http://ninadgaikwad.blogspot.com/search?updated-max=2011-07-12T12:18:00-07:00&max-results=3&start=15&by-date=false
अमृता सारखे अमृतसर :) :) - १
परीक्षा
संपल्या नंतर आम्ही उत्तर भारत फिरण्याचे ठरवले..! त्याचप्रमाणे परीक्षा
संपल्या संपल्या घाई घाईत आम्ही सगळी प्लानिंग अगदी काटेकोरपणे केली ! आणि
निघालो भारत शोधायला :) आमचा पहिला पाडाव होता पंजाब ! प्रस्तुत लेखात
आपल्याला पंजाब बद्दल काही गोष्टी आवर्जून सांगाव्याश्या वाटतात ! ३ दिवसांचा प्रवास करत करत आम्ही अमृतसर ला पोहचलो !
अमृतसर स्टेशन ला पोहचल्यावर
काय
सुंदर शहर..! त्याच्या सुंदर तेचे वर्णन करता करता माझा ब्लोग भरून जाईल!
खरेच एखादे शहर इतके सुंदर असू शकते याचा कधी प्रत्यय आला नव्हता !
आमचा सगळा मित्रपरिवार
धार्मिक वातावरणात रुजणारी माणसे अगदी मानाने देखील खूप चांगली आहे ! तिथे
पोचल्या नंतर आमचा प्लान होता "सुवर्णमंदिर " फिरण्याचा ! खरेच काय
सांगू.. इतकी सुंदर जागा भारतात असू शकेल असे वाटले नव्हते.. सर्व बाजूनी
पांढर्याशुभ्र इमारतींचे कवच असेले आणि मधोमध स्वच पाण्याचे तळे आणि
सुवर्णमंदिर ! आहा ! क्या बात है ! खरेच सुवर्णमंदिर ला जाऊन फक्त शरीर
नाही तर मन पवित्र होते!
मी सुवर्ण मंदिरा बरोबर
एखाद्या
चांगल्या कामासाठी काम करणारी पुष्कळ मनुष्ये तेठेय काम करताना मी बघितली!
त्यास पंजाबी भाषेत " लंगर" असे संबोधतात असे माझा पंजाबी मित्र मला
म्हणाला ! आम्ही मंदिरास संपूर्ण प्रदक्षिणा घातली तसेच त्या सरोवरात देखील
उतरलो ! २००६ साली आलेल्या रंग दे बसंती या चित्रपट हे सरोवर मी नीट
पाहीले होते . कारण त्यात त्या चित्रपटातील नायक सुद्धा त्यात स्नान
करताना दाखवले आहेत! आम्ही देखील त्या सरोवरातील पवित्र पाणी आमच्या
माथ्याला लावले व पुढे चालत राहिलो ! नंतर आम्ही पंजाब मधील सर्वात "शक्तिशाली" जागा पाहीले जिचे नाव आहे "अकाल तख्त " ..!
गुरुग्रंथ साहेब
आम्हास
सांगितल्या प्रमाणे तीठेय शिखांचा पवित्र ग्रंथ " गुरु ग्रंथसाहेब" ची
मुळप्रत ठेवण्यात आली आहे ! दर सायंकाळी ही प्रत सोन्याच्या पालखील घालून
वाजत गाजत सुवर्ण मंदिरात ठेव्यात येते! येथे फोटो काढण्यास परवानगी
नसल्याने आम्हास फोटो काढता आला नाही ! परुंतु
एकूणच मजा आली ! येथे २-२ तासांची रांग असते सुवर्ण मंदिरात दर्शन
घेण्यासाठी ! परंतु एकूणच वस्तू पवित्र आहे..! सामाजिक कार्यासाठी काम
करणारी भरपूर माणसे आहेत !
मी अकाल तख्त बरोबर
जाता
जाता खटकणारी एकाच गोष्ट वाटली ती म्हणजे मंदिर परीसतात खलिस्तानी
आतंकवादी " जर्णेल सिंग भिंद्रनवाले " याच्या भरपूर प्रतिमा दिसल्या ! हे
पाहून खूप वाईट वाटले.. आजही पंजाब मधेय भिन्दनवाले या न त्या रुपात जिवंत
आहे याचा प्रत्यय आला..! यावर तर कहर म्हणजे आम्ही एका दुन्कानात
"भिंद्रनवाले " याच्या नावाचा छातीवर लावण्याचा बिल्ला बघितला.. ! त्यावर
चक्क लिहिले होते " संत" भिंद्रनवाले ! हेय पाहून मला वाईट वाटले..!
आमचा सगळा मित्रपरिवार
पण
एकूण तो दिवस सुवर्ण मंदिर आणि परिसर पाहून सत्कारणी लागला..! पुढील
आयुष्यभर मला शुभ्र पाण्यात चकाकणारे सुवर्णमंदिर चे कळस कधी विसरता येणार
नाही हेय मात्र नक्की ! :) :) :)
अमृता सारखे अमृतसर :) :) - २

अमृता सारखे अमृतसर :) :) - २
शहीद उधम सिंग आज आपण बोलणार आहोत जालियानवाला बाग बद्दल . असा भारतीय आपणास शोधूनही सापडणार नाही ज्याला या घटने बद्दल काहीही माहिती नाही ! खरेच किती क्रूर घटना होती ! कशी घडली असेल..? कसे त्या शिपायांच्या बाहूत निष्पापांना मारण्याचे बळ आले असेल ! खरेच ..आज आपण त्या घटनेला भारतीय इतिहासातील सर्वात काळा दिवस मानतो..! आमच्या नशिबाने आम्हास या पवित्र अशा जालियानवाला बागेत जाण्याची संधी चालून आली ! या संधीचे मला खरेच सोने करून घ्यायचे होते !
हीच ती जालियानवाला बाग मागील लेख प्रमाणे सुवर्ण मंदिरा ची भेट घेऊन झाल्यानंतर आम्ही ठरल्या प्रमाणे जालियानवाला बागे कडे निघालो! सुवर्ण मंदिरा पासून २ मिनीटाचा रस्ता आपणास जालियानवाला बागे कडे घेऊन जातो ! इथे प्रवेश करण्या साठी मेटल डीटेकटर ची व्यवस्था केली आहे पण ते चालू स्थितीत नाही.. इथून आत गेल्यावर आपल्याला १ चिंचोळीशी गल्ली लागते .. खरेच खूप छोटीशी आहे हे गल्ली इथेय पोहोचल्यावर आपणास माहिती फाकल दिसतो कि " याच रस्त्यावरून ( गल्लीतून) जनरल डायर आपल्या सैनीकान समवेत आता आला होता.. " आणि अश्या रस्त्यातून आत आल्या वर आपल्याला प्रसिद्ध अश्या आजच्या हिरवळीने नटलेली जालियानवाला बाग दिसून येते..
जनरल डायर याच मार्गाने आला ! आता आपण आता आलो आहोत इथून उजवी कडे १ अमर ज्योत आहे जी सतत तेवत होती.. हे इथल्या शाहिदन साठी एक आठवण म्हणून तेवत ठेवली आहे . . आपल्या भारताचा इतिहासाचा अभ्यास करताना मला असे आढळून आले होते कि पंजाब मधे " सरदार भागत सिंग" येथे लहान पाणी आले होते आणि त्यांनी याच जालियानवाला बाघे ची माती आपल्या बाटली मध्ये भरून ठेवली होती ..जी त्यांना पुढे अतिशय प्रेरणादायी ठरली ! परुंतु आज या जागेचे रूप अगदी पालटून गेले आहे !
अमर ज्योत आता इथे डाव्या हाताला एक जागा आहे जिला शहिदी कुवा असे म्हणतात . जनरल डायर ने गोळी बार सुरे केल्यानंतर त्या पासून वाचण्यासाठी लोक या विहिरीत उडी मारू लागली !
शहीदी कुवा
नंतर या विहिरीतून अनेक शव बाहेर काढण्यात आले ! मी मोठ्या भक्तिभावाने या पवित्र जागेचे दर्शन घेतले! आज या बाघे च्या अगदी मधोमद शहीद स्म्रारक उभारण्यात आले आहे !
हाच तो शहीदी कुवा नंतर अजून २ जागा बघण्य सारख्या आहेत. इथेय एक मैला चा दगड लावला आहे ज्यावर लिहिले आहे कि लोकांना गोळ्या इथून चालवण्यात आल्या ! खरेच कधी गेलात टर त्या जागेवर उभे राहा..! आपल्याला कसे वाटेल याचे वर्णन करणे शक्य नाही ! जालियानवाला बाहेत आज गोळ्यांचे निशाण जतन करून ठेवले आहेत त्या दिवसाची आठवण म्हणून ! आम्हाला ते निशाण देखील बघायला मिळाले!

लोकांना येथून गोळ्या घालण्यात आल्या !
अंगावर काटा आल्या शिवाय राहवत नाही हे एवढे पाहून ! जाता जाता आता इथेय नवीन वाट केली आहे बाहेर जाण्या साठी ( पूर्वी एकः वाट होती म्हणून जनरल डायर ने गोळीबार केल्यावर कोणी पळून जाऊ शकले नाही ) आता या वाटेने बाहेर पडल्यावर तेथे १ छोटेसे संग्रालय आहे जेथे शहीद उधमसिंग ( ज्याने जनरल डायर ला मारले) त्याच्या अस्थी ठेवल्या आहेत..!

या जागेवर फोटो काढण्यास परवानगी नाही..! असे करत करत संपूर्ण बाग फिरलो आणि मनसोक्त फोटो काढले ..! एकूणच आधी सुवर्ण मंदिर आणि आता जालियान वाला बाग !
मजा येत होती.. हळू हळू पंजाब मला आवडू लागला होता ! आता शहीदाना वंदन काढून आमची पावले वल्ली होती भारत पाकिस्तान सीमे कडे..! म्हणजेच पुढील लक्ष " वाघा बोर्डर " ! (पुढील भाग )
आम्ही सगळे मित्र जालियान वाला बागेतील स्मारका जवळ !
अमृता सारखे अमृतसर - ३ ( वाघा बॉरडर )

आज आम्ही जाणार होतो अमृतसर पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असणार्या " वाघा बोर्डर" ला ! प्रत्यक्ष पाकिस्तान ! आजवर भारतात अनेक ठिकाणी फिरलो परंतु पाकिस्तान बघण्याची ( लांबून का होईनात) संधी मला मिळणार होती ! त्याचा मी पुरेपूर उपयोग करून घेणार होतो ! काय माहित परत कधी पहावयास मिळेल! आम्ही तेथे ( तसेच सुवर्ण मंदिरात ) जाण्यासाठी गाडी बुक केली होती ! यात आमच्या गाडी चा चालक "सुख" हा अतिशय मनमौजी तसेच उत्तर प्रकारे गाडी चालवण्यात माहीर असा होता ! वास्तविक तो त्याच्या स्वतःच्या व्यवसायाचा मालक होता .. परंतु माझा मित्र जसजीत च्या नात्यातला असल्याने तो आम्हाला अमृतसर फिरवण्यास आला ! त्याची तवेरा गाडी होती !
मधील प्रसिद्ध असा कुलचा ! अमृतसर मधील गोल्डन टेम्पल . दुर्ग्याना टेम्पल तसेच जालियानवाला बाग बघून आम्ही सगळ्यांनी मनसोक्त शॉपिंग केली.. तेथील प्रसिद्ध अश्या "कुलच्या" वर ताव मारला ! तसेच आता आम्ही बोर्डर कडे निघणार होतो ! जी.टी रोड ( ग्रांड ट्रंक ) आम्हास लागला होता ! अतिशय सुंदर रस्ता आहे .. हा पाहिल्यावर मुंबई पुणा एक्स्प्रेस हायवे चीच आठवण आल्या खेरीज राहत नाही !
वाघ प्रवेशद्वार( पाकिस्तान काही मीटर दूर)आता हळू हळू फलक दिसू लागले होते वाघा २२किलोमीटर...वाघा १९किलोमीटर... वाघा १२किलोमीटर... आणि मग वाघा चे बोर्ड जाऊन चक्क " लाहोर २२किलोमीटर" असे बोर्ड लागायला सुरवात झाली ! इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते.. अमृतसर पासून वाघाचे जेव्हढे अंतर आहे तेव्हडेच लाहोर पासून वाघा चे आहे ! आता आम्ही भारताच्या शेवटच्या स्टेशन कडे आलो ! " अटारी " भारताची शेवटची हद्द ! जिथवर भारताची रेल्वे जाते! गम्मत म्हणजे "वाघा " रेल्वे स्टेशन हे पाकिस्तानात आहे ! म्हणून भारताची शेवटची हद्द म्हणजे " अटारी" स्टेशन ( गदर चित्रपट मध्ये देखील अमिषा पटेल याच स्थानकावर सनी देओल ला भेटते ! ) तिथून आम्ही वाघा बोर्डर च्या प्रवेशद्वार पाशी आलो !
प्रत्यक्ष बॉरडरवर !३ वाजले होते आणि गेट ५ वाजता उघडणार होते॥ मग आम्ही आसपास चा परिसर पहिला.. मला जितके शक्य होईल तितके डोळ्यात साठवून घेत होतो ! तिकडे आम्ही "अमिर्चंद" नावाच्या हॉटेल मालकाच्या हॉटेल मधेय जेवलो.. मी पैसे देत असताना त्याचं कडे १ विलक्षण गोष्ट बघितली ती म्हणजे "पाकिस्तान ची नोट"! आपल्या नोटे च्या संग्रहात ठेवावी म्हणून मी ती चक्क ५० रुपयांना विकत घेतली ! आता ५ वाजले होते॥
पाकिस्तानी नोट ! माणसांची तुडुंब गर्दीतून आम्ही चालले होतो ! पंजाब पोलीस जागो जागी दिसत होते ! त्यात माझे मित्र जगदीप आणि जसजीत हे मस्ती करत होते.. आणि त्या गर्दीतून वाट काढीत आम्ही वागा बोर्डर च्या प्रवेशद्वार पाशी पोचलो ! तितक्यात तेथे बहुचर्चित " लाहोर बस" आली आणि गेली ! आता आवर चढू लागलो होतो आणि ..आणि.. मला पाकिस्तान दिसला !
भारतातील गर्दी( डावीकडील) व पाकिस्तानातील गर्दी(उजवीकडे )खरेच काही म्हणजे काहीच फरक नव्हता इथल्या आणि तिथल्या भूमीत माणसे सारखी त्यांचा दिसणे .. कपडे रस्ते मोटारी पोशाख सगळे काही सारखे ! फक्त मनात दुरावा ! आणि अश्या वातावरणात आम्ही पोचलो ! जवळ जवळ १०ते २० हजार माणसे वाघा बोर्डर ला आली असतील भारताच्या बाजूने .. तर पाकिस्तान च्या बाजूला १०० -१५० माणसेच दिसत होती ! संध्याकाळच्या परेडला तिथे फारसा उत्साह दिसत नव्हता ! तसेच आता देशभक्ती पर गाणी सुउरू झाली होती दोन्ही बाजूला !
प्रत्यक्ष पाकिस्तान! भारत झिंदाबाद .. पाकिस्तान झिंदाबाद असे एकमेकांच्या बाजूचे लोक ओरडत होते ! खरेच माझे लक्ष्य होते कि वाघा पलीकडे जास्तीत जास्त पाकिस्तान डोळ्यात सामावून घ्यावा ! तीठेय ४५ अंश तापमान होते अश्या गर्मीत ६:३० ला परेड सुरु झाली ! परेड मधेय सेनेचे जवान हे कसरती करत ..! तसेच तेथील गेट जोर जोरात आपटत असत ! आणि नंतर हेच सगळे काही पाकिस्तान च्या बाजूने देखील होत असे ! मला एका गोष्ट्चे कुतूहल वाटले पाकिस्तान आज पर्यंत एकही लढाई जिंकला नाही मग ते देशभक्ती पर गीत कसे म्हणत असतील!
प्रत्यक्ष पाकिस्तान! हा खोडकर विचार मनात आणत बाजूला नजर फिरली आता भारताचा एक सैनिक पाकिस्तानात गेला आणि पाकिस्तानचा एक भारतात आला त्याने दोन्ही झेन्द्याना प्रणाम केला आणि एकमेकांनी झेंडा खाली काढला ! अश्या प्रकारे हा कार्यक्रम संपला ! अश्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडला !
भारतात आपले स्वागत आहे ! परत येताना आम्ही जी।टी. रोड वरून अतिशय सुसाट वेगाने येत होतो॥ आमचा चालक सुख हा आपले गाडी चालवण्याचे कौशल्य आम्हास दाखवत होता ! जाता जाता मी तिथून पाकिस्तानातून भारतात आणलेला एक दगड या सहलीची आठवण म्हणून घेतला !गाडीत बसून विचार करत होतो की फक्त एका दिवसात पार पडलेली आमची हि सहल अतिशय यशस्वी झाली तसेच आता दुसर्या दिवशी हिमाचल प्रदेश मला खुणावत होते :) :)
हिमाचल कि ओर ! वाघा बोर्डर विषयी
१) भारताचा एक शिवाई पाकिस्तानात जातो तसेच तिकडचा इकडे येतो !
२) वाघा बोर्डर ला तिकीट नाही
३) ६:३० ला कार्यक्रम सुरु होतो !
४) शिवीगाळ ( पाकिस्तान बद्दल) करण्यास मना आहे !
५) १४ ऑगस्ट ला आपल्याला ( भारतातील लोकांना ) एका ठराविक अंतरा पर्यंत ( बहुदा कस्टम ची चौकी) पाकिस्तानात जाता येते !
६) आता तर उच्च हुद्द्या वरील दोन्ही कडेचे अधिकारी बिनदिक्कत कधीही बोर्डर पार ये-जा करतात !
७) २६-११ च्या नंतर निर्माण झालेल्या कटू संबंध नंतरही दोन्ही देशांची आयात निर्यात "वाघा " बोर्डर वरून सुरु आहे ( मी आणलेला दगड ! )
८) वाघा बोडेर हि बरतात असली तरी स्टेशन हे पाकिस्तानात आहे !
९) वाघा बोर्डर वर भारताची सीमा १८०अन्श आहे ( पहा गुगल अर्थ किवा पंजाब चा नकाशा )
१० ) जी टी रोड ची हद्द वाघा ला संपते ( भारत ) आणि वाघा ( पाकिस्तान पासून) चालू होते ते पुढे लाहोर पर्यंत!
११) वाघा बोर्डर ला च भारताचे शेवटचे पोस्ट ऑफीस आहे ( अटारी पोस्ट ऑफीस )
अमृतसर से लौटकर
| दुर्ग्याणा मन्दिर में पानी के बीच से बना मंदिर तक का रास्ता |
| दुर्ग्याणा मन्दिर |
| दुर्ग्याणा मन्दिर में लगी महावीर हनुमान की सुन्दर प्रतिमा |
| दुर्ग्याणा मन्दिर |
| दुर्ग्याणा मन्दिर में पानी के बीच से बना मंदिर तक का रास्ता |
स्वर्ण मंदिर , रात के समय में ! ये फ़ोटो इंटरनेट से ली गयी है !
|
स्वर्ण मंदिर
क्रमशः
अमृतसर से लौटकर पार्ट-2
इस यात्रा वृतान्त को शुरू से पढ़ने के लिए यहाँ क्लिक करिये !
![]() |
| जलियाँवाला बाग़ में स्थित शहीदी कुआँ |
![]() |
| जलियाँवाला बाग़ में स्थित शहीदी कुआँ |
![]() |
| जलियाँवाला बाग़ |
![]() |
जलियाँवाला बाग़ में आज भी गोलियों के निशान बाकी हैं |
![]() |
| जलियाँवाला बाग़ में स्थित स्मारक |
![]() |
| वाघा बॉर्डर पर भारत की महिला शक्ति |
![]() |
| वाघा बॉर्डर पर भारत की शान को दिखता वीर सैनिक |
![]() |
| वाघा बॉर्डर |
![]() |
| वाघा बॉर्डर पर पाकिस्तान के सैनिक से आँख मिलाता वीर सिपाही |
![]() |
| वाघा बॉर्डर पर भारत और पाकिस्तान के झंडे उतारते समय |
![]() |
| वाघा बॉर्डर पर भारत के वीर सैनिक ,परेड करते हुए |
![]() |
| यह दृश्य आँखों में समा जाता है |













No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.