Sunday, July 7, 2024

केरळ कन्याकुमारी लेखमाला

 खूप दिवसापासून केरळ माझ्या बकेट लिस्ट मध्ये होते. मिपावर केरळ वरती अनेक लेख आहेत. तसेच युट्युब वरती सुद्धा केरळ बद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे. माझ्या सासूबाई वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झाल्या. त्यांना कुठेतरी फिरायला जायचे होते. आपण सर्वजण कुठल्यातरी निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाऊयात याबाबतचे तू नियोजन कर असे सासूबाईंनी मला सप्टेंबर मध्ये सांगितल्यामुळे माझा आधीच तयार असलेला केरळ प्लान त्यांना सांगितला आणि आमचे दिवाळीनंतर केरळला जायचे निश्चित झाले. माझ्या हातात नियोजनासाठी जवळ जवळ तीन महिने होते. कुठेही गेलो तरी बजेट सहल करावी असा माझा आग्रह असतो. उगाच अवास्तव खर्च करणे टाळावे यावर माझा कटाक्ष असतो. तथापि सासुबाई म्हणाल्या की एक तरी प्रवास हा विमानाने करूयात. मग काय .... मी विमानाची तिकिटे मॉनिटर करायला सुरुवात केली. त्यावेळी विमानाचा दर साधारण साडेआठ हजार प्रतिमाणशी चालू होता. केरळमध्ये दोन विमानतळ आहेत. एक म्हणजे कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ. आम्ही साधारण पूर्ण केरळ फिरायचे ठरवले होते. आमच्या हातात आठ रात्री नऊ दिवस होते. त्यातले शेवटचा दिवस मला आराम करण्यासाठी ठेवायचा होता. जेणेकरून सोमवारपासून परत ऑफिस जॉईन करता येईल. आधी मी जाताना कोचीपर्यंत रेल्वेने व येताना त्रिवेंद्रम वरून विमानाने अशा पद्धतीने प्लॅन आखला होता. कोची व त्रिवेंद्रम या दोन्ही ठिकाणची जातानाची व परतीची अशी तिकिटे मी सतत मॉनिटर करत होते. बुकिंग करण्याची घाई केली नाही कारण कॅन्सलेशन चार्जेस भरपूर असतात हे मी पाहिले होते. आश्चर्यकारक रित्या सप्टेंबर नंतर कधीतरी तिकिटाचे दर अचानक खाली आले व साधारण चार-पाच हजाराच्या आसपास किंमत दिसू लागली. मुळात विमानासाठी आठ ते नऊ हजार रुपये एका वेळचे खर्च करण्याची तयारी ठेवली होती. आता दर निम्म्यावरती येत आहेत तर सरळ जाताना आणि येतानाही विमानाने जायचे असे ठरवून स्थलदर्शनामध्ये काही जागा अजून समाविष्ट केल्या.

     केरळ मुळातच एका खेपेमध्ये पाहणे अन्यायकारक आहे असे माझे स्पष्ट मत आहे. केरळ पाहायचा झाला तर उत्तर केरळ, मध्य केरळ आणि दक्षिण केरळ असे केरळचे सरळ सरळ 3 भाग करता येतील. उत्तर केरळमध्ये बघण्यासारखी ठिकाणे म्हणजे कासारगोड, बेकल, कोझिकोडे व वायनाड. मध्य केरळमध्ये बघण्यासारखी ठिकाणे म्हणजे त्रिशूल, गुरुवायुर, अथीरपल्ली वॉटरफॉल, कोची, कलाडी, मुन्नार, टेकडी व आलेप्पी. दक्षिण केरळचा विचार केला तर मून्रो आयर्लंड, कोल्लम, जटायू अर्थ सेंटर, वर्कला, त्रिवेंद्रम, पूवर व कन्याकुमारी असा प्लॅन करता येईल. उत्तर केरळमध्ये रस्ते हे अतिशय निमुळते व घाटाचे वळणावळणाचे असल्यामुळे उत्तर केरळ पाहण्यासाठी जास्त दिवस लागतात त्यामुळे उत्तर केरळ व मध्य केरळ अशी ट्रिप शक्यतो क्लब करू नये. तथापि थोडे जास्त दिवस हाताशी असतील तर मध्य केरळ व दक्षिण केरळ ही सहल एकत्र करता येणे शक्य आहे. मी स्वतः राजस्थान जसे चार टप्प्यात करायचे ठरवले आहे तसेच केरळ सुद्धा तीन टप्प्यांमध्ये करायचा ठरवला होता. परंतु एवढा विमानाचा खर्च करतच आहोत व सासूबाईंना काही सारखे सारखे येणे जमणार नाही हा विचार करून मध्य केरळ व दक्षिण केरळ ही ट्रीप एकत्र करून टाकावी त्याचबरोबर कन्याकुमारी सुद्धा या सोबतच करावी असा विचार केला. आणि हा विचार अत्यंत योग्य ठरला. आमच्या आठ रात्री नऊ दिवस या प्लानमध्ये गुरुवायूर व अथीरपल्ली हे काही बसेना. शेवटी ही दोन ठिकाणे उत्तर केरळाच्या ट्रिपमध्ये समाविष्ट करायचे असे ठरवून कोची, कलाडी, मुन्नार, थेकडी, मूनरो आयलंड, वर्कला, जटायू अर्थ सेंटर, त्रिवेंद्रम, पूवर, पद्मनाभ पुरम पॅलेस, सुचिंद्रम टेम्पल व कन्याकुमारी ही ठिकाणे कव्हर करण्याचे निश्चित झाले.

नकाशा

     Go इबिबो व बुकिंग डॉट कॉम या वेबसाईटवरून मी कोची आंतरराष्ट्रीय विमानतळापाशी Base9Airport हे हॉटेल एका रात्री करिता, Durga Budget Stay हे हॉटेल मुन्नार येथे दोन दिवसांसाठी, Holiday Villa हे हॉटेल थेकडी येथे व वर्कला येथे एक दिवस व Hotel JAAS कन्याकुमारी येथे दोन दिवस असे हॉटेलचे बुकिंग करून टाकले. प्रत्येक ठिकाणी एक मोठी फॅमिली रूम व एक स्वतंत्र बेड आम्हाला उपलब्ध करून देणार होते. जेणेकरून आम्ही सर्वजण एकाच खोलीत राहू शकणार होतो. हे सर्व आम्हाला अत्यंत स्वस्त मिळाले व सर्वच ठिकाणी सोय अतिशय चांगले झाली. पेपर केरला या कंपनीच्या कारचे रिव्ह्यू अतिशय चांगले होते. पेपर केरला या कंपनीकडून मला सगळ्यात कमी रकमेचे कोटेशन मिळाले, त्यानुसार मी या कंपनीचे सुरुवातीचे काही पैसे भरून बुकिंग करून टाकले. हिंदी बोलणारा ड्रायव्हर द्यावा अशी आवर्जून सूचना केली होती. जवळपास तीन आठवडे आधी मी या सर्व गोष्टी पूर्ण केल्या आणि सहलीची आतुरतेने वाट पाहू लागले.
     शेवटी जायचा दिवस उजाड उजाडला. आमचे विमान संध्याकाळी सात वाजता होते. त्यामुळे चार वाजताच घरी पोहोचायचे या हिशेबाने ऑफिस मधून लवकर निघायचे आधीच सांगितले होते.पण शेवटपर्यंत काही ना काही अर्जंट काम येत राहिले व शेवटी एकदाचे मी चार वाजता ऑफिस सोडले. धावत पळत चर्चगेटला लोकलमध्ये बसले तर स्पाइस जेट कडून मेसेज आला की आपले विमान दोन तास उशिरा येणार आहे. त्यामुळे विमान नऊ वाजता निघणार होते. मनातल्या मनात थोडे बरेच वाटले. घरी पोहोचून थोडे फ्रेश होऊन आम्ही साधारण साडेसहा वाजताच विमानतळावर पोहोचलो. सर्वांचाच हा पहिला विमान प्रवास असल्यामुळे चेक-इन प्रोसेस तसेच अन्य कोणत्याही औपचारिकतेबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे लवकर जाऊन सर्व प्रोसेस करून तिथे निवांत थांबूयात हा विचार करून आम्ही लवकरच गेलो. सिक्युरिटी चेकिंग झाले. बॅगा केबिनमध्ये टाकण्यासाठी दिल्या आणि आम्ही मग तिकडे फिरत राहिलो. सात वाजता तिथेच असलेल्या एका साउथ इंडियन काउंटरवरून आम्ही रात्रीचे डिनर करून घेतले कारण रूमवर पोहोचायला उशीर होणार होता. तसे मी हॉटेल मालकाला फोन करून सांगितलेही होते. सर्व काही व्यवस्थित पार पडेल ना याचे मला जरा टेन्शन आले होते. शेवटी एकदाचे दहाच्या सुमारास आमच्या विमानाने उड्डाण केले. आम्ही साडेबारा वाजता कोची विमानतळावरती पोहोचलो. तिथे चक्क पाऊस पडत होता. हवेत गारवा होता. आम्ही प्रीपेड टॅक्सीने जवळच असलेल्या आमच्या हॉटेल वरती पोहोचलो. त्यावेळी रात्रीचा एक वाजला होता. विमानात मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी हॉटेल मालकाला उतरल्यानंतर फोन केला. त्याने तो उचलला आणि तुम्ही सावकाश या असे सांगितले. हॉटेलचे लोकेशन त्याने व्हाट्सअप वर आधीच पाठवून दिले होते. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत तोही गाडीतून आला. त्याने आम्हाला रूम दाखवली. रूम प्रशस्त होती . साधारण दोन रूम होत्या. आतल्या रूम मध्ये डबल बेड व एक एक्स्ट्रा बेड व अटॅच बाथरूम होते तर बाहेरच्या रूममध्ये सोफा व डायनिंग टेबल होते. एकूणच आम्हाला रूम अतिशय आवडली. आम्ही त्यांना एक बेड बाहेर एक्स्ट्रा टाकायला सांगितला. त्यालाही त्याने कोणतीही खळखळ न करता पटकन व्यवस्था करून दिली. शेवटी एकदाचे केरळमध्ये पोहोचलो होतो. आता जरा मला सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्यासारखी वाटू लागली. मी निश्चिंत होऊन नेत्रादेवीच्या अधीन झाले. उद्या आम्हाला सर्वप्रथम शंकराचार्यांचे जन्मस्थान असलेल्या कलाडी येथे भेट द्यायची होती आणि वाटेत येणाऱ्या स्थळांना भेट देत मुन्नारला पोहोचायचे होते. हा सर्व वृत्तांत पुढील भागात........!

केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस पहिला- कलाडी ते मुन्नार

सहलीचा पहिला दिवस उजाडला. आज आम्हाला कलाडी या आद्य शंकराचार्यांच्या जन्मगावी भेट देऊन पुढे मुन्नारला पोहोचायचे होते. सकाळी आम्ही लवकर उठून आंघोळी करून आठ वाजेपर्यंत तयार झालो. हॉटेल मालकांनी अर्धा तासात ऑर्डर प्रमाणे नाश्ता बनवून देण्यात येईल म्हणून सांगितले. तथापि आम्हाला तेवढा वेळ नव्हता. त्यामुळे आम्ही चहा मागवला. नुकतीच दिवाळी झाल्यामुळे तसेच सासूबाईंना सकाळची गोळी घ्यायची असल्यामुळे फराळ सोबत ठेवला होता. आम्ही चहा व फराळ करून घेतला. आमचा ड्रायव्हर आम्हाला आठ वाजता घ्यायला आला. ड्रायव्हरचे नाव शामियर असे होते. हसतमुख, बोलक्या अशा शामियरचे आम्ही शमीभाई असे नामकरण करून टाकले. शमीभाईला एकंदरीत सहलीचा प्लॅन सांगितला. हॉटेलमधून चेक आउट करून आम्ही कलाडीकडे साधारण साडेआठच्या दरम्यान प्रस्थान केले. कलाडी येथे आद्य शंकराचार्यांचा जन्म झाला. तेथे शारदा शृंगेरी मठ आहे.
मंदीर

मंदीर

मंदीर

      आत शारदा देवीची मूर्ती , अष्टदुर्गांच्या मूर्ती, तसेच श्री शंकराचार्यांच्या आईची समाधी आहे. मंदिराच्या आत मध्ये कुठेही फोटो काढणे अलाउड नसल्याने बाहेरूनच फोटो काढले. तसेच जवळच श्रीकृष्ण मंदिर आहे. श्रीकृष्ण मंदिरांमधील मूर्ती अत्यंत मोहक होती.
मंदीर

     केरळ मधील मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहात कृत्रिम दिवा नसतो. केवळ पणत्यांच्या नैसर्गिक प्रकाशात जे भगवंताचे दृश्य दिसते ते केवळ-अवर्णनीय!! शारदा मठ व श्रीकृष्ण मंदिर या दोन्हीही मंदिरांमध्ये जाऊन मन खूप प्रसन्न झाले. मंदीर परीसर अत्यंत शांत व रमणीय आहे. आवर्जून भेट द्यावीत अशी ही मंदीरे आहेत. इथे आमचा दीड तास कसा गेला तेच कळले नाही. सहलीची सुरुवात तर उत्तम झाली होती.
     शमी भाईला मी विचारले की आम्हाला केरळची प्रसिद्ध राईस प्लेट “ साध्य” खायचे आहे. त्यावर त्यांनी मुन्नारला जाताना एक अतिशय प्रसिद्ध व उत्तम हॉटेल आहे तिथे आपण जेवूयात. साधारण एक तासात आपण तिथे पोहोचू असे सांगितले. मंदिरातून आम्ही निघालो त्यावेळी साडेअकरा वाजले होते. तसाही आम्ही नाष्टा केला नव्हता. त्यामुळे आता नाश्ता न करता थेट लवकर जेवणच करावे असा आम्ही विचार केला आणि मार्गस्थ झालो. हॉटेल “ रस ” असे या विशेष करून केरळी साध्य मिळण्यासाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल आहे. अत्यंत उत्कृष्ट असे हे हॉटेल असून अडीचशे रुपयाला अनलिमिटेड थाळी मिळते. या मार्गावर रस या नावाची अनेक हॉटेल्स असल्याने मी ज्या हॉटेलमध्ये जेवले त्याची लिंक देत आहे.

जेवण

     जेवताना पुढील पदार्थ होते - लिंबू लोणचे, आल्याचे लोणचे, कैरी लोणचे, यासोबत बारीक चिरलेल्या बटाट्याची वेगळीच भाजी, मिक्स व्हेजिटेबल हे सर्व पारंपरिक केरळी पद्धतीचे होते. या सोबतच अननसाची कोशिंबीर, लाल भोपळ्याची अतिशय चविष्ट भाजी, पांढऱ्या भोपळ्याची चणा घालून केलेली चविष्ट भाजी, सांबार, रस्सम, साधे वरण, कढी, बीटाची कोशिंबीर, सांडगी तळलेली मिरची, बनाना चिप्स, त्याच्यासोबत मिळणारा गुळाचा खडा, तीन प्रकारचे पायसम म्हणजे खीर होती. त्यामध्ये एक गव्हाची खीर, दुसरी शेवयाची खीर व तिसरी गाजराची खीर केली होती यासोबत पापड दही, केळ हे अतिशय पारंपारिक पद्धतीने केळीच्या पानावरती वाढून दिलेले अप्रतिम जेवण होते. जेवणातील प्रत्येक भाजी व कोशिंबीर चविष्ट होती. आम्ही 2-3 वेळी मागून मागून खाल्ली. खीर/पायसंम खाण्याची इथे विशिष्ट पद्धत आहे. खीरीमध्ये केळ कुस्करायचे व त्यात पापड मिक्स करायचा... जबरदस्त चव लागते. इथे जेवणे हा सोहळा आहे. अजिबात मिस करु नये.
     इथले जेवण जेवून आम्ही तृप्त झालो. शमी भाई ने सांगितले मी फूडी आहे त्यामुळे मला केरळमध्ये कुठे काय चांगले खायला मिळते ते अगदीच माहित आहे. तुम्हाला मी उत्तम प्युअर व्हेज मिळणार्‍या ठिकाणी नेत जाईन काळजी करू नका, असे सांगितले, मी त्याला सांगितले की मला या संपूर्ण प्रवासात पुट्टू विथ कडला करी, अप्पम विथ व्हेज स्ट्यू, तसेच केरला पराठा खायचे आहे. त्यावर त्याला आश्चर्य वाटले की मला इतके केरळी पदार्थ कसे काय माहिती? मी त्याला सांगितले की, मी पण खूप फूडी आहे. त्यामुळे मला इथले लोकल पदार्थ खायची इच्छा आहे. तुम्हाला जिथे वाटेल की इथला हा पदार्थ लोकल आहे आणि तो खाल्ला पाहिजे तेव्हा नक्की सांगा. त्यावर तो म्हणाला की खरंच तुम्ही बराच रिसर्च केला आहे. तुम्ही अल्लेपी ऐवजी मुन्रो आयर्लंड ला जाणार आहात. हे ठिकाण मी पहिल्यांदाच ऐकत आहे. तुमच्यामुळे मलाही ते पाहायला मिळेल असे तो म्हणाला. मी मात्र मनात हा निर्णय योग्य ठरेल किंवा वेडेपणा ठरेल हे भविष्यातच कळेल अशा विचार करत होते.
      आता घाट एरिया सुरू झाला होता आणि निसर्गाने त्याची रूपे दाखवायला सुरुवात केली होती. मी बहुदा मुन्नार या ठिकाणाबाबत खूप जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या. परंतु घाटामध्ये मला जो निसर्ग दिसत होता त्या निसर्गाच्या रूपांमध्ये आणि आपल्या कोकणातल्या घाटांमध्ये दिसणाऱ्या रूपांमध्ये फारसा काही फरक नव्हता. वाटेत आम्ही चिअप्परा वॉटरफॉल, वलरा वॉटरफॉल, अशा ठिकाणी थांबलो.

धबधबा

धबधबा

     फोटोसेशन केले. तथापि या वॉटर फॉल मध्ये जाऊन आपण भिजू शकत नाही. केवळ लांबून बघणे इतकेच करू शकतो. त्यामुळे थोडासा मूड ऑफ झाला. मुन्नार मध्ये तुम्हाला काय काय पाहायचे आहे असे शमीभाईने विचारले. त्यावरती मी त्याला माझा प्लॅन सांगितला. तर तो म्हणाला या ठिकाणी तर सर्वच जण जातात. मी तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे तुम्ही प्लान करा. काही वेगळी ठिकाणे पहा. तुम्हाला ती ठिकाणे नक्की आवडतील. त्याने आता जाताना हत्तीची सफारी करूयात, चॉकलेट फॅक्टरी पाहूयात, स्पाइस गार्डन पाहुयात आणि संध्याकाळी कथकली डान्स शो बघूयात असे सुचवले. त्यावर चॉकलेट फॅक्टरी पहाण्यात आम्हाला रस नाही. तसेच कथाकली शो आम्ही थेकडी ला पहायचा ठरवला आहे असे सांगितले. तथापि सासूबाईंसाठी हा पहिलाच अनुभव असल्यामुळे स्पाइस गार्डन पाहण्याचे ठरले. तसेच मी शमी भाईला सुचवले की आम्हाला झिप लाईन करायची आहे. शमीभाईने एका स्पाइस गार्डनच्या तिथे आमची गाडी थांबवली. हे फ्री होते. एका गाईडने आम्हाला तेथील वनस्पतींची माहिती दिली.
तेथील काही फोटो –
फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

     स्पाइस गार्डनची व्हिजिट हा एक खूप चांगला अनुभव होता. नंतर त्यांनी आम्हाला स्टोअर मध्ये नेले तथापि आम्ही तिथून काहीही घेतले नाही. तिथून आम्ही झिप लाईन साठी निघालो. ही झिप लाईन तेथील सर्वात लांब जीप लाईन आहे. खाली पूर्ण हिरवीगार दरी दिसत होती. आम्ही सर्वजण रोमांचित झालो होतो. मी सासूबाईंना देखील झिप लाईन करण्याचा आग्रह केला. नाही होय म्हणत त्या तयार झाल्या. परंतु जेव्हा सर्वप्रथम माझा आठ वर्षाचा मुलगा एका ट्रेनर सोबत गेला तेव्हा मात्र त्या घाबरू लागल्या. मी काही जाणार नाही पैसे परत करा असे म्हणू लागल्या. माझा नवरा पुढे गेला. शेवटी त्या येत नाहीत हे पाहून मीही गेले. शमी भाई ने एक युक्ती केली. तो म्हणाला छोट्या बरोबर जसा ट्रेनर गेला तसा तुमच्याबरोबर पण हा ट्रेनर येईल. त्याच्याशी मल्याळीमध्ये बोलून काहीतरी सांगितले आणि सासूबाईंना त्यांनी तयार केले. सासूबाईंना वाटले की आपल्याबरोबर हा ट्रेनर येणार आहे त्यामुळे त्या तयार झाल्या. तर ट्रेनरने त्यांना धरून उभा केले आणि धक्का देताना त्यांना एकट्यालाच सोडले. अशा रीतीने सासूबाईंनी देखील या वयात झिप लाईन चा आनंद घेतला.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

     मी पुढे जाऊन त्यांच्यासाठी थांबले होते. त्या येत असताना बघून मला खूप आनंद झाला. मी दुसऱ्या बाजूने पुढे गेले आणि त्याही माझ्या मागोमाग आल्या. आयुष्यात कधी करू न शकणारे धाडस केल्याचा आनंद व आश्चर्य त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. परत आल्यानंतर आम्ही दोघींनीही एकमेकींना कडकडून मिठी मारली. आमच्या सर्वांसाठी एक लाईफ टाईम अनुभव होता हा. पैसे पूर्ण वसूल झाले होते. ट्रिपचा आता आनंद यायला लागला होता. आम्हाला बऱ्यापैकी वेळ झाला होता. शमी भाई आम्हाला तिथे जवळच असलेल्या कथकली शो पहा असे सांगू लागले. पण तिकीट खूपच जास्त होते. पाचशे रुपये एकाचे. मी त्यांना म्हणले की हा शो २०० रुपयांमध्ये पाहायला मिळतो. त्यावरती शमीभाईचे म्हणणे पडले की मी खूप ठिकाणी हा शो पाहिलेला आहे. त्याच्यात काही मजा नाही. परंतु हा शो पाहिल्यानंतर तुम्हाला पैसे वसूल झाल्याचे फील येईल. मी सकाळी सुचवलेला हॉटेलच्या जेवणाचा अनुभव तुम्ही घेतलात ना, त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा. तुमची सहल चांगलीच होईल अशाच गोष्टीं मी तुम्हाला सुचवेन. शेवटी मी त्याला सांगितले की रेट मध्ये काहीतरी घासाघीस कर हे मला खूपच जास्त वाटतं. त्यावर त्याने मल्याळीमध्ये बोलून प्रत्येकाचे आठशे रुपये दोन्ही शोचे ठरवले. म्हणजेच एक तासाचा कथकली शो व एक तासाचा कलरीपट्टू बघायला मिळणार होता. हे आम्हाला जास्तच वाटले. परंतु ठीक आहे. सहलीमध्ये असे काही ना काही आऊट ऑफ बजेट होत असते असा आम्ही विचार केला. त्याच वेळी तिथे असलेल्या एका माणसाकडे दुसऱ्या दिवशी साठी एक जीप ठरवली जी अर्धा दिवसांसाठी आम्हाला पाच वेगवेगळ्या ठीकाणी फिरवणार होती. जिचे आम्ही तीन हजार पाचशे रुपये पे केले.
     पाच वाजले होते आणि कथकली शो ची वेळ झाली होती. या प्रोग्रॅम मध्ये त्यांनी कथकली, भरतनाट्यम त्याचबरोबर केरळमधील थय्यम हे नृत्य प्रकार देखील दाखवले. हा कार्यक्रम अतिशय नेत्रदीपक असा झाला. आम्हाला अतिशय आवडला. त्यानंतर कलरीयापट्टू हा केरळमधील पारंपारिक मार्शल आर्ट च्या कार्यक्रम देखील चांगलाच होता.
त्याचे काही फोटो –
कथकली

फोटो
थय्यम

फोटो
भीम व दूर्योधन युद्ध
फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

     कार्यक्रमा मधील कलाकारांबरोबर काही फोटो काढून आम्ही हॉटेलकडे प्रस्थान केले. हॉटेलच्या मालकाला आम्ही उशिरा येत आहोत हे सकाळीच सांगून ठेवले होते. त्याप्रमाणे आम्ही साधारण साडेनऊ वाजता हॉटेलवर पोहोचलो. आमची रूम तिसऱ्या मजल्यावर होती. रूम प्रशस्त होती. बाहेर एक कॉमन पेसेज होता. तिथे बेड टाकून ठेवले होते. एकंदरीतच उत्तम रूम आम्हाला केवळ सतराशे रुपये मध्ये मिळाली होती. 24 तास गरम पाणी होते. स्वच्छता होती. अजून काय हवे होते? हॉटेल मालकाने आमच्या चारही बॅगा तिसऱ्या मजल्यावरती स्वतः चढवल्या. आम्ही तेथे दोन दिवस राहणार होतो. आजचा पूर्ण दिवस अत्यंत अविस्मरणीय असाच गेला. सकाळी मंदिरांची भेट, चविष्ट अशी साध्य थाळी, त्यानंतर झिप लाईन चा थरार, स्पाइस गार्डन ची भेट, कथकली आणि कलरीयापट्टूचा शो हे सर्वच आम्ही खूप जास्त एन्जॉय केले. आता सर्वांना भूक लागली होती. जवळच एका प्युअर व्हेज असलेल्या अन्नपूर्णा नावाच्या हॉटेलमध्ये आम्ही चायनीज खायचे ठरवले. त्यानुसार आम्ही मशरूम फ्राईड राईस, गोबी मंचुरियन व पनीर चिली ऑर्डर केले. हे सर्व आम्हाला खूप होईल असे वाटले होते तथापि क्वांटिटी कमी होती. हे पाहून नूडल्स देखील ऑर्डर केल्या. आश्चर्यकारकरीत्या सर्व पदार्थांची चव अत्यंतिक चांगली होती. आजचा दिवस सार्थकी लागला होता. उद्या आता मुन्नाचे काय दर्शन होते आणि काय नवीन अनुभव मिळतो याबाबत उत्सुकता मनात घेऊन आम्ही झोपी गेलो......

दिवस दुसरा- मुन्नार स्थानिक स्थलदर्शन

 आज सहलीचा दुसरा दिवस होता. सकाळी लवकरच उठून आवरल्यानंतर समोर असलेल्या हॉटेल अन्नपूर्णा मध्ये आम्ही नाश्ता करायला गेलो. नेहमीप्रमाणे साउथ इंडियन नाश्ता आम्ही ऑर्डर केला. इडली, मेदुवडा, डोसा अशा पदार्थांवर आम्ही आडवा हात मारला. त्याचबरोबर कॉफी ऑर्डर केली. सगळ्याची चव अतिशय उत्तम होती.
फोटो

     मून्नारला पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे एरावीकुलम नॅशनल पार्क, मुटिपट्टी डॅम, टॉप स्टेशन, कुंडला डॅम इ. ही एकाच मार्गावर आहेत. परंतू वेगळे काही बघुयात असे ठरलेले असल्याने पोटभर नाश्ता करून आम्ही ड्रायव्हर सोबत काल जिथे जिप ठरवली होती त्या ठिकाणीच आलो. आज ते आम्हाला रीप्पल वॉटर फॉल, पोनमोडी डॅम, इको पॉईंट व हँगिंग ब्रिज जिथे बऱ्याच चित्रपटांचे शूटिंग झालेले आहे त्याचबरोबर एक व्ह्यू पॉईंट अशा ठिकाणी फिरवणार होते. या ठिकाणांवरती जाण्याचा मार्ग हा कच्चा रस्त्याचा असल्यामुळे इथे आपली नेहमीची गाडी जात नाही. त्याकरिता जीपच करावी लागते असे आम्हाला सांगण्यात आले. आणि खरंच जो रस्ता होता, तो रस्ता नाही, खरं म्हणजे तिला पायवाट म्हणावे अशा प्रकारचा तो रस्ता होता.त्यामुळे इथे नॉर्मल गाडी जाणार नाही हे खरेच होते.आमची जीप खाजगी मसाल्यांच्या बागांमधून देखील गेली. आमची ठरवलेली जीप

फोटो

      सर्वप्रथम आम्ही रीप्पल वॉटर फॉल ला भेट दिली. रीप्पल वॉटर फॉल हे अतिशय छान ठिकाण आहे. ईथे बसण्यासाठी सुविधा आहे. थोडे चालत खाली वर उतरावे लागते. तथापि हा वॉटरफॉल हा दुरून बघण्याचा एक वॉटरफॉल आहे. इथे देखील तुम्ही झीप लाईन करू शकता. ही झीप लाईन वॉटरफॉलच्या वरुन पार करुन जाते. इथे बरेच लोक झीप लाईन करत होते.

फोटो

फोटो

फोटो

      नंतर आम्ही हैंगिंग ब्रिज ला भेट दिली. हैंगिंग ब्रिज वरून बराच चित्रपटांचे शूटिंग झाले आहे असे आम्हाला सांगितले. खालून असाच एक धबधबा वाहत होता आणि वरती तो ब्रिज होता. फार काही ग्रेट वाटले नाही.
फोटो

फोटो

फोटो

     त्यानंतर ते आम्हाला पोनमोडी डॅम वरती घेऊन गेले आणि तिथूनच जवळ असलेल्या इको पॉइंटवर घेऊन गेले. हे डॅमच्या मागे असलेल्या बॅकवॉटरच्या बाजूला एक पॉईंट होता. इथे म्हणे चेन्नई एक्सप्रेस चे शूटिंग झाले होते. आम्हाला काही तो प्रसंग आठवेना. इथे एक गंमत होती की प्रत्येक जण तिथे ओरडून इको येतोय काय ते पाहत होता. अचानक माझ्या मुलाने एका जागेवरून आई अशी जोरात हाक मारली आणि इको आला. तेव्हा सगळे चमकून त्याच्याकडे पाहू लागले. मग माझे मिस्टर देखील तिथे गेले आणि जोरात मुलाच्या नावाने हाक मारली. तथापि एको आला नाही. मुलाने बाबा अशी जोरात हाक मारली आणि इको आला. तेव्हा लक्षात आले की मुलगा ज्या ठिकाणी उभा होता तिथूनच केवळ इको ऐकू येत होता. मग काय!! आलेल्या सगळ्या पर्यटकांनी एका मागोमाग एक तिथे उभारून इको येतोय का हे पाहायला सुरुवात झाली आणि आम्हाला तो इको पॉईंट एकदाचा सापडला!! त्यामुळे तिथे मात्र आम्हाला खूप मज्जा आली. याचा व्हीडीओ आहे. परंतू मला व्हीडीओ कसा चढवायचा ते जमत नाही.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

     नंतर ते एका पॉईंटला घेऊन गेले. तिथून डोंगर रांगा दिसत होत्या.

फोटो

फोटो

      भर दुपारचे आम्ही तिथे उभे होतो. तिथूनही वरून एक लांबचा धबधबा दिसत होता. तथापि फार काही ग्रेट वाटले नाही. खरंतर ही सर्व ठिकाणे सुंदर होती. परंतु एकंदरीतच साडेतीन हजार रुपये एक्स्ट्रा देऊन अशा पद्धतीची ट्रीप करणे फार काही वर्थ वाटले नाही. पण ठीक आहे. आम्ही ठरवले होते. जे काही आपल्याला दिसेल त्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा. त्यामुळे आम्हाला जे काही दिसले, ते आम्ही फोटो वगेरे काढून एन्जॉय करत होतो.
      जीप ड्रायव्हरने आम्हाला परत जिथे होते तिथेच सोडले. साधारण दुपारचा 1.30 वाजला होता. आता आम्ही तिथल्याच एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवायचं ठरवले. तिथे काही साउथ इंडियन जेवण मिळत नव्हते. त्यामुळे आम्ही फ्राईड राईस आणि नूडल्स मागवले आणि भूक भागवली. शमी भाईला आमचा एक्सपिरीयन्स फार काही ग्रेट नव्हता हे सांगितले. त्यावर तो म्हणाला, आता मी तुम्हाला एक पॉईंट ला घेऊन जातो तो बघितल्यावर मात्र तुमचं मन खुश होऊन जाईल. हा पण एक धबधबाच आहे आणि इथे नॉर्मली कोणीही तुम्हाला घेऊन जाणार नाही.
      जाताना त्याने आम्हाला केरळामधला पहिला हायड्रो प्रोजेक्ट दाखवला

फोटो

फोटो

      आणि तो आम्हाला आटूकडू वॉटर फॉल्स कडे घेऊन गेला. हा धबधबा मात्र फारच जवळून दिसत होता. पाण्याचा मोठा प्रवाह जोरात वाहत होता. आम्ही तेथेदेखील ब्रिजवर उभे होतो आणि धबधबा खूप जवळून दिसत होता.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

परंतु इथे जाण्याचा मार्ग मात्र अतिशय अप्रतिम होता. तिथे जाण्याचा मार्ग हा चहाच्या मळ्यातून जात होता. त्यामुळे आम्ही मध्येच उतरून एका चहाच्या मळ्यामध्ये काही फोटो काढले. त्याच्यामागे आम्हाला बॅकग्राऊंड वरती एक लांबचा धबधबा दिसत होता. खूपच मजा आली.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

वेलचीची झाडे तळाला जो हिरवे हिरवे शेंगा सारखे दिसत आहेत ते वेलची आहेत
फोटो

     त्यानंतर तो आम्हाला पोथमेडू या व्यू पॉइंटवर घेऊन गेला. इथून पूर्ण मुन्नारचा सुंदर नजारा दिसत होता. हे दोन्ही ठिकाणी आम्हाला अतिशय आवडली आणि सकाळी फारसे काही बघायला नाही मिळाले याबाबत जे काही असमाधान होते ते क्षणात दूर पळाले.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

      संध्याकाळचे 5.00 वाजले होते. चहाची तल्लफ आली होती. वाटेत आमचे अन्नपूर्णा हॉटेल लागले. तिथे चहा आणि केरळची प्रसिद्ध केळ्याची भजी ट्राय केली. याला मल्याळीमध्ये पाळम पोरी असे नाव आहे. गोड व तिखट असे दोन्ही प्रकार मिळतात. कोल्हापूरी मिरची भजीचे फॅन आसणाऱ्या आम्हा कुणालाच हा प्रकार अजिबात आवडला नाही. आवर्जून खावा असा काही हा प्रकार नाही. पण इथे हा प्रकार बराच चालतो.

फोटो

      चहा पिऊन झाला. का कुणास ठाऊक मला मुटूपट्टी डॅम बघायचा होता. तिथे बोटिंग करायला मिळाले तर करायचे होते. शमीभाई ने आता गाडी तिकडे वळवली. खरं तर ते खूप लांब होते. नेमका कुठलातरी उत्सव असल्यामुळे गाडी मुन्नार शहरातच बराच वेळ अडकली. नंतर आम्ही जे मुटूपट्टी डॅमच्या रस्त्याला लागलो तो मात्र सुंदर नजारा होता. तथापि डॅमच्या अलीकडे खूप सार्‍या गाड्या लागलेल्या असल्यामुळे ड्रायव्हरने आत मध्ये जितके शक्य आहे तिथपर्यंत सोडून परत रिव्हर्स घेऊन पार्किंगसाठी गेला आणि आम्हाला पुढे जायला सांगितले. कारण आता तिथे संध्याकाळ झालेली असल्यामुळे कदाचित आम्हाला फिरता येणार नव्हते. त्यामुळे आम्ही चालत चालत पुढे गेलो. बऱ्यापैकी अंधार झाला होता. वेळ संपलेली होती. सर्वजण ते पाहून परत निघाले होते. आम्ही काही फोटो काढले. आजूबाजूला फिरत राहिलो. तेवढ्यात एक घोडेस्वार आला. मुलाला त्याच्यावरती बसायचे होते. त्यामुळे त्याला सवारी करवली आणि आम्ही परत फिरलो.
फोटो

फोटो

फोटो

      एकंदरीतच आज एकाच दिवसात आम्ही बरेच पॉईंट फिरलो होतो आणि छान वाटत होते. साधारण साडेसात-आठच्या दरम्यान आम्ही हॉटेल वरती परत पोहोचलो. उद्या आम्हाला थेक्कडी ला जायचे होते. प्रामाणिकपणे सांगायचं तर मुन्नारला लोक दोन ते तीन दिवसाचा मुक्काम कराच असे सांगतात. तथापि मला मुन्नार का कुणास ठाऊक पण फार काही आवडले नाही. जेवढी हाइप मुन्नार बद्दल लोकांनी करून ठेवली आहे तितके काही ते ग्रेट आहे असे वाटत नाही. कदाचित मी मुन्नारबाबत फारच अपेक्षा ठेवून गेले होते म्हणून हे झाले असेल. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. कोचीहून मुन्नारला पोहोचण्याचा एक दिवस व त्यानंतरचा एक दिवस हा मुन्नार साठी खूप झाला. मी तर म्हणेन दुसरे दिवशी सरळ मुन्नार होऊन थेकडीला सावकाश जावे. हा प्रवास अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. येथे मात्र तुम्हाला जागोजागी थांबून निसर्गाची वेगवेगळी रूपे पहावे असे वाटेल. त्यामुळे मुन्नार ते थेकडी हा प्रवास जरी गुगल मॅप वरती तीन तासाचा असला तरीही तुम्हाला पोहोचेपर्यंत चार ते साडेचार तास आरामात लागू शकतात आणि खरोखर तेवढा वेळ दिला पाहिजे. इतकी जागोजागी अप्रतिम निसर्गाची मुक्तहस्ताने उधळण झालेली दिसते आणि आपण केरळ मध्ये आलो आहोत याचा परिचय होतो. असो. याचे वर्णन आता पुढील भागात......

दिवस तिसरा "थेकडी"

   आज आम्हाला थेकडी ला जायचे होते. थेकडी हे पेरियार अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. सकाळी उठल्यावर येथील प्रसिद्ध “सर्वना भवन” येथे आम्ही नाश्ता करण्यासाठी गेलो. हे मुन्नार मधले एक अतिशय उत्तम व मस्ट ट्राय असे हॉटेल आहे. इथे आम्ही इडली, मेदुवडा, डोसा, पोंगल व त्याचबरोबर अप्पम आणि गोड नारळाचे दूध हे पदार्थ ट्राय केले.

फोटो

     हा एक अतिशय उत्तम अनुभव होता. केरळमध्ये अप्पम हे व्हेज कुर्मा/अंडा करी/फीश करी बरोबर खातात. पण इथे तो गोड नारळाच्या दुधाबरोबर सर्व्ह केला गेला. मस्त चव होती अप्पमची. पोंगल हा साधारण खिचडीभातासारखा प्रकार आहे. एकदा खायला छान वाटला. हे सर्व पदार्थ नारळ, आलं+मिरची+पुदीना व टोमॅटो अशा 3 प्रकारच्या चटण्या व सांबार सोबत दिले. इथे केरळमध्ये सर्वच ठिकाणी सांबार दाट व चवीला साधारण होते. पण चटण्या मात्र 1 नंबर. त्यामुळे चवीचा सगळा गेम चटण्यांचा होता. चटण्या व सांबार सगळीकडे अनलिमिटेड असते. तसेच इकडे नगावर इडली व मेदूवडा देतात. म्हणजे तुम्ही कितीही इडली, मेदूवडा खा शेवटी ते नगानुसार बिल करतात. 1 इडली 15 रु. व एक मेदूवडा 20रु. याप्रमाणे. भरपेट नाश्ता करून, तृप्त होऊन आम्ही साधारण साडेनऊ वाजता थेकडीला प्रस्थान केले.

     आता थोडे थेकडी बद्दल बोलूया. थेकडीला जावे की न जावे याबद्दल अनेकांची अनेक मते असतात. असेही रिव्ह्यू वाचले आहे की थेकडीला काहीही नाही, त्यामुळे ते स्किप केले तरी चालते. परंतु मुन्नार वरून थेट मुनरो आयर्लंड येथे जाण्याचा रस्ता हा साधारण गुगल मॅप वरती सात ते आठ तासांचा दाखवत होता. त्यामुळे मध्येच कुठेतरी स्टॉप घेऊन हा प्रवास करणे आवश्यक होते. त्यामुळे मी थेकडी या ठिकाणाचा समावेश आमच्या सहलीमध्ये केला. या ठिकाणाकडून मला फार काही अपेक्षा नव्हत्या. इथे प्रसिद्ध असलेली ऍक्टिव्हिटी म्हणजे इथल्या बॅक वॉटर मध्ये करायचे बोटिंग. साधारण तीन तासाच्या या बोटिंगमध्ये तुमचे नशीब चांगले असेल तर काही प्राणी दिसू शकतात. तथापि आम्हाला इतका वेळ बोट राईड करण्यामध्ये रस नव्हता.
     मी periyartigerriserve.org या वेबसाईट वरती तिथे करण्यात येणाऱ्या बऱ्याच ऍक्टिव्हिटी बघितल्या होत्या. ज्यामध्ये नेचर वॉक, ग्रीन वॉक, बांबू राफ्टींग- हे पूर्ण दिवस व अर्धा दिवस अशा पद्धतीने होते, शिवाय ट्रेकिंग, नाईट सफारी, हायकिंग, ट्रायबल डान्स, जंगल कॅम्प, बर्ड सॉंग ट्रेल, गावी नावाच्या जंगल एरियामध्ये जंगल सफारी, असे अनेक पर्याय अत्यंत माफक दरामध्ये उपलब्ध असलेले दिसले. या एकाच साईट वरती तुम्ही जंगलामध्ये राहण्यासाठी कॉटेज देखील बुक वगैरे करू शकता. अतिशय अद्यावत अशी ही वेबसाईट असून याच्यावरून ऑनलाइन बुकिंग करता येते.
     ज्यावेळी मी सहलीचे नियोजन करत होते त्यावेळी माझा अंदाज होता की आम्ही साधारण एक वाजेपर्यंत थेकडी येथे पोहोचलो की त्यानंतर दोन तासाचा नेचर वॉक बुक करायचा. त्यानंतर हत्तीची सफारी करायची. संध्याकाळी वेळ मिळाला व दर योग्य असेल तर तर मसाज घ्यायचा किंवा मार्केट फिरायचे. इथे सुद्धा दोनशे रुपये प्रतिमांशी दरामध्ये कलरीपट्टू व कथाकलीचे शो संध्याकाळी असतात. ही सर्व ठिकाणे जवळजवळ असल्यामुळे मुन्नार मध्ये जसे प्रत्येक ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यामध्ये वेळ जातो तसा मात्र येथे जात नाही. कारण हे खूप छोटेसे शहर असल्यामुळे तिथल्या तिथेच बरीच ठिकाणे आहेत.
     खरंतर मुन्नार येथील बऱ्याच ऍक्टिव्हिटी या थेकडी येथे उपलब्ध आहेत आणि बरेचसे पर्यटक या सर्व ऍक्टिव्हिटी मुन्नारला आधीच करून आलेले असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी थेकडी येथे बोटिंग सोडले तर करण्यासारखे विशेष असे वेगळे काही उरत नाही. टुरिस्ट कंपन्या आपला ग्राहकांना इथे उपलब्ध असलेल्या इतर ऍक्टिव्हिटी बद्दल कितपत सांगतात याबद्दल मला शंका आहे. त्यामुळे हे ठिकाण स्किप करण्याचा देखील सल्ला बरेच जण देतात. परंतु मला मात्र जंगलात फिरायला आवडते वेबसाईटवरील बऱ्याचश्या ऍक्टिव्हिटी या मला अतिशय आकर्षक वाटल्या. खरं म्हणजे थेकडी येथे भविष्यात मी नक्की पुन्हा भेट देणार आहे व राहिलेल्या सर्व ऍक्टिव्हिटी पूर्ण करणार आहे जसे की जंगल वॉक ,नाईट सफारी हा अनुभव मला जंगलातीलच कॉटेजमध्ये राहून घ्यायचा आहे. बघूया कधी जमेल ते. असो.
     मुन्नार ते थेकडी हा मार्ग अत्यंत निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. हा प्रवास अविस्मरणीय असा होता. केरळ सहलीमध्ये सर्वात आवडलेले काही क्षण जर मला कोणी सांगायला लावले तर हा मुन्नार- थेकडी प्रवास , मुनरो आयर्लंड मधील बोट राईड, आणि पद्मनाभम पॅलेसची सफर असे मी तीन हाय पॉइंट सांगेन. एकाच वेळी आपल्याला चहाचे हिरवेगार मळे आणि जंगलाने वेढलेले डोंगर आणि निळे शार आकाश असं एक सुंदर कॉम्बिनेशन दिसतं. हे दृश्य कितीही डोळ्यात साठवलं तरी मन भरत नाही. प्रत्येक वळणावरती निसर्गाचा नवीन कॅनव्हास आपल्यासमोर एक नवीन निसर्ग चित्र निर्माण करतो. या प्रवासाने आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले इतकेच म्हणेन.

फोटो

कधीतरी मध्ये चहाचे मळे दिसत होते तर कधी सुंदरशा डोंगर रांगा

फोटो

फोटो

हिरवेगार चहाचे मळे.... त्याच्यामागे उभे असलेले उंच पहाड आणि वरती निळे शार आकाश.......

फोटो

फोटो

     या मार्गांवरती काही ठिकाणी थांबून खूप फोटोग्राफी केली.

प्रत्येक वळणावरती निसर्गाची एक नवीन फ्रेम समोर येत होती. आता इथेच बघा आकाश किती सुंदर दिसत आहे आणि खाली साधारण जंगलाचा भाग पण संपूर्ण चित्र निळाईत रंगल्यासारखं वाटत आहे
फोटो

हे सर्व दृश्य किती बघू आणि किती नको असेच होते
फोटो

सुंदर से निळे आकाश आणि मागे डोंगरांच्या कित्येक रांगा ......लांबून त्याही निळाईने रंगलेल्या वाटत होत्या ......
फोटो

निळाईची उधळण...

फोटो

वाटेत सुंदर वॉटर फॉल दिसला...

फोटो

या धबधब्यामध्ये पाणी भरपूर होते
फोटो

     तेवढ्यात एके ठिकाणी पेरियार धरणाचे बॅकवॉटर आम्हाला दिसले. टाटा टी चे चहाचे मळे त्याला लागूनच होते आणि त्या चहाच्या मळ्यांमध्ये आम्हाला दोन हरणे बागडताना दिसली. आम्ही गाडी थांबवली आणि घाटाच्या कठड्यावरती बसून त्या दृश्यांचा आस्वाद घेऊ लागलो. चहाचे मळे, त्याला लागून असलेले बॅक वॉटर आणि त्याच्या पलीकडे असलेले डोंगर आणि डोंगराच्या वरती असलेले निळेशार आकाश! असे वाटले इथून कधीही उठू नये!! आमच्याकडे दुर्बीण होती आणि आम्ही त्यातून पाहू लागलो तर आम्हाला त्या धरणाच्या बॅक वॉटर मध्ये तीन हत्ती पाणी पीत असताना दिसले. त्याचबरोबर एक हत्तीचे पिल्लू देखील होते. खाली जिथे बाण दाखवला आहे तिथे हरणाचे एक पिल्लू दिसत आहे.असे दोन पिल्ले आजूबाजूला बागडत होती .

फोटो

फोटो

फोटो

फोटो

     आम्हाला अलभ्य असा लाभ झाला होता! मुळात आम्ही थेकडीला बोट राईट घेणार नव्हतो. कारण मी बऱ्याच ठिकाणी वाचलं होतं की दोन-तीन तास फिरून देखील एकही प्राणी दिसत नाही. त्यामुळे आम्ही टेकडीला फक्त जंगलात नेचर वॉक करणार होतो, हत्तीवरून फिरणार होतो आणि तेथील मसाल्यांच्या मार्केटमध्ये फिरणार होतो. जे काही करायला मिळेल तो आमचा बोनस होता. कारण आम्ही कधी पोहोचू याची शाश्वती नव्हती. आम्ही तिथे थांबलेले बघून काही पर्यटकांच्या गाड्या देखील तिथे थांबल्या. आम्ही त्यांना सांगितले तिथे खाली हरणे आहेत. तसेच हत्ती देखील आहेत. त्यावेळी एक पर्यटक स्त्री म्हणाली आत्ताच आम्ही थेकडीला दोन तासाची बोट राईड करून आलो परंतु एकही प्राणी आम्हाला दिसला नाही,नशीब आमचं की इथे तरी आम्हाला काही प्राणी दिसले.

फोटो

फोटो

     आम्ही साधारण तासभर तरी तिथे थांबलो. कारण ते दृश्यच इतके नयनरम्य होते की तिथून उठावे असे वाटतच नव्हते. तेवढ्यात एक जंगली गवा तिथे पाणी पिण्यासाठी आला. आम्ही सर्वजण कठड्यावरती पाय सोडून निवांत बसलो होतो व त्या दृश्यांचा आनंद घेत होतो.

फोटो

तेथील जवळ एका नारळ पाणी पिणाऱ्या विक्रेत्याकडून नारळ पाणी पिण्यासाठी घेतले आणि साधारण तासा-दीडतासा नंतर आम्ही तिथून निघालो. त्यावेळी 12 वाजले होते.

      आम्ही जरा पुढे आलो आणि तिथे शमीभाईने गाडी टाटाटीच्या फॅक्टरीमध्ये नेली. समोरचे दृश्य बघून आम्ही स्तिमित झालो. कारण सुंदर नदी वाहत होती व त्याच्या काठावरती टी प्लांटेशन झाले होते. शमीभाई म्हणाला इथे आपण चहा वेचणाऱ्या बायकांच्या रूपात तुमचे फोटो सेशन करूयात. त्याने माझ्या सासूबाईंचा स्कार्फ विशिष्ट पद्धतीने डोक्यावरती बांधला. आता आम्ही थोडे चहा खुडणाऱ्या बायकांसारखे दिसत होतो. त्यांनी आमचे मस्त फोटोशूट केले. त्यातील काही फोटो-

फोटो

फोटो

     प्रवासातील दृश्य एन्जॉय करत करत आम्ही थेकडीला साधारण 3.00 वाजता पोहोचलो. पोहोचल्या पोहोचल्या तिथे हत्तीच्या सफारीची तिकिटे काढली. खूप गर्दी होती. टोकन नंबर नुसार आमचा नंबर यायला साधारण दीड ते दोन तास जाणार होते. त्यामुळे आम्ही तेवढ्या वेळात तेथीलच एका जवळच्या हॉटेलमध्ये जेवून घेतले. नॉर्थ इंडियन थाळी होती. बरी होती. जेवून आम्ही हत्तीच्या सफारीसाठी आलो. इथेच बाजूला कलारीपट्टू आणि कथकलीच्या शोची तिकिटे मिळणार होती. तथापि आम्ही हे शो आधीच पाहिले होते. हत्तीच्या सफारीसाठी किती वेळ जाईल हे माहित नव्हते. तसेच प्रवासाचा थकवा जाणवत होता, त्यामुळे नेचर वॉकचा बेत रद्द केला व संध्याकाळी केवळ मार्केटमध्ये फेरफटका मारू असा विचार केला. थेकडीमध्ये आम्ही जे हॉटेल बुक केले होते, तेथील मालकाला आम्ही उशिरा येत आहोत हे कळवले.
      हत्तीची सफारी अतिशय उत्तम झाली.
फोटो

फोटो

मसाल्याच्या बागेतून 15 मिनिटे हत्तीने आम्हाला फिरवून आणले.

फोटो

फोटो

मुलाने हत्तीच्या सोंडेतून पडणाऱ्या पाण्यात अंघोळ करून घेतली. त्याला खूप मजा वाटली.

फोटो

फोटो

हे सर्व प्रतिमाणशी 500 रुपयांमध्ये झाले. आंघोळीचे पाचशे रुपये वेगळे.
     त्यानंतर आम्ही आमचे हील व्ह्यू नावाचे हॉटेल होते, तिथे चेक-इन केले. मालक अतिशय सहकार्य करणारा होता. हॉटेलमधून समोर दिसणारे दृश्य अप्रतिम होते. कारण समोर उभा डोंगरच्या डोंगर दिसत होता. धुके दाटून आले होते.

फोटो

     खरंच असं वाटलं की थेकडीला अजून एक दिवस ठेवायला पाहिजे होता. त्या हॉटेलच्या आमच्या रूमच्या बाहेर मस्त मोठा व्हरांडा होता. तिथे बांबूच्या छान दोन खुर्च्या टाकून दिल्या होत्या. मी आणि माझा नवरा निवांत तिथे बसलो. समोरचे दृश्य एवढे सुंदर होते की काही बोलावे असे वाटत नव्हते.

फोटो

खरं म्हणजे मुन्नार मध्ये एक दिवस कमी करून तो थेकडीला एक दिवस वाढवायला हवा होता असे वाटले. केवळ हॉटेलमध्ये बसून देखील आम्ही राहिलो असतो तरी देखील समोरचे दृश्य बघतच आम्ही दिवस घालवला असता, इतके सुंदर दृश्य होते.
      रूम ताब्यात घेऊन बाकीचे सगळे सोपस्कार करेपर्यंत साडेसात वाजले होते. आम्ही मार्केटमध्ये फिरायला बाहेर पडलो. फिरून काही मसाले घेतले. हे मसाले स्वस्त नसले तरी चांगल्या दर्जाचे असतात. (खरं तर सासूबाईंना मात्र गावी वापरण्यासाठी मसाले घ्यायचे होते. मला मसाल्यांची खरेदी करण्यामध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता. परंतु सासूबाईच्या इच्छे खातर मसाल्याची थोडीफार खरेदी झाली. घरी आल्यानंतर मी या मसाल्यांचा वापर करून मिसळ बनवली आणि फरक लगेच जाणवला. खड्या मसाल्यांचा सुंदर असा वास कटाला आला होता आणि मग इतके दिवस मी केरळमधील विविध हॉटेलमध्ये पदार्थ खात असताना मसाल्यांचा जो ताजेपणा जाणवत होता तो का जाणवत होता याचे उत्तर मिळाले. आपणही थोडे जास्तीचे खडे मसाले खरेदी केले असते तर बरे झाले असते असेही वाटून गेले....) तसेच मला मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी गव्हाच्या हलवा दिसला. एका दुकानांमध्ये आम्ही मसाले व ड्रायफ्रूट हलवा व गव्हाचा हलवा विकत घेतला.

फोटो

      साधारण 80 ते 90 रुपये पाव किलो या दराने हा हलवा मिळतो.

फोटो

हा हलवा चवीला उत्तम लागतो. हा पदार्थ केरळला कुणी गेले तर मीस करु नये. तेवढ्यात समोर एक चाट वाला दिसला. त्याच्याकडे आम्ही पाणीपुरी, भेळ असे चाट खाल्ले. दुपारी उशिरा जेवण झालेले असल्यामुळे भूक फारशी नव्हती.
      त्यामुळे हॉटेलवर आलो आणि लवकर झोपी गेलो. कारण उद्या लवकर उठायचे होते. उद्या आम्हाला मुन्रो आयर्लंड येथे जायचे होते. गुगल मॅप चार तास दाखवत असले तरी आजच्या अनुभवावरून मला लक्षात आले होते की त्याहीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. शिवाय केरळ मधील रस्ते हे अरुंद असल्यामुळे तसेच ड्रायव्हरला 60 पेक्षा जास्त स्पीडने गाडी चालवण्यास कंपनीकडून बंदी असल्याने, ट्रॅफिक नसले तरीही ड्रायव्हर जास्त स्पीडने गाडी चालवत नाही. त्यामुळे उशीर लागणार आहे हे लक्षात घेऊन शमीभाईला सांगितले की उद्या सकाळी साडेसहा वाजता तयार रहा, आपल्याला लवकर लिहायचे आहे.मुनरो आयर्लंड च्या नितांतसुंदर अनुभवाची गोष्ट पुढील भागात.....


अप्पम आणि परोटा हे दोन्ही पदार्थ केरळ आणि तामिळनाडूमध्ये चांगले मिळत असले तरी केरळचे अप्पम (पालप्पम) आणि परोटा (मलबार परोटा) माझ्या विशेष आवडीचे! केरळी लोकांच्या घरी पारंपरिक पद्धतीने तयार केल्या जाणाऱ्या अप्पमसाठी ज्यांच्या घरी ताडाचे झाड असेल ते ताज्या 'ताडीत' आणि ज्यांच्याकडे ते नसेल ते लोक आपल्या घरच्या काहीशा जून झालेल्या शहाळ्याच्या पाण्यात तांदूळ भिजवतात. शहाळ्याच्या वरच्या पातळ पापुद्र्याला छिद्र पाडताना सोड्याची बाटली उघडताना येतो तसा आत तयार झालेला गॅस 'स्स्स्स्स....' आवाज करत बाहेर पडेल ते शहाळे ह्यासाठी उत्तम मानले जाते.
ह्या दोन्ही प्रकारे बनवलेले अप्पम चवीला अप्रतिम लागत असले तरी ताडीत भिजवलेल्या तांदुळाचे अप्पम चवीला अधिक उजवे वाटतात आणि ह्या पारंपरिक पद्धतीत यीस्टचा वापर होत नसल्याने हॉटेलमध्ये मिळणाऱ्या अप्पमपेक्षा ते फारच छान लागतात.

माझ्या काही केरळी मित्रांच्या घरी असे अप्पम नाश्त्याला चटणी-सांबार बरोबर आणि जेवताना चिकनच्या रश्श्या बरोबर खायला मला आवडतात आणि मलबार परोटे हे तिथे कुर्मा, चिकन, बोकडाचे मटण, बीफ, पोर्क, अंडा/फिश करी वगैरे बरोबर खाल्ले जात असले तरी मला ते कुर्मा, चिकन किंवा अंडा करी बरोबर खायला आवडतात.

गेल्या अडीच-तीन दशकांपासून अप्पम आणि परोटे हे पदार्थ बऱ्याच स्नॅक कॉर्नर्स मध्ये छान मिळत असल्याने अनेक डोंबिवलीकरांच्या ते चांगल्याच परिचयाचे आणि आवडीचे आहेत. त्यात गेल्या काही वर्षांपासून बाजारात 'फ्रोझन मलबार परोटेही' मिळू लागल्याने चांगली सोय झाली आहे.

बाकी सांबारचे म्हणाल तर आंध्र प्रदेशातल्या खूपच पातळ आणि कर्नाटकमधलया विशेषतः उडपी पातळ व गोडसर सांबारपेक्षा केरळ आणि तामिळनाडूमधले दाटसर सांबारच चवीला बेस्ट असे माझे वैयक्तिक मत


खरं म्हणजे थेकडी येथे भविष्यात मी नक्की पुन्हा भेट देणार आहे व राहिलेल्या सर्व ऍक्टिव्हिटी पूर्ण करणार आहे जसे की जंगल वॉक ,

जरूर करा. जंगल वॉक चा आमचा अनुभव भारी होता . येथील जंगलात खूप जळू/जळवा आहेत. चालतांना बूट आवश्यक. बुटांपासून गुडघ्यापर्यंत दोन्ही बाजूस बांधता येईल जाड कापडी पिशवी लावूनच चालायचे . तरीसुद्धा कुठूनतरी काही जळू अंगाला चिकटतातच. जळू काढून टाकली तरी रक्त लवकर थांबत नाही.

दिवस चौथा - मुनरो आयलँड

आज आम्हाला थेकडीवरून मुनरो आयर्लंड येथे जायचे होते आणि संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत वरकला इथे पोहोचायचे होते. आम्ही ठरलेल्या वेळेप्रमाणे लवकर उठून साडेसहा वाजताच थेकडी सोडले. माझ्या अंदाजाप्रमाणे आम्हाला मुनरो आयर्लंड ला पोहोचायला दुपारचे साडेबारा तरी वाजतील असे वाटले. वाटेत सृष्टी सौंदर्य छान होते. .

फोटो

पण आता झाडांचा प्रकार बदलला होता. मुन्नार सोडले त्या वेळेला आम्हाला चहाचे मळे पाहायला मिळत होते. आता मात्र सर्व जंगली भाग आणि जंगलामध्ये दिसणाऱ्या झाडांनी मन मोहून जात होते

फोटो

     तेवढ्यात आम्हाला एक सुंदर असा धबधबा दिसला.

धबधबा

साधारण सकाळचे आठ वाजले असतील. आम्ही इथे एक छोटा ब्रेक घ्यायचे ठरवले. हा धबधबा मात्र खाली जवळ जाऊन एन्जॉय करता येण्यासारखा होता. विशेष म्हणजे या धबधब्यामध्ये आम्हाला एक इंद्रधनुष्यही दिसले. या खालच्या चित्रामध्ये तुम्हालाही दिसेल !!

धबधबा

तरी तिथे एक पोलीस होताच . शमीभाई त्यांच्याशी मल्याळी मध्ये बोलला आणि त्याने आम्हाला खाली जवळ जाऊन फोटो घेता येईल असे सांगितले.

धबधबा

मग काय, आम्ही खुश झालो आणि शेवटी धबधब्यामध्ये भिजायचा आनंद आम्हाला मिळालाच! टायटॅनिक पोज मध्ये जॅक आणि रोज बनून आम्ही रोमँटिक फोटोशूट केले!!

फोटो

     तिथेच जवळ असलेल्या एका चहाच्या टपरीवर आम्हाला केळाचे भजे दिसले. इथेही ट्राय करूया कदाचित वेगळी चव मिळेल आणि हा प्रकार आवडेलही असे म्हणून आम्ही ट्राय करायला घेतले, तर त्याची चव अजूनच बेकार होती!! पण चहा मात्र अप्रतिम होता! साधारण वीस-पंचवीस मिनिटात आम्ही तिथून निघालो. वाटेत रबराची झाडे देखील दिसली.
फोटो

फोटो
साधारण 10 च्या सुमारास आम्ही नाष्ट्यासाठी हॉटेल शोधू लागलो. परंतु चांगले असे हॉटेल मिळेना. या मार्गावरती बरीचशी नॉनव्हेज हॉटेल्स दिसली. शेवटी एका कुठल्यातरी देवस्थानाच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो,तिथे आम्हाला प्युअर व्हेज उडुपी हॉटेल दिसले. तिथे आम्ही नाश्ता करायला थांबलो. इथे सब्रीमलाचे बरेचसे भक्त आम्हाला दिसत होते. ते हॉटेलमध्ये जेवताना दिसत होते.
फोटो

     हे अत्यंत साधे हॉटेल होते जे माफक दरामध्ये भक्तांना जेवण देत होते. बरेचसे लोकं सांबार भात खाताना दिसले आणि पुरी भाजी खाताना दिसले. आम्ही नाष्ट्या करता विचारले, तर त्यांच्याकडे फक्त डोसा होता. डोसा सुद्धा फार काही चांगला नव्हता. परंतु त्या हॉटेलच्या मॅनेजरने आमच्यासाठी ताबडतोब गरम गरम मेदू वडे तळून काढले व फ्रेश चटणी बनवून दिली. त्या सगळ्या गडबडीत मी काही फोटो काढले नाहीत.

     नाश्ता करून आम्ही निघालो. मुनरो आयलँड मध्ये ड्रायव्हरने ओळख काढून एका नावाड्याशी बोलणी करून ठेवली होती. शमीभाईने मुनरो आयर्लंड ला कधीही भेट दिली नव्हती. त्याला हे ठिकाणच माहीत नव्हते. त्यामुळे तो देखील हे ठिकाण पाहण्यासाठी आतुर होता आणि जेव्हा आमची गाडी खरोखरीच मुनरो आयलँड मध्ये शिरली त्यावेळी खरे केरळ आम्हाला दिसले!!!

फोटो

अप्रतिम सुंदर सुंदर अशी नारळाचे झाडे आणि अप्रतिम असा अष्टमुडी बॅकवॉटरचा नजारा ……..

फोटो

फोटो

फोटो

      वा !!!! असे उद्गार आमच्या तोंडातून आपोआप बाहेर पडले. शमी भाई म्हणाला की तुम्ही उत्तम ठिकाण निवडले आहे. इतके स्वच्छ पाणी मी कधीही पाहिले नाही. अलेप्पीचे बॅक वॉटर खूप गढूळ आहे. हे ठिकाण खूपच सुंदर आहे. मी माझ्या बायकोला आणि मुलांना घेऊन इथे नक्की येणार. हे ऐकून मी माझीच पाठ थोपटून घेतली.

फोटो

फोटो

     आता थोडं मुनरो आयर्लंड बद्दल माहिती देते. पूर्वीच्या काळी मुंड्रथुरुथ्थु नावाने ओळखले जाणारे हे बेट अष्टमुडी तलाव व कल्लडा नदी यांच्या संगमावरती वसलेले आहे. याचा इतिहास बघायचा झाला तर सन 1800 पर्यंत मागे जावे लागते. कर्नल जॉन मुनरो हे त्रावणकोरचे दिवाण होते. मलंगकारा मिशनरी चर्च सोसायटी यांना धार्मिक अभ्यास केंद्र उभारता यावे यासाठी त्यांनी आपल्या अखत्यारीतील हे बेट त्यांना देऊन टाकले. कृतज्ञता दर्शवण्यासाठी या सोसायटीने सदर बेटाला कर्नल मुनरो यांचे नाव दिले. तेव्हापासून हे बेट मुनरो आयलँड म्हणून ओळखले जाते.

फोटो

फोटो

     कल्लडा नदीतील गाळाची माती संचयित होऊन या बेटाची निर्मिती झालेली आहे. सुरुवातीला सुपीक असणाऱ्या या भागामध्ये नंतर मात्र अष्टमुडी तलावातील खारट पाण्यामुळे हा भाग शेतीसाठी नापीक होत गेला. पूर्वी या बेटावरती शेती व काथ्या(coir) बनवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होत होते. तथापि आता हे दोन्हीही उद्योगाचे प्रमाण येथे खूप कमी झाले आहे. दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे बरीचशी घरे पाण्यामध्ये बुडून जात असल्यामुळे एका अहवालानुसार सदर बेट सन 2050 पर्यंत पाण्याखाली जाईल. याबाबतचे अनेक व्हिडिओ मी youtube वर पाहिले होते. मुनरो आयर्लंड येथे छोट्या छोट्या निमुळत्या जलमार्गातून छोट्या पारंपारिक होडीतून प्रवास करायला मिळतो.

फोटो

फोटो

अगदी पारंपारिक केरळचे दर्शन करायचे असेल तर ही जागा म्हणजे खरंच पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. इथे अष्टमुडी तलावामध्ये कांदळवनांनी नैसर्गिक रित्या कमान बनवलेली आहे.

फोटो

फोटो

हा एक निसर्गाचा सुंदर चमत्कार आहे. संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारे खारफुटी वनस्पतींनी अशा प्रकारची कलाकृती बनवणे माझ्यातरी पाहण्यात किंवा ऐकण्यात नाही. त्यामुळे माझ्यासाठी हे स्थान म्हणजे एकमेव द्वितीय असे आहे. तिथे जाऊन येणे आणि त्या प्रकारच्या खारफुटी वनस्पती पाहणे हे माझ्यासाठी अतिशय उत्तम अनुभव होता.
     केरळमध्ये आपण अशा प्रकारचं बॅकवॉटर होडीतून अनुभवण्यासाठी आलेप्पी व पूवर हे दोन अतिशय प्रसिद्ध ठिकाणे आहेत. त्यामानाने मुनरो आयर्लंड हे ठिकाण मात्र तितकेसे प्रसिद्ध नाही. परंतु त्याचे व्हिडिओ आणि फोटो पाहून मला मात्र तिथे जाण्याची इच्छा झाली. कारण सन 2050 पर्यंत जर ते बुडून गेले तर या सुंदर ठिकाणावर आपल्याला कधी जाता येणार नाही. आलेप्पी नंतरही बघता येईल असा विचार केला. आम्हाला हाऊसबोटीमध्ये राहण्यात इंटरेस्ट नव्हता कारण मुलगा सोबत होता व त्यामुळे हालचालीवर मर्यादा येतात. तसेच आम्हाला पूवरही मिस करायचे नव्हते. आलेप्पी व मुनरो आयर्लंड या दोन्ही ठिकाणचा अनुभव एकच असणार होता. कारण मी आलेप्पिला जरी गेले तरी तिथे छोट्या छोट्या जलमार्गातूनच फिरणार होते. तथापि मी मुनरो आयलँड ची निवड केली आणि हा माझा या सहलीसाठी नियोजनाचा सर्वोत्तम निर्णय ठरला! खरंतर हे शांतता अनुभवणाऱ्या लोकांसाठी उत्तम ठिकाण आहे. मुनरो येथे पारंपारिक पद्धतीने नाव हाकली जाते. त्यामुळे नावेला अजिबात स्पीड नसतो. नाव अत्यंत निमुळत्या रस्त्यातून जात असल्यामुळे आजूबाजूची झाडे, पक्षी अगदी पाण्यातून वाहत जाणारे साप, हे खूप जवळून दिसतात. येथील सृष्टी सौंदर्य हे तुम्हाला निःशब्द करून टाकते. नैसर्गिक कमानी पर्यंत जर जायचे असेल,तर जाता- येता जवळपास दोन तास लागतात. यासाठी एका बोटीला चालवणारा दोन ते अडीच हजार रुपये घेतो. त्यांची मेहनत बघता हा दर काही जास्त नाही. एका तासाचे 1000 याप्रमाणे साधारण हिशेब असतो. तुम्हाला नुसते छोट्या छोट्या जलमार्गातून फिरायचे असेल तर एका तासात ते एक हजार रुपये घेऊन फिरवून आणतात. परंतु जर तुम्हाला नैसर्गिक कमानी पर्यंत जायचे असेल तर मात्र जास्त पैसे द्यावे लागतात. आम्हाला नैसर्गिक कमान बघायची होती. त्यामुळे आम्ही तीन तासासाठी दोन हजार रुपये या दराने बोट ठरवली.
      मुनरो आयलँड येथे बरेच होमस्टे आहेत. इथे तुम्हाला पारंपारिक केरळी पदार्थ ऑर्डरनुसार बनवून मिळतात. येथे एक जुनी चर्च आहे, तेही पाहता येते. खरंतर या गावात नुसताच फेरफटका मारणे हा सुद्धा एक सुखाचा अनुभव असू शकतो. थोडक्यात ज्यांना शांतता हवी आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण स्वर्गीय आहे, परंतु ज्यांना स्पीड बोट मध्ये बोटिंग करण्याची इच्छा असते लहान मुले सोबत आहेत, त्यांना कदाचित हा अनुभव आवडणार देखील नाही. परंतु खरंच सांगते आमच्या जवळपास अडीच तासाच्या बोटीच्या सहलीमध्ये मुलाने खूप एन्जॉय केले. कारण आजूबाजूला खूप सारे पक्षी, पाण्यामध्ये साप, खेकड्यांची घरे, अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी सतत दिसत होत्या. नैसर्गिक कमान बघून त्याला कांदळवनांनी तयार केलेला निसर्गाचा चमत्कार बघायला मिळाला. त्याला मुळीच कंटाळा आला नाही आणि आम्हाला देखील आला नाही जेव्हा मी सर्व सहल संपल्यानंतर सगळ्यांना या सहलीमध्ये सगळ्यात जास्त काय आवडले असे विचारले त्यावर आम्हा सर्वांचेच एकमत झाले ते म्हणजे मुनरो आयलँड !!
     सहलीचे नियोजन करताना या सर्व गोष्टींची माहिती असावी म्हणून हे सर्व मी विस्ताराने लिहिलेले आहे . आलेप्पी किंवा मूनरो आयलंड यापैकी एक निवडावे का? या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकणार नाही. कारण मी आलेप्पी पाहिलेले नाही. ते सुद्धा सुंदरच आहे आणि भविष्यात मी आलेप्पिला नक्की भेट देणार आहे. तथापि मूनरो आयलँड हे स्वर्गीय ठिकाण आहे आणि जर त्रिवेंद्रम जवळ जाणार असाल, जटायू अर्थ सेंटरला भेट देणे हा तुमच्या सहलीमधील भाग असेल, तर मुनरो आयर्लंड हे तुमच्या सहलीमध्ये समाविष्ट असायलाच हवे. मुनरो च्या कॅनो राईडमध्ये सुद्धा आम्हाला पक्षी बघायला मिळाले, बॅकवॉटरचा मी अनुभव घेतला, मग पूवर आणि मुनरो सारखे आहेत का? तर नक्कीच नाही!! पूवरचा अनुभव वेगळा आहे आणि मुनरो आयलंड चा अनुभव पूर्णतः वेगळा आहे. दोन्ही अनुभव नक्की घ्यावेत आणि अजिबात चुकवू नयेत असेच आहेत.
     आम्ही गेलो तेव्हा तो नावाडी आमची वाटच पाहत होता. आम्ही समजून गेलो की दोन तासासाठी तो किती ठिकाणाहून कुठून कुठून फिरवून आणणार आहे. त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला रेट सांगितले. एक तासाचे एक हजार दोन तासाच्या फेरीमध्ये रु. 2000. त्यावर आम्ही त्याला सांगितले की आम्हाला मॅगरुव्हची कमान (mangrove arc ) जी आहे तेथून जाऊन यायचे आहे. त्यावर त्यांनी अडीच हजार आम्हाला सांगितले. आम्ही घासागीस करून दोन हजार भरपूर आहेत असे सांगितले. त्यावर तो तयार झाला आणि आमची सफर सुरू झाली. फोटो

फोटो

इथे बोट हाताने वल्लवली जाते. स्पीड बोट नाही आणि त्याला खूप मेहनत लागते. तो बिचारा नावाडी बराच वयस्कर होता. त्याने एक वल्लव मला हातात दिले होते. मी मला जेवढे वल्हवायला जमेल तेवढे वल्हवत होते. p>

फोटो

मजा येत होती. अत्यंत छोट्या छोट्या कॅनॉल मधून आपल्याला नेत असताना आजूबाजूचा निसर्ग हा वर्णन करता येणार नाही इतका सुंदर असतो!!

फोटो

फोटो

खालील चित्र बरेच दिवस माझ्या मोबाईलला वॉलपेपर म्हणून होते

फोटो

फोटो

फोटो

     कॅनॉल वरूनच रहदारीकरीता पूल बांधलेले असल्यामुळे कॅनॉल क्रॉस करत असताना जेव्हा कधी पूल येतो तेव्हा डोके खाली करून क्रॉस व्हावे लागते.
फोटो

हा अनुभव साधारण इटली मधल्या कॅनॉल रायडिंग सारखाच आहे असा रिव्ह्यू मी वाचला होता. त्याची मला प्रचिती आली.

फोटो

खूप सारे प्राणी, पक्षी, पाण्यात पळणारा साप तर खूप ठिकाणी दिसला.

फोटो
कॅनॉल च्या मार्गात काठाने असलेली घरे

फोटो

सुंदरसे पक्षी दिसले. खेकड्यांचे घर दिसले. नितळ निळे सुंदर पाणी आणि त्यातून आमची शांतपणे जाणारी नाव ……

फोटो

फोटो

फोटो

पण आजूबाजूचा निसर्ग तुम्हाला शांततेत अनुभवायचा असेल तर यासारखा सुंदर अनुभव जगात शोधून सापडणार नाही!!! आता आम्ही अष्टमुडी तलावाच्या पाण्यात प्रवेश केला होता

फोटो

ज्यांना दोन तास शांतपणे नावेत बसण्याचे पेशंस आहेत त्यांनी ही राईड अवश्य करावी आणि मॅन्ग्रुव कमानी पर्यंत जावे.

फोटो

फोटो

आता आम्ही या कमानीच्या आत प्रवेश करते झालो ही जागा व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी व फोटो काढण्यासाठी अत्यंत प्रसिद्ध अशी आहे.
फोटो

याचसाठी केला होता अट्टाहास!!
फोटो

फोटो

फोटो

आता आम्ही मॅन्ग्रुव कमान क्रॉस करून पलीकडे गेलो आणि आतील कांदळवणात आम्ही बरेच फोटो काढले. त्याचबरोबर शूटिंग ही केले.

फोटो

फोटो

आता आम्ही त्याच कमानीतून परत जात असतानाचा हा फोटो आहे
फोटो

     त्यानंतर परत येत असताना आम्हाला ते एका फ्लोटिंग रेस्टॉरंट वर घेऊन गेले.
फोटो

फोटो
तिथे नारळाचे पाणी, लिंबू सरबत आम्ही घेतले आणि पुन्हा नाव वल्लवत आम्ही जागेवर आलो. परत येताना देखील अष्ट मुडी तलाव आणि निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य पुन्हा एकदा दिसले..
फोटो

खारफुटी वनस्पती.... या वनस्पतींच्या खालच्या जाड मुळांमुळेच सुनामी च्या लाटांपासून संरक्षण होत असते
फोटो

सुंदरशा नारळाच्या झाडांची रांग पहा...
फोटो

फोटो

फोटो

फोटो

छोट्या छोट्या कॅनॉल मधून नाव जात असताना दिसणारे हे सुंदर नजारे......

फोटो

      खरंच हे दोन तास आम्ही सर्वजण हिप्नोटाईझ झाल्यासारखे निसर्ग रूपाचे दर्शन करत होतो. अक्षरशः स्वर्गातून फिरून आल्यासारखे वाटले. आलेप्पिला आम्ही गेलो नाही ही आमची केवढी मोठी चूक होती ते माहित नाही, परंतु मुनरो आयलंड चा समावेश या सहलीमध्ये करणे हा माझा उत्तम निर्णय होता हे सिद्ध झाले होते. आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही असा स्वप्नवत अनुभव याठिकाणाने आम्हाला दिला.

      आम्ही पुन्हा मूळ जागेवर आलो तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. परत फिरून आलेल्या जागा वरती आम्ही थोडे ग्रुप फोटो काढले त्यातील हा सासूबाईंचा फोटो.

फोटो

होडीवाल्या काकांची मेहनत लक्षात घेऊन आम्ही त्यांना 500 रुपये जास्तच दिले. कारण ते बोलले होते की, आताशा वयोमानामुळे त्यांना दिवसातून एकदाच नाव वल्हवणे जमते. जाताना आम्ही एका रेस्टॉरंट मध्ये जेवणाबद्दल बोलून गेलो होतो. यांची राहण्याची सोय पण आहे असे त्यांनी सांगीतले.
फोटो

फोटो

तिथेच आम्ही गेलो. आम्ही चार थाळी ऑर्डर केल्या. थाळीमध्ये त्यांनी टॉपीओका, मिक्स व्हेज, सांबार,कढी, रस्सम अशा बऱ्याच गोष्टी दिल्या.

फोटो

      तुम्हाला सांगते, थाळीत हे सर्वात डावीकडे जे पिवळे दिसत आहे ते फोडणी दिलेले टॉपीओका आहे. इथे केरळमध्य टॉपीओका चे उत्पादन खूप होते. हे साधारण रताळ्यासारखे दिसते. पण गोड नसते. याच्यापासूनच साबुदाणा करतात म्हणे. हा प्रकार उकडून, मॅश करून खरड्यासारख्या चटणीबरोबर सकाळी नाश्त्याला खायचा इथे प्रघात आहे. त्यामुळे मला हा प्रकार खायचाच होता आणि अनायासे तो इथे खायला मिळाला. जेवण घरगुती आणि अत्यंत चांगले होते. आम्हाला खूप आवडले.

     त्यांच्याशी काही गप्पागोष्टी करून आम्ही तेथून निघालो. आम्हाला खर तर आज इथूनच वरकलाला जायचे होते . वर्कलाला सनसेट बघायचा होता. त्यामुळे तिथे सहाच्या आधी आम्हाला पोहोचायचे होते. गुगल मॅप दोन तासाचा रस्ता दाखवत होता पण एकंदरीतच दोन दिवसाचा अनुभव पाहता मी सनसेट पाहायला मिळेल की नाही याबाबत साशंक होते. शमीभाई ला आम्ही गाडी फास्ट पळवण्यासाठी सांगत होतो. त्याने शक्य तेवढी गाडी फास्ट पळवली तरी देखील आम्हाला वर्कलाला पोहोचायला सायंकाळचे पावणे सात वाजले. त्यामुळे आमचा सूर्यास्त मीस झाला.

     यात एक वाईट गोष्ट घडली म्हणजे आम्ही जे हॉटेल बुक केले होते तो ओनर फोनच घेत नव्हता. मी कॉल बॅक करतो, मी कॉल बॅक करतो असे करून तो फोन कट करायचा. त्यामुळे टेन्शनच यायला लागले, की अरे आपण आता काय करणार आहोत? झालं असं होतं की, माझे बुकिंग घेऊन, पैसे घेऊन तो मला रूम द्यायची तो विसरून गेला होता आणि आमचं बुकिंग त्याने दुसऱ्याच कुणालातरी दिले होते. शेवटी आम्ही वर्कलाला ज्यावेळी पोचलो तेव्हा त्याचा कॉल आला की मी तुम्हाला भेटायला येत आहे आणि तुमचं बुकिंग आम्ही दुसऱ्याला दिलेला आहे. तरी तुमची राहायची सोय मी दुसरीकडे करतोय. मला सुरुवातीला फारच राग आला. तरी पण मी शांततेत त्याला विचारलं की तुम्ही असं कसं करू शकता?त्यावर तो म्हणाला की तुम्हाला त्याच प्रॉपर्टी मध्ये दुसरी रूम देतोय,ती आवडली तर पहा. नाहीतर मी दुसर्या हॉटेलमध्ये तुमची सोय करून देतो .
     त्यावरती मी आम्ही जाऊन पाहिले तर आमची रूम त्याने काही परदेशी पर्यटकांना दिली होती. ते परदेशी पर्यटक तिथे काही ट्रीटमेंटसाठी आले होते आणि मी खरंच पाहिलं की ते व्हिलचेयर वरती असलेले आणि वृद्ध असे लोक होते. त्यांनी महिनाभरासाठी ते कॉटेज बुक केलं होतं. त्यामुळे माझा थोडा मूड ऑफ झाला. आम्हाला आता जी रूम ऑफर करत होता ती नॉन एसी होती आणि बरीच वरती होती. कम्फर्टेबल पण नव्हते. त्यामुळे मी त्याला सांगितले की आम्हाला दुसरी रूम दाखवा. त्यावर त्यांनी सांगितले की इथून दुसरीकडे आमचेच एक हॉटेल आहे. तिथे मी तुम्हाला एसी रूम देतो. त्यावर आम्ही ती रूम दाखवायला सांगितले. हा एक बंगला होता आणि केवळ सतराशे रुपयात एका एसी रूममध्ये आम्ही चार जण आरामात मावू एवढे मोठ्या रूममध्ये त्याने आम्हाला ॲडजस्ट करून दिले. शिवाय ड्रायव्हरला सुद्धा वरती एक रूम रिकामी होती तिथे झोपले तर चालेल अशी सोय करून दिली. त्यामुळे आमचे पैसेही वाचले आणि नुकसान तर काहीच झाले नाही.

     आम्ही रुममध्ये सामान टाकले आणि आम्ही वर्कला बीच बघायला गेलो. खरंतर पूर्ण रात्र झाली होती आणि आम्ही वर्कलाला समुद्र पाहिला तर समुद्र अतिशय खवळलेला होता.

फोटो

      उंच कड्याजवळ (cliff) हा किनारा असून तीथपर्यंत पोहोचायला पायऱ्या उतरुन जावे लागते. आम्ही पायऱ्या उतरून खाली समुद्रापाशी गेलो. आम्ही समुद्रापासून बरेच लांब होतो,पण लाटा इतक्या जोरदार आपटत होत्या की असं वाटतच नव्हतं की याच्यामध्ये पोहायला वगैरे जाता येईल किंवा भिजता येईल. तीथली रेती पाहिली तर सपाट आणि थोड्या अंतरावर तीव्र उतार- परत सपाट रेती -परत तीव्र उतार असे दिसत होते. म्हणजे भरती आल्यावर अंदाज न आल्याने बुडण्याचा अगदीच धोका दिसत होता. तिथे कोणीही समुद्राच्या आसपास जात नव्हते किंवा गेले नव्हते. आणि अचानकच इतकी जोरदार लाट आली आणि आमच्या पायापर्यंत पाणी आले . आमच्या सारखे तीथे इतर निवांत बसलेली माणसे पण चटकन उठून मागे निघून गेली. तेव्हा आमच्या लक्षात आलं की हा समुद्र घातक आहे. पाण्यामध्ये खेळण्याचा हा समुद्र नाही . केवळ लांबून बघणेच योग्य आहे. इथे उद्या यायचं नाही हे मनातल्या मनात ठरवून टाकलं.
      पुन्हा पायऱ्या चढून वरती आलो आणि फिरायला लागलो. कुठे शुद्ध शाकाहारी हॉटेल जेवायला मिळते का ते पाहत आम्ही फिरत होतो. परंतु एकही हॉटेल आम्हाला तिथे सापडले नाही. शेवटी आम्ही मुलासाठी एक आईस्क्रीम घेतलं.

फोटो

रात्रीचे 9.00 वाजून गेले होते. भूक तर खूप लागली होती. इथे नाईट लाईफ जोरावर आले होते. बरेच परदेशी पर्यटक तिथे वेगवेगळ्या कॅफेमध्ये फिरत होते. बाहेर ताजे मासे आणि तत्सम आहार घेऊन विक्रेते तुम्हाला काय पाहिजे सांगा, आम्ही ताजे ताजे बनवून देतो असे सांगत होते . एकंदरीतच इथले हिप्पी टाईप वातावरण पाहून लक्षात आले की आपण चुकीच्या ठिकाणी आलेलो आहोत. खरंतर युट्युब वरचे व्हिडिओ बघून मी या ठिकाणाचा समावेश माझ्या आयटनरीत केला होता. मुनोरो आयर्लंड इथे संध्याकाळी करण्यासारखे विशेष काही नव्हते त्यामुळे सगळ्यांना कंटाळवाणे होईल त्यापेक्षा वर्कला हे अजून एक ठीकाण पाहता येईल आणि इथल्या वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करता येतील असा विचार करून मी नाईट स्टे इथे करायचा असा विचार केला होता. तथापि हा माझ्या सहल नियोजनातील अत्यंत चुकीचा आणि वाईट निर्णय होता. तिथे गेल्या गेल्याच कळालं की येथील हवेच्या स्थितीमुळे पॅरासेलिंग सध्या बंद आहे. एकंदरीत समुद्राच्या रुद्रावतारामुळे कळालेच होतं की इथे काही वॉटर स्पोर्ट्स करण्याच्या परिस्थितीतला हा समुद्र नाही. त्यामुळे सर्फिंग तरी करता येईल का हा विषय होता. एका कॅफेच्या बाहेर फिरता फिरता आम्हाला सर्फिंगचा बोर्ड दिसला आणि एका चांगल्या डीलमध्ये आम्हाला स्वस्तामध्ये सर्फिंग एक तास करण्यासाठी आम्ही बुकिंग करून टाकले.

     शेवटी जेवण्यासाठी गुगल वरती शोधून एक अतिशय उत्तम असे हॉटेल वरकलामध्ये आम्हाला मिळाले. हॉटेल विनायक असे त्याचे नाव . इथे आम्हाला उत्तम असा मलाबार पराठा खायला मिळाला. माझ्या मुलाला तिथला मलाबार पराठा आणि पनीर मशरूमची भाजी इतकी आवडली की, यापुढे रोज आपण हेच खायचं हे त्याने जाहीर करून टाकले. त्यांना मी विचारले की तुमच्याकडे पुट्टू मिळतो का ?त्यावर ते म्हणाले की सकाळी दहा वाजेपर्यंत आमच्याकडे पुट्ट आणि कडला करी मिळते. मी एकदम खुश झाले. कारण हा पदार्थ मला मुन्नार मध्ये खायला मिळाला नव्हता.त्यामुळे दुसऱ्या दिवशी नाश्त्याला इथेच यायचे हे आमचे फिक्स झाले. मस्त पोटभर जेवण करून आम्ही रूमवर गेलो. उद्या आम्हाला लवकर सात वाजताच सरफिंग साठी जवळच्या बीचवर जायचे होते. सर्फिंगचा मी चार वेळा समुद्रामध्ये बुडून घेतलेला अत्यंत थरारक आणि धोकादायक अनुभव….. जटायू अर्थ सेंटर व पूवरची अविस्मरणीय बोट राईड, तेथील सुंदर असा सूर्यास्त व गोल्डन सँड बीच चा अप्रतिम नजारा या सर्व अनुभवांचा तपशील पुढील भागात……..


येत्या १७ ते २१ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पाच दिवसीय केरळ दौऱ्यात कोल्लम आणि वर्कला ह्या दोन शहरांत माझा मुक्काम असणार आहे. गुगल मॅप्सवर बघितले तर कोल्लम पासून मुनरो आयलंड केवळ २३ किमी अंतरावर म्हणजे तसे बऱ्यापैकी जवळ असल्याचे दिसत आहे. अर्थात पर्यटन हा सदर दौऱ्याचा मूळ उद्देश नसला तरी कमी-अधिक प्रमाणात भटकंती होणे अटळ आहे, त्यामुळे हे मुनरो आयलंड बघणे सहज शक्य होईल असं वाटतंय.

आलेप्पिला आम्ही गेलो नाही ही आमची केवढी मोठी चूक होती ते माहित नाही, परंतु मुनरो आयर्लंड चा समावेश या सहलीमध्ये करणे हा माझा उत्तम निर्णय होता हे सिद्ध झाले होते.

पूर्वेचे व्हेनिस म्हणून ओळखले जाणारे अलाप्पुझा (अलेप्पी) देखील छानच आहे, तुमच्या पुढच्या केरळ भेटीत ते देखिल अवश्य बघा. तिथले पुर्ण दिवसाचे जलपर्यटन आणि निसर्गसौन्दर्य आवडले आहेच पण तिथे केवळ फोटो काढण्यापुरती नाही तर चांगली मोठी दुमजली बोट थोडा वेळ चालवायलाही मिळाल्याने मला जरा जास्तच मजा आली होती 😀

1

२

३

४

५

६

७

आता लवकरच मुनरो आयलंड पण पाहिले कि मग ह्या दोन्ही ठिकाणांची तुलना करून माझे काय मत बनते ते कळवतो 😀

पुढील भागाच्या प्रतिक्षेत...


शक्य झाले तर मुनरो आयर्लंड ला अवश्य भेट द्या. ऑगस्ट महिन्यात तिथे अष्टमोडी तलावामध्ये पारंपारिक नावांची स्पर्धा होते. जर पाहायला मिळाली तर अवश्य पहा. बाकी कोल्लमहून मुनरोला जाणार असाल तर अष्टमुडी तलावातून मुनरो आयर्लंड पर्यंत जलमार्ग आहे. जेट्टीने जाऊ शकता. गाडी जरी असली तरी गाडीही चढवता येते आणि आर्थिक दृष्ट्या देखील फायरशीर आहे. वेळही वाचतो .भविष्यात थेकडी व आलेपिला मी नक्कीच भेट देणार आहे. मुनोरो आयर्लंड व आलेपी याबद्दलची तुमची निरीक्षणे वाचायला नक्की आवडतील. आवर्जून लिहा.


खरंतर मुनरो आयलंड हे आलेपीच्या मानाने खूप कमी गर्दीचे व जास्त व्यावसायिकीकरण न झालेले ठिकाण आहे. त्यामानाने आलेपी हे पूर्णतः विकसित असे व्यावसायिकीकरण झालेले ठिकाण आहे. तुलनेने आलेपीला करण्यासारखे बरेच काही आहे. उदाहरणार्थ जरी हाऊसबोटीमध्ये राहायचे नसले तरी तेथील समुद्रकिनारा देखील प्रसिद्ध आहे. तिथे कॉइर म्युझियम म्हणजेच काथ्याच्या पासून केलेल्या वस्तू चे संग्रहालय आहे. हाऊस बोट मध्ये राहणे हा स्वतःच एक वेगळा अनुभव आहे. परंतु मुनारो आयलँड येथे मात्र कॅनॉल रायडिंग शिवाय अन्य काही ऍक्टिव्हिटी नाहीत. म्हणायला जवळ कोल्लम येथे अष्टमुडी तलाव येथे सरकारमान्य दरात अनेक वॉटर ऍक्टिव्हिटी आहेत. जसे की बनाना रायडिंग, फास्ट स्कूटर रायटिंग, वॉटर जम्पिंग सारख्या ऍक्टिव्हिटीज आहेत. तथापि फक्त मुनोरो आयलंड हे शांततेत फेरफटका मारण्यासाठी व ग्रामीण केरळ अनुभवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. दोन्ही ठिकाणांचा अनुभव हा वेगळा असेल असे मला वाटते.


 दिवस पाचवा- वरकला, जटायू अर्थ सेंटर व पुवर

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सर्फिंगला तिथल्याच एका जवळच्या बीचवर गेलो. ज्या बीचवर आम्ही गेलो होतो तो वरकला पासून तीन चार किलोमीटर लांब होता आणि तिथे पाण्याची उंची फार काही नव्हती. कमरेपेक्षा जास्त पाणी तिथे होते. बरेचसे देशी विदेशी पर्यटक तिथे आधीपासूनच सर्फिंग करत होते. सकाळी सात ते आठ असा एक तासाचा वेळ होता.

      तेथे गेल्यावर त्यांनी आम्हाला स्विमिंग ड्रेस ,त्याचबरोबर सर्फिंग पॅड , त्यावर कसे उभे राहायचे, लाट आल्यानंतर नेमके काय करायचे, अशा पद्धतीच्या काही सूचना दिल्या व हलका व्यायाम करून घेतला. आमच्या सोबत अजून दोन नवरा बायकोचे ग्रुप होते. खरंतर त्या सर्व्हिंग पॅड वरती पूर्णपणे हात वर करून आडवे झोपायचे आणि लाट आल्यानंतर पटकन हात छाती खाली घेऊन पाय न वाकवता उभे राहून तोल सांभाळायचा अशा पद्धतीच्या पाच ते सहा वेळा प्रॅक्टिस करून घेतले.

फोटो

त्यावेळी ते सहज जमले कारण आम्ही वाळूवर होतो. नंतर आम्ही आमचे सरफिंग पॅड हातात घेऊन समुद्रात गेलो. एक माणूस समुद्राच्या काठावर देखरेखीसाठी उभा होता आणि तीन-चार मदतनीस समुद्रात आमच्या मदतीसाठी होते.

     मी, माझा नवरा आधी आत गेलो. मुलाला त्यांनी सगळ्यात शेवटी थोडा वेळ देणार असे सांगितले. साधारण छातीला लागेल एवढ्या पाण्यामध्ये आम्ही त्या सर्फिंग पॅड वरती आडवे झोपलो आणि लाट कधी येते आहे हे पाहू लागलो. मदतनीस लोकांनी पॅड धरले होते आणि लाट आली की ते सोडणार होते व आम्हाला त्यासाठी वरती उभे राहण्यासाठी सांगितले होते. आणि लाट आली ……. लाट येताच मी छातीखाली दोन्ही हात घेऊन उभे राहण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे मी आता पाण्यावरती होते त्यामुळे ते सर्फिंग पॅड एका दिशेला म्हणजेच उजव्या बाजूला कलंडले आणि मी पाण्यात पडले…….!!! पाण्यात पडल्यानंतर तेथील रेती वरती उभे राहायचे असे आम्हाला सांगितले होते. पण मी उभे राहण्याचा प्रयत्न करताच पायाखालची वाळू सरकून जात होती. मी हातपाय मारत होते आणि जवळपा पंधरा सेकंद पाण्याखाली होते. मग तिथल्या इन्स्ट्रक्टरने जवळ येऊन मला पाण्याबाहेर काढले. हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत भयानक होता. याचे कारण म्हणजे त्या पॅड वरती उभा राहणे हा काही खेळ नाही. आणि एका दिवसात अशा प्रकारचे कौशल्य येणे हे केवळ अशक्य आहे. तिथे अनेक परदेशी पर्यटक या सगळ्या गोष्टी सहज करत होते. पण आम्हाला काही या गोष्टी जमत नव्हत्या. माझ्या मिस्टरांनी त्यातल्या त्यात बऱ्यापैकी ते जमवले. जमवले म्हणजे काय , तर पहिल्या लाटेतच त्यांना कळाले की या पॅड वर उभे राहता येणे शक्य नाही. तेव्हा त्यांनी लाट येतात पॅड वरती तसेच झोपून राहत होते व लाटांवर तरंगण्याचा आनंद घेत होते. त्यांचे काय चालले आहे याकडे माझे लक्ष नव्हते. परंतु मी मात्र पाण्यात बुडतच होते. सोबतच्या इन्स्ट्रक्टरने दोन-तीन वेळेला मला बुडता-बडता बाजूला काढले. शेवटी ते म्हणाले की तुम्ही हे करू नका जमणार नाही. चुकून तुम्ही बुडाल. जवळपास चार ते पाच वेळा मी समुद्राच्या आतल्या पाण्यामध्ये दहा-पंधरा सेकंद बुडले होते. त्यामुळे आता पाण्यात पडले तर बुडण्याची भीती राहिलेली नाही.

     मी निमूटपणे किनाऱ्यावर येऊन सासूबाईंच्या जवळ उभी राहिले. त्या खरच खूप घाबरल्या होत्या आणि माझे बुडणे पाहून त्या म्हणाल्या मी काही हे करणार नाही. मग तिथेच एका सर्फिंग पॅड वरती मी सासूबाईंना आपण फोटो काढूयात म्हणले त्यावर समुद्रकिनाऱ्यावर उभे असलेला सरफिंग इन्स्ट्रक्टर मात्र ओरडला की असे काही करू नका मी सांगेन त्याच वेळेला फोटो काढा ते धोकादायक आहे, असे सांगू लागला. मला कळेना की यात काय नेमकं धोका आहे. तो आगाऊपणा करतोय असं मला वाटायला लागलं . एक दहा पंधरा मिनिटे गेली असतील आणि तेवढ्यात अचानकच एक मासेमारीची बोट जोरात आल्यावर ती त्यांनी सर्व सर्व्हिंग करणाऱ्यांना बाजूला व्हा बाजूला असे जोरजोरात बोलून बाजूला व्हायला सांगितले. आम्हाला कळेना नेमकी काय झाले . ती बोट आडवी तीडवी अशी कशीपण येत होती आणि शेवटी कशीतरी करून ती किनाऱ्याला लागली. किनाऱ्यावरचे सगळे ममच्छीमार धावत तिकडे गेले आणि त्यांनी ती बोट अडवली होती. मी त्यांना विचारले की एवढे तुम्ही का घाबरलात? हे तर तुमचं रोजचं काम असेल की बोट कुठे पार्क करायचे? बाकीच्यांना बाजूला व्हायला का सांगत होता ? त्यावेळी त्यांनी एक भयानक गोष्ट सांगितली ती म्हणजे त्या बोटीला आतून ब्रेक नसतो म्हणे!!!! त्यामुळे वाटेत जर कोणी आलं तर त्यांना ती पूर्ण धडकूनच जाते. याआधी तिथे असे अनेक अपघात झालेले आहेत. तसेच यामध्ये कित्येक विदेशी पर्यटकांची हाडे फ्रॅक्चर झालेली आहेत. असे त्यांनी सांगितले. ते ऐकल्यानंतर मात्र मला खरंच भीती वाटली. हे सरफिंग च खुळ उगाच आपण काढलं असं मला वाटलं. हे अत्यंत रिस्की आहे. कारण तिथे सर्फिंग करणाऱ्या कंपन्या कितीही काळजी घेत असल्या तरी बऱ्याच गोष्टींवर त्यांचा कंट्रोल नाही हे स्पष्ट दिसत होतं.

     मुलाला मात्र पहिल्याच झटक्यात सरफिंग पॅड वर उभे राहता आले. त्याने तीन ते चार वेळा सर्फिंगचा आनंद घेतला.

फोटो

फोटो

तथापी तो लहान असल्यामुळे त्यांनी त्यापेक्षा जास्त वेळा त्याला ते करू दिले नाही. थोडेफार फोटो शूटिंग करून व समुद्राच्या पाण्यात खेळून एकंदरीतच सरफिंग साठी घातलेले पैसे पुरेपूर वसूल केले .असो. कोणी फॅमिली येथे जाणार असाल तर त्यांना हे सर्व माहिती असावे म्हणून मी मुद्दाम हे लिहीत आहे. फॅमिली साठी वर्कला ही जागा योग्य नाही असं माझं निरीक्षण आहे.

      साधारण साडेनऊ ते दहा वाजता रूमवरून आंघोळ करून नाश्ता करण्याकरता कालच्याच हॉटेलमध्ये पोहोचलो. तेथे केरळाचा पारंपारिक नाश्ता पुट्टु आणि कडला करी म्हणजेच चण्याची उसळ या वरती ताव मारला.
फोटो

हा पट्टू, कडला करी व व्हेज कुर्मा यासोबत दिला होता. आम्ही पापड वेगळ्याने मागून घेतले. पुट्टूला स्वतःची अशी वेगळी काही चव नसते. तांदळाचे पीठ त्यावरती ओल्या नारळाचा कीस परत तांदळाचे पीठ त्यावर ओल्या नारळाचा कीस अशा एका साच्यामध्ये भरून तो वाफवून काढतात. त्यामध्ये कडला करी व पापड मिक्स करून खातात. या हॉटेलमधली कडला करी अतिशय चविष्ट होती. अजिबात स्पायसी नव्हती . आम्ही एक्स्ट्रा मागून घेतली . पोटभर नाश्ता करून तृप्त मनाने आम्ही बाहेर पडलो.
      त्यानंतर जटायू अर्थ सेंटर कडे प्रस्थान केले. जटायू अर्थ सेंटर हे वर्कला पासून साधारण दीड तासाच्या अंतरावर आहे. आता थोडे जटायू अर्थ सेंटर बाबत…. जटायूचे हे शिल्प एखाद्या पक्ष्याचे असलेले आशियातील सर्वात मोठे शिल्प आहे. या शिल्पाचे शिल्पकार आहेत राजीव अंचल. हे शिल्प दोनशे फूट लांब दीडशे फूट रुंद व 70 फूट उंच आहे. जर आपण त्रिवेंद्रमच्या आसपास असाल तर हे पर्यटन स्थळ अजिबात चुकवू नये असेच आहे.
फोटो

फोटो

      आम्ही तिथे साडेबाराच्या सुमारास पोचलो. तेथे केबल कारने जटायूच्या शिल्पा जवळ जावे लागते.
फोटो

फोटो

केबल कारने शिल्पा जवळ पोहोचण्यासाठी साधारण दहा ते पंधरा मिनिटे लागतात. वाटेतील दृश्य ही अत्यंत सुंदर आहेत. केबल कार साठी साधारण आम्हाला 15 ते 20 मिनिटे थांबावे लागले.
फोटो

फोटो

केबल कार मधून जटायू शिल्पाचे होणारे पहिले दर्शन
फोटो

      वरती राम लक्ष्मण सीतेचे देऊळ आहे. श्रीरामाचे प्रत्यक्षातले दगडात उमटलेले पाय आहेत असे म्हणतात.
फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

साधारण हे सर्व पाहून आम्हाला तिथून परत यायला दुपारचे दोन वाजले.

      आम्हाला आता कन्याकुमारीला जायचे होते . शमी भाई ने आम्हाला सुचवले की त्याला कन्याकुमारीला जाण्यासाठी गाडीचे परमिट काढावे लागते तेवढ्या वेळात तुम्ही पुवरला बोटिंग करून घ्या. म्हणजे आपल्याला परत उलटे तिकडे यायला नको .आम्ही ते मान्य केले आणि पूवरला साधारण आम्ही पाच वाजता पोहोचलो. पूवर वरून आम्ही एक बोट ठरवली. ते आम्हाला गोल्डन सँड बीच, एलिफंट रॉक व मदर मेरी या पॉईंट वरती नेणार होते. तेथे आम्हाला सूर्यास्त पाहता येणार होता .
फोटो

फोटो

फोटो

      हा देखील एक अविस्मरणीय व न चुकवू नये असा अनुभव ठरला. जरी मुनरो आयलँड मध्ये आपण बोटिंग केले तरीही पूवर मध्ये स्पीड बोट ने केलेले बोटिंग हा एक वेगळा अनुभव होता. दोन्ही ठिकाणी तेच पक्षी, प्राणी दिसत असले तरीही निसर्ग अत्यंत वेगळा आहे !!!

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

आम्हाला तुलनेने संध्याकाळची वेळ असल्यामुळे खूप भरपूर असे पक्षी दिसले.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

अत्यंत घनदाट अशा खारफुटी जंगलातून आपण जात आहोत असा अनुभव तिथे येतो. जो मुनरो आयलंड मध्ये येत नाही…

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

इथले पाणी जरी गढूळ असले तरी झाडी मात्र घनदाट आहे.

फोटो

फोटो

फोटो

शेवटी आम्ही गोल्डन सँड बीच वरती पोहोचलो . येथे एका बाजूला नेयर नदी आणि एका बाजूला अरबी समुद्र आणि मधेच तो बीच आहे . हे दृश्य फार सुंदर आहे!!!

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

      आम्ही येथे सूर्यास्ताचे अत्यंत मनोहर असे दृश्य पाहिले!!! आणि परत निघालो .

येताना हा एलिफंट रॉक दिसतो. याचा आकार हत्तीसारखा आहे म्हणून याला एलिफंट रॉक म्हणतात .

फोटो

फोटो

मदर मेरी

फोटो

फोटो

क्लब महिंद्रा चे फ्लोटिंग रिसॉर्ट

फोटो

फोटो

परतत असतानाची काही सुंदर निसर्ग चित्रे

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

.अत्यंत तृप्त मनाने आम्ही कन्याकुमारी कडे प्रस्थान केले ….त्यावेळी संध्याकाळचे सात वाजले होते. पूवर येथील बोटिंग मुळीच चुकवू नये आणि शक्यतो संध्याकाळी किंवा पहाटे लवकर बोटिंग करायला मिळेल हे पाहावे असे सुचवेन. कारण या वेळेला पक्ष्यांची संख्या खूप जास्त असते. तसेच तुम्हाला सूर्योदय व सूर्यास्त पाहता येईल. जो अत्यंत सुंदर व मनोहर आहे.

      कन्याकुमारीला जाताना आम्हाला वाटत चित्रा नावाचे एक हॉटेल सापडले. हे हॉटेल जर कोणी जाणार असेल तर जेवणासाठी मुळीच चुकवू नये असे आहे. इथला मेदुवडा हा मी आतापर्यंत खाल्लेला जगातील सर्वोत्तम मेदुवडा आहे. हा मेदू वडा इतका चांगला होता की तो नुसताच खावा अशी त्याची अत्यंत फ्रेश चव होती .मेदुवडा फस्त करून झाल्यानंतर लक्षात आले की अरे आपण तर फोटो काढलाच नाही. त्यामुळे याचा फोटो माझ्याकडे नाही . येथेही आम्ही मलाबार पराठा व पनीरची भाजी, तसेच मशरूम फ्राईड राईस घेतला.

फोटो

फारच चविष्ट होता. पुन्हा इथे जेवायला यायचे हे आम्ही ठरवले. मुळात हे हॉटेल तमिळ थाळी साठी प्रसिद्ध होते. त्यामुळे पुन्हा येताना इथे जेवायला मिळाले तरी यायचे हे ठरवूनच आम्ही निघालो. कन्याकुमारीला आम्ही पोहोचलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. चेकइन करून आम्ही सामान टाकले आणि निद्रादेवीच्या आधीन झालो . उद्या आम्हाला कन्याकुमारी येथील स्थळ दर्शन करायचे होते. कन्याकुमारीच्या अप्रतिम स्थलदर्शनाची गोष्ट पुढील भागात…..


 आम्ही जेथे उतरलो ते हॉटेल ‘जास’ अतिशय मध्यवर्ती व छान होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खूप ऐसपैस होती. इथली रूम सर्विसही उत्तम होती. आमच्या रूम्स या तिसऱ्या मजल्यावर होत्या. तथापि हॉटेलमध्ये लिफ्ट होती त्यामुळे सामान वरती उचलणे व खाली आणणे सोपे गेले. अर्थात सामान उचलायला त्यांच्या हॉटेलमधला स्टाफ तत्परतेने आला. आम्हाला त्यांना रिक्वेस्ट देखील करावी लागली नाही. बोट जेट्टी पासून हे हॉटेल चालत पाच मिनिटांच्या अंतरावर आहे.

      सकाळी उठून आम्ही तेथीलच जवळ असलेल्या प्रसिद्ध मारुती रेस्टॉरंट मध्ये मेदू वडा, इडली, पुरी भाजी इ. नाष्टा केला.

फोटो

हॉटेल लहान आहे पण पदार्थ चविष्ट होते.

      आम्ही विवेकानंद स्मारक साठी जेट्टी पॉईंटला उभे राहिलो. खूप सारी गर्दी होती. तथापि रांग पुढे पुढे सरकत होती. साधारणतः पंधरा-वीस मिनिटात आम्हाला तिकीट मिळाले. तिकीट दर अत्यंत कमी आहे. साधारण 70 रुपये. हेच जर एक्सप्रेस टिकीट काढायचे ठरवले तर आताशी नक्की आठवत नाही पण काही तीनशे रुपयांच्या आसपास दर आहे.
      आम्ही नावेत चढलो आणि मोक्याच्या जागा पकडल्या. साधारण दहा ते पंधरा मिनिटात विवेकानंद स्मारकापाशी आलो. तथापि या प्रवासात समुद्राचे जे दर्शन होते ते अत्यंत प्रेक्षणीय आहे.
फोटो

फोटो

कारण येथील समुद्राच्या पाण्यात वेगवेगळ्या रंगाच्या छटा उठून दिसतात. उदाहरणार्थ बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र हे तीनही कन्याकुमारी येथे एकत्र येतात आणि या पाण्याचा रंग काही ठिकाणी हिरवा, काही ठिकाणी निळा, असा दिसतो. पण पाणी अत्यंत देखणे आहे.

फोटो

समुद्र नितळ आहे. हा समुद्र पाहणे हाच एक घेण्यासारखा अनुभव आहे!! मला जे काही म्हणायचे आहे ते कदाचित मी शब्दात मांडू शकणार नाही. परंतु हे दृश्य असे होते की तो समुद्र केवळ पहात राहण्यासाठी अर्धा दिवस किंवा पूर्ण अख्खा दिवस मी काढू शकले असते, इतका तो मला आवडला होता.

फोटो
समुद्रातून दिसणारे स्मारक

फोटो

      विवेकानंद स्मारकाच्या इथे गेल्यानंतर त्यांनी तेथे ऑफिसमध्ये आम्हाला सगळ्यांना बसवले आणि विवेकानंदांचे जीवन चरित्र आम्हाला सांगितले. त्याचबरोबर कन्याकुमारी या स्थानाचे महात्म्य सांगितले. फार पूर्वीच्या काळामध्ये तिथे देवी कन्याकुमारी राहत होती. जी माता पार्वतीचा अवतार होती. तिथे बाणासुर नावाचा दैत्य फार माजला होता. त्याला असे वरदान होते की केवळ कुमारी स्त्रीच्या हातूनच त्याचा वध होईल. इकडे देवी कन्याकुमारीने मात्र तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले आणि त्याच्याशी विवाह करण्यासाठी त्याला कन्याकुमारी येथे येण्यासाठी सांगितले. ठरल्याप्रमाणे हिमालयातून भगवान शंकर माता कन्याकुमारीशी विवाह करण्यासाठी निघाले. येथे देव लोकात मात्र चिंता होऊ लागली की जर भगवान शंकर आणि माता कन्याकुमारीचा विवाह झाला तर काय होईल? कारण माता कन्याकुमारीच्या हातूनच बाणासुराचा वध होणार होता. त्यामुळे हा विवाह रोखण्यासाठी नारद मुनींना पाठवण्यात आले. नारद मुनींना भगवान शंकराला सांगितले की देवींनी विवाहाचा वर मागितला आणि तुम्ही निघालात? हा तर तुमच्या भोळेपणाचा हा फायदा घेण्यासारखे आहे. त्यामुळे तुम्ही तिला असे सांगा की सूर्यास्तापर्यंत कन्याकुमारीला पोचलो तरच हे लग्न होईल अन्यथा नाही. इकडे भगवान शंकर साधारण काही किलोमीटर अलीकडे आले तेव्हा सूर्यास्त झाला आणि भगवान शंकरांना असे वाटले की आता सूर्यास्त झाला त्यामुळे तिथेच राहिले आणि त्यामुळे त्यांचा विवाह होऊ शकला नाही. कालांतराने देवी कन्याकुमारीने बाणासुराचा वध केला. अशी ही काहीशी कथा आहे.
ज्यावेळी विवेकानंद यांना ज्ञान प्राप्ती करायची होती त्यावेळी त्यांनी असा विचार केला की, हिमालयातला योग्यांचा योगी असलेला शंकर जर या स्थानामध्ये आला असेल, तर भारताच्या सर्वात दक्षिणेकडे असलेल्या या ठिकाणी मी आलो तर मला ज्ञानप्राप्ती निश्चितच होईल. म्हणून ते येथे आले व या खडकावरती त्यांनी समाधी लावली आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यानंतर ते पुढील शिकागो मध्ये गेले आणि त्यांनी प्रवचन दिले हा सर्व इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे.

      त्यानंतर आम्ही माता पार्वतीचे पदचिन्ह असलेल्या दगडाचे तिथे मंदिर आहे त्याचे दर्शन घेतले. मंदिराचे बाहेरून घेतलेले काही फोटो
फोटो

फोटो

तिथे फोटो काढण्याची परवानगी नाही. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांचे पुतळा असलेले जे मुख्य स्मारक आहे तिथे दर्शन घेतले. आत मध्ये ध्यानमंडप आहे तिथे तुम्ही ध्यान देखील करू शकता. इथे देखील आत मध्ये फोटो काढण्यास परवानगी नाही त्यामुळे बाहेरूनच फोटो काढलेले आहेत

फोटो

फोटो

आम्ही सर्वांनी ध्यानाचा अनुभव घेतला.

फोटो

     तिथे दुरूनच थिरुवल्लूवर नावाचे तमिळ कवी आहेत, त्यांचे मोठे दगडी मूर्ती असलेले स्मारक दिसते.

फोटो

फोटो

सध्या त्याचे बांधकाम चालू आहे. पुतळा जरी उभा असला तरी बाजूचे बांधकाम अजून तयार झाले नाही. त्यामुळे सध्या स्थितीत ते लांबूनच पहावे लागते . काही वर्षानंतर बोटीने तेथेही जाता येईल. आम्ही या सर्व ठिकाणी बरीच फोटोग्राफी केली.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

     या स्मारकावरून समुद्राचे अप्रतिम दर्शन होते.
आम्ही येथे खूप फोटोग्राफी करून परत आलो त्यावेळी साधारण साडेबारा वाजले होते.

      मग तेथीलच एका हॉटेलमध्ये आम्ही जेवलो. माझी पारंपारीक थाळी, मुलाचा चॉकलेट शेक, पनीर व मलाबार पराठा व पनीर चिल्ली असे फ्युजन जेवण झाले.

फोटो

      आता आम्हाला येथून जवळच असलेल्या वट्टकुट्टई या 18 व्या शतकात त्रावणकोरच्या राजाने टेहळणी करता बांधलेल्या किल्ल्याला भेट द्यायचे होते.

फोटो

फोटो

जर तुम्ही कन्याकुमारीला जाणार असाल तर या किल्ल्याला जरूर भेट द्या. हा किल्ला सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत उघडा असतो. गाडीने जायला साधारण वीस ते पंचवीस मिनिटे लागतात. येथून समोर समुद्र 180° दिसतो.

फोटो

फोटो

पूर्वीच्या काळी येथून टेहळणी करणे सोपे होते म्हणून हा किल्ला त्यांनी बांधला आहे.
फोटो

फोटो

नंतर डचांनी येथे वसाहत स्थापन केली तेव्हा हा किल्ला त्यांच्या अधिपत्याखाली आला व त्यांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. आतमधे सुंदर हिरवळ आहे.

फोटो

फोटो

फोटो

किल्ल्याच्या बुरुजाला आणि कमानी वरती दगडामध्ये जो चौकोन दिसत आहे ठिकठिकाणी तोफा ठेवण्यासाठी जागा आहे.

फोटो

फोटो

फोटो

आणि किल्ल्यावरून दिसणारे दृश्य तर केवळ अप्रतिम आहे. एका बाजूला समुद्र तर एका बाजूला तटबंदी वरून अशा प्रकारे डोंगरांचे दर्शन होते

फोटो

येथे आम्ही जवळपास तासभर थांबलो होतो.एक छान अनुभव घेऊन आम्ही इथून बाहेर पडलो.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

      आता आम्हाला जवळच असलेले सुचिंद्रम मंदिर येथे जायचे होते. वट्टकुट्टई किल्ल्यापासून साधारण अर्धा तासात आम्ही देवळाजवळ पोहोचलो. वाटेत निसर्ग अतिशय सुंदर दिसत होता. खूप नारळाची झाडे, त्याच्यामध्ये डोंगर आणि आकाश यांचे सुंदर दृश्य दिसत होते.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

      मंदिरापाशी आम्ही साधारण साडेतीन वाजता पोहोचलो. त्यामुळे अर्धा तास आम्हाला वाट पाहायला लागली. (या स्थळांबद्दल मला माहित नव्हते .परंतु कंजूस जी यांनी मला सुचिंद्रम मंदिर तसेच पद्मनाभपुरम पॅलेस या स्थळांबद्दल माहिती दिली. त्यामुळे ही दोन्हीही स्थळे मी माझ्या सहल नियोजनात समाविष्ट केली. ही दोन्ही स्थळे आपण कन्याकुमारीच्या आजूबाजूला असेल तर अजिबात चुकवू नये अशीच आहेत.) हे मंदिर दुपारी बारा वाजता बंद होऊन चार वाजता उघडते हे ध्यानात घेऊन नियोजन करावे. प्रवेशदाराच्या कमानीवर असेलेली ब्रम्हा, विष्णू व महेशाची प्रतिमा

फोटो

फोटो

फोटो

आत मध्ये अनेक निरनिराळी मंदिरे आहेत. नेमके काय बघायचे आणि कुठे पहायचे तेच काही कळेना. आम्ही एका पुजाऱ्याला विचारले तेव्हा त्याने मोडक्या तोडक्यात हिंदी मध्ये हे एक पुजारी तुम्हाला शंभर रुपये दिल्यानंतर सर्व मंदिर फिरवून आणतील असे सांगीतले आणि त्या गुरुजींना विचारले त्यावर त्यांनी येथील एका दुसऱ्या गुरुजींना जोडून दिले. हे गुरुजी अतिशय उत्साही होते. त्यांनी आम्हाला सर्व मंदिराची माहिती सांगायला सुरुवात केली. हे मंदिर मूळतः नवव्या शतकामध्ये चोळराजांनी बांधले आणि त्यानंतर आलेल्या वेगवेगळ्या राजवटींनी त्याचे पुनरुज्जीवन केले. मंदिरात मुख्यतः देवता ही त्रिमूर्तीची आहे. म्हणजेच ब्रम्हा, विष्णू व महेश या तिघांचे हे स्थान आहे. या मंदिरामध्ये हनुमानाचा सर्वात मोठा उभा पुतळा आहे असे म्हणतात. तेथे दत्तात्रेयांचे मंदिर होते . उत्तरेकडच्या व दक्षिणेकडच्या देवी देवतांमध्ये काही फरक आहे असे वाटले. अनेक असे देव त्यानी सांगितले जे मी कधी ऐकले नव्हते. उदाहरणार्थ गणपतीची अशी मूर्ती त्यांनी मला दाखवली ज्यामध्ये अर्धे शरीर गणपतीचे व अर्धे शरीर स्त्रीचे होते याला ते विघ्नेश्वरी असे म्हणतात. मंदिराच्या आत मध्ये असलेले स्तंभामधून संगीत निर्माण होते . गुरुजींनी तसे आम्हाला वाजवून दाखवले. तिथे फोटो काढण्यास परवानगी नव्हती. तरीही त्यांच्या परवानगीने आम्ही काही ठिकाणी फोटो काढले.
      अहिल्येला फसवल्यामुळे इंद्राला जो शाप मिळाला त्यातून मुक्त होण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी याच ठिकाणी त्याला दर्शन देऊन शुद्ध केले म्हणूनही शुची इंद्र (इंद्राची शुद्धी)म्हणून असे नाव पडले. या मोठ्या स्तंभ मंडपा मध्ये पूर्वी जेवणावळी बसत असत असे गुरुजींनी आम्हाला सांगितले. तसेच खांबांच्या खाली ज्या मूर्तींचे हात आहेत, त्या हातांमध्ये तेल घालून वात लावून प्रकाशयोजना केली जात असे.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

मंदिरामध्ये ठिकठिकाणी ‘ येळू ‘ या आठ प्राण्यांचे अवयव असलेल्या काल्पनिक प्राण्याची मूर्ती जागोजागी दिसते.

फोटो

फोटो

इथे जवळपास दोन-अडीच तास आम्ही होतो. त्या गुरुजींनी आम्हाला एवढी माहिती सांगितली, आपला वेळ आम्हाला दिला, त्यामुळे आम्ही ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त दक्षिणा स्वतःहूनच त्यांना दिली . बाहेर पुष्करणी होती. अत्यंत सुंदर दिसत होती .

फोटो

फोटो

तथापि आता अंधार पडत आलेला होता त्यामुळे आम्हाला निघणे भाग होते.
इथून आम्हाला कन्याकुमारीच्या जवळच असलेल्या वॅक्स म्युझियम आणि थ्रीडी आर्ट गॅलरी ला भेट द्यायची होती.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

हे ठिकाणी देखील बच्चे कंपनी वगैरे सोबत असेल तर आणि अतिरिक्त वेळ असेल तर जायला काही हरकत नाही.

      जवळपास तास दीड तास घालवल्यानंतर आम्ही साधारण आठ वाजता कन्याकुमारी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचलो. त्यावेळी मंदिरात अजिबात गर्दी नव्हती. आम्ही पंधरा मिनिटात थेट देवीच्या समोर जाऊन उभे राहिलो . मी अजिबात अतिशयोक्ती करत नाही. मी आजवर जेवढ्या देवींचे दर्शन घेतले आहे त्यामध्ये कन्याकुमारी देवीचे दर्शन हे अत्यंत मनोहरी होते. देवीकडे कितीही पाहिले तरी मन भरत नव्हते. देवीची मूर्ती कमालीची देखणी आहे. इतका सुंदर मुखवटा आजतागायत कोणत्याही देवीचा पाहिला नाही. आपण निव्वळ निःशब्द होतो. उजळलेल्या दिव्यांच्या नैसर्गिक प्रकाशामध्ये देवीच्या नाकात हिऱ्यांची लखलखत असलेली नथ आणि तिचा अत्यंत देखणा असा मुखवटा, त्यावरती फुलांची केलेली कलाकुसर आणि दिव्यांची आरास , इतकी कमालीची सुंदर दिसत होती की काय वर्णन करू!!!! कमीत कमी पाच ते सात मिनिटे निवांत आम्हाला देवीचे दर्शन घेता आले. भविष्यात कधीतरी मी नक्की देवीला परत भेटायला जाणार आहे हे ठरवूनच तिथून बाहेर पडले.

इथून जवळच मत्स्यालय आहे तिथेही आम्ही थोडा वेळ घालवला. येथील काही फोटो-

फोटो

फोटो

फोटो

      आम्ही मंदिरातून बाहेर पडलो तेव्हा तिथे खूप सारी दुकाने होती. कपड्यांची, इलेक्ट्रिक वस्तूंची, शोभेच्या वस्तूंची तसेच अनेक प्रकारची दुकाने तिथे होती.. चौकशी केली असता आम्हाला लक्षात आले की ही वस्तू अत्यंत स्वस्त दरात मिळत आहेत. त्यामुळे आम्ही साड्यांच्या दुकानात शिरलो आणि केरळी साड्या ज्या केरळमध्ये आम्हाला दोन अडीच हजाराच्या आत मिळत नव्हत्या, त्या केवळ 700 रुपयात मिळाल्या . अशा आम्ही सात आठ साड्या घेतल्या. मिस्टरांनी पेन ड्राईव्ह, सेल्फी स्टिक, इअर काॅड इ. वस्तूंची खरेदी केली.

      आता साडेआठ वाजून गेले होते. आम्ही तिथूनच जवळ असलेल्या फूड कोर्ट वरती गेलो . खूप दिवसापासून दक्षिणात्य भोजनावरती ताव मारला होता. त्यामुळे आता काहीतरी वेगळे खाण्याची इच्छा होती. तेथे पावभाजी आणि फालुदा असे वेगळे जेवण मागवले.

फोटो

तेथे आजूबाजूला रस्त्यावरचे विक्रेते बरेच होते . उद्या आम्ही येथे शिंपल्यांच्या वस्तू घ्यायला यायचे असे ठरवले. उद्या सकाळी येथून आम्ही निघणार होतो. कन्याकुमारीच्या स्थलादर्शनासाठी मी दोन दिवस ठेवले हा माझ्या सहलीच्या नियोजनातील अत्यंत योग्य निर्णय होता. खरंतर अजून एक दिवस देखील ठेवला असता तरी चालले असते. जेणेकरून सकाळी सूर्योदय, संध्याकाळचा सूर्यास्त व समुद्र एन्जॉय करणे झाले असते. पण असो . आजचा दिवस खूपच एन्जॉय केला . आता उर्वरित पद्मनाभ्रम पॅलेस, अझिमला शिवा टेम्पल व त्रिवेंद्रम येथील प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिर यांचे वर्णन पुढील शेवटच्या भागामध्ये……..


स्वातंत्र्यानंतर कन्याकुमारीच्या दक्षिणेकडील समुद्रातल्या एका खडकावर स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभारले. तमिळ सर्वसामान्य जनतेला स्वामीजींबद्दल काहीच ठाऊक नव्हते. तेव्हा संपर्कसाधने तुरळक होती. ज्या काही बातम्या मिळत त्या वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी ऊर्फ रेडिओतून. तरीही बव्हंशी निरक्षर समाजाला स्वामीजींबद्दल काही ठाऊक असणे कठीणच. त्यात भाषेचा अडसर. सर्वसामान्य तमिळ जनतेच्या दृष्टीने कोणातरी सामान्य व्यक्तीचे स्मारक त्यांच्या माथी मारल्याची भावना त्यांच्यात दाटली. तमिळ संस्कृतीतले सर्वश्रेष्ठ नाव आहे तिरुवेल्लुवर. यांच्या नावाचा संवत्सर पण तिथे चालते. हे स्मारक मी जाने. २०११ मध्ये पाहिले तेव्हांचे संवत्सर होते २०४६. म्हणजे तिरुवेल्लुवर यांचे जन्मवर्ष येते सुमारे इ.स.पू. ३५ या वर्षी. तिरुवेल्लुवर हे तमिळ महाकवी, संत, मुत्सद्दी, राजनीतीज्ञ, महापंडित, विद्वान तत्त्ववेत्ते वगैरे होते. म्हणजे जे स्थान उत्तर भारतात चाणक्याचे तेच किंबहुना त्याहून सरस असे तमिळ जनतेसाठी होते. त्यांच्या नावाचा संवत्सर आहे यावरूनच तमिळ संस्कृतीतले त्यांचे स्थान ध्यानांत येते. मग तमिळ अस्मिता जागृत झाली. आणि त्यातून विवेकानंद स्मारकाशेजारीच तिरुवेल्लुवर स्मारक उभे राहिले. या स्मारकाच्या निमित्तानेच मी त्यांची माहिती समजून घेतली. त्यामुळे स्मारकाचा हुतू सिद्धीस गेला असे नक्कीच म्हणता येईल.

परंतु विविध संस्कृतींच्या विविध अस्मिता असतात आणि अस्मितांमधून विविध पूर्वग्रह झालेले असू शकतात. त्यामुळे आर्य, बौद्ध, ख्रिस्ती, अशा विविध संस्कृतीतील विद्वानांची मते वेगवेगळी असूं शकतात.

हे स्मारक पूर्ण झालेले आहे आणि खूपच प्रचंड असून देखणे आहे. मी २०१२ साली संपूर्ण पाहिलेले आहे. आता डागडुजीसाठी बंद असावे. ही दोन स्मारके समुद्रात आहेत तर महात्मा गांधी स्मारक मुख्य भूमीवर आहे. विवेकानंदांना न मानणारी जनता महात्मा गांधींना मात्र मानते हे पाहून गंमत वाटली. आपल्या लेखाच्या निमित्ताने माझ्या दक्षिण भारत दौर्‍यांच्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.


प्रवासी कंपन्यांपेक्षा अधिक गोष्टी पाहिल्या आहेत.
१) तिरुवल्लूवर हा तिकडचा संतकवी. एक लाखापेक्षा अधिक श्लोक लिहिले आहेत. त्यांच्या नावाचा जिल्हा उत्तर तमिळनाडूत आहे.
२) २०१०- १२ साली बोटीचे तिकीट वीस रुपये होतं. त्यात तीन बोटी क्रमाने कन्याकुमारी जेटी ते विवेकानंद स्मारक ते तिरुवल्लूवर स्मारक अशा फिरत. तिन्ही प्रवासाचे धरून वीस रुपये. सुट्ट्या नसल्या तर एक तासात जमतं.
३)सुचिंद्रमचं वैशिष्ट्य म्हणजे फारिनरनांही आत प्रवेश आहे. आतमध्ये सारेगम वाजणारे दगडी खांब आहेत ते भाविक वाजवू शकतात. नाही जमल्यास सेवेकरी येऊन वाजवून दाखवतात. ( पद्मनाभस्वामी मंदिरात असे पाचशे खांब आहेत पण ते बंदिस्त करून टाकले आहेत).
४) नागरकोईल हे शहर त्रिवेंद्रम ते कन्याकुमारी रस्त्यावरच आहे. नागरकोईल म्हणजे नागाचे मंदिर. ते बाजारातच आहे. तेसुद्धा पाहिले. फारसे टूरिस्ट ठिकाण नसल्याने इथले वडे इडली स्वस्त आणि चविष्ट आहेत. टपरीवर केळीच्या पानावर देतात. खाऊन झाले की आपणच आपले पान गुंडाळून डब्यात टाकायचे आणि तिथे वर्तमानपत्राचे कागद ठेवलेले असतात त्याने हात पुसायचे. साधी सोपी पद्धत.


कन्याकुमारी हे कमीत कमी दोन रात्री व इतिहासाची व आपल्या संस्कृतीला समजून घेण्याची आवड असेल तर तीन रात्रीचे ठिकाण आहे . खरंतर मला गर्दीची ठिकाणे आवडत नाहीत . कन्याकुमारी येथे बऱ्यापैकी गर्दी असते . गल्लीबोळ अरुंद व गर्दीने गजबजलेले आहेत . तरीही या शहरात मला एक प्रकारचा जिवंतपणा जाणवला. का कुणास ठाऊक मला कन्याकुमारी प्रचंड आवडले . तीन दिवसाचा स्थलदर्शन कार्यक्रम पुढील प्रमाणे असायला हवे असे मला वाटते-
दिवस पहिला - स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल (3-4 तास) व जेवणानंतर वॅक्स म्युझियम थ्रीडी आर्ट गॅलरी एक्वेरियम (2-3 तास),
दिवस दुसरा - सकाळी सूर्योदय पाहणे , विवेकानंद केंद्र येथील रामायण गॅलरी व भारत मंदिर हे म्युझियम पाहणे( येथे रामायणाबद्दल अतिशय विस्तृत माहिती मिळते. तसेच स्वातंत्र्यलढ्यातील अनेक थोर विभूतींचे कार्य याबद्दल माहिती आहे . कमीत कमी चार ते पाच तास सोबत ठेवून जावे. तसेच इतिहासाचे आवड असणाऱ्यांना येथे जावेसे वाटेल. आम्हाला याबद्दल खूप आवड असली तरीही मुलाचा विचार करून व हाती असलेल्या केवळ दोन दिवसांचा विचार करून आम्ही तो कार्यक्रम रद्द केला. भविष्यात जेव्हा कन्याकुमारीला जाणार आहे तेव्हा केवळ एक दिवस याच साठी ठेवणार आहे.) जेवणानंतर वट्टकुट्टई किल्ला व तेथून पुढे सुचिंद्रम मंदिर पाहणे.
दिवस तिसरा- त्रिवेणी संगम , भगवती अमन मंदिर, स्थानिक बाजारपेठेत फेरफटका मारून खरेदी करणे, संध्याकाळी सूर्यास्त पाहणे.
अशा पद्धतीने कन्याकुमारी येथे तीन दिवसांची आरामदायी कार्यक्रम पत्रिका होऊ शकते. ज्यांना ऐतिहासिक गोष्टींमध्ये रस नाही त्यांनी विवेकानंद केंद्राचा कार्यक्रम ,तसेच ज्यांना शॉपिंग मध्ये रस नाही त्यांनी खरेदीसाठी अर्धा दिवस ठेवण्याची गरज नाही . मग कन्याकुमारी येथे संपूर्ण दोन दिवस स्थलदर्शनासाठी ठेवले तर पुरेसे होतात.


कन्याकुमारी नागरकोईल जाताना एक मायलादी गाव आडबाजूला आहे. हे शिल्पकारांचे गाव. पिढ्यानपिढ्या शिल्पकला हाच उद्योग. शुचिंद्रम मंदिर यांच्याच पुर्वजानी बांधले असे मार्गदर्शकने सांगीतल .


Male and female rocks

Before the rocks are chiselled into idols, prayers are offered. There is no temple in TN and Kerala which does not have atheist one sculpture from this village.

https://www.onmanorama.com/travel/outside-kerala/2018/07/04/myladi-tamil...

वट्टकोट्टाई मधले ते एकटे झाड आता बरेच मोठे झालेले दिसतेय. माझ्याकडेही त्याचा फोटो आहे.










 केरल की यादगार यात्रा

सितम्बर 2014 में कन्याकुमारी से दिल्ली तक मारुती 800 में यात्रा की थी. अरब सागर के किनारे किनारे एडापल्ली-पनवेल हाईवे जिसे अब NH 66 कहते हैं, कार चलाई थी. चलते चलाते रास्ते में केरल के कई मंदिर, किले और शहर देखते आए और इन निम्नलिखित शहरों में एक एक दो दो दिन ठहरे भी थे:
थिरुवनंतपुरम ( Trivandrum ),
अल्लेप्पी ( Alleppy / Alappuzha / अलेपूझा / अलेपूया ),
कोची ( Kochi /  कोचीन /  Cochin ),
मुन्नार ( Munnar )
त्रिचूर ( Trichur / Thrissur ) और
कालीकट ( Calicut / कोझिकोड / कोशिक्कोड / Kozhikode ).
बहुत सुंदर, हरा भरा, पहाड़ियों और झरनों से भरपूर और समन्दर के साथ साथ फैला हुआ प्रदेश है. यहाँ चालीस से ज्यादा नदियाँ बहती हैं जिन पर 80 छोटे बड़े बाँध हैं. इसलिए केरल में बिजली, पानी और हरियाली की कमी नहीं है. प्रदेश का गठन 01.11.1956 में हुआ था. 14 जिले हैं जिनमें से थिरुवनंतपुरम शहर सबसे बड़ा है और राजधानी भी है. प्रदेश की आबादी 3.34 करोड़ है जबकि 1850 में यहाँ की आबादी 45 लाख थी. पर्यटन के प्रति समाज में दोस्ताना माहौल है जिसकी वजह से लाखों की तादाद में देशी विदेशी पर्यटक आते रहते हैं.

पिछले दिनों आई अभूतपूर्व बाढ़ में यहाँ जान माल का काफी नुकसान हुआ. भगवान से प्रार्थना है कि जल्दी से जल्दी वहां सामान्य स्थिति बहाल हो जाए. रास्ते में ली गई कुछ फोटो प्रस्तुत हैं :

1. कोची का backwaters. जब समन्दर में ज्वार आता है तो पानी शहर की नहरों में अंदर आ जाता है और भाटा के साथ पानी वापिस चला जाता है और शहर की सफाई भी हो जाती है 

2. थिरुवनंतपुरम की ओर जाती सड़क. सारा केरल इसी तरह से हरा भरा है  

3. अल्लेप्पी सागर तट पर मत्स्य कन्या या mermaid 

4. कालीकट से आगे चलते हुए एक बोर्ड नज़र आया 'Handicrafts Village' तो गाड़ी उधर मोड़ ली. पर टिकट के लिए थोड़ी देर इंतज़ार करना पड़ा. अंदर कारीगर सुंदर सुंदर चीज़ें बना रहे थे   

5. कालीकट का सागर तट

6. थिरुवनंतपुरम का सरकारी होटल जिसके पांचवें माले पर रुके थे 

7. शाम के समय थिरुवनंतपुरम का साफ़ सुथरा बस अड्डा 

8. ओणम त्यौहार वाले दिन बस की इंतज़ार. महिलाओं ने बिंदास सोना पहन रखा है क्यूंकि बस के सफ़र में कोई ख़तरा नहीं है. मौसम गरम और उमस भरा रहता है इसलिए खादी या सूती कपड़े ही आराम देते हैं. उमस और अचानक बारिश के कारण पैर में जूते जुराबें पहनना मुश्किल है चप्पल ही बेहतर है    

9. कोची फोर्ट के पास फुटपाथिये रेस्तरां. यहाँ समन्दर की हवा लगातार चलती रहती है पर धूल बिलकुल नहीं है. और पंखा भी नहीं चलाना पड़ता. इसलिए फुटपाथिये रेस्तरां का अलग ही मज़ा है. तरह तरह के व्यंजन मिल जाते हैं 

10. हरे भरे मुन्नार के हरे भरे रास्ते में 

11. मुन्नार के सुंदर चाय बगान  

12. श्रीपद्मनाभास्वामी मंदिर थिरुवनंतपुरम. दुनिया के सबसे बड़े खज़ाने वाला मंदिर  

13. यहूदी मंदिर या परदेसी सिनागोग. ये 1568 में बना था. इसके दूसरे नाम हैं - Cochin Jewish Synagogue / Mataancherry Synagogue. मूल रूप से चौथी सदी में परदेसी सिनागोग कोदुन्ग्लुर में बना था. यहूदी यहाँ मसालों के व्यापार के लिए आते थे जिनमें से कुछ यहाँ बस भी गए और मालाबार यहूदी कहलाये  

14. श्रीगुरुवायूर मंदिर का आंगन. मंदिर में कृष्ण के बाल स्वरुप की पूजा होती है        

15. आधुनिक मस्जिद. सातवीं आठवीं शताब्दी से अरब व्यापारी केरल में मसालों के लिए आ रहे थे 

16. त्रिचूर में एक चर्च. जीसस क्राइस्ट के शिष्य संत थॉमस यहाँ सन 52 में अर्थात पहली शताब्दी में केरल आये थे.  

17. बेकल फोर्ट से लिया गया फोटो  

18. त्रिचूर का वडक्कुनाथन याने उत्तर के नाथ, शिव मंदिर. मंदिर का इतिहास एक हज़ार साल से भी पुराना है   

19. श्री कृष्णा मंदिर त्रिचूर में शादी. यहाँ शादियाँ सुबह सुबह ही हो जाती हैं  

20. मुन्नार के रास्ते में एक झरना 

केरल जाएं तो छुट्टी ज्यादा लेकर जाएं. प्रदेश के 14 जिलों में से हर एक में कुछ ना कुछ देखने समझने के लिए है. पर्यटकों के लिए माहौल अच्छा है क्यूंकि यहाँ पर्यटक और मसाला व्यापारी सदियों से आते रहे हैं. प्रदेश भारत के उत्तरी राज्यों से ज्यादा समृद्ध, शिक्षित और अनुशासित लगा. घूमने की सभी सुविधाएं आसानी से मिल जाती हैं.
एक बार जरूर जाएं.

20. हरा भरा केरल 








































No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...