वाटेवरच माझी नजर एका फलकावर गेली, "चांगदेव तपोभूमी -चांगवटेश्वर मंदिर सासवड ". लगेच नितेशला मी गाडी थांबवायला
सांगितली.
"काय
रे. काय झालं.? "
"अरे
हे बघ इथे कसलं
प्राचीन मंदिर दिसतंय. चांगदेवांचे नाव आहे. चाल पाहुयात." नितेशने गाडी तिकडे वळवली. रस्त्याला लागूनच असलेले हे छानसं शिवाचं मंदिर
आहे. कऱ्हा नदीच्या
तीरावर वसलेल्या या
मंदिराचा परिसर हि अत्यंत रमणीय
आहे. विशेष म्हणजे ते इथली स्वच्छता.
इतर मंदिरासारखी इथे गडबड नाही कि, उगाचच केलेल्या कर्म-कांडाचा मारा
नाही. बाजूच्या कुंडात पाय धुऊन आम्ही आत जाऊन दर्शन
घेतलं. मानलं एक वेगळाच समाधान
मिळालं होत. मंदिराच्या बाजूलाच त्याचा इतिहास लिहिला आहे त्यावरून हे किती प्राचीन
आहे हे समजते.
चांगदेवाचा
जन्मकाळ श्री. ज्ञानेश्वर महाराजांपूर्वी म्हणजे १४०० वर्षे आधीचा. चांगदेव चातुर्मासातील ४ महिने मौनव्रताने
व अंधत्वाने सर्व व्यवहार करत असत. त्यांचे नित्य एक पार्थिव लिंग
पूजेचे असे. त्यांचा शिष्य चिकण मातीने मळून केलेले लिंग डाव्या हातावर ठेवून त्याचा विधियुक्त पूजा करीत असे. एक दिवशी सततच्या
पावसाने कंटाळून शिष्याने एका मोठ्या पालथ्या वाटीवरच थोड्याश्या मातीचे लंपन तयार करून तेच पार्थिव लिंग म्हणून तयार करून ठेवले. चांगदेव नित्य नियमाने स्नान उरकून पार्थिव लिंगास आव्हानात्मक मंत्रोक्षता वाजून ते उचलून हातावर
घेऊ लागले तर ते मुळी
हालेनाच त्यांनी डोळे उघडून पहिले व ते
उचलून
हातावर घेऊ लागले तर ते हालेनाच.
ते हलविले न जाणारे स्वयंभू
लिंगच चांगदेवास दिसून आले. त्याने छोटेसे मंदिर बांधून त्या स्वयंभू लिंगाची उपासना कायम ठेवली यावरून या मंदिरास चांगावटेश्वर असे
नाव पडले.
 |
Changavateshwar |
भारतीय
प्राचीन स्थापत्यशास्त्र आणि अप्रतिम शिल्पकला यांचा उत्कृष्ट नमुना असलेले वटेश्वर मंदिर पुर्वाभिमुखी असून प्रवेशद्वारातून प्रवेश केला की,
आतील बाजूस प्रशस्त चौकोनाकृती दगडी प्राकार लागतो,
मंदिराच्या सभामंडपाचे दगडी बांधकाम अप्रतिम आहे.
तीस चौकोनी अखंड पाषाण स्तंभावर सभामंडप उभा आहे.
प्रवेशद्वारावरील स्तंभावर तपस्वी,
दधि-
मंथन करणारी स्त्री,
गरुड,
युगुल,
लढत असलेले मल्ल,
तीन नर्तकी असे शिल्प कोरलेले आहे.
त्याच बरोबर कमल पुष्पे,
शृंखलांच्या माला,
नृत्यांगना यांचे सुबक व कोरीव काम
केलेले दिसते.
सभामंडपाच्या मध्यभागी विशाल व देखणी नंदीची
मूर्ती असून नंदीच्या कंठस्थानी साजरशृंगार कोरलेला आहे.
 |
Changavateshwar temple |
सभामंडप
ओलांडून गेल्यावर चौकोनाकृती गाभारा लागतो.
शोडष स्तंभावर हा उभारलेला असून
त्याच्या प्रत्येक स्थंभावर प्रवेशमंडपाप्रमाणेच विविध कलाकुसरयुक्त चित्राकृती,
कमल पुष्पे,
शृंखलांची घडण कोरलेली आहे.
मंडपास दक्षिणोत्तर प्रवेश द्वारे आहेत.
शिवालयाचे गर्भागार नितांतरम्य,
उदात्त नि पवित्र आहे.
त्यामुळे भक्तांच्या मनास सात्विकतेचा अनुभव येतो.
स्वयंभू शिवलिंगाच्या पार्श्वभागी महिरपीच्या कोनाड्यात श्री गणेश देवतेची संगमरवरी रम्य मूर्ती आहे.
मंदिराचा घुमट अष्टकोनी गोलाकार आहे.
पूर्व प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस दोन कृष्णपाषाणी भव्य दीपमाला आहेत.
उत्तरेस पावन कर्
हा तीरावर सखाराम
बापू बोकिलांनी बांधलेला घाट दिसतो.
अशा पुण्यपावन पवित्र शिवालयाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो.
जवळ आलोच आहोत तर संत सोपान
काकांची समाधी पाहूनच पुढे जाऊया म्हणून आम्ही विचारत विचारात त्यांच्या समाधी मंदिरात पोहोचलो.
 |
Saint Sopan kaka samadhi temple
|
 |
Saint Sopan maharaj |
संत
सोपानदेवांचे मंदिर सासवड गावाच्या एका बाजूस ‘
चांबळी ‘
नदीच्या तीरावर आहे .
मंदिर पूर्वाभिमुख आहे.
मंदिराच्या समोरील आवारातून आम्ही उत्तरेकडून प्रवेश केला.
पायऱ्या चढून महाद्वारात आल्यावर समोरच नागेश्वर मंदिर आहे.
हे नागेश्वर मंदिर
संत सोपान देवांच्या आधीचे असून या मंदिराच्या मागच्या
बाजूस सोपान देवांनी समाधी घेतली असे म्हणतात.
समाधी वर्णनाच्या अभंगात या मंदिराचे वर्णन
आले आहे.
गाभाऱ्यात संत सोपानदेवांची समाधी आहे काळ्या पाषाणातील समाधी हि पायऱ्यांची आहे
.
सकाळी नित्य पूजेनंतर समाधीवर मुखवटा ठेवला जातो.
दुपारी चारच्या सुमारास समाधीस पोशाख होतो.
गाभाऱ्याची प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा सभा मंडपात येताना उजव्या हाताला चिंचेच्या झाडाखालील पादुका दिसल्या.
सोपानदेवांनी ज्या गुहेत समाधी घेतली त्या गुहेचे हे प्रवेशद्वार होते
असे सांगतात.
नंतर हा रस्ता बुजवून
त्यावर पादुकांची स्थापना करण्यात आली.
मंदिर परिसरात एक कुंड असून
यालाच भागीरथी असे म्हणतात.
याच्या जवळूनच जी नदी वाहते
ती चांबळी नदी.
या नदीत एक
मोठा वाटोळा खडक दिसतो त्याला हत्ती खडक असे म्हणतात .
नदीला पाणी असले कि हा खडक
नदीत उतरलेल्या हत्तीच्या सोंडेसारखा दिसतो म्हणून हे नाव पडले
असावे कदाचित.
नदीच्या पलीकडे पुंडलिक मंदिर आहे .
दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराचा आता
जीर्णोद्धार झाला असून त्यासमोर सिमेंटचा मंडप व ओटा बांधला
आहे.
नंतर
आम्ही निघालो ते पुरंदरे वाडा
पाहण्यासाठी येथूनच अगदी काही पावलांच्या अंतरावर तो आहे.
कर्हेकाठवरील
पुरंदरे घराण्याचे संस्थापक व पेशव्यांचे दिवाण
अंबाजीपंत पुरंदरे यांनी १७१० मध्ये हा पुरंदरे वाडा
बांधला.
सध्य स्थितीत त्याची अवस्था फारशी चांगली नाही.
वाड्याच्या बाहेरचा परिसरहि थोडा
अस्वच्छ आहे यावरूनच नामशेष होणारी वाडा संस्कृती आणि आपला जपला जाणारा पूर्वजांचा स्वाभिमान किती लयाला गेला आहे याची जाणीव होते.
कानिफनाथ गड.
आधी रात्रीची वस्ती मल्हारगडावर करायचे ठरवले होतं पण का कुणास
ठाऊक कानिफनाथ गडावर जायची एक अनामिक ओढ
लागली होती. आजचा मुक्काम कानिफनाथगडावरच करायचा असं ठरवून आम्ही तिकडे प्रस्थान केलं.
 |
Kanifnath gadh |
कानिफनाथ
गड सह्याद्रिच्या पर्वतरांगामध्ये सासवडच्या पश्चिमेला बोपगांव येथे आहे. पुण्यावरून दिवे घाट मार्गे सासवड हे शहर सुमारे
२८ कि.मी. वर
आहे व हडपसर
पासून सुमारे १७ कि.मी.
सासवड शहरापासून पश्चिमेकडे कोंढव्या कडे जाताना ९ कि.मी
वर बोपगाव या गावानजीक कानिफनाथ
मंदिराकडे जायला एक फाटा आहे.
४-५ कि.मी
चा प्रवास व एक छोटा
घाट चढून गेल्यास कानिफनाथ मंदिरा पर्यंत पोहचता येते. आम्ही मात्र सासवडहून बोपदेव -पुणे मार्गे
कानिफनाथ गडाकडे पोहोचलो.
कानिफनाथगडावर
कानिफनाथ यांचे फार सुंदर मंदिर आहे. मंदिर प्राचिनकालीन आहे.हे मंदिर त्या
पंचक्रोशितील शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या चढून आम्ही वरती गेलो. मंदिर म्हणजे एक छोटी गुहाच
आहे. मंदिरातील गाभारा मोठा आहे. परंतु प्रवेश दरवाजा १×१ फुट
असा आहे. मी कुतुहुलाने पाहत
होतो. एवढ्याश्या जागेमधून भाविक आत मध्ये कसे
जात आहेत. तेथील पुजाऱ्याने एक युक्ती सांगितली
आणि दोन हात कानालगत लावून आत सरपटत प्रवेश
करायचा असतो आणि येताना सुद्धा तसेच आधी पाय बाहेर ठेऊन सरपटत बाहेर यावे लागतं नाहीतर
मग सगळं कठीणचं
स्त्रियांना
आत गाभाऱ्यात जाण्यास मज्जाव आहे. इथे आत गाभाऱ्यात शिरण्यापूर्वी
शर्ट, बनियन, बेल्ट काढून आत शिरावे लागते.
मी आत मध्ये प्रवेश
केला. आतमध्ये कानिफनाथांची समाधी आहे. थोडा वेळ थांबून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन बाहेर आलो. मनाला एक वेगळीच प्रसन्नता
वाटत होती. रात्रीच्या वेळी इथल्या परिसरातले एक वेगळच भारलेलं
वातावरण वाटत होतं. मंदिर परिसरातून लांबवर शहरातील दिसणाऱ्या दिव्याचा झगमगाट दिसत होता.
मंदिराच्या
गाभाऱ्याच्या वर एक वाक्य
आपले लक्ष वेधून घेतं.
"असे
श्रद्धा ज्याच्या उरी । त्यासी दिसे
हा कानिफा मुरारी । "
कुठेतरी
वाचल्यासारखं वाटतंय ना! अरेच्चा हे तर आपल्याला
उसाच्या रसवंती गृहाच्या वर दिसतं नेहमी.
नितेश बोलला. संपूर्ण महाराष्ट्र कुठेही गेलात तरी प्रत्येक रसवंती गृहावर हे वाक्य लिहिलेलं
असतंच. त्याची गोष्ट अशी आहे कि,
आता
आमचा तिसरा मुक्काम होता तो कानिफनाथ गड.
आधी रात्रीची वस्ती मल्हारगडावर करायचे ठरवले होतं पण का कुणास
ठाऊक कानिफनाथ गडावर जायची एक अनामिक ओढ
लागली होती. आजचा मुक्काम कानिफनाथगडावरच करायचा असं ठरवून आम्ही तिकडे प्रस्थान केलं.
कानिफनाथ
गड सह्याद्रिच्या पर्वतरांगामध्ये सासवडच्या पश्चिमेला बोपगांव येथे आहे. पुण्यावरून दिवे घाट मार्गे सासवड हे शहर सुमारे
२८ कि.मी. वर
आहे व हडपसर
पासून सुमारे १७ कि.मी.
सासवड शहरापासून पश्चिमेकडे कोंढव्या कडे जाताना ९ कि.मी
वर बोपगाव या गावानजीक कानिफनाथ
मंदिराकडे जायला एक फाटा आहे.
४-५ कि.मी
चा प्रवास व एक छोटा
घाट चढून गेल्यास कानिफनाथ मंदिरा पर्यंत पोहचता येते. आम्ही मात्र सासवडहून बोपदेव -पुणे मार्गे
कानिफनाथ गडाकडे पोहोचलो.
कानिफनाथगडावर
कानिफनाथ यांचे फार सुंदर मंदिर आहे. कानिफनाथ येथे तपश्चर्येला बसले होते असे मानतात. मंदिर प्राचिनकालीन आहे.हे मंदिर त्या
पंचक्रोशितील शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या चढून आम्ही वरती गेलो. मंदिर म्हणजे एक छोटी गुहाच
आहे. मंदिरातील गाभारा मोठा आहे. परंतु प्रवेश दरवाजा १×१ फुट
असा आहे. मी कुतुहुलाने पाहत
होतो. एवढ्याश्या जागेमधून भाविक आत मध्ये कसे
जात आहेत. तेथील पुजाऱ्याने एक युक्ती सांगितली
आणि दोन हात कानालगत लावून आत सरपटत प्रवेश
करायचा असतो आणि येताना सुद्धा तसेच आधी पाय बाहेर ठेऊन सरपटत बाहेर यावे लागतं नाहीतर मग सगळं कठीणचं
स्त्रियांना
आत गाभाऱ्यात जाण्यास मज्जाव आहे. इथे आत गाभाऱ्यात शिरण्यापूर्वी
शर्ट, बनियन, बेल्ट काढून आत शिरावे लागते.
मी आत मध्ये प्रवेश
केला. आतमध्ये कानिफनाथांची समाधी आहे. थोडा वेळ थांबून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन बाहेर आलो. मनाला एक वेगळीच प्रसन्नता
वाटत होती. रात्रीच्या वेळी इथल्या परिसरातले एक वेगळच भारलेलं
वातावरण वाटत होतं. मंदिर परिसरातून लांबवर शहरातील दिसणाऱ्या दिव्याचा झगमगाट दिसत होता.
मंदिराच्या
गाभाऱ्याच्या वर एक वाक्य
आपले लक्ष वेधून घेतं.
"असे
श्रद्धा ज्याच्या उरी । त्यासी दिसे
हा कानिफा मुरारी । "
कुठेतरी
वाचल्यासारखं वाटतंय ना! अरेच्चा ! हे तर आपल्याला
उसाच्या रसवंती गृहाच्या वर नेहमी दिसतं
. नितेश बोलला. संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही गेलात तरी प्रत्येक रसवंती गृहावर हे वाक्य लिहिलेलं
असतंच. बरोबर. त्याची गोष्ट अशी आहे कि,
साधारण
७०-८० च्या दशकात
पुरंदर तालुक्यातील बोपगाव गावातील एक तरुण रोजगारासाठी
मुंबई ला गेला. त्याला
कळलं कि
इथं आपल्या उसाला भरपूर मागणी आहे. मग दारोदारी जाऊन
ते विकण्यापेक्षा एका जागी दुकान थाटून रस काढून ते
विकावं असं त्याच्या मनात आलं. पुरंदरच्या गोड उसाच्या रसाने मुंबईत जादू केली आणि हळू हळू बोपगाव,सासवड आणि इतर परिसरातील लोक हे त्या उद्योगासाठी
महाराष्ट्रभर पसरले. त्यांच्या धंद्यातील खरेपणाने रसवंतीला एक ब्रँड बनवलं.
अख्खा पुरंदर तालुका हा नवनाथांचा भक्त
आहे. त्यांची कानिफनाथावर खूप श्रद्धा. इथली माणसं जगभर पसरली पण आपल्या मातीला
विसरली नाहीत. त्यांनी श्रद्धेने आपल्या रसवंती गृहाचं नावं
"कानिफनाथ रसवंती गृह " असं ठेवलं. यांचं यश पाहून इतर
रसवंती वाले देखील हेच नाव ठेवू लागले. पूर्वी बैलांनी फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर हे रस काढलं
जायचं परंतु काळाच्या ओघात ते गेलं आणि
आता मशिनी आल्या तरी एकेकाळी या बैलांनी आपल्याला
जगवलं याची आठवण शेतकऱ्यांच्या पोरांनी कायम ठेवली ती बैलाच्या गळ्यातले
घुंगरू मशीनला बांधून . ते आजही छूम-छूम करत मशीनवर फिरत आहेत. कितीही शीतपेय बाजारात आली तरी उसाच्या रसाची लोकप्रियता काही कमी होणारी नाही.
त्यांची
हि अपार श्रध्दा पाहून आम्हीही नतमस्तक होऊन बाहेर आलो आणि इथल्या विश्वस्तांना सांगितल्यावर त्यांनी आम्हाला गडावर रहायची परवानगी दिली.
रात्रीची थंडी खूप वाढत होती.
माझ्याकडे असलेल्या स्लीपिंग बॅग मुळे माझा तर निभाव लागला
पण नितेश मात्र पक्का गारठला होता.
पहाटे आरतीच्या होणाऱ्या आवाजाने जाग आली.
सूर्यनारायणाने हळू हळू दर्शन द्यायला सुरुवात केली होती.
गडावरून
दिसणारा सूर्योदयाचा नजारा फार छान होता.
पुन्हा एकदा नाथांचे दर्शन घेऊन आम्ही सकाळच्या गारठणार्या थंडीतुन परतीचा मार्ग पकडला.
एक वेगळा अनुभव
घेऊन आमचा PMK
चा प्रवास पूर्ण
झाला होता.