http://maharashtradeshee.blogspot.com/2012/06/blog-post.html
नांदूर-मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य
महाराष्ट्रातील काही मोजक्या पक्षी अभयारण्यांपैकी
एक म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. नाशिक जिल्ह्यातील निफ़ाड तालुक्यात नांदूर येथे
हे अभयारण्य आहे. नाशिकच्या जीवनवाहिनी असणाऱ्या गोदावरी व कादवा या नदींच्या संगमावर
बांधलेले धरण म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. या धरणाच्या बॅकवॉटर परिसरात सतत अनेक
पक्षांची रेलचेल असते. शिवाय यात अनेक स्थलांतरीत पक्षांचाही समावेश असतो.
निरनिराळ्या पक्षांच्या किलबिलाटात नांदूर-मध्यमेश्वर परिसर सतत गजबजलेला दिसतो.
त्यामुळेच नांदूर-मध्यमेश्वर बंधारा अर्थात गोदावरी-कादवा संगम परिसर पक्षी
अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. धरणामध्ये डावीकडून येणारी गोदावरी व उजवीकडून
वाह्णारी कादवा यांचा सुरेख संगम पाहता येतो. नांदूर-मध्यमेश्वर हे नाव तेथील
संगमेश्वर व मध्यमेश्वरच्या प्राचीन मंदिरांमुळे पडले आहे. धरणाच्या बॅकवॉटर
परिसरात संगमेश्वर तर धरणाच्या खाली गोदावरी नदी तीरावर मध्यमेश्वरचे मंदिर पाहता
येते. पाणी कमी असताना धरणाच्या बांधाऱ्यावरुन विविध पक्षांचे दर्शन करता येते.
सँडपायपर्स, किंगफ़िशर, टिटवी यांसारख्या पक्षांची येथे नेहमीच ये-जा असते.
पाण्यावर स्थिर राहून अचानक सूर मारणारे किंगफ़िशर्स हे येथील नेहमीचे दृश्य.
आपल्या आवाजाने आसमंत भारावून टाकणारा भारद्वाज, धनेश, तांबट व कोतवाल असे विविध
पक्षीही येथे पाहायला मिळतात. शिवाय धरणावरुन दिसणारा सुर्यास्त हा नयनरम्य असतो.
हा परिसर नाशिकपासून ५० किमीवर आहे. तसेच तो निफ़ाड या तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या
१३ किमीवर आहे. स्वत:चे वाहन असेल तर या परीसरात पोहचणे खूप सोपे पडते.
महाराष्ट्रातील पक्षी अभयारण्य म्हणून येथे भेट देण्यास काही हरकत नसावी.
अंजनेरी: हनुमानाचे जन्मस्थान
नाशिक आज जरी रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र
झाले असले तरी इथे रामायणाचा बराच पौराणिक इतिहास आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म
अंजनी मातेपोटी नाशिकजवळ अंजनेरी येथे झाला होता. अंजनेरी हा गिरीदुर्ग नाशिकपासून
२२ किलोमीटर अंतरावर आहे. नाशिकमधुन त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंजनेरी
गाव वसलेले आहे. बसने जायचे असल्यास खालची अंजनेरी व वरची अंजनेरी असे दोन स्टॉप
आहेत. वरची अंजनेरी ही अंजनेरी दुर्गाच्या जवळ लागते.
हनुमानाच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी
त्र्यंबकेश्वरपासून केवळ ५ ते ६ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईकडून येणाऱ्यांसाठी हा
रस्ता सोयीचा पडेल. हनुमानाचे जन्मस्थान म्हणून परिचित असले तरी अंजनेरी हे
पर्यटकांसाठी एक मेजवानी असणारे स्थळ आहे. इथे एकंदरीत १०८ जैन लेणी आढळून येतात.
मूळ अंजनेरी गावापासून गडाकडे जाण्याकरिता एक किलोमीटर पर्यंत गडावर गाडी (दुचाकी
व चारचाकी) नेता येते. नवरा-नवरी नावाच्या दोन गडसुळक्यांपासून अंजनेरी दुर्गाकडे
रस्ता जातो. त्यासाठी दोन डोंगर पार करून जावे लागते. पहिल्या डोंगरानंतर
अंजनीमातेचे छोटेखानी मंदीर दृष्टीस पडते. तिथुन दुसरा डोंगर ओलांडल्यानंतर भव्य
पठार आहे. व शेवटी वायुपुत्र हनुमानाचे लहानसे मंदीर दृष्टीस पडते. इथवर येण्याचा
मार्ग थोडासा खडतर असल्याने मारूतीचे भव्य मंदीर बांधलेले नसावे. त्र्यंबकेश्वर
रस्त्यावरच अंजनेरी गावात भव्य सिद्ध हनुमान देवस्थानाचे मंदीर बांधलेले आहे.
बहुतांश पर्यटक व भाविक ह्या मंदीरात हनुमानाचे दर्शन घेऊनच अंजनेरी गडाच्या दर्शनासाठी
पुढे जातात. सिद्ध हनुमान देवस्थानात हनुमानाची ११ फुटी ध्यानमग्न उंच मूर्ती
दृष्टीस पडते.
अंजनेरी पहिल्या पर्वतावर
पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात.
एक डावीकडे वळते
तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्याकडे
जाते. डावीकडच्या
वाटेने वळल्यावर १५ मिनिटांतच आपण सीता गुहेपाशी येऊन पोहोचतो. दोन खोल्यांची ही गुहा आहे.
इथे १० ते १२ जणांना राहताही येते. गुहेच्या भिंतींवर अनेक शिल्पे कोरलेली दिसून येतात. समोर असणार्या वाटेने बालेकिल्ल्यावर गेल्यावर वीसच मिनिटांत
आपण दुसर्या अंजनीमातेच्या मंदिरात
पोहोचतो. हे मंदिर सुद्धा
प्रशस्त आहे. किल्ल्याचा घेरा फार मोठा आहे. किल्ल्याच्या पठारावर बाकी काही पाहण्यासारखे काही नाही. अंजनेरी गडाची भव्यता मात्र लक्षात राहुन जाते. समोरच
त्र्यंबकेश्वरचा ब्रम्हगिरी पर्वत मनात घर करुन जातो. अंजनेरी गावापासून
मंदीरापर्यंतचा प्रवास हा साधारणत: दोन तासांचा आहे. दुर्गभ्रमंती म्हणून जायचे
असल्यास अंजनेरीला भेट देण्यास हरकत नसावी.
छायाचित्रे:
![]() |
| अंजनेरी पर्वत |
![]() |
| श्री सिद्धहनुमान देवस्थान |
![]() |
| अंजनेरी गांव |
![]() |
| अंजनेरी येथील तलाव |
![]() |
| अंजनीमाता मंदीर |
![]() |
| अंजनेरी पर्वतावर पावसाळ्यात तयार होणारे तळे |
![]() |
| अंजनेरी: दोन पर्वतांमधील खिंड |
![]() |
| पर्वतावरील विस्तीर्ण परिसर |
सिद्धार्थ उद्यान, औरंगाबाद
बगिचा, उद्यान, सर्पोद्यान, मत्स्यालय, प्राणिसंग्रहालय अशी सर्वच मांदियाळी एकाच ठिकाणी असणारी खूप कमी ठिकाणे महाराष्ट्रात आहेत. राज्यातील महानगरपालिकांनी त्यासाठी सोयही केलेली आहे. मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या औरंगाबाद शहरात असणारे व महापालिकेने तयार केलेले सिद्धार्थ उद्यान हे एक मोठे ठिकाण आहे. बगिचा, उद्यान, सर्पोद्यान, मत्स्यालय, प्राणिसंग्रहालय अशी सर्वच स्थळे सिद्धार्थ उद्यानात पाहायला मिळतात.
औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला लागूनच महापालिकेने हे उद्यान उभे केले आहे. दोन्हींची भिंत एकच आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे या ठिकाणाला पोहोचणे अगदी सोपे आहे. सुट्टीच्या दिवशी इथे मोठी गर्दी पाहायला मिळते. औरंगाबाद शहरातील नागरिक सुट्टी कुटंबासोबत घालवण्यासाठी या उद्यानाला भेट देतात. शिवाय जिल्ह्यातील अनेक शाळांच्या सहलीही इथे भेट देताना दिसत आहेत. उद्यानात प्रवेश केल्याबरोबरच भगवान गौतम बुद्धांची मोठी मूर्ती समोर दृष्टीस पडते. यावरूनच उद्यानाला सिद्धार्थ उद्यान असे नाव का दिले याचे उत्तर मिळते. मूर्तीच्या आजुबाजूच्या परिसरात बागबगिचा फुलविण्यात आला आहे. शिवाय मोठे गवती लॉन्सही आहेत. डाव्या बाजुने गेल्यास प्रथम मत्स्यालय दृष्टीस पडते. अनेक नाना प्रकारचे मासे इथे पाहायला मिळतात. मुख्य उद्यानाबरोबरच मत्स्यालय व प्राणिसंग्रहालयात प्रवेश मिळाविण्यासाठी वेगळी प्रवेश फी द्यावी लागते, हे विशेष! सर्पोद्यानासाठी मात्र प्रवेश शुल्क नाही. प्रत्येक सर्पोद्यानात दिसतात तसे सुस्त झालेले साप याही उद्यानात पाहायला मिळाले. पण, विविध प्रकारचे साप पाहून आपली ज्ञानवृद्धी होते, याचेच समाधान मानावे. भारतातील सर्व मुख्य जातीतील साप इथे पाहायला मिळतात. उद्यानात सर्वात शेवटी प्राणिसंग्रहालय आहे. उद्यानातील सर्वात मोठा भाग इथेच व्यापला गेलेला आहे. वाघ, सिंह व बिबट्याबरोबरच अनेक रानटी प्राणी येथे दृष्टीस पडतात. त्यांना मुक्त संचार करता यावा म्हणून पिंजऱ्यांचे क्षेत्रफळ अधिक करण्यात आले आहे.
औरंगाबाद शहरात कधी जाणे झाल्यास इथे भेट देण्यास हरकत नसावी.
छायाचित्रे:
![]() |
| भगवान बुद्धांची मूर्ती |
| मत्स्यालय प्रवेशद्वार |
| मत्स्यालय |
| मत्स्यालय |
![]() |
| लॉन्स |
![]() |
| हत्ती कारंजा |
![]() |
| प्राणिसंग्रहालय |
![]() |
| प्राणिसंग्रहालय |
![]() |
| सर्पोद्यान प्रवेशद्वार |
![]() |
| सर्पोद्यान |
दक्षिण गंगेचे उगमस्थान - ब्रम्हगिरी
दक्षिणगंगा
म्हणुन ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व
बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक
देवस्थान होय. येथील ब्रम्हगिरी पर्वतावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे.
सह्याद्रिच्या नयनरम्य पर्वतरांगात त्र्यंबकेश्वर वसलेले आहे. चहुबाजूंनी ब्रम्हगिरीचा
डोंगर या परीसराला लाभलेला आहे. श्रावणातील सोमवारी या ठिकाणी दरवर्षी भक्तांचा
महापूर येत असतो. ब्रम्हगिरी पर्वतावर गंगा-गोदावरीचे उगमस्थान साधारणत: ४ ते ५
किमीवर आहे. त्र्यंबकेश्वर गावातून या पर्वताच्या पायथ्यापर्यंत सहज पोहचता येते.
त्याची रचना एखाद्या किल्ल्याप्रमाणे भासते. विशेषत: जून ते डिसेंबर या कालावधीत
घनदाट हिरवळीने हा परीसर नटलेला दिसून येतो. जणू काही निसर्गाने हिरव्या रंगाची
सर्व उधळण याच परिसरात केल्याचा भासही होतो. गोदावरीच्या उगमस्थानापर्यंत जाण्याकरीता
एक पर्वत पुर्ण पार करावा लागतो. चढाईच्या वाटेवर पायऱ्या बनविल्या गेल्या
असल्याने चालण्याचा त्रास जाणवत नाही. अनेक ठिकाणी कोरुन पायऱ्यांची रचना केली अशा
जागेवरुन जाताना प्राचीन ठिकाणी भेट दिल्याचा अविष्कार नक्कीच होतो. पावसाळ्यात या
पर्वतावरील धबधबे सतत वाहत असतात. असे अनेक धबधबे या लांबलचक पर्वतावर दिसून येतात
शिवाय संततधार असल्याने पर्वताच्या वरील परिसर सतत धुक्यात असल्याचा जाणवतो. येथून
त्र्यंबकेश्वर शहराचे नयनरम्य दर्शनही घेता येते. गंगा-गोदावरीच्या ऊगमस्थानी भेट
दिल्याचा व येथील पाणी स्पर्श केल्याचा आनंद काही निराळाच असतो. प्राचीन काळी शंकराने
जटा आपटून गोदावरीला जगतकल्याणासाठी दिशा दिली, तेथे एक मंदिर बांधण्यात आलेले
आहे. शंकराच्या जटेच्या व गुडघ्यांच्या पाऊलखुणा येथे पाहता येतात. गोदावरी नदी
ब्रम्हगिरी पर्वतावरुन वाहताना प्रत्येकाने जीवनात एकदा तरी पहायलाच हवे.
छायाचित्रे:
नयनरम्य ब्रम्हगिरी पर्वत
|
धुक्यात हरविलेले गोदावरी मंदीर
|
नयनरम्य ब्रम्हगिरी पर्वत
|
नयनरम्य ब्रम्हगिरी पर्वत
|
डावीकडून: मी, विवेक पाटील, भूषण पवार
|
ब्रम्हगिरीवरून दिसणारे त्र्यंबकेश्वर शहर
|
मंदीर
|
नयनरम्य ब्रम्हगिरी पर्वत
|
नयनरम्य ब्रम्हगिरी पर्वत
|
गोदावरी मुख
|
गोदावरी मंदीर
|
गोदावरी उगम
|
अंबिकादेवी देवस्थान: देवी भोयरे (जि. अहमदनगर)
देवीभोयरे या छोटयाशा
गावातील श्री अंबिका देवीचे हे पवित्र स्वयंभू स्थान जागृत देवस्थान आहे.
माहूरची श्री रेणुकामाता या ठिकाणी तादुंळाकार पाषाण मूर्तिच्या
स्वरूपात स्वयंभू प्रगट झालेली असून ती दक्षिणभिमुखी आहे. दक्षिणेकडे
मुख असलेली देवस्थाने जागृत असल्याचे मानण्यात येते. या स्थानाची
उत्त्पतीची कथा विस्मयकारक आहे.
|
||||||||||||
क्षीरसागर
हे गावातील प्रतिष्ठित ब्राम्हण घराणे. माहूरची श्री रेणुकामाता हे
त्यांचे कुलदैवत. या घराण्याचे मूळ पुरूष रेणुकामातेच्या निस्सीम
भक्तीपोटी नवरात्रामध्ये माहूरगडाची वारी नियमितपणे करीत असत. त्याकाळी
हा दूरचा प्रवास अतिशय खडतर असे. पुढे वार्धक्यामुळे त्यांना हा जिकीरीचा
प्रवास झेपेनासा झाल्यामुळे वारीचा त्यांचा नित्यनेम खंडित झाला.
त्यांमुळे अतिशय व्यथित होऊन त्यांना रेणुकामातेच्या दर्शनाची तळमळ लागून
राहिली. आणि काय आश्चर्य—श्री रेणुकामातेने सतत तीन दिवस त्यांना
स्वप्न दृष्टांत देवून ‘’मीच तुला दर्शन द्यावयास आले आहे.’’असे सांगून
विशिष्ट जागा दाखविली आणि त्या ठिकाणी खणल्यास ‘’मी प्रगट होईन’’असे
संकेत दिले. तेच हे पवित्र स्थान की जेथे स्वप्न दृष्टांतानुसार
खणल्यासनंतर श्री अंबिकेची तांदुळाकार पाषाण मूर्ति-(‘’तांदळाजमिनीमधून
म्हणजे भुयारामधून स्व यंभू प्रगट झाली. या मूर्तिभोवती हळदीकुंकवाच्या-
पेटयाही आढळून आल्या.
|
||||||||||||
या ठिकाणी
श्रीरेणुकामाता भुयारातून म्हणजे भूविवरातून प्रगट झाली म्हणून गावाला
देवीभूविवर असे नाव प्राप्त झाले. त्याचाच पुढे अपभ्रंश होऊन गावाचे नाव
'देवीभोयरे' असे रूढ झाले.
श्रीक्षेत्र देवीभोयरे श्री. अंबिकादेवी हे ठिकाण महाराष्ट्रात, अहमदनगर
जिल्हयात, पारनेर तालुक्यात आहे. पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला पारनेर
पासून 18 कि. मी. वर व शिरूर पासून 24 कि.मी. अंतरावर देवीभोयरे हे क्षेत्र
आहे.
पुणे ते शिरूर, शिरुर ते कल्याण (मुंबई), नगर पारनेर देवीभोयरे इत्यादी
ठिकाणी सर्व डांबरी रस्ता आहे. पुणे मुंबईतून शिरूर कडे जाणा-या अनेक एस.
टी. बसेस आहेत. त्या सर्व देविभोयरे येथे थांबतात. तसेच अहमदनगर येथुनही
सुपे मार्गे अनेक बसेस उपलब्ध आहेत.
संदर्भ: http://www.devibhoyare.com
छायाचित्रे:
|
बुद्ध स्मारक: नाशिक
स्थळ: बुद्ध स्मारक नाशिक.
ठिकाण: पांडवलेणी पायथ्यापाशी (नाशिकपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर, मुंबई रस्ता)
जाण्यासाठी नाशिकच्या निमाणी बस-स्थानकावरून दर २० मिनिटांनी ’पांडवलेणी’ बस जाते.
छायाचित्रे:
![]() |
| बुद्ध स्मारक (वॉलपेपर) |
![]() |
| बुद्धमूर्ती |
![]() |
| बु्द्धस्मारक (बाह्यचित्र) |
![]() |
| बु्द्धस्मारक (बाह्यचित्र) |
![]() | |
| नाशकातील चार प्रेक्षणीय स्थळे एकाच ठिकाणी: फाळके स्मारक, बुद्ध स्मारक, वॉटर पार्क व पांडव लेणी |
तोरणा: एक थरारक प्रवास
| ढगांत हरविलेला तोरणा |
छत्रपति शिवाजीराजांनी
स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा होय. त्याच्या
ह्या ओळखीशिवाय इतिहासात त्याची फारशी नोंद आठवत नाही. शिवाजीराजे गेल्यानंतर दहा
वर्षे हा किल्ला राजे संभाजींच्या ताब्यात होता. शिवाजीराजांनी सर्वप्रथम जिंकलेला
किल्ला पाहण्याची उत्सुकता ही प्रत्येक शिवप्रेमीला असते. त्याला राजांनीच
प्रचंडगड असे नाव दिले होते. स्वत: शिवाजीराजांनी असे नाव दिल्याने हा किल्ला किती
प्रचंड असेल, याचा अंदाज हा किल्ला पाहिल्यावर येतोच.
पुणे जिल्ह्यातील सर्वात
उंच गड म्हणून तोरणा नावाजलेला आहे. वेल्हे गावात व अर्थात याच तालुक्यात हा गड
येतो. त्याचे पुण्यापासूनचे अंतर आहे ४२ किलोमीटर. सिंहगड रस्ता संपल्यावर
सिंहगडाच्या पायथ्याशी उजव्या बाजूला एक खानापूरकडे जाणारा रस्ता आहे. त्याच
रस्त्याने वेल्हे गावाकडे जाता येते. हा रस्ता पुढे राजगडालाही जाऊन मिळातो. सिंहगडापासून
तोरणा गड हा रस्त्याने २२ किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याला लागणाऱ्या पाबे ह्या
गावापासून डावीकडे राजगडला तीन किमी. तर उजवीकडे पाच किलोमीटरवर तोरणा गड गाठता
येतो. गाडी केवळ किल्याच्या पायथ्यापर्यंतच जाऊ शकते. स्वत:ची गाडी असेल तर उत्तमच
कारण पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावरून वेल्हे गावात जाण्यासाठी गाड्या खूप कमी
आहेत. पावसाळ्यात तोरणा बघण्याची मजा काही औरच असते. पायथ्यापासून अशा वातावरणात
किल्ल्याचा बुरूज दिसणे हे महाकठीण आहे. या काळात त्याचा बुरूज हा धुक्यात
हरविलेला असतो. समुद्रसपाटीपासून गडाचे टोक चार हजार फूट उंच आहे. शिवाय गड
गाठण्यासाठी पायथ्यापासून दोन डोंगर पार करून जावे लागते. पहिल्या डोंगराची चढाई
फारशी कठीण नाही. खरा कस लागतो तो मूळ किल्ला चढण्यासच! तत्पूर्वी उंचीवरून वेगाने
वाहणारे वाऱ्यांना कसेबसे सामोरे जावे लागते. पावसाळ्यात त्यांचा वेग जास्त असतो. या
ठिकाणावरून आपण अतिशय मोठा किल्ला चढत आहोत, याची नक्कीच प्रचिती येते. मूळ किल्ला
चढाईस थोडासा अवघड आहे. पावसाळ्यात घसरणीचा त्रास होऊ शकतो. परंतु, त्यासाठी आधीच
मानसिक तयारी केली असली पाहिजे. जसजसे किल्ला चढत जातो तसतसे धुक्याचे प्रमाण वाढत
जाते व खालचे काहीच दिसत नाही. आणखी काहीसे वर गेल्यावर तिथे आधारासाठी रेलिंग्जची
व्यवस्था केली गेलेली आहे. तोच एकमेव आधार गड चढताना घ्यावा लागतो. ह्या अवघड
वाटेचा अंदाज आल्यावर पूर्वी घोडे किल्यावर कसे नेत असतील? ह्याचा विचार नक्कीच
आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही. किल्ला चढण्यास साधारणत: दोन तासांचा अवधी
लागतो. पावसाळी वातावरणात गडावरील परिसर हा प्रफुल्लीत झालेला दिसतो. गडावर पाहण्यासारखी
तोरणजाई मंदिर, मेंगाई मंदिर, बुधलामाची, झुंजारमाची अशी ठिकाणे आहेत. पावसात
त्याची मजा काही औरच असते. पाऊस नसताना येथुन होणारे राजगडाचे दर्शन मात्र निश्चित
सुखावून जाते.
छायाचित्रे:
| वेल्हे गावातून दिसणारा तोरणा |
| तोरणाकडे जाणारी वाट |
| डावीकडून: मी, प्रतिक आवटे, अमोल कुटे, अमित कुटे, ईशान पवार |
मोहदरी घाट (छायाचित्रे)
नाशिक व सिन्नर यांना
जोडणाऱ्या ’नाशिक-पुणे’ राष्ट्रीय महामार्गावर हा छोटा घाट आहे. नाशिकपासून २२ तर सिन्नरपासून
हा ६ किमी अंतरावर आहे.
| मोहदरी घाट |
| मोहदरी घाट |
| मोहदरी घाट |
| मोहदरी घाट |
| मोहदरी घाट |
| मोहदरी घाट |
| मोहदरी घाट |
चामर लेणी / चांभार लेणी
नाशिकच्या उत्तरेकडे साधारणत:
८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहेत,
त्यास चामर लेणी वा चांभार
लेणी असेही
म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा
नाशिक-दिंडोरी रस्त्यावर ही लेणी आहेत. हे दोन्ही रस्ते गुजरात कडे जाण्याचे मार्ग
आहेत. नाशिक शहरातून ह्या चामर लेणी टेकडीचे सहज दर्शन होते. टेकडीच्या
पायथ्यास म्हसरूळ गावी श्री पारसनाथ मंदिर १९४२ साली बांधले आहे. या
लेण्यांना तीर्थराज गजपंथ असेही संबोधले जाते. पायथ्यापाशीच क्षेमेंद्र किर्ती
यांची समाधीही आहे. ही लेणी साधारणत: ४०० फूट उंचीवर आहेत व वरती जाण्यासाठी ४३५
पायऱ्या चढून जावे लागते. पायऱ्या चढून गेल्यावर इंद्र व अंबिका देवीच्या मूर्त्या
प्रथम दर्शनी पडतात. पुढे
साडे तीन फुट उंचीची परसनाथाची
मूर्ती आहे. ही लेणी
अकराव्या शतकात बांधली असून जैनांच्या पवित्र तिर्थांपैकी एक आहेत.
इथे अनेक जैन संतांचे श्वेत चरण पाहायला मिळतात.
याच टेकडीवर चांभार लेणी
नावाच्या लेण्याही अस्तित्वात आहेत. मुख्य मंदिरात भगवान महावीरांची भव्य मूर्ती
पाहावयास मिळते. या टेकडीवरून संपूर्ण नाशिकचे दर्शनही घेता येते. दिंडोरी की पेठ
रोडवरून येथे यायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. खरं तर नाशिक-पेठ रस्त्यावरूनच इथे
यायला मुख्य रस्ता आहे. निमाणी बस स्थानकावरून बोरगड बस इथे येते. शिवाय तिवली
फाटा येथे येणारी बसही ’गजपंथ’ वरूनच जाते. आमचा प्रवास हा रामशेज किल्ल्यावरून
येथवर पायीच झाला होता. चामर लेणींच्या मागेच रामशेज किल्ला नज़रेस पडतो. इथुन पायी
अंतर सात-आठ किलोमीटर असावे. एकाच दिवसांत दोन्ही ठिकाणी भेटी देता येतात.
छायाचित्रे:
| पेठ रोडवरील दिशादर्शक |
| चामरलेणे पहाड |
| पायथ्याशी असणारे मंदिर |
| प्रवेशद्वार |
| मंदीराचे दर्शन |
| महावीरांची चार दिंशांची मुख असणारी मू्र्ती |
| भगवान महावीर |
| टेकडीवरून नाशिक दर्शन |
लोणजाई टेकडी
नाशिक जिल्हा हा बहुतांशी सातमाळच्या
पर्वतरांगेत येतो. येथील काही तालुक्यांमध्ये डोंगर हा अगदीच विरळा असल्याचे दिसून
येते. त्यातीलच एक निफाड तालुका होय. महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया मानला जाणारा
निफाड हा एक सधन प्रदेश आहे. परंतु, या ठिकाणी डोंगरदऱ्यांची अगदीच वानवा आहे. लोणजाई
टेकडी हा एकमेव उंच प्रदेश निफाड तालुक्यात येतो. पहाडांची संख्या कमी असल्यानेच
या प्रदेशाला नि-पहाड अर्थात निफाड असे संबोधले जाते, असे येथील रहिवासी सांगतात.
निफाड तालुक्यातील नैताळे हे नाशिक-औरंगाबाद
मार्गावरील एक छोटे गांव आहे. येथुन सुमारे दोन किलोमीटर अंतरावर लोणजाई टेकडी
आहे. नैताळे पासून जवळ असली तरी प्रशासकिय दृष्टीने ती विंचुर या गावाच्या हद्दीत
येते. विंचुर हे तालुक्यातील एक मोठे गांव असुन तेही याच महामार्गावर आहे. लोणजाई
फारसे उंच नाही. निफाडच्या दृष्टीने ते तसे उंचच मानावे लागेल. या टेकडीवर
गेल्यावर आजुबाजुचा पूर्ण सपाट परिसर दिसून येतो. दूरदूर पर्यंत कोणताच पर्वत
दिसून येत नाही. त्यामुळे परिसरातुन अनेकजण येथे फिरायला येतात. नैताळे व विंचुर
अश्या दोन्ही ठिकाणाहून इथे पोहोचता येते. वरपर्यंत गाडीही जाऊ शकते. टेकडीच्या
माथ्यावर लोणजाई देवीचे मंदीर आहे. आधी ते छोटे होते व आता त्याचा जिर्णोद्धार
होऊन ते भव्य करण्यात आलेले आहे. दरवर्षी येथे नित्यनेमाने देवीचा उर्सव भरतो. या
पहाडावर काही गुंफाही आहेत. पावसाळ्यात छोटीशी सैर करण्यास येथे परिसरातील लोक
प्राधान्य देतात. संपूर्ण परिसराचे छान दर्शन या टेकडीवरून होते. एक तासाची हिवाळी
वा पावसाळी सफर करण्यासाठी येथे जाण्यास काहीच हरकत नसावी.
छायाचित्रे:
| रस्त्यावरून दिसणारी लोणजाई टेकडी |
| लोणजाई टेकडी |
| लोणजाई टेकडी पायथा |
| लोणजाई टेकडी वरून |
| निफाडच्या शेतीचे दृश्य |
| अन्य रांगा |
| लोणजाई मंदीर |
| लोणजाई देवी |
| लोणजाई मंदीर बांधकाम अवस्थेत |
त्र्यंबक गड
गोदावरीचे उगमस्थान म्हणून नाशिक जिल्ह्यातील
त्र्यंबकेश्वर ओळखले जाते. इथेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग वसलेले
आहे. त्र्यंबकेश्वर जवळच्या ब्रम्हगिरी पर्वतावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. या
विषयी माझ्या या ब्लॉगवर मी आधीच एक पोस्ट केलेली आहेच. परंतु, ब्रम्हगिरीचे
इतिहासात गड-किल्ला म्हणून स्थान अधोरेखित केले नव्हते. म्हणूनच ही पोस्ट करत आहे.
इ.स. १२७१ - १३०८
त्र्यंबकेश्वर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरावर देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या
भावाची राजवट होती. मोगल इतिहासकार किल्ल्याचा उल्लेख नासिक असा करतात. पुढे
किल्ला बहमनी राजवटीकडे गेला. तिथून पुढे तो अहमदनगरच्या निजामशहाकडे गेला. इ.स.
१६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड करून हा किल्ला व आजूबाजूचा परिसर जिंकला. मोगल राजा
शाहजान याने ८ हजाराचे घोडदळ हा परिसर जिंकण्यासाठी पाठवले. इ.स. १६३३ मध्ये
त्रिंबक किल्ल्याचा किल्लेदार मोगलांकडे गेला. इ.स. १६३६ मध्ये शहाजी राजांचा
माहुली येथे पराभव झाल्यावर त्रिंबकगड मोगलांचा सेनापती खानजमान ह्याच्या हवाली
केला. इ.स. १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने त्रिंबक किल्ला
जिंकून घेतला.
इ.स. १६८७ मध्ये
मोगलांच्या अनेक ठिकाणी आक्रमक हालचाली चालू होत्या. याच सुमारास मोगलांचा अधिकारी
मातबर खान याची नासिक येथे नेमणूक झाली. १६८२ च्या सुमारास सुमारास मराठ्यांची फौज
गडाच्या भागात गेल्याने खानजहान बहाद्दरचा मुलगा मुझ्झफरखान याला मोगली फौजेत नेमण्यात
आले. याने गडाच्या पायथ्याच्या तीन वाड्या जाळून टाकल्या. १६८३ च्या फेब्रुवारी
महिन्यात राधो खोपडा हा मराठा अनामतखानाकडे जाऊन मराठयांना फितुर झाला. त्याच्यावर
बादशाही कृपा झाली, तर तो मोगलांना त्रिंबकगड मिळवून देणार होता.
या राधो खोपड्याने त्रिंबक किल्ल्याच्या किल्लेदाराला फितुर करण्याचा प्रयत्न केला, पण किल्लेदार
त्याला वश झाला नाही. तो संभाजी महाराजांशी एकनिष्ठ राहिला. राधो खोपड्याचे
कारस्थान अयशस्वी झाल्यामुळे त्याला मोघलांनी कैद केले. पुढे १६८४ मध्ये नोव्हेंबर
महिन्यात अकरमतखान आणि महमतखान यांनी त्रिंबकगडाच्या पायथ्याच्या काही वाडया
पुन्हा जाळल्या व तेथील जनावरे हस्तगत केली. १६८२ आणि १६८४ मध्ये मोगलांनी किल्ला
घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला, पण तो फसला. इ.स. १६८८ मध्ये मोगल सरदार
मातबरखानाने ऑगस्ट महिन्यात किल्ल्याला वेढा घातला. त्याने औरंगजेबाला पत्र
पाठविले आणि त्यात तो म्हणतो, ’‘त्र्यंबकच्या किल्ल्याला
मी सहा महिन्यांपासून वेढा घातला होता किल्ल्याभोवती मी चौक्या वसविल्या आहेत. सहा
महिन्यांपासून किल्ल्यामध्ये लोकांचे येणे जाणे बंद आहे. किल्ल्यामध्ये रसदेचा
एकही दाणा पोहोचणार नाही याची व्यवस्था मी केली आहे. त्यामुळे किल्ल्यातील लोक
हवालदील होतील आणि शरण येतील’’. [संदर्भ: ट्रेक क्षितीज़.कॉम]
किल्ला
म्हणावा असे या ठिकाणी फारसे अवशेष दिसून येत नाहीत. गोदावरी
व त्र्यंबकेश्वराच्या
भाविकांच्या गर्दीमुळे या ठिकाणी बऱ्यापैकी वर्दळ दिसून येते. प्राचीन किल्ला म्हणून
या ठिकाणी फार भेटी दिल्या जात नाहीत. तसं पाहिलं तर त्र्यंबक पर्वतांची ही रांग
अत्यंत भक्कम कड्यांनी बनलेली आहे. किल्ल्यावरील परिसरही विस्तीर्ण आहे.
गडमाथ्यावरून पूर्वेकडे नाशिकचा रामशेज, भोरगड तर पश्चिमेकडे हरिहर किल्ला स्पष्ट
दिसून येतो. हरिहर व भास्करगडांची रांग त्र्यंबक उतरून पार करता येते, असे कुठेतरी
वाचलं होतं. पण वाट मात्र सापडली नाही. किल्ल्याच्या पायऱ्या ह्या कातळात
कोरलेल्या आहेत. येथुन पावसाळ्यात गड चढत जाणं म्हणजे एक प्रकारचे थ्रीलच असते! गडमाथ्यावरील
पठारावर किल्ल्यातील सैनिकांना राहण्यासाठी ज्या जागा बनविल्या गेल्या होत्या,
त्यांचे केवळ अवशेषच पाहायला मिळतात...
छायाचित्रे:
| त्र्यंबक गडाचे कडे |
| त्र्यंबक वरील गडाचे अवशेष |
| समोर दिसणारा हरिहर किल्ला |
| किल्ल्याच्या मागच्या बाजूस गंगा-गोदावरी मंदिर |
| कातळांत कोरलेल्या गडवाटा |
त्र्यंबकगड : पुराणकाळाचा भक्कम साक्षीदार
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणा-या नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र
त्र्यंबकेश्वरमधील दुर्ग म्हणजे त्र्यंबकगड होय. हा किल्ला त्र्यंबक या
नावापेक्षा ‘ब्रह्मगिरी’ या नावाने अधिक सुपरिचित आहे. ऐतिहासिकतेपेक्षा
पौराणिक महत्त्व या गडाला अधिक असल्याचे दिसते. नाशिक जिल्ह्याच्या
पश्चिमेकडे सह्याद्रीची एक डोंगररांग गेली आहे. या रांगेस त्र्यंबकरांग असे
म्हणतात. ब्रह्मगिरी, अंजनेरी, बसगड, उतवड यासारखे गडकोट या रांगेत उभे
आहेत. यातील ब्रह्मगिरी हा सर्वात मोठा गड आहे. या गडाचे ऐतिहासिक व
पौराणिक महत्त्व तर आहेच, शिवाय पर्यटकांच्या दृष्टीने ब्रह्मगिरी ही एक
पर्वणीच मानली जाते.
तेराव्या शतकात त्र्यंबक किल्ला व परिसरात देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या भावाची राजवट होती. कालांतराने हा किल्ला बहामनी राजवटीकडे गेला. नंतर निझामशाही, शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व मुघल अशा राजवटींत या किल्ल्याचे हस्तांतरण झाले. मुघल इतिहासकारांनी या किल्ल्याचा ‘नासिक’ असाच उल्लेख केला आहे. सन 1670मध्ये शिवाजी महाराजांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला होता. छत्रपती संभाजी राजांच्या काळात राधो खोपडे हा फितूर झाल्याने मुघलांनी त्र्यंबकगड मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. सन 1689 पर्यंत हा किल्ला छत्रपती संभाजी राजांच्याच ताब्यात होता. त्र्यंबकेश्वर हे त्र्यंबकगडाच्या पायथ्याचे ठिकाण होय. चहुबाजूंनी पर्वतांच्या वेढ्यात हे गाव वसलेले आहे. नाशिक शहरापासून त्र्यंबकेश्वर सुमारे 28 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिकच्या मेळा बसस्थानकावरून राज्य परिवहन मंडळाच्या गाड्यांची येथे सतत ये-जा चालूच असते.
शिवाय नाशिकहून पालघर, जव्हार, वाडा या ठिकाणी जाणा-या सर्व बसेस त्र्यंबकेश्वर मार्गे जातात. त्र्यंबकेश्वर
बसस्थानकापासून दहा मिनिटांत ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी पोहोचता येते. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने त्र्यंबकगडाच्या पायथ्याजवळ ‘संस्कृती रिसॉर्ट’ बांधलेले आहे. या रिसॉर्टपासून गडाच्या दिशेने दोन वाटा जातात. दोन्हीही वाटा या पाय-यांच्या आहेत. उजव्या बाजूच्या वाटेने गंगाद्वारापाशी पोहोचता येते, तर डावी वाट थेट गडाच्या दिशेने जाते.
गंगाद्वाराच्या वाटेने वर गेल्यावरही पुन्हा त्र्यंबकगडाकडे जाण्यासाठी पायवाट तयार केलेली आहे. प्रत्यक्ष गडाच्या दिशेने जाण्याकरता मात्र डाव्या बाजूच्या रस्त्यानेच जाणे योग्य ठरते. पावसाळ्यात येथील संपूर्ण परिसर हिरव्या वनराईने नटलेला असतो. त्र्यंबक गडावर येण्याचा रस्ता पाय-यांनी बनवलेला असल्याने फारसा अवघड भासत नाही. चालता चालता रस्त्यात ठिकठिकाणी छोटी मंदिरे दृष्टीस पडतात. सुमारे एक तास पाय-या चढत गेल्यावर किल्ल्याचे मुख्यद्वार लागते. यापुढील पाय-या या कातळात कोरलेल्या आहेत. अखंड दगडांत बनवलेल्या पाय-या पाहता सातवाहनांच्या गडरचनेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अतिशय कुशलतेने या पाय-यांची रचना दगडांमध्ये करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी पाय-या खोलवर असल्याने अंधार जास्त होतो. पाय-या संपल्यावर किल्ल्याचे प्रशस्त पठार नजरेस पडते. पूर्ण त्र्यंबकेश्वर गावाचे दर्शन या ठिकाणाहून व्यवस्थित करता येते. किल्ल्याचे कडे अतिशय भक्कम आहेत. येथूनच पाय-यांच्या बाजूने समोरच्या दिशेला अंजनेरी गड दृष्टीस पडतो. वातावरण स्वच्छ असताना रामशेज व देहेरच्या किल्ल्याचेही दर्शन होते. किल्ल्याचा माथा प्रशस्त असला तरी ‘किल्ला’ म्हणावा असे जास्त अवशेष येथे शिल्लक राहिलेले नाहीत. काही ठिकाणी सपाट प्रदेशावर राहत्या घरांचे प्राचीन अवशेष दिसून येतात. त्या ठिकाणी कोणी फिरकत नाही. हा किल्ला दोन्ही बाजूंनी प्रचंड विस्तारलेला आहे. उजव्या बाजूच्या टोकाला काही ठिकाणी पडलेली तटबंदी नजरेस पडते. या ठिकाणी जाण्याची वाट अवघड असल्याने इथे फिरकणा-यांची संख्या तशी कमीच आहे. सरळ उभे ठाकलेले कडे गडमाथ्यावरून न्याहाळता येतात. गडमाथ्याचा एक उंचवटा पार केल्यावर मागच्या बाजूला गडावरील गोदावरी उगमस्थान, गंगा-गोदावरी मंदिर व जटा मंदिर नजरेस पडते. समोरच्या पर्वतरांगांमध्ये हरिहर किल्ला डौलाने उभा असलेला दिसून येतो. अनेक ट्रेकर्स त्र्यंबक ते हरिहर असाही ट्रेक आयोजित करतात. ही वाट पर्वतांच्या एका खिंडीतून जाते. त्र्यंबक पठारावरील पाय-यांच्या वाटेने मध्येच एक नवी वाट डावीकडे ‘सिद्धगुंफा’ या ठिकाणी जाते. कड्यात कोरलेली गुहा या ठिकाणी पाहता येते. उजवीकडील रस्त्यावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. गंगा-गोदावरी मंदिरात गोदावरीचा प्रवाह पाहता येतो. या मंदिराच्या शेजारी एक बारमाही पाण्याचे टाके आहे. प्राचीन काळापासून या टाक्याचा वापर पाणी साठवण्याकरता होत असावा, असे दिसते. जटा मंदिराच्या मागच्या बाजूला असणा-या टेकडीच्या पलीकडे त्र्यंबक किल्ल्याचा मुख्य बुरूज आहे. परंतु त्याचीही पडझड झाली आहे. त्र्यंबकवरून आजूबाजूचा मोठा परिसर दृष्टिक्षेपात येतो. पावसाळ्यात पर्यटकांची मोठी वर्दळ येथे दिसून येते, तर इतर वेळेस शिवभक्त या पर्वतावर गंगा-गोदावरीचे दर्शन घेण्यासाठी येतात. एका अर्थाने या गडामुळे नाशिक जिल्ह्याचे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व अधोरेखित होत जाते.
tushar@tusharkute.com
तेराव्या शतकात त्र्यंबक किल्ला व परिसरात देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या भावाची राजवट होती. कालांतराने हा किल्ला बहामनी राजवटीकडे गेला. नंतर निझामशाही, शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व मुघल अशा राजवटींत या किल्ल्याचे हस्तांतरण झाले. मुघल इतिहासकारांनी या किल्ल्याचा ‘नासिक’ असाच उल्लेख केला आहे. सन 1670मध्ये शिवाजी महाराजांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला होता. छत्रपती संभाजी राजांच्या काळात राधो खोपडे हा फितूर झाल्याने मुघलांनी त्र्यंबकगड मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. सन 1689 पर्यंत हा किल्ला छत्रपती संभाजी राजांच्याच ताब्यात होता. त्र्यंबकेश्वर हे त्र्यंबकगडाच्या पायथ्याचे ठिकाण होय. चहुबाजूंनी पर्वतांच्या वेढ्यात हे गाव वसलेले आहे. नाशिक शहरापासून त्र्यंबकेश्वर सुमारे 28 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिकच्या मेळा बसस्थानकावरून राज्य परिवहन मंडळाच्या गाड्यांची येथे सतत ये-जा चालूच असते.
शिवाय नाशिकहून पालघर, जव्हार, वाडा या ठिकाणी जाणा-या सर्व बसेस त्र्यंबकेश्वर मार्गे जातात. त्र्यंबकेश्वर
बसस्थानकापासून दहा मिनिटांत ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी पोहोचता येते. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने त्र्यंबकगडाच्या पायथ्याजवळ ‘संस्कृती रिसॉर्ट’ बांधलेले आहे. या रिसॉर्टपासून गडाच्या दिशेने दोन वाटा जातात. दोन्हीही वाटा या पाय-यांच्या आहेत. उजव्या बाजूच्या वाटेने गंगाद्वारापाशी पोहोचता येते, तर डावी वाट थेट गडाच्या दिशेने जाते.
गंगाद्वाराच्या वाटेने वर गेल्यावरही पुन्हा त्र्यंबकगडाकडे जाण्यासाठी पायवाट तयार केलेली आहे. प्रत्यक्ष गडाच्या दिशेने जाण्याकरता मात्र डाव्या बाजूच्या रस्त्यानेच जाणे योग्य ठरते. पावसाळ्यात येथील संपूर्ण परिसर हिरव्या वनराईने नटलेला असतो. त्र्यंबक गडावर येण्याचा रस्ता पाय-यांनी बनवलेला असल्याने फारसा अवघड भासत नाही. चालता चालता रस्त्यात ठिकठिकाणी छोटी मंदिरे दृष्टीस पडतात. सुमारे एक तास पाय-या चढत गेल्यावर किल्ल्याचे मुख्यद्वार लागते. यापुढील पाय-या या कातळात कोरलेल्या आहेत. अखंड दगडांत बनवलेल्या पाय-या पाहता सातवाहनांच्या गडरचनेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अतिशय कुशलतेने या पाय-यांची रचना दगडांमध्ये करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी पाय-या खोलवर असल्याने अंधार जास्त होतो. पाय-या संपल्यावर किल्ल्याचे प्रशस्त पठार नजरेस पडते. पूर्ण त्र्यंबकेश्वर गावाचे दर्शन या ठिकाणाहून व्यवस्थित करता येते. किल्ल्याचे कडे अतिशय भक्कम आहेत. येथूनच पाय-यांच्या बाजूने समोरच्या दिशेला अंजनेरी गड दृष्टीस पडतो. वातावरण स्वच्छ असताना रामशेज व देहेरच्या किल्ल्याचेही दर्शन होते. किल्ल्याचा माथा प्रशस्त असला तरी ‘किल्ला’ म्हणावा असे जास्त अवशेष येथे शिल्लक राहिलेले नाहीत. काही ठिकाणी सपाट प्रदेशावर राहत्या घरांचे प्राचीन अवशेष दिसून येतात. त्या ठिकाणी कोणी फिरकत नाही. हा किल्ला दोन्ही बाजूंनी प्रचंड विस्तारलेला आहे. उजव्या बाजूच्या टोकाला काही ठिकाणी पडलेली तटबंदी नजरेस पडते. या ठिकाणी जाण्याची वाट अवघड असल्याने इथे फिरकणा-यांची संख्या तशी कमीच आहे. सरळ उभे ठाकलेले कडे गडमाथ्यावरून न्याहाळता येतात. गडमाथ्याचा एक उंचवटा पार केल्यावर मागच्या बाजूला गडावरील गोदावरी उगमस्थान, गंगा-गोदावरी मंदिर व जटा मंदिर नजरेस पडते. समोरच्या पर्वतरांगांमध्ये हरिहर किल्ला डौलाने उभा असलेला दिसून येतो. अनेक ट्रेकर्स त्र्यंबक ते हरिहर असाही ट्रेक आयोजित करतात. ही वाट पर्वतांच्या एका खिंडीतून जाते. त्र्यंबक पठारावरील पाय-यांच्या वाटेने मध्येच एक नवी वाट डावीकडे ‘सिद्धगुंफा’ या ठिकाणी जाते. कड्यात कोरलेली गुहा या ठिकाणी पाहता येते. उजवीकडील रस्त्यावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. गंगा-गोदावरी मंदिरात गोदावरीचा प्रवाह पाहता येतो. या मंदिराच्या शेजारी एक बारमाही पाण्याचे टाके आहे. प्राचीन काळापासून या टाक्याचा वापर पाणी साठवण्याकरता होत असावा, असे दिसते. जटा मंदिराच्या मागच्या बाजूला असणा-या टेकडीच्या पलीकडे त्र्यंबक किल्ल्याचा मुख्य बुरूज आहे. परंतु त्याचीही पडझड झाली आहे. त्र्यंबकवरून आजूबाजूचा मोठा परिसर दृष्टिक्षेपात येतो. पावसाळ्यात पर्यटकांची मोठी वर्दळ येथे दिसून येते, तर इतर वेळेस शिवभक्त या पर्वतावर गंगा-गोदावरीचे दर्शन घेण्यासाठी येतात. एका अर्थाने या गडामुळे नाशिक जिल्ह्याचे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व अधोरेखित होत जाते.
tushar@tusharkute.com
मंगळग्रह मंदिर, अंमळनेर
भारत हा एक मंदिरांचा प्रदेश आहे. येथे निरनिराळ्या प्रकारची मंदिरे पहायला
मिळतात. असेच एक वेगळ्या प्रकारचे मंदिर जळगांव जिल्ह्यातील अंमळनेर इथे
पहायला मिळते. हे मंदिर आहे, मंगळग्रहाचे! भारतात मंगळग्रहाची केवळ दोनच
मंदिरे आहेत. त्यातील एक मंदिर कोलकता येथे तर दुसरे अंमळनेर येथे आहे.
अंमळनेरचा नगरदुर्ग पाहायला गेलो तेव्हा या मंदिराचे दर्शन झाले. अंमळनेर
मधील बोरी नदी पार करून गेले की डाव्या बाजुला चोपडा कडे जाण्याकरिता रस्ता
आहे. याच रस्त्यावर मंगळग्रह मंदिर आहे. मुख्य बसस्थानकापासून ते सुमारे
दोन कि.मी. अंतरावर असावे. मंगळवारी गेल्याने या ठिकाणी मोठी गर्दी होती,
त्यामुळे अधिक छायाचित्रे काढता आली नाहीत. श्रद्धाळूंची संख्या मात्र मोठी
होती, अगदी ’देऊळ’ प्रमाणेच. नाशिकच्या विहितगांव येथे नवग्रहांचे एक
मंदिर आहे, तेथेही मंगळाचे छोटेखानी मंदिर पाहता येते.
.
.
![]() |
| Mangalgrah Temple Road Way(Chopda Road), Amalner |
देदीप्यमान इतिहासाचा भरभक्कम साक्षीदार: अहमदनगर किल्ला.
किल्ल्याची सध्याची भक्कम स्थिती पाहून तो पाचशे वर्षांपूर्वी बांधला असे वाटत नाही, इतक्या सुस्थितीत हा भुईकोट किल्ला आहे. अहमदनगर शहरामध्येच पूर्वेला हा किल्ला वसलेला आहे. त्याचा परीघ एक मैल व ऐंशी यार्ड असून तो आशिया खंडातील सर्वोत्तम भुईकोट किल्ल्यांपैकी एक गणला जातो. महाराष्ट्रातील बहामनी राजवटीच्या अखेरच्या काळात इ. स. 1486 मध्ये राज्याचे पाच तुकडे झाले. यातूनच विभक्त झालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने भिंगार गावाजवळ नवे शहर स्थापन करण्यास सुरुवात केली होती. सन 1490 मध्ये सिना नदीच्या तीरावर हा किल्ला बांधण्यास सुरुवात झाली. सन 1494 मध्ये त्याची बांधणी पूर्ण झाली व हा किल्ला निजामशाहीचा राजधानीचा किल्ला बनला. मलिक अहमदशहामुळेच या शहराला अहमदनगर हे नाव पडले. हा किल्ला स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना मानला जातो.
अहमदनगरच्या या किल्ल्यात फंदफितुरीची कारस्थाने शिजली व भाऊबंदकीची नाट्येही रंगली. अनेक तहाचे प्रसंग व शौर्याचे प्रसंग या किल्ल्याने ‘याचि देही याचि डोळा’ पाहिले. अहमदशहा, बु-हाणशहा, सुलताना चांदबीबी यांची कारकीर्द घडवणारी निजामशाही सन 1636पर्यंत इथे नांदत होती. सन 1636 नंतर मुघल बादशहा शहाजहानने अहमदनगर किल्ल्यावर कब्जा केला. त्या काळात मुघलांचा किल्लेदार मुफलत खान अहमदनगरची बाजू सांभाळत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनाही या किल्ल्याने भुरळ घातली होती. या किल्ल्याची महती ते जाणून होते. शिवरायांच्या सैन्याने या प्रांतात तीन वेळा स्वारी केली होती. मात्र हा किल्ला जिंकण्याची महाराजांची इच्छा अपूर्णच राहिली. कालांतराने मुघल सरदार कवी जंग यांना वैयक्तिक जहागिरी प्रदान करून पेशव्यांनी हा किल्ला आपल्या पदरी पाडून घेतला. पुढे सन 1817मध्ये इंग्रजांनी अहमदनगरवर विजय मिळवला. तदनंतर 1947 पर्यंत हा किल्ला त्यांच्याच ताब्यात होता.
अहमदनगरच्या या किल्ल्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे याचा वापर अनेक राजकीय कैदी ठेवण्यासाठी बर्याच वेळा केला गेला. किल्ल्याच्या भक्कमतेमुळे मुघल, पेशव्यांपासून इंग्रजांपर्यंत अनेकांचे बंदिवान या किल्ल्यात कैद होते. सन 1767 मध्ये तोतया सदाशिवराव भाऊ, 1776 मध्ये पेशव्यांचे सरदार सखाराम हरी गुप्ते तसेच चिंतो रायरीकर, नाना फडणवीस, मोरोबा दादा, बाळोबा तात्या, सदाशिव मल्हार, भागीरथीबाई शिंदे इत्यादींना या किल्ल्यात कैदी म्हणून राहावे लागले होते. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर इंग्रजांनी अनेक जर्मन कैद्यांना कैद करून ठेवण्यासाठीही या किल्ल्याचा वापर केला होता. तसेच 1942 मध्ये ‘चले जाव’ आंदोलनात इंग्रजांनी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची धरपकड केली. पंडित नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, गोविंद वल्लभ पंत, आचार्य नरेंद्र देव, सरदार पटेल, पंडित हरिकृष्ण मेहताब, आचार्य कृपलानी, डॉ. सय्यद मेहबूब, डॉ. वट्टामी सीतारामय्या, असफ अली, डॉ. पी. सी. घोष, आचार्य शंकरराव देव या काँग्रेस नेत्यांना या किल्ल्यात बंदिस्त केले गेले होते. चौथ्या शिवाजी महाराजांचा गूढ मृत्यू याच ठिकाणी झाला. कैदेत असताना पंडित नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, मौलाना आझाद यांनी ‘गुबार-ए-खातिर’, पी. सी. घोष यांनी ‘हिस्ट्री ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन’ हे ग्रंथ याच किल्ल्यात लिहिले.
अहमदनगरच्या मध्यवर्ती व तारकपूर या दोन्ही बसस्थानकांपासून हा किल्ला जवळपास सारख्याच अंतरावर आहे. दोन्ही बसस्थानकांवरून किल्ल्याकडे जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध होतात. त्यामुळे केवळ दहा मिनिटांतच किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचता येते. सध्या किल्ला भारतीय सैन्यदलाच्या ताब्यात असल्याने आत त्यांचा बंदोबस्त दिसून येतो. मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला भारताचा राष्ट्रध्वज डौलाने फडकताना दिसतो. इंग्रजांनी पेशव्यांकडून किल्ला ताब्यात घेतला व किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी इंग्रज सेनापती ऑर्थर वेलस्ली याने किल्ल्याजवळील चिंचेच्या झाडाखाली बसून न्याहारी केली होती. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ इथे चार तोफा ठेवण्यात आल्या आहेत. जुन्या मजबूत बनावटीच्या तोफा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पाहण्यास मिळतात. किल्ल्याच्या संपूर्ण बाजूने खोल खंदक आहेत. त्या काळी या खंदकाबाहेर मातीच्या उंच टेकड्या असत. यामुळे किल्ल्याची बांधणी सहजासहजी बाहेरून ध्यानात येत नसे. आज खंदकाच्या बाहेरच्या बाजूने सिमेंटची भिंत व त्यावर कुंपण केले आहे. पूर्वी खंदकात मगरी व सुसरी ठेवल्या जायच्या, जेणेकरून चहुबाजूंनी किल्ल्याचे संरक्षण व्हावे. या अंडाकृती किल्ल्याला एकूण 22 बुरूज आहेत. आजही ते खूप सुस्थितीत असल्याचे दिसतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूने बुरुजांवर चढून किल्ला पाहण्यास सुरुवात करावी. याच बाजूला खाली जुन्या काळातील तुरुंग दिसून येतात. तसेच किल्ल्याचे दरवाजे आजही शाबूत असल्याचे दिसतात. इथून बुरुजांवर जाण्यासाठी पायर्या आहेत. अहमदशहाने आपल्या पराक्रमी सेनापती व कर्तबगार सरदारांची नावे या सर्व बुरुजांना दिली होती. परंतु त्यांचे उल्लेख इतिहासाच्या पानांत आढळत नाहीत. मात्र अनेक ठिकाणी शिळांवर फारसी, अरबी भाषेतील मजकूर दिसून येतो.
किल्ल्याच्या मध्यभागात व तटबंदीच्या आतल्या बाजूस एकूण सहा राजमहाल होते. या किल्ल्यात इंग्रजांनी एक झुलता पूल बांधला होता. आपत्तीप्रसंगी बाहेर पडता यावे, याकरिता या पुलाचा वापर होत असे. किल्ल्याच्या मध्यवर्ती ठिकाणी ‘नेता कक्ष’ नावाची जागा आहे. इंग्रजांनी भारतीय नेत्यांना याच ठिकाणी स्थानबद्ध केले होते. पंडित नेहरूंच्या काही वस्तू येथे पाहता येतात. तसेच काही नेत्यांच्या हस्ताक्षरातील पत्रेही या ठिकाणी संग्रही आहेत. पाचशे वर्षांच्या रोमांचक इतिहासाचा साक्षीदार असलेला अहमदनगर किल्ला खर्या अर्थाने महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांचा राजाच शोभतो.
भीम प्रराक्रमी: रामशेज किल्ला
मराठा साम्राज्यातील बरेचसे किल्ले सह्याद्रीच्या दर्याखोर्यांत व घनदाट झाडींमध्ये होते. रामशेज किल्ला मात्र यास अपवाद ठरतो. नाशिकच्या जवळ असलेला हा किल्ला मैदानी प्रदेशात आहे. संपूर्ण नाशिकमधून या किल्ल्याचे दर्शन करता येते. ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ही उक्ती सार्थ ठरवणारा किल्ला म्हणजे रामशेज. रामशेजच्या लढाईचे वर्णन सर्वप्रथम मुघलांच्या कागदपत्रांत वाचायला मिळाले व खरा इतिहास उजेडात आला. ‘रामशेज’ या शब्दाचा अर्थ ‘रामाची शय्या’ असा होतो. वनवासात असताना भगवान श्रीराम यांनी याच डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता. त्यामुळे प्राचीन काळापासूनच या डोंगराला व किल्ल्यालाही ‘रामशेज’ हे नाव मिळाले आहे. शिवछत्रपतींच्या निधनानंतर मराठेशाहीला सहज नामोहरम करता येईल, या उद्देशाने औरंगजेबाने शहाबुद्दीन फिरोजजंग या सरदाराला महाराष्टÑाच्या मोहिमेवर पाठवले होते. त्या काळात नाशिक व आसपासचा प्रांत मुघलांच्या ताब्यात होता. औरंगजेबाच्या या आक्रमणाची कुणकुण लागताच संभाजीराजांनी रक्षणार्थ साल्हेरचा किल्लेदार रामशेजवर रवाना केला. ऐतिहासिक कागदपत्रांत रामशेजच्या किल्लेदाराचे स्पष्ट नाव सापडत नाही, परंतु बहुतांश इतिहासकारांच्या मते, सूर्याजी जेधे हे रामशेजचे किल्लेदार होते. रामशेजच्या लढाईने किल्ल्याच्या किल्लेदाराचे कार्यही इतिहासात अजरामर केले आहे.
औरंगजेबाचा सरदार फिरोजजंग रामशेजवर चाल करून आला, तेव्हा किल्ल्यावर केवळ 600 मावळे होते. चार-पाच तासांत किल्ला ताब्यात घेऊ, असा फिरोजजंगचा उद्देश होता. त्यासाठी त्याने नाना तºहेने हल्ला चढवला. वेढा कडक केला, सुरुंग लावले, मोर्चे बांधले, तसेच लाकडी दमदमे तयार करून त्यावर तोफा चढवल्या. तरीही रामशेज हाती येत नव्हता. गडावरच्या मावळ्यांनी गोफणीच्या दगडांच्या साहाय्याने प्रतिकार चालू ठेवला होता. किल्लेदाराने चहुबाजूंनी मुघली सैन्यावर हल्ले चढवले. मुघलांचे मनसुबे धुळीस मिळवले गेले. मग वेढा फोडण्यासाठी संभाजीराजांनी 5 ते 7 हजारांची फौज पाठवली. युद्ध झाल्यावर मात्र मुघलांना माघार घ्यावी लागली. फिरोजजंग किल्ल्याचा वेढा सोडून जुन्नरला निघून गेला. नंतर औरंगजेबाने बहादूरखानाला रामशेजला पाठवले. किल्ला जिंकण्यासाठी त्याने मांत्रिकाचा अवलंब केला. परंतु त्यास अपयश आले. मुघली सैन्याचा धीर मात्र सतत चार वर्षांच्या अपयशाने खचून गेला होता. बहादूरशहाने संतापून रामशेजच्या पायथ्याशी बरीच जाळपोळ केली. औरंगजेबाने कासिमखान किरमानी या सरदाराला अखेरीस रामशेजच्या मोहिमेवर पाठवले. परंतु तोही अपयशाचा धनी ठरला. एवढा छोटासा गड मराठा, सैन्याने तब्बल 65 महिने अजिंक्य ठेवला होता!
नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून रामशेज किल्ला 15 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक-पेठ रस्त्यालगत हा किल्ला उभा ठाकलेला दिसतो. पेठकडे जाणार्या बसेस या किल्ल्याला वळसा घालून जातात. नाशिकच्या निमाणीजवळील पेठनाका येथूनही खासगी वाहनांची सोय आहे. आशेवाडी हे रामशेजच्या पायथ्याचे गाव आहे. पेठ रस्त्यापासून आशेवाडी सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्यावर उतरल्यावरच रामशेजच्या टुमदार किल्ल्याचे दर्शन होते. समुद्रसपाटीपासून हा किल्ला 3270 मीटर उंचीवर आहे. परंतु प्रत्यक्ष पायथ्यापासून त्याची उंची अधिक नसल्याने कोणत्याही ऋतूत हा किल्ला नजरेस पडतो. पावसाळ्यात तो ढगांमध्ये लपाछपी खेळत असला तरी ही लपाछपी फार काळ चालत नाही. त्यामुळे ढगांच्या थंड वातावरणात किल्ला पाहता येतो. रामशेजला भेट देण्यासाठी हिवाळाही तसा उत्तमच. वातावरण साफ असल्याने आजूबाजूचा मोठा परिसर न्याहाळता येतो.
आशेवाडी गावातून किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्यास 45 मिनिटे पुरतात. गावाबाहेर पडताना किल्ल्याच्या मुख्य कड्याचे दर्शन होते. इथे ध्वजस्तंभ उभारलेला आहे. त्यावरचा जरीपटका डौलाने फडकताना दिसून येतो. पायथ्याला वळसा घालून थोडे पुढे गेल्यास पायर्या लागतात. आजच्या काळातील सिमेंटने या पायर्या बांधल्या आहेत. पायर्या चढत असताना रामशेज किल्ल्याचा आवाका ध्यानात येतो. किल्ल्याच्या दोन्ही टोकांमधील कड्यांचा परिसर दृष्टीस पडतो. गडावर जाताना वाटेत एक गुहा लागते. या गुहेमध्ये रामाचे मंदिर आहे. तसेच एका बाजूला शिलालेख कोरलेला दिसून येतो. सध्या रामशेजवर काही साधूंचे वास्तव्य आहे. गुहेच्या खालच्या बाजूस एक पाण्याचे टाके दृष्टीस पडते. पावसाळ्यात ते पूर्ण भरून जाते. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
गुहेच्या समोरून जाणार्या पायर्या थेट गडमाथ्यावर जातात. गडाच्या दोन्ही टोकांमधील भागात आपण येऊन पोहोचतो. हा भाग बराचसा अरुंद आहे. समोरच बुजलेल्या अवस्थेत गुप्त दरवाजा आहे. या वाटेने खाली गेल्यास समोर देहेरच्या किल्ल्याचे दर्शन होते. पेठ रोडने चालणारी दूरवरची वाहतूक येथून न्याहाळता येते. गुप्त दरवाजाच्या वर जाणारी वाट रामशेजच्या दुसर्या टोकाकडे जाते व डावीकडची वाट थेट गडाच्या माचीकडे अर्थात, मुख्य बुरुजाकडे जाते. उजवीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यास काही पायर्या दिसून येतात. एका कड्यावर या पायर्यांची रचना केलेली आहे. येथे समोरच किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसून येतो. आज या दरवाजाची अवस्था खराब झालेली आहे व बाहेर पडण्याच्या वाटाही बंद झाल्या आहेत. येथून खाली जाण्यासाठी केवळ एका मनुष्याचा रस्ता दिसून येतो. दरवाजा पाहून मुख्य वाटेला आल्यावर समोर मोठा ध्वजस्तंभ नजरेस पडतो. शंभू छत्रपतींच्या जन्मदिनी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. ध्वजस्तंभ हा किल्ल्याच्या मुख्य बुरुजावर उभारलेला आहे. या ठिकाणी उंच कडा आहे. खाली आशेवाडी गाव दिसते. सुमारे चार-पाच कि.मी. अंतरावर चामर लेणींचा डोंगर दृष्टीस पडतो. त्याहीपलीकडे दूरदूर पांडवलेणींचा डोंगर दिसतो. वातावरण स्वच्छ असेल, तर उजव्या बाजूला दूरवर अंजनेरी व ब्रह्मगिरीचे पर्वत न्याहाळता येतात. बरेच हौशी ट्रेकर्स रामशेज व चामर लेणींचा ट्रेक एका दिवसात पूर्ण करतात.
किल्ल्याच्या दुसर्या टोकाकडे जाण्यासाठी माचीवरून परत मागे फिरावे लागते. या टोकाचा परिसर पहिल्यापेक्षा अधिक उंचवट्याचा आहे. थोडे वर चढून आल्यावर आपण एका सपाटीवर येऊन पोहोचतो. येथे पाण्याची दोन टाकी व एक तलाव आहे. तलावापासून थोडे पुढे चालत गेल्यास एक देवीचे मंदिर दृष्टीस पडते. देवीभक्तांचे येथे सतत येणे-जाणे असावे, असे तेथील पाऊलखुणांवरून दिसून येते. नवरात्रात येथे मोठा उत्सवही होत असतो. मंदिराच्या मागच्या बाजूस पुन्हा उतार चालू होतो. गडाचा दुसरा गुप्त दरवाजा याच ठिकाणी आहे. दुसर्या टोकाशीही दोन पाण्याची टाकी दिसून येतात. या माथ्यावर अनेक पडक्या घरांचे अवशेष विखुरलेले आहेत. मागील बाजूला मोठे उतरते पठार आहे. त्यास वळसा घातल्यास किल्ल्याच्या या टोकाचा घेर ध्यानात येतो. समोरच टेहळणीसाठी वापरण्यात येणारा भोरगड नजरेस पडतो. नाशिक-पेठ रस्त्याचे पूर्ण दर्शन या भागातून होते. या टोकाच्या उजव्या बाजूला काही भग्न मूर्ती व पिंडीचे अवशेष दिसून येतात. त्याचा संदर्भ मात्र इतिहासात सापडत नाही.
रामशेज पाहताना एक गोष्ट मात्र ध्यानात येते की, या किल्ल्याची रचना ही साधीच आहे. परंतु तरीही मराठ्यांनी साडेपाच वर्षे हा किल्ला झुंजत ठेवला होता, यावरूनच त्यांच्या पराक्रमाची प्रचिती येते. किल्ल्यावरील अवशेष मात्र पडझडीत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्टÑाच्या पराक्रमाची माहिती पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी या किल्ल्याचे जतन-संवर्धन ही अत्यावश्यक बाब आहे.
थोरले बाजीराव पेशवे यांच्या सिन्नर, नाशिक येथील जन्मभुमीत उभारलेला पुतळा.
भ्रमंती [मीनेश्वर मंदिर]
साधूचं कूळ अन नदीचं मूळ शोधू नये असं
म्हणतात. साधूच्या मूळाबद्दल माहिती नाही पण नदीच्या मूळ शोधण्याची आम्हाला
भारीच हौस. त्याची सुरूवात नाशिकच्या गोदावरीपासून आम्ही केली होती.
त्यानंतर नद्यांची उगमस्थाने शोधण्याचा धडाकाच लावला. जुन्नरच्या कुकडी व
पुष्पावतीनंतर आता मीनी नदीचा क्रमांक लागला. परवा तांबेवरून घंगाळदऱ्याकडे
जाताना एका बाबांना लिफ्ट दिली होती तेव्हा त्यांनी या उगमस्थानाविषयी
माहिती दिली. मग माझा प्रवास सुरू झाला. जुन्नरच्या चतुर्गंगांमधील मीना ही
कुकडीनंतरची दुसरी मोठी नदी. इतिहासाच्या एका पुस्तकात शिलाहार राजा झंझ
याच्या विषयी माहिती वाचली होती. गोदावरीपासून भीमेच्या खोऱ्यापर्यंत
झंझाने बारा विविध नद्यांच्या उगमस्थानी बारा विविध शिवालये बांधली होती.
यातील आज अनेक हेमाडपंथी शिवालये सुस्थितीत आहेत तर काही शेवटची घटका
मोजतायेत. अहिल्यातीर्थ, रत्नेश्वर, हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वर, कुकडेश्वर
अन भीमाशंकर ही यातील नावाजलेली शिवालये होत. मीना नदीच्या काठावर
ब्रह्मनाथाच्या मंदिराचा संदर्भ आहे. प्रत्यक्षात पारूंडे येथे असणारे हे
शिवालय मीना नदीच्या एका डोंगराच्या पलिकडे आहे. त्यामुळे राजा झंझनेच हे
मंदिर बांधले आहे का, याविषयी माझ्या मनात संभ्रमच आहे.
परवा मीनेश्वर मंदिराविषयी समजले तेव्हा मी लगेचच त्या दिशेने कूच केली. आंबोली हे पुणे जिल्ह्यातले शेवटचे गांव. चहुबाजुंनी पर्वतांनी वेढलेले हे गांव आंबोली धबधबा, ढाकोबा अन दाऱ्याघाट या तीन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. या गावात येतो तेव्हा नुसतं पायी इथल्या डोंगर दऱ्यांमधून फिरायचा मोह आवरत नाही. आंबोलीच्या अलिकडे एक रस्ता उजवीकडे डोंगराच्या दिशेने जातो. अगदीच कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने पुढे गेल्यावर कड्यांच्या पायथ्याशी मीनेश्वर महादेवाचे अलिकडच्या काळात बांधलेले छोटेखानी मंदिर आहे. कुकडेश्वराची प्रतिकृतीच ती! फरक इतकाच मीनेश्वराचे मंदिर हे हेमाडपंथी शैलीत मोडत नाही. मागच्या कोकणकड्याच्या त्या गर्द झाडीतून झुळझुळ वाहणारे ते स्वच्छ पाणी एका नंदिमुखातून पुढे जाताना दिसते. डोंगराच्या माथ्यावरून एका औदुंबराच्या मुळापासून या पाण्याचा उगम होतो. अतिशय शांतता असलेला हा परिसर केवळ नदीच्या पाण्याच्या आवाजाने निसर्गसंगीत निर्माण करत बसलाय...
परवा मीनेश्वर मंदिराविषयी समजले तेव्हा मी लगेचच त्या दिशेने कूच केली. आंबोली हे पुणे जिल्ह्यातले शेवटचे गांव. चहुबाजुंनी पर्वतांनी वेढलेले हे गांव आंबोली धबधबा, ढाकोबा अन दाऱ्याघाट या तीन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. या गावात येतो तेव्हा नुसतं पायी इथल्या डोंगर दऱ्यांमधून फिरायचा मोह आवरत नाही. आंबोलीच्या अलिकडे एक रस्ता उजवीकडे डोंगराच्या दिशेने जातो. अगदीच कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने पुढे गेल्यावर कड्यांच्या पायथ्याशी मीनेश्वर महादेवाचे अलिकडच्या काळात बांधलेले छोटेखानी मंदिर आहे. कुकडेश्वराची प्रतिकृतीच ती! फरक इतकाच मीनेश्वराचे मंदिर हे हेमाडपंथी शैलीत मोडत नाही. मागच्या कोकणकड्याच्या त्या गर्द झाडीतून झुळझुळ वाहणारे ते स्वच्छ पाणी एका नंदिमुखातून पुढे जाताना दिसते. डोंगराच्या माथ्यावरून एका औदुंबराच्या मुळापासून या पाण्याचा उगम होतो. अतिशय शांतता असलेला हा परिसर केवळ नदीच्या पाण्याच्या आवाजाने निसर्गसंगीत निर्माण करत बसलाय...
Sunday, November 20, 2016
गिरिभ्रमण [दुधारी पर्वत]
तब्बल दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आलेला गिरिभ्रमणाचा योग...
छोटा पण ताजातवाना....
मायभूमी जुन्नरच्या सानिध्यात...
चहूबाजूंनी गिरिदुर्गांनी वेढलेल्या भूमीत गिर्यारोहणाची मजाच काही औरच असते...
पहाटेचा उत्साह अन गुलाबी थंडीतला रिफ्रेशिंग अनुभव...
धुक्याच्या दुलईत दूरवर दिसणारी खेडी, धरणांचा शांत व शीतल विस्तृत जलाशय...
शिवनेरी ते नारायणगड... हटकेश्वर, लेण्याद्रीच्या सुलेमान टेकड्या अन मानमोडीचा डोंगर...
सर्वच हा उत्साह ताजातवाना करणारं... पुन्हा नव्या जोमाने गिरिशिखरे पादाक्रांत करण्यासाठी... प्रोत्साहित करणारं...
विलक्षण अन विलोभनीय...
छोटा पण ताजातवाना....
मायभूमी जुन्नरच्या सानिध्यात...
चहूबाजूंनी गिरिदुर्गांनी वेढलेल्या भूमीत गिर्यारोहणाची मजाच काही औरच असते...
पहाटेचा उत्साह अन गुलाबी थंडीतला रिफ्रेशिंग अनुभव...
धुक्याच्या दुलईत दूरवर दिसणारी खेडी, धरणांचा शांत व शीतल विस्तृत जलाशय...
शिवनेरी ते नारायणगड... हटकेश्वर, लेण्याद्रीच्या सुलेमान टेकड्या अन मानमोडीचा डोंगर...
सर्वच हा उत्साह ताजातवाना करणारं... पुन्हा नव्या जोमाने गिरिशिखरे पादाक्रांत करण्यासाठी... प्रोत्साहित करणारं...
विलक्षण अन विलोभनीय...
गिरिभ्रमण : जमनानाथ
आज निश्चित कुठं जायचं ते ठरवलं नव्हतं.
जुन्नरमध्ये डोंगरांची कमी नाहीये. त्यामुळे असाच नवा डोंगरमार्ग शोधू,
याची खात्री होती. सकाळी वडज गावात आलो तेव्हा धरणाच्या पलिकडच्या डोंगरावर
एक पांढरी मंदिरासारखी आकृती दिसली. तेव्हाच आजचे ध्येय गवसल्याचे वाटले.
तिथुन चाललेल्या एका सद्गृहस्थाला विचारले, "काका, त्या डोंगरावरच्या
मंदिरात कसे जायचे?" यावर त्यांनी सांगितले की, ते मंदिर नसून पाण्याची
टाकी आहे. मनातल्या मनात मला पोपट झाल्याचे जाणवले! परंतु, पारूंडे गावात
येणेरे फाट्यावर आल्यावर डोंगरावरचे ते मंदिर स्पष्ट दिसले. रस्ता मात्र
त्या बाजुने नव्हता. गावाच्या अलिकडे उजव्या बाजूला असणाऱ्या गोरक्षवली
बाबा दर्ग्याच्या जवळून एक रस्ता या डोंगराकडे जात होता. थोडी चौकशी
केल्यावर समजले की, सदर मंदिर जिमनानाथाचे आहे. मग, पावसाळ्यातील
पाण्याच्या ओहोळांनी तयात झालेल्या रस्त्याने मी डुलतडुलत या मंदिराच्या
दिशेने निघालो. सकाळची थंडीची लहर आणि सूर्यकिरणांचा वर्षाव अंगावर घेत मी
पायवाटा शोधू लागलो. या दिशेला चिटपाखरूही नव्हते. डोंगर चढू लागल्यावर
पारूंडे गावचा विस्तार नजरेस येऊ लागला होता. एका छोटेखानी खिंडीत
पोहोचल्यावर पलिकडे वडज धरण व दूरवर शिवनेरी किल्ला नजरेस पडत होता. आता
पायवाट बऱ्यापैकी रूळलेली वाटली. दोन्ही बाजुंच्या डोंगररांगा स्पष्ट दिसू
लागल्या होत्या. डोंगरावरच्या काटेरी झुडूपातून वडज धरण फारच सुंदर दिसत
होते. अशावेळी छायाचित्रांचा मोह सुटत नाही. मंदिरापाशी पोहोचलो तेव्हा
सूर्य बऱ्यापैकी वर आलेला. दूरवर साखर कारखान्याच्या धूराचे लोट आसमंतात
जाताना दिसत होते. अशा उंचीवर येऊन निसर्गवाचन करण्याची मजा काही वेगळीच
असते.
बाहेरून पांढरा रंग दिलेल्या त्या मंदिरात
शंकराची पिंडी व काही देवतांचे फोटोही होते. शिववार असणाऱ्या सोमवारीच या
ठिकाणी भाविकांची रेलचेल असावी, असे एकंदरित वाटले. आराधना न करण्यासाठी
इथे येणारा माझ्यासारखा वाटसरू विरळाच नाही का?
मस्तानीची कबर, पाबळ
सन 2006 मध्ये सर्वप्रथम पाबळला जाण्याचा योग
आला होता. त्याच वेळेस पहिल्यांदा पाबळ गावात मस्तानीची कबर आहे, असे
समजले. परंतु, तेव्हा भेट दिली नव्हती. मागील आठवड्यात इतक्या वर्षांनी
पाबळला जाताना हे ठिकाण पाहण्याची संधी मिळाली. पुणे जिल्ह्यातल्या
राजगुरुनगरपासून पाबळ गाव वीस किलोमीटर अंतरावर आहे. या गावामधल्या लोणी
रस्त्यावर डाव्या बाजूला बाजीराव पेशव्यांच्या मस्तानी बाईसाहेबांची समाधी
बाहेर एकाकी पडल्याचे दिसते. त्या शेजारीच गावचे सुन्नी कब्रस्तान आहे.
मस्तानीच्या कबरीभोवती सध्या सिमेंटचे बांधकाम करण्यात आले आहे व चबुतराही
बांधलेला आहे. परंतु सध्याची त्याची अवस्था पाहता महाराष्ट्रातल्या एका
दुर्लक्षित स्थळांपैकीच हे एक ठिकाण असल्याचे जाणवते.
चौरंगा दत्त मंदिर टेकडी, पेठ
पुणे-नाशिक महामार्गावरचा सर्वात पहिला बायपास रस्ता तयार झाला होता
आंबेगाव तालुक्यातल्या पेठ या गावी! याच गावाच्या मागे दूरवर एक डोंगर
दिसतो व त्यावर एक भव्य मंदिरही बांधल्याचे दिसते. हाच चौरंगा डोंगर होय.
या डोंगरावर एक दत्तमंदिर आहे. पेठ गावातून एक रस्ता घोडेगाव कडे जातो. या
रस्त्यावर उजवीकडे एक पाण्याची टाकी आहे. तिथून डाव्या बाजूला एक फाटा
फुटून एक रस्ता भावडी गावात जातो. सदर रस्त्याने पुढे गेल्यावर आपला सौरंगा
डोंगराच्या दिशेने प्रवास चालू होतो. हा परिसर बऱ्यापैकी चढाचा परंतु
बिनाझाडीचा आहे. सौरंगा डोंगरावर दत्ताचे मंदिर झाल्याने आता थेट वरपर्यंत
गाडी जाण्याचा रस्ता तयार केला आहे. पायथ्यापासून डांबरी रस्त्याने थोडे वर
गेल्यास एक आश्रम दृष्टीस पडतो. तेथून पुढचा रस्ता कॉंक्रिटचा बांधलेला
आहे. मी या डोंगरावर गेलो तेव्हा घाट रस्ता चालू होण्यापूर्वीच गाडी
पायथ्याला पार्किंग केली व पायी रस्ता पार करायला सुरुवात केली. रस्त्याची
चढण तशी बर्यापैकी आहे. परंतु, रस्ता सपाटच असल्याने फारशी दमछाक होत
नाही. केवळ तीन वळणांमध्ये कॉंक्रिटचा रस्ता थेट माथ्यावर जातो.
पावसाळ्यात येथुन नयनरम्य नजारा पाहायला मिळतो. माथ्यावर दत्ताचे बऱ्यापैकी
मोठे मंदिर बांधले आहे. मंदिरात काळ्या पाषाणातली मूर्ती आहे. या मंदिराचे
वैशिष्ट्य म्हणजे मंदिर खेड तालुक्यात तर पायथा आंबेगाव तालुक्यात मोडतो.
भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराचेही असेच आहे. अवसरी घाटापासून खेड घाटात
पर्यंतचा व बहुतांश आंबेगाव तालुक्याचा परिसर येथून न्याहाळता येऊ शकतो.
डोंगरावर फारशी झाडे नसल्याने उन्हाळ्यात वैराण अवस्था पाहायला मिळते.
हुतात्मा बाबू गेनू स्मारक, महाळुंगे पडवळ
पुणे-नाशिक महामार्गावर घोड नदीच्या काठावर मंचर जवळ कळंब नावाचे गाव आहे.
या गावातून महाळुंगे पडवळ गावाकडे जाण्यासाठी एक छोटेखानी रस्ता आहे.
त्यावर हुतात्मा बाबू गेनू जन्मस्थळ असल्याची कमान दिसते. गेली कित्येक
वर्ष ही कमान मी पहात आलो. हुतात्मा बाबू गेनू बद्दल इतिहासाच्या पुस्तकात
वाचले होते. परंतु इतके वर्ष बाबू गेनू चे गाव प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला
नव्हता. त्या दिवशी मी या गावाला व स्मारकाला भेट द्यायचे ठरवले. कळंब
गावापासून महाळुंगे पडवळ हे गाव सुमारे सहा किलोमीटर अंतरावर आहे. रस्ता
मात्र अतिशय सुंदर आणि दोन्ही बाजुला दाट झाडी आहे. रस्ता सरळ असल्याने
कुठे चुकण्याचा संभव येत नाही. गावात पोहोचण्यापूर्वी दोन-तीन ठिकाणी खालील
छायाचित्रात दिसत आहेत, अशी क्रांती शिल्पे बनवली आहेत.
शेवटचे क्रांति
शिल्प आपल्याला बाबू गेनू सैद याच्या मूळ घराचा व स्मारकाचा रस्ता दाखवते.
या ठिकाणावरून उजव्या बाजूला सैदवाडीमध्ये बाबू गेनू चे मूळ घर आजही आहे.
तर डाव्या बाजूला महाळुंगे पडवळ गाव आहे. गावात शिरल्या बरोबरच समोरच
ग्रामसचिवालयाची इमारत दिसते. तिच्या उजवीकडे जिल्हा परिषद शाळा व डावीकडे
हुतात्मा बाबू गेनू स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार नजरेस पडते.
अन्य हुतात्मा स्मारकांप्रमाणे याही ठिकाणी हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला आहे. त्याभोवती सुंदर अशी बाग तयार करण्यात आली आहे. बागेच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर हुतात्मा बाबू गेनू ची क्रांती शिल्पे कोरण्यात आली आहेत. त्यावरूनच हुतात्म्याचे कर्तृत्व आपल्याला प्रतीत होते. प्रत्येक शिल्पा शेजारी माहितीचा फलकही आहे. स्मारकाच्या मध्यभागी मुख्य सभागृह बांधले आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असावेत. बाबू गेनू चा प्राणाहुतीमुळे गावाचे नाव देशभरात पोहोचले. त्यामुळे गावकऱ्यांनी त्याच्या स्मृती खूप चांगल्या रीतीने जपून ठेवल्याचे दिसते.
अन्य हुतात्मा स्मारकांप्रमाणे याही ठिकाणी हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला आहे. त्याभोवती सुंदर अशी बाग तयार करण्यात आली आहे. बागेच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर हुतात्मा बाबू गेनू ची क्रांती शिल्पे कोरण्यात आली आहेत. त्यावरूनच हुतात्म्याचे कर्तृत्व आपल्याला प्रतीत होते. प्रत्येक शिल्पा शेजारी माहितीचा फलकही आहे. स्मारकाच्या मध्यभागी मुख्य सभागृह बांधले आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असावेत. बाबू गेनू चा प्राणाहुतीमुळे गावाचे नाव देशभरात पोहोचले. त्यामुळे गावकऱ्यांनी त्याच्या स्मृती खूप चांगल्या रीतीने जपून ठेवल्याचे दिसते.
शमाधर दर्गा, एकलहरे
पुणे-नाशिक महामार्गावर मंचरच्या पुढे मंचर खिंड ओलांडली की डाव्या बाजूला
एका डोंगराच्या टोकावर पांढऱ्या रंगाचं बांधकाम दिसतं. तोच शमाधर दर्गा
होय. रस्त्यावर जाता-येताना मला नेहमीच्या दर्ग्याच्या डोंगरावर जाण्याचे
आकर्षण वाटत आले होते. शेवटी एक दिवस तो योग आलाच. या दर्ग्याचा डोंगर हा
बर्यापैकी उंच आहे. लांबून मात्र त्याच्याकडे जाण्याचा रस्ता कुठून आहे,
हे लवकर ध्यानात येत नाही. त्यासाठी स्थानिकांनाच हा रस्ता विचारावा लागतो.
मंचर खिंडीतून साधारणत: एक किलोमीटर पुढे एक चौधरी निसर्ग ढाबा आहे. याच
ढाब्याच्या अलीकडे त्याला लागून एक सरळसोट रस्ता वरच्या डोंगराच्या दिशेने
जातो. पावसाळ्यात या रस्त्याची स्थिती फारशी बरी नसते. परंतु, अगदी कारही
या डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाईल असे गृहीत धरता येऊ शकते. एकलहरे गावातून
पलीकडच्या सुलतानपूर गावात जाण्यासाठीचा हा एक कच्चा रस्ता आहे. खूपच
मुश्किलीने या डोंगरातून बाईक पलिकडच्या गावात जाऊ शकते. परंतु शमाधरला
जाण्यासाठी पायपीट करत गेले तर योग्यच. मी या दर्ग्याच्या डोंगरावर
पहिल्यांदा गेलो, तेव्हा एकटाच होतो मला एकट्यालाच रस्ता शोधायचा होता.
पायथ्याशी एका ठिकाणी चौकशी केली तेव्हा समजले की, डोंगराच्या निम्म्या
पासून पायऱ्या आहेत. त्यामुळे ही खूण लक्षात ठेवत मार्गक्रमण चालू केले.
मळलेल्या पायवाटेने निम्म्यापर्यंत गेल्यावर डाव्या बाजूला शमाधर दर्ग्याचे
सर्वोच्च टोक दिसू लागले. तसेच काही अंतरावर पायऱ्याही दिसत होत्या.
सिमेंटने बांधलेल्या पांढऱ्या रंगाच्या पायऱ्या अजूनही सुस्थितीत होत्या.
त्यांच्या समोरच उजव्या बाजूला पाण्याचे छोटेखानी टाके दृष्टीस पडले. ते
पावसाळा नुकताच संपल्याने तुडुंब भरलेले होते. उन्हाची तीव्रता वाढू
लागल्याने पायर्यांच्या शेजारच्या एका कठड्यावर थोडी विश्रांती घेतली व
पुन्हा मार्गक्रमण चालू ठेवले. थोड्याच वेळात सिमेंटच्या पायर्या संपून
दगडी पायर्या चालू झाल्या होत्या. एखाद्या किल्ल्याला असाव्यात अशा त्या
पायऱ्या होत्या. वळणावळणाचा सुन्दर रस्ता व आजूबाजूला दाट झाडी होती.
त्यातून एखादा किल्ला चढावा, असे भासत होते. खालच्या सिमेंटच्या पायर्या
एक दोन वर्षांत खराब होतील परंतु, दगडी पायऱ्या कित्येक वर्षे पाय रोवून
उभ्या राहतील, अशाच होत्या. अखेरीस एक छोटी विश्रांती घेऊन मी दर्ग्याच्या
जवळपास पोहोचलो. अलीकडे तीन-चार मोठाले दगड लावून ठेवलेत. त्यांनाही
दर्ग्याचा पांढरा रंग देण्यात आला होता. त्यातून एक चिंचोळी वाट या
डोंगराच्या सर्वोच्च माथ्यावर अर्थात शमाधर दर्ग्यापाशी जाते. अन्य
दर्ग्यांसारखा हाही एक दर्गा होता. पण महत्त्वाचे म्हणजे दर्ग्याची जागा
वगळता या टोकावर अन्य फारशी जागा नव्हती. उजव्या बाजूला जिथे दर्ग्याची
सावली पडत होती, तिथे फरशा टाकलेल्या होत्या. दुपारचे साडेबारा वाजलेले,
उन्हाची तीव्रताही वाढलेली होती. त्यात या टोकावर वारा सुटलेला व
आजूबाजूच्या पावसाळ्यात वाढलेली दाट झाडी होती. मग काय, त्या सावलीतल्या
फरशीवर अंग टाकले व आकाशाकडे बघून डोळे बंद केले. आम्हाला निसर्गसानिध्य
इतके का आवडते? तर ते याच आल्हाददायक वातावरणासाठी! खरे तर निसर्ग आपल्याला
जितका देतो तितका इतर कोणीच देत नाही.
दहा मिनिटांनी तिथून उठलो व समोरचा परिसर निहाळायला सुरुवात केली. हा डोंगर बराच उंच असल्याने आंबेगाव व जुन्नर तालुक्याचा मोठा परिसर या ठिकाणावरून दिसत होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नारायणगाव व मंचर ही दोन्ही गावे एकाच वेळी दिसतील, असे हे एकमेव ठिकाण असावं! शिवाय येथून नारायणगड किल्लाही दिसत होता. अशा या सुंदर ठिकाणाहून परतण्याची इच्छा तर होत नव्हती. त्यामुळे जड अंत:करणाने परतीच्या वाटेला चालायला सुरुवात केली.
दहा मिनिटांनी तिथून उठलो व समोरचा परिसर निहाळायला सुरुवात केली. हा डोंगर बराच उंच असल्याने आंबेगाव व जुन्नर तालुक्याचा मोठा परिसर या ठिकाणावरून दिसत होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नारायणगाव व मंचर ही दोन्ही गावे एकाच वेळी दिसतील, असे हे एकमेव ठिकाण असावं! शिवाय येथून नारायणगड किल्लाही दिसत होता. अशा या सुंदर ठिकाणाहून परतण्याची इच्छा तर होत नव्हती. त्यामुळे जड अंत:करणाने परतीच्या वाटेला चालायला सुरुवात केली.
खंडोबा टेकडी, विठ्ठलवाडी
कळंब गावातून चास कडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारणत: दोन किलोमीटर उजवीकडे एक
रस्ता टाकेवाडी च्या दिशेने जातो. या फाट्यावर एक छोटेखानी जंगल आहे.
विठ्ठलवाडी हे इथले गाव. जंगलातून थोडंसं पुढे गेल्यावर पहिलाच उजव्या
बाजूचा वळण घेणारा कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने चार-पाच घरे लागतात यातील
शेवटचे घर हे खंडोबा टेकडीच्या पायथ्याचे घर होय. टेकडीवरच्या मंदिराची
चावी याच घरात भेटते. मी पहिल्यांदा गेलो तेव्हा त्याबद्दल माहिती नव्हती.
घरातल्या लोकांनी स्वतः मला चावी आणून दिली होती. त्याच घराच्या मागच्या
बाजूने एक छोटी पायवाट या टेकडीवर जाते. फार फार तर दहा मिनिटांमध्ये आपण
या टेकडीवर पोहोचतो. टेकडीवर जाण्याकरता मोठा रस्ता बनविण्याचा प्रयत्न
झाला असावा, असे दिसते. परंतु, अजूनही तो पूर्णतः कच्चा आहे. टेकडीवर
खंडोबाचे छोटेखानी मंदिर आहे. येथून आंबेगाव तालुक्यातला बराचसा मोठा परिसर
दृष्टीक्षेपात येतो. कळंब गाव व पुणे-नाशिक महामार्गही पूर्णपणे दिसतो.
दुपारच्या वेळेस या टेकडीवरची हवा मात्र आनंदाची झुळूक वाटावी अशीच असते.
टेकडीच्या दुसऱ्या बाजूनेही खाली उतरण्यास रस्ता आहे. स्वतःची गाडी घेऊन
गेला नसल्यास या ठिकाणावरून उतरण्यास काहीच हरकत नाही.
इस्लामपूरची दत्त टेकडी
पुण्याच्या बाहेर कधी जाणे झाले की, आमचा बरेचदा ट्रेकिंगचा शोध घेण्याचाही
प्रवास सुरू होतो. इस्लामपूरला आजवर तीन वेळा निरनिराळ्या ट्रेनिंगसाठी
जाण्याचा योग आला. त्यातल्या एका भेटीत मी जवळच्या बहेगाव, सागरेश्वर
अभयारण्य व मच्छिंद्रगड किल्ला यांना भेट देऊन आलो होतो. त्यावेळेस एक बाईक
मला इस्लामपुरात मिळाली होती. पण यावेळेस मात्र काही केल्या बाईक मिळेनात.
ट्रेनिंग मधून आलो की, होस्टेलवर स्वस्त बसून राहावे लागायचे. सोलो
ट्रेकिंगची सवय बऱ्याच वर्षापासून होती. पण दोन दिवस झाले तरी बाईकची
व्यवस्था झाली नाही. म्हणून आता पायीच फिरायचं ठरवलं होतं. त्यासाठी गुगल
मॅप प्रथम स्कॅन केला व इस्लामपूरच्या बाहेर एक छोटेखानी टेकडी सापडली.
तिचं नाव गुगलवर दत्त टेकडी असं होतं. गुगल मॅप वर तिचं अंतर चार किलोमीटर
होतं. म्हणजे जाऊन-येऊन आठ किलोमीटर पडणार! जून महिना चालू असला तरी
पावसाचं नामोनिशानही नव्हतं. या वर्षी दुष्काळ वाढल्याची व पाऊस
लांबण्याची चिन्हे दिसत होती. बातम्यांमध्ये इतकच ऐकू येत होतं की, पाऊस
कर्नाटकापर्यंत आलेला आहे. बाकी इथे सर्व ऊनच पडत होतं. या वेळेच्या
इस्लामपूर भेटीत बरेच प्लान्स केले होते. पण बाईक न मिळाल्याने सर्व घोडं
अडकलं. शेवटी दत्तमंदिराच्या टेकडीचा पायीच प्रवास करायचं ठरवलं. सकाळी सात
वाजता होस्टेलवर निघालो. ऊन फारसं नव्हतं. रस्त्यावर सकाळचे जॉगिंग
करणाऱ्यांची मात्र गर्दी होती. त्या दिवशी बऱ्याच दिवसांनी असं ट्रेकिंगला
बाहेर पडणार होतो. पुन्हा एकदा गुगल मॅप च्या साह्याने पायी चालत रस्ता पार
करायला लागलो. खरं सांगायचं तर पायी चालताना गुगल मॅप्स वापर बऱ्याच कमी
वेळा मी केलाय. त्यातलीच ही एक घटना. जवळपास पंचेचाळीस ते पन्नास मिनिटात
मी टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलो. वर जाण्याचा रस्ता दाखवायला मात्र गुगल
मॅपच्या बाईने चुकी केली. वर चढताना मलाच माझा रस्ता तयार करावा लागला
होता. उन्हाळ्यामुळे झाडांची नेहमीची वाताहत झाली होती. शुष्कपर्ण सर्वत्र
भुईवर पडलेले दिसले. टेकडीच्या टोकावर पोहोचलो तर इथे मी केवळ एकटाच होतो,
असं दिसलं. सर्व इस्लामपूर शहर एका नजरेत पाहता येत होते. माझ्या मोबाईलचा
कॅमेरा फुटला असल्याने फ्रंट कॅमेराने फोटो काढावे लागले. तसे ते चांगले
आलेत. ध्येयावर पोहोचल्याचे समाधान तर वाटत होतेच. पण बऱ्याच दिवसांनी अशी
पायपीट केल्याने पाय दुखायला सुरुवात झाली होती. परत चार किलोमीटर अंतर मी
किती जड पावलांनी पार केलं, ते माझं मलाच माहित!
या छोटेखानी ट्रेकने मात्र थोडंसं का होईना समाधान प्राप्त झालं होतं.
या छोटेखानी ट्रेकने मात्र थोडंसं का होईना समाधान प्राप्त झालं होतं.
नांदेडचा भग्न नंदगिरी किल्ला
महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणात
भुईकोट किल्ले आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि नाशिकचा भाग वगळला, तर
इतर सर्व भागांमध्ये बहुतांश किल्ले भुईकोट आहेत. पूर्वीच्या काळी अनेक
शहरांची ओळख की तिथल्या भुईकोट किल्ल्यावरून होती. त्यातीलच एक किल्ला
म्हणजे नांदेड चा नंदगिरी अर्थात नंदीग्राम किल्ला होय! नांदेड शहराचे नाव
याच किल्ल्यावरून देण्यात आल्याचे मानण्यात येते. शहराच्या मध्यवर्ती
ठिकाणी हा किल्ला वसलेला आहे. अर्थात याच कारणामुळे किल्ल्याची अतिशय
दुरावस्था झाल्याचे दिसते. गोदावरीच्या काठावर आज हा किल्ला भग्नावस्थेत
आढळलेला दिसतो. महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचे किल्ले अंगाखांद्यावर
खेळवत आहेत, परंतु भुईकोट किल्ल्यांच्या माध्यमातून अतिशय वेगाने आपला
इतिहास नामशेष होत असल्याचा दिसतो. आज नांदेडचा नंदगिरी किल्ला
महानगरपालिकेच्या पाणी विभागाच्या ताब्यात आहे. तो आता सार्वजनिक ठिकाणी
असल्यामुळे आणि एका ओसाड जागी असल्यामुळे त्याची भयानक दुरावस्था झाल्याचे
दिसते. आधीच या भागांमध्ये पर्यटन स्थळांची संख्या कमी आहे. त्यातच
नागरिकांनी या किल्ल्यांची दुरावस्था केल्यास पर्यटनाला वाव निश्चितच
मिळणार नाही..
खंडोबा मंदिर, औरंगाबाद
औरंगाबादच्या सातारा परिसरातील पेशवेकालीन
हे आहे खंडोबा मंदिर. मराठा वास्तुशैलीतील हे मंदिर पूर्णतः विटांनी
बांधलेले आहे. बीड बायपास रस्त्यावरून एमआयटी अभियांत्रिकी
महाविद्यालयापासून एक रस्ता थेट सातारा गावात येतो. याच रस्त्यावर सदर
मंदिर बांधले आहे. मंदिर परिसर गर्भगृह, सभामंडप व मुख्य प्रवेशद्वार यात
विभागलेला आहे. अर्धमंडपाच्या वरच्या भागात गजलक्ष्मी, शेषशायी विष्णू, आणि
श्रीकृष्णाची सुंदर शिल्पे कोरलेली दिसतात. याशिवाय मंदिर परिसरात गणेश,
शिव पार्वती, विष्णू दशावतार यांच्या सुबक मूर्तींचेही दर्शन होते.
कवी केशवसुत स्मारक
कवी केशवसुत हे मराठीतील एक उच्च प्रतिभा लाभलेले कवी. त्यांचे जन्मस्थान
कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या गावी आहे. याच ठिकाणी कोकण
मराठी साहित्य परिषदेने त्यांचे स्मारक बनवले आहे. अगदी शंभर वर्षानंतर
सुद्धा आजही हे घर जसेच्या तसे असल्याचे दिसते. टिपिकल कोकणी पद्धतीच्या अन
नारळाच्या झाडांनी वेढलेल्या या घराच्या मागच्या बाजूला मराठीतल्या अनेक
कवींचे रेखाचित्र असलेले एक संग्रहालय आहे. मराठी सारस्वतांची मांदियाळी या
संग्रहालयात दिसते. ही उच्च प्रतीची रेखाचित्रे पाहताना मराठीला समृद्ध
करणाऱ्या कवींना मनोमन प्रणाम करावासा वाटतो.
वन ट्री हिल', औरंगाबाद
सातारा हा औरंगाबाद मनपाच्या एका टोकाला
येणारा परिसर. पेशवेकालीन खंडोबा मंदिरासाठी तो प्रसिद्ध आहे. याच
साताऱ्यातील ही टेकडी- 'वन ट्री हिल'. सुरुवातीला नाव थोडं विचित्र वाटलं.
पण, गुगलवर हेच नाव दिलय. लांबून पाहिल्यास या टेकडीच्या माथ्यावर एकच झाड
शोभून दिसते त्यामुळेच हौशी लोकांनी त्याला 'वन ट्री हील' म्हटले असावे.
औरंगाबादेत बऱ्याच डोंगरांना लेण्या आहेत, तसेच एक लेणे याही डोंगरालाही
पाहायला मिळते. एका झाडाव्यतिरिक्त या ठिकाणचा माथा पूर्णतः सपाट आहे. पण,
शहराचे संपूर्ण रूप येथून पाहता येते. चढाई फक्त पंधरा मिनिटांची! सध्या या
टेकडीवर झाडे लावण्याचा उपक्रम केला गेलाय. अर्थात टेकडीला मल्टी-ट्री हिल
बनवलं जातंय. परंतु, यंदाच्या दुष्काळी उन्हाळ्यात तो कितपत यशस्वी यात
शंकाच आहे.








.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)




























































































































































































































































































































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.