Monday, October 14, 2024

केरळ संपुर्ण

 

पद्मनाभपूरम महाल:त्रावणकोर साम्राज्याचा कलात्मक साक्षिदार

 तुतिकोरीनच्या शेवटच्या भेटीतहि मुक्काम १५-२० दिवस झाला होता. यावेळी जाताना सोबत कॅमेरा घेऊनच गेलो होतो. यावेळी तिथून जवळ असलेल्या रामेश्वरम आणि निघताना केरळला श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट देऊन मुंबईला परतायचा बेत केला होता. कामासोबत थोडी फोटोग्राफीहि होईल असा विचार केला. मागच्यावेळी कॅमेरा सोबत नसल्याने कन्याकुमारीची भेट अगदी रुखरुख लावून गेली होती; इतक्या अप्रतिम फ्रेम्स तिथे होत्या. तर पद्मनाभस्वामीला जायची माहिती गुगलवर शोधताना अचानक ‘पद्मनाभपूरम पॅलेस’ या जागेने लक्ष्य वेधून घेतलं. मग त्याची माहिती मिळवताना आणि गुगलवर काही संदर्भ वाचताना निर्धार केला की आधी हाच महाल बघून घेऊया.


गुगल नकाशावर तुतिकोरीन ते पद्मनाभपूरम महाल हे अंतर मोजले. कुठून कुठे जायचे याचा बेत आखला. एका दिवसात जाऊन येण्यासारचे अंतर होते. त्यात आधी कन्याकुमारीला मी याच मार्गाने गेलो होतो त्यामुळे काळजी नव्हती. एका शनिवारी पहाटे पाच वाजता उठलो आणि पटपट आवरून हॉटेलच्या बाजूलाच असलेल्या तुतिकोरीन सिटी बस स्टँडवरून तिरुनलवेलीला जाणारी बस पकडली. तिरुनलवेली हे नागरकोइल-बेंगळूरु-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरी एक मुख्य शहर आहे. पाउण तासात तिरुनलवेलीला पोचलो, तिथून मग नागरकोइलला जाणारी बस पकडली. तामिळनाडू राज्यातले हे रस्ते अतिशय उत्कृष्ट आहेत. मी सगळा प्रवास तामिळनाडू स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेसमधूनच केला. सरकारी बसेसची अवस्था पुण्यातल्या पीएमटीला लाजवेल अशी पण रस्ते सुबक असल्याने काही वाटत नव्हतं. ड्रायव्हरदेखील एफवनच्या ड्रायव्हरला लाजवेल अशी तुफान पण संयमित ड्रायव्हिंग करतात. हायवेवरून सुसाट धावताना उजव्या बाजूला असलेल्या उत्तुंग पर्वतरांगा मन वेधून घेतात. आणि त्या पर्वतांच्या पायथ्याशी असलेल्या, वाऱ्याने भिरभिरणाऱ्या असंख्य पवनचक्क्या बघून थक्क व्हायला होत होतं. उजव्या बाजूच्या पर्वतरांगा ओलांडल्या की तिकडे केरळ. या पर्वतरांगा म्हणजे पश्चिम-घाटाचे दक्षिणेकडील शेवटचे टोक. याच शेवटच्या टोकाच्या पायथ्याशी म्हणजे वेल्ली पर्वताच्या सुंदर अश्या बॅकड्रॉपवर वसलेला आहे पद्मनाभापूरम पॅलेस. पण तिथे पोचायला अजून बराच वेळ होता.


तासा-दीड तासात नागरकोइलला पोचलो. इथे दक्षिणेत दुसऱ्या राज्यातून आलेल्या माणसाला प्रामुख्याने महाराष्ट्रातून आलेल्यांना दोन मोठ्या प्रसंगाना तोंड द्यावं लागतं; एक म्हणजे भाषा आणि दुसरं म्हणजे जेवण. जेवणाच्या आणि भाषेच्या बाबतीत माझा चेन्नईमधला अनुभव देखील अतिशय वाईट होता. जेवण एकवेळ आपण वेळ मारून नेऊ पण भाषेचं काय करणार? इथले लोक तमिळ शिवाय काहीच बोलत नाही. येत असेल तरी हिंदी मुद्दाम बोलत नाहीत, नाहीतर आपण महाराष्ट्रातले लोक समोरचा मराठीत असेल तरी हिंदीत सुरु होतो. नागरकोइलला पोचल्यावर इथून पद्मनाभपूरम पॅलेसला जायला १४ किमी वर असलेल्या ‘थकलाई’ (Thuckalay) या गावी पोहचायचे होते. बऱ्याच लोकांना हिंदीत विचारून बघत होतो, पण कुणीच दाद देत नव्हतं. इकडल्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांचं इंग्लीश देखिल भयानक असतं. मला जिथे जायचं होतं त्या गावाचं नाव कुणालाच समजत नव्हतं. शेवटी एक देवमाणूस भेटला त्याने मला व्यवस्थित मार्गदर्शन केलं. तो देखील त्याच मार्गाने थिरूवनंतपुरमला चालला होता. त्याच्यासोबतच मी बस पकडली. ही बस मस्त होती. सुंदर नक्षिकाम केलेल्या लाकडी खिडक्या वैगरे होत्या. मला गम्मतच वाटली. मग त्या माणसाने सांगितलं की ती केरळ ट्रान्सपोर्टची बस होती. नागरकोइल सोडताना एक सुंदर नदी ठिकठिकाणी सोबत करत होती. २० मिनिटात मी ‘थकलाई’ गावात पोचलो तेव्हा साधारण अकरा वाजले होते. ‘थकलाईहून आता पद्म्नाभापूरमला जायला अजून एक बस पकडली आणि ५ मिनिटात महालाच्या ठिकाणी पोचलो.

या महालाचे प्रथम दर्शन अतिशय मुग्ध करणारे होते. पद्मनाभपुरम किल्ल्याच्या आवारात हा अतिशय सुंदर असा महाल गेली ३५०-४०० वर्षे उभा आहे. महालाच्या मागच्या बाजूला असलेला उत्तुंग अश्या वेल्ली पर्वताच्या बॅकड्रॉपवर हा नक्षिदार महाल अतिशय उठून दिसत होता. पर्थम दर्शनी मला राहवले नाही इतकावेळ बॅगमध्ये पडून आराम करणारा कॅमेरा काढला आणि आवारातून काही फ्रेम्स टिपल्या. नंतर बाजूला असलेल्या तिकीटघरातून माझे आणि माझ्या डीएसएलआर कॅमेऱ्याचे तिकीट घेतले. बॅग आणि बूट तिथल्या अमानतघरात जमा केले आणि आम्ही दोघे (मी आणि माझा कॅमेरा) महालात शिरलो.


त्रावणकोर साम्राज्याची राजधानी असलेली ही जागा आणि तिथे उभं असलेलं हे नितांत सुंदर वास्तुशिल्प आजही त्या गतवैभवाची साक्ष देत उभं आहे. ई.स. १६०१ मध्ये त्रावणकोर साम्राज्याचा त्यावेळचा अधिपती, राजा इरावी वर्मा कुलसेखरा पेरूमल याने हा महाल बांधल्याचे समजते. त्याने १५९२ – १६०२ पर्यंत त्रावणकोर साम्राज्याची धुरा वाहिली. हा संपूर्ण महाल एकाच राजाच्या कार्यकालात बांधला गेला असे नाही; कारण या महालाच्या आवारात असलेली ‘थाई कोट्टरम’ अर्थात ‘राणीच्या आईचा महाल’ ही इमारत अंदाजे ई.स. १५५० साली बांधण्यात आली. म्हणजे यामितीला ५०० वर्षाहून अधिक काळ लोटला आणि तरीही ही इमारत आणि त्यावरील लाकूडकाम आजही जसेच्या तसे आहे. ई.स. १७५० साली राजा अनिझाम थिरूनल मार्थांड वर्मा याने हा संपूर्ण महाल बांधून काढला आणि ते शहर आपलं कुलदैवत श्री पद्म्नाभाला अर्पण केलं त्यावरून मग या महालाला देखील हेच नाव पडले. पुढे त्रावणकोर साम्राज्याची राजधानी त्रिवेंद्रमला नव्याने स्थापण्यात आली आणि पद्मनाभपूरम महालाची रया गेली. आता जरी ही जागा भौगोलिकरीत्या तामिळनाडू राज्यात असली तरी हा महाल आणि महालाची जागा केरळ सरकारच्या अखत्यारीत आहे. या महालाची देखरेख केरळ पुरात्तव विभागाद्वारेच केली जाते. 
चला तर मग या महालाची अद्भूत सफर करूया:

सहा एकर परिसरावर पसरलेल्या या भव्य महालात लहानमोठ्या अशा १४ वास्तू उभ्या आहेत. महालाच्या मुख्य दरवाजातून म्हणजेच ‘पुड्डीपुरा’मधून आपण प्रवेश करताच ‘पूमुखम’ या स्वागतकक्षात दाखल होतो. इथे समोरच असलेल्या स्वागातदारावरील लाकडावरची नक्षि  आणि कोरीव असे ग्रॅनाईटचे खांब आपलं लक्ष्य वेधून घेतात. इथेच पुरातत्वविभागाद्वारे नेमून दिलेले काही तरुण तुम्हाला माहिती देण्यासाठी उभे असतात. हिंदी, मल्याळम, तमिळ आणि इंग्रजीपैकी तुम्हाला जी भाषा हवी ती निवडू शकता आणि त्या भाषेत माहिती पुरवली जाते. या स्वागतकक्षाचे छत देखील अतिशय रेखीव अशा लाकूडकामाने सजविले आहे. वेगवेगळ्या प्रकारची तब्बल ९० फुले या स्वागतकक्षाच्या छतावर कोरली आहेत. बघून डोळेच काय कॅमेरा देखील थक्क होतो! अतिशय सुंदर असा हा स्वागतकक्ष बघून झाल्यावर मार्किंगला अनुसरून मी पहिल्या माळ्यावर गेलो. इथे ‘मंत्रासाला’ म्हणजे राजाची आणि मंत्रिमंडळाची बैठकीची खोली आहे. या खोलीत प्रकाश, तापमान आणि हवा यांचा सुरेख मेळ जमवला आहे त्यामुळे या खोलीत नेहमीच एक प्रकारचा गारवा पसरत असतो. मंत्रासाला जोडून खाली ‘उत्तुपुरा’ म्हणजे भोजनगृहात उतरायचे. ७२ बाय ९ मीटरचा हे भोजनगृह म्हणजे त्यावेळचे कँटिन असावे. एकेवेळी २००० लोक जेवायला बसायची क्षमता असलेल्या या भोजनगृहात त्यावेळी सणासुदीला राजाकडून गरीब प्रजेला भोजन दिले जाई. तिथे एका जागी भली मोठी चीनी मातीची भांडी अजूनही आहेत. ही भांडी मुख्यत्वे लोणची आणि मसाले मुरवायला वापरायचे अशी माहिती तिथल्या माहितीगाराने पुरवली.


तिथून पुढे आपण ‘थाई कोट्टारम’ म्हणजेच राणीच्या आईच्या महालात प्रवेश करतो. आधीच सांगितल्याप्रमाणे हा दुमजली महाल सर्वात आधी म्हणजे १५५० साली बांधण्यात आला. आणि तेव्हापासून ही वास्तू आजही सुस्थितीत आहे. या महालाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘एकांथ मंडपम’ म्हणजेच तिथला व्हरांडा आणि या व्हरांड्यात असलेले अतिशय सुबक, अद्भूत असे नक्षिकाम केलेले कोरीव खांब. इथलं छत देखील अप्रतिम अश्या कोरीव लाकडी फुलांनी सजवले आहे. त्याकाळी या महालाचे बांधकाम करताना जो मुख्य खांब आधारस्तंभ म्हणून रोवला होता तो फणसाच्या झाडाचा खांब आपण आजही तिथे पाहू शकतो. ‘थाई कोट्टारम’ प्रामुख्याने राजघराण्यातील स्त्रिया अंत:पूर म्हणून वापर करत असत. या महालात चार बाजूला चार मोठे शयनकक्ष आहेत.


‘थाई कोट्टारम’ बघून पुढे बाहेर पडून मार्गिकेच्या खुणेनुसार एका चिंचोळ्या गल्लीतून चालत ‘उप्परीकामलिका’ या दुसऱ्या वास्तूत प्रवेश करायचा. परिसरातली ही सर्वात उंच आणि तशी एकदम नवी वास्तू ई.स. १७५० मध्ये राजा मार्थंड वर्मा याने बांधली. ही वास्तू त्याने आपले कुलदैवत श्री पद्मनाभ याला अर्पण केली म्हणून या वास्तूला ‘पेरूमल कोट्टरम’ म्हणजेच देवाचा महाल असेही म्हटले जाते. ‘उप्परीकामलिका’ याचा शब्दश: अर्थ अनेक मजले असलेली वास्तू असा होतो. या महालाला एकूण तीन मजले आहेत. पहिल्या मजल्यावर कोषागार आहे तर दुसऱ्या मजल्यावर राजाचे शयनकक्ष आहे. या शयनकक्षात प्रवेश करण्यापूर्वी पाय धुवायची व्यवस्था आहे. अतिशय सुबक अश्या एकून ६४ प्रकारच्या लाकडी नक्षीकामाच्या जोडणीतून राजाचा झोपायचा पलंग या खोलीत आहे. त्या पलंगावरील नक्षिकाम डोळे दिपविणारे आहे. तिसऱ्या मजला हा प्रार्थनेसाठी वापरण्यात येत असावा. इथे तिसऱ्या मजल्यावर नितांत सुंदर, अप्रतिम आणि खरोखर शब्दात ज्यांचे सौंदर्य मांडता येणे शक्यच नाही अशी १७ व्या शतकातील भित्तीचित्रे आहेत. कितीही पाहिली तरी डोळे आणि मन भारत नाहीत इतकं सौंदर्य त्या भित्तीचितत्रात सामावलेलं आहे. ज्या निष्णात कलाकाराने ही चित्रे काढली, त्यात मनमोहक रंग भरून ती फुलवली त्या अज्ञात निर्मिकाला आपण मनोमन नमन केल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाहि. (सुरक्षेच्या कारणावरून या भित्तीचित्रांचे फोटो घ्यायला बंदी आहे.)


उप्परीकामलिकाला जोडूनच पुढे ‘प्लामूट्टील कोट्टारम’ नावाचा दुसरा महाल आहे. या महालाचे सगळे इंटेरिअर लाकडापासूनच बनविले आहे. छोट्या, छोट्या लाकडी पुलांनी हा महाल उप्परीकामलिकाला जोडला गेला आहे. ‘वेप्पीनमोडू कोट्टारम’ ही वास्तू ‘पुमुखम’ला जोडली गेली आहे. या वास्तूचे व्हरांडे अतिशय कलात्मकतेने उभारले आहेत. स्टेन्ड ग्लास आणि मायकाचा वापर करून एक सौम्य प्रकाश इथे खेळविला आहे. त्या काचेवरील चित्रे देखील अप्रतिम आहेत. खरं तर या महालातून फिरताना आपण एका भूल भूलैय्यातून फिरत असलाच भास होतो. आणि फिरताना एखाद्या खिडकीतून किंवा सज्जातून मागचा वेल्ली पर्वत खूप छान फ्रेम्स देत राहतो. पुढे ‘इंद्रविलास महालाला जोडून एक लांबलचक कोरिडोअर आहे. या कोरिडोअरच्या भिंतीवर काही ऐतिहासिक जुनी चित्रे आहेत. ‘अंबरी मुखपम’ म्हणजे सज्जा किंवा ‘Bay Window’ हे इथले मुख्य आकर्षण आहे. इथल्या खोल्यांना असलेल्या भल्या मोठ्या खिडक्या, दरवाजे हे फोटोग्राफीसाठी खूप आकर्षक फ्रेम्स मिळवून देतात.


या महालात जरा जास्तच रेंगाळल्यावर बाहेर मोकळ्या आवारात येतो. इथे बाजूला एक छोटे गार्डन आहे. तिथून पुढे आवारात असेलेल्या ‘दक्षिण महाल’ या वास्तूला भेट द्यावी. ही वास्तू केरळी स्थापत्यकलेचा अतिशय सुंदर असा नजराणा आहे. अतिशय जुन्या वस्तू जसे की, टेबल, खुर्च्या, काही वाद्ये आजही तिथे जतन करून ठेवण्यात आली आहेत. या महालाच्या  परिसरात असलेल्या वास्तू आकाराने छोट्या, एकमेकांना जोडलेल्या होत्या. आणि दरवाजे तर उंचीला अतिशय कमीच. एक दोनदा फोटो घ्यायच्या नादात चांगलाच आपटलो. ‘हे दरवाजे इतके कमी उंचीचे का?” अशी विचारणा केल्यावर तिथल्या माहितीगाराने जे उत्तर दिले ते भारावून टाकणारे होते. तो माहितीगार म्हणाला, “आपण जिथे राहतो, जी वास्तू आपल्याला आधार देते तिचा आदर आपण नेहमी केला पाहिजे आणि म्हणूनच आपल्या वास्तूमध्ये प्रवेश करताना नेहमी झुकून, आदराने प्रवेश करावा; यासाठी हे सगळे दरवाजे उंचीला कमीच असतात.” ही वास्तू म्हणजे ‘दक्षिण महाल’ राष्ट्रीय ठेवा म्हून जाहीर करण्यात आली आहे.

‘पुत्थन कोट्टारम’ म्हणजे नवीन महाल ही या समुहातली सर्वात नवीन वास्तू. या वास्तूचा उपयोग मुदपाकखाना म्हणून केला जाई. यालाच लागून एक सुंदर पुष्करणी आहे. या पुष्करणीचे पाणी जेवणासाठी वापरले जाई. त्यावेळची किचन सिस्टम इथे बघावयास मिळते, तसेच मॉडर्न स्टाईल ग्रॅनाईटसने बांधलेल्या टॉयलेट्सच्या रचना देखील बघावयास मिळतात. संपूर्णपणे ग्रॅनाईटच्या दगडाने बांधलेला ‘नवरात्री मंडपम’ म्हणजे तिथल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची जागा. इथे अनेक कलाकार संगीत, नाट्य, नर्तन अश्याप्रकारच्या आपल्या कला सदर करीत. या नवरात्री मंडपमचे छत म्हणजे एक अक्खा ग्रॅनाईट दगड आहे. त्याला आधार देणारे खांब आणि त्यावर कोरलेल्या मुर्त्या देखील अतिशय सुंदर आहेत. हे सर्व पाहून झाल्यावर मनात आणि कॅमेऱ्यात साठवून मार्गिकेच्या खुणेनुसार पुढे जायचे. ‘थाई कोट्टारम’ ला जोडून एका दुसऱ्या वास्तूच्या पहिल्या मजल्यावर सैन्याची शस्त्रे ठेवायची जागा म्हणजेच ‘आयुधपुरा’ आहे. त्याची रचना देखील अत्यंत  सोयीस्कर आहे. आता शस्त्रे तिथे नाहीत. हे संपल्यावर आपण तिथून खाली उतरलो की थेट महालाच्या बाहेरच्या आवारात पोचतो. झाला आपला आतील महालाचा प्रवास. पण बाहेर अजून एक वास्तू आपली वाट पाहत उभी असते. केरळ पुरातत्वविभागाचे एक वस्तूसंग्रहालय इथे आहे. इथे त्रावणकोर (केरळ आणि तामिळनाडू चा काही भाग) मध्ये सापडलेली अति प्राचीन शिल्पे ठेवण्यात आली आहेत. वेळ होता तेव्हा तिथे भेट देऊन आलो.


हे सगळं संपेपर्यंत साडे तीन वाजले होते. खरंतर मी खूप घाई घाईत फिरलो, हा महाल व्यवस्थित बघायला किमान एक पूर्ण दिवस तरी हवा आणि फोटोग्राफी करायची असेल तर दोन दिवस पकडून चला इतक्या अप्रतिम फ्रेम्स मिळतात इथे. स्टील फोटोग्राफीसाठी तर ही जागा स्वर्ग आहे. भारतातून अनेक मोठ्या आर्किटेक्ट कॉलेजेसमधून विद्यार्थी या महालाचा आणि स्थापत्यकलेचा आभ्यास करण्यासाठी येतात. केरळ, कन्याकुमारीला जाणारे परदेशी पर्यटक देखील इथे वाट वाकडी करून येतात. आशिया खंडातील हा सगळ्यात मोठा लाकडी महाल असून अजून देखील UNESCO च्या ड्राफ्ट यादीत पडून आहे. या महालाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या महालाचे लाकडावरील नक्षिकाम. हा संपूर्ण महाल म्हणजे प्राचीन दक्षिणात्य स्थापत्यकलेचं एक अप्रतिम असं जिवंत उदाहरण आहे. कालपरत्वे महालाच्या रचनेत बराच बदल होत गेला. महालाचे स्थापत्य आणि लाकूडकाम हे अति भव्य आणि नेत्रदीपक आहे. एकएक इमारत बघताना डोळे आश्चर्याने थक्क होतात; इतकं प्राचीन आणि नाजूक कलाकुसर जाणणारे आणि करणारे स्थापत्यविशारद आपल्या देशात होते. पारंपारिक स्थापत्यशास्त्र, निपुण शिल्पकारिता आणि भौतिक विज्ञानाचे सखोल ज्ञान म्हणजे पद्म्नाभापुरम महाल. आजही हे वास्तुशिल्प अतिशय काळजीपूर्वक जतन करणाऱ्या केरळ सरकार आणि पुरातत्व विभागाचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या वैभवाची म्हणजेच गड-किल्ल्यांची दुरवस्था बघितली की मन विषण्ण होते. १७०० च्या आसपास बांधलेला आपला शनिवारवाडा आज त्याची जी दुरावस्था झालीय त्याच्याकडे कोणाला बघायला देखील वेळ नाहीय. आपले गड-किल्ले, त्यांची अवस्था तर काय विचारूच नका! फक्त फुकाचा अभिमान आणि माज दाखवण्यात आपण आपल्या या वास्तूंची विल्हेवाट लावत आलोय आणि लावतोय. त्याची ना आपल्याला कदर आहे ना आपल्या पुरातत्व विभागाला! पार तिकडे इंग्लड –फ्रांसला जाऊन बघू नका की पुरातन वास्तू, शिल्पे कशी जपायची ती आपल्या भारतात देखील अशी बरीच ठिकाणे आहेत जिथे ह्या वास्तुंचा आजही आदर केला जातो आणि त्यांना जपलं जातं. कधी दक्षिणेकडे कन्याकुमारी किंवा थिरूवनंतपुरमला भटकायला आलात तर या वास्तूला भेट दिल्याशिवाय जाऊ नका. इतकं सुंदर आणि पुरातन वास्तुशिल्प दुसरीकडे कुठे बघावयास मिळेल की नाही माहित नाही. डोळ्याचे पारणे फिटविणारा हा महाल एकदा तरी डोळे भरून पाहावाच.

कसे जाल? 
कन्याकुमारी पासून : ३६ किमी  
थिरूवनंतपुरम पासून: ६३ किमी. 
जवळचा एअरपोर्ट: थिरूवनंतपुरम
जवळचे रेल्वे स्टेशन: नागरकोइल. 
 भारतातील कोचीन शहर. कोची (कोचीन). मनोरंजन आणि करमणूक

  •  

  •  

कोचीन (कोची किंवा कोचीन देखील) हे भारताच्या केरळ राज्यातील देशाच्या पश्चिमेला असलेले एक मोठे शहर आहे. कोचीन हे देशाच्या या भागातील प्रमुख बंदर शहर आहे. अरबी समुद्राच्या मलबार किनाऱ्यावर हे सर्वात मोठे बंदर आहे.

शहराचे नाव शब्दांवरून आले आहे "कोचू आधीच"जे मल्याळममधून भाषांतरित होते "लहान बंदर".

कोचीन हे राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. त्याची स्वतःची खास चव आहे, जी आंतरराष्ट्रीय वातावरणाद्वारे ओळखली जाते. स्थानिक लोक मलय भाषा बोलतात, शिक्षण आणि व्यवसायात इंग्रजी सामान्य आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या, कोचीन ही भारतातील पहिली युरोपीय वसाहत बनली. 1500 मध्ये, येथे पहिली युरोपियन वस्ती तयार झाली आणि 1503 मध्ये, पहिले पोर्तुगीज बंदर बांधले गेले. 1663 मध्ये, हे शहर डच लोकांच्या ताब्यात गेले आणि शंभर वर्षांनंतर हॉलंडने कोचीनची अदलाबदल करून ब्रिटीश बेट बांगकाला दिली.

कोचीनमध्ये भूतकाळाचा वर्तमानाशी जवळचा संबंध आहे. याला पूर्वेकडील व्हेनिस आणि अरबी समुद्राचा राजा म्हटले जाते असे नाही: जगातील सर्वोत्तम नैसर्गिक बंदरांपैकी एक येथे आहे. त्याच वेळी, शहरात अनेक व्यावसायिक आणि औद्योगिक सुविधा आहेत, ज्यात शिपयार्ड आणि एक बंदर, सागरी वनस्पती, स्टॉक एक्सचेंज, रासायनिक उद्योगातील सर्वात मोठे उद्योग (IREL, HOCL, TCC), विद्युत उद्योग एंटरप्राइझ TELK, आणि औद्योगिक पार्क.

केरळच्या रिसॉर्ट्समध्ये येणारे बहुतेक पर्यटक कोचीनमध्ये थांबतात. विविध सर्वेक्षणांनुसार कोचीन हे भारतातील सहावे सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. कोचीनमधील सुट्ट्या प्रामुख्याने धर्म, स्थापत्यकलेच्या इतिहासाच्या प्रेमींना तसेच ज्यांना सुंदर समुद्रकिनारा असलेल्या आरामदायक शहरात आराम करायचा आहे त्यांना आकर्षित करेल.

हवामान आणि हवामान

कोचीनमध्ये उष्णकटिबंधीय मान्सून हवामान आहे. येथे आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे +१७°С, आणि सर्वोच्च +३८°С. शहरात पावसाळ्याचा कालावधी जून ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये असतो.

कोचीनला जाण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे डिसेंबर ते जून, जेव्हा शहरात पावसाळा राज्य करत नाही आणि तापमान +२३…+३१°С.

निसर्ग

कोचीन हे केरळच्या मध्य भागात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. त्यात मुख्य भूभागाचा काही भाग आणि बेटांचा समूह समाविष्ट आहे. पश्चिमेला, किनार्‍याजवळ, पश्चिमेकडील धाटांच्या पर्वत रांगा आहेत आणि त्यांच्या उतारावर कॉफी, मसाल्याच्या आणि काजूच्या बागा आहेत. कोचीन हे बंदर शहर आहे. येथे केवळ कॉफी आणि मसालेच पिकवले जात नाहीत तर थेट लाकडी प्लॅटफॉर्मवरून मोठ्या जाळ्यांनी मासे पकडले जातात.

वनस्पतींमध्ये, खारफुटीच्या झाडांच्या विविध प्रजाती देखील सामान्य आहेत. ते स्थलांतरित पक्ष्यांच्या अनेक प्रजातींचे निवासस्थान आहेत.

आकर्षणे

कोचीनमध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यात शेजारीच कॅथोलिक चर्च, सिनेगॉग, डच वास्तुविशारदांच्या सुंदर इमारती आणि चिनी मच्छीमारांचे आविष्कार आहेत.

सर्व प्रथम, आम्ही शिफारस करतो की आपण राजवाड्याला भेट द्या मॅटनचेरी, कोचीन महाराजांसाठी 1555 मध्ये पोर्तुगीजांनी बांधले होते. भारतीय महाकाव्यातील आरामदायी दृश्यांनी सजवलेल्या चेंबर्स आणि भिंतींसह ही एक आश्चर्यकारकपणे सुंदर इमारत आहे. हे शुक्रवार वगळता दररोज 10:00 ते 17:00 पर्यंत अभ्यागतांसाठी खुले आहे.

राजवाड्यापासून फार दूर ज्यू क्वार्टर आणि प्राचीन सिनेगॉग आहे. हे 10:00 ते 17:00 पर्यंत अभ्यागतांसाठी खुले आहे, शनिवार एक दिवस सुट्टी आहे.

भारतातील सर्वात जुने कॅथलिक चर्च - चर्च पाहण्यासारखे आहे सेंट. फ्रान्सिस(1510), जिथे वास्को द गामा दफन करण्यात आला (नंतर त्याचे अवशेष घरी पाठवले गेले). येथे अनेक सुंदर जुन्या डच दफनविधी आहेत आणि चर्च स्वतःच एका सुंदर बागेने वेढलेले आहे.

महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांमध्ये कॅथेड्रलचा समावेश होतो सेंट मेरी, बॅसिलिका सांताक्रूझ(XVI शतक), मंदिर सेंट अँथनी, बॅसिलिका सेंट मेरी.

याव्यतिरिक्त, तुम्ही केरळ इतिहास संग्रहालयाला भेट देऊ शकता, 16 व्या शतकातील डच राजवाडा, प्राचीन किल्ला, मंगलवनम पक्षी अभयारण्य आणि इतर अनेक मनोरंजक ठिकाणांना भेट देऊ शकता.

पोषण

कोचीनमध्ये, तुम्ही केरळच्या पारंपारिक पाककृतीमध्ये सामील होऊ शकता, जे मसाले, सीफूड आणि नारळांनी समृद्ध आहे. दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय आणि चायनीज पदार्थही शहरात खूप लोकप्रिय आहेत. फास्ट फूडच्या तत्त्वावर आधारित खाद्यसंस्कृतीचा प्रभाव येथे फारच लक्षात येतो. कोचीन हे पर्यटन शहर असल्याने, येथे मेक्सिकन, फ्रेंच, इटालियन अशा आंतरराष्ट्रीय पाककृतींची रेस्टॉरंट्स देखील आहेत.

तुम्ही चहा पिऊ शकता आणि नाश्ता घेऊ शकता चहाचे भांडे कॅफे, चांगले युरोपियन खाद्यपदार्थ - मध्ये चिलीआउट कॅफे, आणि रेस्टॉरंटमध्ये उत्कृष्ट भारतीय पाककृती तंदूर.

अरब कॅफे बर्‍याचदा रस्त्यावर आढळतात, जिथे तुम्हाला ताजे शावरमा आणि तळलेले चिकन दिले जाईल.

राहण्याची सोय

शहरात आरामदायी पंचतारांकित हॉटेल्स, व्हिला, गेस्ट हाऊसपासून ते आश्रम आणि खाजगी घरांपर्यंत निवासाची विस्तृत निवड आहे. फोर्ट कोचीन परिसरात आणि शहराच्या ऐतिहासिक भागात तुम्हाला बजेट निवास मिळेल.

हॉटेलच्या खोल्यांची सरासरी किंमत दररोज $50 ते $300 पर्यंत असते. गेस्ट हाऊसमध्ये तुम्हाला दररोज $20 मध्ये आश्रय मिळू शकतो, आश्रमात तुम्हाला ठराविक देणगीसाठी राहण्याची परवानगी दिली जाईल.

फोर्ट कोचीन जवळ हॉटेल ब्रंटन बोटयार्ड. हे हॉटेल पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. हॉटेल्स ताज मलबार द्वारे विवांताआणि त्रिशूळवेलिंग्टन बेटावर आणि कोचीनच्या मध्यभागी, एक उंचावर तुमची वाट पाहत आहेत आबाद प्लाझा, जे थकवणार्‍या शहराच्या सहलींनंतर नेहमी आश्रय देईल.

मनोरंजन आणि करमणूक

कोचीनची बहुराष्ट्रीय रचना असल्याने येथे अनेक सुट्ट्या साजऱ्या केल्या जातात. केरळच्या सन्मानार्थ सण पारंपारिक आहेत विष्णूआणि सन्मानाने ओणम. हिंदू सण येथे सन्मानाने साजरा केला जातो होळी, ख्रिश्चन इस्टर आणि ख्रिसमस, इस्लामिक ईद अल अधा.

डिसेंबरचे शेवटचे दहा दिवस तुम्हाला शहरातील किल्ल्यातील कोचीन कार्निव्हलने आनंदित करतील.

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरात मोठा खरेदी महोत्सव सुरू होतो.

वर्षाची वेळ कोणतीही असो, कथकली नृत्याचे असंख्य नाट्यप्रदर्शन येथे आयोजित केले जातात. विशेष थिएटरमध्ये, पर्यटकांना केवळ नृत्यच दाखवले जाणार नाही, तर मेकअप लावण्याची प्रक्रिया देखील दाखवली जाईल, रामायण आणि महाभारताच्या सादरीकरणातील रंग आणि हावभावांचा अर्थ स्पष्ट केला जाईल.

कोचीनमधील पर्यटकांचा आवडता मनोरंजन म्हणजे बंदराच्या बाजूने सागरी प्रवास. अनेक नियमित बोटी आणि फेरींद्वारे ते नांगरले जाते. तुम्ही कॉफीच्या विस्तृत मळ्यांतून फेरफटका मारू शकता, पश्चिम धाटांच्या पर्वतरांगांना भेट देऊ शकता, पक्षी अभयारण्यात फेरफटका मारू शकता किंवा एखाद्या आरामदायक कॅफेमध्ये बसू शकता.

शहरातील मुलांसाठी एक विशेष उघडले मुलांचे उद्यान, आणि प्रौढ लोक झाडांच्या सावलीत बसू शकतात सुभाष पार्क.

क्रीडा मनोरंजनापासून क्रिकेट आणि फुटबॉलला प्राधान्य दिले जाते. कोचीनमध्ये भारतातील सर्वात मोठ्या मल्टीफंक्शनल स्टेडियमपैकी एक - आंतरराष्ट्रीय स्टेडियम आहे जवाहरलाल नेहरू. कोचीनचे प्रादेशिक क्रीडा केंद्र देखील अतिशय महत्त्वाचे आहे.

खरेदी

कोचीनमध्ये खरेदी करणे देखील मनोरंजक असू शकते. अरुंद रस्त्यांमध्ये दुर्मिळ आणि उत्कृष्ट स्मरणिका असलेली अनेक प्राचीन वस्तूंची दुकाने आहेत. तुम्हाला अप्रतिम ट्रॉफीसाठी लढावे लागेल - सौदा.

अलिकडच्या वर्षांत, 1 डिसेंबरपासून कोचीनमध्ये मोठा केरळ खरेदी महोत्सव आयोजित केला जातो ग्रँड केरळ शॉपिंग फेस्टिव्हल. आशिया खंडातील हा सर्वात मोठा उत्सव आहे. हे 45 दिवस टिकते. आजकाल कोचीन एका मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये बदलत आहे. खरेदीसाठी केरळला जगातील सर्वोत्तम टूर म्हणून शिफारस करणे हे या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट आहे. उत्सवादरम्यान सर्व किमती कमी केल्या जातात. याव्यतिरिक्त, भेट प्रमाणपत्रे, ऑनलाइन पैसे देण्याची क्षमता, उत्कृष्ट बक्षिसे आणि बरेच काही आहेत.

शहरातील किमती युरोपच्या तुलनेत लक्षणीय कमी आहेत, परंतु राज्यातील इतर शहरांपेक्षा जास्त आहेत.

वाहतूक

कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ एर्नाकुलम जिल्ह्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. हे आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक दोन्ही उड्डाणे स्वीकारते.

भारतीय रेल्वेचा दक्षिण विभाग कोचीनमधून जातो. दोन प्रमुख स्थानके आहेत: सेव्हर्नी ( एर्नाकुलम शहर) आणि दक्षिणी ( एर्नाकुलम जंक्शन), अनेक रेल्वे स्थानके आहेत.

बस, सायकल रिक्षा आणि मोटार रिक्षा शहरभर फिरतात. कोचीन राज्याच्या मध्यभागी असल्याने, उत्तरेकडून दक्षिणेकडे केरळचे सर्व बस मार्ग स्थानिक बस स्थानकांमधून जातात. मुख्य बस स्थानक आहे KSRTC बस स्टँडएर्नाकुलम प्रदेशाच्या पूर्व भागात स्थित आहे.

लॅकॅडिव्ह बेटांवर शिपिंगसाठी हे बंदर मुख्य तळ आहे. जहाजे दर दोन आठवड्यातून एकदा जातात. बंदराच्या पाण्याच्या क्षेत्रामध्ये अनेक कार फेरी आणि बोटी नांगरल्या जातात.

जोडणी

कोचीनमध्ये सर्व प्रकारचे दळणवळण उपलब्ध आहे. सर्व हॉटेल्स आणि पोस्ट ऑफिसमध्ये सार्वजनिक टेलिफोन आहेत.

मोबाईल संप्रेषण व्यापक आहे. मुख्य कार्यरत ऑपरेटर आहेत एअरटेल, आयडियल, बीएसएनएल. कनेक्ट करण्यासाठी, तुम्हाला एक फोटो आणि तुमच्या पासपोर्टची छायाप्रत आवश्यक आहे.

तुम्ही हॉटेलच्या खोल्यांमधून किंवा अनेक इंटरनेट कॅफेंपैकी एकामध्ये इंटरनेटवर प्रवेश करू शकता. कनेक्शनची किंमत प्रति तास वापरासाठी $ 4 पेक्षा जास्त नसेल.

सुरक्षा

शहरात गंभीर गुन्हे आणि प्रशासकीय उल्लंघनाचे प्रमाण कमी आहे. शहराचे संरक्षण स्थानिक पोलिसांकडून केले जाते.

कोचीनला येण्यापूर्वी, तुम्हाला मेंदुज्वर, विषमज्वर, हिपॅटायटीस ए यांसारख्या रोगांविरुद्ध लसीकरण करणे आवश्यक आहे.

व्यवसायाचे वातावरण

कोचीन हे भारतातील 7 वे सर्वात श्रीमंत शहर आहे. हे शॉपिंग सेंटर म्हणून प्रसिद्ध आहे आणि एक वाढणारे महानगर आहे.

आजकाल, कोचीन शहर केवळ ऐतिहासिक वास्तू, नैसर्गिक बंदराच्या सौंदर्यानेच लक्ष वेधून घेते, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वेगाने विकसित होत असलेल्या उद्योगाने. येथे एक शिपयार्ड आहे, जिथून हजारो टन ड्राय-मालवाहू जहाजे निघतात. एक तेल शुद्धीकरण कारखाना कार्यरत आणि विस्तारत आहे, रासायनिक खताचा कारखाना बांधला जात आहे. याशिवाय, हे शहर भारतातील सर्वात महत्त्वाचे स्टॉक एक्सचेंज, कोचीन स्टॉक एक्सचेंजचे घर आहे. अलिकडच्या दशकांमध्ये, पर्यटन क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे, जे सेवा आणि देखभाल क्षेत्रातील व्यवसायाचा विस्तार करण्यास अनुमती देते.

मालमत्ता

येथे रिअल इस्टेटची किंमत ती ज्या भागात आहे त्या भागावर, दुरुस्तीची गुणवत्ता आणि सुविधांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. कोचीनमध्ये तुम्हाला लक्झरी व्हिला, बंगले, अपार्टमेंट मिळू शकतात.

रिअल इस्टेटच्या खरेदीसाठी कागदपत्रांच्या नोंदणीसाठी, तुम्हाला $100 पेक्षा जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत. कोचीनमध्‍ये घर खरेदी करण्‍याची पूर्वअट किमान सहा महिने भारतात राहणे.

नियमानुसार, रिअल इस्टेटच्या 1 मीटर 2 ची किंमत $4,000 पेक्षा जास्त नाही.

मालमत्ता भाड्याने देण्यासाठी, तुम्ही भाडेपट्टी करार केला पाहिजे.

लक्षात ठेवा की शहर लहान आहे, येथे बरेच लोक एकमेकांना ओळखतात, म्हणून नेहमी सर्वांशी नम्र वागा.

सार्वजनिक ठिकाणी आवाज उठवून उघड्या कपड्यात फिरण्याची प्रथा नाही.

मंदिरांना भेट देताना, सर्व आवश्यक नियमांचे पालन करा, अन्यथा तुम्हाला दंड आकारण्याचा अधिकार आहे.

केरळ हा समुद्रकिनाऱ्यांचा समानार्थी शब्द आहे, परंतु ते मसाल्यांच्या उत्पादनासाठी देखील प्रसिद्ध आहे. कोचीनमध्ये, तुम्ही स्वयंपाकासाठी विविध प्रकारचे मसाले खरेदी करू शकता.

कोचीनला त्याच्या मसाल्यांचे उत्पादन आणि अनेक देशांमध्ये निर्यात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झाली आहे. आज जागतिक मसाल्याच्या बाजारपेठेत शहराचे महत्त्वाचे स्थान आहे.

शहरातील मसाल्यांच्या उत्पादनाचा इतिहास सुमारे 600 वर्षांपूर्वी सुरू होतो. व्यापारी अरब, ज्यू, डच, पोर्तुगीज आणि चिनी लोकांसोबत मसाल्यांचा व्यापार करत. मसाले बहुतेक भारतीय पाककृतींचा अविभाज्य भाग आहेत. ते सुगंधी द्रव्ये आणि औषधे तयार करण्यासाठी देखील वापरले जातात. बर्‍याच भारतीय मसाल्यांमध्ये बरे करण्याचे गुणधर्म आहेत आणि अजूनही लोक अनेक रोगांवर उपाय म्हणून वापरतात.

बाजारात काळी मिरी, वेलची, दालचिनी, जायफळ, हळद, आले आणि मिरची हे सर्वात प्रसिद्ध मसाले आहेत.

कोचीनचे सिनेगॉग

ज्यू सिनेगॉग 1568 मध्ये बांधले गेले. त्याचे अस्तित्व राज्यातील सामान्य सुसंवादाची साक्ष देते, जे अनेक शतकांपासून जतन केले गेले आहे.

सिनेगॉगची पहिली इमारत पोर्तुगीजांच्या ज्यूंच्या छळाच्या वेळी नष्ट झाली. दुसरे सिनेगॉग, जे आजपर्यंत टिकून आहे, ते कोचीनच्या राजाच्या संरक्षणाखाली बांधले गेले. त्याला "परदेशी" ("परदेशी सिनेगॉग") म्हणतात.

नेहमीच्या सभास्थानाप्रमाणे, या सभास्थानात पुरुष आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र विभाग आहेत. मंदिराच्या आत कायद्याच्या गुंडाळ्या, बेल्जियन झुंबर, चष्मा, व्यासपीठ रेलिंग, तांबे प्लेट्स, चिनी रंगाच्या पोर्सिलेन टाइल्स, ओरिएंटल रग आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवल्या आहेत. सिनेगॉगचा एक उल्लेखनीय तपशील म्हणजे 18 व्या शतकातील घड्याळाचा टॉवर.

1968 मध्ये सिनेगॉगने 400 वा वर्धापन दिन साजरा केला. या समारंभाला भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी उपस्थित होत्या.

तुम्हाला कोचीनची कोणती ठिकाणे आवडली? फोटोच्या पुढे आयकॉन आहेत, ज्यावर क्लिक करून तुम्ही एखाद्या विशिष्ट ठिकाणाला रेट करू शकता.

सेंट चर्च. फ्रान्सिस

सेंट फ्रान्सिसचे चर्च हे भारतातील पोर्तुगीजांनी बांधलेले पहिले आणि आताचे सर्वात जुने चर्च आहे. पोर्तुगीजांच्या काळात, ते कॅथोलिक (XVI-XVII शतके), XVII ते XVIII शतके - डच सुधारणावादी, XIX ते XX शतके - अँग्लिकन होते. आता ते चर्च ऑफ साउथ इंडियाचे आहे.

सुरुवातीला, मंदिर लाकडाचे बनलेले होते, परंतु नंतर दगडाने बदलले (1516). ही इमारत फ्रान्सिस्कन भिक्षूंनी 1503 मध्ये बांधली होती. त्याच्या बांधकामानंतर, ख्रिश्चन धर्म भारतात सक्रियपणे पसरू लागला. कोचीन येथे मरण पावलेल्या वास्को द गामा यांना मंदिरात पुरण्यात आले, परंतु 14 वर्षांनंतर त्यांचे अवशेष पोर्तुगालला नेण्यात आले.

हे मंदिर 1923 मध्ये संरक्षित स्मारक म्हणून सूचीबद्ध करण्यात आले. हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या संरक्षणाखाली देखील आहे. मंदिर रविवार आणि संस्मरणीय दिवसांमध्ये सेवा आयोजित करते आणि पर्यटकांसाठी ते आठवड्याच्या दिवशी खुले असते.

डच पॅलेसला मॅटनचेरी पॅलेस असेही म्हणतात. आतील सजावट, आलिशान हॉल आणि प्राचीन फ्रेस्कोसाठी हे मनोरंजक आहे.

राजवाड्याची इमारत पोर्तुगीजांनी 1557 मध्ये राजा विरा केरळ वर्मा कोटी यांच्यासाठी बांधली होती. ही एक सामान्य दुमजली उच्च-वर्गीय वाडा आहे, ज्यामध्ये चार पंख असतात जे मध्यवर्ती अंगणात उघडतात.

राजवाड्यातील सर्वात सुंदर राज्याभिषेक हॉल आहे, जो पूर्वी कोचीनच्या राज्यकर्त्यांनी वापरला होता. खोल्यांच्या भिंती 17 व्या शतकातील फ्रेस्कोने सजवल्या आहेत. ते धार्मिक आणि पौराणिक थीमला समर्पित आहेत, अंशतः कामुक आहेत. पौराणिक चित्रांमध्ये रामायण आणि महाभारतातील दृश्ये दाखवण्यात आली आहेत. राजवाड्यात ठेवलेले इतर अवशेष म्हणजे शाही पोशाख, पगडी, शस्त्रे आणि राजघराण्यातील इतर मौल्यवान पुरातन वस्तू.

राजवाड्याच्या दोन्ही बाजूला कृष्ण आणि शिव यांना समर्पित मंदिरे आहेत.

प्रत्येक चवसाठी वर्णन आणि फोटोंसह कोचीनची सर्वात लोकप्रिय आकर्षणे. आमच्या वेबसाइटवर कोचीनच्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे निवडा.

दक्षिण भारतात आपले स्वागत आहे! त्याचे स्वतःचे वातावरण आहे: थोडे स्वच्छ, थोडे श्रीमंत, थोडे कमी लोक. बहुतेक भारतीय स्थलांतरित हे या भागांतून आलेले आहेत (सिंगापूरमध्ये तमिळ ही अधिकृत भाषांपैकी एक आहे, आणि हिंदी अजिबात नाही). उत्तरेत एक साम्राज्य दुसऱ्या साम्राज्यावर आले, तर दक्षिणेत माल चीन आणि युरोपमध्ये चालवला जात होता. दक्षिणेकडील प्रांत फार उशीरा भारताचा भाग बनले, फक्त ब्रिटिशांच्या अंतर्गत, त्यापूर्वी ते या प्रदेशातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा भागही नव्हते. दक्षिणेकडील भाषा (मल्याळम, तमिळ, तेलगू आणि कन्नड) हिंदी, संस्कृत आणि इतर इंडो-आर्यन भाषांशी संबंधित नाहीत आणि येथील अक्षरेही पूर्णपणे भिन्न आहेत.
कोचीन (किंवा कोची) हे देखील एक ऐतिहासिक शहर आहे; त्याची स्थापना 15 व्या शतकात पोर्तुगीजांनी केली होती, जेव्हा त्यांनी नुकताच भारताचा मार्ग खुला केला होता.

वास्को दा गामा मरण पावला आणि त्याला येथे पुरण्यात आले, तथापि, काही काळानंतर त्याला लिस्बनमधील जेरोम मठात पोर्तुगालमध्ये दफन करण्यात आले. वास्को द गामाची कबर:



आणि हे आधीच डच भाषेत एक थडग्याजवळ आहे, कारण पोर्तुगीजांनंतर डच लोकांच्या मालकीचे कोचीन होते.


त्याच कॅथेड्रल.



तेव्हापासून, अनेक कॅथोलिक कॅथेड्रल संपूर्ण दक्षिण भारतात राहिले आहेत.



आत.





आवारा मध्ये.



ख्रिश्चन धर्म हिंदू धर्माशी जोडलेला आहे, संतांसाठी वेद्या असलेले असे स्तंभ प्राप्त केले जातात. तू वर ये, आणि तिथे सेंट जॉर्ज ड्रॅगनला मारतो.



किंवा वास्को द गामा.



किंवा मदर तेरेसा.



येथे आणखी एक विचित्र आकाराचे मंदिर आहे.



ऐतिहासिक जिल्ह्याला फोर्ट कोचीन म्हणतात. हे एका अरुंद द्वीपकल्पावर स्थित आहे, तेथून शहराच्या त्या भागात जाण्यासाठी जिथे रेल्वे स्टेशन आणि बहुतेक लोकसंख्या आहे, तुम्हाला एकतर कार / बसने 30 किलोमीटरचा वळसा घालून जावे लागेल किंवा सरळ जावे लागेल. फेरी



कोचीन किल्ल्यामध्ये कमी उंचीच्या इमारतींचा समावेश आहे, ज्यामध्ये टाइल्स छत आहेत, गोंडस.





स्मृतीचिन्हांची दुकाने असलेले पर्यटन रस्ते देखील आहेत.



मला इंडोनेशियाची आठवण करून देते.



वसाहती वास्तुकला.





18 व्या शतकातील गेट.



पसरणारे झाड.



जुनी स्मशानभूमी.



किल्ल्याचे अवशेष.



तटबंदी.





चिनी मासेमारीचे जाळे.



शेळ्या नसत्या तर भारत भारत नसता.



वसाहतीतील काही घरे आधीच तुटत आहेत.





युएसएसआर प्रमाणेच डबके आणि आकर्षणे असलेले खेळाचे मैदान.



गांधींचे स्मारक. असे दिसते की त्सेरेटली इतका वाईट शिल्पकार नाही, तो कमीतकमी मूळसारखा दिसतो.



बरीच चिन्हे आणि मार्ग चिन्हे.



आम्ही शहराच्या मुख्य भागात फेरी मारून जाऊ.



कोचीन उंच इमारतींनी बांधले जात असल्याचे दिसून येते; ते फोर्ट द्वीपकल्पाच्या बाहेरील भागात देखील अस्तित्वात आहेत.





मुख्य भूभाग वर आधीच tppichnaya भारत.



प्रचंड रस्ते आणि त्याहूनही प्रचंड ट्रॅफिक जाम.



बस चालकाकडे विंडशील्डवर येशू आहे.



अस्ताव्यस्त, कोचीनमध्ये भुयारी मार्ग बांधला गेला! उघडल्यानंतर फक्त एक आठवडा मी तिथे होतो. त्या वेळी, बांधलेल्या शाखांपैकी फक्त एक तृतीयांश भाग उघडा होता, गाड्या अद्याप अगदी मध्यभागी, फेरी टर्मिनल आणि रेल्वे स्टेशनपर्यंत धावल्या नव्हत्या.



मात्र, गाड्या काही खास नवीन दिसत नव्हत्या.



आणि स्थानकांच्या नावांसह चिन्हांवर, मला एक वेब देखील सापडले!



मेट्रोमध्ये बरेच लोक होते, असे दिसते की बरेच लोक अजूनही तेथे पूर्णपणे टूरवर गेले आहेत, पॅसेजमध्ये आणि स्थानकांवर फोटो काढले आहेत. सदैव दक्ष असलेल्या पोलिसांनीही यात हस्तक्षेप केला नाही.



आणि मुख्य भूप्रदेशाच्या सहलीचा उद्देश येथे आहे: लुलु मॉल, काही अहवालांनुसार, भारतातील सर्वात मोठे शॉपिंग सेंटर आहे.



शॉपिंग सेंटर खरोखर घन आहे, जरी कल्पनाशक्ती आश्चर्यकारक नसली तरी, रशियामध्ये कोणत्याही प्रादेशिक केंद्रात असे आहेत.





इथे पॅडही नाहीत. मुलींनो, जर तुम्ही भारतात गेलात तर तुमच्यासोबत पँटी लाइनरचा पुरवठा घ्या (इंग्रजीमध्ये पॅन्टीलायनर), भारतात ते फक्त गोव्यात विकले जातात.



आणि चीजची निवड असे काही नाही.



दक्षिण भारतीय थाळी. खरं तर, हे इतर प्रदेशांपेक्षा फारसे वेगळे नाही, परंतु येथे ते बहुतेक वेळा ट्रे रिसेसमध्ये नव्हे तर गोल भांड्यात दिले जाते.



स्थानकावर एक वेंडिंग मशीन आहे जी लोकल ट्रेनची तिकिटे विकते. व्हेंडिंग मशीनचा ऑपरेटर त्याच्या शेजारी बसतो, जो तुमच्यासाठी सर्व बटणे दाबतो आणि तिकीट जारी करतो.


कोचीन (कोची, कोचीन) हे अरबी समुद्राच्या किनार्‍यावरील केरळ राज्यातील एक प्रमुख बंदर शहर आणि एक प्रसिद्ध पर्यटन केंद्र आहे. वेंबनाड तलाव नावाच्या सोयीस्कर बंद बंदराच्या काठावर, कोचीन किनारपट्टीवर जवळजवळ 50 किमी पसरलेले आहे. हे सरोवर केरळच्या (केरळ बॅकवॉटर) प्रसिद्ध "अंतर्देशीय पाण्याचे" मालकीचे आहे, जे पश्चिम घाटाच्या पश्चिम उतारावरून वाहणार्‍या प्रवाहांनी बनलेले आहे.

शहरामध्ये अनेक भाग आहेत:

  • एर्नाकुलम वेंबनाडच्या मुख्य भूभागावर स्थित आहे - कोचीनचा सर्वात विस्तृत आणि वेगाने वाढणारा भाग
  • पश्चिमेस २ किमी अंतरावर विलिंग्डन बेट आहे.
  • बंदरातून अगदी बाहेर पडल्यावर - शहराचे सर्वात जुने जिल्हे - दक्षिणेकडून त्याला लागून असलेला फोर्ट कोचीन आणि मॅटनचेरी
  • या भागांनी व्यापलेल्या द्वीपकल्पाच्या उत्तरेला बेटांचा समूह आहे - बोलगट्टी (बोलगट्टी), गुंडू (गुंडू) आणि सर्वात मोठा व्‍यपीन (व्‍यपीन)

शहरातील बहुतेक आकर्षणे फोर्ट कोची आणि मत्तनचेरी भागात आहेत, तर बस आणि रेल्वे स्थानके एर्नाकुलममध्ये आहेत.

वेंबनाड तलावातील अद्वितीय वनस्पती म्हणजे जलकुंभ आहे. हे गवताच्या एका प्रचंड गोंधळलेल्या बॉलसारखे दिसते, जे कधीकधी अशा आकारात पोहोचते की ते पांढरे बगळे वस्ती असलेली संपूर्ण तरंगणारी बेटे बनवतात.

कोचीनला कसे जायचे

कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ शहरापासून २९ किमी अंतरावर आहे. हे कोलंबो, दुबई, अबू धाबी, सिंगापूर, क्वालालंपूर, मस्कत, दोहा, मनामा, कुवेत, त्रिवेंद्रम, मुंबई, मद्रास, दिल्ली, गोवा, कोलकाता, लक्षद्वीप बेटे आणि बंगलोर येथून उड्डाणे प्राप्त करतात.

त्रिवेंद्रमहून ट्रेननेही पोहोचता येते (4-5 तास). शहरामध्ये दोन रेल्वे स्थानके आहेत, जी एर्नाकुलम येथे आहेत - उत्तर आणि दक्षिण.

खरेदी: दुकाने

एमजी रोड आणि मरीन ड्राइव्हवर कपडे आणि दागिने खरेदी करता येतात. अलीकडे, शहरात मोठे शॉपिंग मॉल्स बांधले गेले आहेत: मरीन ड्राइव्हवरील बे प्राइड मॉल, एडापल्ली येथील ओबेरॉन मॉल आणि एमजी रोडवरील माय किंगडम - वातानुकूलित, फूड कोर्ट आणि सुंदर कॉफी शॉप्स.

कोचीनमधून रेशीम आणण्यासारखे आहे - नाजूक, आश्चर्यकारक, सर्व रंग आणि छटा.

कोचीनचे मनोरंजन, सहली आणि प्रेक्षणीय स्थळे

फोर्ट कोची हा जुन्या वसाहतींच्या बंगल्यांनी नटलेला अरुंद रस्त्यांचा आरामदायी भाग आहे. येथे सेंट फ्रान्सिसचे चर्च आहे - भारतातील सर्वात जुने कॅथोलिक चर्च, 1503 मध्ये बांधले गेले होते, जेथे वास्को द गामाची राख एका वेळी विसावलेली होती. 1724 पासून अस्तित्वात असलेल्या जुन्या डच स्मशानभूमी आणि सांताक्रूझच्या बॅसिलिका येथेही तुम्ही चालत जाऊ शकता.

पूर्वीच्या बिशपच्या राजवाड्यात असलेले इंडो-पोर्तुगीज संग्रहालय हे मनोरंजक आहे. संग्रहामध्ये हे समाविष्ट आहे: मंदिराची शिल्पकला आणि चर्चची भांडी, पोर्तुगीज भारताच्या इतिहासावरील साहित्य. उघडण्याचे तास: 9:00-18:00, ब्रेक 13:00-14:00, सोम - दिवस सुट्टी.

Mattanchery मध्ये अनेक मनोरंजक आर्ट गॅलरी आहेत: द्रविडिया आर्ट अँड परफॉर्मन्स गॅलरी, काशी आर्ट कॅफे आणि लिला स्टुडिओ. 1.5 किमी दक्षिणेला मत्तनचेरी पॅलेस आहे, जो कोचीन महाराजांसाठी पोर्तुगीजांनी 1555 मध्ये बांधला होता. राजवाड्यात, कोचीच्या शासकांचे पोर्ट्रेट गॅलरी आहे (कामाचे तास: 10:00-17:00, शुक्रवारी सुट्टी, फोटोग्राफी निषिद्ध आहे). राजवाड्यापासून फार दूर नाही ज्यू क्वार्टर आणि प्राचीन सिनेगॉग परदेसी सिनेगॉग (कामाचे तास: 10:00-17:00, ब्रेक 12:00-15:00, शनिवार - सुट्टी).

केरळ राज्याची सांस्कृतिक घटना, जी 16 व्या शतकापासून अस्तित्वात आहे, ती म्हणजे केरळ कथकली केंद्र. येथे ते पुराण, रामायण किंवा महाभारतातील कथानकावर पारंपारिक नाट्यप्रदर्शनाची मांडणी करतात.

कोचीमधील सर्वात लोकप्रिय आणि मजेदार डिस्को: तांडव, अवा लाउंज, ग्लो लाउंज बार (हार्बर व्ह्यू हॉटेलमध्ये स्थित, बुधवार आणि गुरुवारी सर्वात अपमानजनक पार्ट्या), फॉर्म्युला 1, लाउंजिव्हिटी, कौचिन (द ग्रँड हॉटेलमध्ये स्थित, उत्कृष्ट संगीत ) आणि रामदा.

कोची बंदरात, केरळने (E वर जोर) ब्लॅकवॉटरला जहाजाची सफर केली. 80 युरो पूर्ण दिवस दुपारच्या जेवणासह, 50 युरो अर्धा दिवस उपाशी. आम्ही बसने दीड तास गाडी चालवली (जर तुम्ही गेलात तर वाटेत उजव्या बाजूला बसा, सूर्य डाव्या बाजूला असेल, सावलीत सरळ रस्त्याने 56 किमी चालवणे चांगले).









लेखक खूश होईल!

वेंबनाड तलावातील गोड स्वप्न आणि खेकडा खाणे

तर, लँडिंग पोर्ट हे भारतीय शहर कोची (कोची) आहे ज्यामध्ये शेवटच्या अक्षरावर उच्चार आहे. पूर्वी, शहराला एक अक्षर मोठे म्हटले जात असे - कोचीन आणि मूळ अक्षर "si" - कोचीनद्वारे लिहिलेले होते. किनारी पट्टी खाडी आणि बेटांनी इंडेंट केलेली आहे. कोची क्रूझ टर्मिनल, त्याच्या स्वत: च्या नावाने समुद्रिका समुद्रिका, विलिंग्डन बेटावर स्थित आहे. हे बेट बेटांच्या दुसऱ्या ओळीवर स्थित आहे, म्हणजेच, दुसरे बेट अरबी समुद्रापासून ते बंद करते - एक नैसर्गिक अडथळा आणि घटकांपासून संरक्षण.



















तुम्हाला पुनरावलोकन आवडले? क्लिक करा लेखक खूश होईल!

एकदा तरी पाहण्यासारखे आहे

केरळ राज्यातील कोचीन शहराला ‘अरबी समुद्राचे मोती’ म्हटले जाते. हे शहर युरोपीय लोकांनी भारतात स्थापन केलेली पहिली वस्ती होती. कोचीन पर्यायाने पोर्तुगीजांकडून डचकडे, डचांकडून ब्रिटीशांकडे गेले, ज्यामुळे ते आज शतकानुशतके जुन्या समृद्ध आणि रंगीत इतिहासासह भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात विकसित सागरी शहरांपैकी एक आहे.

आम्ही येथे आणखी चांगल्या गोष्टींचा विचार केला नाही आणि प्रति व्यक्ती 79 युरो दराने बोटीने प्रवास केला. कार्यक्रमात प्रथम कोचीनचा थोडासा भाग आणि नंतर प्रसिद्ध विदेशी "हाऊस बोट्स" वर वेंबनाड तलावावरील क्रूझचा समावेश होता.

बस शहरातून फिरली. दुर्दैवाने, आम्ही वॉकिंग सेंटरवर थांबलो नाही आणि आम्हाला कोचीनच्या उत्तरेला फोर्ट कोची फेरीवर आणले.‎
फोर्ट कोचीनच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर पसरलेली चिनी मासेमारीची मोठी जाळी हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे. भारतात, ते चौदाव्या शतकापासून, चिनी महाद्वीपात प्रवेश केल्यापासून त्यांचा इतिहास शोधतात. एक जटिल मासेमारी यंत्रणा किमान चार लोकांद्वारे लीव्हर आणि वजनाने नियंत्रित केली जाते. मासेमारी सकाळी लवकर सुरू होते आणि चार ते पाच तास चालते. जाळी काळजीपूर्वक पाण्यात बुडवली जातात. जाळे 5 ते 20 मिनिटांपर्यंत पाण्याखाली असते, त्यानंतर ते सहजतेने उचलले जाते आणि किनाऱ्याजवळ पोहणाऱ्या माशांना बाहेर काढले जाते.

मासेमारी ठिकाणापासून दोन मीटर अंतरावर पकडलेले मासे तेथेच विकले जातात. खरेदी केलेले ताजे मासे येथे ग्रील्ड केले जाऊ शकतात.
आजकाल, चिनी मासेमारीची जाळी विदेशी पेक्षा अधिक काही नाही, खरी मासेमारीसाठी कंटाळलेल्या पर्यटकांचे मनोरंजन करण्यासाठी अधिक डिझाइन केलेली आहे. हे एक प्रसिद्ध पर्यटन आकर्षण आहे आणि बरेच पर्यटक जाळी कमी किंवा वाढवण्याच्या अधिकारासाठी पैसे देतात. वास्तविक मच्छिमार आजही शंभर-दोनशे वर्षांपूर्वीच्या मोकळ्या समुद्रात जातात, कदाचित शक्तिशाली इंजिन असलेल्या आधुनिक बोटींशिवाय.

जवळपास, अगदी जमिनीवर, ते विविध भारतीय स्मरणिका विकतात.

दोन तासांनंतर आम्ही अलेप्पीमध्ये पोहोचलो - असंख्य पर्यटक "हाऊस-बॉट्स" चा प्रारंभ बिंदू. अलेप्पी हे संपूर्ण मलबार किनाऱ्यावरील मुख्य बंदरांपैकी एक आहे, अन्यथा त्याला "पूर्वेचा व्हेनिस" म्हटले जाते. केरळच्या प्रसिद्ध हाउसबोट्स या बांबूच्या झोपडीप्रमाणे शैलीबद्ध केलेल्या हाऊस-बोट्स आहेत, ज्यात सर्व सुविधा आहेत ज्या एका छोट्या कंपनीला शांत बॅकवॉटर आणि अंतर्देशीय पाण्याच्या कालव्यांमधून प्रवास करू देतात. हाऊस बोट्स सर्व सुविधांसह आरामदायक दुहेरी केबिन, स्वयंपाकघर व्हरांडा आणि अगदी शॉवर आणि वातानुकूलनसह सुसज्ज आहेत. संघात 3 लोकांचा समावेश आहे - हेल्म्समन, माइंडर आणि कुक. स्थानिक उत्पादनांपासून बनवलेले पारंपारिक जेवण बोर्डवर दिले जाते.

वाटेत सारखी अनेक जहाजे होती. त्यानंतर आम्हाला दुपारचे जेवण देण्यात आले.

आम्हाला केरळमधील सर्वात मोठ्या तलावाच्या मध्यभागी नेण्यात आले - वेंबनाड. तलावातील एकपेशीय वनस्पतीला वॉटर हायसिंथ म्हणतात. कधीकधी ते संपूर्ण तरंगणारी बेटे बनवतात ज्यावर पक्षी घरटे बांधतात.

मी असे म्हणू शकत नाही की भारत माझ्या आत्म्यात बुडाला आहे, परंतु हे सर्व एकदा तरी पाहण्यासारखे आहे.




















तुम्हाला पुनरावलोकन आवडले? क्लिक करा लेखक खूश होईल!

कोचीन स्वतःच मनोरंजक नाही, तुम्हाला कालवे आणि वेंबनाड सरोवर पाहण्याची आवश्यकता आहे

कोचीनमध्ये 8 ते 18 तासांचे पार्किंग होते. पासपोर्ट नियंत्रण होते. उतरण्यापूर्वी पासपोर्ट आणि स्पेशल जारी केले गेले. इमिग्रेशन कार्ड. त्यानंतर भारताच्या पासपोर्ट नियंत्रण अधिकाऱ्यांनी या फॉर्मवर शिक्का मारला आणि त्यानंतरच ते किनार्‍यावर गेले. आम्ही जवळपास ४५ मिनिटे रांगेत उभे होतो. घाटातून बाहेर पडताना त्यांचे स्वागत लोकनृत्य, पौराणिक कथा, एक प्रकारची लोककथा यांनी केले.

बंदराच्या गेटमधून बाहेर पडताना टॅक्सी चालकांनी आमच्यावर हल्ला केला. सर्व बाजूंनी येणाऱ्या प्रस्तावांना शांतपणे प्रतिसाद देण्यासाठी तुमच्याकडे स्टीलच्या नसा असणे आवश्यक आहे.

आम्ही 6 आणि एक मूल असल्याने आम्ही एक मिनीव्हॅन घेतली. कोचीनच्या प्रेक्षणीय स्थळांच्या सहलीव्यतिरिक्त, आम्हाला अलेपे शहराजवळील बॅकवॉटर्सला जायचे होते - कालव्यांजवळील बोट क्रूझ. 1.5 तास एकेरी चालवा. कालवे आणि तलावाच्या बाजूने 2-तास चालण्यासह प्रत्येक गोष्टीसाठी, त्यांनी प्रति व्यक्ती $ 40 दिले. मूल मुक्त.

आमच्या एका माणसाला लोकल बीअर चाखायची होती आणि त्याने ड्रायव्हरला दारूच्या दुकानाजवळ थांबायला सांगितले. हा अर्थातच आम्ही पहिला "शो" पाहिला. अल्कोहोलसाठी रांग, यूएसएसआरमध्ये सोव्हिएत काळाप्रमाणे. दारूचा बाजार हा सळ्यांच्या मागे असून त्यापुढे अडथळे आहेत.

अलेप्पी जिल्हा शहरातील कालवे आणि वेंबनाड सरोवराच्या बाजूने बोटीने आम्ही निघण्याच्या ठिकाणी पोहोचलो.

आमचा दौरा छान होता! निसर्ग, लँडस्केप, पक्षी, लाजिरवाणे न होता आणि विशेषत: जवळून जाणाऱ्या बोटींकडे लक्ष न देता आपले जीवन जगणारे लोक - सर्वकाही खूप प्रभावी होते. आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळं जग.

कोचीनचाच फोटो रिव्ह्यू. कालवे आणि वेंबनाड सरोवराचा फेरफटका मारल्यानंतर तो अजिबात प्रभावित झाला नाही. पाहण्यासारखं काहीच नाही.

बरेच प्रवासी टॅक्सी किंवा टुक-टुकने प्रति कार $20-$25 इतके कमी दराने कोचीनच्या प्रेक्षणीय स्थळांवर गेले. भारतातील किंमती आश्चर्यकारक आहेत.

तुम्हाला पुनरावलोकन आवडले? क्लिक करा लेखक खूश होईल!

होते, पण भारत पाहिला नाही

मला भारतासोबत संमिश्र भावनांनी भेटीची अपेक्षा होती. बरेच जण भारताबद्दल भयंकर आणि जवळजवळ तिरस्काराने बोलतात, परंतु असे बरेच लोक आहेत जे या अद्भुत देशाशी अत्यंत आदराने आणि अगदी उत्साहाने वागतात. मग ती खरोखर कशी आहे?

कदाचित, सर्व लोक भिन्न आहेत आणि सर्वांसाठी ते स्वतःच्या मार्गाने उघडते. जर ते तयार असतील तर ते स्वीकारतील आणि त्यांचे रहस्य उघड करतील, जर ते खूप लवकर असेल तर ते त्यांना दूर ढकलतील... नाही, हे योग्य नाही - हे लोक स्वतःच भारताला स्वतःपासून दूर ढकलतात, कारण त्यांना काय दिसत नाही. वास्तविक मूल्ये आहेत. मला असे वाटते की जे केवळ स्वत:भोवतीच पाहत नाहीत, तर स्वत:कडेही लक्ष देऊ लागतात त्यांच्यासाठी भारताचे हित होईल.

आणि तसेही असो, हा असा देश आहे जिथे जगभरातील लोक चमत्कार, सौंदर्य आणि आंतरिक सुसंवाद शोधत येतात. सोने, दागिने, रत्नांनी भरलेल्या भारताने अनादी काळापासून विजेत्यांना आकर्षित केले आहे. प्राचीन संस्कृती, गुप्त ज्ञान, आयुर्वेद, ज्योतिष... हा गूढवादाने नटलेला, दंतकथांचा देश आहे.

समजण्यासाठी, पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी, क्रूझ दरम्यान एक थांबा नक्कीच पुरेसा नाही! आणि जेव्हा त्यांनी मला विचारले: "बरं, तुला भारत कसा आवडतो?", मी प्रामाणिकपणे म्हणालो: "मी भारत पाहिला नाही."

परंतु जर तुम्ही मला विचारले की मला पुन्हा तिथे जायचे आहे का, तर माझे उत्तर निःसंदिग्ध असेल: "होय!" परंतु हे सर्व एक गीतात्मक विषयांतर आहे आणि आता खरं आहे.

कोचीनमधील बंदराच्या गेटबाहेर प्रवाशांना असंख्य मार्गदर्शक-चालक भेटतात. ते टुक-टुक पासून संपूर्ण दिवसासाठी $ 5 मध्ये अगदी सभ्य जीप देतात. हुशार दिसणारे काका आम्हाला आवडले. त्याची ऑफर आम्हाला अगदी मान्य वाटली - सकाळपासून 18:30 पर्यंत संपूर्ण दिवसासाठी आम्ही $100, म्हणजे प्रति व्यक्ती $25 दिले. दरामध्ये वेंबनाड तलाव नावाच्या बंदराच्या बाजूने 2-मजली ​​बोटीवर 3 तासांची बोट ट्रिप समाविष्ट आहे. मग आम्ही 8 आसनी जीपमध्ये संध्याकाळची प्रेक्षणीय स्थळे पाहिली.
किंमतीच्या बाबतीत - सुमारे 40 आसनी बोटीची किंमत आम्हा चौघांसाठी $80 आहे आणि एका जीपची किंमत प्रत्येकासाठी $20 आहे (प्रति व्यक्ती $5). एका मोठ्या कंपनीसाठी पुरेशी जागा असती, परंतु आम्ही एका मार्गदर्शकाशी किंमतीची वाटाघाटी करत असताना आमचे शिपमेट बंदरात पळून गेले.

बंदरातून, आम्ही वेगाने चालत वॉटर बस स्टॉपवर पोहून पलीकडे गेलो, जिथे आम्ही आमच्या भाड्याच्या बोटीत बसायला हवे होते.
वाटेत, आम्हाला दिग्गज ट्रक भेटले, जे त्यांच्या ड्रायव्हर्सनी खूप प्रेमाने रंगवले आहेत आणि नावे देखील दिली आहेत. कोचीनमधील ट्रक हे कलाकृतीसारखे आहे.

आम्ही भेटलेले सर्व लोक, एक नियम म्हणून, त्यांच्या हृदयाच्या तळापासून हसले.

बरं, तिथूनच आमची वेंबनाड तलावाची मिनी टूर सुरू झाली. हे सरोवर केरळ (केरळ बॅकवॉटर) च्या प्रसिद्ध "अंतर्देशीय पाण्याचे" मालकीचे आहे, ते पश्चिम घाटाच्या पश्चिम उतारावरून वाहणार्‍या प्रवाहांनी तयार झाले आहे. असंख्य पांढरे बगळे किनाऱ्यालगतच्या झाडांच्या फांद्यांवर आणि तळहातावर बसतात. सर्व बोटी इंद्रधनुष्याच्या सर्व रंगात रंगवल्या आहेत. आम्ही एका बर्फाच्छादित ख्रिश्चन चर्चच्या पुढे निघालो. तसे, कोचीनमध्ये ख्रिश्चनांची संख्या 35% आहे - देशातील सर्वात मोठ्या ख्रिश्चन समुदायांपैकी एक. आम्ही सर्व आनंदाने ओवाळतो आणि हसतो.

आम्ही पोहतो आणि आजूबाजूच्या दृश्यांचा आनंद घेतो. सुंदर निसर्ग, खजुरीची झाडे, उष्ण कटिबंध... सर्वात ओळखण्याजोगे चित्र, अक्षरशः कोचीनचे एक व्हिजिटिंग कार्ड, प्रसिद्ध "चिनी जाळी" (चिन-वाला) आहे, ज्यासह मच्छीमार येथे मासे करतात. भरतीच्या वेळी, काउंटरवेट असलेली ही महाकाय जाळी पाण्यात उतरवली जाते आणि कमी भरतीच्या वेळी ती माशांसह उठवली जातात. त्यांना चिनी म्हटले जाते कारण ते असे मानतात की केरळमध्ये हे उपकरण 14 व्या शतकात आलेल्या चिनी लोकांनी आणले होते.

कॅप्टनने आम्हाला त्याचे जहाज चालवायला बोलावले, कंपनीसाठी चालवले.

आमची बोट ट्रिप संपत आली होती, आणि आता तुम्हाला शहरातील आधुनिक घरे दिसत होती. लाटांवरच्या या सुखद वाटचालीनंतर आम्ही भारतीय चहा प्यायला निघालो. त्याच वेळी विविध कलाकृती असलेल्या एका दुकानाला भेट दिली. तेथे तुम्हाला मौल्यवान दगड, असामान्य साडी रंग, तसेच सोन्याने भरतकाम केलेले आणि दगडांनी सजवलेले भारतीय गालिचे, कश्मीरीपासून बनवलेल्या मनोरंजक सुंदर शाल आणि स्कार्फ खरेदी करू शकता. आम्ही स्मरणिका दुकानातून फिरलो.

आमच्या प्रेक्षणीय स्थळांच्या सहलीचा पहिला मुद्दा म्हणजे चर्च ऑफ सेंट फ्रान्सिस,
1524 मध्ये कोची येथे मरण पावलेल्या वास्को द गामाला तिसर्‍या भारत भेटीत दफन करण्यात आले या वस्तुस्थितीसाठी प्रसिद्ध आहे. पण चौदा वर्षांनंतर त्याचे अवशेष लिस्बनला नेण्यात आले. नॅव्हिगेटरचा समाधीचा दगड अजूनही येथे पहायला मिळतो.

आम्ही ऑर्थोडॉक्स पाहिले, परंतु सेंट सीरियन चर्च. पीटर आणि सेंट पॉलचे ऑर्थोडॉक्स सीरियन चर्च.

आम्ही एका मनोरंजक ठिकाणी देखील भेट दिली - मत्तनचेरी पॅलेस, 1555 मध्ये पोर्तुगीजांनी कोची महाराजांसाठी बांधला होता. दुर्दैवाने, तेथे चित्रे काढण्यास सक्तीने मनाई आहे, परंतु तेथे चित्रीकरण करण्यासाठी काहीतरी होते - अनेक हॉलच्या भिंती भारतीय महाकाव्यातील दृश्यांसह रंगवल्या आहेत, तेथे एक पोर्ट्रेट गॅलरी आहे, कोचीच्या राज्यकर्त्यांच्या फर्निचरचे तुकडे आहेत.

आम्ही एका मसाल्याच्या दुकानात थांबलो, कारण कोचीन प्रत्येक चवीसाठी ते भरले आहे.

मुळात आम्ही कोचीनमध्ये हेच बघायला मिळालं. आम्ही अनेक दागिन्यांची दुकाने थांबवून त्यांचे दगड आणि त्यांच्यापासून बनवलेल्या उत्पादनांचे मूल्यमापन केले, आम्हाला अगदी गेल्या शतकातील अतिशय मनोरंजक डिझाइन कामे मिळाली. मग आम्ही आधीच थेट बंदराच्या दिशेने निघालो होतो.

आम्ही अक्षरशः धावत पळत जहाजाकडे गेलो, आम्ही निघण्याच्या अगदी जवळ पोहोचलो. मग आम्ही समुद्रात एक दिवस घालवला आणि मग ... मालदीव!



 लेखक खूश होईल!

 

भटकंती; केरळातील विलोभनीय धबधबे


सामना ऑनलाईन

>>प्रा. वर्षा चोपडे

आपला हिंदुस्थान देखणा आणि सारे जहां से अच्छा आहे. देशातील धुक्याने आच्छादलेली शिखरे, उत्साही प्रवाह, धबधब्याची विहंगम रूपे, हिरवेगार जंगल, विविध वृक्षवेली आणि निसर्गाचा उत्तम आनंद लुटण्यासाठी एखाद्या अद्भुत ठिकाणाला भेट द्यायची असेल तर केरळला आवर्जून भेट द्या. केरळमध्ये एकूण 27 अप्रतिम सुंदर धबधबे आहेत. केरळमधील धबधबे त्याच्या मोहक सौंदर्याने जगभरातील पर्यटकांना भुरळ घालतात. दाक्षिणात्य सिनेमांमध्ये जी नैसर्गिक दृश्ये आपण बघतो त्याला तोड नाही. येथील धबधब्यांच्या वाटेवरचे स्वर्गीय वातावरण, सुपारी, मिरपूड, आले आणि मसाल्यांच्या बागा आपल्या अनोख्या सुगंधाने मन बेभान करतात. केरळात अनेक धबधबे आपण बघू शकतो आणि त्यात तुडुंब भिजू शकतो. परिवारासोबत त्याचा आनंद लुटू शकतो. मी भेट दिलेले काही धबधबे मला अवर्णनीय वाटतात. कारण स्वच्छ नितळ पाणी आणि सुरक्षित जंगल मन भारावून टाकतात, तर पहिला धबधबा आहे अथिरपिल्ली धबधबा. त्रिशूर जिह्यातील चालकुडी तालुक्यातील अथिराप्पिल्ली पंचायतीमध्ये चालकुडी नदीवर स्थित आहे. कोची शहरापासून अंदाजे 60 किलोमीटर अंतरावर असून ‘बाहुबली’ सिनेमात हा धबधबा अप्रतिम चित्रित केला आहे. त्यामुळे पर्यटक मुद्दाम या धबधब्याला भेट देतात. अथिरापिल्ली फॉल्स हा केरळमधील सर्वात मोठा धबधबा आहे आणि त्याला ‘दक्षिण हिंदुस्थानातील नायगारा’ असे टोपणनाव आहे. पण आता ‘बाहुबली’ सिनेमामुळे पर्यटक याला ‘बाहुबली धबधबा’ म्हणून संबोधतात. थिरापिल्ली ते वाझाचल धबधबा या मार्गावर रस्त्याच्या अगदी जवळ आणखी एक धबधबा आहे, ज्याला स्थानिक भाषेत ‘चारपा धबधबा’ म्हणतात. जवळच असलेला एझात्तुमुघम प्रकृति ग्रामम् येथील वाढाचल धबधबा पर्यटकांसाठी पर्वणी आहे. पावसाळय़ात जून-सप्टेंबरला लाखो पर्यटक फॉल्स आणि वाझाचल पिकनिक स्पॉटला भेट देतात. अथिरप्पिली हे तामीळनाडू आणि केरळला जोडणाऱया राज्य महामार्गावर घनदाट जंगलात वसलेले आहे. त्यामुळे रात्रीच्या प्रवासाला परवानगी नाही. दोन्ही बाजूंच्या चौक्या संध्याकाळी साडेसहा वाजता बंद होतात. त्यापूर्वी सर्व वाहनांना दोन्ही चेकपॉइंटमधून बाहेर पडावे लागते.

दुसरा धबधबा थुशारागिरी. कोझिकोडपासून 50 किमी अंतरावर असलेल्या थुशारागिरी धबधब्यात एरत्तुमुक्कू, माझविल चट्टोम आणि थुंबिथुल्लम पारा यांचा समावेश आहे. येथे ट्रेकिंगद्वारे किंवा वाहनाने सहज पोहोचता येते. धबधब्यांमुळे पर्वताच्या शिखरावर तयार झालेल्या सुंदर चांदीच्या मुकुटावरून थुशारागिरी किंवा ‘मिस्ट-कॅप्ड पीक्स’ हे नाव पडले आहे. पश्चिम घाटातून उगम पावणारे दोन प्रवाह येथे मिळून चालीपुझा नदी बनते. नदी तीन धबधब्यांमध्ये वळते आणि एक बर्फाच्छादित स्प्रे तयार करते, ज्यामुळे ‘थुशारागिरी’ हा शब्द आहे. ज्याचा अर्थ बर्फाच्छादित पर्वत असा आहे. पावसाळा आणि हिवाळय़ाचा काळ या धबधब्यास भेट देण्यास उत्तम आहे. अनेक पर्यटक येथे धबधब्याचा आनंद लुटतात. तुषारगिरी धबधब्याजवळ चाळीपुझा येथे तुषारगिरी पूल आहे. हा केरळमधील सर्वात उंच कमान पुलांपैकी एक आहे.

तिसरा पलारुवी धबधबा. हा धबधबाही अत्यंत प्रसिद्ध आहे. केरळ-तामीळनाडू सीमेजवळ स्थित पलारुवी धबधबा, थेनमालाच्या डोंगराळ प्रदेशात एक प्रमुख आकर्षण आहे. पलारुवी म्हणजे ‘दुधाचा प्रवाह’. या धबधब्यात पाणी 300 फूट उंचीवरून खडकांमधून खाली येते. हे एक आनंददायक पिकनिक स्पॉट बनले आहे, जिथे कोणीही विनाव्यत्यय विहंगम दृश्याचा आनंद घेऊ शकतो. फेसाळणारे पाण्याचे प्रवाह, चांदीसारखा चमचमणारा आणि थंड वातावरण असलेला हा धबधबा डोळय़ांचे पारणे फेडतो. पलारुवी कोल्लमपासून सुमारे 75 किमी अंतरावर आहे आणि या जल-स्वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना सुमारे चार किमी खोल जंगलात जावे लागते. धबधब्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी सरकारी वाहन व्यवस्था आहे. त्यामुळे वेळ असेल तर स्वर्गीय केरळला आणि या धबधब्याला जरूर भेट द्या.
– varshakisanc@gmail.com

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)

भटकंती – केरळचे वायनाड इडक्कल लेणी

सामना ऑनलाईन

>> प्रा. वर्षा चोपडे

केरळमधील वायनाड जिल्हा पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. केरळ, तामीळनाडू आणि कर्नाटक. खरं तर, केरळचा हा एकमेव जिल्हा आहे ज्याची सीमा इतर दोन राज्यांशी आहे. वायनाडचा हिंदू धर्माशी संबंध हजारो वर्षांपूर्वीचा आहे. हिंदूशिवाय मुस्लिम आणि ख्रिश्चन तसेच आदिवासी समुदाय येथे आनंदाने राहतात. आश्रमकोळी (वाल्मिकींचा आश्रम), योगीमुला, रामपल्ली, सीता मंड, पुथडी आणि चोरुपुरा ही ठिकाणे रामायण काळाशी संबंध दर्शवतात. रामायण, महाभारत आणि दक्षिण भारत यांचा संबंध असावा. कारण प्राचीन मंदिरे आणि पौराणिक गोष्टीत त्याचा उल्लेख आढळतो. पुलपल्ली येथे सीता-लव-कुश मंदिर असल्याची स्थानिक लोकांची श्रद्धा आहे आणि पुलपल्ली येथेच देवी सीतेने लव आणि कुशला जन्म दिला अशी मान्यता आहे. आश्रम सुंदर आहे. पुलपल्ली सीता-लव-कुश मंदिर पर्यटकांचे आकर्षण आहे. मंदिर वायनाड जिह्यात आहे. तेथील आदिवासी समुदाय भगवान  राम आणि सीता यांना त्यांच्या स्वतच्या कुटुंबातील व्यक्ती मानतात. राक्षस बाणासुरमला आणि भगवान कृष्ण यांच्यातील युद्ध बाणासुरमालावर झाले होते. असे मानले जाते की, युद्धादरम्यान कृष्णाने बाणासुराचा करम (हात) कापला आणि म्हणून त्या जागेचे नाव कराबनाम पडले. बाणासूर टेकडीच्या पायथ्याशी असलेले कराबनाम मंदिर या जिह्यात  प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की, रावणावर विजय मिळविण्यासाठी ऋषीमुनींच्या मार्गदर्शनाखाली भगवान रामाने तिरुनेल्ली मंदिरात प्रार्थना केली. वायनाड जिह्यात  वाल्मिकींचा आश्रम, बाणासूर सागर धरण, कुरुवा आयलॅन्ड, कोडे तलाव, थोलपेटी वन्य जीव अभयारण्य, बांबू कारखाना, वायनाड वन्य जीव अभयारण्य, सोचीपारा फॉल्स, फँटम रॉक, नीलिमाला ह्यू पॉइंट आणि इतर प्रेक्षणीय स्थळे आपण बघू शकतो. हिंदुस्थानला खूप प्राचीन संस्कृतीचे लेणे लाभले आहे. देशातील विविध राज्यांत पुरातन लेण्या आहेत आणि त्याचा इतिहास वेगवेगळा आहे. इडक्कल लेणीहिंदुस्थानातील केरळमधील वायनाड जिह्यातील कलपेट्टापासून 25  किमी (15.5 मैल) दूर इडक्कल येथे दुर्गम ठिकाणी दोन नैसर्गिक गुहा आहेत. त्या म्हैसूरच्या उंच पर्वतांना मलबार किनाऱयावरील बंदरांशी जोडणाऱया प्राचीन व्यापारी मार्गाजवळ अंबुकुट्टी माला येथे समुद्रसपाटीपासून 1,200  मीटर आणि 3,900  फूट उंचीवर आहेत. गुहांच्या आतील भागात सचित्र लेखन आहे, जे या प्रदेशात  वस्ती असल्याचे सूचित करतात. ब्रिटिश काळात 1890 मध्ये तत्कालीन मलबार राज्याचे पोलीस अधिकारी फ्रेड फॉसेट यांनी या गुहांचा शोध लावला होता, पण कयास आहे की आदिवासींना ही लेणी परिचित असावी. त्यांनी  मानववंश शास्त्राrय आणि ऐतिहासिक महत्त्व लगेच ओळखले होते. आणि त्यावर  एक लेख लिहिला होता त्यामुळे अनेक पर्यटकांमध्ये या लेण्यांबाबत आकर्षण निर्माण झाले. इडक्कलच्या पाषाणयुगीन लेण्यावरील कोरीवकाम दुर्मिळ आहे.

खडकाचा तुकडा फुटल्यामुळे 30 फूट खोल भाग आहे. येथे एका बाजूला लाखो टन वजनाचा खडक आहे जो गुहेचे ‘छत’ असल्यागत भासते. गुहेत जे कोरीव काम तसेच मानवी आणि प्राण्यांच्या आकृत्यांचे आणि काही अज्ञात चिन्हे बघून असे  वाटते की, इडक्कल लेण्यांमध्ये इतिहासात वेगवेगळय़ा ठिकाणी अनेक वेळा विविध समुदायांची वस्ती होती.

या गुहेला ‘अम्पकुठय  माला’ असेही म्हणतात. कारण रामाचे पुत्र लव आणि कुश यांनी डोंगरावर बाण मारून गुहा निर्माण केली होती असे मानले जाते, पण चित्रांचा सिंधू संस्कृतीशी संबंध असावा असा तर्क आहे.

केरळ राज्य पुरातत्व विभागाचे इतिहासकार लिहितात, ‘येथील प्रतीकांचा शोध हा हडप्पा संस्कृतीशी मिळताजुळता आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने द्रविडीयन संस्कृती आहे आणि सांस्कृतिक प्रसार झाल्याची साक्ष आहे. सिंधू संस्कृती अचानक नाहीशी झाली असे मानणे चुकीचे आहे. इरावथम महादेवन, सिंधू खोरे आणि गेहसूस लिपींचे अभ्यासक म्हणाले की, हे निष्कर्ष अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि ऐतिहासिकदृष्टय़ा त्याला महत्त्व आहे. केरळमधील ही लेणी प्रसिद्ध असली तरी  शेंथुरिनी (शेंदुर्नी) जंगलातील पाषाणयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. उत्तर प्रदेश आणि रामायण यांचा संबंध आहे, परंतु दक्षिण हिंदुस्थान आणि रामायण, महाभारत यांच्या संबंधावर अभ्यासकांनी आपले मत मांडणे जरुरी असून त्यामुळे अनेक शंकांचे समाधान होण्यास मदत होईल हे नक्की.

varshakisanc@gmail.com

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस कोची केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.

भटकंती – केरळमधील प्राचीन शिवमंदिरे

सामना ऑनलाईन

>> प्रा. वर्षा चोपडे

केरळ कोट्टायाम जिह्यात वसलेले वायकोम पर्यटकांना त्याच्या समृद्ध नैसर्गिक सौंदर्याने आणि आध्यात्मिक महत्त्वाने आकर्षित तर करतेच, पण वेंबनाड सरोवराने वेढलेले वायकोम पर्यटकांना त्याच्या सुंदर पाणवठे आणि शांत वातावरणाने मोहीत करते. हेच ठिकाण वायकोम सत्याग्रहाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. येथे जो सत्याग्रह झाला होता त्याचे नेतृत्व राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पेरियार रामासामी यांनी केले होते. एर्नाकुलम, अलप्पुझा आणि कोट्टायम येथून वायकोमला सहज पोहोचता येते. येथील पन्ना मुरिन्जापुझा बॅकवॉटर आणि हिरवा गालिचा विणलेला निसर्ग पर्यटकांना वेड लावतो.

परंपरेनुसार केळीच्या पानांवर दिल्या जाणाऱ्या ओनासाध्याचा (केरळी जेवण) आणि गोड ताडीचा आस्वाद घेणे आनंददायी अनुभव आहे. येथील मुख्य आकर्षण श्री वायकोम महादेव मंदिर हिंदू देव शिवाला समर्पित आहे. हे मंदिर अशा काही मंदिरांपैकी एक आहे जे शैव, शिव आणि वैष्णवांचे अनुयायी, विष्णूचे अनुयायी या दोघांनीही पूज्य मानले आहे. वायकोममध्ये शिवाला प्रेमाने ‘वायकोम स्वामी वैक्कथप्पन’ म्हटले जाते. येथील शिवलिंग हे हिंदू धर्माच्या दुसऱया युगातील त्रेतायुगातील असल्याचे मानले जाते आणि हे मंदिर केरळमधील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक मानले जाते.

पारंपरिक कथेनुसार खरा नावाचा राक्षस शैव विद्या उपदेश म्हणजे शैव धर्माचे ज्ञान मिळाल्यावर मलयवनातून सध्याच्या तामीळनाडूतील चिदंबरम या पवित्र शहरात गेला आणि तेथे त्याने मोक्षप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या आणि ध्यानधारणा केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिव प्रकट झाले आणि त्याने मागितलेले सर्व वरदान दिले आणि त्यांच्यापासून काढलेली तीन महान लिंगे त्याला दिली. शिव यांनी खराला मोक्ष मिळविण्यासाठी लिंगांची पूजा करण्यास सांगितले आणि ते अदृश्य झाले. खरा राक्षसाने ती शिवलिंगे त्याच्या उजव्या हातात, एक डाव्या हातात आणि गळय़ात घातली व तो तीन लिंगांसह हिमालयातून दक्षिणेकडे परत येत होता. या ठिकाणी आल्यावर थकवा जाणवला म्हणून त्याने शिवलिंग खाली ठेवली. विश्रांतीनंतर जेव्हा त्याने शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते हलले नाही. तेवढय़ात आकाशवाणी झाली. “जो माझा आश्रय घेईल त्याला मी मोक्ष देऊन येथेच राहीन!” खराने शिव यांची अट मान्य केली आणि मुक्ती मिळाल्यानंतर शिवलिंगांना व्याघ्रपद नावाच्या ऋषींच्या ताब्यात देऊन त्यांना संरक्षण आणि पूजा करण्यास सांगितले. मल्याळम दिनदर्शिकेनुसार वृचिका अष्टमीच्या दिवशी शिव आणि पार्वती व्याघ्रपदा ऋषींच्या समोर प्रकट झाले. शिवपार्वतीने हे स्थान ‘व्याघ्रपदपुर्म’ म्हणून ओळखले जाईल असा आशीर्वाद दिला.

व्याघ्रपद यांनी काही काळ भक्तिभावाने पूजा चालू ठेवली आणि शिव इच्छेनुसार तीर्थयात्रेला निघून गेले. एके दिवशी परशुराम त्या ठिकाणाहून जात होते. शुभचिन्हे आणि काही चमत्कारिक जाणवले म्हणून ते थांबले असता त्यांना स्वर्गीय किरण उत्सर्जित करणारे एक शिवलिंग पाण्यात बुडलेले दिसले. ते खरा राक्षसाने ठेवलेले शिवलिंग असल्याचे त्यांना समजले. परशुरामांनी विचार केला की, पृथ्वीवरील सर्वात पवित्र व्याघ्रपदपुर्मा हे स्थान मुक्ती प्राप्त करू इच्छिणाऱया भक्तांसाठी एक उत्तम आश्रय असू शकते. त्यांनी प्रार्थना व पवित्र मंत्रांचे पठण करून येथे शिवलिंगाची पूजा केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिव पत्नी पार्वतीसह परशुरामांसमोर प्रकट झाले. हे शिवलिंग त्यांचे परमभक्त परशुरामांनी रीतीरिवाजांनी आणि संस्कारांनी पवित्र केले आहे हे पाहून त्यांना खूप आनंद झाला.

आनंदाने आणि कृतज्ञतेने भरलेल्या परशुरामांनी येथे एक मंदिर बांधले आणि गावातील एका उच्चभ्रू ब्राह्मणाकडे सोपवले. शिवाची पूजा करण्यासाठी आवश्यक पवित्र मंत्र, कार्यपद्धती, श्लोक शिकवले आणि त्यांना मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून दीक्षा दिली. परशुरामांनी संपूर्ण मंदिर ब्राह्मणाला दान केले आणि अंतर्धान पावले. मंदिर व त्याच्याशी निगडित चालीरीती आणि संस्कार हे परशुरामांनीच नियोजित, निश्चित केले आहेत अशी श्रद्धा आहे.

गावकरी सांगतात जुन्या काळात हे मंदिर 108 कुटुंबांच्या मालकीचे होते. काही वादांमुळे ते दोन गटांत विभागले गेले. त्यातील एक गट राजाच्या बाजूने सामील झाला. त्यांच्यातील वाद आणि भांडणे दिवसेंदिवस वाढत गेली. एके दिवशी दुपारच्या वेळी दुभंगलेल्या गटाचा एक गट मंदिरात आला. एका गटाचा प्रमुख नजलाल नंबुथिरी पूजा थांबवण्यासाठी मंदिरात घुसला. त्या वेळी देवतेला अर्पण केलेले अन्न नैवेद्य मंडपाच्या हॉलच्या पश्चिमेला ठेवले जात असे. नजलाल नंबूथिरी यांनी पश्चिम दरवाजातून प्रवेश केला आणि शिवाची पूजा, नैवेद्य विस्कळीत केला. परत जाताना त्याला एका विषारी सापाने दंश केला. पश्चिमेकडील दरवाजाबाहेर त्याला मृत्यूने गाठले. त्यानंतर गाभाऱयाचा दरवाजा आपोआप बंद झाला आणि गर्भगृहाच्या आतून एक स्वर्गीय आवाज ऐकू आला, “हा पश्चिम दरवाजा आता उघडू नये!” नजलाल नंबुथिरीच्या पूजेच्या व्यत्ययाविरुद्ध शिवाचा ाढाsध भक्तांनी बघितला. नंबुथिरीच्या मृत्यूनंतर मंदिराच्या प्रांगणाचा पश्चिम दरवाजा कायमचा बंद करण्यात आला आहे. हे मंदिर केरळमधील सर्वात मोठय़ा मंदिरांपैकी एक आहे. मंदिर परिसर आकर्षक आहे. नदीच्या वाळूने सपाट केलेला परिसर चारही बाजूंना चार गोपुरम किंवा प्रवेशद्वाराच्या बुरुजांसह कंपाऊंड भिंतींनी संरक्षित आहे. मंदिर उत्तर-दक्षिण दिशेला पाच अंश झुकलेले आहे. गर्भगृह वरवर पाहता गोलाकार आकाराचे आहे आणि त्यावर तांब्याचे पत्रे, दोन दालने आहेत. केरळमधील हे एकमेव मंदिर आहे, ज्यात अंडाकृती आकाराचे गर्भगृह आहे. पण बाहेरून ते गोलाकार मंदिरासारखे दिसते. अप्रतिम मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. मुख्य मंडप, पहिला खांब असलेला सभा मंडप, कक्ष आकाराच्या दगडी आणि एकाच लाकडाचा वापर करून बांधलेला आहे. भिंती आणि खांब खूप मजबूत आहेत. गर्भगृह कक्ष पूर्णत दगडात बांधलेले आहे आणि छताचा चौकोनी आकार आहे. गर्भगृहातून सहा पायऱया ओलांडून गेल्याशिवाय आपल्याला शिवलिंगाचे दर्शन घेता येत नाही. या मागचे विलक्षण सत्य असे की, या सहा पायऱया ओलांडणे म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सरी स्वभाव या सहा अशुद्धता सोडून देणे आणि मुक्ती किंवा मोक्ष प्राप्त करणे होय.

varshakisane@gmail.com

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस कोची-केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)

मंदिरांच्या प्रदेशात

सामना ऑनलाईन

>> प्रा. वर्षा चोपडे

हिंदुस्थानचे केरळ राज्य देशी आणि परदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. संपूर्ण केरळ स्वच्छता आणि सुंदर निसर्ग, प्रत्येक धर्माचे धार्मिक स्थळ आणि विविध देवतांचे निवासस्थान यासाठी ओळखले जाते. अलाप्पुझाचे बीचेस आणि बॅक वॉटर अप्रतिम आहेत, पण अलाप्पुझा जिल्ह्यातील अंबालापुझापासून तीन किमी पूर्वेला करुमाडी हे गाव आहे. या भागातील श्रीकृष्ण मंदिर आणि बुद्ध मंदिर भेट देण्यासारखे आहे. करुमाडी गावातील श्रीकृष्ण मंदिराजवळ करुमादिक्कुत्तन, अर्धी तुटलेली बुद्ध मूर्ती सापडली होती. हे विहार बुद्धाच्या काळ्या ग्रॅनाइटच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. ही बुद्ध मूर्ती 9व्या शतकापासून 14व्या शतकाच्या कालखंडातील आहे, असे इतिहासकार सांगतात. असे म्हणतात की, या काळात केरळमध्ये बौद्ध धर्माची भरभराट झाली. या विहाराला  राज्याच्या इतिहासात आणि पर्यटनात खूप स्थान आहे, कारण केरळमध्ये बुद्धाची मूर्ती असलेले हे एकमेव विहार शिल्लक आहे.

केरळच्या प्रदेशात अय राजा वरगुणाच्या काळात बौद्ध धर्माची भरभराट झाली. त्याच्या कारकिर्दीत, बौद्ध भिक्षूंनी बुद्धाला समर्पित अनेक मंदिरे आणि मठांची रचना केली. पण जसजसा हिंदू राजाने प्रदेश ताब्यात घेतला तसतसा बौद्ध धर्म हळूहळू राज्यातून नाहीसा होऊ लागला. खरे तर अल्लापुझा आणि कुलियनच्या किनारी भागातून बुद्धाच्या मोठय़ा प्रमाणात प्रतिमा उत्खननात सापडल्या आहेत.

पण करुमादिकुटन मंदिरातील बुद्धाची मूर्ती या सर्वांच्या वर आहे. या मंदिरातील बुद्धाची मूर्ती बसलेल्या स्थितीत आहे. असे मानले जाते की हे मंदिर एका बौद्ध भिक्खूने बांधले होते, जे बुद्धाच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी केरळमध्ये आले होते. या काळ्या ग्रॅनाइटच्या बुद्ध मूर्तीबद्दल आणखी एक भाग म्हणजे ती अर्धी तुटलेली आहे. दलाई लामा यांनी 1965  मध्ये करुमाडीला भेट दिली होती. सत्ता असताना प्रत्येक धर्माच्या प्रमुखाने आपल्या धर्माला महत्त्व दिल्याचे लक्षात येते.

  त्याचप्रमाणे अदूरपासून सुमारे 11 किमी अंतरावर असलेल्या पल्लीक्कल येथे बुद्ध मूर्ती मस्तक नसलेली आढळली. करुणागपल्ली येथील बुद्धाची मूर्ती, मंदिराच्या कुंडात सापडलेली ही मूर्ती कदाचित आजपर्यंतची सर्वोत्तम मूर्ती आहे. केरळ राज्य पुरातत्व विभागाने 1980 पर्यंत ते ताब्यात घेतले तेव्हापर्यंत अनभिज्ञ स्थानिक लोकांनी त्या मूर्तीची माहिती नसल्यामुळे सामान्य दगडासारखा कपडे स्वच्छ करण्यासाठी याचा वापर केला. ही मूर्ती सध्या कृष्णपुरम पॅलेस संग्रहालय, कायमकुलम येथे संरक्षित आहे.

थोडय़ा किलोमीटरवर इतरही मंदिरे आहेत, पण जवळचे कृष्ण मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. अंबालपुझा श्रीकृष्ण मंदिर हे एक प्राचीन हिंदू मंदिर आहे जे चेंबकसेरीचे तत्कालीन शासक श्री पूरदम थिरुनल देवनारायणन थमपुरन यांनी 15 व्या – 17 व्या काळात बांधले होते. अंबालापुझा श्रीकृष्ण मंदिराला दक्षिणेकडील द्वारका म्हणून संबोधले जाते. अंबालपुझा श्रीकृष्ण मंदिर भगवान कृष्णाला पार्थसारथीच्या रूपात विराजमान करते – महाभारत युद्धादरम्यान घेतलेला भगवान कृष्णाचा एक पैलू, भगवान कृष्ण येथे उन्निकन्नन (बाल कृष्ण) म्हणून प्रसिद्ध आहेत. येथील कृष्णाची मूर्ती काळ्या ग्रेनाईट दगडात कोरलेली असून उजव्या हातात चाबूक आणि डावीकडे शंख आहे. असे मानले जाते की एक दिवसीय पूरदम थिरुनल थमपुरन आणि संत विलवामंगलम स्वामीयार बॅक वॉटरच्या बाजूने प्रवास करत होते आणि तेवढय़ात त्यांना बासरीचा मधुर आवाज ऐकू आला. अशी आख्यायिका आहे की, कृष्णाचे निस्सीम भक्त संत विलवामंगलम स्वामीयार यांना पिंपळाच्या झाडावर बासरी वाजवताना भगवान श्रीकृष्णाचे दर्शन झाले. देवाचे अस्तित्व जाणवून थंपुराने या ठिकाणी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. गुरुवायूर मंदिरातील श्रीकृष्णाची मूर्ती 1789 मध्ये टिपू सुलतानच्या छाप्यांमध्ये सुरक्षिततेसाठी येथे आणली गेली होती. हे मंदिर त्याच्या अद्वितीय प्रसादम, (प्रसाद) स्वादिष्ट अंबालापुझा पल्पयासम – तांदूळ, दुधापासून बनविलेले गोड खिरीसाठी देखील प्रसिद्ध आहे.

त्याचप्रमाणे हे मंदिर केरळमधील प्रसिद्ध कला प्रकार – ओट्टामथुल्लल यांच्या जन्माशी संबंधित आहे. प्रख्यात मल्याळम कवी कलक्कथ्थु कंचन नांबियार यांनी अंबालपुझा मंदिर परिसरात या अनोख्या कलाप्रकाराला जन्म दिला. कुंजन नांबियार यांनी वापरलेला मिझावू (परफॉर्मिंग आर्टस्मध्ये तालवाद्य म्हणून वापरला जाणारा एक मोठा तांब्याचा ड्रम) आजही मंदिरातील एका कडय़ामध्ये जतन केलेला आहे. थुन्जाथु एझुथाचन, ज्यांना मल्याळम भाषेचे जनक मानले जाते, त्यांनी मंदिरात अध्यात्म रामायणम किलिपट्टू (रामायण आणि महाभारतम किंवा महाभारताचा अनुवाद) लिहिला असे मानले जाते. या दोन मूर्ती एकाच काळ्या ग्रॅनाइट पाषाणात बनवलेल्या आहेत.

श्रीकृष्ण मंदिर आणि बुद्ध मंदिर जवळ जवळ आहे. या भागात गेलात तर या दोन्ही मंदिरास भेट देता येते आणि निसर्गासोबत ऐतिहासिक दोन्ही मंदिरेही बघता येतात. अलाप्पुझा येथील रेल्वे स्टेशन राज्यातील जवळपास सर्व प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. या ठिकाणी भेट देण्याचा सर्वोत्तम काळ सप्टेंबर ते मार्च हा आहे.

 

गॉड्स ओन कंट्री ..... अर्थात केरळ

 https://www.maayboli.com/node/59255

केरळची आमची सहल मीच स्वतः नेट वर बघुन वैगेरे प्लॅन केली होती. मला स्वतः प्लॅन करुन जायलाच आवडत . ते होम वर्क ही मी खुप एऩ्जॉय करते. माबोकराना ह्याचा उपयोग होईल अशी आशा करते.

दिवस पहिला : विमानाने मुंबई - त्रिवेंद्रम. सकाळचचं घेतल होत विमान. विमानाने गेल्यामुळे थकवा नाही जाणवला प्रवासाचा . त्रिवेंद्रम ते कोचिन अशी एअर पोर्ट टु एअर पोर्ट गाडी बुक केली होती. त्रिवेंद्रम विमानतळ तसा जवळच आहे शहरापसून. अकराच्या सुमारास पोचलो हॉटेल ( ऑफिसच गेस्ट हाऊस) वर . जरा आराम करुन शहर बघायला बाहेर पडलो. पद्म्नाभ मन्दिर , एक राजवाडा, राजा रविवर्मा चित्र गॅलरी वैगेरे बघितल. पद्म्नाभ मंदिरात लुंगी किंवा धोती लागतेच पुरषांना त्यामुळे घेऊन जाणे इष्ट. अर्थात तिथे ही विकत मिळतेच. त्रिवेंद्रम शहर खूप कोझी वाटले त्रिवेंद्रम मधली दागिन्यांची दुकान पहाच पहा. खूपच हेवी जुवेलरी असते त्यांची. संध्याकाळी त्रिवेंद्रम पासुन जवळ असलेल्या प्रसिध्द बीच वर गेलो. नाव विसरले आता त्या बीचच

दिवस दुसरा : सकाळी आवरुन कन्याकुमारीला जायला निघालो. वाटेत पुवर बॅक वॉटर मध्ये जवळ जवळ दोन तास बोटींग केल. तो अनुभव छान होता. वेगळ आणि कधी न बघितलेले बघायला मिळालं. कन्याकुमारीला दुपारी पोचलो. माझी कन्याकुमारी गावाबद्दलची कल्पना आणि प्रत्यक्ष गाव यात जमीन अस्मानाच अंतर पडल. भयानक गर्दी, लोटालोटी, बकालपणा, विवेकानंद स्मारक पहाण्याच्या तिकाटासाठी लागलेली मारुतीच्या शेपटासारखी लाईन वैगेरे सगळ फार निरुत्साही करणार होतं. अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे त्या दिवशी विवेकानंद स्मारक बघायचं कॅन्सल केल आणि सुर्यास्त आणि चंद्रोदय( त्या दिवशी पौर्णिमा होती) तीन समुद्रांचा संगम, कन्याकुमारी मंदिर इ. बघितल.

दिवस तिसरा: सकाळी सुर्योदय बघितला हॉटेलच्या खिडकीतुन. मुंबईकरांना समुद्रातला सूर्योदय नाही बघायला मिळत. ते छान वाटल. दुसर्‍या दिवशी ही विवेकानंद स्मारका साठी तेवढीच लाईन होती म्हणुन ते ड्रॉपच केलं तसं ही मी अति गर्दीच्या अनोळखी ठिकाणी जायचं सहसा टाळते. त्यामुळे सकाळी कुमारकोम ला जायला निघालो. आम्ही अलेप्पी इथे न रहाता कुमारकोम इथे रहिलो होतो. ते एक शांत गाव आहे आणि आजूबाजुला बॅक वॉटर आहे सगळीकडे. इथे तुम्ही हाउस बोट मध्ये ही राहु शकता पण आम्ही नव्हतो रहिलो.

दिवस चवथा : सकाळी थेक्कडीला जायला निघालो आणि साधारण बाराच्या सुमारास तिथे पोचलो . ते थंड हवेच ठिकाण आहे. दुपारी तिथली स्पाईस गार्डन बघितली. नंतर हत्तीच्या राईड वगेरे होत्या तिथे ही गेलो. लोकल शॉपिग केल.

दिवस पाचवा : सकाळी हॉटेल मध्ये केरळी ब्रेकफास्ट घेतला आणि पेरियार नदीतल्या फेरफटक्याला निघालो. छान वाटल. पण आम्हाला प्राणी नाही फार दिसले. दुपार तशी मोकळीच होती त्या वेळेत तुम्ही केरळी मसाज, किंवा कथकली नृत्याचा कार्यक्रम पहाणे वैगेरे करु शकता.

दिवस सहावा : सकाळी मुन्नार ला जायला निघालो. वाटेत चहाचे मळे खूप दिसले . खूप सुंदर दृश्य होते . दुपारी बाराच्या सुमारास मुन्नारला पोचलो . त्यादिवशी जवळपास फिरुन आरामच केला

दिवस सातवा : मुन्नार दर्शन ला सकाळी बाहेर पडलो. मुट्टापाटी धरण आणि टी म्युझियम वैगेरे बघुन दुपारी हॉटेल वर आलो . हॉटेल छान होत. आयुर काउंटी नावाच. पण फुड जस्ट ओके. मला वाटत त्यांनी वेज मेनू कडे विषेष लक्ष नव्हत दिलं ( स्मित) रिसोर्ट चा कँपस छान असल्यामुळे वेळ गेला चांगला

दिवस आठवा : सकाळी गुरुवायुर ला जायला निघालो. मुन्नार ते गुरुवायुर अंतर खूप नसले तरी रस्ते अरूंद आणि सततची मनुष्य्वस्ती. त्यामूळे केरळमध्ये कुठे ही वेग घेता येतच नाही गाडीला. आम्ही साधारण एक च्या सुमारास पोचलो तिथे पण दिड वाजता दुपारी देऊळ बंद झाल ते चार वाजता उघडण्यासाठी. जेवण, खरेदी वैगेरे टाइम पास केला मग. तिथे आम्हाला पहिल्यांदा केळीच्या पानावर केरळी जेवण मिळाले. नाहीतर हॉटेल मध्ये जनरली फक्त ब्रेकफास्ट केरळी आणि लंच , डिनर पंजाबी असा प्रकार आहे तिथे. गुरुवायुरच मंदिर फार सुंदर आहे. दर्शन घेईपर्यंत संध्याकाळ होतच आली होती म्हणून मग आणखी थोडा वेळ थांबून तेलाच्या दिव्यात प्रकाशलेले मंदिर बघितल आणि मग कोचीन ला यायला निघालो. तुम्ही पाहिजे तर एक दिवस मुकाम करा गुरुवायुरला . लक्ष लक्ष तेलाच्या दिव्यांच्या प्रकाशात उजळलेले मंदिर बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे फार सुंदर आहे ते. चुकवु नका. दुसर्‍या दिवशे लवकर उठुन कोचीनला येऊ शकता

दिवस नववा : दिवस भर कोचीन बघितले. मला हे शहर फार आवडले. अगदी मॉडर्न आहे तरी ही छान आहे. कोची फोर्ट मिस नका करु. तिथल्या लेन मधुन थोड तरी चालाच फार छान वाटत

संध्याकाळच्या विमानाने रात्रि मुंबईला परत.

एक रात्र त्रिवेंद्रम, एक रात्र कन्यकुमारी, एक रात्र कुमारकोम, दोन रात्री थेक्काडी, दोन रात्रि मुन्नार आणि एक रात्र कोचीन ---- ( नऊ दिवस आणि आठ रात्री)

हे काही फोटो

त्रिवेंद्रम म्युझियम

From mayboli

पाऊस खूप, झाडं ही खूप, त्यामुळे हे असं खूप बघायला मिळत

From mayboli

पद्मनाभ मन्दिराची गोपुरं

From mayboli

पुवर बॅक वॉटर

From mayboli

आणि शेवटी बीच

From mayboli

६)

From mayboli

७) कन्याकुमारी

From mayboli

८) हॉटेल मधील खास केरळी स्वागत

From mayboli

कथकली नृत्य

From mayboli

थेक्कडी स्पाइस गार्डन ...... कॉफी सीड्स

From mayboli

ह्या वाळत घातलेल्या

From mayboli

ही वेलचीची लागवड

From mayboli

आणि ह्या वेलच्या . खाऊन बघितली मी एक ,पण जराही वास नव्हता

From mayboli

चहाचे मळे

From mayboli

From mayboli

ही तिकडे पाहिलेली काही फुल

From mayboli

From mayboli

From mayboli

From mayboli

मुन्नारच हॉटेल

From mayboli

From mayboli

हाऊस बोट

From mayboli

 

अगो हो, मुन्नार हॉटेल खूप छान होत. रुमच्या बाहेर नजरेच्या टप्यात मनुष्य वस्तीच नाव नव्हत त्यामुळे रात्री समोर मस्त कळोख. . आम्ही झोपल्यावर रात्री गॅलरीच्या दारावर धडके देतय कोणीतरी असा आवाज यायला लागला. आम्ही घाबरलो म्हणजे आम्हाला हत्ती धडका देत आहेत असं वाटल पण तसेच झोपुन राहिलो. दुसर्‍या दिवशी कळल हत्ती वैगेरे कोणी नव्हत. जोरात वहाणार्‍या वार्‍यामूळे तस वाटल आम्हाला ( स्मित)

रच्याकने, मी गिरला गेले होते तेव्हा ही मला हॉटेलच्या खोलीवर सिंहाच्या डरकाळ्यांचा सारखा भास होत होता प्रत्यक्षात एक ही नाही ऐकु आली. ( स्मित)

आम्ही जानेवारी महिन्यात गेलो होतो पाऊस नाही मिळाला जरा ही

दिनेश वर्षु तिथे इंग्लिश आणि हिंदी दोन्ही येत कामचलाऊ सगळ्यांना

केरळ मध्ये पर्यटन जाणीवपूर्वक विकसित केलेले आहे, पण त्यामुळेच फार गर्दी आहे >>> हो बरोबर आहे दिनेश.

ऋन्मेष, केरळला तरुण मुल मुली खुप दिसली. हनीमूनर्स फेवरेट बहुतेक. मी मुनारला त्या डॅम च्या इथे टाइम पास करत होते तर एक मुलगा आला माझ्या जवळ आणि म्हणाला काकू ओळख्लत का? मी बुचकळ्यात पडले कारण नव्ह्त ओळखल त्याला . मग तोच म्हणाला आम्ही एकच विमानात होतो तो केसरी बरोबर हनीमूनला आला होता आणि मुंबई विमान तळावर विमानाच्या बॅक ग्राउंडवर मी त्या दोघांचा एक फोटो काढुन दिला होता.

जिप्सी, तु जेव्हा फोटो छान आलेत असं म्हणतोस तेव्हा काय वाटत काय सांगु ?

 गुरुवायुरच्या मंदिरात कॅमेरा अलाऊड नाहिये. नेट वर आहे एखाद दुसरा फोटो. पण फोटोतुन एक टक्क्का ही कल्प्ना नाही येत आहे. देवळाच्या सगळ्या भिंतींवर बाहेरच्या बाजूने , भल्या मोठ्या दीपमाळांवर पितळेच्या पट्ट्या मारुन त्यात पितळी दिवे फिक्स केले आहेत. दुपारी तीन वाजल्या पासुन त्यात तेल वात घालणे सुरु असते. आणि अंधार पडायला लागला की मशालीने दिवे लावायला सुरवात होते. दिवे लावण्यासाठी भक्त गण धडपडत असतात कारण आपण हे दिवे उजळले तर आपली पापं जळून जातील अशी श्रद्धा आहे भाविकांची. तसेच मंदिराच्या प्रांगणात एका भल्या मोठ्या घंगाळात गुंजा ठेवलेल्या असतात . श्रीकृष्ण लहानपणी गुंजा खेळत असे म्हणून प्रत्येक जण त्यात हात फिरवून गुंजा खेळतो आणि प्रौढत्वात ही शैशवाला जपण्याचा प्रयन करतो .
आम्ही जानेवारी महिन्यात गेलो होतो तेव्हा वातावरण छान होतं सगळ्या केरळ मध्ये

 मागच्या वर्षीच जाऊन आले. रम्य आहे केरळ! (अर्थात कोस्टल कर्नाटक आणि तळकोकण ही या बाबतीत तेव्हढेच छान आहे). कन्याकुमारीला जाऊन फक्त विवेकानंद स्मारक बघता आलं कारण खूप वेळ रांगेत थांबण्यात गेला. मला तरी ते टाळलं असतं आणि नुस्तं मनसोक्त समुद्रदर्शान आणि तिथला सुर्योदय आणि सूर्यास्त हे पाहिलं अस्तं तरी चाललं अस्त. जाताना आणि येताना रेल्वेनेच गेलो होतो. कोकण रेल्वे प्रवास मस्त झाला. पण परत येताना कन्याकुमारी एक्सप्रेस ने येऊन पस्तावलो. डब्यात अत्यंत अस्वछता. मेन स्टेशन्स वर सुद्धा गाडी अगदी २, २.५ मिनिटे थांबते; पण मधे मधे उगाचच खूप वेळ थांबते. येताना तामिळ्नाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र , महाराष्ट्र अशी पूर्ण फिरून येते. प्रवास संपता संपत नाही आणि तो ही अतिशय कंटाळ्वाणा! कोणी प्लॅन करणार असेल तर उपयोगी पडेल म्ह्णून लिहितेय. कन्याकुमारी एक्स्प्रेस टाळता आली तर बरं.

 बॅक वाटरच्या बोटीच्या मुक्कामात डासांचा फार त्रास असतो हे खरे आहे काय? मी अलेप्पीला जाऊन कॅनालच्या कडेला उभे राहून उशीर झाल्याने परत कोचीला आलो. बोटींग करायचे नव्हतेच. पण किनार्‍यावरही सायंकाळी बरेच डास होते . पाणीही घाणेरडेच वाटले. शिवाय तिथे बोट वाल्यांच्या , बसवाल्यांच्या युनियनच्या मारामार्‍या भांडणेही असतात वाटते . प्रायवेत विरुद्ध सोसायट्या. मागे केसरीची की कुणाचे बस गेली होती तर यांचे पॅसेंजर नेण्यावरून टॅक्सीवाळ्यांच्या मारामार्‍या झाल्या होट्या म्हणए....

 

केरळ कन्याकुमारी लेखमाला

 खूप दिवसापासून केरळ माझ्या बकेट लिस्ट मध्ये होते. मिपावर केरळ वरती अनेक लेख आहेत. तसेच युट्युब वरती सुद्धा केरळ बद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे. माझ्या सासूबाई वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झाल्या. त्यांना कुठेतरी फिरायला जायचे होते. आपण सर्वजण कुठल्यातरी निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाऊयात याबाबतचे तू नियोजन कर असे सासूबाईंनी मला सप्टेंबर मध्ये सांगितल्यामुळे माझा आधीच तयार असलेला केरळ प्लान त्यांना सांगितला आणि आमचे दिवाळीनंतर केरळला जायचे निश्चित झाले. माझ्या हातात नियोजनासाठी जवळ जवळ तीन महिने होते. कुठेही गेलो तरी बजेट सहल करावी असा माझा आग्रह असतो. उगाच अवास्तव खर्च करणे टाळावे यावर माझा कटाक्ष असतो. तथापि सासुबाई म्हणाल्या की एक तरी प्रवास हा विमानाने करूयात. मग काय .... मी विमानाची तिकिटे मॉनिटर करायला सुरुवात केली. त्यावेळी विमानाचा दर साधारण साडेआठ हजार प्रतिमाणशी चालू होता. केरळमध्ये दोन विमानतळ आहेत. एक म्हणजे कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ. आम्ही साधारण पूर्ण केरळ फिरायचे ठरवले होते. आमच्या हातात आठ रात्री नऊ दिवस होते. त्यातले शेवटचा दिवस मला आराम करण्यासाठी ठेवायचा होता. जेणेकरून सोमवारपासून परत ऑफिस जॉईन करता येईल. आधी मी जाताना कोचीपर्यंत रेल्वेने व येताना त्रिवेंद्रम वरून विमानाने अशा पद्धतीने प्लॅन आखला होता. कोची व त्रिवेंद्रम या दोन्ही ठिकाणची जातानाची व परतीची अशी तिकिटे मी सतत मॉनिटर करत होते. बुकिंग करण्याची घाई केली नाही कारण कॅन्सलेशन चार्जेस भरपूर असतात हे मी पाहिले होते. आश्चर्यकारक रित्या सप्टेंबर नंतर कधीतरी तिकिटाचे दर अचानक खाली आले व साधारण चार-पाच हजाराच्या आसपास किंमत दिसू लागली. मुळात विमानासाठी आठ ते नऊ हजार रुपये एका वेळचे खर्च करण्याची तयारी ठेवली होती. आता दर निम्म्यावरती येत आहेत तर सरळ जाताना आणि येतानाही विमानाने जायचे असे ठरवून स्थलदर्शनामध्ये काही जागा अजून समाविष्ट केल्या.

     केरळ मुळातच एका खेपेमध्ये पाहणे अन्यायकारक आहे असे माझे स्पष्ट मत आहे. केरळ पाहायचा झाला तर उत्तर केरळ, मध्य केरळ आणि दक्षिण केरळ असे केरळचे सरळ सरळ 3 भाग करता येतील. उत्तर केरळमध्ये बघण्यासारखी ठिकाणे म्हणजे कासारगोड, बेकल, कोझिकोडे व वायनाड. मध्य केरळमध्ये बघण्यासारखी ठिकाणे म्हणजे त्रिशूल, गुरुवायुर, अथीरपल्ली वॉटरफॉल, कोची, कलाडी, मुन्नार, टेकडी व आलेप्पी. दक्षिण केरळचा विचार केला तर मून्रो आयर्लंड, कोल्लम, जटायू अर्थ सेंटर, वर्कला, त्रिवेंद्रम, पूवर व कन्याकुमारी असा प्लॅन करता येईल. उत्तर केरळमध्ये रस्ते हे अतिशय निमुळते व घाटाचे वळणावळणाचे असल्यामुळे उत्तर केरळ पाहण्यासाठी जास्त दिवस लागतात त्यामुळे उत्तर केरळ व मध्य केरळ अशी ट्रिप शक्यतो क्लब करू नये. तथापि थोडे जास्त दिवस हाताशी असतील तर मध्य केरळ व दक्षिण केरळ ही सहल एकत्र करता येणे शक्य आहे. मी स्वतः राजस्थान जसे चार टप्प्यात करायचे ठरवले आहे तसेच केरळ सुद्धा तीन टप्प्यांमध्ये करायचा ठरवला होता. परंतु एवढा विमानाचा खर्च करतच आहोत व सासूबाईंना काही सारखे सारखे येणे जमणार नाही हा विचार करून मध्य केरळ व दक्षिण केरळ ही ट्रीप एकत्र करून टाकावी त्याचबरोबर कन्याकुमारी सुद्धा या सोबतच करावी असा विचार केला. आणि हा विचार अत्यंत योग्य ठरला. आमच्या आठ रात्री नऊ दिवस या प्लानमध्ये गुरुवायूर व अथीरपल्ली हे काही बसेना. शेवटी ही दोन ठिकाणे उत्तर केरळाच्या ट्रिपमध्ये समाविष्ट करायचे असे ठरवून कोची, कलाडी, मुन्नार, थेकडी, मूनरो आयलंड, वर्कला, जटायू अर्थ सेंटर, त्रिवेंद्रम, पूवर, पद्मनाभ पुरम पॅलेस, सुचिंद्रम टेम्पल व कन्याकुमारी ही ठिकाणे कव्हर करण्याचे निश्चित झाले.

नकाशा

     Go इबिबो व बुकिंग डॉट कॉम या वेबसाईटवरून मी कोची आंतरराष्ट्रीय विमानतळापाशी Base9Airport हे हॉटेल एका रात्री करिता, Durga Budget Stay हे हॉटेल मुन्नार येथे दोन दिवसांसाठी, Holiday Villa हे हॉटेल थेकडी येथे व वर्कला येथे एक दिवस व Hotel JAAS कन्याकुमारी येथे दोन दिवस असे हॉटेलचे बुकिंग करून टाकले. प्रत्येक ठिकाणी एक मोठी फॅमिली रूम व एक स्वतंत्र बेड आम्हाला उपलब्ध करून देणार होते. जेणेकरून आम्ही सर्वजण एकाच खोलीत राहू शकणार होतो. हे सर्व आम्हाला अत्यंत स्वस्त मिळाले व सर्वच ठिकाणी सोय अतिशय चांगले झाली. पेपर केरला या कंपनीच्या कारचे रिव्ह्यू अतिशय चांगले होते. पेपर केरला या कंपनीकडून मला सगळ्यात कमी रकमेचे कोटेशन मिळाले, त्यानुसार मी या कंपनीचे सुरुवातीचे काही पैसे भरून बुकिंग करून टाकले. हिंदी बोलणारा ड्रायव्हर द्यावा अशी आवर्जून सूचना केली होती. जवळपास तीन आठवडे आधी मी या सर्व गोष्टी पूर्ण केल्या आणि सहलीची आतुरतेने वाट पाहू लागले.
     शेवटी जायचा दिवस उजाड उजाडला. आमचे विमान संध्याकाळी सात वाजता होते. त्यामुळे चार वाजताच घरी पोहोचायचे या हिशेबाने ऑफिस मधून लवकर निघायचे आधीच सांगितले होते.पण शेवटपर्यंत काही ना काही अर्जंट काम येत राहिले व शेवटी एकदाचे मी चार वाजता ऑफिस सोडले. धावत पळत चर्चगेटला लोकलमध्ये बसले तर स्पाइस जेट कडून मेसेज आला की आपले विमान दोन तास उशिरा येणार आहे. त्यामुळे विमान नऊ वाजता निघणार होते. मनातल्या मनात थोडे बरेच वाटले. घरी पोहोचून थोडे फ्रेश होऊन आम्ही साधारण साडेसहा वाजताच विमानतळावर पोहोचलो. सर्वांचाच हा पहिला विमान प्रवास असल्यामुळे चेक-इन प्रोसेस तसेच अन्य कोणत्याही औपचारिकतेबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे लवकर जाऊन सर्व प्रोसेस करून तिथे निवांत थांबूयात हा विचार करून आम्ही लवकरच गेलो. सिक्युरिटी चेकिंग झाले. बॅगा केबिनमध्ये टाकण्यासाठी दिल्या आणि आम्ही मग तिकडे फिरत राहिलो. सात वाजता तिथेच असलेल्या एका साउथ इंडियन काउंटरवरून आम्ही रात्रीचे डिनर करून घेतले कारण रूमवर पोहोचायला उशीर होणार होता. तसे मी हॉटेल मालकाला फोन करून सांगितलेही होते. सर्व काही व्यवस्थित पार पडेल ना याचे मला जरा टेन्शन आले होते. शेवटी एकदाचे दहाच्या सुमारास आमच्या विमानाने उड्डाण केले. आम्ही साडेबारा वाजता कोची विमानतळावरती पोहोचलो. तिथे चक्क पाऊस पडत होता. हवेत गारवा होता. आम्ही प्रीपेड टॅक्सीने जवळच असलेल्या आमच्या हॉटेल वरती पोहोचलो. त्यावेळी रात्रीचा एक वाजला होता. विमानात मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी हॉटेल मालकाला उतरल्यानंतर फोन केला. त्याने तो उचलला आणि तुम्ही सावकाश या असे सांगितले. हॉटेलचे लोकेशन त्याने व्हाट्सअप वर आधीच पाठवून दिले होते. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत तोही गाडीतून आला. त्याने आम्हाला रूम दाखवली. रूम प्रशस्त होती . साधारण दोन रूम होत्या. आतल्या रूम मध्ये डबल बेड व एक एक्स्ट्रा बेड व अटॅच बाथरूम होते तर बाहेरच्या रूममध्ये सोफा व डायनिंग टेबल होते. एकूणच आम्हाला रूम अतिशय आवडली. आम्ही त्यांना एक बेड बाहेर एक्स्ट्रा टाकायला सांगितला. त्यालाही त्याने कोणतीही खळखळ न करता पटकन व्यवस्था करून दिली. शेवटी एकदाचे केरळमध्ये पोहोचलो होतो. आता जरा मला सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्यासारखी वाटू लागली. मी निश्चिंत होऊन नेत्रादेवीच्या अधीन झाले. उद्या आम्हाला सर्वप्रथम शंकराचार्यांचे जन्मस्थान असलेल्या कलाडी येथे भेट द्यायची होती आणि वाटेत येणाऱ्या स्थळांना भेट देत मुन्नारला पोहोचायचे होते. हा सर्व वृत्तांत पुढील भागात........!

केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस पहिला- कलाडी ते मुन्नार

सहलीचा पहिला दिवस उजाडला. आज आम्हाला कलाडी या आद्य शंकराचार्यांच्या जन्मगावी भेट देऊन पुढे मुन्नारला पोहोचायचे होते. सकाळी आम्ही लवकर उठून आंघोळी करून आठ वाजेपर्यंत तयार झालो. हॉटेल मालकांनी अर्धा तासात ऑर्डर प्रमाणे नाश्ता बनवून देण्यात येईल म्हणून सांगितले. तथापि आम्हाला तेवढा वेळ नव्हता. त्यामुळे आम्ही चहा मागवला. नुकतीच दिवाळी झाल्यामुळे तसेच सासूबाईंना सकाळची गोळी घ्यायची असल्यामुळे फराळ सोबत ठेवला होता. आम्ही चहा व फराळ करून घेतला. आमचा ड्रायव्हर आम्हाला आठ वाजता घ्यायला आला. ड्रायव्हरचे नाव शामियर असे होते. हसतमुख, बोलक्या अशा शामियरचे आम्ही शमीभाई असे नामकरण करून टाकले. शमीभाईला एकंदरीत सहलीचा प्लॅन सांगितला. हॉटेलमधून चेक आउट करून आम्ही कलाडीकडे साधारण साडेआठच्या दरम्यान प्रस्थान केले. कलाडी येथे आद्य शंकराचार्यांचा जन्म झाला. तेथे शारदा शृंगेरी मठ आहे.
मंदीर

मंदीर

मंदीर

      आत शारदा देवीची मूर्ती , अष्टदुर्गांच्या मूर्ती, तसेच श्री शंकराचार्यांच्या आईची समाधी आहे. मंदिराच्या आत मध्ये कुठेही फोटो काढणे अलाउड नसल्याने बाहेरूनच फोटो काढले. तसेच जवळच श्रीकृष्ण मंदिर आहे. श्रीकृष्ण मंदिरांमधील मूर्ती अत्यंत मोहक होती.
मंदीर

     केरळ मधील मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहात कृत्रिम दिवा नसतो. केवळ पणत्यांच्या नैसर्गिक प्रकाशात जे भगवंताचे दृश्य दिसते ते केवळ-अवर्णनीय!! शारदा मठ व श्रीकृष्ण मंदिर या दोन्हीही मंदिरांमध्ये जाऊन मन खूप प्रसन्न झाले. मंदीर परीसर अत्यंत शांत व रमणीय आहे. आवर्जून भेट द्यावीत अशी ही मंदीरे आहेत. इथे आमचा दीड तास कसा गेला तेच कळले नाही. सहलीची सुरुवात तर उत्तम झाली होती.
     शमी भाईला मी विचारले की आम्हाला केरळची प्रसिद्ध राईस प्लेट “ साध्य” खायचे आहे. त्यावर त्यांनी मुन्नारला जाताना एक अतिशय प्रसिद्ध व उत्तम हॉटेल आहे तिथे आपण जेवूयात. साधारण एक तासात आपण तिथे पोहोचू असे सांगितले. मंदिरातून आम्ही निघालो त्यावेळी साडेअकरा वाजले होते. तसाही आम्ही नाष्टा केला नव्हता. त्यामुळे आता नाश्ता न करता थेट लवकर जेवणच करावे असा आम्ही विचार केला आणि मार्गस्थ झालो. हॉटेल “ रस ” असे या विशेष करून केरळी साध्य मिळण्यासाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल आहे. अत्यंत उत्कृष्ट असे हे हॉटेल असून अडीचशे रुपयाला अनलिमिटेड थाळी मिळते. या मार्गावर रस या नावाची अनेक हॉटेल्स असल्याने मी ज्या हॉटेलमध्ये जेवले त्याची लिंक देत आहे.

जेवण

     जेवताना पुढील पदार्थ होते - लिंबू लोणचे, आल्याचे लोणचे, कैरी लोणचे, यासोबत बारीक चिरलेल्या बटाट्याची वेगळीच भाजी, मिक्स व्हेजिटेबल हे सर्व पारंपरिक केरळी पद्धतीचे होते. या सोबतच अननसाची कोशिंबीर, लाल भोपळ्याची अतिशय चविष्ट भाजी, पांढऱ्या भोपळ्याची चणा घालून केलेली चविष्ट भाजी, सांबार, रस्सम, साधे वरण, कढी, बीटाची कोशिंबीर, सांडगी तळलेली मिरची, बनाना चिप्स, त्याच्यासोबत मिळणारा गुळाचा खडा, तीन प्रकारचे पायसम म्हणजे खीर होती. त्यामध्ये एक गव्हाची खीर, दुसरी शेवयाची खीर व तिसरी गाजराची खीर केली होती यासोबत पापड दही, केळ हे अतिशय पारंपारिक पद्धतीने केळीच्या पानावरती वाढून दिलेले अप्रतिम जेवण होते. जेवणातील प्रत्येक भाजी व कोशिंबीर चविष्ट होती. आम्ही 2-3 वेळी मागून मागून खाल्ली. खीर/पायसंम खाण्याची इथे विशिष्ट पद्धत आहे. खीरीमध्ये केळ कुस्करायचे व त्यात पापड मिक्स करायचा... जबरदस्त चव लागते. इथे जेवणे हा सोहळा आहे. अजिबात मिस करु नये.
     इथले जेवण जेवून आम्ही तृप्त झालो. शमी भाई ने सांगितले मी फूडी आहे त्यामुळे मला केरळमध्ये कुठे काय चांगले खायला मिळते ते अगदीच माहित आहे. तुम्हाला मी उत्तम प्युअर व्हेज मिळणार्‍या ठिकाणी नेत जाईन काळजी करू नका, असे सांगितले, मी त्याला सांगितले की मला या संपूर्ण प्रवासात पुट्टू विथ कडला करी, अप्पम विथ व्हेज स्ट्यू, तसेच केरला पराठा खायचे आहे. त्यावर त्याला आश्चर्य वाटले की मला इतके केरळी पदार्थ कसे काय माहिती? मी त्याला सांगितले की, मी पण खूप फूडी आहे. त्यामुळे मला इथले लोकल पदार्थ खायची इच्छा आहे. तुम्हाला जिथे वाटेल की इथला हा पदार्थ लोकल आहे आणि तो खाल्ला पाहिजे तेव्हा नक्की सांगा. त्यावर तो म्हणाला की खरंच तुम्ही बराच रिसर्च केला आहे. तुम्ही अल्लेपी ऐवजी मुन्रो आयर्लंड ला जाणार आहात. हे ठिकाण मी पहिल्यांदाच ऐकत आहे. तुमच्यामुळे मलाही ते पाहायला मिळेल असे तो म्हणाला. मी मात्र मनात हा निर्णय योग्य ठरेल किंवा वेडेपणा ठरेल हे भविष्यातच कळेल अशा विचार करत होते.
      आता घाट एरिया सुरू झाला होता आणि निसर्गाने त्याची रूपे दाखवायला सुरुवात केली होती. मी बहुदा मुन्नार या ठिकाणाबाबत खूप जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या. परंतु घाटामध्ये मला जो निसर्ग दिसत होता त्या निसर्गाच्या रूपांमध्ये आणि आपल्या कोकणातल्या घाटांमध्ये दिसणाऱ्या रूपांमध्ये फारसा काही फरक नव्हता. वाटेत आम्ही चिअप्परा वॉटरफॉल, वलरा वॉटरफॉल, अशा ठिकाणी थांबलो.

धबधबा

धबधबा

     फोटोसेशन केले. तथापि या वॉटर फॉल मध्ये जाऊन आपण भिजू शकत नाही. केवळ लांबून बघणे इतकेच करू शकतो. त्यामुळे थोडासा मूड ऑफ झाला. मुन्नार मध्ये तुम्हाला काय काय पाहायचे आहे असे शमीभाईने विचारले. त्यावरती मी त्याला माझा प्लॅन सांगितला. तर तो म्हणाला या ठिकाणी तर सर्वच जण जातात. मी तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे तुम्ही प्लान करा. काही वेगळी ठिकाणे पहा. तुम्हाला ती ठिकाणे नक्की आवडतील. त्याने आता जाताना हत्तीची सफारी करूयात, चॉकलेट फॅक्टरी पाहूयात, स्पाइस गार्डन पाहुयात आणि संध्याकाळी कथकली डान्स शो बघूयात असे सुचवले. त्यावर चॉकलेट फॅक्टरी पहाण्यात आम्हाला रस नाही. तसेच कथाकली शो आम्ही थेकडी ला पहायचा ठरवला आहे असे सांगितले. तथापि सासूबाईंसाठी हा पहिलाच अनुभव असल्यामुळे स्पाइस गार्डन पाहण्याचे ठरले. तसेच मी शमी भाईला सुचवले की आम्हाला झिप लाईन करायची आहे. शमीभाईने एका स्पाइस गार्डनच्या तिथे आमची गाडी थांबवली. हे फ्री होते. एका गाईडने आम्हाला तेथील वनस्पतींची माहिती दिली.
तेथील काही फोटो –
फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

     स्पाइस गार्डनची व्हिजिट हा एक खूप चांगला अनुभव होता. नंतर त्यांनी आम्हाला स्टोअर मध्ये नेले तथापि आम्ही तिथून काहीही घेतले नाही. तिथून आम्ही झिप लाईन साठी निघालो. ही झिप लाईन तेथील सर्वात लांब जीप लाईन आहे. खाली पूर्ण हिरवीगार दरी दिसत होती. आम्ही सर्वजण रोमांचित झालो होतो. मी सासूबाईंना देखील झिप लाईन करण्याचा आग्रह केला. नाही होय म्हणत त्या तयार झाल्या. परंतु जेव्हा सर्वप्रथम माझा आठ वर्षाचा मुलगा एका ट्रेनर सोबत गेला तेव्हा मात्र त्या घाबरू लागल्या. मी काही जाणार नाही पैसे परत करा असे म्हणू लागल्या. माझा नवरा पुढे गेला. शेवटी त्या येत नाहीत हे पाहून मीही गेले. शमी भाई ने एक युक्ती केली. तो म्हणाला छोट्या बरोबर जसा ट्रेनर गेला तसा तुमच्याबरोबर पण हा ट्रेनर येईल. त्याच्याशी मल्याळीमध्ये बोलून काहीतरी सांगितले आणि सासूबाईंना त्यांनी तयार केले. सासूबाईंना वाटले की आपल्याबरोबर हा ट्रेनर येणार आहे त्यामुळे त्या तयार झाल्या. तर ट्रेनरने त्यांना धरून उभा केले आणि धक्का देताना त्यांना एकट्यालाच सोडले. अशा रीतीने सासूबाईंनी देखील या वयात झिप लाईन चा आनंद घेतला.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

     मी पुढे जाऊन त्यांच्यासाठी थांबले होते. त्या येत असताना बघून मला खूप आनंद झाला. मी दुसऱ्या बाजूने पुढे गेले आणि त्याही माझ्या मागोमाग आल्या. आयुष्यात कधी करू न शकणारे धाडस केल्याचा आनंद व आश्चर्य त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. परत आल्यानंतर आम्ही दोघींनीही एकमेकींना कडकडून मिठी मारली. आमच्या सर्वांसाठी एक लाईफ टाईम अनुभव होता हा. पैसे पूर्ण वसूल झाले होते. ट्रिपचा आता आनंद यायला लागला होता. आम्हाला बऱ्यापैकी वेळ झाला होता. शमी भाई आम्हाला तिथे जवळच असलेल्या कथकली शो पहा असे सांगू लागले. पण तिकीट खूपच जास्त होते. पाचशे रुपये एकाचे. मी त्यांना म्हणले की हा शो २०० रुपयांमध्ये पाहायला मिळतो. त्यावरती शमीभाईचे म्हणणे पडले की मी खूप ठिकाणी हा शो पाहिलेला आहे. त्याच्यात काही मजा नाही. परंतु हा शो पाहिल्यानंतर तुम्हाला पैसे वसूल झाल्याचे फील येईल. मी सकाळी सुचवलेला हॉटेलच्या जेवणाचा अनुभव तुम्ही घेतलात ना, त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा. तुमची सहल चांगलीच होईल अशाच गोष्टीं मी तुम्हाला सुचवेन. शेवटी मी त्याला सांगितले की रेट मध्ये काहीतरी घासाघीस कर हे मला खूपच जास्त वाटतं. त्यावर त्याने मल्याळीमध्ये बोलून प्रत्येकाचे आठशे रुपये दोन्ही शोचे ठरवले. म्हणजेच एक तासाचा कथकली शो व एक तासाचा कलरीपट्टू बघायला मिळणार होता. हे आम्हाला जास्तच वाटले. परंतु ठीक आहे. सहलीमध्ये असे काही ना काही आऊट ऑफ बजेट होत असते असा आम्ही विचार केला. त्याच वेळी तिथे असलेल्या एका माणसाकडे दुसऱ्या दिवशी साठी एक जीप ठरवली जी अर्धा दिवसांसाठी आम्हाला पाच वेगवेगळ्या ठीकाणी फिरवणार होती. जिचे आम्ही तीन हजार पाचशे रुपये पे केले.
     पाच वाजले होते आणि कथकली शो ची वेळ झाली होती. या प्रोग्रॅम मध्ये त्यांनी कथकली, भरतनाट्यम त्याचबरोबर केरळमधील थय्यम हे नृत्य प्रकार देखील दाखवले. हा कार्यक्रम अतिशय नेत्रदीपक असा झाला. आम्हाला अतिशय आवडला. त्यानंतर कलरीयापट्टू हा केरळमधील पारंपारिक मार्शल आर्ट च्या कार्यक्रम देखील चांगलाच होता.
त्याचे काही फोटो –
कथकली

फोटो
थय्यम

फोटो
भीम व दूर्योधन युद्ध
फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

     कार्यक्रमा मधील कलाकारांबरोबर काही फोटो काढून आम्ही हॉटेलकडे प्रस्थान केले. हॉटेलच्या मालकाला आम्ही उशिरा येत आहोत हे सकाळीच सांगून ठेवले होते. त्याप्रमाणे आम्ही साधारण साडेनऊ वाजता हॉटेलवर पोहोचलो. आमची रूम तिसऱ्या मजल्यावर होती. रूम प्रशस्त होती. बाहेर एक कॉमन पेसेज होता. तिथे बेड टाकून ठेवले होते. एकंदरीतच उत्तम रूम आम्हाला केवळ सतराशे रुपये मध्ये मिळाली होती. 24 तास गरम पाणी होते. स्वच्छता होती. अजून काय हवे होते? हॉटेल मालकाने आमच्या चारही बॅगा तिसऱ्या मजल्यावरती स्वतः चढवल्या. आम्ही तेथे दोन दिवस राहणार होतो. आजचा पूर्ण दिवस अत्यंत अविस्मरणीय असाच गेला. सकाळी मंदिरांची भेट, चविष्ट अशी साध्य थाळी, त्यानंतर झिप लाईन चा थरार, स्पाइस गार्डन ची भेट, कथकली आणि कलरीयापट्टूचा शो हे सर्वच आम्ही खूप जास्त एन्जॉय केले. आता सर्वांना भूक लागली होती. जवळच एका प्युअर व्हेज असलेल्या अन्नपूर्णा नावाच्या हॉटेलमध्ये आम्ही चायनीज खायचे ठरवले. त्यानुसार आम्ही मशरूम फ्राईड राईस, गोबी मंचुरियन व पनीर चिली ऑर्डर केले. हे सर्व आम्हाला खूप होईल असे वाटले होते तथापि क्वांटिटी कमी होती. हे पाहून नूडल्स देखील ऑर्डर केल्या. आश्चर्यकारकरीत्या सर्व पदार्थांची चव अत्यंतिक चांगली होती. आजचा दिवस सार्थकी लागला होता. उद्या आता मुन्नाचे काय दर्शन होते आणि काय नवीन अनुभव मिळतो याबाबत उत्सुकता मनात घेऊन आम्ही झोपी गेलो......

दिवस दुसरा- मुन्नार स्थानिक स्थलदर्शन

 आज सहलीचा दुसरा दिवस होता. सकाळी लवकरच उठून आवरल्यानंतर समोर असलेल्या हॉटेल अन्नपूर्णा मध्ये आम्ही नाश्ता करायला गेलो. नेहमीप्रमाणे साउथ इंडियन नाश्ता आम्ही ऑर्डर केला. इडली, मेदुवडा, डोसा अशा पदार्थांवर आम्ही आडवा हात मारला. त्याचबरोबर कॉफी ऑर्डर केली. सगळ्याची चव अतिशय उत्तम होती.
फोटो

     मून्नारला पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे एरावीकुलम नॅशनल पार्क, मुटिपट्टी डॅम, टॉप स्टेशन, कुंडला डॅम इ. ही एकाच मार्गावर आहेत. परंतू वेगळे काही बघुयात असे ठरलेले असल्याने पोटभर नाश्ता करून आम्ही ड्रायव्हर सोबत काल जिथे जिप ठरवली होती त्या ठिकाणीच आलो. आज ते आम्हाला रीप्पल वॉटर फॉल, पोनमोडी डॅम, इको पॉईंट व हँगिंग ब्रिज जिथे बऱ्याच चित्रपटांचे शूटिंग झालेले आहे त्याचबरोबर एक व्ह्यू पॉईंट अशा ठिकाणी फिरवणार होते. या ठिकाणांवरती जाण्याचा मार्ग हा कच्चा रस्त्याचा असल्यामुळे इथे आपली नेहमीची गाडी जात नाही. त्याकरिता जीपच करावी लागते असे आम्हाला सांगण्यात आले. आणि खरंच जो रस्ता होता, तो रस्ता नाही, खरं म्हणजे तिला पायवाट म्हणावे अशा प्रकारचा तो रस्ता होता.त्यामुळे इथे नॉर्मल गाडी जाणार नाही हे खरेच होते.आमची जीप खाजगी मसाल्यांच्या बागांमधून देखील गेली. आमची ठरवलेली जीप

फोटो

      सर्वप्रथम आम्ही रीप्पल वॉटर फॉल ला भेट दिली. रीप्पल वॉटर फॉल हे अतिशय छान ठिकाण आहे. ईथे बसण्यासाठी सुविधा आहे. थोडे चालत खाली वर उतरावे लागते. तथापि हा वॉटरफॉल हा दुरून बघण्याचा एक वॉटरफॉल आहे. इथे देखील तुम्ही झीप लाईन करू शकता. ही झीप लाईन वॉटरफॉलच्या वरुन पार करुन जाते. इथे बरेच लोक झीप लाईन करत होते.

फोटो

फोटो

फोटो

      नंतर आम्ही हैंगिंग ब्रिज ला भेट दिली. हैंगिंग ब्रिज वरून बराच चित्रपटांचे शूटिंग झाले आहे असे आम्हाला सांगितले. खालून असाच एक धबधबा वाहत होता आणि वरती तो ब्रिज होता. फार काही ग्रेट वाटले नाही.
फोटो

फोटो

फोटो

     त्यानंतर ते आम्हाला पोनमोडी डॅम वरती घेऊन गेले आणि तिथूनच जवळ असलेल्या इको पॉइंटवर घेऊन गेले. हे डॅमच्या मागे असलेल्या बॅकवॉटरच्या बाजूला एक पॉईंट होता. इथे म्हणे चेन्नई एक्सप्रेस चे शूटिंग झाले होते. आम्हाला काही तो प्रसंग आठवेना. इथे एक गंमत होती की प्रत्येक जण तिथे ओरडून इको येतोय काय ते पाहत होता. अचानक माझ्या मुलाने एका जागेवरून आई अशी जोरात हाक मारली आणि इको आला. तेव्हा सगळे चमकून त्याच्याकडे पाहू लागले. मग माझे मिस्टर देखील तिथे गेले आणि जोरात मुलाच्या नावाने हाक मारली. तथापि एको आला नाही. मुलाने बाबा अशी जोरात हाक मारली आणि इको आला. तेव्हा लक्षात आले की मुलगा ज्या ठिकाणी उभा होता तिथूनच केवळ इको ऐकू येत होता. मग काय!! आलेल्या सगळ्या पर्यटकांनी एका मागोमाग एक तिथे उभारून इको येतोय का हे पाहायला सुरुवात झाली आणि आम्हाला तो इको पॉईंट एकदाचा सापडला!! त्यामुळे तिथे मात्र आम्हाला खूप मज्जा आली. याचा व्हीडीओ आहे. परंतू मला व्हीडीओ कसा चढवायचा ते जमत नाही.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

     नंतर ते एका पॉईंटला घेऊन गेले. तिथून डोंगर रांगा दिसत होत्या.

फोटो

फोटो

      भर दुपारचे आम्ही तिथे उभे होतो. तिथूनही वरून एक लांबचा धबधबा दिसत होता. तथापि फार काही ग्रेट वाटले नाही. खरंतर ही सर्व ठिकाणे सुंदर होती. परंतु एकंदरीतच साडेतीन हजार रुपये एक्स्ट्रा देऊन अशा पद्धतीची ट्रीप करणे फार काही वर्थ वाटले नाही. पण ठीक आहे. आम्ही ठरवले होते. जे काही आपल्याला दिसेल त्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा. त्यामुळे आम्हाला जे काही दिसले, ते आम्ही फोटो वगेरे काढून एन्जॉय करत होतो.
      जीप ड्रायव्हरने आम्हाला परत जिथे होते तिथेच सोडले. साधारण दुपारचा 1.30 वाजला होता. आता आम्ही तिथल्याच एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवायचं ठरवले. तिथे काही साउथ इंडियन जेवण मिळत नव्हते. त्यामुळे आम्ही फ्राईड राईस आणि नूडल्स मागवले आणि भूक भागवली. शमी भाईला आमचा एक्सपिरीयन्स फार काही ग्रेट नव्हता हे सांगितले. त्यावर तो म्हणाला, आता मी तुम्हाला एक पॉईंट ला घेऊन जातो तो बघितल्यावर मात्र तुमचं मन खुश होऊन जाईल. हा पण एक धबधबाच आहे आणि इथे नॉर्मली कोणीही तुम्हाला घेऊन जाणार नाही.
      जाताना त्याने आम्हाला केरळामधला पहिला हायड्रो प्रोजेक्ट दाखवला

फोटो

फोटो

      आणि तो आम्हाला आटूकडू वॉटर फॉल्स कडे घेऊन गेला. हा धबधबा मात्र फारच जवळून दिसत होता. पाण्याचा मोठा प्रवाह जोरात वाहत होता. आम्ही तेथेदेखील ब्रिजवर उभे होतो आणि धबधबा खूप जवळून दिसत होता.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

परंतु इथे जाण्याचा मार्ग मात्र अतिशय अप्रतिम होता. तिथे जाण्याचा मार्ग हा चहाच्या मळ्यातून जात होता. त्यामुळे आम्ही मध्येच उतरून एका चहाच्या मळ्यामध्ये काही फोटो काढले. त्याच्यामागे आम्हाला बॅकग्राऊंड वरती एक लांबचा धबधबा दिसत होता. खूपच मजा आली.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

वेलचीची झाडे तळाला जो हिरवे हिरवे शेंगा सारखे दिसत आहेत ते वेलची आहेत
फोटो

     त्यानंतर तो आम्हाला पोथमेडू या व्यू पॉइंटवर घेऊन गेला. इथून पूर्ण मुन्नारचा सुंदर नजारा दिसत होता. हे दोन्ही ठिकाणी आम्हाला अतिशय आवडली आणि सकाळी फारसे काही बघायला नाही मिळाले याबाबत जे काही असमाधान होते ते क्षणात दूर पळाले.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

      संध्याकाळचे 5.00 वाजले होते. चहाची तल्लफ आली होती. वाटेत आमचे अन्नपूर्णा हॉटेल लागले. तिथे चहा आणि केरळची प्रसिद्ध केळ्याची भजी ट्राय केली. याला मल्याळीमध्ये पाळम पोरी असे नाव आहे. गोड व तिखट असे दोन्ही प्रकार मिळतात. कोल्हापूरी मिरची भजीचे फॅन आसणाऱ्या आम्हा कुणालाच हा प्रकार अजिबात आवडला नाही. आवर्जून खावा असा काही हा प्रकार नाही. पण इथे हा प्रकार बराच चालतो.

फोटो

      चहा पिऊन झाला. का कुणास ठाऊक मला मुटूपट्टी डॅम बघायचा होता. तिथे बोटिंग करायला मिळाले तर करायचे होते. शमीभाई ने आता गाडी तिकडे वळवली. खरं तर ते खूप लांब होते. नेमका कुठलातरी उत्सव असल्यामुळे गाडी मुन्नार शहरातच बराच वेळ अडकली. नंतर आम्ही जे मुटूपट्टी डॅमच्या रस्त्याला लागलो तो मात्र सुंदर नजारा होता. तथापि डॅमच्या अलीकडे खूप सार्‍या गाड्या लागलेल्या असल्यामुळे ड्रायव्हरने आत मध्ये जितके शक्य आहे तिथपर्यंत सोडून परत रिव्हर्स घेऊन पार्किंगसाठी गेला आणि आम्हाला पुढे जायला सांगितले. कारण आता तिथे संध्याकाळ झालेली असल्यामुळे कदाचित आम्हाला फिरता येणार नव्हते. त्यामुळे आम्ही चालत चालत पुढे गेलो. बऱ्यापैकी अंधार झाला होता. वेळ संपलेली होती. सर्वजण ते पाहून परत निघाले होते. आम्ही काही फोटो काढले. आजूबाजूला फिरत राहिलो. तेवढ्यात एक घोडेस्वार आला. मुलाला त्याच्यावरती बसायचे होते. त्यामुळे त्याला सवारी करवली आणि आम्ही परत फिरलो.
फोटो

फोटो

फोटो

      एकंदरीतच आज एकाच दिवसात आम्ही बरेच पॉईंट फिरलो होतो आणि छान वाटत होते. साधारण साडेसात-आठच्या दरम्यान आम्ही हॉटेल वरती परत पोहोचलो. उद्या आम्हाला थेक्कडी ला जायचे होते. प्रामाणिकपणे सांगायचं तर मुन्नारला लोक दोन ते तीन दिवसाचा मुक्काम कराच असे सांगतात. तथापि मला मुन्नार का कुणास ठाऊक पण फार काही आवडले नाही. जेवढी हाइप मुन्नार बद्दल लोकांनी करून ठेवली आहे तितके काही ते ग्रेट आहे असे वाटत नाही. कदाचित मी मुन्नारबाबत फारच अपेक्षा ठेवून गेले होते म्हणून हे झाले असेल. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. कोचीहून मुन्नारला पोहोचण्याचा एक दिवस व त्यानंतरचा एक दिवस हा मुन्नार साठी खूप झाला. मी तर म्हणेन दुसरे दिवशी सरळ मुन्नार होऊन थेकडीला सावकाश जावे. हा प्रवास अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. येथे मात्र तुम्हाला जागोजागी थांबून निसर्गाची वेगवेगळी रूपे पहावे असे वाटेल. त्यामुळे मुन्नार ते थेकडी हा प्रवास जरी गुगल मॅप वरती तीन तासाचा असला तरीही तुम्हाला पोहोचेपर्यंत चार ते साडेचार तास आरामात लागू शकतात आणि खरोखर तेवढा वेळ दिला पाहिजे. इतकी जागोजागी अप्रतिम निसर्गाची मुक्तहस्ताने उधळण झालेली दिसते आणि आपण केरळ मध्ये आलो आहोत याचा परिचय होतो. असो. याचे वर्णन आता पुढील भागात......

दिवस तिसरा "थेकडी"

   आज आम्हाला थेकडी ला जायचे होते. थेकडी हे पेरियार अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. सकाळी उठल्यावर येथील प्रसिद्ध “सर्वना भवन” येथे आम्ही नाश्ता करण्यासाठी गेलो. हे मुन्नार मधले एक अतिशय उत्तम व मस्ट ट्राय असे हॉटेल आहे. इथे आम्ही इडली, मेदुवडा, डोसा, पोंगल व त्याचबरोबर अप्पम आणि गोड नारळाचे दूध हे पदार्थ ट्राय केले.

फोटो

     हा एक अतिशय उत्तम अनुभव होता. केरळमध्ये अप्पम हे व्हेज कुर्मा/अंडा करी/फीश करी बरोबर खातात. पण इथे तो गोड नारळाच्या दुधाबरोबर सर्व्ह केला गेला. मस्त चव होती अप्पमची. पोंगल हा साधारण खिचडीभातासारखा प्रकार आहे. एकदा खायला छान वाटला. हे सर्व पदार्थ नारळ, आलं+मिरची+पुदीना व टोमॅटो अशा 3 प्रकारच्या चटण्या व सांबार सोबत दिले. इथे केरळमध्ये सर्वच ठिकाणी सांबार दाट व चवीला साधारण होते. पण चटण्या मात्र 1 नंबर. त्यामुळे चवीचा सगळा गेम चटण्यांचा होता. चटण्या व सांबार सगळीकडे अनलिमिटेड असते. तसेच इकडे नगावर इडली व मेदूवडा देतात. म्हणजे तुम्ही कितीही इडली, मेदूवडा खा शेवटी ते नगानुसार बिल करतात. 1 इडली 15 रु. व एक मेदूवडा 20रु. याप्रमाणे. भरपेट नाश्ता करून, तृप्त होऊन आम्ही साधारण साडेनऊ वाजता थेकडीला प्रस्थान केले.

     आता थोडे थेकडी बद्दल बोलूया. थेकडीला जावे की न जावे याबद्दल अनेकांची अनेक मते असतात. असेही रिव्ह्यू वाचले आहे की थेकडीला काहीही नाही, त्यामुळे ते स्किप केले तरी चालते. परंतु मुन्नार वरून थेट मुनरो आयर्लंड येथे जाण्याचा रस्ता हा साधारण गुगल मॅप वरती सात ते आठ तासांचा दाखवत होता. त्यामुळे मध्येच कुठेतरी स्टॉप घेऊन हा प्रवास करणे आवश्यक होते. त्यामुळे मी थेकडी या ठिकाणाचा समावेश आमच्या सहलीमध्ये केला. या ठिकाणाकडून मला फार काही अपेक्षा नव्हत्या. इथे प्रसिद्ध असलेली ऍक्टिव्हिटी म्हणजे इथल्या बॅक वॉटर मध्ये करायचे बोटिंग. साधारण तीन तासाच्या या बोटिंगमध्ये तुमचे नशीब चांगले असेल तर काही प्राणी दिसू शकतात. तथापि आम्हाला इतका वेळ बोट राईड करण्यामध्ये रस नव्हता.
     मी periyartigerriserve.org या वेबसाईट वरती तिथे करण्यात येणाऱ्या बऱ्याच ऍक्टिव्हिटी बघितल्या होत्या. ज्यामध्ये नेचर वॉक, ग्रीन वॉक, बांबू राफ्टींग- हे पूर्ण दिवस व अर्धा दिवस अशा पद्धतीने होते, शिवाय ट्रेकिंग, नाईट सफारी, हायकिंग, ट्रायबल डान्स, जंगल कॅम्प, बर्ड सॉंग ट्रेल, गावी नावाच्या जंगल एरियामध्ये जंगल सफारी, असे अनेक पर्याय अत्यंत माफक दरामध्ये उपलब्ध असलेले दिसले. या एकाच साईट वरती तुम्ही जंगलामध्ये राहण्यासाठी कॉटेज देखील बुक वगैरे करू शकता. अतिशय अद्यावत अशी ही वेबसाईट असून याच्यावरून ऑनलाइन बुकिंग करता येते.
     ज्यावेळी मी सहलीचे नियोजन करत होते त्यावेळी माझा अंदाज होता की आम्ही साधारण एक वाजेपर्यंत थेकडी येथे पोहोचलो की त्यानंतर दोन तासाचा नेचर वॉक बुक करायचा. त्यानंतर हत्तीची सफारी करायची. संध्याकाळी वेळ मिळाला व दर योग्य असेल तर तर मसाज घ्यायचा किंवा मार्केट फिरायचे. इथे सुद्धा दोनशे रुपये प्रतिमांशी दरामध्ये कलरीपट्टू व कथाकलीचे शो संध्याकाळी असतात. ही सर्व ठिकाणे जवळजवळ असल्यामुळे मुन्नार मध्ये जसे प्रत्येक ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यामध्ये वेळ जातो तसा मात्र येथे जात नाही. कारण हे खूप छोटेसे शहर असल्यामुळे तिथल्या तिथेच बरीच ठिकाणे आहेत.
     खरंतर मुन्नार येथील बऱ्याच ऍक्टिव्हिटी या थेकडी येथे उपलब्ध आहेत आणि बरेचसे पर्यटक या सर्व ऍक्टिव्हिटी मुन्नारला आधीच करून आलेले असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी थेकडी येथे बोटिंग सोडले तर करण्यासारखे विशेष असे वेगळे काही उरत नाही. टुरिस्ट कंपन्या आपला ग्राहकांना इथे उपलब्ध असलेल्या इतर ऍक्टिव्हिटी बद्दल कितपत सांगतात याबद्दल मला शंका आहे. त्यामुळे हे ठिकाण स्किप करण्याचा देखील सल्ला बरेच जण देतात. परंतु मला मात्र जंगलात फिरायला आवडते वेबसाईटवरील बऱ्याचश्या ऍक्टिव्हिटी या मला अतिशय आकर्षक वाटल्या. खरं म्हणजे थेकडी येथे भविष्यात मी नक्की पुन्हा भेट देणार आहे व राहिलेल्या सर्व ऍक्टिव्हिटी पूर्ण करणार आहे जसे की जंगल वॉक ,नाईट सफारी हा अनुभव मला जंगलातीलच कॉटेजमध्ये राहून घ्यायचा आहे. बघूया कधी जमेल ते. असो.
     मुन्नार ते थेकडी हा मार्ग अत्यंत निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. हा प्रवास अविस्मरणीय असा होता. केरळ सहलीमध्ये सर्वात आवडलेले काही क्षण जर मला कोणी सांगायला लावले तर हा मुन्नार- थेकडी प्रवास , मुनरो आयर्लंड मधील बोट राईड, आणि पद्मनाभम पॅलेसची सफर असे मी तीन हाय पॉइंट सांगेन. एकाच वेळी आपल्याला चहाचे हिरवेगार मळे आणि जंगलाने वेढलेले डोंगर आणि निळे शार आकाश असं एक सुंदर कॉम्बिनेशन दिसतं. हे दृश्य कितीही डोळ्यात साठवलं तरी मन भरत नाही. प्रत्येक वळणावरती निसर्गाचा नवीन कॅनव्हास आपल्यासमोर एक नवीन निसर्ग चित्र निर्माण करतो. या प्रवासाने आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले इतकेच म्हणेन.

फोटो

कधीतरी मध्ये चहाचे मळे दिसत होते तर कधी सुंदरशा डोंगर रांगा

फोटो

फोटो

हिरवेगार चहाचे मळे.... त्याच्यामागे उभे असलेले उंच पहाड आणि वरती निळे शार आकाश.......

फोटो

फोटो

     या मार्गांवरती काही ठिकाणी थांबून खूप फोटोग्राफी केली.

प्रत्येक वळणावरती निसर्गाची एक नवीन फ्रेम समोर येत होती. आता इथेच बघा आकाश किती सुंदर दिसत आहे आणि खाली साधारण जंगलाचा भाग पण संपूर्ण चित्र निळाईत रंगल्यासारखं वाटत आहे
फोटो

हे सर्व दृश्य किती बघू आणि किती नको असेच होते
फोटो

सुंदर से निळे आकाश आणि मागे डोंगरांच्या कित्येक रांगा ......लांबून त्याही निळाईने रंगलेल्या वाटत होत्या ......
फोटो

निळाईची उधळण...

फोटो

वाटेत सुंदर वॉटर फॉल दिसला...

फोटो

या धबधब्यामध्ये पाणी भरपूर होते
फोटो

     तेवढ्यात एके ठिकाणी पेरियार धरणाचे बॅकवॉटर आम्हाला दिसले. टाटा टी चे चहाचे मळे त्याला लागूनच होते आणि त्या चहाच्या मळ्यांमध्ये आम्हाला दोन हरणे बागडताना दिसली. आम्ही गाडी थांबवली आणि घाटाच्या कठड्यावरती बसून त्या दृश्यांचा आस्वाद घेऊ लागलो. चहाचे मळे, त्याला लागून असलेले बॅक वॉटर आणि त्याच्या पलीकडे असलेले डोंगर आणि डोंगराच्या वरती असलेले निळेशार आकाश! असे वाटले इथून कधीही उठू नये!! आमच्याकडे दुर्बीण होती आणि आम्ही त्यातून पाहू लागलो तर आम्हाला त्या धरणाच्या बॅक वॉटर मध्ये तीन हत्ती पाणी पीत असताना दिसले. त्याचबरोबर एक हत्तीचे पिल्लू देखील होते. खाली जिथे बाण दाखवला आहे तिथे हरणाचे एक पिल्लू दिसत आहे.असे दोन पिल्ले आजूबाजूला बागडत होती .

फोटो

फोटो

फोटो

फोटो

     आम्हाला अलभ्य असा लाभ झाला होता! मुळात आम्ही थेकडीला बोट राईट घेणार नव्हतो. कारण मी बऱ्याच ठिकाणी वाचलं होतं की दोन-तीन तास फिरून देखील एकही प्राणी दिसत नाही. त्यामुळे आम्ही टेकडीला फक्त जंगलात नेचर वॉक करणार होतो, हत्तीवरून फिरणार होतो आणि तेथील मसाल्यांच्या मार्केटमध्ये फिरणार होतो. जे काही करायला मिळेल तो आमचा बोनस होता. कारण आम्ही कधी पोहोचू याची शाश्वती नव्हती. आम्ही तिथे थांबलेले बघून काही पर्यटकांच्या गाड्या देखील तिथे थांबल्या. आम्ही त्यांना सांगितले तिथे खाली हरणे आहेत. तसेच हत्ती देखील आहेत. त्यावेळी एक पर्यटक स्त्री म्हणाली आत्ताच आम्ही थेकडीला दोन तासाची बोट राईड करून आलो परंतु एकही प्राणी आम्हाला दिसला नाही,नशीब आमचं की इथे तरी आम्हाला काही प्राणी दिसले.

फोटो

फोटो

     आम्ही साधारण तासभर तरी तिथे थांबलो. कारण ते दृश्यच इतके नयनरम्य होते की तिथून उठावे असे वाटतच नव्हते. तेवढ्यात एक जंगली गवा तिथे पाणी पिण्यासाठी आला. आम्ही सर्वजण कठड्यावरती पाय सोडून निवांत बसलो होतो व त्या दृश्यांचा आनंद घेत होतो.

फोटो

तेथील जवळ एका नारळ पाणी पिणाऱ्या विक्रेत्याकडून नारळ पाणी पिण्यासाठी घेतले आणि साधारण तासा-दीडतासा नंतर आम्ही तिथून निघालो. त्यावेळी 12 वाजले होते.

      आम्ही जरा पुढे आलो आणि तिथे शमीभाईने गाडी टाटाटीच्या फॅक्टरीमध्ये नेली. समोरचे दृश्य बघून आम्ही स्तिमित झालो. कारण सुंदर नदी वाहत होती व त्याच्या काठावरती टी प्लांटेशन झाले होते. शमीभाई म्हणाला इथे आपण चहा वेचणाऱ्या बायकांच्या रूपात तुमचे फोटो सेशन करूयात. त्याने माझ्या सासूबाईंचा स्कार्फ विशिष्ट पद्धतीने डोक्यावरती बांधला. आता आम्ही थोडे चहा खुडणाऱ्या बायकांसारखे दिसत होतो. त्यांनी आमचे मस्त फोटोशूट केले. त्यातील काही फोटो-

फोटो

फोटो

     प्रवासातील दृश्य एन्जॉय करत करत आम्ही थेकडीला साधारण 3.00 वाजता पोहोचलो. पोहोचल्या पोहोचल्या तिथे हत्तीच्या सफारीची तिकिटे काढली. खूप गर्दी होती. टोकन नंबर नुसार आमचा नंबर यायला साधारण दीड ते दोन तास जाणार होते. त्यामुळे आम्ही तेवढ्या वेळात तेथीलच एका जवळच्या हॉटेलमध्ये जेवून घेतले. नॉर्थ इंडियन थाळी होती. बरी होती. जेवून आम्ही हत्तीच्या सफारीसाठी आलो. इथेच बाजूला कलारीपट्टू आणि कथकलीच्या शोची तिकिटे मिळणार होती. तथापि आम्ही हे शो आधीच पाहिले होते. हत्तीच्या सफारीसाठी किती वेळ जाईल हे माहित नव्हते. तसेच प्रवासाचा थकवा जाणवत होता, त्यामुळे नेचर वॉकचा बेत रद्द केला व संध्याकाळी केवळ मार्केटमध्ये फेरफटका मारू असा विचार केला. थेकडीमध्ये आम्ही जे हॉटेल बुक केले होते, तेथील मालकाला आम्ही उशिरा येत आहोत हे कळवले.
      हत्तीची सफारी अतिशय उत्तम झाली.
फोटो

फोटो

मसाल्याच्या बागेतून 15 मिनिटे हत्तीने आम्हाला फिरवून आणले.

फोटो

फोटो

मुलाने हत्तीच्या सोंडेतून पडणाऱ्या पाण्यात अंघोळ करून घेतली. त्याला खूप मजा वाटली.

फोटो

फोटो

हे सर्व प्रतिमाणशी 500 रुपयांमध्ये झाले. आंघोळीचे पाचशे रुपये वेगळे.
     त्यानंतर आम्ही आमचे हील व्ह्यू नावाचे हॉटेल होते, तिथे चेक-इन केले. मालक अतिशय सहकार्य करणारा होता. हॉटेलमधून समोर दिसणारे दृश्य अप्रतिम होते. कारण समोर उभा डोंगरच्या डोंगर दिसत होता. धुके दाटून आले होते.

फोटो

     खरंच असं वाटलं की थेकडीला अजून एक दिवस ठेवायला पाहिजे होता. त्या हॉटेलच्या आमच्या रूमच्या बाहेर मस्त मोठा व्हरांडा होता. तिथे बांबूच्या छान दोन खुर्च्या टाकून दिल्या होत्या. मी आणि माझा नवरा निवांत तिथे बसलो. समोरचे दृश्य एवढे सुंदर होते की काही बोलावे असे वाटत नव्हते.

फोटो

खरं म्हणजे मुन्नार मध्ये एक दिवस कमी करून तो थेकडीला एक दिवस वाढवायला हवा होता असे वाटले. केवळ हॉटेलमध्ये बसून देखील आम्ही राहिलो असतो तरी देखील समोरचे दृश्य बघतच आम्ही दिवस घालवला असता, इतके सुंदर दृश्य होते.
      रूम ताब्यात घेऊन बाकीचे सगळे सोपस्कार करेपर्यंत साडेसात वाजले होते. आम्ही मार्केटमध्ये फिरायला बाहेर पडलो. फिरून काही मसाले घेतले. हे मसाले स्वस्त नसले तरी चांगल्या दर्जाचे असतात. (खरं तर सासूबाईंना मात्र गावी वापरण्यासाठी मसाले घ्यायचे होते. मला मसाल्यांची खरेदी करण्यामध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता. परंतु सासूबाईच्या इच्छे खातर मसाल्याची थोडीफार खरेदी झाली. घरी आल्यानंतर मी या मसाल्यांचा वापर करून मिसळ बनवली आणि फरक लगेच जाणवला. खड्या मसाल्यांचा सुंदर असा वास कटाला आला होता आणि मग इतके दिवस मी केरळमधील विविध हॉटेलमध्ये पदार्थ खात असताना मसाल्यांचा जो ताजेपणा जाणवत होता तो का जाणवत होता याचे उत्तर मिळाले. आपणही थोडे जास्तीचे खडे मसाले खरेदी केले असते तर बरे झाले असते असेही वाटून गेले....) तसेच मला मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी गव्हाच्या हलवा दिसला. एका दुकानांमध्ये आम्ही मसाले व ड्रायफ्रूट हलवा व गव्हाचा हलवा विकत घेतला.

फोटो

      साधारण 80 ते 90 रुपये पाव किलो या दराने हा हलवा मिळतो.

फोटो

हा हलवा चवीला उत्तम लागतो. हा पदार्थ केरळला कुणी गेले तर मीस करु नये. तेवढ्यात समोर एक चाट वाला दिसला. त्याच्याकडे आम्ही पाणीपुरी, भेळ असे चाट खाल्ले. दुपारी उशिरा जेवण झालेले असल्यामुळे भूक फारशी नव्हती.
      त्यामुळे हॉटेलवर आलो आणि लवकर झोपी गेलो. कारण उद्या लवकर उठायचे होते. उद्या आम्हाला मुन्रो आयर्लंड येथे जायचे होते. गुगल मॅप चार तास दाखवत असले तरी आजच्या अनुभवावरून मला लक्षात आले होते की त्याहीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. शिवाय केरळ मधील रस्ते हे अरुंद असल्यामुळे तसेच ड्रायव्हरला 60 पेक्षा जास्त स्पीडने गाडी चालवण्यास कंपनीकडून बंदी असल्याने, ट्रॅफिक नसले तरीही ड्रायव्हर जास्त स्पीडने गाडी चालवत नाही. त्यामुळे उशीर लागणार आहे हे लक्षात घेऊन शमीभाईला सांगितले की उद्या सकाळी साडेसहा वाजता तयार रहा, आपल्याला लवकर लिहायचे आहे.मुनरो आयर्लंड च्या नितांतसुंदर अनुभवाची गोष्ट पुढील भागात.....


अप्पम आणि परोटा हे दोन्ही पदार्थ केरळ आणि तामिळनाडूमध्ये चांगले मिळत असले तरी केरळचे अप्पम (पालप्पम) आणि परोटा (मलबार परोटा) माझ्या विशेष आवडीचे! केरळी लोकांच्या घरी पारंपरिक पद्धतीने तयार केल्या जाणाऱ्या अप्पमसाठी ज्यांच्या घरी ताडाचे झाड असेल ते ताज्या 'ताडीत' आणि ज्यांच्याकडे ते नसेल ते लोक आपल्या घरच्या काहीशा जून झालेल्या शहाळ्याच्या पाण्यात तांदूळ भिजवतात. शहाळ्याच्या वरच्या पातळ पापुद्र्याला छिद्र पाडताना सोड्याची बाटली उघडताना येतो तसा आत तयार झालेला गॅस 'स्स्स्स्स....' आवाज करत बाहेर पडेल ते शहाळे ह्यासाठी उत्तम मानले जाते.
ह्या दोन्ही प्रकारे बनवलेले अप्पम चवीला अप्रतिम लागत असले तरी ताडीत भिजवलेल्या तांदुळाचे अप्पम चवीला अधिक उजवे वाटतात आणि ह्या पारंपरिक पद्धतीत यीस्टचा वापर होत नसल्याने हॉटेलमध्ये मिळणाऱ्या अप्पमपेक्षा ते फारच छान लागतात.

माझ्या काही केरळी मित्रांच्या घरी असे अप्पम नाश्त्याला चटणी-सांबार बरोबर आणि जेवताना चिकनच्या रश्श्या बरोबर खायला मला आवडतात आणि मलबार परोटे हे तिथे कुर्मा, चिकन, बोकडाचे मटण, बीफ, पोर्क, अंडा/फिश करी वगैरे बरोबर खाल्ले जात असले तरी मला ते कुर्मा, चिकन किंवा अंडा करी बरोबर खायला आवडतात.

गेल्या अडीच-तीन दशकांपासून अप्पम आणि परोटे हे पदार्थ बऱ्याच स्नॅक कॉर्नर्स मध्ये छान मिळत असल्याने अनेक डोंबिवलीकरांच्या ते चांगल्याच परिचयाचे आणि आवडीचे आहेत. त्यात गेल्या काही वर्षांपासून बाजारात 'फ्रोझन मलबार परोटेही' मिळू लागल्याने चांगली सोय झाली आहे.

बाकी सांबारचे म्हणाल तर आंध्र प्रदेशातल्या खूपच पातळ आणि कर्नाटकमधलया विशेषतः उडपी पातळ व गोडसर सांबारपेक्षा केरळ आणि तामिळनाडूमधले दाटसर सांबारच चवीला बेस्ट असे माझे वैयक्तिक मत


खरं म्हणजे थेकडी येथे भविष्यात मी नक्की पुन्हा भेट देणार आहे व राहिलेल्या सर्व ऍक्टिव्हिटी पूर्ण करणार आहे जसे की जंगल वॉक ,

जरूर करा. जंगल वॉक चा आमचा अनुभव भारी होता . येथील जंगलात खूप जळू/जळवा आहेत. चालतांना बूट आवश्यक. बुटांपासून गुडघ्यापर्यंत दोन्ही बाजूस बांधता येईल जाड कापडी पिशवी लावूनच चालायचे . तरीसुद्धा कुठूनतरी काही जळू अंगाला चिकटतातच. जळू काढून टाकली तरी रक्त लवकर थांबत नाही.

दिवस चौथा - मुनरो आयलँड

आज आम्हाला थेकडीवरून मुनरो आयर्लंड येथे जायचे होते आणि संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत वरकला इथे पोहोचायचे होते. आम्ही ठरलेल्या वेळेप्रमाणे लवकर उठून साडेसहा वाजताच थेकडी सोडले. माझ्या अंदाजाप्रमाणे आम्हाला मुनरो आयर्लंड ला पोहोचायला दुपारचे साडेबारा तरी वाजतील असे वाटले. वाटेत सृष्टी सौंदर्य छान होते. .

फोटो

पण आता झाडांचा प्रकार बदलला होता. मुन्नार सोडले त्या वेळेला आम्हाला चहाचे मळे पाहायला मिळत होते. आता मात्र सर्व जंगली भाग आणि जंगलामध्ये दिसणाऱ्या झाडांनी मन मोहून जात होते

फोटो

     तेवढ्यात आम्हाला एक सुंदर असा धबधबा दिसला.

धबधबा

साधारण सकाळचे आठ वाजले असतील. आम्ही इथे एक छोटा ब्रेक घ्यायचे ठरवले. हा धबधबा मात्र खाली जवळ जाऊन एन्जॉय करता येण्यासारखा होता. विशेष म्हणजे या धबधब्यामध्ये आम्हाला एक इंद्रधनुष्यही दिसले. या खालच्या चित्रामध्ये तुम्हालाही दिसेल !!

धबधबा

तरी तिथे एक पोलीस होताच . शमीभाई त्यांच्याशी मल्याळी मध्ये बोलला आणि त्याने आम्हाला खाली जवळ जाऊन फोटो घेता येईल असे सांगितले.

धबधबा

मग काय, आम्ही खुश झालो आणि शेवटी धबधब्यामध्ये भिजायचा आनंद आम्हाला मिळालाच! टायटॅनिक पोज मध्ये जॅक आणि रोज बनून आम्ही रोमँटिक फोटोशूट केले!!

फोटो

     तिथेच जवळ असलेल्या एका चहाच्या टपरीवर आम्हाला केळाचे भजे दिसले. इथेही ट्राय करूया कदाचित वेगळी चव मिळेल आणि हा प्रकार आवडेलही असे म्हणून आम्ही ट्राय करायला घेतले, तर त्याची चव अजूनच बेकार होती!! पण चहा मात्र अप्रतिम होता! साधारण वीस-पंचवीस मिनिटात आम्ही तिथून निघालो. वाटेत रबराची झाडे देखील दिसली.
फोटो

फोटो
साधारण 10 च्या सुमारास आम्ही नाष्ट्यासाठी हॉटेल शोधू लागलो. परंतु चांगले असे हॉटेल मिळेना. या मार्गावरती बरीचशी नॉनव्हेज हॉटेल्स दिसली. शेवटी एका कुठल्यातरी देवस्थानाच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो,तिथे आम्हाला प्युअर व्हेज उडुपी हॉटेल दिसले. तिथे आम्ही नाश्ता करायला थांबलो. इथे सब्रीमलाचे बरेचसे भक्त आम्हाला दिसत होते. ते हॉटेलमध्ये जेवताना दिसत होते.
फोटो

     हे अत्यंत साधे हॉटेल होते जे माफक दरामध्ये भक्तांना जेवण देत होते. बरेचसे लोकं सांबार भात खाताना दिसले आणि पुरी भाजी खाताना दिसले. आम्ही नाष्ट्या करता विचारले, तर त्यांच्याकडे फक्त डोसा होता. डोसा सुद्धा फार काही चांगला नव्हता. परंतु त्या हॉटेलच्या मॅनेजरने आमच्यासाठी ताबडतोब गरम गरम मेदू वडे तळून काढले व फ्रेश चटणी बनवून दिली. त्या सगळ्या गडबडीत मी काही फोटो काढले नाहीत.

     नाश्ता करून आम्ही निघालो. मुनरो आयलँड मध्ये ड्रायव्हरने ओळख काढून एका नावाड्याशी बोलणी करून ठेवली होती. शमीभाईने मुनरो आयर्लंड ला कधीही भेट दिली नव्हती. त्याला हे ठिकाणच माहीत नव्हते. त्यामुळे तो देखील हे ठिकाण पाहण्यासाठी आतुर होता आणि जेव्हा आमची गाडी खरोखरीच मुनरो आयलँड मध्ये शिरली त्यावेळी खरे केरळ आम्हाला दिसले!!!

फोटो

अप्रतिम सुंदर सुंदर अशी नारळाचे झाडे आणि अप्रतिम असा अष्टमुडी बॅकवॉटरचा नजारा ……..

फोटो

फोटो

फोटो

      वा !!!! असे उद्गार आमच्या तोंडातून आपोआप बाहेर पडले. शमी भाई म्हणाला की तुम्ही उत्तम ठिकाण निवडले आहे. इतके स्वच्छ पाणी मी कधीही पाहिले नाही. अलेप्पीचे बॅक वॉटर खूप गढूळ आहे. हे ठिकाण खूपच सुंदर आहे. मी माझ्या बायकोला आणि मुलांना घेऊन इथे नक्की येणार. हे ऐकून मी माझीच पाठ थोपटून घेतली.

फोटो

फोटो

     आता थोडं मुनरो आयर्लंड बद्दल माहिती देते. पूर्वीच्या काळी मुंड्रथुरुथ्थु नावाने ओळखले जाणारे हे बेट अष्टमुडी तलाव व कल्लडा नदी यांच्या संगमावरती वसलेले आहे. याचा इतिहास बघायचा झाला तर सन 1800 पर्यंत मागे जावे लागते. कर्नल जॉन मुनरो हे त्रावणकोरचे दिवाण होते. मलंगकारा मिशनरी चर्च सोसायटी यांना धार्मिक अभ्यास केंद्र उभारता यावे यासाठी त्यांनी आपल्या अखत्यारीतील हे बेट त्यांना देऊन टाकले. कृतज्ञता दर्शवण्यासाठी या सोसायटीने सदर बेटाला कर्नल मुनरो यांचे नाव दिले. तेव्हापासून हे बेट मुनरो आयलँड म्हणून ओळखले जाते.

फोटो

फोटो

     कल्लडा नदीतील गाळाची माती संचयित होऊन या बेटाची निर्मिती झालेली आहे. सुरुवातीला सुपीक असणाऱ्या या भागामध्ये नंतर मात्र अष्टमुडी तलावातील खारट पाण्यामुळे हा भाग शेतीसाठी नापीक होत गेला. पूर्वी या बेटावरती शेती व काथ्या(coir) बनवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होत होते. तथापि आता हे दोन्हीही उद्योगाचे प्रमाण येथे खूप कमी झाले आहे. दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे बरीचशी घरे पाण्यामध्ये बुडून जात असल्यामुळे एका अहवालानुसार सदर बेट सन 2050 पर्यंत पाण्याखाली जाईल. याबाबतचे अनेक व्हिडिओ मी youtube वर पाहिले होते. मुनरो आयर्लंड येथे छोट्या छोट्या निमुळत्या जलमार्गातून छोट्या पारंपारिक होडीतून प्रवास करायला मिळतो.

फोटो

फोटो

अगदी पारंपारिक केरळचे दर्शन करायचे असेल तर ही जागा म्हणजे खरंच पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. इथे अष्टमुडी तलावामध्ये कांदळवनांनी नैसर्गिक रित्या कमान बनवलेली आहे.

फोटो

फोटो

हा एक निसर्गाचा सुंदर चमत्कार आहे. संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारे खारफुटी वनस्पतींनी अशा प्रकारची कलाकृती बनवणे माझ्यातरी पाहण्यात किंवा ऐकण्यात नाही. त्यामुळे माझ्यासाठी हे स्थान म्हणजे एकमेव द्वितीय असे आहे. तिथे जाऊन येणे आणि त्या प्रकारच्या खारफुटी वनस्पती पाहणे हे माझ्यासाठी अतिशय उत्तम अनुभव होता.
     केरळमध्ये आपण अशा प्रकारचं बॅकवॉटर होडीतून अनुभवण्यासाठी आलेप्पी व पूवर हे दोन अतिशय प्रसिद्ध ठिकाणे आहेत. त्यामानाने मुनरो आयर्लंड हे ठिकाण मात्र तितकेसे प्रसिद्ध नाही. परंतु त्याचे व्हिडिओ आणि फोटो पाहून मला मात्र तिथे जाण्याची इच्छा झाली. कारण सन 2050 पर्यंत जर ते बुडून गेले तर या सुंदर ठिकाणावर आपल्याला कधी जाता येणार नाही. आलेप्पी नंतरही बघता येईल असा विचार केला. आम्हाला हाऊसबोटीमध्ये राहण्यात इंटरेस्ट नव्हता कारण मुलगा सोबत होता व त्यामुळे हालचालीवर मर्यादा येतात. तसेच आम्हाला पूवरही मिस करायचे नव्हते. आलेप्पी व मुनरो आयर्लंड या दोन्ही ठिकाणचा अनुभव एकच असणार होता. कारण मी आलेप्पिला जरी गेले तरी तिथे छोट्या छोट्या जलमार्गातूनच फिरणार होते. तथापि मी मुनरो आयलँड ची निवड केली आणि हा माझा या सहलीसाठी नियोजनाचा सर्वोत्तम निर्णय ठरला! खरंतर हे शांतता अनुभवणाऱ्या लोकांसाठी उत्तम ठिकाण आहे. मुनरो येथे पारंपारिक पद्धतीने नाव हाकली जाते. त्यामुळे नावेला अजिबात स्पीड नसतो. नाव अत्यंत निमुळत्या रस्त्यातून जात असल्यामुळे आजूबाजूची झाडे, पक्षी अगदी पाण्यातून वाहत जाणारे साप, हे खूप जवळून दिसतात. येथील सृष्टी सौंदर्य हे तुम्हाला निःशब्द करून टाकते. नैसर्गिक कमानी पर्यंत जर जायचे असेल,तर जाता- येता जवळपास दोन तास लागतात. यासाठी एका बोटीला चालवणारा दोन ते अडीच हजार रुपये घेतो. त्यांची मेहनत बघता हा दर काही जास्त नाही. एका तासाचे 1000 याप्रमाणे साधारण हिशेब असतो. तुम्हाला नुसते छोट्या छोट्या जलमार्गातून फिरायचे असेल तर एका तासात ते एक हजार रुपये घेऊन फिरवून आणतात. परंतु जर तुम्हाला नैसर्गिक कमानी पर्यंत जायचे असेल तर मात्र जास्त पैसे द्यावे लागतात. आम्हाला नैसर्गिक कमान बघायची होती. त्यामुळे आम्ही तीन तासासाठी दोन हजार रुपये या दराने बोट ठरवली.
      मुनरो आयलँड येथे बरेच होमस्टे आहेत. इथे तुम्हाला पारंपारिक केरळी पदार्थ ऑर्डरनुसार बनवून मिळतात. येथे एक जुनी चर्च आहे, तेही पाहता येते. खरंतर या गावात नुसताच फेरफटका मारणे हा सुद्धा एक सुखाचा अनुभव असू शकतो. थोडक्यात ज्यांना शांतता हवी आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण स्वर्गीय आहे, परंतु ज्यांना स्पीड बोट मध्ये बोटिंग करण्याची इच्छा असते लहान मुले सोबत आहेत, त्यांना कदाचित हा अनुभव आवडणार देखील नाही. परंतु खरंच सांगते आमच्या जवळपास अडीच तासाच्या बोटीच्या सहलीमध्ये मुलाने खूप एन्जॉय केले. कारण आजूबाजूला खूप सारे पक्षी, पाण्यामध्ये साप, खेकड्यांची घरे, अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी सतत दिसत होत्या. नैसर्गिक कमान बघून त्याला कांदळवनांनी तयार केलेला निसर्गाचा चमत्कार बघायला मिळाला. त्याला मुळीच कंटाळा आला नाही आणि आम्हाला देखील आला नाही जेव्हा मी सर्व सहल संपल्यानंतर सगळ्यांना या सहलीमध्ये सगळ्यात जास्त काय आवडले असे विचारले त्यावर आम्हा सर्वांचेच एकमत झाले ते म्हणजे मुनरो आयलँड !!
     सहलीचे नियोजन करताना या सर्व गोष्टींची माहिती असावी म्हणून हे सर्व मी विस्ताराने लिहिलेले आहे . आलेप्पी किंवा मूनरो आयलंड यापैकी एक निवडावे का? या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकणार नाही. कारण मी आलेप्पी पाहिलेले नाही. ते सुद्धा सुंदरच आहे आणि भविष्यात मी आलेप्पिला नक्की भेट देणार आहे. तथापि मूनरो आयलँड हे स्वर्गीय ठिकाण आहे आणि जर त्रिवेंद्रम जवळ जाणार असाल, जटायू अर्थ सेंटरला भेट देणे हा तुमच्या सहलीमधील भाग असेल, तर मुनरो आयर्लंड हे तुमच्या सहलीमध्ये समाविष्ट असायलाच हवे. मुनरो च्या कॅनो राईडमध्ये सुद्धा आम्हाला पक्षी बघायला मिळाले, बॅकवॉटरचा मी अनुभव घेतला, मग पूवर आणि मुनरो सारखे आहेत का? तर नक्कीच नाही!! पूवरचा अनुभव वेगळा आहे आणि मुनरो आयलंड चा अनुभव पूर्णतः वेगळा आहे. दोन्ही अनुभव नक्की घ्यावेत आणि अजिबात चुकवू नयेत असेच आहेत.
     आम्ही गेलो तेव्हा तो नावाडी आमची वाटच पाहत होता. आम्ही समजून गेलो की दोन तासासाठी तो किती ठिकाणाहून कुठून कुठून फिरवून आणणार आहे. त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला रेट सांगितले. एक तासाचे एक हजार दोन तासाच्या फेरीमध्ये रु. 2000. त्यावर आम्ही त्याला सांगितले की आम्हाला मॅगरुव्हची कमान (mangrove arc ) जी आहे तेथून जाऊन यायचे आहे. त्यावर त्यांनी अडीच हजार आम्हाला सांगितले. आम्ही घासागीस करून दोन हजार भरपूर आहेत असे सांगितले. त्यावर तो तयार झाला आणि आमची सफर सुरू झाली. फोटो

फोटो

इथे बोट हाताने वल्लवली जाते. स्पीड बोट नाही आणि त्याला खूप मेहनत लागते. तो बिचारा नावाडी बराच वयस्कर होता. त्याने एक वल्लव मला हातात दिले होते. मी मला जेवढे वल्हवायला जमेल तेवढे वल्हवत होते. p>

फोटो

मजा येत होती. अत्यंत छोट्या छोट्या कॅनॉल मधून आपल्याला नेत असताना आजूबाजूचा निसर्ग हा वर्णन करता येणार नाही इतका सुंदर असतो!!

फोटो

फोटो

खालील चित्र बरेच दिवस माझ्या मोबाईलला वॉलपेपर म्हणून होते

फोटो

फोटो

फोटो

     कॅनॉल वरूनच रहदारीकरीता पूल बांधलेले असल्यामुळे कॅनॉल क्रॉस करत असताना जेव्हा कधी पूल येतो तेव्हा डोके खाली करून क्रॉस व्हावे लागते.
फोटो

हा अनुभव साधारण इटली मधल्या कॅनॉल रायडिंग सारखाच आहे असा रिव्ह्यू मी वाचला होता. त्याची मला प्रचिती आली.

फोटो

खूप सारे प्राणी, पक्षी, पाण्यात पळणारा साप तर खूप ठिकाणी दिसला.

फोटो
कॅनॉल च्या मार्गात काठाने असलेली घरे

फोटो

सुंदरसे पक्षी दिसले. खेकड्यांचे घर दिसले. नितळ निळे सुंदर पाणी आणि त्यातून आमची शांतपणे जाणारी नाव ……

फोटो

फोटो

फोटो

पण आजूबाजूचा निसर्ग तुम्हाला शांततेत अनुभवायचा असेल तर यासारखा सुंदर अनुभव जगात शोधून सापडणार नाही!!! आता आम्ही अष्टमुडी तलावाच्या पाण्यात प्रवेश केला होता

फोटो

ज्यांना दोन तास शांतपणे नावेत बसण्याचे पेशंस आहेत त्यांनी ही राईड अवश्य करावी आणि मॅन्ग्रुव कमानी पर्यंत जावे.

फोटो

फोटो

आता आम्ही या कमानीच्या आत प्रवेश करते झालो ही जागा व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी व फोटो काढण्यासाठी अत्यंत प्रसिद्ध अशी आहे.
फोटो

याचसाठी केला होता अट्टाहास!!
फोटो

फोटो

फोटो

आता आम्ही मॅन्ग्रुव कमान क्रॉस करून पलीकडे गेलो आणि आतील कांदळवणात आम्ही बरेच फोटो काढले. त्याचबरोबर शूटिंग ही केले.

फोटो

फोटो

आता आम्ही त्याच कमानीतून परत जात असतानाचा हा फोटो आहे
फोटो

     त्यानंतर परत येत असताना आम्हाला ते एका फ्लोटिंग रेस्टॉरंट वर घेऊन गेले.
फोटो

फोटो
तिथे नारळाचे पाणी, लिंबू सरबत आम्ही घेतले आणि पुन्हा नाव वल्लवत आम्ही जागेवर आलो. परत येताना देखील अष्ट मुडी तलाव आणि निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य पुन्हा एकदा दिसले..
फोटो

खारफुटी वनस्पती.... या वनस्पतींच्या खालच्या जाड मुळांमुळेच सुनामी च्या लाटांपासून संरक्षण होत असते
फोटो

सुंदरशा नारळाच्या झाडांची रांग पहा...
फोटो

फोटो

फोटो

फोटो

छोट्या छोट्या कॅनॉल मधून नाव जात असताना दिसणारे हे सुंदर नजारे......

फोटो

      खरंच हे दोन तास आम्ही सर्वजण हिप्नोटाईझ झाल्यासारखे निसर्ग रूपाचे दर्शन करत होतो. अक्षरशः स्वर्गातून फिरून आल्यासारखे वाटले. आलेप्पिला आम्ही गेलो नाही ही आमची केवढी मोठी चूक होती ते माहित नाही, परंतु मुनरो आयलंड चा समावेश या सहलीमध्ये करणे हा माझा उत्तम निर्णय होता हे सिद्ध झाले होते. आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही असा स्वप्नवत अनुभव याठिकाणाने आम्हाला दिला.

      आम्ही पुन्हा मूळ जागेवर आलो तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. परत फिरून आलेल्या जागा वरती आम्ही थोडे ग्रुप फोटो काढले त्यातील हा सासूबाईंचा फोटो.

फोटो

होडीवाल्या काकांची मेहनत लक्षात घेऊन आम्ही त्यांना 500 रुपये जास्तच दिले. कारण ते बोलले होते की, आताशा वयोमानामुळे त्यांना दिवसातून एकदाच नाव वल्हवणे जमते. जाताना आम्ही एका रेस्टॉरंट मध्ये जेवणाबद्दल बोलून गेलो होतो. यांची राहण्याची सोय पण आहे असे त्यांनी सांगीतले.
फोटो

फोटो

तिथेच आम्ही गेलो. आम्ही चार थाळी ऑर्डर केल्या. थाळीमध्ये त्यांनी टॉपीओका, मिक्स व्हेज, सांबार,कढी, रस्सम अशा बऱ्याच गोष्टी दिल्या.

फोटो

      तुम्हाला सांगते, थाळीत हे सर्वात डावीकडे जे पिवळे दिसत आहे ते फोडणी दिलेले टॉपीओका आहे. इथे केरळमध्य टॉपीओका चे उत्पादन खूप होते. हे साधारण रताळ्यासारखे दिसते. पण गोड नसते. याच्यापासूनच साबुदाणा करतात म्हणे. हा प्रकार उकडून, मॅश करून खरड्यासारख्या चटणीबरोबर सकाळी नाश्त्याला खायचा इथे प्रघात आहे. त्यामुळे मला हा प्रकार खायचाच होता आणि अनायासे तो इथे खायला मिळाला. जेवण घरगुती आणि अत्यंत चांगले होते. आम्हाला खूप आवडले.

     त्यांच्याशी काही गप्पागोष्टी करून आम्ही तेथून निघालो. आम्हाला खर तर आज इथूनच वरकलाला जायचे होते . वर्कलाला सनसेट बघायचा होता. त्यामुळे तिथे सहाच्या आधी आम्हाला पोहोचायचे होते. गुगल मॅप दोन तासाचा रस्ता दाखवत होता पण एकंदरीतच दोन दिवसाचा अनुभव पाहता मी सनसेट पाहायला मिळेल की नाही याबाबत साशंक होते. शमीभाई ला आम्ही गाडी फास्ट पळवण्यासाठी सांगत होतो. त्याने शक्य तेवढी गाडी फास्ट पळवली तरी देखील आम्हाला वर्कलाला पोहोचायला सायंकाळचे पावणे सात वाजले. त्यामुळे आमचा सूर्यास्त मीस झाला.

     यात एक वाईट गोष्ट घडली म्हणजे आम्ही जे हॉटेल बुक केले होते तो ओनर फोनच घेत नव्हता. मी कॉल बॅक करतो, मी कॉल बॅक करतो असे करून तो फोन कट करायचा. त्यामुळे टेन्शनच यायला लागले, की अरे आपण आता काय करणार आहोत? झालं असं होतं की, माझे बुकिंग घेऊन, पैसे घेऊन तो मला रूम द्यायची तो विसरून गेला होता आणि आमचं बुकिंग त्याने दुसऱ्याच कुणालातरी दिले होते. शेवटी आम्ही वर्कलाला ज्यावेळी पोचलो तेव्हा त्याचा कॉल आला की मी तुम्हाला भेटायला येत आहे आणि तुमचं बुकिंग आम्ही दुसऱ्याला दिलेला आहे. तरी तुमची राहायची सोय मी दुसरीकडे करतोय. मला सुरुवातीला फारच राग आला. तरी पण मी शांततेत त्याला विचारलं की तुम्ही असं कसं करू शकता?त्यावर तो म्हणाला की तुम्हाला त्याच प्रॉपर्टी मध्ये दुसरी रूम देतोय,ती आवडली तर पहा. नाहीतर मी दुसर्या हॉटेलमध्ये तुमची सोय करून देतो .
     त्यावरती मी आम्ही जाऊन पाहिले तर आमची रूम त्याने काही परदेशी पर्यटकांना दिली होती. ते परदेशी पर्यटक तिथे काही ट्रीटमेंटसाठी आले होते आणि मी खरंच पाहिलं की ते व्हिलचेयर वरती असलेले आणि वृद्ध असे लोक होते. त्यांनी महिनाभरासाठी ते कॉटेज बुक केलं होतं. त्यामुळे माझा थोडा मूड ऑफ झाला. आम्हाला आता जी रूम ऑफर करत होता ती नॉन एसी होती आणि बरीच वरती होती. कम्फर्टेबल पण नव्हते. त्यामुळे मी त्याला सांगितले की आम्हाला दुसरी रूम दाखवा. त्यावर त्यांनी सांगितले की इथून दुसरीकडे आमचेच एक हॉटेल आहे. तिथे मी तुम्हाला एसी रूम देतो. त्यावर आम्ही ती रूम दाखवायला सांगितले. हा एक बंगला होता आणि केवळ सतराशे रुपयात एका एसी रूममध्ये आम्ही चार जण आरामात मावू एवढे मोठ्या रूममध्ये त्याने आम्हाला ॲडजस्ट करून दिले. शिवाय ड्रायव्हरला सुद्धा वरती एक रूम रिकामी होती तिथे झोपले तर चालेल अशी सोय करून दिली. त्यामुळे आमचे पैसेही वाचले आणि नुकसान तर काहीच झाले नाही.

     आम्ही रुममध्ये सामान टाकले आणि आम्ही वर्कला बीच बघायला गेलो. खरंतर पूर्ण रात्र झाली होती आणि आम्ही वर्कलाला समुद्र पाहिला तर समुद्र अतिशय खवळलेला होता.

फोटो

      उंच कड्याजवळ (cliff) हा किनारा असून तीथपर्यंत पोहोचायला पायऱ्या उतरुन जावे लागते. आम्ही पायऱ्या उतरून खाली समुद्रापाशी गेलो. आम्ही समुद्रापासून बरेच लांब होतो,पण लाटा इतक्या जोरदार आपटत होत्या की असं वाटतच नव्हतं की याच्यामध्ये पोहायला वगैरे जाता येईल किंवा भिजता येईल. तीथली रेती पाहिली तर सपाट आणि थोड्या अंतरावर तीव्र उतार- परत सपाट रेती -परत तीव्र उतार असे दिसत होते. म्हणजे भरती आल्यावर अंदाज न आल्याने बुडण्याचा अगदीच धोका दिसत होता. तिथे कोणीही समुद्राच्या आसपास जात नव्हते किंवा गेले नव्हते. आणि अचानकच इतकी जोरदार लाट आली आणि आमच्या पायापर्यंत पाणी आले . आमच्या सारखे तीथे इतर निवांत बसलेली माणसे पण चटकन उठून मागे निघून गेली. तेव्हा आमच्या लक्षात आलं की हा समुद्र घातक आहे. पाण्यामध्ये खेळण्याचा हा समुद्र नाही . केवळ लांबून बघणेच योग्य आहे. इथे उद्या यायचं नाही हे मनातल्या मनात ठरवून टाकलं.
      पुन्हा पायऱ्या चढून वरती आलो आणि फिरायला लागलो. कुठे शुद्ध शाकाहारी हॉटेल जेवायला मिळते का ते पाहत आम्ही फिरत होतो. परंतु एकही हॉटेल आम्हाला तिथे सापडले नाही. शेवटी आम्ही मुलासाठी एक आईस्क्रीम घेतलं.

फोटो

रात्रीचे 9.00 वाजून गेले होते. भूक तर खूप लागली होती. इथे नाईट लाईफ जोरावर आले होते. बरेच परदेशी पर्यटक तिथे वेगवेगळ्या कॅफेमध्ये फिरत होते. बाहेर ताजे मासे आणि तत्सम आहार घेऊन विक्रेते तुम्हाला काय पाहिजे सांगा, आम्ही ताजे ताजे बनवून देतो असे सांगत होते . एकंदरीतच इथले हिप्पी टाईप वातावरण पाहून लक्षात आले की आपण चुकीच्या ठिकाणी आलेलो आहोत. खरंतर युट्युब वरचे व्हिडिओ बघून मी या ठिकाणाचा समावेश माझ्या आयटनरीत केला होता. मुनोरो आयर्लंड इथे संध्याकाळी करण्यासारखे विशेष काही नव्हते त्यामुळे सगळ्यांना कंटाळवाणे होईल त्यापेक्षा वर्कला हे अजून एक ठीकाण पाहता येईल आणि इथल्या वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करता येतील असा विचार करून मी नाईट स्टे इथे करायचा असा विचार केला होता. तथापि हा माझ्या सहल नियोजनातील अत्यंत चुकीचा आणि वाईट निर्णय होता. तिथे गेल्या गेल्याच कळालं की येथील हवेच्या स्थितीमुळे पॅरासेलिंग सध्या बंद आहे. एकंदरीत समुद्राच्या रुद्रावतारामुळे कळालेच होतं की इथे काही वॉटर स्पोर्ट्स करण्याच्या परिस्थितीतला हा समुद्र नाही. त्यामुळे सर्फिंग तरी करता येईल का हा विषय होता. एका कॅफेच्या बाहेर फिरता फिरता आम्हाला सर्फिंगचा बोर्ड दिसला आणि एका चांगल्या डीलमध्ये आम्हाला स्वस्तामध्ये सर्फिंग एक तास करण्यासाठी आम्ही बुकिंग करून टाकले.

     शेवटी जेवण्यासाठी गुगल वरती शोधून एक अतिशय उत्तम असे हॉटेल वरकलामध्ये आम्हाला मिळाले. हॉटेल विनायक असे त्याचे नाव . इथे आम्हाला उत्तम असा मलाबार पराठा खायला मिळाला. माझ्या मुलाला तिथला मलाबार पराठा आणि पनीर मशरूमची भाजी इतकी आवडली की, यापुढे रोज आपण हेच खायचं हे त्याने जाहीर करून टाकले. त्यांना मी विचारले की तुमच्याकडे पुट्टू मिळतो का ?त्यावर ते म्हणाले की सकाळी दहा वाजेपर्यंत आमच्याकडे पुट्ट आणि कडला करी मिळते. मी एकदम खुश झाले. कारण हा पदार्थ मला मुन्नार मध्ये खायला मिळाला नव्हता.त्यामुळे दुसऱ्या दिवशी नाश्त्याला इथेच यायचे हे आमचे फिक्स झाले. मस्त पोटभर जेवण करून आम्ही रूमवर गेलो. उद्या आम्हाला लवकर सात वाजताच सरफिंग साठी जवळच्या बीचवर जायचे होते. सर्फिंगचा मी चार वेळा समुद्रामध्ये बुडून घेतलेला अत्यंत थरारक आणि धोकादायक अनुभव….. जटायू अर्थ सेंटर व पूवरची अविस्मरणीय बोट राईड, तेथील सुंदर असा सूर्यास्त व गोल्डन सँड बीच चा अप्रतिम नजारा या सर्व अनुभवांचा तपशील पुढील भागात……..


येत्या १७ ते २१ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पाच दिवसीय केरळ दौऱ्यात कोल्लम आणि वर्कला ह्या दोन शहरांत माझा मुक्काम असणार आहे. गुगल मॅप्सवर बघितले तर कोल्लम पासून मुनरो आयलंड केवळ २३ किमी अंतरावर म्हणजे तसे बऱ्यापैकी जवळ असल्याचे दिसत आहे. अर्थात पर्यटन हा सदर दौऱ्याचा मूळ उद्देश नसला तरी कमी-अधिक प्रमाणात भटकंती होणे अटळ आहे, त्यामुळे हे मुनरो आयलंड बघणे सहज शक्य होईल असं वाटतंय.

आलेप्पिला आम्ही गेलो नाही ही आमची केवढी मोठी चूक होती ते माहित नाही, परंतु मुनरो आयर्लंड चा समावेश या सहलीमध्ये करणे हा माझा उत्तम निर्णय होता हे सिद्ध झाले होते.

पूर्वेचे व्हेनिस म्हणून ओळखले जाणारे अलाप्पुझा (अलेप्पी) देखील छानच आहे, तुमच्या पुढच्या केरळ भेटीत ते देखिल अवश्य बघा. तिथले पुर्ण दिवसाचे जलपर्यटन आणि निसर्गसौन्दर्य आवडले आहेच पण तिथे केवळ फोटो काढण्यापुरती नाही तर चांगली मोठी दुमजली बोट थोडा वेळ चालवायलाही मिळाल्याने मला जरा जास्तच मजा आली होती 😀

1

२

३

४

५

६

७

आता लवकरच मुनरो आयलंड पण पाहिले कि मग ह्या दोन्ही ठिकाणांची तुलना करून माझे काय मत बनते ते कळवतो 😀

पुढील भागाच्या प्रतिक्षेत...


शक्य झाले तर मुनरो आयर्लंड ला अवश्य भेट द्या. ऑगस्ट महिन्यात तिथे अष्टमोडी तलावामध्ये पारंपारिक नावांची स्पर्धा होते. जर पाहायला मिळाली तर अवश्य पहा. बाकी कोल्लमहून मुनरोला जाणार असाल तर अष्टमुडी तलावातून मुनरो आयर्लंड पर्यंत जलमार्ग आहे. जेट्टीने जाऊ शकता. गाडी जरी असली तरी गाडीही चढवता येते आणि आर्थिक दृष्ट्या देखील फायरशीर आहे. वेळही वाचतो .भविष्यात थेकडी व आलेपिला मी नक्कीच भेट देणार आहे. मुनोरो आयर्लंड व आलेपी याबद्दलची तुमची निरीक्षणे वाचायला नक्की आवडतील. आवर्जून लिहा.


खरंतर मुनरो आयलंड हे आलेपीच्या मानाने खूप कमी गर्दीचे व जास्त व्यावसायिकीकरण न झालेले ठिकाण आहे. त्यामानाने आलेपी हे पूर्णतः विकसित असे व्यावसायिकीकरण झालेले ठिकाण आहे. तुलनेने आलेपीला करण्यासारखे बरेच काही आहे. उदाहरणार्थ जरी हाऊसबोटीमध्ये राहायचे नसले तरी तेथील समुद्रकिनारा देखील प्रसिद्ध आहे. तिथे कॉइर म्युझियम म्हणजेच काथ्याच्या पासून केलेल्या वस्तू चे संग्रहालय आहे. हाऊस बोट मध्ये राहणे हा स्वतःच एक वेगळा अनुभव आहे. परंतु मुनारो आयलँड येथे मात्र कॅनॉल रायडिंग शिवाय अन्य काही ऍक्टिव्हिटी नाहीत. म्हणायला जवळ कोल्लम येथे अष्टमुडी तलाव येथे सरकारमान्य दरात अनेक वॉटर ऍक्टिव्हिटी आहेत. जसे की बनाना रायडिंग, फास्ट स्कूटर रायटिंग, वॉटर जम्पिंग सारख्या ऍक्टिव्हिटीज आहेत. तथापि फक्त मुनोरो आयलंड हे शांततेत फेरफटका मारण्यासाठी व ग्रामीण केरळ अनुभवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. दोन्ही ठिकाणांचा अनुभव हा वेगळा असेल असे मला वाटते.


 दिवस पाचवा- वरकला, जटायू अर्थ सेंटर व पुवर

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सर्फिंगला तिथल्याच एका जवळच्या बीचवर गेलो. ज्या बीचवर आम्ही गेलो होतो तो वरकला पासून तीन चार किलोमीटर लांब होता आणि तिथे पाण्याची उंची फार काही नव्हती. कमरेपेक्षा जास्त पाणी तिथे होते. बरेचसे देशी विदेशी पर्यटक तिथे आधीपासूनच सर्फिंग करत होते. सकाळी सात ते आठ असा एक तासाचा वेळ होता.

      तेथे गेल्यावर त्यांनी आम्हाला स्विमिंग ड्रेस ,त्याचबरोबर सर्फिंग पॅड , त्यावर कसे उभे राहायचे, लाट आल्यानंतर नेमके काय करायचे, अशा पद्धतीच्या काही सूचना दिल्या व हलका व्यायाम करून घेतला. आमच्या सोबत अजून दोन नवरा बायकोचे ग्रुप होते. खरंतर त्या सर्व्हिंग पॅड वरती पूर्णपणे हात वर करून आडवे झोपायचे आणि लाट आल्यानंतर पटकन हात छाती खाली घेऊन पाय न वाकवता उभे राहून तोल सांभाळायचा अशा पद्धतीच्या पाच ते सहा वेळा प्रॅक्टिस करून घेतले.

फोटो

त्यावेळी ते सहज जमले कारण आम्ही वाळूवर होतो. नंतर आम्ही आमचे सरफिंग पॅड हातात घेऊन समुद्रात गेलो. एक माणूस समुद्राच्या काठावर देखरेखीसाठी उभा होता आणि तीन-चार मदतनीस समुद्रात आमच्या मदतीसाठी होते.

     मी, माझा नवरा आधी आत गेलो. मुलाला त्यांनी सगळ्यात शेवटी थोडा वेळ देणार असे सांगितले. साधारण छातीला लागेल एवढ्या पाण्यामध्ये आम्ही त्या सर्फिंग पॅड वरती आडवे झोपलो आणि लाट कधी येते आहे हे पाहू लागलो. मदतनीस लोकांनी पॅड धरले होते आणि लाट आली की ते सोडणार होते व आम्हाला त्यासाठी वरती उभे राहण्यासाठी सांगितले होते. आणि लाट आली ……. लाट येताच मी छातीखाली दोन्ही हात घेऊन उभे राहण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे मी आता पाण्यावरती होते त्यामुळे ते सर्फिंग पॅड एका दिशेला म्हणजेच उजव्या बाजूला कलंडले आणि मी पाण्यात पडले…….!!! पाण्यात पडल्यानंतर तेथील रेती वरती उभे राहायचे असे आम्हाला सांगितले होते. पण मी उभे राहण्याचा प्रयत्न करताच पायाखालची वाळू सरकून जात होती. मी हातपाय मारत होते आणि जवळपा पंधरा सेकंद पाण्याखाली होते. मग तिथल्या इन्स्ट्रक्टरने जवळ येऊन मला पाण्याबाहेर काढले. हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत भयानक होता. याचे कारण म्हणजे त्या पॅड वरती उभा राहणे हा काही खेळ नाही. आणि एका दिवसात अशा प्रकारचे कौशल्य येणे हे केवळ अशक्य आहे. तिथे अनेक परदेशी पर्यटक या सगळ्या गोष्टी सहज करत होते. पण आम्हाला काही या गोष्टी जमत नव्हत्या. माझ्या मिस्टरांनी त्यातल्या त्यात बऱ्यापैकी ते जमवले. जमवले म्हणजे काय , तर पहिल्या लाटेतच त्यांना कळाले की या पॅड वर उभे राहता येणे शक्य नाही. तेव्हा त्यांनी लाट येतात पॅड वरती तसेच झोपून राहत होते व लाटांवर तरंगण्याचा आनंद घेत होते. त्यांचे काय चालले आहे याकडे माझे लक्ष नव्हते. परंतु मी मात्र पाण्यात बुडतच होते. सोबतच्या इन्स्ट्रक्टरने दोन-तीन वेळेला मला बुडता-बडता बाजूला काढले. शेवटी ते म्हणाले की तुम्ही हे करू नका जमणार नाही. चुकून तुम्ही बुडाल. जवळपास चार ते पाच वेळा मी समुद्राच्या आतल्या पाण्यामध्ये दहा-पंधरा सेकंद बुडले होते. त्यामुळे आता पाण्यात पडले तर बुडण्याची भीती राहिलेली नाही.

     मी निमूटपणे किनाऱ्यावर येऊन सासूबाईंच्या जवळ उभी राहिले. त्या खरच खूप घाबरल्या होत्या आणि माझे बुडणे पाहून त्या म्हणाल्या मी काही हे करणार नाही. मग तिथेच एका सर्फिंग पॅड वरती मी सासूबाईंना आपण फोटो काढूयात म्हणले त्यावर समुद्रकिनाऱ्यावर उभे असलेला सरफिंग इन्स्ट्रक्टर मात्र ओरडला की असे काही करू नका मी सांगेन त्याच वेळेला फोटो काढा ते धोकादायक आहे, असे सांगू लागला. मला कळेना की यात काय नेमकं धोका आहे. तो आगाऊपणा करतोय असं मला वाटायला लागलं . एक दहा पंधरा मिनिटे गेली असतील आणि तेवढ्यात अचानकच एक मासेमारीची बोट जोरात आल्यावर ती त्यांनी सर्व सर्व्हिंग करणाऱ्यांना बाजूला व्हा बाजूला असे जोरजोरात बोलून बाजूला व्हायला सांगितले. आम्हाला कळेना नेमकी काय झाले . ती बोट आडवी तीडवी अशी कशीपण येत होती आणि शेवटी कशीतरी करून ती किनाऱ्याला लागली. किनाऱ्यावरचे सगळे ममच्छीमार धावत तिकडे गेले आणि त्यांनी ती बोट अडवली होती. मी त्यांना विचारले की एवढे तुम्ही का घाबरलात? हे तर तुमचं रोजचं काम असेल की बोट कुठे पार्क करायचे? बाकीच्यांना बाजूला व्हायला का सांगत होता ? त्यावेळी त्यांनी एक भयानक गोष्ट सांगितली ती म्हणजे त्या बोटीला आतून ब्रेक नसतो म्हणे!!!! त्यामुळे वाटेत जर कोणी आलं तर त्यांना ती पूर्ण धडकूनच जाते. याआधी तिथे असे अनेक अपघात झालेले आहेत. तसेच यामध्ये कित्येक विदेशी पर्यटकांची हाडे फ्रॅक्चर झालेली आहेत. असे त्यांनी सांगितले. ते ऐकल्यानंतर मात्र मला खरंच भीती वाटली. हे सरफिंग च खुळ उगाच आपण काढलं असं मला वाटलं. हे अत्यंत रिस्की आहे. कारण तिथे सर्फिंग करणाऱ्या कंपन्या कितीही काळजी घेत असल्या तरी बऱ्याच गोष्टींवर त्यांचा कंट्रोल नाही हे स्पष्ट दिसत होतं.

     मुलाला मात्र पहिल्याच झटक्यात सरफिंग पॅड वर उभे राहता आले. त्याने तीन ते चार वेळा सर्फिंगचा आनंद घेतला.

फोटो

फोटो

तथापी तो लहान असल्यामुळे त्यांनी त्यापेक्षा जास्त वेळा त्याला ते करू दिले नाही. थोडेफार फोटो शूटिंग करून व समुद्राच्या पाण्यात खेळून एकंदरीतच सरफिंग साठी घातलेले पैसे पुरेपूर वसूल केले .असो. कोणी फॅमिली येथे जाणार असाल तर त्यांना हे सर्व माहिती असावे म्हणून मी मुद्दाम हे लिहीत आहे. फॅमिली साठी वर्कला ही जागा योग्य नाही असं माझं निरीक्षण आहे.

      साधारण साडेनऊ ते दहा वाजता रूमवरून आंघोळ करून नाश्ता करण्याकरता कालच्याच हॉटेलमध्ये पोहोचलो. तेथे केरळाचा पारंपारिक नाश्ता पुट्टु आणि कडला करी म्हणजेच चण्याची उसळ या वरती ताव मारला.
फोटो

हा पट्टू, कडला करी व व्हेज कुर्मा यासोबत दिला होता. आम्ही पापड वेगळ्याने मागून घेतले. पुट्टूला स्वतःची अशी वेगळी काही चव नसते. तांदळाचे पीठ त्यावरती ओल्या नारळाचा कीस परत तांदळाचे पीठ त्यावर ओल्या नारळाचा कीस अशा एका साच्यामध्ये भरून तो वाफवून काढतात. त्यामध्ये कडला करी व पापड मिक्स करून खातात. या हॉटेलमधली कडला करी अतिशय चविष्ट होती. अजिबात स्पायसी नव्हती . आम्ही एक्स्ट्रा मागून घेतली . पोटभर नाश्ता करून तृप्त मनाने आम्ही बाहेर पडलो.
      त्यानंतर जटायू अर्थ सेंटर कडे प्रस्थान केले. जटायू अर्थ सेंटर हे वर्कला पासून साधारण दीड तासाच्या अंतरावर आहे. आता थोडे जटायू अर्थ सेंटर बाबत…. जटायूचे हे शिल्प एखाद्या पक्ष्याचे असलेले आशियातील सर्वात मोठे शिल्प आहे. या शिल्पाचे शिल्पकार आहेत राजीव अंचल. हे शिल्प दोनशे फूट लांब दीडशे फूट रुंद व 70 फूट उंच आहे. जर आपण त्रिवेंद्रमच्या आसपास असाल तर हे पर्यटन स्थळ अजिबात चुकवू नये असेच आहे.
फोटो

फोटो

      आम्ही तिथे साडेबाराच्या सुमारास पोचलो. तेथे केबल कारने जटायूच्या शिल्पा जवळ जावे लागते.
फोटो

फोटो

केबल कारने शिल्पा जवळ पोहोचण्यासाठी साधारण दहा ते पंधरा मिनिटे लागतात. वाटेतील दृश्य ही अत्यंत सुंदर आहेत. केबल कार साठी साधारण आम्हाला 15 ते 20 मिनिटे थांबावे लागले.
फोटो

फोटो

केबल कार मधून जटायू शिल्पाचे होणारे पहिले दर्शन
फोटो

      वरती राम लक्ष्मण सीतेचे देऊळ आहे. श्रीरामाचे प्रत्यक्षातले दगडात उमटलेले पाय आहेत असे म्हणतात.
फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

साधारण हे सर्व पाहून आम्हाला तिथून परत यायला दुपारचे दोन वाजले.

      आम्हाला आता कन्याकुमारीला जायचे होते . शमी भाई ने आम्हाला सुचवले की त्याला कन्याकुमारीला जाण्यासाठी गाडीचे परमिट काढावे लागते तेवढ्या वेळात तुम्ही पुवरला बोटिंग करून घ्या. म्हणजे आपल्याला परत उलटे तिकडे यायला नको .आम्ही ते मान्य केले आणि पूवरला साधारण आम्ही पाच वाजता पोहोचलो. पूवर वरून आम्ही एक बोट ठरवली. ते आम्हाला गोल्डन सँड बीच, एलिफंट रॉक व मदर मेरी या पॉईंट वरती नेणार होते. तेथे आम्हाला सूर्यास्त पाहता येणार होता .
फोटो

फोटो

फोटो

      हा देखील एक अविस्मरणीय व न चुकवू नये असा अनुभव ठरला. जरी मुनरो आयलँड मध्ये आपण बोटिंग केले तरीही पूवर मध्ये स्पीड बोट ने केलेले बोटिंग हा एक वेगळा अनुभव होता. दोन्ही ठिकाणी तेच पक्षी, प्राणी दिसत असले तरीही निसर्ग अत्यंत वेगळा आहे !!!

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

आम्हाला तुलनेने संध्याकाळची वेळ असल्यामुळे खूप भरपूर असे पक्षी दिसले.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

अत्यंत घनदाट अशा खारफुटी जंगलातून आपण जात आहोत असा अनुभव तिथे येतो. जो मुनरो आयलंड मध्ये येत नाही…

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

इथले पाणी जरी गढूळ असले तरी झाडी मात्र घनदाट आहे.

फोटो

फोटो

फोटो

शेवटी आम्ही गोल्डन सँड बीच वरती पोहोचलो . येथे एका बाजूला नेयर नदी आणि एका बाजूला अरबी समुद्र आणि मधेच तो बीच आहे . हे दृश्य फार सुंदर आहे!!!

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

      आम्ही येथे सूर्यास्ताचे अत्यंत मनोहर असे दृश्य पाहिले!!! आणि परत निघालो .

येताना हा एलिफंट रॉक दिसतो. याचा आकार हत्तीसारखा आहे म्हणून याला एलिफंट रॉक म्हणतात .

फोटो

फोटो

मदर मेरी

फोटो

फोटो

क्लब महिंद्रा चे फ्लोटिंग रिसॉर्ट

फोटो

फोटो

परतत असतानाची काही सुंदर निसर्ग चित्रे

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

.अत्यंत तृप्त मनाने आम्ही कन्याकुमारी कडे प्रस्थान केले ….त्यावेळी संध्याकाळचे सात वाजले होते. पूवर येथील बोटिंग मुळीच चुकवू नये आणि शक्यतो संध्याकाळी किंवा पहाटे लवकर बोटिंग करायला मिळेल हे पाहावे असे सुचवेन. कारण या वेळेला पक्ष्यांची संख्या खूप जास्त असते. तसेच तुम्हाला सूर्योदय व सूर्यास्त पाहता येईल. जो अत्यंत सुंदर व मनोहर आहे.

      कन्याकुमारीला जाताना आम्हाला वाटत चित्रा नावाचे एक हॉटेल सापडले. हे हॉटेल जर कोणी जाणार असेल तर जेवणासाठी मुळीच चुकवू नये असे आहे. इथला मेदुवडा हा मी आतापर्यंत खाल्लेला जगातील सर्वोत्तम मेदुवडा आहे. हा मेदू वडा इतका चांगला होता की तो नुसताच खावा अशी त्याची अत्यंत फ्रेश चव होती .मेदुवडा फस्त करून झाल्यानंतर लक्षात आले की अरे आपण तर फोटो काढलाच नाही. त्यामुळे याचा फोटो माझ्याकडे नाही . येथेही आम्ही मलाबार पराठा व पनीरची भाजी, तसेच मशरूम फ्राईड राईस घेतला.

फोटो

फारच चविष्ट होता. पुन्हा इथे जेवायला यायचे हे आम्ही ठरवले. मुळात हे हॉटेल तमिळ थाळी साठी प्रसिद्ध होते. त्यामुळे पुन्हा येताना इथे जेवायला मिळाले तरी यायचे हे ठरवूनच आम्ही निघालो. कन्याकुमारीला आम्ही पोहोचलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. चेकइन करून आम्ही सामान टाकले आणि निद्रादेवीच्या आधीन झालो . उद्या आम्हाला कन्याकुमारी येथील स्थळ दर्शन करायचे होते. कन्याकुमारीच्या अप्रतिम स्थलदर्शनाची गोष्ट पुढील भागात…..


 आम्ही जेथे उतरलो ते हॉटेल ‘जास’ अतिशय मध्यवर्ती व छान होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खूप ऐसपैस होती. इथली रूम सर्विसही उत्तम होती. आमच्या रूम्स या तिसऱ्या मजल्यावर होत्या. तथापि हॉटेलमध्ये लिफ्ट होती त्यामुळे सामान वरती उचलणे व खाली आणणे सोपे गेले. अर्थात सामान उचलायला त्यांच्या हॉटेलमधला स्टाफ तत्परतेने आला. आम्हाला त्यांना रिक्वेस्ट देखील करावी लागली नाही. बोट जेट्टी पासून हे हॉटेल चालत पाच मिनिटांच्या अंतरावर आहे.

      सकाळी उठून आम्ही तेथीलच जवळ असलेल्या प्रसिद्ध मारुती रेस्टॉरंट मध्ये मेदू वडा, इडली, पुरी भाजी इ. नाष्टा केला.

फोटो

हॉटेल लहान आहे पण पदार्थ चविष्ट होते.

      आम्ही विवेकानंद स्मारक साठी जेट्टी पॉईंटला उभे राहिलो. खूप सारी गर्दी होती. तथापि रांग पुढे पुढे सरकत होती. साधारणतः पंधरा-वीस मिनिटात आम्हाला तिकीट मिळाले. तिकीट दर अत्यंत कमी आहे. साधारण 70 रुपये. हेच जर एक्सप्रेस टिकीट काढायचे ठरवले तर आताशी नक्की आठवत नाही पण काही तीनशे रुपयांच्या आसपास दर आहे.
      आम्ही नावेत चढलो आणि मोक्याच्या जागा पकडल्या. साधारण दहा ते पंधरा मिनिटात विवेकानंद स्मारकापाशी आलो. तथापि या प्रवासात समुद्राचे जे दर्शन होते ते अत्यंत प्रेक्षणीय आहे.
फोटो

फोटो

कारण येथील समुद्राच्या पाण्यात वेगवेगळ्या रंगाच्या छटा उठून दिसतात. उदाहरणार्थ बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र हे तीनही कन्याकुमारी येथे एकत्र येतात आणि या पाण्याचा रंग काही ठिकाणी हिरवा, काही ठिकाणी निळा, असा दिसतो. पण पाणी अत्यंत देखणे आहे.

फोटो

समुद्र नितळ आहे. हा समुद्र पाहणे हाच एक घेण्यासारखा अनुभव आहे!! मला जे काही म्हणायचे आहे ते कदाचित मी शब्दात मांडू शकणार नाही. परंतु हे दृश्य असे होते की तो समुद्र केवळ पहात राहण्यासाठी अर्धा दिवस किंवा पूर्ण अख्खा दिवस मी काढू शकले असते, इतका तो मला आवडला होता.

फोटो
समुद्रातून दिसणारे स्मारक

फोटो

      विवेकानंद स्मारकाच्या इथे गेल्यानंतर त्यांनी तेथे ऑफिसमध्ये आम्हाला सगळ्यांना बसवले आणि विवेकानंदांचे जीवन चरित्र आम्हाला सांगितले. त्याचबरोबर कन्याकुमारी या स्थानाचे महात्म्य सांगितले. फार पूर्वीच्या काळामध्ये तिथे देवी कन्याकुमारी राहत होती. जी माता पार्वतीचा अवतार होती. तिथे बाणासुर नावाचा दैत्य फार माजला होता. त्याला असे वरदान होते की केवळ कुमारी स्त्रीच्या हातूनच त्याचा वध होईल. इकडे देवी कन्याकुमारीने मात्र तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले आणि त्याच्याशी विवाह करण्यासाठी त्याला कन्याकुमारी येथे येण्यासाठी सांगितले. ठरल्याप्रमाणे हिमालयातून भगवान शंकर माता कन्याकुमारीशी विवाह करण्यासाठी निघाले. येथे देव लोकात मात्र चिंता होऊ लागली की जर भगवान शंकर आणि माता कन्याकुमारीचा विवाह झाला तर काय होईल? कारण माता कन्याकुमारीच्या हातूनच बाणासुराचा वध होणार होता. त्यामुळे हा विवाह रोखण्यासाठी नारद मुनींना पाठवण्यात आले. नारद मुनींना भगवान शंकराला सांगितले की देवींनी विवाहाचा वर मागितला आणि तुम्ही निघालात? हा तर तुमच्या भोळेपणाचा हा फायदा घेण्यासारखे आहे. त्यामुळे तुम्ही तिला असे सांगा की सूर्यास्तापर्यंत कन्याकुमारीला पोचलो तरच हे लग्न होईल अन्यथा नाही. इकडे भगवान शंकर साधारण काही किलोमीटर अलीकडे आले तेव्हा सूर्यास्त झाला आणि भगवान शंकरांना असे वाटले की आता सूर्यास्त झाला त्यामुळे तिथेच राहिले आणि त्यामुळे त्यांचा विवाह होऊ शकला नाही. कालांतराने देवी कन्याकुमारीने बाणासुराचा वध केला. अशी ही काहीशी कथा आहे.
ज्यावेळी विवेकानंद यांना ज्ञान प्राप्ती करायची होती त्यावेळी त्यांनी असा विचार केला की, हिमालयातला योग्यांचा योगी असलेला शंकर जर या स्थानामध्ये आला असेल, तर भारताच्या सर्वात दक्षिणेकडे असलेल्या या ठिकाणी मी आलो तर मला ज्ञानप्राप्ती निश्चितच होईल. म्हणून ते येथे आले व या खडकावरती त्यांनी समाधी लावली आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यानंतर ते पुढील शिकागो मध्ये गेले आणि त्यांनी प्रवचन दिले हा सर्व इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे.

      त्यानंतर आम्ही माता पार्वतीचे पदचिन्ह असलेल्या दगडाचे तिथे मंदिर आहे त्याचे दर्शन घेतले. मंदिराचे बाहेरून घेतलेले काही फोटो
फोटो

फोटो

तिथे फोटो काढण्याची परवानगी नाही. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांचे पुतळा असलेले जे मुख्य स्मारक आहे तिथे दर्शन घेतले. आत मध्ये ध्यानमंडप आहे तिथे तुम्ही ध्यान देखील करू शकता. इथे देखील आत मध्ये फोटो काढण्यास परवानगी नाही त्यामुळे बाहेरूनच फोटो काढलेले आहेत

फोटो

फोटो

आम्ही सर्वांनी ध्यानाचा अनुभव घेतला.

फोटो

     तिथे दुरूनच थिरुवल्लूवर नावाचे तमिळ कवी आहेत, त्यांचे मोठे दगडी मूर्ती असलेले स्मारक दिसते.

फोटो

फोटो

सध्या त्याचे बांधकाम चालू आहे. पुतळा जरी उभा असला तरी बाजूचे बांधकाम अजून तयार झाले नाही. त्यामुळे सध्या स्थितीत ते लांबूनच पहावे लागते . काही वर्षानंतर बोटीने तेथेही जाता येईल. आम्ही या सर्व ठिकाणी बरीच फोटोग्राफी केली.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

     या स्मारकावरून समुद्राचे अप्रतिम दर्शन होते.
आम्ही येथे खूप फोटोग्राफी करून परत आलो त्यावेळी साधारण साडेबारा वाजले होते.

      मग तेथीलच एका हॉटेलमध्ये आम्ही जेवलो. माझी पारंपारीक थाळी, मुलाचा चॉकलेट शेक, पनीर व मलाबार पराठा व पनीर चिल्ली असे फ्युजन जेवण झाले.

फोटो

      आता आम्हाला येथून जवळच असलेल्या वट्टकुट्टई या 18 व्या शतकात त्रावणकोरच्या राजाने टेहळणी करता बांधलेल्या किल्ल्याला भेट द्यायचे होते.

फोटो

फोटो

जर तुम्ही कन्याकुमारीला जाणार असाल तर या किल्ल्याला जरूर भेट द्या. हा किल्ला सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत उघडा असतो. गाडीने जायला साधारण वीस ते पंचवीस मिनिटे लागतात. येथून समोर समुद्र 180° दिसतो.

फोटो

फोटो

पूर्वीच्या काळी येथून टेहळणी करणे सोपे होते म्हणून हा किल्ला त्यांनी बांधला आहे.
फोटो

फोटो

नंतर डचांनी येथे वसाहत स्थापन केली तेव्हा हा किल्ला त्यांच्या अधिपत्याखाली आला व त्यांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. आतमधे सुंदर हिरवळ आहे.

फोटो

फोटो

फोटो

किल्ल्याच्या बुरुजाला आणि कमानी वरती दगडामध्ये जो चौकोन दिसत आहे ठिकठिकाणी तोफा ठेवण्यासाठी जागा आहे.

फोटो

फोटो

फोटो

आणि किल्ल्यावरून दिसणारे दृश्य तर केवळ अप्रतिम आहे. एका बाजूला समुद्र तर एका बाजूला तटबंदी वरून अशा प्रकारे डोंगरांचे दर्शन होते

फोटो

येथे आम्ही जवळपास तासभर थांबलो होतो.एक छान अनुभव घेऊन आम्ही इथून बाहेर पडलो.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

      आता आम्हाला जवळच असलेले सुचिंद्रम मंदिर येथे जायचे होते. वट्टकुट्टई किल्ल्यापासून साधारण अर्धा तासात आम्ही देवळाजवळ पोहोचलो. वाटेत निसर्ग अतिशय सुंदर दिसत होता. खूप नारळाची झाडे, त्याच्यामध्ये डोंगर आणि आकाश यांचे सुंदर दृश्य दिसत होते.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

      मंदिरापाशी आम्ही साधारण साडेतीन वाजता पोहोचलो. त्यामुळे अर्धा तास आम्हाला वाट पाहायला लागली. (या स्थळांबद्दल मला माहित नव्हते .परंतु कंजूस जी यांनी मला सुचिंद्रम मंदिर तसेच पद्मनाभपुरम पॅलेस या स्थळांबद्दल माहिती दिली. त्यामुळे ही दोन्हीही स्थळे मी माझ्या सहल नियोजनात समाविष्ट केली. ही दोन्ही स्थळे आपण कन्याकुमारीच्या आजूबाजूला असेल तर अजिबात चुकवू नये अशीच आहेत.) हे मंदिर दुपारी बारा वाजता बंद होऊन चार वाजता उघडते हे ध्यानात घेऊन नियोजन करावे. प्रवेशदाराच्या कमानीवर असेलेली ब्रम्हा, विष्णू व महेशाची प्रतिमा

फोटो

फोटो

फोटो

आत मध्ये अनेक निरनिराळी मंदिरे आहेत. नेमके काय बघायचे आणि कुठे पहायचे तेच काही कळेना. आम्ही एका पुजाऱ्याला विचारले तेव्हा त्याने मोडक्या तोडक्यात हिंदी मध्ये हे एक पुजारी तुम्हाला शंभर रुपये दिल्यानंतर सर्व मंदिर फिरवून आणतील असे सांगीतले आणि त्या गुरुजींना विचारले त्यावर त्यांनी येथील एका दुसऱ्या गुरुजींना जोडून दिले. हे गुरुजी अतिशय उत्साही होते. त्यांनी आम्हाला सर्व मंदिराची माहिती सांगायला सुरुवात केली. हे मंदिर मूळतः नवव्या शतकामध्ये चोळराजांनी बांधले आणि त्यानंतर आलेल्या वेगवेगळ्या राजवटींनी त्याचे पुनरुज्जीवन केले. मंदिरात मुख्यतः देवता ही त्रिमूर्तीची आहे. म्हणजेच ब्रम्हा, विष्णू व महेश या तिघांचे हे स्थान आहे. या मंदिरामध्ये हनुमानाचा सर्वात मोठा उभा पुतळा आहे असे म्हणतात. तेथे दत्तात्रेयांचे मंदिर होते . उत्तरेकडच्या व दक्षिणेकडच्या देवी देवतांमध्ये काही फरक आहे असे वाटले. अनेक असे देव त्यानी सांगितले जे मी कधी ऐकले नव्हते. उदाहरणार्थ गणपतीची अशी मूर्ती त्यांनी मला दाखवली ज्यामध्ये अर्धे शरीर गणपतीचे व अर्धे शरीर स्त्रीचे होते याला ते विघ्नेश्वरी असे म्हणतात. मंदिराच्या आत मध्ये असलेले स्तंभामधून संगीत निर्माण होते . गुरुजींनी तसे आम्हाला वाजवून दाखवले. तिथे फोटो काढण्यास परवानगी नव्हती. तरीही त्यांच्या परवानगीने आम्ही काही ठिकाणी फोटो काढले.
      अहिल्येला फसवल्यामुळे इंद्राला जो शाप मिळाला त्यातून मुक्त होण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी याच ठिकाणी त्याला दर्शन देऊन शुद्ध केले म्हणूनही शुची इंद्र (इंद्राची शुद्धी)म्हणून असे नाव पडले. या मोठ्या स्तंभ मंडपा मध्ये पूर्वी जेवणावळी बसत असत असे गुरुजींनी आम्हाला सांगितले. तसेच खांबांच्या खाली ज्या मूर्तींचे हात आहेत, त्या हातांमध्ये तेल घालून वात लावून प्रकाशयोजना केली जात असे.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

मंदिरामध्ये ठिकठिकाणी ‘ येळू ‘ या आठ प्राण्यांचे अवयव असलेल्या काल्पनिक प्राण्याची मूर्ती जागोजागी दिसते.

फोटो

फोटो

इथे जवळपास दोन-अडीच तास आम्ही होतो. त्या गुरुजींनी आम्हाला एवढी माहिती सांगितली, आपला वेळ आम्हाला दिला, त्यामुळे आम्ही ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त दक्षिणा स्वतःहूनच त्यांना दिली . बाहेर पुष्करणी होती. अत्यंत सुंदर दिसत होती .

फोटो

फोटो

तथापि आता अंधार पडत आलेला होता त्यामुळे आम्हाला निघणे भाग होते.
इथून आम्हाला कन्याकुमारीच्या जवळच असलेल्या वॅक्स म्युझियम आणि थ्रीडी आर्ट गॅलरी ला भेट द्यायची होती.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

हे ठिकाणी देखील बच्चे कंपनी वगैरे सोबत असेल तर आणि अतिरिक्त वेळ असेल तर जायला काही हरकत नाही.

      जवळपास तास दीड तास घालवल्यानंतर आम्ही साधारण आठ वाजता कन्याकुमारी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचलो. त्यावेळी मंदिरात अजिबात गर्दी नव्हती. आम्ही पंधरा मिनिटात थेट देवीच्या समोर जाऊन उभे राहिलो . मी अजिबात अतिशयोक्ती करत नाही. मी आजवर जेवढ्या देवींचे दर्शन घेतले आहे त्यामध्ये कन्याकुमारी देवीचे दर्शन हे अत्यंत मनोहरी होते. देवीकडे कितीही पाहिले तरी मन भरत नव्हते. देवीची मूर्ती कमालीची देखणी आहे. इतका सुंदर मुखवटा आजतागायत कोणत्याही देवीचा पाहिला नाही. आपण निव्वळ निःशब्द होतो. उजळलेल्या दिव्यांच्या नैसर्गिक प्रकाशामध्ये देवीच्या नाकात हिऱ्यांची लखलखत असलेली नथ आणि तिचा अत्यंत देखणा असा मुखवटा, त्यावरती फुलांची केलेली कलाकुसर आणि दिव्यांची आरास , इतकी कमालीची सुंदर दिसत होती की काय वर्णन करू!!!! कमीत कमी पाच ते सात मिनिटे निवांत आम्हाला देवीचे दर्शन घेता आले. भविष्यात कधीतरी मी नक्की देवीला परत भेटायला जाणार आहे हे ठरवूनच तिथून बाहेर पडले.

इथून जवळच मत्स्यालय आहे तिथेही आम्ही थोडा वेळ घालवला. येथील काही फोटो-

फोटो

फोटो

फोटो

      आम्ही मंदिरातून बाहेर पडलो तेव्हा तिथे खूप सारी दुकाने होती. कपड्यांची, इलेक्ट्रिक वस्तूंची, शोभेच्या वस्तूंची तसेच अनेक प्रकारची दुकाने तिथे होती.. चौकशी केली असता आम्हाला लक्षात आले की ही वस्तू अत्यंत स्वस्त दरात मिळत आहेत. त्यामुळे आम्ही साड्यांच्या दुकानात शिरलो आणि केरळी साड्या ज्या केरळमध्ये आम्हाला दोन अडीच हजाराच्या आत मिळत नव्हत्या, त्या केवळ 700 रुपयात मिळाल्या . अशा आम्ही सात आठ साड्या घेतल्या. मिस्टरांनी पेन ड्राईव्ह, सेल्फी स्टिक, इअर काॅड इ. वस्तूंची खरेदी केली.

      आता साडेआठ वाजून गेले होते. आम्ही तिथूनच जवळ असलेल्या फूड कोर्ट वरती गेलो . खूप दिवसापासून दक्षिणात्य भोजनावरती ताव मारला होता. त्यामुळे आता काहीतरी वेगळे खाण्याची इच्छा होती. तेथे पावभाजी आणि फालुदा असे वेगळे जेवण मागवले.

फोटो

तेथे आजूबाजूला रस्त्यावरचे विक्रेते बरेच होते . उद्या आम्ही येथे शिंपल्यांच्या वस्तू घ्यायला यायचे असे ठरवले. उद्या सकाळी येथून आम्ही निघणार होतो. कन्याकुमारीच्या स्थलादर्शनासाठी मी दोन दिवस ठेवले हा माझ्या सहलीच्या नियोजनातील अत्यंत योग्य निर्णय होता. खरंतर अजून एक दिवस देखील ठेवला असता तरी चालले असते. जेणेकरून सकाळी सूर्योदय, संध्याकाळचा सूर्यास्त व समुद्र एन्जॉय करणे झाले असते. पण असो . आजचा दिवस खूपच एन्जॉय केला . आता उर्वरित पद्मनाभ्रम पॅलेस, अझिमला शिवा टेम्पल व त्रिवेंद्रम येथील प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिर यांचे वर्णन पुढील शेवटच्या भागामध्ये……..


स्वातंत्र्यानंतर कन्याकुमारीच्या दक्षिणेकडील समुद्रातल्या एका खडकावर स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभारले. तमिळ सर्वसामान्य जनतेला स्वामीजींबद्दल काहीच ठाऊक नव्हते. तेव्हा संपर्कसाधने तुरळक होती. ज्या काही बातम्या मिळत त्या वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी ऊर्फ रेडिओतून. तरीही बव्हंशी निरक्षर समाजाला स्वामीजींबद्दल काही ठाऊक असणे कठीणच. त्यात भाषेचा अडसर. सर्वसामान्य तमिळ जनतेच्या दृष्टीने कोणातरी सामान्य व्यक्तीचे स्मारक त्यांच्या माथी मारल्याची भावना त्यांच्यात दाटली. तमिळ संस्कृतीतले सर्वश्रेष्ठ नाव आहे तिरुवेल्लुवर. यांच्या नावाचा संवत्सर पण तिथे चालते. हे स्मारक मी जाने. २०११ मध्ये पाहिले तेव्हांचे संवत्सर होते २०४६. म्हणजे तिरुवेल्लुवर यांचे जन्मवर्ष येते सुमारे इ.स.पू. ३५ या वर्षी. तिरुवेल्लुवर हे तमिळ महाकवी, संत, मुत्सद्दी, राजनीतीज्ञ, महापंडित, विद्वान तत्त्ववेत्ते वगैरे होते. म्हणजे जे स्थान उत्तर भारतात चाणक्याचे तेच किंबहुना त्याहून सरस असे तमिळ जनतेसाठी होते. त्यांच्या नावाचा संवत्सर आहे यावरूनच तमिळ संस्कृतीतले त्यांचे स्थान ध्यानांत येते. मग तमिळ अस्मिता जागृत झाली. आणि त्यातून विवेकानंद स्मारकाशेजारीच तिरुवेल्लुवर स्मारक उभे राहिले. या स्मारकाच्या निमित्तानेच मी त्यांची माहिती समजून घेतली. त्यामुळे स्मारकाचा हुतू सिद्धीस गेला असे नक्कीच म्हणता येईल.

परंतु विविध संस्कृतींच्या विविध अस्मिता असतात आणि अस्मितांमधून विविध पूर्वग्रह झालेले असू शकतात. त्यामुळे आर्य, बौद्ध, ख्रिस्ती, अशा विविध संस्कृतीतील विद्वानांची मते वेगवेगळी असूं शकतात.

हे स्मारक पूर्ण झालेले आहे आणि खूपच प्रचंड असून देखणे आहे. मी २०१२ साली संपूर्ण पाहिलेले आहे. आता डागडुजीसाठी बंद असावे. ही दोन स्मारके समुद्रात आहेत तर महात्मा गांधी स्मारक मुख्य भूमीवर आहे. विवेकानंदांना न मानणारी जनता महात्मा गांधींना मात्र मानते हे पाहून गंमत वाटली. आपल्या लेखाच्या निमित्ताने माझ्या दक्षिण भारत दौर्‍यांच्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.


प्रवासी कंपन्यांपेक्षा अधिक गोष्टी पाहिल्या आहेत.
१) तिरुवल्लूवर हा तिकडचा संतकवी. एक लाखापेक्षा अधिक श्लोक लिहिले आहेत. त्यांच्या नावाचा जिल्हा उत्तर तमिळनाडूत आहे.
२) २०१०- १२ साली बोटीचे तिकीट वीस रुपये होतं. त्यात तीन बोटी क्रमाने कन्याकुमारी जेटी ते विवेकानंद स्मारक ते तिरुवल्लूवर स्मारक अशा फिरत. तिन्ही प्रवासाचे धरून वीस रुपये. सुट्ट्या नसल्या तर एक तासात जमतं.
३)सुचिंद्रमचं वैशिष्ट्य म्हणजे फारिनरनांही आत प्रवेश आहे. आतमध्ये सारेगम वाजणारे दगडी खांब आहेत ते भाविक वाजवू शकतात. नाही जमल्यास सेवेकरी येऊन वाजवून दाखवतात. ( पद्मनाभस्वामी मंदिरात असे पाचशे खांब आहेत पण ते बंदिस्त करून टाकले आहेत).
४) नागरकोईल हे शहर त्रिवेंद्रम ते कन्याकुमारी रस्त्यावरच आहे. नागरकोईल म्हणजे नागाचे मंदिर. ते बाजारातच आहे. तेसुद्धा पाहिले. फारसे टूरिस्ट ठिकाण नसल्याने इथले वडे इडली स्वस्त आणि चविष्ट आहेत. टपरीवर केळीच्या पानावर देतात. खाऊन झाले की आपणच आपले पान गुंडाळून डब्यात टाकायचे आणि तिथे वर्तमानपत्राचे कागद ठेवलेले असतात त्याने हात पुसायचे. साधी सोपी पद्धत.


कन्याकुमारी हे कमीत कमी दोन रात्री व इतिहासाची व आपल्या संस्कृतीला समजून घेण्याची आवड असेल तर तीन रात्रीचे ठिकाण आहे . खरंतर मला गर्दीची ठिकाणे आवडत नाहीत . कन्याकुमारी येथे बऱ्यापैकी गर्दी असते . गल्लीबोळ अरुंद व गर्दीने गजबजलेले आहेत . तरीही या शहरात मला एक प्रकारचा जिवंतपणा जाणवला. का कुणास ठाऊक मला कन्याकुमारी प्रचंड आवडले . तीन दिवसाचा स्थलदर्शन कार्यक्रम पुढील प्रमाणे असायला हवे असे मला वाटते-
दिवस पहिला - स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल (3-4 तास) व जेवणानंतर वॅक्स म्युझियम थ्रीडी आर्ट गॅलरी एक्वेरियम (2-3 तास),
दिवस दुसरा - सकाळी सूर्योदय पाहणे , विवेकानंद केंद्र येथील रामायण गॅलरी व भारत मंदिर हे म्युझियम पाहणे( येथे रामायणाबद्दल अतिशय विस्तृत माहिती मिळते. तसेच स्वातंत्र्यलढ्यातील अनेक थोर विभूतींचे कार्य याबद्दल माहिती आहे . कमीत कमी चार ते पाच तास सोबत ठेवून जावे. तसेच इतिहासाचे आवड असणाऱ्यांना येथे जावेसे वाटेल. आम्हाला याबद्दल खूप आवड असली तरीही मुलाचा विचार करून व हाती असलेल्या केवळ दोन दिवसांचा विचार करून आम्ही तो कार्यक्रम रद्द केला. भविष्यात जेव्हा कन्याकुमारीला जाणार आहे तेव्हा केवळ एक दिवस याच साठी ठेवणार आहे.) जेवणानंतर वट्टकुट्टई किल्ला व तेथून पुढे सुचिंद्रम मंदिर पाहणे.
दिवस तिसरा- त्रिवेणी संगम , भगवती अमन मंदिर, स्थानिक बाजारपेठेत फेरफटका मारून खरेदी करणे, संध्याकाळी सूर्यास्त पाहणे.
अशा पद्धतीने कन्याकुमारी येथे तीन दिवसांची आरामदायी कार्यक्रम पत्रिका होऊ शकते. ज्यांना ऐतिहासिक गोष्टींमध्ये रस नाही त्यांनी विवेकानंद केंद्राचा कार्यक्रम ,तसेच ज्यांना शॉपिंग मध्ये रस नाही त्यांनी खरेदीसाठी अर्धा दिवस ठेवण्याची गरज नाही . मग कन्याकुमारी येथे संपूर्ण दोन दिवस स्थलदर्शनासाठी ठेवले तर पुरेसे होतात.


कन्याकुमारी नागरकोईल जाताना एक मायलादी गाव आडबाजूला आहे. हे शिल्पकारांचे गाव. पिढ्यानपिढ्या शिल्पकला हाच उद्योग. शुचिंद्रम मंदिर यांच्याच पुर्वजानी बांधले असे मार्गदर्शकने सांगीतल .


Male and female rocks

Before the rocks are chiselled into idols, prayers are offered. There is no temple in TN and Kerala which does not have atheist one sculpture from this village.

https://www.onmanorama.com/travel/outside-kerala/2018/07/04/myladi-tamil...

वट्टकोट्टाई मधले ते एकटे झाड आता बरेच मोठे झालेले दिसतेय. माझ्याकडेही त्याचा फोटो आहे.










 केरल की यादगार यात्रा

सितम्बर 2014 में कन्याकुमारी से दिल्ली तक मारुती 800 में यात्रा की थी. अरब सागर के किनारे किनारे एडापल्ली-पनवेल हाईवे जिसे अब NH 66 कहते हैं, कार चलाई थी. चलते चलाते रास्ते में केरल के कई मंदिर, किले और शहर देखते आए और इन निम्नलिखित शहरों में एक एक दो दो दिन ठहरे भी थे:
थिरुवनंतपुरम ( Trivandrum ),
अल्लेप्पी ( Alleppy / Alappuzha / अलेपूझा / अलेपूया ),
कोची ( Kochi /  कोचीन /  Cochin ),
मुन्नार ( Munnar )
त्रिचूर ( Trichur / Thrissur ) और
कालीकट ( Calicut / कोझिकोड / कोशिक्कोड / Kozhikode ).
बहुत सुंदर, हरा भरा, पहाड़ियों और झरनों से भरपूर और समन्दर के साथ साथ फैला हुआ प्रदेश है. यहाँ चालीस से ज्यादा नदियाँ बहती हैं जिन पर 80 छोटे बड़े बाँध हैं. इसलिए केरल में बिजली, पानी और हरियाली की कमी नहीं है. प्रदेश का गठन 01.11.1956 में हुआ था. 14 जिले हैं जिनमें से थिरुवनंतपुरम शहर सबसे बड़ा है और राजधानी भी है. प्रदेश की आबादी 3.34 करोड़ है जबकि 1850 में यहाँ की आबादी 45 लाख थी. पर्यटन के प्रति समाज में दोस्ताना माहौल है जिसकी वजह से लाखों की तादाद में देशी विदेशी पर्यटक आते रहते हैं.

पिछले दिनों आई अभूतपूर्व बाढ़ में यहाँ जान माल का काफी नुकसान हुआ. भगवान से प्रार्थना है कि जल्दी से जल्दी वहां सामान्य स्थिति बहाल हो जाए. रास्ते में ली गई कुछ फोटो प्रस्तुत हैं :

1. कोची का backwaters. जब समन्दर में ज्वार आता है तो पानी शहर की नहरों में अंदर आ जाता है और भाटा के साथ पानी वापिस चला जाता है और शहर की सफाई भी हो जाती है 

2. थिरुवनंतपुरम की ओर जाती सड़क. सारा केरल इसी तरह से हरा भरा है  

3. अल्लेप्पी सागर तट पर मत्स्य कन्या या mermaid 

4. कालीकट से आगे चलते हुए एक बोर्ड नज़र आया 'Handicrafts Village' तो गाड़ी उधर मोड़ ली. पर टिकट के लिए थोड़ी देर इंतज़ार करना पड़ा. अंदर कारीगर सुंदर सुंदर चीज़ें बना रहे थे   

5. कालीकट का सागर तट

6. थिरुवनंतपुरम का सरकारी होटल जिसके पांचवें माले पर रुके थे 

7. शाम के समय थिरुवनंतपुरम का साफ़ सुथरा बस अड्डा 

8. ओणम त्यौहार वाले दिन बस की इंतज़ार. महिलाओं ने बिंदास सोना पहन रखा है क्यूंकि बस के सफ़र में कोई ख़तरा नहीं है. मौसम गरम और उमस भरा रहता है इसलिए खादी या सूती कपड़े ही आराम देते हैं. उमस और अचानक बारिश के कारण पैर में जूते जुराबें पहनना मुश्किल है चप्पल ही बेहतर है    

9. कोची फोर्ट के पास फुटपाथिये रेस्तरां. यहाँ समन्दर की हवा लगातार चलती रहती है पर धूल बिलकुल नहीं है. और पंखा भी नहीं चलाना पड़ता. इसलिए फुटपाथिये रेस्तरां का अलग ही मज़ा है. तरह तरह के व्यंजन मिल जाते हैं 

10. हरे भरे मुन्नार के हरे भरे रास्ते में 

11. मुन्नार के सुंदर चाय बगान  

12. श्रीपद्मनाभास्वामी मंदिर थिरुवनंतपुरम. दुनिया के सबसे बड़े खज़ाने वाला मंदिर  

13. यहूदी मंदिर या परदेसी सिनागोग. ये 1568 में बना था. इसके दूसरे नाम हैं - Cochin Jewish Synagogue / Mataancherry Synagogue. मूल रूप से चौथी सदी में परदेसी सिनागोग कोदुन्ग्लुर में बना था. यहूदी यहाँ मसालों के व्यापार के लिए आते थे जिनमें से कुछ यहाँ बस भी गए और मालाबार यहूदी कहलाये  

14. श्रीगुरुवायूर मंदिर का आंगन. मंदिर में कृष्ण के बाल स्वरुप की पूजा होती है        

15. आधुनिक मस्जिद. सातवीं आठवीं शताब्दी से अरब व्यापारी केरल में मसालों के लिए आ रहे थे 

16. त्रिचूर में एक चर्च. जीसस क्राइस्ट के शिष्य संत थॉमस यहाँ सन 52 में अर्थात पहली शताब्दी में केरल आये थे.  

17. बेकल फोर्ट से लिया गया फोटो  

18. त्रिचूर का वडक्कुनाथन याने उत्तर के नाथ, शिव मंदिर. मंदिर का इतिहास एक हज़ार साल से भी पुराना है   

19. श्री कृष्णा मंदिर त्रिचूर में शादी. यहाँ शादियाँ सुबह सुबह ही हो जाती हैं  

20. मुन्नार के रास्ते में एक झरना 

केरल जाएं तो छुट्टी ज्यादा लेकर जाएं. प्रदेश के 14 जिलों में से हर एक में कुछ ना कुछ देखने समझने के लिए है. पर्यटकों के लिए माहौल अच्छा है क्यूंकि यहाँ पर्यटक और मसाला व्यापारी सदियों से आते रहे हैं. प्रदेश भारत के उत्तरी राज्यों से ज्यादा समृद्ध, शिक्षित और अनुशासित लगा. घूमने की सभी सुविधाएं आसानी से मिल जाती हैं.
एक बार जरूर जाएं.

20. हरा भरा केरल 
 
 
 

गॉड्स ओन कंट्री ..... अर्थात केरळ

 

केरळची आमची सहल मीच स्वतः नेट वर बघुन वैगेरे प्लॅन केली होती. मला स्वतः प्लॅन करुन जायलाच आवडत . ते होम वर्क ही मी खुप एऩ्जॉय करते. माबोकराना ह्याचा उपयोग होईल अशी आशा करते.

दिवस पहिला : विमानाने मुंबई - त्रिवेंद्रम. सकाळचचं घेतल होत विमान. विमानाने गेल्यामुळे थकवा नाही जाणवला प्रवासाचा . त्रिवेंद्रम ते कोचिन अशी एअर पोर्ट टु एअर पोर्ट गाडी बुक केली होती. त्रिवेंद्रम विमानतळ तसा जवळच आहे शहरापसून. अकराच्या सुमारास पोचलो हॉटेल ( ऑफिसच गेस्ट हाऊस) वर . जरा आराम करुन शहर बघायला बाहेर पडलो. पद्म्नाभ मन्दिर , एक राजवाडा, राजा रविवर्मा चित्र गॅलरी वैगेरे बघितल. पद्म्नाभ मंदिरात लुंगी किंवा धोती लागतेच पुरषांना त्यामुळे घेऊन जाणे इष्ट. अर्थात तिथे ही विकत मिळतेच. त्रिवेंद्रम शहर खूप कोझी वाटले त्रिवेंद्रम मधली दागिन्यांची दुकान पहाच पहा. खूपच हेवी जुवेलरी असते त्यांची. संध्याकाळी त्रिवेंद्रम पासुन जवळ असलेल्या प्रसिध्द बीच वर गेलो. नाव विसरले आता त्या बीचच

दिवस दुसरा : सकाळी आवरुन कन्याकुमारीला जायला निघालो. वाटेत पुवर बॅक वॉटर मध्ये जवळ जवळ दोन तास बोटींग केल. तो अनुभव छान होता. वेगळ आणि कधी न बघितलेले बघायला मिळालं. कन्याकुमारीला दुपारी पोचलो. माझी कन्याकुमारी गावाबद्दलची कल्पना आणि प्रत्यक्ष गाव यात जमीन अस्मानाच अंतर पडल. भयानक गर्दी, लोटालोटी, बकालपणा, विवेकानंद स्मारक पहाण्याच्या तिकाटासाठी लागलेली मारुतीच्या शेपटासारखी लाईन वैगेरे सगळ फार निरुत्साही करणार होतं. अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे त्या दिवशी विवेकानंद स्मारक बघायचं कॅन्सल केल आणि सुर्यास्त आणि चंद्रोदय( त्या दिवशी पौर्णिमा होती) तीन समुद्रांचा संगम, कन्याकुमारी मंदिर इ. बघितल.

दिवस तिसरा: सकाळी सुर्योदय बघितला हॉटेलच्या खिडकीतुन. मुंबईकरांना समुद्रातला सूर्योदय नाही बघायला मिळत. ते छान वाटल. दुसर्‍या दिवशी ही विवेकानंद स्मारका साठी तेवढीच लाईन होती म्हणुन ते ड्रॉपच केलं तसं ही मी अति गर्दीच्या अनोळखी ठिकाणी जायचं सहसा टाळते. त्यामुळे सकाळी कुमारकोम ला जायला निघालो. आम्ही अलेप्पी इथे न रहाता कुमारकोम इथे रहिलो होतो. ते एक शांत गाव आहे आणि आजूबाजुला बॅक वॉटर आहे सगळीकडे. इथे तुम्ही हाउस बोट मध्ये ही राहु शकता पण आम्ही नव्हतो रहिलो.

दिवस चवथा : सकाळी थेक्कडीला जायला निघालो आणि साधारण बाराच्या सुमारास तिथे पोचलो . ते थंड हवेच ठिकाण आहे. दुपारी तिथली स्पाईस गार्डन बघितली. नंतर हत्तीच्या राईड वगेरे होत्या तिथे ही गेलो. लोकल शॉपिग केल.

दिवस पाचवा : सकाळी हॉटेल मध्ये केरळी ब्रेकफास्ट घेतला आणि पेरियार नदीतल्या फेरफटक्याला निघालो. छान वाटल. पण आम्हाला प्राणी नाही फार दिसले. दुपार तशी मोकळीच होती त्या वेळेत तुम्ही केरळी मसाज, किंवा कथकली नृत्याचा कार्यक्रम पहाणे वैगेरे करु शकता.

दिवस सहावा : सकाळी मुन्नार ला जायला निघालो. वाटेत चहाचे मळे खूप दिसले . खूप सुंदर दृश्य होते . दुपारी बाराच्या सुमारास मुन्नारला पोचलो . त्यादिवशी जवळपास फिरुन आरामच केला

दिवस सातवा : मुन्नार दर्शन ला सकाळी बाहेर पडलो. मुट्टापाटी धरण आणि टी म्युझियम वैगेरे बघुन दुपारी हॉटेल वर आलो . हॉटेल छान होत. आयुर काउंटी नावाच. पण फुड जस्ट ओके. मला वाटत त्यांनी वेज मेनू कडे विषेष लक्ष नव्हत दिलं ( स्मित) रिसोर्ट चा कँपस छान असल्यामुळे वेळ गेला चांगला

दिवस आठवा : सकाळी गुरुवायुर ला जायला निघालो. मुन्नार ते गुरुवायुर अंतर खूप नसले तरी रस्ते अरूंद आणि सततची मनुष्य्वस्ती. त्यामूळे केरळमध्ये कुठे ही वेग घेता येतच नाही गाडीला. आम्ही साधारण एक च्या सुमारास पोचलो तिथे पण दिड वाजता दुपारी देऊळ बंद झाल ते चार वाजता उघडण्यासाठी. जेवण, खरेदी वैगेरे टाइम पास केला मग. तिथे आम्हाला पहिल्यांदा केळीच्या पानावर केरळी जेवण मिळाले. नाहीतर हॉटेल मध्ये जनरली फक्त ब्रेकफास्ट केरळी आणि लंच , डिनर पंजाबी असा प्रकार आहे तिथे. गुरुवायुरच मंदिर फार सुंदर आहे. दर्शन घेईपर्यंत संध्याकाळ होतच आली होती म्हणून मग आणखी थोडा वेळ थांबून तेलाच्या दिव्यात प्रकाशलेले मंदिर बघितल आणि मग कोचीन ला यायला निघालो. तुम्ही पाहिजे तर एक दिवस मुकाम करा गुरुवायुरला . लक्ष लक्ष तेलाच्या दिव्यांच्या प्रकाशात उजळलेले मंदिर बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे फार सुंदर आहे ते. चुकवु नका. दुसर्‍या दिवशे लवकर उठुन कोचीनला येऊ शकता

दिवस नववा : दिवस भर कोचीन बघितले. मला हे शहर फार आवडले. अगदी मॉडर्न आहे तरी ही छान आहे. कोची फोर्ट मिस नका करु. तिथल्या लेन मधुन थोड तरी चालाच फार छान वाटत

संध्याकाळच्या विमानाने रात्रि मुंबईला परत.

एक रात्र त्रिवेंद्रम, एक रात्र कन्यकुमारी, एक रात्र कुमारकोम, दोन रात्री थेक्काडी, दोन रात्रि मुन्नार आणि एक रात्र कोचीन ---- ( नऊ दिवस आणि आठ रात्री)

हे काही फोटो

त्रिवेंद्रम म्युझियम

From mayboli

पाऊस खूप, झाडं ही खूप, त्यामुळे हे असं खूप बघायला मिळत

From mayboli

पद्मनाभ मन्दिराची गोपुरं

From mayboli

पुवर बॅक वॉटर

From mayboli

आणि शेवटी बीच

From mayboli

६)

From mayboli

७) कन्याकुमारी

From mayboli

८) हॉटेल मधील खास केरळी स्वागत

From mayboli

कथकली नृत्य

From mayboli

थेक्कडी स्पाइस गार्डन ...... कॉफी सीड्स

From mayboli

ह्या वाळत घातलेल्या

From mayboli

ही वेलचीची लागवड

From mayboli

आणि ह्या वेलच्या . खाऊन बघितली मी एक ,पण जराही वास नव्हता

From mayboli

चहाचे मळे

From mayboli

From mayboli

ही तिकडे पाहिलेली काही फुल

From mayboli

From mayboli

From mayboli

From mayboli

मुन्नारच हॉटेल

From mayboli

From mayboli

हाऊस बोट

From mayboli

 उतरल्या-उतरल्या पहिली जाणीव झाली की भाषा ही एक प्रमुख अडचण आहे. तरी बरे की कॅब आधीच बुक करून ठेवली होती. आमची प्रवासाची व रहाण्याची सोय कोची मधल्या एका डॉक्टर ने केली होती. त्याचे केरळभर बरेच फार्म हाऊसेस होते आणि तो आता टुरिझम मध्ये आपला हात आजमावत होता. आम्ही त्याचे पहिलेच गिर्‍हाईक होतो. गाडीने आम्ही त्याच्या फार्म हाउस वर आलो. हे फार्म हाऊस शहराबाहेर एका बॅकवॉटर किनारी होते. अतिशय सुंदर परिसर होता पण रात्री निरव शांतता.

दिवस १: सकाळी आवरुन मुन्नार च्या वाटेला लागलो. २३ डिसेंबर ला सकाळी ९ वाजता पण अंगातुन घामाच्या धारा लागल्या. मुन्नार, कोची पासुन ३ तासांवर (१३०किमी) आहे. केरळ मधली ही अंतरे फसवी असतात. केरळ मध्ये दाट लोकवस्ती आहे त्यामुळे प्रवासाचा वेग पण बराच कमी असतो. आमच्या कन्याकुमारी ते कोची ह्या ३०० किमी च्या प्रवासात एकदाही वस्ती संपलेली नव्हती. गाडी पुर्णपणे बाजारातुन आणि वस्त्यांमधुनच जाते. असो. मुन्नारला जाताना मध्ये एलिफंट ट्रेनिंग सेंटर लागते. ते पहायला विसरू नका. कोथामंगलम च्या पुढे घनदाट जंगल लागते. वस्ती तुरळकच आहे. ईथे मजा म्हणजे जंगलात सुद्धा दागिन्याच्या दुकांनाचे मोठ्-मोठे होर्डिंग्ज लागले आहेत. एकवेळ खायला-प्यायला मिळणार नाही पण हे बोर्डस् दिसतील. कोची मध्ये तुम्हाला ३-४ मजली फक्त दागिन्यांची अशी बरीच दुकाने दिसतील. ईथे लोक दागिने खातात का काय काही कळत नाही. असो. दुपारी मुन्नारला पोहोचलो. ईथे बरीच थंडी होती. ईथले फार्म हाउस अगदी जंगलात लपलेले होते. एका बाजुने जंगल, एका बाजुला चहाचे मळे व समोर रस्ता ओलांडुन दरी असे फार्म हाउस होते. जेवण आवरुन मुन्नार गाव पाहिले. गाव तसे साधेच होते.
कॅमेरा: Canon Powershot S2 IS
प्रचि १
फार्म हाऊस समोरील जंगल

-
-
-
दिवस दुसरा: दुसर्‍या दिवशी site-seeing साठी बाहेर पडलो. ईथली बघण्यासारखी ठिकाणे म्हणजे मट्टूपेटी धरण, अनामुडी शिखर, चिन्नाकानल धबधबा, अनायीरांगल धरण, राजमला अभयारण्य, एको पॉइंट, चहाचे संग्रहालय. आम्ही आधी मट्टूपेटी धरण पहाण्यास निघालो. धरणामध्ये बर्‍याच प्रकारच्या बोटिंग्ज चालतात. धरणाच्या दोन्ही बाजुला जंगल व चहाचे मळे आहेत. कधी कधी बाजुच्या जंगलात हत्ती पण दिसतात. आम्ही नशिबवान होतो म्हणुन एक दिसला. मुन्नारमध्ये जागा मिळेल तिथे चहा लावला आहे. अगदी रस्ता-दुभाजकावर सुद्धा. ईथले चहाचे संग्रहालय पण पहाण्यासारखे आहे. अगदी चहाच्या ईतिहासापासुन, आज चहा कसा बनविला जातो, त्याचे प्रकार कुठले हे सर्व दाखविले जाते. ईथे चहा विकतही मिळतो. धरण, चहाचे मळे व बाकिची काही स्थळे पाहुन संध्याकाळी परत आलो.
प्रचि २
चहाचे मळे

-
-
-

प्रचि ३
अनायीरांगल धरणाचे बॅकवॉटर

-
-
-

प्रचि ४


-
-
-

प्रचि ५

-
-
-

प्रचि ६

-
-
-

प्रचि ७

-

प्रचि ८
चहाचे म्युझियम व फॅक्टरी.

-
-
-

प्रचि ९


-
-
-

प्रचि १०
जंगलात दिसलेला एक हत्ती

-
-
-

प्रचि ११
ईथे नजर जाईल तिथवर चहाचे मळे पसरले आहेत.

-
-
-

दिवस तिसरा: आज सकाळीसच थेक्कडी कडे प्रयाण केले. थेक्कडी, मुन्नार पासुन ३ तासांवर (९२किमी) आहे. जातान वाटेत परत चहाचे मळे, धबधबे, धरण असे बरेच काही लागले. घनदाट जंगल हे नेहमीचेच झाले होते.
प्रचि १२
पच्शिम घाटाचे जंगल

-
-
-

थांबत्-थांबत, निसर्गाची मजा लुटत दुपारी थेक्कडी ला पोहोचलो. थेक्कडी पण छोटेसेच गाव आहे. थेक्कडी मध्ये पेरीयार अभयारण्य, मसाल्यांच्या बागा, मसाले व केरळी मसाज प्रसिद्ध आहे. दुपारी जेवण आटोपुन मसाल्यांची बाग पहायला बाहेर पडलो. अशा बागा खास पर्यटकांसाठी तयार केलेल्या असतात. एकाच बागेत लवंगा, दालचिनी, वेलदोडे, काळी-मिरी, तमालपत्र, कोको, व्हॅनिला असे बरेच काही पहायला मिळते. संध्याकाळी घरी जायच्या आधी ईथला प्रसिद्ध केरळी मसाज घेतला. मसाज झाल्यावर काय झोप आली म्हणुन सांगता. सर्व अंग सैल पडले होते. घरी येऊन फ्रेश होऊन जेवायला बाहेर पडलो. ईथे पेरियार अभयारण्याच्या वाटेवर अंबाडी म्हणुन एक हॉटेल आहे. तिथल्या रेस्तराँ मध्ये अतिशय सुंदर जेवण मिळते.

प्रचि १४
मसाल्यांची बाग.

-
-
-

दिवस चौथा: आज अगदी भल्या पहाटे ऊठुन पेरीयार अभयारण्याकडे निघालो. पेरीयार अभयारण्य पेरीयार नदिच्या बॅकवॉटर च्या भोवताली वसलेले आहे. हे अभयारण्य पहाण्यास बोटीने जावे लागते.
ईथे पक्षी, हत्ती, कोल्हे, लांडगे, हरीण, सांबर, गवे, तसेच ऑटर्स (मराठी शब्द?) कासवे बर्‍याच संखेने आढळतात. नशिब असेल तर वाघही दिसतो असे म्हणतात.
प्रचि १५
पेरीयार नदीचे बॅकवॉटर

-
-
-

प्रचि १६

-
-
-

प्रचि १७

-
-
-

प्रचि १८

-
-
-
प्रचि २०

-
-
-
प्रचि २१

-
-
-

दुपारपर्यंत अभयारण्याची भेट संपवुन मसाल्यांची खरेदी केली. ईथे पेरीयार अभयारण्याच्या प्रवेशद्वाराबाहेरच बरीच मसाल्यांची दुकाने आहेत. ईथे मसाले आपल्यापेक्षा बरेच स्वस्त आणी दर्जेदार मिळतात. जर का तुम्ही ठोक मध्ये घेणार असाल तर भावही बरेच कमी करतात.
खरेदी आवरून कन्याकुमारी (३५०किमी) ला निघालो. थेक्कडी अगदी केरळ व तमिळनाडू च्या सीमेवर येते. आम्ही तमिळनाडू राज्यातुन कन्याकुमारी ला निघालो. कन्याकुमारी बद्दल माहिती तामिळनाडू च्या भागात येईल.

दिवस पाचवा : हा दिवस आम्ही कन्याकुमारी मध्ये घालविला. दुपारी थिरुअनंतपुरम कडे निघालो.
दुपारी उशिरा थिरुअनंतपुरमला पोहोचलो. ईथे शेषशायी विष्णुचे पद्मनाभस्वामी हे १५व्या शतकातले मंदिर आहे. ईथे स्त्रियांना फक्त साडी असेल तरच व पुरुषांना फक्त पांढरी लुंगी असेल तरच प्रवेश दिला जातो. ईथे तसे कपडे भाड्याने देण्याची व कपडे बदलण्याची सोय आहे. ईथली विष्णुची मुर्ती तुम्हाला ३ दरवाजांमधुन दिसते. एका दरवाजातुन फक्त पाय दिसतात, दुसर्‍या दरवाजातुन फक्त नाभी व पोटाकडचा भाग दिसतो व तिसर्‍या दरवाजातुन फक्त चेहरा दिसतो.
ह्या मंदिरात भाविकांना थोडेसे लुटले जाते. जसे तुम्ही आत शिरता तसे तुमच्या हातात एक तेलाचे भांडे दिले जाते. कोणी काही बोलत नाही. तुम्हाला वाटते ही काहितरी ईथली प्रथा आहे. पुढे गेल्यावर एका ठिकाणी ते तेल तुम्हाला ओतायला सांगितले जाते व पैसे मागितले जातात. तेव्हा सावधान!
दर्शन करुन ईथल्या कोवालम किनार्‍याजवळच होम स्टे घेतला.

दिवस सहावा: आज सकाळी थिरुअनंतपुरम च्या कोवालम समुद्रकिनार्‍याला भेट द्यायला निघालो. कोवालम च्या ईथले पाणी अगदी निळेशार आहे. रेस्तराँ व पर्यटकांची गजबज असुनसुद्धा घाण आणी कचरा कुठे दिसला नाही.
प्रचि २१

-
-
-

प्रचि २२

-
-
-

प्रचि २३

-
-
-

प्रचि २४
माशाचे जाळे ओढणारे मच्छिमार.

-
-
-

प्रचि २५

कोवालम वरुन दुपारी अलेपुझ्झा ला जायला निघालो व संध्या़काळी ६ वाजता पोहोचलो. अलेपुझ्झा ला तुम्हाला हॉटेल किंवा हाऊसबोट असे २ पर्याय आहेत. सुट्ट्यांच्या काळात मात्र हाऊसबोटीला आधीच बुकिंग करावे लागते. गेल्यावर हाऊसबोट मिळेलच असे नाही. आम्हाला तरी नाही मिळाली त्यामुळे हॉटेलवर मुक्काम करावा लागला.

दिवस सातवा: आज अलेपुझ्झा चे प्रसिद्ध बॅकवॉटर्स पहायला निघालो. अलेपुझ्झा ला पुर्वेचे व्हेनिस म्हणतात. ईथे सर्वत्र समुद्राचे पाणी जमिनीमध्ये आत शिरल्यामुळे नैसर्गिक कालवे तयार झाले आहेत.
ईथले जवळपास सर्व व्यवहार बोटीने चालतात. रस्ते असे नाहीतच. घरे, शाळा, गावे सर्व काही कालव्यांच्या किनारी वसलेले आहे.
ईथे तुम्ही यांत्रिक किंवा वल्हवता येणारी बोट घेऊ शकता. आम्ही वल्हवता येणारी बोट घेतली. ईथे कालव्यांच्या दोन्ही बाजुला गावे किंवा भात-शेती आहे. अवर्णनिय हिरवागार असा हा परिसर आहे. ईथेच एका कालव्याच्या बाजुला असलेल्या एका साध्या उपहारगृहात दुपारच्या जेवणात लॉबस्टर घेतला. आहाहा! काय सुंदर चव होती त्याची. केरळात येऊन सी-फूड न खाण्यासारखे दुसरे पाप नाही. Happy केरळमध्ये आलात तर केरळी पराठा आणी त्याबरोबर ईथली सी-फूड ग्रेव्ही जरूर चाखा. दिवसभर त्या कालव्यांतुन सफर करुन संध्याकाळी कोची साठी रवाना झालो.

प्रचि २६
बॅकवॉटर मधल्या हाऊसबोटी

-
-
-

प्रचि २८
बॅकवॉटरच्या किनारची भातशेती

-
-
-

प्रचि २९

-
-
-

प्रचि ३०

-
-
-

प्रचि ३१

-
-
-

प्रचि ३२
एक शाळा

-
-
-

प्रचि ३३

-
-
-

प्रचि ३४
कालव्यांशेजारील घरे.

-
-
-

प्रचि ३५

-
-
-

प्रचि ३६

-
-
-

शेवटचा दिवस : आज संध्याकाळची फ्लाईट होती. तत्पुर्वी कोची फोर्ट पहायचा ठरले. कोची फोर्ट मध्ये कुठलाही किल्ला वगैरे नसुन त्या भागालाच कोची फोर्ट असे म्हणतात. कोची फोर्ट ला जायला बोट मिळते. हिच बोट तुम्हाला पुर्ण कोची बंदर फिरवुन आणते. ईथे एक जुने चर्च आहे व कोळ्यांचा बाजार भरतो. ईथे अगदी ताजे व विवीध प्रकरचे मासे, झिंगे, लॉबस्टर, शिंपले मिळतात.
कोची फोर्ट आणी कोची बंदर पाहुन आम्ही आमच्या केरळ ट्रिप ची सांगता केली.

प्रचि ३९
कोळ्यांची जाळी

-
-
-

प्रचि ४०
कोची बंदर

-
-
-

प्रचि ४१
कोची स्कायलाईन.

 

 

 गेल्या महिन्यात कुटुंबीया समवेत केरळ राज्यी जाऊन आलो .

पुणे - मुंबई - एर्नाकुलम- मुन्नार- थेक्कडी - त्रिवेंद्रम - पुणे असा ६-७ दिवसाचा भेट ठरवला होता .

1
मुंबई - एर्नाकुलम दुरान्तो एक्स्प्रेस ने रात्री मुंबई सोडले.
2
रात्रीचा प्रवास असल्यामुळे कोकणातील निसर्ग व बोगदे पाहता आले नाही .

मडगाव सोडले आणि पहाट झाली.

3

4
सोबत मंगळूर लागले .
5

१८ - २० तासांच्या प्रवासानंतर एर्नाकुलम गाठले .

एर्नाकुलम म्हणजेच कोची किवा कोचीन .

ऑफ सिझन असल्याने हॉटेल बुकिंग वेळेवर केले .
कोचीन रेल्वे स्टेशन बाहेर कोचीन गेस्ट हाउस चांगले हॉटेल आहे .
जेवण पंजाबी मिळाले .

दुसर्या दिवशी सकाळीच उठून MARINE DRIVE ला भेट दिली .
7

8

9
MARINE DRIVE वरून दिसणारा समुद्र .
10

11

काही कारणास्तव फोर्ट कोची बघता आले नाही .

संध्याकाळी मुन्नार ला जाण्यासाठी आगेकूच केली .

मुन्नार म्हणजे हिल स्टेशन . कोचीन ला गर्मी तर मुन्नार ला थंडी .

मुन्नार गाव तसा छोटासा . इथले लोक CHRISTIAN असल्याने केरळ मध्ये चर्च जास्त पाहायला मिळतात .

रात्री मस्त मुक्काम करून दुसर्या दिवशी मुन्नार बघितले .
12

13
सगळे मळे हे संरक्षित आहेत .
आपल्याला आत मध्ये जाता येत नाही . (ट्राय केले तर येते पण ) . पण जाऊ नये . इथे हत्ती जास्त प्रमाणात आहेत . ते आत मध्ये येउन नासधूस करू नये म्हणून केलेलं हे कुम्पन. (करंट सोडलेले आहेत. )
13

14

15

16

17

18

19

20
मुन्नार ला चहाचे मळे बघायला मिळतात .

टाटा यांचे येथे संग्रहालय आहे. एन्ट्री फी रु. १०० /- .

मुन्नार Bus Stand च्या समोरच्या गल्लीत अस्सल केरळी जेवण मिळाले (नाव लक्षात नाही).
रस्सम भात व ५-६ चटण्या .

333
Bus Stand च्या बाजूलाच मार्केट आहे. वेगवेगळे मसाले मिळतात .

रात्री मुन्नार ला मुक्काम केला व दुसर्या दिवशी थेक्कडी साठी निघलो.

जाताना मसाल्याचे मळे पाहायला भेटले .

*** विलायची चे झाड . ***
21

*** विलायची ***
कच्ची विलायची.

खाताना चव नाही लागत पण वास येतो
22

*** बुरशी (दगडी फुल) ***

आपल्याकडे जे दगडी फुल म्हणून मसाल्यात वापरतात ते एक प्रकारची बुरशी आहे.
इथल्या वातावरणात हे आपोआप तयार होते .

23
25

27
कॉफ्फी बिन्स : केरळ मध्ये कॉफ्फी ची झाडे पण आहेत.
28

कथ्थकली ( मुन्नार)
हा इथला पारंपारिक नृत्य आहे .

अगदी तयारी पासून सगळे लाइव पाहायला मिळाले .
मेक अप हा पूर्ण नच्रल कलर ने करतात .

30

मुन्नार जवळ कुमिली गाव आहे . इथे पेरियार पार्क आहे .

सकाळी ६ ला बोटीने चक्कर मारली .

33

34

34

36

39

39

* ** अलेप्पी ** *
अल्लेपी ची खासियत म्हणजे हाउस बोटीतून Backwaters एन्जोय करणे .

मुक्काम करायचा असेल तर या किमान ५००० रु. /- पासून सुरु होतात .

३.-४ तासांसाठी रु. १२०० - १५०० /- लागतात .

बोटीतून अल्लेपिचा आजूबाजूचा परिसर बघता येतो .

इथले वायनाड लेक बघण्यासारखे आहे .

इथे लोकाल त्रांस्पोर्त म्हणून बोट वापरतात .

रु. ५ - २०/- तिकीट . कुठेही जा

333

34
ff

56
689

647

4gd
46
6546
67
64

 

Alleppey Houseboat

The first time I heard the word Alleppey was in college. One of my juniors, Mary Abraham, was from Alleppey. She adored me, and I liked her a lot too. She would write me letters during the holidays, and send me cards for birthdays. She was so kind, soft-spoken, and gentle in her demeanor. She was strikingly fair, with long hair and a long nose, and deep, black eyes. Mary from Alleppey- the connection stayed in my mind.

Our college was run by Christian missionaries, and so there were many Malayali Christians studying in the college, doing their graduation course in the morning-to-afternoon classes, and theology in the post-lunch classes. A majority of the students came from Kannur, the northernmost district of Kerala (KL), which was infamous for strikes and protests by communists. Not many were from Alleppey and I guess that is another reason why the name stuck so strongly in my memory. 

And then, there was the aggressive marketing campaign of the state government. Who in India didn't know about God's Own Country? The coconut trees, the elephants, the tea gardens, the backwaters, the houseboats, the Ayurvedic treatments - KL was a famous state and attracted hordes of travelers - both domestic and international.

Sathya & I have traveled the length and breadth of KL but somehow never went to Alleppey in all these years. Most of the early years of our married life were spent exploring the neighboring Southern states of Andhra, KL, and Tamil Nadu. Our last family trip to KL was in 2018, to  Kochi. It has already been four years since we explored KL. 

The state has become rabidly violent and is known for all the wrong reasons. The Covid mess-up, the ISIS recruitment, the targeted killings of RSS workers by the communists, the Muslim street marches that boldly said "Time's up for Hindus & Christians, be ready to die", and so on. The list is endless. Coincidentally, the hate speech incident of a young kid calling for the death of Hindus & Christians happened in May 2022 in Alleppey. The rally was organized by the Popular Front of India, where a mob of over 1000 Muslims called for violence against Hindus & Christians, abused them, & threatened them. Check the videos available online to see the hatred they have for "kafirs"; the venom in their vitriolic speeches. KL will soon be another Kashmir, like West Bengal has already become. Hindu ethnic cleansing pogrom is on the cards. 

The only two places I want to see in this "god's own country - NO MORE", are Jathayu Park in Kollam and the 58-feet tall Shiva Murti in Azhimala. My heart longs for these.

Recently, an unexpected opportunity came our way to visit Alleppey. Sathya's office planned a houseboat trip over the weekend of July 23-24. The train tickets were booked in June. The group had 38 members including spouses & children. This was our first houseboat experience. 

I realized, on this trip, that Alleppey and Alapuzha are one and the same. Like Kochi, Cochin & Ernakulam - all same. 

If you search the internet, you would find November to February to be the best months to visit Alleppey. Our visit was during peak monsoon month. Luckily for us, it didn't rain during our 2-day stay, even though it had been pouring the whole of the previous week. The weather was very pleasant, occasionally cloudy. Perfect for us to enjoy the view.

The red building in the pic below is the Ramada hotel. 

Hundreds of boats were parked on the dock. It looked like Bangalore's Majestic Bus Stand. There were countless houseboats of various capacities (1-bed, 2-bed, etc) in the water. In addition to the houseboats, there were small boats selling ice cream (Uncle John's) and speed boats too (Rs 300 for a ride). Crowded waters! 

The local women fishing in coracles. 

We caught a few fish on our boat too. The children were ecstatic with the fishing experience and took turns holding the fishing rod but caught only leaves and debris.

Breakfast, lunch, evening tea & snacks, and dinner are all provided on the boat. 

The houseboat experience is definitely over-rated. It is marketed really well, though. The photographs in travel magazines and on the internet will beckon you with a once-in-a-lifetime experience. I did not find it that great. I say that considering the amount of time and effort we spent getting to the place. 13 hours of train travel from BLR to Kottayam (8:30 p.m to 9:30 a.m), then 2 hours bus ride to the houseboat location. The return journey of 12 hours from Alleppey to BLR 7:30 p.m to 7:30 a.m.  It is not worth it. 

The trip ended on a sad note for us as my handbag was stolen on the train. I lost my mobile, one Samsung tab, and the house key. Early in the morning, we had to search for key maker shops to get him to break open the house lock.It took more than half an hour to break the Godrej lock open and Rs 700 in labor. And a new lock to be bought and a new phone! Sob sob!

Ours was a group tour, so, fortunately, the economics of it worked out to be a bit reasonable. We had the entire boat for ourselves. And another boat for the sleepover at night. If it was a single family, clubbed with others in a 6-bed boat or 1 family in a 1-bed boat, it would have been miserable. How much can you look at endless, still water and coconut trees, especially if you are already from a coastal district & live in a backwater yourself? Anyways, it was a 1N2D stay, so could be tolerated. 

The Amaze World park and the two beaches we visited were a delight for the kids and Instagram reel makers of the group. 

The highlight was the unexpected darshan of Lord Shiv in the Mararikulam Devasthanam. It is at least 700 years old and is the only temple in KL where Mahadev and Parvat sit facing each other. Shivji is in the Marari roop in the temple and Parvathi in the Swayamvar roop. Marari means the Kaam hating roop of Shiv or cupid killer. Remember the story of Shiv & Sati in the post on Maa Kamakhya temple? Shivji was sad after the demise of Sati and went to the Himalayas for meditation. Meanwhile, in the devlok, the power of the Gods was overthrown and the solution was for Shiv to beget a child. Parvati was sent in the swayamvar roop to woo Shiv. To break his dhyan, Kaamdev was sent. Shivji was angry on Kaamdev for disturbing his yog sadhana, opened his third eye, and burnt him. The Umananda temple is where Kamdev was destroyed. 

What a beautiful temple! The staff requested us to wait for a few minutes and take the prasadam. We happily obliged. It was our pleasure and a blessing that we happened to be there during the last aarthi (12 o'clock) and could partake in the prasada seva. 

May the Sanatana Dharma thrive in this land that was once truly God's Own Country.

At the temple, saw this beautiful flower. The staff said it is sahasra kamala. 

Such broad leaves.

Stage 1: The seeds. Looks like a shower head.

Stage 2Stage 3: The budStage 4: The gorgeous flower

 https://sujathastravelblog.blogspot.com/2022/07/alleppey-houseboat.html

 

पेरियार : नयनरम्य जंगल

 

God's Own Country, Kerala (Nov 2013)


As against the regular campings which I do in national forests, this Diwali, we decided to have a family trip to one of the most beautiful states of India. Thanking Kumar H V and CHD, I had done all my necessary hotel bookings on the day prior to the travel. I was nervous and excited about the journey as it was the longest car journey that I ever had. My last longest journey by car was less than 2/3rd of this. Also after reading blogs and photos of the friends who had been to Kerala, I was very much anxious to witness and capture the emerald beauty of the nature.

The overall plan was ...


Travel Plan


Day 1 - On 31st October at 4AM sharp we started our journey as per the routes planned by Kumar HV. I started the journey using the older Katraj – Satara road as I stay close to it. The condition of the road till the end of Katraj ghat is very bad. To my surprise before reaching the Katraj ghat, I saw a porcupine running along the road just before the Katraj tunnel. This was rare sighting for me just within 15 minutes from start of my journey. This is the first time I have seen this animal in open. On first day, the plan was to reach Krishnagiri, TN. Its about 950Km from Pune. The target was steep. But NH-4 was too good and it never felt as burden till I exited the Nice Road of Bangalore. With couple of Petrol halts and one Food halt we reached Bangalore at 4.00PM. The road is Makkhan post Kagal. There are generally very less number of vehicles on the roads post Kagal till Tumkur. No long queues on the Tolls. After Tumkur, the Bangalore traffic starts, but still you can drive at 100 kmph. Nice road is the outer ring road for Bangalore. Its worth to pay the toll of Rs. 155 on there as you can bypass the pathetic traffic conditions of Bangalore. The Nice road is awesome. I can compare it with some of the freeways of Britain / USA. Still it has lot of traffic, but it was moving. When I took E City exit towards Hosur, I had to face the heavy traffic of Bangalore.

I was not tired at all till I reach here. I even had a call with Kumar to discuss if I can go further to Krishnagiri as soon as I hit the Nice road. He suggested me 'Salem'. But the Bangalore traffic near Hosur made me standstill for long time. I almost lost an hour + time in there. I think, most of the folks from TN who work in Bangalore, were traveling to their natives for Diwali vacation. Finally we rolled-back our decision about Salem and halted at Krishnagiri as planned. I checked in at 7 PM and called off that day with @950km on the trip meter..

Day 2 we packed up breakfast and started early as per the advice from all the experienced folks. We crossed Dindigul and took exit for Sembatti, Vathalagundu, Periakulam, Theni. The roads post the Dindigul exit is not in well condition. I had to come below 50kmph. Also lot many villages alongside the road and the colorful buses of Kerala / Tamilnadu were nightmare. 


Highway Passes through Villages


Most awesome drivers in Lungi were the folks on TVS 50. They are next best to some of the Pune drivers who can take sharp turns without any notice. In Pune, I had seen similar drivers on Scooty / Activa taking sharp turns by looking at the sales board on the shop, Chitale Mithai shop or even fresh green vegetables :). Don't mind, I own Activa. God bless all such drivers!! Good that I was used to these driving styles from my hometown! At 2 o’clock, I got first ever surprise when the road to Munnar from there was closed. The folks on the check post were not knowing Hindi and English. But their communication was good enough to tell me that the road is blocked till 5PM. Again I dialed Kumar to tell about the situation. He suggested me a different road which I followed. I came back till Theni and took Cambum, Nedumkandam, Poopara, Periakanal and Munnar. Till Cambum, the road condition is not good. Thereafter, its ghat road and there is not much traffic except the Jeep drivers. Next time when you travel, please make sure that road from Theni is open. Below is a little map for your help..

Dindigul - Munnar

As soon as you reach near Munnar, you get to see the Tea plantation and lush green surrounding.

Tea
The moment I reached Munnar, I took multiple stops and photos on the way to capture the scenic beauty. The place is so clean and lush green that it was just too difficult for me to rush to hotel without any halts. The journey post Nedumkandam to Munnar was awesome. I reached hotel when it was almost dark. We then planned for the next day.

Day 3 - The main thing which was high on my list was the Eravikulam National Park. The unique shola grassland ecosystem of the western ghats where we could spot the Niligiri thar. We wanted to visit this place as early as we could to avoid the rush. Reached there early in the morning post breakfast. There are forest buses which take you to the next check post called Rajamala. From there we have to trek for 1-2 kms. The road gives you glimpse of the lovely Western Ghats. You could touch the clouds on the way. The clean and cool atmosphere, green surroundings, tall cloud cladded mountains, small water streams need no more explanation to the phrase “Kerala, Gods’s own Country”.

Good Morning Munnar



Rocky Mountains



Rajmala



Habitat for Nilgiri Thar

We were fortunate to even spot herd of Niligiri Thars which was my first ever sighting. The beautiful animals are capable of walking / climbing up and down through the rocky patches. We could not see them doing any of these activities though. But their sight while grazing on the grassland was pleasing!!

Nilgiri Thar



Nilgiri Thar

Also on the way there were many beautiful and rare species of herbs and shrubs. I tried to capture few of the rare flowers.

ID?



ID?



ID?



ID?



ID?



Cynotis Tuberosa / आभाळी


ID?
While coming back from the Eravikulam, my car’s front tyre showed low air pressure. I was equipped with the puncture kit. But I did not find the puncture point. When I started feeling the drift, I decided to take the car on the jack. I changed the wheel and went back to the town to get it repaired. This costed me 1 hour :( . On the same day decided to buy following 2 things before my next long trip – Hydraulic Jack and the Tyre inflator :)


Puncture :(

Due to this we skipped the plan to visit the Tata Tea factory. We had a lunch in one of the nearby restaurants and decided to cover the rest of the points around Munnar. We saw Echo point, Cattle Farm, Mattupetty Dam and Top Station. More than the destination, this road is awesome. On Top station as we reached, it was totally covered with Fog / clouds. I was driving through the clouds. We could not see much from the Top station but did not regret reaching there at all!!


Emerald Beauty



Munnar roads



What's your height



Some Fall Colors



On the top of Mattupetty Dam



Mattupetty Dam



Tea Estate

Green All Around

While coming back, I saw a guard continuously staring at the hill. If he would have been a tourist, I could have ignored him. But I thought, he must be seeing something unusual. I slowed down my car and tried to see in the direction he was looking. I could not see anything. So I decided to pull out my car on the roadside and walked out. To my surprise there were 3 -4 elephants grazing on the grass on the small hillock on my right. That was dream come true. We stopped there for almost 30 minutes to see them grazing along.. Due to me and my camera, many of the tourist started stopping on the road and then I decided to see-off the elephants. 

Wild Elephant



Wild Elephant

It was already 4.30PM when we returned in Munnar. The weather was overcast and there were some lightnings as well. So we thought of heading back to hotel. But saw a board of Kathakalli cultural program on the road. Checked the clock and it was just started at 5PM and we were just 5 minutes late. We ran to the counter and purchased the tickets. It was awesome program. A new experience to all of us!! 


Kathakali

So with immense beauty of nature, wild animals and the cultural program we wrapped up the Munnar trip and headed back to hotel. To all of us, Munnar was the most beautiful place in the Kerala Trip.

Day 4 – We made this as a practice to check out earlier in morning and reach the destination earlier. This principal was followed throughout the trip. We packed the breakfast, had tea and left Munnar at 7 AM. Munnar is even fresher in the morning. While leaving Munnar also we took multiple stops to capture the greenery with layers of fog.

We were on the way to Periyar / Thekadi. The road till Nedumkandam was kind of known to me. There is a big waterfall on the way. Thereafter we took Puliyanmala, Kumili and Thekadi road. 


Goodbye Munnar



Fog playing with the Green!



These views don't allow me to drive..



With Sunlight



Waterfall while saying goodbye to Munnar
Green Landscape





Remote island

The road till Kumili is very scenic. In one of the patches there was a huge fog and it was tough to see beyond 50 meters. On the way we saw many birds like
Emerald Dove, Spotted Dove, Racket Tailed Drongo, Flameback Woodpecker, Roufous treepie, Rock Thrush etc. No pictures :( as I could not handle 2 machines (SX4 and Canon) at the same time ;)


Thick Fog

We reached Periyar at 11. We had booked Periyar House. This place is inside the national park. If you are staying outside, you need to queue up to enter the gate and then you have to purchase the boat ride tickets. My main intention here was the boat ride only. So we did not target any other activities like Elephant ride etc. As we crossed the gate, we were welcomed by the Sambar deers. It was so close that I could capture it in my wide angle lens (18-55). I was excited to see the deer so close. 



Periya Gate



Sambar Deer welcoming us!

There are lot many bonnet macaques in this region. Instructions are written on the hotel windows and doors to keep those closed all the time. These naughty monkeys, who can steal the food from your hand, bags and even from your rooms. Also they come in the windows and try to see if you have any food stuff near the window or anyone interested in feeding them. Here, my kids had some knowledge sharing sessions with them across the window of our room :). 


Bilateral Talks!

I even had seen the monkeys stilling the food stuff from many of the folks. As they come near, many folks throw out the food stuff and try to stay away from them. But now these creatures are so fond of the human food that, I have captured one such Pepsi lover on the tree. thanks God that their brains are not yet developed to open the bottle cap.



Yehi hai Right Choice Baby!!

We had some rest and head out for restaurant as the restaurant inside was not having any seafood available. When we came back inside the jungle gate, I saw the Nilgiri langur for the first time in wild.

We have booked the boat ride at 3.30PM, which is the last one. We enjoyed the afternoon by having a small walk to the backyard of the hotel, where there is a water body behind the thick forest. The hotel was average and maintained by KTDC, the location and the surrounding was awesome.

At 3.30PM, We went for the Boat ride. There are 4 boats of different sizes start from here. I found those overcrowded and bit noisy if you want to see the wild life. But at the start point itself we could see a large sized herd of Sambar deer, Indian Gaur and Elephants grazing across the water body.

Elephant Herd



More Harbivora



Boat Ride!

The boat ride in the jungle was also a nice experience. This boat ride is on the backwaters of the Periyar dam. This dam was built long back by British. On both sides of the water, there is thick forest and is home for many wild animals including tigers and leopards. The sighting of the carnivorous animals is very rare though. The boat guide has seen the tiger way back in September. We saw Wild boars, Turtles, Monitor Lizard and more deer in this journey. We even saw birds like grey heron, common kingfisher, White breasted kingfisher, Grey and White Wagtails, Large Cormorant nesting etc on the way. The view from the boat was very fascinating. But the icing on the cake was the thunderstorm experience in water. The boats are equipped to prevent you from getting wet. The side curtains restricted our view by keeping us dry. But soon in 15 mins the rains were off and the surrounding became more clean and greener.

Classic View



Nature at its best!



Cormorant Nesting



Thunderstorms at Periyar

Day 5- We said good bye to Periyar and started for Allepy in the morning. I took the road as Kumili, Parunthampara, Kuttikanam, Kanjirapalli, Changanaserry, Alapuzha Boat Jetty. The road condition is OK. On this road, I had my first ever meeting with the Kerala RTO. They had their white Innova parked on left side and asked me to stop. I had all required documents with me, so was very confident. But they told me that I was over speeding. As usual, I told them that I was at 40kmpl ;). Then he showed me the person standing on the other side of the road had a speed gun installed on a tripod and was taking reading of all the vehicles. I had seen the board with the road speed of 30 on that road. I asked him what was my speed. He told me 75kmph. Then I asked him what is the speed limit even though I had read it as 30. And to my surprise he told me 70. It was tough to negotiate with the officer who was not very conversant with Hindi and Marathi. So I paid the charges of 400 bucks and kept my car at exactly 70km till I reach Allepy. But I did not see any other Police vehicle till the end of my journey. I took a shopping halt at Changanaserry to pickup lot of banana chips which we actually finished before our return journey :)

We reached hotel after crossing few of the flyovers to see the back waters and some house boats. We reached hotel, took some rest, lunch and then headed to the Jetty from where we took 2 hours of the backwater ride in the Allepy. The boat driver was very kind and had offered my kids to drive the boat. My son did not came out of the driving cabin for more than 1 hr, as he was just enjoying driving the boat. The back water is the river water and meets the Arabian sea. We could see 4 districts of Kerala from the back waters. We had also seen the place where the Nehru snake boat completion gets held every years. Even saw one of the practice snake boats along the journey. People leaving across the canal on back water have built a small ramp and they pump out the water from one side to the canal. That way one side of the water has a level below sea level. There the farmers do rice farming. This place is called as a rice bowl of India and is very famous as that’s the only place where the farming is done below sea level. We got to see the awesome beauty of nature and huge water fronts from the nice cozy boat. By the time we returned, sun was setting and I could capture some of the skyscapes in different colors. From the boat we had seen different birds like pond heron, cormorants, drongo, barbets, flame back woodpecker and egrets. Many people prefer to stay on the house boat. I think you have a good group of 2-3 families, it would be most enjoyable.


Skillful Driver!


Backwaters


Houseboat



Reflections



Rice Bowl of India



Sun sets at Allepy



Sun sets at Allepy


Day 6 -The plan from here was not typical. We wanted to head north to see the Ahirapalli Waterfall. From the images I had seen on the net were forced me to add it in my plan. The road I took to reach here was Alapuzha, Kochi BP, Ernakulam - Vytilla, Chalakudy, Athirapalli Waterfall. Again the road condition to reach here is nice. No hurdles. There is check post before the falls and you have to pay the entry fee for Waterfall entry. A beautiful gate is built of Bamboo near the entrance. The small walk of 10 minutes take you to the place from where you can see the fall from the top. This is more of a side view of the fall and does not give you the real size of the fall. Still the noise it creates can you some idea.. 



Athirapalli

But the real beauty of this massive waterfall can be seen from its bottom. We had to do a climb down the hill to reach to the lower level. From this point you could see the massive size of the fall. You could actually see 3 falls in this season. I think, in Monsoon, this would doubled in size where these 3 falls swells to make it one single huge fall. As you reach down there the small sparkling of the waterfall makes you wet as you go near to it. I think this is one of the biggest waterfalls I have seen in India. As I went close to the fall, my camera started getting wet, so I have to hide it and enjoy the fall. this is the last record shot I took before packing it in my backpack..

Athirapalli Waterfall


Here as well there is lot of nuisance of these monkeys. Our ice cream candies were pulled out by few monkeys, before we could finish those. I found one board called Echo Shop guarded by these Echo Agent :)
Really Eco


Our destination for that night was Valaparai, TN. This was the last point where we should have had our lunch. But we said, lets go ahead and see if we find the food elsewhere. We were wrong, as there are no good hotels on the road and the road goes through thick forest. Thanks to the banana chips which we managed to buy while leaving from Alleppy and some Diwali sweets that my wife had made and packed for this trip. Drive is just awesome on these roads. I enjoyed driving slowly enjoying the scenic beauty along the road.



Roadside


Natural Tunnel

On the way, I had spotted the stork billed Kingfisher across the road. Then I pulled off from the road and took changed the lens on my camera (100-400) to take the shot of this lovely bird. It was far and the overcast weather, did not give me good photos.


Stork Billed Kingfisher

Also on the way, we got to see many Nilgiri Langoors. But these are bit shy. Still I got to catch this fellow on my camera. 



Nilgiri Langur


We reached Valaparai in the evening. We stayed in the one of the home stay, which had a great view. Valaparai is just like Munnar. It had lot of Tea estates and not many tourist. I love such virgin places where there are less of crowd and more of nature. Even the view from my room was amazing..


Valparai

Day 7 - In the morning, we wake up with the chirp of many birds. I got to see the spotted dove on the roof of the neighboring building roof.

Spotted Dove

In the morning we started towards our next destination. It was Wayanad - Sulthan Bathery. In last 2 destinations, its more of the road to the destination than the destination itself. It was again very scenic drive passing through thick foliage. Even spotted the elephant dungs at various places on the road. The route take for this journey was , Pollachi, Palakkad, Mannarkkad, Perinthalmanna, Nilambur, Nadugani, Cherambadi, Vythiri. Other route goes via Ooty. But we had been to Ooty earlier, so decide to go via Nilambur.


Classic Roads of Kerala


But were not very lucky to spot any wild life around. On the road spotted many rubber and palm trees. Palm oil is extracted from the seeds of these palm fruits.


Palm Oil Seed

Day 8 - Wayanad is another nice spot with less number tourists. It had many of the attractions. Edakkal caves was one of the things that we wanted to visit. But the overall journey was taking a toll on the kids. So we skipped the attractions and decided to have only one jungle ride the next day morning. It was the jeep drive through the Muthanga range. It was a 1 hour drive on the bumpy road where none other vehicle than Mahindra jeep can travel. The road was so uneven that I decide to give the rest to my camera. Couple of photographs clicked there are as follows

Wayanad
Tuskar but Tame :(


Spotted Deer

Day 9 - In the afternoon, we discussed about the things to do hereon. We decided that we should now head back. So in the afternoon, post lunch we started our journey back. The planned destination was Hubli. the road take was Manathavady, Kutta, Nagahole, Hunsur, Mysore BP Ring Road, Bellur Cross, Huliyar, Davangere, Haveri, Hubli

We traveled through the Nagarhole National Reserve to Coorg / Mysoor. The place is full of wild life, but could not spot any creatures as it was hot afternoon there. We tried to stop at places to hear the sounds, but the jungle was quiet.

We stopped at Mysore at around 4PM and had lunch. The road till NH4 has lot many speed breakers. Its tough to deal with those in the dark. I could have taken the Bangalore Nice road to hit NH-4. That would have saved my time. But due to the prior experience of Bangalore traffic, I decide against it. I reached Hubli at 12 in night.

Day 10 - In morning we had a grate South Indian breakfast. I think this quality of South Indian food is not available anywhere else. We had multiple dishes of Medu Wada, Paper Dosa, Puri bhaji. After visiting one of our family friends in Hubli, we left Hubli at 12 noon. We stopped at Kolhapur to have a lunch and then left for our final sprint to Pune.




Paper Dosa




From Kolhapur to Pune driving in a daytime is like a playing a cars game on computer. All types of crazy drivers drive on this road. I am not sure what happens to all the drivers as they cross Satara. Most of these drivers drive as if they are racing against Shumi. They can overtake you in the queue at toll gate. You find all those multitasking drivers who feel they can talk on mobile, text friends, listen to loud music, and even smooching and boozing all at 80+ kmph. I can understand some of this behavior as the road from Mahabaleshwar (the place famous for bachelor parties as well as recommended for your 3rd / 4th / later honeymoons) meets NH4 here and all those who don't want to come out of *THAT* mood remain in that mood till they reach Pune ;) . Saving myself from all such craziness, and waiting for 20 minutes each at 2 big toll gates, I reached home by 8 PM. 

And to my surprise, the trip meter at my parking slot showed a magic figure. May be my car also got to know that it was the trip to the "GOD'S OWN COUNTRY".. 

http://icampers-kedar.blogspot.com/2013/11/gods-own-country-kerala-nov-2013.html


दक्षिण भारतातील केरळ हे राज्य तिथल्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. अथांग पसरलेले अनेक सुंदर किनारे, केरळ राज्याची सांस्कृतिक आणि आर्थिक राजधानी अशी बिरुदावली मिरवणारं सुंदर कोची बंदर, आकाशाला स्पर्श करणाऱ्या सुंदर डोंगरांनी नटलेलं मुन्नार; निर्जन कालवे, तलाव व नद्या यांच्या जाळ्यांनी बनलेल्या केरळच्या बॅकवॉटर्सचा परीसस्पर्श झालेलं अलेप्पी शहर आणि यात असणाऱ्या हाउसबोटींच्या साहाय्यानं चालणारा नौकाविहार... अशा अनेक वैशिष्ट्यांनी नटलेलं केरळ राज्य भारतातील रमणीय ठिकाणांपैकी एक समजलं जातं. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन अंदमान निकोबार बेटांनंतर केरळमध्ये होतं आणि मग ते भारतात सर्वदूर पसरतात. हेही केरळ राज्याचं आणखी एक वैशिष्ट्य. ‘ देवांचा प्रदेश’ म्हणूनही ओळख असणाऱ्या या राज्याला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. अनेक अप्रतिम जंगलांनी नटलेलं केरळ राज्य निसर्ग संवर्धनाच्या बाबत भारतातील एक प्रमुख राज्य आहे. वायनाड, आरलम, चिन्नार, इडुक्की, सायलेंट व्हॅली अशी अनेक जंगलं केरळ राज्याच्या सौंदर्यात अधिक भर टाकतात.

या जंगलांत एका जंगलाचं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागेल. या भारतात अस्तित्वात असणाऱ्या जुन्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक, अशीही या जंगलाची ओळख आहे. वेलची डोंगररांगांमध्ये वसलेलं हे सुंदर जंगल म्हणजे ‘ पेरियार व्याघ्र प्रकल्प’. १९३४ मध्ये इथं असणाऱ्या जैवविविधतेचं महत्त्व लक्षात घेऊन त्रावणकोरच्या महाराजांनी या जंगलाला संरक्षित क्षेत्र म्हणून मान्यता दिली. पुढं भारत स्वतंत्र झाल्यावर १९५० मध्ये या जंगलाला पेरियार वन्यजीव अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली. १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्पांची स्थापना झाल्यावर भारतातील नऊ जंगलांना व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून पेरियार जंगलाचं असलेलं महत्त्व लक्षात घेऊन १९७८ मध्ये भारतातील दहावा व्याघ्र प्रकल्प म्हणून या जंगलाला मान्यता देण्यात आली. १९८२ मध्ये सुमारे ३५० चौरस किलोमीटर भागात पसरलेल्या जंगलाला पेरियार राष्ट्रीय उद्यान म्हणून मान्यता देण्यात आली. जंगलात प्रदेशनिष्ठ पक्षी, प्राणी, वनस्पती यांची संख्याही चांगल्या प्रमाणावर आहे. त्यामुळं व्याघ्र प्रकल्पामुळं मिळालेल्या संरक्षणाचा फायदा वाघांबरोबर जंगलातील इतर जैवविविधतेलाही झाला आहे. जंगलात हत्तींची संख्याही चांगल्या प्रमाणात आहे. याचं कारण म्हणजे, १९९८ मध्ये या जंगलाचा समावेश हत्ती संरक्षण प्रकल्पात करण्यात आला.

सुमारे ८८१ चौरस किलोमीटरचा कोअर भाग आणि सुमारे ४४ चौरस किलोमीटरचा बफर भाग मिळून सुमारे ९२५ चौरस किलोमीटर पसरलेल्या या जंगलात आपल्याला मोठ्या प्रमाणावर जैवविविधता पाहायला मिळते. इडुक्की आणि पत्तनमिट्टा जिल्ह्यात हे जंगल पसरलेलं आहे. केरळ राज्यातील दोन महत्त्वाच्या नद्या पेरियार आणि पंपा यांचं पाणी जंगलात पसरलेलं आहे. पेरियार नदीवरून जंगलाला पेरियार अभयारण्य म्हणून नाव मिळालं. १८९५ मध्ये पेरियार नदीवर धरण बांधण्यात आलं. या धरणाचं बॅकवॉटर जंगलात सुमारे २६ चौरस किलोमीटर भागात पसरलेलं आहे. हे बॅकवॉटर जंगलातील वन्यजीवांसाठी महत्त्वाचा पाण्याचा स्रोत आहे. हे बॅकवॉटर आणि त्याच्या आजूबाजूला पसरलेलं सदाहरित, निमसदाहरित जंगल हे दृश्य अत्यंत विलोभनीय असतं. या पाणलोट क्षेत्रातून आपण बोटिंगचाही आनंद घेऊ शकतो. बोटीत बसून आजूबाजूचं जंगल अनुभवायची मजा और असते. फार वन्यजीवनाचं दर्शन आपल्याला बोटीतून जाताना होईल असं नाही; पण नुसतंच जंगल बघण्याचा आनंदही वेगळाच असतो.

पश्चिम घाटातील वेलची डोंगरानं वेढलेल्या या जंगलाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, काही प्रदेशनिष्ठ प्राणी, पक्षी, वनस्पती यांचा आढळ. सिंहपुच्छ माकड, नीलगिरी थार, नीलगिरी वानर असे काही दुर्मीळ जीव आपल्याला पेरियारमध्ये पाहायला मिळतात. केवळ पश्चिम घाटात सापडणाऱ्या काही वनस्पतीही आपल्याला पेरियारच्या जंगलात आढळतात. एकूण सुमारे १९८५ प्रजातींच्या वनस्पती आपल्याला पेरियारमध्ये पाहायला मिळतात, ज्यांपैकी ५१९ प्रजातींच्या वनस्पती प्रदेशनिष्ठ आहेत. नीलगिरी थार ही फक्त नीलगिरी पर्वतरांगांमध्ये सापडणारी, दुर्मीळ होत चाललेली जंगली शेळीची प्रजाती आपल्याला पेरियारमध्ये चांगल्या संख्येनं पाहायला मिळते. तमिळनाडू आणि केरळ राज्यात हा प्राणी जंगलांमध्ये पाहायला मिळतो. तमिळनाडू राज्याचा हा राज्यप्राणी आहे.

स्थानिक भाषेत याला नीलगिरी साकीन किंवा साकीन म्हणून ओळखलं जातं. पश्चिम घाटातील वर्षावन हा या प्राण्याचा अधिवास. पूर्वी मोठ्या संख्येनं आढळणाऱ्या या प्राण्याची संख्या विसाव्या शतकाच्या सुरुवातीला केवळ १०० च्या आसपास राहिली होती. चांगल्या प्रकारचं संरक्षण मिळाल्यामुळं आता सुमारे २००० पर्यंत ही संख्या पोहोचली आहे. केरळ राज्यातील एराविकुलम राष्ट्रीय उद्यानात हा प्राणी सर्वांत जास्त संख्येनं आढळून येतो. अंगापिंडानं सशक्त असलेल्या या प्राण्याच्या अंगावर आखूड केसांची फर असते, मानेभोवती आयाळ असते. नर आणि मादी दोघांनाही शिंगं असतात. नराची शिंगं अधिक वक्राकार असतात. नराचं वजन सुमारे ८० ते १०० किलोपर्यंत असतं, तर खांद्यानजीक उंची सुमारे १०० सेंमी. असते. वयस्कर नराच्या पाठीचा रंग हळूहळू करडा होतो, ज्यावरून नर सहजपणे ओळखता येतात. सुमारे १२०० ते १६०० मीटरच्या उंचीचा पठारी भाग हे यांचं आदर्श निवासस्थान. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे, शोला जंगलांमध्ये यांचा आढळ आहे. त्यामुळं या प्राण्यांचं संवर्धन करायचं असेल, तर अगोदर दोन डोंगरांमध्ये अडकलेला जंगल प्रकार अर्थात शोला वन वाचवणं अधिक गरजेचं आहे.

पर्वतरांगांनी वेढलेल्या पेरियार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेलं हे पेरियार जंगल अप्रतिम जैवविविधतेचा खजिनाच आहे. निसर्गाचा हा सुंदर आविष्कार पाहणं म्हणजे निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच. निसर्गाचे नानाविध रंग आपल्याला या जंगलात पाहायला मिळतात. दरवर्षी तुफान पडणारा पाऊस, उंचच उंच डोंगर, कड्यावर कोसळणारं पाणी, घनदाट अरण्य, डोळ्यांचं पारणं फेडणारं पेरियार नदीचं रूप आणि यात ठायी ठायी भरून असलेली जैवविविधता यामुळं आपण पेरियार जंगलाच्या प्रेमात पडतो. वाघांची चांगली संख्या असणाऱ्या या जंगलाला वाघांबरोबर हत्ती, नीलगिरी थार, नीलगिरी वानर या प्राण्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीनंही अनन्यसाधारण महत्त्व आहे. इथं आलो की निसर्गाचं दान ओंजळभरून घ्यावं. हे निसर्गाचं दान म्हणजे श्रीकृष्णाच्या अक्षय थाळीसारखं आहे, ते कधीच कमी होणारं नाही. निसर्गाचा हा दानपसा आपल्याला अधिक समृद्ध करून टाकेल यात कोणतीही शंका नाही.

csi cathedral kozhikode

Rate This


Cathedral built in 1856

A beautiful church built in the nineteenth century in Kozhikode… close to the Mananchira square. It combines the European and Kerala style of architecture and was built by the German missionaries from Basel.

wikipedia image by Rupesh DG

There is a serene lake and garden with interesting sculptures in the area, it is a pleasant walk to take on an evening.


  • There is so much to see in every corner of India … all we need is open eyes and open mind…

    an ode to mishkal mosque

    Rate This


    A calm quiet suburb in Kozhikode around the Kuttichira lake and the walk on the seashore is enchanting … especially listening to the sound of the sea and witnessing the sun set over the Arabian sea.

    Kozhikode beach

    The Thekkepuram beach is comparatively quieter than the beach closer to the city centre, but perhaps a bit unclean due to trash thrown by the locals and the tourists. But walking around in this area reveals a different side of Kozhikode city

    Nakhuda Mishkal mosque

    This minimal but elegant looking mosque is an important site in terms of Islamic architecture of southern India. No minarets, no domes, no cupolas … but a balanced wooden structure of 4 stories built in Kerala style. This mosque was built by the trader Mishkal in the 14th century and it was damaged during the Portuguese attack thanks to arson. It was rebuilt again in 1510 CE. This mosque has 47 gates, 25 pillars and a large prayer hall that can accommodate around 400 people for Namaz.


  • The mosque was restored by the Hindu king Samoothiri or Zamorin and it is an important landmark in India’s maritime history.

    https://chinmaye.com/2019/07/05/an-ode-to-mishkal-mosque/

     
     

    रामायणाच्या पाऊलखुणा....

    चार पाच महिन्यांपूर्वी जेव्हा यावर्षीची वार्षिक कौटुंबिक सहल कुठे न्यायची असा विचार करत होतो, तेव्हा अचानक दहा वर्षांपूर्वी टाटा मध्ये असताना निखिलने सुचवलेल्या वायनाड ची आठवण झाली. लग्नाआधी माझ्या केरळ वाऱ्या दोन तीन झाल्या होत्या पण लग्नानंतर एकही नाही. त्यामुळे केरळ आणि कर्नाटक अशी मोपल्यांच्या बंडाची सुरुवात जिथे झाली ते वायनाड- काबिनी - कुर्ग - मडीकेरी-म्हैसूर- बंगलोर अशी भरगच्च ट्रीप ठरवली.

    खरेतर वायनाड हे तसे फार प्रसिद्ध नाही. पण नेमके राहूल गांधींनी अमेठी बरोबर हा मतदारसंघ निवडला आणि ते एकदम प्रकाशझोतात आले. आमच्या ट्रीपची सुरुवात आम्ही पनवेल- कोझीकोड (कालिकत) अशा रेल्वे प्रवासाने केली. त्यामुळे रात्रभर रेल्वेचा प्रवास आणि नंतर तीन तास रोडचा प्रवास करुन मुले वैतागली होती. त्यामुळे उरलेला पहिला दिवस हा आराम करण्यातच घालवला. त्यावेळी काय काय पहायचे याचा अभ्यास करताना एकदम सीतादेवी - लव कुश मंदिराने लक्ष वेधून घेतले. ड्रायव्हरला विचारले तर त्याला काहीच माहिती नाही. पण त्याला दाखवल्यावर आणि गुगळे मॅप्स वर बघितल्यावर सकाळी लवकर यायला तो यायला तयार झाला. सकाळी म्हणजे पहाटेच कारण हे एकदम वेगळ्या वाटेवर आणि तासाभराच्या अंतरावर असल्याने, उशिरा गेलो तर आमचे दिवसभराचे गणित चुकणार होते. पण लव- कुश मंदिर हे वाचूनच मी बाकी कुठे नाही गेलो तरी चालेल पण इथे जायचेच हे ठरवून टाकले.

    लवकर झोपलेलो असल्याने पहाटे पाचलाच जाग आली. त्यामुळे आमच्या दोघांचे आवरुन आणि मुलांना झोपेतच उचलून, आम्ही वायनाड- पालुपल्ली प्रवासाला सुरुवात केली. बोलता बोलता ड्रायव्हरही म्हणाला की मी पाचशे वेळा वायनाडला आलो असेन पण पालुपल्लीला आणि पर्यायाने या मंदिरात पहिल्यांदाच चाललोय.

    तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही त्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी पोहोचलो. फोटोत बघितलेल्या मंदिरामुळे माझी उत्सुकता फारच वाढली होती. आणि मंदिराच्या त्या पहिल्या प्रत्यक्ष दर्शनाने तर आपण इकडे यायचा अगदी योग्य निर्णय घेतला याचे समाधान वाटले. सकाळचे रम्य वातावरण आणि ते अप्रतिम असे मंदिर यामुळे आमच्या ट्रीपची सर्वार्थाने मस्त सुरुवात झाली होती.

    मंदिरात आवारात प्रवेश केल्यावर समोरच सीतादेवीचे मंदिर आहे. सकाळच्या आरतीची वेळ असल्याने मंदिरातल्या सगळ्या समया पेटवलेल्या होत्या. त्याची अद्भूत अशी आरास डोळ्यांचे पारणे फेडत होती. त्या प्रकाशात सीतामाईही अगदी उजळून निघाली होती. त्याच्या शेजारीच लव- कुशांचे दाक्षिणात्य शैलीतील मंदिर आहे. त्यांच्या मूर्ती अगदी वेगळ्या अशा होत्या. त्याबरोबरच गणपती, नागदेवता, शिव, अय्यप्पा आणि सुब्रमण्यम यांचीही छोटी छोटी मंदिरे त्या आवारात आहेत.

    तिथून बाहेर पडताना, भिंतीवर लिहिलेल्या स्थानमहात्म्याने एकदम रोमांचित झालो. आणि तिथेच काही लिखित माहिती मिळेल का असे विचारले. तिथे एक छोटेसे दहा पानी मल्याळम भाषेतील माहितीपुस्तिका मिळाली. नशिबाने शेवटी एक पान इंग्रजी मध्ये होते आणि त्यामुळे या पवित्र स्थानाची बऱ्यापैकी माहिती कळली.

    ही जागा म्हणजे रामायणातील वाल्मिकी आश्रम. इथेच सीतेने लव-कुशाला जन्म दिला. आणि अश्वमेध यज्ञासाठी प्रभू श्रीरामांनी सोडलेल्या अश्वाला या दोघांनी इथेच अडवले होते. पूर्वीच्या काळी हा सगळा परिसर जवळपास पंधरा हजार एकरांचा होता. पण आता मात्र फारच थोडा परिसर उरला आहे. ही जी मंदिरे होती त्यालाच वाल्मिकी आश्रम किंवा पूर्व स्थानम् असे म्हणतात. भिंतीवर लिहिलेल्या चार ओळींमध्ये शेवटची ओळ होती की इथूनच जवळ असलेल्या मूलस्थानम् ला भेट दिल्याशिवाय तुमची यात्रा आणि दर्शन पूर्ण होणार नाही. आलोच आहोत तर जाऊच या म्हणून मग गाडी तिकडे वळवली.

    पाच मिनिटांवर असलेले ते ठिकाण म्हणजे रामायणातील एक अद्भूत ठिकाण आहे. कारण संपूर्ण रामायणातील ही एकमेव जागा आहे जिथे श्रीराम, सीतामाता, लव-कुश, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, वाल्मिकी ऋषी, हनुमान आणि इतर देवता यांची भेट झाली. पूर्वी वाल्मिकी आश्रमाचाच भाग असलेल्या या ठिकाणी सीतेने अग्निपरीक्षा दिली आणि ती धरणीमातेला शरण गेली. त्यावेळी तिला वाचवण्यासाठी रामाने तिचे केस पकडले पण त्याच्या हातात फक्त केस राहून सीता मात्र भूगर्भाच्या उदरात गेली. त्यामुळे तिथे केस नसलेल्या सीतेच्या मूर्तीची पूजा करतात.

    हे सगळे माझ्यासाठी अद्भुतच होते. कुणीही कितीही प्रयत्न केला तरी आपली ही पुरातन संस्कृती आणि त्यातील दैवते ही वेगवेगळ्या रुपात आपल्यासमोर येतच रहातात. अगदी अनपेक्षितपणे हा पुरातन सांस्कृतिक ठेवा आमच्या समोर आला आणि आमच्या वार्षिक सहलीची सुरुवात ही रामायणमय झाली. पुढच्या वेळी कुणी आले तर मी याठिकाणी मी नक्की घेऊन येणार असे आमच्या ड्रायव्हरच्या तोंडून ऐकून तर या संपूर्ण सहलीचे फळ पहिल्या तीन तासातच मिळाले. तुम्हीही कुणी वायनाडला आलात तर या ठिकाणी अगदी न चुकता भेट द्या.

    हृषीकेश कापरे
    ०३.०६.१९

    Friday, February 9, 2024

    मुन्नार: किंग ऑफ हिल स्टेशन

     


     -राकेश साळुंखे

    केरळला ‘देवभूमी’ का म्हणतात, हे तिथे गेल्यावर कळते . हिरवागार निसर्ग , सुंदर समुद्र किनारे , बॅक वॉटर , प्राचीन देवळे , आयुर्वेदिक औषधे व पंचकर्म चिकित्सा  , कथकली हा नृत्यप्रकार यासाठी तर केरळ प्रसिद्ध आहेच सोबतच  मैलोनमैल पसरलेल्या चहाच्या मळ्यांनी हा प्रांत अधिकच देखणा झालं आहे . केरळ भेटील  King of Hill station असा ज्या स्थळाचा उल्लेख होतो, त्या मुन्नारला भेट देणे अजिबात चुकवू नये.  मुन्नार हे माझे सर्वात आवडते Hill-station आहे. मी पाहिलेल्या  कर्नाटक , तमिळनाडू , दार्जिलिंग व श्रीलंका येथील चहाच्या मळ्यांपेक्षा सर्वात सुंदर चहाचे मळे मुन्नारमध्येआहेत.

    मुन्नार हे कोचीपासून १२८ किमी म्हणजे रस्त्याने चार तास अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी बसेस किंवा खाजगी वाहन हाच पर्याय आहे . बरेचजण मुन्नार-थेक्कडी असा एकत्रित प्लान घेतात. मुन्नारला जायचे म्हणजे किमान दोन दिवस तरी हवेत. कोचीवरुन मुन्नारला निघालो की काही अंतरावर घाट लागतो  . घाट चालू  झाल्यावर वाटेत दोन धबधबे लागतात. एक ‘चियपारा’ आणि दुसरा ‘पायकारा’. चियपारा येथे आपण धबधब्यात भिजण्याचा आनंद घेऊ शकतो. ऑगस्ट महिना असेल तर वाटेत छोटे-छोटे बरेच झरे लागतात. या निसर्गरम्य प्रदेशातून  आपण पुढे पालीवासळला येतो. येथेही मोठा धबधबा असून तेथे दोन वर्षापूर्वीपर्यंत फार जुना असा लाकडी पूल होता. दोन वर्षापूर्वीच्या महापुरात हा पूल वाहून गेला. आता हा पूल नसल्याने धबधब्याकडे जाता येत नाही. त्याच्या जवळच बायसन-व्हॅली ही अतिशय सुंदर व्हॅली आहे. चहाच्या टेकड्या व मसाल्यांचे मळे असलेल्या या भागात बरेच रिसॉर्ट आहेत. मुन्नार गावातील हॉटेल्सपेक्षा येथील मुक्काम चांगला.

    या वाटेवर बरेच मसाल्यांचे मळे लागतात. प्रत्येकी १००रु एंट्री फी  देऊन आत जाता येते . आतमध्ये Group-wise एक guide असतो. तो अनेक मासाल्यांची झाडे दाखवतो व त्याबद्दल माहिती देतो. Stevia, ज्याचे पान साखरेपेक्षाही कित्येकपटीने गोड असणारी वनस्पती व little-apple ही वनस्पती पहिल्यांदाच येथे पहिली. या गार्डन मध्ये खरेदी करताना मात्र चौकसपणे करावी . मुन्नार पाहताना प्रथम टॉप स्टेशनच्या दिशेने गेलेले चांगले. मुन्नार शहरातून वर निघाल्यावर घाट सुरू झाल्यानंतर Botanical garden आहे. खरंतर ही फुलांची बाग आहे. विविध फुले पाहत पाहत वर्तुळाकार फिरत फिरत आपण बाहेर पडतो . त्यानंतर वर जाऊ लागतो तसे चहाच्या मळ्यांनी आच्छादलेल्या  हिरव्यागार डोंगररांगा दिसू लागतात. डावीकडे फोटोपॉइंट म्हणून चहाच्या टेकडीच्या पार्श्वभूमीवर फोटो घेण्याचे सुंदर ठिकाण लागते. जसे बहुतेक पर्यटनस्थळी Instant photo प्रिंट देणारे photographer आढळतात तसेच येथेही आढळतात. चहाच्या मळ्यातल्या कामगारांची टोपली व त्यांच्या डोक्यावर असते तशी टोपी घालून येथे फोटो काढून देतात. तेथून मध्ये-मध्ये थांबत थांबत आपण त्या चहाच्या मळ्यांची विलोभनीय दृश्य पाहत टेकडी चढून वर जात असताना ज्यांना चहाची आवड आहे ते तेथे ताज्या चहाचा आस्वाद घेऊ शकतात. वर चढून गेल्यावर कन्ननदेवन हिल्सची चहाची फॅक्टरी आहे. आपण ही फॅक्टरी १००/- रु एंट्री फी देऊन पाहू शकतो व निरनिराळ्या चवीचा चहा चाखू शकतो , मात्र ते फुकट नाही. येथे चहाची खरेदीही करता येते. या फॅक्टरीमध्ये छोट्या छोट्या ग्रुपने सोडले जाते त्यामुळे आपल्याला थोडावेळ रांगेत उभे राहावे लागते. आतील माहिती देण्याकरिता एक माणूस नेमलेला आहे. तसेच तेथे स्क्रीनवर एक छोटा माहितीपटही दाखवला जातो.
    येथे गेल्यावर चहाबद्दल मला बरीचशी माहिती कळली. जसे की, सुमारे दर २१ दिवसांनी चहाच्या पानांचा खुडा घेतला जातो. त्यापैकी मोठी पाने नेहमीच्या वापरातील चहासाठी तर एकदम कोवळी पाने ग्रीन-टी बनवण्यासाठी वापरतात. या चहाच्या झाडांचा शेंडा व्हाइट-टी बनवण्यासाठी वापरतात. चहा हे झुडूप स्वरूपात दिसत असले तरी ते झुडूपवर्गीय नसून त्याचे मोठे झाड होते परंतु त्याची नियमित छाटणी केल्याने ते आपल्याला छोट्या स्वरूपात पाहायला मिळते. चहाच्या झाडाचे आयुष्य १०० वर्षे असते.

    या फॅक्टरीमध्ये चहाची पाने आत कशी आणतात यापासून त्याचे वर्गीकरण करून पॅकिंग करेपर्यंतची सर्व प्रक्रिया पाहायला मिळते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चहाची पाने अर्धादिवस सुकवून पुढे बारीक बारीक केली जातात. ही प्रक्रिया ज्या पट्ट्यावर पाने ओतली जातात तो पट्टा पुढे सरकत असताना घडत असते. Hopper वरुन पुढे सरकत असताना पानांचे बारीक तुकडे केले जातात. त्यानंतर fermentation केले जाते, त्यापुढे बॉयलरने हीट देऊन किनवण प्रक्रिया केली जाते. आता चहाचा रंग तपकिरी झालेला असतो. तो पुढे त्याच्या गुणवततेनुसार विभागला जातो व त्याचे पॅकिंग केले जाते. मोठा असतो तो उत्तम प्रतीचा मानलो जातो व dust असतो तो कमी प्रतीचा मानला जातो. जगभर मध्यम गुणवत्तेचा चहा जास्त प्रमाणात वापरला जातो. KDHPचा चहा ‘Ripple’ या ब्रॅंड-नेम ने विकला जातो. त्याव्यतिरिक्त तो मोठ्या कंपन्यांनाही विकला जातो. चहाच्या कारखान्यातून बाहेर पडलो की या मार्गावर मथूपेट्टी नावाचे धरण लागते. हे धरण उथिरापुझ्झा, चंदूवऱ्हाई आणि कुंडळे या तीन नद्यांच्या संगमावर आहे. या धरणातील पाण्याने जलविद्युत निर्मिती केली जाते. या धरणाच्या valve वरूनच पुढे जावे लागते. या धरणाच्या दरवाज्यातून सोडलेले पानी हे वरील valve वरुन पाहणे हा एक विलक्षण अनुभव आहे. या धरणापसून ते पुढे echo-point, कुंडला-धरणापर्यंत आपण महाराष्ट्रात आहोत की काय असे वाटावे  इतके मराठी ऐकू येते. येथे बहुतांश पर्यटक महाराष्ट्रातील असतात.  ‘Echo-point’ हे अत्यंत गर्दीचे असे ठिकाण आहे. येथे बोटिंग इत्यादि activity व खरेदीसाठी खूपशी छोटी छोटी दुकाने आहेत. येथील पाण्याच्या पलीकडील बाजूस निलगिरीचे जंगल आहे व त्यामागे पहाडी भाग आहे. त्यामुळे येथे जोरात ओरडले की आवाजाचा प्रतिध्वनि (Echo) ऐकू येतो. बरेचजण या गोष्टीची प्रचिती घेत असतात.
    या ठिकाणच्या पुढे बऱ्याच पर्यटन संस्था पर्यटकांना नेत नाहीत. तिथे वनखात्याचे तपासणी केंद्र आहे, त्यामुळे कदाचित मोठ्या वाहनांना सोडले जात नसावे पण खरेतर पुढेच चहाचे सुंदर मळे आहेत.

    ‘Echo-Point’ वरून पुढे निघालो की कुंडले नदीवरील कुंडला धरण लागते. इथे water sports आहेत तसेच घोड्यावरून सैरसपाटा मारता येतो. येथे प्रदूषण होऊ नये म्हणून सर्व Boats या Paddle-boats आहेत, तसेच येथे तराफेही आहेत. बहुतांश पर्यटक येथूनच परत जातात. ज्यांना माहिती आहे ते पुढे top-station पर्यन्त जातात. वाटेत खूप सुंदर ठिकाणे आहेत. आपण गाडीतून  जात असताना आपल्याला खूपदा खाली उतरण्याचा मोह आवरता येत  नाही त्यामुळे खरंतर चालतच जावे असे वाटते. पुढे छोटी खिंड लागते, ज्यापासून जवळच तामिळनाडू राज्याची सीमा आहे.
    मी व माझे पुतणे एकदा इकडे गेलो असता, फोटो काढण्यासाठी या खिंडीतील चहाच्या मळ्यात गेलो . चालत असताना माझ्या एका पुतण्याच्या पायाला जखम झाली व त्यामधून रक्त येऊ  लागले . त्या परिस्थितित त्याला साप चावला असावा असे वाटले . आम्ही व तेथील चहाच्या टपरीवरील एक वृद्ध व्यक्ती ती जखम साप चावल्याने झाली आहे का हे निरखू लागलो. नंतर ती जखम ही चहाच्या झाडाची वाळलेली  फांदी लागल्याने झाली आहे असे लक्षात आले . परंतु त्याच्या मनातील सर्पदंशाची शंका मात्र दूर होईना. आम्ही समजूत काढूनही काही उपयोग झाला नाही . मग मात्र आम्ही परत माघारी फिरायचे ठरवले. परतीच्या मार्गावरील चहाच्या मळ्यातील सुंदर अशी दृश्ये पाहून ही घटना त्याच्यासह सर्वजणच  विसरले व पुनः एकदा सर्व जण या मळ्यांचे सौंदर्य निरखण्यात मग्न झाले.

     या खिंडीच्या पुढे तामिळनाडू राज्याच्या हद्दीत एक कडा आहे त्याला Top-Station म्हणतात, येथे गाडी पार्क करून अर्धा किलोमीटर पुढे चालत गेल्यावर Watch-station लागते त्यावरून दिसणाऱ्या सभेवतालच्या दृश्यापेक्षा पुढे अर्धा एक किलोमीटर खाली उतरून गेल्यावर आपल्याला खरा निसर्ग अनुभवता येतो येथे डोंगर-दऱ्यांना न्याहाळत पायवाटेने आपण जस जसे खाली उतरू लागतो  तसे दरीतील पशुपक्ष्यांचे आवाज आपल्याला स्पष्टपणे कानावर पडू लागतात. येथून पुढचा भाग निर्मनुष्य असल्याने येथील जंगल सुस्थितीत आहे. दरीतून येणाऱ्या शुद्ध हवेने आपण ताजेतवाने होतो. तेथील नीरव शांतता आपल्या मनालाही शांती देऊन जाते. तेथून माघारी फिरावेसे वाटत नाही. येथून जेवणासाठी थेट मुन्नारलाच जाणे गरजेचे असते. कुंडला डॅम किंवा Echo-Point-ला खाद्यपदार्थांच्या छोट्या टपऱ्या आहेत पण तेथे खाण्यापेक्षा उशीर झाला तरी मुन्नारमध्येच जेवायला जावे.

      दुपारच्या Session मध्ये राजमला म्हणजे एरावीकुलम नॅशनल पार्कला जावे. तेथे निलगिरी ताहर हा केरलचा राज्यप्राणी कळापाने दृष्टीस पडतो. हा प्राणी  बोकड व हरिण यांच्या मिश्रणासारखा दिसतो . बोकडासारखा आकार, दाढी पण हरणाचे तोंड व हरणांसारखाच रंग. संध्याकाळी मुन्नार गावाच्या सुरुवातीला KDHP चे Outlet आहे. तिथे चहा खरेदी करण्यासाठी भेट द्यावी . हे कन्ननदेवन हिलस् येथील चहाच्या फॅक्टरीचे Outlet आहे. मुन्नारला चहाची अनेक दुकाने आहेत परंतु तेथे  फसवणुकीची शक्यता जास्त असते . गावातील काही दुकानात  सुंदर चवीची , ताजी होममेड चॉकलेटस् मिळतात . मुन्नार येथे ‘हॉटेल सरवना’ म्हणून एक प्रसिद्ध रेस्टोरंट आहे, ते येथे येणाऱ्या पर्यंटकांत खूप प्रसिद्ध आहे. तेथे मिळणाऱ्या साऊथ इंडियन पदार्थांची चव बरेच दिवस जीभेवर रेंगाळत राहते आणि आठवण आली तरी तोंडाला पाणी सुटते . मी येथे प्रथमच कमळाच्या आकाराचा डोसा खाल्ला होता.

    दुसऱ्या दिवशी Thunder-world व जीप सफारी करावी , पोनमुडी डॅमच्या दिशेने ही सफारी असते. दरीतील चढउतार अनुभवत सिंगल रोडने ही जीप सफारी होते. या वाटेवर थोडे कॉफीचे मळेही लागतात. चहाचे मळे कमी व दाट झाडीमध्ये कॉफी व मसाल्याची झाडे दिसतात. मिरीचे वेल झाडावर चढवलेले असतात. खास मसाला गार्डन पाहायला गेलो नाही. कारण या वाटेवर वेलदोडा, मिरी, दालचीनी, ई. अनेक मसाल्यांचे छोटे-छोटे मळे दिसतात. वेलडोद्याची झाडे हळदीसारखी असून त्याला जमिनीपासून तुरे येऊन त्याला  वेलदोडे लागतात. साधारणपणे झाडाझुडपांच्या शेंड्याला फुले येऊन फळे येतात हा नेहमीचा अनुभव पण हा प्रकार मी  येथे पहिल्यांदा पाहिला  तेव्हा अचंबित झालो . Silver-Oak च्या झाडावर चढवलेल्या मिरीच्या वेलावरील मिरी कशी काढतात ही सुद्धा उत्सुकता होती तेव्हा मिरी एक विशिष्ट शिडीने काढताना पहिली. या जीप सफारीमध्ये दरीत खाली उतरून गेलो की Ripple Waterfall लागतो. पावसाळ्याव्यतीरिक्त इतरवेळी खाली उतरून धबधब्यासामोर जाता येते. येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही सोयी केल्या आहेत.

    Ripple-Waterfall  पाहिल्यानंतर  चढ चढत असताना  एका वळणावर दक्षिण भारतातील सर्वात जुना झुलता पूल लागतो. तसेच थोडे वर पोनमुडी डॅमची भिंत लागते. येथे बऱ्याच सिनेमांचे चित्रीकरण झालेले आहे. धरणाच्या भिंतीवर जायला आपल्याला परवानगी वगैरे काही लागत नाही. मुन्नार मधीत एक वैशिष्ट्य आहे कि येथे बहुतांश सर्व धरणांवर जाता येते. येथेही पुढे एक इको पॉइंट आहे .पोनमुडी धरणाच्या बॅक वॉटरच्या कडेला प्रचंड उंच निलगिरीची झाडे असून त्यापुढे पाण्यापर्यंत लाँन सारखे  गवत सर्वदूर पसरलेले आहे. अशा नयनरम्य ठिकाणी सिनेमांचे चित्रीकरण झाले नसेल तर नवलच ! तेथून पुढे एकदम डोंगरमाथ्यावर गेले की तेथून सभोवतालचा संपूर्ण परिसर दिसतो. डोंगररांगा व दरीमध्ये असणाऱ्या दाट झाडीमधल्या नारळी पोफळीच्या बागा दिसतात. संध्याकाळची वेळ असेल तर सूर्यास्त बघूनच परतीच्या मार्गी लागावे.

      आम्ही एकदा तेथे जीपने गेलो होतो. गाडी चालवणारा एक स्थानिक मुलगा होता, तो वाटेत  तेथील बरीच माहिती सांगत होता . मुलगा एकदम चुणचुणीत वाटला .  येथील जवळच्याच खेड्यातील राहणारा होता. त्याच्या बोलण्यातून समजले की सिझन मध्ये एका दिवसाला त्याला ४००रु मिळतात . इतरवेळी मात्र पोट भरण्यासाठी काही छोटीमोठी कामे करावी लागतात . परंतु नोटबंदीनंतर पर्यटक बरेच कमी झाल्याने सिझनलाही फारशी कमाई होत नाही. येथील  स्थानिक लोकांचा रोजगार हा बराचसा पर्यटकांवरच अवलंबून असल्याने नोटबंदी नंतर तो अडचणीत सापडला आहे.
    येथे केरळीयन मसाजची सोय देखील आहे . केरलीयन मसाज जगप्रसिध्द आहे . पण मित्रांच्या बाबतीतील मसाजसंदर्भात घडलेला किस्सा आठवून ही सुविधा मात्र  मी प्रत्येक वेळी टाळत असतो . माझे  हे ५-६ मित्र केरळला गेले होते त्यातल्या दोघा तिघांना मसाज करून घ्यायची हुक्की आली. हॉटेल चांगलेच होते, त्यामुळे मसाजही चांगलाच होईल हा त्यांचा कयास. चांगल्या हॉटेलमध्ये मसाज करायचा असल्याने तिघेही जण बिनधास्त ! सुरुवातीला एक जण मसाज करून आला, बाहेर आल्यावर त्याला सर्वांनी विचारले की कसा होता अनुभव, तर तो म्हणाला की चांगला मसाज होतोय, खूप Relax वाटतय. ते बघून दुसराही गेला व बाहेर आल्यावर त्यानेही तेच उत्तर दिले. असे करून तिघांनीही मसाज करून घेतला. कसे वाटते तर छान . असेच या तिघांचेही उत्तर. परंतु जेव्हा दुसऱ्या दिवशी एकाला अंगदुखी सहन होईना तेव्हा तो कण्हत पहिल्या दोघांना म्हणाला, “काय राव  स्पष्ट सांगायचे नाही का? कणिक तिंबल्यासरखे तिंबलय! कसला मसाज आणि कसले काय !” सगळे अंग दुखतंय .  ज्यादा पैसे देऊनही शास्त्रोक्त पद्धतीने मसाज न होता फक्त तेलाने अंग रगडणे यालाच मसाज म्हणतात की काय असे त्यांना वाटले . त्यानंतर संपूर्ण प्रवासभर केरळीयन मसाजचे नाव निघाले की सर्वजण मनमुराद हसून घेत व अजूनही हसू फुटते. त्यामुळे व्यवस्थित माहिती घेवूनच मसाज घ्या.
    केरळला कितीदाही वेळा भेट दिली तरी मन भरत नाही . दरवेळी वेगळा अनुभव देणारे केरळ खरोखरच देवभूमी आहे.

     

    अगस्त्यकुडम! केरळ

     https://www.maayboli.com/node/85344

    अगस्त्यकुडम

    डिसेंबर २०१६:
    वेळ: पहाटे साडे चार.
    स्थळ: तिरुअनंतपुरम मध्यवर्ती बस स्थानक (अर्थात 'तंपानुर'), चौकशी खिडकी.
    संभाषणासाठी कमीत कमी शब्द आणि जास्त हावभाव हे धोरण आम्ही ठरवलं होतं, त्यानुसार:
    Bonakkad bus?
    त्यावर बोटानी इशारा आणि 'Platform number 9'.
    विशेष म्हणजे platform number 9 ला चक्क बस उभी होती.
    पाटीवर ठळक अक्षर मल्याळी असलं तरी बारीक अक्षरात इंग्रजीत पण नाव लिहिलं होतं: Bonakkad.
    चला, एकदाची योग्य बस गाठली! आत जाऊन पाठपिशव्या ठेवून जागा पकडल्या. बस ५ वाजता सुटणार असल्याने निवांत चहा घेता आला. पुण्यातल्या थंडीच्या मानानी तिथे दमट हवेमुळे उकडत होतं.

    रीतसर ५ वाजता बस हलली आणि १०-१५ मिनिटात थंडी वाजायला लागली. तेव्हा लक्षात आलं की कुठल्याच खिडकीला काचा नाहीयेत! दुकानाच्या शटर सारखं खिडकीला शटर होतं, पण ते पूर्ण बंद होईना. बस पुढे जाईल तशी थंडी वाढायलाच लागली. तासा दीड तासानी बस कुठे तरी (चहासाठी) थांबली तेव्हा जरा बरं वाटलं. बोनाक्कड यायला अजून किती वेळ होता कोण जाणे.
    २ तासात बोनाक्कड येतं असं वाचल्याचं आठवत होतं खरं. पण खाली उतरून बघितलं तर आजूबाजूला डोंगरांचं काहीच चिन्हं दिसत नव्हतं. पण उतरल्यामुळे इतकं कळलं की गावाचं नाव वितुरा आहे. खूप वेळ थांबून एकदाचे चालक-वाहक आले. तिथून निघाल्यावर ५ मिनिटात एका फाट्यावर उजवीकडे वळलो आणि जवळ जवळ लगेच घाट सुरु झाला की! एव्हाना बरंच उजाडलं असल्यामुळे आता डोंगर आणि झाडी दिसायला लागले. लवकरच घनदाट जंगल सुरु झालं. आता जरा ट्रेक ला जातोय असा वाटायला लागलं!

    अगस्त्यकुडम!
    ७-८ वर्षांपूर्वी कुणा केरळी माणसानी पोस्ट केलेले फोटो पहिले होते तेव्हापासून निश्चय होता की एकदा जायलाच पाहिजे. समुद्रसपाटीपासून १८६६ मीटर उंचावरचं हे शिखर. तिथे अगस्त्य ऋषींचा पुतळा आहे आणि ते तामिळ लोकांचे भक्तिस्थान आहे. अगस्त्य ऋषींनी तामिळ भाषेचं व्याकरण तयार केलं म्हणे. असेल बुवा. आमच्यासाठी तर कोणताही देखणा डोंगर म्हणजे भक्तिस्थान आहे!
    नेट वरून माहिती कळली होती की केरळ वन खात्याची परवानगी घ्यायला लागते. एका मल्याळी सहकाऱ्याच्या मदतीनी वन खात्याला फोन केला आणि demand draft (रु.४३००/-, ३ जणांसाठी) पाठवून ते सोपस्कार पार पाडले. आणी आता बसमध्ये बसून बोनाक्कडची वाट बघत होतो. बोनाक्कड पासून शिखरमाथा तब्बल २८ किमी आहे. पहिल्या दिवशी बोनाक्कड ते अतिरुमला (Athirumala)अशी २१ किमी चाल होती. दुसऱ्या दिवशी शिखरमाथा गाठून यायचं आणि मुक्काम पुन्हा अतिरुमला. तिसऱ्या दिवशी पुन्हा २१ किमी उतरून बोनाक्कड असा बेत होता.

    एव्हाना असं कळलं की बोनाक्कड वरचं, खालचं, मधलं असे २-३ थांबे आहेत! त्यातला आमचा थांबा कोणता? सुदैवानी तेव्हढ्यात मास्तरांनी इशारा केला की अगस्त्यकुडम वाले इथे उतरा! हे बहुतेक मधलं बोनाक्कड होतं.
    उतरताना त्यानी उजवीकडे हात दाखवला होता, त्याप्रमाणे आम्ही चालू लागलो. ३ मिनिटात एक धबधबा! त्यावरील पूल ओलांडून पलीकडे लवकरच ७-८ घरांची एक वस्ती होती. आम्हाला पाहून एका आजीबाईनी (मल्याळी भाषेत) चौकशी केली. आम्ही अगस्त्यकुडम म्हणताच त्यांनी जी २-३ वाक्यं बोलली त्यातलं एक अक्षरही कळलं नाही, पण त्यांचा एकंदरीत आविर्भाव असा होता की 'तुम्ही जाऊ शकत नाही'! तेव्हा आम्ही वन खात्याच्या परवानगीचा प्रिंट आउट खिशातून बाहेर काढला. एव्हाना आणखी एक इसम आला होता त्याला तो दाखवला. त्याला इंग्रजी वाचता येत होतं की नाही कोण जाणे. पण तो म्हणाला की तरी सुद्धा आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही आधी चेकपोस्ट ला जाऊन या कागदावर शिक्का मारून आणला पाहिजे. चेकपोस्ट कुठे आहे? तर म्हणे आलो त्याचं वाटेने १५ किमी मागे! आलो त्याचं बसनी आम्ही परत चेकपोस्टला जावं असा त्याचा सल्ला (खरं तर आग्रह किंवा हट्ट) होता. समजा गेलो, तर पुन्हा काय १५ किमी चालत यायचं की काय? कारण पुढची बस साडे तीन तासानंतर होती. बरं हे सगळं संभाषण तो मल्याळीमध्ये आणि आम्ही हिंदी/इंग्रजी मध्ये असं सुरु होतं.

    शेवटी नाईलाजास्तव आम्ही माघारी फिरलेल्या त्याचं बस मध्ये बसून चेकपोस्टला गेलो. तिथे सगळा उलगडा झाला. तिथे हिंदी बोलू शकणारा एक माणूस होता. त्याच्याकडून कळलं की अधिकृत गाईड साठी तिथे पैसे भरावे लागतात.
    आणि अधिकृत गाईड शिवाय जायला परवानगी नाही. एक गाईड चे रोजचे ५००, म्हणजे ३ दिवसांचे १५००. पण किमान २ गाईड आवश्यक असतात म्हणून आम्ही ३००० भरावे असा त्याचं म्हणणं होतं. नोटा टंचाई मुळे आधीच आमच्याकडे रोख कमी होती. त्यात तिथे कुठेही पेटीएम किंवा क्रेडीट कार्ड चालत नाही. फोनच चालत नाहीत तर हे सगळं कसं चालेल? तेवढ्यात आणखी २ इसम आले. त्यातील एक आमच्याच बस मध्ये होता असं आठवलं. दुसरा गाईड होता. तेव्हा कळलं की ७ तामिळ भाविकांचा गट अगस्त्यकुडमलाच जाऊ इच्छित होता! उरलेले ६ जण बोनाक्कडलाच थांबले होते. आम्हीच वेड्यासारखे तिघेही इथे आलो. या चेकपोस्ट मध्ये ४३०० ची पावती दाखवायची. शिवाय प्रत्येकाचा ID proof दाखवायची आणि त्याची छायाप्रत द्यायची. तामिळ गटाचा नेता हे सर्व घेऊन आला होता,
    ते पण सर्व ७ जणांचा! आमच्यात फक्त अजित कडे pancard आणि त्याची छायाप्रत होती. बाकी आमच्या दोघांकडे driving license होतं पण त्याची छायाप्रत नव्हती. तेव्हा त्या साहेबांनी सुचवलं की original इथे ठेवून जा; परत जाताना घेऊन जा.

    Checkpost (Thodayar Section Office - Kanithadam)
    Checkpost (Thodayar Section Office - Kanithadam)

    गाईड बद्दल असा तोडगा निघाला की ७ तामिळ व आम्ही तिघं मिळून एकूण ४ गाईड घ्यायचे आणि त्याचे पैसे share करायचे. एकदाचे आम्ही आता "जाऊ शकतो" असं झालं...पण नाही, अजून बाकी आहे. तिथल्या जेवणाचे काय? आमचा समज होता की वर जेवण, नाश्ता मिळतो. तर मिळतो हे बरोबर आहे, पण त्यासाठी तांदूळ, डाळ वगैरे लागेल की नाही? ते काय आकाशातून पडणार आहे का? तेव्हा ते आपणच घेऊन जायचं असतं असं कळलं. आता ते कुठे मिळेल? तेव्हा तो गाईड आमच्या मदतीला आला. त्याचं नाव तंबू. त्याच्या बाईक वरून तो आमच्यासाठी (आणि तामिळ गटासाठीही) सर्व शिधा घेऊन आला. आता हे पण वजन आपल्याच पाठीवर येऊन बसणार अशी कल्पना केलेली नव्हती. प्रत्येकी २ किलो वजन वाढलं! सगळं झालं. पण आता पुन्हा बोनाक्कडला कसं पोचायचं? १५ किमी! तेव्हा असा सल्ला मिळालं की थोडं थांबलात तर जाणाऱ्या गावकऱ्यापैकी कुणी lift देतील. तेव्हा वाट बघत थांबलो. त्या चेकपोस्ट मध्ये सुदैवानी स्वच्छतागृह होतं आणि भरपूर पाणी होतं, तेव्हा निदान तो कार्यक्रम सुखानी उरकता आला! कालांतरानी खरंच lift मिळून आम्ही बोनाक्कड ला पोचलो! आणि १०:३० वाजता एकदाचा आमचा ट्रेक सुरु झाला.

    ७ तामिळ भाविक + ३ मराठी उनाड इसम + ४ मल्याळी गाईड! सुरुवातीला २-३ किमी कच्चा गाडी रस्ता पार केल्यावर आलं तथाकथित "picket station". तिथे पुन्हा सर्वांच्या नावांची नोंद झाली आणि मग खरा जंगल रस्ता सुरु झाल. याच्या पुढे गाडी जाऊ शकत नाही. आजचं मुक्कामाचं ठिकाण (अतिरुमला) हे इथून पुढे २१ किमीवर आहे अशी शुभवार्ता कळली. इथेच ११:३० झाले होते तेव्हा अंधार पडायच्या आत पोचू की नाही अशी शंका वाटायला लागली. पण गाईड काहीही घाई गडबड न करता निवांत चालत होते, तेव्हा आम्हीही तीच गती आनंदानी स्वीकारली.

    सुरुवातीला किंचित चढण (सुमारे १००-१५० मीटर) पार करून लवकरच साधारण सपाट रस्ता लागला. पण थोड्याच वेळात असं लक्षात आलं की दर थोड्या वेळानी थोडा उतार, मग एक ओहोळ पार करायचा मग पुन्हा चढ असा रस्ता आहे. एकंदरीत समुद्रसपाटीपासून उंची वाढत नव्हती पण सतत चढ आणि उतार. पाठीवरचं ओझं आता नको वाटायला लागलं! प्रत्येक ओहोळ बऱ्यापैकी वाहत होते; काही ठिकाणी तर चांगलाच जोरदार धबधबा! महाराष्ट्रात डिसेंबर महिन्यात इतकं पाणी कुठे बघितल्याचं स्मरत नाही. हळूहळू रस्त्यालगत जंगल खूपच दाट झालं. आता बोलू नका अशी गाईडनी दटावणी दिली. आपल्या बोलण्यानी हत्ती अस्वस्थ होतात म्हणे...म्हणजे अस्वस्थ झाले तर आपल्यावर हल्ला करतात की काय? असतील बुवा म्हणून आम्ही तोंडं बंद केली.

    सर्वात पुढे जो गाईड होता तो खरं तर वयस्कर होता, पण तोच सर्वात वेगानी आणि अथक जात होता. बाकी तिघे अधून मधून विडीकाडीसाठी थांबत होते. पहिल्या गाईडचे नामकरण आम्ही मामा असे करून टाकले. सगळ्यात तरुण होता तो तंबू. बाकी दोघांची नावं मात्र शेवटपर्यंत कळली नाहीत.

    एव्हाना १ वाजत आला होता आणि पोटात कावळे ओरडायला लागले होते. पण आमच्याकडे खायला तर काहीच नव्हतं. दुपारचे जेवण अतिरुमला मुक्कामीच अशा भाबड्या समजामुळे आम्ही बरोबर काहीच घेतलं नव्हतं. तेवढ्यात मामानी हात आडवा करून अजितला थांबवलं. नव्हे, जवळ जवळ मागे ढकललं! पुढे रस्त्यात हत्ती होता! आता हे महाराज जाईपर्यंत आपण नुसतीच वाट बघायची की काय? तर नाही, तंबूकडे फटाके नामक उपाय होता. चक्क फटाका उडवला, आणि हत्ती महाराज पण आवाजाला घाबरून निघून गेले!

    पोटातल्या कावळ्यांना दामटून गप करून आम्ही जातच राहिलो. पुढेपुढे ओहोळ चांगलेच मोठे होत होते. आणी झाडं तर इतकी सुरेख! थांबून थांबून एक एक झाड बघत बसावं वाटत होतं. इथली झाडं पण महाराष्ट्रापेक्षा पुष्कळ वेगळी आहेत. आणि खरंच सुंदर आहेत! प्रत्येक ओहोळ ओलांडताना दगडांवर पाय देऊन जात होतो. पण एक खूप रुंद ओहोळ आला तेव्हा शेवटी बूट आणि पाय ओले झालेच! एव्हाना २ वाजले असल्याने त्या ओहोळाकाठीच lunch break घ्यायचा असा गाईडनी आदेश दिला. आमच्याकडे lunch होतंच कुठे? पण तामिळ भाविक पूर्ण तयारीनी आले होते आणि चांगले प्रेमळ होते. त्यांनी चक्क चपात्या आणल्या होत्या. अगदी आपल्यासारख्याच, फक्त मोहन मात्र थोडे जास्तच होतं. आणि त्याबरोबर tomato चटणी! अहाहा! तामिळ कृपेने छानच जेवण झालं. आमच्याकडे कधीमधी खायला म्हणून थोडे लाडू आणि साटोऱ्या होत्या त्यापण आम्ही सगळ्यांनी वाटून घेतल्या.

    इथपर्यंत आम्ही काहीच उंची गाठली नव्हती. बोनाक्कडची समुद्रसपाटीपासून उंची ५५० मीटर आहे, तर इथे ५००! म्हणजे चढ उतार करून आम्ही एकूण ५० मीटर खालीच उतरलो होतो. अतिरुमलाची उंची ११०० मीटर आहे, तेव्हा इथून पुढे भरपूर चढ असणार अशी खुणगाठ बांधून निघालो. आणि झालंही तसंच. मध्ये एका ठिकाणी आम्ही झाडीतून बाहेर पडलो आणी मग गवताळ भागातून वाट होती. पुढे काही अंतरावर वाट पुन्हा झाडीत घुसते आहे असं दिसत होतं. मधेच या भागात झाडी कशी नव्हती कोण जाणे.

    आता सतत चढ असल्याने चालण्याचा वेग कमी झाला. त्यातही मामा सगळ्यात पुढेच व त्यांच्याबरोबर आम्ही तिघे. ता.भा. मागे पडले. मध्ये मध्ये मामा वैतागून काही पुटपुटत असे. मागचे लोक फार हळू चालताहेत म्हणून तो बहुतेक उखडलेला असावा. आता या टप्प्यावर असंख्य पक्षी! खूपच वेगवेगळे आवाज येत होते. इथे काही खूपच रंगीत पक्षी दिसले. उदाहरणार्थ काही चमकणारे निळे! काही लाल भडक! अगदी छोटे - म्हणजे चिमण्यांएवढे. दुर्दैवानी माझी आणि कॅमेराची मैत्री नसल्याने प्रकाशचित्र नाही!

    अतिरुमला
    आता वाट पुन्हा झाडीत शिरली. सुदैवानी इथे डास नव्हते. नाही तर मागे भीमाशंकरच्या जंगलात प्रचंड डास चावले होते. खरं तर इथे दाट झाडी आणि भरपूर पाणी / चिखल असल्याने डास असतील असं वाटलं होतं. पुष्कळ चढ चढून झाल्यावर थोडा सपाट - पण दाट जंगलातून रस्ता होता. इथे मामानी आम्हाला थांबवलं. आणि मामा घुसला झाडीत. त्यानी खाली पडलेल्या (त्यातल्या त्यात) वाळक्या फांद्या गोळा करायला सांगितल्या. तेव्हा लक्षात आलं की अतिरुमलाला स्वयंपाकासाठी हीच लाकडं वापरायची आहेत. बघता बघता पुष्कळ लाकडं गोळा झाली. एव्हाना मागून
    ताभा आणि गाईड लोकांचा आवाज यायला लागला. तोपर्यंत मामानी काही लाकडं आम्हाला उचलायला सांगितली, काही स्वतः घेतली आणि उरलेली तुम्ही घेऊन या असं मागच्या गाईडना ओरडून सांगितलं - आणि मामा पुन्हा एक-दोन एक-दोन...आम्ही आधीच दमलो होतो त्यात आता अजून लाकडांचं ओझं. अजून किती अंतर होतं कोण जाणे. पण ज्याअर्थी मामानी लाकडं इथे गोळा केली त्याअर्थी आता जवळ असेल - निदान आता चढ तरी नसेल असं वाटलं. ते खरंच निघालं. १० मिनिटात समोर पत्र्याच्या झोपड्या दिसू लागल्या. त्यात कुणाचा बोलण्याचा आवाज येत होता. म्हणजे तिथे आधीच कुणी तरी आहे तर...लवकरच एका खन्दकावरील छोटा पूल ओलांडून आम्ही अतिरुमला मुक्कामी प्रवेश केला.

    Forest
    Forest, on way to Athirumala / Agasthyakudam

    इथे झाडी तोडून थोडा परिसर मोकळा केला आहे आणि त्यात पत्र्याच्या झोपड्या. झाडीतून मोकळ्यात आल्यावर अगस्त्यकुडमचे अगदी जवळून दर्शन झाले. आई शपथ! बघून तर असं वाटतं की तिथे जाणे अशक्यच! वेल्ह्यातून तोरणा जितका उंच दिसतो, साधारण तेवढी उंची. पण पूर्ण दगडी भिंतच जणू! त्रिकोणाकृती भिंत. त्याच्या उजव्या बाजूला आणखी काही शिखरे. तर डाव्या बाजूला २ प्रचंड डोंगर. दोघांच्या मध्ये खिंडीसारखा भाग होता, तिथे घसरगुंडीसारखा उतार दिसत होता. आणि त्या उतारावर पण भरपूर झाडी होती. जणू झाडांचा धबधबा!

    अतिरुमला म्हणजे एक पठार आहे - पूर्ण जंगलमय. त्याच्या पूर्वेला प्रचंड अगस्त्यकुडम. आग्नेयेला त्याच्यापेक्षा थोडी लहान शिखरे. उत्तरेला २ डोंगरांमध्ये झाडांचा धबधबा. पश्चिमेला आणि दक्षिणेला उतार. पैकी पश्चिम बाजू चढून आम्ही आलो होतो. पाठपिशव्या खाली ठेवून किती तरी वेळ अगस्त्यकुडम आणि परिसर बघत बसलो. खरोखर इथेच पैसे वसूल झाले!

    दरम्यान मामानी १ झोपडी उघडून दिली. भिंती आणि छप्पर दोन्ही पत्र्याचेच. आत या टोकापासून त्या टोकापर्यंत भिंतीलगत बांबूचे platform केले होते. हाच पलंग आणि सोफा पण हाच. मामानी त्यावर अंथरायला चटया आणून दिल्या. कीटक आणि सरपटणारे प्राणी भरपूर असल्याने जमिनीवर बसणे किंवा झोपणे वर्ज्य. म्हणून हे platform. आम्ही चटईला पाठ टेकून आडवे झालो - तेव्हा पाठीला किती सुख झाले ते सांगता येणार नाही!

    आम्ही आराम करत असलो तरी मामा मात्र लगेच कामाला लागले होते. आणलेली लाकडं कुऱ्हाडीनी फोडणे सुरु. मागचे लोक येताच मामानी चूल पेटवून कॉफी ठेवली पण. थोड्याच वेळात बिन दुधाची कॉफी. पण त्यावेळी ती इतकी छान लागली की मामाचे शतशः आभार मानले. त्यापाठोपाठ मामानी लगेच स्वयंपाक सुरु केला. आम्ही अजून अगस्त्यकुडमकडे बघत बघत कॉफी पीत निवांत गप्पा मारत होतो.

    चढताना इतका घाम निघाला होता की अतिरुमलाला पोचताच आंघोळ करायची असं सगळ्यांनीच ठरवलं होतं. तिथे पाणी भरपूर आहे. भरपूर म्हणजे २४ तास पाण्याची टाकी भरून वाहात असते. कारण कुठल्याश्या ओढ्यातून पाईपनी पाणी आणून सोडलं आहे. अर्धा तास आराम झाल्यावर आम्ही खूप गार पडलो - कारण अतिरुमलाला चांगलीच थंडी होती. शिवाय पाणी तर इतकं गार, की आंघोळीचा विचार सगळ्यांनी डोक्यातून काढून टाकला.

    या अतिरुमलाला केरळ वन विभागाचे २ कर्मचारी कायम मुक्कामाला असतात. तिथून खाली शहरातील कार्यालयाशी संपर्कासाठी तिथे वायरलेस संच होता. एका झाडालाच उंच काठीवर अन्टेना लावून ठेवला होता. थोड्या वेळानी पूर्ण अंधार झाला. तिथे सोलर सिस्टीम होती, त्यावर मोकळ्या जागेत एक कॉमन दिवा आणि प्रत्येक झोपडीत एक दिवा सुरु झाला. वायरलेस ऑपरेटरनी रेडीओ लावला होता. त्यावर चक्क हिंदी गाणी लागली. फौजी भाईयो के लिये जयमाला! २-३ गाणी होईपर्यंत मामानी सगळ्यांना जेवायला बोलावलं. म्हणजे भात आणि मिश्र भाज्यांचा रस्सा. सांबार नसल्याने थोडा हिरमोड झाला. सांबार नाही कारण डाळ आणलेलीच नव्हती. रस्सा चवदार होता खरा पण सांबार हुकल्याची भावना गेली नाही. असो. आयतं जेवण मिळालं हे काय कमी आहे?

    जेवणानंतर थोडा वेळ शतपावली करत होतो. खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोनला signal मिळतो आहे का हे बघत होतो. अखेर एका कोपऱ्यात गेल्यावर थोड्या वेळानी signal (१-२ काड्या) मिळतो असा शोध लागला. घरी फोन करायचा प्रयत्न काही यशस्वी झाला नाही. शेवटी नुसता SMS पाठवला. तेवढ्यात वायरलेस ऑपरेटर येऊन सांगून गेला: 5 minutes light off! तेव्हा घाईघाईने झोपडीत जाऊन sleeping bag मध्ये घुसून बसलो. घड्याळात जेमतेम सव्वाआठ वाजले होते.

    इतक्या लवकर झोपल्याने आणि अनोळखी ठिकाण असल्याने झोप तुटक तुटक लागली. सकाळी जाग आली तीच हत्तीच्या ओरडण्याने! अजून अंधारच होता. बाहेर जावे कि नाही? समोर हत्ती उभा असला म्हणजे? आवाज थोडा लांबून येतोय असं वाटत होतं खरं, पण तरी रिस्क नको म्हणून चुपचाप पडून राहिलो. हळूहळू अंधुक उजेड यायला लागला आणि पक्ष्यांचे आवाज पण सुरु झाले. दरम्यान अजित आणि ऋषिकेश पण उठले. मग सगळे बाहेर गेलो. हत्ती नव्हता! अगस्त्यकुडम कडे बघितलं तर...भरभक्कम बाबाच्या अंगा खांद्यावर लहानग्यांनी खेळावं तसे अगस्त्यकुडमवर ढग बागडत होते. आणि त्याच्या उजवीकडच्या दोन शिखारान्मधून तर जणू ढगांचा धबधबा कोसळत होता. आई शपथ! पैसे कालच वसूल झाले असल्याने आज आता काय म्हणावं तेच सुचेना! १० मिनिटे नुसते बघत राहिलो! इतक्यात मामानी "कॉफी" म्हणून आवाज दिला. शिवाय तंबू येऊन सांगून गेला की आज आपल्याला लवकर निघायचं आहे. नाही तर अगस्त्यकुडमला जाऊन पुन्हा अंधार पडायच्या आधी इथे कसे परत येणार? मग लगोलग सगळ्यांनी सकाळच्या अत्यावश्यक गोष्टी आटोपल्या. पाणी कालच्यापेक्षा गार असल्याने अंघोळ नाहीच! दरम्यान मामानी नाश्त्यासाठी उपमा केला होता. उपमा आणि पुन्हा कॉफी. खाऊन पिऊन प्रत्येकानी आपापली ताटली आणि मग धुऊन ठेवायचा.

    जळवा
    ७ ठरलं होतं तरी प्रत्यक्षात ८ वाजता आम्ही निघालो. आज पाठीवर ओझं खूपच कमी होतं. प्रत्येकी एक बाटली पाणी आणि जेवणासाठी पुन्हा तोच उपमा. त्याची चव enhance करण्यासाठी आम्ही आमच्याजवळ थोडं फरसाण होतं तेही घेतलं. आज मामा आमच्याबरोबर नव्हते. तंबू आणि इतर २ गाईड. त्या दोघांनी कमरेला कोयता लटकावला होता. काल ज्या वाटेने आलो तिकडेच पुन्हा ५ मिनिटे मागे गेलो तेव्हा उजवीकडे एक (दगड रुपी) देव दिसला. तिथे तंबूनी उदबत्ती लावून रीतसर पूजा केली. जंगली प्राण्यांपासून देवानी आपले रक्षण करावे हा हेतू असावा. मग उजवीकडे वळून चढाचा रस्ता सुरु! कालच्यासारखीच मध्ये मध्ये ओढे असलेली वाट. पण आज सतत चढ होता. तरी पाठीवर ओझं नसल्याने एकदम छान वाटत होतं. १०-१५ मिनिटात काही ताभांना पायाला जळवा चिकटलेल्या दिसल्या. कालच्या पेक्षा इथलं जंगल जास्त दाट आहे, म्हणून जमीन जास्त ओलसर - म्हणून जास्त जळवा. सर्व ताभा साध्या चपला घालून आले होते. काही तर निव्वळ रबरी स्लीपर घालून आले होते. आम्ही ताभांची कीव करत होतो तेवढ्यात लक्षात आले की आमच्या बुटातही जळवा घुसल्या आहेत! आता दर ५ मिनिटांनी थांबून चिकटलेल्या जळवा काढायच्या आणि मग पुढे, असा आमचा प्रवास सुरु झाला.

    या वाटेत जागो जागी हत्तीचे शेण पडलेले दिसत होते. सगळ्यात पुढे आणि शेवटी एक एक कोयताधारी गाईड आणि मध्ये आमच्याबरोबर तंबू. वाट मध्ये मध्ये पार दिसेनाशी होत होती, पण झाडीतून घसून थोडं पुढे गेलं की पुन्हा वाट दिसायची.

    अतिरुमला पासून अगस्त्यकुडम पूर्वेला असलं तरी सरळ पूर्वेला जाणे शक्यच नाही. ७०० मीटर उभ्या भिंतीवर कुणी चढू शकेल का? तेव्हा आम्ही साधारण ईशान्य दिशेला जात होतो. तासाभरात आम्ही साधारण सूप बाउल सारख्या दिसणाऱ्या एका ठिकाणी आलो. काळ्या खडकाचा प्रचंड सूप बाउल! त्याच्या दक्षिण बाजूला अगस्त्यकुडम. त्यावरून येणारे असंख्य ओढे या बाउल मध्ये एकत्र येत होते. बाउलची पश्चिम बाजू थोडी कापली गेली होती आणि तिथून तेच पाणी खाली पडत होते. या संपूर्ण प्रवासातील सर्वात सुंदर ठिकाण हेच. इथे तासंतास बसून राहायला मला आवडलं असतं. अगस्त्यकुडमला पुन्हा गेलो तर मी खरंच तिथेच बसून राहीन!

    तिथे गेल्यावर आधी सगळेच आहा उहू करत होते आणि भरपूर बडबड करत होते, फोटो काढत होते. पाण्यात खडा टाकल्यामुळे उठणाऱ्या लाटा विरून पुन्हा पाणी शांत व्हावे तसे थोड्या वेळानी सगळे आपोआप शांत झाले. तेव्हा तर ती जागा अजूनच सुंदर वाटली! बराच वेळ शांततेत सुखानी गेला. "वादी मे गुंजती हुई खामोशीया सुने" हे गुलजारचे शब्द अक्षरशः अनुभवले.

    "शिखरावर पोचायला अजून किमान २ तास लागतील" असं तंबू म्हणाला तेव्हा समाधी मोडली. सावकाश उठून सगळे चालू लागले. आता आम्ही दगडी बाउलची कड चढायला लागलो. थोड्याच वेळात वर पोचून मग तीच कड धरून आडवे चालायला लागलो. इथे मात्र जळवा नव्हत्या. लवकरच बाउलच्या पुढचे पठार सुरु झाले. आता उंच झाडांचे दाट जंगल जाऊन छोट्या झुडुपांचे जरा विरळ जंगल सुरु झाले. एका ठिकाणी तंबूनी माहिती पुरवली की "या झाडीत वाघ राहतो". वाघोबांनी आम्हाला काही दर्शन दिलं नाही. आता हे सुदैव की दुर्दैव हे तुम्हीच ठरवा. मी अजूनही जिवंत आणि धडधाकट अवस्थेत आहे हे मला तरी सुदैव वाटते! थोड्याच वेळात सपाट पठार संपून आम्ही आता थेट अगस्त्यकुडमच्या शिखराला भिडलो. खडी चढण. १०-१५ मिनिटातच दमछाक झाली. एका ओढ्याकाठी थांबलो तेव्हाच तंबूकडून कळले की यानंतर पुन्हा पाण्याचा स्त्रोत नाही. तेव्हा सगळ्यांनी बाटल्या भरून घेतल्या.

    आता इथून पूर्वेला दरी होती. ती बाजू म्हणजे तामिळनाडू. तिकडून वर येणारी वाट इथेच आमच्या वाटेला मिळत होती.
    गेल्या ५-६ वर्षांपासून मात्र तामिळनाडूकडून येणारी वाट बंद आहे. म्हणजे तिकडून वर यायला परवानगी नाही. का ते मात्र तंबूला सांगता नाही आलं. किंवा आम्हाला कळले नाही असं म्हणा.

    दोर
    खडी चढण सुरूच होती. चढण इतकी तीव्र होती की शिखरमाथा काही केल्या दिसतंच नव्हता. जसं पुढे जाऊ तसं वाट अजून अरुंद होत होती. त्यातच तामिळनाडूच्या बाजूने हळू हळू ढग वर येऊ लागले. वेग मंदावला आणि रांग खूपच लांबली. अजित व ऋषिकेश वेगानी पुढे जात होते. पण "दोर दिसला की थांबा" अशी तंबूनी ताकीद दिली होती. खरंच थोड्या वेळानी एक मोठा खडक समोर उभा राहिला. तो चढून जाणं सोपं करण्यासाठी तिथे २-३ दोर कायमचे बांधून ठेवले आहेत. अर्थात उन्हा-पावसानी ते खराब होणार म्हणून अधून मधून ते बदलत असणार. तंबूला बहुतेक थोडी चिंता वाटत होती. आम्ही सगळे जण दोराला धरून सुरक्षित जाऊ शकू ना? अशी. पण ऋषिकेश तर दोराला न धरताच पटपट वर गेला सुद्धा. मी मात्र रीतसर दोर धरून गेलो. जाताना काहीच अवघड नाही वाटलं. पण आपण इथून उतरणार कसे अशी किंचित धाकधूक वाटत होती.

    Ropes for safer rock climbing
    Ropes for safer rock climbing

    आता शिखर जवळ आलं असा आमचा समज झाला, पण अजून निदान २० मिनिटे लागतील अशी शुभवार्ता तंबूनी दिली. लगेचच अजून एक दोर-खडक टप्पा होता. त्यानंतर वाट पुन्हा झुडुपांच्या जंगलात घुसली. जंगल पार केल्यावर मग तिसरा आणि शेवटचा दोर-खडक टप्पा. एव्हाना ढगांची गर्दी इतकी झाली की खालचं काहीच दिसेना. दोर धरून वर गेलो आणि लवकरच आम्ही शिखरावर पोचलो! अगस्त्यकुडम! निव्वळ खडक! आणि अगस्त्य ऋषींचा पुतळा. तिथे रीतसर पूजा झाली. साधारण आपण आरती करतो तसं काही तरी त्यांनी म्हणलं. आम्ही मात्र फक्त टाळ्या वाजवल्या. नंतर प्रसाद म्हणून गुळ खोबरं. नंतर बराच वेळ दगडावर निवांत पसरलो.

    Agasthi
    Agasthi

    इथून पश्चिमेला अतिरुमला सहजच दिसलं असतं, पण ढगांमुळे काहीच दिसेना. बरंच वेळ बसलो होतो पण ढग काही
    हलले नाहीत. शेवटी आम्हीच हलायची वेळ झाली. शिखर गाठलं होतं खरं. पण शिखरावरून चारी बाजूचं सौंदर्य डोळे
    भरून बघितल्याशिवाय ट्रेक सफळ संपूर्ण होत नाही. त्यामुळे परत निघताना एक हुरहूर लागून राहिली होती. चुपचाप
    आम्ही हळू हळू परतीची वाट धरली. पण आम्हा तिघांच्या मनात जे होतं त्याला शेवटी अजितनी वाचा फोडली:
    आपण पुढच्या वर्षी इथे पुन्हा यायचं का?

    Notes:

    1. Agasthyakudam is also known as Agasthyamalai.

    2. Women (of any age) and boys younger than 12 were once not allowed to go up Agasthyakudam. Since a court ruling in 2020, women are now allowed to go up.

    3. Kerala forest department allows 100 devotees to go up every day, only during a certain period each year: from 14th Jan to Holi. During this period, the charges per person are much less than what we paid.

    4. Kerala forest department allows smaller private parties to go up during rest of the year, but the charges per person are higher. We paid that, since we wanted to go there in December.

    5. In Kerala, it rains from May through Dec. Be prepared for rain, unless you are planning a visit in April (not sure if it is feasible though).

     
     

    फोर्टकोची, केरळ (God's own country..)

    Submitted by अजय जवादे on 24 October, 2012 - 18:39

    डच, पोर्तुगीजांनी वसवलेले बंदर.

    १) कोचीन

    3766

    २)

    3817

    ३)

    3831

    ४)

    3834

    ५)

    3836

    ६)

    3840

    ७)

    3846

    ८)

    3849

    ९)

    3858

    १०)

    3871

    ११)

    3901

    १२)

    3933

    १३)

    3941

    मुन्नार : http://www.maayboli.com/node/38762
    अ‍ॅलेप्पि: http://www.maayboli.com/node/38763

     
     

    अ‍ॅलेप्पि, केरळ (God's own country..)

    Submitted by अजय जवादे on 24 October, 2012 - 18:28

    इथे फक्त बॅकवाटर बघायच. एक दिवस पुरतो. बॅकवाटर ६ महिने गोडे आणि ६ महिने खारे असते. शेतीसाठी हेच पाणि वापरत असल्यामउळे, खारे पाणि बॅकवाटरमध्ये मिक्स होउ देत नाहीत.

    १) मारारी बीच

    3369

    २) मारारी बीच

    3390

    ३) मारारी बीच

    3403

    ४) मारारी बीच
    3417

    ५) मारारी बीच

    3495

    ६) मारारी बीच

    3518

    ७) एकटा

    3519

    ८) बॅकवाटर

    3562

    ९) बॅकवाटर

    3563

    १०) बॅकवाटर

    3565

    ११) बॅकवाटर

    3571

    १२) बॅकवाटर

    3601

    १३)

    3649

    १४)

    3668

    १५)

    3669

    १६)

    3676

    १७)

    3677

    १८)

    3681

    कोचीन : http://www.maayboli.com/node/38764
    मुन्नार : http://www.maayboli.com/node/38762

     

    मुन्नार, केरळ (God's own country..)

    Submitted by अजय जवादे on 24 October, 2012 - 18:05

    मुन्नार, केरळ येथील प्रकाशचित्रे.

    १) कथ्थकली कलाकार, मेकअप करत असतांना..
    2605

    २) नमस्कार Happy
    2627

    ३)
    2652

    ४)

    2663

    ५) मुन्नार टी गार्डन
    सगळे टी गार्डन्स टाटांच्या मालकीचे आहेत.

    2740

    ६)

    2744

    ७)

    2768

    ८)

    2778

    ९)

    2779

    १०) धरण

    2781

    ११)

    2899

    १२)

    2966

    १३) आमचा पण फोटो काढा की!!

    3026

    १४)

    3035

    १५) कार आणि रस्ता

    3039

    १६)

    3042

    १७)

    3064_Col

    १८)

    3068

    १९)

    3083

    २०)

    3144

    अ‍ॅलेप्पिची प्रकाशचित्रे : http://www.maayboli.com/node/38763
     
     

     Puliyarai View Point: Scenic Pit Stop on the Tenkasi - Kerala Highway

    5Save 5Save

    Puliyarai view point - a stunning location to take a break just before entering Kerala

    It is the last village of the Tenkasi district of Tamil Nadu before you enter Kerala. It is a beautiful village that has been blessed by nature’s bounty. It is full of exotic fruit orchards like mangosteen, rambutan, star fruit, pomelo, passion fruit, longan, custard apple, guava and many more. It is also home to gorgeously green paddy fields. And all of this greenery is surrounded by the tall mountains of the Western Ghats. I am talking about the village of Puliyarai and its two view points.


    A pit stop at Puliyarai view point, Tamil Nadu

    The first view point presents itself just before you enter the village of Puliyarai. Here, you can see vast swathes of paddy fluttering in the breeze and shining in the sun and in the background, you can see the massive contiguous mountain ranges of the Western Ghats. This is a massive stretch and the paddy stretches on both sides. The road is kind of like a curve and it appears after kilometres of regular highway with regular trees on both sides. Hence, the view becomes extra special. You can stop here to take a few pictures of the incredible views while you sip on some fresh tender coconut water and chomp on some locally grown delicious star gooseberries.

    The golden and green paddy fields of Puliyarai with the Western Ghats in the background

    After this first view point, you will come to the Puliyarai village with its exotic tropical fruit stalls and once you cross these fruit stalls, you will come to the other view point of towering mountains and winding hairpin roads. From here, the actual climb begins and in a few kilometres, you will cross the Kerala forest check up, thus officially entering the state of Kerala. Both the view points before and after are sublime, but the first view point of the paddyfields, the mountains and the highway is striking owing to its panoramic nature. Don’t miss to stop at these view points if you happen to be heading from Shenkottai or Tenkasi to Kerala anytime soon. My favourite past time here is to feast on locally grown exotic tropical fruits while soaking in the lush views.

    A pit stop at the gorgeous view point of Puliyarai on the Tamil Nadu - Kerala border

    Other nearby tourist attractions:

    1) Courtallam: The herbal bath holiday destination of Tamil Nadu

    2) Sunderapandiapuram: A gorgeous village surrounded by sunflower fields, wind mills and the Western Ghats

    3) Sivasailam Temple: 1000 year old temple surrounded by the lush mountains of the Western Ghats

    4) Sivasailam: One of the wettest places during the North East Monsoon in India

    5) 13th century Kasi Visvanathar temple at Tenkasi

    6) Mekkarai: The lush village where paddy fields, fruit orchards and mountains merge into one

    7) Shenkottai to Achankovil forest route: The lesser known scenic jungle route

    8) Manalar Falls: The gorgeous forest waterfall perfect for a family getaway

    9) Kambhavurutty Falls: Pristine Jungle Waterfall in the middle of dense forest

    10) Thenmala forest: Offbeat nature and wildlife getaway

    11) Vintage Pathimoonu Kannara Bridge: Colonial charm of the Indian Railways

    12) Punalur Suspension Bridge: Historical gem of Kerala

    13) Lesser known Kerala Mountain Railways: Treat for Nature Lovers

    14) Aryankavu Saastha Temple: Ancient temple located in the sacred forests of the Western Ghats


    15) Palaruvi Falls:Kerala’s herbal waterfall that drops like milk from the sky

    16) Thenmala Dam: A monsoon pit stop view

    17) Rosemala: Spectacular view point of the Thenmala reservoir

     https://www.beontheroad.com/2024/09/scenic-puliyarai-view-point-tenkasi-kerala-highway.html
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     
     

    No comments:

    Post a Comment

    Note: Only a member of this blog may post a comment.

    https://westernghatstreks.blogspot.com back up

      Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...