाकले असता पहिला समोर येतो तो याच मंदिराचा याच जागेहून काढलेला फोटो. गुरु चित्रपटातला लग्नाचा प्रसंग इथेच चित्रित झाला होता. त्या दृश्याची प्रत्यक्षातली अनुभूती कित्येक पटींनी अधिक सुंदर होती. तिथे मनसोक्त फोटो काढून मी अखेरीस मंदिरात शिरलो.  

भूतनाथ मंदिरे आणि अगस्त्य तीर्थ 

मंदिरातला सुबक नंदी 
या समुहात दोन मंदिरे आहेत. दोन्ही मंदिरे आद्य दक्षिण भारतीय शैलीत बांधलेली. त्यातल्या पहिल्या मोठ्या मंदिराचा मंडप काहीसा तीर्थाच्या आत शिरलेला आहे. शिखराच्या आसपासचे बांधकाम काहीसे अपूर्णावस्थेत आहे. ही मंदिरे दोन टप्प्यांत बांधली गेली. अंतर्गत भागावर आद्य चालुक्य शैली तर बाह्य भागावर कल्याणी चालुक्य शैलीचा प्रभाव आढळतो. दोन्ही मंदिरे शिवाची आहेत. मोठ्या मंदिराच्या मंडपात एक सुबक नंदी विराजमान झालेला दिसतो. उत्तरेकडच्या शिवालयांच्या तुलनेत ही मंदिरे बऱ्या अवस्थेत दिसत होती. कलत्या उन्हाच्या प्रकाशात मंदिराचे खांब तळपत होते. त्यांतून झिरपत येणारे उन्हाचे कवडसे मंडपात छाया-प्रकाशाचा अद्भुत खेळ खेळत होते. मंदिराच्या मंडपातून समोरचे तीर्थ आणि आजूबाजूचा रम्य परिसर फारच विलोभनीय दिसत होता. इतक्यात समोरच्या बाजूने एक तरुण विद्यार्थ्यांचा ग्रुप येताना दिसला. आता इथेही कालच्यासारखा कलकलाट सुरु होणार कि काय या विचाराने मी धास्तावलो. पण पाहतो तर काय, ते सारे तरुण समोरच्या तीर्थात उतरणाऱ्या पायऱ्यांवर विसावले आणि चित्रकलेच्या सामानाची जुळवाजुळव करू लागले. एखाद्या फाईन आर्ट्स किंवा तत्सम अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असावेत. कलेच्या माध्यमातून या रम्य परिसराला अभिवादन करणारे तरुण पाहून फार बरं वाटलं. इथून निघताना त्यांच्या चित्रांवर एक नजर टाकायची असं ठरवून मी मंदिरांच्या आसपासचा परिसर पहायला निघालो. 

अर्धवट बांधला गेलेला मंदिराचा कळस 

तिथला परिसर तसा लहानसाच होता. मंदिरामागच्या प्रचंड शिळेवर एक लहानसे मंदिर दिसत होते. पण तिथे जायचा मार्ग बंद होता. इतक्यात माझी नजर मागच्या डोंगरावर जाणाऱ्या वाटेवर पडली. त्या वाटेबद्दल सहजच तिथल्या सुरक्षा रक्षकाला विचारलं. अगस्त्य तीर्थाच्या दक्षिणेकडच्या किल्ल्यावर ती वाट जात होती. डोंगरातली वाट बघून माझ्यातला ट्रेकर जागा झाला. वरून दिसू शकणारे तीर्थाचे आणि आसपासच्या परिसराचे दृश्य मी मनात रेखाटू लागलो. फार विचार न करता मी सरळ ती वाट चढू लागलो. वाटेतले दगड पांढऱ्या रंगात रंगवले होते. वाट चुकू नये म्हणून ही सोय असावी. त्यांचा माग ठेवत मी पुढे जाऊ लागलो. संध्याकाळचा प्रसन्न वारा सुटला होता. चढण फार तीव्र नव्हती. काही वेळातच ती वाट डोंगराच्या मागे पोहोचली. तीर्थाचा परिसर आता नजरेआड गेला होता. डोंगरामागचे खुरट्या झुडुपांचे रान निश्चल पहुडले होते. काही वेळापूर्वी वाहणारा वारा त्या डोंगराने अडवून धरला होता. इथून पुढे चढण थोडी तीव्र होती. पांढरे दगड नाहीसे झाले होते. पण लोकांनी फेकलेला कचरा अधेमध्ये दिसत होता. आसपासच्या लोकांचा हा अपेयपानाचा अड्डा असावा. गुटख्याची पाकिटे आणि बियरच्या बाटल्यांचे तुकडे माझ्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावत होते. वीसेक मिनिटात वर पोहोचलो. डोंगराचा माथा तसा सपाट आणि खडकाळ होता. मधेच उगवलेली काटेरी झुडुपे शाळा सुटल्यावर मैदानात उगीच रेंगाळणाऱ्या पोरांसारखी भासत होती. एवढ्यात चार तरुणांचा एक ग्रुप उजवीकडच्या बाजूने येताना दिसला. मला एकट्याला पाहून त्यांना जरा आश्चर्यच वाटलं असावं. ते जिथून आले तिथे काय आहे असे मी विचारताच सगळे एकदम उत्साहात तिथल्या ‘व्यू’ विषयी सांगू लागले. त्यांनी केलेल्या वर्णनावरून मी मोठ्या उत्साहात तिथे जायला निघालो. 

डोंगरकड्यावरून दिसणारे विलोभनीय दृश्य 
डोंगरमाथ्याचा एक तुकडा बाहेरच्या बाजूला झुकला होता. त्या लहानशा सपाट जागेवर मी पोहोचलो आणि दरीतून वर झेपावणारा वारा एकदम अंगावर आला. थोडा दबकतच मी पुढे गेलो. रंगमंचावरचा पडदा हळूहळू उघडत जावा तसे समोरचे दृश्य एकेका पावलावर समोर उलगडू लागले. मातकट निळ्या अगस्त्य तीर्थाच्या पार्श्वभूमीवर उत्तरेकडच्या डोंगरावरची शिवालये मोठ्या दिमाखात उभी दिसत होती. तीर्थाच्या बाजूचा घाट, तो प्रचंड वटवृक्ष, आणि ते संग्रहालय इथून एखाद्या चित्रात असावे तसे दिसत हते. डोंगराच्या बरोबर खाली, उजव्या हाताला, भूतनाथ मंदिरे दिसत होती. ते सारेच दृश्य अक्षरशः स्वप्नवत वाटत होते. मी तिथेच मांडी घालून बसलो. त्या जागेवरून गावातल्या लोकांची लगबग पाहताना गंमत वाटत होती. तो जगन्नियंता असाच एखाद्या उंच आणि दूर जागेवरून आपले पामरांचे आयुष्य निरखत असेल का? म्हणूनच बहुतांश मंदिरे उंच जागी  बांधली जात असतील का? की माणसाने आपले स्वतःचे आयुष्य अशा त्रयस्थ नजरेने बघण्याची क्षमता साधावी व त्यातच खरा परमार्थ आहे असा प्रतीकात्मक अर्थ त्यामागे आहे? रम्य ठिकाणी विसावलो की मन कधी उत्तरे न मिळणाऱ्या प्रश्नांच्या आसपास घोंघावू लागते. त्यातून नवे प्रश्न निर्माण होतात आणि मग त्यांवर चिंतन करण्यासाठी नव्या रम्य जागांचा शोध सुरु होतो. यालाच कदाचित शहाणे होणे म्हणत असतील. ‘केल्याने देशाटन...’ चा कदाचित असाच काही अर्थ असावा. असो. 

कलत्या सूर्याच्या प्रकाशातले  भूतनाथ मंदिर 

कर्कश आवाज करत उडत जाणाऱ्या त्या टिटवीने माझा तंद्रीभंग केला. सूर्यास्त जवळ आला होता. अंधार  पडायच्या आत तिथून खाली पोहोचणे आवश्यक होते. मात्र समोरच दक्षिण किल्ला दिसत होता. इतके वरपर्यंत आलो आहोत तर तिथल्या बुरूजापर्यंत जाऊन येऊ असा विचार करून मी पुढे निघालो. दोन बुरुज आणि एक तोफ एवढे सोडून तिथे काहीच उरले नव्हते. किल्ल्यावरून एक वाट थेट खाली गुंफा मंदिरांच्या परिसरात उतरत होती. मात्र ती वाट लोखंडी ग्रीलने बंद केलेली होती. तिथल्या पायऱ्या अगदी मोडकळीला आलेल्या होत्या. कदाचित सुरक्षेसाठी म्हणून तो मार्ग बंद केला असेल. तोफ ठेवलेल्या बुरुजावरून बदामी शहर आणि अगस्त्य तीर्थाचा अप्रतिम देखावा दिसत होता. तिथे थोडीफार फोटोग्राफी करून मी आल्या वाटेने खाली उतरलो. एव्हाना सूर्यबिंब लाल-केशरी झाले होते. त्याची सोनेरी प्रभा त्या साऱ्या परिसराला अजूनच मोहक रूप देत होती. भूतनाथ मंदिराच्या परिसरात बसलेल्या चित्रकारांची चित्रे आता पूर्ण होत आली होती. मी तिथे थोडा वेळ रेंगाळलो. वेगवेगळ्या कलादृष्टींतून साकारलेली एकाच भूदृश्याची ती वेगवेगळी चित्रे न्याहाळणे एक सुखद अनुभव होता. 

बुरुजावरून दिसणारे अप्रतिम दृश्य 

बदामीचे चित्र रेखाटण्यात गुंतलेले चित्रकार आणि त्यांचे सुंदर कलाविष्कार 

मी घाटावरून तसाच पुढे चालू लागलो. अगस्त्य तीर्थाला अर्धप्रदक्षिणा घालून मी गावाच्या दिशेने बाहेर पडलो. त्या बाजूला एक धक्कादायक दृश्य माझ्यापुढे उभे होते. गावातल्या बायका घरची धुणी-भांडी घेऊन तीर्थावर आल्या होत्या. त्यांची लहान पोरं तिथे डुबक्या मारत होती. मला पाहताच एक लहान पोरांचा जथ्था मागे लागला. त्यांना काहीतरी खायला किंवा पैसे हवे होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मी पुढे चालू लागलो. थोड्याच अंतरावर दिसला गावातला उकिरडा! तिथे दुर्गंधी आणि डासांचे थैमान चालू होते. गुरे-डुकरे इतस्ततः फिरत होती. त्याच्याच शेजारी एका लहान मंदिरात आरती चालू होती. शुचिर्भूत होऊन देवाच्या आराधनेत मग्न झालेल्या गावकऱ्यांना त्या आजूबाजूच्या अस्वच्छतेचा जणू मागमूसही नव्हता! ते सारे दृश्य बघून मन विषण्ण झाले. कुठे ती चालुक्यकालीन मंदिरे आणि कुठे हे आजचे गाव! हा तोच समाज का? कुठे गेली ती सौंदर्यदृष्टी आणि माणसाच्या आयुष्याचा गहन अर्थ शोधणारी तत्त्वप्रणाली? जागतिक वारसास्थल असलेल्या तलावात धुणी-भांडी? आणि त्याच्या बाजूला उकिरडा? गरिबीचं जाउद्या पण किमान स्वच्छता तरी असावी? की लोकांची तेवढी लायकीच नाही?

मी तडक त्या परिसरातून बाहेर पडलो. अस्वच्छता आणि गुलामगिरी यांच्यात बरेच साम्य आहे. जोपर्यंत घाणीत राहणाऱ्या माणसाला आपण घाणीत राहतोय हे पटणार नाही तोपर्यंत त्यात काहीच बदल घडणार नाही. इथल्या लोकांना लवकरच सद्बुद्धी दे अशी प्रार्थना त्या मंदिरातल्या देवाकडे करून मी हॉटेलवर परतलो.

 

प्रचि २५

-
-
-

प्रचि २६

-
-
-

प्रचि २७

-
-
-

प्रचि २८

-
-
-

प्रचि २९

-
-
-

प्रचि ३०

-
-
-

प्रचि ३१

-
-
-

बदामीच्या लेण्या:
प्रचि ३२

-
-
-

बदामीच्या किल्ल्याचे प्रवेशद्वार:
प्रचि ३३

-
-
-

प्रचि ३४

-
-
-

किल्ल्यावरील एक मंदिर
प्रचि ३५

-
-
-

प्रचि ३६

-
-
-

प्रचि ३७

-
-
-

प्रचि ३८

-
-
-

प्रचि ३९

 पट्टडकल

 

पट्टदकल

आजचा दिवस पट्टदकल आणि ऐहोळे या दोन जागा आणि तिथल्या मंदिरांसाठी ठरवला होता. बदामीपासून पट्टदकल २२ किमी तर ऐहोळे त्यापुढे १४ किमी वर आहे. ही दोन्ही ठिकाणे चालुक्यकालीन मंदिरांसाठी सुप्रसिद्ध आहेत. बदामीवरून एक रिक्षा ठरवून ही दोन्ही ठिकाणे बघता येतात. मी आदल्या दिवशीच मुख्य बस स्थानकावर जाऊन एक रिक्षा ठरवली होती. ठरल्याप्रमाणे रिक्षावाला ९ वाजता हॉटेलवर हजर झाला. मी कॅमेरा वगैरे घेऊन बाहेर आलो आणि पाहतो तर काय, रिक्षावाला पल्सर बाईक घेऊन उभा! त्याच्या रिक्षात आयत्या वेळी काहीतरी तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. तसाही मी एकटाच जाणार होतो. त्यामुळे धंदा बुडू नये म्हणून हा पठ्ठ्या चक्क बाईक घेऊन आला होता. त्याच्या हुशारीचं मला कौतुक वाटलं. बाईकवरून भटकायला मिळणार म्हणून मीही मनातल्या मनात खुश झालो. बदामीतल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून आम्ही पट्टदकलच्या दिशेने निघालो.     

बदामी शहरातून बाहेर पडलो आणि बाईकने वेग घेतला. स्वच्छ उन पडलं होतं. सकाळची वेळ असल्याने उन्हाचा चटका फारसा जाणवत नव्हता. दक्षिण-मध्य भारतातला हा भाग म्हणजे तसा दुष्काळीच. अलमट्टी धरणामुळे इथे वर्षभर पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पाण्याचे तसे दुर्भिक्ष नाही. मात्र अत्यल्प पर्जन्यमान असल्याने मोठे वृक्ष फार कमी दिसतात. सारा भूप्रदेश रेताड आणि खडकाळ दिसत होता. थोडीफार खुरटी झुडुपे दिसत होती. शेतांमधली कापणी नुकतीच झालेली असावी. त्यामुळे शेतेही उजाड दिसत होती. विजेच्या तारांवर वेड्या राघूंची (Green Bee Eater) लगबग सुरु होती. मध्येच एखादा नीलकंठ (Indian Roller) पंख पसरून मनोहारी निळाईचे दर्शन घडवत होता. दूरवरून ऐकू येणारा खंड्याचा कलकलाट इथे मी सुद्धा आहे असे ठासून सांगत होता. 

पट्टदकल मधील मंदिर समूह 

अर्ध्या-पाऊण तासांत आम्ही पट्टदकलला पोहोचलो. पट्टदकल हे बदामीसारखेच एक प्राचीन शहर. ग्रीक तत्त्ववेत्ता टॉलेमी याच्या Geography या इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात लिहलेल्या पुस्तकात या शहराचा उल्लेख सापडतो. पट्टदकल या नावाचा शब्दशः अर्थ होतो राज्याभिषेकाचा दगड. चालुक्य राजांनी सातव्या ते आठव्या शतकांच्या दरम्यान मलप्रभा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर राज्याभिषेकादि शाही समारंभांसाठी हा मंदिरसमूह बांधला. उत्तरोत्तर विकसित होत गेलेल्या चालुक्य स्थापत्यशैलीचे अत्युच्च स्वरूप या मंदिरांत बघायला मिळते. या समूहात एकूण ९ मंदिरे आहेत. सारी मंदिरे पूर्वाभिमुख असून शिवाला समर्पित आहेत. दक्षिण भारतीय ‘द्राविड’ शैली आणि उत्तर भारतीय ‘नागर’ शैली यांचे सुरेख मिश्रण या मंदिरांत दिसून येते. हा समूह युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेला आहे. प्रथमदर्शनी तरी पट्टदकल एक टिपिकल भारतीय खेडेगाव वाटत होते. आपण बरोबर जागी आलोय की नाही असा प्रश्न पडावा इतके  ते गाव लहान आणि अविकसित वाटत  होते. मात्र मंदिरांचा परिसर नजरेस पडला आणि इथे काहीतरी वेगळीच दुनिया वसली आहे की काय असा आभास झाला. अपेक्षेनुसार इथेही भारतीय पुरातत्व विभागाने मंदिरांचा परिसर कुंपणाने संरक्षित केला होता. मंदिरांच्या आजूबाजूला सुंदर बागही फुलवली होती. मी तिकीट काढून आत शिरलो. 

काडसिद्धेश्वर मंदिर आणि त्याच्या अग्रभागी असलेली नृत्यामग्न शिवाची मूर्ती   
आत शिरल्याबरोबर उजव्या हाताला काडसिद्धेश्वर आणि जंबुलिंगेश्वर अशी दोन लहान मंदिरे होती. मंदिरांची शिखरे ढासळलेली असली तरी बाकीची रचना तशी मजबूत होती. दोन्ही मंदिरांचा मूळ आकार चौरसाकृती होता. सातव्या शतकाच्या सुरुवातीला बांधली गेलेली ही मंदिरे नागर शैलीत बांधलेली होती. काडसिद्धेश्वर मंदिराच्या शिखरावर अग्रभागी नृत्यमग्न शिवाची विलक्षण मूर्ती लक्ष वेधून घेत होती. या मंदिराच्या इतर बाजूंना काही इतर मूर्ती कोरल्या होत्या. गर्भगृहात फारशी प्रकाशयोजना नव्हती. कदाचित देवासोबत होणाऱ्या संवादात प्रकाशाचा व्यत्यय नको असावा. जंबुलिंगेश्वर मंदिराच्या बाहेर अर्धभग्न अवस्थेतला नंदी दिसत होता. तिथून थोडं पुढे जाताच दिसले संगमेश्वर मंदिर. हे पट्टदकलमधील सर्वात जुने मंदिर आहे. चालुक्य राजा विजयादित्य याने आठव्या शतकात हे मंदिर बांधले. हे तुलनेने मोठे होते. याची रचना द्राविड शैलीतली होती. मंडप आणि प्रदक्षिणा मार्ग अजूनही सुस्थितीत होते. मंडपातील खांबांवरचे कोरीवकाम लक्ष वेधून घेत होते. इतक्या बारीक तपशीलांसह एक खांब पूर्ण करायला किती वेळ लागला असेल त्या काळी? किती मोबदला मिळत असेल त्या कारागिरांना? आणि हे कौशल्य कधी आणि कसे अस्तंगत झाले? अशा असंख्य प्रश्नांनी मनात गर्दी केली होती. मंदिराचे अंतरंग अनुभवायला म्हणून आत शिरलो. गर्भगृहाच्या भोवतालचा प्रदक्षिणा मार्ग खुणावत होता. त्या अंधाऱ्या मार्गावर वरच्या झरोक्यातून झिरपणारा सूर्यप्रकाश एक विलक्षण वातावरण निर्मिती करत होता. एक प्रदक्षिणा पूर्ण करून मी मंडपात आलो. एका कोपऱ्यात बसून बदामी मध्ये विकत घेतलेले पुस्तक चाळू लागलो. थोडावेळ तिथे विश्रांती-वाचन करून मी पुढची मंदिरे बघायला निघालो. 

संगमेश्वर मंदिर 

गलगनाथ मंदिर 
समोरच होते गलगनाथ मंदिर. हेही उत्तर भारतीय नागर शैलीत बांधलेले होते. त्याच्या माथ्यावरचा कलश फारच विलोभनीय होता. पुढच्या ढासळलेल्या भागाच्या तुलनेत आमलक आणि कलश उत्तम स्थितीत होते. मंदिराच्या समोरचा प्रशस्त चौथरा त्याच्या जमीनदोस्त झालेल्या मंडपाच्या खुणा दर्शवत होता. उरल्यासुरल्या भागावरच्या देव-देवतांच्या मूर्ती तरीही प्रसन्न चेहऱ्याने येणाऱ्या भक्ताचे स्वागत करत होत्या. गलगनाथ मंदिराच्या पुढे होते काशीविश्वेवर मंदिर. हे या समूहातले सगळ्यात शेवटी बांधले गेलेले मंदिर. चालुक्य राजवटीत विकसित झालेल्या रेखा नागर शैलीचे हे उत्तम उदाहरण. पाच स्तरांनी बनलेल्या या मंदिराच्या शिखरावरचे आमलक आणि कलश आता ढासळले असले तरी शूकनास आणि शिखर मात्र उत्तम स्थितीत होते. शूकनासावरची उमा-महेशाची मूर्ती फारच सुरेख दिसत होती. शिखराच्या बाह्यभागावरचे जाळीदार नक्षीकाम मंदिराचे सौंदर्य एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवत होते. त्या लहानमोठ्या चौकोनांत छाया-प्रकाशाचा अद्भुत खेळ मोठ्या रंगात आला होता. सूर्यास्ताच्या वेळी हा खेळ अजून किती सुंदर दिसत असेल याची कल्पना करत मी पुढच्या मंदिराकडे वळलो.

काशी विश्वेवर मंदिर आणि त्यावरचे जाळीदार नक्षीकाम 
आता मी पोहोचलो होतो पट्टदकलमधल्या सगळ्यात महत्त्वाच्या दोन मंदिरांजवळ – मल्लिकार्जुन मंदिर आणि विरुपाक्ष मंदिर. यांपैकी विरुपाक्ष मंदिर हे आजही वापरात असलेले देवस्थान आहे. हे मंदिर राणी लोका महादेवी हिने राजा विक्रमादित्य दुसरा याच्या पल्लवांवरील विजयाप्रीत्यर्थ बांधले. यां मंदिराचा मूळ आराखडा कांचीपुरम येथील कैलाशनाथ मंदिरावर बेतलेला आहे. मात्र स्थापत्यशैली खास चालुक्य वळणाची आहे. द्राविड शैलीत बांधलेल्या या मंदिराच्या समोर उंच चौथऱ्यावर नंदीमंडप आहे. चौरसाकृती गर्भगृहाच्या तीनही बाजूंनी प्रशस्त सभामंडप उभारलेला आहे. मंदिराच्या बाजूने इतर लहान-मोठी देवस्थाने बांधलेली आहेत. एकूण ३२ देवस्थानांपैकी आज ५-६ च शिल्लक आहेत. मी बूट काढून मंदिरात शिरलो. आत काही भाविकांची गर्दी होती. हे मंदिर जरी पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या भागात असले तरी इथे दर्शनासाठी यायला मागच्या बाजूने सोय होती. पहिल्यांदाच एका प्राचीन मंदिरात फुलांचा आणि उदबत्तीचा सुगंध, मंत्रोच्चार, घंटानाद असे नेहमीचे वातावरण अनुभवत होतो. गर्भगृहाबाहेरचा पुजारी लगबगीने सगळ्यांना तीर्थप्रसाद देत होता. आतापर्यंत पाहिलेल्या मंदिरात जाणवलेले गूढत्व इथे मात्र जाणवत नव्हते. काहीशा ओळखीच्या जागी आल्यासारखे वाटत होते. तिथल्या खांबांवर कोरलेल्या मूर्ती गतकाळातल्या नव्हे तर आजच्या वाटत होत्या. निव्वळ तिथे जाणाऱ्या भाविकांच्या मनातल्या भावनांनी त्या मंदिराच्या वातावरणावर अमूलाग्र परिणाम घडवला होता. आतापर्यंत केवळ स्थापत्यशैलीचे नमुने असणारे ते भग्नावशेष विरुपाक्ष मंदिरात मात्र अनादी-अनंत अशा मानवी श्रद्धेचे आणि भक्तीचे अधिष्ठान बनले होते. कुठून येत असेल ही उर्जा? काय घडत असेल माणसाच्या मेंदूत की ज्यातून भक्तीची निरंतर भावना निर्माण असेल? मनात मंथन सुरु होते आणि डोळे मंदिराच्या सभामंडपातले कोरीवकाम निरखण्यात गुंतले होते. इथल्या प्रत्येक खांबावर रामायण-महाभारत आणि पुराणातल्या कथा कोरल्या होत्या. या मंदिरातले कोरीवकाम म्हणजे इथल्या कलेचा कळसाध्यायच जणू! थोडा वेळ तिथे घालवून मी बाहेर पडलो. 

मंदिरातील अप्रतिम कोरीवकाम 

विरुपाक्ष मंदिराचे प्रवेशद्वार 
विरुपाक्ष मंदिराच्या शेजारीच होते मल्लिकार्जुन मंदिर. हे मंदिर म्हणजे विरुपाक्ष मंदिराची लहान प्रतिकृती. हे मंदिर त्याच सुमारास राणी त्रिलोक्या देवी हिने बांधले. काही सूक्ष्म स्थापत्यघटक वगळता या मंदिराची रचना विरुपाक्ष मंदिरासारखीच आहे. हे मात्र वापरात असलेले देवस्थान नाही. मंदिराभोवती एक चक्कर मारून मी विरुपाक्ष आणि मल्लिकार्जुन या मंदिरांच्या मधल्या अरुंद जागी पोहोचलो. इथे विलक्षण गारवा जाणवत होता. सकाळपासून कदाचित या जागी सूर्यप्रकाश पोहोचला नसावा. माझ्या चहूबाजूंनी पुराणातल्या देव-देवता पाषाणरुपात त्यांच्या हजारो वर्षे प्रचलित असलेल्या कथा सांगत होत्या. मधल्या एका उंचवट्यावर मी उभा राहिलो. स्मार्टफोनवर नुकतेच टाकलेले ३६० अंशात फोटो काढणारे एक अॅप मला वापरून पहायचे होते. त्यासाठी याहून उत्तम जागा कोणती? मी तिथे उभा राहून फोटो काढू लागलो. त्या जागेची सगळी अनुभूती मला त्या फोटोत बंदिस्त करायची होती. इतक्यात मागून एक सुरक्षारक्षक शिट्टी वाजवत तिथे आला. अनावधानाने मी ज्या उंच जागी उभा राहिलो होतो तो मल्लिकार्जुन मंदिराच्या भग्न भिंतीचा एक भाग होता! मी मुकाट्याने खाली उतरलो. त्या भग्न अवशेषांची मनोमन क्षमा मागितली. मागे वळलो तर समोरच होता विजयस्तंभ. हा स्तंभावरचे कन्नड भाषेतले शिलालेख अत्यंत महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पुरावे मानले जातात. पल्लव राजांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतिनिधित्व हा स्तंभ करतो. थोडा वेळ त्या भागात छायाचित्रण करून मी तिथून बाहेर पडलो. आता ऐहोळे मधल्या मंदिरांविषयी उत्सुकता मनात निर्माण झाली होती. 

खांबांवरील कलाकुसर 

पट्टडकल मलप्रभा नदिच्या काठी वसलेले आहे. ईथे जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे बदामी. पट्टडकलला रहाण्याची काही सोय नाहीये. त्यामुळे मुक्कामास बदामीस उतरावे. पट्टडकल बदामीपासुन २२ किमी वर आहे.
पट्टडकल चालुक्य राजवटीची राजधानी होती.
ईथे ७ व्या व ८ व्या शतकातील १० मंदिरांचा समुदाय आहे. यातील ४ मंदिरे ही द्राविड शैलीतील आहेत तर ४ मंदिरे नागरा शैलीतील आहेत. बाकी २ मिश्र शैलीतील आहेत. ह्या मंदिरांचा समावेश UNESCO च्या World Heritage sites मध्ये होतो.
आठवतील तेव्हड्या मंदिरांची नावे येथे देण्याच्या प्रयत्न मी केला आहे. कोणास अधिक माहिती असेल तर नक्की कळवा.
पट्टडकल बद्दल अधिक माहिती येथे पहावी: http://en.wikipedia.org/wiki/Pattadakal

प्रचि १

-
-
-
प्रचि २

-
-
-
प्रचि ३
गळगनाथ मंदिर

-
-
-
प्रचि ४
गळगनाथ मंदिर

-
-
-
प्रचि ५
गळगनाथ मंदिर

-
-
-

प्रचि ६

-
-
-
प्रचि ७

-
-
-

प्रचि ९
संगमेश्वरा मंदिर

-
-
-
प्रचि १०
संगमेश्वरा मंदिर

-
-
-
प्रचि ११
संगमेश्वरा मंदिर

-
-
-
प्रचि ११
संगमेश्वरा मंदिर

-
-
-

प्रचि १२

-
-
-
प्रचि १३

-
-
-
प्रचि १४

-
-
-
प्रचि १५

-
-
-
प्रचि १६

-
-
-
प्रचि १७
विरूपाक्ष मंदिर

-
-
-
प्रचि १८

-
-
-
प्रचि १९

-
-
-
प्रचि २०

-
-
-
प्रचि २१

-
-
-
प्रचि २२

-
-
-
प्रचि २३

-
-
-
प्रचि २४
विरूपाक्ष मंदिर

-
-
-
प्रचि २८
विरूपाक्ष मंदिर

-
-
-

प्रचि २५

-
-
-
प्रचि २६

-
-
-
प्रचि २७

-
-
-
प्रचि २९

-
-
-
प्रचि ३०

-
-
-
प्रचि ३१

-
-
-
प्रचि ३२

-
-
-
प्रचि ३३

-
-
-
प्रचि ३४

-
-
-
प्रचि ३५

-
-
-
प्रचि ३६
जैन नारायण मंदिर

-
-
-
प्रचि ३८
जैन नारायण मंदिर

-
-
-

प्रचि ३९

-
-
-
प्रचि ४०

-

 ऐहोळे

 

मंदिरस्थापत्यकलेची प्रयोगशाळा - ऐहोळे



पट्टदकलमधल्या एकाहून एक सुबक मंदिरांची सफर पूर्ण करून मी आता ऐहोळेच्या दिशेने निघालो होतो. हे अंतर फारसे नव्हते. मात्र रस्त्याचे काम चालू असल्याने वेगावर मर्यादा येत होती. आपल्या देशात काही ना काही कारणांनी रस्ते “काम चालू आहे” या स्थितीतच असतात. कर्नाटकातला हा ग्रामीण प्रदेश त्याला काही अपवाद नव्हता. अर्धवट बांधून झालेल्या रस्त्यावरून वाट काढत आमची बाईक ऐहोळे गावात शिरली. हे तर अगदीच खेडेगाव वाटत होते. रस्त्यावर धुणी धुणाऱ्या आणि भांडी घासणाऱ्या बायका, त्यातून इतस्ततः वाहणारे पाणी, त्यातच गुरांचे शेण आणि धूळ मिसळून झालेला चिखल, अस्ताव्यस्त पसरलेला कचरा आणि त्यात उंडारणारी डुकरे असे गलिच्छ स्वरूप त्या गावाचे होते. आपण नक्की योग्य ठिकाणी आलो आहोत की नाही याची शंका मला वाटू लागली. इतक्यात त्या बजबजपुरीत मधेच उगवलेला एक मंदिराचा कळस दिसला. थोडं पुढे गेलो तर आणखी काही भग्नावशेष दिसले. त्या मंदिरांतल्या पायऱ्या आणि सभामंडप म्हणजे गावातल्या लोकांसाठी चकाट्या पिटण्याची जागा बनले होते. कोरीव स्तंभांच्या दरम्यान लहान मुले लपंडाव खेळत होती. ते सगळे दृश्य पाहून मी हादरलोच. हीच का ऐहोळे मधली प्रसिद्ध मंदिरे अशी विचारणा मी माझ्या बाईक चालकाला केली. त्यावर तो हसून म्हणाला, नाही नाही, मुख्य मंदिरे अजून पुढे आहेत. ते ऐकून मनाला थोडा दिलासा मिळाला. पण तरीही दुरवस्था झालेल्या त्या मंदिरांसाठी मनोमन फार वाईट वाटत होते. गावाच्या थोडं पुढे जाताच एक मोठे वळण लागले. त्यापुढेच पुरातत्व खात्याने संरक्षित केलेला प्रशस्त भाग नजरेस पडला. पट्टदकलपेक्षा इथला परिसर बराच मोठा होता. किंबहुना अनेक मंदिरांचे लहान-मोठे समूह वेगवेगळे संरक्षित केलेले होते. त्यातल्या मुख्य समूहापाशी बाईकचालकाने मला सोडले. तिकीट काढून मी आत शिरलो.        

ऐहोळे येथील मुख्य मंदिरसमूह 

ऐहोळे ही चालुक्य राजांची पूर्वाश्रमीची राजधानी. या जागेस “मंदिरस्थापत्यकलेची प्रयोगशाळा” असे संबोधले जाते. चालुक्यकालीन कारागिरांनी आजूबाजूच्या प्रदेशातले तत्कालीन स्थापत्यघटक एकत्र आणून एक नवी शैली विकसित केली. याच शैलीचे थोडे विकसित स्वरूप बदामी मध्ये, तर आणखी पुढचे स्वरूप पट्टदकलमध्ये बघायला मिळते. बेलूर आणि हळेबीड इथली मंदिरे म्हणजे या शैलीचा कळसाध्याय! सामान्य भाषेत सांगायचे झाले तर ऐहोळे म्हणजे या स्थापत्यशैलीची प्राथमिक शाळा, बदामी म्हणजे माध्यमिक शाळा, तर पट्टदकल महाविद्यालय होय! ऐहोळे या नावाच्या व्युत्पत्तीची कथाही मोठी रंजक आहे. एकवीस वेळा पृथ्वीप्रदक्षिणा करून क्षत्रियांचा नायनाट केल्यानंतर परशुराम आपला रक्ताने माखलेला परशु घेऊन मलप्रभा नदीच्या काठी आला. नदीच्या पाण्यात परशु धुताच पाणी लाल झाले. लाल पाणी बघताच गावातली एक स्त्री ओरडली “अई होळी! अई होळी!” त्यावरूनच गावाचे नाव पडले ऐहोळे. या गावाची अय्यावोळे किंवा आर्यपुरा अशी नावेही प्रचलित आहेत.
ऐहोळेमध्ये एकूण १२५ च्या आसपास मंदिरे आहेत. काही ठिकाणी अजूनही उत्खनन चालू आहे. इतकी सगळी मंदिरे पहायला आणि त्यांची स्थापत्यवैशिष्ट्ये समजून घ्यायला ३ दिवसही कमीच आहेत. त्यामुळे मी केवळ महत्त्वाच्या ३-४ मंदिरांना भेट द्यायचं ठरवलं. 

दुर्गा मंदिराची अर्धवर्तुळाकार रचना 

दुर्गा मंदिराचे कोरीव स्तंभ 

आत शिरल्या शिरल्या समोरच दृष्टीस पडलं दुर्गा मंदिर. मंदिराची अर्धवर्तुळाकार रचना लक्षवेधी वाटत होती. या मंदिराच्या नावात दुर्गा असली तरी हे मंदिर मात्र विष्णू किंवा शिवाचे आहे. जवळच असलेल्या दुर्ग नामक किल्ल्यामुळे या मंदिराला दुर्गा मंदिर म्हणतात. अर्थात, या कथेबाबतीत अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. असो. मंदिराची रचना ही बौद्ध चैत्यगृहाचा आभास निर्माण करणारी आहे. मध्यवर्ती गर्भगृहाच्या बाजूने जाणारा प्रदक्षिणा मार्ग अर्धवर्तुळाकृती असून तो एकसारख्या स्तंभांनी सजवलेला आहे. मी पायऱ्या चढून मंदिराच्या आत शिरलो. तसे मंदिर लहानसेच वाटत होते. मात्र आतील स्तंभांवरचे व छतावरचे कोरीवकाम एका वेगळ्याच दुनियेत आल्याचा आभास निर्माण करत होते. चौकोनी सभामंडपातून पलीकडचे अंधारलेले गर्भगृह दिसत होते. मुळात हे मंदिर कोणाचे होते याची काहीच कल्पना आज नाही. मात्र स्थापत्यशैलीच्या वैशिष्ट्यांमुळे हे मंदिर ऐहोळे मधले एक प्रमुख आकर्षण आहे. मी प्रदक्षिणा मार्गाकडे वळलो. स्तंभांच्या मधून झिरपणारा प्रकाश आतल्या शिल्पांवर एक वेगळेच तेज चढवत होता. प्रत्येक स्तंभावर एक शिल्प होते. तसेच गर्भगृहाच्या बाहेरील भिंतीवरदेखील काही शिल्पे होती. यांपैकी महिषासुरमर्दिनी आणि वराह-अवतार ही शिल्पे विशेष उल्लेखनीय. शिल्पातील स्त्री-पुरुषांच्या भावमुद्रा, त्यांचे अलंकार, शरीरसौष्ठव सारे काही बारीक तपशीलांसह पाषाणातून साकारले होते. 

प्रदक्षिणा मार्ग 
प्रदक्षिणा पूर्ण करून मी मंदिराच्या सभामंडपात थोडा वेळ विसावलो. मंदिराच्या निर्मितीच्या वेळी तिथे कसे वातावरण राहिले असेल याची कल्पना करू लागलो. छिन्नी-हातोडीच्या आघातातून प्रकट होत जाणारे शिल्प, मग एकावर एक रचले जाणारे पाषाणाचे एकक, आणि अखेरीस उभारला जाणारा कळस. किती वर्षे लागली असतील हे एक मंदिर बांधायला? ज्यांच्या हातून हे अजरामर शिल्प घडले ते कलाकार किती कृतार्थ झाले असतील! कसे असेल तेव्हाचे जनजीवन आणि काय राहिले असेल या कलाकारांचे समाजातील स्थान? कदाचित कोणत्याच ऐतिहासिक दस्तावेजांत या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत. पाषाणात कोरले जातात ते दिग्विजय. सर्वसामान्य व्यक्तीच्या क्षुद्र आयुष्याची कशाला कोणी घेईल दखल? 

दुर्गा मंदिराकडून मी निघालो लाडखान मंदिराकडे. या समूहातले हे आद्य मंदिर. हे मंदिर साधारण पाचव्या शतकात बांधले गेले. कोणतेही कळस नसलेली एखाद्या घरासारखी दिसणारी या मंदिराची रचना अगदीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. गर्भगृहाच्या वर दिसणारी एखाद्या मजल्यासारखी रचना कळस या रचनेची पूर्वावस्था दर्शवते. मुळात शिवाचे अधिष्ठान असलेले हे मंदिर मध्ययुगीन काळात लाडखान नामक इसमाने स्वतःचे घर बनवले होते. म्हणूनच त्याचे आज लाडखान मंदिर असे नाव प्रचलित आहे. या मंदिराचा सभामंडप तसा प्रशस्त होता. १२ स्तंभांवर सुरेख कोरीवकाम केलेले होते. त्यापुढे मुखमंडपात एक नंदी विराजमान झालेला दिसत होता. गर्भगृहातले शिवलिंग गूढ भासत होते. सुरुवातीला आयताकृती वाटणारी मंदिराची रचना गर्भगृहात मात्र चौरसाकृती झालेली दिसत होती. तिथे काही वेळ फोटोग्राफी करून मी बाहेर पडलो. त्या समूहातली इतर काही मंदिरे पाहून मी रावणफडी गुंफांच्या दिशेने निघालो. 

लाडखान मंदिर 

लाडखान मंदिरातील कोरीव स्तंभ 

अर्धनारीश्वर 
ऐहोळेमधील मुख्य मंदिरसमूहापासून या गुंफा जरा आडवाटेवर आहेत. मात्र बदामीमधील गुंफा मंदिरांसारख्या या गुंफादेखील भारतीय छेदाश्म स्थापत्यकलेचा उत्तम नमुना मानल्या जातात. यातील मुख्य गुंफेपाशी माझ्या बाईकचालकाने मला सोडले. इथे फारसे पर्यटक नव्हते. कलत्या उन्हात इथला शांत परिसर प्रसन्न वाटत होता. पायऱ्या चढून आत शिरलो. समोरच गर्भगृहात भलेमोठे शिवलिंग दिसले. बदामीमधल्या गुंफांपेक्षा ही गुंफा तशी लहान होती. शिवाय मंडपात इतर स्तंभही दिसत नव्हते. तितक्यात चालकाने माझे लक्ष चारही बाजूंच्या भिंतीवर साकारलेल्या शिल्पांकडे वेधले. तिथल्या अंधारात स्पष्ट काही दिसत नव्हते म्हणून मी विजेरी काढली आणि एक-एक शिल्प निरखू लागलो. डाव्या बाजूच्या भिंतीवर होते नटराजाचे महाकाय शिल्प. अठरा हातांचा नृत्यमग्न शंकर फारच सुबक घडवला होता. त्याच्या शेजारी गणपती आणि पार्वती दिसत होते. हे शिल्प बदामीमधल्या एका गुंफेशी साधर्म्य साधणारे होते. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूलाही देखणी शिल्पे होती. एका बाजूला हरी-हर अशी जोडी होती तर दुसरीकडे अर्धनारीश्वराचे शिल्प होते. एवढ्या अपुऱ्या प्रकाशात ही शिल्पे कशी काय घडवली असतील याचेच मला राहून राहून आश्चर्य वाटत होते. तिथे थोडी फोटोग्राफी करून मी बाहेर पडलो. या समुहातली दुसरी गुंफा जैन तीर्थंकरांची होती. बदामीमधल्या चौथ्या गुंफेप्रमाणेच जैन तीर्थंकर व त्यांच्या जीवनातले प्रसंग तिथे घडवले होते. वैष्णव, शैव, आणि जैन विचारांचा वैशिष्ट्यपूर्ण संगम या मंदिरांमध्ये दिसून येतो. त्या काळात प्रचलित असलेला धर्मविचार आणि वेगवेगळ्या दैवतांप्रती असलेली समाजाची आदराची भावना धर्मनिरपेक्षतेच्या एका वेगळ्याच आयामाचे दर्शन घडवते. 

रावणफडी गुंफा 

नृत्यमग्न नटराजाचे महाकाय शिल्प  

जैन गुंफांतील शिल्पे 

एव्हाना दुपारचे ३ वाजत आले होते. चांगलीच भूक लागली होती. सुदैवाने जवळच कर्नाटक टुरिझमचे हॉटेल होते. तिथे भरपेट जेवण केले आणि बदामीच्या दिशेने निघालो.

ऐहोळे बदामी पासुन ३३ किमी वर आहे. ईथे जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे बदामीच. ही चालुक्य राजवटीची बदामी-पुर्व राजधानी होती. ह्या परिसरात चालुक्य राजांनी बांधलेली जवळपास १२५ मंदिरे आहेत. पण बरीच मंदिरे भग्न स्वरुपात आहेत. काही मंदिरांचे जिर्णोद्धाराचे काम सुरु आहे. पौराणिक कथेनुसार परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रिय केल्यावर आपली कुर्‍हाड ईथेच धुतली होती.
हा सर्व परिसर पहायला कमीत-कमी ५-६ तास तरी हवेत.
ऐहोळे बद्दल अधिक माहिती येथे पहावी.
http://en.wikipedia.org/wiki/Aihole

ईथे आठवतील तेव्हडया मंदीरांची नावे देतो आहे.

प्रचि १
दुर्ग मंदीरः
हे खरेतर देवीचे मंदीर नसुन शंकराचे मंदीर आहे. जवळच दुर्ग (किल्ला) असल्याने ह्याला दुर्ग मंदीर असे नाव पडले.

-
-
-
-
प्रचि २

-
-
-
-

प्रचि ३

-
-
-
-

प्रचि ४
मंदीराचा परिसर

-
-
-
-

प्रचि ५

-
-
-
-

प्रचि ६

-
-
-
-

प्रचि ७

-
-
-
-

लाडखान मंदीरः
प्रचि ८

-
-
-
-

प्रचि ९

-
-
-
-

प्रचि १०

-
-
-
-

प्रचि ११

-
-
-
-

रावणफाडी:
ही एका अखंड दगडात कोरलेली लेणी आहे.
प्रचि १२

-
-
-
-

प्रचि १३

-
-
-
-

प्रचि १४

-
-
-
-

प्रचि १५

-
-
-
-

प्रचि १५

-
-
-
-

प्रचि १६

-
-
-
-

प्रचि १७

-
-
-
-

प्रचि १८

-
-
-
-

प्रचि १९

-
-
-
-

प्रचि २०
हुचिमल्ली गुडी

-
-
-
-

प्रचि २१

-
-
-
-

प्रचि २२

-
-
-
-

प्रचि २३

-
-
-
-

प्रचि २४
मेगुती जैन मंदीर

-
-
-
-

प्रचि २५

-
-
-
-

प्रचि २६

-
-
-
-

प्रचि २७

-
-
-
-

प्रचि २८

-
-
-
-

प्रचि २९

-
-
-
-

प्रचि ३०

-
-
-
-

प्रचि ३१

----------------------------

रंगनथिट्टू पक्षी अभयारण्य

बंगलोरच्या आसपासच्या विकएंड साठिच्या ठिकाणांचा शोध सुरु झाला. कुठेतरी जाऊन पडुन रहावे असे ठिकाण शोधत असताना रंगनथिट्टू पक्षी अभयारण्याला जाण्याचा बेत पक्का झाला आणि एका शनिवारी सकाळी सहकुटुंब सहपरिवार निघालो. रंगनथिट्टू पक्षी अभयारण्य म्हैसुर आधी व श्रीरंगापटना च्या नंतर आहे. बंगलोर पासुन साधा:रणपणे १२० किमी वर. ह्या अभयारण्याजवळच KSTDC चा मयुरा रिव्हर व्ह्यु हा नितांत सुंदर रिसॉर्ट आहे. हा रिसॉर्ट कावेरी नदीच्या किनारी आहे. अतिशय शांत, हिरवागार व प्रसन्न परिसर आहे हा. बंगलोर मध्ये रहाणार्‍याने किमान एकदा तरी ह्या रिसॉर्ट ला भेट द्यावी. म्हैसुर मधील बरेच लोक ईथे दुपारी फक्त जेवण करायला व आराम करायला येतात. ह्या रिसॉर्ट मध्ये कावेरी मध्ये बोटिंग करायची पण सोय आहे. असो.
रमतगमत ईथे दुपारी १ वाजता पोहोचलो. जेवण व थोडा आराम करुन ४ वाजता अभयारण्यापाशी पोहोचलो. अभयारण्या च्या २ वेळा आहेत. एकदा सकाळी व एकदा संध्याकाळी. ह्या अभयारण्यात एक तलाव आहे व मध्ये २-३ बेटे आहेत. सर्व पक्षी ह्या तलावाच्या किनारी वा बेटावर असतात. ह्या तलावात बर्‍याचशा नैसर्गिक मगरी पण आहेत. ईथे बोटीची व्यवस्था आहे. बोटवाले तुम्हाला अर्धा ते पाऊण तास फिरवतात.

संध्याकाळी भटकंती आटोपुन परत रिसॉर्ट वर आलो. रिसॉर्ट वाल्यांनी मस्त कँपफायर लावुन दिला होता. गप्पा, खाणे-पिणे, पिक्षनरी ह्यात संध्याकाळ घालविली. दुसर्‍या दिवशी सकाळी परत अभयारण्याला भेट दिली. दुपारी रिसॉर्ट वरुन निघालो. ईथे जवळच फिश-लँड म्हणुन एक रेस्टॉरंट आहे. ईथे सी-फूड अप्रतिम मिळते. तेथे ताव मारला. येताना चन्नापटना ला थांबलो. येथे लाकडी खेळणी बनविण्याचा फार मोठा उद्योग चालतो. ईथे थोडी-फार खरेदी करुन रविवारी संध्याकाळी परत घरी आलो.

प्रचि १
रिसॉर्ट समोरील कावेरी.

-
-
-

प्रचि २

-
-
-

प्रचि ३

-
-
-

प्रचि ४
Pale Billed Flowerpecker

-
-
-

प्रचि ५
Painted Stork

-
-
-

प्रचि ६

-
-
-

प्रचि ७

-
-
-

प्रचि ८
Painted Stork

-
-
-

प्रचि ९

-
-
-

प्रचि १०

-
-
-

प्रचि ११

-
-
-

प्रचि १२

-
-
-

प्रचि १३

-
-
-
प्रचि १४

-
-
-
प्रचि १५

-
-
-

प्रचि १६

-
-
-

प्रचि १७

-
-
-

प्रचि १८

-
-
-

प्रचि १९

-
-
-

प्रचि २०

-
-
-

प्रचि २१

-
-
-

प्रचि २३
Pied Kingfisher

-
-
-

प्रचि २४

-
-
-

प्रचि २५
Cattle Egret (Breeding Plumage)

-
-
-

प्रचि २६

-
-
-

प्रचि २७

-
-
-

प्रचि २८
Asian Openbill Stork

-
-
-

प्रचि २९

-
-
-

प्रचि ३०

-
-
-

प्रचि ३१

-
-
-

प्रचि ३२

-
-
-

प्रचि ३३
White Ibis

-
-
-

प्रचि

-
-
-

प्रचि ३४

-
-
-

प्रचि ३५
Egret

-
-
-

प्रचि ३६

-
-
-

प्रचि ३७

-
-
-

प्रचि ३८
Intermediate Egret

-
-
-

प्रचि ३९
Night Heron

-
-
-

प्रचि ४०
पाखरांची शाळा

-
-
-

प्रचि ४१
वटवाघुळे

-
-
-

प्रचि ४२

-
-
-

प्रचि ४३

-प्रचि ४४


चिकमंगळूर

 चिकमंगळूर परीसरात कॉफीच्या मळ्यातले होम स्टे (बंगले) प्रसिद्ध आहेत. ह्यांचा दर सिझनवर अवलंबुन असतो. आम्हाला १५००/- दर माणशी दर रात्री असा होम स्टे मिळाला. हे सर्व बंगले चिकमंगळूर शहरापासुन बाहेर जंगलात किंवा मळ्यात असतात. हे सर्व मळे खाजगी असल्याने तिथपर्यंत जायचा रस्ता यथा-तथाच किंवा कधी-कधी नसतोच. त्यामुळे स्वतःची गाडी असणे फार गरजेचे आहे.
चिकमंगळूर बंगलोर पासुन २५० किमीवर आहे. बराचसा रस्ता खुप चांगला आहे. १२०-१३० चा वेग आरामात गाठता येतो. मध्ये थोडा-फार खराब पॅच आहे. पण बंगलोरच्या बाहेर पडायलाच २ तास लागतात.
असो. सकाळी १० ला घराबाहेर पडलो व टाईमपास करत, फोटोज् काढत दुपारी ३ वाजेपर्यंत चिकमंगळूरला पोहोचलो.

ह्या भागात झेंडूचे पण बरेच मळे आहेत.
प्रचि १

-
-

जो बंगला रहायला बुक केला होता तो अगदी भन्नाट जागी होता. कॉफी मळ्यात अगदी आत चारही बाजुने कॉफी मळ्यांनी ने वेढलेला, समोरच थोड्याच अंतरावर मोठा डोंगर व त्यावर घनदाट जंगल व खाली एक मोठा तलाव. नितांत सुंदर जागी हा बंगला होता.
बंगल्याकडे जाण्याचा रस्ता. दोन्ही बाजुला कॉफीचे मळे आहेत.
प्रचि २

-
-
-
प्रचि ३

-
-
-
कॉफी
प्रचि ४

-
-
-
प्रचि ५

-
-
-
प्रचि ६
सिल्व्हर ओक आणि काळी मिरीच्या वेली.

-
-
-
प्रचि ७

-
-
-

संध्याकाळपर्यंत बाकी सर्व जण पण येऊन पोहोचले.
पावसाळा होता म्हणुन हवेत थंडी होती. समोर व्हरांड्यात सर्व जण खुर्च्या टाकुन बसले होते. तिथल्या कुक ने गरम -गरम सूप आणुन दिले. एकाने मोठी शेकोटी लावुन दिली. पिक्शनरी, गप्पा, खाणे-पिणे ह्यात संध्याकाळ गेली.

दुसर्‍या दिवशी सकाळी मुलायनागिरी शिखर पहायला निघालो. हे कर्नाटकातील सर्वात ऊंच शिखर (१९३० मी) मानले जाते.
प्रचि ८
मुलायनगिरी

-
-
-
प्रचि ९

-
-
-
प्रचि १०
मुलायनगिरी समोर दिसणारा एक डोंगर.

-
-
-
तिसर्‍या दिवशी हेब्बे आणि कलाहत्ती धबधबे पहायला निघालो. ईथे जाणारा रस्ता अगदी घनदाट जंगलातुन गेला आहे. रस्ता तर अतिशय वाईट आहे आणि शिवाय गाडीला काही झाले तर जवळपास २०-३० किमीच्या परिसरात वस्तीही नाहिये. जवळपास ४० किमीचा वाईट पॅच आहे. हेब्बे फॉल्सजवळ पोहोचल्यावर कळले की हा धबधबा पर्यटकांना बंद केला आहे. मग तसेच पुढे कलाहत्ती फॉल्स ला निघालो.
प्रचि ११

-
-
-
प्रचि १२

-
-
-
प्रचि १३

-
-
-
प्रचि १४

-
-
-
प्रचि १५
पच्शिम घाटातील जंगलातले रस्ते

-
-
-
प्रचि १६
पच्शिम घाटातील जंगल

-
-
-
प्रचि १७
पच्शिम घाट

-
-
-

प्रचि १८

-
-
-
प्रचि १९

-
-
-
प्रचि २०

-
-
-
प्रचि २१
कलाहत्ती फॉल्स

-
-
-
प्रचि २२

-
-
-
प्रचि २३
परतताना लागलेले काही कॉफी मळे

-
-
-
प्रचि २४

-
-
-
प्रचि २५

-
-
-
प्रचि २६


भोगनंदिश्वर

भोगनंदिश्वर मंदिर बंगलोर पासुन ४० किमीवर नंदि हिल्सच्या पायथ्याशी येते. येथे २ मंदिरे एकमेकांना लागुन आहेत. भोगनंदिश्वर आणि अरुणाचलेश्वर. ही मंदिरे ८ व्या शतकातील स्थानिक बाणा राजवटीत बांधली गेली. हि मंदिरे मूळ द्राविड शैलीतील आहेत. पण उत्तरोत्तर चोला,होयसळा आणि विजयनगर राजवटीत ह्यांत भर घातली गेली.

प्रचि १

-
-
-
प्रचि २

-
-
-
प्रचि ३

-
-
-
प्रचि ४

-
-
-
प्रचि ५

-
-
-
प्रचि ६

-
-
-
प्रचि ७

-
-
-
प्रचि ८

-
-
-
प्रचि ९
येथे असलेली पुष्करीणी...

-
-
-
प्रचि १०

-
-
-
प्रचि ११

-
-
-
प्रचि १२

-

कारवार

 कारवार गोव्याच्या हद्दीपासुन अवघे ४० किमी वर आहे.
कारवार ही नितांत सुंदर आणि शांत आहे. गोव्याला लागुनच पण पर्यटकांची वर्दळ अजिबात नाही. अगदी हौशी असेच लोक येथे येतात. नीरव शांतता, सफेद वाळू असलेले समुद्र किनारे, हिरवागार परिसर, बाजुलाच पच्शिम घाट असे कारवारचे वर्णन करता येईल.
कारवारमध्ये नुसती निरुद्देश भटकंती जरी केली तरी मजा येते. येथे मराठी सर्रास चालते. जवळपासची आवर्जुन पहाण्यासारखी ठिकाणे म्हणजे सदाशिवगड बीच, रविंद्रनाथ टागोर बीच, याना रॉक्स, गोकर्ण, दांडेली चे जंगल (पक्षी निरीक्षणासाठी) ईत्यादी...
येथे मोठा नाविक तळ आहे. तसेच नौदलाचे एक संग्रहालयही आहे. तेथे आय एन एस चपळ ही युद्धनौका ठेवली आहे. ईथला गाईड नौकेची निर्मिती, ईतिहास, कामगिरी याची पुर्ण माहिती देतो. तसेच ही नौका तुम्हाला आतुन पुर्णपणे दाखविली जाते. येथे नौदलाची एक लघुचित्रफितही दाखवितात. प्रचि १
सुर्योदय, काली नदी

-
-
-
प्रचि २

-
-
-
प्रचि ३
काली नदिचे मुख.

-
-
-
प्रचि ४

-
-
-
प्रचि ५

-
-
-
प्रचि ६

-
-
-
प्रचि ७
सदाशिवगड बीच.

-
-
-
प्रचि ८
सदाशिवगड बीच.

-
-
-
प्रचि ९
सदाशिवगड बीच.

-
-
-
प्रचि १०
सदाशिवगड बीच.

-
-
-
प्रचि ११
आय एन एस चपळ, नौदल संग्रहालय.

-
-
-
प्रचि १२

-
-
-
प्रचि १३
रविंद्रनाथ टागोर बीच.

-
-
-
प्रचि १४
याना रॉक्स.

-
-
-
प्रचि १५

-
-
-
प्रचि १६
काली नदी, पॅनो.

-
-
-
प्रचि १७
सुर्योदय, काली नदी, पॅनो.

 

कुद्रेमुखची रानवाट - भाग १ - तोंडओळख आणि ट्रेकची सुरुवात

बेंगळूरुत स्थायिक झाल्यापासून कधी एकदा जवळपासचे डोंगर तुडवायला निघतोय असं झालं होतं. कर्नाटक राज्याला पश्चिम घाटाच्या डोंगररांगांचं वरदान लाभलं आहे. मुलायनगिरी, कुमारपर्वता, कोडचादरी, ताडीयांडामोल असे असंख्य ट्रेकिंग रुट्स इथे आहेत. कुद्रेमुख हा त्यांपैकीच एक अत्यंत लोकप्रिय असा ट्रेक. बऱ्याच वर्षांपासून हा ट्रेक बकेट लिस्ट वर होता. तिथले हिरवेगार डोंगर आणि घनदाट अरण्ये खुणावत होती. फक्त पाऊस सुरु व्हायची वाट बघत होतो. जुलै महिना लागला, पावसाचे बस्तान बसले, आणि मी एका प्रथितयश ट्रेकिंग ग्रुपसोबत ट्रेकची नोंदणी करून टाकली. दरम्यान कुद्रेमुखबद्दल माहिती शोधू लागलो.

कुद्रेमुख हे एक १८९४ मीटर उंचीचे शिखर. हे कर्नाटकातल्या चिकमगळूर जिल्ह्यात येते. इथल्या कमी उंचीवरच्या टेकड्यांवर आणि दऱ्यांमध्ये घनदाट पर्जन्यवने आहेत तर अधिक उंचीवरच्या पठारी भागावर गवताळ वने आढळतात. या गवताळ प्रदेशास शोला ग्रासलँड असे संबोधतात. पावसाळ्यात हा गवताळ प्रदेश हिरव्यागार कुरणांनी बहरून जातो. पश्चिम घाटातली ही एकमेकाद्वितीय अशी परिसंस्था अनेक प्रदेशनिष्ठ सजीवांना आसरा देते. उदाहरणच द्यायचे झाले तर वान्दरू (Lion-tailed macaque; Macaca silenus) हे वानर केवळ केरळ आणि कर्नाटक राज्यांतील पर्जन्यवनांत आढळते. या वानराचा कुद्रेमुख म्हणजे सगळ्यात उत्तरेकडचा अधिवास. वानराची ही प्रजात संकटग्रस्त अवस्थेत आहे. त्यामुळेच हा सगळा प्रदेश राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केलेला आहे. याव्यतिरिक्त मलबार जायंट स्क्विरल, बायसन, अस्वल, बिबट्या असे असंख्य प्राणी आणि औषधी वनस्पती व रानफुले इथे आढळतात. अशा संपन्न प्रदेशात ट्रेकिंग करायला मी फारच उत्सुक होतो. 

कुद्रेमुख ट्रेक (फोटो आंतरजालावरून साभार © http://www.b365.co.in)

यथावकाश ट्रेकचा दिवस उजाडला. शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमधलं काम लवकर आटोपून मी निघालो. बेंगळूरूच्या ट्राफिक मधून वाट काढत वेळेत पोहोचणं हे एक मोठं आव्हान होतं. कसाबसा बस निघायच्या जेमतेम काही मिनिटं आधी मी पोहोचलो. २५ जणांचा ग्रुप होता. त्यात काही अनुभवी तर काही नवखे होते. ओळख-पाळख झाली आणि आमची बस निघाली. बेंगळूरू ते कुद्रेमुख साधारण ३०० किमी अंतर. रात्रभरचा प्रवास होता. वाटेत एका धाब्यावर जेवणासाठी थांबलो. पोट भरल्यावर गार हवेत छान झोप लागली. पण ही झोप मात्र अगदीच क्षणभंगुर ठरली. मुदिगेरे पर्यंत पोहोचलो आणि जोरदार पावसाच्या आवाजाने जाग आली. हसन-बेंगळूरूचा पठारी प्रदेश पार करून आही पश्चिम घाटाच्या सीमेवर येऊन पोहोचलो होतो. पावसाचा वाढलेला जोर ही त्याचीच खूण होती. त्यात आता घाटही सुरु झाला होता. त्या वाटवळणांत आणि पावसाच्या आवाजात झोपेचे तीन-तेरा वाजले. चारच्या सुमारास आम्ही कळसाला पोहोचलो. इथे वनविभागाचं चेक पोस्ट आहे. इथून कुद्रेमुखवर जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. फक्त पहिल्या ५० जणांना परवानगी दिली जाते. जो हाजीर तो वजीर. आम्ही चार वाजताच पोहोचल्याने आम्हाला लगेचच परवानगी मिळाली. मग कुद्रेमुख-मुलोडी रस्त्याच्या जवळ आमची बस येऊन थांबली. अजून सूर्योदय व्हायला तासभर अवकाश होता. आम्ही तेवढीच जरा झोप काढून घेतली. पाऊस सुरूच होता. 

साडेसहाच्या सुमारास आम्ही बसमधून उतरलो. इथून मुलोडीपर्यंत जीपची सोय केली होती. हा रस्ता म्हणजे एक भयंकर प्रकरण होतं. अर्धा-एक किमी ठीक-ठाक असलेला रस्ता पुढे चिखलराड्यात कुठेतरी हरवून गेला होता. मध्येच पाण्याचे ओहोळ आडवे येत होते. त्यात अवघड वळणं आणि तीव्र चढ. चालकाची खरी परीक्षा होती. फोर-व्हील ड्राईव असल्याने तेवढाच काय तो दिलासा होता. पण जीप चालक तर जणू एक्स्प्रेस वे वर चालवत असल्यासारखा जीप हाकत होता. त्याच्यासाठी रोजचंच काम म्हणा. त्या वळणांनी आणि धक्क्यांनी आमचा जीव मात्र कसानुसा झाला होता. होते अंतर जेमतेम ६ किमी. पण तेवढे पार करायला आम्हाला जवळपास एक तास लागला. अखेरीस मुलोडी गावात पोहोचलो. हे गाव साधारण १००० मीटर उंचीवर होते. गाव कसले, वीसेक घरांचा पाडाच तो. इथल्या सगळ्या घरांत मुक्कामाची आणि जेवणाची सोय होते. आम्ही अशाच एका घरात उतरलो. चांगलं आठ-दहा खोल्यांचं ऐसपैस कौलारू घर होतं. ते घर बघून कोकणातल्या वेळासमधील निजसुरे काकांच्या घराची आठवण झाली. पडवीतच एका कोपऱ्यात चूल होती. त्यावर चहा उकळत होता. एवढ्या भयंकर प्रवासानंतर चहा आवश्यकच होता की. चहाचे दोन घोट घशाखाली गेले तेव्हा कुठे जरा तरतरी आली. त्या कुंद पावसाळी वातावरणात तो काहीसा पाणचट चहादेखील अमृततुल्य वाटत होता. लवकरच नाश्ता आला. सगळी आवरा-आवरी करून आम्ही ट्रेकसाठी सज्ज झालो.                   

क्रमशः  

 

कुद्रेमुखची रानवाट - भाग २ - शोला परिसंस्थेत प्रवेश

मुलोडी गावात चहा-नाश्ता उरकून आम्ही ट्रेकसाठी सज्ज झालो. पाऊस अधून-मधून कोसळत होता. वातावरण कुंद होते. गार वाऱ्यावर हुडहुडी भरत होती. फार जास्त पाऊस लागू नये अशी अपेक्षा करत आम्ही हर हर महादेव म्हणून ट्रेकला सुरुवात केली. गावातून बाहेर पडताच मंद चढण सुरु झाली. आजूबाजूच्या डोंगरांवर नुसती खुरटी झुडूपं आणि गवत दिसत होते. उंच आणि घनदाट झाडं कधीच मागे पडली होती. आपण बऱ्यापैकी उंचीवर असल्याचं जाणवत होतं. तेवढ्यात वन विभागाची चेक पोस्ट दिसली. आम्ही पहाटे दिलेल्या ओळखपत्राच्या प्रती इथल्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचल्या होत्या. तो प्रत्येकाचं नाव घेऊन तीच वक्ती आहे की नाही हे तपासून बघत होता. शिवाय प्रत्येकाच्या बॅगेत किती प्लास्टिकच्या पिशव्या आहेत हेही तपासणं चाललं होतं. माणशी केवळ एकच पिशवी वर न्यायची परवानगी होती. त्यामुळे दुपारच्या जेवणाचं पाकीट वगळता इतर सगळं समान इथे काढून ठेवावं लागलं. तसा उपक्रम स्तुत्यच होता. कुद्रेमुखचा परिसर अति-संवेदनशील असल्याने वन विभाग इथल्या पर्यावरणाच्या बाबतीत बराच दक्ष होता. महाराष्ट्रातल्या वन विभागाला कधी जाग येणार देव जाणे. असो. सगळी तपासणी पूर्ण होतेय तेवढ्यात पावसाची एक जोरदार सर आली. वाऱ्याने थंडी वाजू लागली. आता सगळा ट्रेक या अशाच वातावरणात करायचा आहे याची मनोमन तयारी करत आम्ही पुढे निघालो. 

वाटेतले रम्य दृश्य 

वन विभागाची चेक पोस्ट 


दरीत फोफावलेलं गच्च रान आणि माथ्यावरची खुरटी झुडपे 

एका डोंगरधारेच्या अंगाने वर-खाली होत ती वाट हळूहळू कुद्रेमुखच्या शिखराच्या दिशेने जात होती. काही अंतर मोकळ्या गवताळ भागातून रेंगाळत ती वाट मध्येच डोंगराच्या बेचक्यात शिरत होती. डोंगराच्या बेचक्यांमध्ये घनदाट रान फोफावलं होतं. त्या रानात प्रवेश केला की वेगळ्याच विश्वात आल्यासारखं वाटे. भर दिवसा दाटून आलेला अंधार, पानांतून सळसळत वाहणारा वारा, वरून पावसाचे थेंब, आणि ते उबदार दमट वातावरण थोडा वेळ हवंहवंसं वाटे. मग त्या बेचक्यातून धोधो वाहणारा ओढा आडवा येई. आपल्या घुमणाऱ्या ध्रोन्कारात तो पावसाच्या आवाजावरही मात करे. त्या तांबुसराड पाण्यात झोकून द्यावंसं वाटे. मग अचानक ते दाटलेलं रान कोंदट आणि भयाण वाटू लागे. ओढा पार करून थोडं वर चढलं की वाट रानातून बाहेर येई. मग ती पुन्हा डोंगरधारेच्या अंगाने खुरट्या गवतातून सरपटत पुढे जाताना दिसे. त्यावरून तोल सावरत चालू लागताच वाऱ्यासोबत पाऊस सपासप अंगावर चालून येई. मग पुन्हा कधी बेचक्यातलं रान येतंय याची वाट बघत जीव पुढे चालू लागे. 

बेचक्यातल्या कोंदट रानातून वाहणारा ओढा  

रमतगमत, पावसाचा आनंद घेत आम्ही पुढे चाललो होतो. एक गोष्ट मात्र या आनंदात सतत व्यत्यय आणत होती. ती म्हणजे जळवा!! पश्चिम घाट म्हटलं म्हणजे जळवा आल्याच. त्यात कुद्रेमुखचं हे रान म्हणजे जळवांचं जणू माहेरच. इथे प्रत्येक पावलावर कुठेतरी जळू दिसत होती. आम्ही दर दहा पावलांवर अंगावर कुठे जळू चढलिये का ते बघत होतो. कोणाच्या अंगावर चढलेली दिसली तर लगेच सावध करत होतो. ट्रेक लीडर आमच्याकडे बघून हसत होता. म्हणत होता, पिऊ दे की थोडंफार रक्त. काही होत नाही. त्याचं म्हणणं खरंच होतं म्हणा. जळवांच्या चावण्याने कुठले रोग होत असल्याचे ऐकीवात नाही. शिवाय त्या दंशाने कसली विषबाधाही होत नाही. थोडंफार रक्त वाहतं एवढंच. तासभर जळू-दक्षता अभियान राबवल्यानंतर आम्ही शेवटी हार मानली. काय व्हायचंय ते होऊदेत. एकदा स्वतःला निसर्गाच्या स्वाधीन केलं की त्याने देऊ केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत तशा स्वीकारायच्या.  

वाटेतला फलक आणि समोर ढगांच्या दुलईत दडलेले कुद्रेमुख शिखर 

वर-खाली होणारी ती वाट आता एका सपाट भागावर येऊन पोहोचली. इथे कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानाचा एक फलक लावलेला होता. समोर ढगांनी व्यापलेला एक प्रचंड डोंगर दिसत होता. हेच कुद्रेमुख शिखर. त्या फलकावरच्या चित्रानुसार इथून कुद्रेमुख शिखराचा संपूर्ण व्यू दिसतो. मात्र आज ढगांच्या साम्राज्यामुळे तसा व्यू काही आमच्या नशिबात नव्हता. तिथे थोडे फोटो काढून आम्ही पुढे निघालो. पाऊस जरा ओसरला होता. वातावरण प्रसन्न वाटत होतं. थोडं अंतर पुढे जाताच तीव्र चढण सुरु झाली. वीसेक मिनिटांच्या चढाईनंतर एका उंच टेकडीवर वाट येऊन थबकली. इथून साऱ्या कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानाचा रम्य परिसर दिसत होता. हिरवा मखमली शालू पांघरलेले डोंगर जणू ढगांशी हवा-पाण्याच्या गप्पा मारत होते. नजर जाईल तिथपर्यंत हिरव्यागार गोलाकार टेकड्या दिसत होत्या. महाराष्ट्रातला सह्याद्री आणि इथला सह्याद्री यांत हाच फरक आहे. अग्निजन्य खडकामुळे महाराष्ट्रातला सह्याद्री रांगडा वाटतो. बेलाग ताशीव कडे, माथ्यावरची बोडकी पठारे आणि पायथ्याशी बिलगलेली अरण्ये असे महाराष्ट्रातले त्याचे रूप. इथे कर्नाटकात मात्र तो काळासावळा खडक कुठे दिसत नाही. गोल-गोल टेकड्या एकमेकांच्या अंगावर चढत आभाळाला स्पर्श करू पाहतात. त्यांच्या उताराने गच्च रान पसरत जातं. मग एका उंचीनंतर मोठे वृक्ष तग धरू शकत नाहीत तिथपासून खुरट्या झुडपांचा आणि गवताचा प्रदेश सुरु होतो. हाच तो नानाविध प्रदेशनिष्ठ प्रजातींना आसरा देणारा शोला प्रदेश. भारतातली एक अद्वितीय परिसंस्था त्या ठिकाणी मी अनुभवत होतो. 

हिरवा शालू नेसलेले डोंगर 

शोला परिसंस्था 

अजून जवळपास अर्धी चढाई बाकी होती. आम्ही पावलांचा वेग वाढवला.
क्रमश: 
 

कुद्रेमुखची रानवाट - भाग ३ - शिखर आरोहण

अथांग हिरवळीने नटलेल्या त्या राजस टेकड्या न्याहाळत आम्ही कुद्रेमुख शिखराकडे चाललो होतो. पाऊस थांबला होता. पण त्या उंचीवर हवेनेच जणू पाण्याच्या सूक्ष्म थेंबांना तोलून धरले होते. वाऱ्यासोबत ते थेंब अंगावर आदळत होते, नाकातोंडात जात होते. खरंच कधी ढगांमधून विहरायला मिळालं तर असाच काहीसा अनुभव येईल कदाचित. एक तीव्र चढणीचा टप्पा पार करून वाट आता थोडी सपाट झाली. समोर दरीच्या काठाने बिलगून वाढलेलं एक झाड दिसत होतं. त्या गवताळ डोंगरमाथ्यावर तेवढं एकच झाड दिमाखात उभं होतं. जणू साऱ्या प्रदेशाची राखण करायची जबाबदारी त्या एकट्या झाडाला कुद्रेमुखच्या शिखराने दिली होती. या जागेस ओंतीमारा असे म्हणतात. याचा शब्दशः अर्थ होतो एकटे झाड. माथेरानच्या One-tree hill सारखीच ही जागा वाटत होती. झाडाच्या शेजारी कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानातल्या प्राणीसंपदेविषयी माहिती देणारा एक फलक लावला होता. तिथे आम्ही जरा वेळ विसावलो. थोडीफार खादाडी केली. फोटो-बिटो काढले आणि पुढे निघालो. 

ओंतीमाराकडे जाणारी वाट 

ओंतीमारा 

आता पुन्हा एकदा चढण सुरु झाली. आता शिखराच्या मुख्य धारेवर आम्ही येऊन पोहोचलो होतो. चढाईचा मार्ग मागच्या बाजूने होता. त्यामुळे खालून दिसणारा (किंबहुना दिसू शकणारा) शिखराचा तो विशिष्ट आकार इथून नजरेस पडत नव्हता. समोर दिसत होती ती निव्वळ डोंगराच्या अंगाने वर-वर चढत जाणारी वाट. डोंगराच्या बेचक्यांमध्ये बांबू फोफावला होता. अधे-मधे रानफुलं दिसत होती. सोबतीला जळवा होत्याच. जसजसे वर चढत होतो तसा वाऱ्याचा वेग वाढत होता. एका मोठाल्या खडकापाशी ती वाट येऊन अडखळली. इथून डाव्या हाताने खडी चढण सुरु होत होती. घोंघावणारा वारा आता तोललेल्या थेंबांना बाणांसदृश अंगावर फेकून मारत होता. त्याच्याकडे दुर्लक्ष करत आम्ही ती खडी चढण चढू लागलो. चांगलीच धाप लागत होती. त्यात सगळी वाट प्रचंड निसरडी झाली होती. टोचणाऱ्या पावसापेक्षा आता पुढे टाकलेलं पाउल एका जागी स्थिर राहतंय की नाही याची काळजी जास्त होती. आधीच एवढं अंतर चालून थकलेले पाय आता चढताना बोलू लागले होते. अजून ३ किमी अंतर बाकी होतं. ट्रेक लीडर सगळ्यांना प्रोत्साहित करत होता. पण कुद्रेमुख आता खरा इंगा दाखवत होतं. ग्रुपमधल्या दोघांनी तिथूनच माघार घेतली. ओंतीमारापाशी जाऊन थांबतो असं म्हणून ते तिथूनच मागे फिरले. आम्ही मात्र उरलीसुरली उमेद एकवटून वर चढू लागलो. म्हणता म्हणता ती खडी चढण संपली. शेवटचा गडी वर पोहोचला आणि आम्ही सगळ्यांनीच एकमेकांचं अभिनंदन केलं. शिखर अजून अर्धा किलोमीटर लांब होतं. पण वाट मात्र सपाट होती. 

शिखरावर चढत जाणारी वाट 

हळूहळू आम्ही शिखरापर्यंत पोहोचलो. कुद्रेमुखच्या सर्वोच्च जागेचा फलक तिथे लावलेला होता. या जागेवरून आजूबाजूला केवळ ढग दिसत होते. संपूर्ण व्हाईट-आउट! इथून कुद्रेमुखच्या गोलाकार टेकड्यांचे सुरेख दृश्य दिसते म्हणे. मात्र आज ढगांनी आमचे दृश्य अडवले होते. भर पावसाळ्यात अजून काय नशिबात असणार म्हणा. वाऱ्याच्या अंगातले थेंबांचे बाण आता मशीनगनमध्ये अपग्रेड झाले होते. शिखरावर पोहोचल्याचा आनंद होताच, मात्र तो तिथे थांबून साजरा करणं अशक्य होत होतं. आम्ही जमतील तसे फोटो काढले आणि खाली उतरायला सुरुवात केली. जिथून तीव्र उतार सुरु होत होता तिथे थांबलो आणि जेवणाच्या पिशव्या उघडल्या. सपाटून भूक लागली होती. कुठे बसावं तर आजूबाजूला चिखलाने माखलेला नुसता बोडका कातळ होता. मग उभ्या-उभ्याच खायला सुरुवात केली. त्या थंड ओल्या हवेत उभ्या-उभ्या लेमन राईसचे बकाणे भरण्यात काही वेगळीच मजा होती. 

शिखरावर 

जेवण उरकून उतरायला सुरुवात केली. चढताना दम खाणारी ती चढण आता उतरणे एक मोठे आव्हान होते. पावसाने वाट निसरडी झाली होती. त्यात डोंगरावरून खाली येणारे पाणी त्याच वाटेचा आधार घेऊन खाली वाहत होते. आम्ही कधी घसरत, कधी सरपटत, तर कधी बेडूकउड्या मारत खाली येत होतो. दोन हात आणि दोन पाय यांवर कसेही करून स्वतःला सावरून धरायचे एवढे एकच उद्दिष्ट होते समोर. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर एकदाचे त्या मोठ्या खडकापाशी येऊन पोहोचलो. ती वाट चढल्यावर झाला नसेल एवढा आनंद उतरल्यावर झाला! आता पुढची वाट तशी सोपीच होती. झपाझप ओंतीमाराजवळ येऊन पोहोचलो. क्षणभर विश्रांती घेऊन लगेच पुढे चालू लागलो. पाऊस थांबला होता. वाराही मंद वाहत होता. तितक्यात समोरच्या टेकडीमागून एक भलामोठा ढग पुढे येताना दृष्टीस पडला. आता पुन्हा पाऊस येणार की काय अशा विचारात असतानाच पाण्याचे टपोरे थेंब अंगावर पडू लागले. म्हणता म्हणता पावसाने रौद्र रूप धरण केले. जणू ढगफुटीच! एवढी वेगवेगळी पावसाची रूपं बघितली या ट्रेकमध्ये. आता हे एकच रुपडं राहिलं होतं जसं काही! आज निसर्गापुढे स्वतःला ओवाळून टाकलं आहे. होऊन जाऊ द्या! 

टेकडीमागून रोरावत पुढे येणारा ढग 

भारतीय उपखंडातला मान्सूनचा पाऊस म्हणजे एक रंगकर्मीच! जिथे जाईल तिथे वेगळं रुपडं घेऊन येईल. किनारपट्टीवर कोसळताना वादळी वारे सोबतीला घेऊन येईल. एकदा बरसू लागला की सात-आठ दिवस सतत बरसेल. मग अनिश्चित काळासाठी सुट्टीवर जाईल. दमट उष्म्याने जीव अगदी नकोसा करून टाकेल. मग सणावारांचे मुहूर्त गाठून धो-धो बरसेल. अगदी नवरात्रीचा प्रसाद घेतल्याशिवाय जागचा हलणार नाही. घाटातला पाऊस म्हणजे एक दीर्घकाव्य. तिथल्या डोंगररांगांशी त्याची खास दोस्ती. तिथे एकदा आवर्तला की चार-एक महिन्यांसाठी बाळंतपणाला माहेरी आलेल्या मुलीसारखा सुस्तावेल. कधी नुसतेच ढग, कधी भुरभूर, कधी रिमझिम, तर कधी मुसळधार अशा वेगवेगळ्या सर्गांमध्ये, छंदांमध्ये मनाला येईल तसा बरसत राहील. मग रानफुलं प्रसवून बागडत निघून जाईल. घाटमाथ्यासोबत मात्र त्याचा relationship status कायमच It’s complicated! असा. एक तर प्रदीर्घ काळ वाट बघायला लावील. किनारपट्टीवर एखाद-दोन पूर येऊन जातील पण इथे मात्र दोन-चार सरींच्या पुढे पर्जन्यमापकाचा आकडा जाणार नाही. मग एखाद्या उनाड दुपारी अधाशासारखा कोसळेल, सारं वातावरण गारेगार करेल, पाऊस आला असा खोटा दिलासा देईल, आणि पुन्हा दडी मारून बसेल. पावसा-पाण्याची तऱ्हाच न्यारी!

शोला प्रदेश 

न संपणारी रानवाट 

कुद्रेमुखच्या घाटातला तो पाउस कोणत्या सर्गात कोसळत होता देव जाणे! परतीची वाट अजूनच बिकट होत होती. आता कधी एकदा खाली पोहोचतोय असं वाटत होतं.
क्रमशः 

कुद्रेमुखची रानवाट - भाग ४ - परतीचा रम्य प्रवास

मुसळधार पावसातून आम्ही मुलोडीच्या दिशेने उतरत होतो. उतरतानाची वाट म्हणजे वाट कमी आणि ओहोळवाट जास्त वाटत होती. रस्त्यात लागणारे झरे आता कमरेपर्यंत फुगले होते. एकमेकांचे हात धरत, तोल सावरत, आम्ही ते पार करत होतो. सगळी झाडं-झुडुपंं, डोंगर-टेकड्या, गवत-फुलं त्या पावसापुढे नतमस्तक होऊन त्याचा मारा झेलत होते. त्या सगळ्यांसाठी निसर्गाचा आशीर्वादच होता तो पाऊस. पुढचे आठ-दहा महिने काही एवढं विपुल जलामृत मिळणार नव्हतं त्या रानाला. म्हणून आता हवं तितकं जलामृत पिऊन घेत होतं ते रान. सततच्या पावसाने आमची मात्र अवस्था बिकट झाली होती. ओल्या-कच्च कपड्यांतून अंगात हुडहुडी भरत होती. चष्म्याच्या काचा थेंबांनी धूसर झाल्या होत्या. शरीरातले सगळे स्नायू बोलत होते. पाय थरथरत होते. कधी एकदा कोरडे होऊन उबदार जागी रजई घेऊन बसतोय असं झालं होतं. ते चित्र डोळ्यांसमोर ठेऊन आम्ही स्वतःला पुढे रेटत होतो. ती वाट काही संपता संपत नव्हती. 

भिजून तृप्त झालेलं रान 

हात धरून ओहोळ पार करताना 
दोन-तीन तासांच्या पायपिटीनंतर आम्ही त्या वन विभागाच्या चेकपोस्टपाशी पोहोचलो. सकाळी जाताना काढून ठेवावी लागलेली खाऊची पाकीटंं आता परत मिळाली. सगळ्यांनी त्यावर एकच फडशा पाडला. थंडी-पावसाने आणि अथक पायपिटीने त्रस्त झालेल्या जिवाला ते पिवळे केळ्याचे चिप्स सुद्धा स्वर्गीय वाटत होते. कुद्रेमुखसारखे ट्रेक हे असे पाय जमिनीवर राखण्यास भाग पाडतात. आयुष्यातल्या छोट्यात छोट्या गोष्टीची किंमत दाखवून देतात. रौद्र निसर्गापुढे माणूस किती क्षुद्र आहे याची पदोपदी जाणीव करून देतात. असो. 

खाली पोहोचल्याचा आनंदात आम्ही बागडत बागडत होम स्टे वर पोहोचलो. साधारण पाच वाजत आले होते. वेळेत ट्रेक पूर्ण केल्याचे समाधान वाटत होते. खोलीवर येऊन रेनकोट काढला आणि बघतो तर काय सगळा टी-शर्ट आणि विजार रक्ताने माखलेले!! जळूबाईने आपला डाव साधला होता. पोटावर एक-दोन नाही चांगले चार व्रण दिसत होते. आता ती जळूबाई सरपटत रेनकोट आणि शर्टच्या आत कशी काय पोहोचली हे एक कोडंच होतं. थोडं रक्त अजूनही येत होतंच. मग लगेच त्यावर डेटोलचा कापूस दाबून धरला. त्याशिवाय पायावरही काही ठिकाणी व्रण दिसत होते. ना कसली वेदना ना काही जळजळ. नुसते रक्ताने वाहणारे व्रण. सगळ्यांचीच अवस्था अशी झाली होती. कोणाला छातीवर, कोणाला पाठीवर, तर कोणाला मांडीवर, जिथे मिळेल तिथे जळूने चावा घेतला होता. होम स्टे वर अजून एक ग्रुप आला होता. त्यांना वर जायचे परवाने मिळाले नव्हते म्हणून ते होम स्टे वरच थांबले होते. उद्याच्या दिवशी लवकर नंबर लावून परवाने मिळवणार होते. जळूबाईंच्या हल्ल्याने आमची झालेली अवस्था बघून सगळे धास्तावले होते. आम्हीही त्यांना ट्रेकच्या गमतीजमती खुलवून सांगू लागलो. तेवढ्यात गरमागरम चहा आणि भजी आणली गेली. सगळ्यांनी त्यावर यथेच्छ ताव मारला. मग उगाच गप्पा मारत बसलो. फोनला नेटवर्क नव्हतंंच. त्यामुळे आमचं आपापसातलंं नेटवर्क जमण्यास मदत झाली. गप्पा मारता मारता जेवायची वेळ झाली. मग मस्तपैकी सांबार-भात आणि पापड खाऊन अजून जरा वेळ बोलत बसलो. तासाभरातच सगळे निद्रादेवीच्या अधीन झालो. 

पहाटे पावसाच्या आवाजानेच जाग आली. हा पाऊस काही आमचा पिच्छा सोडणार नव्हता. शेवटी घाटातलाच पाऊस तो. आन्हिकं आणि नाश्ता उरकून आम्ही परतीच्या प्रवासासाठी सज्ज झालो. कळसापर्यंत सोडायला जाणाऱ्या जीपगाड्या तयारच होत्या. त्या चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून आम्ही तासाभरात कळसाला येऊन पोहोचलो. तिथे आमची बस होतीच. घाटातून वाटवळणं घेत बस जसजशी पुढे जाऊ लागली तसे गार हवेवर सगळेच डुलक्या काढू लागले. मी मात्र लहान मुलासारखा टकामका घाटातले सृष्टीसौंदर्य न्याहाळत होतो. कर्नाटकातला हा भाग म्हणजे एक वेगळीच दुनिया होती. जागोजागी कॉफीचे मळे, त्यात मध्येच लावलेली सिल्व्हर ओकची गोंडस झाडे, ढगांत हरवलेले डोंगरमाथे, डोंगरांच्या बेचक्यांतून वाहणारे शुभ्र धुमाळ, सारेच विलोभनीय होते. मधेच एखादी पावसाची सर साऱ्या परिसराला झोडपून काढत होती. मग एखादा चुकार ढग भलताच खाली उतरून कॉफीच्या मळ्यांना गोंजारून जात होता. रविवार असल्याने अधून-मधून पर्यटकांच्या गाड्या दिसत होत्या. हा नितांतसुंदर प्रदेश हुडकायला परत एकदा इथे यायचं असं मी मनाशी ठरवून टाकलं. 

कॉफीचे मळे (फोटो आंतरजालावरून साभार (http://vivasayam.org/wp-content/uploads/2014/08/Plantation.jpg)

म्हणता-म्हणता आम्ही बंगलोरला पोहोचलो. नव्याने दोस्ती झालेल्या सवंगड्यांचा निरोप घेतला आणि घराच्या दिशेने निघालो. बरीच वर्षं बकेट लिस्ट वर असलेलं एक ठिकाण पाहिल्याचं विशेष समाधान मनात दाटलं होतं.    
समाप्त

कर्नाटकातील किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण - भाग १ - रम्य ट्रेनप्रवास आणि ट्रेकची सुरुवात

भटकंतीमध्ये रमलेला जीव सदैव नव्या जागांच्या शोधात असतो. कधी काळी भटके मित्र किंवा रविवारची पुरवणी एवढेच काही मार्ग होते नव्या जागा शोधण्याचे. मात्र आता तंत्रज्ञानाने सगळे जग अक्षरशः हाताच्या बोटांवर आणून ठेवले आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरचे भटकंतीविषयक ग्रुप म्हणजे तर खजिनाच. असाच एकदा फेसबुक चाळत होतो. अचानक एका भटक्या मित्राची पोस्ट पहिली, कुमटा-गोकर्ण बीच ट्रेक! आता हा काय नवीन प्रकार? किल्ले, धबधबे, घाटवाटा, रानवाटा, हिमनद्या, दऱ्याखोरं, असे सगळे ट्रेकिंगचे रुळलेले मार्ग तर परिचयाचे होते. बीच ट्रेक हा प्रकार फारसा परिचयाचा नव्हता. वाटलं, नुसतं बीचवरून काय चालायचं? पण समोरचे फोटो तर फारच भारी होते. मग थोडी अजून माहिती काढली. हा ट्रेक केलेल्यांनी तर NOT TO BE MISSED अशी ग्वाही देऊन टाकली. मग काय, लगेच नोव्हेंबर मधला एक वीकेंड निवडला आणि नेहमीच्या ग्रुप सोबत या ट्रेकसाठी नोंदणी करून टाकली. 


ट्रेकमधला एक निवांत समुद्रकिनारा 

गोकर्ण हे तसे पर्यटनाच्या नकाशावरचे लोकप्रिय ठिकाण. गोव्यासारखेच सुंदर आणि प्रशस्त समुद्रकिनारे, पण तुलनेने कमी गर्दी असे हे ठिकाण. शिवाय मुरुडेश्वर, कारवार, जोग धबधबा अशा आजूबाजूच्या ठिकाणांची सोबत. त्यामुळे गोकर्णला पर्यटकांची बऱ्यापैकी वर्दळ असते. त्याच्याच दक्षिणेला, साधारण तीसेक किलोमीटर वर आहे कुमटा. हे अगदी लहानसे गाव. गोकर्णपासून थोडे दूर असलेले विलोभनीय समुद्रकिनारे कुमटा गावाच्या दिशेने वसलेले आहेत. हे सगळे किनारे पाहता यावेत म्हणून या ट्रेकचा मार्ग होता कुमटा ते गोकर्ण. शुक्रवारी रात्री मंगलोर सुपरफास्ट एक्स्प्रेसने आम्ही निघालो. नेहमीप्रमाणे भटक्यांचा ग्रुप जमला की सुरु होतात तशा गप्पा सुरु झाल्या. गाडी मुंबईच्या बाहेर पडली तसा हवेतला गारवा जाणवू लागला. कोकण रेल्वेचा नयनरम्य मार्ग रात्रीच्या अंधारातच पार पडणार होता. गाडी वेळेत पोहोचेल अशी अपेक्षा करत थोडा वेळ गप्पा-टप्पा करून सगळे जण झोपी गेलो. 


ट्रेकचा मार्ग 

सातच्या सुमारास जाग आली. नुकतंच उजाडलं होतं. गाडीने नुकताच गोव्यात प्रवेश केला होता. थिवीम, करमाळी, वगैरे स्थानकं धाडधाड मागे पडत होती. मडगाव आलं तशी गाडी ऐंशी टक्के रिकामी झाली. मग काय, मी पळालो दारात. दारात उभं राहून धावत्या गाडीचा आनंद घेणं यासारखी दुसरी मजा नाही. तो झोंबणारा वारा, वळणावरून गाडी जाताना दिसणारे पुढचे-मागचे डबे, आजूबाजूच्या गावांतली उगाचच ट्रेनकडे बघून हात हलवणारी लहान मुले, गाडी अचानक बोगद्यात शिरली की दाटून येणारा अंधार, सारेच कसे गंमतीदार! वयाने कितीही आकडे ओलांडले तरी यातली गंमत कधी कमी झाली नाही. एकदा तिथे उभं राहिलं की गाडीच्या त्या बेसूर धडधडीतही लय सापडू लागते. पुलावरून गाडी जाताना घुमणारा आवाज एक्स्ट्रा बास सारखा वाटू लागतो. मग अचानक भास होतो, गाडी खरंच “कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी” असं गातेय की काय? मग उगीचच झुक झुक अगीनगाडी वगैरे बालगीतं आठवत राहतात आणि आपण काहीशा वेगळ्याच तंद्रीत रमतो. मग एखाद्या अधिकृत थांबा नसलेल्या मधल्याच लहानशा स्टेशनात गाडी थांबते आणि यादृच्छिक गोष्टींमध्ये रमलेला जीव धडधडत वर्तमानात येतो. एव्हाना गाडी कर्नाटकात शिरली होती. कारवार यायचे बाकी होते. आजूबाजूने नारळी-पोफळीच्या गच्च बागा दिसत होत्या. उतरत्या छपरांची लहान-मोठी घरे मधूनच डोकावत होती. मधूनच एखाद्या खाडीवरच्या पुलावरून गाडी धडाडत जात होती. दूरवर कुठेतरी त्या खाडीच्या पाण्याला पिऊन टाकणारा अथांग समुद्र दिसत होता. एखादी ब्राह्मणी घार ऐटीत पाण्यात सूर मारताना दिसत होती. किनाऱ्यावरच्या कांदळवनात राखी बगळे ध्यानस्थ होऊन मत्स्याराधना करताना दिसत होते. मधेच एखादा केकाटत जाणारा खंड्या त्यांच्या साधनेत व्यत्यय आणत होता. असे सृष्टीसौंदर्य न्याहाळण्यात वेळ मजेत जात होता. 

कुठल्याशा छोट्या स्टेशनात थांबलेली ट्रेन 

म्हणता म्हणता कुमटा स्टेशन आले. गाडीने चांगलाच तासभर उशीर केला होता. लगबगीने सगळे उतरलो. इथून सगळ्यांच्या बॅगा गाडीने मुक्कामाच्या ठिकाणी जाणार होत्या. त्यामुळे आम्हाला फक्त खाण्या-पिण्याच्या गोष्टी लहान बॅगेत वेगळ्या काढून मोठी बॅग टेम्पोमध्ये ठेवण्यास सांगण्यात आले. ही सगळी आवरा-आवर झाली आणि मग आम्ही ओळखपरेडसाठी गोल जमलो. साधारण तीस जणांचा ग्रुप होता. ओळखीसोबत थोडेफार स्ट्रेचिंगचे व्यायामप्रकार केले आणि नाश्त्याला निघालो. स्टेशनच्या बाहेरच एका टिपिकल दाक्षिणात्य उपहारगृहात शिरलो. तिथे मस्त नाश्ता केला. तिथले केळ्याचे बन्स तर फारच चविष्ट होते. मग तिथून स्थानिक बस पकडून कुमटा बीचवर पोहोचलो. इथून ट्रेक सुरु होणार होता. पुरेसे पाणी आहे की नाही याची खातरजमा करून घेतली. आयोजकांनी हव्या त्या सूचना दिल्या. आणि मग मोरया म्हणत आम्ही ट्रेक सुरु केला. 

स्टेशनबाहेर वाॅर्मिंग अप  

क्रमश:

कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण - भाग २ - शांत समुद्रकिनारे आणि डॉल्फिन दर्शन


कुमटा गावातल्या कुमटा बीचवरून आम्ही ट्रेकला सुरुवात केली. साडेअकरा वाजले होते. मध्यान्हीचं उन तळपत होतं. समुद्रावरचा वाराही निपचित पडला होता. बाजूच्या कोळीवाड्यात खारवलेले मासे सुकायला ठेवले होते. त्याचा वास काहीसा अस्वस्थ करत होता. आम्ही किनाऱ्याला समांतर रस्त्याने पुढे चाललो होतो. थोड्या वेळाने एक चढण घेऊन वाट लहानशा टेकाडावर येऊन पोहोचली. इथून कुमटा गाव फारच सुंदर दिसत होते. इथे काही बसायला बाकं आणि पार्किंगची जागा होती. कदाचित स्थानिक लोकांची संध्याकाळी फिरायला येण्याची जागा असावी. आसपास थोडा कचरा आणि फुटलेल्या बियरच्या बाटल्या दिसत होत्या. सुंदर जागेचं वाट्टोळं कसं करायचं हे भारतीय लोकांकडून शिकावं. असो. तिथे थोडे फोटो काढून आम्ही पुढे निघालो.

वन्नळी बीच


ते टेकाड उतरून आम्ही आता वन्नळी बीचवर पोहोचलो. हा एक लहानसा अंतर्वक्र किनारा. बाजूला थोडीफार कोळ्यांची वस्ती होती. दुपारची वेळ असल्याने बहुतांश बोटी किनाऱ्यावरच नांगरलेल्या होत्या. एका ओळीत नांगरलेल्या बोटी आणि संथ लयीत वाळूवर येणाऱ्या लाटा सुरेख वातावरणनिर्मिती करत होत्या. किनाऱ्यावर फारच उन लागत होते म्हणून आम्ही बाजूच्या रस्त्याने चालू लागलो. इथे नारळांच्या झाडांनी थोडी सावली धरली होती. खरेतर ही आमच्या दुपारच्या जेवणाची जागा होती. जवळच्या हॉटेलमधला एक जण बिर्याणीचे पार्सल घेऊन येणार होता. त्याची वाट बघत आम्ही एका सावलीच्या जागी थांबलो. फोटोग्राफर मंडळी आपल्या कामाला लागली. काही जण ट्रेकिंगमधले खेळ खेळू लागले. उरलेले आम्ही काही लोक गप्पा मारत बसलो. आमचा मोठा ग्रुप बघून कुठूनतरी एक कुल्फीवाला सायकलीची रिंग वाजवत तिथे आला. आधीच एवढं उन, त्यात समोर आलेली कुल्फी. सगळ्यांनी त्या कुल्फीवाल्यासमोर एकच गर्दी केली. अक्षरशः पाच मिनिटात त्याच्याकडच्या सगळ्या कुल्फ्या संपल्या! तेवढ्यात जेवणाची पार्सल्स घेऊन हॉटेलवाला माणूस आला. इतका भरपेट नाश्ता, त्यात उन्हामुळे सारखं प्यायलं जाणारं पाणी, आणि आता खाल्लेली कुल्फी, यांमुळे कोणालाच भूक नव्हती. मग आम्ही पुढच्या बीचवर जेवायचा निर्णय घेतला आणि पार्सल घेऊन पुढे निघालो.


लाटांमध्ये व्यत्यय आणणारे खडक

वन्नळी बीच संपला तशी वाट पुन्हा टेकाडावर चढू लागली. ही टेकडी जरा उंच आणि खडकाळ होती. उन्हात तेवढं अंतर चढणंही अवघड वाटत होतं. एकदाचे आम्ही वर पोहोचलो. सावलीच्या जागी जरा विसावलो. चढणीमुळे काही जण मागे पडले होते. त्यांची वाट बघत सगळे जण थांबलो होतो. समुद्रावरच्या दमट हवेची झुळूक सुखावह वाटत होती. छान डुलकी लागेल असे वाटत असताना अचानक एक जण ओरडला, डॉल्फिन!! खरंच समोर पाण्यात डॉल्फिन उड्या मारताना दिसत होते. त्यांचे त्रिकोणी पंख आणि टोकेरी शेपट्या पाण्याबाहेर येताना दिसत होत्या. बराच मोठा कळप असावा कदाचित. एकाने दुर्बीण आणली होती. त्यातून मग सगळे एक-एक करत डॉल्फिन पाहू लागले. त्या जलचरांची ती क्रीडा फारच मोहक वाटत होती. तेवढ्यात मागे पडलेले लोक तिथवर येऊन पोहोचले. एक-दोन जणांचे उन्हामुळे अगदीच अवसान गळाले होते. ते मागे फिरायची भाषा करत होते. मग ग्रुप लीडरने त्यांना समजावून पुढे चालण्यास प्रवृत्त केले. डॉल्फिन बघून त्यांचा मूडही जरा बरा झाला. एकदाचे सगळे जण पुढच्या वाटेला लागलो.


टेकाडावर बसून डॉल्फिन दर्शन



टेकडीवरून खाली उतरणारी वाट थोडी अवघड होती. मोठाले खडक विखुरलेले दिसत होते. त्यावरून माकडउड्या मारत आम्ही खाली उतरत होतो. पुढच्या टप्प्यात तर वाट पाण्याच्या अगदी जवळून जात होती. तोल सांभाळत आम्ही त्या डेंजर झोनमधून बाहेर आलो. आता सगळ्यांचा जठराग्नी पेटला होता. मग तिथेच एका सपाट खडकावर सगळे जण बसलो आणि जेवणाची पार्सल्स उघडली. तासभर जेवण अधिक विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो. पुढचा बीच होता कडले बीच. हा बीच अगदीच शांत होता. आधीच्या बीचवर दिसणारी कोळ्यांची वस्ती इथे दिसत नव्हती. शिवाय बोटीही दिसत नव्हत्या. लाटा संथपणे वाळू भिजवत होत्या. मधेच काही खडक लाटांची लय बिघडवायचा प्रयत्न करत होते. पण त्या लहानशा व्यत्ययाचा त्या दर्याला काहीएक फरक पडत नव्हता. उष्ण हवेच्या झोतांवर घारी पंख पसरून घिरट्या घालत होत्या. शांतता बघून आम्ही तिथे ग्रुप फोटो काढायला सुरुवात केली. यात बराच वेळ जातोय हे बघून ग्रुप लीडर घाई करू लागला. मग सगळे हळू-हळू पुढे जायला निघाले.


टेकडावरून दिसणारा रम्य बीच

क्रमशः
 
 

कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण - भाग ३ - निर्वाणा बीच आणि एक रम्य सूर्यास्त

बीच आणि टेकडी हा क्रम आता नित्याचाच झाला होता. एक बीच संपला की खडकाळ टेकडी येणार आणि ती उतरली की पुन्हा बीच हे आता सगळ्यांना पाठ झाले होते. पण त्या टेकड्यांमुळेच ट्रेकच्या मार्गात वैविध्य येत होतं. उंचीवरून बीच आणि आजूबाजूच्या परिसराचा रम्य देखावा दिसत होता. चढ-उतार करण्यात दमछाक होत होती तो भाग वेगळा. पण ट्रेकिंग म्हटलं की दमछाक आलीच. कडले बीचवरची फोटोग्राफी संपवून आम्ही पुढे निघालो होतो. पुढच्या टेकडीवर बऱ्यापैकी झाडं दिसत होती. झाडांतून वाट काढत आम्ही थोड्या मोकळ्या पठारावर आलो. इथून पुढे वाट एका कड्यावरून जात होती. डाव्या हाताला फेसाळलेला समुद्र कड्यावर आदळत होता. आता वाराही भन्नाट सुटला होता. समुद्राच्या त्या धीरगंभीर आवाजात आणि बेभान वाऱ्यात उन्हाची तीव्रता कमी भासत होती. थोडे अंतर गेलो आणि समोर अचानक तो कडा तुटल्यासारखा भासू लागला. वाट चुकलो की काय? पण पुढे जाताच लक्षात आलं की वाट उजवीकडे वळून खाली बीचवर उतरत होती. आणि समोर अत्यंत रम्य असा निर्वाणा बीच पहुडलेला होता. आतापर्यंत या ट्रेकमध्ये पाहिलेले बीच काहीसे अंतर्वक्र, मधेच खडकाळ असे होते. हा मात्र एकसलग, एका रेषेत पसरलेला वाळूचा किनारा होता. मध्ये कसलाच व्यत्यय नसल्याने समुद्राच्या लाटा संथपणे किनाऱ्यावर येऊन विसावत होत्या. समुद्रात दूर कुठेतरी एक पांढरी रेघ निर्माण होत होती आणि किनाऱ्याशी समांतर राहण्याचे वचन पाळत एका लयीत वाळूशी एकरूप होत होती. मग मागून लगेच दुसरी रेघ. त्याच्यामागून तिसरी. लाटांचा हा खेळ इथेच बसून बघत रहावा असे वाटत होते. तापत्या उन्हातून खडकाळ टेकड्यांवर केलेली पायपीट इथे सार्थकी लागल्यासारखी वाटत होती. बीचवर अक्षरशः कुणीच नव्हते. आमच्याच ग्रुपमधले पुढे गेलेले काही लोक दूरवर चालताना दिसत होते. त्यांची वाळूत उमटलेली पावलं एवढाच काय तो मानवी अस्तित्वाचा पुरावा त्या किनाऱ्यावर दिसत होता. आम्ही मागे राहिलेले काही जण तिथे बसून फोटो काढू लागलो. किती काढू तितके कमीच. शेवटी लीडर ओरडायला लागल्यावर आम्ही कॅमेरा आवरता घेतला. 




कड्यावरून खाली उतरून आता आम्ही बीचवरून चालू लागलो. इथल्या मऊसूत वाळूत पाय रुतत होते. बूट काढून चालावे तर गरम वाळूत पाय पोळत होते. शेवटी आम्ही ओल्या वाळूवरून अनवाणी चालू लागलो. इथली ओळी वाळू ऊबदार लागत होती. मधेच एखादी खट्याळ लाट पायांवर येत होती. ओल्या वाळूवर खेकड्यांची घरटी दिसत होती. त्यातून अधूनमधून खेकडबाळे डोकावत होती. आम्ही जवळ गेलो की झपकन आपल्या इवल्याशा बिळात शिरत होती. त्यांच्या वाकड्या चालीने वाळूवर सुरेख नक्षी उमटलेली दिसत होती. आम्ही एका लयीत चाललो होतो. जणू काही आमची चाल लाटांच्या लयीशी एकरूप झाली होती. निर्वाणा बीच एकूण ४-५ किमी लांबीचा होता. त्यातले ३ किमी आम्हाला चालायचे होते. उन्हामुळे आणि वाळूमुळे सगळ्यांचाच वेग मंदावला होता. जवळचे पाणी संपले होते. घशाला कोरड पडली होती. आधीच टेकड्या चढून दुखावलेले पाय आता वाळूत चालून अजूनच बोलायला लागले होते. आता मात्र कधी एकदा वाळू संपतेय असं झालं होतं. 

बीचवरची फोटोग्राफी (सौजन्य - प्रणीत धुरी)

शेवटी एकदाचा गावाकडे जाणारा रस्ता दिसला. आम्ही बीचवरून बाहेर पडून डांबरी रस्त्यावर आलो. तिथून अर्धा-एक किलोमीटरवर मुख्य रस्ता लागला. इथून बसने आम्ही अघनाशिनी जेट्टी पर्यंत जाणार होतो. बसची वाट बघत आम्ही तिथे रस्त्यातच बसकण मारली. नेहमीच्या गप्पा-टप्पा सुरु झाल्या. तेवढ्यात बस आलीच. वीसेक मिनिटात जेट्टी वर पोहोचलो. अघनाशिनी नदी इथे समुद्राला मिळते. तिचं विस्तीर्ण पात्र पार करायला तिथे नावांची सोय होती. आम्ही सगळे दाटीवाटीने नावेत बसलो. नावाड्याने मोटर चालू केली आणि सरसर पाणी कापत आमची नाव पुढे सरकू लागली. मावळतीकडे झुकलेल्या सूर्याचा सोनेरी प्रकाश फारच मोहक वाटत होता. पाणी तसे संथ होते. दूरवर गरजणाऱ्या समुद्राच्या लाटा दिसत होत्या. नदीच्या काठाने बगळ्यांच्या माळा पाण्याला समांतर उडत जाताना दिसत होत्या. सगळे घरट्यांकडे परतत असावेत. घारी अजूनही शेवटचा चान्स म्हणून मासे शोधण्यात गुंतल्या होत्या. तेवढ्यात आमची नाव तडाडी जेट्टीवर लागली. हे कदाचित स्थानिक मच्छीमारांचे मोठे बंदर असावे. दिवस मावळायला आल्याने सगळ्यांचीच आवरा-आवर सुरु होती. त्या कोलाहलातून आम्ही लगबगीने बाहेर पडलो आणि बेलेकन बीचची वाट धरली. 

नावेतून नदी पर करताना (सौजन्य - देवेंद्र देशमुख) 

आता शरीर अगदीच थकले होते. अजून किती चालायचं असा प्रश्न हळूच कोणीतरी ट्रेकलीडरला विचारताना दिसत होतं. जणू काही त्या प्रश्नाचं वेगळं उत्तर मिळणार आहे! हा रस्ता काहीशा उंचीवरून नदीला समांतर जात होता. इथून नदीतल्या नावांची ये-जा दिसत होती. उजव्या हाताला लहानशी टेकडी होती. तिला वळसा घालून उजवीकडे वळून रस्ता बेलेकन बीचवर उतरत होता. तेवढ्यात समोर एक लहानसे मंदिर दिसले. मंदिरातून कानडी भक्तीसंगीताच्या सुरावटी ऐकू येत होत्या. काही स्थानिक बायका शुचिर्भूत होऊन मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. खालून वाहणारी नदी, पलीकडचा गरजणारा समुद्र, मंद वाहणारा वारा, अस्ताला जाणाऱ्या सूर्याने केशरी-गुलाबी रंगात रंगवलेले आकाश, आणि मंदिरात लागलेले ते मधुर भक्तीसंगीत. नाटकातल्या कलाकारांनी एकत्र येऊन मंचावर एखादे दृश्य साकारावे आणि प्रत्येकाने आपल्या अदाकारीने ते दृश्य खुलवावे तसे निसर्गातले ते एकक त्या भूदृश्याला आपापला रंग बहाल करत होते. त्याक्षणी इतकं प्रसन्न वाटलं की शरीराचा थकवा जणू त्या रंगांमध्ये विरघळून गेला असावा. उजवीकडे वळण घेऊन खाली उतरलो तर आणखी एक अप्रतिम दृश्य स्वागताला हजर होते. दोन बाजूंना टेकड्या आणि मध्ये एक लहानसा अंतर्वक्र बीच दिसत होता. हाच होता वेलेकन बीच. याच बीचवर आमची कॅम्पसाईट होती. बीच तसा खडकाळच होता. दूरवर गरजणाऱ्या लाटा किनाऱ्यावर येईपर्यंत लिंबू-टिंबू होत होत्या. टेकड्यांच्या मागे लपलेला सहस्ररश्मी आपल्या सोनेरी किरणांनी साऱ्या भूदृष्याला वेगळाच उठाव देत होता. त्याच्या सोनेरी प्रकाशात लाटा चमकत होत्या. क्षीण आवाजात ऐकू येणारे मंदिरातले भक्तीसंगीत याही दृश्याची सोबत करत होते. तिथे थोडा वेळ फोटो काढून आम्ही पुढे निघालो. 

वेलेकन बीच आणि रम्य सूर्यास्त 

रस्त्याच्या कडेने काही हॉटेल्स दिसत होती. त्यांनी पक्क्या खोल्यांच्या बाजूने अगदी बीचवर काही झोपड्या उभारल्या होत्या. पर्यटनाची ही नवी कल्पना इथे चांगलाच जोम धरत होती. आमची कॅम्पसाईट सुद्धा अशीच एका छोटेखानी हॉटेलने उपलब्ध करून दिली होती. कॅम्पसाईटवर पोहोचल्याबरोबर चहा आणि भजी स्वागताला हजर होती. भूक तर लागलीच होती. दिवसभर उन्हात चालल्याने डोकं अगदी सुन्न झालं होतं. गरम चहाने जरा तरतरी आली. मग गप्पागोष्टी आणि कॅम्पिंग गेम्स सुरु झाले. यथावकाश जेवण आले. एव्हाना गार वारा सुटला होता. आकाशात विखुरलेले असंख्य तारे जणू एकमेकांशी प्रकाशाची स्पर्धा करत होते. आता मात्र झोप अनावर होत होती. उबदार स्लीपिंग बॅगेत स्वतःला गुर्फुटून घेत एकदाचे झोपी गेलो.

आमची कॅम्पसाईट (सौजन्य - देवेंद्र देशमुख)
 
क्रमशः 
 

कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण - भाग ४ - गोकर्णचे नयनरम्य किनारे

लाटांच्या जोरदार आवाजाने जाग आली. तसा तो आवाज रात्रभर चालूच होता. पण पहाटे कदाचित भरती आली असावी. तशी उठायची घाई नव्हती. कालच्या पायपिटीने पाय ठणकत होते. अजून थोडा वेळ झोपावं वाटत होतं. पण एकदा लख्ख सूर्यप्रकाश बघितला की परत झोप येत नाही. मग एकदाचा उठलो. काही जण उठून सूर्योदय बघायला गेले होते ते परत येत होते. काहीशा ढगाळ वातावरणामुळे सूर्योदय काही पाहता आला नव्हता. ते नुसतेच पहाटेच्या मंद प्रकाशात फोटोग्राफी करून परत फिरले होते. तेवढ्यात नाश्ता आला. सगळ्यांचं खाऊन होतंय तोवर नऊ वाजले. मग आवरून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. 

तीव्र उताराची वाट
आजची वाट कालच्यापेक्षा कमी अंतराची होती. पण चढ-उतार जास्त होते. वेलेकन बीचला समांतर वाटेने आम्ही गोकर्णच्या दिशेने चालू लागलो. काल सूर्यास्ताच्या वेळी सूर्य ज्या टेकडीने झाकला होता ती आता समोर उभी ठाकली होती. आतापर्यंतच्या टेकड्यांच्या तुलनेत ही टेकडी बरीच उंच होती. वाटेने गच्च झाडी होती. त्यामुळे वातावरणात दमट उष्मा जाणवत होता. समुद्रावरचा वारा दूर कुठेतरी अडकून पडला होता. कपाळावर जमा होणारे घामाचे थेंब पुसत आम्ही वर चढत होतो. अर्ध्या तासातच माथ्यावर पोहोचलो. अगदी सह्याद्रीतल्या ट्रेकसारखं वाटत होतं. आजूबाजूला झाडी होती आणि समुद्राचा कुठे काही पत्ताच नव्हता! थोडा वेळ पुढे गेल्यावर काहीशी मोकळी जागा दिसली. तिथं पोहोचलो आणि दूरवर अडकून पडलेला वारा भपकन अंगावर आला. आधीच घामाने वैतागलेला जीव त्या वाऱ्याने जरा शांत झाला. खरी मजा तर पुढे होती. अजून काही अंतर गेलो आणि समोर हजर होता पॅरेडाईझ बीच! तसा बीचला काही आकार-उकार नव्हता. एका बाजूने काही खडक उगीच लोकलच्या दारात लोंबकळणाऱ्या टवाळ पोरांसारखे समुद्रात झुकले होते. अविरत आदळणाऱ्या लाटांची त्यांना नशा चढली असावी. खडकांच्या पलीकडे थोडीफार वाळू दिसत होती. हा गोकर्ण मधला एक अत्यंत रमणीय किनारा. शहरापासून तसा लांब असल्याने इथे फार लोक येत नाहीत. त्यामुळे तशी शांतता असते. शिवाय खडकांचे विलोभनीय भूदृष्य! म्हणूनच पॅरेडाईझ बीच म्हणत असावेत कदाचित. अतिशय तीव्र उताराची वाट उतरत आम्ही बीचवर पोहोचलो. त्या ओबडधोबड खडकांवर जरा वेळ विसावलो. बीचवर काही तुरळक पर्यटक होते. आम्हा ट्रेकर्सकडे विस्मित नजरेने बघत होते. हे कोण लोक, हे असे टेकडीवरून कसे काय इथे आले, आणि भर उन्हाचं बीचवर बियर पीत लोळायचं सोडून हे ट्रेकिंग कसले करतायत, असेच काहीसे प्रश्न त्यांच्या मनात येत असावेत. आम्ही उगीच त्यांना टाटा करून पुढे निघलो. 

स्मॉल हेल बीच 

आणखी एक खडकाळ टप्पा पार केला आणि पोहोचलो स्मॉल हेल बीचवर. हा बीच म्हणजे नावालाच बीच होता. खडकाळ टेकडीच्या मध्यात एका खोबणीत लहानसा वाळूचा किनारा तयार झाला होता, एवढाच काय तो बीच! आजूबाजूला शिंपल्यांचा सडा पडला होता. समुद्राचा आवाज घुमल्यासारखा वाटत होता. इथे एका कोपऱ्यात काही विदेशी नागरिक एक तंबू उभारून राहिले होते. कॅम्पिंगची जागा असावी ती अशी. तिथून आम्ही पुढच्या खडकाळ टेकडीवर चढलो. हा म्हणजे एक नुसता उंचवटा होता. मात्र तिथले दृश्य अफाट होते. तीनही बाजूंनी समुद्राच्या लाटा आजूबाजूला आदळत होत्या. भन्नाट वारा सुटला होता. टेकडीवरची लहान-मोठी झाडं-झुडूपं वाऱ्याच्या तालावर नाचत होती. दुपारचं टळटळीत ऊन त्या वाऱ्याने निष्प्रभ करून टाकलं होतं. तिथल्या खडकावर उभं राहून एक मोठ्ठी आरोळी मारावी असं वाटत होतं. जणू त्या जागेतच काहीशी नशा होती. एवढ्यात एक समुद्रगरुडाची जोडी समोरून विहरताना दिसली. त्या वाऱ्यावर त्यांनी आपले विशाल पंख मोठ्या ऐटीत पसरले होते. कुठल्या हालचालीची आवश्यकताच नव्हती मुळी. गरम हवेच्या झोतावर स्वतःला मोठ्या आत्मविश्वासात झोकून देत ती जोडी जणू हा समुद्राचा भाग आपलीच जहागिरी आहे अशा आविर्भावात वावरत होती. थोडा वेळ घिरट्या मारून ते पक्षी एका माडाच्या शेंड्यावर विसावले. समुद्र्गरुड एकदा जोडीदार मिळाला की त्याच्याचसोबत आयुष्यभर राहतात. त्यांचे घरटेही एकाच ठिकाणी असते वर्षानुवर्षे. एक क्षण हेवा वाटला त्या पक्ष्यांचा. अशा स्वर्गीय किनाऱ्यावर घरकुल होते त्यांचे. अवघा रत्नाकर म्हणजे त्यांचे अंगण. आणि उंच उडायला फार कष्ट करायचीही गरज नाही. वारा असतोच मदतीला. जन्म-मृत्यूचे चक्र खरेच अस्तित्वात असेल तर एखाद्या जन्मी समुद्रगरुड व्हायला नक्कीच आवडेल. असो. 



ती खडकाळ टेकडी उतरून आम्ही पोहोचलो हाफ मून बीचवर. हाही एक लहानसा अंतर्वक्र किनारा होता. मात्र दोन बाजूंनी लहानशा टेकड्या समुद्रात घुसल्या होत्या. त्यामुळे तिथले भूदृष्य अगदी थायलंड किंवा हवाईसारखे वाटत होते. किनाऱ्याला लागून माडांची दाट झाडी होती. त्यात लहान-मोठ्या बीच हट्स दिसत होत्या. गोकर्णच्या पर्यटकप्रिय भागात आल्याची ती खूण होती. दुपारची वेळ असल्याने गर्दी तशी तुरळकच होती. आम्ही एका हटमध्ये थांबलो. उन्हात चालून घशाला कोरड पडली होती. मग शीतपेयांच्या बाटल्या रिचवल्या. थोड्या विश्रांतीनंतर पुढे निघालो. आजच्या दिवसाचा अर्धा प्रवास संपला होता. मात्र अजून गोकर्णमधले दोन मुख्य किनारे बघायचे बाकी होते. शिवाय संध्याकाळी वेळेत स्टेशनवरही पोहोचायचे होते. आम्ही पावलांचा वेग वाढवला.    
क्रमशः
 

कर्नाटकातली किनाराभ्रमंती : कुमटा ते गोकर्ण - भाग ५ - उरलेसुरले किनारे आणि न हरवलेला कॅमेरा

हाफ मून बीचवरच्या विश्रांतीनंतर आम्ही पुढच्या बीचकडे निघालो. समोर अर्थातच एक टेकडी दिसत होती. ही आत्तापर्यंतची सगळ्यात उंच टेकडी असेल. वाटेने गर्द झाडी होती. चांगला तास लागला वर चढायला. आता पुढची वाट टेकडीच्या धारेने जात होती. डाव्या हाताला समुद्र गर्जत होता. उतारावर वाढलेली माडाची झाडं मोठ्या कसोशीने वाऱ्याशी झुंज देत उभी होती. थोड्या वेळातच वाट पुन्हा गर्द झाडीत शिरली. पानांच्या जाळीतून दुपारचं कडक उन हिरवं होऊन खाली झिरपत होती. लाल मातीतली पायवाट आणि ते हिरव्या छटेचं उन एक वेगळीच वातावरणनिर्मिती करीत होते. आता वाट उतरू लागली. हळूहळू झाडांची दाटी कमी होऊ लागली आणि समुद्र दिसू लागला. एका वळणावर आलो आणि समोर ॐ बीचचे नितांतसुंदर दृश्य नजरेस पडले. एकमेकास लागुन असलेल्या दोन अंतर्वक्र किनाऱ्यांमुळे या बीचला ओम बीच असे नाव पडले होते. दोन किनाऱ्यांच्या मधल्या भागात जमिनीचा एक लहानसा तुकडा समुद्रात शिरला होता. त्यावर एक लहानशी खडकाळ टेकडीही दिसत होती. इथे बरेच पर्यटक दिसत होते. ओम बीचचा हा “व्यू” बघण्यासाठी अनेक जण या वळणापर्यंत चढत येत होते. त्यामुळे तिथे काही लहान-सहान दुकानेही उगवली होती. गर्दी बघून आम्ही लगेचच तिथून काढता पाय घेतला. 


टेकडीच्या धारेवरून जाणारी वाट 

हिरवंं उन आणि लाल माती 

ओम बीचचे रम्य दृश्य 

ओम बीच तसा चालायला बराच मोठा होता. इथली वाळूही अगदी भुसभुशीत होती. ऊन मी म्हणत होतं. आता चालायचा अगदी कंटाळा आला होता. पण थोडेच अंतर राहिले होते. म्हणता म्हणता आम्ही कडले बीचवर पोहोचलो. हा गोकर्णमधला सगळ्यात गजबजलेला बीच. दुपारची वेळ असल्याने गर्दी तशी आटोक्यात होती. या बीचवर पोहण्यास असुरक्षित अशा काही जागा होत्या. तिथे तसे फलकही लावलेले होते. जागोजागी सुरक्षारक्षक लोकांवर नजर ठेवून होते. ती व्यवस्था बघून थोडेसे आश्चर्य तर वाटलेच पण समाधानही वाटले. भारतात कुठेतरी लोकांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था आहे हे बघून जरा बरं वाटलं. बीचवरच्याच एका हॉटेलवर आमची जेवणाची सोय होती. इथे दोन तासांचा ब्रेक होता. जेवणाची ऑर्डर देऊन आम्ही काही लोक पाण्यात खेळायला पळालो. दोन दिवसांचा शीण पाण्यात उतरल्यावर कुठच्या कुठे पळाला. लाटा उंच उसळत होत्या. दुपारच्या वेळचं ते समुद्राचं कोमट पाणी दुखऱ्या स्नायूंवर मायेचा हात फिरवत होतं. पाण्यात खेळता-खेळता तास कसा गेला कळलंच नाही. जेवण तयार झाल्याची हाक ऐकू आली आणि काहीशा अनिच्छेनेच पाण्याच्या बाहेर पडलो. आता सडकून भूक लागली होती. भरपेट जेवण झाले. काश एक छान डुलकी काढता आली असती! पण घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. 

कडले बीच 

आता गोकर्णचा मुख्य किनारा पार करून थेट ट्रेन स्टेशनवर जायचे होते. दुपारचे चार वाजत आले होते. उन्हाची तीव्रता जरा कमी झाली होती. मुख्य किनाऱ्याच्या एका अंगाला एक लहानसे मंदिर होते. तिथून बीच आणि समोरचा समुद्र यांचे रम्य दृश्य दिसत होते. आम्ही तिथे थोडा वेळ विसावलो. ग्रुप फोटो वगैरे काढले आणि बीचवरून बाहेर पडलो. आता शहरातून काही अंतर चालत बस स्थानकावर जायचे होते. ट्रेक तर संपला होता. म्हटलं आता ते अवजड ट्रेकिंग शूज काढून साध्या चपला घालू. दोन मिनिटे थांबून बदलाबदली केली आणि शूज नुसते एका पिशवीत घालून पुढे चालू लागलो. थोडं अंतर जातोय तेवढ्यात लक्षात आलं, गळ्यातला कॅमेरा कुठंय?? जिथे शूज काढले तिथे राहिला की काय? दोन क्षण काही सुचेचना! लगेच ट्रेक लीडरला सांगून मी मागे पळालो. शूज काढले तिथे येऊन पोहोचलो. आसपासच्या लोकांना वेड्यासारखा विचरू लागलो, कोणी एक काळी बॅग बघितली का. भेळपुरीवाल्याला विचारलं, पाणीपुरीवाल्याला विचारलं, समोरच्या बाकावर बसलेल्या बायकांना विचारलं, चौकातल्या ट्राफिक पोलिसालाही विचारलं. काहीच धड उत्तर मिळेना. आता जर कोणी चोरलाच असेल तर असा कोणाला विचारून मिळायची शक्यता नाहीच! पोलिसात तक्रार करावी का? ट्रेनच्या वेळेआधी ते करून होईल? आणि तरीही मिळायची काय शक्यता? एक नाही हजार विचार डोक्यात थैमान घालू लागले. कॅमेरा हरवला आहे आहे सत्य अजूनही पचले नव्हते. तितक्यात फोन वाजला. ट्रेक लीडरचाच फोन होता. “तुझा कॅमेरा इथे आमच्याकडे आहे, लवकर पुढे ये!” ते शब्द ऐकून जीवात जीव आला. धावतच पुढे गेलो. माझा घामेजलेला चेहरा बघून सगळे हसत होते. ग्रुपमधल्याच एका मुलीने तिच्या मित्राचा कॅमेरा समजून माझा कॅमेरा उचलला होता! शूज बदलण्याच्या नादात त्याकडे माझे लक्षच गेले नाही. नेहमी असतो तसा कॅमेरा गळ्यात असेल असे समजून मी पुढे चालू लागलो होतो. नक्की काय घडले नि कसे घडले कोणास ठाऊक! पण त्या काही मिनिटांसाठी माझा जीव असा काही टांगणीला लागला होता की विचारू नका! 

गोकर्ण मुख्य बीच 

एकदाचे आम्ही स्टेशनवर पोहोचलो. गाडीत शिरताच जेवण वगैरे उरकले आणि सगळेच निद्रेच्या स्वाधीन झालो. खडकाळ टेकड्या, विस्तीर्ण किनारे, रम्य सूर्यास्त आणि त्याचसोबत न हरवलेला कॅमेरा यांमुळे हा बीच ट्रेक आठवणींच्या गाठोड्यात कायमचा बांधला गेला आहे. 

समाप्त
 

जोग फॉल्स

जुलै २०११ सुरु होता. बंगलोरात धो-धो पाऊस पडत होता. घरीही एकटाच होतो त्यामुळे सारखे कुठेतरी जाण्याची खुमखुमी येत होती. पावसाळा होता म्हणुन म्हणले एखाद्या धबधब्याला भेट द्यावी. जोग धबधब्याचे बरेच नाव ऐकुन होतो. अजुन कोणी येते आहे का हे पहायला प्रकाशला (माबोकर प्रकाश काळेल) तर तो ही तयार झाला आणि एका वीकएंड आम्ही दोघे निघालो.जोग फॉल्स पच्शिम घाटात अगदी आत आहे. जोग फॉल्स ला जाण्यासाठी बंगलोर-शिमोगा-सागर-जोग फॉल्स असा प्रवास आहे. बंगलोर -शिमोगा अशी रेल्वे आहे. हा साधारणःपणे ३.५ तासांचा प्रवास आहे. आता बंगलोर-तलगुप्पा (तलगुप्पा - जोग फॉल्स १६ किमी) अशी नवी रेल्वे सुरु झाली आहे. शिमोगा ला थांबुन दुसर्‍या दिवशी सकाळी जोग फॉल्स ला निघालो. सागरला पोहोचलो तर मुसळधार पाऊस सुरु झाला होता. तिथुन दुसरी बस घेऊन जोग फोल्स ला पोहोचलो. हा भारतातला दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात ऊंच (२५३ मीटर ) धबधबा आहे. हा धबधबा शरावती नदीवर आहे. ह्या धबधब्याचे राजा, राणी, रोअरर आणि रॉकेट असे ४ प्रवाह आहेत. KSTDC ने धबधब्याच्या अगदी तळापर्यंत नेण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत.
तेथुन ह्या धबधब्याचे खरे रौद्र रूप पाहता येते. वरून पडणारा मुसळधार पाऊस, धबधब्यामुळे होणारा तुषारांचा दाट पडदा, त्यात ढग अशा वातावरणात पायर्‍या ऊतरून खाली गेलो व शक्य असेल तेव्हडे फोटोज् काढले.
(काही प्रचि slow shutter speed वापरुन काढण्याचा प्रयत्न केला आहे पण tripod नसल्यामुळे थोडेसे blur आले आहेत. )

प्रचि १
एक छोटा धबधबा:

-
-
-
प्रचि २
जोग फॉल्सः

-
-
-
प्रचि ३
जोग फॉल्स, तळाकडुनः

-
-
-
प्रचि ४
झरा

-

 

नागराजाच्या राज्यात.. अगुंबे

पश्चिम घाट – विषुववृत्तीय दाट पावसाळरान. जागतिक वारसा प्रभाग म्हणून नोंद झालेला हा प्रदेश म्हणजे वन्यजीवप्रेमींसाठी मोठी पर्वणीच. गुजरातमधल्या डांगपासून थेट तामिळनाडूपर्यंत, पश्चिम किनारपट्टीला साधारण समांतर पसरलेला डोंगरप्रदेश. कोकणातून घाटावर जायला याच डोंगररांगांमधून काढलेल्या घाटरस्त्यांनी आपण अनेक वेळा प्रवास केलेला असतो. त्यातच कधीतरी एखाद्या वन्य प्राण्याने अवचित दर्शन दिलेल असतं. माझ्यासारखा जंगली (जंगलप्रेमी) माणसाने एकदा या प्रदेशाला भेट दिल्यावर त्याच्या प्रेमात पडणं अगदी साहजिकच आहे. त्यात पावसाळा म्हटलं की पश्चिम घाटात किमान एक भ्रमंती केलीच पाहिजे असं प्रलोभन - व्यसनच म्हणा ना - खुणावत असतं. गेल्या वर्षी महाराष्ट्रात सह्याद्रीमध्ये आंबोलीत भ्रमंती केली होती. (उडणार्‍या (तरंगणार्‍या) बेडकाच्या प्रदेशात – भाग १, भाग २). आता या वर्षी एका मित्राने आयोजन केल्यामुळे दक्षिणेकडच्या कर्नाटकात अगुंबे भ्रमंतीचा योग आला.

मुंबई ते अगुंबे : जवळजवळ १३०० कि.मी. ट्रेनने (मत्स्यगंधा एक्स. १२६१९, सोळा-सतरा तास,) उडुपी रेल्वे स्टेशनपर्यंत. तिथून बस डेपोपर्यंत प्रीपेड तीन आसनी रिक्षा (सुमारे अर्धा तास, ८० रु.), तिथून बसने अगुंबे बस डेपो (दीड तास, ६० रु.). इथून मुक्कामाच्या जागेपर्यंत (ARRS) रिक्षा (अर्धा तास, १०० रु.).
आपला जीव मुठीत धरून, डोळे गच्च बंद करून आणि दोन्ही हातांना जे काय लागेल ते घट्ट धरून उडुपी ते अगुंबे हा घाटातून बस प्रवास करायचा असतो. ४ या आकड्यासारख्या अनेक चढउतारांवरून गाडी चालवताना गाडीचा वेग ६०-७०पेक्षा कमी असला तर ड्रायव्हरला कामावरून काढून टाकायचा नियम असावा, किंवा ड्रायव्हरला कमीपणा (इज्जत का इडली-डोसा) वाटत असेल अशी शंका येते. अशाच वळणांवरून विरुद्ध दिशेने येणार्‍या गाड्यांशी गळाभेट चार वेळा जेमतेम दोन-तीन इंचाने चुकली. ड्रायव्हरने कानडीत सडसडून काहीतरी उद्गार काढले. बहुधा कानडीतून ‘अम्मा-आक्कां’ची ‘भ’कार-‘म’कारयुक्त आठवण असावी, कारण बसमधल्या कानडी अम्मा-आक्कांच्या चेहर्‍यावर ‘मेल्याच्या जिभेला काही हाड.. बायकांसमोर असं काही बोलतात का..’ असे नाराजीचे भाव उमटले.

मग अगुंबेला (परतीच्या प्रवासात उडुपीला) उतरल्यावर अंग झाडून आपली सर्व हाडं शाबूत असल्याची आणि असली तर ती सर्व योग्य जागी असल्याची खातरी करून घ्यायची. आम्ही बसमधून उतरल्यावर मला ड्रायव्हर-कंडक्टरचे पाय धरायचे होते, पण बहुधा कमरेतल्या मणक्यांनी जागा सोडल्यामुळे मला वाकताच न आल्यामुळे शेवटी नुसतेच (कोपरापासून) हात जोडून त्यांना नमस्कार केला. असो.

अगुंबे हे नागराजाच्या विणीचं प्रमुख ठिकाण म्हणून प्रसिद्ध होतंच. नागराज (King Cobra Ophiophagus hannah) हा भारतातला सर्वात मोठा साप. जवळजवळ साडेचार-पाच मीटर लांब असतो. आपल्या अंड्यांच्या संरक्षणासाठी घरटं बनवणारा हा जगातला एकमेव साप आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये मिलन झाल्यावर एप्रिल-मेमध्ये मादी वाळक्या पानांचा ढीग बनवून त्यात अंडी घालते. पावसाळा सुरू होईपर्यंत त्यातून पिल्लं बाहेर येतात. डोंगरारांगांमधलं दमट, ओलसर आणि माणसाने वाट न लावलेलं अनाघ्रात पावसाळरान हे त्याचं वसतिस्थान आणि इतर साप (मुख्यत: धामण, दिवड इ.) हे प्रमुख अन्न या सर्व गोष्टी अगुंबेला जमून आल्या आहेत. त्यामुळेच नागराजांनी इथे आपलं साम्राज्य स्थापन केलंय.

जंगल परिसर - ३६० अंशात एक अवलोकन

रॉम व्हिटेकर आणि ए.आर.आर.एस.

सरपटणार्‍या प्राण्यांचे अभ्यासक रॉम व्हिटेकर यांनी काही वर्षांपूर्वी मद्रासला (आताच्या चेन्नईला) सुसर संशोधन आणि प्रजनन केंद्र स्थापन केलं. नागराजाबरोबरच एकूणच पावसाळरानाविषयी सखोल संशोधन व्हावं, यासाठी मूलभूत सुविधा असलेलं एक संशोधन केंद्र - Agumbe Rainforest Research Station - ARRS - त्यांनी इथे २००५मध्ये स्थापन केलं.

अगुंबे परिसरातल्या काही स्थानिक आदिवासी जमाती सर्प हाताळण्यात अत्यंत कुशल आहेत. त्यांच्या साहाय्याने नागराज आणि इतर विषारी सर्प पकडून, सर्पविषविरोधी लस (Anti snake venom) बनवण्यासाठी त्यांचं विष काढून ते संशोधन संस्थांकडे पाठवलं जायचं. पूर्वी इथे साप बर्‍याच प्रमाणात मारले जायचे, ते या उपक्रमामुळे खूपच कमी झालं. नॅशनल जिओग्राफिकने यावर एक माहितीपटही बनवला आहे. त्यामुळेच रॉम आणि ए.आर.आर.एस. खर्‍या अर्थाने प्रकाशात आले.

ARRS     ARRS

दोन-तीन वर्षांपूर्वी इथे एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला गेला. नागराजांना पकडून त्यांच्या शरीरामध्ये एक छोटीशी चिप बसवायची, म्हणजे त्यांचा मागोवा घेता येतो आणि त्यांच्या सखोल अभ्यासासाठी बरीच माहिती मिळते. त्यापासून मिळणार्‍या माहितीची छाननी सुरू आहे.

संशोधन केंद्रात शिरल्यावर “काय, कसा झाला प्रवास?” असं खास क्वल्लापुरी ढंगातलं स्वागत कानावर पडलं आणि कर्नाटकच्या मधोमध असलेल्या दाट जंगलात, मुंबईपासून हजारभर कि.मी. अंतरावर मायमराठीतले शब्द आयकून क्षनभर घ्येरीच आली बगा.. धीरज हा कोल्हापूरचा शेतकी पदवीधर, सहा वर्षांपूर्वी कुठल्यातरी संशोधन प्रकल्पनिमित्त इथे आला आणि तेव्हापासून इथेच राहतोय, इथलं संपूर्ण व्यवस्थापन सांभाळतोय. अत्यंत मितभाषी धीरजला बोलतं केल्यावर मात्र इथली अनेक रहस्यं उलगडत जातात.

नागराज आणि पावसाळरान यांच्याशी संबंधित अनेक विषयांवर संशोधन करण्यासाठी इथे अनेक विद्यार्थी, संशोधक येतात. त्यांच्या भोजन-निवासाची सोय इथे केली जाते. झोपायला गाद्या-उशा-पांघरुणं आहेत. दाक्षिणात्य पद्धतीचं (म्हणजे मुख्यत: भात. इथे तिन्ही त्रिकाळ भात खाल्ल्यामुळे, परत आल्यावर महिनाभर भात वर्ज्य केला.) शाकाहारी साधंसं जेवण, नाश्ता असतं. मात्र हे ‘हॉलिडे रिसॉर्ट’ नाही, त्यामुळे इथे कोणत्याही ‘लक्झरी’ नाहीत. सौर प्रणालीद्वारे वीज मिळते, त्यामुळे टीव्ही-फ्रीज-एसी-गिझर सोडाच, पंखेही नाहीत. फक्त दिवे आणि बॅटरी चार्जिंग (आणि केंद्रातला कॉम्प्युटर, महाजाल जोडणी) यासाठी वीज आहे. (आपल्याला आणखी काय पाहिजे म्हणा!) इथे फक्त बीएसएनएलचं मोबाइल नेटवर्क चालतं. माझं डॉल्फिन नेटवर्क मुंबईत नीट चालायची मारामार, पण तिथे मात्र ते आपोआप बीएसएनएलमध्ये गेल्यामुळे फक्त माझा आणि आणखी एकाचाच मोबाइल चालत होता.

ARRS Guest huse

आम्ही इथे राहिलो.

आमच्या राहायच्या खोलीच्या बाहेरच जंगलातली जीवविविधता दिसायला स्रुरुवात झाली. आंबोलीला बघितलेले जीव इथे बघायला मिळालेच, त्याशिवाय इतरही अनेक जीव दिसले. संशोधन केंद्रात पाऊल टाकल्यावर या मलबार चापडाने (Malabar pit viper Trimeresurus malabaricus) स्वागत केलं. दरवाजातच आडव्या बांबूला शेपटीचा वेढा घालून बसला होता. हातासारखा उपयोग करून शेपटीने पकड घेता येते, या शेपटीला Prehensile tail म्हणतात.

DSC04181

इथे खूप उंचच उंच वृक्ष आहेत. या उंच वृक्षांमधून सहजतेने वावरण्यासाठी, भक्ष मिळवण्यासाठी आणि भक्षकापासून संरक्षणासाठी जमिनीवरच्या काही प्राण्यांनी हवेत ‘तरंगण्याची’ क्षमता विकसित केली आहे. आंबोलीला दिसलेल्या उडणार्‍या (तरंगणार्‍या) बेडकाप्रमाणे इथे तरंगणारा सरडा, साप आणि खार आहेत. त्यासाठी त्यांच्या पोटाच्या दोन्ही बाजूंना पातळ पडदे असतात. ते पसरून हे प्राणी उंच जागेवरून खालच्या जागेवर तरंगत येऊ शकतात. आम्हाला तरंगणारा सरडा (Gliding lizard, Draco dussumieri) आणि साप (Ornamental flying snake Chrysopelea ornata) दिसले, पण कॅमेर्‍यात काही टिपता आले नाहीत.

सोनेरी बेडूक (Golden Frog Hylarana aurantiaca). आंबोलीला पाहिलेल्या कास्यबेडूक ( Bronze Frog Hylarana temporalis) आणि दुरंगी बेडूक (Bicoloured frog Clinotarsus curtipes) यांचा हा भाईबंद.

Golden frog

जवळच एक डबकं होतं, तिथे रोज रात्री दोन नर सोनेरी बेडकांची जुगलबंदी चालायची.

निळ्या डोळ्यांचा बेडूक (Raorchestes Luteolus??). याला मराठीतून नाव सुचलं – ‘नीलाक्ष’.

Blue Eyed Frog

आपला नेहमीचा बेडूक (Indian bull frog Hoplobatracus tigerinus) याच्या शरीरावरची हिरवी नक्षी हळूहळू नाहीशी होते.

Indian Bull Frog

परिसराशी सरूपतेची (chemoflageची) दोन उदाहरणं

Cricket frog     Ramanella
क्रिकेट फ्रॉग (Cricket frog Zakirana sp.) आणि आखूडतोंड्या रामानेल्ला (Narrow mouth frog Ramanella mormorata)

काही कीटक, विंचू वगैरे

Catterpiller    Pupa in bark
पान खाणारी, पतंगाची अळी, झाडाच्या पोकळ खोडात लपलेला हा एका पतंगाचा कोष

Katydid    Round Headed Katydid
कॅटायडिड (Katydid) आणि हिरवा कॅटायडिड (Round Headed Katydid Holochlora albida)

Stick Insect    DSC04184
वाळक्या काटकीसारखा काडीकिडा (Stick insect, Indian walking stick Carausius morosus) आणि गवतावर बागडणारा नाकतोडा

DSC04186     Scorpion
चॉकलेट पॅन्झी फूलपाखरू (Chocolet Pansy Junonia iphita), विंचू (Scorpion Palemnaeus sp.)

अशा दाट पावसाळरानात उंचच उंच वाढलेल्या झाडांमुळे जमिनीपासून पन्नास-साथ फुटांवर एक ‘जंगलछत’ (कॅनोपी) तयार होतं. या छतामध्ये मोठ्या झाडाच्या आधाराने वाढणार्या> छोट्या वेली-वनस्पती (एपिफाइट्स), त्यावर आकर्षित होणारे कीटक, इतर छोटे-मोठे जीव, फांद्यांच्या बेचक्यात साचलेलं पाणी यांनी मिळून इतक्या उंचावर फांद्यांच्या बेचक्यात एक वेगळीच स्वतंत्र छोटीशी परिसंस्था तयार होते. ती पाहण्यासाठी उंच झाडाच्या एखाद्या फांदीवर झोल टाकून जाड दोरी टाकून, त्याला जुमार्ससारखी साधनं लावून वर चढायचं, याला म्हणतात कॅनोपी क्लाइंबिंग.. खरं तर मला रॉक क्लाइंबिंग, जुमारिंग, रिव्हर क्रॉसिंग, पर्वतारोहण अशा प्रकारांमध्ये रस नाही. पण इतक्या उंचावरून खाली, चहूबाजूना बघायचं हा एक वेगळाच, अगदी पक्ष्याला सगळ जग कसं दिसत असेल असा (बर्डस आय व्ह्यू) अनुभव असतो.

कॅनोपी क्लाइंबिंग करताना सुरक्षिततेसाठी हारनेस, हेल्मेट, जुमार्स वगैरे जामानिमा करावा लागतो.

कॅनोपी क्लाइंबिंगसाठी तयार

Canopy climbing

वर जाताना

खाली येताना

एका वेळेस दोघं किंवा तिघंही

Canopy climbing    Canopy climbing

या वेळी काही कारणांनी मी फार उंच चढू शकलो नाही, पण पुन्हा संधी मिळाली की थेट वरपर्यंत नक्की चढेन.

रात्री भटकंतीला बाहेर पडल्यावर आभाळ निरभ्र होतं, तेव्हा अगणित तारे चमचमत होते. (मुंबईत हे दृश्य तसं दुर्मीळच! मुंबईत तर प्रकाशाचंही प्रदूषण!!) मध्येच थोडासा मोकळा, शेतासारखा गवताळ भाग लागला. धीरजने सर्वांना टॉर्च बंद करायला सांगितलं, आणि.. ओहो, काही सेकंदांतच एक अलौकिक दृश्य बघायला मिळालं! गवतातले असंख्य काजवे (अळ्या आणि माद्या) लुकलुकायला लागले. ‘तारे जमींपर..’ जणू आकाशातले लक्ष लक्ष तारे जमिनीवर अवतरले आहेत असं ते दृश्य! कॅमेर्‍यात टिपता आलं नाही, तरी मनात मात्र साठवून ठेवलंय.

आम्ही नागराजाच्या राज्यात गेलो होतो. पण नागराजांचं दर्शन झालं नाही. लाजवंती (लोरिस Slow Loris Nycticebus coucang), नकटा / नाकाड्या चापडा (Hump nosed pit viper Hypnale hypnale) असे अनेक प्राणी दिसले नाहीत. पण तरीही जंगलाचं आकर्षण कमी न होता वाढतच जातं. कारण..

समुद्र, आकाश, पर्वत, जंगल - निसर्गाची ही विविध रूपं. या तिन्ही रूपांनी निसर्ग आपल्याला भव्यतेची, विशालतेची अनुभूती देत असतो. समुद्रकिनार्‍यावर बसून समुद्राकडे पाहणं, त्याची गाज ऐकणं, जंगलात आजूबाजूच्या दाट वृक्षराजीकडे पाहणं, एखाद्या निर्जन ठिकाणाहून आकाशाचं, तार्‍यांचं दर्शन.. भव्यतेच्या, विशालतेच्या या दर्शनाने मनातली सगळी मरगळ, नैराश्याची भावना, नकारात्मक विचार दूर होतात. रोजच्या जीवनसंघर्षाला सामोरं जायला नव्याने उभारी येते, नवं बळ मिळतं. नव्या कल्पना सुचतात, नवं काहीतरी बघायला मिळतं. म्हणून तर वेळ काढून अधूनमधून जंगलभ्रमंती केली पाहिजे, समुद्रकिनारी निवांत फेरफटका मारला पाहिजे, डोंगर-दर्‍यांत, पर्वताच्या कुशीत विसावलं पाहिजे ...

कैदाला आणि शिबी

Primary tabs

तेराव्या शतकात होयसाळांच्या राजवटीत एक महान शिल्पकार होवून गेले जकनाचारी. त्यांचा जन्म झाला तुमकुर जिल्ह्यातील कैदाला ह्या गावात. सोमनाथपुरा आणि बेलुरच्या सुंदर मंदिरांचे ते रचनाकार होते. ही मंदिरे बांधत असताना ते बरीच वर्षे घरी गेले नाहीत. त्यांचा मुलगा दनकाचारी. जो स्वत: एक उत्तम शिल्पकार होता त्याने आपल्या वडिलांना पाहिले नव्हते. त्याने आपल्या वडिलांचा शोध घेण्याचे ठरीवले. तो त्यांना शोधत बेलुरला येवून पोहचला. तिथे केशवाची एक मूर्ती मंदिरात स्थापन करण्यात येत होती. दनकाचार्याने त्या मूर्तीमध्ये दोष असून त्याची स्थापना करू नये असे सुचवले. ते ऐकून त्या मूर्तीचे मुख्य शिल्पकार जनकाचारी ह्यांना राग आला. ( बाप लेक अजून पर्यंत एक दुसर्याला ओळखत नव्हते) "ह्या मूर्तीत जर दोष निघाला तर मी स्वतःचा उजवा हात कापून टाकेन" अशी प्रति़ज्ञा जनकाचारी ह्यांनी केली.
त्या संपूर्ण मूर्तीवर चंदनाचा लेप देन्यात आला. काही वेळाने, नाभी वगळता बाकी सर्व ठिकाणचे चंदन वाळले. थोडी तपासणी केल्यावर त्यांना त्या ठिकाणी वाळू आणि पाणी असलेली एक छोटी पो़कळी सापडते आणि त्यात एक छोटा बेडूक.
हा दोष पाहिल्यावर जनकाचारी आपल्या हलजर्गी पणावर चिडतात आणि स्वत:चा उजवा हात तोडून टाकतात. नंतर पितपुत्राची ओळख होते.
ह्या घटनेनंतर ते दोघेही आपल्या गावी कैदाला इथे पोचतात. एक दिवस त्यांना स्वप्नात त्यांना विष्णु दर्शन देतात आणि जनकाचार्याने कैदाला इथे आपले मंदिर बांधावे अशी ईच्छा प्रकट करतात. आणि त्यानंतर कैदाला इथे चन्ना केशवा ( सुंदर विष्णु) मंदिर उभारण्यात येते. जनकाचारी आणि दनकाचारी स्वतः ती मुर्ती घडवतात. त्यानंतर ईश्वर प्रसन्न होऊन, वर स्वरूपात, जकनाचार्यांचा कापलेला हात पुनः पूर्ववत व्यवस्थित होतो.

कैदालाची विष्णुची मूर्ती ही बहुदा दक्षिण भारतातील( किंवा कदाचित पूर्ण भारतातील) सर्वात सुंदर मूर्ती आहे. भागवात पुराणातील विष्णुच्या वर्णानाप्रमाणे ही मूर्ती घडवली आहे. मूर्तीचा बाजूने विष्णुचे दाही अवतार कोरले आहेत. मूर्तीच्या एका हातात गदा आहे. पुजारी गदा आणि हाताची पाची बोटे ह्यांच्यातून एक सुई आरपार घालवून दाखावतात. वरील गोष्ट किती खरी ते माहित नाही, पण मी जर ईश्वर असतो तर ती मूर्ती पाहून नक्कीच त्यांच्या सर्व ईच्छा पूर्ण केल्या असत्या.
मंदिरात मूर्तीचा फोटो काढण्याची परवानगी मिळाली नाही म्हणून ही फोटो आंतरजालावरून साभार.
keshawa

आता मी काढलेले फोटो.
हे मंदिर प्रचंड साधं पण प्रशस्त आहे. मंदिराचे प्रवेशद्वार.
Entrance of ChannaKeshawa Temple - Kaidala

दरवाज्यावर कोरलेली अप्सरा.

DSC_1465

कमानीवर कोरलेला विष्णु
Vishnu Idol adorning Entrance of ChennaKeshawa Temple Kaidala

दुसर्या बाजूला कोरलेला कृष्ण
Krishna Idol Carved on the Entrnace of Channakeshava Temple-kaidala

मुख्य मंदिर
DSC_1374

मागून एक फोटो
DSC_1373

मंदिराचे आतले प्रवेश्द्वार
DSC_1383

आतील भाग.
Interiors of Chennakeshava Temple - Kaidala

केशवा मंदिराच्या बाजूलाच एक शंकराचे मंदिर आहे. दुर्दैवाने ते बंद असल्यामुळे बाहेर जाळीतून फोटो काढावा लागला.
DSC_1472

कैदालाहून चाळीस एक किलोमीटर अंतरावर NH4 वर शिबी (seebi) येथे नृसिहाचे मंदिर आहे. हे मंदिर जवळपास ४०० वर्षे जुने असून मंदिरात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे.
मंदिराचे प्रवेश द्वार

DSC_0032

मंदिराचा आतील भाग

DSC_1476

मंदिरा बाहेर एक मोठी पुष्कर्णी आहे. त्याचे काही फोटो
DSC_1481

DSC_0006

DSC_1484

परत येताना तुमकूरजवळ एक मोठे तळं लागलं, तिथे सूर्यास्ताचे काढलेले काही फोटो
DSC_0107

DSC_0097

DSC_0088

बेंगलोर ते कैदाला ७५ किमी आहे आणि तेथून शिबी ४० किमी. ह्यातील बराचसा प्रवास बेंगलोर-पुणे हायवेवर होतो. त्यामुळे आधी कैदालाला जा, परत तुमकुरला येवून शिबी. जेवण तुमकूरला करणे उत्तम. हा प्रवास अर्ध्या दिवसात करता येतो.


भोगानंदिश्वरा

Primary tabs

नंदिहिल्स बेंगलोरपासून अवघ्या ५० किमी अंतरावर आहे. नंदिहिल्स हि बेंगलोरवासियांसाठी सुटीच्या दिवशी भेट द्यायची आवडीची जागा. सुटीच्या दिवशी जवळपास जत्रा भरेल इतकी गर्दी असते आणि टेकडीवरचे योगानंदिश्वरा मंदिर सर्वांच्या परिचयाचे आहे. पण नंदिहिल्सच्या पायथ्याशी असलेलं भोगानंदिश्वरा हे बारशे वर्श जुनं मंदिर मात्र दुर्लक्षित राहिलं आहे. हे मंदिर नंदिहिल्सपासून फक्त पाच किमी अंतरावर नंदिग्राम ह्या खेड्यात आहे.
नवव्या शतकात बाणा राज्यघराण्याची राणी रत्नावली हिने ह्या मंदिराची स्थापना केली. ह्या मंदिराचा पुढे, गंगा, चोला, होयसाळा, पल्लवा आणि विजयनगर ह्यांचा कारकिर्दित विस्तार झाला. मंदिराच्या कलाकृतींमध्ये हे प्रकर्षाने जाणवते. मंदिराचा आवार प्रशस्त असून तिथे अरुणाचलेश्वर, उमामहेश्वर आणि भोगानंदिश्वर असे तीन मंदिरांचे संकुल आहे.
अरुणाचलेश्वर ही महादेबाची बाल अवस्था, भोगानंदिश्वरा ही तारुण्य अवस्था आणि योगानंदिश्वरा ही वैराग्यावस्था मानन्यात येते. भोगानंदिश्वरा हे शिवाच्या तारुण्य अवस्थेला समर्पित केले आहे.

मंदिराचा आवार प्रचंड मोठा आहे. त्याचे काही फोटो

DSC_0014

DSC_0040

DSC_0574

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार.
DSC_0053

प्रवेशद्वारावर कोरलेल्या काही अप्सरा.
DSC_1259

DSC_0060

DSC_0054

आता मुख्य मंदिराचे काही फोटो.

DSC_0233

DSC_0239

DSC_0222

DSC_0221

DSC_1373

आता मंदिरातील मूर्त्या आणि इतर कलाकुसर.

bn2

DSC_2572

DSC_2566

DSC_2564

DSC_1320

DSC_1306

DSC_1286

DSC_0632

DSC_0045

DSC_0042

bn30

bn29

bn11

bn10

bn8

bn7

ह्या मंदिराच्या आवारात शृंगेरी तिर्थ नावाची एक मोठी पुष्कर्णी आहे आणि तिथे पिनाकिणी नदिचा उगम होतो असे मानन्यात येते.

पुष्कर्णीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला मंड्प.
DSC_0625

पुष्कर्णीचे फोटो

DSC_0602

DSC_0182

bn12

पुष्कर्णीच्या भोवतलचा परीसर आणि तिथले मूर्तीकाम.

bn13

bn15

bn5

bn4

आता नंदिहिल्स वरून सूर्यास्ताच्या वेळी काढलेले काही फोटो.

DSC_2475

DSC_0423

चोला, होयसाला आणि विजयनगर ह्यांच्या कलाकृती एकाच ठिकाणी असणारे हे दुर्मिळ मंदिर आहे. प्रत्येक इतिहासप्रेमी मानसाने भेट जरूर द्यावी.
मंदिराला भेट देण्यासाठी दोन प्रकारे प्लॅन करता येत. नंदि हिल्स वर सूर्योदय पाहा. मग खाली येवून मंदिराला भेट द्या.
किंवा दुपारी दोन-तीनच्या सुमारास आधी मंदिराला भेट द्या मग नंदिहिल्सवर सुर्यास्त पाहायला जा.

मंदिराविषयी अधिक माहीत तुम्हाला इथे मिळेल.
http://www.karnataka.com/nandi-hills/nandi-village-bhoga-nandeeshwara-te...


भोगानंदिश्वरा:
याबद्दल पॉइंट ब्लँक यांनी इथेआधीच सविस्तर माहिती दिलेली आहे पण मला मूर्ती आणि त्यामागचे अर्थ यांचे आजिबातच ज्ञान नसल्याने काही प्रश्न पडले आहेत.
इथे त्या प्रश्नांचे निरसन करू शकणारी बरीच मंडळी आहेत त्यामुळे खाली काही फोटो चिटकवत आहे.

या चित्रात कोणीतरी घोड्यावर बसलेला दिसत आहे तसेच त्या खाली हत्तीदेखील दिसत आहे. मंदिराच्या समोरच्या भागातील दोन खांबावर हे शिल्प आहे. याचा काही विशेष अर्थ आहे का?
pic1

हे शिल्प नक्की कशाचे आहे? बऱ्याच ठिकाणी हे पाहण्यात आले आहे.
pic2

या चित्रात मोरावर आरूढ असलेला कार्तिकेय आहे का? आणि असल्यास त्याला तीन तोंड का आहेत?
pic3

या चित्रात काही व्यक्तींना चार हात आहेत तर काहीना दोन! तसेच एक गाय हि आहे जिला कलशामधील पाणी(हा माझा अंदाज! ) दिले जात आहे. उजव्या बाजूला एक व्यक्ती हातामध्ये एक कलश घेऊन उभी आहे, हा प्रसंग कोणता आहे? मुळात, कोरलेले प्रत्येक शिल्प काही इतिहास दर्शवते का?
pic4

आतापर्यंत गोमुख पहिले होते पण इथे मगरीसारखा(डोळ्यांवरून अंदाज लावला आहे ) प्राणी दिसत आहे आणि तिचे तोंड कोणीतरी उघडले आहे, असे का?
pic5

काही प्रश्न अत्यंत बाळबोधसुद्धा असतील कदाचित पण खरोखर याविषयी काहीच माहिती नसल्याने उत्सुकतेपोटी विचारले आहेत! :)


पाहिले आणि दुसरे जनरल शिल्प आहेत. तत्कालीन घोडेस्वार पहिल्या शिल्पात तर दुसऱ्या शिल्पात सिंह मुख असलेला हायब्रिड मनुष्य आहे.

तिसऱ्या शिल्पात डावीकडे नंदीवर आरुढ शंकर, मध्ये गरुडवाहन विष्णू तर त्याचे शेजारी हंसावर आरुढ चतुर्मुखी ब्रह्मा.

चौथ्या शिल्पात परत हेच त्रिदेव असून सर्वात उजवीकडे ऋषी आहे.

पाचव्या शिल्पात मकरमुख आहे. मकर सुद्धा गायीसारखाच पवित्र प्राणी मानला जातो.

हे मंदिर मुळात होयसाळांनी बांधले नसले तरी त्यांनी त्यात भर घातली असे कुठे तरी वाचले होते.

होयसाळा मंदिरांमध्ये हत्ती, सिंह, मोर, मकर, अश्व असे स्तर दिसतात. त्यात हत्ती स्थैर्याचे, सिंह शौर्याचे, अश्व प्रगतीचे प्रतिक आहे
मंदिर जेवढे सुबत्तेच्या काळात बांधले गेले तेवढे स्तर जास्त आहेत. उदा हळेबीड-बेलूर च्या मंदिरांमध्ये ८ स्तर दिसतात.

बाकी दुसर्या फोटोमधील नरसिंह आणि चौथ्या फोटोमधील ऋषी हे लेपाक्शी येथील नरसिंह आणि ऋषींच्या प्रतिमांशी फारच मिळते जुळते आहेत.


विरुपाक्षी, बंगारू तिरुपती आणि कोटिलिंगेश्वर

Primary tabs

विरुपाक्षी हे कोलार जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. हे मुलबागलपासून ५ किमी अंतरावर असून, इथे तेराव्या शतकातील एक प्रशस्त शिव मंदिर आहे. हे मंदिर कृष्णदेवराय दुसरे ह्यांच्या कारकिर्दीत बांधले गेले. ह्याची रचना हंपीतिल विरुपाक्ष मंदिराप्रमाने असल्याचे सांगण्यात येते. (हम्पी मी अजून पाहिले नाही तेंव्हा जाणकारांनी ह्यावर प्रकाश टाकवा.) ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, इथे एकाच गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत. आणि ह्यातील एका शिवलंगाचा रंग सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत बदलत राहतो. मी तिथे दुपारी तासभर होतो तेंव्हा ह्याची शहानिशा करता आली. पण हे मंदिर आज दुर्लक्षित आहे इतकं मात्र खरे.
मंदिराचे प्रवेशद्वार

DSC_0082

आत प्रवेश केल्यावर होणारे भव्य मंदिराचे दर्शन

DSC_0075_1

मागून बाजूने काढलेला अजून एक फ़ोटो

DSC_0044_1

ह्याच आवारात श्रीकृष्णाचेही छोटेसे मंदिर आहे. त्यातील सुंदर मूर्ती.

DSC_0050

तिथले पार्वतीचे मंदिर बंद होते. मंदिरा बाहेरील सिंह .
DSC_0059

मंदिराबाहेर एक अर्धवट बांधलेले प्रवेश द्वार आहे.
DSC_0085

विरुपाक्षीहून अंदाजे १३ किमी अंतरावर गुट्टाहल्ली इथे बंगारू तिरुपती हे मंदिर आहे. ह्याला लक्ष्मी व्येंकटेश्वरा स्वामी मंदिर अशा नावानेसुद्धा ओळखले जाते. एका छोट्याश्या टेकडीवर विष्णूचे तर बाजूच्या टेकडीवर पद्मावतीचे मंदिर आहे. इथे विष्णूचे दर्शन दरवाज्यातून न घेता खिडकीतून घेतात. भृगु महर्षी ह्यांच्या स्वप्नात देवाने असेच दर्शन दिल्यामुळे मंदिराची रचना अशा प्रकारे करण्यात आल्याचे पूजार्यांनी सांगितले.

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार

DSC_0154

आत जाताच दिसणारे विहंगम द्रुश्य
DSC_0104_!
पुष्कर्णिच्या मधोमध बसवलेला हा पक्षी. राजहंस आहे का?

DSC_0125

मंदिराच्या खालच्या भागावर तयार केलेला हा गरूड , जणू मंदिर गरुडाने आपल्या पाठीवर घेतल्याचा आभास निर्माण करते.

DSC_0126

बंगारु तिरुपतीपासून १० किमी अंतरावर कोटी लिंगेश्वर आहे. ह्या मंदिरात एक कोटि शिवलिंग स्थापन करण्याचा प्रकल्प चालू आहे. ह्याची सुरुवात १९७२ साली झाली. आजतागायत ९० लाख लिंग स्थापन झाल्याचे सांगण्यात येते.

आत जाताच आपण विविध आकाराच्या आणि प्रकाराच्या शिवलिंगाच्या सागरात हरवून जातो

DSC_0166

हे चार मजली ईमारतिच्या उंचीचे शिवलिंग

DSC_0196_1

त्याचाच जवळून काढलेला एक फ़ोटो.

DSC_0176_1

समोर बसलेला भव्य नंदी
DSC_0203_1

दुसरे एक जवळपास वीस फुट उंचीचे शिवलिंग आणि त्यासमोर स्थापन केलला कलश

DSC_0220_1

इथेच देवीच्या अनेक अवतारांच्या मूर्त्या आहेत
DSC_0230

अजून एक
DSC_0228

बाजूचा आवार
DSC_0251

कोटिलंगेश्वर इथे केमरा आत नेण्यासाठी १०० रुपये द्यावे लागतात

हा पूर्ण प्रवास अर्ध्या दिवसात करता येतो. ह्या तिन्ही ठिकाणी जेवण्याची फारशी सोय नाही. गरज पडल्यास मुलबागलला जेवण करावे.
जाताना बेंगलोर चन्नई हायवे वरून कोलार बायपास करून मुलाबागालाही बायपास करून विरुपाक्षीला जात येते. येताना कोटि लिंगेश्वरहून परत मुलाबागालला ने येता, बंगारपेठ मार्गे बेंगलोरला येता येते. पण हा रस्ता थोडा अरूंद असून गाडी हळू चालवावी लागते.

कुरुडुमळे आणि मुलबागल

Primary tabs

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in भटकंती
12 Mar 2015 - 10:46 pm

कुरुडुमळे हे कोलार जिल्ह्यातील एक छोटेसे गाव, बेंगलोरपासून अवघ्या १०० किमीच्या आत. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच. कौडिण्य ऋषींनी येथे एका टेकडीवर तपश्चर्या केलली. बेंगलोरहून कोलार आणि तेथून जवळपास तीस किमी हायवेवर जायचे. मुलबागल हायवे सोडून तीन किमीवर आगे. मुलबागालहून कुरुडुमळे अवघ्या आठ किमॆवर आहे..

ह्या गावात एक गणपतीचे आणि एक सोमेश्वराचे मंदिर आहे.

गणपतीची मूर्ती अंदाजे बारा (काहि ठिकाणी चौदा लिहिले आहे) फूट उंचीची असून एका अखंड शाळिग्राम दगडात कोरली आहे. ही मूर्ती किती जुनी आहे ह्याची कुठेही नोंद नाही. चौदाव्या शतकापर्यंत हा गणपती उघड्यार होता. विजयनगरच्या राज्यांनी हे मंदिर मूर्तीभोवती बांधले. मंदिरात कलाकुसर तितकीशी पहावयास मिळत नाही. पण मंदिराच्या चौकटी वापरून एक छान आभास निर्माण करण्यात आला आहे. मंदिरातून जसजसे बाहेर जावू तसतशी मूर्ती मोठी होत असल्याचा भास होतो.

मंदिराचा एक फ़ोटो
DSC_0021

सुदैवाने ह्या मंदिरात देवतेचा फ़ोटो काढण्याची परवानगी मिळाली.
DSC_0059

ह्या गावातील दुसरे मंदिर आहे सोमेश्वराचे. हे मंदिर गणपतीच्या मंदिरापेक्षा जुने आहे. चोलांनी मूळ मंदिराची उभारणी केली असून होयसाळा काळात त्यात वाढ करण्यात आली.
मंदिरात प्रवेश करताच हा गणपती आपले स्वागत करतो.
DSC_0063

ह्या गणपतीचे एक खास वैशिष्ट्य आहे. ह्याच्या शरीरावार वेगवेगळ्या भागावर टिचकी मारली की वेगवेगळे आवाज निघतात आणि मूर्तीवर कुठेही जोड दिसत नाहीत. म्हणजे बहुधा आतून पोकळपणा एकसारखा नसावा असा एक अंदाज आहे.

मंदिराचा एक फ़ोटो
Someshwara

मंदिराच्या खांभावर मजेशीर मूर्ती कोरल्या आहेत. तीन व्यक्ती आणि चारच पाय असलेले हे नृत्य.
DSC_0099

त्याच आवारात कार्तिक स्वामींचे एक छोटेसे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती
DSC_0116

एक विचित्र गोष्ट दिसून येते ती म्हणजे शंकराच्या मंदिरात इतर बर्याच देवतांच्या मुर्त्या आहेत. उदा ही बालाजीची मूर्ती .
DSC_0103

असे ऐकण्यात आहे की कधी काळी कुरुडुमळे आणि जवळपास तीस मंदिरे होतॆ. ती सर्व अरकोटच्या नवबाने उधवस्त केली. काही वाचलेल्या मूर्त्या शंकराच्या मंदिरात आणून ठेवल्या आहेत.

परत येताना मुलबागलला भेट दिली. इथे विरांजनेय म्हणजेच हनुमानाचे मंदिर आहे. मारुतीची मूर्ती आठ फूट उंचीची आहे. ह्या मारुतीच्या हातात गदेबरोबर तलवार सुध्दा आहे. ह्याची स्थापना अर्जुनाने केली असे मानन्यात येते.
मंदिराच्या प्रवेशद्वाराचा फोटो
DSC_0202

मंदिराचा आवार प्रशस्त आहे. आणि मंदिर परिसरात शेषशायी विष्णुची सुद्धा एक सुरेख मूर्ती आहे. आवाराचा एक फोटो.
DSC_0203

बेंगलोरहून चन्नई हायवे वापरून कोलार बायपासवरून मुलबागला जाता येते. गाडी चालवण्यास रस्ता एकदम मस्त आहे. ही सहल अर्ध्या दिवसात पूर्ण करता येते. मुलबागल तालुक्याचे ठिकाण असून, नाष्ट्याची चांगली सोय आहे.
पूर्ण दिवस घालवायचा असेल तर कुरुडुमळे, मुलबागल, विरुपाक्षी, बंगारु तिरुपती, कोटी लिंगेश्वरा या सर्व ठिकाणी भेट देता येवू शकते. ऐनवेळी दुपारी उल्हास आल्यामुळे हे दोन ट्प्यात करावे लागले. राहिलेल्या ठिकाणांचे फोटो परत कधीतरी.

सोमनाथपुरा

Primary tabs

सोमनाथपुरा हे म्हैसूर जिल्हतील एक छोटेसे गाव. बेंगलोरपासून १४० किमी अंतरावर. इथे चन्ना केशवा हे होयासाला काळातील भव्य मंदीर आहे. होयसाळांचा सेनापती सोमनाथ ह्याने हे मंदिर १२६८ साली बांधले. हे मंदीर भगवान श्रीकृष्णाला समर्पित असून इथे जनार्दन, केशव आणि वेणुगोपाल ह्या तीन मुख्य देवता आहेत. त्यातील केशावाची मूर्ती गायब आहे.
कुणी सुलतानाने ह्या मंदिरातील मूर्त्यांची नासधूस करून मंदिराचा विटाळ केला. तेंव्हापासून ह्या मंदिरात पूजा केली जात नाहि.

मुख्य द्वारातून प्रवेश करताच दिसणारे मंदिर

DSC_0217

मंदिराचा मागून काढलेला फ़ोटो
DSC_0248

अजून एक
DSC_0668

मंदिराच्या भिंती विविध देवतांच्या मूर्त्यांनी सजल्या आहेत.

DSC_0636

DSC_0629

लढाईला चालेले सैनिक
DSC_0616

ह्या मंदिरातील सर्वात जास्त आवडलेली मूर्ती ही महिशासुरमर्दिनिची. आक्रमकता आणि नाजुकतेचा छान संगम

Beautiful Slaughter

आठ हातांची नृत्यलक्ष्मी.
DSC_0465

बहुदा बालाजी असावेत
DSC_0460

ही कल्पतेचा उच्चांक गाठणारी नृसिंह लक्ष्मीची मूर्ती . लक्ष्मीने कमळावर पाय ठेवला आहे. आणि त्या दबलेल्या कमळाला हत्ती आधार देतोय.
DSC_0442

आता ईतर देवता
DSC_0432

DSC_0423

DSC_0402

DSC_0397

ही सरस्वती असावी
DSC_0385

ही लक्ष्मी
DSC_0347

अजून एक देवी
DSC_0334

शेष नागावर बसलेले विष्णू
DSC_0300

मंदिरचा द्वारपाल

DSC_0283

गर्भगृहातील मूर्ती
DSC_0578

DSC_0574

DSC_0570

आत छतावर कोरेलेले कमळ
DSC_0561

ह्या मंदिराच्या एका कोपऱ्यात काही मोडक्या मूर्ती आहेत. ह्या बहुदा इतर मोडलेल्या मंदिरातील मुख्य देवता असाव्यात
DSC_0266

DSC_0269

DSC_0271

DSC_0272

ह्यात दोन जैन मुर्त्यासुद्धा आहेत
DSC_0272

DSC_0279

सोमानाथापुराचे हे मंदिर कलेचा एक खजाना आहे इथे लहान मोठ्या हजारो मूर्त्या कोरल्या आहेत. सोमनाथपुरा आणि तळकडु एक दिवसात पाहता येतात. सोमनाथपुरामध्ये जेवणाची कोणतीही सोय उपलब्ध नाहि. बेंगलोर म्हैसोर हायवेवर नाष्टा करून सोमणाथपुराला भेट द्या आणि जेवण्यासाठी तळकडुला जा. तळकडुचे फोटो लवकरच टाकेन.


नुग्गेहळ्ळी

Primary tabs

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in भटकंती
5 Mar 2015 - 2:49 pm

होयसाळा राज्यघरण्याने दहाव्या ते चौदाव्या शतकापर्यंत दक्षिण भारतात राज्य केले. त्यांनी जवळपास दोनशे मंदिरे बांधली. त्यातील हळेबेद बेलूरची मंदिरे जगप्रसिद्ध आहेत. पण इतर बरीच मंदिरे दुर्लीक्षीत आहेत किंवा मोडकळीला आलेली आहेत.
नुग्गेहळ्ळी हे हसन जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. श्रवनबेळगोळा पासून अवघ्या २६ किलोमीटर असूनहि प्रवाश्यांपासून लपून राहिले आहे. ह्या गावात तेराव्या शतकातील दोन सुंदर मंदिरे आहेत - लक्ष्मी नरसिंह आणि सदाशिव . ह्या मंदिरात टिपलेले काही फोटो :

लक्ष्मी नरसिंह मंदिर
DSC_0883

मंदिराच्या भिंतीवर विविध देवी देवतांच्या मूर्ती कोरल्या आहेत.

नाट्यलक्ष्मिची सुंदर मूर्ती
DSC_0770

क्लोज अप

DSC_0770-001

अजून एक लक्ष्मीची मूर्ती . ह्या दोन्ही मूर्त्यांच्या हातात मक्याचे कणिस बघा. हि मंदिरे युरोपियन भारतात येण्याआधी बांधलेली आहेत. त्यामूळे मका त्यांनी भारतात आणला हा तर्क चुकीचा ठरतो
DSC_0793

शेष नागवारील विष्णू.
DSC_0845

गोवर्धन पर्वत उचलणार कृष्ण।
DSC_0853

अजून एक विष्णू
DSC_0864

हिरण्यकश्यपूचा वध
DSC_0747

कालिया मर्दन.
Taming Kaliya

सदाशिव मंदिरात फारसे कोरीव काम आढळत नाही . पण मंदिर प्रेक्षणिय आहे.
DSC_0969

अधिक माहितीसाठी
http://en.wikipedia.org/wiki/Lakshmi_Narasimha_Temple,_Nuggehalli
http://nuggehalli.org/

बेंगलोरहून श्रवनबेळगोळा आणि नुग्गेहळ्ळी एका दिवसात प्रवास पूर्ण होऊ शकतो. सार्वजनिक वाहतुकीची सोय बहुधा नसावी. जेवण श्रवनबेळगोळामध्ये केलेले उत्तम



सांगीतिक भटकंती :सवाई गंधर्वांचा वाडा(कुंदगोळ), गंगुबाई हंगालांचे घर (हुबळी) आणि संगीत गुरुकुल

फार दिवसांची इच्छा पूर्ण होण्यासाठी मुहूर्त लागावा लागतो. केवळ वेळ असून चालत नाही, वेळ यावी लागते. हुबळीची बायको असून वर्षात ४ वेळा सासुरवाडीला जाऊन पण केवळ १६ कि.मी. असणाऱ्या गावाला जायला झाले नव्हते. आज महाराष्ट्रातील सर्वात श्रेष्ठ गायक कोण होते हा प्रश्न आला कि भीमसेन जोशींच्या गुरूंचे म्हणजेच सवाई गंधर्व रामभाऊ कुन्दागोलाकारंच नाव ओघानेच येत. त्यांच्या वाड्यात जाउन त्या हवेचा फील घ्यायचा नंतर काही फोटो पहायचे असा फार वर्ष पासूनचा बेत होता. तसे गंगुबाई हंगालांचे घर हुबळी गावातच आहे. पूर्वी एकदा तिथे जाऊन आलो होतो पण फोटो काढायचा विसरलो होतो. आता नक्की प्लान करून गेलो होतो.

कसे जाल: कुंदगोळ हे हुबळी पासून केवळ १६ कि.मी. वर आहे. पुणे-बंगलोर(रा. म. क्र. ४) वर धारवाड-हुबळी बायपास संपला कि गब्बुर हे ठिकाण येते. तिथून २ कि.मी. अंतर मधेच डावीकडे कुंदगोळ ला रस्ता जातो. पूर्वी तिथे फलक होता. आता दिसला नाही. रस्ता चुकून सरळ ४० कि.मी. गेल्यावर चूक लक्षात आली. परत फिरून मधेच एका गावात राईट मारून गुन्दगोळ ला पोहोचलो.
Survat

NH-4

Windmill

गाव यथा तथाच आहे.तिथे एक स्मारक चांगले बांधले आहे. तिथे गेल्यावर सरकारी उत्तर मिळाले --- मालक लग्नाला गेले आहेत. बघायला मिळणार नाहि.ठिक आहे. वाडा कुठे आहे हे तरीनित सांगीतले. तिथे गेल्यावर पण आनंदच होता. वाडा सुंदर असून पण "आत पूजा चालू आहे" सोडणार नाहि. हे उत्तर मिळाले. गंधर्वांचे वडील येथील नाड्गिर वाड्या मध्ये क्लार्क होते आणि त्यांनी गन्धर्वाना आश्रय देवून फार मोठे उपकार केले आहेत असे दाखवण्याचा तेथील सध्याच्या पिढीचा प्रयत्न होता. अनेक वेळा विनंती केल्यावर सकाळी ८ च्या आधी आणि दुपारी ३ नंतरच प्रवेश मिळेल असे काही तरी सांगितले. रामाभौंची केवळ एक मूर्ती पाहायला मिळाली. तरीही तो सुंदर वाडा, त्याच्या बाजूचा गोठा वगेरे पाहून परत निघालो. भीमसेन जोशी जिथून पाणी भरून घागरी घेऊन जायचे तो तलाव कम विहीर वाटेत लागते. ती पाहून बिलकुल निराश न होता हुबळी चा रस्ता धरला. पर्यटनाला गेल्यावर निराशा होते कधी कधी…ठीक आहे. पण वाडा पहिल्यचे समाधान होते. आपण याचे देणे लागतो, हि जागा निट केली पाहिजे असा काहीसा भाव मनात आला. याचे कारण देखील समजले…राम भाऊ अथवा भीमसेन यांना कर्नाटक जवळचा वाटत नव्हता. तेथील लोकांना विशेष किंमत नव्हती यांच्या गुणांची।म्हणुन इतर ठिकाणी पर्यटन वाढवणाऱ्या या राज्याने रामभाऊ अथवा भीमसेन यांच्या घरी काही विशेष संघ्रहालय मात्र केलेले नाही.
Smarak

vaada
murti
khamb
vaada
vaada
vaada

Vihir
गंगुबाई हंगालांची गोष्ट तशी नाही. या उलट गंगुबाई हंगालांच्या घरी उत्तम सहकार्य मिळाले. घर जरी २-५ बंद असले तरी मी कराडहून आलो आहे हे सांगितले मग त्यांनी प्रवेश दिला. सर्व ४ खोल्यांमध्ये दिवे लावले मग सुरु झाला फोटोंचा धडाका. एवढा कि त्या माणसाने मला विचारले…."पाहायला आलाय का फोटो काढायला?" मी लगेच फेकले "ऑफ्कोर्स…बघायला…पण डोळ्यात मावत नाहीये म्हणून फोटो काढून घरी जाउन नीट पाहीन"…त्याला गोळी पचली. गंगुबाई हंगालांच्या घरी मात्र मस्त स्मारक आहे. हुबळी च्या देशपांडे नगर मध्ये हे घर आहे. इथे त्यांचे अनेक गायक, राजकारणी यांच्या बरोबर चे फोटो आहे. अनेक वाद्य ठेवली आहेत. तिथे गाण्याचे वर्ग देखील चालतात…त्याला अजून "कोचिंग" चे रूप आलेला नाहि. त्यांना मिळालेले सर्व पुरस्कार येथे नीट जवळून पाहता येतात. याचे काही फोटो देत आहे. एका मागून एक सुंदर फोटो, साहित्य होते…सतारी, तंबोरे, तबले, पेट्या …किति मोजु…!! पुरस्कार आणि भेट वस्तू यांचा खच पडला होता. पहिल्यांदा मी माझ्या डोळ्याने पद्म भूषण आणि पद्म विभूषण हे स्वताच्या डोळ्यांनी पाहत होतो…आता जास्त वर्णन न करता सरळ फोटो पहा.
GH
GH
GH
Padmabhushan
GH
GH
GH
GH
GH
GH
GH
GH
GH
GH
GH
GH
GH
GH

(( वाढीव ))

आज सकाळी हुबळी इथे गंगुबाई हनगल यांच्या नावाने संगीत गुरुकुल चालवले जाते याची माहिती मिळली. लगेच तिकडे दौरा काढला. कर्नाटक सरकार ने संगीताच्या पंढरीत हा उपक्रम केला आहे. अतिशय छान जागी, डोंगराच्या पायथ्याशी ६ एकर जागेवर हे गुरुकुल बांधले आहे. ३० विद्यार्थी व सुमारे ६-८ गुरुजन हे कायम स्वरूपी इथे वास्तव्याला आहेत. विद्यार्थ्यांना पूर्णवेळ करीयर संगीतात करता यावे म्हणून हि सोय आहे. विद्यार्थ्यांना मानधन देखील दिले जाते. आधुनिक आणि पारंपारिक चा सुंदर मिलाफ येथे आहे. रीयाझा साठी उत्तम बैठक व साथीला छान वाद्य-वृंदा आहे. कायम गाण्याचे सूर इथे दरवळत असतात. तसेच सोलर हीटर, पाणी शुद्धीकरण अशा आधुनिक सोयी, स्वतंत्र लायब्ररी अशा अनेक सोयी आहेत. योग्य ठिकाणी सरकार ने पैसे खर्च केल्याचे समाधान वाटले पण आमच्या दळभद्री महाराष्ट्र सरकार ची पण आठवण आली कम स्वताची लाज वगेरे नेहमी प्रमाणे वाटली…सांगली-मिरज सारख्या संगीत पंढरी मध्ये असे काही का होऊ शकत नाही? नारायणराव बालगंधर्व यांच्या सारखा गायक जिथे झाला आणि ३-३ मोठे मंत्री ज्या जिल्ह्यातून आहेत अथवा आमच्या कराड गावात मुख्यमंत्री आहेत अथवा यशवंतराव चव्हाणन सारखे रसिक व दूरदर्शी नेतृत्व होते तिथे हे कधी होणार? आमची अस्वस्थता संपत नाही …!!!
GH

GH

GH

GH

GH

GH
GH

GH

GH

पुढील भागात:बाइक वरून बंगलोर- म्हैसूर-बंदीपूर-मुदुमलाई- उटी- कुनूर


श्री क्षेत्र संगमेश्वर :- अद्भुत शिल्पाच्या शोधात केलेला प्रवास

           बऱ्याच दिवसांपूर्वी मोबाईलवर एक फोटो आला ज्यामध्ये श्रीकृष्णाचा एक चेहरा व पाच शरीर आणि कुठूनही बघा कोणत्याही शरीरास ते शीर तंतोतंत जुळते अशा कुशल कामगिरीबाबत उत्कंठा म्हणून त्या ठिकाणाचा शोध घेऊन तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. बराच शोध घेतल्यावर लक्षात आलं कि हे शिल्प महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवरील "कुडल" नामक एका गावी भीमा व सीना नदीच्या संगमावर असलेल्या हरिहरेश्वर मंदिरात आहे.
 अद्भुत शिल्प
           ज्याक्षणी ह्या ठिकाणची माहिती मिळाली त्याक्षणी ताबडतोब ट्रेनच बुकिंग केलं आणि ठरल्याप्रमाणे शनिवारी रात्री मुंबई बिदर एक्सप्रेस पकडून सकाळी ५.३० ला सोलापूरला उतरलो. तिथून स्टेशनच्या बाहेरच विजापूरला जाणारी बस होती. ती पकडून साधारण सव्वासहाच्या सुमारास टाकळी ह्या मध्यवर्ती ठिकाणावर उतरलो व तिथून पुढे जाताना काही वाहन मिळतंय का? त्याची वाट पहिली पण काही मिळालं नाही. शेवटी एका दुचाकीवर बसून कुडल ह्या गावापर्यंत पोहोचलो वाटेत खूप सुंदर सूर्योदय व गावची शेती पाहायला मिळाली.
कुडल गावापर्यंत पोहोचेपर्यंतचा सूर्योदय
              सदर ठिकाणचं महत्व म्हणजे येथे भीमा आणि सीना ह्या नद्यांचा येथे संगम इथे असलेल्या मंदिरास "संगमेश्वर मंदिर" म्हणून ओळखले जाते. भीमा आणि सीना ह्या नद्या ह्याच ठिकाणी एकमेकांना काटकोनात मिळतात.
भीमा सीना नदी संगम
           इथून पुढे सुरु झाला तो मंदिरसमूहाचा प्रवास. कुडल गावात मिळणाऱ्या ज्याकाही मूर्ती, जी काही शिल्प आपणास पाहावयास मिळतात ती सर्व उत्खननात सापडलेली आहेत त्यातलंच एक दुर्मिळ व जगातील एकमेव असं बहुमुखी शिवलिंग आहे
श्री विश्वरूप शिवदर्शन :-
             ह्या ठिकाणी असलेलं हे जगातील एकमेव शिवलिंग असून ह्यावर ३६० शिवप्रतिमा आहेत. शिवलिंगाची उंची साधारण ४ फूट एवढी असून ह्यावर भक्ताला वर्षभर अभिषेक केल्याचे पुण्य मिळते अशी ह्यामागील धारणा आहे

बहुरूपी शिवलिंग

श्रीकृष्ण मूर्ती :-
           आधीच सांगितल्याप्रमाणे कुडल गावात मिळालेल्या सर्व मूर्ती ह्या उत्खननात सापडलेल्या आहेत. त्याप्रमाणे गोकुळाष्टमीच्या दिवशी जमिनीतून मिळालेली हि अखंडित श्रीकृष्ण मूर्ती. श्रीकृष्ण म्हणजे भगवान विष्णूचा आठवा अवतार. ह्या मूर्तीत श्रीकृष्णाला गोपाळांच्या स्वरूपात दाखवलं आहे ह्यात श्रीकृष्णाच्या हातात बासरी असून डोक्यावर टोप व पायाशी गाय व वासरू आहे.
संगमेश्वर मंदिर :-
              हत्तरसंग मधील कूडल ह्या गावातील मध्यवर्ती असलेल्या मंदिर समूहातील महादेवाचे सर्वात जुने व सर्वात मोठे मंदिर म्हणून संगमेश्वर ह्या मंदिराचा उल्लेख केला जातो. मंदिराचे वैशिष्टय म्हणजे उत्तरायण व दक्षिणायन होताना सूर्य पूर्व दिशेच्या उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असताना साधारणपणे फाल्गुन व भाद्रपद महिन्याच्या प्रतिपदेला सूर्याची किरणे हि सात दरवाजे ओलांडून बरोबर संगमेश्वराच्या शिवलिंगावर पडतात.
 कुडल मंदिरसमूहाचे प्रवेशद्वार 
संगमेश्वर मंदिर



ओम नमः शिवाय
          संगमेश्वर मंदिराच्या प्राचीनत्वाचे अस्तित्व दाखविणारा महत्वपूर्ण पुरावा म्हणजे मंदिरात येथील शिलालेख. येथे मराठी भाषेतील आद्य शिलालेख आहे ज्यावर "वाचितो विजयी होईता" अशा प्रकारचा संदेश लिखित स्वरूपात उपलब्ध आहे.
मराठी शिलालेख
अन्नपूर्णा माता  :- 
           संगमेश्वर मंदिराच्या आवारात मंदिराच्या नैऋत्य दिशेस अन्नपूर्णा मातेचं एक छोटेखानी मंदिर आहे चतुर्भुज व अलंकाराने परिपूर्ण असणाऱ्या ह्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्ट जाणवतात.
अन्नपूर्णा माता
पंचलिंग परमेश्वर :- 
           संगमेश्वर मंदिराच्या वायव्य कोपऱ्यात एक देव कोष्टकात पाच लिंग एकत्रित असलेलं एक शिवलिंग आहे ह्यास पंचमहाभूतांचे प्रतीक मानले जाते. 
पंचलिंग परमेश्वर
श्री हरिहरेश्वर मंदिर :-
              हरिहरेश्वर मंदिरातील वैशिष्ट्य म्हणजे अतिशय कलापूर्ण अशा शिल्पांनी परिपूर्ण नटलेले असे हे मंदिर आहे. मंदिराची रचना मुखमंडप, अर्धमंडप, स्वर्गमंडप अंतराळव गर्भगृह अशी आहे. मुखमंडपात एकाच दगडात एका बाजूस लक्ष्मी व दुसऱ्या बाजूस भैरवीची उत्कृष्ट कलाकृती आहे.

श्री हरिहरेश्वर मंदिर
लक्ष्मी व भैरवीची एका दगडातील मूर्ती
            ह्या मंदिराच्या सभामंडपाचे तीन भाग केलेले असून डाव्या बाजूस असलेल्या शिल्पामध्ये श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत खेळताना दाखवलं आहे. मधले शिल्प हे अद्भुत असून ह्यात श्रीकृष्णाचा एक चेहरा व त्यास पाच शरीर परंतु ह्या शिल्पाची निर्मिती अश्या पद्धतीने केली आहे कि कोणत्याही अवस्थेतील शरीराला शिर हे तंतोतंत जोडलेले दिसते. डाव्या बाजूस असलेल्या शिल्पात श्रीकृष्ण सवंगड्यासोबत खेळताना दाखविले आहे.
सवंगड्यांसोबत श्रीकृष्ण
बहुरूपी श्रीकृष्ण
गोपिकांबरोबर श्रीकृष्ण
          पुढे गेल्यास आपला प्रवेश होतो तो स्वर्गमंडपात स्वर्ग मंडपाच्या शिल्पांची रचना हि सर्वात खालच्या बाजूस हत्ती वर भारवाहक त्यावर मिरवणुकीचा आवेश आहे त्यामध्ये एक मूर्ती वाद्य वाजवत असलेलं काही स्त्रिया फुगडी खेळत असलेलं असा सभोवतालचा पट्टा आहे आणि त्यावर सुरसुंदरी दाखवल्या आहेत. प्राण्यांमध्ये सर्वात बलवान म्हणून हत्ती हे खालच्या बाजूस दाखवलं आहे मनुष्य प्राण्यांमध्ये भारवाहक हा बलवान म्हणून तो हत्तीच्या वरच्या बाजूस दाखवलं गेलं आहे.
स्वर्गमंडप

स्वर्गमंडपावरील शिल्प
कालभैरव :-
           स्वर्ग मंडपात दोन प्रवेशद्वाराच्या मध्यभागी देंवकोष्टकात कालभैरवाची उत्कृष्ट अशी मूर्ती आहे ज्याच्या दोन्ही बाजूस सप्तफणा काढलेले नाग आहेत. कालभैरवाच्या हातात त्रिशूल व डमरु असून कालभैरवाचे वाहन कुत्रा असल्यामुळे तो खालच्या बाजूस दाखविला आहे भैरव हे शिवाचेच एक प्रतिरूप मानले जाते म्ह्णून त्याचा चेहरा उग्र दाखविण्यात आला आहे.
  सप्तमुखी नाग व कालभैरव
            इथून पुढे आपण प्रवेश करतो ते अंतराळात. अंतराळात २ गर्भगृह असून ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे शैव व वैष्णव ह्या दोन्हींचे प्रतिनिधित्व करते म्हणून डाव्या बाजूच्या गर्भगृहात शिवलिंग दिसते व उजव्या बाजूस कृष्णरुपात विष्णूची मूर्ती दिसते व मध्यभागी गणपतीची मूर्ती दिसते.
 शैव मंदिर 
 अंतराळातील गणपती 
  वैष्णव मंदिर विष्णुरूपी मुरलीधर 
            मंदिराच्या आवारात एक भग्न झालेली कृष्णाची मूर्ती आहे व्हरांड्यात उजव्या हाती एक गणपतीची मूर्ती ठेवली आहे. मंदिराच्या आजूबाजूने भग्न झालेली व उत्खननात अढळलेली बरीच शिल्पे, छतावरची झुंबरं आढळतात.
उत्खननात अढळलेल्या मूर्ती :-



उत्खननात सापडलेल्या मुर्त्या व शिल्पे
            सुमारे ३ तास मंदिराच्या आवारात मनसोक्त फिरल्यानंतर आता वेळ आलेली ती निघायची, मंदिरातून बाहेर पडताच आवारात श्री स्वामी समर्थ व हनुमान हि २ मंदिरे आहेत मंदिरातील मूर्ती ह्या पुरातन नसून त्या नवीन आहेत.
           ह्या मंदिरात दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. एव्हाना दहा वाजून गेल्याने १० ची सिटी बस थोडक्यात चुकली होती म्हणून बाहेर असलेल्या छोटेखानी हॉटेलमध्ये बसून गावकऱ्यांशी गप्पा मारत बसलो ११ च्या बस ची वाट बघत होतो. तेवढ्यात एका सद्गृहस्थांशी भेट झाली त्यांचं नाव "मधुकर बिराजदार". मधुकर बिराजदार हे ह्या मंदिर समूहाचे माहितगार. त्यांच्याशी गप्पा मारता मारता ह्या मंदिराचा हळू हळू इतिहास उलगडत गेला. त्यांच्याशी गप्पा मारून मंदिराला भेट दिल्याचे सार्थक झाले. एव्हाना ११ ची बस आली आणि मी कुडल गाव व ग्रामस्थांना निरोप देऊन परतीच्या प्रवासाला लागलो.

टीप :-
१)  मंदिरापर्यंत पोहोचायचे असल्यास एकतर स्वतःची गाडी हवी अथवा सर्वप्रथम सोलापूर गाठावे तिथून विजापूर ला जाणारी बस पकडून टाकळीला उतरावे व टाकळीवरून मिळेल ते वाहन पकडून कुडल गावापर्यंत जावे.
२) मंदिराची विस्तृत माहिती हवी असल्यास गावात जाऊन "मधुकर बिराजदार" ह्यांच्याशी संपर्क साधावा

ह्या अद्भुत कलेच्या कलाकारास शत शत नमन . . .
 
 https://trekadventure365.blogspot.com/2020/04/blog-post.html
 
 
 

 सेंट मेरीज आयलंड , ऊडुपी. (St.Mary's Island , Udupi) Offbeat Karnataka

सेंट मेरीज आयलंड , ऊडुपी.


मुंबईकरांना उडुपी माहिती आहे ते मुंबईतल्या उडूपी हॉटेल्समुळे आणि उडूपीतल्या प्रसिध्द श्रीकृष्ण मंदिरामुळे. या उडुपीला सुंदर समुद्र किनारा आहे त्याच नाव आहे मालपे बीच. या बीच पासून  ६ किलोमीटर अंतरावर निसर्गातील एका आश्चर्याने समुद्रातुन डोक वर काढलेल आहे, ते म्हणजे सेंट मेरीज आयलंड. पंचकोनी, षटकोनी, सप्तकोनी, अष्ट्कोनी अशा उभ्या बेसॉल्ट खडकाच्या स्तंभांनी ही चार बेट बनलेली आहेत. भारतातली अशा प्रकारची ही एकमेव बेट असुन, जिओग्राफ़िकल सर्व्हे ऑफ़ इंडीयाने २००१ साली या बेटांना "नॅशनल जिओग्राफ़िक मॉन्युमेंटचा" दर्जा दिलेला आहे.


उडुपी बस स्थानका पासून ५ किमीवर जेटी आहे. सेंट मेरीज आयलंडला जाण्यासाठी येथून बोटी सुटतात. बोटीचे तिकीट रुपये १००/- असून ३० लोक जमा झाल्याशिवाय बोट सोडत नाहीत. त्यामुळे शक्यतो सुट्टीचा दिवस आणि संध्याकाळी ४ च्या दरम्यान जावे म्हणजे सुर्यास्त पाहून परतता येते. बेटावर वस्ती नसल्याने खाण्यापिण्याच्या वस्तूही मिळत नाहीत.. त्यामुळे त्या सोबत बाळगाव्यात. धक्क्यावरुन साधारण अर्ध्या तासात आपण सेंट मेरीज आयलंडपाशी  पोहोचतो. स्थानिक दंतकथे प्रमाणे केरळला जाण्यापूर्वी १४९८ मध्ये वास्को द गामा प्रथम या बेटांवर आला आणि मदर मेरीच्या नावावरून त्याने या बेटाला सेंट मेरी आयलंड (ओ पाड्रो दी सांता मारीया) असे नाव दिले. या ठिकाणी  कोकनट आयलंड ( या बेटावर नारळाची झाड आहेत.), नॉर्थ आयलंड, दर्या बहादुरगड आयलंड आणि साऊथ आयलंड या चार मोठ्या बेटांनी समुद्रातून डोके वर काढलेले आहे. यातील कोकनट आयलंड म्हणजेच (सेंट मेरीज आयलंड) वर बॅसॉल्ट खडकाचे बहुकोनी स्तंभ आहेत.



   बेटा जवळ बोट आल्यावर दुरुनच बेटावर आणि समुद्रात आजूबाजूला विखुरलेले बेसॉल्टचे स्तंभ दिसायला लागतात. बेट २४ एकरावर पसरलेले आहे. बेटावर काही माडाची झाड आणि खुरटी झुडप पाहायला मिळतात. बेटावरची जमिन वाळुने बनलेली नसून चक्क शंख शिंपल्यांनी बनलेली आहे. बेटावर अगणित शंख शिंपले पाहायला मिळतात. एवढ्या मोठ्या प्रमाणवर शंख शिंपले इतर ठिकाणी क्वचितच पाहायला मिळतात.या बेटाला वाळूचा किनारा नसून या शंख शिंपल्यांनी बनलेला किनारा आहे. बेटाच्या आजूबाजूला खडक असल्याने समुद्रही पोहोण्याच्या लायक नाही आहे. बेटावर फ़िरतांना वरुन पाहिले तर कासवाच्या पाठीसारखे आणि बाजूने पाहिले तर खांबांसारखे दिसणारे बेसॉल्टचे दगडी स्तंभ दिसायला लागतात. 

६० दशलक्ष वर्षापूर्वी लाव्हारसामुळे दख्खनच्या पठाराची निर्मिती झाली त्याच वेळी या बेटाची आणि त्यावरील स्तंभांची निर्मिती झाली. या स्तंभांसारख्या रचनेला "कॉलम्नर जॉईंट" म्हणतात. चौकोनी, पंचकोनी, षटकोनी, सप्तकोनी, अष्ट्कोनी अशा बहुकोनी आकारात तयार झालेले हे स्तंभ एकमेकाला चिकटलेले असतात. ज्वालमुखीच्य उद्रेका नंतर लाव्हारस जर खोलगट भागात जमा झाला तर अशा प्रकारची रचन तयार होण्याची शक्यता असते. लाव्हारस थंड होण्याची प्रक्रीया पृष्ठभागापासून चालू होते. वरचा भाग थंड झाल्यावर हळूहळू खालचा भाग थंड होत जातो. अशा प्रकारे द्रवरुपातून घनरुपात येतांना तो आकुंचन पावतो आणि त्यामुळे त्याला भेगा पडतात. सामान्यत: या भेगा एकमेकांशी ६० अंशाच्या कोनात पडतात. त्यामुळे दगडाला षटकोनी आकार येतो. या भेगा पृष्ठभागाशी ९० अंशाचा कोन करतात त्यामुळे षटकोनी आकाराचे उभे स्तंभ तयार होतात. जर भेगा पडण्याच्या प्रक्रीयेत काही बाधा आली तर चौकोनी, पंचकोनी आकारचे स्तंभ तयार होतात. 

वर्षानूवर्षे लाटांच्या आणि वार्‍याच्या मार्‍यमुळे या ठिकाणी अनेक स्तंभ तुटून पडलेले पाहायला मिळतात. बेटावर काही सेंटीमीटर उंच ते जास्तीत जास्त ३ ते ४ मीटर उंचीचे स्तंभ पाहायला मिळतात. 

दगडी स्तंभांचे विविध आकार, त्यावर फ़ुटणार्‍या लाटा आणि विविध आकाराचे, रंगांचे शंख शिंपले गोळा करतांना वेळ कसा जातो ते कळत नाही. बोटीचा परतीचा इशारा देणारा भोंगा वाजायला लागतो. समुद्रात बुडणार्‍या सूर्याला साक्षीला ठेऊन आपण या सुंदर बेटाचा निरोप घेतो.



जाण्यासाठी :- कर्नाटकातील उडुपी स्थानक कोकण रेल्वे वरील महत्वाचे स्थानक आहे. या ठिकाणी सर्व गाड्या थांबतात. उडुपीत राहाण्यासाठी अनेक हॉटेल्स आहेत. कोस्टल कर्नाटक सहलीत वाट थोडी वाकडी करुन आपण उडुपी आणि सेंट मेरी आयलंडचा समावेश करु शकतो.


अमित सामंत
 
 

राजा की गद्दी (मडीकेरी)

गेल्या डिसेंबरात कर्नाटक राज्याच्या दक्षिणेकडील "मडीकेरी" या थंड हवेच्या ठिकाणी गेलो होतो. तिथे राजा की गद्दी / रॉयल टोंब या नावाच्या जुळ्या वास्तु पाहण्यात आल्या. मी आतापर्यंतच्या माझ्या प्रवासात (जो अत्यंत कमी आहे) येथे दिसलेले काहि तपशील याआधी कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे त्या अनुशंगाने जे काहि प्रश्न डोक्यात आहेत त्यासंबंधी चर्चा करण्याचा हेतु इथे आहे.

सर्वप्रथम तिथे लिहिलेल्या सरकारी बोर्डावरील माहिती अशी
==========
रॉयल टोंबः
इंडो-सार्सेनिक पद्धतीने बांधलेल्या ह्या वास्तुला गद्दी अथवा टोंब् म्हणतात. कोडवा राजघराण्याने बांधलेल्या वास्तुपैकी काहि मोजक्या टिकलेल्या वास्तुपैकी हि एक वास्तु आहे. येथील मधील टोंब राजा दोड्डावीरराजेंद्र आणि त्याच्या राणीचा आहे. तर उजवीकडील टोंब राजा लिंगराजेंद्राच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याचा पुत्र चिकवीरराजेंद्र यांने १८२० मधे बांधला आहे. इथे डावीकडे अजून एक वास्तु आहे ती राजाचा पुजारी रुद्रप्पाने १८३४ मधे बांधुन घेतली.

हे राजे आणि कोडगु जंगलातील व भोवतीची त्यांची प्रजा शिवभक्त असल्याने या वास्तुमधे शंकराची स्थापना केली आहे. मुख्य प्रवेशद्वारापाशी तसेच चारहि मिनारांवर शंकराचे वाहन नंदी याचा पाहरा आहे.
============
कोडवा लोकांबद्दल (इतिहास): [संदर्भ विकी]
१. दोड्डावीरराजेंद्र हा वीरपुरुष होता. हैदर अली आणि पुढे टिपु सुलतानाने कोडगु प्रांत बळकावला व या राजाला कैद केले. तेव्हा या राजाने कैदेतुन पळुन, पुन्हा टीपुशी लढून आपला प्रांत मुक्त केला.
उपकहाणी अशी की टीपुला हा प्रांत राखणे तसेहि जड होते. त्याची पाठ फिरते ना फिरते इथेली प्रजा टीपुच्या सैन्याला सळो का पळो करून सोडत असत. टिपुने मग हजारो जणांना श्रीरंगपट्टणमला नेऊन मुसलमान बनवणे चालु केले. भारतातील अनेक प्रांताप्रमाणे जेव्हा ही प्रजा माघारी आली तेव्हा हिंदु कोडवांनी त्यांना आपल्यात घेतले नाहि. ते कोडगु प्रांतातच राहिले मात्र् त्यांना कोडवा-मपिलि म्हणू लागले

२. याउलट त्याचा नातु चिक्कवीरराजेंद्र अतिशय निर्दयी राजा होता. आपल्या कोडवा प्रजेला त्यांने छळायला सुरवात केली. त्यानिमित्ताने इंग्रजांनी त्याला हाकलुन सत्ता ताब्यात घेतली

आता मला पडलेले प्रश्न

१. विकीवरील माहिती व्यतीरिक्त या कोडवा लोकांबद्दल काहि विषेश माहिती आहे का? इथे एक अख्खी वास्तु पुजार्‍याला बांधुन दिलेली दिसते. पुजार्‍यांना इतका मान देणारी प्रथा प्रथमच पाहिली.
२. इंडोसार्सेनिक मंदीरांची वैशिष्ट्ये काय? सार्सेनिक आणि इंडोसार्सेनिक मधे फरक काय?
३. इथे प्रत्येक वास्तुच्या प्रवेशद्वारावर हातात डमरु आणि त्रिशुळ घेतलेला मात्र पायाखाली भुजंग असलेला पुतळा आहे तो कोणाचा असेल?

४. येथील चित्रांमधे जे साधु कोरले आहेत त्यांना मुकुट दाखवले आहेत. (क्वचित मोत्याची माळ वगैरेही गळ्यात आहे). (अगदी कमंडलुधारी काठी घेतलेल्या साधुच्या डोक्यावरहि मुकुट आहे). भारतात साधु क्षत्रियांप्रमाणे मुकुट, आभुषणे वापरत असत का?

५. प्रत्येक खिडकीवर पुढील आकृती आहे. कोणाला कन्नड (अथवा कोडवा टिक्क?) येत असल्यास त्याचा अर्थ काय ते सांगु शकेल का? (का आपल्या "श्री" सारखे काहि आहे?)

६. पुढील चित्रांत दाखवलेला कोंबडासदृश प्राणी/पक्षी (मात्र तुरा नाहि, चेहरा घोड्यासारखा वाटतो, आणि झुपकेदार शेपुट आहे) ओळखता येतोय का? असल्यास तो नामशेष झाला आहे का? कारण हा पक्षी तिथे बर्‍याच ठिकाणी कोरलेला दिसला.

चित्रे भरदुपारी काढल्याने अतिप्रकाशात न्हाली आहेत.. क्षमस्व!

यानिमित्ताने काहि प्रमाणात टिपुसुलतानच्या वेळच्या मानी हिंदु राज्यांबद्दलहि वाचायला आवडेल.मात्र तो मुख्य चर्चाविषय नाहि

 

राजा दोड्डावीरराजेंद्र आणि त्याच्या राणीचा आहे. तर उजवीकडील टोंब राजा लिंगराजेंद्राच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याचा पुत्र चिकवीरराजेंद्र यांने १८२० मधे बांधला आहे.

यातील दोड्ड आणि चिक यांचा अर्थ मोठा आणि लहान असा होतो. नात्यातील मोठे-लहानपणा दाखवण्यासाठी याचा वापर होतो. उदा. कर्नाटकात मोठ्या काकाला दोड्डप्पा काकीला दोड्डम्मा, लहान काकाला चिक्कप्पा आणि काकीला चिक्कम्मा म्हणतात.

आता काही माहिती दे. प्रतिसादांतून चर्चा करूया.

१. हा रॉयल टोम्ब प्रकार काय आहे? म्हणजे समाधीसदृश काही किंवा कसे?

२. तू दिलेल्या फोटोंवरून मंदिर इंडो-सार्सेनिक आहे किंवा कसे ते कळत नाही. मूळ मंदिराच्या इमारतीचे फोटो लाव. व्हीटी स्टेशनची इमारत इंडो-सार्सेनिक पद्धतीची आहे असे म्हणतात.

३. साधूंची जी चित्रे आहेत त्यातील डावीकडील चित्रात मला तो साधू असल्यासारखा वाटला नाही. त्याच्या अंगावर जानवे नाही. (त्याच्यामागे बाईही दाखवली आहे. ;-) हा राजा असावा काय?) उजवीकडील साधू असावा त्याच्या अंगात जानवे आहे पण डोक्यावर मुकुट आहे असे वाटले नाही पण हे जरा चित्र स्पष्ट न दिसल्याने होत असावे. जरा खुलासा कर.

सहावा फोटो व्यालाचा असावा. ते अनेक ठिकाणी का येते? रॉयल सिम्बॉल आहे किंवा कसे ते पाहायला हवे.

इंडो-सार्सेनिकबद्दल माहिती येथे मिळेलच. :-)

द. भारतात पुजार्‍यांना विशेष महत्त्व असते ही गोष्ट खरी आहे. एक उदाहरण द्यायचे झाले तर - आमच्या कुटुंबाचे मूळ गाव आहे तेथे त्यांच्या इस्टेटीवर एक देऊळ आहे. फारा वर्षांपूर्वी तिथे माझ्या सासर्‍यांचे वडिल स्वतः पूजा करत. नंतर कुटुंब वाढले, पांगले. आता त्या देवळाची खरी मालकी आणि त्या देवळाच्या आजूबाजूच्या थोड्या परिसराची , तेथील घर, मळा इ. ची मालकी, देवळाच्या पुजार्‍याकडे आहे. देवळात कोणताही उत्सव असेल तर जरी आमच्या कुटुंबांकडून (सध्या माझे काही दीर ते करतात) करवून घेतला जातो परंतु त्या उत्सवाचा अर्धा खर्च हे पुजारी आपल्या स्वतःच्या पैशांतून स्वखुशीने आणि आनंदाने करतात.

 

यातील दोड्ड आणि चिक यांचा अर्थ मोठा आणि लहान असा होतो. नात्यातील मोठे-लहानपणा दाखवण्यासाठी याचा वापर होतो. उदा. कर्नाटकात मोठ्या काकाला दोड्डप्पा काकीला दोड्डम्मा, लहान काकाला चिक्कप्पा आणि काकीला चिक्कम्मा म्हणतात.

इथे मात्र ते लहान मोठे भाऊ नसुन वडील -मुलगा आहेत

आता काही माहिती दे. प्रतिसादांतून चर्चा करूया.

१. हा रॉयल टोम्ब प्रकार काय आहे? म्हणजे समाधीसदृश काही किंवा कसे?

हे टोम्ब काहि वास्तुंचा गुच्छ (?) आहे. यात दोन शिवमंदीरे आहेत. तर एक पुजार्‍याने बांधलेले मंदीर आहे. बाकी दोन टिपू सुलतानाच्याबरोबर लढताना शहिद झालेल्या दोघांची स्मारके आहेत (स्मारके व पुजार्‍याच्या मंदीराचा फोटो नाहि)

२. तू दिलेल्या फोटोंवरून मंदिर इंडो-सार्सेनिक आहे किंवा कसे ते कळत नाही. मूळ मंदिराच्या इमारतीचे फोटो लाव. व्हीटी स्टेशनची इमारत इंडो-सार्सेनिक पद्धतीची आहे असे म्हणतात.

हा मंदीराचा फोटो.

गुगलून इंडो सार्सेनिक बर्‍याच इमारती मिळाल्या पण मग सार्सेनिक आणि इंडो-सारर्सेनिक मधे फरक काय राहिला ते कळेना. (बरं इंडियातील सार्सेनिक वास्तु म्हणावं तर या शैतीत जगभरात बांधलेल्या वास्तु येतात)

३. उजवीकडील साधू असावा त्याच्या अंगात जानवे आहे पण डोक्यावर मुकुट आहे असे वाटले नाही पण हे जरा चित्र स्पष्ट न दिसल्याने होत असावे. जरा खुलासा कर.

या चित्रात उजवीकडे साधु आहे हे नक्की. त्याच्या एका हातात कमंडलु आहे, दुसर्‍या हातात काठी. गळ्यात तीनपदरी जानवे आहे (हे तीनपदरी कसे तोहि प्रश्न आहेच). शिवाय गळ्यात मोत्याची माळ, डोक्यावर मुकुट (मुकुट पारंपारिक पद्धतीचा शंकाकृती नसुन बसका मोत्याने सजवलेला व वरून उघडा असा वाटतो. त्यातुन साधुच्या जटा बाहेर आल्या आहेत)

सहावा फोटो व्यालाचा असावा. ते अनेक ठिकाणी का येते? रॉयल सिम्बॉल आहे किंवा कसे ते पाहायला हवे.

घोडा आणि कोंबडा असलेला व्यालहि असतो हे बघुन गंमत वाटली. असो, असेनाका बापडा ;)

अजून एक. प्रश्न पाच मधे दिसणारी (श्री/वी/पी सदृश) आकृती/अक्षरे अगदी काहि किर्तीमुखांच्या मस्तकी देखील आरूढ आहेत:

काहि इतर फोटोज:

वेळ होईल तशी इतर ऐकीव माहिती देखील टंकेन.. तुर्तास घाईत आहे

 

 

 

 

 

 http://www.misalpav.com/node/19934

प्रस्तावना :
एखाद्या गोष्टीचे वेड जर मनात घेतलं तर ते पुर्ण केल्या शिवाय माझा आत्मा शांत राहत नाही, असेच एक वेडं मला मागच्या सोमवारी/मंगळवारी टिम गोवा यांनी गोवाच्या इतिहासावर लेखन करण्यास सुरूवात केली व पहिल्या भागामध्ये, विचार करावे व शोध घ्यावे असे काहीतरी सापडले ते म्हणजे पाषाणावर खोदलेले / रेखाटलेले चक्रव्यूह पाहताना, अगदी असेच नसले तरी त्याच्याशी मिळते जुळते काहीतरी मी पाहीले होते, पण कोठे हे काही केल्या आठवत नव्हते, मग त्याचा शोध घेणे चालू केले, जुन्या ट्रिपचे फोटो पाहिले, नेटवर शोधले पण काहीच हाती पडेना पण तोच काहीतरी शोधताना काहीतरी सापडावे असे घडले, एक चित्र मला सोनालीने दाखवले व नंतर तेथेच शोध घेतल्यावर जे दिसले ते अद्वितीय होते, हैलेबिडु येथे असलेल्या पुरातन मंदिराचे फोटो कोणीतरी पिकासावर अपलोड केले होते. फोटो पाहिले थोडी शोधा शोध घेतल्यावर समजले येथून (बेंगलोर पासून) जवळ नसले तरी लांब देखील जास्त नाही हे स्थळ.

माझ्या सारखाच अजुन एक वेडा, माझ्या ऑफिसमध्येच आहे, पण कामामुळे आम्ही दोघे एकत्र भटकायला बाहेर पडू शकत, पण सगळे योग जूळून आले व अचानक शनिवारी पहाटे या प्रवासाला निघायचे असे ठरले सुद्धा. त्यांने नवीन बाईक घेतली आहे, बजाज अव्हेंजर. व त्याच प्रकारची माझी बाईक होती यामाहा एनटायसर, त्यामुळे लांबच्या बाईक प्रवासाचा अनुभव कामी आला. सकाळी ६ वाजता आम्ही बेंगलोरू मधून बाहेर पडलो. जास्त काही त्रास न घेणे हा एकमेव उद्देश ठेऊन बाईकचे स्पिड फिक्स ६० किमी / तास असे आम्ही दोघांनी ठरवले व पुर्ण प्रवास त्याच वेगाने केला. (जीवनात पहिल्यांदा कुठल्यातरी गोष्टीवर सुरवाती पासून शेवट पर्यंत कंट्रोल ठेवला)

प्रवासाला निघताना आम्हाला कल्पना नव्हती की आपण काय पाहणार आहोत व त्याचे महत्त्व काय. १००० वर्षापेक्षा जास्त काळात देखील, आसमानी व सुलतानी कहर झेलून दिमाखाने उभे असलेल्या व भारताच्या स्थापत्यकलेचा उज्ज्वल इतिहास संभाळून ठेवणार्‍या ३ भव्य व दिव्य अश्या स्थळांचे दर्शन आम्ही अचानक घेऊ, हे ध्यानीमनी देखील नव्हते पण सर्व अचानक ठरत गेले व प्रवास सूरू झाला..

स्थळ : हैलेबिडु
जिल्हा : ह्सन, कर्नाटक
कसे जावे : बाईक वरून २४० कि.मी. बेंगलोरू हून. जवळचे रेल्वे स्टेशन हसन व एअरपोर्ट बेंगलोरू.

द्वारसमुद्र, होयसाळ / होयसाल साम्राज्याची राजधानी. ईस्वीसन १००० ते १४०० हा काळ त्या साम्राज्याचा सुवर्णकाल होता. या काळामध्ये वेगवेगळ्या मंदिरांची व अनेक वास्तुशिल्पांचे निर्माण सातत्याने होत राहिले. पृथ्वीवरील स्वर्गाची निर्मिती केले होयसाळ / होयसाल सामाज्याने. द्वारसमुद्र व बेल्लूर यांना पृथ्वीवरचा स्वर्ग असे म्हणले जात असे. पुर्ण दख्खन (कर्नाटक) व तामिळनाडूवर होयसाल साम्राज्य पसरले होते.

ई.स. १००० च्या आधी त्या व आजूबाजूच्या सर्व प्रदेशावर जैन धर्माचा प्रचंड प्रभाव होता, तो प्रभाव मोडून काढून पुन्हा हिंदू साम्राज्य उभे करण्याचे श्रेय या होयसाळ / होयसाल राजांना जाते, त्यांनी त्या भागावरील जैन धर्माचा प्रभाव जवळजवळ पुर्ण नष्ट केला व आपल्या अद्भुत व देखण्या होयसाल स्थापत्य कलेतून अनेक मंदिरे उभी केली, जुळी मंदिरे या प्रकार देखील त्यांनी सुरू केला ( याची माहिती पुढे येईल). द्वारसमुद्र मध्ये असलेली व होयसाळ / होयसाल राजांनी निर्माण केलेली ही मंदिरे प्रामुख्याने शिव मंदिरे आहेत.

मलिक काफुर व मोहंम्मद बीन तुगलक, यांनी या साम्राज्यावर आक्रमण केले, सर्वात आधी दिल्ली सुलतानाच्या आदेशाने मलिक काफुर ने १३११-१३१५ च्या आसपास होयसाळ / होयसाल सम्राजावर आक्रमण केले व शेकडो उंटावरून, सोने व दागिने या साम्राजातून घेऊन गेला पण जाताना त्याने द्वारसमुद्र जवळ जवळ नष्ट केले, मंदिरे पाडली, मुर्त्या नष्ट केल्या व शहर ध्वस्त केले. यानंतर काहीच वर्षानंतर मोहंम्मद बीन तुगलक ने आक्रमण केले व राहिलेले सर्व लुटून नेले व द्वारसमुद्र पूर्णतः: नष्ट केले, त्याच्या तावडीतून काहीच मंदिरे शिल्लक राहिली ती देखील भग्न अवस्थेत.

पृथ्वीवरील स्वर्ग असणारे नगर, मातीत मिळाले, व त्याला नवीन नाव मिळाले हैलेबिडु म्हणजे जुनी राजधानी, एक नष्ट शहर.

३५० ते ४०० वर्ष होयसाळ / होयसाल राजांनी एका मोठ्या भूखंडावर राज्य केले. हे प्रामुख्याने शिव भक्त. यांच्या राज्याचं चिन्ह होते सिंह व योद्धा, त्याकाळी ज्ञात व वापरात असलेल्या तिन्ही लिपी मध्ये त्यांनी अनेक शिलालेख निर्माण केले ज्यामध्ये, तामिळ (जूनी), कन्नड व तसेच मोडी भाषेत. मंदिरामध्ये, विजय / धर्म स्तंभावर तसेच रेखीव संगमरवरी पाषाणावर यांनी विपुल लेखन केले, ज्यामध्ये विजय कथा, साम्राज्यात झालेले फेरबदल, पुराण कथा, देव स्तुती इत्यादी चा समावेश आहे. मंदिर निर्माण साठी त्यांनी स्थानिक पिवळसर दगड (प्रस्तर ?) व पाया व मूर्ती निर्माण साठी काळ्या पाषाणाचा वापर प्रामुख्याने केला.

आता त्या काळात उपलब्ध असलेली दोन मंदिरे शिल्लक व सुस्थितीत आहेत. हैलेबिडु व बेल्लूर. १२ किलोमीटरच्या अंतरावर वसलेल्या दोन प्राचीन शहरातील राहिलेले वैभव. तसे पाहता होयसाळ / होयसाल राजांनी आपल्या साम्राज्यात १५० च्या वर मंदिर निर्माण केलीत पण उल्लेखनीय व स्थापत्य कलेचा नमुना म्हणून हैलेबिडु व बेल्लूर हे महत्त्वाचे आहेत. मंदिरांची वैशिष्ट्य पुर्ण रचना व मांडणी वेगळ्या पद्घतीने केली गेली आहे. तीन द्वार असलेली व एकाच मंदिरात दोन गाभारे असलेल्या जुळ्या मंदिराची संकल्पना येथे राबवली गेली आहे. सर्वात प्रथम आपण हैलेबिडू मंदिर व त्याची रचना पाहू.

हैलेबिडु, असे नाव वापरण्यापेक्षा मी त्या शहराचे प्राचीन नाव पुढे वापरणार आहे जेणेकरून एका वैभवशाली शहराचे नाव आपल्या स्मृतीत कोरले जावे व आपल्या समृद्ध अश्या इतिहासामध्ये एक द्वारसमुद्र नावाचे नगर देखील होते ज्या नगराने देशाला व त्यावेळच्या समाज व्यवस्थेला एक नवीन प्रकारच्या स्थापत्य पद्धतीची, कलेची ओळख जगाला करून दिली याचा विसर पडू नये म्हणून.

तर,

द्वारसमुदचे मंदिर : एका तलावाच्या काठी उभारले गेलेले हे व पुर्ण पाषाणामध्ये निर्माण केले गेलेले हे मंदिर व त्याचे नाव आहे होयसळायेश्वर / होयसलायेश्वर मंदिर. राजघराण्यांचे प्रमुख मंदिर त्या राजघराण्याच्या नावानेच आजही ओळखले जाते. या मंदिराची ४-५ एकर परिसरामध्ये एक मुख्य जुळे मंदिर व आजूबाजूला सलग्न पण भारदस्त अशी ४-५ मंदिरे, समोर नंदी मंडप व (गर्भगृहाच्या समोर) विस्तृत तळे. अशी संरचना होती. आक्रमणानिमित्त प्रमुख मंदिर राहिले व बाकीची सलग्न मंदिरे काळाच्या ओघात नष्ट झाली / केली केली. आता द्वारसमुद्र मध्ये फक्त होयसलायेश्वर मंदिर आहे, पण ते भव्य व दिव्य आहे.

प्रवेशद्वारातून पाहिल्यावर अनेकांना तामिळनाडू मधील महाबलीपुरम (तामिळनाडू, ५०-६० किमी, चेन्नई पासून) मंदिराची आठवण झाली नाही तर नवलच. पण जसे जसे जवळ जाऊ तसा तसा फरक समोर स्पष्ट होत जातात. महाबलीपुरम विषयी नंतर कधीतरी लिहतो. तर होयसलायेश्वर मंदिर हे तीन टप्पात आहे. नजरेत भरतो तो पहिला भाग दर्शनी मंदिराचा. जसे जसे तुम्ही जवळ जाता तसे मंदिर निर्माण करताना वापरलेली कल्पकता समोर येत जाते. ५-६ फुटाच्या मंदिराचा पाया, पूर्णतः इंटर-लॉकिंग सिस्टम ( मराठी शब्द ? ) वापरलेला. जर हे मंदिर वरून पाहिले तर त्यांची रचना स्टार (चांदणी) सारखी आहे.

दुसरा टप्पा, बारा प्रकारचे लेअर (विभाग) असलेल्या भिंती. वेगवेगळ्या प्रकारे भिंती शिल्पे व नक्षी काम केलेले व अनेक पुराण कथा यांचे चित्रण याचा संगम म्हणजे मंदिराचे बाह्य रूप. सर्वात खालील विभागात, गज शक्तीचे प्रदर्शन, नंतर राज्य चिन्ह असलेल्या सिंहाचे व त्यांनंतर वेगळ वेगळ्या आपात्कालीन पद्घतीने नक्षी काम. त्याच्या वरच्या विभागात यक्ष, किन्नर, वाद्य वाजवणारे, नृत्यात मग्न असे नर्तकी व नर्तक यांची दर्शन. १० इंचाच्या आसपास उंची असलेल्या या विभागात, इतक्या बारकाईने कोरीव काम केले आहे की पाहताना दंग व्हावे व समोर पहात असलेले दृष्य आपल्या नजरे समोर घडत आहे असलेले नृत्य असावे असे भासते, अनेक छोट्या छोट्या गोष्टी, नर्तकीच्या पायातील पैंजण, ती च्या गळ्यातील दागिने व डोळे. कलेतून एखादं दृष्य जिवंत होते कसे या प्रश्नाचे उत्तर येथे मिळते.

नंतरच्या सातव्या व आठव्या विभागामध्ये (लेअर) पुरातन कथा रेखाटलेल्या आहेत, ज्यामध्ये रामायण व महाभारत प्रामुख्याने आहेत. कर्ण वध, अभिमन्यू वध, युद्ध रचना, आयुधे, रथ यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तसेच कृष्ण अवतारातील अनेक कथा येथे दिसतात, बाललीला कालिया मर्दन इत्यादी. प्रत्येक विभागाचे वैशिष्टे अधोरेखित करण्यामागचे कारण हे की त्यांनी जेव्हा मंदिर निर्माण सुरू केले तेव्हा त्यांना काय तयार करायचे आहे, याची स्पष्ट कल्पना होती, रामायणामध्ये महाभारत घुसत नाही अथवा महाभारतात इतर कथा. प्रमुख व महत्त्वपूर्ण कथा व त्यातील पात्र त्यांनी आधीच ठरवले होते, हे पाहताना लक्ष्यात येते. येथे काही गोष्टींचा संदर्भ तुम्हाला जोडावा लागतो, व ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्हाला त्या कथा पुर्ण माहिती असतील अथवा तो पार्ट, त्या कथेतील तो भाग स्पष्टपणे तुम्हाला समजला असेल. याच लेअर (विभागामध्ये ) ज्या चित्रा पासून हा प्रवास चालू झाला ते मला मिळाले. येथे तुम्हाला रावण कैलाश पर्वत उचलताना, कृष्ण - अर्जून अभिमन्यू च्या वधानंतर चर्चा करत असलेले, अर्जून व कर्णाचे भयंकर युध्द त्यांची अस्त्रे, शंकराचा दरबार, शंकराचे नटराज स्वरूप इत्यादी अनेक कथा पहावयास मिळतात.


चक्रव्यूह

ज्या चित्रा पासून हा प्रवास चालू झाला ते चित्र येथे देत आहे. हा फोटो टिम गोवा यांच्या लेखातील आहे.

हा सात लेयर मध्ये (विभागामध्ये) असलेल्या चक्रव्युहाचा नकाशा आहे. (९९.९% मला असे वाटते)

महाभारतातील प्रमुख घटना मधील ही एक घटना तेथे सचित्र कोरलेली आहे व तेथेच अश्याच पद्धतीचे एक भित्तीचित्र मला दिसले. व्युह रचना व त्याचा आकार. आधी मला गोव्यातील ते चित्र म्हणजे शक्यतो सुर्य घड्याळ असावे की काय असे वाटले होते व तसेच मी कोठेतरी पाहिले आहे असे वाटत होते, पण हे भित्तीचित्र पाहिल्यावर लक्ष्यात आले की नाही, हा चक्रव्यूह आहे व हा आपण उत्तर भारतात फिरताना, काही वाचन करताना पाहिलेले आहे.


यानंतरचा लेअर (विभाग) हा नक्षीकामाचा आहे व त्यानंतर मुख्य लेअर (विभाग) येतो तो भित्तीशिल्प याचा.
मी येथे व वरील लेखनामध्ये दोन वेगळे शब्द वापरले आहेत, भित्तीचित्रे व भित्तीशिल्प. दोन्ही प्रकारे दगडामध्ये कोरून कला प्रदर्शन केले जाते पण, दोन्ही मध्ये सौम्य असा फरक आहे, भित्तीशिल्प पुर्ण कोरीव व हाव-भावसह तसेच पूर्णाकृती मूर्ती / मूर्तींची रांग असते, तर भित्तीचित्रे मध्ये कथेला प्राधान्य असते मूर्तीच्या दिसण्यावर नाही (हा फरक मला वाटतो, याचे कुठलेही शास्त्रीय कारण माझ्याकडे नाही आहे).

तर,
मुख्य लेअर (विभाग) मध्ये ३-४ फुट उंचीचे भित्तीशिल्प आहेत, ज्यामध्ये विष्णूची अनेक रूपे, अवतार, ब्रम्ह स्वरूप, शिव स्वरूप गणेश मूर्ती व इतर देवदेवता इत्यादी यांचे दर्शन घडते, येथे एक गोष्ट नोंद घेण्यासारखं आहे, मंदिर हे शिव मंदिर आहे, राजे हे शिव उपासक होते, पण त्यांच्या कलेमध्ये, आवडीमध्ये, फक्त शिव हा अट्टहास नाही आहे, विष्णू व शिव वाद ( जो उत्तर भारतात होता, आहे.) दिसत नाही, ज्या होयसाळ / होयसाल राज्यांनी जैन धर्माची पाळेमुळे खणून काढली दक्षिण भारतातून ( सध्या यांनीच की इतर कोणी याचे उत्तर नाही, कारण याच्या राजधानी पासून म्हणजेच द्वारसमुद्र पासून ९०-१०० किमी दुरवर असलेले प्राचीन जैन धार्मिक स्थळ / पुरातन स्थळ जसेच्या तसे उभे आहे, त्यामुळे थोडा गोंधळ होतो आहे.) त्यांनी निर्माण केलेल्या मंदिराच्या भित्तीचित्रे / शिल्पा वर जैन तीर्थंकर देखील दिसतात. एक तर त्यांचा सर्वधर्म समावेशक असा विचार असावा अथवा एखाद्या धर्माचे, पंथाचे मन दुखावणे म्हणजे राजकारण हे कारण असावे.

मुख्य लेअर (विभाग) मध्ये विष्णूचा मक्ता जास्त उठावदार दिसतो, अनेक शिल्पे त्याच्या अवताराची आहेत, वराह अवतारापासून, नरसिंह अवतार व राम अवतार सगळेच तेथे दिसतात, बम्हास्वरूप देखील तेथे कोरलेले आहे त्याच बरोबर अजुन एक जाणवलेली गोष्ट म्हणजे जी मी इतर भारता अनेक मंदिरे फिरलो पण दुर्गा अवतार /काली अवतार बिंतीशिल्पे मंदिरावर कधी पाहिलेले आठवत नाही, गळ्यात मुंडमाला पासून पायाखाली लोळलेला राक्षस अश्या प्रकारच्या ३-४ शिल्पे तेथे आहेत.

याच लेअर मध्ये, गणेश मुर्ती देखील आहे, पण त्याला प्रमुख द्वारा वर स्थान नाही मिळालेले आहे, पण गणेश मूर्ती ही ब्रह्मा, विष्णू व महेश (शिव) याच्या बरोबरीने तेथे दिसते तसेच, इतर कुठल्या देवाची नाही पण एक ८-९ फुटी उंच गणेश मूर्ती त्याच प्रांगणातून मिळाली होती जी आधी प्रवेशद्वारासमोर होती. अतिशय रेखीव एका पाषाणातून घडवली गेलेली ही मूर्ती खरंच खूप सुंदर आहे. विष्णूच्या नरसिंह अवताराचा देखील येथे बोलबाला आहे, नरसिंह शिल्पे तर आहेतच, पण नरसिंह स्तंभ व नरसिंह कथा असलेला शिलालेख देखील येथे आहे, शक्यतो याचे कारण साम्राज्याचे प्रमुख चिन्ह सिंह हे होते. अनेक जागी सिंहाची शिल्पे कोरलेली आहेत.

सर्व जग डावीकडून उजवीकडे असे भटकते, पण आम्ही मुद्दाम उजवीकडून सुरूवात केली होती, कारण तेथे असलेली गर्दी टाळता यावी व योगायोगाने अनेकवेळा केलेला हा प्रयोग पुन्हा यशस्वी ठरला व मंदिर मनसोक्तपणे हवा तेवढा वेळ बाहेरून पाहता आले. मंदिराला तीन प्रवेशद्वार आहेत, एक मुख्य प्रवेशद्वार व दोन उजवी व डावीकडून प्रवेशद्वार. जे प्रमुख द्वार आहे त्यातून राजघराण्यातील मंडळींना प्रवेश, उजवीकडच्या प्रवेशद्वारातून मंत्री अथवा राजघराण्या समकक्ष लोकांचे प्रवेश द्वार, व डावीकडील प्रवेशद्वार सर्व सामान्य जनतेसाठी होते. उजवी व डावी बाजू पाहिली तर दोन्ही मध्ये कणमात्र फरक करता येत नाही, दोन्ही बाजूची जडण-घडण एकाच पद्घतीने व प्रकाराने केलेली आहे, द्वारपालाच्या मूर्ती पासून चौकटीवर असलेल्या चिन्हापर्यंत सर्व काही एक सारखे. पण राज घराणे ज्या द्वारातून प्रवेश करत असे, त्याची योजना वेगळी व खास पद्घतीने केली आहे.

प्रवेशद्वारापासून काही फुट अंतरावर मंडप आहे, ज्या मंडपात भला मोठा नंदी आहे, भारतात जे अखंड शिळेतून तयार केलेले नंदी आहेत, व जे मी पाहिले आहेत त्यात सर्वात रेखीव असा हा नंदी आहे, तसेच हा भारतातील ४ अथवा पाचव्या क्रमांकाचा सर्वात उंच नंदी आहे. नंदीद्वारापासून प्रवेश केल्यावर समोर मंदिराचे प्रवेशद्वार व आता एक मंडप व त्याच्या समोर गाभारा आहे. मुख्य मंदिरात ५ फुटी उंच व जवळ जवळ ८-९ फुटी रुंदीचे शिवलिंग आहे ( आकार अंदाजे) वर मी लिहिल्याप्रमाणे हे जुळे मंदिर आहे, एकाबाजूला शिवलिंग व एका बाजूला मुर्ती असलेला गाभारा. असे दोन गाभारे आहेत. दोन्ही गाभार्‍या समोर नंदी आहे, व त्याच्या साठी पाषाण मंडप आहे, जुळे मंदिर हा शब्द देखील याच कारणामुळे वापरला जातो.

हे मंदिराचे पुरावे व शिलालेख सापडले आहेत, त्यात एका भल्यामोठ्या सुर्यनारायणाच्या मुर्तीचा उल्लेख येतो, ज्यात सुर्य नारायण त्यांच्या सात अश्व जोडलेल्या रथातून येत आहेत असे रेखाटले होते, पण ती मुर्ती हरवलेली आहे, त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. ही पश्चिम मुख मूर्ती नंदी मूर्तीच्या बरोबर मागे म्हणजे पूर्वेकडे स्थापन केलेली होती आतील मंडपातील प्रत्येक खांब वेगवेगळ्या कथा सांगतो, जसे नरसिंह कथा, महाभारत कथा. छतावर अत्यंत रेखीव सुबक असे नक्षी काम केले आहे. भिंतीवर कन्नड/तामिळ मध्ये शिलालेख कोरलेले आहेत, वर लिहिल्याप्रमाणे एका गाभार्‍यात शिवलिंग आहे व दुसर्‍या गाभार्‍यात मुर्ती.

क्रमशः

आता अगदी थोडक्यात लिहिते. http://www.misalpav.com/node/17609 या आमच्या लेखात जो चक्रव्युह नाव दिलेला आकार आहे, त्या शिल्पाकृतींचा काळ साधारण नव अश्म युग असा निश्चित केला गेला आहे. म्हणजे आजपासून किमान ७ ते १२ हजार वर्षांपूर्वी कधीतरी. तिथल्या इतर आकृत्या या अगदी प्राथमिक स्वरुपातल्या शिकारी, प्राणी इ च्या आहेत. महाभारताचा काळ हा खूपच सुसंस्कृत लोकांचा झाला. या शिल्पांमधे अशा प्रगत संस्कृतीच्या कोणत्याही खुणा नाहीत. हा विशिष्ट आकार अन्यत्र खूप ठिकाणी सापडला आहे. लेबिरिंथ बद्दल मी तुम्हाला सांगावं असं काही नाही! पण आईच्या गर्भातील बाळ किंवा असा काही संदर्भ इतिहासपूर्व काळापासून या आकाराला लावला गेला असावा.

महाभारताचा काळ हा साधारण ५००० वर्षांपूर्वीचा असा आतापर्यंतचा समज होता. अर्थात या दोन्हीच्या काळाबद्दल नवीन संशोधन होतं तसे बदल होत आहेतच पण इतक्या प्राथमिक स्वरूपातील प्रस्तर शिल्पे, आकृत्या माहाभारत काळापूर्वीची आहेत यात काही संशय नाही. आपल्याकडे अनेक ठिकाणच्या शिल्पांना, देवळांना पांडवांनी तयार केली अशा कथा लोकांनी चिकटवल्या आहेत. तसाच प्रकार होऊन या आकृतीला चक्रव्युहाचे नाव दिले गेले असावे किंवा या आकृतीचा उपयोग करून नंतरच्या काळात चक्रव्युहाची कल्पना उदयाला आली असावी.

मी जिथवर इतिहास वाचलाय त्यावरून सांगतो, राष्ट्रकूट, चालुक्य, त्यांच्याच भावकीतले सोळंकी हे आपल्याला वाटतात त्या अर्थाने "शक्तीशाली","साम्राज्ये" वगैरे नव्हती. तुम्हाला जो एकछत्री अंमल अपेक्षित आहे तो मौर्य व गुप्त ह्यांच्या काळात होता. अगदि हर्षवर्धनाच्या काळातही "बलाढ्य केंद्र"सत्ता अशी नव्हती. दक्षिण भारतातही नाही अन् उत्तर भारतात तर अजिबातच नाही.(तिक्डे प्रामुख्याने काही चांद्रवंशीय व सूर्यवंशीय त्यातही राजपूत घराण्यांची असंख्य राज्यांची greater rajputanaची कल्पना होती.)
It was like a loose confederate.The same way it existed in mid to late 18th century of Maratha confederate.
राज्यांचा संघ्,मांडलिक राजे,स्थानिक वतनदार अशी ती शृंखला होती.

आता हे वरच काहीच समजलं नाही अस्सं म्हणत असाल तर वेगळ्या शब्दात लिहितोय.
चंद्रगुप्त मौर्यानं सत्तेवर आल्याआल्या काय केलं? मुळात नंद राजघराण्यानं आधीच सोळा महाजनपदांपैकी* काही घराणी घशात घालून मोठे "मगध राज्य" बनवले होते. त्यांनी आधीच्या राज्यक्र्त्यांचा समूळ बिमोड केला. आधीच्या राज्यक्र्त्यांचा वंश संपवला किंवा परागंदा व्हायला भाग पाडले.(मग ते पुढे दूरच्या भाअगात जाउन शेती-वाडी, व्यापार-उदीम अशी सामान्य जनांसारखीच कामे करत.) हे नंदांचं राज्य त्यानं takeover केलं.
नंतर आसपासची गणराज्ये(घराणेविहीन) काही जिंकून व काही तहाने जोडली. इतर "राजां"ची राज्ये जिंकली, राजांना बंदी बनवले किम्वा मारून टाकले किंवा सत्ताभ्रष्ट तरी केलेच केले.(विशेषतः घुसलेल्या ग्रीक क्षत्रपांना)
म्हणजे, आजच्या बिहार पासून ते उत्तरेला पेशावर्,मुल्तान पर्यंत एकच राज्घराणे शिल्लक राहिले :- मौर्य.
सगली सत्ता केंद्राच्या,मगधाच्या हातात. ह्यांच्याअशी स्पर्धक होइल असे सर्वच दूर झालेले,संपलेले.

अगदि तद्वतच तुघलक-खिल्जी-काफूर ह्यांनी केले.जिथे जिथे जिंकले, तिथले राजवंश तत्काळ किम्वा काही कालाने थेट संपवलेच. ती घराणी पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी सत्तेवर आलीच नाहित.(उदा:- दिल्लीहून व अजमेरहून चौहान घराणे संपले ११९१ला, ते कायमचेच. १२९१ला देवगिरीचे यादव संपले, ते कायमचेच. शिल्लक राहिलेल्या यादव कुळाला देवगिरी सोडून जावे लागले, साम्राज्य तर बुडालेच.)

"अस्सय होय. मग असच चालुक्य भरभराटॅएच्या काळात असताना होय्सळ कसे असतील? ह्यांच्यापैकी एकाने दुसर्‍याअला संपवले असेलच ना" हा विचार सहज डोक्यात येतो. पण तसे नाही.
गुप्त काळानंतर, म्हणजे चौथ्या पाचव्या शतकानंतर भारतात एक्संध असे कुठलेच राज्य नव्हते. हे भारताचे शाब्दिक चित्र मी देतोय ते पहा.
आजच्या बांग्लादेश व बंगालात गौड घराण्याची सत्ता होती. पश्चिम बंगालमधील पश्चिम भागातून निघालेल्या वर्धन घराण्याची सत्ता बर्‍अयच मध्यभारतावर्(महाराष्टृआपर्यंतही) ,पूर्व भारतावर(ओरिसा वगैरे) होती.
पैठण हे राजधानीचे ठिकाण होते. दक्षिणेला आख्खा आंध्र व बराचसा कर्नाटक्,महाराष्ट्र ह्यांच्या ताब्यत होता.पश्चिमेला हे गुजरातच्या काही भागापर्यंत होते.(कोकण व नाणे घाट तर त्यात आलेच) . त्यानंतर केरळ व तामिअळ्नाडू मधे अशी अनेक घराणी होती, त्यातली प्रमुख चार पांड्य,चोळ,चेरा आणि पल्लव.

मग एकाच वेळी इतकी सगळी घराणी कशी?
कारण त्यांच्या सीमा कधीच स्थिर नसत. सतत आपसात युद्धे व चकमकी चालत. मात्र कुणीही जिंकले तरी समोरच्या घराण्याचा समूळ विनाश कधीच होत नसे.फक्त तह होइ. काही खंडाणी व मुलूख द्यावा लागे व विजेत्याचे मांडलिक बनून रहावे लागे. म्हणजे हरल्यानंतरही तुम्ही "राजा" ही पदवी लावू शकता. "महाराजाधिराज" ही पदवी विजेता लावणार. एक उदाहरण समजा :- पाड्यांनी चोळांचा पराभव केला. तर चोळ संपले का? तर नाही.
चोळांनी फक्त आपल्या खजिन्यातला काही हिस्सा पांड्यांना द्यायचा आणि पांडयंना म्हणत रहायचे "तुम्ही राजे,राजधिराजे" बाकी त्यांच्या स्वतःच्या महसूलात्, जीवनशैलीत व एकूणच राज्यकारभारात काहीही ढवळाढवळ होनार नाही. अगदि "जैसे थे" तशीच स्थिती राहिल!! मग होतं काय की ह्या मांडलिक चोळ राजांपैकीच कुणीतरी एक पराक्रमी राजा निघतो २-३ शतकांनंतर व मग तो आपले मालक पांड्याम्ना हरवून आपली स्वामित्व सिद्ध करतो.
मग आधीच्या मालकांना, पांड्यांना तो समूळ संपवतो का? तर अजिबात नाही.तोही आधीसारखेच त्याम्ना मांडलिक बनवून सोडून देतो. पुन्हा अजून दीड्-दोन शतकात चाके पुन्हा उलटी होतात व पुन्हा पांड्य मालक!
तर स्थिती अशी होती.
म्हणजे मांडलिक राजा असला तरी त्याच्या राजय्चा तो भरभराटीचा काळ असू शकतो(कला-स्थापत्त्य वगैरे किंवा एकूणच administration. भलेही सैनिकी सामर्थ्य फार नसेल.)
सांगायचे म्हणजे, होयसळ हे त्याकालात चालुक्य किंवा राष्ट्रकूट ह्याम्चे मांडलिक असले, तरी त्यांची राजधानी हळेबीडच होती. तिला कुणी मुलापासून नष्ट्-भ्रष्ट करत नसे. युद्ध म्हणजे तात्कालिक आर्थिक हानी.बस्स. एकदा हे ध्यानात घेतलं की मग स्वाभाविक लक्षात येतं की त्या चालुक्य्-अधिपत्याच्या काळातच मंदिराची बांधणी होत रहाणे शक्य आहे. चालुक्यांचे अंकित असतानाच त्यांनी इतर राजांचा पराबह्व करत स्वतःचा विस्तार केला असणे शक्य आहे.
आपण शालेय इतिहासात त्यामुळेच वाचले असेल "राष्ट्रकूटांनी चालुक्यांचा पराभव केला आणि चालुक्यांना उतरती कळा लागली" आणि २-३ शतकानी ह्याच्याच उलट "चालुक्यांनी राष्ट्रकूटांचा पराभव केला आणि राष्ट्रकूटांना उतरती कळा लागली" म्हणजेच, इतकी युद्धे होउन संपले कुणीच नाही. एकाच वेळी दोघेही कार्यरत राहू शकतात.

ह्याचे समांतर उदाहरण म्हणजे कित्येक राजपूत घराणी (मेवाड सोडून) असे मानतात की १५२७ ते ब्रिटिशकालादरम्यानचा काळ (मुघलांनी अंकित केलेला) हा त्यांचा वैभवशाली काळ होता!!!
उत्तमोत्तम स्थापत्यरचाना(खजानाबावडी वगरे सरख्या सुंदर विहीरी), भव्य -देखणे महाल हे राजपुतांनी मुघलांचे अंकित असतानाच बांधलेत.

अजून एक मुद्द काल निश्चितीचा व घराणी जे दावे करतात त्यांच्या सत्यतेचा येतो. बर्‍याचदा पुलकेशी व हर्षवर्धन किंवा हर्षवर्धन व बंगालचा गौडाधीप शशांक एकाच इलाख्यावर आपली सत्ता आहे असे साम्गतात्,दाखवतात!

तुम्ही म्हणता ते सत्य धरूनही सांगायचे म्हणजे धागाकर्ते सांगतात तो काळ बरोबर असण्याची भारपूर शक्यता आहे.

*सोळा महाजनपदे म्हणजे श्रावस्ती,कुशावती, कोसल्,वृज्जी,शाक्य,उज्जैन,काशी इत्यादी.

 
 

मागील भागात आपण होयसाळ / होयसाल साम्राजाची राजधानी द्वारसमुद्र (हैलेबिडु) बद्दल माहिती व छायाचित्रे पाहिली आता त्रिकोणातील २रा कोन. बेल्लुर.


मंदिराचे प्रवेशद्वार

द्वारसमुद्र पासून १२-१३ किलोमीटर बेल्लुर वसलेले आहे, एकेकाळी ही जुळी शहरे संपन्न व पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून समजली जात. राजाचा वरदहस्त व राजकोष मुक्त हस्ताने वितरीत करण्याची उदारता यामुळे अनेक कलांचा प्रसार होयसाळ साम्राज्यात झाला. अत्यंत भरभराटीच्या काळात बेल्लुर व द्वारसमुद्र मध्ये शेकडो मंदिरांची उभारणी केली गेली, शिल्पकलेला राजमान्यता होतीच पण त्याच्या सौंदर्यामुळे जनमान्यता देखील लवकरच मिळत गेली.


अर्जून

आताच्या काळात मुख्य मंदिरे व वस्तूसंग्रहातील अनेक शिलालेख, मुर्ती व त्या काळातील संपन्नतेचे पुरावे सोडले तर बेल्लुर / द्वारसमुद्र फक्त एका साम्राज्याच्या काही अंश शिल्लक राहिले आहेत. भारतीय पुरातत्व विभागाने प्रचंड काम या दोन मंदिरावर केलेले आहे. एकेकाळी पुर्ण नष्ट व विद्रुप केलेली ही मंदिरे भारतीय पुरातत्व विभागाने जसेच्या तसे पुर्ण अभ्यास करून उभे केले व त्यामुळे आपल्याला होयसाळ साम्राज्याच्या काही खाणाखुणा स्वतःच्या डोळ्यानी पाहता येतात हे आपले भाग्य.

मुख्य मंदिर

बेल्लुर मंदिराची रचना दक्षीणेत प्रसिध्द असलेल्या शिल्प प्रकारात आहे म्हणजेच विमान प्रकारात. प्रशस्थ पटांगण, उत्तुंग असे प्रवेशद्वारावरील शिखर, मुख्य मंदिर व त्याला सलग्न अशी उजवी/डावी कडे तेवढीच भारदस्त मंदिरे. मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर नजरेत भरतात ते दोन स्तंभ. ३०-४० फुटी उचं व एका अखंड शिळेतून निर्माण केलेले हे स्तंभ कुठल्याही आधारावीना उभे आहेत. ( आपल्याकडील मंदिरात जसे दगडी दिपमाळ दिसते तसेच दक्षीणे कडील मंदिरामध्ये असे स्तंभ दिसतात, याचे धार्मिक कारण माहिती नाही आहे, पण एखाद्या मोठ्या विजयाची आठवण रहावी म्हणून असे मोठ मोठे स्तंभ त्याकाळात उभे केले जात व त्यावर राजाने मिळवलेल्या विजयाची गाथा लिहली जात असे) मंदिराच्या दोन्ही बाजूला धर्मशाळा सदृष्य तात्पुरती राहण्याची सोय ( हा प्रकार याच काळात सर्वमान्य झालेला दिसतो आहे, कारण अश्या प्रकारची सोय द्वारसमुद्रला होती असे शिलालेखाच्या माहिती वरून समजते तशीच सोय, श्रवणबेलगोळ, हंप्पी व दक्षिणेतील अनेक मंदिरात दिसते तसेच आपल्या जवळच्या महालक्ष्मी मंदिरात देखील त्या प्रकारची सोय होती पण कालांतराने त्या तात्पुरत्या निवार्‍याचे छोट्या छोट्या मंदिरात रुपांतर बडव्यांनी केले.)


स्तंभ


तात्पुरते निवास्थान

बेल्लुरची मंदिरे देखील द्वारसमुद्रामधील मंदिरासारखी शिल्पकलेचा खजीना आपल्या अंगावर घेऊन उभे आहेत. चन्नकेशवाचे (कृष्ण) मुख्य मंदिर व डाव्या बाजूला असलेले मंदिर बंद आहे तर उजव्या बाजूचे रंगनायकी मंदिर. गोलाकार व लेअर पध्दतीचे नक्षीकाम असलेले स्तंभ, प्रशस्थ असा पाषाण मंडप, त्यानंतर विषेश कक्ष व मग गाभारा अशी संरचना असलेली ही तिन्ही मंदिरे आतून व बाहेरून अत्यंत रेखीव व सुरेख अश्या शिल्पांनी मढवलेली आहेत. जगप्रसिध्द आरश्यात आपले रूप निहारणारी नर्तिका हे शिल्प देखील येथेच आहे तसेच गरूडेश्वराची पुर्णाकृती मुर्ती देखील येथील वैशिष्ट आहे. मंदिर परिसरामध्ये जलकुंड व ४ विहीरी आहेत त्यापैकी जलकुंड उपयोगी राहिलेले नाही आहेत तर चार पैकी २ विहीरी अजून ही वापरत येतात, देवाच्या अभिषेकाच्या वेळी तेथीलच पाणी वापरले जाते.


चबुतरा / मंडप ???


स्तंभ


मंदिराचे बाह्य स्वरूप

मंदिराच्या पटांगणामध्येच पुष्करणी पध्दतीने येथे एक उत्तर दिशेला थोडे छोटे असे कल्याणी नावाचे कुंड / चौकोण विहीर / तळे आहे. ११७५ मध्ये याचे निर्माण केले गेले, उत्तर व दक्षिण दिशेला असलेली दोन प्रवेशद्वारे आहेत व प्रवेशद्वार दोन्ही हत्तीचे सुरेख शिल्प व तेथून पुढे मध्यभागी निमुळती होत जाणार्‍या चौकोणी पायर्‍या अशी रचना आहे. वरून पाहताना या तळ्याची वैशिष्टपुर्ण बांधणी लक्ष्यात येते. काही शतकापुर्वी बेल्लुर हे धार्मिक स्थळ म्हणून पुन्हा प्रसिद्ध होऊ लागले होते व तेथे रथयात्रा व इतर धार्मिक उत्सव याचे प्रस्थ वाढले होते तीच पध्दत अजून ही सुरू आहे त्यामुळे आहोरात्र येथे भाविकांचे येणे जाणे सुरू असते त्यातूनच अस्वच्छता निर्माण होऊ लागली व एकेकाळी आपल्या गोड व रुचकर अश्या पाण्यासाठी प्रसिध्द असलेली कल्याणी शेवटी लोकांसाठी बंद करण्यात आली आता फक्त बाहेरून दर्शन घेता येते, कधी एकेकाळी निळसर असलेले वाहते पाणी आता हिरवेगार पडलेले आहे.


कल्याणी जलकुंड


जलकुंड


गरुडदेव

ज्या दिवशी आम्ही बेल्लुरला गेलो तो दिवस तेथील धार्मिक जत्रेचा होता व रथयात्रेची सुरवात होण्याच्या वेळीच तेथे पोहचल्यामुळे हजारो लोकांच्या गर्दीने आमचे स्वागत केले व गर्दीमध्ये मनसोक्तपणे फिरता येत नाही व हवे ते पाहता येत नाही. त्यामुळे बेल्लुरचा प्रवास लवकर संपवून आम्ही आमच्या प्रवासातील तिसरे टोक म्हणजेच श्रवणबेलगोळ च्या दिशेने वाटचाल चालू केली.

क्रमशः

 

मागील भागात आपण बेल्लुर पाहिले. आता म्हैसूरपासून ९०-९५ कि.मी. दूर असलेल्या विंध्यगिरी पर्वतावर जैनधर्मियांचे मोठे तिर्थक्षेत्र आहे श्रावणबेळगोळ. मराठी माणसाला श्रावणबेळगोळ व तेथील गोमटेश्वराची मुर्ती माहिती असण्याचे कारण म्हणजे त्या मुर्तीच्या पायथ्यावर मराठीमध्ये केलेले शिलालेखन. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांना ही माहिती सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचा मान जातो.

श्रावणबेळगोळचा ज्ञात इतिहास हा शकवर्ष 8०० ते ११०० च्या कालावधीतील आहे. गंग राजे राचमल्ल (४ थे) यांच्या कालावधीत शक्यतो शकवर्ष ९५० च्या पुढे-मागे या गोमटेश्वराच्या मुर्तीचे निर्माण केले गेले. ही मुर्ती ५७ फूट उंचीची आहे व ती एका अखंड पाषाणातून बनवली गेलेली आहे. श्री चामुंडराय हे गंग राजे राचमल्ल (४) यांचे सेनापती होते, त्यांनी या मुर्तीची स्थापना केली होती. गोम्मटराय हे श्रीचामुंडराय यांचेच नाव म्हणून या मुर्तीला गोमटेश्वर असे नाव पडले. मुळ मुर्ती ही बाहुबली यांची आहे ( बाहुबली = सम्राट भरतचा लहान भाऊ).

मुर्ती एवढी उंच असल्या कारणाने या मंदिराला फक्त तटबंदी आहे, छत नाही. तटबंदीच्या दोन्ही बाजूला सभापंडप, मुनींच्या राहण्याची व्यवस्था आहे. या पुर्ण विंध्यगिरी पर्वतावर अनेक शिलालेख आहे, व त्या शिलालेखांची पुर्णपणे नीट काळजी घेतली जात आहे.

सिध्दर बस्ती
मुख्यमुर्ती स्थानाच्या बाहेर असलेल्या सर्व पाषाणातून निर्माण केलेल्या गृहांना/ मंडपांना सिध्दर बस्ती असे म्हटले जाते. ज्याचे निर्माण शकवर्ष १७००-१८०० मध्ये केले गेले. या सर्वभागात अनेक शिलालेख असून त्यावर मंदिरासंबधी माहिती, निर्माते व दानासंबधी उल्लेख केलेला आहे.

गुल्लेकायी - अज्जी मंडप
पांच गोलाकार स्तंभ, एक शिलालेख व एका अज्जीची साडी नेसलेली मुर्ती. असलेला हा मंडप अनेक दंतकथेमुळे प्रसिध्द आहे, चामुंडराय यांचा घमंड तोडण्यासाठी देवी पद्मावती तेथे अज्जीच्या रूपात गेली होती ही सर्वात प्रसिध्द दंतकथा आहे. हा मंडप शकवर्ष १४०० च्या काळत उभारलेला असून याचे स्तंभ मात्र शकवर्ष १२०० च्या काळातील आहेत.

विंध्यगिरी पर्वतावर त्रिकुट बस्ती (ओदेगल बस्ती) म्हणून एकमात्र त्रिमंदिर आहे. पुर्वीच्याकाळी तळघर बांधण्यासाठी कणाश्म शिला नावाच्या दगडाचा विषेशतः वापर केला जात असे त्याच दगडातून हे मंदिर उभारले गेले आहे. शकवर्ष १४०० च्या काळत उभारलेले हे गोलाकार स्तंभ असलेले मंदिर बाहेरून जरी साधे वाटले तरी विषेश दगडांच्या वापरामुळे व याच्या अतंर्गत रचनेमुळे विशिष्ठ ठरते. आता तीन गर्भगृह असून प्रत्येक गर्भगृहात स्तरितशिला (संगमरवर) चा वापरून करून अत्यंत सुरेख व रेखीव अश्या तीर्थंकरांच्या मुर्त्या आहेत.

त्यागदं स्तंभ
कलात्मक सौंदर्याचे अनुपम उदाहरण असलेला त्यागदं स्तंभाचे ऐतिहासिक दृष्ट्यादेखील अनन्य साधारण महत्त्व आहे. एक छोटा मंडप व त्यामध्ये मध्यभागी हा स्तंभ आहे. याचे निर्माण शकवर्ष ९५०-१००० मध्ये केले गेले असून या वापर श्री चामुंडराय दान-धर्म करण्यासाठी करत (तेथे उभे राहून दे डोळे बंद करून दान देत असत). व शेवटी शेवटी त्यांनी आपल्या सर्व संपत्तीचे दान येथे उभे राहूनच केले व सन्यास घेतला. स्तंभावर लतावेली यांचे सुरेख रेखाटन केले असून पुर्ण स्तंभ रेखीव आहे.

विंध्यगिरी पर्वतावरून दिसणारा सुर्यास्त.

 अगुंबे : दक्षिण भारताची ‘चेरापुंजी’

By सकाळ वृत्तसेवा

-संजय उपाध्ये

भारतात सर्वांत जास्त पाऊस मेघालय राज्यातील चेरापुंजी येथे पडतो. त्यानंतर देशात आणखी एक ठिकाण आहे, की जेथे चेरापुंजीच्या तोडीस तोड असा झिम्माड पाऊस कोसळतो. कर्नाटकाच्या शिमोगा जिल्ह्यातील अगुंबे (ता. तीर्थहळ्ळी) येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या पावसाची नोंद झाली आहे. येथे वर्षभरात सुमारे ८,००० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. कर्नाटकात पश्‍चिम घाटाचा (सह्याद्री पर्वतरांग) मोठा भाग येतो. बेळगाव, कारवार, धारवाड, उडुपी, शिमोगा, चिक्कमंगळूर, हासन, कोडगू या जिल्ह्यांतील काही भाग पश्‍चिम घाटात मोडतो. त्यापैकी ‘मलनाड’ भागात दरवर्षी मोठा पाऊस होतो. मलनाड (कन्नडमध्ये ‘पावसाचा प्रदेश’) भागातील घनदाट जंगलात डोंगररांगांवर चिमुकले अगुंबे गाव वसले आहे. अगुंबे गाव अत्यधिक पावसामुळे ‘दक्षिण भारताचे चेरापुंजी’, ‘कर्नाटकाची वर्षा राजधानी’, ‘कर्नाटकातील सर्वांत ओले ठिकाण’ अशा विशेषणांनीही ओळखले जाते.

महिन्यात साडेचार हजार मिलीमीटर पाऊस!

अगुंबे पश्‍चिम घाटाच्या पर्वतरांगेतील एक छोटे गाव आहे. शहरीकरणापासून गाव लांब असल्याने तेथे मर्यादितच सुविधा आहेत. अगुंबेची लोकसंख्या अवघी ५०० आहे तर गावाचे क्षेत्र केवळ तीन चौरस किलोमीटर आहे. समुद्रसपाटीपासून गाव ८२३ मीटर उंचीवर आहे. अगुंबे गावात फेब्रुवारीतही पाऊस पडल्याची नोंद आहे. सर्वांत कमी पावसाचा महिना फेब्रुवारी आहे तर सर्वांत जास्त पाऊस जुलैमध्ये होतो. जुलैमध्ये एका महिन्यात सरासरी २,६४७ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. तर वार्षिक सरासरी ७,६२० मिलीमीटर (३०० इंच) इतका पाऊस पडतोच. तर आतापर्यंत एका महिन्यात सरासरी ४,५०८ मिमी (१७७.५ इंच) इतका पाऊस झाल्याची ऑगस्ट १९४६ ची नोंद आहे. त्यातूनच येथे भारतातील पहिली स्वयंचलित वेधशाळा (ऑटोमॅटिक वेदर स्टेशन) उभारण्याचे श्रेय पर्यावरणप्रेमी रॉमलस व्हिटकर यांना जाते. हरित वर्षावन भागात अगुंबे वसले आहे. तसेच विषुववृत्तीय वातावरण, उष्ण आणि आर्द्रता असे हवामानही येथे असते. त्यामुळे घनदाट चंदेरी धुके नेहमी अगुंबेच्या परिसरात पाहायला मिळते. येथील अगुंबे घाटही प्रसिद्ध आहे. या घाटातही मॉन्सूनच्या काळात धुवाँधार पाऊस कोसळत असतो.

जागतिक वारसास्थळाचा मान

पश्‍चिम घाटाचा भाग असल्यामुळे अगुंबेला साहजिकच जागतिक वारसास्थळाचा सन्मान प्राप्त झाला आहे. अगुंबेच्या जवळच सोमेश्‍वर अभयारण्य तर कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान आहे. अगुंबेइतकाच झिम्माड पाऊस कर्नाटकात आणखी काही ठिकाणी पडतो. पश्‍चिम घाटातील अगुंबेजवळील हुलिकल्ल (जि. शिमोगा), आमगाव (जि. बेळगाव), तळकावेरी (जि. कोडगू), कोकळ्ळी, कॅसलरॉक, नीलकुंड (तीनही जि. कारवार) येथील पावसाची सरासरीही अगुंबेशी स्पर्धा करते. यापैकी बेळगाव जिल्ह्यातील आमगाव येथे २०१० ला तब्बल १०,०६८ मिलीमीटर इतक्या प्रचंड पावसाची नोंद झाली आहे आणि ही नोंद कर्नाटकाच्या आजवरच्या पावसाचा उच्चांक आहे. मंगळूरपासून ९८ किलोमीटर अंतरावर अगुंबे आहे, तर बंगळूरहून ३५७ किलोमीटर अंतर आहे. किनारपट्टीवरील उडुपी येथे जवळील रेल्वेस्थानक आहे. तर जवळील विमानतळ हे बाजपे (मंगळूर) येथे आहे. रस्ते, विमान आणि रेल्वेने अगुंबे जगाच्या इतर भागाशी जोडले गेले आहे. त्यामुळेच येथे पर्यटकांचा वर्षभर राबता असतो. त्यातूनही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे महिने अतिशय आल्हाददायक असतात. हिरवा निसर्ग, खळाळते नाले, धबधबे आणि रम्य हवामान यामुळे मन उल्हसित होऊन जाते.

पाऊस वाढतच चाललाय!

पश्‍चिम घाटातील मॉन्सून पावसाचे प्रमाण अनेक वर्षे जवळपास स्थिर होते; पण गेल्या काही वर्षांत तेथे पाऊस पडण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. गोल्बल वॉर्मिंग किंवा हरित वायूचा परिणाम येथेही दिसून येऊ लागला आहे. त्याचा फार मोठा परिणाम होत आहे, असे गेल्या तीन-चार वर्षांतील आकडेवारी सांगते. २०१६ मध्ये ६,१५१ मिलीमीटर पाऊस अगुंबे येथे झाला. २०१७ ला ६,२७६ मिलीमीटर तर २०१८ ला तब्बल ८,२०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वर्षाची सरासरी आता ७,६२४ मिलीमीटर इतकी झाली आहे. पण पावसाची वार्षिक सरासरी काढताना तब्बल ५० वर्षांतील पावसाच्या नोंदी घेतल्या जातात. त्यावरून लक्षात येते, की अगुंबे आणि कर्नाटकाच्या पश्‍चिम घाट प्रदेशातील पावसाचे प्रमाण वर्षागणिक वाढतच चालले आहे. त्यामुळे पूर, भूस्खलन, झाडांच्या मुळाखालील जमीन निघून जाणे, जंगलप्रदेश कमी होणे असे धोके दिसून येत आहेत.

धबधबे, सूर्यास्त, ट्रेकिंग

अगुंबेतील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. शेतकरी भात आणि सुपारी ही पिके घेतात. सगळा जंगलप्रदेश असल्यामुळे शेती यथातथाच असते. त्यामुळे तेथील शेतकरी गरीबच आहे. रक्षा कवच व्हिवर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीने तेथील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कुटिरोद्योग सुरू केले आहेत. अगुंबेच्या परिसरात कुंडद्री, कोडचाद्री हिल्स, उडुपी, कारकळ, कोळ्ळुरु, श्रींगेरी, चिक्कमंगळूर, शिमोगा, भद्रावती, एन. आर. पुरा, होसनगर आणि तीर्थहळ्ळी ही पर्यटनस्थळे आहेत. याबरोबरच बरकाना, ओनके, जोगीगुंडी, कुडलूतीर्थ, सिरीमने हे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. सूर्यास्त पाहण्यासाठीही अगुंबे प्रसिद्ध आहे.

दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका पॉईंटवरून अरबी समुद्रात बुडणाऱ्या सूर्याचे अतिसुंदर दृश्‍य दिसते. खास हा सूर्यास्त पाहण्यासाठीच पर्यटक येथे येत असतात. अगुंबेची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. वर्षाजल संग्रह, औषधी वनस्पतींचे दस्तावेजीकरण, पर्यटन (ट्रेकिंग आणि फोटोग्राफी) तसेच कुटिरोद्योगासाठीही अगुंबे प्रसिद्ध आहे.

किंग कोब्राचे आश्रयस्थान

अगुंबे रेनफॉरेस्ट रिसर्च स्टेशनही येथे आहे. त्याशिवाय देशातील एकमेव असे नागराज अभयारण्यही (किंग कोब्रा सँक्चरी) येथे आहे. पश्‍चिम घाटातील पाऊस, हवामान, आर्द्रता आणि इतर पोषक वातावरण असल्याने नागराजाचे हे आश्रयस्थान बनले आहे. नागराजाचे अस्तित्व असल्यामुळे जंगल सशक्त आहे. अन्नसाखळीत नागराज अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे येथील जंगलाला सुदृढता लाभली आहे. त्यामुळे भारताचे महान सर्पतज्ज्ञ होमलस व्हिटकर यांनी येथे किंग कोब्रा अभयारण्य बनविण्यासाठी अतिशय मेहनत घेतली आहे. १९७१ ला त्यांनीच पहिला किंग कोब्रा येथेच पकडला होता. त्यातूनच आपल्या संस्कृतीत अतिशय महत्त्वाचे स्थान मिळालेल्या नागसर्पाला सुरक्षा मिळावी, त्याचे संवर्धन व्हावे तसेच त्याचा अभ्यासही होत राहावा, यासाठी या अभयारण्याचा उद्देश आहे.

पर्यावरणप्रेमी आणि सर्पतज्ज्ञ गौरीशंकर यांच्यासारखे इतर अनेक नागरिक येथील अभयारण्याशी संलग्न आहेत. गौरीशंकर यांनी आजपर्यंत नागरिकांच्या घरात घुसलेले तब्बल शंभरावर नागसर्प जवळच पण सुरक्षित ठिकाणी सोडले आहेत. तर दोनशेवर नागसर्पाची पिलेही सुरक्षित ठिकाणी पोचवली आहेत. नागसापांच्या या ठिकाणाला वाचविण्यासाठी वाहने शंभर मीटर दूरच थांबविली जातात. नागरिकही या ठिकाणाला जपतात. नागच नव्हे, तर येथे आढळणाऱ्या वानर, मोठी खार, पक्षी यांना इजा पोहचवत नाहीत. वारुळालाही धक्का लावत नाहीत. एकूणच तेथे नागसर्प, विविध पक्षी आणि माणूस यांचे सहजीवन पाहायला मिळते.

अगुंबेत गेल्या अकरा वर्षांत झालेल्या पावसाच्या नोंदी अशा : (सर्व आकडे मिलीमीटरमध्ये)

२०१०--६,९२९

२०११--७,९२१

२०१२--६,९३३

२०१३--८,७७०

२०१४--७,९१७

२०१५--५,५१८

२०१६--६,१५१

२०१७--६,२७६

२०१८--८,२०८

२०१९--७,६२०

२०२०--६,५८३

 https://www.esakal.com/premium-article/know-all-about-agumbe-high-altitude-village-karnataka-heavy-rainfall-ass97

 २ महिन्यापुर्वीच मैसूर - ऊटी ला जाउन आलो. तेव्हापसुन मनात होते की तिकडचे फोटु टाकावेत म्हणुन. पण मि पा वर इतकी उद्बोधक चर्चा चालु होती की उगा लोकांना डिस्टर्ब करावेसे वाटले नाही.

हा मैसूरचा प्रसिद्ध राजवाडा. ज्यानी राजस्थानमधले महाल पाहिले असतील त्यांना यात विशेष असे काही वाटणार नाही. पण राजवाडा छान जतन केलेला आहे. आणि इथली सर्वित्तम गोष्ट म्हणजे राजवाड्यातील तैलचित्रे. इतकी जिवंत तैलचित्रे मी आजवर इतर कोठेही पाहिलेली नाहीत. दुर्दैवाने आत कॅमेरा न्यायला बंदी आहे. त्यामुळे छायाचित्रण करता आले नाही. त्यामुळे राजवाड्याची फक्त बाहेरुनच छायाचित्रे काढुन समाधान मानावे लागले

वृंदावनचे पण फोटो टाकणार होतो पण का कोणास ठाऊक, २० वर्षांपुर्वी जे वृंदावन पाहिले होते ते हे नव्हेच असे वाटले. आता ती शान नाही उरली वृंदावनची. गणेशोत्सवात चिंचेच्या तालमीचे कारंजे पण त्याच तोडीचे असते. त्यामुळे असेल कदाचित पण काही विशेष नाही वाटले खरे.

वृंदावनने केलेली निराशा चक्क मैसूरचे प्राणिसंग्रहालय बघुन दुर झाली. आता झू बघुन खुष होण्याचे दिवस गेले खरे म्हणजे. माकड बघुन लहानपणी जे हसु यायचे ते पण येत नाही आता (मि पा ची कृपा. बरीच माकडे आहेत इथे. रोज आरसाही बघतो. त्याचाही परिणाम असेल कदाचित). पण मैसूर चा झू खरोखर अप्रतिम आहे. काही छायाचित्रे:

वरचा फोटो पुर्ण झूम लावुन काढलेला आहे. त्यामुळे क्लॅरिटी थोडी गंडली आहे.

वरच्या फोटोतला मिपाकर कोण हे ज्याचे त्याने ठरवावे ;)

लहानपणापसुन मैसूरचे सर्वात मोठे आकर्षण होते महिषासुराचा पुतळा. त्याचा हा पुतळा बघुन अंमळ थोडी निराशाच झाली. माझ्या कल्पनेतला हा पुतळा चांगला ५० -१०० फूट उंच आणि १०-१२ फूट रुंद होता. प्रत्यक्ष पुतळा बघुन पुतळ्याचा बोन्साय बघितल्यासारखा वाटला. माझ्या बरोबर असलेल्य मित्रांची पण थोड्याफार फरकाने अशीच निराशा झाली. तरी "तु अजुन थोडा जाड असला असतास तर असाच दिसला असतास" असे म्हणुन मित्राने त्यातल्या त्यात त्याचे मानसिक समाधान साधुन घेतलेच

हेच ते चामुंडा देवीचे सुप्रसिद्ध मंदीर

मैसूर मध्ये आमचे सर्वात जास्त निराशा केली मैसूर मसाला डोश्याने. मैसूर मसाला डोसा हवा असे म्हणालो की लोक आमच्याकडे फार विचित्र नजरेने पाहायचे. हा डोसा पुण्याच्या शेट्ट्यांनी चक्क मैसूरच्या नावावर खपवला आहे. शेवटी या डोश्यावर तडजोड केली. डोसा होता मात्र अप्रतिम

बाकी उटी भाग -२ मध्ये.

 http://www.misalpav.com/node/13973

मैसूर भ्रमंती नंतर आम्ही गाडी करुन उटीला जायला निघालो. मैसूर - उटी हा अवघा ३ - ३.५ तासाचा रस्ता. पण संपुर्ण रस्ताभर मंजील से बेहतर लगने लगे ये रास्ते असेच वाटत राहते. वास्तविक आम्ही गेलो होतो जुलै मध्ये. त्यावेळेस पुण्यात पाउस सुरु झाला होता. पण मैसूर ते उटी या रस्त्यात आम्हाला पावसाचे टिपुस सुद्धा नाही दिसले. पण एकंदर वातावरण खुपच सुंदर होते. निम्म्याहुन आधिक रस्ता बांदिपुर आणि मदुमलाई अभयारण्यातुन जातो. कर्नाटक बाजुचे अभयारण्य बांदिपुर म्हणुन ओळखले जाते तर मदुमलाई तामिळ्नाडुच्या बाजुचे. एरवी हे एकच अभयारण्य. सकाळच्या वेळी रस्ता पुर्ण धुक्याच्या दुलईत वेढला गेलेला होता. ऊटीचे थंडी काय असेल त्याचा प्रत्यय एकदा अभयारण्यात शिरल्यावर यायला लागला. थंड वार्‍याचे झोत अंगावर यायला लागले तसे अधुनमधुन आम्ही काचा बंद करुन गाडीतील वातानुकुलन यंत्रणा चालु करायला सुरुवात केली. AC चे वारे थोडे कमी थंड होते. नंतर मात्र आम्ही हा नतद्रष्टपणा पुर्ण बंद केला. आणि निसर्गाचा आनंद पुर्ण अनुभवला. मैसूर ऊटी साठी AC गाडी उगाच केली असे मात्र नंतर संपुर्ण प्रवासभर राहुन राहुन वाटत होते.

बांदिपुर - मदुमलई ची ही छोटीशी झलकः

अभयारण्यातील रस्त्याने जाताना प्राणी चिक्कार दिसतात. तसे मैसूर च्या प्राणिसंग्रहालयात बरेच प्राणी बघितले होते. पण प्राणिसंग्रहालयातल्या प्राण्यांना पारतंत्र्याची एक विषण्ण झालर असते. निसर्गाच्या सान्निध्यातल्या या प्राण्यांना पाहिल्यावर जास्त प्रसन्न वाटते. कदाचित हे मनाचे खेळ पण असतील. पण तसे वाटते खरे. कदाचित त्यामुळेच प्राणिसंग्रहालयातील हत्ती रोडावल्यासारखे वाटतात. मात्र अभयारण्यातील हत्ती, अगदी हत्तीपालन केंद्रातील सुद्धा जास्त तजेलदार वाटले. या अभयारण्यात गाडीतुन खाली उतरायला आणि छायाचित्रण करायला मनाई आहे. आणि पकडल्यावर जबर दंड देखील होतो. आम्हाला हे माहिती नसल्यामुळे आणि आम्हाला महिती नाही हे वनरक्षकांना महिती नसल्यामुळे आम्ही थोडे फोटो काढुन घेतलेच

अभयारण्याच्या या दर्शनाने उटीपेक्षा इथेच कुठेतरी रहावे असे वाटायला लागले होते. तरीही नेटाने ऊटीला गेलोच. आणि मदुमलाईत रहायला नाही मिळाले याचे वाईट वाटले तरी उटीला गेल्याचा पश्चाताप मात्र नाही झाला इतके उटीदेखील सुंदर आहे. उटीला स्थानिक भाषेत उटकमंड असेही नाव आहे. पण कुठेही गेलो तरी पर्यटकांना उटी असेच म्हणताना ऐकले. समुद्रसपाटीपासुन उटी अवघे ७५०० फूट उंचीवर आहे. म्हणजे महाबळेश्वर पेक्षा केवळ ३०००- ४००० फूट उंच. उंचीतील हा फरक अर्थातच हवेत जाणवतो. पुण्यात ज्या वेळेस घामाच्या धारा लागत होत्या आणि महाबळेश्वरात पण थंडी वगैरे वाजत नव्हती तिथे त्याचवेळेस ऊटीला मात्र गुलाबी थंडी पडली होती. (आमच्यासारख्या सडाफटींग माणसांना गुलाबी थंडी कसली म्हणा. नुसतेच इतर जोडप्यांकडे बघुन गुलाबी गुलाबी म्हणायचे :) )

आम्ही पहिल्यांदाच दोडाबेट्टाला गेलो. आधीच उटी उंचावर त्यात दोडाबेट्टा उटीतले उंच शिखर, किंबहुना दक्षिण भारतातले सर्वात उंच शिखर. समुद्रसपाटीपसुन तब्बल ८६४० फूट उंचीवर. इथे आजुबाजुला हरीणे, जंगली अस्वले, ससे, चित्ता, नीलगाय इत्यादी प्राणी आहेत. आम्हाला एकही दिसला नाही. :)

दोडाबेट्टाचा अर्थ काय ते माहिती नाही. पण धुक्याची दुलई हेच नाव त्याला सार्थ ठरेल. दोडाबेट्ट्याला १२ महिने धुके असते. प्रमाण ऋतुप्रमाणे कमीआधिक असते एव्हढेच. दोडाबेट्टा वरुन काढलेली काही छायाचित्रे:

दोडाबेट्टावरुन आम्ही बॉटेनिकल गार्डन गाठले. तब्बल २२ एकरांच्या परिसरात वसलेले हे उद्यान केवळ वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर पर्यटकांसाठीसुद्धा एक पर्वणी आहे. तिथल्या काही फुलांची ही छायाचित्रे:

उद्यानातील काही लॅण्डस्केप दृष्ये आणि दुर्मीळ वृक्षसंपदा:

उटीच्या रोज गार्डनच्यावर आधी पण एक धागा टाकला होता. तरीसुद्धा त्यातील काही खुप निवडक छायचित्रे इथे परत डकवण्याचा मोह आवरत नाही आहे. रोज गार्डन मध्ये २८०० पेक्षा जास्त जातींचे गुलाब आहेत आणि हे भारतातील अश्या प्रकारचे सर्वात मोठे उद्यान आहे:

वाटले होते त्यापेक्षा हा भाग जरा जास्तच मोठा झाला. त्यामुळे इच्छा असुनही उरलेले फोटो या भागात टाकत नाही आहे. आमच्या प्रवासाच अंतिम टप्पा होते कुन्नूर. शब्दातीत असे ज्या निसर्गाचे वर्णन करता येइल त्याची छायाचित्रे पुढच्या भागात टाकेन आता.

सुहाना सफर और ये मौसम हसी ............ हे गीत शैलेंद्रने उटी - कुन्नूर प्रवासात लिहिले असावे अशी मला दाट शंका आहे. का कोण जाणे पण कुन्नूर मध्ये हे गाणे सारखे गुणगुणावेसे वाटते.

ऊटीमध्ये २ दिवस फिरल्यावर कुन्नूरला जायचे ठरले. बराच उहापोह केल्यावर जाताना टॉय ट्रेनने जावे आणि येताना कारने यावे हा सर्वमान्य तोडगा निघाला.

हीच ती युनेस्को ने वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणुन घोषित केलेली उटी ते कुन्नूर धावणारी आगगाडी.

ही फुलराणी निलगिरीच्या रांगा चढताना समुद्रसपाटीपासुन ७७०० फूटांचे अंतर पण लीलया चढते आणि निलगिरीतल्या डोंगररांगांचे चढउतार पार करताना अशी काही दिलखेचक दृष्ये आपल्यासमोर सादर करते की त्याला केवळ नजरेच्या कॅमेर्‍यामधुन टिपुन केवळ मेंदुच्या मेमरी मध्येच साठवावे लागते. कुठलेही यंत्र ही दृष्ये परिणामकारकरीत्या टीपण्यास असमर्थ आहे. १९०८ साली गोर्‍या साहेबाने सुरु केलेल्या या फुलराणीला चालवण्यासाठी तामिळनाडु सरकारला दरवर्षी ४ कोटीचा तोटा होतो म्हणे. पण निलगिरीच्या डोंगररांगांतील अवर्णनीय निसर्गापुढे हा खर्च देखील फारसा काहीच नाही असे वाटत राहते. ट्रेनमधुन काढलेली ही काही छायाचित्रे. पण असे आवर्जुन नमूद करावे लागेल की कुठलाही कॅमेरा या प्रवासाला योग्य न्याय नाही देउ शकत. हा प्रवास डोळ्यातच साठवावा:

या प्रवासात काही क्षण असे येतात की तुम्हाला अक्षरशः विमानात बसल्यासारखे वाटते. दोन्ही बाजुला खोल खोल जाणारी दरी आणि जणु काही आकाशातुन जाणारी आगगाडी. हे क्षण आम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी पिऊन काढले. छायाचित्रे घ्यायचे देखील भान कोणाला उरले नाही. खालील छायाचित्र काढले तोपर्यंत तो सर्वोच्च उंचीचा पट्टा निघुन गेला होता:

टॉय ट्रेनची ही सफर साधारण तासाभरात संपते. त्यानंतर सुरु होते ती निसर्गाच्या सान्निध्यातील एक प्रदुषणमुक्त आठवण. ट्रेनमधुन उतरल्या उतरल्या घडलेले कुन्नूरचे हे पहिले दर्शनः

कुन्नूर हे अश्या काही निवडक पर्यटनस्थळांपैकी काही आहे की जिथे जाउन आल्यावर कोणी विचारले की काय काय पाहिले की तुम्ही आपसुक सांगाल की निसर्ग सोडुन काहीच नाही. इतर कुठल्याही पर्यटनस्थळासारखे इथेही "दाखवायला" काही पॉईंट्स तयार केले गेले आहेत. परंतु ते बघितले नाहीत तरी तसा फारसा काही फरक पडत नाही. निसर्गसौंदर्य तिथे ठायीठायी भरलेले आहे. त्यासाठी वेगळ्या पोईंट्सची गरजच नाही आहे मुळात.

ट्रेनमधुन उतरल्या उतरल्या धुक्याने वेढलेल्या कून्नूरचे जे दर्शन घडले होते तेच रूप मनात भरुन राहिले आहे. कुन्नूर हे धुक्याने वेढलेले आहे असे म्हणण्यापेक्षा ते धुक्याने ग्रासलेले आहे असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल इतके धुके आहे तिथे. हे काही पुरावे:

धुके, थंडी (परत गुलाबी - उटीसारखीच. किंबहुना थोडीशी जास्तच), नजर जाइल तिथे हिरव्या पाचुने नटलेल्या दर्‍या आणि चहाच्या बागा म्हणजे कुन्नूर. किंबहुना कुन्नूर म्हणजे एक मोठी चहाची बागच आहे असे म्हणता येइल. इथल्या गाईड्सना का कोण जाणे पण इथे मुमताजच्या (शहाजहानची नाही. अपराध मधली मुमताज किंवा गोरे रंग पे ना इतना गुमान कर फेम रोटीमधली) चहाच्या बागा आहेत याचे कोण मोठे अप्रुप आहे. कुन्नूरच्या चहाच्या बागांचे हे काही फोटो:

" alt=""

आम्ही कुन्नूरच्या एकुण वातावरणानेच इतके भारावुन गेलो होतो की विशेष काही वेगळे पोइंट्स बघण्यात आम्हाला फारसा रस नव्हता. उगाच इकडेतिकडे भटकण्यात आणि निसर्गाचा पुर्ण आस्वाद घेण्यात आम्हाला जास्त मजा वाटत होती. त्यात वर आमच्या ड्रायवर कम गाईडला आम्ही जेव्हा जेव्हा कुन्नूरला काय बघण्यासारखे आहे हे विचारले तेव्हा त्याने न चुकता आम्हाला "सुसाइड पॉईंट" असे उत्तर दिले होते. हे ऐकुन आम्ही एवढे वैतागलो होतो की शोले मधला "लेकीन ये अंग्रेज लोक सुसाट क्यो करते है" हा एक लाखमोलाचा प्रश्न आहे यावर माझा पुर्ण विश्वास बसला होता. शेवटी या सुसाईड पायी या मरगठ्यांनी आपला जीव घेउ नये असा सुज्ञ विचार करुन आमच्या ड्रायवरने आम्हाला डॉल्फिन नोज आणि लॅम्ब रॉक अशी विचित्र नावे असलेल्या आणि अपेक्षेप्रमाणे जिथुन डोल्फिन नोज किंवा मेढा असे काहीच दिसत नाही अश्या पॉइंटसवर नेले. आम्हीदेखील कुठलेच पोइंट्स न बघता परत आलो असे कोणाला सांगुन त्यांच्या कुत्सित नजरांना सामोरे जायला लागु नये म्हणुन निमुटपणे त्याच्या मागोमाग गेलो. इथुन जे नजारे दिसले ते इतर कुठल्याही हिल स्टेशनवर दिसतील असेच होते. पण तरीही नेटाने आम्ही काही छायाचित्रे काढलीच. फरक काय तो इतकाच की इथे कुठेही नजर टाकली तरीही चहाच्या बागा हमखास दिसतात

मी आधीच म्हटल्याप्रमाणे शैलेंद्रने सुहाना सफर इथेच लिहिले असणार. बघा "ये आसमा झुक रहा है जमीं पे" याचा प्रत्यय देखील इथे वारंवार येतो:

अश्या या अतिरम्य गावात असेच एक सुंदरसे टुमदार घर बांधुन कायमचे वास्तव्य करावे असे राहुन राहुन सारखे वाटते आहे.

कुन्नूर खुणावते आहे. पण इलाज नाही. पापी पेट का सवाल है. इथेच काम करावे लागणार. त्यामुळे आता थांबतो.

इति मैसूर - उटी - कुन्नूर पुराण संपुर्णम.



 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...