Sunday, February 4, 2024

भटकंती – रामराज्यातील मंतरलेले क्षण

 
सामना ऑनलाईन

निमिष पाटगावकर  << npatgaonkar@yahoo.com >>

माझ्या हातावर प्रवासयोग दर्शविणारी रेषा आहे का, मला माहीत नाही, पण गेल्या तीस वर्षांमध्ये मला जी भटकंती करायला मिळाली ती बघता ही रेषा नक्कीच असावी. या सर्व भटकंतीत हेही प्रकर्षाने जाणवले की, काही ठिकाणी जायचा योग यावा लागतो. यातलेच एक ठिकाण म्हणजे श्रीरामजन्मभूमी अयोध्या. जेव्हा सर्व जग 22 तारखेला राममय झाले होते तेव्हा हा सर्व सोहळा बघताना दोन महिन्यांपूर्वीच मी बघितलेली अयोध्या नगरी डोळ्यांसमोर उभी राहिली. निमित्त होते हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यातल्या लखनऊला होणाऱ्या विश्वचषकाच्या सामन्याचे. हा सामना झाल्यावर लखनऊहून माझे परतीचे विमान दुसऱ्या दिवशी संध्याकाळी होते तेव्हा हाती असलेला हा दिवस कसा सत्कारणी लावायचा होता. लखनऊहून अयोध्याचे गुगलवर अंतर बघितले आणि ‘चलो अयोध्या’ करायचे ठरवले.

कुठच्याही हिंदू व्यक्तीला अयोध्येचे एक वेगळेच आकर्षण असते. लखनऊ फिरायला एक टॅक्सी मी केली होती. त्यालाच विचारले, “अयोध्या चलोगे?” अयोध्येला माझे सारथ्य करायला साजेसे असे रघुनंदन पाठक माझ्या टॅक्सी चालकाचे नाव होते. हिंदुस्थानात जी हमरस्ते  क्रांती झाली आहे, ती बघण्यासारखी आहे. अयोध्येपर्यंत उत्तम हायवे होता. जेव्हा आम्ही अयोध्येत पोहोचलो तेव्हा गाडीपाशी एक टुरिस्ट गाईड आला. मला गाईड आवडतात. कारण बहुतेक गाईड इतक्या कमी पैशांत मनोभावे त्यांचे काम करत असतात. एखाददुसरा अवलिया निघतो, पण तो अपवादच! अयोध्येत त्या पंपोशीत सात हजार मंदिरे आहेत तेव्हा नक्की काय पाहायचेपेक्षा न हरवता पुन्हा गाडीकडे कसे यायचे? हा मोठा प्रश्न होता.

रामदर्शनाच्या आधी रामसेवकाचे दर्शन घ्यायला हनुमान गढीच्या पायऱ्या चढून मारुतीरायापाशी गेलो. प्रभू रामचंद्र रावणवध करून अयोध्येला परतल्यावर हनुमान अयोध्येचे रक्षक म्हणून इथे वास्तव्याला होते. माझा गाईड आता रंगात येऊन मला रामायणाच्या काळात घेऊन चालला होता. बाजूला एक सुंदर महाल होता. त्याला राजद्वार महाल म्हणतात. त्या गाईडने मला सांगितले, या राजद्वार महालातून समोर या रस्त्यावरून राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न राजा दशरथाला भेटायला जात असत. मला ते सर्व डोळ्यांसमोर दिसायला लागले. या काल्पनिक दृश्यातून मी दशरथ महालात गेलो. दशरथ महालात गेल्यावर पहिले जाणवते ते या राजेशाही महालाचा राजा कसा राजेशाही थाटात राहत असेल! इथे रामाच्या आयुष्यातील तीन टप्प्यांच्या मूर्ती आहेत. लग्न करून आलेला राम, बालपणीचे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि वनवासातून आलेला राम. हा वनवास संपवून आलेला राम काळाराम रंगवला आहे.

इथून पुढचा टप्पा होता कनक भवन. त्रेतायुगात हे पूर्ण सोन्याचे भवन दशरथाने कैकयीसाठी बांधले होते.  कैकयीला आपण दुष्टपणाचे लेबल लावले आहे, पण जेव्हा नवी सून सीतामाई घरी आली तेव्हा उत्तर प्रदेशच्या प्रथेनुसार मूंह दिखाई म्हणून कैकयीने आपला हा सोन्याचा महाल सीतेला भेटच देऊन टाकला. इथे राम-सीता वास करतात असे अजूनही मानतात. इथे ज्या मूर्ती आहेत त्या फक्त राम-सीतेच्या. थोडक्यात, हा फार प्रायव्हेट महाल आहे जिथे हनुमान, लक्ष्मण वगैरे नेहमीच्या बरोबरच्या यशस्वी कलाकारांना प्रवेश नाही. माझा गाईड सांगत होता, आता साडेअकराला महाराजांचे भोजन झाल्यावर बंद होईल, तो चार वाजता उघडेल. रात्री नऊ वाजता हा बंद होतो. कारण प्रभू रामचंद्र इथे विश्रामाला येतात. इथे भरताने आणलेल्या रामाच्या पादुका ठेवल्या आहेत त्या चौथऱ्यावर डोके ठेवताना एक वेगळीच भावना सर्वांगातून वाहते. भर दुपारीही अतिशय शीतल आणि समाधानकारक स्पर्श त्या पादुकांत होता. एक मंद सुगंध असलेल्या त्या पादुकांची जागा वर्णन करायच्या पलीकडची आहे. ‘रामजन्मभूमी’ या शब्दाबरोबर श्रद्धा, संघर्ष, आनंद आणि अनेक भावना जोडल्या आहेत. आता प्राणप्रतिष्ठा झालेल्या रामलल्लाच्या मंदिराचे काम तेव्हा जोरात चालू होते. रामलल्ला राहत असलेल्या तात्पुरत्या जागेत विराजमान झालेल्या रामाचे दर्शन घेतले. तिथल्या रामजन्मभूमी न्यासासाठी देणगी द्यायला गेलो तर समोर कॉम्प्युटरवर रिसीट देणाऱ्या बाई पुण्याच्या मराठी निघाल्या. मला आश्चर्य वाटले, सरकारी बदलीपोटी पुण्यासारख्या शहरातून इथे येऊन राहायचे याचे. त्या पुण्याच्या बाईंना रोज रामाला भेटायचे भाग्य मिळत असले तरी नोकरीसाठी पुण्याहून अयोध्येला बदली हा त्यांना वनवास तर नसेल? हा विचार मला उगाच अस्वस्थ करून गेला. कुणी वनवास संपवून अयोध्येत येतो तर कुणी वनवासासाठी!

सीता की रसोई म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इथला भंडारा किंवा लंगर आहे. घर नसलेले किंवा घरातून घालवून दिलेले अनेक निराधार अयोध्येला येतात. ते राहतात त्या बॅरॅक्स मी नंतर बघितल्या आणि आयुष्याची अखेर रामाच्या चरणी होत असली तरी त्या तुटपुंज्या जागेत राहणे, सीता की रसोईत रोज जेवायला अवलंबून राहणे म्हणजे त्यांचाही आजन्म वनवासच आहे.

’शरयू तीरावरी अयोध्या मनूनिर्मित नगरी’ बघत बघत मी हळूहळू वास्तवात येत घडय़ाळाकडे बघितले. या रामराज्याची काही तासांची भेट आयुष्याला पुरेशी अशी होती.

रामलल्लाचे दर्शन घ्यायचे असेल तर मंदिरात प्रवेश करण्याची वेळ आणि तारीख घ्या जाणून

Monika Lonkar –Kumbhar

Ayodhya Ram Mandir : अयोध्येमध्ये मागील काही दिवसांपासून प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. त्यामुळे, एक वेगळाच उत्साह अयोध्येत पहायला मिळाला होता. नुकताच २२ जानेवारीला (सोमवारी) अयोध्येतील नवीन मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला.

हा सोहळा पार पडल्यानंतर आता भाविकांना प्रश्रू श्रीरामांचे दर्शन घेण्याची ओढ लागली आहे. हा सोहळा पार पडल्यानंतर आजपासून प्रभू श्रीरामांचे हे मंदिर सामान्य नागरिकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

जर तुम्हाला ही अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे दर्शन घ्यायचे असेल तर त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. हे दर्शन घेण्यासाठीची प्रक्रिया काय आहे? आणि दर्शन घेण्याची वेळ काय? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

रामलल्लाचे दर्शन कधीपासून घेऊ शकता?

नुकताच 22 जानेवारीला अयोध्येतील नव्या मंदिरात प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पार पडला. आजपासून अर्थात २३ जानेवारीपासून हे मंदिर आता सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे, भाविकांना आता प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता येणार आहे.

केवळ दर्शनच नाही तर भाविकांना आता प्रभू श्रीरामांच्या आरतीमध्ये देखील सहभागी होता येणार आहे. प्रभू श्रीरामांच्या या प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा पार पडल्यानंतर देशभरातील अनेक राज्यांमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला.

रामलल्लाच्या दर्शनासाठी लोकांची उत्सुकता पाहता अयोध्येत भाविकांची गर्दी होणार हे निश्चित आहे. रामजन्मभूमीवर हे मंदिर वसलेले असल्याने रामभक्तांसाठी या मंदिराचे महत्व अधिकच वाढले आहे. या मंदिरातील गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बालस्वरूपातील मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या मूर्तीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.

रामल्लाच्या आरतीची वेळ काय आहे?

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या अधिकृत वेबसाईटनुसार भाविक श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे दर्शन घेण्यासाठी सकाळी ७ ते ११:३०  पर्यंत येऊ शकतात. त्यानंतर, दुपारी २ ते ७ या वेळेत सायंकाळच्या दर्शनासाठी भाविक येऊ शकतात.

रामल्लाच्या दर्शनासोबतच तुम्ही प्रभू श्रीरामांच्या सकाळी आणि संध्याकाळी पार पडणाऱ्या आरतीमध्ये ही सहभागी होऊ शकता. पंरतु, यासाठी तुम्हाला पासेस बूक करावे लागतील. प्रभू श्रीरामांच्या आरतीसाठी मिळणारे पासेस मोफत आहेत. त्यासाठी, तुम्हाला आधी बुकिंग करून पास घ्यावा लागेल. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही या पासेसचे बुकिंग करू शकता.

ऑनलाईन पासचे बुकिंग तुम्हाला राम मंदिराच्या वेबसाईटवरून करता येईल आणि ऑफलाईन पद्धतीने बुकिंग करण्यासाठी तुम्ही प्रभू रामजन्मभूमीच्या कॅम्प ऑफिसमध्ये जाऊ शकता. यासाठी तुम्हाला वैध सरकारी ओळखपत्र दाखवावे लागेल. त्यानंतरच, तुम्हाला पास मिळेल.

प्रभू श्रीरामांच्या सकाळच्या शृंगार आरतीसाठी तुम्हाला एक रात्र आधीच बुकिंग करावे लागेल. तसेच, संध्याकाळच्या आरतीसाठी तुम्हाला अर्धा तास आधी मंदिरात जावे लागेल. जर तुमच्याकडे पास नसेल तर तुम्हाला मंदिरात प्रवेश मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे, रामल्लाचे दर्शन घेण्यासाठी आणि आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी पासचे बुकिंग करा आणि तुमचे सरकारी ओळखपत्र सोबत ठेवायला विसरू नका.

अयोध्येतील राम मंदिराजवळ आहेत आणखीही बरीच पर्यटन स्थळं, एका दिवसात होतील पाहून; जाणून घ्या

Aishwarya Musale

आज 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशभरातील जवळपास सात हजार लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे.

यानंतर अयोध्येत येण्याची तयारी अनेक लोकांनी केली आहे. राम मंदिर भक्तांना दर्शनासाठी 23 जानेवारीपासून खुले होणार आहे. लोकांच्या मनात भव्य राम मंदिर पाहण्यासाठी उत्सूकता दिसत आहे. अयोध्येत राम मंदिरासह, इतरही सुंदर ठिकाणे आहेत ज्यांना तुम्ही भेट द्यायलाच हवी. एका दिवसात ही सुंदर ठिकाणं पाहून होतील.

राम की पैडी

शरयू नदीच्या काठावर वसलेल्या 'राम की पैडी' येथे लाखो दिवे प्रज्वलित होत असताना दिवाळीत मोठा दीपोत्सव आणि लेझर लाइट शो तुम्ही टीव्हीवर पाहिला असेल. हे अयोध्येतील घाटांचे एक समूह आहेत, जेथे भक्त स्नान करतात.

नागेश्वर नाथ मंदिर

आपण राम की पैडी येथील नागेश्वर नाथ मंदिराला भेट देऊ शकता, असे मानले जाते की ते प्रभू रामाचे पुत्र कुश याने बांधले होते. शरयू नदीत आंघोळ करताना कुशचे बाजूबंद हरवले तेव्हा ते नागकन्याला सापडले, कारण ती मुलगी शिवभक्त होती, म्हणून कुशने येथे मंदिर बांधले होते.

कनक भवन

अयोध्येच्या रामकोटमध्ये बनवलेले कनक भवन या प्राचीन शहराच्या सर्वात सुंदर इमारतींपैकी एक आहे, असे म्हटले जाते की राणी कैकेयीने ही इमारत सीता मातेला तिच्या लग्नानंतर भेट म्हणून दिली होती.

जैन श्वेतांबर मंदिर

तुम्ही अयोध्येत आलात तर जैन श्वेतांबर मंदिरालाही भेट देऊ शकता. जैन धर्मातील अनेक तीर्थंकरांचा जन्म येथे झाला, म्हणूनच या धर्माच्या अनुयायांसाठी हे पवित्र स्थान आहे.

गुप्तर घाट

हा घाट शरयू नदीच्या काठावर आहे ज्याला घग्गर घाट असेही म्हणतात. फैजाबादजवळील हे प्रसिद्ध ठिकाण आहे. पूर्वी गुप्तर घाटाच्या पायऱ्यांजवळ कंपनीची बाग होती, जी आता गुप्तर घाट जंगल म्हणून ओळखली जाते. 

प्रभू श्रीरामांनी अयोध्या ते श्रीलंका कसा केला प्रवास? आजही पहायला मिळतात ती ठिकाणे!

Pooja Karande-Kadam

प्रभू श्रीरामांचा जन्मकाळ आज आहे. देशभरातील लाखो भक्त हा उत्सव साजरा करत आहेत. या दिवशी देशातील सर्वच मंदिरांमध्ये प्रभू श्री रामांचा जयजयकार होत आहे. श्री रामांचा जन्म अयोध्येत झाला तरी त्यांनी वनवासात केलेल्या भ्रमंतीमूळे अवघी भारतभूमीच त्यांच्या सहवासाने पावन झाली आहे.

श्री राम अयोध्या नगरीचे राजे होते. पण तरीही त्यांना वनवास भोगावा लागला होता. माता कौसल्याच्या हट्टापाई श्री राम, लक्ष्मणजी आणि सीता मातेला वनवासाला जावं लागलं. अयोध्येतून सुरू झालेला हा प्रवास श्रीलंकेमध्ये जाऊन संपला. भारतातील ज्या ज्या ठिकाणी श्रीरामांनी भ्रमण केलं त्या त्या ठिकाणी आजही त्यांच्या पाऊलखूणा आहेत.

आज रामनवमीच्या दिवशी त्याच ठिकाणांची सैर आपण करूया. प्रभू श्रीरामांची आणि जटायूची भेट कुठे झाली, ते प्रयागमध्ये नक्की कुठे होते? या अशाच प्रश्नांची उत्तरे आज जाणून घेऊयात.  

जनकपूर

जनकपूर हे राजा जनकाची कन्या सीतेचे जन्मस्थान असल्याचे म्हटले जाते. जनकपूर हे ठिकाण होते जेथे श्री रामांचा सीता मातेशी विवाह झाला होता. सध्याचे, जनकपूर हे काठमांडूपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे.

जनकपूरमधील पॅलेस

जनकपूरमधील पॅलेसesakal

प्रयागराज

पूर्वी अलाहाबाद म्हणून ओळखले जाणारे प्रयाग हे हिंदू धर्मातील महत्त्वाचे स्थान आहे. प्रभू श्री राम, देवी सीता आणि लक्ष्मण यांना १४ वर्षांच्या वनवासात पाठवण्यात आले. तेव्हा त्यांनी प्रयागमधीलच पवित्र गंगा नदी पार केली होती. प्रयागराज हे गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमाचेही ठिकाण आहे.

प्रयागराजमधील कुंभमेळा

प्रयागराजमधील कुंभमेळाesakal

चित्रकूट

चित्रकूट हे एक महत्त्वपूर्ण स्थान मानले जाते. याच ठिकाणी श्री रामांनी पिता दशरथ यांच्या मृत्यूची बातमी समजली होती. दशरथांच्या निधनाची बातमी घेऊन बंधू भरत रामचंद्रांच्या भेटीला आले होते. तेव्हा वनवास संपवून माघारी फिरण्याची विनंतीही भरत यांनी श्री रामांना केली होती. सध्याचे चित्रकूट हे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यांमध्ये वसलेले आहे आणि भक्तांसाठी भगवान रामाला समर्पित मंदिरांनी भरलेले आहे.

चित्रकूट धाम

चित्रकूट धामesakal

पंचवटी

पंचवटी येथे घडलेल्या घटनांनी भगवान राम, देवी सीता आणि लक्ष्मण यांचे जीवन बदलून गेले. म्हणून हे रामायणातील एक महत्त्वाचे स्थान असल्याचे म्हटले जाते. लक्ष्मणाने याच वनात शुर्पणखाचे नाक कापले होते. त्या बदल्यात रावणाने देवी सीतेचे येथून अपहरण केले होते. पंचवटीला नाशिक म्हणून ओळखले जाते आणि ते महाराष्ट्रात आहे. तुम्ही येथील लोकप्रिय पंचमुखी हनुमान मंदिरालाही अवश्य भेट द्या.

पंचवटी

पंचवटीesakal

अशोक वन    

रावणाने देवी सीतेचे अपहरण करून त्यांना श्रीलंकेत नेल्यानंतर सीतामातेने रावणाच्या महालात राहण्यास नकार दिला. त्या अशोकांच्या झाडाच्या वनात राहू लागल्या. म्हणून तिला अशोक वाटिका असे म्हणतात. सध्या हे ठिकाण श्रीलंकेच्या नुवारा एलिया शहराजवळील हकागाला बोटॅनिकल गार्डनमध्ये असल्याचे सांगितले जाते.

अशोक वाटीका

अशोक वाटीकाesakal

रामेश्वरम

भारत आणि लंकेला जोडणारा रामसेतू याच ठिकाणी उभारण्यात आला होता. लंकेत जाण्यासाठी भगवान रामाच्या वानरांच्या सैन्याने रामेश्वरम येथे राम सेतू बांधला. सीतेने लंकेहून परतल्यावर येथे शिवलिंग बांधले असे मानले जाते. रावणाचा वध केल्यानंतर भगवान रामानेही येथे शिवाची प्रार्थना केली होती.

रामेश्वरम धाम

रामेश्वरम धाम

राम मंदिराच्या दर्शनाला जाताय ? फक्त अयोध्येतच चाखता येतील 'हे' खास स्ट्रीट फूड

Monika Lonkar –Kumbhar

Street Foods In Ayodhyaesakal

Street Foods In Ayodhya : अयोध्येमध्ये मागील काही दिवसांपासून प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापणेची जय्यत तयारी सुरू आहे. अयोध्येमध्ये २२ जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची नवीन मंदिरात प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. त्यामुळे, सध्या अयोध्येमध्ये एक वेगळाच उत्साह पहायला मिळत आहे.

या राम मंदिराच्या प्रतिष्ठापणा सोहळ्याला राजकारणापासून ते क्रीडा, मनोरंजन आणि अध्यात्मातील अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत. या व्यतिरिक्त ५५ देशांमधील सुमारे १०० विशेष लोकांनाही या सोहळ्याची खास आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.

अयोध्या नगरी ही केवळ राम मंदिरासाठी प्रसिद्ध नाही तर येथील खाद्यपदार्थांसाठी देखील प्रसिद्ध आहे. एकदा जर तुम्ही येथील खाद्यपदार्थांची चव चाखली तर ही चव तुम्ही कधीच विसरणार नाही. मग, ते चाट असो किंवा जिलेबी.

अयोध्येत आल्यानंतर, येथील खास मसाल्यांनी बनवलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याशिवाय अयोध्येचा प्रवास हा पूर्ण मानला जात नाही. त्यामुळे, आज आपण अयोध्येतील खास स्ट्रीट फूड्सबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुम्ही अयोध्येला जाण्याचा विचार करत असाल तर तिथे गेल्यावर हे स्ट्रीट फूड्स खायला विसरू नका.

दाल कचोरी

दाल कचोरी आणि पूरी हा अयोध्येतील लोकांचा सकाळचा आवडता नाश्ता आहे. या दाल कचोरीमध्ये विविध प्रकारच्या भाज्या आणि कडधान्यांचा समावेश असतो. अयोध्येमध्ये मूग आणि उडीद डाळ यांच्यापासून बनवलेली कचोरी खूप प्रसिद्ध आहे. ही कचोरी चटणी किंवा भाजीसोबत खाल्ली जाते. या कचोरीची चव अतिशय अप्रतिम लागते.

दाल कचोरी

दाल कचोरी

ही स्पेशल कचोरी खाल्ल्यानंतर पोट लवकर भरते. मात्र, तुमचे मन लवकर भरत नाही. त्यामुळे, अयोध्येत गेल्यावर या खास दाल कचोरीचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

चाट

उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये चाट विशेष लोकप्रिय आहे. या राज्यातील विविध शहरांमध्ये चाटचे विविध प्रकार पहायला आणि चाखायला मिळतात. अयोध्येतील चाटची देखील खासियत आहे. ही खासियत म्हणजे अयोध्येमध्ये मिळणाऱ्या चाटसोबत गोड-आंबट चटणी, मसालेदार चणे, कोथिंबीर आणि इतर मसाल्यांचा वापर केला जातो. यामुळे, चाटची चव देखील वाढते.

चाट

चाट

हे खास प्रकारचे चाट खाण्यासाठी संध्याकाळच्या वेळी स्टॉल्सवर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होते. हिवाळ्यात हे खास प्रकारचे चाट खाण्याची मजा काही औरच असते. तुम्ही अयोध्येत गेल्यानंतर येथील चाटचा आस्वाद नक्की घ्या.

रबडी

ज्या लोकांना गोड खायला आवडते. त्यांच्यासाठी अयोध्येमध्ये गोड पदार्थांचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. साखरेच्या पाकात बुडवलेली जिलेबी असो किंवा तोंडात विरघळणारे मऊ लाडू असो. येथे तुम्हाला मिठाईंचे भन्नाट ऑप्शन्स मिळतील.

रबडी

रबडीPicasa

लाडू, जिलेबी आणि विविध प्रकारच्या मिठाईंसोबत येथील स्पेशल रबडी खायला विसरू नका. अयोध्येतील स्पेशल रबडी सुप्रसिद्ध असून या रबडीमध्ये विविध प्रकारच्या ड्रायफ्रूट्सचा आणि केशरचा वापर केला जातो. त्यामुळे, या रबडीची चव खास असते. अयोध्येत गेल्यावर ही रबडी चाखायला विसरू नका.

दही भल्ले

अयोध्येत गेल्यावर येथील दही भल्ले खायला अजिबात विसरू नका. या दही भल्ल्यांची चव इतकी अप्रतिम आहे की, तुम्ही या दही भल्ल्यांची चव विसरूच शकणार नाही. हे दही भल्ले डाळींपासून बनवले जातात.

दही भल्ले

दही भल्ले

यासाठी विविध प्रकारच्या डाळींचा वापर केला जातो. या वड्यांमध्ये दह्याचा वापर करून ते गोड-आंबट चटणीसोबत खाल्ले जातात. अशा प्रकारचे चविष्ट दहीभल्ले तुम्हाला अयोध्येतील प्रत्येक गल्लीमध्ये चाखायला मिळतील.

विशेष म्हणजे अयोध्येतील या स्ट्रीट फूड्स आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजण्याची गरज पडणार नाही. कमी पैशांमध्ये तुम्ही येथील स्ट्रीट फूड्सचा आस्वाद घेऊ शकता.

सीता मातेचे स्वयंपाकघर आजही जसेच्या तसे आहे, तुम्ही पाहीलंय का?

Pooja Karande-Kadam

Sita Rasoi in ayodhya esakal

Sita Rasoi :

सीता मातेचे स्वयंवर झालं आणि ते अयोध्येला आले. तेव्हा श्री रामांना वनवासाला जावं लागलं त्यांच्यासोबत सीता आणि लक्ष्मण सुद्धा गेले. तिथे रावणाने सीतेचे हरण केले त्यानंतर वानरसेना बणवून श्रीरामांनी सीतामातेला सोडवून अयोध्येत आणले. 

१४ वर्षांचा वनवास भोगून प्रभू श्रीराम अयोध्येला परतले. श्रीरामांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरीने दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते. त्या दिवसापासून दिवाळी साजरी करण्याची प्रथा रूढ झाली असे पुराणांमध्ये सांगितले जाते. 

रामायणातील काही प्रसंगांच्या पाऊलखूणा आजही सापडतात. उत्तर प्रदेशातील मंदाकिनी नदीच्या काठावर असलेले चित्रकूट धाम हे असे स्थान आहे जिथे माता सीतेने आपला बहुतेक वेळ घालवला होता. या धाममध्ये माता सीतेचे स्वयंपाकघर आहे, जिथे माता सीता स्वयंपाक करायच्या. इथे त्या महर्षी ऋषींना भोजन द्यायच्या.  

चित्रकूट धामचा इतिहास हजारो वर्षे जूना आहे. लाखो भाविक येथे भगवंताच्या दर्शनासाठी येतात. येथे कामद गिरी नावाचा पर्वत आहे, जो कोणी या पर्वताला प्रदक्षिणा घालतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते.

या ठिकाणी तुम्हाला भारत मिलाप मंदिर देखील पाहायला मिळेल. हे ते ठिकाण आहे जेव्हा वनवासात असताना बंधू भरत यांनी श्रीरामांना वनवास सोडून परत या आणि अयोध्येची गादी सांभाळा, अशी विनंती केली होती. परंतू श्रीरामांनी राजतंत्र नाहीतर एका मुलाने पित्याला दिलेले वचन पाळले. आणि वनवासाचा काळ पुर्ण करूनच ते अयोध्येला परतले.

सीता मातेचे स्वयंपाकघर

सीता मातेचे स्वयंपाकघरesakal

येथे एक मंदिर आहे ज्यावर सीता रसोई असे लिहिलेले आहे. माता सीता येथे स्वयंपाक करायच्या. या मंदिरात सिता मातेची पोळपाट लाटणे, चूल, इतर मातीची भांडी आहेत. हे मंदिर रामजन्मभूमीच्या उत्तर-पश्चिम भागात आहे. मंदिरात तुम्हाला भगवान राम, माता सीता यांच्यासह लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न आणि त्यांच्या पत्नींची छायाचित्रेही पाहायला मिळतील.

या मंदिरात तुम्हाला स्वयंपाकघरातील भांड्यांमुळेच लोक या मंदिराला मातेचे स्वयंपाकघर मानतात. इथे भेट देऊन इतिहासातील हा ठेवा पहायला लोक उत्सुक असतात. खास करून महिला वर्गात याचे आकर्षण आहे. माता सीता साक्षात देवीचेच रूप, त्यांचा स्पर्श झालेल्या या भांड्याचे आशिर्वाद घेऊन आपणही अन्नपुर्णा होऊ अशी महिलांची भाबडी इच्छा असते.

या गाभाऱ्यात स्वयंपाकातील रोजच्या वस्तू जतन करण्यात आल्यात

या गाभाऱ्यात स्वयंपाकातील रोजच्या वस्तू जतन करण्यात आल्यात esakal











No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...