रास्तों पर निगाह रखने वाले, मंज़िल कहाँ देख पाते हैं|
सफर तो ताउम्र हैं, दरमियाँ सुकून के दो-पल कमाने है|
घड्याळाच्या काट्याला बांधलेलं आयुष्य स्वीकारून आता उणीपुरी दोन दशके
सरायला झालीत. प्रवास सुरु आहे आणि राहील ही, रस्ता पायाखाली तर आहे पण
पोहोचणार कुठे व कधी याचा काहीचं अदमास अजूनही लागलेला नाही. त्यामुळेच
एखाद्या अनवट वळणावर वाट थोडी वाकडी करून, चाकोरीबद्ध जगण्याला हुल
देण्याची लागलेली खोडं काही जाता जात नाही.
सह्याद्री आणि समुद्र म्हणजे चाकोरीला मोडण्यासाठी नेहमीच आव्हान
देणाऱ्या जागा. वाट वाकडी करून उतरायचं असेलच तर याशिवाय दुसऱ्या पर्यायाचा
विचार मी सहसा करत नाही.
हया वेळेस वाकडी केलेली वाट मला "वेळणेश्वर" या छोट्याशा पण नितांतसुंदर
गावाला घेऊन गेली. अपार निसर्गसौंदर्याने नटलेली कोकणची भूमी, माडा-पोफळी,
आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे, डोंगरउतारांवरील
खाचरांची नक्षी आणि पार्श्वभूमीला समुद्राची घनगंभीर गाज...... निसर्गाचा
वरदहस्त या अपरांतक प्रदेशाला लाभला आहे.
गुहागर-तवसाळ रस्त्यावरून डाव्या हाताला वळून सड्यावरून जाणारा सपाट
रस्ता संपला की मग तीव्र उतारांचा वळणा-वळणांचा रस्ता उतरून गावात प्रवेश
होतो. वळणावरून गाडी पास होतांनाच समोर अथांग सिंधू-सागराचं अमोघ दर्शन
होतं.
वेळणेश्वर हे गुहागरपासून साधारण १५ किलोमीटरवर, वेळणेश्वर-महादेवाच्या
साथीने सुमारे १२०० वर्षांपुर्वीपासून जागते-राबते गाव, सभोवताली
नारळ-पोफळीच्या बागा, अर्धचंद्राकृती, सुरक्षित आणि स्वच्छ समुद्रकिनारा.
किनाऱ्यावरून डाव्या हाताला दिसणारा जिंदाल औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प
आणि उजव्या हाताला सुरू होऊन मागे जाणारी टेकडी, झाडांच्या गर्दीतून माना
उंचावणारी घरे, रिसॉर्ट्स असा इथला परिसर.
कोकणातील अनेक घराण्यांचं कुलदैवत असणाऱ्या इथल्या वेळणेश्वर
महादेवाच्या मंदिराचा परिसर तर अक्षरक्ष: भुरळ पाडणारा आहे. प्रशस्त मंदिर
आवार, साधारण १० फुट उंचीची दीपमाळ, घुमटाकार शिखराचा सभामंडप, बाहेर पितळी
ओटा, त्यावर चारही बाजूने एकमुखी मुखवटे आणि त्यावर पाच फन्यांचा नाग आहे.
गाभाऱ्यात अडीच -तीन फुटी लांबीची पिंड असून पिंडीच्या मागे कोनाड्यात
पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याबाहेर कालीमाता ,
महिषासुरमर्दिनी , गोपाळकृष्ण यांच्या पंचधातूच्या तर विठ्ठल-रखुमाईची
पाषाणातील मुर्त्या आहेत. मुख्य मंदिराला लागुनच काळभैरव, गणपती,
लक्ष्मीनारायण अशी मंदिरे आहेत.
तसेच गावराखा, भुताई या ग्रामदैवतांचं ही एकमंदिर मुख्य मंदिराला लागूनच
आहे. संपुर्ण मंदिर परिसर आकर्षक रंगसंगतीमध्ये रंगवला आहे व कटाक्षाने
स्वच्छ राखला जातो. मन प्रसन्न करणारी ऊर्जा इथे जाणवत राहते.
पर्यटकांसाठी गावात घरगुती तसेच जवळपास काही हॉटेल्स-रिसॉर्ट्स मध्ये सोय होते. वेळणेश्वर भक्त निवासही उपलब्ध आहे.
जेवणाबद्दल बोलायचं तर मत्स्यप्रेमींची थोडी निराशा होते कारण
पापलेट-सुरमई सारख्या माशांची इथे वानवा आहे. आधी सांगून ठेवलं तरच सोय होऊ
शकते. इतर शाकाहारी-मांसाहारी जेवण मात्र अप्रतिम मिळते. MTDC रिसॉर्टचं
लोकेशन तर एकदम लाजवाब आहे.
समुद्रकिनारा अजिबात गर्दी नसलेला, कुठल्याही प्रकारच्या वॉटर
स्पोर्ट्सचा गोंगाट नसलेला, पांढऱ्या शुभ्र वाळूचा आहे. किनाऱ्यावरून
छोट्या मासेमारी बोटी अतिशय सुंदर दिसतात. या ठिकाणावरून आम्ही पाहिलेल्या
सूर्यास्ताचं वर्णन करण्यास तर शब्द ही थिटे पडावे अशी गत.....
असो, दोन दिवस निवांत घालवावे अशी ही सुंदर जागा सदोदित अशीच राहो ही वेळणेश्वर चरणी प्रार्थना !!!
आता विजयदुर्गावरून परतीचा प्रवास सुरू
करून अधांर पडला होता. देवगड मालवण रस्त्याने जाताना रामेश्वर अशी पाटी
दिसते. रस्त्याला लागूनच एक-दिड किलोमीटरवर रामेश्वराचे मंदिर होते. आम्ही
गाडी फिरवली लगेच. काळोखात गाडीच्या उजेडात आम्ही मंदिर नाहीतर त्याचा कळस
तरी दिसतोय काय ते शोधण्याचा प्रयत्न करत होतो. पण फोकसमध्ये आम्हाला फक्त
प्रवेशद्वार दिसले. आम्ही गेलो तिथे. अगदी प्रवेशद्वारात उभे राही पर्यंत
मंदिर काय आम्हाला शोधता आले नाही.
मंदिराचे प्रवेशद्वार एकदम छानसे आहे.
वरती दोन हत्ती स्वागताला आहेत. मंदिराचे प्रवेशद्वार हे जहाजाची डोलकाठी
स्वरूपात आहे. जवळच दोन तोफांचे चौथरे आहेत आणि एका चौथऱ्यावरच तोफ दिसते.
२०१४ साली एक तोफ चोरीला गेली. जांभा दगडावर लांबलचक १००-१५० मीटरचा खोदलेला मार्ग आहे.
खाली उतरल्यावर प्रवेशद्वाराजवच एक मोठी
घंटा दिसते. पेशव्यांचे सरदार आनंदराव धुळप यांनी ती अर्पण केलेली आहे.
समोरच प्रवेशद्वाराजवळ सात दिपमाळ आपले लक्ष वेधून घेतात. श्रीमंत सवाईराव
माधवराव पेशवे यांचे सुभेदार गंगाधरपंत भानू (नाना फडणवीसांचे बंधू) यांनी
३०० वर्षापूर्वी मंदिराचे बांधकाम केलेले आहे. पेशव्यांचे सरदार आनंदराव
धुळप यांनी पुर्वेकडील प्रवेशद्वार आणि उत्तरेकडील जांभा दगडातील मार्ग
उभारलेला आहे.
मंदिराच्या समोरच रेखीव नंदी आहे.
पुर्वी मंदिरात नंदीवर बसलेले श्रीदेव रामेश्वराची चांदीची मूर्ती होती पण
ती २००९ साली चोरीला गेली. सध्या मंदिरात पिंडीची पुजा केली जाते.
मंदिरासभोवती असणारी दगडी फरसबंदी आणि तटबंदी कान्होजी आंग्रे यांचे पुत्र
संभाजी आंग्रे यांनी केलेली आहे. जवळच संभाजी आंग्रे यांची समाधी
दुर्लक्षीत अवस्थेत आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला रामायण आणि
महाभारतावर आधारीत भिंतीचित्रे दिसतात.
दरवर्षी माघ महिन्यात इथे
महाशिवरात्रीचा उत्सव असतो. इथून पालखी निघते. मंदिरात असणारे रामेश्वराचे
मुखावटे आपले लक्ष वेधून घेतात. सध्या रात्रीच्या वेळेस गावकरी मंदिरात
आळीपाळीने राखण करत असतात.
रामेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आता पुढच्या प्रवसाला…
– विशाल चं. अडखळे (मावळे ट्रेकर्स)
प्रवेशद्वारजांभा दगडावरील मार्ग प्रवेशद्वार (खाली उतरल्यावर)सरदार आनंदराव धुळप यांनी अर्पण केलेली घंटादगडी दिपमाळमंदिरनंदीशिवलिँगपालखी
ठिकाण – चंडीका देवी मंदिर, दाभोळ, ता. दापोली, जि. रत्नागिरी. जवळचे रेल्वे स्टेशन – खेड. जवळचे एसटी स्टॕंड – दापोली.
मनमोहक आणि सुंदर समुद्र किनारे,
किनाऱ्यावर हिवाळ्यात येणारे ‘सी गल’ पक्षी, याच दरम्यान मधूनच कधीतरी
घडणारे डॉल्फीनचे दर्शन, हर्णे बंदरावरचा मासळी बाजार, सुवर्णदुर्ग,
मंडणगड, बाणकोट यांसारखे गड-किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंसाठी रत्नागिरी
जिल्ह्यातील दापोली तालुका प्रसिद्ध आहे. रत्नागिरी जिल्हातील दापोली
तालुक्यात वसलेले दाभोळ हे गाव “दालभ्य” ऋषींच्या वसतीस्थानाने पावित्र्य
झालेले असून एक निसर्गरम्य आणि हिरवेगार गाव अशी ओळख आहे.
दाभोळ बंदराजवळ वाशिस्ठी नदीच्या तीरावर
चंडीका देवीचे स्वयंभू मंदिर प्रसिद्ध आहे. दापोली-दाभोळ रस्त्यावर
दाभोळच्या अलीकडल्या डाव्या बाजूच्या पठारावर तीन किलोमीटर अंतरावर
चंडिकादेवीचे मंदिर आहे. एकसंध कातळात तयार झालेल्या नैसर्गिक गुहेमध्ये
चंडिका देवीची सुमारे साडेतीन फूट उंचीची काळ्या पाषाणातली शेंदूर लावलेली
मूर्ती आहे. अशा या श्री स्वयंभू चंडिका देवीचे रुप जेव्हढे सुंदर तेव्हढेच
रौद्रही भासते. देवीच्या भुवया या मोठ्या असून ती आपल्या नयनांनी संपूर्ण
दाभोळवर देवीच्या नजरेची सावली असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. चंडीका
देवीचे मुख नैऋत्य दिशेला असून देवीला चार हात आहेत. उजव्या हातात तलवार,
डाव्या हातात ढाल तसेच इतर आयुधे आहेत.
देवीच्या मूर्तीजवळ एक इतिहासकालीन तलवार आहे. गुहेचे तोंड चांदीच्या
पत्र्याने मढवलेले असून, लहान असल्याने आत वाकून जावे लागते. गुहेत अंधार
असून ठिकठिकाणी दिवे लावलेले आहेत तसेच कृत्रिम दिवे किवा टाॕर्च घेऊन
जाण्यास मनाई आहे. नवरात्रीत मंदिराच्या मुख्य द्वाराजवळच घटस्थापना केली
जाते. पहाटे साडेचार-पाचच्या सुमारास काकड आरती होते आणि दसर्याच्या दिवशी
सोने लुटून मंदिरावर निशाण चढविले जाते. देवीचे रूप हे स्वयंभू असून ती
नवसाला पावते अशी ओळख आहे. उत्सवाच्या काळात आजूबाजूच्या गावातून भक्त
देवीच्या दर्शनाला हजारोंच्या संख्येने येत असतात.
शिवाजी महाराजांनी दाभोळ जिंकल्यानंतर अंजनवेलचा गोपाळगड, गोवळकोट व
आडीवरे भागावर स्वारी केली होती. तेव्हा मोहिमेदरम्यान अनेक वेळा त्यांनी
या स्थानास भेट दिली होती, असा इतिहासात उल्लेख आलेला आहे. दाभोळ गावात
असलेल्या ईंगळाइ-भैरीदेवी या श्री चंडीकेच्या बहिणी असून दालभ्येश्वर,
नवनाथ दत्त मंदिर आदी देवांना तीने आपल्या छत्रछायेखाली घेतले असल्याचे
येथील स्थानिक सांगतात. फार पूर्वी दालभ्य ऋषींनी इथल्या गुहेत तप-साधना
केल्याचे सांगितले जाते.
खास कोकणी निसर्ग सौंदर्याबरोबर स्वयंभू
दालभ्येश्वर मंदिर, नवसाला पावणारा सय्यद अमीरूद्दीन बालापीर, अंडा मशिद
आपले वैशिष्ट्ये जपून आहेत. अंडा मशिद हा प्राचीन वास्तुशास्त्राचा अप्रतिम
नमुना आहे. चिपळूणकडून येणारी वशिष्टी नदी, पलीकडील डोंगरावरचा गोपाळ
गड, टाळकेश्वराच्या देवळाचे शिखर, दाभोळकडील बाजूचे मशिदीचे मिनार,
शिळावरचे मारुती मंदिर, समुद्रकिना-याला लागूनच वाढलेले सुरुचे दाट वन आणि
खाडीच्या किनारपट्टीत वाढलेले उंच माड आपल्या हिरव्यागार झावळय़ांचा गुच्छा
करून वा-याच्या झुळकीने येणा-यांचे स्वागत करत असतात. सूर्योदय आणि
सूर्यास्ताच्या वेळी तर ही निसर्गाची शोभा बघण्यासारखीच असते.
“0 कि.मी.” अशी प्रवासात रस्त्यावर पाटी
दिसली आणि आपला प्रवासाचा शेवट तिथे होणार असला की प्रवास कितीही लांबचा
असूदे आपला प्रवासाचा थकवा लगेच दुर निघून जातो, शरीरात एक नवीन ऊर्जा
निर्माण होते आणि ओढ लागते तिथे पोहचण्याची. काहींना प्रवासाचा वैताग आला
असेल तर त्यांना पाटी बघून हायसं वाटतं ! आणि खिडकीत बसलेल्या काही उत्साही
मंडळींना प्रवास संपल्यामुळे कधी हिरमुसल्यासारखं वाटत !
असे हे गाव किलोमीटर दर्शक (माईल स्टोन)
आपल्याला ठिक ठिकाणी हमरस्त्यावर/ हायवेवर मोठ्या गावाच्या किंवा शहराच्या
नावाने लावलेले दिसतात. त्यावरचा भाग काही ठराविक रंगाने रंगीत केलेला
असतो आणि खाली ठिकाणाचे नाव आणि किलोमीटर दर्शवलेले असते. बहुतेक प्रवासी
फक्त किलोमीटर आणि ठिकाणाचे नाव सोडून कशावर जास्त लक्ष देत नाहीत.
यावर खालच्या भागातील रंग हा पांढरा
असतो आणि त्यावर काळ्या अक्षरात किलोमीटर आणि ठिकाणाचे नाव लिहिलेले असते.
तर वरच्या भागात लावलेल्या रंगाचं पण गुपीत आहे. हे रंग पिवळ्या, हिरव्या,
काळ्या/निळ्या, लाल रंगात असतात आणि त्यावर महामार्ग क्रमांक लिहिलेला
असतो. पिवळा रंगातले किलोमीटर दर्शक हे राष्ट्रीय महामार्गावर (National
Highway) लावलेले असतात. हिरव्या रंगातले किलोमीटर दर्शक हे राज्य
महामार्गावर (State Highway) लावलेले असतात. काळ्या/निळ्या रंगातले
किलोमीटर दर्शक हे कोणत्यातरी मोठ्या गावाचं किंवा जिल्ह्याच अंतर
दर्शवितात आणि लाल रंगातले किलोमीटर दर्शक हे आपण कोणत्यातरी गावात आहोत हे
दर्शवितात.
पुर्वी google map सारखे साथीदार
प्रवाशांच्या, वाटसरूंच्या सोबतीला नव्हते तेव्हा या दगडी दर्शकांनी अगदी
मोलाची कामगिरी बजावलीय आणि या आजच्या काळातही वाटसरूंना वेळप्रसंगी यांचाच
आधार वाटतो.
आंबेनळी घाट हा रायगड जिल्ह्यातील
पोलादपूर पासून ते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या मार्गावर आहे. हा
राज्य महामार्ग क्र.७२ असून एकूण ४० कि.मी. लांबीचा गाडीरस्ता आहे. घाटाची
उंची सर्वसाधारणपणे ६२५ मी (२०५१ फुट) आहे.
महाबळेश्वर ते पोलादपूर मध्ये दोन घाट
आहेत ‘फिट्झेराल्ड’ हा महाबळेश्वर ते वाडा कुंभरोशी पर्यंत आहे तर दुसरा
‘आंबेनळी’ हा कुंभरोशी ते पोलादपूर पर्यंत आहे. (संदर्भ – महाराष्ट्रातील
घाट रस्ते). जावळीच्या घनदाट अरण्यात हा घाट येतो. जावळी म्हणजे
सह्याद्रीतलं काळीज! जावळी म्हणजे वाघाची जाळी. जावळीचा प्रदेश खुपच घनदाट.
दिवसा जमीनीवर सुर्यकिरणे पडणे देखील कधी मुश्कील होत. जावळीच्या खोऱ्यात
उतरणे म्हणजे साक्षात मृत्यूच्या तोंडात उतरण्यासारखे झाले.
जावळी मुलखात पारघाट, कोंडेनळी घाट,
रडतोंडी घाट, ढवळाघाट, हातलोटचा घाट, सापळाखिंड, कावल्या-बावल्या,
अन्नछत्राची नाळ, बोराटयाची नाळ, वरंधा-घाट, आंबेनळीघाट इ. सुमारे 60-62
घाट होते.
१५ जानेवारी १६५६ या दिवशी महाराज
जातीनिशी जावळीत आले आणि चंद्रराव मोरेंचा पाडाव करून जावळी ताब्यात घेतली.
त्यानंतर १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवरायांनी जावळीच्या प्रतापगडावर
स्वराज्यावर धावून आलेला अफझल खानासारखा राक्षसी शत्रू जाया केला.
पोवाडेकार म्हणतात. “जाऊ जाणे येऊ नेणे अशी गत अबदुल्ल्याची झाली.”
हा घाटरस्ता ऐतिहासिक काळातील असून
सोंडेवरून उतरणाऱ्या ऐसपैस वळणदार पायवाटा आज ही इतिहासाच्या पाऊलखुणा
जपून आहे. शिवकाळात हा रडतोंडीचा घाट म्हणून परिचित होता. गंमतीने म्हणायचे
तर, अफजलखानाच्या वधानंतर त्याच्या अफाट सैन्याला स्वराज्याच्या
मावळ्यांनी इथेच प्रतापगडाच्या पायथ्याशी पार रडतोंडीला आणले होते म्हणून
हा रडतोंडी घाट! प्रतापगड भेटीच्या वेळी अफझलखानाची छावणी गडाच्या
पायथ्याशी असणाऱ्या पारसोंड या गावी पडलेली. पारसोंड या गावातून प्रतापगड
दिसत नाही पण प्रतापगडावरून गाव दिसतो, हिच ती सह्याद्रीची आणि महाराजांची
किमया!
आंबेनळी घाटाच्या पुर्वेस प्रतापगड आणि
महाबळेश्वर, पच्छिमेस महाड पोलादपूर, दक्षिणेस सुमेरगड आणि उत्तरेस
चंद्रगड, मंगलगड आणि रायगड आहे. ह्या घाटमार्गातून तान्हाजी मालुसरे यांचे
ऐतिहासिक गाव उमरठ, चंद्रगड (ढवळे गाव), प्रतापगड आणि महाबळेश्वर येथे
जाता येते. तर उत्तरेस सावित्री आणि ढवळी नदी आहे.
जवळची पाहण्यासारखी ठिकाणे :- १) तान्हाजी मालुसरे आणि शेलार मामा यांची समाधी आणि शिवकालीन कुंभळजाई मंदिर (उमरठ गाव) २) मोरझोत धबधबा (खोपड गाव) ३) चंद्रगड (ढवळे गाव) ४) प्रतापगड ५) महाबळेश्वर ६) बहिरीची घुमटी (चंद्रगड ते आॕर्थर सीट ट्रेक दरम्यान) ७) आदीशक्ती श्रीरामवरदायिणी मंदिर (पार गाव) ८) कोयना नदीवरील शिवकालीन पूल
कोकणातील आणि महाबळेश्वरातील पर्यटन
वाढल्यामुळे या घाटात आता गाड्यांची वर्दळ देखील बरीच वाढलेली आहे. या
घाटातील रस्ता धोकादायक वळणाचा असल्याने अपघाताचे प्रमाण ही बरेच वाढलेले
आहे.
किल्ल्याचा प्रकार – जलदुर्ग ठिकाण – देवगड तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा.
<p class="has-text-align-justify" value="<amp-fit-text
layout="fixed-height" min-font-size="6" max-font-size="72"
height="80">विजयदुर्ग किल्ला हा वाघोटन नदी अरबी समुद्रास मिळते
त्याठिकाणी असून मराठा साम्राज्याची पोर्तुगीज, फ्रेंच, सिद्धी,
इंग्रजांपासून रक्षणासाठी उभा ठाकला आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी
अस्तित्वात आणलेल्या मराठा आरमाराचे प्रमुख ठिकाण होते. किल्ल्याच्या
पश्चिमेस भर समुद्राखाली संरक्षणासाठी भिंत बांधलेली आहे हे एक आश्चर्यच
म्हणावे लागेल.विजयदुर्ग
किल्ला हा वाघोटन नदी अरबी समुद्रास मिळते त्याठिकाणी असून मराठा
साम्राज्याची पोर्तुगीज, फ्रेंच, सिद्धी, इंग्रजांपासून रक्षणासाठी उभा
ठाकला आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी अस्तित्वात आणलेल्या मराठा
आरमाराचे प्रमुख ठिकाण होते. किल्ल्याच्या पश्चिमेस भर समुद्राखाली
संरक्षणासाठी भिंत बांधलेली आहे हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल.
<p class="has-text-align-justify" value="<amp-fit-text
layout="fixed-height" min-font-size="6" max-font-size="72"
height="80">किल्ल्यावर पडकोट खुष्क म्हणजे किल्ल्याची मुख्य तटबंदी
सोडून कांही अंतरावर बांधलेली तटबंदी आहे त्यामुळे किल्ल्याच्या आत अजून एक
किल्ला असल्यासारखा भास होतो. छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी आरमारी
केंद्र स्थापन करावयाचे असल्याने त्यांनी किल्ल्याची दुरुस्ती करून
किल्ल्याची व्याप्ती केली. मुख्य दरवाजाला संरक्षण देणार्या निबीच्या
दरवाजापुढे गेल्यावर 30 मिटर उंचीची ही तटबंदी आहे. हा किल्ला आजच्या काळात
देखील बघितल्यावर अंदाज लावता येतो किल्ला किती अभेद्य असेल! कदाचित
यामुळेच टोपीकर याला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असावेत.किल्ल्यावर
पडकोट खुष्क म्हणजे किल्ल्याची मुख्य तटबंदी सोडून कांही अंतरावर बांधलेली
तटबंदी आहे त्यामुळे किल्ल्याच्या आत अजून एक किल्ला असल्यासारखा भास
होतो. छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी आरमारी केंद्र स्थापन करावयाचे
असल्याने त्यांनी किल्ल्याची दुरुस्ती करून किल्ल्याची व्याप्ती केली.
मुख्य दरवाजाला संरक्षण देणार्या निबीच्या दरवाजापुढे गेल्यावर 30 मिटर
उंचीची ही तटबंदी आहे. हा किल्ला आजच्या काळात देखील बघितल्यावर अंदाज
लावता येतो किल्ला किती अभेद्य असेल! कदाचित यामुळेच टोपीकर याला
पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असावेत.
इतिहास –
<p class="has-text-align-justify" value="<amp-fit-text
layout="fixed-height" min-font-size="6" max-font-size="72"
height="80">कोल्हापूरचा शिलाहार राजा भोज याने इ.स. ११९३ ते इ.स.१२०६
हा किल्ला बांधला. त्यानंतर यादव, विजयनगर, बहामनी, आदिलशाही या राजवटींकडे
हा किल्ला होता. शिवाजी महाराजांनी हा किल्ला इ.स. १६६४ मध्ये जिंकून
घेतला व त्याचे नाव विजयदुर्ग ठेवले. शिवाजी महाराजां नंतर सरखेल कान्होजी
आंग्रे यांच्याकडे हा किल्ला होता. इंग्रजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी
दोनदा १७१८ आणि १७२० रोजी प्रयत्न केले होते पण दोन्ही वेळेस त्यांना
मराठ्यांकडून हार पत्करावी लागली.कोल्हापूरचा
शिलाहार राजा भोज याने इ.स. ११९३ ते इ.स.१२०६ हा किल्ला बांधला. त्यानंतर
यादव, विजयनगर, बहामनी, आदिलशाही या राजवटींकडे हा किल्ला होता. शिवाजी
महाराजांनी हा किल्ला इ.स. १६६४ मध्ये जिंकून घेतला व त्याचे नाव विजयदुर्ग
ठेवले. शिवाजी महाराजां नंतर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्याकडे हा किल्ला
होता. इंग्रजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी दोनदा १७१८ आणि १७२० रोजी प्रयत्न
केले होते पण दोन्ही वेळेस त्यांना मराठ्यांकडून हार पत्करावी लागली.
<p class="has-text-align-justify" value="<amp-fit-text
layout="fixed-height" min-font-size="6" max-font-size="72"
height="80">इ.स.१७५६ मधे तुळाजी आंग्रेंच्या विरुध्द पेशवे आणि
इंग्रजांनी संयुक्त आघाडी उघडली. पेशव्यांनी जमिनीवरून व इंग्रजांनी
पाण्यावरून हल्ला केला. विजयदुर्ग किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
पेशव्यांशी झालेल्या तहात इंग्रजांनी बाणकोट किल्ल्याच्या बदल्यात
विजयदुर्ग किल्ला पेशव्यांना दिला. पेशव्यांनी आनंदराव धुळपांची
विजयदुर्गावर नेमणुक केली.इ.स.१७५६
मधे तुळाजी आंग्रेंच्या विरुध्द पेशवे आणि इंग्रजांनी संयुक्त आघाडी
उघडली. पेशव्यांनी जमिनीवरून व इंग्रजांनी पाण्यावरून हल्ला केला.
विजयदुर्ग किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पेशव्यांशी झालेल्या तहात
इंग्रजांनी बाणकोट किल्ल्याच्या बदल्यात विजयदुर्ग किल्ला पेशव्यांना दिला.
पेशव्यांनी आनंदराव धुळपांची विजयदुर्गावर नेमणुक केली.
<p class="has-text-align-justify" value="<amp-fit-text
layout="fixed-height" min-font-size="6" max-font-size="72"
height="80">इ.स. १८७८ मधे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञ
लॉकियर याने विजयदुर्गावर खास चौथरे बनवून घेतले व सुर्याचे निरीक्षण केले.
त्यावेळी त्याला हेलियम वायूचा शोध लागला.इ.स.
१८७८ मधे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञ लॉकियर याने
विजयदुर्गावर खास चौथरे बनवून घेतले व सुर्याचे निरीक्षण केले. त्यावेळी
त्याला हेलियम वायूचा शोध लागला.
पहाण्याची ठिकाणे –
<p class="has-text-align-justify" value="<amp-fit-text
layout="fixed-height" min-font-size="6" max-font-size="72"
height="80">१) हनुमंत दरवाजा -<br>हा किल्ल्याचा पहिला दरवाजा
असून यातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. त्याच्या समोरच शिवाजी महाराजांनी
स्थापन केलेले हनुमानाचे मंदिर आहे आणि बाजूलाच तोफ आहे.१) हनुमंत दरवाजा – हा
किल्ल्याचा पहिला दरवाजा असून यातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. त्याच्या
समोरच शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हनुमानाचे मंदिर आहे आणि बाजूलाच
तोफ आहे.
<p value="<amp-fit-text layout="fixed-height" min-font-size="6"
max-font-size="72" height="80">२) जिबीचा दरवाजा -<br>हनुमंत
दरवाज्यातून पुढे गेल्यावर आपल्याला हा दरवाजा लागतो.२) जिबीचा दरवाजा – हनुमंत दरवाज्यातून पुढे गेल्यावर आपल्याला हा दरवाजा लागतो.
<p value="<amp-fit-text layout="fixed-height" min-font-size="6"
max-font-size="72" height="80">३) तीन तटबंद्या -<br>किल्ल्याला
तीन तटबंदी आहेत. पहिली तटबंदी ३० फूट उंचीची दुसरी १० फुटांची आणि तिसरी
३० फूटांची आहे.३) तीन तटबंद्या – किल्ल्याला तीन तटबंदी आहेत. पहिली तटबंदी ३० फूट उंचीची दुसरी १० फुटांची आणि तिसरी ३० फूटांची आहे.
<p value="<amp-fit-text layout="fixed-height" min-font-size="6"
max-font-size="72" height="80">४) यशवंत महाद्वार -<br>दुसर्या
आणि तिसर्या तटबंदीच्या मधे गोमुखी रचनेचे भव्य "यशवंत" महाव्दार आहे.४) यशवंत महाद्वार – दुसर्या आणि तिसर्या तटबंदीच्या मधे गोमुखी रचनेचे भव्य “यशवंत” महाव्दार आहे.
<p value="<amp-fit-text layout="fixed-height" min-font-size="6"
max-font-size="72" height="80">५) इमारतींचे
अवशेष<br>खलबतखान्याची इमारत, सदरेची इमारत, राणीवसाची इमारत५) इमारतींचे अवशेष खलबतखान्याची इमारत, सदरेची इमारत, राणीवसाची इमारत
६) चुन्याचा घाणा – सदरेची इमारतीपुढे आणि किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूस आपल्याला चुन्याचा घाणा पहावयास मिळतो.
<p class="has-text-align-justify" value="<amp-fit-text
layout="fixed-height" min-font-size="6" max-font-size="72"
height="80">७) बुरूज -<br>गणेश बुरूज , राम बुरूज, हणमंत बुरूज
आणि दर्या बुरूज, तुटका बुरूज, शिकरा बुरूज, सिंदे बुरूज, शहा बुरूज,
व्यंकट बुरूज , सर्जा बुरूज, शिवाजी बुरूज, गगन बुरूज, मनरंजन बुरूज,
गोविंद बुरूज अशी किल्ल्यात बुरूजे आहेत.७) बुरूज – गणेश
बुरूज , राम बुरूज, हणमंत बुरूज आणि दर्या बुरूज, तुटका बुरूज, शिकरा
बुरूज, सिंदे बुरूज, शहा बुरूज, व्यंकट बुरूज , सर्जा बुरूज, शिवाजी बुरूज,
गगन बुरूज, मनरंजन बुरूज, गोविंद बुरूज अशी किल्ल्यात बुरूजे आहेत.
८) चोर दरवाजा – मनरंजन बुरुजावरून गोविंद बुरुजाकडे जातांना उजव्या बाजुला असलेल्या किल्ल्याच्या मुख्य तटबंदीत एक चोर दरवाजा पाहायला मिळतो.
९) साहेबांचे ओटे – इथून इ.स. १८७८
मधे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञ लॉकियर याने विजयदुर्गावर खास
चौथरे बनवून घेतले व सुर्याचे निरीक्षण केले. त्यावेळी त्याला हेलियम
वायूचा शोध लागला.
<p class="has-text-align-justify" value="<amp-fit-text
layout="fixed-height" min-font-size="6" max-font-size="72"
height="80">१०) दोन हौद -<br>पायवाटेने चालत आल्यास डाव्या बाजूस
एक लहान व एक प्रचंड मोठा हौद पाहायला मिळतो. मोठ्या हौदात उतरण्यासाठी
पायर्या आहेत. साठलेले पाणी जमिनीत मुरु नये म्हणुन हौद बांधताना शिश्याचा
वापर केला होता.१०) दोन हौद – पायवाटेने
चालत आल्यास डाव्या बाजूस एक लहान व एक प्रचंड मोठा हौद पाहायला मिळतो.
मोठ्या हौदात उतरण्यासाठी पायर्या आहेत. साठलेले पाणी जमिनीत मुरु नये
म्हणुन हौद बांधताना शिश्याचा वापर केला होता.
११) धान्यकोठार – हौदाच्या पुढे असलेल्या इमारतीत खालच्या मजल्यावर धान्य कोठार होते.
१२) जखीणीचे मंदिर आणि तोफ – साहेबांचे ओटे आणि धान्यकोठार पाहून झाल्यावर समोरच जखीणीचे मंदिर आणि तोफ आहे.
जवळची ठिकाणे –
१) विजयदुर्ग समुद्रकिनारा २) गिर्ये गावाजवळील रामेश्वर मंदिर आणि संभाजी आंग्रे यांची समाधी ३) गिर्ये गावातील आनंदराव धुळपांचा वाडा
पोहोचण्याच्या वाटा –
मुंबई ते विजयदुर्ग अंतर हे 415 कि.मी. आहे.
१) गाडीने येताना मुंबई गोवा महामार्गावरील तळेरे या फाट्यावरून विजयदुर्गाकडे जाणारा रस्ता आहे.
२) रेल्वेने येताना वैभववाडी हे जवळचे रेल्वेस्टेशन आहे.
राहण्याची आणि जेवणाची सोय –
विजयदुर्गाजवळ हाॕटेल्स आहेत तिथे जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था होऊ शकते.
सुसाट निघालेला रात्रीचा प्रवास…
गावातल्या वाघदेवाच्या छप्परवजा मंदिरातला रात्रीचा मुक्काम…
कुडकुडणाऱ्या थंडीत रात्री ३.०० वा. शेकोटीसाठी केलेली धावपळ… कोपऱ्यात नं
झोपण्यासाठी सिद्धूची उडालेली धांदल…!!!
सकाळचा चिमणी पाखरांचा चिवचिवाट… वाडीत
घेतलेला मस्त कोरा करकरीत वाफाळलेला चहा… गड चढताना पावलोपावली यशने
मारलेल्या बैठका… मी थकलोच नाही – हे दाखवून देण्यासाठी गौरवने केलेली
कलाकारी… नंतर “भाय मी थकलो नाही रे फक्त पाय दुखतायत!” या dialogue मारून
सगळ्यांचा पिकलेलेला हश्या…
डोळ्यांत साठवलेले किल्ल्याचे मनमोहक
सौंदर्य… झाडाखाली कातळावर आडवे पडून समोरचा नयनमनोहर डोंगर-दऱ्याचे सुख
घेत केलेला आराम… याची feeling इतकी Duplex की पलंगही त्यासमोर वाटेल
फिका…
पुन्हा परतीचा प्रवास… गावातल्या
कुडाच्या भिंतीच्या घरात वारली चित्रकलेच्या सानिध्यात उरकलेले पोटभर जेवण…
आणि पुन्हा घोड्यांवर स्वार होऊन ७५ च्या Nonstop speed ने गाठलेली मुंबई! गोराईकर मावळे ट्रेकर्स (GMT) सोबत अविस्मरणीय अनुभवाची शिदोरी घेऊन पुन्हा नव्या दमाने आता Office ची सुरवात!
किल्ल्याची माहिती –
ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यात
येणाऱ्या किल्ल्यांपैकी अशेरीगड किल्ल्याचा आकार प्रचंड असल्याने हा गड
बुलंद वाटतो. किल्ल्याला अशिरगड असेही संबोधले जाते. इतिहास काळात
ठाण्याच्या उत्तर सीमेचे रक्षण करणार्या या किल्ल्याच्या परिसरात सागाच्या
झाडांचे जंगल आहे. प्रामुख्याने जहाज बांधणीस उपयुक्त ठरणार्या
लाकडांमुळे या गडाचे इतिहासकाळात फार महत्त्व होते.अशेरीगड शिलाहारवंशीय
भोजराजाने बांधला असा उल्लेख आहे. त्यामुळे या गडाचे आयुर्मान साधारणतः ८००
वर्षे आहे असे अनुमान निघते. पुढे १४व्या शतकात महिकावती नगरी (माहीम)
येथील राजा बिंबदेव याने हा किल्ला जिंकून घेतला व या गडाचा उत्तम बंदोबस्त
करून येथे आपले लष्करी ठाणे बसविले. पुढे पोर्तुगीजांनी वसईत बस्तान
बसविल्यावर इ. स. १५५६ साली अशेरीवर हल्ला करून तो बळकाविला. या किल्ल्याचे
महत्त्व लगेच पोर्तुगीजांच्या लक्षात आले व त्यांनी या गडाच्या
मजबुतीकरिता अनेक नवीन बांधकामे केली. पुढे संभाजी राजांच्या कारकीर्दीत
पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी इ. स. १६८३ साली तारापूरवर हल्ला करून
बेचिराख केले. त्याच वेळी राजांनी अशेरीगड जिंकून स्वराज्यात सामील केला पण
ऑक्टोबर १६८७मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. पुढे
चिमाजी आप्पा पेशवे यांच्या वसई स्वारीच्या वेळी मराठ्यांनी
पोर्तुगीजांकडून १७३७च्या कोंकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला व परत
मराठ्यांचे भगवे निशाण गडावर अभिमानाने डोलू लागले. १८१८ नंतर अशेरीगड
इंग्रजांच्या हाती गेला.
पहाण्याची ठिकाणे –
१) पडक्या वाड्याचे अवशेष
२) चर असलेले अनेक चौथरे
३) पहारेकरींना झोपण्यासाठी दगडी पलंग
४) तीन तळे
– विशाल चं. अडखळे. (मावळे ट्रेकर्स)
शनिवार, १ डिसेंबर २०१८.
सुरूवात प्रवासाची..,Tea BreakIts time to sleep buddyअशेरीगडशिड्यांचा प्रवासपोटभर जेवण
तारीख – २६ मे २०१७, शुक्रवार. उंची ८५० जवळचे गाव – घोसाळे ठिकाण- रोहा, रायगड, महाराष्ट्र.
तर आता या वर्षी एवढ्या कडक उन्हात
ट्रेकिंगला जायचं म्हणजे तसं अगदी जिवावरच येत होत, पण नाही नाही करता करता
एक छोटासा ट्रेक झालाच. मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलो होतो आणि तिथूनच
माझ्या दोन भावां सोबत म्हणजेच विजय दादा आणि राहूल सोबत घोसाळगडाची
भटकंती करून घेतली.
ट्रेकक्षितीजच्या माहितीनुसार घोसाळगड
हा किल्ला १६व्या शतकात निजामाच्या ताब्यात होता इस १६४८ मध्ये शिवाजी
महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. ‘‘रघुनाथ बल्लाळ(कोरडे)
सबनीस सात पाच हजार मावळे खळक पाइचे घेऊन राजापुरीवर चालिले त्यांनी जाऊन
राजापुरी पावेतो तळे, घोसाळे कुल देश मारुन सरद दरियाकिनारा मोकळा केला’’
असा उल्लेख सभासद बखरीत आहे. शिवरायांनी घोसाळगडचे नाव ‘वीरगड’ ठेवले इ.स
१६५९ मध्ये सिद्दीने घोसाळगडला वेढा घातला, पण महाराजांनी अफजल खानाचा वध
केल्याची बातमी ऐकून सिद्दी वेढा उठवून निघून गेला. त्यानंतर सिद्दी,
आंग्रे, मराठे यांच्या ताब्यात हा किल्ला होता. इस १८१८ मध्ये कर्नल
प्रॉथरने हा किल्ला जिंकून घेतला.
विजय दादा येतोय म्हणून अचानक आम्ही
घोसाळगड जायचा बेत पक्का केला. तळा या तालुक्यामार्गे आम्ही घोसाळे गावात
आल्यावर किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी लावली. भवानी मंदिराच्या पाठून
किल्ल्यावर जायला पायवाट जाते, तिथून आम्ही किल्ल्यावर चढायला सुरवात
केली. तशी किल्ल्याची उंची लहान असल्याने आम्ही १२ मिनिटातच तटबंदीपाशी
येऊन पोचलो. (आणि त्यातही विजय दादा धापा टाकत होता!) सोबत असलेल्या विजय
दादाचा हा पहिलाच ट्रेक असल्याने त्याला लवकरच वर येऊन हायसे वाटले.
तुटलेल्या तटबंदी मधून वर आल्यावर डाव्या बाजूला पाण्याचे टाके आहे. तेथेच
आपल्याला एक चोरदरवाजा दिसून येतो, जो आपल्याला किल्ल्याच्या विरूद्ध
बाजसू घेऊन जातो. समोरच आपल्याला किल्ल्याची माची दिसते तिथे जरीपटका
डौलाने फडकत असतो. इथे राहूल तर एकदम selfy काढण्यात मग्न झालेला.
पायऱ्या चढून वर आलो की, आपण
बालेकिल्याजवळ येऊन पोचतो. बालेकिल्ल्याला पायवाटेने गोल प्रदक्षिणा घालू
शकतो. तिथे डावीकडून जाणाऱ्या वाटेनी गेलो की उजव्या दिशेला पाण्याचे दोन
टाके आहेत. तिथे उन्हाळ्यातही पाणी असते पण ते पिण्यायोग्य नाही. या वाटेने
पुढे जाताना चाफ्याची झाडे खुप दिसतात. पुढे डावीकडे एक दरवाजा, पायऱ्या,
आणि पहारेकर्यांच्या देवड्या दिसतात, पण ते पहायला आपल्याला खालपर्यत यावे
लागते. रस्ता थोडा अवघड असल्याने नवख्याने येऊ नये. ही वाट म्हणजे Shortcut
असून आपल्याला direct खालपर्यंत घेऊन येते.
पुढे चालत गेलो की आपल्याला उजवीकडे एक
पडका वाडा दिसतो. थोडे पुढे गेल्यावर शौचकुपाचे अवशेष दिसतात. समोरच
आपल्याला एक तोफ दिसते. तोफेचे तोंड मांदाड खाडीच्या दिशेला ठेवण्यात आले
आहे. सध्या तरी हिच जागती खुण किल्ल्यावरती अस्तित्वात आहे. तिथल्या माचीवर
उभे राहून आपल्याला पूर्वेकडे तळेगड दिसतो. या ठिकाणी आम्ही photography
आणि videography करून घेतली.
आता आम्ही निघालो परतीच्या दिशेला वर
सांगितलेल्या कठीण वाटेने आम्ही खालीतरून पायथ्याशी ७-१० मिनिटांत आलो. इथे
खाली उतरताना १५ फुटाची उंची आपल्याला झाडाच्या मुळाला पकडून खाली उतरावे
लागते. मी पहिला खाली उतरून माझ्यामागून राहुल उतरला आणि शेवटी विजय दादा.
इथे विजय दादाचा पहिलाच ट्रेक असल्याने त्याची खाली उतरताना मज्जा आली, पण
त्याने मी दिलेल्या instructions नुसार एकदम छानपैकी खाली उतरून दाखवला.
कसे पोहचाल?
रायगड मधील रोहा या तालुक्यात यावे. तिथुन रोहा-भालगाव मुरूड या रस्त्याने घोसाळा या पायथ्याच्या गावी यावे. स्वताचे वाहन असल्यास तळेगड, घोसाळगड, कुडालेणी हे ठिकाणे एकाच दिवसात पाहू शकतो. मुरूड-जंजिरा कडून येत असाल तर भालगाव मार्गे येवून सोबत कुडा लेणी ही पाहू शकता.
– Vishal C. Adkhale मावळे ट्रेकर्स (गोराई)
घोसाळगड किल्याचे दृश्य घोसाळे गावघोसाळगड गडावरील तोफगडावरील चोरवाटघोसाळगडावरून दिसणारा तळेगड
उंच कड्यावर जाऊन काढलेल्या फोटोच्या
मागे असते ती कठोर मेहनत चढण्याची, धापा टाकलेल्या श्वासांची आणि दिवस
मावळेल म्हणून ऊर फुटस्तोवर धावताना निघालेल्या घामाच्या धारांची!
रविवारचा दिवस होता आणि मी दिवसभर लोळत
होतो. बरेच दिवस काही Thrilling Adventure केलं नाही तर शरीर कस सुस्तावून
जातं एकदम. दुपारी 1.00 ला मनात आले कुठेतरी भटकून येऊ.. कंटाळा आलाय… माझा
Trek Partner स्वप्निलला विचारू म्हणून call केला… त्याचे उत्तर कधी
“नाही” येणार आहे काय? लगेच जेवण करून 2.00 ला घर सोडलं. पण नक्की जायचं
कुठे बेत पक्का नव्हता. भटक्यांना कसली आलीय Planning नी काय… आपली नेहमीची
Backpack चेक करून उचलली की सुटलो… फक्त प्रश्न राहतो तो charging चा..!!!
निघताना सरसगड ला जाऊन जायचं असं ठरलं
जर जास्तच रात्र झाली आणि बेत फसला तर निदान पालीचा गणपती तरी होईल
म्हणून. पनवेल सोडल्यावर मुंबई-पुणे हायवेला लागल्यावर समोरच ईरशाळगड दिसत
होता. जणू म्हणतचं होता माझ्याशी “या… जवळ या… सोबतीला बसून एक निवांत भेट
घ्या माझी…” गाडी थोडी बाजूला लावून स्वप्निल आणि माझं मत पक्के झाले.
गाडी ईरशाळगडाला वळवली.
संध्याकाळ झाली होती. आम्ही पायथ्याशी
पोहोचलो. आता स्पर्धा सुर्यदेवाशी होती. तशी अंधारात तर आम्ही Tourch विना
पण चालण्याची सवय होती पण आम्हाला उंचावरून सुर्यास्त पाहायचा होता. आम्ही
धावतच सुटलो. वेळ होती 5.05 PM. संध्याकाळच्या वेळेस एक ट्रेकर्स ग्रूप
खाली उतरत होता आणि आम्ही वर चढत होतो. त्यातल्या दोन पोरी धापा टाकत खाली
उतरताना आमच्याकडे आश्चर्यकारक नजरेने बघत होत्या. ग्रूपमधली पोरं तर
आम्ही येडपटच आहोत अश्या तोऱ्यात आमच्याकडे पाहत होती. ते घसरड्यावरून खाली
बसून हळू हळू खालच्या दिशेला उतरू लागली आणि आम्ही बहुतेक धावतच
त्यांच्या बाजूने वर निघून गेलो.
वरती 5.45 PM ला जवळपास आम्ही एका उंच
कड्यावर पोहोचलो तिथेच आता संध्याकाळ घालवावी असा बेत केला आणि सुर्यदेव
मावळेपर्यंत छान निसर्गाचा मन भरून आस्वाद घेतला. मी तर छानसा कातळावर आडवा
होऊन निसर्गाचे सौंदर्य न्याहाळत होतो. वरून कर्नाळा किल्ला, मुंबई-पुणे
हायवे, प्रबळगड, मोरबे धरण, माथेरानसारखा परीसर दृष्टीस पडतो. नंतर काळोख
होऊन ही बराच वेळ 7.15 PM पर्यत आम्ही आजूबाजूचा चकाकत्या परीसराचा मन भरून
आनंद घेतला आणि पुन्हा Recharge होऊन मुंबई गाठली ती सोमवारच्या नित्य
दिनचर्येला!
(या करोनारुपी महामारीत संपूर्ण जगातील
मानवजात घरात कोंडनू आहे, यास नेहमी भंटकंतीवर असणारे ट्रेकर्स कसे अपवाद
असतील? सर्व ट्रेकर्स मंडळींना सह्याद्रीची, दऱ्या-खोऱ्यांची,
कातळ-कड्यांची ओढ लागलीय. आणि बरेच दिवस झालेत आपल्याला भेटायला आपले भटके
मित्र कसे आले नाहीत असा प्रश्न सह्याद्रीला, डोंगर-दऱ्यांना पडल्यावर एका
ट्रेकर्सने सह्याद्रीस पत्र पाठवलंय …)
प्रिय सह्याद्री,
आता तुला पुन्हा भेटायचे असेल तर घरीच
बसून संयम ठेवणेच योग्य. या कोरोनारूपी सिद्दीचा वेढा हा दिवसेंदिवस आवळत
चालला आहे. सगळीकडे म्हणतात की, चायनावाल्या बादशाहाने हा जैविक हल्ला
केलेला आहे आणि करोनारूपी गनिम या जगावर सर्वत्र पाठवलेले आहेत. जगात बराच
हाहाकार उडालेला आहे. मृत्यूंचा खच पडत आहे.
या क्षणाला आपल्या सरकारला रयतेची मदत
फार मोलाची ठरत आहे. तरी काही समाजद्वेशष्टक, राजकारणी अगदी आपली रयतसुद्धा
कळत-नकळतपणे शत्रूला मोर्चे लावून वेढा आवळण्यास मदत करत आहेत. असेच होत
राहिले तर सर्वनाश होईल.
इथे आता वातावरण बरंच गंभीर आहे पण आपले
सरकार अगदी तुझ्यासारखेच खंबीर आहे. नेहमी समाज ज्यांना पांडू म्हणतो, तेच
आज आपल्यासाठी रस्त्यावर पांडुरंग होऊन उभे आहेत. डाॕक्टर्स-नर्सेस अगदी
म्यानातून तलवार उपसून गनिमाशी लढा देत आहेत.
जसे तुझा सोबत्या पन्हाळ गडाने चार
महिने महाराजांना काळजात सुखरूप दडवून ठेवले होते तसेच आता आमचे घर हेच
आमचे गडकोट ठरत आहेत. शत्रू हा भयंकर आहे, तो आपल्याला आपल्या जवळ दात
वासून उभा असला तरी दिसत नाही.
लवकरच या गनिमाला आपण सर्व एकत्र येऊन
हाणून पाडू आणि पुन्हा एकदा सर्व जगाचा व्यवहार सुरळीत करू याची खात्री आहे
मला. तू ही सावध राहा.
तुझ्या कड्या-कपाऱ्यात असणाऱ्या तुझे सर्व सोबती गड- कोटांना माझा निरोप दे. पुन्हा येईनच तुझ्या भेटीला तो पर्यंत लोभ असावा.
त्या दिवशी आमची बरीच घौडदौड झाली होती.
आदल्या रात्री कामावरून येऊन 2-3 तासांची झोप घेऊन सकाळी 3.00 वा. मुंबई
सोडली होती. दिवसभरात रमत गमत कोल्हापूरात पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली
होती, आणि आता सगळेच Down झाले होते. फोंडा घाटात यायला रात्र झाली. त्यात
फोंडा घाटात रस्ता खराब असल्याने आमचा बराच वेळ गेला. आणि त्यात
तारकर्लीहून काका आम्हाला सारखे जेवणासाठी call करत होते त्याना 10.00 वा
पोहचतो असे सांगितलेले. आणि राधानगरीतच 10.00 वाजून गेलेले. राधानगरीत विजय
दादा आणि दिपक दादा इथेच झोपू असं सांगत होते तरी त्यांना आम्ही कणकवली
पर्यत खेचून आणला. त्यात दिपक दादाच्या मित्राने त्याला फोनवर सांगितले
मालवणात वळू पिसाटलाय. आता तर निमित्तच भेटलं. म्हणतो आता पुढे जायला नको…
वळू पिसाटलाय… रस्त्यावर सगळ्यांना मारतोय… आपण नको जायला आता… इथेच
झोपू… स्वप्निल आणि मी मात्र वेळ ओळखून पुढे पळालो आणि कसाल नाक्यावर
पोहचून सर्व येईपर्यंत अर्धा तासाची एक डुलकी घेतली. मॕडी आणि अनिकेतने
कसाबसा यांना कसाल पर्यत रेमटवत आणला. आता कोणाच्याच अंगात त्राण नव्हता.
गाडी अक्षरशा स्वप्नात चालवल्याचा Feel येत होता. मग मात्र मालवणाच्या
रस्त्याला वेताळगडाजवळ मध्येच भर जंगलात गाड्या तशाच सोडून रात्री 1.00 वा.
सगळे रस्त्यावर आडवे पडले. आता कसला वळू नी काय? वाघ जरी आला तरी कोणाला
भीती राहिली नव्हती. राहणार तरी कुठून? त्यासाठी शरीरात आणि मनात त्राण तरी
हवा ना !!!
सुट्टीत गावी असलो की लहानपणी मोठी आई आम्हाला गोष्टी सांगायची त्यात एक गोष्ट मनात घर करून राहीली ती कुंभळे गावच्या नागदेवाची.
गोष्ट अशी की जुन्या काळात पंचक्रोशीत
जर कोणा एखाद्याला साप चावला तर त्याला या कुंभळे गावाच्या नागदेवाच्या
भल्या मोठ्या वारूळात नेऊन एकट्याला ठेवले जाई, मग वारूळातून भला मोठा
नागदेव बाहेर येई आणि त्या माणसाच्या शरीरातील विष बाहेर काढी.
ही गोष्ट कायम माझ्या मनात घर करून
राहिली आणि माझ्या जिज्ञासू वृत्तीला तो वारूळ प्रत्यक्ष पाहण्याची ओढ
लागली. शेवटी योग आला तो भावाची लग्नपत्रीका त्या गावात वाटण्याच्या
हेतूने.
रायगड जिल्ह्यात तळा तालुक्यात प्रसिद्ध
कुडालेणीच्या जवळच निसर्गाच्या सानिध्यातले कुंभळे हे छोटसं गाव आहे.
गुगल मॕपच्या नजरकैदेतून सुटलेल्या या गावाच्या वेशीपाशीच पुरातन काळातलं
नागदेवाचं मोठ्ठं वारूळ आहे आणि त्या वारूळात भला मोठा नागदेव अजुनही
अस्तित्वात आहे अशी येथील गावकऱ्यांची श्रद्धा आहे. प्रत्यक्ष जाऊन हे
मंदिर पाहिले असता तिथे आता प्रशस्त मंदिराचे कामकाज चालू आहे. मंदिराच्या
बांधकामासाठी राजस्थानातून खास कारागीर आले आहेत. मंदिरात पुरातन काळातली
पाच दगडी शिल्पे आहेत. त्यातल्या दोन दगडी शिल्पांवर तांब्याचे मुखवटे
बसवण्यात आले आहेत.
पोहचण्याच्या वाटा :-
१) मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर
या गावी उतरून १४ किमी वरील तळा तालुक्यात एसटीने किंवा टमटमने यावे.
इंदापूर तळासाठी एसटीची तसेच शेअरींग टमटमची सोय दर अर्धा-एक तासाने असते.
तळातून रोवळा एसटी बसची सोय आहे तसेच रोवळ्यापर्यंत शेअरींग टमटम आहेत.
तिथून पुढे ५-६ किमी वर असणाऱ्या कुंभळा या गावी जायला डाव्या हाताला फाटा
फुटतो. तिथून पुढे उजव्या हाताला जाणारा रस्ता हा वरळ गावात जातो आणि
डाव्या हाताचा रस्ता कुंभळे या गावी जातो.
२) मुंबई सेंट्रल वरून रात्री १०.३० वा
रोवळा एसटी बसने शेवटच्या रोवळा या गावी उतरावे. रोवळा गावातून ५-६ किमी
असणाऱ्या कुंभळा या गावी यावे.
कारतलबखानाच्या 20,000 फौजेला
शिवरायांच्या 1,000 मावळ्यांनी कोंडीत पकडून त्याचा पार धुरळा उडवला ती ही
जागा.शाहिस्तेखानाचा पाडाव करण्याआधी उंबरखिंडीत कारतलब खानाच्या सुमारे
२०००० सैन्याचा महाराजांनी पुरता धुव्वा उडवला आणि त्याला बिनशर्त शरणागती
घेण्यास भाग पाडले. खान कोकणात जाण्यासाठी पुण्याहून निघाल्यापासून बहिर्जी
आणि त्याचे हेर खानाच्या सैन्याच्या आजूबाजूला राहून माहिती काढत होते.
खान बोरघाट मार्गाने कोकणात जाईल असा अंदाज होता, पण खानाने ऐनवेळी
उंबरखिंडीचा मार्ग निवडला. राजांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपले
सैन्य आधीच उंबरखिंडीत आणि आसपासच्या जंगलात पेरून ठेवले. खानाचे सैन्य
खिंडीच्या मध्यावर येताच आघाडी आणि पिछाडीची नाकाबंदी करून खानाचा पूर्ण
पराभव केला. बहिर्जी यांनी दिलेल्या अचूक आणि योग्य वेळी दिलेल्या माहितीचा
यात निश्चितच मोठा वाटा होता..