थोडक्यात माहिती -
सिझन (हिवाळा): डिसेंबर ते फेब्रुवारी. (१५ जानेवारी ते फेब्रुवारी अतिशय योग्य)
प्रेक्षणिय स्थळे - श्रीनगर , गुलमर्ग, सोनमर्ग, पहेलगाम.
आम्ही पाहिलेली स्थळे- श्रीनगर , गुलमर्ग, पहेलगाम
दिवस - ४ ते ५
श्रिनगर ला २ प्रकारे जाता येते.
१) दिल्ली - श्रीनगर - दिल्ली flight.
२) दिल्ली - जम्मू- श्रीनगर highway. बरेचदा अति बर्फवॄष्टीमूळे हा मार्ग हिवाळ्यात बंद असतो आणि गाड्या १०-१० दिवस अडकतात.
श्रिनगर चा विमानतळ वायू दलाच्या ताब्यात असल्यामूळे हा विमानतळ कधीच बंद नसतो.
प्रवासवर्णन -
आम्ही श्रिनगर ला जाण्यासाठी दिल्ली येथुन जानेवारी २४ ला सकाळच्या
विमानाने निघालो. आधिच थंडी, त्यात काश्मिर ला जाणार असल्याने वूलन
थर्मल्स, जॅकेट्स, स्वेटर्स, लेदर ग्लवज, कानटोप्या, लोकरी पायमोज्यांच्या २
जोड्या अशी सर्व तयारी केली होती.
जानेवारी २३: दिल्ली वरून सकाळचे विमान पकडून दूपारी १२:३० वाजता श्रीनगर च्या विमानतळावर उतरलो. बाहेर कडाक्याची थंडी होती. विमानतळावर हात धुवायला नळ सुरु केला आणि विजेचा झटका बसवा तसा झटका बसला. तापमान २-३ अंश सेल्सिअस होते. कार बूक केली होती म्हणून ड्रायव्हर घ्यायला आला होता. तिथुन श्रीनगर ला गेलो. लश्कराचे अस्तित्व पदोपदी जाणवत होते. श्रीनगर शहरात साधा:रणपणे प्रत्येक २० ते ३० फूटांवर एक जवान तैनात होता. शहराबाहेर तिच परिस्थिती १०० ते २०० फूट अशी होती. ह्या जवानांचा आपल्याला काहीही त्रास होत नाही. उलट ते आहेत म्हणून सुरक्षित वाटते. असो. off season असल्यामूळे ५०० ते १००० च्या दरम्यान छान हॉटेल मिळते. हॉटेल श्रीनगर मध्येच घ्यावे कारण की श्रीनगर हे गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहेलगाम यांच्या मध्यभागी पडते. आम्ही houseboat घेणार होतो. पण आमचा ड्रायव्हर म्हणाला की सर्व houseboat चे मालक दल सरोवराचे पाणी वापरायला देतात आणि सांडपाणी पुन्हा सरोवरामध्येच सोडुन देतात. Yuk. खरे खोटे देव जाणे. पण कशाला विषाची परीक्षा घ्या म्हणून आम्ही houseboat च्या फंदात नाही पडलो. बरीच हॉटेल्स पाहून एक छानसे हॉटेल घेतले. हॉटेल मध्ये प्रत्येक खोली मध्ये छान fireplace होती. प्रत्येक गादी मध्ये electric heater होता. नाहीतर त्या थंडी मध्ये गादी पण एव्हडी थंड असते की त्यावर झोपावेसे वाटत नाही. आधिच हाताला झटका बसला होता. आता कुठे कुठे बसायचा.... असो. सामान ठेवून आणि फ्रेश होउन दल सरोवर पहायला बाहेर पडलो. सरोवराजवळ तर आणखिनच थंड वाटत होते. एथे प्रत्येकाने आपल्या अंगात एक झगा घातला होता आणि त्या झग्यात "कांगडी" होती. कांगडी म्हणजे एक छोटे मडके असते. त्यात निखारा असतो आणि हे मडके एका वेताच्या टोपलीमध्ये ठेवलेले असते. चालता फिरता heater. पुढचे ४ दिवस आम्ही जिथे जाऊ तिथे आधी कांगडी शोधत होतो. असो. शिकारे घेउन दल सरोवर पहायला निघालो. दल सरोवर हे तीन बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. हिवाळा असल्यामूळे सर्व डोंगर बर्फाच्छादीत होते. दल सरोवराच्या मध्यभागी एक छोटिशी बागदेखिल आहे. दल सरोवरात चक्कर मारून दल सरोवरामधल्या बाजारात गेलो. हा बाजार पाण्यावर आहे. तरंगता नव्हे. तिथे थोडी फार शाली, over coats, jackets, dress material अशी खरेदि केली. दल सरोवर पाहुन झाल्यावर श्रीनगर च्या बाजारात गेलो. ईथे अक्रोड, आणि केशर फार छान मिळते. ते घेतले. तसा आमचा ग्रुप निर्व्यसनी पण तेवढाच रसिक. म्हणले काश्मिर ला आलो आहोत तर काश्मिर ची थंडी enjoy करावी म्हणून येताना वाईन घेतली. आमच्या एका हौशी मित्राने पुण्यावरून येताना बॅग मध्ये पॅक करून हुक्का आणि निरनिराळे flavors आणले होते. हॉटेल वर आल्यावर fireplace समोर बसुन वाईन, हुक्का व काश्मीरी कबाब यांचा आस्वाद घेतला. फार छान अनुभव होता. असा पहिला दिवस घालवला.
जानेवारी २४: आज गुलमर्ग ला जाण्याचा बेत ठरला. गुलमर्ग हे श्रीनगर पासून ३ ते ४ तासांवर आहे. मध्ये एका ठिकाणी थांबुन बर्फामध्ये जाण्यासाठि लागणारे gum boot आणि trenchcoat घेतले. गुलमर्ग ला जाता जाता snowfall सुरू झाला. सर्वजण आयुष्यात प्रथमच snowfall बघत होते त्यामूळे सर्वांना खूप आनंद झाला. गुलमर्ग ला पोहोचल्यावर तुम्ही sledge घेऊ शकता, skiing करू शकता किंवा तिथल्या cable car मधुन सैर करू शकता. सर्वांनी बर्फात भरपूर मजा केली. खाली छाती पर्यंत बर्फ आणि वरुन snowfall त्यामूळे वेगळाच आनंद वाटत होता. पण हाच snowfall हळू हळू वाढत गेला आणि थोडाफार भितीदायक वाटायला लागला. तोपर्यंत ३-४ तास झाले होते. सर्व जण खेळून आणि हुंदडून थकले होते. तोपर्यंत ड्रायवर चा पण फोन आला की snowfall जास्त होतो आहे, रस्ते बंद होण्याची शक्यता आहे तेव्हा आता निघा.सर्वजण आटोपुन परत श्रीनगर ला आलो.
जानेवारी २५: आज पहेलगाम चा बेत ठरला. पहेलगाम हे श्रिनगर पासुन ४ तासांवर आहे. तिथे पण भरपुर बर्फ होता पण हलकासा पाऊस ही होता. त्यामूळे एवढे फिरता नाही आले. तरी पण मजा आली. पहेलगाम च्या रस्त्यावर खुप cricket bat च्या factories आहेत. येताना तेथे थांबलो. आमच्या काही मित्रांनी bats खरेदी केल्या. तसेच ह्या रस्त्यावर केशराची शेते देखिल आहेत.
जानेवारी २६: आम्हि आज सोनमर्ग ला निघालो. पण २ तास प्रवास केल्यावर असे कळले की अति बर्फवॄष्टिमूळे सोनमर्ग चा रस्ता बंद झालेला आहे. आमचा mood off झाला. तेथून परत श्रिनगर ला आलो. आज २६ जानेवारी असल्यामूळे सर्वत्र कडकडित बंद होता म्हणून शहरातील सर्व दूकाने बंद होती. रस्त्यावर चिट पाखरू ही नव्हते. उध्या दूपारची परतीची flight असल्यामूळे आज शंकराचार्य मंदिर पहायचे ठरले. मंदिर दल सरोवरासमोरील डोंगरावर आहे. येथून श्रिनगर व दल सरोवराचा छान देखावा दिसतो. संध्याकाळी शालीमार बागेला भेट दिली. हिवाळा असल्यामूळे बागेत जास्त झाडे वा फूले नव्हती. बाग पाहून परत hotel वर आलो.
जानेवारी २७: आज सकाळी थोडा time pass केला. दल सरोवर जवळच असल्यामूळे परत एकदा जाऊन फोटोज काढले. परत hotel वर येऊन bags आवरुन दिल्ली ला प्रयाण केले.
---------------------------------------------------------------------------
प्रकाशचित्रे
दल सरोवर
दल सरोवर
दल सरोवर
दल सरोवर
दल सरोवर
दल सरोवर
दल सरोवर
दल सरोवर
दल सरोवर
दल सरोवर
दल सरोवर
दल सरोवर.
दल सरोवर.
दल सरोवरामधील बाजार
दल सरोवर. संध्याकाळी
दल सरोवर. संध्याकाळी
दल सरोवर. संध्याकाळी
दल सरोवर, श्रिनगर व श्रिनगर चा राजवाडा
---------------------------------------------------------------------
शालिमार बाग
शालिमार बाग. संध्याकाळी.
---------------------------------------------------------------------
शंकराचार्य मंदिर
---------------------------------------------------------------------
गुलमर्ग च्या वाटेवर...
गुलमर्ग च्या वाटेवर...
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
---------------------------------------------------------------------
पहेलगाम
पहेलगाम
चिनाराची गोठलेली पाने, पहेलगाम.
पहेलगाम
पहेलगाम
पहेलगाम
पहेलगाम
पहेलगाम
पहेलगाम
पहेलगाम
पहेलगाम
पहेलगाम
पहेलगाम
पहेलगाम
पहेलगाम
केशराचे शेत
केशराचे शेत
केशराचे शेत
एक गाव.
कांगडी... आमची तारणहार...
बॅट चा कारखाना, पहेलगाम
काश्मिरचा ग्रुप
दल लेक
ह्या सुट्टीत नेपाळ किंवा कुलू मनाली किंवा काश्मिर ह्या पैकी कुठे जायचे असे ठरता ठरता शेवटी काश्मिरवर शिक्कामोर्तब झाला. आम्ही तिन जोडपी आणि पिल्लावळ असे आम्ही नेहमीच जातो. माझी मुलगी पावणे दोन वर्षाची असल्याने तसेच इतरांनाही जास्त दगदग नको होती म्हणून सगळ्यांनीच वैष्णौदेवी-कतरा गाळण्याचे ठरवून त्या प्रमाणे आमचे पॅकेज इझी गो मध्ये बुक केले. ११ मे ते १७ मे असा हा सगलीचा कालावधी ठरवला गेला.
इथला मे-जून चा कडक उन्हाळा नकोसा होऊन काश्मिर सहलीची स्वप्ने मनाला शितलता देत होती. बर्फाचे डोंगर, बर्फात खेळणे, मस्त थंडी, झाडाला लागलेले सफरचंद, काश्मिरी ड्रेस अशा स्वप्नांचे तरंग वारंवार डोळ्यासमोर उमटून गारवा येत होता. काश्मिरला जायचे दिवस जवळ आले तसे नेण्यासाठी लागणार्या सामानाची जुळवा जुळव चालू झाली. सगळ्या ओळखीच्या लोकांकडून अनुभवी व बिनअनुभवी सल्ले येऊ लागले. कोणी म्हणे तिथे खुप थंडी असते तर कोणी म्हणे आपल्या सारखेच वातावरण असते. पण आम्ही थंडीच्या कपड्यांची जास्त जुळवाजुळव केली. आमची, दोन्ही मुलींची सगळ्या किरकोळ आजारांवरील आठवतील तशी औषधांची एक छोटी बॅग भरायला सुरुवात केली. पिल्लावळ तर खुपच उत्सुक झाली होती. दोन दिवस जायला बाकी होते आणि नेमकी छोट्या राधाला ताप यायला सुरुवात झाली. मन थोडे विचलीत झाले. इथे उन तर तिथे थंडी. तिथे हिला अजुन त्रास तर होणार नाही ना? प्लॅन कॅन्सल करावा का? माझ्या मनातला निसर्गमय कोपराही मधूनच डोकावत होता. त्यातून एक चांगली गोष्ट म्हणजे औषधाने फरक पडत होता. मिस्टरांनी व इतर सगळ्यांनीच धीर दिला की इथल्या उष्णतेमुळे होणारा त्रास तिथल्या थंड वातावरणात कमी होईल. आदल्या दिवशी डॉक्टरांनीही ग्रीन सिग्नल दिला. रात्री १.५ वाजे पर्यंत उरले सुरले सामान बॅग मध्ये भरण्याचे काम चालूच होते. खरे तर राधाची काळजी व सकाळी लवकर जाण्याच्या विचारांनी झोपच लागत नव्हती.
इतर दिवशी ९ वाजता उठणार्या माझ्या मुली काश्मिरला जायचेय (राधासाठी बाहेर फिरायला जायचेय) ऐकताच पहाटे ४ वाजता उठल्या व उफाळून आलेल्या आनंदात भराभर तयारीही केली. राधा फ्रेश वाटतेय हे पाहून माझा जीव भांड्यात पडला. सकाळी ९ ची फ्लाईट होती ७ वाजता एअर पोर्टवर पोहोचायचे होते त्यामुळे घरातून ५.३० ला घराला व घरातील मंडळींना टाटा करुन निघालो. एअरपोर्टवर जाण्यासाठी आम्ही भा़ड्याची सुमो केली होती. त्यात सगळ्यांचे सामान बांधून गणपती बाप्पा मोरया चा नारा चढवून आम्ही एअरपोर्टवर बरोब्बर पावणेसातला पोहोचलो. विमानतळावर येणारी-जाणारी विमाने पाहण्यात श्रावणी-राधा गुंग होत्या. तिथले सगळे सोपस्कर पूर्ण करुन आम्ही विमानात बसलो व ९ वाजता आमचे विमान सुटले. विमान व्हाया अमृतसर होते. अमृतसरच्या विमानतळावर उतरत असताना कुठे सुवर्णमंदीर दिसते का ह्याचा शोध आम्हा सगळ्यांच्या सुप्त नजरा घेत होत्या.
अमृतसर वरून निघून साधारण २ वाजता आमचे विमान श्रीनगरला पोहोचले.
खाली उतरता उतरताच कोणीतरी ओरडल तो बघा बर्फाचा डोंगर. दूरवर बर्फाच्छदीत डोंगर चमकताना दिसत होता. तो पाहताच वॉव, आहाहा, मस्तच असे उद्गार सगळ्यांच्या तोंडी डोंगराप्रमाणेच उंचाऊ लागले. तिथे काळ्या ढगांनी आभाळ भरून आल होत. गार गार वारा हिंदोळे घेत होता. आमच्या स्वागतासाठी काश्मिरच्या गार वर्षाबिंदूंची बरसात होणार होती.
मुंबईच्या गरम वातावरणामुळे आम्ही साधे कपडे घालूनच गेलो होतो. पण श्रीनगरच्या विमानतळावर उतरल्याबरोबर थंडीने कुडकुडू लागलो. राधाला मी लगेच शॉल मध्ये गुंडाळून घेतले. श्रावणीला मफ्लर गुंडाळून दिला. इझी गो ट्रॅव्हलचा ड्रायव्हर आमची वाट पाहत विमान तळावर थांबला होता. कुडकुडत्या थंडीतही मी तिथला निसर्ग न्याहाळत होते. गाडीत जाउन बसल्यावर जरा थंडी कमी जाणवू लागली.
आम्ही घेतलेल्या पॅकेजनुसार आम्ही पहिले दोन दिवस श्रीनगरमध्ये दल लेक मधील हाउसबोट मध्ये राहणार होतो. मुले तर फारच उत्साही होती हाउसबोट साठी. श्रीनगर विमानतळावरुन आम्ही दल लेकच्या दिशेने निघालो. तेंव्हा मला लगेच जाणवले आपल्या निसर्गापेक्षा कितीतरी वेगळा हा निसर्ग आहे. हवा, पाणी, दगड, झाडे सगळ्याचे दृष्टीने. महाराष्ट्रातून फिरताना जशी आपल्याला जागोजागी आंबा, फणस, काजू, चिंचेची झाडे दिसतात तशी इथे अॅप्पल, आक्रोडची झाडे होती. आपल्या महाराष्ट्रात जशी सोनमोहोर, पर्जन्य वृक्षाची झाडे दिसतात तशी इथे भले मोठे बुजुर्ग चिनार वृक्षाची झाडे दिसत होती. अर्थात ह्या दिवशी मला ह्या झाडांची नावे कळली नव्हती. ती पुढे हळू हळू कळली. महाराष्ट्रात जास्वंदीची झाडे जशी कुंपणाला फुललेली असतात तशी इथल्या घरांच्या समोर झुबक्यांनी आलेली गुलाबाची मोठ्ठी मोठ्ठी फुले दिमाखात आपल्या काश्मिरचे सौंदर्य दरवळवत होती. मध्ये मध्ये तर काही बारीक पिवळी फुलेही डुलत होती.
दिड ते दोन तासात आम्ही दल लेक ला पोहोचलो. गाडीतून उतरलो तेंव्हा जाणवले की विमानतळावरील थंडी अजून आनंदात उफाळून आमच्याबरोबर येऊन स्वतःचा आनंद द्विगुणीत करत आहे. बच्चे कंपनीने थंडीवर मात करत हौसेवर ताबा मिळवला. राधा पण शिकारातून हाऊसबोट पर्यंत जाताना मम मम करत आपला आनंद व्यक्त करत होती. शिकारा चालवणारे सकळेच कश्मिरी त्यांच्या गोड भाषा शैलीचा वापर करतात. अगदी आदराने आणि आपलेपणाने आपल्याशी बोलतात. त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य बसलेल असत ते आम्हाला मजेशीर वाटल. साब "कश्मिर का मौसम और बंबई का फॅशन का कुछ अंदाजा नही लगा सगते वज मिनटोमे बदल जाता है."
पाउस पडून गेल्याने तापमान खुपच थंड झाले होते. वातावरणही ढगाळच होते. कुडकुडत आम्ही हाउसबोट मध्ये जाऊन हाउसबोटमधल्या रुमचा ताबा घेतला.
हाउसबोट मध्ये गेल्यावरही राधा सारखी तळे दाखवायला बाहेर न्यायला लावत होती. पण प्रचंड गारवा होता. आम्ही सगळ्यांनी आमचे उबदार कपडे घातले आणि जेवायला गेलो. जेवणाची सोय हाउस बोटच्याच बाजूच्या मागच्या आवारात होती. जेवणा दरम्यान परत पाउस चालू झाला आणि पुन्हा थंडीची लाट अधीक जाणवू लागली. आम्ही जेवण आटोपताच आपाअपल्या रुम मध्ये जाऊन राधाला औषधाचा डोस देउन ब्लॅकेंट्स वगैरे घेउन आराम करायला बसलो. रुम मध्ये २४ तास गरम पाणी होते हे एखाद्या वाळवंटात पाण्याचा खड्डा पाहण्यासारखे सुखद होते.
एखाद तास आराम करुन मग शिकार्यातून दल लेक मधील मार्केट पहायला जाण्याचा पुढचा प्लॅन होता. पण प्रचंड न सहन होणार्या थंडीमुळे राधाला अधिक त्रास होऊ नये म्हणून आम्ही नवरा-बायको दोघांनी हा प्लॅन रद्द केला. श्रावणी मात्र तिच्या काका-काकींबरोबर मज्जा करायला निघून गेली. गरमा गरम कबाब वगैरे खाउन ते सगळे परत आले आणि आम्ही खुप काही मिस केल करुन आम्हाला टुक टुक माकड केलं. :हाहा: ती संध्याकाळ पुर्ण काळोखी होती. आता असेच वातावरण राहीले तर आपण कसे काश्मिर पहायचे हा प्रश्न आमच्यापुढे होता.
दुसरा दिवस उजाडला तो उन्हाची किरणे पसरत. त्यामुळे खुप हायसे वाटले. बाहेर गेलो तेंव्हा स्वच्छ तळे सभोवतारी हिरव्यागार डोंगरांच्या रांगा, त्यावर आलेले काहिसे ढग, तलावात फिरणार्या शिकारा दिसू लागल्या.
तिथे मला एका शिकारावर ही चिमणी दिसली.
सकाळी येथे बरेच व्यापारी येतात. हे व्यापारी पण गोड बोलीच्या शैलीचेच असतात. एक केसर विकणारा व्यापारी आला होता. त्याने केसरचे फुलही आणले होते. हे पाहताना फार कुतुहल वाटत होते.
काही वेळाने एक फुलांनी भरलेली शिकारा दिसली. माझ्या आनंद त्या गगनचुंबी पर्वतरांगांप्रमाणे फुलला होता. वेगवेगळ्या प्रकारची फुले घेऊन त्या शिकार्यातील व्यापारी त्या फुलांचे कंद विकण्यासाठी घेउन आले होते.
त्या व्यापार्याने सगळ्या फुलांचे अलबम, बिया व कंद दाखवली. त्यात हिरवे तसेच इतर गुलाब अजुन वेगवेगळ्या फुलांचे फोटो दाखवले. त्यात आपल्याकडे असणारे मे फ्लॉवर, वेगवेगळ्या लिलिही होत्या. ही फुले आपल्याइथे होतील की नाही याची मी त्याला शंका विचारली तेंव्हा त्याने ३० ते ३५ डिग्री पर्यंत हवामानात ही फुले येतात असे त्याने सांगितल्याने मी काही कंद त्याच्याकडून घेतले. शिकारामधील एक त्याच्या भाषेतील न्युईन गुलाब नामक फुल आणले. हे फुल गुलाबासारखेच व गावठी गुलाबाचा वास असणारे होते.
ह्या निसर्ग सौंदर्याने, फुलांनी आदल्या दिवशीचा ताण कुठल्या कुठे पळून गेला.
दल लेकच्या मागे दिसणारा हरीसिंग पॅलेस.
दल लेक मध्ये दूरवर जागोजागी कारंजेही बसवलेले आहेत.
आमच्या ड्रायव्हरने माहीती दिली की थंडीत येथ बर्फ होऊन त्यावर मुले फुटबॉल खेळतात. एकदा एका पुढार्याने आत बर्फावरून गाडी पण नेली होती.
दुसर्या दिवशी सूर्यप्रकाशातील वातावरणातून शिकारातून जाताना तलावातील स्वच्छ पाणी , आत मध्ये काही वेली व छोटे छोटे मासे पाहताना मन प्रसन्न झाल होत.
बरेचसे लोक हल्ली विमानाने जातात .पण जम्मु- उधमपूर पटनीटॉप बागलिहार- बनिहाल,मुंडा,अनंतनाग संगम मार्गे श्रीनगरला जाणे ही एक काहीसा घाबवणारा पण मस्त अनुभव आहे. काही ठिकाणी मोटरचे चाक व रस्त्याची कड यात एखाद्या फुटाचेच अंतर असते.
कास्मीरी लोक आस्थेवाईक असतात. मला पुण्यात नातेवाईक असलेली एक काश्मीरी बाई श्रीनगरच्या एक गल्लीत भेटली होती. तिच्या मते लोणावळा खंडाळा हे काश्मीर सारखेच सुंदर .काश्मीर हे पाच W साठी प्रसिद्ध म्हणावे लागेल. willow, weather,water, wool and women !
गुलमर्ग ची गंडोला राईड एक खास अनुभव असला तरी ज्यांच्याकडे वेळ आहे अशी माणसे पायी मधल्या टप्प्यापर्यंत जाताना दिसली.
पहलगाम फारच सुंदर. लिडर नदीच्या काठी पाण्यात उभे रहाण्यात मजा . हिरवळीवर लोळण्यातही मजा.
काश्मीरची घरे लाकडाने सुशोभित . फार सूंदर दिसतात. बरीचशी रिकामी आहेत. ( काश्मीरी पंडितांचा आहेत असे कळले.)
लाल चौक ठिकाण मस्त आहे पण तेथे फार रक्तपात झाला आहे. हे एका हॉटेलवाल्याने सांगितले.
दल लेकच्या काठाने जाणार्या रस्त्याने रात्री पायी फिरत दिव्यानी फुललेले दल लेक पहाणे हा अनुभव जरूर घ्यावा.
श्रीनगर मधील संग्रहालय, रेश्मी कापडाचे कारखाने, गालीचे तयार करण्याचा वर्कशॉप हा ही एक कार्यक्रम आखता येतो.
आडवाटेवरील रियासी
रियासी हे नाव ऐकून कदाचित डोक्यात प्रकाश पडणार नाही. ते साहजिक आहे, कारण जम्मू-काश्मीरमध्ये असूनही रियासी हे ना तीर्थक्षेत्र आहे ना हिलस्टेशन. किंबहुना, कटरा (वैष्णोमाता मंदिर) हा अतिप्रसिद्ध शेजारी लाभल्यामुळे रियासीचे नाव अधिकच विसरले जाते. पण तरीही एकदा जाऊन पहावी (अगदी दोन दिवस राहून) अशी जागा आहे.
शिव खोरीच्या रस्त्यावर लागणारे रियासी गाव चिनाब नदीच्या तीरावर वसलेले आहे. पीरपंजाल पर्वतरांगा इथे सपाट मैदानाला येऊन मिळतात. त्यमुळे नदीचा प्रवाह सुसाट असतो. सिंधु पाणीकरारानुसार चिनाबवर धरण बांधता येत नाही. नदीच्या वेगवान प्रवाहावर "राफ्टिंग" करण्याची सोय आहे.
फोटो पाहून कदाचित रियासी हे एक थंड हवेचे ठिकाण असावे असा समज झाल्यास नवल नाही. पण तो चुकीचा ठरेल. उन्हाळ्यात येथील तापमान उत्तर भारतातील अन्य शहरांशी स्पर्धा करत ४० डिग्रीच्याही वर जाते. पण त्याही दिवसांत येथील रात्री सुखद असतात.
रियासीपासून सलाल जलविद्युत प्रकल्प अगदी जवळ आहे. पर्वतरांगांनी वेढलेले हे धरण फारच सुंदर दिसते. विशेष परवानगी घेतल्यास अगदी भूगर्भात पाच मजले खाली बसवलेली जनित्रे पाहता येतात. चिनाब नदीचा प्रवाह एका प्रचंड भुयारातून वळवून, जनित्रांद्वारे विद्युतनिर्मिती करून, ते पाणी ४ किलोमीटर खाली पुन्हा नदीपात्रात सोडले जाते. पण छायाचित्रणावर प्रतिबंध असल्यामुळे जास्त फोटो काढता आले नाहीत.

रियासी गावातून बाहेर पडून चिनाब पार केली की लगेच येते सिहाड बाबाची गुहा. येथील जलप्रपाताची उंची पाहून डोळे फिरतात.
शहरापासून १० किलोमीटरवर धनसर बाबाची गुहा हे आणखी एक नितांतसुंदर स्थळ आहे. अमाप नितळ पाणी, शांतता आणि स्वच्छता यामुळे मन प्रसन्न होते. (धनसर बाबा मंदिर-गुहा कटरापासून फक्त १५ किलोमीटरवर आहे).
रियासी गावाला लागूनच भीमगड किल्ला आहे. खरेतर लहानखुरा असल्यामुळे त्याला गढी म्हणणे योग्य होईल. पण दिसायला फार छान आहे. राज्यसरकारने विशेष प्रयत्न करून पर्यटकांसाठी या किल्ल्याची डागडुजी केली आहे. अशा वेळी न चुकता महाराष्ट्रातील किल्ल्यांची दुर्दशा आठवून अफाट वाईट वाटते.

माझ्या लटपटत्या मराठीची अधिक दुर्दशा पाहून मिपाकरांना वाईट वाटू नये, म्हणून इथेच थांबतो आणि राहिलेले वर्णन छायाचित्रांवर मर्यादित ठेवतो..!
इकडे आलात तर जरूर भेटा..! जय माता दी!!!! :) :)
-----
अंतर: कटरापासून ३० किलोमीटर. जम्मूपासून सुमारे १०० किलोमीटर.
प्रवासः रस्त्याने. लवकरच कटरा - उधमपूर रेल्वे सुरू होईल. (रियासीवरून जाते).
हवामानः तीव्र उन्हाळा. अन्य दिवसांमध्ये सुखद हवामान.
जवळपास अन्य पाहण्याजोगे: सिहाड बाबाची गुहा, नौदेवी मंदिर, धनसर बाबाची गुहा, सलाल जलविद्युत प्रकल्प, शिव खोरी.
------
रियासीची काही अन्य छायाचित्रे:
१. बहरलेला आंबा

२. रंगात आलेला खोखोचा सामना (किल्ल्यावरून काढलेला फोटो)

३. मधाची शेती

४. देवाचा पार




No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.