Thursday, February 15, 2024

Viarbh Darshan Facebbok page 5












 Shri Chakradhar Swami Temple, Barshitakali, Akola
One of the three ancient temples located at Barshitakali is the place of the Mahanubhav cult which is pious by the touch of Shri Chakradhar Swamy. The construction of the temple is in black rock and appears in the twelfth century.
On 19 October 1268, Sarvagya Shri Chakradhar Swami had come to Barshitakali from Paithan on his way to Riddhapur from Patur. He had one night stay in Uttarshwar temple. They left for Yelvan the next day.
(Photo - Minesh Wasnik)

Photos of two ancient temples in Kothali, Buldhana from 1871
(Photo - Robert Gill)
(Courtesy - British Library)





मुसलमानांनी सगळे खांब उखडून टाकून तेथील जमीन धनासाठी उकरली आणि पुरातत्व विभाग काहीच पहायला तयार नाही आणि अशीच परिस्थिती मेहकर मधील पैनगंगेची आहे .राजकारणी स्वतःचे बंगले बांधत आहेत .नदीच्या पात्रात घरे बांधत आहेत. जी नदी मेहकर ची शान आहे तिचं अस्तित्व च नष्ट केले या राजकारण्यांनी. मेहकरात पाणी टंचाई आहे तेंव्हा या नदीचा उपसा करायचे सोडून तिथे काही धन सापडते का ते पाहतात राजकारणी आणि कागद पत्रात दाखवतात नदीच उपसा झाला आहे पण प्रत्यक्षात तसे काहीच नाही झाले आहे. मी स्वत: या मोठ्या लोकांशी बोलले आहे पण ते माझ्यासारख्या सामान्य व्यक्तिला काय मदत करणार बदमाश आहेत हे सर्व राजकारणी लोकं

Photo of the ancient temple at Mehkar, Buldhana from 1865
(Photo - Robert Gill)
(Courtesy - British Library)

हे मेहकरच्या मढ नावाच्या वास्तूचे फोटो आहेत. हे मंदिर नसून ही तत्कालीन यज्ञशाळा होती. हे पैनगंगेच्या काठावर आहे.
१८६५ साली ही वास्तू खूपच सुस्थितीत होती, असे या फोटोंवरून दिसते.
आज या वास्तूची खूप पडझड झालेली आहे. काहीच अवशेष शिल्लक आहेत. मात्र आता पुरातत्त्व खात्याचा चौकीदार हजर असतो.


Space Parshwanath Pavali Jain Temple, Shirpur, Vashim Temple's photo from 1871
(Source - MERE. PIX )











 Markandeya Shiva Temple, Amgaon Mahal, Gadchiroli
Ancient Hemadpanthi Temple is counting the last elements at Amgaon (Mahal) in Chamorshi taluka of Gadchiroli district. The construction style of this neglected temple is similar to the Markanda temple. Amgaon Mahal is a village 17 km away from Markanda temple. The temple has fallen a lot. The zudpie fellows have grown on it. The Archeology Department needs to pay attention to this.
(📷- Mayur Polojwar, Wikimedia)




दैत्यसूदन मंदिर
यज्ञेश्वर मंदिर

लिंबी बारव

अन्नछत्र धर्मशाळा
मोर महादेव मंदिर
रामगया मंदिर
धार मंदिर/गोमुख

पापहरेश्वर मंदिर आणि लोणार सरोवर

 Photos of temples in lonar, Buldhana in 1860:
Photographer - Robert Gill
Courtesy - British Library Website














Ancient Shiva Temple, Talegaon Talatule, Hinganghat, Wardha
(Photo - Dr. Lovely Naranje)


Ancient statue found while digging in Kundanyapur
An ancient statue carved on a stone was found digging into a house adjacent to the Mata Rukmini temple in Kundanyapur with historical importance. Shobhatai Babanrao Dambe is the name of the owner of the house. It is said that these idols belong to Brahma-Vishnu-Mahesh gods.
Shri Kshetra Kundanyapur in Tivsa taluka, the ancient capital of Vidarbha, Mata Rukhmini along with Panchasati's mother and Kulaswamini Ambika's Shaktipeeth, has ancient history and we can see its proofs in great books like Mahabharata.
Along with that, we can see many goods and material property even today at Kundanyapur. The Archaeology Department has done research several times and some evidence has also been found, now another evidence has come forward and an ancient statue has been found within 5 feet while construction is underway at the house of Shobhatai Babanrao Dambe, located near Shri Rukmini Mata's main temple at Kundanyapur.
The Sadar idol is made from continuous rock and replica of three gods are engraved in this rock. Information about this has been given to the Archaeology Department and this statue is currently organized by Dambe family members at the Shiva temple nearby.
While digging in the area of the house, the workers found a similar three-faced statue carved on a single stone. We have kept this idol in the Shiva temple for darshan after worshiping it. A similar statue had come out before too.
- Shobhatai Dambe, home owner.
Historical remains are found if you dig anywhere in the area of this Kundanyapur land which has ancient history. We have instructed them regarding the Archaeology department preserved the statues and other remains found on the ground.
-Atul Thackeray, the trustworthy of the temple.
Courtesy - Sakal

कौंडण्यपूरात खोदकाम करताना आढळली प्राचीन मूर्ती

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या मंदिराला लागूनच असलेल्या एका घरात खोदकाम करताना दगडावर कोरलेली प्राचीन मूर्ती आढळून आली. शोभाताई बबनराव डंबे असे घर मालकाचे नाव आहे. या मूर्ती ब्रम्हा-विष्णू-महेश देवतांची असल्याचा सांगण्यात येते.

विदर्भाची पुरातन राजधानी, माता रुख्मिणी सह पंचसतीचे माहेरघर व कुलस्वामिनी अंबिका मातेचे शक्तिपीठ असलेल्या तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र कौंडण्यपूरला प्राचीन इतिहास लाभलेला असून त्याची प्रचिती व पुरावे आपल्याला महाभारत यासारख्या महाग्रंथामध्ये पाहायला मिळतात.

त्याचबरोबर कौंडण्यपूर येथे सुद्धा अनेक वस्तू व साहित्य संपदा आजही आपल्याला दिसून येते. याठिकाणी अनेक वेळा पुरातत्त्व विभागाने संशोधन केले असून काही पुरावे सुद्धा आढळले आहे, अशातच आता आणखी एक पुरावा समोर आला असून कौंडण्यपूर येथे श्री रुक्मिणी मातेच्या मुख्य मंदिराला लागूनच असलेल्या शोभाताई बबनराव डंबे यांच्या घरी बांधकाम सुरू असताना ५ फुटाच्या दरम्यान एक प्राचीन मूर्ती आढळली आहे.

सदर मूर्ती अखंड पाषाणापासून तयार केलेली असून तीन देवतांच्या प्रतिकृती या पाषाणामध्ये कोरल्या गेल्या आहे. याबाबतचती माहिती पुरातत्त्व विभागाला देण्यात आली असून सध्या ही मूर्ती जवळच असलेल्या शिवमंदिर येथे डंबे कुटुंबीयांनी विधिवत पूजा अर्चना करून ठेवली आहे.

घराच्या परिसरात खोदकाम सुरू असताना मजुरांना एकाच दगडावर कोरलेल्या अशाच तीन मुखाची मूर्ती आढळून आली. आम्ही त्याची विधिवत पूजा करून ही मुर्ती शिव मंदिरात दर्शनासाठी ठेवली आहे. या आधी सुद्धा अशीच मूर्ती निघाली होती.

- शोभाताई डंबे, घरमालक.

प्राचीन असा इतिहास असलेल्या या कौंडण्यपूर भूमीच्या परिसरात कुठेही खोदकाम केल्यास ऐतिहासिक असे अवशेष आढळून येतात. जमिनीत आढळून आलेल्या मूर्ती व इतर अवशेष हे पुरातत्त्व विभागाने सांभाळून ठेवल्या असून याबाबत आम्ही त्यांना सूचना दिल्या आहेत.

-अतुल ठाकरे, मंदिराचे विश्वस्त.

सौजन्य - सकाळ




Famous Gilawada of Amravati
Ram, Laxman and Sita
Place - Baradwari Paihir, Pawani, Amravati











Punyeshwar Temple, Phulsavangi, Mahagaon, Yavatmal
(Photo - Pradip Sonune)


All the doors of Ayodhya Ram temple are made from teak wood near our Alapalli in Vidarbhat. This is considered the best in the country.
(Photo - Satish Ansingkar)









Ancient statue of Lord Shri Ram, Balapur, Akola
(Photo - Kishor Wankhade)


Ancient Kalaram Temple, Vani, Yavatmal
Vani in Yavatmal district is historic city pious by the touch of Lord Ramchandra. Shri Ram had gone to South India from Vani which was a part of the penalty while he was in exile. Ram temple was established here due to their company for some time. The temple is ancient and is constructed in black rock. Before entering the assembly hall in the temple, there was a view of the beautiful idols of Shri Ganesh and Hanuman. The assembly is located on the stone pillar. Jai Vijay Dwarpal is at the door branch of the womb. An ancient inscription carved on the right side of the Dwarbranch. Ram Sita's beautiful tempting statue in the womb. Along with Lakshman, Bharat, Shatrughan, Hanuman also have idols.













Lord Shriram Temple, Ramtek, Nagpur
When Lord Shri Ram was in exile, he stayed at this place for some time. So this place was named Ramtek. 55 k from Nagpur. Me. This city upstairs is so beautiful. There is a high mountain east of the city, on which there is a 600 years old temple of Lord Shriram. This is a very panoramic view of the surrounding areas. There is a huge Nandi in the Ram temple area and ancient temple of Shri Ganesha. Here Senagan of Shrirama means free communication of monkeys. Nagpurkar Bhosale's special weapons are stocked in this temple. This temple fills Tripurari Pournima Yatra in Kartik month. Tripur is lit on the high kalsa at 12 o'clock in the night.
E. S. Ramtek area was under the captaincy of Maurya rulers in 250. Pravarpur (current Mansar) was an important place during the seven vehicles. E. S. Wakataks took over power by making their defeat in 350. It is understood that Kalidas became Kalidas during the same time. A classy artwork in Sanskrit poem is 'Meghdoot'. Kavikulguru Kalidas has written this poem in the same Ramtek area. In 1970-1971, in Ramtek Gadmandir area, Maharashtra government created 'Kalidas Memorial'. Sanskrit University is opening here in the name of this Kalidas. Kalidas Mahotsav is celebrated every year at this place.
Close up, Totladoh is the dam. Wakatak-era city fort, south of Ramtek, was its capital.






































श्री राम मंदिर, अयोध्या, उत्तर प्रदेश





Sita Nhani Cave, Dongargaon (Shankarpur), Chimur, Chandrapur
A cave of mother Sita is carved on a deckdi near Dongargaon in Chimur taluka of Chandrapur district, five km from Muktai. The local cave is known as the leaf bath (bathing location). The statue of mother Sita has been installed inside the cave.
(Photo - Muktai Waterfall)




















Cave of Mahakaya stones, Taluka. Dhanora, Dist. Gadchiroli
(Photo - Rahul Sarkar)





पुरातन शिव मंदिर, देऊळवाडा, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील ऐतिहासिक संदर्भ असलेले देऊळवाडा गाव. येथे एका टेकडीच्या पायथ्याशी पुरातन शिव मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम बाराव्या शतकातील असावे. मंदिराचे फक्त गर्भगृह अस्तित्वात आहे. सभागृह काळाच्या ओघात नष्ट झाला असावा. सध्या सिमेंट बांधकाम केलेला नवीन सभामंडप समोर बांधलेला आहे. येथे पुरातन गणेश प्रतिमा, नृसिंह प्रतिमा आणि इतर स्त्री प्रतिमा दिसून येतात.
टेकडीच्या वर आणखी एक भवानी मातेचे पुरातन मंदिर आहे. नामशेष झालेला देऊळवाड्याचा किल्ला आहे आणि बर्याच लेण्या कोरलेल्या आहेत. त्यामुळेच या टेकडीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. इतिहासाची आवड असणाऱ्यांनी एकदा तरी या टेकडीला भेट द्यायलाच हवी.
(Photo - Amit Upadhye)





































Lingeshwar Temple, Linga (Devkhed), This ancient Lingeshwar Mahadev temple is located in a small village of Linga on the banks of the Purna river in Sindkhed Raja taluka in Buldhana district. The construction of the temple is seen in the twelfth century. The temple has been restored a few years ago. Here was an ancient barav that has been extinguished. The month of Shravan and Mahashivaratra is celebrated with enthusiasm. (Photo - Nitin Patil)



पुरातन शिव मंदिर, डोमरुळ, ता. + जि. बुलढाणा

पुरातन सुर्य मुर्ती, भद्रावती, चंद्रपूर
(Photo - Satish Lanjewar)
















जगदंबा देवी मंदिर, नागरतास, वाशिम
मालेगांव तालुक्यातील नागरतास परिसरातील शेत नागरतांना दशरुजी घुमशे यांना 500 वर्षांपूर्वी जगदंबा देवीची काळ्या पाषाणातील कोरीव मूर्ती नागराच्या तासामध्ये सापडली होती. त्यांनी गांवाच्या ईशान्येला मंदिर बांधून जगदंबा देवी मूर्तीची स्थापना केली. नागराच्या तासामध्ये मुर्ती सापडल्या मुळे गावाचे नाव नागरतास असे पडले. या मंदिरात नियमित विविध धार्मिक उपक्रम राबविले जात असतात.








निसर्गाला किंवा ईश्वराला ‘थँक्यू’ म्हणण्याचा विधी "आठवीची पूजा"
निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. त्याच्या प्रती आपणही कृतज्ञता अनेकदा व्यक्त केली पाहिजे. आणि करतोही त्यातूनच अनेक कृतज्ञतेचे सोहळे आलेत. त्याचेच पुढे सण झालेत. आठवीची पूजा म्हणतात, तोही त्यातलाच प्रकार. निसर्गाला किंवा ईश्वराला ‘थॅंक्यू’ म्हणण्याचाच जणू हा विधी आहे. अष्टमीला केली जाणारी पूजा म्हणजे आठवी, आज ही पूजा अनेक ठिकाणी साजरी झाली. त्यासाठी बाजारातही संबंधित पूजासाहित्याची खरेदी दिवसभर चालली.
दसरा आणि दिवाळीच्या मध्ये ही पूजा होते. त्यामागे अनेक लोककथा, दंतकथा आहेत. भारतात शेती संपन्न आहे. या शेतीसंस्कृतीतून अनेक सण आलेत. आठवीची पूजा ही देवीची पूजा मानली जाते. काहीजण ही लक्ष्मीही मानतात. अश्विन महिन्यातील कृष्ण अष्टमीला ही पूजा होते.
एरवी शेतातून पिकं घरात आलेली असतात. या पिकांचीही पूजा या निमित्तानं करतात. पूर्वी ज्वारी हे मुख्य पीक होतं. त्याचेच पदार्थ खाण्यात असायचे. त्यामुळे पिढ्यानपिढ्या या पूजेत ज्वारीचंही महत्त्व आलं. ज्वारीच्या कण्यांची आंबील यावेळी केली जाते. लोककथांनुसार कुंती आणि गांधारीने ही पूजा केली असं सांगतात.
आपली माता कुंती ही पूजा करीत आहे, हे अर्जुन पाहतो. आपल्या आईसाठी तो देवी अथवा इंद्राला प्रसन्न करतो. इंद्र आणि ऐरावत पृथ्वीवर येतात. त्या ऐरावत हत्तीवर बसून कुंती प्रसाद वाटते. या दिवशी अनेकजण आपापल्या देवतांची पूजा करतात.
कालानुसार विविध देवता वाढलेत. काही कमी झालेत. एकंदरीतच हा कृषीसंस्कृतीतला महत्वाचा सोहळा आहे. विशेषतः हा विदर्भातच होतो. दिवाळीच्या स्वागतासाठी सगळेच सज्ज होतात. आपल्या ईश्वराला, निसर्गाला थँक्यू म्हणण्याचाच हा सोहळा आहे.
(माहिती - सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती)










मल्लिकार्जुन मंदिर, दिग्रस, यवतमाळ
दिग्रस येथून वाहणाऱ्या दवंडा नदीच्या काठावर मल्लिकार्जुन महादेव संस्थान या नावाने प्रसिद्ध असलेले शिवाचे प्राचीन मंदिर आहे. काळ्या पाषाणातील बांधकाम असलेले हे मंदिर बाराव्या शतकातील आहे. मंदिराच्या शेजारी ब्रह्मानंद स्वामींचे मंदिर आहे. त्यांचे अनुयायी डिसेंबर महिन्यात त्यांच्या जयंतीनिमित्त जमतात. हे 7 दिवस चालते आणि पालखी (मिरवणूक) सह समाप्त होते.







गजलक्ष्मी प्रवेशद्वार, भटाळा, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील भटाळा या ऐतिहासिक गावात हे प्राचीन प्रवेशद्वार स्थित आहे. ज्यावर गजलक्ष्मी कोरलेली आहे. हे प्रवेशद्वार राजा जगदेव परमार यांच्या किल्ल्याचे होते असे सांगण्यात येते. किल्ला नष्ट झाला असून सध्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे प्रवेशद्वार म्हणून या द्वाराचा उपयोग केला जातो.
दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !! 





Ancient Jagdamba Mata Temple, Pusad, Yavatmal


खोलेश्वर मंदिर, पुसद, यवतमाळ






राजेश्वर मंदिर, राजेगाव, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील राजेगाव येथील पुरातन शिव मंदिर राजेश्वर महादेव म्हणून ओळखले जाते. मंदिराचे बांधकाम बाराव्या शतकातील दिसून येते. रंगरंगोटी आणि टाईल्समुळे मंदिराचे काळ्या पाषाणातील सौंदर्य झाकले गेले आहे. कळस आणि समोरील सभागृह बांधकाम अलीकडील आहे.
(Photo - Gajanan Avhale)

























Kapileshwar Temple, Satefal, Yavatmal
This small village of Satephal in Ner Parasopant taluka of Yavatmal district. Two ancient temples exist here. Kapileshwar temple has a hall with Gabhara, assembly and new construction. There is a very decent and certified Muralidhar statue in the deep. This is a twisted roof with a great model of Yadav-era architecture in which pictures representing Krishna are playing flute along with Gopi and Gurans. The peaks of the temple are well preserved.
(Photo - Rahul Deshmukh)




















कोंडेश्वर मंदिर, कोंडाळा झामरे, वाशिम
वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील कोंडाळा झामरे येथे निसर्गरम्य परिसरात वसलेले पुरातन कोंडेश्वर शिवालय. मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले असून रंगकाम केल्यामुळे ते दिसून येत नाही. मंदिरात दोन नंदी आहेत. मंदिराशेजारी आणखी एक पुरातन मंदिर आहे ते नरकेश्वर म्हणून ओळखतात. मंदिराच्या समोर एक भव्य बारव आहे. मंदिराच्या मागील बाजूस आणखी एक गोलाकार बारव आहे.


जगदंबादेवी शांती उत्सव, (मोठी देवी) खामगाव, बुलढाणा
संपूर्ण भारतामध्ये एकाच ठिकाणी म्हणजेच बुलढाणा जिल्हयातील खामगाव येथील अनेक वर्षापासून जगदंबेचा शांतीउत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, जगदंबा उत्सव ची सुरवात कोजागिरी पासून केली जाते. देवीच्या उत्सवाची सुरुवात १६०८ मध्ये सुरु झाली, नवराञात नऊ दिवस दैत्यांशी युध्द केल्यानंतर तिचा क्रोध शांत हाण्यासाठी हा शांतीउत्सव, या देवीला मोठी देवी देखिल म्हणतात. क्रोधा मुळे चेहरा लाल रक्तवर्ण आहे. देवीचे मुळ ठाणे तेलंगणा मध्ये बोधन येथे आहे. पण आई चे भक्त खामगाव ला स्थायिक झाले. तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो. नवरात्रांनंतर जगदंबा देवी शांती उत्सव १० ते १२ दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

















कोंडेश्वर मंदिर, वनवारला, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील वनवारला येथील पुरातन शिव मंदिर. हे मंदिर पुस नदीच्या तीरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे. मंदिर अतिशय प्राचीन असून येथे प्रभु श्रीरामांनी भेट दिली होती अशी आख्यायिका सांगितली जाते. जवळच सतत वाहणारा गोमुख कुंड आहे. पुस नदीच्या पात्रात असंख्य नैसर्गिक कुंड देखील आहेत. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे भक्तांची वर्दळ असते.



विदर्भातील भुलाबाई उत्सव
पहिली गं भुलाबाई देवा देवा साथ दे
साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा!!
आज म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला विदर्भात घरोघरी भुलाबाई आणि भुलोजी राणा/ भुलजा यांची पूजा होते. विशेषकरून शेतकऱ्यांसाठी आणि मुलींसाठी हा भुलाबाईचा सण मोठा आनंदाचा असतो. गणपती विसर्जनानंतर घरोघरी भुलाबाईंची स्थापना होते. (भुलाबाई म्हणजे पार्वतीचेच रूप आणि तिचे पती भुलोजी राणा म्हणजे भोळा सांब- शंकर) भुलाबाई म्हणजे माहेरवाशिणीचे रूप भाद्रपद पौर्णिमेला तिचे आगमन होते ते आजच्या आश्विन/ शरद पौर्णिमेपर्यंत ती लाड करू घेते.
या भुलाबाईसमोर रोज संध्याकाळी 16 वर्षांपर्यंतच्या मुली फेर धरू पारंपरिक गाणी म्हणतात. (ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्रात भोंडला/ हादगा असतो, तशीच गाणी) भुलाबाईची गाणी म्हणत असताना कुणाचं घर कुठल्या जातीचं आहे, हे सगळे भेद गळून पडतात. त्यामुळेच भुलाबाईचा उत्सव हा सर्व जाती-धर्मातील लहान मुलींचा उत्सव म्हणून आवडीचा आहे. भुलाबाईची गाणी ही तर अमूल्य असा लोकगीतांचा ठेवाच आहे. भुलाबाईच्या गाण्यातून यथार्थ लोकजीवन रेखाटलेलं जाणवतं. पूर्वीच्या काळी असणारं सासरपण आणि माहेरपण हे भुलाबाईच्या गाण्यातून व्यक्त होतं. सून म्हणून मुलींवर असणाऱ्या अतिरेकी जबाबदाऱ्या सांभाळताना सुनेची होणारी दमछाक भुलाबाईच्या गाण्यातून व्यक्त होते.
उदा. कारल्याचं बी पेर गं सूनबाई,
मग जा आपल्या माहेरा माहेरा किंवा
यादवराया राणी रूसून बसली कैसी किंवा
नणंदा भावजया दोघीच जणी बाई दोघीच जणी,
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कुणी खाल्लं कुणी
गाण्याचा कार्यक्रम संपला की आलेल्या मुलींना खिरापत म्हणजे खाऊ मिळतो पण तो खाऊ ओळखायचा असतो. जी मुलगी खिरापत ओळखेल तिचे कौतुक होते आणि ही खिरापत ओळखताना मजाही येते. शेवटी
बाणाबाई बाणा सुरेख बाणा
गाणे संपले खिरापत आणा.
असे गाणे म्हणून खिरापत आणायला सांगितले जाते.
आजच्या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी भुलाबाईच्या उत्सवाची रंगत फार वेगळी असते. महिनाभर स्थापलेल्या भुलाबाईची कोजागिरीच्या टिपूर चांदण्यात घराच्या अंगणात पूजा मांडली जाते. भुलाबाई-भुलोजी-गणपती यांची ज्वारीच्या भरलेल्या कणसांसहित ज्वारीच्या पाच धांडय़ांची खोपडी (निवारा) बनवून पूजा केली जाते. या खोपडीला माळी म्हणतात. जिराईत शेतकरी ज्वारीच्या कणसांची खोपडी करतात तर बागाईत शेतकरी ही उसाच्या पाच खोडांची खोपडी करतात. तिला माळी असेही म्हणतात. भुलाबाई आणि भुलोजी यांच्या डोक्यावर ही 'माळी' हिरवे छत म्हणून लावली जाते. नवीन आलेल्या ज्वारीच्या भरलेल्या कणसांची, कणसातील ज्वारीच्या दाण्यांची पूजा करून शेतकरी त्या धान्याचे स्वागत करतात. घरातील अन्न- धान्य- धनलक्ष्मीचे स्वागत म्हणजे म्हणजेच भुलाबाईचा उत्सव. याला काहीजण माळी पौर्णिमा असेही म्हणतात.
शेवटच्या दिवशी म्हणजे कोजागिरीला तर मुलींना एका महिन्याचा खाऊ म्हणजे ३१ दिवसांचा खाऊ (खिरापत) एकाच दिवशी मिळतो. आज भुलाबाईंना 31 प्रकारच्या खिरापतींचा (खाऊंचा) नैवेद्य दिला जातो. त्यामुळे लहान मुलींना, महिलांना आणि सगळ्यांनाच या दिवशी खाऊंची खिरापतीची मोठीच मेजवानी मिळते. शिवाय या घरगुती खिरापती पौष्टिक आणि सकसही असतात. या खिरापतींमध्ये मोड आलेल्या मुगाची उसळ, बरबटीची उसळ, हरभऱ्याची उसळ, पालक पुऱ्या, सांभार वडी, कचोरी, शेंगदाणा चिक्की, विविध पौष्टिक पक्वान्ने किंवा मग फरसाण, चिवडा, चकली, लाडू, पेढा इत्यादी खिरापतींची खाऊंची अगदी चंगळ असते. शिवाय कोजागिरी पौर्णिमेनिमित्त खास सुकामेवा घालून आटवलेल्या मसाला दुधाचाही प्रसाद असतो.
आता कालपरत्वे महिनाभर भुलाबाईचा उत्सव साजरा होत नसला तरी किमान दसऱ्यानंतर 5 दिवस किंवा फक्त कोजागिरीच्या दिवशी तरी भुलाबाईची गाणी म्हणत, खिरापती ओळखत हा नवधान्याचा आणि माहेरवाशिणीच्या लाडा- कोडाचा उत्सव साजरा केला जातो. यासाठी भुलाबाई आणि भुलोजींच्या मूर्ती बाजारात विकत मिळतात. पण भुलाबाईच्या हाताने केलेल्या मातीच्या मूर्तीचे या सणात जास्त महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी या मातीच्या भुलाबाईंचे विसर्जन होते. विदर्भासह शेजारच्या खानदेशातही हा भुलाबाईचा उत्सव आनंदात साजरा होतो.








श्रीकृष्ण मंदिर, देवरी, अकोला
विदर्भातील अकोला जिल्ह्यातील देवाची देवरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवरी येथील श्रीकृष्ण मंदिरात अतिप्राचीन व दुर्मिळ श्रीकृष्ण मूर्ती आहे. काळ्या अखंड पाषाणात नक्षीदार कलाकुसरीने कोरलेली ही आहे. खोड्या करणारा नटखट गोपाल कृष्ण दोन्ही हातात बासरी वाजवत आहे. बासरीला रत्नाकार लांब झालर आहे.
मुर्तीच्या ओठांवर स्वर मुद्रा आहे. कानात मत्स्यआकार कुंडल आहेत. हातात नक्षीदार मनगटा व बाजूबंद कोरलेली आहेत. पायात रेखीव पैंजण चाळ सुंदर कमल चरणांची शोभा वाढवतात. घडी मारलेल्या उजव्या पायाच्या अंगठ्या खाली कालीया नाग कोरलेला दिसत आहे. मूर्ती खाली दोन्ही बाजूंनी गाई कोरलेल्या स्पष्ट दिसत आहेत.
मुर्तीच्या डाव्या हाताची करंगळी तुटलेली आहे. गावातील जुन्या लोकांकडून अशी आख्यायिका सांगितली जाते की परकीय जुलमी सत्ताधारीयांच्या तोडफोडी पासून बचाव होण्यासाठी ही मूर्ती ग्रामस्थांनी येथे जमिनीत गाडली होती. काही काळानंतर येथे बैलगाडीचे चाक फसले असता चाकाला दगडाची उट लागल्याचे समजले दगडाला खोदून काढण्याच्या हेतूने खोदकाम करत असताना देवाची करंगळी तुटल्याचे सांगितले जाते.
कृष्णाची कोरीव मूर्ती असल्याचे दिसून आल्यावर मूर्तीची विधिवत स्थापना केली गेली. या घटनेचा निश्चित असा कालावधी सांगता येणार नसला तरी मूर्ती ही हजार वर्ष जुन्या शैलीतील असल्याचे सांगण्यात आले तर जिर्णोद्धार करतांना मंदिर किमान शिवकालीन असल्याचे लक्षात आले. सप्टेंबर 2023 ला गावकऱ्यांनी लोक वर्गणीतून नवीन मंदिर निर्माण केलेले आहे.
(फोटो आणि माहिती - महेंद्र पाटील)



















शेषशायी विष्णू मुर्ती
हातात शंख, चक्र, गदा. पायाशी लक्ष्मी सेवा करतांना. सात फण्यांचा नाग आणि त्यावर विष्णु आपल्या उजव्या कुशीवर हे विष्णूचे लोकप्रिय रूप असून त्याला पाण्यात असल्याने जलाशायी, शेषनागावर असल्याने शेषशायी, तर नाभिमध्ये कमळ असल्याने पद्मनाभ अशी नावे आहेत. काही ठिकाणी विष्णु नागावर बसलेल्या अवस्थेत देखील असतो.
























अमरावती जिल्ह्यातील मुख्य शहरापासून अवघ्या 14 किमी वर असलेला खोरगडे यांचा सावरखेड वाडा !!
(Photo - Aditya Khorgade)















विदर्भातील पहिले फुलपाखरू उद्यान - बटरफ्लाय गार्डन आगरझरी, चंद्रपूर
ताडोबा-अंधारी व्याघ‘ प्रकल्पाच्या रस्त्यावर आगरझरी येथील निसर्गरम्य वातावरणात वनविभागाने तयार केलेले विदर्भातील पहिले फुलपाखरू उद्यान पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे.
चंद्रपूर जिल्हा ताडोबातील वाघांसाठी जगप्रसिद्ध आहे. पण येथे येणारा पर्यटक हा केवळ वाघ बघायलाच येऊ नये. तर त्याने ही वैदर्भीय निसर्गसृष्टीही अनुभवावी. या जंगलातील प्रत्येक जीवांचे कौतुक करावे, वनवैभव आपल्या डोळ्यात साठवून जावे, हे होत असताना त्यांनी येथील काही नाविण्यपूर्ण वस्तूंची आठवणही आपल्यासोबत न्यावी, यासाठी ताडोबाच्या बफरझोनमध्ये असलेल्या आगरझरी गावालगत वनविभागाने भव्य बटरफ्लॉय गार्डन तयार केले आहे.
चंद्रपूर शहरापासून अवघ्या 17 किलोमीटर अंतरावर हे उद्यान आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे उद्यान सुरू असते. मोठ्यांसाठी 20 रुपये, तर लहान मुलांसाठी 10 रुपये शुल्क घेऊन या उद्योनात सोडले जाते. तत्पूर्वी, पर्यटकांना फुलपाखरांबद्दलची अत्यंत दुर्मिळ आणि महत्वाची माहिती अद्ययावत चित्रांद्वारे दिली जाते, त्यासाठी एक विशेष दालन तयार करण्यात आले आहे.यासोबतच बच्चे कंपनीसाठी खेळणी, सेल्फी पॉईंट, झुलता पुल हेही या उद्यानाचे आकर्षण आहे.
प्रत्येक फुलपाखराला राहायला, अंडी द्यायला आणि खाण्यासाठी विशिष्ट प्रकारचे झाड आणि फुल लागतात, त्यासाठी येथे खासप्रकारची झाडे लावण्यात आली आहे. येथे फुलपाखराच्या अंडी, अळी, कोश आणि फुलपाखरू या चारही अवस्था पाहायला मिळतात.
‘गवळी बॅरॉन’ फुलपाखराची नोंद आतापर्यंत ताडोबात झाली नव्हती. ते फुलपाखरूसुद्धा या उद्यानात आढळले असून, महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ‘ब्लू मॉरमॉन’ हेसुद्धा येथे दिसते. ‘ब्लू मॉरमॉन’ हे फुलपाखरू भारतातील आकाराने सर्वात मोठ्या असलेल्या ‘सदर्न बर्डविंग’ या फुलपाखरानंतरचे सर्वात मोठे फुलपाखरू आहे. झाडांना औषध देणे, कटाई करणे इत्यादीसाठी दर मंगळवारी हे उद्यान बंद ठेवण्यात येते.
लेख :- स्वप्नील राजुरकर

 नगरधन किल्ला

नगरधन. वाकाटक साम्राज्याची राजधानी. एक असं साम्राज्य की जे अरबी समुद्रापासून सातपुड्यापर्यंत आणि नर्मदेपासून भिमा खोऱ्यापर्यंत उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, विदर्भ आणि मध्यप्रदेशात पसरले होते. एक असं साम्राज्य ज्यांने सलग २५० वर्षे या सर्व भागाच्या सर्वांगिन प्रगतिची बिजं रोवली व यशस्वीपणे फोपावलीही. एक असं साम्राज्य की ज्याच्या सोयरीकी थेट चंद्रगुप्त मौर्यांपर्यंत होत्या आणि जिथं एका महिलेने सलग २० वर्षे यशस्वी राज्यकारभार केला, तिच्या लोपमुद्रा आजही सापडतात इथल्या उत्खननात.
गुगल सर्च ला भरपूर काही सापडतं वाकाटकांविषयी. पुरातत्व विभागानं इथं खोदकाम केलंय. त्यातही सापडलंय भरपूर काही... प्राचिन संस्कृती, तत्कालिन माणसांच जगणं स्पष्ट करणारं, इतिहासाची हरवलेली पानं सापडताहेत, जे सापडतंय त्यातून अनेक गोष्टी जुन्या समजांना, आत्तापर्यंतच्या गृहीतकांना फाट्यावर मारून नवीनच काही गोष्टी सांगू पाहताहेत...असंही बरच काही आहे.
पुराणातील वांगी पुराणात ठेवून तत्कालिन शेती व शेतकऱ्यांची अवस्था काय होती, हे समजू पाहतो तेव्हा इथं माझ्या हाती धतूरा येतो. कुणाच्या हाती काही असेल तर कळवावं.
या किल्ल्यात व भोवती बरंच उत्खनन झालंय, सुरू असतं त्या त्या वेळी बरच काही. भातखाचरं, तुर आन् पडकाच्या रानात सापडलंयही बरंच काही. उत्खननाच्या खड्ड्यात लागलेलं पाणी पाहून रानमालक शंकररावांना थोडी उभारी आलीय, पावसानं भात घालवलाय त्यांचा आणि उत्खननाच्या खड्ड्याची विहिर करून पाणी उपसायची सोय कशी करायची या इचारानं त्यांच्या डोक्याचा गोयंदा झालाय.
सध्या वाकाटकांच्या या राजधानीत शेतकऱ्यांची अवस्था फारशी चांगली नाही, कालिदासाच्या यक्षाला खुणावणारे मेघ शेतकऱ्यांना मात्र वाकुल्या दाखवताहेत, अपुऱ्या पावसामुळं काही रानं पडीक पडलीत, भात खुरटल्यासारखा आहे, तूर नाही पेक्षा ठिक आहे. नापेर क्षेत्रात चना बुना करायच्या इचारात बांधाची गवत कापताहेत मंडळी, त्याला मात्र मरान नाही आणि ब्रोकर मंडळी घिरट्या हालताहेत डांबरी डांबरीनं.
रामटेकवरील लिखान खरं मानलं... खरं मानलं की बळीवंशातील हिरण्यकश्यपूचा वध इथं झाला, म्हणजे वाकाटक वगैरेंच्या आधी कधी तरी इथं बळीराजाच्या राज्याचाही केंद्रबिंदु असावा. असं असेल तर... आणि बळीनंतर वाकाटकांनी राज्य केलं असेल आणि त्यामुळे भरभराटही झाली असेल अगदी अजंठा वेरुळचीही... तरी मग इथले शेतकरी इडा पिडा टळो, वाकाटकांचे राज्य येवो असं का म्हणत नाहीत कोण जाणे.






 बैल पोळा, गडचिरोली

चार वाजता त्या जंगलातल्या गावात गावातल्या झाडून सगळ्या बैलजोड्या जमा झाल्या. सर्व बैल सजवलेले, झुली, बेगडं, बाशिंगं, तोढे वगैरे वगैरे वगैरे
अर्धा तास ताफा चालला. पाचसात गाणी चांगली वाजली ढुमक्यावर, मग पोळा फुटला आणि बैल जोड्या गावभर पांगल्या.
प्रत्येक गल्लीत आपापल्या दरीदारी सुवासिनी बैलांना ओवाळायला ताट घेवून आणि खावू घालायला कालपासून खपून तयार केलेली मिक्सव्हेज भाजी भात, पुरणपोळी सुपात घेवून सज्ज होती.
बैलजोड्या एकामागून एक दारोदार दर्शन देत होत्या. घरातील तान्ह्या पोरापासून खुरटलेल्या म्हताऱ्यापर्यंत सगळे बैलांची पुजा करून पाया पडत होते. सरतेशेवटी ज्यांच्या मेहनतीच्या बळावर पसापसा करून भरल्या सुपानं वारंत उफनत धान्याच्या राशी घरात येतात, त्याच सुपात बैलांसाठी केलेलं पुरणपोळीचं जेवण त्यांना वाढलं गेलं. कण न् कण बैलांनी चाटून पुसून खाल्लं की घरधनी धनिन समाधानी नजरेनं भरून पावायचे...
Point to be noted... एका घरात अनेक बैलजोड्यांची पुजा होते. ज्यांचा व शेतीचा संबंध नाही अशा बारा व्यवसायिकांपासून ते नव्या समाजरचनेची मास्तरकी बँकवाले यासारख्या नव्या गावकामगारांपर्यंत सगळ्यांच्या घरी तोच पाहूनचार, स्वागत, दर्शन, कृतज्ञता...
बैलं जेवेपर्यंत घरातलं लहान पोरगं ही भजी किंवा डाळवड्यालाही तोंड लावत नाही. बैलपुजा झाली आणि जेवणावळी बसल्या.
दिल्लीच्या परोठ्याच्या आकाराच्या दुधाळ आणि मधाळ पोळ्या. गुळवणी हा प्रकार नाही. बैलांसाठी खास बनवलेला मिक्सव्हेज, सोबत आणखी एखादी भाजी, एखादा गोड पदार्थ, इथले प्रसिद्ध चपटे पापडाएवढे गोल आणि पाच रुपयांच्या दोन डॉलरएवढे जाड डाळवडे... हान मर्दा...
मग पान सुपारी. तेवढं करून झालं की गडी मानसांना पत्त्याच्या डावाचे वेध लागतात. मास्तर लोक, डॉक्टरलोकांपासून हातावर पोट असलेल्या मजूरापर्यंत सगळे गुण्या गोविंदाने आपापली भट्टी जमवून पत्ते खेळत बसत्यात, दोन दिवस पत्त्यांचे...
आणि हो आज संध्याकाळी घराघरात मदनावर लहान पोरांच्या हस्ते छोटाले लाकडाचे बैल पुजले गेले. अगदी आरत्या म्हणू म्हणू. आज मोठा पोळा झाला... उद्या लहान पोरांचा आणि त्यांच्या लाकडांच्या बैलांचा तान्हापोळा होणार.
आज गोडाचा पोळा, श्रावण संपला. उद्या तिखटाचा पोळा, बोकड, कोंबड्यांची तजविज रेडी आहे.
लहान मुलांच्या लाकडाच्या बैलांची मिरवणूक निघणार, मग समारोपाला मुलांना वह्या, पेन, खाऊ वाटप होणार. काल गोडधोड खाल्लेल्या पाहूणे यांनी उद्या गावोगाव मांसाहारी जेवण खाऊ खालण्यात येणार. तान्हापोळा मोठ्या जल्लोशात संपन्न होणार.
(दारूचा वास सहन होत नाही त्यांनी नाकात व कानात कापूस कोंबण्याची तयारी ठेवावी, बाकी ऑल इज वेल....गडचिरोलीत कुठेतरी)
- - - - -
२५ वर्षापूर्वी जुन्नरला निमगिरीच्या पुढचा केशव दुंदा मुकणे आमच्याकडं कामाला होता. घरच्यासारखं सगळं. मी शाळकरी होतो.
मुख्य पोळा झाला. पुरण पोळी सारभात. मावळी पोळ्या. प्रचंड आग्रह. पाव्हणा कुणाच्या घरी जेवणार यावरून भांडणाची वेळ.
केशवच्याच घरी दोन पोळ्यात टम्म फुगलो. जेवण करून खडकावं बसलो तर मंडळी तंबाखू खायला लागली.
मी शाजूक प्रश्नकरी, काय व्हतंय, कसं व्हतंय
ते म्हणे पचाया चांगली असती. आमच्याकं बारकी पोरं बी खात्यात.
वाघाला चँलेंज ? बनवा इडा...
ठेवली तोंडात... आगागागा... असली गुचकी लागली पुढचे ४ तास प्रचंड हैराण...
आज नवा शेतकरी सोयरा पानाचा आग्रह करायला लागला जेवण झाल्यावर. पान खाल्यावर पानउतारा व्हतो त्यामुळं वर्षा दोन वर्षातून एखाद्यापलिकडं मजल नसती.
इथलं मसाला पान म्हणजे मसाला तोंडी लावण्यापुरता, पानंच तेज, टपरीवालं म्हणलं सुपारी ? टाक !
आता आपल्याला काय माहित कच्ची पक्की. चार तास झाले, डोकं जाम झालंय. बेक्कार नाद बॉ...





 कारंजा लाड - वाशिम


29 जुलै 2017
कारंजा (लाड). स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी इथल्या नवाबाला, या गावाला दोन वेळा लुटलेलं. कधी हिंदु, कधी मुस्लिम तर कधी जैन धर्मीयांच्या धर्मसशक्तीकरणाचे केंद्रबिंदु राहीलेले चार वेशींचे तीन तलावांमध्ये वसलेले वाशिम जिल्ह्यातील टुमदार गाव. कारंजा काळविट अभयारण्य त्याच्या लौकिकात आणखी भर घालतंय.
बराच फिरलो उभा आडवा, पण काळविट काही दिसलं नाही... आता सगळीकडंच गवत वाढलंय त्यामुळं त्याला १० वाटा मोकळ्या, आणि त्यातूनही ते काही देव नाही, भाविकांसाठी एका जागी बसून रहायला. रूषी तलाव मस्त आहे. आणि त्याच्या काठावरचं मंदीरही. एरवी म्हटलो असतो... जास्त लाडात यायचं काम नाही. पण आता लाडात (कारंजा) यायला हरकत नाही... 






 रामटेक, नागपूर

ज्ञानतपस्वी अगस्तीजी इथं राजकन्येशी लग्न करून आश्रमात तपश्चर्या करत होते.
प्रभू रामचंद्र वनवासात त्यांची भेट घ्यायला इथं आले. सहकुटुंब बरेच दिवस राहीले. रावणजींचा वध करायची प्रतिज्ञा त्यांनी इथेच केली, आणि इथून पुढे नाशिकला गेले.
बौद्ध धर्मीय ज्ञानतपस्वी नागार्जून स्वामी यांनी इथं कित्येक वर्षे तपश्चर्या केली.
महानुभव पंथाचे आद्यआचार्य चक्रधर स्वामी यांनीही पंथोपदेश करण्यासाठी काही काळ (१० महिने) इथं वास्तव्य केले.
कालिदास गावाच्या एका अनाडी मानसानं श्रीराम प्रभूंच्या कृपेेने इथेच मेघदूत नावाचे विश्वप्रसिद्ध, जगद्मान्य संस्कृत महाकाव्य लिहीले.
नागपूरकर भोसले महाराजांनी इथल्याच अंबाला तलावात आंघोळ करून केलेल्या प्रतिज्ञेनुसार मंदिरांच्या संरक्षणार्थ इथं किल्ला उभारला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी इथं १२ वर्षे तपश्चर्या केली.
विष्णूजींनी इथेच नरसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूजींचा टेटवा फाडून डेंडाळा बाहेर काढला, वध केला.
वाकाटक साम्राज्य इथूनच चारिदिशा वाढलं फोफावलं...
बाकी सटर फटर तं न बोललेलंच बरं ना भाऊ... इथं सगळं थोर आहे !



















No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...