Friday, February 16, 2024

Viarbh Darshan Facebbok page 6

 पुरातन गणेश मंदिर आणि बारव, पिंप्री खंदारे, सिंदखेड राजा, बुलढाणा
(Photo - It's Dnyano)


अकोला जिल्ह्यातील तीन वेग वेगळे मंदिर.. बांधकाम आणि दिसायला एक सारखेच...

नागपूर - अमरावती महामार्गावर हे पुरातन मंदिर आहे. नेमके कुठे आहे कोणास माहित असल्यास कमेंट करा.
(Photo - Roop Nagotra)

पुरातन शिव मंदिर, सालोड, नांदगाव खंडेश्वर, अमरावती
(Photo - Sagar Sawwalakhe Jain)



तरनोळी, ता. दारव्हा जि. यवतमाळ
एकेकाळातील देवीच्या उपासनेचे महत्त्वाचे केंद्र तरनोळी हे गाव दारव्हा या तालुक्याच्या ठिकाणा पासून 20 कि. मी. अंतरावर असुन सातेफळ (नेर तालुक्यातील) पासूनही जवळ आहे. साधारणतः ३५०० लोकवस्तीचे गाव. जुन्या अखाइका नुसार पूर्वी गावाला तृणवल्ली हे नाव होते. नंतर तरणवळी आणि तरनोळी असा अपभ्रंश झाला. गावात शंकराचे आणि विश्वाई देवी असे दोन प्राचीन मंदिरे होती त्यापैकी शंकराचे मंदिर बऱ्यापैकी जुन्या अवस्थेत असून येथे उमा महेश्वर, गणपती मूर्ती दिसून येतात.
ब्रिटिश काळामध्ये 1831 च्या दरम्यान तरनोळी गावाचा सर्वे झाला. पुढे १८७४ च्या नंतर जिल्हा गॅझेटिअर पब्लिश झाले. त्यातील नोंदीनुसार गावात दोन उध्वस्त हेमाडपंती मंदिरे असून ती अनुक्रमे दुर्गादेवी आणि चामुंडा देवी यांना समर्पित आहे. मूर्तीमध्ये विशेषता चामुंडा देवीची मूर्ती प्रमाणानुसार व आकार नुसार कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. याशिवाय मंदिराच्या आजूबाजूला तुटलेल्या मूर्ती व कोरीव दगडाचे अवशेष पसरले आहेत. एका दगडावर पार्श्वनाथ या 23 व्या जैन तीर्थंकराची मूर्ती कोरलेली असल्याचेही गॅझेटीअर मध्ये नोंद आहे. ( गॅझेटीअर 1903 ला पुनर्मुद्रित करण्यात आले.) सद्यस्थितीत गावात कोठेही जैन मूर्ती असलेला स्तंभ किंवा दगड आढळून येत नाही, एकंदरीत गावचा इतिहास १२व्या शतकापर्यत जुना असेल असे अवशेषांवरून तरी दिसते. येथे एक जुना दगडी शिलालेख होता. तो शिलालेख पुढे यवतमाळ येथे हलवण्यात आला. त्याकाळी महाजन वकील यांनी तो यवतमाळ येथे नेला. तथापि या शिलालेखाच्या सद्यस्थितीबद्दल कोणालाही माहिती नाही. गावात पूर्वी पांढऱ्या मातीची गढी होती. त्यास चार बाजूंना बुरुज होते. याला देशमुखाची गढी असे म्हणत.
तरनोळी गावाच्या चार दिसेस चार देवींचे मंदिरे आहेत. त्याला मेसकाई माई, तारा माई, वाघामाई ,भवानी माय अशी नावे आहेत. त्या काळात गावाचे रक्षण करण्यासाठी गावकुसाबाहेर असी ग्रामदेवता असत.. गावाच्या मधोमध शंकरा मंदिरालगत असलेले विश्वाई मंदिर किंवा विश्वेश्वर (जगदंबा) मंदिर हे अलीकडे नव्याने जीर्णोद्धारित झालेले आहे. या मंदिराच्या गर्भगृहामध्ये चामुंडा या देवीची पूजा केली जाते. चामुंडाच्या जवळच भैरव मुर्ती असून यांना विश्वाई आणि विश्वेश्वर या नावाने ओळखले जाते. काही लोक याला इसा माय म्हणूनही संबोधतात.
गावात मंदिरालगत बाळू जोशी यांचा वाडा अजूनही सुस्थितीत असून गावामध्ये आजही धार्मिक परंपरा जपल्या जातात. 1831 नंतरच्या गॅजेटियर मध्ये असलेल्या चामुंडा देवी आणी दुर्गादेवी या मंदिराच्या विशेष नोंदीवरून येथे ही शाक्त संप्रदायात देवीची पूजा अर्चना केली जात असावी हे असे म्हणता येईल. वणी ( जि. यवतमाळ), रेणुकापुर ( नेर जि यवतमाळ) यांच धर्तीवर तरनोळी हे सुध्दा देवीच्या उपासनेचे केंद्र असावे. अभ्यासाअंती अधिक माहिती मिळेल.
जुन्या मंदिरांचे जिर्णोध्दाराच्या नावाखाली होत असलेले सिमेंटीकरण वेळीच थांबले नाही तर हा अनमोल सांस्कृतीक वारसा पुढील पिढीसाठी जतन करण्यात ही पिढी अपयशी ठरेल. तसेच गावातील ऐतिहासिक शिल्पं/शिलालेख गावातुन दुसरीकडे हलविले जाणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे.
फोटो - सुभाष कदम
माहिती - डॉ. विलास वाहणे
सहायक संचालक पुरातत्त्व


ऐतिहासिक अचलपूर, जिल्हा अमरावती
अचलपूरचा इतिहास म्हणजेच वऱ्हाडचा इतिहास’ असा अभिमानपूर्वक उल्लेख ज्या शहराबद्दल केला जातो, ते अचलपूर (आणि परतवाडा) आता पार बदलून गेले आहे. संपन्नतेची साक्ष पटवणाऱ्या खुणा तेवढय़ा शिल्लक आहेत, इतकी ती संपन्नता लयास गेली आहे. या शहरातील ऐतिहासिक वास्तूंमुळे गतकाळातील वैभवाची साक्ष पटते.
अचलपूर किंवा एलिचपूर- इतिहासाला सुमारे दिड सहस्रकापासुन ज्ञात असलेली एक प्राचीन नगरी. या शहरात मध्ययुगीन कालखंडातील अनेक प्राचीन स्थापत्य अवशेष आजही सुस्थितीत दिसतात. या शहराला हा वारसा जतन करण्याची व येथील इतिहास जाणून घेण्याची आज आवश्यकता आहे.
अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेले एक महत्वाचे तालुक्याचे शहर. अचलपुर शिवाय वऱ्हाडचा इतिहास पुर्ण होऊच शकत नाही असे या शहराबाबत म्हटले जाते. जैनधर्मीय इल राजाने हे नगर वसवल्याने त्याला एलिचपूर असे नाव पडले व काळाच्या ओघात त्याचे अचलपुर झाले. काही काळ विदर्भाची राजधानी असलेले हे शहर बिच्छन नदीतीरावर एका भुइकोटाच्या आत वसलेले असुन मध्ययुगीन काळात वऱ्हाडातील एक महत्वाचे ठिकाण होते. मध्ययुगीन काळातील वैभवाची साक्ष देणाऱ्या वास्तु आजही या शहरात विखुरलेल्या अवस्थेत पहायला मिळतात. अचलपुर किल्ला अमरावती बुऱ्हाणपूर मार्गावर अमरावती पासुन ५० कि.मी.अंतरावर तर परतवाडा शहरापासुन ४ कि.मी.अंतरावर आहे. अचलपुर शहरात आपला प्रवेश या किल्ल्याच्या दरवाजातूनच होतो. भक्कम पोलादी तटबंदीत असलेल्या या शहरात आजही त्याच्या सौंदर्याने नटलेल्या वास्तु दुर्लक्षित झालेल्या आहेत. शहराभोवती असलेली भक्कम तटबंदी, त्यातील बुरुज व कोरीवकामाने सजलेले सहा बुलुंद दरवाजे आजही या शहराचे वैभव आहे. या वास्तु आपल्याला कळत नकळत मध्ययुगीन काळात घेऊन जातात. या सर्व दरवाजावर असलेले पर्शियन शिलालेख त्या दरवाजाची माहिती देतात पण या शिलालेखांचे एकत्रित वाचन कोठेही आढळून येत नाही. हे दरवाजे दुल्हा दरवाजा, खिडकी दरवाजा, जिवनपुरा दरवाजा, माळीपुरा दरवाजा, बुंदेलपुरा दरवाजा आणि हिरापुरा दरवाजा या नावांनी ओळखले जातात. ३०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला दुल्हा दरवाजा इस्माईल खान याने बांधल्याचा शिलालेख त्या दरवाजावर कोरलेला आहे. या दरवाजाची वाट दुल्हा रहेमान यांच्या दर्ग्याकडे जात असल्याने या दरवाजाचे नाव दुल्हा दरवाजा असे पडले. शहराबाहेरील तटबंदी सुलतानखानचा मुलगा नवाब इस्माईलखान याने बांधल्याचा शिलालेख एका दरवाजावर कोरण्यात आला आहे. किल्ला फिरताना तटबंदीखाली काही ठिकाणी सांडपाण्याचे मार्ग तर काही ठिकाणी किल्ल्यात येणारे पाणीमार्ग तसेच या पाण्यासाठी बांधलेले उच्छ्वास पहायला मिळतात. यातील एक उच्छवास आपल्याला दुल्हा दरवाजाच्या आत समोर पहायला मिळतो. बहामनी काळात बिच्छन नदीवर धरण बांधुन खापरी नळाने नगरात सात ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात आला होता. सातभुळकी नावाने ओळखली जाणारी हि व्यवस्था बंद झाली असली तरी त्याचे अवशेष व टाक्या अजूनही पहायला मिळतात. अचलपूर शहरात नबाबांच्या नावावर ३५ पेक्षा जास्त पुरे अस्तित्वात असुन त्यांना वसवणाऱ्या नबाबांच्या नावाने ते ओळखले जातात. समरसखानने (१७२४) साली वसवला तो समरसपुरा, सुल्तानखानने (१७२७) साली वसवला.
माहीती - दुर्ग भरारी
फोटो - लिजोश अब्राहम


विदर्भातील ३०३ पुरातन मंदिरांची यादी गोळा करण्यात आली आहे. 😍
यादीत समाविष्ट नसलेली मंदिरे कमेंट करा.

वैभव महादेव मंदिर, शिळोणा, पुसद, यवतमाळ
(Photo - Amardeep Kadam)

अष्टकोणी बारव, चांडस, वाशिम
वाशिम जिल्ह्यातील चांडस येथे चंद्रेश्वर शिव मंदिराजवळील ही भव्य सुंदर बारव आहे. बाहेरून अष्टकोणी आणि आतून वर्तुळाकार असलेल्या या बारवेला आत उतरण्यासाठी चार प्रवेश मार्ग आहेत.

धनकेश्वर मंदिर, पुसद, यवतमाळ


विभांडकेश्वर मंदिर, भंडारी, पुसद, यवतमाळ


पुसद, यवतमाळ येथील काळा मारोती मंदिरातील भगवान विष्णूची सुंदर मुर्ती.


पुरातन शिव मंदिर, अंबाळी, उमरखेड, यवतमाळ
(Photo - Suraj Kale)


पुरातन बारव, सातेफळ, नेर, यवतमाळ
सातेफळ येथील ही बारव नंदा प्रकारातील बारव आहे. गावाच्या पूर्व भागात एक किलोमीटर अंतरावर कपिलेश्वर मंदिराच्या पूर्व दिशेस जगन्नाथ मोतीराम बाठ यांच्या शेतात आहे. या शेतात ही बारव आजही सुस्थितीत आहे.
तसा सातेफळ या गावचा परिसर निर्जल आहे. गावात पाण्याचा कायम ठणठणाट असतो. शेतशिवारात अगदी बोटावर मोजण्या एवढ्याच विहिरी आहेत. त्यामुळे सिंचनाचा टक्काही नसल्यात जमा आहे. मात्र, साधारणतः सातशे वर्ष जुनी ही बारव अजूनही जैसे थे असून अद्याप आटलेली नाही हे विशेष. विहिरीचे पाणी मधुर व स्वच्छ असून पाणी पिताच अमृत प्राशन केल्याची जाणीव होते.
या विहीरीला एकूण वीस पायऱ्या आहेत. वरून आत जाताना दहा पायऱ्या ह्या चौकोनी राजनीपर्यंत आहेत. व उर्वरित दहा पायऱ्या खालच्या भागापर्यंत आहेत. या विहीरीची खोली 25 फुट असून आता उन्हाळ्यातही तिला जवळपास पंधरा फुट पाणी आहे. भू पृष्ठभागावर ही विहीर साधारणतः तीस बाय वीस फूटच्या आकाराची आहे. संपूर्ण विहीरीचे बांधकाम टणक अशा दगडी चिऱ्यात केले असून चिरे हे अत्यंत रेखीव आहेत. वरचा काही भाग अलीकडे सिमेंट विटांनी बांधला आहे. या विहीरीत काचेप्रमाणे स्वच्छ व शितल जल आहे. पायऱ्या थेट पाण्यापर्यंत पोहचत असल्याने पाणी उपस्यासाठी दोरखंड किंवा इतर साधनांची गरज पडत नाही. पाणी टंचाईच्या काळात ही विहीर आजही गावकर्यांची जीवनदायीनी ठरली आहे.
(Photo - Pavan Waghajale)


पुरातन शिव मंदिर, लाखखिंड, दारव्हा, यवतमाळ
(Photo - Harish Chavhan)


अमरावती शहरालगतच्या डोंगरांमध्ये 5 हजार वर्षापासून उभे आहे 'कोंडेश्वर मंदिर'; जाणून घ्या इतिहास

 https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/amravati/history-of-kondeshwar-temple-near-amravati-city/mh20230210182539586586026
ETV Bharat

5 हजार वर्षापूर्वीपासून उभे आहे कोंडेश्वर मंदिर

अमरावती : कोंडेश्वराचे मंदिर विदर्भ राजाच्या काळात उभारण्यात आल्याचे सांगण्यात येते. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी या परिसरात राज्य असणाऱ्या विदर्भ राजा हे काशी क्षेत्रातील भगवान विश्वेश्वराचे भक्त होते. या विदर्भ राजाने आपल्या विदर्भ प्रदेशात कौंडिय मुनीच्या आग्रहावरून शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली. या शिवलिंगाला कोंडेश्वर असे नाव देण्यात आले.

असा आहे कोंडेश्वर मंदिराचा इतिहास : कोंडेश्वराजवळ प्राचीन काळी अनेक वेळा काशी ,प्रयागराज, ओमकारेश्वर आणि अन्य स्थानावरून ऋषीमुनी, वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण, साधुसंत, भाविक, शिवभक्त येत असत. यामुळेच शिव उपासनेचा सुगंध या परिसरात सर्वत्र आजही दरवळतो. अनेक राज्यसत्तांच्या काळात श्रीक्षेत्र कोंडेश्वराचा उत्कर्ष झाला. वाकाटक आणि गुप्तकाळात कोंडेश्वर येथील मंदिराची प्रतिष्ठा वाढली. रामदेवराव यादव आणि कृष्णदेवराव यादव या घराण्यातील राज्य सत्तेच्या काळात त्यांचे पंतप्रधान असणाऱ्या हेमांद्रीपंत यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्यापैकीच त्यांनी कोंडेश्वर येथील विद्यमान मंदिर राज्यसत्तेच्या खर्चाने बांधले. या मूळ मंदिराला लावलेले शिलाखंड व त्यावरील कोरीव काम पाहता यावर दक्षिणेकडील कलाकृतीचा पगडा असल्याचे दिसते.

कोंडेश्वराला मनाचे स्थान : यादवकाळानंतर 400 वर्षांनी औरंगजेबाच्या मोगली सत्तेत इतर मंदिरांप्रमाणे कोंडेश्वरच्या मंदिरालाही अवकळा प्राप्त झाली होती. अमरावतीकर भोसलेंच्या ताब्यात हा भाग आल्यावर कोंडेश्वराला पुन्हा मनाचे स्थान मिळाले. माधवराव पेशव्यांच्या काळात अभिषेक, शिवलीलामृत पाठ, अन्नदान, नाम सप्ताह अशा धार्मिक विधी वाढल्याने कोंडेश्वराचे महात्म्य पुन्हा एकदा वाढले. काळ्याभोर पाषाणाचे चिरे एकावर एक रचून हे मंदिर बांधण्यात आले. हेमाडपंथी स्वरूपात उभारण्यात आलेल्या या मंदिराची उंची पूर्वी 12 फूट इतकीच होती. पुढे या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. त्यावेळी पूर्वी असणाऱ्या काळापाषाणाचाच वापर करून मंदिराची उंची 75 फूट करण्यात आली.

जागृत देवस्थान : कोंडेश्वर हे विदर्भातील काही प्रसिद्ध घराण्यांचे कुलदैवत ही मानले जाते. भाविक कोंडेश्वराच्या गाभारा जलामृत्ताने भरण्यासाठी अनेकदा प्रयत्न करतात. कोंडेश्वरावर पाण्याची सतत धार सुरू राहते. मात्र, कोंडेश्वराचे लिंग पूर्णपणे पाण्यात कधीही बुडत नाही. मंदिरातील पाणी बाहेर जाणार नाही याची सर्व दक्षता घेतली जाते. गाभाऱ्याचा तळ भाग चुन्याचा पक्का बनविला असतानाही हजारो लिटर पाणी नेमके कुठे जाते याचा शोध आजवर लागलेला नाही. कोंडेश्वर हे जागृत देवस्थान असल्याची मान्यता आहे. गाभाऱ्यात कोंडेश्वर बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिमांची स्थापना देखील करण्यात आली आहे.

दगडावर कोरलेल्या हत्तींचे वैशिष्ट्य : कोंडेश्वर मंदिराच्या बाहेरून बसविलेल्या दगडी चिऱ्यांवर अगदी पायथ्याशी हत्ती कोरलेले आहेत. अतिशय कलात्मक रचना असणाऱ्या या हत्तींच्या दोन शरीरांना एक मूक तर काही ठिकाणी दोन मुखांना एकच हत्तीचा देह दिसतो . यामुळे या कोरलेल्या हत्तींची निश्चित संख्या किती हे समजणे कठीण आहे. हे हत्ती एका बाजूने मोजत गेल्यास या हत्तींची जेवढी संख्या भरते तेवढीच संख्या दुसऱ्या बाजूने मोजत गेल्यास भरत नाही.

तपश्चर्या करणारा नंदी : कोंडेश्वराच्या गाभाऱ्याकडे जाताना एक भला मोठा नंदी गाभाऱ्याच्या खाली उतरणाऱ्या द्वारासमोर आहे. अग्र पूजेचा मान असणाऱ्या नंदीची बैठक ही जणू तो तपश्चर्या करीत असल्याचाच भास होतो. कोंडेश्वराच्या मंदिर परिसरात अति पुरातन काळातील गणपती मंदिर आणि हनुमानाचे मंदिर देखील आहे.




विदर्भाचे आद्य इतिहासकार : या. मा.काळे (जयंती विशेष)
इतिहासाचार्य पू.राजवाडे, पू.सरदेसाई आदि मंडळींचे ऐतिहासिक क्षेत्रांत अतुलनीय योगदान आहे. विदर्भाच्या इतिहासाचा विचार केल्यास वऱ्हाडचे आद्य इतिहासाचार्य यादव माधव काळे उपाख्य अण्णासाहेब काळे यांचे नाव अग्रक्रमाने घेतल्या जाते. दुर्दैव असे की अण्णासाहेबांचे नाव त्यांची जन्मभूमी असलेल्या बुलढाणा जिल्ह्यांत फारसे ठाऊक नाही. यास जबाबदार केवळ जातीयतेचे गलिच्छ राजकारण आहे. अण्णासाहेबांवर एक लेखमाला लिहावी असे मला खूप वाटे परंतु आवश्यक संदर्भांची जुळवाजुळव करीत होतो. या लेखापासून प्रारंभ करीत आहे.
अण्णासाहेबांचा जन्म 18 फेब्रुवारी सन 1881 साली बुलढाणा जिल्ह्यातील सुप्रसिध्द लोणार या गावी एका देशस्थ रुग्वेदी ब्राह्मण कुळात झाला. परिस्थिती अतिशय हलाखीची होती कारण विद्वान असूनही निजामी अंमलामुळे काळ कंठणे सुरु होते. त्यांचे वडिल पं. माधवराव काळे हे विद्वान वे.शा.सं. होते. अण्णासाहेब हे बालपणापासूनच प्रखर बुध्दीमान, धर्मकृत्य परायण, व व्यायामाची प्रचंड आवड असणारे होते. लोणार-धारा ही हिन्दुंसाठी अतिशय पवित्र. तसेच दैत्यसुदन भगवान, कमळजा माता, आणि लोणार सरोवर हे तर हिन्दुंचे श्रध्दास्थळ. परंतु हमखास हिन्दु लोक येथे स्नानास आले की मुसलमान खोड्या काढीत. तेणेकरुन हिन्दुबांधव त्रस्त होते. अण्णांच्या मातु:श्री राधाबाईंचा नित्यनेम असे, पौर्णिमेस धारास्नान करण्याचा. अशाच त्या एकदा गेल्या असता, स्नानादरम्यान कुणा यवनाने वस्त्रे पळविली. हे धाकटे अण्णा पाहत होते. त्यांच्यामागे जाऊ लागले. मात्र आपल्या पुत्रास बाटवितील या भयाने आईने परत बोलाविले. पण हा प्रसंग अण्णासाहेबांच्या मनास लागला. विचारांच्या गर्तेत असता बालकाने आई कमळजेसमोर शपथ घेतली, 'मी जोवर लोणार-धारा म्लेंच्छमुक्त करित नाही तोवर लोणारात पाउल टाकणार नाही'. आणि मातु:श्री बाईंचे व देवतांचे दर्शन घेउन अण्णासाहेब लोणारांतुन निघुन गेले. येथुन पुढे पदवी बी.ए. होईपर्यंत त्यांनी काय केले ते सापडत नाही. कळते ते एवढेच की अण्णासाहेब पदवी घेउन यवतमाळ येथल्या एका राष्ट्रीय शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. नोकरी करता करता त्यांनी वकिलीचे शिक्षण पूरे केले. यात त्यांना श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांची खूप मदत मिळाली. प्रारंभी ते दादासाहेबांचे Asst. म्हणूनच अमरावतीत कार्यरत होते. येथेच त्यांचापू. लोकमान्य टिळकांच्या विचारांशी जवळून परिचय झाला. ते प्रखर राष्ट्रभक्त बनले, टिळकभक्त बनले. हिन्दुत्व तर हाडीमांसी भिनलेलेच होते. कायद्याचे शस्त्र उपसून आपल्या प्रतिद्न्ये नुसार ते कोर्टात गेले. त्यांनी हरतर्हेने पुरावे मांडून लढा यशस्वी केला. लोणार धारेवर हिन्दुंचा हक्क मान्य करवून घेतला. विजयश्रीमंडित अण्णा लोणारात प्रविष्ट झाले. लोणार धारा हिन्दुंची झाली.
आपल्या व्यवसायात स्थिर झाल्यावर व प्रथम काही काळ मेहकर व तद्नंतर बुलडाण्यासच अण्णांनी व्यवसाय सुरु केला. स्थैर्य प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या आवडत्या विषयाकडे लक्ष केंद्रीत केले-इतिहास संशोधन. वर्हाडप्रांत हा त्यांच्या जिव्हाळा व आपुलकीचा विषय होता. ती त्यांची जन्म-कर्म भूमि होती. तोवर विदर्भाच्या इतिहासावर फारसे संशोधनही झाले नव्हते. अतयेव अण्णासाहेबांनी या कार्यास वाहून घेतले. यात त्यांना सरदेसाई, दत्तोपंत आपटे, यशवंत खुशाल आदि मंडळींचे सहकार्य लाभले. साधारणत: अण्णांच्या ऐतिहासिक कार्याचे वर्गीकरण तीन प्रकारांत करता येते.
1. ऐतिहासिक लेखन
2. संपादन
3. निबंध व व्याख्याने.
● ऐतिहासिक लेखन: अण्णांनी सुरुवात मातृभुपासुनच केली. त्यांचा पहिला ग्रंथ लोणार महात्म्य. हा ग्रंथ संस्कृतात आहे परंतु ऐतिहासिक दस्तावेज, तत्कालीन जवळपास उपलब्ध असलेली 25 पुस्तकांचा आधार घेउन हे लिहीले आहे. हा धर्मग्रंथ नव्हे. याशिवाय अण्णा प्रमुख्याने प्रसिध्द आहेत ते त्यांच्या 'वर्हाडचा इतिहास' या ग्रंथासाठी.
वर्हाडचा इतिहास: सन 1904-05 सालीच अण्णासाहेबांनी या ग्रंथाचा पहिला भाग लिहिला. यासाठी बडोद्यापासून नागपूर, अकोला, बाळापूर, चंद्रपूर, गडचिरोली आदि स्थांनांचे दौरे केले. तत्कालीन कागदपत्रे, संदर्भ, वाकाटकांपासून ते भोसले महाराजांपर्यंत सगळ्या नोंदी तपासल्या व प्रस्तुत ग्रंथ लिहीला. या ग्रंथाचा द्वितिय भाग सन 1924 साली प्रकाशित झाला. या ग्रंथाचे महत्व असे,की इतिहासाचार्य सरदेसायांनी दिलेल्या प्रस्तावनेत 'ही तर विदर्भाची बखरच आहे' असे गौरवोद्गार काढले आहेत.
गोंड लोकांचा इतिहास: गडचिरोली, गोंदिया, भंडारा आदि भागात गोंड लोकांचे पूर्वापार वास्तव्य होते. ही लढवय्यी जमात कायम उपेक्षित राहीली. यांचे गुणगान गाणारे अण्णासाहेब हे पहिले इतिहासकार होत. म्हणूनच गोंडवना विद्यापीठीस अण्णासाहेबांचे नाव द्यावे असा प्रस्ताव आला होता मात्र हे होऊ शकले नाही. हा ग्रंथ सन 1926-27 साली लिहिला गेला.
नागपूर प्रांताचा इतिहास: नागपूर चा अगदी नाग लोकांपासूनचा इतिहास यात आहे. विविध राजे, सत्तापालट यांचे रोमहर्षक वर्णन या ग्रंथात पहावयास मिळते ग्रंथलेखन सन 1934 सालचे आहे. याशिवाय, सरदार रघुजी भोसल्यांवर लहान मुलांसाठी एक लेखमालाही अण्णांनी लिहीली.
● ऐतिहासीक ग्रंथांचे संपादन:
नागपूरकर भोसल्यांची बखर: प्रस्तुत ग्रंथ हा नागपूरकर भोसले महाराजांच्या दरबारी असलेला इंग्रज रेसिडेंट रिचर्ड जेन्किन्स याने इंग्रजीत लिहीला होता (सन 1822). त्यानंतर तिचे मराठीत भाषांतर झाले, मात्र ते मोडी लिपीत होते. राब।। वामन दाजी ओक यांनी ही बखर सर्वप्रथम 1885 साली 'काव्येतिहास संग्रहा'त मालीकारूपाने प्रसिध्द केली होती. परंतु ती अपूर्णच राहीली. सन 1937 साली अण्णासाहेबांनी तिचे देवनागरी लिप्यंतर करून शुध्द स्वरूपात संपादन केले व त्यास अभ्यासपूर्ण दीर्घ प्रस्तावनाही लिहीली. अण्णांना जरी भोसल्यांची प्रजा असल्याचा अभिमान होता, तरी या बखरीत त्यांनी जानोजीराजांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणतात, "सातारीयाच्या तख्ताचा मोह धरून, ज्यांचेमुळे मर्हाटा राज्य पुनश्च दिल्लीपर्यंत विस्तारले, त्या माधवराय पंतप्रधानावर तरवार धरोन चालून गेले, त्याचा अंजाम पावले. तेथेच जानोजीने नागपूर संस्थान इंग्रजी घशात घालावयाचा श्रीगणेश केला.." या बखरीचे वैशिष्ट्य म्हणजे अण्णांकडून संपादीत ही बखर आग्रा विश्वविद्यालयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली होती.
POONA RESIDENCY RECORDS vol. 5 (1781-1821): या ग्रंथाचे संपादन इतिहासाचार्य सरदेसायांसह अण्णासाहेबांनी सन 1939 साली केले.
ऎतिहासीक पत्रवेव्हार सूची: या ग्रंथाचे संपादन सरदेसाई, वाकसकर, कुळकर्णी या मंडळींसह अण्णासाहेबांनी केले. या सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. याखेरीज Histroy of wakatakas हा ग्रंथहि त्यांनी करावयास घेतला होता, परंतु तो पूरा होउ शकला नाही.
● निबंध व व्याख्याने:
यादवरावांचे वक्तृत्व उत्तुंग होते. अभ्यास सखोल होता, व मनात इतिहासाविषयी अलोट श्रध्दा होती. यातुनच त्यांनी काही स्फुट लेखन केले. त्यापैकी काही येथे देतो.
'वाशीमचा राजा उदाराम' हा त्यांचा निबंध अभ्यासकांसाठी उत्तम आहे. (प्रकाशक- भारत इतिहास संशोधन मंडळ). सन 1923.
'375 वर्षांपूर्वीचा कळंब (जि. यवतमाळ) चा शिलालेख'.
श्रीमंत थोरले बाजीराव साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त रावेरखेडी येथील व्याख्याने (सन 1926).
सरदार मल्हारराव होळकर पुण्यतिथीनिमित्त इंदुर येथील व्याख्याने (सन 1926)
परांजपे स्मारक व्याख्यानमाला, नागपूर.
वसंत व्याख्यानमाला, दत्तोपंत आपटे यांचे अध्यक्षतेखाली, (सन1917). विषय- सीताबर्डी(नागपूर) ची लढाई. याखेरीज त्यांच्या साहित्यसेवेसाठी पूण्यात आनंदाश्रम येथे साहित्यसम्राट न.चि.केळकर यांनी अण्णांचा सत्कार केला होता.
☆ इतिहासाचार्यांचे राजकारण:
मुख्य हरिकथा निरोपण। दुसरे ते राजकारण।।' या समर्थ रामदास स्वामींच्या वचनावर अण्णासाहेबांचा पूर्ण विश्वास होता. अमरावती मुक्कामी श्रीमंत दादासाहेब खापर्ड्यांशी संपर्क आला असताना ते पू. लोकमान्य टिळकांच्या राजकीय विचारांशी समरस झाले. श्रीरामदास स्वामी व लोकमान्यांना ते गुरु मानीत. लोकमान्यांच्या खामगाव, अकोला येथे झालेल्या सभांना उपस्थिती लावून त्यांनी लोकमान्यांचे आशीर्वादहि घेतले होतेे. लोकमान्यांच्या देहान्तानंतर ते विधायक राजकारणाकडे वळले. देशबंधु चित्तरंजन दास यांनी स्थापन केलेल्या 'स्वराज्य पक्षा' ची निवडणूक त्यांनी लढविली व त्यांत ते विजयीही झाले. त्याचप्रमाणे सन 1925 साली Central Provinces & Berar Legislative Council चे अध्यक्ष म्हणूनही ते निवडुन आले व सन 1937 पर्यंत ते प्रस्तुत समितिचे सभासदही होते. सन 1926 साली मुंबई येथे झालेल्या हैदराबाद स्टेट पिपल्स कान्फरन्स चे अध्यक्ष म्हणूनहि ते निवडुन आले. विदर्भासाठी त्यांनी तनमनधन ओतुन कार्य केले. आजहि बुलडाणा, लोणार, मेहकर व इतर भागातील वृध्द व जाणकार लोक त्यांचे आदराने नाव घेतात. बुलडाण्यात वृक्षारोपणाचा सपाटा लावून, त्याला प्रसिध्दी मिळवून देणारे कानडे शास्त्री हे अण्णांचे शिष्यच होत! अण्णासाहेब हिन्दु महासभेचे ही काही काळ कार्यकर्ते राहीले होेते. आपले राजकीय वजन व वकिली बुध्दीमत्ता वापरून त्यांनी वाशीम प्रांतातील पद्मतीर्थाचा खटला सोडविला. हिन्दुंच्या बाजूने न्याय मिळवून घेतला. हिन्दु मुस्लीम दंग्यातून निरपराध हिन्दुंना सोडविले. वाशीमकर हिन्दु जनतेने यासाठी त्यांना मानपत्रहि प्रदान केले. त्यातील मजकूर लेखासह पोस्ट केलेल्या चित्रात देत आहे. एकुणच राजकीय क्षेत्रांत अण्णांनी उत्तम ठसा उमटविला आहे.
☆ साहित्य सेवा:
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या 'विदर्भ साहित्य संघा'च्या संस्थापकांपैकी अण्णासाहेब एक होत. दादासाहेब खापर्डे, अण्णासाहेब ओक, न्या.कोरटकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, ओक आदि मंडळींसह सन 1923 साली 'विदर्भ साहित्य संघा' ची स्थापना झाली. अण्णासाहेब काळ्यांच्या इतिहाससेवेचा सम्मान म्हणून अमरावती येथील ब्रह्मविद्या मंदिरात झालेल्या सन 1924 सालच्या 'विदर्भ साहित्य संघा' च्या द्वितिय साहित्यसम्मेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली होती.
आपले संपूर्ण जीवन राष्ट्रकार्यास व धर्मकार्यास वाहून घेणार्या मंडळींना कौटुंबीक सौख्य क्वचितच लाभते. अण्णासाहेबांनाहि ते फारसे लाभले नाही, किंबहुना आपले सपूर्ण जीवन इतिहास संशोधन, राजकारण व समाजसेवेस वाहून घेतल्याने त्यांना घराकडे लक्ष द्यावयास सवड झाली नाही. प्रथम पत्नीच्या निधनानंतर त्यांनी द्वीतीय विवाह केला. सध्याही बुलडाण्यातील जुनी जाणती मंडळी अण्णासाहेबांचे नाव घेतात. मध्यप्रांतातून वर्हाड मुक्त व्हावा अशी मागणी करणारे अण्णासाहेब पहिलेच गृहस्थ होत. यासाठी त्यांनी हैदराबादेपर्यंत जाउन प्रयत्न केले. तेथील खटल्यासाठी वयाच्या 60 व्या वर्षी अण्णांना उर्दु शिकावे लागले. परंतु वर्हाडातील निजामी सत्तेखाली असणार्या हिन्दुंच्या मुक्ततेसाठी करता येईल तेवढे त्यांनी केले. बुलडाण्यास आज जेथे सरकारी दवाखाना आहे, तेथेच अण्णांचा विस्तृत वाडा होता. स्थानिक लोक त्या जागेस अजूनहि 'काळ्यांचा वाडा' म्हणूनच ओळखतात. अण्णासाहेब असेतो तेथे व्यायामशाळा होती. स्वत: परोपकारी वृत्तीचे असल्याने ते नेहमीच आपल्या वाड्यात शिकाऊ विद्यार्थी ठेवत. त्यांच्या शिक्षणाचा व खाण्यापिण्याचा खर्च स्वत: करत. त्यांच्या देहान्तापश्चात वाडा त्यांच्या मुलाने नि:स्पृहपणे सरकारी दवाखान्यास देउन टाकला. अण्णासाहेबांचे प्रखर हिन्दुत्व पाहून रा.स्व.संघाचे संस्थापक डा.हेडगेवार यांनी अण्णासाहेबांना बुलडाणा नगराचे प्रथम नगर संघचालक म्हणून नियुक्त केले होते. वर्धा येथे राष्ट्र सेविका समिती संस्थापन दिनास ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गेले होते. 1943 साली अण्णांना पक्षाघाताचा झटका आला व त्यातच, दि. 11मार्च 1943 रोजी बुलडाण्यास आपल्या वाड्यात रात्री 12:30 वाजता काळाने अण्णासाहेबांवर झडप घातली!! विदर्भाचे आद्य इतिहासाचार्य ब्यारीस्टर यादव माधव काळे अनंतात विलीन झाले.
विदर्भाच्या सर्वांगीण इतिहासावर त्यानंतर बरीच ग्रंथसंपदा निघाली, डा.कोलते, मिराशी, देशपांडे इत्यादिंनी विदर्भाच्या इतिहासावर खूप संशोधन केले मात्र याही मंडळींनी आद्य वैदर्भ-इतिहासाचार्य म्हणून अण्णासाहेब काळ्यांना गौरवान्वीत केले आहे. अण्णासाहेबांचे फारसे वंशज नाहीत. शिवाय त्यांच्यामागे समर्थपणे ही धुरा संभाळणारा कुणी नव्हता, व आमच्या लोकांची इतिहासाबद्दलची वाढती उदासीनता, यांमुळे हा नरशार्दुल कायमच उपेक्षीत राहीला.
आभार - रवी ठोकरे पाटिल, सचिन दिक्षीत
संदर्भ ग्रंथ:
1. जगप्रसिध्द विवर : लोणार सरोवर--प्रा. प्रकाशचन्द्र व्यास
2. संघगंगोत्री-(संपा.) रमेश पतंगे
3. बडोदा संस्थाातील कागदपत्रे (Article 11)
4. नागपूरकर भोसल्यांच्या ग्रंथाशी संबंधीत विद्यापीठातील कागदपत्रे
5. विदर्भ साहित्य संघाचा इतिहास
6. इतिहासाचार्यांचे सर्व ग्रंथ.
7. राष्ट्र सेविका समिती पुस्तिका..
सर्व हक्क लेखकाधीन... © सुधांशू कविमंडन





पुरातन शिव मंदिर, देऊळगाव, कुरखेडा, गडचिरोली


























मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला आज 50 वर्ष पुर्ण
त्या आधी नव्हते असे नाही पण, ब्रिटीश आणि नंतरच्या काळात वाघांच्या अतोनात शिकारी झाल्या, त्याला आळा बसला. पट्टेदार वाघ महाराष्ट्रात फक्त विदर्भातच आहेत ही FACT आहे.
वाघ असणे म्हणजे इतर सर्व निसर्ग pyramid मजबूत आहे.
मेळघाट महाभारत काळापासून संदर्भात आहे. पांडव इथे अज्ञातवासात येऊन राहिले, कदाचित रुक्मिणी हरण वेळी अमरावतीला येऊन गेल्यावर कृष्णाने पाहिले ऐकले असेल आणि सूचवले असेल की घनदाट आहे आणि secluded आहे जेणेकरून बातमी कळू नये.
150 किमी East West आणि 70किमी north south असलेला हा डोंगराळ भाग दोन मजबूत किल्ले आणि एक hill station ठेवून तर आहेच, ब्रिटिशांनी निबिड अरण्यात ठिकठिकाणी हौशीखातर बांधलेले Rest Houses आजही आहेत. नरनाळा हा महाराष्ट्रातल्या आकाराने मोठ्या पहिल्या पाचात येईल एवढा.
सातपुडा म्हणजे सात East West रांगा काही ठिकाणाहून मोजता येतात. "तुझे निळे पण आभाळाचे" सुचावे इतके विविध निळ्या छटा इथे दिसतात. डोंगरांना फार अक्राळविक्राळ सुळके नसल्याने असावे की वन्यजीव खूप आणि म्हणून वाघोबा.
आम्ही उभयता इथे दिवाळी आणि Monsoon ला येतो ते वाघ बघण्यासाठी नाही तर निसर्ग रिचवण्यासाठी. दिसला कधी तर Bonus मानू. चिखलदऱ्याच्या cozy stay पासून ते अंबाबरवा च्या real nature stay पर्यंत मधले सगळे अनुभवत अनुभवत.
एका दिवाळीत तर नागपूर AM band वरील मराठी गाणी ऐकत High point ला केलेला किंवा चिखलदऱ्याहून आमझरी आणि खाली केलेला, वैराटचा प्रवास, तसेच सूर्या धबधब्याचे पहिले दर्शन .. printed आहे memoryत.
मेळघाटात रात्री जेवढ्या चांदण्या दिसतात, मला तरी कुठेच तेवढया दिसल्या नाहीत, कोटी कोटींचा खच !!!!
Melghat is for Nature Trail, nature soaking, ... भसा भसा जा points ला आणि काढा फोटो असे नको.
एकदा दाट जंगलातून येताना वाडी वस्तीवरील आजी आजोबा bus ची वाट पहात होते, त्यांना आणून चिखलदऱ्याला सोडले, उतरताना त्यांनी थरथरत्या हाताने दहाची जुनी नोट देऊ केली... डोळ्यात टचकन पाणी आले .
- सतिश अनसिंगकर










श्री चक्रधर स्वामी मंदिर, बार्शीटाकळी, अकोला
बार्शीटाकळी येथे असलेल्या तीन पुरातन मंदिरापैकी एक उत्तरेश्वर मंदिर म्हणजेच श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महानुभाव पंथांचे स्थान. मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणातील असून बाराव्या शतकातील दिसून येते.
19 ऑक्टोबर सन 1268 मध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्धात पैठण वरुन रिद्धपूरला जाताना पातूर हून बार्शीटाकळीला आले होते. त्यांचे उत्तरेश्वर मंदिरात एक रात्र वास्तव्य होते. दुसर्या दिवशी त्यांनी येळवनला प्रस्थान केले.
(Photo - Minesh Wasnik)
चिंतामणी महादेव मंदिर
विष्णू मंदिर (फोटोमधील व्यक्ती - राॅबर्ट गिल)

कोथळी, बुलढाणा येथील दोन पुरातन मंदिरांचे सन 1871 मधील फोटो
(फोटो - राॅबर्ट गिल)
(सौजन्य - ब्रिटिश लायब्ररी)





मेहकर, बुलढाणा येथील पुरातन मंदिराचे सन 1865 मधील फोटो
(फोटो - राबर्ट गिल)
(सौजन्य - ब्रिटिश लायब्ररी)

हे मेहकरच्या मढ नावाच्या वास्तूचे फोटो आहेत. हे मंदिर नसून ही तत्कालीन यज्ञशाळा होती. हे पैनगंगेच्या काठावर आहे.
१८६५ साली ही वास्तू खूपच सुस्थितीत होती, असे या फोटोंवरून दिसते.
आज या वास्तूची खूप पडझड झालेली आहे. काहीच अवशेष शिल्लक आहेत. मात्र आता पुरातत्त्व खात्याचा चौकीदार हजर असतो




अंतरिक्ष पार्श्वनाथ पवळी जैन मंदिर, शिरपूर, वाशिम मंदिराचे सन 1871 मधील फोटो
(Source - MERE.PIX)


मार्कंडेय शिव मंदिर, आमगाव महाल, गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात आमगाव (महाल) येथे पुरातन हेमाडपंथी मंदिर शेवटच्या घटका मोजत आहे. या दुर्लक्षित मंदिराची बांधकाम शैली मार्कंडा मंदिरासारखीच आहे. मार्कंडा मंदिरापासून 17 किमी अंतरावर आमगाव महाल हे गाव आहे. मंदिराची खुप पडझड झाली आहे. त्यावर झुडपी वेली वाढली आहेत. पुरातत्व विभागाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
(📷- Mayur Polojwar, Wikimedia)


लोणार, बुलढाणा येथील सरोवर परिसरात असलेल्या मंदिरांचे सन 1860 मधील फोटो :
फोटोग्राफर - राॅबर्ट गिल
सौजन्य - ब्रिटिश लायब्ररी वेबसाईट


पुरातन शिव मंदिर, तळेगाव टालाटुले, हिंगणघाट, वर्धा
(फोटो - डाॅ. मनोहर नरांजे)


कौंडण्यपूरात खोदकाम करताना आढळली प्राचीन मूर्ती
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या मंदिराला लागूनच असलेल्या एका घरात खोदकाम करताना दगडावर कोरलेली प्राचीन मूर्ती आढळून आली. शोभाताई बबनराव डंबे असे घर मालकाचे नाव आहे. या मूर्ती ब्रम्हा-विष्णू-महेश देवतांची असल्याचा सांगण्यात येते.
विदर्भाची पुरातन राजधानी, माता रुख्मिणी सह पंचसतीचे माहेरघर व कुलस्वामिनी अंबिका मातेचे शक्तिपीठ असलेल्या तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र कौंडण्यपूरला प्राचीन इतिहास लाभलेला असून त्याची प्रचिती व पुरावे आपल्याला महाभारत यासारख्या महाग्रंथामध्ये पाहायला मिळतात.
त्याचबरोबर कौंडण्यपूर येथे सुद्धा अनेक वस्तू व साहित्य संपदा आजही आपल्याला दिसून येते. याठिकाणी अनेक वेळा पुरातत्त्व विभागाने संशोधन केले असून काही पुरावे सुद्धा आढळले आहे, अशातच आता आणखी एक पुरावा समोर आला असून कौंडण्यपूर येथे श्री रुक्मिणी मातेच्या मुख्य मंदिराला लागूनच असलेल्या शोभाताई बबनराव डंबे यांच्या घरी बांधकाम सुरू असताना ५ फुटाच्या दरम्यान एक प्राचीन मूर्ती आढळली आहे.
सदर मूर्ती अखंड पाषाणापासून तयार केलेली असून तीन देवतांच्या प्रतिकृती या पाषाणामध्ये कोरल्या गेल्या आहे. याबाबतचती माहिती पुरातत्त्व विभागाला देण्यात आली असून सध्या ही मूर्ती जवळच असलेल्या शिवमंदिर येथे डंबे कुटुंबीयांनी विधिवत पूजा अर्चना करून ठेवली आहे.
घराच्या परिसरात खोदकाम सुरू असताना मजुरांना एकाच दगडावर कोरलेल्या अशाच तीन मुखाची मूर्ती आढळून आली. आम्ही त्याची विधिवत पूजा करून ही मुर्ती शिव मंदिरात दर्शनासाठी ठेवली आहे. या आधी सुद्धा अशीच मूर्ती निघाली होती.
- शोभाताई डंबे, घरमालक.
प्राचीन असा इतिहास असलेल्या या कौंडण्यपूर भूमीच्या परिसरात कुठेही खोदकाम केल्यास ऐतिहासिक असे अवशेष आढळून येतात. जमिनीत आढळून आलेल्या मूर्ती व इतर अवशेष हे पुरातत्त्व विभागाने सांभाळून ठेवल्या असून याबाबत आम्ही त्यांना सूचना दिल्या आहेत.
-अतुल ठाकरे, मंदिराचे विश्वस्त.
सौजन्य - सकाळ














No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...