Thursday, December 28, 2023

Rajasthan Diaries| Mira Temple| Chittorgarh Fort

 https://www.lifeofaash.com/mira_temple_chittorgarh_fort/

admin

Let us pick up from where we left in my last blog. As I was leaving Rana Kumbha Palace at Chittorgard Fort, the cries of the women folks who committed Jauhar along with Rani Padamavati was still lingering in my ears. We now moved on to visit our next destination.

You can click on this link to read earlier part and blog on  Sanwariya Temple and Rana kumbha Palace

Rana Kumbha Palace

Mira Mandir:

This temple is dedicated to Meerabai a famous saint, poetess and princess.

Mira Mandir, Chittorgarh Fort

I came across the story about Mirabai when I was studying in school. We had a lesson in school on Mirabai and later thanks to Amar Chitra Katha Comics which played huge role in enhancing our knowledge about Indian mythology.

Feel blessed to be at Mira Mandir

The story of Mira bai always intrigued me because though she was married to King of Mewar, but she never accepted him as her husband. Her love was only for Krishna. To know more about Mirabai we need to know her childhood too.

Small temple next to Mira Temple.

Story of Mira bai:

MiraBai was born in 1504 AD at Chaukari village in Merta District of Rajasthan. Merta was a small state in Marwar Region, Rajasthan was then ruled by the Rathors, Her father, Ratan Singh, was the second son of Rao Duda ji, a descendent of Rao Jodha ji Rathor, the founder of Jodhpur. MiraBai was raised and nurtured by her grandfather.

You may like to read this Rana Kumbha Palace Chittorgarh 

.

.

.

Entry Gate to Mira Mandir, Chittorgarh

.

.

As customary with royal families, her education included knowledge of scriptures, music, archery, fencing, horseback riding and driving chariots. She was also trained to wield weapons in case of a war. However, MiraBai also grew up amidst an atmosphere of total Krishna consciousness, which was responsible in molding her life in the path of total devotion towards Lord Krishna.

.

.

Carved Idol of Ganpati on the exterior of Mira Temple

.

When she was 4 years old, she happen to watch a marriage procession passing  by near her house and in that marriage procession she saw a smart bridegroom, she was very impressed to watch all this and in all innocence asked her mother “ Mother, Who will be my bridegroom?” Her mother smiled and in jest pointed toward the idol of Lord Krishna and said” Mira, that handsome lord Krishna shall be your bridegroom.”  What was simply a casual banter actually had big impression on Mira bai. She infact started to believe that Lord Krishna is her future bridegroom. With the passing of time her love and devotion became all the more intense.

.

.

Carved idols of gods on the exterior of Mira temple.

.

There is another incident which happened during her childhood. One day a saint had come to their house to conduct puja. He had a lovely idol of lord Krishna which him which he kept very close to him, The saint was very fond of the idol. He decorate it and worship the idol all the time.

Carved idols of gods on the exterior of Mira temple.

.

Mira bai was fascinated by this whole thing. She too started to feel attachment with that idol.She felt that she has to have that idol so she requested the saint to give it to her. The saint however refused, Mira bai was very dejected and she started to cry and she was so hysterical that she had a fit.

Carved idols of gods on the exterior of Mira temple.

Her grandfather was very worried seeing all this so he pleaded with the saint to hand over the idol to Mira bai . Thereafter Mirabai always kept that idol very close to her. She sang hymns, garlanded the idol and kept the idol close to her even while sleeping.

.

.

Carvings of dancing girls and people in daily life.

.

.

Mirabai must be 5 or 6 years old when she lost her mother. She lost her father Ratna Singh in a battle defending the kingdom against the Emperor Akbar. Thus, Mirabai had very little affection from her parents. However, her grandfather, Rao Dudaji, raised her with love and care and he was very attached to Mirabai.

.

.

Carved idols of gods on the exterior of Mira temple.

.

In those days, the most common means to unite kingdoms was to build a relationship through marriage. Consequent to which Mirabai was married to Bhojraj Singh Sisodia, who was the eldest son of Rana Sanga, much against her wishes. She never accepted the king as her husband. Mira bai’s devotion and love remained only for Lord Krishna. Though Mira bai and her husband were a good friends yet their relationship was nowhere close to that of husband and wife. This kind of behavior of Mira bai was not acceptable to her in laws and various conspiracies were hatched to kill Mira bai. In one instance poison was mixed in her milk and then at one time a poisonous snake was sent in a basket instead of flower garment. But Mira’s devotion and love for Lord Krishna won all over these conspiracies.

.

.

.

Mira Mandir of Chittorgarh is perhaps one of its kind which is dedicated to a mortal and not god. This temple was constructed by Maharana the husband of Mirabai . This temple has some of the most intricate carvings.

.

.

Intricate carvings on the exterior of temple

.

.

The visit to the Mira temple will also let you know about various significant historical facts. You will learn Rajput’s inclination towards Hinduism. Moreover, it will also reveal the fact that this is the only temple which escaped the loot done by Alauddin Khilji during the 16th century.

You can read from the beginning about our Chittorgarh visit Click Here

We spent some peaceful moment at the temple. Admired the beautiful carvings of the temple and moved to visit other attractions on Chittorgarh Fort.

Thank you for reading my blog. If you like my blogs please do share them with your friends and join my site. Your comments and views on the blogs  are very important to us , so please comment on the blog.

Total Page Visits: 3505 - Today Page Visits: 2

कामाक्षी मंदिर, कांचीपूरम

 https://kalaapushpa.com/2020/11/06/devi_mandire_2/

इतिहास

अयोध्या मथुरा माया काशी काञ्ची अवन्तिकापुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका ||

मोक्षदायिनी काञ्चीपुरीमध्ये असलेले एकमेव प्राचीन मंदिर म्हणजे कामाक्षी देवी मंदिर. वास्तविक या ठिकाणी कामाक्षी देवीचीच दोन मंदिरे आहेत. एक मंदिर म्हणजे आत्ताचे भव्य कामाक्षी मंदिर, जे कांचीकामकोटी पीठ म्हणूनही ओळखले जाते. तर दुसरे म्हणजे ‘आदी कामाक्षी’ मंदिर जे या मंदिराच्या बाजूस आहे आणि ते आदी पीठ म्हणूनही ओळखले जाते. अशी मान्यता आहे की ‘आदी कामाक्षी’ मंदिर हेच मूळ मंदिर आहे आणि आदि शं‍कराचार्यांच्या आयुष्यातील घटना याच ठिकाणी घडल्या होत्या.

या दोन्ही मंदिरांचा काळ आणि कर्ता इतिहासाला अज्ञात आहेत परंतु स्थापत्यशैलीनुसार ही मंदिरे ६व्या – ७ व्या शतकात बांधली गेली असावीत, जेव्हा कांचीपूरम ही पल्लवांची राजधानी होती. परंतु कदाचित याही अगोदरपासून येथे कामाक्षी देवीची उपासना होत असावी. नंतरच्या काळात चालुक्य, चोल, पांड्य, विजयनगर इत्यादी राजांनी या मंदिराचा (नव्या) जीर्णोद्धार केला आणि याच्या मूळ बांधकामात भरदेखील घातली.

मंदिर आणि मूर्ती

सध्याचे मंदिर द्रविड स्थापत्य शैलीत असून नक्षीदार गोपुरांनी वेढलेले भव्य प्राकार, पुष्करिणी, अर्धमंडप, सभामंडप, गर्भगृह अशा सर्व घटकांनी युक्त आहे. कामाक्षीदेवीची मूर्ती पद्मासनात बसलेली असून ती चतुर्भुजा आहे. तिच्या पुढच्या दोन हातांमध्ये उसाचा दंड (धनुष्य) आणि पुष्पगुच्छ आहे तर मागील दोन हातात पाश आणि अंकुश आहेत. तिच्या हातातल्या पुष्पगुच्छावर पोपट बसलेला आहे. पोपट हा ‘प्रेम आणि कामना’ यांचे प्रतिक आहे तर उसाचे धनुष्य, तांत्रिक संप्रदायानुसार ‘काम’ किंवा आकांक्षांचे प्रतिक मानले जाते.

आख्यायिका

कामाक्षी देवीस परब्रह्मस्वरूपिणी असेही म्हटले जाते. या देवीच्या संदर्भात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात –

१) जेव्हा भगवान शिव आपल्या प्रिय पत्नीचे, सतीचे शव घेऊन हिमालयात निघाले होते तेव्हा त्या शवाचे भाग अनेक ठिकाणी गळून पडले. ज्या ठिकाणी हे भाग पडले ती ठिकाणे देवीची शक्तिपीठे म्हणून ओळखली जातात. अशी ५१ शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. कांची येथे सतीची नाभि गळून पडली त्यामुळे या स्थानास ‘नाभिस्थान’ असेही नाव आहे.

२) कोणे एके काळी भण्डासुर नावाच्या दैत्याने ब्रह्माकडून वरदान प्राप्त करून देवांना सळो की पळो करून सोडले होते. त्याच्या त्रासास कंटाळून सर्व देवगण शंकराकडे गेले आणि त्याचा वध करण्याची प्रार्थना केली. परंतु शिवाने त्यांना “कांची क्षेत्री जावे. तेथे पार्वतीच्या ‘श्री बाल त्रिपुर सुंदरी’ स्वरूपाने कामाक्षी म्हणून जन्म घेतला आहे आणि तीच भण्डासुराचा वध करण्यास समर्थ आहे” असे सांगितले. त्यावर सर्व देवगण कांची क्षेत्री आले आणि त्यांनी बालरूपातल्या कामाक्षीची मनोभावे प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन कामाक्षीने अत्यंत उग्र असे कालीमातेचे रूप धारण केले व भण्डासुराचा वध केला. दैत्याचा वध करूनही देवीचा क्रोध शांत झाला नाही तेव्हा देवांनी भीतभीतच देवीची आळवणी केली त्यावर मात्र देवीने पुन्हा कोमल, सुस्वरूप असे बालिकेचे रूप धारण केले. तिच्या चेहऱ्यावरची प्रभा पाहून देवही विस्मयचकित झाले. त्यांनी देवीला याच स्वरूपात येथे राहण्याची विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन तेव्हापासून देवी आजतागायत येथे भक्तांच्या कल्याणासाठी वास करून आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की कामाक्षी देवी केवळ आपल्या नेत्र कटाक्षानेच भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करते.

३) नंतर कामाक्षीने वाळूचे शिवलिंग तयार करून शिवाला प्राप्त करून घेण्यासाठी कठोर तपस्या आरंभिली. तिच्या तपस्येवर प्रसन्न होऊन शंकराने कामाक्षीचा स्वीकार केला.

४) सरस्वती देवीच्या शापाने दग्ध झाल्यावर दुर्वास ऋषींनी कामाक्षी देवीची उपासना केली. जेव्हा दुर्वास ऋषी शापातून मुक्त झाले तेव्हा त्यांनी देवीसमोर श्रीयंत्राची स्थापना केली आणि ‘सौभाग्य कल्प चिंतामणी’ म्हणजेच दुर्वास संहितेची रचना केली. या ग्रंथात कामाक्षी देवीची आराधना कशी करावी याचे सविस्तर विवेचन आहे. आणि आजही याच ग्रंथाप्रमाणे देवीची पूजा अर्चा केली जाते

५) असे मानले जाते की मंदिर उभे राहण्याअगोदर पासून या ठिकाणी देवीची तांत्रिक स्वरूपात साधना प्रचलित होती. आदी शं‍कराचार्यांनी या ठिकाणी श्रीयंत्राची स्थापना करून येथील साधनेचे आणि देवीचे तांत्रिक, उग्र स्वरूप बदलून ते शांत, सौम्य केले.

या आणि अशा अनेक आख्यायिका एका गोष्टीकडे मात्र निर्देश करतात की हे मंदिर प्राचीन काळी शाक्त संप्रदायातल्या तंत्र साधनेचे प्रमुख केंद्र असावे परंतु नंतरच्या काळात मात्र ते शाक्त संप्रदायाच्या सात्विक उपासनेचे मुख्य अधिष्ठान बनले. आदी शं‍कराचार्यांनी येथे श्रीयंत्र स्थापन केल्याने शं‍कराचार्यांच्या शिष्यांपैकी एका शाखेने येथे मठ स्थापन केला. तेच हे कांचीकामकोटी पीठ होय. या शाखेच्या मतानुसार शं‍कराचार्यांनी याच ठिकाणी समाधी घेतली.

या मंदिरात कामाक्षी देवीची पाच रूपं पाहायला मिळतात – १) मूळ कामाक्षी २) तापस कामाक्षी ३) बंगारू (स्वर्ण) कामाक्षी ४) अंजना कामाक्षी (अरूप लक्ष्मी) ५) उत्सव कामाक्षी.

अशा अनेक आख्यायिका, देवीची विविध रूपे आणि ऐतिहासिक घटनांनी गुंफलेले हे मंदिर देवीच्या मूळ स्वरूपाचा म्हणजेच या विश्वाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या गूढ, अगम्य अशा प्रकृतीचा शोध घेण्यास प्रवृत्त करते. दर वर्षी या मंदिरात अनेक उत्सव साजरे केले जातात. त्यातही नवरात्र आणि ब्रह्मोत्सव प्रमुख म्हणता येईल. अशा या भक्तवत्सल कामाक्षी देवीस आमचे नमन असो.

कामारिकामां कमलासनस्थां
काम्यप्रदां कङ्कणचूडहस्तां |
काञ्चीनिवासां कनकप्रभासां
कामाक्षीदेवीं कलयामि चित्ते ||

– गिरिनाथ भारदे
©Ancient Trails.

शारदाम्बा, शृंगेरी

 https://kalaapushpa.com/2020/11/03/devi_mandire_1/

इतिहास
प्राचीन शृंगेरी गावात, अत्यंत रमणीय अशा तुंग नदीच्या तीरावर उभं असलेलं हे देऊळ शक्तीच्या सरस्वती रूपास समर्पित आहे. आठव्या शतकात आदी शं‍कराचार्यांनी सनातन धर्म प्रस्थापित करण्या हेतू स्थापन केलेल्या चार पीठांपैकी शृंगेरी हे पहिले पीठ आहे.

शं‍कराचार्यांनी शृंगेरी येथे पीठ स्थापन केल्यावर सर्व प्रथम जी ज्ञानाची देवता आहे त्या देवी सरस्वतीची आराधना करून शारदा रूपात तिची येथे स्थापना केली. शं‍कराचार्यांनी स्वतः एका दगडावर कोरलेल्या श्री यंत्रावर चंदनाच्या लाकडापासून तयार केलेली शारदा देवीची मूर्ती स्थापना केली. त्यामुळे हे पीठ ‘दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठं’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
तेव्हापासून तब्बल बाराशे वर्ष या ठिकाणाची महती , ‘ शारदा देवीच्या सान्निध्यात आणि कृपाछत्राखाली ज्ञान संपादन करून घेण्याचे तीर्थक्षेत्र’ म्हणून वाढत आहे.

१४व्या शतकामध्ये पीठाचे १२वे आचार्य स्वामी विद्यारण्य यांच्या आशीर्वादाने निर्माण झालेल्या विजयनगर साम्राज्याच्या राजांनी या मंदिरास पुष्कळ दान दिले. त्याच सुमारास या परिसरात विद्याशंकर नावाच्या देखण्या शिवमंदिराचीदेखील निर्मिती झाली. विजयनगर राजांच्या काळात शारदेची मूळ चंदनाची मूर्ती बदलून सोन्याच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. नंतरच्या काळात होऊन गेलेल्या अनेक राजांनी जसे की मैसूरचे महाराजे, पेशवे, त्रावणकोरचे राजे इत्यादींनी शृंगेरी पीठास असणारा राजाश्रय कायम ठेवला आणि मोठ्या भक्तिभावाने शारदेची आणि येथील आचार्यांची सेवा केली.

आख्यायिका –
या संदर्भात एक आख्यायिका प्रचलित आहे. ‘आदी शंकराचार्य आणि थोर विद्वान मंडनमिश्र यांच्या वादविवादात मंडनमिश्र यांची पत्नी उभयभारती हीने पंच म्हणून जबाबदारी स्वीकारली. या वादविवादात शं‍कराचार्यांचा विजय झाला. असं म्हणतात की उभयभारती ही देवी सरस्वतीचा अवतार होती. वादविवादात पराभव झाल्यानंतर मंडनमिश्रांनी उभयभारतीची परवानगी घेऊन संन्यास स्वीकारला आणि शं‍कराचार्यांचे शिष्यत्व पत्करले. ‘अशा या शारदा देवीची मनोभावे भक्ती केली तर ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सरस्वती, लक्ष्मी, पार्वती या सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात’, अशी मान्यता आहे.

या ठिकाणी ‘अक्षरभाष्य’ नावाचा विधी अनेक भाविकांकडून केला जातो. यामध्ये २ ते ५ वयोगटातील मुलांचे पालक आपल्या मुलांना घेऊन देवी शारदेच्या दर्शनासाठी येतात आणि पाटीवर मुलांच्या हाताने ओंकार गिरवून ती पाटी व पेन्सिल देवीस अर्पण करतात. अशा तऱ्हेने लहान मुलांची पहिली अक्षरओळख शारदा देवीसमोर करून दिली जाते. यात ‘त्या छोट्या शिशूस उत्तम ज्ञान मिळावे’ अशी प्रार्थना केली जाते.

या मंदिरास अनेक उत्सवांची अतिशय प्राचीन परंपरा आहे. त्यामध्ये ११ दिवसांचा नवरात्र उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

या पहिल्या लेखाच्या निमित्ताने ‘आम्हास उत्तम प्रकारच्या ज्ञानाची प्राप्ती व्हावी’ म्हणून श्री शारदेस आम्ही मनोभावे वंदन करतो.

या देवी सर्व भूतेषु ज्ञानरूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ||

– गिरिनाथ भारदे
©Ancient Trails.

अप्रतिम हळेबिडू

 https://kalaapushpa.com/2019/06/24/sa_halebidu/

होयसळ वास्तुकला-शिल्पकला इ. स. ११०० ते इ. स. १४०० यादरम्यान विकसित झाली. ही कर्नाटकातील एक वैभवशाली राजवट होती. आपण मध्य कर्नाटकातील हावेरीपासून हनगल, बंकापूर, राणीबेन्नूर, हरिहर, चित्रदुर्ग ही सगळी ठिकाणे पाहिली. हरिहरपासून शिमोगा-चिकमंगळूरमार्गे हळेबिडू येथे जाता येते.

हळेबिडूचा अर्थ होतो नष्ट झालेले गाव किंवा जुने गाव. पूर्वी या गावाला समुद्रद्वार असेही म्हणत असत. हे गाव बहामनी राजवटीत दोन वेळा नष्ट झाले. तरीही याचे सौंदर्य लक्षवेधक आहे. प्रामुख्याने वैष्णव आणि जैन प्रकारातील येथे असलेली मंदिरे म्हणजे शिल्पकलेचा अद्भुत खजिना आहे. हळेबिडू हे ठिकाण कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात आहे.

होयसळ घराण्यातील राजा विष्णुवर्धन याने इ. स. ११२१मध्ये हळेबिडू या सुंदर गावात राजधानी वसवली. तसेच अनेक सुंदर मंदिरे बांधली. या मंदिराचे काम साधारण इ. स. ११६०पर्यंत सुरू होते. होयसळ राजवटीत कर्नाटकातील या परिसरात ९५८ ठिकाणी सुमारे १५०० मंदिरे बांधली गेली. त्यातील अनेक ठिकाणां माहिती आपण याआधीच्या लेखांमध्ये घेतली आहे. जेम्स सी. हॉर्ल या संशोधकाने दक्षिण भारतातील वास्तू, मंदिरे आणि शिल्पकलेचा सखोल अभ्यास करून अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यात हळेबिडू व बेलूरचे सुंदर वर्णन केले आहे. त्यामुळे अनेक परदेशी पर्यटकही येथे भेट देतात.

होयसळेश्वर मंदिर : या मंदिरात शिवपार्वती, श्री गणेश, उत्तर व दक्षिण नंदी आणि दुर्गा यांच्या सुंदर मूर्ती आहेत. तसेच रामायणाचे देखावे कोरलेले असून, मंडपावरील छत, तसेच बाहेरच्या सर्व भिंतींवर शिल्पकला ओतप्रोत भरली आहे. मंदिराच्या बाहेरच्या भिंतींवर अत्यंत बारीक नक्षीदार शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. त्यामध्ये वरून खाली वेगवेगळ्या स्तरांवर शिल्पपट्ट्या आहेत. तसेच हत्ती, सिंह, निसर्ग, घोडे, हिंदू ग्रंथ, नर्तक, पौराणिक दृश्ये, मगरी आणि हंस व इतर प्राण्यांची शिल्पे कोरलेली आहेत. या शिल्पपट्ट्या जवळजवळ २०० मीटर लांबीच्या आहेत. त्यात रामायण आणि भागवतातील प्रसंग दर्शविले आहेत. तसेच मंदिराच्या बाह्य भिंतीवर हिंदू महाकाव्यांचे चित्रण केलेले आहे. मधील मोठ्या पॅनल्सवर देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. महाकाव्यांशी संबंधित असलेल्या या पट्ट्या आश्चर्यकारक आहेत.

बाहेरील भिंतीवर दरबारातील दृश्ये, भैरव, भैरवी, समुद्रमंथन, १२व्या शतकातील संगीतकारांसह वाद्ये, शुक्राचार्य, कच, देवयानी यांच्या पौराणिक कथा, लक्ष्मी, उमा-महेश्वर, वामन-बाली-त्रिविक्रमा आख्यायिका, इंद्राची पौराणिक कथा, वीरभद्र, योगमुद्रेतील शिव अशी अनेक शिल्पे आहेत. शिवमंदिराच्या आग्नेयेकडील बाहेरील भिंतीवर नर्तक-नर्तिकाआहेत, तर ईशान्य बाजूवर भागवत, कृष्णाची लीला, कृष्ण जन्म, त्याचे सवंगड्याबरोबरचे खेळ, युधिष्ठिर व शकुनी द्यूताचा खेळ, कीचकवध इत्यादी प्रसंग कोरलेले आहेत. एका भिंतीवर भीष्मपर्व, द्रोणपर्व, अर्जुनाचा द्रोणाचार्यांवर विजय, तसेच नर्तक-संगीतकार यांची शिल्पे आहेत. महाभारतामधील कृष्णपर्वासह अर्जुन, नर्तकांनी पांडवांचा विजय उत्सवपूर्वक साजरा केला ते दृश्य, मोहिनी आख्यान, शिव पार्वतीच्या विवाहामध्ये नृत्य करणारे नर्तक ही शिल्पेही एका भिंतीवर आहेत. मंदिरांच्या अनेक आर्टवर्क पॅनल्समध्ये कलाकारांची नावे, स्वाक्षऱ्या दिसून येतात

केदारेश्वर मंदिर : हे मंदिर प्रसिद्ध होयसळेश्वर मंदिरापासून जवळच आहे. हे शिवमंदिर होयसळ राजा वीर बल्लाळ दुसरा व त्याची पत्नी केतलादेवी यांनी ११७३ ते ११२० दरम्यान बांधले. सरकारने हे मंदिर राष्ट्रीय महत्त्वाचे एक स्मारक म्हणून संरक्षित केले आहे. कला इतिहासकार अॅडम हार्डी यांच्या मते, मंदिर इसवी सन १२१९पूर्वी बांधण्यात आले आहे. मंदिराचे बांधकाम कोरीव काम करता येण्याजोग्या सोपस्टोन प्रकारच्या पाषाणात करण्यात आले आहे. या दगडाचा वापर १२व्या आणि १३व्या शतकात मोठ्या प्रमाणात केला जात असे. होयसळ पद्धतीच्या मंदिरात आतील बाजूला गाभाऱ्यांच्या भोवती प्रदक्षिणा मार्ग न ठेवता बाह्य बाजूने पाच ते सहा फूट रुंदीच्या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. त्यामुळे भिंतीवरील शिल्पकला पाहता येते. हे मंदिरही कलेने भरलेले आहेच. आतील छतावर मध्यभागी गोलाकार असलेले नक्षीकाम अतिशय सुंदर आहे. केदारेश्वर मंदिर आणि होयसळश्वर मंदिर या दोन्ही स्थळांना ‘युनेस्को’चे जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळणे प्रस्तावित आहे.

जैन मंदिर: ११व्या ते १४व्या शतकादरम्यान होयसळ राज्याची राजधानी असलेल्या हळेबिडू पारिसरामध्ये जैन लोकांची वस्ती मोठ्या प्रमाणावर होती. केदारेश्वर व होयसळेश्वर मंदिराबरोबरच तीन जैन मंदिरांची उभारणीही येथे करण्यात आली. राजा विष्णुवर्धन जैन होता. परंतु त्याने हिंदू संत रामानुजचार्य यांच्या प्रभावाखाली वैष्णव धर्मात प्रवेश केला; मात्र त्याची पत्नी शांतलादेवीने मात्र जैन धर्म सोडला नाही. जैन मंदिरांपैकी पार्श्वनाथ मंदिर हे त्यातील सुंदर नवरंग हॉल आणि खांबावरील उत्कृष्ट कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. १८ उंचीची पार्श्वनाथाची मूर्ती हे येथील वैशिष्ट्य. यक्ष आणि पद्मावतीची इतर सुंदर शिल्पे येथे आहेत. जवळच संग्रहालय आहे. तेथे अनेक पुरातन वस्त्यांचा ठेवा जपून ठेवला आहे.

Share this:

विमलेश्वर मंदिर

 https://kalaapushpa.com/2019/07/01/sa_vimaleshwar/

हे मंदिर म्हणजे प्रत्यक्षात एक कोरीव लेणेच आहे. साधारणत: पंधरा मीटर उंच व शंभर मीटर लांब अशा कातळी खडकात हे मंदिर कोरलेले आहे. या कातळात चर मारून मंदिरासाठी वेगळा भाग घेण्यात आला आहे. या मंदिराकडे थोडे दुरून पाहिले तर, सर्वप्रथम दोन्ही बाजूंना असलेले दोन प्रचंड हत्ती नजरेत भरतात. त्यांच्या वरचे माहूत तर पैलवानांसारखे वाटतात.

मंदिरासमोर प्रशस्त असे पटांगण आहे. पटांगणातून सात-आठ पाय-या चढल्यावर या मंदिराचे पहिले प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक छोटासा चौक आहे. या चौकातून आत जाण्यासाठी आणखी एक प्रवेशद्वार आहे. यातून आत गेल्यावर एक प्रशस्त असा चौक आहे. या चौकात दोन्ही बाजूंना तीन-तीन दगडी खांब आहेत.

या चौकातून पुढे गेल्यावर गाभा-यात जाण्यासाठी पाय-या लागतात. या पाय-या चढून गेल्यावर आपण गाभा-यात प्रवेश करतो. हा गाभारा म्हणजे दहा ते बारा फूट व्यास असलेली एक गुहा आहे. गाभा-याची उंची जेमतेम सात फूट होईल. गाभा-याच्या मध्यभागी भगवान शंकराची संपूर्ण काळ्या दगडाची पिंडी आहे. हे शिवलिंग स्वयंभू आहे.

या मंदिराचे पहिले वैशिष्टय़ म्हणजे, मंदिराच्या खालच्या बाजूने बारमाही वाहणारा ओहोळ आहे. देवाची पूजा व पिण्यासाठी याचे पाणी वापरतात. बाराही महिने हा ओहोळ वाहत असतो.

या मंदिराचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे, पावसाळ्यात ज्यावेळी ओहोळाचे पाणी गढूळ होते. त्यावेळी, मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या हत्तीच्या पायथ्याजवळून एक झरा आपोआप सुरू होतो. या झ-याचे पाणी स्वच्छ, मधुर व थोडेसे दुधाच्या रंगाचे असते. स्थानिक लोक या झ-याला ‘गंगा आली’ असे म्हणतात.

या मंदिराचे तिसरे वैशिष्टय़ म्हणजे, संपूर्ण हिंदुस्थानात, उंचावर शिवलिंग वसलेले हे एकमेव मंदिर आहे. या शिवलिंगावर कितीही जलाभिषेक केला तरी ते पाणी तेथेच मुरून जाते.

विमलेश्वराचे मंदिर कोकणात, देवगड तालुक्यातील वाडा या ठिकाणी आहे. मंदिर तेथील कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे.

विमलेश्‍वराच्‍या मंदिरासभोवती दाट वनराई आहे. आकाशाकडे झेपावणारे उंचच उंच माड, पोफळी आदी झाडे मन लोभावतात. डोंगराच्या पायथ्याशी अखंड कातळात कोरलेल्या कलाकृतीतून मंदिर साकारले आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंस दोन हत्ती कोरलेले आहेत व त्यांच्या शेजारी दीपमाळा आहेत. मंदिराच्या जवळून, वरील बाजूने वाहतुकीचा मार्ग जात असल्याने मंदिराच्या सभोवतीचा कडा सुमारे तीन फूट खोदून चर काढलेला आहे. कळसाचे बांधकाम सिमेंटने उंच बांधून वाढवण्यात आले आहे.

प्रवेशद्वारावर मानवी रूपातील पाच कोरीव शिल्पे आहेत. ती शिल्पे पंचतत्त्वांची प्रतीके मानली जातात. मंदिराच्या पाय-या चढताच भलीमोठी घंटा टांगलेली दिसते. पुढे जाताच, 3३५× ३०× १२ फूट क्षेत्रफळ असलेला सभामंडप लागतो. मंदिरात अंधार असल्याने तेथे वटवाघळे आहेत. तेथून काही पाय-या चढल्यावर मंदिराचा गाभारा , मध्यभागी सुबक आकारातील शंकराची पिंड व पिंडीसमोर नंदीची मूर्ती . तेथील गाभा-यात उंचावर असलेले शिवलिंग हे भारतातील दुर्मीळ वैशिष्ट्य! मानवी कल्पकता व निसर्ग यांचा सुंदर मिलाफ असलेले ते प्राचीन मंदिर त्याच स्थितीत टिकून आहे. मंदिराच्या समोर ओढा असून त्याला बारमाही पाणी असते. तेथे दोन झरे वाहताना दिसतात ज्यांचे पाणी स्वच्छ असते. त्यामुळे ते गंगेचे पाणी मानले जाते. लेण्यांच्या दगडांतून सफेद गोंदासारखा द्रव पाझरतो, त्यास स्थानिक बोलीभाषेत ‘पाषाण’ असे म्हणतात. त्या द्रवाचा उपयोग स्थानिकांकडून दमा या आजारावर केला जातो.

मंदिरासमोर सभामंडप व बसण्यासाठी कठडा आहे. दोन्ही बाजूंला प्रदक्षिणेचा मार्गही बांधून काढलाय. शेजारी मोठे तुळशीवृंदावन, काळभैरव मंदिर व गणेश मंदिर आहे.

– स्नेहल आपटे

Wednesday, December 27, 2023

जळगाव (जामोद) येथील सातपुड्यातील ऐतिहासिक गढी

 





















मुघल काळा पासुन या शहराला ऐतिहासिक महत्व आहे. येथून जवळच काही अंतरावर असलेल्या जामोद या गावाला शहाजहानची प्रेयसी मुमताज गरोदरपणात आजारी पडली होती. त्यानंतर काही दिवसातच तिचा येथून ५० कि.मी. असलेल्या मध्यप्रदेशातील बुरहाणपूर येथे मृत्यू झाला होता.

सातपुड्यातील धारणी तालुक्यात तापी आणि गडगा नदीच्या संगमावर अपरिचीत असलेल्या आमनेर किल्ल्याची वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेच्या वतीने किल्ल्याचे संवर्धन आणि जनमाणसांचे लक्ष वेधण्यासाठी श्रमदानातुन स्वच्छता मोहीम ठेवण्यात आली होती.
मोहीम आटोपुन मी, मध्यप्रदेशातील तुकईथड-खकनार- डोईफोडिया-जलगांव जामोद-शेगांव-वाशिम या आडवाटेने मोटारसायकलने प्रवास करत पक्षी आणि निसर्ग निरिक्षण करतांना परतीच्या प्रवासात या भागातील अनेक ऐतिहासिक ठिकाणांची माहिती मिळाली. त्यापैकी जलगांव (जामोद) येथील किल्ला-वजा गढी पहाण्याचा योग आला.
ही गढी जलगांव (जामोद) ते बुरहाणपूर या रोडवर ४ कि.मी. अंतरावर आहे. ह्या गढीचा मुख्य दरवाजा, गढीवरील दोन मजले, एक तळघर आणि दोन विहीरीचे अवशेष बघायला मिळतात.
(फोटो आणि माहिती - मिलिंद सावडेकर)

Viarbh Darshan Facebbok page 3

 २०२३ मध्ये खरे गाडगे महाराज जाणून घेता आले जेव्हा संत गाडगे महाराज मिशन धर्मशाळा पाहिली. त्यांचे विचार प्रेरणादायीच नाहीत तर जगण्याचा मार्ग दाखविणारे आहेत. सेवा काय आहे? ती का करावी? ह्या सर्वांची उत्तरे त्यांच्या संदेशातून मिळतात.
|| संत गाडगे महाराज पुण्यतिथी ||
1. माय बाबांनो, घरीदारी व गावात नेहमी स्वच्छता ठेवा. मुला-मुलींना शिकवा. अंध, अपंग, अनाथांना यथाशक्ती अन्न, वस्त्र दान करा.
2. शाळेहून थोर मंदिर नाही. उदार देणगी शाळेला द्या. भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर, शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ.
3. देवासाठी पैसा खर्च करू नका. तोच पैसा शिक्षणाला द्या. मंदिराची भर करू नका. जो विद्यार्थी हुशार आहे, तो पैसा त्याला द्या. धर्मकृत्य करण्यासाठी नाही, विद्या घेण्यासाठी पैसा खर्च करा.
4. सरकारने दारूबद्दल उपदेशच करायला नको. पण मुलंच पोलीस झाले पाहिजे. बाप दारू पिऊन सापडला, असा बडवा की बापाच्या बापाने पाहिलं नसेल, असा थंडा करा.
5. दिवाळीला टोपलं भर लाडू केले. घरच्या पोराला खूप खाऊ घाला. पण दोन पोरं गरिबाचे येऊन उभे राहिले, तर त्यांना दोन लहान, दोघाला दोन लाडू द्या.
6. माणसाचे धन तिजोरी नाही, सोनं नाही, हिरे नाही, मोटर नाही. माणसाचं धन कीर्ती आहे. चार महिने बरसात परमात्मा देते. मग जमीन पिकते. चार महिने बरसात नाही पडली, तर जमीन पिकेल का? हजारो करोडो लोक मरतील, देवाला आपण फुलं वाहतो. फुलं कोणी पैदा केली? आपल्या आजाने की पंजाने? देवाने केली. मग त्याचीच फुलं, त्याचीच बरसात, आपण त्याचं त्यालाच देतो.
7. ज्या साली लढाई झाली त्या साली एक एक आगबोट 50-50 कोटी रुपयांची पार तळाला गेली. अशा किती आगबोटी बुडाल्या. सत्यनारायण करणाऱ्या महाराजाला म्हणावं, अडीच रुपये घेऊन कशाला एवढी बडबड करता? अडीच लाख रुपये घ्या, अडीच कोटी रुपये घ्या. समुद्राच्या किनाऱ्यावर एक सत्यनारायण करा अन् एक आगबोट वर आणा. हे त्यांना जमणार नाही.
8. माणसाचे खरोखर देव कोणी असतील तर ते आहेत आईबाप! आई बापाची सेवा करा.
9. गाय सुखी, तर शेतकरी सुखी आणि शेतकरी सुखी, तर जग सुखी. म्हणूनच गोपालन, पशुपालन प्रेमाने करा आणि सर्व प्राणिमात्रांवर दया करा. हाच आजचा धर्म आहे.
10. गणपती बसवणे देवाची भक्ती नाही. जेव्हा तुम्ही गणपतीला आणता, बँड लावता, भजन लावता आणि वाजवत वाजवत आणता, आणून सिंहासनावर बसवता अन् त्याची पूजा करता. निवद, मोदक, आरत्या आणि शेवटच्या दिवशी उठवता. ज्याची एवढी भक्ती केली, एवढी शोभा केली, ज्याच्या आरत्या केल्या. त्याला पाण्यात बुडवून मारता! तुमच्यावर कधी खटला भरला तर फौजदारी होते. ही देवाची भक्ती नाही. देवाची भक्ती म्हणजे भजन…
11. देव देवळात नाही. देऊळ तयार झालं, मूर्ती आणावी लागते. मूर्ती विकत भेटते. देव विकत भेटतो का? मेथीची भाजी आहे की कादे-बटाटे आहेत? देव विकत भेटतो हेही समजत नाही ज्या माणसाला, तो माणूसचं कसा!
12. डॉक्टर आंबेडकर साहेब यांच्या वडिलांना सद्बुद्धी सुचली आणि आंबेडकर साहेबाला शाळेत घातलं. आंबेडकर साहेबांनं काही लहान-सहान कमाई नाही केली. हिंदुस्तानची घटना केली, घटना! अन् तेच शाळेत गेले नसते अन् शिकले नसते तर झाडू मारणंच त्यांच्या कर्मात होतं. विद्या मोठं धन आहे.
13. हवा आहे, लाल आहे, हिरवी आहे, पिवळी आहे, ते समजत नाही आणि त्याचे ठिकाण नाही. असाच परमेश्वर आहे. हे जे तिर्थात देव बसलेले आहेत ना, हे पोट भरण्याचे देव आहेत.
14. तुमच्या देवाचा देवळा पूरता तरी उजेड पडतो का? नाही. मग दिवा विझला, मंडळी दर्शनाला आली, बापूराव दिवा लावा. मग देव कोणी दाखवला? दिव्यानं…! दिवा मोठा की देव मोठा? दिवा…!
15. कोणी तुम्हाला जात विचारली, तू कोण? तर म्हणावं मी माणूस. माणसाला जाती दोनच आहेत. बाई आणि पुरुष. या दोनच जाती आहेत. तिसरी जातच नाही.
16. अनेकजण म्हणतात, “पगार पुरत नाही.” पगार सरतचं नाही, असे म्हटले पाहिजे. ज्या घरात नवरा-बायको बुद्धिमान, अक्कलवान असतील, तिथे पगार सरत नाही. शिल्लक पेटीत टाकली पाहिजे.
साभार - Dipali Sindhutej
 































 
पुतळा बारव , सिंदखेड राजा, बुलढाणा...🚩🚩🚩
विदर्भातील सर्वात सुंदर बारव पैकी एक पुतळा बारव असावी. कारण बारव मध्ये अत्यंत सुंदर रेखीव कोरीव मुर्ती आणि नक्षीदार शिल्प आहेत.
पुतळा बारव ही एक पुष्करणी असून (पुष्करणी:-विहिरीतील पाण्याच्या पातळीपर्यंत पोचण्यासाठी पायऱ्या असलेली विहीर. जुन्या काळी अशा विहिरी बांधण्याची पद्धत होती. राजस्थानमधील पुष्कर या गावी अश्या प्रकारची पहिली विहीर बांधली गेली, म्हणून हे नांव पडले.) ही अष्टकोनी बारव आहे. या बारवेच्या भिंतीवर असलेल्या सुंदर मुर्तींमुळे या बारवचे नाव पुतळा बारव पडले असावे. पुतळा बारव अकराव्या शतकातील असावी असा उल्लेख आढळतो. पण सध्या स्थिती खूप दुर्लक्षित झालेली आहे कारण या बारवची खूप पड-झड झालेली आहे. एका वास्तूवरून या बारव ला चार प्रवेशद्वार असावे, चार कॉर्नर आणि बाजूला आधारस्तंभ खांब होते. ज्यावर छत हे टिकून होते तर छताचा काही भाग सूर्यप्रकाश येण्याकरिता मोकळा होता. परकीय आक्रमणे आणि स्थानिक लोकांच्या हव्यासापोटी भारतातील बहुतेक ऐतिहासिक वास्तू या जीर्ण झाल्यात. राजघराण्यातील स्त्रीयांसाठी स्नानासाठी या पुतळा बारवचा उपयोग होत. जर डोळ्यापुढे संपूर्ण बारव ची वास्तू उभी केली तर असे लक्षात येते की बारव च्या आतल्या बाजूने वेगवेगळ्या देवींदेवतांच्या मुर्ती असणाऱ्या देवळ्या होत्या त्यातल्या काही देवळ्या अजूनही आहेत परंतु त्यातील सुंदर मूर्ती ह्या पडझडीमुळे तुटल्या तर काही चोरीस सुद्धा गेल्या आहेत.
माहिती साभार - Vidarbha Darshan 
 






सजना बारव , सिंदखेड राजा , बुलढाणा...🚩🚩🚩
माँ जिजाऊ यांचे जन्मस्थान सिंदखेड राजा येथे अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यापैकी एक सजना बारव. ही बारव राजे लखुजी जाधव यांच्या काळातील आहे. ऐतिहासिक चांदणी तलावाजवळ ही बारव आहे. विहिरीत प्रवेशासाठी पायऱ्या बनवलेल्या असून विहिरीवर दोन ओवऱ्या काढून स्नानगृहाची व्यवस्था केलेली आहे.
माहिती साभार - Vidarbha Darshan
 





















मातृतीर्थ सिंदखेडराजा....🚩🚩
राजमाता जिजामाता, (राजमाता जिजाऊ) हयांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.
राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या.
आज हे स्थळ केवळ ऐतिहासिक स्थळ नाही तर एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखल्या जाते.
जिजाऊ माँसाहेबांचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये १२ जानेवारी १५९८ साली झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेला लागुनच आहे. याच वस्तूसमोर नगर पालिका निर्मित एक बगिचा देखील आहे. येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. ही भव्य वस्तू भारतातील संपूर्ण हिंदुराज्यांच्या समाधीपेक्षा मोठी वस्तू आहे. ज्या ठिकाणी जिजाऊंनी रंग खेळला तो महाल म्हणजे रंगमहाल. याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी करण्यात आली होती.































राजे लखोजीराव जाधव समाधी स्थळ ,
सिंदखेडराजा, बुलढाणा....🚩🚩🚩
सिंदखेड राजा येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. ही भव्य वास्तू भारतातील संपूर्ण हिंदुराज्यांच्या समाधीपेक्षा मोठी वास्तू आहे.
ज्या ठिकाणी जिजाऊंनी रंग खेळला तो महाल म्हणजे रंगमहाल. याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी करण्यात आली होती.
येथे नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे, या मंदिरामध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले हरीहाराचे सुंदर शिल्प आहे, तर राजे लखुजीराव जाधवांनी मंदिराचे पुर्नजीवन केल्याचा शिलालेख कोरलेला आहे. या मंदिरासमोरच चौकोनी आकारात तळापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असणारी एक भव्य बारव आहे. तर ८व्या ते १० व्या शतकातील अतिप्राचीन असे हेमाडपंथी रामेश्वर मंदिर आहे.
राजेराव जगदेवराव जाधवांच्या कार्यकाळात भव्य किल्यांच्या निर्मितीची सुरवात झाली होती त्याचचं एक सुंदर उदाहरण म्हणजे काळाकोठ. अतिभव्य आणि मजबूत अशा या काळाकोठच्या भिंती २० फुट रुंद आणि तेवढ्याच उंच आहेत. यासोबतच साकरवाडा नावाचा ४० फुट उंच भिंतीचा परकोट येथे बघायला मिळतो, त्या परकोटावर निगराणीसाठी अंतर्गत रस्ता, आतमध्ये विहीर, भुयारी तळघरे, भुयारी मार्ग आहेत. तर या वस्तूचे प्रवेशद्वार देखील अतिसुंदर आहे.
मोतीतलाव म्हणजे सिंचनासाठी पाणी सोडण्याची अति सुव्यवस्थीत आणि त्या काळातील जल अभियांत्रीकीचा अतिउत्कृष्ट नमुना. या तलावाच्या समोरील भाग एका किल्ल्याप्रमाणे बांधण्यात आला असून, विलोभनीय असा परिसर याला लाभला आहे. मोतीतलावाबरोबरच चांदणी तलाव हे देखील एक प्रेक्षणीय स्थळ आहे. तलावाच्या मधोमध तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे. या परिसरात अतिशय रेखीव पद्धतीने बांधण्यात आलेली पुतळाबारव आहे. ही म्हणजे असंख्य मूर्ती व शिल्पांचा एकत्र वापर करून बनविलेली देखणी शिल्पकृती. तसेच येथे एक सजनाबाई विहीर आहे, त्या काळी या विहिरीतून गावामध्ये पाणी पुरवठा भुमिगत बंधिस्त नाल्यांच्या द्वारे केल्या जात होत्या, या विहरीत आतपर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची सुविधा देखील आहे.
(Photos & Info - Nilesh Balasaheb Bathe)




































 
लोणार सरोवर मंदिर समुह....🚩🚩🚩
लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात स्थित भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक सुंदर आणि रहस्यमय तलाव आहे. सुमारे ५२,००० वर्षांपूर्वी एक उल्का पृथ्वीवर आदळली तेव्हा लोणार विवर सरोवर तयार झाल्याचे म्हटले जाते. हे सरोवर अद्वितीय आहे कारण त्याचे पाणी क्षारयुक्त आणि क्षारीय दोन्ही आहे, जे केवळ भारतातच नाही तर जगभरातील एकमेव आहे. लोणार विवर तलाव त्याच्या नैसर्गिक सौंदर्य आणि अद्वितीय वैशिष्ट्यांचा परिणाम म्हणून दरवर्षी हजारो लोकांना आकर्षित करते. हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणूनही ओळखले जाते.
लोणार सरोवराचे उगमस्थान अज्ञात आहे. स्कंद पुराण आणि पद्म पुराण यांसारख्या प्राचीन वाङ्‌मयात या सरोवराचा प्रथम उल्लेख आहे. जेव्हा त्याच्या उत्पत्तीबद्दल विचार केला जातो तेव्हा असे मानले जाते की सुमारे ५२,००० वर्षांपूर्वी एक उल्का पृथ्वीवर आदळली तेव्हा ती तयार झाली होती. तथापि, युरोपियन अधिकारी जेई अलेक्झांडर यांना सुरुवातीला १८२३ मध्ये हे रहस्यमय तलाव सापडले.
हिंदू धर्मग्रंथात उल्लेख:
हिंदू वेद आणि पुराणातही या तलावाचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. अफवा आहे की ऋग्वेद, स्कंद पुराण आणि पद्म पुराण या सर्वांचा संदर्भ आहे. स्कंद पुराणातील कथेनुसार लोणासूर नावाचा राक्षस पूर्वी या सरोवराजवळ राहत होता आणि त्याच्या या घृणास्पद कृत्यामुळे या प्रदेशातील प्रत्येकजण दुःखी होता. लोणासूरचे भय नाहीसे करण्यासाठी देवतांनी विष्णूला प्रार्थना केली.
तेव्हा भगवान विष्णूंनी एक सुंदर मुलगा प्रकट केला आणि त्याला दैत्यसूदन नाव दिले. लोणासूरच्या दोन बहिणी पहिल्यांदा दैत्यसूदनच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकल्या आणि त्यांच्या मदतीने लोणासूर जिथे लपून बसला होता तिथलं प्रवेशद्वार उघडलं.
दैत्यसूदन आणि लोणासूर यांच्यात रक्तरंजित संघर्ष झाला ज्याचा शेवट लोणासूरच्या वधाने झाला. लोणासूरची सध्याची खाडी लोणार सरोवर आहे आणि तिचे आवरण लोणारपासून सुमारे ३६ किलोमीटर अंतरावर दातेफळ टेकडीवर आहे. सरोवराचे क्षार आणि पाणी या दोन्हींचा पुराणात अनुक्रमे लोणासूर रक्त आणि मांस असा उल्लेख आहे.
लोणार सरोवराची रहस्ये (Secrets of Lonar Lake in Marathi)
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर त्याच्या गूढतेमुळे चर्चेत आहे. त्याची गूढता शास्त्रज्ञ आणि अभ्यागत दोघांनाही चिंतन करायला लावते. मी तुम्हाला सांगतो की हे तलाव एक नाही तर दोन रहस्यांशी संबंधित आहे. प्रथम, या तलावाच्या निर्मितीचा आणि उत्पत्तीचा कालखंड हे सर्वात मोठे रहस्य आहे, या तलावाचे बांधकाम अंदाजे ५२,००० वर्षांपूर्वीचे आहे. पृथ्वीवर उल्कापिंडाचा आघात हे कारण होते. या सरोवराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याचे पाणी क्षारयुक्त आणि क्षारीय दोन्ही आहे, जे संपूर्ण गूढ आहे.
लोणार सरोवराविषयी काही मनोरंजक तथ्ये (Some interesting facts about Lonar Lake in Marathi)
लोणार सरोवराचा पाया बेसॉल्टिक खडक आहे. शास्त्रज्ञांच्या मते, धूमकेतू किंवा लघुग्रह ताशी ९,००,००० किमी वेगाने या स्थानावर आदळला, ज्यामुळे सरोवराचे विवर तयार झाले.
कार्टर एका अंडाकृती-आकाराच्या तलावावर स्थित आहे, हे सूचित करते की धूमकेतू किंवा लघुग्रह ३५ ते ४० डिग्रीच्या कोनात आडळला असावा.
लोणार विवर तलाव हे बेसाल्ट खडकात कोरलेले सर्वात चांगले जतन केलेले आणि सर्वात नवीन विवर आहे.
२०१० मध्ये प्रकाशित झालेल्या एका वैज्ञानिक पेपरनुसार हे तलाव ४७,००० वर्षे जुने असल्याचा अंदाज आहे.
लोणार विवर तलावाचा सरासरी व्यास ३९०० फूट (१.२ किलोमीटर) आहे.
मॉनिटर सरडे हे लोणार विवर सरोवरात सर्वात जास्त दिसणारे प्राणी आहेत.
या सरोवरात नॉन-सिम्बायोटिक नायट्रोजन-फिक्सिंग बॅक्टेरिया देखील सापडले आहेत; अभ्यास दर्शविते की हे सर्व सूक्ष्मजंतू फक्त अल्कधर्मी वातावरणातच टिकून राहू शकतात.
तटस्थ झोन, ज्याचा pH ७ आहे, तलावाच्या बाहेरील बाजूस स्थित आहे. ११ च्या pH सह, तलावाचा आतील भाग क्षारीय क्षेत्र आहे.
जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत लोणार सरोवरात सुट्टी घालवण्याचा विचार करत असाल आणि जाण्यापूर्वी लोणार क्रेटर लेक उघडण्याचे तास जाणून घ्यायचे असतील, तर हे तलाव आठवड्याचे सातही दिवस २४ तास उघडे असते हे जाणून घ्या. आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही येथे फिरायला येऊ शकता.
लोणार सरोवर प्रवेश शुल्क (Lonar Lake Entry Fee in Marathi)
कृपया पर्यटकांना कळवा की लोणार सरोवराला भेट देण्यासाठी त्यांच्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही; ते काहीही न देता फिरण्यास मोकळे आहेत.
लोणार सरोवराच्या आजूबाजूला अनेक मनोरंजक ठिकाणे (Lonar lake information in Marathi)
आम्ही तुम्हाला सांगूया की लोणार सरोवराच्या परिसरात भेटण्यासाठी अनेक मंदिरे आणि आकर्षणे आहेत जी तुम्हाला भेट देताना आवश्यक आहेत.
गोमुखाचे मंदिर
सुधन मंदिर दातिया
श्री कमलजा देवी मंदिर हे देवी कमलजा देवीला समर्पित हिंदू मंदिर आहे
विष्णूचे मंदिर
लोणार
जरी लोक लोणार क्रेटर सरोवराला वर्षाच्या कोणत्याही वेळी भेट देऊ शकतात, परंतु भेट देण्याचा इष्टतम वेळ ऑक्टोबर ते मार्च दरम्यान आहे. यावेळी हवामान आल्हाददायक आहे, ज्यामुळे तुम्हाला लोणार सरोवराच्या सहलीचे पूर्ण कौतुक करता येईल. सभोवतालचे स्पष्ट चित्र मिळविण्यासाठी, कडक उन्हाळा आणि पावसाळा टाळा.
लोणार सरोवराकडे जाताना तुम्ही कुठे थांबलात? (Where did you stop on your way to Lonar Lake?)
जर तुम्ही लोणार सरोवरात राहण्यासाठी जागा शोधत असाल, तर तेथे फक्त काही पर्याय उपलब्ध आहेत. लोणार सरोवरातील तुमच्या मुक्कामासाठी, तुम्ही जवळपासच्या शहरातील हॉटेल्समधून निवडू शकता.
लोणार सरोवराला कसे जायचे? (How to reach Lonar Lake in Marathi?)
लोणार सरोवर महाराष्ट्रातील बुलढाणा येथून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर आहे आणि भारतातील कोणत्याही ठिकाणाहून विमानाने, रेल्वेने किंवा रस्त्याने पोहोचता येते.
लोणार सरोवराला विमानाने कसे जायचे?
जर तुम्हाला विमानाने लोणार सरोवराला भेट द्यायची असेल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबादमध्ये आहे, जे सुमारे १४० किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही विमानतळावर आल्यावर, तुम्ही बस, टॅक्सी किंवा ऑटोमोबाईलने लोणार सरोवराकडे जाऊ शकता.
रेल्वेने लोणार सरोवराकडे जाणे?
लोणार सरोवराशी थेट रेल्वे कनेक्शन नाही, त्यामुळे लोणार सरोवराकडे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी याची जाणीव ठेवावी. औरंगाबादमध्ये लोणार सरोवराचे सर्वात जवळचे मोठे रेल्वे स्टेशन देखील आहे. तुम्ही औरंगाबादहून टॅक्सी घेऊ शकता किंवा औरंगाबाद ते लोणार दरम्यान नियमितपणे धावणाऱ्या बसपैकी एका बसमध्ये जागा बुक करू शकता.
लोणार सरोवरावर गाडीने कसे जायचे?
लोणार सरोवर हे महामार्गाच्या चांगल्या जाळ्याने महाराष्ट्रातील सर्व लगतच्या शहरांशी चांगले जोडलेले आहे. तुम्ही एकतर लोणार सरोवरापर्यंत गाडी चालवू शकता किंवा शेजारच्या कोणत्याही शहरातून टॅक्सी भाड्याने घेऊ शकता. वैकल्पिकरित्या, तुम्ही महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून लोणारला नियमित बसने जाऊ शकता.
 
 
 
 
 
















ऐतिहासिक वैभवाचे रोहिणखेड....
🚩🚩🚩
अजिंठा पर्वतरांगांच्या निसर्गरम्य कुशीत वसलेले पंधराव्या शतकातील रौनकाबादनंतर रोहिणाबाद आणि आत्ताचे रोहिणखेड हे गाव पुरातन भारतीय संस्कृतीच्या ऐतिहासिक वैभवाचे साक्षीदार आहे. कलात्मक पातळीवर सुंदररचना असलेल्या वास्तू या वैभवात आणखी भर घालतात. निजामशाहीत कधी काळी राजधानीचे शहर म्हणून ओळखल्या गेलेले रोहिणखेड आता तेथील मशिदीमुळे पुन्हा प्रकाशझोतात आले आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात बाबासाहेब पुरंदरेंच्या भाषणात बुलडाणा जिल्ह्यातील या वास्तूचा नामोल्लेख केला होता.
मोताळा तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर हे गाव आहे. १५८२मध्ये खुदावतखा महमद यांच्या पुढाकारातून ही मशिद बांधण्यात आली. रोहिणखेडसोबतच साखरखेर्डा आणि पाल येथेही सारख्या ढाच्यातील या वास्तू आहेत. मात्र, रोहिणखेडमधील वास्तूचे वैशिष्ट्य वेगळे आहे. येथील भिंतीवर केलेल्या कोरीव कामामध्ये कुराणातील आयत लिहिण्यात आलेले आहेत. पाण्याने कापड ओला करून या भिंतीवर फिरवल्यानंतरच ते कोरीव काम वाचता येते. ओलावा संपला की पुन्हा अक्षर नजरेआड जातात. शिशे वितळवून या कामात वापर झाल्याचे जाणकार सांगतात. अरबी भाषेतील ही कलाकुसर आहे. लाल व काळी शाई यासाठी वापरण्यात आली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात दगडी कोरीव शिल्प आढळतात. शिवाय सन १४३७च्या सुमारास खान्देशच्या सुलतानाचे युद्ध या ठिकाणी झाल्याचेही पुरावे आहेत. औरंगजेबाच्या शासनकाळात दिल्लीश्वरांना औरंगाबादला जाण्यासाठी पालमार्गे बुऱ्हानपूर, मलकापूर, रोहिणखेड देऊळघाट तेथून पुढे औरंगाबादला पोहचता येत होते. या रस्त्यावर अनेक बारवदेखील आहेत. घाट दरवाजासारखी वास्तू आजही नवाबवंशज राहत असलेल्या देऊळघाट परिसरात असून रोहणखेड येथील बुरजावरून ती पाहता येते. सैनिकांना पूर्व सूचना देण्यासाठी व निगराणीसाठी या वास्तुंचा उपयोग केला जात होता. सध्या रोहिणखेड येथील मशिद आसारे कदिमा अर्थात पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. आठवड्यात केवळ शुक्रवारीच एक वेळ नमाज येथे अता केली जाते.
कोळेश्वराचे मंदिर
गावाला बारामारोती, बारावेसा असून नळगंगा नदीकाठी रोहिणखेडमध्ये कोळेश्वराचे मंदिरदेखील पुरातन काळापासून आहे. जागृत देवस्थान म्हणून या मंदिराचा उल्लेख आहे. शेकडो वर्षांपूर्वी जैन संशोधक उत्खनन व संशोधनार्थ येथे आले होते. त्यावेळी बाहेरील ओट्यावर संस्कृतमध्ये शिलालेख त्याने पाहिला. तदन्वये भूपती कूट यावरून या मंदिराचा राष्ट्रकुट राजा असला पाहिजे असा अंदाज बांधला जातो. तसेच मराठीतील आद्यग्रंथकार श्रीपती भट्ट हे रोहिणखेड येथीलच रहिवाशी होते. त्यांनी जोतिष्यरत्नमाला टीका हा मराठीतील ग्रंथ लिहिला. प्रज्ञावंत लेखक व ख्यातनाम समीक्षक डॉ. सत्र्यंकुल्ली हेदेखील रोहिणखेडचेच!
माहिती साभार - गजानन धांडे, बुलडाणा
फोटो - निलेश बाठे

























किल्ले गोंधनापूर....
🚩🚩🚩
खामगावपासून ९ किमी अंतरावर असलेले गोंधनापूर हे एक छोटेस गाव आहे. हे गावच किल्ल्याच्या परकोटत वसलेले आहे़. गावात एक भुईकोट किल्ला आहे. दगड व विटांनी बांधकाम केलेला किल्ला सुस्थितीत आहे. इतिहासाच्या पानांमध्ये दडला असलेल्या या किल्ल्याची विशेषता भुयारी खोल्यांमध्ये दडली आहे़. किल्ल्यात भुयारामध्ये खोल्या असून, एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी रस्ता आहे़. आतमध्ये प्रकाश येण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असून, बाहेर येण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. नागपूरचे रघुजी राजे भोसले दुसरे यांनी सन १७९१ मध्ये दिवाण वैद्य यांच्या देखरेखीखाली या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. या ठिकाणी पूर्वी गढी होती. भोसले यांचे दिवाण कृष्णराव वैद्य यांच्याकडे या किल्ल्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. नागपूरवरून किल्ल्याचे काम पाहणे शक्य होत नसल्याने पिंपळगाव राजा परगण्याचे वतनदार मुरडाजी पाटील यांच्याकडे देखरेखीची जबाबदारी सोपविण्यात आली. माधवराव चिटणीस उर्फ नानासाहेब यांनी मुरडाजी पाटील यांना मुखत्यारपत्र देऊन किल्ल्याच्या देखरेखीची जबाबदारी सोपविली, असल्याचा उल्लेख खामगाव तालुक्यातील स्थापत्य पुस्तकात डॉ. किशोर मारोती वानखडे यांनी केला आहे. हा किल्ला सध्या चिटणीस यांच्या मालकिचा आहे़. इ.स. १९४२ साली या किल्ल्यात मोठी आग लागली होती. या आगीत त्यावेळी वास्तव्यास असलेल्या जानकीमाता चिटणीस आणि त्यांच्या कुटुंबीयांचा जळून मृत्यू झाला. यावेळी किल्ल्यातील अनेक वास्तू जळून खाक झाल्या. जिल्ह्याच्या इतिहासात गोंधनापूर हे गाव फार प्रसिद्धीस नव्हते. पिंपळगाव राजा हा मोठा परगणा होता. पिंपळगाव राजामध्ये सुद्धा किल्ला होता. तसेच येथील रेणुका देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. रघुजी राजे यांनी मात्र किल्ल्यासाठी गोंधनापूर गावाची निवड केली. गोंधनापूर आधी पिंपळगाव राजा परगण्यात येत होते.
किल्ल्याची थोडी पडझड झाली असली तरी स्थिती सध्याही उत्तम आहे़. किल्ल्याच्या परकोटाच्या आतमध्ये नागरिकांनी घरे बांधली असून, शेकडो कुटुंबे येथे वास्तव्य करीत आहे़. किल्ल्याच्या सभोवताल एक किलोमीटर परिघाचा भव्य असा परकोट होता, तो सध्या पडला असून, त्याचे अवशेष पहायला मिळतात. या परकोटाला चार मजबूत बुरुज व एक प्रवेशद्वार आहे़. या परकोटाच्या आत गावकऱ्यांनी घरे बांधली या किल्ल्याला तीन प्रवेशद्वार आहेत. त्यापैकी पहिले प्रवेशद्वार हे परकोटाच्या भिंतीचे आहे़. यामधून प्रवेश केल्यावर नागरिकांची घरे दिसतात़. किल्ल्याच्या भिंतीला लागूनच घरे आहेत. त्यामुळे नागरिक भिंतीजवळ खत, कचरा टाकतात, गुरे बांधतात. या किल्ल्याचे बांधकाम तीनशे वर्षांपूर्वी करण्यात आले. बांधकाम दोन मजली असून, खालील बांधकाम दगडामध्ये तर वरील बांधकाम विटा व चुन्यामध्ये केले आहे़. किल्ल्याच्या मुख्य इमारतीला दोन दरवाजे आहेत. पहिल्या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर किल्ल्याची भव्यता निदर्शनास येते. दुसऱ्या दरवाजातून प्रवेश केल्यावर मुख्य किल्ला दृष्टीस पडतो किल्ल्याच्या डाव्या व उजव्या बाजुला धान्याची कोठारे आहेत. घोड्याच्या पागा आहेत, दुसऱ्या मजल्यावर ओळीने खोल्या आहेत. एका खोलीतून किल्ल्याबाहेर पडण्यासाठी चोरवाट आहे़. किल्ल्यात पाच ते सहा विहिरी आहेत, या विहिरी सध्या बुजल्या आहेत. ४० ते ५० फूट उंच असलेल्या किल्ल्याच्या तटावरुन दहा किमी अंतरावरील परिसर न्याहाळता येतो. या किल्ल्याच्या तटावर ठिकठिकाणी शत्रूवर नजर ठेवणार्या सैनिकांच्या बंदूका ठेवण्यासाठी जागा केलेली आहे़. किल्ल्याला असलेल्या बाहेरील भव्य परकोटाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. गावाच्या पाच किमी अंतरावर या परकोटाचे भग्नावशेष दिसतात. किल्ल्याच्या प्रवेशव्दाराला कुलूप असून, गावकरी आतमध्ये जात नाहीत, त्यामुळे सर्वत्र गवत उगवलेले आहे़. भुयारांमध्ये वटवाघळांचे राज्य आहे़. या किल्ल्याचे बांधकाम कुणी केले, याबद्दल माहिती मिळत नाही. किल्ल्याच्या इतिहासाबद्दल कुणीही अद्याप लिहिलेले नाही. आजूबाजूच्या लोकांना तर गोंधनापूर गावात भव्य असा किल्ला आहे, याचीही माहिती नाही. एकंदर हा किल्ला नागरिकांचे अतिक्रमण, शासनाची उदासिनता, चिटणीसांचा दुर्लक्षितपणा यामध्ये अडकला आहे़. किल्ल्याच्या परिसरात असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी नागपूरचे चिटणीस यांनी न्यायालयात धाव घेतली आहे़. नागरिकांना न्यायालयाने नोटीसही दिली आहे़. मात्र गावकरी घरे सोडण्यास तयार नाहीत़. चिटणीस यांनी हा किल्ला विक्रीसही काढला होता. कधीकाळी हा किल्ला जिंकण्यासाठी प्राण लावून युद्ध करण्यात येत होते. आता, मात्र एकही ग्राहक मिळाला नाही.
भुयारातील खोल्या
अनेक किल्ल्यांमध्ये भुयारात खोल्या असतात. गोंधनापूरच्या किल्ल्यात सुद्धा भुयारामध्ये काही खोल्या आहेत. या भुयारातील खोल्यांमध्ये जाणारा रस्ता अजूनही आहे़. हा रस्ता सरळ नसून, अत्यंत छोट्या छिद्रातून झोपून आतमध्ये प्रवेश करावा लागतो. आतमध्ये सहा ते सात फूट उंच खोल्या आहेत. खोल्यांमध्ये विटांचे बांधकाम करण्यात आले आहे़. तसेच सुर्यप्रकाश येण्यासाठी छोटे छोटे छिद्रही ठेवण्यात आले आहे़. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी दरवाजा आहे़. चार ते पाच खोल्यानंतर बाहेर निघण्यासाठी वेगळा रस्ता आहे़. अशाप्रकारे येथे ५२ खोल्या असल्याचे येथील काही वयोवद्ध ग्रामस्थ सांगतात मात्र, सर्वच खोल्या सध्या दिसत नाहीत. किल्ल्यात फिरताना अनेक भुयारी मार्ग दिसतात. हे मार्ग मातीमुळे सध्या बुजले आहेत. एका खोलीतून भुयारी मार्ग असून, तो पिंपळगाव राजा येथील देवीच्या मंदिरात निघतो, असे सांगण्यात येते.
Photos- Nilesh Balasaheb Bathe
माहिती साभार - लोकमत वृत्तसेवा

























किल्ले महेलगड...
🚩🚩🚩
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदपासून तीन ते चार किमी अंतरावर असलेल्या डोंगरावर वसलेला “किल्ले मैलगड”...🚩
दऱ्या, खोऱ्या, निसर्ग वेलींनी नटलेला बुलढाणा जिल्हा प्राचीन मुर्त्या, किल्ले व ऐतिहासिक वास्तूंची खाण आहे. ओंकारचा आकार असलेल्या अजिंठा पर्वतरांगांमधील डोंगरांनी बुलडाणाच्या नैसर्गिक सौदर्यात भर घातली आहे. खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवराने बुलडाण्याला जगात प्रसिद्धी मिळवून दिली तर संपूर्ण देशाचे स्फूर्तीस्थान असलेल्या शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान सिंदखेड राजाने या जिल्ह्याला इतिहासात अजरामर स्थान मिळवून दिले...
सातपुडा पर्वतरांगेतील एका डोंगरावर असलेल्या या किल्ल्याची विशेषतः म्हणजे हा संपूर्ण किल्ला डोंगरातील काळ्या पाषाणात कोरुन बांधला आहे. अंदाजे एक मैल चौरस असे या किल्ल्याचे क्षेत्रफळ आहे. गडावरुन बघितल्यावर येथे काहीच नाही असे दिसते. मात्र, दगडामध्ये विविध ठिकाणी मोठमोठ्या खोल्या आहेत. किल्ल्याचे बांधकाम गोलाकार आहे. डोंगराच्या चारही बाजूने खोल दरी आहे. गडावर फिरल्यानंतर चारही बाजूने दगडांमध्ये भुयारासारख्या खोल्या असल्याचे दिसते. खोल्यांमधील भिंती व खांब हे दगडांचेच आहेत. सध्या खोल्यांमध्ये माती व कचरा साचला असल्यामुळे आत जाता येत नाही. मात्र, हा संपूर्ण डोंगर पोखरुन त्यामध्ये मजबूत असा किल्ला असल्याचे चारही बाजूने बघितल्यावर निदर्शनास येते. यामध्ये २० ते २५ खोल्या असाव्यात. एवढ्या उंच डोंगरावरही पाणी उपलब्ध आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस उन्हाळ्यात किल्ल्यावर गेल्यावरही तेथे पाणी होते. येथे एक सासू, सुनेचे पाणी म्हणून प्रसिद्ध असलेले एक जलकुंभ आहे...
सोळाव्या शतकात हा किल्ला हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून औरंगजेबाच्या तावडीतून निसटून वेशांतर करून रायगडावर जाताना ते बूऱ्हाणपूरवरुन मैलगडावर आले होते. येथे ते वास्तव्यास राहणार होते औरंगजेबाने शिवाजी महाराजांना पकडून देणाऱ्याला मोठे बक्षिस जाहीर केले होते, त्यावेळी किल्लेदार असलेल्या गोसावीला शिवाजी महाराज मैलगडावर मुक्कामास आले असल्याचे समजले त्याने बक्षिसाच्या लालसेपोटी औरगंजेबाला ही माहिती देण्याचे ठरविले त्याचा सैनिकांशी केलेला हा वार्तालाप त्याच्या सुनेने ऐकला व तिने गडावर असलेल्या प्रवाशां मध्ये जावून शिवाजी महाराजांना ही माहिती दिली त्यामुळे शिवाजी महाराज तत्काळ येथून निघून गेले...
इ.स. १८०१ च्या सुमारास वऱ्हाडात गाजीखान नावाच्या व्यक्तीने सैन्य जमवून लुटालूट चालविली होती.. त्यामुळे द्वितीय रघुजी भोसले यांनी यशवंतराव भवानी शंकर काळू याच्या अधिपत्याखाली पाच हजार सैन्य देवून पाठविले गाजीखान हा मैलगड किल्ल्यात बसला होता.. काळू यांनी या किल्ल्यावर तोफांनी मारा सुरु केला किल्ल्यावर सैनिकांच्या हल्ल्यानंतर गाजीखानला पराभवाचे लक्षण दिसताच तो लष्करी साहित्य सोडून पळून गेला...!
माहिती नेट साभार ✒️
Photos - Nilesh Balasaheb Bathe





















किल्ले बाळापूर.....
🚩🚩🚩
बाळापूर किल्ला हा महाराष्ट्राच्या विदर्भातील अकोला जिल्ह्यामध्ये आहे. मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर असलेल्या छोट्याशा उंचवट्यावर बाळापूरचा प्रसिद्ध किल्ला बांधलेला आहे. गजानन महाराजांमुळे प्रसिद्ध शेगाव येथून 19 किमी अंतरावर हे बाळापूर गाव आहे. 33 फूट उंच या किल्ल्याला २९ ऑगस्ट, इ.स. १९१२ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.
हा किल्ला औरंगजेब बादशहाचा दुसरा शहजादा आज्जमशहाने सन 1721 साली बांधायला सुरुवात केली होती. पुढे त्याचे बांधकाम इस्माईल खान या अचलपूरच्या नवाबाने सन 1757 मध्ये पूर्ण केले.
बाळापूरच्या किल्ल्याला दुहेरी बांधणीची भक्कम तटबंदी असून याला जागोजाग बलदंड बुरूज बांधलेले आहे. बाळापूर किल्ल्याचा प्रवेशमार्ग उत्तरेकडून असून याला तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा उत्तराभिमुख असून चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आहे. तर आत गेल्यावर पश्चिमेकडे दुसरा दरवाजा आहे. दारावरच्या कमानीवर महिरप आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी असून समोर उत्तराभिमुख असा तिसरा दरवाजा आहे. या तिसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामध्ये प्रवेश करता येतो.
किल्ल्यातील इमारती जुन्या असून त्यांची जुजबी दुरुस्ती करून त्यामध्ये सध्या काही सरकारी कार्यालये केलेली आहेत. तटबंदीवर चढण्यासाठी जागोजागी पायऱ्या असून येथून रुंदीच्या तटावर पोहोचता येते. तटावरून किल्ल्याला फेरी मारणे अद्भूत वाटतं. या तटबंदीवरून बाहेरील तटबंदी दिसून येते. बलदंड बुरुजांनी वेढलेली तटबंदी किल्ल्याच्या बेलागपणाची जाणीव करून देते.
किल्ल्याच्या शेजारीच बालादेवीचे प्राचीन देऊळ आहे. बाळापूरच्या किल्ल्याच्या भ्रमंतीमध्ये दक्षिणेकडे नदीकाठावर मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधलेली छत्री बघण्यासारखी आहे.
मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर वसलेले बाळापूर हे जळगाव ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावर आहे. ते बुलढाणा तसेच वाशीम या जिल्ह्यांच्या ठिकाणांना गाडीमार्गाने जोडलेले आहे.
Photos - Nilesh Balasaheb Bathe
माहिती साभार - वेबदुनिया मराठी











अजिंठा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेलं निसर्गरम्य ठिकाण - गिरडा, बुलढाणा








विदर्भ सर्वार्थाने सर्वांगसुंदर आहे राव. प्रत्येक गोष्टीत निराळीच ब्युटी आहे. गडचिरोली नागपूर रस्त्यावर नागभिडच्या थोडं पुढं आल्यावर एक लाल रंगावर पांढऱ्या अक्षरात लिहिलेला बोर्ड दिसला, प्राचिन पाचपांडव गुफा कुनघाडा चक आपले सहर्ष स्वागत करत आहे. थोडं आत वळलो आणि हा ऐवज हाती आला.
माझ्यासारखा राज्यात, देशात (म्हणजे आपसूकच जगात) सर्वाधिक लेणी असलेल्या तालुक्यातला गडी या ठिकाणी गुळाच्या ढेपंसारखा तासभर पाघळून बसला म्हणजे हे लेणं किती गुळचाट असेल याची कल्पना करा. समोरुन, कोपऱ्यातून, वरुन, खालून... शक्य त्या प्रत्येक कोनातून हे घडिव शिल्प अनुभवत होतो आणि प्रत्येक अॅगलने अलौकिक आनंद उरात साठत होता, ठसत होता.
काही लेणी ढोबळी मिरचीसारखी असतात, काही तळायच्या लांब फुगीर मिरचीसारखी, काही सुईच्या मिरच्या तर काही उरफट्या मिरच्या... हे लेणं म्हणजे लवंगी मिरची आहे. छोटंसं... बुट्टं, गिट्टं आणि ठसठशित. एकदम ठुमक्यात मनात घर करुन गेलं. जणून काही आत्ताच रेडी झालंय वन आरके, वन बिएचके फ्लॅटसारखं. खरंच यांची रचना माजघर, दिवाणखाना, ओसरी अशा पद्धतीची वाटली मला.
हा पूर्व विदर्भ आहे... इथल्या बहुतेक नवाट पुरातन वास्तू गोंड काळाशी जोडल्या गेलेल्या आहेत... आणि जुनाट पुरातन वास्तू थेट रामायण आणि महाभारताशी. या लेण्यांचा संबंध स्थानिक लोकांनी पांडवांशी जोडलाय आणि तो समाजमान्यही पावलाय. हा भाग दंडकारण्यात मोडतो. पांडव वनवासात असताना या गुहांमध्ये मुक्कामी होते, किंबहुना त्यांच्या मुक्कामांसाठीच या गुहांची रचना केली गेली, असेही म्हटले जाते. हे सर्व ज्या दगडात आहे त्याच्या माथ्यावर एक पदचिन्ह कोरलेले आहे. ते पांडवांवर आक्रमण केलेल्या राक्षसाचे आहे म्हणतात.
ग्रामस्थांनी इथे पाचपांडव व हनुमान यांच्या संयुक्त मंदीराची उभारणी केलेली आहे. दत्त जयंतीला इथे उत्सव व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होतो. पावसाळ्यात या ठिकाणचे सौदर्य अधिक अफलातून असणार याचा अंदाज येतो... पण आत्ताही ऐन रणरणत्या उन्हातही त्याचे सौदर्य तसूभरही कमी नाही... फक्त आपली तहान जागी पाहिजे...
आसपासच्या गावठी आंब्यांना कैऱ्यांचे घोस च्या घोस लगडलेले आहेत. लेण्यांसमोरच्या हातपंपाचं पाणी दुसऱ्या झटक्यालाच उसळी मारुन वर येतं.. आयाबायांची धुणी धुवायला जायची लगबग सुरु असते डोक्यावर कपड्यांनी भरलेल्या बादल्या घेवून... एखादं म्हतारं हातातली काठी हनुवटीवर टेकवून विश्वाची चिंता वाहत मस्त मिचमिच्या डोळ्यानं शेरडं वळत असतं. उन मस्त लईत लाही लाही लाही करत असतं... त्याला कुठं कुठं लपलेल्या चिरक्या राग चिरचिर गावून चिरशांतीच्या कमाल पातळीवर नेवून पोचवत असतात. आपण त्याच शांतीशी वेव्हलेंथ जुळवायची, या अनोख्या वास्तुशी एकरुप निसर्गाशी एकात्म पावायचं आणि अवघा रंग एक झाला म्हणत रोमांचित होऊन पुढचे कित्येक तास... प्रहर... दिवस... रोम रोम जागवत रहायचं...
साभार - संतोष डुकरे
















सिद्धेश्वर मंदिर, सिद्धनाथपूर, अमरावती
अमरावती जिल्ह्यातील, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सिद्धनाथपुर (चाकोरा) येथील बेंबळा नदीच्या तीरावर वसलेले हे पुरातन सिद्धेश्वराचे मंदिर ८०० ते ९०० वर्षे जुने असावे. पुरातन मंदिरांच्या जागी आता जिर्णोध्दार केलेले नवीन मंदिर आहे. पण मंदिरातील पुरातन शिवलिंग, मंदिराची द्वार शाखा आणि मंदिराशेजारी विखुरलेले मंदिराचे अवशेष पुरातन मंदिराची ओळख करून देतात.
फोटो आणि माहिती - सौरभ प्रल्हादराव ठाकरे


या मंग जेवाले.....
आमची #विदर्भस्पेशल चमचमीत झणझणीत #कोहळ्याचीभाजी, पोळी अन् बरबटीच्या शेंगाची भाजी😋😋
भाजीवालीपाशी मस्त कोहळ दिसल मले मंग जास्त विचार न करता लगेच घेतल कोहळ......
आमच्या यायले कोहळ दिसल्यावर म्हणते अरे वा कोहळ आणल पुढच त्यायले काई बोलू देल्ल नाई मी😒 अन् म्हटल ह्म्म कोहळ आणल पण तुमचे आवडीचे बन्स बनवाले नाई आणल (ते घारग्याला बन्स म्हणतात🤭आता एवढ्यातच दोन तीन वेळा घारगे बनवुन झाले माझे) मायीवाली विदर्भातली भाजी बनवाले आणल 😋मग ते म्हटले हा बनव ना भाजी मी नाई खाणार पण 😒मी म्हटल तुमी नका खाऊ मीच खाणार आहे मस्त चाटुन😋 पुसुन......
तुमच्यासाठी बरबटीच्या शेंगाची भाजी बनवली
हे विचारतात कोणत्या शेंगा अहो चवळीच्या शेंगा 😒🤭
अस असत आमच गोवा विदर्भ आमचे हे आपल्याकडच्या तर्रीवाल्या भाज्या खात नाई जास्त पण यायन नाई खाल्ल्या तरी मी काई खान सोडत नाई बाप्पा...♥️😋आठवण आली की बनवुन खातेच मी...
आता काही दिवसांनी गणपती महालक्ष्मीले मज्जा असते आमच्या विदर्भात 😍
विदर्भात ही कोहळ्याची भाजी आणि फळं बैलपोळ्याच्या खांदामळणीच्या दिवशी बैलांसाठी नैवेद्याला बनवतात आणि कोहळ्याची भाजी महालक्ष्मी बसतात तेव्हा आणि गणपतीला सुद्धा बनवतात..♥️
ही कोहळ्याची भाजी ईतकी जबरदस्त चविष्ट झणझणीत आणि चमचमीत लागते म्हणुन सांगु की बस 😋😋
मग कुणाला माहीत आहे का हे फळं अन् कोहळ्याची भाजी तुम्ही खाल्ल का कधी फळं अन् कोहळ्याची भाजी😋😋
आणच्याकडे महालक्ष्मी बसतात तेव्हा मस्त ही कोहळ्याची भाजी फळं पंचामृत सोळा प्रकारच्या भाज्या आंबील गुळवणी बापरे लय म्हणजे लय प्रकार असतात...
आमच्या घरी महालक्ष्मी नाही बसायच्या पण वेटाळ्यात खुप जणांकडे बसायच्या मंग लय घरच चुलीले आमंञण राहत होत.....गावी हिच मज्जा असते लहाणपणी घरातल कुणी पोरग सांगायला यायच अन् अमुक अमुक घरच चुलीले आमंञण हाये अस सांगुन जायच लहान असतांना खुप आनंद व्हायचा चुलीले आमंञण आल म्हणुन खरच लहाणपणी छोट्या छोट्या गोष्टीतुन पण किती आनंद मिळायचा ना...
गावी पैसा कमी असतो पण सुख माञ खुप असत♥️
खरच खुप आठवण येते मले कधीकधी विदर्भाची
ईकडे गोव्यात आल्यापासुन महालक्ष्मीच जेवालेच भेटल नाई ती आंबील तर लयच भारी लागते....♥️😋
असो विदर्भातल्या आठवणीतुन बाहेर येते ♥️अन् गोव्यातल्या घरातले जेवणाचे भांडे घासुन घेते मंग आता🤭😒
(बर तुमाले मायीवाली भाषा समजतेन नाई समजत असन तर सांगजा बाप्पा मी शुद्ध मराठीत लिहत जाईन)
(अन हो ते कोहळ म्हंजे लाल भोपळाच चल रे भोपळ्या टुणुक टुणुक वाला नाईत म्हणाल आमी कोहळ नाई म्हणत याले पण आमी विदर्भ वाले लाल भोपळ्यालेच कोहळ म्हणतो अन् बरबटीच्या शेंगा म्हणजेच चवळीच्या शेंगा)
बर रेसिपी देते करून पायजा मंग कोहळ्याची भाजी.....
प्रत्येक ठिकाणची रेसिपी हि वेगळी असू शकते पण मी माझ्या आईची रेसिपी बनवते....
कोहळ म्हणजेच लाल भोपळा विदर्भात याला कोहळ बोलतात......
सर्वप्रथम एक कांदा कुणी कांदा वापरत नाही हवा असल्यास वापरायचा थोडे सुक्या खोबर्याचे तुकडे लालसर रंगावर भाजुन घ्यायचे त्यात आल, लसुण पाकळ्या, जिर ,कढीपत्ता घालायचा सगळ छान परतवुन घ्यायच व गॅस बंद करायचा हे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक वाटण करून घ्यायच....
आता एका कढईत तेल गरम करायला ठेऊन(या भाजीत नेहमीपेक्षा तेल जरा जास्त टाकायच तेव्हा भाजीला चव छान येते)त्यात थोड जिर ,मोहरी , हिंग आणि मेथीदाणे टाकुन एक छोटा कांदा एकदम बारीक चिरून घालायचा कांदा लालसर झाल्यावर वाटलेला मसाला घालायचा मसाला छान लालसर होऊ द्यायचा नंतर त्यात हळद, लाल तिखट (तिखट जरा नेहमीपेक्षा जास्त घालायच कारण कोहळ्याची चव गोड असते)धणे पावडर व मीठ घालुन मसाला छान परतवुन घ्यायचा नंतर त्यात कोहळ्याच्या छोट्या छोट्या फोडी करून धुऊन घालायच्या थोडस पाणी घालायच व झाकण ठेवुन मस्त शिजु द्यायच कोहळ शिजल्यावर वरून काळा मसाला व कोथिंबीर घालायची झाली आपली चमचमीत झणझणीत कोहळ्याची भाजी तयार ही भाजी पोळीबरोबर ज्वारीच्या फळांबरोबर आणि भाताबरोबर छान लागते.♥️
या भाजीत चनादाळ पण घालतात छान लागते चनाडाळ घातलेली भाजी मी कधीकधी घालते..
मी विदर्भकन्या @सोनल गांवकर



मुतनूर हिल स्टेशन, गडचिरोली
⛰️❤️
मुतनूर हे चामोर्शी (तहसीलदार कार्यालय) पासून 31 किमी अंतरावर आणि जिल्हा मुख्यालय गडचिरोलीपासून 70 किमी अंतरावर आहे.

































































































































































































































गडचांदूर, चंद्रपूर येथील चार पुरातन वास्तू शेवटच्या घटका मोजत आहेत.






























सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत बहरले
मेळघाटचे सौंदर्य...!!! ❤ ❤ ❤
******************
सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत वसलेले चिखलदरा सध्या विविध प्रजातींच्या वनस्पतींनी नटले अन् निसर्गसौंदर्याने बहरले आहे. केवळ विदर्भाचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे नंदनवन ठरावे, अशी येथील निसर्ग वनसंपदा पाहिल्यावर प्रत्येक पर्यटकाला मनोमन वाटते. सातपुडाच्या शिखरावर चिखलदऱ्याचे पठार असून, मोथा ते वैराटपर्यंत २५ ते ३० कि.मी. हा परिसर पसरलेला दिसतो. उन्हाळ्यातही गारवा, नजर टाकावी तेथे विहंगम दृश्य, विविध प्रजातींची फुले झाडे, हिरवा-गालिचा अन् डोंगरदऱ्यातून जाणाऱ्या ढगांची मालिका पाहून कुणालाही वारंवार यावेसे वाटते. चिखलदऱ्याच्या सौंदर्याची किमया ही न्यारीच असून, महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पर्यटनस्थळांना लाजवेल, अशी मनसोक्त निसर्ग सौंदर्याची उधळण चिखलदऱ्यात बघायला मिळते.चिखलदरा शहराचे क्षेत्रफळ ३९४ हेक्टरच्या वर आहे. हे शहर दोन पातळ्यांमध्ये विभागले गेले आहे. समुद्रसपाटीपासून लोअर प्लॅटोची उंची हजार ६०० फूट, तर अप्पर प्लॅटोची उंची हजार ६५० फूट इतकी आहे. चिखलदरा पर्यटन नगरीत साधारणपणे १० ते १२ प्रेक्षणीय स्थळे आहेत. यांतील सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे सनसेट आहे. पण, तो केवळ उन्हाळ्यात पाहायला मिळतो. थंड हवेचे ठिकाण: ब्रिटिशांच्या राजवटीत उदयास आलेले चिखलदरा हे विदर्भातील एकमात्र थंड हवेचे ठिकाण आहे. हैद्राबाद फलटणीचा कॅप्टन रॉबिन्सन याने १८२३ साली चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणाचा शोध लावला. इंग्रजांनीच या स्थळाचा विकास घडवून आणला. चिखलदरा म्हणजे विदर्भाचे काश्मीर असे मानले जाते.
(फोटो सौजन्य:- चेतन देशमुख निसर्गप्रेमी छाया चित्रकार)









चंडिका देवी मंदिर, वाई, पांढरकवडा, यवतमाळ




















पवन राजाचा किल्ला, पवनी, भंडारा
भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यातील पवनीचा प्रसिद्ध किल्ला, भंडाऱ्या पासून ४७ आणि नागपूर पासून ८२ किलोमीटर अंतरावर आहे. या गावाच्या तीन बाजूनी टेकड्या आणि एका बाजूने वैनगंगा नदी वाहते. गावात शिरताच आपल्याला दिसतो तो पवन राजाचा किल्ला. त्यावरूनच पवनी हे या गावाचं नाव पडलं आहे. गावात जाणारा मुख्य रस्ता या किल्ल्याच्या दरवाजातूनच जातो. हा किल्ला अजूनही बराच सुस्थितीत आहे. किल्ल्याची एक भिंत आणि तिच्या पायथ्याशी असलेला तलाव गावात प्रवेश करतानाच लक्ष वेधून घेतात.
(Photo - Suraj Gadpayle)









चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील देवघाट येथील परिसरात पुरातन मंदिराचे अवशेष आणि विखुरलेल्या स्वरुपात देव देवतांच्या मूर्ती आहे.
(Photo - Jayant Janekar)


























स्वामी नृसिंह सरस्वती जन्मस्थान, काळे वाडा, कारंजा लाड, वाशिम
थोर दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वतींचे जन्मस्थान म्हणून करंजनगरी वा कारंजा या शहराची प्रसिद्धी आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर-यवतमाळ या रेल्वेरस्त्यावर कारंजा हे स्टेशन आहे. साठ सत्तर हजार लोकसंख्येच्या या गावी चांगली बाजारपेठ असून गुरुमंदिरामुळे दत्तभक्तांनाही ते प्रिय झाले आहे. प्राचीन काळातही या क्षेत्राचे महत्त्व वर्णन केले आहे. करंजमुनींनी या ठिकाणी पाण्यासाठी तलाव खणण्यास सुरुवात केल्याची कथा आहे. या क्षेत्रात गंगा व यमुना यांचे वास्तव्य बिंदुमती नावाच्या कुंडात असून येथून पुढे बेंबळा नदी वाहते. याच क्षेत्रात यक्षमाता यक्षिणी देवीचेही वास्तव्य असल्याचे सांगतात. करंजमुनींच्या प्रभावाने गरुडापासून शेषनागास संरक्षण येथेच मिळाल्यामुळे या क्षेत्रास ‘शेषांकित क्षेत्र’ असेही नाव आहे. येथील नागेश्वराच्या पूजनामुळे कधीही विषबाधा होत नाही असे सांगतात.
याच करंजनगरीत श्री नृसिंह सरस्वती शके १३०० च्या सुमारास जन्मास आले. श्रीगुरुंच्या जन्मस्थानाचा शोध अलीकडेच लागला. सन १९०५ मध्ये श्री वासुदेवानंदसरस्वतींनी या नगरीत वास्तव्य श्री राम मंदिरात केले होते. सध्याच्या गुरुमंदिराशेजारी घुडे यांचा वाडा आहे. हा वाडा जवळपास ७०० वर्षे जुना आहे. बाळकृष्ण श्रीधर घुडे यांनी नगरनाईक काळे यांच्याकडून हा वाडा सन १८८० च्या सुमारास विकत घेतला. काळे यांचे वंशज सध्या काशीस असतात. यांपैकी कोणालाच श्रीगुरूंच्या जन्मस्थानाची कल्पना नव्हती. हा वाडा चार मजली, भव्य व प्रेक्षणीय आहे. जमिनीखाली तीन मजली भुयार आहे. भिंतीची रुंदी चार फुटांपासून सहा फुटांपर्यंत आहे. दुसऱ्या मजल्यावर श्रीगुरुंच्या जन्मस्थानाची जागा आहे.





पुरातन गणेश मंदिर, वाई, पांढरकवडा, यवतमाळ
(Photo - Mohit Jaiswal)
महादेव धबधबा चारठाणा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ द































































विदर्भातील धबधबे


अश्मयुगीन चित्रे आणि गुफा, नवताळा, चिमूर, चंद्रपूर
(Photo - Pramod Sawsakde)

पुरातन शिव मंदिर, अरततोंडी, गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यामध्ये असलेल्या अरततोंडी येथे हे पुरातन हेमाडपंती शिव मंदिर आहे. एका उंच टेकडीवर हे मंदिर स्थित आहे. येथील निसर्गरम्य परिसर मन मोहून टाकणारा आहे. टेकडीच्या पायथ्याशी अरततोंडी जलाशय आहे. येथे एक नैसर्गिक गुफा सुद्धा आहे.


तुमच्या पैकी किती लोकांनी या फुलांची भाजी खाल्ली आहे?
दुडी, दोडी, दवडी, झुटेल, जिवतीची फुलं अशी विविध नावं या फुलांची आहेत. ही फुलं खूप दुर्मिळ आहेत, बाजारात सहसा उपलब्ध होत नाही. विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीला ही फुलं येतात. रानात किंवा शेताच्या बांधांवर या फुलांची वेल असते. वर्षभर ही वेल वाळलेली असते आणि पावसाळ्यात हिरवीगार होउन जुलै महिन्यात फुलांनी बहरते. या फुलांची भाजी खूप स्वादिष्ट आणि रुचकर बनते. एकदा ज्याने या भाजीची चव घेतली तो या फुलभाजीचा फॅनच होतो.



गडबोरी किल्ला, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका मुख्यालयापासून ७ किमी अंतरावर गडबोरी हे प्राचीन गाव वसलेले आहे. तिथे पुरातन काळातील किल्ला आहे. तेथील परिसर झाडाझुडूपांनी व काटेरी वनस्पतींनी व्यापलेला आहे. किल्ल्यावर माना जमातीचे शक्तीस्थळ माणकादेवीचे मंदिर आहे तसेच गोरजाईची मुर्ती सुद्धा आहे. तसेच महाराज कोलबा वाघ यांची समाधी सुद्धा आहे. या समाधीला कोलासूराची समाधी असे सुद्धा संबोधण्यात येते. गडबोरी गावात अनेक प्राचीन कालीन मंदिरे असुन त्यावर तसेच गाभार्यात नागमुर्ती कोरलेल्या आहेत. गडबोरी किल्ल्यावर महाराज कोलबा वाघ यांचे रुपाने इस १७३४ पर्यंत मानांचे राज्य अस्तित्वात होते. सदर किल्ला नागवंशीय माना राजा महाराज कुरुमप्रहोद यांनी बांधल्याची शासन दरबारी नोंद आहे. या किल्ल्यावर गोंड राजांनी राज्य केल्याची नोंद नाही. त्यामुळे गडबोरीचा शेवटचा राजा महाराज कोलबा वाघ हेच होय. त्यांचे जन्मवर्ष ऊपलब्ध असल्याचे आढळून येत नाही. परंतु ते चांदागड चा गोंडराजा राजा रामशहाचे समकालीन होते. रामशहाचा कालखंड इस १६७२- १७३५ अशी ऐतिहासिक नोंद आढळते. महाराज कोलबा वाघ अत्यंत शुर, पराक्रमी, लढवैय्या असून दांडपट्टा खेळण्यात, घोडसवारी करण्यात, तलवार चालविण्यात मातब्बर होते. वर्ण काळा सावळा, बलदंड शरीरयष्टी, झुपकेदार मिशा, लांब कल्ले, गोल चेहरा, बसके नाक असं त्यांच एकंदरीत व्यक्तीमत्व होत. त्यांचे ताब्यात प्रशासकीय तसेच संरक्षणाकरीता गडबोरी, नागभिड, चिमूर, नेरी, मदनागड, नवरगांव, भटाळा, भिसी, चंदनखेडा, वरोरा इत्यादी परगण्यातील एकूण २०९ गांवे व भुप्रदेश व चतुरंग सैन्य होते.
इस १७३१ मधे ईरव्याची प्रसिद्ध लढाई गोंडराजा राजा रामशहाचे सैन्य व महाराज कोलबा वाघ यांचे सैन्यात झाली. महाराज कोलबा वाघ यांचे ताब्यातील ईरवा टेकडीवरचा किल्ला मजबूत व भक्कम तटबंदी असलेला होता. जमिनीपासून ३५० फुट ऊंच टेकडीवरचा हा किल्ला दगडांनी बांधलेला होता. हा किल्ला सर करण्यासाठी रामशहाचा भाचा आगबा प्रचंड मोठ्या सैन्यासह चालून आला. परंतु महाराज कोलबा वाघ यांचे सैन्याने अत्यंत आक्रमकपणे हल्ला केल्याने दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले यात आगबाचे सैन्याचा पराभव होऊन ते जीव मुठीत घेऊन पळून गेले.
या पराभवाने चिडून जाऊन इस १७३४ मधे महाराज कोलबा वाघ यांचा पराभव करण्याकरीता रामशहाने सैन्याचे नेत्रुत्व सेमाजी ऊर्फ शंकर ढुमे या ब्राम्हण रिसालदाराकडे दिले. त्याने कपटकारस्थान करून महाराज कोलबा वाघ यांना जिवंत पकडून खजीना लुटून चांदागडकडे रवाना झाले. दुसरे दिवशी रामशहानेे दरबार भरवून महाराज कोलबा वाघ यांना प्रश्न केला '' जर तु माझा मांडलीक होशिल, तर मी तुला गडबोरी परगण्याची मोकासदारी देईन '' परंतु महाराज कोलबा वाघ यांनी स्वाभिमानाने व बाणेदारपणे ऊत्तर दिले.'' मी मेलो तरी चालेल पण मी तुझा मांडलीक बनुन राहणार नाही.'' त्यामुळे चिडून रामशहाने '' याचा शिरच्छेद करा '' असे आदेश आपले सैन्यास दिले. अशाप्रकारे एका महान पराक्रमी माना जमातीच्या राजाचा अंत झाला व त्याच बरोबर माना जमातीच्या राज्याचा शेवट झाला.
आजही माना जमातीचे लोक गडबोरी किल्ल्याला भेट देतात व महाराज कोलबा वाघ यांचे समाधीला भेट देऊन नतमस्तक होतात.
- इंजी. यादव घोडमारे.
(सौजन्य - गडबोरीचा पराक्रमी राजा कोलबा वाघ भाग-१)
लेखक : प्रा. नरेंद्र मेश्राम


शिरपूर किल्ला, ता. वणी जि. यवतमाळ
एका अधुऱ्या प्रेम कहाणीचा गड
हा किल्ला वणीपासून १४ किमी अंतरावर आहे. हा किल्ला चांदागडाच्या गोंड राज्याच्या अंतर्गत येत असे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून १३३ मीटर उंचीवर वसलेले आहे. हा भुईकोट किल्ला बांधण्यासाठी दगडाचा वापर केलेला आहे. आजूबाजूच्या आवारातही दगडाचा वापर करण्यात आला आहे. किल्ल्याच्या आत दगडाची पायविहीर आहे. किल्ला पूर्णत: ढासळला आहे. दगडी भिंत शिल्लक आहे.
येथील किल्लेदार कन्नाके गोत्राचा होता. (येरवेन सागा) कन्नाके गोत्र हे चांदागडाच्या अंतर्गत सर्वात श्रीमंत परगणा होते. अगबा, बागबा आणि राघबा हे तीन भाऊ मिळून हा परगणा सांभाळत होते. हे तिघे चांदगडचा गोंड राजा रामशहा याचे भाचे होते. त्यापैकी बागबा हा कर्तबगार होता. राजा रामशाहची मुलगी बागबाच्या प्रेमात पडली. दोघेही एकमेकांना भेटू लागले. एके दिवशी राजाला ही गोष्ट कळली. संतापून राजाने तीन लाख शेख, सय्यद, मोगल आणि पठाण, ४० हजार गोंड सैन्य, १ तोफ, ९६० हत्ती दळ एकत्र केले आणि ते लढायला निघाले. बागबाकडे ३५ हजारांची फौज होती. सन १७३५ मध्ये वर्धा नदीच्या काठी घुग्घुस येथे घनघोर युद्ध झाले. वर्धा नदीचे पाणी रक्ताने लाल झाले आहे, जिकडे पाहावे तिकडे चिरलेली मुंडकी. यापूर्वी बागबा विजयी शर्यतीत होता. राजा रामशहाचे सैन्य मागे हटत होते. अचानक भरती वळली, बागबाचा धाकटा भाऊ राघबा मारला गेला. हे युद्ध पराभवाच्या मार्गावर होते. राजा भूमपती आपल्या सैन्यासह पुढे जात होता. त्या रणांगणातून बागबा निसटला. त्याचा पाठलाग करत गोंडराजा रामशहा तरोडा येथे पोहोचला. तेथे मोठा भाऊ अगबा मारला गेला. बागबाचे सर्व काही संपले. शिरपूर येथे त्यांचे कुटुंब होते. कुटुंबाला वाचवण्यासाठी बागबा शिरपूरला पोहोचला. तेथे गोंड राजा रामशाहचे सैन्यही आले. गावातील प्रत्येक गोंड कुटुंबाची कत्तल करण्यात आली. शिरपूरचे एकही गोंड कुटुंब जिवंत राहिले नाही. आता बागबाला पळून जाण्याची संधी नव्हती. त्याने आपले संपूर्ण कुटुंब एका भूमिगत तळघरात लपवले. आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा शिरच्छेद केला. आणि स्वतःच्या हातांनी स्वतःचे डोके देखील कापले. अशा प्रकारे त्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाचा अंत केला. मोकासदार बागबाची प्रेमकहाणी अपूर्णच राहिली. राजा रामशहाने स्वत:च्या हाताने आपल्या भाच्याचा परगणा संपवला.
माहिती संकलन : प्रा.डॉ.श्याम कोरेटी
(Photo - Tulson Kannake)


यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात असलेल्या कायर या ऐतिहासिक गावातील पुरातन मंदिरे :

गणपती मंदिर, कायर, वणी, यवतमाळ

सांबशिव मंदिर, आष्टोना, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील आष्टोना गावात नदीच्या तीरावर हे पुरातन मंदिर वसलेले आहे. मंदिरात नागदेवता, गणपती, विष्णू, अन्नपूर्णा माता, कृष्ण यांच्या मुर्ती आहेत. शिव मंदिराला लागूनच राम मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे.
(Photo - Mohit Jaiswal & Pratik Dhurve)


पुरातन मंदिराचे अवशेष, वडकी, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वडकी या छोट्याशा गावात पुरातन मंदिराचे अवशेष आहेत. गावातील हनुमान मंदिर आणि गावाबाहेरील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुरातन मंदिराचे अवशेष आहेत. यात विविध देवी देवतांच्या मुर्त्या, मंदिराचे स्तंभ मंदिराशेजारी विखुरलेले आहेत. पुरातन अवशेषांवरून कळते की येथे आधी हेमाडपंथी शैलीचे मंदिर असावे परंतु काळाच्या ओघात ते नष्ट झाले असावे.
(Photo - Mohit Jaiswal)


विदर्भातील १०६ गढी आणि किल्ले एकाच ठिकाणी :
या अल्बम मध्ये गढी, किल्ल्याचे फोटो, गाव आणि जिल्ह्याची माहिती देण्यात आली आहे. जर आपल्या गावातील गढीचा किंवा किल्ल्याचा समावेश नसेल तर कमेंट मध्ये कळवा.










































































































































विदर्भातील गढी आणि किल्ले :
विदर्भ म्हटला की नेहमीच दुर्लक्षित राहिलेला प्रांत मग तो पर्यटन क्षेत्रात असो वा इतर.. आणि विदर्भातील किल्ले म्हटले की आपल्याला बोटावर मोजण्याइतकेच आठवतात.. पण विदर्भात एकेकाळी बरेच किल्ले गिरीदुर्ग, वनदुर्ग, भुईकोट व गढी स्वरुपात अस्तित्वात होते. विदर्भातील किल्ल्यांची शोधयात्रा करताना आम्हाला एकुण १०० कोट अवशेष रुपात पहायला मिळाले. आजच्या संगणक युगात आंतरजालावरही या किल्ल्यांची माहिती दिसून येत नाही. या किल्ल्यांचे फोटो गोळा करून गाव व जिल्ह्याची माहिती आम्ही पेजवर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यातील बरेच कोट सुस्थितीत तर काही पडझड झालेले आहेत. बऱ्याच गढी पुर्णपणे नष्ट झाल्या असुन केवळ तटबंदीची एखादी भिंत अथवा एखादा बुरुज वा दरवाजा असे उर्वरित अवशेष काळाशी झुंज देत आहेत. यातील बहुतांशी गढीकोटात गाव, मंदिरे वा दर्गा असल्याने या वास्तुनीच या कोटांच्या अवशेषांचा घास घेतला आहे तसेच स्थानिकांचे या वास्तु बद्दलचे अज्ञान व उदासीनता देखील या कोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे.
(Photo - Suresh Nimbalkar, Tushar Patil, Vijay Menon, ॐ Ratnangrikar, Google)



बेसा, नागपूर येथील स्वामी समर्थ धाम परिसरात स्थित 21 फूट उंच विठुरायाची आकर्षक मूर्ती...
जय हरी 🙏 (📸 - @aapla_nagpur )

लंकेनाथ, ता. नेर, जि. यवतमाळ येथील शिव मंदिरातील पुरातन मुर्ती. विठ्ठल?
(Photo - Vyankatesh Kute)


पुरातन विठ्ठल - रुख्मिणी मंदिर, सावंगी (जोड), वर्धा
वर्धा- वेणा या दोन नद्यांचा संगम हिंगणघाट तालुक्यातील सावंगी जोड या गावाजवळ झाला आहे. याच संगमावर चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या तिन्ही जिल्ह्याच्या सीमा एकत्र येतात. या संगमावर निसर्गरम्य परिसरात विठ्ठल मंदिर वसलेले आहे. येथे पुरातन शिल्प आढळून आले आहेत. याच संगमाच्या काही अंतरावर वरोरा तालुक्यातील दिंदोडा बॅरेज प्रकल्प प्रस्तावित आहे.


विदर्भाचे 'पंढरपूर' धापेवाडा, नागपूर
आदासा नागपूर जिल्ह्यात एक गाव आहे आणि नागपूर शहरात सुमारे 40 कि.मी. अंतरावर आहे, म्हणजेच ते एक तास दूर आहे. हे ठिकाण गावच्या जवळ असलेल्या डोंगरावर वसलेले प्राचीन मंदिर संकुलासाठी प्रामुख्याने प्रसिद्ध आहे.
आदासापासून जवळ जवळ 2 कि.मी., हे धापेवाडा गाव आहे. हे गाव चंद्रभागा नदीच्या काठी वसलेले आहे. शहराचे एक वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे विठोबाचे मंदिर, जे नदीकडे दुर्लक्ष करते. उमाजी आबा, दिवाण यांनी राजा बाजीराव भोंसले यांनी बांधले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे धापेवाडाला विदर्भाचे 'पंढरपूर' असेही म्हणतात.



विठ्ठल रुक्मिणी मंदिर, कौंडण्यपूर, अमरावती
भगवान श्रीकृष्णाचे अमरावती शहराशी काही विशेष नाते आहे कारण, अमरावती पासून अवघ्या ४४ किमी अंतरावर श्रीकृष्ण पत्नी रुक्मिणीचे जन्मस्थळ कौंडिण्यपूर धाम आहे.
वर्धा नदीकाठी कौंडिण्यपूर वसले आहे. या स्थळाचे कुण्डिनपूर, कुंडिनी इ. नावांनी प्राचीन साहित्यात उल्लेख मिळतात; तसेच हे स्थळ प्राचीन विदर्भाची राजधानी असल्याचे ज्ञात होते. पुराणांतील अनेक कथांत कौंडिण्यपूर गुरफटलेले आहे. कृष्ण-रुक्मिणी, शिशुपाल, नल-दमयंती यांचा संबंध कौंडिण्यपूरशी असल्याचे अनेक कथा सांगतात. हे स्थळ भीष्मक राजाची राजधानी असून त्याची कन्या रुक्मिणी हिचे श्रीकृष्णाने गावाबाहेरील अंबिकेच्या मंदिरातून हरण केले, अशी कथा प्रसिद्ध आहे.
आपले गौरवशाली हिंदुस्तान राष्ट्र जगातील सर्वधर्माचे मूळ स्थान व मानवतेचे ज्ञानपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. आर्य संस्कृती अति प्राचीन आणि सनातन, शाश्वत, चिरकाली प्रगमनशिल व प्रख्यात आहे या आर्य भुमीत आसेतू हिमाचल असलेल्या पुण्य नगरी पैकी प्राचीन वैभवशाली विदर्भाची तत्कालीन समाधी म्हणून कौंडण्यपूर किर्तीवंत आहे, पुरातनकाळी श्री वशिष्ठ ऋषींनी तप केल्यामुळे वर्धा नदी ही वशिष्ठा नावांने तसेच श्री अंबरीश ऋषीचे पुत्र कुंडण (कौंडील्य) ऋषींनी तप केल्यामुळे या तपोवनाला कुंडीनपुर नाव प्राप्त झाले.
प्रभु श्रीरामचंद्राची आजी राजा दशरथाची आई इंदुमती, नलराजाची राणी दमयंती, श्री अगस्ती ऋषीची पत्नी लोपामुद्रा, राजा भिमककन्या माता रुख्मीणी, स्वर्गातुन गंगा पृथ्वीवर आणणाऱ्या श्री भगिरथ राजाची माता केशीनी या पंचसतीचे माहेर तसेच नाथ संप्रदायातील श्री चौरंगीनाथ या सर्वांचे स्थान कौंडण्यपुरच आहे. नाथाची समाधी सुद्धा इथेच आहे. या शिवाय इ.स. १२०० पूर्वीचे श्री गणपती व पंचमुखी महादेवाची पिंड आहे.
वशिष्ठा (वरदा) - आजची वर्धा नदीच्या पात्रात पुंडलिक नांवाचे कुंड आहे. याच कुंडातुन संत श्रेष्ठ श्री सदाराम महाराजांना श्री पांडुरंगाची मूर्ती प्राप्त झाली. तीची प्रतिस्थापना करुन येथे आज भव्य मंदिर उभे आहे. विदर्भातील हे प्रसिद्ध तिर्थक्षेत्र श्री विठ्ठल-रुख्मीणी संस्थान, कौंडण्यपुर म्हणून ओळखले जाते.
येथे पुराणवस्तु संशोधनाचा अल्पसा प्रयत्न स.न. १९२८ मध्ये कै. अ. रा. रानडे यांनी केला, नंतर स.न. १९३६ मध्ये पुरातत्व विभागाचे प्रमुख रायबहादुर श्री का.ना. दिक्षीत यांनी केला. या नंतर स.न. १९६२ मध्ये पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. मोरेश्वर दिक्षीत यांनी केला. उत्खनातुन मिळालेल्या वस्तुंन वरुन असे दिसून येते कि ह्या वस्तू ताम्र व पाषाण युगातील असाव्यात तसेच पुरातन शेषशायी विष्णु भगवानाची पाषाण मूर्ती देवालयात पहावयास मिळेल. श्री क्षेत्राची जोपासना करण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्य मूर्ती वंदनीय श्री गाडगे महाराज व वंदनीय श्री अच्युत महाराज यांचा सिंहाचा वाटा आहे. सातवाहन काळातील काही नाणी व मातीची भांडी उत्खननात मिळाली. या पुरातन वास्तुचे संशोधन सातत्याने होणे आवश्यक आहे.
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा....!!
ही आहे हिंगणघाट (वर्धा) येथील विदर्भातील सर्वात उंच ५१ फुट उंच विठ्ठल मुर्ति जी वेणा नदीच्या तिरावर आहे.



पोही' वरचा महादेव, चिखली, बुलढाणा
चिखली शहरातील जुन्या मंदिरापैकी ' पोही ' वरचा महादेव हे एक मंदिर. ८ ते १० फुट उंचीचे हे मंदिर हेमाडपंथी प्रकारातील आहे. मंदिरावर नक्षीकाम नाही मात्र मोठ मोठे दगडावर दगड ठेऊन हे मंदिर बांधकाम आहे. पूर्वी हे काळ्या पाषाणात काळेशार उठून दिसे. मंदिरात पिंड आहे बाहेर नंदी, सध्या ते MIDC मध्ये गेल्याने त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे, त्याची रंगरंगोटी केली आहे. या मंदिराच्या समोर एक बारव मोडकळीस आलेला आहे. MIDC ने त्या बारवाचा ही जीर्णोद्धार केल्यास त्याला पूर्व सौंदर्य प्राप्त होईल.
(संदर्भ - Sunil Bambal)









कमलापूर हत्ती कँप, गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातल्या कमलापूरमध्ये असलेल्या वनविभागाच्या हत्ती कॅम्पचे आकर्षण वाढत आहे. एक-दोन नाही तर लहान-मोठे मिळून तब्बल ९ हत्ती असलेला हा राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प आहे. एरवी गडचिरोलीचे नाव काढले की ‘नक्षलवादी’ एवढेच चित्र आपसुकपणे नजरेसमोर येते. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांनी बरबटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ‘पर्यटन’ ही कल्पनाही कोणी सहसा करत नाही. परंतू गडचिरोली जिल्ह्यातल्या काही पर्यटनस्थळांना भेटी दिल्यानंतर कोणीही पर्यटक त्या स्थळांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहात नाही, ही वस्तुस्थिती आहे. कमलापूरचा हा हत्ती कॅम्पही अशाच पर्यटनस्थळांपैकी एक आहे.
(📸 :- @raju_kadarlawar IG)


काण्णव बंगला, कारंजा लाड, वाशिम
भारत आणि श्रीलंका तसे दोन स्वतंत्र देश, प्रशासन व्यवस्थाही स्वतंत्रच मात्र, श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांचा बंगला वर्हाडातील कारंज्यात हे ऐकूण कुणालाही आश्चर्य वाटेल.
वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथील काण्णव यांचा बंगला चक्क श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांच्या बंगल्याची प्रतिकृती आहे. नव्हे तर, श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांचा बंगला काण्णवांच्या बंगल्याची प्रतिकृती आहे. इंग्रजांनी काण्णवांनी बांधलेला बंगला पाहून इथलेच कारागीर श्रीलंकेत नेले. आणि तेथेही असाच बंगला उभा राहिला. श्रीलंकन व्हाईसरायचे असलेले निवासस्थान श्रीलंका स्वतंत्र झाल्यानंतर पहिले राष्ट्राध्यक्ष सिरीमाओ भंडारनायके यांचे ते शासकीय निवासस्थान ठरले. वर्हाड तशी सोन्याची कुर्हाड म्हणून ओळखले जाते. संपन्नतेचा वारसा लाभलेले वर्हाड त्यात कारंजा हे वैभव इतिहासात आहे. विदर्भामध्ये वाडे खूप आहेत. कारंज्यातील काण्णवांचा मात्र ‘बंगलाच’ आहे. 121 वर्षांपूर्वी सोने 17 रुपये तोळा होते. त्यावेळी हा बंगला साडेतीन लाख रुपये खर्च करून बांधण्यात आला. आत्ताचा सोन्याचा भाव आणि रुपयांची किंमत याची तुलना केली तर, आज या बंगल्याची काय कॉस्ट असती, याचा विचार करा. ती या बंगल्याची किंमत झाली. ही श्रीमंती लौकीकाच्या पातळीवर संपन्नता सांगायची तर या बंगल्यात संपन्नता मोजता येणार नाही. कारंजा येथील कृष्णाजी काण्णव व्यापाराच्या निमित्ताने नेहमी मुंबईला जायायचे. तेथील ब्रिटीश व पोर्तुगीज स्थापत्य कलेच्या वास्तू पाहून ते प्रभावीत झाले. कृष्णाजींनी मग कारंज्यातही पोर्तुगीज शैलीतील बंगला बांधण्यास सुरुवात केली. 1899 साली सुरुवात केलेला हा बंगला 1903 सालापर्यंत तयार झाला. या बंगल्याच्या पाया खोदताना काळी माती असल्याने प्रत्येक आठ फुटांवर सहा इंचाचा शिसाचा थर टाकण्यात आला. त्याकाळी ब्रम्हदेशातील सागवानाचे लाकूड बांधकामासाठी सर्वोत्कृष्ट समजले जायायचे. इंग्लडच्या महारानीचा दिवानखाणा याच लाकडांनी सजला आहे. या बंगल्याचे खांब एकसंघ बर्माटिकवूडचे आहेत. राजस्थानी कारागिरांनी बारीक नक्षी कोरून त्याला चार चांद लावले आहेत. बंगल्याचे विटा चुण्याचे बांधकाम काठेवाडी कारागिरांनी केले आहे. रंगरंगोटी मुंबई येथील प्रख्यात विठोबा पेंटर यांनी केल्याचा उल्लेख आहे. बंगल्याचे प्रवेशद्वार सभामंडपासारखे आहे. समोरचे दोन्ही नक्षीदार स्तंभ कित्येक टन वजन असलेल्या ओतीव बिडाचे आहेत.फसरबंदी त्याकाळात दुर्मीळ असलेल्या इटालियन मार्बलचे आहे. इटालियन मार्बल वापरणारे त्या काळातील काण्णव हे एकमेव ग्रहस्थ होते. वास्तूच्या मधोमध दोन्ही दालनांना लागून 30 बाय 30 चौरस फुटाचा चौक आहे. दुसर्या माळ्यावर 50 बाय 40 फुटांचा दिवाणखाना आहे. ही भौतिक श्रीमंती पाहिल्यानंतर हा बंगला पाहणार्यांशी बोलू लागतो. या बंगल्याची कलौकीक संपन्नता डोळे दिपवणारी आहे. दिवाणखान्यातील प्रसन्नता रोमारोमांत भिनली जाते. या दिवाणखान्यात कधीकाळी लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर बसले होते. याच दिवाणखान्यात कधी सतारीचे स्वर दरवळले. कुणाचा षड्ज ऐकू आला तर कधी बालगंधर्वाचे नाट्यपद निनादून गेले. मास्टर दिनानाथांचा मालकंस रुनझुनला, बालगंधर्व, भाटेबुवा, शिरगोपीकर यांच्या खास मैफीली याच बंगल्यात रंगल्या. हिराबाई बडोदेकर, पंडित नारायण व्यास, जगन्नाथबुवा पंढरपूरकर, मनोहर बर्वे, केशवराव भोळे, पंडित दिनानाथ मंगेशकर यांचे स्वरही या दिवाणखान्याने अनुभवले.
लता मंगेशकरांची बाळपावले याच बंगल्यात दुडदुडली. दिनानाथ मंगेशकर यांची कंपनी कारंज्यात आली असताना काण्णवांकडे गाण्याची मैफल झाली. लहानगी लता दिनानाथांचे बोट धरून बंगलाभर फिरली. आणि थकून झोपी गेली. किर्तन महोत्सवामध्ये घोंगडेबुवा महाराज, कराडकर, कोल्हटकर, पाठक, हिरवळकर, आयाचीतकर, निजामपूरकर, भालेराव, कुळकर्णीबुवा इत्यादी प्रसिद्ध किर्तनकारांची किर्तने या बंगल्याच झाली. केशवराव भोळ्यांसारखा मराठी संगीतातील तालेवार गायकांची मैफलही इथे सजली. प्रत्येक मैफीलीनंतर काण्णवांकडे वर्हाडी परंपरेनुसार पुरणपोळ्यांची पंगत असायची. एकदा केशवराव भोळ्यांसाठी मसाल्याची आमटी (सार) बनविली. केशवरावांना ती एवढी आवडली की ते चक्क दहा वाट्या आमटी प्यायले. परिणामी, घसा खराब होऊन रात्रीची मैफल रद्द करावी लागल्याचा उल्लेख खुद्द केशवरावांनी एका दिवाळी अंकात केला होता. या बंगल्याच्या आधी काण्णवांच्या पूर्वजांनी 28 एप्रिल 1876 रोजी कारंजा येथे राममंदिर बांधल्याची नोंद आहे.
आत्ता वळू श्रीलंकेकडे
कृष्णाजी काण्णव यांनी हा बंगला बांधला तेव्हा तो काळ इंग्रज आमदणीचा होता. त्यात कारंजा पुरातन काळापासून मोठी व्यापारी पेठ म्हणून ओळखले जात होते. शिवाजी महाराजांनी गुजरातेतील सुरत हे शहर लुटले होते. हे त्या शहराची श्रीमंती अधोरेखीत करण्यासाठी सांगितले जाते. मात्र, महाराजांनी मोगलांचे महत्त्वाचे व्यापारी ठाणे असलेले कारंजा देखील दोनवेळा लुटल्याची ऐतिहासीक नोंद आहे. या शहराची गरिमा संपन्न आहे. वर्हाडातील कापसाची उलाढाल कारंज्यातून होते. ब्रम्हदेश, चीन, श्रीलंका, आखाती देश ते पार इंग्लंडपर्यंत कारंज्यातील कापूस जात होता. या व्यापारातून अनेक व्यापारी शहरात आले. मूळचे फलटणचे असलेले काण्णव देखील कापसाच्या व्यापारासाठी कारंजात आले. आणि इथल्या मातीत रमले.
कृष्णराव काण्णवांनी हा बंगला बांधल्यानंतर या बंगल्याची महती पार सातासमुद्रापार गेली. इंग्रज राजवटीत श्रीलंका व भारत हे दोन्ही देश असल्याने श्रीलंकन व्हाईसरायच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी तत्कालीन वर्हाड प्रांताच्या इंग्रजांच्या कारभार्यांनी ही बाब मुंबई प्रांताच्या गव्हर्रनरच्या कानी घातली. सरकारी सुत्र फिरली. काण्णवांच्या बंगल्याचे बांधकाम करणारे कारागीर जहाजाने तत्कालीन सिलोनला नेले गेले. तेथे या बंगल्याची प्रतिकृती उभी राहिली. व्हाईसराय हाऊस म्हणून ओळखले जाणारे हे निवासस्थान श्रीलंका स्वतंत्र झाल्यानंतर तिथले पहिले राष्ट्राध्यक्ष सिरीमाओ भंडारनायके यांचे शासकीय निवासस्थान झाले.
(माहिती आणि फोटो - सुबोध आवारी)


पुरातन शिव मंदिर, हर्षी, पुसद, यवतमाळ


विदर्भातील दुर्लक्षित स्वर्ग - गडचिरोली
गडचिरोली म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर नक्षलवाद, पोलिस, हिंसा अशा प्रतिमा उभ्या राहतात. पण त्या पलिकडे गडचिरोली मध्ये खुप काही आहे, जे आजपर्यंत दुर्लक्षित आहे. गडचिरोली जिल्हा निसर्गाने सजवलेला सुंदर प्रदेश आहे. तर करूया सफर गडचिरोलीची..
(Photo - @Gadchiroli_IG )


जटपुरा गेट, चंद्रपूरचा ब्रिटिश काळातील एक फोटो. सन 1920


पुरातन शिव मंदिर, वघार टाकळी, घाटंजी, यवतमाळ
(Photo - Amar Buttekar)

पुरातन पायविहीर, भांबेरी, तेल्हारा, अकोला
(Photo - Amjad Khan)


नागपूर जिल्ह्यात अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीचे महापाषाण संस्कृतीचे अवशेष आढळले.
नागपूर जिल्ह्यातील कोहळा गावाशेजारी एका टेकडीवर अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीचे महापाषाण संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत. या संस्कृतीत लोकांना लोखंडाचा उपयोग माहित होता, एवढेच नव्हे तर लोहमृतिकेपासून लोह गाळण्याची कलाही त्यांना अवगत होती.
महापाषाण संस्कृतीची शंभरावर शिलावर्तुळ प्रकारचे दफनस्मारके, आणि प्राचीन वसाहत आढळून आली आहे. शिळावर्तुळ, शिळास्तंभ, शिळाप्रकोष्ठ, दगडांची रास, शवपेटी अशी या संस्कृतीची विविध प्रकारची दफन स्थाने पूर्व विदर्भात वर्धा आणि वैनगंगा नदीच्या खोऱ्यात मोठ्या संख्येने आढळून आलेली आहेत.
महापाषाण संस्कृतीचे लोक हे विदर्भाचे आद्यनिवासी होत, त्यांनीच शेतीची सुरुवात विदर्भात सर्वप्रथम केली. या लोकांना लोखंडाचा उपयोग माहित होता, एवढेच नव्हे तर लोहमृतिकेपासून लोह गाळण्याची कलाही त्यांना अवगत होती. हे यावरुन दिसून येते आहे. ही संपुर्ण माहिती नागपूरचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी पाठवली आहे.
(संदर्भ - tv9 marathi)




केळझर मध्ये आढळली यादवकालीन पाषाण मुर्ती
वर्धा जिल्ह्यातील केळझर येथील बुद्धविहार परिसरात शेतामध्ये काम करणाऱ्यांना पाषाणमूर्ती आढळून आल्याने नागरिकांसह प्रशासनही जागे झाले. नागपूरच्या पुरातत्त्व विभागाने धाव घेत जेसीबीच्या साहाय्याने ही मूर्ती बाहेर काढून शोध घेण्यात आला. पुरातत्त्व विभागाच्या म्हणण्यानुसार १३ व्या शतकातील यादवकालीन वृषभनाथ महाराजांची मूर्ती असल्याचे सांगण्यात आले.
येथील बुद्धविहार परिसर १४ एकरांवर पसरला आहे. त्यापैकी काही शेती ठेक्याने दिली जाते. मंगळवारी २ जानेवारीला दुपारी शेतात काम करणाऱ्यांना अचानक अखंड मोठा दगड दिसून आला. त्यावरील माती साफ केल्यानंतर ती एक कोरीव पाषाणमूर्ती असल्याने लक्षात येताच ही माहिती गावभर पसरली. त्यामळे मूर्ती बघण्याकरिता गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. प्रशासनाला माहिती मिळताच सेलूचे नायब तहसीलदार एम, जी. ठाकरे, केळझरचे मंडळ अधिकारी दिलीप मुडे, तलाठी अभिषेक शुक्ला यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी याबद्दल नागपुरातील पुरातत्त्व विभागाला माहिती दिली. सेलूचे ठाणेदार तिरुपती राणे यांनी घटनास्थळी पाहणी करून पोलिस बंदोबस्त लावला.
बुधवारी पुरातत्त्व विभाग नागपूरचे अधिक्षक अरुण मलिक,
सहाय्यक पुरातत्वज्ञ श्याम बोरकर, सह. पुरातत्त्वज्ञ शरद गोस्वामी, दीपक सुरा, सोनुकुमार बारंवाल, आदित्य राणे यांचा चमू केळझरमध्ये दाखल झाली. त्यांनी सर्व तपासणी करून जेसीबीच्या सहाय्याने तब्बल साडेतीन तासांच्या परिश्रमांती पाच फूट लांब, ४४ सेंमी रुंदी आणि दीड फूट जाडीची कोरीव पाषाणमूर्ती बाहेर काढली. ही मूर्ती बाहेर काढल्यानंतर नागपूरला पुरातत्त्व विभागात नेण्याची तयारी अधिकाऱ्यांनी दाखविली. मात्र, बुद्धविहार कमिटी आणि गावकऱ्यांनी त्याला विरोध केल्याने सायंकाळी उशिरापर्यंत तणावपूर्ण शांतता होती.
"ही पाषाणमूर्ती यादवकालीन असून १३ व्या शतकातील आहे, या
मूर्तीची पाहणी केल्यानंतर ती वृषभनाथ महाराज यांची असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही मूर्ती चारही बाजूने कोरीव असून वजन पाचशे किलोच्या आसपास आहे. ती बाहेर काढण्याकरिता साधारणत: तीन ते साडेतीन तासांचा कालावधी लागला. आता ही मुर्ती कुठे ठेवायची याचाही निर्णय घेतला जाईल."
- अरुण मलिक, अधीक्षक,
पुरातत्त्व विभाग, नागपूर
सौजन्य - लोकमत
छायाचित्र - सागर सव्वालाखे जैन
ही मूर्ती जैन धर्माशी संबंधित असून, मंदिर समोर असणाऱ्या मानस्तंभ मधील वरच्या टोकाचा चतुर्मुख भाग आहे...

वर्धा जिल्ह्यातील केळझर गावात बुद्ध विहार परिसरात आढळली १३ व्या शतकातील पाषाण मूर्ती
सौजन्य - लोकसत्ता
Sagar Sawwalakhe Jain हो बुद्ध विहार परिसरात मोठी. जैन प्रतिमा ठेवली आहे..
केळझर या परिसरात प्राचीन बौद्ध प्रतिमा व जैन प्रतीमा निघत राहते....... ज्यांचे हे शेत होते त्यांनी बौद्ध विहाराला दान दिले ....तिथे जैन वास्तू भेटत राहतात









  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...